मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारत वि. इंग्लंड क्रिकेट मालिका - २०१४

श्रीगुरुजी ·

एस Wed, 06/25/2014 - 13:22
बीसीसीआयच्या संघाला हरवून पुन्हा फॉर्मात येण्याची इंग्लंडच्या संघाला सुवर्णसंधी आहे. :-|

In reply to by एस

अनुप ढेरे Wed, 06/25/2014 - 13:51
कुक नक्की फॉर्ममध्ये येणार. ओपनिंगला विजय/धवन ऐवजी शर्माही चालेल. गंभीरही फार दिवे लावेल असं वाटत नाही. पण वर म्हटलं तसं, ब्याटिंगची भिस्त ३-४-५, कोहलीम पुजारा आणि रहाणेवर आहे. नॉटिंगहममध्ये पहिली मॅच आहे हे पाहून झहीरची आठवण झाली. बॉलिंग मध्ये झहीर असायला पाहिजे होता. झहीर, भुवनेश्वर आणि शर्मा. प्रॅक्टिस म्याचेस आहेत २ ते चांगलं आहे. मागच्या वेळेला हार झाल्याचं कमी प्रॅक्टीस मॅचेस हे एक कारण होतं.

In reply to by एस

एस Mon, 08/18/2014 - 18:52
चला, बीसीसीआयच्या संघाला पुनरेकवार हरल्याबद्दल किंचित सहानुभूती आणि इंग्लंडच्या संघाचं विजयाबद्दल जोरदार अभिनंदन. आगामी भारत दौर्‍यातही इंग्लंडला अशाच सुवर्णसंधी पुन्हापुन्हा देत रहा बरं का रे. (इथून पुढचं जाहीर लिहिण्यासारखं नसल्याने फक्त मनातल्या मनात. कसंय, तुम्हांला जरी लाजीरवाण्या पद्धतीनं हरल्याबद्दल शब्दशः लाज वाटत नसली तरी आम्हांला अपशब्द जाहीरपणे वापरायची लोकलाज अजूनही वाटते.)

सौंदाळा Wed, 06/25/2014 - 14:18
ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो.
याऐवजी मी ईशांत शर्मा भारतात बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. असे म्हणेन. मागच्या ईग्लंड दौर्‍यावर (तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण असताना आपण सपाटुन हारलो होतो तो दौरा) ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती. बाकी कालची कसोटी थरारक झाली. अंडरसन एक चेंडु शिल्लक असताना आउट झाला. आणि हीच स्थिती श्रीलंकेची पहील्या कसोटीला होती आणि त्यांनी सामना अनिर्णयीत ठेवण्यात यश मिळवले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 16:51
>>> बाकी कालची कसोटी थरारक झाली. +१ जबरदस्त कसोटी झाली. इंग्लंडने पराभव टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा कसोटीतला फक्त १ चेंडू शिल्लक असताना त्यांना हार पत्करावी लागली. पहिल्या डावात १०८ धावांनी मागे असताना सुद्धा श्रीलंकेने झुंझून विजय मिळविला.

कपिलमुनी Wed, 06/25/2014 - 14:37
फार फार दिवसांनी क्रिकेटवर मोठा लेख आला.. प्रत्येक पिढीचे आवडते हीरो असतात.. ते रीटायर झाले की आवड कमी होते .. तसाच कहीसा झाला आहे. सध्याच्या टीम मधे अजून तरी फार इंटरेस्ट नाहिये.. बादवे ते ष्टकार नावाचा पाक्षिक मिळता का अजून ?

पामर Wed, 06/25/2014 - 16:12
ह्याच दौ-यात अजुन एक आकर्षण म्हणजे ५ जुलै रोजी क्रिकेट पंढरी-लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI' असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला आहे. MCC च्या संघात -सचिन तेंडुलकर (कर्णधार),ब्रायन लारा, राहुल द्रवीड,ब्रेट ली,शिवनारायण चंद्रपॉल व इतर खेळाडु आहेत तर उर्वरीत जगाच्या संघात- शेन वॉर्न (कर्णधार),अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मुथैया मुरलीधरन,शाहीद आफ्रिदी,केवीन पिटर्सन ,युवराज सिंग वगैरे खेळाडु आहेत.भारतात स्टार चॅनल वर हा सामना दा़खवणार आहेत. *clapping*

In reply to by पामर

असंका Wed, 06/25/2014 - 16:34
लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI'
मेलबर्न असा उच्चार आहे का? मला वाटायचे मेरिलबोन (Marylebone)!!

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 17:04
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बहुतेक मधूसुदन पानसरेला (आणि रवि बोपाराला) पाचारण करतील असं वाटतंय. केव्हिन पीटरसनलाही परत बोलावतील का? (तो परत यावा अशी इच्छा आहे)

फारएन्ड गुरुवार, 06/26/2014 - 09:36
झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 12:28
>>> झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? झहीर हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे ब्रह्मास्त्र होता. त्याने ९ सामन्यात २१ बळी घेऊन जवळपास प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. आता तो संघात नाही त्याची ३ कारणे आहेत. १) झहीर २०११ च्या विश्वचषकानंतर त्याचा फॉर्म हरपला आहे. आजतगायत त्याला फॉर्म परत मिळविता आलेला नाही. ज्या मोजक्याच सामन्यात तो खेळला, त्यात तो निष्प्रभ ठरला. आयपीएल मध्ये सुद्धा तो चमकलेला नाही. २) त्याला तंदुरूस्तीची तीव्र समस्या आहे. १-२ सलग सामने खेळले की तो मोडतो आणि नंतर ५-६ महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असतो. ३) तंदुरूस्तीमुळे त्याला पुरेसा सराव मिळत नाही व त्यामुळे तो ज्या सामन्यात खेळतो त्यात चमकत नाही. >>> रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. रोहीत शर्मा २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगला खेळला होता. परंतु एकंदरीत तो अपवाद वगळता परदेशात तो बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे. तो, अश्विन आणि ईशांत शर्मा हे धोनीचे लाडके असावेत असं वाटतंय, कारण अनेकवेळा अपयशी ठरल्यानंतर ते परत परत संघात दिसतात. >>> स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. मुनाफ २०११ च्या विश्वचषकानंतर पूर्णपणे निष्प्रभ आहे. त्याला नाही घेतलं तेच बरं केलं. >>>> सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? इरफान पठाणला गेल्या ३-४ वर्षात अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. २०१२ मध्ये बांगला देशात झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत बांगला देश विरूध्द त्याने व प्रवीणकुमारने अत्यंत सुमार गोलंदाजी करून तब्बल २९० धावांचे लक्ष्य बांगलाला सहज पार करून दिले होते. >>> गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा. सहमत! धोनीला आपल्या कर्णधारपदाच्या सुरूवातीच्या कालखंडात वरीष्ठ खेळाडूंची सतत भीति वाटायची. आपण थोडेसे अपयशी ठरलो तर आपल्याकडून कर्णधारपद हिसकावले जाऊन कोणत्यातरी वरीष्ठ खेळाडूच्या हातात नेतृत्वाची धुरा जाईल या दडपणामुळे त्याने वरीष्ठ खेळाडूंना सतत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. २००७ च्या ट-२० च्या विश्वचषकात सुद्धा त्याने वरीष्ठ खेळाडूंना ने घेण्याच्या अटीवर कर्णधारपद स्वीकारले होते. गंभीर, सेहवाग, सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, झहीर, हरभजन आणि कुंबळे या वरीष्ठ खेळाडूंपैकी ५ जण निवृत्त झाले असून उरलेले ४ जण अजून खेळत आहेत. त्यापैकी तिघेजण संघात नाहीत. त्यामुळे धोनीला फारशी भीति नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे गुरुवार, 06/26/2014 - 16:39
पठाण बद्दल सहमत. प्रवीण कुमार चालला असता. मागच्या दौर्‍यात जीव तोडून बोलिंग केली होती.

नाखु गुरुवार, 06/26/2014 - 11:17
पण ते चेन्नई सुपर किंग मध्ये आहेत हे जास्त महत्वाचे निवडीसाठी.मोहीत शर्माला पण संधी त्यामुळेच मिळाली. खरे खोटे "श्री" जाणे! आप्ण गुमान पहाणे!

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 22:33
सुरूवात तर चांगली झाली. आजच्या पहिल्याच सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारताने ४० षटकांत ४ बाद ३३३ अशी चांगली कामगिरी केली. त्यातल्या मुरली विजय (२०) व कोहली (२९) वगळता इतरांनी चांगल्या धावा केल्या. गंभीर, धवन व पुजाराने अर्धशतक केले.

श्रीगुरुजी Sun, 06/29/2014 - 21:10
पहिला सराव सामना पावसामुळे फक्त २ दिवस चालला. भारतीय फलंदाजांनी बर्‍यापैकी फलंदाजी केली. गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाल्ला. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ३ फलंदाज बाद करता आले. असो. या सामन्याच्या निमित्ताने थोडा सराव तरी झाला. अजून एक सराव सामना बाकी आहे. नंतर ९ जुलैला पहिला कसोटी सामना सुरू होईल. सध्या विश्वचषक फूटबॉल फिव्हरमध्ये आणि त्याचवेळी विम्बल्डन सुरू असताना क्रिकेट थोडे निस्तेज झाले आहे. विंडीज वि किवीज आणि इंग्लंड वि. लंका या सामन्यांच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रात येत नव्हत्या. साधारणपणे १५ जुलैनंतर क्रिकेटला परत चांगले दिवस येतील.

श्रीगुरुजी Wed, 07/02/2014 - 12:43
कालपासून भारताचा दुसरा सराव सामना डर्बीशायर विरूद्ध सुरू झाला. आधीच्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ५ फलंदाज बाद करता आले. दोन्ही सामन्यात मिळून एकूण २ दिवसांच्या गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांना जवळपास ६६५ धावांच्या मोबदल्यात फक्त ८ गडी बाद करता आले आहेत. एकंदरीत गोलंदाजांचे या दौर्‍यावर हाल होतील असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 12:46
दुसरा सराव सामना भारताने जिंकला. पहिल्या दोन्ही सराव सामन्यात भारताची फलंदाजी बर्‍यापैकी झाली. पण गोलंदाजांनी बराच मार खाल्ला. स्थानिक संघाविरूद्ध त्यांना फारसे बळी मिळविता आले नाहीत. अर्थात हे नेहमीचंच रडगांणं आहे. आता ९ जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. बघूया काय होतंय ते. सलामीला मुरली विजयला न घेता गंभीरला घेतील असं वाटतंय. रहाणे देखील आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रोहीत शर्माला बाहेर बसावं लागेल. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जडेजा आणि ईशांत शर्मा नक्की आत येतील.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा Sat, 07/05/2014 - 15:25
तो १४/१६ च्या टीममधे कसा काय येतो परत परत??? मग ११ त आला तर खरेतर आश्चर्याच्या धक्क्याने आम्ही मरायलाच पाहिजे!

In reply to by पैसा

श्रीगुरुजी Sun, 07/06/2014 - 14:07
कितीही खराब खेळले तरी शर्मा बंधू (रोहीत आणि ईशांत) हे कायम १६ जणांच्या चमूत असतात. रोहीत शर्माला २०१२ मध्ये एकूण १४ एकदिवसीय सामन्यात खेळविले होते. त्यात त्याने एकूण १६८ धावा केल्या होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १३ सामन्यात एकूण ८५ धावा होत्या. तरीसुद्धा त्याला संघातून एकदाही वगळले नव्हते. श्रीलंकेत त्याच वर्षी झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १४ धावा केल्या होत्या (सर्वाधिक ८). इतका खराब खेळ करूनसुद्धा त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात त्याला निवडले होते. त्याच्यामुळे मागील ३-४ वर्षे रहाणे संघात असून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 20:41
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारतातील क्रिकेट मालिका बहुतेकवेळा 'स्टार' वर असतात. वेस्ट इंडिज, दुबई/शारजा, द. आफ्रिका व न्यूझीलॅंड येथील मालिका टेन क्रिकेट किंवा सोनी सिक्सवर असतात. पूर्वी या मालिका 'निओ'वर असायच्या. पण आता 'निओ' क्रिकेट प्रक्षेपणातून बाहेर पडलेलं दिसतंय आणि त्यांची जागा सोनी सिक्सने घेतलेली दिसतेय.

स्पार्टाकस Fri, 07/04/2014 - 22:44
आफ्रीदीसारखा वाचाळ आणि टिनपाट खेळाडू दिग्गज कधीपासून झाला ?? केवळ अंदाधुंद बॅटींग (जीदेखील गेली काही वर्षे चालत नाही) आणि कामचलाऊ बॉलींग करणारा महान झाला?

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी Sat, 07/05/2014 - 12:54
+१ आफ्रिदीप्रमाणेच विश्व संघात टिनो बेस्ट, सिड्ल्, तमीम इक्बाल इ. "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत. तर एम सी सी च्या संघात उमर गुल, शॉन टेट, व्हिटोरी, एरॉन फिंच, रीड असे "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 17:48
हरो किंवा जिंको, पण संध्याकाळी घरी आल्यावर ईंग्लंडच्या वातावरणातील कसोटी सामने बघणे नेत्रसुखद अनुभव असतो. फक्त दादा, सचिन, द्रविड आणि हो, वीरूही नसल्याने ती मजा यंदा कितपत येईल हा प्रश्नच आहे.

श्रीगुरुजी Wed, 07/09/2014 - 20:47
पहिल्या कसोटीत आतापर्यंत बरी फलंदाजी झाली आहे. कोहली व धवन अपयशी ठरले, तर पुजारा आणि रहाणे स्थिरावल्यावर बाद झाले. एकटा मुरली विजय किल्ला लढवतोय. भारताने किमान ४०० धावा करायला हव्यात.

सौंदाळा गुरुवार, 07/10/2014 - 17:40
दुसरा दिवस, जेवण ३४२/५. चांगल्या धावा झाल्या आहेत. अजुन किमान एक सेशन तरी भारताने खेळायला पाहीजे म्हणजे सामन्यावर पकड घेण्याची संधी मिळेल.

थॉर माणूस गुरुवार, 07/10/2014 - 18:02
धोनी उपखंडाबाहेरचं पहिलं शतक मारेल का याची उत्सुकता आहे... काय ते कळेलच पुढच्याच सेशनमधे. त्यानंतर (किंवा धोनी बाद झाला तर) डाव घोषित करतील बहुतेक.

स्पार्टाकस गुरुवार, 07/10/2014 - 23:45
भुवनेश्वर आणि शमीने इंग्लंडवर बॅटींगमध्ये गिलेस्पी-मॅकग्राथ प्रयोग केला आहे! (गिलेस्पी आणि मॅकग्राथ यांनी न्यूझीलंडविरुध्द १००+ ची पार्टनरशीप केली होती. मॅकग्राथने चक्क ६३ रन्स काढल्या होत्या!) अ‍ॅलीस्टर कूकला पुन्हा एकदा सस्त्यात गाशा गुंडाळावा लागला आहे. जाडेजा कदाचीत धोकादायक ठरु शकेल. एकून टेस्ट बोअरींग होणार नाही अशी अपेक्षा आहे.

श्रीगुरुजी Fri, 07/11/2014 - 09:58
भारताला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आज इंग्लंडच्या उर्वरीत फलंदाजांना बाद करून किमान १५० धावांची भक्कम आघाडी घेतली पाहिजे. इयान बेल (आणि कदाचित मॅट प्रॉयर) हाच मोठा अडथळा आहे. उर्वरीत फलंदाज नवे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Fri, 07/11/2014 - 10:46
टू अर्ली टु से थिस.. खेळपट्टी खूपच निर्जीव आहे. आणि भारतीय गोलंदाजीची अवस्था फार काही चांगली नाहिये.. हाय स्कोरींग ड्रॉची शक्यता जास्त आहे..

आतिवास Sat, 07/12/2014 - 17:39
दोन्ही संघांच्या तळातल्या फलंदाजांनी (अर्थात रूट काही तळातला फलंदाज नाही म्हणा) जो खेळ केला, त्यावरून क्रिकेट मध्ये किती अनिश्चितता असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला!

श्रीगुरुजी Sat, 07/12/2014 - 20:53
भारतीय गोलंदाज विशेषत: इशांत शर्माने आज पुन्हा एकदा मठ्ठ बैलासारखी गोलंदाजी केली. इंद्रसेन (अ‍ॅण्डर्सन) मागील ३-४ डावात उसळत्या चेंडूवर बाद झाला होता. २९८/९ असताना तो खेळायला आल्यावर त्याला बाद करण्यासाठी शर्मा व इतरांनी त्याला सातत्याने फक्त उसळते चेंडू टाकले. पडणारा प्रत्येक चेंडू हा उसळताच असेल हे गृहीत धरून अशा चेंडूचा सामना करण्यासाठी तो आधीच तयार असायचा आणि असे सर्व चेंडू त्याने सहजगत्या खेळून काढले व भरपूर धावा करून गोलंदाजांना रडविले. उसळता चेंडू अनपेक्षितरित्या अंगावर आला तर बाद होण्याची शक्यता असते. पण येणारा प्रत्येक चेंडू हा छाती किंवा खांद्यापर्यंत उसळणार आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा असे चेंडू खेळण्याच्या तयारीनेच फलंदाज उभा असतो. इंद्रसेनला सातत्याने उसळते चेंडू टाकण्याऐवजी यॉर्कर, स्लोअर वन, आत/बाहेर जाणारे चेंडू अशी विविधता आणली असती तर तो लवकर बाद झाला असतो. असो. भारताने सुरवातीला २०२/७ व नंतर २९८/९ अशा उत्तम परिस्थितीतून मोठी आघाडी घ्यायची संधी आपल्या करंटेपणाने घालविली. आता सामना अनिर्णित होण्याचीच शक्यता आहे.

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 11:47
मला वाटते अधिकृत कसोटी सामने झाल्या पासून बहुदा हा एकच सामना असावा ज्यात दोन्ही बाजूच्या शेवटच्या भागीदारीसाठी १०० पेक्षा जास्त धावा झाल्या असाव्यात. क्रिकेट हा खेळ किती विचित्र आहे !

In reply to by आतिवास

ज्यो रूट आणि अँडरसनने भारतीय गोलंदाजाच्या नाकात दम आणला अतिशय निष्प्रभ गोलंदाजी. १९५ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि कसोटीने अनिर्नित अवस्थेकडे प्रयाण केले. शेवटच्या विकेटसाठी इतकी भागीदारी व्हावी अतिशय लज्जास्पद आहे भारतीय गोलंदाजीसाठी. बाकी, विश्वचषक फूटबॉल संपला की इकडे हजर होत राहीन. :) -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sun, 07/13/2014 - 20:34
सामना अनिर्णित होणार हे नक्की. दुसर्‍या डावात चहापानाला भारत ३४७/८. उर्वरीत वेळात भारताचे उर्वरीत फलंदाज बाद करून सामना जिंकणे इंग्लंडला अशक्य आहे. पहिले ३ दिवस भारताने वर्चस्व राखले होते. आज ५ व्या दिवशी ३९ धावांनी मागे पडलेल्या भारताची अचानक ६ बाद १८४ अशी अवस्था झाली तेव्हा भारताकडे फक्त १४५ धावांची आघाडी होती व दिवसातली किमान ७७ षटके शिल्लक होती. अचानक इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली. परंतु बिन्नी, जडेजा व भुवनेश्वर कुमार यांनी उत्तम फलंदाजी करून भारताला पराभवापासून खूप लांब नेले आणि आता उर्वरीत ३१ षटकात सामन्याचा निकाल लागणे अशक्य आहे. एकंदरीत या सामन्यात कोहली (व काही प्रमाणात धवन) वगळता इतर सर्वांनी किमान एका डावात फलंदाजीत चांगले योगदान दिले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शमी व शर्माने बर्‍यापैकी गोलंदाजी केली. अर्थात शेपटाने त्रास देण्याची परंपरा याही कसोटीत सुरू राहिली. तळाच्या २-३ फलंदाजांना बाद करणे हे भारतीय गोलंदाजांसाठी अवघड काम होऊन बसले आहे. असो. पुढील कसोटीत हाच संघ कायम राहील असे वाटते. अश्विन किंवा वरूण एरॉनला आत यायची संधी दिसत नाही. दुसरा कसोटी सामना गुरूवारी १७ जुलैला लॉर्ड्स वर सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 11:48
आजपासून दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू होतोय. खेळपट्टी हिरवीगार असण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागतोय का याचीच उत्सुकता आहे.

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 11:55
जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून पाहावे कारण जादेजापेक्षा अश्विनचे फलंदाजीचे तंत्र जास्त चांगले आहे, शिवाय त्याने शतकही झळकावलेले आहे

In reply to by स्पा

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 14:45
- जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अश्विनचे क्षेत्ररक्षण अत्यंत भिकार आहे. - फलंदाजीत अश्विनच्या तुलनेत जडेजाने फारश्या धावा केलेल्या नाहीत. - भारताबाहेर दोघेही निष्प्रभ गोलंदाज आहेत. एकंदरीत दोघांपैकी कोणालाही घेतले तरी फारसा फरक पडत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 15:16
कसोटीत क्षेत्र रक्षण टी२० किंवा एकदिवसीय सामान्यैतके महत्वाचे दिसून येत नाही, कारण अगदी एक एक धावा वाचवताना कोणी दिसत नाही अर्थात अपवाद असेलच भारतभर दोघेही कुचकामी ठरलेले असले तरी आत्ताच्या इंग्लंड च्या पिचेस आणि माग्च्या दौर्यातल्या पिचेस ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे

In reply to by स्पा

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 15:27
तेंडुलकरांच्या सचिनला पण परत खेळण्यासाठी आवताण द्यावे. इथल्या काही मिपाकरांना(मी नव्हे) त्याच्याशिवाय करमत नाही.

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 13:05
रहाणे काल मस्त खेळला. त्याला बरेच दिवस कुजवले होते. पण मागील वर्षापासून कसोटीत संधी मिळताच त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली (आतापर्यंत ७ कसोटीत ३ अर्धशतके व २ शतके). धवन पूर्ण अयशस्वी ठरतोय. पुढच्या डावात त्याने धावा केल्या नाहीत तर गंभीर नक्की आत येईल. पुढच्या कसोटीत जडेजा किंवा बिन्नीऐवजी अश्विन नक्की आत येणार. कोहलीला साधारणपणे मालिकेच्या उत्तरार्धात सूर सापडतो. तो बहुतेक तिसर्‍या कसोटीपासून फॉर्मात येईल. सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Fri, 07/18/2014 - 14:44
***सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे. -त्याचा इरफान पठाण होऊ नये, ही सदीच्छा!!

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 20:46
जर कुकची कामगिरी सुधारली नाही किंवा जर इंग्लंडला ही मालिका जिंकण्यात अपयश आले तर कुकची कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊन (कदाचित संघातूनही हकालपट्टी होऊ शकते), इयान बेल कर्णधार होऊ शकतो. कदाचित ही मालिका संपण्यापूर्वीच हा निर्णय होऊ शकेल.

श्रीगुरुजी Sat, 07/19/2014 - 21:22
सामना चांगल्या अवस्थेत आहे. तिसर्‍या दिवशी दोन्ही संघाचे डाव संपून भारत २४ धावांनी मागे आहे. पण दुसर्‍या डावात आतापर्यंत भारत १ बाद १०७ अशा उत्तम स्थितीत आहे. सामना निर्णायक होण्याची दाट शक्यता आहे. आज दिवसअखेर भारताकडे अंदाजे १६० धावांची आघाडी असेल. उद्या ४ थ्या दिवशी भारताने चहापानानंतर १ तास खेळून अंदाजे ३७५ धावांचे आव्हान दिले तर ५ व्या दिवशी इंग्लंडला हिरव्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे. इंग्लंडतर्फे अ‍ॅण्डरसन (आतापर्यंत ३ डावात ९ बळी व २ डावात १०० धावा) व भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (आतापर्यंत २ डावात ११ बळी व ३ डावात १५७ धावा) जबरदस्त कामगिरी करत आहेत.

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 20:21
मस्त सामना चाललाय. इंग्लंडला आजच्या उर्वरीत २ तासात व उद्या ५ व्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या ३१९ धावा करणे अवघड आहे. भारताला सामना जिंकून मालिकेत सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भुवनेश्वर पुन्हा एकदा चमकला. २ कसोटीत ४ डावात २०० हून अधिक धावा (त्यात ३ अर्धशतके) आणि आतापर्यंत ११ बळी ही जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आहे. मुरली विजय सुद्धा उत्तम खेळतोय. कोहली अजून अयशस्वी आहे (अनुष्काचा पायगुण ?). परंतु मालिकेच्या उत्तरार्धात तो नक्की भरात येईल.

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:32
मस्त जिंकलो. कालच लिहिल्याप्रमाणे आज भारताला चांगलीच संधी होती. अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 07/21/2014 - 21:48
तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.
आणि मग-
अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!
धन्य!! अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:25
काल ईशांतने चांगली गोलंदाजी केली हे मान्य आहे. परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे. त्याला कालच्या विजयाचे क्रेडीट आहेच. त्याच्याबरोबरीने भुवनेश्वर कुमारलाही (४४ आणि ५२ धावा आणि पहिल्या डावात ५ बळी) सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता. पहिल्या कसोटीतही भुवनेश्वरला डावलून जेम्स अ‍ॅण्डरसनला सामनावीर पुरस्कार दिला होता (भुवनेश्वर ५८ आणि नाबाद ६३ धावा आणि पहिल्या डावात ६ बळी). >>> >>> अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते. काल भुवनेश्वर कुमार खूप बळी मिळवेल असे वाटत होते. प्रत्यक्षात त्याला एकही बळी मिळाला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Tue, 07/22/2014 - 13:39
परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे
सहमत.. कालचा विजय त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइंट ठरो .. आणि याआधीचा "तो" ईशांत परत न येवो!! :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु गुरुवार, 07/24/2014 - 11:27
त्याची "केस" फारच डोळ्यावर आणी हाताबहेर झाली होती आता "सावरून" जाग्यावर येईल अशी अपेक्षा. पण काही करा भुवीचा "पठाण" करू नका!!

In reply to by नाखु

असंका Fri, 07/25/2014 - 19:35
बर्‍याच लोकांना धक्का बसला आहे म्हणे इशांतच्या खेळण्याचा! त्याने पाँटिंगची काय भंबेरी उडवली होती ती तरी आठवायची!

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 07/25/2014 - 20:51
त्याने पॉंटिंगची एकाच डावात भंबेरी उडविली होती आणि ती सुद्धा जानेवारी २००८ मध्ये (म्हणजे तब्बल साडेसहा वर्षांपूर्वी). त्यानंतर किमान २०१३ अखेरीपर्यंत तो फारसा चमकला नाही. काही सामने तर त्याच्या खराब गोलंदाजीमुळे आपण हरलो. उदाहरणार्थ नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात ७ एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यातल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ३ षटकात तब्बल ४७ धावा हव्या होत्या व त्यांचे ६ खेळाडू बाद झाले होते. दुसर्‍या कोणत्याही संघाने इतका हातात आलेला सामना क्वचितच घालविला असता. त्या सामन्यात इशांत शर्माने ४८ वे षटक टाकताना सर्व चेंडू लेगस्टंपवर आखूड टप्प्याचे किंवा फुल्टॉस या प्रकारचे टाकले. त्यात १ नोबॉलही होता ज्यावर फ्रीहिट सुद्धा मिळाली. समोर फॉकनर होता. त्याने त्या षटकात तब्बल ३४ धावा चोपून उर्वरीत २ षटकांत फक्त १३ धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण करून शेवटी जवळपास पूर्ण हरलेला सामना जिंकून दाखविला. इशांतची कामगिरी जानेवारी २००८ नंतर फारशी चांगली नव्हती. अर्थात २०१४ मध्ये तो सुधारल्यासारखा वाटतोय. जानेवारी २०१४ मध्ये द. आफ्रिकेत त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ४ बळी व दुसर्‍या डावात १ बळी अशी चांगली गोलंदाजी केली. नंतर न्यूझीलँडमध्ये दोन्ही कसोटीतल्या एकेका डावात ६-६ बळी मिळवून २ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक १६ बळी मिळविले. आणि सध्याच्या मालिकेत पहिल्या कसोटीत ३ व दुसर्‍या कसोटीत ७ बळी मिळवून "सामनावीर" झाला. एकंदरीत तब्बल ६ वर्षांनी परदेशात त्याला बळी मिळायला लागलेत. त्याचा हाच फॉर्म कायम रहावा हीच सदिच्छा!

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:32
पंचांचे काही निर्णय भारताविरूद्ध गेले नसते तर अजून सहज व लवकर सामना जिंकला नसता. दुसर्‍या डावात रहाणेच्या आर्म गार्डला लागून उडालेल्या चेंडूवर त्याला चुकीचे बाद दिले गेले. इंग्लंडच्या दुसर्‍या डावात ४ थ्या दिवशी मोईन अली जडेजाच्या गोलंदाजीवर अगदी अचूक पायचित झाला होता. पायावर चेंडू बसला तेव्हा तो क्रीजच्या आतच होता आणि रिप्लेमध्ये तो चेंडू मधल्या यष्टीवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. तरीसुद्धा धर्मसेनाने त्याला बाद दिला नव्हता. त्याच मोईन अलीने पुढे तब्बल २ तास खेळून १०१ धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या दिशेने न्यायला सुरूवात केली होती. या सामन्या साठी डी आर एस प्रणाली असती तर भारताला खूप फायदा झाला असता. जगात फक्त भारताचा डी आर एस ला विरोध आहे. या विरोधाचे कारण अनाकलनीय आहे.

तुषार काळभोर Tue, 07/22/2014 - 14:38
कूक- फॉर्म परत येतोय बहुतेक.... (संघातील स्थान राहील, कर्णधारपद जाऊ शकते, पण सध्यातरी इंग्लंडकडे दुसरा कर्णधार दिसत नाहिये.) धवन-दुसर्‍या डावातील मोजक्या धावांचा फार उपयोग होईल असे वाटत नाही, गंभीर वाट पाहतोय. बिन्नी-सध्या फक्त ३ पूर्ण गोलंदाज (भुवनेश्वर, शमी, इशांत), अन् २ 'फलंदाज-गोलंदाज' किंवा 'गोलंदाज-फलंदाज' (जडेजा अन् बिन्नी) आहेत. बहुतेक बिन्नी/जडेजा पैकी एकाला बसवून अश्विनला अंतिम संघात घेतील. (तो बर्‍यापैकी फलंदाजी सुद्धा करू शकतो.) भुवनेश्वरसुद्धा अडीनडीला उपयोगी पडू शकतो.

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 21:26
धवनला अजून एका कसोटीत संधी मिळेल. त्यातही तो अपयशी झाला तर गंभीर नक्की आत येईल. तिसर्‍या कसोटीत बिन्नीच्या जागी अश्विन आत यायची शक्यता आहे. इंग्लंडची तिसर्‍या कसोटीआधीच एक विकेट पडली आहे. तिसर्‍या कसोटीसाठी मॅट प्रॉयर च्या जागी जॉस बटलर ला यष्टीरक्षक म्हणून घेतले आहे. बेन स्टोक्स च्या जागी ख्रिस जॉर्डन किंवा ख्रिस वोक्स येण्याची देखील शक्यता आहे. इंग्लंडने खरं तर केव्हिन पीटरसन व जोनाथन ट्रॉट ला परत बोलवायला पाहिजे. जमल्यास ग्रॅमी स्वानला देखील निवृत्ती रद्द करून परत बोलवावे. भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 07/23/2014 - 10:45
भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.
त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). त्यातच हल्लीच त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता असे मित्राकडुन ऐकले होते.

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:41
>>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). लघुशंका हे कारण नसावे कारण अ‍ॅण्डरसन, पीटरसन आणि अजून एक खेळाडू या तिघांनी देखील रात्री मैदानात जाऊन खेळपट्टीवर लघुशंका केली होती. त्यातला अ‍ॅण्डरसन अजूनही संघात आहे. बहुतेक पानसरे फॉर्मात नसावा. अन्यथा भारताविरूद्ध त्याला नक्की घेतले असते.

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:53
दारूच्या नशेत खेळपट्टीवर केलेली लघुशंका असो वा दारूच्या नशेत वरच्या मजल्यावरून सोडलेली धार असो (एका बाऊन्सरच्या दुर्दैवाने तो नेमका त्याच धारखाली सापडला), दोन्ही कृती सारख्याच किळसवाण्या आहेत.

श्रीगुरुजी Mon, 07/28/2014 - 21:06
तिसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडने परत पाटा खेळपट्टी बनविली. इंग्लंड बहुतेक ५५० च्या आसपास डाव घोषित करेल असं वाटतंय. बिन्नीच्या जागी अश्विनला न घेता रोहीत शर्माला घेण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. अश्विन व रोहीत च्या फलंदाजीत फार फरक नाही, पण गोलंदाजीत खूप फरक आहे. पंकज सिंगचं दुर्दैव. त्याच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले व एक अत्यंत स्पष्ट असलेला पायचितचा निर्णय पंचांनी नाकारला. डी आर् एस् असती तर पायचित चा निर्णय भारताच्या बाजूने लागला असता. भारताचा डी आर् एस् असलेला विरोध अनाकलनीय आहे. तंत्रज्ञान हाताशी असून वापरायचे नाही या निर्णयामागे काहीच तर्कशुद्ध कारण नाही. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले श्रीनिवासन्, राजीव शुक्ला इ. मंडळी बीसीसीआय वर नागोबा सारखी वेटोळे घालून बसलेली आहेत. बीसीसीआय ची सूत्रे क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंच्या हातात असती तर असे अनाकलनीय निर्णय झाले नसते आणि कदाचित भ्रष्टाचारही कमी झाला असता. असो.

श्रीगुरुजी Tue, 07/29/2014 - 20:44
पाटा खेळपट्टीवर भारताची वाट लागलेली दिसतेय (आतापर्यंत ५ बाद २१७). एकटा रहाणे अर्धशतक काढून खिंड लढवतोय. मुरली विजय, पुजारा, कोहली आणि रोहीत शर्मा एक तासापेक्षा अधिक वेळ खेळून आणि प्रत्येक जण किमान ५२ चेंडू खेळून स्थिरावल्यावर मोठी धावसंख्या न करता बाद झाले. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑफ किंवा मधल्या यष्टीवर पडून बाहेर जाणारे चेंडू खेळणे त्याला अशक्य होताना दिसतंय. पुढच्या डावात काही केलं नाही तर गंभीर नक्कीच आत येणार. एकंदरीत परिस्थिती कठीण आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 12:45
फॉलोऑनची परिस्थिती असली तरी इंग्लंड फॉलोऑन न देता अंदाजे ३ तास फलंदाजी करून १६०-१७० धावा करून डाव घोषित करेल व दुसर्‍या डावात अंदाजे ८ तासाच्या खेळात भारतापुढे ३७५-४०० धावांचे आव्हान ठेवेल. २००१ मध्ये कलकत्त्यात दुसर्‍या कसोटीत स्टीव्ह वॉ ने भारताला फॉलोऑन दिला होता आणि नंतर भारताने लक्ष्मण-द्रविडच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर ५ व्या दिवशी १ तासानंतर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३००+ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भज्जीच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळून भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इतर सर्व देश फॉलोऑन देणे शक्य असूनही ५ व्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी टाळण्यासाठी फॉलोऑन न देता फलंदाजी करतात.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Wed, 07/30/2014 - 13:00
२००८ च्या चेन्नई कसोटित भारताने चौथ्या डावात ३८० चं आव्हान आरामात पार केलं होतं. (सेहवागमुळे ते शक्य झाले होते) त्यामुळे इंग्लंड ४५० पेक्षा कमी आव्हान ठेवील असे वाटत नाही.

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 13:18
तेव्हा फॉलोऑनची परिस्थिती नव्हती. इंग्लंडने अंदाजे ७ तासात भारताला ३७५ धावांचे आव्हान दिले तेव्हा भारताला ५ व्या दिवशी फलंदाजी करणे अवघड जाईल असाच इंग्लंडचा अंदाज होता. तसेच भारत हे आव्हान न स्वीकारता बचावात्मक खेळ करून सामना अनिर्णित ठेवायचा प्रयत्न करेल असाही इंग्लंडचा अंदाज होता. त्याला कारणही तसेच होते कारण भारताने भूतकाळात फक्त ४ वेळा ४ थ्या डावात ५ व्या दिवशी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. (१९७६ मध्ये विंडीजमध्ये तिसर्‍या कसोटीत ४०४ धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. त्यात गावसकर व विश्वनाथचे शतक, मोहिंदरचे अर्धशतक व ब्रिजेश पटेलच्या नाबाद ४९ धावांचा वाटा होता. नंतर १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताने ५ व्या कसोटीत ४७६ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ४५० धावा केल्या होत्या. नंतर १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने ४ थ्या कसोटीत ४३९ धावांचा पाठलाग करताना ८ बाद ४२९ पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर १९८६ मध्ये भारतात मद्रासमध्ये तिसर्‍या कसोटीत भारताने ३४८ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ३४७ धावा करून इतिहासातला केवळ दुसरा कसोटी सामना बरोबरीत सोडविला होता.) मात्र इतर प्रसंगी भारताने कच खाऊन ५ व्या दिवशी बचावात्मक खेळ करून सामना न हरण्याची दक्षता घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. १९८६ मध्ये इंग्लंडमधील ३ रा कसोटी सामना, १९९३ मध्ये आफ्रिकेतील ४ था कसोटी सामना, नंतर २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध आफ्रिकेतील ३ रा कसोटी सामना, २०११ मध्येच विंडीजविरूद्ध विंडीजमधील ३ रा कसोटी सामना इ.). त्यामुळेच कदाचित भारत ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करण्याचे धाडस करणार नाही असे गृहीत धरून स्ट्रॉसने डाव घोषित करून आव्हान दिले होते. पण सेहवागच्या ५८ चेंडूत ८५ धावा व सचिनचे नाबाद शतक यामुळे भारताने ३७५ धावांचे आव्हान लीलया पार करून सामना जिंकला. अर्थात त्या सामन्यात खेळपट्टी पाटा होती हे सुद्धा विसरून चालणार नाही.

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 20:47
जिंकायला ४४५ करायच्यात. अत्यंत अवघड लक्ष्य आहे. जवळपास १२० षटके ८ तासात खेळायची आहेत. जिंकणे जवळपास अशक्य आहे. सामना वाचविण्याची शक्यता देखील बरीच कमी आहे. चांगले तंत्र असलेल्या रहाणे, पुजारा व कोहलीवरच सगळी मदार आहे. इतरांची खात्री नाही. अर्थात माझे अंदाज खोटे ठरो हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

In reply to by श्रीगुरुजी

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/31/2014 - 15:16
देवपण नाही वाचवु शकला. प्रत्येक गोष्ट देवावर नका टाकु. मागची इंग्लंड मधली कसोटी मालिका विसरलात वाटते.

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 11:49
लॉर्ड्सवर भारतीय फास्ट बोलर्सनी बाउंसरवर विकेट काढल्या.. आणि आता ईंग्लिश पार्टटाइम स्पिनर्स स्पिन चांगल्याप्रकारे हाताळणार्‍या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स काढतायत ते पण ईंग्लिश खेळपट्टीवर.. दोन टोकाचे परफॉरमन्सेस !! बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. आणि हा सामना तर ऑलमोस्ट हरलाच आहे.. बाकी २ ड्रॉ करण्याचीच अपेक्षा आहे आता.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/31/2014 - 14:13
>>> बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. हे तितकेसे खरे नाही. भारताने १९६८ मध्ये न्यूझीलँड मध्ये ३-१ असा विजय मिळविला होता. १९७६-७७ मध्ये ऑस्ट्रेलियात २-३ अशी मालिका हरली होती. १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये २-० असा विजय मिळविला होता. १९७६ मध्येच भारताने न्यूझीलँडला न्यूझीलँडमध्ये २-१ असे हरविले होते. अर्थात ही तुरळक उदाहरणे आहेत. अगदी थोड्या मालिकांमध्ये भारताने एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 16:45
गेल्या दोन दशकात म्हणायचं होतं मला.. खास करुन अझरुद्दीनच्या संघाने १९९३ ला इंग्लंड्ला ३-० हरवून मायदेशात जिंकायची सवय लावल्यापासून.. त्यापूर्वी मायदेशातपण इतके जिंकत नसत..

सौंदाळा गुरुवार, 07/31/2014 - 17:55
हम्म जेवणापर्यंत सुध्दा दम धरला नाही आपल्या फलंदाजांनी. धवन, रोहीत शर्मा किंवा जडेजा, शामी, पंकजसिंग यांची गछंती होऊन गंभीर, अश्विन, अरॉन किंवा इश्वर पांडे, इशांत शर्मा आत येतील असे वाटत आहे. पुढची कसोटी ७-ऑगस्ट मँचेस्टरला होणार आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 11:07
पुढच्या सामन्यात धवन आणि रोहीत शर्मा गच्छंती होऊन गंभीर आणि अश्विन आत यावेत अशी इच्छा आहे. धवन नक्की बाहेर जाणार. परंतु रोहीत शर्मा हा धोनीचा 'ब्ल्यू आईड बॉय' असल्याने कितीही वाईट खेळला तरी तो संघात असतोच . त्यामुळे त्याची गच्छंती अवघड वाटतेय. (२०१२ मध्ये श्रीलंकेच्या दौर्‍यात ५ एकदिवसीय सामन्यात त्याने एकूण १८ धावा केल्या होत्या. तरीसुद्धा त्यानंतरच्या ट-२० मध्ये त्याला खेळवलंच. वास्तविक पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ०, ४, ४ अशी कामगिरी केल्यावर त्याला लगेच हाकलायला हवा होता. पण धोनीचा तो लाडका असल्याने त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले. पूर्वी रवी शास्त्री असाच गावसकर व डुंगरपूर यांचा कमालीचा लाडका होता.) पंकज सिंग दुर्दैवी ठरला. त्याच्या गोलंदाजीवर २ झेल सुटले. परंतु दुर्दैवाने त्यालाही कदाचित बाहेर काढून वरूण एरॉन/ईश्वर पांडे आत येण्याची शक्यता आहे. ५ गोलंदाज नको असेल तर बुद्धीमान साहा हा सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे. भारत खराब फलंदाजी, खराब गोलंदाजी व अत्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे हरला हे सत्य आहे. त्याच बरोबरीने पंचांची सदोष कामगिरी देखील इंग्लंडच्या विजयाला कारणीभूत ठरली. डी आर एस पद्धत असती तर भारताला बराच फायदा होऊ शकला असता. असो.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 08/01/2014 - 15:31
2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? आणि रोहित शर्मा एकुण किती कसोटी खेळला आहे की ज्यामुळे आपण तो लाडका असल्याचा निष्कर्ष काढला आहे?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 21:05
>>> 2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? रोहीत शर्माचे सुरवातीपासूनचे सर्व कसोटी डाव बघा (६ नोव्हेंबर २०१३ पासून आजतगायत). १७७, १११* (दोन्ही भारतात विंडीजविरूद्ध), १४, ६, ०, २५ (द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध), ७२, १९, ०, ३१* (न्यूझीलँडमध्ये किवींविरूद्ध), २८, ६ (सध्याच्या मालिकेत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध) भारतातल्या पाटा खेळपट्टीवर विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीसमोर तो २ डाव खेळला व दोन्ही डावात शतके केली. पण भारताबाहेर पडताक्षणी त्याच्या धावा बंद झाल्या. ७२ हा एकमेव डाव वगळता परदेशातील १० पैकी ९ डावात तो अपयशी आहे. त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की लागोपाठ अनेक डावात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात असतो. उदा. १७ फेब्रु २००८ ते ३ जुलै २००९ या अंदाजे साडेसोळा महिन्यांच्या कालावधीत तो एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळला. त्यात फक्त २ अर्धशतके (५८ आणि ६६)आणि एकदा ४३ व एकदा ३२ धावा केल्या होत्या. उर्वरीत २७ सामन्यात त्याने ० ते २८ च्या दरम्यान धावा केल्या होत्या. त्यात १५ वेळा त्याने एकेरी आकड्यात धावा केल्या आहेत (३१ पैकी १५ सामन्यात एकेरी धावा आणि त्यात ३ वेळा ०). तरीसुद्धा तो संघात टिकला. २०१० मध्ये त्याने तुलनेने काहीशी कामगिरी सुधारली. नंतर ११ डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१२ या अंदाजे साडेबारा महिन्यात तो एकूण १५ सामने खेळला. त्यात फक्त १ अर्धशतक (६८ धावा) होते. उर्वरीत १४ डाव तो ० ते ३३ या दरम्यान बाद झाला. त्यात १५ पैकी ८ डावात त्याने एकेरी धावा केल्या (त्यात ३ वेळा ०). जुलै २०१२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात खेळविले होते आणि त्याची कामगिरी होती ५, ०, ०, ४, ४. आश्चर्य म्हणजे या मालिकेपाठोपाठ लगेचच शेवटचा ट-२० सामना होता. ५ सामन्यात अपयशी ठरल्यावर निदान ट-२० मध्ये तरी त्याच्याऐवजी दुसर्‍या फलंदाजाला संधी द्यायला हवी होती. परंतु तो धोनीचा लाडका असल्याने या सामन्यात पण त्यालाच संधी मिळाली. त्याची कामगिरी बघता तो अनेकवेळा लागोपाठ अनेक सामने अपयशी ठरून सुद्धा त्याला वारंवार संधी मिळाल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यामुळेच रहाणेसारखा गुणी खेळाडू अनेक वर्षे संघाबाहेर राहिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 08/04/2014 - 00:54
सचिन आणि युवराजनंतर सर्वात शैलीदार फलंदाज आज रोहित शर्मा आहे. तो भरात असताना त्याचा खेळ ज्यांनी कुणी बघितला आहे ते हे अमान्य करू शकत नाहीत. मनोरंजन हा जर क्रिकेट बघण्याचा उद्देश आसेल तर रोहित एवढं मनोरंजन करणारा आज आपल्याकडे कुणीच नाही. पण हे माझं मत झालं. जसं रहाणे हा गुणी खेळाडू असल्याचं आपलं मत आहे तसंच. आपण आपली मतं स्वतंत्रपणे का मांडत नाही? माझ्या प्रश्नांच्या खालीच आपण आपली मतं मांडल्यामुळे माझा असा गैरसमज झाला की ही माझ्या प्रश्नांना आपली उत्तरे आहेत. आपल्या सोइसाठी माझे प्रश्न सोपे करुन सांगतो- 1. 2013 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या? 2. 2011 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या 3. रोहित हा आजपर्यंत सगळे मिळून एकूण किती कसोटी सामने खेळला आहे की ज्या आधाराने तो लाडका आहे असे दिसून येते?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Mon, 08/04/2014 - 12:50
रोहीतच्या कसोटी डावांची माहिती आधीच्या प्रतिसादात दिली आहे. त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. त्याची २०११ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (१२/१/२०११ ते ११/१२/२०११) (द. आफ्रिकेत) ११, ९, २३, १, ५, (वेस्ट इंडीजमध्ये) ६८*, ७*, ८६*, ३९, ५७, (इंग्लंडमध्ये) ०*, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, ९०*, ९५, २७, २१ ही कामगिरी अतिशय बोलकी आहे. परदेशात, विशेषतः आफ्रिकेत, तो कायमच अपयशी ठरताना दिसतो. ५ सामन्यांच्या मालिकेत पहिले ३ सामने अपयशी ठरूनही त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (११, ९, २३, १, ५). नंतर २०१२ मध्येही श्रीलंकेत पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ५, ०, ० अशी कामगिरी करूनसुद्धा त्याला वगळले जात नाही व उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (५,०,०,४,४). यावरून तो कर्णधाराच्या मर्जीतला आहे हे सिद्ध होतं. याच रोहीतची कामगिरी भारतात व विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीविरूद्ध एकदम सुधारते आणि त्या भांडवलावर तो संघात स्थान टिकवितो. पण इतर देशांविरूद्ध त्याची कामगिरी एकदम ढेपाळते. त्याने २०१२ मध्ये १३ एकदिवसीय सामन्यात एकूण १६८ धावा केल्या (त्यात फक्त एक अर्धशतक - ८३). ही अत्यंत खराब कामगिरी बघता त्याला एकदिवसीय सामन्यातून वगळायला हवे होते. पण तरीसुद्धा तो संघात होता. त्याची २०१३ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (२३/१/२०१३ ते ०८/१२/२०१३) (भारतामध्ये इंग्लंडविरूद्ध) ८३, ४ (चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये) ६५, ५२, १८, ३३, ९ (वेस्ट इंडिजमध्ये) ६०, ५, ४६, ४८*, ५८ (झिंबाब्वेमध्ये) २०, १, १४, ६४* (भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध) ४२, १४१*, ११, ९, ७९, २०९, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, १२, ४ (द. आफ्रिकेत) १८, १९ यावरून पुन्हा एकदा असंच दिसतंय की तो विंडीजविरूद्ध आणि बहुतेक वेळा भारतीय खेळपट्ट्यांवरच धावा करतो. इतर देशात त्याच्या धावा बहुतेक वेळा आटलेल्या दिसतात. अगदी झिंबाब्वेमध्ये सुद्धा ४ पैकी ३ डावात तो अपयशी होता. द. आफ्रिकेविरूद्ध तर तो कधीच धावा करताना दिसत नाही. त्याची २०१४ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (न्यूझीलँड मध्ये) ३, २०, ३९, ७९, ४ (बांगलादेश मध्ये) २१, १३, ५६, १८* विंडीजशिवाय इतर देशांमध्ये तो फारसा यशस्वी नसतो हे पुन्हा एकदा २०१४ वरून सिद्ध होतंय.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 08/07/2014 - 19:21
नाही हो, असं नाही. तीन वाक्यात उत्तर देता येत होतं. आपण अगोदर रोहितबद्द्ल टीका करताना कसं २०१३ मध्ये त्याने अमुक एवढे रन केले असं एका वाक्यात लिहिलं होतंत ना, तसंच. आता तुम्ही एक काम करा. खाली मी तयार वाक्यच देतो. त्यात गाळलेल्या जागा फक्त भरा- १. रोहित शर्माने २०१३ साली _____ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. २. रोहित शर्माने २०११ साली ________ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. ३. रोहित शर्मा सगळ्या मिळून आत्तापर्यंत ___ कसोटी खेळला आहे, ज्यावरून असे सिद्ध होते की तो कर्णधाराचा लाडका आहे.

देशपांडे विनायक गुरुवार, 07/31/2014 - 18:13
जडेजाने सोडलेला CATCH आणि रोहित शर्माने पहिल्या इंनिंग ला फेकलेली विकेट यामुळे हरण्याला पर्याय नाही असे दिसायला लागले होते ते शेवटी दिसलेच

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:20
वृध्दीमान साहा भारतात परतणार आहे .. बहुतेक दुखापतीमुळे. त्याच्याजागी नमन ओझाला बोलावले आहे. नमन ओझाने ऑस्ट्रेलियात ३ डावात १ द्विशतक आणि २ शतके केली आहेत त्यातही २ दा नाबाद. दोनही सामने ब्रिस्बेनच्या उसळत्या खेळपट्टीवर होते. तो वेळेत पोहोचला तर त्याची वर्णी लागावी असे वाटते. इशांत चौथा सामनाही खेळु शकणार नाही हे धोणीने कालच स्पष्ट केलय. त्यामुळे बदल होणार संघात हे नक्की. पण अति बदल टाळण्यासाठी कदाचित शमीला परत संधी मिळु शकेल. संघ असा असावा ४थ्या सामन्यासाठी असे वाटते. विजय, ओझा/ गंभीर, पुजारा, कोहली, रहाणे, धोणी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर, शमी, पांडे/ अ‍ॅरॉन

भाते गुरुवार, 08/07/2014 - 23:41
दहापैकी सहा खेळाडू शुन्यावर बाद! एका कसोटी सामन्यात सर्वाधिक खेळाडू शुन्यावर बाद होण्याचा जागतिक विक्रम काय आहे? सचिनने वयाच्या सतराव्या वर्षी इथेच आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते!

श्रीगुरुजी Mon, 08/11/2014 - 12:21
६-७ दिवस मिपा संकेतस्थळ बंद होते. तेवढ्यात चौथा कसोटी सामना सुरू होऊन ३ दिवसांत संपलादेखील. तिसर्‍या दिवशी शेवटच्या केवळ एका सत्रात भारताने ९ गडी गमावून स्वतःच्या आणि इंग्लंडच्या संघाचीही विश्रांतीची सोय केली. ते सत्र खेळून काढले असते तर उगाच चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये येऊन बसावे लागले असते आणि दिवसभर पावसाची दाट शक्यता असल्याने खेळही नाही आणि आउटिंग पण नाही अशी भारताची व इंग्लंडची कंटाळवाणी अवस्था झाली असती. ५ व्या दिवशीही तेच झाले असते. त्याऐवजी भारतीय खेळाडूंनी पटापट विकेट फेकून सर्वांचीच अडचणीतून मुक्तता केली. त्यामुळे विराट कोहलीला अनुष्काबरोबर फिरायला २ जास्त दिवस मिळाले. इतरांनाही फुकटचे २ दिवस पदरात पडले. भारताच्या पहिल्या डावात तब्बल ६ खेळाडूंनी शून्य धावा करून एका जागतिक विक्रमाची बरोबरी केली. या पराभवाबरोबर धोनी आता भारताच्या क्रिकेट इतिहासातील परदेशातील सामन्यातील सर्वाधिक अयशस्वी कर्णधार ठरलेला आहे. पूर्ण फॉर्म हरविलेल्या कुक ला भारतानेच मदतीचा हात दिला. भारताचे प्रमुख फिरकी गोलंदाज बळीसाठी झगडत असताना कामचलावू फिरकी गोलंदाज मोईन अली तब्बल १९ बळी मिळवून मुख्य गोलंदाज बनण्याचे श्रेय भारताचेच आहे. आपल्या पहिल्या बळीसाठी झगडणार्‍या बिचार्‍या पंकज सिंगला शेवटी २ बळी मिळाले हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू. असो. आता ५ व्या कसोटीसाठी भारताने जास्त विचार करू नये. उर्वरीत मोकळे दिवस सराव वगैरे सारख्या फालतू गोष्टीत वाया न घालविता शॉपिंग, आउटिंग, डेटिंग, पिकनिक इ. महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरावेत. संघ निवडीच्या वेळी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून पहिले ज्याचे नाव येईल त्याला कर्णधार करावे व उर्वरीत १० खेळाडू चिठ्ठ्या टाकून उचलावेत. कारण कोणीही संघात असले तरी काहीही फरक पडणार नाही. शेवटी पत्त्याच्या कॅटमध्ये जर सर्व ५२ पत्ते कर असले, तर कितीही वेळा पत्ते पिसले तरी काय फरक पडणार आहे?

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 17:44
लज्जास्पद पराभव. मोईन अली विकेट काढतो, जडेजा, अश्विन मात्र रिकामेच. लॉर्डस् वर जिंकलेला संघ हाच का असा प्रश्न पडलाय.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/14/2014 - 21:09
उद्यापासून शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. सुरवातीला १-० असा आघाडीवर असणारा भारत आता १-२ असा मागे पडला आहे. भारत परदेशात लागोपाठ मालिका हरत आहे. २०११ च्या विश्वचषक विजयानंतर भारत परदेशात एकूण ५ मालिका खेळला. त्यापैकी वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये भारत मालिका हरला. आता ही मालिकादेखील भारत हरण्याच्या मार्गावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत परदेशात खेळलेले १३ कसोटी सामने हरलेला आहे. याबाबतीत विक्रम ब्रायन लारा व स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर आहे. दोघेही कर्णधार असताना परदेशात एकूण १६ कसोटी सामने हरले होते. धोनी त्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. उद्या इशांत शर्मा आत येणार हे नक्की. बहुतेक पंकजसिंग बाहेर जाईल. कदाचित जडेजाच्या जागी स्टूअर्ट बिन्नी आत येऊ शकतो. बाकी सगळे "नेहमीचेच यशस्वी कलाकार" असतील. असो. निदान अंतिम कसोटीत तरी भारताने आपली गेलेली अब्रू काही प्रमाणात परत मिळवावी हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

श्रीगुरुजी Tue, 08/19/2014 - 12:15
भारतीय संघाला शिव्या द्यायची पण लाज वाटतीये. शिव्या द्यायची पण यांची लायकी नाही. लागोपाठ ३ वेळा एक-दीड सेशन मध्येच ऑलआऊट झाला याची धोनी किंवा इतर कोणालाही लाज, लज्जा, खंत, शरम इ. काहीही वाटत नाही. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटचा सत्यानाश झाला हे उघड सत्य आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलचे दुष्परिणाम २०११ मध्येच दिसू लागले होते. सचिन, द्रविड इ. चे तंत्र सुद्धा शेवटी शेवटी बिघडल्याचे दिसले त्याचे कारण आयपीएलच होते. द्रविडसारखा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज आपल्या शेवटच्या १५-१६ डावात बहुतेक वेळा त्रिफळा बाद झाला होता तो तंत्र बिघडल्यामुळेच. भारतातल्या पाटा खेळपट्ट्यांवर फलंदाजाला अनुकूल क्षेत्ररक्षक रचनेसमोर बॅट कशीही वेडीवाकडी फिरवून १५-२० चेंडू खेळून २५-३० धावा करणारे शूर वीर कसोटीत एकत्रित ३० षटके सुद्धा टिकू शकत नाहीत हे बघणे अत्यंत क्लेशदायक होते. पूर्वी गावसकर तब्बल २-२ दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करत असे. आताचे खेळाडू अर्धा तास सुद्धा टिकू शकत नाहीत हे अत्यंत दुर्दैव आहे. एवढी नामुष्की होऊनसुद्धा "उगाच आयपीएलवर जळू नका" असे अत्यंत निगरगट्टपणे धोनी बजावत होता. आयुष्यात हातात कधीही चेंडूफळी न धरलेल्या पुढार्‍यांनी जेव्हा बीसीसीआयमध्ये शिरकाव केला तेव्हाच भारतीय क्रिकेटच्या अधोगतीला सुरूवात झाली. ज्या ज्या क्षेत्रात पुढारी घुसतात त्या सर्व क्षेत्रांचा सत्यानाश होतो. भारतीय क्रिकेट सुधारण्याचे उपाय म्हणजे सर्वप्रथम या पुढार्‍यांना बीसीसीआय मधून हाकलून देणे आणि आयपीएल बंद करणे. जर आयपीएल बंद करणे शक्य नसेल तर निदान आयपीएलमध्ये न खेळणार्‍यांनाच कसोटी संघात निवडावे व आयपीएलमध्ये खेळणार्‍यांना फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळवावे. आणि तेही शक्य नसेल तर भारताने कसोटी क्रिकेट खेळणे थांबवावे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 08/20/2014 - 20:02
+१ शर्यतीचा बैल वेगळा, शेतीसाठी काम करणारा बैल वेगळा आणि 'ते' काम करणारा वळु वेगळा ;) क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 21:08
>>> 'ते' काम करणारा वळु वेगळा *LOL* >>> क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते. + १ सध्या एकच बदल लगेच करता येईल. कसोटीसाठी आयपीएल खेळलेले कमीतकमी खेळाडू निवडावेत.

श्रीगुरुजी Mon, 08/25/2014 - 12:24
आजपासून भारत वि. इंग्लंड ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. आजचा सामना ब्रिस्टलमध्ये भारतीय वेळेनुसार दु. ३ वाजता सुरू होईल. कसोटी सामन्यात माती खाल्लेल्या भारताने निदान एकदिवसीय सामन्यात तरी अब्रू राखावी. ५ सामन्यांपैकी निदान २ सामने तरी जिंकावेत. म्हणजे किमान लंगोटी तरी शाबूत राहील. आजपासून झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका यांच्यात झिंबाब्वेमध्ये तिरंगी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होत आहे. आज झिंबाब्वे वि. ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीय वेळेनुसार दु. १ वाजता सुरु होईल. आज विंडीज वि. बांगला यांच्यात देखील एकदिवसीय सामना आहे. तो सामना भा.प्र.वे. नुसार मध्यरात्री १२ वाजता सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/28/2014 - 12:47
काल चक्क जिंकलो आपण. तब्बल १३३ धावांनी जिंकलो. काही अपवाद वगळता संघातील सर्वांचीच कामगिरी उत्तम झाली. धवन आणि कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरले. कोहलीला आता काही काळ विश्रांती द्यायची वेळ आली आहे. त्याची पूर्वपुण्याई संपत आली आहे. तिकडे झिंबाब्वेमधील तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत तब्ब्ल ३२७ धावा करून सुद्धा पराभव पदरी पडला. द आफ्रिकच्या फाफडू आणि डी व्हीलिअर्स या दोघांनी वेगवान शतके झळकावून आफ्रिकेला विजयी केले. मागील ६-७ सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३०० पेक्षा अधिक धावा करूनसुद्धा सामना हरावा लागला आहे. भारतात तर भारताने २ वेळा ३५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वीरित्या गाठून ऑस्ट्रेलियाला हरविले होते. गोलंदाजांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Tue, 09/02/2014 - 15:39
आणि ह्या इंग्लिश संघाबद्द्लही काही ? तो कसोटीत किती सेशन टिकेल? दोघांचेही हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ फारच वेगळे आहेत.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:16
इंग्लंडचा एकदिवसीय संघ आणि कसोटी संघ यात बरेच बदल आहेत. प्रमुख गोलंदाज ब्रॉड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. हेल्स, मॉर्गन, गर्नी, फिन हे कसोटी मालिकेत नसलेले खेळाडू संघात आहेत. भारताचा कसोटी संघ व एकदिवसीय संघ बराचसा सारखा आहे. रैना हा एकमेव खेळाडू (आणि ४ थ्या सामन्यात आलेला धवल कुलकर्णी) सोडला तर उर्वरीत सर्वजण कसोटी संघातलेच आहेत. त्यामुळे या दोन संघात एकदिवसीय संघाचे खेळाडू घेऊन कसोटी मालिका झाली तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 09/04/2014 - 16:25
मुरली विजय आणि गौतम गंभीरने गेल्या तीनपैकी किती सामन्यात बॅटिंगची ओपनींग केली? चेतेश्वर पुजारा किती वेळा तीन/चार नंबरला आला? इशांत शर्मा, आणि वरूण आरोनने किती ओवर टाकल्या गेल्या तीन सामन्यात? एकूण पाच खेळाडू फार विचार न करता सांगता आले. मग सांगा बदल आहे की नाही?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 13:06
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला नक्की समजले नाही. आताच्या भारताच्या एकदिवसीय संघात कसोटी संघाच्या तुलनेत बरेच बदल आहेत असा तुमचा दावा असावा. हे गृहीत धरून प्रतिसाद देत आहे. आताचा भारताचा एकदिवसीय संघ पाहिला तर ११ पैकी ९ जण कसोटी संघात सुद्धा होते. फक्त रैना व धवल कुलकर्णी एकही कसोटी खेळले नाहीत. संघात फारसा बदल नाही. कसोटीत खेळलेला जवळपास सर्व संघच एकदिवसीय सामने खेळत आहे. परंतु संघाची कामगिरी अचानक सुधारली आहे. या ११ पैकी सर्वजण व कसोटी खेळलेले सर्वजण आयपीएल मध्ये नियमित खेळतात. एकंदरीत हा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांकरिता जास्त योग्य आहे. या संघातील बहुतेक जण कसोटी सामन्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे निवड समितीने विचार करून कसोटी सामन्यांसाठी पूर्ण वेगळा संघ निवडावा. कसोटी संघात स्थानिक स्पर्धा खेळलेलेच खेळाडू असावेत. आयपीएल मधील खेळाडूंना कसोटी सामन्यात खेळणे अवघड जात आहे. त्यामुळे आयपीएल मधील खेळाडूंचा कसोटी साठी विचार करू नये.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 09/05/2014 - 13:57
माझा काहीही दावा नाहिये. आपण मात्र दावा करत आहात की हा संघ कसोटीत एक सेशन पण टिकणार नाही. त्यावर माझा आपल्याला असा प्रश्न होता की मग इंग्लंडचा हा संघ किती सेशन टिकेल? कारण माझ्या मते अशी तुलना योग्य होणार नाही. कारण माझ्या मते, दोन्ही देशांचे हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ वेगळे होते. इंग्लंडने बदललेले खेळाडू आपल्याला माहित असावे कारण आपण यादी दिली आहेच. भारतानेही असे अनुरूप बदल केले आहेत. कोण कोण वगळले ते मी वर सांगितले आहेच. परत सांगतो- मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वरूण आरोन. मग आता वन डे स्पेशालिस्ट संघ - तोही विजयी संघ; कसोटीत कसा खेळेल, यावर टिप्पणीचे प्रयोजन काय?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 20:43
हा संघ कसोटीत पुन्हा एकदा अपयशी ठरेल हे उघडच आहे कारण नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत खेळलेल्या संघातले बहुतेक सर्व खेळाडू एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहेत. जे नवीन आले आहेत त्यापैकी सुरेश रैना हा कसोटीत बर्‍याच वेळा अपयशी ठरलेला आहे. म्हणजे तो येऊनही फारसा फायदा नाही. धवल कुलकर्णी अजून कसोटी खेळलेलाच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अंदाज करण्यात अर्थ नाही. या दोन्ही संघांच्या एकदिवसीय संघामध्ये जर कसोटी सामना झाला तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल कारण भारतीय संघात फारसे बदल नाहीत आणि इंग्लंड संघात काही बदल असले तरी कसोटीत भारताचा कर्दनकाळ ठरलेले कुक, रूट, अ‍ॅण्डरसन, अली, बटलर इ. मंडळी एकदिवसीय संघात आहेतच. खरं सांगायचं तर भारताने कसोटीसाठी एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य असलेला संघ खेळविला आणि इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांसाठी कसोटीसाठी योग्य असलेला संघ खेळविला. त्याचे परीणाम दोन्ही संघांना भोगावे लागले आहेत.

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:19
भारताने लागोपाठ ३ रा सामना जिंकून एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. २०११ च्या तुलनेत एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी झाली. इंग्लिश संघ एकदिवसीय सामन्यात पारच ढेपाळलेला दिसतोय. पीटरसनला काढून त्यांनी मोठी चूक केलेली आहे. बोपारा व ब्रेस्ननला बाहेर ठेवणे हीदेखील मोठी चूक आहे.

श्रीगुरुजी Sat, 09/06/2014 - 14:36
शेवटचा सामना हरून भारताने एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाची संधी घालविली. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की मालिका जिंकल्यानंतर उर्वरीत सामन्यात भारतीय संघ एकदम शिथिल पडतो. या मालिकेतही तसेच झाले. खरं तर शेवटच्या सामन्यात स्वतः धोनीने विश्रांती घेऊन संजू सॅमसनला खेळवायला हवे होते. तसेच स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा यांनादेखील संधी हवी होती. थकलेल्या भुवनेश्वरकुमारला खेळविण्यात अर्थ नव्हता. असो. आता उद्या दौर्‍यातला शेवटचा ट-२० सामना आहे. तो जिंकून शेवट गोड करावा.

एस Wed, 06/25/2014 - 13:22
बीसीसीआयच्या संघाला हरवून पुन्हा फॉर्मात येण्याची इंग्लंडच्या संघाला सुवर्णसंधी आहे. :-|

In reply to by एस

अनुप ढेरे Wed, 06/25/2014 - 13:51
कुक नक्की फॉर्ममध्ये येणार. ओपनिंगला विजय/धवन ऐवजी शर्माही चालेल. गंभीरही फार दिवे लावेल असं वाटत नाही. पण वर म्हटलं तसं, ब्याटिंगची भिस्त ३-४-५, कोहलीम पुजारा आणि रहाणेवर आहे. नॉटिंगहममध्ये पहिली मॅच आहे हे पाहून झहीरची आठवण झाली. बॉलिंग मध्ये झहीर असायला पाहिजे होता. झहीर, भुवनेश्वर आणि शर्मा. प्रॅक्टिस म्याचेस आहेत २ ते चांगलं आहे. मागच्या वेळेला हार झाल्याचं कमी प्रॅक्टीस मॅचेस हे एक कारण होतं.

In reply to by एस

एस Mon, 08/18/2014 - 18:52
चला, बीसीसीआयच्या संघाला पुनरेकवार हरल्याबद्दल किंचित सहानुभूती आणि इंग्लंडच्या संघाचं विजयाबद्दल जोरदार अभिनंदन. आगामी भारत दौर्‍यातही इंग्लंडला अशाच सुवर्णसंधी पुन्हापुन्हा देत रहा बरं का रे. (इथून पुढचं जाहीर लिहिण्यासारखं नसल्याने फक्त मनातल्या मनात. कसंय, तुम्हांला जरी लाजीरवाण्या पद्धतीनं हरल्याबद्दल शब्दशः लाज वाटत नसली तरी आम्हांला अपशब्द जाहीरपणे वापरायची लोकलाज अजूनही वाटते.)

सौंदाळा Wed, 06/25/2014 - 14:18
ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो.
याऐवजी मी ईशांत शर्मा भारतात बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. असे म्हणेन. मागच्या ईग्लंड दौर्‍यावर (तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण असताना आपण सपाटुन हारलो होतो तो दौरा) ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती. बाकी कालची कसोटी थरारक झाली. अंडरसन एक चेंडु शिल्लक असताना आउट झाला. आणि हीच स्थिती श्रीलंकेची पहील्या कसोटीला होती आणि त्यांनी सामना अनिर्णयीत ठेवण्यात यश मिळवले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 16:51
>>> बाकी कालची कसोटी थरारक झाली. +१ जबरदस्त कसोटी झाली. इंग्लंडने पराभव टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा कसोटीतला फक्त १ चेंडू शिल्लक असताना त्यांना हार पत्करावी लागली. पहिल्या डावात १०८ धावांनी मागे असताना सुद्धा श्रीलंकेने झुंझून विजय मिळविला.

कपिलमुनी Wed, 06/25/2014 - 14:37
फार फार दिवसांनी क्रिकेटवर मोठा लेख आला.. प्रत्येक पिढीचे आवडते हीरो असतात.. ते रीटायर झाले की आवड कमी होते .. तसाच कहीसा झाला आहे. सध्याच्या टीम मधे अजून तरी फार इंटरेस्ट नाहिये.. बादवे ते ष्टकार नावाचा पाक्षिक मिळता का अजून ?

पामर Wed, 06/25/2014 - 16:12
ह्याच दौ-यात अजुन एक आकर्षण म्हणजे ५ जुलै रोजी क्रिकेट पंढरी-लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI' असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला आहे. MCC च्या संघात -सचिन तेंडुलकर (कर्णधार),ब्रायन लारा, राहुल द्रवीड,ब्रेट ली,शिवनारायण चंद्रपॉल व इतर खेळाडु आहेत तर उर्वरीत जगाच्या संघात- शेन वॉर्न (कर्णधार),अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मुथैया मुरलीधरन,शाहीद आफ्रिदी,केवीन पिटर्सन ,युवराज सिंग वगैरे खेळाडु आहेत.भारतात स्टार चॅनल वर हा सामना दा़खवणार आहेत. *clapping*

In reply to by पामर

असंका Wed, 06/25/2014 - 16:34
लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI'
मेलबर्न असा उच्चार आहे का? मला वाटायचे मेरिलबोन (Marylebone)!!

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 17:04
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बहुतेक मधूसुदन पानसरेला (आणि रवि बोपाराला) पाचारण करतील असं वाटतंय. केव्हिन पीटरसनलाही परत बोलावतील का? (तो परत यावा अशी इच्छा आहे)

फारएन्ड गुरुवार, 06/26/2014 - 09:36
झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 12:28
>>> झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? झहीर हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे ब्रह्मास्त्र होता. त्याने ९ सामन्यात २१ बळी घेऊन जवळपास प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. आता तो संघात नाही त्याची ३ कारणे आहेत. १) झहीर २०११ च्या विश्वचषकानंतर त्याचा फॉर्म हरपला आहे. आजतगायत त्याला फॉर्म परत मिळविता आलेला नाही. ज्या मोजक्याच सामन्यात तो खेळला, त्यात तो निष्प्रभ ठरला. आयपीएल मध्ये सुद्धा तो चमकलेला नाही. २) त्याला तंदुरूस्तीची तीव्र समस्या आहे. १-२ सलग सामने खेळले की तो मोडतो आणि नंतर ५-६ महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असतो. ३) तंदुरूस्तीमुळे त्याला पुरेसा सराव मिळत नाही व त्यामुळे तो ज्या सामन्यात खेळतो त्यात चमकत नाही. >>> रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. रोहीत शर्मा २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगला खेळला होता. परंतु एकंदरीत तो अपवाद वगळता परदेशात तो बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे. तो, अश्विन आणि ईशांत शर्मा हे धोनीचे लाडके असावेत असं वाटतंय, कारण अनेकवेळा अपयशी ठरल्यानंतर ते परत परत संघात दिसतात. >>> स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. मुनाफ २०११ च्या विश्वचषकानंतर पूर्णपणे निष्प्रभ आहे. त्याला नाही घेतलं तेच बरं केलं. >>>> सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? इरफान पठाणला गेल्या ३-४ वर्षात अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. २०१२ मध्ये बांगला देशात झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत बांगला देश विरूध्द त्याने व प्रवीणकुमारने अत्यंत सुमार गोलंदाजी करून तब्बल २९० धावांचे लक्ष्य बांगलाला सहज पार करून दिले होते. >>> गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा. सहमत! धोनीला आपल्या कर्णधारपदाच्या सुरूवातीच्या कालखंडात वरीष्ठ खेळाडूंची सतत भीति वाटायची. आपण थोडेसे अपयशी ठरलो तर आपल्याकडून कर्णधारपद हिसकावले जाऊन कोणत्यातरी वरीष्ठ खेळाडूच्या हातात नेतृत्वाची धुरा जाईल या दडपणामुळे त्याने वरीष्ठ खेळाडूंना सतत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. २००७ च्या ट-२० च्या विश्वचषकात सुद्धा त्याने वरीष्ठ खेळाडूंना ने घेण्याच्या अटीवर कर्णधारपद स्वीकारले होते. गंभीर, सेहवाग, सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, झहीर, हरभजन आणि कुंबळे या वरीष्ठ खेळाडूंपैकी ५ जण निवृत्त झाले असून उरलेले ४ जण अजून खेळत आहेत. त्यापैकी तिघेजण संघात नाहीत. त्यामुळे धोनीला फारशी भीति नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे गुरुवार, 06/26/2014 - 16:39
पठाण बद्दल सहमत. प्रवीण कुमार चालला असता. मागच्या दौर्‍यात जीव तोडून बोलिंग केली होती.

नाखु गुरुवार, 06/26/2014 - 11:17
पण ते चेन्नई सुपर किंग मध्ये आहेत हे जास्त महत्वाचे निवडीसाठी.मोहीत शर्माला पण संधी त्यामुळेच मिळाली. खरे खोटे "श्री" जाणे! आप्ण गुमान पहाणे!

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 22:33
सुरूवात तर चांगली झाली. आजच्या पहिल्याच सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारताने ४० षटकांत ४ बाद ३३३ अशी चांगली कामगिरी केली. त्यातल्या मुरली विजय (२०) व कोहली (२९) वगळता इतरांनी चांगल्या धावा केल्या. गंभीर, धवन व पुजाराने अर्धशतक केले.

श्रीगुरुजी Sun, 06/29/2014 - 21:10
पहिला सराव सामना पावसामुळे फक्त २ दिवस चालला. भारतीय फलंदाजांनी बर्‍यापैकी फलंदाजी केली. गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाल्ला. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ३ फलंदाज बाद करता आले. असो. या सामन्याच्या निमित्ताने थोडा सराव तरी झाला. अजून एक सराव सामना बाकी आहे. नंतर ९ जुलैला पहिला कसोटी सामना सुरू होईल. सध्या विश्वचषक फूटबॉल फिव्हरमध्ये आणि त्याचवेळी विम्बल्डन सुरू असताना क्रिकेट थोडे निस्तेज झाले आहे. विंडीज वि किवीज आणि इंग्लंड वि. लंका या सामन्यांच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रात येत नव्हत्या. साधारणपणे १५ जुलैनंतर क्रिकेटला परत चांगले दिवस येतील.

श्रीगुरुजी Wed, 07/02/2014 - 12:43
कालपासून भारताचा दुसरा सराव सामना डर्बीशायर विरूद्ध सुरू झाला. आधीच्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ५ फलंदाज बाद करता आले. दोन्ही सामन्यात मिळून एकूण २ दिवसांच्या गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांना जवळपास ६६५ धावांच्या मोबदल्यात फक्त ८ गडी बाद करता आले आहेत. एकंदरीत गोलंदाजांचे या दौर्‍यावर हाल होतील असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 12:46
दुसरा सराव सामना भारताने जिंकला. पहिल्या दोन्ही सराव सामन्यात भारताची फलंदाजी बर्‍यापैकी झाली. पण गोलंदाजांनी बराच मार खाल्ला. स्थानिक संघाविरूद्ध त्यांना फारसे बळी मिळविता आले नाहीत. अर्थात हे नेहमीचंच रडगांणं आहे. आता ९ जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. बघूया काय होतंय ते. सलामीला मुरली विजयला न घेता गंभीरला घेतील असं वाटतंय. रहाणे देखील आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रोहीत शर्माला बाहेर बसावं लागेल. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जडेजा आणि ईशांत शर्मा नक्की आत येतील.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा Sat, 07/05/2014 - 15:25
तो १४/१६ च्या टीममधे कसा काय येतो परत परत??? मग ११ त आला तर खरेतर आश्चर्याच्या धक्क्याने आम्ही मरायलाच पाहिजे!

In reply to by पैसा

श्रीगुरुजी Sun, 07/06/2014 - 14:07
कितीही खराब खेळले तरी शर्मा बंधू (रोहीत आणि ईशांत) हे कायम १६ जणांच्या चमूत असतात. रोहीत शर्माला २०१२ मध्ये एकूण १४ एकदिवसीय सामन्यात खेळविले होते. त्यात त्याने एकूण १६८ धावा केल्या होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १३ सामन्यात एकूण ८५ धावा होत्या. तरीसुद्धा त्याला संघातून एकदाही वगळले नव्हते. श्रीलंकेत त्याच वर्षी झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १४ धावा केल्या होत्या (सर्वाधिक ८). इतका खराब खेळ करूनसुद्धा त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात त्याला निवडले होते. त्याच्यामुळे मागील ३-४ वर्षे रहाणे संघात असून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 20:41
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारतातील क्रिकेट मालिका बहुतेकवेळा 'स्टार' वर असतात. वेस्ट इंडिज, दुबई/शारजा, द. आफ्रिका व न्यूझीलॅंड येथील मालिका टेन क्रिकेट किंवा सोनी सिक्सवर असतात. पूर्वी या मालिका 'निओ'वर असायच्या. पण आता 'निओ' क्रिकेट प्रक्षेपणातून बाहेर पडलेलं दिसतंय आणि त्यांची जागा सोनी सिक्सने घेतलेली दिसतेय.

स्पार्टाकस Fri, 07/04/2014 - 22:44
आफ्रीदीसारखा वाचाळ आणि टिनपाट खेळाडू दिग्गज कधीपासून झाला ?? केवळ अंदाधुंद बॅटींग (जीदेखील गेली काही वर्षे चालत नाही) आणि कामचलाऊ बॉलींग करणारा महान झाला?

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी Sat, 07/05/2014 - 12:54
+१ आफ्रिदीप्रमाणेच विश्व संघात टिनो बेस्ट, सिड्ल्, तमीम इक्बाल इ. "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत. तर एम सी सी च्या संघात उमर गुल, शॉन टेट, व्हिटोरी, एरॉन फिंच, रीड असे "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 17:48
हरो किंवा जिंको, पण संध्याकाळी घरी आल्यावर ईंग्लंडच्या वातावरणातील कसोटी सामने बघणे नेत्रसुखद अनुभव असतो. फक्त दादा, सचिन, द्रविड आणि हो, वीरूही नसल्याने ती मजा यंदा कितपत येईल हा प्रश्नच आहे.

श्रीगुरुजी Wed, 07/09/2014 - 20:47
पहिल्या कसोटीत आतापर्यंत बरी फलंदाजी झाली आहे. कोहली व धवन अपयशी ठरले, तर पुजारा आणि रहाणे स्थिरावल्यावर बाद झाले. एकटा मुरली विजय किल्ला लढवतोय. भारताने किमान ४०० धावा करायला हव्यात.

सौंदाळा गुरुवार, 07/10/2014 - 17:40
दुसरा दिवस, जेवण ३४२/५. चांगल्या धावा झाल्या आहेत. अजुन किमान एक सेशन तरी भारताने खेळायला पाहीजे म्हणजे सामन्यावर पकड घेण्याची संधी मिळेल.

थॉर माणूस गुरुवार, 07/10/2014 - 18:02
धोनी उपखंडाबाहेरचं पहिलं शतक मारेल का याची उत्सुकता आहे... काय ते कळेलच पुढच्याच सेशनमधे. त्यानंतर (किंवा धोनी बाद झाला तर) डाव घोषित करतील बहुतेक.

स्पार्टाकस गुरुवार, 07/10/2014 - 23:45
भुवनेश्वर आणि शमीने इंग्लंडवर बॅटींगमध्ये गिलेस्पी-मॅकग्राथ प्रयोग केला आहे! (गिलेस्पी आणि मॅकग्राथ यांनी न्यूझीलंडविरुध्द १००+ ची पार्टनरशीप केली होती. मॅकग्राथने चक्क ६३ रन्स काढल्या होत्या!) अ‍ॅलीस्टर कूकला पुन्हा एकदा सस्त्यात गाशा गुंडाळावा लागला आहे. जाडेजा कदाचीत धोकादायक ठरु शकेल. एकून टेस्ट बोअरींग होणार नाही अशी अपेक्षा आहे.

श्रीगुरुजी Fri, 07/11/2014 - 09:58
भारताला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आज इंग्लंडच्या उर्वरीत फलंदाजांना बाद करून किमान १५० धावांची भक्कम आघाडी घेतली पाहिजे. इयान बेल (आणि कदाचित मॅट प्रॉयर) हाच मोठा अडथळा आहे. उर्वरीत फलंदाज नवे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Fri, 07/11/2014 - 10:46
टू अर्ली टु से थिस.. खेळपट्टी खूपच निर्जीव आहे. आणि भारतीय गोलंदाजीची अवस्था फार काही चांगली नाहिये.. हाय स्कोरींग ड्रॉची शक्यता जास्त आहे..

आतिवास Sat, 07/12/2014 - 17:39
दोन्ही संघांच्या तळातल्या फलंदाजांनी (अर्थात रूट काही तळातला फलंदाज नाही म्हणा) जो खेळ केला, त्यावरून क्रिकेट मध्ये किती अनिश्चितता असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला!

श्रीगुरुजी Sat, 07/12/2014 - 20:53
भारतीय गोलंदाज विशेषत: इशांत शर्माने आज पुन्हा एकदा मठ्ठ बैलासारखी गोलंदाजी केली. इंद्रसेन (अ‍ॅण्डर्सन) मागील ३-४ डावात उसळत्या चेंडूवर बाद झाला होता. २९८/९ असताना तो खेळायला आल्यावर त्याला बाद करण्यासाठी शर्मा व इतरांनी त्याला सातत्याने फक्त उसळते चेंडू टाकले. पडणारा प्रत्येक चेंडू हा उसळताच असेल हे गृहीत धरून अशा चेंडूचा सामना करण्यासाठी तो आधीच तयार असायचा आणि असे सर्व चेंडू त्याने सहजगत्या खेळून काढले व भरपूर धावा करून गोलंदाजांना रडविले. उसळता चेंडू अनपेक्षितरित्या अंगावर आला तर बाद होण्याची शक्यता असते. पण येणारा प्रत्येक चेंडू हा छाती किंवा खांद्यापर्यंत उसळणार आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा असे चेंडू खेळण्याच्या तयारीनेच फलंदाज उभा असतो. इंद्रसेनला सातत्याने उसळते चेंडू टाकण्याऐवजी यॉर्कर, स्लोअर वन, आत/बाहेर जाणारे चेंडू अशी विविधता आणली असती तर तो लवकर बाद झाला असतो. असो. भारताने सुरवातीला २०२/७ व नंतर २९८/९ अशा उत्तम परिस्थितीतून मोठी आघाडी घ्यायची संधी आपल्या करंटेपणाने घालविली. आता सामना अनिर्णित होण्याचीच शक्यता आहे.

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 11:47
मला वाटते अधिकृत कसोटी सामने झाल्या पासून बहुदा हा एकच सामना असावा ज्यात दोन्ही बाजूच्या शेवटच्या भागीदारीसाठी १०० पेक्षा जास्त धावा झाल्या असाव्यात. क्रिकेट हा खेळ किती विचित्र आहे !

In reply to by आतिवास

ज्यो रूट आणि अँडरसनने भारतीय गोलंदाजाच्या नाकात दम आणला अतिशय निष्प्रभ गोलंदाजी. १९५ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि कसोटीने अनिर्नित अवस्थेकडे प्रयाण केले. शेवटच्या विकेटसाठी इतकी भागीदारी व्हावी अतिशय लज्जास्पद आहे भारतीय गोलंदाजीसाठी. बाकी, विश्वचषक फूटबॉल संपला की इकडे हजर होत राहीन. :) -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sun, 07/13/2014 - 20:34
सामना अनिर्णित होणार हे नक्की. दुसर्‍या डावात चहापानाला भारत ३४७/८. उर्वरीत वेळात भारताचे उर्वरीत फलंदाज बाद करून सामना जिंकणे इंग्लंडला अशक्य आहे. पहिले ३ दिवस भारताने वर्चस्व राखले होते. आज ५ व्या दिवशी ३९ धावांनी मागे पडलेल्या भारताची अचानक ६ बाद १८४ अशी अवस्था झाली तेव्हा भारताकडे फक्त १४५ धावांची आघाडी होती व दिवसातली किमान ७७ षटके शिल्लक होती. अचानक इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली. परंतु बिन्नी, जडेजा व भुवनेश्वर कुमार यांनी उत्तम फलंदाजी करून भारताला पराभवापासून खूप लांब नेले आणि आता उर्वरीत ३१ षटकात सामन्याचा निकाल लागणे अशक्य आहे. एकंदरीत या सामन्यात कोहली (व काही प्रमाणात धवन) वगळता इतर सर्वांनी किमान एका डावात फलंदाजीत चांगले योगदान दिले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शमी व शर्माने बर्‍यापैकी गोलंदाजी केली. अर्थात शेपटाने त्रास देण्याची परंपरा याही कसोटीत सुरू राहिली. तळाच्या २-३ फलंदाजांना बाद करणे हे भारतीय गोलंदाजांसाठी अवघड काम होऊन बसले आहे. असो. पुढील कसोटीत हाच संघ कायम राहील असे वाटते. अश्विन किंवा वरूण एरॉनला आत यायची संधी दिसत नाही. दुसरा कसोटी सामना गुरूवारी १७ जुलैला लॉर्ड्स वर सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 11:48
आजपासून दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू होतोय. खेळपट्टी हिरवीगार असण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागतोय का याचीच उत्सुकता आहे.

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 11:55
जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून पाहावे कारण जादेजापेक्षा अश्विनचे फलंदाजीचे तंत्र जास्त चांगले आहे, शिवाय त्याने शतकही झळकावलेले आहे

In reply to by स्पा

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 14:45
- जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अश्विनचे क्षेत्ररक्षण अत्यंत भिकार आहे. - फलंदाजीत अश्विनच्या तुलनेत जडेजाने फारश्या धावा केलेल्या नाहीत. - भारताबाहेर दोघेही निष्प्रभ गोलंदाज आहेत. एकंदरीत दोघांपैकी कोणालाही घेतले तरी फारसा फरक पडत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 15:16
कसोटीत क्षेत्र रक्षण टी२० किंवा एकदिवसीय सामान्यैतके महत्वाचे दिसून येत नाही, कारण अगदी एक एक धावा वाचवताना कोणी दिसत नाही अर्थात अपवाद असेलच भारतभर दोघेही कुचकामी ठरलेले असले तरी आत्ताच्या इंग्लंड च्या पिचेस आणि माग्च्या दौर्यातल्या पिचेस ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे

In reply to by स्पा

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 15:27
तेंडुलकरांच्या सचिनला पण परत खेळण्यासाठी आवताण द्यावे. इथल्या काही मिपाकरांना(मी नव्हे) त्याच्याशिवाय करमत नाही.

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 13:05
रहाणे काल मस्त खेळला. त्याला बरेच दिवस कुजवले होते. पण मागील वर्षापासून कसोटीत संधी मिळताच त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली (आतापर्यंत ७ कसोटीत ३ अर्धशतके व २ शतके). धवन पूर्ण अयशस्वी ठरतोय. पुढच्या डावात त्याने धावा केल्या नाहीत तर गंभीर नक्की आत येईल. पुढच्या कसोटीत जडेजा किंवा बिन्नीऐवजी अश्विन नक्की आत येणार. कोहलीला साधारणपणे मालिकेच्या उत्तरार्धात सूर सापडतो. तो बहुतेक तिसर्‍या कसोटीपासून फॉर्मात येईल. सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Fri, 07/18/2014 - 14:44
***सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे. -त्याचा इरफान पठाण होऊ नये, ही सदीच्छा!!

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 20:46
जर कुकची कामगिरी सुधारली नाही किंवा जर इंग्लंडला ही मालिका जिंकण्यात अपयश आले तर कुकची कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊन (कदाचित संघातूनही हकालपट्टी होऊ शकते), इयान बेल कर्णधार होऊ शकतो. कदाचित ही मालिका संपण्यापूर्वीच हा निर्णय होऊ शकेल.

श्रीगुरुजी Sat, 07/19/2014 - 21:22
सामना चांगल्या अवस्थेत आहे. तिसर्‍या दिवशी दोन्ही संघाचे डाव संपून भारत २४ धावांनी मागे आहे. पण दुसर्‍या डावात आतापर्यंत भारत १ बाद १०७ अशा उत्तम स्थितीत आहे. सामना निर्णायक होण्याची दाट शक्यता आहे. आज दिवसअखेर भारताकडे अंदाजे १६० धावांची आघाडी असेल. उद्या ४ थ्या दिवशी भारताने चहापानानंतर १ तास खेळून अंदाजे ३७५ धावांचे आव्हान दिले तर ५ व्या दिवशी इंग्लंडला हिरव्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे. इंग्लंडतर्फे अ‍ॅण्डरसन (आतापर्यंत ३ डावात ९ बळी व २ डावात १०० धावा) व भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (आतापर्यंत २ डावात ११ बळी व ३ डावात १५७ धावा) जबरदस्त कामगिरी करत आहेत.

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 20:21
मस्त सामना चाललाय. इंग्लंडला आजच्या उर्वरीत २ तासात व उद्या ५ व्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या ३१९ धावा करणे अवघड आहे. भारताला सामना जिंकून मालिकेत सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भुवनेश्वर पुन्हा एकदा चमकला. २ कसोटीत ४ डावात २०० हून अधिक धावा (त्यात ३ अर्धशतके) आणि आतापर्यंत ११ बळी ही जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आहे. मुरली विजय सुद्धा उत्तम खेळतोय. कोहली अजून अयशस्वी आहे (अनुष्काचा पायगुण ?). परंतु मालिकेच्या उत्तरार्धात तो नक्की भरात येईल.

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:32
मस्त जिंकलो. कालच लिहिल्याप्रमाणे आज भारताला चांगलीच संधी होती. अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 07/21/2014 - 21:48
तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.
आणि मग-
अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!
धन्य!! अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:25
काल ईशांतने चांगली गोलंदाजी केली हे मान्य आहे. परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे. त्याला कालच्या विजयाचे क्रेडीट आहेच. त्याच्याबरोबरीने भुवनेश्वर कुमारलाही (४४ आणि ५२ धावा आणि पहिल्या डावात ५ बळी) सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता. पहिल्या कसोटीतही भुवनेश्वरला डावलून जेम्स अ‍ॅण्डरसनला सामनावीर पुरस्कार दिला होता (भुवनेश्वर ५८ आणि नाबाद ६३ धावा आणि पहिल्या डावात ६ बळी). >>> >>> अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते. काल भुवनेश्वर कुमार खूप बळी मिळवेल असे वाटत होते. प्रत्यक्षात त्याला एकही बळी मिळाला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Tue, 07/22/2014 - 13:39
परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे
सहमत.. कालचा विजय त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइंट ठरो .. आणि याआधीचा "तो" ईशांत परत न येवो!! :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु गुरुवार, 07/24/2014 - 11:27
त्याची "केस" फारच डोळ्यावर आणी हाताबहेर झाली होती आता "सावरून" जाग्यावर येईल अशी अपेक्षा. पण काही करा भुवीचा "पठाण" करू नका!!

In reply to by नाखु

असंका Fri, 07/25/2014 - 19:35
बर्‍याच लोकांना धक्का बसला आहे म्हणे इशांतच्या खेळण्याचा! त्याने पाँटिंगची काय भंबेरी उडवली होती ती तरी आठवायची!

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 07/25/2014 - 20:51
त्याने पॉंटिंगची एकाच डावात भंबेरी उडविली होती आणि ती सुद्धा जानेवारी २००८ मध्ये (म्हणजे तब्बल साडेसहा वर्षांपूर्वी). त्यानंतर किमान २०१३ अखेरीपर्यंत तो फारसा चमकला नाही. काही सामने तर त्याच्या खराब गोलंदाजीमुळे आपण हरलो. उदाहरणार्थ नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात ७ एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यातल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ३ षटकात तब्बल ४७ धावा हव्या होत्या व त्यांचे ६ खेळाडू बाद झाले होते. दुसर्‍या कोणत्याही संघाने इतका हातात आलेला सामना क्वचितच घालविला असता. त्या सामन्यात इशांत शर्माने ४८ वे षटक टाकताना सर्व चेंडू लेगस्टंपवर आखूड टप्प्याचे किंवा फुल्टॉस या प्रकारचे टाकले. त्यात १ नोबॉलही होता ज्यावर फ्रीहिट सुद्धा मिळाली. समोर फॉकनर होता. त्याने त्या षटकात तब्बल ३४ धावा चोपून उर्वरीत २ षटकांत फक्त १३ धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण करून शेवटी जवळपास पूर्ण हरलेला सामना जिंकून दाखविला. इशांतची कामगिरी जानेवारी २००८ नंतर फारशी चांगली नव्हती. अर्थात २०१४ मध्ये तो सुधारल्यासारखा वाटतोय. जानेवारी २०१४ मध्ये द. आफ्रिकेत त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ४ बळी व दुसर्‍या डावात १ बळी अशी चांगली गोलंदाजी केली. नंतर न्यूझीलँडमध्ये दोन्ही कसोटीतल्या एकेका डावात ६-६ बळी मिळवून २ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक १६ बळी मिळविले. आणि सध्याच्या मालिकेत पहिल्या कसोटीत ३ व दुसर्‍या कसोटीत ७ बळी मिळवून "सामनावीर" झाला. एकंदरीत तब्बल ६ वर्षांनी परदेशात त्याला बळी मिळायला लागलेत. त्याचा हाच फॉर्म कायम रहावा हीच सदिच्छा!

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:32
पंचांचे काही निर्णय भारताविरूद्ध गेले नसते तर अजून सहज व लवकर सामना जिंकला नसता. दुसर्‍या डावात रहाणेच्या आर्म गार्डला लागून उडालेल्या चेंडूवर त्याला चुकीचे बाद दिले गेले. इंग्लंडच्या दुसर्‍या डावात ४ थ्या दिवशी मोईन अली जडेजाच्या गोलंदाजीवर अगदी अचूक पायचित झाला होता. पायावर चेंडू बसला तेव्हा तो क्रीजच्या आतच होता आणि रिप्लेमध्ये तो चेंडू मधल्या यष्टीवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. तरीसुद्धा धर्मसेनाने त्याला बाद दिला नव्हता. त्याच मोईन अलीने पुढे तब्बल २ तास खेळून १०१ धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या दिशेने न्यायला सुरूवात केली होती. या सामन्या साठी डी आर एस प्रणाली असती तर भारताला खूप फायदा झाला असता. जगात फक्त भारताचा डी आर एस ला विरोध आहे. या विरोधाचे कारण अनाकलनीय आहे.

तुषार काळभोर Tue, 07/22/2014 - 14:38
कूक- फॉर्म परत येतोय बहुतेक.... (संघातील स्थान राहील, कर्णधारपद जाऊ शकते, पण सध्यातरी इंग्लंडकडे दुसरा कर्णधार दिसत नाहिये.) धवन-दुसर्‍या डावातील मोजक्या धावांचा फार उपयोग होईल असे वाटत नाही, गंभीर वाट पाहतोय. बिन्नी-सध्या फक्त ३ पूर्ण गोलंदाज (भुवनेश्वर, शमी, इशांत), अन् २ 'फलंदाज-गोलंदाज' किंवा 'गोलंदाज-फलंदाज' (जडेजा अन् बिन्नी) आहेत. बहुतेक बिन्नी/जडेजा पैकी एकाला बसवून अश्विनला अंतिम संघात घेतील. (तो बर्‍यापैकी फलंदाजी सुद्धा करू शकतो.) भुवनेश्वरसुद्धा अडीनडीला उपयोगी पडू शकतो.

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 21:26
धवनला अजून एका कसोटीत संधी मिळेल. त्यातही तो अपयशी झाला तर गंभीर नक्की आत येईल. तिसर्‍या कसोटीत बिन्नीच्या जागी अश्विन आत यायची शक्यता आहे. इंग्लंडची तिसर्‍या कसोटीआधीच एक विकेट पडली आहे. तिसर्‍या कसोटीसाठी मॅट प्रॉयर च्या जागी जॉस बटलर ला यष्टीरक्षक म्हणून घेतले आहे. बेन स्टोक्स च्या जागी ख्रिस जॉर्डन किंवा ख्रिस वोक्स येण्याची देखील शक्यता आहे. इंग्लंडने खरं तर केव्हिन पीटरसन व जोनाथन ट्रॉट ला परत बोलवायला पाहिजे. जमल्यास ग्रॅमी स्वानला देखील निवृत्ती रद्द करून परत बोलवावे. भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 07/23/2014 - 10:45
भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.
त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). त्यातच हल्लीच त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता असे मित्राकडुन ऐकले होते.

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:41
>>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). लघुशंका हे कारण नसावे कारण अ‍ॅण्डरसन, पीटरसन आणि अजून एक खेळाडू या तिघांनी देखील रात्री मैदानात जाऊन खेळपट्टीवर लघुशंका केली होती. त्यातला अ‍ॅण्डरसन अजूनही संघात आहे. बहुतेक पानसरे फॉर्मात नसावा. अन्यथा भारताविरूद्ध त्याला नक्की घेतले असते.

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:53
दारूच्या नशेत खेळपट्टीवर केलेली लघुशंका असो वा दारूच्या नशेत वरच्या मजल्यावरून सोडलेली धार असो (एका बाऊन्सरच्या दुर्दैवाने तो नेमका त्याच धारखाली सापडला), दोन्ही कृती सारख्याच किळसवाण्या आहेत.

श्रीगुरुजी Mon, 07/28/2014 - 21:06
तिसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडने परत पाटा खेळपट्टी बनविली. इंग्लंड बहुतेक ५५० च्या आसपास डाव घोषित करेल असं वाटतंय. बिन्नीच्या जागी अश्विनला न घेता रोहीत शर्माला घेण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. अश्विन व रोहीत च्या फलंदाजीत फार फरक नाही, पण गोलंदाजीत खूप फरक आहे. पंकज सिंगचं दुर्दैव. त्याच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले व एक अत्यंत स्पष्ट असलेला पायचितचा निर्णय पंचांनी नाकारला. डी आर् एस् असती तर पायचित चा निर्णय भारताच्या बाजूने लागला असता. भारताचा डी आर् एस् असलेला विरोध अनाकलनीय आहे. तंत्रज्ञान हाताशी असून वापरायचे नाही या निर्णयामागे काहीच तर्कशुद्ध कारण नाही. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले श्रीनिवासन्, राजीव शुक्ला इ. मंडळी बीसीसीआय वर नागोबा सारखी वेटोळे घालून बसलेली आहेत. बीसीसीआय ची सूत्रे क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंच्या हातात असती तर असे अनाकलनीय निर्णय झाले नसते आणि कदाचित भ्रष्टाचारही कमी झाला असता. असो.

श्रीगुरुजी Tue, 07/29/2014 - 20:44
पाटा खेळपट्टीवर भारताची वाट लागलेली दिसतेय (आतापर्यंत ५ बाद २१७). एकटा रहाणे अर्धशतक काढून खिंड लढवतोय. मुरली विजय, पुजारा, कोहली आणि रोहीत शर्मा एक तासापेक्षा अधिक वेळ खेळून आणि प्रत्येक जण किमान ५२ चेंडू खेळून स्थिरावल्यावर मोठी धावसंख्या न करता बाद झाले. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑफ किंवा मधल्या यष्टीवर पडून बाहेर जाणारे चेंडू खेळणे त्याला अशक्य होताना दिसतंय. पुढच्या डावात काही केलं नाही तर गंभीर नक्कीच आत येणार. एकंदरीत परिस्थिती कठीण आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 12:45
फॉलोऑनची परिस्थिती असली तरी इंग्लंड फॉलोऑन न देता अंदाजे ३ तास फलंदाजी करून १६०-१७० धावा करून डाव घोषित करेल व दुसर्‍या डावात अंदाजे ८ तासाच्या खेळात भारतापुढे ३७५-४०० धावांचे आव्हान ठेवेल. २००१ मध्ये कलकत्त्यात दुसर्‍या कसोटीत स्टीव्ह वॉ ने भारताला फॉलोऑन दिला होता आणि नंतर भारताने लक्ष्मण-द्रविडच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर ५ व्या दिवशी १ तासानंतर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३००+ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भज्जीच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळून भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इतर सर्व देश फॉलोऑन देणे शक्य असूनही ५ व्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी टाळण्यासाठी फॉलोऑन न देता फलंदाजी करतात.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Wed, 07/30/2014 - 13:00
२००८ च्या चेन्नई कसोटित भारताने चौथ्या डावात ३८० चं आव्हान आरामात पार केलं होतं. (सेहवागमुळे ते शक्य झाले होते) त्यामुळे इंग्लंड ४५० पेक्षा कमी आव्हान ठेवील असे वाटत नाही.

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 13:18
तेव्हा फॉलोऑनची परिस्थिती नव्हती. इंग्लंडने अंदाजे ७ तासात भारताला ३७५ धावांचे आव्हान दिले तेव्हा भारताला ५ व्या दिवशी फलंदाजी करणे अवघड जाईल असाच इंग्लंडचा अंदाज होता. तसेच भारत हे आव्हान न स्वीकारता बचावात्मक खेळ करून सामना अनिर्णित ठेवायचा प्रयत्न करेल असाही इंग्लंडचा अंदाज होता. त्याला कारणही तसेच होते कारण भारताने भूतकाळात फक्त ४ वेळा ४ थ्या डावात ५ व्या दिवशी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. (१९७६ मध्ये विंडीजमध्ये तिसर्‍या कसोटीत ४०४ धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. त्यात गावसकर व विश्वनाथचे शतक, मोहिंदरचे अर्धशतक व ब्रिजेश पटेलच्या नाबाद ४९ धावांचा वाटा होता. नंतर १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताने ५ व्या कसोटीत ४७६ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ४५० धावा केल्या होत्या. नंतर १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने ४ थ्या कसोटीत ४३९ धावांचा पाठलाग करताना ८ बाद ४२९ पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर १९८६ मध्ये भारतात मद्रासमध्ये तिसर्‍या कसोटीत भारताने ३४८ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ३४७ धावा करून इतिहासातला केवळ दुसरा कसोटी सामना बरोबरीत सोडविला होता.) मात्र इतर प्रसंगी भारताने कच खाऊन ५ व्या दिवशी बचावात्मक खेळ करून सामना न हरण्याची दक्षता घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. १९८६ मध्ये इंग्लंडमधील ३ रा कसोटी सामना, १९९३ मध्ये आफ्रिकेतील ४ था कसोटी सामना, नंतर २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध आफ्रिकेतील ३ रा कसोटी सामना, २०११ मध्येच विंडीजविरूद्ध विंडीजमधील ३ रा कसोटी सामना इ.). त्यामुळेच कदाचित भारत ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करण्याचे धाडस करणार नाही असे गृहीत धरून स्ट्रॉसने डाव घोषित करून आव्हान दिले होते. पण सेहवागच्या ५८ चेंडूत ८५ धावा व सचिनचे नाबाद शतक यामुळे भारताने ३७५ धावांचे आव्हान लीलया पार करून सामना जिंकला. अर्थात त्या सामन्यात खेळपट्टी पाटा होती हे सुद्धा विसरून चालणार नाही.

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 20:47
जिंकायला ४४५ करायच्यात. अत्यंत अवघड लक्ष्य आहे. जवळपास १२० षटके ८ तासात खेळायची आहेत. जिंकणे जवळपास अशक्य आहे. सामना वाचविण्याची शक्यता देखील बरीच कमी आहे. चांगले तंत्र असलेल्या रहाणे, पुजारा व कोहलीवरच सगळी मदार आहे. इतरांची खात्री नाही. अर्थात माझे अंदाज खोटे ठरो हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

In reply to by श्रीगुरुजी

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/31/2014 - 15:16
देवपण नाही वाचवु शकला. प्रत्येक गोष्ट देवावर नका टाकु. मागची इंग्लंड मधली कसोटी मालिका विसरलात वाटते.

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 11:49
लॉर्ड्सवर भारतीय फास्ट बोलर्सनी बाउंसरवर विकेट काढल्या.. आणि आता ईंग्लिश पार्टटाइम स्पिनर्स स्पिन चांगल्याप्रकारे हाताळणार्‍या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स काढतायत ते पण ईंग्लिश खेळपट्टीवर.. दोन टोकाचे परफॉरमन्सेस !! बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. आणि हा सामना तर ऑलमोस्ट हरलाच आहे.. बाकी २ ड्रॉ करण्याचीच अपेक्षा आहे आता.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/31/2014 - 14:13
>>> बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. हे तितकेसे खरे नाही. भारताने १९६८ मध्ये न्यूझीलँड मध्ये ३-१ असा विजय मिळविला होता. १९७६-७७ मध्ये ऑस्ट्रेलियात २-३ अशी मालिका हरली होती. १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये २-० असा विजय मिळविला होता. १९७६ मध्येच भारताने न्यूझीलँडला न्यूझीलँडमध्ये २-१ असे हरविले होते. अर्थात ही तुरळक उदाहरणे आहेत. अगदी थोड्या मालिकांमध्ये भारताने एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 16:45
गेल्या दोन दशकात म्हणायचं होतं मला.. खास करुन अझरुद्दीनच्या संघाने १९९३ ला इंग्लंड्ला ३-० हरवून मायदेशात जिंकायची सवय लावल्यापासून.. त्यापूर्वी मायदेशातपण इतके जिंकत नसत..

सौंदाळा गुरुवार, 07/31/2014 - 17:55
हम्म जेवणापर्यंत सुध्दा दम धरला नाही आपल्या फलंदाजांनी. धवन, रोहीत शर्मा किंवा जडेजा, शामी, पंकजसिंग यांची गछंती होऊन गंभीर, अश्विन, अरॉन किंवा इश्वर पांडे, इशांत शर्मा आत येतील असे वाटत आहे. पुढची कसोटी ७-ऑगस्ट मँचेस्टरला होणार आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 11:07
पुढच्या सामन्यात धवन आणि रोहीत शर्मा गच्छंती होऊन गंभीर आणि अश्विन आत यावेत अशी इच्छा आहे. धवन नक्की बाहेर जाणार. परंतु रोहीत शर्मा हा धोनीचा 'ब्ल्यू आईड बॉय' असल्याने कितीही वाईट खेळला तरी तो संघात असतोच . त्यामुळे त्याची गच्छंती अवघड वाटतेय. (२०१२ मध्ये श्रीलंकेच्या दौर्‍यात ५ एकदिवसीय सामन्यात त्याने एकूण १८ धावा केल्या होत्या. तरीसुद्धा त्यानंतरच्या ट-२० मध्ये त्याला खेळवलंच. वास्तविक पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ०, ४, ४ अशी कामगिरी केल्यावर त्याला लगेच हाकलायला हवा होता. पण धोनीचा तो लाडका असल्याने त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले. पूर्वी रवी शास्त्री असाच गावसकर व डुंगरपूर यांचा कमालीचा लाडका होता.) पंकज सिंग दुर्दैवी ठरला. त्याच्या गोलंदाजीवर २ झेल सुटले. परंतु दुर्दैवाने त्यालाही कदाचित बाहेर काढून वरूण एरॉन/ईश्वर पांडे आत येण्याची शक्यता आहे. ५ गोलंदाज नको असेल तर बुद्धीमान साहा हा सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे. भारत खराब फलंदाजी, खराब गोलंदाजी व अत्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे हरला हे सत्य आहे. त्याच बरोबरीने पंचांची सदोष कामगिरी देखील इंग्लंडच्या विजयाला कारणीभूत ठरली. डी आर एस पद्धत असती तर भारताला बराच फायदा होऊ शकला असता. असो.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 08/01/2014 - 15:31
2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? आणि रोहित शर्मा एकुण किती कसोटी खेळला आहे की ज्यामुळे आपण तो लाडका असल्याचा निष्कर्ष काढला आहे?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 21:05
>>> 2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? रोहीत शर्माचे सुरवातीपासूनचे सर्व कसोटी डाव बघा (६ नोव्हेंबर २०१३ पासून आजतगायत). १७७, १११* (दोन्ही भारतात विंडीजविरूद्ध), १४, ६, ०, २५ (द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध), ७२, १९, ०, ३१* (न्यूझीलँडमध्ये किवींविरूद्ध), २८, ६ (सध्याच्या मालिकेत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध) भारतातल्या पाटा खेळपट्टीवर विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीसमोर तो २ डाव खेळला व दोन्ही डावात शतके केली. पण भारताबाहेर पडताक्षणी त्याच्या धावा बंद झाल्या. ७२ हा एकमेव डाव वगळता परदेशातील १० पैकी ९ डावात तो अपयशी आहे. त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की लागोपाठ अनेक डावात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात असतो. उदा. १७ फेब्रु २००८ ते ३ जुलै २००९ या अंदाजे साडेसोळा महिन्यांच्या कालावधीत तो एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळला. त्यात फक्त २ अर्धशतके (५८ आणि ६६)आणि एकदा ४३ व एकदा ३२ धावा केल्या होत्या. उर्वरीत २७ सामन्यात त्याने ० ते २८ च्या दरम्यान धावा केल्या होत्या. त्यात १५ वेळा त्याने एकेरी आकड्यात धावा केल्या आहेत (३१ पैकी १५ सामन्यात एकेरी धावा आणि त्यात ३ वेळा ०). तरीसुद्धा तो संघात टिकला. २०१० मध्ये त्याने तुलनेने काहीशी कामगिरी सुधारली. नंतर ११ डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१२ या अंदाजे साडेबारा महिन्यात तो एकूण १५ सामने खेळला. त्यात फक्त १ अर्धशतक (६८ धावा) होते. उर्वरीत १४ डाव तो ० ते ३३ या दरम्यान बाद झाला. त्यात १५ पैकी ८ डावात त्याने एकेरी धावा केल्या (त्यात ३ वेळा ०). जुलै २०१२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात खेळविले होते आणि त्याची कामगिरी होती ५, ०, ०, ४, ४. आश्चर्य म्हणजे या मालिकेपाठोपाठ लगेचच शेवटचा ट-२० सामना होता. ५ सामन्यात अपयशी ठरल्यावर निदान ट-२० मध्ये तरी त्याच्याऐवजी दुसर्‍या फलंदाजाला संधी द्यायला हवी होती. परंतु तो धोनीचा लाडका असल्याने या सामन्यात पण त्यालाच संधी मिळाली. त्याची कामगिरी बघता तो अनेकवेळा लागोपाठ अनेक सामने अपयशी ठरून सुद्धा त्याला वारंवार संधी मिळाल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यामुळेच रहाणेसारखा गुणी खेळाडू अनेक वर्षे संघाबाहेर राहिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 08/04/2014 - 00:54
सचिन आणि युवराजनंतर सर्वात शैलीदार फलंदाज आज रोहित शर्मा आहे. तो भरात असताना त्याचा खेळ ज्यांनी कुणी बघितला आहे ते हे अमान्य करू शकत नाहीत. मनोरंजन हा जर क्रिकेट बघण्याचा उद्देश आसेल तर रोहित एवढं मनोरंजन करणारा आज आपल्याकडे कुणीच नाही. पण हे माझं मत झालं. जसं रहाणे हा गुणी खेळाडू असल्याचं आपलं मत आहे तसंच. आपण आपली मतं स्वतंत्रपणे का मांडत नाही? माझ्या प्रश्नांच्या खालीच आपण आपली मतं मांडल्यामुळे माझा असा गैरसमज झाला की ही माझ्या प्रश्नांना आपली उत्तरे आहेत. आपल्या सोइसाठी माझे प्रश्न सोपे करुन सांगतो- 1. 2013 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या? 2. 2011 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या 3. रोहित हा आजपर्यंत सगळे मिळून एकूण किती कसोटी सामने खेळला आहे की ज्या आधाराने तो लाडका आहे असे दिसून येते?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Mon, 08/04/2014 - 12:50
रोहीतच्या कसोटी डावांची माहिती आधीच्या प्रतिसादात दिली आहे. त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. त्याची २०११ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (१२/१/२०११ ते ११/१२/२०११) (द. आफ्रिकेत) ११, ९, २३, १, ५, (वेस्ट इंडीजमध्ये) ६८*, ७*, ८६*, ३९, ५७, (इंग्लंडमध्ये) ०*, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, ९०*, ९५, २७, २१ ही कामगिरी अतिशय बोलकी आहे. परदेशात, विशेषतः आफ्रिकेत, तो कायमच अपयशी ठरताना दिसतो. ५ सामन्यांच्या मालिकेत पहिले ३ सामने अपयशी ठरूनही त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (११, ९, २३, १, ५). नंतर २०१२ मध्येही श्रीलंकेत पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ५, ०, ० अशी कामगिरी करूनसुद्धा त्याला वगळले जात नाही व उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (५,०,०,४,४). यावरून तो कर्णधाराच्या मर्जीतला आहे हे सिद्ध होतं. याच रोहीतची कामगिरी भारतात व विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीविरूद्ध एकदम सुधारते आणि त्या भांडवलावर तो संघात स्थान टिकवितो. पण इतर देशांविरूद्ध त्याची कामगिरी एकदम ढेपाळते. त्याने २०१२ मध्ये १३ एकदिवसीय सामन्यात एकूण १६८ धावा केल्या (त्यात फक्त एक अर्धशतक - ८३). ही अत्यंत खराब कामगिरी बघता त्याला एकदिवसीय सामन्यातून वगळायला हवे होते. पण तरीसुद्धा तो संघात होता. त्याची २०१३ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (२३/१/२०१३ ते ०८/१२/२०१३) (भारतामध्ये इंग्लंडविरूद्ध) ८३, ४ (चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये) ६५, ५२, १८, ३३, ९ (वेस्ट इंडिजमध्ये) ६०, ५, ४६, ४८*, ५८ (झिंबाब्वेमध्ये) २०, १, १४, ६४* (भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध) ४२, १४१*, ११, ९, ७९, २०९, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, १२, ४ (द. आफ्रिकेत) १८, १९ यावरून पुन्हा एकदा असंच दिसतंय की तो विंडीजविरूद्ध आणि बहुतेक वेळा भारतीय खेळपट्ट्यांवरच धावा करतो. इतर देशात त्याच्या धावा बहुतेक वेळा आटलेल्या दिसतात. अगदी झिंबाब्वेमध्ये सुद्धा ४ पैकी ३ डावात तो अपयशी होता. द. आफ्रिकेविरूद्ध तर तो कधीच धावा करताना दिसत नाही. त्याची २०१४ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (न्यूझीलँड मध्ये) ३, २०, ३९, ७९, ४ (बांगलादेश मध्ये) २१, १३, ५६, १८* विंडीजशिवाय इतर देशांमध्ये तो फारसा यशस्वी नसतो हे पुन्हा एकदा २०१४ वरून सिद्ध होतंय.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 08/07/2014 - 19:21
नाही हो, असं नाही. तीन वाक्यात उत्तर देता येत होतं. आपण अगोदर रोहितबद्द्ल टीका करताना कसं २०१३ मध्ये त्याने अमुक एवढे रन केले असं एका वाक्यात लिहिलं होतंत ना, तसंच. आता तुम्ही एक काम करा. खाली मी तयार वाक्यच देतो. त्यात गाळलेल्या जागा फक्त भरा- १. रोहित शर्माने २०१३ साली _____ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. २. रोहित शर्माने २०११ साली ________ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. ३. रोहित शर्मा सगळ्या मिळून आत्तापर्यंत ___ कसोटी खेळला आहे, ज्यावरून असे सिद्ध होते की तो कर्णधाराचा लाडका आहे.

देशपांडे विनायक गुरुवार, 07/31/2014 - 18:13
जडेजाने सोडलेला CATCH आणि रोहित शर्माने पहिल्या इंनिंग ला फेकलेली विकेट यामुळे हरण्याला पर्याय नाही असे दिसायला लागले होते ते शेवटी दिसलेच

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:20
वृध्दीमान साहा भारतात परतणार आहे .. बहुतेक दुखापतीमुळे. त्याच्याजागी नमन ओझाला बोलावले आहे. नमन ओझाने ऑस्ट्रेलियात ३ डावात १ द्विशतक आणि २ शतके केली आहेत त्यातही २ दा नाबाद. दोनही सामने ब्रिस्बेनच्या उसळत्या खेळपट्टीवर होते. तो वेळेत पोहोचला तर त्याची वर्णी लागावी असे वाटते. इशांत चौथा सामनाही खेळु शकणार नाही हे धोणीने कालच स्पष्ट केलय. त्यामुळे बदल होणार संघात हे नक्की. पण अति बदल टाळण्यासाठी कदाचित शमीला परत संधी मिळु शकेल. संघ असा असावा ४थ्या सामन्यासाठी असे वाटते. विजय, ओझा/ गंभीर, पुजारा, कोहली, रहाणे, धोणी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर, शमी, पांडे/ अ‍ॅरॉन

भाते गुरुवार, 08/07/2014 - 23:41
दहापैकी सहा खेळाडू शुन्यावर बाद! एका कसोटी सामन्यात सर्वाधिक खेळाडू शुन्यावर बाद होण्याचा जागतिक विक्रम काय आहे? सचिनने वयाच्या सतराव्या वर्षी इथेच आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते!

श्रीगुरुजी Mon, 08/11/2014 - 12:21
६-७ दिवस मिपा संकेतस्थळ बंद होते. तेवढ्यात चौथा कसोटी सामना सुरू होऊन ३ दिवसांत संपलादेखील. तिसर्‍या दिवशी शेवटच्या केवळ एका सत्रात भारताने ९ गडी गमावून स्वतःच्या आणि इंग्लंडच्या संघाचीही विश्रांतीची सोय केली. ते सत्र खेळून काढले असते तर उगाच चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये येऊन बसावे लागले असते आणि दिवसभर पावसाची दाट शक्यता असल्याने खेळही नाही आणि आउटिंग पण नाही अशी भारताची व इंग्लंडची कंटाळवाणी अवस्था झाली असती. ५ व्या दिवशीही तेच झाले असते. त्याऐवजी भारतीय खेळाडूंनी पटापट विकेट फेकून सर्वांचीच अडचणीतून मुक्तता केली. त्यामुळे विराट कोहलीला अनुष्काबरोबर फिरायला २ जास्त दिवस मिळाले. इतरांनाही फुकटचे २ दिवस पदरात पडले. भारताच्या पहिल्या डावात तब्बल ६ खेळाडूंनी शून्य धावा करून एका जागतिक विक्रमाची बरोबरी केली. या पराभवाबरोबर धोनी आता भारताच्या क्रिकेट इतिहासातील परदेशातील सामन्यातील सर्वाधिक अयशस्वी कर्णधार ठरलेला आहे. पूर्ण फॉर्म हरविलेल्या कुक ला भारतानेच मदतीचा हात दिला. भारताचे प्रमुख फिरकी गोलंदाज बळीसाठी झगडत असताना कामचलावू फिरकी गोलंदाज मोईन अली तब्बल १९ बळी मिळवून मुख्य गोलंदाज बनण्याचे श्रेय भारताचेच आहे. आपल्या पहिल्या बळीसाठी झगडणार्‍या बिचार्‍या पंकज सिंगला शेवटी २ बळी मिळाले हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू. असो. आता ५ व्या कसोटीसाठी भारताने जास्त विचार करू नये. उर्वरीत मोकळे दिवस सराव वगैरे सारख्या फालतू गोष्टीत वाया न घालविता शॉपिंग, आउटिंग, डेटिंग, पिकनिक इ. महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरावेत. संघ निवडीच्या वेळी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून पहिले ज्याचे नाव येईल त्याला कर्णधार करावे व उर्वरीत १० खेळाडू चिठ्ठ्या टाकून उचलावेत. कारण कोणीही संघात असले तरी काहीही फरक पडणार नाही. शेवटी पत्त्याच्या कॅटमध्ये जर सर्व ५२ पत्ते कर असले, तर कितीही वेळा पत्ते पिसले तरी काय फरक पडणार आहे?

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 17:44
लज्जास्पद पराभव. मोईन अली विकेट काढतो, जडेजा, अश्विन मात्र रिकामेच. लॉर्डस् वर जिंकलेला संघ हाच का असा प्रश्न पडलाय.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/14/2014 - 21:09
उद्यापासून शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. सुरवातीला १-० असा आघाडीवर असणारा भारत आता १-२ असा मागे पडला आहे. भारत परदेशात लागोपाठ मालिका हरत आहे. २०११ च्या विश्वचषक विजयानंतर भारत परदेशात एकूण ५ मालिका खेळला. त्यापैकी वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये भारत मालिका हरला. आता ही मालिकादेखील भारत हरण्याच्या मार्गावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत परदेशात खेळलेले १३ कसोटी सामने हरलेला आहे. याबाबतीत विक्रम ब्रायन लारा व स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर आहे. दोघेही कर्णधार असताना परदेशात एकूण १६ कसोटी सामने हरले होते. धोनी त्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. उद्या इशांत शर्मा आत येणार हे नक्की. बहुतेक पंकजसिंग बाहेर जाईल. कदाचित जडेजाच्या जागी स्टूअर्ट बिन्नी आत येऊ शकतो. बाकी सगळे "नेहमीचेच यशस्वी कलाकार" असतील. असो. निदान अंतिम कसोटीत तरी भारताने आपली गेलेली अब्रू काही प्रमाणात परत मिळवावी हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

श्रीगुरुजी Tue, 08/19/2014 - 12:15
भारतीय संघाला शिव्या द्यायची पण लाज वाटतीये. शिव्या द्यायची पण यांची लायकी नाही. लागोपाठ ३ वेळा एक-दीड सेशन मध्येच ऑलआऊट झाला याची धोनी किंवा इतर कोणालाही लाज, लज्जा, खंत, शरम इ. काहीही वाटत नाही. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटचा सत्यानाश झाला हे उघड सत्य आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलचे दुष्परिणाम २०११ मध्येच दिसू लागले होते. सचिन, द्रविड इ. चे तंत्र सुद्धा शेवटी शेवटी बिघडल्याचे दिसले त्याचे कारण आयपीएलच होते. द्रविडसारखा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज आपल्या शेवटच्या १५-१६ डावात बहुतेक वेळा त्रिफळा बाद झाला होता तो तंत्र बिघडल्यामुळेच. भारतातल्या पाटा खेळपट्ट्यांवर फलंदाजाला अनुकूल क्षेत्ररक्षक रचनेसमोर बॅट कशीही वेडीवाकडी फिरवून १५-२० चेंडू खेळून २५-३० धावा करणारे शूर वीर कसोटीत एकत्रित ३० षटके सुद्धा टिकू शकत नाहीत हे बघणे अत्यंत क्लेशदायक होते. पूर्वी गावसकर तब्बल २-२ दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करत असे. आताचे खेळाडू अर्धा तास सुद्धा टिकू शकत नाहीत हे अत्यंत दुर्दैव आहे. एवढी नामुष्की होऊनसुद्धा "उगाच आयपीएलवर जळू नका" असे अत्यंत निगरगट्टपणे धोनी बजावत होता. आयुष्यात हातात कधीही चेंडूफळी न धरलेल्या पुढार्‍यांनी जेव्हा बीसीसीआयमध्ये शिरकाव केला तेव्हाच भारतीय क्रिकेटच्या अधोगतीला सुरूवात झाली. ज्या ज्या क्षेत्रात पुढारी घुसतात त्या सर्व क्षेत्रांचा सत्यानाश होतो. भारतीय क्रिकेट सुधारण्याचे उपाय म्हणजे सर्वप्रथम या पुढार्‍यांना बीसीसीआय मधून हाकलून देणे आणि आयपीएल बंद करणे. जर आयपीएल बंद करणे शक्य नसेल तर निदान आयपीएलमध्ये न खेळणार्‍यांनाच कसोटी संघात निवडावे व आयपीएलमध्ये खेळणार्‍यांना फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळवावे. आणि तेही शक्य नसेल तर भारताने कसोटी क्रिकेट खेळणे थांबवावे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 08/20/2014 - 20:02
+१ शर्यतीचा बैल वेगळा, शेतीसाठी काम करणारा बैल वेगळा आणि 'ते' काम करणारा वळु वेगळा ;) क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 21:08
>>> 'ते' काम करणारा वळु वेगळा *LOL* >>> क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते. + १ सध्या एकच बदल लगेच करता येईल. कसोटीसाठी आयपीएल खेळलेले कमीतकमी खेळाडू निवडावेत.

श्रीगुरुजी Mon, 08/25/2014 - 12:24
आजपासून भारत वि. इंग्लंड ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. आजचा सामना ब्रिस्टलमध्ये भारतीय वेळेनुसार दु. ३ वाजता सुरू होईल. कसोटी सामन्यात माती खाल्लेल्या भारताने निदान एकदिवसीय सामन्यात तरी अब्रू राखावी. ५ सामन्यांपैकी निदान २ सामने तरी जिंकावेत. म्हणजे किमान लंगोटी तरी शाबूत राहील. आजपासून झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका यांच्यात झिंबाब्वेमध्ये तिरंगी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होत आहे. आज झिंबाब्वे वि. ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीय वेळेनुसार दु. १ वाजता सुरु होईल. आज विंडीज वि. बांगला यांच्यात देखील एकदिवसीय सामना आहे. तो सामना भा.प्र.वे. नुसार मध्यरात्री १२ वाजता सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/28/2014 - 12:47
काल चक्क जिंकलो आपण. तब्बल १३३ धावांनी जिंकलो. काही अपवाद वगळता संघातील सर्वांचीच कामगिरी उत्तम झाली. धवन आणि कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरले. कोहलीला आता काही काळ विश्रांती द्यायची वेळ आली आहे. त्याची पूर्वपुण्याई संपत आली आहे. तिकडे झिंबाब्वेमधील तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत तब्ब्ल ३२७ धावा करून सुद्धा पराभव पदरी पडला. द आफ्रिकच्या फाफडू आणि डी व्हीलिअर्स या दोघांनी वेगवान शतके झळकावून आफ्रिकेला विजयी केले. मागील ६-७ सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३०० पेक्षा अधिक धावा करूनसुद्धा सामना हरावा लागला आहे. भारतात तर भारताने २ वेळा ३५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वीरित्या गाठून ऑस्ट्रेलियाला हरविले होते. गोलंदाजांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Tue, 09/02/2014 - 15:39
आणि ह्या इंग्लिश संघाबद्द्लही काही ? तो कसोटीत किती सेशन टिकेल? दोघांचेही हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ फारच वेगळे आहेत.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:16
इंग्लंडचा एकदिवसीय संघ आणि कसोटी संघ यात बरेच बदल आहेत. प्रमुख गोलंदाज ब्रॉड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. हेल्स, मॉर्गन, गर्नी, फिन हे कसोटी मालिकेत नसलेले खेळाडू संघात आहेत. भारताचा कसोटी संघ व एकदिवसीय संघ बराचसा सारखा आहे. रैना हा एकमेव खेळाडू (आणि ४ थ्या सामन्यात आलेला धवल कुलकर्णी) सोडला तर उर्वरीत सर्वजण कसोटी संघातलेच आहेत. त्यामुळे या दोन संघात एकदिवसीय संघाचे खेळाडू घेऊन कसोटी मालिका झाली तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 09/04/2014 - 16:25
मुरली विजय आणि गौतम गंभीरने गेल्या तीनपैकी किती सामन्यात बॅटिंगची ओपनींग केली? चेतेश्वर पुजारा किती वेळा तीन/चार नंबरला आला? इशांत शर्मा, आणि वरूण आरोनने किती ओवर टाकल्या गेल्या तीन सामन्यात? एकूण पाच खेळाडू फार विचार न करता सांगता आले. मग सांगा बदल आहे की नाही?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 13:06
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला नक्की समजले नाही. आताच्या भारताच्या एकदिवसीय संघात कसोटी संघाच्या तुलनेत बरेच बदल आहेत असा तुमचा दावा असावा. हे गृहीत धरून प्रतिसाद देत आहे. आताचा भारताचा एकदिवसीय संघ पाहिला तर ११ पैकी ९ जण कसोटी संघात सुद्धा होते. फक्त रैना व धवल कुलकर्णी एकही कसोटी खेळले नाहीत. संघात फारसा बदल नाही. कसोटीत खेळलेला जवळपास सर्व संघच एकदिवसीय सामने खेळत आहे. परंतु संघाची कामगिरी अचानक सुधारली आहे. या ११ पैकी सर्वजण व कसोटी खेळलेले सर्वजण आयपीएल मध्ये नियमित खेळतात. एकंदरीत हा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांकरिता जास्त योग्य आहे. या संघातील बहुतेक जण कसोटी सामन्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे निवड समितीने विचार करून कसोटी सामन्यांसाठी पूर्ण वेगळा संघ निवडावा. कसोटी संघात स्थानिक स्पर्धा खेळलेलेच खेळाडू असावेत. आयपीएल मधील खेळाडूंना कसोटी सामन्यात खेळणे अवघड जात आहे. त्यामुळे आयपीएल मधील खेळाडूंचा कसोटी साठी विचार करू नये.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 09/05/2014 - 13:57
माझा काहीही दावा नाहिये. आपण मात्र दावा करत आहात की हा संघ कसोटीत एक सेशन पण टिकणार नाही. त्यावर माझा आपल्याला असा प्रश्न होता की मग इंग्लंडचा हा संघ किती सेशन टिकेल? कारण माझ्या मते अशी तुलना योग्य होणार नाही. कारण माझ्या मते, दोन्ही देशांचे हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ वेगळे होते. इंग्लंडने बदललेले खेळाडू आपल्याला माहित असावे कारण आपण यादी दिली आहेच. भारतानेही असे अनुरूप बदल केले आहेत. कोण कोण वगळले ते मी वर सांगितले आहेच. परत सांगतो- मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वरूण आरोन. मग आता वन डे स्पेशालिस्ट संघ - तोही विजयी संघ; कसोटीत कसा खेळेल, यावर टिप्पणीचे प्रयोजन काय?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 20:43
हा संघ कसोटीत पुन्हा एकदा अपयशी ठरेल हे उघडच आहे कारण नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत खेळलेल्या संघातले बहुतेक सर्व खेळाडू एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहेत. जे नवीन आले आहेत त्यापैकी सुरेश रैना हा कसोटीत बर्‍याच वेळा अपयशी ठरलेला आहे. म्हणजे तो येऊनही फारसा फायदा नाही. धवल कुलकर्णी अजून कसोटी खेळलेलाच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अंदाज करण्यात अर्थ नाही. या दोन्ही संघांच्या एकदिवसीय संघामध्ये जर कसोटी सामना झाला तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल कारण भारतीय संघात फारसे बदल नाहीत आणि इंग्लंड संघात काही बदल असले तरी कसोटीत भारताचा कर्दनकाळ ठरलेले कुक, रूट, अ‍ॅण्डरसन, अली, बटलर इ. मंडळी एकदिवसीय संघात आहेतच. खरं सांगायचं तर भारताने कसोटीसाठी एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य असलेला संघ खेळविला आणि इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांसाठी कसोटीसाठी योग्य असलेला संघ खेळविला. त्याचे परीणाम दोन्ही संघांना भोगावे लागले आहेत.

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:19
भारताने लागोपाठ ३ रा सामना जिंकून एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. २०११ च्या तुलनेत एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी झाली. इंग्लिश संघ एकदिवसीय सामन्यात पारच ढेपाळलेला दिसतोय. पीटरसनला काढून त्यांनी मोठी चूक केलेली आहे. बोपारा व ब्रेस्ननला बाहेर ठेवणे हीदेखील मोठी चूक आहे.

श्रीगुरुजी Sat, 09/06/2014 - 14:36
शेवटचा सामना हरून भारताने एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाची संधी घालविली. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की मालिका जिंकल्यानंतर उर्वरीत सामन्यात भारतीय संघ एकदम शिथिल पडतो. या मालिकेतही तसेच झाले. खरं तर शेवटच्या सामन्यात स्वतः धोनीने विश्रांती घेऊन संजू सॅमसनला खेळवायला हवे होते. तसेच स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा यांनादेखील संधी हवी होती. थकलेल्या भुवनेश्वरकुमारला खेळविण्यात अर्थ नव्हता. असो. आता उद्या दौर्‍यातला शेवटचा ट-२० सामना आहे. तो जिंकून शेवट गोड करावा.
भारत व इंग्लंड यांच्यात इंग्लंड येथे २६ जून २०१४ ते ७ सप्टेंबर या दरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे. या मालिकेत भारत इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ५ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने व एक २० षटकांचा सामना खेळेल. तसेच स्थानिक संघांविरूद्ध दोन ३-दिवसीय सामने व १ एकदिवसीय सामना आयोजित केलेला आहे. भारत २६ जून पासून लिस्टरशायर विरूद्ध ३ दिवसांच्या सामन्याने मालिकेचा शुभारंभ करेल व ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्याने मालिकेची सांगता होईल.

ओकांची ठकी - एका काव्य कट्ट्याचा अहवाल

शशिकांत ओक ·

एस Tue, 06/24/2014 - 17:58
कट्ट्याबद्दल अभिनंदन! त्या हैय्योंच्या धाग्याचा दुवा द्या तेवढा.

शशिकांत ओक Wed, 06/25/2014 - 11:24
कविराज मित्रांनो, आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव वरीव प्रकारे काही काव्यात्मक अविष्कार करून दाखवावा अशी विनंती...

एस Tue, 06/24/2014 - 17:58
कट्ट्याबद्दल अभिनंदन! त्या हैय्योंच्या धाग्याचा दुवा द्या तेवढा.

शशिकांत ओक Wed, 06/25/2014 - 11:24
कविराज मित्रांनो, आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव वरीव प्रकारे काही काव्यात्मक अविष्कार करून दाखवावा अशी विनंती...
मित्र हो, एका रविवारी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर स्थानापन्न झाल्यावर जालावर शब्दरुपाने भेटणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. जुजबी गप्पा नंतर राजने आयोजित काव्यस्पर्धेबाबत आणि आगामी काळात मराठी व अन्य भाषेतील साहित्य प्रकाशनाच्या साकार होऊ घातलेल्या त्यांच्या कल्पना सांगितल्या.

पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

anagha kulkarni ·

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:05
स्टिरिओटाईपला धक्का दिल्या बद्दल अभिनंदन..! बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत.. त्यामुळे त्यांचा खुप गोंधळ उडतो रस्त्यावर हे खरंय... पण पुरुष अत्यंत बेक्कार ड्राइव्ह करताना पाहिले आहेत.. बाईक नागमोडी डुलवत कट मारत जाणारे.. आपण मोठ्या गाडित बसलो म्हणजे बाकीचे सगळे किडे मुंग्या समजुन वाट्टेल तशी गाडी चालवणारे.. कारण नसताना हॉर्न वाजवणारे.. रिक्षावाले (इथे काही वर्णनाची गरजच नाही).. सिग्नल तोडणारे.. बहुतांशी पुरुषच असतात.. आणि कदाचित असंही असेल की ह्याचा बायकांना जेवढा त्रास होतो तेवढा इतर पुरुषांना होत नाही / नसावा..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Tue, 06/24/2014 - 16:18
बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत
याची पाटी लावायची काय??? ;)

In reply to by टवाळ कार्टा

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:29
लावा की.. माझ्या पप्पांचं काय जातय..!! आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी.. पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 16:45
आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:51
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
लक्षात ठेवा हे वाक्य बरं का!!
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा
. तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं.. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे.. ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात... प्रश्न्च संपला किनई..

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 17:27
माझेच वाक्य मलाच लक्षात ठेवायला सांगून आपण मी सोयीप्रमाणे भूमिका बदलणारा आहे असे ध्वनित केले आहे. माझे मिपावरील कुठलेही लेखन/प्रतिसाद वाचून मी असे काही केल्याचे दाखवून द्या असे मी आपणांस विनम्र आव्हान देत आहे. माझ्या तुम्ही उद्धृत केलेल्या प्रतिसादातही जास्तीत जास्त समतोलपणा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तसेही जर प्रश्न संपल्याचे तुम्हांला मान्य होते तर मग पुन्हा
तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं..
ह्याची आवश्यकता नव्हती. तुमच्या प्रतिसादातील खवचटपणा जर इतर कुणाला उद्देशून असेल तर मला असल्या निरर्थक स्कोअर-सेटलिंगमध्ये रस नाही. चालू द्या.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:36
ओ तुम्ही बरे आहात ना... तुम्हाला काय जोक बिक कळतो की नाही? कसले डोंबलचे स्कोर सेटलिंग* आणि नम्र आव्हानं... टाईमपास करतेय मी.. बाकी तुम्ही भुमिका बदला न बदला.. (परत एकदा) माझ्या पप्पांचं काहीही जात नाही.. त्यामुळे असलं काही मला म्हणायचही नाही.. पण असोच.... फकत तुमचा असा प्रतिसाद पाहुन अमंळ आश्चर्य वाटले हे जाता जाता सांगुन ठेवते.. (ह्यातुन तुमच्या बद्दल काहीही ध्वनित वगैरे करायचं नाहीये.. नोंद घेणे) * - (आणि तुमच्याशी कशाला ब्वॉ?? आपण तर तुम्हाला इज्जतीत नेहमी चांगलेच प्रतिसाद दिलेत..)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 17:57
आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? अहो औकात तरी आहे का आमची तेवढी? आम्ही आपले साधे शॉव्हिनिस्ट आहोत ओ. आमची तेवढी लायकी नाही ओ.

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 18:07
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!! बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!! लगे रहो..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:11
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!
त्या गाजराची पुंगी वाजवा, तेवढेच मनोरंजन होईल मिपाकरांचे =)) न वाजली तर मोडून खा, तेवढंच आरोग्याला चांगलं असतं =))
बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!!
ओह सॉरी हां तुमचा यूएसपी चोरला का? अरेरेरे, दुसरा नाराच उरला नसेल नैका आता...चला आता 'हौ टु परेड वन्स ओन शॉव्हिनिझम" चे क्लासेस घ्या बघू! आयॅम शुअर लै गर्दी होईल =))

In reply to by बॅटमॅन

होकाका Wed, 06/25/2014 - 11:40
George Orwell च्या Animal Farm मधल्या "... some are more equal" या वाक्याचा चुकीचा अर्थ बरेचदा लावला जातो. इथे more equal चा अर्थ आहे people who are not special at all -- they are "more equal". या उलट, "Less equal" means "people with some (special) difference". बाकी चालू द्या ध्धम्माल.... .

In reply to by टवाळ कार्टा

होकाका Wed, 06/25/2014 - 11:20
@ टवाळ कार्टा ही घ्या पाटी: As a senior citizen was driving down the freeway, his car phone rang. Answering, he heard his wife's voice urgently warning him, "Herman, I just heard on the news that there's a car going the wrong way on 280. Please be careful!" "Hell," said Herman, "It's not just one car. It's hundreds of them!"

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:06
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत,
शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले. अपेक्षा पूर्ण केल्याने लेख आवडला. शिवाय चालू फ्याशनचा असल्याने वर राजेंद्र मेहेंदळे म्हणताहेत त्याप्रमाणे १०० तरी कुठंच जाणार नाहीत. छानच गं, मस्तच गं, इ.इ.इ. झालंच तर माझ्या प्रतिसादाला शिव्या, संपादन, एकूण काय टिपिकल प्रवास =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Tue, 06/24/2014 - 16:15
बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला विद्यार्थी. पहिल्यापासून असाच तेजस्वी. पुरूषजातीवर अन्याय झाल्याची शंका जरी आली तरी उसळून भांडायला उठे. पुरूष ही "जात" नव्हे हे मी त्याला एकदा असंबद्ध आणि तुटक तुटकपणे सांगत असताना नेमके हेडसर आले आणि "जातीवरून बोलते" म्हणून माझी बदली येरवड्याच्या शाळेत केली.

In reply to by वपाडाव

खटपट्या Wed, 06/25/2014 - 23:01
अहो, स्री आयडी असेल तर ताई बोलेन. पुरुष आयडी असेल तर दादा म्हणेन. बाकी काय करणार आम्ही. मला माझी स्वतःची नाडी बघायची आहे (शशिकांत काका कडे)

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:25
ए तू अपर्णा रामतीर्थकर नावाच्या बाईंची भाषणं ऐक.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईचंही ऐकतात.. बायकोचंही ऐकतात.. बहीणीचही ऐकतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या मनात काहिही भरवुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते ऐकतात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. तुमच्या पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:57
ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक आहेत. त्या आपल्या नवर्‍याला बहुधा म्हणत असाव्यात, "तू मला धाकात ठेव. नै ठेवलास तर याद राख, मारच खाशील माझ्याकडून. मी तुला नेहमी भिऊन राहीन. नै राह्यले तर बघच मग तू!!"

In reply to by पिलीयन रायडर

विटेकर Wed, 06/25/2014 - 14:16
अपर्णा रामतीर्थकर >> असहमत . लव जिहाद या विषयावर त्यांचे विचार ऐकले होते . अप्रतिम . फार झोंबणारे खरे बोलत होत्या त्या. बाकी चालू द्या !

In reply to by विटेकर

पिलीयन रायडर Wed, 06/25/2014 - 14:23
ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच भाषण ऐकलं.. दिड तासाचं होतं.. पैकी मी ४५ मिनिटं ऐकु शकले.. नंतर माझं डोकं उठलं.. बाईंकडे चांगलं बोलण्याची कला आहेच.. पण "स्त्री" ह्या विषयावर जे काही बोलल्या, ते अतिरेकी होतं हे नक्की.. असो.. हा विषय एका शतकी धाग्याचा आहे.. कशाला इथे वाया घालवा!!

In reply to by पिलीयन रायडर

जनरली स्त्री या विषयावर जालावरही चर्चिले जाते ते अतिरेकीच असते. कदाचित रामतीर्थकर बाईंच्या विरुद्ध पण अतिरेकी तर्‍हाच. परंतु तुम्ही असो म्हणून आम्हीही असो.

In reply to by बॅटमॅन

शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले.
अगदी अगदी !!! मागे एका मिपा ग्रुप वर पुढील वाक्य ऐकले होते "जर एखाद्या बाईने पुरुषाला चारचौघात शिवी दिली, तर याचा अर्थ त्याने तशीच काही चूक केली असली पाहिजे" शिवाय "सगळ्या शिव्यांचे जनक पुरूषच असणार", "बायका शिव्या देत नाहीत" अशी चिक्कार मजेदार चर्चा झाली. त्यानंतर मला कसलेच आश्चर्य वाटेनासे झाले. रच्याकने :- १०० झाले !!!!

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 16:18
सहसा पुरूष दुचाक्या ड्राईव्ह करत असताना सर्वात डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे दोघा किंवा तिघा बायकर्सने एकमेकांना समांतर तेही रमतगमत जाणे! जाम राग येतो अशा महाभागांचा! हा प्रकार बायकांना करताना अजून तरी पाहिलेले नाही. कुठूनही युटर्न घेणे, लेन कधीही बदलणे हे विषय स्त्री पुरूष या मुद्द्यांवर नाही तर मुंबई-पुणे या मुद्द्यावर लढायला हवेत ना? (घ्या! आता १०० काय घेऊन बसलात राजेश राव! ;) )

In reply to by ऋषिकेश

एस Tue, 06/24/2014 - 18:05
अशाच पद्धतीने दोन रिक्षाचालक एकाच्या रिक्षाला दुसरा एक पाय टेकवून पूर्ण लेन अडवून चालत असतात. ते तर जाम डोक्यात जातात. मी एकदा संधी मिळताच अशाच रमतगमत चाललेल्या दोन रिक्षाचालकांना ओलांडून पुढे गेलो आणि शांतपणे रस्त्यातच गाडी थांबवली. झक मारून त्यांना त्यांचे फॉर्मेशन तोडावे लागले. नाद नाय करायचावाल्यांचा खरंच एकदा नाद केला की त्यांचा आवेश किती पोकळ असतो हे कळते. म्युच्युअल डॅमेज थेरपी.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

एस Tue, 06/24/2014 - 18:21
एका पायाने टोईंग करतात, तेही दोन्हीं रिक्शांमध्ये फुल माणसे भरलेली असताना. सुपर्म्यानच असावेत बहुतेक. वरील उदाहरणात ते आपसूकच शेपरेट शेपरेट नीट चालवू लागले, आणि त्यांच्या संथ वेगामुळे त्या एवढ्याश्या पुलावरील मागे वाहनांची लागलेली रांग सुरळीत झाली.

In reply to by ऋषिकेश

असहमत समांतर ड्रायव्हींगचा अनुभव प्रचंड घेतला आहे. मुले समजा समांतर जात असतील तर हॉर्न मोठ्याने रेटल्यावर मधली दुचाकी एकदम उसळून बाजूला तरी जाते पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते. संधी मिळाल्यावर ओव्हरटेक जर करत असू तर या मुली अशा काही रागाने बघतात की त्या बाजूला होण्यास हॉर्न नाही तर कागदी रॉकेट वगैरे मारले आहे. आमचे बंधूराज अशा वेळेला गाडी जवळ नेऊन जोराने ओरडतात "गप्पा बागेत/घरी जाऊन मारा!"

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 14:45
माझा अनुभव कॉलेजकुमारांसंबंधी आहे. रात्री १२ नंतर चित्रपट सुटल्यावर घरी निघालो असता ५-६ बाईक वाल्यांनी आडव्या एका रांगेत बाईक्स चालवून आख्खा रस्ता अडविला होता. मुद्दाम सावकाश चालवत होते. माझी कोंडी केल्याची मजा लुटत होते. कितीही जोरात आणि कितीही वेळ हॉर्न धरून ठेवला तरी बाजूला होत नव्हते. शेवटी माझी गाडी त्यांच्या पैकी एकाच्या बाईकला धडकविण्याइतकी जवळ आल्यावर त्यांची फळी तुटली मी माझी गाडी दामटवून, खिडकीची काच खाली करून एकाला सिग्नलपाशी अडवला आणि हात बाहेर काढून त्याची कॉलर पकडली. तेंव्हा इतर सर्व जणं पळून गेले. ज्याला मी पकडले होते त्याचा शर्ट फाटून कॉलर माझ्या हाती आली आणि तो रस्ता दुभाजकावर बाईक चढवून विरुद्ध रस्त्याने पळून गेला. ते ५-६ जणं असून एकाच्या ही अंगात माझ्याशी २ हात करायची हिंमत नव्हती. डरपोक होते. पण रात्रीची वेळ आणि माझ्यासारख्या कुटुंबवत्सल माणसाला पाहून त्यांना चेव आला होता. पण प्रसंगी हा कुटुंबवत्सल प्राणी आपले थोबाड ही फोडू शकतो हे पाहील्यावर पांगापांग झाली.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ही समान्तर बाईक्स चालवत गप्पा मारण्याची पद्धत मुम्बईत पाहिली नाही कधी. पुण्यात सर्रास करतात. मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा चाट पडलो होतो.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 06/26/2014 - 08:57
मुम्बईत खरेच नाही पाहिला मी हा प्रकार. गेल्या शनिवारी पुण्यात मित्राकडे आलो होतो. तो वर्जिनल मुम्बईकर, गेली काही वर्षे पुण्यात सेटल (भोग असतात हो नशिबाचे ;-) ) त्याच्याशी याच विषयावर चर्चा चालली होती. म्हणाला, आता कुणी माझ्याशी असे बोलायला लागले तर मी दचकत नाही, बोलू शकतो. आपणहून बोलण्याइतका पुणेकर झालो नाहिये अजून, असेही म्हणाला (पुण्याच्या भाषेत म्हणला)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मालोजीराव गुरुवार, 06/26/2014 - 12:13
पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते
बरोबर आहे पुपे… आणि कधी जर आम्ही एखाद्या हॉट स्कूटीवालीच्या समांतर गाडी चालवू लागलो तर लगेच या 'काकू' टाईप चालकांच्या पोटात दुखायला लागतं आणि मग जोरजोरात हॉर्न वाजवणं चालू होतं.

धर्मराजमुटके Tue, 06/24/2014 - 16:22
नाही हो. अस काही नाहीये. मी रोज डिस्कवर १३५ बाईकवरुन प्रवास करतो पण अगदी स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन जातात. माझा स्पीड जेमतेम ५०-६० प्रति कि.मी. असतो.

In reply to by धर्मराजमुटके

तुषार काळभोर गुरुवार, 06/26/2014 - 10:41
डिस्कवर १३५ बाईक जेमतेम (!!!) ५०-६० प्रति कि.मी. स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक.... आरारारा...... लई वैट दीस आल्यात... (ह घ्या असं सांगाय पायजे काय? ;) )

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 16:36
>>>>ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . अशी भांडणं (जी माझी अनेकदा होतात) ती तुम्हीच तुमच्या लेखात दिलेल्या एक-दोन कारणांमुळे होतात. एकदा हिंजवडीच्या अलिकडे एका कारने अगदी जवळून माझ्या गाडी समोर गाडी घातली. त्याला अडविले असता दिशादर्शक (इंडिकेटर) टाकला होता नं, दिसत नाही का? असा उर्मट प्रश्न केला. त्याच्या मते दिशादर्शक टाकला की आपल्याला कशीही कुठेही वळायला कायदेशीर परवानगीच आहे. चांगला कुटुंब वत्सल गृहस्थ. बरोबर त्याची पत्नी आणि मुलगीही होती. त्याला मी हिंजवडी वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेलो. तिथे पोलीसाला सांगितलं की त्याने कशी असुरक्षित मार्गिका बदलली आणि अपघात टाळण्यासाठी मला कसा कचकावून गतिरोधक (ब्रेक) दाबावा लागला. त्यावर त्याला समजावून सांगण्या ऐवजी त्या पोलीसाने त्या कुटुंबाला 'तुम्ही जा साहेब, मी बोलतो ह्यांच्याशी' असे सांगून सोडून दिले आणि 'अपघात झाला का?' असे मलाच विचारले. मी म्हंटले पण, 'अहो, दुर्घटना घडल्यावरच पोलीसात जायचं का? दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं चालकाचं कर्तव्य नाही का? तो जर तशी काळजी घेत नसेल तर तो चालक अपघाताला निमंत्रण देऊन, नियम पाळत वाहन चालविणार्‍या इतर निष्पाप चालकांच्या आयुष्याशी खेळत नाही का?' असे म्हंटल्यावर तो पोलीस म्हणतो, 'तुम्ही म्हणता तसं झालं तर रामराज्य येईल. आमची गरजच काय?' मार्गिका बदलण्यासाठी वाहतूक खात्याचे कांही ठोस नियम आहेत. त्या पोलीसाची त्याच्या वरीष्ठांकडे तक्रार करावी असा विचार मनात आला होता पण काळ उलटल्यावर आपला राग कमी होतो, तक्रारींचा कांही परिणाम होत नाही आणि वरीष्ठाच्या वाहतुक सुरक्षेच्या ज्ञानाविषयी असलेली साशंकता ह्यामुळे तो प्रसंग तिथेच आटोपला. >>>> पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना चर्चा करून कांही होत नाही, पोलीसात जाऊन कांही होत नाही. अवजड वाहनांना चढणीवर उभे करून नंतर आपण निघून जावे आणि त्याला ते भरलेले वाहन घाटात चढविण्यासाठी त्रासदायक व्हावे एवढेच आपण करू शकतो.

धन्या Tue, 06/24/2014 - 17:02
पुरुष काय किंवा स्त्री काय, पुण्यात वाहतुकीचे नियम पाळून आणि आपल्या बेदकारपणे वाहन चालवण्याने आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात येऊ शकतात याची जाणिव ठेवणारे वहनचालक विरळाच.

भावना कल्लोळ Tue, 06/24/2014 - 17:22
अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या सिग्नल पासुन ते डोंगरी पर्यंतच्या रस्त्यावर असते. सिग्नल असुन नसल्या सारखा, कोणी कशी हि गाडी नेतात त्यात तर बाईक स्वार तर सगळे "धुम" शान मध्येच. पोलिस हि या एरिया मध्ये दुर्लक्ष करतात कारण अल्पसंख्याक इथे जास्त प्रमाणात. पोलीसावरही हाथ उचलायला कमी करत नाहीत. इथुन स्टेशन पर्यंत चालत जायचे कधी म्हंटले तरी जीव मुठीत घेऊन जावे लागते कारण स्त्री पाहिली कि कट ठरलेला.

In reply to by भावना कल्लोळ

एस Tue, 06/24/2014 - 17:39
स्त्री पाहिली कि कट ठरलेला.
ही मनोवृत्ती पुरुषांच्या सुप्त भीतीतून येते. "व्हाट डज् एव्हरी पॉवरफुल मॅन वॉण्ट? मोर पॉवर." असे आहे ते. ह्याचेच सामान्यीकरण करायचे झाले तर नियम तोडून गाडी दामटणे ह्यात आपले कोणी वाकडे करू शकत नाही हे इतर वाहनचालकांना दाखवून देणे आणि त्यातून स्वतःचे तथाकथित सामर्थ्य/वर्चस्व/नियंत्रण पडताळून पाहणे हा उद्देश असतो. अरुंधती रॉय यांना ढोबळमानाने उद्धृत करायचे झाले तर 'द स्ट्रॉन्ग हॅव मोर फीअर ऑफ द वीक, बिकॉज दे थिंक द वीक विल अल्टीमेटली गेट स्ट्रॉन्ग.' (वाक्य नीट आठवत नाही.)

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 06/24/2014 - 18:16
आज सकाळचाच प्रसंग !! बर्‍यापैकी लहान गल्लीत एक काकू कार चालवत समोरुन येत होत्या. हॉर्न देऊनही त्यांची गाडी माझ्या दुचाकीच्या दिशेने वळतेय हे पाहिल्यावर मी बाईक थांबवली. कार जवळ आल्यानंतर कळलं त्या काकू उजव्या हातात मोबाईल धरुन तो डाव्या कानाला लावून मोबाईलवर बोलत होत्या आणि डाव्या हाताने स्टेअरिंग सांभाळलं होतं. आता धागा वाचल्यावर मला हे लक्षात येतंय की चूक त्या काकूंची नव्हती. तो आलेला कॉल जर एखाद्या पुरुषाचा असेल तर ती त्याची चूक होती तो जर पुरुषेतर कोणाचा असेल तर 'मी' दोनदा हॉर्न दिल्यामुळे काकू बावचळल्या असं म्हणावं लागेल. थोडक्यात काय, चूक त्यांची नव्हतीच. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:17
अगदी अगदी. तुझीच चूक रे सुडक्या =)) काकूंचा काय दोष? आरामात फोनवर बोलत होत्या ते दिसलं नै ते नै, वर आणि हॉर्न मारतोस? कुठं फेडशील ही पापं =))

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:24
तुमच्या दुचाकीला रिवर्स गियर नव्हता, नव्हता तर तुम्ही खास बनवून घेतला नाही, किमानपक्षी दुचाकी पायाने ढकलत ढकलत मागे जाण्याचा क्षीण प्रयत्न केला नाही, वगैरे वगैरे...

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:26
अन सर्वांत मोठे पाप म्हणजे त्या काकू होत्या हे पाहिल्यावरही हॉर्न मारण्याचे डेरिंग केले. काका असते तर चाललं असतं, पण काकू दिसताहेत अन तरी हॉर्न? उद्धटपणाची कमालच झाली ही तर!

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:31
काहीही करा अथवा न करा, प्राईम सस्पेक्ट इन द सो कॉल्ड क्राईम नेहमी तुम्हीच.

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:36
अर्थातच. शिवाय काही बोललं तर स्त्रीद्वेष्टेपणाचा (साला हा लय पापिलवार चलनी सबुद है आजकालचा) शिक्का तर आहेच.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या Wed, 06/25/2014 - 05:58
एका बाईक च्या मागे लिहिले होते
महिला ड्रायव्हर म्हणजे आकाशातले तारे, ते तुम्हाला दिसतात पण त्यांना तुम्ही दिसालच याची खात्री नाही

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:05
स्टिरिओटाईपला धक्का दिल्या बद्दल अभिनंदन..! बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत.. त्यामुळे त्यांचा खुप गोंधळ उडतो रस्त्यावर हे खरंय... पण पुरुष अत्यंत बेक्कार ड्राइव्ह करताना पाहिले आहेत.. बाईक नागमोडी डुलवत कट मारत जाणारे.. आपण मोठ्या गाडित बसलो म्हणजे बाकीचे सगळे किडे मुंग्या समजुन वाट्टेल तशी गाडी चालवणारे.. कारण नसताना हॉर्न वाजवणारे.. रिक्षावाले (इथे काही वर्णनाची गरजच नाही).. सिग्नल तोडणारे.. बहुतांशी पुरुषच असतात.. आणि कदाचित असंही असेल की ह्याचा बायकांना जेवढा त्रास होतो तेवढा इतर पुरुषांना होत नाही / नसावा..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Tue, 06/24/2014 - 16:18
बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत
याची पाटी लावायची काय??? ;)

In reply to by टवाळ कार्टा

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:29
लावा की.. माझ्या पप्पांचं काय जातय..!! आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी.. पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 16:45
आम्हाला (म्हणजे आमच्यातल्या बहुतांश जणींना.. सरसकटीकरण करु नये.. बॅट्याला राग येतो..) पुरुषांएवढी चांगली ड्रायव्हिंग येत नाहीच मुळी..
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
पण रस्त्यावरच्या गोंधळाला पुरुष "बहुतांशी" जवाबदार असतात ही पण पाटी लावा हो.. (रस्त्यावर तासभर उभे राहुन हवं तर आपण विदा गोळा करु..!)
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:51
ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात.
लक्षात ठेवा हे वाक्य बरं का!!
त्याच विदामध्ये पुरुष चालक किती आणि महिला चालक किती ह्यांचेही प्रमाण नोंदवा. मग त्याअनुषंगाने गुणोत्तर काढा. मग हवा तो निष्कर्ष काढा
. तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं.. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे.. ड्रायवर हे चांगले ड्रायवर किंवा वाईट ड्रायवर असतात, ते पुरुष किंवा स्त्री नसतात... प्रश्न्च संपला किनई..

In reply to by पिलीयन रायडर

एस Tue, 06/24/2014 - 17:27
माझेच वाक्य मलाच लक्षात ठेवायला सांगून आपण मी सोयीप्रमाणे भूमिका बदलणारा आहे असे ध्वनित केले आहे. माझे मिपावरील कुठलेही लेखन/प्रतिसाद वाचून मी असे काही केल्याचे दाखवून द्या असे मी आपणांस विनम्र आव्हान देत आहे. माझ्या तुम्ही उद्धृत केलेल्या प्रतिसादातही जास्तीत जास्त समतोलपणा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तसेही जर प्रश्न संपल्याचे तुम्हांला मान्य होते तर मग पुन्हा
तशी तर आम्ही पाटी पण लावायला तयार आहोत की नाहीचे आमचं ड्रायव्हिंग चांगलं..
ह्याची आवश्यकता नव्हती. तुमच्या प्रतिसादातील खवचटपणा जर इतर कुणाला उद्देशून असेल तर मला असल्या निरर्थक स्कोअर-सेटलिंगमध्ये रस नाही. चालू द्या.

In reply to by एस

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:36
ओ तुम्ही बरे आहात ना... तुम्हाला काय जोक बिक कळतो की नाही? कसले डोंबलचे स्कोर सेटलिंग* आणि नम्र आव्हानं... टाईमपास करतेय मी.. बाकी तुम्ही भुमिका बदला न बदला.. (परत एकदा) माझ्या पप्पांचं काहीही जात नाही.. त्यामुळे असलं काही मला म्हणायचही नाही.. पण असोच.... फकत तुमचा असा प्रतिसाद पाहुन अमंळ आश्चर्य वाटले हे जाता जाता सांगुन ठेवते.. (ह्यातुन तुमच्या बद्दल काहीही ध्वनित वगैरे करायचं नाहीये.. नोंद घेणे) * - (आणि तुमच्याशी कशाला ब्वॉ?? आपण तर तुम्हाला इज्जतीत नेहमी चांगलेच प्रतिसाद दिलेत..)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 17:57
आम्हीअन काड्या लावणार? भलतंच? अहो औकात तरी आहे का आमची तेवढी? आम्ही आपले साधे शॉव्हिनिस्ट आहोत ओ. आमची तेवढी लायकी नाही ओ.

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 18:07
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!! बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!! लगे रहो..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:11
लेस इक्वलला असं कधी मधी गाजर दाखवावं लागतं!!
त्या गाजराची पुंगी वाजवा, तेवढेच मनोरंजन होईल मिपाकरांचे =)) न वाजली तर मोडून खा, तेवढंच आरोग्याला चांगलं असतं =))
बाकी जिकडे तिकडे चोहीकडे इक्वॅलिटीचा गजर जोरात चाल्लय हां..!!
ओह सॉरी हां तुमचा यूएसपी चोरला का? अरेरेरे, दुसरा नाराच उरला नसेल नैका आता...चला आता 'हौ टु परेड वन्स ओन शॉव्हिनिझम" चे क्लासेस घ्या बघू! आयॅम शुअर लै गर्दी होईल =))

In reply to by बॅटमॅन

होकाका Wed, 06/25/2014 - 11:40
George Orwell च्या Animal Farm मधल्या "... some are more equal" या वाक्याचा चुकीचा अर्थ बरेचदा लावला जातो. इथे more equal चा अर्थ आहे people who are not special at all -- they are "more equal". या उलट, "Less equal" means "people with some (special) difference". बाकी चालू द्या ध्धम्माल.... .

In reply to by टवाळ कार्टा

होकाका Wed, 06/25/2014 - 11:20
@ टवाळ कार्टा ही घ्या पाटी: As a senior citizen was driving down the freeway, his car phone rang. Answering, he heard his wife's voice urgently warning him, "Herman, I just heard on the news that there's a car going the wrong way on 280. Please be careful!" "Hell," said Herman, "It's not just one car. It's hundreds of them!"

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:06
मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत,
शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले. अपेक्षा पूर्ण केल्याने लेख आवडला. शिवाय चालू फ्याशनचा असल्याने वर राजेंद्र मेहेंदळे म्हणताहेत त्याप्रमाणे १०० तरी कुठंच जाणार नाहीत. छानच गं, मस्तच गं, इ.इ.इ. झालंच तर माझ्या प्रतिसादाला शिव्या, संपादन, एकूण काय टिपिकल प्रवास =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Tue, 06/24/2014 - 16:15
बॅटमॅन माझा नानावाडा शाळेतला विद्यार्थी. पहिल्यापासून असाच तेजस्वी. पुरूषजातीवर अन्याय झाल्याची शंका जरी आली तरी उसळून भांडायला उठे. पुरूष ही "जात" नव्हे हे मी त्याला एकदा असंबद्ध आणि तुटक तुटकपणे सांगत असताना नेमके हेडसर आले आणि "जातीवरून बोलते" म्हणून माझी बदली येरवड्याच्या शाळेत केली.

In reply to by वपाडाव

खटपट्या Wed, 06/25/2014 - 23:01
अहो, स्री आयडी असेल तर ताई बोलेन. पुरुष आयडी असेल तर दादा म्हणेन. बाकी काय करणार आम्ही. मला माझी स्वतःची नाडी बघायची आहे (शशिकांत काका कडे)

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 16:25
ए तू अपर्णा रामतीर्थकर नावाच्या बाईंची भाषणं ऐक.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईचंही ऐकतात.. बायकोचंही ऐकतात.. बहीणीचही ऐकतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या मनात काहिही भरवुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते ऐकतात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. तुमच्या पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी..

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 16:57
ऐकलीयेत हो. चिकार मनोरंजक आहेत. त्या आपल्या नवर्‍याला बहुधा म्हणत असाव्यात, "तू मला धाकात ठेव. नै ठेवलास तर याद राख, मारच खाशील माझ्याकडून. मी तुला नेहमी भिऊन राहीन. नै राह्यले तर बघच मग तू!!"

In reply to by पिलीयन रायडर

विटेकर Wed, 06/25/2014 - 14:16
अपर्णा रामतीर्थकर >> असहमत . लव जिहाद या विषयावर त्यांचे विचार ऐकले होते . अप्रतिम . फार झोंबणारे खरे बोलत होत्या त्या. बाकी चालू द्या !

In reply to by विटेकर

पिलीयन रायडर Wed, 06/25/2014 - 14:23
ते मी ऐकलं नाहीये.. मी एकच भाषण ऐकलं.. दिड तासाचं होतं.. पैकी मी ४५ मिनिटं ऐकु शकले.. नंतर माझं डोकं उठलं.. बाईंकडे चांगलं बोलण्याची कला आहेच.. पण "स्त्री" ह्या विषयावर जे काही बोलल्या, ते अतिरेकी होतं हे नक्की.. असो.. हा विषय एका शतकी धाग्याचा आहे.. कशाला इथे वाया घालवा!!

In reply to by पिलीयन रायडर

जनरली स्त्री या विषयावर जालावरही चर्चिले जाते ते अतिरेकीच असते. कदाचित रामतीर्थकर बाईंच्या विरुद्ध पण अतिरेकी तर्‍हाच. परंतु तुम्ही असो म्हणून आम्हीही असो.

In reply to by बॅटमॅन

शेवटी जगातल्या सर्व चुकांचे, गुन्ह्यांचे, इ.इ. आदिकारण पुरुषच आहेत हे कुठं लिहिलंय की नाही तेच चेकवायला आलो होतो. एकदाचं पाहून डोळे निवले.
अगदी अगदी !!! मागे एका मिपा ग्रुप वर पुढील वाक्य ऐकले होते "जर एखाद्या बाईने पुरुषाला चारचौघात शिवी दिली, तर याचा अर्थ त्याने तशीच काही चूक केली असली पाहिजे" शिवाय "सगळ्या शिव्यांचे जनक पुरूषच असणार", "बायका शिव्या देत नाहीत" अशी चिक्कार मजेदार चर्चा झाली. त्यानंतर मला कसलेच आश्चर्य वाटेनासे झाले. रच्याकने :- १०० झाले !!!!

ऋषिकेश Tue, 06/24/2014 - 16:18
सहसा पुरूष दुचाक्या ड्राईव्ह करत असताना सर्वात डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे दोघा किंवा तिघा बायकर्सने एकमेकांना समांतर तेही रमतगमत जाणे! जाम राग येतो अशा महाभागांचा! हा प्रकार बायकांना करताना अजून तरी पाहिलेले नाही. कुठूनही युटर्न घेणे, लेन कधीही बदलणे हे विषय स्त्री पुरूष या मुद्द्यांवर नाही तर मुंबई-पुणे या मुद्द्यावर लढायला हवेत ना? (घ्या! आता १०० काय घेऊन बसलात राजेश राव! ;) )

In reply to by ऋषिकेश

एस Tue, 06/24/2014 - 18:05
अशाच पद्धतीने दोन रिक्षाचालक एकाच्या रिक्षाला दुसरा एक पाय टेकवून पूर्ण लेन अडवून चालत असतात. ते तर जाम डोक्यात जातात. मी एकदा संधी मिळताच अशाच रमतगमत चाललेल्या दोन रिक्षाचालकांना ओलांडून पुढे गेलो आणि शांतपणे रस्त्यातच गाडी थांबवली. झक मारून त्यांना त्यांचे फॉर्मेशन तोडावे लागले. नाद नाय करायचावाल्यांचा खरंच एकदा नाद केला की त्यांचा आवेश किती पोकळ असतो हे कळते. म्युच्युअल डॅमेज थेरपी.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

एस Tue, 06/24/2014 - 18:21
एका पायाने टोईंग करतात, तेही दोन्हीं रिक्शांमध्ये फुल माणसे भरलेली असताना. सुपर्म्यानच असावेत बहुतेक. वरील उदाहरणात ते आपसूकच शेपरेट शेपरेट नीट चालवू लागले, आणि त्यांच्या संथ वेगामुळे त्या एवढ्याश्या पुलावरील मागे वाहनांची लागलेली रांग सुरळीत झाली.

In reply to by ऋषिकेश

असहमत समांतर ड्रायव्हींगचा अनुभव प्रचंड घेतला आहे. मुले समजा समांतर जात असतील तर हॉर्न मोठ्याने रेटल्यावर मधली दुचाकी एकदम उसळून बाजूला तरी जाते पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते. संधी मिळाल्यावर ओव्हरटेक जर करत असू तर या मुली अशा काही रागाने बघतात की त्या बाजूला होण्यास हॉर्न नाही तर कागदी रॉकेट वगैरे मारले आहे. आमचे बंधूराज अशा वेळेला गाडी जवळ नेऊन जोराने ओरडतात "गप्पा बागेत/घरी जाऊन मारा!"

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 14:45
माझा अनुभव कॉलेजकुमारांसंबंधी आहे. रात्री १२ नंतर चित्रपट सुटल्यावर घरी निघालो असता ५-६ बाईक वाल्यांनी आडव्या एका रांगेत बाईक्स चालवून आख्खा रस्ता अडविला होता. मुद्दाम सावकाश चालवत होते. माझी कोंडी केल्याची मजा लुटत होते. कितीही जोरात आणि कितीही वेळ हॉर्न धरून ठेवला तरी बाजूला होत नव्हते. शेवटी माझी गाडी त्यांच्या पैकी एकाच्या बाईकला धडकविण्याइतकी जवळ आल्यावर त्यांची फळी तुटली मी माझी गाडी दामटवून, खिडकीची काच खाली करून एकाला सिग्नलपाशी अडवला आणि हात बाहेर काढून त्याची कॉलर पकडली. तेंव्हा इतर सर्व जणं पळून गेले. ज्याला मी पकडले होते त्याचा शर्ट फाटून कॉलर माझ्या हाती आली आणि तो रस्ता दुभाजकावर बाईक चढवून विरुद्ध रस्त्याने पळून गेला. ते ५-६ जणं असून एकाच्या ही अंगात माझ्याशी २ हात करायची हिंमत नव्हती. डरपोक होते. पण रात्रीची वेळ आणि माझ्यासारख्या कुटुंबवत्सल माणसाला पाहून त्यांना चेव आला होता. पण प्रसंगी हा कुटुंबवत्सल प्राणी आपले थोबाड ही फोडू शकतो हे पाहील्यावर पांगापांग झाली.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ही समान्तर बाईक्स चालवत गप्पा मारण्याची पद्धत मुम्बईत पाहिली नाही कधी. पुण्यात सर्रास करतात. मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा चाट पडलो होतो.

In reply to by पैसा

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 06/26/2014 - 08:57
मुम्बईत खरेच नाही पाहिला मी हा प्रकार. गेल्या शनिवारी पुण्यात मित्राकडे आलो होतो. तो वर्जिनल मुम्बईकर, गेली काही वर्षे पुण्यात सेटल (भोग असतात हो नशिबाचे ;-) ) त्याच्याशी याच विषयावर चर्चा चालली होती. म्हणाला, आता कुणी माझ्याशी असे बोलायला लागले तर मी दचकत नाही, बोलू शकतो. आपणहून बोलण्याइतका पुणेकर झालो नाहिये अजून, असेही म्हणाला (पुण्याच्या भाषेत म्हणला)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मालोजीराव गुरुवार, 06/26/2014 - 12:13
पण मुली मात्र बिलकूल लोड घेत नाहीत निवांत गप्पा मारत समांतर ड्रायव्हींग चालू राहते
बरोबर आहे पुपे… आणि कधी जर आम्ही एखाद्या हॉट स्कूटीवालीच्या समांतर गाडी चालवू लागलो तर लगेच या 'काकू' टाईप चालकांच्या पोटात दुखायला लागतं आणि मग जोरजोरात हॉर्न वाजवणं चालू होतं.

धर्मराजमुटके Tue, 06/24/2014 - 16:22
नाही हो. अस काही नाहीये. मी रोज डिस्कवर १३५ बाईकवरुन प्रवास करतो पण अगदी स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन जातात. माझा स्पीड जेमतेम ५०-६० प्रति कि.मी. असतो.

In reply to by धर्मराजमुटके

तुषार काळभोर गुरुवार, 06/26/2014 - 10:41
डिस्कवर १३५ बाईक जेमतेम (!!!) ५०-६० प्रति कि.मी. स्कुटी पळविणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक.... आरारारा...... लई वैट दीस आल्यात... (ह घ्या असं सांगाय पायजे काय? ;) )

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 16:36
>>>>ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . अशी भांडणं (जी माझी अनेकदा होतात) ती तुम्हीच तुमच्या लेखात दिलेल्या एक-दोन कारणांमुळे होतात. एकदा हिंजवडीच्या अलिकडे एका कारने अगदी जवळून माझ्या गाडी समोर गाडी घातली. त्याला अडविले असता दिशादर्शक (इंडिकेटर) टाकला होता नं, दिसत नाही का? असा उर्मट प्रश्न केला. त्याच्या मते दिशादर्शक टाकला की आपल्याला कशीही कुठेही वळायला कायदेशीर परवानगीच आहे. चांगला कुटुंब वत्सल गृहस्थ. बरोबर त्याची पत्नी आणि मुलगीही होती. त्याला मी हिंजवडी वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेलो. तिथे पोलीसाला सांगितलं की त्याने कशी असुरक्षित मार्गिका बदलली आणि अपघात टाळण्यासाठी मला कसा कचकावून गतिरोधक (ब्रेक) दाबावा लागला. त्यावर त्याला समजावून सांगण्या ऐवजी त्या पोलीसाने त्या कुटुंबाला 'तुम्ही जा साहेब, मी बोलतो ह्यांच्याशी' असे सांगून सोडून दिले आणि 'अपघात झाला का?' असे मलाच विचारले. मी म्हंटले पण, 'अहो, दुर्घटना घडल्यावरच पोलीसात जायचं का? दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं चालकाचं कर्तव्य नाही का? तो जर तशी काळजी घेत नसेल तर तो चालक अपघाताला निमंत्रण देऊन, नियम पाळत वाहन चालविणार्‍या इतर निष्पाप चालकांच्या आयुष्याशी खेळत नाही का?' असे म्हंटल्यावर तो पोलीस म्हणतो, 'तुम्ही म्हणता तसं झालं तर रामराज्य येईल. आमची गरजच काय?' मार्गिका बदलण्यासाठी वाहतूक खात्याचे कांही ठोस नियम आहेत. त्या पोलीसाची त्याच्या वरीष्ठांकडे तक्रार करावी असा विचार मनात आला होता पण काळ उलटल्यावर आपला राग कमी होतो, तक्रारींचा कांही परिणाम होत नाही आणि वरीष्ठाच्या वाहतुक सुरक्षेच्या ज्ञानाविषयी असलेली साशंकता ह्यामुळे तो प्रसंग तिथेच आटोपला. >>>> पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना चर्चा करून कांही होत नाही, पोलीसात जाऊन कांही होत नाही. अवजड वाहनांना चढणीवर उभे करून नंतर आपण निघून जावे आणि त्याला ते भरलेले वाहन घाटात चढविण्यासाठी त्रासदायक व्हावे एवढेच आपण करू शकतो.

धन्या Tue, 06/24/2014 - 17:02
पुरुष काय किंवा स्त्री काय, पुण्यात वाहतुकीचे नियम पाळून आणि आपल्या बेदकारपणे वाहन चालवण्याने आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात येऊ शकतात याची जाणिव ठेवणारे वहनचालक विरळाच.

भावना कल्लोळ Tue, 06/24/2014 - 17:22
अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या सिग्नल पासुन ते डोंगरी पर्यंतच्या रस्त्यावर असते. सिग्नल असुन नसल्या सारखा, कोणी कशी हि गाडी नेतात त्यात तर बाईक स्वार तर सगळे "धुम" शान मध्येच. पोलिस हि या एरिया मध्ये दुर्लक्ष करतात कारण अल्पसंख्याक इथे जास्त प्रमाणात. पोलीसावरही हाथ उचलायला कमी करत नाहीत. इथुन स्टेशन पर्यंत चालत जायचे कधी म्हंटले तरी जीव मुठीत घेऊन जावे लागते कारण स्त्री पाहिली कि कट ठरलेला.

In reply to by भावना कल्लोळ

एस Tue, 06/24/2014 - 17:39
स्त्री पाहिली कि कट ठरलेला.
ही मनोवृत्ती पुरुषांच्या सुप्त भीतीतून येते. "व्हाट डज् एव्हरी पॉवरफुल मॅन वॉण्ट? मोर पॉवर." असे आहे ते. ह्याचेच सामान्यीकरण करायचे झाले तर नियम तोडून गाडी दामटणे ह्यात आपले कोणी वाकडे करू शकत नाही हे इतर वाहनचालकांना दाखवून देणे आणि त्यातून स्वतःचे तथाकथित सामर्थ्य/वर्चस्व/नियंत्रण पडताळून पाहणे हा उद्देश असतो. अरुंधती रॉय यांना ढोबळमानाने उद्धृत करायचे झाले तर 'द स्ट्रॉन्ग हॅव मोर फीअर ऑफ द वीक, बिकॉज दे थिंक द वीक विल अल्टीमेटली गेट स्ट्रॉन्ग.' (वाक्य नीट आठवत नाही.)

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 06/24/2014 - 18:16
आज सकाळचाच प्रसंग !! बर्‍यापैकी लहान गल्लीत एक काकू कार चालवत समोरुन येत होत्या. हॉर्न देऊनही त्यांची गाडी माझ्या दुचाकीच्या दिशेने वळतेय हे पाहिल्यावर मी बाईक थांबवली. कार जवळ आल्यानंतर कळलं त्या काकू उजव्या हातात मोबाईल धरुन तो डाव्या कानाला लावून मोबाईलवर बोलत होत्या आणि डाव्या हाताने स्टेअरिंग सांभाळलं होतं. आता धागा वाचल्यावर मला हे लक्षात येतंय की चूक त्या काकूंची नव्हती. तो आलेला कॉल जर एखाद्या पुरुषाचा असेल तर ती त्याची चूक होती तो जर पुरुषेतर कोणाचा असेल तर 'मी' दोनदा हॉर्न दिल्यामुळे काकू बावचळल्या असं म्हणावं लागेल. थोडक्यात काय, चूक त्यांची नव्हतीच. ;)

In reply to by सूड

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:17
अगदी अगदी. तुझीच चूक रे सुडक्या =)) काकूंचा काय दोष? आरामात फोनवर बोलत होत्या ते दिसलं नै ते नै, वर आणि हॉर्न मारतोस? कुठं फेडशील ही पापं =))

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:24
तुमच्या दुचाकीला रिवर्स गियर नव्हता, नव्हता तर तुम्ही खास बनवून घेतला नाही, किमानपक्षी दुचाकी पायाने ढकलत ढकलत मागे जाण्याचा क्षीण प्रयत्न केला नाही, वगैरे वगैरे...

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:26
अन सर्वांत मोठे पाप म्हणजे त्या काकू होत्या हे पाहिल्यावरही हॉर्न मारण्याचे डेरिंग केले. काका असते तर चाललं असतं, पण काकू दिसताहेत अन तरी हॉर्न? उद्धटपणाची कमालच झाली ही तर!

In reply to by बॅटमॅन

एस Tue, 06/24/2014 - 18:31
काहीही करा अथवा न करा, प्राईम सस्पेक्ट इन द सो कॉल्ड क्राईम नेहमी तुम्हीच.

In reply to by एस

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 18:36
अर्थातच. शिवाय काही बोललं तर स्त्रीद्वेष्टेपणाचा (साला हा लय पापिलवार चलनी सबुद है आजकालचा) शिक्का तर आहेच.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या Wed, 06/25/2014 - 05:58
एका बाईक च्या मागे लिहिले होते
महिला ड्रायव्हर म्हणजे आकाशातले तारे, ते तुम्हाला दिसतात पण त्यांना तुम्ही दिसालच याची खात्री नाही
लेखनविषय:
लेखनप्रकार
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये.

उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी ·

इनिगोय Tue, 06/24/2014 - 21:21
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला यात असा बदल केला तर? --- अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये ”त्याला” कविता नेहमीसारखी आवडलीच!

तुला इतक्या तरलतेनं कशा बांधता येतात, याचं नवल वाटतं. स्वातंत्र्य या आदिम इच्छेची, काव्यात्मक अभिव्यक्ती; आणि घर की अंगण या द्विधेत सापडलेली माती, मनापासून आवडली. या ओळी :
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
(बहुदा) अशा हव्यात ............ वाहून गेलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 09:52
आपल्या रचना नेहमीच वाचतो. कविता आवडतात. काल माझ्या मैत्रीणीने या कवितेवर चांगली चर्चा केली. मैत्रीणीच्या भाषेत '' माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का” असं म्हणुन कवितेवर चर्चा करायला दिलं आम्हाला कामाला लावून. एखादी कविता वाचली की कवितेत असलेली सर्व कथा उलगडावी असे वाटते. एखाद्या कवितेच्या काही ओळी खास वाटतात कारण त्यात असलेल्या कल्पनेने आणि त्यातल्या अर्थाने. मला कवितेची थीम आवडली. धो धो पाऊस आलाय आणि घराचा उंबरठा वाहून गेला. घरात कोंडमारा झालेल्या सर्व वस्तू आपल्या व्यक्तिमत्वासहीत बाहेर पडल्या आहेत, बाहेरची ओढ आहेच. म्हणुनच सुरुवातीच्या ओळी मला खूप आवडल्या. बैठकीच्या खोलीतली फुलदानी बाहेर पडलीय ती पहाटेच्या वर्षावात ''एखादं फुलं पदरात पडावं म्हणुन'' निर्जीवपणा जावा, टवटवीतपणा यावा फुलदानीच्या जगण्याला अतिशय सुरेख ओळी आणि छान कल्पना. आणि मग कवितेत असा एखादा अर्थ लागला की पुढच्या ओळींमधुन तसाच अर्थ वाचायला मिळतो का असे म्हणुन वाचलं समईची मंद ज्योतीचं आता देव्हा-यात लक्ष नाही. तिचंही लक्ष विचलित झालंय तीही घराबाहेर पडलेल्या उंबरठ्याच्या दिशेने पाहात आहे, ज्योतीचं बाळकृष्णावर अतिशय प्रेम आहे, सतत त्याच्यापुढे मंद तेवत आणि झुलत असते. पण उंबरठाच गेलाय तर कदाचित तिलाही हे बंध नकोत का ? पण असं नसावं. आपल्या आयुष्याला शोभा देव्हा-यामुळे आणि मग आपल्यालाही बाहेर पडावं लागतंकी काय, म्हणुन ती थरथरते आहे. याही ओळी छान आहेत. डायरीतल्या आठवणीही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. उंबरठाच वाहून गेलाय तेव्हा आपलं म्हणुन काही अस्तित्व उरलं नाही असे वाटतं घरातल्या प्रत्येक वस्तुला. आणि मग ''काय झालं कुणास ठाऊक पासून ते उंबरठाच वाहून गेला'' इथपर्यंतच्या ओळी मला विस्कळीत वाटतात. कवितेचा आनंद मिळत नाही. 'अंगणातली माती आत बाहेर होत आहे' असू दे नाही तर ’फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर’ यात ओळी चांगल्या आलेल्या असूनही एका सलग थीमची मजा घेता येत नाही. अर्थात कवीच्या मनातल्या कल्पना आणि अर्थ वाचकाच्या कल्पना आणि अर्थाशी जुळलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही आपलं आपल्याला काही पोहोचतं का इतक्याच शोधात असतो. आपल्या कवितेवर आम्हाला चर्चा करतांना मजा आली. आभार लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 11:40
डिबी, मला तरी मांडणी विस्कळीत वाटली नाही. अर्थात, मिकाच्या भावना, तो स्वतःच स्पष्ट करेल. पण मला पोहोचलेला अर्थ असा :
माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का”
स्वच्छंद आणि रुटीन-आयुष्य, यातली उंबरठा ही सीमा आहे. स्वच्छंद आपल्याला सतत खुणावत असतो, उंबरठा ओलांडावासं कैकदा वाटतं पण रोजचं रुटीन, ते साहस करु देत नाही. `मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो' या अप्रतीम कवितेत, संदीप खरे म्हणतो : मी जुनाट दारा परी किरकीरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी, मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो, तो लंघून चौकट पार निघाया बघतो | ....ही चौकट पार करणं मिकाच्या कवितेचा उंबरठा वाहून जाणं आहे. तुमच्या मैत्रिणीला बहुदा, तो अर्थ पोहोचला नसावा आणि त्यामुळे पुढचे संदर्भ लागले नसतील.
काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसून पाऊस फुलं देऊन.. गेला आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
पावसानं चित्तवृत्ती फुलल्या होत्या. त्या फुलांनी स्वछंदाची ओढ लावली होती. उंबरठा वाहून गेला होता. पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे अंगणात शांतता पसरलीये. पुन्हा ती ओढ विरतेयं. .........
पण आता अंगणातली माती चक्रीवादळात अडकल्यासारखी आत-बाहेर होतेय
ही माती म्हणजे आपण आहोत. आपली द्विधा मनस्थिती आहे. घरात जावं, पुन्हा रुटीनला लागावं की मोकळ्या अंगणात थांबावं हे चक्रीवादळ, मनाला घेरतंय. एकदा आत जावंसं वाटतंय, तर पुन्हा अंगण खुणावतंय. -----
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला
स्वच्छंदाची उधळण झालेली फुलं वेचावी की पुन्हा घरात शिरावं हा मनाला संभ्रम आहे. कारण उंबरठा वाहून जाण्याची संधी; ती चौकट लंघून जाण्याची उर्मी, पुन्हापुन्हा येत नाही. -----
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय
हे रिपीटिशन, थीम हायलाइट करतं.... तुम्हाला परत एकदा कविता वाचाशी वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 13:08
आस्वादक म्हणुन विस्कळीत ओळीअर्थांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न उत्तम वाटला. आवडलेली कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे आता पुन्हा वाचण्यासारखं आणि शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही, जे वाटलं ते लिहिलंच आहे तुम्हीही आणि मीही....! दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या कवितेवर इतका विचार आणि चर्चा झाली हे वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं. मुळात त्या कवितेचा अर्थ मी देखिल इतक्या विस्तृतपणे मांडू शकेन कां यावर मलाच शंकाच आहे. तुम्ही उभयतांनी केलेले रसग्रहण अगदी तंतोतत आहे असे जरी म्हणता येत नसलं तरी मला अभिप्रेत असलेला भावर्थ तुमच्या रसग्रहणाशी खुप जवळ जातो. मला शेवटच्या ओळी अश्या कां लिहावाश्या वाटल्या हे मलाही सांगता येणार नाही, पण ज्या मातीचा मी उल्लेख केलाय ती माती त्या घराला धरुन होती (पाऊस येऊन उंबरठा वाहून जाण्याआधी). त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे. असो, मला खरचं नाही सांगता येणार. तरीही तुम्ही माझी कविता इतक्या मनःपूर्वक वाचली आणि आपला विस्तृत अभिप्राय मांडण्याचे कष्ट घेतले यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आणि, या खुलाशानं
त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे
मी केलेल्या रसग्रहणाचं सार्थक झालं!

असंका गुरुवार, 06/26/2014 - 10:09
इतकं वेगळं काही बघितल्याच्या आनंदात असतानाच, एक जरा खटकलं- उंबरठा कालच वाहून गेलाय तर "आजकाल असं होतंय" याला काय संदर्भ? "आज असं होतंय" हे जास्त नैसर्गिक झाले असते ? तरीही इतकी सुंदर कल्पना ज्यांच्या डो़क्यातून निघाली त्यांच्यासमोर काय बोलायचे हो? अनेक धन्यवाद!

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:54
सुरेख रचना! प्रा.डो. बिरुटे सरांचं रसग्रहणही आवडलं.

एस गुरुवार, 06/26/2014 - 23:33
कविता पुनःपुन्हा वाचतोय. 'भय इथले...' डोक्यात वाजत राहतेय आणि आपली ही कविता जणू उर फुटूून धावत सुटलीय.

शुचि Sat, 06/28/2014 - 00:25
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
निव्वळ टचिंग!!!

वॉल्टर व्हाईट Sat, 06/28/2014 - 04:14
वाहुन गेलेला उंबरठा ह्या रुपकाने प्रत्येक वाचकाच्या मनात आपापले कल्पनाविश्व उभे राहिले नसल्यास नवलच. बहुदा अशी ताकतवान रुपकेच अश्या भावविभोर करणार्‍या कवितांना इतके परिणामकारक बनवत असावीत. कवितेतली जी इन्विजिबल प्रोटोगॉनिस्ट आहे तिची प्रत्येक वाचकाने आपापली तरल प्रतिमा बनवली असणार.. कुणी गेलेली आजी, कुणाची परगावी असलेली आई तर कुणाची लग्नघरी नांदणारी बहिण अन कुणाची लॉस्ट प्रेयसी. सगळ्यांच्या या प्रतिविश्वात प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख ही भावना मात्र सारखी, सगळ्या वाचकांची प्रतिविश्वं एका माळेत ओवणारी. ब्राव्हो !

इनिगोय Tue, 06/24/2014 - 21:21
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला यात असा बदल केला तर? --- अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये ”त्याला” कविता नेहमीसारखी आवडलीच!

तुला इतक्या तरलतेनं कशा बांधता येतात, याचं नवल वाटतं. स्वातंत्र्य या आदिम इच्छेची, काव्यात्मक अभिव्यक्ती; आणि घर की अंगण या द्विधेत सापडलेली माती, मनापासून आवडली. या ओळी :
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
(बहुदा) अशा हव्यात ............ वाहून गेलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 09:52
आपल्या रचना नेहमीच वाचतो. कविता आवडतात. काल माझ्या मैत्रीणीने या कवितेवर चांगली चर्चा केली. मैत्रीणीच्या भाषेत '' माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का” असं म्हणुन कवितेवर चर्चा करायला दिलं आम्हाला कामाला लावून. एखादी कविता वाचली की कवितेत असलेली सर्व कथा उलगडावी असे वाटते. एखाद्या कवितेच्या काही ओळी खास वाटतात कारण त्यात असलेल्या कल्पनेने आणि त्यातल्या अर्थाने. मला कवितेची थीम आवडली. धो धो पाऊस आलाय आणि घराचा उंबरठा वाहून गेला. घरात कोंडमारा झालेल्या सर्व वस्तू आपल्या व्यक्तिमत्वासहीत बाहेर पडल्या आहेत, बाहेरची ओढ आहेच. म्हणुनच सुरुवातीच्या ओळी मला खूप आवडल्या. बैठकीच्या खोलीतली फुलदानी बाहेर पडलीय ती पहाटेच्या वर्षावात ''एखादं फुलं पदरात पडावं म्हणुन'' निर्जीवपणा जावा, टवटवीतपणा यावा फुलदानीच्या जगण्याला अतिशय सुरेख ओळी आणि छान कल्पना. आणि मग कवितेत असा एखादा अर्थ लागला की पुढच्या ओळींमधुन तसाच अर्थ वाचायला मिळतो का असे म्हणुन वाचलं समईची मंद ज्योतीचं आता देव्हा-यात लक्ष नाही. तिचंही लक्ष विचलित झालंय तीही घराबाहेर पडलेल्या उंबरठ्याच्या दिशेने पाहात आहे, ज्योतीचं बाळकृष्णावर अतिशय प्रेम आहे, सतत त्याच्यापुढे मंद तेवत आणि झुलत असते. पण उंबरठाच गेलाय तर कदाचित तिलाही हे बंध नकोत का ? पण असं नसावं. आपल्या आयुष्याला शोभा देव्हा-यामुळे आणि मग आपल्यालाही बाहेर पडावं लागतंकी काय, म्हणुन ती थरथरते आहे. याही ओळी छान आहेत. डायरीतल्या आठवणीही बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. उंबरठाच वाहून गेलाय तेव्हा आपलं म्हणुन काही अस्तित्व उरलं नाही असे वाटतं घरातल्या प्रत्येक वस्तुला. आणि मग ''काय झालं कुणास ठाऊक पासून ते उंबरठाच वाहून गेला'' इथपर्यंतच्या ओळी मला विस्कळीत वाटतात. कवितेचा आनंद मिळत नाही. 'अंगणातली माती आत बाहेर होत आहे' असू दे नाही तर ’फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर’ यात ओळी चांगल्या आलेल्या असूनही एका सलग थीमची मजा घेता येत नाही. अर्थात कवीच्या मनातल्या कल्पना आणि अर्थ वाचकाच्या कल्पना आणि अर्थाशी जुळलाच पाहिजे असं काही नाही. आम्ही आपलं आपल्याला काही पोहोचतं का इतक्याच शोधात असतो. आपल्या कवितेवर आम्हाला चर्चा करतांना मजा आली. आभार लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 11:40
डिबी, मला तरी मांडणी विस्कळीत वाटली नाही. अर्थात, मिकाच्या भावना, तो स्वतःच स्पष्ट करेल. पण मला पोहोचलेला अर्थ असा :
माणसाच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची पण उधळण होते व अस्ताव्यस्त दु:खही सतत माणसाला लगडून असतात मग यात काय सांभाळायचं उंबरठा नसल्यावर नाही का”
स्वच्छंद आणि रुटीन-आयुष्य, यातली उंबरठा ही सीमा आहे. स्वच्छंद आपल्याला सतत खुणावत असतो, उंबरठा ओलांडावासं कैकदा वाटतं पण रोजचं रुटीन, ते साहस करु देत नाही. `मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो' या अप्रतीम कवितेत, संदीप खरे म्हणतो : मी जुनाट दारा परी किरकीरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी, मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो, तो लंघून चौकट पार निघाया बघतो | ....ही चौकट पार करणं मिकाच्या कवितेचा उंबरठा वाहून जाणं आहे. तुमच्या मैत्रिणीला बहुदा, तो अर्थ पोहोचला नसावा आणि त्यामुळे पुढचे संदर्भ लागले नसतील.
काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसून पाऊस फुलं देऊन.. गेला आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
पावसानं चित्तवृत्ती फुलल्या होत्या. त्या फुलांनी स्वछंदाची ओढ लावली होती. उंबरठा वाहून गेला होता. पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे अंगणात शांतता पसरलीये. पुन्हा ती ओढ विरतेयं. .........
पण आता अंगणातली माती चक्रीवादळात अडकल्यासारखी आत-बाहेर होतेय
ही माती म्हणजे आपण आहोत. आपली द्विधा मनस्थिती आहे. घरात जावं, पुन्हा रुटीनला लागावं की मोकळ्या अंगणात थांबावं हे चक्रीवादळ, मनाला घेरतंय. एकदा आत जावंसं वाटतंय, तर पुन्हा अंगण खुणावतंय. -----
अंगणातली फुलं सांभाळायची कि उंबरठा नसलेले घर तेच उमजत नाहीये तिला
स्वच्छंदाची उधळण झालेली फुलं वेचावी की पुन्हा घरात शिरावं हा मनाला संभ्रम आहे. कारण उंबरठा वाहून जाण्याची संधी; ती चौकट लंघून जाण्याची उर्मी, पुन्हापुन्हा येत नाही. -----
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय
हे रिपीटिशन, थीम हायलाइट करतं.... तुम्हाला परत एकदा कविता वाचाशी वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 13:08
आस्वादक म्हणुन विस्कळीत ओळीअर्थांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न उत्तम वाटला. आवडलेली कविता मी पुन्हा पुन्हा वाचतो त्यामुळे आता पुन्हा वाचण्यासारखं आणि शोधण्यासारखं काही राहिलेलं नाही, जे वाटलं ते लिहिलंच आहे तुम्हीही आणि मीही....! दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या कवितेवर इतका विचार आणि चर्चा झाली हे वाचून आनंद झाला आणि समाधान वाटलं. मुळात त्या कवितेचा अर्थ मी देखिल इतक्या विस्तृतपणे मांडू शकेन कां यावर मलाच शंकाच आहे. तुम्ही उभयतांनी केलेले रसग्रहण अगदी तंतोतत आहे असे जरी म्हणता येत नसलं तरी मला अभिप्रेत असलेला भावर्थ तुमच्या रसग्रहणाशी खुप जवळ जातो. मला शेवटच्या ओळी अश्या कां लिहावाश्या वाटल्या हे मलाही सांगता येणार नाही, पण ज्या मातीचा मी उल्लेख केलाय ती माती त्या घराला धरुन होती (पाऊस येऊन उंबरठा वाहून जाण्याआधी). त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे. असो, मला खरचं नाही सांगता येणार. तरीही तुम्ही माझी कविता इतक्या मनःपूर्वक वाचली आणि आपला विस्तृत अभिप्राय मांडण्याचे कष्ट घेतले यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

आणि, या खुलाशानं
त्या मातीची (आणि कदाचित घरातल्या कर्त्या पुरुषाची) व्दिधा मनःस्थिती मांडण्याचा तो एक प्रयत्न आहे
मी केलेल्या रसग्रहणाचं सार्थक झालं!

असंका गुरुवार, 06/26/2014 - 10:09
इतकं वेगळं काही बघितल्याच्या आनंदात असतानाच, एक जरा खटकलं- उंबरठा कालच वाहून गेलाय तर "आजकाल असं होतंय" याला काय संदर्भ? "आज असं होतंय" हे जास्त नैसर्गिक झाले असते ? तरीही इतकी सुंदर कल्पना ज्यांच्या डो़क्यातून निघाली त्यांच्यासमोर काय बोलायचे हो? अनेक धन्यवाद!

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:54
सुरेख रचना! प्रा.डो. बिरुटे सरांचं रसग्रहणही आवडलं.

एस गुरुवार, 06/26/2014 - 23:33
कविता पुनःपुन्हा वाचतोय. 'भय इथले...' डोक्यात वाजत राहतेय आणि आपली ही कविता जणू उर फुटूून धावत सुटलीय.

शुचि Sat, 06/28/2014 - 00:25
देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत
निव्वळ टचिंग!!!

वॉल्टर व्हाईट Sat, 06/28/2014 - 04:14
वाहुन गेलेला उंबरठा ह्या रुपकाने प्रत्येक वाचकाच्या मनात आपापले कल्पनाविश्व उभे राहिले नसल्यास नवलच. बहुदा अशी ताकतवान रुपकेच अश्या भावविभोर करणार्‍या कवितांना इतके परिणामकारक बनवत असावीत. कवितेतली जी इन्विजिबल प्रोटोगॉनिस्ट आहे तिची प्रत्येक वाचकाने आपापली तरल प्रतिमा बनवली असणार.. कुणी गेलेली आजी, कुणाची परगावी असलेली आई तर कुणाची लग्नघरी नांदणारी बहिण अन कुणाची लॉस्ट प्रेयसी. सगळ्यांच्या या प्रतिविश्वात प्रिय व्यक्तीच्या वियोगाचे दु:ख ही भावना मात्र सारखी, सगळ्या वाचकांची प्रतिविश्वं एका माळेत ओवणारी. ब्राव्हो !
लेखनविषय:
काव्यरस
काय झालं कुणास ठाऊक पण काल रात्री पावसात या घराचा उंबरठाच वाहून गेलाय तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू जणू स्वतंत्र झाल्या आहेत ---- बैठकीच्या खोलीत कोपर्‍यातल्या मेजावर एक फुलदाणी होती .. काल रात्रीपर्यंत होती सकाळी अंगणात सापडली पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं पदरात पडेल या आशेने अंगणात आली असावी बहुदा ---- देवघरासमोरील समईची मंद ज्योत आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी पोहचेनाशी झालीये त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या दिशेने झुकत राहते थरथरत ---- तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे उजाडल्यापासून बघतोय थडाथड दारं आपटतायत बहुदा तिची डायरीही असावी त्यात ---- काय झालं कुणास ठाऊक पण गेला एकदाचा रात्रभर बरसू

मॅनेजमेंटचा गोडाचा शिरा

वेल्लाभट ·

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:18
घरी बायकोला अन ऑफीसात साहेबाला, खूष ठेवणारा प्राणी अद्याप आम्हाला भेटलेला नाही.

शिद Tue, 06/24/2014 - 14:46
"थोडा अलग सोचो, थिंक आऊट ऑफ द बॉक्स" असं बोलून कैच्याकै आयडिया समोर मांडत असतो. आणि आपण काही आयडिया दिली कि लगेच "कस्टमर को ये पसंद नही आयेगा" असंं म्हणत तिच आयडिया स्वःताच्या नावावर खपवतो.

In reply to by शिद

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 15:19
म्हणुन आधी ती आयडिया मेल करायची.. तेही बॉस च्या बॉसला सीसी मध्ये ठेवुन.. वर चार ओळी बॉस कसं माझं प्रेरणास्थान आहे हे लिहायचं.. मग खाली "पण मला काय वाटतं... " असं म्हणुन मग आपली आयडिया सांगायची..

In reply to by धन्या

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:42
मलाही आत्तच कळालयं.. चांगलं किंवा वाईट असं असतं.. स्त्री - पुरुष असं काही नसतं.. सोप्पच झालं माझं आयुष्य!!

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 14:53
कितीहि तुपात घोळवुन, सजवुन दिला तरी "बॉस" नामक प्राण्याला तो पसंत पडणं म्हणजे कर्मकठिण!!! छानच जमलाय लेख. त्या बरोबर मुविं म्हणतायेत त्याला +१.

ह भ प Tue, 06/24/2014 - 18:31
असा एक लेख वाचला होता.. त्यात कंपनी एम्प्लोयॆला सायकल देते तिला केरॆअर नसत; स्टेंड नसता. तो विचारतो मला दोन्ही लावून दया.. कम्पनी केरॆअर लावून देते; स्टेंड नै देत .. तो परत म्हणतो स्टेंड लावून दया तर कम्पनी स्टेंड लावून देते अन कैरॆअर काढून घेते. तो म्हणतो असं का तर कम्पनी म्हणते दोन्ही एकदम मिळनार नै.. कैरीअर हवं असेल तर स्टेंड मिळ नार नै अन स्टेंड हवा असेल तर कैरीअर सोडावं लागेल..

एस Tue, 06/24/2014 - 18:37
लेख आवडला वेल्लाभट. करिअरमधील स्टँड आता सोप्पा होणार. नव्याने कळलं.

मित्रहो Wed, 06/25/2014 - 11:23
मस्त जमला शिरा, गोड नसला म्हणून काय झाले. शिराच्या उपमा झाला तरी तो शिराच असतो कारण बॉसने सांगितले म्हणून. आवडला. खूप आवडला. एक जुना विडीओ आठवला http://www.youtube.com/watch?v=AHSjpFUKQR4 असाच शिरो पकतो. मित्रहो www.mitraho.wordpress.com

कंजूस Wed, 06/25/2014 - 15:04
मला वाटलं मिपाकर आपापले किस्से सांगतील पण कसचे काय ?मी पयला आणि दुसराच्या पुढे जात नाही .प्रत्येक जण आपला शिरा जिलबी वेगळी पाडणार ?

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:18
घरी बायकोला अन ऑफीसात साहेबाला, खूष ठेवणारा प्राणी अद्याप आम्हाला भेटलेला नाही.

शिद Tue, 06/24/2014 - 14:46
"थोडा अलग सोचो, थिंक आऊट ऑफ द बॉक्स" असं बोलून कैच्याकै आयडिया समोर मांडत असतो. आणि आपण काही आयडिया दिली कि लगेच "कस्टमर को ये पसंद नही आयेगा" असंं म्हणत तिच आयडिया स्वःताच्या नावावर खपवतो.

In reply to by शिद

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 15:19
म्हणुन आधी ती आयडिया मेल करायची.. तेही बॉस च्या बॉसला सीसी मध्ये ठेवुन.. वर चार ओळी बॉस कसं माझं प्रेरणास्थान आहे हे लिहायचं.. मग खाली "पण मला काय वाटतं... " असं म्हणुन मग आपली आयडिया सांगायची..

In reply to by धन्या

पिलीयन रायडर Tue, 06/24/2014 - 17:42
मलाही आत्तच कळालयं.. चांगलं किंवा वाईट असं असतं.. स्त्री - पुरुष असं काही नसतं.. सोप्पच झालं माझं आयुष्य!!

दिपक.कुवेत Tue, 06/24/2014 - 14:53
कितीहि तुपात घोळवुन, सजवुन दिला तरी "बॉस" नामक प्राण्याला तो पसंत पडणं म्हणजे कर्मकठिण!!! छानच जमलाय लेख. त्या बरोबर मुविं म्हणतायेत त्याला +१.

ह भ प Tue, 06/24/2014 - 18:31
असा एक लेख वाचला होता.. त्यात कंपनी एम्प्लोयॆला सायकल देते तिला केरॆअर नसत; स्टेंड नसता. तो विचारतो मला दोन्ही लावून दया.. कम्पनी केरॆअर लावून देते; स्टेंड नै देत .. तो परत म्हणतो स्टेंड लावून दया तर कम्पनी स्टेंड लावून देते अन कैरॆअर काढून घेते. तो म्हणतो असं का तर कम्पनी म्हणते दोन्ही एकदम मिळनार नै.. कैरीअर हवं असेल तर स्टेंड मिळ नार नै अन स्टेंड हवा असेल तर कैरीअर सोडावं लागेल..

एस Tue, 06/24/2014 - 18:37
लेख आवडला वेल्लाभट. करिअरमधील स्टँड आता सोप्पा होणार. नव्याने कळलं.

मित्रहो Wed, 06/25/2014 - 11:23
मस्त जमला शिरा, गोड नसला म्हणून काय झाले. शिराच्या उपमा झाला तरी तो शिराच असतो कारण बॉसने सांगितले म्हणून. आवडला. खूप आवडला. एक जुना विडीओ आठवला http://www.youtube.com/watch?v=AHSjpFUKQR4 असाच शिरो पकतो. मित्रहो www.mitraho.wordpress.com

कंजूस Wed, 06/25/2014 - 15:04
मला वाटलं मिपाकर आपापले किस्से सांगतील पण कसचे काय ?मी पयला आणि दुसराच्या पुढे जात नाही .प्रत्येक जण आपला शिरा जिलबी वेगळी पाडणार ?
लेखनविषय:
आपल्यापैकी काहीजण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, तर काही जणांनी या पैकी एक केलेलं आहे. पैसे मिळवायला तुम्हाला ते करणं भाग असतं. आणि यात विशेषत: ज्यांनी नोकरी केलेली आहे, म्हणजे जे ऐलतीरावर राहिलेले आहेत त्यांना पैलतीरावरच्या माणसांचा नेहमीच (अपवाद असतीलच) त्रास झालेला आहे. सांगायचंच झालं तर ज्या प्राण्याला बॉस म्हणतात त्या प्राण्याचे लाड करण्यात, नखरे सहन करण्यात, एम्प्लॉयी किंवा कर्मचारी नामक व्यक्तीची काय तारांबळ होते, किती त्रास होतो, किती मनस्ताप होतो, राग येतो, हे ज्याचं त्याला ठाऊक आहे.

कैफ़ियत..

vaibhav deshmukh ·

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

vaibhav deshmukh Tue, 06/24/2014 - 14:06
एक मुक्त कविता.. जिच्यात मला शब्दापेक्षा अनुभव, व्याकरणापेक्षा आशय आणि भाषेपेक्षा भावना महत्वाच्या वाटतात. धन्यवाद सर!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

vaibhav deshmukh Tue, 06/24/2014 - 14:06
एक मुक्त कविता.. जिच्यात मला शब्दापेक्षा अनुभव, व्याकरणापेक्षा आशय आणि भाषेपेक्षा भावना महत्वाच्या वाटतात. धन्यवाद सर!
लेखनविषय:
कैफ़ियत.. प्रिये तु विचारतेस.. तु आज अस्वस्थ कसा? तुझ्य़ा चेहरय़ावरचा भाव अस्थिर कसा? भिजलेल्या ओल्या पापण्य़ा मुद्रेवर विखुरलेल्या रेषा काळाच्या चक्रात कैद नजर आणि मनस्तापाने सोडलेला प्रचंड तप्त सुस्कारा या तुझ्य़ा सार्;य़ा मलुल जिंदगीचा या उन्मादाचा हा अर्थ कसा? प्रिये.. मी मान्य करतो माझा अस्वस्थपणा आणि स्वीकारतोही तुझ्य़ा तगमगत्या मनाची चिंतातुरता तुला हवे आहे माझ्य़ा मुद्रेवरच्या भल्यामोठ्या प्रश्नचिन्हाचे एक वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण म्ह्णुनच; काहीश्य़ा हाताशतेने तुझ्य़ासमोर मांडतो त्या प्रश्नचिन्हाची एक वस्तुनिष्ठ कैफ़ियत... "तुलाही कबुल असेल या जिंदगिवरची माझी अपेक्षा या अपेक्षेच्या पुर्तीसाठी पाय

मनमोहक बाली : ०४ : किंतामणी आणि पुरा तिर्ता एंपुल

डॉ सुहास म्हात्रे ·

सही बाली दर्शन.

तुमचे नाव चतुर असायला हवे होते. तुम्ही भारताबाहेर फिरता कधी, भारतात येवुन कटट्याला हजेरी लावता कधी. सगळं लाजवाब आहे.

एस Tue, 06/24/2014 - 13:20
नेहमीप्रमाणेच. अजून काय लिहायचं आता हे कळत नाही. :-)

शिद Tue, 06/24/2014 - 14:14
मस्त मनमोहक फोटो. प्रश्नः बालीला कायम म्हणजे १२ महिने असा हिरवेगारपणा असतो का कि आपल्यासारखे फक्त पावसाळ्यात वैगरे?

In reply to by एस

सहमत ! ऑक्टोबर-एप्रिल पावसाळा आणि मे-सप्टेंबर उन्हाळा असला तरी पावसाच्या सरी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे सगळे बेट वर्षभर हिरवेगार असते.

आदिजोशी Tue, 06/24/2014 - 14:36
एक्का काकांमुळे कैक सहलींचे पुण्य पदरात पडले आहे. ईबुकं काढाच आता एकेकाची.

In reply to by चौकटराजा

ही व्दारे बालीची खासियत आहे. व्दारे कशी असावित, प्रत्येक प्रकारावर कोणती नक्षी असावी / असू नये आणि प्रत्येक प्रकार कोणत्या ठिकाणाचे प्रवेशव्दार असावे याचे एक शास्त्रच आहे तेथे !

माधुरी विनायक Wed, 06/25/2014 - 16:07
डोळे निवले... तृप्त झाले. देखणी शिल्पं, त्यांच्या वरताण निसर्ग, पुन्हा त्याहून कुशल कलाकुसर. काय बघु आणि काय नको, असं झालं. देखणी सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.

सही बाली दर्शन.

तुमचे नाव चतुर असायला हवे होते. तुम्ही भारताबाहेर फिरता कधी, भारतात येवुन कटट्याला हजेरी लावता कधी. सगळं लाजवाब आहे.

एस Tue, 06/24/2014 - 13:20
नेहमीप्रमाणेच. अजून काय लिहायचं आता हे कळत नाही. :-)

शिद Tue, 06/24/2014 - 14:14
मस्त मनमोहक फोटो. प्रश्नः बालीला कायम म्हणजे १२ महिने असा हिरवेगारपणा असतो का कि आपल्यासारखे फक्त पावसाळ्यात वैगरे?

In reply to by एस

सहमत ! ऑक्टोबर-एप्रिल पावसाळा आणि मे-सप्टेंबर उन्हाळा असला तरी पावसाच्या सरी केव्हाही येऊ शकतात. त्यामुळे सगळे बेट वर्षभर हिरवेगार असते.

आदिजोशी Tue, 06/24/2014 - 14:36
एक्का काकांमुळे कैक सहलींचे पुण्य पदरात पडले आहे. ईबुकं काढाच आता एकेकाची.

In reply to by चौकटराजा

ही व्दारे बालीची खासियत आहे. व्दारे कशी असावित, प्रत्येक प्रकारावर कोणती नक्षी असावी / असू नये आणि प्रत्येक प्रकार कोणत्या ठिकाणाचे प्रवेशव्दार असावे याचे एक शास्त्रच आहे तेथे !

माधुरी विनायक Wed, 06/25/2014 - 16:07
डोळे निवले... तृप्त झाले. देखणी शिल्पं, त्यांच्या वरताण निसर्ग, पुन्हा त्याहून कुशल कलाकुसर. काय बघु आणि काय नको, असं झालं. देखणी सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

धरतीवरील स्वर्ग (काश्मिर भाग - १) दल लेक

जागु ·

एस Tue, 06/24/2014 - 00:43
वा सुरेख! छायाचित्रे आणि वर्णन दोन्ही झकास आहेत!

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 02:40
१९८४च्या आठवणी चाळवल्या. काश्मिर म्हणजे खरोखरच नंदनवन आहे. दललेक, चार चिनार, चश्मेशाही वगैरे वगैरे मस्त स्थळं आहेत. लेकमधे मात्र कसलीशी पाण वनस्पती भरपूर प्रमाणात आहे. पॉवर बोटला, जी तुम्हाला मिनिटाच्या हिशोबात चालवायला देतात, ट्रकचे इंजिन बसविलेले होते. दर थोड्या थोड्या वेळाने बोटीच्या पंख्यात पाणवनस्पती गुंतायची की लगेच रिव्हर्स गिअर टाकून ती काढून टाकायची आणि पुढे जायचं. अशी एक सफर केली होती. >>>>दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. श्रीनगर विमानतळ ते दल लेक ७ किलोमिटर आहे. एव्हढा वेळ का लागावा? लेख आणि छायाचित्रं मस्तं आहेत फक्त कांही ठिकाणी ती जलखूण (वॉटर मार्क) फार बटबटीत आणि छायाचित्राच्या आस्वादात बाधक वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु Tue, 06/24/2014 - 11:58
प्रभाकर काका तुमच्या बर्‍याच पोस्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात. मोठ्या वॉटारमार्क वाले फोटो मोबाईलमधून टाकल्यामुळे निट सेटींग नाही जमलेय. खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय. पण आता पुर्ण काश्मिरच्या फोटोंना वॉटरमार्क देउन झालेयत त्यामुळे पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन. वॉटरमार्क दिलेले फोटोतील वॉटरमार्क काढता येतात ह्या बद्दल मी अज्ञानी होते. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूर्वी मी खुप लाईट वॉटरमार्क टाकायचे तेंव्हा ते तसेच फेसबूकवर चोरी झालेले माझ्या काही मैत्रीणींनी निदर्शनास आणून दिलेले म्हणून मी हल्ली जरा थोडे मोठे वॉटरमार्क टाकते. पण ह्यापुढे छोटे टाकण्याची काळजी नक्की घेईन. विमानतळ ते दल लेक चे अंतर मी अंदाजे टाकले आहे. कदाचीत माझी स्मरण शक्ती मला दगा देत असेल.

In reply to by जागु

सुहास.. Fri, 06/27/2014 - 11:59
फोटो छान आलेत ग !! हे वॉटर मार्कच ई, काही विषेष नाही ...बघणार्‍याच्या नजरेत असते ते !! जे बघायच ते बघायच सोडुन ईतर गोष्टीच जास्त बघत बसतात .... ( ही काही जनता गुरुवर्यांच्या/ सल्लागाराच्या भुमिकेतुन कधी बाहेर येणर कोणास ठावुक ! )

In reply to by सुहास..

प्रभाकर पेठकर Fri, 06/27/2014 - 14:25
जे बघायचं आहे, जे अतिसुंदर आहे त्याचा आस्वाद घेताना बटबटीत जलखूणेने (वॉटरमार्कने) बाधा येते आहे. हे धागाकर्तीनेही, 'खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय.' हया वाक्यात मान्य केले आहे. हे इतर गोष्टी पाहणे नसुन ज्या उद्देशाने (इतर सदस्यांच्या अस्वादासाठी) धागाकर्तीने ही छायाचित्रं धाग्यात गुंफली आहेत त्या उद्देशालाच धक्का लागतो आहे म्हणून ती एक सकारात्मक टिप्पणी आहे. तुम्हालाही ९०% प्रतिसाद न दिसता फक्त शेवटची ओळच दखलपात्र वाटली त्याला मी तरी काय करणार? चालायचंच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सखी Tue, 06/24/2014 - 17:43
+४ मस्त फोटो आणि वर्णन. तसेच खर्चाचा अंदाजपण देता येईल का? कोणत्या कंपनीबरोबर बुकिंग केले होते आणि त्यांचा अनुभव चांगला होता का?

अनिता ठाकूर Tue, 06/24/2014 - 17:52
सुंदर वर्णन व फोटो! मात्र, आमच्या शिकार्‍याच्या माणसाने माझ्या बहिणीच्या नवर्‍याचा ipod व तिने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी घेतलेला चीजचा मोठा बॉक्स पळवला होता. ही गोष्ट २०१० सालातली. आम्हाला तरी आमचा शिकारा सुरक्षित नाही वाटला.एकूणच शिकारा हे प्रकरण भारी नाही वाटलं.

चौकटराजा Wed, 06/25/2014 - 15:11
बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते. कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर . काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women ! गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली. पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा. काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.) लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले. दल लेकच्या काठाने जाणार्‍या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा. श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.

इशा१२३ Fri, 06/27/2014 - 13:54
सगळे फोटो सुरेख!माझ्याही काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.काश्मिर सारखे सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही.हाउसबोटीचा अनुभवही मस्तच!

एस Tue, 06/24/2014 - 00:43
वा सुरेख! छायाचित्रे आणि वर्णन दोन्ही झकास आहेत!

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 02:40
१९८४च्या आठवणी चाळवल्या. काश्मिर म्हणजे खरोखरच नंदनवन आहे. दललेक, चार चिनार, चश्मेशाही वगैरे वगैरे मस्त स्थळं आहेत. लेकमधे मात्र कसलीशी पाण वनस्पती भरपूर प्रमाणात आहे. पॉवर बोटला, जी तुम्हाला मिनिटाच्या हिशोबात चालवायला देतात, ट्रकचे इंजिन बसविलेले होते. दर थोड्या थोड्या वेळाने बोटीच्या पंख्यात पाणवनस्पती गुंतायची की लगेच रिव्हर्स गिअर टाकून ती काढून टाकायची आणि पुढे जायचं. अशी एक सफर केली होती. >>>>दिड ते दोन तासात आम्ही दल लेक ला पोहोचलो. श्रीनगर विमानतळ ते दल लेक ७ किलोमिटर आहे. एव्हढा वेळ का लागावा? लेख आणि छायाचित्रं मस्तं आहेत फक्त कांही ठिकाणी ती जलखूण (वॉटर मार्क) फार बटबटीत आणि छायाचित्राच्या आस्वादात बाधक वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

जागु Tue, 06/24/2014 - 11:58
प्रभाकर काका तुमच्या बर्‍याच पोस्टी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात. मोठ्या वॉटारमार्क वाले फोटो मोबाईलमधून टाकल्यामुळे निट सेटींग नाही जमलेय. खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय. पण आता पुर्ण काश्मिरच्या फोटोंना वॉटरमार्क देउन झालेयत त्यामुळे पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन. वॉटरमार्क दिलेले फोटोतील वॉटरमार्क काढता येतात ह्या बद्दल मी अज्ञानी होते. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पूर्वी मी खुप लाईट वॉटरमार्क टाकायचे तेंव्हा ते तसेच फेसबूकवर चोरी झालेले माझ्या काही मैत्रीणींनी निदर्शनास आणून दिलेले म्हणून मी हल्ली जरा थोडे मोठे वॉटरमार्क टाकते. पण ह्यापुढे छोटे टाकण्याची काळजी नक्की घेईन. विमानतळ ते दल लेक चे अंतर मी अंदाजे टाकले आहे. कदाचीत माझी स्मरण शक्ती मला दगा देत असेल.

In reply to by जागु

सुहास.. Fri, 06/27/2014 - 11:59
फोटो छान आलेत ग !! हे वॉटर मार्कच ई, काही विषेष नाही ...बघणार्‍याच्या नजरेत असते ते !! जे बघायच ते बघायच सोडुन ईतर गोष्टीच जास्त बघत बसतात .... ( ही काही जनता गुरुवर्यांच्या/ सल्लागाराच्या भुमिकेतुन कधी बाहेर येणर कोणास ठावुक ! )

In reply to by सुहास..

प्रभाकर पेठकर Fri, 06/27/2014 - 14:25
जे बघायचं आहे, जे अतिसुंदर आहे त्याचा आस्वाद घेताना बटबटीत जलखूणेने (वॉटरमार्कने) बाधा येते आहे. हे धागाकर्तीनेही, 'खरच त्यामुळे जरा आस्वादात बाधा येतेय.' हया वाक्यात मान्य केले आहे. हे इतर गोष्टी पाहणे नसुन ज्या उद्देशाने (इतर सदस्यांच्या अस्वादासाठी) धागाकर्तीने ही छायाचित्रं धाग्यात गुंफली आहेत त्या उद्देशालाच धक्का लागतो आहे म्हणून ती एक सकारात्मक टिप्पणी आहे. तुम्हालाही ९०% प्रतिसाद न दिसता फक्त शेवटची ओळच दखलपात्र वाटली त्याला मी तरी काय करणार? चालायचंच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सखी Tue, 06/24/2014 - 17:43
+४ मस्त फोटो आणि वर्णन. तसेच खर्चाचा अंदाजपण देता येईल का? कोणत्या कंपनीबरोबर बुकिंग केले होते आणि त्यांचा अनुभव चांगला होता का?

अनिता ठाकूर Tue, 06/24/2014 - 17:52
सुंदर वर्णन व फोटो! मात्र, आमच्या शिकार्‍याच्या माणसाने माझ्या बहिणीच्या नवर्‍याचा ipod व तिने तिच्या ६ वर्षांच्या मुलीसाठी घेतलेला चीजचा मोठा बॉक्स पळवला होता. ही गोष्ट २०१० सालातली. आम्हाला तरी आमचा शिकारा सुरक्षित नाही वाटला.एकूणच शिकारा हे प्रकरण भारी नाही वाटलं.

चौकटराजा Wed, 06/25/2014 - 15:11
बरेचसे लोक हल्ली विमानाने जातात .पण जम्मु- उधमपूर पटनीटॉप बागलिहार- बनिहाल,मुंडा,अनंतनाग संगम मार्गे श्रीनगरला जाणे ही एक काहीसा घाबवणारा पण मस्त अनुभव आहे. काही ठिकाणी मोटरचे चाक व रस्त्याची कड यात एखाद्या फुटाचेच अंतर असते. कास्मीरी लोक आस्थेवाईक असतात. मला पुण्यात नातेवाईक असलेली एक काश्मीरी बाई श्रीनगरच्या एक गल्लीत भेटली होती. तिच्या मते लोणावळा खंडाळा हे काश्मीर सारखेच सुंदर . काश्मीर हे पाच W साठी प्रसिद्ध म्हणावे लागेल. willow, weather,water, wool and women ! गुलमर्ग ची गंडोला राईड एक खास अनुभव असला तरी ज्यांच्याकडे वेळ आहे अशी माणसे पायी मधल्या टप्प्यापर्यंत जाताना दिसली. पहलगाम फारच सुंदर. लिडर नदीच्या काठी पाण्यात उभे रहाण्यात मजा . हिरवळीवर लोळण्यातही मजा. काश्मीरची घरे लाकडाने सुशोभित . फार सूंदर दिसतात. बरीचशी रिकामी आहेत. ( काश्मीरी पंडितांचा आहेत असे कळले.) लाल चौक ठिकाण मस्त आहे पण तेथे फार रक्तपात झाला आहे. हे एका हॉटेलवाल्याने सांगितले. दल लेकच्या काठाने जाणार्‍या रस्त्याने रात्री पायी फिरत दिव्यानी फुललेले दल लेक पहाणे हा अनुभव जरूर घ्यावा. श्रीनगर मधील संग्रहालय, रेश्मी कापडाचे कारखाने, गालीचे तयार करण्याचा वर्कशॉप हा ही एक कार्यक्रम आखता येतो.

इशा१२३ Fri, 06/27/2014 - 13:54
सगळे फोटो सुरेख!माझ्याही काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या.काश्मिर सारखे सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही.हाउसबोटीचा अनुभवही मस्तच!
ह्या सुट्टीत नेपाळ किंवा कुलू मनाली किंवा काश्मिर ह्या पैकी कुठे जायचे असे ठरता ठरता शेवटी काश्मिरवर शिक्कामोर्तब झाला. आम्ही तिन जोडपी आणि पिल्लावळ असे आम्ही नेहमीच जातो. माझी मुलगी पावणे दोन वर्षाची असल्याने तसेच इतरांनाही जास्त दगदग नको होती म्हणून सगळ्यांनीच वैष्णौदेवी-कतरा गाळण्याचे ठरवून त्या प्रमाणे आमचे पॅकेज इझी गो मध्ये बुक केले. ११ मे ते १७ मे असा हा सगलीचा कालावधी ठरवला गेला. इथला मे-जून चा कडक उन्हाळा नकोसा होऊन काश्मिर सहलीची स्वप्ने मनाला शितलता देत होती.

भूक

निशदे ·

In reply to by निशदे

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 14:56
आमदाराच्या मुखातून सरकारने पिडित शेतकर्‍यांना आशेचा किरण दाखविला. पण प्रत्यक्षात धर्माला सगळीकडे वाटाण्याच्या अक्षताच नशिबी आल्या. एव्हढ्या एका वाक्यात धर्माच्या दु:खाचा, समस्यांचा, आशा-आकांक्षांचा झालेला चुराडा आणि पुढच्या पावसापर्यंत स्वतः जिवंत राहून बायको-मुलांना जिवंत ठेवण्यासाठीचा घनघोर संघर्ष डोळ्यासमोर उभा राहात नाही. ही शतशब्द कथा नसल्याने धर्मावर गुदरलेला प्रातिनिधिक प्रसंग आणि त्याचे अमांगल्य अजून जास्त शब्दात विशद करावयास पाहिजे होते, जेणे करून कथेतील परमोच्च बिंदूचे प्रभावीकरण झाले असते असे मला वाटते. >>>>धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे. दोन व्यक्तिमत्त्वातील फरक, 'धर्माकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून एखाद्या उन्मत्त हुकुमशहा सारखी दमदार पावले टाकत खैरनार अंधारात नाहिसा झाला.' अशी वाक्यरचना धर्माची आर्थिक असहाय्यता आणि मानसिक दुर्बलता अधोरेखित होऊन, 'बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर, ओलावल्या डोळ्यांनी, त्याने तो पुडा उचलला.................' ह्या कथेतील परमोच्चबिंदूने वाचकाच्या मनात एक आवश्यक ती अस्वस्थता निर्माण झाली असती. असो. प्रत्येक लेखकाचे लेखनस्वातंत्र्य असतेच तसे तुम्हासही आहे. पण, तुम्ही अधिक विस्ताराची विचारणा केलीत म्हणून थोडे धाडस केले आहे. राग नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

निशदे Tue, 06/24/2014 - 21:32
राग मुळीच नाही. उलट प्रतिक्रियांमधून अनेकदा त्याच कथावस्तूकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. सदर कथा १० मिनिट नॅरेशनमध्ये बसवायची असल्याने तो भाग अधिक खोलात जाऊन लिहिता आला नाही. मात्र यापुढे मी अशा नॅरेशनच्या कथा जास्त उत्तम मांडणी करून लिहायचा नक्की प्रयत्न करेन. "इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे" > खैरनार हा केवळ सावकाराचा एक दलाल आहे. यांचा मूळ उद्देशच सावकाराला नवनवीन सावज आणून देणे असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात ही माणसे दुष्ट असतात असेही नाही (वैयक्तिक अनुभव). त्यामुळे मला इथे याहून अधिक dramatization करण्याची गरज वाटली नाही.

एस Tue, 06/24/2014 - 13:18
छान लिहिलंय. अजून परिणामकारकपणे लिहिता आली असती असे वाटले. पण कथा 'पोचली'. '७२ मैल...' च्या शेवटाची आठवण आली. भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो.

In reply to by एस

पियू परी Wed, 06/25/2014 - 21:56
भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो. >> सोला आने सच !!! आणि हे समजण्यासाठी गरीबीचीच गरज आहे असे नाही. भुकेले असतांना आपण आसपासच्या (विशेषतः हक्काच्या) लोकांशी कसे बोलतो आणि पोट भरल्यावर/ भरलेले असल्यावर कसे बोलतो एवढे निरिक्षण पुरेसे आहे.

आयुर्हित Tue, 06/24/2014 - 14:14
खुप छान व डोळ्यांत अंजन घालणारा लेख. एक अगदि महत्त्वाचा मुद्दा समोर आणल्याबद्दल धन्यवाद. या प्रश्नाचे काही अंशी उत्तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना १९९९ (SGSY) येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:26
सरकार कर्ज देत नाही अन सावकार कर्जाच्या नावाखाली शेत हडपायचे सोडत नाही...

निशदे Tue, 06/24/2014 - 21:33
सर्वांना मनापासून धन्यवाद. अशा घटना घडताना पाहिलेल्या असल्याने परिणामकारकता साधता आली.

In reply to by निशदे

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 14:56
आमदाराच्या मुखातून सरकारने पिडित शेतकर्‍यांना आशेचा किरण दाखविला. पण प्रत्यक्षात धर्माला सगळीकडे वाटाण्याच्या अक्षताच नशिबी आल्या. एव्हढ्या एका वाक्यात धर्माच्या दु:खाचा, समस्यांचा, आशा-आकांक्षांचा झालेला चुराडा आणि पुढच्या पावसापर्यंत स्वतः जिवंत राहून बायको-मुलांना जिवंत ठेवण्यासाठीचा घनघोर संघर्ष डोळ्यासमोर उभा राहात नाही. ही शतशब्द कथा नसल्याने धर्मावर गुदरलेला प्रातिनिधिक प्रसंग आणि त्याचे अमांगल्य अजून जास्त शब्दात विशद करावयास पाहिजे होते, जेणे करून कथेतील परमोच्च बिंदूचे प्रभावीकरण झाले असते असे मला वाटते. >>>>धीमी धीमी पावले टाकत खैरनार अंधारात नाहीसा झाला. इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे. दोन व्यक्तिमत्त्वातील फरक, 'धर्माकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून एखाद्या उन्मत्त हुकुमशहा सारखी दमदार पावले टाकत खैरनार अंधारात नाहिसा झाला.' अशी वाक्यरचना धर्माची आर्थिक असहाय्यता आणि मानसिक दुर्बलता अधोरेखित होऊन, 'बाकड्यावरच्या भेळेच्या पुड्याकडे धर्मा विषण्ण्पणे बघत राहिला आणि अखेर, ओलावल्या डोळ्यांनी, त्याने तो पुडा उचलला.................' ह्या कथेतील परमोच्चबिंदूने वाचकाच्या मनात एक आवश्यक ती अस्वस्थता निर्माण झाली असती. असो. प्रत्येक लेखकाचे लेखनस्वातंत्र्य असतेच तसे तुम्हासही आहे. पण, तुम्ही अधिक विस्ताराची विचारणा केलीत म्हणून थोडे धाडस केले आहे. राग नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

निशदे Tue, 06/24/2014 - 21:32
राग मुळीच नाही. उलट प्रतिक्रियांमधून अनेकदा त्याच कथावस्तूकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. सदर कथा १० मिनिट नॅरेशनमध्ये बसवायची असल्याने तो भाग अधिक खोलात जाऊन लिहिता आला नाही. मात्र यापुढे मी अशा नॅरेशनच्या कथा जास्त उत्तम मांडणी करून लिहायचा नक्की प्रयत्न करेन. "इथे धर्मा हा अत्यंत असहाय्य आणि खैरनार हा एखाद्या हुकुमशहासारखा आहे" > खैरनार हा केवळ सावकाराचा एक दलाल आहे. यांचा मूळ उद्देशच सावकाराला नवनवीन सावज आणून देणे असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात ही माणसे दुष्ट असतात असेही नाही (वैयक्तिक अनुभव). त्यामुळे मला इथे याहून अधिक dramatization करण्याची गरज वाटली नाही.

एस Tue, 06/24/2014 - 13:18
छान लिहिलंय. अजून परिणामकारकपणे लिहिता आली असती असे वाटले. पण कथा 'पोचली'. '७२ मैल...' च्या शेवटाची आठवण आली. भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो.

In reply to by एस

पियू परी Wed, 06/25/2014 - 21:56
भुकेचा आगडोंब जगातल्या कुठल्याही ज्वालामुखीपेक्षा जास्त जळजळीत असतो. >> सोला आने सच !!! आणि हे समजण्यासाठी गरीबीचीच गरज आहे असे नाही. भुकेले असतांना आपण आसपासच्या (विशेषतः हक्काच्या) लोकांशी कसे बोलतो आणि पोट भरल्यावर/ भरलेले असल्यावर कसे बोलतो एवढे निरिक्षण पुरेसे आहे.

आयुर्हित Tue, 06/24/2014 - 14:14
खुप छान व डोळ्यांत अंजन घालणारा लेख. एक अगदि महत्त्वाचा मुद्दा समोर आणल्याबद्दल धन्यवाद. या प्रश्नाचे काही अंशी उत्तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना १९९९ (SGSY) येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुक्त विहारि Tue, 06/24/2014 - 14:26
सरकार कर्ज देत नाही अन सावकार कर्जाच्या नावाखाली शेत हडपायचे सोडत नाही...

निशदे Tue, 06/24/2014 - 21:33
सर्वांना मनापासून धन्यवाद. अशा घटना घडताना पाहिलेल्या असल्याने परिणामकारकता साधता आली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती. गारपीटग्रस्तांना मदत घोषित झाल्यावर धर्माला आशेचा किरण दिसला. आमदारसाहेबांनी स्वतः गावात येऊन २ शेतकर्‍यांना मदतीचे चेक स्वहस्ते दिले. मामलेदार कचेरीत जाऊन आता फक्त चेक घेऊन आले की आपल्याला कसलीच काळजी राहणार नाही अशी त्याची खात्रीच पटली. पहिल्या खेपेला बँकेने दादच लागू दिली नाही.

पुणे कट्टा वृतांत्त

देशपांडे विनायक ·

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 06/23/2014 - 19:31
लेखनविषयही छायाचित्रण आहे.

दिपक.कुवेत Mon, 06/23/2014 - 18:27
तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

:) इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;) देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

धन्या Mon, 06/23/2014 - 18:47
देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
अगदी अगदी. बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भाते Mon, 06/23/2014 - 19:46
भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत. खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 14:49
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

In reply to by बॅटमॅन

धन्या Tue, 06/24/2014 - 15:01
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे. त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 06/23/2014 - 19:31
लेखनविषयही छायाचित्रण आहे.

दिपक.कुवेत Mon, 06/23/2014 - 18:27
तु लोकांना "सरळ" करण्याचं जे उदात्त कार्य हाती घेतलं आहेस त्यात परमेश्वर तुला संपुर्ण सहकार्य देवो. मज पामराचा काहि "हातभार" लागल्यास अवश्य सांग.

:) इतका "सरळ" मिपा वृत्तांत अगोदर वाचला नव्हता ;) देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!

धन्या Mon, 06/23/2014 - 18:47
देशपांडे साहेब, तुमचे पानशेत धरणफुटीचे खुद्द ओरिजिनल जागेवरून केलेले चाक्षुर्व्येसत्यम् वर्णन मात्र बिनतोड होते ! त्याबद्दल खास धन्यवाद !!
अगदी अगदी. बाकी मी खुप पूर्वी संदर्भ दिलेल्या "मनाचे व्यवस्थापन" या सुंदर पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. :)

भाते Mon, 06/23/2014 - 19:46
भटकंती, पाककृती आणि कट्टा वृत्तांत फोटोशिवाय अपुर्ण आहेत. खादाडीचे नको पण किमान मिपाकरांचे तरी फोटो पाहिजेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन Tue, 06/24/2014 - 14:49
वल्लीदा यांना "सातवाहन कालीन हल्क" नामक पदवी अगोदरपासूनच दिल्या गेलेली आहे याची क्रुप्या करूण नोंद घेने.

In reply to by बॅटमॅन

धन्या Tue, 06/24/2014 - 15:01
नुकतेच त्यांचे "रिनोव्हेशन" झाले आहे. त्यांनी आपला सातवाहनकालिन काळा टी शर्ट कुणा अज्ञात पुराणवस्तू संग्रहालयास जतन करण्यास दिला असून हल्ली ते बिन बाह्यांचा शर्ट घालतात असे आमच्या सुत्रांनी कळवले आहे.

ते सिस्कोचा टी शर्ट घातलेले कोण आहेत बुवा? आपणसुद्धा हार्ड्कोअर सिस्को वालेच्...आता जरा चेकपॉईंट मध्ये घुसलोय म्हणा
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुणे कट्टा वृतांत्त माझा पहिला कट्टा पुण्यातला मिसळपाव वाल्यांनी बोलावलेला तेंव्हा काहीतरी घडणार याची खात्री होती आणि ते घडलेच मला सरळ केले गेले असा होतो ---- देशपाडॅ विनायक असे केले ----- देशपांडे विनायक धन्यवाद प्रशांत