मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुटुंबसंस्थेचे चालन

arunjoshi123 ·

पिलीयन रायडर Fri, 06/27/2014 - 17:33
मी खुप मन लावुन लेख वाचला.. काही ठिकाणी भाषा अगदी जटील आहे.. थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत असतं तर बरं झालं असतं.. पण एकंदरीत चर्चा प्रस्ताव चांगला आहे.. तुम्हाला असं म्हणायचय का की पुरुषप्रधान सिस्टीममध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) त्याच्या तुलनेत समताप्रधान कुटुंबामध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) ह्याची तुलना व्हावी, कारण वरकरणी वाटलं तरी समताप्रधान कुटुंब अन्यायमुक्त (किंवा तुलनेनी कमी अन्याय होत असणारं) असेलच असं नाही (कारण तुम्ही वानगी दाखल दिलेले ११ प्रश्न..) मुळात कोणतीही सिस्टीम फ्लॉलेस नसतेच. त्यामुळे कोणत्याही सिस्टिम मध्ये कुणा न कुणावर अन्याय होत रहाणार हे नक्की. त्यात सुद्धा अन्याय हा कोणत्या एका पक्क्या सुत्राने मोजता येत नाही. स्थल-काल-लिंग सापेक्षता वगैरे मुद्दे तिथे असतात. (केवळ काय मोजतोय ह्याबद्दल नाही तर "कोण" मोजतोय ह्याबद्दल् सुद्धा). त्यामुळे अशी दोन सिस्टीम मधल्या अन्यायाची काटेकोर तुलना करता येईल का हा मुळात मला पडलेला प्रश्न आहे.. पुरुषप्रधान सिस्टिमला जो स्त्रियांकडुन विरोध होतो त्यावर मी एक स्त्री म्हणुन भाष्य करु शकते. (आणि ती सर्वस्वी माझी मते आहेत.. कुणाला दिलेले सल्ले अथवा आरोप नाहीत.. त्यामुळे माझी विधाने केवळ माझे अनुभव असल्याने त्यांना सिद्ध करुन दाखवायची माझी जवाबदारी नाही कारण ती मान्य कराच असा माझा आग्रह नाही) स्त्री म्हणुन पुरुषप्रधान सिस्टीमला जो विरोध असतो तो केवळ "लिंग" ह्या एका मुद्द्यावर नसावा. इथे मुळात एखाद्याचे जगण्याचे, विचारांचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसणे हा एक मोठा मुद्दा आहे. "केवळ पुरुष आहे" ह्या एका गोष्टीसाठी अनेक अधिकार पुरुषाकडे असतात. कुटुंब व्यवस्था सोयिस्कर असावी म्हणुन निवडालेला तो एक पर्याय जरी मानला तरी त्यात केवळ गोंधळ नको म्हणुन एकहाती कारभार सोपोवणे हा एकच उद्देश नाही (किंवा उद्देश काहीही असला तरी त्याचा केवळ तोच एक परिणाम नाही). ह्या मध्ये सत्ता हाती यावी म्हणुन "पुरुष ह्या लिंगाला प्राधान्य देणे" ही समस्या निर्माण होते आणि त्यामुळे स्त्री भ्रुण हत्या वगैरे प्रश्नांची मालिका सुरु होते (इथे स्त्रियांना जे काही मुलभुत प्रश्न आहेत.. गर्भात हत्या, आवश्यक शिक्षण न मिळणे. कुपोषण, स्वामित्वाच्या भावनेतुन आणि स्त्रीला भोगवस्तु म्हणुन पाहण्याच्या वृत्तीमुळे झालेले बलात्कार, हुंडाबळी, पळवुन नेऊन विकणे इ समस्या मला अपेक्षित आहेत..). बर एकाधिकार दिले म्हणुन कारभार सुरळित चालु आहे असे तरी आहे का? तर निश्चित नाही.. ह्या व्यतिरिक्त अजुन एक मुद्दा जो मला अत्यंत मह्त्वाचा वाटतो तो असा, की कुटूंबव्यवस्था, समाज सुरळित चालु रहाणं हे महत्वाचं आहे, त्यासाठी व्यक्तिला अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण एखादया व्यक्तिच्या आयुष्यात नक्की कुठवर आपण ह्या व्यवस्थांचा हस्तक्षेप चालवुन घेऊ शकतो? म्हणजे माणुस म्हणुन आवडीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर आवळले जाणार असेल तर ती सिस्टीम एक फेल्युअर नाही का? तुम्ही म्हणता की हॉस्टेलची पाटी वाचल्या प्रमाणे एका कुटुंबातली नावे नकोत.. पण Does it really matter? असलीच चोघांची नावं अत्यंत वेगवेगळी तरी त्याचा नक्की किती फरक पडतो? केवळ सोय म्हणुन, किंवा वाचायला बरं (रिदमिक विथ ऑदर मेम्बर्स) वाटतं म्हणुन एखाद्याचं नाव बदलुन टाकणे योग्य ठरते का? तुम्ही मुळचे कुठले ह्या प्रशाचे उत्तर ८-१० पिढ्यानंतर पण देता आले पाहिजे म्हणुन हा खटाटोप करायचा? आणि मग त्या उत्तरासाठी "स्त्री ने लग्न झाले की माहेर विसरून सासरच आपले घर मानावे आणि स्वतःला त्या वंशात विरघळवुन टाकावे" अशा मानसिकतेचा उदय होतो. पण मुळात "तुम्ही मुळचे कुठले" हा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे का की ज्या साठी त्या घरात येणारी प्रत्य्के स्त्री गरजे पलीकडे बदलुन जाते? तुम्ही सिस्टीम कोणतीही निवडा, पण त्यात व्यक्तिस्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर (आणि गरजेपेक्षा जास्त) धोक्यात येणार असेल तर ती माझ्या दृष्टिने फेल्युअर आहे. बाकी तुम्ही जे ११ प्रश्न दिले आहेत, त्यांची सर्व घरांमध्ये एकच एक उत्तरं मिळणं हे अशक्यच आहे.. तशी न मिळणं ह्यालाच आयुष्य म्हणतात ना...

In reply to by पिलीयन रायडर

arunjoshi123 Fri, 06/27/2014 - 17:51
आपल्याला पूर्ण आशय पोचला त्याचा आनंद आहे. आपली जवळजवळ सारी वाक्यं पटणेबल आहेत. एखाद्या विचाराबद्दल अजून काही सुचलं तर अवश्य लिहिन.

In reply to by मराठी कथालेखक

हाडक्या Wed, 07/02/2014 - 19:27
त्यांच्या अभिव्यक्तीचा तो आविष्कार आहे.. तुम्ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंन्त्र्याचा आदर करणार की तुमची 'दाताला खडा' लागल्यासारखी सेन्सॉरशीप लादत बसणार ? ;)

आतिवास Fri, 06/27/2014 - 18:09
'लिंग' (सेक्स - स्त्री आहे की पुरुष) आणि 'लिंगभाव' (हिंदी भाषेत त्याला 'सामाजिक लिंग' असे म्हटले जाते) या दोन वेगळ्या संज्ञा आहेत - त्यांचा संबंध आहे पण त्या वेगळ्या आहेत. सामान्यतः लिंगभावाबद्दल चर्चा होत असते. 'लिंगभाव' म्हणजे थोडक्यात सांगायचे तर: व्यक्तीचे लिंग केंद्रस्थान घेते आणि तिच्या/त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात (मोठ्याने बोलू नये, रडू नये इत्यादी) ; कामाची विभागणी होते (स्वयंपाक, नारळ फोडणे इत्यादी) ; विविध साधनं कोणाला प्राधान्याने मिळणार (शिक्षण इत्यादी) हे ठरते, साधनांवर मालकी कोणाची हे ठरते (शेती, घर), निर्णय कोणी घ्यायचे हे ठरते... इत्यादी. 'लिंग' बदलत नाही, ते बदलावे अशी अपेक्षाही नाही; 'लिंगभाव' व्यवहार बदलतो - तो सगळीकडे सारखा असत नाही. पुरुषप्रधान रचनेत एका विशिष्ट प्रकारची लिंगभाव व्यवस्था आहे - असमानता आहे, ती बदलण्याचा प्रयत्न करताना स्त्रीच्या लिंगाधारित गरजा (बाळंतपण, राजकीय सहभागाची संधी इत्यादी) लक्षात घेणे म्हणजे 'भेदभाव' नाही. (तुम्ही हे म्हटले नाही इथे, पण जाताजाता लिहिले.) पुरुषप्रधान समाजरचनेचे समर्थक फक्त पुरुष असतात असे नाही, स्त्रियाही असतात; लिंगभाव धारणा बदलायला हव्यात असे फक्त स्त्रियांना वाटत नाही, अनेक पुरुषांना वाटते. सर्व स्त्रिया स्त्रियांबाबत संवेदनशील असतील असे नाही, सर्व पुरुष स्त्रियांच्या प्रती असंवेदनशील असतील असे नाही. संवेदनशीलता, परस्पर आदर नसतो तेव्हा अकराच काय अकरा हजार प्रश्न निर्माण होतात... संवेदनशीलता आणि परस्पर आदर असेल तरीही प्रश्न निर्माण होतातच पण त्यातून मार्ग काढला जातो. स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!!

रेवती Fri, 06/27/2014 - 19:49
स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!! भयानक सहमत. माझ्याच निर्णयामुळे आलेली अडचण कशी निस्तरावी या विचार अनेक वर्षे करत होते. परवा सकाळी झोपेतून उठल्यावर त्याचे पर्फेक्ट असे नाही पण चांगले असे उत्तर मिळाले होते. ते श्रेय मात्र माझे नाही. आपण अनेक पुस्तके, लेख, चांगले विचार, मुलाखती ऐकत, वाचत असतो. काही गोष्ती डोक्यात बसतात ते नेहमीच आपल्याला कळत नाही. पण त्या सगळ्यातून आपण (मेंदू)प्रश्नाचे उत्तर शोधत राहतो, नकळतपणे आणि असे एखादे दिवशी ते समोर येते, जेंव्हा ते एक्सपेक्टेड नसते. परवाचा सगळा दिवस मनातल्या मनात आश्चर्य करणे, मनाशी हसणे यात घालवला (म्हणजे बाकीही कामे केली हां). ;) कोंडीबद्दलही नाही लिहित.

साती Fri, 06/27/2014 - 20:58
मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय? मूळात समताप्रधान अशी समाजव्यवस्था अजूनतरी भारतात निर्माण झाली नाही. जिथे समताप्रधान व्यवस्था असल्याचे भासते ती 'कमी पुरूषप्रधान' व्यवस्था असते. जर समताप्रधान व्यवस्था झाली तर तिचा पायाच इतका सामंजस्याचा असेल की असे प्रश्नं निर्माणच होणार नाहीत. (हे मी बहुसंख्यांकांच्या बाबतीत लिहित्येय, ईशान्येकडील राज्यात अजूनही काही ठिकाणी स्त्रीप्रधान व्यवस्था आहे आणि तिथली समताप्रधान व्यवस्था ही कमी स्त्रीप्रधान असेल याची जाणीव आहे) तसे तर हॉस्टेलला रहणारे रूममेट मित्रं मैत्रिणीसुद्धा एकमेकांबरोबर थोडे काँप्रमाईज आणि थोडे मॅनिप्युलेट करून रहातो. इथे तर अख्ख्या जीवनाचा आणि संसाराचा प्रश्नं आहे. त्यामुळे कुठल्याही सहजीवनात येऊ शकतील असे इश्यूज इथेही येणारच. ते सोडवायचे कसे हा मुख्य मुद्दा आहे. बरं हे सोडवतानासुद्धा पारंपारिक वर्चस्ववाल्या गटाने 'मी खरंतर पडतं घ्यायला नको/घेतलं नसतं पण समानतेपायी घेतोय' असा मोठेपणा घेतला जाण्याची किंवा दुसर्या बाजूने दिली जाण्याची शक्यता जास्तं असते. 'माझे मिस्टर सकाळी भाजी चिरून देतात' हे कौतुकाने संगितलं तर पुप्र मानणारी स्त्री. 'मी बायकोला अगदी भाजीही चिरून देतो' असे म्हणणारा पुप्रवाला पुरूष. खर्या समानतावाल्याना यात काही विशेष सांगण्यासारखे आहे असेही वाटणार नाही. मग तू घरी किती पैसे दिलेस का दिलेस इ. विचार फक्तं एक व्यवहाराचा भाग म्हणून होतील त्याला रुसवेफुगवे मानापमान याचं ड्रेसिंग लागणार नाही. त्यामुळे खरी समताप्रधान व्यवस्था जेव्हा येईल तेव्हा त्यात पुरूष व स्त्री यांपैकी कुठल्याही व्यवस्थेत येणारी घुसमट अज्जिबात येणार नाही.

कवितानागेश Sat, 06/28/2014 - 17:18
मला काही किचकट चर्चा जमत नाही, पण एक गोष्ट नक्की लक्षात येतेय, कुटुंबसंस्था ही लहान मुलांच्या सुरक्षित वाढीसाठी आणि म्हातार्‍या माणसांच्या आधारासाठी आणि काही प्रमाणात 'हक्काच्या' सोबतीसाठी निर्माण झालेली/ केली गेलेली आहे. या अश्या कुटुंबाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना मात्र मूळात या कशाची तत्क्षणी गरजच नसते. ते केवळ स्वतःच्या सोयीचा/ मनाचा विचार करुन मुक्त राहू शकत असतात. पण त्यांनी त्यांच्या भूतकाळात या संस्थेचा फायदा घेतलेला असतो, आणि भविष्यकाळातही मिळणार असतो. अशा वेळेस समाज बांधून रहाणं, सुरक्षितता आणि त्यायोगे होउ शकणारी प्रगती यादेखिल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याकडे दुर्लक्ष होताना दिसते... ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा व्यक्तींनी जर का जे काही आहे ते 'आपलं' आहे आणि 'आपल्यासाठी' आहे, असा विचार केला तर फारसे प्रश्न पडत नाहीत. जर का ' हे 'मला' किती फायदेशीर होईल?' असा विचार केला तर रस्सीखेच जास्त जोरात सुरु होईल... आणि ती कायम सुरु रहाणार! कारण 'मी' विरुद्ध 'आपण' हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी समोर येतोच. त्याचे उत्तर कालपरत्वे आणि व्यक्तीपरत्वे बदलतं.. अमुक एक मान्य करणं योग्य आणि अमुक एक कृती करणं अयोग्य असं आपल्याला खरोखरच कधी ठरवता येइल का, हे माहित नाही.

पैसा Sat, 06/28/2014 - 20:34
जिवंत माणसांचा प्रश्न येतो तिथे २+२=४ असं उत्तर नेहमीच मिळत नाही. कधी उत्तर १ असेल तर कधी ६. प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा. पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही. गावातल्या अशिक्षित स्त्रिया अख्खं कुटुंब चालवत असतात हे अनेकदा पाहिले आहे. सुशिक्षित उच्च वर्गीय कुटुंबातही समानता असमानता दोन्ही प्रकार असतात. हा प्रत्येकाच्या जडणघडणीचा, विचारांचा भाग आहे. इतर बहुतेक गोष्टी स्त्री -पुरुष कोणीही करू शकत असले तरी मुलाला प्रत्यक्ष जन्म देणे आणि काही वर्षेपर्यंत त्याचे संगोपन करणे हे स्त्रीलाच करावं लागतं. त्यासाठी तडजोडी तिलाच कराव्या लागतात. (मुलांना योग्य प्रकारे वाढवण्यासाठी कोणा पुरुषाने करियर सोडलेली फार उदाहरणे आजूबाजूला दिसत नाहीत.) इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल यात फार फरक असतो. ते जर कोणाला नको असेल तर मुले न होऊ देणे हा पर्याय उपलब्ध आहेच.
माझा असा कयास आहे कि सांप्रतकालीन बहुसंख्य पुरुषप्रधानतेचा विरोध करणार्‍या स्त्रीया (काहीवेळा असे पुरुष) केवळ कशाचा विरोध फॅशन मधे आहे हे पाहून त्या गोष्टींवर फोकस करतात.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे. पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही. कारण ते फारच कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचं नातं राहील. जो/जी घटक पैसे मिळवत नाही त्याला सतत दबून रहावं लागेल. जिथे आर्थिक विषय महत्त्वाचे होतात तिथे मानवी नातं मागे पडतंच. तसाही इन्कम टॅक्समुळे जमाखर्च आणि इन्वेस्टमेंट्स वेगळ्या ठेवाव्या लागतातच पण घरातले खर्च अगदी वेगळे ठेवता येत नाहीत. इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
"पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?
पुन्हा नाही. ती मानवी प्रवृत्ती आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीने वेगळी नावं देतो. शेवट सगळा पॉवरचा, सत्तासामर्थ्याचा आणि संघर्षाचा खेळ आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 Sun, 06/29/2014 - 14:42
प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा.
प्रत्येक कुटुंब प्रत्येक गोष्ट नव्याने शिकू शकत नाही. सहसा समाजात काय चालले आहे याचा मोठ्या निर्णयांसाठी आधार घेतला जातो.
पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही.
सहमत. मी ही असंच म्हटलं आहे.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे.
हे फारसं पटलं नाही. भारतातल्या सर्वात धुरंधर स्त्रीवादी स्त्रीच्या आईच्या नावाने काहीच संपत्ती नसायचीच शक्यता जास्त आहे. " ते समजूनदार पालक आहेत म्हणून त्यांची संपत्ती विभागणे मला गरजेचे वाटले नाही" असे सांगण्यात येईल. याउलट स्त्रीने जीन्स घालू नये असे कोणी म्हटले तर सगळ्या चवताळून उठतील.
पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही.
मी असा सल्ला दिला नाही. प्रश्न केला आहे. दोघे कमावत असतील, क्षःय रेशोमधे, घरात प्रत्येकाचे वेगवेगळे, एकत्रित खर्च, इ इ ब क ड ई असतील तर निर्णय कसे करणार?
इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
जगातली बहुसंख्य कुटुंबे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावरच चालतात. स्त्रीप्रधान, पुरुषप्रधान वा लिंगनिरपेक्ष अशी कोणतीही व्यवस्था असती तर त्यांना फरक पडला नसता. पण सबब लेखात त्यावर चर्चा करायची नाही. प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते. पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते. आपण हुंड्याचे उदाहरण घेऊ. मी खालील निरीक्षणे मांडू इच्छितो. सामान्य कुटुंबांत- १. स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते. २. हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल. ३. हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये. संपत्ती पुरुषाकडेच असली तरी कोणाला किती मुली, किती मुले होतील हे सांगता येत नाही. ज्या कुटुंबांत पुरुषप्रधान व्यवस्थेचा फायदा घ्यायची वृत्ती आहे- ४. हुंडाबळींची संख्या (मुलीच्या सासरच्या मागण्या न पुरविल्याने, इ) ही हुंडाबळी न ठरलेल्या मुलींच्या मानाने नगण्य असते. या कुटुंबांमधे पुन्हा मुलीच्या पित्याला कर्ज घेऊन, शेत विकून, दागिने विकून, इ इ त्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या असतात. इथे पुरुषप्रधानता केवळ एक निमित्त आहे. मूलतः एका गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा संबंध साध्या लोकांशी आला आहे. ५. हुंडा द्या, लवकर द्या, जास्त द्या, इ इ संदेश तीव्र करण्यासाठी जे एक्झिक्यूटीव ऑफिसर असतात त्यांत नवरा हा एकच पुरुष असतो. बाकी स्त्रीयाच असतात. विशेष करून अशाच परिस्थितीतून गेलेली सासू असते. यात लिंगाचा नि हुंड्याचा संबंध दिसतो का? काहीच नाही. ही सगळी मेस का निर्माण झाली आहे? कारण वारश्याचे नियम नीट नाहीत म्हणून. आदिवास्यांत पोरगीच्या बापाला पैसे द्यावे लागतात. त्याचे रेट, नियम फिक्स असतात. म्हणून त्यांच्यात असले गुन्हे होत नाहीत. स्त्रीप्रधानता + व्यवस्थित नियम + प्रोटोकॉल्स अशी ती सिस्टिम आहे. जी किमान मानवी गुन्हेगारी असणारच आहे, तिचे खापर व्यवस्थेवर (इथे पुरुषप्रधान) फोडू नये. पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्टॅट देत, पोलिस फोर्स डिसबँड करावा असे म्हणू नये. ही चर्चा मेरिट बसिसवर असावी.
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल. माझं असं मत आहे कि काही व्यवस्था काही इतर व्यवस्थांपेक्षा जास्त इफेक्टीव असतात. ज्या व्यवस्थांत खासकरून कोणतेच पायंडे नसतात त्या अधिकच अन्यायकारक असतात, कारण त्या सद्य भारतीय लोकशाहीपेक्षाही वाईट चालतील. इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे. कृपया समजूतदारपणाचा इश्श्यू मधे आणू नका. आपण थोड्या गडबड लोकांबद्दल बोलतोय ज्यांच्यामुळे समाजात अन्यायाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उदा घेऊ. परिस्थितीचा फायदा घेऊन कमी जास्त अन्याय करायला २०% लोकांना (१०% स्त्रीया, १०% पुरुष) आवडते असे समजू. समाज लिंगनिरपेक्ष आहे नि केव्हाचा पुरुषप्रधानता विसरला आहे असे समजू. एकत्र कुटुंबे नाहीत नि प्रतिजीवनात २-३ घटस्फोट फार काही नाहीत असे समजू. वैवाहिक लैंगिक निष्ठा अजूनही प्रचलित आहे असे समजू. 'रोजची गैरसोय' टाळण्यासाठी ऑपरेशन करायचे आहे. कोण करायचे यासाठी काहीही बेंचमार्क उपलब्ध नाही असे समजू. हे ऑपरेशन इर्रिवसिबल आहे असे समजू. कोणी करायचे? स्त्रीने? पुरुर्षाने? दोघांनी? घटस्फोटानंतर या ऑपरेशनच्या स्टॅटस्मुळे दुसरा साथी मिळतो का नि त्यास मुले हवीत का असे प्रमुख यांच्यापुढे प्रश्न असतील. मी हे मुद्दाम कृत्रिम उदाहरण दिले आहे पण आज जशी आपण स्त्रीयांवरील अन्यायाची उदाहरणे देत आहात तसे उद्या "ज्यांच्या स्पाऊसने मुलाला आपले मिडल नेम लावू दिले नाही" अशांवरील अन्यायाची उदाहरणे देत ग्रुप असतील आणि त्यांची सदस्यसंख्या आजच्या मानाने शेकड्याने जास्त असेल.
पुन्हा नाही.
सहमत.

In reply to by arunjoshi123

पैसा Sun, 06/29/2014 - 19:43
प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते.
बर्‍याच अंशी सहमत आहे. आता खरे तर हुंडाबंदी कायदे आहेत. मुलींना पित्याच्या संपत्तीमधे वारसा आहे. हुंडाबळी जाऊ नये म्हणून शक्य तेवढे काळजीपूर्वक कायदे केले आहेत. तरीही गुन्हे होतात. याची तुलना ड्रग्ज घेणे/खून यासंबंधीचे कायदे असले तरी हे गुन्हे होतात याच्याशी करता येईल.
पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते.
हे जरा गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते.
मला वाटते, स्त्रीधनात फक्त आईबापाकडून आणि सासरच्या लोकांकडून लग्नात मिळालेले जे दागिने स्त्री वापरते त्याचाच समावेश होतो. पूर्वीच्या काळी मुलींना पैतृक संपत्तीमधे वारसाहक्क नव्हता त्याकाळात या ना त्या स्वरूपात मुलीला संपत्तीचा काहीतरी भाग द्यावा म्हणून दागिने देण्याची पद्धत सुरू झाली. पुढे काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या हावरटपणामुळे त्याचे हुंड्याच्या जाचक प्रथेत रूपांतर झाले. इतर गोष्टी जसे की रोकड/फ्लॅट्/गाडी/फर्निचर्/सासरच्या इतर नातेवाईकांना दिलेल्या भेटवस्तू यांचा समावेश हुंड्यात होतो, पण ते स्त्रीधन नसते. त्या वस्तू सासरचे इतर लोक वापरतात. स्त्रीधन सर्वात शेवटी वापरले जाते यामागे जास्त भावनिक कारणे असतात. अनेक स्त्रियांकडे मंगळसूत्र/दोनेक बांगड्या याशिवाय काहीच नसते आणि हे सौभाग्यालंकार समजले गेलेले दागिने गहाण टाकणे/विकणे अशुभ समजले जाते. वगैरे. मात्र इतर जास्तीचे दागिने अनेक स्त्रिया घरातील कॅश संपल्यावर आपणहून वापरायला देतात. मुस्लिमांमधे मेहेर नजर हा प्रकार आहे तो या स्त्रीधनाच्या जवळपास जाणारा वाटतो. तलाक झाल्यास त्यांना तो स्त्रीला परत करावा लागतो. मुस्लिम लोकांत अजूनही स्त्रियांना वारसाहक्क नाही (बहुतेक). यासाठीच जिना हाऊसच्या केसमधे बॅ. जिनांच्या मुलीने आपण मुस्लिम नसल्याचे कोर्टात सांगितले होते.
हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल.
संपत्तीमधे समान अधिकार जरूर आहे. तसाच हुंड्याविरोधात कायदा आहे. स्त्रिया अनेक कारणांनी तो वापरत नाहीत.
हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये.
हे पटले नाही. लग्न करणारा पुरुष आपल्या मुलीवर आणि आपल्यावर उपकार करत आहे, या भावनेने आपली मुलगी 'खपावी' म्हणून दिलेली लाच आहे एकप्रकारे. जर पुरुषप्रधानता नसती तर हुंड्याचा जन्मच झाला नसता. काही आदिवासी जमातीत याउलट स्त्रीचे मूल्य तिचा नवरा तिच्या बापाला चुकवतो. कारण तिथे पुरुषप्रधानता नसते. मात्र कोणत्याही कारणाने सुरू झालेल्या गुन्हेगारीला आळा घालणे कठीण आहे. जोपर्यंत गुन्हेगारीची प्रवृत्ती जिवंत आहे तोपर्यंत या नाही त्या प्रकारे ती सुरू राहील हे मान्य.
इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे
सहमत.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल
होय. मला वाटते तुम्हीही हेच सांगत आहात की गुन्हेगारी प्रवृत्ती ही लिंगनिरपेक्ष असते. बहुधा, ही गुन्हेगारी कशी सुरू झाली याबद्दल आपली मते जुळणारी नसली तरी सध्याच्या स्थितीबद्दल जुळणारी आहेत.

In reply to by रामपुरी

सहमत. आपत्तीच्या ऐवजी आक्षेप असा मराठी शब्द लिह्हीता आला असता. पण असूद्या. बहुधा, लेखक मराठीतच, महाराष्ट्राबाहेरच वास्तव्यास असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 03:50
भाषेची शुद्धता पाळत बसणं हा संपून जायचा सोप्पा मार्ग आहे. तेव्हा करा हो जरा इकडचे तिकडचे शब्द स्वीकार.

ऋषिकेश गुरुवार, 07/03/2014 - 10:18
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.

In reply to by ऋषिकेश

arunjoshi123 Fri, 07/04/2014 - 12:40
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील राज्यव्यस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. राष्ट्र संस्थेला कोणी एक 'शास्ता' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे. असे काहीसे वाचल्यासारखे वाटले. असो.

arunjoshi123 Fri, 07/04/2014 - 12:38
भाषेबद्दल - प्रमाण भाषा अचूकपणे येणे बर्‍यापैकी अवघड आहे. त्यासाठी थोडे नशीब, थोडे कष्ट लागतात. शिवाय संकल्पनेचा आशय नीट मांडण्यासाठी एक प्रकारची प्रतिभाच लागते. ती अनेकांना नसते. (ती कैकांना हासिल होत नाही म्हणणार होतो.) एकतर गावात, वर लातूरकडे वाढल्याने, जिथे अशुद्ध वाणी भाषा बोलतात, पेशवे म्हणतात त्याप्रमाणे बराच काळ दिल्लीत वास्तव्य असल्याने, घरातही हिंदी बोलत असल्याने, विचारही हिंदीत करत असल्याने, एकतर आधीच मराठी टायपणे क्लिष्ट, शिवाय पलटून सगळ्या वाक्यरचना दुरुस्त करत बसणे कंटाळवाणे असल्याने अशा वाक्यरचना होतात. नाईलाज आहे. पण चालून जावे.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 12:43
चालायला हर्कत काहीच नाही. फक्त काहीवेळेस असे होते की महाराष्ट्रात वाढलेल्या आणि आजन्म महाराष्ट्राबाहेर न राहिलेल्या लोकांकडूनही हिंदी प्रभाव असलेले शब्दप्रयोग होतात तेव्हा ते जास्त खटकतं. बाकी महाराष्ट्राबाहेर बराच काळ वास्तव्य असलेल्यांना याचा गंड बाळगण्याचे आजिबात म्ह. आजिबात कारण नाही. हिंदी लहेज्यातली मराठी ऐकायला आणि वाचायलाही तशी मस्त वाटते. (विशेषतः एमपीच्या मराठी पोरींची.....आहाहा नका, नका आठवण करून देऊ!!)

पिलीयन रायडर Fri, 06/27/2014 - 17:33
मी खुप मन लावुन लेख वाचला.. काही ठिकाणी भाषा अगदी जटील आहे.. थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत असतं तर बरं झालं असतं.. पण एकंदरीत चर्चा प्रस्ताव चांगला आहे.. तुम्हाला असं म्हणायचय का की पुरुषप्रधान सिस्टीममध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) त्याच्या तुलनेत समताप्रधान कुटुंबामध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) ह्याची तुलना व्हावी, कारण वरकरणी वाटलं तरी समताप्रधान कुटुंब अन्यायमुक्त (किंवा तुलनेनी कमी अन्याय होत असणारं) असेलच असं नाही (कारण तुम्ही वानगी दाखल दिलेले ११ प्रश्न..) मुळात कोणतीही सिस्टीम फ्लॉलेस नसतेच. त्यामुळे कोणत्याही सिस्टिम मध्ये कुणा न कुणावर अन्याय होत रहाणार हे नक्की. त्यात सुद्धा अन्याय हा कोणत्या एका पक्क्या सुत्राने मोजता येत नाही. स्थल-काल-लिंग सापेक्षता वगैरे मुद्दे तिथे असतात. (केवळ काय मोजतोय ह्याबद्दल नाही तर "कोण" मोजतोय ह्याबद्दल् सुद्धा). त्यामुळे अशी दोन सिस्टीम मधल्या अन्यायाची काटेकोर तुलना करता येईल का हा मुळात मला पडलेला प्रश्न आहे.. पुरुषप्रधान सिस्टिमला जो स्त्रियांकडुन विरोध होतो त्यावर मी एक स्त्री म्हणुन भाष्य करु शकते. (आणि ती सर्वस्वी माझी मते आहेत.. कुणाला दिलेले सल्ले अथवा आरोप नाहीत.. त्यामुळे माझी विधाने केवळ माझे अनुभव असल्याने त्यांना सिद्ध करुन दाखवायची माझी जवाबदारी नाही कारण ती मान्य कराच असा माझा आग्रह नाही) स्त्री म्हणुन पुरुषप्रधान सिस्टीमला जो विरोध असतो तो केवळ "लिंग" ह्या एका मुद्द्यावर नसावा. इथे मुळात एखाद्याचे जगण्याचे, विचारांचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसणे हा एक मोठा मुद्दा आहे. "केवळ पुरुष आहे" ह्या एका गोष्टीसाठी अनेक अधिकार पुरुषाकडे असतात. कुटुंब व्यवस्था सोयिस्कर असावी म्हणुन निवडालेला तो एक पर्याय जरी मानला तरी त्यात केवळ गोंधळ नको म्हणुन एकहाती कारभार सोपोवणे हा एकच उद्देश नाही (किंवा उद्देश काहीही असला तरी त्याचा केवळ तोच एक परिणाम नाही). ह्या मध्ये सत्ता हाती यावी म्हणुन "पुरुष ह्या लिंगाला प्राधान्य देणे" ही समस्या निर्माण होते आणि त्यामुळे स्त्री भ्रुण हत्या वगैरे प्रश्नांची मालिका सुरु होते (इथे स्त्रियांना जे काही मुलभुत प्रश्न आहेत.. गर्भात हत्या, आवश्यक शिक्षण न मिळणे. कुपोषण, स्वामित्वाच्या भावनेतुन आणि स्त्रीला भोगवस्तु म्हणुन पाहण्याच्या वृत्तीमुळे झालेले बलात्कार, हुंडाबळी, पळवुन नेऊन विकणे इ समस्या मला अपेक्षित आहेत..). बर एकाधिकार दिले म्हणुन कारभार सुरळित चालु आहे असे तरी आहे का? तर निश्चित नाही.. ह्या व्यतिरिक्त अजुन एक मुद्दा जो मला अत्यंत मह्त्वाचा वाटतो तो असा, की कुटूंबव्यवस्था, समाज सुरळित चालु रहाणं हे महत्वाचं आहे, त्यासाठी व्यक्तिला अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण एखादया व्यक्तिच्या आयुष्यात नक्की कुठवर आपण ह्या व्यवस्थांचा हस्तक्षेप चालवुन घेऊ शकतो? म्हणजे माणुस म्हणुन आवडीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर आवळले जाणार असेल तर ती सिस्टीम एक फेल्युअर नाही का? तुम्ही म्हणता की हॉस्टेलची पाटी वाचल्या प्रमाणे एका कुटुंबातली नावे नकोत.. पण Does it really matter? असलीच चोघांची नावं अत्यंत वेगवेगळी तरी त्याचा नक्की किती फरक पडतो? केवळ सोय म्हणुन, किंवा वाचायला बरं (रिदमिक विथ ऑदर मेम्बर्स) वाटतं म्हणुन एखाद्याचं नाव बदलुन टाकणे योग्य ठरते का? तुम्ही मुळचे कुठले ह्या प्रशाचे उत्तर ८-१० पिढ्यानंतर पण देता आले पाहिजे म्हणुन हा खटाटोप करायचा? आणि मग त्या उत्तरासाठी "स्त्री ने लग्न झाले की माहेर विसरून सासरच आपले घर मानावे आणि स्वतःला त्या वंशात विरघळवुन टाकावे" अशा मानसिकतेचा उदय होतो. पण मुळात "तुम्ही मुळचे कुठले" हा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे का की ज्या साठी त्या घरात येणारी प्रत्य्के स्त्री गरजे पलीकडे बदलुन जाते? तुम्ही सिस्टीम कोणतीही निवडा, पण त्यात व्यक्तिस्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर (आणि गरजेपेक्षा जास्त) धोक्यात येणार असेल तर ती माझ्या दृष्टिने फेल्युअर आहे. बाकी तुम्ही जे ११ प्रश्न दिले आहेत, त्यांची सर्व घरांमध्ये एकच एक उत्तरं मिळणं हे अशक्यच आहे.. तशी न मिळणं ह्यालाच आयुष्य म्हणतात ना...

In reply to by पिलीयन रायडर

arunjoshi123 Fri, 06/27/2014 - 17:51
आपल्याला पूर्ण आशय पोचला त्याचा आनंद आहे. आपली जवळजवळ सारी वाक्यं पटणेबल आहेत. एखाद्या विचाराबद्दल अजून काही सुचलं तर अवश्य लिहिन.

In reply to by मराठी कथालेखक

हाडक्या Wed, 07/02/2014 - 19:27
त्यांच्या अभिव्यक्तीचा तो आविष्कार आहे.. तुम्ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंन्त्र्याचा आदर करणार की तुमची 'दाताला खडा' लागल्यासारखी सेन्सॉरशीप लादत बसणार ? ;)

आतिवास Fri, 06/27/2014 - 18:09
'लिंग' (सेक्स - स्त्री आहे की पुरुष) आणि 'लिंगभाव' (हिंदी भाषेत त्याला 'सामाजिक लिंग' असे म्हटले जाते) या दोन वेगळ्या संज्ञा आहेत - त्यांचा संबंध आहे पण त्या वेगळ्या आहेत. सामान्यतः लिंगभावाबद्दल चर्चा होत असते. 'लिंगभाव' म्हणजे थोडक्यात सांगायचे तर: व्यक्तीचे लिंग केंद्रस्थान घेते आणि तिच्या/त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात (मोठ्याने बोलू नये, रडू नये इत्यादी) ; कामाची विभागणी होते (स्वयंपाक, नारळ फोडणे इत्यादी) ; विविध साधनं कोणाला प्राधान्याने मिळणार (शिक्षण इत्यादी) हे ठरते, साधनांवर मालकी कोणाची हे ठरते (शेती, घर), निर्णय कोणी घ्यायचे हे ठरते... इत्यादी. 'लिंग' बदलत नाही, ते बदलावे अशी अपेक्षाही नाही; 'लिंगभाव' व्यवहार बदलतो - तो सगळीकडे सारखा असत नाही. पुरुषप्रधान रचनेत एका विशिष्ट प्रकारची लिंगभाव व्यवस्था आहे - असमानता आहे, ती बदलण्याचा प्रयत्न करताना स्त्रीच्या लिंगाधारित गरजा (बाळंतपण, राजकीय सहभागाची संधी इत्यादी) लक्षात घेणे म्हणजे 'भेदभाव' नाही. (तुम्ही हे म्हटले नाही इथे, पण जाताजाता लिहिले.) पुरुषप्रधान समाजरचनेचे समर्थक फक्त पुरुष असतात असे नाही, स्त्रियाही असतात; लिंगभाव धारणा बदलायला हव्यात असे फक्त स्त्रियांना वाटत नाही, अनेक पुरुषांना वाटते. सर्व स्त्रिया स्त्रियांबाबत संवेदनशील असतील असे नाही, सर्व पुरुष स्त्रियांच्या प्रती असंवेदनशील असतील असे नाही. संवेदनशीलता, परस्पर आदर नसतो तेव्हा अकराच काय अकरा हजार प्रश्न निर्माण होतात... संवेदनशीलता आणि परस्पर आदर असेल तरीही प्रश्न निर्माण होतातच पण त्यातून मार्ग काढला जातो. स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!!

रेवती Fri, 06/27/2014 - 19:49
स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!! भयानक सहमत. माझ्याच निर्णयामुळे आलेली अडचण कशी निस्तरावी या विचार अनेक वर्षे करत होते. परवा सकाळी झोपेतून उठल्यावर त्याचे पर्फेक्ट असे नाही पण चांगले असे उत्तर मिळाले होते. ते श्रेय मात्र माझे नाही. आपण अनेक पुस्तके, लेख, चांगले विचार, मुलाखती ऐकत, वाचत असतो. काही गोष्ती डोक्यात बसतात ते नेहमीच आपल्याला कळत नाही. पण त्या सगळ्यातून आपण (मेंदू)प्रश्नाचे उत्तर शोधत राहतो, नकळतपणे आणि असे एखादे दिवशी ते समोर येते, जेंव्हा ते एक्सपेक्टेड नसते. परवाचा सगळा दिवस मनातल्या मनात आश्चर्य करणे, मनाशी हसणे यात घालवला (म्हणजे बाकीही कामे केली हां). ;) कोंडीबद्दलही नाही लिहित.

साती Fri, 06/27/2014 - 20:58
मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय? मूळात समताप्रधान अशी समाजव्यवस्था अजूनतरी भारतात निर्माण झाली नाही. जिथे समताप्रधान व्यवस्था असल्याचे भासते ती 'कमी पुरूषप्रधान' व्यवस्था असते. जर समताप्रधान व्यवस्था झाली तर तिचा पायाच इतका सामंजस्याचा असेल की असे प्रश्नं निर्माणच होणार नाहीत. (हे मी बहुसंख्यांकांच्या बाबतीत लिहित्येय, ईशान्येकडील राज्यात अजूनही काही ठिकाणी स्त्रीप्रधान व्यवस्था आहे आणि तिथली समताप्रधान व्यवस्था ही कमी स्त्रीप्रधान असेल याची जाणीव आहे) तसे तर हॉस्टेलला रहणारे रूममेट मित्रं मैत्रिणीसुद्धा एकमेकांबरोबर थोडे काँप्रमाईज आणि थोडे मॅनिप्युलेट करून रहातो. इथे तर अख्ख्या जीवनाचा आणि संसाराचा प्रश्नं आहे. त्यामुळे कुठल्याही सहजीवनात येऊ शकतील असे इश्यूज इथेही येणारच. ते सोडवायचे कसे हा मुख्य मुद्दा आहे. बरं हे सोडवतानासुद्धा पारंपारिक वर्चस्ववाल्या गटाने 'मी खरंतर पडतं घ्यायला नको/घेतलं नसतं पण समानतेपायी घेतोय' असा मोठेपणा घेतला जाण्याची किंवा दुसर्या बाजूने दिली जाण्याची शक्यता जास्तं असते. 'माझे मिस्टर सकाळी भाजी चिरून देतात' हे कौतुकाने संगितलं तर पुप्र मानणारी स्त्री. 'मी बायकोला अगदी भाजीही चिरून देतो' असे म्हणणारा पुप्रवाला पुरूष. खर्या समानतावाल्याना यात काही विशेष सांगण्यासारखे आहे असेही वाटणार नाही. मग तू घरी किती पैसे दिलेस का दिलेस इ. विचार फक्तं एक व्यवहाराचा भाग म्हणून होतील त्याला रुसवेफुगवे मानापमान याचं ड्रेसिंग लागणार नाही. त्यामुळे खरी समताप्रधान व्यवस्था जेव्हा येईल तेव्हा त्यात पुरूष व स्त्री यांपैकी कुठल्याही व्यवस्थेत येणारी घुसमट अज्जिबात येणार नाही.

कवितानागेश Sat, 06/28/2014 - 17:18
मला काही किचकट चर्चा जमत नाही, पण एक गोष्ट नक्की लक्षात येतेय, कुटुंबसंस्था ही लहान मुलांच्या सुरक्षित वाढीसाठी आणि म्हातार्‍या माणसांच्या आधारासाठी आणि काही प्रमाणात 'हक्काच्या' सोबतीसाठी निर्माण झालेली/ केली गेलेली आहे. या अश्या कुटुंबाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना मात्र मूळात या कशाची तत्क्षणी गरजच नसते. ते केवळ स्वतःच्या सोयीचा/ मनाचा विचार करुन मुक्त राहू शकत असतात. पण त्यांनी त्यांच्या भूतकाळात या संस्थेचा फायदा घेतलेला असतो, आणि भविष्यकाळातही मिळणार असतो. अशा वेळेस समाज बांधून रहाणं, सुरक्षितता आणि त्यायोगे होउ शकणारी प्रगती यादेखिल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याकडे दुर्लक्ष होताना दिसते... ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा व्यक्तींनी जर का जे काही आहे ते 'आपलं' आहे आणि 'आपल्यासाठी' आहे, असा विचार केला तर फारसे प्रश्न पडत नाहीत. जर का ' हे 'मला' किती फायदेशीर होईल?' असा विचार केला तर रस्सीखेच जास्त जोरात सुरु होईल... आणि ती कायम सुरु रहाणार! कारण 'मी' विरुद्ध 'आपण' हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी समोर येतोच. त्याचे उत्तर कालपरत्वे आणि व्यक्तीपरत्वे बदलतं.. अमुक एक मान्य करणं योग्य आणि अमुक एक कृती करणं अयोग्य असं आपल्याला खरोखरच कधी ठरवता येइल का, हे माहित नाही.

पैसा Sat, 06/28/2014 - 20:34
जिवंत माणसांचा प्रश्न येतो तिथे २+२=४ असं उत्तर नेहमीच मिळत नाही. कधी उत्तर १ असेल तर कधी ६. प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा. पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही. गावातल्या अशिक्षित स्त्रिया अख्खं कुटुंब चालवत असतात हे अनेकदा पाहिले आहे. सुशिक्षित उच्च वर्गीय कुटुंबातही समानता असमानता दोन्ही प्रकार असतात. हा प्रत्येकाच्या जडणघडणीचा, विचारांचा भाग आहे. इतर बहुतेक गोष्टी स्त्री -पुरुष कोणीही करू शकत असले तरी मुलाला प्रत्यक्ष जन्म देणे आणि काही वर्षेपर्यंत त्याचे संगोपन करणे हे स्त्रीलाच करावं लागतं. त्यासाठी तडजोडी तिलाच कराव्या लागतात. (मुलांना योग्य प्रकारे वाढवण्यासाठी कोणा पुरुषाने करियर सोडलेली फार उदाहरणे आजूबाजूला दिसत नाहीत.) इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल यात फार फरक असतो. ते जर कोणाला नको असेल तर मुले न होऊ देणे हा पर्याय उपलब्ध आहेच.
माझा असा कयास आहे कि सांप्रतकालीन बहुसंख्य पुरुषप्रधानतेचा विरोध करणार्‍या स्त्रीया (काहीवेळा असे पुरुष) केवळ कशाचा विरोध फॅशन मधे आहे हे पाहून त्या गोष्टींवर फोकस करतात.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे. पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही. कारण ते फारच कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचं नातं राहील. जो/जी घटक पैसे मिळवत नाही त्याला सतत दबून रहावं लागेल. जिथे आर्थिक विषय महत्त्वाचे होतात तिथे मानवी नातं मागे पडतंच. तसाही इन्कम टॅक्समुळे जमाखर्च आणि इन्वेस्टमेंट्स वेगळ्या ठेवाव्या लागतातच पण घरातले खर्च अगदी वेगळे ठेवता येत नाहीत. इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
"पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?
पुन्हा नाही. ती मानवी प्रवृत्ती आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीने वेगळी नावं देतो. शेवट सगळा पॉवरचा, सत्तासामर्थ्याचा आणि संघर्षाचा खेळ आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 Sun, 06/29/2014 - 14:42
प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा.
प्रत्येक कुटुंब प्रत्येक गोष्ट नव्याने शिकू शकत नाही. सहसा समाजात काय चालले आहे याचा मोठ्या निर्णयांसाठी आधार घेतला जातो.
पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही.
सहमत. मी ही असंच म्हटलं आहे.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे.
हे फारसं पटलं नाही. भारतातल्या सर्वात धुरंधर स्त्रीवादी स्त्रीच्या आईच्या नावाने काहीच संपत्ती नसायचीच शक्यता जास्त आहे. " ते समजूनदार पालक आहेत म्हणून त्यांची संपत्ती विभागणे मला गरजेचे वाटले नाही" असे सांगण्यात येईल. याउलट स्त्रीने जीन्स घालू नये असे कोणी म्हटले तर सगळ्या चवताळून उठतील.
पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही.
मी असा सल्ला दिला नाही. प्रश्न केला आहे. दोघे कमावत असतील, क्षःय रेशोमधे, घरात प्रत्येकाचे वेगवेगळे, एकत्रित खर्च, इ इ ब क ड ई असतील तर निर्णय कसे करणार?
इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
जगातली बहुसंख्य कुटुंबे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावरच चालतात. स्त्रीप्रधान, पुरुषप्रधान वा लिंगनिरपेक्ष अशी कोणतीही व्यवस्था असती तर त्यांना फरक पडला नसता. पण सबब लेखात त्यावर चर्चा करायची नाही. प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते. पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते. आपण हुंड्याचे उदाहरण घेऊ. मी खालील निरीक्षणे मांडू इच्छितो. सामान्य कुटुंबांत- १. स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते. २. हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल. ३. हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये. संपत्ती पुरुषाकडेच असली तरी कोणाला किती मुली, किती मुले होतील हे सांगता येत नाही. ज्या कुटुंबांत पुरुषप्रधान व्यवस्थेचा फायदा घ्यायची वृत्ती आहे- ४. हुंडाबळींची संख्या (मुलीच्या सासरच्या मागण्या न पुरविल्याने, इ) ही हुंडाबळी न ठरलेल्या मुलींच्या मानाने नगण्य असते. या कुटुंबांमधे पुन्हा मुलीच्या पित्याला कर्ज घेऊन, शेत विकून, दागिने विकून, इ इ त्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या असतात. इथे पुरुषप्रधानता केवळ एक निमित्त आहे. मूलतः एका गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा संबंध साध्या लोकांशी आला आहे. ५. हुंडा द्या, लवकर द्या, जास्त द्या, इ इ संदेश तीव्र करण्यासाठी जे एक्झिक्यूटीव ऑफिसर असतात त्यांत नवरा हा एकच पुरुष असतो. बाकी स्त्रीयाच असतात. विशेष करून अशाच परिस्थितीतून गेलेली सासू असते. यात लिंगाचा नि हुंड्याचा संबंध दिसतो का? काहीच नाही. ही सगळी मेस का निर्माण झाली आहे? कारण वारश्याचे नियम नीट नाहीत म्हणून. आदिवास्यांत पोरगीच्या बापाला पैसे द्यावे लागतात. त्याचे रेट, नियम फिक्स असतात. म्हणून त्यांच्यात असले गुन्हे होत नाहीत. स्त्रीप्रधानता + व्यवस्थित नियम + प्रोटोकॉल्स अशी ती सिस्टिम आहे. जी किमान मानवी गुन्हेगारी असणारच आहे, तिचे खापर व्यवस्थेवर (इथे पुरुषप्रधान) फोडू नये. पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्टॅट देत, पोलिस फोर्स डिसबँड करावा असे म्हणू नये. ही चर्चा मेरिट बसिसवर असावी.
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल. माझं असं मत आहे कि काही व्यवस्था काही इतर व्यवस्थांपेक्षा जास्त इफेक्टीव असतात. ज्या व्यवस्थांत खासकरून कोणतेच पायंडे नसतात त्या अधिकच अन्यायकारक असतात, कारण त्या सद्य भारतीय लोकशाहीपेक्षाही वाईट चालतील. इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे. कृपया समजूतदारपणाचा इश्श्यू मधे आणू नका. आपण थोड्या गडबड लोकांबद्दल बोलतोय ज्यांच्यामुळे समाजात अन्यायाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उदा घेऊ. परिस्थितीचा फायदा घेऊन कमी जास्त अन्याय करायला २०% लोकांना (१०% स्त्रीया, १०% पुरुष) आवडते असे समजू. समाज लिंगनिरपेक्ष आहे नि केव्हाचा पुरुषप्रधानता विसरला आहे असे समजू. एकत्र कुटुंबे नाहीत नि प्रतिजीवनात २-३ घटस्फोट फार काही नाहीत असे समजू. वैवाहिक लैंगिक निष्ठा अजूनही प्रचलित आहे असे समजू. 'रोजची गैरसोय' टाळण्यासाठी ऑपरेशन करायचे आहे. कोण करायचे यासाठी काहीही बेंचमार्क उपलब्ध नाही असे समजू. हे ऑपरेशन इर्रिवसिबल आहे असे समजू. कोणी करायचे? स्त्रीने? पुरुर्षाने? दोघांनी? घटस्फोटानंतर या ऑपरेशनच्या स्टॅटस्मुळे दुसरा साथी मिळतो का नि त्यास मुले हवीत का असे प्रमुख यांच्यापुढे प्रश्न असतील. मी हे मुद्दाम कृत्रिम उदाहरण दिले आहे पण आज जशी आपण स्त्रीयांवरील अन्यायाची उदाहरणे देत आहात तसे उद्या "ज्यांच्या स्पाऊसने मुलाला आपले मिडल नेम लावू दिले नाही" अशांवरील अन्यायाची उदाहरणे देत ग्रुप असतील आणि त्यांची सदस्यसंख्या आजच्या मानाने शेकड्याने जास्त असेल.
पुन्हा नाही.
सहमत.

In reply to by arunjoshi123

पैसा Sun, 06/29/2014 - 19:43
प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते.
बर्‍याच अंशी सहमत आहे. आता खरे तर हुंडाबंदी कायदे आहेत. मुलींना पित्याच्या संपत्तीमधे वारसा आहे. हुंडाबळी जाऊ नये म्हणून शक्य तेवढे काळजीपूर्वक कायदे केले आहेत. तरीही गुन्हे होतात. याची तुलना ड्रग्ज घेणे/खून यासंबंधीचे कायदे असले तरी हे गुन्हे होतात याच्याशी करता येईल.
पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते.
हे जरा गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते.
मला वाटते, स्त्रीधनात फक्त आईबापाकडून आणि सासरच्या लोकांकडून लग्नात मिळालेले जे दागिने स्त्री वापरते त्याचाच समावेश होतो. पूर्वीच्या काळी मुलींना पैतृक संपत्तीमधे वारसाहक्क नव्हता त्याकाळात या ना त्या स्वरूपात मुलीला संपत्तीचा काहीतरी भाग द्यावा म्हणून दागिने देण्याची पद्धत सुरू झाली. पुढे काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या हावरटपणामुळे त्याचे हुंड्याच्या जाचक प्रथेत रूपांतर झाले. इतर गोष्टी जसे की रोकड/फ्लॅट्/गाडी/फर्निचर्/सासरच्या इतर नातेवाईकांना दिलेल्या भेटवस्तू यांचा समावेश हुंड्यात होतो, पण ते स्त्रीधन नसते. त्या वस्तू सासरचे इतर लोक वापरतात. स्त्रीधन सर्वात शेवटी वापरले जाते यामागे जास्त भावनिक कारणे असतात. अनेक स्त्रियांकडे मंगळसूत्र/दोनेक बांगड्या याशिवाय काहीच नसते आणि हे सौभाग्यालंकार समजले गेलेले दागिने गहाण टाकणे/विकणे अशुभ समजले जाते. वगैरे. मात्र इतर जास्तीचे दागिने अनेक स्त्रिया घरातील कॅश संपल्यावर आपणहून वापरायला देतात. मुस्लिमांमधे मेहेर नजर हा प्रकार आहे तो या स्त्रीधनाच्या जवळपास जाणारा वाटतो. तलाक झाल्यास त्यांना तो स्त्रीला परत करावा लागतो. मुस्लिम लोकांत अजूनही स्त्रियांना वारसाहक्क नाही (बहुतेक). यासाठीच जिना हाऊसच्या केसमधे बॅ. जिनांच्या मुलीने आपण मुस्लिम नसल्याचे कोर्टात सांगितले होते.
हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल.
संपत्तीमधे समान अधिकार जरूर आहे. तसाच हुंड्याविरोधात कायदा आहे. स्त्रिया अनेक कारणांनी तो वापरत नाहीत.
हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये.
हे पटले नाही. लग्न करणारा पुरुष आपल्या मुलीवर आणि आपल्यावर उपकार करत आहे, या भावनेने आपली मुलगी 'खपावी' म्हणून दिलेली लाच आहे एकप्रकारे. जर पुरुषप्रधानता नसती तर हुंड्याचा जन्मच झाला नसता. काही आदिवासी जमातीत याउलट स्त्रीचे मूल्य तिचा नवरा तिच्या बापाला चुकवतो. कारण तिथे पुरुषप्रधानता नसते. मात्र कोणत्याही कारणाने सुरू झालेल्या गुन्हेगारीला आळा घालणे कठीण आहे. जोपर्यंत गुन्हेगारीची प्रवृत्ती जिवंत आहे तोपर्यंत या नाही त्या प्रकारे ती सुरू राहील हे मान्य.
इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे
सहमत.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल
होय. मला वाटते तुम्हीही हेच सांगत आहात की गुन्हेगारी प्रवृत्ती ही लिंगनिरपेक्ष असते. बहुधा, ही गुन्हेगारी कशी सुरू झाली याबद्दल आपली मते जुळणारी नसली तरी सध्याच्या स्थितीबद्दल जुळणारी आहेत.

In reply to by रामपुरी

सहमत. आपत्तीच्या ऐवजी आक्षेप असा मराठी शब्द लिह्हीता आला असता. पण असूद्या. बहुधा, लेखक मराठीतच, महाराष्ट्राबाहेरच वास्तव्यास असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भृशुंडी गुरुवार, 07/03/2014 - 03:50
भाषेची शुद्धता पाळत बसणं हा संपून जायचा सोप्पा मार्ग आहे. तेव्हा करा हो जरा इकडचे तिकडचे शब्द स्वीकार.

ऋषिकेश गुरुवार, 07/03/2014 - 10:18
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.

In reply to by ऋषिकेश

arunjoshi123 Fri, 07/04/2014 - 12:40
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील राज्यव्यस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. राष्ट्र संस्थेला कोणी एक 'शास्ता' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे. असे काहीसे वाचल्यासारखे वाटले. असो.

arunjoshi123 Fri, 07/04/2014 - 12:38
भाषेबद्दल - प्रमाण भाषा अचूकपणे येणे बर्‍यापैकी अवघड आहे. त्यासाठी थोडे नशीब, थोडे कष्ट लागतात. शिवाय संकल्पनेचा आशय नीट मांडण्यासाठी एक प्रकारची प्रतिभाच लागते. ती अनेकांना नसते. (ती कैकांना हासिल होत नाही म्हणणार होतो.) एकतर गावात, वर लातूरकडे वाढल्याने, जिथे अशुद्ध वाणी भाषा बोलतात, पेशवे म्हणतात त्याप्रमाणे बराच काळ दिल्लीत वास्तव्य असल्याने, घरातही हिंदी बोलत असल्याने, विचारही हिंदीत करत असल्याने, एकतर आधीच मराठी टायपणे क्लिष्ट, शिवाय पलटून सगळ्या वाक्यरचना दुरुस्त करत बसणे कंटाळवाणे असल्याने अशा वाक्यरचना होतात. नाईलाज आहे. पण चालून जावे.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 12:43
चालायला हर्कत काहीच नाही. फक्त काहीवेळेस असे होते की महाराष्ट्रात वाढलेल्या आणि आजन्म महाराष्ट्राबाहेर न राहिलेल्या लोकांकडूनही हिंदी प्रभाव असलेले शब्दप्रयोग होतात तेव्हा ते जास्त खटकतं. बाकी महाराष्ट्राबाहेर बराच काळ वास्तव्य असलेल्यांना याचा गंड बाळगण्याचे आजिबात म्ह. आजिबात कारण नाही. हिंदी लहेज्यातली मराठी ऐकायला आणि वाचायलाही तशी मस्त वाटते. (विशेषतः एमपीच्या मराठी पोरींची.....आहाहा नका, नका आठवण करून देऊ!!)
पुरुषप्रधान मानसिकता स्त्रियांचीही असू शकते असं कोणी म्हणालं. यावर विचार केला असता असे जाणवले कि, एतत्सम विचार करणार्‍या लोकांचा विरोध हा पुरुषांना नसून पुरुषप्राधान्याला आहे. हे पुरुषप्राधान्य पुरुष वा स्त्रीया कोणीही (आपल्या स्वार्थासाठी वा आंधळेपणाने आपल्या अहितासाठी) राबवू शकत असू शकते. उदा. पुरुषप्रधान स्त्री आपल्या पतीचे आडनाव स्वतःला लावायचा आग्रह धरू शकते. पतीने कमवावे व सर्वात मोठी रिस्क त्याने घ्यावी, तिचा (रिस्कचा) माझा संबंध नाही असे ती मानत असू शकते. तसेच पुरुषप्रधान पुरुष माझ्या बहिणीचे लग्न मीच लावून देणार म्हणून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ शकतो.

नारकोन्डम बेट

सुबोध खरे ·

प्रभाकर पेठकर Fri, 06/27/2014 - 14:49
सुंदर, ओघवते वर्णन. प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचा भास होतो. अभिनंदन. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

सुंदर सुरुवात ! या असल्या तुमच्या (डॉ खरेंच्या खर्‍या आयुष्यातल्या) कथा वाचायला नेहमीच खूप मजा येते. त्यातही अशी अनवट आणि विशेष म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या ठिकाणाची गोष्ट म्हटल्यावर उत्सुकता प्रचंड चाळवली गेली आहे. त्यामुळे या गोष्टीतली ठिकाणे जालावर धुंडाळली नसती तरच नवल ! तो नकाशा (तुमची परवानगी गृहीत धरण्याचे धाडस करून) टाकत आहे...
 (मूळ नकाशा जालावरून साभार)
पुढचे भाग लवकर लवकर टाका हेवेसांन :)

In reply to by सुबोध खरे

एस Fri, 06/27/2014 - 15:52
वाचतोय. पुढचा भाग लवकर टाका. जास्त उत्सुकता ताणू नका. :-) नारकोंडम हॉर्नबिल ची माहिती इथे.

कंजूस Fri, 06/27/2014 - 17:05
छान .पण एक शंका . आता गुगल मैप्स आणि विकि मधून बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात .तरीही संरक्षण दलांतून बाहेर पडल्यावर माहिती सांगण्यावर उघड करण्यावर कर्मचाऱ्यांवर किती बंधन असते ?

एस Fri, 06/27/2014 - 23:13
जर प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडून खालचा परिच्छेद लिहिला तर लेख अजून वाचनीय होतील असे वाटतेे. :)

नंदन Fri, 06/27/2014 - 23:48
उत्कंठावर्धक लेख. पुढील भागांची वाट पाहतो.

भाते Mon, 06/30/2014 - 19:52
वाचुनच अंगावर काटा आला. अप्रतिम! पुढे काय… ह्याच्या प्रतिक्षेत. एक्का काका, तुमच्या नकाशामुळे समजले हे ठिकाण कुठे आहे ते! धन्यवाद.

सुबोध खरे Fri, 07/04/2014 - 14:48
एक पुरवणी बेटाला भेट देण्याचे कारण -- नारकोंडम च्या आसपासहून जाणारी तटरक्षक दलाची किंवा नौदलाची जहाजे तेथिल पोलिसांना सदिच्छा भेट दत असतात आणि त्यांच्या कडून काही गुप्त माहिती/ खबरी ज्या बिनतारी यंत्रणेवर पाठवता येणार नाही ती गोळा करून लष्कर/पोलिस मुख्यालयाला पाठवण्याचे काम करतात.

प्रभाकर पेठकर Fri, 06/27/2014 - 14:49
सुंदर, ओघवते वर्णन. प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचा भास होतो. अभिनंदन. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

सुंदर सुरुवात ! या असल्या तुमच्या (डॉ खरेंच्या खर्‍या आयुष्यातल्या) कथा वाचायला नेहमीच खूप मजा येते. त्यातही अशी अनवट आणि विशेष म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या ठिकाणाची गोष्ट म्हटल्यावर उत्सुकता प्रचंड चाळवली गेली आहे. त्यामुळे या गोष्टीतली ठिकाणे जालावर धुंडाळली नसती तरच नवल ! तो नकाशा (तुमची परवानगी गृहीत धरण्याचे धाडस करून) टाकत आहे...
 (मूळ नकाशा जालावरून साभार)
पुढचे भाग लवकर लवकर टाका हेवेसांन :)

In reply to by सुबोध खरे

एस Fri, 06/27/2014 - 15:52
वाचतोय. पुढचा भाग लवकर टाका. जास्त उत्सुकता ताणू नका. :-) नारकोंडम हॉर्नबिल ची माहिती इथे.

कंजूस Fri, 06/27/2014 - 17:05
छान .पण एक शंका . आता गुगल मैप्स आणि विकि मधून बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात .तरीही संरक्षण दलांतून बाहेर पडल्यावर माहिती सांगण्यावर उघड करण्यावर कर्मचाऱ्यांवर किती बंधन असते ?

एस Fri, 06/27/2014 - 23:13
जर प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडून खालचा परिच्छेद लिहिला तर लेख अजून वाचनीय होतील असे वाटतेे. :)

नंदन Fri, 06/27/2014 - 23:48
उत्कंठावर्धक लेख. पुढील भागांची वाट पाहतो.

भाते Mon, 06/30/2014 - 19:52
वाचुनच अंगावर काटा आला. अप्रतिम! पुढे काय… ह्याच्या प्रतिक्षेत. एक्का काका, तुमच्या नकाशामुळे समजले हे ठिकाण कुठे आहे ते! धन्यवाद.

सुबोध खरे Fri, 07/04/2014 - 14:48
एक पुरवणी बेटाला भेट देण्याचे कारण -- नारकोंडम च्या आसपासहून जाणारी तटरक्षक दलाची किंवा नौदलाची जहाजे तेथिल पोलिसांना सदिच्छा भेट दत असतात आणि त्यांच्या कडून काही गुप्त माहिती/ खबरी ज्या बिनतारी यंत्रणेवर पाठवता येणार नाही ती गोळा करून लष्कर/पोलिस मुख्यालयाला पाठवण्याचे काम करतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नारकोन्डम बेट -- हे अंदमान बेट समूहातील सर्वात दूर आणि पूर्वेकडे असलेले एक छोटेसे बेट आहे. पहा http://en.wikipedia.org/wiki/Narcondam_Island#mediaviewer/File:Narcondam_I-_locale.png हे बेट एका मृत किंवा निद्रिस्त ज्वालामुखीच्या शिखरामुळे तयार झालेले असून उत्तर अंदमान च्या बेटांपासून ते ११४ किमी दूर आहे. या बेटाला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. हे पूर्वेच्या समुद्रात या आगामी लेखमालेतील एक पुष्प असून लेखमाला येत्या काही दिवसात लिहिण्याचा विचार आहे.

अविस्मरणीय ग्रीस - भाग २ - अथेन्स

सानिकास्वप्निल ·

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 06:49
फोटो आणि व्रुत्तांत, दोन्ही मस्तच... बाकी, १. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे. २. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार. ३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.

In reply to by मुक्त विहारि

हम्म्म
१. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे.
दुरुस्ती करण्यात आली आहे, गल्तीसे मिशेट्क हो गयी :)
२. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार.
बर्‍याच ठिकाणी असल्या ग्रफीटीचे दर्शन होते, त्यांच्या मेट्रो तर अख्ख्या ग्रफिटीने भरलेल्या आहेत :(
३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.
लेखमाला? हॅ हॅ हॅ पाकृ देईन एखाद दुसरी :)

In reply to by सानिकास्वप्निल

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 07:31
तुम्ही मस्त तिकडे ग्रीक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या आणि मिपाकरांची मात्र, एखाद्या पा.क्रु. वर बोळवण करा....

यशोधरा Fri, 06/27/2014 - 06:59
छान लिहिलं आहे. फोटोही सुरेख. प्राचीन बांधकामाच्या अवशेषांवरुन एके काळी हेच बांधाकम, इमारती, प्रासाद किती देखणे दिसत असतील, असे वाटले..

अजया Fri, 06/27/2014 - 08:11
टेकडीवरुन दिसणारे अक्रोपोलीस चा फोटो खूप आवडला. सगळं अ‍ॅक्रोपोलीस एका नजरेत सामवलं आहे ! वर्णन छानच . ग्रीक खाऊची वर्णनं आमच्या लाडक्या शेफ पा.कृ लिहायला विसरल्या नाहियेत याची खात्री करुन देत आहेत *wink*

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 18:08
फोटो मस्तच आहेत, पण ते थिएटर ऑफ डायोनिसिअस पाहिले नैत काय ओ तुम्ही? आधीच्याही भागात उल्लेख कुठे दिसला नै म्हणून म्हटलं. तिकडे अख्ख्या ग्रीसमध्ये जगप्रसिद्ध असलेले नाटकांचे प्रयोग व्हायचे. बाकी खाद्यपदार्थ इ.इ. नेहमीप्रमाणेच झकास!!! कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल, उदा. "पॉस ईस्ते?" कसे आहात? "कालिमेऽरा!" गुड मॉर्निंग, "कालिनिख्ता", गुड नैट, "एफ्खारिस्तो पॉल्ला", थँक्यू व्हेरी मच, "ओला काला", ऑल राईट, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

डायोनिसिअस चा रंगमंच नाही बघीतला कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला असे सांगण्यात आले की थिएटरात काही शोज होतात आणि त्यांचा त्यादिवशीचा शो रात्री होता त्यामुळे दुपारी आतून रंगमंच बघायला मनाई होती. आम्हाला रात्री जमणं शक्य नव्हतं म्हणून तो राहून गेला, पुन्हा केव्हातरी :)
कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल
हो मीसुद्धा काही बेसिक ग्रीक शब्द शिकून घेतले होते उदा: कॅलिस्पेऽर - गुड ईव्हनिंग, नॅ - येस, एफ्खारिस्तो - थँक्यू, सिम्फोनी- ओके, पोसो कानी- हाऊ मच इज ईट?, सिग्नोमी- सॉरी, कातालवा- आय गेट ईट, पॅरॅकॅएलो - एस्क्युज मी तालिमेएरागोतेरा - सी यू लेटर :) धन्यवाद.

In reply to by सानिकास्वप्निल

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 23:35
ओह ओक्के :) बाकी ग्रीक शिकून घेतलेत हे उत्तम केलेत. :) अवांतरः मायसीनीला (ग्रीक उच्चार मिकेनाइ) गेलेलात काय? अ‍ॅटिकामध्ये नाही, पेलोपोनीसमध्ये आहे पण अथेन्सहून तसे जवळ आहे. कदाचित पुढच्या भागात येत असेलही त्याचे वर्णन पण शेवटी आगामेम्नॉनच्या घराबद्दल उत्सुकता मावत नाही म्हणून विचारले इतकेच. :)

In reply to by बॅटमॅन

आम्ही अथेन्समध्ये फक्त दोनच दिवस होतो आणि जे पाहिले त्याबद्दल वृत्तांत लिहिले आहेच :) बाकी पुन्हा संधी कधी मिळाली तर नक्की हे सगळं बघु हाकानाका :) धन्यवाद

मस्त चाललीय सफर ! मस्त फोटो. "लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस" विषेश आवडला. "ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले." यावरून ग्रीक आणि भारतीय संस्कृत्यांचे नाते किती अभेद्य आहे हे अधोरेखीत झाले ;) पुभाप्र

पैसा Mon, 06/30/2014 - 10:40
प्रवासवर्णन आणि फटु अप्रतिम आहेत. त्या ग्रीक सैनिकांचे कपडे अजून जुन्या स्टायलीतले दिसताहेत. असे घेराचे अंगरखे आपल्याकडेही मुघल काळात वापरात होते.

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 06:49
फोटो आणि व्रुत्तांत, दोन्ही मस्तच... बाकी, १. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे. २. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार. ३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.

In reply to by मुक्त विहारि

हम्म्म
१. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे.
दुरुस्ती करण्यात आली आहे, गल्तीसे मिशेट्क हो गयी :)
२. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार.
बर्‍याच ठिकाणी असल्या ग्रफीटीचे दर्शन होते, त्यांच्या मेट्रो तर अख्ख्या ग्रफिटीने भरलेल्या आहेत :(
३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.
लेखमाला? हॅ हॅ हॅ पाकृ देईन एखाद दुसरी :)

In reply to by सानिकास्वप्निल

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 07:31
तुम्ही मस्त तिकडे ग्रीक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या आणि मिपाकरांची मात्र, एखाद्या पा.क्रु. वर बोळवण करा....

यशोधरा Fri, 06/27/2014 - 06:59
छान लिहिलं आहे. फोटोही सुरेख. प्राचीन बांधकामाच्या अवशेषांवरुन एके काळी हेच बांधाकम, इमारती, प्रासाद किती देखणे दिसत असतील, असे वाटले..

अजया Fri, 06/27/2014 - 08:11
टेकडीवरुन दिसणारे अक्रोपोलीस चा फोटो खूप आवडला. सगळं अ‍ॅक्रोपोलीस एका नजरेत सामवलं आहे ! वर्णन छानच . ग्रीक खाऊची वर्णनं आमच्या लाडक्या शेफ पा.कृ लिहायला विसरल्या नाहियेत याची खात्री करुन देत आहेत *wink*

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 18:08
फोटो मस्तच आहेत, पण ते थिएटर ऑफ डायोनिसिअस पाहिले नैत काय ओ तुम्ही? आधीच्याही भागात उल्लेख कुठे दिसला नै म्हणून म्हटलं. तिकडे अख्ख्या ग्रीसमध्ये जगप्रसिद्ध असलेले नाटकांचे प्रयोग व्हायचे. बाकी खाद्यपदार्थ इ.इ. नेहमीप्रमाणेच झकास!!! कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल, उदा. "पॉस ईस्ते?" कसे आहात? "कालिमेऽरा!" गुड मॉर्निंग, "कालिनिख्ता", गुड नैट, "एफ्खारिस्तो पॉल्ला", थँक्यू व्हेरी मच, "ओला काला", ऑल राईट, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

डायोनिसिअस चा रंगमंच नाही बघीतला कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला असे सांगण्यात आले की थिएटरात काही शोज होतात आणि त्यांचा त्यादिवशीचा शो रात्री होता त्यामुळे दुपारी आतून रंगमंच बघायला मनाई होती. आम्हाला रात्री जमणं शक्य नव्हतं म्हणून तो राहून गेला, पुन्हा केव्हातरी :)
कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल
हो मीसुद्धा काही बेसिक ग्रीक शब्द शिकून घेतले होते उदा: कॅलिस्पेऽर - गुड ईव्हनिंग, नॅ - येस, एफ्खारिस्तो - थँक्यू, सिम्फोनी- ओके, पोसो कानी- हाऊ मच इज ईट?, सिग्नोमी- सॉरी, कातालवा- आय गेट ईट, पॅरॅकॅएलो - एस्क्युज मी तालिमेएरागोतेरा - सी यू लेटर :) धन्यवाद.

In reply to by सानिकास्वप्निल

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 23:35
ओह ओक्के :) बाकी ग्रीक शिकून घेतलेत हे उत्तम केलेत. :) अवांतरः मायसीनीला (ग्रीक उच्चार मिकेनाइ) गेलेलात काय? अ‍ॅटिकामध्ये नाही, पेलोपोनीसमध्ये आहे पण अथेन्सहून तसे जवळ आहे. कदाचित पुढच्या भागात येत असेलही त्याचे वर्णन पण शेवटी आगामेम्नॉनच्या घराबद्दल उत्सुकता मावत नाही म्हणून विचारले इतकेच. :)

In reply to by बॅटमॅन

आम्ही अथेन्समध्ये फक्त दोनच दिवस होतो आणि जे पाहिले त्याबद्दल वृत्तांत लिहिले आहेच :) बाकी पुन्हा संधी कधी मिळाली तर नक्की हे सगळं बघु हाकानाका :) धन्यवाद

मस्त चाललीय सफर ! मस्त फोटो. "लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस" विषेश आवडला. "ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले." यावरून ग्रीक आणि भारतीय संस्कृत्यांचे नाते किती अभेद्य आहे हे अधोरेखीत झाले ;) पुभाप्र

पैसा Mon, 06/30/2014 - 10:40
प्रवासवर्णन आणि फटु अप्रतिम आहेत. त्या ग्रीक सैनिकांचे कपडे अजून जुन्या स्टायलीतले दिसताहेत. असे घेराचे अंगरखे आपल्याकडेही मुघल काळात वापरात होते.
अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स . सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही हॉटेल खालूनचं टॅक्सी पकडली आणि अरिस्तेप्पू स्ट्रीटवरच्या लायकाबेट्टस टेलेफेरीकला पोहोचलो. टेलेफेरीक ही एक केबल रेल्वे आहे जी तुम्हाला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. ह्याला फनीक्युलर रेल्वे असे ही म्हटले जाते.

दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही

संजय क्षीरसागर ·

चाणक्य Fri, 06/27/2014 - 09:54
हसनजींनी सुरूवात खरच जीवघेणी केलीये...तुमच्या लिखाणाची सुरूवातही मस्त. आणि तुम्ही लिहीलेल्या ग्रेसच्या ओळी सुद्धा लाजवाब.

माधुरी विनायक Fri, 06/27/2014 - 13:10
उर्दू ही प्रेमाच्या अभिव्यक्तीची देखणी भाषा. खूपच सुरेख लिहिलंय तुम्ही.. कोणे एके काळी ऐकलेल्या आणि नकळत लक्षात राहिलेल्या अशाच दोन तरल ओळी आठवल्या.. गुनगुनाती हुई आती है फ़लक से बुंदें कोई बदली तेरे पाज़ेब से टकराई है... पाजेब - पैंजण

भूलेसे मुस्कुराओ तो, मोती बरस पडे पलकें उठाके देखो तो, कलीयां भी हस पडे खुशबू तुम्हारी जुल्फकी, फूलोंसे कम नही । स्स्ही...!!! संक्षीसेठ, गझल भारी आहे, पण मी अजून ''मरिजे मुहब्बत''मधुन बाहेर पडलो नाही. :)
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम |
-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरीज़े मुहोब्बतचा स्वरसाज, गुलाम अलींचा पहिल्या शब्दापासून लागलेला लक्षवेधी स्वर आणि प्रत्येक शेराच्या शेवटी दिसणारी उस्ताद क़मर जलालवींची कमाल प्रतिभा, ग़ज़लचा मूड क्षणोक्षणी वाढवत नेते. तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहौल वेगळा आहे. शब्द साधे आहेत, चाल सोपी आहे पण आषय उत्कट आहे. ही ग़ज़ल अभिव्यक्तीपेक्षा अनुभवात सरस आहे. फक्त प्रेम करता यायला हवं, मग प्रेयसीबद्दल कोणताही शिकवा राहात नाही कारण तीनं तुमची दुनिया जन्नत केलेली असते!

In reply to by संजय क्षीरसागर

तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! :) संक्षीसेठ, बिना पेगची 'ती'आणि 'मरिजे मुहोब्बत' या गझलेची आठवण व्हावी अशी ती सुंदर गझल. आणि पेग घेतल्यावर तर ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' वर माणुस घुटमळु लागेल आणि मग आनंदापेक्षा त्रास व्हायला लागेल. दिलकश असलेली ही गझल केवळ सुंदरच. बशीर बद्रचा एक सुंदर शेर आहे- चांद चेहरा, जुल्फ दरया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने दे दिया क्या क्या मु़झे. सालं सर्व तुला दिलं आणि आमच्या वाट्याला काय तर ''दिल मुश्तरिब है'' हेच वाट्याला येतं, एक तर प्रेम या गोष्टीपासून माणसाने चार हात दूर राहावं (असं दूर थोडी राहता येतं म्हणा) आणि एकदा की तुमच्या मनाने मनकायाप्रवेश केला मी मग तुम्ही कुठलेच उरत नाही म्हणुन तुम्हे ''दिल लगाने को किसने कहा था'' असे ऐकावं लागतं. `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहोल वेगळ आहे हे मान्यच. शब्द साधे आहेत म्हणुन म्हणा किंवा चाल म्हणुन म्हणा तुलनेत 'मरिजे मुहोब्बत' शब्द, आशयात भारीच आणि गायन असं की आत नुसतं काहुर माजावं इतकी ती सुंदर आहे, असे मला वाटते. प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते. असो, अशाच चांगल्या चांगल्या गझला आणा ऐकायला त्यांच्या भावार्थाचा आनंद लुटायला मजा येत आहे. आभार. अवांतर : आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मुड काही खास आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/03/2014 - 00:28
आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मूड काही खास आहे, असे वाटते.
सर, संदर्भ वेगळे असतात म्हणून मूड वेगळा वाटतो, माणूस एकच आहे! इतर वेळी दिमाग दिमागसे उलझता है, ग़ज़ल तो दिलका दिलसे उलझ जाना है|
चांद चेहरा, जुल्फ दरिया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने, दे दिया क्या क्या मु़झे |
आयला, तुम्ही सुद्धा एकदम शायराना मिज़ाज़ आहात. तुम्हें दिल लगानेको किसने कहा था, बहेल जाएगा दिल बहेलते बहेलते | या ओळीत तर क़मर जलालवींची, काव्यविषयाशी एकतानता ठेवण्याची आणि आयुष्याची एक दारुण वास्तविकता सहजपणे लिहून जाण्याची, प्रतिभा काही और आहे. जिच्याशी मुहोब्बत केली ती मिळत नाही, तो सल तर कायम राहातो आणि तिच्याशिवाय जगतांना हेच वाटत राहातं की, दिवस तसेही सरलेच असते, कशाला कुणासमोर इतका हळवा झालो. हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |
प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते.
सहमत!

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/03/2014 - 01:35
जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, त्यामुळे कदाचित मला `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही', माझीच ग़ज़ल वाटते. रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' तुम बादशा-ए-हुस्न हो, हुस्ने जहान हो जाने वफ़ा हो और, मोहोब्बतकी शान हो | ही वफा़दारी मुहोब्बतशी आहे, स्मृतींशी नाही. प्रेमी असतील, नसतील, पण प्रेम कायम असेल. ज्यांना त्याची जादू कळेल ते एकमेकांशी जोडले जातील आणि तीच इश्काची खरी शान आहे. आणि ज्यांना ती कळली, त्यांच्यासाठी दुनिया जन्नत आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, आय हाय.... खल्ल्लास...! सही संक्षीसेठ. :) रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. वॉव...! सुंदर. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मान्य नाही. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' असं कुठं असतं काहो. प्रेम असं दहादा करता येत असतं का ? आणि एकावर प्रेम केलंत तस्सचं दुस-यावर करता येत असत का ? आणि वेळ, काळ परिस्थितीनुसार जरी कोणी आवडलं तरी पहिल्याप्रेमासारखं हे दुसरं प्रेम रंगवता येईल का ? आपल्याच्याने शक्य नाही बॉ. पहिलंच प्रेम सतत समुद्राच्या लांटासारखे मनावर आदळत राहील. आणि असं नाही झालं तर माणसंच नव्हे तर मला पानं, फुलं, हवा, मंदिरं, रस्ते, शब्द,कवितेच्या ओळी आणि तिच्या सहवासातील प्रत्येक एकेक गोष्ट विचारेल की अरे ती कुठेय...? मी काय बोलणार. इन्हीं रास्तो ने जिन पर कभी तुम थे साथ मेरे मुझे रोक रोक के पुछा की तेरा हम सफर कहा है -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावनिकतेचा कौल नेहमी तुमच्या बाजूनं आहे. पण वास्तवाशी हुज्जत घालता येत नाही. इट इज ऑलरेडी देअर. स्ट्रेट इन फ्रंट ऑफ यू. मी गेलो तर, उर्वरित आयुष्यात ती दु:खी राहून काय उपयोग? आणि प्रेमात प्रतारणा होऊ शकत नाही हे मान्य, पण स्मृतींशी इमान राखून, दु:खच पदरी येत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा. काल्पनिक गोष्ट असल्यानं नेमका निर्णय होऊ शकत नाही. पण मला वाटतं, प्रश्न प्रेमाचा आहे. व्यक्ती आता परत येणारच नाही म्हटल्यावर, भूतकाळ बाजूला ठेवून वर्तमान स्विकारायला हवा.... आणि वर्तमानाची जन्नत करायची असेल तर, पुन्हा प्रेमात पडायला हवं! देअर इज नो वे. दुनिया समजत असेल पण, ती व्यक्तीशी प्रतारणा नाही, प्रेमाची शान आहे.

प्रिय संक्षीसेठ, आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही लिहिणार की नै एवढंच सांगा. नसेल लिहायचं तर आपली दोस्ती खतम. जब से तुने मुझे दिवाना बना रखा है. -दिलीप बिरुटे

चाणक्य Fri, 06/27/2014 - 09:54
हसनजींनी सुरूवात खरच जीवघेणी केलीये...तुमच्या लिखाणाची सुरूवातही मस्त. आणि तुम्ही लिहीलेल्या ग्रेसच्या ओळी सुद्धा लाजवाब.

माधुरी विनायक Fri, 06/27/2014 - 13:10
उर्दू ही प्रेमाच्या अभिव्यक्तीची देखणी भाषा. खूपच सुरेख लिहिलंय तुम्ही.. कोणे एके काळी ऐकलेल्या आणि नकळत लक्षात राहिलेल्या अशाच दोन तरल ओळी आठवल्या.. गुनगुनाती हुई आती है फ़लक से बुंदें कोई बदली तेरे पाज़ेब से टकराई है... पाजेब - पैंजण

भूलेसे मुस्कुराओ तो, मोती बरस पडे पलकें उठाके देखो तो, कलीयां भी हस पडे खुशबू तुम्हारी जुल्फकी, फूलोंसे कम नही । स्स्ही...!!! संक्षीसेठ, गझल भारी आहे, पण मी अजून ''मरिजे मुहब्बत''मधुन बाहेर पडलो नाही. :)
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम |
-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरीज़े मुहोब्बतचा स्वरसाज, गुलाम अलींचा पहिल्या शब्दापासून लागलेला लक्षवेधी स्वर आणि प्रत्येक शेराच्या शेवटी दिसणारी उस्ताद क़मर जलालवींची कमाल प्रतिभा, ग़ज़लचा मूड क्षणोक्षणी वाढवत नेते. तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहौल वेगळा आहे. शब्द साधे आहेत, चाल सोपी आहे पण आषय उत्कट आहे. ही ग़ज़ल अभिव्यक्तीपेक्षा अनुभवात सरस आहे. फक्त प्रेम करता यायला हवं, मग प्रेयसीबद्दल कोणताही शिकवा राहात नाही कारण तीनं तुमची दुनिया जन्नत केलेली असते!

In reply to by संजय क्षीरसागर

तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! :) संक्षीसेठ, बिना पेगची 'ती'आणि 'मरिजे मुहोब्बत' या गझलेची आठवण व्हावी अशी ती सुंदर गझल. आणि पेग घेतल्यावर तर ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' वर माणुस घुटमळु लागेल आणि मग आनंदापेक्षा त्रास व्हायला लागेल. दिलकश असलेली ही गझल केवळ सुंदरच. बशीर बद्रचा एक सुंदर शेर आहे- चांद चेहरा, जुल्फ दरया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने दे दिया क्या क्या मु़झे. सालं सर्व तुला दिलं आणि आमच्या वाट्याला काय तर ''दिल मुश्तरिब है'' हेच वाट्याला येतं, एक तर प्रेम या गोष्टीपासून माणसाने चार हात दूर राहावं (असं दूर थोडी राहता येतं म्हणा) आणि एकदा की तुमच्या मनाने मनकायाप्रवेश केला मी मग तुम्ही कुठलेच उरत नाही म्हणुन तुम्हे ''दिल लगाने को किसने कहा था'' असे ऐकावं लागतं. `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहोल वेगळ आहे हे मान्यच. शब्द साधे आहेत म्हणुन म्हणा किंवा चाल म्हणुन म्हणा तुलनेत 'मरिजे मुहोब्बत' शब्द, आशयात भारीच आणि गायन असं की आत नुसतं काहुर माजावं इतकी ती सुंदर आहे, असे मला वाटते. प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते. असो, अशाच चांगल्या चांगल्या गझला आणा ऐकायला त्यांच्या भावार्थाचा आनंद लुटायला मजा येत आहे. आभार. अवांतर : आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मुड काही खास आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/03/2014 - 00:28
आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मूड काही खास आहे, असे वाटते.
सर, संदर्भ वेगळे असतात म्हणून मूड वेगळा वाटतो, माणूस एकच आहे! इतर वेळी दिमाग दिमागसे उलझता है, ग़ज़ल तो दिलका दिलसे उलझ जाना है|
चांद चेहरा, जुल्फ दरिया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने, दे दिया क्या क्या मु़झे |
आयला, तुम्ही सुद्धा एकदम शायराना मिज़ाज़ आहात. तुम्हें दिल लगानेको किसने कहा था, बहेल जाएगा दिल बहेलते बहेलते | या ओळीत तर क़मर जलालवींची, काव्यविषयाशी एकतानता ठेवण्याची आणि आयुष्याची एक दारुण वास्तविकता सहजपणे लिहून जाण्याची, प्रतिभा काही और आहे. जिच्याशी मुहोब्बत केली ती मिळत नाही, तो सल तर कायम राहातो आणि तिच्याशिवाय जगतांना हेच वाटत राहातं की, दिवस तसेही सरलेच असते, कशाला कुणासमोर इतका हळवा झालो. हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |
प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते.
सहमत!

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 07/03/2014 - 01:35
जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, त्यामुळे कदाचित मला `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही', माझीच ग़ज़ल वाटते. रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' तुम बादशा-ए-हुस्न हो, हुस्ने जहान हो जाने वफ़ा हो और, मोहोब्बतकी शान हो | ही वफा़दारी मुहोब्बतशी आहे, स्मृतींशी नाही. प्रेमी असतील, नसतील, पण प्रेम कायम असेल. ज्यांना त्याची जादू कळेल ते एकमेकांशी जोडले जातील आणि तीच इश्काची खरी शान आहे. आणि ज्यांना ती कळली, त्यांच्यासाठी दुनिया जन्नत आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, आय हाय.... खल्ल्लास...! सही संक्षीसेठ. :) रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. वॉव...! सुंदर. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मान्य नाही. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' असं कुठं असतं काहो. प्रेम असं दहादा करता येत असतं का ? आणि एकावर प्रेम केलंत तस्सचं दुस-यावर करता येत असत का ? आणि वेळ, काळ परिस्थितीनुसार जरी कोणी आवडलं तरी पहिल्याप्रेमासारखं हे दुसरं प्रेम रंगवता येईल का ? आपल्याच्याने शक्य नाही बॉ. पहिलंच प्रेम सतत समुद्राच्या लांटासारखे मनावर आदळत राहील. आणि असं नाही झालं तर माणसंच नव्हे तर मला पानं, फुलं, हवा, मंदिरं, रस्ते, शब्द,कवितेच्या ओळी आणि तिच्या सहवासातील प्रत्येक एकेक गोष्ट विचारेल की अरे ती कुठेय...? मी काय बोलणार. इन्हीं रास्तो ने जिन पर कभी तुम थे साथ मेरे मुझे रोक रोक के पुछा की तेरा हम सफर कहा है -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावनिकतेचा कौल नेहमी तुमच्या बाजूनं आहे. पण वास्तवाशी हुज्जत घालता येत नाही. इट इज ऑलरेडी देअर. स्ट्रेट इन फ्रंट ऑफ यू. मी गेलो तर, उर्वरित आयुष्यात ती दु:खी राहून काय उपयोग? आणि प्रेमात प्रतारणा होऊ शकत नाही हे मान्य, पण स्मृतींशी इमान राखून, दु:खच पदरी येत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा. काल्पनिक गोष्ट असल्यानं नेमका निर्णय होऊ शकत नाही. पण मला वाटतं, प्रश्न प्रेमाचा आहे. व्यक्ती आता परत येणारच नाही म्हटल्यावर, भूतकाळ बाजूला ठेवून वर्तमान स्विकारायला हवा.... आणि वर्तमानाची जन्नत करायची असेल तर, पुन्हा प्रेमात पडायला हवं! देअर इज नो वे. दुनिया समजत असेल पण, ती व्यक्तीशी प्रतारणा नाही, प्रेमाची शान आहे.

प्रिय संक्षीसेठ, आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही लिहिणार की नै एवढंच सांगा. नसेल लिहायचं तर आपली दोस्ती खतम. जब से तुने मुझे दिवाना बना रखा है. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुमच्या हृदयात फक्त एक दिलरुबा हवी, मग स्वर्ग आकाशाच्या पलिकडे नाही. तुमचं रोजचं आयुष्यच जन्नत आहे. तुमची दिलरुबाच तुमची परी आहे. फक्त नज़रिया बदलायचा अवकाश, एखादीनं तुम्हाला मोहवण्याचा अवकाश आहे. सम्राट अकबर, युवराज सलीमला विचारतो, ‘या नाचिज़ अनारकलीत तू असं काय पाहिलंस’? अकबराला वाटतं, युवराजाच्या मेहेर नज़रेची आस असणार्‍या, सल्तनतेत इतक्या लावण्यवती आहेत की त्याचं मन बदलणं अवघड नाही. आणि सलीम अकबराला कमालीचं दिलकष उत्तर देतो, ‘जहांपनाह, अनारकलीको देखनेके लिए तो सलीमकी नज़र चाहीए’. तुमची दिलरुबा दुनियेसाठी काय आहे यानं काही फरक पडत नाही.

एक वाचलेच पाहिजे असे पुस्तक...नशायात्रा....लेखक: तुषार नातू (उर्फ, माझ्या द्रुष्टीने आधूनिक वाल्मिकी...)

मुक्त विहारि ·

In reply to by किसन शिंदे

रामपुरी Fri, 06/27/2014 - 03:02
पूर्णपणे ताबा मिळवता येत असेल तर त्याला "व्यसन" कसे म्ह्णता येईल? :)

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे Fri, 06/27/2014 - 11:45
शिंदे साहेब माझा स्वतःवर संपूर्णपणे ताबा आहे असे म्हणणारे गर्द च्या व्यसनातून बाहेर पडू शकत नाहीत. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव आहेत( ऐकीव नाहीत) त्यामुळे कोणताही माणूस किंवा स्त्री जर केवळ गम्मत म्हणून किंवा किक म्हणून किंवा एक अनुभव म्हणून जर गर्द किंवा अफूचे सेवन करणार असेल तर त्याला कळकळीने परावृत्त करणे हे फार महत्त्वाचे आहे. चार किंवा पाच डोस मध्ये आयुष्यभरासाठी विळख्यात अडकणारे कित्येक लोक आहेत. गर्द बद्दल खरच अशी परिस्थिती आहे कि विषाची परिक्षासुद्धा पाहू नये

In reply to by किसन शिंदे

व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे. हे सत्य लक्षात न घेता "आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं." असा गैरसमज करून घेऊन व्यस॑नाधिन झालेली उदाहरणं नेहमिचीच आहेत. एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिल्यास (कारण तेथे आपल्या व्यसनाबद्दल खरेपणाने बोलणारी मंडळी सापडण्याची जास्त शक्यता असते) खात्री करून घेता येईल.

In reply to by किसन शिंदे

आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं.
करेकट ! ( माझ्या कपाटात ग्लेन्लेव्हिट खंबा ऑक्टोबर महिन्यापासुन आहे ....पण "निर्विकार" अवस्था अनुभवतानाच दारु प्यायची *i-m_so_happy* ह्या अटी मुळे पडुन आहे *sad* ह्याला ताबा म्हणता येईल काय ? *biggrin* ) बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही असे ऐकुन आहे ! गांजा किंव्वा भांग सारखी व्यसनं "जीवनमुक्त" माणसांनी करायला हरकत नाही असे आपले स्पष्ट मत आहे *crazy* उरलेल्या इतर व्यसनांच्या बाबतीत बोलायचा आपल्याला "अधिकार" आणि "अभ्यासही" नाही *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 13:30

बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही

सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही किंवा गांजा देखील ओढत नाही.

In reply to by मृत्युन्जय

गवि Fri, 06/27/2014 - 13:36
सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही
अगदी अगदी.. गाढवच ते.. (हा निव्वळ जोक आहे. ही व्यसने हानीकारक आहेत याची नोंद वाचकांनी घ्यावी..)

In reply to by गवि

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 15:10
गाढवाला दारुची चव काय? अतिअवांतरः गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर पाहिला नाही. एकदा घराच्या गेटजवळ सावलीत एक गाढव उभे होते. त्याच्या समोर उभा राहिलो. ते जरा बिचकले, पण मी तिथेच उभा राहिलो. एक पाऊल पुढे गेलो. जरा बिचकले, पण तिथेच उभा राहिलो. असे करतकरत त्याला हात लावला, त्यानेही लावून घेतला. लय मजा आली.

In reply to by बॅटमॅन

सुनील Fri, 06/27/2014 - 15:38
त्याच्या समोर उभा राहिलो
छॅ! गाढवाच्या समोर उभे राहण्यात काय मजा नाय. मागे उभे राहून पहा!! ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 17:51
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे. बाकी गाढवाची पिल्ले असत्तात खुप निरागस. मोठ्या गाढवांच्या कधी मागे नाही गेलो ;)

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 17:59
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे.
अशीच. गाढव हा प्राणी मला आवडायचा तरी लोकं उगीच दुस्वास करायचे ते आवडत नव्हतं, शिवाय गाढवं जवळ गेलो तर बुजायची. म्हणताना मग एकदा अनायासे घराजवळच दिसलं गाढव नि हात लावला झालं. :) बाकी लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, सबब मोठ्या गाढवावरच समाधान मानावे लागले.

In reply to by बॅटमॅन

वॉल्टर व्हाईट Sat, 06/28/2014 - 03:25
गाढव बॅचलर होते का ? ( लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, यासबबी नुसार मोठ्या गाढवांवर त्यांच्या बायकांचा हक्क असावा )

In reply to by वॉल्टर व्हाईट

बॅटमॅन Mon, 06/30/2014 - 12:32
कल्पना नाही ओ. मंगळसूत्र किंवा अंगठी/तोडा यांपैकी काहीच दिसले नाही, शिवाय आम्हांस गर्दभी प्राकृत येत नसल्याने ते विचारताही आले नाही.

निशदे Fri, 06/27/2014 - 03:55
व्यसन हा एक मानसिक आणि शारिरिक रोगच असतो. 'नॉर्मल' मेंदूमध्ये जशी साद-प्रतिसादांची मालिका चालू असते तशी व्यसनी लोकांमध्येही त्यांची स्वतःची अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन मालिका चालू असते. दुर्दैवाने लोकांना सदर मनुष्य स्वतःच्या मर्जीने असे करतोय असेच वाटत असते आणि मग व्यसनी मनुष्य त्यातून बाहेर येण्याऐवजी 'lack of support' मुळे अधिकाधिक गर्तेत रुतत जातो.

प्रचेतस Fri, 06/27/2014 - 07:16
भयानक व्यसन आहे हे. तुषार नातूंची कहाणीचा एक भाग याआधीही वाचला होताच. ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांच्या सुप्रसिद्ध 'शांताराम' कादंबरीतूनही गर्दच्या व्यसनाचे, कोल्ड टर्कीचे भयानक दर्शन झाले होते.

इनिगोय Fri, 06/27/2014 - 08:10
मुवि, हे मिपावर आणल्याबद्दल आभार. तुषार नातूंच्या ब्लाॅगची ओळख एका मिपाकराकडूनच झाली. ब्लाॅगवरचं जवळजवळ सगळं लेखन वाचलं आहे. हा माणूस अतिशय सरळसोटपणे जे जे घडलं ते सगळं लिहित गेला आहे. सुन्न व्हायला होतं, त्यांच्या कुटुंबीयांनी किती, किती काळ आणि कसं सहन केलं असेल याचा विचार येत राहतो. गर्दच्या नादापायी या माणसाने घेऊ नये ते ते सगळे अनुभव घेतले आहेत. आणि ते सगळे शब्दात मांडले आहेत. व्यसनी ते (यशस्वी.. हे खूप महत्त्वाचं आहे) समुपदेशक हा त्यांचा प्रवास मूळीच सोपा नाही. लिहिणार्यासाठीही नाही आणि वाचणार्यासाठीही नाही. किंबहुना वाचता वाचता या माणसाची कीव येते, चीड येते, आणि त्याचवेळी कौतुकही वाटतं. वरच्या उतार्यात दिलेला प्रसंग काहीच नाही अशा घटना नातूंच्या आयुष्यात घडल्या आहेत, आणि तिरस्करणीय असलं तरी लोकांना व्यसनी माणसाची मानसिकता समजायलाच हवी म्हणून त्यांनी ते लिहून काढलं आहे. गर्दचा "विळखा" या शब्दाची यथार्थता प्रत्येक ब्लाॅगपोस्टमधून जाणवत राहते. व्यसनी माणसांबाबत कळकळ असणार्यांनी, आणि नसणार्यांनीही हे अनुभव जरूर वाचण्यासारखे आहेत.

एसमाळी Fri, 06/27/2014 - 09:09
तुषार नातु यांचे सर्वलेखन चेपुवर एका बंदिस्त कम्युनिटीत वाचले होते.काही दिवसापुर्वी लोकसत्तामध्ये पण या पुस्तकाचा काही भाग आलता.जमल्यास लिंक देतो.निरागस पणे मांडलय सगळ.

एस Fri, 06/27/2014 - 11:15
जीवघेणा अनुभव आहे. व्यसनी माणसाच्या आयुष्याची वाट लागते त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे जवळच्या नात्यात पाहतो आहे. पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

धर्मराजमुटके Fri, 06/27/2014 - 11:30
बोलल्या जात नाही, केल्या जात नाही सारख्या शब्दांचे शुद्धलेखन सुधारा असा एक आपुलकीचा सल्ला. एकंदरीतच अशा प्रकारे चुकीचे लिहीण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे असे दिसत आहे.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Fri, 06/27/2014 - 11:47
बोली भाषेत आणि लिहिण्याच्या भाषेत साधारणपणे बदल असतो. तसा तो असावा. एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात. तशी ती गरजच असते. लेखकाने लिहीलेले लिखाण हे परिचय निवेदन आहे. जाता जाता : ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

प्रचेतस Fri, 06/27/2014 - 11:51
एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात.
ह्याबाबतीत सहमत. पण तरीही प्रमाणभाषेत लिहितांना बोलीभाषेचा वापर केला तर त्यात वावगे अथवा अशुद्ध आहे असे मला वाटत नाही. उदा. श्री.ना. पेंडसे अथवा गोनीदांचे लेखन पहा.
ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?
माहीत नै ब्वा.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Fri, 06/27/2014 - 12:21
आपण ज्या लेखनाचा संदर्भ देत आहात ती बहुतेक सर्व कथा, कादंबर्‍या किंवा ललीत लिखाण आहे. रिपोर्ताज पद्धतीच्या लि़खाणात बोलीभाषेचा वापर करु नये असे माझे मत. याउपर ही चर्चा येथेच थांबवूया. धाग्याचा मुळ उद्देश हा पुस्तक परिचयाचा आहे त्या अनुषंगाने प्रतिसाद येवोत. धागा विनाकारण भरकटविण्याचे श्रेय की पाप :) आपल्या माथी नको !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Fri, 06/27/2014 - 13:40
या चार्टवरुन एलेसडी, भांग आदि पदार्थ तंबाखू आणि मद्यापेक्षा कमी सवयखोर आणि कमी हानीकारक आहेत असं मत होतं. आणि असं मत होणं डेंजरस आहे. सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं.

In reply to by गवि

सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं. >>> करेक्ट ! हा ग्राफ विकीपेडीयावर मिळालाय ... ह्यात नक्की स्केल काय आहे ते पहायला हवे ...

चौकटराजा Fri, 06/27/2014 - 13:09
आमच्या अगोदरच्या म्हणजे १९२० चे सुमारास जन्माला आले व २००० पर्यंत मरण पावले अशा पिढीत जवळ जवळ प्रत्येकाला सुपारी, पान, तंबाखू, जर्दा, तपकीर, सिगरेट, दारू चहा ई पैकी कशाचे तरी व्यसन असायचेच. आता त्यानंतर या प्रकारच्या व्यसनांच्या प्रमाणात खूपच सुधारणा झाली आहे. निदान भारतात तरी. माझ्या सख्या मामीचा सख्खा पुतण्या गर्द च्या व्यसनात सापडून देवाला प्रिय झाला. माझे मामे आते ई प्रकारचे सर्व भाउ या सर्वांपासून दूर आहेत. पण त्यांचे वडील मात्र नव्हते. माझा स्वता: चा एक अनुभव असा की २००३ साली माझ्या हाताला कंपाउंड फ्रॅकचर झाले त्यावेळी मला भूल देण्यासाठी जो पदार्थ वापरला तो या नार्कोटिक्सच्या पैकी एक होता. त्याच्या सहवासात मला जो अनुभव आला तो माझ्या ६१ वर्षाच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे. त्यामुळे सिगरेट ( ही ही मी एकदा ओढून पाहिली आहे ) पेक्षा नर्कोटिक्स यात माणूस वेगाने का ओढला जातो याची कल्पना मी करू शकतो. असे कुठेतरी वाचले आहे की त्याचे अत्याकर्षण पेशीच्या पातळीला तयार होते. ( असेच साखरेचे आकर्षण मधुमेह झाल्यावर होत असावे काय ? ) माझे स्वता: चे मत असे आहे की तुम्ही फ्लर्ट असत रहा. म्हणजे व्यसन लागत नाही. अगदी रोजचा मोर्निगं वॉक देखील एकाच मार्गावरून करू नका. पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.

In reply to by चौकटराजा

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 13:32
सख्या मामीचा सख्खा पुतण्या तुमच्या मामीचा पुतण्या तुमचा मामेभाऊच असणार की? इतके लांबवुन का सांगितले नाते?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे Fri, 06/27/2014 - 15:22
चौरा साहेब, ]माझ्या छातीत पाणी झाले होते तेंव्हा ते काढून त्याची तपासणी करायची होती. तेंव्हा मला १५ मिग्राम मोर्फिन दंडात इंजेक्शन ने दिले होते. आणि पाणी काढणारा डॉक्टर माझा कॉलेजमध्ये ३ वर्षे वरिष्ठ होता. मार्च चा महिना आणि पुण्यातील सकाळ तेंव्हा मला फार छान वाटत होते. सगळीकडे आनंद भरून राहिला होता. माझा वरिष्ठ माझ्या छातीतून पाणी काढण्यासाठी सुई घेऊन आला तेंव्हा मी स्वतःहून पोझिशन घेऊन बसलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो.त्याने मला बधिर करणारे इंजेक्शन दिले आणि माझ्या छातीत सुई खुपसली पण त्यातून पाणी आले नाही त्यावर मी त्याला म्हटले कि सर असे होते टेन्शन घेऊ नका. कदाचित तुम्ही लिव्हर मध्ये गेला असाल. परत प्रयत्न करा आणि जर वर सुई घुसवा. त्यावर त्याला अधिकच टेन्शन आले. पण दुसर्या वेळेस सुई घातल्यावर पाणी आले. ते एका परीक्षनळीत आणि बाटलीत घेऊन त्यांनी सुई काढली आणि मला परत वार्डात नेले. मी त्यांना मजेत म्हणत होतो कि सर तुम्ही उगाच टेन्शन घेतले जसे काही हा प्रकार दुसर्याच व्यक्तीवर चालू होता. हा अनुभव अगदी पूर्ण शुद्धीत असताना आणि पूर्ण ज्ञानासह घेतला आहे. परंतु हा अनुभव सर्वात जास्त आनंददायी आहे असे वाटले नाही त्यापेक्षा सेक्स(ORGASM) चा आनंद वैयक्तिक दृष्ट्या मला अत्त्युच्च आनंदाचा वाटतो.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा Fri, 06/27/2014 - 18:40
मी घेतलेला अनुभव अर्ध बेहोशीतला असावा . पार सप्तस्वर्ग फिरून आलो. नंतर आय सी यू त डॉ ना म्हणालो' ईटस वोज एस्पीरियन्स ओफ लाईफ टाईम ' त्यावर ते मला म्हणाले 'तसे काही नसते तुम्ही एकदम मेरी मूडमधे अनास्थेशियात गेलात म्हणून तुम्हाला असा अनुभव आला असावा.

पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.
आणि जगत रहाण्याची चटक ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा Fri, 06/27/2014 - 13:22
यावर एक उपाय असा की त्यातही विचारांशी फ्लर्टिंग करीत रहायचे.. जीवन सुंदर आहे असे अनुभवतानाच मरणात खरोखर जग जगते किंवा सुंदर मी होणार हो मरणाने जगणार अशा कवितांचा ही संस्कार मनावर करायचा. न जीवनाची आसक्ती न आत्महत्येचे आकर्षण असा प्रयत्न करायचा !!!

म्हैस Fri, 06/27/2014 - 13:56
व्यसन म्हणजे "स्वत: विकत घेतलेले" मानसीक अपंगत्व. व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे.
अगदी अगदी .. लोकांना काळात असतं पण वळत नसत.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 15:01
....डोंबिवलीच्या मॅजेस्टिक मध्ये सध्या उपलब्ध आहे.... लेखकाच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे.त्यांची टेलीफोनिक परवानगी घेतली आहे.... http://tusharnatu2013.blogspot.in/2013/03/introductory-post.html

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 15:26
एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराचे , आभार मानू नयेत असे वाटते. आभार मानायचेच असतील तर, तुषार नातू यांचे माना.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 15:23
आणि समजा जर एखादा व्यसनांच्या आहारी गेलाच असेल तर घरच्यांनी काय उपाय-योजना करावी? ह्याची पण सुंदर माहिती दिली आहे. पुस्तक शक्यतो विकत घेऊन वाचा, कारण ह्या पुस्तकाची रॉयल्टी त्यांना मिळणार आहे. एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

In reply to by मुक्त विहारि

+१०० एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

प्यारे१ Fri, 06/27/2014 - 16:36
वाचायलाच हवं असं पुस्तक दिसतंय. इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल. दारु, ड्रग्स चे दुष्परिणाम लगेच दिसतात, बाकीचे लगेच नाहीत दिसत पण परिणाम करुन जातातच. आधीच नकार हे एक उत्तर जास्त परिणामकारक असणार आहे असं वाटतं. देर आये दुरुस्त आये वगैरे बोलायला सोपं असलं तरी वागताना कमीजास्त आठवण करुन देणारंच असतंय. भविष्यात कधीही काहीही झालं की लगेच जनता बोलायला मोकळी असते... 'म्हत्लं नव्हतं? हे तसलंच आहे म्हणून' असं काही सुरु होतं.

In reply to by प्यारे१

आदूबाळ Fri, 06/27/2014 - 17:16
इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल
ये बात!

विटेकर Mon, 06/30/2014 - 11:55
स्साला २ दिवस अस्वस्थ होतो.. सगळा ब्लोग वाचून काढला.. लै म्हन्जे लैच त्रास झाला.. अदभुत आणि भयचकित होऊन नकळत पुन्हा पुन्हा ब्लोग्वर जात होतो... धड वाचवत नव्हते आणि ना ही सोडवत ! नारायण धारपांच्या कथेसारखे ! फरक इतकाच हे सारे खरे खरे घडलेले होते ... मी ललित लेखन सहसा वाचत नाही .. आता फारशी आवड ही राहीली नाही .. पण हे एक हाती वाचले ! आमचा साष्टांग नमस्कार तुमच्या मित्राच्या कुटुंबीयाना आणि नन्तर त्यांनाही कळवा. ..... .. . राहून राहून एक सतत वाटत राहीले , इतक्या सहज ब्राउन शुगर मिळते कशी ? कायद्याचे रक्षक , माणसे आहेत की राक्षस ? कुटूम्बे उद्धस्त होतात आणि तरीही आमचे शासन जागे होत नाही ?

In reply to by विटेकर

प्रसाद प्रसाद Mon, 06/30/2014 - 15:37
अगदी असेच वाटले...... अगदी मी जे अनुभवले ते तुम्ही लिहून सांगितले आहे विटेकर साहेब. तुमच्याइतके व्यवस्थित कदाचित मला लिहिता आले नसते.

पैसा Mon, 06/30/2014 - 12:34
पुस्तकाची ओळख चांगली आहे. पण मला वाचणे शक्य नाही. कुत्र्याचेही असे हाल करू शकतो तो इसम माणूस राहिलेला नसतोच. त्याच्याबद्दल कितीही प्रयत्न केला तरी दया/सहानुभूती वाटून घेणे शक्य दिसत नाही. त्यातून बाहेर आल्याबद्दल श्री नातू यांचे अभिनंदन. पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. "Once a bearer cheque always a bearer cheque" अशी काहीशी परिस्थिती आहे ही. आपल्या जवळचे कोणी या भयानक परिस्थितीत सापडू नये एवढी प्रार्थनाच आपण करू शकतो.

In reply to by पैसा

प्यारे१ गुरुवार, 07/03/2014 - 15:37
>>> पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. श्री. नातूंबद्दल शक्यता कमी वाटत आहे. कारण त्यांच्या फेबु प्रोफाईल वरुन ते स्वतः मुक्तांगण ला समुपदेशक म्हणून काम करत आहेत असं वाटतंय. बाकी इन जनरल सहमती.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 15:22
मलाही..'स्टोरी ऑफ इंडिया' नामक डाकुमेंट्रीत मायकेल वुड पेशावरला गेला असताना हे करून पाहतो, साला लय हेवा वाटला होता त्याचा.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/03/2014 - 15:48
(तेरा वर्षांच्या करिअर मध्ये सात जॉब करुन आठव्याचे वेध लागल्यावर पडलेला प्रश्न) *scratch_one-s_head* वारंवार नोकरी बदलणे /बदलाविशी वाटणे हे पण एक व्यसन असेल का ? असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे

In reply to by मराठी कथालेखक

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/03/2014 - 15:52
असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे
>>> स्काळ संध्याकाळ काली फॉसीफोरम ६ ३० घेत चला... शाबुदाण्याच्या गोळ्यातुन *lol*

In reply to by किसन शिंदे

रामपुरी Fri, 06/27/2014 - 03:02
पूर्णपणे ताबा मिळवता येत असेल तर त्याला "व्यसन" कसे म्ह्णता येईल? :)

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे Fri, 06/27/2014 - 11:45
शिंदे साहेब माझा स्वतःवर संपूर्णपणे ताबा आहे असे म्हणणारे गर्द च्या व्यसनातून बाहेर पडू शकत नाहीत. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव आहेत( ऐकीव नाहीत) त्यामुळे कोणताही माणूस किंवा स्त्री जर केवळ गम्मत म्हणून किंवा किक म्हणून किंवा एक अनुभव म्हणून जर गर्द किंवा अफूचे सेवन करणार असेल तर त्याला कळकळीने परावृत्त करणे हे फार महत्त्वाचे आहे. चार किंवा पाच डोस मध्ये आयुष्यभरासाठी विळख्यात अडकणारे कित्येक लोक आहेत. गर्द बद्दल खरच अशी परिस्थिती आहे कि विषाची परिक्षासुद्धा पाहू नये

In reply to by किसन शिंदे

व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे. हे सत्य लक्षात न घेता "आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं." असा गैरसमज करून घेऊन व्यस॑नाधिन झालेली उदाहरणं नेहमिचीच आहेत. एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिल्यास (कारण तेथे आपल्या व्यसनाबद्दल खरेपणाने बोलणारी मंडळी सापडण्याची जास्त शक्यता असते) खात्री करून घेता येईल.

In reply to by किसन शिंदे

आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं.
करेकट ! ( माझ्या कपाटात ग्लेन्लेव्हिट खंबा ऑक्टोबर महिन्यापासुन आहे ....पण "निर्विकार" अवस्था अनुभवतानाच दारु प्यायची *i-m_so_happy* ह्या अटी मुळे पडुन आहे *sad* ह्याला ताबा म्हणता येईल काय ? *biggrin* ) बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही असे ऐकुन आहे ! गांजा किंव्वा भांग सारखी व्यसनं "जीवनमुक्त" माणसांनी करायला हरकत नाही असे आपले स्पष्ट मत आहे *crazy* उरलेल्या इतर व्यसनांच्या बाबतीत बोलायचा आपल्याला "अधिकार" आणि "अभ्यासही" नाही *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 13:30

बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही

सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही किंवा गांजा देखील ओढत नाही.

In reply to by मृत्युन्जय

गवि Fri, 06/27/2014 - 13:36
सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही
अगदी अगदी.. गाढवच ते.. (हा निव्वळ जोक आहे. ही व्यसने हानीकारक आहेत याची नोंद वाचकांनी घ्यावी..)

In reply to by गवि

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 15:10
गाढवाला दारुची चव काय? अतिअवांतरः गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर पाहिला नाही. एकदा घराच्या गेटजवळ सावलीत एक गाढव उभे होते. त्याच्या समोर उभा राहिलो. ते जरा बिचकले, पण मी तिथेच उभा राहिलो. एक पाऊल पुढे गेलो. जरा बिचकले, पण तिथेच उभा राहिलो. असे करतकरत त्याला हात लावला, त्यानेही लावून घेतला. लय मजा आली.

In reply to by बॅटमॅन

सुनील Fri, 06/27/2014 - 15:38
त्याच्या समोर उभा राहिलो
छॅ! गाढवाच्या समोर उभे राहण्यात काय मजा नाय. मागे उभे राहून पहा!! ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 17:51
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे. बाकी गाढवाची पिल्ले असत्तात खुप निरागस. मोठ्या गाढवांच्या कधी मागे नाही गेलो ;)

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 17:59
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे.
अशीच. गाढव हा प्राणी मला आवडायचा तरी लोकं उगीच दुस्वास करायचे ते आवडत नव्हतं, शिवाय गाढवं जवळ गेलो तर बुजायची. म्हणताना मग एकदा अनायासे घराजवळच दिसलं गाढव नि हात लावला झालं. :) बाकी लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, सबब मोठ्या गाढवावरच समाधान मानावे लागले.

In reply to by बॅटमॅन

वॉल्टर व्हाईट Sat, 06/28/2014 - 03:25
गाढव बॅचलर होते का ? ( लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, यासबबी नुसार मोठ्या गाढवांवर त्यांच्या बायकांचा हक्क असावा )

In reply to by वॉल्टर व्हाईट

बॅटमॅन Mon, 06/30/2014 - 12:32
कल्पना नाही ओ. मंगळसूत्र किंवा अंगठी/तोडा यांपैकी काहीच दिसले नाही, शिवाय आम्हांस गर्दभी प्राकृत येत नसल्याने ते विचारताही आले नाही.

निशदे Fri, 06/27/2014 - 03:55
व्यसन हा एक मानसिक आणि शारिरिक रोगच असतो. 'नॉर्मल' मेंदूमध्ये जशी साद-प्रतिसादांची मालिका चालू असते तशी व्यसनी लोकांमध्येही त्यांची स्वतःची अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन मालिका चालू असते. दुर्दैवाने लोकांना सदर मनुष्य स्वतःच्या मर्जीने असे करतोय असेच वाटत असते आणि मग व्यसनी मनुष्य त्यातून बाहेर येण्याऐवजी 'lack of support' मुळे अधिकाधिक गर्तेत रुतत जातो.

प्रचेतस Fri, 06/27/2014 - 07:16
भयानक व्यसन आहे हे. तुषार नातूंची कहाणीचा एक भाग याआधीही वाचला होताच. ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांच्या सुप्रसिद्ध 'शांताराम' कादंबरीतूनही गर्दच्या व्यसनाचे, कोल्ड टर्कीचे भयानक दर्शन झाले होते.

इनिगोय Fri, 06/27/2014 - 08:10
मुवि, हे मिपावर आणल्याबद्दल आभार. तुषार नातूंच्या ब्लाॅगची ओळख एका मिपाकराकडूनच झाली. ब्लाॅगवरचं जवळजवळ सगळं लेखन वाचलं आहे. हा माणूस अतिशय सरळसोटपणे जे जे घडलं ते सगळं लिहित गेला आहे. सुन्न व्हायला होतं, त्यांच्या कुटुंबीयांनी किती, किती काळ आणि कसं सहन केलं असेल याचा विचार येत राहतो. गर्दच्या नादापायी या माणसाने घेऊ नये ते ते सगळे अनुभव घेतले आहेत. आणि ते सगळे शब्दात मांडले आहेत. व्यसनी ते (यशस्वी.. हे खूप महत्त्वाचं आहे) समुपदेशक हा त्यांचा प्रवास मूळीच सोपा नाही. लिहिणार्यासाठीही नाही आणि वाचणार्यासाठीही नाही. किंबहुना वाचता वाचता या माणसाची कीव येते, चीड येते, आणि त्याचवेळी कौतुकही वाटतं. वरच्या उतार्यात दिलेला प्रसंग काहीच नाही अशा घटना नातूंच्या आयुष्यात घडल्या आहेत, आणि तिरस्करणीय असलं तरी लोकांना व्यसनी माणसाची मानसिकता समजायलाच हवी म्हणून त्यांनी ते लिहून काढलं आहे. गर्दचा "विळखा" या शब्दाची यथार्थता प्रत्येक ब्लाॅगपोस्टमधून जाणवत राहते. व्यसनी माणसांबाबत कळकळ असणार्यांनी, आणि नसणार्यांनीही हे अनुभव जरूर वाचण्यासारखे आहेत.

एसमाळी Fri, 06/27/2014 - 09:09
तुषार नातु यांचे सर्वलेखन चेपुवर एका बंदिस्त कम्युनिटीत वाचले होते.काही दिवसापुर्वी लोकसत्तामध्ये पण या पुस्तकाचा काही भाग आलता.जमल्यास लिंक देतो.निरागस पणे मांडलय सगळ.

एस Fri, 06/27/2014 - 11:15
जीवघेणा अनुभव आहे. व्यसनी माणसाच्या आयुष्याची वाट लागते त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे जवळच्या नात्यात पाहतो आहे. पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

धर्मराजमुटके Fri, 06/27/2014 - 11:30
बोलल्या जात नाही, केल्या जात नाही सारख्या शब्दांचे शुद्धलेखन सुधारा असा एक आपुलकीचा सल्ला. एकंदरीतच अशा प्रकारे चुकीचे लिहीण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे असे दिसत आहे.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Fri, 06/27/2014 - 11:47
बोली भाषेत आणि लिहिण्याच्या भाषेत साधारणपणे बदल असतो. तसा तो असावा. एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात. तशी ती गरजच असते. लेखकाने लिहीलेले लिखाण हे परिचय निवेदन आहे. जाता जाता : ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

प्रचेतस Fri, 06/27/2014 - 11:51
एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात.
ह्याबाबतीत सहमत. पण तरीही प्रमाणभाषेत लिहितांना बोलीभाषेचा वापर केला तर त्यात वावगे अथवा अशुद्ध आहे असे मला वाटत नाही. उदा. श्री.ना. पेंडसे अथवा गोनीदांचे लेखन पहा.
ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?
माहीत नै ब्वा.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Fri, 06/27/2014 - 12:21
आपण ज्या लेखनाचा संदर्भ देत आहात ती बहुतेक सर्व कथा, कादंबर्‍या किंवा ललीत लिखाण आहे. रिपोर्ताज पद्धतीच्या लि़खाणात बोलीभाषेचा वापर करु नये असे माझे मत. याउपर ही चर्चा येथेच थांबवूया. धाग्याचा मुळ उद्देश हा पुस्तक परिचयाचा आहे त्या अनुषंगाने प्रतिसाद येवोत. धागा विनाकारण भरकटविण्याचे श्रेय की पाप :) आपल्या माथी नको !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Fri, 06/27/2014 - 13:40
या चार्टवरुन एलेसडी, भांग आदि पदार्थ तंबाखू आणि मद्यापेक्षा कमी सवयखोर आणि कमी हानीकारक आहेत असं मत होतं. आणि असं मत होणं डेंजरस आहे. सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं.

In reply to by गवि

सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं. >>> करेक्ट ! हा ग्राफ विकीपेडीयावर मिळालाय ... ह्यात नक्की स्केल काय आहे ते पहायला हवे ...

चौकटराजा Fri, 06/27/2014 - 13:09
आमच्या अगोदरच्या म्हणजे १९२० चे सुमारास जन्माला आले व २००० पर्यंत मरण पावले अशा पिढीत जवळ जवळ प्रत्येकाला सुपारी, पान, तंबाखू, जर्दा, तपकीर, सिगरेट, दारू चहा ई पैकी कशाचे तरी व्यसन असायचेच. आता त्यानंतर या प्रकारच्या व्यसनांच्या प्रमाणात खूपच सुधारणा झाली आहे. निदान भारतात तरी. माझ्या सख्या मामीचा सख्खा पुतण्या गर्द च्या व्यसनात सापडून देवाला प्रिय झाला. माझे मामे आते ई प्रकारचे सर्व भाउ या सर्वांपासून दूर आहेत. पण त्यांचे वडील मात्र नव्हते. माझा स्वता: चा एक अनुभव असा की २००३ साली माझ्या हाताला कंपाउंड फ्रॅकचर झाले त्यावेळी मला भूल देण्यासाठी जो पदार्थ वापरला तो या नार्कोटिक्सच्या पैकी एक होता. त्याच्या सहवासात मला जो अनुभव आला तो माझ्या ६१ वर्षाच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे. त्यामुळे सिगरेट ( ही ही मी एकदा ओढून पाहिली आहे ) पेक्षा नर्कोटिक्स यात माणूस वेगाने का ओढला जातो याची कल्पना मी करू शकतो. असे कुठेतरी वाचले आहे की त्याचे अत्याकर्षण पेशीच्या पातळीला तयार होते. ( असेच साखरेचे आकर्षण मधुमेह झाल्यावर होत असावे काय ? ) माझे स्वता: चे मत असे आहे की तुम्ही फ्लर्ट असत रहा. म्हणजे व्यसन लागत नाही. अगदी रोजचा मोर्निगं वॉक देखील एकाच मार्गावरून करू नका. पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.

In reply to by चौकटराजा

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 13:32
सख्या मामीचा सख्खा पुतण्या तुमच्या मामीचा पुतण्या तुमचा मामेभाऊच असणार की? इतके लांबवुन का सांगितले नाते?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे Fri, 06/27/2014 - 15:22
चौरा साहेब, ]माझ्या छातीत पाणी झाले होते तेंव्हा ते काढून त्याची तपासणी करायची होती. तेंव्हा मला १५ मिग्राम मोर्फिन दंडात इंजेक्शन ने दिले होते. आणि पाणी काढणारा डॉक्टर माझा कॉलेजमध्ये ३ वर्षे वरिष्ठ होता. मार्च चा महिना आणि पुण्यातील सकाळ तेंव्हा मला फार छान वाटत होते. सगळीकडे आनंद भरून राहिला होता. माझा वरिष्ठ माझ्या छातीतून पाणी काढण्यासाठी सुई घेऊन आला तेंव्हा मी स्वतःहून पोझिशन घेऊन बसलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो.त्याने मला बधिर करणारे इंजेक्शन दिले आणि माझ्या छातीत सुई खुपसली पण त्यातून पाणी आले नाही त्यावर मी त्याला म्हटले कि सर असे होते टेन्शन घेऊ नका. कदाचित तुम्ही लिव्हर मध्ये गेला असाल. परत प्रयत्न करा आणि जर वर सुई घुसवा. त्यावर त्याला अधिकच टेन्शन आले. पण दुसर्या वेळेस सुई घातल्यावर पाणी आले. ते एका परीक्षनळीत आणि बाटलीत घेऊन त्यांनी सुई काढली आणि मला परत वार्डात नेले. मी त्यांना मजेत म्हणत होतो कि सर तुम्ही उगाच टेन्शन घेतले जसे काही हा प्रकार दुसर्याच व्यक्तीवर चालू होता. हा अनुभव अगदी पूर्ण शुद्धीत असताना आणि पूर्ण ज्ञानासह घेतला आहे. परंतु हा अनुभव सर्वात जास्त आनंददायी आहे असे वाटले नाही त्यापेक्षा सेक्स(ORGASM) चा आनंद वैयक्तिक दृष्ट्या मला अत्त्युच्च आनंदाचा वाटतो.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा Fri, 06/27/2014 - 18:40
मी घेतलेला अनुभव अर्ध बेहोशीतला असावा . पार सप्तस्वर्ग फिरून आलो. नंतर आय सी यू त डॉ ना म्हणालो' ईटस वोज एस्पीरियन्स ओफ लाईफ टाईम ' त्यावर ते मला म्हणाले 'तसे काही नसते तुम्ही एकदम मेरी मूडमधे अनास्थेशियात गेलात म्हणून तुम्हाला असा अनुभव आला असावा.

पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.
आणि जगत रहाण्याची चटक ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा Fri, 06/27/2014 - 13:22
यावर एक उपाय असा की त्यातही विचारांशी फ्लर्टिंग करीत रहायचे.. जीवन सुंदर आहे असे अनुभवतानाच मरणात खरोखर जग जगते किंवा सुंदर मी होणार हो मरणाने जगणार अशा कवितांचा ही संस्कार मनावर करायचा. न जीवनाची आसक्ती न आत्महत्येचे आकर्षण असा प्रयत्न करायचा !!!

म्हैस Fri, 06/27/2014 - 13:56
व्यसन म्हणजे "स्वत: विकत घेतलेले" मानसीक अपंगत्व. व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे.
अगदी अगदी .. लोकांना काळात असतं पण वळत नसत.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 15:01
....डोंबिवलीच्या मॅजेस्टिक मध्ये सध्या उपलब्ध आहे.... लेखकाच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे.त्यांची टेलीफोनिक परवानगी घेतली आहे.... http://tusharnatu2013.blogspot.in/2013/03/introductory-post.html

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 15:26
एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराचे , आभार मानू नयेत असे वाटते. आभार मानायचेच असतील तर, तुषार नातू यांचे माना.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Fri, 06/27/2014 - 15:23
आणि समजा जर एखादा व्यसनांच्या आहारी गेलाच असेल तर घरच्यांनी काय उपाय-योजना करावी? ह्याची पण सुंदर माहिती दिली आहे. पुस्तक शक्यतो विकत घेऊन वाचा, कारण ह्या पुस्तकाची रॉयल्टी त्यांना मिळणार आहे. एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

In reply to by मुक्त विहारि

+१०० एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

प्यारे१ Fri, 06/27/2014 - 16:36
वाचायलाच हवं असं पुस्तक दिसतंय. इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल. दारु, ड्रग्स चे दुष्परिणाम लगेच दिसतात, बाकीचे लगेच नाहीत दिसत पण परिणाम करुन जातातच. आधीच नकार हे एक उत्तर जास्त परिणामकारक असणार आहे असं वाटतं. देर आये दुरुस्त आये वगैरे बोलायला सोपं असलं तरी वागताना कमीजास्त आठवण करुन देणारंच असतंय. भविष्यात कधीही काहीही झालं की लगेच जनता बोलायला मोकळी असते... 'म्हत्लं नव्हतं? हे तसलंच आहे म्हणून' असं काही सुरु होतं.

In reply to by प्यारे१

आदूबाळ Fri, 06/27/2014 - 17:16
इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल
ये बात!

विटेकर Mon, 06/30/2014 - 11:55
स्साला २ दिवस अस्वस्थ होतो.. सगळा ब्लोग वाचून काढला.. लै म्हन्जे लैच त्रास झाला.. अदभुत आणि भयचकित होऊन नकळत पुन्हा पुन्हा ब्लोग्वर जात होतो... धड वाचवत नव्हते आणि ना ही सोडवत ! नारायण धारपांच्या कथेसारखे ! फरक इतकाच हे सारे खरे खरे घडलेले होते ... मी ललित लेखन सहसा वाचत नाही .. आता फारशी आवड ही राहीली नाही .. पण हे एक हाती वाचले ! आमचा साष्टांग नमस्कार तुमच्या मित्राच्या कुटुंबीयाना आणि नन्तर त्यांनाही कळवा. ..... .. . राहून राहून एक सतत वाटत राहीले , इतक्या सहज ब्राउन शुगर मिळते कशी ? कायद्याचे रक्षक , माणसे आहेत की राक्षस ? कुटूम्बे उद्धस्त होतात आणि तरीही आमचे शासन जागे होत नाही ?

In reply to by विटेकर

प्रसाद प्रसाद Mon, 06/30/2014 - 15:37
अगदी असेच वाटले...... अगदी मी जे अनुभवले ते तुम्ही लिहून सांगितले आहे विटेकर साहेब. तुमच्याइतके व्यवस्थित कदाचित मला लिहिता आले नसते.

पैसा Mon, 06/30/2014 - 12:34
पुस्तकाची ओळख चांगली आहे. पण मला वाचणे शक्य नाही. कुत्र्याचेही असे हाल करू शकतो तो इसम माणूस राहिलेला नसतोच. त्याच्याबद्दल कितीही प्रयत्न केला तरी दया/सहानुभूती वाटून घेणे शक्य दिसत नाही. त्यातून बाहेर आल्याबद्दल श्री नातू यांचे अभिनंदन. पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. "Once a bearer cheque always a bearer cheque" अशी काहीशी परिस्थिती आहे ही. आपल्या जवळचे कोणी या भयानक परिस्थितीत सापडू नये एवढी प्रार्थनाच आपण करू शकतो.

In reply to by पैसा

प्यारे१ गुरुवार, 07/03/2014 - 15:37
>>> पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. श्री. नातूंबद्दल शक्यता कमी वाटत आहे. कारण त्यांच्या फेबु प्रोफाईल वरुन ते स्वतः मुक्तांगण ला समुपदेशक म्हणून काम करत आहेत असं वाटतंय. बाकी इन जनरल सहमती.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 15:22
मलाही..'स्टोरी ऑफ इंडिया' नामक डाकुमेंट्रीत मायकेल वुड पेशावरला गेला असताना हे करून पाहतो, साला लय हेवा वाटला होता त्याचा.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/03/2014 - 15:48
(तेरा वर्षांच्या करिअर मध्ये सात जॉब करुन आठव्याचे वेध लागल्यावर पडलेला प्रश्न) *scratch_one-s_head* वारंवार नोकरी बदलणे /बदलाविशी वाटणे हे पण एक व्यसन असेल का ? असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे

In reply to by मराठी कथालेखक

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/03/2014 - 15:52
असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे
>>> स्काळ संध्याकाळ काली फॉसीफोरम ६ ३० घेत चला... शाबुदाण्याच्या गोळ्यातुन *lol*
लेखनप्रकार
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्‍याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात.

कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर?

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे हवाईदलातील दिवस ब्लॉगची लिंक
“...बुरी तरहसे फँसा तू रे’ असं मी मला म्हणत होतो. कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्धरिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली... ...‘साहेब,अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. इथे फक्त परेडच्या सरावाला,15 ऑगस्ट, 26 जानेवारीअन पार्टीच्या वेळी ‘बँडइन अटेंडन्स’असेल तर ‘डायनिंगइन नाईट’च्यावेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश”म्हणून बोळवण केली जाते...’ ...मलात्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली.

घर कसं बाळमुठीत कोंदणात सजणार -----------------

डॉ. दत्ता फाटक ·
लेखनविषय:
घर शेणाच, घर मेणाच, माती दगड वीटानचे घर कसं ही पण घर हवं ------------------- माउलीच्या साउलीच, अश्रुभरल्या ओलाव्याच, घर हसतं, घर रांगत , घर बाळमुठीत कोंदणात सजतं , घर कसही पण घर हवं ---------------------- लडिवाळ , घर हवं गाउलीच्या सायी सारखं , घर मधु मक्षिकेच, मधभरल्या ओलाव्याच, मधभरल्या माधुर्याच---------------------------- घर कसं सजतं ---------------------------- घर कणाकणानी सजलेलं , घामाच्या रेघांच घर घराचे घरपण टिकविणारे , ---------- सांजवाऱ्यासवे घराकडे ओढावणार ------ घर कसं असंच --------------

रंगरेषा ......... अन ......... मी .........

डॉ. दत्ता फाटक ·
लेखनविषय:
.

आठवणी दाटतात .......... !!

डॉ. दत्ता फाटक ·

psajid Tue, 07/01/2014 - 15:04
जुने दिवस डोळ्यापुढे उभे राहिले ! लेख अजून विस्ताराने, अलंकारिक आणि वर्णनात्मक लिहला असता तर अजून रंजकता आली असती. बाकी लेख सुंदर !

psajid Tue, 07/01/2014 - 15:04
जुने दिवस डोळ्यापुढे उभे राहिले ! लेख अजून विस्ताराने, अलंकारिक आणि वर्णनात्मक लिहला असता तर अजून रंजकता आली असती. बाकी लेख सुंदर !
लेखनविषय:
लेखनप्रकार
ते दिवस खूप म्हणजे खूपच छान होते, गांवकुसाकडे एवढी प्रगती झाली नव्हती, आमची दगडी शाळा नांनदुरकीच्या झाडा-जवळ भरायची, एकच मोठा वर्ग, त्यात पहिली ते तिसरीचे वर्ग भरायचे, बाकडी वगैरे कांही नव्हती, एकाखालीएकशा चौरस पट्टे पंधरा- सोळाफूट लांबीचे मुरुमाच्या मातीचे ताशीवदगडी ची-याचे बांध माती ओघळू नये म्हणूनचे, एकच खुर्ची-टेबल, बसायला तरटाची बसकणं, भरपूर धूळ, बंडोपंत परांजपे मास्तर, एकहाती कळकीचा फोक, एकहाती खडू, डोक्यावर तिरकस स्वभावाप्रमाणे तिरकस टोपी, हात-धुलाईचा झब्बा, कंचं बांधलेलं भोंगळ धोतर, उभंगंध, आणि अनुनासिक बोलणं, दोनचार खास शिव्या तोंडी लावायला, भारी मा- रकुटा मास्तर, एकदा वर्गात

जडण-घडण...4

माधुरी विनायक ·

एस गुरुवार, 06/26/2014 - 16:50
कोणाच्याही सोबतीसाठी अडून राहायचं नाही, हा खूप मोठा धडा शिकले मी तेव्हा. खरंच, पुढे अनेकदा या धड्याने मला आणखी खंबीर बनवलं.
अभिनंदन. पहा, आधीच्या भागापर्यंतच थांबला असतात तर आम्हांला इतकं चांगलं वाचायला मिळालं नसतं. वाचतोय. पुभाप्र.

In reply to by एस

सखी गुरुवार, 06/26/2014 - 22:09
आम्हांला इतकं चांगलं वाचायला मिळालं नसतं. - अगदी अगदी. अनुभव व लेखन दोन्ही आवडलं आणि परत तेच जाणवलं त्या अश्या वागल्या म्हणुन खूपदा आपणही अद्द्ल घडवण्यासाठी तसचं किंवा अजुन काहीतरी करायला जातो किंवा करत नाही (मदत या अर्थी). मला नेहमी तेव्हा वाटतं त्यांनी गाय मारली तर आपण वासरु कशाला मारायला पाहीजे, तुम्ही तसे केले नाहीत याच अर्थातच कौतुक वाटतं. पुलेशु. बाकी मधुराच्या क्वीन या लेखाची आठवण मलाही झाली जमल्यास नक्की वाचा.

बहुगुणी गुरुवार, 06/26/2014 - 17:05
जिद्द आवडली, आणि कोत्या वृत्तीच्या मैत्रिणींनाही शेवटी मदत करण्याचा दिलदारपणा देखील आवडला. अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! लिहित रहा!

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 22:29
छान लिहिलंय. मलाही माझ्याच लेखातल्या या ओळी आठवल्या.
आपल्या सगळ्यांमध्ये एक रानी दडलेली आहेच. त्यासाठी लंडन काय आणि मुंबई काय? कधी कुठल्या घटनेतून हे घडेल तो प्रत्येकीचा चित्रपट...
:) तुमच्यातली रानी वाचून आनंद झाला. जडण घडण चे पुढचे भाग वाचायला आवडतील.

यशोधरा Fri, 06/27/2014 - 07:51
कोणाच्याही सोबतीसाठी अडून राहायचं नाही, हा खूप मोठा धडा शिकले मी तेव्हा. खरंच, पुढे अनेकदा या धड्याने मला आणखी खंबीर बनवलं.
अगदी खरं आहे! सुरेख जमला आहे हा भाग.

माधुरी विनायक Mon, 06/30/2014 - 11:29
मधुरा, क्वीन वरचा लेख मस्त. सखी, लेखाच्या दुव्यासाठी खरंच आभार आणि सर्वांच्या प्रतिसादांबद्दलही आभार. गाता गळा, शिंपता मळा च्या धर्तीवर हात लिहिता ठेवायचा प्रयत्न नक्कीच करेन.

मराठी कथालेखक Fri, 05/13/2016 - 15:46
लेखनशैली आवडली. जुन्या आठवणी, प्रसंग तपशीलात लिहले आहेत पण पाल्हाळिक वाटत नाही. का कुणास ठावूक मला स्वतःच्या अशा अतिशय जुन्या आठवणीत (शाळेतील, कॉलेजातील) रमायला , किंबहूना त्या कुणाला सांगायला वा स्वतःशीच आठवायला आवडत नाही (शाळेतील तर नाहीच नाही.) पण इतरांच्या वाचायला आवडतात.. :)

एस गुरुवार, 06/26/2014 - 16:50
कोणाच्याही सोबतीसाठी अडून राहायचं नाही, हा खूप मोठा धडा शिकले मी तेव्हा. खरंच, पुढे अनेकदा या धड्याने मला आणखी खंबीर बनवलं.
अभिनंदन. पहा, आधीच्या भागापर्यंतच थांबला असतात तर आम्हांला इतकं चांगलं वाचायला मिळालं नसतं. वाचतोय. पुभाप्र.

In reply to by एस

सखी गुरुवार, 06/26/2014 - 22:09
आम्हांला इतकं चांगलं वाचायला मिळालं नसतं. - अगदी अगदी. अनुभव व लेखन दोन्ही आवडलं आणि परत तेच जाणवलं त्या अश्या वागल्या म्हणुन खूपदा आपणही अद्द्ल घडवण्यासाठी तसचं किंवा अजुन काहीतरी करायला जातो किंवा करत नाही (मदत या अर्थी). मला नेहमी तेव्हा वाटतं त्यांनी गाय मारली तर आपण वासरु कशाला मारायला पाहीजे, तुम्ही तसे केले नाहीत याच अर्थातच कौतुक वाटतं. पुलेशु. बाकी मधुराच्या क्वीन या लेखाची आठवण मलाही झाली जमल्यास नक्की वाचा.

बहुगुणी गुरुवार, 06/26/2014 - 17:05
जिद्द आवडली, आणि कोत्या वृत्तीच्या मैत्रिणींनाही शेवटी मदत करण्याचा दिलदारपणा देखील आवडला. अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद! लिहित रहा!

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 22:29
छान लिहिलंय. मलाही माझ्याच लेखातल्या या ओळी आठवल्या.
आपल्या सगळ्यांमध्ये एक रानी दडलेली आहेच. त्यासाठी लंडन काय आणि मुंबई काय? कधी कुठल्या घटनेतून हे घडेल तो प्रत्येकीचा चित्रपट...
:) तुमच्यातली रानी वाचून आनंद झाला. जडण घडण चे पुढचे भाग वाचायला आवडतील.

यशोधरा Fri, 06/27/2014 - 07:51
कोणाच्याही सोबतीसाठी अडून राहायचं नाही, हा खूप मोठा धडा शिकले मी तेव्हा. खरंच, पुढे अनेकदा या धड्याने मला आणखी खंबीर बनवलं.
अगदी खरं आहे! सुरेख जमला आहे हा भाग.

माधुरी विनायक Mon, 06/30/2014 - 11:29
मधुरा, क्वीन वरचा लेख मस्त. सखी, लेखाच्या दुव्यासाठी खरंच आभार आणि सर्वांच्या प्रतिसादांबद्दलही आभार. गाता गळा, शिंपता मळा च्या धर्तीवर हात लिहिता ठेवायचा प्रयत्न नक्कीच करेन.

मराठी कथालेखक Fri, 05/13/2016 - 15:46
लेखनशैली आवडली. जुन्या आठवणी, प्रसंग तपशीलात लिहले आहेत पण पाल्हाळिक वाटत नाही. का कुणास ठावूक मला स्वतःच्या अशा अतिशय जुन्या आठवणीत (शाळेतील, कॉलेजातील) रमायला , किंबहूना त्या कुणाला सांगायला वा स्वतःशीच आठवायला आवडत नाही (शाळेतील तर नाहीच नाही.) पण इतरांच्या वाचायला आवडतात.. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
अशी खूप वर्षं सरली. दहावी इयत्तेनंतर गावी जाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. शिक्षण सुरूच होतं. फारसा विचार किंवा प्रयास न करता चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळून गेला. एखाद-दुसरा अपवाद वगळता ओळखीचं फारसं कुणी नव्हतं. कोणाच्या अध्यात-मध्यात नाही, अशी ती अकरावी-बारावीची दोन वर्षं निघून गेली. बारावीचा निकाल लागला आणि मी आमच्याच कॉलेजमध्ये पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेतला. त्या छोट्याश्या कालावधीतही लक्षात राहिलेले शिक्षक म्हणजे अनंत भावे सर. मराठी शिकवायचे. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच त्यांची लेक्चर्स ऐकता आली.