गटणेंचा "आयटीतील मंदी आणखी दोन-तीन वर्षे" हा काथ्याकूट वाचत होतो. त्यावरचे काही प्रतिसाद वाचून आयटीवाल्यांवर उगीचच आगपाखड करण्यात येते असं जाणवलं. मी जवळपास दोन वर्ष मॅन्युफॅक्चरींग कंपनीत आयटी खात्यात नोकरीला होतो आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत आहे. त्यामुळे मला आयटी आणि नॉन-आयटी अशी दोन्ही ठिकाणं पहायला मिळाली. आयटीवाल्यांवर सर्वसाधारणपणे खालील आक्षेप ऐकायला मिळतात.
आक्षेप क्र.१. तुमच्यामुळे सगळं (घरांच्या किमती, भाजीपाला, इत्यादि) महाग झालं...
जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की २ बीएचके घरासाठी १० लाख फार कमी होतात. आमचे पगार जरा जास्त आहेत तेव्हा तुम्ही जर २५ लाखाला देत असाल तरच आम्ही तुमच्याकडून फ्लॅट घेऊ. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचं घर असावं असं वाटतं, तसच ते आयटीवाल्यांनाही वाटतं. बिल्डरनी ठेवलेली किंमत ज्यांना परवडते ते घर घेतात. ती काही फक्त आयटीवाल्यांची मक्तेदारी नाही. अवाच्या सवा किमती बांधकाम व्यावसायिकांनी वाढवल्या. ज्यांनी पूर्वी जमिनी किंवा घरं किरकोळ किमतीत विकत घेतली त्या सर्वांना नंतर बक्कळ फायदा झाला. पण ठणाणा मात्र आयटीवाल्यांच्या नावानी.
आक्षेप क्र.२. तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो.
दुसरी गोष्ट अशी की आयटी मधला बेसिक पे (पगारातला एक महत्वाचा भाग) मॅन्युफॅक्चरींग तसेच इतर क्षेत्रांत मिळणार्या बेसिक पे पेक्षा भरपूर कमी असतो. त्यामुळे साहजिकच पी.फ. आणि एच.आर.ए. कमी मिळतो. पर्यायाने उत्पन्न कर जास्त बसतो. महिन्याच्या शेवटी जो पगार मिळतो तो कॉस्ट टू द कंपनी पेक्षा भरपूर कमी असतो.
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो. इतर क्षेत्रांचं म्हणाल तर सहाव्या वेतन आयोगामुळे केंद्रिय कर्मचार्यांचे पगार चिकार वाढणार आहेत. सरकारी अनुदानं लाभलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही पगार बक्कळ वाढणार आहेत.
आक्षेप क्र.३ बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे.
इथे बसून तर असता म्हणजे नेमकं काय अभिप्रेत असतं लोकांना देव जाणे!!! इतर क्षेत्रांतील कामांप्रमाणेच आयटीमधेही आव्हानात्मक स्वरूपाची कामं असतात. कामं म्हणजे फक्त प्रोग्राम लिहीणं नाही. देश-विदेशातील लोकांशी बोलावं लागतं, त्यामुळे संभाषण कौशल्य आवश्यक असतं. ठराविक कालांतराने प्रोजेक्ट बदलतो त्यामुळे नवनवीन संगणकीय भाषा सतत शिकत रहाव्या लागतात. विविध देशांतील कंपन्यांचे प्रोजेक्टस असल्यामुळे कधी कधी शिफ्ट्स मधे काम करावं लागतं.
मला तरी प्रामुख्याने वरील तीन आक्षेप ऐकायला मिळाले. मी माझ्यापरीने आयटीवाल्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचने
15425
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>उदाहरण
In reply to >>मग जर या by नीधप
वैयक्तिक नको
"जसं काही
एक खन्त