मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालकवी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

अवलिया 13/05/2009 - 13:49
वा ! दिलीपशेट !! सुरेख लेख! येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !! वा !! (दिलीपशेटचा पंखा) अवलिया

In reply to by अवलिया

असेच म्हणतो. कवितेच्या बाबतीत आम्ही दगडच पण तुमचा ओघवत्या भाषेतील लेख वाचायला मस्त वाटले. लेख आवडला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !! असेच म्हणतो हो प्रा.डॉ ==निखिल

In reply to by निखिल देशपांडे

क्लिंटन 13/05/2009 - 15:08
प्राध्यापक साहेब, कविता, ललित साहित्य यासारख्या विषयांपासून खरे सांगायचे तर मी अंतर राखून असतो .पण तरीही आपला लेख खूप आवडला तो आपल्या ओघावत्या भाषाशैलीमुळे आणि त्यातील ’कन्टेन्ट’ मुळे.अगदी आपल्या वर्गात बसल्यासारखे वाटले. असे इतर कवींविषयीही लेख येऊ द्यात. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

वडापाव 13/05/2009 - 14:26
आचार्य अत्रे यांच्या या आत्मचरित्रात बालकवींविषयी काही माहिती आली आहे. विशेषकरून त्यांच्या मृत्युच्या वादाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आपण वाचली असेल, तर उत्तमच ! पण माहितीवरून अत्रे हे बालकवींचे देखील भक्त होते असेच वाटते. बाकी आपला लेख छान आहे. माझे सध्या कर्हेचे पाणी याचेच वाचन सुरू आहे. यात गोविंदाग्रजाबद्दल अत्र्यांनी केलेल्या मतप्रदर्शनामुळे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यास मी उत्सुक आहे. आपणाला माहिती असल्यास पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करावी, अशी विनंती. आपला नम्र, वडापाव

In reply to by वडापाव

भादली स्टेशनावर (भुसावळ आणि जळगावच्या मधे ) रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या पटरीत ट्रॅक बदलतात तिथे पाय अडकून पडल्यामुळे मालगाडी अंगावरुन गेली इतकीच माहिती आहे. त्याव्यतिरिक्त कोणती माहिती आपल्याकडे आहे ? मला उत्सुकता आहे ! अवांतर : पुढे कोणतेही लेखन करणार नाही हो, हेच लेखन अपूर्ण वाटते म्हणून तसे लिहिले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिरोटा 13/05/2009 - 15:16
अशीच जरा वेगळी माहिती शाळेत शिक्षकानी सांगितली होती.मालगाडीला सिग्नल होता म्हणून थांबली होती.ट्रॅक च्या दुसर्‍या बाजुला त्याना जायचे होते.म्हणून ते डब्याखालून जावू लागले आणि गाडी चालु झाली. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वडापाव 13/05/2009 - 16:19
ही गोष्ट अत्रेंनी लिहीली आहे. यात मी फक्त वाचकाची भूमिका बजावली आहे : ५ मे १९१८ चा तो दिवस होता. खानदेशात भादली स्टेशनजवळ एका सकाळी तो अपघात झाला. स्टेशनपासून काही अंतरावर आगगाडीचे दोन फाटे फुटतात. यांपैकी एका फाट्यावर बालकवी उभे होते. कारण त्या फाट्यावरून जाणारी गाडी आधीच येऊन गेली पाहिजे अशी बालकवींची समजूत होती. पण, त्या दिवशी त्या गाडीला उशीर झाला होता. ती गाडी समोरून येताना बालकवीनी पाहिली. त्यांना वाटले, की ती गाडी दुसर्या फाट्यावरून जाणारी आहे.म्हणून डाव्या हातावर तंबाखू घेऊन तिला चुना चोळीत ते विमनस्कपणे त्या फाट्यावर तसेच उभे राहिले. एवढ्यात ती गाडी एकदम त्यांच्या अंगावर आली आणि तिच्याखाली सापडून त्यांचे तीन तुकडे झाले. पुढे त्यांनी असेही लिहीले आहे की बालकवींना मृत्यु का आला ह्यासंबंधीची एक विलक्षण हकिकत 'बालकवी' चे चरित्रकार श्री. कृ. बा. मराठे यांनी आपल्या पुस्तकात दिलेली त्यांना आढळली. ती येथे सांगितल्यास बालकवींचे चरित्र वाचताना त्याबद्दलची उत्सुकता राहणार नाही, म्हणून येथे मी देत नाही. आपला विनम्र, (अत्रेभक्त) वडापाव

In reply to by वडापाव

मृत्यू त्यांचा आपण म्हणता तसेच झाला. त्याबाबतीत इतर हकीकत माहिती नाही, वाचनात ही नाही. पण कोणी ज्योतिषाने त्यांना 'चैत्रातली नवमी घाततिथी असे सांगितले होते 'बालकवी तसे त्या तिथींना डचकूनच असायचे. त्या संबधी एक आठवण वरील पुस्तकात आहेच. ''बालकवींचे पुण्याचे मित्र श्री. भा. नी. सहस्त्रबुद्धे लिहितात, 'बालकवींचा मृत्यू १९१८ साली पाण्यात बुडून किंवा आगगाडीखाली सापडून अपघाताने होईल असे भाकीत केले होते. बालकवींना ते प्रत्यक्ष माहीत नव्हते. मात्र दुर्दैवाने ते भविष्य खरे ठरले. '' ( समग्र बालकवीत पृ.क्र. ३३ वर याचा उल्लेख आहेच) मात्र या नंतरच्या कथा असाव्यात बाकी योगायोगाच्या गोष्टी आहेत असे वाटते. -दिलीप बिरुटे

सहज 13/05/2009 - 14:27
अजुनही कवितेतले तितकेसे(बरेचसे सगळेच) समजत नसले तरी लेख आवडला. बालकवींच्या आयुष्यावर अजुन काहीतरी लिहलेत तर आवडेल.

अप्रतिम काव्यपरिचय. बालकवी माझेही काव्यदैवत. खूप लहानपणी त्यांच्या आनंदी आनंद गडेने जे वेड लावले ते गारुड पुढे घोंघावतच गेले. त्या कवितेतील, स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडुनी स्वार्था तो जातो द्वेष संपला मत्सर गेला आतां उरला इकडे तिकडे चोहिंकडे आनंदी आनंद गडे! या ओळीतर अविस्मरणीयच

लिखाळ 13/05/2009 - 18:06
वा ! सर, लेख आवडला. बालकवींच्या काही कविता एक्-कविता या अनुदिनीवर वाचता येतील. त्यांची 'आनंदी पक्षी' ही कविता मला फार आवडते. ...... हासवितो लतिकाकुंजांना प्रेमे काढी सुंदर तना आनंदाच्या गाऊनी गाना आनंदे रमतो ... ... बा आनंदी पक्ष्या देई प्रसाद आपुला मजला काही जेणे मन हे गुंगुनी जाई प्रेमाच्या डोही ... -- लिखाळ.

विकास 13/05/2009 - 19:28
खूप चांगला लेख आणि विषय. आपण अपूर्ण असे लिहीले असले तरी अजून यात तसेच अशा इतर वाडम्यीन विषयांवर लिहीले जावे ही मनापासून विनंती! बालकवींच्या कवितेतील निसर्गाने माझ्या सारख्या शहरात राहून त्या निसर्गास न पाहणार्‍याला पण वेड लावले होते. त्यांचे शब्द आणि त्या शब्दांची ठेवण या मुळे प्रत्येक कविता ही आकर्षक झाली होती. ती आनंदी असोत अथवा दु:खी/उदास. आपण वर दिलेल्या "रात्र संपली दिवसही गेले..." या नैराश्य ह्या कवितेत मला त्यांच्यातील लपलेले नैराश्य दिसले होते. त्याच्या उर्वरीत ओळी काहीशा अशा आहेत (आठवणीतून):
चंद्रबिंब धरी अभिनव कांती, मेघ तयांनी धवलीत होती परी हृदयी नैराश्य काळीमा मम खंडीत नाही भोवर्‍यात जणू अडलो कोठे, स्वप्न भयंकर दिसते वाटे जिवन केवळ करूणा संकुल नैराश्ये होई.
मात्र नंतर त्यांनी त्याच्या खाली अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्‍यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्‍या चंद्राप्रमाणे करायची असावी... ती कविता जरी त्यांनी पूर्ण केली नाही तरी, वर अरूणरावांनी म्हणल्याप्रमाणे, त्यांनी "आनंदी आनंद गडे" लिहीले आणि स्वतःची गीते ही लक्षात राहताना आनंदच होवूदेत असे वाटून की काय त्यांनी शेवटी (?) लिहीले असावे असे वाटते:
"निरध्वनी हे , मूक गान हे" यास म्हणो कोणी , नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी. सर्व धर्म हे , भेद-पंथही सर्व एक झाले , माझे , माझे विश्व , तार ही प्रेमाची बोले शांतहि मत्सर , प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला , चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला. ही मोक्षाची , स्वातंत्र्याची , उन्नतिची माला , सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला. हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली ! मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली.

In reply to by विकास

अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्‍यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्‍या चंद्राप्रमाणे करायची असावी... काय सांगावे तसेही असेल ! ज्या बर्‍याच अपूर्ण कविता आहेत त्यात असा विचार नक्की करता येऊ शकेल !

क्रान्ति 13/05/2009 - 19:45
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. बालकवींबद्दल खूपच चांगली माहिती लेख आणि प्रतिसाद दोन्हीतून मिळाली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

चतुरंग 13/05/2009 - 20:10
ह्या बालकवींच्या निसर्गकवितेची मोहिनी अजूनही मनावर आहे. अत्यंत चित्रदर्शी आणि गेय कविता असे बालकवींच्या कवितांचे वर्णन करावे लागेल. निसर्गाशी तादात्म्य पावलेला कवीच असे काव्य करु शकेल. प्राडॉ. तुमचे लिखाण अतिशय भावले. 'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का? पण हे पुस्तक जरुर मिळवायला हवे असे वाटते. उत्तम, अभ्यासपूर्ण लेखाबद्दल तुमचे अनेक आभार आणि अभिनंदन! त्यांच्या इतरही कविता वाचनात आल्या त्यातली 'प्रीती हवी तर' ही कविता बघा -
प्रीती हवी तर जीव आधी कर अपुला कुर्बान, प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान ! तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत, याद ठेव अंगार जगाला लावील निमिषांत ! प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी? प्रीतीदेवी जगदेकवीर जो जाय तयापाठी ! नव्हे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा, परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा. गुल गुल बोले प्रीती काय ती? काय महालांत? प्रीती बोलते काळ घालिता कलिजाला हात ! स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला हीन जिवाने घेऊ नये त्या जहरी प्याल्याला ! सह्य जिवाला होय जाहला जरी विद्युत्पात, परी प्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पांत ! जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात; साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत !
बालकवींचा प्रेमभंग झाला होता का? त्याने त्यांना नैराश्य आले असावे का? 'पारवा' सारखी एकाकीपणाने/नैराश्याने भरलेली गीते लिहून ते त्यांच्या मनाची तगमग शांतवीत असतील का? अतिसंवेदनाशील आणि प्रतिभाशाली मनाचे व्यवहारिक जगात धिंडवडे निघत असतील का? आणि ह्यातून येणार्‍या खिन्नमनस्कतेचा परिणाम तो दुर्दैवी रेल्वे अपघात होण्यात झाला असेल का? असे असंख्य प्रश्न मनात पिंगा धरुन रहातात! चतुरंग

In reply to by चतुरंग

>>बालकवींचा प्रेमभंग झाला होता का? नाही ! (तसे आढळत नाही ) >>त्याने त्यांना नैराश्य आले असावे का? नैराश्याची वेगवेगळी कारणे असली तरी 'विमनस्क' मोड मधे जाण्याची त्यांना जरा सवयच होती. ( बालस्वभाव असल्यामुळे ते तर साहजिकच होते. ) अशा अवस्थेचे आणखी एक कारण घरगुती अशांत वातावरण, पोटापाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, अस्थीर जीवन, काही पैसे जमा झाले की लहान भाऊ भांडन करुन ते पैसे घेऊन जायचा. त्यांची आर्थिक स्थिती कधीच सुधारली नाही. हे नैराश्येचे मूळ कारण असावे असे वाटते. >>'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का? समग्र बालकवी एकदा वाचाच. माणूस वेडा होतो. एकतर त्यांच्या कवीतेवर झालेले संस्कार वाचायला मिळतात. त्यांच्याविषयी वाचायला मिळते....त्यातले 'समालोचन' कवितांचे वेगवेगळे अंगण वाचकांना खूले करते. खूप असे काहे त्यात आहे ! -दिलीप बिरुटे

डॉ.दिलीप, लेख खूपच आवडला.बालकवींची खूपच माहिती वाचायला मिळाली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

प्राजु 13/05/2009 - 20:41
सुंदर काव्य परिचय.. बालकवींचा जन्म १८९० साली खानदेशात झाला. त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक , निसर्गाशी नाजूक असे जुळलेले भावबंद .. यांमुळे त्यांना निसर्गकवी च म्हंटले जाते.. एका वक्तृत्व स्पर्धेत मी "बालकवी- एक निसर्गकवी" या विषयांवर बोलले होते. तेव्हा त्या भाषणांत आईने खालची कविता लिहिली होती.. तुझ्याच शब्दे डौल मिरवी, हिरवळ ही हिरवी तुझ्याच स्पर्शी फुटते या ढगांना सोनेरी पालवी तूच एकला फुलराणीला गोड गोड लाजवी निसर्ग तुझा.. तू निसर्गाचा, बालकवी तू निसर्गकवी..! बिरूटे सर.. उत्तम लेखन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अवलिया 13/05/2009 - 13:49
वा ! दिलीपशेट !! सुरेख लेख! येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !! वा !! (दिलीपशेटचा पंखा) अवलिया

In reply to by अवलिया

असेच म्हणतो. कवितेच्या बाबतीत आम्ही दगडच पण तुमचा ओघवत्या भाषेतील लेख वाचायला मस्त वाटले. लेख आवडला. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

येवु द्या अजुन असेच सुंदर सुंदर लेख तुमच्या लेखणीतुन !! असेच म्हणतो हो प्रा.डॉ ==निखिल

In reply to by निखिल देशपांडे

क्लिंटन 13/05/2009 - 15:08
प्राध्यापक साहेब, कविता, ललित साहित्य यासारख्या विषयांपासून खरे सांगायचे तर मी अंतर राखून असतो .पण तरीही आपला लेख खूप आवडला तो आपल्या ओघावत्या भाषाशैलीमुळे आणि त्यातील ’कन्टेन्ट’ मुळे.अगदी आपल्या वर्गात बसल्यासारखे वाटले. असे इतर कवींविषयीही लेख येऊ द्यात. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

वडापाव 13/05/2009 - 14:26
आचार्य अत्रे यांच्या या आत्मचरित्रात बालकवींविषयी काही माहिती आली आहे. विशेषकरून त्यांच्या मृत्युच्या वादाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आपण वाचली असेल, तर उत्तमच ! पण माहितीवरून अत्रे हे बालकवींचे देखील भक्त होते असेच वाटते. बाकी आपला लेख छान आहे. माझे सध्या कर्हेचे पाणी याचेच वाचन सुरू आहे. यात गोविंदाग्रजाबद्दल अत्र्यांनी केलेल्या मतप्रदर्शनामुळे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यास मी उत्सुक आहे. आपणाला माहिती असल्यास पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करावी, अशी विनंती. आपला नम्र, वडापाव

In reply to by वडापाव

भादली स्टेशनावर (भुसावळ आणि जळगावच्या मधे ) रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या पटरीत ट्रॅक बदलतात तिथे पाय अडकून पडल्यामुळे मालगाडी अंगावरुन गेली इतकीच माहिती आहे. त्याव्यतिरिक्त कोणती माहिती आपल्याकडे आहे ? मला उत्सुकता आहे ! अवांतर : पुढे कोणतेही लेखन करणार नाही हो, हेच लेखन अपूर्ण वाटते म्हणून तसे लिहिले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिरोटा 13/05/2009 - 15:16
अशीच जरा वेगळी माहिती शाळेत शिक्षकानी सांगितली होती.मालगाडीला सिग्नल होता म्हणून थांबली होती.ट्रॅक च्या दुसर्‍या बाजुला त्याना जायचे होते.म्हणून ते डब्याखालून जावू लागले आणि गाडी चालु झाली. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वडापाव 13/05/2009 - 16:19
ही गोष्ट अत्रेंनी लिहीली आहे. यात मी फक्त वाचकाची भूमिका बजावली आहे : ५ मे १९१८ चा तो दिवस होता. खानदेशात भादली स्टेशनजवळ एका सकाळी तो अपघात झाला. स्टेशनपासून काही अंतरावर आगगाडीचे दोन फाटे फुटतात. यांपैकी एका फाट्यावर बालकवी उभे होते. कारण त्या फाट्यावरून जाणारी गाडी आधीच येऊन गेली पाहिजे अशी बालकवींची समजूत होती. पण, त्या दिवशी त्या गाडीला उशीर झाला होता. ती गाडी समोरून येताना बालकवीनी पाहिली. त्यांना वाटले, की ती गाडी दुसर्या फाट्यावरून जाणारी आहे.म्हणून डाव्या हातावर तंबाखू घेऊन तिला चुना चोळीत ते विमनस्कपणे त्या फाट्यावर तसेच उभे राहिले. एवढ्यात ती गाडी एकदम त्यांच्या अंगावर आली आणि तिच्याखाली सापडून त्यांचे तीन तुकडे झाले. पुढे त्यांनी असेही लिहीले आहे की बालकवींना मृत्यु का आला ह्यासंबंधीची एक विलक्षण हकिकत 'बालकवी' चे चरित्रकार श्री. कृ. बा. मराठे यांनी आपल्या पुस्तकात दिलेली त्यांना आढळली. ती येथे सांगितल्यास बालकवींचे चरित्र वाचताना त्याबद्दलची उत्सुकता राहणार नाही, म्हणून येथे मी देत नाही. आपला विनम्र, (अत्रेभक्त) वडापाव

In reply to by वडापाव

मृत्यू त्यांचा आपण म्हणता तसेच झाला. त्याबाबतीत इतर हकीकत माहिती नाही, वाचनात ही नाही. पण कोणी ज्योतिषाने त्यांना 'चैत्रातली नवमी घाततिथी असे सांगितले होते 'बालकवी तसे त्या तिथींना डचकूनच असायचे. त्या संबधी एक आठवण वरील पुस्तकात आहेच. ''बालकवींचे पुण्याचे मित्र श्री. भा. नी. सहस्त्रबुद्धे लिहितात, 'बालकवींचा मृत्यू १९१८ साली पाण्यात बुडून किंवा आगगाडीखाली सापडून अपघाताने होईल असे भाकीत केले होते. बालकवींना ते प्रत्यक्ष माहीत नव्हते. मात्र दुर्दैवाने ते भविष्य खरे ठरले. '' ( समग्र बालकवीत पृ.क्र. ३३ वर याचा उल्लेख आहेच) मात्र या नंतरच्या कथा असाव्यात बाकी योगायोगाच्या गोष्टी आहेत असे वाटते. -दिलीप बिरुटे

सहज 13/05/2009 - 14:27
अजुनही कवितेतले तितकेसे(बरेचसे सगळेच) समजत नसले तरी लेख आवडला. बालकवींच्या आयुष्यावर अजुन काहीतरी लिहलेत तर आवडेल.

अप्रतिम काव्यपरिचय. बालकवी माझेही काव्यदैवत. खूप लहानपणी त्यांच्या आनंदी आनंद गडेने जे वेड लावले ते गारुड पुढे घोंघावतच गेले. त्या कवितेतील, स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडुनी स्वार्था तो जातो द्वेष संपला मत्सर गेला आतां उरला इकडे तिकडे चोहिंकडे आनंदी आनंद गडे! या ओळीतर अविस्मरणीयच

लिखाळ 13/05/2009 - 18:06
वा ! सर, लेख आवडला. बालकवींच्या काही कविता एक्-कविता या अनुदिनीवर वाचता येतील. त्यांची 'आनंदी पक्षी' ही कविता मला फार आवडते. ...... हासवितो लतिकाकुंजांना प्रेमे काढी सुंदर तना आनंदाच्या गाऊनी गाना आनंदे रमतो ... ... बा आनंदी पक्ष्या देई प्रसाद आपुला मजला काही जेणे मन हे गुंगुनी जाई प्रेमाच्या डोही ... -- लिखाळ.

विकास 13/05/2009 - 19:28
खूप चांगला लेख आणि विषय. आपण अपूर्ण असे लिहीले असले तरी अजून यात तसेच अशा इतर वाडम्यीन विषयांवर लिहीले जावे ही मनापासून विनंती! बालकवींच्या कवितेतील निसर्गाने माझ्या सारख्या शहरात राहून त्या निसर्गास न पाहणार्‍याला पण वेड लावले होते. त्यांचे शब्द आणि त्या शब्दांची ठेवण या मुळे प्रत्येक कविता ही आकर्षक झाली होती. ती आनंदी असोत अथवा दु:खी/उदास. आपण वर दिलेल्या "रात्र संपली दिवसही गेले..." या नैराश्य ह्या कवितेत मला त्यांच्यातील लपलेले नैराश्य दिसले होते. त्याच्या उर्वरीत ओळी काहीशा अशा आहेत (आठवणीतून):
चंद्रबिंब धरी अभिनव कांती, मेघ तयांनी धवलीत होती परी हृदयी नैराश्य काळीमा मम खंडीत नाही भोवर्‍यात जणू अडलो कोठे, स्वप्न भयंकर दिसते वाटे जिवन केवळ करूणा संकुल नैराश्ये होई.
मात्र नंतर त्यांनी त्याच्या खाली अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्‍यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्‍या चंद्राप्रमाणे करायची असावी... ती कविता जरी त्यांनी पूर्ण केली नाही तरी, वर अरूणरावांनी म्हणल्याप्रमाणे, त्यांनी "आनंदी आनंद गडे" लिहीले आणि स्वतःची गीते ही लक्षात राहताना आनंदच होवूदेत असे वाटून की काय त्यांनी शेवटी (?) लिहीले असावे असे वाटते:
"निरध्वनी हे , मूक गान हे" यास म्हणो कोणी , नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी. सर्व धर्म हे , भेद-पंथही सर्व एक झाले , माझे , माझे विश्व , तार ही प्रेमाची बोले शांतहि मत्सर , प्रशांत कपटस्वार्थाची ज्वाला , चिच्छांतीने अहा भरीले सगळ्या विश्वाला. ही मोक्षाची , स्वातंत्र्याची , उन्नतिची माला , सौभाग्याची तार लागलो मी छेडायाला. हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली ! मंगल मंगल मद्‌गानाची गति ही शेवटली.

In reply to by विकास

अपूर्ण असे लिहून गणितातील फर्मॅटच्या सिद्धांतासारखे एक वलय तयार केले. कुठेतरी वाटते की त्यांना ही कविता नंतर "भोवर्‍यातून" सुटलेल्या नायकाप्रमाणे, ढग विरल्येल्या आणि परत शुभ्र चांदण्याने काळोख दूर करणार्‍या चंद्राप्रमाणे करायची असावी... काय सांगावे तसेही असेल ! ज्या बर्‍याच अपूर्ण कविता आहेत त्यात असा विचार नक्की करता येऊ शकेल !

क्रान्ति 13/05/2009 - 19:45
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. बालकवींबद्दल खूपच चांगली माहिती लेख आणि प्रतिसाद दोन्हीतून मिळाली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

चतुरंग 13/05/2009 - 20:10
ह्या बालकवींच्या निसर्गकवितेची मोहिनी अजूनही मनावर आहे. अत्यंत चित्रदर्शी आणि गेय कविता असे बालकवींच्या कवितांचे वर्णन करावे लागेल. निसर्गाशी तादात्म्य पावलेला कवीच असे काव्य करु शकेल. प्राडॉ. तुमचे लिखाण अतिशय भावले. 'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का? पण हे पुस्तक जरुर मिळवायला हवे असे वाटते. उत्तम, अभ्यासपूर्ण लेखाबद्दल तुमचे अनेक आभार आणि अभिनंदन! त्यांच्या इतरही कविता वाचनात आल्या त्यातली 'प्रीती हवी तर' ही कविता बघा -
प्रीती हवी तर जीव आधी कर अपुला कुर्बान, प्रीती हवी तर तळहातावर घे कापुनी मान ! तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत, याद ठेव अंगार जगाला लावील निमिषांत ! प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी? प्रीतीदेवी जगदेकवीर जो जाय तयापाठी ! नव्हे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा, परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा. गुल गुल बोले प्रीती काय ती? काय महालांत? प्रीती बोलते काळ घालिता कलिजाला हात ! स्त्रैणपणाच्या चार भावना नच पचती ज्याला हीन जिवाने घेऊ नये त्या जहरी प्याल्याला ! सह्य जिवाला होय जाहला जरी विद्युत्पात, परी प्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पांत ! जीवंतपणी मरण घेउनी फिरणे जगतात; साठविली ब्रम्हांडदाहिनी दाहकता यांत !
बालकवींचा प्रेमभंग झाला होता का? त्याने त्यांना नैराश्य आले असावे का? 'पारवा' सारखी एकाकीपणाने/नैराश्याने भरलेली गीते लिहून ते त्यांच्या मनाची तगमग शांतवीत असतील का? अतिसंवेदनाशील आणि प्रतिभाशाली मनाचे व्यवहारिक जगात धिंडवडे निघत असतील का? आणि ह्यातून येणार्‍या खिन्नमनस्कतेचा परिणाम तो दुर्दैवी रेल्वे अपघात होण्यात झाला असेल का? असे असंख्य प्रश्न मनात पिंगा धरुन रहातात! चतुरंग

In reply to by चतुरंग

>>बालकवींचा प्रेमभंग झाला होता का? नाही ! (तसे आढळत नाही ) >>त्याने त्यांना नैराश्य आले असावे का? नैराश्याची वेगवेगळी कारणे असली तरी 'विमनस्क' मोड मधे जाण्याची त्यांना जरा सवयच होती. ( बालस्वभाव असल्यामुळे ते तर साहजिकच होते. ) अशा अवस्थेचे आणखी एक कारण घरगुती अशांत वातावरण, पोटापाण्यासाठी करावी लागणारी भटकंती, अस्थीर जीवन, काही पैसे जमा झाले की लहान भाऊ भांडन करुन ते पैसे घेऊन जायचा. त्यांची आर्थिक स्थिती कधीच सुधारली नाही. हे नैराश्येचे मूळ कारण असावे असे वाटते. >>'समग्र बालकवी' ह्यात बालकवींच्या कवितांबद्दल, एकूण आयुष्याबद्दल चिंतनात्मक असे काही लिखाण आहे का? समग्र बालकवी एकदा वाचाच. माणूस वेडा होतो. एकतर त्यांच्या कवीतेवर झालेले संस्कार वाचायला मिळतात. त्यांच्याविषयी वाचायला मिळते....त्यातले 'समालोचन' कवितांचे वेगवेगळे अंगण वाचकांना खूले करते. खूप असे काहे त्यात आहे ! -दिलीप बिरुटे

डॉ.दिलीप, लेख खूपच आवडला.बालकवींची खूपच माहिती वाचायला मिळाली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

प्राजु 13/05/2009 - 20:41
सुंदर काव्य परिचय.. बालकवींचा जन्म १८९० साली खानदेशात झाला. त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक , निसर्गाशी नाजूक असे जुळलेले भावबंद .. यांमुळे त्यांना निसर्गकवी च म्हंटले जाते.. एका वक्तृत्व स्पर्धेत मी "बालकवी- एक निसर्गकवी" या विषयांवर बोलले होते. तेव्हा त्या भाषणांत आईने खालची कविता लिहिली होती.. तुझ्याच शब्दे डौल मिरवी, हिरवळ ही हिरवी तुझ्याच स्पर्शी फुटते या ढगांना सोनेरी पालवी तूच एकला फुलराणीला गोड गोड लाजवी निसर्ग तुझा.. तू निसर्गाचा, बालकवी तू निसर्गकवी..! बिरूटे सर.. उत्तम लेखन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्‍या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे.

(यादी गेली कवित्व उरले)

कपिल काळे ·

कपिल काळे 07/05/2009 - 08:03
सायली, भेन्डीबाजार, देव काका, अवलिया, प्राजु - प्रतिसादांबद्द्ल आभार!! कपिल(सामंत)

कविता मस्तच आहे. म्हणोनी म्हणतो मनुजा! सांगावा जमेल तो आशय पद्यातूनी नच जमे तो तितूका गद्यातूनी www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

योगी९०० 08/05/2009 - 12:43
कपिलभाऊ, मस्तच रे... स्वाक्षरीत कंपू नसे तोचि मात्र हवा असे प्रतिसादांसाठी कसे मन वेडे हो तरसे हे सगळ्यात आवडले...!!! जरा कमी निष्ठांवर पण काही येऊ द्या. खादाडमाऊ

किती भली मोठी लांब किती भली मोठी लांब एैवजी किती भली मोठी लांब वाचुन पाठीला लागली आम्ब चालल का? बाकि कविता ततोतंत. आवडली */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

In reply to by यन्ना _रास्कला

कपिल काळे 11/05/2009 - 11:02
वाचुन पाठीला लागली आम्ब >> हे छंदात बसत नाही. यादी हा शब्द न लिहिता, तो आहे तसेच यादीची लांबी अंमळ जास्त आहे - हे जाणवून देण्यासाठी दोनदा तीच ओळ वापरली आहे.

विजय आवारे 11/05/2009 - 11:06
झकास झाली कविता. किती भली मोठी लांब किती भली मोठी लांब मारुतीचीच शेपटी देवा!! आता तरी थांब हे आवडले.

कपिल काळे 07/05/2009 - 08:03
सायली, भेन्डीबाजार, देव काका, अवलिया, प्राजु - प्रतिसादांबद्द्ल आभार!! कपिल(सामंत)

कविता मस्तच आहे. म्हणोनी म्हणतो मनुजा! सांगावा जमेल तो आशय पद्यातूनी नच जमे तो तितूका गद्यातूनी www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

योगी९०० 08/05/2009 - 12:43
कपिलभाऊ, मस्तच रे... स्वाक्षरीत कंपू नसे तोचि मात्र हवा असे प्रतिसादांसाठी कसे मन वेडे हो तरसे हे सगळ्यात आवडले...!!! जरा कमी निष्ठांवर पण काही येऊ द्या. खादाडमाऊ

किती भली मोठी लांब किती भली मोठी लांब एैवजी किती भली मोठी लांब वाचुन पाठीला लागली आम्ब चालल का? बाकि कविता ततोतंत. आवडली */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

In reply to by यन्ना _रास्कला

कपिल काळे 11/05/2009 - 11:02
वाचुन पाठीला लागली आम्ब >> हे छंदात बसत नाही. यादी हा शब्द न लिहिता, तो आहे तसेच यादीची लांबी अंमळ जास्त आहे - हे जाणवून देण्यासाठी दोनदा तीच ओळ वापरली आहे.

विजय आवारे 11/05/2009 - 11:06
झकास झाली कविता. किती भली मोठी लांब किती भली मोठी लांब मारुतीचीच शेपटी देवा!! आता तरी थांब हे आवडले.
किती भली मोठी लांब किती भली मोठी लांब मारुतीचीच शेपटी देवा!! आता तरी थांब लेखकांना केले सिद्ध तयां केले यादीबद्ध जे वाचले ते टाकले बाकी सारे निषिद्ध स्वाक्षरीत कंपू नसे तोचि मात्र हवा असे प्रतिसादांसाठी कसे मन वेडे हो तरसे कंपूतील गंपू तेच टाकतात नवे पेच कडमडे कोणी नवा धडपडे लागे ठेच ठाके नवा कोणी उभा मांडला सवतासुभा आयडी होइल ब्लॉक नसे पोचण्याची मुभा साहित्याच्या समुद्रात मिपा असे नदीमात्र कशाला ही यादीबिदी स्वांतसुख क्षणमात्र मराठी ही कर्कवृत्ती बरी का हो अशी वृत्ती सत्वरी वाचा , होइल मुद्रण सुलभ आवृत्ती ह. घ्या सा. न. ल.

सोसायटी आणि बॅचलर

निखिल देशपांडे ·

चिरोटा 04/05/2009 - 19:26
अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का?
मानतो पण खात्री पटावी लागते.उ.दा. तुमच्या मित्राने होणारी बायको आली असताना आजुबाजुला रहाणार्‍या लोकाना गप्पा मारायला बोलावले असते आणि ओळख करुन दिली असती तर असे झाले नसते असे मला वाटते. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

चतुरंग 04/05/2009 - 19:35
तुम्ही तुमच्या होणार्‍या पत्नीची किंवा पतीची ओळख अशी सरसकट कोणाही व्यक्तीला विनाकारण करुन द्याल का? माझ्यामते फक्त घरमालकाला तुम्ही, तुमचा मित्र आणि त्याची नियोजित सहचर ह्यांनी भेटावे रीतसर ओळख करुन द्यावी/घ्यावी. मुलगी जवळच रहाते हे स्प्ष्ट करावे, इतर कुटुम्बीय असले तर त्यांची जुजबी माहिती द्यावी आणि होणारे नवरा-बायको असल्याने एकमेकांना भेटणे गैर नाही हे सांगावे. सभ्यतेचे सामाजिक संकेत पाळून ते त्यांच्या फावल्या वेळात काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याउप्परही तक्रार असेल तर लक्ष देऊ नये! :) चतुरंग

In reply to by मेघना भुस्कुटे

छोटा डॉन 04/05/2009 - 19:46
लेखात सांगितल्याप्रमाणे समजुन सांगितल्यावर मालक म्हणतो की " ठिक आहे पण टाळता आले तर पहा" ... समजुतदार असल्याचे लक्षण आहे, बहुतेक काही प्रोब्लेम होणार नाही ... पण सोसायटीच्या इतर लोकांची काही गँरेटी नसल्याने प्रेडिक्शन करणे कठिण आहे ... बाकीचे सोडा हो पाठीमागुन मारलेल्या टोमण्यांचा अतिशय त्रास होतो हे सत्य आहे, फारच भ्याड आणि सणक आणणारा प्रकार आहे हा. इथे सर्वांची तोंडे बंद करणे शक्य नसते, त्रास होतोच ... मालकाच्या समजुतदारपणाचे कौतुक करु वाटते ... ------ (कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत राहणारा) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by चिरोटा

नितिन थत्ते 16/05/2009 - 19:36
हे या पोस्टला उत्तर नाही पण प्रतिसाद वर दिसावा म्हणून इथे लिहिले. आजच्या लोकसत्तातील वास्तुरंग पुरवणीतील महत्त्वाचा दुवा. अविवाहित भाडेकरूना सोसायटी मज्जाव करू शकत नाही असा ग्राहक न्यायालयाचा निर्णय आहे http://www.loksatta.com/daily/20090516/ws02.htm खराटा (रंग माझा वेगळा)

छोटा डॉन 04/05/2009 - 19:41
निखीलराव, एका चांगल्या विषयाला हात घातला आहात. ह्यावरही बरेच लिहण्यासारखे आहे ( आले, बर्‍याच जणांचे मी अजुन लिहणार आहे हे वाचल्यावर बदललेले चेहरे‍ डोळ्यासमोर आले. असो. ) ;) तुम्ही पुण्यात असाल तर हा प्रॉब्लेम शक्यतो होतोच ... त्यात तुम्हीही आणि घरमालकही मराठी असाल तर हमखास होतो ... (कॄपया मराठी आणि अमराठी ह्यावर वाद नको, माझ्या म्हणण्याचा विस्तॄत अर्थ लक्षात घेतल्यास बरे होईल ) शेवटी हे सुद्धा "समजुतदारपणा" आणि परस्परांवरील "विश्वास" ह्यावर अवलंबुन आहे हे लक्षात घेतले तर बरेच इश्श्यु आपोआप सुटतील ... मात्र दुर्दैवाने हे प्रमाण फार कमी आहे. तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ... आजही सामान्य सोसायटीत "एका मुलाने रुमवर मुलगी आणणे" अथवा उलटे हे घोर अपराध समजले जाते हे दुर्दैवी सत्य आहे ... कदाचित त्याला काही बाहेरुन आलेल्यांची अथवा इथल्यांचीच "गैर वागणुक" कारण असेल पण हे सर्वसाधारण सत्य समजता येणार नाही ... माझा वैयक्तीक माझ्या रुमवर माझ्या मैत्रिणींना बोलावण्यास विरोध नसेल व रुममेट्सचाही नसेल. मैत्रिणींनाही असा प्रॉब्लेम कधी झाल्याचे ऐकले नाही. मालकानेही कधी ह्याबद्दल प्रश्न विचारल्याचे आठवत नाही, इनफॅक्ट विचारलेच नाहीत ... तुमच्यासाठी उपाय : तो सांगणे अवघड आहे, कारण ह्याला अनेक पैलु येतात. घरमालकाची विचारसारणी कशी आहे ह्यावर हे अवलंबुन आहे. माझा सल्ला : पुण्यात असाल तर दुसर्‍या घराचा शोध चालु करा अथवा तुमच्या बिचार्‍या मित्राची चुक नसताना त्याला घर बदलण्याचा चुकीचा अपण अटळ निर्णय घ्यावा लागेल ... महत्वाची गोष्ट : "रुमवर मैत्रिणी अथवा मित्र बोलावुन चाळे करणे हे प्रकार घडतात " हे अगदीच अमान्य नाही, हे जरुर घडते पण "घडतेच" असे नाही ... पण शितावरुन भाताची परिक्षा केली तर डिफेन्स करण्यासारखे काही उरत नाही ... मात्र अशा चाळेखोर व्यक्तींमुळे बाकीच्यांना त्रास होतो हा मुद्दा "विनाअट" मान्य करण्यासारखा आहे, आम्हालाही मान्य आहे. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

डान्रावांच्या मुख्य सल्ल्याशी सहमत. दुसर्‍या घराचा शोध सुरू करा, बॅकअप असलेला चांगलाच. एकट्या मुलाला भाड्यावर घर शोधायला त्रास होतो याची मलाही कल्पना आहे; माझ्या भावालाच ओळखीच्यांचंच घर मिळाल्यामुळे हा त्रास झाला नाही. आणि का होतो याचीही कल्पना आहेच, त्यामुळे मी घरमालकांनाही दोष देत नाही. सुक्याबरोबर ओलंही जळतं पण आपला त्याला कधीकधी इलाज नसतो. "'चाळे' म्हणजे नक्की काय?" असा प्रश्न सध्या मला पडला आहे. म्हणजे घरी मित्र-मैत्रिणी बोलावून एकाच्या दृष्टीने सभ्यपणे पार्टी करणे हा दुसर्‍याच्या दृष्टीने 'थेरं' या प्रकारात मोडणारा प्रकार असू शकतो. पुन्हा एकदा मुख्य सल्ला: सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तेव्हा बॅकअप असलेला बरा! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by चतुरंग

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तेव्हा बॅकअप असलेला बरा! ह्याचाशी नक्किच सहमत. घर शोधायला सुरवात केली आहेच ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by छोटा डॉन

तुम्ही पुण्यात असाल तर हा प्रॉब्लेम शक्यतो होतोच ... सध्यातरी ठाण्यात आहे.... :-) त्यात तुम्हीही आणि घरमालकही मराठी असाल तर हमखास होतो ... तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ... आजही सामान्य सोसायटीत "एका मुलाने रुमवर मुलगी आणणे" अथवा उलटे हे घोर अपराध समजले जाते हे दुर्दैवी सत्य आहे ... कदाचित त्याला काही बाहेरुन आलेल्यांची अथवा इथल्यांचीच "गैर वागणुक" कारण असेल पण हे सर्वसाधारण सत्य समजता येणार नाही ... मी ही मराठी आणी मालक ही मराठी.... साधारण सोसायटितले सदस्य सुद्धा मराठी.... कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत राहिलो होतो त्या मुळे फरक सरळच जाणवतो. तुमच्यासाठी उपाय : तो सांगणे अवघड आहे, कारण ह्याला अनेक पैलु येतात. घरमालकाची विचारसारणी कशी आहे ह्यावर हे अवलंबुन आहे. माझा सल्ला : पुण्यात असाल तर दुसर्‍या घराचा शोध चालु करा अथवा तुमच्या बिचार्‍या मित्राची चुक नसताना त्याला घर बदलण्याचा चुकीचा अपण अटळ निर्णय घ्यावा लागेल ... तुमचा सल्ला अगदी योग्य वाटतो. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

मानतो पण खात्री पटावी लागते.उ.दा. तुमच्या मित्राने होणारी बायको आली असताना आजुबाजुला रहाणार्‍या लोकाना गप्पा मारायला बोलावले असते आणि ओळख करुन दिली असती तर असे झाले नसते असे मला वाटते. =)) =)) अरे त्याची होणारी बायको आली होती. कोणी शिनीमा नटी किंवा प्रदर्शनातली वस्तु न्हवती आली. कै च्या कै बर का. आजकाल एक तर दोन फ्लॅट मधल्या लोकांची आपापसात ओळख पण नसते त्यात हे पालथे धंदे कोणी करायला सांगीतलेत अजुन ? नुसते घराचे दार उघडे ठेवुन बसलेले चालत नाही का ? आणी अशा उघड्या दाराकडे लक्ष ठेवणारे कोणी असतील तर बिनधास्त ४ मैत्रीणी घेउन त्यांच्या घरी जाउन बसावे. "तुम्हाला चोरुन चोरुन डोकवायचा त्रास नको, म्हणुन आलो" असे सांगुन मोकळे व्हावे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

नितिन थत्ते 04/05/2009 - 19:42
मालकाची खात्री पटावी म्हणून मित्राच्या पालकांना मालकाशी बोलायला सांगा. त्या मुलीला मालकाशी व सोसायटीतील शेजारणींना भेटवा. (नंतर संबंध येणारच आहे- मित्र तेथेच राहणार असेल तर). तसेच सोसायटीच्या पदादिकार्‍यांना त्या मित्राने भेटलेले बरे. थोडक्यात गोष्टी जितक्या उघडपणे कराल तितका लोकांचा विश्वास बसेल. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

उद्या सोसायटीत राहायला आलेले बॅचलर पण म्हणाले की सगळ्या सोसायटीतील पुरुषांनी त्यांच्या बायका आणी मुलींची ओळख करुन द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल की इथे सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात. आली का पंचाईत ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 04/05/2009 - 19:51
बॅचलर पण म्हणाले की सगळ्या सोसायटीतील पुरुषांनी त्यांच्या बायका आणी मुलींची ओळख करुन द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल की इथे सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात.
+१, अगदी योग्य आहे हा मुद्दा ... समोर राहणारी केवळ बॅचलर मुले आहेत म्हणुन नेहमी घराचा दरवाजा बंद करुन बसणार्‍या "संस्कॄतीरक्षक शेजार्‍यांना" हा अधिकार आहे का मुळ प्रश्न. असल्यास ह्या नियमाचे पालन एकाच साईडने जस्टिफाईड आहे का ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिरोटा 04/05/2009 - 19:51
...सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात.आली का पंचाईत ??
विचारु शकता पण लोक जुमानणार नाहीत. कारण सुसंस्कृतेची व्याख्या समाज (म्हणजे त्या सोसायटीतील लोक) करतो.सध्या तरी चाळे करा नाहीतर करु नका, मुलगी रूमवर आणणे समाजाच्या सभ्यतेच्या व्याख्येत बसत नाही. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

छोटा डॉन 04/05/2009 - 19:58
सध्या तरी चाळे करा नाहीतर करु नका, मुलगी रूमवर आणणे समाजाच्या सभ्यतेच्या व्याख्येत बसत नाही.
बासच , विषयच संपला आता ... कोण बरे हा समाज ? ह्यांच्या सभ्यतांची व्याख्या ती काय ? सदैव आपली दारं बंद करुन बसणारी आणि खुज्या व भित्र्या मानसीकतेची शेजारी म्हणजे समाज होय ? शिवाय आम्ही ह्या समाजाला किंमत द्यावी ह्यासाठी हा समाज आमच्यासाठी काय करतो ?
एखाद्या सणाला समोर बॅचलर पोरांना सणासुदीचे खायला मिळावे म्हणुन कधी जेवायचे आमंत्रण देतो का हा समाज ? घरापासुन दुर राहिलेली पोरं काय खातात, कशी राहतात, काही त्रास आहे का ह्याकडे लक्ष देतो का हा समाज ? काही दुखले खुपले तरी कधी ढुंकुनही चौकशी करतो का हा समाज ? एखादे यश मिळाले तर त्या आनंदात मुक्त मनाने सामील होतो का हा समाज ?
नसल्यास आम्ही ह्या समाजाचे काय देणे लागतो व आम्ही का म्हणुन त्यांच्या "झुट्या व अनाठायी" सभ्यतांचे पालन करावे ? मी वर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणार असाल तर "सभ्यतेची व्याख्या" स्पष्ट होईल असे वाटते ... सभ्यता म्हणजे काय तर " आपला तो बाळ्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे" असेच आहे सध्या .... असो. ------ ( सामाजीक सभ्यतेच्या विरोधातला बंडखोर ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 04/05/2009 - 20:01
सर्व संस्कृतीरक्षकांचा विजय असो ! डॉन्या के साथ बाता : आपल्याला जे जमले नाही ते तरुण लोक करताना दिसले की अनेकांचे पित्त खवळते आणि अचानक त्यांना संस्कृतीची आठवण होते असे कधीकधी वाटते :) -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

छोटा डॉन 04/05/2009 - 20:06
डॉन्या के साथ बाता : आपल्याला जे जमले नाही ते तरुण लोक करताना दिसले की अनेकांचे पित्त खवळते आणि अचानक त्यांना संस्कृतीची आठवण होते असे कधीकधी वाटते
+१, अगदी करेक्ट ..!!! म्हणजे कसे की मुलींच्या मुलांच्या हातात हात घालुन पबमध्ये जाऊन थिरकण्याला विरोध आहे कारण ती मुले "आम्ही" नाही आहोत व कोणीतरी "दुसरीच" आहेत. मग बुडाली हो संस्कॄती ऽऽऽ जर त्याच मुली "आमच्या"बरोबर येत असतील तर ते आमचे "स्वातंत्र्य" होते ... असो, चालायचेच ... ------ (संस्कॄतीरक्षक)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by मेघना भुस्कुटे

अजुन एक वाक्य आठवले :- आप करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

लिखाळची म्हण आवडली, पर्‍याची म्हण कॉस्मॉपॉलिटन असल्यामुळे अगदीच चूक वाटली! (पर्‍या ह. घे रे, नाहीतर लिहायचास माझ्यावरही एखादा फार्स!) ;-) अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by चिरोटा

विचारु शकता पण लोक जुमानणार नाहीत. कारण सुसंस्कृतेची व्याख्या समाज (म्हणजे त्या सोसायटीतील लोक) करतो. बॅचलर समाजाचा एक हिस्सा नाहीत काय ? तुम्ही भाडे भरता तेव्हडेच किंबहुना त्यापेक्षा जास्ती भाडे भरुन ते राहात असतात मग त्यांना हा प्रश्न विचारायचा अधीकार का नाही ? जसा एखाद्या सोसायटीला बॅचलर लोकांचा त्रास झाला असेल तसा त्या मुलांना पण सोसायटीचा त्रास कशावरुन झाला नसेल ? आमच्या सोसायटीत पण अनेक बॅचलर मुले राहतात. एखादा रात्री १२ ला भसाड्या आवाजात गायला तरी फक्त आजुबाजुच्या फ्लॅट मधुन 'वाह वाह' 'झोपा गर्दभ कुमार' असे आवाज आले की एकदम शांतता पसरते ;) शेवटी एकमेकांच्यावरचा विश्वास महत्वाचा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 04/05/2009 - 19:51
प रा चा मुद्दा बिनतोड. पण अदितीने सांगितल्या प्रमाणे सत्तेपुढे शहाणपण नसते. म्हणून प्रश्न. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

पण तुमचा उपाय वाचून तर रोग परवडला म्हणायची वेळ आली. आज आम्हीही भाड्याने घर घेऊन रहात आहोत, एखाद दोन माणसं सोडून या बिल्डींगीत १४-१५ महिन्यात कोणाशीही ओळख झालेली नाही. आपल्या समाजात एकदा लग्नं झालं की आता माणूस 'सभ्य' आहे, यांच्याकडे जायला, आपल्या लेकीसुनांना पाठवायला हरकत नाही असा एक सर्वमान्य समज आहे. त्यामुळे तुमच्या मित्राचं लग्न ठरलं आहे हे घरमालकाला सांगून हवंतर त्या मुलीलाही भेटायला घेऊन जा. शक्यतोवर यापुढे त्यांनी काही खिटपिट करू नये. अगदीच नाही झालं तर घरी एक सत्यनारायण घाला, मित्राचं लग्नं ठरलं/झालं म्हणून! (हा सल्ला ह.च घ्या) ;-) मित्राला आणि त्याच्या होणार्‍या बायकोला शुभेच्छा. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by नितिन थत्ते

चिरोटा 04/05/2009 - 19:46
सहमत.
सभ्यतेचे सामाजिक संकेत पाळून ते त्यांच्या फावल्या वेळात काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
हे आपल्या समाजाला पटत नाही ना!. म्हणून तर हे उपद्व्याप करावे लागतात.
थोडक्यात गोष्टी जितक्या उघडपणे कराल तितका लोकांचा विश्वास बसेल.
बरोबर्.म्हणूनच जास्तित जास्त शेजार्‍यांशी ओळख करुन द्यावी. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

बरोबर्.म्हणूनच जास्तित जास्त शेजार्‍यांशी ओळख करुन द्यावी. अहो ज्या शेजार्‍यांशी मागच्या २ वर्षात फक्त २ वेळा बोलणे झाले आहे त्यांना का म्हणुन ही माझी होणारी बायको आहे हे सांगत फिरावे. आणी ते बोलण्यासाठी त्यांची ऐकुन घ्यायची तयारी असली पाहिजे ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by निखिल देशपांडे

छोटा डॉन 04/05/2009 - 20:00
ज्या शेजार्‍यांशी मागच्या २ वर्षात फक्त २ वेळा बोलणे झाले आहे त्यांना का म्हणुन ही माझी होणारी बायको आहे हे सांगत फिरावे
. अगदी बिनतोड मुद्दा आहे ... अजिबात गरज नाही तसे सांगण्याची, गेले उडतं ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

निखिलराव, तुमचे घरमालक मराठी आहेत का? असतील तर या धाग्याचे आणि प्रतिसादाचे प्रिंट्स काढा आणि दाखवा त्यांना! काम होऊन जाईल तुमचं!! :-) अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगला उपाय आहे.... आज घेउनच जातो ... जस्तित जास्त काय घर सोडायला सांगतील, ३ महिन्याने करार संपणारच आहे. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by निखिल देशपांडे

चिरोटा 04/05/2009 - 20:05
मग बॅकअप बघाच बुवा!!.ईकडे समाज बरोबर की आपण हा प्रश्न नाही. मित्राला तिकडे रहायचे असेल तर त्याला ओळखी करुन घ्याव्याच लागतील असे वाटते. तयारी नसेल तर दुसरीकडे जावे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते 04/05/2009 - 20:23
डॉन वगैरे लोकांशी पूर्णतः सहमत आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवलेली बरी. समाज आगरकर, कर्वे आणि फुल्यांचा सत्कार ते मेल्यानंतर करतो. जिवंतपणी शेण-चिखल्-दगड यांचा माराच सहन करावालागतो. तेव्हा समाज बदलायला निघाला असाल तर तयारी ठेवा बुवा. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन 04/05/2009 - 20:31
समाज आगरकर, कर्वे आणि फुल्यांचा सत्कार ते मेल्यानंतर करतो. जिवंतपणी शेण-चिखल्-दगड यांचा माराच सहन करावा लागतो.
छे हो, वर उल्लेखलेली माणसे फार मोठ्ठी आहेत ... त्यांच्याबरोबर कणभर तुलना होण्याइतकी आमची औकाद नाही, फार मोठ्ठे लोकं आहेत हो हे ... बाकी आपल्याशी सहमत आहे, खरोखर असे घडते ... समाज बदलायला वगैरे निघालो नाही ( अजुन डोके बर्‍यापैकी ठिकाणावर आहे ;) ) पण जमेल तितके "शहाणे करुन सोडावे सकळ जन" हा प्रयत्न चालु असतो. विस्तॄत दॄष्टीकोण राहिला तरच शांततामय जीवन जगता येईल ह्यावर आमचा गाढा विश्वास आहे. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

नितिन थत्ते 04/05/2009 - 21:59
तुमचे म्हणणे बरोबर आहे डॉनराव. शक्य तोवर शहाणे करून सोडण्याचा प्रयत्न करावाच. फक्त काय आहे.. आपण इथे लांबून सल्ले देतोय. ज्याला तिथे दोन हात करायचेत "त्याला आम्ही हवे तसे वागू जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत" असे म्हणायचे असेल तर ते सहज साध्य नसेल एवढेच सांगायचे होते. (आगरकरांचे उदाहरण फक्त परिचयाचे म्हणून दिले) खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन 04/05/2009 - 22:05
ज्याला तिथे दोन हात करायचेत "त्याला आम्ही हवे तसे वागू जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत" असे म्हणायचे असेल तर ते सहज साध्य नसेल
अगदी अचुक ... एकदम मान्य आहे आपले मत ... ------ (सहमत)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

Nile 04/05/2009 - 20:24
अहो तो श्री राम नाही लोकांची तोंड बंद करु शकला तिथे तुमची आमची काय गत? प्रेम करण्यार्‍याने प्रेम हवे तसे (म्हणजे लपुन वा खुलेआम) करावे, समाज काही केलं तरी बोंब मारणार. अवलिया शेठ काढा हो एक फर्मास पाठ पुराणातुन! ;)

क्रान्ति 04/05/2009 - 20:26
बॅचलर मुलींनाही जागा मिळायला त्रास होतो . त्यात घरमालकाच्या सतराशे साठ अटी! अरे, ही मुलं मुली सुद्धा सभ्य चांगल्या घरातली असतात, त्यांनाही आई-वडील, भावंडं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले, की त्यांची काहीतरी भानगड आहे, असा कोता विचार किती दिवस करणार? उद्या आपल्या मुलांवर/नातवंडांवर देखिल अशी वेळ येऊ शकते, हा विचार का नाही मनात येत? क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

In reply to by क्रान्ति

क्रांतीताई, त्यांची भले असेल काही "भानगड", पण चारचौघांसमोर त्यांचं वागणं आक्षेपार्ह नसेल तर त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यांना तो अधिकार कोणी दिला? त्यांनी हिरावून घेतला असेल तर खरंच त्यांना असा अधिकार आहे का?? अनेक जोडप्यांना व्यावहारीक अडचणींमुळे नाही लगेच लग्नं करता येत, लगेच 'भानगड' असते का त्यांची? आणि लग्नाची तारीख काढली, हॉल बुक केला की मग सगळं चालतं, असं का?? अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

विकास 04/05/2009 - 20:53
कोणे एके काळी... महाविद्यालयात वर्गातील मुलगे आणि मुली यांची "वर्गमैत्री" (क्लासमेट्स या अर्थी) असलेली पाहून कुजकट नजरा असलेली मंडळी पाहीलेली आणि अनुभवली आहेत. त्यांना वेळोवेळी हाताळण्याच्या प्रसंगानुरूप केसस्टजीज असू शकतात/आहेत :-) सध्या जे काही चालले आहे, त्यात जर धिंगाणा घालणार्‍या मुलांचा जर त्रास झाला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून उगाच कोणाला तरूण-तरूणी म्हणून "जाब" विचारणे अती वाटते. अर्थात या प्रसंगातील मालक हा समंजस वाटतो आहे आणि खात्री करून घेऊ इच्छित आहे असे दिसते. त्यामुळे वर अनेकांनी सांगितलेला एकच उपाय येथे योग्य वाटतो: तो म्हणजे घरमालकाची ओळख मुलीशी करून देणे. मला वाटते या एका चालीने हा नसलेला प्रश्न आपोआप सुटेल. सोसायटीतील माणसे अशी का वागतात याची पण एकाहून अधिक कारणे असू शकतात असे वाटते:
  1. वर उल्लेखलेले (तथाकथीत) संस्कृतीरक्षण ही त्यातील एक शक्यता आहे.
  2. पुर्वानुभवावरून जर रात्रीच्या वेळेस मोठमोठे आवाज करणार्‍या पार्ट्या झाल्या असल्यातर.
  3. स्वतःची मुले ही अडनिड्या वयात असताना त्यांना त्या वयाला न साजेसा "मेसेज" मिळू नये असे वाटणे.
बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते. उ.दा. मुंबई-पुणे विमानतळावरून येताना शेजारील तिशीच्या आसपासच्या तरूणाशी गप्पा मारत होतो. तो लंडनहून येऊन पुण्याला जात होता, मी बॉस्टनहून. त्याने आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला नव्या मुंबईत थोडी वाकडी वाट करायला लावली. त्या अपरात्री दोन विद्यार्थीदशेतील मुले होती, त्यांना त्याने त्यांच्यासाठी लंडनहून आणलेले पार्सल दिले. नंतर पुढे रस्त्यावरून जाताना लक्षात आले की तो प्रथमच पुण्यात जात होता, ज्या घरात त्याने रुममेट म्हणून जागा घेतली होती ती त्याने नेटवरून शोधली होती, नक्की कुठे जात होता ते त्याला माहीत नव्हते आणि कदाचीत ज्यांच्याकडे जात होता त्यांना तोदेखील माहीत नव्हता... त्याने मला सांगताना तो बंगलोरचा आहे असे सांगितले. आता विचार करा, तो नक्की कुठला ते माहीत नाही, कुठतरी आडरस्त्यावर पार्सल देताना दिसतो (अर्थात याचा घरमालकाशी संबंध नाही), मग पुण्यात पोचल्यावर रस्ता शोधत आणि माणसांना शोधत तो ठरलेल्या ठिकाणी जातो. मला हे सर्व त्या घरमालकासाठीच नाही तर अगदी त्या मुलासाठीपण धोक्याचे वाटते... कारण जिथे राहणार आहे ते कसे आहेत याची कल्पना त्याला देखील नाही ही अवस्था... असो. वर थोडे विषयांतर झाले, पण घर भाड्याने देण्यात जसे संस्कृतीरक्षण वगैरे असू नये असे वाटते तसेच सुरक्षिततेचा मुद्दा असावा असे देखील वाटते. मात्र बर्‍याचदा नुसत्याच जागा विकत घेऊन भाड्याने देणारे, त्यांच्यावर पण जबाबदारी (लायाबिलीटी) असताना, "पैसे देणारी रिअल इस्टेट" व्यतिरीक्त यासर्व बाबींचा विचार करतात असे वाटत नाही.

In reply to by विकास

विकास यांच्याशी सहमत आहे. तीन एक वर्षांपुर्वी भारती विद्यापीठ परिसरात सोसायट्यांमध्ये परप्रांतिय विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांना दमदाटी / मारहाण केली.भाड्याने घेतलेल्या सदनिकेत रम रमा रमी हे सर्व उद्योग चालु असायचे इतके कि इतरांना त्याचा खुपच त्रास होई. केवळ जास्त भाडे मिळते म्हणुन मालकांनी या सदनिका भाड्याने दिल्या होत्या. हे प्रकरण वर्तमानपत्रांनी उचलून धरले त्यावेळी अनेक वाद प्रतिवाद ( खर तर संवाद) झाले दोन्ही बाजु लोकांच्या समोर आल्या. कुठलही विधान सरसकट करता येणार नाही परंतु समाजमनाला न रुचणार्‍या परंतु विवेकी गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. मुद्दे योग्य असले तरी पुर्वदुषित ग्रहांमुळे ते समाजमनाला मान्य करायला अवघड जाते. मुद्दे जर आक्रस्ताळेपणे मांडले गेले तर मुद्दे योग्य असले तरी आक्रस्तळे पणामुळे चर्चा मुद्द्यावरुन गुद्द्यावर येते.
बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते.
सहमत आहे परंतु प्रत्येकवेळी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होतेच असे नाहि. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 05/05/2009 - 00:17
>>>...भारती विद्यापीठ परिसरात सोसायट्यांमध्ये परप्रांतिय विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांना दमदाटी / मारहाण केली.भाड्याने घेतलेल्या सदनिकेत रम रमा रमी हे सर्व उद्योग चालु असायचे इतके कि इतरांना त्याचा खुपच त्रास होई.... हाच मुद्दा बर्‍याचदा तेथील इतर रहीवाशांना त्रासदायक ठरतो. बाकी येथे बर्‍याचजणांचा असा मुद्दा दिसला की कॉस्मोपॉलीटन वस्तीत असले प्रकार होत नाहीत. त्याचा अनुभव नाही, मात्र पुण्यात अगदी पूर्ण मराठी लोकांच्या इमारतीत पण असे भाडेतत्वाने दिलेल्या जागेत कोणी नाक खुपसत नाही असे जवळून पाहीले. मात्र जेंव्हा आजूबाजूची शांतता खराब होते तेंव्हा घरमालकाला सांगून मुलांना कंट्रोलमधे आणले. हा प्रश्न बर्‍याचदा मुलगा आणि मुलगी असा असण्यापेक्षा धांगडधिंगा असण्याचा असतो. अमेरिकेत पण विशेष करून युनिव्हर्सिटीजच्या भागात तेथील कायमस्वरूपी रहीवासी जर स्टूडंट्सनी गोंधळ घातला तर अशीच तक्रार करतात. येथे फक्त पोलीसांना फोन करायला पण लोकं कमी करत नाहीत.
तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते.
सहमत आहे परंतु प्रत्येकवेळी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होतेच असे नाहि.
माझ्या आजीचे एक वाक्य आठवले, "नशिबाचे भोग कुणाला चुकत नाहीत म्हणणे ठीक आहे, पण म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेयची का?" :-) तात्पर्यः आपल्या हातात जितके शक्य आहे तितके बॅकराउंड चेक करणे टाळायची गरज नाही. मात्र ते केल्यावर फूलप्रूप नाहीतरी बर्‍यापैकी काळजी घेतल्याने वेडेवाकडे प्रसंग होणे टळू शकतात असे वाटते...

In reply to by विकास

बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. सहमत आहे, बर्‍या पैकी हे घडतही. आता माझच उदाहरण द्यायचे झाले तर मुंबइतले माझे हे चौथे घर आहे. दर वेळेस माझी सर्व माहिति घरमालक नोंद करुन घेतातच. ह्या माहितित मी रहाणार कुठला आहे? माझा घरचा पत्ता? माझ्या काम करणार्‍या अस्थापनेचा पत्ता ही सर्व माहिती दिलेली असते. ह्या उपर पोलिस तपासणी होवुन गुन्हेगारी पार्श्व्भुमी नाही हे पण तपासल्या जाते. आत एवढे सगळे करुन घर मिळाल्यावर जर मी घरात आवाज न करता किंवा सार्वजनिक सभ्यतेचे नियम पाळुन राहात असेल तरी मला बॅचलर म्हणुन त्रास होतोच. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

अवलिया 04/05/2009 - 23:20
चर्चा आणि प्रतिसादातुन एकच सारांश मी तरी काढला घरमालकाच्याच पोरिला पटवणे सगळ्यात बेस्ट !! रुमवर आली तरी "भाडे" वसुलीला आली होती सांगता येते !! --अवलिया

In reply to by अवलिया

मराठमोळा 04/05/2009 - 23:30
चर्चा आणि प्रतिसादातुन एकच सारांश मी तरी काढला घरमालकाच्याच पोरिला पटवणे सगळ्यात बेस्ट !! रुमवर आली तरी "भाडे" वसुलीला आली होती सांगता येते !! आता कसं बोललात नाना.. :) झकास. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सँडी 05/05/2009 - 00:11
तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ... अगदी बरोबर! यावरुन एक आठवलं. मॉडेल कॉलनीत ३-४ इमारती सोडुन रहात असलेल्या एका मित्राकडे येणे-जाणे असायचे. तिथे एक (त्यावेळचा)नविनच प्रकार समजला(आता अगदी सामान्य! प्रकार). एका जवळच्या फ्लॅटमध्ये ३-४परप्रांतिय मुलमुली एकत्र रहायची. मुलींच जाणंयेणं हे प्रकार तर राजरोस. चार भिंतीत कोण काय करतं असे संकुचित, रिकामटेकडे आणि उगाचचं जास्त(दुष्काळी का होईना)पावसाळे पाहिल्याचा आव आणणारे विचार मनाला न शिवल्याने चर्चासत्रात वेळ घातला नाही. त्यांचे ते उनाड वागणं वगैरे गोष्टींकडे तेथील सो कॉल्ड कॉस्मोपॉलिटीन सोयायटीवाल्यांच दुर्लक्ष. निखिलराव, वर पराने म्ह्टल्याप्रमाणे आप करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला.... =)) हेही प्रकार आजकाल जास्तच, तसेच ५२ नं मध्ये काहि मुले रात्री मुलींना घेउन आले होते आणि त्यांना नको ते चाळे करताना पकडले गेले. ------------------------------------------------------------------------------------------------ माझ्या रुममेट च्या मैत्रिणि येतात हे मला माहित होते. ------------------------------------------------------------------------------------------------ काल त्याची होणारी बायको दुपारी चार वाजता येवुन साधरणता सहा वाजेच्या सुमारास दोघेही बाहेर गेले होते आता वस्तुस्थीति जाणुन घेतल्यावर आमच्या मालकांचे म्हणने पडले पहा जर टाळता आले तुम्हाला तर टाळा. या माहीतीवरुन असे वाटते की या वेगवेगळ्या घटना असल्यातरी तिथल्या लोकांचे खुपच गैरसमज झाले असावेत. आपले घरमालक सहजासहजी ऐकतील असे वाटतं नाही. तरीपण चर्चा करुन पहा. जर तुमच्या मित्राला तो फ्लॅट लग्नानंतर वापरायचा असेल तर तात्पुरती तडजोड करुन त्यांचे म्हणणे मान्य करायला हरकत नाही. नसल्यास दुसरा फ्लॅट ऑप्शन म्हणुन पाहुन ठेवावा. -संदीप कुलकर्णी. काय'द्याचं बोला

मुक्तसुनीत 05/05/2009 - 00:07
पेईंग गेस्ट /भाडेकरू म्हणून काही करारनामा केला आहे काय ? केला असल्यास त्यात असले "डिस्क्रेशनरी " कलम आहे काय ? नसल्यास मालकांना बोलण्याचा अधिकार उरत नाही असे वाटते. अर्थात, जोरजबरदस्ती करून भाडेकरूंना बाहेर काढायचे मालकांनी ठरविले तर गोष्ट वेगळी. बाकी आमचे मत : १. घरमालकांचे विचार बुरसटलेले दिसतात. त्यांना भाड्याचे पैसे हवे असतील तर कायद्याच्या कक्षेत बसणारे भाडेकरूंचे वर्तन (भाडेकरूची मुदत संपेपर्यंत ) त्यानी सहन करावी. करार आणि कायद्याच्या कक्षेत , मुदतपूर्व कालात भाडेकरूला काढण्याचा त्यांना अधिकार नाही. २. सभ्यता आणि कायदेशीरपणा यांचे बंधन पाळल्यानंतर "कन्सेंटींग ऍडल्ट्स्"नी काय करावे नि काय करू नये याबद्दलची त्यांची स्वायत्तता यावर त्या जोडप्याचा हक्क आहे. त्यांनी मालकाना "काका , काकी , माईंड युअर ओन बिझनेस" म्हणायला हरकत नाही. भाड्याने जेव्हा जागा वापरायला दिली तेव्हा कायद्याच्या कक्षेत बसणारे सर्वकाही त्या जागेत चालू शकते.

रेवती 05/05/2009 - 00:32
वरील चर्चा वाचून एक मजेशीर प्रसंग आठवला. मी शाळकरी वयाची असताना आमच्या सोसायटीत मुंबईत राहणार्‍या (पण पुण्यात घर असावं म्हणून घेऊन ठेवणार्‍या)काकांनी त्यांचे घर परदेशी विद्यार्थांना दिले होते. त्या दोघा मुलांच्या मैत्रिणी रोज संध्याकाळी भेटायला यायच्या. एकमेकांना सोडून जातानाची भेट ही बिल्डींगखाली शिनेमाश्टाइलने होत असे. त्याचवेळी सोसायटीमधील बराचसा स्त्रीवर्ग भाजी, इस्त्रीला कपडे देणे, मुलांना विविध क्लासेस ना नेणे/आणणे, बालकवर्ग खेळण्यात, तसेच आज्जी/आजोबा वर्ग हे बिल्डींगसमोरच्या बेंचवर बसणे व समवयस्कांशी बोलणे ह्यामधे गुंतलेला असे. वॉचमन या सुप्रसिद्ध वेळी सगळ्या बिल्डींगांच्या टाक्या भरणे अशी कामे करत असे. हळूहळू एक बातमी सगळ्या सोसायटीत पसरली व सर्वप्रथम लहान मुले त्या परदेशी मुलामुलींचा मुक्तपणे चाललेला निरोपसमारंभ बघायला जमू लागली. चक्क त्यांच्याभोवती कोंडाळं करून ते नक्की काय करतात हे पाहू लागली. वॉचमन तर फारच एकाग्रतेने दीर्घचुंबनदृश्य बघत असे. आजोबा मंडळींना पुढच्या बिघडलेल्या पिढीवर बोलण्यास जोर चढला (आज्ज्या मात्र,"अगदीच ताळतंत्र सोडला मेल्यांनी" यावरच बोलायचे थांबल्या.). माझ्या बाबांसकट सर्व वडीलांना आपल्या मुलींची फार म्हणजे फार काळजी वाटू लागली. काही दिवसातच मुंबईच्या काकांना फोन करून बातमी देण्यात आली व सर्वांची करमणूक करणारे भाडेकरू गायब झाले. खरं तर यावर एक स्वतंत्र गोष्टं तयार होइल ;) पण आधीच अवांतर असल्याने क्षमस्व! रेवती

चिरोटा 05/05/2009 - 09:50
थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा. ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत. आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा.ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत. पैसे खर्च करण्याचा प्र्श्न येत नाही हो..... पैसा काय कितिही टाकता येईल.... आणी त्या साठी आपण सांगितल्या जागिच नाहि तर ठाणे, बोरीवली , मुलुंड, भांदुप, वाशी , कोपखैरने, बेलापुर, पनवेल, खारघर अश्या ठीकाणी मराठी सोसायटीत ही रहाता येयिल तिकडे दुसर्‍याचा वय्यक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करणार्‍या सोसायट्या आहेतच आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! :-) ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by चिरोटा

सँडी 05/05/2009 - 10:26
अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! =)) =)) =)) अगायाया! -संदीप कुलकर्णी. काय'द्याच बोला.

मराठमोळा 05/05/2009 - 10:03
छान चर्चा. मी जर माझे हे अनुभव लिहायला घेतले तर दोन दिवसही कमी पडतीत. असो. चर्चेतील प्रतिसादही पटले. आपला (बरेच वर्ष बाहेर राहण्याचा अनुभव असलेला) मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

काल ह्या धाग्यावर चर्चा केल्यानंतर मी माझ्या घरमालकांकडे गेलो. आमच्या घरमालकाने सांगितलेली भुमिका पुढील प्रमाणे " तसे तर घरात तुम्ही तुमची प्रेयसी, होणारी वधु, मैत्रीणी ह्या पैकी कोणीही आले तर मला फरक पदत नाही. पण नेमके ह्या वेळेस मी सोसायटीच्या कमीटी वर असल्यामुळे प्रोब्लेम होत आहे. कारण सोसायटीच्या मिटींग मधे लोक मलाच सांगत होते की तुमच्या रुम मधे रहाणार्‍या मुलांकडे मुली येतात. खरे तर सोसायटी मधे लग्नाविणा सोबत राहाणारे दोन तिन जोडपे आहेत पण परवा झालेल्या प्रकारेमुळे सोसायटी वाले बॅचलर मुलांच्या मागे आहेत. तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल." तर सध्या तरी आम्ही त्याच सोसायटीत आहोत.... आमच्या मित्राने होणार्‍या बायकोला भेटायला तिच्याघरी जायचा निर्णय घेतला आहे. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by निखिल देशपांडे

चिरोटा 06/05/2009 - 09:21
तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल
हे ऊत्तर अपेक्षितच होते्. आता 'तुम्ही आम्हाला कोण विचारणारे?" असा प्रतिप्रश्न कोणी केला तर 'ईकडून आताच्या आता फुटा' असे ऊत्तर येइल.!! पोलिसात कोणी गेला तर पोलिस कोणाची बाजु घेतील हे आपणास ठावोक आहे. :D अवांतर्-हे योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

ईथ वाशित पाम बीचवर अस काय काय चाल्त कि शाशन लवझोन का करत नाय ते कलत नाय. नवे लगिन ठरलेल्यानि काय करायच. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

In reply to by यन्ना _रास्कला

चिरोटा 06/05/2009 - 09:09
अहो पेशल ईकॉनॉमिक झोन बनवतानाच नाकी नऊ येतात सरकारला,तिकडे लव झोन कसला घेवून बसलात? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

अभंगाची कॅसेट् लावावी बॅक्ग्राउंड ला. सर्व उद्देश साध्य होतात. मुख्य दरवाजावर नितिवान"(नितिश + पासवान)सर्टीफिकेट मिळते ते लावावे. कुठे मीळाले नाही तर माझ्या कडे या.

अमोल केळकर 06/05/2009 - 09:24
आत्तापर्यंत तुमचा प्रश्न सुटला आहे असे मानतो. तरी भविष्याची सोय/ बॅक अप म्हणून एखादे घर बघून ठेवा असे अनेक सन्मानीय सदस्यांनी सुचवले आहे . त्याचा अवश्य विचार करा त्यासाठी एक उपाय सुचवतो. - तुमचा मित्र आणी त्याची होणारी बायको या दोघांना घर हुडकायच्या कामाला लावा. त्यांना ही एकमेकांचा सहवास लाभेल आणि तुमचे ही काम होईल. :D -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

चिरोटा 04/05/2009 - 19:26
अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का?
मानतो पण खात्री पटावी लागते.उ.दा. तुमच्या मित्राने होणारी बायको आली असताना आजुबाजुला रहाणार्‍या लोकाना गप्पा मारायला बोलावले असते आणि ओळख करुन दिली असती तर असे झाले नसते असे मला वाटते. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

चतुरंग 04/05/2009 - 19:35
तुम्ही तुमच्या होणार्‍या पत्नीची किंवा पतीची ओळख अशी सरसकट कोणाही व्यक्तीला विनाकारण करुन द्याल का? माझ्यामते फक्त घरमालकाला तुम्ही, तुमचा मित्र आणि त्याची नियोजित सहचर ह्यांनी भेटावे रीतसर ओळख करुन द्यावी/घ्यावी. मुलगी जवळच रहाते हे स्प्ष्ट करावे, इतर कुटुम्बीय असले तर त्यांची जुजबी माहिती द्यावी आणि होणारे नवरा-बायको असल्याने एकमेकांना भेटणे गैर नाही हे सांगावे. सभ्यतेचे सामाजिक संकेत पाळून ते त्यांच्या फावल्या वेळात काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याउप्परही तक्रार असेल तर लक्ष देऊ नये! :) चतुरंग

In reply to by मेघना भुस्कुटे

छोटा डॉन 04/05/2009 - 19:46
लेखात सांगितल्याप्रमाणे समजुन सांगितल्यावर मालक म्हणतो की " ठिक आहे पण टाळता आले तर पहा" ... समजुतदार असल्याचे लक्षण आहे, बहुतेक काही प्रोब्लेम होणार नाही ... पण सोसायटीच्या इतर लोकांची काही गँरेटी नसल्याने प्रेडिक्शन करणे कठिण आहे ... बाकीचे सोडा हो पाठीमागुन मारलेल्या टोमण्यांचा अतिशय त्रास होतो हे सत्य आहे, फारच भ्याड आणि सणक आणणारा प्रकार आहे हा. इथे सर्वांची तोंडे बंद करणे शक्य नसते, त्रास होतोच ... मालकाच्या समजुतदारपणाचे कौतुक करु वाटते ... ------ (कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत राहणारा) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by चिरोटा

नितिन थत्ते 16/05/2009 - 19:36
हे या पोस्टला उत्तर नाही पण प्रतिसाद वर दिसावा म्हणून इथे लिहिले. आजच्या लोकसत्तातील वास्तुरंग पुरवणीतील महत्त्वाचा दुवा. अविवाहित भाडेकरूना सोसायटी मज्जाव करू शकत नाही असा ग्राहक न्यायालयाचा निर्णय आहे http://www.loksatta.com/daily/20090516/ws02.htm खराटा (रंग माझा वेगळा)

छोटा डॉन 04/05/2009 - 19:41
निखीलराव, एका चांगल्या विषयाला हात घातला आहात. ह्यावरही बरेच लिहण्यासारखे आहे ( आले, बर्‍याच जणांचे मी अजुन लिहणार आहे हे वाचल्यावर बदललेले चेहरे‍ डोळ्यासमोर आले. असो. ) ;) तुम्ही पुण्यात असाल तर हा प्रॉब्लेम शक्यतो होतोच ... त्यात तुम्हीही आणि घरमालकही मराठी असाल तर हमखास होतो ... (कॄपया मराठी आणि अमराठी ह्यावर वाद नको, माझ्या म्हणण्याचा विस्तॄत अर्थ लक्षात घेतल्यास बरे होईल ) शेवटी हे सुद्धा "समजुतदारपणा" आणि परस्परांवरील "विश्वास" ह्यावर अवलंबुन आहे हे लक्षात घेतले तर बरेच इश्श्यु आपोआप सुटतील ... मात्र दुर्दैवाने हे प्रमाण फार कमी आहे. तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ... आजही सामान्य सोसायटीत "एका मुलाने रुमवर मुलगी आणणे" अथवा उलटे हे घोर अपराध समजले जाते हे दुर्दैवी सत्य आहे ... कदाचित त्याला काही बाहेरुन आलेल्यांची अथवा इथल्यांचीच "गैर वागणुक" कारण असेल पण हे सर्वसाधारण सत्य समजता येणार नाही ... माझा वैयक्तीक माझ्या रुमवर माझ्या मैत्रिणींना बोलावण्यास विरोध नसेल व रुममेट्सचाही नसेल. मैत्रिणींनाही असा प्रॉब्लेम कधी झाल्याचे ऐकले नाही. मालकानेही कधी ह्याबद्दल प्रश्न विचारल्याचे आठवत नाही, इनफॅक्ट विचारलेच नाहीत ... तुमच्यासाठी उपाय : तो सांगणे अवघड आहे, कारण ह्याला अनेक पैलु येतात. घरमालकाची विचारसारणी कशी आहे ह्यावर हे अवलंबुन आहे. माझा सल्ला : पुण्यात असाल तर दुसर्‍या घराचा शोध चालु करा अथवा तुमच्या बिचार्‍या मित्राची चुक नसताना त्याला घर बदलण्याचा चुकीचा अपण अटळ निर्णय घ्यावा लागेल ... महत्वाची गोष्ट : "रुमवर मैत्रिणी अथवा मित्र बोलावुन चाळे करणे हे प्रकार घडतात " हे अगदीच अमान्य नाही, हे जरुर घडते पण "घडतेच" असे नाही ... पण शितावरुन भाताची परिक्षा केली तर डिफेन्स करण्यासारखे काही उरत नाही ... मात्र अशा चाळेखोर व्यक्तींमुळे बाकीच्यांना त्रास होतो हा मुद्दा "विनाअट" मान्य करण्यासारखा आहे, आम्हालाही मान्य आहे. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

डान्रावांच्या मुख्य सल्ल्याशी सहमत. दुसर्‍या घराचा शोध सुरू करा, बॅकअप असलेला चांगलाच. एकट्या मुलाला भाड्यावर घर शोधायला त्रास होतो याची मलाही कल्पना आहे; माझ्या भावालाच ओळखीच्यांचंच घर मिळाल्यामुळे हा त्रास झाला नाही. आणि का होतो याचीही कल्पना आहेच, त्यामुळे मी घरमालकांनाही दोष देत नाही. सुक्याबरोबर ओलंही जळतं पण आपला त्याला कधीकधी इलाज नसतो. "'चाळे' म्हणजे नक्की काय?" असा प्रश्न सध्या मला पडला आहे. म्हणजे घरी मित्र-मैत्रिणी बोलावून एकाच्या दृष्टीने सभ्यपणे पार्टी करणे हा दुसर्‍याच्या दृष्टीने 'थेरं' या प्रकारात मोडणारा प्रकार असू शकतो. पुन्हा एकदा मुख्य सल्ला: सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तेव्हा बॅकअप असलेला बरा! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by चतुरंग

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, तेव्हा बॅकअप असलेला बरा! ह्याचाशी नक्किच सहमत. घर शोधायला सुरवात केली आहेच ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by छोटा डॉन

तुम्ही पुण्यात असाल तर हा प्रॉब्लेम शक्यतो होतोच ... सध्यातरी ठाण्यात आहे.... :-) त्यात तुम्हीही आणि घरमालकही मराठी असाल तर हमखास होतो ... तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ... आजही सामान्य सोसायटीत "एका मुलाने रुमवर मुलगी आणणे" अथवा उलटे हे घोर अपराध समजले जाते हे दुर्दैवी सत्य आहे ... कदाचित त्याला काही बाहेरुन आलेल्यांची अथवा इथल्यांचीच "गैर वागणुक" कारण असेल पण हे सर्वसाधारण सत्य समजता येणार नाही ... मी ही मराठी आणी मालक ही मराठी.... साधारण सोसायटितले सदस्य सुद्धा मराठी.... कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत राहिलो होतो त्या मुळे फरक सरळच जाणवतो. तुमच्यासाठी उपाय : तो सांगणे अवघड आहे, कारण ह्याला अनेक पैलु येतात. घरमालकाची विचारसारणी कशी आहे ह्यावर हे अवलंबुन आहे. माझा सल्ला : पुण्यात असाल तर दुसर्‍या घराचा शोध चालु करा अथवा तुमच्या बिचार्‍या मित्राची चुक नसताना त्याला घर बदलण्याचा चुकीचा अपण अटळ निर्णय घ्यावा लागेल ... तुमचा सल्ला अगदी योग्य वाटतो. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

मानतो पण खात्री पटावी लागते.उ.दा. तुमच्या मित्राने होणारी बायको आली असताना आजुबाजुला रहाणार्‍या लोकाना गप्पा मारायला बोलावले असते आणि ओळख करुन दिली असती तर असे झाले नसते असे मला वाटते. =)) =)) अरे त्याची होणारी बायको आली होती. कोणी शिनीमा नटी किंवा प्रदर्शनातली वस्तु न्हवती आली. कै च्या कै बर का. आजकाल एक तर दोन फ्लॅट मधल्या लोकांची आपापसात ओळख पण नसते त्यात हे पालथे धंदे कोणी करायला सांगीतलेत अजुन ? नुसते घराचे दार उघडे ठेवुन बसलेले चालत नाही का ? आणी अशा उघड्या दाराकडे लक्ष ठेवणारे कोणी असतील तर बिनधास्त ४ मैत्रीणी घेउन त्यांच्या घरी जाउन बसावे. "तुम्हाला चोरुन चोरुन डोकवायचा त्रास नको, म्हणुन आलो" असे सांगुन मोकळे व्हावे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

नितिन थत्ते 04/05/2009 - 19:42
मालकाची खात्री पटावी म्हणून मित्राच्या पालकांना मालकाशी बोलायला सांगा. त्या मुलीला मालकाशी व सोसायटीतील शेजारणींना भेटवा. (नंतर संबंध येणारच आहे- मित्र तेथेच राहणार असेल तर). तसेच सोसायटीच्या पदादिकार्‍यांना त्या मित्राने भेटलेले बरे. थोडक्यात गोष्टी जितक्या उघडपणे कराल तितका लोकांचा विश्वास बसेल. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

उद्या सोसायटीत राहायला आलेले बॅचलर पण म्हणाले की सगळ्या सोसायटीतील पुरुषांनी त्यांच्या बायका आणी मुलींची ओळख करुन द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल की इथे सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात. आली का पंचाईत ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 04/05/2009 - 19:51
बॅचलर पण म्हणाले की सगळ्या सोसायटीतील पुरुषांनी त्यांच्या बायका आणी मुलींची ओळख करुन द्या म्हणजे आमचा विश्वास बसेल की इथे सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात.
+१, अगदी योग्य आहे हा मुद्दा ... समोर राहणारी केवळ बॅचलर मुले आहेत म्हणुन नेहमी घराचा दरवाजा बंद करुन बसणार्‍या "संस्कॄतीरक्षक शेजार्‍यांना" हा अधिकार आहे का मुळ प्रश्न. असल्यास ह्या नियमाचे पालन एकाच साईडने जस्टिफाईड आहे का ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिरोटा 04/05/2009 - 19:51
...सुसंस्कृत लोक राहतात आणी त्यांच्या घरात 'इतर' बायका नसतात.आली का पंचाईत ??
विचारु शकता पण लोक जुमानणार नाहीत. कारण सुसंस्कृतेची व्याख्या समाज (म्हणजे त्या सोसायटीतील लोक) करतो.सध्या तरी चाळे करा नाहीतर करु नका, मुलगी रूमवर आणणे समाजाच्या सभ्यतेच्या व्याख्येत बसत नाही. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

छोटा डॉन 04/05/2009 - 19:58
सध्या तरी चाळे करा नाहीतर करु नका, मुलगी रूमवर आणणे समाजाच्या सभ्यतेच्या व्याख्येत बसत नाही.
बासच , विषयच संपला आता ... कोण बरे हा समाज ? ह्यांच्या सभ्यतांची व्याख्या ती काय ? सदैव आपली दारं बंद करुन बसणारी आणि खुज्या व भित्र्या मानसीकतेची शेजारी म्हणजे समाज होय ? शिवाय आम्ही ह्या समाजाला किंमत द्यावी ह्यासाठी हा समाज आमच्यासाठी काय करतो ?
एखाद्या सणाला समोर बॅचलर पोरांना सणासुदीचे खायला मिळावे म्हणुन कधी जेवायचे आमंत्रण देतो का हा समाज ? घरापासुन दुर राहिलेली पोरं काय खातात, कशी राहतात, काही त्रास आहे का ह्याकडे लक्ष देतो का हा समाज ? काही दुखले खुपले तरी कधी ढुंकुनही चौकशी करतो का हा समाज ? एखादे यश मिळाले तर त्या आनंदात मुक्त मनाने सामील होतो का हा समाज ?
नसल्यास आम्ही ह्या समाजाचे काय देणे लागतो व आम्ही का म्हणुन त्यांच्या "झुट्या व अनाठायी" सभ्यतांचे पालन करावे ? मी वर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणार असाल तर "सभ्यतेची व्याख्या" स्पष्ट होईल असे वाटते ... सभ्यता म्हणजे काय तर " आपला तो बाळ्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे" असेच आहे सध्या .... असो. ------ ( सामाजीक सभ्यतेच्या विरोधातला बंडखोर ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

लिखाळ 04/05/2009 - 20:01
सर्व संस्कृतीरक्षकांचा विजय असो ! डॉन्या के साथ बाता : आपल्याला जे जमले नाही ते तरुण लोक करताना दिसले की अनेकांचे पित्त खवळते आणि अचानक त्यांना संस्कृतीची आठवण होते असे कधीकधी वाटते :) -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

छोटा डॉन 04/05/2009 - 20:06
डॉन्या के साथ बाता : आपल्याला जे जमले नाही ते तरुण लोक करताना दिसले की अनेकांचे पित्त खवळते आणि अचानक त्यांना संस्कृतीची आठवण होते असे कधीकधी वाटते
+१, अगदी करेक्ट ..!!! म्हणजे कसे की मुलींच्या मुलांच्या हातात हात घालुन पबमध्ये जाऊन थिरकण्याला विरोध आहे कारण ती मुले "आम्ही" नाही आहोत व कोणीतरी "दुसरीच" आहेत. मग बुडाली हो संस्कॄती ऽऽऽ जर त्याच मुली "आमच्या"बरोबर येत असतील तर ते आमचे "स्वातंत्र्य" होते ... असो, चालायचेच ... ------ (संस्कॄतीरक्षक)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by मेघना भुस्कुटे

अजुन एक वाक्य आठवले :- आप करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

लिखाळची म्हण आवडली, पर्‍याची म्हण कॉस्मॉपॉलिटन असल्यामुळे अगदीच चूक वाटली! (पर्‍या ह. घे रे, नाहीतर लिहायचास माझ्यावरही एखादा फार्स!) ;-) अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by चिरोटा

विचारु शकता पण लोक जुमानणार नाहीत. कारण सुसंस्कृतेची व्याख्या समाज (म्हणजे त्या सोसायटीतील लोक) करतो. बॅचलर समाजाचा एक हिस्सा नाहीत काय ? तुम्ही भाडे भरता तेव्हडेच किंबहुना त्यापेक्षा जास्ती भाडे भरुन ते राहात असतात मग त्यांना हा प्रश्न विचारायचा अधीकार का नाही ? जसा एखाद्या सोसायटीला बॅचलर लोकांचा त्रास झाला असेल तसा त्या मुलांना पण सोसायटीचा त्रास कशावरुन झाला नसेल ? आमच्या सोसायटीत पण अनेक बॅचलर मुले राहतात. एखादा रात्री १२ ला भसाड्या आवाजात गायला तरी फक्त आजुबाजुच्या फ्लॅट मधुन 'वाह वाह' 'झोपा गर्दभ कुमार' असे आवाज आले की एकदम शांतता पसरते ;) शेवटी एकमेकांच्यावरचा विश्वास महत्वाचा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

नितिन थत्ते 04/05/2009 - 19:51
प रा चा मुद्दा बिनतोड. पण अदितीने सांगितल्या प्रमाणे सत्तेपुढे शहाणपण नसते. म्हणून प्रश्न. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

पण तुमचा उपाय वाचून तर रोग परवडला म्हणायची वेळ आली. आज आम्हीही भाड्याने घर घेऊन रहात आहोत, एखाद दोन माणसं सोडून या बिल्डींगीत १४-१५ महिन्यात कोणाशीही ओळख झालेली नाही. आपल्या समाजात एकदा लग्नं झालं की आता माणूस 'सभ्य' आहे, यांच्याकडे जायला, आपल्या लेकीसुनांना पाठवायला हरकत नाही असा एक सर्वमान्य समज आहे. त्यामुळे तुमच्या मित्राचं लग्न ठरलं आहे हे घरमालकाला सांगून हवंतर त्या मुलीलाही भेटायला घेऊन जा. शक्यतोवर यापुढे त्यांनी काही खिटपिट करू नये. अगदीच नाही झालं तर घरी एक सत्यनारायण घाला, मित्राचं लग्नं ठरलं/झालं म्हणून! (हा सल्ला ह.च घ्या) ;-) मित्राला आणि त्याच्या होणार्‍या बायकोला शुभेच्छा. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by नितिन थत्ते

चिरोटा 04/05/2009 - 19:46
सहमत.
सभ्यतेचे सामाजिक संकेत पाळून ते त्यांच्या फावल्या वेळात काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे
हे आपल्या समाजाला पटत नाही ना!. म्हणून तर हे उपद्व्याप करावे लागतात.
थोडक्यात गोष्टी जितक्या उघडपणे कराल तितका लोकांचा विश्वास बसेल.
बरोबर्.म्हणूनच जास्तित जास्त शेजार्‍यांशी ओळख करुन द्यावी. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

बरोबर्.म्हणूनच जास्तित जास्त शेजार्‍यांशी ओळख करुन द्यावी. अहो ज्या शेजार्‍यांशी मागच्या २ वर्षात फक्त २ वेळा बोलणे झाले आहे त्यांना का म्हणुन ही माझी होणारी बायको आहे हे सांगत फिरावे. आणी ते बोलण्यासाठी त्यांची ऐकुन घ्यायची तयारी असली पाहिजे ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by निखिल देशपांडे

छोटा डॉन 04/05/2009 - 20:00
ज्या शेजार्‍यांशी मागच्या २ वर्षात फक्त २ वेळा बोलणे झाले आहे त्यांना का म्हणुन ही माझी होणारी बायको आहे हे सांगत फिरावे
. अगदी बिनतोड मुद्दा आहे ... अजिबात गरज नाही तसे सांगण्याची, गेले उडतं ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

निखिलराव, तुमचे घरमालक मराठी आहेत का? असतील तर या धाग्याचे आणि प्रतिसादाचे प्रिंट्स काढा आणि दाखवा त्यांना! काम होऊन जाईल तुमचं!! :-) अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगला उपाय आहे.... आज घेउनच जातो ... जस्तित जास्त काय घर सोडायला सांगतील, ३ महिन्याने करार संपणारच आहे. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by निखिल देशपांडे

चिरोटा 04/05/2009 - 20:05
मग बॅकअप बघाच बुवा!!.ईकडे समाज बरोबर की आपण हा प्रश्न नाही. मित्राला तिकडे रहायचे असेल तर त्याला ओळखी करुन घ्याव्याच लागतील असे वाटते. तयारी नसेल तर दुसरीकडे जावे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते 04/05/2009 - 20:23
डॉन वगैरे लोकांशी पूर्णतः सहमत आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवलेली बरी. समाज आगरकर, कर्वे आणि फुल्यांचा सत्कार ते मेल्यानंतर करतो. जिवंतपणी शेण-चिखल्-दगड यांचा माराच सहन करावालागतो. तेव्हा समाज बदलायला निघाला असाल तर तयारी ठेवा बुवा. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन 04/05/2009 - 20:31
समाज आगरकर, कर्वे आणि फुल्यांचा सत्कार ते मेल्यानंतर करतो. जिवंतपणी शेण-चिखल्-दगड यांचा माराच सहन करावा लागतो.
छे हो, वर उल्लेखलेली माणसे फार मोठ्ठी आहेत ... त्यांच्याबरोबर कणभर तुलना होण्याइतकी आमची औकाद नाही, फार मोठ्ठे लोकं आहेत हो हे ... बाकी आपल्याशी सहमत आहे, खरोखर असे घडते ... समाज बदलायला वगैरे निघालो नाही ( अजुन डोके बर्‍यापैकी ठिकाणावर आहे ;) ) पण जमेल तितके "शहाणे करुन सोडावे सकळ जन" हा प्रयत्न चालु असतो. विस्तॄत दॄष्टीकोण राहिला तरच शांततामय जीवन जगता येईल ह्यावर आमचा गाढा विश्वास आहे. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

नितिन थत्ते 04/05/2009 - 21:59
तुमचे म्हणणे बरोबर आहे डॉनराव. शक्य तोवर शहाणे करून सोडण्याचा प्रयत्न करावाच. फक्त काय आहे.. आपण इथे लांबून सल्ले देतोय. ज्याला तिथे दोन हात करायचेत "त्याला आम्ही हवे तसे वागू जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत" असे म्हणायचे असेल तर ते सहज साध्य नसेल एवढेच सांगायचे होते. (आगरकरांचे उदाहरण फक्त परिचयाचे म्हणून दिले) खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन 04/05/2009 - 22:05
ज्याला तिथे दोन हात करायचेत "त्याला आम्ही हवे तसे वागू जोपर्यंत तुम्हाला त्रास होत नाही तोपर्यंत" असे म्हणायचे असेल तर ते सहज साध्य नसेल
अगदी अचुक ... एकदम मान्य आहे आपले मत ... ------ (सहमत)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

Nile 04/05/2009 - 20:24
अहो तो श्री राम नाही लोकांची तोंड बंद करु शकला तिथे तुमची आमची काय गत? प्रेम करण्यार्‍याने प्रेम हवे तसे (म्हणजे लपुन वा खुलेआम) करावे, समाज काही केलं तरी बोंब मारणार. अवलिया शेठ काढा हो एक फर्मास पाठ पुराणातुन! ;)

क्रान्ति 04/05/2009 - 20:26
बॅचलर मुलींनाही जागा मिळायला त्रास होतो . त्यात घरमालकाच्या सतराशे साठ अटी! अरे, ही मुलं मुली सुद्धा सभ्य चांगल्या घरातली असतात, त्यांनाही आई-वडील, भावंडं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले, की त्यांची काहीतरी भानगड आहे, असा कोता विचार किती दिवस करणार? उद्या आपल्या मुलांवर/नातवंडांवर देखिल अशी वेळ येऊ शकते, हा विचार का नाही मनात येत? क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

In reply to by क्रान्ति

क्रांतीताई, त्यांची भले असेल काही "भानगड", पण चारचौघांसमोर त्यांचं वागणं आक्षेपार्ह नसेल तर त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यांना तो अधिकार कोणी दिला? त्यांनी हिरावून घेतला असेल तर खरंच त्यांना असा अधिकार आहे का?? अनेक जोडप्यांना व्यावहारीक अडचणींमुळे नाही लगेच लग्नं करता येत, लगेच 'भानगड' असते का त्यांची? आणि लग्नाची तारीख काढली, हॉल बुक केला की मग सगळं चालतं, असं का?? अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

विकास 04/05/2009 - 20:53
कोणे एके काळी... महाविद्यालयात वर्गातील मुलगे आणि मुली यांची "वर्गमैत्री" (क्लासमेट्स या अर्थी) असलेली पाहून कुजकट नजरा असलेली मंडळी पाहीलेली आणि अनुभवली आहेत. त्यांना वेळोवेळी हाताळण्याच्या प्रसंगानुरूप केसस्टजीज असू शकतात/आहेत :-) सध्या जे काही चालले आहे, त्यात जर धिंगाणा घालणार्‍या मुलांचा जर त्रास झाला तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून उगाच कोणाला तरूण-तरूणी म्हणून "जाब" विचारणे अती वाटते. अर्थात या प्रसंगातील मालक हा समंजस वाटतो आहे आणि खात्री करून घेऊ इच्छित आहे असे दिसते. त्यामुळे वर अनेकांनी सांगितलेला एकच उपाय येथे योग्य वाटतो: तो म्हणजे घरमालकाची ओळख मुलीशी करून देणे. मला वाटते या एका चालीने हा नसलेला प्रश्न आपोआप सुटेल. सोसायटीतील माणसे अशी का वागतात याची पण एकाहून अधिक कारणे असू शकतात असे वाटते:
  1. वर उल्लेखलेले (तथाकथीत) संस्कृतीरक्षण ही त्यातील एक शक्यता आहे.
  2. पुर्वानुभवावरून जर रात्रीच्या वेळेस मोठमोठे आवाज करणार्‍या पार्ट्या झाल्या असल्यातर.
  3. स्वतःची मुले ही अडनिड्या वयात असताना त्यांना त्या वयाला न साजेसा "मेसेज" मिळू नये असे वाटणे.
बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते. उ.दा. मुंबई-पुणे विमानतळावरून येताना शेजारील तिशीच्या आसपासच्या तरूणाशी गप्पा मारत होतो. तो लंडनहून येऊन पुण्याला जात होता, मी बॉस्टनहून. त्याने आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला नव्या मुंबईत थोडी वाकडी वाट करायला लावली. त्या अपरात्री दोन विद्यार्थीदशेतील मुले होती, त्यांना त्याने त्यांच्यासाठी लंडनहून आणलेले पार्सल दिले. नंतर पुढे रस्त्यावरून जाताना लक्षात आले की तो प्रथमच पुण्यात जात होता, ज्या घरात त्याने रुममेट म्हणून जागा घेतली होती ती त्याने नेटवरून शोधली होती, नक्की कुठे जात होता ते त्याला माहीत नव्हते आणि कदाचीत ज्यांच्याकडे जात होता त्यांना तोदेखील माहीत नव्हता... त्याने मला सांगताना तो बंगलोरचा आहे असे सांगितले. आता विचार करा, तो नक्की कुठला ते माहीत नाही, कुठतरी आडरस्त्यावर पार्सल देताना दिसतो (अर्थात याचा घरमालकाशी संबंध नाही), मग पुण्यात पोचल्यावर रस्ता शोधत आणि माणसांना शोधत तो ठरलेल्या ठिकाणी जातो. मला हे सर्व त्या घरमालकासाठीच नाही तर अगदी त्या मुलासाठीपण धोक्याचे वाटते... कारण जिथे राहणार आहे ते कसे आहेत याची कल्पना त्याला देखील नाही ही अवस्था... असो. वर थोडे विषयांतर झाले, पण घर भाड्याने देण्यात जसे संस्कृतीरक्षण वगैरे असू नये असे वाटते तसेच सुरक्षिततेचा मुद्दा असावा असे देखील वाटते. मात्र बर्‍याचदा नुसत्याच जागा विकत घेऊन भाड्याने देणारे, त्यांच्यावर पण जबाबदारी (लायाबिलीटी) असताना, "पैसे देणारी रिअल इस्टेट" व्यतिरीक्त यासर्व बाबींचा विचार करतात असे वाटत नाही.

In reply to by विकास

विकास यांच्याशी सहमत आहे. तीन एक वर्षांपुर्वी भारती विद्यापीठ परिसरात सोसायट्यांमध्ये परप्रांतिय विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांना दमदाटी / मारहाण केली.भाड्याने घेतलेल्या सदनिकेत रम रमा रमी हे सर्व उद्योग चालु असायचे इतके कि इतरांना त्याचा खुपच त्रास होई. केवळ जास्त भाडे मिळते म्हणुन मालकांनी या सदनिका भाड्याने दिल्या होत्या. हे प्रकरण वर्तमानपत्रांनी उचलून धरले त्यावेळी अनेक वाद प्रतिवाद ( खर तर संवाद) झाले दोन्ही बाजु लोकांच्या समोर आल्या. कुठलही विधान सरसकट करता येणार नाही परंतु समाजमनाला न रुचणार्‍या परंतु विवेकी गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. मुद्दे योग्य असले तरी पुर्वदुषित ग्रहांमुळे ते समाजमनाला मान्य करायला अवघड जाते. मुद्दे जर आक्रस्ताळेपणे मांडले गेले तर मुद्दे योग्य असले तरी आक्रस्तळे पणामुळे चर्चा मुद्द्यावरुन गुद्द्यावर येते.
बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते.
सहमत आहे परंतु प्रत्येकवेळी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होतेच असे नाहि. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 05/05/2009 - 00:17
>>>...भारती विद्यापीठ परिसरात सोसायट्यांमध्ये परप्रांतिय विद्यार्थ्यांनी स्थानिक रहिवाशांना दमदाटी / मारहाण केली.भाड्याने घेतलेल्या सदनिकेत रम रमा रमी हे सर्व उद्योग चालु असायचे इतके कि इतरांना त्याचा खुपच त्रास होई.... हाच मुद्दा बर्‍याचदा तेथील इतर रहीवाशांना त्रासदायक ठरतो. बाकी येथे बर्‍याचजणांचा असा मुद्दा दिसला की कॉस्मोपॉलीटन वस्तीत असले प्रकार होत नाहीत. त्याचा अनुभव नाही, मात्र पुण्यात अगदी पूर्ण मराठी लोकांच्या इमारतीत पण असे भाडेतत्वाने दिलेल्या जागेत कोणी नाक खुपसत नाही असे जवळून पाहीले. मात्र जेंव्हा आजूबाजूची शांतता खराब होते तेंव्हा घरमालकाला सांगून मुलांना कंट्रोलमधे आणले. हा प्रश्न बर्‍याचदा मुलगा आणि मुलगी असा असण्यापेक्षा धांगडधिंगा असण्याचा असतो. अमेरिकेत पण विशेष करून युनिव्हर्सिटीजच्या भागात तेथील कायमस्वरूपी रहीवासी जर स्टूडंट्सनी गोंधळ घातला तर अशीच तक्रार करतात. येथे फक्त पोलीसांना फोन करायला पण लोकं कमी करत नाहीत.
तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते.
सहमत आहे परंतु प्रत्येकवेळी हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होतेच असे नाहि.
माझ्या आजीचे एक वाक्य आठवले, "नशिबाचे भोग कुणाला चुकत नाहीत म्हणणे ठीक आहे, पण म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेयची का?" :-) तात्पर्यः आपल्या हातात जितके शक्य आहे तितके बॅकराउंड चेक करणे टाळायची गरज नाही. मात्र ते केल्यावर फूलप्रूप नाहीतरी बर्‍यापैकी काळजी घेतल्याने वेडेवाकडे प्रसंग होणे टळू शकतात असे वाटते...

In reply to by विकास

बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्‍याचदा ते दिसत नाही. सहमत आहे, बर्‍या पैकी हे घडतही. आता माझच उदाहरण द्यायचे झाले तर मुंबइतले माझे हे चौथे घर आहे. दर वेळेस माझी सर्व माहिति घरमालक नोंद करुन घेतातच. ह्या माहितित मी रहाणार कुठला आहे? माझा घरचा पत्ता? माझ्या काम करणार्‍या अस्थापनेचा पत्ता ही सर्व माहिती दिलेली असते. ह्या उपर पोलिस तपासणी होवुन गुन्हेगारी पार्श्व्भुमी नाही हे पण तपासल्या जाते. आत एवढे सगळे करुन घर मिळाल्यावर जर मी घरात आवाज न करता किंवा सार्वजनिक सभ्यतेचे नियम पाळुन राहात असेल तरी मला बॅचलर म्हणुन त्रास होतोच. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

अवलिया 04/05/2009 - 23:20
चर्चा आणि प्रतिसादातुन एकच सारांश मी तरी काढला घरमालकाच्याच पोरिला पटवणे सगळ्यात बेस्ट !! रुमवर आली तरी "भाडे" वसुलीला आली होती सांगता येते !! --अवलिया

In reply to by अवलिया

मराठमोळा 04/05/2009 - 23:30
चर्चा आणि प्रतिसादातुन एकच सारांश मी तरी काढला घरमालकाच्याच पोरिला पटवणे सगळ्यात बेस्ट !! रुमवर आली तरी "भाडे" वसुलीला आली होती सांगता येते !! आता कसं बोललात नाना.. :) झकास. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सँडी 05/05/2009 - 00:11
तुम्ही एखाद्या "कॉस्मोपॉलिटीन सोसायटीत" रहात असाल तर शक्यतो असला त्रास होणार नाही, इथे मुद्दा एकंदरीत बिघडलेल वातावरणचा नाही तर जग पाहुन आलेल्या मॅच्युरिटीचा आहे ... अगदी बरोबर! यावरुन एक आठवलं. मॉडेल कॉलनीत ३-४ इमारती सोडुन रहात असलेल्या एका मित्राकडे येणे-जाणे असायचे. तिथे एक (त्यावेळचा)नविनच प्रकार समजला(आता अगदी सामान्य! प्रकार). एका जवळच्या फ्लॅटमध्ये ३-४परप्रांतिय मुलमुली एकत्र रहायची. मुलींच जाणंयेणं हे प्रकार तर राजरोस. चार भिंतीत कोण काय करतं असे संकुचित, रिकामटेकडे आणि उगाचचं जास्त(दुष्काळी का होईना)पावसाळे पाहिल्याचा आव आणणारे विचार मनाला न शिवल्याने चर्चासत्रात वेळ घातला नाही. त्यांचे ते उनाड वागणं वगैरे गोष्टींकडे तेथील सो कॉल्ड कॉस्मोपॉलिटीन सोयायटीवाल्यांच दुर्लक्ष. निखिलराव, वर पराने म्ह्टल्याप्रमाणे आप करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला.... =)) हेही प्रकार आजकाल जास्तच, तसेच ५२ नं मध्ये काहि मुले रात्री मुलींना घेउन आले होते आणि त्यांना नको ते चाळे करताना पकडले गेले. ------------------------------------------------------------------------------------------------ माझ्या रुममेट च्या मैत्रिणि येतात हे मला माहित होते. ------------------------------------------------------------------------------------------------ काल त्याची होणारी बायको दुपारी चार वाजता येवुन साधरणता सहा वाजेच्या सुमारास दोघेही बाहेर गेले होते आता वस्तुस्थीति जाणुन घेतल्यावर आमच्या मालकांचे म्हणने पडले पहा जर टाळता आले तुम्हाला तर टाळा. या माहीतीवरुन असे वाटते की या वेगवेगळ्या घटना असल्यातरी तिथल्या लोकांचे खुपच गैरसमज झाले असावेत. आपले घरमालक सहजासहजी ऐकतील असे वाटतं नाही. तरीपण चर्चा करुन पहा. जर तुमच्या मित्राला तो फ्लॅट लग्नानंतर वापरायचा असेल तर तात्पुरती तडजोड करुन त्यांचे म्हणणे मान्य करायला हरकत नाही. नसल्यास दुसरा फ्लॅट ऑप्शन म्हणुन पाहुन ठेवावा. -संदीप कुलकर्णी. काय'द्याचं बोला

मुक्तसुनीत 05/05/2009 - 00:07
पेईंग गेस्ट /भाडेकरू म्हणून काही करारनामा केला आहे काय ? केला असल्यास त्यात असले "डिस्क्रेशनरी " कलम आहे काय ? नसल्यास मालकांना बोलण्याचा अधिकार उरत नाही असे वाटते. अर्थात, जोरजबरदस्ती करून भाडेकरूंना बाहेर काढायचे मालकांनी ठरविले तर गोष्ट वेगळी. बाकी आमचे मत : १. घरमालकांचे विचार बुरसटलेले दिसतात. त्यांना भाड्याचे पैसे हवे असतील तर कायद्याच्या कक्षेत बसणारे भाडेकरूंचे वर्तन (भाडेकरूची मुदत संपेपर्यंत ) त्यानी सहन करावी. करार आणि कायद्याच्या कक्षेत , मुदतपूर्व कालात भाडेकरूला काढण्याचा त्यांना अधिकार नाही. २. सभ्यता आणि कायदेशीरपणा यांचे बंधन पाळल्यानंतर "कन्सेंटींग ऍडल्ट्स्"नी काय करावे नि काय करू नये याबद्दलची त्यांची स्वायत्तता यावर त्या जोडप्याचा हक्क आहे. त्यांनी मालकाना "काका , काकी , माईंड युअर ओन बिझनेस" म्हणायला हरकत नाही. भाड्याने जेव्हा जागा वापरायला दिली तेव्हा कायद्याच्या कक्षेत बसणारे सर्वकाही त्या जागेत चालू शकते.

रेवती 05/05/2009 - 00:32
वरील चर्चा वाचून एक मजेशीर प्रसंग आठवला. मी शाळकरी वयाची असताना आमच्या सोसायटीत मुंबईत राहणार्‍या (पण पुण्यात घर असावं म्हणून घेऊन ठेवणार्‍या)काकांनी त्यांचे घर परदेशी विद्यार्थांना दिले होते. त्या दोघा मुलांच्या मैत्रिणी रोज संध्याकाळी भेटायला यायच्या. एकमेकांना सोडून जातानाची भेट ही बिल्डींगखाली शिनेमाश्टाइलने होत असे. त्याचवेळी सोसायटीमधील बराचसा स्त्रीवर्ग भाजी, इस्त्रीला कपडे देणे, मुलांना विविध क्लासेस ना नेणे/आणणे, बालकवर्ग खेळण्यात, तसेच आज्जी/आजोबा वर्ग हे बिल्डींगसमोरच्या बेंचवर बसणे व समवयस्कांशी बोलणे ह्यामधे गुंतलेला असे. वॉचमन या सुप्रसिद्ध वेळी सगळ्या बिल्डींगांच्या टाक्या भरणे अशी कामे करत असे. हळूहळू एक बातमी सगळ्या सोसायटीत पसरली व सर्वप्रथम लहान मुले त्या परदेशी मुलामुलींचा मुक्तपणे चाललेला निरोपसमारंभ बघायला जमू लागली. चक्क त्यांच्याभोवती कोंडाळं करून ते नक्की काय करतात हे पाहू लागली. वॉचमन तर फारच एकाग्रतेने दीर्घचुंबनदृश्य बघत असे. आजोबा मंडळींना पुढच्या बिघडलेल्या पिढीवर बोलण्यास जोर चढला (आज्ज्या मात्र,"अगदीच ताळतंत्र सोडला मेल्यांनी" यावरच बोलायचे थांबल्या.). माझ्या बाबांसकट सर्व वडीलांना आपल्या मुलींची फार म्हणजे फार काळजी वाटू लागली. काही दिवसातच मुंबईच्या काकांना फोन करून बातमी देण्यात आली व सर्वांची करमणूक करणारे भाडेकरू गायब झाले. खरं तर यावर एक स्वतंत्र गोष्टं तयार होइल ;) पण आधीच अवांतर असल्याने क्षमस्व! रेवती

चिरोटा 05/05/2009 - 09:50
थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा. ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत. आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by चिरोटा

थोडा खर्च जास्त करायची तयारी असेल तर कुलाबा,पेडर रोड्,कफ परेड्,मलबार हिल अश्या ठिकाणी भाड्याची जागा बघा.ईकडे लोक दुसर्‍याच्या घरात डोकावून बघत नाहीत.बरेचसे लोक अमराठी आहेत. पैसे खर्च करण्याचा प्र्श्न येत नाही हो..... पैसा काय कितिही टाकता येईल.... आणी त्या साठी आपण सांगितल्या जागिच नाहि तर ठाणे, बोरीवली , मुलुंड, भांदुप, वाशी , कोपखैरने, बेलापुर, पनवेल, खारघर अश्या ठीकाणी मराठी सोसायटीत ही रहाता येयिल तिकडे दुसर्‍याचा वय्यक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करणार्‍या सोसायट्या आहेतच आपण काय करता हेही विचारणार नाहीत्.मग १ काय २५ मुली रूमवर आणल्या तरी ते काही करणार नाहीत्.अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! :-) ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by चिरोटा

सँडी 05/05/2009 - 10:26
अतिशय सुसंस्क्रुत लोक आहेत ते.! =)) =)) =)) अगायाया! -संदीप कुलकर्णी. काय'द्याच बोला.

मराठमोळा 05/05/2009 - 10:03
छान चर्चा. मी जर माझे हे अनुभव लिहायला घेतले तर दोन दिवसही कमी पडतीत. असो. चर्चेतील प्रतिसादही पटले. आपला (बरेच वर्ष बाहेर राहण्याचा अनुभव असलेला) मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

काल ह्या धाग्यावर चर्चा केल्यानंतर मी माझ्या घरमालकांकडे गेलो. आमच्या घरमालकाने सांगितलेली भुमिका पुढील प्रमाणे " तसे तर घरात तुम्ही तुमची प्रेयसी, होणारी वधु, मैत्रीणी ह्या पैकी कोणीही आले तर मला फरक पदत नाही. पण नेमके ह्या वेळेस मी सोसायटीच्या कमीटी वर असल्यामुळे प्रोब्लेम होत आहे. कारण सोसायटीच्या मिटींग मधे लोक मलाच सांगत होते की तुमच्या रुम मधे रहाणार्‍या मुलांकडे मुली येतात. खरे तर सोसायटी मधे लग्नाविणा सोबत राहाणारे दोन तिन जोडपे आहेत पण परवा झालेल्या प्रकारेमुळे सोसायटी वाले बॅचलर मुलांच्या मागे आहेत. तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल." तर सध्या तरी आम्ही त्याच सोसायटीत आहोत.... आमच्या मित्राने होणार्‍या बायकोला भेटायला तिच्याघरी जायचा निर्णय घेतला आहे. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

In reply to by निखिल देशपांडे

चिरोटा 06/05/2009 - 09:21
तर सध्या काही दिवस तुम्ही टाळले तर बरे राहील आणी काही कारणास्तव जर घरी आणावेच लागत असेल तर आम्हाला कल्पना द्या म्हणजे कोणी काही बोलले तर आम्हाला उत्तर देता येयिल
हे ऊत्तर अपेक्षितच होते्. आता 'तुम्ही आम्हाला कोण विचारणारे?" असा प्रतिप्रश्न कोणी केला तर 'ईकडून आताच्या आता फुटा' असे ऊत्तर येइल.!! पोलिसात कोणी गेला तर पोलिस कोणाची बाजु घेतील हे आपणास ठावोक आहे. :D अवांतर्-हे योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

ईथ वाशित पाम बीचवर अस काय काय चाल्त कि शाशन लवझोन का करत नाय ते कलत नाय. नवे लगिन ठरलेल्यानि काय करायच. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

In reply to by यन्ना _रास्कला

चिरोटा 06/05/2009 - 09:09
अहो पेशल ईकॉनॉमिक झोन बनवतानाच नाकी नऊ येतात सरकारला,तिकडे लव झोन कसला घेवून बसलात? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

अभंगाची कॅसेट् लावावी बॅक्ग्राउंड ला. सर्व उद्देश साध्य होतात. मुख्य दरवाजावर नितिवान"(नितिश + पासवान)सर्टीफिकेट मिळते ते लावावे. कुठे मीळाले नाही तर माझ्या कडे या.

अमोल केळकर 06/05/2009 - 09:24
आत्तापर्यंत तुमचा प्रश्न सुटला आहे असे मानतो. तरी भविष्याची सोय/ बॅक अप म्हणून एखादे घर बघून ठेवा असे अनेक सन्मानीय सदस्यांनी सुचवले आहे . त्याचा अवश्य विचार करा त्यासाठी एक उपाय सुचवतो. - तुमचा मित्र आणी त्याची होणारी बायको या दोघांना घर हुडकायच्या कामाला लावा. त्यांना ही एकमेकांचा सहवास लाभेल आणि तुमचे ही काम होईल. :D -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन. घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का??? मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे. घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते. मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो. घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला.

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

छोटा डॉन ·

आनंदयात्री 02/05/2009 - 22:29
काय फरक पडतो असा एक रुपया भाडेकपातीने ? हे माजोरडे रिक्षावाले एक तर कमीत कमी ५० रुपयांवरचे अंतर असल्याशिवाय येत नाहीत. मुख्य रस्त्यापासुन आत जायचे असेल तर १० रुपये जास्त घेणार. नवख्याला तर १०० टक्के लांबुन नेउन उल्लु बनवणार. दादागिरी आहेच. एवढा सगळा माज असतांना १ रुपयांनी काय फरक पडणारे ? पुण्यात दुकानदारांनंतर धसका घ्यायसारखी ही अजुन एक जमात ,, बास्स !!

In reply to by आनंदयात्री

टारझन 03/05/2009 - 00:11
बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ " अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मेल्या .. कं जबरा लिवलं रं .. अगदी तुझ्या स्पेषल षैली मधे .. बाकी आंद्या म्हणतो त्याच्याशी सहमत ... त्याचाच णिशेद म्हणून .. आम्हाला मुंबैत कट मारणार्‍या दोन (युपीवाल्या) रिक्षावाल्यांच्या डॉस्क्यात आम्ही हेल्मेट घातलंय ..

डान्राव, लेख नेहेमीप्रमाणे खणखणीत! हा संप मोडून काढला जावो अशी एक क्षुद्र अपेक्षा आहे. आजच संध्याकाळीही रस्त्यावर बर्‍यापैकी रिक्षा दिसल्या होत्याच, बाणेर भागात! पुण्यात क्वचित कधी रिक्षात बसायची वेळ आली आहे, त्यातल्या काही वेळा प्रामाणिक रिक्षेवालेही सापडले आहेत. काही व्यवच्छेदक निरीक्षणं: १. गोरे पाहूणे रिक्षातून नेताना रिक्षावाला 'तुम्ही मराठी, मी मराठी' गप्पा मारायला लागला की समजावं, प्रवासाचा शेवट भांडणाने होणार आहे. २. रिक्षास्टँडवर गोर्‍या पाहूण्यांसमोर रिक्षावाल्याशी हुज्जत घातली की "यासाठीच का (शिवाजी) महाराज लढले होते", अशा टाईपचं 'लूटमारी'चं बकवास समर्थन ऐकायला मिळणार आहे. ३. "आयुकाला येणार का?" या प्रश्नावर काय आयुका, कुठे आयुका हे माहिती नसताना ४० रुपये होतील असं उत्तर येणार. आपण मनात ठरवावं की याने झिगझिग केली नाही तर ५० रुपयेही द्यायला हरकत नाही, तर त्याने आत पोहोचल्यावर ७५ ची मागणी करावी. ४. अशा माजोर्ड्यांपैकी काही रिक्षावाल्यांच्या रिक्षा जेवढ्या वेगात सरळ दिशेत हलतात त्यापेक्षा जास्त (अँग्युलर) गतीने उभ्या दिशेतही हलतात. डोंबिवलीला एका रिक्षात बसले होते आणि रिक्षाचा आवाजच नाही! मी खोदून विचारलं तेव्हा चालकाने सांगितलं, रिक्षा नवीन आहे. म्हणजे बाकीच्या रिक्षावाल्यांना किती प्रेम असतं त्या बापड्या वहानावर ते समजलं. पण थोड्या रिक्षाप्रवासानंतरचा माझा ठोकताळा, दिवसाउजेडी किमान अर्धेतरी रिक्षावाले माणसासारखे बोलतात. रात्र झाली की त्यांच्या अंगात येत असावं. काही रिक्षावाले हे मुहूर्त न मानणार्‍या प्रकारातले असल्यामुळे दिवस-रात्र कसलीही पर्वा न करता, आपण रिक्षा चालवतो म्हणजे अगदी देशच चालवतो अशाच आविर्भावात असतात. अवांतरः काही व्यवच्छेदक लक्षणं वाचून मराठी विरुद्ध बिगरमराठी रिक्षावाले असा वाद उफाळून येऊ नये अशी छोटीशी अपेक्षा! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by आनंदयात्री

दवबिन्दु 03/05/2009 - 08:22
मुंबईतल्या रिक्षावाल्यांचा चांगला अनुभव आहे. चान्गल वागतात कारन शाप आहे, B.E.S.T. खरोखर ब्येस आहे, रिक्शाने संप क्येला तर B.E.S.T. लगेच जादा गाड्या रस्त्यावर काडते. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

In reply to by दवबिन्दु

खरंय. मुंबईतले रिक्षावाले खरंच सौजन्यपुतळेच म्हणायला हवेत असे अनुभव बाहेर येतात. बाकी डॉन्या, खणखणीत लेख एकदम. मजा आली.

डॉन्याने उत्तमपणे लेख लिहिला आहे. अदिती आणि आंदोबाशी सहमत. रिक्षावाल्यांमधे काही फरक पडेल असे वाटत नाही. त्यांना पब्लिकची नस बरोबर माहित आहे. मला यावेळी पुण्यात दोन रिक्षावाल्यांनी 'निंबाळकर तालिम' एवढा सुप्रसिद्ध लँडमार्क सांगूनसुद्धा दोन्ही वेळेला मस्त फिरवले. नेमक्या जागी सोडलंच नाही. अवांतर: मुंबईत तुलनेने परिस्थिती बरी आहे. इथे मात्र बाहेरचे आणि मराठी असे दोन्ही चालक नीटच वागतात. याला काही प्रमाणात जनतेचा वचक आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण दोन्ही कारणीभूत आहे असे वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी 05/05/2009 - 15:42
इथे मात्र बाहेरचे आणि मराठी असे दोन्ही चालक नीटच वागतात. याला काही प्रमाणात जनतेचा वचक आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण दोन्ही कारणीभूत आहे असे वाटते. रिक्षावाल्याने माज दाखवला की त्याला तिथल्यातिथे खणखणीत कानाखाली वाजवणारे लोकं आहेत अजून मुंबईत आणि ट्रॅफिक पोलीसही दांडूका घेऊन उभे असतात म्हणून रिक्षावाले नीट वागतात.

अभिज्ञ 02/05/2009 - 23:12
डॉनराव, लेख एकांगी वाटला. मला हे एक वाक्य फार आवडले. एक रुपयाने काय फरक पडतो? मला वाटते कि रिक्षावाले हि हेच म्हणत असतील कि एक रुपायाने काय फरक पडतो? असो. सविस्तर प्रतिसाद सवडिने देतो. :) -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

छोटा डॉन 02/05/2009 - 23:57
सर्वात प्रथम लेख एकांगी वाटण्याबद्दल, तो वाटु शकतो. माझी ह्याला हरकत नाही/नसणार. लेख लिहताना "एक बाजु" घेऊन विचार केला की लिहणे मुद्देसुद होते म्हणुन मी फक्त रिक्षावाल्यांच्या "विरोधात" विचार केल्याने लेख एकांगी वाटु शकतो. मात्र मला ह्या उद्दाम रिक्षावाल्यांबद्दल काडीची आत्मियता वाटत नसल्याने मला काही फरक पडेल असे वाटत नाही ... >>एक रुपायाने काय फरक पडतो? छे छे, मुद्दा कधीही "फक्त १ रुपया" ह्याचा नव्हता ? अहो दर भाड्यामागे सरासरी १० रु. जास्त कमावणार्‍यांना १ रुपयाची किंमत ती काय ? आमचे मत "म्हातारी मेली तरी हरकत नाही पण काळ सोकायला नको" असे असल्याने आम्ही ह्या "मात्र १ रुपया"च्या मागे लेख वगैरे लिहला ... हे झाले "१ रुपया"चे समर्थन ... आता बोलु "फरक काय पडतो ? " ह्या मानसिकतेबद्दल ... एकुण अंदाजे किती वर्षे आपण लोक "फरक काय पडतो?" ही हतभागी, निराश, बेफिकीर आणि पराभुत मानसीकता घेऊन जगणार आहोत ह्याचा एकदा व्यापक अभ्यास व्हायला हवा. पब्लिकला काही सिरीयस वाटतच नाही, फरकच पडत नाही ... "फरक पडायला हवा" ह्या विचारातुन शोध लागले, क्रांत्या झाल्या, देश स्वतंत्र झाके, अनेक सत्ता उलथल्या गेल्या, प्रगती झाली हे सर्व असताना "फरक काय पडतो" हे वाक्य खरोखर संतापजनक आहे ... प्रश्न १ रुपयाचा मुळीच नाही, ह्या "ऍडजस्ट" करणार्‍या मानसिकतेचा आहे, आमचा विरोध त्यालाच आहे ... आज जर तुम्हाला १ रुपयाचा फरक पडत नसेल तर भविष्यात होणार्‍या कसल्याही समप्रतीच्या अन्याय अथवा असमान वाटणीचा "फरक तुम्हाला पडणे अपेक्षीत नाही" हे सरळ आहे. काही बेसीक गोष्टीं आणि सुविधांच्या बाबत आपण "नो टॉलरंस" ऍटीट्युड कधी ठेवणार आहोत हे देव जाणे ... अभिज्ञसाहेबा, हा रोख आपल्यावर नाही तर विषय निघाला म्हणुन बोलुन घेतले ... बाकी आपल्या "सविस्तर" प्रतिसादाची वाट पहातो आहे ... वैयक्तिक विचारशील तर माझा "फरक काय पडतो" ह्या पॉलिसीला "झिरो टॉलरंस विरोध" आहे. माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीचा फरक जरुर पडतो, ज्या गोष्टीचा फरक पडणार नाही अशी गोष्ट ह्या माझ्यापुरत्या विश्वात अस्तित्वात नाही. .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्राजु 02/05/2009 - 23:50
अगदी प्रत्येक अक्षरातून खणान् खण आवाज येत आहे. :) रिक्षावाले या विषयांवर पीएच डी होऊ शकते. (आदितीने उगाचच दुर्बिणक्षेत्रात पीएच डी केली... छ्या!! चांगला विषय हातचा गमावला!) ;) डॉन राव, आपली निरिक्षणे आणि त्यावरचे निष्कर्ष यावर दाद द्यायला हवी. पुण्यात तसा रिक्षाने खूप फिरण्याचा योग नाही आला. पण जितक्या वेळेला हिंडले तेव्हा, संमिश्र अनुभव आला. कुमठेकर रोड, तुळशी बाग, मंडई या भागातून संध्याकाळी ६ नंतर रिक्षावाले कोथरूड, कर्वेनगर या भागात यायला अजिबात तयार होत नाहीत. एखादा झालाच तर ५ रूपये (४ वर्षापूर्वी) जास्ती मागायचा. आपली रिक्षा नसून, आपले चार्टर प्लेन आहे आणि त्यात बसलेला प्रवासी हक्काने लुबाडण्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत (छे!! खात्रीच असते). त्यातही तुम्ही पहाटे, किंवा रात्री उशिरा बसलात रिक्षात तर, त्यावर सुवर्णवर्ख दिल्याप्रमाणे ते अगदी व्यवस्थित गोड बोलून लुटतात. आणि लुटायाचे असते म्हणून की काय, राजकारण, समाजकारण,.. बॉम्बस्फोट असल्या विषयांवर गप्पाही ठोकतात. एकदा मी, रिक्षातून बसून घरी जात होते. रिक्षावाला का कोण जाणे बराच कातावलेला वाटत होता. त्यातही रोड खणलेलेच ठेवण्याची शपथ्थ घेतलेल्या पुण्यात, तो कर्वेरोड सारख्या नियमीत उकरून ठेवलेल्या रोड वरून निघाला होता. रिक्षामध्ये हॉर्न सोडून सगळं वाजत होतं. तरीही "च्यामारी, या म्युन्सिपाल्टीच्या..********* घातली लाथ, कशाला र्‍हायचं असल्या श्येरात(शहरात)?? मुक्त संचार (बहुतेक कुठल्या भाषणात हा शब्द ऐकला असावा त्याने) असता तर कध्धीच आम्मी आट्रुलिया {(ऑस्ट्रेलिया), हाच देश का निवडला त्याने देव जाणे!!)} ला निघून गेलो असतो.. " इ. मुक्ताफळे शिंपडायला चालू केली. खूप इच्छा झाली होती त्याला सांगायची की, बाबारे, तुझ्या रिक्षातले खणखण्णारे आवाज बंद कर, मला घरी सोड आणि मग ऑट्रुलिया ला जा"... असो. हा विषय न संपणारा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

डॉनभाउ लेख मस्तच जमला आहे. आता पुण्यात मला पण एक दोन वेळा असा अनुभव आला आहे. प्राजुतै मी करतो आहे हो सध्या ह्या विषयात पी एच डि ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर.

देवदत्त 03/05/2009 - 00:05
अरे वा, माझे दोन मुद्देही (किंवा प्रश्न) ह्यात सविस्तर आले आहेत. :) रिक्षा पंचायतीचे म्हणायचे तर ठाण्यातील रिक्षा युनियन वाल्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, ग्राहकाला काही तक्रार असेल तर ती वाहतूक पोलिसाकडे करायची. रिक्षा युनियन फक्त रिक्षा चालकांच्या तक्रारींवर लक्ष देते. बाकी, तुमचे सर्व मुद्दे सडेतोड आहेत :)

भाग्यश्री 03/05/2009 - 01:36
खरं सांगायचे तर मला रिक्षावाल्यांचा एखाद दुसरा सोडला तर वाईट अनुभव नाही.. हा, तुळशीबागेतून रात्री कर्वेरोडला यायला फारसं कोणीच तयार नसायचे हा मात्र अनुभव बर्‍याचदा आला.. हे असं का? माहीत नाही! काही चालक माजोरडेपणाचा क्लास काढता येईल इतके मुजोर असतात , असंही का, माहीत नाही! :) कसला माज देवाला ठाऊक! पण एकंदरीत उठ-सुठ संप करण्याबद्द्ल माझाही विरोध.. माझी दुचाकी नसताना रिक्शा हाच एक आधार असायचा.. बस हा पर्याय उत्तम असूनही कधी वाटेला गेले नाही.. त्यामुळे माझ्यासारखे अजुन कोणी असतील तर त्यांची गैरसोय अगदी नक्कीच झाली असणार! लेख उत्तम! :) www.bhagyashree.co.cc

गणा मास्तर 03/05/2009 - 06:39
१. रिक्षाचालकांचे नेत्तृत्व करणारी मंडळी नालायक आहेत. मी बाबा आढाव(की आघाव) या माणसाला रिक्षाचालकांचा एक मुजोर नेता असेच समजत होतो. त्यांचे कष्टकरी हमाल यासंबधीचे काम याविषयी नंतर माहिती झाली. अर्थात त्यांच्या जागी दुसरा कोणीही असता तरी असाच वागला असता, पण तथाकथित समाजवादी नेत्याचे सामान्य जनतेची कदर न करणारे विचार झेपत नाहीत. २. पिंपरी चिंचवड परिसरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियम करुन देखिल रि़क्षा मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. भाडेकपात रद्द झाली तर हे साले तिथे मीटरप्रमाणे भाडे घेणार काय? ३. या सर्वाच्या मुळाशी आपली सडकी सार्वजनिक परिवहन व्यवस्था आहे. राजकीय नेतॄत्वाचा अदूरदर्शीपणा, सामान्य जनतेची मतदानाचे कर्तव्य बजावण्यातली अनास्था ह्या सगळ्याच गोष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहेत. धन्य ते तोक्योतले महभाग ज्यांनी १९२७ साली मेट्रो चालु केली. इथेही प्रचंड भ्रष्टाचार चालतो, पण जनतेचे हित आणि कामाचा दर्जा याबाबत तडजोड होत नाही. समाजसेवाच करायची होती तर,२८ गाडया बाळगणार्‍या डीएसकेंनी २५ गाडया स्वारगेट ते शिवाजीनगर सोडायला हरकत नव्हती,:D पुण्यातल्या कुठल्याही राजकीय पक्षाने यावर मतप्रदर्शन केल्याचे दिसले नाही.निवडणुक झाली आता पाच वर्षांनी पाहु असाच सार्‍यांचा विचार दिसतो. ४.प्राधिकरणात बिग इंडिया ते निगडी ह्या २.४ किलोमीटर अंतरासाठी रिक्षावाले १५ रुपये घ्यायचे. रात्री अपरात्री नवख्याकडुन तर जास्तच.. पण नव्या पीएमपीएलने निगडी ते आकुर्डी रेल्वे स्टेशन अशी शटल बससेवा दर १० मिनिटाच्या वारंवारतेने चालु केल्यापासुन आम्ही फक्त ३ रुपयात घरी जातो. आता रिक्षावाले हात चोळत बसले आहेत. एक रिक्षास्टॅन्ड चक्क बंद पडला. पीएमपीएलने अशी सेवा सर्वत्र द्यावी. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

सहज 03/05/2009 - 07:19
वरील बर्‍याच प्रतिक्रियांशी सहमत. एकंदर मोठा चर्चेचा विषय आहे. पुण्याची सार्वजनीक वाहतूक न सुधारण्यात राजकीय पक्षांचे हित असावे असाच निष्कर्ष निघतो आहे असे वाटते. नुकत्याच झालेल्या पुणेप्रवासात रिक्षाने फिरायची अनेकदा वेळ आली. ह्यावेळी फारसा वाईट अनुभव आला नाही हेही नमूद करावेसे वाटते.

जृंभणश्वान 03/05/2009 - 07:30
मस्तच आहे लेख. मला एकाआड एक चांगले/वाईट अजुभव येतात रिक्षावाल्यांचे त्यामुळे कधी वाटते मिळुदे बिचारर्‍यांना एखादा रुपया जास्त कधी वाटते माजलेत लगेच संप.

डॉन्या छान ल्हिहितोस रे तु. सहमत. जेंव्हा जेंव्हा पुण्यात गेलो तेंव्हा नेहेमी रिक्षावाल्याने लुटले नाही असे झालेच नाही अगदी गंजलेल्या रिक्षात बसलो तरी सुद्धा.

कलंत्री 03/05/2009 - 09:08
तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात अनांगोदी, इतरांना लुटण्याची हौसच चालु आहे असे दिसत आहे. शिक्षणक्षेत्र, वैद्यकियसेवा, बाजारपेठा असे सांगता येईल. तोच नियम रिक्षावाल्यानाही लागु पडतो. सर्वसामान्य भाववाढ आणि महागाई याचा विचार केला तर यातुन सर्वमान्य तोडगा निघायला हवा. एकदम संप हाही मार्ग अतिरेकी वाटतो.

03/05/2009 - 16:26
डानराव सुरेख लेख! आता खरंतर प्रवाशांनीच संप केला पाहिजे. म्हणजे आपल्याला कितीही घाई असली तरी रिक्षा करायची नाही. वेळ लागला तरी चालेल पण रिक्षात बसणार नाही अशी काहीशी भूमिका घेतल्यास " अहो तुम्ही द्याल ते घेईन हो पण बसा गाडीत" असं रिक्षावाले म्हणतील! छे: अशी स्वप्नं देखील पाहणं म्हणजे ते कायसं दिवास्वप्न का काय म्हणतात तसं होईल!!!

शितल 03/05/2009 - 18:16
डॉन्या, मस्त मीटर पाडुन लेखणी चालवली आहे. :) पुण्यातील रिक्षावाले ह्यांना माजोरी आहेत हे मात्र नक्की.

अभिज्ञ 03/05/2009 - 23:49
संपुर्ण लेख वाचल्यावर माझ्यापुढे रिक्षावाला म्हणजे एक अत्यंत श्रीमंत, ज्याने रिक्षा चालवून पाच सहा बंगले बांधले आहेत व त्या श्रीमंतीच्या जोरावर तो माज करत सामान्य लोकांशी अत्यंत मस्तवाल पणे वागणारा मनुष्य अशी एक प्रतिमा उभी राहिली. बहुतांश प्रतिसादकर्त्यांचा रोख हा रिक्षावाल्यांच्या माजोरडेपणावर आहे.किंबहुना लेखकाचा मुद्दा हि सरसकट हाच वाटला. मला वाटत मुद्दा हा रिक्षा भाडे कपात व त्याला विरोध म्हणून रिक्षावाल्यांनी पुकारलेला संप एवढाच आहे. रिक्षावाले माजोरडे असतात,रिक्षा सुमार दर्ज्याच्या असतात,हि काहि विधाने इथे (संपाच्या असमर्थानाकरिता) अनाकलनीय वाटली. रिक्षावाले बरोबर आहेत किंवा चुक आहेत हा भाग वेगळा आहे. मुळ लेखात फ़क्त रिक्षावाले चुक आहेत एवढ्याच भावनेने लिहिलेले दिसते. त्या अनुषंगाने माझे काहि मुद्दे इथे मांडू इच्छितो. मुळात रिक्षा हे पीएमटी वा तत्सम महानगर पालिके पुरस्कृत वाहन आहे काय? नसावे. जरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे रिक्षाचे दरभाडे ठरवत असले तरी तिथे पीएमटी सारखी तिकिटाची व्यवस्था नाहि.उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो. आता हा व्यवहार दोघातच होत असल्याने वेळ, पुरवठा, मागणी अन तुमची आगतिकता ह्यावर उतारू व रिक्षावाला दोघेहि संधीचा फ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात.ब-याच वेळा मीटरपेक्षा जास्त भाडे आकारून हा व्यवहार होतो. रिक्षावाले हे ब-याच वेळा अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. हे सुध्दा वर म्हंटल्याप्रमाणे ब-याचश्या गोष्टींवर अवलंबुन असते. जसे बाजारात एखादे दिवस पापलेटची आवक कमी झाली कि लगेच त्याचे भाव वाढतात. पुरवठा कमी व मागणी वाढली कि आपोआप हे प्रकार घडतातच. रिक्षावाला हा अत्यंत माजोरडा इसम असतो असे एका प्रतिसादातून ध्वनीत झाले. मुळात रिक्षा हि कोण चालवते? समाजातला उच्चभ्रु वर्ग ह्या भानगडीत नसतो. बहुतांश रिक्षावाले हे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीयांमधून किंवा लोअर इनकम ग्रुप मधून आलेले असतात. शिक्षण पुर्ण न झालेले, किंवा नोकरी न मिळालेले वा अंगात पोट भरण्याकरीता दुसरी कुठलीहि कला नसलेले लोक इथे सापडतात. त्यामुळे तिथे काहि अवगुण हे असणारच व आहेत. एका रिक्षावाल्याचे दिवसाचे उत्पन्न किती असावे? तर सरासरी हे उत्पन्न दिवसाला २५० ते ३०० रुपये एवढेच असते. बहुतांश रिक्षा चालवणारे हे निव्वळ चालक असतात, रिक्षाचा मालक वेगळाच असतो. दिवसाला १५०-२०० रु ह्या दराने हि रिक्षा चालवायला दिलेली असते. हे २०० रु व उत्पन्न २५० रु धरले तर रिक्षा चालकाला बाकिचा चहा पाण्याचा खर्च,इंधनाचा खर्च व इतर खर्च वगळता दिवसाला किमान ७०० रु चा धंदा करावा लागतो. आता हे टारगेट पुर्ण करायला त्याला कधी कधी दिवसातले १२ ते १४ तास खर्ची घालावे लागतात. त्यातहि पुन्हा प्रचंड ट्रफ़िक आली, खणलेले रस्ते आले, इंधन भरण्याकरीता लागलेल्या रांगा आल्या.,पोलिसी त्रास आला. मग सहाजिकच ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे रिक्षावाले हे इझी मनीचा मार्ग स्वीकारतात. कुणाला बस पकडायची असते,कुणाला ट्रेन चुकवायची नसते,फ़्लाईट मिस करून तर चालणारच नसते, मग अशा वेळि मीटर गेला खड्यात,रिक्षावाल्याशी डायरेक्ट भाव केला जातो. रिक्षावाल्यांचा अजून एक मुद्दा म्हणजे इनसेक्युरिटि. आपल्या सारखे हेल्थ इंन्श्युरन्स, पी एफ़,ग्रेट्युइटी ह्या भानगडी ह्या लोकांना लागू होत नाहीत. क्रेडिट कार्ड,होम लोन सारखे प्रकार हि ह्यांना कोणी देत नाही. आधीच उच्च विद्याविभुषित लोकांना मिळणारे "कार्पोरेट ट्रेनिंग" ह्याना मिळत नसते. दिवसातले १२ ते १४ तास राबून म्हणावा तसा पैसा मिळत नाहि. आधीच दिशा नसलेले आयुष्य मग आणीक कूठेतरी भरकटते.दारु ,लॊटरी तत्सम प्रकारचि व्यसने सुरु होतात. मला वाटते ह्या सर्वाचा परिणाम हा मीटर टेम्परींग,अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, असा कुठेसा होत असावा. इझी मनी. आता प्रश्न आहे एक रुपायाचा, रिक्षा चे भाडेदर प्रति किमी १ रुपयाने कमी करावे असा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे. त्याचे मुख्य कारण असे आहे कि इंधनाचे दर हे कमी झालेले आहेत. सकृतदर्शनी हे कारण योग्य असले तरी मला काहि मुद्दे मांडावेसे वाटतात. पेट्रोल डिझेल गॆस ह्यांचे भाव कमी झाल्यानंतर देखील १.पीएमटी वा बहुतांश सरकारी वाहनांच्या भाडयात त्या प्रमाणात कपात झालेली नाहि. २.महागाइचा दर शुन्य टक्क्याच्या आसपास येउन देखील बाजारात वस्तुंच्या वाढलेल्या दरात फ़ारशी घट झालेली नाहि. ३.महागाईचा दर शुन्य टक्क्याच्या आसपास येउन देखील, सरकारने कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात कपात केलेली नाहि. ४.मुलभुत सुविधा (जसे इंधन) स्वस्त झाल्याने कुठल्याहि उद्योग धंद्याने आपल्या प्रॊडक्टचे दर कमी केलेले नाहीत. ५.होटेल उद्योगात कुठल्याहि डिशचे भाव ह्या इंधन स्वस्ताई मुळे कमी झालेले दिसत नाहित. ६.कुठल्याहि हॊस्पिटलने आमचा महिन्याचा जनरेटरचा खर्च डिझेल स्वस्त झाल्याने कमी झालाय म्हणून दर कमी केलेत? अशी अनेक उदाहरणॆ आहेत. मग हा एक रुपाया रिक्षावाल्यांच्या बाबतीच का इतका प्राईम ठरावा ह्याचे गणित मला कळालेले नाहि. मुळात आपल्या पैकी किती लोक रेग्युलर रिक्षा वापरतात? रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल? जागतिक मंदिमुळे बहुतांश कंपन्या आता वेतन कमी करत आहेत,वा त्या मार्गावर आहेत. १० ते १५% वेतन कपात संभावित आहे. हे होणे कुठल्याहि नोकरदार माणसाला मनापासून पसंत नाहि. तरी देखील तो १०% कमी वेतनात ब-यापैकी निभावून जाउ शकतो. परंतु हा घटलेला एक रुपाया कदाचित रिक्षावाल्यांचे उत्पन्न २०% पर्यंत कमी करतो .आधीच आवक कमी असलेल्या ह्या उत्पन्न गटाला हा भार मोठा आहे,अन शेवटि ह्याची परिणीती तो भार ग्राहकांनाच कळत नकळत उचलावा लागणार. मला वाटते कि ह्या सर्व मुद्यांचा लेखकाने व इतरांनी जरूर विचार करावा. जाता जाता. रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? गरज कुणाला आहे ? ह्याच चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन, पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे जस्टिफाईड आहे का ? हे वाक्य टाळ्या घेण्यासारखे असले तरी मला वाटते कि इथे लेखकाने विचारलेला प्रश्न व दिलेली काहि उदाहरणे प्रचंड असंबध्द व विसंगत वाटली. असो. अभिज्ञ. (डॉनराव्,वैयक्तिक न घेणे. अर्थात आपल्याला सांगायची गरज नाहिच म्हणा. :)) -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

अनामिक 04/05/2009 - 00:46
माझ्याही मनात असंच काहीसं होतं, पण एकत्रीतपणे मांडायला जमलंच नाही (कारणे- आमचं लेखण कौशल्य आणि वेळे आभावी), पण अभिज्ञची प्रतिक्रिया वाचली आणि वाटलं आपल्याला हेच तर म्हणायचं होतं. रिक्षावाल्यांची भाषा, अरेरावी, ग्राहकाला दिलेली वागणूक हा भाग वगळता त्यांच्या भाड्यात (१रु./ किमी) झालेली कपात बर्‍याच अंशी पटली नाही. (बहुतांशी) खालच्या वर्गातून आलेल्या रिक्षाचालकांचं पोट रोजगारावर अवलंबून असताना आणि दररोजच्या मुलभूत गरजांचे (रोटी-कपडा) दर कोणत्याच प्रकारे कमी झालेले नसताना, रिक्षाचालकांच्या भाड्यात अशी दर कपात करणे पटत नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या जलद केलेल्या मीटरचं, मीटरच्या वर घेण्यात येणार्‍या पैश्यांच, रिक्षाच्या अस्वच्छतेचं, वापरण्यात येणार्‍या चुकीच्या इंधनाचं, नशेत असलेल्या रिक्षावाल्यांचं समर्थन करतोय. ते सगळं चूक आहेच, अशावेळी आपली गौरसोय झालीच तर आपण (बहुतेक) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे किंवा योग्य ठिकाणी त्यांची तक्रार करावी. ग्राहकानेसुद्धा आपल्या अनुभवातून शिकून रिक्षात बसायच्या आधीच योग्य ती बोलणी करावी.... मी पुण्यात जवळ जवळ दोन वर्षे होतो (६-७ वर्षांपुर्वी), एक दोन वाईट अनुभवही आलेत, पण आपण स्वतः दक्षता घेतल्यास असे वाईट अनुभवही टाळता येतात. काहीवेळा आपले ठिकाण रिक्षावाल्याला माहीत नसते, तेव्हा ते काहीतरी भाडं सांगतात.... आपणही कमी सांगीतलं म्हणून खूश होतो... आणि पोचल्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी वाद घातला की आपणही चिडतो.... पण त्यांनी कमी भाडं सांगीतलं तेव्हाच त्यांना "नाही बाबा, बाकीचे ४० नाही ५०रु. घेतात, तेव्हा तू तेवढेच घे, पण तिथे गेल्यावर वाद घालू नको" असे सांगतो का?.... तर नाही, कारण आपल्यालाही आपले १० रु. वाचवायचे असतात. अजून एक - वरच्या लेखात "गरज कोणाला आहे?" हा प्रश्न आलाय... तर गरज इथे ग्राहक आणि रिक्षावाला दोघांनाही आहे.... रिक्षावाल्याला पैश्याची तर ग्राहकाला नियोजीत ठिकाणी वेळेत पोचण्याची. बाकीच्या उदाहरणातल्यांशी (जसे भिकारी, अन्नछत्रातले यात्रेकरू, भंगारवाला) ही तुलना पटत नाही. आज इंधनाचे भाव कमी झालेत म्हणून रिक्षाभाडे कमी करा म्हणतोय... पण आपली पगारवाढ झाली तर आपण घरातल्या कामवालीचा, स्वयंपाकवाल्या बाईंचा पगार वाढवतो का? किंवा आजच्या रेसेशन मधे तुमचा पगार १०% नी कमी झाला तर कामवाली बाई ५००रु ऐवजी ४५०रु घेईल का? दोन्हीची उत्तरे नाही अशीच आहेत, तेव्हा इंधन दर कपातीचा बोजा फक्तं रिक्षावाल्यांनीच उचलावा हे पटत नाही. पाठीवर मारा (रिक्षाचालकांसाठी इतर कडक नियम करुन), पोटावर का मारताय? -अनामिक

In reply to by अभिज्ञ

छोटा डॉन 04/05/2009 - 12:05
संपुर्ण लेख वाचल्यावर माझ्यापुढे रिक्षावाला म्हणजे एक अत्यंत श्रीमंत, ज्याने रिक्षा चालवून पाच सहा बंगले बांधले आहेत व त्या श्रीमंतीच्या जोरावर तो माज करत सामान्य लोकांशी अत्यंत मस्तवाल पणे वागणारा मनुष्य अशी एक प्रतिमा उभी राहिली.
=)) अगदी स्पष्ट असहमत ... कदाचित आपण "उपहास" म्हणुन म्हणत असाल तर मान्य दाद देतो. मात्र हा लेख लिहताना आम्ही आत्तापर्यंत पाहिलेला " कनिष्ठ मध्यमवर्ग अथवा त्याखालच्या वर्गातुन आलेला, शिक्षण जास्त न झालेला व इतर कोणते व्यव्सायीक कौशल्य ज्ञात नसलेला व म्हणुनच रिक्षा चालवुन आपले पोट भरु इच्छिणारा" असा प्रामाणिक रिक्षावाला अशी कल्पना मनात ठेऊन हा लेख लिहला ... माणसाला जर वस्तुस्थीतीची संपुर्ण कल्पना असेल व त्यानंतर सुद्धा वागण्यात जो मस्तवालपणा येतो त्याला "गर्व अथवा मस्ती" म्हणतात ... उदा : श्रीमंत बापाची वाया गेलेली पोरे ... पण जर मुळात काही नसेल आणि माणुस फुकाचा मस्तवालपणा करत असेल तर त्याला "माज" म्हणतात. ... उदा : रिक्षावाले, मजुर वर्ग वगैरे ...
बहुतांश प्रतिसादकर्त्यांचा रोख हा रिक्षावाल्यांच्या माजोरडेपणावर आहे.किंबहुना लेखकाचा मुद्दा हि सरसकट हाच वाटला.
अर्धसत्य .... माझा बहुतांशी रोख रिक्षावाल्यांचा "अनावश्यक, अनवॉरंटेड, अनजस्टिफाईड, अतार्किक" अशा मस्ती आणि माजोरडेपणावर आहे.मी अवतरणचिन्हात वापरलेले शब्द टाकुन माझ्यामते मी सांगत असलेल्या माजोरडेपणाची व्याख्या होऊ शकत नाही ... असो, माझा मुद्दा हा रिक्षावाल्यांचा "अनावश्यक, अनवॉरंटेड, अनजस्टिफाईड, अतार्किक" माजोरडेपणा हाच आहे/असणार.
मला वाटत मुद्दा हा रिक्षा भाडे कपात व त्याला विरोध म्हणून रिक्षावाल्यांनी पुकारलेला संप एवढाच आहे.
नाही, झालेल्या न्याय्य अथवा अन्याय्य म्हणा दरकपातीच्या विरोधात रिक्षावाल्यांनी ज्यांच्यावर त्यांचे पोट अवलंबुन आले अशा ग्राहकांना वेढीला धरुन पुकारलेल्या "अनजस्टिफाईड आणि अवानश्यक" संपाला मला करावा वाटलेला विरोध हा मुद्दा आहे ...
रिक्षावाले माजोरडे असतात,रिक्षा सुमार दर्ज्याच्या असतात,हि काहि विधाने इथे (संपाच्या असमर्थानाकरिता) अनाकलनीय वाटली.
आपली गल्लत होते आहे, मी असे केव्हाही म्हणलो नाही ... "सुमार" वगैरे तर विनोद होते कोटी करुन केलेले, सबब हा मुद्दा अमान्य ...
रिक्षावाले बरोबर आहेत किंवा चुक आहेत हा भाग वेगळा आहे. मुळ लेखात फ़क्त रिक्षावाले चुक आहेत एवढ्याच भावनेने लिहिलेले दिसते.
पुन्हा अर्धसत्य. मी इथे रिक्षावाल्यांचे संपाशी निगडीत आडवणुक करणारे मुजोर वागणे हे "चुक" आहेच असे स्पष्ट म्हणतो, मी ते "बरोबर" आहे असे म्हटलो नाही/म्हणणार नाही ... कदाचित त्यांचा दरकपातीला विरोध हे म्हणणे न्याय्य असेल पण त्यासाठी उचलेले संपाचे हत्यार हे "नामंजुर" आहे ...
उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो.
करेक्ट ... व्यवहार : जेव्हा ग्राहक आणि विक्रेता ह्यांच्यात योग्य बोलाचाली होऊन अन्याय न होता अथवा अडवणुक न होता दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य दाम ठरवला जाऊन जेव्हा ग्राहक आणि विक्रेता ह्या दोघांचेही समाधान होते ह्याला अर्थशात्राच्या भाषेत "व्यवहार" म्हणातात ... पण जेव्हा ह्यातुन "आडवणुक होउन, अवाजावी दाम, अर्वाच्च भाषेत दिली जाणारी प्रवाश्यांना वागणुक, ग्राहकावर अन्याय" वगैरे गोष्टी येतात तेव्हा ह्याच व्य्वहाराला समाजशास्त्र "लुट अथवा लुबाडणे" असे व्याख्येत बसवते .... आमचे रोख ह्यावरच आहे, असण्यास प्रत्यवाय नसावा ....
आता हा व्यवहार दोघातच होत असल्याने वेळ, पुरवठा, मागणी अन तुमची आगतिकता ह्यावर उतारू व रिक्षावाला दोघेहि संधीचा फ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात.ब-याच वेळा मीटरपेक्षा जास्त भाडे आकारून हा व्यवहार होतो.
ग्राहक कसा काय फायदा घेईल बॉ ? म्हणजे रिक्षावाला रिकामा बसला आहे हे गॄहीत धरुन संधीचा फायदा म्हणुन रिक्षावाल्याने ५० रुपयाचे भाडे ३० रुपयात न्हेणेप्रॅक्टिकली शक्य आहे का ? हे तर धंद्याच्या तत्वांच्या विरोधात आहे ...
रिक्षावाले हे ब-याच वेळा अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. हे सुध्दा वर म्हंटल्याप्रमाणे ब-याचश्या गोष्टींवर अवलंबुन असते.
जाऊ देत, ह्या मुद्द्यावर बरेच लिहण्यासारखे आहे ... तरी "अवलंबुन" हा शब्द मी मान्य करुन आपला मुद्दा मान्य करतो ...
बहुतांश रिक्षावाले हे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीयांमधून किंवा लोअर इनकम ग्रुप मधून आलेले असतात. शिक्षण पुर्ण न झालेले, किंवा नोकरी न मिळालेले वा अंगात पोट भरण्याकरीता दुसरी कुठलीहि कला नसलेले लोक इथे सापडतात. त्यामुळे तिथे काहि अवगुण हे असणारच व आहेत.
अजिबात शक्य नाही. हा मुद्दा होऊच कसा शकतो ? त्यांचे "अवगुणांचे" जरी जस्टीफिकेशन केले नाही तरी त्यांना "त्यासकट" सिकारा असे मतप्रदर्शन आणि त्याचे समर्थन होऊच कसे शकते ... अरे एवढी अवगुणांची चरबी चढत आहे तर रिक्षा टाका आणि हत्यारे घेउन गुंडागर्दीत शिरा ना ... मग ह्याच वर्गातुन आलेल्या "पेपरवाले, चहावाले, टपरीवाले, पंक्चरवाले, भाजीवाले ... इ.इ. " अगणिक व्यवसायिकांनी काय "चांगुलपणाचा" ठेका घेतला आहे का ? का जो ह्या वर्गातुन रिक्षा चालवायला जातो त्याकडेच हे अवगुण जातात ... लोअर इनकम ग्रुपमधुन आला म्हणुन अवगुणांचे समर्थन होऊ शकत नाही, करणे हा माझ्यामते "सामाजिक अपराध" पकडायला हरकत नसावी ...
त्यातहि पुन्हा प्रचंड ट्रफ़िक आली, खणलेले रस्ते आले, इंधन भरण्याकरीता लागलेल्या रांगा आल्या.,पोलिसी त्रास आला. मग सहाजिकच ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे रिक्षावाले हे इझी मनीचा मार्ग स्वीकारतात.
मान्य ...!!!! पण आपण जेव्हा एखादा व्यवसाय स्विकारतो तेव्हा त्याबरोबर येणार्‍या गोष्टी स्विकारु नयेत काय ? शिवाय आपण जे म्हणाता ते मान्य जरी केले तरी "जस्टिफिकेशन"चा प्रश्न आहे तिथेच राहतो, त्याचे काय ????
रिक्षावाल्यांचा अजून एक मुद्दा म्हणजे इनसेक्युरिटि. आपल्या सारखे हेल्थ इंन्श्युरन्स, पी एफ़,ग्रेट्युइटी ह्या भानगडी ह्या लोकांना लागू होत नाहीत. क्रेडिट कार्ड,होम लोन सारखे प्रकार हि ह्यांना कोणी देत नाही. आधीच उच्च विद्याविभुषित लोकांना मिळणारे "कार्पोरेट ट्रेनिंग" ह्याना मिळत नसते.
ह्यात दोष कुणाचा ? वर आम्ही "पंचायतीला" कशासाठी हाणले आहे ? ही त्यांची जबाबदारी नाही का ?
दिशा नसलेले आयुष्य मग आणीक कूठेतरी भरकटते.दारु ,लॊटरी तत्सम प्रकारचि व्यसने सुरु होतात. मला वाटते ह्या सर्वाचा परिणाम हा मीटर टेम्परींग,अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, असा कुठेसा होत असावा.
तर्क जरी मान्य केला तरी मनाला हा मार्ग पटत नाही.... असो.
मग हा एक रुपाया रिक्षावाल्यांच्या बाबतीच का इतका प्राईम ठरावा ह्याचे गणित मला कळालेले नाहि.
हो, कारण मुळात पुण्यात रिक्षाचे दर "अव्वाच्या सव्वा" आहेत ... जर तुम्ही बेंगलोर अथवा चेन्नईशी तुलना करत असाल तर पुण्यातील रिक्षा हे खरोखर महाग प्रकरण आहे ... तुलनात्मक सांगतो की इंधन अलमोस्ट सारखे आहे, भाव जवळपास तोच आहे, पुण्यात रोड टॅक्स कमी आहे, ट्रिफिक ज्यॅममुळे होणारा इंधनाचा अपव्याय व मेंटेनन्स इश्श्यु कमी आहेत, रिक्षांचे उत्पादक पुण्याजवळ असल्याने सर्व्हिसिंग आण इनिशियल इन्व्हेस्तमेंट चा खर्च खरोखर पुण्यात कमी आहे ... तरीही सध्या "रिक्षांचे दर" हे तुलनेत जास्त आहेत.... असो.
रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल?
मालक, आम्ही केव्हापासुन सांगतो आहे की मुद्दा हा " १रुपयाचा" नव्हेच, मुद्दा हा रिक्षावाल्यांचा "सोकावण्याचा " आहे ... "म्हातारी मेली तरी हरकत नाही, काळ सोकवायला नको" हीच भुमिका आहे/होती/असणार ...
परंतु हा घटलेला एक रुपाया कदाचित रिक्षावाल्यांचे उत्पन्न २०% पर्यंत कमी करतो
. कसे काय ??? मला हे व्यवहारी आणि गणिती तर्कानुसार पटत नाही. असो, मी वर मांडलेल्या "सध्याच्या अव्वाच्या सव्वा भावाचा" आणि उत्पन्नाचा जरुर विचार व्हावा ...
हे वाक्य टाळ्या घेण्यासारखे असले तरी मला वाटते कि इथे लेखकाने विचारलेला प्रश्न व दिलेली काहि उदाहरणे प्रचंड असंबध्द व विसंगत वाटली.
असु शकेल. मला दिलेली उदाहरणे प्रचंड तर्कसंगत आणि योग्य वाटली. असो, आपल्या "अमान्य"असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही, चालते तेवढे ... बाकी आम्ही कधीच "पर्सनल" घेत नाहे, काळजी नसावी, मनोसोक्त वाद घाला ... असो. ------ (विस्तारीत)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by अभिज्ञ

देवदत्त 05/05/2009 - 00:36
जरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे रिक्षाचे दरभाडे ठरवत असले तरी तिथे पीएमटी सारखी तिकिटाची व्यवस्था नाहि.उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो. तिकिट व्यवस्था नाही. पण जे मीटर लावून दिले आहे ते शोभेसाठी आहे का? तो व्यवहार तर नीट करा. मनपा च्या हद्दीबाहेर तर सोडाच (तिथे तर मीटर खाली पडलेले खूप कमी वेळा दिसते), पण पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे रिक्षावाले उभे असतात त्यांच्या तोंडून तुम्ही भाव ऐका, मीटरने येत तर नाहीतच, वर ६० रूपये होतात तिथे१८० रू मागतात. रिक्षावाला हा अत्यंत माजोरडा इसम असतो असे एका प्रतिसादातून ध्वनीत झाले. मी तर म्हणतो ज्याला माणुसकी नाही त्याला माजोरडा म्हणणे ही कमीच आहे. दवाखान्यातून माझ्या आईला घरी आणायचे होते. जिथे मीटरप्रमाणे पाहिले तर जेमतेम ५ रूपये होतील.(कमीत कमी भाडे ८ रू आहे, म्हणून ८ मानतो) तेथे त्या रिक्षावाल्याने सांगितले मी नाही येणार, दुसरा बघा. सर्वांनी २५ रू मागितले, कारण काय तर त्या भागात कमीतकमी २५ रू घेतात. रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल? असल्या मनोवृत्तीमुळेच सगळीकडचे भाव अवास्तव वाढले आहेत. आज १ रू करीता सोडून द्यायचे, उद्या १० रू करीता सोडून द्यायचे. पण ह्यात मुद्दा हा आहे की तोच भाव ठेवल्यानंतर जर रिक्षाचालक फक्त मीटरनेच येण्याचे मान्य करत असतील तर विचार करण्यासारखे आहे. आणि नाही, तर मीटरचा भाव १ ने कमी करा की ५ ने काय फरक पडणार आहे? आणि इतर काही मुद्द्यांचे म्हणाल तर, त्याने गाय मारली म्हणून मीही वासरू मारेन हा न्याय पटत नाही. हेच मुद्दे बहुधा इतर ठिकाणीही मांडु शकतो. आज रिक्षावाल्यांचे आहे,उद्या मल्टीप्लेक्स वाल्यांचेही मांडूया. सगळीकडे आपण सोडूनच देउया.

=)) =)) लै बेक्कार लै बेकार हसलो राव ! मला हा लेख आणी त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रीयांचा अर्थ आणी उद्देशच कळला नाहीये. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की रिक्षावाले तुमच्या बा चे नोकर नाहीत. आम्ही रिक्षा चालवतो ते आमचा वेळ जात नाही म्हणुन आणी तुमच्यावर उपकार म्हणुन. साला तुमचा चॅनेल व्ही बघणारा पोरगा 'ओ वडील / मातोश्री जा आजच्या दिवस चालत एकटे मी काय हा प्रोग्रॅम सोडुन येणार नाही ' असे ठणकावतो, तेंव्हा तुम्ही किती कौतुकानी त्याच्याकडे बघता आणी स्वतःच्या खिशातले पैसे भरुन, कर्ज काढुन रीक्षा घेणारा रिक्षावाला 'येत नाही' म्हणाला तर तो माजोरडा होय ? अरे वाह र तुम्ही सुशिक्षीत ! साहेब जरा तेव्हडे बिलाचे बघा म्हणताना टेबला खालुन हळुच १०० सरकवता तेंव्हा स्वतःच्या अक्कल हुषारीचे कौतुक करुन घेता आणी रिक्षावाल्यानी अंधार्‍या रात्री घरी सोडायचे १० रुपये जास्ती मागितले तर लगेच बोंबलता होय ? स्वतः कधी दारु पिउन गाडी चालवली नाहीत का ? मग आमच्या रिक्षात आम्ही दरु पिली, पुडी खाल्ली तर तुमच्या पोटात का दुखते ? पगार वाढवायला सरकारी / बँक नोकरांनी , अनाधिकृत झोपड्या अधिकृत करायला झोपडीवाल्यांनी मोर्चा काढला , कामकाज बंद ठेवले तर त्यांना सहानभुती आणी आम्हाला खेटराची पुजा होय ? आठवडाभर सिग्नलला गाडी बंद करुन उभा राहिला तर ५० रुपये वाचत्याल राव तुमचे, कशाला रुपायापायी आम्हा गरीबाच्या पोटावर पाय देता ? आन असल येव्हडीच हौस तर वाट पाहा (पाहात रहा) आणी पी यम टी नी जावा. आबा गाढाव ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 04/05/2009 - 12:33
एक नंबर हाणला आसेस परा भौ, जबरदस्त .. =)) =)) =)) =)) =)) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मैत्र 04/05/2009 - 14:15
डॉन भौ ... दणदणीत पुनरागमन... मुद्दा एक रुपयापेक्षा वृत्तीचा आणि मुजोरीचा आहे. दिलिप बंड ( काय मस्त नाव आहे) - प्रा प प्रा ( सोप्या भाषेत आर टी ओ) चे मुख्य. त्यांनी मुद्दा मांडला आहे की पेट्रोल डिझेल चे भाव कमी झाले तेव्हा रिक्षाचे दर कमी न करता सी एन जी , एल पी जी ला प्रोत्साहन देऊन जुने दर कायम ठेवावे. ज्यामुळे पुण्याचे प्रदुषण कमी व्हायला मदत होईल. त्याबरोबर सी एन जी / एल पी जी साठीचा खर्च भरून निघायला मदत होईल. या ईंधनाचे दर हे पेट्रोल पेक्षा खूप जास्त परवडतात असं वाचलं होतं. तेव्हापासून दोन महिन्यात कुठल्याही संघटनांनी काहीही केलं नाही. विरोधही केला नाही, वेळ वाढवून मागितला नाही. रिक्षाचालकांना हे तुमच्या आणि पुणेकरांच्या फायद्याचं आहे असं सांगून सी एन जी वापरायला प्रोत्साहनही दिलं नाही. मग जर पेट्रोलचे भाव किमान दहा रुपयांनी कमी झाले तर वीस टक्के दरकपात बारा टक्के भाडे कपातीत जायला काही हरकत नाही. तेव्हा ज्या अर्थी रिक्षा संघटना आणि रिक्षाचालकांनी काहीही हालचाल केली नाही त्या अर्थी त्यांना ही भाडे कपात मान्य आहे! अभिज्ञ - पी एम पी एम एल ने एक रुपयाने भाडे कपात केली आहे. कंपनीच्या बसेस च्या भाड्यात त्या प्रमाणात कपात झाली आहे. मुंबई, ठाणे इथे रिक्षाचे दर असेच कमी झाले आहेत. पुण्याचे रिक्षावालेही असेच पुणेरी आणि एम एच बाराचे आहेत हे सिद्ध झालं आहे. दहा लाखांवर दुचाकी आणि दोन तीन लाख चार चाकी असलेले पुणे फक्त पंचवीस ते तीस हजार रिक्षा रस्त्यावर न उतरल्याने किती सुसह्य होते ते कोणी गेल्या तीन दिवसात अनुभवले का? पुण्यातले प्रदूषण अचानक प्रचंड प्रमाणात आणि जाणवण्याइतके कमी झाले. कुठेही ट्रॅफिक जाम नव्हते. पोलिसांचा कामाचा ताण कमी झाला असे ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. याचा अर्थ काय होतो? सुज्ञास सांगणे न लगे. पण याचा अर्थ रिक्षा ही सोय आहे पण त्यामुळे संपूर्ण वाहतूकीवर ताण येतो, प्रदुषण खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि बेशिस्त, बेमुर्वत पणे हाकण्याची प्रवृत्ती वाढते. भाडे वाढवून जगातले सर्व शहरातले रिक्षा आणी टॅक्सी वाले मागतात आणि फसवतात. बेंगलूरू ला कदाचित अनभिषिक्त सम्राट म्हणून घोषित करता येईल. मूळ मुद्दा काळ सोकावतो -- एक हैदराबादचा एकदम सारखा अनुभव. हैदराबादमध्ये इन्फोसिस, विप्रो, पोलॅरिस, मायक्रोसॉफ्ट, आय एस बी वगैरे एका नवीन वसवलेल्या भागात आहेत जिथे सुमारे दोन वर्षापूर्वी काहीही सोयी नव्हत्या. मेन रोड पासून सुमारे दिड ते अडीच किलोमीटर अंतर आतमध्ये जाण्यासाठी शेअर रिक्षा प्रत्येकी तीन ते चार रुपये घेत होत्या. एका रिक्षात किमान पाच जण !! अर्थात ती हैदराबादची परंपरा आहे. पेट्रोल डिझेलच्या भाड्यात भाववाढ झाल्याने त्यांनी थेट तीन चे चार आणि चार चे पाच केले. डिझेल चे भाव वाढले तीन रुपयांनी लिटर मागे - यांनी भाव वाढवले पाच रुपये एक दोन किलोमीटर मागे. खूप आरडा ओरडा केला गेला. तेव्हा "तुम्ही इतके कमावता मग आम्हाला थोडे दिले तर काय बिघडलं"चा नेहमीचा घोष झाला. आता भाव उतरले पण हे भाडे तसेच राहिले! काळ सोकावतो हेच खरं.

In reply to by मैत्र

मनिष 04/05/2009 - 14:31
दहा लाखांवर दुचाकी आणि दोन तीन लाख चार चाकी असलेले पुणे फक्त पंचवीस ते तीस हजार रिक्षा रस्त्यावर न उतरल्याने किती सुसह्य होते ते कोणी गेल्या तीन दिवसात अनुभवले का? पुण्यातले प्रदूषण अचानक प्रचंड प्रमाणात आणि जाणवण्याइतके कमी झाले. कुठेही ट्रॅफिक जाम नव्हते. पोलिसांचा कामाचा ताण कमी झाला असे ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. याचा अर्थ काय होतो? सुज्ञास सांगणे न लगे. पण याचा अर्थ रिक्षा ही सोय आहे पण त्यामुळे संपूर्ण वाहतूकीवर ताण येतो, प्रदुषण खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि बेशिस्त, बेमुर्वत पणे हाकण्याची प्रवृत्ती वाढते. भाडे वाढवून जगातले सर्व शहरातले रिक्षा आणी टॅक्सी वाले मागतात आणि फसवतात.
बेशिस्त खूप कमी होते. रिक्षावाल्यांकडे पोलिसांनी पी. यू. सी. (कार आणि दुचाकी प्रमाणे) मागितल्याचे पाहिले नाही. रिक्षावाल्यांच्या माजोरीपणावर एक स्वतंत्र लेखच लिहीता येईल. शिवाय जेंव्हा पेट्रोल ५०चे ५५ रु. झाले तेव्हा भाडे किलोमईट्र ला ६ चे ८ झाले - ३३% वाढ. तेंव्हा रिक्षेवाल्यांच्या संघटनांनी (बाबा आढाव धरून) पेट्रोल ६५ रु. होईपर्यंत भाववाढ करणार नाही असे सांगितले होते. आता पेट्रोल ५५ चे ४५ झाले आहे. रिक्षावाल्यांच्या आधिच्या हिशोबाने जायचे तर ४ रु> भावकपात केली पाहिजे; निदान २ रू. तरी; पण फक्त १ रू कपात करून आर टी ऑ ने खरे तर खूपच मवाळ भाडेकपात केली आहे, कुठेतरी रिक्षावाल्यांच्या मुजोर आणि मनमानी वागण्याला आळा बसलाच पाहिजे!

In reply to by मैत्र

चिरोटा 04/05/2009 - 19:03
बेंगलूरू ला कदाचित अनभिषिक्त सम्राट म्हणून घोषित करता येईल
सहमत्.**त प्रचंड मस्ती असेल तर बेंगळुरुचे रिक्षा चालक. मीटर पे़क्षा जास्त भाडे मिळत नसेल तर रि़क्षा तशीच २/३ तास रिकामी ठेवून गप्पा मारत बसतील . पॅसेंजर आणि चालक ह्यांची दररोजची खडाजंगी ठरलेली असते.ही मस्ती चढायला कारणीभूत महानगर पालिकेची दळभद्री बससेवा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

रेवती 05/05/2009 - 01:17
चांगला लेख आहे. चर्चाही चांगली आहे. तसं पुण्यात राहून म्हणावा असा वाईट अनुभव (अमक्या ठीकाणी येणार नाही असंही फारसं नाही) आला नाही.;) आता पुण्यात गेले की माझ्या मुलाला रिक्षा हा प्रकार नविन व भन्नाट वाटतो. रिक्षातून उतरताना त्याने काहीवेळा किती 'डॉलर' द्यायचे असं (मजा वाटाते म्हणून)विचारल्यावर मात्र्.......वाईट्ट अनुभव आले. त्याला आता दम दिलाय की तोंड उघडायचं नाही म्हणून. रेवती

आनंदयात्री 02/05/2009 - 22:29
काय फरक पडतो असा एक रुपया भाडेकपातीने ? हे माजोरडे रिक्षावाले एक तर कमीत कमी ५० रुपयांवरचे अंतर असल्याशिवाय येत नाहीत. मुख्य रस्त्यापासुन आत जायचे असेल तर १० रुपये जास्त घेणार. नवख्याला तर १०० टक्के लांबुन नेउन उल्लु बनवणार. दादागिरी आहेच. एवढा सगळा माज असतांना १ रुपयांनी काय फरक पडणारे ? पुण्यात दुकानदारांनंतर धसका घ्यायसारखी ही अजुन एक जमात ,, बास्स !!

In reply to by आनंदयात्री

टारझन 03/05/2009 - 00:11
बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ " अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मेल्या .. कं जबरा लिवलं रं .. अगदी तुझ्या स्पेषल षैली मधे .. बाकी आंद्या म्हणतो त्याच्याशी सहमत ... त्याचाच णिशेद म्हणून .. आम्हाला मुंबैत कट मारणार्‍या दोन (युपीवाल्या) रिक्षावाल्यांच्या डॉस्क्यात आम्ही हेल्मेट घातलंय ..

डान्राव, लेख नेहेमीप्रमाणे खणखणीत! हा संप मोडून काढला जावो अशी एक क्षुद्र अपेक्षा आहे. आजच संध्याकाळीही रस्त्यावर बर्‍यापैकी रिक्षा दिसल्या होत्याच, बाणेर भागात! पुण्यात क्वचित कधी रिक्षात बसायची वेळ आली आहे, त्यातल्या काही वेळा प्रामाणिक रिक्षेवालेही सापडले आहेत. काही व्यवच्छेदक निरीक्षणं: १. गोरे पाहूणे रिक्षातून नेताना रिक्षावाला 'तुम्ही मराठी, मी मराठी' गप्पा मारायला लागला की समजावं, प्रवासाचा शेवट भांडणाने होणार आहे. २. रिक्षास्टँडवर गोर्‍या पाहूण्यांसमोर रिक्षावाल्याशी हुज्जत घातली की "यासाठीच का (शिवाजी) महाराज लढले होते", अशा टाईपचं 'लूटमारी'चं बकवास समर्थन ऐकायला मिळणार आहे. ३. "आयुकाला येणार का?" या प्रश्नावर काय आयुका, कुठे आयुका हे माहिती नसताना ४० रुपये होतील असं उत्तर येणार. आपण मनात ठरवावं की याने झिगझिग केली नाही तर ५० रुपयेही द्यायला हरकत नाही, तर त्याने आत पोहोचल्यावर ७५ ची मागणी करावी. ४. अशा माजोर्ड्यांपैकी काही रिक्षावाल्यांच्या रिक्षा जेवढ्या वेगात सरळ दिशेत हलतात त्यापेक्षा जास्त (अँग्युलर) गतीने उभ्या दिशेतही हलतात. डोंबिवलीला एका रिक्षात बसले होते आणि रिक्षाचा आवाजच नाही! मी खोदून विचारलं तेव्हा चालकाने सांगितलं, रिक्षा नवीन आहे. म्हणजे बाकीच्या रिक्षावाल्यांना किती प्रेम असतं त्या बापड्या वहानावर ते समजलं. पण थोड्या रिक्षाप्रवासानंतरचा माझा ठोकताळा, दिवसाउजेडी किमान अर्धेतरी रिक्षावाले माणसासारखे बोलतात. रात्र झाली की त्यांच्या अंगात येत असावं. काही रिक्षावाले हे मुहूर्त न मानणार्‍या प्रकारातले असल्यामुळे दिवस-रात्र कसलीही पर्वा न करता, आपण रिक्षा चालवतो म्हणजे अगदी देशच चालवतो अशाच आविर्भावात असतात. अवांतरः काही व्यवच्छेदक लक्षणं वाचून मराठी विरुद्ध बिगरमराठी रिक्षावाले असा वाद उफाळून येऊ नये अशी छोटीशी अपेक्षा! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

In reply to by आनंदयात्री

दवबिन्दु 03/05/2009 - 08:22
मुंबईतल्या रिक्षावाल्यांचा चांगला अनुभव आहे. चान्गल वागतात कारन शाप आहे, B.E.S.T. खरोखर ब्येस आहे, रिक्शाने संप क्येला तर B.E.S.T. लगेच जादा गाड्या रस्त्यावर काडते. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

In reply to by दवबिन्दु

खरंय. मुंबईतले रिक्षावाले खरंच सौजन्यपुतळेच म्हणायला हवेत असे अनुभव बाहेर येतात. बाकी डॉन्या, खणखणीत लेख एकदम. मजा आली.

डॉन्याने उत्तमपणे लेख लिहिला आहे. अदिती आणि आंदोबाशी सहमत. रिक्षावाल्यांमधे काही फरक पडेल असे वाटत नाही. त्यांना पब्लिकची नस बरोबर माहित आहे. मला यावेळी पुण्यात दोन रिक्षावाल्यांनी 'निंबाळकर तालिम' एवढा सुप्रसिद्ध लँडमार्क सांगूनसुद्धा दोन्ही वेळेला मस्त फिरवले. नेमक्या जागी सोडलंच नाही. अवांतर: मुंबईत तुलनेने परिस्थिती बरी आहे. इथे मात्र बाहेरचे आणि मराठी असे दोन्ही चालक नीटच वागतात. याला काही प्रमाणात जनतेचा वचक आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण दोन्ही कारणीभूत आहे असे वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी 05/05/2009 - 15:42
इथे मात्र बाहेरचे आणि मराठी असे दोन्ही चालक नीटच वागतात. याला काही प्रमाणात जनतेचा वचक आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण दोन्ही कारणीभूत आहे असे वाटते. रिक्षावाल्याने माज दाखवला की त्याला तिथल्यातिथे खणखणीत कानाखाली वाजवणारे लोकं आहेत अजून मुंबईत आणि ट्रॅफिक पोलीसही दांडूका घेऊन उभे असतात म्हणून रिक्षावाले नीट वागतात.

अभिज्ञ 02/05/2009 - 23:12
डॉनराव, लेख एकांगी वाटला. मला हे एक वाक्य फार आवडले. एक रुपयाने काय फरक पडतो? मला वाटते कि रिक्षावाले हि हेच म्हणत असतील कि एक रुपायाने काय फरक पडतो? असो. सविस्तर प्रतिसाद सवडिने देतो. :) -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

छोटा डॉन 02/05/2009 - 23:57
सर्वात प्रथम लेख एकांगी वाटण्याबद्दल, तो वाटु शकतो. माझी ह्याला हरकत नाही/नसणार. लेख लिहताना "एक बाजु" घेऊन विचार केला की लिहणे मुद्देसुद होते म्हणुन मी फक्त रिक्षावाल्यांच्या "विरोधात" विचार केल्याने लेख एकांगी वाटु शकतो. मात्र मला ह्या उद्दाम रिक्षावाल्यांबद्दल काडीची आत्मियता वाटत नसल्याने मला काही फरक पडेल असे वाटत नाही ... >>एक रुपायाने काय फरक पडतो? छे छे, मुद्दा कधीही "फक्त १ रुपया" ह्याचा नव्हता ? अहो दर भाड्यामागे सरासरी १० रु. जास्त कमावणार्‍यांना १ रुपयाची किंमत ती काय ? आमचे मत "म्हातारी मेली तरी हरकत नाही पण काळ सोकायला नको" असे असल्याने आम्ही ह्या "मात्र १ रुपया"च्या मागे लेख वगैरे लिहला ... हे झाले "१ रुपया"चे समर्थन ... आता बोलु "फरक काय पडतो ? " ह्या मानसिकतेबद्दल ... एकुण अंदाजे किती वर्षे आपण लोक "फरक काय पडतो?" ही हतभागी, निराश, बेफिकीर आणि पराभुत मानसीकता घेऊन जगणार आहोत ह्याचा एकदा व्यापक अभ्यास व्हायला हवा. पब्लिकला काही सिरीयस वाटतच नाही, फरकच पडत नाही ... "फरक पडायला हवा" ह्या विचारातुन शोध लागले, क्रांत्या झाल्या, देश स्वतंत्र झाके, अनेक सत्ता उलथल्या गेल्या, प्रगती झाली हे सर्व असताना "फरक काय पडतो" हे वाक्य खरोखर संतापजनक आहे ... प्रश्न १ रुपयाचा मुळीच नाही, ह्या "ऍडजस्ट" करणार्‍या मानसिकतेचा आहे, आमचा विरोध त्यालाच आहे ... आज जर तुम्हाला १ रुपयाचा फरक पडत नसेल तर भविष्यात होणार्‍या कसल्याही समप्रतीच्या अन्याय अथवा असमान वाटणीचा "फरक तुम्हाला पडणे अपेक्षीत नाही" हे सरळ आहे. काही बेसीक गोष्टीं आणि सुविधांच्या बाबत आपण "नो टॉलरंस" ऍटीट्युड कधी ठेवणार आहोत हे देव जाणे ... अभिज्ञसाहेबा, हा रोख आपल्यावर नाही तर विषय निघाला म्हणुन बोलुन घेतले ... बाकी आपल्या "सविस्तर" प्रतिसादाची वाट पहातो आहे ... वैयक्तिक विचारशील तर माझा "फरक काय पडतो" ह्या पॉलिसीला "झिरो टॉलरंस विरोध" आहे. माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीचा फरक जरुर पडतो, ज्या गोष्टीचा फरक पडणार नाही अशी गोष्ट ह्या माझ्यापुरत्या विश्वात अस्तित्वात नाही. .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

प्राजु 02/05/2009 - 23:50
अगदी प्रत्येक अक्षरातून खणान् खण आवाज येत आहे. :) रिक्षावाले या विषयांवर पीएच डी होऊ शकते. (आदितीने उगाचच दुर्बिणक्षेत्रात पीएच डी केली... छ्या!! चांगला विषय हातचा गमावला!) ;) डॉन राव, आपली निरिक्षणे आणि त्यावरचे निष्कर्ष यावर दाद द्यायला हवी. पुण्यात तसा रिक्षाने खूप फिरण्याचा योग नाही आला. पण जितक्या वेळेला हिंडले तेव्हा, संमिश्र अनुभव आला. कुमठेकर रोड, तुळशी बाग, मंडई या भागातून संध्याकाळी ६ नंतर रिक्षावाले कोथरूड, कर्वेनगर या भागात यायला अजिबात तयार होत नाहीत. एखादा झालाच तर ५ रूपये (४ वर्षापूर्वी) जास्ती मागायचा. आपली रिक्षा नसून, आपले चार्टर प्लेन आहे आणि त्यात बसलेला प्रवासी हक्काने लुबाडण्यासाठीच आहे अशी त्यांची समजूत (छे!! खात्रीच असते). त्यातही तुम्ही पहाटे, किंवा रात्री उशिरा बसलात रिक्षात तर, त्यावर सुवर्णवर्ख दिल्याप्रमाणे ते अगदी व्यवस्थित गोड बोलून लुटतात. आणि लुटायाचे असते म्हणून की काय, राजकारण, समाजकारण,.. बॉम्बस्फोट असल्या विषयांवर गप्पाही ठोकतात. एकदा मी, रिक्षातून बसून घरी जात होते. रिक्षावाला का कोण जाणे बराच कातावलेला वाटत होता. त्यातही रोड खणलेलेच ठेवण्याची शपथ्थ घेतलेल्या पुण्यात, तो कर्वेरोड सारख्या नियमीत उकरून ठेवलेल्या रोड वरून निघाला होता. रिक्षामध्ये हॉर्न सोडून सगळं वाजत होतं. तरीही "च्यामारी, या म्युन्सिपाल्टीच्या..********* घातली लाथ, कशाला र्‍हायचं असल्या श्येरात(शहरात)?? मुक्त संचार (बहुतेक कुठल्या भाषणात हा शब्द ऐकला असावा त्याने) असता तर कध्धीच आम्मी आट्रुलिया {(ऑस्ट्रेलिया), हाच देश का निवडला त्याने देव जाणे!!)} ला निघून गेलो असतो.. " इ. मुक्ताफळे शिंपडायला चालू केली. खूप इच्छा झाली होती त्याला सांगायची की, बाबारे, तुझ्या रिक्षातले खणखण्णारे आवाज बंद कर, मला घरी सोड आणि मग ऑट्रुलिया ला जा"... असो. हा विषय न संपणारा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

डॉनभाउ लेख मस्तच जमला आहे. आता पुण्यात मला पण एक दोन वेळा असा अनुभव आला आहे. प्राजुतै मी करतो आहे हो सध्या ह्या विषयात पी एच डि ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर.

देवदत्त 03/05/2009 - 00:05
अरे वा, माझे दोन मुद्देही (किंवा प्रश्न) ह्यात सविस्तर आले आहेत. :) रिक्षा पंचायतीचे म्हणायचे तर ठाण्यातील रिक्षा युनियन वाल्यांनी दिलेल्या उत्तरानुसार, ग्राहकाला काही तक्रार असेल तर ती वाहतूक पोलिसाकडे करायची. रिक्षा युनियन फक्त रिक्षा चालकांच्या तक्रारींवर लक्ष देते. बाकी, तुमचे सर्व मुद्दे सडेतोड आहेत :)

भाग्यश्री 03/05/2009 - 01:36
खरं सांगायचे तर मला रिक्षावाल्यांचा एखाद दुसरा सोडला तर वाईट अनुभव नाही.. हा, तुळशीबागेतून रात्री कर्वेरोडला यायला फारसं कोणीच तयार नसायचे हा मात्र अनुभव बर्‍याचदा आला.. हे असं का? माहीत नाही! काही चालक माजोरडेपणाचा क्लास काढता येईल इतके मुजोर असतात , असंही का, माहीत नाही! :) कसला माज देवाला ठाऊक! पण एकंदरीत उठ-सुठ संप करण्याबद्द्ल माझाही विरोध.. माझी दुचाकी नसताना रिक्शा हाच एक आधार असायचा.. बस हा पर्याय उत्तम असूनही कधी वाटेला गेले नाही.. त्यामुळे माझ्यासारखे अजुन कोणी असतील तर त्यांची गैरसोय अगदी नक्कीच झाली असणार! लेख उत्तम! :) www.bhagyashree.co.cc

गणा मास्तर 03/05/2009 - 06:39
१. रिक्षाचालकांचे नेत्तृत्व करणारी मंडळी नालायक आहेत. मी बाबा आढाव(की आघाव) या माणसाला रिक्षाचालकांचा एक मुजोर नेता असेच समजत होतो. त्यांचे कष्टकरी हमाल यासंबधीचे काम याविषयी नंतर माहिती झाली. अर्थात त्यांच्या जागी दुसरा कोणीही असता तरी असाच वागला असता, पण तथाकथित समाजवादी नेत्याचे सामान्य जनतेची कदर न करणारे विचार झेपत नाहीत. २. पिंपरी चिंचवड परिसरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियम करुन देखिल रि़क्षा मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. भाडेकपात रद्द झाली तर हे साले तिथे मीटरप्रमाणे भाडे घेणार काय? ३. या सर्वाच्या मुळाशी आपली सडकी सार्वजनिक परिवहन व्यवस्था आहे. राजकीय नेतॄत्वाचा अदूरदर्शीपणा, सामान्य जनतेची मतदानाचे कर्तव्य बजावण्यातली अनास्था ह्या सगळ्याच गोष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहेत. धन्य ते तोक्योतले महभाग ज्यांनी १९२७ साली मेट्रो चालु केली. इथेही प्रचंड भ्रष्टाचार चालतो, पण जनतेचे हित आणि कामाचा दर्जा याबाबत तडजोड होत नाही. समाजसेवाच करायची होती तर,२८ गाडया बाळगणार्‍या डीएसकेंनी २५ गाडया स्वारगेट ते शिवाजीनगर सोडायला हरकत नव्हती,:D पुण्यातल्या कुठल्याही राजकीय पक्षाने यावर मतप्रदर्शन केल्याचे दिसले नाही.निवडणुक झाली आता पाच वर्षांनी पाहु असाच सार्‍यांचा विचार दिसतो. ४.प्राधिकरणात बिग इंडिया ते निगडी ह्या २.४ किलोमीटर अंतरासाठी रिक्षावाले १५ रुपये घ्यायचे. रात्री अपरात्री नवख्याकडुन तर जास्तच.. पण नव्या पीएमपीएलने निगडी ते आकुर्डी रेल्वे स्टेशन अशी शटल बससेवा दर १० मिनिटाच्या वारंवारतेने चालु केल्यापासुन आम्ही फक्त ३ रुपयात घरी जातो. आता रिक्षावाले हात चोळत बसले आहेत. एक रिक्षास्टॅन्ड चक्क बंद पडला. पीएमपीएलने अशी सेवा सर्वत्र द्यावी. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

सहज 03/05/2009 - 07:19
वरील बर्‍याच प्रतिक्रियांशी सहमत. एकंदर मोठा चर्चेचा विषय आहे. पुण्याची सार्वजनीक वाहतूक न सुधारण्यात राजकीय पक्षांचे हित असावे असाच निष्कर्ष निघतो आहे असे वाटते. नुकत्याच झालेल्या पुणेप्रवासात रिक्षाने फिरायची अनेकदा वेळ आली. ह्यावेळी फारसा वाईट अनुभव आला नाही हेही नमूद करावेसे वाटते.

जृंभणश्वान 03/05/2009 - 07:30
मस्तच आहे लेख. मला एकाआड एक चांगले/वाईट अजुभव येतात रिक्षावाल्यांचे त्यामुळे कधी वाटते मिळुदे बिचारर्‍यांना एखादा रुपया जास्त कधी वाटते माजलेत लगेच संप.

डॉन्या छान ल्हिहितोस रे तु. सहमत. जेंव्हा जेंव्हा पुण्यात गेलो तेंव्हा नेहेमी रिक्षावाल्याने लुटले नाही असे झालेच नाही अगदी गंजलेल्या रिक्षात बसलो तरी सुद्धा.

कलंत्री 03/05/2009 - 09:08
तसे पाहिले तर सर्वच क्षेत्रात अनांगोदी, इतरांना लुटण्याची हौसच चालु आहे असे दिसत आहे. शिक्षणक्षेत्र, वैद्यकियसेवा, बाजारपेठा असे सांगता येईल. तोच नियम रिक्षावाल्यानाही लागु पडतो. सर्वसामान्य भाववाढ आणि महागाई याचा विचार केला तर यातुन सर्वमान्य तोडगा निघायला हवा. एकदम संप हाही मार्ग अतिरेकी वाटतो.

03/05/2009 - 16:26
डानराव सुरेख लेख! आता खरंतर प्रवाशांनीच संप केला पाहिजे. म्हणजे आपल्याला कितीही घाई असली तरी रिक्षा करायची नाही. वेळ लागला तरी चालेल पण रिक्षात बसणार नाही अशी काहीशी भूमिका घेतल्यास " अहो तुम्ही द्याल ते घेईन हो पण बसा गाडीत" असं रिक्षावाले म्हणतील! छे: अशी स्वप्नं देखील पाहणं म्हणजे ते कायसं दिवास्वप्न का काय म्हणतात तसं होईल!!!

शितल 03/05/2009 - 18:16
डॉन्या, मस्त मीटर पाडुन लेखणी चालवली आहे. :) पुण्यातील रिक्षावाले ह्यांना माजोरी आहेत हे मात्र नक्की.

अभिज्ञ 03/05/2009 - 23:49
संपुर्ण लेख वाचल्यावर माझ्यापुढे रिक्षावाला म्हणजे एक अत्यंत श्रीमंत, ज्याने रिक्षा चालवून पाच सहा बंगले बांधले आहेत व त्या श्रीमंतीच्या जोरावर तो माज करत सामान्य लोकांशी अत्यंत मस्तवाल पणे वागणारा मनुष्य अशी एक प्रतिमा उभी राहिली. बहुतांश प्रतिसादकर्त्यांचा रोख हा रिक्षावाल्यांच्या माजोरडेपणावर आहे.किंबहुना लेखकाचा मुद्दा हि सरसकट हाच वाटला. मला वाटत मुद्दा हा रिक्षा भाडे कपात व त्याला विरोध म्हणून रिक्षावाल्यांनी पुकारलेला संप एवढाच आहे. रिक्षावाले माजोरडे असतात,रिक्षा सुमार दर्ज्याच्या असतात,हि काहि विधाने इथे (संपाच्या असमर्थानाकरिता) अनाकलनीय वाटली. रिक्षावाले बरोबर आहेत किंवा चुक आहेत हा भाग वेगळा आहे. मुळ लेखात फ़क्त रिक्षावाले चुक आहेत एवढ्याच भावनेने लिहिलेले दिसते. त्या अनुषंगाने माझे काहि मुद्दे इथे मांडू इच्छितो. मुळात रिक्षा हे पीएमटी वा तत्सम महानगर पालिके पुरस्कृत वाहन आहे काय? नसावे. जरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे रिक्षाचे दरभाडे ठरवत असले तरी तिथे पीएमटी सारखी तिकिटाची व्यवस्था नाहि.उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो. आता हा व्यवहार दोघातच होत असल्याने वेळ, पुरवठा, मागणी अन तुमची आगतिकता ह्यावर उतारू व रिक्षावाला दोघेहि संधीचा फ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात.ब-याच वेळा मीटरपेक्षा जास्त भाडे आकारून हा व्यवहार होतो. रिक्षावाले हे ब-याच वेळा अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. हे सुध्दा वर म्हंटल्याप्रमाणे ब-याचश्या गोष्टींवर अवलंबुन असते. जसे बाजारात एखादे दिवस पापलेटची आवक कमी झाली कि लगेच त्याचे भाव वाढतात. पुरवठा कमी व मागणी वाढली कि आपोआप हे प्रकार घडतातच. रिक्षावाला हा अत्यंत माजोरडा इसम असतो असे एका प्रतिसादातून ध्वनीत झाले. मुळात रिक्षा हि कोण चालवते? समाजातला उच्चभ्रु वर्ग ह्या भानगडीत नसतो. बहुतांश रिक्षावाले हे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीयांमधून किंवा लोअर इनकम ग्रुप मधून आलेले असतात. शिक्षण पुर्ण न झालेले, किंवा नोकरी न मिळालेले वा अंगात पोट भरण्याकरीता दुसरी कुठलीहि कला नसलेले लोक इथे सापडतात. त्यामुळे तिथे काहि अवगुण हे असणारच व आहेत. एका रिक्षावाल्याचे दिवसाचे उत्पन्न किती असावे? तर सरासरी हे उत्पन्न दिवसाला २५० ते ३०० रुपये एवढेच असते. बहुतांश रिक्षा चालवणारे हे निव्वळ चालक असतात, रिक्षाचा मालक वेगळाच असतो. दिवसाला १५०-२०० रु ह्या दराने हि रिक्षा चालवायला दिलेली असते. हे २०० रु व उत्पन्न २५० रु धरले तर रिक्षा चालकाला बाकिचा चहा पाण्याचा खर्च,इंधनाचा खर्च व इतर खर्च वगळता दिवसाला किमान ७०० रु चा धंदा करावा लागतो. आता हे टारगेट पुर्ण करायला त्याला कधी कधी दिवसातले १२ ते १४ तास खर्ची घालावे लागतात. त्यातहि पुन्हा प्रचंड ट्रफ़िक आली, खणलेले रस्ते आले, इंधन भरण्याकरीता लागलेल्या रांगा आल्या.,पोलिसी त्रास आला. मग सहाजिकच ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे रिक्षावाले हे इझी मनीचा मार्ग स्वीकारतात. कुणाला बस पकडायची असते,कुणाला ट्रेन चुकवायची नसते,फ़्लाईट मिस करून तर चालणारच नसते, मग अशा वेळि मीटर गेला खड्यात,रिक्षावाल्याशी डायरेक्ट भाव केला जातो. रिक्षावाल्यांचा अजून एक मुद्दा म्हणजे इनसेक्युरिटि. आपल्या सारखे हेल्थ इंन्श्युरन्स, पी एफ़,ग्रेट्युइटी ह्या भानगडी ह्या लोकांना लागू होत नाहीत. क्रेडिट कार्ड,होम लोन सारखे प्रकार हि ह्यांना कोणी देत नाही. आधीच उच्च विद्याविभुषित लोकांना मिळणारे "कार्पोरेट ट्रेनिंग" ह्याना मिळत नसते. दिवसातले १२ ते १४ तास राबून म्हणावा तसा पैसा मिळत नाहि. आधीच दिशा नसलेले आयुष्य मग आणीक कूठेतरी भरकटते.दारु ,लॊटरी तत्सम प्रकारचि व्यसने सुरु होतात. मला वाटते ह्या सर्वाचा परिणाम हा मीटर टेम्परींग,अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, असा कुठेसा होत असावा. इझी मनी. आता प्रश्न आहे एक रुपायाचा, रिक्षा चे भाडेदर प्रति किमी १ रुपयाने कमी करावे असा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे. त्याचे मुख्य कारण असे आहे कि इंधनाचे दर हे कमी झालेले आहेत. सकृतदर्शनी हे कारण योग्य असले तरी मला काहि मुद्दे मांडावेसे वाटतात. पेट्रोल डिझेल गॆस ह्यांचे भाव कमी झाल्यानंतर देखील १.पीएमटी वा बहुतांश सरकारी वाहनांच्या भाडयात त्या प्रमाणात कपात झालेली नाहि. २.महागाइचा दर शुन्य टक्क्याच्या आसपास येउन देखील बाजारात वस्तुंच्या वाढलेल्या दरात फ़ारशी घट झालेली नाहि. ३.महागाईचा दर शुन्य टक्क्याच्या आसपास येउन देखील, सरकारने कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात कपात केलेली नाहि. ४.मुलभुत सुविधा (जसे इंधन) स्वस्त झाल्याने कुठल्याहि उद्योग धंद्याने आपल्या प्रॊडक्टचे दर कमी केलेले नाहीत. ५.होटेल उद्योगात कुठल्याहि डिशचे भाव ह्या इंधन स्वस्ताई मुळे कमी झालेले दिसत नाहित. ६.कुठल्याहि हॊस्पिटलने आमचा महिन्याचा जनरेटरचा खर्च डिझेल स्वस्त झाल्याने कमी झालाय म्हणून दर कमी केलेत? अशी अनेक उदाहरणॆ आहेत. मग हा एक रुपाया रिक्षावाल्यांच्या बाबतीच का इतका प्राईम ठरावा ह्याचे गणित मला कळालेले नाहि. मुळात आपल्या पैकी किती लोक रेग्युलर रिक्षा वापरतात? रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल? जागतिक मंदिमुळे बहुतांश कंपन्या आता वेतन कमी करत आहेत,वा त्या मार्गावर आहेत. १० ते १५% वेतन कपात संभावित आहे. हे होणे कुठल्याहि नोकरदार माणसाला मनापासून पसंत नाहि. तरी देखील तो १०% कमी वेतनात ब-यापैकी निभावून जाउ शकतो. परंतु हा घटलेला एक रुपाया कदाचित रिक्षावाल्यांचे उत्पन्न २०% पर्यंत कमी करतो .आधीच आवक कमी असलेल्या ह्या उत्पन्न गटाला हा भार मोठा आहे,अन शेवटि ह्याची परिणीती तो भार ग्राहकांनाच कळत नकळत उचलावा लागणार. मला वाटते कि ह्या सर्व मुद्यांचा लेखकाने व इतरांनी जरूर विचार करावा. जाता जाता. रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? गरज कुणाला आहे ? ह्याच चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन, पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे जस्टिफाईड आहे का ? हे वाक्य टाळ्या घेण्यासारखे असले तरी मला वाटते कि इथे लेखकाने विचारलेला प्रश्न व दिलेली काहि उदाहरणे प्रचंड असंबध्द व विसंगत वाटली. असो. अभिज्ञ. (डॉनराव्,वैयक्तिक न घेणे. अर्थात आपल्याला सांगायची गरज नाहिच म्हणा. :)) -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

अनामिक 04/05/2009 - 00:46
माझ्याही मनात असंच काहीसं होतं, पण एकत्रीतपणे मांडायला जमलंच नाही (कारणे- आमचं लेखण कौशल्य आणि वेळे आभावी), पण अभिज्ञची प्रतिक्रिया वाचली आणि वाटलं आपल्याला हेच तर म्हणायचं होतं. रिक्षावाल्यांची भाषा, अरेरावी, ग्राहकाला दिलेली वागणूक हा भाग वगळता त्यांच्या भाड्यात (१रु./ किमी) झालेली कपात बर्‍याच अंशी पटली नाही. (बहुतांशी) खालच्या वर्गातून आलेल्या रिक्षाचालकांचं पोट रोजगारावर अवलंबून असताना आणि दररोजच्या मुलभूत गरजांचे (रोटी-कपडा) दर कोणत्याच प्रकारे कमी झालेले नसताना, रिक्षाचालकांच्या भाड्यात अशी दर कपात करणे पटत नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या जलद केलेल्या मीटरचं, मीटरच्या वर घेण्यात येणार्‍या पैश्यांच, रिक्षाच्या अस्वच्छतेचं, वापरण्यात येणार्‍या चुकीच्या इंधनाचं, नशेत असलेल्या रिक्षावाल्यांचं समर्थन करतोय. ते सगळं चूक आहेच, अशावेळी आपली गौरसोय झालीच तर आपण (बहुतेक) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे किंवा योग्य ठिकाणी त्यांची तक्रार करावी. ग्राहकानेसुद्धा आपल्या अनुभवातून शिकून रिक्षात बसायच्या आधीच योग्य ती बोलणी करावी.... मी पुण्यात जवळ जवळ दोन वर्षे होतो (६-७ वर्षांपुर्वी), एक दोन वाईट अनुभवही आलेत, पण आपण स्वतः दक्षता घेतल्यास असे वाईट अनुभवही टाळता येतात. काहीवेळा आपले ठिकाण रिक्षावाल्याला माहीत नसते, तेव्हा ते काहीतरी भाडं सांगतात.... आपणही कमी सांगीतलं म्हणून खूश होतो... आणि पोचल्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी वाद घातला की आपणही चिडतो.... पण त्यांनी कमी भाडं सांगीतलं तेव्हाच त्यांना "नाही बाबा, बाकीचे ४० नाही ५०रु. घेतात, तेव्हा तू तेवढेच घे, पण तिथे गेल्यावर वाद घालू नको" असे सांगतो का?.... तर नाही, कारण आपल्यालाही आपले १० रु. वाचवायचे असतात. अजून एक - वरच्या लेखात "गरज कोणाला आहे?" हा प्रश्न आलाय... तर गरज इथे ग्राहक आणि रिक्षावाला दोघांनाही आहे.... रिक्षावाल्याला पैश्याची तर ग्राहकाला नियोजीत ठिकाणी वेळेत पोचण्याची. बाकीच्या उदाहरणातल्यांशी (जसे भिकारी, अन्नछत्रातले यात्रेकरू, भंगारवाला) ही तुलना पटत नाही. आज इंधनाचे भाव कमी झालेत म्हणून रिक्षाभाडे कमी करा म्हणतोय... पण आपली पगारवाढ झाली तर आपण घरातल्या कामवालीचा, स्वयंपाकवाल्या बाईंचा पगार वाढवतो का? किंवा आजच्या रेसेशन मधे तुमचा पगार १०% नी कमी झाला तर कामवाली बाई ५००रु ऐवजी ४५०रु घेईल का? दोन्हीची उत्तरे नाही अशीच आहेत, तेव्हा इंधन दर कपातीचा बोजा फक्तं रिक्षावाल्यांनीच उचलावा हे पटत नाही. पाठीवर मारा (रिक्षाचालकांसाठी इतर कडक नियम करुन), पोटावर का मारताय? -अनामिक

In reply to by अभिज्ञ

छोटा डॉन 04/05/2009 - 12:05
संपुर्ण लेख वाचल्यावर माझ्यापुढे रिक्षावाला म्हणजे एक अत्यंत श्रीमंत, ज्याने रिक्षा चालवून पाच सहा बंगले बांधले आहेत व त्या श्रीमंतीच्या जोरावर तो माज करत सामान्य लोकांशी अत्यंत मस्तवाल पणे वागणारा मनुष्य अशी एक प्रतिमा उभी राहिली.
=)) अगदी स्पष्ट असहमत ... कदाचित आपण "उपहास" म्हणुन म्हणत असाल तर मान्य दाद देतो. मात्र हा लेख लिहताना आम्ही आत्तापर्यंत पाहिलेला " कनिष्ठ मध्यमवर्ग अथवा त्याखालच्या वर्गातुन आलेला, शिक्षण जास्त न झालेला व इतर कोणते व्यव्सायीक कौशल्य ज्ञात नसलेला व म्हणुनच रिक्षा चालवुन आपले पोट भरु इच्छिणारा" असा प्रामाणिक रिक्षावाला अशी कल्पना मनात ठेऊन हा लेख लिहला ... माणसाला जर वस्तुस्थीतीची संपुर्ण कल्पना असेल व त्यानंतर सुद्धा वागण्यात जो मस्तवालपणा येतो त्याला "गर्व अथवा मस्ती" म्हणतात ... उदा : श्रीमंत बापाची वाया गेलेली पोरे ... पण जर मुळात काही नसेल आणि माणुस फुकाचा मस्तवालपणा करत असेल तर त्याला "माज" म्हणतात. ... उदा : रिक्षावाले, मजुर वर्ग वगैरे ...
बहुतांश प्रतिसादकर्त्यांचा रोख हा रिक्षावाल्यांच्या माजोरडेपणावर आहे.किंबहुना लेखकाचा मुद्दा हि सरसकट हाच वाटला.
अर्धसत्य .... माझा बहुतांशी रोख रिक्षावाल्यांचा "अनावश्यक, अनवॉरंटेड, अनजस्टिफाईड, अतार्किक" अशा मस्ती आणि माजोरडेपणावर आहे.मी अवतरणचिन्हात वापरलेले शब्द टाकुन माझ्यामते मी सांगत असलेल्या माजोरडेपणाची व्याख्या होऊ शकत नाही ... असो, माझा मुद्दा हा रिक्षावाल्यांचा "अनावश्यक, अनवॉरंटेड, अनजस्टिफाईड, अतार्किक" माजोरडेपणा हाच आहे/असणार.
मला वाटत मुद्दा हा रिक्षा भाडे कपात व त्याला विरोध म्हणून रिक्षावाल्यांनी पुकारलेला संप एवढाच आहे.
नाही, झालेल्या न्याय्य अथवा अन्याय्य म्हणा दरकपातीच्या विरोधात रिक्षावाल्यांनी ज्यांच्यावर त्यांचे पोट अवलंबुन आले अशा ग्राहकांना वेढीला धरुन पुकारलेल्या "अनजस्टिफाईड आणि अवानश्यक" संपाला मला करावा वाटलेला विरोध हा मुद्दा आहे ...
रिक्षावाले माजोरडे असतात,रिक्षा सुमार दर्ज्याच्या असतात,हि काहि विधाने इथे (संपाच्या असमर्थानाकरिता) अनाकलनीय वाटली.
आपली गल्लत होते आहे, मी असे केव्हाही म्हणलो नाही ... "सुमार" वगैरे तर विनोद होते कोटी करुन केलेले, सबब हा मुद्दा अमान्य ...
रिक्षावाले बरोबर आहेत किंवा चुक आहेत हा भाग वेगळा आहे. मुळ लेखात फ़क्त रिक्षावाले चुक आहेत एवढ्याच भावनेने लिहिलेले दिसते.
पुन्हा अर्धसत्य. मी इथे रिक्षावाल्यांचे संपाशी निगडीत आडवणुक करणारे मुजोर वागणे हे "चुक" आहेच असे स्पष्ट म्हणतो, मी ते "बरोबर" आहे असे म्हटलो नाही/म्हणणार नाही ... कदाचित त्यांचा दरकपातीला विरोध हे म्हणणे न्याय्य असेल पण त्यासाठी उचलेले संपाचे हत्यार हे "नामंजुर" आहे ...
उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो.
करेक्ट ... व्यवहार : जेव्हा ग्राहक आणि विक्रेता ह्यांच्यात योग्य बोलाचाली होऊन अन्याय न होता अथवा अडवणुक न होता दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य दाम ठरवला जाऊन जेव्हा ग्राहक आणि विक्रेता ह्या दोघांचेही समाधान होते ह्याला अर्थशात्राच्या भाषेत "व्यवहार" म्हणातात ... पण जेव्हा ह्यातुन "आडवणुक होउन, अवाजावी दाम, अर्वाच्च भाषेत दिली जाणारी प्रवाश्यांना वागणुक, ग्राहकावर अन्याय" वगैरे गोष्टी येतात तेव्हा ह्याच व्य्वहाराला समाजशास्त्र "लुट अथवा लुबाडणे" असे व्याख्येत बसवते .... आमचे रोख ह्यावरच आहे, असण्यास प्रत्यवाय नसावा ....
आता हा व्यवहार दोघातच होत असल्याने वेळ, पुरवठा, मागणी अन तुमची आगतिकता ह्यावर उतारू व रिक्षावाला दोघेहि संधीचा फ़ायदा घ्यायचा प्रयत्न करतात.ब-याच वेळा मीटरपेक्षा जास्त भाडे आकारून हा व्यवहार होतो.
ग्राहक कसा काय फायदा घेईल बॉ ? म्हणजे रिक्षावाला रिकामा बसला आहे हे गॄहीत धरुन संधीचा फायदा म्हणुन रिक्षावाल्याने ५० रुपयाचे भाडे ३० रुपयात न्हेणेप्रॅक्टिकली शक्य आहे का ? हे तर धंद्याच्या तत्वांच्या विरोधात आहे ...
रिक्षावाले हे ब-याच वेळा अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. हे सुध्दा वर म्हंटल्याप्रमाणे ब-याचश्या गोष्टींवर अवलंबुन असते.
जाऊ देत, ह्या मुद्द्यावर बरेच लिहण्यासारखे आहे ... तरी "अवलंबुन" हा शब्द मी मान्य करुन आपला मुद्दा मान्य करतो ...
बहुतांश रिक्षावाले हे अतिकनिष्ठ मध्यमवर्गीयांमधून किंवा लोअर इनकम ग्रुप मधून आलेले असतात. शिक्षण पुर्ण न झालेले, किंवा नोकरी न मिळालेले वा अंगात पोट भरण्याकरीता दुसरी कुठलीहि कला नसलेले लोक इथे सापडतात. त्यामुळे तिथे काहि अवगुण हे असणारच व आहेत.
अजिबात शक्य नाही. हा मुद्दा होऊच कसा शकतो ? त्यांचे "अवगुणांचे" जरी जस्टीफिकेशन केले नाही तरी त्यांना "त्यासकट" सिकारा असे मतप्रदर्शन आणि त्याचे समर्थन होऊच कसे शकते ... अरे एवढी अवगुणांची चरबी चढत आहे तर रिक्षा टाका आणि हत्यारे घेउन गुंडागर्दीत शिरा ना ... मग ह्याच वर्गातुन आलेल्या "पेपरवाले, चहावाले, टपरीवाले, पंक्चरवाले, भाजीवाले ... इ.इ. " अगणिक व्यवसायिकांनी काय "चांगुलपणाचा" ठेका घेतला आहे का ? का जो ह्या वर्गातुन रिक्षा चालवायला जातो त्याकडेच हे अवगुण जातात ... लोअर इनकम ग्रुपमधुन आला म्हणुन अवगुणांचे समर्थन होऊ शकत नाही, करणे हा माझ्यामते "सामाजिक अपराध" पकडायला हरकत नसावी ...
त्यातहि पुन्हा प्रचंड ट्रफ़िक आली, खणलेले रस्ते आले, इंधन भरण्याकरीता लागलेल्या रांगा आल्या.,पोलिसी त्रास आला. मग सहाजिकच ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे रिक्षावाले हे इझी मनीचा मार्ग स्वीकारतात.
मान्य ...!!!! पण आपण जेव्हा एखादा व्यवसाय स्विकारतो तेव्हा त्याबरोबर येणार्‍या गोष्टी स्विकारु नयेत काय ? शिवाय आपण जे म्हणाता ते मान्य जरी केले तरी "जस्टिफिकेशन"चा प्रश्न आहे तिथेच राहतो, त्याचे काय ????
रिक्षावाल्यांचा अजून एक मुद्दा म्हणजे इनसेक्युरिटि. आपल्या सारखे हेल्थ इंन्श्युरन्स, पी एफ़,ग्रेट्युइटी ह्या भानगडी ह्या लोकांना लागू होत नाहीत. क्रेडिट कार्ड,होम लोन सारखे प्रकार हि ह्यांना कोणी देत नाही. आधीच उच्च विद्याविभुषित लोकांना मिळणारे "कार्पोरेट ट्रेनिंग" ह्याना मिळत नसते.
ह्यात दोष कुणाचा ? वर आम्ही "पंचायतीला" कशासाठी हाणले आहे ? ही त्यांची जबाबदारी नाही का ?
दिशा नसलेले आयुष्य मग आणीक कूठेतरी भरकटते.दारु ,लॊटरी तत्सम प्रकारचि व्यसने सुरु होतात. मला वाटते ह्या सर्वाचा परिणाम हा मीटर टेम्परींग,अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, असा कुठेसा होत असावा.
तर्क जरी मान्य केला तरी मनाला हा मार्ग पटत नाही.... असो.
मग हा एक रुपाया रिक्षावाल्यांच्या बाबतीच का इतका प्राईम ठरावा ह्याचे गणित मला कळालेले नाहि.
हो, कारण मुळात पुण्यात रिक्षाचे दर "अव्वाच्या सव्वा" आहेत ... जर तुम्ही बेंगलोर अथवा चेन्नईशी तुलना करत असाल तर पुण्यातील रिक्षा हे खरोखर महाग प्रकरण आहे ... तुलनात्मक सांगतो की इंधन अलमोस्ट सारखे आहे, भाव जवळपास तोच आहे, पुण्यात रोड टॅक्स कमी आहे, ट्रिफिक ज्यॅममुळे होणारा इंधनाचा अपव्याय व मेंटेनन्स इश्श्यु कमी आहेत, रिक्षांचे उत्पादक पुण्याजवळ असल्याने सर्व्हिसिंग आण इनिशियल इन्व्हेस्तमेंट चा खर्च खरोखर पुण्यात कमी आहे ... तरीही सध्या "रिक्षांचे दर" हे तुलनेत जास्त आहेत.... असो.
रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल?
मालक, आम्ही केव्हापासुन सांगतो आहे की मुद्दा हा " १रुपयाचा" नव्हेच, मुद्दा हा रिक्षावाल्यांचा "सोकावण्याचा " आहे ... "म्हातारी मेली तरी हरकत नाही, काळ सोकवायला नको" हीच भुमिका आहे/होती/असणार ...
परंतु हा घटलेला एक रुपाया कदाचित रिक्षावाल्यांचे उत्पन्न २०% पर्यंत कमी करतो
. कसे काय ??? मला हे व्यवहारी आणि गणिती तर्कानुसार पटत नाही. असो, मी वर मांडलेल्या "सध्याच्या अव्वाच्या सव्वा भावाचा" आणि उत्पन्नाचा जरुर विचार व्हावा ...
हे वाक्य टाळ्या घेण्यासारखे असले तरी मला वाटते कि इथे लेखकाने विचारलेला प्रश्न व दिलेली काहि उदाहरणे प्रचंड असंबध्द व विसंगत वाटली.
असु शकेल. मला दिलेली उदाहरणे प्रचंड तर्कसंगत आणि योग्य वाटली. असो, आपल्या "अमान्य"असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही, चालते तेवढे ... बाकी आम्ही कधीच "पर्सनल" घेत नाहे, काळजी नसावी, मनोसोक्त वाद घाला ... असो. ------ (विस्तारीत)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by अभिज्ञ

देवदत्त 05/05/2009 - 00:36
जरी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण हे रिक्षाचे दरभाडे ठरवत असले तरी तिथे पीएमटी सारखी तिकिटाची व्यवस्था नाहि.उतारू व रिक्षाचालक ह्यांच्यातच हा थेट व्यवहार होत असतो. तिकिट व्यवस्था नाही. पण जे मीटर लावून दिले आहे ते शोभेसाठी आहे का? तो व्यवहार तर नीट करा. मनपा च्या हद्दीबाहेर तर सोडाच (तिथे तर मीटर खाली पडलेले खूप कमी वेळा दिसते), पण पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे रिक्षावाले उभे असतात त्यांच्या तोंडून तुम्ही भाव ऐका, मीटरने येत तर नाहीतच, वर ६० रूपये होतात तिथे१८० रू मागतात. रिक्षावाला हा अत्यंत माजोरडा इसम असतो असे एका प्रतिसादातून ध्वनीत झाले. मी तर म्हणतो ज्याला माणुसकी नाही त्याला माजोरडा म्हणणे ही कमीच आहे. दवाखान्यातून माझ्या आईला घरी आणायचे होते. जिथे मीटरप्रमाणे पाहिले तर जेमतेम ५ रूपये होतील.(कमीत कमी भाडे ८ रू आहे, म्हणून ८ मानतो) तेथे त्या रिक्षावाल्याने सांगितले मी नाही येणार, दुसरा बघा. सर्वांनी २५ रू मागितले, कारण काय तर त्या भागात कमीतकमी २५ रू घेतात. रिक्षाचे भाव सध्या आहेत तसे ठेवले तर आपल्यावर किती बोजा पडेल? रिक्षाचे भाव कमी झाले तर एकंदर महागाईवर वा आपल्या महिन्याच्या बजेटवर किती फ़रक पडेल? असल्या मनोवृत्तीमुळेच सगळीकडचे भाव अवास्तव वाढले आहेत. आज १ रू करीता सोडून द्यायचे, उद्या १० रू करीता सोडून द्यायचे. पण ह्यात मुद्दा हा आहे की तोच भाव ठेवल्यानंतर जर रिक्षाचालक फक्त मीटरनेच येण्याचे मान्य करत असतील तर विचार करण्यासारखे आहे. आणि नाही, तर मीटरचा भाव १ ने कमी करा की ५ ने काय फरक पडणार आहे? आणि इतर काही मुद्द्यांचे म्हणाल तर, त्याने गाय मारली म्हणून मीही वासरू मारेन हा न्याय पटत नाही. हेच मुद्दे बहुधा इतर ठिकाणीही मांडु शकतो. आज रिक्षावाल्यांचे आहे,उद्या मल्टीप्लेक्स वाल्यांचेही मांडूया. सगळीकडे आपण सोडूनच देउया.

=)) =)) लै बेक्कार लै बेकार हसलो राव ! मला हा लेख आणी त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रीयांचा अर्थ आणी उद्देशच कळला नाहीये. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की रिक्षावाले तुमच्या बा चे नोकर नाहीत. आम्ही रिक्षा चालवतो ते आमचा वेळ जात नाही म्हणुन आणी तुमच्यावर उपकार म्हणुन. साला तुमचा चॅनेल व्ही बघणारा पोरगा 'ओ वडील / मातोश्री जा आजच्या दिवस चालत एकटे मी काय हा प्रोग्रॅम सोडुन येणार नाही ' असे ठणकावतो, तेंव्हा तुम्ही किती कौतुकानी त्याच्याकडे बघता आणी स्वतःच्या खिशातले पैसे भरुन, कर्ज काढुन रीक्षा घेणारा रिक्षावाला 'येत नाही' म्हणाला तर तो माजोरडा होय ? अरे वाह र तुम्ही सुशिक्षीत ! साहेब जरा तेव्हडे बिलाचे बघा म्हणताना टेबला खालुन हळुच १०० सरकवता तेंव्हा स्वतःच्या अक्कल हुषारीचे कौतुक करुन घेता आणी रिक्षावाल्यानी अंधार्‍या रात्री घरी सोडायचे १० रुपये जास्ती मागितले तर लगेच बोंबलता होय ? स्वतः कधी दारु पिउन गाडी चालवली नाहीत का ? मग आमच्या रिक्षात आम्ही दरु पिली, पुडी खाल्ली तर तुमच्या पोटात का दुखते ? पगार वाढवायला सरकारी / बँक नोकरांनी , अनाधिकृत झोपड्या अधिकृत करायला झोपडीवाल्यांनी मोर्चा काढला , कामकाज बंद ठेवले तर त्यांना सहानभुती आणी आम्हाला खेटराची पुजा होय ? आठवडाभर सिग्नलला गाडी बंद करुन उभा राहिला तर ५० रुपये वाचत्याल राव तुमचे, कशाला रुपायापायी आम्हा गरीबाच्या पोटावर पाय देता ? आन असल येव्हडीच हौस तर वाट पाहा (पाहात रहा) आणी पी यम टी नी जावा. आबा गाढाव ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 04/05/2009 - 12:33
एक नंबर हाणला आसेस परा भौ, जबरदस्त .. =)) =)) =)) =)) =)) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मैत्र 04/05/2009 - 14:15
डॉन भौ ... दणदणीत पुनरागमन... मुद्दा एक रुपयापेक्षा वृत्तीचा आणि मुजोरीचा आहे. दिलिप बंड ( काय मस्त नाव आहे) - प्रा प प्रा ( सोप्या भाषेत आर टी ओ) चे मुख्य. त्यांनी मुद्दा मांडला आहे की पेट्रोल डिझेल चे भाव कमी झाले तेव्हा रिक्षाचे दर कमी न करता सी एन जी , एल पी जी ला प्रोत्साहन देऊन जुने दर कायम ठेवावे. ज्यामुळे पुण्याचे प्रदुषण कमी व्हायला मदत होईल. त्याबरोबर सी एन जी / एल पी जी साठीचा खर्च भरून निघायला मदत होईल. या ईंधनाचे दर हे पेट्रोल पेक्षा खूप जास्त परवडतात असं वाचलं होतं. तेव्हापासून दोन महिन्यात कुठल्याही संघटनांनी काहीही केलं नाही. विरोधही केला नाही, वेळ वाढवून मागितला नाही. रिक्षाचालकांना हे तुमच्या आणि पुणेकरांच्या फायद्याचं आहे असं सांगून सी एन जी वापरायला प्रोत्साहनही दिलं नाही. मग जर पेट्रोलचे भाव किमान दहा रुपयांनी कमी झाले तर वीस टक्के दरकपात बारा टक्के भाडे कपातीत जायला काही हरकत नाही. तेव्हा ज्या अर्थी रिक्षा संघटना आणि रिक्षाचालकांनी काहीही हालचाल केली नाही त्या अर्थी त्यांना ही भाडे कपात मान्य आहे! अभिज्ञ - पी एम पी एम एल ने एक रुपयाने भाडे कपात केली आहे. कंपनीच्या बसेस च्या भाड्यात त्या प्रमाणात कपात झाली आहे. मुंबई, ठाणे इथे रिक्षाचे दर असेच कमी झाले आहेत. पुण्याचे रिक्षावालेही असेच पुणेरी आणि एम एच बाराचे आहेत हे सिद्ध झालं आहे. दहा लाखांवर दुचाकी आणि दोन तीन लाख चार चाकी असलेले पुणे फक्त पंचवीस ते तीस हजार रिक्षा रस्त्यावर न उतरल्याने किती सुसह्य होते ते कोणी गेल्या तीन दिवसात अनुभवले का? पुण्यातले प्रदूषण अचानक प्रचंड प्रमाणात आणि जाणवण्याइतके कमी झाले. कुठेही ट्रॅफिक जाम नव्हते. पोलिसांचा कामाचा ताण कमी झाला असे ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. याचा अर्थ काय होतो? सुज्ञास सांगणे न लगे. पण याचा अर्थ रिक्षा ही सोय आहे पण त्यामुळे संपूर्ण वाहतूकीवर ताण येतो, प्रदुषण खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि बेशिस्त, बेमुर्वत पणे हाकण्याची प्रवृत्ती वाढते. भाडे वाढवून जगातले सर्व शहरातले रिक्षा आणी टॅक्सी वाले मागतात आणि फसवतात. बेंगलूरू ला कदाचित अनभिषिक्त सम्राट म्हणून घोषित करता येईल. मूळ मुद्दा काळ सोकावतो -- एक हैदराबादचा एकदम सारखा अनुभव. हैदराबादमध्ये इन्फोसिस, विप्रो, पोलॅरिस, मायक्रोसॉफ्ट, आय एस बी वगैरे एका नवीन वसवलेल्या भागात आहेत जिथे सुमारे दोन वर्षापूर्वी काहीही सोयी नव्हत्या. मेन रोड पासून सुमारे दिड ते अडीच किलोमीटर अंतर आतमध्ये जाण्यासाठी शेअर रिक्षा प्रत्येकी तीन ते चार रुपये घेत होत्या. एका रिक्षात किमान पाच जण !! अर्थात ती हैदराबादची परंपरा आहे. पेट्रोल डिझेलच्या भाड्यात भाववाढ झाल्याने त्यांनी थेट तीन चे चार आणि चार चे पाच केले. डिझेल चे भाव वाढले तीन रुपयांनी लिटर मागे - यांनी भाव वाढवले पाच रुपये एक दोन किलोमीटर मागे. खूप आरडा ओरडा केला गेला. तेव्हा "तुम्ही इतके कमावता मग आम्हाला थोडे दिले तर काय बिघडलं"चा नेहमीचा घोष झाला. आता भाव उतरले पण हे भाडे तसेच राहिले! काळ सोकावतो हेच खरं.

In reply to by मैत्र

मनिष 04/05/2009 - 14:31
दहा लाखांवर दुचाकी आणि दोन तीन लाख चार चाकी असलेले पुणे फक्त पंचवीस ते तीस हजार रिक्षा रस्त्यावर न उतरल्याने किती सुसह्य होते ते कोणी गेल्या तीन दिवसात अनुभवले का? पुण्यातले प्रदूषण अचानक प्रचंड प्रमाणात आणि जाणवण्याइतके कमी झाले. कुठेही ट्रॅफिक जाम नव्हते. पोलिसांचा कामाचा ताण कमी झाला असे ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. याचा अर्थ काय होतो? सुज्ञास सांगणे न लगे. पण याचा अर्थ रिक्षा ही सोय आहे पण त्यामुळे संपूर्ण वाहतूकीवर ताण येतो, प्रदुषण खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि बेशिस्त, बेमुर्वत पणे हाकण्याची प्रवृत्ती वाढते. भाडे वाढवून जगातले सर्व शहरातले रिक्षा आणी टॅक्सी वाले मागतात आणि फसवतात.
बेशिस्त खूप कमी होते. रिक्षावाल्यांकडे पोलिसांनी पी. यू. सी. (कार आणि दुचाकी प्रमाणे) मागितल्याचे पाहिले नाही. रिक्षावाल्यांच्या माजोरीपणावर एक स्वतंत्र लेखच लिहीता येईल. शिवाय जेंव्हा पेट्रोल ५०चे ५५ रु. झाले तेव्हा भाडे किलोमईट्र ला ६ चे ८ झाले - ३३% वाढ. तेंव्हा रिक्षेवाल्यांच्या संघटनांनी (बाबा आढाव धरून) पेट्रोल ६५ रु. होईपर्यंत भाववाढ करणार नाही असे सांगितले होते. आता पेट्रोल ५५ चे ४५ झाले आहे. रिक्षावाल्यांच्या आधिच्या हिशोबाने जायचे तर ४ रु> भावकपात केली पाहिजे; निदान २ रू. तरी; पण फक्त १ रू कपात करून आर टी ऑ ने खरे तर खूपच मवाळ भाडेकपात केली आहे, कुठेतरी रिक्षावाल्यांच्या मुजोर आणि मनमानी वागण्याला आळा बसलाच पाहिजे!

In reply to by मैत्र

चिरोटा 04/05/2009 - 19:03
बेंगलूरू ला कदाचित अनभिषिक्त सम्राट म्हणून घोषित करता येईल
सहमत्.**त प्रचंड मस्ती असेल तर बेंगळुरुचे रिक्षा चालक. मीटर पे़क्षा जास्त भाडे मिळत नसेल तर रि़क्षा तशीच २/३ तास रिकामी ठेवून गप्पा मारत बसतील . पॅसेंजर आणि चालक ह्यांची दररोजची खडाजंगी ठरलेली असते.ही मस्ती चढायला कारणीभूत महानगर पालिकेची दळभद्री बससेवा. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

रेवती 05/05/2009 - 01:17
चांगला लेख आहे. चर्चाही चांगली आहे. तसं पुण्यात राहून म्हणावा असा वाईट अनुभव (अमक्या ठीकाणी येणार नाही असंही फारसं नाही) आला नाही.;) आता पुण्यात गेले की माझ्या मुलाला रिक्षा हा प्रकार नविन व भन्नाट वाटतो. रिक्षातून उतरताना त्याने काहीवेळा किती 'डॉलर' द्यायचे असं (मजा वाटाते म्हणून)विचारल्यावर मात्र्.......वाईट्ट अनुभव आले. त्याला आता दम दिलाय की तोंड उघडायचं नाही म्हणून. रेवती
आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले ( काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....". हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ?

दुनियादारी - माझ्या नजरेने !

दशानन ·

देवदत्त 01/05/2009 - 23:37
फक्त मनात एकच विचार आला हे मिस्टर सुहास शिरवळकर कुठे भेटतील व त्यांचे कसे आभार मानावेत एवढे सुंदर चित्रण लिहल्या बद्दल ? राजे, मिस्टर सुहास शिरवळकर आता आपल्यात नाहीत. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले.

In reply to by देवदत्त

दशानन 02/05/2009 - 00:09
अरे रे :( त्यांना माझी हीच श्रध्दांजली ! ज्या मानवाच्या लेखणीमध्ये दोन दशके हलवण्याची ताकत असेल त्याला माझा ही लेखणीद्वारे हा दंडवत. थोडेसं नवीन !

सागर 02/05/2009 - 00:12
धन्यवाद राजे, माझ्या विनंतीला मान देऊन दुनियादारीवर लिहिलेत त्याबद्दल. खरेतर मी काही सांगायची गरजच नव्हती.... दुनियादारी वाचल्यावर तुमच्या मनातील विचार आपोआपच मि.पा. वर उमटणार होते याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती... छान भाव व्यक्त केले आहेत दुनियादारी वाचून झाल्यावर ... :) देवदत्ता खरे आहे बाबा... एवढा चांगला लेखक आपल्यातून तसा बराच लवकर गेला.... अगदी पन्नाशीत रहस्यकथां.... सामाजिक कथा.... भयकथा .... अत्भुतकथा... विनोदी कथा....अशा अनेक विषयांवर शिरवळकरांची पकड होती.... अनुभव, वेशीपलिकडे, गुणगुण या रहस्यकादंबर्‍या अप्रतिमच आहेत.... बॅरिस्टर अमर विश्वासाच्या कथा वाचताना आपण प्रत्यक्ष कोर्टात बसल्याचा अनुभव मिळतो. तर कधी दारा बुलंदच्या साहसकथा वाचताना राजस्थानाच्या जैसलमेरच्या वाळवंटी वातावरणाचा फील येतो... मंदार पटवर्धन आणि फिरोज इराणीच्या कथा मुंबईतील वास्तव जीवनाचे दर्शन घडवतात..... तर कधी पाळं-मुळं सारखी देशभक्तीपर कादंबरी ... विनोदी कादंबरी देखील या लेखकाने अतिशय उत्तम लिहिल्या आहेत. जाता - येता आणि बरसात चांदण्यांची ह्या २ कादंबर्‍या याची उत्तम उदाहरणे आहेत.... तरीही हा अप्रतिम आणि समाजमनाची उत्तम जाण असलेला हा लेखक चाकोरीबाहेर लिहिणारा म्हणून जास्त प्रसिद्ध होता... कोवळीक, दास्तान, कोसळ, मधुचंद्र ह्या पुस्तकांतून याची प्रचिती येते... एवढा हरहुन्नरी आणि विलक्षण ताकदीचा लेखक त्याच्या हयातीत फारसा चर्चिला गेला नाही ही खरेच दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेन. तरी त्यांच्या विपुल लेखनाने मराठी मनांवर कायमची पकड मिळविली आहे आणि यापुढेही त्यांची सर्व पुस्तके अतिशय आवडीने आजची व यापुढील पिढ्या आत्मियतेने वाचतील यांत तीळमात्र शंका नाही.... अर्थात यात आपली आवडती दुनियादारी आहेच... आपल्या आवडत्या सुशिंना आदराचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली... (सुशी प्रेमी) सागर

In reply to by सागर

दशानन 02/05/2009 - 00:24
दुनियादारीचे हिंदी मध्ये भाषांतर झालेले आहे काय ? माझ्या काही मित्रांना आज कट्टावर ह्या पुस्तकाबद्दल सांगितल्यावर वाचण्याची इच्छा आहे त्यांना, एक तर हिंदी मध्ये भाषांतरीत पुस्तक असेल तर माझे काम सोपे होईल नाही तर त्यांना मी कशी काय दुनियादारी समजवून देऊ शकेन हे आई भवानीलाच माहीत ! थोडेसं नवीन !

In reply to by सागर

अभिज्ञ 02/05/2009 - 03:11
मला वाटत सुशि वगैरे वाचणारा एक विशिष्ट वयोगट असतो. साधारण तरूण वयात हे वाङमय भुरळ पाडते. सुशि,श्रीकांत सिनकर..वगैरे ह्यांचे साहित्य मी साधारण १८ ते २२ या वयात असताना वाचले असेन. तेंव्हा डोक्यात ह्या पुस्तकांची धुंदी होती. मला तेंव्हा पुल,वपु ह्यांचे लिखाण जास्त आकर्षित वाटत नव्हते.परंतु पुढे पुढे जस जसे इतर साहित्य वाचत गेलो तेंव्हा सुशि,सिनकर ...ह्यांचे साहित्य वाचणे पार मागे पडले. हे असे का झाले हे मलाहि ठाउक नाही.परंतु नंतर हि पुस्तके वाचावीत असे कधीच उत्स्फुर्तपणे वाटले नाही. सुशिं नी इतरहि कादंब-या (विनोदी) लिहिल्या आहेत हे माहित नव्हते. नक्कीच मिळवून वाचल्या पाहिजेत. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

सागर 02/05/2009 - 13:08
मला वाटत सुशि वगैरे वाचणारा एक विशिष्ट वयोगट असतो. साधारण तरूण वयात हे वाङमय भुरळ पाडते. अभिज्ञ, मी काहीसा असहमत आहे या विधानाशी... माझ्यामते प्रत्येक लेखकाची एक विशिष्ट शैली असते आणि ती तुम्हाला एकदा भावली की मग आपण त्या लेखकाचे पुस्तक कधी वाचतो आहोत याने फारसा फरक नाही पडत. मुख्य गोष्ट असते ती पुस्तकातील कथानकाशी तुम्ही किती समरस होता याची... एकदा समरस झालात की वय हे बंधन उरत नाही... मी पुल,वपु , गोनीदा, ह. ना. आपटे, गो ना दातार, नाथमाधव, विश्वास पाटील, रणजीत देसाई, बाबासाहेब पुरंदरे, वि.ग. कानिटकर ,इ... इ.... बरीच पुस्तके सु.शींची पुस्तके वाचत असण्याच्याच वयात तेवढ्याच तन्मयतेने वाचली आहेत ... आजही वाचत आहे. अर्थात मी यावर अधिकाराने भाष्य नाही करु शकणार कारण मी आत्ता ३२-३३ वर्षांचा आहे, आणि आजही सु.शी. मी तेवढ्याच तल्लीनतेने वाचतो... त्यामुळे सध्यातरी माझ्या बाबतीत ही गोष्ट लागू होत नाही... पुढचे माहित नाही ;) येथील ज्येष्ठ सदस्य यावर अधिक प्रकाश टाकू शकतील... सु.शींची जाता येता आणि बरसात चांदण्यांची ही पुस्तके अवश्य वाचा... खूप छान मनोरंजन होईन... :) धन्यवाद, सागर

टारझन 02/05/2009 - 00:32
राजे .. दुनियादारी वाचून पाणवले का डॉळे ? मी बी रडलो व्हतो राव ... दुनियादारी लेखकाला आमची पण श्रद्धांजली

In reply to by टारझन

दशानन 02/05/2009 - 00:46
दुनियादारीमुळे मला मीच सापडलो ! हे कर्ज आहे सुशिचे माझ्यावर ! मी पण असाच आहे फाटका एमके माझ्यामध्ये देखील वेगळा कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ तर कधी दारुमुळे झालेली अबाळ मी असाच एक श्रेयस दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता अचानक दुनियादारी शिकलेला हरवलेल्या मित्रांमध्ये कधी श्री तर कधी नितीन शोधत असलेला संतोष बार च्या अंधा-या टेबलवर दुनियादारीचा हिशोब मांडलेला मीच तो एम के कधी श्रेयस असलेला ! क्रमशः लिहायची जराही इच्छा नव्हती पण जेथे शब्दच आटले तेथे मी काय लिहणार, त्यामुळे क्रमशः उद्याच दुसरा भाग पुर्ण टाकतो. थोडेसं नवीन !

मित्रा, तुझा लेख वाचून किती आणि किती आनंद झालाय ते सांगताच येत नाहीये !! मी दुनियादारीवरचा लेख लिहिला आणि मला अजून काही मित्र मिळाले.... सगळेच जण दुनियादारीवेडे :) आपल्या दुर्दैवाने सुहास शिरवळकरांचं अकाली निधन झालं पण ते तुला त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून भेटतील. शिरवळकरांचा मुलगा माझा चांगला मित्र आहे आणि या लेखाची लिंक मी त्याला नक्की देईन. ---------------------- सागरने चांगली पुस्तकं सांगितली आहेतच शिवाय या पुस्तकांपैकी बघ कुठली वाचता येतायत -- १) कल्पांत २) ओ ! गॉड ३) अखेर ४) समांतर ५) क्षणोक्षणी ६) सॉरी सर ७) जुगार (फिरोज इराणी या पात्राचे पहिले पुस्तक) ८) झूम ९) क्षितीज १०) प्रयास आणि जी कुठली मिळतील ती !!!!! पण एक मात्र नक्की -- दुनियादारी या सगळ्यांचा मास्टर पीस आहे.

In reply to by संदीप चित्रे

दशानन 02/05/2009 - 01:07
तुमच्या लेखामुळेच तर दुनियादारीच्यामागे पडलो व सागर मुळे मला लवकरात लवकर वाचावयास मिळाली :) हे तुमचे अनंत उपकार माझ्यावर ! थोडेसं नवीन !

In reply to by संदीप चित्रे

सागर 02/05/2009 - 12:59
संदीप, खूप नशीबवान आहेस रे बाबा.. एवढ्या प्रतिभावान लेखकाच्या मुलाशी तुझी दोस्ती आहे... नक्की सांग रे त्याला ... म्हणाव त्याच्या बाबांनी संपूर्ण समाजमन हलवून सोडलं होतं.... लोक मृत्यूंजय साठी शिवाजी सावंतांना.... पानिपतासाठी विश्वास पाटीलांना ... ओळखतात. असे अनेक लेखक आहेत की ज्यांना लोक त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकासाठी ओळखतात.... पण खास लेखकासाठी पुस्तके वाचक घेतात अशा अगदी मोजक्या लेखकांमध्ये सुहास शिरवळकर होते यातच या प्रतिभावान लेखकाचे यश आहे... सुशिंची कोणतेही पुस्तक घ्यावे आणि वाचावे... अगदी निर्भेळ दिलखुलास आनंद मिळण्याची गॅरंटीच होती... एवढे सातत्याने आणि लोकांना आवडणारे लेखन करणे म्हणजे खूप मोठी तपश्चर्याच म्हणावी लागेल... अर्थात सचिन तेंडुलकरही कधीतरी शून्यवर आउट होतो तसे अगदी मोजकी १-२ पुस्तके सुशींची त्यांच्या नेहमीच्या वकूबाप्रमाणे झाली नाहीत हे ही खरे.. पण जवळपास ९९ % सुशींची पुस्तके अगदी सुंदर या कॅटेगरीत मोडतात... (सुशी प्रेमी) सागर

बेसनलाडू 02/05/2009 - 02:29
या पुस्तकावर दुसर्‍यांना इतका चांगला अभिप्राय आल्यावर आता वाचणे भागच आहे. लवकरच वाचायला मिळो ही सदिच्छा! (वाचक)बेसनलाडू

In reply to by शितल

सागर 02/05/2009 - 12:49
भारतात असाल तर http://www.erasik.com/ येथून खरेदी करु शकाल नेमकी लिंक हवी असेन तर http://www.erasik.com/books/by/Shiravalakar%20Suhas/page2/ या पानावर दुनियादारी मिळेल आणि विदेशात राहणार्‍या मित्रांसाठी http://www.rasik.com/ आहेच :) मराठी अनुवादीत व इतर अनेक चांगली पुस्तके http://www.mehtapublishinghouse.com/ येथूनही खरेदी करता येतात बर्‍याच जणांना हे माहीत असेन. पण नसेन त्यांच्यासाठी पर्वणी :) (मराठी पुस्तकप्रेमी) सागर

अवलिया 02/05/2009 - 06:54
राजे ! छान लेख ! साल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलास बघ !! (काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला) अवलिया

हम्म्म्म राजे नेमके शनीवारीच असले हळवे विषय तुम्ही का काढता बॉ ? दुनियादारीने एक वाचक म्हणुन खुप संपन्न केले. जेव्हडे लिहावे तेव्हडे कमीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

कॉलेजात असताना दुनियादारी अवचित मिळाली वाचायला. झालं काय की माझ्याऐवजी बाबा गेले लायब्ररीतलं पुस्तक बदलायला आणि त्यांना हे अगदी नवे पुस्तक आलेले दिसले. नवेकोरे म्हणजे अजून स्टँप मारुन पण झालेला नव्हता म्हणून त्यांनी उत्सुकतेने तेच पुस्तक स्टँप लवकर मारवून घेऊन घरी आणले , चाळले आणि पूर्णच वाचले . लग्गेचच मला आणि बहिणीला रेकमेंड केले.. बिल्डिंगमधल्या जवळजवळ सगळ्या पोराटोरांना जी कॉलेजात होती आणि जाऊ घातली होती अशा सगळ्यांना त्यांनी हे पुस्तक वाचायला सांगितले,:)नंतर अर्थातच पुस्तकाची पारायणे केली. विकतही घेतले होते पण ते असेच कोणाला तरी वाचायला दिले ते परतच नाही आले.. आणि कोणी नेले आहे ते आठवत नाहीये,:( आत्ताच्या आत्ता दोनदोनदा दुनियादारीवर चर्चा झालेली वाचून आठवणी ताज्या झाल्या, परत एकदा वाचायला पाहिजे आता..(आधी मिळायला हवे.) स्वाती

ठकू 02/05/2009 - 12:52
'दुनियादारी'ला जास्त प्रसिद्धी मिळाली, ती त्या कथेवर बनवलेल्या मालिकेमुळे. पण पुस्तकातला 'इफेक्ट' मालिकेमध्ये नाही आला. : सु.शिं. ची खासियत म्हणजे त्यांनी 'तेव्हा' लिहिलेल्या कथाही 'आजच्या' वाटतात. त्यांच्या 'मंदार कथा', 'अमर कथा', 'फिरोज कथा' तर प्रसिद्ध आहेतच. पण त्यांच्या 'क्लासिक' (हा शब्द सु.शि. फॅन अजिंक्यचा बरं का!) म्हणवता येतील, अशा 'रुपमती', 'जमीन आसमान' ह्या कादंब-या अवश्य वाचा. स्थळ-काळाचं बंधन तोडून या माणसाने जे काही लिहिलंय, ते 'भन्नाट' या शब्दाव्यतिरिक्त मला व्यक्त करताच येत नाही. ज्या व्यक्तिने 'राजस्थान' कधी पाहिलंच नाही, त्या व्यक्तिने 'दारा बुलंद' कथा कशा लिहिल्या असतील? त्यांच्या 'कल्पांत' या कादंबरीवरही त्याच नावाची मालिका बनवण्यात आली होती. ज्यात मिलिंद गुणाजी आणि चिन्मयी सुर्वे राघवन यांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या. 'देवकी' नावाच चित्रपटही सु.शि.दांच्या कादंबरीवर आधारीत होता. ज्यासाठी त्यांना पटकथा लेखनाचा पुरस्कारही मिळाला. आपल्याला जर खरंच सु.शि.दांची पुस्तकं वाचायची असतील किंवा कलेक्शन करायचं असेल, तर प्रकाशन कंपनीचं आणि पुस्तकाचं नाव याची यादी सोबत दिली आहे. यादी इंग्रजीमध्ये असल्याबद्दल क्षमस्व. कारण मी ती ऑर्कुट वरून कॉपी पेस्ट केलेली आहे. ज्यांचे ऑर्कुट खाते आहे, ते या दुव्यावर टिचकी देऊन 'सुहास शिरवळकर कम्युनिटीची' वाटचाल पाहू शकतात.' List of Books with Publication Dilipraj Prakashan 251 C, Shanivar Peth, Pune - 411030 1. Marmabandh 2. Moods 3. Wonder Twelve 4. Not Guilty 5. Maranottar 6. Kshan kshan Ayushaya 7. Hi-way murder 8. Binshart 9. Mhanoon (He ek faar majeshir pustak aahe.) 10. Terific 11. Matam 12. Mutkti 13. Padadhyaad 14. Gungun 15. Sorry sir 16. Silence please 17. Madhyam 18. Sansanati 19. Sanshay 20. Tukada tukada chandra 21. Aseem 22. Veshipalikade 23. Nidan 24. Kshitij 25. Asahya 26. Nyay-anyay 27. Janiv 28. Jivghena 29. Dastan 30. Hello hello 31. Stupid 32. Barsat chandanyachi 33. Yogayog 34. Master plan 35. Saalam 36. Kill crazy 36. Dukadhuak 37. Ethun thithun 38. Kanakanane ************************************** Shashideep Prakashan Mr. Shashideep Khopkar 44, Mukundnagar, Siddharth Chamber, Pune Phone: 24220154 / Mobile: 9850150225 1. Duniyadari 2. Nimittamatra 3. Thararak 4. Kramasha 5. Operation bullet 6. Star hunters 7. Izzat 8. Gold heaven 9. Aakrosh 10. Tharrat 11. Challange 12. Safai 13. Hirvi nazar 14. Bhayanak 15. Kale yug 16. Trailor girl 17. Sannata 18. Last bullet 19. To..! 20. Sahaj 21. Dead shot 22. Panchali 23. Havyas 24. Gafil 25. Black cobra 26. Avadhavya 27. Poladi 28. Baladhya 29. Pahadi 30. Prayas सु.शिंच्या पुस्तकातील अर्पणपत्रिका पाहायच्या असतील, तर येथे टिचकी देऊन पाहता येतील. अतिशय सुंदर अर्पणपत्रिका आहेत. आणखी काही माहिती हवी असेल, तर याच धाग्यात प्रतिसाद द्या. वैधानिक इशारा: सुहास शिरवळकरांच्या 'अमर कथा' वाचून शिवाजी पार्क परिसरातील 'अमर मंझिल' नावाची आठ माळ्याची इमारत शोधून काढण्याचा मोह होतो. सर्व 'अमर कथा' कथा काल्पनिक आहेत, याची जाणीव असावी. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

ठकू 02/05/2009 - 12:55
अवांतर (पण सु.शि. फॅन्ससाठी महत्वाचे): Dilipraj Prakashan 251 C, Shanivar Peth, Pune - 411030 सु.शिंचं घर याच इमारतीत आहे, बरं का! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

सुशिंच्या एका नितांतसुंदर पुस्तकाचा उल्लेख इथे राहुन गेला आहेसं वाटतं.. हृदयस्पर्श .... (किडनीच्या आजाराने त्रस्त एक मनस्वी कवी "लौकीक" आणि एक मैफीलीतुन गाणारी गायिका "मैत्राली" यांच्या जगावेगळ्या नात्याची कथा सांगणारी ही कादंबरी खुप सुंदर आहे.) जरुर वाचा. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

In reply to by विशाल कुलकर्णी

सागर 22/05/2009 - 16:54
हृदयस्पर्शच नाही तर अनेक पुस्तके या यादीत राहिली आहेत :) तलखी हे त्यातील एक आजच ई-रसिक्.कॉम वरची माझी सुहास शिरवळकरांची ११ पुस्तकांची ऑर्डर पूर्ण झाली आहे. २-३ दिवसांत मला ही पुस्तके मिळतील. तेव्हा माझा अनुभव सांगेन तुम्हा सर्वांना.... ई-रसिक्.कॉम वर छान पुस्तकांचा साठा उपलब्ध आहे धन्यवाद सागर

In reply to by सागर

सागर 29/05/2009 - 22:42
मित्रांनो, आजच मला सु.शिंची मी ऑर्डर केलेली ११ पुस्तके स्पीड पोस्ट ने मिळाली. ई-रसिक.कॉम अजून पूर्ण तयार नसेन. पण सध्या संकेतस्थळावर दिलेल्या ई-मेलवर तुमची मागणी नोंदवली की पुढचा संपर्क खूप चांगल्या पद्धतीने होतो. तुमची ऑर्डर पूर्ण करायला वेळ लागत असेन तर तसेही ते सांगतात व ऑर्डर पाठवल्याचे डिटेल्स देखील तुम्हाला ईमेल केले जातात. माझा पहिला अनुभव तर नक्कीच छान आहे. आता सु.शिंच्या पुस्तकाचा आस्वाद घेतो २ दिवस सुट्टी आहे तर :) धन्यवाद सागर

अगदी त्यात कथापोर्णिमा, पांचाली, शॅली शॅली ही नावे पण महत्वाची ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

देवदत्त 01/05/2009 - 23:37
फक्त मनात एकच विचार आला हे मिस्टर सुहास शिरवळकर कुठे भेटतील व त्यांचे कसे आभार मानावेत एवढे सुंदर चित्रण लिहल्या बद्दल ? राजे, मिस्टर सुहास शिरवळकर आता आपल्यात नाहीत. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले.

In reply to by देवदत्त

दशानन 02/05/2009 - 00:09
अरे रे :( त्यांना माझी हीच श्रध्दांजली ! ज्या मानवाच्या लेखणीमध्ये दोन दशके हलवण्याची ताकत असेल त्याला माझा ही लेखणीद्वारे हा दंडवत. थोडेसं नवीन !

सागर 02/05/2009 - 00:12
धन्यवाद राजे, माझ्या विनंतीला मान देऊन दुनियादारीवर लिहिलेत त्याबद्दल. खरेतर मी काही सांगायची गरजच नव्हती.... दुनियादारी वाचल्यावर तुमच्या मनातील विचार आपोआपच मि.पा. वर उमटणार होते याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती... छान भाव व्यक्त केले आहेत दुनियादारी वाचून झाल्यावर ... :) देवदत्ता खरे आहे बाबा... एवढा चांगला लेखक आपल्यातून तसा बराच लवकर गेला.... अगदी पन्नाशीत रहस्यकथां.... सामाजिक कथा.... भयकथा .... अत्भुतकथा... विनोदी कथा....अशा अनेक विषयांवर शिरवळकरांची पकड होती.... अनुभव, वेशीपलिकडे, गुणगुण या रहस्यकादंबर्‍या अप्रतिमच आहेत.... बॅरिस्टर अमर विश्वासाच्या कथा वाचताना आपण प्रत्यक्ष कोर्टात बसल्याचा अनुभव मिळतो. तर कधी दारा बुलंदच्या साहसकथा वाचताना राजस्थानाच्या जैसलमेरच्या वाळवंटी वातावरणाचा फील येतो... मंदार पटवर्धन आणि फिरोज इराणीच्या कथा मुंबईतील वास्तव जीवनाचे दर्शन घडवतात..... तर कधी पाळं-मुळं सारखी देशभक्तीपर कादंबरी ... विनोदी कादंबरी देखील या लेखकाने अतिशय उत्तम लिहिल्या आहेत. जाता - येता आणि बरसात चांदण्यांची ह्या २ कादंबर्‍या याची उत्तम उदाहरणे आहेत.... तरीही हा अप्रतिम आणि समाजमनाची उत्तम जाण असलेला हा लेखक चाकोरीबाहेर लिहिणारा म्हणून जास्त प्रसिद्ध होता... कोवळीक, दास्तान, कोसळ, मधुचंद्र ह्या पुस्तकांतून याची प्रचिती येते... एवढा हरहुन्नरी आणि विलक्षण ताकदीचा लेखक त्याच्या हयातीत फारसा चर्चिला गेला नाही ही खरेच दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेन. तरी त्यांच्या विपुल लेखनाने मराठी मनांवर कायमची पकड मिळविली आहे आणि यापुढेही त्यांची सर्व पुस्तके अतिशय आवडीने आजची व यापुढील पिढ्या आत्मियतेने वाचतील यांत तीळमात्र शंका नाही.... अर्थात यात आपली आवडती दुनियादारी आहेच... आपल्या आवडत्या सुशिंना आदराचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली... (सुशी प्रेमी) सागर

In reply to by सागर

दशानन 02/05/2009 - 00:24
दुनियादारीचे हिंदी मध्ये भाषांतर झालेले आहे काय ? माझ्या काही मित्रांना आज कट्टावर ह्या पुस्तकाबद्दल सांगितल्यावर वाचण्याची इच्छा आहे त्यांना, एक तर हिंदी मध्ये भाषांतरीत पुस्तक असेल तर माझे काम सोपे होईल नाही तर त्यांना मी कशी काय दुनियादारी समजवून देऊ शकेन हे आई भवानीलाच माहीत ! थोडेसं नवीन !

In reply to by सागर

अभिज्ञ 02/05/2009 - 03:11
मला वाटत सुशि वगैरे वाचणारा एक विशिष्ट वयोगट असतो. साधारण तरूण वयात हे वाङमय भुरळ पाडते. सुशि,श्रीकांत सिनकर..वगैरे ह्यांचे साहित्य मी साधारण १८ ते २२ या वयात असताना वाचले असेन. तेंव्हा डोक्यात ह्या पुस्तकांची धुंदी होती. मला तेंव्हा पुल,वपु ह्यांचे लिखाण जास्त आकर्षित वाटत नव्हते.परंतु पुढे पुढे जस जसे इतर साहित्य वाचत गेलो तेंव्हा सुशि,सिनकर ...ह्यांचे साहित्य वाचणे पार मागे पडले. हे असे का झाले हे मलाहि ठाउक नाही.परंतु नंतर हि पुस्तके वाचावीत असे कधीच उत्स्फुर्तपणे वाटले नाही. सुशिं नी इतरहि कादंब-या (विनोदी) लिहिल्या आहेत हे माहित नव्हते. नक्कीच मिळवून वाचल्या पाहिजेत. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

सागर 02/05/2009 - 13:08
मला वाटत सुशि वगैरे वाचणारा एक विशिष्ट वयोगट असतो. साधारण तरूण वयात हे वाङमय भुरळ पाडते. अभिज्ञ, मी काहीसा असहमत आहे या विधानाशी... माझ्यामते प्रत्येक लेखकाची एक विशिष्ट शैली असते आणि ती तुम्हाला एकदा भावली की मग आपण त्या लेखकाचे पुस्तक कधी वाचतो आहोत याने फारसा फरक नाही पडत. मुख्य गोष्ट असते ती पुस्तकातील कथानकाशी तुम्ही किती समरस होता याची... एकदा समरस झालात की वय हे बंधन उरत नाही... मी पुल,वपु , गोनीदा, ह. ना. आपटे, गो ना दातार, नाथमाधव, विश्वास पाटील, रणजीत देसाई, बाबासाहेब पुरंदरे, वि.ग. कानिटकर ,इ... इ.... बरीच पुस्तके सु.शींची पुस्तके वाचत असण्याच्याच वयात तेवढ्याच तन्मयतेने वाचली आहेत ... आजही वाचत आहे. अर्थात मी यावर अधिकाराने भाष्य नाही करु शकणार कारण मी आत्ता ३२-३३ वर्षांचा आहे, आणि आजही सु.शी. मी तेवढ्याच तल्लीनतेने वाचतो... त्यामुळे सध्यातरी माझ्या बाबतीत ही गोष्ट लागू होत नाही... पुढचे माहित नाही ;) येथील ज्येष्ठ सदस्य यावर अधिक प्रकाश टाकू शकतील... सु.शींची जाता येता आणि बरसात चांदण्यांची ही पुस्तके अवश्य वाचा... खूप छान मनोरंजन होईन... :) धन्यवाद, सागर

टारझन 02/05/2009 - 00:32
राजे .. दुनियादारी वाचून पाणवले का डॉळे ? मी बी रडलो व्हतो राव ... दुनियादारी लेखकाला आमची पण श्रद्धांजली

In reply to by टारझन

दशानन 02/05/2009 - 00:46
दुनियादारीमुळे मला मीच सापडलो ! हे कर्ज आहे सुशिचे माझ्यावर ! मी पण असाच आहे फाटका एमके माझ्यामध्ये देखील वेगळा कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ तर कधी दारुमुळे झालेली अबाळ मी असाच एक श्रेयस दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता अचानक दुनियादारी शिकलेला हरवलेल्या मित्रांमध्ये कधी श्री तर कधी नितीन शोधत असलेला संतोष बार च्या अंधा-या टेबलवर दुनियादारीचा हिशोब मांडलेला मीच तो एम के कधी श्रेयस असलेला ! क्रमशः लिहायची जराही इच्छा नव्हती पण जेथे शब्दच आटले तेथे मी काय लिहणार, त्यामुळे क्रमशः उद्याच दुसरा भाग पुर्ण टाकतो. थोडेसं नवीन !

मित्रा, तुझा लेख वाचून किती आणि किती आनंद झालाय ते सांगताच येत नाहीये !! मी दुनियादारीवरचा लेख लिहिला आणि मला अजून काही मित्र मिळाले.... सगळेच जण दुनियादारीवेडे :) आपल्या दुर्दैवाने सुहास शिरवळकरांचं अकाली निधन झालं पण ते तुला त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून भेटतील. शिरवळकरांचा मुलगा माझा चांगला मित्र आहे आणि या लेखाची लिंक मी त्याला नक्की देईन. ---------------------- सागरने चांगली पुस्तकं सांगितली आहेतच शिवाय या पुस्तकांपैकी बघ कुठली वाचता येतायत -- १) कल्पांत २) ओ ! गॉड ३) अखेर ४) समांतर ५) क्षणोक्षणी ६) सॉरी सर ७) जुगार (फिरोज इराणी या पात्राचे पहिले पुस्तक) ८) झूम ९) क्षितीज १०) प्रयास आणि जी कुठली मिळतील ती !!!!! पण एक मात्र नक्की -- दुनियादारी या सगळ्यांचा मास्टर पीस आहे.

In reply to by संदीप चित्रे

दशानन 02/05/2009 - 01:07
तुमच्या लेखामुळेच तर दुनियादारीच्यामागे पडलो व सागर मुळे मला लवकरात लवकर वाचावयास मिळाली :) हे तुमचे अनंत उपकार माझ्यावर ! थोडेसं नवीन !

In reply to by संदीप चित्रे

सागर 02/05/2009 - 12:59
संदीप, खूप नशीबवान आहेस रे बाबा.. एवढ्या प्रतिभावान लेखकाच्या मुलाशी तुझी दोस्ती आहे... नक्की सांग रे त्याला ... म्हणाव त्याच्या बाबांनी संपूर्ण समाजमन हलवून सोडलं होतं.... लोक मृत्यूंजय साठी शिवाजी सावंतांना.... पानिपतासाठी विश्वास पाटीलांना ... ओळखतात. असे अनेक लेखक आहेत की ज्यांना लोक त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकासाठी ओळखतात.... पण खास लेखकासाठी पुस्तके वाचक घेतात अशा अगदी मोजक्या लेखकांमध्ये सुहास शिरवळकर होते यातच या प्रतिभावान लेखकाचे यश आहे... सुशिंची कोणतेही पुस्तक घ्यावे आणि वाचावे... अगदी निर्भेळ दिलखुलास आनंद मिळण्याची गॅरंटीच होती... एवढे सातत्याने आणि लोकांना आवडणारे लेखन करणे म्हणजे खूप मोठी तपश्चर्याच म्हणावी लागेल... अर्थात सचिन तेंडुलकरही कधीतरी शून्यवर आउट होतो तसे अगदी मोजकी १-२ पुस्तके सुशींची त्यांच्या नेहमीच्या वकूबाप्रमाणे झाली नाहीत हे ही खरे.. पण जवळपास ९९ % सुशींची पुस्तके अगदी सुंदर या कॅटेगरीत मोडतात... (सुशी प्रेमी) सागर

बेसनलाडू 02/05/2009 - 02:29
या पुस्तकावर दुसर्‍यांना इतका चांगला अभिप्राय आल्यावर आता वाचणे भागच आहे. लवकरच वाचायला मिळो ही सदिच्छा! (वाचक)बेसनलाडू

In reply to by शितल

सागर 02/05/2009 - 12:49
भारतात असाल तर http://www.erasik.com/ येथून खरेदी करु शकाल नेमकी लिंक हवी असेन तर http://www.erasik.com/books/by/Shiravalakar%20Suhas/page2/ या पानावर दुनियादारी मिळेल आणि विदेशात राहणार्‍या मित्रांसाठी http://www.rasik.com/ आहेच :) मराठी अनुवादीत व इतर अनेक चांगली पुस्तके http://www.mehtapublishinghouse.com/ येथूनही खरेदी करता येतात बर्‍याच जणांना हे माहीत असेन. पण नसेन त्यांच्यासाठी पर्वणी :) (मराठी पुस्तकप्रेमी) सागर

अवलिया 02/05/2009 - 06:54
राजे ! छान लेख ! साल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलास बघ !! (काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला) अवलिया

हम्म्म्म राजे नेमके शनीवारीच असले हळवे विषय तुम्ही का काढता बॉ ? दुनियादारीने एक वाचक म्हणुन खुप संपन्न केले. जेव्हडे लिहावे तेव्हडे कमीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

कॉलेजात असताना दुनियादारी अवचित मिळाली वाचायला. झालं काय की माझ्याऐवजी बाबा गेले लायब्ररीतलं पुस्तक बदलायला आणि त्यांना हे अगदी नवे पुस्तक आलेले दिसले. नवेकोरे म्हणजे अजून स्टँप मारुन पण झालेला नव्हता म्हणून त्यांनी उत्सुकतेने तेच पुस्तक स्टँप लवकर मारवून घेऊन घरी आणले , चाळले आणि पूर्णच वाचले . लग्गेचच मला आणि बहिणीला रेकमेंड केले.. बिल्डिंगमधल्या जवळजवळ सगळ्या पोराटोरांना जी कॉलेजात होती आणि जाऊ घातली होती अशा सगळ्यांना त्यांनी हे पुस्तक वाचायला सांगितले,:)नंतर अर्थातच पुस्तकाची पारायणे केली. विकतही घेतले होते पण ते असेच कोणाला तरी वाचायला दिले ते परतच नाही आले.. आणि कोणी नेले आहे ते आठवत नाहीये,:( आत्ताच्या आत्ता दोनदोनदा दुनियादारीवर चर्चा झालेली वाचून आठवणी ताज्या झाल्या, परत एकदा वाचायला पाहिजे आता..(आधी मिळायला हवे.) स्वाती

ठकू 02/05/2009 - 12:52
'दुनियादारी'ला जास्त प्रसिद्धी मिळाली, ती त्या कथेवर बनवलेल्या मालिकेमुळे. पण पुस्तकातला 'इफेक्ट' मालिकेमध्ये नाही आला. : सु.शिं. ची खासियत म्हणजे त्यांनी 'तेव्हा' लिहिलेल्या कथाही 'आजच्या' वाटतात. त्यांच्या 'मंदार कथा', 'अमर कथा', 'फिरोज कथा' तर प्रसिद्ध आहेतच. पण त्यांच्या 'क्लासिक' (हा शब्द सु.शि. फॅन अजिंक्यचा बरं का!) म्हणवता येतील, अशा 'रुपमती', 'जमीन आसमान' ह्या कादंब-या अवश्य वाचा. स्थळ-काळाचं बंधन तोडून या माणसाने जे काही लिहिलंय, ते 'भन्नाट' या शब्दाव्यतिरिक्त मला व्यक्त करताच येत नाही. ज्या व्यक्तिने 'राजस्थान' कधी पाहिलंच नाही, त्या व्यक्तिने 'दारा बुलंद' कथा कशा लिहिल्या असतील? त्यांच्या 'कल्पांत' या कादंबरीवरही त्याच नावाची मालिका बनवण्यात आली होती. ज्यात मिलिंद गुणाजी आणि चिन्मयी सुर्वे राघवन यांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या. 'देवकी' नावाच चित्रपटही सु.शि.दांच्या कादंबरीवर आधारीत होता. ज्यासाठी त्यांना पटकथा लेखनाचा पुरस्कारही मिळाला. आपल्याला जर खरंच सु.शि.दांची पुस्तकं वाचायची असतील किंवा कलेक्शन करायचं असेल, तर प्रकाशन कंपनीचं आणि पुस्तकाचं नाव याची यादी सोबत दिली आहे. यादी इंग्रजीमध्ये असल्याबद्दल क्षमस्व. कारण मी ती ऑर्कुट वरून कॉपी पेस्ट केलेली आहे. ज्यांचे ऑर्कुट खाते आहे, ते या दुव्यावर टिचकी देऊन 'सुहास शिरवळकर कम्युनिटीची' वाटचाल पाहू शकतात.' List of Books with Publication Dilipraj Prakashan 251 C, Shanivar Peth, Pune - 411030 1. Marmabandh 2. Moods 3. Wonder Twelve 4. Not Guilty 5. Maranottar 6. Kshan kshan Ayushaya 7. Hi-way murder 8. Binshart 9. Mhanoon (He ek faar majeshir pustak aahe.) 10. Terific 11. Matam 12. Mutkti 13. Padadhyaad 14. Gungun 15. Sorry sir 16. Silence please 17. Madhyam 18. Sansanati 19. Sanshay 20. Tukada tukada chandra 21. Aseem 22. Veshipalikade 23. Nidan 24. Kshitij 25. Asahya 26. Nyay-anyay 27. Janiv 28. Jivghena 29. Dastan 30. Hello hello 31. Stupid 32. Barsat chandanyachi 33. Yogayog 34. Master plan 35. Saalam 36. Kill crazy 36. Dukadhuak 37. Ethun thithun 38. Kanakanane ************************************** Shashideep Prakashan Mr. Shashideep Khopkar 44, Mukundnagar, Siddharth Chamber, Pune Phone: 24220154 / Mobile: 9850150225 1. Duniyadari 2. Nimittamatra 3. Thararak 4. Kramasha 5. Operation bullet 6. Star hunters 7. Izzat 8. Gold heaven 9. Aakrosh 10. Tharrat 11. Challange 12. Safai 13. Hirvi nazar 14. Bhayanak 15. Kale yug 16. Trailor girl 17. Sannata 18. Last bullet 19. To..! 20. Sahaj 21. Dead shot 22. Panchali 23. Havyas 24. Gafil 25. Black cobra 26. Avadhavya 27. Poladi 28. Baladhya 29. Pahadi 30. Prayas सु.शिंच्या पुस्तकातील अर्पणपत्रिका पाहायच्या असतील, तर येथे टिचकी देऊन पाहता येतील. अतिशय सुंदर अर्पणपत्रिका आहेत. आणखी काही माहिती हवी असेल, तर याच धाग्यात प्रतिसाद द्या. वैधानिक इशारा: सुहास शिरवळकरांच्या 'अमर कथा' वाचून शिवाजी पार्क परिसरातील 'अमर मंझिल' नावाची आठ माळ्याची इमारत शोधून काढण्याचा मोह होतो. सर्व 'अमर कथा' कथा काल्पनिक आहेत, याची जाणीव असावी. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

ठकू 02/05/2009 - 12:55
अवांतर (पण सु.शि. फॅन्ससाठी महत्वाचे): Dilipraj Prakashan 251 C, Shanivar Peth, Pune - 411030 सु.शिंचं घर याच इमारतीत आहे, बरं का! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

सुशिंच्या एका नितांतसुंदर पुस्तकाचा उल्लेख इथे राहुन गेला आहेसं वाटतं.. हृदयस्पर्श .... (किडनीच्या आजाराने त्रस्त एक मनस्वी कवी "लौकीक" आणि एक मैफीलीतुन गाणारी गायिका "मैत्राली" यांच्या जगावेगळ्या नात्याची कथा सांगणारी ही कादंबरी खुप सुंदर आहे.) जरुर वाचा. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

In reply to by विशाल कुलकर्णी

सागर 22/05/2009 - 16:54
हृदयस्पर्शच नाही तर अनेक पुस्तके या यादीत राहिली आहेत :) तलखी हे त्यातील एक आजच ई-रसिक्.कॉम वरची माझी सुहास शिरवळकरांची ११ पुस्तकांची ऑर्डर पूर्ण झाली आहे. २-३ दिवसांत मला ही पुस्तके मिळतील. तेव्हा माझा अनुभव सांगेन तुम्हा सर्वांना.... ई-रसिक्.कॉम वर छान पुस्तकांचा साठा उपलब्ध आहे धन्यवाद सागर

In reply to by सागर

सागर 29/05/2009 - 22:42
मित्रांनो, आजच मला सु.शिंची मी ऑर्डर केलेली ११ पुस्तके स्पीड पोस्ट ने मिळाली. ई-रसिक.कॉम अजून पूर्ण तयार नसेन. पण सध्या संकेतस्थळावर दिलेल्या ई-मेलवर तुमची मागणी नोंदवली की पुढचा संपर्क खूप चांगल्या पद्धतीने होतो. तुमची ऑर्डर पूर्ण करायला वेळ लागत असेन तर तसेही ते सांगतात व ऑर्डर पाठवल्याचे डिटेल्स देखील तुम्हाला ईमेल केले जातात. माझा पहिला अनुभव तर नक्कीच छान आहे. आता सु.शिंच्या पुस्तकाचा आस्वाद घेतो २ दिवस सुट्टी आहे तर :) धन्यवाद सागर

अगदी त्यात कथापोर्णिमा, पांचाली, शॅली शॅली ही नावे पण महत्वाची ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.

जे मला दिसले ते

दशानन ·

अवलिया 26/04/2009 - 17:24
अर्रर्रर्र् तु कवी बनायचे फारच मनावर घेतलेस... :| अरे तु चांगल्या कविता करतोस असे गंमतीने म्हणालो होतो, तु सिरीयसलीच घेतलेस :( असो जरा रसग्रहण पण केलेस तर बरे... म्हणजे सगळ्यांना कळेल :) --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन 26/04/2009 - 22:46
कोणी तरी सरांच्या प्रतिसादातील तो शब्द इडिट करावा ही विनंती, चुकीचा शब्द, चुकीच्या जागी लिहल्या बद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, क्षमा असावी. थोडेसं नवीन !

टारझन 26/04/2009 - 21:54
आर्रे पापड्या ... काय रे ते "पांचाली" चं कडवं जपून पहा बे .. च्यायला .. नाय तर तुझाच दुर्योधन व्हायचा !!!

अवलिया 26/04/2009 - 17:24
अर्रर्रर्र् तु कवी बनायचे फारच मनावर घेतलेस... :| अरे तु चांगल्या कविता करतोस असे गंमतीने म्हणालो होतो, तु सिरीयसलीच घेतलेस :( असो जरा रसग्रहण पण केलेस तर बरे... म्हणजे सगळ्यांना कळेल :) --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन 26/04/2009 - 22:46
कोणी तरी सरांच्या प्रतिसादातील तो शब्द इडिट करावा ही विनंती, चुकीचा शब्द, चुकीच्या जागी लिहल्या बद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, क्षमा असावी. थोडेसं नवीन !

टारझन 26/04/2009 - 21:54
आर्रे पापड्या ... काय रे ते "पांचाली" चं कडवं जपून पहा बे .. च्यायला .. नाय तर तुझाच दुर्योधन व्हायचा !!!
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

मी तिला वाचवलं!

क्रान्ति ·

यशोधरा 25/04/2009 - 21:57
हे असं वाचवण्यापेक्षा अश्या जगात हिंमतीने, ताठ मानेनं जगायला सबल बनवून वाचवू शकली असती ना! :(

क्रान्ति 25/04/2009 - 22:05
चकलीताई आणि यशोधराताई, मला स्वतःलाही शेवट मनापासून पटला नाहीय, पण जेव्हा वृत्तपत्रात ती बातमी वाचली, त्यावेळी ताबडतोब मनात आलेली ती प्रतिक्रिया होती, जिला मी कथारूप दिलं. मलाही हे पटतं, की आपण अबला व्हायचं की सबला, हे आपल्याच हातात आहे, आणि हा मार्ग पळपुटेपणाचा आहे. त्यामुळे तुम्हा दोघींच्या मताशी मी सहमत आहे, अगदी १००%! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

प्राजु 26/04/2009 - 00:09
क्रांती.. वाचवणं. ...! हे अशाप्रकारे?? नाही गं पटत. तिला वाचवायचं तर.. तर ती जन्मतःच तीला "खूब लढी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी.." हे ऐकवणं. तीच गरज आहे . शेवट सुन्न करून गेला पण आवडला नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 26/04/2009 - 00:54
अवघड आहे !!! प्रभू बाबा ... एक केस घ्या हो अजुन ;) हे असं वाचवणं चालू राहिलं तर मलाही एक फिक्शन लेख लिहावा लागेल ... त्यात स्त्रिया ह्या भुतकाळात गेलेल्या असतील @!!

मनीषा 26/04/2009 - 11:37
ही कथा हे एक वास्तव आहे ... हे बदलायला पाहिजे . अशा प्रकारे संकटे टाळून "असल्या" वाईट प्रवृत्तींना विरोध करु शकणार्‍यांची संख्या कमी होईल, नाही का? मला वाटतं अशा प्रवृत्तींचा विरोध करण्यास आपल्या मुलींना सक्षम बनवणे आणि मुलाला 'असा' होण्यापासून परावृत्त करणे म्हणजेच त्यांना खर्‍या अर्थाने 'वाचवणे' होइल . तुमच्या कविते प्रमाणेच हे गद्य लेखनही दर्जेदार आहे . कविते इतकेच कथा आणि इतर गद्य लेखनही तुम्ही प्रभावीपणे करु शकाल असे वाटते .

ऋषिकेश 26/04/2009 - 12:02
कथानक नेमक्या मर्मावर बोट ठेवतं सगळ्या प्रतिक्रियांवरून कथानकाने नेमका परिणाम साधलेला दिसतोय.. शेवटी कथा म्हणजे लेखिकेची मते नसून एखादी घटना (मग सत्य असो वा कल्पित / चांगली असे वा वाईट) सशक्तपणे समोर मांडणे. त्यामुळे कथेतील व्यक्तीने "वाचवले" असे म्हणणे हे नागवे सत्य तश्याच उघडपणे लिहिल्याबद्दल लेखिकेचे कौतुक मला एक कथा म्हणून आवडली. एक परिणामकारक कथा. ऋषिकेश

दशानन 26/04/2009 - 17:45
अरे मित्रांनो ! वरिल लेखिकेने एका बातमी वरुन कथा लिहली आहे ;) तुम्ही सत्य समजून असहमत असहमत करत बसलात तरी काही फायदा नाही, हा पण असे होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय करु शकता व सरकारवर आपल्या मतअधिकाराचा वापर करुन दबाव आणू शकता का नाही हे पहा ! * सरकार मला अपेक्षित असलेले काम मी १८ वर्षाचा झाल्यापासून करत आहे हे मला कधीच दिसले नाही त्यामुळे मी मतदानावर बहिष्कार टाकला आहे ! माझी अपेक्षीत कामे जी सरकार ने करावयास हवी होतीत त्यामध्ये स्त्री सुरक्षा व शिक्षण हमी ह्या देखील एक मुद्दा आहे. * ब्लॉग वर मनसे विरुध्द, क्रॉगेस विरुध्द, भाजपा विरुध्द, इतर पक्षाविरुध्द लिहले तर त्याची दखल घेतली जाते आजकाल असे चित्र आहे तर आम्ही मतदान करणार नाही असे लिहले तर कमीत कमी काही पक्ष तरी व्यक्तिगत पातळीवरील हल्ले सोडून मुख्य मुद्द्यावर (देशाच्या भल्यावर) येईल ही आशा. मी मतदान केले नाही तर सरकार येणार नाही निवडून असे काही नाही पण कमीत कमी मला समाधान भेटेल की मी एक मत वाचवले नालायकांना सत्तेपासून दुर साखण्यासाठी ! थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

यशोधरा 26/04/2009 - 18:28
अभिमन्यूचे व्रत हे खडतर कर्तव्यावर त्याचा तर भर नाव तयाचे सांगसी तू जर कार्यासी कसा ढळला? :( माफी :) रागवू नये.

वेताळ 26/04/2009 - 17:56
टारझन्याच्या डाग्तर लेखा वरुन परत हे वाचले....पुरा मेलो मी हे वाचुन ,मस्त कथा ,मस्त विचार आवडले आपल्याला.लेखिकेचा विचार पुढे नेला तर सर्व स्त्रीयाना पारतत्र्यांतुन मुक्ती मिळेल. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

शितल 26/04/2009 - 18:49
क्रान्ती, कथा लिहिली छान आहेस. पण एक आई असे करेल असे मनाला ही पटले नाही.

सुनील 26/04/2009 - 19:10
शेवट फारसा पटला नाही पण कथा आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आंबोळी 26/04/2009 - 22:34
फर सुन्न क्रुन गेलि क्था. सेवत ब्द्ल्ता येतोक बगा ज्रा. शेव्त पत्ला नहि. प्रो.आंबोळी

क्रान्ति 26/04/2009 - 23:00
कथा वाचून अगदी मनापासून प्रतिसाद देणा-या सर्व मिपाकरांची मी आभारी आहे. कथेचा शेवट बदलणं किंवा न बदलणं फारसं महत्त्वाचं नाही, कारण तो शेवटी काल्पनिकच आहे. पण प्रत्यक्षात शेवट खूप वेगळा होऊ शकतो, हे सगळ्या प्रतिक्रियांवरून कळून येतंय. अजूनही मनं जीवंत असल्याचं ते लक्षण आहे. स्त्रीजातीचं भविष्य उज्वल आहे, असा संकेत त्यातून मिळतोय. धन्यवाद! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

नंदन 27/04/2009 - 05:29
कथा आवडली. टोनी मॉरिसन या लेखिकेने अशाच एका सत्यघटनेभवती 'बिलव्हेड' ही कादंबरी लिहिली आहे. गुलाम म्हणून आणि एक स्त्री म्हणून जे दुहेरी अत्याचार स्वतःला भोगावे लागले, ते आपल्या मुलीलाही भोगावे लागू नयेत म्हणून तिचा जीव घेणार्‍या एका कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीची कहाणी यात आहे. मार्गरेट गार्नर हे त्या स्त्रीचे नाव. जवळपास दोनशे वर्षांनीही अशीच बातमी वाचायला मिळणे हे दुर्दैव.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

बातमीवरुन फुलवलेली कथा म्हणुन कथा ठिक आहे क्रांतीतै, पण कथा लिहिताना तु त्यात नकी बदल करु शकली असतीस असे वाटते. काव्यातुन आयुष्याचे येव्हडे सुंदर सुंदर रंग समोर आणणारी तु, असा शेवट करशील ही अपेक्षा न्हवती. बाकी कथेचा शेवट हा वादाचा मुद्दा झालेला आहेच त्यामुळे त्यावर जास्ती भाष्य करत नाही. पहिलाच गद्य प्रयत्न आवडला. खोलगट टिकाकार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

यशोधरा 25/04/2009 - 21:57
हे असं वाचवण्यापेक्षा अश्या जगात हिंमतीने, ताठ मानेनं जगायला सबल बनवून वाचवू शकली असती ना! :(

क्रान्ति 25/04/2009 - 22:05
चकलीताई आणि यशोधराताई, मला स्वतःलाही शेवट मनापासून पटला नाहीय, पण जेव्हा वृत्तपत्रात ती बातमी वाचली, त्यावेळी ताबडतोब मनात आलेली ती प्रतिक्रिया होती, जिला मी कथारूप दिलं. मलाही हे पटतं, की आपण अबला व्हायचं की सबला, हे आपल्याच हातात आहे, आणि हा मार्ग पळपुटेपणाचा आहे. त्यामुळे तुम्हा दोघींच्या मताशी मी सहमत आहे, अगदी १००%! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

प्राजु 26/04/2009 - 00:09
क्रांती.. वाचवणं. ...! हे अशाप्रकारे?? नाही गं पटत. तिला वाचवायचं तर.. तर ती जन्मतःच तीला "खूब लढी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी.." हे ऐकवणं. तीच गरज आहे . शेवट सुन्न करून गेला पण आवडला नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 26/04/2009 - 00:54
अवघड आहे !!! प्रभू बाबा ... एक केस घ्या हो अजुन ;) हे असं वाचवणं चालू राहिलं तर मलाही एक फिक्शन लेख लिहावा लागेल ... त्यात स्त्रिया ह्या भुतकाळात गेलेल्या असतील @!!

मनीषा 26/04/2009 - 11:37
ही कथा हे एक वास्तव आहे ... हे बदलायला पाहिजे . अशा प्रकारे संकटे टाळून "असल्या" वाईट प्रवृत्तींना विरोध करु शकणार्‍यांची संख्या कमी होईल, नाही का? मला वाटतं अशा प्रवृत्तींचा विरोध करण्यास आपल्या मुलींना सक्षम बनवणे आणि मुलाला 'असा' होण्यापासून परावृत्त करणे म्हणजेच त्यांना खर्‍या अर्थाने 'वाचवणे' होइल . तुमच्या कविते प्रमाणेच हे गद्य लेखनही दर्जेदार आहे . कविते इतकेच कथा आणि इतर गद्य लेखनही तुम्ही प्रभावीपणे करु शकाल असे वाटते .

ऋषिकेश 26/04/2009 - 12:02
कथानक नेमक्या मर्मावर बोट ठेवतं सगळ्या प्रतिक्रियांवरून कथानकाने नेमका परिणाम साधलेला दिसतोय.. शेवटी कथा म्हणजे लेखिकेची मते नसून एखादी घटना (मग सत्य असो वा कल्पित / चांगली असे वा वाईट) सशक्तपणे समोर मांडणे. त्यामुळे कथेतील व्यक्तीने "वाचवले" असे म्हणणे हे नागवे सत्य तश्याच उघडपणे लिहिल्याबद्दल लेखिकेचे कौतुक मला एक कथा म्हणून आवडली. एक परिणामकारक कथा. ऋषिकेश

दशानन 26/04/2009 - 17:45
अरे मित्रांनो ! वरिल लेखिकेने एका बातमी वरुन कथा लिहली आहे ;) तुम्ही सत्य समजून असहमत असहमत करत बसलात तरी काही फायदा नाही, हा पण असे होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय करु शकता व सरकारवर आपल्या मतअधिकाराचा वापर करुन दबाव आणू शकता का नाही हे पहा ! * सरकार मला अपेक्षित असलेले काम मी १८ वर्षाचा झाल्यापासून करत आहे हे मला कधीच दिसले नाही त्यामुळे मी मतदानावर बहिष्कार टाकला आहे ! माझी अपेक्षीत कामे जी सरकार ने करावयास हवी होतीत त्यामध्ये स्त्री सुरक्षा व शिक्षण हमी ह्या देखील एक मुद्दा आहे. * ब्लॉग वर मनसे विरुध्द, क्रॉगेस विरुध्द, भाजपा विरुध्द, इतर पक्षाविरुध्द लिहले तर त्याची दखल घेतली जाते आजकाल असे चित्र आहे तर आम्ही मतदान करणार नाही असे लिहले तर कमीत कमी काही पक्ष तरी व्यक्तिगत पातळीवरील हल्ले सोडून मुख्य मुद्द्यावर (देशाच्या भल्यावर) येईल ही आशा. मी मतदान केले नाही तर सरकार येणार नाही निवडून असे काही नाही पण कमीत कमी मला समाधान भेटेल की मी एक मत वाचवले नालायकांना सत्तेपासून दुर साखण्यासाठी ! थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

यशोधरा 26/04/2009 - 18:28
अभिमन्यूचे व्रत हे खडतर कर्तव्यावर त्याचा तर भर नाव तयाचे सांगसी तू जर कार्यासी कसा ढळला? :( माफी :) रागवू नये.

वेताळ 26/04/2009 - 17:56
टारझन्याच्या डाग्तर लेखा वरुन परत हे वाचले....पुरा मेलो मी हे वाचुन ,मस्त कथा ,मस्त विचार आवडले आपल्याला.लेखिकेचा विचार पुढे नेला तर सर्व स्त्रीयाना पारतत्र्यांतुन मुक्ती मिळेल. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

शितल 26/04/2009 - 18:49
क्रान्ती, कथा लिहिली छान आहेस. पण एक आई असे करेल असे मनाला ही पटले नाही.

सुनील 26/04/2009 - 19:10
शेवट फारसा पटला नाही पण कथा आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आंबोळी 26/04/2009 - 22:34
फर सुन्न क्रुन गेलि क्था. सेवत ब्द्ल्ता येतोक बगा ज्रा. शेव्त पत्ला नहि. प्रो.आंबोळी

क्रान्ति 26/04/2009 - 23:00
कथा वाचून अगदी मनापासून प्रतिसाद देणा-या सर्व मिपाकरांची मी आभारी आहे. कथेचा शेवट बदलणं किंवा न बदलणं फारसं महत्त्वाचं नाही, कारण तो शेवटी काल्पनिकच आहे. पण प्रत्यक्षात शेवट खूप वेगळा होऊ शकतो, हे सगळ्या प्रतिक्रियांवरून कळून येतंय. अजूनही मनं जीवंत असल्याचं ते लक्षण आहे. स्त्रीजातीचं भविष्य उज्वल आहे, असा संकेत त्यातून मिळतोय. धन्यवाद! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

नंदन 27/04/2009 - 05:29
कथा आवडली. टोनी मॉरिसन या लेखिकेने अशाच एका सत्यघटनेभवती 'बिलव्हेड' ही कादंबरी लिहिली आहे. गुलाम म्हणून आणि एक स्त्री म्हणून जे दुहेरी अत्याचार स्वतःला भोगावे लागले, ते आपल्या मुलीलाही भोगावे लागू नयेत म्हणून तिचा जीव घेणार्‍या एका कृष्णवर्णीय गुलाम स्त्रीची कहाणी यात आहे. मार्गरेट गार्नर हे त्या स्त्रीचे नाव. जवळपास दोनशे वर्षांनीही अशीच बातमी वाचायला मिळणे हे दुर्दैव.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

बातमीवरुन फुलवलेली कथा म्हणुन कथा ठिक आहे क्रांतीतै, पण कथा लिहिताना तु त्यात नकी बदल करु शकली असतीस असे वाटते. काव्यातुन आयुष्याचे येव्हडे सुंदर सुंदर रंग समोर आणणारी तु, असा शेवट करशील ही अपेक्षा न्हवती. बाकी कथेचा शेवट हा वादाचा मुद्दा झालेला आहेच त्यामुळे त्यावर जास्ती भाष्य करत नाही. पहिलाच गद्य प्रयत्न आवडला. खोलगट टिकाकार ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, तिला पहिलंवहिलं कन्यारत्न झालं होतं. तिच्या सासरी माहेरी दोन्हीकडे मुलांच प्रमाण जास्त होतं, मुलगी ही एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! तिलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दिवसभर सासूबाई आणि रात्री आई दोघी चिमुरडीची काळजी घेत, त्यामुळे तिला निवांत आराम मिळत असे.

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग २

सातारकर ·

सातारकरसाहेब उपयुक्त माहिती आहे. भाषिक,प्रांतिक, जातीय, धार्मिक अस्मिता या अलगता वाद निर्माण करतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 18/04/2009 - 17:02
चांगली माहिती. पुढील भाग लवकर येऊदे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सीडी देशमुखांचा उल्लेख केल्याविना कधीच पूर्ण होत नाही. त्याविषयीही वाचायला आवडेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वाहीदा 19/04/2009 - 00:40
खुपच छान माहीती आहे ! उत्तरेच वर्चस्व दक्षिण सहन करेल काय. आधीच दक्षिण उत्तरेपासून विभक्त व्हायच्या प्रयत्नात असल्याची लक्षण आहेत. अहो सहन करणे बाजुला ... ते तर हिंदी भाषीकांशी एवढा तिरस्कार का बाळगतात अजून ही नाही कळत तरीही त्यांच्या नट नट्या हिंदी सिनेमात घुसायला बघतात च ! केवढा हा विरोधाभास :O असो त्याने काही बिघडत नाही म्हणा .. ~वाहीदा

In reply to by वाहीदा

सातारकर 20/04/2009 - 18:04
कारण उत्तर नेहमीच आपलच खरं म्हणणार हे त्यांच्या संख्येवरून उघड आहे. नटनट्याम्च माहीत नाही पण सामान्य नागरीक अस का करतात त्याच स्पष्टीकरण वरती राजगोपालाचारींच्या शब्दात आहेच. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden

सातारकरसाहेब उपयुक्त माहिती आहे. भाषिक,प्रांतिक, जातीय, धार्मिक अस्मिता या अलगता वाद निर्माण करतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 18/04/2009 - 17:02
चांगली माहिती. पुढील भाग लवकर येऊदे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सीडी देशमुखांचा उल्लेख केल्याविना कधीच पूर्ण होत नाही. त्याविषयीही वाचायला आवडेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वाहीदा 19/04/2009 - 00:40
खुपच छान माहीती आहे ! उत्तरेच वर्चस्व दक्षिण सहन करेल काय. आधीच दक्षिण उत्तरेपासून विभक्त व्हायच्या प्रयत्नात असल्याची लक्षण आहेत. अहो सहन करणे बाजुला ... ते तर हिंदी भाषीकांशी एवढा तिरस्कार का बाळगतात अजून ही नाही कळत तरीही त्यांच्या नट नट्या हिंदी सिनेमात घुसायला बघतात च ! केवढा हा विरोधाभास :O असो त्याने काही बिघडत नाही म्हणा .. ~वाहीदा

In reply to by वाहीदा

सातारकर 20/04/2009 - 18:04
कारण उत्तर नेहमीच आपलच खरं म्हणणार हे त्यांच्या संख्येवरून उघड आहे. नटनट्याम्च माहीत नाही पण सामान्य नागरीक अस का करतात त्याच स्पष्टीकरण वरती राजगोपालाचारींच्या शब्दात आहेच. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १ उत्तर आणि दक्षिणेत फार फरक आहे. उत्तर ही conservative आहे तर दक्षिण पुरोगामी. उत्तर अंधश्रद्ध (superstitious) आहे तर दक्षिण वास्तववादी (rational). दक्षिण शैक्षणिकद्रूष्ट्या पुढारलेली आहे तर उत्तर मागासलेली. दक्षिणेची संस्क्रूती आधुनिक आहे तर उत्तरेची प्राचिन. अशा स्थितीत उत्तरेच वर्चस्व दक्षिण सहन करेल काय. आधीच दक्षिण उत्तरेपासून विभक्त व्हायच्या प्रयत्नात असल्याची लक्षण आहेत. २७ नोव्हेंबर १९५५ च्या टाइम्स ऑफ इंडीया मधे आलेला श्री.

जय हो "आंतरराष्ट्रीय" अभिव्यक्ती-स्वातंत्र्य!

निमिष सोनार ·

चिरोटा 13/04/2009 - 19:24
तेव्हा थोडक्यात सांगायचे झाले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे
माझ्यामते भारतात ते बर्‍याच अन्शी आहेच आणि मिपावर ते आहेच आहे.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

चिरोटा 13/04/2009 - 19:24
तेव्हा थोडक्यात सांगायचे झाले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे
माझ्यामते भारतात ते बर्‍याच अन्शी आहेच आणि मिपावर ते आहेच आहे.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
'स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट भारतीयांनी बघितला. त्याला ऑस्कर मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून. तसेच 'जय हो' या गाण्याला ही पुरस्कार मिळालेत. या चित्रपटाकडे एका दृष्टीकोनातून बघितल्यास असे वाटते की, यात भारतातील सत्य पण वाईट गोष्टी म्हणजे झोपडपट्टी, गरिबी, दंगे, बाल गुन्हेगारी असे प्रकार दाखवलेत. या पूर्वी लगान ऑस्कर मध्ये जावूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही कारण त्यात इंग्रज लोकांविरुद्ध आपण जिंकतो असे दाखवले आहे. लगान हा सगळ्याच बाबतीत 'स्लमडॉग मिलेनियर' पेक्षा सरस होता.

तुम्हाला माहिती आहेत का ही.... चिन्हे <>?:;',.

मिलिंद ·

मनिष 10/04/2009 - 11:33
९ १० ==> नाईन इस लेस दॅन टेन हेच फक्त बरोबर आहे, कुठल्याही माध्यमात शिकला तरी. १० इस ग्रेटर दॅन ९ हे इंप्लाईड आहे, पण इथे चिन्ह ते दाखवत नाही. अवांतर : कंपाइलर लिहिला आहे का कधी? किंवा अभ्यासला आहे का? हे असले सगळे फंडे क्लीअर होतात. एक चांगला प्रोग्रॅमर म्हणूनच बहुतेक वेळा खूप नेमके (प्रिसाईज) बोलतो.

मराठी_माणूस 10/04/2009 - 11:36
जर मी a = 5 असे लिहीले तर डावीकडील अक्षरास मधल्या चिन्हामुळे उजवीकडील किंमत लागू होते हे स्प्ष्ट झाल्यानंतर गणितातील कोणतेही वाक्य/समीकरण डावीकडून उजवीकडे वाचायचे असते हे स्पष्ट होते (माझ्या माहितीनुसार अगदी उर्दु मध्ये सुध्दा गणिताच्या बाबतीत हेच अवलंबिले जाते). मी हे इतके जणांना विचारले आहे की शेवटी कंटाळून शिक्षकांना (विशेषतः गणिताच्या) विचारायला सुरुवात केली तेव्हाही तेच इथे काय म्हणायचे आहे ते कळले नाही.

In reply to by मराठी_माणूस

मिलिंद 10/04/2009 - 12:46
म्हणायचे असे की कोणतीही भाषा असो उजवीकडून वाचली जाणारी अथवा डावीकडून वाचली जाणारी..... पण गणित लिहिण्याची वेळ आली की भाषांचा नियम डावीकडून उजवीकडेच राहतो

मिलिंद 10/04/2009 - 11:40
सगळेच कंपायलर लिहीत असते तर फार बरे झाले असते. मी सर्वसाधारण जनांबद्दल लिहीले आहे विशेष जनांबद्दल नाही. आणि विशेष जनांनाही कि-बोर्ड वरची चिन्हे विचारा किती चिन्हे सांगता येतात ते पहा? : ला मराठीत काय म्हणतात ते १०० जणांना विचारुन पहा एकदा.

In reply to by मिलिंद

मनिष 10/04/2009 - 11:46
सगळेच कंपायलर लिहीत असते तर फार बरे झाले असते. मी सर्वसाधारण जनांबद्दल लिहीले आहे विशेष जनांबद्दल नाही. आणि विशेष जनांनाही कि-बोर्ड वरची चिन्हे विचारा किती चिन्हे सांगता येतात ते पहा? : ला मराठीत काय म्हणतात ते १०० जणांना विचारुन पहा एकदा.
म्हणूनच मी अवांतर मधे लिहीले आहे, माझा दुखवायचा किंवा हिणवायचा हेतू नव्हता - एक निरीक्षण संगत होतो. गणितातच पुढे 'असोसिएटीव्ह' (मराठी माहित नाही, मी मराठी माध्यमात नाही शिकलो) वगैरे असते, तेव्हा डावीकडून उजवीकडे हे समजावले जाते असे वाटते, पण हे सगळे खर्‍या अर्थाने उमगते ते कंपायलर लिहितांना - मजा येते खरच! :) : म्हणजे विसर्ग -- बरोबर आहे ना?

In reply to by मनिष

मिलिंद 10/04/2009 - 12:48
: म्हणजे विसर्ग हे अगदी बरोबर काही जणांना विचारु पहा काय काय उत्तरे येतात ती?मजा येईल.

विंजिनेर 10/04/2009 - 12:06
इथे खरं तर चिन्हांचा अर्थ लगेच समजतो पण थोडेसे ताणून असे विचारले की मी पहिले वाक्य टेन इज ग्रेटर दॅन नाईन असे वाचले तर चालेल का? तर मराठी माध्यमातील शिकलेले लगेच सांगतात की चालेल किंवा दुसरे वाक्य नाईन इज लेस दॅन टेन असे वाचले तर चालेल का तर तेही हो असे उत्तर येते.
ह्यात मराठी माध्यमाचा काय संबंध आहे ते नीटसे कळाले नाही. मुळ गोंधळ एखाद्या समीकरणाचा इंप्लाइड म्हणजे गर्भित अर्थ आणि दर्शितार्थ(/explicit) ह्यातला फरक हा आहे. तो लक्षात आणून देण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज आहे :) . ह्या ऐवजी गणिताचे भाषीकरण करून मुलांच्या गोंधळात भर पाडणे होईल(गणिताच्या पेपरच्या वेळी कोणत्या भाषेचा पेपर सोडवू असे विचारल्यावर पंचाईत... वर पुन्हा गणिते+भाषा ५०/५० ला लावायचे का हा वेगळचा प्रश्न ;)). -- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

In reply to by विंजिनेर

मिलिंद 10/04/2009 - 13:00
मराठी माध्यमाचा संबंध असा की सेमी इंग्लिश माध्यम येण्याअगोदर १० वी पर्यंत लेस दॅन ग्रेटर दॅन च्या ऐवजी च्यापेक्षा लहान च्या पेक्षा मोठे हेच कानावरुन गेलेले असायचे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाअसते हे चिन्ह लेस दॅन व > हे चिन्ह ग्रेटर दॅन असे फक्त माहिती असते, पण त्याचा वापर करताना डावीकडून उजवीकडे वाचले पाहिजे हे मात्र माहिती नसते. खरंतर शाळेत (प्राथमिक/माध्यमिक) हे शिक्षकांकडून शिकविले गेले पाहिजे, पणत् यांच्यातच आनंदीआनंद आहे. गणिताचे भाषीकरण करण्याची गरजच नाही कोणत्याही भाषेत गणित लिहिण्या - वाचण्याची पध्दत बदलत नाही, पण मराठी माध्यमातून शिकणा-या सर्वसामान्य विद्यार्थ्याला असे ज्ञान मिळत असेल तर का नाही बागुवबुवा होणार गणित आणि इंग्रजीचा??

मनिष 10/04/2009 - 12:08
ह्यात मराठी माध्यमाचा काय संबंध आहे ते नीटसे कळाले नाही. मुळ गोंधळ एखाद्या समीकरणाचा इंप्लाइड म्हणजे गर्भित अर्थ आणि दर्शितार्थ(/explicit) ह्यातला फरक हा आहे. तो लक्षात आणून देण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज आहे Smile
सहमत! :)

पक्या 10/04/2009 - 12:21
>> 9 10 आणी 10 > 9 >> अनुक्रमे वाचले की नाईन इज लेस दॅन टेन व टेन इज ग्रेटर दॅन नाईन. हे पटले. सामान्यत: डावीकडून उजवी कडे वाचले जात असल्याने गणितातही तसेच होत असावे.

सँडी 10/04/2009 - 14:13
आम्ही आणि आमचे गणिताचे मास्तर, कंपाइलर न लिहितापण गणितात लै हुशार होतो! (आता पण आहोत...;)) -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

सूहास 10/04/2009 - 16:54
आम्ही आणि आमचे गणिताचे मास्तर, कंपाइलर न लिहितापण गणितात लै हुशार होतो, आमच ही असच पण मास्तरा॑च नेमक आमच्या विषयी गणीत चुकायच..परिक्षेच्या येळेला.. सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

नितिन थत्ते 10/04/2009 - 18:43
आत्ता कळलं तुम्ही काय म्हणताय ते. ९ 'पेक्षा लहान' १० असे डावीकडून उजवीकडे वाचले तर ते चुकीचं होतं. खराटा (रंग माझा वेगळा)

चतुरंग 10/04/2009 - 19:54
९ १० हे समीकरण 'नऊ दहापेक्षा लहान' असे मराठीत आणि 'नाईन लेस दॅन टेन' असे इंग्रजीत वाचले जायला हवे. १० > ९ हे समीकरण 'दहा नवापेक्षा मोठा' असे मराठीत आणि 'टेन ग्रेटर दॅन नाईन' असे इंग्रजीत वाचले जायला हवे. मराठी किंवा इंग्रजी मध्यमामुळे ह्या गणिती भाषेत फरक पडत नाही. खरा घोळ होण्याचे कारण भाषेतला शब्दांचा क्रम विशिष्ठ असल्याने होतोय. मराठीत आपण 'नऊ लहान दहापेक्षा' असे म्हणत नाही पण इंग्रजीमधे 'नाईन लेसदॅन टेन' असे म्हणतो त्यामुळे 'आकडा - गणीती चिन्ह - आकडा' ह्यांचा डावीकडून उजवीकडे जाणारा प्रवाह हा गणिती आणि इंग्रजी भाषेत सारखा रहातो. तर मराठी भाषेत समजावताना 'नऊ दहापेक्षा लहान' 'आकडा - आकडा - चिन्ह' असा बदलतो - हा भाषेतल्या व्याकरणामुळे झालेला बदल आहे. समीकरण वाचताना पहिली संख्या ही डावीकडलीच उच्चारली जायला हवी हा नियम हे सगळ्याचे मूळ सूत्र आहे तो पक्का करुन घेणे हे गणिताच्या शिक्षकाचे काम म्हणजे मग घोळ होत नाही! चतुरंग

दवबिन्दु 11/04/2009 - 11:15
आपण लोक आकडे बोल्ताना २१ हे एक-वीस, २५ हे पंच-वीस असे बोल्तो. भारतात गणित पुर्वी उलट्या दिशेन वाचत असावेत.

मनिष 10/04/2009 - 11:33
९ १० ==> नाईन इस लेस दॅन टेन हेच फक्त बरोबर आहे, कुठल्याही माध्यमात शिकला तरी. १० इस ग्रेटर दॅन ९ हे इंप्लाईड आहे, पण इथे चिन्ह ते दाखवत नाही. अवांतर : कंपाइलर लिहिला आहे का कधी? किंवा अभ्यासला आहे का? हे असले सगळे फंडे क्लीअर होतात. एक चांगला प्रोग्रॅमर म्हणूनच बहुतेक वेळा खूप नेमके (प्रिसाईज) बोलतो.

मराठी_माणूस 10/04/2009 - 11:36
जर मी a = 5 असे लिहीले तर डावीकडील अक्षरास मधल्या चिन्हामुळे उजवीकडील किंमत लागू होते हे स्प्ष्ट झाल्यानंतर गणितातील कोणतेही वाक्य/समीकरण डावीकडून उजवीकडे वाचायचे असते हे स्पष्ट होते (माझ्या माहितीनुसार अगदी उर्दु मध्ये सुध्दा गणिताच्या बाबतीत हेच अवलंबिले जाते). मी हे इतके जणांना विचारले आहे की शेवटी कंटाळून शिक्षकांना (विशेषतः गणिताच्या) विचारायला सुरुवात केली तेव्हाही तेच इथे काय म्हणायचे आहे ते कळले नाही.

In reply to by मराठी_माणूस

मिलिंद 10/04/2009 - 12:46
म्हणायचे असे की कोणतीही भाषा असो उजवीकडून वाचली जाणारी अथवा डावीकडून वाचली जाणारी..... पण गणित लिहिण्याची वेळ आली की भाषांचा नियम डावीकडून उजवीकडेच राहतो

मिलिंद 10/04/2009 - 11:40
सगळेच कंपायलर लिहीत असते तर फार बरे झाले असते. मी सर्वसाधारण जनांबद्दल लिहीले आहे विशेष जनांबद्दल नाही. आणि विशेष जनांनाही कि-बोर्ड वरची चिन्हे विचारा किती चिन्हे सांगता येतात ते पहा? : ला मराठीत काय म्हणतात ते १०० जणांना विचारुन पहा एकदा.

In reply to by मिलिंद

मनिष 10/04/2009 - 11:46
सगळेच कंपायलर लिहीत असते तर फार बरे झाले असते. मी सर्वसाधारण जनांबद्दल लिहीले आहे विशेष जनांबद्दल नाही. आणि विशेष जनांनाही कि-बोर्ड वरची चिन्हे विचारा किती चिन्हे सांगता येतात ते पहा? : ला मराठीत काय म्हणतात ते १०० जणांना विचारुन पहा एकदा.
म्हणूनच मी अवांतर मधे लिहीले आहे, माझा दुखवायचा किंवा हिणवायचा हेतू नव्हता - एक निरीक्षण संगत होतो. गणितातच पुढे 'असोसिएटीव्ह' (मराठी माहित नाही, मी मराठी माध्यमात नाही शिकलो) वगैरे असते, तेव्हा डावीकडून उजवीकडे हे समजावले जाते असे वाटते, पण हे सगळे खर्‍या अर्थाने उमगते ते कंपायलर लिहितांना - मजा येते खरच! :) : म्हणजे विसर्ग -- बरोबर आहे ना?

In reply to by मनिष

मिलिंद 10/04/2009 - 12:48
: म्हणजे विसर्ग हे अगदी बरोबर काही जणांना विचारु पहा काय काय उत्तरे येतात ती?मजा येईल.

विंजिनेर 10/04/2009 - 12:06
इथे खरं तर चिन्हांचा अर्थ लगेच समजतो पण थोडेसे ताणून असे विचारले की मी पहिले वाक्य टेन इज ग्रेटर दॅन नाईन असे वाचले तर चालेल का? तर मराठी माध्यमातील शिकलेले लगेच सांगतात की चालेल किंवा दुसरे वाक्य नाईन इज लेस दॅन टेन असे वाचले तर चालेल का तर तेही हो असे उत्तर येते.
ह्यात मराठी माध्यमाचा काय संबंध आहे ते नीटसे कळाले नाही. मुळ गोंधळ एखाद्या समीकरणाचा इंप्लाइड म्हणजे गर्भित अर्थ आणि दर्शितार्थ(/explicit) ह्यातला फरक हा आहे. तो लक्षात आणून देण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज आहे :) . ह्या ऐवजी गणिताचे भाषीकरण करून मुलांच्या गोंधळात भर पाडणे होईल(गणिताच्या पेपरच्या वेळी कोणत्या भाषेचा पेपर सोडवू असे विचारल्यावर पंचाईत... वर पुन्हा गणिते+भाषा ५०/५० ला लावायचे का हा वेगळचा प्रश्न ;)). -- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

In reply to by विंजिनेर

मिलिंद 10/04/2009 - 13:00
मराठी माध्यमाचा संबंध असा की सेमी इंग्लिश माध्यम येण्याअगोदर १० वी पर्यंत लेस दॅन ग्रेटर दॅन च्या ऐवजी च्यापेक्षा लहान च्या पेक्षा मोठे हेच कानावरुन गेलेले असायचे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाअसते हे चिन्ह लेस दॅन व > हे चिन्ह ग्रेटर दॅन असे फक्त माहिती असते, पण त्याचा वापर करताना डावीकडून उजवीकडे वाचले पाहिजे हे मात्र माहिती नसते. खरंतर शाळेत (प्राथमिक/माध्यमिक) हे शिक्षकांकडून शिकविले गेले पाहिजे, पणत् यांच्यातच आनंदीआनंद आहे. गणिताचे भाषीकरण करण्याची गरजच नाही कोणत्याही भाषेत गणित लिहिण्या - वाचण्याची पध्दत बदलत नाही, पण मराठी माध्यमातून शिकणा-या सर्वसामान्य विद्यार्थ्याला असे ज्ञान मिळत असेल तर का नाही बागुवबुवा होणार गणित आणि इंग्रजीचा??

मनिष 10/04/2009 - 12:08
ह्यात मराठी माध्यमाचा काय संबंध आहे ते नीटसे कळाले नाही. मुळ गोंधळ एखाद्या समीकरणाचा इंप्लाइड म्हणजे गर्भित अर्थ आणि दर्शितार्थ(/explicit) ह्यातला फरक हा आहे. तो लक्षात आणून देण्यासाठी चांगल्या शिक्षकाची गरज आहे Smile
सहमत! :)

पक्या 10/04/2009 - 12:21
>> 9 10 आणी 10 > 9 >> अनुक्रमे वाचले की नाईन इज लेस दॅन टेन व टेन इज ग्रेटर दॅन नाईन. हे पटले. सामान्यत: डावीकडून उजवी कडे वाचले जात असल्याने गणितातही तसेच होत असावे.

सँडी 10/04/2009 - 14:13
आम्ही आणि आमचे गणिताचे मास्तर, कंपाइलर न लिहितापण गणितात लै हुशार होतो! (आता पण आहोत...;)) -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

सूहास 10/04/2009 - 16:54
आम्ही आणि आमचे गणिताचे मास्तर, कंपाइलर न लिहितापण गणितात लै हुशार होतो, आमच ही असच पण मास्तरा॑च नेमक आमच्या विषयी गणीत चुकायच..परिक्षेच्या येळेला.. सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

नितिन थत्ते 10/04/2009 - 18:43
आत्ता कळलं तुम्ही काय म्हणताय ते. ९ 'पेक्षा लहान' १० असे डावीकडून उजवीकडे वाचले तर ते चुकीचं होतं. खराटा (रंग माझा वेगळा)

चतुरंग 10/04/2009 - 19:54
९ १० हे समीकरण 'नऊ दहापेक्षा लहान' असे मराठीत आणि 'नाईन लेस दॅन टेन' असे इंग्रजीत वाचले जायला हवे. १० > ९ हे समीकरण 'दहा नवापेक्षा मोठा' असे मराठीत आणि 'टेन ग्रेटर दॅन नाईन' असे इंग्रजीत वाचले जायला हवे. मराठी किंवा इंग्रजी मध्यमामुळे ह्या गणिती भाषेत फरक पडत नाही. खरा घोळ होण्याचे कारण भाषेतला शब्दांचा क्रम विशिष्ठ असल्याने होतोय. मराठीत आपण 'नऊ लहान दहापेक्षा' असे म्हणत नाही पण इंग्रजीमधे 'नाईन लेसदॅन टेन' असे म्हणतो त्यामुळे 'आकडा - गणीती चिन्ह - आकडा' ह्यांचा डावीकडून उजवीकडे जाणारा प्रवाह हा गणिती आणि इंग्रजी भाषेत सारखा रहातो. तर मराठी भाषेत समजावताना 'नऊ दहापेक्षा लहान' 'आकडा - आकडा - चिन्ह' असा बदलतो - हा भाषेतल्या व्याकरणामुळे झालेला बदल आहे. समीकरण वाचताना पहिली संख्या ही डावीकडलीच उच्चारली जायला हवी हा नियम हे सगळ्याचे मूळ सूत्र आहे तो पक्का करुन घेणे हे गणिताच्या शिक्षकाचे काम म्हणजे मग घोळ होत नाही! चतुरंग

दवबिन्दु 11/04/2009 - 11:15
आपण लोक आकडे बोल्ताना २१ हे एक-वीस, २५ हे पंच-वीस असे बोल्तो. भारतात गणित पुर्वी उलट्या दिशेन वाचत असावेत.
तुम्हाला एक प्रयोग सांगतो. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर (म्हणजे आत्ताचे नोकरदार, व्यावसायिक, गृहीणी इत्यादी, पण पुर्वी मराठी माध्यमातुल शिकलेले सर्वजण किंवा आत्ताही मराठी माध्यमातून शिकत असणारे) प्रयत्न केल्यास प्रयोगाला हमखास यश! प्रयोग काय तर व > अशी जी दोन चिन्हे आहेत त्याबद्दल विचारायचे. प्रश्न इंग्रजीत विचारलात की काम फत्ते. म्हणजे यातले लेस दॅन कोणते व ग्रेटर दॅन कोणते? मराठी माध्यमात शिकलेल्यांना च्या पेक्षा लहान व च्यापेक्षा मोठे अशी ही चित्रे माहिती आहेत.