साचेबंद बुध्दिबळ ?
आनंद वि॰ कार्लसन यांचा प्रत्येक डाव नंतर पुन्हा खेळून पाहतोय. इथे खेळाडूची पहिली खेळी झाली की लगेचच सिसिलिअन, फ्रेँच, ग्रंडफिल्ड, इत्यादी सुरवात/ रक्षण पध्दती अशी टिप्पणी येते. कम्प्युटर आणि महालढवैये त्याचे बरोबर-चूक विश्लेषण करून पुढील खेळी कोणती खेळणार हे सुचवतात बहुतेक तीच चाल चालली जाते. बुध्दिबळ हा खेळ आता इतक्या साचेबंद अवस्थेत पोहोचला आहे का?खेळाडू आता वेळेशी जमवून घाईने खेळताना चुकला की डाव घसरून हारतो. खेळातले वैविध्य हरवत चालले आहे असं वाटू लागतं.
राजा -गुलाम आणि वजीराच्या जोडीला रंभा ही मानवी मोहरी वाढवायला हवीत आणि पट १० चौकडीँचा करावा.