गेली चोवीस वर्षे क्रिकेट नावाचा एक खेळत होतास तू, त्यातल्या खऱ्या खोट्या चांगल्या वाईट अनेक गोष्टी पचवून.
का भारतीयांनी क्रिकेट फक्त पहायचं आणि टाळ्या वाजवायच्या. का फक्त इतरांनी केलेल्या विक्रमान्बद्दल बोलायचं.
तू ते बदललस. क्रिकेट खेळता खेळता तू त्याला आपला गुलाम बनवलंस. जणू विक्रम हे फक्त तू आधी करायचेस म्हणूनच दैवाने लिहिलेले होते की काय असं खेळलास तू. अगदी दृष्ट लागण्यासारखा.
पण कोणाचीही दृष्ट लागली नाही तुला. ना यशाची ना पैशाची ना टीकेची.