Skip to main content

मत

तालिबानीस्तान !

लेखक भोचक यांनी बुधवार, 18/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची राजधानी दिल्लापासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र असे होतेय. राजधानी इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटरवर असलेल्या 'स्वात' प्रांतात आता पाकिस्तानी कायदे चालणार नाहीत. पाकिस्तानी सरकार आणि या भागात वर्चस्व असलेल्या तालिबान्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या भागात न्यायदानाच्या प्रक्रियेसाठी 'शरीया' कायदे लागू होतील.

"ती काही उमेद हारत नाही ".....समस्यापुर्ती अथवा काव्यस्पर्धा ...!!!

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 17/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नुकताच "जागतीक प्रेमदिन उर्फ व्हॅलेंटाईन डे" मोठ्ठ्य जोशात पार पडला ( हे वाक्य माझ्याबद्दलच आहे असे काही नाही). बहुतेक सर्वांनी आपापल्या "प्रिय अथवा प्रियेला" शुभेच्छा देताना अथवा पटवताना अनेक काव्ये रचली असतील अथवा इंटरनेटवरुन ढापुन परस्पर तिच्यापर्यंत पोचवली असतील, ह्यात एक वेगळीच मज्जा असते नाही ? अश "प्रेमरसाने" ओथंबुन भरलेल्या कविता गाऊन दाखवण्याची तर वेगळीच नशा ...! असो. आपला आज "तो विषय" नाही ... सध्या आम्ही एका वेगळ्याच समस्येने त्रस्त आहोत.

रोमिओगिरी..

लेखक शितल यांनी बुधवार, 11/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"जरा बरी पोरगी दिसली रे दिसली की खिश्यातुन दोन रुपयाचा कंगवा काढुन केसाला भांग पाडुन, साजरं तोंड करून मोकळे " हे वाक्य आमच्या ऒरगॊनिक केमेस्ट्रीच्या सरांनी कॊलेजमध्ये असताना कित्येकदा तरी वर्गातील मुलांना ऐकवले आहे, प्रत्येक वेळी त्या वाक्यावर आम्ही मुली हसु ओठात दाबत मनातील आनंद एकमेकींना डोळ्यातुन दाखवुन देत असु. एक वेळ कॊलेज मधील लेक्चर बंक केले तर चालेल पण संध्याकाळी महाव्दार रोड चुकता कामा नये असा अधिलिखित नियम काही रोमिओंचा असायचा. कार्टी वर्गात दिसायची नाहीत पण त्या रोड वर मात्र नक्की दिसतील. ;) असे आमचे सर वरचे वर म्हणायचे.

मैने प्यार किया

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्‍यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं.

लफडा

लेखक दशानन यांनी गुरुवार, 05/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ? हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे, त्यांची किव करावी शी वाटते, अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना.. पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ? नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा :? आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता.. मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली ! मी म्हणालो... असं कसं ?

आपले दुरावलेले बांधव - रोमा

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 05/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या. देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा.

कुणीही यावे......

लेखक सुनील मोहन यांनी मंगळवार, 13/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारने भारतीय नागरिकांना अतिशय सक्षम अशा सुरक्षाव्यवस्थेची हमी दिलेली होती. सर्व राजकारणी लोकांनी अगदी जीव तोडून सांगितले की भारताच्या सर्व तपास यंत्रणा, पोलिस,सी.बी.आय, लष्कर इत्यादींना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. पण ह्या सर्व यंत्रणा खरंच कार्यरत आहेत? बहुधा नसाव्यात अशी दाट शंका यावी अशा दोन बातम्या गेल्या काही दिवसात वाचनात आल्या. आज या दोन घटना घडून सुद्धा अनेक दिवस उलटून गेले आहेत पण सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा यापैकी कुणाकडूनही काही खुलासा केला गेला नाहीय.

मुड

लेखक शितल यांनी सोमवार, 05/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मुडी मिपाकर, मस्त पैकी मुड मध्ये येऊन, मी "मुड" बद्दल लिहित आहे. :) तर मुडी मिपाकरहो, या "मुड"चा महिमा अघाध आहे. जेव्हा पासुन आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणिव यायला लागते तेव्हा पासुन हा "मुड" आपल्या मध्ये शिरतो, तो आपला इहलोकी प्रवास संपल्यावरच तो जातो. :) लहान बाळ कधी खुप छान हसुन बोलक्या डोळ्यांतुन आपल्याशी हु, हु करत असते. काही तरी बोलत असते, स्वत:च्या विश्वात हरवुन स्वारी खेळत असते. तर कधी आपण त्याच्या ओळखीचे असलो तरी आपल्याकडे काही न बोलता गप पहात बसते. आपल्या कडे फारसे लक्ष न देता स्वत:च्या विचारात गढुन गेल्या सारखा चेहरा करून बसते.

गझनी/गजनी आणि करमणुक

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 31/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
१५ मिनिट टीकणारी स्मृती घेउन प्रेक्षक चित्रपट बघायला येतात ह्या समजातुन आमिर खानचा नविन गझनी हा चित्रपट बनवला आहे. समोरच्या प्रसंगात काय चालले आहे ह्याची १५ मिनिटापुर्वीच्या चित्रपटाशी सांगड घालायचा प्रयत्न केलात तर तुम्ही फसलात. कशाचा कशालाही आगापीछा नाही.

डायरेक्ट ढगात जातील . . .

लेखक काहीतरीच यांनी मंगळवार, 23/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अरे मुर्खान्नो,अरे लुच्चान्नो, बस करा तुमचे राजकारण, तुमच्या या हलगर्जी पनामुले, सामन्यांचे होत आहे मरण . . . खुर्चीच्या मागे लागुन-लागुन भ्रष्टाचाराचा केला कलस, अरे आतातरी सुधरा अन झटकून टाका आलस . . . आरोप-प्रत्यारोप करता-करता तुमचा वेळ जातो, कोणी जमीन, कोणी पैसे, तर कोणी चारा खातो . . . फार झाला गांडूपणा, फार झाला अत्याचार, पाकिस्तान समोर वाकू नका, करा थोडा विचार . . . तुम्ही वोटांच्या मागे असताना, भाडखाऊ बोट करुन आले, आमच्या या मुम्बापुरिला, त्यांनी गालबोट लावले . . . लाखो संकटे आलीत, तरी भारतवासी समर्थ राहतील, पण, यापुढे भ्रष्टाचारी आणि आंतकवादी मात्र डायरेक्ट ढगात जातील . .
Taxonomy upgrade extras