मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनमोहक बाली : ०६ : गालुंगन, बालीचा सर्वात मोठा उत्सव

डॉ सुहास म्हात्रे ·

बॅटमॅन 27/06/2014 - 23:56
मी पयला!!!!!! च्यामारी मी, इतकेसे बाली बेट पण साला सौंदर्य किती कुटून कुटून भरावे त्याला कै लिमिट???? अफाट प्रकार आहे सगळा. _/\_

एस 28/06/2014 - 00:13
जंगलाने झाकलेले पर्वत पाणी साठवतात आणि ते नद्यांच्या रूपाने वर्षभर मानवाला देतात.
आपल्याकडे उलटे आहे. वरील वाक्य कंठशोष करत कितीतरी दशके पर्यावरणवादी सांगत आले आहेत. आपण आधी जंगले उजाड करतो आणि मग डोंगरांनाही फोडून तिथे गुंठेवारी काढतो. लक्ष्मीरस्त्यावर दोन्हीं बाजूंनी असे पेंजोर लावायचा इरादा आहे. कसे दिसेल बरे! गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बुरुजांवर लावून पाहूया. बुरुज अर्ध्यापर्यंत असे पीतांबर सरोंग नेसले आहेत आणि वर पेंजोर झुलत आहेत. वाह! :-)

In reply to by एस

आपल्या पर्वत-जंगलांच्या काळजीबद्दल म्हणावे तितके थोडेच आहे ! लक्ष्मीरस्त्यावर दोन्हीं बाजूंनी असे पेंजोर लावायचा इरादा आहे. कसे दिसेल बरे! गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बुरुजांवर लावून पाहूया. बुरुज अर्ध्यापर्यंत असे पीतांबर सरोंग नेसले आहेत आणि वर पेंजोर झुलत आहेत. वाह! भन्नाट कल्पना. प्रयोग करून पाहण्यासारखा आहे :)

आयुर्हित 28/06/2014 - 00:56
पर्यट्क आकर्षित करण्यासाठी बालीकडुन भारताला खुप बोध घेण्यासारखा आहे! १)रिसोर्ट जंगलात आहे की जंगल रिसोर्ट मध्ये असा प्रश्न पडण्याइतपत घनदाट झाडी आहेत. २)पायवाटा आणि रस्ते सोडले की सर्वीकडे हिरवळ्च हिरवळ आहे. जमीन कोठेही दिसत नाहि. ३)निसर्गरम्य वातावरणासोबत मानवनिर्मीत उत्क्रुष्ट कोरिवकाम असलेले पुतळे व मंदिरे डोळ्याचे पारणे फिटते ४)देवळात पुजेच्या साहित्यासाठी कागद वा प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरता बांबूच्या आणि केळीच्या पानांचा वापर करणे. प्रत्येक पेंजोरची कलात्मक नक्षी फारच सुंदर आहे. बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे, ह्याचा ज्योतिषिय आधार काय आहे? (शुक्राचा सुर्याभोवती फिरण्याचा काल २२४.७ दिवसाचा आहे. पहाटे शुक्राची चांदणी दिसण्याचा काही संबंध आहे का?)

In reply to by आयुर्हित

तुमच्या मतांशी सहमत आहे. बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे, ह्याचा ज्योतिषिय आधार काय आहे? (शुक्राचा सुर्याभोवती फिरण्याचा काल २२४.७ दिवसाचा आहे. पहाटे शुक्राची चांदणी दिसण्याचा काही संबंध आहे का?) ती दिनदर्शिका हिंदू धर्माशी निगडीत आहे असं म्हणतात. पण वर वर पाहता मला तरी ते फारच गुंतागुंतीचे प्रकरण आहे असे वाटले. इथे सविस्तर माहिती आहे. त्यातल्या काही विशेष गोष्टी अश्या: १. आठवड्यांच्या दिवसांना 'वार' असेच म्हणतात. २. आठवड्यात एका पासून १० पर्यंत दिवस असू शकतात (एकवारा ते दशवारा आठवडा). ३. आठवड्यात काही वार अनेकदा येऊ शकतात आणि ते एकमेकाशी सलगही असू शकतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयुर्हित 28/06/2014 - 12:23
पावुकोण दिनदर्शिकात दाखविल्या प्रमाणे सप्तवार पद्ध्ती हि आपल्या शक किंवा ग्रेगोरियन दिनदर्शिकेप्रमाणे ३० आठवड्याचा एक वर्ष हे कळले. फक्त वर्ष केव्हा सुरु होते हे़ कळले नाही.

In reply to by आयुर्हित

दर २१० दिवसांचा कालखंड संपला की पुढच्या वर्षाचा पहिला दिवस येतो. त्यामुळे ग्रोगॉरियन दिनदर्शिकेशी, सुर्याच्या भ्रमणाशी अथवा ऋतुंशी बाली वर्षांचा काही ताळमेळ नसतो. त्यामुळे एका ग्रेगॉरियन वर्षात(३६५ दिवसांत) एकापेक्षा जास्त बाली वर्षे (प्रत्येकी २१० दिवस) येत असल्याने एका ग्रेगॉरियन वर्षात बालीचे वार्षिक सण दोनदोनदा येतात. उदाहरणार्थ, खाली दिलेल्या गालुंगन आणि कुनिंगनच्या ग्रेगॉरियन तारखा पहा: Year(G)...Galungan.........Kuningan 2013.........March 27...........April 6 2013.........October 23.........November 2 2014.........May 21..............May 31 2014.........December 17......December 27 2015.........July 15..............July 25

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयुर्हित 29/06/2014 - 12:16
दिलेल्या तारखांची ग्रहस्थिती ही भिन्न आहे. काहीहि सारखे नाही.त्यामूळे ग्रोगॉरियन दिनदर्शिकेशी, सुर्याच्या भ्रमणाशी अथवा ऋतुंशी बाली वर्षांचा काही ताळमेळ नसतो, हेच खरे!

रेवती 28/06/2014 - 03:10
सुरेख गुढ्या आहेत, अपल्याकडच्या फिक्या पडल्या असं वाटतय. शेताचे हिरवे फोटू खोटे आहेत की काय इतके चांगले दिसतायत. अवांतर- बाली प्रवासवर्णनाचा ५ वा भाग (आणखीही काही धगे) मला उघडता आला नाही. ते वाचल्यावर तिकडे प्रतिसाद देईन.

यशोधरा 28/06/2014 - 06:49
सुरेख! हिरवाई पाहून डोळे निवले. आपल्याकडे असे दृश्य कधी दिसणार? इथे तर असलेले डोंगर, पर्वत सपाट करायची अहमहमिका लागलेली आहे! :( असलेले सौंदर्य मातीमोल करत आहेत.

चौकटराजा 29/06/2014 - 07:20
देशीदेशी का जावे ....केल्याने देशाटन ...हे का म्हटले आहे हे आपल्या लेखांवरून कळते. भारतीय व एक्दम पाश्चात्य या खेरीज मध्यपूर्व मगोलियन, अग्नेय आशियन अशा विविध संस्कतीत किती नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. आता यातीलच पहा त्या गुढ्या , तोरणे, फुलांच्या परड्या देखील आपण कधी न पाहिलेल्या. आपण मिपाचे सदस्य नसतो तर . असा एक निबंध लिहायला हवा. आपण पुणेकर आहात हे आमचे कवढे भाग्य की वरचेवर भेट होऊन माहितीत भर पडते. जुग जुग जियो साहब ! जाता जाता - पेठकर काका व मी एकाच वयाचे.त्यानी दुसर्या एका धाग्यात रंग उजळला ज्या ऐवजी रंग उधळला असे वाचले. वयामुळे माझी ही समस्या तीच ...हा गालूंगन शब्द वाचताना मी एकदम 'गाल चुम्बन अलिंगन' असे काही वाचून गेलो.

In reply to by चौकटराजा

तुमच्या सारखे रसिक वाचक आहेत म्हणूनच तर ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे. त्यात कट्ट्यात होणारी प्रत्यक्ष भेट ही तर दुधात साखर !! पेठकर काका व मी एकाच वयाचे.त्यानी दुसर्या एका धाग्यात रंग उजळला ज्या ऐवजी रंग उधळला असे वाचले. वयामुळे माझी ही समस्या तीच ...हा गालूंगन शब्द वाचताना मी एकदम 'गाल चुम्बन अलिंगन' असे काही वाचून गेलो. :)

रिसॉर्टचे फोटो अप्रतिम, त्या हिरवाईत कुठेही कृत्रिमता वाटत नाहीये बालीकरांची रंगीबेरंगी टोपी आपल्या लहान पोरांना दिली तर जाम खूश होतील.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

सबंध बालीचे निसर्गाशी इतके घट्ट आणि एकसंध नाते आहे की दोघांना वेगळे करणे शक्यच होत नाही. कोठेही कृत्रिमपणे निसर्गाला घासूनपुसून अट्टाहासाने शिस्तीत बसवायचा प्रयत्न दिसत नाही. बालीमध्ये नागरिक, संस्कृती आणि निसर्ग हे एकाच एकत्र कुटुंबाचे सहृदय घटक असल्याचे सारखे जाणवते. टोपीचं म्हणाल तर लहान पोरंच का म्हणून... हा मोठा पोरगाही (अस्मादिक) ती टोपी घालून जाम खूष होताच की !

दिपक.कुवेत 29/06/2014 - 13:37
भाग ५ आणि ६ मेहमीप्रमाणेच मनमोहक. हिरवाई अगदि दृष्ट लागण्यासारखी आहे.

In reply to by कवितानागेश

"बालीच्या प्रेमात न पडणारा माणूस विरळाच" असे म्हणतात यात अजिबात अतिशयोक्ती नाही याची मी खात्री देतो :)

प्रवासवर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख चालु आहेत. एक से एक फोटो बघुन कधी ना कधी बालीला जायचा विचार पक्का होत आहे. तो आजोबा आणि नातू फोटो आपल्याला फार आवडला राव..घरोघरी..आपले देशोदेशी प्रेमळ आजोबा :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ती आजोबा-नातू जोडगोळी पाहिली आणि हा प्रसंग कोकणातला म्हणूनही खपून जाईल असे वाटले. गाडीतून गडबडीत काढल्याने तंत्रदृष्ट्या चांगला आला नाही पण तो प्रसंग मनात भरल्याने इथे टाकावाच लागला :)

बॅटमॅन 27/06/2014 - 23:56
मी पयला!!!!!! च्यामारी मी, इतकेसे बाली बेट पण साला सौंदर्य किती कुटून कुटून भरावे त्याला कै लिमिट???? अफाट प्रकार आहे सगळा. _/\_

एस 28/06/2014 - 00:13
जंगलाने झाकलेले पर्वत पाणी साठवतात आणि ते नद्यांच्या रूपाने वर्षभर मानवाला देतात.
आपल्याकडे उलटे आहे. वरील वाक्य कंठशोष करत कितीतरी दशके पर्यावरणवादी सांगत आले आहेत. आपण आधी जंगले उजाड करतो आणि मग डोंगरांनाही फोडून तिथे गुंठेवारी काढतो. लक्ष्मीरस्त्यावर दोन्हीं बाजूंनी असे पेंजोर लावायचा इरादा आहे. कसे दिसेल बरे! गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बुरुजांवर लावून पाहूया. बुरुज अर्ध्यापर्यंत असे पीतांबर सरोंग नेसले आहेत आणि वर पेंजोर झुलत आहेत. वाह! :-)

In reply to by एस

आपल्या पर्वत-जंगलांच्या काळजीबद्दल म्हणावे तितके थोडेच आहे ! लक्ष्मीरस्त्यावर दोन्हीं बाजूंनी असे पेंजोर लावायचा इरादा आहे. कसे दिसेल बरे! गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बुरुजांवर लावून पाहूया. बुरुज अर्ध्यापर्यंत असे पीतांबर सरोंग नेसले आहेत आणि वर पेंजोर झुलत आहेत. वाह! भन्नाट कल्पना. प्रयोग करून पाहण्यासारखा आहे :)

आयुर्हित 28/06/2014 - 00:56
पर्यट्क आकर्षित करण्यासाठी बालीकडुन भारताला खुप बोध घेण्यासारखा आहे! १)रिसोर्ट जंगलात आहे की जंगल रिसोर्ट मध्ये असा प्रश्न पडण्याइतपत घनदाट झाडी आहेत. २)पायवाटा आणि रस्ते सोडले की सर्वीकडे हिरवळ्च हिरवळ आहे. जमीन कोठेही दिसत नाहि. ३)निसर्गरम्य वातावरणासोबत मानवनिर्मीत उत्क्रुष्ट कोरिवकाम असलेले पुतळे व मंदिरे डोळ्याचे पारणे फिटते ४)देवळात पुजेच्या साहित्यासाठी कागद वा प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरता बांबूच्या आणि केळीच्या पानांचा वापर करणे. प्रत्येक पेंजोरची कलात्मक नक्षी फारच सुंदर आहे. बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे, ह्याचा ज्योतिषिय आधार काय आहे? (शुक्राचा सुर्याभोवती फिरण्याचा काल २२४.७ दिवसाचा आहे. पहाटे शुक्राची चांदणी दिसण्याचा काही संबंध आहे का?)

In reply to by आयुर्हित

तुमच्या मतांशी सहमत आहे. बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे, ह्याचा ज्योतिषिय आधार काय आहे? (शुक्राचा सुर्याभोवती फिरण्याचा काल २२४.७ दिवसाचा आहे. पहाटे शुक्राची चांदणी दिसण्याचा काही संबंध आहे का?) ती दिनदर्शिका हिंदू धर्माशी निगडीत आहे असं म्हणतात. पण वर वर पाहता मला तरी ते फारच गुंतागुंतीचे प्रकरण आहे असे वाटले. इथे सविस्तर माहिती आहे. त्यातल्या काही विशेष गोष्टी अश्या: १. आठवड्यांच्या दिवसांना 'वार' असेच म्हणतात. २. आठवड्यात एका पासून १० पर्यंत दिवस असू शकतात (एकवारा ते दशवारा आठवडा). ३. आठवड्यात काही वार अनेकदा येऊ शकतात आणि ते एकमेकाशी सलगही असू शकतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयुर्हित 28/06/2014 - 12:23
पावुकोण दिनदर्शिकात दाखविल्या प्रमाणे सप्तवार पद्ध्ती हि आपल्या शक किंवा ग्रेगोरियन दिनदर्शिकेप्रमाणे ३० आठवड्याचा एक वर्ष हे कळले. फक्त वर्ष केव्हा सुरु होते हे़ कळले नाही.

In reply to by आयुर्हित

दर २१० दिवसांचा कालखंड संपला की पुढच्या वर्षाचा पहिला दिवस येतो. त्यामुळे ग्रोगॉरियन दिनदर्शिकेशी, सुर्याच्या भ्रमणाशी अथवा ऋतुंशी बाली वर्षांचा काही ताळमेळ नसतो. त्यामुळे एका ग्रेगॉरियन वर्षात(३६५ दिवसांत) एकापेक्षा जास्त बाली वर्षे (प्रत्येकी २१० दिवस) येत असल्याने एका ग्रेगॉरियन वर्षात बालीचे वार्षिक सण दोनदोनदा येतात. उदाहरणार्थ, खाली दिलेल्या गालुंगन आणि कुनिंगनच्या ग्रेगॉरियन तारखा पहा: Year(G)...Galungan.........Kuningan 2013.........March 27...........April 6 2013.........October 23.........November 2 2014.........May 21..............May 31 2014.........December 17......December 27 2015.........July 15..............July 25

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयुर्हित 29/06/2014 - 12:16
दिलेल्या तारखांची ग्रहस्थिती ही भिन्न आहे. काहीहि सारखे नाही.त्यामूळे ग्रोगॉरियन दिनदर्शिकेशी, सुर्याच्या भ्रमणाशी अथवा ऋतुंशी बाली वर्षांचा काही ताळमेळ नसतो, हेच खरे!

रेवती 28/06/2014 - 03:10
सुरेख गुढ्या आहेत, अपल्याकडच्या फिक्या पडल्या असं वाटतय. शेताचे हिरवे फोटू खोटे आहेत की काय इतके चांगले दिसतायत. अवांतर- बाली प्रवासवर्णनाचा ५ वा भाग (आणखीही काही धगे) मला उघडता आला नाही. ते वाचल्यावर तिकडे प्रतिसाद देईन.

यशोधरा 28/06/2014 - 06:49
सुरेख! हिरवाई पाहून डोळे निवले. आपल्याकडे असे दृश्य कधी दिसणार? इथे तर असलेले डोंगर, पर्वत सपाट करायची अहमहमिका लागलेली आहे! :( असलेले सौंदर्य मातीमोल करत आहेत.

चौकटराजा 29/06/2014 - 07:20
देशीदेशी का जावे ....केल्याने देशाटन ...हे का म्हटले आहे हे आपल्या लेखांवरून कळते. भारतीय व एक्दम पाश्चात्य या खेरीज मध्यपूर्व मगोलियन, अग्नेय आशियन अशा विविध संस्कतीत किती नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. आता यातीलच पहा त्या गुढ्या , तोरणे, फुलांच्या परड्या देखील आपण कधी न पाहिलेल्या. आपण मिपाचे सदस्य नसतो तर . असा एक निबंध लिहायला हवा. आपण पुणेकर आहात हे आमचे कवढे भाग्य की वरचेवर भेट होऊन माहितीत भर पडते. जुग जुग जियो साहब ! जाता जाता - पेठकर काका व मी एकाच वयाचे.त्यानी दुसर्या एका धाग्यात रंग उजळला ज्या ऐवजी रंग उधळला असे वाचले. वयामुळे माझी ही समस्या तीच ...हा गालूंगन शब्द वाचताना मी एकदम 'गाल चुम्बन अलिंगन' असे काही वाचून गेलो.

In reply to by चौकटराजा

तुमच्या सारखे रसिक वाचक आहेत म्हणूनच तर ही प्रवासवर्णने लिहायला मजा येत आहे. त्यात कट्ट्यात होणारी प्रत्यक्ष भेट ही तर दुधात साखर !! पेठकर काका व मी एकाच वयाचे.त्यानी दुसर्या एका धाग्यात रंग उजळला ज्या ऐवजी रंग उधळला असे वाचले. वयामुळे माझी ही समस्या तीच ...हा गालूंगन शब्द वाचताना मी एकदम 'गाल चुम्बन अलिंगन' असे काही वाचून गेलो. :)

रिसॉर्टचे फोटो अप्रतिम, त्या हिरवाईत कुठेही कृत्रिमता वाटत नाहीये बालीकरांची रंगीबेरंगी टोपी आपल्या लहान पोरांना दिली तर जाम खूश होतील.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

सबंध बालीचे निसर्गाशी इतके घट्ट आणि एकसंध नाते आहे की दोघांना वेगळे करणे शक्यच होत नाही. कोठेही कृत्रिमपणे निसर्गाला घासूनपुसून अट्टाहासाने शिस्तीत बसवायचा प्रयत्न दिसत नाही. बालीमध्ये नागरिक, संस्कृती आणि निसर्ग हे एकाच एकत्र कुटुंबाचे सहृदय घटक असल्याचे सारखे जाणवते. टोपीचं म्हणाल तर लहान पोरंच का म्हणून... हा मोठा पोरगाही (अस्मादिक) ती टोपी घालून जाम खूष होताच की !

दिपक.कुवेत 29/06/2014 - 13:37
भाग ५ आणि ६ मेहमीप्रमाणेच मनमोहक. हिरवाई अगदि दृष्ट लागण्यासारखी आहे.

In reply to by कवितानागेश

"बालीच्या प्रेमात न पडणारा माणूस विरळाच" असे म्हणतात यात अजिबात अतिशयोक्ती नाही याची मी खात्री देतो :)

प्रवासवर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख चालु आहेत. एक से एक फोटो बघुन कधी ना कधी बालीला जायचा विचार पक्का होत आहे. तो आजोबा आणि नातू फोटो आपल्याला फार आवडला राव..घरोघरी..आपले देशोदेशी प्रेमळ आजोबा :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ती आजोबा-नातू जोडगोळी पाहिली आणि हा प्रसंग कोकणातला म्हणूनही खपून जाईल असे वाटले. गाडीतून गडबडीत काढल्याने तंत्रदृष्ट्या चांगला आला नाही पण तो प्रसंग मनात भरल्याने इथे टाकावाच लागला :)
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

महाभारताची वेगळी कथा...

माधुरी विनायक ·

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हाडक्या 27/06/2014 - 19:22
काय राव.. दोन इकडच्या तिकडच्या कथांची सरमिसळ आहे इथे. :) उगोलिनोची कथा आहे त्यात त्याला आणि त्याच्या मुलांना असे कैदेत ठेवलेले असते तेव्हा काही जणाना जगवायला इतर जण मरतात. आणि हे एक प्रसिध्द चित्र, Ugolino

मृत्युन्जय 27/06/2014 - 17:56
वेगळी म्हणुन वाचायला चांगली अशी कथा . पण या कथेव्यतिरिक्त आणि चोप्रांच्या महाभारताव्यतिरिक्त शकुनी कुठेही पंगू आहे असे वाचल्याचे ऐकीवात नाही. चूभूद्याघ्या

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस 27/06/2014 - 18:10
सहमत आहे. उलट भीष्म शकुनीचे वर्णन करताना म्हणतो की शकुनिर्मातुलस्य ते ऽसौ रथ एकौ नराधिप परसज्य पाण्डवैर वैरं यॊत्स्यते नात्र संशयः || एतस्य सैन्या दुर्धर्षाः समरे ऽपरतियायिनः विकृतायुध भूयिष्ठा वायुवेगसमा जवे || हे नराधिपा, तुझा मातुल शकुनी एक रथी असून त्यानेच पांडवांशी हे वैर योजीले आहे. तो युद्ध करील ह्यात शंका नाही समोरच्या शत्रूंवर चालून जाणारी ह्याची सेना दुर्धर्ष असून ह्याचे विचित्र आयुधांनी युक्त असलेले सैन्य वायुप्रमाणे वेगवान आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 27/06/2014 - 18:19
शकुनीची सेना कशीही असली तरी त्यामुळे तो पंगू नसेलच असे सांगता येत नाही. उदा. तैमुरलंग लंगडा होताच की.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 28/06/2014 - 09:07
रथी म्हणजे रथारूढ योद्धा आणि महारथी किंवा अतीरथी म्हणजे एकाच रथात बसून कित्येक रथ्यांशी एकाच वेळी युद्ध करू शकणारे. महारथी आणि अतिरथी मधील अधिक श्रेष्ठ कोण याबद्दल महाभारत मुग्धच आहे पण काहीवेळा श्रेष्ठ योद्ध्यांना एकाचवेळी अतिरथ आणि महारथ असेही संबोधलेले आहे. उद्योगपर्वातील रथातिरथसंख्यान उपपर्वात कौरव आणि पांडवांतील रथी, महारथी आणि अतिरथी योद्ध्यांची संख्या दिलेली आहे. ह्यात दुर्योधन, दु:शासनादिक कौरवांना रथी, सिंधुराज जयद्रथाला द्वैरथी, शल्याला, द्रोण, भीष्म अतिरथी/महारथी तर कर्णाला परशुरामाच्या शापामुळे अर्धरथी मानले गेले आहे.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 28/06/2014 - 10:16
अतिरथी हा महारथींपेक्षा श्रेष्ठ. फार कमी लोकांना अतिरथी म्हणुन संबोधिले गेले आहे. राम, कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, क्रूतवर्मा, सात्यकी, भूरिश्र्वा, बाल्हिक, प्रद्युम्न, अनिरुद्ध, अभिमन्यु, द्रुष्ट्यद्युम्न, श्वेत हे सर्व अतिरथी होते. दुर्योधन आणि त्याचे १० भाऊ, अश्वत्थामा, घटोत्कच, वृषसेन, विराट, द्रुपद इत्यादी महारथी होते. अश्वत्थामाला काही ठिकाणी अतिरथी म्हटलेले आहे. भीम ८ रथांच्या योग्यतेचा होता (दुर्योधनापेक्षा कमी). एकावेळेस एक यौद्धा किती लोकांशी यशस्वीपणे लढु शकतो त्याप्रमाणे त्याला रथी, महारथी अथवा अतिरथीचा दर्जा मिळत असे. माझ्या माहितीनुसार एक अतिरथी एका वेळेस ६०००० सामान्य यौद्ध्यांशी यशस्वीपणे लढु शकत असे. याचा अर्थ असा की ६०००० सामान्य यौद्ध्यांमध्ये त्याला एकट्याला सोडल्यास तो त्याच्या शस्त्रांस्त्रांच्या बळावर त्यांच्यामधुन तरुन जाउ शकत असणार. भीमाला ८ रथांच्या योग्यतेचा अशासाथी म्हटलेले आहे की त्याच्याकडे इतरांच्या मानाने दिव्यास्त्रे कमी होती (माझे अनुमान). त्यामानाने ती दुर्योधनाकडे जास्त होती असे मानावे लागेल. पण भीम एकटा भल्याभल्यांना भारी पडला. आणि भीष्म आणि बाल्हिक सोडल्यास सर्वांना त्याने हरवले. एका युद्धात त्याने ३० कौरव मारले. ते ही कर्णासमोर ते लक्षात घेता त्याच्या ताकदीच्या जोरावर आणि निर्दयी स्वभावामुळे आणि रणमदात तो एकेकट्ञाला कधीही भारी पडत होता असे दिसेल. तर कर्णाला परशुरामाच्या शापामुळे अर्धरथी मानले गेले आहे. असे भीष्म म्हणतात. तेही केवळ कर्णाचा तेजोभंग करण्यासाठी आणि त्याला युद्धातुन बाजुला ठेवण्यासाठी. भीष्माच्या पाडावानंतर जेव्हा कर्ण भीष्माला भेटायला जातो तेव्हा भीष्म मान्य करतात की तो अर्जुनाच्या बरोबरीचा आहे. नंतर ते स्वतःच त्याला तो २ महारथ्यांच्या बरोबर असल्याचा निर्वाळा देतात. अर्थात तरीही त्याला अतिरथी मानत नहित. इतर बर्‍याच ठिकाणी मात्र कर्णाचा उल्लेख अतिरथी म्हणुन येतो.

In reply to by मृत्युन्जय

अर्धरथी म्हणजे ज्याला रथातुन युध्द करता येते पण रथ चालवण्याचे कौशल्य मात्र तितकेसे नसते असा योध्दा. महाभारतात अर्जुनानेही रथ चालवल्याचे उल्लेख आले आहेत असे वाचल्याचे आठवते पण स्वतः सारथीपूत्र असुनदेखील कर्णाने स्वतः रथ हाकल्याचा उल्लेख महाभारतात नाही.कौरव व पांडवांना शस्त्रास्त्राचे जे शिक्षण मिळाले ते त्याकाळच्या रितिरिवाजानुसार परिपूर्ण असावे त्यामुळे सारथ्यापासुन सर्व शस्त्रे हाताळण्याचे योग्य शास्त्रीय शिक्षण त्यांना मिळाले असण्याची शक्यता असावी. पण कर्ण मात्र शिकला तो केवळ महत्वकांक्षा वा इन्स्टिंक्ट मुळे.त्यामुळे त्याच्या कौशल्यात ती परिपूर्णता कधीही नव्हती.उदाहरणच द्यायचे झाले तर जिम इन्स्ट्रक्टर चा उपयोग करुन शरीरसौष्ठव बनवणे व केवळ शरीर बनवण्याच्या इच्छेखातर स्वतःहुन व्यायाम वगैरे करुन शरीर बनवणे ह्यात जसा फरक आहे तसाच फरक कर्णाच्या व इतर कौरवपांडवांच्या कौशल्यात असावा.(शरीर बनवायला आहार ही तितकाच महत्वाचा असतो व त्याबाबतीत एक निष्णात जिम इन्स्ट्रक्टरच व्यवस्थित मार्गदर्शन करु शकतो.एकुण शरीरसौष्ठव बनवण्यात योग्य डायटचा जो रोल आहे तसाच रोल महारथी बनण्यात सारथ्यकौशल्याचा असावा. त्यामुळे एकुणच सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याच्या कर्णाच्या प्रयत्नांत ह्या सारथ्यकौशल्य शिकण्याच्या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असु शकते.किंबहुना योग्य मार्गदर्शकच नसल्यामुळे त्याला ही गोष्ट कधी तशी स्ट्राईक झालीच नसावी. ह्याबाबतीत कर्ण मात्र तसा दुर्दैवीच म्हणावा लागेल.) अर्जुन कर्ण ह्या शेवटच्या निर्वाणीच्या युध्दावेळीही शल्य रथ सोडुन पळुन जातो पण केवळ रथ चालवता येत नसल्याने कर्ण असहाय होतो. व त्याची तिच कमतरता त्याचा बळी घेते.

विकास 27/06/2014 - 18:57
वर सांगितलेली रोचक कथा ऐकलेली आहे, पण खरे खोटे व्यासांनाच माहीत. :) त्यातच पुढे असे देखील होते की त्याने स्वतःच्या वडलांच्या हाडांचा वापर करून फासे तयार केले म्हणून तो जिंकायचा. (वडील मुलांसाठी हाडाची काडे करतात ते माहीत होते. हाडाचे फासे करणे नवीनच आय मीन फारच जुने!) Shakuni Temple विकीवरील माहितीप्रमाणे, महाभारतयुद्धानंतर शकुनी स्वर्गाला व्हाया केरळ गेला. स्थानिक समजुतीप्रमाणे, त्याने तेथे शंकराची पुजा केली आणि नंतर महात्मा (लॉर्ड) शकुनी होऊन तो स्वर्गाला गेला. त्याचे तेथे देऊळ पण आहे! वर दाखवलेले छायाचित्र त्या देवळाचे आहे. अजून एक लंगडण्यासंदर्भात गोष्ट ऐकलेली: महाभारत सिरीयल मधे निवडल्यानंतर गुफि पेंटलला म्हणे व्यक्तीगत आयुष्यात घोड्यावरून पडला. परीणामी व्यासांसमोर नाही पण चोप्रांसमोर तो लंगडत गेला. त्यांना ते आवडले आणि शेवटपर्यंत लंगडीचे राज्य त्याच्यावर (म्हणजे गुफी पेंटलवर) आले!

In reply to by विकास

आगाऊ कार्टा 27/06/2014 - 19:48
शकुनीने वडलांच्या हाडांचा वापर करून फासे तयार केले नव्हते तर ते फासे जरासंधाच्या हाडांपासुन बनवलेले होते. त्यामुळे दान कोणीही मगितले तरी ते कौरवांच्या बजुनेच पडत असे. परंतु द्युताच्या प्रसंगी फासे फेकत असत तेव्हा भीम मोठ्याने ओरडत असे. भीमाच्या आवाजाने ते फासे थरथरत असत (कारण भीमाने जरासंधाला मारले होते) आणि दान नेमके पांडवांच्या बाजुने पडत असे. हे फक्त शकुनीच्या लक्षात आले तेव्हा त्याने दुर्योधनाला सांगुन भीमाल गप्प केले. त्यानंतरचे महाभारत सर्वांनाच माहित आहे.

विकास 27/06/2014 - 19:10
खालती गुगलबुक्स मधला संदर्भ आयफ्रेम मधे टाकला आहे, तो वाचता आले नाही तर सांगा. (कधी कधी भारतात वाचता येत नाही म्हणून). देवदत्त पटनाईक यांनी महाभारतावर बराच अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात तथ्य असावे. (थोडक्यात: ह्या नंतरच्या लोककथा आहेत. बोकडाशी लग्न जैनांच्या महाभारतातून आले आहे. काही ठिकाणी शकुनीच्या भावांना आणि वडलांना भिष्माने नाही तर दुर्योधनाने मारले. तेंव्हा एखादा व्हिलन एकापद्धतीने का वागतो हे समजून घेणे पण महत्वाचे आहे... ) मला एक पडलेला प्रश्नः जर शकुनीला कौरवांचा इतका खुन्नस होता, तर तो सरळ पांडवांनाच जाऊन का मिळाला नाही? ;)

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 30/06/2014 - 14:10
जर शकुनीला कौरवांचा इतका खुन्नस होता, तर तो सरळ पांडवांनाच जाऊन का मिळाला नाही? >>>>>>> बाहेरुन जितके नुकसान करता येते त्यापेक्षा कीतीतरी पट जास्त नुकसान आत राहुन करता येते.

धन्या 27/06/2014 - 19:40
इथेही जन्म पत्रिका आणि ज्योतिषी आहे. म्हणजे हे खुळ अगदी महाभारत काळापासून आहे तर. :D कथा अतिशय रोचक आहे. पहिल्यांदाच वाचली.

मराठे 27/06/2014 - 21:09
गंमत म्हणून महाभारतातील सगळ्या अकल्पीत आणि असंभव गोष्टी काढून टाकल्या (उदा: वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीची न संपणारी साडी, ब्रह्मास्त्र किंवा पर्जन्यास्त्र सारखी अस्त्र, विश्वरूपदर्शन, संजयाची दिव्यदृष्टी इ.इ.) तर महाभारत कसं असेल? महाभारत तरीही श्रेष्ठ महाकाव्य असेलच. श्रीकृष्ण महा"मानव" म्हणून समोर येईल. महाभारत कालीन राजकारण आणि समाजातील प्रचलीत रुढी आणखी स्पष्ट होतील. वरवरच्या चमत्कारापेक्षा त्या महाकाव्यातलं खरं मर्म लोकांना नीट समजेल.

एस 27/06/2014 - 23:38
या किंवा अशा हरदासी कथांना महाभारतात आधार शोधणे किचकट काम असणार. इथे घेतले गेलेले आक्षेप या गृहीतकावर आधारीत आहेत की महाभारत रचले गेले व नंतर कालौघात मूळ काव्याचा आधार घेऊन लोकसाहित्यात म्हणा किंवा इतर साहित्यात अशा कल्पना/कथा निर्माण होत गेल्या. समजा आपण हे गृहीतक उलटे करून बघितले, म्हणजे जय हे मूळ काव्य, त्यावर संस्करण-बदल-भर वगैरेंनी झालेले भारत हा विस्तारग्रंथ आणि मग महाभारत या सगळ्यांत ह्या काव्याने लोकसाहित्यातून आणि लोकसाहित्यानेही ह्या महाकाव्यातून संकल्पना उचलल्या असाव्यात, कथाबीजांचे आणि कल्पनाविस्तारांचे आदानप्रदान आणि तेही अतिशय विस्तृत अशा कालखंडात होत राहिले असावे. मग या हरदासी कथांचा अशा साहित्यावर होणारा परिणाम असा छाटून टाकता येत नाही. अशा दृष्टीने विचार करून पाहूया. कालखंडनिश्चितीच्या बाबतीत पं. जवाहरलाल नेहरूंनी आपल्या 'डिस्कवरी ऑफ् इंडिया' या ग्रंथात महाभारताला रामायणापेक्षा जास्त प्राचीन ठरवले आहे. मूळ महाभारताची खात्रीशीर प्रत उपलब्ध असेल का याविषयी माझ्या मनात किंतु आहे.

In reply to by एस

प्रचेतस 28/06/2014 - 09:14
इरावती कर्वे यांच्या 'युगांत' मधील प्रस्तावनेत महाभारतावरील जुन्या प्रतींचे तसेच त्याच्या कालखंडाच्या मागोव्याचे उत्कृष्ट विवेचन आहे. तसेच भांडारकर प्राच्य विद्या संस्थेने महाभारताच्या बहुतांश प्राचीन हस्तप्रतींचा अभ्यास करून संशोधीत प्रत सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे त्यात द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगीचा कृष्णाचा धावा, त्याने वस्त्रे पुरवून पुरवून सोडवणे असे प्रसंग गाळून टाकले आहेत.
डिस्कवरी ऑफ् इंडिया' या ग्रंथात महाभारताला रामायणापेक्षा जास्त प्राचीन ठरवले आहे.
ह्याला मी ह्या लेखनाचा काळ असा मानतो. रामायणाचा कालखंड हा महाभारतापेक्षा नक्कीच जुना आहे. महाभारतात रामायण अथवा वाल्मिकिचा उल्लेख कुठेही येत नाही पण रामकथेचे उल्लेख मात्र येतात तसेच त्यात रामाला अवतार न मानता एक श्रेष्ठ राजाच मानलेले आहे. अर्थात रामकथा जरी आधीपासून प्रचलित असली तरी रामायण हे महाभारतानंतर लिहिले गेलेले असावे असे त्याच्या लेखनावरून दिसते.

In reply to by प्रचेतस

एस 28/06/2014 - 15:01
ह्या विषयाचा माझा अजिबात अभ्यास नाही. तरीपण एक तप आणि दोनेक वर्षांनंतर स्मरणशक्ती जेवढी साथ देईल तेवढे आठवून थोडे खरडतो. भाग एक - महाभारताच्या संशोधित प्रतींसंदर्भात, लिपीचा शोध महाभारत वगैरे काव्ये रचली गेली तेव्हा लागला नव्हता. मुखोद्गत पद्धतीने इतक्या मोठ्या साहित्याचे जतन शतकानुशतके होत राहिले. पण त्यात कोणताही बदल झाला नाही असे मानणे कठीण आहे. "Unlike the Vedas, which have to be preserved letter-perfect, the epic was a popular work whose reciters would inevitably conform to changes in language and style." भाग दोन - कालखंडनिश्चिती. इथे मानवाला शेती करण्याची कला माहीत झाली ती साधारणपणे सात हजार वर्षांपूर्वी. तोपर्यंत स्थिर संस्कृतींचा किंवा समाजांचा उदय होणे अशक्य होते. शेतीचा फायदा असा होतो की अन्नोत्पादन आता भुकेपुरते मर्यादित न राहता शिल्लक उरू लागले आणि उत्पादनांची देवाणघेवाण, पुढे वस्तुविनिमयपद्धती (Barter trade) उदयास आली. शेती आणि व्यापार यामुळे स्थिर मनुष्यसमूह व शहरे उदयास आली. त्याआधी अल्पशा मानवी वसाहतींचे एका जागीचे स्थान हे तिथल्या अन्नाच्या उपलब्धतेपुरतेच कायम असे. ही नागरसंस्कृती सिंधू नदीच्या खोर्‍यात उदयास येण्यास आणखी चारेक हजार वर्षे जावी लागली. याच काळात तेव्हाचा द्राविड प्रदेश म्हणजे गंगेच्या खोर्‍यापासून ते दक्षिणेकडे हा घनदाट निबिड अरण्याने व्यापलेला होता. सिंधू संस्कृतीच्या उत्तरकालात नागरसंस्कृती आणखी पूर्वेला आणि दक्षिणेला विकसित झाली. पण अद्यापही आजच्या दख्खनच्या पठारावरील इतर मानवी संस्कृतींशी वायव्येच्या सभ्यतेशी फारसा संबंध आलेला नव्हता. गंगेच्या उर्ध्वखोर्‍यात मानवी वस्तीचे नागरस्वरूपातील अवशेष सापडले ते इसवी सनाच्या हजार वर्षांपूर्वीनंतर. पण तेव्हा द्राविड टोळ्या मध्य व दक्षिण भारतात स्थिरावल्या होत्या. यात नाग व असुर संस्कृती प्रमुख होत्या. महाभारत रचले गेल्याचा कालखंड साडेपाचशे ते तीनशे ख्रिस्तपूर्व असा असावा, तर रामायण हे इसवीसनाच्या पहिल्या शतकात रचले गेले असावे. तत्पूर्वी सातशे ख्रिस्तपूर्वपर्यंत उत्तरवेदिक कालखंड आणि बौद्धमताचा उदय होऊन गेला होता. नॉदर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअरचा कालखंड Early NBPW (800-300 BC) आणि Late NBPW (300-100 BC) यावरूनही त्याकाळची समाजरचना आणि मुख्यत्वे अर्थकारणाची माहिती मिळते. यावरून सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतरची पहिली गणराज्ये, नदीकाठी शेतीनिगडीत अर्थव्यवस्थेचा झपाट्याने झालेला विकास, संरक्षणासाठीच्या 'पुर' म्हणजेच कोटांची बांधणी करण्याची पद्धत, लवचिकता गमावलेले सामाजिक स्तरीकरण, वर्णसंस्थेचे जातिव्यवस्थेत अवमूल्यन, व्यापाराचा विस्तार व यादवी युद्धांतून साम्राज्ययुद्धांमध्ये झालेले परिवर्तन ही या काळाची काही ठळक वैशिष्ठ्ये होत. याला भारतीय पुरातत्त्वविभागाने केलेल्या उत्खननात आणि कार्बन डेटिंगद्वारे दुजोरा मिळाला आहे. भाषेबद्दल - ह्या काव्यांचे संस्कृत ही उत्तरवैदिक कालखंडातील वाटते. पाणिनिच्या इसपू. चौथ्या शतकातील व्याकरणाचा प्रभाव या काव्यांच्या भाषेवर आढळतो. दोन्ही काव्ये बुद्धोत्तर असावीत असे सूचित करणारा भाग वाल्मिकीरामायणात येतो. रामाच्या तोंडी अयोध्याकांडात जाबालीला उद्देशून येणारे वाक्य पहा - "यथा ही चोर: स तथा ही बुद्ध स्वथागतं नास्तिक मंत्र विद् तस्मादि य: शक्यतम: प्रजानाम् स नास्तिके नाभि मुखो बुद्ध: स्वातम्।" पूर्ववेदांतमत आणि बौद्ध साहित्यातील पाली-प्राकृत भाषेचा वापर हे दोन्ही समकालीन असावेत. अश्वघोषाच्या बुद्धचरित मध्ये वाल्मिकी त्याच्या समकालीन असल्याचा उल्लेख करतो. दुसरा भाग मानवइतिहासातील वेगवेगळ्या धातूंचा प्रभाव. सिंधूसंस्कृती ही ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांच्या आसपास क्षीण होऊ लागली. त्याचबरोबर मानवइतिहासातील ताम्रयुग संपुष्टात आले. सिंधूसंस्कृतीच्या अस्तानंतर साधारणतः बाराशे ते हजार वर्षे ख्रिस्तपूर्व पासून लोहयुगाची सुरुवात झाली. भारतीय उपखंडात उत्तर आणि दक्षिणेत जवळजवळ एकाच वेळी पण स्वतंत्रपणे लोहयुग अवतरले. लोहयुगाबरोबर गंगेच्या खोर्‍यात गणपद व महाजनपदरूपी राज्यव्यवस्थांची सुरुवात झाली. लोहयुगातील प्रगत शस्त्रास्त्रांमुळे युद्धांचे स्वरूप बदलले व लहान टोळीयुद्धे अस्तित्वात आली. या युद्धांचे स्वरूप आपापसातील यादवीसारखे केंद्रित होते. संस्कृतींमधील विनाशकारी युद्धे अजून लांब होती. महाभारतात कर्ण हा कौरवांचे सैन्य घेऊन तत्कालीन संपूर्ण आर्यावर्तावर ताबा मिळवण्यासाठी मोहीम काढतो. यात कर्णाने कंबोज, शाक्य, केकय, अवंत्य, गांधार, मदरक, त्रिगर्त, तंगण, पांचाल, विदेह, सुहमा, अंग, वंग, निशद, कलिंग, वत्स, अश्मक वगैरे राज्यांवर स्वारी केल्याचा उल्लेख येतो. पण कर्ण मरहट्ठांच्या दक्षिण प्रदेशात पाऊल टाकण्याचे टाळतो. याचे कारण म्हणजे इथून पुढचा (दक्षिणेकडचा) प्रदेश आर्यावर्तात मोडत नाही असे देतो. याउलट रामायणात मध्य व दक्षिण भारताच्या लोकसंस्कृतींचे, भौगोलिक परिस्थितीचे आणि राजकारणाचे खोलवर वर्णन येते. रामायणातील संघर्ष हा जातिव्यवस्था पूर्णपणे प्रचलित झालेल्या संस्कृतीचा आणि दक्षिणेतील अरण्यवासीयांचा संघर्ष आहे. येथे आर्यावर्ताची सीमा ओलांडून कथा दक्षिण टोकापर्यंत पोहोचते. दुसरे म्हणजे महाभारतात असुरांचे वर्णन तितके येत नाही जितके रामायणात येते. रामायण मुळातच सुरासुर संघर्षाची कथा आहे. महाभारतात हा संघर्ष खूपच बाल्यावस्थेत आहे. रामायणातील अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे उत्तर भारताच्या पूर्व भागातील प्रगत उत्तरनागरसंस्कृतींचे वर्णन आहे, तर महाभारतात प्रामुख्याने कुरुप्रदेश म्हणजे पश्चिमोत्तर भारतातील वरील प्रदेशाच्या पश्चिमेकडील तितक्या विकसित न झालेल्या संस्कृतींचे वर्णन आहे. महाभारतातील युद्धाचे वर्णन हे अतिरंजित असावे. इतके मोठे सैन्य पाळण्याइतकी लोकसंख्या, आर्थिक उलाढाल या सर्व बाबी तेव्हा नव्हत्या. नेहरूंनी ते युद्ध हे प्रत्यक्षात लहानसे टोळीयुद्ध असावे असे म्हटले आहे. रामायणात मात्र दक्षिणेकडील तशाच प्रगत राज्यव्यवस्थांचा उत्तरेकडील जनपदांशी आलेला संबंध अधोरेखित झाला आहे. वरील सर्व बाबी अभ्यासता मला महाभारत हे रामायणापेक्षा जुने असावे, पण बौद्धोत्तर कालखंडातील असावे असे वाटते.

In reply to by एस

प्रचेतस 29/06/2014 - 11:16
प्रतिसाद अतिशय आवडला.
अरील सर्व बाबी अभ्यासता मला महाभारत हे रामायणापेक्षा जुने असावे, पण बौद्धोत्तर कालखंडातील असावे असे वाटते.
शंकाच नाही. पण महाभारताचा काळ त्यातही मूळ व्यासप्रणीत 'जय' ग्रंथाचा काळ हा बुद्धपूर्व असावा असे मला वाटते. इ.स. पूर्व १२०० ते ८०० वर्षांच्या आसपास. त्यानंतर बुद्धकाळात व तदनंतरच्या मौर्य, कण्व, सातवाहन, शुंग, गुप्त इत्यादी कालखंडात त्यात सातत्याने भर पडत गेली व आजचे महाभारत तयार झाले. उदा. यवन, शक, हूण अशा परकीय टोळ्यांचा उल्लेख, अहिंसेचा प्रसार करणारी अर्धांग सोनेरी झालेल्या नकुलाची कथा.

In reply to by एस

बॅटमॅन 29/06/2014 - 21:03
स्वॅप्स, प्रतिसाद आवडला. बरेच मुद्दे आहेत, आणि त्यातल्या थोड्यांबद्दलच चर्चा करतो. जय, भारत आणि महाभारत या ३ स्टेजेस आहेत असे खुद्द महाभारतातच नमूद आहे. ते सोडून एम आर यार्दी या संशोधकांनी १९८६ साली 'महाभारत : दि ग्रोथ ऑफ एपिक - अ स्टॅटिस्टिकल स्टडी' हे पुस्तक लिहिले, ज्यात महाभारतातील लेखनपद्धतीचा सांख्यिकीय अभ्यास करून त्यांनी ५ वेगवेगळे लेयर्स ओळखून दाखवले की कुठल्या पर्वातला कुठला भाग हा कुठल्या लेयरमध्ये आहे इ.इ. बाकी महाभारत म्ह. ग्लोरिफाईड आणि मॅग्निफाईड दाशराज्ञ युद्ध असे एका जे एन यू मधील प्राध्यापकाचे मत रोचक असले तरी तितके ग्राह्य वाटत नाही. तो पेपर विकीवर पूर्ण डौनलोडसाठी उपलब्ध आहे. अन रामायण व महाभारत या दोहोंची भाषा पाणिनीय संस्कृतच आहे. त्यामुळे लेखनकालदृष्ट्या बौद्धोत्तर असणे क्रमप्राप्तच आहे. मात्र त्यात वर्णिलेल्या घटना या बौद्धोत्तर असणे संभवत नाही, कारण निव्वळ बुद्ध या शब्दोल्लेखाने लुंबिनीत जन्म झालेला सिद्धार्थ गौतमच अभिप्रेत आहे असे दिसत नाही. अन तसे पाहिले तर गीतेतल्या ११ व्या अध्यायात काही श्लोक आर्ष रूपे , आर्ष वृत्ते वापरून लिहिलेले आहेत त्यावरून त्याचे पाणिनीपूर्वत्व अधोरेखित होते. अन जनरल घटना पाहिल्या तर बौद्ध धर्माचा दूरदूरतक संबंधच नाहीये- रामायणातही अन महाभारतातही. बाकी महाभारत-रामायणाच्या पौर्वापर्याबद्दलचे मुद्दे ठीक आहेत, पण या काळाबद्दल साहित्यिक सोडून अन्य माहिती खूप कमी ठिकाणी आहे. रेमंड अलचिन नामक पुरातत्त्ववेत्याचे आयर्न एज इंडिया नामक पुस्तक या कालखंडावर प्रकाश टाकते, पण ते तितपतच. मुख्य अडचण अशी आहे, की आपल्याकडे या महाकाव्यांशी संबंधित ठिकाणे उदा. अयोध्या, द्वारका, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, इ. ठिकाणी व आसपास व्हावे तितके उत्खनन झालेले नाही. कैक ठिकाणी जुन्याच इमारतींवर आजची घरे, देवळे, सर्व काही नांदत आहेत. इतक्या सगळ्या लोकांना अन्यत्र हलवणे केवळ अशक्य आहे. ट्रॉयला हेन्रिख श्लीमानने आणि त्यानंतर ऑल द वे डौन टु नुकतेच वारलेले मान्फ्रेड कॉर्फमन या लोकांनी गेली जवळपास १५० वर्षे उत्खनन केलेय तेव्हा कुठे ट्रोजन युद्धाबद्दल कल्पनातीत नवी माहिती मिळाली. आपल्याकडे काय झालंय? -हस्तिनापूरः १९५१ सालचे एक उत्खनन, बहुतेक ७३ साली अजूनेक. -इंद्रप्रस्थः सत्तरच्या दशकात ट्रायल उत्खनन, सध्या जस्ट थांबवलेय सुरू असलेले. पुन्हा पुढच्या वर्षी सुरू होईल. -द्वारका: पाण्याखाली काहीतरी सापडलेय. पण त्याचा काळ गुप्तकाळापर्यंतच (इ.स. ४००-५००) पर्यंतच जातो. त्याच्या बर्‍यापैकी अगोदर म्ह. इसपू ५०० च्या अगोदरचे फक्त खापरांचे अवशेष बेट द्वारका या ठिकाणी मिळालेले आहेत. -अहिच्छत्रः उत्खनन ८३ साली झाले बहुधा. आपल्याकडे काही प्रयत्न झालेत, पण ते खूप कमी आणि खूप एकांगी आहेत. त्यात परत हडप्पा संस्कृतीनंतर म्ह. सुमारे इ.स. २००० पासून ते मौर्यकाळ - इ.स.पू. ३०० या सुमारे १७०० वर्षांच्या काळात अख्ख्या भारतात

एकही - & आय रिपीट एकही

लिपीचा पुरावा सापडलेला नाही. लिपी कसलीही असो, संस्कृत असो नैतर तमिळ असली तरी ठीक, अगदी चिनी असली तरी चालेल, पण कुठली तरी मिळू द्या!!! पण नाही. सापडलेलंच नाही. त्यामुळे एका बाजूला रामायणमहाभारतागत ग्रंथ आणि दुसर्‍या बाजूला तुटक उत्खनने हे इतकेच आपल्यासमोर आहे. या दोहोंची सांगड घालणे हे महाकर्मकठीण काम असून त्याला आत्ता आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अजून टनावारी उत्खनने व्हायला हवीत तेव्हा कुठे आपण याबद्दलचा विदा ठीकठाक प्रमाणात आपल्याकडे आहे असे म्हणू शकतो. तूर्त काहीच विदा नाही म्हणण्यासारखा. उत्खनन करून जी मातीची भांडी सापडतात त्यावरून काळ सांगितला की संपलं इतकंच चाललंय. बाकी काही कुणी करत नाहीये. हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा उलगडा होणे आणि विशिष्ट ठिकाणी उत्खनने आजवर झालीत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणे हे झाल्याशिवाय, रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे. माझे वैयक्तिक मत आहे की अशा घटना घडणे अगदी शक्य आहे, फक्त अतिरंजित पार्ट वगळून. पण त्याला पुरावा पाहिजे...

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 30/06/2014 - 09:53
उत्खनने आजवर झालीत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणे हे झाल्याशिवाय, रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे.
समजा, पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्खनने झाली, तर रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे, हे सिद्ध होण्यासाठी त्यातून कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणता ?

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 30/06/2014 - 10:40
गुड क्वेश्चन चित्रगुप्तजी. तुमच्या प्रश्नाचे एकदम डायरेक्ट उत्तर माझ्याकडे नाही, पण उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ट्रॉय, मायसीनी, इ. ठिकाणी उत्खनने झाली, तेव्हा होमरने वर्णन केल्याप्रमाणे टनावारी खजिना सापडला. चांदी-सोन्याच्या मुठी असलेल्या तलवारी, वाईन प्यायचा सोन्याचा कप, रानडुकराचे सुळे लावलेले हेल्मेट, ब्राँझचे चिलखत, इ.इ. अनेक गोष्टी ज्या होमरच्या काव्यात वर्णिलेल्या होत्या. त्याशिवाय तत्कालीन शिलालेखांत अलेक्सांद्रॉस ऊर्फ पॅरिस आणि त्याचा बाप पियामारादू ऊर्फ प्रिआम यांची नावे कोरलेली मिळालेली आहेत शिवाय आगामेम्नॉनच्या बापाचा उल्लेख आहे. ग्रीकांचा 'अहियवा' ऊर्फ अखीअन्स म्हणून उल्लेख मिळाला आहे, त्यामुळे होमरचे काव्य खर्‍या घटनांवर आधारित आहे असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे अजून उत्खनने झाली, तर काही शस्त्रे म्हणा, काही वसाहतींचे 'रॉयल' छाप अवशेष, काही शिलालेख, थोडाफार खजिना आणि या संस्कृतीचा अन्य समकालीन उल्लेख असे काहीसे सापडले तर ही काव्ये मूलतः खर्‍या घटनांवर आधारलेली असू शकतात असे म्हणता येईल. म्ह. अगदी कृष्ण, युधिष्ठिर , इ. नावेच पाहिजेत असे नाही, पण मुख्य कथाभाग- मोठ्या युद्धवाला- तो तरी झाला याचा पुरावा मिळाला तर प्रूफ झालेच ना.

In reply to by बॅटमॅन

एस 30/06/2014 - 14:12
सर्व प्रतिसाद बारकाईने वाचले. वल्ली जसे म्हणताहेत की किमान 'जय' ह्या ग्रंथाचा कालखंड बुद्धपूर्व असावा, ह्याला काहीपक्षी दुजोरा देणारे विश्लेषण माझ्याच प्रतिसादात आले आहे. कर्णाच्या मोहिमेत महरठ्ठांचा प्रदेश आर्यावर्तात न मोडणे पण बौद्धमताचा प्रसार दक्षिणेतही निदान अशोकाच्या राज्यकालात होणे हे लक्षणीय आहे. या दोन गोष्टींची कालानुयिक तुलना केल्यास 'जय' ग्रन्थातील वर्णन किंवा मूळ महाभारताचे कथाबीज हे अजून आठशे-ते-हजार वर्षे मागे जाऊ शकते. बॅटमॅनच्या प्रतिसादातील लिपीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सिंधूसंस्कृतीनंतर लिपीचा र्‍हास झाला. तो इतका की या संस्कृतीला आणि त्यानंतरच्या प्रागैतिहासिक काळाला जोडणारा दुवाच सापडत नाही. पण लिपीचा शोध लुप्त झाला असतानाही नंतरच्या काळात जी काही ग्रंथनिर्मिती झाली तिची रचना आणि संवाहन केवळ मुखोद्गत पद्धतीने इतक्या मोठ्या कालखंडावर होत राहणे अचंबित करणारे आहे. इथे इतिहास काहीतरी मुग्ध आहे. सिंधूसंस्कृतीच्या लिपीचे वाचन आणि उत्खनन करून मिळवलेले मधल्या कालखंडातील अवशेषरूपी पुरावे ह्या दोनच बाबी हरवलेल्या शृंखलांचे अस्तित्त्व सिद्ध करू शकतील. बौद्धमताचा संबंध नाहीच. ते केवळ कालखंडाचा संदर्भ घेण्याइतपतच विचारात घेतले आहे. भारतीय इतिहासाचा मागोवा घेण्यात काय तृटी आहेत हे बॅटमनच्या प्रतिसादात सुरेखपणे समजावले आहे. त्या दृष्टीने अधिक प्रयत्न होणे फार गरजेचे आहे. असा मागोवा घेण्याचे काम लिखित साधनांच्या बाबतीत लिपीच्या पहिल्या धांडोळ्यापर्यंत जाऊन थांबतो. महाभारत-रामायण हे ग्रंथही त्याला अपवाद नाहीत. तोपर्यंत हे ग्रंथ लेखनकालदृष्ट्या बुद्धोत्तर असावेत हा पुराव्यांनी दर्शवलेला निष्कर्ष आणि ग्रंथ किंवा कथाबीज जास्त प्राचीन असावेत हा अंदाज ह्या दोन गोष्टी आज आपल्या हातात आहेत.

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 30/06/2014 - 15:01
कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात समजा एका धष्ट्पुष्ट माणसाचा सांगाडा, त्याच्या मांडीचे हाड मोडलेल्या अवस्थेत असलेला, आणि जवळच एक गदा सापडली, तरी तो दुर्योधनाचाच सांगाडा आहे, हे कसे ठरवणार ? अन्य कलाकृती, शिल्पे, वस्तू, वगैरे अगदी उत्खननातूनच कशाला निघायला हवीत ? ती वरतीच बक्कळ आहेत की? महाभारताच्या युद्धाचा देखावा असलेले दोन हजार वर्षापूर्वीचे शिल्प सापडले, तरी ते महाभारत कथा ऐकून घडवलेले असू शकते, तो ती घटना खरोखर घडली, याचा पुरावा कसाकाय मानायचा? अगदी उत्खननातून सापडले, तरच तो पुरावा ग्राह्य का मानला जावा?

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 30/06/2014 - 15:24
कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात समजा एका धष्ट्पुष्ट माणसाचा सांगाडा, त्याच्या मांडीचे हाड मोडलेल्या अवस्थेत असलेला, आणि जवळच एक गदा सापडली, तरी तो दुर्योधनाचाच सांगाडा आहे, हे कसे ठरवणार ?
जोपर्यंत 'दुर्योधन इथे/अन्यत्र गदाप्रहाराने मेला' असे लिहिलेला एखादा शिलालेख इ. सापडत नै तोवर तो सांगाडा दुर्योधनाचाच आहे, असे म्हणणे शक्य नाहीच. पण बर्‍यापैकी जुना, म्ह. बुद्धपूर्वकालीन तसा अवशेष मिळाला, तर महाभारतातली कथा कदाचित खरी असू शकेलही असे सांगता येईल. अर्थात त्यासाठी फक्त हाडमोडका सांगाडा असून चालणार नाही, तो राजाचा/राजकुळातल्या व्यक्तीचा सांगाडा होता असे दर्शवणारा एखादा पुरावा पाहिजे. एकाच गोष्टीवरून असे सिद्ध करता येत नाही, त्याला अन्य बरेच पुरावे लागतात.
अन्य कलाकृती, शिल्पे, वस्तू, वगैरे अगदी उत्खननातूनच कशाला निघायला हवीत ? ती वरतीच बक्कळ आहेत की? महाभारताच्या युद्धाचा देखावा असलेले दोन हजार वर्षापूर्वीचे शिल्प सापडले, तरी ते महाभारत कथा ऐकून घडवलेले असू शकते, तो ती घटना खरोखर घडली, याचा पुरावा कसाकाय मानायचा?
अगदी सहमत आहे. पण असे एखादे शिल्प इ. जितके जुने मिळेल तितक्या वर्षांपासून ती कथा प्रचलित असल्याचा पुरावा मिळतो. एखादी कथा किती वर्षांपासून प्रचलित आहे, याचा तो सर्वांत डायरेक्ट पुरावा आहे.
अगदी उत्खननातून सापडले, तरच तो पुरावा ग्राह्य का मानला जावा?
अगदी योग्य प्रश्न. तर त्याचे उत्तर असे आहे की उत्खननात तुम्हांला प्रत्यक्षपणे बर्‍याच गोष्टी क्लीअरकट कळतात. उत्खननाचा आधार नसेल, तर फक्त ग्रंथ समोर घेऊन बसले की कल्पनेच्या भरार्‍या किती आणि कुठल्या दिशेला मारल्या जातात याला काही सुमार नसतो. आता टिळकांनीही आर्क्टिक होम ऑफ द वेदाज़ इ.इ. लिहिले आहेच की. त्यात कल्पनेच्या भरार्‍या सोडल्या तर काय आहे? त्यांना काही गोष्टी योग्य वाटल्या आणि त्याच्या आधारे त्यांचा सिद्धांत त्यांनी मांडला, पण निव्वळ ग्रंथांवर अवलंबून राहण्यातला तोटा हा आहे की ग्रंथांत अनेक काल्पनिक गोष्टींचे बेमालूम मिश्रण झालेले असते, काही केसेसमध्ये परस्परविरोधी डीटेल्सही असतात. त्यामुळे 'नक्की काय झाले असावे' याचा निर्णय करण्याची प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि सोपी करण्यासाठी उत्खननाची फार मदत होते. शेवटी ऐतिहासिक पुराव्याची निश्चिती करण्यासाठी उत्खनन हे ग्रांथिक पुराव्यांसारखेच साधन आहे. उत्खनन हेच सुप्रीम आहे असा माझा दावा नाही. त्याचा व्यर्थपणा एका साध्या उदा.द्वारे सांगतो. १८ व्या शतकात मराठे अख्ख्या भारतभर पसरले. अगदी अटकेपार इ. जाऊन आले. पण आज शनिवारवाड्याकडे पाहून वाटतं तरी का की इथे राहणार्‍या सत्ताधीशांची पॉवर तेवढी होती म्हणून? नुसता पडका आणि कंजस्टेड वाडा वाटतो फक्त. पण तसे सांगणारे असंख्य कागदपत्र आज उपलब्ध आहेत म्हणून आपण सांगतो की मराठ्यांनी खरोखरच उत्तरेपर्यंत स्वार्‍या केल्यात. मी स्वतःलाच विरोध करतो आहे असे वाटेल, पण तसे नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, की ऐतिहासिक सत्यनिर्णयनासाठीचे उत्खनन हे एक महत्त्वाचे अंग आहे. ते व्हावे तसे आणि तितके झालेले नाही, त्यामुळे ग्रांथिक पुरावा जो काही आहे, त्यात किती सत्य आणि किती अतिशयोक्ती आहे हे तूर्तास सांगता येत नाही. एकूणच निर्णयप्रक्रियेतले हे अंग आजवर दुर्लक्षित असल्याने आजवरचे प्रयत्न अतिशय एकांगी आणि अपुरे राहिलेले आहेत. तस्मात उत्खनने अजून झाली पाहिजेत. सर्वच गोष्टींचे डायरेक्ट पुरावे नसले तरी इन्डायरेक्ट पुरावे कैक गोष्टींचे मिळू शकतील आणि ते अधिक ठामपणे दर्शवता येतील म्हणून त्याला महत्त्व आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 30/06/2014 - 17:34
प्रतिसाद आवडला रे.
पण असे एखादे शिल्प इ. जितके जुने मिळेल तितक्या वर्षांपासून ती कथा प्रचलित असल्याचा पुरावा मिळतो. एखादी कथा किती वर्षांपासून प्रचलित आहे, याचा तो सर्वांत डायरेक्ट पुरावा आहे.
नाणेघाटातल्या इ.स.पू २१० च्या आसपासच्या नागनिकेच्या लेखात वासुदेव आणि संकर्षणाला वंदन केलेले आहे तर इ.स २३० च्या सुमारास कोरल्या गेलेल्या पांडवलेणीतील गौतमी बलश्रीच्या लेखात गौतमीपुत्राचा पराक्रम राम (भार्गवराम), कृष्ण, भीम, अर्जुन यांसमान लेखला आहे तर गौतमीपुत्राचे तेज नाभाग, नहुष, जनमेजय, ययाती, दाशरथी राम, अंबरीष यासमान लेखिले आहे. ही सर्व नावे महाभारतात आहेतच. साहजिकच महाभारत कथा त्याकाळी (इ.स. पू. २०० पासून) पूर्णपणे प्रचलित असावी हे उघड आहे. आणि ह्या व्यक्तींना (गौतमीपुत्राच्या लेखात) देव मानलेले दिसत नाही. अशोकाच्या लेखातही पांडवांचे उल्लेख बहुधा असावेत. संदर्भ तपासून पाहिले पाहिजेत.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 30/06/2014 - 17:41
धन्स रे. :) बाकी या शिलालेखांतून असे पुरावे निश्चितपणे मिळतातच. फक्त एक शंका: नागनिकेचा शिलालेख इसपू २१० चा आहे की इस २१० चा? सातवाहनांचा इतका जुना पुरावा असेलसे वाटत नाही. अन दैवतीकरण तोपर्यंत झालेले असावे. शिलालेखात डिरेक्टली लिहिले नसावे कारण त्याचा फोकस गौतमीपुत्र होता. बाकीचे लोक निव्वळ उपमेपुरते होते.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 30/06/2014 - 17:49
नागनिकेचा इ.स.पू. २१० च्या आसपासचा. ती प्रथम सातकर्णीची पत्नी आणि आद्य सातवाहन सिमुकाची सून. सिमुकाआधी सातवाहनांच्या तीन्/चार पिढ्या झाल्या असाव्यात. दैवतीकरण कृष्णाचे झाले असावेही कदाचित. पण रामाला मात्र इतर राजांसमानच मानलेले दिसते कारण त्याचे नाव इतर राजांबरोबरच आहे. अर्थात ह्या नावांव्यतिरिक्त इतर ठोस पुरावे नसल्याने नक्की काहीच सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 30/06/2014 - 18:01
धन्यवाद रे. इतका जुना शिलालेख म्ह. जबरीच आहे. बाकी रामपूजेचा सर्वांत जुना उल्लेख कुठे आहे काय माहिती. इ.स. पहिल्या शतकाच्या आसपास तरी भागवत धर्मात बहुधा 'वासुदेव कृष्ण'च जोरात होता असे दिसते.

In reply to by बॅटमॅन

एस 30/06/2014 - 18:43
गुप्त काळात बांधल्या गेलेल्या देवगडच्या विष्णू मंदिरात काही राममूर्त्या आहेत. हा राम कथेचा शिल्पस्वरूपातील सर्वात जुना पुरावा आहे. पण त्यातही राम हा मनुष्यरूपात दाखवला आहे. कदाचित इस दुसर्‍या शतकापासून राम दैवी रूपात दर्शविला जाऊ लागला असावा. संदर्भ - ए. एल. बाशाम.

In reply to by एस

बॅटमॅन 30/06/2014 - 18:47
ओह अच्छा, धन्यवाद. देवगड नसून देवगढ़ आहे ते. यूपीमधले दशावतार मंदिर. वन ऑफ द अर्लिएस्ट फ्रीस्टँडिंग टेंपल्स म्हणून त्याचे महत्त्व फार आहे. http://en.wikipedia.org/wiki/Dashavatara_Temple,_Deogarh

In reply to by बॅटमॅन

एस 01/07/2014 - 11:12
मोबाईलवरून नीट टंकता येत नाही. त्याचे 'दशावतार टेंपल' हे नाव अलिकडचे आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम (1814–1893) - भारतीय पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन मुख्य संचालक यांनी दिलेलं. मंदिर खूप भारी आहे.

In reply to by एस

बॅटमॅन 01/07/2014 - 12:12
ओह ओक्के. कनिंगहॅमने नाव दिलेलं माहिती नव्हतं, धन्यवाद. बाकी मंदिर प्रत्यक्ष पाहिले नाही, पण फटूंवरून तरी जबरी आहे हे दिसतंच आहे.

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 30/06/2014 - 19:38
त्यासाठी फक्त हाडमोडका सांगाडा असून चालणार नाही, तो राजाचा/राजकुळातल्या व्यक्तीचा सांगाडा होता असे दर्शवणारा एखादा पुरावा पाहिजे.
यावरून डिस्कव्हरी का कश्यावर तरी आलेला एक कार्यक्रम आठवला. त्यात इजिप्तचे पिरॅमिड्स बांधणार्‍या मजुरांच्या (जमीनीत गडलेल्या) सांगाड्यांपैकी एकाच्या कवटीत सोन्याचा दात होता. त्यावरून इजिप्तच्या पुरातत्व विभागाचे डायरेक्टर का कोणी हापिसर मोठ्या अभिमानाने सांगत होते, की पिरॅमिड्स बांधण्यासाठी वेठबिगार आणि गुलामांचा वापर केला जायचा, हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा असल्याचा हा पुरावा आहे. कारण या पुराव्यावरून हे सिद्ध होते, की त्या मजुरांना त्याकाळचे हेल्थकेयर वगैरे दिले जायचे. एवढे, की चक्क सोन्याचा दात बसवून दिला गेल्याचा पुरावा आहे... वगैरे. मी असे वाचले आहे, की त्याकाळी इजिप्त मधील भव्य इमारती वगैरे बघायला जे प्रवासी दूरदूरच्या देशातून येत ( हे प्रवासी त्याकाळच्या प्रवासातील त्रास वगैरेंचा विचार करता चांगले सुस्थितीतले असणार), त्यांना गुलाम बनवून बांधकामात मजूरी करायला लावत, आणि ते मेले, की तिथेच गाडून टाकत. हा सोन्याचा दातवाला देखील असाच एकादा सधन प्रवासी असू शकतो, आणि उत्खननातून मिळालेला हाच पुरावा वेठबिगारीच्या सिद्धांताचीसुद्धा पुष्टी करू शकतो....

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 30/06/2014 - 21:38
हा हा हा, अगदी अगदी. उत्खननातले पुरावेही दिशाभूल करू शकतात. म्हणून त्यासाठी दोन्ही पद्धतीचे पुरावे आणि बरेच तारतम्य पाहिजे. जिथे निर्णयन होत नाही तिथे तसे सांगितले पाहिजे. याची काही मजेशीर उदाहरणे ट्रॉय आणि मायसीनीच्या उत्खननात सापडतील ती देणार आहे.

ब़जरबट्टू 28/06/2014 - 09:33
कथा म्हणून फार आवडली.. बाकी एव्हढे काही लाजिक असावे, असे वाटत नाही.. जर शक्कुला बदलाच घ्यायचा होता, तर पांडवांना चांगले फासे टाकूनही घेता आला असताच... :)

पैसा 28/06/2014 - 11:50
गोष्ट आवडली. महाभारतावर आधारित गोष्टी वाचायला नेहमीच मजेशीर असतात. तुमची लेखनशैली आवडतेच. मनमोहनसिंगांनी शीख हत्याकांडाचा बदला खान्ग्रेसला संपवून घेतला अशी एक थिअरी मजा म्हणून लोक मेसेजवरून पाठवत होते त्याची आठवण झाली!

चित्रगुप्त 28/06/2014 - 21:49
ही कथा प्रथमच ऐकली. रोचक वाटली. महाभारतावरील माझे काही (सचित्र) लेख: सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १,२ ३ ) http://www.misalpav.com/node/25328 महाभारत (भाग १,२,३): http://www.misalpav.com/node/26965

चर्चाविषय व एकुणच चर्चा रोचक आहे. शकुनि व शल्य दोघेही महाभारत युध्दात एक विशिष्ठ भूमिका घेऊन आले होते. त्याकाळी ज्या राजपुरुषांचा विवाह होण्यात काही अडचणी येत असत त्या पुरुषांची राजघराणी मद्र देशातुन द्र्वय देऊन वधु मिळवित असत थोडक्यात लग्नासाठी मुली विकत घेतल्या जात असत व त्यांच्याशी ह्या पुरुषांचा विवाह लावण्यात येईल. माद्रीचा पांडुशी विवाह हा असाच प्रकार होता. गांधार देशातील राजघराण्यांवर धाकदपटशा/युध्दे लादुन तेथील स्त्रियांशी विवाह लावले जात. भीष्माने लावलेला धृतराष्ट्राचा गांधारीशी विवाह हा ह्याचे उदाहरण आहे. शकुनि कुरूवंशाचे कंबरडे मोडायच्या उद्देशानेच हस्तिनापुरात तळ ठोकुन होता.कोणाचीही बाजु घेतली असती तरी त्याला कौरवपांडवात असलेल्या भाऊबंदकीचा फायदा घेऊन दोघांत महायुध्द व्हायलाच हवे असेच त्याचे राजकारण होते. कारण महायुध्द झाल्यानंतर एकुणच आर्यावर्त इतका दुबळा झाला कि त्यानंतर गांधारांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत त्यानंतरचा आर्यावर्तातील कोणीही राजा करु शकला नाही.भीष्माला हे राजकारण कळत असुनदेखील केवळ प्रतिज्ञेच्या परिपूर्ततेपायी त्याला हा सर्व प्रकार स्वीकारावा लागला. कृष्णाला ही शकुनिचे राजकारण वेळीच लक्षात आले होते त्याने त्यातल्या त्यात एकुणच यादवांना व यादवसेनेला ह्या युध्दापासुन तशी फारशी झळ पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली.

सर्व प्रतिसाद आत्ता वाचले. खूप अभ्यासपूर्ण आणि वेगळी माहिती मिळाली. विशेषत: उगोलिनो ची कथा. या व्यक्तिरेखेबद्दल मला काहीच माहिती नाही. हे नावही मी पहिल्यांदाच वाचलं. अधिक जाणून घ्यायला आवडेल. वल्ली, मृत्युंजय, कानडाऊ योगेशु, विकास, आगाऊ कार्टा, मराठे, स्वॅप्स, बॅटमॅन आणि आपणा सर्वांच्याच प्रतिसादांतून नवीन माहिती मिळाली. मी ही कथा वाचली, मला अचंबा वाटला. माझ्याच प्रमाणे आणखी काही जणांना ही कथा माहिती नसेल आणि जाणून घ्यायला आवडेल असं वाटलं, म्हणून इथे सादर केली. कथेच्या सत्यासत्यतेबाबत माझा काहीच दावा नाही. अशाच आणखीही काही कथा वाचनात आल्या आहेत. यापुढे जमेल तशा त्या सुद्धा इथे सादर करीत जाईन. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार.

विजुभाऊ 03/07/2014 - 14:04
ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला. शकुनी पंगु झाला,
हे चुकीचे आहे. चोप्रांच्या महाभारत मालीकेत गुफी पेंटल या कलकाराने तो रोल केला होता. तो एका पायाने अधू असल्यासारखा चालत असे. अन्यतः महाभारता कुठेच शकुनीच्या पंगडेपणाबद्दल उल्लेख आलेला नाही. महाभारतात प्रमुख पात्रांच्या व्याधीम्बद्दल उल्लेख आलेले आहेत उदा:पंडू हा पंडू रोगी ( अ‍ॅनिमीक , भुर्‍या ) होता. धृतराष्ट्र हा अंध होता. शिखंडी हा तृतीयपम्थी होता. इत्यादी

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हाडक्या 27/06/2014 - 19:22
काय राव.. दोन इकडच्या तिकडच्या कथांची सरमिसळ आहे इथे. :) उगोलिनोची कथा आहे त्यात त्याला आणि त्याच्या मुलांना असे कैदेत ठेवलेले असते तेव्हा काही जणाना जगवायला इतर जण मरतात. आणि हे एक प्रसिध्द चित्र, Ugolino

मृत्युन्जय 27/06/2014 - 17:56
वेगळी म्हणुन वाचायला चांगली अशी कथा . पण या कथेव्यतिरिक्त आणि चोप्रांच्या महाभारताव्यतिरिक्त शकुनी कुठेही पंगू आहे असे वाचल्याचे ऐकीवात नाही. चूभूद्याघ्या

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस 27/06/2014 - 18:10
सहमत आहे. उलट भीष्म शकुनीचे वर्णन करताना म्हणतो की शकुनिर्मातुलस्य ते ऽसौ रथ एकौ नराधिप परसज्य पाण्डवैर वैरं यॊत्स्यते नात्र संशयः || एतस्य सैन्या दुर्धर्षाः समरे ऽपरतियायिनः विकृतायुध भूयिष्ठा वायुवेगसमा जवे || हे नराधिपा, तुझा मातुल शकुनी एक रथी असून त्यानेच पांडवांशी हे वैर योजीले आहे. तो युद्ध करील ह्यात शंका नाही समोरच्या शत्रूंवर चालून जाणारी ह्याची सेना दुर्धर्ष असून ह्याचे विचित्र आयुधांनी युक्त असलेले सैन्य वायुप्रमाणे वेगवान आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 27/06/2014 - 18:19
शकुनीची सेना कशीही असली तरी त्यामुळे तो पंगू नसेलच असे सांगता येत नाही. उदा. तैमुरलंग लंगडा होताच की.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 28/06/2014 - 09:07
रथी म्हणजे रथारूढ योद्धा आणि महारथी किंवा अतीरथी म्हणजे एकाच रथात बसून कित्येक रथ्यांशी एकाच वेळी युद्ध करू शकणारे. महारथी आणि अतिरथी मधील अधिक श्रेष्ठ कोण याबद्दल महाभारत मुग्धच आहे पण काहीवेळा श्रेष्ठ योद्ध्यांना एकाचवेळी अतिरथ आणि महारथ असेही संबोधलेले आहे. उद्योगपर्वातील रथातिरथसंख्यान उपपर्वात कौरव आणि पांडवांतील रथी, महारथी आणि अतिरथी योद्ध्यांची संख्या दिलेली आहे. ह्यात दुर्योधन, दु:शासनादिक कौरवांना रथी, सिंधुराज जयद्रथाला द्वैरथी, शल्याला, द्रोण, भीष्म अतिरथी/महारथी तर कर्णाला परशुरामाच्या शापामुळे अर्धरथी मानले गेले आहे.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 28/06/2014 - 10:16
अतिरथी हा महारथींपेक्षा श्रेष्ठ. फार कमी लोकांना अतिरथी म्हणुन संबोधिले गेले आहे. राम, कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, क्रूतवर्मा, सात्यकी, भूरिश्र्वा, बाल्हिक, प्रद्युम्न, अनिरुद्ध, अभिमन्यु, द्रुष्ट्यद्युम्न, श्वेत हे सर्व अतिरथी होते. दुर्योधन आणि त्याचे १० भाऊ, अश्वत्थामा, घटोत्कच, वृषसेन, विराट, द्रुपद इत्यादी महारथी होते. अश्वत्थामाला काही ठिकाणी अतिरथी म्हटलेले आहे. भीम ८ रथांच्या योग्यतेचा होता (दुर्योधनापेक्षा कमी). एकावेळेस एक यौद्धा किती लोकांशी यशस्वीपणे लढु शकतो त्याप्रमाणे त्याला रथी, महारथी अथवा अतिरथीचा दर्जा मिळत असे. माझ्या माहितीनुसार एक अतिरथी एका वेळेस ६०००० सामान्य यौद्ध्यांशी यशस्वीपणे लढु शकत असे. याचा अर्थ असा की ६०००० सामान्य यौद्ध्यांमध्ये त्याला एकट्याला सोडल्यास तो त्याच्या शस्त्रांस्त्रांच्या बळावर त्यांच्यामधुन तरुन जाउ शकत असणार. भीमाला ८ रथांच्या योग्यतेचा अशासाथी म्हटलेले आहे की त्याच्याकडे इतरांच्या मानाने दिव्यास्त्रे कमी होती (माझे अनुमान). त्यामानाने ती दुर्योधनाकडे जास्त होती असे मानावे लागेल. पण भीम एकटा भल्याभल्यांना भारी पडला. आणि भीष्म आणि बाल्हिक सोडल्यास सर्वांना त्याने हरवले. एका युद्धात त्याने ३० कौरव मारले. ते ही कर्णासमोर ते लक्षात घेता त्याच्या ताकदीच्या जोरावर आणि निर्दयी स्वभावामुळे आणि रणमदात तो एकेकट्ञाला कधीही भारी पडत होता असे दिसेल. तर कर्णाला परशुरामाच्या शापामुळे अर्धरथी मानले गेले आहे. असे भीष्म म्हणतात. तेही केवळ कर्णाचा तेजोभंग करण्यासाठी आणि त्याला युद्धातुन बाजुला ठेवण्यासाठी. भीष्माच्या पाडावानंतर जेव्हा कर्ण भीष्माला भेटायला जातो तेव्हा भीष्म मान्य करतात की तो अर्जुनाच्या बरोबरीचा आहे. नंतर ते स्वतःच त्याला तो २ महारथ्यांच्या बरोबर असल्याचा निर्वाळा देतात. अर्थात तरीही त्याला अतिरथी मानत नहित. इतर बर्‍याच ठिकाणी मात्र कर्णाचा उल्लेख अतिरथी म्हणुन येतो.

In reply to by मृत्युन्जय

अर्धरथी म्हणजे ज्याला रथातुन युध्द करता येते पण रथ चालवण्याचे कौशल्य मात्र तितकेसे नसते असा योध्दा. महाभारतात अर्जुनानेही रथ चालवल्याचे उल्लेख आले आहेत असे वाचल्याचे आठवते पण स्वतः सारथीपूत्र असुनदेखील कर्णाने स्वतः रथ हाकल्याचा उल्लेख महाभारतात नाही.कौरव व पांडवांना शस्त्रास्त्राचे जे शिक्षण मिळाले ते त्याकाळच्या रितिरिवाजानुसार परिपूर्ण असावे त्यामुळे सारथ्यापासुन सर्व शस्त्रे हाताळण्याचे योग्य शास्त्रीय शिक्षण त्यांना मिळाले असण्याची शक्यता असावी. पण कर्ण मात्र शिकला तो केवळ महत्वकांक्षा वा इन्स्टिंक्ट मुळे.त्यामुळे त्याच्या कौशल्यात ती परिपूर्णता कधीही नव्हती.उदाहरणच द्यायचे झाले तर जिम इन्स्ट्रक्टर चा उपयोग करुन शरीरसौष्ठव बनवणे व केवळ शरीर बनवण्याच्या इच्छेखातर स्वतःहुन व्यायाम वगैरे करुन शरीर बनवणे ह्यात जसा फरक आहे तसाच फरक कर्णाच्या व इतर कौरवपांडवांच्या कौशल्यात असावा.(शरीर बनवायला आहार ही तितकाच महत्वाचा असतो व त्याबाबतीत एक निष्णात जिम इन्स्ट्रक्टरच व्यवस्थित मार्गदर्शन करु शकतो.एकुण शरीरसौष्ठव बनवण्यात योग्य डायटचा जो रोल आहे तसाच रोल महारथी बनण्यात सारथ्यकौशल्याचा असावा. त्यामुळे एकुणच सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याच्या कर्णाच्या प्रयत्नांत ह्या सारथ्यकौशल्य शिकण्याच्या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असु शकते.किंबहुना योग्य मार्गदर्शकच नसल्यामुळे त्याला ही गोष्ट कधी तशी स्ट्राईक झालीच नसावी. ह्याबाबतीत कर्ण मात्र तसा दुर्दैवीच म्हणावा लागेल.) अर्जुन कर्ण ह्या शेवटच्या निर्वाणीच्या युध्दावेळीही शल्य रथ सोडुन पळुन जातो पण केवळ रथ चालवता येत नसल्याने कर्ण असहाय होतो. व त्याची तिच कमतरता त्याचा बळी घेते.

विकास 27/06/2014 - 18:57
वर सांगितलेली रोचक कथा ऐकलेली आहे, पण खरे खोटे व्यासांनाच माहीत. :) त्यातच पुढे असे देखील होते की त्याने स्वतःच्या वडलांच्या हाडांचा वापर करून फासे तयार केले म्हणून तो जिंकायचा. (वडील मुलांसाठी हाडाची काडे करतात ते माहीत होते. हाडाचे फासे करणे नवीनच आय मीन फारच जुने!) Shakuni Temple विकीवरील माहितीप्रमाणे, महाभारतयुद्धानंतर शकुनी स्वर्गाला व्हाया केरळ गेला. स्थानिक समजुतीप्रमाणे, त्याने तेथे शंकराची पुजा केली आणि नंतर महात्मा (लॉर्ड) शकुनी होऊन तो स्वर्गाला गेला. त्याचे तेथे देऊळ पण आहे! वर दाखवलेले छायाचित्र त्या देवळाचे आहे. अजून एक लंगडण्यासंदर्भात गोष्ट ऐकलेली: महाभारत सिरीयल मधे निवडल्यानंतर गुफि पेंटलला म्हणे व्यक्तीगत आयुष्यात घोड्यावरून पडला. परीणामी व्यासांसमोर नाही पण चोप्रांसमोर तो लंगडत गेला. त्यांना ते आवडले आणि शेवटपर्यंत लंगडीचे राज्य त्याच्यावर (म्हणजे गुफी पेंटलवर) आले!

In reply to by विकास

आगाऊ कार्टा 27/06/2014 - 19:48
शकुनीने वडलांच्या हाडांचा वापर करून फासे तयार केले नव्हते तर ते फासे जरासंधाच्या हाडांपासुन बनवलेले होते. त्यामुळे दान कोणीही मगितले तरी ते कौरवांच्या बजुनेच पडत असे. परंतु द्युताच्या प्रसंगी फासे फेकत असत तेव्हा भीम मोठ्याने ओरडत असे. भीमाच्या आवाजाने ते फासे थरथरत असत (कारण भीमाने जरासंधाला मारले होते) आणि दान नेमके पांडवांच्या बाजुने पडत असे. हे फक्त शकुनीच्या लक्षात आले तेव्हा त्याने दुर्योधनाला सांगुन भीमाल गप्प केले. त्यानंतरचे महाभारत सर्वांनाच माहित आहे.

विकास 27/06/2014 - 19:10
खालती गुगलबुक्स मधला संदर्भ आयफ्रेम मधे टाकला आहे, तो वाचता आले नाही तर सांगा. (कधी कधी भारतात वाचता येत नाही म्हणून). देवदत्त पटनाईक यांनी महाभारतावर बराच अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात तथ्य असावे. (थोडक्यात: ह्या नंतरच्या लोककथा आहेत. बोकडाशी लग्न जैनांच्या महाभारतातून आले आहे. काही ठिकाणी शकुनीच्या भावांना आणि वडलांना भिष्माने नाही तर दुर्योधनाने मारले. तेंव्हा एखादा व्हिलन एकापद्धतीने का वागतो हे समजून घेणे पण महत्वाचे आहे... ) मला एक पडलेला प्रश्नः जर शकुनीला कौरवांचा इतका खुन्नस होता, तर तो सरळ पांडवांनाच जाऊन का मिळाला नाही? ;)

In reply to by विकास

प्रसाद१९७१ 30/06/2014 - 14:10
जर शकुनीला कौरवांचा इतका खुन्नस होता, तर तो सरळ पांडवांनाच जाऊन का मिळाला नाही? >>>>>>> बाहेरुन जितके नुकसान करता येते त्यापेक्षा कीतीतरी पट जास्त नुकसान आत राहुन करता येते.

धन्या 27/06/2014 - 19:40
इथेही जन्म पत्रिका आणि ज्योतिषी आहे. म्हणजे हे खुळ अगदी महाभारत काळापासून आहे तर. :D कथा अतिशय रोचक आहे. पहिल्यांदाच वाचली.

मराठे 27/06/2014 - 21:09
गंमत म्हणून महाभारतातील सगळ्या अकल्पीत आणि असंभव गोष्टी काढून टाकल्या (उदा: वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीची न संपणारी साडी, ब्रह्मास्त्र किंवा पर्जन्यास्त्र सारखी अस्त्र, विश्वरूपदर्शन, संजयाची दिव्यदृष्टी इ.इ.) तर महाभारत कसं असेल? महाभारत तरीही श्रेष्ठ महाकाव्य असेलच. श्रीकृष्ण महा"मानव" म्हणून समोर येईल. महाभारत कालीन राजकारण आणि समाजातील प्रचलीत रुढी आणखी स्पष्ट होतील. वरवरच्या चमत्कारापेक्षा त्या महाकाव्यातलं खरं मर्म लोकांना नीट समजेल.

एस 27/06/2014 - 23:38
या किंवा अशा हरदासी कथांना महाभारतात आधार शोधणे किचकट काम असणार. इथे घेतले गेलेले आक्षेप या गृहीतकावर आधारीत आहेत की महाभारत रचले गेले व नंतर कालौघात मूळ काव्याचा आधार घेऊन लोकसाहित्यात म्हणा किंवा इतर साहित्यात अशा कल्पना/कथा निर्माण होत गेल्या. समजा आपण हे गृहीतक उलटे करून बघितले, म्हणजे जय हे मूळ काव्य, त्यावर संस्करण-बदल-भर वगैरेंनी झालेले भारत हा विस्तारग्रंथ आणि मग महाभारत या सगळ्यांत ह्या काव्याने लोकसाहित्यातून आणि लोकसाहित्यानेही ह्या महाकाव्यातून संकल्पना उचलल्या असाव्यात, कथाबीजांचे आणि कल्पनाविस्तारांचे आदानप्रदान आणि तेही अतिशय विस्तृत अशा कालखंडात होत राहिले असावे. मग या हरदासी कथांचा अशा साहित्यावर होणारा परिणाम असा छाटून टाकता येत नाही. अशा दृष्टीने विचार करून पाहूया. कालखंडनिश्चितीच्या बाबतीत पं. जवाहरलाल नेहरूंनी आपल्या 'डिस्कवरी ऑफ् इंडिया' या ग्रंथात महाभारताला रामायणापेक्षा जास्त प्राचीन ठरवले आहे. मूळ महाभारताची खात्रीशीर प्रत उपलब्ध असेल का याविषयी माझ्या मनात किंतु आहे.

In reply to by एस

प्रचेतस 28/06/2014 - 09:14
इरावती कर्वे यांच्या 'युगांत' मधील प्रस्तावनेत महाभारतावरील जुन्या प्रतींचे तसेच त्याच्या कालखंडाच्या मागोव्याचे उत्कृष्ट विवेचन आहे. तसेच भांडारकर प्राच्य विद्या संस्थेने महाभारताच्या बहुतांश प्राचीन हस्तप्रतींचा अभ्यास करून संशोधीत प्रत सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे त्यात द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगीचा कृष्णाचा धावा, त्याने वस्त्रे पुरवून पुरवून सोडवणे असे प्रसंग गाळून टाकले आहेत.
डिस्कवरी ऑफ् इंडिया' या ग्रंथात महाभारताला रामायणापेक्षा जास्त प्राचीन ठरवले आहे.
ह्याला मी ह्या लेखनाचा काळ असा मानतो. रामायणाचा कालखंड हा महाभारतापेक्षा नक्कीच जुना आहे. महाभारतात रामायण अथवा वाल्मिकिचा उल्लेख कुठेही येत नाही पण रामकथेचे उल्लेख मात्र येतात तसेच त्यात रामाला अवतार न मानता एक श्रेष्ठ राजाच मानलेले आहे. अर्थात रामकथा जरी आधीपासून प्रचलित असली तरी रामायण हे महाभारतानंतर लिहिले गेलेले असावे असे त्याच्या लेखनावरून दिसते.

In reply to by प्रचेतस

एस 28/06/2014 - 15:01
ह्या विषयाचा माझा अजिबात अभ्यास नाही. तरीपण एक तप आणि दोनेक वर्षांनंतर स्मरणशक्ती जेवढी साथ देईल तेवढे आठवून थोडे खरडतो. भाग एक - महाभारताच्या संशोधित प्रतींसंदर्भात, लिपीचा शोध महाभारत वगैरे काव्ये रचली गेली तेव्हा लागला नव्हता. मुखोद्गत पद्धतीने इतक्या मोठ्या साहित्याचे जतन शतकानुशतके होत राहिले. पण त्यात कोणताही बदल झाला नाही असे मानणे कठीण आहे. "Unlike the Vedas, which have to be preserved letter-perfect, the epic was a popular work whose reciters would inevitably conform to changes in language and style." भाग दोन - कालखंडनिश्चिती. इथे मानवाला शेती करण्याची कला माहीत झाली ती साधारणपणे सात हजार वर्षांपूर्वी. तोपर्यंत स्थिर संस्कृतींचा किंवा समाजांचा उदय होणे अशक्य होते. शेतीचा फायदा असा होतो की अन्नोत्पादन आता भुकेपुरते मर्यादित न राहता शिल्लक उरू लागले आणि उत्पादनांची देवाणघेवाण, पुढे वस्तुविनिमयपद्धती (Barter trade) उदयास आली. शेती आणि व्यापार यामुळे स्थिर मनुष्यसमूह व शहरे उदयास आली. त्याआधी अल्पशा मानवी वसाहतींचे एका जागीचे स्थान हे तिथल्या अन्नाच्या उपलब्धतेपुरतेच कायम असे. ही नागरसंस्कृती सिंधू नदीच्या खोर्‍यात उदयास येण्यास आणखी चारेक हजार वर्षे जावी लागली. याच काळात तेव्हाचा द्राविड प्रदेश म्हणजे गंगेच्या खोर्‍यापासून ते दक्षिणेकडे हा घनदाट निबिड अरण्याने व्यापलेला होता. सिंधू संस्कृतीच्या उत्तरकालात नागरसंस्कृती आणखी पूर्वेला आणि दक्षिणेला विकसित झाली. पण अद्यापही आजच्या दख्खनच्या पठारावरील इतर मानवी संस्कृतींशी वायव्येच्या सभ्यतेशी फारसा संबंध आलेला नव्हता. गंगेच्या उर्ध्वखोर्‍यात मानवी वस्तीचे नागरस्वरूपातील अवशेष सापडले ते इसवी सनाच्या हजार वर्षांपूर्वीनंतर. पण तेव्हा द्राविड टोळ्या मध्य व दक्षिण भारतात स्थिरावल्या होत्या. यात नाग व असुर संस्कृती प्रमुख होत्या. महाभारत रचले गेल्याचा कालखंड साडेपाचशे ते तीनशे ख्रिस्तपूर्व असा असावा, तर रामायण हे इसवीसनाच्या पहिल्या शतकात रचले गेले असावे. तत्पूर्वी सातशे ख्रिस्तपूर्वपर्यंत उत्तरवेदिक कालखंड आणि बौद्धमताचा उदय होऊन गेला होता. नॉदर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअरचा कालखंड Early NBPW (800-300 BC) आणि Late NBPW (300-100 BC) यावरूनही त्याकाळची समाजरचना आणि मुख्यत्वे अर्थकारणाची माहिती मिळते. यावरून सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतरची पहिली गणराज्ये, नदीकाठी शेतीनिगडीत अर्थव्यवस्थेचा झपाट्याने झालेला विकास, संरक्षणासाठीच्या 'पुर' म्हणजेच कोटांची बांधणी करण्याची पद्धत, लवचिकता गमावलेले सामाजिक स्तरीकरण, वर्णसंस्थेचे जातिव्यवस्थेत अवमूल्यन, व्यापाराचा विस्तार व यादवी युद्धांतून साम्राज्ययुद्धांमध्ये झालेले परिवर्तन ही या काळाची काही ठळक वैशिष्ठ्ये होत. याला भारतीय पुरातत्त्वविभागाने केलेल्या उत्खननात आणि कार्बन डेटिंगद्वारे दुजोरा मिळाला आहे. भाषेबद्दल - ह्या काव्यांचे संस्कृत ही उत्तरवैदिक कालखंडातील वाटते. पाणिनिच्या इसपू. चौथ्या शतकातील व्याकरणाचा प्रभाव या काव्यांच्या भाषेवर आढळतो. दोन्ही काव्ये बुद्धोत्तर असावीत असे सूचित करणारा भाग वाल्मिकीरामायणात येतो. रामाच्या तोंडी अयोध्याकांडात जाबालीला उद्देशून येणारे वाक्य पहा - "यथा ही चोर: स तथा ही बुद्ध स्वथागतं नास्तिक मंत्र विद् तस्मादि य: शक्यतम: प्रजानाम् स नास्तिके नाभि मुखो बुद्ध: स्वातम्।" पूर्ववेदांतमत आणि बौद्ध साहित्यातील पाली-प्राकृत भाषेचा वापर हे दोन्ही समकालीन असावेत. अश्वघोषाच्या बुद्धचरित मध्ये वाल्मिकी त्याच्या समकालीन असल्याचा उल्लेख करतो. दुसरा भाग मानवइतिहासातील वेगवेगळ्या धातूंचा प्रभाव. सिंधूसंस्कृती ही ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांच्या आसपास क्षीण होऊ लागली. त्याचबरोबर मानवइतिहासातील ताम्रयुग संपुष्टात आले. सिंधूसंस्कृतीच्या अस्तानंतर साधारणतः बाराशे ते हजार वर्षे ख्रिस्तपूर्व पासून लोहयुगाची सुरुवात झाली. भारतीय उपखंडात उत्तर आणि दक्षिणेत जवळजवळ एकाच वेळी पण स्वतंत्रपणे लोहयुग अवतरले. लोहयुगाबरोबर गंगेच्या खोर्‍यात गणपद व महाजनपदरूपी राज्यव्यवस्थांची सुरुवात झाली. लोहयुगातील प्रगत शस्त्रास्त्रांमुळे युद्धांचे स्वरूप बदलले व लहान टोळीयुद्धे अस्तित्वात आली. या युद्धांचे स्वरूप आपापसातील यादवीसारखे केंद्रित होते. संस्कृतींमधील विनाशकारी युद्धे अजून लांब होती. महाभारतात कर्ण हा कौरवांचे सैन्य घेऊन तत्कालीन संपूर्ण आर्यावर्तावर ताबा मिळवण्यासाठी मोहीम काढतो. यात कर्णाने कंबोज, शाक्य, केकय, अवंत्य, गांधार, मदरक, त्रिगर्त, तंगण, पांचाल, विदेह, सुहमा, अंग, वंग, निशद, कलिंग, वत्स, अश्मक वगैरे राज्यांवर स्वारी केल्याचा उल्लेख येतो. पण कर्ण मरहट्ठांच्या दक्षिण प्रदेशात पाऊल टाकण्याचे टाळतो. याचे कारण म्हणजे इथून पुढचा (दक्षिणेकडचा) प्रदेश आर्यावर्तात मोडत नाही असे देतो. याउलट रामायणात मध्य व दक्षिण भारताच्या लोकसंस्कृतींचे, भौगोलिक परिस्थितीचे आणि राजकारणाचे खोलवर वर्णन येते. रामायणातील संघर्ष हा जातिव्यवस्था पूर्णपणे प्रचलित झालेल्या संस्कृतीचा आणि दक्षिणेतील अरण्यवासीयांचा संघर्ष आहे. येथे आर्यावर्ताची सीमा ओलांडून कथा दक्षिण टोकापर्यंत पोहोचते. दुसरे म्हणजे महाभारतात असुरांचे वर्णन तितके येत नाही जितके रामायणात येते. रामायण मुळातच सुरासुर संघर्षाची कथा आहे. महाभारतात हा संघर्ष खूपच बाल्यावस्थेत आहे. रामायणातील अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे उत्तर भारताच्या पूर्व भागातील प्रगत उत्तरनागरसंस्कृतींचे वर्णन आहे, तर महाभारतात प्रामुख्याने कुरुप्रदेश म्हणजे पश्चिमोत्तर भारतातील वरील प्रदेशाच्या पश्चिमेकडील तितक्या विकसित न झालेल्या संस्कृतींचे वर्णन आहे. महाभारतातील युद्धाचे वर्णन हे अतिरंजित असावे. इतके मोठे सैन्य पाळण्याइतकी लोकसंख्या, आर्थिक उलाढाल या सर्व बाबी तेव्हा नव्हत्या. नेहरूंनी ते युद्ध हे प्रत्यक्षात लहानसे टोळीयुद्ध असावे असे म्हटले आहे. रामायणात मात्र दक्षिणेकडील तशाच प्रगत राज्यव्यवस्थांचा उत्तरेकडील जनपदांशी आलेला संबंध अधोरेखित झाला आहे. वरील सर्व बाबी अभ्यासता मला महाभारत हे रामायणापेक्षा जुने असावे, पण बौद्धोत्तर कालखंडातील असावे असे वाटते.

In reply to by एस

प्रचेतस 29/06/2014 - 11:16
प्रतिसाद अतिशय आवडला.
अरील सर्व बाबी अभ्यासता मला महाभारत हे रामायणापेक्षा जुने असावे, पण बौद्धोत्तर कालखंडातील असावे असे वाटते.
शंकाच नाही. पण महाभारताचा काळ त्यातही मूळ व्यासप्रणीत 'जय' ग्रंथाचा काळ हा बुद्धपूर्व असावा असे मला वाटते. इ.स. पूर्व १२०० ते ८०० वर्षांच्या आसपास. त्यानंतर बुद्धकाळात व तदनंतरच्या मौर्य, कण्व, सातवाहन, शुंग, गुप्त इत्यादी कालखंडात त्यात सातत्याने भर पडत गेली व आजचे महाभारत तयार झाले. उदा. यवन, शक, हूण अशा परकीय टोळ्यांचा उल्लेख, अहिंसेचा प्रसार करणारी अर्धांग सोनेरी झालेल्या नकुलाची कथा.

In reply to by एस

बॅटमॅन 29/06/2014 - 21:03
स्वॅप्स, प्रतिसाद आवडला. बरेच मुद्दे आहेत, आणि त्यातल्या थोड्यांबद्दलच चर्चा करतो. जय, भारत आणि महाभारत या ३ स्टेजेस आहेत असे खुद्द महाभारतातच नमूद आहे. ते सोडून एम आर यार्दी या संशोधकांनी १९८६ साली 'महाभारत : दि ग्रोथ ऑफ एपिक - अ स्टॅटिस्टिकल स्टडी' हे पुस्तक लिहिले, ज्यात महाभारतातील लेखनपद्धतीचा सांख्यिकीय अभ्यास करून त्यांनी ५ वेगवेगळे लेयर्स ओळखून दाखवले की कुठल्या पर्वातला कुठला भाग हा कुठल्या लेयरमध्ये आहे इ.इ. बाकी महाभारत म्ह. ग्लोरिफाईड आणि मॅग्निफाईड दाशराज्ञ युद्ध असे एका जे एन यू मधील प्राध्यापकाचे मत रोचक असले तरी तितके ग्राह्य वाटत नाही. तो पेपर विकीवर पूर्ण डौनलोडसाठी उपलब्ध आहे. अन रामायण व महाभारत या दोहोंची भाषा पाणिनीय संस्कृतच आहे. त्यामुळे लेखनकालदृष्ट्या बौद्धोत्तर असणे क्रमप्राप्तच आहे. मात्र त्यात वर्णिलेल्या घटना या बौद्धोत्तर असणे संभवत नाही, कारण निव्वळ बुद्ध या शब्दोल्लेखाने लुंबिनीत जन्म झालेला सिद्धार्थ गौतमच अभिप्रेत आहे असे दिसत नाही. अन तसे पाहिले तर गीतेतल्या ११ व्या अध्यायात काही श्लोक आर्ष रूपे , आर्ष वृत्ते वापरून लिहिलेले आहेत त्यावरून त्याचे पाणिनीपूर्वत्व अधोरेखित होते. अन जनरल घटना पाहिल्या तर बौद्ध धर्माचा दूरदूरतक संबंधच नाहीये- रामायणातही अन महाभारतातही. बाकी महाभारत-रामायणाच्या पौर्वापर्याबद्दलचे मुद्दे ठीक आहेत, पण या काळाबद्दल साहित्यिक सोडून अन्य माहिती खूप कमी ठिकाणी आहे. रेमंड अलचिन नामक पुरातत्त्ववेत्याचे आयर्न एज इंडिया नामक पुस्तक या कालखंडावर प्रकाश टाकते, पण ते तितपतच. मुख्य अडचण अशी आहे, की आपल्याकडे या महाकाव्यांशी संबंधित ठिकाणे उदा. अयोध्या, द्वारका, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, इ. ठिकाणी व आसपास व्हावे तितके उत्खनन झालेले नाही. कैक ठिकाणी जुन्याच इमारतींवर आजची घरे, देवळे, सर्व काही नांदत आहेत. इतक्या सगळ्या लोकांना अन्यत्र हलवणे केवळ अशक्य आहे. ट्रॉयला हेन्रिख श्लीमानने आणि त्यानंतर ऑल द वे डौन टु नुकतेच वारलेले मान्फ्रेड कॉर्फमन या लोकांनी गेली जवळपास १५० वर्षे उत्खनन केलेय तेव्हा कुठे ट्रोजन युद्धाबद्दल कल्पनातीत नवी माहिती मिळाली. आपल्याकडे काय झालंय? -हस्तिनापूरः १९५१ सालचे एक उत्खनन, बहुतेक ७३ साली अजूनेक. -इंद्रप्रस्थः सत्तरच्या दशकात ट्रायल उत्खनन, सध्या जस्ट थांबवलेय सुरू असलेले. पुन्हा पुढच्या वर्षी सुरू होईल. -द्वारका: पाण्याखाली काहीतरी सापडलेय. पण त्याचा काळ गुप्तकाळापर्यंतच (इ.स. ४००-५००) पर्यंतच जातो. त्याच्या बर्‍यापैकी अगोदर म्ह. इसपू ५०० च्या अगोदरचे फक्त खापरांचे अवशेष बेट द्वारका या ठिकाणी मिळालेले आहेत. -अहिच्छत्रः उत्खनन ८३ साली झाले बहुधा. आपल्याकडे काही प्रयत्न झालेत, पण ते खूप कमी आणि खूप एकांगी आहेत. त्यात परत हडप्पा संस्कृतीनंतर म्ह. सुमारे इ.स. २००० पासून ते मौर्यकाळ - इ.स.पू. ३०० या सुमारे १७०० वर्षांच्या काळात अख्ख्या भारतात

एकही - & आय रिपीट एकही

लिपीचा पुरावा सापडलेला नाही. लिपी कसलीही असो, संस्कृत असो नैतर तमिळ असली तरी ठीक, अगदी चिनी असली तरी चालेल, पण कुठली तरी मिळू द्या!!! पण नाही. सापडलेलंच नाही. त्यामुळे एका बाजूला रामायणमहाभारतागत ग्रंथ आणि दुसर्‍या बाजूला तुटक उत्खनने हे इतकेच आपल्यासमोर आहे. या दोहोंची सांगड घालणे हे महाकर्मकठीण काम असून त्याला आत्ता आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अजून टनावारी उत्खनने व्हायला हवीत तेव्हा कुठे आपण याबद्दलचा विदा ठीकठाक प्रमाणात आपल्याकडे आहे असे म्हणू शकतो. तूर्त काहीच विदा नाही म्हणण्यासारखा. उत्खनन करून जी मातीची भांडी सापडतात त्यावरून काळ सांगितला की संपलं इतकंच चाललंय. बाकी काही कुणी करत नाहीये. हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा उलगडा होणे आणि विशिष्ट ठिकाणी उत्खनने आजवर झालीत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणे हे झाल्याशिवाय, रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे. माझे वैयक्तिक मत आहे की अशा घटना घडणे अगदी शक्य आहे, फक्त अतिरंजित पार्ट वगळून. पण त्याला पुरावा पाहिजे...

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 30/06/2014 - 09:53
उत्खनने आजवर झालीत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणे हे झाल्याशिवाय, रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे.
समजा, पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्खनने झाली, तर रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे, हे सिद्ध होण्यासाठी त्यातून कोणकोणत्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणता ?

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 30/06/2014 - 10:40
गुड क्वेश्चन चित्रगुप्तजी. तुमच्या प्रश्नाचे एकदम डायरेक्ट उत्तर माझ्याकडे नाही, पण उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ट्रॉय, मायसीनी, इ. ठिकाणी उत्खनने झाली, तेव्हा होमरने वर्णन केल्याप्रमाणे टनावारी खजिना सापडला. चांदी-सोन्याच्या मुठी असलेल्या तलवारी, वाईन प्यायचा सोन्याचा कप, रानडुकराचे सुळे लावलेले हेल्मेट, ब्राँझचे चिलखत, इ.इ. अनेक गोष्टी ज्या होमरच्या काव्यात वर्णिलेल्या होत्या. त्याशिवाय तत्कालीन शिलालेखांत अलेक्सांद्रॉस ऊर्फ पॅरिस आणि त्याचा बाप पियामारादू ऊर्फ प्रिआम यांची नावे कोरलेली मिळालेली आहेत शिवाय आगामेम्नॉनच्या बापाचा उल्लेख आहे. ग्रीकांचा 'अहियवा' ऊर्फ अखीअन्स म्हणून उल्लेख मिळाला आहे, त्यामुळे होमरचे काव्य खर्‍या घटनांवर आधारित आहे असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे अजून उत्खनने झाली, तर काही शस्त्रे म्हणा, काही वसाहतींचे 'रॉयल' छाप अवशेष, काही शिलालेख, थोडाफार खजिना आणि या संस्कृतीचा अन्य समकालीन उल्लेख असे काहीसे सापडले तर ही काव्ये मूलतः खर्‍या घटनांवर आधारलेली असू शकतात असे म्हणता येईल. म्ह. अगदी कृष्ण, युधिष्ठिर , इ. नावेच पाहिजेत असे नाही, पण मुख्य कथाभाग- मोठ्या युद्धवाला- तो तरी झाला याचा पुरावा मिळाला तर प्रूफ झालेच ना.

In reply to by बॅटमॅन

एस 30/06/2014 - 14:12
सर्व प्रतिसाद बारकाईने वाचले. वल्ली जसे म्हणताहेत की किमान 'जय' ह्या ग्रंथाचा कालखंड बुद्धपूर्व असावा, ह्याला काहीपक्षी दुजोरा देणारे विश्लेषण माझ्याच प्रतिसादात आले आहे. कर्णाच्या मोहिमेत महरठ्ठांचा प्रदेश आर्यावर्तात न मोडणे पण बौद्धमताचा प्रसार दक्षिणेतही निदान अशोकाच्या राज्यकालात होणे हे लक्षणीय आहे. या दोन गोष्टींची कालानुयिक तुलना केल्यास 'जय' ग्रन्थातील वर्णन किंवा मूळ महाभारताचे कथाबीज हे अजून आठशे-ते-हजार वर्षे मागे जाऊ शकते. बॅटमॅनच्या प्रतिसादातील लिपीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सिंधूसंस्कृतीनंतर लिपीचा र्‍हास झाला. तो इतका की या संस्कृतीला आणि त्यानंतरच्या प्रागैतिहासिक काळाला जोडणारा दुवाच सापडत नाही. पण लिपीचा शोध लुप्त झाला असतानाही नंतरच्या काळात जी काही ग्रंथनिर्मिती झाली तिची रचना आणि संवाहन केवळ मुखोद्गत पद्धतीने इतक्या मोठ्या कालखंडावर होत राहणे अचंबित करणारे आहे. इथे इतिहास काहीतरी मुग्ध आहे. सिंधूसंस्कृतीच्या लिपीचे वाचन आणि उत्खनन करून मिळवलेले मधल्या कालखंडातील अवशेषरूपी पुरावे ह्या दोनच बाबी हरवलेल्या शृंखलांचे अस्तित्त्व सिद्ध करू शकतील. बौद्धमताचा संबंध नाहीच. ते केवळ कालखंडाचा संदर्भ घेण्याइतपतच विचारात घेतले आहे. भारतीय इतिहासाचा मागोवा घेण्यात काय तृटी आहेत हे बॅटमनच्या प्रतिसादात सुरेखपणे समजावले आहे. त्या दृष्टीने अधिक प्रयत्न होणे फार गरजेचे आहे. असा मागोवा घेण्याचे काम लिखित साधनांच्या बाबतीत लिपीच्या पहिल्या धांडोळ्यापर्यंत जाऊन थांबतो. महाभारत-रामायण हे ग्रंथही त्याला अपवाद नाहीत. तोपर्यंत हे ग्रंथ लेखनकालदृष्ट्या बुद्धोत्तर असावेत हा पुराव्यांनी दर्शवलेला निष्कर्ष आणि ग्रंथ किंवा कथाबीज जास्त प्राचीन असावेत हा अंदाज ह्या दोन गोष्टी आज आपल्या हातात आहेत.

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 30/06/2014 - 15:01
कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात समजा एका धष्ट्पुष्ट माणसाचा सांगाडा, त्याच्या मांडीचे हाड मोडलेल्या अवस्थेत असलेला, आणि जवळच एक गदा सापडली, तरी तो दुर्योधनाचाच सांगाडा आहे, हे कसे ठरवणार ? अन्य कलाकृती, शिल्पे, वस्तू, वगैरे अगदी उत्खननातूनच कशाला निघायला हवीत ? ती वरतीच बक्कळ आहेत की? महाभारताच्या युद्धाचा देखावा असलेले दोन हजार वर्षापूर्वीचे शिल्प सापडले, तरी ते महाभारत कथा ऐकून घडवलेले असू शकते, तो ती घटना खरोखर घडली, याचा पुरावा कसाकाय मानायचा? अगदी उत्खननातून सापडले, तरच तो पुरावा ग्राह्य का मानला जावा?

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 30/06/2014 - 15:24
कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात समजा एका धष्ट्पुष्ट माणसाचा सांगाडा, त्याच्या मांडीचे हाड मोडलेल्या अवस्थेत असलेला, आणि जवळच एक गदा सापडली, तरी तो दुर्योधनाचाच सांगाडा आहे, हे कसे ठरवणार ?
जोपर्यंत 'दुर्योधन इथे/अन्यत्र गदाप्रहाराने मेला' असे लिहिलेला एखादा शिलालेख इ. सापडत नै तोवर तो सांगाडा दुर्योधनाचाच आहे, असे म्हणणे शक्य नाहीच. पण बर्‍यापैकी जुना, म्ह. बुद्धपूर्वकालीन तसा अवशेष मिळाला, तर महाभारतातली कथा कदाचित खरी असू शकेलही असे सांगता येईल. अर्थात त्यासाठी फक्त हाडमोडका सांगाडा असून चालणार नाही, तो राजाचा/राजकुळातल्या व्यक्तीचा सांगाडा होता असे दर्शवणारा एखादा पुरावा पाहिजे. एकाच गोष्टीवरून असे सिद्ध करता येत नाही, त्याला अन्य बरेच पुरावे लागतात.
अन्य कलाकृती, शिल्पे, वस्तू, वगैरे अगदी उत्खननातूनच कशाला निघायला हवीत ? ती वरतीच बक्कळ आहेत की? महाभारताच्या युद्धाचा देखावा असलेले दोन हजार वर्षापूर्वीचे शिल्प सापडले, तरी ते महाभारत कथा ऐकून घडवलेले असू शकते, तो ती घटना खरोखर घडली, याचा पुरावा कसाकाय मानायचा?
अगदी सहमत आहे. पण असे एखादे शिल्प इ. जितके जुने मिळेल तितक्या वर्षांपासून ती कथा प्रचलित असल्याचा पुरावा मिळतो. एखादी कथा किती वर्षांपासून प्रचलित आहे, याचा तो सर्वांत डायरेक्ट पुरावा आहे.
अगदी उत्खननातून सापडले, तरच तो पुरावा ग्राह्य का मानला जावा?
अगदी योग्य प्रश्न. तर त्याचे उत्तर असे आहे की उत्खननात तुम्हांला प्रत्यक्षपणे बर्‍याच गोष्टी क्लीअरकट कळतात. उत्खननाचा आधार नसेल, तर फक्त ग्रंथ समोर घेऊन बसले की कल्पनेच्या भरार्‍या किती आणि कुठल्या दिशेला मारल्या जातात याला काही सुमार नसतो. आता टिळकांनीही आर्क्टिक होम ऑफ द वेदाज़ इ.इ. लिहिले आहेच की. त्यात कल्पनेच्या भरार्‍या सोडल्या तर काय आहे? त्यांना काही गोष्टी योग्य वाटल्या आणि त्याच्या आधारे त्यांचा सिद्धांत त्यांनी मांडला, पण निव्वळ ग्रंथांवर अवलंबून राहण्यातला तोटा हा आहे की ग्रंथांत अनेक काल्पनिक गोष्टींचे बेमालूम मिश्रण झालेले असते, काही केसेसमध्ये परस्परविरोधी डीटेल्सही असतात. त्यामुळे 'नक्की काय झाले असावे' याचा निर्णय करण्याची प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि सोपी करण्यासाठी उत्खननाची फार मदत होते. शेवटी ऐतिहासिक पुराव्याची निश्चिती करण्यासाठी उत्खनन हे ग्रांथिक पुराव्यांसारखेच साधन आहे. उत्खनन हेच सुप्रीम आहे असा माझा दावा नाही. त्याचा व्यर्थपणा एका साध्या उदा.द्वारे सांगतो. १८ व्या शतकात मराठे अख्ख्या भारतभर पसरले. अगदी अटकेपार इ. जाऊन आले. पण आज शनिवारवाड्याकडे पाहून वाटतं तरी का की इथे राहणार्‍या सत्ताधीशांची पॉवर तेवढी होती म्हणून? नुसता पडका आणि कंजस्टेड वाडा वाटतो फक्त. पण तसे सांगणारे असंख्य कागदपत्र आज उपलब्ध आहेत म्हणून आपण सांगतो की मराठ्यांनी खरोखरच उत्तरेपर्यंत स्वार्‍या केल्यात. मी स्वतःलाच विरोध करतो आहे असे वाटेल, पण तसे नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, की ऐतिहासिक सत्यनिर्णयनासाठीचे उत्खनन हे एक महत्त्वाचे अंग आहे. ते व्हावे तसे आणि तितके झालेले नाही, त्यामुळे ग्रांथिक पुरावा जो काही आहे, त्यात किती सत्य आणि किती अतिशयोक्ती आहे हे तूर्तास सांगता येत नाही. एकूणच निर्णयप्रक्रियेतले हे अंग आजवर दुर्लक्षित असल्याने आजवरचे प्रयत्न अतिशय एकांगी आणि अपुरे राहिलेले आहेत. तस्मात उत्खनने अजून झाली पाहिजेत. सर्वच गोष्टींचे डायरेक्ट पुरावे नसले तरी इन्डायरेक्ट पुरावे कैक गोष्टींचे मिळू शकतील आणि ते अधिक ठामपणे दर्शवता येतील म्हणून त्याला महत्त्व आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 30/06/2014 - 17:34
प्रतिसाद आवडला रे.
पण असे एखादे शिल्प इ. जितके जुने मिळेल तितक्या वर्षांपासून ती कथा प्रचलित असल्याचा पुरावा मिळतो. एखादी कथा किती वर्षांपासून प्रचलित आहे, याचा तो सर्वांत डायरेक्ट पुरावा आहे.
नाणेघाटातल्या इ.स.पू २१० च्या आसपासच्या नागनिकेच्या लेखात वासुदेव आणि संकर्षणाला वंदन केलेले आहे तर इ.स २३० च्या सुमारास कोरल्या गेलेल्या पांडवलेणीतील गौतमी बलश्रीच्या लेखात गौतमीपुत्राचा पराक्रम राम (भार्गवराम), कृष्ण, भीम, अर्जुन यांसमान लेखला आहे तर गौतमीपुत्राचे तेज नाभाग, नहुष, जनमेजय, ययाती, दाशरथी राम, अंबरीष यासमान लेखिले आहे. ही सर्व नावे महाभारतात आहेतच. साहजिकच महाभारत कथा त्याकाळी (इ.स. पू. २०० पासून) पूर्णपणे प्रचलित असावी हे उघड आहे. आणि ह्या व्यक्तींना (गौतमीपुत्राच्या लेखात) देव मानलेले दिसत नाही. अशोकाच्या लेखातही पांडवांचे उल्लेख बहुधा असावेत. संदर्भ तपासून पाहिले पाहिजेत.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 30/06/2014 - 17:41
धन्स रे. :) बाकी या शिलालेखांतून असे पुरावे निश्चितपणे मिळतातच. फक्त एक शंका: नागनिकेचा शिलालेख इसपू २१० चा आहे की इस २१० चा? सातवाहनांचा इतका जुना पुरावा असेलसे वाटत नाही. अन दैवतीकरण तोपर्यंत झालेले असावे. शिलालेखात डिरेक्टली लिहिले नसावे कारण त्याचा फोकस गौतमीपुत्र होता. बाकीचे लोक निव्वळ उपमेपुरते होते.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 30/06/2014 - 17:49
नागनिकेचा इ.स.पू. २१० च्या आसपासचा. ती प्रथम सातकर्णीची पत्नी आणि आद्य सातवाहन सिमुकाची सून. सिमुकाआधी सातवाहनांच्या तीन्/चार पिढ्या झाल्या असाव्यात. दैवतीकरण कृष्णाचे झाले असावेही कदाचित. पण रामाला मात्र इतर राजांसमानच मानलेले दिसते कारण त्याचे नाव इतर राजांबरोबरच आहे. अर्थात ह्या नावांव्यतिरिक्त इतर ठोस पुरावे नसल्याने नक्की काहीच सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 30/06/2014 - 18:01
धन्यवाद रे. इतका जुना शिलालेख म्ह. जबरीच आहे. बाकी रामपूजेचा सर्वांत जुना उल्लेख कुठे आहे काय माहिती. इ.स. पहिल्या शतकाच्या आसपास तरी भागवत धर्मात बहुधा 'वासुदेव कृष्ण'च जोरात होता असे दिसते.

In reply to by बॅटमॅन

एस 30/06/2014 - 18:43
गुप्त काळात बांधल्या गेलेल्या देवगडच्या विष्णू मंदिरात काही राममूर्त्या आहेत. हा राम कथेचा शिल्पस्वरूपातील सर्वात जुना पुरावा आहे. पण त्यातही राम हा मनुष्यरूपात दाखवला आहे. कदाचित इस दुसर्‍या शतकापासून राम दैवी रूपात दर्शविला जाऊ लागला असावा. संदर्भ - ए. एल. बाशाम.

In reply to by एस

बॅटमॅन 30/06/2014 - 18:47
ओह अच्छा, धन्यवाद. देवगड नसून देवगढ़ आहे ते. यूपीमधले दशावतार मंदिर. वन ऑफ द अर्लिएस्ट फ्रीस्टँडिंग टेंपल्स म्हणून त्याचे महत्त्व फार आहे. http://en.wikipedia.org/wiki/Dashavatara_Temple,_Deogarh

In reply to by बॅटमॅन

एस 01/07/2014 - 11:12
मोबाईलवरून नीट टंकता येत नाही. त्याचे 'दशावतार टेंपल' हे नाव अलिकडचे आहे. अलेक्झांडर कनिंगहॅम (1814–1893) - भारतीय पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन मुख्य संचालक यांनी दिलेलं. मंदिर खूप भारी आहे.

In reply to by एस

बॅटमॅन 01/07/2014 - 12:12
ओह ओक्के. कनिंगहॅमने नाव दिलेलं माहिती नव्हतं, धन्यवाद. बाकी मंदिर प्रत्यक्ष पाहिले नाही, पण फटूंवरून तरी जबरी आहे हे दिसतंच आहे.

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त 30/06/2014 - 19:38
त्यासाठी फक्त हाडमोडका सांगाडा असून चालणार नाही, तो राजाचा/राजकुळातल्या व्यक्तीचा सांगाडा होता असे दर्शवणारा एखादा पुरावा पाहिजे.
यावरून डिस्कव्हरी का कश्यावर तरी आलेला एक कार्यक्रम आठवला. त्यात इजिप्तचे पिरॅमिड्स बांधणार्‍या मजुरांच्या (जमीनीत गडलेल्या) सांगाड्यांपैकी एकाच्या कवटीत सोन्याचा दात होता. त्यावरून इजिप्तच्या पुरातत्व विभागाचे डायरेक्टर का कोणी हापिसर मोठ्या अभिमानाने सांगत होते, की पिरॅमिड्स बांधण्यासाठी वेठबिगार आणि गुलामांचा वापर केला जायचा, हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा असल्याचा हा पुरावा आहे. कारण या पुराव्यावरून हे सिद्ध होते, की त्या मजुरांना त्याकाळचे हेल्थकेयर वगैरे दिले जायचे. एवढे, की चक्क सोन्याचा दात बसवून दिला गेल्याचा पुरावा आहे... वगैरे. मी असे वाचले आहे, की त्याकाळी इजिप्त मधील भव्य इमारती वगैरे बघायला जे प्रवासी दूरदूरच्या देशातून येत ( हे प्रवासी त्याकाळच्या प्रवासातील त्रास वगैरेंचा विचार करता चांगले सुस्थितीतले असणार), त्यांना गुलाम बनवून बांधकामात मजूरी करायला लावत, आणि ते मेले, की तिथेच गाडून टाकत. हा सोन्याचा दातवाला देखील असाच एकादा सधन प्रवासी असू शकतो, आणि उत्खननातून मिळालेला हाच पुरावा वेठबिगारीच्या सिद्धांताचीसुद्धा पुष्टी करू शकतो....

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 30/06/2014 - 21:38
हा हा हा, अगदी अगदी. उत्खननातले पुरावेही दिशाभूल करू शकतात. म्हणून त्यासाठी दोन्ही पद्धतीचे पुरावे आणि बरेच तारतम्य पाहिजे. जिथे निर्णयन होत नाही तिथे तसे सांगितले पाहिजे. याची काही मजेशीर उदाहरणे ट्रॉय आणि मायसीनीच्या उत्खननात सापडतील ती देणार आहे.

ब़जरबट्टू 28/06/2014 - 09:33
कथा म्हणून फार आवडली.. बाकी एव्हढे काही लाजिक असावे, असे वाटत नाही.. जर शक्कुला बदलाच घ्यायचा होता, तर पांडवांना चांगले फासे टाकूनही घेता आला असताच... :)

पैसा 28/06/2014 - 11:50
गोष्ट आवडली. महाभारतावर आधारित गोष्टी वाचायला नेहमीच मजेशीर असतात. तुमची लेखनशैली आवडतेच. मनमोहनसिंगांनी शीख हत्याकांडाचा बदला खान्ग्रेसला संपवून घेतला अशी एक थिअरी मजा म्हणून लोक मेसेजवरून पाठवत होते त्याची आठवण झाली!

चित्रगुप्त 28/06/2014 - 21:49
ही कथा प्रथमच ऐकली. रोचक वाटली. महाभारतावरील माझे काही (सचित्र) लेख: सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १,२ ३ ) http://www.misalpav.com/node/25328 महाभारत (भाग १,२,३): http://www.misalpav.com/node/26965

चर्चाविषय व एकुणच चर्चा रोचक आहे. शकुनि व शल्य दोघेही महाभारत युध्दात एक विशिष्ठ भूमिका घेऊन आले होते. त्याकाळी ज्या राजपुरुषांचा विवाह होण्यात काही अडचणी येत असत त्या पुरुषांची राजघराणी मद्र देशातुन द्र्वय देऊन वधु मिळवित असत थोडक्यात लग्नासाठी मुली विकत घेतल्या जात असत व त्यांच्याशी ह्या पुरुषांचा विवाह लावण्यात येईल. माद्रीचा पांडुशी विवाह हा असाच प्रकार होता. गांधार देशातील राजघराण्यांवर धाकदपटशा/युध्दे लादुन तेथील स्त्रियांशी विवाह लावले जात. भीष्माने लावलेला धृतराष्ट्राचा गांधारीशी विवाह हा ह्याचे उदाहरण आहे. शकुनि कुरूवंशाचे कंबरडे मोडायच्या उद्देशानेच हस्तिनापुरात तळ ठोकुन होता.कोणाचीही बाजु घेतली असती तरी त्याला कौरवपांडवात असलेल्या भाऊबंदकीचा फायदा घेऊन दोघांत महायुध्द व्हायलाच हवे असेच त्याचे राजकारण होते. कारण महायुध्द झाल्यानंतर एकुणच आर्यावर्त इतका दुबळा झाला कि त्यानंतर गांधारांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत त्यानंतरचा आर्यावर्तातील कोणीही राजा करु शकला नाही.भीष्माला हे राजकारण कळत असुनदेखील केवळ प्रतिज्ञेच्या परिपूर्ततेपायी त्याला हा सर्व प्रकार स्वीकारावा लागला. कृष्णाला ही शकुनिचे राजकारण वेळीच लक्षात आले होते त्याने त्यातल्या त्यात एकुणच यादवांना व यादवसेनेला ह्या युध्दापासुन तशी फारशी झळ पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली.

सर्व प्रतिसाद आत्ता वाचले. खूप अभ्यासपूर्ण आणि वेगळी माहिती मिळाली. विशेषत: उगोलिनो ची कथा. या व्यक्तिरेखेबद्दल मला काहीच माहिती नाही. हे नावही मी पहिल्यांदाच वाचलं. अधिक जाणून घ्यायला आवडेल. वल्ली, मृत्युंजय, कानडाऊ योगेशु, विकास, आगाऊ कार्टा, मराठे, स्वॅप्स, बॅटमॅन आणि आपणा सर्वांच्याच प्रतिसादांतून नवीन माहिती मिळाली. मी ही कथा वाचली, मला अचंबा वाटला. माझ्याच प्रमाणे आणखी काही जणांना ही कथा माहिती नसेल आणि जाणून घ्यायला आवडेल असं वाटलं, म्हणून इथे सादर केली. कथेच्या सत्यासत्यतेबाबत माझा काहीच दावा नाही. अशाच आणखीही काही कथा वाचनात आल्या आहेत. यापुढे जमेल तशा त्या सुद्धा इथे सादर करीत जाईन. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार.

विजुभाऊ 03/07/2014 - 14:04
ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला. शकुनी पंगु झाला,
हे चुकीचे आहे. चोप्रांच्या महाभारत मालीकेत गुफी पेंटल या कलकाराने तो रोल केला होता. तो एका पायाने अधू असल्यासारखा चालत असे. अन्यतः महाभारता कुठेच शकुनीच्या पंगडेपणाबद्दल उल्लेख आलेला नाही. महाभारतात प्रमुख पात्रांच्या व्याधीम्बद्दल उल्लेख आलेले आहेत उदा:पंडू हा पंडू रोगी ( अ‍ॅनिमीक , भुर्‍या ) होता. धृतराष्ट्र हा अंध होता. शिखंडी हा तृतीयपम्थी होता. इत्यादी
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज थोडं वेगळं लिहू का... माझं वाचन नियमीत सुरू असतं. मुख्यत्वे मराठी आणि बऱ्यापैकी इंग्रजी. शिवा ट्रायॉलॉजी वाचल्यानंतर पौराणीक साहित्य वाचायला आवडू लागलं. पुराणातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची ओढ लागली आणि हाती लागेल तसं बरंच काही वाचत गेले. अशीच एक कथा. फार कमी लोकांना माहिती असावी, म्हणून इथे लिहावी, असं वाटलं. ही गोष्ट आहे कौरव-पांडवांची. पंडुच्या मृत्युनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतलेली. वनात जन्मलेले, लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच. युधिष्ठीर त्यातल्या त्यात शांत, सौम्य. साधारण तसेच नकुल-सहदेव.

कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर? भाग - २

शशिकांत ओक ·

एस 27/06/2014 - 23:01
एकदम आवडला हाही भाग. वाचायला मजा आली. :) अवांतरः ते <strong> हा HTML टॅग 'भाग 2' पर्यंत संपवायला हवा होता असे वाटले.

एस 27/06/2014 - 23:01
एकदम आवडला हाही भाग. वाचायला मजा आली. :) अवांतरः ते <strong> हा HTML टॅग 'भाग 2' पर्यंत संपवायला हवा होता असे वाटले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग 2
‘...रन, सर्च फॉर शेल्टर यू फूल! व्हेयरीज युवर ट्रेंच रन?... ... एयरमन चेक पोस्ट पार करून शटरवर फुली मारली तेवढ्यात मागून शिटी वाजली. दोन जण धावले मी पटकन एका आडोशाला गेलो. ‘किसने लगाया ये क्रॉस? तुम क्या कर रहे थे? ये गया ना बॉम्ब के धमाकेसे! ...’ म्हणताना ऐकत होतो. ... कडकडून थंडी वाजल्याप्रमाणे मला कंप सुटला होता. ‘आता काय एक्शन घेतली जाणार याची कटू सुनावणी ऐकायला मला भिती वाटायला लागली!’ ... पंधरा दिवसापुर्वी पहिल्या भेटीतील पुसटशी ओळख झालेला एओसी राक्षसाप्रमाणे वाटत होता.’
तेवढ्यात ‘यू, व्हाट इज युवर नेम?

कुटुंबसंस्थेचे चालन

arunjoshi123 ·

मी खुप मन लावुन लेख वाचला.. काही ठिकाणी भाषा अगदी जटील आहे.. थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत असतं तर बरं झालं असतं.. पण एकंदरीत चर्चा प्रस्ताव चांगला आहे.. तुम्हाला असं म्हणायचय का की पुरुषप्रधान सिस्टीममध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) त्याच्या तुलनेत समताप्रधान कुटुंबामध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) ह्याची तुलना व्हावी, कारण वरकरणी वाटलं तरी समताप्रधान कुटुंब अन्यायमुक्त (किंवा तुलनेनी कमी अन्याय होत असणारं) असेलच असं नाही (कारण तुम्ही वानगी दाखल दिलेले ११ प्रश्न..) मुळात कोणतीही सिस्टीम फ्लॉलेस नसतेच. त्यामुळे कोणत्याही सिस्टिम मध्ये कुणा न कुणावर अन्याय होत रहाणार हे नक्की. त्यात सुद्धा अन्याय हा कोणत्या एका पक्क्या सुत्राने मोजता येत नाही. स्थल-काल-लिंग सापेक्षता वगैरे मुद्दे तिथे असतात. (केवळ काय मोजतोय ह्याबद्दल नाही तर "कोण" मोजतोय ह्याबद्दल् सुद्धा). त्यामुळे अशी दोन सिस्टीम मधल्या अन्यायाची काटेकोर तुलना करता येईल का हा मुळात मला पडलेला प्रश्न आहे.. पुरुषप्रधान सिस्टिमला जो स्त्रियांकडुन विरोध होतो त्यावर मी एक स्त्री म्हणुन भाष्य करु शकते. (आणि ती सर्वस्वी माझी मते आहेत.. कुणाला दिलेले सल्ले अथवा आरोप नाहीत.. त्यामुळे माझी विधाने केवळ माझे अनुभव असल्याने त्यांना सिद्ध करुन दाखवायची माझी जवाबदारी नाही कारण ती मान्य कराच असा माझा आग्रह नाही) स्त्री म्हणुन पुरुषप्रधान सिस्टीमला जो विरोध असतो तो केवळ "लिंग" ह्या एका मुद्द्यावर नसावा. इथे मुळात एखाद्याचे जगण्याचे, विचारांचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसणे हा एक मोठा मुद्दा आहे. "केवळ पुरुष आहे" ह्या एका गोष्टीसाठी अनेक अधिकार पुरुषाकडे असतात. कुटुंब व्यवस्था सोयिस्कर असावी म्हणुन निवडालेला तो एक पर्याय जरी मानला तरी त्यात केवळ गोंधळ नको म्हणुन एकहाती कारभार सोपोवणे हा एकच उद्देश नाही (किंवा उद्देश काहीही असला तरी त्याचा केवळ तोच एक परिणाम नाही). ह्या मध्ये सत्ता हाती यावी म्हणुन "पुरुष ह्या लिंगाला प्राधान्य देणे" ही समस्या निर्माण होते आणि त्यामुळे स्त्री भ्रुण हत्या वगैरे प्रश्नांची मालिका सुरु होते (इथे स्त्रियांना जे काही मुलभुत प्रश्न आहेत.. गर्भात हत्या, आवश्यक शिक्षण न मिळणे. कुपोषण, स्वामित्वाच्या भावनेतुन आणि स्त्रीला भोगवस्तु म्हणुन पाहण्याच्या वृत्तीमुळे झालेले बलात्कार, हुंडाबळी, पळवुन नेऊन विकणे इ समस्या मला अपेक्षित आहेत..). बर एकाधिकार दिले म्हणुन कारभार सुरळित चालु आहे असे तरी आहे का? तर निश्चित नाही.. ह्या व्यतिरिक्त अजुन एक मुद्दा जो मला अत्यंत मह्त्वाचा वाटतो तो असा, की कुटूंबव्यवस्था, समाज सुरळित चालु रहाणं हे महत्वाचं आहे, त्यासाठी व्यक्तिला अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण एखादया व्यक्तिच्या आयुष्यात नक्की कुठवर आपण ह्या व्यवस्थांचा हस्तक्षेप चालवुन घेऊ शकतो? म्हणजे माणुस म्हणुन आवडीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर आवळले जाणार असेल तर ती सिस्टीम एक फेल्युअर नाही का? तुम्ही म्हणता की हॉस्टेलची पाटी वाचल्या प्रमाणे एका कुटुंबातली नावे नकोत.. पण Does it really matter? असलीच चोघांची नावं अत्यंत वेगवेगळी तरी त्याचा नक्की किती फरक पडतो? केवळ सोय म्हणुन, किंवा वाचायला बरं (रिदमिक विथ ऑदर मेम्बर्स) वाटतं म्हणुन एखाद्याचं नाव बदलुन टाकणे योग्य ठरते का? तुम्ही मुळचे कुठले ह्या प्रशाचे उत्तर ८-१० पिढ्यानंतर पण देता आले पाहिजे म्हणुन हा खटाटोप करायचा? आणि मग त्या उत्तरासाठी "स्त्री ने लग्न झाले की माहेर विसरून सासरच आपले घर मानावे आणि स्वतःला त्या वंशात विरघळवुन टाकावे" अशा मानसिकतेचा उदय होतो. पण मुळात "तुम्ही मुळचे कुठले" हा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे का की ज्या साठी त्या घरात येणारी प्रत्य्के स्त्री गरजे पलीकडे बदलुन जाते? तुम्ही सिस्टीम कोणतीही निवडा, पण त्यात व्यक्तिस्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर (आणि गरजेपेक्षा जास्त) धोक्यात येणार असेल तर ती माझ्या दृष्टिने फेल्युअर आहे. बाकी तुम्ही जे ११ प्रश्न दिले आहेत, त्यांची सर्व घरांमध्ये एकच एक उत्तरं मिळणं हे अशक्यच आहे.. तशी न मिळणं ह्यालाच आयुष्य म्हणतात ना...

In reply to by पिलीयन रायडर

arunjoshi123 27/06/2014 - 17:51
आपल्याला पूर्ण आशय पोचला त्याचा आनंद आहे. आपली जवळजवळ सारी वाक्यं पटणेबल आहेत. एखाद्या विचाराबद्दल अजून काही सुचलं तर अवश्य लिहिन.

In reply to by मराठी कथालेखक

हाडक्या 02/07/2014 - 19:27
त्यांच्या अभिव्यक्तीचा तो आविष्कार आहे.. तुम्ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंन्त्र्याचा आदर करणार की तुमची 'दाताला खडा' लागल्यासारखी सेन्सॉरशीप लादत बसणार ? ;)

आतिवास 27/06/2014 - 18:09
'लिंग' (सेक्स - स्त्री आहे की पुरुष) आणि 'लिंगभाव' (हिंदी भाषेत त्याला 'सामाजिक लिंग' असे म्हटले जाते) या दोन वेगळ्या संज्ञा आहेत - त्यांचा संबंध आहे पण त्या वेगळ्या आहेत. सामान्यतः लिंगभावाबद्दल चर्चा होत असते. 'लिंगभाव' म्हणजे थोडक्यात सांगायचे तर: व्यक्तीचे लिंग केंद्रस्थान घेते आणि तिच्या/त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात (मोठ्याने बोलू नये, रडू नये इत्यादी) ; कामाची विभागणी होते (स्वयंपाक, नारळ फोडणे इत्यादी) ; विविध साधनं कोणाला प्राधान्याने मिळणार (शिक्षण इत्यादी) हे ठरते, साधनांवर मालकी कोणाची हे ठरते (शेती, घर), निर्णय कोणी घ्यायचे हे ठरते... इत्यादी. 'लिंग' बदलत नाही, ते बदलावे अशी अपेक्षाही नाही; 'लिंगभाव' व्यवहार बदलतो - तो सगळीकडे सारखा असत नाही. पुरुषप्रधान रचनेत एका विशिष्ट प्रकारची लिंगभाव व्यवस्था आहे - असमानता आहे, ती बदलण्याचा प्रयत्न करताना स्त्रीच्या लिंगाधारित गरजा (बाळंतपण, राजकीय सहभागाची संधी इत्यादी) लक्षात घेणे म्हणजे 'भेदभाव' नाही. (तुम्ही हे म्हटले नाही इथे, पण जाताजाता लिहिले.) पुरुषप्रधान समाजरचनेचे समर्थक फक्त पुरुष असतात असे नाही, स्त्रियाही असतात; लिंगभाव धारणा बदलायला हव्यात असे फक्त स्त्रियांना वाटत नाही, अनेक पुरुषांना वाटते. सर्व स्त्रिया स्त्रियांबाबत संवेदनशील असतील असे नाही, सर्व पुरुष स्त्रियांच्या प्रती असंवेदनशील असतील असे नाही. संवेदनशीलता, परस्पर आदर नसतो तेव्हा अकराच काय अकरा हजार प्रश्न निर्माण होतात... संवेदनशीलता आणि परस्पर आदर असेल तरीही प्रश्न निर्माण होतातच पण त्यातून मार्ग काढला जातो. स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!!

रेवती 27/06/2014 - 19:49
स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!! भयानक सहमत. माझ्याच निर्णयामुळे आलेली अडचण कशी निस्तरावी या विचार अनेक वर्षे करत होते. परवा सकाळी झोपेतून उठल्यावर त्याचे पर्फेक्ट असे नाही पण चांगले असे उत्तर मिळाले होते. ते श्रेय मात्र माझे नाही. आपण अनेक पुस्तके, लेख, चांगले विचार, मुलाखती ऐकत, वाचत असतो. काही गोष्ती डोक्यात बसतात ते नेहमीच आपल्याला कळत नाही. पण त्या सगळ्यातून आपण (मेंदू)प्रश्नाचे उत्तर शोधत राहतो, नकळतपणे आणि असे एखादे दिवशी ते समोर येते, जेंव्हा ते एक्सपेक्टेड नसते. परवाचा सगळा दिवस मनातल्या मनात आश्चर्य करणे, मनाशी हसणे यात घालवला (म्हणजे बाकीही कामे केली हां). ;) कोंडीबद्दलही नाही लिहित.

साती 27/06/2014 - 20:58
मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय? मूळात समताप्रधान अशी समाजव्यवस्था अजूनतरी भारतात निर्माण झाली नाही. जिथे समताप्रधान व्यवस्था असल्याचे भासते ती 'कमी पुरूषप्रधान' व्यवस्था असते. जर समताप्रधान व्यवस्था झाली तर तिचा पायाच इतका सामंजस्याचा असेल की असे प्रश्नं निर्माणच होणार नाहीत. (हे मी बहुसंख्यांकांच्या बाबतीत लिहित्येय, ईशान्येकडील राज्यात अजूनही काही ठिकाणी स्त्रीप्रधान व्यवस्था आहे आणि तिथली समताप्रधान व्यवस्था ही कमी स्त्रीप्रधान असेल याची जाणीव आहे) तसे तर हॉस्टेलला रहणारे रूममेट मित्रं मैत्रिणीसुद्धा एकमेकांबरोबर थोडे काँप्रमाईज आणि थोडे मॅनिप्युलेट करून रहातो. इथे तर अख्ख्या जीवनाचा आणि संसाराचा प्रश्नं आहे. त्यामुळे कुठल्याही सहजीवनात येऊ शकतील असे इश्यूज इथेही येणारच. ते सोडवायचे कसे हा मुख्य मुद्दा आहे. बरं हे सोडवतानासुद्धा पारंपारिक वर्चस्ववाल्या गटाने 'मी खरंतर पडतं घ्यायला नको/घेतलं नसतं पण समानतेपायी घेतोय' असा मोठेपणा घेतला जाण्याची किंवा दुसर्या बाजूने दिली जाण्याची शक्यता जास्तं असते. 'माझे मिस्टर सकाळी भाजी चिरून देतात' हे कौतुकाने संगितलं तर पुप्र मानणारी स्त्री. 'मी बायकोला अगदी भाजीही चिरून देतो' असे म्हणणारा पुप्रवाला पुरूष. खर्या समानतावाल्याना यात काही विशेष सांगण्यासारखे आहे असेही वाटणार नाही. मग तू घरी किती पैसे दिलेस का दिलेस इ. विचार फक्तं एक व्यवहाराचा भाग म्हणून होतील त्याला रुसवेफुगवे मानापमान याचं ड्रेसिंग लागणार नाही. त्यामुळे खरी समताप्रधान व्यवस्था जेव्हा येईल तेव्हा त्यात पुरूष व स्त्री यांपैकी कुठल्याही व्यवस्थेत येणारी घुसमट अज्जिबात येणार नाही.

कवितानागेश 28/06/2014 - 17:18
मला काही किचकट चर्चा जमत नाही, पण एक गोष्ट नक्की लक्षात येतेय, कुटुंबसंस्था ही लहान मुलांच्या सुरक्षित वाढीसाठी आणि म्हातार्‍या माणसांच्या आधारासाठी आणि काही प्रमाणात 'हक्काच्या' सोबतीसाठी निर्माण झालेली/ केली गेलेली आहे. या अश्या कुटुंबाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना मात्र मूळात या कशाची तत्क्षणी गरजच नसते. ते केवळ स्वतःच्या सोयीचा/ मनाचा विचार करुन मुक्त राहू शकत असतात. पण त्यांनी त्यांच्या भूतकाळात या संस्थेचा फायदा घेतलेला असतो, आणि भविष्यकाळातही मिळणार असतो. अशा वेळेस समाज बांधून रहाणं, सुरक्षितता आणि त्यायोगे होउ शकणारी प्रगती यादेखिल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याकडे दुर्लक्ष होताना दिसते... ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा व्यक्तींनी जर का जे काही आहे ते 'आपलं' आहे आणि 'आपल्यासाठी' आहे, असा विचार केला तर फारसे प्रश्न पडत नाहीत. जर का ' हे 'मला' किती फायदेशीर होईल?' असा विचार केला तर रस्सीखेच जास्त जोरात सुरु होईल... आणि ती कायम सुरु रहाणार! कारण 'मी' विरुद्ध 'आपण' हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी समोर येतोच. त्याचे उत्तर कालपरत्वे आणि व्यक्तीपरत्वे बदलतं.. अमुक एक मान्य करणं योग्य आणि अमुक एक कृती करणं अयोग्य असं आपल्याला खरोखरच कधी ठरवता येइल का, हे माहित नाही.

पैसा 28/06/2014 - 20:34
जिवंत माणसांचा प्रश्न येतो तिथे २+२=४ असं उत्तर नेहमीच मिळत नाही. कधी उत्तर १ असेल तर कधी ६. प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा. पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही. गावातल्या अशिक्षित स्त्रिया अख्खं कुटुंब चालवत असतात हे अनेकदा पाहिले आहे. सुशिक्षित उच्च वर्गीय कुटुंबातही समानता असमानता दोन्ही प्रकार असतात. हा प्रत्येकाच्या जडणघडणीचा, विचारांचा भाग आहे. इतर बहुतेक गोष्टी स्त्री -पुरुष कोणीही करू शकत असले तरी मुलाला प्रत्यक्ष जन्म देणे आणि काही वर्षेपर्यंत त्याचे संगोपन करणे हे स्त्रीलाच करावं लागतं. त्यासाठी तडजोडी तिलाच कराव्या लागतात. (मुलांना योग्य प्रकारे वाढवण्यासाठी कोणा पुरुषाने करियर सोडलेली फार उदाहरणे आजूबाजूला दिसत नाहीत.) इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल यात फार फरक असतो. ते जर कोणाला नको असेल तर मुले न होऊ देणे हा पर्याय उपलब्ध आहेच.
माझा असा कयास आहे कि सांप्रतकालीन बहुसंख्य पुरुषप्रधानतेचा विरोध करणार्‍या स्त्रीया (काहीवेळा असे पुरुष) केवळ कशाचा विरोध फॅशन मधे आहे हे पाहून त्या गोष्टींवर फोकस करतात.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे. पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही. कारण ते फारच कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचं नातं राहील. जो/जी घटक पैसे मिळवत नाही त्याला सतत दबून रहावं लागेल. जिथे आर्थिक विषय महत्त्वाचे होतात तिथे मानवी नातं मागे पडतंच. तसाही इन्कम टॅक्समुळे जमाखर्च आणि इन्वेस्टमेंट्स वेगळ्या ठेवाव्या लागतातच पण घरातले खर्च अगदी वेगळे ठेवता येत नाहीत. इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
"पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?
पुन्हा नाही. ती मानवी प्रवृत्ती आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीने वेगळी नावं देतो. शेवट सगळा पॉवरचा, सत्तासामर्थ्याचा आणि संघर्षाचा खेळ आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 29/06/2014 - 14:42
प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा.
प्रत्येक कुटुंब प्रत्येक गोष्ट नव्याने शिकू शकत नाही. सहसा समाजात काय चालले आहे याचा मोठ्या निर्णयांसाठी आधार घेतला जातो.
पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही.
सहमत. मी ही असंच म्हटलं आहे.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे.
हे फारसं पटलं नाही. भारतातल्या सर्वात धुरंधर स्त्रीवादी स्त्रीच्या आईच्या नावाने काहीच संपत्ती नसायचीच शक्यता जास्त आहे. " ते समजूनदार पालक आहेत म्हणून त्यांची संपत्ती विभागणे मला गरजेचे वाटले नाही" असे सांगण्यात येईल. याउलट स्त्रीने जीन्स घालू नये असे कोणी म्हटले तर सगळ्या चवताळून उठतील.
पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही.
मी असा सल्ला दिला नाही. प्रश्न केला आहे. दोघे कमावत असतील, क्षःय रेशोमधे, घरात प्रत्येकाचे वेगवेगळे, एकत्रित खर्च, इ इ ब क ड ई असतील तर निर्णय कसे करणार?
इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
जगातली बहुसंख्य कुटुंबे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावरच चालतात. स्त्रीप्रधान, पुरुषप्रधान वा लिंगनिरपेक्ष अशी कोणतीही व्यवस्था असती तर त्यांना फरक पडला नसता. पण सबब लेखात त्यावर चर्चा करायची नाही. प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते. पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते. आपण हुंड्याचे उदाहरण घेऊ. मी खालील निरीक्षणे मांडू इच्छितो. सामान्य कुटुंबांत- १. स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते. २. हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल. ३. हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये. संपत्ती पुरुषाकडेच असली तरी कोणाला किती मुली, किती मुले होतील हे सांगता येत नाही. ज्या कुटुंबांत पुरुषप्रधान व्यवस्थेचा फायदा घ्यायची वृत्ती आहे- ४. हुंडाबळींची संख्या (मुलीच्या सासरच्या मागण्या न पुरविल्याने, इ) ही हुंडाबळी न ठरलेल्या मुलींच्या मानाने नगण्य असते. या कुटुंबांमधे पुन्हा मुलीच्या पित्याला कर्ज घेऊन, शेत विकून, दागिने विकून, इ इ त्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या असतात. इथे पुरुषप्रधानता केवळ एक निमित्त आहे. मूलतः एका गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा संबंध साध्या लोकांशी आला आहे. ५. हुंडा द्या, लवकर द्या, जास्त द्या, इ इ संदेश तीव्र करण्यासाठी जे एक्झिक्यूटीव ऑफिसर असतात त्यांत नवरा हा एकच पुरुष असतो. बाकी स्त्रीयाच असतात. विशेष करून अशाच परिस्थितीतून गेलेली सासू असते. यात लिंगाचा नि हुंड्याचा संबंध दिसतो का? काहीच नाही. ही सगळी मेस का निर्माण झाली आहे? कारण वारश्याचे नियम नीट नाहीत म्हणून. आदिवास्यांत पोरगीच्या बापाला पैसे द्यावे लागतात. त्याचे रेट, नियम फिक्स असतात. म्हणून त्यांच्यात असले गुन्हे होत नाहीत. स्त्रीप्रधानता + व्यवस्थित नियम + प्रोटोकॉल्स अशी ती सिस्टिम आहे. जी किमान मानवी गुन्हेगारी असणारच आहे, तिचे खापर व्यवस्थेवर (इथे पुरुषप्रधान) फोडू नये. पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्टॅट देत, पोलिस फोर्स डिसबँड करावा असे म्हणू नये. ही चर्चा मेरिट बसिसवर असावी.
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल. माझं असं मत आहे कि काही व्यवस्था काही इतर व्यवस्थांपेक्षा जास्त इफेक्टीव असतात. ज्या व्यवस्थांत खासकरून कोणतेच पायंडे नसतात त्या अधिकच अन्यायकारक असतात, कारण त्या सद्य भारतीय लोकशाहीपेक्षाही वाईट चालतील. इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे. कृपया समजूतदारपणाचा इश्श्यू मधे आणू नका. आपण थोड्या गडबड लोकांबद्दल बोलतोय ज्यांच्यामुळे समाजात अन्यायाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उदा घेऊ. परिस्थितीचा फायदा घेऊन कमी जास्त अन्याय करायला २०% लोकांना (१०% स्त्रीया, १०% पुरुष) आवडते असे समजू. समाज लिंगनिरपेक्ष आहे नि केव्हाचा पुरुषप्रधानता विसरला आहे असे समजू. एकत्र कुटुंबे नाहीत नि प्रतिजीवनात २-३ घटस्फोट फार काही नाहीत असे समजू. वैवाहिक लैंगिक निष्ठा अजूनही प्रचलित आहे असे समजू. 'रोजची गैरसोय' टाळण्यासाठी ऑपरेशन करायचे आहे. कोण करायचे यासाठी काहीही बेंचमार्क उपलब्ध नाही असे समजू. हे ऑपरेशन इर्रिवसिबल आहे असे समजू. कोणी करायचे? स्त्रीने? पुरुर्षाने? दोघांनी? घटस्फोटानंतर या ऑपरेशनच्या स्टॅटस्मुळे दुसरा साथी मिळतो का नि त्यास मुले हवीत का असे प्रमुख यांच्यापुढे प्रश्न असतील. मी हे मुद्दाम कृत्रिम उदाहरण दिले आहे पण आज जशी आपण स्त्रीयांवरील अन्यायाची उदाहरणे देत आहात तसे उद्या "ज्यांच्या स्पाऊसने मुलाला आपले मिडल नेम लावू दिले नाही" अशांवरील अन्यायाची उदाहरणे देत ग्रुप असतील आणि त्यांची सदस्यसंख्या आजच्या मानाने शेकड्याने जास्त असेल.
पुन्हा नाही.
सहमत.

In reply to by arunjoshi123

पैसा 29/06/2014 - 19:43
प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते.
बर्‍याच अंशी सहमत आहे. आता खरे तर हुंडाबंदी कायदे आहेत. मुलींना पित्याच्या संपत्तीमधे वारसा आहे. हुंडाबळी जाऊ नये म्हणून शक्य तेवढे काळजीपूर्वक कायदे केले आहेत. तरीही गुन्हे होतात. याची तुलना ड्रग्ज घेणे/खून यासंबंधीचे कायदे असले तरी हे गुन्हे होतात याच्याशी करता येईल.
पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते.
हे जरा गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते.
मला वाटते, स्त्रीधनात फक्त आईबापाकडून आणि सासरच्या लोकांकडून लग्नात मिळालेले जे दागिने स्त्री वापरते त्याचाच समावेश होतो. पूर्वीच्या काळी मुलींना पैतृक संपत्तीमधे वारसाहक्क नव्हता त्याकाळात या ना त्या स्वरूपात मुलीला संपत्तीचा काहीतरी भाग द्यावा म्हणून दागिने देण्याची पद्धत सुरू झाली. पुढे काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या हावरटपणामुळे त्याचे हुंड्याच्या जाचक प्रथेत रूपांतर झाले. इतर गोष्टी जसे की रोकड/फ्लॅट्/गाडी/फर्निचर्/सासरच्या इतर नातेवाईकांना दिलेल्या भेटवस्तू यांचा समावेश हुंड्यात होतो, पण ते स्त्रीधन नसते. त्या वस्तू सासरचे इतर लोक वापरतात. स्त्रीधन सर्वात शेवटी वापरले जाते यामागे जास्त भावनिक कारणे असतात. अनेक स्त्रियांकडे मंगळसूत्र/दोनेक बांगड्या याशिवाय काहीच नसते आणि हे सौभाग्यालंकार समजले गेलेले दागिने गहाण टाकणे/विकणे अशुभ समजले जाते. वगैरे. मात्र इतर जास्तीचे दागिने अनेक स्त्रिया घरातील कॅश संपल्यावर आपणहून वापरायला देतात. मुस्लिमांमधे मेहेर नजर हा प्रकार आहे तो या स्त्रीधनाच्या जवळपास जाणारा वाटतो. तलाक झाल्यास त्यांना तो स्त्रीला परत करावा लागतो. मुस्लिम लोकांत अजूनही स्त्रियांना वारसाहक्क नाही (बहुतेक). यासाठीच जिना हाऊसच्या केसमधे बॅ. जिनांच्या मुलीने आपण मुस्लिम नसल्याचे कोर्टात सांगितले होते.
हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल.
संपत्तीमधे समान अधिकार जरूर आहे. तसाच हुंड्याविरोधात कायदा आहे. स्त्रिया अनेक कारणांनी तो वापरत नाहीत.
हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये.
हे पटले नाही. लग्न करणारा पुरुष आपल्या मुलीवर आणि आपल्यावर उपकार करत आहे, या भावनेने आपली मुलगी 'खपावी' म्हणून दिलेली लाच आहे एकप्रकारे. जर पुरुषप्रधानता नसती तर हुंड्याचा जन्मच झाला नसता. काही आदिवासी जमातीत याउलट स्त्रीचे मूल्य तिचा नवरा तिच्या बापाला चुकवतो. कारण तिथे पुरुषप्रधानता नसते. मात्र कोणत्याही कारणाने सुरू झालेल्या गुन्हेगारीला आळा घालणे कठीण आहे. जोपर्यंत गुन्हेगारीची प्रवृत्ती जिवंत आहे तोपर्यंत या नाही त्या प्रकारे ती सुरू राहील हे मान्य.
इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे
सहमत.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल
होय. मला वाटते तुम्हीही हेच सांगत आहात की गुन्हेगारी प्रवृत्ती ही लिंगनिरपेक्ष असते. बहुधा, ही गुन्हेगारी कशी सुरू झाली याबद्दल आपली मते जुळणारी नसली तरी सध्याच्या स्थितीबद्दल जुळणारी आहेत.

In reply to by रामपुरी

सहमत. आपत्तीच्या ऐवजी आक्षेप असा मराठी शब्द लिह्हीता आला असता. पण असूद्या. बहुधा, लेखक मराठीतच, महाराष्ट्राबाहेरच वास्तव्यास असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भृशुंडी 03/07/2014 - 03:50
भाषेची शुद्धता पाळत बसणं हा संपून जायचा सोप्पा मार्ग आहे. तेव्हा करा हो जरा इकडचे तिकडचे शब्द स्वीकार.

ऋषिकेश 03/07/2014 - 10:18
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.

In reply to by ऋषिकेश

arunjoshi123 04/07/2014 - 12:40
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील राज्यव्यस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. राष्ट्र संस्थेला कोणी एक 'शास्ता' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे. असे काहीसे वाचल्यासारखे वाटले. असो.

arunjoshi123 04/07/2014 - 12:38
भाषेबद्दल - प्रमाण भाषा अचूकपणे येणे बर्‍यापैकी अवघड आहे. त्यासाठी थोडे नशीब, थोडे कष्ट लागतात. शिवाय संकल्पनेचा आशय नीट मांडण्यासाठी एक प्रकारची प्रतिभाच लागते. ती अनेकांना नसते. (ती कैकांना हासिल होत नाही म्हणणार होतो.) एकतर गावात, वर लातूरकडे वाढल्याने, जिथे अशुद्ध वाणी भाषा बोलतात, पेशवे म्हणतात त्याप्रमाणे बराच काळ दिल्लीत वास्तव्य असल्याने, घरातही हिंदी बोलत असल्याने, विचारही हिंदीत करत असल्याने, एकतर आधीच मराठी टायपणे क्लिष्ट, शिवाय पलटून सगळ्या वाक्यरचना दुरुस्त करत बसणे कंटाळवाणे असल्याने अशा वाक्यरचना होतात. नाईलाज आहे. पण चालून जावे.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 04/07/2014 - 12:43
चालायला हर्कत काहीच नाही. फक्त काहीवेळेस असे होते की महाराष्ट्रात वाढलेल्या आणि आजन्म महाराष्ट्राबाहेर न राहिलेल्या लोकांकडूनही हिंदी प्रभाव असलेले शब्दप्रयोग होतात तेव्हा ते जास्त खटकतं. बाकी महाराष्ट्राबाहेर बराच काळ वास्तव्य असलेल्यांना याचा गंड बाळगण्याचे आजिबात म्ह. आजिबात कारण नाही. हिंदी लहेज्यातली मराठी ऐकायला आणि वाचायलाही तशी मस्त वाटते. (विशेषतः एमपीच्या मराठी पोरींची.....आहाहा नका, नका आठवण करून देऊ!!)

मी खुप मन लावुन लेख वाचला.. काही ठिकाणी भाषा अगदी जटील आहे.. थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत असतं तर बरं झालं असतं.. पण एकंदरीत चर्चा प्रस्ताव चांगला आहे.. तुम्हाला असं म्हणायचय का की पुरुषप्रधान सिस्टीममध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) त्याच्या तुलनेत समताप्रधान कुटुंबामध्ये जो अन्याय होतो (स्त्री व पुरुष दोघांवरही) ह्याची तुलना व्हावी, कारण वरकरणी वाटलं तरी समताप्रधान कुटुंब अन्यायमुक्त (किंवा तुलनेनी कमी अन्याय होत असणारं) असेलच असं नाही (कारण तुम्ही वानगी दाखल दिलेले ११ प्रश्न..) मुळात कोणतीही सिस्टीम फ्लॉलेस नसतेच. त्यामुळे कोणत्याही सिस्टिम मध्ये कुणा न कुणावर अन्याय होत रहाणार हे नक्की. त्यात सुद्धा अन्याय हा कोणत्या एका पक्क्या सुत्राने मोजता येत नाही. स्थल-काल-लिंग सापेक्षता वगैरे मुद्दे तिथे असतात. (केवळ काय मोजतोय ह्याबद्दल नाही तर "कोण" मोजतोय ह्याबद्दल् सुद्धा). त्यामुळे अशी दोन सिस्टीम मधल्या अन्यायाची काटेकोर तुलना करता येईल का हा मुळात मला पडलेला प्रश्न आहे.. पुरुषप्रधान सिस्टिमला जो स्त्रियांकडुन विरोध होतो त्यावर मी एक स्त्री म्हणुन भाष्य करु शकते. (आणि ती सर्वस्वी माझी मते आहेत.. कुणाला दिलेले सल्ले अथवा आरोप नाहीत.. त्यामुळे माझी विधाने केवळ माझे अनुभव असल्याने त्यांना सिद्ध करुन दाखवायची माझी जवाबदारी नाही कारण ती मान्य कराच असा माझा आग्रह नाही) स्त्री म्हणुन पुरुषप्रधान सिस्टीमला जो विरोध असतो तो केवळ "लिंग" ह्या एका मुद्द्यावर नसावा. इथे मुळात एखाद्याचे जगण्याचे, विचारांचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसणे हा एक मोठा मुद्दा आहे. "केवळ पुरुष आहे" ह्या एका गोष्टीसाठी अनेक अधिकार पुरुषाकडे असतात. कुटुंब व्यवस्था सोयिस्कर असावी म्हणुन निवडालेला तो एक पर्याय जरी मानला तरी त्यात केवळ गोंधळ नको म्हणुन एकहाती कारभार सोपोवणे हा एकच उद्देश नाही (किंवा उद्देश काहीही असला तरी त्याचा केवळ तोच एक परिणाम नाही). ह्या मध्ये सत्ता हाती यावी म्हणुन "पुरुष ह्या लिंगाला प्राधान्य देणे" ही समस्या निर्माण होते आणि त्यामुळे स्त्री भ्रुण हत्या वगैरे प्रश्नांची मालिका सुरु होते (इथे स्त्रियांना जे काही मुलभुत प्रश्न आहेत.. गर्भात हत्या, आवश्यक शिक्षण न मिळणे. कुपोषण, स्वामित्वाच्या भावनेतुन आणि स्त्रीला भोगवस्तु म्हणुन पाहण्याच्या वृत्तीमुळे झालेले बलात्कार, हुंडाबळी, पळवुन नेऊन विकणे इ समस्या मला अपेक्षित आहेत..). बर एकाधिकार दिले म्हणुन कारभार सुरळित चालु आहे असे तरी आहे का? तर निश्चित नाही.. ह्या व्यतिरिक्त अजुन एक मुद्दा जो मला अत्यंत मह्त्वाचा वाटतो तो असा, की कुटूंबव्यवस्था, समाज सुरळित चालु रहाणं हे महत्वाचं आहे, त्यासाठी व्यक्तिला अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण एखादया व्यक्तिच्या आयुष्यात नक्की कुठवर आपण ह्या व्यवस्थांचा हस्तक्षेप चालवुन घेऊ शकतो? म्हणजे माणुस म्हणुन आवडीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर आवळले जाणार असेल तर ती सिस्टीम एक फेल्युअर नाही का? तुम्ही म्हणता की हॉस्टेलची पाटी वाचल्या प्रमाणे एका कुटुंबातली नावे नकोत.. पण Does it really matter? असलीच चोघांची नावं अत्यंत वेगवेगळी तरी त्याचा नक्की किती फरक पडतो? केवळ सोय म्हणुन, किंवा वाचायला बरं (रिदमिक विथ ऑदर मेम्बर्स) वाटतं म्हणुन एखाद्याचं नाव बदलुन टाकणे योग्य ठरते का? तुम्ही मुळचे कुठले ह्या प्रशाचे उत्तर ८-१० पिढ्यानंतर पण देता आले पाहिजे म्हणुन हा खटाटोप करायचा? आणि मग त्या उत्तरासाठी "स्त्री ने लग्न झाले की माहेर विसरून सासरच आपले घर मानावे आणि स्वतःला त्या वंशात विरघळवुन टाकावे" अशा मानसिकतेचा उदय होतो. पण मुळात "तुम्ही मुळचे कुठले" हा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे का की ज्या साठी त्या घरात येणारी प्रत्य्के स्त्री गरजे पलीकडे बदलुन जाते? तुम्ही सिस्टीम कोणतीही निवडा, पण त्यात व्यक्तिस्वातंत्र्य जर प्रमाणाबाहेर (आणि गरजेपेक्षा जास्त) धोक्यात येणार असेल तर ती माझ्या दृष्टिने फेल्युअर आहे. बाकी तुम्ही जे ११ प्रश्न दिले आहेत, त्यांची सर्व घरांमध्ये एकच एक उत्तरं मिळणं हे अशक्यच आहे.. तशी न मिळणं ह्यालाच आयुष्य म्हणतात ना...

In reply to by पिलीयन रायडर

arunjoshi123 27/06/2014 - 17:51
आपल्याला पूर्ण आशय पोचला त्याचा आनंद आहे. आपली जवळजवळ सारी वाक्यं पटणेबल आहेत. एखाद्या विचाराबद्दल अजून काही सुचलं तर अवश्य लिहिन.

In reply to by मराठी कथालेखक

हाडक्या 02/07/2014 - 19:27
त्यांच्या अभिव्यक्तीचा तो आविष्कार आहे.. तुम्ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंन्त्र्याचा आदर करणार की तुमची 'दाताला खडा' लागल्यासारखी सेन्सॉरशीप लादत बसणार ? ;)

आतिवास 27/06/2014 - 18:09
'लिंग' (सेक्स - स्त्री आहे की पुरुष) आणि 'लिंगभाव' (हिंदी भाषेत त्याला 'सामाजिक लिंग' असे म्हटले जाते) या दोन वेगळ्या संज्ञा आहेत - त्यांचा संबंध आहे पण त्या वेगळ्या आहेत. सामान्यतः लिंगभावाबद्दल चर्चा होत असते. 'लिंगभाव' म्हणजे थोडक्यात सांगायचे तर: व्यक्तीचे लिंग केंद्रस्थान घेते आणि तिच्या/त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात (मोठ्याने बोलू नये, रडू नये इत्यादी) ; कामाची विभागणी होते (स्वयंपाक, नारळ फोडणे इत्यादी) ; विविध साधनं कोणाला प्राधान्याने मिळणार (शिक्षण इत्यादी) हे ठरते, साधनांवर मालकी कोणाची हे ठरते (शेती, घर), निर्णय कोणी घ्यायचे हे ठरते... इत्यादी. 'लिंग' बदलत नाही, ते बदलावे अशी अपेक्षाही नाही; 'लिंगभाव' व्यवहार बदलतो - तो सगळीकडे सारखा असत नाही. पुरुषप्रधान रचनेत एका विशिष्ट प्रकारची लिंगभाव व्यवस्था आहे - असमानता आहे, ती बदलण्याचा प्रयत्न करताना स्त्रीच्या लिंगाधारित गरजा (बाळंतपण, राजकीय सहभागाची संधी इत्यादी) लक्षात घेणे म्हणजे 'भेदभाव' नाही. (तुम्ही हे म्हटले नाही इथे, पण जाताजाता लिहिले.) पुरुषप्रधान समाजरचनेचे समर्थक फक्त पुरुष असतात असे नाही, स्त्रियाही असतात; लिंगभाव धारणा बदलायला हव्यात असे फक्त स्त्रियांना वाटत नाही, अनेक पुरुषांना वाटते. सर्व स्त्रिया स्त्रियांबाबत संवेदनशील असतील असे नाही, सर्व पुरुष स्त्रियांच्या प्रती असंवेदनशील असतील असे नाही. संवेदनशीलता, परस्पर आदर नसतो तेव्हा अकराच काय अकरा हजार प्रश्न निर्माण होतात... संवेदनशीलता आणि परस्पर आदर असेल तरीही प्रश्न निर्माण होतातच पण त्यातून मार्ग काढला जातो. स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!!

रेवती 27/06/2014 - 19:49
स्वतःच्या निर्णयातून आयुष्यात आलेल्या अडचणी आणि कोणा व्यवस्थेमुळे झालेली कोंडी यात प्रचंड फरक आहे - गुणात्मक दृष्ट्या!! भयानक सहमत. माझ्याच निर्णयामुळे आलेली अडचण कशी निस्तरावी या विचार अनेक वर्षे करत होते. परवा सकाळी झोपेतून उठल्यावर त्याचे पर्फेक्ट असे नाही पण चांगले असे उत्तर मिळाले होते. ते श्रेय मात्र माझे नाही. आपण अनेक पुस्तके, लेख, चांगले विचार, मुलाखती ऐकत, वाचत असतो. काही गोष्ती डोक्यात बसतात ते नेहमीच आपल्याला कळत नाही. पण त्या सगळ्यातून आपण (मेंदू)प्रश्नाचे उत्तर शोधत राहतो, नकळतपणे आणि असे एखादे दिवशी ते समोर येते, जेंव्हा ते एक्सपेक्टेड नसते. परवाचा सगळा दिवस मनातल्या मनात आश्चर्य करणे, मनाशी हसणे यात घालवला (म्हणजे बाकीही कामे केली हां). ;) कोंडीबद्दलही नाही लिहित.

साती 27/06/2014 - 20:58
मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय? मूळात समताप्रधान अशी समाजव्यवस्था अजूनतरी भारतात निर्माण झाली नाही. जिथे समताप्रधान व्यवस्था असल्याचे भासते ती 'कमी पुरूषप्रधान' व्यवस्था असते. जर समताप्रधान व्यवस्था झाली तर तिचा पायाच इतका सामंजस्याचा असेल की असे प्रश्नं निर्माणच होणार नाहीत. (हे मी बहुसंख्यांकांच्या बाबतीत लिहित्येय, ईशान्येकडील राज्यात अजूनही काही ठिकाणी स्त्रीप्रधान व्यवस्था आहे आणि तिथली समताप्रधान व्यवस्था ही कमी स्त्रीप्रधान असेल याची जाणीव आहे) तसे तर हॉस्टेलला रहणारे रूममेट मित्रं मैत्रिणीसुद्धा एकमेकांबरोबर थोडे काँप्रमाईज आणि थोडे मॅनिप्युलेट करून रहातो. इथे तर अख्ख्या जीवनाचा आणि संसाराचा प्रश्नं आहे. त्यामुळे कुठल्याही सहजीवनात येऊ शकतील असे इश्यूज इथेही येणारच. ते सोडवायचे कसे हा मुख्य मुद्दा आहे. बरं हे सोडवतानासुद्धा पारंपारिक वर्चस्ववाल्या गटाने 'मी खरंतर पडतं घ्यायला नको/घेतलं नसतं पण समानतेपायी घेतोय' असा मोठेपणा घेतला जाण्याची किंवा दुसर्या बाजूने दिली जाण्याची शक्यता जास्तं असते. 'माझे मिस्टर सकाळी भाजी चिरून देतात' हे कौतुकाने संगितलं तर पुप्र मानणारी स्त्री. 'मी बायकोला अगदी भाजीही चिरून देतो' असे म्हणणारा पुप्रवाला पुरूष. खर्या समानतावाल्याना यात काही विशेष सांगण्यासारखे आहे असेही वाटणार नाही. मग तू घरी किती पैसे दिलेस का दिलेस इ. विचार फक्तं एक व्यवहाराचा भाग म्हणून होतील त्याला रुसवेफुगवे मानापमान याचं ड्रेसिंग लागणार नाही. त्यामुळे खरी समताप्रधान व्यवस्था जेव्हा येईल तेव्हा त्यात पुरूष व स्त्री यांपैकी कुठल्याही व्यवस्थेत येणारी घुसमट अज्जिबात येणार नाही.

कवितानागेश 28/06/2014 - 17:18
मला काही किचकट चर्चा जमत नाही, पण एक गोष्ट नक्की लक्षात येतेय, कुटुंबसंस्था ही लहान मुलांच्या सुरक्षित वाढीसाठी आणि म्हातार्‍या माणसांच्या आधारासाठी आणि काही प्रमाणात 'हक्काच्या' सोबतीसाठी निर्माण झालेली/ केली गेलेली आहे. या अश्या कुटुंबाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांना मात्र मूळात या कशाची तत्क्षणी गरजच नसते. ते केवळ स्वतःच्या सोयीचा/ मनाचा विचार करुन मुक्त राहू शकत असतात. पण त्यांनी त्यांच्या भूतकाळात या संस्थेचा फायदा घेतलेला असतो, आणि भविष्यकाळातही मिळणार असतो. अशा वेळेस समाज बांधून रहाणं, सुरक्षितता आणि त्यायोगे होउ शकणारी प्रगती यादेखिल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याकडे दुर्लक्ष होताना दिसते... ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा व्यक्तींनी जर का जे काही आहे ते 'आपलं' आहे आणि 'आपल्यासाठी' आहे, असा विचार केला तर फारसे प्रश्न पडत नाहीत. जर का ' हे 'मला' किती फायदेशीर होईल?' असा विचार केला तर रस्सीखेच जास्त जोरात सुरु होईल... आणि ती कायम सुरु रहाणार! कारण 'मी' विरुद्ध 'आपण' हा संघर्ष प्रत्येक ठिकाणी समोर येतोच. त्याचे उत्तर कालपरत्वे आणि व्यक्तीपरत्वे बदलतं.. अमुक एक मान्य करणं योग्य आणि अमुक एक कृती करणं अयोग्य असं आपल्याला खरोखरच कधी ठरवता येइल का, हे माहित नाही.

पैसा 28/06/2014 - 20:34
जिवंत माणसांचा प्रश्न येतो तिथे २+२=४ असं उत्तर नेहमीच मिळत नाही. कधी उत्तर १ असेल तर कधी ६. प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा. पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही. गावातल्या अशिक्षित स्त्रिया अख्खं कुटुंब चालवत असतात हे अनेकदा पाहिले आहे. सुशिक्षित उच्च वर्गीय कुटुंबातही समानता असमानता दोन्ही प्रकार असतात. हा प्रत्येकाच्या जडणघडणीचा, विचारांचा भाग आहे. इतर बहुतेक गोष्टी स्त्री -पुरुष कोणीही करू शकत असले तरी मुलाला प्रत्यक्ष जन्म देणे आणि काही वर्षेपर्यंत त्याचे संगोपन करणे हे स्त्रीलाच करावं लागतं. त्यासाठी तडजोडी तिलाच कराव्या लागतात. (मुलांना योग्य प्रकारे वाढवण्यासाठी कोणा पुरुषाने करियर सोडलेली फार उदाहरणे आजूबाजूला दिसत नाहीत.) इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल यात फार फरक असतो. ते जर कोणाला नको असेल तर मुले न होऊ देणे हा पर्याय उपलब्ध आहेच.
माझा असा कयास आहे कि सांप्रतकालीन बहुसंख्य पुरुषप्रधानतेचा विरोध करणार्‍या स्त्रीया (काहीवेळा असे पुरुष) केवळ कशाचा विरोध फॅशन मधे आहे हे पाहून त्या गोष्टींवर फोकस करतात.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे. पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही. कारण ते फारच कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचं नातं राहील. जो/जी घटक पैसे मिळवत नाही त्याला सतत दबून रहावं लागेल. जिथे आर्थिक विषय महत्त्वाचे होतात तिथे मानवी नातं मागे पडतंच. तसाही इन्कम टॅक्समुळे जमाखर्च आणि इन्वेस्टमेंट्स वेगळ्या ठेवाव्या लागतातच पण घरातले खर्च अगदी वेगळे ठेवता येत नाहीत. इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
"पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?
पुन्हा नाही. ती मानवी प्रवृत्ती आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीने वेगळी नावं देतो. शेवट सगळा पॉवरचा, सत्तासामर्थ्याचा आणि संघर्षाचा खेळ आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 29/06/2014 - 14:42
प्रत्येक कुटुंब हे सर्वस्वी वेगवेगळं असतं आणि त्यांचे प्रश्न आणि त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरंसुद्धा.
प्रत्येक कुटुंब प्रत्येक गोष्ट नव्याने शिकू शकत नाही. सहसा समाजात काय चालले आहे याचा मोठ्या निर्णयांसाठी आधार घेतला जातो.
पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान अशी लेबलं आपण लावतो, पण तरीही त्यात अनेक तीव्रतेच्या छटा असतात. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यावर कंगोरे घासून सर्वात परिणामकारक अशी व्यवस्था त्यांच्यात अस्तित्त्वात येते, किंवा ते शक्य नसेल तर कुटुंब मोडूही शकतं. स्त्री किंवा पुरुष असण्यावर आर्थिक निर्णय अवलंबून असतात असं मला वाटत नाही.
सहमत. मी ही असंच म्हटलं आहे.
हे फारसं पटलं नाही. तेही प्रत्येकाचे कंडिशनिंग, शिक्षण, विचारक्षमता यावर अवलंबून असावे.
हे फारसं पटलं नाही. भारतातल्या सर्वात धुरंधर स्त्रीवादी स्त्रीच्या आईच्या नावाने काहीच संपत्ती नसायचीच शक्यता जास्त आहे. " ते समजूनदार पालक आहेत म्हणून त्यांची संपत्ती विभागणे मला गरजेचे वाटले नाही" असे सांगण्यात येईल. याउलट स्त्रीने जीन्स घालू नये असे कोणी म्हटले तर सगळ्या चवताळून उठतील.
पैसे वेगळे ठेवावेत हेही पटलं नाही.
मी असा सल्ला दिला नाही. प्रश्न केला आहे. दोघे कमावत असतील, क्षःय रेशोमधे, घरात प्रत्येकाचे वेगवेगळे, एकत्रित खर्च, इ इ ब क ड ई असतील तर निर्णय कसे करणार?
इतर बरेचसे प्रश्न हे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावर किती यशस्वीपणे सोडवता येतील हे अवलंबून असतं. जर एका घटकाला फक्त आणि फक्त तडजोडी कराव्या लागत असतील तर ती त्या प्रश्नाची यशस्वी उकल मानता येणार नाही. कित्येकदा आपण अन्याय करत आहोत हे दुसर्‍याच्या गावीही नसते.
जगातली बहुसंख्य कुटुंबे परस्पर सामंजस्य, प्रेम आणि तडजोडी करायची क्षमता यावरच चालतात. स्त्रीप्रधान, पुरुषप्रधान वा लिंगनिरपेक्ष अशी कोणतीही व्यवस्था असती तर त्यांना फरक पडला नसता. पण सबब लेखात त्यावर चर्चा करायची नाही. प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते. पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते. आपण हुंड्याचे उदाहरण घेऊ. मी खालील निरीक्षणे मांडू इच्छितो. सामान्य कुटुंबांत- १. स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते. २. हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल. ३. हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये. संपत्ती पुरुषाकडेच असली तरी कोणाला किती मुली, किती मुले होतील हे सांगता येत नाही. ज्या कुटुंबांत पुरुषप्रधान व्यवस्थेचा फायदा घ्यायची वृत्ती आहे- ४. हुंडाबळींची संख्या (मुलीच्या सासरच्या मागण्या न पुरविल्याने, इ) ही हुंडाबळी न ठरलेल्या मुलींच्या मानाने नगण्य असते. या कुटुंबांमधे पुन्हा मुलीच्या पित्याला कर्ज घेऊन, शेत विकून, दागिने विकून, इ इ त्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या असतात. इथे पुरुषप्रधानता केवळ एक निमित्त आहे. मूलतः एका गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा संबंध साध्या लोकांशी आला आहे. ५. हुंडा द्या, लवकर द्या, जास्त द्या, इ इ संदेश तीव्र करण्यासाठी जे एक्झिक्यूटीव ऑफिसर असतात त्यांत नवरा हा एकच पुरुष असतो. बाकी स्त्रीयाच असतात. विशेष करून अशाच परिस्थितीतून गेलेली सासू असते. यात लिंगाचा नि हुंड्याचा संबंध दिसतो का? काहीच नाही. ही सगळी मेस का निर्माण झाली आहे? कारण वारश्याचे नियम नीट नाहीत म्हणून. आदिवास्यांत पोरगीच्या बापाला पैसे द्यावे लागतात. त्याचे रेट, नियम फिक्स असतात. म्हणून त्यांच्यात असले गुन्हे होत नाहीत. स्त्रीप्रधानता + व्यवस्थित नियम + प्रोटोकॉल्स अशी ती सिस्टिम आहे. जी किमान मानवी गुन्हेगारी असणारच आहे, तिचे खापर व्यवस्थेवर (इथे पुरुषप्रधान) फोडू नये. पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांचे स्टॅट देत, पोलिस फोर्स डिसबँड करावा असे म्हणू नये. ही चर्चा मेरिट बसिसवर असावी.
नाव कोणतंही द्या, अन्याय हा अन्यायच असतो. त्याला अन्याय करणार्‍याइतकाच सहन करणाराही जबाबदार असतो.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल. माझं असं मत आहे कि काही व्यवस्था काही इतर व्यवस्थांपेक्षा जास्त इफेक्टीव असतात. ज्या व्यवस्थांत खासकरून कोणतेच पायंडे नसतात त्या अधिकच अन्यायकारक असतात, कारण त्या सद्य भारतीय लोकशाहीपेक्षाही वाईट चालतील. इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे. कृपया समजूतदारपणाचा इश्श्यू मधे आणू नका. आपण थोड्या गडबड लोकांबद्दल बोलतोय ज्यांच्यामुळे समाजात अन्यायाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उदा घेऊ. परिस्थितीचा फायदा घेऊन कमी जास्त अन्याय करायला २०% लोकांना (१०% स्त्रीया, १०% पुरुष) आवडते असे समजू. समाज लिंगनिरपेक्ष आहे नि केव्हाचा पुरुषप्रधानता विसरला आहे असे समजू. एकत्र कुटुंबे नाहीत नि प्रतिजीवनात २-३ घटस्फोट फार काही नाहीत असे समजू. वैवाहिक लैंगिक निष्ठा अजूनही प्रचलित आहे असे समजू. 'रोजची गैरसोय' टाळण्यासाठी ऑपरेशन करायचे आहे. कोण करायचे यासाठी काहीही बेंचमार्क उपलब्ध नाही असे समजू. हे ऑपरेशन इर्रिवसिबल आहे असे समजू. कोणी करायचे? स्त्रीने? पुरुर्षाने? दोघांनी? घटस्फोटानंतर या ऑपरेशनच्या स्टॅटस्मुळे दुसरा साथी मिळतो का नि त्यास मुले हवीत का असे प्रमुख यांच्यापुढे प्रश्न असतील. मी हे मुद्दाम कृत्रिम उदाहरण दिले आहे पण आज जशी आपण स्त्रीयांवरील अन्यायाची उदाहरणे देत आहात तसे उद्या "ज्यांच्या स्पाऊसने मुलाला आपले मिडल नेम लावू दिले नाही" अशांवरील अन्यायाची उदाहरणे देत ग्रुप असतील आणि त्यांची सदस्यसंख्या आजच्या मानाने शेकड्याने जास्त असेल.
पुन्हा नाही.
सहमत.

In reply to by arunjoshi123

पैसा 29/06/2014 - 19:43
प्रत्येक समाजात एक डीफॉल्ट डीग्री ऑफ क्रिमिनॅलिटी असते. किमान गुन्हेगारीता. ती व्यवस्थेच्या तृटी पाहून आपले पोतडे भरून घेते.
बर्‍याच अंशी सहमत आहे. आता खरे तर हुंडाबंदी कायदे आहेत. मुलींना पित्याच्या संपत्तीमधे वारसा आहे. हुंडाबळी जाऊ नये म्हणून शक्य तेवढे काळजीपूर्वक कायदे केले आहेत. तरीही गुन्हे होतात. याची तुलना ड्रग्ज घेणे/खून यासंबंधीचे कायदे असले तरी हे गुन्हे होतात याच्याशी करता येईल.
पुरुषप्रधानता असल्यामुळे स्त्रीयांवरीलच अन्यायाला बढावा मिळतो हे एक मिथक आहे असे म्हणता येऊ शकते.
हे जरा गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
स्त्रीधन हे शेवटपर्यंत स्त्रीकडे असते. अगदी शेवटच्या वाईट क्षणी त्याला हात घालतात. हे बाप व सासरे तिला देतात. बरेच पालक हुंडा हा स्त्रीचा वारसाहक्क मानतात. त्यात जबरदस्ती नसते.
मला वाटते, स्त्रीधनात फक्त आईबापाकडून आणि सासरच्या लोकांकडून लग्नात मिळालेले जे दागिने स्त्री वापरते त्याचाच समावेश होतो. पूर्वीच्या काळी मुलींना पैतृक संपत्तीमधे वारसाहक्क नव्हता त्याकाळात या ना त्या स्वरूपात मुलीला संपत्तीचा काहीतरी भाग द्यावा म्हणून दागिने देण्याची पद्धत सुरू झाली. पुढे काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या हावरटपणामुळे त्याचे हुंड्याच्या जाचक प्रथेत रूपांतर झाले. इतर गोष्टी जसे की रोकड/फ्लॅट्/गाडी/फर्निचर्/सासरच्या इतर नातेवाईकांना दिलेल्या भेटवस्तू यांचा समावेश हुंड्यात होतो, पण ते स्त्रीधन नसते. त्या वस्तू सासरचे इतर लोक वापरतात. स्त्रीधन सर्वात शेवटी वापरले जाते यामागे जास्त भावनिक कारणे असतात. अनेक स्त्रियांकडे मंगळसूत्र/दोनेक बांगड्या याशिवाय काहीच नसते आणि हे सौभाग्यालंकार समजले गेलेले दागिने गहाण टाकणे/विकणे अशुभ समजले जाते. वगैरे. मात्र इतर जास्तीचे दागिने अनेक स्त्रिया घरातील कॅश संपल्यावर आपणहून वापरायला देतात. मुस्लिमांमधे मेहेर नजर हा प्रकार आहे तो या स्त्रीधनाच्या जवळपास जाणारा वाटतो. तलाक झाल्यास त्यांना तो स्त्रीला परत करावा लागतो. मुस्लिम लोकांत अजूनही स्त्रियांना वारसाहक्क नाही (बहुतेक). यासाठीच जिना हाऊसच्या केसमधे बॅ. जिनांच्या मुलीने आपण मुस्लिम नसल्याचे कोर्टात सांगितले होते.
हुंडा 'मागणे' हा स्त्रीवरचा 'आर्थिक' अन्याय नसतो, तो तिच्या वडिलांवरचा अन्याय असतो. अन्यथा स्त्रीयांना संपत्तीचे अधिकार नाहीत म्हणणे आणि हुंडा द्यावा लागतो म्हणणे हे अन्यायाचे डबलकाऊंटींग होईल.
संपत्तीमधे समान अधिकार जरूर आहे. तसाच हुंड्याविरोधात कायदा आहे. स्त्रिया अनेक कारणांनी तो वापरत नाहीत.
हुंडा पुरुषांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चालू केला म्हणता येऊ नये.
हे पटले नाही. लग्न करणारा पुरुष आपल्या मुलीवर आणि आपल्यावर उपकार करत आहे, या भावनेने आपली मुलगी 'खपावी' म्हणून दिलेली लाच आहे एकप्रकारे. जर पुरुषप्रधानता नसती तर हुंड्याचा जन्मच झाला नसता. काही आदिवासी जमातीत याउलट स्त्रीचे मूल्य तिचा नवरा तिच्या बापाला चुकवतो. कारण तिथे पुरुषप्रधानता नसते. मात्र कोणत्याही कारणाने सुरू झालेल्या गुन्हेगारीला आळा घालणे कठीण आहे. जोपर्यंत गुन्हेगारीची प्रवृत्ती जिवंत आहे तोपर्यंत या नाही त्या प्रकारे ती सुरू राहील हे मान्य.
इथे व्यवस्थित नियम, पायंडे असून केवळ पालनाचा प्रश्न आहे
सहमत.
यातून आपण असं सूचित करत आहात कि कौटुंबिक अन्याय, व्यवस्था कोणती का असेना, समानच असेल
होय. मला वाटते तुम्हीही हेच सांगत आहात की गुन्हेगारी प्रवृत्ती ही लिंगनिरपेक्ष असते. बहुधा, ही गुन्हेगारी कशी सुरू झाली याबद्दल आपली मते जुळणारी नसली तरी सध्याच्या स्थितीबद्दल जुळणारी आहेत.

In reply to by रामपुरी

सहमत. आपत्तीच्या ऐवजी आक्षेप असा मराठी शब्द लिह्हीता आला असता. पण असूद्या. बहुधा, लेखक मराठीतच, महाराष्ट्राबाहेरच वास्तव्यास असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

भृशुंडी 03/07/2014 - 03:50
भाषेची शुद्धता पाळत बसणं हा संपून जायचा सोप्पा मार्ग आहे. तेव्हा करा हो जरा इकडचे तिकडचे शब्द स्वीकार.

ऋषिकेश 03/07/2014 - 10:18
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.

In reply to by ऋषिकेश

arunjoshi123 04/07/2014 - 12:40
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील कुटुंबसंस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. कुटुंब संस्थेला कोणी एक 'चालक' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे.
१. मुळात सध्याच्या स्वरूपातील राज्यव्यस्था ही टिकववण्याची गरज आहे असे मी मानत नाही २. राष्ट्र संस्थेला कोणी एक 'शास्ता' असतो हेच मला मान्य नाही त्यामुळे सगळी चर्चाच माझ्यासाठी गैरलागू आहे. असे काहीसे वाचल्यासारखे वाटले. असो.

arunjoshi123 04/07/2014 - 12:38
भाषेबद्दल - प्रमाण भाषा अचूकपणे येणे बर्‍यापैकी अवघड आहे. त्यासाठी थोडे नशीब, थोडे कष्ट लागतात. शिवाय संकल्पनेचा आशय नीट मांडण्यासाठी एक प्रकारची प्रतिभाच लागते. ती अनेकांना नसते. (ती कैकांना हासिल होत नाही म्हणणार होतो.) एकतर गावात, वर लातूरकडे वाढल्याने, जिथे अशुद्ध वाणी भाषा बोलतात, पेशवे म्हणतात त्याप्रमाणे बराच काळ दिल्लीत वास्तव्य असल्याने, घरातही हिंदी बोलत असल्याने, विचारही हिंदीत करत असल्याने, एकतर आधीच मराठी टायपणे क्लिष्ट, शिवाय पलटून सगळ्या वाक्यरचना दुरुस्त करत बसणे कंटाळवाणे असल्याने अशा वाक्यरचना होतात. नाईलाज आहे. पण चालून जावे.

In reply to by arunjoshi123

बॅटमॅन 04/07/2014 - 12:43
चालायला हर्कत काहीच नाही. फक्त काहीवेळेस असे होते की महाराष्ट्रात वाढलेल्या आणि आजन्म महाराष्ट्राबाहेर न राहिलेल्या लोकांकडूनही हिंदी प्रभाव असलेले शब्दप्रयोग होतात तेव्हा ते जास्त खटकतं. बाकी महाराष्ट्राबाहेर बराच काळ वास्तव्य असलेल्यांना याचा गंड बाळगण्याचे आजिबात म्ह. आजिबात कारण नाही. हिंदी लहेज्यातली मराठी ऐकायला आणि वाचायलाही तशी मस्त वाटते. (विशेषतः एमपीच्या मराठी पोरींची.....आहाहा नका, नका आठवण करून देऊ!!)
पुरुषप्रधान मानसिकता स्त्रियांचीही असू शकते असं कोणी म्हणालं. यावर विचार केला असता असे जाणवले कि, एतत्सम विचार करणार्‍या लोकांचा विरोध हा पुरुषांना नसून पुरुषप्राधान्याला आहे. हे पुरुषप्राधान्य पुरुष वा स्त्रीया कोणीही (आपल्या स्वार्थासाठी वा आंधळेपणाने आपल्या अहितासाठी) राबवू शकत असू शकते. उदा. पुरुषप्रधान स्त्री आपल्या पतीचे आडनाव स्वतःला लावायचा आग्रह धरू शकते. पतीने कमवावे व सर्वात मोठी रिस्क त्याने घ्यावी, तिचा (रिस्कचा) माझा संबंध नाही असे ती मानत असू शकते. तसेच पुरुषप्रधान पुरुष माझ्या बहिणीचे लग्न मीच लावून देणार म्हणून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ शकतो.

नारकोन्डम बेट

सुबोध खरे ·

सुंदर, ओघवते वर्णन. प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचा भास होतो. अभिनंदन. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

सुंदर सुरुवात ! या असल्या तुमच्या (डॉ खरेंच्या खर्‍या आयुष्यातल्या) कथा वाचायला नेहमीच खूप मजा येते. त्यातही अशी अनवट आणि विशेष म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या ठिकाणाची गोष्ट म्हटल्यावर उत्सुकता प्रचंड चाळवली गेली आहे. त्यामुळे या गोष्टीतली ठिकाणे जालावर धुंडाळली नसती तरच नवल ! तो नकाशा (तुमची परवानगी गृहीत धरण्याचे धाडस करून) टाकत आहे...
 (मूळ नकाशा जालावरून साभार)
पुढचे भाग लवकर लवकर टाका हेवेसांन :)

In reply to by सुबोध खरे

एस 27/06/2014 - 15:52
वाचतोय. पुढचा भाग लवकर टाका. जास्त उत्सुकता ताणू नका. :-) नारकोंडम हॉर्नबिल ची माहिती इथे.

कंजूस 27/06/2014 - 17:05
छान .पण एक शंका . आता गुगल मैप्स आणि विकि मधून बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात .तरीही संरक्षण दलांतून बाहेर पडल्यावर माहिती सांगण्यावर उघड करण्यावर कर्मचाऱ्यांवर किती बंधन असते ?

एस 27/06/2014 - 23:13
जर प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडून खालचा परिच्छेद लिहिला तर लेख अजून वाचनीय होतील असे वाटतेे. :)

नंदन 27/06/2014 - 23:48
उत्कंठावर्धक लेख. पुढील भागांची वाट पाहतो.

भाते 30/06/2014 - 19:52
वाचुनच अंगावर काटा आला. अप्रतिम! पुढे काय… ह्याच्या प्रतिक्षेत. एक्का काका, तुमच्या नकाशामुळे समजले हे ठिकाण कुठे आहे ते! धन्यवाद.

सुबोध खरे 04/07/2014 - 14:48
एक पुरवणी बेटाला भेट देण्याचे कारण -- नारकोंडम च्या आसपासहून जाणारी तटरक्षक दलाची किंवा नौदलाची जहाजे तेथिल पोलिसांना सदिच्छा भेट दत असतात आणि त्यांच्या कडून काही गुप्त माहिती/ खबरी ज्या बिनतारी यंत्रणेवर पाठवता येणार नाही ती गोळा करून लष्कर/पोलिस मुख्यालयाला पाठवण्याचे काम करतात.

सुंदर, ओघवते वर्णन. प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचा भास होतो. अभिनंदन. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.

सुंदर सुरुवात ! या असल्या तुमच्या (डॉ खरेंच्या खर्‍या आयुष्यातल्या) कथा वाचायला नेहमीच खूप मजा येते. त्यातही अशी अनवट आणि विशेष म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या ठिकाणाची गोष्ट म्हटल्यावर उत्सुकता प्रचंड चाळवली गेली आहे. त्यामुळे या गोष्टीतली ठिकाणे जालावर धुंडाळली नसती तरच नवल ! तो नकाशा (तुमची परवानगी गृहीत धरण्याचे धाडस करून) टाकत आहे...
 (मूळ नकाशा जालावरून साभार)
पुढचे भाग लवकर लवकर टाका हेवेसांन :)

In reply to by सुबोध खरे

एस 27/06/2014 - 15:52
वाचतोय. पुढचा भाग लवकर टाका. जास्त उत्सुकता ताणू नका. :-) नारकोंडम हॉर्नबिल ची माहिती इथे.

कंजूस 27/06/2014 - 17:05
छान .पण एक शंका . आता गुगल मैप्स आणि विकि मधून बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात .तरीही संरक्षण दलांतून बाहेर पडल्यावर माहिती सांगण्यावर उघड करण्यावर कर्मचाऱ्यांवर किती बंधन असते ?

एस 27/06/2014 - 23:13
जर प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडून खालचा परिच्छेद लिहिला तर लेख अजून वाचनीय होतील असे वाटतेे. :)

नंदन 27/06/2014 - 23:48
उत्कंठावर्धक लेख. पुढील भागांची वाट पाहतो.

भाते 30/06/2014 - 19:52
वाचुनच अंगावर काटा आला. अप्रतिम! पुढे काय… ह्याच्या प्रतिक्षेत. एक्का काका, तुमच्या नकाशामुळे समजले हे ठिकाण कुठे आहे ते! धन्यवाद.

सुबोध खरे 04/07/2014 - 14:48
एक पुरवणी बेटाला भेट देण्याचे कारण -- नारकोंडम च्या आसपासहून जाणारी तटरक्षक दलाची किंवा नौदलाची जहाजे तेथिल पोलिसांना सदिच्छा भेट दत असतात आणि त्यांच्या कडून काही गुप्त माहिती/ खबरी ज्या बिनतारी यंत्रणेवर पाठवता येणार नाही ती गोळा करून लष्कर/पोलिस मुख्यालयाला पाठवण्याचे काम करतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नारकोन्डम बेट -- हे अंदमान बेट समूहातील सर्वात दूर आणि पूर्वेकडे असलेले एक छोटेसे बेट आहे. पहा http://en.wikipedia.org/wiki/Narcondam_Island#mediaviewer/File:Narcondam_I-_locale.png हे बेट एका मृत किंवा निद्रिस्त ज्वालामुखीच्या शिखरामुळे तयार झालेले असून उत्तर अंदमान च्या बेटांपासून ते ११४ किमी दूर आहे. या बेटाला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. हे पूर्वेच्या समुद्रात या आगामी लेखमालेतील एक पुष्प असून लेखमाला येत्या काही दिवसात लिहिण्याचा विचार आहे.

अविस्मरणीय ग्रीस - भाग २ - अथेन्स

सानिकास्वप्निल ·

फोटो आणि व्रुत्तांत, दोन्ही मस्तच... बाकी, १. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे. २. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार. ३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.

In reply to by मुक्त विहारि

हम्म्म
१. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे.
दुरुस्ती करण्यात आली आहे, गल्तीसे मिशेट्क हो गयी :)
२. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार.
बर्‍याच ठिकाणी असल्या ग्रफीटीचे दर्शन होते, त्यांच्या मेट्रो तर अख्ख्या ग्रफिटीने भरलेल्या आहेत :(
३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.
लेखमाला? हॅ हॅ हॅ पाकृ देईन एखाद दुसरी :)

In reply to by सानिकास्वप्निल

तुम्ही मस्त तिकडे ग्रीक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या आणि मिपाकरांची मात्र, एखाद्या पा.क्रु. वर बोळवण करा....

यशोधरा 27/06/2014 - 06:59
छान लिहिलं आहे. फोटोही सुरेख. प्राचीन बांधकामाच्या अवशेषांवरुन एके काळी हेच बांधाकम, इमारती, प्रासाद किती देखणे दिसत असतील, असे वाटले..

अजया 27/06/2014 - 08:11
टेकडीवरुन दिसणारे अक्रोपोलीस चा फोटो खूप आवडला. सगळं अ‍ॅक्रोपोलीस एका नजरेत सामवलं आहे ! वर्णन छानच . ग्रीक खाऊची वर्णनं आमच्या लाडक्या शेफ पा.कृ लिहायला विसरल्या नाहियेत याची खात्री करुन देत आहेत *wink*

बॅटमॅन 27/06/2014 - 18:08
फोटो मस्तच आहेत, पण ते थिएटर ऑफ डायोनिसिअस पाहिले नैत काय ओ तुम्ही? आधीच्याही भागात उल्लेख कुठे दिसला नै म्हणून म्हटलं. तिकडे अख्ख्या ग्रीसमध्ये जगप्रसिद्ध असलेले नाटकांचे प्रयोग व्हायचे. बाकी खाद्यपदार्थ इ.इ. नेहमीप्रमाणेच झकास!!! कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल, उदा. "पॉस ईस्ते?" कसे आहात? "कालिमेऽरा!" गुड मॉर्निंग, "कालिनिख्ता", गुड नैट, "एफ्खारिस्तो पॉल्ला", थँक्यू व्हेरी मच, "ओला काला", ऑल राईट, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

डायोनिसिअस चा रंगमंच नाही बघीतला कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला असे सांगण्यात आले की थिएटरात काही शोज होतात आणि त्यांचा त्यादिवशीचा शो रात्री होता त्यामुळे दुपारी आतून रंगमंच बघायला मनाई होती. आम्हाला रात्री जमणं शक्य नव्हतं म्हणून तो राहून गेला, पुन्हा केव्हातरी :)
कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल
हो मीसुद्धा काही बेसिक ग्रीक शब्द शिकून घेतले होते उदा: कॅलिस्पेऽर - गुड ईव्हनिंग, नॅ - येस, एफ्खारिस्तो - थँक्यू, सिम्फोनी- ओके, पोसो कानी- हाऊ मच इज ईट?, सिग्नोमी- सॉरी, कातालवा- आय गेट ईट, पॅरॅकॅएलो - एस्क्युज मी तालिमेएरागोतेरा - सी यू लेटर :) धन्यवाद.

In reply to by सानिकास्वप्निल

बॅटमॅन 27/06/2014 - 23:35
ओह ओक्के :) बाकी ग्रीक शिकून घेतलेत हे उत्तम केलेत. :) अवांतरः मायसीनीला (ग्रीक उच्चार मिकेनाइ) गेलेलात काय? अ‍ॅटिकामध्ये नाही, पेलोपोनीसमध्ये आहे पण अथेन्सहून तसे जवळ आहे. कदाचित पुढच्या भागात येत असेलही त्याचे वर्णन पण शेवटी आगामेम्नॉनच्या घराबद्दल उत्सुकता मावत नाही म्हणून विचारले इतकेच. :)

In reply to by बॅटमॅन

आम्ही अथेन्समध्ये फक्त दोनच दिवस होतो आणि जे पाहिले त्याबद्दल वृत्तांत लिहिले आहेच :) बाकी पुन्हा संधी कधी मिळाली तर नक्की हे सगळं बघु हाकानाका :) धन्यवाद

मस्त चाललीय सफर ! मस्त फोटो. "लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस" विषेश आवडला. "ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले." यावरून ग्रीक आणि भारतीय संस्कृत्यांचे नाते किती अभेद्य आहे हे अधोरेखीत झाले ;) पुभाप्र

पैसा 30/06/2014 - 10:40
प्रवासवर्णन आणि फटु अप्रतिम आहेत. त्या ग्रीक सैनिकांचे कपडे अजून जुन्या स्टायलीतले दिसताहेत. असे घेराचे अंगरखे आपल्याकडेही मुघल काळात वापरात होते.

फोटो आणि व्रुत्तांत, दोन्ही मस्तच... बाकी, १. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे. २. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार. ३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.

In reply to by मुक्त विहारि

हम्म्म
१. एव्हझोन्सची उंची, कमीतकमी ६'१२" असावी लागते. हे वाक्य समजले नाही. आमचे गणित चांगलेच कच्चे आहे.
दुरुस्ती करण्यात आली आहे, गल्तीसे मिशेट्क हो गयी :)
२. बेल टॉवरवर नांव लिहिलेले पाहून, ग्रीकांचे आणि भारतीयांचे नक्कीच पटत असणार.
बर्‍याच ठिकाणी असल्या ग्रफीटीचे दर्शन होते, त्यांच्या मेट्रो तर अख्ख्या ग्रफिटीने भरलेल्या आहेत :(
३. आता लवकरच मिपावर, काही अप्रतिम ग्रीक पदार्थ, अशी लेखमाला यायची शक्यता आहे.
लेखमाला? हॅ हॅ हॅ पाकृ देईन एखाद दुसरी :)

In reply to by सानिकास्वप्निल

तुम्ही मस्त तिकडे ग्रीक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या आणि मिपाकरांची मात्र, एखाद्या पा.क्रु. वर बोळवण करा....

यशोधरा 27/06/2014 - 06:59
छान लिहिलं आहे. फोटोही सुरेख. प्राचीन बांधकामाच्या अवशेषांवरुन एके काळी हेच बांधाकम, इमारती, प्रासाद किती देखणे दिसत असतील, असे वाटले..

अजया 27/06/2014 - 08:11
टेकडीवरुन दिसणारे अक्रोपोलीस चा फोटो खूप आवडला. सगळं अ‍ॅक्रोपोलीस एका नजरेत सामवलं आहे ! वर्णन छानच . ग्रीक खाऊची वर्णनं आमच्या लाडक्या शेफ पा.कृ लिहायला विसरल्या नाहियेत याची खात्री करुन देत आहेत *wink*

बॅटमॅन 27/06/2014 - 18:08
फोटो मस्तच आहेत, पण ते थिएटर ऑफ डायोनिसिअस पाहिले नैत काय ओ तुम्ही? आधीच्याही भागात उल्लेख कुठे दिसला नै म्हणून म्हटलं. तिकडे अख्ख्या ग्रीसमध्ये जगप्रसिद्ध असलेले नाटकांचे प्रयोग व्हायचे. बाकी खाद्यपदार्थ इ.इ. नेहमीप्रमाणेच झकास!!! कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल, उदा. "पॉस ईस्ते?" कसे आहात? "कालिमेऽरा!" गुड मॉर्निंग, "कालिनिख्ता", गुड नैट, "एफ्खारिस्तो पॉल्ला", थँक्यू व्हेरी मच, "ओला काला", ऑल राईट, इ.इ.

In reply to by बॅटमॅन

डायोनिसिअस चा रंगमंच नाही बघीतला कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा आम्हाला असे सांगण्यात आले की थिएटरात काही शोज होतात आणि त्यांचा त्यादिवशीचा शो रात्री होता त्यामुळे दुपारी आतून रंगमंच बघायला मनाई होती. आम्हाला रात्री जमणं शक्य नव्हतं म्हणून तो राहून गेला, पुन्हा केव्हातरी :)
कामचलाऊ ग्रीक शब्द वापरून मजाही तुम्हांला करता येईल
हो मीसुद्धा काही बेसिक ग्रीक शब्द शिकून घेतले होते उदा: कॅलिस्पेऽर - गुड ईव्हनिंग, नॅ - येस, एफ्खारिस्तो - थँक्यू, सिम्फोनी- ओके, पोसो कानी- हाऊ मच इज ईट?, सिग्नोमी- सॉरी, कातालवा- आय गेट ईट, पॅरॅकॅएलो - एस्क्युज मी तालिमेएरागोतेरा - सी यू लेटर :) धन्यवाद.

In reply to by सानिकास्वप्निल

बॅटमॅन 27/06/2014 - 23:35
ओह ओक्के :) बाकी ग्रीक शिकून घेतलेत हे उत्तम केलेत. :) अवांतरः मायसीनीला (ग्रीक उच्चार मिकेनाइ) गेलेलात काय? अ‍ॅटिकामध्ये नाही, पेलोपोनीसमध्ये आहे पण अथेन्सहून तसे जवळ आहे. कदाचित पुढच्या भागात येत असेलही त्याचे वर्णन पण शेवटी आगामेम्नॉनच्या घराबद्दल उत्सुकता मावत नाही म्हणून विचारले इतकेच. :)

In reply to by बॅटमॅन

आम्ही अथेन्समध्ये फक्त दोनच दिवस होतो आणि जे पाहिले त्याबद्दल वृत्तांत लिहिले आहेच :) बाकी पुन्हा संधी कधी मिळाली तर नक्की हे सगळं बघु हाकानाका :) धन्यवाद

मस्त चाललीय सफर ! मस्त फोटो. "लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस" विषेश आवडला. "ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले." यावरून ग्रीक आणि भारतीय संस्कृत्यांचे नाते किती अभेद्य आहे हे अधोरेखीत झाले ;) पुभाप्र

पैसा 30/06/2014 - 10:40
प्रवासवर्णन आणि फटु अप्रतिम आहेत. त्या ग्रीक सैनिकांचे कपडे अजून जुन्या स्टायलीतले दिसताहेत. असे घेराचे अंगरखे आपल्याकडेही मुघल काळात वापरात होते.
अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स . सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही हॉटेल खालूनचं टॅक्सी पकडली आणि अरिस्तेप्पू स्ट्रीटवरच्या लायकाबेट्टस टेलेफेरीकला पोहोचलो. टेलेफेरीक ही एक केबल रेल्वे आहे जी तुम्हाला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. ह्याला फनीक्युलर रेल्वे असे ही म्हटले जाते.

दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही

संजय क्षीरसागर ·

चाणक्य 27/06/2014 - 09:54
हसनजींनी सुरूवात खरच जीवघेणी केलीये...तुमच्या लिखाणाची सुरूवातही मस्त. आणि तुम्ही लिहीलेल्या ग्रेसच्या ओळी सुद्धा लाजवाब.

उर्दू ही प्रेमाच्या अभिव्यक्तीची देखणी भाषा. खूपच सुरेख लिहिलंय तुम्ही.. कोणे एके काळी ऐकलेल्या आणि नकळत लक्षात राहिलेल्या अशाच दोन तरल ओळी आठवल्या.. गुनगुनाती हुई आती है फ़लक से बुंदें कोई बदली तेरे पाज़ेब से टकराई है... पाजेब - पैंजण

भूलेसे मुस्कुराओ तो, मोती बरस पडे पलकें उठाके देखो तो, कलीयां भी हस पडे खुशबू तुम्हारी जुल्फकी, फूलोंसे कम नही । स्स्ही...!!! संक्षीसेठ, गझल भारी आहे, पण मी अजून ''मरिजे मुहब्बत''मधुन बाहेर पडलो नाही. :)
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम |
-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरीज़े मुहोब्बतचा स्वरसाज, गुलाम अलींचा पहिल्या शब्दापासून लागलेला लक्षवेधी स्वर आणि प्रत्येक शेराच्या शेवटी दिसणारी उस्ताद क़मर जलालवींची कमाल प्रतिभा, ग़ज़लचा मूड क्षणोक्षणी वाढवत नेते. तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहौल वेगळा आहे. शब्द साधे आहेत, चाल सोपी आहे पण आषय उत्कट आहे. ही ग़ज़ल अभिव्यक्तीपेक्षा अनुभवात सरस आहे. फक्त प्रेम करता यायला हवं, मग प्रेयसीबद्दल कोणताही शिकवा राहात नाही कारण तीनं तुमची दुनिया जन्नत केलेली असते!

In reply to by संजय क्षीरसागर

तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! :) संक्षीसेठ, बिना पेगची 'ती'आणि 'मरिजे मुहोब्बत' या गझलेची आठवण व्हावी अशी ती सुंदर गझल. आणि पेग घेतल्यावर तर ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' वर माणुस घुटमळु लागेल आणि मग आनंदापेक्षा त्रास व्हायला लागेल. दिलकश असलेली ही गझल केवळ सुंदरच. बशीर बद्रचा एक सुंदर शेर आहे- चांद चेहरा, जुल्फ दरया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने दे दिया क्या क्या मु़झे. सालं सर्व तुला दिलं आणि आमच्या वाट्याला काय तर ''दिल मुश्तरिब है'' हेच वाट्याला येतं, एक तर प्रेम या गोष्टीपासून माणसाने चार हात दूर राहावं (असं दूर थोडी राहता येतं म्हणा) आणि एकदा की तुमच्या मनाने मनकायाप्रवेश केला मी मग तुम्ही कुठलेच उरत नाही म्हणुन तुम्हे ''दिल लगाने को किसने कहा था'' असे ऐकावं लागतं. `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहोल वेगळ आहे हे मान्यच. शब्द साधे आहेत म्हणुन म्हणा किंवा चाल म्हणुन म्हणा तुलनेत 'मरिजे मुहोब्बत' शब्द, आशयात भारीच आणि गायन असं की आत नुसतं काहुर माजावं इतकी ती सुंदर आहे, असे मला वाटते. प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते. असो, अशाच चांगल्या चांगल्या गझला आणा ऐकायला त्यांच्या भावार्थाचा आनंद लुटायला मजा येत आहे. आभार. अवांतर : आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मुड काही खास आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मूड काही खास आहे, असे वाटते.
सर, संदर्भ वेगळे असतात म्हणून मूड वेगळा वाटतो, माणूस एकच आहे! इतर वेळी दिमाग दिमागसे उलझता है, ग़ज़ल तो दिलका दिलसे उलझ जाना है|
चांद चेहरा, जुल्फ दरिया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने, दे दिया क्या क्या मु़झे |
आयला, तुम्ही सुद्धा एकदम शायराना मिज़ाज़ आहात. तुम्हें दिल लगानेको किसने कहा था, बहेल जाएगा दिल बहेलते बहेलते | या ओळीत तर क़मर जलालवींची, काव्यविषयाशी एकतानता ठेवण्याची आणि आयुष्याची एक दारुण वास्तविकता सहजपणे लिहून जाण्याची, प्रतिभा काही और आहे. जिच्याशी मुहोब्बत केली ती मिळत नाही, तो सल तर कायम राहातो आणि तिच्याशिवाय जगतांना हेच वाटत राहातं की, दिवस तसेही सरलेच असते, कशाला कुणासमोर इतका हळवा झालो. हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |
प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते.
सहमत!

In reply to by संजय क्षीरसागर

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, त्यामुळे कदाचित मला `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही', माझीच ग़ज़ल वाटते. रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' तुम बादशा-ए-हुस्न हो, हुस्ने जहान हो जाने वफ़ा हो और, मोहोब्बतकी शान हो | ही वफा़दारी मुहोब्बतशी आहे, स्मृतींशी नाही. प्रेमी असतील, नसतील, पण प्रेम कायम असेल. ज्यांना त्याची जादू कळेल ते एकमेकांशी जोडले जातील आणि तीच इश्काची खरी शान आहे. आणि ज्यांना ती कळली, त्यांच्यासाठी दुनिया जन्नत आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, आय हाय.... खल्ल्लास...! सही संक्षीसेठ. :) रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. वॉव...! सुंदर. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मान्य नाही. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' असं कुठं असतं काहो. प्रेम असं दहादा करता येत असतं का ? आणि एकावर प्रेम केलंत तस्सचं दुस-यावर करता येत असत का ? आणि वेळ, काळ परिस्थितीनुसार जरी कोणी आवडलं तरी पहिल्याप्रेमासारखं हे दुसरं प्रेम रंगवता येईल का ? आपल्याच्याने शक्य नाही बॉ. पहिलंच प्रेम सतत समुद्राच्या लांटासारखे मनावर आदळत राहील. आणि असं नाही झालं तर माणसंच नव्हे तर मला पानं, फुलं, हवा, मंदिरं, रस्ते, शब्द,कवितेच्या ओळी आणि तिच्या सहवासातील प्रत्येक एकेक गोष्ट विचारेल की अरे ती कुठेय...? मी काय बोलणार. इन्हीं रास्तो ने जिन पर कभी तुम थे साथ मेरे मुझे रोक रोक के पुछा की तेरा हम सफर कहा है -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावनिकतेचा कौल नेहमी तुमच्या बाजूनं आहे. पण वास्तवाशी हुज्जत घालता येत नाही. इट इज ऑलरेडी देअर. स्ट्रेट इन फ्रंट ऑफ यू. मी गेलो तर, उर्वरित आयुष्यात ती दु:खी राहून काय उपयोग? आणि प्रेमात प्रतारणा होऊ शकत नाही हे मान्य, पण स्मृतींशी इमान राखून, दु:खच पदरी येत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा. काल्पनिक गोष्ट असल्यानं नेमका निर्णय होऊ शकत नाही. पण मला वाटतं, प्रश्न प्रेमाचा आहे. व्यक्ती आता परत येणारच नाही म्हटल्यावर, भूतकाळ बाजूला ठेवून वर्तमान स्विकारायला हवा.... आणि वर्तमानाची जन्नत करायची असेल तर, पुन्हा प्रेमात पडायला हवं! देअर इज नो वे. दुनिया समजत असेल पण, ती व्यक्तीशी प्रतारणा नाही, प्रेमाची शान आहे.

प्रिय संक्षीसेठ, आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही लिहिणार की नै एवढंच सांगा. नसेल लिहायचं तर आपली दोस्ती खतम. जब से तुने मुझे दिवाना बना रखा है. -दिलीप बिरुटे

चाणक्य 27/06/2014 - 09:54
हसनजींनी सुरूवात खरच जीवघेणी केलीये...तुमच्या लिखाणाची सुरूवातही मस्त. आणि तुम्ही लिहीलेल्या ग्रेसच्या ओळी सुद्धा लाजवाब.

उर्दू ही प्रेमाच्या अभिव्यक्तीची देखणी भाषा. खूपच सुरेख लिहिलंय तुम्ही.. कोणे एके काळी ऐकलेल्या आणि नकळत लक्षात राहिलेल्या अशाच दोन तरल ओळी आठवल्या.. गुनगुनाती हुई आती है फ़लक से बुंदें कोई बदली तेरे पाज़ेब से टकराई है... पाजेब - पैंजण

भूलेसे मुस्कुराओ तो, मोती बरस पडे पलकें उठाके देखो तो, कलीयां भी हस पडे खुशबू तुम्हारी जुल्फकी, फूलोंसे कम नही । स्स्ही...!!! संक्षीसेठ, गझल भारी आहे, पण मी अजून ''मरिजे मुहब्बत''मधुन बाहेर पडलो नाही. :)
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम |
-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरीज़े मुहोब्बतचा स्वरसाज, गुलाम अलींचा पहिल्या शब्दापासून लागलेला लक्षवेधी स्वर आणि प्रत्येक शेराच्या शेवटी दिसणारी उस्ताद क़मर जलालवींची कमाल प्रतिभा, ग़ज़लचा मूड क्षणोक्षणी वाढवत नेते. तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहौल वेगळा आहे. शब्द साधे आहेत, चाल सोपी आहे पण आषय उत्कट आहे. ही ग़ज़ल अभिव्यक्तीपेक्षा अनुभवात सरस आहे. फक्त प्रेम करता यायला हवं, मग प्रेयसीबद्दल कोणताही शिकवा राहात नाही कारण तीनं तुमची दुनिया जन्नत केलेली असते!

In reply to by संजय क्षीरसागर

तीन-चार पेग झाल्या नंतर कुणी फर्माईश केली तर, मलाही नेमकी तीच ग़ज़ल आठवते! :) संक्षीसेठ, बिना पेगची 'ती'आणि 'मरिजे मुहोब्बत' या गझलेची आठवण व्हावी अशी ती सुंदर गझल. आणि पेग घेतल्यावर तर ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' वर माणुस घुटमळु लागेल आणि मग आनंदापेक्षा त्रास व्हायला लागेल. दिलकश असलेली ही गझल केवळ सुंदरच. बशीर बद्रचा एक सुंदर शेर आहे- चांद चेहरा, जुल्फ दरया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने दे दिया क्या क्या मु़झे. सालं सर्व तुला दिलं आणि आमच्या वाट्याला काय तर ''दिल मुश्तरिब है'' हेच वाट्याला येतं, एक तर प्रेम या गोष्टीपासून माणसाने चार हात दूर राहावं (असं दूर थोडी राहता येतं म्हणा) आणि एकदा की तुमच्या मनाने मनकायाप्रवेश केला मी मग तुम्ही कुठलेच उरत नाही म्हणुन तुम्हे ''दिल लगाने को किसने कहा था'' असे ऐकावं लागतं. `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही' चा माहोल वेगळ आहे हे मान्यच. शब्द साधे आहेत म्हणुन म्हणा किंवा चाल म्हणुन म्हणा तुलनेत 'मरिजे मुहोब्बत' शब्द, आशयात भारीच आणि गायन असं की आत नुसतं काहुर माजावं इतकी ती सुंदर आहे, असे मला वाटते. प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते. असो, अशाच चांगल्या चांगल्या गझला आणा ऐकायला त्यांच्या भावार्थाचा आनंद लुटायला मजा येत आहे. आभार. अवांतर : आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मुड काही खास आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या इतर प्रतिसादांपेक्षा गझल आणि कवितांवरचे प्रतिसाद मला आवडतात, हा आपला मूड काही खास आहे, असे वाटते.
सर, संदर्भ वेगळे असतात म्हणून मूड वेगळा वाटतो, माणूस एकच आहे! इतर वेळी दिमाग दिमागसे उलझता है, ग़ज़ल तो दिलका दिलसे उलझ जाना है|
चांद चेहरा, जुल्फ दरिया, बात खुशबु, दिल चमन इक तुम्हे दे कर खुदा ने, दे दिया क्या क्या मु़झे |
आयला, तुम्ही सुद्धा एकदम शायराना मिज़ाज़ आहात. तुम्हें दिल लगानेको किसने कहा था, बहेल जाएगा दिल बहेलते बहेलते | या ओळीत तर क़मर जलालवींची, काव्यविषयाशी एकतानता ठेवण्याची आणि आयुष्याची एक दारुण वास्तविकता सहजपणे लिहून जाण्याची, प्रतिभा काही और आहे. जिच्याशी मुहोब्बत केली ती मिळत नाही, तो सल तर कायम राहातो आणि तिच्याशिवाय जगतांना हेच वाटत राहातं की, दिवस तसेही सरलेच असते, कशाला कुणासमोर इतका हळवा झालो. हमने तो दिलको आपके कदमोंपे रख़ दिया, इस दिलका क्या करेंगे ये, अब आप सोचिए |
प्रेयसीने दुनिया जन्नत केलेली असते हे खरं आहे पण खरी मजा गिला शिकवातच आहे, मग दुनिया जन्नत होते असे मला वाटते.
सहमत!

In reply to by संजय क्षीरसागर

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, त्यामुळे कदाचित मला `दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही', माझीच ग़ज़ल वाटते. रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' तुम बादशा-ए-हुस्न हो, हुस्ने जहान हो जाने वफ़ा हो और, मोहोब्बतकी शान हो | ही वफा़दारी मुहोब्बतशी आहे, स्मृतींशी नाही. प्रेमी असतील, नसतील, पण प्रेम कायम असेल. ज्यांना त्याची जादू कळेल ते एकमेकांशी जोडले जातील आणि तीच इश्काची खरी शान आहे. आणि ज्यांना ती कळली, त्यांच्यासाठी दुनिया जन्नत आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

जिच्याशी मुहोब्बत केली तिच्याशीच शादी केली, आय हाय.... खल्ल्लास...! सही संक्षीसेठ. :) रोज इतके गिले-शिकवे होतात, इतक्या वर्षात इतक्या प्रसंगातून गेलो, पण अनुबंध पहिल्या दिवसा सारखाच आहे. मुहोब्बतची जादू अशीये की तिला कालाचं बंधन नाही, तुमच्यासाठी ती तशीच राहाते. वॉव...! सुंदर. एकदा तीनं विचारलं देखिल की, `मी गेले तर तुम्ही पुन्हा लग्न कराल'? तिला वाटलं मी खोटं बोलेन, पण मी म्हणालो, `लगेच!' ती म्हणाली `वाटलंच!' मी म्हणालो, `तसं नाही, मला इश्काची जादू कळलीये, तुझ्यावर जितकं बेतहाशा प्रेम करतो, तितकंच तिच्यावर देखिल करीन! आपण दोघंही नसू, पण प्रेम जगात तसंच राहील. मान्य नाही. मी गेलो तर तू दु:खी होऊ नकोस, जो मनापासून आवडेल त्याच्याशी पुन्हा विवाहबद्ध हो. जितकं माझ्यावर करतेस, तितकंच प्रेम, त्याच्यावर कर. दुनिया स्मृतींशी इमान राखत असेल, तू प्रेमाशी इमान ठेव.' असं कुठं असतं काहो. प्रेम असं दहादा करता येत असतं का ? आणि एकावर प्रेम केलंत तस्सचं दुस-यावर करता येत असत का ? आणि वेळ, काळ परिस्थितीनुसार जरी कोणी आवडलं तरी पहिल्याप्रेमासारखं हे दुसरं प्रेम रंगवता येईल का ? आपल्याच्याने शक्य नाही बॉ. पहिलंच प्रेम सतत समुद्राच्या लांटासारखे मनावर आदळत राहील. आणि असं नाही झालं तर माणसंच नव्हे तर मला पानं, फुलं, हवा, मंदिरं, रस्ते, शब्द,कवितेच्या ओळी आणि तिच्या सहवासातील प्रत्येक एकेक गोष्ट विचारेल की अरे ती कुठेय...? मी काय बोलणार. इन्हीं रास्तो ने जिन पर कभी तुम थे साथ मेरे मुझे रोक रोक के पुछा की तेरा हम सफर कहा है -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावनिकतेचा कौल नेहमी तुमच्या बाजूनं आहे. पण वास्तवाशी हुज्जत घालता येत नाही. इट इज ऑलरेडी देअर. स्ट्रेट इन फ्रंट ऑफ यू. मी गेलो तर, उर्वरित आयुष्यात ती दु:खी राहून काय उपयोग? आणि प्रेमात प्रतारणा होऊ शकत नाही हे मान्य, पण स्मृतींशी इमान राखून, दु:खच पदरी येत असेल, तर दृष्टीकोन बदलायला हवा. काल्पनिक गोष्ट असल्यानं नेमका निर्णय होऊ शकत नाही. पण मला वाटतं, प्रश्न प्रेमाचा आहे. व्यक्ती आता परत येणारच नाही म्हटल्यावर, भूतकाळ बाजूला ठेवून वर्तमान स्विकारायला हवा.... आणि वर्तमानाची जन्नत करायची असेल तर, पुन्हा प्रेमात पडायला हवं! देअर इज नो वे. दुनिया समजत असेल पण, ती व्यक्तीशी प्रतारणा नाही, प्रेमाची शान आहे.

प्रिय संक्षीसेठ, आबेदा प्रवीणच्या गायकीवर तुम्ही लिहिणार की नै एवढंच सांगा. नसेल लिहायचं तर आपली दोस्ती खतम. जब से तुने मुझे दिवाना बना रखा है. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुमच्या हृदयात फक्त एक दिलरुबा हवी, मग स्वर्ग आकाशाच्या पलिकडे नाही. तुमचं रोजचं आयुष्यच जन्नत आहे. तुमची दिलरुबाच तुमची परी आहे. फक्त नज़रिया बदलायचा अवकाश, एखादीनं तुम्हाला मोहवण्याचा अवकाश आहे. सम्राट अकबर, युवराज सलीमला विचारतो, ‘या नाचिज़ अनारकलीत तू असं काय पाहिलंस’? अकबराला वाटतं, युवराजाच्या मेहेर नज़रेची आस असणार्‍या, सल्तनतेत इतक्या लावण्यवती आहेत की त्याचं मन बदलणं अवघड नाही. आणि सलीम अकबराला कमालीचं दिलकष उत्तर देतो, ‘जहांपनाह, अनारकलीको देखनेके लिए तो सलीमकी नज़र चाहीए’. तुमची दिलरुबा दुनियेसाठी काय आहे यानं काही फरक पडत नाही.

एक वाचलेच पाहिजे असे पुस्तक...नशायात्रा....लेखक: तुषार नातू (उर्फ, माझ्या द्रुष्टीने आधूनिक वाल्मिकी...)

मुक्त विहारि ·

In reply to by किसन शिंदे

रामपुरी 27/06/2014 - 03:02
पूर्णपणे ताबा मिळवता येत असेल तर त्याला "व्यसन" कसे म्ह्णता येईल? :)

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे 27/06/2014 - 11:45
शिंदे साहेब माझा स्वतःवर संपूर्णपणे ताबा आहे असे म्हणणारे गर्द च्या व्यसनातून बाहेर पडू शकत नाहीत. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव आहेत( ऐकीव नाहीत) त्यामुळे कोणताही माणूस किंवा स्त्री जर केवळ गम्मत म्हणून किंवा किक म्हणून किंवा एक अनुभव म्हणून जर गर्द किंवा अफूचे सेवन करणार असेल तर त्याला कळकळीने परावृत्त करणे हे फार महत्त्वाचे आहे. चार किंवा पाच डोस मध्ये आयुष्यभरासाठी विळख्यात अडकणारे कित्येक लोक आहेत. गर्द बद्दल खरच अशी परिस्थिती आहे कि विषाची परिक्षासुद्धा पाहू नये

In reply to by किसन शिंदे

व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे. हे सत्य लक्षात न घेता "आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं." असा गैरसमज करून घेऊन व्यस॑नाधिन झालेली उदाहरणं नेहमिचीच आहेत. एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिल्यास (कारण तेथे आपल्या व्यसनाबद्दल खरेपणाने बोलणारी मंडळी सापडण्याची जास्त शक्यता असते) खात्री करून घेता येईल.

In reply to by किसन शिंदे

आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं.
करेकट ! ( माझ्या कपाटात ग्लेन्लेव्हिट खंबा ऑक्टोबर महिन्यापासुन आहे ....पण "निर्विकार" अवस्था अनुभवतानाच दारु प्यायची *i-m_so_happy* ह्या अटी मुळे पडुन आहे *sad* ह्याला ताबा म्हणता येईल काय ? *biggrin* ) बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही असे ऐकुन आहे ! गांजा किंव्वा भांग सारखी व्यसनं "जीवनमुक्त" माणसांनी करायला हरकत नाही असे आपले स्पष्ट मत आहे *crazy* उरलेल्या इतर व्यसनांच्या बाबतीत बोलायचा आपल्याला "अधिकार" आणि "अभ्यासही" नाही *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय 27/06/2014 - 13:30

बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही

सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही किंवा गांजा देखील ओढत नाही.

In reply to by मृत्युन्जय

गवि 27/06/2014 - 13:36
सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही
अगदी अगदी.. गाढवच ते.. (हा निव्वळ जोक आहे. ही व्यसने हानीकारक आहेत याची नोंद वाचकांनी घ्यावी..)

In reply to by गवि

बॅटमॅन 27/06/2014 - 15:10
गाढवाला दारुची चव काय? अतिअवांतरः गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर पाहिला नाही. एकदा घराच्या गेटजवळ सावलीत एक गाढव उभे होते. त्याच्या समोर उभा राहिलो. ते जरा बिचकले, पण मी तिथेच उभा राहिलो. एक पाऊल पुढे गेलो. जरा बिचकले, पण तिथेच उभा राहिलो. असे करतकरत त्याला हात लावला, त्यानेही लावून घेतला. लय मजा आली.

In reply to by बॅटमॅन

सुनील 27/06/2014 - 15:38
त्याच्या समोर उभा राहिलो
छॅ! गाढवाच्या समोर उभे राहण्यात काय मजा नाय. मागे उभे राहून पहा!! ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 27/06/2014 - 17:51
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे. बाकी गाढवाची पिल्ले असत्तात खुप निरागस. मोठ्या गाढवांच्या कधी मागे नाही गेलो ;)

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 27/06/2014 - 17:59
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे.
अशीच. गाढव हा प्राणी मला आवडायचा तरी लोकं उगीच दुस्वास करायचे ते आवडत नव्हतं, शिवाय गाढवं जवळ गेलो तर बुजायची. म्हणताना मग एकदा अनायासे घराजवळच दिसलं गाढव नि हात लावला झालं. :) बाकी लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, सबब मोठ्या गाढवावरच समाधान मानावे लागले.

In reply to by बॅटमॅन

गाढव बॅचलर होते का ? ( लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, यासबबी नुसार मोठ्या गाढवांवर त्यांच्या बायकांचा हक्क असावा )

In reply to by वॉल्टर व्हाईट

बॅटमॅन 30/06/2014 - 12:32
कल्पना नाही ओ. मंगळसूत्र किंवा अंगठी/तोडा यांपैकी काहीच दिसले नाही, शिवाय आम्हांस गर्दभी प्राकृत येत नसल्याने ते विचारताही आले नाही.

निशदे 27/06/2014 - 03:55
व्यसन हा एक मानसिक आणि शारिरिक रोगच असतो. 'नॉर्मल' मेंदूमध्ये जशी साद-प्रतिसादांची मालिका चालू असते तशी व्यसनी लोकांमध्येही त्यांची स्वतःची अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन मालिका चालू असते. दुर्दैवाने लोकांना सदर मनुष्य स्वतःच्या मर्जीने असे करतोय असेच वाटत असते आणि मग व्यसनी मनुष्य त्यातून बाहेर येण्याऐवजी 'lack of support' मुळे अधिकाधिक गर्तेत रुतत जातो.

प्रचेतस 27/06/2014 - 07:16
भयानक व्यसन आहे हे. तुषार नातूंची कहाणीचा एक भाग याआधीही वाचला होताच. ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांच्या सुप्रसिद्ध 'शांताराम' कादंबरीतूनही गर्दच्या व्यसनाचे, कोल्ड टर्कीचे भयानक दर्शन झाले होते.

इनिगोय 27/06/2014 - 08:10
मुवि, हे मिपावर आणल्याबद्दल आभार. तुषार नातूंच्या ब्लाॅगची ओळख एका मिपाकराकडूनच झाली. ब्लाॅगवरचं जवळजवळ सगळं लेखन वाचलं आहे. हा माणूस अतिशय सरळसोटपणे जे जे घडलं ते सगळं लिहित गेला आहे. सुन्न व्हायला होतं, त्यांच्या कुटुंबीयांनी किती, किती काळ आणि कसं सहन केलं असेल याचा विचार येत राहतो. गर्दच्या नादापायी या माणसाने घेऊ नये ते ते सगळे अनुभव घेतले आहेत. आणि ते सगळे शब्दात मांडले आहेत. व्यसनी ते (यशस्वी.. हे खूप महत्त्वाचं आहे) समुपदेशक हा त्यांचा प्रवास मूळीच सोपा नाही. लिहिणार्यासाठीही नाही आणि वाचणार्यासाठीही नाही. किंबहुना वाचता वाचता या माणसाची कीव येते, चीड येते, आणि त्याचवेळी कौतुकही वाटतं. वरच्या उतार्यात दिलेला प्रसंग काहीच नाही अशा घटना नातूंच्या आयुष्यात घडल्या आहेत, आणि तिरस्करणीय असलं तरी लोकांना व्यसनी माणसाची मानसिकता समजायलाच हवी म्हणून त्यांनी ते लिहून काढलं आहे. गर्दचा "विळखा" या शब्दाची यथार्थता प्रत्येक ब्लाॅगपोस्टमधून जाणवत राहते. व्यसनी माणसांबाबत कळकळ असणार्यांनी, आणि नसणार्यांनीही हे अनुभव जरूर वाचण्यासारखे आहेत.

एसमाळी 27/06/2014 - 09:09
तुषार नातु यांचे सर्वलेखन चेपुवर एका बंदिस्त कम्युनिटीत वाचले होते.काही दिवसापुर्वी लोकसत्तामध्ये पण या पुस्तकाचा काही भाग आलता.जमल्यास लिंक देतो.निरागस पणे मांडलय सगळ.

एस 27/06/2014 - 11:15
जीवघेणा अनुभव आहे. व्यसनी माणसाच्या आयुष्याची वाट लागते त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे जवळच्या नात्यात पाहतो आहे. पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

बोलल्या जात नाही, केल्या जात नाही सारख्या शब्दांचे शुद्धलेखन सुधारा असा एक आपुलकीचा सल्ला. एकंदरीतच अशा प्रकारे चुकीचे लिहीण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे असे दिसत आहे.

In reply to by प्रचेतस

बोली भाषेत आणि लिहिण्याच्या भाषेत साधारणपणे बदल असतो. तसा तो असावा. एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात. तशी ती गरजच असते. लेखकाने लिहीलेले लिखाण हे परिचय निवेदन आहे. जाता जाता : ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

प्रचेतस 27/06/2014 - 11:51
एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात.
ह्याबाबतीत सहमत. पण तरीही प्रमाणभाषेत लिहितांना बोलीभाषेचा वापर केला तर त्यात वावगे अथवा अशुद्ध आहे असे मला वाटत नाही. उदा. श्री.ना. पेंडसे अथवा गोनीदांचे लेखन पहा.
ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?
माहीत नै ब्वा.

In reply to by प्रचेतस

आपण ज्या लेखनाचा संदर्भ देत आहात ती बहुतेक सर्व कथा, कादंबर्‍या किंवा ललीत लिखाण आहे. रिपोर्ताज पद्धतीच्या लि़खाणात बोलीभाषेचा वापर करु नये असे माझे मत. याउपर ही चर्चा येथेच थांबवूया. धाग्याचा मुळ उद्देश हा पुस्तक परिचयाचा आहे त्या अनुषंगाने प्रतिसाद येवोत. धागा विनाकारण भरकटविण्याचे श्रेय की पाप :) आपल्या माथी नको !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 27/06/2014 - 13:40
या चार्टवरुन एलेसडी, भांग आदि पदार्थ तंबाखू आणि मद्यापेक्षा कमी सवयखोर आणि कमी हानीकारक आहेत असं मत होतं. आणि असं मत होणं डेंजरस आहे. सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं.

In reply to by गवि

सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं. >>> करेक्ट ! हा ग्राफ विकीपेडीयावर मिळालाय ... ह्यात नक्की स्केल काय आहे ते पहायला हवे ...

चौकटराजा 27/06/2014 - 13:09
आमच्या अगोदरच्या म्हणजे १९२० चे सुमारास जन्माला आले व २००० पर्यंत मरण पावले अशा पिढीत जवळ जवळ प्रत्येकाला सुपारी, पान, तंबाखू, जर्दा, तपकीर, सिगरेट, दारू चहा ई पैकी कशाचे तरी व्यसन असायचेच. आता त्यानंतर या प्रकारच्या व्यसनांच्या प्रमाणात खूपच सुधारणा झाली आहे. निदान भारतात तरी. माझ्या सख्या मामीचा सख्खा पुतण्या गर्द च्या व्यसनात सापडून देवाला प्रिय झाला. माझे मामे आते ई प्रकारचे सर्व भाउ या सर्वांपासून दूर आहेत. पण त्यांचे वडील मात्र नव्हते. माझा स्वता: चा एक अनुभव असा की २००३ साली माझ्या हाताला कंपाउंड फ्रॅकचर झाले त्यावेळी मला भूल देण्यासाठी जो पदार्थ वापरला तो या नार्कोटिक्सच्या पैकी एक होता. त्याच्या सहवासात मला जो अनुभव आला तो माझ्या ६१ वर्षाच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे. त्यामुळे सिगरेट ( ही ही मी एकदा ओढून पाहिली आहे ) पेक्षा नर्कोटिक्स यात माणूस वेगाने का ओढला जातो याची कल्पना मी करू शकतो. असे कुठेतरी वाचले आहे की त्याचे अत्याकर्षण पेशीच्या पातळीला तयार होते. ( असेच साखरेचे आकर्षण मधुमेह झाल्यावर होत असावे काय ? ) माझे स्वता: चे मत असे आहे की तुम्ही फ्लर्ट असत रहा. म्हणजे व्यसन लागत नाही. अगदी रोजचा मोर्निगं वॉक देखील एकाच मार्गावरून करू नका. पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.

In reply to by चौकटराजा

मृत्युन्जय 27/06/2014 - 13:32
सख्या मामीचा सख्खा पुतण्या तुमच्या मामीचा पुतण्या तुमचा मामेभाऊच असणार की? इतके लांबवुन का सांगितले नाते?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे 27/06/2014 - 15:22
चौरा साहेब, ]माझ्या छातीत पाणी झाले होते तेंव्हा ते काढून त्याची तपासणी करायची होती. तेंव्हा मला १५ मिग्राम मोर्फिन दंडात इंजेक्शन ने दिले होते. आणि पाणी काढणारा डॉक्टर माझा कॉलेजमध्ये ३ वर्षे वरिष्ठ होता. मार्च चा महिना आणि पुण्यातील सकाळ तेंव्हा मला फार छान वाटत होते. सगळीकडे आनंद भरून राहिला होता. माझा वरिष्ठ माझ्या छातीतून पाणी काढण्यासाठी सुई घेऊन आला तेंव्हा मी स्वतःहून पोझिशन घेऊन बसलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो.त्याने मला बधिर करणारे इंजेक्शन दिले आणि माझ्या छातीत सुई खुपसली पण त्यातून पाणी आले नाही त्यावर मी त्याला म्हटले कि सर असे होते टेन्शन घेऊ नका. कदाचित तुम्ही लिव्हर मध्ये गेला असाल. परत प्रयत्न करा आणि जर वर सुई घुसवा. त्यावर त्याला अधिकच टेन्शन आले. पण दुसर्या वेळेस सुई घातल्यावर पाणी आले. ते एका परीक्षनळीत आणि बाटलीत घेऊन त्यांनी सुई काढली आणि मला परत वार्डात नेले. मी त्यांना मजेत म्हणत होतो कि सर तुम्ही उगाच टेन्शन घेतले जसे काही हा प्रकार दुसर्याच व्यक्तीवर चालू होता. हा अनुभव अगदी पूर्ण शुद्धीत असताना आणि पूर्ण ज्ञानासह घेतला आहे. परंतु हा अनुभव सर्वात जास्त आनंददायी आहे असे वाटले नाही त्यापेक्षा सेक्स(ORGASM) चा आनंद वैयक्तिक दृष्ट्या मला अत्त्युच्च आनंदाचा वाटतो.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 27/06/2014 - 18:40
मी घेतलेला अनुभव अर्ध बेहोशीतला असावा . पार सप्तस्वर्ग फिरून आलो. नंतर आय सी यू त डॉ ना म्हणालो' ईटस वोज एस्पीरियन्स ओफ लाईफ टाईम ' त्यावर ते मला म्हणाले 'तसे काही नसते तुम्ही एकदम मेरी मूडमधे अनास्थेशियात गेलात म्हणून तुम्हाला असा अनुभव आला असावा.

पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.
आणि जगत रहाण्याची चटक ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा 27/06/2014 - 13:22
यावर एक उपाय असा की त्यातही विचारांशी फ्लर्टिंग करीत रहायचे.. जीवन सुंदर आहे असे अनुभवतानाच मरणात खरोखर जग जगते किंवा सुंदर मी होणार हो मरणाने जगणार अशा कवितांचा ही संस्कार मनावर करायचा. न जीवनाची आसक्ती न आत्महत्येचे आकर्षण असा प्रयत्न करायचा !!!

म्हैस 27/06/2014 - 13:56
व्यसन म्हणजे "स्वत: विकत घेतलेले" मानसीक अपंगत्व. व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे.
अगदी अगदी .. लोकांना काळात असतं पण वळत नसत.

In reply to by आदूबाळ

....डोंबिवलीच्या मॅजेस्टिक मध्ये सध्या उपलब्ध आहे.... लेखकाच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे.त्यांची टेलीफोनिक परवानगी घेतली आहे.... http://tusharnatu2013.blogspot.in/2013/03/introductory-post.html

In reply to by आदूबाळ

एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराचे , आभार मानू नयेत असे वाटते. आभार मानायचेच असतील तर, तुषार नातू यांचे माना.

In reply to by बॅटमॅन

आणि समजा जर एखादा व्यसनांच्या आहारी गेलाच असेल तर घरच्यांनी काय उपाय-योजना करावी? ह्याची पण सुंदर माहिती दिली आहे. पुस्तक शक्यतो विकत घेऊन वाचा, कारण ह्या पुस्तकाची रॉयल्टी त्यांना मिळणार आहे. एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

In reply to by मुक्त विहारि

+१०० एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

प्यारे१ 27/06/2014 - 16:36
वाचायलाच हवं असं पुस्तक दिसतंय. इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल. दारु, ड्रग्स चे दुष्परिणाम लगेच दिसतात, बाकीचे लगेच नाहीत दिसत पण परिणाम करुन जातातच. आधीच नकार हे एक उत्तर जास्त परिणामकारक असणार आहे असं वाटतं. देर आये दुरुस्त आये वगैरे बोलायला सोपं असलं तरी वागताना कमीजास्त आठवण करुन देणारंच असतंय. भविष्यात कधीही काहीही झालं की लगेच जनता बोलायला मोकळी असते... 'म्हत्लं नव्हतं? हे तसलंच आहे म्हणून' असं काही सुरु होतं.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 27/06/2014 - 17:16
इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल
ये बात!

विटेकर 30/06/2014 - 11:55
स्साला २ दिवस अस्वस्थ होतो.. सगळा ब्लोग वाचून काढला.. लै म्हन्जे लैच त्रास झाला.. अदभुत आणि भयचकित होऊन नकळत पुन्हा पुन्हा ब्लोग्वर जात होतो... धड वाचवत नव्हते आणि ना ही सोडवत ! नारायण धारपांच्या कथेसारखे ! फरक इतकाच हे सारे खरे खरे घडलेले होते ... मी ललित लेखन सहसा वाचत नाही .. आता फारशी आवड ही राहीली नाही .. पण हे एक हाती वाचले ! आमचा साष्टांग नमस्कार तुमच्या मित्राच्या कुटुंबीयाना आणि नन्तर त्यांनाही कळवा. ..... .. . राहून राहून एक सतत वाटत राहीले , इतक्या सहज ब्राउन शुगर मिळते कशी ? कायद्याचे रक्षक , माणसे आहेत की राक्षस ? कुटूम्बे उद्धस्त होतात आणि तरीही आमचे शासन जागे होत नाही ?

In reply to by विटेकर

अगदी असेच वाटले...... अगदी मी जे अनुभवले ते तुम्ही लिहून सांगितले आहे विटेकर साहेब. तुमच्याइतके व्यवस्थित कदाचित मला लिहिता आले नसते.

पैसा 30/06/2014 - 12:34
पुस्तकाची ओळख चांगली आहे. पण मला वाचणे शक्य नाही. कुत्र्याचेही असे हाल करू शकतो तो इसम माणूस राहिलेला नसतोच. त्याच्याबद्दल कितीही प्रयत्न केला तरी दया/सहानुभूती वाटून घेणे शक्य दिसत नाही. त्यातून बाहेर आल्याबद्दल श्री नातू यांचे अभिनंदन. पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. "Once a bearer cheque always a bearer cheque" अशी काहीशी परिस्थिती आहे ही. आपल्या जवळचे कोणी या भयानक परिस्थितीत सापडू नये एवढी प्रार्थनाच आपण करू शकतो.

In reply to by पैसा

प्यारे१ 03/07/2014 - 15:37
>>> पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. श्री. नातूंबद्दल शक्यता कमी वाटत आहे. कारण त्यांच्या फेबु प्रोफाईल वरुन ते स्वतः मुक्तांगण ला समुपदेशक म्हणून काम करत आहेत असं वाटतंय. बाकी इन जनरल सहमती.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 03/07/2014 - 15:22
मलाही..'स्टोरी ऑफ इंडिया' नामक डाकुमेंट्रीत मायकेल वुड पेशावरला गेला असताना हे करून पाहतो, साला लय हेवा वाटला होता त्याचा.

(तेरा वर्षांच्या करिअर मध्ये सात जॉब करुन आठव्याचे वेध लागल्यावर पडलेला प्रश्न) *scratch_one-s_head* वारंवार नोकरी बदलणे /बदलाविशी वाटणे हे पण एक व्यसन असेल का ? असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे

In reply to by मराठी कथालेखक

असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे
>>> स्काळ संध्याकाळ काली फॉसीफोरम ६ ३० घेत चला... शाबुदाण्याच्या गोळ्यातुन *lol*

In reply to by किसन शिंदे

रामपुरी 27/06/2014 - 03:02
पूर्णपणे ताबा मिळवता येत असेल तर त्याला "व्यसन" कसे म्ह्णता येईल? :)

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे 27/06/2014 - 11:45
शिंदे साहेब माझा स्वतःवर संपूर्णपणे ताबा आहे असे म्हणणारे गर्द च्या व्यसनातून बाहेर पडू शकत नाहीत. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव आहेत( ऐकीव नाहीत) त्यामुळे कोणताही माणूस किंवा स्त्री जर केवळ गम्मत म्हणून किंवा किक म्हणून किंवा एक अनुभव म्हणून जर गर्द किंवा अफूचे सेवन करणार असेल तर त्याला कळकळीने परावृत्त करणे हे फार महत्त्वाचे आहे. चार किंवा पाच डोस मध्ये आयुष्यभरासाठी विळख्यात अडकणारे कित्येक लोक आहेत. गर्द बद्दल खरच अशी परिस्थिती आहे कि विषाची परिक्षासुद्धा पाहू नये

In reply to by किसन शिंदे

व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे. हे सत्य लक्षात न घेता "आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं." असा गैरसमज करून घेऊन व्यस॑नाधिन झालेली उदाहरणं नेहमिचीच आहेत. एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिल्यास (कारण तेथे आपल्या व्यसनाबद्दल खरेपणाने बोलणारी मंडळी सापडण्याची जास्त शक्यता असते) खात्री करून घेता येईल.

In reply to by किसन शिंदे

आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं.
करेकट ! ( माझ्या कपाटात ग्लेन्लेव्हिट खंबा ऑक्टोबर महिन्यापासुन आहे ....पण "निर्विकार" अवस्था अनुभवतानाच दारु प्यायची *i-m_so_happy* ह्या अटी मुळे पडुन आहे *sad* ह्याला ताबा म्हणता येईल काय ? *biggrin* ) बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही असे ऐकुन आहे ! गांजा किंव्वा भांग सारखी व्यसनं "जीवनमुक्त" माणसांनी करायला हरकत नाही असे आपले स्पष्ट मत आहे *crazy* उरलेल्या इतर व्यसनांच्या बाबतीत बोलायचा आपल्याला "अधिकार" आणि "अभ्यासही" नाही *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय 27/06/2014 - 13:30

बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही

सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही किंवा गांजा देखील ओढत नाही.

In reply to by मृत्युन्जय

गवि 27/06/2014 - 13:36
सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही
अगदी अगदी.. गाढवच ते.. (हा निव्वळ जोक आहे. ही व्यसने हानीकारक आहेत याची नोंद वाचकांनी घ्यावी..)

In reply to by गवि

बॅटमॅन 27/06/2014 - 15:10
गाढवाला दारुची चव काय? अतिअवांतरः गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर पाहिला नाही. एकदा घराच्या गेटजवळ सावलीत एक गाढव उभे होते. त्याच्या समोर उभा राहिलो. ते जरा बिचकले, पण मी तिथेच उभा राहिलो. एक पाऊल पुढे गेलो. जरा बिचकले, पण तिथेच उभा राहिलो. असे करतकरत त्याला हात लावला, त्यानेही लावून घेतला. लय मजा आली.

In reply to by बॅटमॅन

सुनील 27/06/2014 - 15:38
त्याच्या समोर उभा राहिलो
छॅ! गाढवाच्या समोर उभे राहण्यात काय मजा नाय. मागे उभे राहून पहा!! ;)

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 27/06/2014 - 17:51
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे. बाकी गाढवाची पिल्ले असत्तात खुप निरागस. मोठ्या गाढवांच्या कधी मागे नाही गेलो ;)

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन 27/06/2014 - 17:59
च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे.
अशीच. गाढव हा प्राणी मला आवडायचा तरी लोकं उगीच दुस्वास करायचे ते आवडत नव्हतं, शिवाय गाढवं जवळ गेलो तर बुजायची. म्हणताना मग एकदा अनायासे घराजवळच दिसलं गाढव नि हात लावला झालं. :) बाकी लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, सबब मोठ्या गाढवावरच समाधान मानावे लागले.

In reply to by बॅटमॅन

गाढव बॅचलर होते का ? ( लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, यासबबी नुसार मोठ्या गाढवांवर त्यांच्या बायकांचा हक्क असावा )

In reply to by वॉल्टर व्हाईट

बॅटमॅन 30/06/2014 - 12:32
कल्पना नाही ओ. मंगळसूत्र किंवा अंगठी/तोडा यांपैकी काहीच दिसले नाही, शिवाय आम्हांस गर्दभी प्राकृत येत नसल्याने ते विचारताही आले नाही.

निशदे 27/06/2014 - 03:55
व्यसन हा एक मानसिक आणि शारिरिक रोगच असतो. 'नॉर्मल' मेंदूमध्ये जशी साद-प्रतिसादांची मालिका चालू असते तशी व्यसनी लोकांमध्येही त्यांची स्वतःची अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन मालिका चालू असते. दुर्दैवाने लोकांना सदर मनुष्य स्वतःच्या मर्जीने असे करतोय असेच वाटत असते आणि मग व्यसनी मनुष्य त्यातून बाहेर येण्याऐवजी 'lack of support' मुळे अधिकाधिक गर्तेत रुतत जातो.

प्रचेतस 27/06/2014 - 07:16
भयानक व्यसन आहे हे. तुषार नातूंची कहाणीचा एक भाग याआधीही वाचला होताच. ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांच्या सुप्रसिद्ध 'शांताराम' कादंबरीतूनही गर्दच्या व्यसनाचे, कोल्ड टर्कीचे भयानक दर्शन झाले होते.

इनिगोय 27/06/2014 - 08:10
मुवि, हे मिपावर आणल्याबद्दल आभार. तुषार नातूंच्या ब्लाॅगची ओळख एका मिपाकराकडूनच झाली. ब्लाॅगवरचं जवळजवळ सगळं लेखन वाचलं आहे. हा माणूस अतिशय सरळसोटपणे जे जे घडलं ते सगळं लिहित गेला आहे. सुन्न व्हायला होतं, त्यांच्या कुटुंबीयांनी किती, किती काळ आणि कसं सहन केलं असेल याचा विचार येत राहतो. गर्दच्या नादापायी या माणसाने घेऊ नये ते ते सगळे अनुभव घेतले आहेत. आणि ते सगळे शब्दात मांडले आहेत. व्यसनी ते (यशस्वी.. हे खूप महत्त्वाचं आहे) समुपदेशक हा त्यांचा प्रवास मूळीच सोपा नाही. लिहिणार्यासाठीही नाही आणि वाचणार्यासाठीही नाही. किंबहुना वाचता वाचता या माणसाची कीव येते, चीड येते, आणि त्याचवेळी कौतुकही वाटतं. वरच्या उतार्यात दिलेला प्रसंग काहीच नाही अशा घटना नातूंच्या आयुष्यात घडल्या आहेत, आणि तिरस्करणीय असलं तरी लोकांना व्यसनी माणसाची मानसिकता समजायलाच हवी म्हणून त्यांनी ते लिहून काढलं आहे. गर्दचा "विळखा" या शब्दाची यथार्थता प्रत्येक ब्लाॅगपोस्टमधून जाणवत राहते. व्यसनी माणसांबाबत कळकळ असणार्यांनी, आणि नसणार्यांनीही हे अनुभव जरूर वाचण्यासारखे आहेत.

एसमाळी 27/06/2014 - 09:09
तुषार नातु यांचे सर्वलेखन चेपुवर एका बंदिस्त कम्युनिटीत वाचले होते.काही दिवसापुर्वी लोकसत्तामध्ये पण या पुस्तकाचा काही भाग आलता.जमल्यास लिंक देतो.निरागस पणे मांडलय सगळ.

एस 27/06/2014 - 11:15
जीवघेणा अनुभव आहे. व्यसनी माणसाच्या आयुष्याची वाट लागते त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे जवळच्या नात्यात पाहतो आहे. पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

बोलल्या जात नाही, केल्या जात नाही सारख्या शब्दांचे शुद्धलेखन सुधारा असा एक आपुलकीचा सल्ला. एकंदरीतच अशा प्रकारे चुकीचे लिहीण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे असे दिसत आहे.

In reply to by प्रचेतस

बोली भाषेत आणि लिहिण्याच्या भाषेत साधारणपणे बदल असतो. तसा तो असावा. एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात. तशी ती गरजच असते. लेखकाने लिहीलेले लिखाण हे परिचय निवेदन आहे. जाता जाता : ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

प्रचेतस 27/06/2014 - 11:51
एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात.
ह्याबाबतीत सहमत. पण तरीही प्रमाणभाषेत लिहितांना बोलीभाषेचा वापर केला तर त्यात वावगे अथवा अशुद्ध आहे असे मला वाटत नाही. उदा. श्री.ना. पेंडसे अथवा गोनीदांचे लेखन पहा.
ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?
माहीत नै ब्वा.

In reply to by प्रचेतस

आपण ज्या लेखनाचा संदर्भ देत आहात ती बहुतेक सर्व कथा, कादंबर्‍या किंवा ललीत लिखाण आहे. रिपोर्ताज पद्धतीच्या लि़खाणात बोलीभाषेचा वापर करु नये असे माझे मत. याउपर ही चर्चा येथेच थांबवूया. धाग्याचा मुळ उद्देश हा पुस्तक परिचयाचा आहे त्या अनुषंगाने प्रतिसाद येवोत. धागा विनाकारण भरकटविण्याचे श्रेय की पाप :) आपल्या माथी नको !

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 27/06/2014 - 13:40
या चार्टवरुन एलेसडी, भांग आदि पदार्थ तंबाखू आणि मद्यापेक्षा कमी सवयखोर आणि कमी हानीकारक आहेत असं मत होतं. आणि असं मत होणं डेंजरस आहे. सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं.

In reply to by गवि

सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं. >>> करेक्ट ! हा ग्राफ विकीपेडीयावर मिळालाय ... ह्यात नक्की स्केल काय आहे ते पहायला हवे ...

चौकटराजा 27/06/2014 - 13:09
आमच्या अगोदरच्या म्हणजे १९२० चे सुमारास जन्माला आले व २००० पर्यंत मरण पावले अशा पिढीत जवळ जवळ प्रत्येकाला सुपारी, पान, तंबाखू, जर्दा, तपकीर, सिगरेट, दारू चहा ई पैकी कशाचे तरी व्यसन असायचेच. आता त्यानंतर या प्रकारच्या व्यसनांच्या प्रमाणात खूपच सुधारणा झाली आहे. निदान भारतात तरी. माझ्या सख्या मामीचा सख्खा पुतण्या गर्द च्या व्यसनात सापडून देवाला प्रिय झाला. माझे मामे आते ई प्रकारचे सर्व भाउ या सर्वांपासून दूर आहेत. पण त्यांचे वडील मात्र नव्हते. माझा स्वता: चा एक अनुभव असा की २००३ साली माझ्या हाताला कंपाउंड फ्रॅकचर झाले त्यावेळी मला भूल देण्यासाठी जो पदार्थ वापरला तो या नार्कोटिक्सच्या पैकी एक होता. त्याच्या सहवासात मला जो अनुभव आला तो माझ्या ६१ वर्षाच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे. त्यामुळे सिगरेट ( ही ही मी एकदा ओढून पाहिली आहे ) पेक्षा नर्कोटिक्स यात माणूस वेगाने का ओढला जातो याची कल्पना मी करू शकतो. असे कुठेतरी वाचले आहे की त्याचे अत्याकर्षण पेशीच्या पातळीला तयार होते. ( असेच साखरेचे आकर्षण मधुमेह झाल्यावर होत असावे काय ? ) माझे स्वता: चे मत असे आहे की तुम्ही फ्लर्ट असत रहा. म्हणजे व्यसन लागत नाही. अगदी रोजचा मोर्निगं वॉक देखील एकाच मार्गावरून करू नका. पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.

In reply to by चौकटराजा

मृत्युन्जय 27/06/2014 - 13:32
सख्या मामीचा सख्खा पुतण्या तुमच्या मामीचा पुतण्या तुमचा मामेभाऊच असणार की? इतके लांबवुन का सांगितले नाते?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे 27/06/2014 - 15:22
चौरा साहेब, ]माझ्या छातीत पाणी झाले होते तेंव्हा ते काढून त्याची तपासणी करायची होती. तेंव्हा मला १५ मिग्राम मोर्फिन दंडात इंजेक्शन ने दिले होते. आणि पाणी काढणारा डॉक्टर माझा कॉलेजमध्ये ३ वर्षे वरिष्ठ होता. मार्च चा महिना आणि पुण्यातील सकाळ तेंव्हा मला फार छान वाटत होते. सगळीकडे आनंद भरून राहिला होता. माझा वरिष्ठ माझ्या छातीतून पाणी काढण्यासाठी सुई घेऊन आला तेंव्हा मी स्वतःहून पोझिशन घेऊन बसलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो.त्याने मला बधिर करणारे इंजेक्शन दिले आणि माझ्या छातीत सुई खुपसली पण त्यातून पाणी आले नाही त्यावर मी त्याला म्हटले कि सर असे होते टेन्शन घेऊ नका. कदाचित तुम्ही लिव्हर मध्ये गेला असाल. परत प्रयत्न करा आणि जर वर सुई घुसवा. त्यावर त्याला अधिकच टेन्शन आले. पण दुसर्या वेळेस सुई घातल्यावर पाणी आले. ते एका परीक्षनळीत आणि बाटलीत घेऊन त्यांनी सुई काढली आणि मला परत वार्डात नेले. मी त्यांना मजेत म्हणत होतो कि सर तुम्ही उगाच टेन्शन घेतले जसे काही हा प्रकार दुसर्याच व्यक्तीवर चालू होता. हा अनुभव अगदी पूर्ण शुद्धीत असताना आणि पूर्ण ज्ञानासह घेतला आहे. परंतु हा अनुभव सर्वात जास्त आनंददायी आहे असे वाटले नाही त्यापेक्षा सेक्स(ORGASM) चा आनंद वैयक्तिक दृष्ट्या मला अत्त्युच्च आनंदाचा वाटतो.

In reply to by सुबोध खरे

चौकटराजा 27/06/2014 - 18:40
मी घेतलेला अनुभव अर्ध बेहोशीतला असावा . पार सप्तस्वर्ग फिरून आलो. नंतर आय सी यू त डॉ ना म्हणालो' ईटस वोज एस्पीरियन्स ओफ लाईफ टाईम ' त्यावर ते मला म्हणाले 'तसे काही नसते तुम्ही एकदम मेरी मूडमधे अनास्थेशियात गेलात म्हणून तुम्हाला असा अनुभव आला असावा.

पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.
आणि जगत रहाण्याची चटक ?

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकटराजा 27/06/2014 - 13:22
यावर एक उपाय असा की त्यातही विचारांशी फ्लर्टिंग करीत रहायचे.. जीवन सुंदर आहे असे अनुभवतानाच मरणात खरोखर जग जगते किंवा सुंदर मी होणार हो मरणाने जगणार अशा कवितांचा ही संस्कार मनावर करायचा. न जीवनाची आसक्ती न आत्महत्येचे आकर्षण असा प्रयत्न करायचा !!!

म्हैस 27/06/2014 - 13:56
व्यसन म्हणजे "स्वत: विकत घेतलेले" मानसीक अपंगत्व. व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे.
अगदी अगदी .. लोकांना काळात असतं पण वळत नसत.

In reply to by आदूबाळ

....डोंबिवलीच्या मॅजेस्टिक मध्ये सध्या उपलब्ध आहे.... लेखकाच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे.त्यांची टेलीफोनिक परवानगी घेतली आहे.... http://tusharnatu2013.blogspot.in/2013/03/introductory-post.html

In reply to by आदूबाळ

एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराचे , आभार मानू नयेत असे वाटते. आभार मानायचेच असतील तर, तुषार नातू यांचे माना.

In reply to by बॅटमॅन

आणि समजा जर एखादा व्यसनांच्या आहारी गेलाच असेल तर घरच्यांनी काय उपाय-योजना करावी? ह्याची पण सुंदर माहिती दिली आहे. पुस्तक शक्यतो विकत घेऊन वाचा, कारण ह्या पुस्तकाची रॉयल्टी त्यांना मिळणार आहे. एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

In reply to by मुक्त विहारि

+१०० एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

प्यारे१ 27/06/2014 - 16:36
वाचायलाच हवं असं पुस्तक दिसतंय. इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल. दारु, ड्रग्स चे दुष्परिणाम लगेच दिसतात, बाकीचे लगेच नाहीत दिसत पण परिणाम करुन जातातच. आधीच नकार हे एक उत्तर जास्त परिणामकारक असणार आहे असं वाटतं. देर आये दुरुस्त आये वगैरे बोलायला सोपं असलं तरी वागताना कमीजास्त आठवण करुन देणारंच असतंय. भविष्यात कधीही काहीही झालं की लगेच जनता बोलायला मोकळी असते... 'म्हत्लं नव्हतं? हे तसलंच आहे म्हणून' असं काही सुरु होतं.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 27/06/2014 - 17:16
इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल
ये बात!

विटेकर 30/06/2014 - 11:55
स्साला २ दिवस अस्वस्थ होतो.. सगळा ब्लोग वाचून काढला.. लै म्हन्जे लैच त्रास झाला.. अदभुत आणि भयचकित होऊन नकळत पुन्हा पुन्हा ब्लोग्वर जात होतो... धड वाचवत नव्हते आणि ना ही सोडवत ! नारायण धारपांच्या कथेसारखे ! फरक इतकाच हे सारे खरे खरे घडलेले होते ... मी ललित लेखन सहसा वाचत नाही .. आता फारशी आवड ही राहीली नाही .. पण हे एक हाती वाचले ! आमचा साष्टांग नमस्कार तुमच्या मित्राच्या कुटुंबीयाना आणि नन्तर त्यांनाही कळवा. ..... .. . राहून राहून एक सतत वाटत राहीले , इतक्या सहज ब्राउन शुगर मिळते कशी ? कायद्याचे रक्षक , माणसे आहेत की राक्षस ? कुटूम्बे उद्धस्त होतात आणि तरीही आमचे शासन जागे होत नाही ?

In reply to by विटेकर

अगदी असेच वाटले...... अगदी मी जे अनुभवले ते तुम्ही लिहून सांगितले आहे विटेकर साहेब. तुमच्याइतके व्यवस्थित कदाचित मला लिहिता आले नसते.

पैसा 30/06/2014 - 12:34
पुस्तकाची ओळख चांगली आहे. पण मला वाचणे शक्य नाही. कुत्र्याचेही असे हाल करू शकतो तो इसम माणूस राहिलेला नसतोच. त्याच्याबद्दल कितीही प्रयत्न केला तरी दया/सहानुभूती वाटून घेणे शक्य दिसत नाही. त्यातून बाहेर आल्याबद्दल श्री नातू यांचे अभिनंदन. पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. "Once a bearer cheque always a bearer cheque" अशी काहीशी परिस्थिती आहे ही. आपल्या जवळचे कोणी या भयानक परिस्थितीत सापडू नये एवढी प्रार्थनाच आपण करू शकतो.

In reply to by पैसा

प्यारे१ 03/07/2014 - 15:37
>>> पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. श्री. नातूंबद्दल शक्यता कमी वाटत आहे. कारण त्यांच्या फेबु प्रोफाईल वरुन ते स्वतः मुक्तांगण ला समुपदेशक म्हणून काम करत आहेत असं वाटतंय. बाकी इन जनरल सहमती.

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 03/07/2014 - 15:22
मलाही..'स्टोरी ऑफ इंडिया' नामक डाकुमेंट्रीत मायकेल वुड पेशावरला गेला असताना हे करून पाहतो, साला लय हेवा वाटला होता त्याचा.

(तेरा वर्षांच्या करिअर मध्ये सात जॉब करुन आठव्याचे वेध लागल्यावर पडलेला प्रश्न) *scratch_one-s_head* वारंवार नोकरी बदलणे /बदलाविशी वाटणे हे पण एक व्यसन असेल का ? असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे

In reply to by मराठी कथालेखक

असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे
>>> स्काळ संध्याकाळ काली फॉसीफोरम ६ ३० घेत चला... शाबुदाण्याच्या गोळ्यातुन *lol*
लेखनप्रकार
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्‍याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात.

कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर?

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझे हवाईदलातील दिवस ब्लॉगची लिंक
“...बुरी तरहसे फँसा तू रे’ असं मी मला म्हणत होतो. कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्धरिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली... ...‘साहेब,अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. इथे फक्त परेडच्या सरावाला,15 ऑगस्ट, 26 जानेवारीअन पार्टीच्या वेळी ‘बँडइन अटेंडन्स’असेल तर ‘डायनिंगइन नाईट’च्यावेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश”म्हणून बोळवण केली जाते...’ ...मलात्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली.

घर कसं बाळमुठीत कोंदणात सजणार -----------------

डॉ. दत्ता फाटक ·
लेखनविषय:
घर शेणाच, घर मेणाच, माती दगड वीटानचे घर कसं ही पण घर हवं ------------------- माउलीच्या साउलीच, अश्रुभरल्या ओलाव्याच, घर हसतं, घर रांगत , घर बाळमुठीत कोंदणात सजतं , घर कसही पण घर हवं ---------------------- लडिवाळ , घर हवं गाउलीच्या सायी सारखं , घर मधु मक्षिकेच, मधभरल्या ओलाव्याच, मधभरल्या माधुर्याच---------------------------- घर कसं सजतं ---------------------------- घर कणाकणानी सजलेलं , घामाच्या रेघांच घर घराचे घरपण टिकविणारे , ---------- सांजवाऱ्यासवे घराकडे ओढावणार ------ घर कसं असंच --------------