मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

जे.पी.मॉर्गन ·

सौंदाळा 04/09/2013 - 13:24
हे जर खरं असेल तर असे वाटते की ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश दिल्यावर घ्यायला पाहिजे होती, दिल्लीला. मस्त मौका होता.

ब़जरबट्टू 04/09/2013 - 13:24
आवडले, आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!" +१०००००००

पैसा 04/09/2013 - 13:40
लेख प्रचंड आवडला आहे. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आता क्रिकेट हा गावस्करच्या काळात होता तसा खेळ राहिलेला नाही. तेव्हा महिना महिना प्रवास करून बोटीने इंग्लंडला जाणारे खेळाडू होते. रणजी मॅचेस खेळायला लोकल ट्रेनमधून जाणारे खेळाडू होते. आता सगळ्याच गोष्टी ७० एम एम करायची पद्धत आहे. क्रिकेट हा खेळ राहिलेला नाही. निव्वळ पैसे छापायची टांकसाळ आहे. प्रत्येकजण जेवढे खाता येईल तेवढे खात असतो. तरी कोणाचं पोट भरत नाही. तसे सचिनच्या काळात खेळलेले लारा आणि पॉण्टिंग तेवढेच, कदाचित काकणभर सरसच होते हे कबूल करायला आम्हा भारतीयांना का जमत नाही? लारा म्हणतो की "सचिन सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे." तसे लाराबद्दल सचिन का म्हणू शकत नाही?

In reply to by पैसा

पैसाताई, सचिननी कोणाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करावी अशी देखील अपेक्षा नाही. पण मुळात सचिनच काय, पण कुठल्याही क्रिकेटपटू / सिनेकलाकार / राजकारण्याला आपण इतकं larger than life का बनवतो हेच समजत नाही. एक गोष्ट कबूल की आफ्रिकन / ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखे आपले खेळाडू सार्वजनिक वाहनांतून प्रवास करू शकणार नाहीत. पण त्यांच्यावर कोणी टीका केली तर लगेच आपल्याला इतकं का झोंबतं? लगेच निषेध व्यक्त करून माफी मागायची मागणी कशासाठी? सचिन एक ऑल टाईम ग्रेट फलंदाज आहे - पीरियड. तोच प्रकार संजय दत्तला " भावनिक पाठिंबा देण्यासाठी" गर्दी करणार्‍यांचा. भयंकर चीड येते ह्या लांगूलचालनाची. जे.पी.

अद्द्या 04/09/2013 - 14:00
आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"
आणि तेवढ्यात कोणी तरी म्हणेल . नाही . सैतान नाही हा . नाही तर आम्हाला लहान मुलांसारखा लोळवून मारल्यानंतर पण असा वागला नसता हा . देवच आहे . लई भारी लेख साहेब .

In reply to by पिंपातला उंदीर

अमोल, भारी लेख आहे रे. सचिन किंवा फेडरर च्या मनात काय चाललंय ते त्यांनाच ठाऊक. त्याआधी बालगंधर्वांपासून कपिल देव पर्यंत अगणित कलाकार आणि खेळाडूंना काय वाटलं असेल ते सुद्धा त्यांनाच ठाऊक. कदाचित एड स्मिथ म्हणतो त्याप्रमाणे खरंच त्या खेळाचं / कलेचं प्रेम, त्यानी येणारी धुंदी आणि नशाच असेल जी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्यासाठी क्रिकेट / टेनिसच आयुष्य आहे. लहानपणापासून दुसरं काही केलेलंच नाही. मग त्यांना हा "ब्रेक-अप" त्रासदायकच ठरणार. जे.पी.

उपास 05/09/2013 - 18:03
तळमळ जाणवलीच.. कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट आण व्यक्तिचा देव करण्याची उफराटी सवय लागलेय आपल्या समाजाला... त्यात फेक्स वर चेहरे रंगवून घेणारे पण आले आणि फेसबुक वर 'लाईक'ची भिक मागणारे पण आले. कालच बातमी वाचली पेपरात की नवी मुंबईत बाळासाहेबांच्या वेषात गणपती बनवलाय.. डोक्याला हात लावला..चीड, संताप ह्यापेक्षा कीव येते अशा प्रकारांची..!! असो, पण सच्च्याची एकदिवसीय सामन्यातली निवृत्ती मात्र अजून चांगली हवी होती असं मनात येतच!

आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"
++सुपरलाइक.

आशिष दा 06/09/2013 - 13:50
बडे बडे देशोमे अलग अलग खेलोमे ऐसे बहोत बडे बडे प्लेयर होके गये पण कोणी खेळा पेक्षा मोठा नाही समजला गेला. आमचं भारतीयांचं मात्र वेगळच ! काय तर म्हणे खेळाडू म्हणतो मी कधी जायचं मी ठरवणार !! आम्ही एकदा दैवत्व बहाल केलं कोणाला म्हणजे मग नाय नो नेव्हर... काही म्हणजे काही बोलायचं नाही देवाच्या विरुद्ध

हकु 07/06/2016 - 20:29
दोनशे वी कसोटी ही घरच्या मैदानावर व्हावी अशी इच्छा नक्की कोणाची होती? सचिन च्या चाहत्यांची की स्वतः सचिन ची?

सौंदाळा 04/09/2013 - 13:24
हे जर खरं असेल तर असे वाटते की ऑस्ट्रेलियाला व्हाईट वॉश दिल्यावर घ्यायला पाहिजे होती, दिल्लीला. मस्त मौका होता.

ब़जरबट्टू 04/09/2013 - 13:24
आवडले, आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!" +१०००००००

पैसा 04/09/2013 - 13:40
लेख प्रचंड आवडला आहे. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आता क्रिकेट हा गावस्करच्या काळात होता तसा खेळ राहिलेला नाही. तेव्हा महिना महिना प्रवास करून बोटीने इंग्लंडला जाणारे खेळाडू होते. रणजी मॅचेस खेळायला लोकल ट्रेनमधून जाणारे खेळाडू होते. आता सगळ्याच गोष्टी ७० एम एम करायची पद्धत आहे. क्रिकेट हा खेळ राहिलेला नाही. निव्वळ पैसे छापायची टांकसाळ आहे. प्रत्येकजण जेवढे खाता येईल तेवढे खात असतो. तरी कोणाचं पोट भरत नाही. तसे सचिनच्या काळात खेळलेले लारा आणि पॉण्टिंग तेवढेच, कदाचित काकणभर सरसच होते हे कबूल करायला आम्हा भारतीयांना का जमत नाही? लारा म्हणतो की "सचिन सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे." तसे लाराबद्दल सचिन का म्हणू शकत नाही?

In reply to by पैसा

पैसाताई, सचिननी कोणाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करावी अशी देखील अपेक्षा नाही. पण मुळात सचिनच काय, पण कुठल्याही क्रिकेटपटू / सिनेकलाकार / राजकारण्याला आपण इतकं larger than life का बनवतो हेच समजत नाही. एक गोष्ट कबूल की आफ्रिकन / ऑस्ट्रेलियन खेळाडू सारखे आपले खेळाडू सार्वजनिक वाहनांतून प्रवास करू शकणार नाहीत. पण त्यांच्यावर कोणी टीका केली तर लगेच आपल्याला इतकं का झोंबतं? लगेच निषेध व्यक्त करून माफी मागायची मागणी कशासाठी? सचिन एक ऑल टाईम ग्रेट फलंदाज आहे - पीरियड. तोच प्रकार संजय दत्तला " भावनिक पाठिंबा देण्यासाठी" गर्दी करणार्‍यांचा. भयंकर चीड येते ह्या लांगूलचालनाची. जे.पी.

अद्द्या 04/09/2013 - 14:00
आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"
आणि तेवढ्यात कोणी तरी म्हणेल . नाही . सैतान नाही हा . नाही तर आम्हाला लहान मुलांसारखा लोळवून मारल्यानंतर पण असा वागला नसता हा . देवच आहे . लई भारी लेख साहेब .

In reply to by पिंपातला उंदीर

अमोल, भारी लेख आहे रे. सचिन किंवा फेडरर च्या मनात काय चाललंय ते त्यांनाच ठाऊक. त्याआधी बालगंधर्वांपासून कपिल देव पर्यंत अगणित कलाकार आणि खेळाडूंना काय वाटलं असेल ते सुद्धा त्यांनाच ठाऊक. कदाचित एड स्मिथ म्हणतो त्याप्रमाणे खरंच त्या खेळाचं / कलेचं प्रेम, त्यानी येणारी धुंदी आणि नशाच असेल जी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्यासाठी क्रिकेट / टेनिसच आयुष्य आहे. लहानपणापासून दुसरं काही केलेलंच नाही. मग त्यांना हा "ब्रेक-अप" त्रासदायकच ठरणार. जे.पी.

उपास 05/09/2013 - 18:03
तळमळ जाणवलीच.. कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट आण व्यक्तिचा देव करण्याची उफराटी सवय लागलेय आपल्या समाजाला... त्यात फेक्स वर चेहरे रंगवून घेणारे पण आले आणि फेसबुक वर 'लाईक'ची भिक मागणारे पण आले. कालच बातमी वाचली पेपरात की नवी मुंबईत बाळासाहेबांच्या वेषात गणपती बनवलाय.. डोक्याला हात लावला..चीड, संताप ह्यापेक्षा कीव येते अशा प्रकारांची..!! असो, पण सच्च्याची एकदिवसीय सामन्यातली निवृत्ती मात्र अजून चांगली हवी होती असं मनात येतच!

आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"
++सुपरलाइक.

आशिष दा 06/09/2013 - 13:50
बडे बडे देशोमे अलग अलग खेलोमे ऐसे बहोत बडे बडे प्लेयर होके गये पण कोणी खेळा पेक्षा मोठा नाही समजला गेला. आमचं भारतीयांचं मात्र वेगळच ! काय तर म्हणे खेळाडू म्हणतो मी कधी जायचं मी ठरवणार !! आम्ही एकदा दैवत्व बहाल केलं कोणाला म्हणजे मग नाय नो नेव्हर... काही म्हणजे काही बोलायचं नाही देवाच्या विरुद्ध

हकु 07/06/2016 - 20:29
दोनशे वी कसोटी ही घरच्या मैदानावर व्हावी अशी इच्छा नक्की कोणाची होती? सचिन च्या चाहत्यांची की स्वतः सचिन ची?
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

Come on बारक्या.....fight!

जे.पी.मॉर्गन ·

राही 30/08/2013 - 00:05
सकारात्मक दृष्टिकोनही आवडला. सी.के.नायडूंच्या सिक्सर विषयी असे ऐकलेले आहे की बाँबे जिम्खान्यावर खेळताना त्यांनी ती सिक्सर मारली होती. त्या काळी बहुधा क्लब मॅचेस ओवलवर होत नसत. त्यामुळे जे घड्याळ फुटले (हे ऐकले आहे)ते राजाबाई टॉवरचे नसावे. ओवल च्या कडेने युनिवर्सिटी आणि कोर्ट असल्याने तो परिसर शांत राखला गेला होता. मधल्या रस्त्यावरही वाहतूक नसे. ती सुरू झाली श्री.पसरिचा वहातुक आयुक्त असताना म. गांधी मार्ग एकदिक मार्ग केला गेला तेव्हा.

In reply to by राही

राही, माहितीबद्दल धन्यवाद. खरंतर त्या गोष्टीची कधी शहानिशा करावीशी वाटलीच नाही. मला अगदी लहानपणी असं कोणी सांगितल्याचं आढवतंय. सी के नायडूंनी बॉम्बे जिमखान्याच्या गच्चीवर बॉल मारल्याचंदेखील मी ऐकलंय. ते अंतर १०० एक मीटर असेल पिच पासून. म्हणजे विश्वास ठेवायला जागा आहे. पण ते घड्याळ फोडायला केवळ मिसाइल लाँचरमधून बॉल सोडावा लागेल हे आम्हाला तेव्हा लक्षातही आलं नाही. आम्हाला तर कित्येक वेळा "अरे त्या अमुक तमुकनी जी सिक्स मारली.... नेहरू स्टेडियमवरून बॉल थेट सारसबागेत" वगैरेही सांगितलं गेलं होतं :). शेवटी दंतकथा म्हणजे वेगळं काय? बाजीप्रभूंची तलवार एक मणाची (४० किलो!!) होती वगैरेही सांगणारे असतातच की. पण ती लोकं मुळात इतकी महान होती म्हणूनच तर त्यांच्या दंतकथा बनतात ना? सुनील जोशी किंवा नरेंद्र हिरवाणीची नाही दंतकथा सांगत ते कोणी? ;-). आणि शेवटी why let facts come in the way of a good story? :-)

In reply to by जे.पी.मॉर्गन

बॅटमॅन 30/08/2013 - 12:41
why let facts come in the way of a good story?
हे बाकी एकदम खरं!!! तुकोबा सदेह वैकुंठात जाणे किंवा ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वदवणे इ. गोष्टी लैच जबर्‍या. त्यांचे महात्म्य तेवढ्यापुरते राहू देण्यात काही हार्म इल्ले असे मला वाटते.

In reply to by राही

शेखर काळे 31/08/2013 - 07:00
ही नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मारलेली होती. मैदानच्याच बाहेर एक चर्च आहे व त्यावर (अजूनही) ते घड्याळही आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर हे अंतर जवळ जवळ १५० मीटर असावे.

अर्धवटराव 30/08/2013 - 00:21
या सर्व लढवय्या मैदानपटुंचं कौतुक करताना एका रसीक, अगदी मोजक्या शब्दात खेळाचा थरार आणि जिगर नेमकं पकडणार्‍या आणि ते आमच्यापर्यंत सही सही पोचवणार्‍या क्रीडाप्रेमी समीक्षकाचं नाव न दिल्यामुळे जे.पी. चा निषेध :) ओळखा बघु कोण हा मिपाकर :) ??

उपास 30/08/2013 - 00:31
छान लिहिलयस (तुझ्या जुन्या लिखाणाची आठवण झाली - शारलेट एअरपोर्टवरचया अन इंडँटेड कॅज्युएलिटी वालं). खेळ खेळायचेच कशाला, पाहून/ चर्चून वेळ फुकट कशाला घालवायचा? काय मिळतं त्यातून असे प्रश्न मला विचारले गेले (विशेषतः नवतरूणांकडून) की माझं असं लंबचौड भाषण तयार असतं ;) स्पोर्टसमन्शिप आणि त्याची नशा अशी काही और आहे की बस्स्स! बॉल टू बॉल मॅच, मग री-प्लेज, मग सगळ्या पेपरांमधील वार्तांकन वाचण्याचे दिवस आठवले. दुर्दैवाने क्रिकेट इतका ठसा इतर खेळांनी उठवेपर्यंत लहानपण संपलच होतं जवळ जवळ. पण ब्रीज, कॅरम, चेस सारखा बैठा असो की कुठलाही मैदानी, खेळ खेळण्याची आणि पहाण्याची मजा लहानपणापासूनच ठसली मनावर. आणि हो, विश्वनाथ आनंदचा उल्लेख आवडला असता लेखात :) तद्वत पेस सुद्धा!

चतुरंग 30/08/2013 - 10:55
सुरेख लेख. फारच आवडला. (वरती उपास यांनी म्हणल्याप्रमाणे आमच्या 'विशीचा' उल्लेख असता तर सोने पे सुहागा असं झालं असतं पण तरीही लेख आवडलाच.) खेळाने जो चिवटपणा आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती तयार होते त्याला खरंच पर्याय नाही. आमचे मल्लखांबाचे गोपाळे सर आठवले त्यांनी रागं भरुन पहाटे व्यायामाच्या सवयीची लावलेली शिस्त आठवली आणि भरुन आलं!

In reply to by चतुरंग

रंगाकाका, तुमच्याकडून गोपाळे सरांचा उल्लेख ह्या आधीही एकदा आलाय. त्यांच्याबद्दल तुमच्या लेखणीतून वाचायला खूप आवडेल. जे.पी.

ब़जरबट्टू 30/08/2013 - 11:05
वा, मस्त लिहलय.. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!

चिगो 30/08/2013 - 11:42
दोन संघ वा खेळाडू अश्या ताकदीनी आणि त्वेषानी एकमेकांना भिडतात की बघणार्‍याला आपल्याच नशीबाचा हेवा वाटावा. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात! Contests not for the faint hearted !
क्या बात..  
आणि जोपर्यंत आंतरशालेय स्पर्धेत सहावीतला तो बारक्या फुटबॉलपटू खरचटलेल्या कोपरांवरची माती झटकून पुन्हा "किक ऑफ" साठी जातोय, जोपर्यंत ती ढोपराएवढी पोरगी धरमतर ते गेटवे पोहण्यासाठी ६-६, ८-८ तास तलावात सराव करतीये, जोपर्यंत आपल्या वेळेतला एक दशांश सेकंद कमी करण्यासाठी तो अ‍ॅथलीट पहाटे ४ चा गजर लावून उठतोय तोपर्यंत त्या पणतीला काही धोका नाही. खेळच ह्या पोरांना परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद देईल. संकटांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत देईल, अपयशाच्या छाताडावर पाय देऊन यशाचा जल्लोष करण्याची ऊर्मी देईल.
जबरदस्त.. अत्यंत समर्पक, रोमांचक लेेख, माॅर्गनसाहेब.. अत्यंत आवडला..

उपास 31/08/2013 - 09:11
वर उल्लेखलिल्या किंवा तत्सम अटीतटीच्या सामन्यांचि क्षणचित्रे यु ट्युब वर असतिल ना? त्यांच्या सगळ्या लिंक्स एकत्र करुन ठेवता येतील का? म्हणजे वेगवेगळे खेळ आणि त्यातले हे क्षण पुन्हा पुन्हा उपभोगता येतील, ते ही सहजच. जे. पी. what say?

In reply to by उपास

सर्वांना त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. @उपास.... अशी एक यादी करायला हवी. आणि लोकांनी त्यांच्या आवडत्या सामन्यांचे दुवे द्यावेत ! आयडिया भारी आहे. जे.पी.

पैसा 04/09/2013 - 14:30
मिपा गंडल्यामुळे हा लेख वाचायचा राहून गेला होता. लै भारी लिहिलंय! सलाम!!

मस्त लेख.
डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!
माझी टीम जिंकत असेल तरच मी टाळ्या वाजवणार या प्रवृत्तीच्या पलिकडे जाऊन सुंदर खेळ झाला तर मी दाद देणार हे म्हणणं आवडलं.

जॅक डनियल्स 05/09/2013 - 03:43
सहज सुंदर आणि मस्त लेख आहे. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. क्रिकेट सोडून इतर खेळांचा उल्लेख आल्यामुळे खूप बरे वाटले. भाग मिल्खा भाग ! हे गाणं खूप प्रेरणा देऊन जाते. आत्ता असाच ध्यानचंद वर पण सिनेमा यायला पाहिजे, मन खुश होऊन जाईल.

एच्टूओ 05/09/2013 - 17:11
जोपर्यंत आंतरशालेय स्पर्धेत सहावीतला तो बारक्या फुटबॉलपटू खरचटलेल्या कोपरांवरची माती झटकून पुन्हा "किक ऑफ" साठी जातोय, जोपर्यंत ती ढोपराएवढी पोरगी धरमतर ते गेटवे पोहण्यासाठी ६-६, ८-८ तास तलावात सराव करतीये, जोपर्यंत आपल्या वेळेतला एक दशांश सेकंद कमी करण्यासाठी तो अ‍ॅथलीट पहाटे ४ चा गजर लावून उठतोय तोपर्यंत त्या पणतीला काही धोका नाही.
खूपच छान...!!

राही 30/08/2013 - 00:05
सकारात्मक दृष्टिकोनही आवडला. सी.के.नायडूंच्या सिक्सर विषयी असे ऐकलेले आहे की बाँबे जिम्खान्यावर खेळताना त्यांनी ती सिक्सर मारली होती. त्या काळी बहुधा क्लब मॅचेस ओवलवर होत नसत. त्यामुळे जे घड्याळ फुटले (हे ऐकले आहे)ते राजाबाई टॉवरचे नसावे. ओवल च्या कडेने युनिवर्सिटी आणि कोर्ट असल्याने तो परिसर शांत राखला गेला होता. मधल्या रस्त्यावरही वाहतूक नसे. ती सुरू झाली श्री.पसरिचा वहातुक आयुक्त असताना म. गांधी मार्ग एकदिक मार्ग केला गेला तेव्हा.

In reply to by राही

राही, माहितीबद्दल धन्यवाद. खरंतर त्या गोष्टीची कधी शहानिशा करावीशी वाटलीच नाही. मला अगदी लहानपणी असं कोणी सांगितल्याचं आढवतंय. सी के नायडूंनी बॉम्बे जिमखान्याच्या गच्चीवर बॉल मारल्याचंदेखील मी ऐकलंय. ते अंतर १०० एक मीटर असेल पिच पासून. म्हणजे विश्वास ठेवायला जागा आहे. पण ते घड्याळ फोडायला केवळ मिसाइल लाँचरमधून बॉल सोडावा लागेल हे आम्हाला तेव्हा लक्षातही आलं नाही. आम्हाला तर कित्येक वेळा "अरे त्या अमुक तमुकनी जी सिक्स मारली.... नेहरू स्टेडियमवरून बॉल थेट सारसबागेत" वगैरेही सांगितलं गेलं होतं :). शेवटी दंतकथा म्हणजे वेगळं काय? बाजीप्रभूंची तलवार एक मणाची (४० किलो!!) होती वगैरेही सांगणारे असतातच की. पण ती लोकं मुळात इतकी महान होती म्हणूनच तर त्यांच्या दंतकथा बनतात ना? सुनील जोशी किंवा नरेंद्र हिरवाणीची नाही दंतकथा सांगत ते कोणी? ;-). आणि शेवटी why let facts come in the way of a good story? :-)

In reply to by जे.पी.मॉर्गन

बॅटमॅन 30/08/2013 - 12:41
why let facts come in the way of a good story?
हे बाकी एकदम खरं!!! तुकोबा सदेह वैकुंठात जाणे किंवा ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वदवणे इ. गोष्टी लैच जबर्‍या. त्यांचे महात्म्य तेवढ्यापुरते राहू देण्यात काही हार्म इल्ले असे मला वाटते.

In reply to by राही

शेखर काळे 31/08/2013 - 07:00
ही नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मारलेली होती. मैदानच्याच बाहेर एक चर्च आहे व त्यावर (अजूनही) ते घड्याळही आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर हे अंतर जवळ जवळ १५० मीटर असावे.

अर्धवटराव 30/08/2013 - 00:21
या सर्व लढवय्या मैदानपटुंचं कौतुक करताना एका रसीक, अगदी मोजक्या शब्दात खेळाचा थरार आणि जिगर नेमकं पकडणार्‍या आणि ते आमच्यापर्यंत सही सही पोचवणार्‍या क्रीडाप्रेमी समीक्षकाचं नाव न दिल्यामुळे जे.पी. चा निषेध :) ओळखा बघु कोण हा मिपाकर :) ??

उपास 30/08/2013 - 00:31
छान लिहिलयस (तुझ्या जुन्या लिखाणाची आठवण झाली - शारलेट एअरपोर्टवरचया अन इंडँटेड कॅज्युएलिटी वालं). खेळ खेळायचेच कशाला, पाहून/ चर्चून वेळ फुकट कशाला घालवायचा? काय मिळतं त्यातून असे प्रश्न मला विचारले गेले (विशेषतः नवतरूणांकडून) की माझं असं लंबचौड भाषण तयार असतं ;) स्पोर्टसमन्शिप आणि त्याची नशा अशी काही और आहे की बस्स्स! बॉल टू बॉल मॅच, मग री-प्लेज, मग सगळ्या पेपरांमधील वार्तांकन वाचण्याचे दिवस आठवले. दुर्दैवाने क्रिकेट इतका ठसा इतर खेळांनी उठवेपर्यंत लहानपण संपलच होतं जवळ जवळ. पण ब्रीज, कॅरम, चेस सारखा बैठा असो की कुठलाही मैदानी, खेळ खेळण्याची आणि पहाण्याची मजा लहानपणापासूनच ठसली मनावर. आणि हो, विश्वनाथ आनंदचा उल्लेख आवडला असता लेखात :) तद्वत पेस सुद्धा!

चतुरंग 30/08/2013 - 10:55
सुरेख लेख. फारच आवडला. (वरती उपास यांनी म्हणल्याप्रमाणे आमच्या 'विशीचा' उल्लेख असता तर सोने पे सुहागा असं झालं असतं पण तरीही लेख आवडलाच.) खेळाने जो चिवटपणा आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती तयार होते त्याला खरंच पर्याय नाही. आमचे मल्लखांबाचे गोपाळे सर आठवले त्यांनी रागं भरुन पहाटे व्यायामाच्या सवयीची लावलेली शिस्त आठवली आणि भरुन आलं!

In reply to by चतुरंग

रंगाकाका, तुमच्याकडून गोपाळे सरांचा उल्लेख ह्या आधीही एकदा आलाय. त्यांच्याबद्दल तुमच्या लेखणीतून वाचायला खूप आवडेल. जे.पी.

ब़जरबट्टू 30/08/2013 - 11:05
वा, मस्त लिहलय.. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!

चिगो 30/08/2013 - 11:42
दोन संघ वा खेळाडू अश्या ताकदीनी आणि त्वेषानी एकमेकांना भिडतात की बघणार्‍याला आपल्याच नशीबाचा हेवा वाटावा. डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात! Contests not for the faint hearted !
क्या बात..  
आणि जोपर्यंत आंतरशालेय स्पर्धेत सहावीतला तो बारक्या फुटबॉलपटू खरचटलेल्या कोपरांवरची माती झटकून पुन्हा "किक ऑफ" साठी जातोय, जोपर्यंत ती ढोपराएवढी पोरगी धरमतर ते गेटवे पोहण्यासाठी ६-६, ८-८ तास तलावात सराव करतीये, जोपर्यंत आपल्या वेळेतला एक दशांश सेकंद कमी करण्यासाठी तो अ‍ॅथलीट पहाटे ४ चा गजर लावून उठतोय तोपर्यंत त्या पणतीला काही धोका नाही. खेळच ह्या पोरांना परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद देईल. संकटांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत देईल, अपयशाच्या छाताडावर पाय देऊन यशाचा जल्लोष करण्याची ऊर्मी देईल.
जबरदस्त.. अत्यंत समर्पक, रोमांचक लेेख, माॅर्गनसाहेब.. अत्यंत आवडला..

उपास 31/08/2013 - 09:11
वर उल्लेखलिल्या किंवा तत्सम अटीतटीच्या सामन्यांचि क्षणचित्रे यु ट्युब वर असतिल ना? त्यांच्या सगळ्या लिंक्स एकत्र करुन ठेवता येतील का? म्हणजे वेगवेगळे खेळ आणि त्यातले हे क्षण पुन्हा पुन्हा उपभोगता येतील, ते ही सहजच. जे. पी. what say?

In reply to by उपास

सर्वांना त्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. @उपास.... अशी एक यादी करायला हवी. आणि लोकांनी त्यांच्या आवडत्या सामन्यांचे दुवे द्यावेत ! आयडिया भारी आहे. जे.पी.

पैसा 04/09/2013 - 14:30
मिपा गंडल्यामुळे हा लेख वाचायचा राहून गेला होता. लै भारी लिहिलंय! सलाम!!

मस्त लेख.
डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी लढत व्हावी की हार - जीत गौण ठरावी. अशी अटीतटीची लढत की विजेत्यानी पराभूताला सलाम ठोकावा. खेळाच्या मैदानात अशी द्वंद्वं बघायला मिळतात ज्यांच्या कथा कुठल्याही युद्धकथेपेक्षा कमी रोमांचक नसतात!
माझी टीम जिंकत असेल तरच मी टाळ्या वाजवणार या प्रवृत्तीच्या पलिकडे जाऊन सुंदर खेळ झाला तर मी दाद देणार हे म्हणणं आवडलं.

जॅक डनियल्स 05/09/2013 - 03:43
सहज सुंदर आणि मस्त लेख आहे. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. क्रिकेट सोडून इतर खेळांचा उल्लेख आल्यामुळे खूप बरे वाटले. भाग मिल्खा भाग ! हे गाणं खूप प्रेरणा देऊन जाते. आत्ता असाच ध्यानचंद वर पण सिनेमा यायला पाहिजे, मन खुश होऊन जाईल.

एच्टूओ 05/09/2013 - 17:11
जोपर्यंत आंतरशालेय स्पर्धेत सहावीतला तो बारक्या फुटबॉलपटू खरचटलेल्या कोपरांवरची माती झटकून पुन्हा "किक ऑफ" साठी जातोय, जोपर्यंत ती ढोपराएवढी पोरगी धरमतर ते गेटवे पोहण्यासाठी ६-६, ८-८ तास तलावात सराव करतीये, जोपर्यंत आपल्या वेळेतला एक दशांश सेकंद कमी करण्यासाठी तो अ‍ॅथलीट पहाटे ४ चा गजर लावून उठतोय तोपर्यंत त्या पणतीला काही धोका नाही.
खूपच छान...!!
आज २९ ऑगस्ट - आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस. लहानपणी .. म्हणजे लपाछपी, चोर - पोलीस, आप्पारप्पी, लगोरी वगैरे खेळांतून "ग्रॅज्युएट" होऊन "स्पोर्ट्स" ह्या प्रकारांत गणले जाणारे खेळ खेळायला लागलो तेव्हा......त्या पांढरे कपडे घालून तांबड्या चेंडूनी खेळायच्या खेळानी वेड लावलं आणि आयुष्यात पहिल्यांदा हिरव्यागार मैदानांवर पाऊल पडलं. कपिल देवसारखी अॅक्शन करणं... "वन डाऊन" बॅट्समन असल्यामुळे हेल्मेटखाली संजय मांजरेकरसारखी पट्टी बांधणं वगैरे चावट उद्योग चालू होते. अझरुद्दीन, इम्रान, रिचर्ड्स वगैरे हीरोज होते... शाळेतून पळून जाऊन मित्राच्या घरी टीव्ही बघणं व्हायचं... सगळं यथास्थित चालू होतं.

कपिल व गांगुलीने निवडलेले एकदिवसीय क्रिकेटचे भारताचे सर्वकालीन सर्वोत्तम संघ

श्रीगुरुजी ·

आदूबाळ 18/08/2013 - 12:12
सर्वोत्तम संघात धोनी कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून निवडला जाऊ शकतो. पण त्याला सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणणं जरा जास्तच होतंय. तो "उत्तम" यष्टिरक्षक सुद्धा नाही, "बरा" आहे. लेगकडच्या ब्लाईंड बॉलवर बर्‍याचदा कोंबडी पकडतो. सय्यद किरमाणी किंवा नयन मोंगिया यांची निवड होऊ शकते.

श्रीगुरुजी 18/08/2013 - 14:05
>>> तो "उत्तम" यष्टिरक्षक सुद्धा नाही, "बरा" आहे. लेगकडच्या ब्लाईंड बॉलवर बर्‍याचदा कोंबडी पकडतो. भारताला मिळालेला गेल्या १५-२० वर्षांतला तो सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. पार्थिव पटेल, साबा करीम, नयन मोंगिया, दीप दासगुप्ता, राहुल द्रविड, संदीप दिघे, दिनेश कार्तिक या व अशा अनेक यष्टीरक्षकांपेक्षा त्याचे यष्टीरक्षण उच्च दर्जाचे आहे. लेगसाईडला पडलेल्या चेंडूवर फलंदाजाला क्षणार्धात यष्टीचित करण्याचे त्याचे कौशल्य वादातीत आहे. किरमाणी हा त्याच्याइतकाच किंबहुना त्याच्यापेक्षा काहीसा सरक यष्टीरक्षक असला तरी यष्टीरक्षणाच्या बरोबरीने तडाखेबंद फलंदाजी, मॅच फिनिशर व शांत डोक्याचा कर्णधार या गुणांमुळे तो किरमाणीपेक्षा खूपच सरस ठरतो.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 19/08/2013 - 12:53
>> पार्थिव पटेल, साबा करीम, नयन मोंगिया, दीप दासगुप्ता, राहुल द्रविड, संदीप दिघे, दिनेश कार्तिक या व अशा अनेक यष्टीरक्षकांपेक्षा त्याचे यष्टीरक्षण उच्च दर्जाचे आहे. आपल्या ज्ञानाचा प्रत्यय आला ..निर्वाण प्राप्त झाले आहे

In reply to by श्रीगुरुजी

किसन शिंदे 19/08/2013 - 20:55
सय्यद किरमाणीची किपींग पाहिली नाहीये, पण काही जुन्या विडीओत पाहता तो चांगली किपींग करायचा. मला वाटतं त्याच्यानंतर नयन मोंगियाच सर्वोत्तम विकेट किपर आहे. आणि त्याखालोखाल धोन्या. कुंबळेचा उसळलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटला थोडासा चुकून जेव्हा त्याच्या हातात विसावायचा तेव्हा त्याचा ठरलेला शब्द, आई ग्गं!! नंतर नंतर तो एवढा पाठ झाला की असा चेंडू हुकल्यानंतर मोंगियाच्या आधी आम्हीच आई ग्गं म्हणून ओरडत असू. :)

In reply to by श्रीगुरुजी

फारएन्ड 20/08/2013 - 03:36
गुरूजी, तो समीर दिघे :) चेन्नई ला २००१ मधे निर्णायक वेळी चांगले खेळून हरभजन च्या मदतीने भारताला मालिका जिंकून देण्यात हातभार लावला होता त्याने. तुम्हाला बहुधा लक्षात असेलच. दादा ने ही मग शब्द पाळला व त्याला पुढे दोन सिरीज प्राधान्य दिले होते. बाकी 'दादा' हा वन डे तील सर्वोत्तम खेळाडूंपैकी समजला जातो. तो जेव्हा खेळायचा तेव्हा कोणाच्याही संघात बसेल असाच होता. स्लिप किंवा थर्ड मॅन ला उभे राहून कप्तानगिरीच मुख्य करायची असल्याने त्याची फिल्डिंग लपून जात असे. मात्र आउटफील्ड कॅचिंग त्याचे एकदम रिलायेबल होते.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:27
बरोब्बर. तो समीर दिघे. नावात जरा घोटाळा झाला. २००१ च्या ऑस्ट्रेलियाविरीद्धच्या हरभजन फेम मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना तिसर्‍या कसोटीत ५ व्या दिवशी भारत विजयासाठी १६० च्या आसपास माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ८ बाद १४० च्या आसपास होती. त्यावेळी समीर दिघेने ३-४ चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. तो एकमेव डाव सोडला तर समीर दिघेची कामगिरी व यष्टीरक्षण यथातथाच होते.

गांगुली संघात असलाच पाहिजे ...कारण तो आउट झाल्यावर बंगाली लोकांचे चेहरे आणि एक्स्पेशन्स पाहण्यासारखे असतात ;) =))

In reply to by धर्मराजमुटके

श्रीगुरुजी 18/08/2013 - 21:00
गावसकर हा कसोटी क्रिकेटच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण तो एकदिवसीय क्रिकेटसाठी फारसा उपयुक्त नाही.

नानबा 19/08/2013 - 11:45
सार्वकालीन सर्वोत्तम १२ भारतीय खेळाडू म्हणतात आणि मोहिंदर अमरनाथ, बिशनसिंग बेदी, रवि शास्त्री, सुनिल गावस्कर, असे खेळाडू वगळून जडेजा आणि कोहलीला घ्यावं?? मला अभिप्रेत सार्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ - सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, रवि शास्त्री, कपिल देव (कर्णधार), महेंद्रसिंग ढोणी (यष्टिरक्षक), बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे, श्रीनाथ, मोहिंदर अमरनाथ आणि युवराज सिंग (१२ वा खेळाडू)

श्रीगुरुजी 19/08/2013 - 12:34
>>> मला अभिप्रेत सार्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ - सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, रवि शास्त्री, कपिल देव (कर्णधार), महेंद्रसिंग ढोणी (यष्टिरक्षक), बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे, श्रीनाथ, मोहिंदर अमरनाथ आणि युवराज सिंग (१२ वा खेळाडू) युवराज १२ वा आणि शास्त्री मुख्य संघात! आणि संघात बेदी सुद्धा! बेदी आणि गावसकर एकदिवसीय संघात अजिबात योग्य वाटत नाहीत. रवि शास्त्री हा निव्वळ एकदिवसीय संघाचाच नव्हे तर कसोटी संघाचा सुद्धा एक अत्यंत भिकार खेळाडू होता. आपल्या अत्यंत संथ व रटाळ फलंदाजीने व सामान्य गोलंदाजीने त्याने अनेक सामने घालविलेले आहेत. तो केवळ स्वतःसाठी खेळणारा स्वार्थी खेळाडू होता. कितीही चेंडू वाया गेले तरी चालतील, कितीही कमी धावा झाल्या तरी चालतील पण मी विकेट घालविणार नाही अशा मनोभूमिकेतून तो खेळत होता. १९९२ विश्वचषकात त्यांच्या संथ खेळीमुळे भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध हरल्यानंतर भारतीय प्रेक्षकांचा संताप अनावर होऊन शेवटी त्यांच्या दडपणामुळे त्याला संघातून वगळावे लागले होते. १९९३ मध्ये त्याच्या कसोटीतल्या संथ खेळामुळेच (सामना जिंकायचा असताना त्याने २०० मिनिटे खेळून नाबाद २३ धावा केल्या होत्या) त्याची कायमस्वरूपी हकालपट्टी झाली होती. असा खेळाडू भारताच्या कोणत्याही काळातील कोणत्याही संघात असू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा 19/08/2013 - 13:56
रवि शास्त्री हा निव्वळ एकदिवसीय संघाचाच नव्हे तर कसोटी संघाचा सुद्धा एक अत्यंत भिकार खेळाडू होता.
हा शास्त्र्या जेवढा भारी समालोचक आहे तेवढाच भिकार खेळाडू होता :D

कपिलमुनी 19/08/2013 - 13:00
>>युवराज १२ वा आणि शास्त्री मुख्य संघात! आणि संघात बेदी सुद्धा! >>अजिबात योग्य वाटत नाहीत. >>अत्यंत भिकार खेळाडू होता >>कोणत्याही संघात असू शकत नाही कपिल ला वाटले त्याने घेतले ...त्याच्यावर टीका करणारा धागा काढण्यापेक्षा , आणि हा कशाला , तो घ्यायला पहिजे होता ..असा लिहिण्यापेक्षा तुम्ही स्वत:ची सार्वकालिक टीम का नाही जाहीर करत ..त्यावर आपण चर्चा करू

स्पा 19/08/2013 - 14:40
आमचा बी एक संघ सद्गोपन रमेश , आकाश चोपडा, अशिश कपूर ,दीप दासगुप्ता ,रवि शास्त्री ,विक्रम राठोड ,सबा कर्रिम, दोड्डा गणेश ,सलील अंकोला, देवाशिष मोहंती , मुनाफ पटेल, श्रीसंत (१२वा )

In reply to by स्पा

बॅटमॅन 19/08/2013 - 14:52
संघातील खेळाडू आणि आपली स्वाक्षरी हे पाहता निर्वाणच मिळणार की हो एकदम =)) =)) बाकी त्या यादीत अ‍ॅबे कुरुविलाचे नाव नसल्याबद्दल जोर्दार णिषेढ!

In reply to by स्पा

आदूबाळ 19/08/2013 - 15:15
सद्गोपन रमेश ऐवजी देवांग गांधी या (अहिंसक) फलंदाजाची भर्ती व्हावी ही णम्र विणंती. इतर काही प्रस्ताव: गगन खोडा अ‍ॅबी कुरुविला अमेय खुरासिया हरविंदर सिंग (जु)

In reply to by घाटावरचे भट

चावटमेला 20/08/2013 - 13:10
आणि आमच्या नोएल डेव्हिडने काय हो पाप केलंय?
जे ब्बात!! गेले दोन दिवस ह्य गोलंदाजाच्या कर्दनकाळाचे नाव आठवत होतो. काही केल्या आठवतच नव्हते ;)

चावटमेला 19/08/2013 - 15:34
डेविड जॉन्सन टीनू योहानन विजय भारद्वाज टी कुमारन निखिल चोप्रा जेकब मार्टिन एम एस के प्रसाद अजय शर्मा रॉबिन सिंग (ज्यु) जे पी यादव निलेश कुलकर्णी

In reply to by चावटमेला

सौंदाळा 19/08/2013 - 18:30
आमच्या पुण्याच्या ऋषिकेशराव कानिटकरसाहेब यांना विसरलात वाटतं.. आघाडीच्या फलंदाजांमधे आमचा आवडता वुर्केरी रमण नसल्यामुळे अंमळ निराशा झाली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

फारएन्ड 20/08/2013 - 03:43
कानिटकर व वरचे नग यांत थोडा फरक आहे. हे बाकीचे लोक रणजी, दुलीप मधेही फारसे चालले नाहीत. ऋषिकेश कानिटकर ने तळागाळातील राजस्थान च्या रणजी संघास सलग दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले. आकाश चोप्राची यावर दोन पुस्तके आहेत, त्यातील एक मी वाचले आहे. नक्कीच वाचनीय आहे. माझ्या मते तो (वन डे) संघात निवडला जाण्याएवढा चांगला नसेल कदाचित (पण १९९८ च्या ढाका फायनल मधे शेवटच्या ओव्हरला चौकार मारून भारताला ३१६ चेस करतान जिंकून देणे एवढी कामगिरी आहे त्याच्या खात्यात. किमान त्याने तरी तो वरच्या लोकांपेक्षा वेगळा आहे), पण या वाईट संघात असण्याएवढाही वाईट नव्हता. तो प्रामुख्याने अझर व सचिन च्या कप्तानपदाच्या वेळेस खेळला. गांगुली च्या वेळेस असता तर त्याला सलग काही सामने त्याने नक्कीच देऊन पूण संधी दिली असती (जशी विनोद कांबळी, दिनेश मोंगिया ई. ना त्याने दिली)

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:33
तो सामना अजून आठवतो. पाकड्यांनी ४८ षटकात ३१२ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी ६.५० हून अधिक धावगती हवी होती. सचिन व गांगुलीने जबरदस्त सलामी दिली. सचिन २६ चेंडूत ४१ धावा करून बाद झाल्यावर अचानक रॉबिन सिंग ३ र्‍या क्रमांकावर आला. त्याने ८३ चेंडूत ८२ धावा केल्या व दुसरीकडे गांगुलीने १२५ धावा केल्या. एक वेळ भारताची धावसंख्या १४ षटकात १ बाद १२५ इतकी जबरदस्त होती. नंतर रॉबिन सिंग बाद झाल्यावर डाव कोसळायला सुरूवात झाली. अझरूद्दिन शून्यावर गेला. शेवटी ९ बाद झाले होते व शेवटच्या ३ चेंडूत ४ धावा हव्या असताना कानिटकरने गुडघ्यावर बसून मिडविकेटच्या डोक्यावरून चौकार मारून भारताला सामना जिंकून दिला. त्याने नाबाद १७ धावा केल्या. शेवटची ५-६ षटके भारत अक्षरश: अंधारात खेळला. सूर्यास्तानंतर संधिप्रकाशात चेंडू नीट दिसत नव्हता. सामना अंधुक प्रकाशामुळे थांबविण्याचा पंच विचार करत होते. तसे झाले असते तर सरस धावगतीच्या जोरावर पाकडे जिंकले असते. पण विजयाची चाहूल लागलेल्या भारताने सामना चालू ठेवण्याचा आग्रह धरला व अक्षरशः जवळपास अंधार पडलेला असताना शेवटची ३-४ षटके खेळून सामना जिंकला.

श्रीगुरुजी 19/08/2013 - 20:39
अरेरे! इथे सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघाऐवजी सर्वकालीन सर्वात टुकार संघाविषयी प्रतिसाद येताहेत. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघ निवडणे तुलनेने सोपे आहे. पण सर्वाधिक टुकार असलेले ११ खेळाडू निवडणे महाकठीण काम आहे कारण त्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा 19/08/2013 - 20:46
पण सर्वाधिक टुकार असलेले ११ खेळाडू निवडणे महाकठीण काम आहे कारण त्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे.
श्री गुरुजी होऊन जौद्या मग :)

In reply to by स्पा

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:36
सर्वाधिक टुकार ११ खेळाडू निवडायचे तर ज्यांनी किमान २५-३० कसोटी व ५०-६० एकदिवसीय सामने खेळले आहेत अशाच नगांचा विचार करावा लागेल. १-२ सामने खेळून गेलेल्यांचा विचार करणे योग्य नाही. या दृष्टीने टुकार संघाचा कर्णधार म्हणून मला रवि शास्त्री योग्य वाटतो. बैलासारखी गोलंदाजी टाकणारा इशांत शर्मासुद्धा या संघात फिट बसेल. अजून ९ नावे शोधावी लागतील.

मोदक 19/08/2013 - 21:24
सुनील वॉल्सन कोणाला आठवतो आहे का..?? १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू. पण हा बिचारा विश्वचषकात एकही मॅच खेळला नाही व नंतर कोणत्याही मालिकेत याची निवड झाली नाही - त्यामुळे एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळता करीयर संपलेल्या या खेळाडूला आपले म्हणा. ;-)

आदिजोशी 20/08/2013 - 14:50
१. धम्या २. डाण्या ३. आंद्या ४. अभ्या ५. टारबा ६. बिका ७. किसनदेव ८. झेलेअण्णा ९. पराशेठ १० अबब आणि ११. आम्ही स्वतः ह्यातला प्रत्येकजण ऑलराउंडर असल्याने बॅटिंग, बोलिंग, विकेटकिपिंग आणी वेळ पडल्यास अंपायरींगही करू शकतो. पुन्हा, इथे प्रत्येकाचा स्वतःचा झेंडा असल्याने प्रत्येकजण कर्णधार म्हणूनच वावरेल. एका संघात ११ खेळाडुंचे ११ मायक्रो संघ अशी भन्नाट टीम असल्यावर कोणाची बिशाद आहे आम्हाला हरवायची?

In reply to by किसन शिंदे

स्पा 21/08/2013 - 11:35
संजय क्षीरसागर (कप्तान) चेसुगु लीलाधर अतृप्त आत्मा स्पा (यष्टीरक्षक) गणेशा प्रकाश १११ पैसा (३३% आरक्षण अंतर्गत) लीमौ (३३% आरक्षण अंतर्गत) अपर्णा अक्षय (३३% आरक्षण अंतर्गत) इंटरनेट स्नेही ब्याटम्यान (१२ वा )

आदूबाळ 18/08/2013 - 12:12
सर्वोत्तम संघात धोनी कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून निवडला जाऊ शकतो. पण त्याला सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणणं जरा जास्तच होतंय. तो "उत्तम" यष्टिरक्षक सुद्धा नाही, "बरा" आहे. लेगकडच्या ब्लाईंड बॉलवर बर्‍याचदा कोंबडी पकडतो. सय्यद किरमाणी किंवा नयन मोंगिया यांची निवड होऊ शकते.

श्रीगुरुजी 18/08/2013 - 14:05
>>> तो "उत्तम" यष्टिरक्षक सुद्धा नाही, "बरा" आहे. लेगकडच्या ब्लाईंड बॉलवर बर्‍याचदा कोंबडी पकडतो. भारताला मिळालेला गेल्या १५-२० वर्षांतला तो सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. पार्थिव पटेल, साबा करीम, नयन मोंगिया, दीप दासगुप्ता, राहुल द्रविड, संदीप दिघे, दिनेश कार्तिक या व अशा अनेक यष्टीरक्षकांपेक्षा त्याचे यष्टीरक्षण उच्च दर्जाचे आहे. लेगसाईडला पडलेल्या चेंडूवर फलंदाजाला क्षणार्धात यष्टीचित करण्याचे त्याचे कौशल्य वादातीत आहे. किरमाणी हा त्याच्याइतकाच किंबहुना त्याच्यापेक्षा काहीसा सरक यष्टीरक्षक असला तरी यष्टीरक्षणाच्या बरोबरीने तडाखेबंद फलंदाजी, मॅच फिनिशर व शांत डोक्याचा कर्णधार या गुणांमुळे तो किरमाणीपेक्षा खूपच सरस ठरतो.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 19/08/2013 - 12:53
>> पार्थिव पटेल, साबा करीम, नयन मोंगिया, दीप दासगुप्ता, राहुल द्रविड, संदीप दिघे, दिनेश कार्तिक या व अशा अनेक यष्टीरक्षकांपेक्षा त्याचे यष्टीरक्षण उच्च दर्जाचे आहे. आपल्या ज्ञानाचा प्रत्यय आला ..निर्वाण प्राप्त झाले आहे

In reply to by श्रीगुरुजी

किसन शिंदे 19/08/2013 - 20:55
सय्यद किरमाणीची किपींग पाहिली नाहीये, पण काही जुन्या विडीओत पाहता तो चांगली किपींग करायचा. मला वाटतं त्याच्यानंतर नयन मोंगियाच सर्वोत्तम विकेट किपर आहे. आणि त्याखालोखाल धोन्या. कुंबळेचा उसळलेला चेंडू फलंदाजाच्या बॅटला थोडासा चुकून जेव्हा त्याच्या हातात विसावायचा तेव्हा त्याचा ठरलेला शब्द, आई ग्गं!! नंतर नंतर तो एवढा पाठ झाला की असा चेंडू हुकल्यानंतर मोंगियाच्या आधी आम्हीच आई ग्गं म्हणून ओरडत असू. :)

In reply to by श्रीगुरुजी

फारएन्ड 20/08/2013 - 03:36
गुरूजी, तो समीर दिघे :) चेन्नई ला २००१ मधे निर्णायक वेळी चांगले खेळून हरभजन च्या मदतीने भारताला मालिका जिंकून देण्यात हातभार लावला होता त्याने. तुम्हाला बहुधा लक्षात असेलच. दादा ने ही मग शब्द पाळला व त्याला पुढे दोन सिरीज प्राधान्य दिले होते. बाकी 'दादा' हा वन डे तील सर्वोत्तम खेळाडूंपैकी समजला जातो. तो जेव्हा खेळायचा तेव्हा कोणाच्याही संघात बसेल असाच होता. स्लिप किंवा थर्ड मॅन ला उभे राहून कप्तानगिरीच मुख्य करायची असल्याने त्याची फिल्डिंग लपून जात असे. मात्र आउटफील्ड कॅचिंग त्याचे एकदम रिलायेबल होते.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:27
बरोब्बर. तो समीर दिघे. नावात जरा घोटाळा झाला. २००१ च्या ऑस्ट्रेलियाविरीद्धच्या हरभजन फेम मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना तिसर्‍या कसोटीत ५ व्या दिवशी भारत विजयासाठी १६० च्या आसपास माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ८ बाद १४० च्या आसपास होती. त्यावेळी समीर दिघेने ३-४ चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. तो एकमेव डाव सोडला तर समीर दिघेची कामगिरी व यष्टीरक्षण यथातथाच होते.

गांगुली संघात असलाच पाहिजे ...कारण तो आउट झाल्यावर बंगाली लोकांचे चेहरे आणि एक्स्पेशन्स पाहण्यासारखे असतात ;) =))

In reply to by धर्मराजमुटके

श्रीगुरुजी 18/08/2013 - 21:00
गावसकर हा कसोटी क्रिकेटच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण तो एकदिवसीय क्रिकेटसाठी फारसा उपयुक्त नाही.

नानबा 19/08/2013 - 11:45
सार्वकालीन सर्वोत्तम १२ भारतीय खेळाडू म्हणतात आणि मोहिंदर अमरनाथ, बिशनसिंग बेदी, रवि शास्त्री, सुनिल गावस्कर, असे खेळाडू वगळून जडेजा आणि कोहलीला घ्यावं?? मला अभिप्रेत सार्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ - सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, रवि शास्त्री, कपिल देव (कर्णधार), महेंद्रसिंग ढोणी (यष्टिरक्षक), बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे, श्रीनाथ, मोहिंदर अमरनाथ आणि युवराज सिंग (१२ वा खेळाडू)

श्रीगुरुजी 19/08/2013 - 12:34
>>> मला अभिप्रेत सार्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ - सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, रवि शास्त्री, कपिल देव (कर्णधार), महेंद्रसिंग ढोणी (यष्टिरक्षक), बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे, श्रीनाथ, मोहिंदर अमरनाथ आणि युवराज सिंग (१२ वा खेळाडू) युवराज १२ वा आणि शास्त्री मुख्य संघात! आणि संघात बेदी सुद्धा! बेदी आणि गावसकर एकदिवसीय संघात अजिबात योग्य वाटत नाहीत. रवि शास्त्री हा निव्वळ एकदिवसीय संघाचाच नव्हे तर कसोटी संघाचा सुद्धा एक अत्यंत भिकार खेळाडू होता. आपल्या अत्यंत संथ व रटाळ फलंदाजीने व सामान्य गोलंदाजीने त्याने अनेक सामने घालविलेले आहेत. तो केवळ स्वतःसाठी खेळणारा स्वार्थी खेळाडू होता. कितीही चेंडू वाया गेले तरी चालतील, कितीही कमी धावा झाल्या तरी चालतील पण मी विकेट घालविणार नाही अशा मनोभूमिकेतून तो खेळत होता. १९९२ विश्वचषकात त्यांच्या संथ खेळीमुळे भारत ऑस्ट्रेलियाविरूद्ध हरल्यानंतर भारतीय प्रेक्षकांचा संताप अनावर होऊन शेवटी त्यांच्या दडपणामुळे त्याला संघातून वगळावे लागले होते. १९९३ मध्ये त्याच्या कसोटीतल्या संथ खेळामुळेच (सामना जिंकायचा असताना त्याने २०० मिनिटे खेळून नाबाद २३ धावा केल्या होत्या) त्याची कायमस्वरूपी हकालपट्टी झाली होती. असा खेळाडू भारताच्या कोणत्याही काळातील कोणत्याही संघात असू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा 19/08/2013 - 13:56
रवि शास्त्री हा निव्वळ एकदिवसीय संघाचाच नव्हे तर कसोटी संघाचा सुद्धा एक अत्यंत भिकार खेळाडू होता.
हा शास्त्र्या जेवढा भारी समालोचक आहे तेवढाच भिकार खेळाडू होता :D

कपिलमुनी 19/08/2013 - 13:00
>>युवराज १२ वा आणि शास्त्री मुख्य संघात! आणि संघात बेदी सुद्धा! >>अजिबात योग्य वाटत नाहीत. >>अत्यंत भिकार खेळाडू होता >>कोणत्याही संघात असू शकत नाही कपिल ला वाटले त्याने घेतले ...त्याच्यावर टीका करणारा धागा काढण्यापेक्षा , आणि हा कशाला , तो घ्यायला पहिजे होता ..असा लिहिण्यापेक्षा तुम्ही स्वत:ची सार्वकालिक टीम का नाही जाहीर करत ..त्यावर आपण चर्चा करू

स्पा 19/08/2013 - 14:40
आमचा बी एक संघ सद्गोपन रमेश , आकाश चोपडा, अशिश कपूर ,दीप दासगुप्ता ,रवि शास्त्री ,विक्रम राठोड ,सबा कर्रिम, दोड्डा गणेश ,सलील अंकोला, देवाशिष मोहंती , मुनाफ पटेल, श्रीसंत (१२वा )

In reply to by स्पा

बॅटमॅन 19/08/2013 - 14:52
संघातील खेळाडू आणि आपली स्वाक्षरी हे पाहता निर्वाणच मिळणार की हो एकदम =)) =)) बाकी त्या यादीत अ‍ॅबे कुरुविलाचे नाव नसल्याबद्दल जोर्दार णिषेढ!

In reply to by स्पा

आदूबाळ 19/08/2013 - 15:15
सद्गोपन रमेश ऐवजी देवांग गांधी या (अहिंसक) फलंदाजाची भर्ती व्हावी ही णम्र विणंती. इतर काही प्रस्ताव: गगन खोडा अ‍ॅबी कुरुविला अमेय खुरासिया हरविंदर सिंग (जु)

In reply to by घाटावरचे भट

चावटमेला 20/08/2013 - 13:10
आणि आमच्या नोएल डेव्हिडने काय हो पाप केलंय?
जे ब्बात!! गेले दोन दिवस ह्य गोलंदाजाच्या कर्दनकाळाचे नाव आठवत होतो. काही केल्या आठवतच नव्हते ;)

चावटमेला 19/08/2013 - 15:34
डेविड जॉन्सन टीनू योहानन विजय भारद्वाज टी कुमारन निखिल चोप्रा जेकब मार्टिन एम एस के प्रसाद अजय शर्मा रॉबिन सिंग (ज्यु) जे पी यादव निलेश कुलकर्णी

In reply to by चावटमेला

सौंदाळा 19/08/2013 - 18:30
आमच्या पुण्याच्या ऋषिकेशराव कानिटकरसाहेब यांना विसरलात वाटतं.. आघाडीच्या फलंदाजांमधे आमचा आवडता वुर्केरी रमण नसल्यामुळे अंमळ निराशा झाली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

फारएन्ड 20/08/2013 - 03:43
कानिटकर व वरचे नग यांत थोडा फरक आहे. हे बाकीचे लोक रणजी, दुलीप मधेही फारसे चालले नाहीत. ऋषिकेश कानिटकर ने तळागाळातील राजस्थान च्या रणजी संघास सलग दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले. आकाश चोप्राची यावर दोन पुस्तके आहेत, त्यातील एक मी वाचले आहे. नक्कीच वाचनीय आहे. माझ्या मते तो (वन डे) संघात निवडला जाण्याएवढा चांगला नसेल कदाचित (पण १९९८ च्या ढाका फायनल मधे शेवटच्या ओव्हरला चौकार मारून भारताला ३१६ चेस करतान जिंकून देणे एवढी कामगिरी आहे त्याच्या खात्यात. किमान त्याने तरी तो वरच्या लोकांपेक्षा वेगळा आहे), पण या वाईट संघात असण्याएवढाही वाईट नव्हता. तो प्रामुख्याने अझर व सचिन च्या कप्तानपदाच्या वेळेस खेळला. गांगुली च्या वेळेस असता तर त्याला सलग काही सामने त्याने नक्कीच देऊन पूण संधी दिली असती (जशी विनोद कांबळी, दिनेश मोंगिया ई. ना त्याने दिली)

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:33
तो सामना अजून आठवतो. पाकड्यांनी ४८ षटकात ३१२ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी ६.५० हून अधिक धावगती हवी होती. सचिन व गांगुलीने जबरदस्त सलामी दिली. सचिन २६ चेंडूत ४१ धावा करून बाद झाल्यावर अचानक रॉबिन सिंग ३ र्‍या क्रमांकावर आला. त्याने ८३ चेंडूत ८२ धावा केल्या व दुसरीकडे गांगुलीने १२५ धावा केल्या. एक वेळ भारताची धावसंख्या १४ षटकात १ बाद १२५ इतकी जबरदस्त होती. नंतर रॉबिन सिंग बाद झाल्यावर डाव कोसळायला सुरूवात झाली. अझरूद्दिन शून्यावर गेला. शेवटी ९ बाद झाले होते व शेवटच्या ३ चेंडूत ४ धावा हव्या असताना कानिटकरने गुडघ्यावर बसून मिडविकेटच्या डोक्यावरून चौकार मारून भारताला सामना जिंकून दिला. त्याने नाबाद १७ धावा केल्या. शेवटची ५-६ षटके भारत अक्षरश: अंधारात खेळला. सूर्यास्तानंतर संधिप्रकाशात चेंडू नीट दिसत नव्हता. सामना अंधुक प्रकाशामुळे थांबविण्याचा पंच विचार करत होते. तसे झाले असते तर सरस धावगतीच्या जोरावर पाकडे जिंकले असते. पण विजयाची चाहूल लागलेल्या भारताने सामना चालू ठेवण्याचा आग्रह धरला व अक्षरशः जवळपास अंधार पडलेला असताना शेवटची ३-४ षटके खेळून सामना जिंकला.

श्रीगुरुजी 19/08/2013 - 20:39
अरेरे! इथे सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघाऐवजी सर्वकालीन सर्वात टुकार संघाविषयी प्रतिसाद येताहेत. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट संघ निवडणे तुलनेने सोपे आहे. पण सर्वाधिक टुकार असलेले ११ खेळाडू निवडणे महाकठीण काम आहे कारण त्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा 19/08/2013 - 20:46
पण सर्वाधिक टुकार असलेले ११ खेळाडू निवडणे महाकठीण काम आहे कारण त्यासाठी जबरदस्त स्पर्धा आहे.
श्री गुरुजी होऊन जौद्या मग :)

In reply to by स्पा

श्रीगुरुजी 20/08/2013 - 14:36
सर्वाधिक टुकार ११ खेळाडू निवडायचे तर ज्यांनी किमान २५-३० कसोटी व ५०-६० एकदिवसीय सामने खेळले आहेत अशाच नगांचा विचार करावा लागेल. १-२ सामने खेळून गेलेल्यांचा विचार करणे योग्य नाही. या दृष्टीने टुकार संघाचा कर्णधार म्हणून मला रवि शास्त्री योग्य वाटतो. बैलासारखी गोलंदाजी टाकणारा इशांत शर्मासुद्धा या संघात फिट बसेल. अजून ९ नावे शोधावी लागतील.

मोदक 19/08/2013 - 21:24
सुनील वॉल्सन कोणाला आठवतो आहे का..?? १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू. पण हा बिचारा विश्वचषकात एकही मॅच खेळला नाही व नंतर कोणत्याही मालिकेत याची निवड झाली नाही - त्यामुळे एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळता करीयर संपलेल्या या खेळाडूला आपले म्हणा. ;-)

आदिजोशी 20/08/2013 - 14:50
१. धम्या २. डाण्या ३. आंद्या ४. अभ्या ५. टारबा ६. बिका ७. किसनदेव ८. झेलेअण्णा ९. पराशेठ १० अबब आणि ११. आम्ही स्वतः ह्यातला प्रत्येकजण ऑलराउंडर असल्याने बॅटिंग, बोलिंग, विकेटकिपिंग आणी वेळ पडल्यास अंपायरींगही करू शकतो. पुन्हा, इथे प्रत्येकाचा स्वतःचा झेंडा असल्याने प्रत्येकजण कर्णधार म्हणूनच वावरेल. एका संघात ११ खेळाडुंचे ११ मायक्रो संघ अशी भन्नाट टीम असल्यावर कोणाची बिशाद आहे आम्हाला हरवायची?

In reply to by किसन शिंदे

स्पा 21/08/2013 - 11:35
संजय क्षीरसागर (कप्तान) चेसुगु लीलाधर अतृप्त आत्मा स्पा (यष्टीरक्षक) गणेशा प्रकाश १११ पैसा (३३% आरक्षण अंतर्गत) लीमौ (३३% आरक्षण अंतर्गत) अपर्णा अक्षय (३३% आरक्षण अंतर्गत) इंटरनेट स्नेही ब्याटम्यान (१२ वा )
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू) त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला.

बोल एनिथिंग बट अ नो बॉल ...

चौकटराजा ·

मोदक 14/04/2013 - 10:01
भारत - श्रीलंका. वन डे मॅच. भारताला जिंकण्यासाठी १ धाव हवी असताना (व सेहवाग ९९ वर खेळत असताना) लंकेच्या एका बोलरने सेहवागला ९९ वर नाबाद ठेवण्यासाठी व भारताला जिंकून देण्यासाठी (हो! कारण ती ४२ वी वगैरे ओव्हर होती आणि भारत कोणत्याही दृष्टीने मॅच हरवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता!!) मुद्दाम नो बॉल टाकला होता - हा प्रकार आठवला. तो सामना विंडीजने जिंकला असा समज सर्व विंडीज खेळाडूंचा होऊन रात्री सेलेब्रेशन ही झाले. दुसर्‍या दिवशी म्हणे पेपरात याना कळले की सामना बरोबरीत सुटला. हे थोडे अतीरंजीत वाटते आहे.

In reply to by मोदक

चौकटराजा 14/04/2013 - 12:09
@ मोदक ,ही मुलाखत मी पाहिलेली होती. कोणत्यातरी कॅरिबियन सीनच्या बॅकग्राउंडवर सर सोबर्स यांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली होती. त्यात असे काहीसे ते म्हटल्याचे मला नक्की आठवतेय !

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 15/04/2013 - 20:38
>>> भारताला जिंकण्यासाठी १ धाव हवी असताना (व सेहवाग ९९ वर खेळत असताना) लंकेच्या एका बोलरने सेहवागला ९९ वर नाबाद ठेवण्यासाठी व भारताला जिंकून देण्यासाठी (हो! कारण ती ४२ वी वगैरे ओव्हर होती आणि भारत कोणत्याही दृष्टीने मॅच हरवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता!!) मुद्दाम नो बॉल टाकला होता - हा प्रकार आठवला. हा सामना २०१० मध्ये श्रीलंकेत खेळला गेला. तो गोलंदाज सूरज रणदिव होता. त्याला नोबॉल टाकायचा सल्ला कर्णधार कुमार संगकारा व दिलशानने दिला होता. त्याने ठरवून नोबॉल टाकल्याने हा चेंडू टाकताना त्याचा पाय क्रीझच्या तब्बल १ फुटाहून अधिक पुढे होता. या चेंडूवर सेहवागने षटकार मारला. पण नियमानुसार ज्याक्षणी नोबॉल दिला गेला त्याच क्षणी संघाला १ धाव मिळाल्यामुळे भारताने सेहवागने चेंडू मारायच्या आधीच सामना जिंकला व त्यामुळे सेहवागचा षटकार नोंदला न जाता तो ९९ वर नाबाद राहिला. या अखिलाडू घटनेवर बरीच टीका झाल्यामुळे श्रीलंकेने दिलशान व रणदीववर १ सामन्याची बंदी घातली, पण संगकारावर काहीच कारवाई झाली नाही.

पैसा 14/04/2013 - 10:49
मस्त किस्सा. ऐकलेला आहे. अशीच चॅपेल बंधूंच्या अंडर आर्म बॉलची आठवण झाली.

गुलाम 15/04/2013 - 21:01
मला तरी तो स्पॉट फिक्सिंग चा प्रकार वाटला. १ चेंडू, २ धावा असे समीकरण असताना कोणताही गोलंदाज वैध चेंडू टाकायचा प्रयत्न करणार नाही का? शिवाय, त्याचा पाय क्रीजच्या बराच पुढे होता. एवढी मोठी चूक एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजाकडून होणे पटत नाही.

मोदक 14/04/2013 - 10:01
भारत - श्रीलंका. वन डे मॅच. भारताला जिंकण्यासाठी १ धाव हवी असताना (व सेहवाग ९९ वर खेळत असताना) लंकेच्या एका बोलरने सेहवागला ९९ वर नाबाद ठेवण्यासाठी व भारताला जिंकून देण्यासाठी (हो! कारण ती ४२ वी वगैरे ओव्हर होती आणि भारत कोणत्याही दृष्टीने मॅच हरवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता!!) मुद्दाम नो बॉल टाकला होता - हा प्रकार आठवला. तो सामना विंडीजने जिंकला असा समज सर्व विंडीज खेळाडूंचा होऊन रात्री सेलेब्रेशन ही झाले. दुसर्‍या दिवशी म्हणे पेपरात याना कळले की सामना बरोबरीत सुटला. हे थोडे अतीरंजीत वाटते आहे.

In reply to by मोदक

चौकटराजा 14/04/2013 - 12:09
@ मोदक ,ही मुलाखत मी पाहिलेली होती. कोणत्यातरी कॅरिबियन सीनच्या बॅकग्राउंडवर सर सोबर्स यांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली होती. त्यात असे काहीसे ते म्हटल्याचे मला नक्की आठवतेय !

In reply to by मोदक

श्रीगुरुजी 15/04/2013 - 20:38
>>> भारताला जिंकण्यासाठी १ धाव हवी असताना (व सेहवाग ९९ वर खेळत असताना) लंकेच्या एका बोलरने सेहवागला ९९ वर नाबाद ठेवण्यासाठी व भारताला जिंकून देण्यासाठी (हो! कारण ती ४२ वी वगैरे ओव्हर होती आणि भारत कोणत्याही दृष्टीने मॅच हरवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता!!) मुद्दाम नो बॉल टाकला होता - हा प्रकार आठवला. हा सामना २०१० मध्ये श्रीलंकेत खेळला गेला. तो गोलंदाज सूरज रणदिव होता. त्याला नोबॉल टाकायचा सल्ला कर्णधार कुमार संगकारा व दिलशानने दिला होता. त्याने ठरवून नोबॉल टाकल्याने हा चेंडू टाकताना त्याचा पाय क्रीझच्या तब्बल १ फुटाहून अधिक पुढे होता. या चेंडूवर सेहवागने षटकार मारला. पण नियमानुसार ज्याक्षणी नोबॉल दिला गेला त्याच क्षणी संघाला १ धाव मिळाल्यामुळे भारताने सेहवागने चेंडू मारायच्या आधीच सामना जिंकला व त्यामुळे सेहवागचा षटकार नोंदला न जाता तो ९९ वर नाबाद राहिला. या अखिलाडू घटनेवर बरीच टीका झाल्यामुळे श्रीलंकेने दिलशान व रणदीववर १ सामन्याची बंदी घातली, पण संगकारावर काहीच कारवाई झाली नाही.

पैसा 14/04/2013 - 10:49
मस्त किस्सा. ऐकलेला आहे. अशीच चॅपेल बंधूंच्या अंडर आर्म बॉलची आठवण झाली.

गुलाम 15/04/2013 - 21:01
मला तरी तो स्पॉट फिक्सिंग चा प्रकार वाटला. १ चेंडू, २ धावा असे समीकरण असताना कोणताही गोलंदाज वैध चेंडू टाकायचा प्रयत्न करणार नाही का? शिवाय, त्याचा पाय क्रीजच्या बराच पुढे होता. एवढी मोठी चूक एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजाकडून होणे पटत नाही.
कालच दि. १३ एप्रिल २०१३ रोजी आय पी एल मधे बंगलोर व चेन्नई संघात टी २० चा सामना झाला. The game is not finished unless the last ball is bowled.या क्रिकेट मधील कुठेही लिखित न झालेल्या नियमाचा प्रत्यय आला. शेवटच्या चेडूवर २ धावा जिकण्यासाठी चेन्नईला हव्या होत्या.आर पी सिंग ने रवींद्र जडेजाला चेडू टाकला .त्याने तो थर्ड मॅनच्या दिशेने उंचावून मारला. थर्ड मॅनला असलेल्याने तो झेलला. झाले. बंगलोरच्या खेळाडूनी हवेत उंच उड्या मारून सेलेबब्रेशन करायला सुरूवात देखील केली. छोट्या पडद्यावर नवेच द्ष्य दिसू लागले. इकडे पिवळा ड्रेस वाले चेनाईकर ही आनंदाने मैदानाकडे अर्थात विजयी मुदद्रेने धाव घेउ लागले.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

उस सिक्सर की गूंज!

फारएन्ड ·

आदूबाळ 06/03/2013 - 00:25
अप्रतिम लेख, फारएन्ड! 'वह सिक्सर' हा भारत-पाक सामन्यांतला "टिपिंग पॉईंट" होता हे नक्की. त्यापुढील वर्षांत पाक संघाची एकुणातच वाताहत झाली. सचिनने मारलेल्या छ़कडीच्या क्लिपमध्ये कॉमेंटेटर रमीज राजाच्या आवाजातला अविश्वास लपत नाही. तो पहिल्यांदा म्हणतो "शोएबने विड्थ दिली" - सूर असा की असले चेंडू पडल्यावर असा फटका कोणीपण मारेल. नंतर त्याची त्यालाच लाज वाटली असावी बहुदा - "हॅट्स ऑफ" वगैरे सारवासारवी करतो. असले शॉट खरं तर सेहवागची खासियत (होती?) सचिन इथे दाखवून देतो डैडी कोन आहे ते!

उपास 06/03/2013 - 00:35
भारत पाक क्रिकेट संदर्भात दोन गोष्टी - १. अमिर सोहेलचा वेंकटेश प्रसादने काढलेला लकडा.. दिलेले जशास तसे उत्तर.. माज उतरवला त्याने.. भारताचा कॉन्फीडस वाढला तो अशा फाईट बॅक वृत्तीमुळे! २. राजेश चौहानने साकलेन मुश्ताकला (चु भू द्या घ्या) शेवटच्या बॉलवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला होता असं आठवतय..

In reply to by उपास

मोदक 06/03/2013 - 00:43
कानेटकरला विसरलात..? ऐन भरात असलेल्या सकलेनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन बॉलमध्ये तीन रन हव्या असताना फोर मारून मॅच जिंकवली होती पठ्ठ्याने!!!

In reply to by उपास

तो तर १९९७ मध्ये पाकिस्तानातील सामन्यात मारला होता. फक्त शेवटच्या चेंडूऐवजी शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मारल होता. या लेखाद्वारे रोमांचित करणार्‍या अनेक जुन्या आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल फारएन्ड यांचे आभार.

लौंगी मिरची 06/03/2013 - 00:40
ये लगा सिक्सर ! टायिप लेखन . वाचकांची नजर खिळवुन आणि लक्ष पकडुन ठेवणारा लेख . तुमच्याकडुन अजुन वाचायला आवडेल वेगवेगळ्या विषयातलं लेखन . लिहित रहा .

उपास 06/03/2013 - 00:47
थोडसं अवांतर पण - कुणाकडे बाळ पंडित, संत, व्ही. व्ही. करमकर ह्यांनी मराठीत केलेल्या धावत्या समालोजनाची ध्वनिफीत वगैरे कुठे मिळू शकेल काय? "पुढचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर.. किंचित खोलवर टप्पा.. " असे शब्द कानावर आदळतायत :)

In reply to by उपास

चौकटराजा 06/03/2013 - 12:57
आता निकी सलढाणा टिळक रस्त्याच्या बाजूने गोलंदाजीला आले आहेत. त्यांच्या साठी कानिटकर यानी दोन स्लीप....एक गली... एरवी कांगा क्रिकेट मधे दादर युनियन कडून रणजी मधे मुम्बईकडून, दुलीपमधे पश्चिम विभागाकडून खेळणार्‍या फक्त पाच फूट चार इंच उंची असलेल्या सुनील मनोहर गावस्कर याने पहिल्याच षटकात स्क्वेअर लेग व मिडविकेटकडे एक एक धाव व नंतर पाचव्या चेंडूवर समोर द्णकेबाज स्ट्रेट ड्राएव्ह मारला त्यावेळी तीस हजार मुबईकराना १९४६ चा विजय मर्चंट यांच्या खेळीची आठवण निश्चिततच झाली असेल. ( हे पेपरातील समालोचन कोणाचे असेल बरं ??? )

उपास 06/03/2013 - 01:14
फारेंण्डा, तू जी एक मार्चची मॅच म्हणतोयस त्यात द्रविड युवी नाही तर कैफ - युवी खेळले होते असं आठवतय..शोधायला हवं!

In reply to by उपास

पैसा 06/03/2013 - 09:16
कैफने महत्त्वाची इनिंग खेळली होती ३५ धावांची पण पाकिस्तानला पोचवण्याचे काम द्रविड आणि युवराजने पार पाडले होते. http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65268.html इथे पूर्ण धावफलक आणि कॉमेंटरी उपलब्ध आहे. फारेण्डाचे लिखाण मस्तच! सचिन पाकिस्तानसाठी नेहमीच स्पेशल राखून ठेवतो. पण "फक्त पाकिस्तानविरुद्ध आउट झालो तर चालायला लागणार नाही" आणि "आपल्यावर हल्ले करणार्‍या पाकिस्तानविरुद्ध अजिबात मॅचेस खेळू नका" म्हणणार्‍या गावस्करचा ख्डूसपणा मला जास्त आवडतो.

अप्रतिम लेख, सकाळीसकाळी मजा आली वाचायला. भारत-पाकिस्तानच्या सर्वात कटू आठवणी शारजाच्या सामन्यात भरल्या असाव्यात, तसेच शुक्रवारी आपण त्यांच्याशी हरायचोच हरायचो. ८०-९० च्या दशकातील तो काळ खरेच भारत-पाक सामना बघणे नकोसे वाटायचे असे लाजिरवाणे हरायचो. पाकिस्तानी खेळाडूंची जिद्द मानायला हवी हा तेव्हाचा ठरलेला डायलॉग. पण आपण त्यांच्याबरोबर पुचाट खेळायचो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. उलट सुलट बरेच लिहिता येईळ इथे. बर्‍याच आठवणी जागवल्या या लेखाने. माझा सर्वात आवडता खेळाडू दादा गांगुली याने टोरेंटोमध्ये पाकिस्तानची लावलेली वाट निव्वळ अविस्मरणीय. मात्र सचिनच्या त्या इनिंगने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची लावलेली वाट हा खरेच एक टर्निग पॉईंट होता कारण भारतीय क्रिकेट रसिक जगात कोणावर मी जळत असतील तर ते पाकी वेगवान गोलंदाजांवर. पुढे द्रविड आणि युवराजच्या भागीदारीचा उल्लेखही योग्यच. ती देखील तितकीच महत्वाची, कारण तिथे घाण केली असती आणि रडतखडत जिंकलो असतो तर त्या सामन्याचा तितका इंम्पॅक्ट राहिला नसता. आज २०-२० च्या जमान्यात मात्र आक्रमकता हाच सर्वात मोठा गुण झाल्याने सगळी परिमाणेच बदलली आहेत. त्यामुळे युवराज-कोहली सारख्यांच्या उद्धटपणाबद्दल केलेली टिप्पणीदेखील योग्यच.

अप्रतिम लेख. भारतीय वृत्तीत झालेल्या या बदलाच श्रेय सौरव गांगुली ला द्यायला हवे. दादाने आपली देह्बोलिच (ऑन द ग्राउंड आणि ऑफ द ग्राउंड) बदलून टाकली. पाकिस्तान तर पाकिस्तान या दादाने ऑस्ट्रेलिया ला पण आपला हिसका दावला. तसेच भारताचा क्रिकेट मधला आर्थिक वाटा खूप वाढला. त्याचा परिणाम पण आपले मनोबल वाढण्यात झाला.

सचिनची सिक्सर म्हटली की डोळ्यासमोर येतो अब्दुल कादीर धूर्त कोल्हा ज्याचा गुगली खुद खुदा सुद्धा सांगू शकत नाही की कधी फलंदाजाला डसेल. त्याने १६ वर्षाच्या मुलाला सांगितले , तुला तुझे नाव करायचे असेल तर मला ह्या ओवर मध्ये सिक्सर मारून दाखव , पुढे मुलाखतीत कादीर म्हणाला देखील माझ्या सारख्या विख्यात गोलंदाजाला सिक्सर मारली तर त्याचे नक्कीच नाव झाले असते, म्हणून मी त्याला तसे म्हणालो. पण अल्ला कसम मी त्याला एकाही चेंडू सहज टाकला नव्हता. त्याने लागोपाठ च्या सिकस मारल्या त्याने पाकिस्तानी स्टेडियम मध्ये मरणप्राय शांतता पसरली. इतना सन्नाटा क्यो हे भाई असा प्रश्न विचारायची पाळी आली. ह्या आधी एवढा आक्रमक पणा ह्या आधी कोणालाच जमला नव्हता. नाही म्हणायला ऐन उमेदीत इंग्लंड विरुद्ध फोलो ऑन टाळण्यासाठी कपिल ने सलग ४ सिक्सर मारले होते , पण पाकिस्तान विरुद्ध मात्र सगळ्यांची गात्र शिथिल व्हायची. गावस्करचा वारसा चालवणार असे म्हणणारे सचिन चे त्यावेळचे चाहते व समीक्षक ह्यांनी आता एक नवीन वारसा नवे पर्व सुरु झाल्याचे मान्य केले. आक्रमता व कलात्मकता ह्यांचा अभूतपूर्व संगम चेतन असो किंवा कादिर एक सिक्सर आदमी का करियर तबाह कर देता हे. हेच सिद्ध झाले

In reply to by निनाद मुक्काम …

आदूबाळ 06/03/2013 - 18:45
एक सिक्सर आदमी का करियर तबाह कर देता हे.
अजून दोन उदाहरणे - हेन्री ओलोंगा आणि क्रेग मॅकडरमॉट

In reply to by आदूबाळ

मनोज प्रभाकर - १९९६ विश्वचषकाआधी अष्टपैलू म्हणून ओळखला जाऊ लागला होता कारण सलामीला येऊन शतक केले होते. त्याच्यासारखे यॉर्कर आजही इतर भारतीय गोलंदाज टाकू शकत नसावेत. मर्यादित गुणवत्ता असली तरी एक उपयुक्त गोलंदाज नक्कीच होता. पण १९९६ च्या विश्वचषकातील लंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात सनथ जयसुर्याने त्याची अशी काही धुलाई केली की अचानक मध्यम-द्रुतगतीवरून त्याला फिरकी गोलंदाजी करावी लागली. अन तो त्याचा अखेरचा सामना ठरला.

तर्री 06/03/2013 - 15:51
जाम आवडला. अशीच एक खेळी इंग्लंड वल्ड कप मध्ये "गांगुली -द्रविड " ने श्रीलंकेविरुद्ध केली होती. दोघांनी कुटून काढले होते.

चौकटराजा 06/03/2013 - 20:08
भारतीय शालेय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्यात सईद किरमाणी , सुरिंदर अमरनाथ हे होते.एका सामन्यात जिंकायला ११ धावा हव्या होत्या व फक्त दोन चेंडू बाकी असताना सुरींदरने दोन षटकार मारून विजय खेचून आणला.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 06/03/2013 - 20:16
लाला अमरनाथचे ३ मुलगे. सुरिंदर विकेटकीपर, मोहिंदर अष्टपैलू आणि तिसरा राजिंदर बहुधा बॉलर होता. मोठे दोघे कसोटी खेळले. धाकटा रणजी खेळाडू.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौकटराजा 06/03/2013 - 20:19
ते जरी फार कसोटी क्रिकेट खेळले नाहीत तरी आपल्या पहिल्याच कसोटीत शतक करणार्‍या भारतीयात ते समाविष्ट आहेत.

श्रीगुरुजी 06/03/2013 - 20:25
षटकारांनी बरीच धमाल केलेली आहे. अलिकडच्या काळात २००७ मध्ये इंग्लंडच्या मॅस्कॅरॅन्हासने युवराजच्या एका षटकात ५ षटकार मारले होते. युवीने त्याचा बदला २००७ मध्येच ट-२० च्या विश्वचषकात स्टूअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारून घेतला होता. काही आठवड्यांपूर्वी विंडीजच्या सुनील नारायणने कांगारूंच्या मॅक्सवेलच्या एका षटकात लागोपाठ ४ षटकार मारले होते. १९८३ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत भारत इंग्लंडच्या २१३ धावांचा पाठलाग करताना ३९ षटकात २ बाद १०९ वर पोचला होता. धावा अतिशय संथ होत होत्या (प्रत्येक षटकात जेमतेम २-३ धावा निघत होत्या). शेवटच्या २१ षटकात १०५ धावा हव्या होत्या (तो सामना ६० षटकांचा होता). प्रतिषट्क ५ धावा हा त्या काळात खूप मोठा रनरेट होता. ४० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यशपाल शर्माने विलीसचा चेंडू फ्लिक करून स्क्वेअर लेगला षटकार मारल्यावर फटक्यांची दिवाळी सुरू झाली. नंतर संदीप पाटिल व कपिलने विलीसच्या एका षटकात ४-४ चौकार मारून शेवटी ६ षटके राखून सामना भारताला जिंकून दिला. यशपाल शर्माच्या षटकारानेच पुढच्या फटक्यांची बत्ती लावली होती.

शारजा मध्ये क्रिकेट चा फड रंगू लागला. डी आपल्या बॉलीवूड सहकार्‍यांच्या सोबत तमाम भारतीयांना टीव्ही वर दिसायला लागला. अरुण गवळी व मुंबई पोलिस त्याला दुबईत गाठायचा कसा ह्या विचारात मग्न होते , मियादाद ने सिक्सर मारला तेव्हा डी चक्क मैदानात धावत आला व मियादाद ला घट्ट मिठी मारली. बहुदा तेव्हाच त्याला आपला नातेवाईक करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली असेल. मग सुरु झाला पैशाचा खेळ , जुगार आणि अझर , मोंगिया , जडेजा आणि संशयित कपिल व प्रभाकर अशी नावे काळाच्या ओघात आपल्या समोर आली शेवटी भारताने गल्फ मध्ये क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात पाकिस्तान १३ खेळाडू सह आपल्याविरुद्ध खेळायचा, अकिब जावेद ची हेटत्रिक आठवते, सचिन सह एल बी डब्ल्यू अक्षरशः ढापले होते.

बघता - बघता दहा वर्षं झालीही? अजूनही असं वाटतंय की कालच तो सामना पाहिला होता :) 'बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस'मधे पहाटे पहाटे चुरचुरत्या डोळ्यांनी मॅच बघताना कपिलने स्विंगिंग यॉर्करवर मुदस्सर नझरचा त्रिफळा उडवलेला आठवतोय :)

नाखु 24/11/2015 - 08:55
हा लेख कसा नजरेतून सुटला तेच कळत नाही... सचिन-लक्ष्मण-द्रवीड कायम बॅट्नेच उत्तर देत आणि अचूक हल्ला करीत, पंचकडीचा पंखा

आदूबाळ 06/03/2013 - 00:25
अप्रतिम लेख, फारएन्ड! 'वह सिक्सर' हा भारत-पाक सामन्यांतला "टिपिंग पॉईंट" होता हे नक्की. त्यापुढील वर्षांत पाक संघाची एकुणातच वाताहत झाली. सचिनने मारलेल्या छ़कडीच्या क्लिपमध्ये कॉमेंटेटर रमीज राजाच्या आवाजातला अविश्वास लपत नाही. तो पहिल्यांदा म्हणतो "शोएबने विड्थ दिली" - सूर असा की असले चेंडू पडल्यावर असा फटका कोणीपण मारेल. नंतर त्याची त्यालाच लाज वाटली असावी बहुदा - "हॅट्स ऑफ" वगैरे सारवासारवी करतो. असले शॉट खरं तर सेहवागची खासियत (होती?) सचिन इथे दाखवून देतो डैडी कोन आहे ते!

उपास 06/03/2013 - 00:35
भारत पाक क्रिकेट संदर्भात दोन गोष्टी - १. अमिर सोहेलचा वेंकटेश प्रसादने काढलेला लकडा.. दिलेले जशास तसे उत्तर.. माज उतरवला त्याने.. भारताचा कॉन्फीडस वाढला तो अशा फाईट बॅक वृत्तीमुळे! २. राजेश चौहानने साकलेन मुश्ताकला (चु भू द्या घ्या) शेवटच्या बॉलवर सिक्स मारुन विजय मिळवून दिला होता असं आठवतय..

In reply to by उपास

मोदक 06/03/2013 - 00:43
कानेटकरला विसरलात..? ऐन भरात असलेल्या सकलेनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन बॉलमध्ये तीन रन हव्या असताना फोर मारून मॅच जिंकवली होती पठ्ठ्याने!!!

In reply to by उपास

तो तर १९९७ मध्ये पाकिस्तानातील सामन्यात मारला होता. फक्त शेवटच्या चेंडूऐवजी शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मारल होता. या लेखाद्वारे रोमांचित करणार्‍या अनेक जुन्या आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल फारएन्ड यांचे आभार.

लौंगी मिरची 06/03/2013 - 00:40
ये लगा सिक्सर ! टायिप लेखन . वाचकांची नजर खिळवुन आणि लक्ष पकडुन ठेवणारा लेख . तुमच्याकडुन अजुन वाचायला आवडेल वेगवेगळ्या विषयातलं लेखन . लिहित रहा .

उपास 06/03/2013 - 00:47
थोडसं अवांतर पण - कुणाकडे बाळ पंडित, संत, व्ही. व्ही. करमकर ह्यांनी मराठीत केलेल्या धावत्या समालोजनाची ध्वनिफीत वगैरे कुठे मिळू शकेल काय? "पुढचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर.. किंचित खोलवर टप्पा.. " असे शब्द कानावर आदळतायत :)

In reply to by उपास

चौकटराजा 06/03/2013 - 12:57
आता निकी सलढाणा टिळक रस्त्याच्या बाजूने गोलंदाजीला आले आहेत. त्यांच्या साठी कानिटकर यानी दोन स्लीप....एक गली... एरवी कांगा क्रिकेट मधे दादर युनियन कडून रणजी मधे मुम्बईकडून, दुलीपमधे पश्चिम विभागाकडून खेळणार्‍या फक्त पाच फूट चार इंच उंची असलेल्या सुनील मनोहर गावस्कर याने पहिल्याच षटकात स्क्वेअर लेग व मिडविकेटकडे एक एक धाव व नंतर पाचव्या चेंडूवर समोर द्णकेबाज स्ट्रेट ड्राएव्ह मारला त्यावेळी तीस हजार मुबईकराना १९४६ चा विजय मर्चंट यांच्या खेळीची आठवण निश्चिततच झाली असेल. ( हे पेपरातील समालोचन कोणाचे असेल बरं ??? )

उपास 06/03/2013 - 01:14
फारेंण्डा, तू जी एक मार्चची मॅच म्हणतोयस त्यात द्रविड युवी नाही तर कैफ - युवी खेळले होते असं आठवतय..शोधायला हवं!

In reply to by उपास

पैसा 06/03/2013 - 09:16
कैफने महत्त्वाची इनिंग खेळली होती ३५ धावांची पण पाकिस्तानला पोचवण्याचे काम द्रविड आणि युवराजने पार पाडले होते. http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65268.html इथे पूर्ण धावफलक आणि कॉमेंटरी उपलब्ध आहे. फारेण्डाचे लिखाण मस्तच! सचिन पाकिस्तानसाठी नेहमीच स्पेशल राखून ठेवतो. पण "फक्त पाकिस्तानविरुद्ध आउट झालो तर चालायला लागणार नाही" आणि "आपल्यावर हल्ले करणार्‍या पाकिस्तानविरुद्ध अजिबात मॅचेस खेळू नका" म्हणणार्‍या गावस्करचा ख्डूसपणा मला जास्त आवडतो.

अप्रतिम लेख, सकाळीसकाळी मजा आली वाचायला. भारत-पाकिस्तानच्या सर्वात कटू आठवणी शारजाच्या सामन्यात भरल्या असाव्यात, तसेच शुक्रवारी आपण त्यांच्याशी हरायचोच हरायचो. ८०-९० च्या दशकातील तो काळ खरेच भारत-पाक सामना बघणे नकोसे वाटायचे असे लाजिरवाणे हरायचो. पाकिस्तानी खेळाडूंची जिद्द मानायला हवी हा तेव्हाचा ठरलेला डायलॉग. पण आपण त्यांच्याबरोबर पुचाट खेळायचो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. उलट सुलट बरेच लिहिता येईळ इथे. बर्‍याच आठवणी जागवल्या या लेखाने. माझा सर्वात आवडता खेळाडू दादा गांगुली याने टोरेंटोमध्ये पाकिस्तानची लावलेली वाट निव्वळ अविस्मरणीय. मात्र सचिनच्या त्या इनिंगने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची लावलेली वाट हा खरेच एक टर्निग पॉईंट होता कारण भारतीय क्रिकेट रसिक जगात कोणावर मी जळत असतील तर ते पाकी वेगवान गोलंदाजांवर. पुढे द्रविड आणि युवराजच्या भागीदारीचा उल्लेखही योग्यच. ती देखील तितकीच महत्वाची, कारण तिथे घाण केली असती आणि रडतखडत जिंकलो असतो तर त्या सामन्याचा तितका इंम्पॅक्ट राहिला नसता. आज २०-२० च्या जमान्यात मात्र आक्रमकता हाच सर्वात मोठा गुण झाल्याने सगळी परिमाणेच बदलली आहेत. त्यामुळे युवराज-कोहली सारख्यांच्या उद्धटपणाबद्दल केलेली टिप्पणीदेखील योग्यच.

अप्रतिम लेख. भारतीय वृत्तीत झालेल्या या बदलाच श्रेय सौरव गांगुली ला द्यायला हवे. दादाने आपली देह्बोलिच (ऑन द ग्राउंड आणि ऑफ द ग्राउंड) बदलून टाकली. पाकिस्तान तर पाकिस्तान या दादाने ऑस्ट्रेलिया ला पण आपला हिसका दावला. तसेच भारताचा क्रिकेट मधला आर्थिक वाटा खूप वाढला. त्याचा परिणाम पण आपले मनोबल वाढण्यात झाला.

सचिनची सिक्सर म्हटली की डोळ्यासमोर येतो अब्दुल कादीर धूर्त कोल्हा ज्याचा गुगली खुद खुदा सुद्धा सांगू शकत नाही की कधी फलंदाजाला डसेल. त्याने १६ वर्षाच्या मुलाला सांगितले , तुला तुझे नाव करायचे असेल तर मला ह्या ओवर मध्ये सिक्सर मारून दाखव , पुढे मुलाखतीत कादीर म्हणाला देखील माझ्या सारख्या विख्यात गोलंदाजाला सिक्सर मारली तर त्याचे नक्कीच नाव झाले असते, म्हणून मी त्याला तसे म्हणालो. पण अल्ला कसम मी त्याला एकाही चेंडू सहज टाकला नव्हता. त्याने लागोपाठ च्या सिकस मारल्या त्याने पाकिस्तानी स्टेडियम मध्ये मरणप्राय शांतता पसरली. इतना सन्नाटा क्यो हे भाई असा प्रश्न विचारायची पाळी आली. ह्या आधी एवढा आक्रमक पणा ह्या आधी कोणालाच जमला नव्हता. नाही म्हणायला ऐन उमेदीत इंग्लंड विरुद्ध फोलो ऑन टाळण्यासाठी कपिल ने सलग ४ सिक्सर मारले होते , पण पाकिस्तान विरुद्ध मात्र सगळ्यांची गात्र शिथिल व्हायची. गावस्करचा वारसा चालवणार असे म्हणणारे सचिन चे त्यावेळचे चाहते व समीक्षक ह्यांनी आता एक नवीन वारसा नवे पर्व सुरु झाल्याचे मान्य केले. आक्रमता व कलात्मकता ह्यांचा अभूतपूर्व संगम चेतन असो किंवा कादिर एक सिक्सर आदमी का करियर तबाह कर देता हे. हेच सिद्ध झाले

In reply to by निनाद मुक्काम …

आदूबाळ 06/03/2013 - 18:45
एक सिक्सर आदमी का करियर तबाह कर देता हे.
अजून दोन उदाहरणे - हेन्री ओलोंगा आणि क्रेग मॅकडरमॉट

In reply to by आदूबाळ

मनोज प्रभाकर - १९९६ विश्वचषकाआधी अष्टपैलू म्हणून ओळखला जाऊ लागला होता कारण सलामीला येऊन शतक केले होते. त्याच्यासारखे यॉर्कर आजही इतर भारतीय गोलंदाज टाकू शकत नसावेत. मर्यादित गुणवत्ता असली तरी एक उपयुक्त गोलंदाज नक्कीच होता. पण १९९६ च्या विश्वचषकातील लंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात सनथ जयसुर्याने त्याची अशी काही धुलाई केली की अचानक मध्यम-द्रुतगतीवरून त्याला फिरकी गोलंदाजी करावी लागली. अन तो त्याचा अखेरचा सामना ठरला.

तर्री 06/03/2013 - 15:51
जाम आवडला. अशीच एक खेळी इंग्लंड वल्ड कप मध्ये "गांगुली -द्रविड " ने श्रीलंकेविरुद्ध केली होती. दोघांनी कुटून काढले होते.

चौकटराजा 06/03/2013 - 20:08
भारतीय शालेय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्यात सईद किरमाणी , सुरिंदर अमरनाथ हे होते.एका सामन्यात जिंकायला ११ धावा हव्या होत्या व फक्त दोन चेंडू बाकी असताना सुरींदरने दोन षटकार मारून विजय खेचून आणला.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 06/03/2013 - 20:16
लाला अमरनाथचे ३ मुलगे. सुरिंदर विकेटकीपर, मोहिंदर अष्टपैलू आणि तिसरा राजिंदर बहुधा बॉलर होता. मोठे दोघे कसोटी खेळले. धाकटा रणजी खेळाडू.

In reply to by श्रीरंग_जोशी

चौकटराजा 06/03/2013 - 20:19
ते जरी फार कसोटी क्रिकेट खेळले नाहीत तरी आपल्या पहिल्याच कसोटीत शतक करणार्‍या भारतीयात ते समाविष्ट आहेत.

श्रीगुरुजी 06/03/2013 - 20:25
षटकारांनी बरीच धमाल केलेली आहे. अलिकडच्या काळात २००७ मध्ये इंग्लंडच्या मॅस्कॅरॅन्हासने युवराजच्या एका षटकात ५ षटकार मारले होते. युवीने त्याचा बदला २००७ मध्येच ट-२० च्या विश्वचषकात स्टूअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारून घेतला होता. काही आठवड्यांपूर्वी विंडीजच्या सुनील नारायणने कांगारूंच्या मॅक्सवेलच्या एका षटकात लागोपाठ ४ षटकार मारले होते. १९८३ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत भारत इंग्लंडच्या २१३ धावांचा पाठलाग करताना ३९ षटकात २ बाद १०९ वर पोचला होता. धावा अतिशय संथ होत होत्या (प्रत्येक षटकात जेमतेम २-३ धावा निघत होत्या). शेवटच्या २१ षटकात १०५ धावा हव्या होत्या (तो सामना ६० षटकांचा होता). प्रतिषट्क ५ धावा हा त्या काळात खूप मोठा रनरेट होता. ४० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यशपाल शर्माने विलीसचा चेंडू फ्लिक करून स्क्वेअर लेगला षटकार मारल्यावर फटक्यांची दिवाळी सुरू झाली. नंतर संदीप पाटिल व कपिलने विलीसच्या एका षटकात ४-४ चौकार मारून शेवटी ६ षटके राखून सामना भारताला जिंकून दिला. यशपाल शर्माच्या षटकारानेच पुढच्या फटक्यांची बत्ती लावली होती.

शारजा मध्ये क्रिकेट चा फड रंगू लागला. डी आपल्या बॉलीवूड सहकार्‍यांच्या सोबत तमाम भारतीयांना टीव्ही वर दिसायला लागला. अरुण गवळी व मुंबई पोलिस त्याला दुबईत गाठायचा कसा ह्या विचारात मग्न होते , मियादाद ने सिक्सर मारला तेव्हा डी चक्क मैदानात धावत आला व मियादाद ला घट्ट मिठी मारली. बहुदा तेव्हाच त्याला आपला नातेवाईक करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली असेल. मग सुरु झाला पैशाचा खेळ , जुगार आणि अझर , मोंगिया , जडेजा आणि संशयित कपिल व प्रभाकर अशी नावे काळाच्या ओघात आपल्या समोर आली शेवटी भारताने गल्फ मध्ये क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात पाकिस्तान १३ खेळाडू सह आपल्याविरुद्ध खेळायचा, अकिब जावेद ची हेटत्रिक आठवते, सचिन सह एल बी डब्ल्यू अक्षरशः ढापले होते.

बघता - बघता दहा वर्षं झालीही? अजूनही असं वाटतंय की कालच तो सामना पाहिला होता :) 'बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस'मधे पहाटे पहाटे चुरचुरत्या डोळ्यांनी मॅच बघताना कपिलने स्विंगिंग यॉर्करवर मुदस्सर नझरचा त्रिफळा उडवलेला आठवतोय :)

नाखु 24/11/2015 - 08:55
हा लेख कसा नजरेतून सुटला तेच कळत नाही... सचिन-लक्ष्मण-द्रवीड कायम बॅट्नेच उत्तर देत आणि अचूक हल्ला करीत, पंचकडीचा पंखा
पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी... गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही!

एंड्युरो ३

बाळ सप्रे ·

एक वारी भाग घेतल्या गेल्या आहे या स्पर्धेत. बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीवही संयोजनात होते त्या वेळेस. शारीरीक कश्टाची विषेश तमा नसल्याने स्पर्धा ठिकठाक पुर्ण झाली. पण सालं ते एन.डि.ए की कसलं मिल्टरी स्कुलच्या गाप्ट्यांम्होरं कोनाचाच टिकाव न्हाइ लागल्या. तेच जिंकु राय्लेन नेमी ? या टाइमास कोन जिंक्ल ?

In reply to by अग्निकोल्हा

बाळ सप्रे 15/02/2013 - 10:22
मिलिटरी किंवा तत्सम लोकांना फक्त "ओपन" गटात भाग घेता येतो. यावेळचे विजेते त्यांच्यापैकी नसून आगाशे महाविद्यालयातील आहेत.

चिंतामणी 15/02/2013 - 09:07
अनुभव कथन छान आहे. पण त्या स्पर्धेत अनेक गट होते. कुठल्या गटात समावेश होता?

In reply to by चिंतामणी

बाळ सप्रे 15/02/2013 - 10:18
गट खूप होते.. आम्ही "कॉर्पोरेट ऑल मेन" गटात होतो. यात ३५ टीम्स होत्या. ओपन , अ‍ॅमॅचुअर, कॉर्पोरेट, आयटी, कॉलेजिअन, मेडीआ, डॉक्टर, टीचर, फॅमिली, ४०+, ज्युनिअर अशा सगळ्या मिळून १८० टीम्स होत्या.

पिंगू 15/02/2013 - 16:31
सप्रेबुवा भारीच आहे. मला तरी यामध्ये इंटरेस्ट आहे. सध्या तरी मी फक्त हौस म्हणून रोज २२ किमीपर्यंत सायकल पळवतो आणि तेही ऑफिसमध्ये लवकर जाता यावे म्हणून. - पिंगू

एक वारी भाग घेतल्या गेल्या आहे या स्पर्धेत. बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीवही संयोजनात होते त्या वेळेस. शारीरीक कश्टाची विषेश तमा नसल्याने स्पर्धा ठिकठाक पुर्ण झाली. पण सालं ते एन.डि.ए की कसलं मिल्टरी स्कुलच्या गाप्ट्यांम्होरं कोनाचाच टिकाव न्हाइ लागल्या. तेच जिंकु राय्लेन नेमी ? या टाइमास कोन जिंक्ल ?

In reply to by अग्निकोल्हा

बाळ सप्रे 15/02/2013 - 10:22
मिलिटरी किंवा तत्सम लोकांना फक्त "ओपन" गटात भाग घेता येतो. यावेळचे विजेते त्यांच्यापैकी नसून आगाशे महाविद्यालयातील आहेत.

चिंतामणी 15/02/2013 - 09:07
अनुभव कथन छान आहे. पण त्या स्पर्धेत अनेक गट होते. कुठल्या गटात समावेश होता?

In reply to by चिंतामणी

बाळ सप्रे 15/02/2013 - 10:18
गट खूप होते.. आम्ही "कॉर्पोरेट ऑल मेन" गटात होतो. यात ३५ टीम्स होत्या. ओपन , अ‍ॅमॅचुअर, कॉर्पोरेट, आयटी, कॉलेजिअन, मेडीआ, डॉक्टर, टीचर, फॅमिली, ४०+, ज्युनिअर अशा सगळ्या मिळून १८० टीम्स होत्या.

पिंगू 15/02/2013 - 16:31
सप्रेबुवा भारीच आहे. मला तरी यामध्ये इंटरेस्ट आहे. सध्या तरी मी फक्त हौस म्हणून रोज २२ किमीपर्यंत सायकल पळवतो आणि तेही ऑफिसमध्ये लवकर जाता यावे म्हणून. - पिंगू
जिममधे विकास सरांनी विचारेपर्यन्त "एन्ड्युरो३" स्पर्धेमधे भाग घेइन असं कधी वाटलच नव्हतं. एन्ड्युरो३ विषयी खूप ऐकुन होतो. गेले ८-१० महिने निखिल शहा आणि पुणे रनिंग ग्रुपमुळे धावण्याची आवड निर्माण झाली होती. स्टॅमिनाही बर्‍यापैकी वाढला होता. या ग्रुपची ओळखही विकासनीच करुन दिली होती. तेव्हापासुन १० वेळातरी अर्धमॅरॅथॉन (२१किमी) धावलो होतो. एकदा मॅरॅथॉन आयोजनाचा अनुभवही घेतला होता. निखिल सायकलिंग्,रनिंग, ट्रेकींगमध्ये खूपच माहीर आहे. बर्‍याच स्पर्धा त्याने जिंकल्याही आहेत. पण त्याचे खरे वेड आहे ते या सगळ्या गोष्टींच इतरांना वेड लावण्यात.

उंटांची चालच तिरकी!

चतुरंग ·

पहिल्यांदा लेख न वाचताच नुसता भरभर खेळून बघितला. आनंदचा खेळ म्हणजे अक्षरशः 'सर को कफन बॉंधे हुए' चालू आहे असं वाटत होतं. सतत 'अरे हा हत्ती खा की. तेवढं नाही पुरे? मग हे घे, घोडा खा.. आणि हा उंट कसा वाटतो... ' आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पांढरा त्यातलं काहीच खायला घाबरत होता. कसला घुमवलाय त्याला... अगदी एखाद्या शाळकरी पोरासारखी परिस्थिती करून ठेवली. त्या इम्मॉर्टल गेमची आठवण झाली. मस्त.

राही 11/02/2013 - 00:19
बुद्धिबळातले काहीही समजत नसूनसुद्धा आपल्या लेखातून एखाद्या युद्धकथेचा थरार अनुभवास आला.आनंदचे धाडस आपण शब्दांत अचूक पकडले आहे.

In reply to by मुक्त विहारि

सोत्रि 13/02/2013 - 09:47
हेच म्हणतो! -(रंगाकाकांचा पंखा) सोकाजी

आदूबाळ 11/02/2013 - 02:29
ती शेवटची आकृती नीट चालत नाही आहे. चतुरंगजी, त्या आकृतीचा दुवा द्याल तर उपकार होतील.

स्पंदना 11/02/2013 - 05:52
तुमच्या लेखणीला सलाम! चतुरंग बुद्धीबळ म्हण्टल की तुमची लेखणी अशी झुळ्झुळ वाहु लागते, मग त्यात सगळ्या खेळांची अगदी समरस होउन वर्णनं येतात.

मन१ 11/02/2013 - 08:30
निव्वळ अशक्य असा डाव. असा धुमाकूळ पहायला मिळणे म्हणजे नशीबाचे सार्थक. परवाच कुठल्यातरी मराठी ब्लॉगवर ह्याच डावाबद्दल वाचलं; आणि खेळ्या पाहून डोके चक्रावून गेले. हत्ती वाचावायचे सोडून उंट काय, घोडा काय देत सुटणे हे स्वतः वेडा असण्याचे किंवा सम्रोअच्याला वेड लावण्याचेच उद्योग आहेत.

मस्तच !! चतुरंगराव आग्रहाची विनंती ...अजुन लिहित चला ! आम्ही वाचत आहोत ! (आणि लिहिणारच असाल तर मॉर्फीसाहेबांच्या गेम्स ने सुरुवात करा ही आगाऊ विनंती )

सुरेख डाव आणि सुंदर वर्णन. पूर्ण डाव खेळून पहिला तेव्हा बराचसा कळला. पण वरून १५ अजून प्रश्न पडले. अमुक वेळेला एखादी विशिष्ट चाल का नाही केली ते कळले नाही. ते सगळे विचारायचे म्हणजे रंगकाकांची शिकवणी लावावी लागेल.

नानबा 13/02/2013 - 10:01
अप्रतिम... भारतात धुपाटण्याने धुणी कशी धुतात याचं बसल्या जागी प्रत्यंतर आलं असेल त्या लॅवॉनला.. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला.. :) :) आहेतच भारतीय तसे हुश्शार..

चतुरंग 13/02/2013 - 16:50
पुढची स्पर्धा कँडिडेट चँपिअनशिप, लंडन इथे मार्च १५ ते एप्रिल १ अशी भरणार आहे. सहभागी खेळाडूंची यादी बघूनच रसिकांच्या तोंडाला पाणी सुटावे अशी परिस्थिती आहे - मॅग्नुस कार्लसन, लेवॉन अरोनिअन, बोरिस गेल्फंड, अलेक्झांडर ग्रिश्चुक, वॅसिली इवन्चुक, व्लादिमीर क्रामनिक, तैमूर रादजाबोव आणि पीटर स्विडलर! या स्पर्धेचा विजेता २०१४ साली होणार्‍या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत आनंदचा प्रतिस्पर्धी असेल! म्हणजे काय जिगरीने स्पर्धा खेळली जाईल याचा अंदाज येऊ शकेल. मॅग्नुस कार्लसन आणि लेवॉन अरोनिअन या दोघांपैकी एक जिंकेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे, पण अनेकदा आश्चर्यकारक निकालही लागतात! सामन्यांचं वर्णन देण्याचा प्रयत्न जरुर असेल. पुरेसा वेळ आणि रमतारामांसारखा एखादा साथिदार मिळाला तर कळीच्या सामन्यांचं धावतं समालोचन करण्याचाही प्रयत्न असेल! :) धन्यवाद! -चतुरंग

धनंजय 14/02/2013 - 05:14
आणि चतुरंगांच्या धावत्या वर्णनामुळे अधिक समजला. (बी७ वरचा उंट किती महत्त्वाचा आहे, ते अगदी शेवटच्या ३-४ खेळ्यांपर्यंत माझ्या लक्षात आले नव्हते. १२व्या खेळीतील c5 चा इतक्या दूरपर्यंत जाणारा स्ट्रॅटिजिक परिणाम!)

ऋषिकेश 14/02/2013 - 08:53
आरामात वाचायला म्हणून बाजुला ठवला होता. सगळ्यांसारखं आमचं डोस्क चटाचटा चालं न्हाई म्हणून दमानं एकेक खेळी करून बघत मग लेख वाचला.. ज्याम मजा आली!!! रंगरावांनी लाईव्ह सामन्याची कॉमेंट्री करावी तशा उत्साहात लेखन केलयं!.. मस्तच!

पहिल्यांदा लेख न वाचताच नुसता भरभर खेळून बघितला. आनंदचा खेळ म्हणजे अक्षरशः 'सर को कफन बॉंधे हुए' चालू आहे असं वाटत होतं. सतत 'अरे हा हत्ती खा की. तेवढं नाही पुरे? मग हे घे, घोडा खा.. आणि हा उंट कसा वाटतो... ' आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पांढरा त्यातलं काहीच खायला घाबरत होता. कसला घुमवलाय त्याला... अगदी एखाद्या शाळकरी पोरासारखी परिस्थिती करून ठेवली. त्या इम्मॉर्टल गेमची आठवण झाली. मस्त.

राही 11/02/2013 - 00:19
बुद्धिबळातले काहीही समजत नसूनसुद्धा आपल्या लेखातून एखाद्या युद्धकथेचा थरार अनुभवास आला.आनंदचे धाडस आपण शब्दांत अचूक पकडले आहे.

In reply to by मुक्त विहारि

सोत्रि 13/02/2013 - 09:47
हेच म्हणतो! -(रंगाकाकांचा पंखा) सोकाजी

आदूबाळ 11/02/2013 - 02:29
ती शेवटची आकृती नीट चालत नाही आहे. चतुरंगजी, त्या आकृतीचा दुवा द्याल तर उपकार होतील.

स्पंदना 11/02/2013 - 05:52
तुमच्या लेखणीला सलाम! चतुरंग बुद्धीबळ म्हण्टल की तुमची लेखणी अशी झुळ्झुळ वाहु लागते, मग त्यात सगळ्या खेळांची अगदी समरस होउन वर्णनं येतात.

मन१ 11/02/2013 - 08:30
निव्वळ अशक्य असा डाव. असा धुमाकूळ पहायला मिळणे म्हणजे नशीबाचे सार्थक. परवाच कुठल्यातरी मराठी ब्लॉगवर ह्याच डावाबद्दल वाचलं; आणि खेळ्या पाहून डोके चक्रावून गेले. हत्ती वाचावायचे सोडून उंट काय, घोडा काय देत सुटणे हे स्वतः वेडा असण्याचे किंवा सम्रोअच्याला वेड लावण्याचेच उद्योग आहेत.

मस्तच !! चतुरंगराव आग्रहाची विनंती ...अजुन लिहित चला ! आम्ही वाचत आहोत ! (आणि लिहिणारच असाल तर मॉर्फीसाहेबांच्या गेम्स ने सुरुवात करा ही आगाऊ विनंती )

सुरेख डाव आणि सुंदर वर्णन. पूर्ण डाव खेळून पहिला तेव्हा बराचसा कळला. पण वरून १५ अजून प्रश्न पडले. अमुक वेळेला एखादी विशिष्ट चाल का नाही केली ते कळले नाही. ते सगळे विचारायचे म्हणजे रंगकाकांची शिकवणी लावावी लागेल.

नानबा 13/02/2013 - 10:01
अप्रतिम... भारतात धुपाटण्याने धुणी कशी धुतात याचं बसल्या जागी प्रत्यंतर आलं असेल त्या लॅवॉनला.. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला.. :) :) आहेतच भारतीय तसे हुश्शार..

चतुरंग 13/02/2013 - 16:50
पुढची स्पर्धा कँडिडेट चँपिअनशिप, लंडन इथे मार्च १५ ते एप्रिल १ अशी भरणार आहे. सहभागी खेळाडूंची यादी बघूनच रसिकांच्या तोंडाला पाणी सुटावे अशी परिस्थिती आहे - मॅग्नुस कार्लसन, लेवॉन अरोनिअन, बोरिस गेल्फंड, अलेक्झांडर ग्रिश्चुक, वॅसिली इवन्चुक, व्लादिमीर क्रामनिक, तैमूर रादजाबोव आणि पीटर स्विडलर! या स्पर्धेचा विजेता २०१४ साली होणार्‍या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत आनंदचा प्रतिस्पर्धी असेल! म्हणजे काय जिगरीने स्पर्धा खेळली जाईल याचा अंदाज येऊ शकेल. मॅग्नुस कार्लसन आणि लेवॉन अरोनिअन या दोघांपैकी एक जिंकेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे, पण अनेकदा आश्चर्यकारक निकालही लागतात! सामन्यांचं वर्णन देण्याचा प्रयत्न जरुर असेल. पुरेसा वेळ आणि रमतारामांसारखा एखादा साथिदार मिळाला तर कळीच्या सामन्यांचं धावतं समालोचन करण्याचाही प्रयत्न असेल! :) धन्यवाद! -चतुरंग

धनंजय 14/02/2013 - 05:14
आणि चतुरंगांच्या धावत्या वर्णनामुळे अधिक समजला. (बी७ वरचा उंट किती महत्त्वाचा आहे, ते अगदी शेवटच्या ३-४ खेळ्यांपर्यंत माझ्या लक्षात आले नव्हते. १२व्या खेळीतील c5 चा इतक्या दूरपर्यंत जाणारा स्ट्रॅटिजिक परिणाम!)

ऋषिकेश 14/02/2013 - 08:53
आरामात वाचायला म्हणून बाजुला ठवला होता. सगळ्यांसारखं आमचं डोस्क चटाचटा चालं न्हाई म्हणून दमानं एकेक खेळी करून बघत मग लेख वाचला.. ज्याम मजा आली!!! रंगरावांनी लाईव्ह सामन्याची कॉमेंट्री करावी तशा उत्साहात लेखन केलयं!.. मस्तच!
सचिनला लगाम घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ब्रेटलीचे अस्त्र काढले तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियातच धू धू धुवून सचिनने वाळत घातला होता! गेल्या तीन आठवड्यांखाली विक अ‍ॅन झी इथे झालेल्या टाटा स्टील बुद्धीबळस्पर्धेत आनंदने लेवॉन अरोनियनला ज्या जीवघेण्या पद्धतीने पिसला ते बघून मला सचिन-ब्रेटली सामन्याची आठवण न होती तरच नवल. ह्या विजयाने आनंदने भल्याभल्यांची तोंडे बंद केली. स्पर्धेत विजेता ठरलेल्या मॅग्नुस कार्लसनने देखील 'माईंड ब्लोइंग' असं या डावाचं वर्णन केलं. अरोनियन आणि आनंदमधली 'दुश्मनी' जुनी आहे. लेवॉनविरुद्ध आनंदचा स्कोअर तसा डावाच आहे.

एपिक फॉल

शिल्पा ब ·

प्रचेतस 19/01/2013 - 09:06
डोपिंगने गुणवत्तेत इतका फरक पडत असेल असे वाटत नाही. स्प्रिंटमध्ये पडतही असावा. परंतु टूर द फ्रान्स सारखी लांबलचक शर्यत, फूटबॉल, क्रिकेट, फॉर्म्युला वन यासारख्या शारीरीक क्षमतेचा कस पाहणार्‍या खेळांमध्ये सतत अग्रेसर राहणे हे उच्च गुणवत्तेशिवाय शक्य नाही. (तरी तज्ज्ञांच्या मतांच्या प्रतिक्षेत)

In reply to by प्रचेतस

वेताळ 19/01/2013 - 10:27
डोपिंग मुळे फारतर थोड्या कालावधी करिता ताकत येत असेल पण ७ वेळा फ्रान्स सायकलिंग जिंकणे सोपे नाही. शारिरीक क्षमता,दुर्दम्य आत्मविश्वास आणि बलवत्तर नशीव ह्या बळावर त्याने हे यश मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या बद्दल कधीच वाईट वाटणार नाही.औषधामुळे तारुण्य येत नाही.

आनन्दिता 19/01/2013 - 09:43
व्यक्तिशः मला लान्स आर्म स्ट्राँग खुप आवड्तो.. गेली कित्तेक वर्षे मी त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक बातमी फॉलो करतेय.. या ़काही दिवसातल्या बातम्या ऐकुन खुप निराशा झाली.. या सर्व गोष्टींमधे लान्स कडे एक वलयांकित खेळाडू म्हणून न पाहता एक साधा माणुस म्हणून पाहिले तर कुठेतरी असंही वाटून जात की, जीवघेणा आजार, किमोथेरपीच्या काळातली ढासळलेली शारीरिक व मानसिक स्थिती, ऐनवेळी स्पॉन्सर्सनी दिलेला दगा, कोलमडलेली आर्थिक स्थिती, करियर अन् एकंदरितच भविष्याबद्दल ची अनिश्चितता अशा अत्यंत टोकाच्या व्यथा एखाद्याच्या आयुष्यात सतत थैमान घालत असतील तर कुठेततरी,काहीतरी चांगलं हाती लागावं म्हणून माणूस असले शॉर्ट्कट शोधत असेल का? थोड्याशा श्रमाने मिळवलेली साध्यातली साधी गोष्ट पण माणसाला प्रिय असते. इथेतर प्रश्न एका खेळाच्या सम्राट्पदाचा होता.. त्यात अमेरिकेसारख्या देशात तुमचं वलय, पास्ट परफॉर्मन्सेस तुमच्या निवडीला मॅटर करत नसल्याले, त्या ने हा असला रस्ता धरला असावा. या सगळ्यातून मला त्याने जे ़केलय ते योग्य आहे वगैरे म्हणायचं नाहीये.. बस एतकंच वाटतं की असले निर्णय घेण्यासाठी खेळाडूच्या स्वभावापेक्षाही तत्कालीन परिस्थिती जास्त जबाबदार असते.

In reply to by आनन्दिता

शिल्पा ब 19/01/2013 - 09:53
तुमची काहीतरी चुक होतेय. त्याने करीअरच्या सुरुवातीपासुनच ड्र्ग्ज घेत असल्याचं सांगितलंय. सातही स्पर्धांच्या वेळी त्याने ब्लड ट्रान्सफ्युजन / ईपीओ सारखे प्रकार केल्याचं सुद्धा सांगितलंय. त्यानेच नाही तर लँडस अन हॅमिल्टननेसुद्धा ते सांगितलंय. त्यामुळे अगदी शेवटचा पर्याय म्हणुन केलेली धडपड नाही.

In reply to by शिल्पा ब

आनन्दिता 19/01/2013 - 12:31
सातही स्पर्धांच्या वेळी त्याने ब्लड ट्रान्सफ्युजन / ईपीओ सारखे प्रकार केल्याचं सुद्धा सांगितलंय. त्यामुळे अगदी शेवटचा पर्याय म्हणुन केलेली धडपड नाही.
माझ्या माहिती नुसार, लान्स च्या सायक्लींग करियरची सुरुवात साधारणतः १९८७-८९ च्या दरम्यान झाली. काही छोट्या मोठ्या स्पर्धांच्या विजेतेपदापेक्षा जास्त त्याने तोपर्यंत तरी केलं नव्हतं.कारकिर्द सुराला लागाण्याच्या वयात म्हण्जे २४ व्या वर्षी त्याला कॅन्सर झाला.. त्याला कॅन्सर डिटेक्ट व्हायच्या आधी फक्त दोनदा (१९९३,१९९५साली)म्हणजे तो सधारण २१-२२ वर्षाचा असताना त्याने पहिल्यांदा टुर दि फ्रान्स मधे पार्टीसिपेट केलं. पण या स्पर्धा तो जिंकू शकला नव्हता. ११९६ साली त्याच्या कॅन्सर चं निदान झालं. १९९९ साली त्याने पहिली टुर दि फ्रान्स जिंकली.त्याने जिंकलेल्या सातही टुर दि फ्रान्स या त्याच्या कमबॅक नंतर जिंकलेल्या आहेत.( साल ११९९ पासुन ते २००५ पर्यंत सलग सात वेळा)

धन्या 19/01/2013 - 11:49
काल परवापर्यंत या साहेबांचं पुस्तक बाजारात दिसायचं. शेवटी कुणीतरी म्हटलंय तेच खरं, दुसर्‍या यशस्वी व्यक्तीचं चरीत्र किंवा आत्मचरीत्र वाचून आणि तसं वागण्याचा प्रयत्न करुन तुम्हीही त्या व्यक्तीईतकेच यशस्वी, प्रसिद्ध व्हाल किंवा त्याच्याईतकाच पैसा मिळवाल तर ते तितकंस़ खरं नाही. कारण प्रत्येकाला मिळणार्‍या संधी, प्रत्येकाचा पिंड, आलेल्या प्रसंगांना सामोरं जायची कुवत, त्या व्यक्तीला पुढे जाण्यास साहाय्य करणार्‍या इतरही बर्‍याच तात्कालिक बाबी अशा बर्‍याच गोष्टी त्या व्यक्तीच्या यशाला कारणीभूत असतात.

५० फक्त 19/01/2013 - 12:53
मला तर त्याचं कॅन्सर होणं सुद्धा या कँम्पेनचाच एक भाग वाटु लागलं आहे आता. विशेषतः कॅन्सर असताना युवराज ज्या पद्धतीनं वर्ल्ड कपला खेळला आणि बरं होउन आल्यावर खेळला ते पाहुन. का कॅन्सर हा घटसर्प आणि डिफिशियंशि ऑफ बि १२ सारखा चिल्लर रोग झाला आहे, काय माहित. ? माझ्या शंकेखोर मनात एक गोष्ट नेहमी येते, हे असलं काहीतरी तेंडुलकरबद्दल ऐकायला मिळु नये कधी काळी.

In reply to by ५० फक्त

बॅटमॅन 21/01/2013 - 15:02
माझ्या शंकेखोर मनात एक गोष्ट नेहमी येते, हे असलं काहीतरी तेंडुलकरबद्दल ऐकायला मिळु नये कधी काळी.
पिल्लू सोडलेच आहे तर मलापण आता तेच वाटायला लागलंय :(

In reply to by बॅटमॅन

इनिगोय 22/01/2013 - 18:20
सद्या हितं संदर्भासहित सपष्टीकर्णाचे दिवस सुरू हैत नं, नवन्व्या मंडळींचे (आणखी नवन्वे) गोंधळ उडायला नकोत, म्हणून सांगिटलं, इतकंच :P

आदूबाळ 19/01/2013 - 12:58
"पुतळ्यांचे पाय मातीचे" हे टायगर वुड्स नंतर पुन्हा सिद्ध झालं. बाकी वर वल्लीताईंचा प्रतिसाद वाचला. थोडक्या काळासाठी शारिरिक क्षमता वाढवणे क्रिकेटमध्ये पण उपयोगी ठरू शकतं. उदा. शोएब अख्तरसारख्या गोलंदाजाने डोपिंग करून ४-५ षटकं तुफानी वेगात टाकली, तर त्यात तो प्रतिस्पर्धी संघाचं प्रचंड नुकसान करू शकतो. डोपींगने मानसिक क्षमता वाढते का नाही कल्पना नाही - पण आयपीएल मधल्या एखाद्या सलामीच्या फलंदाजाने (रात्रीच्या रंगीत पार्टीनंतर) एकाग्रता वाढवायच्या गोळ्या खाल्ल्या, तर त्याचा खेळही सुधारेल.

In reply to by आदूबाळ

प्रचेतस 19/01/2013 - 13:23
उदा. शोएब अख्तरसारख्या गोलंदाजाने डोपिंग करून ४-५ षटकं तुफानी वेगात टाकली, तर त्यात तो प्रतिस्पर्धी संघाचं प्रचंड नुकसान करू शकतो.
वेगात इतका फरक पडेल असे वाटत नाही. फारतर १५० चा १५२/१५३ होऊ शकेल पण १७०/१८० होणे शक्य नाही, शिवाय अचूकता पण महत्वाची. बाकी वल्लीदादा म्हटल्याबद्दल धन्स. :)

In reply to by आदूबाळ

एक 22/01/2013 - 03:56
त्याने जे काही केलं (कितीही चुकीचं असलं तरीही) त्याचा त्याच्या खेळाशी किंवा खेळातल्या परफॉर्मन्स वाढीशी काहीही संबंध नव्हता. डोपींग आणि अफेअर्स या वेगळ्या गोष्टी असाव्यात असं वाटतं. -(टायगर वूडसचा पक्का फॅन) एक

डोपींगमध्ये वापरली जाणारी तंत्रे मुख्यतः एकतर स्नायुंच्या काम करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करतात (स्टिरॉईड-बेस्ड औषधे) अथवा रक्ताच्या प्राणवायू वाहून नेण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करतात (ऑटो ब्लड ट्रान्सफुजन) हे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेले आहे. या गोष्टींना आक्षेप आहे तो मुख्यतः दोन कारणांमुळे: (१) नैतिक : हे प्रकार वापरणार्‍या खेळाडूला मिळणारा अनुचित फायदा (unfair advantage) आणि त्यामुळे ते न वापरणार्‍या प्रामाणिक खेळाडूंवर होणारा अन्याय (२) वैज्ञानिक: स्टिरॉईड व इतर काही औषधांच्या वापराने खेळाडूच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम. ज्या प्रकारे अनुचित मार्गाने मिळवलेली संपत्ती / कॉपी करून मिळवलेले गुण / अनुचित प्रकाराने जिंकलेली निवडणूक ई. प्रकार निषिद्ध आणि त्याकरिता दंड आवश्यक समजला जातो; त्याच न्यायाने डोपिंग करून मिळवलेली बक्षिसे / मानसन्मान / प्रसिद्धी ई. गोष्टीही निषिद्ध व दंडास प्राप्त आहेत. भावनेच्या भरात चुकून एकदा गुन्हा करणे वेगळे आणि गुन्ह्याचे हेतुपुरस्सर व्यवस्थापन करून त्याला विरोध करणार्‍यांना गैरप्रकाराने (बूलीईग, चारीत्र्यहनन, ई.) नेस्तनाबूत करण्याचे जे प्रकारही लान्सने केले आहेत ते वेगळे... आणि ते आता पाणी अगदी नाकाच्याही वर गेल्यावरच ओपरा समोर कबूल केले आहेत. असे वर्तन असलेल्या माणसाला सरळ शुद्ध मराठीत निर्ढावलेला गुन्हेगार म्हणतात. लान्सच्या भूतकाळाकडे बघितले तर, "या कबूलीमागेही त्याचा काही डाव असावा" असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे, तो फार ओढून ताणून केलेला आहे असे वाटत नाही. ओपरासमोर बसून बोलतानाची त्याची बोलण्याची पद्धत व देहबोली याबाबत बरेच काही सांगून जाते. लान्स कर्करोगग्रस्त आहे त्याबद्दल जरूर सहानुभूती असावी आणि आहे. पण त्यामुळे त्याने अनेक वर्षे हेतुपुरस्सर केलेल्या गुन्ह्यांना माफ करा असे म्हणणे रास्त आहे काय? अजून एक हस्यास्पद मुद्दा काहीजण पुढे करतातः लान्सने केलेल्या धर्मदाय कार्यामुळे (Charity) त्याच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करावे असा सांगितला जातो. असे केले तर त्याच न्यायाने भ्रष्टाचार घोटाळ्यांत दोषी असलेल्या अनेक भारतीय राजकारण्यांना त्यांनी चालवलेल्या धर्मदाय संस्थांच्या आधारावर माफ करायला काहीच हरकत नाही !!!???

शिल्पा ब 20/01/2013 - 00:41
ज्या खेळात दम राखणं महत्वाचं आहे जसं सायकलिंग, क्रिकेट, ऑलिंपिक्समधले काही प्रकार, स्विमींग वगैरे अशा खेळात इपीओ, टेस्टॉस्टेरॉन, ब्ल्ड ट्रान्सफ्युजन असे प्रकार केल्याने तुमचा फटीग डीले वाढतो. त्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो असं मी वाचलंय अन या कबुली दिलेल्या लोकांच्या मुलाखतीत ऐकलंय. म्हणजे काय, अगदी मठ्ठ मुलाने/मुलीने कॉपी केली तर फारतर पासिंगचे मार्क मिळतील पण एखाद्या हुश्श्यार मुलाने/मुलीने कॉपी केली तर बोर्डात येईल. तोच फरक आहे. बाकी या आर्मस्ट्राँगने स्वतः कबुली देउनसुद्धा त्याचे "फॅन" त्याने गुणवत्तेवरच जिंकलंय म्हणत असतील तर त्याची गंमत वाटते. त्याची मुलाखत पाहीली तर तीसुद्धा अती झाल्याने इमेज वाचवायचा शेवटचा प्रयत्न वगैरे एक खेळीच वाटते याच्याशी सहमत.

लॅन्स आर्मस्ट्राँग ला दंडवत. चिटींग करणे चुकच. मग ते केले असो वा घडले असो.... पण करुन सवरुन वरुन एव्हडं रॉक केलं म्हणजे जबराच माणुस दिसतोय हा.

पैसा 20/01/2013 - 09:37
सगळ्यांचे पाय शेवटी मातीचेच. त्याने आपणहून कबूल केलं, (जसं हॅन्सी क्रोन्ये ने केलं होतं) हे महत्त्वाचं. भारतात गुन्हे करणारा माणूस असं आपणहून कधी कबूल करतो का?

रेवती 22/01/2013 - 01:47
या गोष्टींमुळे कोणाचं लगेच कौतुक करायला आजकाल नको वाटतं. उगीच गळ्यात मेडल घालायचं आणि तासाभरात काढून घ्यायचं. अश्याने फक्त चाहत्यांचाच नाही तर एकंदरीत मोठ्या स्पर्धांवर विश्वास असलेल्या साध्या प्रेक्षकाचाही गोंधळ उडतो. माझ्यासारखे खेळाशी फारसा संबंध नसलेले तर आणखी लांब जातात.

प्रचेतस 19/01/2013 - 09:06
डोपिंगने गुणवत्तेत इतका फरक पडत असेल असे वाटत नाही. स्प्रिंटमध्ये पडतही असावा. परंतु टूर द फ्रान्स सारखी लांबलचक शर्यत, फूटबॉल, क्रिकेट, फॉर्म्युला वन यासारख्या शारीरीक क्षमतेचा कस पाहणार्‍या खेळांमध्ये सतत अग्रेसर राहणे हे उच्च गुणवत्तेशिवाय शक्य नाही. (तरी तज्ज्ञांच्या मतांच्या प्रतिक्षेत)

In reply to by प्रचेतस

वेताळ 19/01/2013 - 10:27
डोपिंग मुळे फारतर थोड्या कालावधी करिता ताकत येत असेल पण ७ वेळा फ्रान्स सायकलिंग जिंकणे सोपे नाही. शारिरीक क्षमता,दुर्दम्य आत्मविश्वास आणि बलवत्तर नशीव ह्या बळावर त्याने हे यश मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या बद्दल कधीच वाईट वाटणार नाही.औषधामुळे तारुण्य येत नाही.

आनन्दिता 19/01/2013 - 09:43
व्यक्तिशः मला लान्स आर्म स्ट्राँग खुप आवड्तो.. गेली कित्तेक वर्षे मी त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक बातमी फॉलो करतेय.. या ़काही दिवसातल्या बातम्या ऐकुन खुप निराशा झाली.. या सर्व गोष्टींमधे लान्स कडे एक वलयांकित खेळाडू म्हणून न पाहता एक साधा माणुस म्हणून पाहिले तर कुठेतरी असंही वाटून जात की, जीवघेणा आजार, किमोथेरपीच्या काळातली ढासळलेली शारीरिक व मानसिक स्थिती, ऐनवेळी स्पॉन्सर्सनी दिलेला दगा, कोलमडलेली आर्थिक स्थिती, करियर अन् एकंदरितच भविष्याबद्दल ची अनिश्चितता अशा अत्यंत टोकाच्या व्यथा एखाद्याच्या आयुष्यात सतत थैमान घालत असतील तर कुठेततरी,काहीतरी चांगलं हाती लागावं म्हणून माणूस असले शॉर्ट्कट शोधत असेल का? थोड्याशा श्रमाने मिळवलेली साध्यातली साधी गोष्ट पण माणसाला प्रिय असते. इथेतर प्रश्न एका खेळाच्या सम्राट्पदाचा होता.. त्यात अमेरिकेसारख्या देशात तुमचं वलय, पास्ट परफॉर्मन्सेस तुमच्या निवडीला मॅटर करत नसल्याले, त्या ने हा असला रस्ता धरला असावा. या सगळ्यातून मला त्याने जे ़केलय ते योग्य आहे वगैरे म्हणायचं नाहीये.. बस एतकंच वाटतं की असले निर्णय घेण्यासाठी खेळाडूच्या स्वभावापेक्षाही तत्कालीन परिस्थिती जास्त जबाबदार असते.

In reply to by आनन्दिता

शिल्पा ब 19/01/2013 - 09:53
तुमची काहीतरी चुक होतेय. त्याने करीअरच्या सुरुवातीपासुनच ड्र्ग्ज घेत असल्याचं सांगितलंय. सातही स्पर्धांच्या वेळी त्याने ब्लड ट्रान्सफ्युजन / ईपीओ सारखे प्रकार केल्याचं सुद्धा सांगितलंय. त्यानेच नाही तर लँडस अन हॅमिल्टननेसुद्धा ते सांगितलंय. त्यामुळे अगदी शेवटचा पर्याय म्हणुन केलेली धडपड नाही.

In reply to by शिल्पा ब

आनन्दिता 19/01/2013 - 12:31
सातही स्पर्धांच्या वेळी त्याने ब्लड ट्रान्सफ्युजन / ईपीओ सारखे प्रकार केल्याचं सुद्धा सांगितलंय. त्यामुळे अगदी शेवटचा पर्याय म्हणुन केलेली धडपड नाही.
माझ्या माहिती नुसार, लान्स च्या सायक्लींग करियरची सुरुवात साधारणतः १९८७-८९ च्या दरम्यान झाली. काही छोट्या मोठ्या स्पर्धांच्या विजेतेपदापेक्षा जास्त त्याने तोपर्यंत तरी केलं नव्हतं.कारकिर्द सुराला लागाण्याच्या वयात म्हण्जे २४ व्या वर्षी त्याला कॅन्सर झाला.. त्याला कॅन्सर डिटेक्ट व्हायच्या आधी फक्त दोनदा (१९९३,१९९५साली)म्हणजे तो सधारण २१-२२ वर्षाचा असताना त्याने पहिल्यांदा टुर दि फ्रान्स मधे पार्टीसिपेट केलं. पण या स्पर्धा तो जिंकू शकला नव्हता. ११९६ साली त्याच्या कॅन्सर चं निदान झालं. १९९९ साली त्याने पहिली टुर दि फ्रान्स जिंकली.त्याने जिंकलेल्या सातही टुर दि फ्रान्स या त्याच्या कमबॅक नंतर जिंकलेल्या आहेत.( साल ११९९ पासुन ते २००५ पर्यंत सलग सात वेळा)

धन्या 19/01/2013 - 11:49
काल परवापर्यंत या साहेबांचं पुस्तक बाजारात दिसायचं. शेवटी कुणीतरी म्हटलंय तेच खरं, दुसर्‍या यशस्वी व्यक्तीचं चरीत्र किंवा आत्मचरीत्र वाचून आणि तसं वागण्याचा प्रयत्न करुन तुम्हीही त्या व्यक्तीईतकेच यशस्वी, प्रसिद्ध व्हाल किंवा त्याच्याईतकाच पैसा मिळवाल तर ते तितकंस़ खरं नाही. कारण प्रत्येकाला मिळणार्‍या संधी, प्रत्येकाचा पिंड, आलेल्या प्रसंगांना सामोरं जायची कुवत, त्या व्यक्तीला पुढे जाण्यास साहाय्य करणार्‍या इतरही बर्‍याच तात्कालिक बाबी अशा बर्‍याच गोष्टी त्या व्यक्तीच्या यशाला कारणीभूत असतात.

५० फक्त 19/01/2013 - 12:53
मला तर त्याचं कॅन्सर होणं सुद्धा या कँम्पेनचाच एक भाग वाटु लागलं आहे आता. विशेषतः कॅन्सर असताना युवराज ज्या पद्धतीनं वर्ल्ड कपला खेळला आणि बरं होउन आल्यावर खेळला ते पाहुन. का कॅन्सर हा घटसर्प आणि डिफिशियंशि ऑफ बि १२ सारखा चिल्लर रोग झाला आहे, काय माहित. ? माझ्या शंकेखोर मनात एक गोष्ट नेहमी येते, हे असलं काहीतरी तेंडुलकरबद्दल ऐकायला मिळु नये कधी काळी.

In reply to by ५० फक्त

बॅटमॅन 21/01/2013 - 15:02
माझ्या शंकेखोर मनात एक गोष्ट नेहमी येते, हे असलं काहीतरी तेंडुलकरबद्दल ऐकायला मिळु नये कधी काळी.
पिल्लू सोडलेच आहे तर मलापण आता तेच वाटायला लागलंय :(

In reply to by बॅटमॅन

इनिगोय 22/01/2013 - 18:20
सद्या हितं संदर्भासहित सपष्टीकर्णाचे दिवस सुरू हैत नं, नवन्व्या मंडळींचे (आणखी नवन्वे) गोंधळ उडायला नकोत, म्हणून सांगिटलं, इतकंच :P

आदूबाळ 19/01/2013 - 12:58
"पुतळ्यांचे पाय मातीचे" हे टायगर वुड्स नंतर पुन्हा सिद्ध झालं. बाकी वर वल्लीताईंचा प्रतिसाद वाचला. थोडक्या काळासाठी शारिरिक क्षमता वाढवणे क्रिकेटमध्ये पण उपयोगी ठरू शकतं. उदा. शोएब अख्तरसारख्या गोलंदाजाने डोपिंग करून ४-५ षटकं तुफानी वेगात टाकली, तर त्यात तो प्रतिस्पर्धी संघाचं प्रचंड नुकसान करू शकतो. डोपींगने मानसिक क्षमता वाढते का नाही कल्पना नाही - पण आयपीएल मधल्या एखाद्या सलामीच्या फलंदाजाने (रात्रीच्या रंगीत पार्टीनंतर) एकाग्रता वाढवायच्या गोळ्या खाल्ल्या, तर त्याचा खेळही सुधारेल.

In reply to by आदूबाळ

प्रचेतस 19/01/2013 - 13:23
उदा. शोएब अख्तरसारख्या गोलंदाजाने डोपिंग करून ४-५ षटकं तुफानी वेगात टाकली, तर त्यात तो प्रतिस्पर्धी संघाचं प्रचंड नुकसान करू शकतो.
वेगात इतका फरक पडेल असे वाटत नाही. फारतर १५० चा १५२/१५३ होऊ शकेल पण १७०/१८० होणे शक्य नाही, शिवाय अचूकता पण महत्वाची. बाकी वल्लीदादा म्हटल्याबद्दल धन्स. :)

In reply to by आदूबाळ

एक 22/01/2013 - 03:56
त्याने जे काही केलं (कितीही चुकीचं असलं तरीही) त्याचा त्याच्या खेळाशी किंवा खेळातल्या परफॉर्मन्स वाढीशी काहीही संबंध नव्हता. डोपींग आणि अफेअर्स या वेगळ्या गोष्टी असाव्यात असं वाटतं. -(टायगर वूडसचा पक्का फॅन) एक

डोपींगमध्ये वापरली जाणारी तंत्रे मुख्यतः एकतर स्नायुंच्या काम करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करतात (स्टिरॉईड-बेस्ड औषधे) अथवा रक्ताच्या प्राणवायू वाहून नेण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करतात (ऑटो ब्लड ट्रान्सफुजन) हे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेले आहे. या गोष्टींना आक्षेप आहे तो मुख्यतः दोन कारणांमुळे: (१) नैतिक : हे प्रकार वापरणार्‍या खेळाडूला मिळणारा अनुचित फायदा (unfair advantage) आणि त्यामुळे ते न वापरणार्‍या प्रामाणिक खेळाडूंवर होणारा अन्याय (२) वैज्ञानिक: स्टिरॉईड व इतर काही औषधांच्या वापराने खेळाडूच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम. ज्या प्रकारे अनुचित मार्गाने मिळवलेली संपत्ती / कॉपी करून मिळवलेले गुण / अनुचित प्रकाराने जिंकलेली निवडणूक ई. प्रकार निषिद्ध आणि त्याकरिता दंड आवश्यक समजला जातो; त्याच न्यायाने डोपिंग करून मिळवलेली बक्षिसे / मानसन्मान / प्रसिद्धी ई. गोष्टीही निषिद्ध व दंडास प्राप्त आहेत. भावनेच्या भरात चुकून एकदा गुन्हा करणे वेगळे आणि गुन्ह्याचे हेतुपुरस्सर व्यवस्थापन करून त्याला विरोध करणार्‍यांना गैरप्रकाराने (बूलीईग, चारीत्र्यहनन, ई.) नेस्तनाबूत करण्याचे जे प्रकारही लान्सने केले आहेत ते वेगळे... आणि ते आता पाणी अगदी नाकाच्याही वर गेल्यावरच ओपरा समोर कबूल केले आहेत. असे वर्तन असलेल्या माणसाला सरळ शुद्ध मराठीत निर्ढावलेला गुन्हेगार म्हणतात. लान्सच्या भूतकाळाकडे बघितले तर, "या कबूलीमागेही त्याचा काही डाव असावा" असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे, तो फार ओढून ताणून केलेला आहे असे वाटत नाही. ओपरासमोर बसून बोलतानाची त्याची बोलण्याची पद्धत व देहबोली याबाबत बरेच काही सांगून जाते. लान्स कर्करोगग्रस्त आहे त्याबद्दल जरूर सहानुभूती असावी आणि आहे. पण त्यामुळे त्याने अनेक वर्षे हेतुपुरस्सर केलेल्या गुन्ह्यांना माफ करा असे म्हणणे रास्त आहे काय? अजून एक हस्यास्पद मुद्दा काहीजण पुढे करतातः लान्सने केलेल्या धर्मदाय कार्यामुळे (Charity) त्याच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करावे असा सांगितला जातो. असे केले तर त्याच न्यायाने भ्रष्टाचार घोटाळ्यांत दोषी असलेल्या अनेक भारतीय राजकारण्यांना त्यांनी चालवलेल्या धर्मदाय संस्थांच्या आधारावर माफ करायला काहीच हरकत नाही !!!???

शिल्पा ब 20/01/2013 - 00:41
ज्या खेळात दम राखणं महत्वाचं आहे जसं सायकलिंग, क्रिकेट, ऑलिंपिक्समधले काही प्रकार, स्विमींग वगैरे अशा खेळात इपीओ, टेस्टॉस्टेरॉन, ब्ल्ड ट्रान्सफ्युजन असे प्रकार केल्याने तुमचा फटीग डीले वाढतो. त्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो असं मी वाचलंय अन या कबुली दिलेल्या लोकांच्या मुलाखतीत ऐकलंय. म्हणजे काय, अगदी मठ्ठ मुलाने/मुलीने कॉपी केली तर फारतर पासिंगचे मार्क मिळतील पण एखाद्या हुश्श्यार मुलाने/मुलीने कॉपी केली तर बोर्डात येईल. तोच फरक आहे. बाकी या आर्मस्ट्राँगने स्वतः कबुली देउनसुद्धा त्याचे "फॅन" त्याने गुणवत्तेवरच जिंकलंय म्हणत असतील तर त्याची गंमत वाटते. त्याची मुलाखत पाहीली तर तीसुद्धा अती झाल्याने इमेज वाचवायचा शेवटचा प्रयत्न वगैरे एक खेळीच वाटते याच्याशी सहमत.

लॅन्स आर्मस्ट्राँग ला दंडवत. चिटींग करणे चुकच. मग ते केले असो वा घडले असो.... पण करुन सवरुन वरुन एव्हडं रॉक केलं म्हणजे जबराच माणुस दिसतोय हा.

पैसा 20/01/2013 - 09:37
सगळ्यांचे पाय शेवटी मातीचेच. त्याने आपणहून कबूल केलं, (जसं हॅन्सी क्रोन्ये ने केलं होतं) हे महत्त्वाचं. भारतात गुन्हे करणारा माणूस असं आपणहून कधी कबूल करतो का?

रेवती 22/01/2013 - 01:47
या गोष्टींमुळे कोणाचं लगेच कौतुक करायला आजकाल नको वाटतं. उगीच गळ्यात मेडल घालायचं आणि तासाभरात काढून घ्यायचं. अश्याने फक्त चाहत्यांचाच नाही तर एकंदरीत मोठ्या स्पर्धांवर विश्वास असलेल्या साध्या प्रेक्षकाचाही गोंधळ उडतो. माझ्यासारखे खेळाशी फारसा संबंध नसलेले तर आणखी लांब जातात.
कालच ७ वेळा टुर द फ्रांसचा विजेता लॅन्स आर्मस्ट्राँग याने सुरुवातीपासुनच परफॉर्मन्स एन्हॅन्सिंग ड्र्ग्ज घेतले याची कबुली दिली. याआधी त्याने अगदी शपथेवर खोटं बोलुन झालेलं आहे. मुलाखतीत त्याने तो जे प्रकार करत होता त्याविषयी तेंव्हा आपलं काही चुकतंय वगैरे वाटत नसल्याचं सांगितलं. एक लिंक : http://www.youtube.com/watch?v=QTHSFRndS1s आता आमच्या डोक्यात एक किडा वळवळला की बहुतेक खेळाडु टिकुन रहायच्या आशेने असले कैतरी उद्योग करत असतात. क्रिकेट मधे मॅच फिक्सिंक होत होतं / आहे. पण क्रिकेटर्स डोपींग करत असतील का?

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,