Skip to main content

अभिनंदन!

लेखक राही यांनी शुक्रवार, 16/05/2014 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला. आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत. पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.

वाचने 48287
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by हुप्प्या

प्रक्रिया १०० % शांततेत पार पडली.

In reply to by हुप्प्या

एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही.
ओ ... त्यात काय विशेष ? आमचे पट्टेवाले सुध्दा गृहमंत्री झालेच होते की ... औंदाची इलेक्शन जिंकली असती तर घरगुती पंतप्रधानही होण्याचा योग होता =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आजचे लोकसत्तातले संपादकिय छान आहे.सत्तेत असूनही 'मी बिचारा,मी चहा विकायचो,मी ओ.बी.सी.' हे सांगण्यात मोदी व संघ यशस्वी झाले.अर्थात त्यांना गुजरातमधल्या केलेल्या कामाची जोड होतीच.नुसते काम करून भागत नाही तर त्याची व्य्वस्थित जाहिरात्बाजीही करावी लागते. मोदींनी हे संघाला शिकवले आहे असे म्हणावे लागेल. गुजरातमध्ये केलेले काम,एन.आर.आय.प्राध्यापक्,आय.टी.तज्ञ्,सोशल मिडिया,अंबानी,अडानींचा गडगंज पैसा,संघाची आखणी ह्या आधारावर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला. मोदींचे हार्दिक अभिनंदन.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

क्या माई तुम भी? मजाक कर रे क्या? चाय का किटली कौन निकाला? मोदी खुद निकाला? गुजरात एक छटाक भर राज्य. त्याची आक्ख्या देशापुढं काय महती? काँग्रेसनं देशभर केलेलं काम लोकांना का नाही दिसलं गं माऊली? जाहिरातबाजीसाठी मोठ्ठं कंत्राट दिलेलं ना कुणाला? मोदी कडं अडाणी होता तर काँग्रेसकडं डीएलएफ नि पुन्हा अंबानी पण होताच की. जयराम रमेश, शशी थरुर, अहमद पटेल, मीरा कुमार, कपि सिब्बल्ल (होतं कधी कधी एखादं अक्षर इकडं तिकडं) खूप शिकलेली आणि मातब्बर माणसं की! सोशल मिडीया वर लिमिटेड बंदी आणायचा विषय पण झालेला की कधी मधी...! राहुल बाबा पण जातच होता की अधून मधून गरी बांच्या घरी चहापाणी, जेवणखाणाला. चीटिंग नै करायची बाबा अशी. जिंकला तर जिंकला. बघायची वाट थोडे दिवस आता. 'अच्चे दिन आयेले हय' :)

In reply to by प्यारे१

अरे बाबा चिटिंग कसली?.माझे आधिचे प्रतिसाद पहा.नरेंद्रच पंतप्रधान व्हावा असे मलाही वाटत होते़. कॉन्ग्रेसनेही प्रचाराची सर्व हत्यारे वापरली असणारच पण तरीही ह्यांच्या तुलनेत ते नक्कीच कमी पडले. शिवाय रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे,मनमोहनांचे प्रसिद्ध मौन हे घटक कारणीभूत होतेच.

बिजेपीने मिळविलेले दैदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे मोठ्ठाल्ले घोटाळे, आमचं कोण काय वाकडं करू शकतो हा माज आणि महागाईने ग्रस्त सामान्य जनता ह्या सर्वाचा परिपाक म्हणूनच काँग्रेसची ह्या निवडणूकीत अक्षरशः वाताहात झाली. बिजेपीच्या हाती सत्तेची मशाल आली आहे. त्यांनी देशाला भरभराटीच्या मार्गावर नेऊन सोडावे. शिक्षण, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सेवा, रस्ते आदी मूलभूत गरजा स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही दारूण अवस्थेत आहेत त्या सुधारून भारताची लाज वाचवावी. नरेन्द्र मोदी १० वर्षे पंतप्रधान राहतील आणि भारताच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ असेल अशी भविष्यवाणी कोणीतरी उच्चारली आहे ती खरी ठरो.

तेव्हा करायचे जेव्हा नूतन सरकारकडून काही लोकहिताची देशहिताची कामे होतील. खरे आव्हान पुढेच आहे. म्हणून तूर्त मोदी सरकारला शुभेच्छा !

लोकहो पण अजून सगळे संपले नाही. विधानसभा निवडणुकाही तोंडावरच आहेत. केंद्रात मोदी आला म्हणून सगळं संपलं नाही. मोदीकडे बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेत तेवढं पुरं पडणार नाही. अधिक लोकलाईझ्ड मुद्यांवर बीजेपी एट ऑल काय करतात ते पाहणं उद्बोधक ठरेल. त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.

In reply to by बॅटमॅन

त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.
हीच लोकशाहीची खरी मजा आहे. सगळ्यांना व्यवस्थीत तव्यावर ठेवता येते.

ह्या अभिनंदांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी निवडनुकीसाठी महायुतीची घोषणा काय असेल अब की बार ..... अवांतर मायलेक राजीनामा देत आहेत हे वाचून जीव गलबलला त्यांची भाषणे म्हणजे निर्भेळ करमणूक त्याला कपिलरात्रीचा सवंग पणा नाही आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे हास्यकवी संमेलन मम्मी तुसी ना जो रीयंका लावो , पार्टी बचाव प्रियंका इज इंडिया

In reply to by विकास

मस्त आहेत विनोद ! काही तर अगदी ज्युनियर बुशच्या तोडीचे आहेत !! राहूल आणि त्याच्या लेखनिकांना "स्टँड अप कॉमेडी"चे मैदान मारण्याची प्रचंड संधी आहे. आता हे सगळे विनोद "भोगायला" न लावता त्यांचा देशाच्या जनतेला निखळ आनंदाने आस्वाद देता येईल... आणि गाठी दोन पैसेही पडतील आणि लोक त्यांना "बेकार आहेत" असे म्हणात नाहीत... फार फार तर विनोद बेकार आहेत असे म्हणतील ! =))

नरेंद्र मोदींचे अभिनंदन, एकहाती सत्तेवर येणे काय म्हणतात ते नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. पक्षातल्या जेष्ठ नेत्यांची नाराजी असूनही एकट्याने सभा घेणे, माध्यमांचा योग्य वापर, काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेला आपण आणि भाजपाच योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर, लोकशाहीचा प्रगल्भपणे वापर करणा-या जनतेचेही मनःपूर्वक अभिनंदन. भारत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व दृष्टीने अधिकाधिक विकास करेल आणि एक आदर्श सरकार बनेल अशी कामनाही व्यक्त करतो. भारतीय लोकशाहीचा विजय असो. -दिलीप बिरुटे

महाराष्ट्रातील जनतेचा केंद्रातल्या सरकारपेक्षा जास्त राग राज्यातल्या कॉंग्रेस आघडी सरकारवर होता/आहे. १५ वर्षापासून कॉंग्रेस एनसीपीचे राज्य आहे. सिंचन घोटाळा, आदर्श, जमिनी हडपणे,गारपीट, शेतकरी आत्महत्या आदी बाबींत दाखवलेली सरकारी अनास्था, गुंडागर्दी (राणे-भुजबळ- तटकरे-अजित पवार वगैरे),महागाई, बेताल वक्तव्ये यामुळे या आघाडी सरकारचे जाणे अटळ आहे मात्र महायुतीने हुरळून न जाता एकजुटीने, जोमाने प्रचार करणे आवश्यक आहे.

In reply to by दुश्यन्त

विधानसभेत आघाडी सरकारचा पराभव झाला तरच त्यांचे डोळे उघडतील, नैतर आहेच पुन्हा धरण, लघवी आणि शाई.

आता २१ तारखेला मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर झाला की पुढच्या धोरणांचा काहीसा अंदाज येईल. आता आणखी उत्सुकता आहे ती महाराष्ट्र विधानसभेसाठी असणार्‍या युतीबद्दल. जागांच्या संख्यावाटपासाठी वाद होणारच. भाजप आता सेकंड फिडल वाजवण्यावर संतुष्ट राहीलच असे नाही.

काल एकाने पराभूत या शब्दाचा अर्थ असा सांगितला प पवार रा राणे भू भुजबळ त तटकरे मो दी चा अर्थ मो मोठ्या दि दिमाखात

खालील व्हिडीओ हा ८ मिनिटांच्या किंचीत आधीपासून बघा. हेडलेस चिकन या शब्दाचा अर्थ समजेल. :)

In reply to by विकास

मग केतकर असले मुद्दे काढून आकाश पाताळ एकत्र करणार. नेहरूंचे नाव नाही घेतले, गांधींचे नाव नाही घेतले, आंबेडकरांचे नाव नाही घेतले वगैरे ट्यँव ट्यँव ट्यँव चालू. काँग्रेसचे लोक टिळकांचे नाव किती घेतात? ते नसते तर काँग्रेसच बनली नसती. दादाभाई नौरोजी? लाला लजपतराय? बिपिनचंद्र पाल?

केतकरांचा तोल { कोणता ते समजलंच आहे म्हणा ! } केव्हाच ढासळला आहे !

इलिनॉय मधील काँग्रेसमन (/खासदार)Aaron Schock यांनी युट्यूबवर नरेन्द्र मोदींचे केलेले अभिनंदन! :)

विजेत्यांचे अभिनंदन आणि आपल्या मुद्द्यां आणि निष्ठेसाठी साधनांची कमतरता असूनही नेटाने निवडणूक लढवणा-या काही पक्ष आणि त्यांची खंद्या कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक अभिनदन. झालेल्या बदलातुन देश आणि लोकशाही समृद्ध होइल हीच अपेक्षा.

अभिनंदनात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद. सुप्रशासन येवो ही शुभेच्छा आणि सदिच्छा.