Skip to main content

लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

लेखक विकास यांनी शुक्रवार, 16/05/2014 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल. हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे. आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे. तो माहितीसाठी येथे डकवत आहे.
Election Result History
सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना शुभेच्छा!

वाचने 40131
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

आज जे निकाल लागण्याची शक्यता आहे त्याची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहत आहे. २००४ व २००९ मध्ये निकाल (लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा) बघतांना माझा चांगलाच हिरमोड झाला होता. व्यक्तिशः आजचे निकाल तेवढे उत्कंठावर्धक वाटत नाहीयेत. विविध माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळ जाणारे असतील याची खात्री आहे. अजून ५ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र आजपेक्षाही अधिक उत्कंठावर्धक असतील. महाराष्ट्रातील मतदारांची काही खात्री वाटत नाही (गेल्या ३ निवडणुकांवरून), विधानसभेसाठी फारच क्षमाशीलपणे मतदान करतात :-).

१. आमचा मतदारसंघ - प्रिया दत्त वि. पुनम महाजन. २. वाराणसी (मोदी वि. केजरीवाल) ३. निलेश राणे (कोकण) ४. छगन भुजबळ (नाशिक) ५. किरीट सोमैया वि. मेघा पाटकर वि. संजय पाटील ६. शिरुर ( आढाळराव वि. देवदत्त निकम

In reply to by पेरु

आढळराव पाटील २८६००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर अजून एक फेरी बाकी आहे. कैबिनेट स्तरावरचे मंत्रीपद मिळणार असं दिसतंय आमच्या मतदारसंघाला....

ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच विषयावर बोलताहेत - नि आणि नि - निवडणूका आणि निकाल. टीव्ही चॅनेल (सीएनबीसी सुरु असतं हो आमच्या हापिसात! ) सकाळपासून निकालाच्या प्रोजेक्शनच्या बातम्या दाखवत आहे. खरं सांगू तर कंटाळा आला ह्याचा आता.

आयच्यान इतका टेन्शन स्वतःच्या कुठल्या निकालावेळी सुद्धा आलं नव्हतं! किपींग फिंगर्स क्रॉस्ड!! अबकी बार सचमुच अच्छी सरकार ! :)

महाराष्ट्रात मोदींची लाट. सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, विजयससिंह मोहिते-पाटील पिछाडीवर.

In reply to by विकास

भुजबळ १४,००० मतांनी पिछाडीवर *wacko* पवारांचं नाकच कापलं जाईल नाशिक हातचं गेलं तर!!

झी मिडीया ने असले आकडे कुठुन आणलेत!, बा़कीचे चॅनल अजुन ५०-६० च्या घरात आहेत तोवर यांनी एनडीए ला २१३ पर्यंत आघाडी दाखवलिये..

एक्झिट पोल च्या अंदाजानुसार वाटचाल सुरु आहे.. २७२ चा जादुई आकडा पार होण्याची चिन्हे आहेत..

मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की तैसी झालिये. मुंबई सहाच्या सहा जागा युतीकडे जाणार बहुतेक. निलेश राणे चा पराभव व्हायचेच चान्सेस जास्त वाटतायत. *yahoo*

In reply to by विकास

काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. कारणीभूत आहेत.. सोनिया, मनमोहनसिंग, कलमाडी, राजा, कन्निमोळी, वद्रा..इ. इ. बिचार्‍या राहुलचा काय दोष?? :-)

In reply to by बाळ सप्रे

नै नै नरेंद्र मोदी कारणीभुत आहेत असं कबुल करायला हवं खरंतर काँग्रेस ने .!!

भाजपाचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसचा पार बोऱ्या वाजला हे सर्वात उत्तम झाले. पण हे मिळालेले संपूर्ण बहुमत भाजपने राम मंदिरासारख्या प्रश्नांवर वापरण्यापेक्षा विकासासाठी वापरावे. आपचे काय होतंय ते बघुया.

In reply to by संपत

मतदारांनी भाजपाला मत विकास आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. तस्मात भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत, राम मंदिरासह.

In reply to by आनन्दिता

जाहिर सत्कार करायला पाहिजे "त्या" ५८ जणांचा =))

In reply to by आनन्दिता

स्वतः राखी सावंत आणि तिच्या पक्षाचा उमेदवार हे दोघे सोडून बाकी ते कोण "अब तक छप्पन्न" आहेत, ज्यांनी तिला मत दिले? त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र>>>>

In reply to by सुहासदवन

त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र
राखी सावंत बरोबर लग्न लावुन दिले तर??? =))

In reply to by आनन्दिता

१) तिच्याकडे कोटयावधी रुपयांची मालमत्ता आहे. २) ती निरक्षर आहे. :)

In reply to by आनन्दिता

व्हॊट्सपवर सुद्धा फिरतेय, आणि तिथे बंडल बातम्या जास्त फिरतात, राखी सावंत नाव बघून लोक चवीने शेअर करतात. अशीच अजून एक बातमी बघा, सनी लिओन बुधवारपेठेतून आघाडीवर ..

एकट्या भाजपाला २७२ मिळताहेसं दिसतंय तसं झाल्यास राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे मुद्देही भाजपा निकालात काढु शकेल. नाही का?

In reply to by ऋषिकेश

भाजपाला २७२ जागा मिळतात तेंव्हा त्याचा असा अर्थ आहे की सगळ्या बाजूने त्यांना मते मिळाली आहेत. तुर्तास इतकेच. तुम्ही सांगितलेले मुद्दे कसे हाताळतील याची उत्सुकता आहे.

In reply to by ऋषिकेश

तीच भीती आहे. म्हणूनच भाजपला संपूर्ण बहुमत मिळू नये अशी अपेक्षा होती. त्यात आता मोदींसारखे कणखर आणि संघाच्या प्रभावाखालील नेतृत्व आले आहे. माझ्या चिंता खोट्या ठरोत अशीच अपेक्षा.

In reply to by संपत

राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे प्रश्न ताटकाळत ठेवण्यापेक्षा लागू दे ना सोक्षमोक्ष. आणि ह्या भारतात जर राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे विषय जर बहुसंख्यांना मोडीत काढायचेच असतील तर मग हीच योग्य वेळ आहे.... त्यात भिण्याचे कारण काय?

In reply to by ऋषिकेश

तसं झाल्यास राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे मुद्देही भाजपा निकालात काढु शकेल. नाही का?
३७० साठी मला वाटते की राजीव गांधींसारखे पाशवी बहुमत पाहिजे. तेव्हा पुढची ५ वर्षे तरी त्याची काळजी नको. यावेळेस चांगले काम केले तर पुढच्या वेळेस २/३ सीट मिळतील, तेव्हा बघू.. तसे देखील मोदी हे फार दूरदर्शी नेते आहेत, तेव्हा ते पहिले २-३ वर्षे हे मुद्दे काढणार देखील नाहीत असे वाटते.

अजुन एकाही जागेवर विजय मिळाला नाही बिचाऱ्यांना. राहुल बाबा तिसऱ्या क्रमांकावर. :) खांग्रेस कार्यकर्त्यांची दिल्लीत पक्ष कार्यालयासमोर निदर्शने. घोषणा - "प्रियंका गांधी लाओ, देश बचाओ" बोंबला!!!

कुठे गेले आप समर्थक? हाहाहा...पडले का तोंडावर. त्या केजरीला म्हणावं ओरड अजुन जोर जोरात मोदींच्या नावाने..

In reply to by Dhananjay Borgaonkar

एका नवीनच असलेल्या पार्टीचा झालेला फायदा लक्षात घेता त्यांचे (अपेक्षितच असलेले) पडणे आश्चर्यजनक अजिबातच नाही. आता अनेक विरोधी पार्ट्यांमधील एक असल्याने पुढील ५ वर्षात काय शिकतात हे महत्वाचे.

हे मतदारयाद्यांमधून नावं गायब करुन! जर नावं गायब झाली नसती तर.. http://eciresults.nic.in/ConstituencywiseS1334.htm?ac=34 ANIL SHIROLE Bharatiya Janata Party 304731 DR.VISHWAJEET PATANGRAO KADAM Indian National Congress 143418

सोलापूर मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पराभूत. धक्कादायक निकाल. मोदि त्सुनामीच...