मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नमस्ते चायना !! - (३)

अनिल हटेला ·

टुकुल 29/07/2009 - 01:24
अन्या !! लय मस्त लिहिल आहे.. एका दमात वाचुन काढल.. (हापिसात असल्याने फोटो नाही पाहता आले..) >>>जगातल्या सर्वात बोल्ड आणी ब्युटीफुल सुंदर्‍याच्या देशात...रशीयन फेडरेशन्च्या एका देशात ..आमची रवानगी झालेली... येवु दे आता तिथले अनुभव.. अवांतरः "तो अनुभव सुद्धा मनाच्या कुपीत जपलेला आहे...." हे वाक्य काळजाला लागले.. जुन्या आठवणी जाग्या केल्यास. :-) --टुकुल.

सूर्य 29/07/2009 - 08:10
बर्‍याच दिवसांनी भाग टाकला तोही शेवटचा. आता युक्रेनची ष्टोरी येउद्या राव. -सूर्य.

यशोधरा 29/07/2009 - 11:58
स्वातीताईसारखेच म्हणते. निरनिराळ्या देशांच्या वार्‍या करायला मिळताहेत, नशीबवान आहात! :) निरनिराळे अनुभव, माणस, देशप्रदेश.. खूप काही अनुभवयाची संधी आहे..

वाह अन्याभौ ! एकदाचा वेळ मिळाला म्हणायचा. भावा हा ही लेख ज ह बर्‍या च ! अनुभवांचे तुझ्या शैलीत केलेले वर्णन भारीच. आता नवीन देशाच्या माहितीला कधी सुरुवात करतो आहेस ? आणी हो "एक प्रकारचा विश्वास,दिलासा मिळाला मला इथे.स्वतःला आजमावलं मी इथेच...आणी इथे" हे वाक्य हृदयात घुसुन आरपार गेले. चायनामन ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 29/07/2009 - 20:31
आता 'युक्रेन'बद्दल वाचायला आवडेल. खरंच येऊदेत तिथलेही अनुभव.... मॅक्झिम गॉर्कींच्या "आई" मध्ये युक्रेनबद्दल वाचलं होतं.... युक्रेनियन भाषेत आईला "नेनको" म्हणतात या पलीकडं आता त्यातलं काहीच आठवत नाही.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धमाल मुलगा 29/07/2009 - 20:48
भारी लिहिलंयस चिनी लोकांच्या अनुभवाबद्दल :) आता वाट पाहतो.... अन्या बैल चाल्ला युक्रेनला अर्थात : राम राम युक्रेन!! -१ :)

प्राजु 29/07/2009 - 21:02
लिहित रहा इतकेच म्हणेन. नमस्ते युक्रेन च्या प्रतिक्षेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

हवालदार 30/07/2009 - 15:23
चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी मेनका जरी विकयला असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत.

अनिल हटेला 30/07/2009 - 06:05
प्र का आ.. बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

अनिल हटेला 30/07/2009 - 06:04
स्पासीबा द्रुग्स.........(धन्यवाद मित्रहो ) :-) किएव मध्ये असालात तर भाज्या वगैरे जपून खा --->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी उर्वशी जरी विकयल असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत. --->काळजी करु नका... त्याबाबतीत आम्ही द्रवीड आहोत....(डीफेन्सर) :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

हवालदार 30/07/2009 - 15:26
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)

In reply to by अनिल हटेला

हवालदार 30/07/2009 - 15:27
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)

पाषाणभेद 30/07/2009 - 07:14
पह्यला फोटो गाडीतून काढला काय? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

अन्या, लेका किती दिवसांनी लिहिलंयस? आणि एकदम शेवटच!!! छान लिहिलंयस. चीन बद्दल बरेच कळले. आता युक्रेन येउंद्या, नाही तर आम्ही आहोतच ओरडायला.... अन्याच्या बैलालाऽऽऽ...... ;) आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे... बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला 30/07/2009 - 19:58
अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या --> चालायचं मालक...नवीण आहे अजुन...मजा करायला भरपूर वेळ आहे ... पह्यला फोटो गाडीतून काढला काय? --->डोक्यात बडवाईजर होतीसं आठवतये,बाकी ब्लँक....नाय सांगता येणार... वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. -->स्वाक्षरी बदला की राव..इनंती हाये..:-) आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे... --->हो तीबेट विषय संवेदानशील आहेच..पण इतकही घाबरून कसं चालेल.. वाघ म्हटलं तरी खातो.वाघोबा म्हटलं तरी.. लाख मोलाची गोष्ट वादात आम्ही दोघं आणी एक फॅक्टरीची स्टाफ लेडी होती,जी आमच्यात अडल्यास दुभाषाचं काम सुद्धा करत होती. बाकी कुणीच नव्हतं ऐकायला.. ;-) आणी मी ईम्पोर्टर होतो,माझ्याशी कोण पंगा करणार ... :-) टुकुलभाउ,सुर्यराव्,पुणेरी,तात्या,स्वतीताई,सहजराव्,यशोताई,पर्‍या,संदीपदा,मस्त कलंदर्,धम्या,प्राजुताई,हवालदार,दगडू आणी बीप्सदा... धन्यवाद........पून्यांदा....:-D बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

टारझन 30/07/2009 - 21:45
झकास !! दोस्ता जियो ... तुझे लेख वाचताना मज्जा येते .. कधी तरी द्राक्षासवाच्या अंमलाखालीही लिहीत जा :)

मदनबाण 30/07/2009 - 22:23
अन्या,तुझे अनुभव वाचायला फार मजा येते. :) तू लिहलेली २री घटना फार आवडली. (फक्त ग्रीन लेबल चहा पिणारा);) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

अभिज्ञ 30/07/2009 - 22:45
तीनहि भाग आवडले रे. अन्याबा,और भी आने दो. "चाफेकर चौक टु चायना" हे शीर्षक पण चालले असते. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

आकाशी नीळा 01/08/2009 - 05:52
सुंदर प्रकटन झालये...नीन्ही भाग एकदम वाचले... आणी तुमची लिहण्याची स्टाइल जाम आवदली. थोडंसं उरकल्यासारखे वाटतये.अजुण थोडा सविस्तर वाचायला आवडेल..

दशानन 01/08/2009 - 10:43
मस्त लिहले आहेस रे बैला.. ;) I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ह्यासाठी तुला +१ व मला पण :D +++++++++++++++++++++++++++++

भोचक 01/08/2009 - 18:02
अनिलदा मजा आला. तिन्ही भाग वाचून. आता युक्रेनविषयी वाचायला उत्सुक आहे. बाकी ओडेसा फाईल नावाची फ्रेडरिक फोरसिथची नोव्हेल आहे. त्याचा ओडेसाशी काही संबंध आहे काय? नाझी अत्याचारावरच आहे ती. अधिक काही आठवत नाही. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

टुकुल 29/07/2009 - 01:24
अन्या !! लय मस्त लिहिल आहे.. एका दमात वाचुन काढल.. (हापिसात असल्याने फोटो नाही पाहता आले..) >>>जगातल्या सर्वात बोल्ड आणी ब्युटीफुल सुंदर्‍याच्या देशात...रशीयन फेडरेशन्च्या एका देशात ..आमची रवानगी झालेली... येवु दे आता तिथले अनुभव.. अवांतरः "तो अनुभव सुद्धा मनाच्या कुपीत जपलेला आहे...." हे वाक्य काळजाला लागले.. जुन्या आठवणी जाग्या केल्यास. :-) --टुकुल.

सूर्य 29/07/2009 - 08:10
बर्‍याच दिवसांनी भाग टाकला तोही शेवटचा. आता युक्रेनची ष्टोरी येउद्या राव. -सूर्य.

यशोधरा 29/07/2009 - 11:58
स्वातीताईसारखेच म्हणते. निरनिराळ्या देशांच्या वार्‍या करायला मिळताहेत, नशीबवान आहात! :) निरनिराळे अनुभव, माणस, देशप्रदेश.. खूप काही अनुभवयाची संधी आहे..

वाह अन्याभौ ! एकदाचा वेळ मिळाला म्हणायचा. भावा हा ही लेख ज ह बर्‍या च ! अनुभवांचे तुझ्या शैलीत केलेले वर्णन भारीच. आता नवीन देशाच्या माहितीला कधी सुरुवात करतो आहेस ? आणी हो "एक प्रकारचा विश्वास,दिलासा मिळाला मला इथे.स्वतःला आजमावलं मी इथेच...आणी इथे" हे वाक्य हृदयात घुसुन आरपार गेले. चायनामन ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

In reply to by संदीप चित्रे

मस्त कलंदर 29/07/2009 - 20:31
आता 'युक्रेन'बद्दल वाचायला आवडेल. खरंच येऊदेत तिथलेही अनुभव.... मॅक्झिम गॉर्कींच्या "आई" मध्ये युक्रेनबद्दल वाचलं होतं.... युक्रेनियन भाषेत आईला "नेनको" म्हणतात या पलीकडं आता त्यातलं काहीच आठवत नाही.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धमाल मुलगा 29/07/2009 - 20:48
भारी लिहिलंयस चिनी लोकांच्या अनुभवाबद्दल :) आता वाट पाहतो.... अन्या बैल चाल्ला युक्रेनला अर्थात : राम राम युक्रेन!! -१ :)

प्राजु 29/07/2009 - 21:02
लिहित रहा इतकेच म्हणेन. नमस्ते युक्रेन च्या प्रतिक्षेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

हवालदार 30/07/2009 - 15:23
चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी मेनका जरी विकयला असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत.

अनिल हटेला 30/07/2009 - 06:05
प्र का आ.. बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

अनिल हटेला 30/07/2009 - 06:04
स्पासीबा द्रुग्स.........(धन्यवाद मित्रहो ) :-) किएव मध्ये असालात तर भाज्या वगैरे जपून खा --->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी उर्वशी जरी विकयल असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत. --->काळजी करु नका... त्याबाबतीत आम्ही द्रवीड आहोत....(डीफेन्सर) :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by अनिल हटेला

हवालदार 30/07/2009 - 15:26
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)

In reply to by अनिल हटेला

हवालदार 30/07/2009 - 15:27
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)

पाषाणभेद 30/07/2009 - 07:14
पह्यला फोटो गाडीतून काढला काय? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

अन्या, लेका किती दिवसांनी लिहिलंयस? आणि एकदम शेवटच!!! छान लिहिलंयस. चीन बद्दल बरेच कळले. आता युक्रेन येउंद्या, नाही तर आम्ही आहोतच ओरडायला.... अन्याच्या बैलालाऽऽऽ...... ;) आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे... बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला 30/07/2009 - 19:58
अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या --> चालायचं मालक...नवीण आहे अजुन...मजा करायला भरपूर वेळ आहे ... पह्यला फोटो गाडीतून काढला काय? --->डोक्यात बडवाईजर होतीसं आठवतये,बाकी ब्लँक....नाय सांगता येणार... वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. -->स्वाक्षरी बदला की राव..इनंती हाये..:-) आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे... --->हो तीबेट विषय संवेदानशील आहेच..पण इतकही घाबरून कसं चालेल.. वाघ म्हटलं तरी खातो.वाघोबा म्हटलं तरी.. लाख मोलाची गोष्ट वादात आम्ही दोघं आणी एक फॅक्टरीची स्टाफ लेडी होती,जी आमच्यात अडल्यास दुभाषाचं काम सुद्धा करत होती. बाकी कुणीच नव्हतं ऐकायला.. ;-) आणी मी ईम्पोर्टर होतो,माझ्याशी कोण पंगा करणार ... :-) टुकुलभाउ,सुर्यराव्,पुणेरी,तात्या,स्वतीताई,सहजराव्,यशोताई,पर्‍या,संदीपदा,मस्त कलंदर्,धम्या,प्राजुताई,हवालदार,दगडू आणी बीप्सदा... धन्यवाद........पून्यांदा....:-D बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

टारझन 30/07/2009 - 21:45
झकास !! दोस्ता जियो ... तुझे लेख वाचताना मज्जा येते .. कधी तरी द्राक्षासवाच्या अंमलाखालीही लिहीत जा :)

मदनबाण 30/07/2009 - 22:23
अन्या,तुझे अनुभव वाचायला फार मजा येते. :) तू लिहलेली २री घटना फार आवडली. (फक्त ग्रीन लेबल चहा पिणारा);) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

अभिज्ञ 30/07/2009 - 22:45
तीनहि भाग आवडले रे. अन्याबा,और भी आने दो. "चाफेकर चौक टु चायना" हे शीर्षक पण चालले असते. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

आकाशी नीळा 01/08/2009 - 05:52
सुंदर प्रकटन झालये...नीन्ही भाग एकदम वाचले... आणी तुमची लिहण्याची स्टाइल जाम आवदली. थोडंसं उरकल्यासारखे वाटतये.अजुण थोडा सविस्तर वाचायला आवडेल..

दशानन 01/08/2009 - 10:43
मस्त लिहले आहेस रे बैला.. ;) I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ह्यासाठी तुला +१ व मला पण :D +++++++++++++++++++++++++++++

भोचक 01/08/2009 - 18:02
अनिलदा मजा आला. तिन्ही भाग वाचून. आता युक्रेनविषयी वाचायला उत्सुक आहे. बाकी ओडेसा फाईल नावाची फ्रेडरिक फोरसिथची नोव्हेल आहे. त्याचा ओडेसाशी काही संबंध आहे काय? नाझी अत्याचारावरच आहे ती. अधिक काही आठवत नाही. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
लेखनप्रकार
3

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

भोचक ·

बर्‍याच वेळा जी गोष्ट आपल्या हातुन निसटत आहे ती धरुन ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. भाषा,तारुण्य. पैसा,सत्ता, सौंदर्य, आरोग्य वगैरे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 28/07/2009 - 19:10
भोचकरावांनी इंदूरमधल्या मराठी समाजामधील वैशिष्ट्यांचे सविस्तर आणि सुंदर वर्णन केले आहे. माझे कांही आप्त इंदूरवासी आहेत. त्यांच्याबद्दल माझी जी संकल्पना आहे त्याच्याशी ते बरेच मिळतेजुळते आहे. भोचकराव हे स्वतः जुने इंदूरवासी आहेत की नवस्थलांतरित आहेत हे त्यांनी लिहिलेले नाही, पण त्यांच्या शुद्ध मराठी वरून त्यांनी मराठी भाषेचे शिक्षण घेतले असावे असे वाटते. त्यांनी इंदूरला इंदौर म्हंटलेले नाही. भाषा हरवते म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. आज जी शुध्द मराठी भाषा लिहिली जाते ती घरात कोणीसुध्दा बोलत नाही. 'झाले', 'गेले' या शब्दांचा बोलतांना 'झालं', 'गेलं' असाच उच्चार असतो, पण तोसुध्दा 'झालम्', 'गेलम्' यापेक्षा वेगळा असतो. मालवण पासून गोंदियापर्यंत आणि डहाणूपासून सोलापूरपर्यंत महाराष्ट्राच्या सलग प्रदेशातल्या बोलीभाषेतसुध्दा प्रचंड फरक दिसतो. इतकेच नव्हे तर इंदूर, ग्वाल्हेर, सागर आणि जबलपूरचे मराठी भाषिक त्यांच्या बोलीवरून वेगळे वाटतात. तंजावर आणि मंगलोरला शहाजी महाराजांच्या काळापासून स्थायिक झालेले मराठी लोक आहेत. त्यांची मराठी बोली तर मलासुध्दा अगम्य वाटते. मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या बोलण्यात 'वट्ट', 'हुम्म' यासारखे कानडी शब्द यायचे, मुंबईतल्या गुजराथी लोकांच्या बोलण्यातून 'वांधा', 'सरस' यासारखे शब्द आले तर हिंदीमधून 'सही' (स्वाक्षरी नव्हे), 'मस्त' वगैरे शब्द. आता त्यांचा समावेश मराठीत झाल्यासारखाच आहे. माझ्या लहानपणी कायम तोंडात असलेले 'सदरा', 'विजार' हे शब्द आता कोणाच्या बोलण्यात येतच नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर भाषा ही स्थळकाळानुसार बदलत असते. इंदूर असो किंवा तंजावूर, मॉरिशस किंवा लॉस एंजेलिस, तिथल्या मराठी माणसाला आपण 'मराठी' आहोत असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत तो अंशतः का होईना पण आपली एक स्वतंत्र अशी ओळख ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या अगदी दुसर्‍या टोकाला जाऊन पुण्यामुंबईत राहणारे पण संपूर्णपणे इंग्रजाळलेले महाभागसुध्दा क्वचित कधी दिसतात. त्यांना जर आपण 'मराठी' आहोत असे वाटतच नसेल तर त्यांना मराठी भाषा येते की नाही याला फारसा अर्थ नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

नंदन 29/07/2009 - 00:10
लेख आवडला. प्रकाशरावांशी सहमत आहे. कुठल्याही ओळखीला (आयडेंटिटी) - सांस्कृतिक, धार्मिक वा अन्य - धोका निर्माण होतो किंवा तशी भावना असते, तेव्हा आपल्या मुळांना धरून ठेवण्याकडे अधिक कल असणे स्वाभाविक आहे. साठच्या दशकात तामिळनाडूत पेरियारांच्या प्रभावाखाली आपली हिंदू ओळख अमान्य करणार्‍या बहुजन समाजाचेच प्रतिनिधी जेव्हा श्रीलंकेत आपल्या धर्माला दुय्यम दर्जा मिळतो आहे म्हणून ती ओळख हिरीरीने मिरवतात; त्यामागचे कारण हेच असावे. मद्रासमधल्या मराठी भाषकांचीही अशीच मानसिकता आहे हे मस्त कलन्दर यांनी लिहिलेल्या या लेखातील अनुभवावरून कळून येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

एकलव्य 29/07/2009 - 07:35
हाच मुळात मोठा रोचक प्रश्न आहे. "नेतिनेति"चा नियम लावायचा झाल्यास अस्तित्व म्हणजे निव्वळ मराठी भाषा असे बिलकुल नाही. मराठी भाषेशिवाय मराठी माणूस ही मरणप्राय कल्पना वाटली तरीही निव्वळ भाषा येत नाही म्हणून 'तू मराठी नाय बां' असे म्हणून एनआरएमच्या पुढच्या पिढ्यांना हिणविणे योग्य होणार नाही. आईवडील मराठीत बोलणार आणि मुले हिंदीत हा प्रकार दिल्लीतील मराठी मंडळीत (किंबहुना तसा तो मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्याच ठि़काणी) आढळतो हे पाहण्यात आहे. लेखातील इंदूर वर्णन आवडले... समाज चित्र आणि लेखकाचे विचार चांगले मांडले आहेत. धन्यवाद! (इंदूरला जाण्याचा योग लवकरच साधायला हवा या विचारात गढलेला) एकलव्य

परवा कविवर्य महाराष्ट्रभूषण श्री.मंगेश पाडगावकर ठाणे येथे आमच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना जेव्हा मराठी भाषेचे भवितव्य काय ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी छातीठोकपणे सांगितले "की काही मूठभर लोकांच्या कारवायांमुळे मराठी भाषा मरणार नाही " आणी हे सांगताना त्यांनी मध्य प्रदेशचेच उदाहरण दिले. बाकी लेख छानच . मस्त जमलाय. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मराठी भाषा अजूनही इतर प्रातांत चांगली बोलल्या जाते, ही एक मराठी माणसाला आनंद देणारी गोष्ट. सांस्कृतिक-सामाजिक आणि राजकारणातही मराठी टीकून आहे, त्याचा घेतलेला धावता आढावा, आवडला. भाषेत बदल हे साहजिक आहेत आणि असे बदल स्वीकारले पाहिजेत. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. -दिलीप बिरुटे
प्रतिसादाच्या बॉक्सची लांबी, लैच लांबल्यासारखी वाटते

अ-मोल 29/07/2009 - 10:51
लेख आवडला. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. शंभर टक्के सहमत. मराठीने सोवळेपणा सोडला, तरच तिची वाढ होईल.

JAGOMOHANPYARE 29/07/2009 - 12:04
यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? मग ती यु पी वाल्याना कळणारच की, त्यात काय विशेष..

भोचक 29/07/2009 - 13:33
यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? जगमोहन प्यारे जी, देवनागरी ही लिपी आणि या लिपीत मराठी, हिंदी, नेपाळी या भाषा लिहिल्या जातात. आपण संस्कृतही याच भाषेत लिहितो. अरगद म्हणजे काय आपल्याला माहित आहे काय? त्याला मराठीत तूरडाळ म्हणतात ! हा फक्त मासला. वाणसामानात अनेक वस्तू आहेत, ज्यांना हिंदीत 'कम्प्लिट' वेगळी नावं आहेत. वानगीदाखल माझा या विषयावरचा हा लेख वाचावा. http://www.misalpav.com/node/4037 बाकी प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

लिखाळ 29/07/2009 - 22:23
लेख एकदम सुंदर. भाषा आणि संस्कृती या बाबत विचार करता मला नेहमीच आज आसपास शहरी लोकांच्या तोंडी असणारी मराठी आणि त्यांचे वागणे विचारात टाकते. इंग्रजी, हिंदी मिश्रित बोलणे ते सुद्धा इंग्रजी लकबीने हे संस्कृती पासून दुरावणे आहे की वाढदिवसाला केक कापण्यासारख्या प्रथा (हे एक उदाहरण म्हणून) अंगीकारणे हे संस्कृतीपासून दूर जाणे आहे हे मला कळत नाही. आपल्या लेखात वर्णन केलेले लोक बोली वेगळी बोलत असले तरी रीती-रिवाजांना जास्त चिकटून आहेत आणि ते आशादायक आहे असा सूर दिसतो. -- लिखाळ. मराठी लँग्वेजचं फ्युचं मध्ये काय होणार गॉड नोज !

बर्‍याच वेळा जी गोष्ट आपल्या हातुन निसटत आहे ती धरुन ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. भाषा,तारुण्य. पैसा,सत्ता, सौंदर्य, आरोग्य वगैरे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे 28/07/2009 - 19:10
भोचकरावांनी इंदूरमधल्या मराठी समाजामधील वैशिष्ट्यांचे सविस्तर आणि सुंदर वर्णन केले आहे. माझे कांही आप्त इंदूरवासी आहेत. त्यांच्याबद्दल माझी जी संकल्पना आहे त्याच्याशी ते बरेच मिळतेजुळते आहे. भोचकराव हे स्वतः जुने इंदूरवासी आहेत की नवस्थलांतरित आहेत हे त्यांनी लिहिलेले नाही, पण त्यांच्या शुद्ध मराठी वरून त्यांनी मराठी भाषेचे शिक्षण घेतले असावे असे वाटते. त्यांनी इंदूरला इंदौर म्हंटलेले नाही. भाषा हरवते म्हणजे काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. आज जी शुध्द मराठी भाषा लिहिली जाते ती घरात कोणीसुध्दा बोलत नाही. 'झाले', 'गेले' या शब्दांचा बोलतांना 'झालं', 'गेलं' असाच उच्चार असतो, पण तोसुध्दा 'झालम्', 'गेलम्' यापेक्षा वेगळा असतो. मालवण पासून गोंदियापर्यंत आणि डहाणूपासून सोलापूरपर्यंत महाराष्ट्राच्या सलग प्रदेशातल्या बोलीभाषेतसुध्दा प्रचंड फरक दिसतो. इतकेच नव्हे तर इंदूर, ग्वाल्हेर, सागर आणि जबलपूरचे मराठी भाषिक त्यांच्या बोलीवरून वेगळे वाटतात. तंजावर आणि मंगलोरला शहाजी महाराजांच्या काळापासून स्थायिक झालेले मराठी लोक आहेत. त्यांची मराठी बोली तर मलासुध्दा अगम्य वाटते. मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या बोलण्यात 'वट्ट', 'हुम्म' यासारखे कानडी शब्द यायचे, मुंबईतल्या गुजराथी लोकांच्या बोलण्यातून 'वांधा', 'सरस' यासारखे शब्द आले तर हिंदीमधून 'सही' (स्वाक्षरी नव्हे), 'मस्त' वगैरे शब्द. आता त्यांचा समावेश मराठीत झाल्यासारखाच आहे. माझ्या लहानपणी कायम तोंडात असलेले 'सदरा', 'विजार' हे शब्द आता कोणाच्या बोलण्यात येतच नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर भाषा ही स्थळकाळानुसार बदलत असते. इंदूर असो किंवा तंजावूर, मॉरिशस किंवा लॉस एंजेलिस, तिथल्या मराठी माणसाला आपण 'मराठी' आहोत असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत तो अंशतः का होईना पण आपली एक स्वतंत्र अशी ओळख ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्या अगदी दुसर्‍या टोकाला जाऊन पुण्यामुंबईत राहणारे पण संपूर्णपणे इंग्रजाळलेले महाभागसुध्दा क्वचित कधी दिसतात. त्यांना जर आपण 'मराठी' आहोत असे वाटतच नसेल तर त्यांना मराठी भाषा येते की नाही याला फारसा अर्थ नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

नंदन 29/07/2009 - 00:10
लेख आवडला. प्रकाशरावांशी सहमत आहे. कुठल्याही ओळखीला (आयडेंटिटी) - सांस्कृतिक, धार्मिक वा अन्य - धोका निर्माण होतो किंवा तशी भावना असते, तेव्हा आपल्या मुळांना धरून ठेवण्याकडे अधिक कल असणे स्वाभाविक आहे. साठच्या दशकात तामिळनाडूत पेरियारांच्या प्रभावाखाली आपली हिंदू ओळख अमान्य करणार्‍या बहुजन समाजाचेच प्रतिनिधी जेव्हा श्रीलंकेत आपल्या धर्माला दुय्यम दर्जा मिळतो आहे म्हणून ती ओळख हिरीरीने मिरवतात; त्यामागचे कारण हेच असावे. मद्रासमधल्या मराठी भाषकांचीही अशीच मानसिकता आहे हे मस्त कलन्दर यांनी लिहिलेल्या या लेखातील अनुभवावरून कळून येईल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

एकलव्य 29/07/2009 - 07:35
हाच मुळात मोठा रोचक प्रश्न आहे. "नेतिनेति"चा नियम लावायचा झाल्यास अस्तित्व म्हणजे निव्वळ मराठी भाषा असे बिलकुल नाही. मराठी भाषेशिवाय मराठी माणूस ही मरणप्राय कल्पना वाटली तरीही निव्वळ भाषा येत नाही म्हणून 'तू मराठी नाय बां' असे म्हणून एनआरएमच्या पुढच्या पिढ्यांना हिणविणे योग्य होणार नाही. आईवडील मराठीत बोलणार आणि मुले हिंदीत हा प्रकार दिल्लीतील मराठी मंडळीत (किंबहुना तसा तो मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्याच ठि़काणी) आढळतो हे पाहण्यात आहे. लेखातील इंदूर वर्णन आवडले... समाज चित्र आणि लेखकाचे विचार चांगले मांडले आहेत. धन्यवाद! (इंदूरला जाण्याचा योग लवकरच साधायला हवा या विचारात गढलेला) एकलव्य

परवा कविवर्य महाराष्ट्रभूषण श्री.मंगेश पाडगावकर ठाणे येथे आमच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना जेव्हा मराठी भाषेचे भवितव्य काय ? हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी छातीठोकपणे सांगितले "की काही मूठभर लोकांच्या कारवायांमुळे मराठी भाषा मरणार नाही " आणी हे सांगताना त्यांनी मध्य प्रदेशचेच उदाहरण दिले. बाकी लेख छानच . मस्त जमलाय. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मराठी भाषा अजूनही इतर प्रातांत चांगली बोलल्या जाते, ही एक मराठी माणसाला आनंद देणारी गोष्ट. सांस्कृतिक-सामाजिक आणि राजकारणातही मराठी टीकून आहे, त्याचा घेतलेला धावता आढावा, आवडला. भाषेत बदल हे साहजिक आहेत आणि असे बदल स्वीकारले पाहिजेत. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. -दिलीप बिरुटे
प्रतिसादाच्या बॉक्सची लांबी, लैच लांबल्यासारखी वाटते

अ-मोल 29/07/2009 - 10:51
लेख आवडला. उगाच ही मराठी नाही, वरीजनल मराठी वेगळी, असा भेद आपण करु तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी ठरु असे वाटते. शंभर टक्के सहमत. मराठीने सोवळेपणा सोडला, तरच तिची वाढ होईल.

JAGOMOHANPYARE 29/07/2009 - 12:04
यादी मराठीत दिली तरीही तो सामान न चुकता आणू देतो यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? मग ती यु पी वाल्याना कळणारच की, त्यात काय विशेष..

भोचक 29/07/2009 - 13:33
यादी मराठी म्हनजे देवनागरी ..? जगमोहन प्यारे जी, देवनागरी ही लिपी आणि या लिपीत मराठी, हिंदी, नेपाळी या भाषा लिहिल्या जातात. आपण संस्कृतही याच भाषेत लिहितो. अरगद म्हणजे काय आपल्याला माहित आहे काय? त्याला मराठीत तूरडाळ म्हणतात ! हा फक्त मासला. वाणसामानात अनेक वस्तू आहेत, ज्यांना हिंदीत 'कम्प्लिट' वेगळी नावं आहेत. वानगीदाखल माझा या विषयावरचा हा लेख वाचावा. http://www.misalpav.com/node/4037 बाकी प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

लिखाळ 29/07/2009 - 22:23
लेख एकदम सुंदर. भाषा आणि संस्कृती या बाबत विचार करता मला नेहमीच आज आसपास शहरी लोकांच्या तोंडी असणारी मराठी आणि त्यांचे वागणे विचारात टाकते. इंग्रजी, हिंदी मिश्रित बोलणे ते सुद्धा इंग्रजी लकबीने हे संस्कृती पासून दुरावणे आहे की वाढदिवसाला केक कापण्यासारख्या प्रथा (हे एक उदाहरण म्हणून) अंगीकारणे हे संस्कृतीपासून दूर जाणे आहे हे मला कळत नाही. आपल्या लेखात वर्णन केलेले लोक बोली वेगळी बोलत असले तरी रीती-रिवाजांना जास्त चिकटून आहेत आणि ते आशादायक आहे असा सूर दिसतो. -- लिखाळ. मराठी लँग्वेजचं फ्युचं मध्ये काय होणार गॉड नोज !
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराच्या डायरीच्या निमित्ताने

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 03/07/2009 - 16:47
प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल? पूर्ण सहमत. सुंदर वाक्य. एका वाक्यात या निवेदनाचं सार येऊन जातंय. अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा ... हा का होतो आहे याचा आपणही विचार केला पाहिजे, प्रसन्न. मुळात असं आहे की. तुम्ही किंवा मी प्रिंटमधले आहोत. हा ओरडा होण्यामागचं एक कारण आहे तो आत्ता फोफावलेल्या वाहिन्या. एक उदाहरण - एका प्रतिष्ठीत इंग्रजी वाहिनीचे मुख्य संपादक. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमधील फरक त्यांच्याच मराठी वाहिनीवर सांगत होते, "अशोक चव्हाण एम.बी.ए. आहेत म्हणजे ते शंकररावांपेक्षा उच्च शिक्षीत आहेत." हसावे की रडावे? हे संपादक अनेकांचे आदर्श आहेत. त्यांच्या या अशा चुकांची यादी देऊ शकतो, त्यांनी केलेल्या पत्रकारितेविषयी आदर ठेवूनही. कारण त्यांचे सोर्सेस आदर्शच आहेत. पण म्हणून, त्यांच्या या चुका माफ कशा करता येतील? कोणी म्हणेल ही तपशिलाची चूक आहे. पण तुला पटेल अशी तपशिलाची चूक पुढे काय घडवू शकते ते... अशी मंडळी जेव्हा पत्रकारितेच्या स्वतंत्र्याचा अधिकार घेत काही गोष्टी करतात तेव्हा हा ओरडा होतो. २६/११ च्या संदर्भात हे प्रश्न उभे ठाकले आहेत. अरूषी प्रकरणात उभे ठाकले आहेत. नटवरिसंह यांच्या सुनेच्या आत्महत्येसंदर्भात उभे ठाकले आहेत. इतकेच कशाला, तहलकासंदर्भातही आहेत. बारकाईने लक्ष दिले तर तेही समजून येतील. 'चमत्कारां'च्या हेच रिपोर्टिंग असे करणाऱ्या वाहिन्या असतात तेव्हाही हे प्रश्न येतात. हा सुमारपणा मारक आहेच. असा ओरडा पूर्वी प्रिंटविषयीही व्हायचा. इंडियन पोस्ट आठवतो, यशवंतरावांविषयी झालेलं कव्हरेज? कुणी केलं होतं ते सांगायचं? नकोच. पण त्याचे प्रमाण कमी असायचे. कारण वीण कमी. मला आठवते, केवळ ब्लॅकमेलींगसाठी निघणाऱ्या पत्रांच्या अनुषंगाने असे व्हायचेच. त्या ओरड्यात थोडासा अर्थ आहेच. तो आपणही समजून घेतला तर... तर आपल्यात सुधारणा होईलच, आणि ओरडा करण्यासही वाव राहणार नाही. समजून घेतो का? २६/११ नंतर काहींनी घेतलेले पवित्रे पाहिले तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. हे काही म्हणजे कुणी कनिष्ठ नाहीत. सगळे असे आहेत की ज्यांनी नेतृत्त्व द्यायचे आहे... तुमची भावना पूर्ण मान्य. पण सारेच तुमच्यासारखे नाहीत. म्हणूनच अळी - सुरवंट - फुलपाखरू न्याय इथे पक्का लागू होतो.

In reply to by श्रावण मोडक

तुमच्या सर्व विधानांशी पुर्णपणे सहमत आहे. मला एकच म्हणायचेय, या प्रकारच्या गोष्टी का चालतात तर त्या कुणाला तरी हव्या असतात म्हणुन. मुळात मी प्रिंट किंवा ऑडिओ-व्हिज्युअल, कुठल्याच मीडीयाची कैफियत मांडत नाहीये. मला या आरोपांना विरोध करायचाच नाही. माझे म्हणणे एकच आहे, की ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. ----- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

श्रावण मोडक 03/07/2009 - 17:11
ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. सहमत. शंभर टक्के सहमत. हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे. वाचक-दर्शक चांगल्या अर्थाने ग्राहकाच्या भूमिकेत आला ना की मग या गोष्टी सुरळीतपणे पुढे सरकण्याचा वाव निर्माण होईल. मी नेहमी म्हणतो, वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवरील बुलेटीन हे एक प्रॉडक्ट आहे हे आधी स्वीकारूया. पण एकदा ते स्वीकारले तर प्रश्न येतो. हे प्रॉडक्ट काय आहे - 'टूथपेस्ट' की 'शेविंग क्रीम'. 'ट्यूब' सारखीच दिसते, आत काय आहे? 'पेस्ट' म्हणून 'शेविंग क्रीम' तर विकले जात नाही ना? किंवा 'शेविंग क्रीम' म्हणून 'टूथपेस्ट' तर विकले जात नाही ना? हा निकाल एकदा वाचक-ग्राहकाने घेतला की कलींग सुरू होईल. जे फसवे प्रॉडक्ट देतात ते 'खपतील'. न फसवणारे खपतीलच.

In reply to by श्रावण मोडक

असेच म्हणतो. पुन्हा एकदा स्पष्टीकरणः ओरड्याला माझा अजिबात विरोध नाही, उलट पुर्ण पाठिंबा आहे. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ---- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by श्रावण मोडक

हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे.
हेच म्हणतो. सहमतीतील विखुरलेपण यातुनच येते प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 03/07/2009 - 17:00
तुम्ही प्रत्रकार असाल ह्याचा अंदाज आला होताच. लेख आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 04/07/2009 - 01:16
मला वाटते मी कोणत्याच भागाला आधी प्रतिसाद दिला नाहीये. पण मी तुमच्या सर्व भागांचे वाचन केले. भाग ओघवते आणि ऑथेंटिक वाटतात. तुमचे ह्या भागातले विवेचनही अतिशय पटणारे आहे. अभिनंदन!! (संपादक)चतुरंग

सुनील 04/07/2009 - 05:54
सध्या अकरावीच्या प्रवेशाबद्दलचा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. बहुधा सोमवारी त्याचा निकाल लागेल. जेव्हा तो लागेल तेव्हा त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करता येईलच पण मला इथे जो मुद्दा मांडायचा आहे तो टाईम्स ऑफ इंडिया ह्या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या भूमिकेबद्दल. एक वृत्तपत्र म्हणून एखादी भूमिका घेणे (ICSE विध्यार्थ्यांच्या बाजूने) एकवेळ समजू शकते परंतु त्या वृत्तपत्राने ह्या संपूर्ण प्रकरणाला जो एक मराठी-अमराठी रंग देण्याचा प्रयत्न केला, तो प्रकार मला अश्लाघ्य वाटतो. गरजूंनी गेल्या ३ आठवड्यातील अंक चाळून पहावेत, मी काय म्हणतो ते कळेल. एक विचार मनात येतो, अशी एकांगी भूमिका मांडण्याची सक्ती संबंघित पत्रकारांवर व्यवस्थापनाकडून होत असेल का? व्यवस्थापनाचे न ऐकता सत्य मांडणार्‍या पत्रकारांची फरफट होत असेल का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 04/07/2009 - 06:59
लेखमाला तर छान होतीच पण हा संवाद जो साधला आहे तो आधीकच आवडला. धन्यवाद. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ह्याबद्दल देखील तुम्ही, मोडककाका अजुन सांगावे. वर्तमानपत्र, वाहीनी हे सगळेच जाहीरातींवर चालते. (ग्राहकराजा महत्वाचा आहे पण तितकाही नाही.)जाहीरती देणारा वर्ग आपल्याला आपल्याकामाशी मतलब म्हणुन मोकळा होतो. थोडक्यात ही माध्यमं मालकांच्या मर्जीवरच चालतात. हा धंदा आहे. माध्यमचालकांचे आर्थीक व राजकीय हितसंबध गुंतलेले आहेत. नक्की सामान्यवाचकाने काय करावे. परत दबावगट? परत अजुन एक सत्ताकेंद्र बनवायचे? मेधा पाटकर, अण्णा हजारे अश्या लोकांना जर सरकार दबत नाही तर आरडाओरडाशिवाय काय करायचे ते पण जरा सांगा. जे लोक सनदशीर मार्गाने अन्यायनिवारणासाठी लढा देत आहेत त्यांना सहानुभूती, आर्थीक मदत शिवाय अजुन काय आहे तरी काय आमच्या हातात? सगळ्यांनी केबल टिव्ही, माध्यमांवर बहिष्कार टाकणे शक्य आहे का?

Nile 04/07/2009 - 07:50
पत्रकाराचे निवेदन आवडले. माझे तरी, biased (कोणी या बाजुने तर कोणी त्या), T.R.P. लोलुप (अनेक वाहीन्यांनी अत्यंत अशास्त्रीय, खोट्या बातम्या फक्त सनसनाटी स्वरुप देउन दाखवलेल्या मी स्वत: पाहीलेल्या आहेत) मीडीया बाबतीत अजीबात चांगले मत नाही. अर्थात ही परीस्थीती फक्त भारतात आहे असेही नाही. त्यातल्या त्यात जी निरपेक्ष, to the business प्रसारमाध्यमं आहेत ती मी follow करतोच. असो, ओरडा फारच कमी लोक करतात असं मला वाटत, बर्‍याच लोकांना प्रसारमाध्यमांचा झालेला "reality-show" प्रकार आवडतो आणि त्यामुळे ती माध्यमं बाजारात विकली पण जातच आहेत. असो चालायचंच!

मोहन 04/07/2009 - 09:36
प्रसन्नकुमारजी , फारच छान लेखमाला. त्याहीपेक्षा तुमचे निवेदन आवडले. मी माझ्याकडून २४ तास बातम्या वाहिन्या पाहणे बंद केले आहे. म.टा. सकाळ , टाईम्स, बंद करून. लोकसत्ता , डि.एन.ए लावला.( दगडापेक्षा विट मऊ!) "तुम्हाला ग्राहकराजा जागा हो" म्हणजे नक्की काय कर हे मार्गदर्शन केले तर उपयुक्त होईल. मोहन

पुनेरी (शुद्ध शब्द) पुणेरी, आपले निवेदन वाचले, आपल्या पत्रकारांविषयीच्या भावना समजल्या, तरीही पत्रकारांविषयी काही त्रोटक माहिती / अपेक्षा वरील निवेदनात वाटतात. पहिली गोष्ट पत्रकारांना सामाजिक भान किती असते, एखादी बातमी वाचतांना ही बातमी खरी असेल का ? अशी शहनिशा वाचकांना करावी लागते. अन्य दैनिकातल्या बातमीशी तुलना करुन मग त्या बातमीचा अंदाज यायला लागतो. पत्रकारांबद्दलची आपण म्हणता तशी विश्वासार्हता केव्हाच संपली आहे असे वाटते. बातमी कोणत्या दैनिकात आहे, दैनिकं कोणत्या विचाराचे आहे, राग येऊ देऊ नका, पण काही पत्रकारांना तर'एखाद्या बातमीचा' पाठपुरावा केल्यानंतर एखाद्या पार्टीकडून किती मलिदा मिळेल असा हव्यास आजच्या काही पत्रकारांना असतो. लोकप्रिय दैनिकात काही पत्रकार माझेही मित्र आहेत. एखाद्या घटनेची बातमी कशी सोयीने लावली जाते, हे मी जवळून पाहिले आहे. बरं नंबर एकचा बाताड्या कोण असेल तर पत्रकार, असे माझे स्वत:चे मत आहे. सर्व विषयातील स्वतःला तज्ञ समजण्याची धडपड पाहिली की,मला त्यांची कीव येते. अर्थात हे काही सर्वांच्या बाबतीत नाही, त्याला काही अपवाद असतीलही. >>मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत. वाचायला चांगले वाटते. पण यातले काहीच खरे नाही, नसावे असे पत्रकारांकडे पाहून वाटते. दैनिकं व्यायवसायिक झाल्यामुळे 'अर्थ' याच उद्देशाभोवती पत्रकारिता फिरतांना दिसते. 'कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. असे म्हणतात ते उगाच नाही, असो...थांबतो. वरील प्रतिसाद पुणेरी किंवा मिसळपावरील कोणा पत्रकारांना उद्देशून लिहिले आहे, असे कृपया समजू नका. एकूण पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे, याकडे मला अंगुलीनिर्देश करायचा होता. अवांतर : आपल्या डायरीतल्या एक दोन भागावर फक्त क्लीक केले होते, वाचून प्रतिक्रिया लिहीन ! -दिलीप बिरुटे

श्रावण मोडक 03/07/2009 - 16:47
प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल? पूर्ण सहमत. सुंदर वाक्य. एका वाक्यात या निवेदनाचं सार येऊन जातंय. अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा ... हा का होतो आहे याचा आपणही विचार केला पाहिजे, प्रसन्न. मुळात असं आहे की. तुम्ही किंवा मी प्रिंटमधले आहोत. हा ओरडा होण्यामागचं एक कारण आहे तो आत्ता फोफावलेल्या वाहिन्या. एक उदाहरण - एका प्रतिष्ठीत इंग्रजी वाहिनीचे मुख्य संपादक. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांमधील फरक त्यांच्याच मराठी वाहिनीवर सांगत होते, "अशोक चव्हाण एम.बी.ए. आहेत म्हणजे ते शंकररावांपेक्षा उच्च शिक्षीत आहेत." हसावे की रडावे? हे संपादक अनेकांचे आदर्श आहेत. त्यांच्या या अशा चुकांची यादी देऊ शकतो, त्यांनी केलेल्या पत्रकारितेविषयी आदर ठेवूनही. कारण त्यांचे सोर्सेस आदर्शच आहेत. पण म्हणून, त्यांच्या या चुका माफ कशा करता येतील? कोणी म्हणेल ही तपशिलाची चूक आहे. पण तुला पटेल अशी तपशिलाची चूक पुढे काय घडवू शकते ते... अशी मंडळी जेव्हा पत्रकारितेच्या स्वतंत्र्याचा अधिकार घेत काही गोष्टी करतात तेव्हा हा ओरडा होतो. २६/११ च्या संदर्भात हे प्रश्न उभे ठाकले आहेत. अरूषी प्रकरणात उभे ठाकले आहेत. नटवरिसंह यांच्या सुनेच्या आत्महत्येसंदर्भात उभे ठाकले आहेत. इतकेच कशाला, तहलकासंदर्भातही आहेत. बारकाईने लक्ष दिले तर तेही समजून येतील. 'चमत्कारां'च्या हेच रिपोर्टिंग असे करणाऱ्या वाहिन्या असतात तेव्हाही हे प्रश्न येतात. हा सुमारपणा मारक आहेच. असा ओरडा पूर्वी प्रिंटविषयीही व्हायचा. इंडियन पोस्ट आठवतो, यशवंतरावांविषयी झालेलं कव्हरेज? कुणी केलं होतं ते सांगायचं? नकोच. पण त्याचे प्रमाण कमी असायचे. कारण वीण कमी. मला आठवते, केवळ ब्लॅकमेलींगसाठी निघणाऱ्या पत्रांच्या अनुषंगाने असे व्हायचेच. त्या ओरड्यात थोडासा अर्थ आहेच. तो आपणही समजून घेतला तर... तर आपल्यात सुधारणा होईलच, आणि ओरडा करण्यासही वाव राहणार नाही. समजून घेतो का? २६/११ नंतर काहींनी घेतलेले पवित्रे पाहिले तर त्याचे उत्तर नकारार्थी येते. हे काही म्हणजे कुणी कनिष्ठ नाहीत. सगळे असे आहेत की ज्यांनी नेतृत्त्व द्यायचे आहे... तुमची भावना पूर्ण मान्य. पण सारेच तुमच्यासारखे नाहीत. म्हणूनच अळी - सुरवंट - फुलपाखरू न्याय इथे पक्का लागू होतो.

In reply to by श्रावण मोडक

तुमच्या सर्व विधानांशी पुर्णपणे सहमत आहे. मला एकच म्हणायचेय, या प्रकारच्या गोष्टी का चालतात तर त्या कुणाला तरी हव्या असतात म्हणुन. मुळात मी प्रिंट किंवा ऑडिओ-व्हिज्युअल, कुठल्याच मीडीयाची कैफियत मांडत नाहीये. मला या आरोपांना विरोध करायचाच नाही. माझे म्हणणे एकच आहे, की ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. ----- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

श्रावण मोडक 03/07/2009 - 17:11
ही परिस्थिती बदलण्यासाठी जसे जेवढे जमेल तेवढे सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर मीडीया करतोय ते वाचक/ दर्शकांना पटत नसेल, आवडत नसेल तर त्यांनीच हे करण्याची गरज आहे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलेल असे मला वाटत नाही. सहमत. शंभर टक्के सहमत. हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे. वाचक-दर्शक चांगल्या अर्थाने ग्राहकाच्या भूमिकेत आला ना की मग या गोष्टी सुरळीतपणे पुढे सरकण्याचा वाव निर्माण होईल. मी नेहमी म्हणतो, वृत्तपत्र किंवा वाहिन्यांवरील बुलेटीन हे एक प्रॉडक्ट आहे हे आधी स्वीकारूया. पण एकदा ते स्वीकारले तर प्रश्न येतो. हे प्रॉडक्ट काय आहे - 'टूथपेस्ट' की 'शेविंग क्रीम'. 'ट्यूब' सारखीच दिसते, आत काय आहे? 'पेस्ट' म्हणून 'शेविंग क्रीम' तर विकले जात नाही ना? किंवा 'शेविंग क्रीम' म्हणून 'टूथपेस्ट' तर विकले जात नाही ना? हा निकाल एकदा वाचक-ग्राहकाने घेतला की कलींग सुरू होईल. जे फसवे प्रॉडक्ट देतात ते 'खपतील'. न फसवणारे खपतीलच.

In reply to by श्रावण मोडक

असेच म्हणतो. पुन्हा एकदा स्पष्टीकरणः ओरड्याला माझा अजिबात विरोध नाही, उलट पुर्ण पाठिंबा आहे. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ---- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by श्रावण मोडक

हा ओरडा त्याचाच एक भाग आहे. आविष्कार चुकत असेल, आतला आशय बरोबर आहे.
हेच म्हणतो. सहमतीतील विखुरलेपण यातुनच येते प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील 03/07/2009 - 17:00
तुम्ही प्रत्रकार असाल ह्याचा अंदाज आला होताच. लेख आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 04/07/2009 - 01:16
मला वाटते मी कोणत्याच भागाला आधी प्रतिसाद दिला नाहीये. पण मी तुमच्या सर्व भागांचे वाचन केले. भाग ओघवते आणि ऑथेंटिक वाटतात. तुमचे ह्या भागातले विवेचनही अतिशय पटणारे आहे. अभिनंदन!! (संपादक)चतुरंग

सुनील 04/07/2009 - 05:54
सध्या अकरावीच्या प्रवेशाबद्दलचा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. बहुधा सोमवारी त्याचा निकाल लागेल. जेव्हा तो लागेल तेव्हा त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांबद्दल स्वतंत्रपणे चर्चा करता येईलच पण मला इथे जो मुद्दा मांडायचा आहे तो टाईम्स ऑफ इंडिया ह्या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या भूमिकेबद्दल. एक वृत्तपत्र म्हणून एखादी भूमिका घेणे (ICSE विध्यार्थ्यांच्या बाजूने) एकवेळ समजू शकते परंतु त्या वृत्तपत्राने ह्या संपूर्ण प्रकरणाला जो एक मराठी-अमराठी रंग देण्याचा प्रयत्न केला, तो प्रकार मला अश्लाघ्य वाटतो. गरजूंनी गेल्या ३ आठवड्यातील अंक चाळून पहावेत, मी काय म्हणतो ते कळेल. एक विचार मनात येतो, अशी एकांगी भूमिका मांडण्याची सक्ती संबंघित पत्रकारांवर व्यवस्थापनाकडून होत असेल का? व्यवस्थापनाचे न ऐकता सत्य मांडणार्‍या पत्रकारांची फरफट होत असेल का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 04/07/2009 - 06:59
लेखमाला तर छान होतीच पण हा संवाद जो साधला आहे तो आधीकच आवडला. धन्यवाद. एकच अपेक्षा ती म्हणजे फक्त ओरड्याने काहीच होणार नाही, अजुन जोमदार कृती हवी आहे. ग्राहकराजा जागा हो! ह्याबद्दल देखील तुम्ही, मोडककाका अजुन सांगावे. वर्तमानपत्र, वाहीनी हे सगळेच जाहीरातींवर चालते. (ग्राहकराजा महत्वाचा आहे पण तितकाही नाही.)जाहीरती देणारा वर्ग आपल्याला आपल्याकामाशी मतलब म्हणुन मोकळा होतो. थोडक्यात ही माध्यमं मालकांच्या मर्जीवरच चालतात. हा धंदा आहे. माध्यमचालकांचे आर्थीक व राजकीय हितसंबध गुंतलेले आहेत. नक्की सामान्यवाचकाने काय करावे. परत दबावगट? परत अजुन एक सत्ताकेंद्र बनवायचे? मेधा पाटकर, अण्णा हजारे अश्या लोकांना जर सरकार दबत नाही तर आरडाओरडाशिवाय काय करायचे ते पण जरा सांगा. जे लोक सनदशीर मार्गाने अन्यायनिवारणासाठी लढा देत आहेत त्यांना सहानुभूती, आर्थीक मदत शिवाय अजुन काय आहे तरी काय आमच्या हातात? सगळ्यांनी केबल टिव्ही, माध्यमांवर बहिष्कार टाकणे शक्य आहे का?

Nile 04/07/2009 - 07:50
पत्रकाराचे निवेदन आवडले. माझे तरी, biased (कोणी या बाजुने तर कोणी त्या), T.R.P. लोलुप (अनेक वाहीन्यांनी अत्यंत अशास्त्रीय, खोट्या बातम्या फक्त सनसनाटी स्वरुप देउन दाखवलेल्या मी स्वत: पाहीलेल्या आहेत) मीडीया बाबतीत अजीबात चांगले मत नाही. अर्थात ही परीस्थीती फक्त भारतात आहे असेही नाही. त्यातल्या त्यात जी निरपेक्ष, to the business प्रसारमाध्यमं आहेत ती मी follow करतोच. असो, ओरडा फारच कमी लोक करतात असं मला वाटत, बर्‍याच लोकांना प्रसारमाध्यमांचा झालेला "reality-show" प्रकार आवडतो आणि त्यामुळे ती माध्यमं बाजारात विकली पण जातच आहेत. असो चालायचंच!

मोहन 04/07/2009 - 09:36
प्रसन्नकुमारजी , फारच छान लेखमाला. त्याहीपेक्षा तुमचे निवेदन आवडले. मी माझ्याकडून २४ तास बातम्या वाहिन्या पाहणे बंद केले आहे. म.टा. सकाळ , टाईम्स, बंद करून. लोकसत्ता , डि.एन.ए लावला.( दगडापेक्षा विट मऊ!) "तुम्हाला ग्राहकराजा जागा हो" म्हणजे नक्की काय कर हे मार्गदर्शन केले तर उपयुक्त होईल. मोहन

पुनेरी (शुद्ध शब्द) पुणेरी, आपले निवेदन वाचले, आपल्या पत्रकारांविषयीच्या भावना समजल्या, तरीही पत्रकारांविषयी काही त्रोटक माहिती / अपेक्षा वरील निवेदनात वाटतात. पहिली गोष्ट पत्रकारांना सामाजिक भान किती असते, एखादी बातमी वाचतांना ही बातमी खरी असेल का ? अशी शहनिशा वाचकांना करावी लागते. अन्य दैनिकातल्या बातमीशी तुलना करुन मग त्या बातमीचा अंदाज यायला लागतो. पत्रकारांबद्दलची आपण म्हणता तशी विश्वासार्हता केव्हाच संपली आहे असे वाटते. बातमी कोणत्या दैनिकात आहे, दैनिकं कोणत्या विचाराचे आहे, राग येऊ देऊ नका, पण काही पत्रकारांना तर'एखाद्या बातमीचा' पाठपुरावा केल्यानंतर एखाद्या पार्टीकडून किती मलिदा मिळेल असा हव्यास आजच्या काही पत्रकारांना असतो. लोकप्रिय दैनिकात काही पत्रकार माझेही मित्र आहेत. एखाद्या घटनेची बातमी कशी सोयीने लावली जाते, हे मी जवळून पाहिले आहे. बरं नंबर एकचा बाताड्या कोण असेल तर पत्रकार, असे माझे स्वत:चे मत आहे. सर्व विषयातील स्वतःला तज्ञ समजण्याची धडपड पाहिली की,मला त्यांची कीव येते. अर्थात हे काही सर्वांच्या बाबतीत नाही, त्याला काही अपवाद असतीलही. >>मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत. वाचायला चांगले वाटते. पण यातले काहीच खरे नाही, नसावे असे पत्रकारांकडे पाहून वाटते. दैनिकं व्यायवसायिक झाल्यामुळे 'अर्थ' याच उद्देशाभोवती पत्रकारिता फिरतांना दिसते. 'कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते. असे म्हणतात ते उगाच नाही, असो...थांबतो. वरील प्रतिसाद पुणेरी किंवा मिसळपावरील कोणा पत्रकारांना उद्देशून लिहिले आहे, असे कृपया समजू नका. एकूण पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे, याकडे मला अंगुलीनिर्देश करायचा होता. अवांतर : आपल्या डायरीतल्या एक दोन भागावर फक्त क्लीक केले होते, वाचून प्रतिक्रिया लिहीन ! -दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
मायबापहो, १० जुन पासुन मी दैनिक बोम्बाबोम्ब मधला प्रशिक्षणार्थी पत्रकार प्रमोद भोंडे (पम्या) याची डायरी मिसळपावमार्फत आपल्यापर्यंत घेवून आलो. जरी मराठी माणुस असलो अन वाचन हे माझे व्यसन असले तरी अशाप्रकारचे लिखाण मी करण्याची ही पहिलीच वेळ. अर्थातच त्यात अनेक त्रुटी होत्या. पण आपण माझा हा वानवळा गोड मानुन घेतला, रोज मी जे वेडेवाकडे लिहिले ते वाचले, माझे उदंड कौतुक केले, प्रतिसाद दिले अन प्रोत्साहनही यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. ही डायरी लिहीत असताना अनेक जणांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी अचुक अंदाज बांधले तर काहींनी मला तसे विचारलेही.

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....

छोटा डॉन ·

In reply to by मेघना भुस्कुटे

विजुभाऊ 01/07/2009 - 12:31
धर्म देव ह्या वैक्तीक बाबी आहेत त्या कोणीच कोणावर लादू नयेत ह्या सर्व गोष्टी मानवनिर्मीत आहेत. देव ही संकल्पनासुद्धा मानवनिर्मीत आहे. गालीबच्या भाषेत सांगायचे तर " दिल बहलाने के लिये गालीब खयाल अच्छा है" धर्म हा प्रमाण मानायचा तर नक्की कोण धर्म प्रमाण मानायचा "तस्मात युद्धस्च भारत" म्हणणारा कृष्ण प्रमाण मानायचा की शत्रुला सुद्धा क्षमा कर म्हणणारा येशु ? दिवस भर प्रार्थना कर आणि रात्री जिवापुरते खा म्हणणारा महंमद की सूर्योदयानन्तर अन्नभक्षण हे पाप आहे म्हणणारा महावीर? अन्याय करणाराला अन्याय करु देत. विठोबा तुझी काळजी घेईल म्हणणारा भागवत धर्म की मग अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा पापी म्हणणारा इस्लाम. चातुर्वर्ण्य आणि त्याची तारीफ करणारा मनू श्रेष्ठ मानायचा की समानतेची जाण निर्माण करणारा इस्लाम मोठा मानायचा. शूद्रांना शिक्षण नाकारणारा मनू चांगला की शिका संघटीत व्हा म्हणणारा धम्म?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by अवलिया

विजुभाऊ 03/07/2009 - 10:12
अर्धवट माहितीवर आधारीत असलेला बिनडोक प्रतिसाद. १००% सहमत. अवलिया साहेब आणि बिपीनभौ आपण या आणि इतर बर्‍याच बाबतीतले जाणकार आहात. मी बिनडोक आहेच त्या शिवाय का एवढे प्रश्न पडले असते ? असो. वैयक्तीक चिखलफेक करण्याची सवय नाही तरिही माझ्या शंकांचे निरसन आपणासारख्या जाणकार त्रिकाल आणिसर्व ज्ञानी माणसाने करावे ही विनन्ती. मी बिनडोक असलो तरिही उघडपणे जसा आहे तसा वावरतो. सर्वाना मूळच्याच नावानेच भेटतो. उगाचच अ‍ॅनानिमिटीचा वायफळ आग्रह ठेवत नाही असो. आपण मी विचारलेल्या सर्व शंकांचे आपण बहुशृत असल्याकारणे नीट मुद्देसूद निरसन करालच. अन्यथा आपण केवळ गालीप्रदान करणे आणि भेटलाच आहे तर ठोकुन काढुया या अर्थाने उगाच निव्वळ वायफळ प्रतिसाद देणार्‍या लोकांपैकीच आहात असेच होईल

सूहास 30/06/2009 - 15:35
स॑स्कार,संस्कृती,श्रध्दा,कर्मका॑डे आणी विश्वास या॑ची सा॑गड घालणे खरोखरच अवधड गोष्ट आहे.... जरा कुठे कमी पडल तर नास्तीक,पराचा मॉडर्न..जास्त झाल की अ॑धश्रध्दाळु,जुनाट-बुरसट विचारी . सुहास

पाषाणभेद 30/06/2009 - 15:56
कोणी काही म्हणो पण तुम्ही खरे संस्कारी आहात. तुम्ही कोणाला दुखवत तर नाही ना. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विसोबा खेचर 30/06/2009 - 15:57
देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" - इति : बाबा डॉनराव, मी आपल्या बाबांशी सहमत आहे..! श्रद्धेला पर्याय नाही.. तिरंग्यावर, पंढरीच्या विठोबावर, लालबागच्या राजावर, माझ्या देशावर, माणसाच्या माणूसपणावर, सहृदयतेवर, सृजनशीलतेवर, आईवर, गाण्या-खाण्यापिण्यावर, मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर, मला आवडणार्‍या सर्व गायक-वादकांवर - साहित्यिकांवर - अभिनेते/अभिनेत्रींवर, अनेकानेक अज्ञात चित्रकारांवर, मूर्तीकारांवर, मिपावर, मिपाकरांवर, अ‍ॅन्ड लास्ट बट नॉट द लीस्ट - नियतीवर! माझी नितांत श्रद्धा आहे! आपला, (श्रद्धाळू) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्याशी सहमत फक्त हे सोडुन बरं मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर,;) ( देवभोळा ) घाशीराम ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

नितिन थत्ते 30/06/2009 - 16:05
हा तर माझा चर्चेचा आणि वादावादीचा आवडता प्रांत. पण काय करणार? डॉनरावांनी इतकं तंतोतंत माझ्याच मनातलं लिहिलंय की मला काही लिहायलाच नको. (विश्वातल्या कुठल्या सुप्रीम पॉवरवर मात्र विश्वास नाही...तशी गरज वाटत नाही) (श्लोक पाठ असण्यापेक्षा वागणूक चांगली असणे म्हणजे संस्कार असे मानणारा) खराटा

खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात. त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही. मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते. पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार? म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल? आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे. असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते. आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं. आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा. विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं. परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं. म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली. हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे. पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

In reply to by मेघना भुस्कुटे

छोटा डॉन 30/06/2009 - 17:03
मी पुढच्या माझ्या एखाद्या प्रतिसादात मेघनाचा, संवेदचा लेख आणि त्यावर सेन च्या प्रतिक्रिया ह्याची लिंक देणारच होतो. आता मेघनाने आख्खा लेखच दिल्याने प्रश्न मिटला ... मेघनाचा व संवेदचा लेखही फार सुंदर आहे. सेनच्या प्रतिक्रियाही मस्त. मागच्या पुणे भेटीत झालेले मित्रांबरोबरचे वाद आणि उपरोक्त लेख हेच माझय ह्या लेखामागची प्रेरणा ठरले असे म्हणायला हरकत नसावी. धन्यवाद मेघना ...!!! ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by मेघना भुस्कुटे

श्रावण मोडक 30/06/2009 - 18:13
डॉन, मेघना, उत्तम! मनःपूर्वक वाचलं. मूळ लेख विचारप्रवर्तक, त्यावरची अत्यंत संयत, पण तितकीच विचारप्रवर्तक प्रतिक्रिया. अगदी उत्तम. तुमचे अभिनंदन करणार नाही. अभिमान वाटतो म्हणेन. धर्म, त्याच्याशी निगडीत परमेश्वर, त्याच्याशी निगडीत नियती या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवून स्वतःकडे पाहिल्यानंतर आपण माणूस आहोत, माणसाची विचार करण्याची शक्ती वापरतो, विवेकाचा अवलंब करतो असे वाटते का? वाटत असेलच... एखाद-दुसऱ्या प्रतिक्रियेत चुकलोही असू, कारण माणूसच आहोत. आणि तसे वाटत असेल ना, तर धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता यांचा विचार कशाला करायचा? या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवूया असे का म्हणतो? कारण, या साऱ्या चर्चेत कुठं तरी धर्म, परमेश्वर, नियती या तिन्ही गोष्टी अपौरूषेय ठरतात. त्या तिन्ही गोष्टी अपौरुषेय नाहीत, अशी धारणा झाली तर बरेच अवकाश खुले होते विचार करण्यासाठी. कारण या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही. अशाही स्थितीत, मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो. माझी आई पूजा करते. तिच्या पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी तिचा देव माझ्या जगण्याच्या आड येत असेल तर मी त्यापासून वेगळा होतो. कटाक्षाने वेगळा राहतो. अशावेळी "थांब रे, आमटी फोडणीला टाकायची आहे," असे ती म्हणाली तरी मी चटणी-पोळी, ताकभात खाऊन मोकळा होतो. हे वागणे मातृभक्तांच्या लेखी वावगे असेल... पण माझ्या दृष्टीने नाही. मी तिला त्रास देत नाही. मी आमटी-भात न खाता ताकभात खाल्ला याचा तिला त्रास होत असेल का? असेलच. पण तिच्या श्रद्धेची तिने मोजलेली ती किंमत आहे. आमटी-भाताऐवजी ताकभात ही माझ्या अश्रद्धतेची मी मोजलेली किंमत असेल. हे असे वागावे का? ज्याने-त्याने आपापल्या धारणेप्रमाणे ठरवावे. या वर्तणुकीचा आग्रह धरणे अयोग्य नाही, पण धरता येतोच असे नाही. अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो. सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही. परवाचाच किस्सा आहे - एका मित्राच्या कार्यालयात नवे मॅकबुक आले. गणेशाची प्रतिमा ठेवून सहकाऱ्यांनी मी पूजा करावी असा आग्रह धरला. मी नकार दिला. म्हटलं, आधी इथं असलेल्या मुलींच्या हातून पूजा करा. मग मीही करतो. हा मान पुरूषाचाच हे मला खोडून काढायचं होतं. मुलींनी पूजा केली, मग मीही उदबत्ती ओवाळली (इथं अश्रद्धांच्या लेखी मी दांभीक ठरतोय). मेघना, पितळी मूर्तीवर पाय असा प्रसंग अनेकांच्या जगण्यात घडतो का? बहुदा घडत असावा. असंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं आहे. गणपतीचा फोटो फोडण्याचं कृत्य. अशाच वादातून. पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम. उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?

In reply to by श्रावण मोडक

सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
मी पण असेच करतो. पुर्वीपेक्षा ताठरपणा कमी झालाय. पण शासकीय कार्यालयात सत्यनारायणाची पुजा केली जाते त्याला माझा विरोध असतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अशी शासकीय पुजा असु नये हे माझे मत. सत्यनाराणाची पुजा कोण करतो? ज्याला आपल्यातला खोटेपणा डाचत असतो तो. मग ती बोच कमी करण्यासाठी सत्यनारायण घालायचा. त्यापेक्षा सत्याची पुजा करा! (जी आजच्या जीवनात॑ अशक्य आहे) अशा कानपिचक्या ऑफिसमध्ये द्यायचो. सत्यनारायणाचा प्रसाद मला शिरा म्हणुन खायला आवडतो हे बहुतेकांना माहित होते. त्यांच्या घरी गेल्यावर तु शिरा म्हणुन खा बाबा! पण ये घरी असा प्रेमळ आग्रह असायचा. अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. मग असा विक्षिप्तपणा का करा असा विचार करतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्रावण मोडक 30/06/2009 - 18:47
धर्म, परमेश्वर, धार्मिकता या पूर्णपणे वैयक्तिकच बाबी. त्या तशाच रहाव्यात. सरकारी कार्यालयच कशाला, माझा तर त्यांना खासगी कार्यालयातही विरोध असतो. त्याच भूमिकेतून त्या कार्यालयातील मुलींच्या हातून अग्रपूजा. किमान तेवढीच आपल्या सद् सद् विवेकाला टोचणी टाळण्याची कृती.

In reply to by श्रावण मोडक

छोटा डॉन 30/06/2009 - 19:03
धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.
+१, असेच म्हणतो. उपरोक्त गोष्टी ह्या पौरुषेय आहेत आणि जेव्हा त्यांची निर्मीती झाली तेव्हा त्याला स्थळ, काळ, वेळ ह्यांचे परिमाण होते. अशा परिस्थीतीत त्या आजही आहे तशाच योग्य आहेत का ह्याचा उहापोह नको का करायला ? समजा करायला गेलो तर आमच्या नशिबी "अधर्मी" ठरणे आले, भले ते भंपक का असेना. शिवाय भंपक म्हणणारे १० लोक नसतात तर हजारोंच्या संख्येने असतात. इनफॅक्ट आपला हिंदु धर्म ह बराच चिकित्सेला आणि संशोधनाला वाव देतो म्हणुन आम्हाला त्याचे कौतुक आहे. आपण हिंदु धर्मात अवश्य संशोधन करुन कालबाह्य परंपरा आणि रुढी ह्या प्रवाहातुन काढु शकतो म्हणुन तसे करण्याला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. उदा : सति प्रथा, विधवांचे हक्क , जातीभेद ह्यावर बरीच चिकित्सा झाली आणि आज आपण परिणाम आणि सुधारणा पाहतो आहोत. मग हे आता इथेच थांबवायचे का ? आपल्या धर्मातल्या कित्येक उदात्त आणि महान गोष्टी अजुन जनसामान्यांपर्यंत पोहचल्याच नाहीत, बहुतांशी तो वर्ग अजुन खेदाने कर्मकांडातच आणि अंधविश्वासातच अडकुन पडला आहे हे सत्य नाही का ? म्हणुन विष्लेषण हे आवश्यक ठरते, त्याला होणार्‍या विरोधाची कल्पना आहेच आणि त्यासाठी मानसीक तयारीही आहेच की, इथे फक्त काय काय करता येईल ह्यासंबंधी जार चाचपणी चालु आहे ...
मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.
हो , हे सुद्धा मान्य. मात्र हे मला प्रत्येकचवेळी जमेल असे नाही. मी कितपत अलिप्त राहु शकतो हे सांगणे कठिण आहे. खरे सांगायचे तर "तुला करायचे ते कर, मी येणार नाही" हे मला जमत नाही, समोरचा एखादा चुकीचा अथवा अनावश्यक वागतो आहे हे जेव्हा दिसते तेव्हा मी अलिप्तपणे बाजुला होण्याऐवजी त्याला ४ गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न करतो. बहुदा हेच अनावश्यक आणि अनवॉरंटेड ठरत असावे ... शिवाय माझे सामिल न होणे किंवा होणे ह्यावर समजा माझे "सामाजिक स्थान" अथवा "रिलेशनशिप्स" ह्यावर परिणाम होत असेल तर काय करावे ? काही वेळा नुसते "त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव" असे सांगणे शक्यही नसते व बरोबरही नसते. अशा वेळेस मी तुर्तास गुपचुप त्यात सामिल होण्याचा मार्ग स्विकारतो, ते मनाला पटत नाही हे माहित असुनही, तडजोडच म्हणावी लागेल ह्याला, पण करावी लागते.
अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.
+१, अगदी परफेक्ट ... समतोल साधणे महत्वाचे आहे ...
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
ह्यावर एक वेगळा, विस्तॄत प्रतिसाद लिहीन ... निमीत्त सत्यनारायणाचे मात्र ह्या अनुषंगाने गरिब वर्गाला आर्थिकदॄष्ट्या परवडत नसतानसुद्धा केवळ सामाजीक कर्तव्य म्हणुन पार पाडाव्या लागणार्‍या कर्मकांडावर भाष्य करेन ...
पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.
ह्यावर बहुदा मला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आपला स्टान्स पटतो आहे मात्र अफार अवघड आहे असे प्रथमदर्शनी दिसत आहे. पाहतो कसे जमते ते ...!!!
उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?
:) हा हा हा, ५० जाऊ देत पण अजुन काही जणांकडुन "कन्ट्रक्टिव्ह प्रतिसादांची" अपेक्षा मात्र जरुर आहे ... मोडकसाहेबांचा प्रतिसाद आवडला ..!!! धन्यवाद. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by मेघना भुस्कुटे

भोचक 30/06/2009 - 18:53
डॉन तुझा लेख उत्तमच. पण मेघना तुझा प्रतिक्रियात्मक लेख म्हणजे माझ्या मनीचेच सारे काही मांडलेस. १०००००००० टक्के सहमत.... (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

उत्तम मनोगत, डॉनराव (यवढ भारी लिवल्यावर डॉन्या कस काय म्हणायच) जणु काही आमच्या मनातल बोल्लास. मेघनाचा प्रतिसादाने बहार आणली. समाधान पाव्लो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले १) निरंजन घाटे हा ही माणूस च आहे २) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही. ३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय? ४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर? परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक." प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भोचक 30/06/2009 - 20:07
मी ज्या घरात वाढलो तिथे कट्टर म्हणावं असं धार्मिक वातावरण नव्हतं. आई-वडिल कट्टर धार्मिक होते असं नाही, पण त्यांनी कधी काही सक्ती केली नाही. लहानपणी कधी तरी आठवलेकाकांकडे परवचा म्हणायला आई-बाबा पाठवायचे. पण तो परंपरागत धार्मिक संस्कारांचा भाग असावा. त्यावेळी हे का? असे प्रश्न पडले तरी विचारायचे कुणाला? हा प्रश्न होता. पुस्तकाचं दुकान असल्याने धार्मिक पुस्तकं भरपूर होती. त्यातली बरीचशी वाचली होती. त्यातली शंकरासंदर्भातली पुस्तकं वाचल्यानंतर हा किती पांचट नि स्त्रीलोलुप देव होता, अशी प्रतिमा मात्र मनात तयार झाली होती. ती आजही कायम आहे. ती त्यावेळी कुणाकडे व्यक्त झाली मात्र नाही. पुढे नाशिकला आल्यानंतर वाचन वाढलं. त्याचाही प्रवास फार रंजक झाला. माझा देवावर विश्वास, श्रद्धा होती का हा मलाही पडलेला प्रश्नच. पण देवावरचा विश्वास उडण्याऐवजी त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची याची कारणं शोधण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या शोधातच मुळ विश्वासच डळमळीत झाला. ओशो वाचनात आले नि त्यांनी पार आधीचं 'संस्कारीत' प्रतिमाविश्व उध्वस्त करून टाकलं. इतरही काही मंडळींनी हेच केलं. मग भरपूर प्रश्न पडायला लागले. मतं तयार व्हायला लागली. (खरं तर कुणाची तरी घेतली गेली.आपील मतं खरोखरंच आपली असतात की...?) मनात तोपर्यंत तयार झालेल्या महिमामंडित प्रतिमांचा शेंदूर पार सुटायला लागला. मग या वाचनातून एक बंडखोरी सुरू झाली. कुठल्याही धार्मिक कार्यातील चुका काढून दाखविण्याची नि त्यावर तावातावाने चर्चा करण्याची सवय लागली. नातेवाईकांत आपण वाचलेल्या 'चार बुकातलं' काही सांगितलं, की तेही 'आ' वासून निरूत्तर होऊन बघायचे. 'अतिशहाणा' हे बिरूदही त्यामुळे मिळालं. पण त्याचवेळी याला आपल्यापेक्षा जास्त कळतं असा त्यांच्या नजरेतला भावही उगाचच स्वतःचा अहं वाढवून जायचा. मी तेव्हा नास्तिक होतो का? हा मलाही आज प्रश्न पडतो. नास्तिकतेच्या जवळ कुठेतरी होतो, असं वाटतं, पण आस्तिक्यपण पूर्ण सुटलं होतं, असंही नाही. कारण लग्न करताना त्यातल्या विधीत वायफळ खर्च करावा असं वाटत नव्हतं. पण लग्न 'संस्कारीत' व्हावं असं मात्र वाटत होतं, म्हणून प्रबोधिनीच्या पद्दतीने का होईना, पण चार मित्रांच्या उपस्थितीत असं 'संस्कारीत' लग्न नक्की केलं. हे संस्कार केले नसते तर काय झालं असतं? नक्कीच काही नाही. पण किमान तेवढे संस्कार हवेच, हा आतापर्यंतच्या पारंपरिक संस्कारांचा पगडा त्यावेळीही सुटू शकला नाही. त्याचवेळी नवं घर घेतलं, तेव्हा वास्तुपूजा मात्र केली नाही. पूजा केली ती साधी. सत्यनारायणाची. त्या पुजेवरही विश्वास होता असं नाही. कारण जहाजाच्या बिनडोक कथेवर काय विश्वास ठेवणार? पण पु्न्हा तीच भूमिका घरावर काही एक संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून चार गोष्टी व्हाव्यात. खरं तर माझा आस्तिक्य-नास्तिक्यमध्ये झुलणारा 'मोरू' झाला होता. पण मग वरकरणी दिसणार्‍या माझ्या नास्तिक्यवादी भूमिकेला मी थोडं बंडखोरीचं परिणाम देऊ लागलो. जे धार्मिक संस्कार करायचे त्याला काही वेगळा एंगल द्यायचा असं करायला लागलो. मुलगी झाल्यानंतर पाचपावलीला मंत्रपठणाला मी महिला पुरोहितांना बोलावलं ते त्यातूनच. मग माझ्या या दृष्टिकोनाचे कट्टर विरोधक असेलले माझे काका त्या निर्णयावरही नाराज झाले. पण त्यांच्या नाराजीपेक्षा त्यांच्या नाकावर टिच्चून मी मला हवं ते केलं, याचा आनंद (?) वाटला. त्याला पार्श्वभूमीही वेगळी होती. आई गेली तेव्हा याच काकांशी एकदा सामना झाला. आईचा दहावा करताना विधी करा पण त्यातला भोजनाचा भाग गाळा नि ते पैसे आधाराश्रमाला द्या अशी सूचना अस्मादिकांनी केली नि काका प्रचंड संतापले. ढेरपोट्या नि बाहेरून केवळ जेवायला बोलवलेल्या ब्राह्मणांना (माझ्या आईशी ज्यांची काहीही 'गाठ' नसलेल्याना) जेवायला घालणं मला कसंसंच वाटत होतं. काकांच्या आक्रमकपणाला मीही तितकाच आक्रमक होऊन प्रतिवाद केला. पण वडिल नि भावाने नमते घेऊन काकाशरण मार्ग अवलंबला. मग या सगळ्या विधींत मी आपला कृत्रिमरित्या वावरलो. पुढे चुलत भाऊ गेला, तेव्हाही याचाच रिपीट परफॉर्मन्स झाला. पण मी नास्तिक आहे का? की आस्तिक हा मलाही पडलेला प्रश्न. मधल्या काळात नास्तिकपणाच्या टोकाला गेलेला मी आता तिथून थोडा वळालो. विरोध कोणताच करत नाही, पण स्वतःहून कोणतीही धार्मिक गोष्ट करण्याकडे कल नसतो. त्यामुळे कुणाच्या चुकीच्या पद्धतीलाही विरोधही फारसा करत नाही. वटसावित्रीपासून कुठली पूजा करण्याची कधीही सक्ती, इच्छा व्यक्त करत नाही. घरी कधीही पुजा सहसा करत नाही. बायकोने खूप आग्रह केला तरच. तीही धार्मिक आहे असंही नाही. पाळीच्या काळात मंदिरात जाणं तिलाही वावगं वाटत नाही. नि मलाही. याचा अर्थ धार्मिक अकर्मता अंगी बाणलीय असंही नव्हे. पण बिनडोक न पटणार्‍या प्रथा, परंपरा नाही पाळायच्या हे मात्र ठरवलंय. ऐकणारं कुणी असेल तर त्यामागची भूमिका समजावूनही सांगतो. पण त्याला पटावीच हा आग्रह नसतो. तावातावाने भांडण्याची हौसही आता जिरलीय. त्यामुळे स्वतःपुरतं जे चांगलं वाटलं ते करतो. जेथे चांगलं वाटतं,(भलेही ते मंदिर असो वा मशीद) त्यावेळी तिथं जातो. मन प्रसन्न करणारं ऐकावसं वाटलं तर ऐकतो. शंकराचार्यांच्या ओम पूर्णमिदं ची अध्यात्मिक अनुभूती छान वाटते. अथर्वशीर्षाची वर्णनं मी सृष्टीला लावतो. (या अर्थाने देवाच्या जागी मी निसर्ग रिप्लेस केलाय, असं म्हणता येईल.) बाकी मी आस्तिक-नास्तिक, धार्मिक की अध्यात्मिक हा मलाही पडलेला गुंता आहेच. ही गुंतवळ सुटत नाही नि सोडवतही नाही. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

मुख्य लेख आणि प्रतिसाद विचारपुर्ण, मोठा प्रतिसाद टंकायला जरा वेळ लागेल.तुर्तास प्रतिसाद राखुन ठेवते. (सगळ्या विचारांच्या कल्लोळाला शब्दांमध्ये बांधयला स्वःतासाठी घेतलेला वेळ) --मयुरा.

नितिन थत्ते 30/06/2009 - 23:12
उच्च चर्चा. मेघना, भोचक, श्रावण सार्‍यांचेच प्रतिसाद अतिशय उत्तम. डॉनरावांच्या मूळ लेखातला एक मुद्दा घेऊन पुढे जातोय. ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? नास्तिकपणा किंवा अधार्मिकपणाचे अनेक पैलू आहेत. एक पैलू धर्म आंणि कर्मकांडे यांना विरोध या अंगाने जाणारा असतो. या पैलूत आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बसू शकतात. म्हणजे देव आहे असे मनातून वाटणारे पण तो या दगडाच्या किंवा इतर मूर्तीत आणि कर्मकांडात नाही असे वाटणारे आस्तिकही यात येतात. डॉनराव हे अशा स्वरूपाचे आस्तिक (पण लौकिकार्थाने अधार्मिक) असावेत असे वरील वाक्यावरून वाटते. काही जण आस्तिक पण असतात आणि कर्मकांडांना ही हरकत नसते. पण या कर्मकांडांना पॉझिटिव्ह वळण द्यावे असे वाटणारे आणि तसा प्रयत्न करणारे असतात. वर कोणीतरी आश्रमाला दान देण्याविषयी लिहिले आहे. काही जण खरोखरच नास्तिक म्हणजे देव नाहीच अशा मताचे असतात. मेघना ही अशा पैलूतील अधार्मिक आणि 'ठार' नास्तिक असावी असे वाटते. मी पण बराचसा मेघना टाईपचा नास्तिक आहे. अर्थात मी मूर्तीला लाथ मारेन की नाही हे सांगता येत नाही. मी अनेकदा वडिलधार्‍यांच्या इच्छेसाठी काही धार्मिक गोष्टी करतो. त्यामागे बहुधा 'माझा नास्तिकपणा या समोरच्या व्यक्तीला दु:ख देण्याइतका महत्त्वाचा आहे का?' हा दृष्टीकोन असतो. देवळात जाऊ असे अशी व्यक्ती म्हणाली तर मी जातोही किंवा नाहीही जात. कधी बरोबर जातो पण देवळाच्या बाहेरच थांबतो. थोडक्यात माझे प्रत्यक्ष वागणे माझ्या दृष्टीकोनाशी नेहमीच सुसंगत असतेच असे नाही. पण सत्यनारायण घाल किंवा मुद्दाम जाऊन कुलदैवताचे दर्शन घेऊन ये असे त्या व्यक्तीने सांगितले तर नक्कीच करणार नाही. माझी नास्तिकतेची पूर्वपीठिका अशी. देव या संकल्पनेचा काहीही अर्थ सांगितला तरी 'विश्वातील घटनांचे नियंत्रण करणारा आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम हव्या तशा प्रकारे घडवू/बदलू शकणारा' हा अर्थ देवाच्या संकल्पनेपासून कधीही दूर करता येण्यातला नाही. कारण हा अर्थ काढून टाकला तर देव असला काय आणि नसला काय? बहुतेक आस्तिकांनाही अशा देवाचे माहात्म्य वाटणार नाही. तर वरील प्रकारची क्षमता बाळगणारी कोणतीही शक्ती या विश्वात नाही असे मी मानतो. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

अन्वय 30/06/2009 - 23:31
आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले घाटे यांना स्यूडो म्हणणे चुकीचेच आहे. कारण जो खरा विज्ञानवादी असतो. तोच दैववादी असतो, अशी माझी धारणा आहे. अशी धारणा होण्यामागेही एक घटना आहे. माझ्या एका मित्राचे जवळचे नातेवाईक रुग्णालयात होते. ते कोमात होते. वय अधिक असले, तरी त्यांना वाचविण्यासाठी त्या कुटुंबाचे खूप प्रयत्न सुरू होते. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते जगणे शक्‍य नव्हते. विशेष म्हणजे तो मित्र निरीश्‍वरवादी होता. आम्ही डॉक्‍टरांना भेटलो. ते म्हणाले. तुम्ही त्यांना घरी नेले, तर बरे होईल. तो मित्र मात्र तयार नव्हता. डॉ. आजोबा वाचलेच पाहिजे, असं तो वारंवार विनवत होता. त्यावेळी डॉक्‍टर फटकन म्हणाले, माझे प्रयत्न सुरूच आहेत. बाकी सर्व ईश्‍वराच्या हाती. हे ऐकल्यानंतर तो मित्र सटकलाच. म्हटला, डॉक्‍टर असून ईश्‍वराचा हवाला देता. डॉक्‍टरांनी त्याचे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाले, डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे. कारण मला माहिती आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्यावर जगातला कोणताच डॉक्‍टर नियंत्रण ठेवू शकत नाही. ही शक्ती एकाच गोष्टीत आहे. तिला आपण ईश्‍वर म्हणतो. मित्र गपगार झाला. बोलण्यासारखे काही त्याच्याकडे राहिलेच नव्हते. तो शांतपणे उठला आणि आजोबांजवळ जाऊन त्याने त्यांचा हात हातात घेतला. त्याचवेळी आजोबांच्या ओठाची थोडी हलचाल झाली. पुढे काही दिवस मी त्याच्याबरोबर रुग्णालयात जात होतो. चार दिवसांनंतर आजोबा शुद्धीवर आले. आता बोला.

In reply to by अन्वय

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:02
डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे. क्या बात है..! बोला गणपतीबाप्पा मोरया..! आपला, (गणेशप्रेमी) तात्या. स्वगत : हम्म! भाग्यश्रीच्या शब्दात सांगायचं तर आता हा धागा हायजॅक करू की काय?! ;) थोर थोर विचारवंतांची रेवडी उडवायला जरा मज्जा येईल! :) जाऊ द्या झालं! देवदेवतांच्या मूर्त्यांवर पाय देऊन तुडवणं सुरू आहे. आपण कशाला उगा मध्येच पडा! साला कुणाचा तरी पाय आपल्याही टाळक्यावर पडायचा!:) तात्या.

विसोबा खेचर 30/06/2009 - 23:46
ईश्वरी अस्तित्वाबद्दल साशंक असणार्‍यांचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली! :) असो, थोरामोठ्या विचारवंतांची ही वैचारिक गंगा अशीच वहात राहो..! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अन्वय 01/07/2009 - 00:08
खरंच ना तात्या. उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते. त्यातलीच ही चर्चा आहे. चालू द्यात. प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!

In reply to by अन्वय

चतुरंग 01/07/2009 - 00:20
उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते. विरोधी मते असली तरी आपण वापरलेल्या अधोरेखित शब्दांसारखे दुसर्‍या प्रतिसादकर्त्यांना मानहानीकारक शब्द वापरणे योग्य नव्हे! जरा जपून लिहा. विचारपूर्वक लिहा. (सूचक)चतुरंग

In reply to by अन्वय

घाटावरचे भट 01/07/2009 - 00:44
त्याचं काय आहे अन्वयराव, इथे षड्ज ऋषभापासून वेगळा न काढता येणारे, विद्वत्ता पाजळणारे बरेच लोक आहेत. आता सगळ्यांची लेव्हल तुमच्याइतकी तर नसणार ना... पण बाकी काही म्हणा, कानाखाली वाजवून लगेच हात जोडून समोर उभं राहाण्याची तुमची ष्टाईल आवडली बॉ आपल्याला.

In reply to by अन्वय

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:21
प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. हो बुवा! एकंदर प्रकार गंमतीशीर आहे खरा! :) आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया! येस्स! :) तात्या.

कोणी काय मानावे आणि काय नाही यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही. परंतु मी तर म्हणेन मी धार्मिक आहे (म्हणजे डान्या ज्या पद्धतीचा धार्मिक नाही त्या पद्धतीचा मी आहे) कारण मी त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामागची भूमिका काय आहे हे शोधायचा प्रयत्न करतो आणि शेवटी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नियम सर्वत्र लागू आहे असे मला वाटते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या या उत्क्रांतीचे टप्पे पार करत आल्या आहेत असे मला वाटते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचल्यावर माझा अंदाज बरोबर आहे असेही वाटले. जसे पूर्वी लैंगिकसंबंध माणसाचे देखील पशुवत होत. आई आणि मुले देखील शरीरसंबंध करीत असत परंतु जसा जसा समाज विकसित होत गेला तसे तसे बंधने वाढत गेली. व आताच्या काळात एक सुजाण भारतीय पुरुष तरी आपल्या आईबद्दल शारीरीक संबंधाची वासना ठेवणार नाही असे वाटते. जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे. ज्या गोष्टी आज मला घरी सांगितल्या जातात त्या सर्वच टाकावू असतात असे नाही किंवा सर्वच सरसकट योग्य असतात असंही नाही. किंवा परिस्थितीनुसार उपकारक किंवा अपकारक असू शकतात. उदा. माझी आई पाळीच्या वेळेस बाजूला बसत असे, त्यामुळे घरातली कामे उदा. स्वैपाक, भांडी, केर-वारे इ. मी, माझा दादा, माझे बाबा वाटून घेऊन करत असू. त्याचा सर्वात मोठा फायदा मला अमेरिकेत आल्यावर झाला तो असा की माझा स्वैपाक मला व्यवस्थित बनविता येत असे. खाण्यासाठी बाहेर पैसे खर्च करायची किंवा पा.कृ. ची पुस्तके धुंडाळण्याची वेळ आली नाही. तसेच आपल्या पापपुण्याच्या संकल्पना यादेखील माणसाने वाईट वागू नये यासाठी त्याला घालण्यात आलेली भिती आहे असे मला वाटते, आणि म्हणून ते योग्य वाटते. स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते. त्यामुळे एखादी धार्मिक गोष्ट मला पटली नाही तरी मी ती पाळतो. त्यावर जास्तीत जास्त विचार करून ती का करावे असे म्हटले असेल याचा शोध घेतो. केवळ कोणीतरी लिहीले सांगितले म्हणून माझ्या संस्कृतीत सांगितलेली एखादी गोष्ट मी टाकाऊ मानत नाही. तसेच जी जी संतचरित्रे मी आजवर वाचली त्यात त्या त्या संतानी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, उपासना श्रेष्ठ हेच सांगितले आहे. आणि तेवढे कारण मला''देव' मानायला पुरेसे आहे. बाकी सुचेल तसे पुढे लिहीत राहतो. (१७६१मधला) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 01/07/2009 - 11:26
काय बोललात साहेब!
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते.
=D> =D> =D> =D> =D> =D> आवडले. असेच म्हणतो. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनंदयात्री 02/07/2009 - 10:58
काय बोल्लात मालक !!! एकच नंबर !! जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे. ते व्यक्तिस्वातंत्र्य वैगेरे वाल्यांनी तुमचा प्रतिसाद वाचलेला दिसत नाहीये ..

भाग्यश्री 01/07/2009 - 00:10
डॉन.. लेख फार आवडला! माझ्या मनात अगदी असंच येत असतं सारखं! मी जरा श्रद्धाळू आहे! पण त्यासाठी रोज देवळात गेलेच पाहीजे, देवाचे नाव घेतलेच पाहीजे, पन्नासदा येताजाता नमस्कार केला पाहीजे असं मला मुळीच वाटत नाही.. माझी आज्जी अगदी टोकाची सोवळं ओवळं पाळणारी! लहानपणापासून तिचे कर्मठ वागणे डोळ्यासमोर होते, विचार करू लागल्यावर ते कधी पटले सुद्धा नाहीत.. सुरवातीला मी तिला फार त्रास दिला.. हे असंच का? तसं का नाही! जेवणाच्या आधी शिवायचे नाही हा तर मला अस्पृश्य करून टाकणार प्रकार वाटायचा.. पण हळूहळू माझेच विचार बदलले.. म्हणजे जे जे आपल्याला पटत नाही, तिथे तिथे विरोध हा केला पाहीजे असं वाटणं कमी झाले.. त्यामुळे आजुबाजुची लोकं कमी दुखावली जातात.. आणि मला तेच हवंय.. त्यांना न दुखवता स्वतःला जे हवंय ते करणे.. मी श्रद्धाळू कशी आहे मग? मी नास्तिक नाही आहे, आणि टोकाची आस्तिकही नाहीये.. मी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. खरं तर आता विचार येतोय देव म्हणजे कुठला? एक कुठलीतरी अनाम शक्ती, की वेगवेगळ्या मूर्ती ? मी मूर्तीपूजक नाही आहे, परंतू त्याचवेळेस मला खूपदा मूर्तीकडे पाहून शांत वाटते.. आमच्या पुण्याच्या घराच्या शेजारी आम्ही कॉलनीतल्या सर्व लोकांनी खपून विठ्ठल मंदीर बांधले.. त्याच्या निर्मितीपासून इन्वॉल्व्ह झाल्याने खूप जिव्हाळा वाटतो त्या मंदिराचा.. त्या गाभार्‍यात मिळणारी शांतता कुठेही मिळत नाही.. गणपतीच्या कुठल्याही मूर्तीसमोर गेल्यास मला केवळ शांत शांत वाटते! पण म्हणुन मी दिवसातून हजारवेळा नाही जात.. देवपूजा करताना, संस्कृत श्लोक, आरत्या, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला मला फार आवडते. पण एखाद दिवस नाही झाले यातले काही तरी बिघडत नाही.. मला असं वाटतं, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीशी आपण कसे वागू तसं काहीसं माझं देवाबरोबर होते.. रोजचा कॉन्टॅक्ट नसला तरी काही बिघडत नाही.. पण कधीतरी तिथे जाऊन मन मोकळे केले, शांत केले की बरे वाटते.. त्याचबरोबर, माझ्या आयुष्यात जे जे काही होत आहे ते ते केवळ माझ्याच प्रयत्नांनी होत आहे असंही मला म्हणता येत नाही! पण मी ती 'पांडुरंगाची कृपा' , गणपतीचा आशिर्वाद आहे इत्यादी म्हणु नाही शकत.. थोडक्यात मी त्या प्रांतात गोंधळलेली आहे.. जसं जसं अजुन जास्त वाचन होईल तशा काही गोष्टी उलगडतील असं समजून मी सद्ध्या शांत आहे.. पण तू एक अतिशय उत्तम मुद्दा, उत्तम प्रकारे मांडलास त्याबद्दल अभिनंदन..अतिशय संयत लेखन करणे, कधीही तोल जाऊ न देणे हे संस्कारीपणाचेच लक्षण आहे डॉनराव! http://www.bhagyashree.co.cc/

In reply to by भाग्यश्री

अनामिक 01/07/2009 - 02:08
भाग्यश्रीच्या मताशी अगदी सहमत. मीही जरा श्रद्धाळू आहे, पण त्यासाठी देवळातच गेलं पाहीजे किंवा वडीलधारी म्हणताहेत तसे कर्मकांडं केलेच पाहीजे असे कधीच वाटत नाही. असे असले तरी कुणाला तसे करण्यापासून परावृत्तही करत नाही. कारण, प्रत्येकाची आपली श्रद्धा असते.... कुणाची दगडातल्या देवात तर कुणाची कोण्या दुसर्‍या ठिकाणी. याठिकाणी मला मेघनाच्या आईचं मेघनाने मुर्तीवर पाय दिल्यावरचं उत्तर पटते.... कुणाच्या विश्वासाची, श्रद्धेची पायमल्ली करणे चुकच. तुमचा विश्वास नाही तर नसू देत, पण ज्यांचा आहे त्यांच्यात अडथळा न बनणेच योग्य! माझ्या घरीही (भाग्यश्रीप्रमाणेच) आजीमुळे कडक सोवळे (अजूनही) पाळले जाते. पुजा/जेवणाच्या आधी न शिवण्याच्य नियमाने तर खूप चिड यायची! मी आईला म्हणायचोही की आजीच्या नकळत पारोश्या अंगाने मी किंवा ति कशाला शिवलो अर आजीला थोडीच कळणार आहे... तरी तू अगदी काटेकोरपणे का पाळतेस हे सगळं? ... त्यावर ती म्हणाली, सहज शक्य आहे असे करणे... पण असे करून काय साध्य होणार? आजीचा असलेला विश्वास तो फक्त तोडल्या जाणार... एक छोटासा नियम तो, ज्याने तुला किंवा कोणालाच काही त्रास होत नसेल तर सोवळ्याचे ते आहे म्हणून उगाच अवडंबर माजवण्यापेक्षा, निमुटपणे पाळलेले काय वाईट? सांगायचा मुद्दा हाच की कुणाची श्रद्धा तुमच्या आड येत नाही ना? मग त्याला विरोध केलाच पाहिजे का? तुमचा कर्मकांडावर विश्वास नाही तर नसू देत... लोक त्यामुळे आपल्याला नास्तिक म्हणून मोकळे होत असतिल तर होऊ देत बापडे.... आपण, आपला देव (किंवा अजून काही), आणि आपल्या भावना स्पष्टं आहेत ना... मग झालं तर! मग कुणी देवाला स्वेटर घातलं काय किंवा सोन्याचा मुकूट अर्पण केला काय, मला त्याचा काही फरक पडत नाही. डॉन... खूप सुंदर लिहिला आहेस लेख. कुठेही तोल गेलेला नाही! -(श्रद्धाळू) अनामिक

नितिन थत्ते 01/07/2009 - 00:11
एकदम आठवलं. हल्ली सुशिक्षित लोकांच्यात डोळस श्रद्धा असा एक गंमतीदार शब्द प्रचारात आला आहे. माझ्यामते एकदा श्रद्धा म्हटली की त्यात डोळस आणि अंध असं काही नसतं नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

नंदन 01/07/2009 - 00:22
डॉनरावांचा लेख आणि मेघना, श्रावण, भोचक यांचे प्रतिसाद आवडले. आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे मान्य करण्यास खर्‍या विज्ञानवाद्याला अडचण नसावी. पण या अज्ञाताच्या नावाखाली धर्माच्या नावावर खपवल्या जाणार्‍या अनेक गोष्टींमुळे प्रतिक्रियात्मक म्हणून एक जवळजवळ तितकीच कट्टर मनोवृत्ती तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर श्रावण यांनी स्पष्ट केलेली भूमिका ("एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.") संतुलित वाटते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:29
आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे अरे सांगतोस काय मेल्या नंदन सायबा?! मला तर काही काही लोकान्ची बुद्धी घोड्यापुढे धावतांना दिसते तिच्यायला! :) तात्या.

लिखाळ 01/07/2009 - 00:34
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले. ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? ..... पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, ....
अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा :) असे नमस्कार घ्यायला फार सावधानता लागते. ती नसेल तर आपण समोरच्याचा नमस्कार देवाकडे वळवावा आणि लगेच समोरच्याच्या पाया पडून टाकावे. हे उत्तम ! (असे माझे मत) बाकी देव, श्रद्धा याबाबत बरेच काही चांगले लिहिले आहे. काळजीपूर्वक आपली मते तपासत राहणे हे चांगलेच असते. मते बदलतसुद्धा असतात. बदलाचे एकदा जसे स्वागत होते तसे पुन्हा सुद्धा व्हावे. तेव्हा संकोच होऊ न द्यावा. सर्वांचे प्रतिसाद सुद्धा भारी आहेत. सध्या माझ्याकडून भर घालण्यासारखे काही नाही. रामाच्या ईच्छेने तसे काही असेल तर लिहिनच ! -- लिखाळ. जुने ठेवणे मीपणे आकळेना - समर्थ.

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:43
लिखाळगुरुजी, अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?! :) काय म्हणता? बाकी आमचे तुकोबा बिच्चारे भाबडे हो! त्यांना ठायी ठायी विठोबा दिसत असे..! :) असो.. आपला, (विठ्ठलप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 01/07/2009 - 00:49
अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?!
बरोबर. पण जेव्हा समोरचा विठोबाला नमस्कार करतो आहे असे आपण मानतो तेव्हा (स्वतःसाठी विठोबा अस्तित्वात नसला) तरी समोरच्याच्या असलेल्या विठोबाला आपण क्षणभर मान्यता देतोच ना. त्या नसलेल्या पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा :) (हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही.) -- लिखाळ विठोबासी शरण जावे। निजनिष्ठा नाम घ्यावे - संत तुकाराम (चित्रपटातले)

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:57
पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा असं म्हणता? बरं बरं! :) हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही. हम्म! तर्क, रॅशनल थिंकिंग वगैरे वगैरे! आपण तर या शब्दांनादेखील पार घाबरतो भैय्या! :) तात्या. -- माती, पाणी, उजेड, वारा तूच मिसळीशी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार.. विठ्ठला, तू वेडा कुंभार!

राघव 01/07/2009 - 01:40
१-२ शंका उगाच मनात आल्यासारख्या वाटतात - १. (भगवंत) आहे अशी श्रद्धा असणारा तो आस्तिक अन् (भगवंत) नाही श्रद्धा असणारा तो नास्तिक. - पण, भगवंत आहे, त्याच्याच ईच्छेने सगळे घडते अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा आस्तिक म्हणता येईल काय? तसेच भगवंत नाही अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा नास्तिक म्हणता येईल काय? :) - श्रद्धा दोन्ही बाजूंनी नाही काय? एका बाजूची अंध अन् दुसर्‍या बाजूची डोळस कशी होईल? २. धर्म ही संकल्पना कशासाठी अस्तित्वात आली? ती नसती तर काय झाले असते? कर्मकांडं-रूढी-परंपरा कशासाठी अस्तित्वात आल्यात? कर्मकांडं-रूढी-परंपरा म्हणजेच धर्म का? किंवा हे सर्व न पाळणं म्हणजे धर्म का? - मी स्वतः अजूनही वरील प्रश्नांच्या उत्तरांजवळ नाही पोचू शकलो ब्वॉ. तसे यम -नियमांबद्दल वाचले होते थोडेसे. पण ते वाचून वाटले की इतर धर्मांत देखील या पेक्षा काही वेगळे सांगीतलेले नसावे. ३. पौरुषेय-अपौरुषेय म्हणजे नक्की काय? (फारच बाळबोध प्रश्न असे वाटू नये म्हणजे झाले रे राघवा!!) - मला वाटते यावर चर्चा करण्यासाठी आधी भगवंत आहे हे मान्य करावे लागेल. मनोभुमिका सारख्या पातळीवर आल्याशिवाय चर्चा करणे अयोग्य. मला स्वत:ला असे वाटते की आपण कोणत्याही गोष्टीचा कार्यकारणभाव जाणून मग पटले तर तसे वागावे. मी देवळात जातो. कशासाठी? ते एकदा शोधले की मग त्यावर चर्चा करण्याची गरज राहील असे वाटत नाही. तसेच मी पूजा करतो. व्रतं-उपास-तीर्थयात्रा करतो. हे सर्व मी का करतो हे शोधणे योग्य. तसे केले म्हणजे इतरांशी तुलना करण्याचा संभव उरणार नाही. :) (भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा असलेला) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

मृदुला 01/07/2009 - 01:41
हा धागा सगळा वाचला. "माझिया जातिचे मज मिळो कोणी" प्रकारचा आनंद मिळाला. श्रावण यांच्याशी सहमत; कोणाच्या श्रद्धाविषयाच्या आड मी येत नाही आणि माझ्या मतांच्या आड कोणाच्या श्रद्धा येऊ देत नाही. मी साधारण ११ वर्षांची असताना खूप विचार करून (!) देव असणे शक्य नाही असे ठरवले. आता त्यावर वीसेक वर्षे उलटून गेल्यावर कधी कधी असे वाटते की एखादी अशी आंधळी श्रद्धा असती तर बरे झाले असते का? कसे वाटले असते, असे कुतूहल वाटते. पण अश्या विषयात, एकदा एका दिशेने चालू पडल्यावर परतीची वाट नाही. कदाचित, सश्रद्धांचेही असेच होत असावे. जसे मला लोकांना देव आहे हे पटतेच कसे याचे मनोमन आश्चर्य वाटते, तसे त्यांना देव नाही वाटणारे लोक नीट विचार करत कसा नाहीत याचे आश्चर्य वाटत असावे. न राहवून खालच्या ओळी. मूळ विषयाशी असंबंध. वर एका प्रतिसादात (बहुधा भोचक यांच्या) उत्क्रांती शब्दाचा वापर त्यांनी प्रगती या अर्थाने केला आहे. पशुवत आचरणातून नागरीकरणाकडे असे काहीसे. उत्क्रांती म्हणजे प्रगती नाही. उत्क्रांती म्हणजे मोठा बदल. तो चांगला की वाईट, प्रगती की अधो, हे त्या शब्दात नाही.

यशोधरा 01/07/2009 - 02:02
लेख वाचला, त्यावरच्या प्रतिक्रिया, अभिप्रायही वाचले. चर्चेसंबंधात मलाही माझे काही विचार तपासून घ्यावेसे वाटले, म्हणून हा पोस्टप्रपंच. मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. कदाचित माझ्या समजूतीची गल्लत असेल, मी नाकारीत नाही. लेख 'संस्कार' ह्या मूळ विषयापासून सुरु होत होत, आस्तिकता/ नास्तिकतेची वळणं घेत, धर्म ह्या विषयाला स्पर्ष करुन (इथे जगण्याचे तत्वज्ञान, पद्ध्त ह्या अर्थी हिंदू धर्म म्हणायचे आहे का धार्मिकता ह्या अर्थी? दोन्ही खूप वेगळ्या बाबी आहेत), रुढी आणि त्या अनुषंगाने येणारे आचार, विचार, पद्धती येथवर येऊन पोहोचतो. ह्या पैकी नक्की चर्चा कशावर? की सगळ्यांच बाबींवर? कारण प्रथमदर्शनी पाहता एकमेकांशी निगडीत वाटणार्‍या ह्या सर्व बाबी भिन्न आहेत, असं मला वाटत. उदाहरणार्थ: संस्कार आणि त्यावरुन आस्तिक वा नास्तिक असण्याचा मुद्दा. संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल? उदा: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थित: l हे नुसते पाठ करुन संस्कार निश्चित होणार नाही, पण, ह्या मागचा अर्थ समजावून जर हे स्तोत्र म्हटले तर, संस्कार जरुर होतील. सर्व जगात मातृरुपाने देवी वास करते आहे. म्हटले तर साधे वाक्य आहे, म्हटले तर आईचा मान का राखावा ह्याची शिकवण आहे. कधीकधी बुद्धीप्रामाण्यवादाचेही झापड लागू शकते. देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्‍याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? आडवे तिडवे वाचन आणि चर्चा करणार्‍याला हे प्रश्न कधी पडत नाहीत का? किंवा, गीतेमध्ये सांगितले आहे, त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः l काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ll एतैर्विमुक्त: कौंतेय तमौद्वारेस्त्रिभिर्नरः l आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ll (गीता १६.२१ आणि २२ - चू भू माफ करा काही असेल तर) थोडक्यात, काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची ३ दारे आहेत. हे विकार आत्म्याचा विनाश करतात, तेह्वा यांचा त्याग करावा. हे अर्जुना, ह्या तीन तमोद्वारांतून (तमोगुणांमधून) मनुष्य सुटला म्हणजे तो स्वतःला कल्याणकारी आचरण करतो व परमगतीला प्राप्त होतो. ह्यातला अध्यात्माचा भाग - परमगती वगैरे, स्वर्ग, नरक- सोडून देऊ हवे तर, पण हा उपदेश, संस्काराचा भाग नाही का? कशातून किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे एका मर्यादेनंतर आपले आपणच ठरवायला नको का? असो. माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक. तुकोबाराय म्हणतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll हेच ना संस्कार? अवांतरः हुश्श!! हिंदू धर्म (तत्वज्ञान) आणि रुढींना धर्म मानून धर्म ह्या संकल्पनेला झोडपण्याविषयी नंतर... क्रमशः, क्रमशः :D :P

In reply to by यशोधरा

विसोबा खेचर 01/07/2009 - 02:06
मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. हम्म! देसी डोळे परि निर्मिसी तयापुढे अंधार विठ्ठला तू वेडा कुंभार..! :) तात्या.

प्रमेय 01/07/2009 - 04:35
मला या विषयावर एक लेख लिहायचा होता, पण राहून जात होते. १. संस्कार हे मनावर करायचे असतात कारण मन हे चंचल असते. ते काबूत ठेवणे ही समाजाची (टिकण्यासाठी आणि पुढील पिठीवर दॄढ करण्यासाठीची) गरज आहे. याद्वारे आपण आपले स्वातंत्र अंशतः गमावून समाजात आपली जागा मिळवतो. म्हणजेच आपण काही विशिष्ट प्रकारे न वागायचे मान्य करतो आणि इतर गोष्टींकडे लक्ष देतो. २. समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था... ३. काही गोष्टी मात्र मनुष्य मूळ प्राणी स्वभावाने करतोच. याचाच अर्थ असा की, आपण अजून पूर्ण सामाजिक(माणसाळलेले) झालो नाही आहोत. जर एखादे कुत्रे जंगलात हरवले तर ते जंगली बनते व माणसाळलेले राहत नाही कारण जगण्यासाठी माणसाळलेले राहण्याची त्याची गरज संपलेली/नष्ट झालेली असते. ४. आपल्या समाजातल्या अशा कितीतरी गोष्टी ह्या जुन्या नियमानुसार आहेत असे मी मानतो. जेवढा समाज जास्त जुना/प्राचीन तेवढ्या त्यात जास्त चूकीच्या समजूती किंवा कालबाह्य समजूती. ५. आता एवढ्या प्रस्तावनेनंतर मूळ मुद्दा असा की, जर आपण काही चुकीच्या समजूती झुकारल्या तर आपण नास्तिक ठरत नाही. तसेच केवळ दुसर्‍यासाठी त्या मान्य करण्याने अस्तिक ठरत नाही. ६. जेवढी ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे तेवढीच ती समाज आणि काळ सापेक्षपण आहे. ७. त्यामुळे धर्म हा व्यक्तिगत बनला पाहिजे आणि समाजाने त्याला हो म्हणले पाहिजे. ८. हिंदू धर्मात(की संस्कॄती?) कितीतरी चाली-रिती आहेत ज्या नसण्यामुळे आपण जास्त प्रगत बनू. फक्त धर्मसुधारणा करून न थांबता सुधारित धर्म् आचरणात आला पाहिजे. ९. का आपण १० लोक मिळून सांगू शकत नाही, की आम्ही असा असा हिंदू धर्मावर आधारित पण सुधारित समुदाय काढला आहे आणि सरकारने त्याला नवा धर्म म्हणून मान्यता द्यावी. यात नवे ग्रंथ, पुस्तक असेल, नवी न्याय समाज रचना असेल. ही मान्यता मिळाल्यावर तो धर्म/जात म्हणून पुढच्या पिढीला मिळेल आणि सामाजिक विषमता दूर होण्यास सुरुवात होइल. जसे जास्त अनुयायी तशी कमी विषमता. बाकी परत...

नितिन थत्ते 01/07/2009 - 08:43
>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था... १०० % असहमत. असल्या रूढी कोणत्याही काळात/जगात अयोग्यच. त्याची काही कारणे असलीच तर ती एका गटाने दुसर्‍या गटावर वर्चस्व गाजवणे हीच होती. आणि हे कोणत्याही जगात/काळात स्वीकारार्ह असता कामा नयेत. (निदान जी उदाहरणे दिली आहेत ती तरी तसल्या प्रकारची आहेत) बाकी तुमचे म्हणणे बरेचसे मान्य. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

विकास 01/07/2009 - 09:09
>>>१०० % असहमत. आपल्या असहमतीशी सहमत. विशेष करून जी उदाहरणे दिली आहेत त्यासंदर्भात नक्कीच असहमती आहे. बाकी आधी लिहायची इच्छा होती पण वराती मागून घोडं नको असे वाटते. :-)

In reply to by नितिन थत्ते

प्रमेय 02/07/2009 - 00:00
>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था... मी आपला विरोध समजू शकतो. पण वरील वाक्यात मी कुठेही असे म्हटले नाहीये की त्या रूढी बरोबर होत्या. त्या काळी तथाकथित उच्च वर्गाचे महत्व टिकण्यासाठी आणि इतरांचे दमन करण्यासाठी या चाली रिती होत्या असे आपण म्हणतो हेच बरोबर आहे. पण मूळ प्रश्न असा की, जर हे कारण चूक होते/आहे, तरीपण त्या काळी समाजाने ते प्रकार वापरलेच ना? जिथे कुठे सुरूवात झाली असेल, तिथेच त्याला विरोध करून हाणून का पाडले गेले नाही? याचाच दुसरा अर्थ असा की, समाजाने ते स्वीकारले (यात सर्वजण आले. आपण ४थी, ५वीच्या पुस्तकात वाचत नाही का, अस्पॄशता, सती आणि बालविवाह या त्याकाळी समाजाला लागलेली वाळवी होती. म्हणजेच ती काही फक्त विशिष्ट सामाजिक वर्गात नसून सर्व थरांत होती.) यात त्या समाजाची कितीही दांभिकता असली तरी हाच समाज आपला पूर्वज आहे हे मान्य करावे लागते. आता चिकित्साच करायची झाली तर असे म्हणता येइल की, सती पध्दत ही त्याकाळी मागे उरणार्‍या विधवा स्त्रीयांची विल्हेवाट लावण्याची सोय होती. आजच्या काळात हे नक्कीच क्रूर आहे. पण लक्षात घ्या की, माझ्या प्रतिक्रियेत मुद्दा २ व ३ हे याचा विचार करतात. एकेकाळी मनुष्य जमात प्राण्यांकडून शिकत असे. जसे काही सस्तन प्राणी वर्गांत वॄध्द, आजारी व परावलंबी प्राणी हे प्रवासात मागे पडतात आणि इतर श्वापदांकडून मारले जातात तशी काहीशी प्रथा मनुष्याने उचलली. उदाहरण द्यायचे तर,आफ्रिकेतील जमातीत नात्यात लग्न करणे उचित समजतात. त्यामुळे असे म्हणता येइल की, ज्या घडामोडी आपण आत्ता पाहतो आहोत त्या पुढे चांगल्याकडे घेऊन जावोत.

धमाल मुलगा 01/07/2009 - 12:03
मोठा गहन आणि उत्तम विषय आहे. असा विषय चर्चेला घेतल्याबद्दल श्री.डानराव ह्यांचे अभिनंदन. अश्या गहन विचार करणार्‍या थोर विचारवंतांच्या मांदियाळीतले बरेचसे आमचे स्नेही आहे ह्याचा आम्हाला मोठा अभिमानच वाटतो. छान! असेच मोठे व्हा...उत्तम नाव कमवा....आम्हाला तुमचा अभिमान आहे. :) बाकी,आपणा सर्वांना त्या सर्वशक्तीमान अश्या जगनियंत्या परमेश्वराने साक्षात त्यालाच "काय रे, बोल तू आहेस का? दे ऊतर" असे विचार करण्याची बुध्दी देऊ केली, किती तो थोरपणा त्या देवाचा. :) असो, साक्षात ज्ञानोबा माऊलींनी म्हणलंच आहे, "जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात" ईश्वरवाद्यांना ईश्वर मिळो, निरिश्वरवाद्यांना तो नसण्याच्या आपल्या विचारांचं समाधान मिळो, सगुण उपासकांना त्यांच्या इष्ट देवतेचा कृपाप्रसाद लाभो, निर्गुण उपासकांना "कोऽऽहम्"चे उत्तर मिळो ......प्राणिजात!!! बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली :) बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्‍यांना एक जाहीर आव्हान करतो, असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात? ह्यावर कोणी इतक्यांदा घासून गुळगुळीतच नव्हे तर बुळबुळीत झालेलं लंगडं उत्तर देऊ नका..."मी माझ्या धर्माबद्दलच बोलणार" वगैरे...पुष्कळ झालंय आत्तापर्यंत हिंदूधर्मावर तोंडसुख घेऊन. आता येऊद्या इतर धर्माबाबत!!!! आहेत..मुस्लीम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, ज्यू आहे पुष्कळ आहेत. थोर विचारवंतांकडून ह्या सर्व धर्मांतल्या अनिष्ट प्रथांबद्दलही कळु द्या आम्हा मुर्ख गरीब अज्ञानी बहुजनांस ! बोला, पुंडलीक वरदा हऽऽरी विठ्ठल... ज्ञानेश्वर माऽऊली...ज्ञानराज माऽऊली.....तुकाराम :!!!!!!!!!!!!१ -(भडक्क भगवा) ध. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 01/07/2009 - 12:43
बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली
मौज नाही वाटली, तर इतके दृढ श्रद्धाळू लोक आहेत हे पाहून छान वाटलं, आणि अशी दृढता माझ्या श्रद्धेमधे केव्हा येईल असा प्रश्नही मनात उत्पन्न झाला. शेवटी श्रद्धा कशावरही असू दे, ईश्वराच्या असण्यावर नाहीतर ईश्वराच्या नसण्यावर, देवावर नाहीतर फक्त स्वतःवर, श्रद्धा असणं महत्वाचं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवलं - 'माणसांमाणसांत जर काही फरक असेल तर तो या श्रद्धेचा. श्रद्धेचं अस्तित्वच माणसाचं लहानमोठेपण ठरवते. तेव्हा श्रद्धा बाळगा.' (हे मूळ विंग्रजी वाक्यांचं तोकडं भाषांतर आहे, तेव्हा चूभूदेघे). - भटोबा

In reply to by घाटावरचे भट

धमाल मुलगा 01/07/2009 - 12:49
छान बोल्लात भटोबा... एकदम काठावरचे भट झालात की. ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

श्रावण मोडक 01/07/2009 - 18:16
बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्‍यांना एक जाहीर आव्हान करतो, असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?
आव्हान देताहात हे खरं, पण त्याची गरजच नाही. डॉन यांचा लेख, मेघना, मी किंवा भोचक यांची प्रतिक्रिया आणि नंतर त्यावर त्यांना पुष्टी देणारे प्रतिसाद यावरून ही चर्चा झाली आहे. एक गोष्ट पाहताहात का, या सगळ्यात प्रत्येकाने स्वतःचे विश्लेषण केले आहे. ते व्यक्तीगत विश्लेषण आहे. सश्रद्धांच्या संदर्भात केलेले आत्मविश्लेषण आहे. स्वतःला तपासण्याची ती कृती आहे. येथे हे सारे करताना या मंडळींसाठी सश्रद्धांमध्ये केवळ हिंदूच आहेत असे तुम्ही गृहीत धरता आहात, कारण त्यांनी लिहिताना त्यासंदर्भातील दाखले देत लिहिले आहे. पण तुम्ही हे विसरू नका, की त्यात केलेले भाष्य हे न पटणाऱ्या, तर्काच्या कसोटीला न उतरणाऱ्या गोष्टींवर (ही धारणा त्या-त्या लेखकाची आहे) आहे. आणि ही मंडळी त्या अर्थाने धर्म मानतच नसल्याने, पण त्यांची टीका धर्म (विशिष्ट धर्म नव्हे) ही संदर्भचौकट घेऊन येणाऱ्या गोष्टींवरच असल्याने, ती इतर धर्मांतील अशा गोष्टींना लागू होतेच. आम्ही अधार्मिक ठरतो ना ते सगळ्या धर्मांच्या लेखी. इस्लाम, ख्रिश्चन किंवा अन्य कोणताही. अगदी बौद्धांच्या लेखीही ठरूच. आम्ही आमच्यावरच टीका केली ती तुम्ही अशी लावून घेऊ नका. आव्हानाच्या भाषेपेक्षा सरळसोट प्रश्न जरूर करा. ही तात्कालीक प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलीतच कशी हे समजेनासे झाले आहे. :) आता माझ्यापुरते बोलायचे तर... ख्रिश्चन, इस्लाम, (तुम्ही म्हणता म्हणून) हिंदू (मी म्हणेन वैदिक धर्म), बौद्ध, जैन (इत्यादी, कुठला राहिला असल्यास त्यावरून पकडाल तुम्ही) या सगळ्या धर्मांमध्ये तर्कावर न उतरणाऱ्या, माणसाने आज जिथंपर्यंतची प्रगती साध्य केली आहे त्या प्रगतीतून आलेल्या अनुभवांती ज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या गोष्टी आहेत. त्या त्याज्य आहेत. हे सगळे धर्म त्या - त्या रुढी-परंपरांपुरते भंपक आहेत. विज्ञानाच्या अनुषंगाने मानवी बुद्धीच्या सध्याच्या क्षमतेतदेखील या विश्वाच्या काही रहस्यांची उत्तरे मिळत नाहीतच. त्यामुळे ती विज्ञानाची मर्यादा आहेच. विज्ञान हेही त्या अर्थाने धर्मासारखेच मर्यादित आहे. दोघांच्या मर्यादांचा आवाका वेगळा. पहिल्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने पहिल्याला पवित्रेबाज आव्हान देण्यात अर्थ नाही. कारण अशा वेळी त्यांच्या-त्यांच्या बौद्धीक क्षमतांच्या पलीकडे असणारे प्रश्न सामान्य माणसाकडून आले की त्यांची पंचाईत होते. हे ध्यानी घ्या की असे प्रश्न तज्ज्ञांपेक्षा सामान्य माणसालाच अधिक पडतात. त्याच्याकडचा तो एरवी रेअर असलेला कॉमन सेन्स अशा वेळी पूर्ण जागा असतो. अशा प्रश्नांपुढे आपला विचार तर्काच्या कसोटीवर उतरवण्यात हे दोन्ही वादी कमीच पडतात. मग त्यांचे-त्यांचे क्षेत्र पार झूटच आहे असा भ्रम पसरण्यास वेळ लागत नाही. आणि खरं सांगायचं तर या ज्या मर्यादा आहेत ना, धर्म किंवा विज्ञानाच्या नव्हेतच. त्या आहेत माणसाच्या मर्यादा. कारण धर्म असो वा विज्ञान, हे दोन्ही माणसाच्याच बुद्धीतून, कल्पनेतून जन्माला आले आहेत. त्याच्या बुद्धीच्या मर्यादांची चौकट त्या संकल्पनाला लागलेली आहेच. माणूसच ती आतून ढुशा मारून विस्तारत असतो. ही चर्चा किंवा अशा इतर चर्चा म्हणजेच या ढुशा आहेत. विचारविश्वाचीही उत्क्रांती होत असते. त्या उत्क्रांतीमध्ये या ढुशा देण्याच्या प्रक्रिया होतातच. विठ्ठल, माणसाचा माणसाला नमस्कार वगैरे उल्लेख वर आले आहेत. एक गोष्ट मांडतो - सच्चा वारकरी जो असतो ना, तो एकादशीच्या दिवशी गाभाऱ्यातील विठ्ठलाचे दर्शन घेत नाही, तो त्या दिवशी खरं तर मंदिरात जातच नाही. मंदिराबाहेर राहून तो कळसाकडे पाहून नमस्कार करतो. त्या दिवशी विठ्ठलच वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी कळसावर आलेला असतो, असे मानले जाते. पुरेशी बोलकी आहे ही गोष्ट श्रद्धा आणि अश्रद्धा, देव असणे आणि देव नसणे आणि धर्म व अधर्म यासंदर्भात भाष्य करण्यासाठी. त्या वारकऱ्याची ही श्रद्धा आहे, विठ्ठल माझे दर्शन घेतोय, मी त्याचे घेतोय. कारण हा विठ्ठल लोकांच्या मनात आहे. तो त्या मूर्तीत नाही. मूर्ती ही केवळ प्रतिक आहे. त्या प्रतिकापाशी वारकरी लीन होतो हे ठीक. पण त्याचवेळी "कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी," हेदेखील आहेच. चोखा त्या पायरीशी गेला हे विसरता येत नाही. हे सारं व्यामिश्र आहे. त्याची आपल्या नेहमीच्या पद्धतीनं कृष्ण-धवल उत्तरं निघत नसतात. आजच्या बुद्धीची ती मर्यादा आहे. आईनस्टाईनच ना, म्हणाला होता की, माणसाची बुद्धी ही केव्हाही त्याच्यापुढे असणाऱ्या समस्या सोडवण्याच्या गरजेपेक्षा थोडी मागेच असते. किंवा माणसापुढच्या समस्या या नेहमी त्या घडीच्या त्याच्या बुद्धीक्षमतेच्या थोड्या पुढेच असतात. हे विसरून कसं चालेल? तारतम्य (म्हणजेच विवेक म्हणूया) ही माणसाची मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेच्या जोरावरच तो इतर जीवांपेक्षा वेगळा ठरत गेला आहे. तोच हरपला की काय होते त्याचे दाखले या चर्चेत काही प्रतिसादांतून दिसतात.

नितिन थत्ते 01/07/2009 - 12:56
चला, आता चर्चा बंद करायला हवी. कारण इतर धर्मांतील अनिष्ट प्रथांबद्दल आपण काही बोलत नाही. (आपल्याला इतर धर्मांबद्दल पुरेशी माहिती आहेच कुठे? आपण आपले आपल्या आसपासच्या समाजात जे पाहतो त्यावरच बोलतो. माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते). या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही. पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे. या धाग्यावरही इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल कोणास माहिती असेल आणि लिहायचे असेल तर आडकाठी नाहीच आहे. इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात. अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे. कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता. आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

धमाल मुलगा 01/07/2009 - 14:41
माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते
नक्की? खात्रीलायक?? अगदी कन्फर्म??? शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ :) >>या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही. नाकारलेलेही कुठे दिसत नाही बॉ. आणि हो, हिंदू धर्मच ह्या अनिष्ट रुढी-परंपरांना हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्‍यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो. >>पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे. चर्चा थांबवण्याबद्दल कुठे काय म्हणालंय कोण? आम्ही ह्याच धाग्यात इतर धर्मांवर बोला असं म्हणालो आहोत काय? आम्ही फक्त असं म्हणालो की आजवर बर्‍याचदा हिंदूधर्मावर टिकात्मक लेखन झालंय, इतर धर्मांबाबतही थोर विचारवंताचे ज्ञानकण आम्हा मूढांच्या पदरात घालावे :)
अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे.
अशी आणखी किती उदाहरणं आहेत? आणि उठसुठ हिंदूधर्माला बोल लावणारे किती आणि कितीदा 'फुल थ्रॉटल' असतात? पहा, विचार करा, आनंदी रहा :)
कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता.
हो ना! मग इथे काय फक्त आणि फक्त हिंदूच आहेत का? की अनुभव विश्व फक्त हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवलंय? तसं असेल तर निधर्मी/सेक्युलरगिरी कुठे गेली? :)
आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल.
बरोबर! पण आम्ही कधी म्हणालो की केरळातल्या ख्रिश्चनांबद्दल किंवा उत्तरप्रदेशातल्या मुस्लीमांबद्दल बोला? जिथल्या हिंदूंना नजरेसमोर ठेऊन त्या रुढींवर टिका केली तशीत तिथल्याच अहिंदू रुढींवर बोला की. :) >>इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात. सलमान रश्दी, तस्लीमा नसरीन ही नावं कुठं ऐकल्यासारखी वाटताहेत, नै का बॉ? :) काय झालंय बरं त्यांचं? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

नितिन थत्ते 01/07/2009 - 15:54
>>शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ तुम्हाला या सार्‍या गोष्टींची माहिती जर आहे तर तुम्ही लिहा ना त्यातल्या अनिष्ट गोष्टींबद्दल. आम्हाला नाही तेवढी माहिती मुसलमानांबद्दल... म्हणून आम्ही नाही लिहू शकत. तुम्ही लिहा. मी तर कुठल्या धर्माबद्दल लिहिलेच नव्हते. देव या संकल्पनेबद्दल लिहिले होते. मी समजा हिंदूंच्या एका अनिष्ट रूढीविषयी लिहिले असेल तर लगेच मी दुसर्‍या धर्मातल्या एका रूढीबाबत लिहिलेच पाहिजे असा हट्ट का? मी एखाद्या रूढीविषयी लिहिले तर ते हिंदू धर्मावरील टीका नसून त्या रूढीवरील टीका असते. ती रूढी कोणत्याही धर्मात असेल तरी मी तिच्यावर टीकाच करेन. बालविवाह कोणत्याही धर्मात आक्षेपार्हच आहे. >>हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्‍यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो. हे तर ख्रिश्चन धर्मातही आहे. पाश्चात्य जगाची प्रगती (इथे प्रगती कशाला म्हणायचे हा फाटा फोडू नये) ही धर्माला आव्हान देण्याच्या प्रक्रियेतूनच सुरू झाली आहे. आणि आता धर्मावर टीका करणार्‍याला विषाचा प्याला घ्यायची शिक्षा केली जात नाही. मुस्लिम धर्मात हे कदाचित आज कमी प्रमाणात असेल पण पुढे ते होणारच नाही असे नव्हे. अजून एक गोष्ट. समजा मी एखाद्याच्या रस्त्यावरील प्रत्येक देवळाकडे/चर्चकडे पाहून नमस्कार करण्याच्या सवयीवर टीका केली तर ती त्या विशिष्ट कृतीवर टीका नसून त्या व्यक्तीच्या मानसिक परावलंबित्वावरची टीका असेल. धर्मावरील आमचा आक्षेप हा अनेक अन्यायकारक गोष्टींना तो समर्थन पुरवतो हे आहे. त्यामध्ये सर्वच धर्म येतात. (अवांतरः आपण येथे वकिली युक्तिवाद करायला जमलो नाही. त्यामुळे विशिष्ट शब्द पकडून बोल्ड करून आव्हाने द्यायची गरज नाही.) नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

यशोधरा 01/07/2009 - 13:16
धर्म आणि रुढी एकमेकांपासून अतिशय भिन्न अशा संकल्पना आहेत. धर्मामध्ये एक विशिष्ट तत्वज्ञान सांगितलेले असते, जगण्याची, वागण्याची विशिष्ट अशी प्रणाली सांगितलेली असते. आपल्या मूळ रुपात कोणताही धर्म खूप व्यापक आणि सहिष्णू असतो. मुळात हिंदू धर्म हा "धार्मिकता" ह्या अर्थी धर्म नव्हे. ती एक जीवन प्रणाली आहे. ह्यात प्रत्येक मताला स्थान आहे. आस्तिकता, नास्तिकता, सगुण, निर्गुण, निरीश्वरवाद... यादी वाढतच जाते, म्हणूनच हिंदू वेगवेगळे पंथ मानू शकतात, त्यांची दैवतंही वेगळी असू शकतात. एकच देवाला वा प्रेषिताला मानायला हवं अशी सक्ती इथे नाही. जन्माने वा कर्माने हिंदू असून, हिंदू धर्माविषयी माहिती न करुन घेता, काही अभ्यास न करता, धर्माला नावं ठेवायची मुभाही इथेच आहे, ह्याच धर्मात. आताआतापर्यंत असं कोणी केलं तर केवळ धर्मांधतेने कोणी अश्या टीकाकांराना त्रास पोहोचवल्याचं ऐकीवात नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची पूर्ण मुभा हे हिंदू धर्माचं अतिशय अभिमानस्पद वैशिष्ट्य आहे. राहता राहिल्या रुढी. ह्या व्यक्ती निर्माण करतात आणि सामाजिक जीवनात रुढी जन्म घेतात आणि नष्टही होतात. रुढी निर्माण होण्याची कारणं बर्‍याचदा समाजावर मूठभर लोकांचा वरचष्मा रहावा म्हणून निर्माण केल्या जातात. त्या नाहीश्या व्हायलाही हव्यात, पण रुढी म्हणजे धर्म, असे गृहीतक धरुन, म्हणून धर्माला का झोडपावे? हे म्हणजे, हाताला घाण लागली तर, घाण साफ करण्याऐवजी हात कापून टाकूया म्हणण्याप्रमाणेच झाले ना?

पक्या 01/07/2009 - 13:47
हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच. ही जी काय शक्ती आहे माझ्या मते तीच देव. तिची वेगवेगळी रुपे माणसाने निर्माण केली की खरोखरीच अशी रुपे आहेत ते मला माहित नाहि पण त्या शक्तीवर माझा विश्वास आहे. ह्या शक्तीला / देवाला कर्मकांडाच्या बंधनात अडकवले माणसाने. कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.

In reply to by पक्या

यातले "कोट्स" वगळता बाकी सर्व माझी, एका व्यक्तीची व्यक्तीगत मतं आहे. त्यामुळे प्रतिवादात झोडपायचं असेल तरीही कृपया समस्त निरीश्वरवादी गटाला झोडपू नये.
हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच.... ... कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.
ब्रह्मांड जर कोणी निर्माण केले तर त्याला/तिला/तेला कोणी निर्माण केलं? एकदा ब्रह्मांड निर्माण झालं हे मान्य केलंत की आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले याचं उत्तर देणारी मोठी लेखमाला मी लिहू शकते. (सॉरी, सध्या अजिबात वेळ नाही, जमेल तसं लिहेन, मागणी असेल तरच!) ब्रह्मांड कसं निर्माण झालं याचंही उत्तर विश्वरचनेचा अभ्यास करण्यार्‍यांकडे आहे (मला ते समजलं आहे असा माझा दावा नाही). कसं निर्माण झालं याचं उत्तर विज्ञान देतं, पण का निर्माण झालं याचं उत्तर विज्ञानात मिळेलच असं नाही. तिथे मात्र तर्क इ. इ. गोष्टींची गरज पडेल. सृष्टीनिर्माणकर्त्याचं अस्तित्त्व हा मलातरी चक्राकार खेळ वाटतो. कशावरून हे ब्रह्मांड, ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली? आणि मग या निर्मिकाला कोणी निर्माण केलं? आणि निर्मिकाच्या निर्मात्याला कोणी निर्माण केलं .... ही साखळी संपणारच नाही. काही थोडी वेगळी उदाहरणं देते: १. पूर्वी असं मानत एका कासवाच्या पाठीवर (किंवा ग्रीसमधे असाल तर हर्क्युलिसच्या पाठीवर) पृथ्वी आहे असं मानत. मग ते कासव (/हर्क्युलिस) कुठल्या पृष्ठभागावर विसावलं आहे? या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे, की पृथ्वी अंतराळात आहे, आणि सूर्याशी गुरूत्वाकर्षणाने बांधली आहे. २. जेव्हा सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात हे अमान्य होतं, तेव्हा अतिशय किचकट अशा ग्रहांच्या कक्षा आखून (एपिसायकल्स) , ग्रह पृथ्वीभोवती फिरतात असं मानायचे. ६ ग्रहांसाठी २८ (का जास्त) एपिसायकल्स होती. एक चुकीचं गृहीतक हटवलं, आणि ६ ग्रहांसाठी १ नियम लागू करता आला. पुढे तो नियम सगळ्याच गुरूत्वीय बंधक वस्तूंसाठी लागू होतो असं लक्षात आलं. निष्कर्षः आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी. माझी देवाविषयीची धारणा: मी निरोगी असताना, दुसरा आजारी पडू नये; किंवा दुसरा ठणठणीत असताना मी आजारी पडू नये असा काही नियम नाही. आजारी माणसाला औषधं, जास्तीची काळजी इ.ची गरज असते. तसंच काही लोकांना नित्यनियमाने किंवा अडीअडचणीत एका मानसिक आधाराची गरज असते, ती गरज "देव" किंवा "ती विवक्षित शक्ती आहे ही धारणा" भागवतात. देवाच्या अशा प्रकारच्या अस्तित्त्वामुळे काही लोकं, खरंतर बरेच लोकं, सुखात रहातात. (अडचणीच्या काळात माझ्यासाठी हीच गरज मित्रमंडळ, नातेवाईक, कलिग्ज भागवतात.) माझ्यालेखी देव आहे, पण तो या आस्तिक लोकांच्या डोक्यात आहे, अगदी I think, so I am, याच चालीवर! जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. अनेक आस्तिक मित्र-मैत्रिणीही जिवलग आहेत. पण माझ्यावर देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची सक्ती मला चालत नाही.

In reply to by मेघना भुस्कुटे

सनविवि 01/07/2009 - 17:29
मी पण अदितीशी सहमत. १ वर्षापूर्वीपर्यंत मीही आस्तिक होतो. म्हणजे कधी नीट विचारच केला नव्हता मी आस्तिक का आहे ह्याचा. आणि जेंव्हा मी तो केला तेंव्हा लक्षात आलं की एका आस्तिक कुटंबात वाढणे हेच त्याच्यामागचे एकमेव कारण आहे. देव ही संकल्पना मला मनापासून नाहीच पटत. आस्तिक लोकांबद्दल आपली काहीच तक्रार नाही. फक्त सारखं आम्हाला re-convert करण्याची धडपड सोडून द्या!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाहरुख 04/07/2009 - 09:55
>>जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. मला काय वाटते हे नीट लिहायची अक्कल असती तर मी असेच काहीसे लिहिले असते !!

बाप रे थोर थोर लोकांचे मोठे वाद चालले आहेत, म्या पामराने लिहावे की नको ? लिहितोच... देव आहे का नाही ? आस्तीक नास्तीक हे मला खरच कळत नाही. मी स्वतः कधी रोजची पुजा वगैरे करत नाही. गणपती मात्र श्रद्धेनी अगदी गुरुजींच्या आवाजातली कॅसेट वगैरे लावुन बसवतो. माझ्या आजीला सांधेदुखीचा त्रास व्हायचा. योग्य ती ट्रीटमेंट, व्यायाम वगैरे करुनही कधी कधी हा त्रास उफाळुन यायचा, तेंव्हा आपण रामरक्षा म्हणली की हा त्रास कमी होतो अशी तिची श्रद्धा होती. बर्‍याचदा ती हा प्रयोग करायची मग काही वेळाने तीच्या चेहर्‍यावर एक वेदनामुक्त समाधानी सुखी भाव यायचे आणी ती मनोभावे रामाला नमस्कार करायची. मी सुद्धा लगेच नमस्काराला हात जोडायचो. तीच्यापुरते का होईना मी देवाचे अस्तीत्व मान्य केलेले असायचे. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

यशोधरा 01/07/2009 - 14:58
>>जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. अदिती, तुझा बहुतांश प्रतिसाद पटला. देव मानणं वा न मानणं हे व्यक्तीसापेक्ष. मान्य. असं धरून चालू, की देव आहे. मग काय त्याने सांगितलय की माझ्या नावावर भांडा? तो भांडणार्‍यांचा दोष की देवाचा? भांडणं देवाच्या प्रेमाने होत असतील, असंही नसत! अशी भांडणं बहुतांशी धूर्त लोक त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी लावतात, आणि विचार न करता, झापडबाज जनता त्याला बळी पडते. ह्यात देवाचा काय दोष? जनतेच्या अज्ञानाचा, माहिती नसल्याचा फायदा घेऊन आपापसात तेढ पैदा करुन दिली जाते. सगळे मानवी खेळच ना? उदा: रुढींना धर्म समजणे, मानणे. तसंच हे भांडणं होतात म्हणून देव आवडत नाही, असं म्हणणं झालं की. आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. :) जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!

In reply to by यशोधरा

आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!
माझ्या आधीच्या प्रतिसादात व्याकरण आणि/किंवा भाषेची चूक आहे. माझ्यासाठी देव ही काही (बर्‍याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. एक नुसती संकल्पना असू शकत नाही, तिच्यासाठी एका मेंदूची गरज असते आणि नुसता मेंदूही असू शकत नाही, त्यासाठी एका (मानवी) शरीराची गरज असते. (हाच तर्क "ती शक्ती म्हणजे देव" याही बाबतीत लावता येईल.) मुद्दा हा, की जेव्हा अशी सक्ती होते तेव्हा ती संकल्पना, पक्षी: तो माणूस, मला आवडत नाही. देवाला माझ्या लेखी स्वतंत्र अस्तित्व नाही, त्यासाठी एका मेंदूची आणि (मानवी) शरीराची आवश्यकता आहे (किंवा एखादा शब्दकोषतरी)! आणि यशो, तुझा तर्क मान्य, जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचा रागतरी कसा येणार? थोडं अवांतर: माझं निरीश्वरवादी असणं हे (माझ्यामते) "सिमेट्रीक" आहे. उदा: मला एक झोळी आवडली म्हणून मी ती घेतली, अगदी रोज वापरते. त्या झोळीवर "हरे कृष्ण हरे राम" असं लिहिलेलं असूनसुद्धा मला त्याचा फरक पडत नाही. मला झोळीशी मतलब आहे, त्यावरच्या लिखाणाशी नाही. ते लिखाण नसतं तरी मला फरक पडत नव्हता, तर ते लिखाण आहे म्हणूनही मला फरक पडू नये.

यशोधरा 01/07/2009 - 15:21
>>जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. >> :) संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का? :) कारण तीच संकल्पना अजून काही जणांना मान्य असेल, पण ती इतरांनीही मान्य करावी असा त्यांचा आग्रह नसेल. मग दोषी कोण? संकल्पना की ती राबवणारे? असो. मुळातच चर्चा नक्की कशावर हा माझा सुरुवातीचा प्रश्न तसाच आहे. :)

In reply to by यशोधरा

संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का?
एक गृहीतक चुकतं तेव्हा आख्खा डोलारा कोसळतो, जसा एपिसायकल्सचा डोलारा कोसळला! :-) (किंवा, गणितात जेव्हा एखादी अगदी साधी वाटणारी गोष्ट सिद्ध करतात, उदा. शून्य एकापेक्षा लहान आहे, तेव्हा सुरूवात करताना एक शून्यापेक्षा लहान आहे, किंवा दोन्ही सारखेच आहेत असं मानतात. आणि मग डोलारा कोसळतो ते दाखवतात. असो. माझं वाचन फार काही नाही, त्यामुळे माझ्या मर्यादित माहितीमधून हे एक उदाहरण दिलं.) असो... देव आणि धर्म या दोन गोष्टींचा संबंध नाही असं माझं आणखी एक मत. तेव्हा डॉनराव, चर्चा नक्की कशावर करायची आहे, देवावर का धर्मावर??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळ 01/07/2009 - 15:53
नक्की चर्चा कशावर ! डॉनरावांनी 'जनातले मनातले' मध्ये स्वतःच्या मनातले विचार मांडले आहेत. लेख या स्वरूपात ते विचार असतानासुद्धा चर्चा कशावर? हा प्रश्न अप्रस्तुत वाटतो. विषय निघाला म्हणून सदस्य एकमेकांत चर्चा करत असावेत. पाहा समोर दिसत असून उमज पडत नाही. देवाच्या बाबतीत असे होत नसेल कशावरून. तर्काच्या घोड्यावर स्वार झाले की रस्त्यातल्या अनेक गोष्टी धुरळ्यात अंधूक होतात असे वाटते. (हे आपले उगीच बरे का :) !) अदिती, विवेकानंदांची ज्ञानयोगावरील वाख्याने आहेत. त्यामध्ये ईश्वरविषयी कल्पनांचा प्रवास, आणि बरेच काही चांगल्या पद्धतीने मांडले आहे. वाचले नसल्यास जरूर वाचावे. --लिखाळ. जुने ठेवणे मीपणे आकळेना -समर्थ.

सूहास 01/07/2009 - 15:24
खर तर ईतर मान्यव॑राच्या मध्ये ईथे कडमडायच नव्हत ..पण जरा काही निदर्शनास आणुन देत आहोत.. बाबा॑नो आणी बाया॑नो, काही कारण नसताना, तावातावाने,शब्द-पाल्हाळ लावुन, वाद-विवाद स्पर्धेच "सत्यनारायण" घालुन. आपण एक-दुसर्‍यास मिपाच्या माध्यमाने " आस्तिक कि॑वा नास्तिक व्हायला सा॑गत आहात" आमच्या साठी दोन्ही सारखेच नास्तिक म्हणतो देव नाही ..सोडुन देतो.. आस्तिक म्हणतो देव आहे .मान्य करतो.सोडुन देतो... देव आहे की नाही हे कोणी शोधत नाही...का ? का ? सा॑गा ना...लई जिकीरीच काम ना ?? कुठ आता तपश्चर्येला बसणार... जरा दमान घ्या... सुहास

In reply to by मेघना भुस्कुटे

विजुभाऊ 01/07/2009 - 12:31
धर्म देव ह्या वैक्तीक बाबी आहेत त्या कोणीच कोणावर लादू नयेत ह्या सर्व गोष्टी मानवनिर्मीत आहेत. देव ही संकल्पनासुद्धा मानवनिर्मीत आहे. गालीबच्या भाषेत सांगायचे तर " दिल बहलाने के लिये गालीब खयाल अच्छा है" धर्म हा प्रमाण मानायचा तर नक्की कोण धर्म प्रमाण मानायचा "तस्मात युद्धस्च भारत" म्हणणारा कृष्ण प्रमाण मानायचा की शत्रुला सुद्धा क्षमा कर म्हणणारा येशु ? दिवस भर प्रार्थना कर आणि रात्री जिवापुरते खा म्हणणारा महंमद की सूर्योदयानन्तर अन्नभक्षण हे पाप आहे म्हणणारा महावीर? अन्याय करणाराला अन्याय करु देत. विठोबा तुझी काळजी घेईल म्हणणारा भागवत धर्म की मग अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा पापी म्हणणारा इस्लाम. चातुर्वर्ण्य आणि त्याची तारीफ करणारा मनू श्रेष्ठ मानायचा की समानतेची जाण निर्माण करणारा इस्लाम मोठा मानायचा. शूद्रांना शिक्षण नाकारणारा मनू चांगला की शिका संघटीत व्हा म्हणणारा धम्म?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by अवलिया

विजुभाऊ 03/07/2009 - 10:12
अर्धवट माहितीवर आधारीत असलेला बिनडोक प्रतिसाद. १००% सहमत. अवलिया साहेब आणि बिपीनभौ आपण या आणि इतर बर्‍याच बाबतीतले जाणकार आहात. मी बिनडोक आहेच त्या शिवाय का एवढे प्रश्न पडले असते ? असो. वैयक्तीक चिखलफेक करण्याची सवय नाही तरिही माझ्या शंकांचे निरसन आपणासारख्या जाणकार त्रिकाल आणिसर्व ज्ञानी माणसाने करावे ही विनन्ती. मी बिनडोक असलो तरिही उघडपणे जसा आहे तसा वावरतो. सर्वाना मूळच्याच नावानेच भेटतो. उगाचच अ‍ॅनानिमिटीचा वायफळ आग्रह ठेवत नाही असो. आपण मी विचारलेल्या सर्व शंकांचे आपण बहुशृत असल्याकारणे नीट मुद्देसूद निरसन करालच. अन्यथा आपण केवळ गालीप्रदान करणे आणि भेटलाच आहे तर ठोकुन काढुया या अर्थाने उगाच निव्वळ वायफळ प्रतिसाद देणार्‍या लोकांपैकीच आहात असेच होईल

सूहास 30/06/2009 - 15:35
स॑स्कार,संस्कृती,श्रध्दा,कर्मका॑डे आणी विश्वास या॑ची सा॑गड घालणे खरोखरच अवधड गोष्ट आहे.... जरा कुठे कमी पडल तर नास्तीक,पराचा मॉडर्न..जास्त झाल की अ॑धश्रध्दाळु,जुनाट-बुरसट विचारी . सुहास

पाषाणभेद 30/06/2009 - 15:56
कोणी काही म्हणो पण तुम्ही खरे संस्कारी आहात. तुम्ही कोणाला दुखवत तर नाही ना. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विसोबा खेचर 30/06/2009 - 15:57
देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" - इति : बाबा डॉनराव, मी आपल्या बाबांशी सहमत आहे..! श्रद्धेला पर्याय नाही.. तिरंग्यावर, पंढरीच्या विठोबावर, लालबागच्या राजावर, माझ्या देशावर, माणसाच्या माणूसपणावर, सहृदयतेवर, सृजनशीलतेवर, आईवर, गाण्या-खाण्यापिण्यावर, मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर, मला आवडणार्‍या सर्व गायक-वादकांवर - साहित्यिकांवर - अभिनेते/अभिनेत्रींवर, अनेकानेक अज्ञात चित्रकारांवर, मूर्तीकारांवर, मिपावर, मिपाकरांवर, अ‍ॅन्ड लास्ट बट नॉट द लीस्ट - नियतीवर! माझी नितांत श्रद्धा आहे! आपला, (श्रद्धाळू) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्याशी सहमत फक्त हे सोडुन बरं मादक-आव्हानात्मक दिसणार्‍या स्त्रियांवर,;) ( देवभोळा ) घाशीराम ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

नितिन थत्ते 30/06/2009 - 16:05
हा तर माझा चर्चेचा आणि वादावादीचा आवडता प्रांत. पण काय करणार? डॉनरावांनी इतकं तंतोतंत माझ्याच मनातलं लिहिलंय की मला काही लिहायलाच नको. (विश्वातल्या कुठल्या सुप्रीम पॉवरवर मात्र विश्वास नाही...तशी गरज वाटत नाही) (श्लोक पाठ असण्यापेक्षा वागणूक चांगली असणे म्हणजे संस्कार असे मानणारा) खराटा

खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात. त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही. मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते. पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार? म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल? आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे. असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते. आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं. आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा. विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं. परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं. म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली. हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे. पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

In reply to by मेघना भुस्कुटे

छोटा डॉन 30/06/2009 - 17:03
मी पुढच्या माझ्या एखाद्या प्रतिसादात मेघनाचा, संवेदचा लेख आणि त्यावर सेन च्या प्रतिक्रिया ह्याची लिंक देणारच होतो. आता मेघनाने आख्खा लेखच दिल्याने प्रश्न मिटला ... मेघनाचा व संवेदचा लेखही फार सुंदर आहे. सेनच्या प्रतिक्रियाही मस्त. मागच्या पुणे भेटीत झालेले मित्रांबरोबरचे वाद आणि उपरोक्त लेख हेच माझय ह्या लेखामागची प्रेरणा ठरले असे म्हणायला हरकत नसावी. धन्यवाद मेघना ...!!! ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by मेघना भुस्कुटे

श्रावण मोडक 30/06/2009 - 18:13
डॉन, मेघना, उत्तम! मनःपूर्वक वाचलं. मूळ लेख विचारप्रवर्तक, त्यावरची अत्यंत संयत, पण तितकीच विचारप्रवर्तक प्रतिक्रिया. अगदी उत्तम. तुमचे अभिनंदन करणार नाही. अभिमान वाटतो म्हणेन. धर्म, त्याच्याशी निगडीत परमेश्वर, त्याच्याशी निगडीत नियती या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवून स्वतःकडे पाहिल्यानंतर आपण माणूस आहोत, माणसाची विचार करण्याची शक्ती वापरतो, विवेकाचा अवलंब करतो असे वाटते का? वाटत असेलच... एखाद-दुसऱ्या प्रतिक्रियेत चुकलोही असू, कारण माणूसच आहोत. आणि तसे वाटत असेल ना, तर धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता यांचा विचार कशाला करायचा? या तिन्ही गोष्टी बाजूला ठेवूया असे का म्हणतो? कारण, या साऱ्या चर्चेत कुठं तरी धर्म, परमेश्वर, नियती या तिन्ही गोष्टी अपौरूषेय ठरतात. त्या तिन्ही गोष्टी अपौरुषेय नाहीत, अशी धारणा झाली तर बरेच अवकाश खुले होते विचार करण्यासाठी. कारण या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही. अशाही स्थितीत, मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो. माझी आई पूजा करते. तिच्या पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी तिचा देव माझ्या जगण्याच्या आड येत असेल तर मी त्यापासून वेगळा होतो. कटाक्षाने वेगळा राहतो. अशावेळी "थांब रे, आमटी फोडणीला टाकायची आहे," असे ती म्हणाली तरी मी चटणी-पोळी, ताकभात खाऊन मोकळा होतो. हे वागणे मातृभक्तांच्या लेखी वावगे असेल... पण माझ्या दृष्टीने नाही. मी तिला त्रास देत नाही. मी आमटी-भात न खाता ताकभात खाल्ला याचा तिला त्रास होत असेल का? असेलच. पण तिच्या श्रद्धेची तिने मोजलेली ती किंमत आहे. आमटी-भाताऐवजी ताकभात ही माझ्या अश्रद्धतेची मी मोजलेली किंमत असेल. हे असे वागावे का? ज्याने-त्याने आपापल्या धारणेप्रमाणे ठरवावे. या वर्तणुकीचा आग्रह धरणे अयोग्य नाही, पण धरता येतोच असे नाही. अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो. सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही. परवाचाच किस्सा आहे - एका मित्राच्या कार्यालयात नवे मॅकबुक आले. गणेशाची प्रतिमा ठेवून सहकाऱ्यांनी मी पूजा करावी असा आग्रह धरला. मी नकार दिला. म्हटलं, आधी इथं असलेल्या मुलींच्या हातून पूजा करा. मग मीही करतो. हा मान पुरूषाचाच हे मला खोडून काढायचं होतं. मुलींनी पूजा केली, मग मीही उदबत्ती ओवाळली (इथं अश्रद्धांच्या लेखी मी दांभीक ठरतोय). मेघना, पितळी मूर्तीवर पाय असा प्रसंग अनेकांच्या जगण्यात घडतो का? बहुदा घडत असावा. असंच काहीसं माझ्याही बाबतीत झालं आहे. गणपतीचा फोटो फोडण्याचं कृत्य. अशाच वादातून. पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम. उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?

In reply to by श्रावण मोडक

सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
मी पण असेच करतो. पुर्वीपेक्षा ताठरपणा कमी झालाय. पण शासकीय कार्यालयात सत्यनारायणाची पुजा केली जाते त्याला माझा विरोध असतो. धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अशी शासकीय पुजा असु नये हे माझे मत. सत्यनाराणाची पुजा कोण करतो? ज्याला आपल्यातला खोटेपणा डाचत असतो तो. मग ती बोच कमी करण्यासाठी सत्यनारायण घालायचा. त्यापेक्षा सत्याची पुजा करा! (जी आजच्या जीवनात॑ अशक्य आहे) अशा कानपिचक्या ऑफिसमध्ये द्यायचो. सत्यनारायणाचा प्रसाद मला शिरा म्हणुन खायला आवडतो हे बहुतेकांना माहित होते. त्यांच्या घरी गेल्यावर तु शिरा म्हणुन खा बाबा! पण ये घरी असा प्रेमळ आग्रह असायचा. अश्रद्धेच्या अतिरेकापेक्षा माणुस महत्वाचा म्हणुन मी जातो. माणसे जोडायला वेळ लागतो पण तोडायला वेळ लागत नाही. मग असा विक्षिप्तपणा का करा असा विचार करतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

श्रावण मोडक 30/06/2009 - 18:47
धर्म, परमेश्वर, धार्मिकता या पूर्णपणे वैयक्तिकच बाबी. त्या तशाच रहाव्यात. सरकारी कार्यालयच कशाला, माझा तर त्यांना खासगी कार्यालयातही विरोध असतो. त्याच भूमिकेतून त्या कार्यालयातील मुलींच्या हातून अग्रपूजा. किमान तेवढीच आपल्या सद् सद् विवेकाला टोचणी टाळण्याची कृती.

In reply to by श्रावण मोडक

छोटा डॉन 30/06/2009 - 19:03
धर्म, परमेश्वर, नियती, धार्मिकता या गोष्टी मुळातच माणसाच्या कल्पनेतून आल्या असतील तर त्यांचे विश्लेषण करावेच लागते. ते केले म्हणून कोणी आपल्याला अधर्मी म्हणत असेल तर तो म्हणणाऱ्याचा भंपकपणा असेल. इतकेच. तसे नसेल तर या गोष्टी अपौरूषेय आहेत हे आधी सिद्ध करावे लागेल. तसे सिद्ध तर होत नाही.
+१, असेच म्हणतो. उपरोक्त गोष्टी ह्या पौरुषेय आहेत आणि जेव्हा त्यांची निर्मीती झाली तेव्हा त्याला स्थळ, काळ, वेळ ह्यांचे परिमाण होते. अशा परिस्थीतीत त्या आजही आहे तशाच योग्य आहेत का ह्याचा उहापोह नको का करायला ? समजा करायला गेलो तर आमच्या नशिबी "अधर्मी" ठरणे आले, भले ते भंपक का असेना. शिवाय भंपक म्हणणारे १० लोक नसतात तर हजारोंच्या संख्येने असतात. इनफॅक्ट आपला हिंदु धर्म ह बराच चिकित्सेला आणि संशोधनाला वाव देतो म्हणुन आम्हाला त्याचे कौतुक आहे. आपण हिंदु धर्मात अवश्य संशोधन करुन कालबाह्य परंपरा आणि रुढी ह्या प्रवाहातुन काढु शकतो म्हणुन तसे करण्याला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. उदा : सति प्रथा, विधवांचे हक्क , जातीभेद ह्यावर बरीच चिकित्सा झाली आणि आज आपण परिणाम आणि सुधारणा पाहतो आहोत. मग हे आता इथेच थांबवायचे का ? आपल्या धर्मातल्या कित्येक उदात्त आणि महान गोष्टी अजुन जनसामान्यांपर्यंत पोहचल्याच नाहीत, बहुतांशी तो वर्ग अजुन खेदाने कर्मकांडातच आणि अंधविश्वासातच अडकुन पडला आहे हे सत्य नाही का ? म्हणुन विष्लेषण हे आवश्यक ठरते, त्याला होणार्‍या विरोधाची कल्पना आहेच आणि त्यासाठी मानसीक तयारीही आहेच की, इथे फक्त काय काय करता येईल ह्यासंबंधी जार चाचपणी चालु आहे ...
मी असेही म्हणतो की एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.
हो , हे सुद्धा मान्य. मात्र हे मला प्रत्येकचवेळी जमेल असे नाही. मी कितपत अलिप्त राहु शकतो हे सांगणे कठिण आहे. खरे सांगायचे तर "तुला करायचे ते कर, मी येणार नाही" हे मला जमत नाही, समोरचा एखादा चुकीचा अथवा अनावश्यक वागतो आहे हे जेव्हा दिसते तेव्हा मी अलिप्तपणे बाजुला होण्याऐवजी त्याला ४ गोष्टी सुनावण्याचा प्रयत्न करतो. बहुदा हेच अनावश्यक आणि अनवॉरंटेड ठरत असावे ... शिवाय माझे सामिल न होणे किंवा होणे ह्यावर समजा माझे "सामाजिक स्थान" अथवा "रिलेशनशिप्स" ह्यावर परिणाम होत असेल तर काय करावे ? काही वेळा नुसते "त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव" असे सांगणे शक्यही नसते व बरोबरही नसते. अशा वेळेस मी तुर्तास गुपचुप त्यात सामिल होण्याचा मार्ग स्विकारतो, ते मनाला पटत नाही हे माहित असुनही, तडजोडच म्हणावी लागेल ह्याला, पण करावी लागते.
अनेक गोष्टींचा तोल इथे सांभाळावयाचा असतो.
+१, अगदी परफेक्ट ... समतोल साधणे महत्वाचे आहे ...
सत्यनारायण. जातो. नमस्कार करतो. धारणा तीच. न केल्याने जसे बिघडत नाही, तसेच केल्यानेही बिघडत नाही.
ह्यावर एक वेगळा, विस्तॄत प्रतिसाद लिहीन ... निमीत्त सत्यनारायणाचे मात्र ह्या अनुषंगाने गरिब वर्गाला आर्थिकदॄष्ट्या परवडत नसतानसुद्धा केवळ सामाजीक कर्तव्य म्हणुन पार पाडाव्या लागणार्‍या कर्मकांडावर भाष्य करेन ...
पण नंतर बदललो, तुझ्यासारखाच. अलीप्त असतो, पण कुणाच्या श्रद्धेच्या वाटेत येत नाही. अर्थात, त्या श्रद्धेनं माझ्या जगण्यात हस्तक्षेप न करणे ही अट कायम.
ह्यावर बहुदा मला बरीच मेहनत घ्यावी लागेल. आपला स्टान्स पटतो आहे मात्र अफार अवघड आहे असे प्रथमदर्शनी दिसत आहे. पाहतो कसे जमते ते ...!!!
उत्तम चर्चा, हिच्या प्रतिसादांची संख्या पन्नासवर कधी जाईल?
:) हा हा हा, ५० जाऊ देत पण अजुन काही जणांकडुन "कन्ट्रक्टिव्ह प्रतिसादांची" अपेक्षा मात्र जरुर आहे ... मोडकसाहेबांचा प्रतिसाद आवडला ..!!! धन्यवाद. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by मेघना भुस्कुटे

भोचक 30/06/2009 - 18:53
डॉन तुझा लेख उत्तमच. पण मेघना तुझा प्रतिक्रियात्मक लेख म्हणजे माझ्या मनीचेच सारे काही मांडलेस. १०००००००० टक्के सहमत.... (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

उत्तम मनोगत, डॉनराव (यवढ भारी लिवल्यावर डॉन्या कस काय म्हणायच) जणु काही आमच्या मनातल बोल्लास. मेघनाचा प्रतिसादाने बहार आणली. समाधान पाव्लो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले १) निरंजन घाटे हा ही माणूस च आहे २) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही. ३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय? ४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर? परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक." प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भोचक 30/06/2009 - 20:07
मी ज्या घरात वाढलो तिथे कट्टर म्हणावं असं धार्मिक वातावरण नव्हतं. आई-वडिल कट्टर धार्मिक होते असं नाही, पण त्यांनी कधी काही सक्ती केली नाही. लहानपणी कधी तरी आठवलेकाकांकडे परवचा म्हणायला आई-बाबा पाठवायचे. पण तो परंपरागत धार्मिक संस्कारांचा भाग असावा. त्यावेळी हे का? असे प्रश्न पडले तरी विचारायचे कुणाला? हा प्रश्न होता. पुस्तकाचं दुकान असल्याने धार्मिक पुस्तकं भरपूर होती. त्यातली बरीचशी वाचली होती. त्यातली शंकरासंदर्भातली पुस्तकं वाचल्यानंतर हा किती पांचट नि स्त्रीलोलुप देव होता, अशी प्रतिमा मात्र मनात तयार झाली होती. ती आजही कायम आहे. ती त्यावेळी कुणाकडे व्यक्त झाली मात्र नाही. पुढे नाशिकला आल्यानंतर वाचन वाढलं. त्याचाही प्रवास फार रंजक झाला. माझा देवावर विश्वास, श्रद्धा होती का हा मलाही पडलेला प्रश्नच. पण देवावरचा विश्वास उडण्याऐवजी त्याच्यावर श्रद्धा का ठेवायची याची कारणं शोधण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या शोधातच मुळ विश्वासच डळमळीत झाला. ओशो वाचनात आले नि त्यांनी पार आधीचं 'संस्कारीत' प्रतिमाविश्व उध्वस्त करून टाकलं. इतरही काही मंडळींनी हेच केलं. मग भरपूर प्रश्न पडायला लागले. मतं तयार व्हायला लागली. (खरं तर कुणाची तरी घेतली गेली.आपील मतं खरोखरंच आपली असतात की...?) मनात तोपर्यंत तयार झालेल्या महिमामंडित प्रतिमांचा शेंदूर पार सुटायला लागला. मग या वाचनातून एक बंडखोरी सुरू झाली. कुठल्याही धार्मिक कार्यातील चुका काढून दाखविण्याची नि त्यावर तावातावाने चर्चा करण्याची सवय लागली. नातेवाईकांत आपण वाचलेल्या 'चार बुकातलं' काही सांगितलं, की तेही 'आ' वासून निरूत्तर होऊन बघायचे. 'अतिशहाणा' हे बिरूदही त्यामुळे मिळालं. पण त्याचवेळी याला आपल्यापेक्षा जास्त कळतं असा त्यांच्या नजरेतला भावही उगाचच स्वतःचा अहं वाढवून जायचा. मी तेव्हा नास्तिक होतो का? हा मलाही आज प्रश्न पडतो. नास्तिकतेच्या जवळ कुठेतरी होतो, असं वाटतं, पण आस्तिक्यपण पूर्ण सुटलं होतं, असंही नाही. कारण लग्न करताना त्यातल्या विधीत वायफळ खर्च करावा असं वाटत नव्हतं. पण लग्न 'संस्कारीत' व्हावं असं मात्र वाटत होतं, म्हणून प्रबोधिनीच्या पद्दतीने का होईना, पण चार मित्रांच्या उपस्थितीत असं 'संस्कारीत' लग्न नक्की केलं. हे संस्कार केले नसते तर काय झालं असतं? नक्कीच काही नाही. पण किमान तेवढे संस्कार हवेच, हा आतापर्यंतच्या पारंपरिक संस्कारांचा पगडा त्यावेळीही सुटू शकला नाही. त्याचवेळी नवं घर घेतलं, तेव्हा वास्तुपूजा मात्र केली नाही. पूजा केली ती साधी. सत्यनारायणाची. त्या पुजेवरही विश्वास होता असं नाही. कारण जहाजाच्या बिनडोक कथेवर काय विश्वास ठेवणार? पण पु्न्हा तीच भूमिका घरावर काही एक संस्कार व्हायला पाहिजे, म्हणून चार गोष्टी व्हाव्यात. खरं तर माझा आस्तिक्य-नास्तिक्यमध्ये झुलणारा 'मोरू' झाला होता. पण मग वरकरणी दिसणार्‍या माझ्या नास्तिक्यवादी भूमिकेला मी थोडं बंडखोरीचं परिणाम देऊ लागलो. जे धार्मिक संस्कार करायचे त्याला काही वेगळा एंगल द्यायचा असं करायला लागलो. मुलगी झाल्यानंतर पाचपावलीला मंत्रपठणाला मी महिला पुरोहितांना बोलावलं ते त्यातूनच. मग माझ्या या दृष्टिकोनाचे कट्टर विरोधक असेलले माझे काका त्या निर्णयावरही नाराज झाले. पण त्यांच्या नाराजीपेक्षा त्यांच्या नाकावर टिच्चून मी मला हवं ते केलं, याचा आनंद (?) वाटला. त्याला पार्श्वभूमीही वेगळी होती. आई गेली तेव्हा याच काकांशी एकदा सामना झाला. आईचा दहावा करताना विधी करा पण त्यातला भोजनाचा भाग गाळा नि ते पैसे आधाराश्रमाला द्या अशी सूचना अस्मादिकांनी केली नि काका प्रचंड संतापले. ढेरपोट्या नि बाहेरून केवळ जेवायला बोलवलेल्या ब्राह्मणांना (माझ्या आईशी ज्यांची काहीही 'गाठ' नसलेल्याना) जेवायला घालणं मला कसंसंच वाटत होतं. काकांच्या आक्रमकपणाला मीही तितकाच आक्रमक होऊन प्रतिवाद केला. पण वडिल नि भावाने नमते घेऊन काकाशरण मार्ग अवलंबला. मग या सगळ्या विधींत मी आपला कृत्रिमरित्या वावरलो. पुढे चुलत भाऊ गेला, तेव्हाही याचाच रिपीट परफॉर्मन्स झाला. पण मी नास्तिक आहे का? की आस्तिक हा मलाही पडलेला प्रश्न. मधल्या काळात नास्तिकपणाच्या टोकाला गेलेला मी आता तिथून थोडा वळालो. विरोध कोणताच करत नाही, पण स्वतःहून कोणतीही धार्मिक गोष्ट करण्याकडे कल नसतो. त्यामुळे कुणाच्या चुकीच्या पद्धतीलाही विरोधही फारसा करत नाही. वटसावित्रीपासून कुठली पूजा करण्याची कधीही सक्ती, इच्छा व्यक्त करत नाही. घरी कधीही पुजा सहसा करत नाही. बायकोने खूप आग्रह केला तरच. तीही धार्मिक आहे असंही नाही. पाळीच्या काळात मंदिरात जाणं तिलाही वावगं वाटत नाही. नि मलाही. याचा अर्थ धार्मिक अकर्मता अंगी बाणलीय असंही नव्हे. पण बिनडोक न पटणार्‍या प्रथा, परंपरा नाही पाळायच्या हे मात्र ठरवलंय. ऐकणारं कुणी असेल तर त्यामागची भूमिका समजावूनही सांगतो. पण त्याला पटावीच हा आग्रह नसतो. तावातावाने भांडण्याची हौसही आता जिरलीय. त्यामुळे स्वतःपुरतं जे चांगलं वाटलं ते करतो. जेथे चांगलं वाटतं,(भलेही ते मंदिर असो वा मशीद) त्यावेळी तिथं जातो. मन प्रसन्न करणारं ऐकावसं वाटलं तर ऐकतो. शंकराचार्यांच्या ओम पूर्णमिदं ची अध्यात्मिक अनुभूती छान वाटते. अथर्वशीर्षाची वर्णनं मी सृष्टीला लावतो. (या अर्थाने देवाच्या जागी मी निसर्ग रिप्लेस केलाय, असं म्हणता येईल.) बाकी मी आस्तिक-नास्तिक, धार्मिक की अध्यात्मिक हा मलाही पडलेला गुंता आहेच. ही गुंतवळ सुटत नाही नि सोडवतही नाही. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

मुख्य लेख आणि प्रतिसाद विचारपुर्ण, मोठा प्रतिसाद टंकायला जरा वेळ लागेल.तुर्तास प्रतिसाद राखुन ठेवते. (सगळ्या विचारांच्या कल्लोळाला शब्दांमध्ये बांधयला स्वःतासाठी घेतलेला वेळ) --मयुरा.

नितिन थत्ते 30/06/2009 - 23:12
उच्च चर्चा. मेघना, भोचक, श्रावण सार्‍यांचेच प्रतिसाद अतिशय उत्तम. डॉनरावांच्या मूळ लेखातला एक मुद्दा घेऊन पुढे जातोय. ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? नास्तिकपणा किंवा अधार्मिकपणाचे अनेक पैलू आहेत. एक पैलू धर्म आंणि कर्मकांडे यांना विरोध या अंगाने जाणारा असतो. या पैलूत आस्तिक आणि नास्तिक दोन्ही बसू शकतात. म्हणजे देव आहे असे मनातून वाटणारे पण तो या दगडाच्या किंवा इतर मूर्तीत आणि कर्मकांडात नाही असे वाटणारे आस्तिकही यात येतात. डॉनराव हे अशा स्वरूपाचे आस्तिक (पण लौकिकार्थाने अधार्मिक) असावेत असे वरील वाक्यावरून वाटते. काही जण आस्तिक पण असतात आणि कर्मकांडांना ही हरकत नसते. पण या कर्मकांडांना पॉझिटिव्ह वळण द्यावे असे वाटणारे आणि तसा प्रयत्न करणारे असतात. वर कोणीतरी आश्रमाला दान देण्याविषयी लिहिले आहे. काही जण खरोखरच नास्तिक म्हणजे देव नाहीच अशा मताचे असतात. मेघना ही अशा पैलूतील अधार्मिक आणि 'ठार' नास्तिक असावी असे वाटते. मी पण बराचसा मेघना टाईपचा नास्तिक आहे. अर्थात मी मूर्तीला लाथ मारेन की नाही हे सांगता येत नाही. मी अनेकदा वडिलधार्‍यांच्या इच्छेसाठी काही धार्मिक गोष्टी करतो. त्यामागे बहुधा 'माझा नास्तिकपणा या समोरच्या व्यक्तीला दु:ख देण्याइतका महत्त्वाचा आहे का?' हा दृष्टीकोन असतो. देवळात जाऊ असे अशी व्यक्ती म्हणाली तर मी जातोही किंवा नाहीही जात. कधी बरोबर जातो पण देवळाच्या बाहेरच थांबतो. थोडक्यात माझे प्रत्यक्ष वागणे माझ्या दृष्टीकोनाशी नेहमीच सुसंगत असतेच असे नाही. पण सत्यनारायण घाल किंवा मुद्दाम जाऊन कुलदैवताचे दर्शन घेऊन ये असे त्या व्यक्तीने सांगितले तर नक्कीच करणार नाही. माझी नास्तिकतेची पूर्वपीठिका अशी. देव या संकल्पनेचा काहीही अर्थ सांगितला तरी 'विश्वातील घटनांचे नियंत्रण करणारा आणि प्रसंगानुरूप घटनाक्रम हव्या तशा प्रकारे घडवू/बदलू शकणारा' हा अर्थ देवाच्या संकल्पनेपासून कधीही दूर करता येण्यातला नाही. कारण हा अर्थ काढून टाकला तर देव असला काय आणि नसला काय? बहुतेक आस्तिकांनाही अशा देवाचे माहात्म्य वाटणार नाही. तर वरील प्रकारची क्षमता बाळगणारी कोणतीही शक्ती या विश्वात नाही असे मी मानतो. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

अन्वय 30/06/2009 - 23:31
आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले घाटे यांना स्यूडो म्हणणे चुकीचेच आहे. कारण जो खरा विज्ञानवादी असतो. तोच दैववादी असतो, अशी माझी धारणा आहे. अशी धारणा होण्यामागेही एक घटना आहे. माझ्या एका मित्राचे जवळचे नातेवाईक रुग्णालयात होते. ते कोमात होते. वय अधिक असले, तरी त्यांना वाचविण्यासाठी त्या कुटुंबाचे खूप प्रयत्न सुरू होते. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ते जगणे शक्‍य नव्हते. विशेष म्हणजे तो मित्र निरीश्‍वरवादी होता. आम्ही डॉक्‍टरांना भेटलो. ते म्हणाले. तुम्ही त्यांना घरी नेले, तर बरे होईल. तो मित्र मात्र तयार नव्हता. डॉ. आजोबा वाचलेच पाहिजे, असं तो वारंवार विनवत होता. त्यावेळी डॉक्‍टर फटकन म्हणाले, माझे प्रयत्न सुरूच आहेत. बाकी सर्व ईश्‍वराच्या हाती. हे ऐकल्यानंतर तो मित्र सटकलाच. म्हटला, डॉक्‍टर असून ईश्‍वराचा हवाला देता. डॉक्‍टरांनी त्याचे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाले, डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे. कारण मला माहिती आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्यावर जगातला कोणताच डॉक्‍टर नियंत्रण ठेवू शकत नाही. ही शक्ती एकाच गोष्टीत आहे. तिला आपण ईश्‍वर म्हणतो. मित्र गपगार झाला. बोलण्यासारखे काही त्याच्याकडे राहिलेच नव्हते. तो शांतपणे उठला आणि आजोबांजवळ जाऊन त्याने त्यांचा हात हातात घेतला. त्याचवेळी आजोबांच्या ओठाची थोडी हलचाल झाली. पुढे काही दिवस मी त्याच्याबरोबर रुग्णालयात जात होतो. चार दिवसांनंतर आजोबा शुद्धीवर आले. आता बोला.

In reply to by अन्वय

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:02
डॉक्‍टर आहे म्हणूनच ईश्‍वराचे नाव घेतले आहे. क्या बात है..! बोला गणपतीबाप्पा मोरया..! आपला, (गणेशप्रेमी) तात्या. स्वगत : हम्म! भाग्यश्रीच्या शब्दात सांगायचं तर आता हा धागा हायजॅक करू की काय?! ;) थोर थोर विचारवंतांची रेवडी उडवायला जरा मज्जा येईल! :) जाऊ द्या झालं! देवदेवतांच्या मूर्त्यांवर पाय देऊन तुडवणं सुरू आहे. आपण कशाला उगा मध्येच पडा! साला कुणाचा तरी पाय आपल्याही टाळक्यावर पडायचा!:) तात्या.

विसोबा खेचर 30/06/2009 - 23:46
ईश्वरी अस्तित्वाबद्दल साशंक असणार्‍यांचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली! :) असो, थोरामोठ्या विचारवंतांची ही वैचारिक गंगा अशीच वहात राहो..! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अन्वय 01/07/2009 - 00:08
खरंच ना तात्या. उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते. त्यातलीच ही चर्चा आहे. चालू द्यात. प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया!

In reply to by अन्वय

चतुरंग 01/07/2009 - 00:20
उगा फुका बाता मारण्यात आणि आपली "असली' विद्वत्ता पाजाळण्यात अर्धवटांना फार सुख वाटते. विरोधी मते असली तरी आपण वापरलेल्या अधोरेखित शब्दांसारखे दुसर्‍या प्रतिसादकर्त्यांना मानहानीकारक शब्द वापरणे योग्य नव्हे! जरा जपून लिहा. विचारपूर्वक लिहा. (सूचक)चतुरंग

In reply to by अन्वय

घाटावरचे भट 01/07/2009 - 00:44
त्याचं काय आहे अन्वयराव, इथे षड्ज ऋषभापासून वेगळा न काढता येणारे, विद्वत्ता पाजळणारे बरेच लोक आहेत. आता सगळ्यांची लेव्हल तुमच्याइतकी तर नसणार ना... पण बाकी काही म्हणा, कानाखाली वाजवून लगेच हात जोडून समोर उभं राहाण्याची तुमची ष्टाईल आवडली बॉ आपल्याला.

In reply to by अन्वय

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:21
प्रत्येकजण मी किती शहाणा आणि विद्वान आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. हो बुवा! एकंदर प्रकार गंमतीशीर आहे खरा! :) आपण आपली मजा घेवूयात आणि अधून मधून आपले विचार पेरूया! येस्स! :) तात्या.

कोणी काय मानावे आणि काय नाही यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही. परंतु मी तर म्हणेन मी धार्मिक आहे (म्हणजे डान्या ज्या पद्धतीचा धार्मिक नाही त्या पद्धतीचा मी आहे) कारण मी त्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामागची भूमिका काय आहे हे शोधायचा प्रयत्न करतो आणि शेवटी डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा नियम सर्वत्र लागू आहे असे मला वाटते. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्या या उत्क्रांतीचे टप्पे पार करत आल्या आहेत असे मला वाटते. राजवाड्यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचल्यावर माझा अंदाज बरोबर आहे असेही वाटले. जसे पूर्वी लैंगिकसंबंध माणसाचे देखील पशुवत होत. आई आणि मुले देखील शरीरसंबंध करीत असत परंतु जसा जसा समाज विकसित होत गेला तसे तसे बंधने वाढत गेली. व आताच्या काळात एक सुजाण भारतीय पुरुष तरी आपल्या आईबद्दल शारीरीक संबंधाची वासना ठेवणार नाही असे वाटते. जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे. ज्या गोष्टी आज मला घरी सांगितल्या जातात त्या सर्वच टाकावू असतात असे नाही किंवा सर्वच सरसकट योग्य असतात असंही नाही. किंवा परिस्थितीनुसार उपकारक किंवा अपकारक असू शकतात. उदा. माझी आई पाळीच्या वेळेस बाजूला बसत असे, त्यामुळे घरातली कामे उदा. स्वैपाक, भांडी, केर-वारे इ. मी, माझा दादा, माझे बाबा वाटून घेऊन करत असू. त्याचा सर्वात मोठा फायदा मला अमेरिकेत आल्यावर झाला तो असा की माझा स्वैपाक मला व्यवस्थित बनविता येत असे. खाण्यासाठी बाहेर पैसे खर्च करायची किंवा पा.कृ. ची पुस्तके धुंडाळण्याची वेळ आली नाही. तसेच आपल्या पापपुण्याच्या संकल्पना यादेखील माणसाने वाईट वागू नये यासाठी त्याला घालण्यात आलेली भिती आहे असे मला वाटते, आणि म्हणून ते योग्य वाटते. स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते. त्यामुळे एखादी धार्मिक गोष्ट मला पटली नाही तरी मी ती पाळतो. त्यावर जास्तीत जास्त विचार करून ती का करावे असे म्हटले असेल याचा शोध घेतो. केवळ कोणीतरी लिहीले सांगितले म्हणून माझ्या संस्कृतीत सांगितलेली एखादी गोष्ट मी टाकाऊ मानत नाही. तसेच जी जी संतचरित्रे मी आजवर वाचली त्यात त्या त्या संतानी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण, उपासना श्रेष्ठ हेच सांगितले आहे. आणि तेवढे कारण मला''देव' मानायला पुरेसे आहे. बाकी सुचेल तसे पुढे लिहीत राहतो. (१७६१मधला) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 01/07/2009 - 11:26
काय बोललात साहेब!
स्वामी विवेकानंदानी असे म्हटले होते कि 'जेव्हा आम्ही एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो तेव्हा तो देव तिथे असतो कारण ती आमची श्रद्धा असते'. तसेच कदाचित मेघनाताईंनी जसा पितळेच्या मूर्तीवर पाय दिला तसा त्यांच्या आईच्या फोटोवर किंवा एखाद्या प्रिय व्यक्तिच्या फोटोवर दिला नसता असे वाटते, कारण त्या फोटोमधे त्यानी कागदाचा कपटा न बघता आईची किंवा प्रिय व्यक्तीची छबी बघितली असती. असे निदान मला तरी वाटते.
=D> =D> =D> =D> =D> =D> आवडले. असेच म्हणतो. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आनंदयात्री 02/07/2009 - 10:58
काय बोल्लात मालक !!! एकच नंबर !! जशी जशी कोणतीही गोष्ट जास्त जास्त विकसित होत जाते तशी तशी बंधने वाढत जातात. जसे माती पहील्यांदा माती मोकळी असते, मग त्यात पाणी घालून ती कालवतात, म्हणजे प्रत्येक कणाचे वेगळे राहण्याचे स्वातंत्र्य पाण्याच्या योगाने बंधित केले जाते व मातीचा गोळा तयार होतो. मग त्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन मूर्ती घडविली जाते. म्हणजे त्या मातीच्या गोळ्याचे अंगभूत ओबडधोबड आकाराचे स्वातंत्र्य त्याला आकार देऊन हिरावून घेतले जाते आणि त्याला एका मूर्तीचा आकार दिला जातो. म्हटले तर स्वातंत्र्य हिरावणे आहे आणि म्हटले तर सुंदर मूर्ती घडवणे आहे. ते व्यक्तिस्वातंत्र्य वैगेरे वाल्यांनी तुमचा प्रतिसाद वाचलेला दिसत नाहीये ..

भाग्यश्री 01/07/2009 - 00:10
डॉन.. लेख फार आवडला! माझ्या मनात अगदी असंच येत असतं सारखं! मी जरा श्रद्धाळू आहे! पण त्यासाठी रोज देवळात गेलेच पाहीजे, देवाचे नाव घेतलेच पाहीजे, पन्नासदा येताजाता नमस्कार केला पाहीजे असं मला मुळीच वाटत नाही.. माझी आज्जी अगदी टोकाची सोवळं ओवळं पाळणारी! लहानपणापासून तिचे कर्मठ वागणे डोळ्यासमोर होते, विचार करू लागल्यावर ते कधी पटले सुद्धा नाहीत.. सुरवातीला मी तिला फार त्रास दिला.. हे असंच का? तसं का नाही! जेवणाच्या आधी शिवायचे नाही हा तर मला अस्पृश्य करून टाकणार प्रकार वाटायचा.. पण हळूहळू माझेच विचार बदलले.. म्हणजे जे जे आपल्याला पटत नाही, तिथे तिथे विरोध हा केला पाहीजे असं वाटणं कमी झाले.. त्यामुळे आजुबाजुची लोकं कमी दुखावली जातात.. आणि मला तेच हवंय.. त्यांना न दुखवता स्वतःला जे हवंय ते करणे.. मी श्रद्धाळू कशी आहे मग? मी नास्तिक नाही आहे, आणि टोकाची आस्तिकही नाहीये.. मी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. खरं तर आता विचार येतोय देव म्हणजे कुठला? एक कुठलीतरी अनाम शक्ती, की वेगवेगळ्या मूर्ती ? मी मूर्तीपूजक नाही आहे, परंतू त्याचवेळेस मला खूपदा मूर्तीकडे पाहून शांत वाटते.. आमच्या पुण्याच्या घराच्या शेजारी आम्ही कॉलनीतल्या सर्व लोकांनी खपून विठ्ठल मंदीर बांधले.. त्याच्या निर्मितीपासून इन्वॉल्व्ह झाल्याने खूप जिव्हाळा वाटतो त्या मंदिराचा.. त्या गाभार्‍यात मिळणारी शांतता कुठेही मिळत नाही.. गणपतीच्या कुठल्याही मूर्तीसमोर गेल्यास मला केवळ शांत शांत वाटते! पण म्हणुन मी दिवसातून हजारवेळा नाही जात.. देवपूजा करताना, संस्कृत श्लोक, आरत्या, अथर्वशीर्ष, रामरक्षा म्हणायला मला फार आवडते. पण एखाद दिवस नाही झाले यातले काही तरी बिघडत नाही.. मला असं वाटतं, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीशी आपण कसे वागू तसं काहीसं माझं देवाबरोबर होते.. रोजचा कॉन्टॅक्ट नसला तरी काही बिघडत नाही.. पण कधीतरी तिथे जाऊन मन मोकळे केले, शांत केले की बरे वाटते.. त्याचबरोबर, माझ्या आयुष्यात जे जे काही होत आहे ते ते केवळ माझ्याच प्रयत्नांनी होत आहे असंही मला म्हणता येत नाही! पण मी ती 'पांडुरंगाची कृपा' , गणपतीचा आशिर्वाद आहे इत्यादी म्हणु नाही शकत.. थोडक्यात मी त्या प्रांतात गोंधळलेली आहे.. जसं जसं अजुन जास्त वाचन होईल तशा काही गोष्टी उलगडतील असं समजून मी सद्ध्या शांत आहे.. पण तू एक अतिशय उत्तम मुद्दा, उत्तम प्रकारे मांडलास त्याबद्दल अभिनंदन..अतिशय संयत लेखन करणे, कधीही तोल जाऊ न देणे हे संस्कारीपणाचेच लक्षण आहे डॉनराव! http://www.bhagyashree.co.cc/

In reply to by भाग्यश्री

अनामिक 01/07/2009 - 02:08
भाग्यश्रीच्या मताशी अगदी सहमत. मीही जरा श्रद्धाळू आहे, पण त्यासाठी देवळातच गेलं पाहीजे किंवा वडीलधारी म्हणताहेत तसे कर्मकांडं केलेच पाहीजे असे कधीच वाटत नाही. असे असले तरी कुणाला तसे करण्यापासून परावृत्तही करत नाही. कारण, प्रत्येकाची आपली श्रद्धा असते.... कुणाची दगडातल्या देवात तर कुणाची कोण्या दुसर्‍या ठिकाणी. याठिकाणी मला मेघनाच्या आईचं मेघनाने मुर्तीवर पाय दिल्यावरचं उत्तर पटते.... कुणाच्या विश्वासाची, श्रद्धेची पायमल्ली करणे चुकच. तुमचा विश्वास नाही तर नसू देत, पण ज्यांचा आहे त्यांच्यात अडथळा न बनणेच योग्य! माझ्या घरीही (भाग्यश्रीप्रमाणेच) आजीमुळे कडक सोवळे (अजूनही) पाळले जाते. पुजा/जेवणाच्या आधी न शिवण्याच्य नियमाने तर खूप चिड यायची! मी आईला म्हणायचोही की आजीच्या नकळत पारोश्या अंगाने मी किंवा ति कशाला शिवलो अर आजीला थोडीच कळणार आहे... तरी तू अगदी काटेकोरपणे का पाळतेस हे सगळं? ... त्यावर ती म्हणाली, सहज शक्य आहे असे करणे... पण असे करून काय साध्य होणार? आजीचा असलेला विश्वास तो फक्त तोडल्या जाणार... एक छोटासा नियम तो, ज्याने तुला किंवा कोणालाच काही त्रास होत नसेल तर सोवळ्याचे ते आहे म्हणून उगाच अवडंबर माजवण्यापेक्षा, निमुटपणे पाळलेले काय वाईट? सांगायचा मुद्दा हाच की कुणाची श्रद्धा तुमच्या आड येत नाही ना? मग त्याला विरोध केलाच पाहिजे का? तुमचा कर्मकांडावर विश्वास नाही तर नसू देत... लोक त्यामुळे आपल्याला नास्तिक म्हणून मोकळे होत असतिल तर होऊ देत बापडे.... आपण, आपला देव (किंवा अजून काही), आणि आपल्या भावना स्पष्टं आहेत ना... मग झालं तर! मग कुणी देवाला स्वेटर घातलं काय किंवा सोन्याचा मुकूट अर्पण केला काय, मला त्याचा काही फरक पडत नाही. डॉन... खूप सुंदर लिहिला आहेस लेख. कुठेही तोल गेलेला नाही! -(श्रद्धाळू) अनामिक

नितिन थत्ते 01/07/2009 - 00:11
एकदम आठवलं. हल्ली सुशिक्षित लोकांच्यात डोळस श्रद्धा असा एक गंमतीदार शब्द प्रचारात आला आहे. माझ्यामते एकदा श्रद्धा म्हटली की त्यात डोळस आणि अंध असं काही नसतं नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

नंदन 01/07/2009 - 00:22
डॉनरावांचा लेख आणि मेघना, श्रावण, भोचक यांचे प्रतिसाद आवडले. आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे मान्य करण्यास खर्‍या विज्ञानवाद्याला अडचण नसावी. पण या अज्ञाताच्या नावाखाली धर्माच्या नावावर खपवल्या जाणार्‍या अनेक गोष्टींमुळे प्रतिक्रियात्मक म्हणून एक जवळजवळ तितकीच कट्टर मनोवृत्ती तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर श्रावण यांनी स्पष्ट केलेली भूमिका ("एखाद्याची श्रद्धा असेल तर जरूर असू द्यावी. तिचा माझ्या जगण्यात हस्तक्षेप न होणे हे मी महत्त्वाचे मानतो. असा हस्तक्षेप होईल तेव्हा मी तो स्पष्ट नाकारतो. तिथं मी त्या श्रद्धेचं मूल्य तुझ्यापाशीच ठेव असंही बजावतो.") संतुलित वाटते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:29
आपल्या बुद्धीला मर्यादा आहेत आणि त्यापलीकडे खूप काही आहे हे अरे सांगतोस काय मेल्या नंदन सायबा?! मला तर काही काही लोकान्ची बुद्धी घोड्यापुढे धावतांना दिसते तिच्यायला! :) तात्या.

लिखाळ 01/07/2009 - 00:34
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले. ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? ..... पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, ....
अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा :) असे नमस्कार घ्यायला फार सावधानता लागते. ती नसेल तर आपण समोरच्याचा नमस्कार देवाकडे वळवावा आणि लगेच समोरच्याच्या पाया पडून टाकावे. हे उत्तम ! (असे माझे मत) बाकी देव, श्रद्धा याबाबत बरेच काही चांगले लिहिले आहे. काळजीपूर्वक आपली मते तपासत राहणे हे चांगलेच असते. मते बदलतसुद्धा असतात. बदलाचे एकदा जसे स्वागत होते तसे पुन्हा सुद्धा व्हावे. तेव्हा संकोच होऊ न द्यावा. सर्वांचे प्रतिसाद सुद्धा भारी आहेत. सध्या माझ्याकडून भर घालण्यासारखे काही नाही. रामाच्या ईच्छेने तसे काही असेल तर लिहिनच ! -- लिखाळ. जुने ठेवणे मीपणे आकळेना - समर्थ.

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:43
लिखाळगुरुजी, अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?! :) काय म्हणता? बाकी आमचे तुकोबा बिच्चारे भाबडे हो! त्यांना ठायी ठायी विठोबा दिसत असे..! :) असो.. आपला, (विठ्ठलप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

लिखाळ 01/07/2009 - 00:49
अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?!
बरोबर. पण जेव्हा समोरचा विठोबाला नमस्कार करतो आहे असे आपण मानतो तेव्हा (स्वतःसाठी विठोबा अस्तित्वात नसला) तरी समोरच्याच्या असलेल्या विठोबाला आपण क्षणभर मान्यता देतोच ना. त्या नसलेल्या पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा :) (हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही.) -- लिखाळ विठोबासी शरण जावे। निजनिष्ठा नाम घ्यावे - संत तुकाराम (चित्रपटातले)

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर 01/07/2009 - 00:57
पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा असं म्हणता? बरं बरं! :) हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही. हम्म! तर्क, रॅशनल थिंकिंग वगैरे वगैरे! आपण तर या शब्दांनादेखील पार घाबरतो भैय्या! :) तात्या. -- माती, पाणी, उजेड, वारा तूच मिसळीशी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार.. विठ्ठला, तू वेडा कुंभार!

राघव 01/07/2009 - 01:40
१-२ शंका उगाच मनात आल्यासारख्या वाटतात - १. (भगवंत) आहे अशी श्रद्धा असणारा तो आस्तिक अन् (भगवंत) नाही श्रद्धा असणारा तो नास्तिक. - पण, भगवंत आहे, त्याच्याच ईच्छेने सगळे घडते अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा आस्तिक म्हणता येईल काय? तसेच भगवंत नाही अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा नास्तिक म्हणता येईल काय? :) - श्रद्धा दोन्ही बाजूंनी नाही काय? एका बाजूची अंध अन् दुसर्‍या बाजूची डोळस कशी होईल? २. धर्म ही संकल्पना कशासाठी अस्तित्वात आली? ती नसती तर काय झाले असते? कर्मकांडं-रूढी-परंपरा कशासाठी अस्तित्वात आल्यात? कर्मकांडं-रूढी-परंपरा म्हणजेच धर्म का? किंवा हे सर्व न पाळणं म्हणजे धर्म का? - मी स्वतः अजूनही वरील प्रश्नांच्या उत्तरांजवळ नाही पोचू शकलो ब्वॉ. तसे यम -नियमांबद्दल वाचले होते थोडेसे. पण ते वाचून वाटले की इतर धर्मांत देखील या पेक्षा काही वेगळे सांगीतलेले नसावे. ३. पौरुषेय-अपौरुषेय म्हणजे नक्की काय? (फारच बाळबोध प्रश्न असे वाटू नये म्हणजे झाले रे राघवा!!) - मला वाटते यावर चर्चा करण्यासाठी आधी भगवंत आहे हे मान्य करावे लागेल. मनोभुमिका सारख्या पातळीवर आल्याशिवाय चर्चा करणे अयोग्य. मला स्वत:ला असे वाटते की आपण कोणत्याही गोष्टीचा कार्यकारणभाव जाणून मग पटले तर तसे वागावे. मी देवळात जातो. कशासाठी? ते एकदा शोधले की मग त्यावर चर्चा करण्याची गरज राहील असे वाटत नाही. तसेच मी पूजा करतो. व्रतं-उपास-तीर्थयात्रा करतो. हे सर्व मी का करतो हे शोधणे योग्य. तसे केले म्हणजे इतरांशी तुलना करण्याचा संभव उरणार नाही. :) (भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा असलेला) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

मृदुला 01/07/2009 - 01:41
हा धागा सगळा वाचला. "माझिया जातिचे मज मिळो कोणी" प्रकारचा आनंद मिळाला. श्रावण यांच्याशी सहमत; कोणाच्या श्रद्धाविषयाच्या आड मी येत नाही आणि माझ्या मतांच्या आड कोणाच्या श्रद्धा येऊ देत नाही. मी साधारण ११ वर्षांची असताना खूप विचार करून (!) देव असणे शक्य नाही असे ठरवले. आता त्यावर वीसेक वर्षे उलटून गेल्यावर कधी कधी असे वाटते की एखादी अशी आंधळी श्रद्धा असती तर बरे झाले असते का? कसे वाटले असते, असे कुतूहल वाटते. पण अश्या विषयात, एकदा एका दिशेने चालू पडल्यावर परतीची वाट नाही. कदाचित, सश्रद्धांचेही असेच होत असावे. जसे मला लोकांना देव आहे हे पटतेच कसे याचे मनोमन आश्चर्य वाटते, तसे त्यांना देव नाही वाटणारे लोक नीट विचार करत कसा नाहीत याचे आश्चर्य वाटत असावे. न राहवून खालच्या ओळी. मूळ विषयाशी असंबंध. वर एका प्रतिसादात (बहुधा भोचक यांच्या) उत्क्रांती शब्दाचा वापर त्यांनी प्रगती या अर्थाने केला आहे. पशुवत आचरणातून नागरीकरणाकडे असे काहीसे. उत्क्रांती म्हणजे प्रगती नाही. उत्क्रांती म्हणजे मोठा बदल. तो चांगला की वाईट, प्रगती की अधो, हे त्या शब्दात नाही.

यशोधरा 01/07/2009 - 02:02
लेख वाचला, त्यावरच्या प्रतिक्रिया, अभिप्रायही वाचले. चर्चेसंबंधात मलाही माझे काही विचार तपासून घ्यावेसे वाटले, म्हणून हा पोस्टप्रपंच. मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. कदाचित माझ्या समजूतीची गल्लत असेल, मी नाकारीत नाही. लेख 'संस्कार' ह्या मूळ विषयापासून सुरु होत होत, आस्तिकता/ नास्तिकतेची वळणं घेत, धर्म ह्या विषयाला स्पर्ष करुन (इथे जगण्याचे तत्वज्ञान, पद्ध्त ह्या अर्थी हिंदू धर्म म्हणायचे आहे का धार्मिकता ह्या अर्थी? दोन्ही खूप वेगळ्या बाबी आहेत), रुढी आणि त्या अनुषंगाने येणारे आचार, विचार, पद्धती येथवर येऊन पोहोचतो. ह्या पैकी नक्की चर्चा कशावर? की सगळ्यांच बाबींवर? कारण प्रथमदर्शनी पाहता एकमेकांशी निगडीत वाटणार्‍या ह्या सर्व बाबी भिन्न आहेत, असं मला वाटत. उदाहरणार्थ: संस्कार आणि त्यावरुन आस्तिक वा नास्तिक असण्याचा मुद्दा. संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल? उदा: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थित: l हे नुसते पाठ करुन संस्कार निश्चित होणार नाही, पण, ह्या मागचा अर्थ समजावून जर हे स्तोत्र म्हटले तर, संस्कार जरुर होतील. सर्व जगात मातृरुपाने देवी वास करते आहे. म्हटले तर साधे वाक्य आहे, म्हटले तर आईचा मान का राखावा ह्याची शिकवण आहे. कधीकधी बुद्धीप्रामाण्यवादाचेही झापड लागू शकते. देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्‍याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? आडवे तिडवे वाचन आणि चर्चा करणार्‍याला हे प्रश्न कधी पडत नाहीत का? किंवा, गीतेमध्ये सांगितले आहे, त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः l काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ll एतैर्विमुक्त: कौंतेय तमौद्वारेस्त्रिभिर्नरः l आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ll (गीता १६.२१ आणि २२ - चू भू माफ करा काही असेल तर) थोडक्यात, काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची ३ दारे आहेत. हे विकार आत्म्याचा विनाश करतात, तेह्वा यांचा त्याग करावा. हे अर्जुना, ह्या तीन तमोद्वारांतून (तमोगुणांमधून) मनुष्य सुटला म्हणजे तो स्वतःला कल्याणकारी आचरण करतो व परमगतीला प्राप्त होतो. ह्यातला अध्यात्माचा भाग - परमगती वगैरे, स्वर्ग, नरक- सोडून देऊ हवे तर, पण हा उपदेश, संस्काराचा भाग नाही का? कशातून किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे एका मर्यादेनंतर आपले आपणच ठरवायला नको का? असो. माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक. तुकोबाराय म्हणतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll हेच ना संस्कार? अवांतरः हुश्श!! हिंदू धर्म (तत्वज्ञान) आणि रुढींना धर्म मानून धर्म ह्या संकल्पनेला झोडपण्याविषयी नंतर... क्रमशः, क्रमशः :D :P

In reply to by यशोधरा

विसोबा खेचर 01/07/2009 - 02:06
मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. हम्म! देसी डोळे परि निर्मिसी तयापुढे अंधार विठ्ठला तू वेडा कुंभार..! :) तात्या.

प्रमेय 01/07/2009 - 04:35
मला या विषयावर एक लेख लिहायचा होता, पण राहून जात होते. १. संस्कार हे मनावर करायचे असतात कारण मन हे चंचल असते. ते काबूत ठेवणे ही समाजाची (टिकण्यासाठी आणि पुढील पिठीवर दॄढ करण्यासाठीची) गरज आहे. याद्वारे आपण आपले स्वातंत्र अंशतः गमावून समाजात आपली जागा मिळवतो. म्हणजेच आपण काही विशिष्ट प्रकारे न वागायचे मान्य करतो आणि इतर गोष्टींकडे लक्ष देतो. २. समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था... ३. काही गोष्टी मात्र मनुष्य मूळ प्राणी स्वभावाने करतोच. याचाच अर्थ असा की, आपण अजून पूर्ण सामाजिक(माणसाळलेले) झालो नाही आहोत. जर एखादे कुत्रे जंगलात हरवले तर ते जंगली बनते व माणसाळलेले राहत नाही कारण जगण्यासाठी माणसाळलेले राहण्याची त्याची गरज संपलेली/नष्ट झालेली असते. ४. आपल्या समाजातल्या अशा कितीतरी गोष्टी ह्या जुन्या नियमानुसार आहेत असे मी मानतो. जेवढा समाज जास्त जुना/प्राचीन तेवढ्या त्यात जास्त चूकीच्या समजूती किंवा कालबाह्य समजूती. ५. आता एवढ्या प्रस्तावनेनंतर मूळ मुद्दा असा की, जर आपण काही चुकीच्या समजूती झुकारल्या तर आपण नास्तिक ठरत नाही. तसेच केवळ दुसर्‍यासाठी त्या मान्य करण्याने अस्तिक ठरत नाही. ६. जेवढी ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे तेवढीच ती समाज आणि काळ सापेक्षपण आहे. ७. त्यामुळे धर्म हा व्यक्तिगत बनला पाहिजे आणि समाजाने त्याला हो म्हणले पाहिजे. ८. हिंदू धर्मात(की संस्कॄती?) कितीतरी चाली-रिती आहेत ज्या नसण्यामुळे आपण जास्त प्रगत बनू. फक्त धर्मसुधारणा करून न थांबता सुधारित धर्म् आचरणात आला पाहिजे. ९. का आपण १० लोक मिळून सांगू शकत नाही, की आम्ही असा असा हिंदू धर्मावर आधारित पण सुधारित समुदाय काढला आहे आणि सरकारने त्याला नवा धर्म म्हणून मान्यता द्यावी. यात नवे ग्रंथ, पुस्तक असेल, नवी न्याय समाज रचना असेल. ही मान्यता मिळाल्यावर तो धर्म/जात म्हणून पुढच्या पिढीला मिळेल आणि सामाजिक विषमता दूर होण्यास सुरुवात होइल. जसे जास्त अनुयायी तशी कमी विषमता. बाकी परत...

नितिन थत्ते 01/07/2009 - 08:43
>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था... १०० % असहमत. असल्या रूढी कोणत्याही काळात/जगात अयोग्यच. त्याची काही कारणे असलीच तर ती एका गटाने दुसर्‍या गटावर वर्चस्व गाजवणे हीच होती. आणि हे कोणत्याही जगात/काळात स्वीकारार्ह असता कामा नयेत. (निदान जी उदाहरणे दिली आहेत ती तरी तसल्या प्रकारची आहेत) बाकी तुमचे म्हणणे बरेचसे मान्य. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

विकास 01/07/2009 - 09:09
>>>१०० % असहमत. आपल्या असहमतीशी सहमत. विशेष करून जी उदाहरणे दिली आहेत त्यासंदर्भात नक्कीच असहमती आहे. बाकी आधी लिहायची इच्छा होती पण वराती मागून घोडं नको असे वाटते. :-)

In reply to by नितिन थत्ते

प्रमेय 02/07/2009 - 00:00
>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था... मी आपला विरोध समजू शकतो. पण वरील वाक्यात मी कुठेही असे म्हटले नाहीये की त्या रूढी बरोबर होत्या. त्या काळी तथाकथित उच्च वर्गाचे महत्व टिकण्यासाठी आणि इतरांचे दमन करण्यासाठी या चाली रिती होत्या असे आपण म्हणतो हेच बरोबर आहे. पण मूळ प्रश्न असा की, जर हे कारण चूक होते/आहे, तरीपण त्या काळी समाजाने ते प्रकार वापरलेच ना? जिथे कुठे सुरूवात झाली असेल, तिथेच त्याला विरोध करून हाणून का पाडले गेले नाही? याचाच दुसरा अर्थ असा की, समाजाने ते स्वीकारले (यात सर्वजण आले. आपण ४थी, ५वीच्या पुस्तकात वाचत नाही का, अस्पॄशता, सती आणि बालविवाह या त्याकाळी समाजाला लागलेली वाळवी होती. म्हणजेच ती काही फक्त विशिष्ट सामाजिक वर्गात नसून सर्व थरांत होती.) यात त्या समाजाची कितीही दांभिकता असली तरी हाच समाज आपला पूर्वज आहे हे मान्य करावे लागते. आता चिकित्साच करायची झाली तर असे म्हणता येइल की, सती पध्दत ही त्याकाळी मागे उरणार्‍या विधवा स्त्रीयांची विल्हेवाट लावण्याची सोय होती. आजच्या काळात हे नक्कीच क्रूर आहे. पण लक्षात घ्या की, माझ्या प्रतिक्रियेत मुद्दा २ व ३ हे याचा विचार करतात. एकेकाळी मनुष्य जमात प्राण्यांकडून शिकत असे. जसे काही सस्तन प्राणी वर्गांत वॄध्द, आजारी व परावलंबी प्राणी हे प्रवासात मागे पडतात आणि इतर श्वापदांकडून मारले जातात तशी काहीशी प्रथा मनुष्याने उचलली. उदाहरण द्यायचे तर,आफ्रिकेतील जमातीत नात्यात लग्न करणे उचित समजतात. त्यामुळे असे म्हणता येइल की, ज्या घडामोडी आपण आत्ता पाहतो आहोत त्या पुढे चांगल्याकडे घेऊन जावोत.

धमाल मुलगा 01/07/2009 - 12:03
मोठा गहन आणि उत्तम विषय आहे. असा विषय चर्चेला घेतल्याबद्दल श्री.डानराव ह्यांचे अभिनंदन. अश्या गहन विचार करणार्‍या थोर विचारवंतांच्या मांदियाळीतले बरेचसे आमचे स्नेही आहे ह्याचा आम्हाला मोठा अभिमानच वाटतो. छान! असेच मोठे व्हा...उत्तम नाव कमवा....आम्हाला तुमचा अभिमान आहे. :) बाकी,आपणा सर्वांना त्या सर्वशक्तीमान अश्या जगनियंत्या परमेश्वराने साक्षात त्यालाच "काय रे, बोल तू आहेस का? दे ऊतर" असे विचार करण्याची बुध्दी देऊ केली, किती तो थोरपणा त्या देवाचा. :) असो, साक्षात ज्ञानोबा माऊलींनी म्हणलंच आहे, "जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात" ईश्वरवाद्यांना ईश्वर मिळो, निरिश्वरवाद्यांना तो नसण्याच्या आपल्या विचारांचं समाधान मिळो, सगुण उपासकांना त्यांच्या इष्ट देवतेचा कृपाप्रसाद लाभो, निर्गुण उपासकांना "कोऽऽहम्"चे उत्तर मिळो ......प्राणिजात!!! बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली :) बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्‍यांना एक जाहीर आव्हान करतो, असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात? ह्यावर कोणी इतक्यांदा घासून गुळगुळीतच नव्हे तर बुळबुळीत झालेलं लंगडं उत्तर देऊ नका..."मी माझ्या धर्माबद्दलच बोलणार" वगैरे...पुष्कळ झालंय आत्तापर्यंत हिंदूधर्मावर तोंडसुख घेऊन. आता येऊद्या इतर धर्माबाबत!!!! आहेत..मुस्लीम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, ज्यू आहे पुष्कळ आहेत. थोर विचारवंतांकडून ह्या सर्व धर्मांतल्या अनिष्ट प्रथांबद्दलही कळु द्या आम्हा मुर्ख गरीब अज्ञानी बहुजनांस ! बोला, पुंडलीक वरदा हऽऽरी विठ्ठल... ज्ञानेश्वर माऽऊली...ज्ञानराज माऽऊली.....तुकाराम :!!!!!!!!!!!!१ -(भडक्क भगवा) ध. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 01/07/2009 - 12:43
बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली
मौज नाही वाटली, तर इतके दृढ श्रद्धाळू लोक आहेत हे पाहून छान वाटलं, आणि अशी दृढता माझ्या श्रद्धेमधे केव्हा येईल असा प्रश्नही मनात उत्पन्न झाला. शेवटी श्रद्धा कशावरही असू दे, ईश्वराच्या असण्यावर नाहीतर ईश्वराच्या नसण्यावर, देवावर नाहीतर फक्त स्वतःवर, श्रद्धा असणं महत्वाचं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवलं - 'माणसांमाणसांत जर काही फरक असेल तर तो या श्रद्धेचा. श्रद्धेचं अस्तित्वच माणसाचं लहानमोठेपण ठरवते. तेव्हा श्रद्धा बाळगा.' (हे मूळ विंग्रजी वाक्यांचं तोकडं भाषांतर आहे, तेव्हा चूभूदेघे). - भटोबा

In reply to by घाटावरचे भट

धमाल मुलगा 01/07/2009 - 12:49
छान बोल्लात भटोबा... एकदम काठावरचे भट झालात की. ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

श्रावण मोडक 01/07/2009 - 18:16
बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्‍यांना एक जाहीर आव्हान करतो, असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?
आव्हान देताहात हे खरं, पण त्याची गरजच नाही. डॉन यांचा लेख, मेघना, मी किंवा भोचक यांची प्रतिक्रिया आणि नंतर त्यावर त्यांना पुष्टी देणारे प्रतिसाद यावरून ही चर्चा झाली आहे. एक गोष्ट पाहताहात का, या सगळ्यात प्रत्येकाने स्वतःचे विश्लेषण केले आहे. ते व्यक्तीगत विश्लेषण आहे. सश्रद्धांच्या संदर्भात केलेले आत्मविश्लेषण आहे. स्वतःला तपासण्याची ती कृती आहे. येथे हे सारे करताना या मंडळींसाठी सश्रद्धांमध्ये केवळ हिंदूच आहेत असे तुम्ही गृहीत धरता आहात, कारण त्यांनी लिहिताना त्यासंदर्भातील दाखले देत लिहिले आहे. पण तुम्ही हे विसरू नका, की त्यात केलेले भाष्य हे न पटणाऱ्या, तर्काच्या कसोटीला न उतरणाऱ्या गोष्टींवर (ही धारणा त्या-त्या लेखकाची आहे) आहे. आणि ही मंडळी त्या अर्थाने धर्म मानतच नसल्याने, पण त्यांची टीका धर्म (विशिष्ट धर्म नव्हे) ही संदर्भचौकट घेऊन येणाऱ्या गोष्टींवरच असल्याने, ती इतर धर्मांतील अशा गोष्टींना लागू होतेच. आम्ही अधार्मिक ठरतो ना ते सगळ्या धर्मांच्या लेखी. इस्लाम, ख्रिश्चन किंवा अन्य कोणताही. अगदी बौद्धांच्या लेखीही ठरूच. आम्ही आमच्यावरच टीका केली ती तुम्ही अशी लावून घेऊ नका. आव्हानाच्या भाषेपेक्षा सरळसोट प्रश्न जरूर करा. ही तात्कालीक प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलीतच कशी हे समजेनासे झाले आहे. :) आता माझ्यापुरते बोलायचे तर... ख्रिश्चन, इस्लाम, (तुम्ही म्हणता म्हणून) हिंदू (मी म्हणेन वैदिक धर्म), बौद्ध, जैन (इत्यादी, कुठला राहिला असल्यास त्यावरून पकडाल तुम्ही) या सगळ्या धर्मांमध्ये तर्कावर न उतरणाऱ्या, माणसाने आज जिथंपर्यंतची प्रगती साध्य केली आहे त्या प्रगतीतून आलेल्या अनुभवांती ज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या गोष्टी आहेत. त्या त्याज्य आहेत. हे सगळे धर्म त्या - त्या रुढी-परंपरांपुरते भंपक आहेत. विज्ञानाच्या अनुषंगाने मानवी बुद्धीच्या सध्याच्या क्षमतेतदेखील या विश्वाच्या काही रहस्यांची उत्तरे मिळत नाहीतच. त्यामुळे ती विज्ञानाची मर्यादा आहेच. विज्ञान हेही त्या अर्थाने धर्मासारखेच मर्यादित आहे. दोघांच्या मर्यादांचा आवाका वेगळा. पहिल्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने पहिल्याला पवित्रेबाज आव्हान देण्यात अर्थ नाही. कारण अशा वेळी त्यांच्या-त्यांच्या बौद्धीक क्षमतांच्या पलीकडे असणारे प्रश्न सामान्य माणसाकडून आले की त्यांची पंचाईत होते. हे ध्यानी घ्या की असे प्रश्न तज्ज्ञांपेक्षा सामान्य माणसालाच अधिक पडतात. त्याच्याकडचा तो एरवी रेअर असलेला कॉमन सेन्स अशा वेळी पूर्ण जागा असतो. अशा प्रश्नांपुढे आपला विचार तर्काच्या कसोटीवर उतरवण्यात हे दोन्ही वादी कमीच पडतात. मग त्यांचे-त्यांचे क्षेत्र पार झूटच आहे असा भ्रम पसरण्यास वेळ लागत नाही. आणि खरं सांगायचं तर या ज्या मर्यादा आहेत ना, धर्म किंवा विज्ञानाच्या नव्हेतच. त्या आहेत माणसाच्या मर्यादा. कारण धर्म असो वा विज्ञान, हे दोन्ही माणसाच्याच बुद्धीतून, कल्पनेतून जन्माला आले आहेत. त्याच्या बुद्धीच्या मर्यादांची चौकट त्या संकल्पनाला लागलेली आहेच. माणूसच ती आतून ढुशा मारून विस्तारत असतो. ही चर्चा किंवा अशा इतर चर्चा म्हणजेच या ढुशा आहेत. विचारविश्वाचीही उत्क्रांती होत असते. त्या उत्क्रांतीमध्ये या ढुशा देण्याच्या प्रक्रिया होतातच. विठ्ठल, माणसाचा माणसाला नमस्कार वगैरे उल्लेख वर आले आहेत. एक गोष्ट मांडतो - सच्चा वारकरी जो असतो ना, तो एकादशीच्या दिवशी गाभाऱ्यातील विठ्ठलाचे दर्शन घेत नाही, तो त्या दिवशी खरं तर मंदिरात जातच नाही. मंदिराबाहेर राहून तो कळसाकडे पाहून नमस्कार करतो. त्या दिवशी विठ्ठलच वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी कळसावर आलेला असतो, असे मानले जाते. पुरेशी बोलकी आहे ही गोष्ट श्रद्धा आणि अश्रद्धा, देव असणे आणि देव नसणे आणि धर्म व अधर्म यासंदर्भात भाष्य करण्यासाठी. त्या वारकऱ्याची ही श्रद्धा आहे, विठ्ठल माझे दर्शन घेतोय, मी त्याचे घेतोय. कारण हा विठ्ठल लोकांच्या मनात आहे. तो त्या मूर्तीत नाही. मूर्ती ही केवळ प्रतिक आहे. त्या प्रतिकापाशी वारकरी लीन होतो हे ठीक. पण त्याचवेळी "कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी," हेदेखील आहेच. चोखा त्या पायरीशी गेला हे विसरता येत नाही. हे सारं व्यामिश्र आहे. त्याची आपल्या नेहमीच्या पद्धतीनं कृष्ण-धवल उत्तरं निघत नसतात. आजच्या बुद्धीची ती मर्यादा आहे. आईनस्टाईनच ना, म्हणाला होता की, माणसाची बुद्धी ही केव्हाही त्याच्यापुढे असणाऱ्या समस्या सोडवण्याच्या गरजेपेक्षा थोडी मागेच असते. किंवा माणसापुढच्या समस्या या नेहमी त्या घडीच्या त्याच्या बुद्धीक्षमतेच्या थोड्या पुढेच असतात. हे विसरून कसं चालेल? तारतम्य (म्हणजेच विवेक म्हणूया) ही माणसाची मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेच्या जोरावरच तो इतर जीवांपेक्षा वेगळा ठरत गेला आहे. तोच हरपला की काय होते त्याचे दाखले या चर्चेत काही प्रतिसादांतून दिसतात.

नितिन थत्ते 01/07/2009 - 12:56
चला, आता चर्चा बंद करायला हवी. कारण इतर धर्मांतील अनिष्ट प्रथांबद्दल आपण काही बोलत नाही. (आपल्याला इतर धर्मांबद्दल पुरेशी माहिती आहेच कुठे? आपण आपले आपल्या आसपासच्या समाजात जे पाहतो त्यावरच बोलतो. माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते). या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही. पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे. या धाग्यावरही इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल कोणास माहिती असेल आणि लिहायचे असेल तर आडकाठी नाहीच आहे. इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात. अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे. कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता. आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

धमाल मुलगा 01/07/2009 - 14:41
माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते
नक्की? खात्रीलायक?? अगदी कन्फर्म??? शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ :) >>या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही. नाकारलेलेही कुठे दिसत नाही बॉ. आणि हो, हिंदू धर्मच ह्या अनिष्ट रुढी-परंपरांना हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्‍यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो. >>पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे. चर्चा थांबवण्याबद्दल कुठे काय म्हणालंय कोण? आम्ही ह्याच धाग्यात इतर धर्मांवर बोला असं म्हणालो आहोत काय? आम्ही फक्त असं म्हणालो की आजवर बर्‍याचदा हिंदूधर्मावर टिकात्मक लेखन झालंय, इतर धर्मांबाबतही थोर विचारवंताचे ज्ञानकण आम्हा मूढांच्या पदरात घालावे :)
अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे.
अशी आणखी किती उदाहरणं आहेत? आणि उठसुठ हिंदूधर्माला बोल लावणारे किती आणि कितीदा 'फुल थ्रॉटल' असतात? पहा, विचार करा, आनंदी रहा :)
कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता.
हो ना! मग इथे काय फक्त आणि फक्त हिंदूच आहेत का? की अनुभव विश्व फक्त हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवलंय? तसं असेल तर निधर्मी/सेक्युलरगिरी कुठे गेली? :)
आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल.
बरोबर! पण आम्ही कधी म्हणालो की केरळातल्या ख्रिश्चनांबद्दल किंवा उत्तरप्रदेशातल्या मुस्लीमांबद्दल बोला? जिथल्या हिंदूंना नजरेसमोर ठेऊन त्या रुढींवर टिका केली तशीत तिथल्याच अहिंदू रुढींवर बोला की. :) >>इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात. सलमान रश्दी, तस्लीमा नसरीन ही नावं कुठं ऐकल्यासारखी वाटताहेत, नै का बॉ? :) काय झालंय बरं त्यांचं? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

नितिन थत्ते 01/07/2009 - 15:54
>>शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ तुम्हाला या सार्‍या गोष्टींची माहिती जर आहे तर तुम्ही लिहा ना त्यातल्या अनिष्ट गोष्टींबद्दल. आम्हाला नाही तेवढी माहिती मुसलमानांबद्दल... म्हणून आम्ही नाही लिहू शकत. तुम्ही लिहा. मी तर कुठल्या धर्माबद्दल लिहिलेच नव्हते. देव या संकल्पनेबद्दल लिहिले होते. मी समजा हिंदूंच्या एका अनिष्ट रूढीविषयी लिहिले असेल तर लगेच मी दुसर्‍या धर्मातल्या एका रूढीबाबत लिहिलेच पाहिजे असा हट्ट का? मी एखाद्या रूढीविषयी लिहिले तर ते हिंदू धर्मावरील टीका नसून त्या रूढीवरील टीका असते. ती रूढी कोणत्याही धर्मात असेल तरी मी तिच्यावर टीकाच करेन. बालविवाह कोणत्याही धर्मात आक्षेपार्हच आहे. >>हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्‍यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो. हे तर ख्रिश्चन धर्मातही आहे. पाश्चात्य जगाची प्रगती (इथे प्रगती कशाला म्हणायचे हा फाटा फोडू नये) ही धर्माला आव्हान देण्याच्या प्रक्रियेतूनच सुरू झाली आहे. आणि आता धर्मावर टीका करणार्‍याला विषाचा प्याला घ्यायची शिक्षा केली जात नाही. मुस्लिम धर्मात हे कदाचित आज कमी प्रमाणात असेल पण पुढे ते होणारच नाही असे नव्हे. अजून एक गोष्ट. समजा मी एखाद्याच्या रस्त्यावरील प्रत्येक देवळाकडे/चर्चकडे पाहून नमस्कार करण्याच्या सवयीवर टीका केली तर ती त्या विशिष्ट कृतीवर टीका नसून त्या व्यक्तीच्या मानसिक परावलंबित्वावरची टीका असेल. धर्मावरील आमचा आक्षेप हा अनेक अन्यायकारक गोष्टींना तो समर्थन पुरवतो हे आहे. त्यामध्ये सर्वच धर्म येतात. (अवांतरः आपण येथे वकिली युक्तिवाद करायला जमलो नाही. त्यामुळे विशिष्ट शब्द पकडून बोल्ड करून आव्हाने द्यायची गरज नाही.) नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)

यशोधरा 01/07/2009 - 13:16
धर्म आणि रुढी एकमेकांपासून अतिशय भिन्न अशा संकल्पना आहेत. धर्मामध्ये एक विशिष्ट तत्वज्ञान सांगितलेले असते, जगण्याची, वागण्याची विशिष्ट अशी प्रणाली सांगितलेली असते. आपल्या मूळ रुपात कोणताही धर्म खूप व्यापक आणि सहिष्णू असतो. मुळात हिंदू धर्म हा "धार्मिकता" ह्या अर्थी धर्म नव्हे. ती एक जीवन प्रणाली आहे. ह्यात प्रत्येक मताला स्थान आहे. आस्तिकता, नास्तिकता, सगुण, निर्गुण, निरीश्वरवाद... यादी वाढतच जाते, म्हणूनच हिंदू वेगवेगळे पंथ मानू शकतात, त्यांची दैवतंही वेगळी असू शकतात. एकच देवाला वा प्रेषिताला मानायला हवं अशी सक्ती इथे नाही. जन्माने वा कर्माने हिंदू असून, हिंदू धर्माविषयी माहिती न करुन घेता, काही अभ्यास न करता, धर्माला नावं ठेवायची मुभाही इथेच आहे, ह्याच धर्मात. आताआतापर्यंत असं कोणी केलं तर केवळ धर्मांधतेने कोणी अश्या टीकाकांराना त्रास पोहोचवल्याचं ऐकीवात नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची पूर्ण मुभा हे हिंदू धर्माचं अतिशय अभिमानस्पद वैशिष्ट्य आहे. राहता राहिल्या रुढी. ह्या व्यक्ती निर्माण करतात आणि सामाजिक जीवनात रुढी जन्म घेतात आणि नष्टही होतात. रुढी निर्माण होण्याची कारणं बर्‍याचदा समाजावर मूठभर लोकांचा वरचष्मा रहावा म्हणून निर्माण केल्या जातात. त्या नाहीश्या व्हायलाही हव्यात, पण रुढी म्हणजे धर्म, असे गृहीतक धरुन, म्हणून धर्माला का झोडपावे? हे म्हणजे, हाताला घाण लागली तर, घाण साफ करण्याऐवजी हात कापून टाकूया म्हणण्याप्रमाणेच झाले ना?

पक्या 01/07/2009 - 13:47
हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच. ही जी काय शक्ती आहे माझ्या मते तीच देव. तिची वेगवेगळी रुपे माणसाने निर्माण केली की खरोखरीच अशी रुपे आहेत ते मला माहित नाहि पण त्या शक्तीवर माझा विश्वास आहे. ह्या शक्तीला / देवाला कर्मकांडाच्या बंधनात अडकवले माणसाने. कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.

In reply to by पक्या

यातले "कोट्स" वगळता बाकी सर्व माझी, एका व्यक्तीची व्यक्तीगत मतं आहे. त्यामुळे प्रतिवादात झोडपायचं असेल तरीही कृपया समस्त निरीश्वरवादी गटाला झोडपू नये.
हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच.... ... कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.
ब्रह्मांड जर कोणी निर्माण केले तर त्याला/तिला/तेला कोणी निर्माण केलं? एकदा ब्रह्मांड निर्माण झालं हे मान्य केलंत की आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले याचं उत्तर देणारी मोठी लेखमाला मी लिहू शकते. (सॉरी, सध्या अजिबात वेळ नाही, जमेल तसं लिहेन, मागणी असेल तरच!) ब्रह्मांड कसं निर्माण झालं याचंही उत्तर विश्वरचनेचा अभ्यास करण्यार्‍यांकडे आहे (मला ते समजलं आहे असा माझा दावा नाही). कसं निर्माण झालं याचं उत्तर विज्ञान देतं, पण का निर्माण झालं याचं उत्तर विज्ञानात मिळेलच असं नाही. तिथे मात्र तर्क इ. इ. गोष्टींची गरज पडेल. सृष्टीनिर्माणकर्त्याचं अस्तित्त्व हा मलातरी चक्राकार खेळ वाटतो. कशावरून हे ब्रह्मांड, ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली? आणि मग या निर्मिकाला कोणी निर्माण केलं? आणि निर्मिकाच्या निर्मात्याला कोणी निर्माण केलं .... ही साखळी संपणारच नाही. काही थोडी वेगळी उदाहरणं देते: १. पूर्वी असं मानत एका कासवाच्या पाठीवर (किंवा ग्रीसमधे असाल तर हर्क्युलिसच्या पाठीवर) पृथ्वी आहे असं मानत. मग ते कासव (/हर्क्युलिस) कुठल्या पृष्ठभागावर विसावलं आहे? या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे, की पृथ्वी अंतराळात आहे, आणि सूर्याशी गुरूत्वाकर्षणाने बांधली आहे. २. जेव्हा सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात हे अमान्य होतं, तेव्हा अतिशय किचकट अशा ग्रहांच्या कक्षा आखून (एपिसायकल्स) , ग्रह पृथ्वीभोवती फिरतात असं मानायचे. ६ ग्रहांसाठी २८ (का जास्त) एपिसायकल्स होती. एक चुकीचं गृहीतक हटवलं, आणि ६ ग्रहांसाठी १ नियम लागू करता आला. पुढे तो नियम सगळ्याच गुरूत्वीय बंधक वस्तूंसाठी लागू होतो असं लक्षात आलं. निष्कर्षः आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी. माझी देवाविषयीची धारणा: मी निरोगी असताना, दुसरा आजारी पडू नये; किंवा दुसरा ठणठणीत असताना मी आजारी पडू नये असा काही नियम नाही. आजारी माणसाला औषधं, जास्तीची काळजी इ.ची गरज असते. तसंच काही लोकांना नित्यनियमाने किंवा अडीअडचणीत एका मानसिक आधाराची गरज असते, ती गरज "देव" किंवा "ती विवक्षित शक्ती आहे ही धारणा" भागवतात. देवाच्या अशा प्रकारच्या अस्तित्त्वामुळे काही लोकं, खरंतर बरेच लोकं, सुखात रहातात. (अडचणीच्या काळात माझ्यासाठी हीच गरज मित्रमंडळ, नातेवाईक, कलिग्ज भागवतात.) माझ्यालेखी देव आहे, पण तो या आस्तिक लोकांच्या डोक्यात आहे, अगदी I think, so I am, याच चालीवर! जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. अनेक आस्तिक मित्र-मैत्रिणीही जिवलग आहेत. पण माझ्यावर देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची सक्ती मला चालत नाही.

In reply to by मेघना भुस्कुटे

सनविवि 01/07/2009 - 17:29
मी पण अदितीशी सहमत. १ वर्षापूर्वीपर्यंत मीही आस्तिक होतो. म्हणजे कधी नीट विचारच केला नव्हता मी आस्तिक का आहे ह्याचा. आणि जेंव्हा मी तो केला तेंव्हा लक्षात आलं की एका आस्तिक कुटंबात वाढणे हेच त्याच्यामागचे एकमेव कारण आहे. देव ही संकल्पना मला मनापासून नाहीच पटत. आस्तिक लोकांबद्दल आपली काहीच तक्रार नाही. फक्त सारखं आम्हाला re-convert करण्याची धडपड सोडून द्या!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाहरुख 04/07/2009 - 09:55
>>जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. मला काय वाटते हे नीट लिहायची अक्कल असती तर मी असेच काहीसे लिहिले असते !!

बाप रे थोर थोर लोकांचे मोठे वाद चालले आहेत, म्या पामराने लिहावे की नको ? लिहितोच... देव आहे का नाही ? आस्तीक नास्तीक हे मला खरच कळत नाही. मी स्वतः कधी रोजची पुजा वगैरे करत नाही. गणपती मात्र श्रद्धेनी अगदी गुरुजींच्या आवाजातली कॅसेट वगैरे लावुन बसवतो. माझ्या आजीला सांधेदुखीचा त्रास व्हायचा. योग्य ती ट्रीटमेंट, व्यायाम वगैरे करुनही कधी कधी हा त्रास उफाळुन यायचा, तेंव्हा आपण रामरक्षा म्हणली की हा त्रास कमी होतो अशी तिची श्रद्धा होती. बर्‍याचदा ती हा प्रयोग करायची मग काही वेळाने तीच्या चेहर्‍यावर एक वेदनामुक्त समाधानी सुखी भाव यायचे आणी ती मनोभावे रामाला नमस्कार करायची. मी सुद्धा लगेच नमस्काराला हात जोडायचो. तीच्यापुरते का होईना मी देवाचे अस्तीत्व मान्य केलेले असायचे. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

यशोधरा 01/07/2009 - 14:58
>>जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही. अदिती, तुझा बहुतांश प्रतिसाद पटला. देव मानणं वा न मानणं हे व्यक्तीसापेक्ष. मान्य. असं धरून चालू, की देव आहे. मग काय त्याने सांगितलय की माझ्या नावावर भांडा? तो भांडणार्‍यांचा दोष की देवाचा? भांडणं देवाच्या प्रेमाने होत असतील, असंही नसत! अशी भांडणं बहुतांशी धूर्त लोक त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी लावतात, आणि विचार न करता, झापडबाज जनता त्याला बळी पडते. ह्यात देवाचा काय दोष? जनतेच्या अज्ञानाचा, माहिती नसल्याचा फायदा घेऊन आपापसात तेढ पैदा करुन दिली जाते. सगळे मानवी खेळच ना? उदा: रुढींना धर्म समजणे, मानणे. तसंच हे भांडणं होतात म्हणून देव आवडत नाही, असं म्हणणं झालं की. आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. :) जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!

In reply to by यशोधरा

आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!
माझ्या आधीच्या प्रतिसादात व्याकरण आणि/किंवा भाषेची चूक आहे. माझ्यासाठी देव ही काही (बर्‍याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. एक नुसती संकल्पना असू शकत नाही, तिच्यासाठी एका मेंदूची गरज असते आणि नुसता मेंदूही असू शकत नाही, त्यासाठी एका (मानवी) शरीराची गरज असते. (हाच तर्क "ती शक्ती म्हणजे देव" याही बाबतीत लावता येईल.) मुद्दा हा, की जेव्हा अशी सक्ती होते तेव्हा ती संकल्पना, पक्षी: तो माणूस, मला आवडत नाही. देवाला माझ्या लेखी स्वतंत्र अस्तित्व नाही, त्यासाठी एका मेंदूची आणि (मानवी) शरीराची आवश्यकता आहे (किंवा एखादा शब्दकोषतरी)! आणि यशो, तुझा तर्क मान्य, जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचा रागतरी कसा येणार? थोडं अवांतर: माझं निरीश्वरवादी असणं हे (माझ्यामते) "सिमेट्रीक" आहे. उदा: मला एक झोळी आवडली म्हणून मी ती घेतली, अगदी रोज वापरते. त्या झोळीवर "हरे कृष्ण हरे राम" असं लिहिलेलं असूनसुद्धा मला त्याचा फरक पडत नाही. मला झोळीशी मतलब आहे, त्यावरच्या लिखाणाशी नाही. ते लिखाण नसतं तरी मला फरक पडत नव्हता, तर ते लिखाण आहे म्हणूनही मला फरक पडू नये.

यशोधरा 01/07/2009 - 15:21
>>जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. >> :) संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का? :) कारण तीच संकल्पना अजून काही जणांना मान्य असेल, पण ती इतरांनीही मान्य करावी असा त्यांचा आग्रह नसेल. मग दोषी कोण? संकल्पना की ती राबवणारे? असो. मुळातच चर्चा नक्की कशावर हा माझा सुरुवातीचा प्रश्न तसाच आहे. :)

In reply to by यशोधरा

संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का?
एक गृहीतक चुकतं तेव्हा आख्खा डोलारा कोसळतो, जसा एपिसायकल्सचा डोलारा कोसळला! :-) (किंवा, गणितात जेव्हा एखादी अगदी साधी वाटणारी गोष्ट सिद्ध करतात, उदा. शून्य एकापेक्षा लहान आहे, तेव्हा सुरूवात करताना एक शून्यापेक्षा लहान आहे, किंवा दोन्ही सारखेच आहेत असं मानतात. आणि मग डोलारा कोसळतो ते दाखवतात. असो. माझं वाचन फार काही नाही, त्यामुळे माझ्या मर्यादित माहितीमधून हे एक उदाहरण दिलं.) असो... देव आणि धर्म या दोन गोष्टींचा संबंध नाही असं माझं आणखी एक मत. तेव्हा डॉनराव, चर्चा नक्की कशावर करायची आहे, देवावर का धर्मावर??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळ 01/07/2009 - 15:53
नक्की चर्चा कशावर ! डॉनरावांनी 'जनातले मनातले' मध्ये स्वतःच्या मनातले विचार मांडले आहेत. लेख या स्वरूपात ते विचार असतानासुद्धा चर्चा कशावर? हा प्रश्न अप्रस्तुत वाटतो. विषय निघाला म्हणून सदस्य एकमेकांत चर्चा करत असावेत. पाहा समोर दिसत असून उमज पडत नाही. देवाच्या बाबतीत असे होत नसेल कशावरून. तर्काच्या घोड्यावर स्वार झाले की रस्त्यातल्या अनेक गोष्टी धुरळ्यात अंधूक होतात असे वाटते. (हे आपले उगीच बरे का :) !) अदिती, विवेकानंदांची ज्ञानयोगावरील वाख्याने आहेत. त्यामध्ये ईश्वरविषयी कल्पनांचा प्रवास, आणि बरेच काही चांगल्या पद्धतीने मांडले आहे. वाचले नसल्यास जरूर वाचावे. --लिखाळ. जुने ठेवणे मीपणे आकळेना -समर्थ.

सूहास 01/07/2009 - 15:24
खर तर ईतर मान्यव॑राच्या मध्ये ईथे कडमडायच नव्हत ..पण जरा काही निदर्शनास आणुन देत आहोत.. बाबा॑नो आणी बाया॑नो, काही कारण नसताना, तावातावाने,शब्द-पाल्हाळ लावुन, वाद-विवाद स्पर्धेच "सत्यनारायण" घालुन. आपण एक-दुसर्‍यास मिपाच्या माध्यमाने " आस्तिक कि॑वा नास्तिक व्हायला सा॑गत आहात" आमच्या साठी दोन्ही सारखेच नास्तिक म्हणतो देव नाही ..सोडुन देतो.. आस्तिक म्हणतो देव आहे .मान्य करतो.सोडुन देतो... देव आहे की नाही हे कोणी शोधत नाही...का ? का ? सा॑गा ना...लई जिकीरीच काम ना ?? कुठ आता तपश्चर्येला बसणार... जरा दमान घ्या... सुहास
लेखनप्रकार
3

एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 10/06/2009 - 16:30
फारच लवकर संपली इंटर्नशिप. अनेक कॅरेक्टर्स डोळ्यांसमोर येऊ लागली होती आणि तितक्यात पडदा पडला... :(

In reply to by श्रावण मोडक

Nile 11/06/2009 - 02:53
+१. प्रत्येक कॅरॅक्टर थोडं अजुन वाढवलं असतं तर चाललं असतं. :)

हर्षद आनंदी 10/06/2009 - 16:51
राजकारणा प्रमाणेच समाजसेवा, सत्याचा पाठपुरावा वगैरे नसुन.... फक्त आणि फक्त पोट भरण्याचे साधन राहिले आहे. :W कथा म्हणुन मस्तच..... नविन पत्रकार काय आदर्श डोळ्यासमोर ठेवुन चालतात हे बघुन डोळे फिरले. 8}

अवलिया 10/06/2009 - 19:38
फार थोडक्यात आटोपले राव ! एकेका दिवसाचा एकेक भाग होवु शकतो :) असो. चालु द्या प्रशिक्षण :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

निशिगंध 10/06/2009 - 22:06
खरेच असे होते का... वाईट वाटत आहे.. पण डायरी ची पाने छान.. थोडी वाढ्ली असती तर.. बाकी आवडली ____ नि शि गं ध ____

श्रावण मोडक 10/06/2009 - 16:30
फारच लवकर संपली इंटर्नशिप. अनेक कॅरेक्टर्स डोळ्यांसमोर येऊ लागली होती आणि तितक्यात पडदा पडला... :(

In reply to by श्रावण मोडक

Nile 11/06/2009 - 02:53
+१. प्रत्येक कॅरॅक्टर थोडं अजुन वाढवलं असतं तर चाललं असतं. :)

हर्षद आनंदी 10/06/2009 - 16:51
राजकारणा प्रमाणेच समाजसेवा, सत्याचा पाठपुरावा वगैरे नसुन.... फक्त आणि फक्त पोट भरण्याचे साधन राहिले आहे. :W कथा म्हणुन मस्तच..... नविन पत्रकार काय आदर्श डोळ्यासमोर ठेवुन चालतात हे बघुन डोळे फिरले. 8}

अवलिया 10/06/2009 - 19:38
फार थोडक्यात आटोपले राव ! एकेका दिवसाचा एकेक भाग होवु शकतो :) असो. चालु द्या प्रशिक्षण :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

निशिगंध 10/06/2009 - 22:06
खरेच असे होते का... वाईट वाटत आहे.. पण डायरी ची पाने छान.. थोडी वाढ्ली असती तर.. बाकी आवडली ____ नि शि गं ध ____
लेखनप्रकार
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आमच्या आळीतल्या भोंड्यांचा पम्या म्हणजे लय भारी बेणं! तसे घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण त्यांच्यात पम्या म्हणजे एकदम भांगेत तुळस! ड्ब्बल जाड काचेचा चश्मा लावणारा, पम्याचा फादर मुन्शीपाल्टीत संडास (सॉरी शॅनिट्री) इंस्पेक्टर असला तरी आपल्याला रिस्पेक देतो.

एंजल्स & डेमन्स ...

छोटा डॉन ·

लै भारी परिक्षण रे डॉण्या..... पुस्तक वाचलेच आहे त्यामुळे चित्रपट पण पहायचा आहे. तुझा लेख वाचल्या बंतर तर आता नक्किच बघावा लागेल. "मेसन्स आणि इल्युमिनाटी" हा लेख लवकरच येवो ==निखिल

अबोल 08/06/2009 - 22:17
दा विंची कोड प्रथम बघितला तेव्हा डोक्यावरुन गेला. मग त्याचे पुस्तक वाचले तेव्हा तो समजला.तो एक सु॑दर चित्रपट होता. आता लवकरच हा चित्रपट पण बघायचाय

अंतु बर्वा 08/06/2009 - 23:08
मी सुद्धा पहिल्याच दिवशी पाहिला चित्रपट... एवढ्या मोठ्या novel ला २ तासाच्या वेळेत बसवणे म्हणजे खरंच खुप कठीण आहे... पण एक छान प्रयत्न म्हणून पाहायला हवा (आणी Tom Hanks साठी...) Da vinci कींवा angels and demons सारखे चित्रपट पाहण्यासाठी अशी काहितरी पार्श्वभुमी माहीत हवीचं. विशेषत: ज्यानी पुस्तक वाचलेले नाही त्यांच्यासाठी... ती तु थोड्क्यात परंतु सोप्या शब्दात मांड्ली आहेस... सो, गुड जॉब...

अनुप कोहळे 09/06/2009 - 00:44
पुस्तक फार वर्षांपुर्वी वाचाले होते...३ किंवा ४....त्यामुळे थोडेच आठवते.... हम्म....परत वाचावे लागेल...... छान परीक्षण.....

टारझन 09/06/2009 - 00:56
थँक्स रे डाणू ... आपल्याला बी पाहायचा होता पिक्चर .. परिक्षणही उत्तम जमलाव .. असाच लिहीत राहिलास तर लवकरंच "सिद्धहस्त लेखक" होशील .. हां .. पण त्यासाठी तुला खोड्या अंमळ कमी कराव्या लागतील आं ..

विकास 09/06/2009 - 01:23
परीक्षण आवडले! हा चित्रपट मी देखील गेल्याच आठवड्यात पाहीला. दा विंचीच्या बाबतीत पुस्तक आधी वाचले असल्याने चित्रपट तितकासा आवडला नव्हता. येथे पुस्तक वाचायाला सुरवात केली आणि तितक्यात अचानक चित्रपट पहायला जाणे झाले. थोडक्यात पुस्तक वाचायच्या आधी चित्रपट पाहील्याने तो अधिक आवडला असे वाटते.

बबलु 09/06/2009 - 01:56
चित्रपट मलाही आवडला (दा विंची कोड चित्रपटातील चुका टाळल्याहेत). :) पण पुस्तक मला जास्त आवडलं. पुस्तकातले असंख्य बारकावे २ तासाच्या चित्रपटात बसवणं तसंही अवघडच. परीक्षण मस्तच लिहिलंय. अभिनंदन. ....बबलु

आवडले... पुस्तक अर्धवटच म्हणजे १५० पाने वगैरे वाचले होते. :) बघू आता पूर्ण सिनेमा बघावा असा विचार आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

भाग्यश्री 09/06/2009 - 03:05
छान लिहीले आहेस रे.. सगळा लेख अगदी आवर्जून परत वाचण्यासारखा झालाय! पुस्तक दा विंचि पेक्षाही आवडते आहे.. त्यामुळे मुव्ही नक्कीच बघणार.. आणि या मुव्हीमधे चुकाही कमी केल्यात असं ऐकून आहे.. बघितल्यावर कळेल आता.. बायदवे, इल्युमिनातीचा तो अँबिग्राम पाहून आणि ती मजा कळल्यावर मी अवाक झाले होते !! www.bhagyashree.co.cc

Nile 09/06/2009 - 03:51
वा! मस्त परीक्षण! मला नेहमीच वाटत, एखाद्या सुंदर पुस्तकाचा सिनेमा करण हे खुपच अवघड कामं. त्यात पुस्तकात जसा पात्र, वातावरन निर्मितीला वाव असतो तेवढा सिनेमात असत नाही. त्यामुळे पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे. :) ) डिस्कव्हरी चॅनेल वर नुकतेच दा विंची कोड व एंजल्स अ‍ॅन्ड डीमन्स यावर कार्यक्रम झाले. त्यात सर्व "संकल्पनांचा" (उदा. अ‍ॅन्टीमॅटर, इल्युमीनाटी, प्रायरी, वगैरे) व्यवस्थीत अभ्यास, आढावा घेण्यात आला, जरुर पहाण्यासारखे कार्यक्रम. डॅन ब्राउनने अनेक खर्‍या गोष्टींपासुन सुरुवात करुन इतक्या सुंदर (काल्पनीक) कथा बनवल्या आहेत की त्याला सलाम करावासा वाटतो. उदा. अँटीमॅटर खरच CERN ने बनवलं आहे, त्याचा व्यवस्थीत त्याने अभ्यास केला, पण तेवढ्या अँटीमॅटर ने इतक नुकसान होउ शकत नाही असा ते बनवण्यार्‍या शास्त्रज्ञांचा दावा आहे. तसेच इल्युमिनाटी खरच होती आणी तिला फ्रेंच राज्यकर्त्यांनी (?) चर्चच्या मदतीने संपवली हे ही इतिहासकार मानतात, पण बाकी गोष्टी मात्र डॅनच्या कल्पनाशक्तीची उदाहरणं. :)

In reply to by Nile

आनंदयात्री 09/06/2009 - 10:05
>>पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे कांगो , अ‍ॅना अँड द किंग ऑफ सयाम हे असेच काही आधी कादंबरी नंतर चित्रपट असे पाहिलेले चित्रपट. परिक्षण छान आहे डान्या .. कर्मठतेच्या विरुद्ध असलेल्या मेसनरी चळवळी बद्दल जरुर टाक. (चळवळ शब्द किती भारतियीकरण करतो नाही ;) ) - (आंतरजालिय मेसन) किंग आंद्या सॉलोमन

सुबक ठेंगणी 09/06/2009 - 04:28
मी पुस्तक वाचले नाहिये...पण तुझ्या परिक्षणावरून वाचावंसं वाटतं आहे...मनापासून धन्यवाद... आणि भाग्यश्री म्हणते ती इल्युमिनातीच्या अँबिग्रामची मजा कोणती? का त्याच्यासाठी पुस्तक वाचू?

In reply to by सुबक ठेंगणी

भाग्यश्री 09/06/2009 - 08:03
अगं तेव्हढ्याचसाठी पुस्तक कशाला..! तो इल्युमिनातीचा लोगो आहे ना? तो साधा सरळ वाच, आणि नंतर शीर्षासन करून वाच.. दोन्हीकडून वाचता येतो.. त्याप्रकारच्या आकृतीला अँबिग्राम म्हणतात.. www.bhagyashree.co.cc

In reply to by भाग्यश्री

नविनच माहिती कळली. अँबिग्राम बद्दल. धन्यवाद. अवांतर: एक शंका आहे. शीर्षासन करण्यापेक्षा स्क्रीन उलटा करून वाचले तर चालेल का? ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by आनंदयात्री

'नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन' हे वाक्य ऐकलंच असेल तुम्ही. आता आम्हाला ते उलटंपालटं करून तर बघायचं आहे पण शीर्षासन? हॅहॅहॅ, अंमळ कठीण आहे सध्याच्या परिस्थितीत. म्हणून ही आयडिया. क बोल्तो? चालंन का? बिपिन कार्यकर्ते

In reply to by भाग्यश्री

छोटा डॉन 10/06/2009 - 22:56
>>जे सोप्पं जाईल ते करा! मी शीर्षासन करूनच वाचते अँबिग्राम्स! हरे राम ...!!! छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक किती डोके खाजवतात हे पाहुन आश्चर्य वाटले. कोणी शिर्षासन करुन वाचतो तर कोणी स्क्रीन उलटी फिरवुन वाचतो .... पण साधे उपाय कुणाला सुचत नाहीत ... मी एक सुवर्णमध्य देतो ... काय करायचे की स्क्रीन आहे ती तुर्तास जमिनीशी "४५ डिग्री" अंशाचा कोन करुन सेट करायची, व्यव्स्थीत उभी रहात नसल्यास स्क्रीनला भोके पाडुन त्यात दोर्‍याने ओवुन ती छताशी टांगा, पण कोन हा "४५ डिग्री" हवा. त्यानंतर तुम्ही स्वतः जमिनीशी "१३५ डिग्री"चा कोन करुन उभे रहा, ते कसे करायचे ते आम्ही नाही सांगणार, सगळे आम्हीच सांगितल्यावर तुम्ही काय करणार झाले, आहे काय आणि नाही काय ? हीच प्रक्रिया कोन आपटुपालटुन केली तरी चालते ... सोप्पं आहे की नाही ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया 09/06/2009 - 06:38
उत्तम परिक्षण. आवडले, येवु दे अजुन असेच सुरेख लेखन :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

सहज 09/06/2009 - 07:15
परिक्षण अतिशय आवडले. सिनेमा मनोरंजक आहे. ज्यांना मूळ कादंबरी, इतिहास फारशी माहीती नाही त्यांच्यासाठी हे परिक्षण नक्कीच उपयुक्त.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile 09/06/2009 - 11:54
नाही! ते बरणीतही(कॅनीस्टर) फ्लोटींगच असतं असंच डॅन म्हणतो! (ह्यावर ही चर्चा केली होती डीस्कव्हरीवाल्यांनी)

In reply to by Nile

छोटा डॉन 09/06/2009 - 13:09
नाईलरावांचे म्हणणे बरोबर आहे ... पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे आणि आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे खालील माहिती ह्यासंदर्भात उपयुक्त ठरेल ... जेव्हा "लार्ज हैड्रोजन कोलायडर"मध्ये अत्यंत गतिमान(अलमोस्ट लाईट स्पीड ) अशा भारीत कणांची ( पोलराईझ्ड बीम्सची ) टक्कर घडवुन आणतात तेव्हा त्यातुन "मॅटर ( जे पॄथ्वीवर सगळीकडे अस्तित्वात आहे)" व "अँटीमॅटर ( ज्याचे अस्तित्व अवकाशात आहे, पॄथ्वीवर ते एकटे सापडणे शक्य नाही )" असे २ पदार्थ तयार होतात. मग अतिशय उच्च ताकदीच्या व विरुद्ध प्रभार असलेल्या शक्तिशाली चुंबकाचा वापर करुन हे २ कण विरुद्ध दिशेला खेचले जातात की जेणेकरुन त्यांचा संयोग होणार नाही ... आता कॅनिस्टरबद्दल ... कॅनिस्टर म्हणजे काय तर एक शुद्ध बरणीच, मात्र ती आहे अतिशुद्ध अशा आयसोटोप्सची. बरणीचे मटेरियल हे "मॅटर"मध्येच मोडते. ह्या बरणीमध्ये अत्य्तंत शक्तिशाली निर्वात पोकळी तयार केली जाती. बरणीच्या २ टोकांना २ शक्तिशाली परंतु परस्परविरोधी प्रभार असलेले इलेक्ट्रोमॅग्नेट्स जोडलेल असतात. त्यांची मॅग्नेटिक रेडियस करेक्ट कॅनिस्टरच्या केंद्रबिंदुपाशी एकमेकांना छेदते. म्हणजे ह्या बिंदुपाशी जाऊन जर तपासले तर इथे अतिशय उच्च निर्वात पोकळी आहे व दोन्ही बाजुला समान ताकदीने खेचणारे पोलराईझ्ड चुंबकीय क्षेत्र आहे. जेव्हा "अँटीमॅटर" आत खेचले जाते तेव्हा एकाच बाजुचा प्रभार सुरवातीला सुरु असतो, जेव्हा हे केंद्रबिंदुपाशी येते तेव्हा दुसर्‍या बाजुचा तेवढ्याच शक्तिशाली मात्र विरुद्ध प्रभाराचे चुंबकीय क्षेत्र कार्यान्वित होते ते अँटीमॅटर बरणीच्या केंद्रबिंदुपाशी "सस्पेंडेड" रहाते, ते बरणीला अथवा कुठल्याच मॅग्नेटला स्पर्श करत नाही. ते बरणीच्या आत "फ्लोटिंग" असते ..... अर्थात ही सर्व क्रिया अतिशीत तापमानातच केली जाते की जेणेकरुन अँटीमॅटरवर असलेला भार त्याच्या साठवणीसाठीच्या पातळीवर येईल... जेव्हा चुंबकीत क्षेत्र नष्ट होते अथवा बंद केले जाते तेव्हा आतल्या अँटीमॅटरचा बाहेरच्या मॅटरशी संयोग होऊन एक "महास्फोट" होतो त्याला "इनहिलीशन" म्हणातात .... "पार्टिकल फिजिक्स" हे माझे अभ्यासाचे क्षेत्र नसल्याने एवढीच माहिती मी देऊ शकतो. चु.भु.द्या.घ्या. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by आनंदयात्री

गोगोल 10/06/2009 - 23:04
बाकी मी बरेच दिवस तो शब्द लार्ज हार्ड ऑन कोलयडर असा वाचत होतो. एक दिवस चार चौघात जाहीर तसे बोलून दाखवले आणि लाज निघाली ;)

In reply to by गोगोल

छोटा डॉन 10/06/2009 - 23:20
तो शब्द हैड्रोजन नसुन "हैड्रॉन अथवा हैड्रोन" असा हवा आहे. मुळ प्रतिसादातच माझ्याकडुन चुक झाली होती, नंतर खरडवह्यात चर्चा करताना योग्य शब्द सापडला. पण उपप्रतिसाद दिला गेल्याने मला मुळ प्रतिसाद संपादित करण्याची सोय राहिली नाही ... तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे.
तुम्हाला हैड्रौन (hadron) म्हणायचं आहे का? ;-) आमच्यात याचा उच्चार हॅड्रॉन करतात, काही लोकं हॅड्लॉन असंही म्हणतात.

शार्दुल 09/06/2009 - 09:57
पुस्तकही वाचेन आणि पिक्चरही पाहीन,,,, ( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन ) जरुर लिही,,,, नेहा

डॉनराव, उत्कंठा वाढवलीत राव्..आता बघायलाच हवा हा सिनेमा. ठांकु बर्का ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085

मदनबाण 09/06/2009 - 11:06
उत्तम परिक्षण... :) मी पण सध्या दोन नविन चित्रपट पाहिले. १)आमिर :-- http://en.wikipedia.org/wiki/Aamir_(film) २)आयर्न मॅन :-- http://ironmanmovie.marvel.com/ दोन्ही फार वेगळे चित्रपट आहेत...जमल्यास नक्की बघ. :) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

छोटा डॉन 09/06/2009 - 11:24
अर्थातच आमच्या स्वभावानुसार आम्ही आधी पुस्तक वाचले, नेटवरुन भरमसाठ माहिती गोळा केली आणि मग पिक्चर पाहिला .... पण मला पिक्चर आणि पुस्तक ह्यांची तुलना नाही करु वाटत, एकाच गोष्टींवर बेतलेल्या असलेल्या तरी ह्या अगदी सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत असे मी मानतो .... शिवाय एवढे क्लिष्ठ आणि महान पुस्तक "फक्त २ तासाच्या सिनेमात" बसवणे म्हणजे त्याच्या पटकथेवर अन्याय होतो, पण ते सहाजिकच आहे त्यामुळे नो ऑफेन्स. स्वाभाविकच स्क्रीनच्या सोईसाठी चित्रपटात अनेक बदल केले आहेत. १. पुस्तकात अत्यंत ताकदवान असणार्‍या विट्टोरिया व्हेट्रा इथे चक्क नगाला नग म्हणले तरी चालेल अशी दिसते. २. सर्नचे प्रमुख मॅक्सम्युलर कोहलरांचे पात्र तर चक्क गायब आहे. ३. हॅसासिन अत्यंत साधा व सरळ दाखवला आहे. ४. पुस्तकात वर्णन केल्याच्या प्रमाणात क्रिप्टेक्स, व्हॅटिकन, सर्न आणि इतर चर्चेसचे डिटेल्स फक्त १० : २ ह्या प्रमाणात दाखवली आहेत, अर्थातच प्रॅक्टिकल लिमीटेशन्स हा मुद्दा महत्वाचा आहे .... ५. चित्रपटात बरीच रहस्ये अगदी सहज उकलतात, पुस्तकात पानेच्या पाने घातली आहेत. ६. चर्चचे कॉन्क्लेव्ह अत्यंत थोडक्यात पण तेवढ्याच प्रभावीपणे दाखवले गेले आहे, त्याचे कौतुक करावेच लागेल. ७. काही सार्वजनिक स्थळीवरचे मॉब शॉटच अत्यंत अप्रतिम .... असो. तुलना न करणे उत्तम, दोन्हीही आपापल्या परिघात श्रेष्ठच ...!!!! एकच सांगतो,शेवटी अत्यंत उंचावरुन शुट केलेला एक "व्हॅटिकन सिटीचा" शॉट आहे, अत्यंत जबरदस्त .... त्या शॉटसाठी चित्रपट पुन्हा पहायला हरकत नाही ... अवांतर : मेसन्स, ब्रदरहुड, इल्युमिनाटी आणि चर्च ह्याबद्दलचा लेख शक्य तितक्या लवकर लिहतो. आपल्याला असलेल्या जिज्ञासेबद्दल आभार .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

सुमीत 09/06/2009 - 11:29
डॉन्या, मस्तच लिहिले आहे. मला वाटले होते की हा चित्रपट थोडासा "डाय हार्ड ३" च्या दिशेने जात असेल पण आतानाही वाटत, बघीतलाच पाहिजे आत हा सिनेमा. " इल्यु मिनाती" बदल अजून लिहिच, वाट पहात आहे.

या लेखाकरता धन्यवाद रे डॉन्या तुला. आता सिनेमा आणि पुस्तक, दोन्ही 'मस्ट' आहेत! इतके दिवस नुसती चालढकल करत होते, आता दोन्ही पाहावंच लागेल!

वाह डॉनराव वाह ! उच्च परिक्षण, आता लगेच टोरँट डाउनलोडला लावलाच पाहिजे. तुमच्या पुढील लेखाची आतुरतेनी वाट पाहात आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

ऋषिकेश 09/06/2009 - 13:49
हे पुस्तक म्हणजे खरंतर डाविंचीचा "प्रिक्वेल"(पुर्वार्ध?)! मात्र डाविंची नंतर (की मुळे?) प्रसिद्धी मिळालेलं.. माझं हे डाविंचीच्या आधीच वाचून झालं होतं तेव्हाच प्रचंड आवडलं होतं .. हे पुस्तक वाचलेले असल्याने आणि ते खूप आवडल्याने चित्रपट बघावा की नाहि या द्विधेमधे होतो. चित्रपट पुस्तक वाचणार्‍यांनाहि आवडलाय हे तुझ्या परिक्षणामुळे कळल्याने आता बघतोच :) धन्यु! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

पण आता सिनेमा बघावा म्हणतोय. लेखासाठी धन्स रे डॉन्या... अवांतर -- 'दा विन्ची कोड' जर ऑडियो बुक स्वरूपात मिळाले तर जरूर ऐका... पुस्तक 'वाचून कसे दाखवावे' ह्याचा उत्तम धडा आहे:) त्याचप्रमाणे हॅरी पॉटर सिरीजमधल्या कुठल्याही पुस्तकाचे ऑडियो बुक. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

प्रियाली 10/06/2009 - 05:34
पुस्तक फार मागेच वाचले होते. ऐकलेही होते. चित्रपटही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. दा विन्चीपेक्षा जास्त आवडला. दा विन्चीही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. ;) सध्या डॅन ब्राऊनचे नवे पुस्तक द लॉस्ट सिम्बल बुक करून ठेवले आहे. सप्टेंबरात मिळेल. मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही. असो. त्याने चित्रपटाला वेगळी खुमारी आली असती.

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 10/06/2009 - 11:16
मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही.
अगदी करेक्ट प्रियालीताई, माझी चित्रपट पाहुन बाहेर आल्यावर फर्स्ट रिअ‍ॅक्शन अशीच होती. सर्नचा प्रमुख मॅक्सम्युलर कोह्लर दाखवायला हवा होता, मजा आली असती ... बाकी शेवटच्या रहस्याबाबत लिहणे योग्य नाही, की कसेबसे ते आवरतो आहे, चित्रपटात पहाणेच योग्य ..... मात्र हा चित्रपट व्यक्तिरेखांच्या बांधणीत जरासा कमी पडतो, अपवाद फक्त "केमरलिंगो"ची व्यक्तिरेखा. दा विंची कोड मध्ये जसे सर ली टिबींग, बेझु फाश, फादर अरिंगारोझा, खुनी सिलास जसे व्यवस्थित रंगवले गेले आहेत त्याची साफ कमी इथे जाणवते ... शिवाय दा विंची मध्ये जसा "फ्लॅशबॅकचा" प्रभावी वापर करून "प्रायरी, ब्रदरहुड, टेम्पलर" वगैरे दाखवले होते व इतिहास सांगितला होता तसे इथे काहिच नाही. जर फ्लॅशबॅकचा वापर "इल्युमिनाटी" व त्यांचा इतिहास दाखवण्यासाठी केला असता तर पिक्चर नक्की अजुन भारी झाला असता ... असो. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

सचीन जी 10/06/2009 - 12:05
डॅन ब्राउन मस्तच लिहतो. मला त्याचे "डीजीटल फोर्ट्रेस" सगळयात जास्त आवडले. चार पुस्तकानंतर डॅन ब्राउनचे नवीन पुस्तक आलेच नाही. कोणाला माहीत आहे का पाचवे पुस्तक कधी येणार ते?

वा!!! लै भारी डान्राव. लेख आणि नंतर आलेली माहीती पण. पुस्तक वाचणं जमेल की नाही माहित नाही. चित्रपट बघावाच लागेल. टॉरेंट हाय का कुनाकडं? बिपिन कार्यकर्ते

लै भारी परिक्षण रे डॉण्या..... पुस्तक वाचलेच आहे त्यामुळे चित्रपट पण पहायचा आहे. तुझा लेख वाचल्या बंतर तर आता नक्किच बघावा लागेल. "मेसन्स आणि इल्युमिनाटी" हा लेख लवकरच येवो ==निखिल

अबोल 08/06/2009 - 22:17
दा विंची कोड प्रथम बघितला तेव्हा डोक्यावरुन गेला. मग त्याचे पुस्तक वाचले तेव्हा तो समजला.तो एक सु॑दर चित्रपट होता. आता लवकरच हा चित्रपट पण बघायचाय

अंतु बर्वा 08/06/2009 - 23:08
मी सुद्धा पहिल्याच दिवशी पाहिला चित्रपट... एवढ्या मोठ्या novel ला २ तासाच्या वेळेत बसवणे म्हणजे खरंच खुप कठीण आहे... पण एक छान प्रयत्न म्हणून पाहायला हवा (आणी Tom Hanks साठी...) Da vinci कींवा angels and demons सारखे चित्रपट पाहण्यासाठी अशी काहितरी पार्श्वभुमी माहीत हवीचं. विशेषत: ज्यानी पुस्तक वाचलेले नाही त्यांच्यासाठी... ती तु थोड्क्यात परंतु सोप्या शब्दात मांड्ली आहेस... सो, गुड जॉब...

अनुप कोहळे 09/06/2009 - 00:44
पुस्तक फार वर्षांपुर्वी वाचाले होते...३ किंवा ४....त्यामुळे थोडेच आठवते.... हम्म....परत वाचावे लागेल...... छान परीक्षण.....

टारझन 09/06/2009 - 00:56
थँक्स रे डाणू ... आपल्याला बी पाहायचा होता पिक्चर .. परिक्षणही उत्तम जमलाव .. असाच लिहीत राहिलास तर लवकरंच "सिद्धहस्त लेखक" होशील .. हां .. पण त्यासाठी तुला खोड्या अंमळ कमी कराव्या लागतील आं ..

विकास 09/06/2009 - 01:23
परीक्षण आवडले! हा चित्रपट मी देखील गेल्याच आठवड्यात पाहीला. दा विंचीच्या बाबतीत पुस्तक आधी वाचले असल्याने चित्रपट तितकासा आवडला नव्हता. येथे पुस्तक वाचायाला सुरवात केली आणि तितक्यात अचानक चित्रपट पहायला जाणे झाले. थोडक्यात पुस्तक वाचायच्या आधी चित्रपट पाहील्याने तो अधिक आवडला असे वाटते.

बबलु 09/06/2009 - 01:56
चित्रपट मलाही आवडला (दा विंची कोड चित्रपटातील चुका टाळल्याहेत). :) पण पुस्तक मला जास्त आवडलं. पुस्तकातले असंख्य बारकावे २ तासाच्या चित्रपटात बसवणं तसंही अवघडच. परीक्षण मस्तच लिहिलंय. अभिनंदन. ....बबलु

आवडले... पुस्तक अर्धवटच म्हणजे १५० पाने वगैरे वाचले होते. :) बघू आता पूर्ण सिनेमा बघावा असा विचार आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

भाग्यश्री 09/06/2009 - 03:05
छान लिहीले आहेस रे.. सगळा लेख अगदी आवर्जून परत वाचण्यासारखा झालाय! पुस्तक दा विंचि पेक्षाही आवडते आहे.. त्यामुळे मुव्ही नक्कीच बघणार.. आणि या मुव्हीमधे चुकाही कमी केल्यात असं ऐकून आहे.. बघितल्यावर कळेल आता.. बायदवे, इल्युमिनातीचा तो अँबिग्राम पाहून आणि ती मजा कळल्यावर मी अवाक झाले होते !! www.bhagyashree.co.cc

Nile 09/06/2009 - 03:51
वा! मस्त परीक्षण! मला नेहमीच वाटत, एखाद्या सुंदर पुस्तकाचा सिनेमा करण हे खुपच अवघड कामं. त्यात पुस्तकात जसा पात्र, वातावरन निर्मितीला वाव असतो तेवढा सिनेमात असत नाही. त्यामुळे पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे. :) ) डिस्कव्हरी चॅनेल वर नुकतेच दा विंची कोड व एंजल्स अ‍ॅन्ड डीमन्स यावर कार्यक्रम झाले. त्यात सर्व "संकल्पनांचा" (उदा. अ‍ॅन्टीमॅटर, इल्युमीनाटी, प्रायरी, वगैरे) व्यवस्थीत अभ्यास, आढावा घेण्यात आला, जरुर पहाण्यासारखे कार्यक्रम. डॅन ब्राउनने अनेक खर्‍या गोष्टींपासुन सुरुवात करुन इतक्या सुंदर (काल्पनीक) कथा बनवल्या आहेत की त्याला सलाम करावासा वाटतो. उदा. अँटीमॅटर खरच CERN ने बनवलं आहे, त्याचा व्यवस्थीत त्याने अभ्यास केला, पण तेवढ्या अँटीमॅटर ने इतक नुकसान होउ शकत नाही असा ते बनवण्यार्‍या शास्त्रज्ञांचा दावा आहे. तसेच इल्युमिनाटी खरच होती आणी तिला फ्रेंच राज्यकर्त्यांनी (?) चर्चच्या मदतीने संपवली हे ही इतिहासकार मानतात, पण बाकी गोष्टी मात्र डॅनच्या कल्पनाशक्तीची उदाहरणं. :)

In reply to by Nile

आनंदयात्री 09/06/2009 - 10:05
>>पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे कांगो , अ‍ॅना अँड द किंग ऑफ सयाम हे असेच काही आधी कादंबरी नंतर चित्रपट असे पाहिलेले चित्रपट. परिक्षण छान आहे डान्या .. कर्मठतेच्या विरुद्ध असलेल्या मेसनरी चळवळी बद्दल जरुर टाक. (चळवळ शब्द किती भारतियीकरण करतो नाही ;) ) - (आंतरजालिय मेसन) किंग आंद्या सॉलोमन

सुबक ठेंगणी 09/06/2009 - 04:28
मी पुस्तक वाचले नाहिये...पण तुझ्या परिक्षणावरून वाचावंसं वाटतं आहे...मनापासून धन्यवाद... आणि भाग्यश्री म्हणते ती इल्युमिनातीच्या अँबिग्रामची मजा कोणती? का त्याच्यासाठी पुस्तक वाचू?

In reply to by सुबक ठेंगणी

भाग्यश्री 09/06/2009 - 08:03
अगं तेव्हढ्याचसाठी पुस्तक कशाला..! तो इल्युमिनातीचा लोगो आहे ना? तो साधा सरळ वाच, आणि नंतर शीर्षासन करून वाच.. दोन्हीकडून वाचता येतो.. त्याप्रकारच्या आकृतीला अँबिग्राम म्हणतात.. www.bhagyashree.co.cc

In reply to by भाग्यश्री

नविनच माहिती कळली. अँबिग्राम बद्दल. धन्यवाद. अवांतर: एक शंका आहे. शीर्षासन करण्यापेक्षा स्क्रीन उलटा करून वाचले तर चालेल का? ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by आनंदयात्री

'नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन' हे वाक्य ऐकलंच असेल तुम्ही. आता आम्हाला ते उलटंपालटं करून तर बघायचं आहे पण शीर्षासन? हॅहॅहॅ, अंमळ कठीण आहे सध्याच्या परिस्थितीत. म्हणून ही आयडिया. क बोल्तो? चालंन का? बिपिन कार्यकर्ते

In reply to by भाग्यश्री

छोटा डॉन 10/06/2009 - 22:56
>>जे सोप्पं जाईल ते करा! मी शीर्षासन करूनच वाचते अँबिग्राम्स! हरे राम ...!!! छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक किती डोके खाजवतात हे पाहुन आश्चर्य वाटले. कोणी शिर्षासन करुन वाचतो तर कोणी स्क्रीन उलटी फिरवुन वाचतो .... पण साधे उपाय कुणाला सुचत नाहीत ... मी एक सुवर्णमध्य देतो ... काय करायचे की स्क्रीन आहे ती तुर्तास जमिनीशी "४५ डिग्री" अंशाचा कोन करुन सेट करायची, व्यव्स्थीत उभी रहात नसल्यास स्क्रीनला भोके पाडुन त्यात दोर्‍याने ओवुन ती छताशी टांगा, पण कोन हा "४५ डिग्री" हवा. त्यानंतर तुम्ही स्वतः जमिनीशी "१३५ डिग्री"चा कोन करुन उभे रहा, ते कसे करायचे ते आम्ही नाही सांगणार, सगळे आम्हीच सांगितल्यावर तुम्ही काय करणार झाले, आहे काय आणि नाही काय ? हीच प्रक्रिया कोन आपटुपालटुन केली तरी चालते ... सोप्पं आहे की नाही ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया 09/06/2009 - 06:38
उत्तम परिक्षण. आवडले, येवु दे अजुन असेच सुरेख लेखन :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

सहज 09/06/2009 - 07:15
परिक्षण अतिशय आवडले. सिनेमा मनोरंजक आहे. ज्यांना मूळ कादंबरी, इतिहास फारशी माहीती नाही त्यांच्यासाठी हे परिक्षण नक्कीच उपयुक्त.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Nile 09/06/2009 - 11:54
नाही! ते बरणीतही(कॅनीस्टर) फ्लोटींगच असतं असंच डॅन म्हणतो! (ह्यावर ही चर्चा केली होती डीस्कव्हरीवाल्यांनी)

In reply to by Nile

छोटा डॉन 09/06/2009 - 13:09
नाईलरावांचे म्हणणे बरोबर आहे ... पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे आणि आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे खालील माहिती ह्यासंदर्भात उपयुक्त ठरेल ... जेव्हा "लार्ज हैड्रोजन कोलायडर"मध्ये अत्यंत गतिमान(अलमोस्ट लाईट स्पीड ) अशा भारीत कणांची ( पोलराईझ्ड बीम्सची ) टक्कर घडवुन आणतात तेव्हा त्यातुन "मॅटर ( जे पॄथ्वीवर सगळीकडे अस्तित्वात आहे)" व "अँटीमॅटर ( ज्याचे अस्तित्व अवकाशात आहे, पॄथ्वीवर ते एकटे सापडणे शक्य नाही )" असे २ पदार्थ तयार होतात. मग अतिशय उच्च ताकदीच्या व विरुद्ध प्रभार असलेल्या शक्तिशाली चुंबकाचा वापर करुन हे २ कण विरुद्ध दिशेला खेचले जातात की जेणेकरुन त्यांचा संयोग होणार नाही ... आता कॅनिस्टरबद्दल ... कॅनिस्टर म्हणजे काय तर एक शुद्ध बरणीच, मात्र ती आहे अतिशुद्ध अशा आयसोटोप्सची. बरणीचे मटेरियल हे "मॅटर"मध्येच मोडते. ह्या बरणीमध्ये अत्य्तंत शक्तिशाली निर्वात पोकळी तयार केली जाती. बरणीच्या २ टोकांना २ शक्तिशाली परंतु परस्परविरोधी प्रभार असलेले इलेक्ट्रोमॅग्नेट्स जोडलेल असतात. त्यांची मॅग्नेटिक रेडियस करेक्ट कॅनिस्टरच्या केंद्रबिंदुपाशी एकमेकांना छेदते. म्हणजे ह्या बिंदुपाशी जाऊन जर तपासले तर इथे अतिशय उच्च निर्वात पोकळी आहे व दोन्ही बाजुला समान ताकदीने खेचणारे पोलराईझ्ड चुंबकीय क्षेत्र आहे. जेव्हा "अँटीमॅटर" आत खेचले जाते तेव्हा एकाच बाजुचा प्रभार सुरवातीला सुरु असतो, जेव्हा हे केंद्रबिंदुपाशी येते तेव्हा दुसर्‍या बाजुचा तेवढ्याच शक्तिशाली मात्र विरुद्ध प्रभाराचे चुंबकीय क्षेत्र कार्यान्वित होते ते अँटीमॅटर बरणीच्या केंद्रबिंदुपाशी "सस्पेंडेड" रहाते, ते बरणीला अथवा कुठल्याच मॅग्नेटला स्पर्श करत नाही. ते बरणीच्या आत "फ्लोटिंग" असते ..... अर्थात ही सर्व क्रिया अतिशीत तापमानातच केली जाते की जेणेकरुन अँटीमॅटरवर असलेला भार त्याच्या साठवणीसाठीच्या पातळीवर येईल... जेव्हा चुंबकीत क्षेत्र नष्ट होते अथवा बंद केले जाते तेव्हा आतल्या अँटीमॅटरचा बाहेरच्या मॅटरशी संयोग होऊन एक "महास्फोट" होतो त्याला "इनहिलीशन" म्हणातात .... "पार्टिकल फिजिक्स" हे माझे अभ्यासाचे क्षेत्र नसल्याने एवढीच माहिती मी देऊ शकतो. चु.भु.द्या.घ्या. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by आनंदयात्री

गोगोल 10/06/2009 - 23:04
बाकी मी बरेच दिवस तो शब्द लार्ज हार्ड ऑन कोलयडर असा वाचत होतो. एक दिवस चार चौघात जाहीर तसे बोलून दाखवले आणि लाज निघाली ;)

In reply to by गोगोल

छोटा डॉन 10/06/2009 - 23:20
तो शब्द हैड्रोजन नसुन "हैड्रॉन अथवा हैड्रोन" असा हवा आहे. मुळ प्रतिसादातच माझ्याकडुन चुक झाली होती, नंतर खरडवह्यात चर्चा करताना योग्य शब्द सापडला. पण उपप्रतिसाद दिला गेल्याने मला मुळ प्रतिसाद संपादित करण्याची सोय राहिली नाही ... तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

In reply to by छोटा डॉन

तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे.
तुम्हाला हैड्रौन (hadron) म्हणायचं आहे का? ;-) आमच्यात याचा उच्चार हॅड्रॉन करतात, काही लोकं हॅड्लॉन असंही म्हणतात.

शार्दुल 09/06/2009 - 09:57
पुस्तकही वाचेन आणि पिक्चरही पाहीन,,,, ( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन ) जरुर लिही,,,, नेहा

डॉनराव, उत्कंठा वाढवलीत राव्..आता बघायलाच हवा हा सिनेमा. ठांकु बर्का ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085

मदनबाण 09/06/2009 - 11:06
उत्तम परिक्षण... :) मी पण सध्या दोन नविन चित्रपट पाहिले. १)आमिर :-- http://en.wikipedia.org/wiki/Aamir_(film) २)आयर्न मॅन :-- http://ironmanmovie.marvel.com/ दोन्ही फार वेगळे चित्रपट आहेत...जमल्यास नक्की बघ. :) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

छोटा डॉन 09/06/2009 - 11:24
अर्थातच आमच्या स्वभावानुसार आम्ही आधी पुस्तक वाचले, नेटवरुन भरमसाठ माहिती गोळा केली आणि मग पिक्चर पाहिला .... पण मला पिक्चर आणि पुस्तक ह्यांची तुलना नाही करु वाटत, एकाच गोष्टींवर बेतलेल्या असलेल्या तरी ह्या अगदी सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत असे मी मानतो .... शिवाय एवढे क्लिष्ठ आणि महान पुस्तक "फक्त २ तासाच्या सिनेमात" बसवणे म्हणजे त्याच्या पटकथेवर अन्याय होतो, पण ते सहाजिकच आहे त्यामुळे नो ऑफेन्स. स्वाभाविकच स्क्रीनच्या सोईसाठी चित्रपटात अनेक बदल केले आहेत. १. पुस्तकात अत्यंत ताकदवान असणार्‍या विट्टोरिया व्हेट्रा इथे चक्क नगाला नग म्हणले तरी चालेल अशी दिसते. २. सर्नचे प्रमुख मॅक्सम्युलर कोहलरांचे पात्र तर चक्क गायब आहे. ३. हॅसासिन अत्यंत साधा व सरळ दाखवला आहे. ४. पुस्तकात वर्णन केल्याच्या प्रमाणात क्रिप्टेक्स, व्हॅटिकन, सर्न आणि इतर चर्चेसचे डिटेल्स फक्त १० : २ ह्या प्रमाणात दाखवली आहेत, अर्थातच प्रॅक्टिकल लिमीटेशन्स हा मुद्दा महत्वाचा आहे .... ५. चित्रपटात बरीच रहस्ये अगदी सहज उकलतात, पुस्तकात पानेच्या पाने घातली आहेत. ६. चर्चचे कॉन्क्लेव्ह अत्यंत थोडक्यात पण तेवढ्याच प्रभावीपणे दाखवले गेले आहे, त्याचे कौतुक करावेच लागेल. ७. काही सार्वजनिक स्थळीवरचे मॉब शॉटच अत्यंत अप्रतिम .... असो. तुलना न करणे उत्तम, दोन्हीही आपापल्या परिघात श्रेष्ठच ...!!!! एकच सांगतो,शेवटी अत्यंत उंचावरुन शुट केलेला एक "व्हॅटिकन सिटीचा" शॉट आहे, अत्यंत जबरदस्त .... त्या शॉटसाठी चित्रपट पुन्हा पहायला हरकत नाही ... अवांतर : मेसन्स, ब्रदरहुड, इल्युमिनाटी आणि चर्च ह्याबद्दलचा लेख शक्य तितक्या लवकर लिहतो. आपल्याला असलेल्या जिज्ञासेबद्दल आभार .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

सुमीत 09/06/2009 - 11:29
डॉन्या, मस्तच लिहिले आहे. मला वाटले होते की हा चित्रपट थोडासा "डाय हार्ड ३" च्या दिशेने जात असेल पण आतानाही वाटत, बघीतलाच पाहिजे आत हा सिनेमा. " इल्यु मिनाती" बदल अजून लिहिच, वाट पहात आहे.

या लेखाकरता धन्यवाद रे डॉन्या तुला. आता सिनेमा आणि पुस्तक, दोन्ही 'मस्ट' आहेत! इतके दिवस नुसती चालढकल करत होते, आता दोन्ही पाहावंच लागेल!

वाह डॉनराव वाह ! उच्च परिक्षण, आता लगेच टोरँट डाउनलोडला लावलाच पाहिजे. तुमच्या पुढील लेखाची आतुरतेनी वाट पाहात आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

ऋषिकेश 09/06/2009 - 13:49
हे पुस्तक म्हणजे खरंतर डाविंचीचा "प्रिक्वेल"(पुर्वार्ध?)! मात्र डाविंची नंतर (की मुळे?) प्रसिद्धी मिळालेलं.. माझं हे डाविंचीच्या आधीच वाचून झालं होतं तेव्हाच प्रचंड आवडलं होतं .. हे पुस्तक वाचलेले असल्याने आणि ते खूप आवडल्याने चित्रपट बघावा की नाहि या द्विधेमधे होतो. चित्रपट पुस्तक वाचणार्‍यांनाहि आवडलाय हे तुझ्या परिक्षणामुळे कळल्याने आता बघतोच :) धन्यु! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

पण आता सिनेमा बघावा म्हणतोय. लेखासाठी धन्स रे डॉन्या... अवांतर -- 'दा विन्ची कोड' जर ऑडियो बुक स्वरूपात मिळाले तर जरूर ऐका... पुस्तक 'वाचून कसे दाखवावे' ह्याचा उत्तम धडा आहे:) त्याचप्रमाणे हॅरी पॉटर सिरीजमधल्या कुठल्याही पुस्तकाचे ऑडियो बुक. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

प्रियाली 10/06/2009 - 05:34
पुस्तक फार मागेच वाचले होते. ऐकलेही होते. चित्रपटही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. दा विन्चीपेक्षा जास्त आवडला. दा विन्चीही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. ;) सध्या डॅन ब्राऊनचे नवे पुस्तक द लॉस्ट सिम्बल बुक करून ठेवले आहे. सप्टेंबरात मिळेल. मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही. असो. त्याने चित्रपटाला वेगळी खुमारी आली असती.

In reply to by प्रियाली

छोटा डॉन 10/06/2009 - 11:16
मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही.
अगदी करेक्ट प्रियालीताई, माझी चित्रपट पाहुन बाहेर आल्यावर फर्स्ट रिअ‍ॅक्शन अशीच होती. सर्नचा प्रमुख मॅक्सम्युलर कोह्लर दाखवायला हवा होता, मजा आली असती ... बाकी शेवटच्या रहस्याबाबत लिहणे योग्य नाही, की कसेबसे ते आवरतो आहे, चित्रपटात पहाणेच योग्य ..... मात्र हा चित्रपट व्यक्तिरेखांच्या बांधणीत जरासा कमी पडतो, अपवाद फक्त "केमरलिंगो"ची व्यक्तिरेखा. दा विंची कोड मध्ये जसे सर ली टिबींग, बेझु फाश, फादर अरिंगारोझा, खुनी सिलास जसे व्यवस्थित रंगवले गेले आहेत त्याची साफ कमी इथे जाणवते ... शिवाय दा विंची मध्ये जसा "फ्लॅशबॅकचा" प्रभावी वापर करून "प्रायरी, ब्रदरहुड, टेम्पलर" वगैरे दाखवले होते व इतिहास सांगितला होता तसे इथे काहिच नाही. जर फ्लॅशबॅकचा वापर "इल्युमिनाटी" व त्यांचा इतिहास दाखवण्यासाठी केला असता तर पिक्चर नक्की अजुन भारी झाला असता ... असो. ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

सचीन जी 10/06/2009 - 12:05
डॅन ब्राउन मस्तच लिहतो. मला त्याचे "डीजीटल फोर्ट्रेस" सगळयात जास्त आवडले. चार पुस्तकानंतर डॅन ब्राउनचे नवीन पुस्तक आलेच नाही. कोणाला माहीत आहे का पाचवे पुस्तक कधी येणार ते?

वा!!! लै भारी डान्राव. लेख आणि नंतर आलेली माहीती पण. पुस्तक वाचणं जमेल की नाही माहित नाही. चित्रपट बघावाच लागेल. टॉरेंट हाय का कुनाकडं? बिपिन कार्यकर्ते
लेखनविषय:
डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ... जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे. टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ...

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

ॐकार ·

In reply to by पर्नल नेने मराठे

ॐकार 07/06/2009 - 18:51
मी स्वतः जीमेल वापरतो आहे.... :s नक्की काय घोळ असेल सांगत येत नाही... या आधीतरी असा घोळ झालेला नाही :(

मदनबाण 07/06/2009 - 18:45
भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सुविधा सुरु केल्या बद्धल ॐकारराव आपले अभिनंदन!!! पासवर्ड तर आलाय पण ejioji username: आणि your e-mail: या पैकी फक्त आपल्या इ-मेल आयडी नेच लॉगिन मिळते मग ejioji username कुठे वापरायचे ते कळले नाही !!! आत लॉगिन केल्यावर मोझिला मधे वेब पेज वर असलेल्या फिल्ड्स हलवता येतात(माय फ्रेन्ड्स,सर्च बाय ए-मेल इं.) वेलकम नाव काही तरी वेगळ्याच फॉन्ट मधे दिसते... लॉग आउट वर टिचकी मारल्यास लॉग आउट होत नाही... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

In reply to by मदनबाण

ॐकार 07/06/2009 - 18:47
युजरनेम हे प्रवेश केल्यावर दिसते. त्याचा प्रवेशाशी संबंध नाही :) फिल्ड्स हलवता येणे ही सोय आहे :D वेलकमचा घोळ मेलद्वारे कळवल्यास सोडवणे सोपे होईल...

In reply to by Nile

ऍडीजोशी 07/06/2009 - 22:42
मलाच का देत नाही हा पासवर्द ह्या वाक्यातील मलाच का देत नाही हा हा भाग मराठीत असून तो बरोबर लिहिलेला आहे. पासवर्द हा शब्द इंग्रजी आहे त्यामुळे अशुद्ध मराठीचा तुमचा मुद्दा इथे गैरलागू आहे :) :) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Nile 08/06/2009 - 07:45
अहो आम्ही शुद्ध लिहिणार्‍याला असे म्हणालो (इथला) प्रतिसाद शुद्ध असणार्‍याला नाही. :) असो! कल्जी घेने! ;)

केवळ_विशेष 12/06/2009 - 15:12
शिस्तीत जमलं सगळं... पण चॅटबॉक्स तर रिकामाच आहे... त्यात इमेल अ‍ॅडरेसेस सोडायचे का?

शाहरुख 13/06/2009 - 01:35
जीटॉक आणि आता याहू मेसेंजर मधे युनिकोडने (बरहा सारखी सुविधा वापरुन ) मराठी आणि ईतर भारतीय भाषांमधून टंकता येते ना.. आपल्या सुविधेचे नाव मात्र खुप आवडले !! एजीओजी ला शुभेच्छा.

In reply to by पर्नल नेने मराठे

ॐकार 07/06/2009 - 18:51
मी स्वतः जीमेल वापरतो आहे.... :s नक्की काय घोळ असेल सांगत येत नाही... या आधीतरी असा घोळ झालेला नाही :(

मदनबाण 07/06/2009 - 18:45
भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सुविधा सुरु केल्या बद्धल ॐकारराव आपले अभिनंदन!!! पासवर्ड तर आलाय पण ejioji username: आणि your e-mail: या पैकी फक्त आपल्या इ-मेल आयडी नेच लॉगिन मिळते मग ejioji username कुठे वापरायचे ते कळले नाही !!! आत लॉगिन केल्यावर मोझिला मधे वेब पेज वर असलेल्या फिल्ड्स हलवता येतात(माय फ्रेन्ड्स,सर्च बाय ए-मेल इं.) वेलकम नाव काही तरी वेगळ्याच फॉन्ट मधे दिसते... लॉग आउट वर टिचकी मारल्यास लॉग आउट होत नाही... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

In reply to by मदनबाण

ॐकार 07/06/2009 - 18:47
युजरनेम हे प्रवेश केल्यावर दिसते. त्याचा प्रवेशाशी संबंध नाही :) फिल्ड्स हलवता येणे ही सोय आहे :D वेलकमचा घोळ मेलद्वारे कळवल्यास सोडवणे सोपे होईल...

In reply to by Nile

ऍडीजोशी 07/06/2009 - 22:42
मलाच का देत नाही हा पासवर्द ह्या वाक्यातील मलाच का देत नाही हा हा भाग मराठीत असून तो बरोबर लिहिलेला आहे. पासवर्द हा शब्द इंग्रजी आहे त्यामुळे अशुद्ध मराठीचा तुमचा मुद्दा इथे गैरलागू आहे :) :) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Nile 08/06/2009 - 07:45
अहो आम्ही शुद्ध लिहिणार्‍याला असे म्हणालो (इथला) प्रतिसाद शुद्ध असणार्‍याला नाही. :) असो! कल्जी घेने! ;)

केवळ_विशेष 12/06/2009 - 15:12
शिस्तीत जमलं सगळं... पण चॅटबॉक्स तर रिकामाच आहे... त्यात इमेल अ‍ॅडरेसेस सोडायचे का?

शाहरुख 13/06/2009 - 01:35
जीटॉक आणि आता याहू मेसेंजर मधे युनिकोडने (बरहा सारखी सुविधा वापरुन ) मराठी आणि ईतर भारतीय भाषांमधून टंकता येते ना.. आपल्या सुविधेचे नाव मात्र खुप आवडले !! एजीओजी ला शुभेच्छा.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(१)

वर्षा ·

टुकुल 03/06/2009 - 02:31
ओ.. माझ नाव जपानी लिपित लिहुन देता का? (जपानी का) :-) मस्त लिहित आहात.. अजुन येवुद्यात. --टुकुल.

In reply to by टुकुल

वर्षा 04/06/2009 - 00:04
ओ टुकुल-सान , काय नावाचा टॅटू करायचाय का?:) तुमचं खरं नाव मुकुल आहे असं धरल्यास तुमच्या नावाचा जपानी उच्चार 'मुकुरु' होईल आणि ते असं दिसेल ムクル आणि टुकुल असल्यास त्याचा उच्चार 'त्सुकुरु' असा होईल आणि लिपीत असं असेल ツクル (You need to have Japanese Language Text Support installed to view the Japanese script properly)

रेवती 03/06/2009 - 07:23
हा भाग बर्‍यापैकी समजला. बाई, आजचा गृहपाठ देणार का?(हलके घेणे) रेवती

क्रान्ति 03/06/2009 - 07:39
मस्त लिहिलाय लेख! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सुबक ठेंगणी 03/06/2009 - 07:45
जपानी-मराठी भगिनी-भगिनी असं वाटत असतानाच येणारा एक इनोद (नक्की विनोदच का हे ज्याचे त्याने ठरवावे.) जपानीत "आहो" म्हणजे "वेडा" आपल्याकडे एजमानांना "अहो" म्हणायची जी पद्धत आहे ते जपानी "आहो"चेच अपभ्रष्ट रूप आहे असा काही भाषेच्या जाणकारांचा दावा आहे. :P मस्त लेख. मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय.

In reply to by सुबक ठेंगणी

विंजिनेर 03/06/2009 - 08:20
खरयं बुवा... बाकी पतीला असली काही नावं ठेवण्यात भाषांमधे स्पर्धाच असते बहुदा (त्यात पुन्हा "भाषा" शब्द सगळ्या भाषांमधे स्त्रीलिंगी :() मराठीतला कायम बायकोच्या आज्ञेत राहून अखंड काम करणारा "नवरा" जेव्हा गुजरातीत जातो तो "रिकामटेकडा" होऊन जातो... चालायचंच... जगाला भोळ्या, निरागस आणि निष्पाप अशा, नवर्‍यांची कदर नसते हेच खरं... :( असो. जपानी भाषालेख छान... ती शितो-बितो ( कामबिम च्या चालीवर) ची गंमत पण सांगा ओ वर्षा-सान! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

प्राजु 03/06/2009 - 08:29
अतिशय इंटरेस्टींग झाला आहे हा भाग. खूप आवडला. लवकर लवकर लिहा पुढचे भाग. खूप उत्सुकता आहे बाकीच्या भागांबद्दल आणि जपानी भाषेबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मस्त झाला आहे ग हा भाग, खूप इंटरेस्टींग झाला आहे. पुढचे भाग लवकर लवकर येऊ देत, स्वाती

मस्त कलंदर 03/06/2009 - 11:24
बाकी भाषेतली साम्यं बर्‍याच ठिकाणी आढळतात.. जाणकारांचं असंही मत आहे.. की इंग्रजी नि संस्कृत थोड्या जवळ जवळ्च्या भाषा आहेत.. जसं (इं) पाथ = (सं) पथ, इं) हजबंड = (सं) ह्स्तबंध(लग्नातली एक क्रिया तद्भव)... अर्थात.. यांतही मतांतरे आहेतच.. अवांतरः रूबरू या (बहुधा) मॉरिशस मध्ये चित्रित झालेल्या सिनेमात भारतीय नायक-नायिका तिथल्या बोलीभषेत धन्यवाद म्हणताना "कापून खा" असं म्हणतात.. :D मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

वर्षा 04/06/2009 - 00:14
>>बाकी भाषेतली साम्यं बर्‍याच ठिकाणी आढळतात.. खरंय. यावरुनच आठवलं, "या मुंडा-ऑस्ट्रिक संस्कृतीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो आर्यांच्या भाषेवर, म्हणजे संस्कृतवर. भारतात बोलल्या जाणार्‍या भाषांचे साधारण तीन गट पाडता येतील. उत्तरेत बोलल्या जाणार्‍या संस्कृत व संस्कृतोद्भव भाषा, दक्षिणेतील तमिळ, व तिसरी मुंडांची आदिम भाषा. यांपैकी संस्कृत, पर्शियन व युरोपियन भाषा एकमेकींना अतिशय जवळ आहेत. तमिळ भाषेचे द्रविडी व फिनीश, एस्टोनियन भाषांशी साम्य आहे. यांपैकी पहिल्या दोन गटांतील भाषांनी ऑस्ट्रिक भाषेकडून बरीच उधारउसनवार तर केलीच, शिवाय आपापसातही त्यांची बरीच देवाणघेवाण झाली. ऑस्ट्रिक भाषेतील अनेक शब्द संस्कृत व तमिळ भाषेत आले. उदाहरणार्थ, मुंडा भाषेत 'जोम' म्हणजे खाणे. या शब्दाचं रूप चोम-ला, आणि त्यापासून तयार झाला चावल. रागी, माष (माठ), मुद्ग (मुग), मसूर, तांदुल या शब्दांचा उगमसुद्धा मुंडा भाषेतच आहे. वतिंगन/ वार्टक/ वृंटक (वांगे), अळाबु (लाल भोपळा), तुंडी (तोंडले), पतोल (पडवळ), कदली (केळे), पनस (फणस) , नागरंग (नारिंगे, पुढे इंग्रजीत orange), चिंचा (चिंच), हरिद्रा (हळद), तांबूल (विड्याचे पान), गुवाक (सुपारी) हे सर्व संस्कृत शब्द मुंडा भाषेतून आले. मुंडा भाषेत न्यु/न्गाई म्हणजे तेल किंवा अर्क. कोलाई म्हणजे दाणा. हे दोन शब्द एकत्र आले आणि नारिकेल (नारळ) हा शब्द तयार झाला." संदर्भः http://www.maayboli.com/node/2802 असो. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)

रोचीन 03/06/2009 - 12:00
वर्षा-सान, कोनिचिवा!!! दो देस का. गो नेन माए ए.एस्.बी. दे हाताराइते इमाश्ता का. :? कोनो किजी गा ईई ने!!!!मोत्तो काइते कुदासाइ ने!!!! :)

आनंदयात्री 03/06/2009 - 12:41
सुंदर लेख वर्षा सान. पुढले भाग पटापट येउ द्या .. वाचतांना मौज वाटतेय :) वाताशिवा निहोंगो बेंक्युशिमास. :D

शाल्मली 03/06/2009 - 13:28
मस्त झाला आहे हा भाग! आवडला. जपानी शब्द छान वाटत आहेत. पुढच्या भागात अजून असेच शब्द येऊदेत.. यावरुन माझी एक मैत्रिण जपानी शिकत असताना तिने मला कुठलंतरी एक जपानी बडबडगीत शिकवलं होतं- फुलपाखरावर होतं. आता आठवत नाहीये पण साकोरे-चोचो असे काहीतरी शब्द होते. त्याची आठवण झाली. :) --शाल्मली.

भाग्यश्री 03/06/2009 - 23:30
हेहे.. जॅपनिज मला भयंकर आवडते.. आई, भाऊ, अनेक मैत्रिणी जॅपनिज शिकल्यामुळे मला फार आवडते ती.. कधी कधी कळते देखील.. पण स्वतः नीट शिकणे काही होत नाहीये! सुरवात बर्‍याचदा केली.. कांजी पण काढल्या! पण वाताशिवा भाग्यश्री देस! कोन्निचिवा अशा बेसिक्सच्या पलिकडे काही येत नाही! :) तुम्ही जरा बेसिक्स पासून सुरू करा ना.. जॅपनिज येणारे खूप लोक्स असतात... शिकायला मजा येईल.. असो, मस्त लेख लिहील्याबद्दल अरिगातो गोझाईमाशिता!!! :) www.bhagyashree.co.cc

का एवढा लहानसाच लेख लिहिलात? वाचायला मजा आली पण अजून बरंच काही वाचायला आवडलं असतं. आता लिहा बरं लवकर लवकर... भाग्यश्री म्हणते तसं, जपानी भाषेच्या बेसिक्स पासून सुरूवात करा बरं... बिपिन कार्यकर्ते

वर्षा 04/06/2009 - 00:18
सुबक, >>मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय. आतापर्यंत लिहिले का नाहीस? ओनेगाई शिमास! (प्लीज..) :) बाकी भाग्यश्री, बिपीन, शाल्मली, आनंदयात्री, रोचीन, सहज, स्वातीताई, प्राजु, विंजिनेर, क्रान्ति, रेवती सर्वांना आरिगतो! (धन्यवाद) :)

सँडी 06/06/2009 - 23:59
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो. तानाका कायत्ता. (तानाका परत गेला/ली) या वाक्यात तानाका स्त्री का पुरुष हे समजत नाय. 記事が面白い。(चु.भु.दे.घे.)

In reply to by सँडी

सुनील 07/06/2009 - 12:04
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो. बंगालीतही पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात. इतकेच कशाला इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

वर्षा 08/06/2009 - 02:01
>>इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे? पण इंग्रजीमध्ये नावाआधी Mr./Mrs/Ms लिहिल्यामुळे असा गोंधळ होत नाही. पण जपानीत होतो. कारण जपानीत 'Mr./Mrs/Ms' साठी 'सान' हा कॉमन शब्द आहे. त्यामुळे सॅंडी म्हणाले तसं 'तानाका-सान' म्हटल्यास तानाका ही व्यक्ती बुवा की बाई हा बोध होत नाही! :) हं पण तानाकाचं first name जर माहिती असेल तर असा गोंधळ होणार नाही. कारण जपानी मुलांच्या नावाच्या शेवटी साधारणपणे '-रो', 'रु' 'ता' अशी अक्षरे असतात (उदा. इचिरो, वातारु वगैरे) तर मुलींच्या '-को' किंवा '-ए' (मिचिको, सानाए वगैरे.) अर्थात हा ढोबळ नियम आहे. :)

अनिल हटेला 12/06/2009 - 18:53
मस्तच आहे जपानी भाषा ... चला आता पूढचा भाग पटकन येउ देत !! बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

टुकुल 03/06/2009 - 02:31
ओ.. माझ नाव जपानी लिपित लिहुन देता का? (जपानी का) :-) मस्त लिहित आहात.. अजुन येवुद्यात. --टुकुल.

In reply to by टुकुल

वर्षा 04/06/2009 - 00:04
ओ टुकुल-सान , काय नावाचा टॅटू करायचाय का?:) तुमचं खरं नाव मुकुल आहे असं धरल्यास तुमच्या नावाचा जपानी उच्चार 'मुकुरु' होईल आणि ते असं दिसेल ムクル आणि टुकुल असल्यास त्याचा उच्चार 'त्सुकुरु' असा होईल आणि लिपीत असं असेल ツクル (You need to have Japanese Language Text Support installed to view the Japanese script properly)

रेवती 03/06/2009 - 07:23
हा भाग बर्‍यापैकी समजला. बाई, आजचा गृहपाठ देणार का?(हलके घेणे) रेवती

क्रान्ति 03/06/2009 - 07:39
मस्त लिहिलाय लेख! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सुबक ठेंगणी 03/06/2009 - 07:45
जपानी-मराठी भगिनी-भगिनी असं वाटत असतानाच येणारा एक इनोद (नक्की विनोदच का हे ज्याचे त्याने ठरवावे.) जपानीत "आहो" म्हणजे "वेडा" आपल्याकडे एजमानांना "अहो" म्हणायची जी पद्धत आहे ते जपानी "आहो"चेच अपभ्रष्ट रूप आहे असा काही भाषेच्या जाणकारांचा दावा आहे. :P मस्त लेख. मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय.

In reply to by सुबक ठेंगणी

विंजिनेर 03/06/2009 - 08:20
खरयं बुवा... बाकी पतीला असली काही नावं ठेवण्यात भाषांमधे स्पर्धाच असते बहुदा (त्यात पुन्हा "भाषा" शब्द सगळ्या भाषांमधे स्त्रीलिंगी :() मराठीतला कायम बायकोच्या आज्ञेत राहून अखंड काम करणारा "नवरा" जेव्हा गुजरातीत जातो तो "रिकामटेकडा" होऊन जातो... चालायचंच... जगाला भोळ्या, निरागस आणि निष्पाप अशा, नवर्‍यांची कदर नसते हेच खरं... :( असो. जपानी भाषालेख छान... ती शितो-बितो ( कामबिम च्या चालीवर) ची गंमत पण सांगा ओ वर्षा-सान! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

प्राजु 03/06/2009 - 08:29
अतिशय इंटरेस्टींग झाला आहे हा भाग. खूप आवडला. लवकर लवकर लिहा पुढचे भाग. खूप उत्सुकता आहे बाकीच्या भागांबद्दल आणि जपानी भाषेबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मस्त झाला आहे ग हा भाग, खूप इंटरेस्टींग झाला आहे. पुढचे भाग लवकर लवकर येऊ देत, स्वाती

मस्त कलंदर 03/06/2009 - 11:24
बाकी भाषेतली साम्यं बर्‍याच ठिकाणी आढळतात.. जाणकारांचं असंही मत आहे.. की इंग्रजी नि संस्कृत थोड्या जवळ जवळ्च्या भाषा आहेत.. जसं (इं) पाथ = (सं) पथ, इं) हजबंड = (सं) ह्स्तबंध(लग्नातली एक क्रिया तद्भव)... अर्थात.. यांतही मतांतरे आहेतच.. अवांतरः रूबरू या (बहुधा) मॉरिशस मध्ये चित्रित झालेल्या सिनेमात भारतीय नायक-नायिका तिथल्या बोलीभषेत धन्यवाद म्हणताना "कापून खा" असं म्हणतात.. :D मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

वर्षा 04/06/2009 - 00:14
>>बाकी भाषेतली साम्यं बर्‍याच ठिकाणी आढळतात.. खरंय. यावरुनच आठवलं, "या मुंडा-ऑस्ट्रिक संस्कृतीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला तो आर्यांच्या भाषेवर, म्हणजे संस्कृतवर. भारतात बोलल्या जाणार्‍या भाषांचे साधारण तीन गट पाडता येतील. उत्तरेत बोलल्या जाणार्‍या संस्कृत व संस्कृतोद्भव भाषा, दक्षिणेतील तमिळ, व तिसरी मुंडांची आदिम भाषा. यांपैकी संस्कृत, पर्शियन व युरोपियन भाषा एकमेकींना अतिशय जवळ आहेत. तमिळ भाषेचे द्रविडी व फिनीश, एस्टोनियन भाषांशी साम्य आहे. यांपैकी पहिल्या दोन गटांतील भाषांनी ऑस्ट्रिक भाषेकडून बरीच उधारउसनवार तर केलीच, शिवाय आपापसातही त्यांची बरीच देवाणघेवाण झाली. ऑस्ट्रिक भाषेतील अनेक शब्द संस्कृत व तमिळ भाषेत आले. उदाहरणार्थ, मुंडा भाषेत 'जोम' म्हणजे खाणे. या शब्दाचं रूप चोम-ला, आणि त्यापासून तयार झाला चावल. रागी, माष (माठ), मुद्ग (मुग), मसूर, तांदुल या शब्दांचा उगमसुद्धा मुंडा भाषेतच आहे. वतिंगन/ वार्टक/ वृंटक (वांगे), अळाबु (लाल भोपळा), तुंडी (तोंडले), पतोल (पडवळ), कदली (केळे), पनस (फणस) , नागरंग (नारिंगे, पुढे इंग्रजीत orange), चिंचा (चिंच), हरिद्रा (हळद), तांबूल (विड्याचे पान), गुवाक (सुपारी) हे सर्व संस्कृत शब्द मुंडा भाषेतून आले. मुंडा भाषेत न्यु/न्गाई म्हणजे तेल किंवा अर्क. कोलाई म्हणजे दाणा. हे दोन शब्द एकत्र आले आणि नारिकेल (नारळ) हा शब्द तयार झाला." संदर्भः http://www.maayboli.com/node/2802 असो. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद :)

रोचीन 03/06/2009 - 12:00
वर्षा-सान, कोनिचिवा!!! दो देस का. गो नेन माए ए.एस्.बी. दे हाताराइते इमाश्ता का. :? कोनो किजी गा ईई ने!!!!मोत्तो काइते कुदासाइ ने!!!! :)

आनंदयात्री 03/06/2009 - 12:41
सुंदर लेख वर्षा सान. पुढले भाग पटापट येउ द्या .. वाचतांना मौज वाटतेय :) वाताशिवा निहोंगो बेंक्युशिमास. :D

शाल्मली 03/06/2009 - 13:28
मस्त झाला आहे हा भाग! आवडला. जपानी शब्द छान वाटत आहेत. पुढच्या भागात अजून असेच शब्द येऊदेत.. यावरुन माझी एक मैत्रिण जपानी शिकत असताना तिने मला कुठलंतरी एक जपानी बडबडगीत शिकवलं होतं- फुलपाखरावर होतं. आता आठवत नाहीये पण साकोरे-चोचो असे काहीतरी शब्द होते. त्याची आठवण झाली. :) --शाल्मली.

भाग्यश्री 03/06/2009 - 23:30
हेहे.. जॅपनिज मला भयंकर आवडते.. आई, भाऊ, अनेक मैत्रिणी जॅपनिज शिकल्यामुळे मला फार आवडते ती.. कधी कधी कळते देखील.. पण स्वतः नीट शिकणे काही होत नाहीये! सुरवात बर्‍याचदा केली.. कांजी पण काढल्या! पण वाताशिवा भाग्यश्री देस! कोन्निचिवा अशा बेसिक्सच्या पलिकडे काही येत नाही! :) तुम्ही जरा बेसिक्स पासून सुरू करा ना.. जॅपनिज येणारे खूप लोक्स असतात... शिकायला मजा येईल.. असो, मस्त लेख लिहील्याबद्दल अरिगातो गोझाईमाशिता!!! :) www.bhagyashree.co.cc

का एवढा लहानसाच लेख लिहिलात? वाचायला मजा आली पण अजून बरंच काही वाचायला आवडलं असतं. आता लिहा बरं लवकर लवकर... भाग्यश्री म्हणते तसं, जपानी भाषेच्या बेसिक्स पासून सुरूवात करा बरं... बिपिन कार्यकर्ते

वर्षा 04/06/2009 - 00:18
सुबक, >>मला इथे इंग्रजी शिकवताना येणारे इनोदी अनुभव लिहून ठेवायला पाहिजेत असं वाटायला लागलंय. आतापर्यंत लिहिले का नाहीस? ओनेगाई शिमास! (प्लीज..) :) बाकी भाग्यश्री, बिपीन, शाल्मली, आनंदयात्री, रोचीन, सहज, स्वातीताई, प्राजु, विंजिनेर, क्रान्ति, रेवती सर्वांना आरिगतो! (धन्यवाद) :)

सँडी 06/06/2009 - 23:59
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो. तानाका कायत्ता. (तानाका परत गेला/ली) या वाक्यात तानाका स्त्री का पुरुष हे समजत नाय. 記事が面白い。(चु.भु.दे.घे.)

In reply to by सँडी

सुनील 07/06/2009 - 12:04
जपानी भाषेत पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात, जबरा गोंधळ असतो. बंगालीतही पुल्लिंगी/स्त्रीलिंगी क्रियापदे नसतात. इतकेच कशाला इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

वर्षा 08/06/2009 - 02:01
>>इंग्लीशमध्येतरी कुठे असतात वेगळी क्रियापदे? काय गोंधळ होतो त्यामुळे? पण इंग्रजीमध्ये नावाआधी Mr./Mrs/Ms लिहिल्यामुळे असा गोंधळ होत नाही. पण जपानीत होतो. कारण जपानीत 'Mr./Mrs/Ms' साठी 'सान' हा कॉमन शब्द आहे. त्यामुळे सॅंडी म्हणाले तसं 'तानाका-सान' म्हटल्यास तानाका ही व्यक्ती बुवा की बाई हा बोध होत नाही! :) हं पण तानाकाचं first name जर माहिती असेल तर असा गोंधळ होणार नाही. कारण जपानी मुलांच्या नावाच्या शेवटी साधारणपणे '-रो', 'रु' 'ता' अशी अक्षरे असतात (उदा. इचिरो, वातारु वगैरे) तर मुलींच्या '-को' किंवा '-ए' (मिचिको, सानाए वगैरे.) अर्थात हा ढोबळ नियम आहे. :)

अनिल हटेला 12/06/2009 - 18:53
मस्तच आहे जपानी भाषा ... चला आता पूढचा भाग पटकन येउ देत !! बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
लेखनविषय:
3

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

भोचक ·

बहुगुणी 20/05/2009 - 20:20
..पण कालच म. टा. मध्ये वाचलेल्या प्रताप आसबेंच्या या लेखाचा 'मान' राखून पवारांनी राजकारण-संन्यास घेतला तर? वर सुचवलेल्या ४ पेक्षा एक नवीनच पर्याय त्या पक्षातील इतर नेत्यांना घ्यावा लागेल. पवारांच्या अनुपस्थितीत ही इतर मंडळी काय करतील हाही उत्सुकतेचा विषय असू शकेल.

नितिन थत्ते 20/05/2009 - 20:42
पवार जरी राष्ट्रवादी नावाच्या पक्षात असले तरी ती काँग्रेसचीच एक शाखा आहे. म्हणजे विचारसरणी वगैरे सर्व काँग्रेसचीच आहे. पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते महाराष्ट्रात काँग्रेसचे सगळ्यात बलवान नेते होते. १९९० विधानसभेत सेना भाजप ची मुसंडी त्यांनी एकहाती थोपवली होती. प्रादेशिक नेतृत्वाला फुलू न देण्याच्या काँग्रेसच्या धोरणातून पवारांना काँग्रेसमध्ये दडपण्याचे प्रयत्न चालू राहिले. एके काळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यास पवारविरोधक असणे ही आवश्यक अट होती. या अडथळ्यांतून मॅनूव्हर करताना पवारांनीही काही खेळ्या केल्या त्यात विविध जागांवर आपले बंडखोर अपक्ष उभा करून त्याला निवडून आणणे आणि त्या बंडखोरांच्या सहाय्याने काँग्रेसश्रेष्ठींशी बार्गेनिंग करणे. अशीच एक खेळी १९९५ च्या निवडणुकीत अंगाशी आली आणि युतीचे सरकार सत्तेवर आले. ही खेळी काँग्रेसच्या नेत्यांना कळलीच होती त्यामुळे १९७८ च्या कृतीने निर्माण झालेला संशय दृढमूल होऊन ते काँग्रेसश्रेष्ठींच्या मनातून उतरले. तेव्हा त्यांनी १९९९ मध्ये सोनिया गांधींनाच चॅलेंज केले आणि वेगळा पक्ष काढला. आता पवारांना पक्षशिस्तीचा जाच राहिला नाही. त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे पवारांशी युती केल्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही (कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). पण पवार आपले पर्याय नेहमीच खुले असल्याचे सांगून काँग्रेसकडून जादा लाभ उपटू शकतात. थोडक्यात नारायण राणे यांची जी अडचण आहे ती वेगळा पक्ष असल्याने पवारांपुढे नाही. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

भोचक 22/05/2009 - 16:14
(कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). खराटाजी, या मुद्यासंदर्भात थोडेसे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आज ज्या काही जागा जिंकते, त्या खरं तर कॉंग्रेसच्या 'खाल्लेल्या' जागा आहेत. राष्ट्रवादीचा पर्याय अस्तित्वात नसता, तर ही सगळी मंडळी कॉंग्रेसमध्येच असती आणि त्या सगळ्यांना उमेदवारी देणेही अवघड झाले असते. कॉंग्रेसमध्ये इतर कोणत्याही पक्षापेक्षा इच्छुक उमेदवारांची संख्या नेहमी जास्त असते. याचे कारण स्थानिक पातळीवरील सहकारापासून अनेक सत्ताकेंद्रे आजही या पक्षाच्या हाताता आहेत. हे सगळे नेते स्थानिक पातळीवर मातब्बर आहेत. त्यामुळेच त्यांचीही आकांक्षा विधानसभेत जाण्याची असते. कॉंग्रेस या सगळ्यांना तिकिट देऊ शकत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्यासाठी पर्याय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससकट या सगळया बंडखोरांना नीट शांत केले, तर कॉंग्रेस नक्की स्वबळावर निवडून येऊ शकते. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अमोल केळकर 22/05/2009 - 09:33
उत्तम लेख. पवार साहेबांना कमी लेखण्याची चूक महाराष्ट्रातील नेते नक्कीच करणार नाहीत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

नितिन थत्ते 22/05/2009 - 17:22
पवारांची आणखी एक ताकत म्हणजे आज निष्प्रभ वाटत असलेले पूर्वाश्रमीचे विरोधी पक्षांतील नेते. हे नेते म्हणजे पूर्वीच्या जनता पक्षातील, समाजवादी पक्षातील (एस एम जोशींचा पक्ष- मुलायमसिंहाचा नव्हे)नेते. हे नेते त्यांनी पुलोदच्या प्रयोगाच्या काळात जोडले आहेत. या नेत्यांच्या मूळ पक्षांतील कार्यकर्ते पवारांना थोडीफार ताकद पुरवतात. त्याचप्रमाणे पवारांना आपली इमेज चांगली ठेवणे शक्य होते. ८-१० जागांच्या जोरावर पंतप्रधानपदाची स्वप्ने तर हल्लीच्या काळात अनेक जण पहात असतात. यापुढे बहुधा पाहणार नाहीत. जनता त्यांना पाहू देणार नाही असे वाटते. खराटा (रंग माझा वेगळा)

बहुगुणी 20/05/2009 - 20:20
..पण कालच म. टा. मध्ये वाचलेल्या प्रताप आसबेंच्या या लेखाचा 'मान' राखून पवारांनी राजकारण-संन्यास घेतला तर? वर सुचवलेल्या ४ पेक्षा एक नवीनच पर्याय त्या पक्षातील इतर नेत्यांना घ्यावा लागेल. पवारांच्या अनुपस्थितीत ही इतर मंडळी काय करतील हाही उत्सुकतेचा विषय असू शकेल.

नितिन थत्ते 20/05/2009 - 20:42
पवार जरी राष्ट्रवादी नावाच्या पक्षात असले तरी ती काँग्रेसचीच एक शाखा आहे. म्हणजे विचारसरणी वगैरे सर्व काँग्रेसचीच आहे. पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते महाराष्ट्रात काँग्रेसचे सगळ्यात बलवान नेते होते. १९९० विधानसभेत सेना भाजप ची मुसंडी त्यांनी एकहाती थोपवली होती. प्रादेशिक नेतृत्वाला फुलू न देण्याच्या काँग्रेसच्या धोरणातून पवारांना काँग्रेसमध्ये दडपण्याचे प्रयत्न चालू राहिले. एके काळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यास पवारविरोधक असणे ही आवश्यक अट होती. या अडथळ्यांतून मॅनूव्हर करताना पवारांनीही काही खेळ्या केल्या त्यात विविध जागांवर आपले बंडखोर अपक्ष उभा करून त्याला निवडून आणणे आणि त्या बंडखोरांच्या सहाय्याने काँग्रेसश्रेष्ठींशी बार्गेनिंग करणे. अशीच एक खेळी १९९५ च्या निवडणुकीत अंगाशी आली आणि युतीचे सरकार सत्तेवर आले. ही खेळी काँग्रेसच्या नेत्यांना कळलीच होती त्यामुळे १९७८ च्या कृतीने निर्माण झालेला संशय दृढमूल होऊन ते काँग्रेसश्रेष्ठींच्या मनातून उतरले. तेव्हा त्यांनी १९९९ मध्ये सोनिया गांधींनाच चॅलेंज केले आणि वेगळा पक्ष काढला. आता पवारांना पक्षशिस्तीचा जाच राहिला नाही. त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे पवारांशी युती केल्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही (कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). पण पवार आपले पर्याय नेहमीच खुले असल्याचे सांगून काँग्रेसकडून जादा लाभ उपटू शकतात. थोडक्यात नारायण राणे यांची जी अडचण आहे ती वेगळा पक्ष असल्याने पवारांपुढे नाही. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

भोचक 22/05/2009 - 16:14
(कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). खराटाजी, या मुद्यासंदर्भात थोडेसे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आज ज्या काही जागा जिंकते, त्या खरं तर कॉंग्रेसच्या 'खाल्लेल्या' जागा आहेत. राष्ट्रवादीचा पर्याय अस्तित्वात नसता, तर ही सगळी मंडळी कॉंग्रेसमध्येच असती आणि त्या सगळ्यांना उमेदवारी देणेही अवघड झाले असते. कॉंग्रेसमध्ये इतर कोणत्याही पक्षापेक्षा इच्छुक उमेदवारांची संख्या नेहमी जास्त असते. याचे कारण स्थानिक पातळीवरील सहकारापासून अनेक सत्ताकेंद्रे आजही या पक्षाच्या हाताता आहेत. हे सगळे नेते स्थानिक पातळीवर मातब्बर आहेत. त्यामुळेच त्यांचीही आकांक्षा विधानसभेत जाण्याची असते. कॉंग्रेस या सगळ्यांना तिकिट देऊ शकत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्यासाठी पर्याय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससकट या सगळया बंडखोरांना नीट शांत केले, तर कॉंग्रेस नक्की स्वबळावर निवडून येऊ शकते. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अमोल केळकर 22/05/2009 - 09:33
उत्तम लेख. पवार साहेबांना कमी लेखण्याची चूक महाराष्ट्रातील नेते नक्कीच करणार नाहीत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

नितिन थत्ते 22/05/2009 - 17:22
पवारांची आणखी एक ताकत म्हणजे आज निष्प्रभ वाटत असलेले पूर्वाश्रमीचे विरोधी पक्षांतील नेते. हे नेते म्हणजे पूर्वीच्या जनता पक्षातील, समाजवादी पक्षातील (एस एम जोशींचा पक्ष- मुलायमसिंहाचा नव्हे)नेते. हे नेते त्यांनी पुलोदच्या प्रयोगाच्या काळात जोडले आहेत. या नेत्यांच्या मूळ पक्षांतील कार्यकर्ते पवारांना थोडीफार ताकद पुरवतात. त्याचप्रमाणे पवारांना आपली इमेज चांगली ठेवणे शक्य होते. ८-१० जागांच्या जोरावर पंतप्रधानपदाची स्वप्ने तर हल्लीच्या काळात अनेक जण पहात असतात. यापुढे बहुधा पाहणार नाहीत. जनता त्यांना पाहू देणार नाही असे वाटते. खराटा (रंग माझा वेगळा)
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

दोन दिग्गज

बहुगुणी ·

मुक्तसुनीत 20/05/2009 - 08:44
पंडीतजींचा फोटो म्हणजे "म्हंमदशा रंगिले.." गातानाचा क्यापचर आहे काय ? त्यातल्या ताना म्हणजे एका ओव्हर मधे सहा सिक्सर आहेत राव !

In reply to by मुक्तसुनीत

बहुगुणी 20/05/2009 - 08:58
.... त्याच व्हिडिओ क्लिप मधली एक फ्रेम ग्रॅब केली. आणि त्या ताना म्हणजे खरंच ३६/ओव्हर आहेत, हातवार्‍यांसकट! आणि तो आवेश पाहूनच मला सचिन डोक्यात आला, तेंव्हा त्या दुव्याबद्दल तात्यांचे आभारच.

In reply to by बहुगुणी

चतुरंग 20/05/2009 - 18:09
एकेक ताना म्हणजे मला शिवथरघळीवरचा धबधबा आठवतो! सतत गर्जणारा, घनगंभीर नादाने सगळे आसमंत भारून टाकणारा! स्वर असे हात जोडून पुढे उभे आहेत आणि भीमण्णा एकेका तानेसरशी पाहिजे त्याला पुढे बोलावून, हवे तसे फिरवून पुन्हा सोडून देताहेत असे वाटत रहाते. :) अगदी रंगात आलेल्या सचिनची लीलया चाललेली फटकेबाजी असतेना तसेच. तो हाफवॉलीला पण मारतो आणि अचूक यॉर्करला सुद्धा तडकावतो! चतुरंग

In reply to by विकास

बहुगुणी 20/05/2009 - 09:08
भीमसेनांची भावमुद्रा त्या (वर उल्लेखलेल्या) व्हिडिओ क्लिप मधील १:३४ या वेळची आहे, आणि सचिन चा फोटो या फोटो गॅलरीतला. दोन्ही फोटो फक्त crop केलेले आहेत साम्य दाखवण्यासाठी.

मिसळभोक्ता 21/05/2009 - 22:54
आण्णांचा कलकत्त्याला सत्कार होता. तेथे हॉटेल वर भेटायला सचिन आला होता. त्याला अण्णांनी विचारले, सचिन, आमचा भाऊ कसा खेळतो. तुमचा भाऊ ? सचिन गोंधळला. हो, सुनील जोशी हा माझा चुलतभाऊ आहे -- अण्णा. त्यावर सचिन काय बोलणार बिचारा ? -- मिसळभोक्ता

मुक्तसुनीत 20/05/2009 - 08:44
पंडीतजींचा फोटो म्हणजे "म्हंमदशा रंगिले.." गातानाचा क्यापचर आहे काय ? त्यातल्या ताना म्हणजे एका ओव्हर मधे सहा सिक्सर आहेत राव !

In reply to by मुक्तसुनीत

बहुगुणी 20/05/2009 - 08:58
.... त्याच व्हिडिओ क्लिप मधली एक फ्रेम ग्रॅब केली. आणि त्या ताना म्हणजे खरंच ३६/ओव्हर आहेत, हातवार्‍यांसकट! आणि तो आवेश पाहूनच मला सचिन डोक्यात आला, तेंव्हा त्या दुव्याबद्दल तात्यांचे आभारच.

In reply to by बहुगुणी

चतुरंग 20/05/2009 - 18:09
एकेक ताना म्हणजे मला शिवथरघळीवरचा धबधबा आठवतो! सतत गर्जणारा, घनगंभीर नादाने सगळे आसमंत भारून टाकणारा! स्वर असे हात जोडून पुढे उभे आहेत आणि भीमण्णा एकेका तानेसरशी पाहिजे त्याला पुढे बोलावून, हवे तसे फिरवून पुन्हा सोडून देताहेत असे वाटत रहाते. :) अगदी रंगात आलेल्या सचिनची लीलया चाललेली फटकेबाजी असतेना तसेच. तो हाफवॉलीला पण मारतो आणि अचूक यॉर्करला सुद्धा तडकावतो! चतुरंग

In reply to by विकास

बहुगुणी 20/05/2009 - 09:08
भीमसेनांची भावमुद्रा त्या (वर उल्लेखलेल्या) व्हिडिओ क्लिप मधील १:३४ या वेळची आहे, आणि सचिन चा फोटो या फोटो गॅलरीतला. दोन्ही फोटो फक्त crop केलेले आहेत साम्य दाखवण्यासाठी.

मिसळभोक्ता 21/05/2009 - 22:54
आण्णांचा कलकत्त्याला सत्कार होता. तेथे हॉटेल वर भेटायला सचिन आला होता. त्याला अण्णांनी विचारले, सचिन, आमचा भाऊ कसा खेळतो. तुमचा भाऊ ? सचिन गोंधळला. हो, सुनील जोशी हा माझा चुलतभाऊ आहे -- अण्णा. त्यावर सचिन काय बोलणार बिचारा ? -- मिसळभोक्ता
लेखनविषय:
लेखनप्रकार
चेहेर्‍यांत साम्य आहे, की कल्पनाविलास?