मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..

कॉमन मॅन ·

प्रचेतस 27/01/2012 - 11:23
सेहवाग, गंभीर, धोनीचे काय? त्यांना का नाही घरी बसवायचे? का केवळ थोडे तरूण आहेत म्हणून त्यांनी धावा केल्या नाहीत तरी चालतात का?

In reply to by प्रचेतस

रेवती 27/01/2012 - 21:24
अहो वल्लीसाहेब, आजकाल खेळाकडे खेळ म्हणून न पाहण्याचाच जमाना आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर जालावरही लोक गंमत म्हणून न येता शिरेसली येतात आणि गमतीचे प्रतिसादही शिरेसलीच घेतात. कश्याला किती महत्व द्यायचं यावर एक कार्यशाळा आयोजित करता काय?;)

In reply to by रेवती

प्रचेतस 27/01/2012 - 21:44
अगदी खरंय रेवतीआज्जे. बाकी कार्यशाळा वैग्रे आयोजित करणे तुम्हीच बघा, आम्ही आपले विद्यार्थी म्हणूनच येऊ. :)

In reply to by कॉमन मॅन

प्यारे१ 27/01/2012 - 11:28
"कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. तोड दो दरवाजा..!" आपली स्वाक्षरी बरंच काही बोलते आहे. शतकी धाग्यासाठी आधीच शुभेच्छा...! ;)

In reply to by कॉमन मॅन

पक पक पक 27/01/2012 - 12:25
च्यायला दर वेळेस सचिन ,द्रविड ,लक्शम्ण यांनी शतके ठो़कलीच पाहि़जेत का..?गेल्या वर्षात द्रविड चे पर्फॉर्मसं बघा कि जरा.. जिंकलो कि डोक्यावर घेउन नाचायच आणी हरलो कि पायद्ळी तुडवाय्च काय पट्त नाय.. हा धागा म्हण्जे दुतोंडी .......... वाट्ते....

In reply to by कॉमन मॅन

चिंतामणी 27/01/2012 - 17:27
>>>>>>>>आधी म्हातार्‍यांना तर हाकला. हाकलायचे कशासाठी?????? खेळ होत नाही म्हणून की म्हातारे झाले म्हणून? उगाचच त्रागा करू नये. वय वाढणे ही नैसर्गीक गोष्ट आहे. प्रत्येकजणाचे वय वाढणारच आहे. म्हणून दरवेळी पुढच्या पिढीने मागच्या पिढीला असे हिणवु नये. मागच्या इंग्लंड दौ-यात फक्त द्रवीडच सातत्याने खेळला हे विसरू नये. असो. खेळ होत नाही म्हणून हाकला असे म्हणायची पंचाईत. सो कॉल्ड यूथ आयकॉन्स घोनी, गंभीर, सेहवाग, इशांत शर्मा इत्यादी हे काय दिवे लावत आहेत?????????

विवेक मोडक 27/01/2012 - 11:24
सचिन्,राहुल आणि लक्ष्मण या सिरीजमधे अपयशी ठरले हे मान्य. पण सगळा दोष त्यांच्या माथी का?? सेहवागला अजुनही वनडे आणि कसोटीतला फरक कळत नसेल (दोन त्रिशतकं आणि एकदा २९३ काढुनदेखील) तर त्याला तोच न्याय लागु होत नाहि का? धोनीचं काय वेगळं आहे? गंभीरसुद्धा "नवीन रक्ता" पैकीच आहे ना?? त्याला या सिरीजमधे काय धाड भरली होती??? नविन रक्त वगैरे ठीक आहे पण त्या नवीन रक्तात फक्त आय पी एल च असेल तर कसोटीत काय उपटणार आहेत ते? गोलंदाजांविषयी जेवढं कमी बोलु तेवढं चांगलं आहे.

In reply to by विवेक मोडक

विमोंशी सहमत. त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. बरेच प्रश्न विचारायची इच्छा होते आहे, मात्र लगेच ते गूगलून उत्तरे मिळतील म्हणून गप्प आहे. अर्थात रोज उठून तद्दन फालतू डायर्‍या लिहिणार्‍यांना देखील घरी बसवावे का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

कपिलमुनी 27/01/2012 - 16:30
आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??

In reply to by कपिलमुनी

आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??
परिक्षण लिहिणार्‍यांनी 'ह्यांन हाकला, त्यांना चित्रपटात घेऊन नका, फलान्यांना घरी बसवा' अशी फुकाची बोंब केली तर त्यांना जरुर हा प्रश्न विचारावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. >> मी अगदी सहमत रे परा! >> अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला.... > त्याचं काय आहे 'कॉमन मॅन', तेंडल्याबद्दल हे प्रकार पूर्वी ही झाले आहेत (म्हणजे ते वाहिन्यांवरचे तज्ज्ञ इ.) पण 'उचलली जीभ...' ह्या प्रकारात आपण बोलणार्‍यांची तोंडं नाही बंद करू शकत ना! बाकी चालू द्या....

In reply to by विवेक मोडक

रमताराम 27/01/2012 - 12:57
एकदम सहमत. च्यामारी त्यांना घरी बसवू हो, पण पर्याय अजून वाईट आहेत त्याचे काय. हे तिघे वगळता उरलेल्या तिघा 'तरूण' फलंदाजांची कामगिरी या 'म्हातार्‍यांहून वाईट आहे त्याचे काय. आणि हे जर देशातील पहिले तीन श्रेष्ठ 'तरुण' फलंदाज आहेत तर इतर 'तरुणांची'ची कामगिरी अजून वाईट असण्याची शक्यताच जास्त आहे. वर्षभरात एक त्रिशतक ठोकले की एरवी ३०च्या वर जायला परवानगी नसते असे समजणार्‍या सेहवागचे काय? तो तीसचा आकडा पार करायला कधी शिकणार? गंभीरही फॉर्ममधे कधी येणार? सहावा फलंदाज म्हणून गेल्या वर्षात आपण किती जणांना संधी दिली. ती जागा अजून स्थिर होत नाही, आणखी तीन मोकळ्या करून कोण दिवटे आणणार तिथे? रडतराऊंच्या सोयीसाठी रडतराऊंनी काढलेला धागा. सामाजिक जीवनात जसे राजकारणी, पोलिस इ. ना एकदा नालायक म्हणत ठो ठो बोंब ठोकली की आपली जबाबदारी झटकून टाकता येते तसे. उठसूठ या तिघांच्या नावे बोंब ठोकली की तर आठ जणांचा नालायकपणा झाकता येतो. जर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सतत २००-२५० मधे प्रतिस्पर्ध्याला उखडत असतील नि याचे कारण वेगवान खेळपट्ट्या हे असेल तर आपले गोलंदाज काय तिथे आट्यापाट्या खेळतात? त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया ६०० धावा करू शकते याचा अर्थ आपली गोलंदाजी सुमार, शाळकरी दर्जापेक्षाही सुमार आहे हे कधी मान्य करणार आपण? सातत्याने हीच स्थिती असताना इतक्या वर्षात वेगवान गोलंदाजाच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना उपयुक्त ठरतील अशा खेळपट्ट्या देशात बनवण्यासाठी कधी सुरुवात होणार? पाटा खेळपट्ट्यांवर धावा रोखण्यापुरती गोलंदाजी करण्याची सवय त्यांना लागत असेल तर त्यांचा काय दोष? आणि आमचे स्पिनर ग्रेट हा मूर्खपणाचा समज कधी सोडणार आपण. चंद्रा-बेदी-प्रसन्नाची धार इतर कोणत्याही भारतीय स्पिनर्सना नव्हती, अगदी कुंबळेलासुद्धा हे स्वच्छ मनाने कधी मान्य करणार. अलिकडच्या काळातील श्रेष्ठ स्पिनर्समधेही कुंबळेचा क्रमांक मुरलिधरन नि वॉर्न यांच्या मागेच लागतो ते सत्य आपण मान्य करणार की नाही. त्यामुळे आपल्या देशात स्पिनर्सना अनुकूल खेळपट्ट्या बनवू नि मग बघून घेऊ हा दावा किती अज्ञानमूलक आहे हे कधी समजणार? काळ बदलतो हे कधी समजणार? आणि मग त्यानुसार धोरणे, पवित्रे डावपेच कधी बदलणार. केवळ सुदैवाने चांगला संघ मिळाल्याने फुकटचे श्रेय घेणारा धोनी स्वत:चे डोके चालवायला कधी शिकणार. त्याने मैदानावर कर्णधार म्हणून काही हालचाली केल्याचे शेवटचे कधी दिसून आले होते. कपिलदेवच्या काळापासून सेट झालेला गोलंदाजीचा पॅटर्न त्याने कधी बदलण्याचा प्रयत्न केला आहे का? नसल्यास यशाचे श्रेय त्याचे कसे, नि आता अपश्रेयाचे खापर फलंदाजांवर का फोडावे? गोलंदाजांनी काय दिवे लावले आहेत? या दौर्‍यात नि मागच्याही, किती वेळा हे गोलंदात प्रतिस्पर्ध्याचा सारा संघ बाद करू शकले आहेते? श्रेय आपले नि अपयशाचे धनी मात्र जुने खेळाडू हा स्वार्थी कावा का म्हणून? जरा वाईट घडू लागले की उठसूठ आपल्या -तथाकथित- देदिप्यमान भूतकाळाकडे चला चा नारा दिला जातो नाहीतर खापर फोडायला एखादा बकरा - पंचिंग बॅग - शोधली जाते. सचिनला मिळणारा पैसा हा नेहमीच मध्यमवर्गीयांच्या असूयेचा मुद्दा असल्याने तो आपले नेहमीचे गिर्‍हाईक आहेच. गेल्या संपूर्ण वर्षातील कामगिरी पाहिली तर अजूनही सचिन द्रविडच पहिले दोन क्रमांक राखून आहेत हे दिसून येते. यावर स्टॅटिस्टिक्स डजन्ट टेल एनिथिंग किंवा तत्सम बिनडोक तर्क दिले जातात. किंवा 'ऐनवेळी सचिन खेळत नाही' हे घोर अज्ञान (सुधीर काळेंनी साधार खोडून काढलेले असूनही) पुन्हा पाजळले जाते. तात्पर्य फारसे विचार न करणार्‍यांना त्रागा करायला दुगाण्या झाडायला चांगला धागा आहे. चालू द्या.

In reply to by रमताराम

बाकी ते सुनिल गावसकर, रवी शास्त्री (आणि बहूदा मदनलाल) ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरुप बदलून त्या वेगवान करण्यासाठी उपाययोजना सुचवणारी जी समिती स्थापन झाली होती, तिचे काय झाले हो पुढे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

विवेक मोडक 27/01/2012 - 14:17
त्याचं काय झालं माहित नाहि. पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??

In reply to by विवेक मोडक

पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??
क्युरेटर मिर्च मसाला मध्ये बसलेला असतो आणि खेळपट्टी कोण तयार करतो हे तुम्ही जाणताच. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

५० फक्त 27/01/2012 - 17:00
पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 27/01/2012 - 17:01
मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना? ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.

In reply to by श्रावण मोडक

पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.
अहो वाहत्या गंगेत हात धुवून घेतोय झाले.
मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना?
नाव बदलले असले तरी कार्य त्याच जोमाने चालू असते. ;)
ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.
ज्जे बात ! त्यात मुंबई - पुणे रणजीच्या आदल्या रात्रीची मजाच वेगळी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिंतामणी 27/01/2012 - 17:45
गेले ते दिन गेले. :( :-( :sad: गहुंजाला काय काय सोई आहेत हे कोणी तज्ञ सांगेल काय?????

सुहास.. 27/01/2012 - 11:31
सिरिज गमावल्याचा दोष फलंदाजावर की गोलदांजावर हे ठरवा आधी. १ ) लेग ग्लान्स साठी फिल्डर घेतला की बॉल लो बाउन्स ऑफसाईड ला ??? ते पन पॉन्टीग ला ( ज्याच्यावर लगान पोर देखील कव्हर ड्राईव्ह मारेल ) २ ) तीन स्लिप घेवुन बॉल कुठ , तर पायात ??? ३ ) सेटल झालेल्या प्लेयर बॉल, फुटबॉल येव्हढा दिसायला लागतो , त्याल चेंज ऑफ पेस ??? मजा आहे !!

In reply to by विवेक मोडक

सुहास.. 27/01/2012 - 11:43
विमो , ' बुंधा ' म्हणजे यॉर्कर , इथे पायात म्हणजे सरळ लेग ला कट किंवा फ्लिक करता येतो . क्रिकेट प्लेयर सुहास यांच्या स्वानुभवातुन ;)

विवेक मोडक 27/01/2012 - 11:37
सुरेश रैना - चेंडु छातीच्या वर उसळला की बोंब सुरु. स्विंग बद्दल बोलायलाच नको. चेतेश्वर पुजारा - मैदानात कमी वेळ दुखापतग्रस्तांच्या यादीत जास्त बद्रीनाथ - नेहरु स्टेडियम पुणे किंवा तत्सम विकेट्सवर शतकं ठोकण्यात पटाईत, पण ग्रीनटॉपवर काय? अभिनव मुकुंद्,मुरली विजय, आणि अजुन बरेच जण आहेत यादीमधे

विवेक मोडक 27/01/2012 - 11:44
नाही, प्रातिनिधीक म्हणुन हेच तिघे का प्रत्येकवेळी??? बाकी काल विराट कोहलीने शतक पूर्ण केल्यावर जो शब्द तोंडातुन काढला हेच बहुतेक या तरुण रक्ताचं प्रातिनिधीक रूप असावं. उदा. कोहली,युवराज

५० फक्त 27/01/2012 - 12:08
हे म्हणजे अगदी त्या आजारी सासु सारखं झालं होत नसलं तरी कामं करायची ( तथाकथित भारतीय संघातुन खेळायचे) आणि मग सुन बाहेर काम करते (आयपिएल मध्ये) म्हणुन घरात काम करत नाही अशी तक्रार करायची.

अनामिका 27/01/2012 - 12:21
त्रिकुटाला म्हातारे म्हणताय ?आपण काय चिरतारुण्याचे वरदान प्राप्त करुन या धरती वर अवतरला आहात का ? अहो !" तो खेळ आहे कुणी तरी हरणार कुणी तरी जिंकणार'खेळा कडे खेळ म्हणून बघायला शिका...... थिल्लर वृत्त माध्यमांचे प्रतिनिधी देखिल मिपावर फेरफटका मारत असतात बहुदा? मिपा बरीच प्रसिद्ध झाली आहे याचे हे द्योतक आहे... हर्षभरीत मिपाकर

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

५० फक्त 27/01/2012 - 13:00
भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ? बाकी, इथला पैसा निवडणुकांमध्ये अडकलेला असल्याने या सिरिजमध्ये जास्त पैसा लागत नसेल आणि त्यामुळं असं होतं आहे का ? भारतातल्या निवडणुका आणि त्यावेळेस झालेल्या सिरिज यावर थोडा शोधा घ्यावा असा विचार आहे. यापुर्वी भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या सिरिज आणि भारतीय शेअर मार्कॅट यामधल्या योगायोगावर लिहुन आलेलं होतंच.

In reply to by ५० फक्त

भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ?
ते ठिक आहे, पण निदान आपल्याला त्या विषयातले खुप काही समजते आणि आपण जणू काही मार्गदर्शक तत्वेच मांडत आहोत असा आव तरी आणू नये. असो. एकदा हुच्चभ्रुच व्हायचे ठरवल्यावर असे धागे काढणे हे क्रमप्राप्तचं!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

श्या!! सचिन, द्रविडला शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची बॅटींग कधी केली होतीत?
राजकारण्यांना विशेषतः संसद सदस्यांना शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची निवडणुक कधी लढवली होतीत? (हे वैयक्तिक तुमच्याविषयी नाही. पण हेच मुद्दे वापरले तर कोणाविषयीच काहीच बोलायला नको. संसद सदस्यांना काही बोलायचे नाही कारण मी निवडणुक कधी लढवली नाही. मी बसलेल्या रिक्षाचा ड्रायव्हर नीट रिक्षा चालवत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी रिक्षा चालवायला गेलो आहे? ब्यांकेत काऊंटरमागचा माणूस नीट काम करत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी काऊंटरमागे होतो? असो.)

गणपा 27/01/2012 - 12:59
तुमच दळण चालुद्या. :) आवांतर : हुच्चभ्रु झाल्याबद्दल अभिनंदन. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यकु 27/01/2012 - 14:23
सहमत. कॉमन मॅन यांनी क्रिकेटकडे लक्ष न देता संविधानावरील लेखमाला टाकावी . ;-) अवांतर ‍आणि खोडसाळ स्वगत: कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय? ;-)

In reply to by यकु

कपिलमुनी 27/01/2012 - 16:48
अजुन प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद ,उपउपप्रतिसाद ,उपउपउपप्रतिसाद नाहीत दिले ..त्यामुळे चेसुगुंची शक्यता वाटत नाही

In reply to by कपिलमुनी

यकु 27/01/2012 - 17:06
छ्‍या: ! ते चेसुगु असलेच तर या अवतारात त्या स्टायलीत कशाला उपउपउपप्रतिसाद देतील? तसे उप, उपप्रतिसाद दिले असते तर इथल्या कुटिलमुनींच्या ;-) चाणाक्ष नजरेतून ते सुटले असते काय?

मोहनराव 27/01/2012 - 14:40
याच म्हातार्‍या लोकांनी जेव्हा सामने जिंकुन दिले तेव्हा डोक्यावर घेउन नाचला होतात ना, मग त्यांच्या इच्छेप्रमाणं त्यांना खेळुद्या की त्यांना वाटतंय तोपर्यंत. निदान नवीन लोकांपेक्षा तरी ते बरे म्हणायचे!! घरी बसुन टिका करत बसणे सगळ्यात सोपी गोष्ट आहे व ती करत बसणे सगळ्यात आवडता उद्योग असतो आपल्या लोकांचा!!

रमताराम 27/01/2012 - 15:04
जरा इथे पहा बरं. जो वर्ल्ड-कप नुकताच जिंकला म्हणून यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले त्यात भारताकडून सर्वाधिक धावा कोणाच्या नि सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत ते बघा बरं जरा. वर आम्ही स्पिनर्सबद्दल जो एक मुद्दा मांडला तो ही इथे तपासून पाहता येईल. आपल्याच भूमीवर खेळत असून जहीर, मुनाफ आणि तीनच सामने खेळलेला नेहरा (तीन बळी) या वेगवान गोलंदाजांनी इतर सार्‍या स्पिनर्सच्या (ज्या युवराज हा पार्टटाईम गोलंदाज सर्वाधिक बळी घेऊन गेलाय.) एकुण बळींपेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. टाईम्स हॅव चेन्जड. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणारा तो एक म्हाताराच आहे. 'ही माझी स्टाईल आहे मी असाच खेळणार' निर्लज्जपणे म्हणत पाच-दहा षटकातच तिसर्‍या फलंदाजाला मैदानावर यायला भाग पाडणारा, खालच्या फलंदाजांना नव्या चेंडूचा सामना करायला लावणारा आणि तरीही स्वतःला आघाडीचा फलंदाज म्हणवून घेणारा कधी बदलणार?'

In reply to by रमताराम

>>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले... झालं गेलं कौतुक मान्य आहे. पण, नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

५० फक्त 27/01/2012 - 17:33
'नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ? ' सर अतिशय महत्वाचा प्रश्न जो विचारणा-यांना नीट विचारता येत नाहीये आणि उत्तर देणा-यांना याचं उत्तर देता येणार नाहीये, इथं मला वाटतं जयंत सरांची स्वाक्षरी आहे ना तसा प्रकार आहे - मी गप्प बसतो त्यांची अडचण होउ नये म्हणुन. खरंतर, क्रिडा क्षेत्रात अन राजकारणात निवृत्तीसाठी वय / विक्रम / सहभाग वगैरे असे नियम केले पाहिजेत. या बाबतीत कुंबळे अन सौरव हुशार निघाले, वेळच्या वेळी बाहेर पडुन / पाडले जाउन आज आहेत त्या स्थितीत बरे आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रमताराम 27/01/2012 - 17:34
त्याची चिंता मला कशाला. मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही. तोवर कशाला बाजारात तुरी.... अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते?

In reply to by रमताराम

>>>>> मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही. आपण निवड समितीत असता तर सचिन, द्रविड आणि लक्ष्मणच्या फलंदाजीचा विदा वर्षानुवर्ष दाखवून सन्मानीय क्रिकेटपटूंना (क्रिकेटच्या देवांना) ते पन्नाशी-साठीचे झाले असते (पायाची हालचाल करतांना त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या) तरी त्यांना खेळवले असते त्याच बरोबर अपयशाचं खापर फोडायला खेळपट्ट्या असणारच होत्या तेव्हा नशीब आम्हा क्रिकेट रसिकांचं की आपल्याला निवड समितीची ऑफर नाही. ;) अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते? आय्ड्या उतनी बुरी नही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

५० फक्त 27/01/2012 - 22:40
+१००, मग नाहि तर काय ,बरं ते जाउ दे, एक सामान्य क्रिकेट चाहता म्हणुन, विशिष्ट खेळाडुचा चाहता म्हणुन नव्हे, बिरुटे सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्या की.

In reply to by ५० फक्त

रमताराम 27/01/2012 - 23:19
याच धाग्यात. वाचायची तसदी घेतली तर मिळेलही. वर मूळ प्रतिसादात क्रिक-इन्फोचा दुवा आहे. चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय? आणि आम्ही तुलनात्मकदृष्ट्या उरलेल्या आठ खेळाडूंच्या कामगिरीबद्दल - काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत? ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय?

In reply to by रमताराम

मेघवेडा 27/01/2012 - 23:22
अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत लिहा वो काहीतरी. हे सगळं आम्हाला कळत नाही. आम्ही फक्त फेल गेल्यावर आरोप करणं जाणतो!

In reply to by रमताराम

५० फक्त 27/01/2012 - 23:47
''चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय? - पण ही कामगिरी भारतातल्या मठ्ठ विकेटवरची झाली, गेल्या महिन्याभरात काय झालंय ऑस्ट्रेलियात ? आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या तरी निघाल्यात का ? ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ? रात गयी बात गयी, जर प्रत्येक मॅच नविन असेल तर प्रत्येक मॅच मधलं हरणं आणि जिंकणं हे सुद्धा नवीनच असतं, आणि त्याचा तेवढाच आनंद किंवा दुख: होतं, आता हे तर मॅच मागुन मॅच हरणं चाललंय आणि ते सुद्धा कोणताही विरोध न दाखवता मग तो सहवाग सचिन द्रविड नाहीतर लक्ष्मण, एखादा दोन दिवस टिकतील पिचवर नाहीच, थोडा टिकेल असं वाटलं की घातलीच बॅच आसाऑस्टं मध्ये. हेच करायचं असेल तर या सगळ्यांनाच टिम ए ला नॅशनल टिम म्हणुन पाठवायचा एक प्रयोग करुन पाहायला काय हरकत आहे. ज्या पिचवर ऑस्ट्रेलियन सहाशे रन काढतात तिथं आपल्याला चारशे करता येउ नयेत, या सगळ्या थोर खेळाडुंचा थोरपणा यातच आहे की त्यांनी बाजुला सरकुन मोकळं व्हावं, पुढं नंतर येणारे सांभाळतील नाहीतर रसातळाला नेतील, काही क्रिकेटवाचुन देशाचं अडलेलं नाहीये, मिळतात का ऑलिंपिक मध्ये पदकं, नाही, मग काही अडलंय का त्यामुळ ? उगा आपण बाजुला सरकलो तर भारतीय क्रिकेट बुडेल असा फार्स कशाला करायचा ? ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय? - भावना बाजुला ठेवुया जरा, पण सध्या जेवढं क्रिकेट खेळलं जात आहे, ते पाहता पन्नास पर्यंत सचिन काय कोणालाच खेळणं शक्य नाही, त्यामुळं ही तुलना जरा गैर वाटते. आणि हिरविणी बरोबर मिरवण हे काय नविन आहे का, ती तर परंपराच आहे आपल्याकडं.

In reply to by ५० फक्त

मेघवेडा 28/01/2012 - 00:25
भारतातल्या मठ्ठ विकेटवरची कामगिरी? जिथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही टेस्ट्स शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या विकेटपर्यंत लढल्या गेल्या त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? जिथं फास्ट बोलर्स विकेट्स काढून जातात त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? नाही, म्हणजे मग स्पोर्टिंग विकेट म्हणजे तरी काय तुमच्या दृष्टीनं? तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे! (तुमचे पूर्वीचे काही प्रतिसादही - या धाग्यावर नव्हे, जुन्या धाग्यांवर - याचीच ग्वाही देतात.) चर्चा त्रिमूर्तींबद्दल चालली आहे तिथं क्रिकेटवर - मुळावरच - घाव घालू नका. तुम्ही म्हणता ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ?! बरं, झाला तो बोल्ड. काय बिघडलं? तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! राहुलनं किती सेंचुरीज मारल्या आणि किती रन्स केले २०११ मध्ये याचं गणित मांडलंय? आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? सगळंच नेहमी गोग्गोड नसतं की हो आयुष्य! यश आहे तसं अपयशही येणारच! पण 'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. 'आपण बाजूला झालो तर भारतीय क्रिकेट बुडेल' असा फार्स कुणी केलाय हो आणि? हे बरे मनाचे श्लोक! वर्ल्ड कप जिंकला, टेस्ट्समध्ये पहिलं रँकिंग मिळालं तेव्हा हेच सगळे सीनियर्स गळ्यांतले ताईत झाले होते आमच्या! या पराभवामागं कोच हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे! ज्याला धोनीचं धूर्त, कुशल नेतृत्व वगैरे म्हणून गौरवण्यात आलं (तो चांगला कर्णधार आहेच, वाद नाही) ते गॅरी कर्स्टनच्या 'परफेक्ट प्लान्स' चं कुशल एक्झिक्युशन होतं! डंकन फ्लेचरकडं तसे ट्रम्प्स नसावेत! Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually. १९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.

In reply to by मेघवेडा

५० फक्त 28/01/2012 - 01:04
' तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे!' - शंभर टक्के कारण तेच अति होतंय आणि अति तिंथं माती होते आहे त्यामु़ळं, या त्रिमुर्ती बद्दल बोलतच नाहीये, कारण मग ती व्यक्तीपुजा होते तो सांधिक खेळ राहातच नाही, क्रिकेट या तिघांपेक्षा फार मोठं आहे, पण आपला मिडिया आणि आपण सगळेच उगाचच वैयक्तिक खेळाडुंना खेळापेक्षा मोठं करत आहे. 'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. '' - हे सुद्धा मान्य, पण सिनियर्सनी जो सिनियरपणा (पक्षी प्रौढत्व) दाखवायला हवा तो दाखवला जात नाही किंवा गेला नाही याबद्दल वाईट वाटतंय. 'तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! ' - छे विसरत नाहीये, पण नवीन पराभवाच्या जखमा जुन्या आठवणींच्या मलमांनी भरुन काढता येत नाहीत, आणि ते देखील चार चार पराभव पाठोपाठ. एका पराभवाचा वचपा काढला जातो, किंवा सुड घेतला जातो तेंव्हाच ती जखम भरली जाते. खेळ मग तो फुटबॉल असो, क्रिकेट असो किंवा बुद्धिबळ हे सगळे युद्धाचा बेस असलेल्या सांघिक किंवा वैयक्तिक कृति आहेत. सभ्य आणि सर्वमान्य प्रकार आहेत हे युद्धाचे, आणि युद्ध म्हणलं की विजय आणि पराभव आलेच, आणि त्यात विजेत्यांची वाढलेली मग्रुरी आणि आणि त्यातुन पराभुतांनी घेतलेली सुड उगवण्याची तयारी ही आलीच, जर हे होणारच नसेल तर कशाला पाहिजेत ही नाटकं. बेंगलोरातच बहुतेक प्रसादनं काढलेली सोहेलची विकेट आणि झिदाननं मारलेली धडक ही याचीच रॉ उदाहरणं आहेत. 'आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? ' - याला मुख्यत्वे जबाबदार ६-७ फलंदाजच,धावा काढणे हे त्यांचंच काम आहे, गोलंदाजांचं नाही, उलट ते तर भरुभरुन धावा देउन आपल्या फलंदाजांना संधी देत आहेत आपले कौशल्य दाखवण्याची. Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually. - but what about old seniors and new seniors, who are actually either fading or have faded, even then not only refuse to accept the fact but also refuse to play well for the country, but will play well for the money in IPL. '१९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.' - history repeats itself, nothing new in it. आणि ज्यांनी हे केलं ते आपलेच काका-मामा होते, कोणी वेगळे नव्हते.

In reply to by रमताराम

काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत? प्रश्न काही विशिष्ट खेळाडूंबद्दलचा नाही. प्रश्न आहे, सच्या, द्र्वीड आणि लक्ष्मणचा. मान्य की संघात तिघांशिवाय खेळाडू आहेत. परंतु मूळ धागामास्तर आणि महामहिमांचा प्रश्न असा आहे की, किती दिवस या सिनियर्संना खेळवणार ? आणि आपले सर्व प्रतिसाद वाचूनही, नुसतं वाचूनही नव्हेच तर आपल्याला नेमकं काय म्हणायचं असाव अशा अंदाजानेही आपले प्रतिसाद डोळ्यात तेल घालूनही वाचल्यानंतर मूळ प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी इतर फलंदाजाची तुलना, त्यांच्या जवाबदार्‍या, भारतीय गोलंदाजी, पाटा खेळपट्ट्या, वेगवान गोलंदाजांचा अभाव, भूतकाळातील स्पीनर्सच्या वर्तमान काळातील गोलंदाजांशी तुलना करणे यापेक्षा आपले प्रतिसाद सरळ प्रश्नांच्या उत्तराकडे पाठ फिरवतांना दिसतात असा एक सामान्य वाचक म्हणून आमचा समज झाला आहे. अर्थात आपण सर्वच प्रश्नाची उत्तरे मोठी अभ्यास करुन दिला आहे, असा आपल्या समजाचा आम्हाला आदर आहेच. अर्थात अशा उतरांचे आम्हाला काही नवलही नाही. देवांचे अपयश झाकण्यासाठी अशा सारवा-सारवीची गरज ' देवांच्या पडत्या काळात' भूतकाळातील विदाची शिदोरी बांधून चाललेली वकिली अनेक करत आहेत. तेव्हा त्यात काही नवे नाही. बाकी, आपल्याही प्रतिसादात नवीन,अद्भूत , अनपेक्षित, अशी माहिती सांगणारा प्रतिसाद आपला आहे, असे आम्हाला वाटत नाही. बाकी, असे सांगण्याचा अधिकार कोणा थोरल्या महाराजांनी दिला नसला तरी धागाकर्त्याच्या चर्चा-संवादात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य आपल्यासोबत आम्हालाही आहेच. कधीतरी सिनियर्सलाही वगळावे लागेल. कधी वगळायचं याचं उत्तर कधी तरी आपणाला नव्हे तर काळालाही द्यावेच लागणार आहे. पण, यापेक्षा उत्तम काळ कोणता किंवा येणार आहे, हे खेळाडूंला ठरवावेच लागणार आहे, तो पर्यंत नसती वकिली आम्हालाही झेलावी लागणारच आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही काही प्रतिक्रिया वाचून खरंच मौज वाटली. सचिन, राहूल आणि लक्ष्मण हे संघावरती भार झालेले असून, ते फॉर्म मध्ये नसताना देखील केवळ वरिष्ठ म्हणून त्यांना सहन करावे लागत आहे असा काहीसा सुर ह्या प्रतिक्रियांमध्ये दिसला. पण मुळात परिस्थीती अशी आहे का ? क्रिकेटकडे खेळ म्हणून बघणे हा झाला आपला सामान्य रसीकांचा दृष्टीकोन. मात्र बोर्ड आणि आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? आज निव्वळ सचिन संघात नाही म्हणून मॅच न बघणारे अनेक लोक मला माहिती आहेत. हे खेळाडू खेळत नसून त्यांना खेळवले जात आहे हे आपल्या लक्षात कधी येणार ? सर्व संघानी आंतरराष्ट्रीय दौर्‍यात आपला तुल्यबळ संघच पाठवायला हवा, हा आयसीसीचा पहिला नियम आहे. त्यामुळे तर काही काळापूर्वी दुबळा संघ सचिनच्या हाताखाली राष्ट्रकुलला आणि तुल्यबळ संघ ट्राय सिरीज खेळायला रवाना झाला होता. गंमतीचे उदाहरण सांगतो. गेल्या २ वर्षात आगरकर, झहिर खान पासून अनेक भारतीय संघात खेळणारे किंवा पदार्पण करणारे खेळाडू पुण्यात विविध सामन्यांसाठी येऊन गेले. आगरकर रणजीसाठी तर झहिर बहूदा ऑईल कंपन्यांच्या सामन्यासाठी येऊन गेला. ह्या खेळाडूंना बघायला ५० प्रेक्षक देखील हजर नव्हते. आणि जेंव्हा सचिनचा मुलगा अर्जुन शालेय सामन्यासांठी पुण्यात आला तेंव्हा त्याला बघायला २५० च्या वर लोकांची गर्दी. ह्याला म्हणतात नाममहात्म्य. उद्या कोहलीच्या कर्णधारपदाखीला त्रिमुर्ती,सेहवाग, धोनी ह्यांना वगळून संघ पाठवला तर किती लोक पहाटे उठून सामना बघतील ? किती प्रेक्षक मैदानात हजेरी लावतील ? आणि मुख्य म्हणजे ह्या संघाच्या सामन्यांना कोण प्रायोजक आपले पैसे लावेल ? दोन वर्षापूर्वीच्या आयपीएलला सचिन शेवटी एकदाचा फिट घोषीत होऊन खेळायला येईपर्यंत मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना काय गर्दी होत होती ? सचिन आल्यावर तिच गर्दी किती वाढली ? प्रत्यक्ष तुम्हीच घेतलेला हा अनुभव आहेत. शेवटी रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? मुद्यात दम आहे. ठाण्याला, युवीची फलंदाजी आणि युवीला जवळून बघायला मिळावे म्हणून ऐववेळी आयपीएलच्या तिकिटासाठी केलेला खटाटोप आणि धावपळ आठवली. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 27/01/2012 - 15:34
सेंच्युरी नाही म्हणून सचिनला घरी बसवा ... महाराष्ट्राची प्रगती नाही म्हणून सी एम ना घरी बसवा.. जनलोकपाल नाही म्हणून अण्णांना म्हणून घरी बसवा.. ( मंदाकिनी , भन्नाट पूर्ण न के ल्याबद्दल परा ला घरी बसवा) बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?

चिरोटा 27/01/2012 - 15:43
१२० कोटींतल्या ११ना , २ कोटींतल्या ११ कडून हरताना पाहून एक मिपाकर म्हणून मान शरमेने खाली गेली.

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा.. हम्म, सहमत आहे. आवडता विषय काथ्याकुटायला घेतल्याबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे (ऑष्ट्रेलियात चव गेल्याने नाराज असलेला)

असुर 27/01/2012 - 17:21
चवकशीच्या कुठल्या अ‍ॅक्टान्वये हा धागा काढला आहे हे धाग्याच्या सुरुवातीलाच (किंवा मध्ये, किंवा शेवटी, किंवा कुठेही) स्पष्ट न केल्याने सदर धाग्याला फाट्यावर मारण्यात आलेले आहे. बाकी ररा पुरेसे बोलले आहेतच. आणि त्यांच्या प्रतिसादातूनही काही कळले नसेल, तर काहीही कळण्यापलिकडे गेल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गप्प रहायचे ठरवण्यात आले आहे. पराषेटना 'डायरीदान' या नावाने लेखमाला सुरु करण्याची विनंती! --असुर

समंजस 27/01/2012 - 18:57
---- मुळीच घरी बसवू नये. क्रिकेट सारख्या मोठया खेळात हरण्याच्या अश्या छोट्या छोट्या घटना होतच असतात. त्याचं काय मोठं मनाला लावून घ्यायचं? अश्या छोट्या घटनांमुळे आपण त्यांनाच काय, कोणालाही घरी बसवू नये.

आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते.
१०० % सहमत. उदा. सुनील, कपिल यांनी घेतलेली निवृत्ती. पण शतकांचे शतक पूर्ण होणं ही बाबही असामान्य आहे आणि ती न साधण्याइतकं सचिन "हे" झाला नाही अजून. त्यानंतर मात्र त्याने सन्मानाने निवृत्त होणेच चांगले.
अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली.
१. सध्याचा परफ़ॉर्मन्स बघितल्यावर वरील तिघांसह इतर आठांवरही जळजळीत टीका होणं आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे. आणि काय होतं, की क्रिकेटला इतकं महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, की घरात एखाद्याचा दहवा/तेरावा असेल तरी जर क्रिकेट मॅच चालू असेल तर दुःख गेलं तेल लावत.. पण क्रिकेटचा विचार सोडवत नाही. क्रिकेट या खेळाचं नाव जर विष्णु, किंवा कृष्ण किंवा तत्सम देव/देवी असतं, तर त्याबद्दलच्या विचाराने कळत-नकळत अनेक भारतीयांना मोक्ष मिळाला असता! २. सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.

In reply to by प्रशांत उदय मनोहर

श्रावण मोडक 27/01/2012 - 19:23
सुनीलसोबत कपीलचं नाव पाहून आश्चर्य वाटलं. कपीलची निवृत्ती लांबली. इतकी, की सचिनची आत्ताची कामगिरी परवडली, अशी कपीलची स्थिती झाली होती. तो हॅडलीचा विक्रम एकदाचा पार झाला आणि मग अनेकांनी हुश्श केलं होतं. निवृत्तीबाबत अलीकडच्या काळातला सर्वाधिक हुशार खेळाडू सुनीलच. अगदी अनपेक्षीतपणे त्याने निवृत्तीची घोषणा केली. :)

In reply to by प्रशांत उदय मनोहर

यकु 27/01/2012 - 19:32
>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. =) ) =) ) =) ) =) ) =) ) लेखामागची परिस्थिती काय जब्बरदस्त टिपलीय. खपलो हे वाचून..

In reply to by यकु

मोदक 27/01/2012 - 19:54
>>>>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. बहुदा या वाक्याचा कॉपीराईट छोटा डॉन कडे आहे. :-D

In reply to by प्रशांत उदय मनोहर

मोदक 29/01/2012 - 01:00
ते तर तुमचेच वाक्य आहे... उगाच चाळीमधल्या संडासासमोरच्या रांगेतला माणूस संडासाचं दार उघडायची वाट पाहतो तसे करू नका. http://www.misalpav.com/node/19879#comment-355215 आमची मेमरी थोडी गंडली असावी. :-)

सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. लबर एक. प्रशांतराव दंडवत घ्या आमचा. :) -दिलीप बिरुटे

५० फक्त 27/01/2012 - 22:41
उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. - कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?

In reply to by ५० फक्त

कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?
ते ठीक आहे हो! पण क्रिकेट मॅचमधल्या पराभवानंतर चर्चा करताना लोकांना स्वतःला गळका-टमरेलधारी चाळकर्‍याच्या भूमिकेत जायला का आवडतं एवढं, हा प्रश्न नेहमी पडतो मला. बाय द वे, वर जाताना जर खाल्लेलं घेऊन जाल तर कदाचित् वरच्या संडासासमोरील रांगेत उभे रहावे लागेल तुम्हाला. ;)

अनेक वर्षापासून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने अती क्रिकेट भारतीय जनतेच्या आणी खेळाडूंच्या माथी मारले आहे. त्यात आय पी एल ह्या व्यावसायिक स्पर्धेची भर पडली .त्यात तर सामन्यांचा रतीब असतो. पूर्वी सचिनने २० २० देशासाठी खेळायचे टाळले होते. पण आता तोही'' दुनिया हिला देंगे'' म्हणत ह्या सर्कशीत दाखल झाला आहे. आपले खेळाडू एक तर प्रचंड थकलेले आहेत किंवा दुखापती लपवून खेळत आहेत. भारतीय संघाबद्दल म्हटले तर कुंबळे गेल्यावर एकहाती गोलंदाजीची धुरा वाहणारा एकही पर्याय उपलब्ध नाहीं आहे. जहीर दुखापतीने त्रस्त बाकीचे आयाराम ,गयाराम आहेत. क्रिकेट सामने गोलंदाज जिंकून देतात. परदेशात ८ सामने सलग हरणे कुणालाच मान्य होणार नाहीं. कणेकरांचे एक वाक्य आठवले . एकदा कपिल देव पाकिस्तान विरुद्ध हरल्यावर म्हणाला होता '' हा खेळ आहे. कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार'' त्यावर ते म्हणतात '' हे आम्हालादेखील कळते, पण हरणारा संघ नेहमी आपलाच का असतो. ता .क आता आय पी एल ५ चे बिगुल वाजले आहे. त्यात पाटा खेळपट्टीवर फटाक्यांची आतिषबाजी पहायला सज्ज होऊया.

श्रीरंग 28/01/2012 - 00:44
क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन बीसीसीआय समोर सपशेल लोटांगण घातले नसते, आणी WADA ची नियमावली बंधनकारक केली असती तर ८०% क्रिकेटपटू डोप टेस्ट मधे फेल होऊन घरीच बसले असते.

प्रचेतस 27/01/2012 - 11:23
सेहवाग, गंभीर, धोनीचे काय? त्यांना का नाही घरी बसवायचे? का केवळ थोडे तरूण आहेत म्हणून त्यांनी धावा केल्या नाहीत तरी चालतात का?

In reply to by प्रचेतस

रेवती 27/01/2012 - 21:24
अहो वल्लीसाहेब, आजकाल खेळाकडे खेळ म्हणून न पाहण्याचाच जमाना आहे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर जालावरही लोक गंमत म्हणून न येता शिरेसली येतात आणि गमतीचे प्रतिसादही शिरेसलीच घेतात. कश्याला किती महत्व द्यायचं यावर एक कार्यशाळा आयोजित करता काय?;)

In reply to by रेवती

प्रचेतस 27/01/2012 - 21:44
अगदी खरंय रेवतीआज्जे. बाकी कार्यशाळा वैग्रे आयोजित करणे तुम्हीच बघा, आम्ही आपले विद्यार्थी म्हणूनच येऊ. :)

In reply to by कॉमन मॅन

प्यारे१ 27/01/2012 - 11:28
"कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. तोड दो दरवाजा..!" आपली स्वाक्षरी बरंच काही बोलते आहे. शतकी धाग्यासाठी आधीच शुभेच्छा...! ;)

In reply to by कॉमन मॅन

पक पक पक 27/01/2012 - 12:25
च्यायला दर वेळेस सचिन ,द्रविड ,लक्शम्ण यांनी शतके ठो़कलीच पाहि़जेत का..?गेल्या वर्षात द्रविड चे पर्फॉर्मसं बघा कि जरा.. जिंकलो कि डोक्यावर घेउन नाचायच आणी हरलो कि पायद्ळी तुडवाय्च काय पट्त नाय.. हा धागा म्हण्जे दुतोंडी .......... वाट्ते....

In reply to by कॉमन मॅन

चिंतामणी 27/01/2012 - 17:27
>>>>>>>>आधी म्हातार्‍यांना तर हाकला. हाकलायचे कशासाठी?????? खेळ होत नाही म्हणून की म्हातारे झाले म्हणून? उगाचच त्रागा करू नये. वय वाढणे ही नैसर्गीक गोष्ट आहे. प्रत्येकजणाचे वय वाढणारच आहे. म्हणून दरवेळी पुढच्या पिढीने मागच्या पिढीला असे हिणवु नये. मागच्या इंग्लंड दौ-यात फक्त द्रवीडच सातत्याने खेळला हे विसरू नये. असो. खेळ होत नाही म्हणून हाकला असे म्हणायची पंचाईत. सो कॉल्ड यूथ आयकॉन्स घोनी, गंभीर, सेहवाग, इशांत शर्मा इत्यादी हे काय दिवे लावत आहेत?????????

विवेक मोडक 27/01/2012 - 11:24
सचिन्,राहुल आणि लक्ष्मण या सिरीजमधे अपयशी ठरले हे मान्य. पण सगळा दोष त्यांच्या माथी का?? सेहवागला अजुनही वनडे आणि कसोटीतला फरक कळत नसेल (दोन त्रिशतकं आणि एकदा २९३ काढुनदेखील) तर त्याला तोच न्याय लागु होत नाहि का? धोनीचं काय वेगळं आहे? गंभीरसुद्धा "नवीन रक्ता" पैकीच आहे ना?? त्याला या सिरीजमधे काय धाड भरली होती??? नविन रक्त वगैरे ठीक आहे पण त्या नवीन रक्तात फक्त आय पी एल च असेल तर कसोटीत काय उपटणार आहेत ते? गोलंदाजांविषयी जेवढं कमी बोलु तेवढं चांगलं आहे.

In reply to by विवेक मोडक

विमोंशी सहमत. त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. बरेच प्रश्न विचारायची इच्छा होते आहे, मात्र लगेच ते गूगलून उत्तरे मिळतील म्हणून गप्प आहे. अर्थात रोज उठून तद्दन फालतू डायर्‍या लिहिणार्‍यांना देखील घरी बसवावे का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

कपिलमुनी 27/01/2012 - 16:30
आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??

In reply to by कपिलमुनी

आता चित्रपट परीक्षण लिहिणार्यांना तुम्ही कोणते कोणते चित्रपट दिगदर्शित केले आहेत असे विचारायचे का ??
परिक्षण लिहिणार्‍यांनी 'ह्यांन हाकला, त्यांना चित्रपटात घेऊन नका, फलान्यांना घरी बसवा' अशी फुकाची बोंब केली तर त्यांना जरुर हा प्रश्न विचारावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>त्याआधी क्रिकेट ह्या क्षेत्रातील कॉमन मॅन ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. >> मी अगदी सहमत रे परा! >> अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला.... > त्याचं काय आहे 'कॉमन मॅन', तेंडल्याबद्दल हे प्रकार पूर्वी ही झाले आहेत (म्हणजे ते वाहिन्यांवरचे तज्ज्ञ इ.) पण 'उचलली जीभ...' ह्या प्रकारात आपण बोलणार्‍यांची तोंडं नाही बंद करू शकत ना! बाकी चालू द्या....

In reply to by विवेक मोडक

रमताराम 27/01/2012 - 12:57
एकदम सहमत. च्यामारी त्यांना घरी बसवू हो, पण पर्याय अजून वाईट आहेत त्याचे काय. हे तिघे वगळता उरलेल्या तिघा 'तरूण' फलंदाजांची कामगिरी या 'म्हातार्‍यांहून वाईट आहे त्याचे काय. आणि हे जर देशातील पहिले तीन श्रेष्ठ 'तरुण' फलंदाज आहेत तर इतर 'तरुणांची'ची कामगिरी अजून वाईट असण्याची शक्यताच जास्त आहे. वर्षभरात एक त्रिशतक ठोकले की एरवी ३०च्या वर जायला परवानगी नसते असे समजणार्‍या सेहवागचे काय? तो तीसचा आकडा पार करायला कधी शिकणार? गंभीरही फॉर्ममधे कधी येणार? सहावा फलंदाज म्हणून गेल्या वर्षात आपण किती जणांना संधी दिली. ती जागा अजून स्थिर होत नाही, आणखी तीन मोकळ्या करून कोण दिवटे आणणार तिथे? रडतराऊंच्या सोयीसाठी रडतराऊंनी काढलेला धागा. सामाजिक जीवनात जसे राजकारणी, पोलिस इ. ना एकदा नालायक म्हणत ठो ठो बोंब ठोकली की आपली जबाबदारी झटकून टाकता येते तसे. उठसूठ या तिघांच्या नावे बोंब ठोकली की तर आठ जणांचा नालायकपणा झाकता येतो. जर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सतत २००-२५० मधे प्रतिस्पर्ध्याला उखडत असतील नि याचे कारण वेगवान खेळपट्ट्या हे असेल तर आपले गोलंदाज काय तिथे आट्यापाट्या खेळतात? त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया ६०० धावा करू शकते याचा अर्थ आपली गोलंदाजी सुमार, शाळकरी दर्जापेक्षाही सुमार आहे हे कधी मान्य करणार आपण? सातत्याने हीच स्थिती असताना इतक्या वर्षात वेगवान गोलंदाजाच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना उपयुक्त ठरतील अशा खेळपट्ट्या देशात बनवण्यासाठी कधी सुरुवात होणार? पाटा खेळपट्ट्यांवर धावा रोखण्यापुरती गोलंदाजी करण्याची सवय त्यांना लागत असेल तर त्यांचा काय दोष? आणि आमचे स्पिनर ग्रेट हा मूर्खपणाचा समज कधी सोडणार आपण. चंद्रा-बेदी-प्रसन्नाची धार इतर कोणत्याही भारतीय स्पिनर्सना नव्हती, अगदी कुंबळेलासुद्धा हे स्वच्छ मनाने कधी मान्य करणार. अलिकडच्या काळातील श्रेष्ठ स्पिनर्समधेही कुंबळेचा क्रमांक मुरलिधरन नि वॉर्न यांच्या मागेच लागतो ते सत्य आपण मान्य करणार की नाही. त्यामुळे आपल्या देशात स्पिनर्सना अनुकूल खेळपट्ट्या बनवू नि मग बघून घेऊ हा दावा किती अज्ञानमूलक आहे हे कधी समजणार? काळ बदलतो हे कधी समजणार? आणि मग त्यानुसार धोरणे, पवित्रे डावपेच कधी बदलणार. केवळ सुदैवाने चांगला संघ मिळाल्याने फुकटचे श्रेय घेणारा धोनी स्वत:चे डोके चालवायला कधी शिकणार. त्याने मैदानावर कर्णधार म्हणून काही हालचाली केल्याचे शेवटचे कधी दिसून आले होते. कपिलदेवच्या काळापासून सेट झालेला गोलंदाजीचा पॅटर्न त्याने कधी बदलण्याचा प्रयत्न केला आहे का? नसल्यास यशाचे श्रेय त्याचे कसे, नि आता अपश्रेयाचे खापर फलंदाजांवर का फोडावे? गोलंदाजांनी काय दिवे लावले आहेत? या दौर्‍यात नि मागच्याही, किती वेळा हे गोलंदात प्रतिस्पर्ध्याचा सारा संघ बाद करू शकले आहेते? श्रेय आपले नि अपयशाचे धनी मात्र जुने खेळाडू हा स्वार्थी कावा का म्हणून? जरा वाईट घडू लागले की उठसूठ आपल्या -तथाकथित- देदिप्यमान भूतकाळाकडे चला चा नारा दिला जातो नाहीतर खापर फोडायला एखादा बकरा - पंचिंग बॅग - शोधली जाते. सचिनला मिळणारा पैसा हा नेहमीच मध्यमवर्गीयांच्या असूयेचा मुद्दा असल्याने तो आपले नेहमीचे गिर्‍हाईक आहेच. गेल्या संपूर्ण वर्षातील कामगिरी पाहिली तर अजूनही सचिन द्रविडच पहिले दोन क्रमांक राखून आहेत हे दिसून येते. यावर स्टॅटिस्टिक्स डजन्ट टेल एनिथिंग किंवा तत्सम बिनडोक तर्क दिले जातात. किंवा 'ऐनवेळी सचिन खेळत नाही' हे घोर अज्ञान (सुधीर काळेंनी साधार खोडून काढलेले असूनही) पुन्हा पाजळले जाते. तात्पर्य फारसे विचार न करणार्‍यांना त्रागा करायला दुगाण्या झाडायला चांगला धागा आहे. चालू द्या.

In reply to by रमताराम

बाकी ते सुनिल गावसकर, रवी शास्त्री (आणि बहूदा मदनलाल) ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरुप बदलून त्या वेगवान करण्यासाठी उपाययोजना सुचवणारी जी समिती स्थापन झाली होती, तिचे काय झाले हो पुढे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

विवेक मोडक 27/01/2012 - 14:17
त्याचं काय झालं माहित नाहि. पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??

In reply to by विवेक मोडक

पण पुण्याच्या नेहरु स्टेडियमच्या क्युरेटरला जगभरातल्या खेळपट्ट्यांचं घाउक कंत्राट दिलं तर??
क्युरेटर मिर्च मसाला मध्ये बसलेला असतो आणि खेळपट्टी कोण तयार करतो हे तुम्ही जाणताच. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

५० फक्त 27/01/2012 - 17:00
पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 27/01/2012 - 17:01
मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना? ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.

In reply to by श्रावण मोडक

पराशेट, अशी राष्ट्रिय गुपितं फोडु नका, कपिल सिब्बल तुमच्या इथं प्रतिसाद देण्यावर बंदी आणतील, इथं आधीच का हुच्च्भ्रु कमी आहेत म्हणुन अजुन गोंधळ वाढवा.
अहो वाहत्या गंगेत हात धुवून घेतोय झाले.
मिर्च मसाला चालू असतं का रे? मध्यंतरी नाव वगैरे बदललं होतं ना?
नाव बदलले असले तरी कार्य त्याच जोमाने चालू असते. ;)
ही विचारणा अवांतर नाही. कारण मिर्च मसाला चालू असेल तर खेळपट्टीचं स्वरूप बदलतं. मिर्च मसालाची जागा दुसऱ्या कशानं घेतली असेल तरी खेळपट्टी बदलत असते.
ज्जे बात ! त्यात मुंबई - पुणे रणजीच्या आदल्या रात्रीची मजाच वेगळी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिंतामणी 27/01/2012 - 17:45
गेले ते दिन गेले. :( :-( :sad: गहुंजाला काय काय सोई आहेत हे कोणी तज्ञ सांगेल काय?????

सुहास.. 27/01/2012 - 11:31
सिरिज गमावल्याचा दोष फलंदाजावर की गोलदांजावर हे ठरवा आधी. १ ) लेग ग्लान्स साठी फिल्डर घेतला की बॉल लो बाउन्स ऑफसाईड ला ??? ते पन पॉन्टीग ला ( ज्याच्यावर लगान पोर देखील कव्हर ड्राईव्ह मारेल ) २ ) तीन स्लिप घेवुन बॉल कुठ , तर पायात ??? ३ ) सेटल झालेल्या प्लेयर बॉल, फुटबॉल येव्हढा दिसायला लागतो , त्याल चेंज ऑफ पेस ??? मजा आहे !!

In reply to by विवेक मोडक

सुहास.. 27/01/2012 - 11:43
विमो , ' बुंधा ' म्हणजे यॉर्कर , इथे पायात म्हणजे सरळ लेग ला कट किंवा फ्लिक करता येतो . क्रिकेट प्लेयर सुहास यांच्या स्वानुभवातुन ;)

विवेक मोडक 27/01/2012 - 11:37
सुरेश रैना - चेंडु छातीच्या वर उसळला की बोंब सुरु. स्विंग बद्दल बोलायलाच नको. चेतेश्वर पुजारा - मैदानात कमी वेळ दुखापतग्रस्तांच्या यादीत जास्त बद्रीनाथ - नेहरु स्टेडियम पुणे किंवा तत्सम विकेट्सवर शतकं ठोकण्यात पटाईत, पण ग्रीनटॉपवर काय? अभिनव मुकुंद्,मुरली विजय, आणि अजुन बरेच जण आहेत यादीमधे

विवेक मोडक 27/01/2012 - 11:44
नाही, प्रातिनिधीक म्हणुन हेच तिघे का प्रत्येकवेळी??? बाकी काल विराट कोहलीने शतक पूर्ण केल्यावर जो शब्द तोंडातुन काढला हेच बहुतेक या तरुण रक्ताचं प्रातिनिधीक रूप असावं. उदा. कोहली,युवराज

५० फक्त 27/01/2012 - 12:08
हे म्हणजे अगदी त्या आजारी सासु सारखं झालं होत नसलं तरी कामं करायची ( तथाकथित भारतीय संघातुन खेळायचे) आणि मग सुन बाहेर काम करते (आयपिएल मध्ये) म्हणुन घरात काम करत नाही अशी तक्रार करायची.

अनामिका 27/01/2012 - 12:21
त्रिकुटाला म्हातारे म्हणताय ?आपण काय चिरतारुण्याचे वरदान प्राप्त करुन या धरती वर अवतरला आहात का ? अहो !" तो खेळ आहे कुणी तरी हरणार कुणी तरी जिंकणार'खेळा कडे खेळ म्हणून बघायला शिका...... थिल्लर वृत्त माध्यमांचे प्रतिनिधी देखिल मिपावर फेरफटका मारत असतात बहुदा? मिपा बरीच प्रसिद्ध झाली आहे याचे हे द्योतक आहे... हर्षभरीत मिपाकर

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

५० फक्त 27/01/2012 - 13:00
भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ? बाकी, इथला पैसा निवडणुकांमध्ये अडकलेला असल्याने या सिरिजमध्ये जास्त पैसा लागत नसेल आणि त्यामुळं असं होतं आहे का ? भारतातल्या निवडणुका आणि त्यावेळेस झालेल्या सिरिज यावर थोडा शोधा घ्यावा असा विचार आहे. यापुर्वी भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या सिरिज आणि भारतीय शेअर मार्कॅट यामधल्या योगायोगावर लिहुन आलेलं होतंच.

In reply to by ५० फक्त

भारतात क्रिकेट आणि राजकारण यावर बोलण्या लिहिण्यासाठी त्यापैकी काही केलेलं असण्याची गरज असते का ?
ते ठिक आहे, पण निदान आपल्याला त्या विषयातले खुप काही समजते आणि आपण जणू काही मार्गदर्शक तत्वेच मांडत आहोत असा आव तरी आणू नये. असो. एकदा हुच्चभ्रुच व्हायचे ठरवल्यावर असे धागे काढणे हे क्रमप्राप्तचं!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

श्या!! सचिन, द्रविडला शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची बॅटींग कधी केली होतीत?
राजकारण्यांना विशेषतः संसद सदस्यांना शिव्या देण्याची फ्याशनच आहे. बाकी तुम्ही शेवटची निवडणुक कधी लढवली होतीत? (हे वैयक्तिक तुमच्याविषयी नाही. पण हेच मुद्दे वापरले तर कोणाविषयीच काहीच बोलायला नको. संसद सदस्यांना काही बोलायचे नाही कारण मी निवडणुक कधी लढवली नाही. मी बसलेल्या रिक्षाचा ड्रायव्हर नीट रिक्षा चालवत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी रिक्षा चालवायला गेलो आहे? ब्यांकेत काऊंटरमागचा माणूस नीट काम करत नसेल तर त्याला काही बोलायचे नाही कारण मी कधी काऊंटरमागे होतो? असो.)

गणपा 27/01/2012 - 12:59
तुमच दळण चालुद्या. :) आवांतर : हुच्चभ्रु झाल्याबद्दल अभिनंदन. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यकु 27/01/2012 - 14:23
सहमत. कॉमन मॅन यांनी क्रिकेटकडे लक्ष न देता संविधानावरील लेखमाला टाकावी . ;-) अवांतर ‍आणि खोडसाळ स्वगत: कॉमन मॅन हे चेसुगु आहेत काय? ;-)

In reply to by यकु

कपिलमुनी 27/01/2012 - 16:48
अजुन प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद ,उपउपप्रतिसाद ,उपउपउपप्रतिसाद नाहीत दिले ..त्यामुळे चेसुगुंची शक्यता वाटत नाही

In reply to by कपिलमुनी

यकु 27/01/2012 - 17:06
छ्‍या: ! ते चेसुगु असलेच तर या अवतारात त्या स्टायलीत कशाला उपउपउपप्रतिसाद देतील? तसे उप, उपप्रतिसाद दिले असते तर इथल्या कुटिलमुनींच्या ;-) चाणाक्ष नजरेतून ते सुटले असते काय?

मोहनराव 27/01/2012 - 14:40
याच म्हातार्‍या लोकांनी जेव्हा सामने जिंकुन दिले तेव्हा डोक्यावर घेउन नाचला होतात ना, मग त्यांच्या इच्छेप्रमाणं त्यांना खेळुद्या की त्यांना वाटतंय तोपर्यंत. निदान नवीन लोकांपेक्षा तरी ते बरे म्हणायचे!! घरी बसुन टिका करत बसणे सगळ्यात सोपी गोष्ट आहे व ती करत बसणे सगळ्यात आवडता उद्योग असतो आपल्या लोकांचा!!

रमताराम 27/01/2012 - 15:04
जरा इथे पहा बरं. जो वर्ल्ड-कप नुकताच जिंकला म्हणून यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले त्यात भारताकडून सर्वाधिक धावा कोणाच्या नि सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत ते बघा बरं जरा. वर आम्ही स्पिनर्सबद्दल जो एक मुद्दा मांडला तो ही इथे तपासून पाहता येईल. आपल्याच भूमीवर खेळत असून जहीर, मुनाफ आणि तीनच सामने खेळलेला नेहरा (तीन बळी) या वेगवान गोलंदाजांनी इतर सार्‍या स्पिनर्सच्या (ज्या युवराज हा पार्टटाईम गोलंदाज सर्वाधिक बळी घेऊन गेलाय.) एकुण बळींपेक्षा अधिक बळी मिळवले आहेत. टाईम्स हॅव चेन्जड. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणारा तो एक म्हाताराच आहे. 'ही माझी स्टाईल आहे मी असाच खेळणार' निर्लज्जपणे म्हणत पाच-दहा षटकातच तिसर्‍या फलंदाजाला मैदानावर यायला भाग पाडणारा, खालच्या फलंदाजांना नव्या चेंडूचा सामना करायला लावणारा आणि तरीही स्वतःला आघाडीचा फलंदाज म्हणवून घेणारा कधी बदलणार?'

In reply to by रमताराम

>>>>> यंग ब्रिगेड वगैरेचे कौतुक झाले... झालं गेलं कौतुक मान्य आहे. पण, नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

५० फक्त 27/01/2012 - 17:33
'नै म्हणजे अजून किती वर्ष सलगपणे ही मंडळी खेळली पाहिजे असे आपल्याला वाटते ? ' सर अतिशय महत्वाचा प्रश्न जो विचारणा-यांना नीट विचारता येत नाहीये आणि उत्तर देणा-यांना याचं उत्तर देता येणार नाहीये, इथं मला वाटतं जयंत सरांची स्वाक्षरी आहे ना तसा प्रकार आहे - मी गप्प बसतो त्यांची अडचण होउ नये म्हणुन. खरंतर, क्रिडा क्षेत्रात अन राजकारणात निवृत्तीसाठी वय / विक्रम / सहभाग वगैरे असे नियम केले पाहिजेत. या बाबतीत कुंबळे अन सौरव हुशार निघाले, वेळच्या वेळी बाहेर पडुन / पाडले जाउन आज आहेत त्या स्थितीत बरे आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रमताराम 27/01/2012 - 17:34
त्याची चिंता मला कशाला. मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही. तोवर कशाला बाजारात तुरी.... अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते?

In reply to by रमताराम

>>>>> मला अजून तरी बीशीशीआयने निवड समितीत घेण्याची आफर दिलेली नाही. आपण निवड समितीत असता तर सचिन, द्रविड आणि लक्ष्मणच्या फलंदाजीचा विदा वर्षानुवर्ष दाखवून सन्मानीय क्रिकेटपटूंना (क्रिकेटच्या देवांना) ते पन्नाशी-साठीचे झाले असते (पायाची हालचाल करतांना त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या) तरी त्यांना खेळवले असते त्याच बरोबर अपयशाचं खापर फोडायला खेळपट्ट्या असणारच होत्या तेव्हा नशीब आम्हा क्रिकेट रसिकांचं की आपल्याला निवड समितीची ऑफर नाही. ;) अवांतरः या प्रश्नाचा कौल बनवायची आय्ड्या कशी वाटते? आय्ड्या उतनी बुरी नही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

५० फक्त 27/01/2012 - 22:40
+१००, मग नाहि तर काय ,बरं ते जाउ दे, एक सामान्य क्रिकेट चाहता म्हणुन, विशिष्ट खेळाडुचा चाहता म्हणुन नव्हे, बिरुटे सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्या की.

In reply to by ५० फक्त

रमताराम 27/01/2012 - 23:19
याच धाग्यात. वाचायची तसदी घेतली तर मिळेलही. वर मूळ प्रतिसादात क्रिक-इन्फोचा दुवा आहे. चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय? आणि आम्ही तुलनात्मकदृष्ट्या उरलेल्या आठ खेळाडूंच्या कामगिरीबद्दल - काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत? ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय?

In reply to by रमताराम

मेघवेडा 27/01/2012 - 23:22
अहो आम्हाला कळेल अशा शब्दांत लिहा वो काहीतरी. हे सगळं आम्हाला कळत नाही. आम्ही फक्त फेल गेल्यावर आरोप करणं जाणतो!

In reply to by रमताराम

५० फक्त 27/01/2012 - 23:47
''चार महिन्यापूर्वीची विश्वचषकातील दोन शतके, दोन अर्धशतकांसह भारतातर्फे सर्वाधिक धावांची कामगिरी आज संघात असण्यासाठी पुरेशी नसेल तर काय फक्त कालच्या कामगिरीचा निकष लावायचा काय? - पण ही कामगिरी भारतातल्या मठ्ठ विकेटवरची झाली, गेल्या महिन्याभरात काय झालंय ऑस्ट्रेलियात ? आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या तरी निघाल्यात का ? ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ? रात गयी बात गयी, जर प्रत्येक मॅच नविन असेल तर प्रत्येक मॅच मधलं हरणं आणि जिंकणं हे सुद्धा नवीनच असतं, आणि त्याचा तेवढाच आनंद किंवा दुख: होतं, आता हे तर मॅच मागुन मॅच हरणं चाललंय आणि ते सुद्धा कोणताही विरोध न दाखवता मग तो सहवाग सचिन द्रविड नाहीतर लक्ष्मण, एखादा दोन दिवस टिकतील पिचवर नाहीच, थोडा टिकेल असं वाटलं की घातलीच बॅच आसाऑस्टं मध्ये. हेच करायचं असेल तर या सगळ्यांनाच टिम ए ला नॅशनल टिम म्हणुन पाठवायचा एक प्रयोग करुन पाहायला काय हरकत आहे. ज्या पिचवर ऑस्ट्रेलियन सहाशे रन काढतात तिथं आपल्याला चारशे करता येउ नयेत, या सगळ्या थोर खेळाडुंचा थोरपणा यातच आहे की त्यांनी बाजुला सरकुन मोकळं व्हावं, पुढं नंतर येणारे सांभाळतील नाहीतर रसातळाला नेतील, काही क्रिकेटवाचुन देशाचं अडलेलं नाहीये, मिळतात का ऑलिंपिक मध्ये पदकं, नाही, मग काही अडलंय का त्यामुळ ? उगा आपण बाजुला सरकलो तर भारतीय क्रिकेट बुडेल असा फार्स कशाला करायचा ? ठीक आहे. हे आमचे उत्तर. जर वर्षातून चार शतके, पाच-सहा वेळा नव्वदीत बाद होणारा खेळाडू असेल जो पंचेचाळीसच्या पेक्षा अधिक वार्षिक सरासरी प्रत्येक वर्षी (लॉन्ग-टर्म अ‍ॅवरेजही नव्हे, त्या त्या वर्षीची सरासरी) तर तो पन्नासच काय शंभर वर्षाचा असला तरी तीसच्या सरासरीने खेळणार्‍या तथाकथित तरूण खेळाडूपेक्षा लाखपटीने परवडला. खेळता येत नाही बोंबलायला तर तारूण्य काय मखरात सजवायचंय? का आज या, उद्या त्या हिरविणीबरोबर गॉसिप म्यागेजिन्स मधून मिरवायचंय? - भावना बाजुला ठेवुया जरा, पण सध्या जेवढं क्रिकेट खेळलं जात आहे, ते पाहता पन्नास पर्यंत सचिन काय कोणालाच खेळणं शक्य नाही, त्यामुळं ही तुलना जरा गैर वाटते. आणि हिरविणी बरोबर मिरवण हे काय नविन आहे का, ती तर परंपराच आहे आपल्याकडं.

In reply to by ५० फक्त

मेघवेडा 28/01/2012 - 00:25
भारतातल्या मठ्ठ विकेटवरची कामगिरी? जिथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही टेस्ट्स शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या विकेटपर्यंत लढल्या गेल्या त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? जिथं फास्ट बोलर्स विकेट्स काढून जातात त्या विकेट्सना मठ्ठ म्हणायचं? नाही, म्हणजे मग स्पोर्टिंग विकेट म्हणजे तरी काय तुमच्या दृष्टीनं? तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे! (तुमचे पूर्वीचे काही प्रतिसादही - या धाग्यावर नव्हे, जुन्या धाग्यांवर - याचीच ग्वाही देतात.) चर्चा त्रिमूर्तींबद्दल चालली आहे तिथं क्रिकेटवर - मुळावरच - घाव घालू नका. तुम्ही म्हणता ज्या द्रविडच्या स्टंम्पला महिनोनमहिने बॉल लागत नसे तो चार पाच वेळा बोल्ड होतो हा फक्त योगायोगच मानायचा का ?! बरं, झाला तो बोल्ड. काय बिघडलं? तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! राहुलनं किती सेंचुरीज मारल्या आणि किती रन्स केले २०११ मध्ये याचं गणित मांडलंय? आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? सगळंच नेहमी गोग्गोड नसतं की हो आयुष्य! यश आहे तसं अपयशही येणारच! पण 'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. 'आपण बाजूला झालो तर भारतीय क्रिकेट बुडेल' असा फार्स कुणी केलाय हो आणि? हे बरे मनाचे श्लोक! वर्ल्ड कप जिंकला, टेस्ट्समध्ये पहिलं रँकिंग मिळालं तेव्हा हेच सगळे सीनियर्स गळ्यांतले ताईत झाले होते आमच्या! या पराभवामागं कोच हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे! ज्याला धोनीचं धूर्त, कुशल नेतृत्व वगैरे म्हणून गौरवण्यात आलं (तो चांगला कर्णधार आहेच, वाद नाही) ते गॅरी कर्स्टनच्या 'परफेक्ट प्लान्स' चं कुशल एक्झिक्युशन होतं! डंकन फ्लेचरकडं तसे ट्रम्प्स नसावेत! Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually. १९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.

In reply to by मेघवेडा

५० फक्त 28/01/2012 - 01:04
' तुमचा प्रतिसाद हा अ‍ॅन्टि त्रिमूर्ती नसून अ‍ॅन्टि क्रिकेटच वाटतो आहे!' - शंभर टक्के कारण तेच अति होतंय आणि अति तिंथं माती होते आहे त्यामु़ळं, या त्रिमुर्ती बद्दल बोलतच नाहीये, कारण मग ती व्यक्तीपुजा होते तो सांधिक खेळ राहातच नाही, क्रिकेट या तिघांपेक्षा फार मोठं आहे, पण आपला मिडिया आणि आपण सगळेच उगाचच वैयक्तिक खेळाडुंना खेळापेक्षा मोठं करत आहे. 'सीनियर्स म्हातारे झाले' ही पराभवाची कारणमीमांसा ठरूच शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. '' - हे सुद्धा मान्य, पण सिनियर्सनी जो सिनियरपणा (पक्षी प्रौढत्व) दाखवायला हवा तो दाखवला जात नाही किंवा गेला नाही याबद्दल वाईट वाटतंय. 'तेवढ्या पाच इनिंग्स बघता, त्याआधीच्या २८० इनिंग्ज बर्‍या विसरता सोयीस्करपणे! ' - छे विसरत नाहीये, पण नवीन पराभवाच्या जखमा जुन्या आठवणींच्या मलमांनी भरुन काढता येत नाहीत, आणि ते देखील चार चार पराभव पाठोपाठ. एका पराभवाचा वचपा काढला जातो, किंवा सुड घेतला जातो तेंव्हाच ती जखम भरली जाते. खेळ मग तो फुटबॉल असो, क्रिकेट असो किंवा बुद्धिबळ हे सगळे युद्धाचा बेस असलेल्या सांघिक किंवा वैयक्तिक कृति आहेत. सभ्य आणि सर्वमान्य प्रकार आहेत हे युद्धाचे, आणि युद्ध म्हणलं की विजय आणि पराभव आलेच, आणि त्यात विजेत्यांची वाढलेली मग्रुरी आणि आणि त्यातुन पराभुतांनी घेतलेली सुड उगवण्याची तयारी ही आलीच, जर हे होणारच नसेल तर कशाला पाहिजेत ही नाटकं. बेंगलोरातच बहुतेक प्रसादनं काढलेली सोहेलची विकेट आणि झिदाननं मारलेली धडक ही याचीच रॉ उदाहरणं आहेत. 'आणि आख्ख्या विश्वचषकात जेवढ्या धावा काढल्या तेवढ्या नाही निघाल्या या सीरीजमध्ये पण यालाही पूर्ण संघच जबाबदार नाही काय? ' - याला मुख्यत्वे जबाबदार ६-७ फलंदाजच,धावा काढणे हे त्यांचंच काम आहे, गोलंदाजांचं नाही, उलट ते तर भरुभरुन धावा देउन आपल्या फलंदाजांना संधी देत आहेत आपले कौशल्य दाखवण्याची. Seniors cannot become old and useless in just 2 series, they would have faded gradually. - but what about old seniors and new seniors, who are actually either fading or have faded, even then not only refuse to accept the fact but also refuse to play well for the country, but will play well for the money in IPL. '१९७१ मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सीरिज जिंकल्यावर वाडेकरचा उदो उदो करणार्‍यांनीच पुढे १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये सीरिज हरून आल्यावर त्याला चपलांचे हार घातले हे आठवलं.' - history repeats itself, nothing new in it. आणि ज्यांनी हे केलं ते आपलेच काका-मामा होते, कोणी वेगळे नव्हते.

In reply to by रमताराम

काही विशिष्ट खेळाडूंबद्दलही - हजार प्रश्न आमच्या एकाहुन अधिक प्रतिसादांतून विचारले आहेत त्याचे उत्तर देण्याचे तुम्ही, महामहीं बिरुटेसर किंवा धागामास्तर कधी मनावर घेणार? की उत्तरे देण्याची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे नि तुम्हाला काय टीका करण्याचे अधिकार थोरल्या महाराजांनी लिहून दिलेत? प्रश्न काही विशिष्ट खेळाडूंबद्दलचा नाही. प्रश्न आहे, सच्या, द्र्वीड आणि लक्ष्मणचा. मान्य की संघात तिघांशिवाय खेळाडू आहेत. परंतु मूळ धागामास्तर आणि महामहिमांचा प्रश्न असा आहे की, किती दिवस या सिनियर्संना खेळवणार ? आणि आपले सर्व प्रतिसाद वाचूनही, नुसतं वाचूनही नव्हेच तर आपल्याला नेमकं काय म्हणायचं असाव अशा अंदाजानेही आपले प्रतिसाद डोळ्यात तेल घालूनही वाचल्यानंतर मूळ प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी इतर फलंदाजाची तुलना, त्यांच्या जवाबदार्‍या, भारतीय गोलंदाजी, पाटा खेळपट्ट्या, वेगवान गोलंदाजांचा अभाव, भूतकाळातील स्पीनर्सच्या वर्तमान काळातील गोलंदाजांशी तुलना करणे यापेक्षा आपले प्रतिसाद सरळ प्रश्नांच्या उत्तराकडे पाठ फिरवतांना दिसतात असा एक सामान्य वाचक म्हणून आमचा समज झाला आहे. अर्थात आपण सर्वच प्रश्नाची उत्तरे मोठी अभ्यास करुन दिला आहे, असा आपल्या समजाचा आम्हाला आदर आहेच. अर्थात अशा उतरांचे आम्हाला काही नवलही नाही. देवांचे अपयश झाकण्यासाठी अशा सारवा-सारवीची गरज ' देवांच्या पडत्या काळात' भूतकाळातील विदाची शिदोरी बांधून चाललेली वकिली अनेक करत आहेत. तेव्हा त्यात काही नवे नाही. बाकी, आपल्याही प्रतिसादात नवीन,अद्भूत , अनपेक्षित, अशी माहिती सांगणारा प्रतिसाद आपला आहे, असे आम्हाला वाटत नाही. बाकी, असे सांगण्याचा अधिकार कोणा थोरल्या महाराजांनी दिला नसला तरी धागाकर्त्याच्या चर्चा-संवादात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य आपल्यासोबत आम्हालाही आहेच. कधीतरी सिनियर्सलाही वगळावे लागेल. कधी वगळायचं याचं उत्तर कधी तरी आपणाला नव्हे तर काळालाही द्यावेच लागणार आहे. पण, यापेक्षा उत्तम काळ कोणता किंवा येणार आहे, हे खेळाडूंला ठरवावेच लागणार आहे, तो पर्यंत नसती वकिली आम्हालाही झेलावी लागणारच आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही काही प्रतिक्रिया वाचून खरंच मौज वाटली. सचिन, राहूल आणि लक्ष्मण हे संघावरती भार झालेले असून, ते फॉर्म मध्ये नसताना देखील केवळ वरिष्ठ म्हणून त्यांना सहन करावे लागत आहे असा काहीसा सुर ह्या प्रतिक्रियांमध्ये दिसला. पण मुळात परिस्थीती अशी आहे का ? क्रिकेटकडे खेळ म्हणून बघणे हा झाला आपला सामान्य रसीकांचा दृष्टीकोन. मात्र बोर्ड आणि आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? आज निव्वळ सचिन संघात नाही म्हणून मॅच न बघणारे अनेक लोक मला माहिती आहेत. हे खेळाडू खेळत नसून त्यांना खेळवले जात आहे हे आपल्या लक्षात कधी येणार ? सर्व संघानी आंतरराष्ट्रीय दौर्‍यात आपला तुल्यबळ संघच पाठवायला हवा, हा आयसीसीचा पहिला नियम आहे. त्यामुळे तर काही काळापूर्वी दुबळा संघ सचिनच्या हाताखाली राष्ट्रकुलला आणि तुल्यबळ संघ ट्राय सिरीज खेळायला रवाना झाला होता. गंमतीचे उदाहरण सांगतो. गेल्या २ वर्षात आगरकर, झहिर खान पासून अनेक भारतीय संघात खेळणारे किंवा पदार्पण करणारे खेळाडू पुण्यात विविध सामन्यांसाठी येऊन गेले. आगरकर रणजीसाठी तर झहिर बहूदा ऑईल कंपन्यांच्या सामन्यासाठी येऊन गेला. ह्या खेळाडूंना बघायला ५० प्रेक्षक देखील हजर नव्हते. आणि जेंव्हा सचिनचा मुलगा अर्जुन शालेय सामन्यासांठी पुण्यात आला तेंव्हा त्याला बघायला २५० च्या वर लोकांची गर्दी. ह्याला म्हणतात नाममहात्म्य. उद्या कोहलीच्या कर्णधारपदाखीला त्रिमुर्ती,सेहवाग, धोनी ह्यांना वगळून संघ पाठवला तर किती लोक पहाटे उठून सामना बघतील ? किती प्रेक्षक मैदानात हजेरी लावतील ? आणि मुख्य म्हणजे ह्या संघाच्या सामन्यांना कोण प्रायोजक आपले पैसे लावेल ? दोन वर्षापूर्वीच्या आयपीएलला सचिन शेवटी एकदाचा फिट घोषीत होऊन खेळायला येईपर्यंत मुंबई इंडियन्सच्या सामन्यांना काय गर्दी होत होती ? सचिन आल्यावर तिच गर्दी किती वाढली ? प्रत्यक्ष तुम्हीच घेतलेला हा अनुभव आहेत. शेवटी रेस मध्ये भाग घ्यायचा का नाही हे घोडा ठरवू शकत नाही हेच खरे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आयसीसी चे मुख्य उद्देश म्हणजे गर्दी आणि पैसा. आता गर्दी आणि पैसा हे गणित जुळवायचे तर ज्यांना दर्शकांनी देवतुल्य बनवले आहे आणि ज्यांना खेळताना बघण्यासाठी दर्शक खिसे रिकामे करायला तयार आहेत, त्या खेळाडूंना खेळवणे भागच आहे ना ? मुद्यात दम आहे. ठाण्याला, युवीची फलंदाजी आणि युवीला जवळून बघायला मिळावे म्हणून ऐववेळी आयपीएलच्या तिकिटासाठी केलेला खटाटोप आणि धावपळ आठवली. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 27/01/2012 - 15:34
सेंच्युरी नाही म्हणून सचिनला घरी बसवा ... महाराष्ट्राची प्रगती नाही म्हणून सी एम ना घरी बसवा.. जनलोकपाल नाही म्हणून अण्णांना म्हणून घरी बसवा.. ( मंदाकिनी , भन्नाट पूर्ण न के ल्याबद्दल परा ला घरी बसवा) बादवे मिपा वर अजुन कोणा़ कोणाला घरी बसवता येइल ?

चिरोटा 27/01/2012 - 15:43
१२० कोटींतल्या ११ना , २ कोटींतल्या ११ कडून हरताना पाहून एक मिपाकर म्हणून मान शरमेने खाली गेली.

सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा.. हम्म, सहमत आहे. आवडता विषय काथ्याकुटायला घेतल्याबद्दल आभारी. -दिलीप बिरुटे (ऑष्ट्रेलियात चव गेल्याने नाराज असलेला)

असुर 27/01/2012 - 17:21
चवकशीच्या कुठल्या अ‍ॅक्टान्वये हा धागा काढला आहे हे धाग्याच्या सुरुवातीलाच (किंवा मध्ये, किंवा शेवटी, किंवा कुठेही) स्पष्ट न केल्याने सदर धाग्याला फाट्यावर मारण्यात आलेले आहे. बाकी ररा पुरेसे बोलले आहेतच. आणि त्यांच्या प्रतिसादातूनही काही कळले नसेल, तर काहीही कळण्यापलिकडे गेल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गप्प रहायचे ठरवण्यात आले आहे. पराषेटना 'डायरीदान' या नावाने लेखमाला सुरु करण्याची विनंती! --असुर

समंजस 27/01/2012 - 18:57
---- मुळीच घरी बसवू नये. क्रिकेट सारख्या मोठया खेळात हरण्याच्या अश्या छोट्या छोट्या घटना होतच असतात. त्याचं काय मोठं मनाला लावून घ्यायचं? अश्या छोट्या घटनांमुळे आपण त्यांनाच काय, कोणालाही घरी बसवू नये.

आणि तसं पाहताही जेव्हा एखादी व्यक्ति सर्वांना हवीहवीशी वाटत असते तेव्हाच तिने मानाने निवृत्त होण्यात खरी शान असते.
१०० % सहमत. उदा. सुनील, कपिल यांनी घेतलेली निवृत्ती. पण शतकांचे शतक पूर्ण होणं ही बाबही असामान्य आहे आणि ती न साधण्याइतकं सचिन "हे" झाला नाही अजून. त्यानंतर मात्र त्याने सन्मानाने निवृत्त होणेच चांगले.
अलिकडेच सर्व वाहिन्यांवरून तज्ञांच्या आणि सामान्य चेंडुफ़ळी रसिकांच्या ज्या मुलाखती घेतल्या गेल्या त्यात सचिनवर बरीच जळजळीत टीका पाहायला/ऐकायला मिळाली.
१. सध्याचा परफ़ॉर्मन्स बघितल्यावर वरील तिघांसह इतर आठांवरही जळजळीत टीका होणं आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आहे. आणि काय होतं, की क्रिकेटला इतकं महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, की घरात एखाद्याचा दहवा/तेरावा असेल तरी जर क्रिकेट मॅच चालू असेल तर दुःख गेलं तेल लावत.. पण क्रिकेटचा विचार सोडवत नाही. क्रिकेट या खेळाचं नाव जर विष्णु, किंवा कृष्ण किंवा तत्सम देव/देवी असतं, तर त्याबद्दलच्या विचाराने कळत-नकळत अनेक भारतीयांना मोक्ष मिळाला असता! २. सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा.

In reply to by प्रशांत उदय मनोहर

श्रावण मोडक 27/01/2012 - 19:23
सुनीलसोबत कपीलचं नाव पाहून आश्चर्य वाटलं. कपीलची निवृत्ती लांबली. इतकी, की सचिनची आत्ताची कामगिरी परवडली, अशी कपीलची स्थिती झाली होती. तो हॅडलीचा विक्रम एकदाचा पार झाला आणि मग अनेकांनी हुश्श केलं होतं. निवृत्तीबाबत अलीकडच्या काळातला सर्वाधिक हुशार खेळाडू सुनीलच. अगदी अनपेक्षीतपणे त्याने निवृत्तीची घोषणा केली. :)

In reply to by प्रशांत उदय मनोहर

यकु 27/01/2012 - 19:32
>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. =) ) =) ) =) ) =) ) =) ) लेखामागची परिस्थिती काय जब्बरदस्त टिपलीय. खपलो हे वाचून..

In reply to by यकु

मोदक 27/01/2012 - 19:54
>>>>>>>सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. बहुदा या वाक्याचा कॉपीराईट छोटा डॉन कडे आहे. :-D

In reply to by प्रशांत उदय मनोहर

मोदक 29/01/2012 - 01:00
ते तर तुमचेच वाक्य आहे... उगाच चाळीमधल्या संडासासमोरच्या रांगेतला माणूस संडासाचं दार उघडायची वाट पाहतो तसे करू नका. http://www.misalpav.com/node/19879#comment-355215 आमची मेमरी थोडी गंडली असावी. :-)

सचिनचं शंभरावं शतक यथाकाल होईल. उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. लबर एक. प्रशांतराव दंडवत घ्या आमचा. :) -दिलीप बिरुटे

५० फक्त 27/01/2012 - 22:41
उगाच मुंबईतल्या एखाद्या चाळीतल्या संडासासमोर रांगेत उभं राहून शेवटापासून पहिल्या क्रमांकावर आल्यावर "आतला माणूस बाहेर यायला वेळ का लावतोय?" अशा विचाराने माणूस वैतागतो तसे वैतागू नका. थोडा संयम बाळगा. - कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?

In reply to by ५० फक्त

कारण बहुधा त्याच्या हातातला टमरेल गळका असतो, आतल्यानं बाहेर यायला अजुन उशीर लावला आणि पाणि गेलं संपुन तर काय करा - दगडी बांधकाम ?
ते ठीक आहे हो! पण क्रिकेट मॅचमधल्या पराभवानंतर चर्चा करताना लोकांना स्वतःला गळका-टमरेलधारी चाळकर्‍याच्या भूमिकेत जायला का आवडतं एवढं, हा प्रश्न नेहमी पडतो मला. बाय द वे, वर जाताना जर खाल्लेलं घेऊन जाल तर कदाचित् वरच्या संडासासमोरील रांगेत उभे रहावे लागेल तुम्हाला. ;)

अनेक वर्षापासून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाने अती क्रिकेट भारतीय जनतेच्या आणी खेळाडूंच्या माथी मारले आहे. त्यात आय पी एल ह्या व्यावसायिक स्पर्धेची भर पडली .त्यात तर सामन्यांचा रतीब असतो. पूर्वी सचिनने २० २० देशासाठी खेळायचे टाळले होते. पण आता तोही'' दुनिया हिला देंगे'' म्हणत ह्या सर्कशीत दाखल झाला आहे. आपले खेळाडू एक तर प्रचंड थकलेले आहेत किंवा दुखापती लपवून खेळत आहेत. भारतीय संघाबद्दल म्हटले तर कुंबळे गेल्यावर एकहाती गोलंदाजीची धुरा वाहणारा एकही पर्याय उपलब्ध नाहीं आहे. जहीर दुखापतीने त्रस्त बाकीचे आयाराम ,गयाराम आहेत. क्रिकेट सामने गोलंदाज जिंकून देतात. परदेशात ८ सामने सलग हरणे कुणालाच मान्य होणार नाहीं. कणेकरांचे एक वाक्य आठवले . एकदा कपिल देव पाकिस्तान विरुद्ध हरल्यावर म्हणाला होता '' हा खेळ आहे. कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार'' त्यावर ते म्हणतात '' हे आम्हालादेखील कळते, पण हरणारा संघ नेहमी आपलाच का असतो. ता .क आता आय पी एल ५ चे बिगुल वाजले आहे. त्यात पाटा खेळपट्टीवर फटाक्यांची आतिषबाजी पहायला सज्ज होऊया.

श्रीरंग 28/01/2012 - 00:44
क्रीडा मंत्रालयाने कच खाऊन बीसीसीआय समोर सपशेल लोटांगण घातले नसते, आणी WADA ची नियमावली बंधनकारक केली असती तर ८०% क्रिकेटपटू डोप टेस्ट मधे फेल होऊन घरीच बसले असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्‍या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस.

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

बिपिन कार्यकर्ते ·

श्रावण मोडक 11/01/2012 - 22:55
वर बिपिन यांनी दिलेल्या दोन क्रमांकापैकी योगिनी खानोलकर यांचा क्रमांक अनेकदा न लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गैरसमज करून घेऊ नका. त्या ज्या भागांत आहेत तेथील नेटवर्कची ती समस्या असेल. :)

विकास 12/01/2012 - 05:08
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.

In reply to by विकास

या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.. हेच म्हणते, स्वाती

श्रावण मोडक 11/01/2012 - 22:55
वर बिपिन यांनी दिलेल्या दोन क्रमांकापैकी योगिनी खानोलकर यांचा क्रमांक अनेकदा न लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गैरसमज करून घेऊ नका. त्या ज्या भागांत आहेत तेथील नेटवर्कची ती समस्या असेल. :)

विकास 12/01/2012 - 05:08
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.

In reply to by विकास

या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.. हेच म्हणते, स्वाती
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

येळकोट येळकोट जय मल्हार!!

यकु ·

शिल्पा ब 06/12/2011 - 01:51
मस्त फोटो. पण त्या गाड्या अशा माणसांनीच भरलेल्या असल्या पाहीजेत का? अन्या, तुला भयानक काय वाटलं? गाड्या ओढणं का चाबकाचे फटके? माझ्या मते चाबकाचे फटके मरीआईचे लोकं ओढतात तसे असावेत, अर्थात थोडंफार लागत असणारंच पण ज्याची त्याची श्रद्धा.

गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवठे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. ------------------------------------------------------------------- आमची आईही हा रिवाज पाळायची,कांदा, लसुण, वांगे खायची नाही..............

गवि 06/12/2011 - 10:00
प्रथेचं अतिशय सुंदर दर्शन घडवलंयस यशवंता.. भंडार्‍याने पिवळी झालेली मिरवणूक पाहताना अवचटांच्या अशाच एका लेखाची आठवण झाली.. आता नाव आठवत नाही, पण याच प्रसंगाविषयी होता. खदखदता पिवळा समुद्र अशा शब्दात त्या गर्दीचं वर्णन केलं आहे.

jaypal 06/12/2011 - 11:02
छायाचित्रांपेक्षा लेख जास्त आवडला."सटाची" मस्त ओळख करुन दिलीत. लेख वाचताना लहानपणी किती तरी वर्षे कानावर पडलेल्या धनगरी ओव्या ढोलासकट परत निनादत आहेत. धनगरांचा देव बिरोबा सुध्दा आहे. शिदोबा, बिरोबा, खंडोबा ई. हे सगळे "बा" म्हणजे माझ्या माहीती प्रमाणे संभुमहादेवाचे"रिजनल मेनेजर" ;-) गवि हे घ्या .... gavi

तर्री 06/12/2011 - 10:50
कोरडे ओढण्याचा प्रकार भयानकच. अर्थात अश्या खूप चालीरीती धर्मात आहेत. कालांतराने जातीलच तोपर्यन्त ह्या परंपरेची चांगली बाजुच पाहुया . मल्हारी मर्तंड जय मल्हारी ....

पैसा 06/12/2011 - 11:01
फोटो पहाताना जरा भीती वाटते खरी, पण मी लहान असताना आमच्या गावात अशी एक बगाडाची जत्रा भरायची त्याची आठवण झाली. त्यात लोक पाठीला हुक टोचून उंचावर लटकत फिरायचे. मोठी माणसं आम्हाला ते कधी बघायला द्यायचे नाहीत. काल रा. चिं ढेरे यांचं 'लज्जागौरी' पुस्तक वाचत होते. त्यात एक प्रकरण खंडोबा बद्दल आहे. त्यांच्या मते खंडोबा हा क्षेत्रपाल देव. दक्षिण भारतातला स्कंद तोच खंडोबा, आणि स्कंदाची पत्नी षष्ठी, म्हणून खंडोबाला षष्ठीचं महत्त्व.

मन१ 06/12/2011 - 11:31
मस्त दस्तऐवजीकरण रे. लेख सध्या नुसता चाळलाय. बादवे, गाव कुठलं म्हटलास तुझं?

वर्णन आणि छायाचित्रे फारच छान आहेत. अभिनंदन. हळदीसारख्या औषधी मसाल्याचे उधळणे, पायदळी तुडवणे, नाश करणे मनाला पटत नाही. श्रद्धेच्या नांवाखाली दूध, दही, तूप, हळद ह्यांची नासाडी करण्यापेक्षा गरजवंतांना ह्या गोष्टी वाटून जास्त पुण्य पदरी पडेल असे वाटते.

यकु 06/12/2011 - 18:57
धन्यवाद दोस्तहो. आपण सर्वांनी फोटो आणि त्यासोबतच्या चार ओळी गोड मानून घेतल्या हे पाहून भरुन पावलो. सर्वांचे आभार. फेसबुकवर मित्रानं हे फोटो अपलोड केले होते; ते पाहून लहानपणी पाहिलेली सट आठवली, ती तशीच लिहून काढली, त्यामुळं ते त्रोटक आहे.

इरसाल 08/12/2011 - 13:00
छान वृतांत. असाच बारागाडे ओढायचा प्रकार आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी होतो (सध्या मानव अधिकारामुळे बंदी) अंगात आलेला भगत कोणाचीही मदत न घेता माणसांनी दाबून भरलेल्या १२ बैलगाड्या(बिन्बैल आणि एकमेकांना बांधलेल्या) एकटा ओढून ७/८ किमी खंडोबाच्या मंदिराजवळ नेत असे.मग त्या धांदलीत गाडीवरून पडून कोणाचा हात मोडणे, कोणाच्या पायावरून गाड्या जाणे इत्यादी प्रकाराने बंदी आली.

In reply to by इरसाल

एका बैलगाडीत १२ माणसे जरी बसवली तरी १२ बैलगाड्यात १४४ माणसे होतात म्हणजेच सरासरी ७० वजन हिशोबात धरले तरी १००८० किलो वजन होते. एवढे वजन सात ते आठ किलोमीटर (किंवा सात अष्टमांश किलोमीटर) ओडून न्यायचे म्हणजे माणसाकडे अचाट शक्ती असणार. ही अचाट शक्ती कुठल्या विधायक कामात वापरता आली तर??

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठी_माणूस 08/12/2011 - 14:31
ही अचाट शक्ती कुठल्या विधायक कामात वापरता आली तर?? हाच विचार असंख्य साई भक्त जेंव्हा पाई पाई शिर्डीला जातात तेंव्हा मनात येतो . किति वेळ आणि शक्ती खर्च होते. रहदारीला अडथळा हा वेगळाच त्रास

In reply to by प्रभाकर पेठकर

इरसाल 10/12/2011 - 21:24
काका अहो त्यावेळी वयामुळे समजत नव्हते, तिथे कोणाला विचारणार किंवा सांगणार. पण आता नक्की वाटतेय कि असे काही(अचाट शक्ती) दिसल्यास नक्की विधायक कामासाठी वापरायला प्रवृत्त करू शकेन.

In reply to by इरसाल

>>>>>>असे काही(अचाट शक्ती) दिसल्यास नक्की विधायक कामासाठी वापरायला प्रवृत्त करू शकेन. आपण त्यांना सुधरवायचे कार्य करावे असे माझे म्हणणे नाही. श्रद्धेच्या नांवाखाली अंधश्रद्धेचा अंतःप्रवाह वाहतो आहे त्यास रोखणे आता आपल्या हाती नाही पण अशा गोष्टींना प्रसिद्धी देऊन त्यास हातभार आपण लावू नये असे वाटते. पुढच्या पिढीचे प्रबोधन करून ती शक्ती काही विधायक कार्याकडे आपण नक्कीच वळवू शकू. शुभेच्छा..!

In reply to by इरसाल

दादा कोंडके 08/12/2011 - 14:38
छान वृतांत असच म्हणतो. आणखी एक प्रसिद्ध मिरवणुक म्हणजे पाठीत हुक अडकवून रथ ओढतात. हे नुसतं टिव्हीवर बघुनच भोवळ येते, प्रत्यक्षात बघितलं तर काय होइल! नवस पूर्ण झाला की हे असले अघोरी प्रकार का करत असतील? असाच पण थोडासा कमी अघोरी प्रकार म्हणजे लोळत प्रदक्षिणा घालणे. एकदा तुळजापुरात पावसाळ्याच्या दिवसात एक बाई मंदीराला लोळत प्रदक्षिणा घालत होती. तिच्या बरोबर असलेल्या स्त्रीच्या (बहुदा आई किंवा सासू) कडेवर तीचं तान्ह मूल होतं. खाली चिखल, खडबडीत जमीन आणि वरून पाउस. तीची साडी सगळी लोळा-गोळा होउन वर गेलेली आणि आजुबाजूला दर्शनासाठी आलेले भाविक थांबून, डोळे भरून हे दृष्य बघत होते. :(

शिल्पा ब 06/12/2011 - 01:51
मस्त फोटो. पण त्या गाड्या अशा माणसांनीच भरलेल्या असल्या पाहीजेत का? अन्या, तुला भयानक काय वाटलं? गाड्या ओढणं का चाबकाचे फटके? माझ्या मते चाबकाचे फटके मरीआईचे लोकं ओढतात तसे असावेत, अर्थात थोडंफार लागत असणारंच पण ज्याची त्याची श्रद्धा.

गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवठे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. ------------------------------------------------------------------- आमची आईही हा रिवाज पाळायची,कांदा, लसुण, वांगे खायची नाही..............

गवि 06/12/2011 - 10:00
प्रथेचं अतिशय सुंदर दर्शन घडवलंयस यशवंता.. भंडार्‍याने पिवळी झालेली मिरवणूक पाहताना अवचटांच्या अशाच एका लेखाची आठवण झाली.. आता नाव आठवत नाही, पण याच प्रसंगाविषयी होता. खदखदता पिवळा समुद्र अशा शब्दात त्या गर्दीचं वर्णन केलं आहे.

jaypal 06/12/2011 - 11:02
छायाचित्रांपेक्षा लेख जास्त आवडला."सटाची" मस्त ओळख करुन दिलीत. लेख वाचताना लहानपणी किती तरी वर्षे कानावर पडलेल्या धनगरी ओव्या ढोलासकट परत निनादत आहेत. धनगरांचा देव बिरोबा सुध्दा आहे. शिदोबा, बिरोबा, खंडोबा ई. हे सगळे "बा" म्हणजे माझ्या माहीती प्रमाणे संभुमहादेवाचे"रिजनल मेनेजर" ;-) गवि हे घ्या .... gavi

तर्री 06/12/2011 - 10:50
कोरडे ओढण्याचा प्रकार भयानकच. अर्थात अश्या खूप चालीरीती धर्मात आहेत. कालांतराने जातीलच तोपर्यन्त ह्या परंपरेची चांगली बाजुच पाहुया . मल्हारी मर्तंड जय मल्हारी ....

पैसा 06/12/2011 - 11:01
फोटो पहाताना जरा भीती वाटते खरी, पण मी लहान असताना आमच्या गावात अशी एक बगाडाची जत्रा भरायची त्याची आठवण झाली. त्यात लोक पाठीला हुक टोचून उंचावर लटकत फिरायचे. मोठी माणसं आम्हाला ते कधी बघायला द्यायचे नाहीत. काल रा. चिं ढेरे यांचं 'लज्जागौरी' पुस्तक वाचत होते. त्यात एक प्रकरण खंडोबा बद्दल आहे. त्यांच्या मते खंडोबा हा क्षेत्रपाल देव. दक्षिण भारतातला स्कंद तोच खंडोबा, आणि स्कंदाची पत्नी षष्ठी, म्हणून खंडोबाला षष्ठीचं महत्त्व.

मन१ 06/12/2011 - 11:31
मस्त दस्तऐवजीकरण रे. लेख सध्या नुसता चाळलाय. बादवे, गाव कुठलं म्हटलास तुझं?

वर्णन आणि छायाचित्रे फारच छान आहेत. अभिनंदन. हळदीसारख्या औषधी मसाल्याचे उधळणे, पायदळी तुडवणे, नाश करणे मनाला पटत नाही. श्रद्धेच्या नांवाखाली दूध, दही, तूप, हळद ह्यांची नासाडी करण्यापेक्षा गरजवंतांना ह्या गोष्टी वाटून जास्त पुण्य पदरी पडेल असे वाटते.

यकु 06/12/2011 - 18:57
धन्यवाद दोस्तहो. आपण सर्वांनी फोटो आणि त्यासोबतच्या चार ओळी गोड मानून घेतल्या हे पाहून भरुन पावलो. सर्वांचे आभार. फेसबुकवर मित्रानं हे फोटो अपलोड केले होते; ते पाहून लहानपणी पाहिलेली सट आठवली, ती तशीच लिहून काढली, त्यामुळं ते त्रोटक आहे.

इरसाल 08/12/2011 - 13:00
छान वृतांत. असाच बारागाडे ओढायचा प्रकार आमच्याकडे पोळ्याच्या दिवशी होतो (सध्या मानव अधिकारामुळे बंदी) अंगात आलेला भगत कोणाचीही मदत न घेता माणसांनी दाबून भरलेल्या १२ बैलगाड्या(बिन्बैल आणि एकमेकांना बांधलेल्या) एकटा ओढून ७/८ किमी खंडोबाच्या मंदिराजवळ नेत असे.मग त्या धांदलीत गाडीवरून पडून कोणाचा हात मोडणे, कोणाच्या पायावरून गाड्या जाणे इत्यादी प्रकाराने बंदी आली.

In reply to by इरसाल

एका बैलगाडीत १२ माणसे जरी बसवली तरी १२ बैलगाड्यात १४४ माणसे होतात म्हणजेच सरासरी ७० वजन हिशोबात धरले तरी १००८० किलो वजन होते. एवढे वजन सात ते आठ किलोमीटर (किंवा सात अष्टमांश किलोमीटर) ओडून न्यायचे म्हणजे माणसाकडे अचाट शक्ती असणार. ही अचाट शक्ती कुठल्या विधायक कामात वापरता आली तर??

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठी_माणूस 08/12/2011 - 14:31
ही अचाट शक्ती कुठल्या विधायक कामात वापरता आली तर?? हाच विचार असंख्य साई भक्त जेंव्हा पाई पाई शिर्डीला जातात तेंव्हा मनात येतो . किति वेळ आणि शक्ती खर्च होते. रहदारीला अडथळा हा वेगळाच त्रास

In reply to by प्रभाकर पेठकर

इरसाल 10/12/2011 - 21:24
काका अहो त्यावेळी वयामुळे समजत नव्हते, तिथे कोणाला विचारणार किंवा सांगणार. पण आता नक्की वाटतेय कि असे काही(अचाट शक्ती) दिसल्यास नक्की विधायक कामासाठी वापरायला प्रवृत्त करू शकेन.

In reply to by इरसाल

>>>>>>असे काही(अचाट शक्ती) दिसल्यास नक्की विधायक कामासाठी वापरायला प्रवृत्त करू शकेन. आपण त्यांना सुधरवायचे कार्य करावे असे माझे म्हणणे नाही. श्रद्धेच्या नांवाखाली अंधश्रद्धेचा अंतःप्रवाह वाहतो आहे त्यास रोखणे आता आपल्या हाती नाही पण अशा गोष्टींना प्रसिद्धी देऊन त्यास हातभार आपण लावू नये असे वाटते. पुढच्या पिढीचे प्रबोधन करून ती शक्ती काही विधायक कार्याकडे आपण नक्कीच वळवू शकू. शुभेच्छा..!

In reply to by इरसाल

दादा कोंडके 08/12/2011 - 14:38
छान वृतांत असच म्हणतो. आणखी एक प्रसिद्ध मिरवणुक म्हणजे पाठीत हुक अडकवून रथ ओढतात. हे नुसतं टिव्हीवर बघुनच भोवळ येते, प्रत्यक्षात बघितलं तर काय होइल! नवस पूर्ण झाला की हे असले अघोरी प्रकार का करत असतील? असाच पण थोडासा कमी अघोरी प्रकार म्हणजे लोळत प्रदक्षिणा घालणे. एकदा तुळजापुरात पावसाळ्याच्या दिवसात एक बाई मंदीराला लोळत प्रदक्षिणा घालत होती. तिच्या बरोबर असलेल्या स्त्रीच्या (बहुदा आई किंवा सासू) कडेवर तीचं तान्ह मूल होतं. खाली चिखल, खडबडीत जमीन आणि वरून पाउस. तीची साडी सगळी लोळा-गोळा होउन वर गेलेली आणि आजुबाजूला दर्शनासाठी आलेले भाविक थांबून, डोळे भरून हे दृष्य बघत होते. :(
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.

दुसर्‍या कुत्र्याच्या प्रतिक्षेत ( तिचा कुत्रा -१)

रामजोशी ·
लेखनप्रकार
तिचा कुत्रा - १ एक प्रयत्न. (विवेकरावांची क्षमा मागून) लहानपणापासुन ओळख होती आमची भेटत होते तसे रोजच. “मित्रच माझा” म्हणाली. 'हुषार आहे अगदी' हसले मी. 'कुत्रे असतातच हुषार' म्हणाले. 'नाही, पण हा. म्हणजे....' ती म्हणाली 'हुशार हो अगदी सकाळी बाहेर जातो न चुकता घरावर तर लक्ष फार सगळे दारूडे, चोर, अगदी “यांच्यावर” सुद्धा. माझ्याकडं बघताय ना? वाटते का तिशीची? याच्याशी खेळणे अगदी रोजच्या रोज रेग्युलर आहे तसा तो सगळ्यातच आणि पर्टिक्युलरही.

अनिल कुंबळे - एक जंबो गोलंदाज

मृत्युन्जय ·

गणपा 07/10/2011 - 01:35
ज ब ह र्‍या.
भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी
+१

पैसा 07/10/2011 - 01:44
कुंबळेने खेळायला सुरुवात केली ती जलदगती गोलंदाज म्हणून आणि नंतर तो फिरकी टाकू लागला असं काहीतरी वाचलेलं आठवतंय. नक्की सांगू शकत नाही. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या मॅचमधे कुंबळे बँडेज बांधून गोलंदाजीला आला तेव्हा लाराच्या चेहर्‍यावरचे भाव अजून आठवतायत!

धन्या 07/10/2011 - 02:03
क्रिकेटमधील आम्हाला फारसं कळत नाही. किबहूना काहीच कळत नाही. परंतू हा लेख आवडला. खुप रोचक आणि रंजक पद्धतीने जंबोची ओळख करुन दिली आहे. आणि मुख्य म्हणजे लिहिताना अभिनिवेश टाळला आहे. इतकं तटस्थ आणि तरीही छान असं कुणी सचिनवर लिहू शकेल काय? त्याचा चुकूनही देव असा उल्लेख न करता? ;)

मेघवेडा 07/10/2011 - 02:11
मस्त लेख रे मृत्युंजया! काही माणसं आपापल्या क्षेत्रातल्या कौशल्याबाबतच नव्हे तर एकूणच जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दल, एकूणच वागण्याबद्दल जगाला बरंच काही शिकवून जातात. खेळाडूही त्याला अपवाद नाहीत. जसं सचिनच्या सिडनीतल्या २४१* खेळीने 'प्रतिकार न करता हार पत्करता कामा नये, वेळेस संकटे अंगावर झेलावी' हे आम्हांला शिकवलं, राहुलनं अनेकदा खंबीरपणाची प्रात्यक्षिकं दिली तसंच अनिलनंही नेहमीच लढाऊ बाणा, खंबीर मनोवृत्ती आणि संतुलित वर्तनाचे वस्तुपाठ घालून दिलेले आहेत. बाकी सगळं तू लिहिलंच आहेस. अजून काही लिहत नाही पण एक गोष्ट इथं मनापासून नमूद करावीशी वाटते - ६१९ कसोटी बळी म्हणजे काही चेष्टा नाही. अलिकडे आपले गोलंदाज १००-१५० होईतो दुखापतींनी अर्धे मेलेले असतात. उद्या कुणी एखाद्या जय/वीरूने हा विक्रम मोडलाच तर त्याचा नक्कीच कारकीर्दीच्या अखेरीस इमामसाहब झालेला असेल! :D भविष्यात कुणा भारतीय गोलंदाजास अनिल कुंबळेला काही ट्रिब्युट द्यायचंच असेल तर 'भारतीय गोलंदाजीची मदार कुणा एकाच खांद्यावर मी राहू देणार नाही' हे वचन हेच कुंबळेला देता येईल असं सर्वोत्तम ट्रिब्युट असेल! :)

शेखर काळे 07/10/2011 - 04:26
नसेल त्याचा बॉल वळत. पण त्याचा टॉपस्पिन आणि गुगली भल्याभल्यांना झेपले नाहीत हे खरे आहे ना? "गूगली" हा न वळणारा चेंडू आहे असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - शेखर

In reply to by शेखर काळे

मृत्युन्जय 07/10/2011 - 09:42
तेवढ्या छोट्या मोठ्या चुका माफ करा हो. कुंबळे चेंडु फिरवत नाही हा आक्षेप अगदी लिटरली नसतो घ्यायचा. :) तरी नशीब तुम्ही मुख्य प्रश्न नाही विचारला की टॉप स्पिन आणि गुगली मध्ये मुख्य फरक काय? ;)

In reply to by मृत्युन्जय

शेखर काळे 08/10/2011 - 01:37
श्री. अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट कामगिरी आणि नैपुण्याचा मी चाहता असल्यामुळे ते चेंडू वळवत नाहीत हे जरा झोंबले. बाकी लेख चांगलाच झाला आहे. मला वाटते की कुंबळेंची आणखी एक बाजू तुम्ही समोर आणली नाहीत - ती म्हणजे समोरच्या फलंदाजाला ओळखून त्याला बाद करण्यातली चतुराई. आपल्या चेंडूचा वेग, वळण आणि फिरक कमी-जास्त करून त्यांनी कितीतरी नामांकित फलंदाजांना बाद केलेले आहे. दोन-तीन साधे, हळूच वळणारे, फलंदाजाला गाफिल करणारे चेंडू कुंबळेंनी टाकले, की पुढचा चेंडू हा वेगवान जरा आखूड टप्प्याचा टॉप स्पिनर असणार हे नक्की. आणि मग मागे वळून आपल्या ऊध्वस्त यष्टींकडे पाहतानाचा फलंदाजाचा गोंधळलेला चेहरा. 'इतका वेळ तर नीट चेंडू पडत होते .. मग हा अग्निबाण कुठून आला' .. असा विचार करत तो बिचारा परत निघणार. कुंबळेंच्या चेहर्‍यावर नेहमीचे विजयी हास्य ! .. हे मी कितीतरी वेळा पाहिलेले आहे. आताच हा लेख वाचल्यावर त्यांचे पाकिस्तानविरुद्ध दहा बळींची चित्रफीत पाहिली. सलीम मलिक .. हा याच गमतीने बाद झाला होता ! राहता राहिले गूगली आणि टॉप स्पिन .. गूगली हा चेंडू करंगळी व त्याच्या बाजूच्या बोटाने धरून फिरवून सोडायचा .. टॉप स्पिन हा चेंडू मधले बोट व पहिले या बोटांनी धरून फिरवून सोडायचा .. लेग स्पिन मधले बोट व अनामिका .. (मुख्य अनामिका) या बोटांनी धरून फिरवायचा. कळले नसल्यास श्री. अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची चित्रफीत जरूर पहावी. - शेखर काळे

सोत्रि 07/10/2011 - 05:23
भारी रे मृत्युन्जय! जम्बोबद्दल अस आपलं वाटणारं कोणी आहे हे समजल्यावर एकदम भरून आले. हॅट्स ऑफ टु जम्बो ! विजीगिषु हा शब्द सार्थ ठरवणारा लढवय्या खेळाडु. - (जम्बोचा जम्बो फॅन) सोकाजी

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:13
शीर्षक बदला. अनिल कुंबळे हे शीर्षक असते तरी लेख वाचला गेला असताच. ते उगाच '... तुंबले' असे केल्याने अधिक लोक लेख वाचतील असे नाही. अशा शीर्षकाखाली वाचनीय लेख असू शकतो, असेच येथे सिरियसली काही चांगले वाचण्यासाठी येणाऱ्यांना वाटण्याची शक्यता आहे. मीही धागा उघडला तो मृत्युन्जय काय पालथे धंदे करू लागला, असा विचार करतच. काळं मीठ अननसासारख्या फळांवरच रुचीला वेगळा खुमार देतं. कैरीवर किंवा आंब्यावर नाही.

In reply to by श्रावण मोडक

मृत्युन्जय 07/10/2011 - 12:24
प्रतिक्रिया पटली. त्यामुळे शीर्षक बदलले. पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते. ज्या फ्लॉ मध्ये लेख लिहिला त्यात हेच टायटल बरोबर वाटले होते. नविन शीर्षक फारच अनाकर्षक वाटते आहे. कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय?

In reply to by मृत्युन्जय

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:40
पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते.
मान्य. माझे शब्द मागे. :) सध्याचे शीर्षक अनाकर्षक आहे हे पटते. बदलता येईल. जंबो!

In reply to by मृत्युन्जय

कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय? >> हे पटतंय का पाहा :- अनिल : आक्रमक वादळांच्या गर्दीत दुर्लक्षिला गेलेला शांत सुखद वारा तळटीप :- १. मला क्रिकेट मधलं फारसं कळत नाही, पण त्याला जेंटलमन्स गेम (सभ्य लोकांचा खेळ) म्हणतात एवढं ऐकून आहे. सचिन तेंडूलकर, स्टीव वॉ, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड हे विशेषण सार्थ करतात असं वाटतं. २. शीर्षक catchy जरूर असावं की ज्यामुळे mass मधील वाचक त्याकडे आकर्षित होतील पण cheap असू नये, की ज्यामुळे class मधले वाचक पळून जावेत. (मी ज्यावरून ह्या वाक्याची प्रेरणा घेतली आहे ते मूळ वाक्य असे आहे - वक्त्याचे भाषण स्त्रियांच्या वस्त्राप्रमाणे अंग झाकण्यापुरते लांब परंतू उत्सुकता निर्माण करण्याइतके आखूड असावे.)

In reply to by श्रावण मोडक

किसन शिंदे 07/10/2011 - 12:59
श्रामो यांच्याशी सहमत.. ............तुंबले हे शिर्षक पाहुन बराच वेळ धागा उघडायचा धीर होत नव्हता. शेवटी धीर करून धागा उघडला आणी एका झटक्यात वाचून संपवला. :)

किसन शिंदे 07/10/2011 - 12:50
आमच्या जंबोवर एवढा चांगला लेख (आणी तो ही जे.पी मॉर्गनच्या लेखांच्या तोडीचा) टाकल्याबद्दल मृत्यंजय यांचे विशेष आभार.

मैत्र 07/10/2011 - 13:27
आम्ही त्याला त्याचं पूर्ण नाव " अनिल सरळ कुंबळे" आहे असं म्हणायचो... :) जगाला गंडवण्यासाठी तो लेग स्पिनर ... खाजगीत मीडियम पेसर आहे हाही एक मुद्दा प्रचलित होता :) बरेच फलंदाज त्याचा बॉल आता वळेल मग वळेल अशी करत राहायचे किंवा ऑफला खेळायला जायचे आणि चेंडू बिचारा वेगात आणि सरळ निघून जायचा कधी पॅड्स तर कधी यष्ट्यांचा वेध घेऊन :) पण त्याची लढाऊ वृत्ती आणि विलक्षण झपकन आत येणारे टॉप स्पिनस आणि स्ट्रेट बॉल्स जबरदस्त होते... ज्या दिवशी तो फॉर्म मध्ये असेल त्या दिवशी तो अतिशय unplayable असायचा. त्या मानाने त्याला मानमरातब मिळाला नाही. पण एकंदरीत क्रिकेट जगतात बॅटस्मनला जास्त भाव मिळतो. अनेक महान गोलंदाज होऊन गेले पण थोडके. त्या मानाने फलंदाज लवकर नाव मिळवतात. कुंबळेचे करिअर रेकॉर्ड पुरेसे आहे त्याची गुणवत्ता आणि महानता सिद्ध करायला. कर्णधारपद, पद्मश्री वगैरे सन्मान त्यालाही मिळाले. पण एका डावातले दहा बळी मिळवणार्‍या या झुंजार खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड च्या काळात त्या कोणाएवढं नावाजलं गेलं नाही हेही खरं. नम्म बेंगळूरुतलं "अनिल कुंबळे सर्कल" नक्कीच त्याच्यावर कन्नडिगांचं प्रेम दाखवतं. गेल्याच वर्षी तो कर्नाटक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झाला.. एकूणात मस्त लेख.. धन्यवाद !

स्मिता. 07/10/2011 - 14:01
आमच्या आवडत्या खेळाडूबद्दल एवढा छान लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. अनिल कुंबळेला त्याच्या कर्तृत्वाच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळाली आहे असं मलाही नेहमीच वाटत आलंय. नाही म्हणायला बंगलोरात महात्मा गांधी रस्त्यावरच्या एका चौकाला 'अनिल कुंबळे सर्कल' असे नाव दिलेले आहे.

जाई. 07/10/2011 - 14:19
लेख आवडला अनिल कुंबळेचे भारतीय क्रिकेटमधील योगदान वादातीत आहे

मिपाचा दर्जा घसरता घसरता पुन्हा एकदा सावरला गेला आहे असे दाखवून देणारा एक अतिशय सुंदर लेख. ......... We all know what a gentleman he is, how humble he is.....and the way he conducts himself on and off the field is a real example to everybody.......I think the one stand-out fact about Anil Kumble is the size of his heart. That is the most important thing about a person...... फार फार महत्त्वाचा संदेश. चला, अनिल कुंबळे सारखे बनण्याचा प्रयत्न करूया.

>> त्याची लीडरशिप बघता त्याला कप्तान बनायला एवढा वेळ का लागला हेच कळाले नाही. हे शंभर हिश्शे खरं ! कुंबळे चेहर्‍यावरून जेवढा मवाळ दिसायचा तितकाच क्रिकेटपटू म्हणून आक्रमक होता. ऑस्ट्रेलियात त्या प्रचंड खुनशीनी लढल्या गेलेल्या सीरीजमध्ये कुंबळेनी मैदानातली आणि मैदानाबाहेरची प्रकरणं ज्या पद्धतीनी हाताळली - त्यावरून असंच वाटलं की ह्याला जर कप्तानपद आधी मिळालं असतं तर हा नक्कीच "ऑल टाईम ग्रेट" कर्णधारांत गणला गेला असता. त्याचं खेळाचं अचाट "रीडिंग" समजायला आपल्या सिलेक्टर्सना इतका उशीर का लागला कोणास ठाऊक. द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होताच "He has a degree in engineering and a PhD in spin bowling." अश्या भन्नाट खेळाडूबद्दल एवढा भन्नाट लेख लिहिलास ! हॅट्स ऑफ टू यू सर ! जे.पी.

तिमा 07/10/2011 - 19:46
लेख अत्यंत 'आवडल्या गेलेल्या आहे' (असंच लिहायचं असतं ना ?)

प्रभो 07/10/2011 - 20:14
मस्त लेख रे... माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे अनिल. लहानपणी वाटायचं हा चष्मा घालून कसं काय खेळतो क्रिकेट? फुटत नाही का बॉल लागून चष्मा.. ?

फारएन्ड 07/10/2011 - 20:37
त्या पिढीतल्या भारताच्या बिग-५ (सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण आणि कुंबळे) पैकी हा सर्वात दुर्लक्षित असावा. गेल्या काही दिवसांत "भारतीय संघ (व्यवस्थापनाच्या दृष्टीने) कुंबळे च्या ताब्यात द्यावा" ही अत्यंत योग्य मागणी बर्‍याच लोकांनी केली होती. त्याच्या सुरूवातीच्या काळात तो भारताबाहेर कमी ईफेक्टिव्ह होता, पण उत्तरार्धात त्याने एकदम चांगली कामगिरी केली. त्याची बॉडी लॅन्ग्वेज, फलंदाजाकडे बघण्याची नजर हे सगळे फास्ट बोलर सारखेच होते. २००४ नंतर दादा-राईट चा फॉर्म ओसरला तेव्हा द्रविड ला कुंबळे हा पर्याय ठरू शकला असता. २००८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे आपण ज्या कसोटीत खेळत नाही त्यात (आपण नसल्याने कॅप्टन असलेला) धोनी त्यांच्या विरूद्ध चांगली कामगिरी करतोय हे लक्षात आल्यावर त्या दिल्ली कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा ही त्याची एकदम वेळेवर घेतलेली स्टेप. आयपीएल मधूनही असेच मानाने बाहेर पडला तो.

मी-सौरभ 07/10/2011 - 23:58
तो एक चतुर माणूस आहे हे त्याने क्रिकेटच्या नविन घेतलेल्या जबाबदार्‍या बघता लक्षात आले असेलच :) त्याला आपल्या टीमचा मॅनेजर करा !!!!

सन्जोप राव 08/10/2011 - 19:39
अनिल कुंबळेविषयीचा हा संयत शब्दांत लिहिलेला लेख आवडला. कुंबळेचे काही गुण इतरांनीही उचलण्याची वेळ आली आहे असे वाटते.

खटपट्या 20/03/2014 - 03:57
मला आठवतंय कि एका भारतीय कप्तानाने म्हटले होते कि "अनिल इतका सभ्य आहे कि मी माझ्या बहिणीचे लग्न त्याच्याशी सहज लावून देयीन" बहुतेक वेंगसरकर होते

श्रीगुरुजी 21/03/2014 - 15:05
अनिल कुंबळेचे अजून एक वैशिष्ट्य २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दिसले. दुसर्‍या कसोटीतले स्टीव्ह बकनर यांनी दिलेले व भारताविरूद्ध गेलेले अनेक वादग्रस्त निर्णय असो वा मंकीगेट प्रकरण असो, कुंबळेने सर्व प्रसंग अत्यंत संयमाने व कमालीची मॅच्युरिटी दाखवून हाताळले. भारत जरी ती मालिका १-२ असा हरला तरी कुंबळेचे नेतृत्व त्यात झळाळून उठले होते.

गणपा 07/10/2011 - 01:35
ज ब ह र्‍या.
भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी
+१

पैसा 07/10/2011 - 01:44
कुंबळेने खेळायला सुरुवात केली ती जलदगती गोलंदाज म्हणून आणि नंतर तो फिरकी टाकू लागला असं काहीतरी वाचलेलं आठवतंय. नक्की सांगू शकत नाही. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या मॅचमधे कुंबळे बँडेज बांधून गोलंदाजीला आला तेव्हा लाराच्या चेहर्‍यावरचे भाव अजून आठवतायत!

धन्या 07/10/2011 - 02:03
क्रिकेटमधील आम्हाला फारसं कळत नाही. किबहूना काहीच कळत नाही. परंतू हा लेख आवडला. खुप रोचक आणि रंजक पद्धतीने जंबोची ओळख करुन दिली आहे. आणि मुख्य म्हणजे लिहिताना अभिनिवेश टाळला आहे. इतकं तटस्थ आणि तरीही छान असं कुणी सचिनवर लिहू शकेल काय? त्याचा चुकूनही देव असा उल्लेख न करता? ;)

मेघवेडा 07/10/2011 - 02:11
मस्त लेख रे मृत्युंजया! काही माणसं आपापल्या क्षेत्रातल्या कौशल्याबाबतच नव्हे तर एकूणच जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दल, एकूणच वागण्याबद्दल जगाला बरंच काही शिकवून जातात. खेळाडूही त्याला अपवाद नाहीत. जसं सचिनच्या सिडनीतल्या २४१* खेळीने 'प्रतिकार न करता हार पत्करता कामा नये, वेळेस संकटे अंगावर झेलावी' हे आम्हांला शिकवलं, राहुलनं अनेकदा खंबीरपणाची प्रात्यक्षिकं दिली तसंच अनिलनंही नेहमीच लढाऊ बाणा, खंबीर मनोवृत्ती आणि संतुलित वर्तनाचे वस्तुपाठ घालून दिलेले आहेत. बाकी सगळं तू लिहिलंच आहेस. अजून काही लिहत नाही पण एक गोष्ट इथं मनापासून नमूद करावीशी वाटते - ६१९ कसोटी बळी म्हणजे काही चेष्टा नाही. अलिकडे आपले गोलंदाज १००-१५० होईतो दुखापतींनी अर्धे मेलेले असतात. उद्या कुणी एखाद्या जय/वीरूने हा विक्रम मोडलाच तर त्याचा नक्कीच कारकीर्दीच्या अखेरीस इमामसाहब झालेला असेल! :D भविष्यात कुणा भारतीय गोलंदाजास अनिल कुंबळेला काही ट्रिब्युट द्यायचंच असेल तर 'भारतीय गोलंदाजीची मदार कुणा एकाच खांद्यावर मी राहू देणार नाही' हे वचन हेच कुंबळेला देता येईल असं सर्वोत्तम ट्रिब्युट असेल! :)

शेखर काळे 07/10/2011 - 04:26
नसेल त्याचा बॉल वळत. पण त्याचा टॉपस्पिन आणि गुगली भल्याभल्यांना झेपले नाहीत हे खरे आहे ना? "गूगली" हा न वळणारा चेंडू आहे असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - शेखर

In reply to by शेखर काळे

मृत्युन्जय 07/10/2011 - 09:42
तेवढ्या छोट्या मोठ्या चुका माफ करा हो. कुंबळे चेंडु फिरवत नाही हा आक्षेप अगदी लिटरली नसतो घ्यायचा. :) तरी नशीब तुम्ही मुख्य प्रश्न नाही विचारला की टॉप स्पिन आणि गुगली मध्ये मुख्य फरक काय? ;)

In reply to by मृत्युन्जय

शेखर काळे 08/10/2011 - 01:37
श्री. अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट कामगिरी आणि नैपुण्याचा मी चाहता असल्यामुळे ते चेंडू वळवत नाहीत हे जरा झोंबले. बाकी लेख चांगलाच झाला आहे. मला वाटते की कुंबळेंची आणखी एक बाजू तुम्ही समोर आणली नाहीत - ती म्हणजे समोरच्या फलंदाजाला ओळखून त्याला बाद करण्यातली चतुराई. आपल्या चेंडूचा वेग, वळण आणि फिरक कमी-जास्त करून त्यांनी कितीतरी नामांकित फलंदाजांना बाद केलेले आहे. दोन-तीन साधे, हळूच वळणारे, फलंदाजाला गाफिल करणारे चेंडू कुंबळेंनी टाकले, की पुढचा चेंडू हा वेगवान जरा आखूड टप्प्याचा टॉप स्पिनर असणार हे नक्की. आणि मग मागे वळून आपल्या ऊध्वस्त यष्टींकडे पाहतानाचा फलंदाजाचा गोंधळलेला चेहरा. 'इतका वेळ तर नीट चेंडू पडत होते .. मग हा अग्निबाण कुठून आला' .. असा विचार करत तो बिचारा परत निघणार. कुंबळेंच्या चेहर्‍यावर नेहमीचे विजयी हास्य ! .. हे मी कितीतरी वेळा पाहिलेले आहे. आताच हा लेख वाचल्यावर त्यांचे पाकिस्तानविरुद्ध दहा बळींची चित्रफीत पाहिली. सलीम मलिक .. हा याच गमतीने बाद झाला होता ! राहता राहिले गूगली आणि टॉप स्पिन .. गूगली हा चेंडू करंगळी व त्याच्या बाजूच्या बोटाने धरून फिरवून सोडायचा .. टॉप स्पिन हा चेंडू मधले बोट व पहिले या बोटांनी धरून फिरवून सोडायचा .. लेग स्पिन मधले बोट व अनामिका .. (मुख्य अनामिका) या बोटांनी धरून फिरवायचा. कळले नसल्यास श्री. अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीची चित्रफीत जरूर पहावी. - शेखर काळे

सोत्रि 07/10/2011 - 05:23
भारी रे मृत्युन्जय! जम्बोबद्दल अस आपलं वाटणारं कोणी आहे हे समजल्यावर एकदम भरून आले. हॅट्स ऑफ टु जम्बो ! विजीगिषु हा शब्द सार्थ ठरवणारा लढवय्या खेळाडु. - (जम्बोचा जम्बो फॅन) सोकाजी

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:13
शीर्षक बदला. अनिल कुंबळे हे शीर्षक असते तरी लेख वाचला गेला असताच. ते उगाच '... तुंबले' असे केल्याने अधिक लोक लेख वाचतील असे नाही. अशा शीर्षकाखाली वाचनीय लेख असू शकतो, असेच येथे सिरियसली काही चांगले वाचण्यासाठी येणाऱ्यांना वाटण्याची शक्यता आहे. मीही धागा उघडला तो मृत्युन्जय काय पालथे धंदे करू लागला, असा विचार करतच. काळं मीठ अननसासारख्या फळांवरच रुचीला वेगळा खुमार देतं. कैरीवर किंवा आंब्यावर नाही.

In reply to by श्रावण मोडक

मृत्युन्जय 07/10/2011 - 12:24
प्रतिक्रिया पटली. त्यामुळे शीर्षक बदलले. पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते. ज्या फ्लॉ मध्ये लेख लिहिला त्यात हेच टायटल बरोबर वाटले होते. नविन शीर्षक फारच अनाकर्षक वाटते आहे. कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय?

In reply to by मृत्युन्जय

श्रावण मोडक 07/10/2011 - 12:40
पण आधीचे शीर्षक जास्त लोकांनी लेख वाचावा म्हणुन नव्हते.
मान्य. माझे शब्द मागे. :) सध्याचे शीर्षक अनाकर्षक आहे हे पटते. बदलता येईल. जंबो!

In reply to by मृत्युन्जय

कोणी जरा बरे शीर्षक सुचवु शकेल काय? >> हे पटतंय का पाहा :- अनिल : आक्रमक वादळांच्या गर्दीत दुर्लक्षिला गेलेला शांत सुखद वारा तळटीप :- १. मला क्रिकेट मधलं फारसं कळत नाही, पण त्याला जेंटलमन्स गेम (सभ्य लोकांचा खेळ) म्हणतात एवढं ऐकून आहे. सचिन तेंडूलकर, स्टीव वॉ, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड हे विशेषण सार्थ करतात असं वाटतं. २. शीर्षक catchy जरूर असावं की ज्यामुळे mass मधील वाचक त्याकडे आकर्षित होतील पण cheap असू नये, की ज्यामुळे class मधले वाचक पळून जावेत. (मी ज्यावरून ह्या वाक्याची प्रेरणा घेतली आहे ते मूळ वाक्य असे आहे - वक्त्याचे भाषण स्त्रियांच्या वस्त्राप्रमाणे अंग झाकण्यापुरते लांब परंतू उत्सुकता निर्माण करण्याइतके आखूड असावे.)

In reply to by श्रावण मोडक

किसन शिंदे 07/10/2011 - 12:59
श्रामो यांच्याशी सहमत.. ............तुंबले हे शिर्षक पाहुन बराच वेळ धागा उघडायचा धीर होत नव्हता. शेवटी धीर करून धागा उघडला आणी एका झटक्यात वाचून संपवला. :)

किसन शिंदे 07/10/2011 - 12:50
आमच्या जंबोवर एवढा चांगला लेख (आणी तो ही जे.पी मॉर्गनच्या लेखांच्या तोडीचा) टाकल्याबद्दल मृत्यंजय यांचे विशेष आभार.

मैत्र 07/10/2011 - 13:27
आम्ही त्याला त्याचं पूर्ण नाव " अनिल सरळ कुंबळे" आहे असं म्हणायचो... :) जगाला गंडवण्यासाठी तो लेग स्पिनर ... खाजगीत मीडियम पेसर आहे हाही एक मुद्दा प्रचलित होता :) बरेच फलंदाज त्याचा बॉल आता वळेल मग वळेल अशी करत राहायचे किंवा ऑफला खेळायला जायचे आणि चेंडू बिचारा वेगात आणि सरळ निघून जायचा कधी पॅड्स तर कधी यष्ट्यांचा वेध घेऊन :) पण त्याची लढाऊ वृत्ती आणि विलक्षण झपकन आत येणारे टॉप स्पिनस आणि स्ट्रेट बॉल्स जबरदस्त होते... ज्या दिवशी तो फॉर्म मध्ये असेल त्या दिवशी तो अतिशय unplayable असायचा. त्या मानाने त्याला मानमरातब मिळाला नाही. पण एकंदरीत क्रिकेट जगतात बॅटस्मनला जास्त भाव मिळतो. अनेक महान गोलंदाज होऊन गेले पण थोडके. त्या मानाने फलंदाज लवकर नाव मिळवतात. कुंबळेचे करिअर रेकॉर्ड पुरेसे आहे त्याची गुणवत्ता आणि महानता सिद्ध करायला. कर्णधारपद, पद्मश्री वगैरे सन्मान त्यालाही मिळाले. पण एका डावातले दहा बळी मिळवणार्‍या या झुंजार खेळाडूला सचिन, गांगुली आणि द्रविड च्या काळात त्या कोणाएवढं नावाजलं गेलं नाही हेही खरं. नम्म बेंगळूरुतलं "अनिल कुंबळे सर्कल" नक्कीच त्याच्यावर कन्नडिगांचं प्रेम दाखवतं. गेल्याच वर्षी तो कर्नाटक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झाला.. एकूणात मस्त लेख.. धन्यवाद !

स्मिता. 07/10/2011 - 14:01
आमच्या आवडत्या खेळाडूबद्दल एवढा छान लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. अनिल कुंबळेला त्याच्या कर्तृत्वाच्या मानाने फार कमी प्रसिद्धी मिळाली आहे असं मलाही नेहमीच वाटत आलंय. नाही म्हणायला बंगलोरात महात्मा गांधी रस्त्यावरच्या एका चौकाला 'अनिल कुंबळे सर्कल' असे नाव दिलेले आहे.

जाई. 07/10/2011 - 14:19
लेख आवडला अनिल कुंबळेचे भारतीय क्रिकेटमधील योगदान वादातीत आहे

मिपाचा दर्जा घसरता घसरता पुन्हा एकदा सावरला गेला आहे असे दाखवून देणारा एक अतिशय सुंदर लेख. ......... We all know what a gentleman he is, how humble he is.....and the way he conducts himself on and off the field is a real example to everybody.......I think the one stand-out fact about Anil Kumble is the size of his heart. That is the most important thing about a person...... फार फार महत्त्वाचा संदेश. चला, अनिल कुंबळे सारखे बनण्याचा प्रयत्न करूया.

>> त्याची लीडरशिप बघता त्याला कप्तान बनायला एवढा वेळ का लागला हेच कळाले नाही. हे शंभर हिश्शे खरं ! कुंबळे चेहर्‍यावरून जेवढा मवाळ दिसायचा तितकाच क्रिकेटपटू म्हणून आक्रमक होता. ऑस्ट्रेलियात त्या प्रचंड खुनशीनी लढल्या गेलेल्या सीरीजमध्ये कुंबळेनी मैदानातली आणि मैदानाबाहेरची प्रकरणं ज्या पद्धतीनी हाताळली - त्यावरून असंच वाटलं की ह्याला जर कप्तानपद आधी मिळालं असतं तर हा नक्कीच "ऑल टाईम ग्रेट" कर्णधारांत गणला गेला असता. त्याचं खेळाचं अचाट "रीडिंग" समजायला आपल्या सिलेक्टर्सना इतका उशीर का लागला कोणास ठाऊक. द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होताच "He has a degree in engineering and a PhD in spin bowling." अश्या भन्नाट खेळाडूबद्दल एवढा भन्नाट लेख लिहिलास ! हॅट्स ऑफ टू यू सर ! जे.पी.

तिमा 07/10/2011 - 19:46
लेख अत्यंत 'आवडल्या गेलेल्या आहे' (असंच लिहायचं असतं ना ?)

प्रभो 07/10/2011 - 20:14
मस्त लेख रे... माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे अनिल. लहानपणी वाटायचं हा चष्मा घालून कसं काय खेळतो क्रिकेट? फुटत नाही का बॉल लागून चष्मा.. ?

फारएन्ड 07/10/2011 - 20:37
त्या पिढीतल्या भारताच्या बिग-५ (सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण आणि कुंबळे) पैकी हा सर्वात दुर्लक्षित असावा. गेल्या काही दिवसांत "भारतीय संघ (व्यवस्थापनाच्या दृष्टीने) कुंबळे च्या ताब्यात द्यावा" ही अत्यंत योग्य मागणी बर्‍याच लोकांनी केली होती. त्याच्या सुरूवातीच्या काळात तो भारताबाहेर कमी ईफेक्टिव्ह होता, पण उत्तरार्धात त्याने एकदम चांगली कामगिरी केली. त्याची बॉडी लॅन्ग्वेज, फलंदाजाकडे बघण्याची नजर हे सगळे फास्ट बोलर सारखेच होते. २००४ नंतर दादा-राईट चा फॉर्म ओसरला तेव्हा द्रविड ला कुंबळे हा पर्याय ठरू शकला असता. २००८ च्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे आपण ज्या कसोटीत खेळत नाही त्यात (आपण नसल्याने कॅप्टन असलेला) धोनी त्यांच्या विरूद्ध चांगली कामगिरी करतोय हे लक्षात आल्यावर त्या दिल्ली कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा ही त्याची एकदम वेळेवर घेतलेली स्टेप. आयपीएल मधूनही असेच मानाने बाहेर पडला तो.

मी-सौरभ 07/10/2011 - 23:58
तो एक चतुर माणूस आहे हे त्याने क्रिकेटच्या नविन घेतलेल्या जबाबदार्‍या बघता लक्षात आले असेलच :) त्याला आपल्या टीमचा मॅनेजर करा !!!!

सन्जोप राव 08/10/2011 - 19:39
अनिल कुंबळेविषयीचा हा संयत शब्दांत लिहिलेला लेख आवडला. कुंबळेचे काही गुण इतरांनीही उचलण्याची वेळ आली आहे असे वाटते.

खटपट्या 20/03/2014 - 03:57
मला आठवतंय कि एका भारतीय कप्तानाने म्हटले होते कि "अनिल इतका सभ्य आहे कि मी माझ्या बहिणीचे लग्न त्याच्याशी सहज लावून देयीन" बहुतेक वेंगसरकर होते

श्रीगुरुजी 21/03/2014 - 15:05
अनिल कुंबळेचे अजून एक वैशिष्ट्य २००८ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दिसले. दुसर्‍या कसोटीतले स्टीव्ह बकनर यांनी दिलेले व भारताविरूद्ध गेलेले अनेक वादग्रस्त निर्णय असो वा मंकीगेट प्रकरण असो, कुंबळेने सर्व प्रसंग अत्यंत संयमाने व कमालीची मॅच्युरिटी दाखवून हाताळले. भारत जरी ती मालिका १-२ असा हरला तरी कुंबळेचे नेतृत्व त्यात झळाळून उठले होते.
लेखनविषय:
अनिल कुंबळे संडास तुंबले हा वाक्प्रचार आम्ही शाळेत असताना लै म्हणजे लै च फेमस होता. वास्तविक अनिल कुंबळेचा आणि संडास तुंबण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण कुंबळे आणि तुंबले याचे यमक जुळते म्हणून बिचार्‍या कुंबळेवर विनोद व्हायचे. असाच एक इथे विषद न करतायेण्याजोगा विनोद त्याच्या फिरकी गोलंदाज असण्यावर पण व्हायचा. तो ही होण्यासारखे काही पाप के एन कृष्णास्वामी कुंबळ्यांच्या या पोराने केलेले नाही पण भारतीय इतिहासातला सर्वात यशस्वी गोलंदाज होउनदेखील त्याचे योग्य ते श्रेय कधीच न मिळणे ही कदाचित अनिल कुंबळेच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका असावी.

७) एका खेळियाने - "युनायटेड" वुई स्टॅन्ड

जे.पी.मॉर्गन ·

शुचि 27/09/2011 - 21:15
>> संगीतात जे स्थान "हार्मनीचं" ............... दिलेली दाद हे सारखेच की ! >> फूट्बॉल चा सामना कधी आवडीने पाहीला नाही परंतु आपले लेख तरीही खूप आवडतात. "एका खेळीयाने" ही संपूर्ण मालीकाच अतिशय सुरस, वाचनीय आहे. प्रत्येक वाक्यागणीक टीमचा/ खेळाडूचा चैतन्य, जोश, उत्साह, आत्मविश्वास, ताकद ओसंडून वहाते. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात "टीमवर्क" ला दिलेले महत्व. सुपर्ब!!

प्रभो 27/09/2011 - 21:15
ह्म्म्म.... जे पी ने कोण्या एका संघाची बाजू घ्यावी हे आवडलं नाही :) असो...पण रायन गिग्ग्स माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. अवांतर : तू मॅन यू च्याबाजूने आहेस म्हटल्यावर तुला लिव्हरपूल बद्दल लिही म्हणून सांगण्यात काही अर्थ नाही ;)

In reply to by प्रभो

मी मॅन यू वाला वगैरे नाही रे प्रभो :). अरे वेगवेगळ्या संघांचा विचार करत होतो...बरेच संघ हे कोण्या विशिष्ट काळात दादागिरी करून गेले. काहींचा इतिहास अगदीच अलिकडचा आहे. काहींना तितकं "ग्लोबल अपील" नाही. त्या निकषांवर मॅन यू परंपरा, प्रसिद्धी आणि यश ह्या तिनही निकषांवर पात्र ठरला म्हणून त्यांच्यावर लिहिलं इतकंच !

५० फक्त 28/09/2011 - 06:28
जबरदस्त लेखन, एका खेळियाने - म्हणजे प्रत्येक वेळी एक व्यक्ति नसुन एक संघ हा पण एक खेळिया असतो ही कल्पना प्रत्यक्षात लिहिल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

ढब्बू पैसा 28/09/2011 - 09:46
खूप फुटबॉलप्रेमी नाही , नुसती तोंडाओळख आहे. मॅनयू या क्लबमागे इतका इतिहास आहे हे माहिती नव्हत़ं! लेख नेहमीप्रमाणे आवडेश :)

छोटा डॉन 28/09/2011 - 11:03
लेख उत्तम आहे ह्यात वाद नाही. जे.पी.च्या लेखणीला सलाम :) मॅन्-यु कडे बरेच काही आहे जे इतरांकडे नाही, त्यांच्याकडे जे आहे ते इतरांना नेहमीच हवे असते पण ते काही केल्या मिळत नाही, त्यांच्याकडे असलेल्या ह्या खास गोष्टीमुळे त्यांचा प्रभाव प्रत्येक मॅचमध्ये दिसतोच, ते विजयाचे शिल्पकार असतात ... होम ग्राउंडवर असलेल्या मॅचचे रेफ्री !!! ;) असो, लेख आवडला हे पुन्हा एकदा सांगतो. बाकी तुर्तास आम्ही ठिक आहोत :) - ( चेल्सीप्रेमी ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अगो बाबो... आग लागलेली दिसतीये ! आयला आपल्याला लई आश्चर्य वाटतं पब्लिकची इतकी अ‍ॅटॅचमेंट बघून. हायबरीला जाताना "निळ्या रंगाचा टीशर्ट घालून जाऊ नकोस" म्हणणारा इंग्रज येडा वाटला होता. पण तिथे गेल्यावर समजलं की त्याच्या बोलण्यात खरंच तथ्य होतं. वीगन कडून आर्सेनल हारल्यावर पब्लिक नी पब मध्ये जो दंगा घातला होता....इंग्लिश पब्लिक लई सेंटी असतं बाबा ! चेल्सीला शुभेच्छा ! :) जे पी.

In reply to by विसुनाना

छोटा डॉन 28/09/2011 - 11:38
विसुनानांनी पिक्चरचा उल्लेख केला म्हणुन आठवले. फुटबॉलवर असलेला 'दी गोल' नावाचा पिक्चर आवजुर्न पाहण्यासारखा आहे. एका मेक्सिकन पोराची शुन्यापासुन सुरवात करुन पहिल्या भागात 'न्यु-कॅसल युनायटेड' पर्यंतचा प्रवास आणि नंतर दुसर्‍या भागात थेट युरोपियन जायंट 'रियाल माद्रिद'मधले करियर ते चॅम्पियन्स लीग जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. मस्त आहे सिनेमा. ह्यात खरेखुरे फुटबॉल स्टार्स घेतल्यामुळे अजुन छान वाटते. ह्या सिनेमातले २ मुख्य पात्र असलेले 'केव्हिन हॅरिस' आणि 'सॅण्टोयागो म्युनेझ' हे कुठल्याच अँगलने चित्रपट कलाकार वाटत नाही, ते जणु खरोखरच प्लेयर्स आहेत असेच वाटते. असो. - छोटा डॉन

जे. पी. शेठ तुम्ही उगाच आमच आवडते लेखक नाही आहात. लेख वाचत नसून अक्षरशः एखादा चलचित्रपट किंवा मॅन्-यु वरची डॉक्युमेंटरी बघत आहोत असेच वाटत होते. सरस लिखाण मालक. पु.भा.प्र. अवांतर :- चेल्सी वैग्रे सारख्या फालतू टिम्सवर मात्र लिहून वेळ घालवू नये अशी विनंती.

गणपा 28/09/2011 - 13:01
टिपीकल जेपी स्टाईल लेख. :) तस आमचं फुटबॉल प्रेम ४ वर्षातुन एकदाच उफाळुन येत म्हणा. पण लेख एकदम आवडल्या गेला आहे. या माळेतील पुढिल पुष्प वाचण्यास उत्सुक. :)

अनिकेतपन्त 29/09/2011 - 10:33
जे.पी., आमच्या टीमवर लेख लिहलास, बर वाटल. बाकी लोकांना 'जास्त चांगलं लिहा' म्हणुन सांगाव लागत, तुला फक्त 'जास्त लिहा' एवढंच सांगाव वाटतय. धन्यवाद...

शुचि 27/09/2011 - 21:15
>> संगीतात जे स्थान "हार्मनीचं" ............... दिलेली दाद हे सारखेच की ! >> फूट्बॉल चा सामना कधी आवडीने पाहीला नाही परंतु आपले लेख तरीही खूप आवडतात. "एका खेळीयाने" ही संपूर्ण मालीकाच अतिशय सुरस, वाचनीय आहे. प्रत्येक वाक्यागणीक टीमचा/ खेळाडूचा चैतन्य, जोश, उत्साह, आत्मविश्वास, ताकद ओसंडून वहाते. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात "टीमवर्क" ला दिलेले महत्व. सुपर्ब!!

प्रभो 27/09/2011 - 21:15
ह्म्म्म.... जे पी ने कोण्या एका संघाची बाजू घ्यावी हे आवडलं नाही :) असो...पण रायन गिग्ग्स माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. अवांतर : तू मॅन यू च्याबाजूने आहेस म्हटल्यावर तुला लिव्हरपूल बद्दल लिही म्हणून सांगण्यात काही अर्थ नाही ;)

In reply to by प्रभो

मी मॅन यू वाला वगैरे नाही रे प्रभो :). अरे वेगवेगळ्या संघांचा विचार करत होतो...बरेच संघ हे कोण्या विशिष्ट काळात दादागिरी करून गेले. काहींचा इतिहास अगदीच अलिकडचा आहे. काहींना तितकं "ग्लोबल अपील" नाही. त्या निकषांवर मॅन यू परंपरा, प्रसिद्धी आणि यश ह्या तिनही निकषांवर पात्र ठरला म्हणून त्यांच्यावर लिहिलं इतकंच !

५० फक्त 28/09/2011 - 06:28
जबरदस्त लेखन, एका खेळियाने - म्हणजे प्रत्येक वेळी एक व्यक्ति नसुन एक संघ हा पण एक खेळिया असतो ही कल्पना प्रत्यक्षात लिहिल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

ढब्बू पैसा 28/09/2011 - 09:46
खूप फुटबॉलप्रेमी नाही , नुसती तोंडाओळख आहे. मॅनयू या क्लबमागे इतका इतिहास आहे हे माहिती नव्हत़ं! लेख नेहमीप्रमाणे आवडेश :)

छोटा डॉन 28/09/2011 - 11:03
लेख उत्तम आहे ह्यात वाद नाही. जे.पी.च्या लेखणीला सलाम :) मॅन्-यु कडे बरेच काही आहे जे इतरांकडे नाही, त्यांच्याकडे जे आहे ते इतरांना नेहमीच हवे असते पण ते काही केल्या मिळत नाही, त्यांच्याकडे असलेल्या ह्या खास गोष्टीमुळे त्यांचा प्रभाव प्रत्येक मॅचमध्ये दिसतोच, ते विजयाचे शिल्पकार असतात ... होम ग्राउंडवर असलेल्या मॅचचे रेफ्री !!! ;) असो, लेख आवडला हे पुन्हा एकदा सांगतो. बाकी तुर्तास आम्ही ठिक आहोत :) - ( चेल्सीप्रेमी ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अगो बाबो... आग लागलेली दिसतीये ! आयला आपल्याला लई आश्चर्य वाटतं पब्लिकची इतकी अ‍ॅटॅचमेंट बघून. हायबरीला जाताना "निळ्या रंगाचा टीशर्ट घालून जाऊ नकोस" म्हणणारा इंग्रज येडा वाटला होता. पण तिथे गेल्यावर समजलं की त्याच्या बोलण्यात खरंच तथ्य होतं. वीगन कडून आर्सेनल हारल्यावर पब्लिक नी पब मध्ये जो दंगा घातला होता....इंग्लिश पब्लिक लई सेंटी असतं बाबा ! चेल्सीला शुभेच्छा ! :) जे पी.

In reply to by विसुनाना

छोटा डॉन 28/09/2011 - 11:38
विसुनानांनी पिक्चरचा उल्लेख केला म्हणुन आठवले. फुटबॉलवर असलेला 'दी गोल' नावाचा पिक्चर आवजुर्न पाहण्यासारखा आहे. एका मेक्सिकन पोराची शुन्यापासुन सुरवात करुन पहिल्या भागात 'न्यु-कॅसल युनायटेड' पर्यंतचा प्रवास आणि नंतर दुसर्‍या भागात थेट युरोपियन जायंट 'रियाल माद्रिद'मधले करियर ते चॅम्पियन्स लीग जिंकण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. मस्त आहे सिनेमा. ह्यात खरेखुरे फुटबॉल स्टार्स घेतल्यामुळे अजुन छान वाटते. ह्या सिनेमातले २ मुख्य पात्र असलेले 'केव्हिन हॅरिस' आणि 'सॅण्टोयागो म्युनेझ' हे कुठल्याच अँगलने चित्रपट कलाकार वाटत नाही, ते जणु खरोखरच प्लेयर्स आहेत असेच वाटते. असो. - छोटा डॉन

जे. पी. शेठ तुम्ही उगाच आमच आवडते लेखक नाही आहात. लेख वाचत नसून अक्षरशः एखादा चलचित्रपट किंवा मॅन्-यु वरची डॉक्युमेंटरी बघत आहोत असेच वाटत होते. सरस लिखाण मालक. पु.भा.प्र. अवांतर :- चेल्सी वैग्रे सारख्या फालतू टिम्सवर मात्र लिहून वेळ घालवू नये अशी विनंती.

गणपा 28/09/2011 - 13:01
टिपीकल जेपी स्टाईल लेख. :) तस आमचं फुटबॉल प्रेम ४ वर्षातुन एकदाच उफाळुन येत म्हणा. पण लेख एकदम आवडल्या गेला आहे. या माळेतील पुढिल पुष्प वाचण्यास उत्सुक. :)

अनिकेतपन्त 29/09/2011 - 10:33
जे.पी., आमच्या टीमवर लेख लिहलास, बर वाटल. बाकी लोकांना 'जास्त चांगलं लिहा' म्हणुन सांगाव लागत, तुला फक्त 'जास्त लिहा' एवढंच सांगाव वाटतय. धन्यवाद...
लेखनविषय:
परवाच आमच्या पराचं "भन्नाट" वाचत होतो... सु.शि. म्हणजे आधीच आपला वीक पॉईंट. त्यात पराच्या कन्सेप्टनीच डोक्याला शॉट दिला. दारा, मंदार, फिरोज आणि अमर विश्वास एकत्र?? एकेकाच्या "परा"क्रमाच्या कथा वाचताना सुद्धा भान हरपायला होतं. आणि हिथंतर पराभाऊ काय सांगून राहिले? दाराची अमानवी ताकद, अमरचं अफाट डोकं, मंदारचा स्मार्टनेस आणि फिरोजचं बैदुल एकत्र?? "अब्ब आयेगा मजा"। हे म्हणजे एका बाजूनी मॅक्ग्रा, दुसर्‍या बाजूनी वॉर्न, मागे गिलख्रिस्ट आणि स्लिप्समध्ये पाँटिंग झालं की राव ! च्यायला....

निस्तीच पोकापोकी!

डॉ.श्रीराम दिवटे ·

धन्या 16/09/2011 - 20:33
अहो सोशल नेटवर्किंग साईटा हे व्हर्च्युअल जग आहे. त्यामुळे तेथे फक्त पोकापोकीच शक्य आहे. तुम्हाला जर ठोकाठोकी करायची असेल तर त्यासाठी ज्या व्यक्तीला ठोकून काढायचे आहे तिला प्रत्यक्षात भेटावे लागेल.

आत्मशून्य 16/09/2011 - 20:43
Facebook and orkut is best way to keep in touch with whom we don't want to keep in touch.... ;) असो, थोडी काळजी घेतली तर फार त्रास होत नाही, तसचं भारतातले सायबर लॉ सूध्दा अत्यंत कडक आहेत. पण ही दूधारी तलवार आहे हे मात्र मान्य.

डॉ. दिवटे.. लेख मनापासुन आवड्ला. आजवर फेसबुक्/ऑर्कुट इ. सोशल नेटवर्किंग साईट्स वर या पेक्षा उत्तम भाष्य करणारे लेखन वाचनात आले नव्हते. - http://www.facebook.com/rishikesh.chindarkar

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 16/09/2011 - 22:05
अज्ञान असलं तरी त्याचं प्रदर्शन कमी कर. आपण प्रदर्शीत करत आहोत ते अज्ञान आहे हे समजण्याच्या बाबतीतच अज्ञान असेल तर? ;) बाकी सोशलनेटवर्कींगवरून मला ellen degeneres या अवखळ उभ्या उभ्या विनोदाचे कार्यक्रम करणार्‍या अभिनेत्रीचे एक म्हणणे आवडते. I don't like FB as I have enough friends. But I like Twitter as I get followers. :-)

In reply to by विकास

मला तर बुवा फेसबुक आवडतं, तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते. ;-) माणसाला प्रत्यक्ष न भेटताही त्याचे विचार काय आहे हे समजतं. आपले स्वतःचे मित्रमैत्रीणीतर असतातच पण त्यांच्या मित्रमैत्रीणींमधे कोणी रोचक व्यक्ती असतील तर त्यांचं लिखाणही वाचता येतं. समोर बसणारी व्यक्ती तुफान बोरिंग नाहीतर अज्ञान काय हे न समजण्याएवढी अज्ञ असेल तरीही आपण तिच्याशीच बोलावं अशी सक्ती फेसबुकावर होत नाही. ज्या लोकांना काहीही म्हणायचं नसतं किंवा ज्यांनी काही म्हटलेलं मला महत्वाचं वाटत नाही किंवा ज्यांना उगाच मित्रसंख्या वाढवायची आहे अशा लोकांना मी सरळच टाळू शकते. विकास, तुमची मागे एक सही होती ती पण मला आवडायची: मेरे पास फेसबुक है, ट्विटर है, ऑर्कुट है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास नौकरीधंदा है।

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ 16/09/2011 - 22:55
सहमत. अवांतरः- हे फेसबुकचं महत्व मसं वर येउन सांगण्याइतकं मसं महत्वाचं शेवटी वाटतच ना. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 16/09/2011 - 22:58
तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते
ह्या बाबतीत खरंच सहमत आहे, अगदी ऑर्कूटवरही जरा भडक लीहलं की मूक्तपीठ कम्यूनीटीमधून बॅन लागायचं.. एकूणच मराठी माणसांची मानसीकता तीतकी ओपन माइंडेड असलेली अंतरजालावरही फारशी दीसून येत नाही... तिथही संकूचीतपणा सूटायचा नाही असंच अनूभवाला येतं. आणी अर्थातच who you are is less important than who you know मूळे एकंदर तीथही फार सूखानं नादतात असेही नाही.

In reply to by आत्मशून्य

पाषाणभेद 16/09/2011 - 23:54
असाच विचार माझाही पक्का व्हायला लागलाय हल्ली हल्ली. म्हणजे अगदीच योग्य वेळेत सांगायच झालं तर कालपासून.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाळकराम 17/09/2011 - 18:11
फेबु वा तत्सम सोशल नेटवर्किंग साईट्स बद्दलआणि आम्हा सर्वांचं अज्ञान दूर करा! गरीबावर एवढी कृपा कराच बुवा!

मुक्तसुनीत 16/09/2011 - 22:28
सोशल नेटवर्किंग साईट चा उपयोग लोक चुकीचा करतात का ? होय. मग त्यामुळे सोशल नेटवर्किंग ही संकल्पनाच चुकीची आहे का ? नाही. सोशल नेटवर्किंग साईट्स च्या आधीच्या इमेल आदि माध्यमांचाही दुरुपयोग होण्याचे प्रकार पाहण्यात आलेले आहेत का ? होय. मग सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये दोष आहे की त्यांचा योग्य तो वापर न करणार्‍या आणि प्रसंगी वाईट वापर करणार्‍या लोकांमधे दोष आहे ? दोष अशा लोकांमधे आहे. अर्थात फेसबुकसारख्या बाबतीत , साईटस च्या चुकीच्या धोरणामुळे प्रायव्हसीचा भंग होण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत. या न्यायाने फेसबुक सदोष आहे हे मान्यच. मात्र "नुसतीच पोकापोकी" हा तो दोष नव्हे. असो.

मराठे 16/09/2011 - 22:44
उगाच एक आठवलं... "काय , आजकाल भेटत नाही अजिबात.. काही खुशाली कळली नाही तुझी" या प्रश्नाची बदलत्या काळाप्रमाणे बदलणारी उत्तरं: १९९० च्या आसपासः "अरे यार तू आधी मोबाईल घे.. म्हणजे तुला एसेमेस पाठवता येतिल.. मोबाईल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल." २००० च्या आसपासः "माझ्या सगळ्या मित्रांशी मी इमेल मधून टच मधे असतो.. तु इमेल अकाउंट ओपन कर.. इमेल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल" २०१० च्या आसपासः "तुझ्या फेसबूक मधे अ‍ॅडव ना मला... काय फेसबूक वापरत नाही? "फेसबूक" नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल!"

In reply to by मराठे

आत्मशून्य 16/09/2011 - 22:53
हेच एकमेव कारण आहे टेलिफोन... टीव्ही... पेजर...मोबाइल.. एस.एम.एस...... एमेल....ओर्कूट... फेस्बूक---- ट्व्वीटर... आणी मिसळपाव..... यांचा शोध लागण्याचं आणी ते यशस्वी होण्याचं... भवीष्यातही जेव्हां जेव्हां या संदर्भात इनोवेशंन होतील यशस्वीच ठरतील :)

छान प्रतिसाद दिलेत सर्वांनी. आभार. मनाला वाटेल ते वॉलवर लिहिता येऊ शकते. म्हणजे काहीही लिहायचे का? काहीही डकवायचे का? आपल्याच मित्र मैत्रिणींना वेगळ्या नावाचे आयडी वापरून सतावायचे का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यासाठी हा लेख लिहिला आहे. या मुद्द्यावर मंथन व्हावे ही अपेक्षा.

In reply to by शिल्पा ब

बाळकराम 18/09/2011 - 19:31
बाकी, तुम्ही कुणाचे ड्यु आय डी आहात ते आम्हाला कळलं बरं का! ;) ( पण अशा साध्या बाबतीत चेगुसुंनाच प्रकाश पाडावा लागतो, हे बघून मौज वाटली! बाकी चालू द्या!)

In reply to by शिल्पा ब

धन्या 19/09/2011 - 20:27
अहो अशा गोष्टी चार चौघात बोंबलायच्या नसतात हो शिल्पातै. बाळकराम बोंबलले का? आणि त्यांच्या फक्त दोन ओळ वाचून तुम्ही हा निष्कर्ष काढलात खुपच तल्लख बुद्धी आहे बुवा तुमची. अमेरिकेत असता काय?

In reply to by धन्या

बाळकराम 20/09/2011 - 01:21
अमेरिकेत असता काय?>> हे काय इचारनं झालं का राव! आपुन काय न बोलता बी समदं कळतंय त्येन्ला! उगाच अमेरिकेत गेल्याती का त्या? काय म्हंता, काडा चंची आन तंबाकू!

रेवती 18/09/2011 - 21:04
दिवटे साहेब, चक्क लेखन आवडले. १००% पटले असे म्हणता येणार नाही. बर्याच चांगल्या गोष्टी असतात हो, त्याचा वापर वाईट रितीने करणारेही असतातच. आता वाईटाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असेल तर काय करणार? अश्लील गोष्टींसाठी वापर केला जात असेल तर ते मला वाईट आहे असे वाटते पण तसे ते वापरणार्‍याला वाटत नसेल तर काय करणार? "थोडक्यात गोडी आणि जास्तीत लबाडी" ;)

स्वस्त असल्याने नेट व मोबाईल चा वापर व दुर उपयोग वाढला आहे.. उपाय........ मोबाईल...इन कमींग व ऑट गोईंग १० रु /मिनिट रेट करावा,.. नेट ..मिनिमम चार्ज रु.५००० ठेवावा... त्या मुळे ज्यांना गरज आहेत असेच लोक नेट वापरतिल... ल्याड लाईन रेट कमी करुन होणारी गैर सोय टाळता येईल... व आज मोबाईल वापर जो बोकाळला आहे तो थांबु शकेल....... मोबाईल व नेट चा व्यवसाया व्यतिरिक्त वापर म्हणजे चंगळ वाद आहे.... लोकांनी ल्यांड लाईन वापरणे जवळ जवळ बंद केल्या गत आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

स्मिता. 19/09/2011 - 16:27
मोबाईल किंवा आंतरजालाचा भरपूर वापर हा त्या सोयींचा दुरुपयोग कसा म्हणता येईल? किंवा मोबाईचा/नेटचा वापर 'बोकाळल्याने' तुम्हाला-आम्हाला काय त्रास होतो? जोवर तंत्रज्ञानाचा गैरवापर होत नाही तोवर त्याचा वापर कितीही असला तरी हरकत नसावी. खरं तर त्यांच्या सहाय्याने किती तरी लोकांची कामे सुकर होतात.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मृत्युन्जय 19/09/2011 - 16:47
बरोबर आहे. मी तर म्हणतो की सरसकट दूरध्वनीवरच (स्थिर काय किंवा भ्रमण काय) बंदी घालावी. दूरध्वनी मुळे लोकांनी पोस्टकार्ड वापरणे बंद केले आहे हो. पत्र लिहिण्याची कलाच नाहिशी होउ लागली आहे. किंबहुना मी तर म्हणतो की पोस्टखातेच बंद करावे. बिचार्‍या पोस्टमनला किती पळवतात हे लोक. त्यापेक्षा पुर्वीची कबूतर मेसेजिंग सर्व्हिस सुरु केली तर कित्ती बरे होइल. आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती) त्यांचा काही उपयोगही करुन घेता येइल. एका कबूतर मेसेजचे ५००० रुपये. दाणापाण्याचा खर्च वेगळा अ‍ॅट अ‍ॅक्चुयल.

In reply to by मृत्युन्जय

आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती)
अगदी योग्य अर्थाने घेतला गेल्या आहे. पुढच्या कट्ट्यास आम्ही तुम्हाला न्यायला व सोडायला येऊ ब्रिजेशच्या गाडीतून.

In reply to by जाई.

आमच्या सोसायटीतही या कबूतरांनी वैताग आणलाय
'या' म्हणजे नक्की कोणत्या ? १) एकट्याने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? का २) जोडीने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? पारवा परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 19/09/2011 - 18:20
बाब्बौ, अग्गा गा गा !!!
एका सोसायटीत किती कबुतरे असतात? किंवा तुमच्या सोसायटीत किती कबुतरे आहेत ? कबुतर घ्या घ्या घ्या, कबुतर घ्या घ्या घ्या, घ्या $$$ घ्या $$$

अनिकेतपन्त 28/09/2011 - 17:36
दिवटे डाक्टर्...तुमच्या लेखाबद्द्ल काय म्हणायच नाही राव आम्हाला...पण 'क्रीडा' म्हणुन बूकमार्क कशाला केलय? आमच्यासारख्या रोजचा पेपर शेवटच्या पानपासुन वाचणार्या लोकांचा पोपट होतो हो बाकी काय नाही.

In reply to by अनिकेतपन्त

मेघवेडा 28/09/2011 - 17:51
अनिकेतपन्त, द वणवणे> डागदरसायबांच्या मनरूपी खेळाडूने विचारांच्या मैदानात कोट्याऽनुप्रासादिरूपी सवंगड्यांसोबत केलेली नैबंधिक क्रीडा आहे ही! /द वणवणे>

धन्या 16/09/2011 - 20:33
अहो सोशल नेटवर्किंग साईटा हे व्हर्च्युअल जग आहे. त्यामुळे तेथे फक्त पोकापोकीच शक्य आहे. तुम्हाला जर ठोकाठोकी करायची असेल तर त्यासाठी ज्या व्यक्तीला ठोकून काढायचे आहे तिला प्रत्यक्षात भेटावे लागेल.

आत्मशून्य 16/09/2011 - 20:43
Facebook and orkut is best way to keep in touch with whom we don't want to keep in touch.... ;) असो, थोडी काळजी घेतली तर फार त्रास होत नाही, तसचं भारतातले सायबर लॉ सूध्दा अत्यंत कडक आहेत. पण ही दूधारी तलवार आहे हे मात्र मान्य.

डॉ. दिवटे.. लेख मनापासुन आवड्ला. आजवर फेसबुक्/ऑर्कुट इ. सोशल नेटवर्किंग साईट्स वर या पेक्षा उत्तम भाष्य करणारे लेखन वाचनात आले नव्हते. - http://www.facebook.com/rishikesh.chindarkar

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 16/09/2011 - 22:05
अज्ञान असलं तरी त्याचं प्रदर्शन कमी कर. आपण प्रदर्शीत करत आहोत ते अज्ञान आहे हे समजण्याच्या बाबतीतच अज्ञान असेल तर? ;) बाकी सोशलनेटवर्कींगवरून मला ellen degeneres या अवखळ उभ्या उभ्या विनोदाचे कार्यक्रम करणार्‍या अभिनेत्रीचे एक म्हणणे आवडते. I don't like FB as I have enough friends. But I like Twitter as I get followers. :-)

In reply to by विकास

मला तर बुवा फेसबुक आवडतं, तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते. ;-) माणसाला प्रत्यक्ष न भेटताही त्याचे विचार काय आहे हे समजतं. आपले स्वतःचे मित्रमैत्रीणीतर असतातच पण त्यांच्या मित्रमैत्रीणींमधे कोणी रोचक व्यक्ती असतील तर त्यांचं लिखाणही वाचता येतं. समोर बसणारी व्यक्ती तुफान बोरिंग नाहीतर अज्ञान काय हे न समजण्याएवढी अज्ञ असेल तरीही आपण तिच्याशीच बोलावं अशी सक्ती फेसबुकावर होत नाही. ज्या लोकांना काहीही म्हणायचं नसतं किंवा ज्यांनी काही म्हटलेलं मला महत्वाचं वाटत नाही किंवा ज्यांना उगाच मित्रसंख्या वाढवायची आहे अशा लोकांना मी सरळच टाळू शकते. विकास, तुमची मागे एक सही होती ती पण मला आवडायची: मेरे पास फेसबुक है, ट्विटर है, ऑर्कुट है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास नौकरीधंदा है।

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ 16/09/2011 - 22:55
सहमत. अवांतरः- हे फेसबुकचं महत्व मसं वर येउन सांगण्याइतकं मसं महत्वाचं शेवटी वाटतच ना. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 16/09/2011 - 22:58
तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते
ह्या बाबतीत खरंच सहमत आहे, अगदी ऑर्कूटवरही जरा भडक लीहलं की मूक्तपीठ कम्यूनीटीमधून बॅन लागायचं.. एकूणच मराठी माणसांची मानसीकता तीतकी ओपन माइंडेड असलेली अंतरजालावरही फारशी दीसून येत नाही... तिथही संकूचीतपणा सूटायचा नाही असंच अनूभवाला येतं. आणी अर्थातच who you are is less important than who you know मूळे एकंदर तीथही फार सूखानं नादतात असेही नाही.

In reply to by आत्मशून्य

पाषाणभेद 16/09/2011 - 23:54
असाच विचार माझाही पक्का व्हायला लागलाय हल्ली हल्ली. म्हणजे अगदीच योग्य वेळेत सांगायच झालं तर कालपासून.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाळकराम 17/09/2011 - 18:11
फेबु वा तत्सम सोशल नेटवर्किंग साईट्स बद्दलआणि आम्हा सर्वांचं अज्ञान दूर करा! गरीबावर एवढी कृपा कराच बुवा!

मुक्तसुनीत 16/09/2011 - 22:28
सोशल नेटवर्किंग साईट चा उपयोग लोक चुकीचा करतात का ? होय. मग त्यामुळे सोशल नेटवर्किंग ही संकल्पनाच चुकीची आहे का ? नाही. सोशल नेटवर्किंग साईट्स च्या आधीच्या इमेल आदि माध्यमांचाही दुरुपयोग होण्याचे प्रकार पाहण्यात आलेले आहेत का ? होय. मग सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये दोष आहे की त्यांचा योग्य तो वापर न करणार्‍या आणि प्रसंगी वाईट वापर करणार्‍या लोकांमधे दोष आहे ? दोष अशा लोकांमधे आहे. अर्थात फेसबुकसारख्या बाबतीत , साईटस च्या चुकीच्या धोरणामुळे प्रायव्हसीचा भंग होण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत. या न्यायाने फेसबुक सदोष आहे हे मान्यच. मात्र "नुसतीच पोकापोकी" हा तो दोष नव्हे. असो.

मराठे 16/09/2011 - 22:44
उगाच एक आठवलं... "काय , आजकाल भेटत नाही अजिबात.. काही खुशाली कळली नाही तुझी" या प्रश्नाची बदलत्या काळाप्रमाणे बदलणारी उत्तरं: १९९० च्या आसपासः "अरे यार तू आधी मोबाईल घे.. म्हणजे तुला एसेमेस पाठवता येतिल.. मोबाईल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल." २००० च्या आसपासः "माझ्या सगळ्या मित्रांशी मी इमेल मधून टच मधे असतो.. तु इमेल अकाउंट ओपन कर.. इमेल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल" २०१० च्या आसपासः "तुझ्या फेसबूक मधे अ‍ॅडव ना मला... काय फेसबूक वापरत नाही? "फेसबूक" नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल!"

In reply to by मराठे

आत्मशून्य 16/09/2011 - 22:53
हेच एकमेव कारण आहे टेलिफोन... टीव्ही... पेजर...मोबाइल.. एस.एम.एस...... एमेल....ओर्कूट... फेस्बूक---- ट्व्वीटर... आणी मिसळपाव..... यांचा शोध लागण्याचं आणी ते यशस्वी होण्याचं... भवीष्यातही जेव्हां जेव्हां या संदर्भात इनोवेशंन होतील यशस्वीच ठरतील :)

छान प्रतिसाद दिलेत सर्वांनी. आभार. मनाला वाटेल ते वॉलवर लिहिता येऊ शकते. म्हणजे काहीही लिहायचे का? काहीही डकवायचे का? आपल्याच मित्र मैत्रिणींना वेगळ्या नावाचे आयडी वापरून सतावायचे का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यासाठी हा लेख लिहिला आहे. या मुद्द्यावर मंथन व्हावे ही अपेक्षा.

In reply to by शिल्पा ब

बाळकराम 18/09/2011 - 19:31
बाकी, तुम्ही कुणाचे ड्यु आय डी आहात ते आम्हाला कळलं बरं का! ;) ( पण अशा साध्या बाबतीत चेगुसुंनाच प्रकाश पाडावा लागतो, हे बघून मौज वाटली! बाकी चालू द्या!)

In reply to by शिल्पा ब

धन्या 19/09/2011 - 20:27
अहो अशा गोष्टी चार चौघात बोंबलायच्या नसतात हो शिल्पातै. बाळकराम बोंबलले का? आणि त्यांच्या फक्त दोन ओळ वाचून तुम्ही हा निष्कर्ष काढलात खुपच तल्लख बुद्धी आहे बुवा तुमची. अमेरिकेत असता काय?

In reply to by धन्या

बाळकराम 20/09/2011 - 01:21
अमेरिकेत असता काय?>> हे काय इचारनं झालं का राव! आपुन काय न बोलता बी समदं कळतंय त्येन्ला! उगाच अमेरिकेत गेल्याती का त्या? काय म्हंता, काडा चंची आन तंबाकू!

रेवती 18/09/2011 - 21:04
दिवटे साहेब, चक्क लेखन आवडले. १००% पटले असे म्हणता येणार नाही. बर्याच चांगल्या गोष्टी असतात हो, त्याचा वापर वाईट रितीने करणारेही असतातच. आता वाईटाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असेल तर काय करणार? अश्लील गोष्टींसाठी वापर केला जात असेल तर ते मला वाईट आहे असे वाटते पण तसे ते वापरणार्‍याला वाटत नसेल तर काय करणार? "थोडक्यात गोडी आणि जास्तीत लबाडी" ;)

स्वस्त असल्याने नेट व मोबाईल चा वापर व दुर उपयोग वाढला आहे.. उपाय........ मोबाईल...इन कमींग व ऑट गोईंग १० रु /मिनिट रेट करावा,.. नेट ..मिनिमम चार्ज रु.५००० ठेवावा... त्या मुळे ज्यांना गरज आहेत असेच लोक नेट वापरतिल... ल्याड लाईन रेट कमी करुन होणारी गैर सोय टाळता येईल... व आज मोबाईल वापर जो बोकाळला आहे तो थांबु शकेल....... मोबाईल व नेट चा व्यवसाया व्यतिरिक्त वापर म्हणजे चंगळ वाद आहे.... लोकांनी ल्यांड लाईन वापरणे जवळ जवळ बंद केल्या गत आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

स्मिता. 19/09/2011 - 16:27
मोबाईल किंवा आंतरजालाचा भरपूर वापर हा त्या सोयींचा दुरुपयोग कसा म्हणता येईल? किंवा मोबाईचा/नेटचा वापर 'बोकाळल्याने' तुम्हाला-आम्हाला काय त्रास होतो? जोवर तंत्रज्ञानाचा गैरवापर होत नाही तोवर त्याचा वापर कितीही असला तरी हरकत नसावी. खरं तर त्यांच्या सहाय्याने किती तरी लोकांची कामे सुकर होतात.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मृत्युन्जय 19/09/2011 - 16:47
बरोबर आहे. मी तर म्हणतो की सरसकट दूरध्वनीवरच (स्थिर काय किंवा भ्रमण काय) बंदी घालावी. दूरध्वनी मुळे लोकांनी पोस्टकार्ड वापरणे बंद केले आहे हो. पत्र लिहिण्याची कलाच नाहिशी होउ लागली आहे. किंबहुना मी तर म्हणतो की पोस्टखातेच बंद करावे. बिचार्‍या पोस्टमनला किती पळवतात हे लोक. त्यापेक्षा पुर्वीची कबूतर मेसेजिंग सर्व्हिस सुरु केली तर कित्ती बरे होइल. आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती) त्यांचा काही उपयोगही करुन घेता येइल. एका कबूतर मेसेजचे ५००० रुपये. दाणापाण्याचा खर्च वेगळा अ‍ॅट अ‍ॅक्चुयल.

In reply to by मृत्युन्जय

आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती)
अगदी योग्य अर्थाने घेतला गेल्या आहे. पुढच्या कट्ट्यास आम्ही तुम्हाला न्यायला व सोडायला येऊ ब्रिजेशच्या गाडीतून.

In reply to by जाई.

आमच्या सोसायटीतही या कबूतरांनी वैताग आणलाय
'या' म्हणजे नक्की कोणत्या ? १) एकट्याने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? का २) जोडीने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? पारवा परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 19/09/2011 - 18:20
बाब्बौ, अग्गा गा गा !!!
एका सोसायटीत किती कबुतरे असतात? किंवा तुमच्या सोसायटीत किती कबुतरे आहेत ? कबुतर घ्या घ्या घ्या, कबुतर घ्या घ्या घ्या, घ्या $$$ घ्या $$$

अनिकेतपन्त 28/09/2011 - 17:36
दिवटे डाक्टर्...तुमच्या लेखाबद्द्ल काय म्हणायच नाही राव आम्हाला...पण 'क्रीडा' म्हणुन बूकमार्क कशाला केलय? आमच्यासारख्या रोजचा पेपर शेवटच्या पानपासुन वाचणार्या लोकांचा पोपट होतो हो बाकी काय नाही.

In reply to by अनिकेतपन्त

मेघवेडा 28/09/2011 - 17:51
अनिकेतपन्त, द वणवणे> डागदरसायबांच्या मनरूपी खेळाडूने विचारांच्या मैदानात कोट्याऽनुप्रासादिरूपी सवंगड्यांसोबत केलेली नैबंधिक क्रीडा आहे ही! /द वणवणे>
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो. सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच.

'सायलेन्स प्लीज'...थँक यू...

प्रभो ·

आत्मशून्य 12/09/2011 - 12:43
त्याचा अ‍ॅस्पेक्ट रेशो आवडला. एकदम वाइडस्क्रिन आहे. त्यामूळं फटू मस्तच दीसत आहेत ;) बाकी सविस्तर वृत्तांताच्या जागी जूजबी विवेचन केल्या बद्दल निषेध. म्हणून प्रतीसाद इथच थाम्बवतो.

सला आमचा प्रभो म्हणजे... बाकी जो लोकावरी विसंबला तो..... त्यात तू गुर्जींवर विसंबला होतास ? अरे रे ! काय ही तुझी दुर्दैवी अवस्था ;)

छोटा डॉन 12/09/2011 - 13:29
च्यायला प्रभ्या, लै भारी की रे ... मस्त फोटो आहेत, साल्या जरा अजुन वर्णन वगैरे केले असते तर तुझी लिव्हरपुल काय घायाळ झाली असती काय ? धागा आवडला, असेच अजुन येऊदेत :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

प्रभो 13/09/2011 - 09:39
डान्या लेका, शनवारी लिव्हरपुलचा दिवस नव्हता...तिकडे स्टोक कडून फुटबॉल टीम हारली तर या मॅचमधे लिव्हरपुल सपोर्टर कॅरोलाईन. :(

In reply to by रेवती

गणपा 12/09/2011 - 16:40
अजून दोन शब्द खर्च केले असतेस तरी चालले असते.
अगं त्याच शब्दभांडार रित नसत का झाल? ;) - कंजुस(प्रभ्याचा मित्र) गण्या

चित्रा 12/09/2011 - 17:26
मस्त फोटो - समोर बसून सामना बघण्यातली मजा काही वेगळीच.

सहज 12/09/2011 - 18:24
लहानपणापासुनचे स्वप्न आहे की पाचही ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धा, ऑस्ट्रेलीयातील क्रिकेट सामने (चॅनेल ९ चे प्रक्षेपण तेव्हा सगळ्यात भारी असायचे) हे दरवर्षी तिथे तिथे जाउन बघता यावे! :-) मस्त रे प्रभो!

In reply to by सहज

छोटा डॉन 12/09/2011 - 18:40
>>लहानपणापासुनचे स्वप्न आहे की पाचही ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धा, ऑस्ट्रेलीयातील क्रिकेट सामने (चॅनेल ९ चे प्रक्षेपण तेव्हा सगळ्यात भारी असायचे) हे दरवर्षी तिथे तिथे जाउन बघता यावे! ऑय्य !!! पाचवी स्पर्धा कुठली हो सहजकाका ? ;) आम्हाला तर ४ ग्रॅंड स्लॅमच माहित आहेत. अवांतर : टायपो आहे हे माहित आहे, खुप दिवसांनी सहजकाका सापडल्याने मोह आवरला नाही ;) - ( चौकस ) छोटा डॉन

In reply to by मी-सौरभ

प्रभो 12/09/2011 - 20:03
>>ऑलिम्पिक गोल्ड मेडल धरुन ५ होतात ना ????? ते चार वर्षात एकदा ना? वरती सहजमामा दरवर्षी म्हणालेत.. :) असो, सहजमामा स्वतः एखादी ग्रँड स्लॅम स्पाँसर करणार असावेत. ;)

In reply to by प्रभो

सहज 13/09/2011 - 06:23
बरोबर चार ग्रँड स्लॅम. पाचवे ऑलिम्पिक्स मेडल मिळून गोल्डन स्लॅम का कायसेसे म्हणतात ना? वरच्या यादीत दर चार वर्षानी होणारी फूटबॉल स्पर्धा देखील अ‍ॅडवा डोन्राव :-)

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला जायचं सोडून युएस ओपनला जायचं? आजकाल मिपावर जो नास्तिकपणा बोकाळला आहे त्यात तू देखील सामील झालात? गेलास तो गेलास, पण जाऊन वर चान चान फोटो टाकून सगळ्यांना जळवल्याबद्दल निषेध. आम्हाला टांग मारणारे म्हटल्याबद्दल डब्बल निषेध. त्यात लंबूटांगने एक टांग मारली की ती माझ्या सहापट होते, हे माहीत नाही का तुला?

पैसा 13/09/2011 - 19:39
प्रभ्याने चक्क लेख लिहिलाय म्हणून सरसावून वाचायला सुरुवात केली, पण ये रे माझ्या मागल्या!!! ;) असो, मागच्या वेळेपेक्षा जास्त शब्द आहेत, आणि फोटो तर फारच छान आलेत!

आत्मशून्य 12/09/2011 - 12:43
त्याचा अ‍ॅस्पेक्ट रेशो आवडला. एकदम वाइडस्क्रिन आहे. त्यामूळं फटू मस्तच दीसत आहेत ;) बाकी सविस्तर वृत्तांताच्या जागी जूजबी विवेचन केल्या बद्दल निषेध. म्हणून प्रतीसाद इथच थाम्बवतो.

सला आमचा प्रभो म्हणजे... बाकी जो लोकावरी विसंबला तो..... त्यात तू गुर्जींवर विसंबला होतास ? अरे रे ! काय ही तुझी दुर्दैवी अवस्था ;)

छोटा डॉन 12/09/2011 - 13:29
च्यायला प्रभ्या, लै भारी की रे ... मस्त फोटो आहेत, साल्या जरा अजुन वर्णन वगैरे केले असते तर तुझी लिव्हरपुल काय घायाळ झाली असती काय ? धागा आवडला, असेच अजुन येऊदेत :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

प्रभो 13/09/2011 - 09:39
डान्या लेका, शनवारी लिव्हरपुलचा दिवस नव्हता...तिकडे स्टोक कडून फुटबॉल टीम हारली तर या मॅचमधे लिव्हरपुल सपोर्टर कॅरोलाईन. :(

In reply to by रेवती

गणपा 12/09/2011 - 16:40
अजून दोन शब्द खर्च केले असतेस तरी चालले असते.
अगं त्याच शब्दभांडार रित नसत का झाल? ;) - कंजुस(प्रभ्याचा मित्र) गण्या

चित्रा 12/09/2011 - 17:26
मस्त फोटो - समोर बसून सामना बघण्यातली मजा काही वेगळीच.

सहज 12/09/2011 - 18:24
लहानपणापासुनचे स्वप्न आहे की पाचही ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धा, ऑस्ट्रेलीयातील क्रिकेट सामने (चॅनेल ९ चे प्रक्षेपण तेव्हा सगळ्यात भारी असायचे) हे दरवर्षी तिथे तिथे जाउन बघता यावे! :-) मस्त रे प्रभो!

In reply to by सहज

छोटा डॉन 12/09/2011 - 18:40
>>लहानपणापासुनचे स्वप्न आहे की पाचही ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धा, ऑस्ट्रेलीयातील क्रिकेट सामने (चॅनेल ९ चे प्रक्षेपण तेव्हा सगळ्यात भारी असायचे) हे दरवर्षी तिथे तिथे जाउन बघता यावे! ऑय्य !!! पाचवी स्पर्धा कुठली हो सहजकाका ? ;) आम्हाला तर ४ ग्रॅंड स्लॅमच माहित आहेत. अवांतर : टायपो आहे हे माहित आहे, खुप दिवसांनी सहजकाका सापडल्याने मोह आवरला नाही ;) - ( चौकस ) छोटा डॉन

In reply to by मी-सौरभ

प्रभो 12/09/2011 - 20:03
>>ऑलिम्पिक गोल्ड मेडल धरुन ५ होतात ना ????? ते चार वर्षात एकदा ना? वरती सहजमामा दरवर्षी म्हणालेत.. :) असो, सहजमामा स्वतः एखादी ग्रँड स्लॅम स्पाँसर करणार असावेत. ;)

In reply to by प्रभो

सहज 13/09/2011 - 06:23
बरोबर चार ग्रँड स्लॅम. पाचवे ऑलिम्पिक्स मेडल मिळून गोल्डन स्लॅम का कायसेसे म्हणतात ना? वरच्या यादीत दर चार वर्षानी होणारी फूटबॉल स्पर्धा देखील अ‍ॅडवा डोन्राव :-)

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला जायचं सोडून युएस ओपनला जायचं? आजकाल मिपावर जो नास्तिकपणा बोकाळला आहे त्यात तू देखील सामील झालात? गेलास तो गेलास, पण जाऊन वर चान चान फोटो टाकून सगळ्यांना जळवल्याबद्दल निषेध. आम्हाला टांग मारणारे म्हटल्याबद्दल डब्बल निषेध. त्यात लंबूटांगने एक टांग मारली की ती माझ्या सहापट होते, हे माहीत नाही का तुला?

पैसा 13/09/2011 - 19:39
प्रभ्याने चक्क लेख लिहिलाय म्हणून सरसावून वाचायला सुरुवात केली, पण ये रे माझ्या मागल्या!!! ;) असो, मागच्या वेळेपेक्षा जास्त शब्द आहेत, आणि फोटो तर फारच छान आलेत!
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्यावर्षी लेबर डे च्या सुट्टीला यु एस ओपन बघायला गेलो होतो. यावर्षी लेबर डे चा दिवस गुर्जी घासकडवी आणी लंबूटांग यांच्यासोबत साजरा केला होता. मी गेल्या शनीवारी(१० सप्टेंबर रोजी) परत एकदा गुर्जी आणी लंबूटांग सोबत त्यांच्या गावची गणपती विसर्जन मिरवणूक बघायला जायचा प्लान केलेला होता पण, गुर्जी आणी लंबूटांग या दोघांनीही टांग दिल्याने ;) ऐन वेळेस यु एस ओपनचे तिकीट काढायचे ठरवले.

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

होड्या सोडणे

डॉ.श्रीराम दिवटे ·
लेखनप्रकार
hodi होड्या सोडणं (पुड्या नव्हे!) अन् खोड्या काढणं हा तर आम्हां मुलांचा पावसाळ्यातील मजेशीर उद्योग असायचा. त्यातल्या त्यात साचलेल्या पावसाच्या उथळ पाण्यात कागदी होड्या करून सोडणं व त्या कशा वाहत जातात, कोणाच्या कशा डुबकी मारतात किंवा कोणाच्या कशा तिरक्या होऊन गटांगळ्या खातात हे पाहणं फार मौजेचं गणित असायचं. होड्या तयार करणे आम्हांला जमत नसल्याने मोठ्या पोरांकडून बनवून घाव्या लागत.