मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

मौनांची भाषांतरे

महासंग्राम ·
काव्यरस
तसा हट्ट नाहिये माझा अगदी तश्याच राहिल्या तरी चालतील मरीन ड्राइव च्या आठवणी, तुझी झालेली पाठवणी माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध, पहिल्या पावसाचा मृद्गंध सोबतीने काढलेली कुडकुड़ती रात्र, नकळत एकमेकात विरघळलेले अनिमिष नेत्र अगदी अबोल शब्दांची पेरणी पण तशीच राहु दे तसा हट्टच नाहिये माझा फक्त बघ जमलच तर कर मौनांची भाषांतरे #जिप्सी #gypsykavita.blogspot.in

पावसात जळाया लागलो...

सतिश गावडे ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय... चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं सोडून गेली रं मैना दोस्त टाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो आज काल दिस रात मला सुचंना कायी पार झालो देवदास आन्न पोटात जात न्हाई येईना हो झोप मला कुशीवर वळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो कसं सांगू काय झालं खेळ खल्लास झाला उडवलेला पैसा सगळा आता वाया तो गेला पैलवान मी मर्द गडी आसू गाळाया लागलो तुम्ही बोलवा फायरबंब पावसात जळाया लागलो

बेफिकीर…पण काही क्षणापुरताच

ganeshpavale ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच… तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या की अभद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुढत बसतो. मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जातो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी. तुझ्यासोबत जगलेले ते क्षण किती गोड होते. किती मदमस्त जीवन होतं.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

करार

ज्ञानोबाचे पैजार ·
तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस आणि त्यात माळलेला तो मोगर्‍याचा गजरा पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो. जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची मी तिची अडचण समजाउन घेतली आणि मग मी तिच्याशी एक करार केला परत भेटण्याचा. जस प्रेम एकतर्फि होत तसाच हा करार पण होता पण शेवटी करार हा करारच असतो मग मी प्रेम करतच राहिलो आणि ती लग्न करुन निघून गेली पण माझा स्वतःवर विश्र्वास होता आणि तिच्यावरही मी तिची वाट बघत थांबलो

कधी येईल आठवण माझी .....

psajid ·
लेखनविषय:
बघशील कधी आठवांना, असशील जिथे तिथे तू, हसशील मनी गालांत, असशील जिथे तिथे तू ! स्पर्श नजरेचा होता, फुललेले अंगी रोमांच, जपशील सदा मनांत असशील जिथे तिथे तू ! सांगत वाहील झरा, माझे शब्द न शब्द, सोडशील श्वास उदासी असशील जिथे तिथे तू ! भेट तुझी माझी मोहोरल्या नभांखालची, फुलतील ते क्षण पुन्हा असशील जिथे तिथे तू ! सांगतील कुणी विरुद्ध, माझ्या चार शब्द, उठशील मैफल टाकून असशील जिथे तिथे तू ! विसरण्यां नाव “साजीद” करता कधी प्रयत्न चुकतील हृदयताल तेव्हा, असशील जिथे तिथे तू ! - साजीद यासीन पठाण

विश्वास वासावरचा

ज्ञानोबाचे पैजार ·
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

पोपट....

ज्ञानोबाचे पैजार ·
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास

व्ह्यालेन्टायीन दिन'दिवाणे'

फुंटी ·
लेखनविषय:
जरी आम्ही असू व्ह्यालेन्टायीन दिन'दिवाणे' दरसाल गातो एकच गाणे छे छे ,ही नसे अपुली संस्कृती नसे ही अपुली परंपरा जाळा ती शुभेच्छापत्रे झोडपा त्या जोडप्याला पाश्चिमात्यांचे हे प्रेमाचे चाळे आम्ही आहोत मराठी मावळे प्रेमदिनाची आम्हाला गरजच काय ? हो हो,ते सगळ ठीकाय आम्ही तरी कराव काय आमची सेटिंग होतच नाय किती वर्ष पहावी वाट स्वप्नात दिसतो आंतरपाट बोलणे माझे घे मनावर नकोस सुंदरी राहूस तू सिंगल करूनच टाक शुभमंगल प्रपोज जरी बहु येती तुजला एक ना धड भाराभर वर गोंधळू नकोस पुकार स्वयंवर मुंबईमध्ये जो घेई घर त्यास मान तुझा प्रियवर...