मला रोज हायवेच्या फाट्यापर्यंत चालत चक्कर टाकल्याशिवाय चैन पडतंच नाही आजकाल. थंडीचे दिवस, पाहुणेराउळे मंजुळेच्या लग्नानिमित्त वस्तीवर संध्याकाळी जमू लागले आहेत. आगत-स्वागतानंतर जेवण वगैरे आटोपून बायका मुलं दमल्यामुळे लवकरच झोपले. लांबचे नवीन पाहुणे अजून येतच आहेत. एकमेकांशी ओळखी-पाळखी करताकरता, त्यांना संध्याकाळचे बाहेर कधी चांगलेच अंधारून आलेलं कळलंच नाही. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे मीही संध्याकाळी निघालो. वस्तीकडे येतानाचा जो रस्ता होता, त्या रस्त्यानंच नेहमी जात असल्यानं मला तो रस्ता माहीत होता. विशेष म्हणजे त्या रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळही नव्हती.