मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गप्पा … त्याच्याशी

भावना कल्लोळ ·

आयुर्हित Mon, 06/23/2014 - 16:04
"जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे" संपुर्ण जीवनाचे सार सांगणार्‍या या ओळी आहेत. खुप छान लेख.

यशोधरा Mon, 06/23/2014 - 16:23
मुक्त व्हावे ग, जड झालेली कोणती हि गोष्ट मुक्त करावी. मग ते शरीर असो, मन असो वा नाते. जड झाले कि रिक्त करावे. जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे.
क्या बात हैं! फार सुरेख!

आयुर्हित Mon, 06/23/2014 - 16:04
"जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे" संपुर्ण जीवनाचे सार सांगणार्‍या या ओळी आहेत. खुप छान लेख.

यशोधरा Mon, 06/23/2014 - 16:23
मुक्त व्हावे ग, जड झालेली कोणती हि गोष्ट मुक्त करावी. मग ते शरीर असो, मन असो वा नाते. जड झाले कि रिक्त करावे. जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे.
क्या बात हैं! फार सुरेख!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज जरा निवांत भेटला तो. त्याला म्हणाले ये, बैस जरा. घटकाभर बोलु आपण. किती दिवस झाले बोलले नाही आहे तुझ्याशी मनमोकळेपणाने. तू येतोस आणि जातोस. मी आपली प्रपंच गाढ्यात. तो म्हणाला अग मग बोलू कि त्यात काय. मी आहे आता ४ महिने तरी. जा घेऊन ये एक वाफाळता कप चहाचा म्हणजे गप्पाची लज्जत वाढेल अजुन. मी : राहु दे, असे म्हणुन दडशील पुन्हा. मग येशील जेव्हा तेव्हा निवांत असेन कि नाही कोण जाणे. तो : नाही ग, आज असेन मी, तुझ्यासाठी. मी : खरंच, राहशील माझ्यासाठी, माझे मन हि खूप जड झाले आहे, आज मी हि तुझ्यासोबत बरसेन म्हणते. तो : आवडेल मला. मी बरसतो सर्वजण पाहतात.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग एक

भडकमकर मास्तर ·

अनुप ढेरे Mon, 06/23/2014 - 15:20
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दलही येऊद्या. चित्रविचित्र टूथ्पेस्टांच्या जाहिराती दिसतात. त्यांचा कितपत फायदा होतो>

भडकमकर मास्तर Mon, 06/23/2014 - 15:50
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दल >>>>>> तत्त्व तेच. गोड आहार शक्यतो नको / कमी आणि खाल्ल्यास लगेच सफाई. सफाईचे उपाय ब्रशिंग फ्लॉसिंग आणि फटी असल्यास इन्टरडेन्टल ब्रश. वेळेतच टाका घातल्यास पुढचे नऊ वाचतात इ. interdental brush टूथपेस्ट्स्बद्दल लिहिणार आहेच. ( जाहिराती अधिक सत्य थोडे .. ट्विस्टेड लॉजिक इ.इ.इ.)

In reply to by आयुर्हित

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 13:36
>>> कोठे होता आत्तपर्यंत? वेगळ्या 'मोड'मध्ये असावेत. ;) >>> खुप उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद. +३२ (अक्कलदाढांसकट)

असंका Mon, 06/23/2014 - 17:15
मास्तर जी, वर एका फोटोमध्य एक काळा बाण काढलेला आहे- ज्याच्यामध्ये दातांमधील भेगात अन्न अडकलेले दाखवलेले आहे. ती किड लागण्याची सुरुवात आहे का?

In reply to by असंका

भडकमकर मास्तर Mon, 06/23/2014 - 18:25
काळा बाण दाखवला आहे तिथे एक खोलगट काळी रेघ तयार झालेली आहे, जिथे कीड लागायला सुरुवात झालेली आहे. या भेगांमध्ये अन्न अडकत राहून कीड अजून वाढत राहते. आणि मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला. खरेतर त्याच्या फार आधीच किडायला सुरुवात झालेली असते.

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश Wed, 06/25/2014 - 16:51
मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला
बरीच जुनी गोष्ट आहे (५-७ वर्षे झाली असतील) पण वरील वाक्यामुळे आठवली. असाच एक तुकडा तोंडात आला नी तो ज्या दातामागून निघाला तिथे जीभेला खड्डाही जाणवत होता. घाबरून लगेच डेंटिस्ट गाठला. तेव्हा कळले की ते एनॅमल नसून "टार्टार" होते. तोवर टार्टार वगैरे प्रकार माहितच नव्हते. अजून सुदैवाने एनॅमल न पडल्याने टार्टारहून ते वेगळे कसे ओळखावे हे समजलेले नाहीये.

सुबोध खरे Tue, 06/24/2014 - 00:02
मास्तर फारच छान, मुद्देसूद आणि फापट पसारा नसलेले लिहिले आहे. रच्याकने-- आपल्या ताजमहालाला वीट लावण्याचा कोणताही हेतू नाही परंतु एक स्वानुभवाचे बोल म्हणून लिहित आहे. मी स्वतः गेली तीस वर्षे तरी रात्री दात घासल्याशिवाय झोपत नाही (मग रेल्वेने प्रवास करत असो कि दुसर्याच्या घरी असो )किंवा प्रत्येक खाण्यानंतर चूळ भरल्याशिवाय राहत नाही तरीही माझे सर्व दात चांदी भरलेले /रूट कॅनाल केलेले किंवा ब्रिज बसवलेले आहेत. (२८ +२ अक्कल दाढा) आणि या सतत होणार्या दन्तक्षयासाठी मी ए एफ एम सी आणि नायर रुग्णालयाच्या विकृती विज्ञान विभागात(ओरल पैथोलोजी) सल्ला (आणि विचार विनिमय) घ्यायला गेलो असता तेथे केलेल्या तपासणीत माझ्या लाळेची पी एच कमी ( आम्लीभूत) आढळली. यामुळे दात किडण्याचे प्रमाण जास्त असावे से त्यांचे मत पडले. यावर वाचन केले असता हि गोष्ट अनुवांशिक असल्याचे वाचल्याचे आठवते. (माझ्या आई वडिलांचे दात फार लवकर खराब झाले आहेत) सुदैवाने माझी दोन्ही मुले आपल्या आईवर गेली असल्याने त्यांचे दात इतक्या सहज किडत नाहीत तरीही त्यांना रात्री दात घासल्याशिवाय मी झोपू देत नाही.

In reply to by सुबोध खरे

रेवती Tue, 06/24/2014 - 01:50
अगदी अगदी! खूप पूर्वी भडकमकर मास्तरांना मी हेच प्रश्न विचारले होते की माझ्या आजीचे दात फार लवकर खराब झाले, आईचेही झाले. त्यानंतर मी व माझ्या मामेबहिणींच्या दातांच्य ट्रीटमेंटा झाल्या. कंटाळा आला होता. त्यावर मास्तरांनी साधारण दोनेक वर्षापूर्वी असे काही नसून , अधिक काळजीपूर्वक दात घासण्याबद्दल व्य. नि. केला. मग मला जास्तच सिरियस होऊन रोजचे दोनदा ब्रश करणे (जे आधीही करायचे पण आता बारकाईने), फ्लॉसिंग, इंटर्डेंटल काळजी घ्यावी लागली आणि गेल्या दोन वर्षात एक अक्कलदाढ काढण्याव्यतिरिक्त कणभरही वेगळी ट्रीटमेंट करावी लागली नाही. तुमची व माझी तब्येत, अनुवंशिकता वगैरे वेगळे आहे हे मान्यच पण मास्तरांना आपण दोघांनीही विचारलेल्या प्रश्नातला सारखेपणा आढळला म्हणून लिहिले. याउलट माझ्या नवर्‍याचे दात फारच चांगले आहेत. त्याला आजपर्यंत फक्त एकदा अक्कल्दाढ तिरकी आल्याने काढावी लागली होती. आता हे लाळेची पी एच चे प्रकरण नवीनच समजले.

In reply to by सुबोध खरे

भडकमकर मास्तर Tue, 06/24/2014 - 02:16
तुमचे म्हणणे योग्य आहे ... लाळेचा पी एच हा दंतक्षयावर परिणाम करणारा एक घटक आहे. इनॅमलच्या पृष्ठभागावरती मिनरलायझेशन आणि डिमिनरलायझेशनचा खेळ सतत सुरू असतो, त्यात विरघळणार्‍या इनॅमलचे रिमिनरलायझेशन करण्यात लाळ आणि त्यातली काही मिनरल्स यांचा सहभाग असतो. पण काही अनाकलनीय कारणांमुळे एखाद्याची लाळच आम्लीभूत असली तर मात्र रीमिनरलायझेशन तितक्या वेगाने होत नाही म्हणून कीड लागायचे प्रमाण जास्त असते.काही आजारांमध्ये जेव्हा लाळ बनण्याची प्रक्रिया बिघडते आणि तोंड कोरडे पडते, त्या रुग्णांमध्येसुद्धा कीड लागायचे प्रमाण फार जास्त असते. अर्थात लाळेच्या पी एचचा दंतक्षयावर खरंच इतका फरक पडतो का यावर शास्त्रज्ञ ( नेहमीप्रमाणे) उल्टंसुल्टं बोलत असतात. आता या लेखातली खालील वाक्यं बघा . The study showed that pH and buffering capacity had a weak correlation with caries activity. Hence it can be speculated that other factors like micro flora, diet and retention of food might have dominated the buffering capacity to initiate caries, which is a multifactorial disease [12]. Similar results were seen in a study conducted by Tuhunoglu who showed no correlation between pH values and caries activity regardless of the age and gender. They were dependent upon individual and environmental variations. The results of the current study was in contrast to the study conducted by Ericsson which showed that salivary buffering capacity has a negative relationship with caries incidence [13] म्हणजे लाळेच्या वाहण्याच्या प्रमाणाचा नक्की परिणाम होतो पण कमी पी एचचा होतो की नाही हा पुन्हा वादाचा मुद्दा असावा वगैरे वगैरे... ( हा सारा वैचारिक गोंधळ टाळण्यासाठी मी लाळेबद्दल लिहिणे टाळले शिवाय पीएच आणि अनुवांशिकतेची भानगड कळाली तर रुग्ण जितकी दातांची काळजी घेतात आणि घरी सफाई करतात, तीही बंद करतील..आता नाहीतरी कीड लागणारच आहे तर कशाला कष्ट घ्या? वगैरे वगैरे ) तुमच्यासारखा रुग्ण जो लेखात लिहिलेली सर्व काळजी नियमितपणे घेतो तरीही त्याच्या दातांना सतत कीड लागते ( असा रुग्ण भेटण्याचे प्रमाण कमी म्हणजे अगदीच कमी असते) अशा माणसाला मीही सांगतो, " हम्म्म... तुमच्या लाळेचा पी एच कमी असणार "LOL

In reply to by भडकमकर मास्तर

रेवती Tue, 06/24/2014 - 06:52
धन्यवाद हो मास्तर! माझ्या लाळेच्या पि एच चा प्रश्न असेलही पण तुम्ही साम्गितल्या दिवसापासून मी जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने माझे जवळ जवळ सगळे प्रश्न सुटलेत. आता मी आधी जो काय गलथानपणा केलाय त्याचे परिणाम भोगावे लागणारच, पण आता फार काळजी वाटत नाही. अर्थातच आमच्या मुलाचे दात स्वच्छ ठेवण्याबाबतीत आम्ही शक्य तितके काटेकोर आहोत.

In reply to by रेवती

भडकमकर मास्तर Tue, 06/24/2014 - 09:24

जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने

झालात हो अमेरिकन पक्के !!! (असे आदर्श रुग्ण बघून एक भारतीय डेन्टिस्ट म्हणून ड्वॉले पानावले )

इनिगोय Tue, 06/24/2014 - 21:16
या विषयावर लिहिल्याबद्दल अनेक आभार. मला काही प्रश्न आहेत.. दुधाचे दात पडून पक्के दात येण्याचं वय नेमकं काय? ही प्रक्रिया किती महिने/वर्षं सुरू राहते? माझ्या मुलाचा (आता साडेसहा वर्षे) एकच दात आठेक महिन्यापूर्वी पडून तिथे नवा आलाय. नंतर जैसे थे. हे कशामुळे असेल? बाकी काही तक्रार नसल्याने डाॅक्टरकडे नेलेलं नाही. रेझिन सिलंटचा वर उल्लेख आला आहे. त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? कितपत खर्चिक उपचार आहे? सतत च्युईंग गम चघळण्याने दातांवर काय परिणाम होतो?

In reply to by इनिगोय

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 13:56
दुधाचे दात पडून नवीन यायचं नेमकं वय : प्रत्येक दातासाठी वय वेगळं असतं ...ढोबळमानाने सांगायचं तर समोरचे दात सहा ते नऊ वर्षे या काळात पडतात आणि दुधाच्या दाढा दहा ते बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत पडतात. त्याच काळात पक्के दात यायलाही सुरुवात होते. पक्के पटाशीचे दात सहा ते सात पूर्ण होताना येऊ लागतात, त्याच काळात पक्क्या दाढाही येऊ लागतात.( पहिली पक्की दाढ सातव्या वर्षी येते ). याचाच अर्थ या काळात तोंडात काही कायमचे दात असतात आणि काही दुधाचे दात. या काळाला म्हणजे सहा ते बारा या वयोगटाला मिश्रदातांचा काळ म्हणतात. बर्‍याच पालकांना वाटतं की सर्व दुधाचे दात एकदम पडतात आणि सर्व कायमचे दात एकदम येतात.तसे होत नाही. सात ते आठ वयापर्यंत पटाशीचा दात आला नसेल तर तसे फारसे काळजी करण्यासारखे नसते. आत दात थोडा उशीरा तयार होतो आणि उशीरा येतो. पण एकदा डेन्टिस्टकडे जाऊन दाखवा, "दात मागे उगवत नाहीना, एकच दात आत अडकून राहिला नाहीये ना, एक्स रे काढायची गरज आहे का " हे तो डेन्टिस्ट ठरवेल... ( त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या दाढा बर्‍या आहेत का ते बघून घ्या, कारण दुखेपर्यंत उपचार वाढत जातो आणि आधी दाखवलं असतं तर बरं झालं असतं असं ऐकून घ्यावं लागतं. ;) दुधाच्या दाढा बारा वयापर्यंत टिकवायच्या असतात हे लक्षात ठेवावं. ) सतत च्युइंग गम चघळणे : शुगरफ्री च्युइन्ग गम लाळेचा प्रवाह वाढवते आणि कीड लागायला प्रतिबंध करते असे म्हणतात. जिथे अगदीच ब्रश करणे शक्य नसते तिथे कधीतरी गम चावायला हरकत नाही पण मी तरी ब्रशला पर्याय म्हणून दररोज गम चावा असे सांगणार नाही. याबद्दलचा विदा कदाचित गमच्या बाजूने असेलही. ;)

In reply to by भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 13:58
रेझिन सीलंटचा दुष्परिणाम नाही. ड्रिल न करता केलेलं ते एक फिलिंगच आहे. खर्चिकही नाही. साधारणपणे मोठ्या फिलिंगच्या निम्मा खर्च येतो .

ऋषिकेश Wed, 06/25/2014 - 11:03
आभार. लेख उत्तम. आता असे जाहिर सल्ले (ते ही विना फी :P) देताच आहात तर एक प्रश्न विचारतो. माझ्या मुलीला झोपताना पाण्यात किंचित मध लागतो (फ्लेवर - वास येण्यापुरता पुरतो) (साधारण १२५ मिलीला पाव - किंवा त्याहूनही कमी - चमचा मध). हे दातांना अपायकारक आहे का? चला जरा डॉक्टरांना रडवूया: आम्ही भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग करून घेतो - तसं जवळच्या डेंटिस्टाकडे तीन वर्षाचं प्याकेजच लावलं आहे. :D आता प्रश्नः दर सहा महिन्यांनी आमची डेंटिस्ट माझ्या दातांना टार्टार जमुनही कशी छोट्टीशी कॅविटीसुद्धा नाही याचे आश्चर्य व्यक्त करते. तिच्या मते माझे टार्टार हे टेन्शनमुळे जमते (असेल बॉ - तसेही माझी वृत्ती शंकेखोर आहे) पण या प्रमाणातील टार्टार असल्यावर छोटीश्शी कॅविटी तरी हवी बॉ (असे काहिशा लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय याविचाराने मी गाल पुढे करतो तर ती तोंडात नवे अवजार खुपसते.. ते असो!) तर प्रश्न असा की मी दाताला ब्लिचिंग करून घेत नाही - फक्त क्लीनिंग करून घेतो. हे ब्लिचिंग खरंच गरजेचं आहे का? मला दात शुभ्र दिसले नाहि तरी चालतील. त्या व्यतिरिक्त त्या ब्लिचिंगचा काही उपयोग?

In reply to by ऋषिकेश

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 11:47
१. मध पाणी : काहीही गोड रात्री देताना जरा काळजीच गरजेची आहे. आता या डायल्यूशनचा मला अंदाज येत नाहीये तरीही झोपताना शेवटी स्वच्छ पाण्याने दात ब्रश करावेत हे बरे.माझ्या एका मित्राच्या मुलाला रात्री झोपताना टॉनिक पिऊन झोपायच्या सवयीने समोरचे दात किडायला सुरुवात झाली होती. भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग आले आले अश्रू आले .. ashroo ब्लीचिंग : दाताची सफाई आवश्यक उपचार आहे. ब्लीचिंग ही एक चैन किंवा ऐश आहे. कॉस्मेटिक ट्रीटमेन्ट. ब्लीचिंग आवश्यक आहे का? अजिबात नाही. मॉडेलिंग करणारे लोक, अभिनेते वगैरेंनी करून घ्यावीच. स्माईल बरे दिसते. लग्नसमारंभ वगैरेंमध्ये उत्सवमूर्तींनी वगैरे करून घ्यावेच. चार पाच हजार रुपये खर्च करायची तयारी असेल तर करावे. हौस म्हणून. अम्रीकेत साधारणपणे दोनतीनशे डालरच्या पुढे खर्च येतो. दोन तीन वर्षांनी हा शुभ्रपणा कमी होतो मग होम ब्लीच करावे. ( डेन्टिस्ताने दिलेल्या ट्रे मध्ये सोल्यूशन दातावर लावून रात्रभर ठेवायचे )

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश Wed, 06/25/2014 - 14:30
आभार! दाताच्या काळजीपोटीच रात्रीचे दूध सोडवायला पाणी देऊ लागलो. मात्र मधपाणी पिता पिताच ती झोपते (आताशी २ वर्षांची आहे) त्यामुळे नंतर दात घासणे कठीण आहे. मात्र सकाळी उठल्यावर आवडीने दात घासते व घासून घेते. तरीही आता तुम्ही सांगताय तर ती सवय बंद करायच्या मागे नक्की लागतो. ब्लिचिंग बाबत अंदाज होताच म्हणून कटाक्षाने नाही म्हणत होतोच. पुनश्च आभार!

In reply to by ऋषिकेश

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 17:20
ब्रश करत न येणार्‍या छोट्या बाळांसाठी झोपण्यापूर्वी स्वच्छ ओल्या रुमालाने उगवणारे दात पुसून काढावेत. त्यामुळे "नंतर दात घासणे कठीण आहे." तरीही सफाईला पर्याय नाही कारण रात्रीत प्लाक न निघाल्याने दात किडायला सुरुवात होते

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 13:41
>>> आमची डेंटिस्ट >>> लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय आणि >>> तीन वर्षाचं प्याकेजच असे काही शब्दसमुच्चय दिसले. धन्यवाद! ;)

In reply to by पाषाणभेद

भडकमकर मास्तर गुरुवार, 06/26/2014 - 11:19
मिळतो की... एवढा काय महाग पण नसतो... पण मेडिकलवाले ठेवायचा कंटाळा करतात... मग त्यांना सांगून आणवावा लागतो इतकंच... उदाहरणार्थ .. थर्मोसील प्रोक्झाब्रश proxa brush

In reply to by ऋषिकेश

रेवती Wed, 06/25/2014 - 17:59
अभिनंदन ऋ! मला दर सहा महिन्यांनी क्लिनिंग प्रकार भारतात असताना माहितच नव्हता. तू छान काम करतोय्/करवून घेतोय्स.

विटेकर Wed, 06/25/2014 - 18:20
धन्यवाद .. सध्या बायकोच्या दाढांचे दोन ब्रीज करायचे आहेत, खर्चिक तर आहेच पण किती त्या तक्रारी ! पूर्वी काळजी न घेतल्याचे परिणाम !

अनुप ढेरे Mon, 06/23/2014 - 15:20
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दलही येऊद्या. चित्रविचित्र टूथ्पेस्टांच्या जाहिराती दिसतात. त्यांचा कितपत फायदा होतो>

भडकमकर मास्तर Mon, 06/23/2014 - 15:50
मोठ्यांनी घ्यायच्या कल्जीबद्दल >>>>>> तत्त्व तेच. गोड आहार शक्यतो नको / कमी आणि खाल्ल्यास लगेच सफाई. सफाईचे उपाय ब्रशिंग फ्लॉसिंग आणि फटी असल्यास इन्टरडेन्टल ब्रश. वेळेतच टाका घातल्यास पुढचे नऊ वाचतात इ. interdental brush टूथपेस्ट्स्बद्दल लिहिणार आहेच. ( जाहिराती अधिक सत्य थोडे .. ट्विस्टेड लॉजिक इ.इ.इ.)

In reply to by आयुर्हित

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 13:36
>>> कोठे होता आत्तपर्यंत? वेगळ्या 'मोड'मध्ये असावेत. ;) >>> खुप उपयुक्त महिती दिल्याबद्दल धन्यवाद. +३२ (अक्कलदाढांसकट)

असंका Mon, 06/23/2014 - 17:15
मास्तर जी, वर एका फोटोमध्य एक काळा बाण काढलेला आहे- ज्याच्यामध्ये दातांमधील भेगात अन्न अडकलेले दाखवलेले आहे. ती किड लागण्याची सुरुवात आहे का?

In reply to by असंका

भडकमकर मास्तर Mon, 06/23/2014 - 18:25
काळा बाण दाखवला आहे तिथे एक खोलगट काळी रेघ तयार झालेली आहे, जिथे कीड लागायला सुरुवात झालेली आहे. या भेगांमध्ये अन्न अडकत राहून कीड अजून वाढत राहते. आणि मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला. खरेतर त्याच्या फार आधीच किडायला सुरुवात झालेली असते.

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश Wed, 06/25/2014 - 16:51
मग अचानक एके दिवशी इनॅमलचा मोठा तुकडा तुटतो आणि त्यावेळी रुग्णाला लक्षात येते की इथे किडून खड्डा पडला
बरीच जुनी गोष्ट आहे (५-७ वर्षे झाली असतील) पण वरील वाक्यामुळे आठवली. असाच एक तुकडा तोंडात आला नी तो ज्या दातामागून निघाला तिथे जीभेला खड्डाही जाणवत होता. घाबरून लगेच डेंटिस्ट गाठला. तेव्हा कळले की ते एनॅमल नसून "टार्टार" होते. तोवर टार्टार वगैरे प्रकार माहितच नव्हते. अजून सुदैवाने एनॅमल न पडल्याने टार्टारहून ते वेगळे कसे ओळखावे हे समजलेले नाहीये.

सुबोध खरे Tue, 06/24/2014 - 00:02
मास्तर फारच छान, मुद्देसूद आणि फापट पसारा नसलेले लिहिले आहे. रच्याकने-- आपल्या ताजमहालाला वीट लावण्याचा कोणताही हेतू नाही परंतु एक स्वानुभवाचे बोल म्हणून लिहित आहे. मी स्वतः गेली तीस वर्षे तरी रात्री दात घासल्याशिवाय झोपत नाही (मग रेल्वेने प्रवास करत असो कि दुसर्याच्या घरी असो )किंवा प्रत्येक खाण्यानंतर चूळ भरल्याशिवाय राहत नाही तरीही माझे सर्व दात चांदी भरलेले /रूट कॅनाल केलेले किंवा ब्रिज बसवलेले आहेत. (२८ +२ अक्कल दाढा) आणि या सतत होणार्या दन्तक्षयासाठी मी ए एफ एम सी आणि नायर रुग्णालयाच्या विकृती विज्ञान विभागात(ओरल पैथोलोजी) सल्ला (आणि विचार विनिमय) घ्यायला गेलो असता तेथे केलेल्या तपासणीत माझ्या लाळेची पी एच कमी ( आम्लीभूत) आढळली. यामुळे दात किडण्याचे प्रमाण जास्त असावे से त्यांचे मत पडले. यावर वाचन केले असता हि गोष्ट अनुवांशिक असल्याचे वाचल्याचे आठवते. (माझ्या आई वडिलांचे दात फार लवकर खराब झाले आहेत) सुदैवाने माझी दोन्ही मुले आपल्या आईवर गेली असल्याने त्यांचे दात इतक्या सहज किडत नाहीत तरीही त्यांना रात्री दात घासल्याशिवाय मी झोपू देत नाही.

In reply to by सुबोध खरे

रेवती Tue, 06/24/2014 - 01:50
अगदी अगदी! खूप पूर्वी भडकमकर मास्तरांना मी हेच प्रश्न विचारले होते की माझ्या आजीचे दात फार लवकर खराब झाले, आईचेही झाले. त्यानंतर मी व माझ्या मामेबहिणींच्या दातांच्य ट्रीटमेंटा झाल्या. कंटाळा आला होता. त्यावर मास्तरांनी साधारण दोनेक वर्षापूर्वी असे काही नसून , अधिक काळजीपूर्वक दात घासण्याबद्दल व्य. नि. केला. मग मला जास्तच सिरियस होऊन रोजचे दोनदा ब्रश करणे (जे आधीही करायचे पण आता बारकाईने), फ्लॉसिंग, इंटर्डेंटल काळजी घ्यावी लागली आणि गेल्या दोन वर्षात एक अक्कलदाढ काढण्याव्यतिरिक्त कणभरही वेगळी ट्रीटमेंट करावी लागली नाही. तुमची व माझी तब्येत, अनुवंशिकता वगैरे वेगळे आहे हे मान्यच पण मास्तरांना आपण दोघांनीही विचारलेल्या प्रश्नातला सारखेपणा आढळला म्हणून लिहिले. याउलट माझ्या नवर्‍याचे दात फारच चांगले आहेत. त्याला आजपर्यंत फक्त एकदा अक्कल्दाढ तिरकी आल्याने काढावी लागली होती. आता हे लाळेची पी एच चे प्रकरण नवीनच समजले.

In reply to by सुबोध खरे

भडकमकर मास्तर Tue, 06/24/2014 - 02:16
तुमचे म्हणणे योग्य आहे ... लाळेचा पी एच हा दंतक्षयावर परिणाम करणारा एक घटक आहे. इनॅमलच्या पृष्ठभागावरती मिनरलायझेशन आणि डिमिनरलायझेशनचा खेळ सतत सुरू असतो, त्यात विरघळणार्‍या इनॅमलचे रिमिनरलायझेशन करण्यात लाळ आणि त्यातली काही मिनरल्स यांचा सहभाग असतो. पण काही अनाकलनीय कारणांमुळे एखाद्याची लाळच आम्लीभूत असली तर मात्र रीमिनरलायझेशन तितक्या वेगाने होत नाही म्हणून कीड लागायचे प्रमाण जास्त असते.काही आजारांमध्ये जेव्हा लाळ बनण्याची प्रक्रिया बिघडते आणि तोंड कोरडे पडते, त्या रुग्णांमध्येसुद्धा कीड लागायचे प्रमाण फार जास्त असते. अर्थात लाळेच्या पी एचचा दंतक्षयावर खरंच इतका फरक पडतो का यावर शास्त्रज्ञ ( नेहमीप्रमाणे) उल्टंसुल्टं बोलत असतात. आता या लेखातली खालील वाक्यं बघा . The study showed that pH and buffering capacity had a weak correlation with caries activity. Hence it can be speculated that other factors like micro flora, diet and retention of food might have dominated the buffering capacity to initiate caries, which is a multifactorial disease [12]. Similar results were seen in a study conducted by Tuhunoglu who showed no correlation between pH values and caries activity regardless of the age and gender. They were dependent upon individual and environmental variations. The results of the current study was in contrast to the study conducted by Ericsson which showed that salivary buffering capacity has a negative relationship with caries incidence [13] म्हणजे लाळेच्या वाहण्याच्या प्रमाणाचा नक्की परिणाम होतो पण कमी पी एचचा होतो की नाही हा पुन्हा वादाचा मुद्दा असावा वगैरे वगैरे... ( हा सारा वैचारिक गोंधळ टाळण्यासाठी मी लाळेबद्दल लिहिणे टाळले शिवाय पीएच आणि अनुवांशिकतेची भानगड कळाली तर रुग्ण जितकी दातांची काळजी घेतात आणि घरी सफाई करतात, तीही बंद करतील..आता नाहीतरी कीड लागणारच आहे तर कशाला कष्ट घ्या? वगैरे वगैरे ) तुमच्यासारखा रुग्ण जो लेखात लिहिलेली सर्व काळजी नियमितपणे घेतो तरीही त्याच्या दातांना सतत कीड लागते ( असा रुग्ण भेटण्याचे प्रमाण कमी म्हणजे अगदीच कमी असते) अशा माणसाला मीही सांगतो, " हम्म्म... तुमच्या लाळेचा पी एच कमी असणार "LOL

In reply to by भडकमकर मास्तर

रेवती Tue, 06/24/2014 - 06:52
धन्यवाद हो मास्तर! माझ्या लाळेच्या पि एच चा प्रश्न असेलही पण तुम्ही साम्गितल्या दिवसापासून मी जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने माझे जवळ जवळ सगळे प्रश्न सुटलेत. आता मी आधी जो काय गलथानपणा केलाय त्याचे परिणाम भोगावे लागणारच, पण आता फार काळजी वाटत नाही. अर्थातच आमच्या मुलाचे दात स्वच्छ ठेवण्याबाबतीत आम्ही शक्य तितके काटेकोर आहोत.

In reply to by रेवती

भडकमकर मास्तर Tue, 06/24/2014 - 09:24

जास्त काळजी घेतीये त्यामुळे व वर्षातून २ दा दंतस्वच्छता, एक्स रे काढून तपासणी करण्याने

झालात हो अमेरिकन पक्के !!! (असे आदर्श रुग्ण बघून एक भारतीय डेन्टिस्ट म्हणून ड्वॉले पानावले )

इनिगोय Tue, 06/24/2014 - 21:16
या विषयावर लिहिल्याबद्दल अनेक आभार. मला काही प्रश्न आहेत.. दुधाचे दात पडून पक्के दात येण्याचं वय नेमकं काय? ही प्रक्रिया किती महिने/वर्षं सुरू राहते? माझ्या मुलाचा (आता साडेसहा वर्षे) एकच दात आठेक महिन्यापूर्वी पडून तिथे नवा आलाय. नंतर जैसे थे. हे कशामुळे असेल? बाकी काही तक्रार नसल्याने डाॅक्टरकडे नेलेलं नाही. रेझिन सिलंटचा वर उल्लेख आला आहे. त्याचे काही दुष्परिणाम आहेत का? कितपत खर्चिक उपचार आहे? सतत च्युईंग गम चघळण्याने दातांवर काय परिणाम होतो?

In reply to by इनिगोय

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 13:56
दुधाचे दात पडून नवीन यायचं नेमकं वय : प्रत्येक दातासाठी वय वेगळं असतं ...ढोबळमानाने सांगायचं तर समोरचे दात सहा ते नऊ वर्षे या काळात पडतात आणि दुधाच्या दाढा दहा ते बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत पडतात. त्याच काळात पक्के दात यायलाही सुरुवात होते. पक्के पटाशीचे दात सहा ते सात पूर्ण होताना येऊ लागतात, त्याच काळात पक्क्या दाढाही येऊ लागतात.( पहिली पक्की दाढ सातव्या वर्षी येते ). याचाच अर्थ या काळात तोंडात काही कायमचे दात असतात आणि काही दुधाचे दात. या काळाला म्हणजे सहा ते बारा या वयोगटाला मिश्रदातांचा काळ म्हणतात. बर्‍याच पालकांना वाटतं की सर्व दुधाचे दात एकदम पडतात आणि सर्व कायमचे दात एकदम येतात.तसे होत नाही. सात ते आठ वयापर्यंत पटाशीचा दात आला नसेल तर तसे फारसे काळजी करण्यासारखे नसते. आत दात थोडा उशीरा तयार होतो आणि उशीरा येतो. पण एकदा डेन्टिस्टकडे जाऊन दाखवा, "दात मागे उगवत नाहीना, एकच दात आत अडकून राहिला नाहीये ना, एक्स रे काढायची गरज आहे का " हे तो डेन्टिस्ट ठरवेल... ( त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या दाढा बर्‍या आहेत का ते बघून घ्या, कारण दुखेपर्यंत उपचार वाढत जातो आणि आधी दाखवलं असतं तर बरं झालं असतं असं ऐकून घ्यावं लागतं. ;) दुधाच्या दाढा बारा वयापर्यंत टिकवायच्या असतात हे लक्षात ठेवावं. ) सतत च्युइंग गम चघळणे : शुगरफ्री च्युइन्ग गम लाळेचा प्रवाह वाढवते आणि कीड लागायला प्रतिबंध करते असे म्हणतात. जिथे अगदीच ब्रश करणे शक्य नसते तिथे कधीतरी गम चावायला हरकत नाही पण मी तरी ब्रशला पर्याय म्हणून दररोज गम चावा असे सांगणार नाही. याबद्दलचा विदा कदाचित गमच्या बाजूने असेलही. ;)

In reply to by भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 13:58
रेझिन सीलंटचा दुष्परिणाम नाही. ड्रिल न करता केलेलं ते एक फिलिंगच आहे. खर्चिकही नाही. साधारणपणे मोठ्या फिलिंगच्या निम्मा खर्च येतो .

ऋषिकेश Wed, 06/25/2014 - 11:03
आभार. लेख उत्तम. आता असे जाहिर सल्ले (ते ही विना फी :P) देताच आहात तर एक प्रश्न विचारतो. माझ्या मुलीला झोपताना पाण्यात किंचित मध लागतो (फ्लेवर - वास येण्यापुरता पुरतो) (साधारण १२५ मिलीला पाव - किंवा त्याहूनही कमी - चमचा मध). हे दातांना अपायकारक आहे का? चला जरा डॉक्टरांना रडवूया: आम्ही भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग करून घेतो - तसं जवळच्या डेंटिस्टाकडे तीन वर्षाचं प्याकेजच लावलं आहे. :D आता प्रश्नः दर सहा महिन्यांनी आमची डेंटिस्ट माझ्या दातांना टार्टार जमुनही कशी छोट्टीशी कॅविटीसुद्धा नाही याचे आश्चर्य व्यक्त करते. तिच्या मते माझे टार्टार हे टेन्शनमुळे जमते (असेल बॉ - तसेही माझी वृत्ती शंकेखोर आहे) पण या प्रमाणातील टार्टार असल्यावर छोटीश्शी कॅविटी तरी हवी बॉ (असे काहिशा लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय याविचाराने मी गाल पुढे करतो तर ती तोंडात नवे अवजार खुपसते.. ते असो!) तर प्रश्न असा की मी दाताला ब्लिचिंग करून घेत नाही - फक्त क्लीनिंग करून घेतो. हे ब्लिचिंग खरंच गरजेचं आहे का? मला दात शुभ्र दिसले नाहि तरी चालतील. त्या व्यतिरिक्त त्या ब्लिचिंगचा काही उपयोग?

In reply to by ऋषिकेश

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 11:47
१. मध पाणी : काहीही गोड रात्री देताना जरा काळजीच गरजेची आहे. आता या डायल्यूशनचा मला अंदाज येत नाहीये तरीही झोपताना शेवटी स्वच्छ पाण्याने दात ब्रश करावेत हे बरे.माझ्या एका मित्राच्या मुलाला रात्री झोपताना टॉनिक पिऊन झोपायच्या सवयीने समोरचे दात किडायला सुरुवात झाली होती. भारतात राहुनसुद्धा वर्षातून दोनदा क्लीनिंग आले आले अश्रू आले .. ashroo ब्लीचिंग : दाताची सफाई आवश्यक उपचार आहे. ब्लीचिंग ही एक चैन किंवा ऐश आहे. कॉस्मेटिक ट्रीटमेन्ट. ब्लीचिंग आवश्यक आहे का? अजिबात नाही. मॉडेलिंग करणारे लोक, अभिनेते वगैरेंनी करून घ्यावीच. स्माईल बरे दिसते. लग्नसमारंभ वगैरेंमध्ये उत्सवमूर्तींनी वगैरे करून घ्यावेच. चार पाच हजार रुपये खर्च करायची तयारी असेल तर करावे. हौस म्हणून. अम्रीकेत साधारणपणे दोनतीनशे डालरच्या पुढे खर्च येतो. दोन तीन वर्षांनी हा शुभ्रपणा कमी होतो मग होम ब्लीच करावे. ( डेन्टिस्ताने दिलेल्या ट्रे मध्ये सोल्यूशन दातावर लावून रात्रभर ठेवायचे )

In reply to by भडकमकर मास्तर

ऋषिकेश Wed, 06/25/2014 - 14:30
आभार! दाताच्या काळजीपोटीच रात्रीचे दूध सोडवायला पाणी देऊ लागलो. मात्र मधपाणी पिता पिताच ती झोपते (आताशी २ वर्षांची आहे) त्यामुळे नंतर दात घासणे कठीण आहे. मात्र सकाळी उठल्यावर आवडीने दात घासते व घासून घेते. तरीही आता तुम्ही सांगताय तर ती सवय बंद करायच्या मागे नक्की लागतो. ब्लिचिंग बाबत अंदाज होताच म्हणून कटाक्षाने नाही म्हणत होतोच. पुनश्च आभार!

In reply to by ऋषिकेश

भडकमकर मास्तर Wed, 06/25/2014 - 17:20
ब्रश करत न येणार्‍या छोट्या बाळांसाठी झोपण्यापूर्वी स्वच्छ ओल्या रुमालाने उगवणारे दात पुसून काढावेत. त्यामुळे "नंतर दात घासणे कठीण आहे." तरीही सफाईला पर्याय नाही कारण रात्रीत प्लाक न निघाल्याने दात किडायला सुरुवात होते

In reply to by ऋषिकेश

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 13:41
>>> आमची डेंटिस्ट >>> लाडिक टोनमध्ये म्हणत ती गालगुच्चा घेईल की काय आणि >>> तीन वर्षाचं प्याकेजच असे काही शब्दसमुच्चय दिसले. धन्यवाद! ;)

In reply to by पाषाणभेद

भडकमकर मास्तर गुरुवार, 06/26/2014 - 11:19
मिळतो की... एवढा काय महाग पण नसतो... पण मेडिकलवाले ठेवायचा कंटाळा करतात... मग त्यांना सांगून आणवावा लागतो इतकंच... उदाहरणार्थ .. थर्मोसील प्रोक्झाब्रश proxa brush

In reply to by ऋषिकेश

रेवती Wed, 06/25/2014 - 17:59
अभिनंदन ऋ! मला दर सहा महिन्यांनी क्लिनिंग प्रकार भारतात असताना माहितच नव्हता. तू छान काम करतोय्/करवून घेतोय्स.

विटेकर Wed, 06/25/2014 - 18:20
धन्यवाद .. सध्या बायकोच्या दाढांचे दोन ब्रीज करायचे आहेत, खर्चिक तर आहेच पण किती त्या तक्रारी ! पूर्वी काळजी न घेतल्याचे परिणाम !
[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ] प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय? Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ( अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात.

गर्भसंस्कार

बाबा पाटील ·

In reply to by सुखी

अनुप ढेरे Mon, 06/23/2014 - 15:22
ही होमिओपथीसारखी आर्गुमेंट झाली. "होमिओपथी उपयोगी आहे हे सिद्ध करा." "नाहिये हे तुम्ही सिद्ध करा."

धन्या Mon, 06/23/2014 - 14:35
कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर बालाजी तांबेचं "गर्भसंस्कार" नावाचं पुस्तक हमखास दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल कुतुहल होतं. या लेखाने ते कुतुहल शमण्यास मदत झाली. गर्भसंस्कारातील तीनही टप्प्यांचे पॅकेज मिळत असणार ना? कितीवर जातं पॅकेज साधारण?

नगरीनिरंजन Mon, 06/23/2014 - 16:20
गर्भसंस्कार थोतांड आहे की नाही ते काही वेळ बाजूला ठेवू या. गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचार घेऊन आपल्या संततीने निरंतर धनसंपादन आणि उपभोगाव्यतिरिक्त काय करणे अपेक्षित आहे? किंवा त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित तरी आहे का? गर्भसंस्कार झालेले मूल पुढे बुद्धासारखे वगैरे "भलतेसलते" विचार ़करु लागले तर आईवडिलांना आनंद होईल की दु:ख? की असे भलतेसलते विचार येऊ नयेत म्हणूनच गर्भसंस्कार असतात?

In reply to by असंका

नगरीनिरंजन Mon, 06/23/2014 - 18:33
विचार करायलाच हवा. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जाहिरातींचं तंत्र आता खूप सुधारलं आहे. आता नुसत्या मालाची/सेवेची जाहिरात न करता विशिष्ट मानसिकतेला टारगेट केलं जातं. आजच्या काळात मुलं आणि मुलांसंबंधीच्या भावना हे एक प्रमुख टारगेट झालं आहे. आपल्या मुलाना सर्वोत्तम तेच द्यायचं या भावनेला अतोनात महत्त्व देऊन त्याचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी इतका अतिरेक केला गेला आहे की आता गर्भात असलेल्या मुलालाही नैसर्गिक अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे. "कॅच देम यंग"च्या खेळात आईवडिलांनीही सहभागी होऊन त्या कोवळ्या जिवाच्या आयुष्याचा ताबा कुठवर घ्यावा यावरही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? जर शक्य असतं तर लोकांनी आतापर्यंत एकसारखं पण डिझाईनर लाईफ असलेल्या ठोकळ्यांचा समाज बनवला असता. घरात पुस्तकं, आजीआजोबा, येणार्‍या जाणार्‍यांचा राबता, परसादारी बाग, कुत्री-मांजरं, शेजारपाजारचे सवंगडी आणि हुंदडायला भरपूर मोकळी जागा व वेळ. इतकं असलं की कसलेही संस्कार "करायची" वेळ येत नाही. अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे?

In reply to by नगरीनिरंजन

बाबा पाटील Mon, 06/23/2014 - 18:50
हेच तर शिकवायचय्,मुलांना नाही त्याच्या आई बापाला थोडी अक्कल आली की बाळ बरचस शहाण होत.गर्भ संस्कार हे बाळा साठी नाही तर त्याच्या पालकांकरिता आहेत आज्जी आजोबांसह.आपलीच पिढी संस्कार विसलीय हो,ते पुढच्या पिढीत कसे जाणार ?

In reply to by नगरीनिरंजन

असंका Fri, 06/27/2014 - 12:31
इंडियाना जोन्स च्या एका भागात हॅरिसन फोर्ड आपल्या वडिलांना ( शाँ कॉनरी) विचारतो, की मी मोठा होत असताना तुम्ही मला कधीच काहिच का शिकवलं नाहीत? त्यावर शाँ कॉनरी उत्तर देतो की मी तुला एक वडील जी देऊ शकतात ती सर्वोत्तम भेट दिली? कुठली? "मी तुझ्या खाजगीपणाचा आदर केला, मी तुला स्वावलंबन शिकवलं.." - (I respected your privacy, I taught you self reliance)!! अगदी त्याची आठवण झाली आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हणाला आहात ते सगळं फारच विचारात पाडणारं आहे...धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

प्रभाकर पेठकर Sat, 06/28/2014 - 11:45
मी गर्भसंस्कारांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही ह्याची नोंद घेऊनच पुढील प्रतिसाद वाचावा ही विनंती. >>>>सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? असा अट्टाहास नसतोच. पण बदलत्या काळात, बदलत्या मानसिकता, मुलांचे बदलते भरकटणे आणि अनाकलनिय घटना ह्यांनी धास्तावलेल्या पालकांना वाटतं आपल्या अपत्यांनी ह्या पासून दूर राहावं, त्यांना ह्याचा वारा लागू नये, संसर्ग होऊ नये. त्यांनी कोणी 'ग्रेट' बनण्यासाठी नाही तर कमीतकमी आपल्यासारखे पापभिरू, सुसंस्कारी आणि सरळमार्गी व्हावं ह्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं. असे वाटण्यात गैर काय आहे? 'संस्कार' शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हढ्या व्यापक दृष्टीकोनातून विचार न करता 'कर्मकांडा'वर लक्ष केंद्रित होतं त्यामुळे पालकांना मानसिक समाधाना व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. मोठमोठे रोग होऊ नयेत, डॉक्टरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागू नयेत, आपल्याला शारीरिक, मानसिक झळ पोहोचू नये म्हणून आपण आधीच कांही उपाययोजना करतो. जसे, जेवणाच्या आधी हात धुणं, बाहेरून आलं की पाय धुणं, मच्छरांना घरात प्रवेश प्रतिबंधीत करणं, घरातला कचरा काढणं किंवा रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं. आपला प्रयत्न रोगराईला दूर ठेवणं हा असतो. पण म्हणून कोणी घरात कधी आजारी पडतच नाही का? पडतात. पण काळजी घेणं आवश्यक असतच नं? वेगवेगळ्या संस्कारांचा (गर्भसंस्कारांसहित) उद्देश 'प्राथमिक उपचार' ह्या पातळीवर सामाजिक रोगराईपासून आपल्या अपत्याला हानी पोहोचू नये हाच असतो. मूल जन्मल्यानंतर, घरी पालकांकडून, शाळेत शिक्षकांकडून, अतिरिक्त वाचनातून, आजूबाजूच्या समाजाकडून, प्रसारमाध्यमांकडून, संस्कार होतंच असतात. पण कुठे कांही कमी पडू नये ह्या काळजी पोटी सर्व उपलब्ध मार्ग वापरले जातात. गर्भसंस्कार त्यातीलच एक. >>>>अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे? सहमत. फक्त 'काय संस्कार होणार...' पेक्षा 'काय चांगले संस्कार होणार...' अशी सुधारणा सुचवितो.

In reply to by नगरीनिरंजन

कवितानागेश Mon, 06/23/2014 - 18:23
'आपल्या दॄष्टीनी भलतेसलते' विचार करणार्‍या मुलांसाठी जगभरातले आईवडील एका विशिष्ट प्रकारे पाठीवर किंवा गालावर वेगानी स्पर्श करण्याचा विधी असतो, तोच वापरतात. मुले तो संस्कार बरोब्बर शिकतात, आणि पुढे चालू ठेवतात.

In reply to by कवितानागेश

धन्या Mon, 06/23/2014 - 18:53
दुर्दैवाने काहींना हा विधी आजही संस्कारांचा अत्यावश्यक भाग वाटतो. किंबहूना एक आजच्या बालकांच्या आधीच्या दोन पीढया आपल्याबाबतीत हा विधी झाला होता आणि आजही तो कसा आवश्यक आहे हे अगदी कौतुकाने सांगत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा Fri, 06/27/2014 - 16:16
>>गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल ह्या प्रश्नाचं माझ्या दृष्टीनं असलेलं आणि वैयक्तिक अनुभवातून आलेलं उत्तर देतो - १.जन्माला येणारी संतती निकोप, निरोगी असावी, २.जन्म देणार्‍या स्त्रीच्या प्रकृतीला अनुसरुन गर्भवती असण्याच्या काळातील औषधोपचार/ जीवनशैली सुखकर असावी, त्या स्त्रीला अपत्य जन्माला घातल्यानंतर पुढे होणारे शारीरिक त्रास विशेष जाणवू नयेत ह्यासाठीची काळजी घेणे. 'संस्कार' हा शब्द केवळ आलोकनाथ पध्दतीपुरता मर्यादित नसून त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेतला त्याचा अर्थ जाणकार वैद्य सांगू शकतीलच. (आयुर्वेदात संस्कार हे केवळ बालकांवर करत नसून औषधांवरही केले जातात.) -- वरील उत्तर हे आमच्या अनुभवातून आलेलं आहे. मी आयुर्वेदातील तज्ज्ञ नाही.

तुषार काळभोर Mon, 06/23/2014 - 16:28
'गर्भसंस्कार' या विषयाबद्दल (पुस्तकाबद्दल नव्हे) काही वर्षांपूर्वी थोडीशी उत्सुकता होती. ती नंतर डॉ तांबेंमुळे कमी झाली ('शमली' या अर्थाने नाही). मला व बायकोला नुकताच पहिल्या खेपेला "व्हाट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" या पुस्तकाचा चांगला फायदा झाला आहे. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे त्या पुस्तकावर कमेंट करणे योग्य नाही. टीपः (धागा पुस्तकाबद्दल नसून त्या विषयाबद्दल आहे, त्यामुळे नक्कीच पुर्वग्रहरहित मनाने वाचतोय. डॉ. खरे व डॉ पाटील या दोन मिपाकर डॉ.विषयी नितांत आदर आहे.)

In reply to by तुषार काळभोर

गवि Mon, 06/23/2014 - 16:46
"व्हॉट टु एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग", "व्हॉट टु एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर", - टॉडलर ही सीरीज अत्यंत लाभदायक ठरते याविषयी शतप्रतिशत सहमत. केवळ माहितीच नव्हे तर मोठा आधारच होतो. अगदी रोज संदर्भासाठी उपयोगी पडेल असं.

गवि Mon, 06/23/2014 - 16:37
छान. यातल्या प्रत्येक पायरीतले सर्वच विधी कालसुसंगत असतील किंवा त्यांचा मूळ उद्देश अद्यापही लागू असेल असं नव्हे (कर्णवेधन, पंचकर्म आदि), पण एकूण जे काही मुद्दे मांडलेत त्यांनी झालाच तर गर्भधारणेला, गर्भावस्थेत आणि शिशुपालनात फायदाच होईल. आहाराची हेळसांड, आरोग्याकडे दुर्लक्ष हे नक्की टळेल. मुख्य बरं वाटलं ते असं की बहुतांश उपचार, - उदा. संगीत उपचार हे माता आणि गर्भाला शांतता आणि निद्राप्राप्तीसाठी, आहारयोजना उत्तम पोषणासाठी इत्यादि सरळ उद्देशाने केले जाणारे उपाय दिसतात. त्याला उगीच गूढ धूसर करण्यासाठी वैज्ञानिक डूब देऊन "वेव्ह्ज, मॅग्नेटिक, अल्ट्राव्हायोलेट, इलेक्ट्रिक एनर्जी, शरीरातली विद्युत मंडले, सिंपथेटिक्/पॅरासिंपथेटिक" इ इ लेपन करुन साध्या लाभदायक उपायांना उगीच तर्कापलीकडे नेलेलं नाही.

नीलकांत Mon, 06/23/2014 - 16:37
बालाजी तांबे आणि अन्य शहा वगैरे लेखकांच्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो. तसेच आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्य मित्रांकडून या विषयाबाबत ऐकून आहे. तुम्ही लिहीलेली माहिती सुध्दा उपयुक्त आहेच. गर्भसंस्कार हा अधिजनन शास्त्र नावाच्या मोठ्या विषयातील एक भाग आहे असे ऐकून आहे. अधिजनन शास्त्रात आई वडीलांच्या शारिरीक व मानसीक आरोग्यापासून सुरूवात होते तर मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगोपणासाठीचे मार्गदर्शन यात केले जाते. वडोदर्‍याच्या श्रीमती इंदूमती काटदरे यांच्या अधिजननशास्त्र या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. मी हे पुस्तक वाचलंय मात्र त्यातील काही गोष्टी पटल्या व काहींशी अजिबात सहमत नाही. बाकी या विषयावर पुढे वाचायला आवडेल. - नीलकांत

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 17:25
हॅ हॅ हॅ. त्यांचे वैचारिक नैतर शारीरिक परिणाम अमुक एका प्रकारचे व्हावेत म्हणून विशिष्ट गोष्टी बिंबवू पाहणे म्हणजे संस्कार. यात लेखातल्यासारखे गर्भसंस्कारही आले आणि सो कॉल्ड लिबरल विचारांचे संस्कारही आले. ;)

In reply to by ऋषिकेश

धन्या Mon, 06/23/2014 - 17:51
संस्कार केले जात नाहीत, संस्कार होत असतात. माझा नऊ वर्षांचा भाचा गेल्या वर्षी माझ्यासोबत राहायला आला. त्याच्याकडून मी खुप काही शिकलो, शिकत आहे. आपण मोठी माणसे मुलांवर "संस्कार घडवण्यासाठी" हे कर, ते करु नको असे सारखे सांगत असतो. मात्र आपण स्वतः तसे वागतो का हा कळीचा मुद्दा असतो. लहान मुलं उदासीन (न्युट्रल) निरिक्षक असतात. आपलं सांगणं आणि आपली कृती यात तफावत आली तर ते लगेच त्यांच्या लगेच लक्षात येतं. काय बोलावं, काय बोलू नये असा "शिष्टाचार" अंगी बाणवलेला नसल्यामुळे मुले निरागसपणे "तू मला म्हणाला होता की लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं असतं. आता मात्र तूच लाल सिग्नल लागलेला असूनही गाडी चालवत राहीलास." असं ऐकवतात. आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. मुलं आपलं अनुकरण करत आपोआप आपल्याला हवे त्याप्रमाणे घडत जातील.

In reply to by धन्या

राजेश घासकडवी Mon, 06/23/2014 - 17:55
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे.
लाखमोलाची गोष्ट. किती बारीकसारीक गोष्टीत ती आपलं अनुकरण करतात हे पाहून एकीकडे कौतुक, अभिमान आणि दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेने भीतीही वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

सखी Mon, 06/23/2014 - 19:06
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. +१ उदासीन (न्युट्रल) याला तटस्थ योग्य होईल का?

इनिगोय Wed, 06/25/2014 - 14:21
गर्भसंस्कार केलेल्या आणि न केलेल्या मुलांमध्ये ढोबळमानाने काय फरक जाणवतात? गर्भसंस्कार केलेले मूल त्याच्या वागण्या-बोलण्यावरून कसे ओळखता येते? मी स्वतः या प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि गर्भसंस्कार करण्याने फरक पडतो हे माझं निरीक्षण आहे. (बालाजी तांबेचं पुस्तक गाईडप्रमाणे वापरता येतं. अन्यथा ही प्रक्रिया आयुर्वेदात आहेच.) मात्र तसं शास्त्रीय विधान करण्याइतपत विदा माझ्याकडे नाही. त्यामुळे, बाबा किंवा इतर कुणीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलात तर हे केल्याने नेमकं काय होतं हे कळायला मदत होईल.

कवितानागेश Wed, 06/25/2014 - 15:30
मला अशा विशिष्ट गर्भसंस्काराबद्दल फारसं माहित नाही. पण घरातले अनुभव असे आहेत की गर्भारपणात ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते विषय पुढे मुलांना खूपच सोपे जातात. त्यामुळे या काळात शरीरासोबतच मनाला आणि बुद्धीलाही उत्तम खुराक हवाच.

बालाजी तांबे ह्यांचा लहान मुलगा संजय तांबे हे म्युनिक मध्ये राहतात व माझा त्यांचा चांगला परिचय आहे , १९८० पासून त्यांच्या संतुलन केद्रांच्या जर्मनी मध्ये अनेक शहरात केंद्र आहेत. त्यांना मानणारा येथे जर्मन समाज बहुसंख्य असून ते वर्षातून किमान दोनदा युरोप दौरा करतात. त्यांचे गर्भ संस्कार व इतर अनेक उपक्रम स्तुत्य आहेत.

कंजूस गुरुवार, 06/26/2014 - 05:55
असं काही तरी करायला हवं ही मानसिकता घरात निर्माण होणे यातच सर्वकाही आले .राहिला प्रश्न परवडण्याचा .परवडेल तो करेल आणि त्यातून काही निष्पन्न झाले नाही तरी त्याला चिमटा थोडीच बसणार आहे .बाकी बघे लोक कावकाव का करतात ते त्यांचे तेच जाणे . डॉक्टरसाहेब तुम्ही लिहाच .

In reply to by कंजूस

इनिगोय गुरुवार, 06/26/2014 - 07:43
+१ परवडण्याचा फारसा प्रश्न नाही, कारण प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात हे न करताही तपासण्या, टाॅनिक्स इत्यादीचा खर्च होतच असतो. गर्भसंस्कारासाठी होणारा खर्च हा त्या तुलनेत फारसा जास्त नाही.

परत एकदा तेच ... हे गर्भ संस्कार प्रकरण निव्वळ थोतांड आहे ... ह्यातली एकही गोष्ट सांख्यिकीय चिकित्सेच्या पट्टीवर खरी उतरणार नाही हे पैजेवर सांगु शकतो ! गर्भसंस्कार केलेक्या अन न केलेल्या मुलात असा काहीही सिग्निफिकन्ट फरक पडत नाही ... बर्‍याच वेळ्या हा संस्कार प्रकार तर निव्वळ ढोंगी पणा / दांभिकता असते ... आमच्या ओळखीतल्या एकांनी प्रेग्नन्सी च्या वेळेला अठंगुळ /अष्ट्मंगल हा संस्कार करुन घेतला... तेव्हा मी त्यांना विचारले "ह्या ज्या ६४ आहुती दिल्या गेल्या तेव्हा सगळ्यात जास्त वेळा कोणता मंत्र म्हणला गेला ? " तर ते म्हणाले "आमच्या लक्षात नाही " मी सांगितले की प्रत्येक वेळी आहुती देताना ते "विष्णवे: इदम् मम्" असे म्हणत होते म्हणजे हे हे विष्णुला अर्पण करतो , ह्यात माझे काही नाही , मग तुमचा तसा भाव आहे का ? तुम्ही ही अनासक्तीची अवस्था प्राप्त करुन घेतली आहे का ? त्यावर ते म्हणाले "आम्ही फक्त म्हणतो ... मानत नाही " आता बोला *ROFL* असले डोंबलाचे संकार काय कामाचे ? त्यापेक्षा मी कर्मकांडे करत नाही पण " "विष्णवे: इदम् मम्"" हे मानतो ... हे लाखपट चांगले !! ( असे माझेच वैयक्तिक मत आहे :) ) बाक्री : बालाजी तांबे हे बेस्ट सेल्स्मन आहे आणि त्याबाबत त्यांच्याविषयी अतिव आदरही आहे ...

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 16:05
तो इतिहास प्रतिक्रियांसकट पीडीएफ करून साठवलेला आहे नेफळेसाहेब. तूर्त इतकी पुणेकर जन्ता तांब्याला इतकी कशी काय भुलते हे जाणून घ्यावयाचे आहे. (पिचुफेम तांब्यांच्या मार्केटिंगचा फ्यान) बॅटम्यान.

In reply to by नानासाहेब नेफळे

कपिलमुनी Fri, 06/27/2014 - 15:06
>>>बाबा पाटील यांच्याकडे गर्भसंस्काराला गेल्या होत्या का तुम्हाला नसेल पटत तर मुद्दे मांडा , वैयक्तिक कशाला होत आहात ?

धमाल मुलगा Fri, 06/27/2014 - 16:17
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय? किती जणांचा स्वत:चा अनुभव आहे हा एक अत्यंत बेशिक प्रश्न पडला. तरी नशीब, आमच्या बाबा पाटलांनी स्वतः ह्या लेखात वर गर्भसंस्काराचे टप्पे - जे बहुतांश वैद्यकिय आहेत ते स्पष्ट लिहिलेले दिसताहेत. मुळात 'गर्भ' म्हणजे काय हे एकदा नीट समजावून सांगा हो बाबा आपल्या विद्वजनांना. मग पुढे त्याची वाढ होत असताना काय करावं न कळावं हे सांगण्यासाठी घ्या भरभक्कम फी. :)

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 16:49
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय?
तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!!

In reply to by बाळ सप्रे

धमाल मुलगा Fri, 06/27/2014 - 17:29
>>तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. तांबे हे गृहस्थ आयुर्वेदातील सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत का? नसल्यास त्यांच्या लेखन/औषधे/इतर बाबी ह्यावरुन मूळ प्रकार काय आहे ह्यावर कसं बोलता येणार? जाता जाता: त्याच पुस्तकात गर्भवतीच्या आहाराबद्दल, प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम, घेण्याच्या घरगुती औषधांबद्दल टिंगल करण्यासारखं निदान मलातरी काही वाटलं नाही बॉ. >>बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. नक्की? मला हे सापडलं - गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. -------------------------------------------------------------------------------- आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास. >> आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!! करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो. देव/भक्ती ह्यावर विश्वास नाही म्हणून फाट्यावर मारणारे आत्ताचे! तेही किती? उर्वरित जनतेला त्याचा फायदाच होतो. भले मग तो प्लासिबो इफेक्ट म्हणून सिध्द केला जावो. उपयोग होणं महत्वाचं. त्यातही पुन्हा, ती बाब केलीच पाहिजे असा आग्रह नाही. ते टाळूनही बाकीच्या गोष्टी करुन उत्तम फायदे मिळतातच की. मला वाईट ह्याचं वाटलं, कोणी बोटानं चंद्र दाखवायला जातोय, तर लोक त्याच्या नखातली माती पाहून नाकं मुरडतात.

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 21:33
आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास
अच्छा म्हणजे गर्भसंस्कार डॉक्टर लोकांसाठी आहे तर!! बाकी संक्षीनी म्हटल्याप्रमाणे यात फक्त ट्रेलर ( टेबल ऑफ कंटेंट)दिसला.. तपशील नाही..
करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो
मानसिक शांतीसाठी अशा गोष्टींची काडीचीही गरज वाटत नसल्यानेच कुठेही देवाचा संबंध जोडल्याने ते सर्व बाळ्बोध वाटते..

पिलीयन रायडर Fri, 06/27/2014 - 16:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.. एकंदरीत घरात लहान मुल आले की घर बदलुन जाते.. ती प्रकिया सुरु होण्याची ही नांदी असावी.. अवांतर :- आमचा एक (डोक्यावर पडलेला) मित्र म्हणाला होता "बायको प्रेग्नंट झाली की तिला ९ महिने सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे म्हणजे त्या बाळाचं "लॉजिक" चांगलं होइल"..!!

धन्या Fri, 06/27/2014 - 17:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.
अगदी अगदी. आयुष्याची पहिली पाच सहा वर्ष बाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात.

पैसा Fri, 06/27/2014 - 18:02
माहितीपूर्ण लेख आहे. यात दिलेल्या बर्‍याच गोष्टी बाळ आणि त्याचे आई-बाबा यांना फायदेशीर ठरणार्‍याच दिसत आहेत. काहीजणांना गर्भसंस्कार या नावाची अ‍ॅलर्जी असावी. "प्रेगाकेअर" इ. काही नाव असते तर त्यांना कदाचित चालले असते! :P

कवितानागेश Sat, 06/28/2014 - 10:55
संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ), याचासारखंच काही वय वाढलेल्या लोकांसाठी आहे का हो? माणसानी जरा शांतपणे शहाण्यासारखं वागावं, उगाच ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाउ नये, याच्यासाठी एखादा संगितिपचार असेल तर क्रुपया पाठवून द्या. आपल्या संस्थळाच्या पहिल्या पानावर चढवून ठेवते. किंवा मिपा ओपन असेल तेवढा वेळ आपोआप वाजेल असं काहीतरी करु.... हल्ली पित्त लई वाढतय लोकांचे.

In reply to by सुखी

अनुप ढेरे Mon, 06/23/2014 - 15:22
ही होमिओपथीसारखी आर्गुमेंट झाली. "होमिओपथी उपयोगी आहे हे सिद्ध करा." "नाहिये हे तुम्ही सिद्ध करा."

धन्या Mon, 06/23/2014 - 14:35
कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर बालाजी तांबेचं "गर्भसंस्कार" नावाचं पुस्तक हमखास दिसतं. त्यामुळे या विषयाबद्दल कुतुहल होतं. या लेखाने ते कुतुहल शमण्यास मदत झाली. गर्भसंस्कारातील तीनही टप्प्यांचे पॅकेज मिळत असणार ना? कितीवर जातं पॅकेज साधारण?

नगरीनिरंजन Mon, 06/23/2014 - 16:20
गर्भसंस्कार थोतांड आहे की नाही ते काही वेळ बाजूला ठेवू या. गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि उदात्त विचार घेऊन आपल्या संततीने निरंतर धनसंपादन आणि उपभोगाव्यतिरिक्त काय करणे अपेक्षित आहे? किंवा त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित तरी आहे का? गर्भसंस्कार झालेले मूल पुढे बुद्धासारखे वगैरे "भलतेसलते" विचार ़करु लागले तर आईवडिलांना आनंद होईल की दु:ख? की असे भलतेसलते विचार येऊ नयेत म्हणूनच गर्भसंस्कार असतात?

In reply to by असंका

नगरीनिरंजन Mon, 06/23/2014 - 18:33
विचार करायलाच हवा. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जाहिरातींचं तंत्र आता खूप सुधारलं आहे. आता नुसत्या मालाची/सेवेची जाहिरात न करता विशिष्ट मानसिकतेला टारगेट केलं जातं. आजच्या काळात मुलं आणि मुलांसंबंधीच्या भावना हे एक प्रमुख टारगेट झालं आहे. आपल्या मुलाना सर्वोत्तम तेच द्यायचं या भावनेला अतोनात महत्त्व देऊन त्याचा आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी इतका अतिरेक केला गेला आहे की आता गर्भात असलेल्या मुलालाही नैसर्गिक अनुभव मिळणे दुरापास्त झाले आहे. "कॅच देम यंग"च्या खेळात आईवडिलांनीही सहभागी होऊन त्या कोवळ्या जिवाच्या आयुष्याचा ताबा कुठवर घ्यावा यावरही प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? जर शक्य असतं तर लोकांनी आतापर्यंत एकसारखं पण डिझाईनर लाईफ असलेल्या ठोकळ्यांचा समाज बनवला असता. घरात पुस्तकं, आजीआजोबा, येणार्‍या जाणार्‍यांचा राबता, परसादारी बाग, कुत्री-मांजरं, शेजारपाजारचे सवंगडी आणि हुंदडायला भरपूर मोकळी जागा व वेळ. इतकं असलं की कसलेही संस्कार "करायची" वेळ येत नाही. अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे?

In reply to by नगरीनिरंजन

बाबा पाटील Mon, 06/23/2014 - 18:50
हेच तर शिकवायचय्,मुलांना नाही त्याच्या आई बापाला थोडी अक्कल आली की बाळ बरचस शहाण होत.गर्भ संस्कार हे बाळा साठी नाही तर त्याच्या पालकांकरिता आहेत आज्जी आजोबांसह.आपलीच पिढी संस्कार विसलीय हो,ते पुढच्या पिढीत कसे जाणार ?

In reply to by नगरीनिरंजन

असंका Fri, 06/27/2014 - 12:31
इंडियाना जोन्स च्या एका भागात हॅरिसन फोर्ड आपल्या वडिलांना ( शाँ कॉनरी) विचारतो, की मी मोठा होत असताना तुम्ही मला कधीच काहिच का शिकवलं नाहीत? त्यावर शाँ कॉनरी उत्तर देतो की मी तुला एक वडील जी देऊ शकतात ती सर्वोत्तम भेट दिली? कुठली? "मी तुझ्या खाजगीपणाचा आदर केला, मी तुला स्वावलंबन शिकवलं.." - (I respected your privacy, I taught you self reliance)!! अगदी त्याची आठवण झाली आपला प्रतिसाद वाचून. आपण म्हणाला आहात ते सगळं फारच विचारात पाडणारं आहे...धन्यवाद!

In reply to by नगरीनिरंजन

प्रभाकर पेठकर Sat, 06/28/2014 - 11:45
मी गर्भसंस्कारांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही ह्याची नोंद घेऊनच पुढील प्रतिसाद वाचावा ही विनंती. >>>>सगळं उत्तम, ठरल्यासारखं आणि आदर्श झालं पाहिजे याचा एवढा अट्टाहास कशासाठी? असा अट्टाहास नसतोच. पण बदलत्या काळात, बदलत्या मानसिकता, मुलांचे बदलते भरकटणे आणि अनाकलनिय घटना ह्यांनी धास्तावलेल्या पालकांना वाटतं आपल्या अपत्यांनी ह्या पासून दूर राहावं, त्यांना ह्याचा वारा लागू नये, संसर्ग होऊ नये. त्यांनी कोणी 'ग्रेट' बनण्यासाठी नाही तर कमीतकमी आपल्यासारखे पापभिरू, सुसंस्कारी आणि सरळमार्गी व्हावं ह्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं. असे वाटण्यात गैर काय आहे? 'संस्कार' शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हढ्या व्यापक दृष्टीकोनातून विचार न करता 'कर्मकांडा'वर लक्ष केंद्रित होतं त्यामुळे पालकांना मानसिक समाधाना व्यतिरिक्त काहीच हाती लागत नाही. मोठमोठे रोग होऊ नयेत, डॉक्टरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागू नयेत, आपल्याला शारीरिक, मानसिक झळ पोहोचू नये म्हणून आपण आधीच कांही उपाययोजना करतो. जसे, जेवणाच्या आधी हात धुणं, बाहेरून आलं की पाय धुणं, मच्छरांना घरात प्रवेश प्रतिबंधीत करणं, घरातला कचरा काढणं किंवा रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं. आपला प्रयत्न रोगराईला दूर ठेवणं हा असतो. पण म्हणून कोणी घरात कधी आजारी पडतच नाही का? पडतात. पण काळजी घेणं आवश्यक असतच नं? वेगवेगळ्या संस्कारांचा (गर्भसंस्कारांसहित) उद्देश 'प्राथमिक उपचार' ह्या पातळीवर सामाजिक रोगराईपासून आपल्या अपत्याला हानी पोहोचू नये हाच असतो. मूल जन्मल्यानंतर, घरी पालकांकडून, शाळेत शिक्षकांकडून, अतिरिक्त वाचनातून, आजूबाजूच्या समाजाकडून, प्रसारमाध्यमांकडून, संस्कार होतंच असतात. पण कुठे कांही कमी पडू नये ह्या काळजी पोटी सर्व उपलब्ध मार्ग वापरले जातात. गर्भसंस्कार त्यातीलच एक. >>>>अन्यथा सकाळी तासभर गर्भसंस्कार करून दुपारभर भंपक टीव्ही मालिका पाहिल्याने काय संस्कार होणार डोंबल्याचे? सहमत. फक्त 'काय संस्कार होणार...' पेक्षा 'काय चांगले संस्कार होणार...' अशी सुधारणा सुचवितो.

In reply to by नगरीनिरंजन

कवितानागेश Mon, 06/23/2014 - 18:23
'आपल्या दॄष्टीनी भलतेसलते' विचार करणार्‍या मुलांसाठी जगभरातले आईवडील एका विशिष्ट प्रकारे पाठीवर किंवा गालावर वेगानी स्पर्श करण्याचा विधी असतो, तोच वापरतात. मुले तो संस्कार बरोब्बर शिकतात, आणि पुढे चालू ठेवतात.

In reply to by कवितानागेश

धन्या Mon, 06/23/2014 - 18:53
दुर्दैवाने काहींना हा विधी आजही संस्कारांचा अत्यावश्यक भाग वाटतो. किंबहूना एक आजच्या बालकांच्या आधीच्या दोन पीढया आपल्याबाबतीत हा विधी झाला होता आणि आजही तो कसा आवश्यक आहे हे अगदी कौतुकाने सांगत असतात.

In reply to by नगरीनिरंजन

धमाल मुलगा Fri, 06/27/2014 - 16:16
>>गर्भसंस्कार कशासाठी करायचे हे कोणी सांगू शकल्यास बरे होईल ह्या प्रश्नाचं माझ्या दृष्टीनं असलेलं आणि वैयक्तिक अनुभवातून आलेलं उत्तर देतो - १.जन्माला येणारी संतती निकोप, निरोगी असावी, २.जन्म देणार्‍या स्त्रीच्या प्रकृतीला अनुसरुन गर्भवती असण्याच्या काळातील औषधोपचार/ जीवनशैली सुखकर असावी, त्या स्त्रीला अपत्य जन्माला घातल्यानंतर पुढे होणारे शारीरिक त्रास विशेष जाणवू नयेत ह्यासाठीची काळजी घेणे. 'संस्कार' हा शब्द केवळ आलोकनाथ पध्दतीपुरता मर्यादित नसून त्याचा अर्थ बराच व्यापक आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेतला त्याचा अर्थ जाणकार वैद्य सांगू शकतीलच. (आयुर्वेदात संस्कार हे केवळ बालकांवर करत नसून औषधांवरही केले जातात.) -- वरील उत्तर हे आमच्या अनुभवातून आलेलं आहे. मी आयुर्वेदातील तज्ज्ञ नाही.

तुषार काळभोर Mon, 06/23/2014 - 16:28
'गर्भसंस्कार' या विषयाबद्दल (पुस्तकाबद्दल नव्हे) काही वर्षांपूर्वी थोडीशी उत्सुकता होती. ती नंतर डॉ तांबेंमुळे कमी झाली ('शमली' या अर्थाने नाही). मला व बायकोला नुकताच पहिल्या खेपेला "व्हाट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" या पुस्तकाचा चांगला फायदा झाला आहे. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे त्या पुस्तकावर कमेंट करणे योग्य नाही. टीपः (धागा पुस्तकाबद्दल नसून त्या विषयाबद्दल आहे, त्यामुळे नक्कीच पुर्वग्रहरहित मनाने वाचतोय. डॉ. खरे व डॉ पाटील या दोन मिपाकर डॉ.विषयी नितांत आदर आहे.)

In reply to by तुषार काळभोर

गवि Mon, 06/23/2014 - 16:46
"व्हॉट टु एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग", "व्हॉट टु एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर", - टॉडलर ही सीरीज अत्यंत लाभदायक ठरते याविषयी शतप्रतिशत सहमत. केवळ माहितीच नव्हे तर मोठा आधारच होतो. अगदी रोज संदर्भासाठी उपयोगी पडेल असं.

गवि Mon, 06/23/2014 - 16:37
छान. यातल्या प्रत्येक पायरीतले सर्वच विधी कालसुसंगत असतील किंवा त्यांचा मूळ उद्देश अद्यापही लागू असेल असं नव्हे (कर्णवेधन, पंचकर्म आदि), पण एकूण जे काही मुद्दे मांडलेत त्यांनी झालाच तर गर्भधारणेला, गर्भावस्थेत आणि शिशुपालनात फायदाच होईल. आहाराची हेळसांड, आरोग्याकडे दुर्लक्ष हे नक्की टळेल. मुख्य बरं वाटलं ते असं की बहुतांश उपचार, - उदा. संगीत उपचार हे माता आणि गर्भाला शांतता आणि निद्राप्राप्तीसाठी, आहारयोजना उत्तम पोषणासाठी इत्यादि सरळ उद्देशाने केले जाणारे उपाय दिसतात. त्याला उगीच गूढ धूसर करण्यासाठी वैज्ञानिक डूब देऊन "वेव्ह्ज, मॅग्नेटिक, अल्ट्राव्हायोलेट, इलेक्ट्रिक एनर्जी, शरीरातली विद्युत मंडले, सिंपथेटिक्/पॅरासिंपथेटिक" इ इ लेपन करुन साध्या लाभदायक उपायांना उगीच तर्कापलीकडे नेलेलं नाही.

नीलकांत Mon, 06/23/2014 - 16:37
बालाजी तांबे आणि अन्य शहा वगैरे लेखकांच्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल ऐकून होतो. तसेच आयुर्वेदात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वैद्य मित्रांकडून या विषयाबाबत ऐकून आहे. तुम्ही लिहीलेली माहिती सुध्दा उपयुक्त आहेच. गर्भसंस्कार हा अधिजनन शास्त्र नावाच्या मोठ्या विषयातील एक भाग आहे असे ऐकून आहे. अधिजनन शास्त्रात आई वडीलांच्या शारिरीक व मानसीक आरोग्यापासून सुरूवात होते तर मुलांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या संगोपणासाठीचे मार्गदर्शन यात केले जाते. वडोदर्‍याच्या श्रीमती इंदूमती काटदरे यांच्या अधिजननशास्त्र या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. मी हे पुस्तक वाचलंय मात्र त्यातील काही गोष्टी पटल्या व काहींशी अजिबात सहमत नाही. बाकी या विषयावर पुढे वाचायला आवडेल. - नीलकांत

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन Mon, 06/23/2014 - 17:25
हॅ हॅ हॅ. त्यांचे वैचारिक नैतर शारीरिक परिणाम अमुक एका प्रकारचे व्हावेत म्हणून विशिष्ट गोष्टी बिंबवू पाहणे म्हणजे संस्कार. यात लेखातल्यासारखे गर्भसंस्कारही आले आणि सो कॉल्ड लिबरल विचारांचे संस्कारही आले. ;)

In reply to by ऋषिकेश

धन्या Mon, 06/23/2014 - 17:51
संस्कार केले जात नाहीत, संस्कार होत असतात. माझा नऊ वर्षांचा भाचा गेल्या वर्षी माझ्यासोबत राहायला आला. त्याच्याकडून मी खुप काही शिकलो, शिकत आहे. आपण मोठी माणसे मुलांवर "संस्कार घडवण्यासाठी" हे कर, ते करु नको असे सारखे सांगत असतो. मात्र आपण स्वतः तसे वागतो का हा कळीचा मुद्दा असतो. लहान मुलं उदासीन (न्युट्रल) निरिक्षक असतात. आपलं सांगणं आणि आपली कृती यात तफावत आली तर ते लगेच त्यांच्या लगेच लक्षात येतं. काय बोलावं, काय बोलू नये असा "शिष्टाचार" अंगी बाणवलेला नसल्यामुळे मुले निरागसपणे "तू मला म्हणाला होता की लाल सिग्नल लागल्यावर थांबायचं असतं. आता मात्र तूच लाल सिग्नल लागलेला असूनही गाडी चालवत राहीलास." असं ऐकवतात. आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. मुलं आपलं अनुकरण करत आपोआप आपल्याला हवे त्याप्रमाणे घडत जातील.

In reply to by धन्या

राजेश घासकडवी Mon, 06/23/2014 - 17:55
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे.
लाखमोलाची गोष्ट. किती बारीकसारीक गोष्टीत ती आपलं अनुकरण करतात हे पाहून एकीकडे कौतुक, अभिमान आणि दुसरीकडे जबाबदारीच्या जाणीवेने भीतीही वाटते.

In reply to by राजेश घासकडवी

सखी Mon, 06/23/2014 - 19:06
आपली मुलं जशी घडावीत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांना ते सांगत न बसता स्वतः तसे वागायला हवे. +१ उदासीन (न्युट्रल) याला तटस्थ योग्य होईल का?

इनिगोय Wed, 06/25/2014 - 14:21
गर्भसंस्कार केलेल्या आणि न केलेल्या मुलांमध्ये ढोबळमानाने काय फरक जाणवतात? गर्भसंस्कार केलेले मूल त्याच्या वागण्या-बोलण्यावरून कसे ओळखता येते? मी स्वतः या प्रक्रियेचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि गर्भसंस्कार करण्याने फरक पडतो हे माझं निरीक्षण आहे. (बालाजी तांबेचं पुस्तक गाईडप्रमाणे वापरता येतं. अन्यथा ही प्रक्रिया आयुर्वेदात आहेच.) मात्र तसं शास्त्रीय विधान करण्याइतपत विदा माझ्याकडे नाही. त्यामुळे, बाबा किंवा इतर कुणीही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलात तर हे केल्याने नेमकं काय होतं हे कळायला मदत होईल.

कवितानागेश Wed, 06/25/2014 - 15:30
मला अशा विशिष्ट गर्भसंस्काराबद्दल फारसं माहित नाही. पण घरातले अनुभव असे आहेत की गर्भारपणात ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, ते विषय पुढे मुलांना खूपच सोपे जातात. त्यामुळे या काळात शरीरासोबतच मनाला आणि बुद्धीलाही उत्तम खुराक हवाच.

बालाजी तांबे ह्यांचा लहान मुलगा संजय तांबे हे म्युनिक मध्ये राहतात व माझा त्यांचा चांगला परिचय आहे , १९८० पासून त्यांच्या संतुलन केद्रांच्या जर्मनी मध्ये अनेक शहरात केंद्र आहेत. त्यांना मानणारा येथे जर्मन समाज बहुसंख्य असून ते वर्षातून किमान दोनदा युरोप दौरा करतात. त्यांचे गर्भ संस्कार व इतर अनेक उपक्रम स्तुत्य आहेत.

कंजूस गुरुवार, 06/26/2014 - 05:55
असं काही तरी करायला हवं ही मानसिकता घरात निर्माण होणे यातच सर्वकाही आले .राहिला प्रश्न परवडण्याचा .परवडेल तो करेल आणि त्यातून काही निष्पन्न झाले नाही तरी त्याला चिमटा थोडीच बसणार आहे .बाकी बघे लोक कावकाव का करतात ते त्यांचे तेच जाणे . डॉक्टरसाहेब तुम्ही लिहाच .

In reply to by कंजूस

इनिगोय गुरुवार, 06/26/2014 - 07:43
+१ परवडण्याचा फारसा प्रश्न नाही, कारण प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यात हे न करताही तपासण्या, टाॅनिक्स इत्यादीचा खर्च होतच असतो. गर्भसंस्कारासाठी होणारा खर्च हा त्या तुलनेत फारसा जास्त नाही.

परत एकदा तेच ... हे गर्भ संस्कार प्रकरण निव्वळ थोतांड आहे ... ह्यातली एकही गोष्ट सांख्यिकीय चिकित्सेच्या पट्टीवर खरी उतरणार नाही हे पैजेवर सांगु शकतो ! गर्भसंस्कार केलेक्या अन न केलेल्या मुलात असा काहीही सिग्निफिकन्ट फरक पडत नाही ... बर्‍याच वेळ्या हा संस्कार प्रकार तर निव्वळ ढोंगी पणा / दांभिकता असते ... आमच्या ओळखीतल्या एकांनी प्रेग्नन्सी च्या वेळेला अठंगुळ /अष्ट्मंगल हा संस्कार करुन घेतला... तेव्हा मी त्यांना विचारले "ह्या ज्या ६४ आहुती दिल्या गेल्या तेव्हा सगळ्यात जास्त वेळा कोणता मंत्र म्हणला गेला ? " तर ते म्हणाले "आमच्या लक्षात नाही " मी सांगितले की प्रत्येक वेळी आहुती देताना ते "विष्णवे: इदम् मम्" असे म्हणत होते म्हणजे हे हे विष्णुला अर्पण करतो , ह्यात माझे काही नाही , मग तुमचा तसा भाव आहे का ? तुम्ही ही अनासक्तीची अवस्था प्राप्त करुन घेतली आहे का ? त्यावर ते म्हणाले "आम्ही फक्त म्हणतो ... मानत नाही " आता बोला *ROFL* असले डोंबलाचे संकार काय कामाचे ? त्यापेक्षा मी कर्मकांडे करत नाही पण " "विष्णवे: इदम् मम्"" हे मानतो ... हे लाखपट चांगले !! ( असे माझेच वैयक्तिक मत आहे :) ) बाक्री : बालाजी तांबे हे बेस्ट सेल्स्मन आहे आणि त्याबाबत त्यांच्याविषयी अतिव आदरही आहे ...

In reply to by नानासाहेब नेफळे

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 16:05
तो इतिहास प्रतिक्रियांसकट पीडीएफ करून साठवलेला आहे नेफळेसाहेब. तूर्त इतकी पुणेकर जन्ता तांब्याला इतकी कशी काय भुलते हे जाणून घ्यावयाचे आहे. (पिचुफेम तांब्यांच्या मार्केटिंगचा फ्यान) बॅटम्यान.

In reply to by नानासाहेब नेफळे

कपिलमुनी Fri, 06/27/2014 - 15:06
>>>बाबा पाटील यांच्याकडे गर्भसंस्काराला गेल्या होत्या का तुम्हाला नसेल पटत तर मुद्दे मांडा , वैयक्तिक कशाला होत आहात ?

धमाल मुलगा Fri, 06/27/2014 - 16:17
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय? किती जणांचा स्वत:चा अनुभव आहे हा एक अत्यंत बेशिक प्रश्न पडला. तरी नशीब, आमच्या बाबा पाटलांनी स्वतः ह्या लेखात वर गर्भसंस्काराचे टप्पे - जे बहुतांश वैद्यकिय आहेत ते स्पष्ट लिहिलेले दिसताहेत. मुळात 'गर्भ' म्हणजे काय हे एकदा नीट समजावून सांगा हो बाबा आपल्या विद्वजनांना. मग पुढे त्याची वाढ होत असताना काय करावं न कळावं हे सांगण्यासाठी घ्या भरभक्कम फी. :)

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 16:49
यथेच्छ टीका/टिंगल करण्यांपैकी किती जणांनी गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हे वाचून पाहिलंय?
तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!!

In reply to by बाळ सप्रे

धमाल मुलगा Fri, 06/27/2014 - 17:29
>>तांब्यांचं पुस्तक वाचुनच ते टिंगल करण्यासारखे आहे असे मत बनले आहे.. तांबे हे गृहस्थ आयुर्वेदातील सर्वोच्च अधिकारी व्यक्ती आहेत का? नसल्यास त्यांच्या लेखन/औषधे/इतर बाबी ह्यावरुन मूळ प्रकार काय आहे ह्यावर कसं बोलता येणार? जाता जाता: त्याच पुस्तकात गर्भवतीच्या आहाराबद्दल, प्रत्येक महिन्यातल्या व्यायाम, घेण्याच्या घरगुती औषधांबद्दल टिंगल करण्यासारखं निदान मलातरी काही वाटलं नाही बॉ. >>बाकी इतरत्रही वाचनात (हा लेख धरुन) काही खास तपशिल आढळला नाही.. नक्की? मला हे सापडलं - गर्भसंस्काराचे टप्पे १. बीज संस्कार ( गर्भधारणेपुर्व माता-पित्याची बीजशुद्धी करुन बीजांना शुद्धीकरुन गुणवर्धन करणे ) २. गर्भ संस्कार ( गर्भ धारणा झाल्यावर प्रत्येक महीन्यात गर्भवाढीनुसार गुणवर्धन चिकित्सा करणे ) ३. शिशू संस्कार ( जन्मोत्तर बालकाच्या शारीरिक,बौद्धिक विकासाच्या दृष्टीकोणातून संस्कार करणे ) १. गर्भधारणपुर्व बीज संस्कार १. अ ] गर्भधारणोत्सुक स्री-पुरुषांची पुर्वतयारी १. प्रजननसंस्थेची व प्रजनन विधीची पुर्ण माहीती देणे. २. प्रकृतिपरिक्षण करणे. ३. पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी ४. पंचकर्मोत्तर रसायन वाजीकरण औषधींचा वापर. ५. योग ( प्राणायाम व आसन ) ह्याद्वारे मनाचा शरीरव्यापाराशी समतोल राखणे. ६. गरजेनुसार औषधी चिकित्सा ( जसे अम्लपित्त , मलावष्टम्भ , शिरःशूल , इ. ) ७. आहार मार्गदर्शन ( प्रकृति व पुर्व व्याधीनुसार , प्रत्येक ऋतुनुसार आहार पथ्य-अपथ्य मार्गदर्शन ) ८. दिनचर्या मार्गदर्शन ( प्रकृती व व्याधीनुसार व व्यवसाय विचारात घेऊन दिनचर्येचे मार्गदर्शन ) १. ब ] गर्भधारण संस्कार १. गर्भधारणार्थे नैष्ठिकी ब्रम्हचर्य व मैथुन विधी ( गर्भधारणापुर्वी पाळावयाचे १ मासिक ब्रम्हचर्य व गर्भधारणार्थ करावयाचा मैथुन विधी – ऋतुनुसार काळ , वेळ , मासिक पाळीनुसार दिवस ,इ.) २. गर्भधारण पुर्व स्री पुरुषांची गर्भासाठी मानस-शारीर-बौद्धिक गुणांचे आवाहन करणे. २. गर्भधारणाकालीन संस्कार ( गर्भसंस्कार ) गर्भधारणेपासून प्रसवापर्यंत म्हणजे जन्मापर्यंत साधारण ९ महिन्यांचे नवमास परिचर्या + संस्कार १. नवमास गर्भिणी परिचर्या ( सगर्भ मातेची काळजी ) २. गर्भवाढीच्या दृष्टीकोनातून मातेसाठी मासानुमासिक आहार ३. दिनचर्या ( पथ्य-अपथ्य ) ४. मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यकर स्तोत्र मंत्र आदि चिकित्सा ५. योग ( प्राणायाम + आसने ) व ध्यान-धारणा ६. रंग चिकित्सा व गंध चिकित्सा ७. सौंदर्यचिकित्सा ह्यात काय काय केले जाते ? १. प्रत्येक महिन्यातील गर्भाची तपासणी बाळाची वाढ / परिक्षण / औषधी २. प्रत्येक महिन्यातील मातेची तपासणी व्याधी चिकित्सा ३. माता/पिता-गर्भ संवाद विधी ४. संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ) ५. प्रसव प्रक्रियेची माहीती. प्राकृत प्रसव व प्रसवकालीन व्याधी व चिकित्सा ६. प्रसवासाठी मानसिक व शारीरिक तयारी करणे. ७. प्रसव कालीन परिचर्या. ३. प्रसवोत्तर संस्कार ( माता व शिशू संस्कार ) १. शिशू संगोपन ( अभ्यंग – स्नान – धूपन - वस्र – क्रिडा – इ. ) २. शिशू षडमास परिचर्या ( स्तन्यपान विधी , निद्रा , बाळगुटी इ. ) ३. षडमासोत्तर बाल-आहार विधी ( क्षीरान्नाद व अन्नाद अवस्था ) ४. मातेस षडमास सूतिका परिचर्या (अभ्यंग धूपन स्नान पट्टबंधन औषधी आहार इ.) ५. शिशू संस्कार ( नालकर्तन स्वर्णप्राशन कर्णवेधन नामकरण इ. -------------------------------------------------------------------------------- आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास. >> आणि सगळीकडे कुठेना कुठे जाउन देव/भक्ति वगैरे कडे जाउन अडकत!! करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो. देव/भक्ती ह्यावर विश्वास नाही म्हणून फाट्यावर मारणारे आत्ताचे! तेही किती? उर्वरित जनतेला त्याचा फायदाच होतो. भले मग तो प्लासिबो इफेक्ट म्हणून सिध्द केला जावो. उपयोग होणं महत्वाचं. त्यातही पुन्हा, ती बाब केलीच पाहिजे असा आग्रह नाही. ते टाळूनही बाकीच्या गोष्टी करुन उत्तम फायदे मिळतातच की. मला वाईट ह्याचं वाटलं, कोणी बोटानं चंद्र दाखवायला जातोय, तर लोक त्याच्या नखातली माती पाहून नाकं मुरडतात.

In reply to by धमाल मुलगा

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 21:33
आता ह्यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजलीच पाहिजे असं म्हणणं असेल तर प्रत्येकानं आधी वैद्यकीय शिक्षण घेणं गरजेचं असावं असा माझा कयास
अच्छा म्हणजे गर्भसंस्कार डॉक्टर लोकांसाठी आहे तर!! बाकी संक्षीनी म्हटल्याप्रमाणे यात फक्त ट्रेलर ( टेबल ऑफ कंटेंट)दिसला.. तपशील नाही..
करावंच लागतं. अगदी सर्वसाधारणपणे मानसिक शांततेसाठी ह्या गोष्टींचा सुंदर उपयोग होतो
मानसिक शांतीसाठी अशा गोष्टींची काडीचीही गरज वाटत नसल्यानेच कुठेही देवाचा संबंध जोडल्याने ते सर्व बाळ्बोध वाटते..

पिलीयन रायडर Fri, 06/27/2014 - 16:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.. एकंदरीत घरात लहान मुल आले की घर बदलुन जाते.. ती प्रकिया सुरु होण्याची ही नांदी असावी.. अवांतर :- आमचा एक (डोक्यावर पडलेला) मित्र म्हणाला होता "बायको प्रेग्नंट झाली की तिला ९ महिने सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे म्हणजे त्या बाळाचं "लॉजिक" चांगलं होइल"..!!

धन्या Fri, 06/27/2014 - 17:38
गर्भसंस्कार होत असले तरी माणसाचा स्वभाव हा मुख्यतः तो कोणत्या परिस्थिती मध्ये रहातो, वाढतो ह्यावर अवलंबुन असावा. त्यामुळे अगदी स्पेशल काही केलं नाही तर फारसा मोठा फरक पडत नसेल. पण मुळात लहान बाळ येणार, जे अत्यंत संवेदनाशील आहे, त्यासाठी घरात, वातावरणात, बोलण्यात, सवयीत, खाण्या-पिण्यात काही बदल घडणं आवश्यक आहे ह्याची जाणीव जास्त महत्वाची आहे.
अगदी अगदी. आयुष्याची पहिली पाच सहा वर्ष बाळाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात.

पैसा Fri, 06/27/2014 - 18:02
माहितीपूर्ण लेख आहे. यात दिलेल्या बर्‍याच गोष्टी बाळ आणि त्याचे आई-बाबा यांना फायदेशीर ठरणार्‍याच दिसत आहेत. काहीजणांना गर्भसंस्कार या नावाची अ‍ॅलर्जी असावी. "प्रेगाकेअर" इ. काही नाव असते तर त्यांना कदाचित चालले असते! :P

कवितानागेश Sat, 06/28/2014 - 10:55
संगितोपचार ( बाळ व मातेसाठी शांतता व निद्रा प्राप्तीसाठी ), याचासारखंच काही वय वाढलेल्या लोकांसाठी आहे का हो? माणसानी जरा शांतपणे शहाण्यासारखं वागावं, उगाच ज्याच्या त्याच्या अंगावर धावून जाउ नये, याच्यासाठी एखादा संगितिपचार असेल तर क्रुपया पाठवून द्या. आपल्या संस्थळाच्या पहिल्या पानावर चढवून ठेवते. किंवा मिपा ओपन असेल तेवढा वेळ आपोआप वाजेल असं काहीतरी करु.... हल्ली पित्त लई वाढतय लोकांचे.
लेखनप्रकार
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते.

जडण-घडण...3

माधुरी विनायक ·

In reply to by माधुरी विनायक

सखी Wed, 06/25/2014 - 17:51
पुढे लिहावं की नाही या विचारात होते. नक्कीच लिहा, मिपाकर वाचत असतात, जमेल तेव्हा प्रतिसाद देतातच, प्रत्येक वेळेस शक्य होतेच असं नाही.

In reply to by सखी

एस Wed, 06/25/2014 - 19:46
मिळालेल्या प्रतिसादांच्या संख्येवरून स्वतःच्या लेखांची लोकप्रियता किंवा लेखांचा दर्जा इथे जोखू नये, ती काही खरी कसोटी नाही. शतक काय कुठलेही धागे करतात आणि त्यात भिक्कार धागेच जास्त पुढे असतात. ;-) (अशा धाग्यांच्या कर्त्यांनी कृपया ह. घ्या!) लोक आवर्जून चांगल्या लेखांची वाट बघतात-वाचतात. फक्त लेखमालेसारख्या लेखनाला दर वेळी प्रतिसाद देतीलच असे नाही. त्यामुळे लेखन थांबवू नका!

माधुरी विनायक गुरुवार, 06/26/2014 - 16:39
लोकप्रियतेसाठी नाही, फार बोर करतेय का वाचणाऱ्यांना, फारच व्यक्तिगत होतंय का लिखाण, असं वाटत होतं. आता पुढचा भाग टाकते. धन्यवाद.

In reply to by माधुरी विनायक

सखी Wed, 06/25/2014 - 17:51
पुढे लिहावं की नाही या विचारात होते. नक्कीच लिहा, मिपाकर वाचत असतात, जमेल तेव्हा प्रतिसाद देतातच, प्रत्येक वेळेस शक्य होतेच असं नाही.

In reply to by सखी

एस Wed, 06/25/2014 - 19:46
मिळालेल्या प्रतिसादांच्या संख्येवरून स्वतःच्या लेखांची लोकप्रियता किंवा लेखांचा दर्जा इथे जोखू नये, ती काही खरी कसोटी नाही. शतक काय कुठलेही धागे करतात आणि त्यात भिक्कार धागेच जास्त पुढे असतात. ;-) (अशा धाग्यांच्या कर्त्यांनी कृपया ह. घ्या!) लोक आवर्जून चांगल्या लेखांची वाट बघतात-वाचतात. फक्त लेखमालेसारख्या लेखनाला दर वेळी प्रतिसाद देतीलच असे नाही. त्यामुळे लेखन थांबवू नका!

माधुरी विनायक गुरुवार, 06/26/2014 - 16:39
लोकप्रियतेसाठी नाही, फार बोर करतेय का वाचणाऱ्यांना, फारच व्यक्तिगत होतंय का लिखाण, असं वाटत होतं. आता पुढचा भाग टाकते. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गावच्या भटकंतीतला प्रत्येक वर्षीचा पहिला उद्योग म्हणजे वाडीतल्या सगळ्या आंब्याच्या झाडांची पाहणी करायची, मिळतील तितक्या कैऱ्या मिळतील तिथेच खायला सुरूवात करायची आणि परतताना जमतील तितक्या कैऱ्या घरी आणायच्या. पहिले तीन-चार दिवस पडवीत आम्ही जमवलेल्या कैऱ्या टोपलीत पडून राहायच्या. दात पुरेसे (म्हणजे वैताग येण्याइतके) आंबट झाले, करकरू लागले की कैऱ्या घरी आणायचा हा क्रम थांबायचा. आश्चर्य म्हणजे झाडाखाली पडलेल्या, क्वचित फुटलेल्या आणि न धुता खाल्लेल्या त्या कैऱ्यांमुळे कधीच खोकला झाला नाही किंवा आम्ही आजारीही पडलो नाही. आमच्या गावात कलमी आंब्यांची हौस कमी, रायवळ आंबे मात्र भरपूर..

शायरी ...

चिनार ·
लेखनविषय:
१. तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे , के तुझे धून्डते धून्डते मैने खुदको खो दिया ! और जब खुदको धून्डने निकला, , तो हर जगह सिर्फ तेरा चेहरा नजर आया ! ! २. तेरी आखो में खोकर कई ख्वाब देख लीये मैने , तेरी सांसो में मिलकर एक जिंदगी जी ली मैने , अब ना तेरी आखे है , ना तेरी सांसे है, , ना कोई ख्वाब है ,, बस्स एक जिंदगी है…. जो पिछा नही छोडती ! ! ३.तेरा ना मिलना तनहाई से क्या कम था , के अब जीने से मै घबराऊ ? तनहा जिंदगी नरक से क्या कम थी , के अब मरने से मै घबराऊ ??

VoIP - म्हणजे काय रे भाऊ?

सोत्रि ·
डॉट कॉम बूमच्या काळात, साधारण 1999-2000 च्या सुमाराला, डायलपॅड.कॉम ह्या संकेतस्थळाची ओळख झाली होती. अमेरिकेतल्या कोणत्याही नंबरवर चकटफू फोन करण्याची सोय त्या संकेतस्थळाने करून दिली होती. बर्‍याच मित्रांना तेव्हा फुकटात फोन करून बघितले होते. पण त्यावेळी मला त्या फुकट सोयीपेक्षा त्या तंत्रज्ञानाने भुरळ पाडली होती. त्याच सुमाराला सत्यम कंप्युटर्स ह्या कंपनीने खोज.कॉम आणि समाचार.कॉम ही संकेतस्थळं कोट्यावधी रुपयांना खरेदी केली आणि ते ऐकल्यावर माझी झोपच उडाली. डायलपॅड.कॉम सारखे मुंबईला फोन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे एक संकेतस्थळ चालू करायचे डोक्यात आले.

नीलकांत Sun, 06/22/2014 - 21:15
व्हिओआयपीसंदर्भात अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला विशेष आवडले ते इन्टरनेट प्रोटोकॉल अतिशय सोप्याभाषेत उदाहरणासोबत समजावून दिले ते! यापुढे कुणी विचारल्यास हे उदाहरण देता येईल. धन्यवाद.

मदनबाण Sun, 06/22/2014 - 22:03
अत्यंत सुंदर सहज सोप लेखन ! :) वा... ही माहिती इतक्या उत्तमपणे आणि ती देखील इतक्या सुंदर भाषेत वाचायला मिळाली याचे प्रचंड समाधान मिळाले ! :) इथेच थांबु नका...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones "Misirlou" 1963

विकास Mon, 06/23/2014 - 04:34
लेख आणि त्यातून अत्यंत सुलभतेने सांगितलेला VOIP हा विषय आवडला. डायलपॅड.कॉम ची आज तुमच्यामुळे आठवण झाली! जाऊन पाहीले पण ते डोमेन विकायला आहे. :( गुगुल व्हॉईस ही अशिच काहीशी सेवा आहे. पण ती भारतातून उपलब्ध नाही... लालफितीच्या नियमांमुळे डिजीटल स्विचिंग खाजगीतत्वावर करण्याची परवानगी नाही मला वाटते केवळ अमेरीकेत या संदर्भात मोकळेपणा आहे. त्यामुळे आज देखील व्हिओआयपी वर चालणार्‍या फोनवरून तत्वतः केवळ अमेरीकेतच फुकट फोन करता येतो. मात्र सध्या अनेक व्हिओआयपी कंपन्या महीन्याच्या फी मधे अमेरीकेतून अनेक ठिकाणचे आंतर्राष्ट्रीय कॉल्स फुकट नाही पण बेमुदत (अनलिमिटेड) करायला देतात. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा म्हणजे कॉल्स प्रचंड स्वस्त झाले.

कंजूस Mon, 06/23/2014 - 07:07
फोनचा प्रसेसरपण चांगला असावा लागतो का ?या सेवेसाठी नेटवर्क प्रवायडर वेगळे पैसे घेतात का ?नोकिआच्या काही आशा फोनमध्येही ही सोय देतात तर ओएस किती सक्षम असावी लागते .खात्रीशिर चालणारे हैंडसेट कोणते ?

यसवायजी Mon, 06/23/2014 - 07:34
Tnx4info. Android apps like LINE, whatsapp etc have option to send voice msg. Facebook also has voice calling now. As they also use internet connection, can we call it VoIP?

In reply to by यसवायजी

फेसबुक किवा स्काईपवरुन केलेल्या कॉलला टेक्निकली VoIP म्हणता येणार नाही..VoIP मध्ये अनालॉग सिग्नलचे डिजिटल मध्ये कन्वर्जन करणारे माध्यम (जसे कि वर सोत्रिंनी सांगितल्याप्रमाणे अ‍ॅनालॉग टेलिफोन अ‍ॅडाप्टर किंवा आयपी फोन) लागते आणि मग तो डिजिटल सिग्नल इंटर्नेटवर स्वार होउन एका ठीकाणाहुन दुसरीकडे जातो आणि पुन्हा तिकडे मूळ अ‍ॅनालॉग स्वरुपात कन्वर्ट होतो. शिवाय कोण्त्याही एका टोकाला जर नॉर्मल अ‍ॅनालॉग टेलिफोन असेल (जसे कि VoIP ते सेलफोनवर केलेला कॉल) तरी चालु शकते. वॉनेज किवा व्हायबर हि VoIP ची उदाहरणे आहेत.

प्रदीप Mon, 06/23/2014 - 07:37
VoIP मधे एकदा चालू केलेले सेशन अजिबात बंद न करता (permamently) सुरू ठेवता येते का? (SIP चा वापर आहे, असे समजूया).

फोटोग्राफर243 Mon, 06/23/2014 - 12:32
पण VoIP हे इंटरनेटवर अवलंबून असल्याने त्याचा प्रभावीपणा हा इंटरनेट बॅन्डविड्थवर अवलंबून असतो. ब्रॉडबँड सुविधा जर नसेल तर VoIP वापरून केलेले संभाषण 1940-50 च्या दशकातील सिनेमांच्या डायलॉग डिलिव्हरीसारखे एकदम संथ असू शकेल. तसेच इंटरनेट वापरासाठी लागणारा विद्युतपुरवठा जर व्यवस्थित नसेल तर हे तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकते. ----> खरे आहे, पण आज काल च्या मोडेम ला क्वालिटी ऑफ सर्विस हे प्राइयारिटी ची काळजी घेते.. जेणे करून फोन कॉल्स ला हाइ प्राइयारिटी मिळते

म्हैस Mon, 06/23/2014 - 13:10
लय भारी . मी पा वर सध्या प्रवासवर्णन , technical गोष्टींची माहिती , गंभीर आणि चिल्लर प्रश्न असे इंटरेस्टिंग लेख येवू लागलेत .

नीलकांत Sun, 06/22/2014 - 21:15
व्हिओआयपीसंदर्भात अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला विशेष आवडले ते इन्टरनेट प्रोटोकॉल अतिशय सोप्याभाषेत उदाहरणासोबत समजावून दिले ते! यापुढे कुणी विचारल्यास हे उदाहरण देता येईल. धन्यवाद.

मदनबाण Sun, 06/22/2014 - 22:03
अत्यंत सुंदर सहज सोप लेखन ! :) वा... ही माहिती इतक्या उत्तमपणे आणि ती देखील इतक्या सुंदर भाषेत वाचायला मिळाली याचे प्रचंड समाधान मिळाले ! :) इथेच थांबु नका...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones "Misirlou" 1963

विकास Mon, 06/23/2014 - 04:34
लेख आणि त्यातून अत्यंत सुलभतेने सांगितलेला VOIP हा विषय आवडला. डायलपॅड.कॉम ची आज तुमच्यामुळे आठवण झाली! जाऊन पाहीले पण ते डोमेन विकायला आहे. :( गुगुल व्हॉईस ही अशिच काहीशी सेवा आहे. पण ती भारतातून उपलब्ध नाही... लालफितीच्या नियमांमुळे डिजीटल स्विचिंग खाजगीतत्वावर करण्याची परवानगी नाही मला वाटते केवळ अमेरीकेत या संदर्भात मोकळेपणा आहे. त्यामुळे आज देखील व्हिओआयपी वर चालणार्‍या फोनवरून तत्वतः केवळ अमेरीकेतच फुकट फोन करता येतो. मात्र सध्या अनेक व्हिओआयपी कंपन्या महीन्याच्या फी मधे अमेरीकेतून अनेक ठिकाणचे आंतर्राष्ट्रीय कॉल्स फुकट नाही पण बेमुदत (अनलिमिटेड) करायला देतात. या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा म्हणजे कॉल्स प्रचंड स्वस्त झाले.

कंजूस Mon, 06/23/2014 - 07:07
फोनचा प्रसेसरपण चांगला असावा लागतो का ?या सेवेसाठी नेटवर्क प्रवायडर वेगळे पैसे घेतात का ?नोकिआच्या काही आशा फोनमध्येही ही सोय देतात तर ओएस किती सक्षम असावी लागते .खात्रीशिर चालणारे हैंडसेट कोणते ?

यसवायजी Mon, 06/23/2014 - 07:34
Tnx4info. Android apps like LINE, whatsapp etc have option to send voice msg. Facebook also has voice calling now. As they also use internet connection, can we call it VoIP?

In reply to by यसवायजी

फेसबुक किवा स्काईपवरुन केलेल्या कॉलला टेक्निकली VoIP म्हणता येणार नाही..VoIP मध्ये अनालॉग सिग्नलचे डिजिटल मध्ये कन्वर्जन करणारे माध्यम (जसे कि वर सोत्रिंनी सांगितल्याप्रमाणे अ‍ॅनालॉग टेलिफोन अ‍ॅडाप्टर किंवा आयपी फोन) लागते आणि मग तो डिजिटल सिग्नल इंटर्नेटवर स्वार होउन एका ठीकाणाहुन दुसरीकडे जातो आणि पुन्हा तिकडे मूळ अ‍ॅनालॉग स्वरुपात कन्वर्ट होतो. शिवाय कोण्त्याही एका टोकाला जर नॉर्मल अ‍ॅनालॉग टेलिफोन असेल (जसे कि VoIP ते सेलफोनवर केलेला कॉल) तरी चालु शकते. वॉनेज किवा व्हायबर हि VoIP ची उदाहरणे आहेत.

प्रदीप Mon, 06/23/2014 - 07:37
VoIP मधे एकदा चालू केलेले सेशन अजिबात बंद न करता (permamently) सुरू ठेवता येते का? (SIP चा वापर आहे, असे समजूया).

फोटोग्राफर243 Mon, 06/23/2014 - 12:32
पण VoIP हे इंटरनेटवर अवलंबून असल्याने त्याचा प्रभावीपणा हा इंटरनेट बॅन्डविड्थवर अवलंबून असतो. ब्रॉडबँड सुविधा जर नसेल तर VoIP वापरून केलेले संभाषण 1940-50 च्या दशकातील सिनेमांच्या डायलॉग डिलिव्हरीसारखे एकदम संथ असू शकेल. तसेच इंटरनेट वापरासाठी लागणारा विद्युतपुरवठा जर व्यवस्थित नसेल तर हे तंत्रज्ञान कुचकामी ठरू शकते. ----> खरे आहे, पण आज काल च्या मोडेम ला क्वालिटी ऑफ सर्विस हे प्राइयारिटी ची काळजी घेते.. जेणे करून फोन कॉल्स ला हाइ प्राइयारिटी मिळते

म्हैस Mon, 06/23/2014 - 13:10
लय भारी . मी पा वर सध्या प्रवासवर्णन , technical गोष्टींची माहिती , गंभीर आणि चिल्लर प्रश्न असे इंटरेस्टिंग लेख येवू लागलेत .

शतशब्द कथा -विषकन्या

विवेकपटाईत ·

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा Mon, 06/23/2014 - 16:12
नक्की काय विचारायचे आहे..."काय टेकवुन" की "कशाला टेकुन" रच्याकने...हा लेख "थोडा है थोडे की जरुरत है" टाइप झालाय...मसाला कमी पडला

योगी९०० Mon, 06/23/2014 - 12:32
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ याऐवजी आईग! त्याने डोळे मिटले. क्षणभरा करता वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. त्याचे लक्ष तिच्या पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ विषकन्या’ हे कसे वाटते???

तिमा Sat, 06/28/2014 - 09:56
मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. पुस्तक वाचायला आहे की नाही ते माहित नाही.

In reply to by तिमा

प्रभाकर पेठकर Sat, 06/28/2014 - 12:26
>>>>मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. महामार्गावर (हायवे वर) नाहीये, द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे वर) आहे. तिथेही खंडाळापरिसरात नाहीए.

योगविवेक गुरुवार, 07/03/2014 - 16:51
विवेक नमस्कार, कविता आवडली. एक धागा मी सोडलाय. त्यातील कथनाप्रमाणे कवित्व करून सादर करावे ही विनंती.

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा Mon, 06/23/2014 - 16:12
नक्की काय विचारायचे आहे..."काय टेकवुन" की "कशाला टेकुन" रच्याकने...हा लेख "थोडा है थोडे की जरुरत है" टाइप झालाय...मसाला कमी पडला

योगी९०० Mon, 06/23/2014 - 12:32
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ याऐवजी आईग! त्याने डोळे मिटले. क्षणभरा करता वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे. त्याचे लक्ष तिच्या पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘ विषकन्या’ हे कसे वाटते???

तिमा Sat, 06/28/2014 - 09:56
मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. पुस्तक वाचायला आहे की नाही ते माहित नाही.

In reply to by तिमा

प्रभाकर पेठकर Sat, 06/28/2014 - 12:26
>>>>मुंबई-पुणे महामार्गावर टु व्हीलरला बंदी आहे आणि गाडी उभी करायलाही बंदी आहे. महामार्गावर (हायवे वर) नाहीये, द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे वर) आहे. तिथेही खंडाळापरिसरात नाहीए.

योगविवेक गुरुवार, 07/03/2014 - 16:51
विवेक नमस्कार, कविता आवडली. एक धागा मी सोडलाय. त्यातील कथनाप्रमाणे कवित्व करून सादर करावे ही विनंती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती. च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले. च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला. किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर. आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे.

ड्रेस्डेन - प्राग - १

मधुरा देशपांडे ·

एस Sun, 06/22/2014 - 15:41
सगळं मिपा भटकायला निघालंय की काय! :-) चला आमची मजा आहे. अजून एक मेजवानी सुरू. बाकी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतीम हो. पुभाप्र.

इशा१२३ Sun, 06/22/2014 - 15:50
मस्त फोटो आणि वर्णन मधुरा.पिवळी शेत अप्रतिम दिसतात.ती रेपसीडची फुल आहेत हे आत्ता समजले.एप्रीलमधे केलेल्या युरोपट्रिपच्या वेळेस सगळीकडे अशी शेत पसरलेली पाहिली होती.टुमदार खेडिही तशीच.कितीही फोटो काढले तरी समाधान होइना.नाव मात्र आत्ता समजले.धन्यवाद.

यशोधरा Sun, 06/22/2014 - 15:58
हिरव्या शेतीमध्ये उभी असलेली पिवळी फुले पाहून मला पंजाबमधली सरसोंची पिवळ्या फुलांची शेती आठवली. तेही अशीच सुरेख दिसतात. हिरव्याकंच शालूवर सोनेरी बुट्टी पसरलेली पाहताना कसं सुरेख वाटेल, तसं! :) मस्त लेख आणि फोटो. मिपावर पर्यटन महोत्सव सुरु झालाय, असं दिसतं आहे!

अजया Sun, 06/22/2014 - 21:38
मस्तच गं मधुरा! तुझ्या ब्लॉगवर वाचलं होतंच.फोटोही सुरेख आहेत.

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 11:26
सुरूवातीचे प्रकटन ही छान व फोटोही. एकच नम्र विनंति सर्वानाच . अडोब फोटोशॉप मधे किंवा इतर फ्री लायसन्स पिक एडीटर मधे इमेज- अ‍ॅडजस्टमेंट- आटो लेव्हल या मार्गाने जाऊन फोटो एडीट केल्यास सावलीतील तपशील जास्त नीटपणे दिसू लागतात. बरोक स्टाईलच्या युरोपियन इमारतीत असे तपशील फार प्रमाणात असतात व ते पहांण्यासारखे ही असतात. आपल्याकडील बेलूर हळेबिडू ई ठिकाण्च्या कोरीव कामाचे फोटो काढतानाही एकतर एच डी आर मोडमधे फोटो काढावेत वा वर दिलेला मार्ग अनुसरावा. आपला फोटो एडीट करू नये असा आग्रह नसावा. युरोपातील देखणे वास्तूशास्त्र व कमालीचे भव्य चौक हे पहायला मिळत असल्याबद्ल आपला हेवा करावा तेवढा थोडाच !

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 13:02
स्वॅप्स, इशा१२३, यशो, कंफ्युज्ड अकौंटंट, रेवती, अनन्या, प्रशांत आवले, अजया, मृत्युन्जय, चौकटराजा, आतिवास, दिपक.कुवेत, राजेंद्र मेहेंदळे, सखी, स्वाती ताई सगळ्यांचे मनापासून आभार.

एस Sun, 06/22/2014 - 15:41
सगळं मिपा भटकायला निघालंय की काय! :-) चला आमची मजा आहे. अजून एक मेजवानी सुरू. बाकी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतीम हो. पुभाप्र.

इशा१२३ Sun, 06/22/2014 - 15:50
मस्त फोटो आणि वर्णन मधुरा.पिवळी शेत अप्रतिम दिसतात.ती रेपसीडची फुल आहेत हे आत्ता समजले.एप्रीलमधे केलेल्या युरोपट्रिपच्या वेळेस सगळीकडे अशी शेत पसरलेली पाहिली होती.टुमदार खेडिही तशीच.कितीही फोटो काढले तरी समाधान होइना.नाव मात्र आत्ता समजले.धन्यवाद.

यशोधरा Sun, 06/22/2014 - 15:58
हिरव्या शेतीमध्ये उभी असलेली पिवळी फुले पाहून मला पंजाबमधली सरसोंची पिवळ्या फुलांची शेती आठवली. तेही अशीच सुरेख दिसतात. हिरव्याकंच शालूवर सोनेरी बुट्टी पसरलेली पाहताना कसं सुरेख वाटेल, तसं! :) मस्त लेख आणि फोटो. मिपावर पर्यटन महोत्सव सुरु झालाय, असं दिसतं आहे!

अजया Sun, 06/22/2014 - 21:38
मस्तच गं मधुरा! तुझ्या ब्लॉगवर वाचलं होतंच.फोटोही सुरेख आहेत.

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 11:26
सुरूवातीचे प्रकटन ही छान व फोटोही. एकच नम्र विनंति सर्वानाच . अडोब फोटोशॉप मधे किंवा इतर फ्री लायसन्स पिक एडीटर मधे इमेज- अ‍ॅडजस्टमेंट- आटो लेव्हल या मार्गाने जाऊन फोटो एडीट केल्यास सावलीतील तपशील जास्त नीटपणे दिसू लागतात. बरोक स्टाईलच्या युरोपियन इमारतीत असे तपशील फार प्रमाणात असतात व ते पहांण्यासारखे ही असतात. आपल्याकडील बेलूर हळेबिडू ई ठिकाण्च्या कोरीव कामाचे फोटो काढतानाही एकतर एच डी आर मोडमधे फोटो काढावेत वा वर दिलेला मार्ग अनुसरावा. आपला फोटो एडीट करू नये असा आग्रह नसावा. युरोपातील देखणे वास्तूशास्त्र व कमालीचे भव्य चौक हे पहायला मिळत असल्याबद्ल आपला हेवा करावा तेवढा थोडाच !

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 13:02
स्वॅप्स, इशा१२३, यशो, कंफ्युज्ड अकौंटंट, रेवती, अनन्या, प्रशांत आवले, अजया, मृत्युन्जय, चौकटराजा, आतिवास, दिपक.कुवेत, राजेंद्र मेहेंदळे, सखी, स्वाती ताई सगळ्यांचे मनापासून आभार.
एखाद्या शहराला भेट द्यायची असं खूप डोक्यात असतं पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने जमत नाही. मग पुन्हा एप्रिल-मे महिन्यात लागून चार दिवस सुट्ट्या आहेत म्हणजे कुठेतरी जाऊ शकतो असा विचार मनात येतो. मग दोघांनाही दोन वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं. हवामानाचे अंदाज घेत, हातातला वेळ आणि खर्च, आपल्याला काय बघायचं यावर चर्चा होतात. उन्हाळा सुरु होतोय, तेव्हा यावेळी शांत, रम्य अशा ठिकाणी जाऊया असे ठरते. पण नियोजन काहीच होत नाही. ऑफिस आणि इतर कामाच्या गडबडीत हे मागे पडते आणि म्हणता म्हणता सुट्ट्यांना अगदी एक आठवडा राहतो. आता आधी ठरवले होते त्या ठिकाणाची तिकिटे अशक्यप्राय महाग झालेली असतात.

मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

इन्दुसुता Mon, 06/23/2014 - 08:53
"शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही! शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?" खरे आहे. अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती !! अवांतरः यातला नागपुरी तडका कळाला नाही.

In reply to by इन्दुसुता

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 18:01
काव्यलेखन करतांना मी कविता, गझल, अंगाईगीत, बालगीत, तुंबडीगीत, लावणी या खेरीज “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार हाताळला आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणी भाषेचा लहजा, वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. आणि या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणार्‍या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या सर्व पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विस्तृत उत्तराबद्दल आभार. नागपुरी तडका काही विशिष्ठ शब्दांबाबत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत. सर्वाना कळेल असे काव्य लिहीले त्याचा परिणाम झटकन होतो. मागे एका कवितेत एकच नागपुरी शब्द मला अडला होता. परंतु त्या शब्दाने अर्थ पोचवण्यात कोणतीही कमी पडली नव्हती. कदाचित तडका टाकताना घेतलेल्या या दक्षतेमुळेच हे होऊ शकले. मुटेसाहेब, तुमच्या प्रत्येक कवितेवर प्रतिक्रिया टाकत नसलो तरी तुमची हरेक कविता मी वाचतो आणि ती आतवर पोचते हे नमुद करतो.

प्रभाकर पेठकर Mon, 06/23/2014 - 10:50
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहेच (कितीजणांपर्यंत पोहोचली हा अभ्यासाचा विषय आहे.) परंतु, पारंपारीक शेती व्यतिरिक्त, जी निसर्गावर अवलंबून आहे, दूसरे व्यवसाय मार्गदर्शन सरकारने केले पाहिजे. शेतकर्‍यांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. नविन कांही शिकून, आत्मसात करून सद्य परिस्थितीवर मात करायचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जे शेतकरी असे प्रयत्न करणार नाहीत त्यांना कर्जे आणि नंतर कर्जमाफी देऊ नये. नदीजोड प्रकल्पाचे पुढे काय झाले समजण्यास मार्ग नाही. तो पूर्ण करावा त्याने जर पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर उत्तमच आहे. शिवाय शेतावरील पंपांना वीज मोफत नाही तर अर्ध्यादराने द्यावी. पवनचक्क्यांचे प्रकल्प सरकारने राबवावे. धान्य वितरणातील दलालांचा बिमोड करावा. शेतकर्‍यांनी सहकारी तत्वावर स्वतःच्या वितरण व्यवस्था उभाराव्यात (सरकारने सहाय्य करावे).

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार Mon, 06/23/2014 - 17:49
यावर्षी आभाळात ढगांचे दर्शन होते आहे पण पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसते. देवाचे चेले पाणी घेऊन आले....देवा देवा पाणी दे! आणि धोंड्या धोंड्या पाणी दे, साळ माळ पिकू दे म्हणत देवाला आण घालण्याचे कार्यक्रम गावोगावी नीत्या प्रमाणे चालू झाले आहेत . ऐन उन्हाळ्यातल्या गारपिटीमुळे शेतांचे नुकसान झाले पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तेवढा भेडसावला नसावा. पण परतीचा पाऊसही नाही झाला तर शहरातील लोक सुद्धा वर्षाभरात काँक्रीट काँक्रीट पाणी दे म्हणत फिरताना दिसतील. नदीजोडप्रकल्पाबाबत मराठी माणसाने विचार करू नये कारण लोक त्यांचे नेते आणि अभियंते कुणालाच काही पडलेले नाही. मुंबईकरता काही घोट पाण्याच्या तडजोडी पलिकडे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात बहुधा महाराष्ट्राचा समावेश नसावा. कृष्णा आणि गोदावरी खोर्‍यातील प्रत्येक थेंब वाचवून जिरवायला हवा, पण नेते मंडळी दुसर्‍याच गोष्टी नेण्यात मश्गुल आहेत का याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. गंगधर मुटेजी कविता लिखो म्हणण्या पलिकडे तुम्ही आम्ही फारसे काही करू शकू असे वाटते नाही.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 18:26
माहितगारजी, कोण जाणे, कदाचित या कविताच शेतकर्‍यांसाठी स्वातंत्र्याचा सूर्य घेऊन येईन. :) आणि हक्कासाठी लढायचे असेल तर प्रबोधन हे अत्यंत प्रभावशाली आयुध आहे, हे तुम्ही जाणताच.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 18:21
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे.
१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? २) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? माझी भूमिका टोकाची वाटत असली तरी वास्तवाला आणि सत्याला धरून आहे आणि सत्य नेहमीच कडवट असते असे म्हणतात. शिवाय शासनाची, शेती तज्ज्ञांची, अर्थशास्त्र्यांची आणि मुख्यत: बिगरशेती समाजाची शेती बद्दलची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्यानंतरची ६५ वर्षे कुचकामी ठरत आली आहे; एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस शेतीची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीची आजवरची भूमिका अयोग्य आहे, हे तर आपोआपच सिद्ध व्हायला हवे. ते सिद्ध करण्याची गरजच पडू नये. . शासन, शेतीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र्यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे समाजमन एवढे नासले आहे आणि आजही आपल्या शेतीविषयक भुमिकेचा आढावा घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आता शेतीविषयक जुजबी उपाययोजना करण्याच्या पलिकडे आजाराचे स्वरूप गेले आहे. आज ना उद्या, कधी ना कधी देशाच्या शेतीविषयक धोरणाला अरबीसमुद्रात बुडवून टाकावेच लागेल. . शेतीला जोडधंदे, शेतीला कर्जपुरवठा, शेतीला सिंचनाची सोय किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे हे समस्येचे समाधान नव्हेच. रोग एक आणि इलाज भलताच चाललाय.

In reply to by गंगाधर मुटे

हाडक्या Tue, 06/24/2014 - 20:41
३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये?
या मुद्द्यांशी पूर्ण सहमत. तरीही यात बरेच गुंतागुंतीचे अर्थकारण (व्यापारी, दलाल इत्यादि) आणि आनुशांगिक राजकारण आहे हे देखील ध्यानात घ्यायला हवे. तसेच शेतकरी या मूलभूत मुद्द्यासाठी (उस दर किंवा कापूस दर आंदोलने नव्हे) इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही (आणि येण्याची शक्यता पण खूप कमी) ही पण एक शोकांतिकाच तशी. असो. विषय खूप मोठा आहे तसा. या संदर्भातला हा बाजार समित्यांनी लादलेली महागाई हा संक्षीप्त लेख वाचनीय आहे.

In reply to by हाडक्या

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 22:47
इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही
आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकर्‍यांचा प्रभावशाली दबावगट निर्मान होऊ शकेल. दबावगट निर्माण करण्यासाठी आंदोलनाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही.

In reply to by गंगाधर मुटे

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 21:09
>>>>१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? इच्छा असेल तर मार्ग दिसेल. >>>>२) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते तज्ञांना विचारा मला विचारून काय फायदा? >>>>५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे), दलालांना त्यांची दलाली मिळावी, आणि बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. >>>६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगैरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 23:31
>>>> इच्छा असेल तर मार्ग दिसेल.>>>>> पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर अन्य व्यवसाय करायचा म्हटले तर चोरी किंवा दरोडा याखेरीज करण्यासारखा अन्य व्यवसाय दिसत नाही. शिवाय झोप न येण्याच्या गोळ्या कुठून मिळवायच्या आणि किती काळ खाणे शक्य आहे, याचाही विचार करावा लागेल. >>>> करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>> करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. >>>>> वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. >>>>> म्हणजे या देशातले किमान ५१ टक्के कर्मचारी जोडधंदा करतात म्हणायचे आणि त्यामुळे ते वेतनवाढ मागतही नाही. गेल्या अनेकवर्षापासून त्यांचे पगार स्थिर आहेत म्हणायचे. मला हे माहित नव्हते. अत्यंत महत्वाची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद. >>>> शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>> त्याचे उत्तर मी कसे देऊ? कारण न मागताच शेतकर्‍यांना बाष्कळ सल्ला तोही फुकटचा वाटण्यासाठी काही मंडळी एवढी उताविळ का असतात, याचे उत्तर तर मलाही माहित नाही. >>>> कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. मान्य. >>>> त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. अत्यंत अव्यवहार्य सल्ला. >>>> तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. >>> सफशेल चूक. शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. ज्या शासकिय धोरणांमुळे शहर आणि खेडी यातील दरी वाढत चालली आहे, त्या शासकीय धोरणाचा आणि धोरणकर्त्यांंचा राग असणे स्वाभाविक आहे. ही धोरणकर्ती मंडळी शहरी आहे म्हणून मी सर्वसामान्य शहरी जनतेचा विरोधी आहे, असा निष्कर्ष काढण्याचे प्रयोजन नाही. >>>> शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे) नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. >>>>> दलालांना त्यांची दलाली मिळावी, ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. >>>> बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. बिगरशेती जनता कशाचा भार उचलणार आहे आणि उचलायची गरजच काय? पण समजा उदा. शेतकर्‍याला एक किलो कांदा पिकवायला ३ रू खर्च येत असेल तर ग्राहकाने (येथे शेतीधारक/बिगरशेती हा शब्दच फालतू आहे.) एक किलो कांदा १ रुपयाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे केवळ गैरच नाही तर माणूसकीला/मानवतेला न शोभणारी आहे. >>>> दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील सफशेल चूक. हमी भाव ठरविण्याचे अधिकार दलाल काय व्यापार्‍यांकडेही नाही. >>>> आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. शेतकर्‍याला शेतमालाची रास्त किंमत मिळायला हवी हे नाकारल्याने व केवळ शेतीमाल स्वस्तात स्वस्त मिळवल्याने आम जनतेवरचा बोजा कमी होनार नाही. किंवा हा बोजा नगण्य आहे.

In reply to by गंगाधर मुटे

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 01:30
>>>>पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर... ३६५ दिवस पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतीची कामे चालतात ह्याची मला कल्पना नव्हती. महाराष्ट्रात तरी अनेक रिकामटेकड्या शेतकर्‍यांना मी पारावर गप्पा मारताना, स्थानिक राजकाणावर हिरीरीने भाष्य करताना, राजकारणात सक्रिय भाग घेताना पाहिलं आहे. माझे जे २-४ शेतकरी मित्र आहेत तेही शेतीचा विशिष्ट कालावधी सोडल्यास केंव्हाहि कुठेही येण्यास मोकळे असतात. ते असो. मी बिगर शेतकरी असल्याकारणाने माझी नजर दूषित असणारच. तुमचेच बरोबर आहे. >>>>करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. मग जोडधंदा कशाला मुख्य धंदा का करू नये? ह्या तुमच्या प्रश्नाला काय अर्थ उरतो? ते जर कांही शेतकरी करीत असतील 'हो, कांही शेतकरी करतातही शेतीव्यतिरिक्त कांही व्यवसाय.' इतकं साधं उत्तर का नाही देऊ शकत? असो. तुमची मर्जी. >>>> शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. असं नुसतं म्हणायचं. बिगर शेतकरी शहरी सदस्याने कांही उपाय सुचविले तर आगपाखड करणं हा तुमचा स्वभाव नुसत्या ह्या धाग्यावरच नाही तर अनेकदा ह्या आधीही अनुभवला आहे. >>>>नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. तरीपण खेडोपाडी शेतकर्‍यांचा जीवावर दारूचे अड्डे चालतात. शेतकरी मोटारसायकली विकत घेताना दिसतात. 'यष्टीम' विकत घेताना दिसतात, मुलांची लग्न धुमधडाक्यात करतात. पण कदाचित हे सर्व फुकटात होत असेल. किंवा मला खेडोपाडी फिरताना भास होत असतील. >>>>ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. तुमची मागणी अंतिम ग्राहकाने जास्त दमड्या मोजाव्यात अशी जाणवते. त्यामुळे दलालांना द्यावी लागणारी दलाली तुम्हाला खटकत नाही. गंगाधर मुटे साहेब, आपण शेतकर्‍यांची बाजू मांडता हे चांगलेच आहे. पण चर्चा करताना एखादा मुद्दा प्रतिवाद करणार्‍यास माहित नसेल तर तो नीट समजावून सांगता यायला पाहिजे. उगीचच, 'वेतनवाढ नाही मिळाली तर बाहेर सलून टाकण्याचा सल्ला देण्यासारखे' वगैरे वगैरे शब्दप्रयोग करून चर्चेचे वातावरण गढूळ करू नये. शेतकर्‍यांबद्दल आम्हाला नक्कीच कणव आहे. त्यापोटीच शेतकर्‍यांना 'नफा' मिळाला पाहिजे असा आग्रह मी माझ्या प्रतिसादात केला होता. पण तुमच्या नजरेला ते दिसत नाही. असो. >>>>अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे. १०० रू खर्च करून फक्त २५ रु मिळवायचे. म्हणजे वर्षोनुवर्षे दर क्विंटलला ७५ रुपये देशसेवेसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करणार्‍या शेतकर्‍याच्या औदार्यास माझा विनम्र नमस्कार. पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रामपुरी Wed, 06/25/2014 - 23:09
"पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे". हाच प्रश्न मला सुद्धा शेतकरी पुढार्‍यांची भाषणे ऐकल्यावर आजतागायत पडत आला आहे. पण या प्रश्नाचे सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो काका, राजकारणी लोकांचे काम हे फक्त प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा करून दाखविणे हे असते. प्रत्येक माणसाला वाटत असतंच आपल्यावर अन्याय होत आहे. "तुमच्यावर अन्याय होत आहे" एवढं फक्त म्ह्णायचा अवकाश.रिक्षावाले, शेतकरी, कामकरी वर्ग, इत्यादी इत्यादी सर्वांवर नेहेमीच अन्याय होत असतो. बाकी सगळ्यांचा फक्त ते शहरात राहतात हाच मोठा गुन्हा. पेट्रोल वाढले की रिक्षावाले संप करतात 'भाडी वाढवा'. जेव्हां एखाद्या गोष्टीची टंचाई असते तेव्हां शेतकरी त्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवतात (आठवा कांदा १००रू किलो, कोथिंबीर १०० रू जुडी). तेव्हां या सर्वांना नैतिकतेची जाणीव होत नाही. त्यावेळी यांचे नेते मूग गिळून बसलेले असतात. पण कांदा १०० रू किलो आहे म्हणून सगळे शेतकरी कांदाच पिकवितात आणि साध्या पुरवठा-मागणी तत्वानुसार भाव जेव्हां भाव कोसळतात तेव्हां "सरकार" ला शिव्या घालायला तयार. लगेच यांचे नेते बिळातून बाहेर येतात. सगळ्या पक्षांना यांची दखल घ्यावी लागते. असो.. बोलाल तेवढे कमी आहे. आम्ही तरी दुसरं काय करणार म्हणा बोलण्याशिवाय. आमच्यावर कविता लिहील्या जायला आम्ही काही शेतकरी नाही की दुसरी कुठली मतपेढी नाही. माझ्या मते तरी जेवढी "दाखवली" जाते तेवढी शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट नाही. काही शेतकर्‍याची परिस्थिती नक्कीच वाईट असेल पण त्याचे सरसकट जे भांडवल केले जाते ते फक्त राजकारणासाठीच. शेतकरी म्हटला की "गरीब, दिनवाणा, कायमच अन्यायग्रस्त" अशी जी प्रतिमा रंगविली जाते ती साफ चुकीची आहे.

In reply to by रामपुरी

गंगाधर मुटे Wed, 06/25/2014 - 23:49
शेतकर्‍याचा लढा उभारून भारत देशात आतापर्यंत तरी एकाही व्यक्तिला/राजकिय पक्षाला राजकारणात यश मिळवता आलेलं नाही. उलट शेतकर्‍यांची बाजू उचलून धरणारे राजकारणात मातीमोल झालेले आहे. त्यामुळे तुमची मांडणी अप्रस्तुत आणि गैर आहे. (उदाहरणादाखल राजू शेट्टीचे नाव घेऊ नये कारण....)

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी गुरुवार, 06/26/2014 - 02:53
पहिल्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळालं नाहीच. बाकीचे तर "औट ऑफ सिल्याबस" च असतील. तेही अपेक्षेप्रमाणेच. असो. नावं घेतली असती पण नावं घेतली की प्रतिसाद उडतात त्यामुळे इत्यलम. तुमची ब्याटिंग चालू राहू दे. आम्ही केव्हांच आऊट झालोय... महागाईने.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 23:38
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे. काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शतकर्‍याच्या केवळ २०-२२ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 23:44
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? >>>>>> सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.>>>>>> काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

कविता ठीक आहे ... प्रश्न वारंवार गिरवुन सुटणार नाहीत उलट ते जास्त गडद होतील , प्रश्नांच्या गुंत्यात अडकण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्यात हरवणे कधीही चांगले ! :) एक अवांतर शंका : भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा .... शेतकर्‍याची ही चिंता सुटेल आणि सर्वसामान्य माणसालाही भावी महागाईची कल्पना येईल अन तो त्याची तयारी करेल !! बेस्ट !!!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Wed, 06/25/2014 - 11:59
रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात. पण आपले शेतकरीही नंतर सोकावतात हे पाहिलेले आहे. कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे.

In reply to by आदिजोशी

रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात.
एफ डी आय इज अ डेंजरस थिंग ! जे वॉलमार्ट करणार ते आपल्याच लोकांनी का करु नये ? पण आपला श्जेतकरी / सरकार आपल्या माणसाला मोठ्ठा होउ देणार नाही ,, कारण आपल्या इथे माणुस नुसता माणुस असत नाही ... त्याच्या सोबत , जात असते , प्रांत असतो , भाषा असते ...आणि नफरत करायला काय कोणतेही कारण चालते :) तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Wed, 06/25/2014 - 13:29
तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! ह्याच दळभद्री विचारसरणीमुळे आपण मागे आहोत.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 14:25
माझंही हेच म्हणणं आहे. शेतकरी एव्हढा डबघाईला आला असेल (आणि क्विंटलमागे ७५ रुपये नुकसान सोसून येणार नाहीतर काय होणार?) तर शेतकर्‍यांनीच एकत्र येऊन सोसायटी, संघटना, वितरण संस्था वगैरे वगैरे कांही उपाय का करू नयेत? वर्षोनुवर्षे, पिढ्यानपिढ्या नुकसान सहन करीत कर्जाचे डोंगर उभे करायचे, जमिनी विकायच्या त्या ऐवजी २ वर्षे पिक न घेता सरकारवर दबाव का निर्माण केला जात नाही. बाकी माझे विचार हे बिगरशेती धारक शहरी सदस्याचे आहेत. ते चुकीचे असू शकतात पण चर्चा करायची म्हंटल्यावर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. चांगले मुद्दे मांडून आमच्याही ज्ञानात भर पडावी असे करावे. शेतकर्‍यांचे दुर्दैवी अनुभव आम्हाला कसे समजणार? जे दिसतं त्यावरून आमची मते बनतात. खरं चित्र विपरीत असेल तर तसे मांडता यायला पाहिजे. चर्चेतून शेतकर्‍यांच्या समस्येवर कांही उपाय सापडणार असेल तर चांगलेच आहे नं. नुसत्या कविता करून काय होणार? आजही आमच्या मनांत शेतकर्‍यांबद्दल कणव आहे पण हूडूसतुडूस करून आहे ते प्रेमही आटेल असे प्रयत्न का करायचे? >>>>कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे. >>>>तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! अशा प्रातिनिधिक प्रतिक्रियातून सर्वसामान्यांना येणारे 'वेगळे' अनुभव अधोरेखित होतात. तेच संपूर्ण चित्र आहे असे मी लगेच मानणार नाही पण शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍याने समस्या समजून न घेणार्‍यावर आगपाखड करण्याऐवजी 'अशा ही केसेस असू शकतात हे मान्य करणे' जरूरी आहे. शेतकरी म्हणजे बापुडवाणा आणि शहरी माणसं म्हणजे स्वस्तात धान्य मिळायला सोकावलेले आणि सरकारला शेतकर्‍याविरोधात नमविणारे हे चित्र उभे करणे योग्य नाही असे मला वाटते.

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 19:41
भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा.
या सर्व प्रकारात सरकार आडवे येते. शेतीसाठी सरकार हीच मोठी समस्या आहे.

समीरसूर Wed, 06/25/2014 - 14:46
कविता चटका लावून गेली. मला एक कळत नाही. मॉन्सूनच्या ३-४ महिन्यातल्या पावसावर भारतातली शेती, वीजनिर्मिती, उद्योग, इत्यादी सगळं अवलंबून आहे. या पावसाशिवाय भारताला पाण्याचा दुसरा असा मुबलक पर्याय नाही. एक-दोन वर्षे पाऊस नाही पडला तर भारतात भीषण परिस्थिती उद्भवू शकते. यावर्षी जून संपत आला तरीही पावसाचा थेंब पडलेला नाही. यंदा जर पाऊस आला नाही तर काय होणार कळत नाही. भारतात ६५ वर्षे राज्य करणार्‍या नालायक राज्यकर्त्यांनी पावसावरचे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी एकदाही थोडेही डोके चालवले नाही यातच आपली सुमार कुवत लक्षात येते. नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे. अर्थात, नेहरूंना लफडी करण्यातून सवड मिळत नव्हती आणि गांधी सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी नेहमीच आसुसलेले होते. बाकी लायक नेते सोयीस्करपणे बाहेर फेकले गेले. नंतरच्या ६०-६५ वर्षात देखील एकाही नेत्याने असे काही धाडसी प्रयत्न केले नाहीत. नाही म्हणायला नदीजोड प्रकल्प चर्चिला गेला परंतु तो अत्यंत खर्चिक आहे आणि बर्‍याच तज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याने नुकसानच जास्त होणार आहे. शेतकरी जगला तर जग जगेल हे साधे सत्य आज माणसांना कळेनासे झाले आहे. पावसाला शिव्या घालणारी माणसे पाहिली की मला त्यांच्या निर्घृण खून करावासा वाटतो. अरे ज्या पावसामुळे तुमच्या पोटात अन्न आणि पाणी पडते त्यालाच शिव्या घालता? कारण काय तर ट्रॅफिक जॅम होतो, कपडे खराब होतात, वगैरे वगैरे? अशा लोकांना समुद्रात बुडविले पाहिजे. शेतकरी हा राजासारखा असला पाहिजे. त्याचे बापुडवाणे चित्र मनाला छिद्रे पाडून जाते. शेतकरी राबतो म्हणून आपल्याला सुखाचे घास मिळतात. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. त्याला पगारी सुट्या मिळत नाहीत, ३जी मोबाईलवर फेसबुक उघडून कँण्डी क्रश खेळायला मिळत नाही, वर्षाची हमखास पगारवाढ मिळत नाही; जे पेरले ते उगवेलच याची शाश्वती मिळत नाही, छान छान घरात राजा-राणीसारखे सुखी जीवन व्यतीत करता येत नाही...त्याला मिळतात फक्त अपार कष्ट! आणि ते ही पावसाच्या सावकारीचा शाप असलेले. लोकांना शेतकर्‍याविषयी आदर वाटेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

हाडक्या Wed, 06/25/2014 - 16:19
(समीरसूर आपले लेख आणि प्रतिसाद वाचतो आणि तुमच्याकडून या प्रकारच्या टिकेची अपेक्षा नव्हती म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)
मला एक कळत नाही.
तसं बरंच काही कळत नाही असे म्हणाले पाहिजे.
नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे
यांच्या काय लक्षात आले आणि काय नाही याबद्दल आपल्याला माहित नसेल तर अभ्यास वाढवावा. उगीच शोकांतिका वगैरे म्हणू नये. मान्य आहे नेहरु, गांधी यांच्याकडून (राजकीय) चुका झाल्यात पण म्हणून त्यांनी केलेल्या राजकीय तसेच सामाजिक कामाचे पण आपल्याला श्रेय देता येत नसेल तर अवघड आहे. जल-संधारण आणि शेतीस पूरक धोरणे यांच्याबद्दल या लोकांचे विचार आणि कार्य तरी चाळावयाचे हे लिहिण्याआधी. उगीच 'लफडे' वगैरे वैयक्तिक हीणकस शेरेबाजी कशाला? (खरे खोटे बाजूलाच ठेवू) तिचा इथे काहीही बादरायण संबंध आहे का? बर्‍याच काही गोष्टी (ज्या आज नीट नेटक्या आहेत देशात) आपण इतक्या सहजपणे गृहित धरतो की यामागे ज्यांच्या हाती हे नवे कोरे राष्ट्र आले होते त्यांचा (सर्वांचाच) परिश्रमपूर्वक सहभाग असावा इतकी पण कृतज्ञता दाखवू शकू नये म्हणजे कमाल झाली. महायुद्धोत्तर स्वतंत्र झालेल्या देशांचा तौलनिक अभ्यास करावा ही विनंती. काही असले तरी उत्तम विचारांचे लोक आपल्या देशाच्या राजकारणात (नेहरु असो वा जयप्रकाश नारायण वा अजून कोणी) नेहमीच होते हे देशाचे सुदैव. असो.. (विषय भरकटायला नको म्हणून तुम्हास अजून चर्चा हवी असल्यास वेगळा धागा काढा, इथे आमच्याकडून इतकेच)

In reply to by हाडक्या

समीरसूर Wed, 06/25/2014 - 17:01
हाडक्यासाहेब, आपल्या मतांचा आदर आहेच. 'मला एक कळत नाही' हे मला ६५ वर्षात आपण पावसावरचे अवलंबित्व किती कमी करू शकलो आणि यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती होती या मुद्द्याला धरून होते. छोट्या छोट्या देशांनी (सिंगापूर, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्त्राईल, वगैरे) जबरदस्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून अक्षरशः वैराण भूमीला सुजलाम सुफलाम केले आहे. मान्य आहे ते देश आकाराने छोटे आहेत पण ती राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. अशी राजकीय इच्छाशक्ती मला आपल्याकडे कधी असल्याचे जाणवले नाही. बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या. मुंबईचा तानसा प्रकल्प इंग्रजांनी १०० वर्षांनंतरच्या मुंबईच्या जलविषयक गरजा कल्पून बांधला होता जो अजूनही मुंबईची तहान भागवतो. आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर अशी दूरदृष्टी दाखवल्याचे दिसत नाही. पुस्तकांमध्ये विचार-बिचार लिहून ठेवणे आणि प्रत्यक्ष कृती करून देशाला त्याचा घसघशीत फायदा मिळवून देणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या समस्या निराळ्या होत्या हे मान्य आहे परंतु त्याबरोबरच प्राथमिक गरजाही तितक्याच महत्वाच्या होत्या. किंबहुना प्राथमिक गरजा या नेहमीच सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. आपले राजकारण इतके प्रगल्भ असते तर आज अशी वाट लागली नसती. स्वातंत्र्यानंतरही ६५ वर्षांनी दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या आईला वीज नसल्याने ३ मजले चढून यावे लागते. वीज किती वेळ राहील याची शाश्वती नाही; पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही; खेड्यांमध्ये १८-१८ तास लोड-शेडिंग आहे. एवढंच कशाला, राजधानी दिल्लीत १८-१८ तास वीज नव्हती १०-१५ दिवस! माझ्या आणि अनेक छोट्या छोट्या गावात लोकांचा दिवसभरातला एक पंचमांशपेक्षा जास्त वेळ दूर कुठूनतरी पाण्याची ओझी वाहण्यात जातो. उन्हातान्हात मी ३० वर्षांपूर्वी पाणी काढलेले आहे आणि आज ३० वर्षांनंतरही त्याहीपेक्षा भयंकर हाल आहेत. हे हाल आहेत २०१४ चे, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले १९४७ मध्ये! आज सगळ्या देशावर पाण्याचे संकट आहे. पाऊसच पडला नाही तर काय करणार आहोत आपण याचे उत्तर आपल्या राज्यकर्त्यांनी शोधून ठेवण्याइतपत कुवत यांच्यात होती असे मलाच काय लक्षावधी-कोट्यवधी लोकांना वाटत नाही. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी आपली पद्धत आहे. सगळं रामभरोसे! त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी चांगली कामे केली असतील; नाही असे नाही. पण एवढ्याच कालावधीमध्ये कित्येक देश आपल्या हजारपट पुढे निघून गेले याची कारणे आपण शोधली पाहिजेत. बाकी नेहरूंविषयी माझे (आणि इतरही बर्‍याच जणांचे) मत तितकेसे बरे नाही. कमला नेहरूंचे जगण्याचे हाल वाचूनच नेहरूंविषयी माझ्या मनात तिटकारा उत्पन्न झाला आहे. त्यांच्या इतर निरर्थक गोष्टींचाच (पॅरीसला कपडे धुवायला जात असत, लेडी माऊंट्बॅटन, लाल गुलाब, मुलांमध्ये प्रिय होते वगैरे छबी; छबी निर्माण करणे गांधींइतके आणि नेहरूंइतके कुणालाच जमले नाही; त्या काळात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ब्रँड केला होता यांनी)जास्त बोलबाला झाला. असो. आपल्यात भांडण कशाला? मतभिन्नतेमुळे मिपाकरांमध्ये कटूता यायला नको. नेहरू, गांधी जसे असतील तसे असतील. त्यावरून मिपाकरांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याचे कारण नाही. :-) व्यक्तीपूजा घातक ती ही अशी. ;-) त्यामुळे जाऊ द्या. नेहरू गांधी काही क्षेत्रात निर्विवाद महान होते यात शंकाच नाही. भांडण नको. मतभिन्नतेमुळे तर नकोच नको. :-) आपल्या इथल्या मतप्रदर्शनामुळे काही फरक पडत नाही मग कशाला उगीच शस्त्रे परजायची? मिल के रहेंगे तो ऐश करेंगे...काय?

In reply to by समीरसूर

हाडक्या Wed, 06/25/2014 - 19:54
हा हा हा .. भांडण कुठले हो राव. :) सामान्यत: तुमच्या मतांचा आदर वाटतो म्हणून आवर्जून असहमती नोंदवली. नेहरु, गांधी आणि इतर महत्त्वाचे भारतीय राजकारणी यांच्याबद्दल अभिनिवेशरहित भावनात्मक शेरेबाजी टाळून क्वचितच पाहिले जाते. मग बाजू घेतली तरी व्यक्ती-पूजेचे बालंट वापरून मुद्दा अदखलपात्र केला जातो ते वेगळेच. इथे बरेच मुद्दे तुम्ही मोघम वापरले आहेत, जसे की
बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या.
अशा मोघम अवतरणांचा पुरावा म्हणून उपयोग नाही. हे मान्य की इन्ग्रजांनी बरीच कामे केली. जशी त्यांनी त्यांच्या देशात केली तशीच त्यांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथे जगभर केली. परत त्यांच्या स्वतःच्या देशात अजून करत आहेत. अजून पुढच्या ५० ते १०० वर्षांच्या धोरणाने करत आहेत. having said that, असे नाही म्हणता की नेहरु गांधीमुळे आपल्या इथे कामे झाली नाहीत. फक्त उदाहरणार्थ आपन भाक्रा-नांगल प्रकल्प घेऊयात. त्याचबरोबर आंतर्देशीय, आंतरराज्यीय पाणीवाटप, जल संधारण नियोजन आणि भविष्यकालीन योजनांसाठी पुरेशा तरतूदी इत्यादि अशा बर्‍याच दूरदर्शी मार्गांनी पहिल्या पिढीच्या राजकारण्यांनी (एकटे नेहरु नव्हे) पायाभरणाचे काम केले. जेवढे विचार मांडले त्यातल्या बर्‍याचशा विचारांशी प्रामाणिक राहून बरेचशे काम देखील केले. पण आता नंतरची पिढी 'धरणात मुतू का?' म्हणणारी निपजणार असेल तर त्याचा दोषदेखील नेहरु पिढीला द्यायचा हे काही खरे नाही. इतर देशात बरीचशी प्रगती ही व्यक्तीनिरपेक्ष सुव्यवस्थेच्या निर्मितीमुळे झाली, वाढली आणि आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेची वाट लावण्यामुळे वाताहत झाली इतके लक्षात घेतले तरी पुरे.
जास्त बोलबाला झाला
हे त्यांच्यापेक्षा असे करण्यात ज्यांचा फायदा (टिका करणारे आणि स्तोम माजवणारे अशा दोन्ही बाजूनी) होता त्यांनी जास्त केले असे म्हणावे वाटते.
सगळं रामभरोसे!
बाकी याच्याशी सहमत. कधी कधी पुढे काय होणार आणि कसे होणार असे वाटत राहते. आम्ही दुष्काळी भागातील असल्याने दूसर्‍या गावातूनदेखील पाण्यासाठी हिंडण्याचा अनुभव घेतलाय. पण आता पाहिल्यावर कळतंय की गावातल्या एका गटाला श्रेय मिळू नये म्हणून दूसर्‍या गटाने अडवणूक करून पाईप-लाईन येऊ दिली नव्हती कित्येक वर्षे आणि पङ सत्ताबदल झाल्यावर पहिल्या गटाने देखील तेच करणे चालू ठेवले. परिणामी अख्खा गाव पाणी पाणी करत हिंडत होता. मग जिथे अगदी गाव-पातळीपासून लोकच इतके उदासीन (की मूर्ख की आणखी काही म्हणावे) तर त्या गांधी नेहरु ला काय ऊठ-सूट दोषी धरायचे ? इतकेच.

समीरसूर Wed, 06/25/2014 - 14:54
परवा कुठल्यातरी भिकार मराठी अवार्ड शोमध्ये (जुना की नवीन आठवत नाही) तो भयानक पकाऊ स्वप्नील जोशी सूत्रसंचालन करत होता. एक पात्र येऊन त्याला शेतकरी म्हणते. स्वप्नील जोशी स्वतःला न शोभणार्‍या रुबाबदार कपड्यांकडे बघून त्या पात्राला विचारतो, "मी शेतकरी वाटतो तुला?" त्याचा स्वर असा होता की कुठे गलिच्छ शेतकरी आणि कुठे मी रुबाबदार नट! जणू शेतकरी ही शिवीच आहे! हा फोपशा स्वप्नील जोशी शेतात पिकवलेलंच अन्न खातो ना? की मंगळावरचे अन्न मागवले जाते याच्यासाठी? हा नकळत भिनलेला भेद विसरला गेला पाहिजे. साला भारतात लोकं एकमेकांचा आदर करतच नाहीत. संशय, अनादर, मग्रुरी, दुसर्‍याला कःपदार्थ समजणे म्हणजे भारतीय संस्कृती!!!

हुप्प्या गुरुवार, 06/26/2014 - 05:01
शेतकरी लोकांचे दु:ख अनेक ठिकाणी पहायला, ऐकायला, वाचायला मिळते. पण मी असे ऐकून आहे की भारतात कुणीही उठून शेतजमीन विकत घेऊन तिथे शेती करू शकत नाही. जर आज शेती करणारे शेतकरी अमाप, अलोट दु:खाने ग्रस्त असतील तर नव्या लोकांना, कुठलीही शेतकरी पार्श्वभूमी नसणार्‍यांना शेत कसायला परवानगी का दिली जात नाही? हे क्षेत्र इतके बंदिस्त का ठेवले आहे? कदाचित एखादा आयटी वा अन्य क्षेत्रातला पैसे कमावलेला माणूस काहीतरी वेगळे करुन दाखवेल. शेती इतके गांजलेले क्षेत्र असताना ते अट्टाहासाने कृषी वारसा असणार्‍याच्याच ताब्यात ठेवण्याचा भारत सरकारचा दुराग्रह अनाकलनीय आहे.

In reply to by हुप्प्या

आदिजोशी Wed, 07/16/2014 - 20:11
शेतजमीनी विकत घेऊन तिथे शेती सोडून बाकीचे सतरा धंदे केल्याने शेतजमीन कमी होत जाईल आणि अन्न तुटवडा निर्माण होईल म्हणून हा नियम आहे असे मध्यंतरी वाचनात आले होते. परंतू, हे असे होऊ नये ह्याची काळजी घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यास उत्सुक लोकांना परवानगी द्यावी ह्या मुद्द्याशी सहमत आहे.

इन्दुसुता Mon, 06/23/2014 - 08:53
"शेतीमधल्या दुर्दशेचे कुत्रे हाल खात नाही! शेतीमधली गरिबी मेल्याशिवाय जात नाही?" खरे आहे. अस्वस्थ करणारी वस्तुस्थिती !! अवांतरः यातला नागपुरी तडका कळाला नाही.

In reply to by इन्दुसुता

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 18:01
काव्यलेखन करतांना मी कविता, गझल, अंगाईगीत, बालगीत, तुंबडीगीत, लावणी या खेरीज “नागपुरी तडका” हा एक नवीन काव्यप्रकार हाताळला आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणी भाषेचा लहजा, वर्‍हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. आणि या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणार्‍या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या सर्व पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.

In reply to by गंगाधर मुटे

विस्तृत उत्तराबद्दल आभार. नागपुरी तडका काही विशिष्ठ शब्दांबाबत मर्यादित ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत. सर्वाना कळेल असे काव्य लिहीले त्याचा परिणाम झटकन होतो. मागे एका कवितेत एकच नागपुरी शब्द मला अडला होता. परंतु त्या शब्दाने अर्थ पोचवण्यात कोणतीही कमी पडली नव्हती. कदाचित तडका टाकताना घेतलेल्या या दक्षतेमुळेच हे होऊ शकले. मुटेसाहेब, तुमच्या प्रत्येक कवितेवर प्रतिक्रिया टाकत नसलो तरी तुमची हरेक कविता मी वाचतो आणि ती आतवर पोचते हे नमुद करतो.

प्रभाकर पेठकर Mon, 06/23/2014 - 10:50
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहेच (कितीजणांपर्यंत पोहोचली हा अभ्यासाचा विषय आहे.) परंतु, पारंपारीक शेती व्यतिरिक्त, जी निसर्गावर अवलंबून आहे, दूसरे व्यवसाय मार्गदर्शन सरकारने केले पाहिजे. शेतकर्‍यांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे. नविन कांही शिकून, आत्मसात करून सद्य परिस्थितीवर मात करायचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. जे शेतकरी असे प्रयत्न करणार नाहीत त्यांना कर्जे आणि नंतर कर्जमाफी देऊ नये. नदीजोड प्रकल्पाचे पुढे काय झाले समजण्यास मार्ग नाही. तो पूर्ण करावा त्याने जर पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर उत्तमच आहे. शिवाय शेतावरील पंपांना वीज मोफत नाही तर अर्ध्यादराने द्यावी. पवनचक्क्यांचे प्रकल्प सरकारने राबवावे. धान्य वितरणातील दलालांचा बिमोड करावा. शेतकर्‍यांनी सहकारी तत्वावर स्वतःच्या वितरण व्यवस्था उभाराव्यात (सरकारने सहाय्य करावे).

In reply to by प्रभाकर पेठकर

माहितगार Mon, 06/23/2014 - 17:49
यावर्षी आभाळात ढगांचे दर्शन होते आहे पण पावसाने हुलकावणी दिल्याचे दिसते. देवाचे चेले पाणी घेऊन आले....देवा देवा पाणी दे! आणि धोंड्या धोंड्या पाणी दे, साळ माळ पिकू दे म्हणत देवाला आण घालण्याचे कार्यक्रम गावोगावी नीत्या प्रमाणे चालू झाले आहेत . ऐन उन्हाळ्यातल्या गारपिटीमुळे शेतांचे नुकसान झाले पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तेवढा भेडसावला नसावा. पण परतीचा पाऊसही नाही झाला तर शहरातील लोक सुद्धा वर्षाभरात काँक्रीट काँक्रीट पाणी दे म्हणत फिरताना दिसतील. नदीजोडप्रकल्पाबाबत मराठी माणसाने विचार करू नये कारण लोक त्यांचे नेते आणि अभियंते कुणालाच काही पडलेले नाही. मुंबईकरता काही घोट पाण्याच्या तडजोडी पलिकडे राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात बहुधा महाराष्ट्राचा समावेश नसावा. कृष्णा आणि गोदावरी खोर्‍यातील प्रत्येक थेंब वाचवून जिरवायला हवा, पण नेते मंडळी दुसर्‍याच गोष्टी नेण्यात मश्गुल आहेत का याची शंका यावी अशी परिस्थिती आहे. गंगधर मुटेजी कविता लिखो म्हणण्या पलिकडे तुम्ही आम्ही फारसे काही करू शकू असे वाटते नाही.

In reply to by माहितगार

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 18:26
माहितगारजी, कोण जाणे, कदाचित या कविताच शेतकर्‍यांसाठी स्वातंत्र्याचा सूर्य घेऊन येईन. :) आणि हक्कासाठी लढायचे असेल तर प्रबोधन हे अत्यंत प्रभावशाली आयुध आहे, हे तुम्ही जाणताच.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 18:21
बळीराजाला शेतीच्या बरोबरीने किंवा पूर्णतया वेगळे व्यवसाय शिकविण्याची गरज आहे.
१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? २) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? ३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? माझी भूमिका टोकाची वाटत असली तरी वास्तवाला आणि सत्याला धरून आहे आणि सत्य नेहमीच कडवट असते असे म्हणतात. शिवाय शासनाची, शेती तज्ज्ञांची, अर्थशास्त्र्यांची आणि मुख्यत: बिगरशेती समाजाची शेती बद्दलची जी भूमिका आहे ती स्वातंत्र्यानंतरची ६५ वर्षे कुचकामी ठरत आली आहे; एवढेच नव्हे तर दिवसेंदिवस शेतीची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीची आजवरची भूमिका अयोग्य आहे, हे तर आपोआपच सिद्ध व्हायला हवे. ते सिद्ध करण्याची गरजच पडू नये. . शासन, शेतीतज्ज्ञ आणि अर्थशास्त्र्यांच्या चुकीच्या भुमिकेमुळे समाजमन एवढे नासले आहे आणि आजही आपल्या शेतीविषयक भुमिकेचा आढावा घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे आता शेतीविषयक जुजबी उपाययोजना करण्याच्या पलिकडे आजाराचे स्वरूप गेले आहे. आज ना उद्या, कधी ना कधी देशाच्या शेतीविषयक धोरणाला अरबीसमुद्रात बुडवून टाकावेच लागेल. . शेतीला जोडधंदे, शेतीला कर्जपुरवठा, शेतीला सिंचनाची सोय किंवा शेतीला अनुदानाचे पॅकेज देणे हे समस्येचे समाधान नव्हेच. रोग एक आणि इलाज भलताच चाललाय.

In reply to by गंगाधर मुटे

हाडक्या Tue, 06/24/2014 - 20:41
३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? ४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? ६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये?
या मुद्द्यांशी पूर्ण सहमत. तरीही यात बरेच गुंतागुंतीचे अर्थकारण (व्यापारी, दलाल इत्यादि) आणि आनुशांगिक राजकारण आहे हे देखील ध्यानात घ्यायला हवे. तसेच शेतकरी या मूलभूत मुद्द्यासाठी (उस दर किंवा कापूस दर आंदोलने नव्हे) इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही (आणि येण्याची शक्यता पण खूप कमी) ही पण एक शोकांतिकाच तशी. असो. विषय खूप मोठा आहे तसा. या संदर्भातला हा बाजार समित्यांनी लादलेली महागाई हा संक्षीप्त लेख वाचनीय आहे.

In reply to by हाडक्या

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 22:47
इतर घटकांप्रमाणे ठामपणे एक दबाव म्हणून कधीही समोर आला नाही
आंदोलनाच्या माध्यमातूनच शेतकर्‍यांचा प्रभावशाली दबावगट निर्मान होऊ शकेल. दबावगट निर्माण करण्यासाठी आंदोलनाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध नाही.

In reply to by गंगाधर मुटे

प्रभाकर पेठकर Tue, 06/24/2014 - 21:09
>>>>१) मरेस्तोवर कष्ट करूनही शेतीतले कामे संपत नाही. सोबत जोडधंदा करायला वेळ कुठून आणायचा? इच्छा असेल तर मार्ग दिसेल. >>>>२) शेतीसोबत जोडधंदा करण्यापेक्षा शेतीऐवजी जोडधंदाच का करू नये? करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>३) कर्मचारी वेतनवाढ मागतात तेव्हा त्यांना वेतनवाढ देण्याऐवजी नोकरी सोबतच ऑफिसच्या बाहेर फावल्यावेळात "हेअर कटिंग" सलूनचे दुकान लावायला का सांगीतले जात नाही? वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>४) शेतीला उद्योगाचा दर्जा देवून त्यानुसार शासकीय धोरणे आखण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते तज्ञांना विचारा मला विचारून काय फायदा? >>>>५) उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याऐवजी त्याला तेवढे सोडून बाकीचे सल्ले देण्यात काय औचित्य आहे? कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे), दलालांना त्यांची दलाली मिळावी, आणि बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. >>>६) निदान उत्पादनखर्च भरून निघेल एवढा तरी शेतमालाला भाव मिळणे रास्त नाही का? एवढी साधी सोपी गोष्ट तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना का कळू नये? तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगैरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 23:31
>>>> इच्छा असेल तर मार्ग दिसेल.>>>>> पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर अन्य व्यवसाय करायचा म्हटले तर चोरी किंवा दरोडा याखेरीज करण्यासारखा अन्य व्यवसाय दिसत नाही. शिवाय झोप न येण्याच्या गोळ्या कुठून मिळवायच्या आणि किती काळ खाणे शक्य आहे, याचाही विचार करावा लागेल. >>>> करा नं! कोणी नाही म्हंटलय? >>>>> करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. >>>>> वेतन पुरत नाही तेंव्हा कोणी न सांगता कर्मचारी जोडधंदे करतात. पार्ट टाईम नोकर्‍या करतात. LIC एजन्सी चालवतात, कोकण प्रॉडक्ट विकतात इ.इ.इ. अनेक व्यवसाय करतात त्यांना सांगावे लागत नाही. >>>>> म्हणजे या देशातले किमान ५१ टक्के कर्मचारी जोडधंदा करतात म्हणायचे आणि त्यामुळे ते वेतनवाढ मागतही नाही. गेल्या अनेकवर्षापासून त्यांचे पगार स्थिर आहेत म्हणायचे. मला हे माहित नव्हते. अत्यंत महत्वाची माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद. >>>> शेतकर्‍यांना का सांगावे लागते? >>>> त्याचे उत्तर मी कसे देऊ? कारण न मागताच शेतकर्‍यांना बाष्कळ सल्ला तोही फुकटचा वाटण्यासाठी काही मंडळी एवढी उताविळ का असतात, याचे उत्तर तर मलाही माहित नाही. >>>> कुठल्याही स्वतंत्र व्यावसायिकाचे धोरण हे, आहे तो फायदा वाढविणे किंवा होणारे नुकसान कमी करावे असा असतो/ असला पाहिजे. मान्य. >>>> त्या अनुषंगाने शेतकरी आणि अंतिम ग्राहक ह्यातील दलालांची शृंखला तोडा असा व्यावहारिक सल्ला दिला होता. तुम्हाला तो तात्विकदृष्ट्याही का मान्य नाही हे कळत नाही. अत्यंत अव्यवहार्य सल्ला. >>>> तुमचा राग हा बिगरशेती शहरी जनतेवर दिसून येतो आहे. >>> सफशेल चूक. शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. ज्या शासकिय धोरणांमुळे शहर आणि खेडी यातील दरी वाढत चालली आहे, त्या शासकीय धोरणाचा आणि धोरणकर्त्यांंचा राग असणे स्वाभाविक आहे. ही धोरणकर्ती मंडळी शहरी आहे म्हणून मी सर्वसामान्य शहरी जनतेचा विरोधी आहे, असा निष्कर्ष काढण्याचे प्रयोजन नाही. >>>> शेतकर्‍यांना आवश्यक तो नफा मिळावा (रास्तं मागणी आहे) नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. >>>>> दलालांना त्यांची दलाली मिळावी, ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. >>>> बिगरशेती जनतेने सर्व भार उचलावा असा आपला दावा दिसतो आहे. जो माझ्या मते गैर आहे. बिगरशेती जनता कशाचा भार उचलणार आहे आणि उचलायची गरजच काय? पण समजा उदा. शेतकर्‍याला एक किलो कांदा पिकवायला ३ रू खर्च येत असेल तर ग्राहकाने (येथे शेतीधारक/बिगरशेती हा शब्दच फालतू आहे.) एक किलो कांदा १ रुपयाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे केवळ गैरच नाही तर माणूसकीला/मानवतेला न शोभणारी आहे. >>>> दलालांची दलाली काढून घेऊन जर शेतकर्‍यांना मिळाली तर शेतकरीही फायद्यात जातील सफशेल चूक. हमी भाव ठरविण्याचे अधिकार दलाल काय व्यापार्‍यांकडेही नाही. >>>> आणि आम जनतेवरही अधिकचा बोजा पडणार नाही. शेतकर्‍याला शेतमालाची रास्त किंमत मिळायला हवी हे नाकारल्याने व केवळ शेतीमाल स्वस्तात स्वस्त मिळवल्याने आम जनतेवरचा बोजा कमी होनार नाही. किंवा हा बोजा नगण्य आहे.

In reply to by गंगाधर मुटे

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 01:30
>>>>पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतात काम केल्यानंतर... ३६५ दिवस पहाटे ४ ते रात्री ९ पर्यंत शेतीची कामे चालतात ह्याची मला कल्पना नव्हती. महाराष्ट्रात तरी अनेक रिकामटेकड्या शेतकर्‍यांना मी पारावर गप्पा मारताना, स्थानिक राजकाणावर हिरीरीने भाष्य करताना, राजकारणात सक्रिय भाग घेताना पाहिलं आहे. माझे जे २-४ शेतकरी मित्र आहेत तेही शेतीचा विशिष्ट कालावधी सोडल्यास केंव्हाहि कुठेही येण्यास मोकळे असतात. ते असो. मी बिगर शेतकरी असल्याकारणाने माझी नजर दूषित असणारच. तुमचेच बरोबर आहे. >>>>करणारे करतच आहेत की. त्यासाठी कोणाचा लेख वाचण्याची गरज भासत नाही. तेवढी अक्कल त्याला असतेच असते. मग जोडधंदा कशाला मुख्य धंदा का करू नये? ह्या तुमच्या प्रश्नाला काय अर्थ उरतो? ते जर कांही शेतकरी करीत असतील 'हो, कांही शेतकरी करतातही शेतीव्यतिरिक्त कांही व्यवसाय.' इतकं साधं उत्तर का नाही देऊ शकत? असो. तुमची मर्जी. >>>> शहरी जनतेवर राग असण्याचे कारणच नाही. असं नुसतं म्हणायचं. बिगर शेतकरी शहरी सदस्याने कांही उपाय सुचविले तर आगपाखड करणं हा तुमचा स्वभाव नुसत्या ह्या धाग्यावरच नाही तर अनेकदा ह्या आधीही अनुभवला आहे. >>>>नफा जाऊ द्या बाजूला. त्याने केलेला खर्च भरून सुद्धा भरून निघत नाही आहे. तरीपण खेडोपाडी शेतकर्‍यांचा जीवावर दारूचे अड्डे चालतात. शेतकरी मोटारसायकली विकत घेताना दिसतात. 'यष्टीम' विकत घेताना दिसतात, मुलांची लग्न धुमधडाक्यात करतात. पण कदाचित हे सर्व फुकटात होत असेल. किंवा मला खेडोपाडी फिरताना भास होत असतील. >>>>ती मिळतच आहे. त्यासाठी मला दावा करण्याची गरजच नाही. तुमची मागणी अंतिम ग्राहकाने जास्त दमड्या मोजाव्यात अशी जाणवते. त्यामुळे दलालांना द्यावी लागणारी दलाली तुम्हाला खटकत नाही. गंगाधर मुटे साहेब, आपण शेतकर्‍यांची बाजू मांडता हे चांगलेच आहे. पण चर्चा करताना एखादा मुद्दा प्रतिवाद करणार्‍यास माहित नसेल तर तो नीट समजावून सांगता यायला पाहिजे. उगीचच, 'वेतनवाढ नाही मिळाली तर बाहेर सलून टाकण्याचा सल्ला देण्यासारखे' वगैरे वगैरे शब्दप्रयोग करून चर्चेचे वातावरण गढूळ करू नये. शेतकर्‍यांबद्दल आम्हाला नक्कीच कणव आहे. त्यापोटीच शेतकर्‍यांना 'नफा' मिळाला पाहिजे असा आग्रह मी माझ्या प्रतिसादात केला होता. पण तुमच्या नजरेला ते दिसत नाही. असो. >>>>अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे. १०० रू खर्च करून फक्त २५ रु मिळवायचे. म्हणजे वर्षोनुवर्षे दर क्विंटलला ७५ रुपये देशसेवेसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करणार्‍या शेतकर्‍याच्या औदार्यास माझा विनम्र नमस्कार. पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रामपुरी Wed, 06/25/2014 - 23:09
"पण पिढ्यानपिढ्या हा नुकसानीचा धंदा शेतकरी कसा काय करू शकतो हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे". हाच प्रश्न मला सुद्धा शेतकरी पुढार्‍यांची भाषणे ऐकल्यावर आजतागायत पडत आला आहे. पण या प्रश्नाचे सरळ उत्तर मिळणार नाही याची खात्री बाळगा. अहो काका, राजकारणी लोकांचे काम हे फक्त प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा करून दाखविणे हे असते. प्रत्येक माणसाला वाटत असतंच आपल्यावर अन्याय होत आहे. "तुमच्यावर अन्याय होत आहे" एवढं फक्त म्ह्णायचा अवकाश.रिक्षावाले, शेतकरी, कामकरी वर्ग, इत्यादी इत्यादी सर्वांवर नेहेमीच अन्याय होत असतो. बाकी सगळ्यांचा फक्त ते शहरात राहतात हाच मोठा गुन्हा. पेट्रोल वाढले की रिक्षावाले संप करतात 'भाडी वाढवा'. जेव्हां एखाद्या गोष्टीची टंचाई असते तेव्हां शेतकरी त्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवतात (आठवा कांदा १००रू किलो, कोथिंबीर १०० रू जुडी). तेव्हां या सर्वांना नैतिकतेची जाणीव होत नाही. त्यावेळी यांचे नेते मूग गिळून बसलेले असतात. पण कांदा १०० रू किलो आहे म्हणून सगळे शेतकरी कांदाच पिकवितात आणि साध्या पुरवठा-मागणी तत्वानुसार भाव जेव्हां भाव कोसळतात तेव्हां "सरकार" ला शिव्या घालायला तयार. लगेच यांचे नेते बिळातून बाहेर येतात. सगळ्या पक्षांना यांची दखल घ्यावी लागते. असो.. बोलाल तेवढे कमी आहे. आम्ही तरी दुसरं काय करणार म्हणा बोलण्याशिवाय. आमच्यावर कविता लिहील्या जायला आम्ही काही शेतकरी नाही की दुसरी कुठली मतपेढी नाही. माझ्या मते तरी जेवढी "दाखवली" जाते तेवढी शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट नाही. काही शेतकर्‍याची परिस्थिती नक्कीच वाईट असेल पण त्याचे सरसकट जे भांडवल केले जाते ते फक्त राजकारणासाठीच. शेतकरी म्हटला की "गरीब, दिनवाणा, कायमच अन्यायग्रस्त" अशी जी प्रतिमा रंगविली जाते ती साफ चुकीची आहे.

In reply to by रामपुरी

गंगाधर मुटे Wed, 06/25/2014 - 23:49
शेतकर्‍याचा लढा उभारून भारत देशात आतापर्यंत तरी एकाही व्यक्तिला/राजकिय पक्षाला राजकारणात यश मिळवता आलेलं नाही. उलट शेतकर्‍यांची बाजू उचलून धरणारे राजकारणात मातीमोल झालेले आहे. त्यामुळे तुमची मांडणी अप्रस्तुत आणि गैर आहे. (उदाहरणादाखल राजू शेट्टीचे नाव घेऊ नये कारण....)

In reply to by गंगाधर मुटे

रामपुरी गुरुवार, 06/26/2014 - 02:53
पहिल्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षेप्रमाणे मिळालं नाहीच. बाकीचे तर "औट ऑफ सिल्याबस" च असतील. तेही अपेक्षेप्रमाणेच. असो. नावं घेतली असती पण नावं घेतली की प्रतिसाद उडतात त्यामुळे इत्यलम. तुमची ब्याटिंग चालू राहू दे. आम्ही केव्हांच आऊट झालोय... महागाईने.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 23:38
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे. काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शतकर्‍याच्या केवळ २०-२२ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 23:44
>>>>> तुम्ही त्यांना ती का पटवून देऊ शकत नाही? >>>>>> सरकार त्यांना पोसतंय ना! म्हणून ते त्यांच्या सोईचं बोलतात. तज्ज्ञांना, बुद्धीवाद्यांना, अर्थशास्त्र्यांना देण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा कुठे आहे? >>> नुसता उत्पादनखर्च निघाला म्हणजे शेतकर्‍याचा संसार, मुलांचे शिक्षण, आजारपणं वगैरे वगरे खर्च कसे निभावणार? मुळात तुमची मागणीच चुकीची आहे.>>>>>> काय बोलताय पेठकर साहेब! अहो, एखादे पीक घ्यायला शेतकर्‍याला १ क्विंटलला १०० रू.खर्च येत असेल तर आपल्या देशात त्या मालाचा हमीभाव २० रू ठरवला जातो. १०० रू खर्च केल्यानंतर शेतकर्‍याच्या हातात केवळ २० ते २५ रुपयेच पडतात. केंद्र शासनाने लिखीत स्वरूपात हे मान्य केले आहे.

कविता ठीक आहे ... प्रश्न वारंवार गिरवुन सुटणार नाहीत उलट ते जास्त गडद होतील , प्रश्नांच्या गुंत्यात अडकण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्यात हरवणे कधीही चांगले ! :) एक अवांतर शंका : भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा .... शेतकर्‍याची ही चिंता सुटेल आणि सर्वसामान्य माणसालाही भावी महागाईची कल्पना येईल अन तो त्याची तयारी करेल !! बेस्ट !!!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Wed, 06/25/2014 - 11:59
रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात. पण आपले शेतकरीही नंतर सोकावतात हे पाहिलेले आहे. कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे.

In reply to by आदिजोशी

रिटेल मधे एफ डी आय आले की ह्यातले काही प्रश्न सुटतील. वॉलमार्ट वगरे लोकं शेतकर्‍यांशी असेच किंमत आणि मालाची प्रत ह्यांचे काँट्रॅक्ट करतात.
एफ डी आय इज अ डेंजरस थिंग ! जे वॉलमार्ट करणार ते आपल्याच लोकांनी का करु नये ? पण आपला श्जेतकरी / सरकार आपल्या माणसाला मोठ्ठा होउ देणार नाही ,, कारण आपल्या इथे माणुस नुसता माणुस असत नाही ... त्याच्या सोबत , जात असते , प्रांत असतो , भाषा असते ...आणि नफरत करायला काय कोणतेही कारण चालते :) तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Wed, 06/25/2014 - 13:29
तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! ह्याच दळभद्री विचारसरणीमुळे आपण मागे आहोत.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रभाकर पेठकर Wed, 06/25/2014 - 14:25
माझंही हेच म्हणणं आहे. शेतकरी एव्हढा डबघाईला आला असेल (आणि क्विंटलमागे ७५ रुपये नुकसान सोसून येणार नाहीतर काय होणार?) तर शेतकर्‍यांनीच एकत्र येऊन सोसायटी, संघटना, वितरण संस्था वगैरे वगैरे कांही उपाय का करू नयेत? वर्षोनुवर्षे, पिढ्यानपिढ्या नुकसान सहन करीत कर्जाचे डोंगर उभे करायचे, जमिनी विकायच्या त्या ऐवजी २ वर्षे पिक न घेता सरकारवर दबाव का निर्माण केला जात नाही. बाकी माझे विचार हे बिगरशेती धारक शहरी सदस्याचे आहेत. ते चुकीचे असू शकतात पण चर्चा करायची म्हंटल्यावर दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या लागतात. चांगले मुद्दे मांडून आमच्याही ज्ञानात भर पडावी असे करावे. शेतकर्‍यांचे दुर्दैवी अनुभव आम्हाला कसे समजणार? जे दिसतं त्यावरून आमची मते बनतात. खरं चित्र विपरीत असेल तर तसे मांडता यायला पाहिजे. चर्चेतून शेतकर्‍यांच्या समस्येवर कांही उपाय सापडणार असेल तर चांगलेच आहे नं. नुसत्या कविता करून काय होणार? आजही आमच्या मनांत शेतकर्‍यांबद्दल कणव आहे पण हूडूसतुडूस करून आहे ते प्रेमही आटेल असे प्रयत्न का करायचे? >>>>कोकणात आंब्याची झाडं अशा प्रकारे घाऊक किंमतीला विकून नंतर भोकात गेला शेट असं म्हणणारे बागायतदार ओळखीचे आहेत. ३-४ वर्षांनी काँट्रॅक्ट संपलं की हे परत गोट्या खेळायला मो़कळे. >>>>तुझा फायदा होवु देणार नाही ,,,मग माझा धंदा डबघाईला गेला तरी चालेल असा एअ‍ॅटीट्युड असतो !! अशा प्रातिनिधिक प्रतिक्रियातून सर्वसामान्यांना येणारे 'वेगळे' अनुभव अधोरेखित होतात. तेच संपूर्ण चित्र आहे असे मी लगेच मानणार नाही पण शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍याने समस्या समजून न घेणार्‍यावर आगपाखड करण्याऐवजी 'अशा ही केसेस असू शकतात हे मान्य करणे' जरूरी आहे. शेतकरी म्हणजे बापुडवाणा आणि शहरी माणसं म्हणजे स्वस्तात धान्य मिळायला सोकावलेले आणि सरकारला शेतकर्‍याविरोधात नमविणारे हे चित्र उभे करणे योग्य नाही असे मला वाटते.

गंगाधर मुटे Tue, 06/24/2014 - 19:41
भारतात शेती मालावर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट , ऑप्शन , फ्युचर्स वगैरेंचे ट्रीडींग अलाऊड नाहीये काय ? किमान फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी उत्पादन खर्चावरील आधारित भावाचा प्रश्न सुटु शकेल ... म्हणजे शेतीत बियाणे पेरले की लगेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करुन भाव लॉक करुन टाकायचा.
या सर्व प्रकारात सरकार आडवे येते. शेतीसाठी सरकार हीच मोठी समस्या आहे.

समीरसूर Wed, 06/25/2014 - 14:46
कविता चटका लावून गेली. मला एक कळत नाही. मॉन्सूनच्या ३-४ महिन्यातल्या पावसावर भारतातली शेती, वीजनिर्मिती, उद्योग, इत्यादी सगळं अवलंबून आहे. या पावसाशिवाय भारताला पाण्याचा दुसरा असा मुबलक पर्याय नाही. एक-दोन वर्षे पाऊस नाही पडला तर भारतात भीषण परिस्थिती उद्भवू शकते. यावर्षी जून संपत आला तरीही पावसाचा थेंब पडलेला नाही. यंदा जर पाऊस आला नाही तर काय होणार कळत नाही. भारतात ६५ वर्षे राज्य करणार्‍या नालायक राज्यकर्त्यांनी पावसावरचे हे अवलंबित्व कमी करण्यासाठी एकदाही थोडेही डोके चालवले नाही यातच आपली सुमार कुवत लक्षात येते. नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे. अर्थात, नेहरूंना लफडी करण्यातून सवड मिळत नव्हती आणि गांधी सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी नेहमीच आसुसलेले होते. बाकी लायक नेते सोयीस्करपणे बाहेर फेकले गेले. नंतरच्या ६०-६५ वर्षात देखील एकाही नेत्याने असे काही धाडसी प्रयत्न केले नाहीत. नाही म्हणायला नदीजोड प्रकल्प चर्चिला गेला परंतु तो अत्यंत खर्चिक आहे आणि बर्‍याच तज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याने नुकसानच जास्त होणार आहे. शेतकरी जगला तर जग जगेल हे साधे सत्य आज माणसांना कळेनासे झाले आहे. पावसाला शिव्या घालणारी माणसे पाहिली की मला त्यांच्या निर्घृण खून करावासा वाटतो. अरे ज्या पावसामुळे तुमच्या पोटात अन्न आणि पाणी पडते त्यालाच शिव्या घालता? कारण काय तर ट्रॅफिक जॅम होतो, कपडे खराब होतात, वगैरे वगैरे? अशा लोकांना समुद्रात बुडविले पाहिजे. शेतकरी हा राजासारखा असला पाहिजे. त्याचे बापुडवाणे चित्र मनाला छिद्रे पाडून जाते. शेतकरी राबतो म्हणून आपल्याला सुखाचे घास मिळतात. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. त्याला पगारी सुट्या मिळत नाहीत, ३जी मोबाईलवर फेसबुक उघडून कँण्डी क्रश खेळायला मिळत नाही, वर्षाची हमखास पगारवाढ मिळत नाही; जे पेरले ते उगवेलच याची शाश्वती मिळत नाही, छान छान घरात राजा-राणीसारखे सुखी जीवन व्यतीत करता येत नाही...त्याला मिळतात फक्त अपार कष्ट! आणि ते ही पावसाच्या सावकारीचा शाप असलेले. लोकांना शेतकर्‍याविषयी आदर वाटेल तो खरा सुदिन!

In reply to by समीरसूर

हाडक्या Wed, 06/25/2014 - 16:19
(समीरसूर आपले लेख आणि प्रतिसाद वाचतो आणि तुमच्याकडून या प्रकारच्या टिकेची अपेक्षा नव्हती म्हणून हा प्रतिसाद प्रपंच)
मला एक कळत नाही.
तसं बरंच काही कळत नाही असे म्हणाले पाहिजे.
नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासारख्या नेत्याला (आणि त्याकाळच्या सगळ्याच पुढार्‍यांना) ही गोष्ट लक्षात येऊ नये ही आपल्या राजकारणाची शोकांतिका आहे
यांच्या काय लक्षात आले आणि काय नाही याबद्दल आपल्याला माहित नसेल तर अभ्यास वाढवावा. उगीच शोकांतिका वगैरे म्हणू नये. मान्य आहे नेहरु, गांधी यांच्याकडून (राजकीय) चुका झाल्यात पण म्हणून त्यांनी केलेल्या राजकीय तसेच सामाजिक कामाचे पण आपल्याला श्रेय देता येत नसेल तर अवघड आहे. जल-संधारण आणि शेतीस पूरक धोरणे यांच्याबद्दल या लोकांचे विचार आणि कार्य तरी चाळावयाचे हे लिहिण्याआधी. उगीच 'लफडे' वगैरे वैयक्तिक हीणकस शेरेबाजी कशाला? (खरे खोटे बाजूलाच ठेवू) तिचा इथे काहीही बादरायण संबंध आहे का? बर्‍याच काही गोष्टी (ज्या आज नीट नेटक्या आहेत देशात) आपण इतक्या सहजपणे गृहित धरतो की यामागे ज्यांच्या हाती हे नवे कोरे राष्ट्र आले होते त्यांचा (सर्वांचाच) परिश्रमपूर्वक सहभाग असावा इतकी पण कृतज्ञता दाखवू शकू नये म्हणजे कमाल झाली. महायुद्धोत्तर स्वतंत्र झालेल्या देशांचा तौलनिक अभ्यास करावा ही विनंती. काही असले तरी उत्तम विचारांचे लोक आपल्या देशाच्या राजकारणात (नेहरु असो वा जयप्रकाश नारायण वा अजून कोणी) नेहमीच होते हे देशाचे सुदैव. असो.. (विषय भरकटायला नको म्हणून तुम्हास अजून चर्चा हवी असल्यास वेगळा धागा काढा, इथे आमच्याकडून इतकेच)

In reply to by हाडक्या

समीरसूर Wed, 06/25/2014 - 17:01
हाडक्यासाहेब, आपल्या मतांचा आदर आहेच. 'मला एक कळत नाही' हे मला ६५ वर्षात आपण पावसावरचे अवलंबित्व किती कमी करू शकलो आणि यासाठी राजकीय इच्छाशक्ती किती होती या मुद्द्याला धरून होते. छोट्या छोट्या देशांनी (सिंगापूर, सौदी अरेबिया, मलेशिया, इस्त्राईल, वगैरे) जबरदस्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून अक्षरशः वैराण भूमीला सुजलाम सुफलाम केले आहे. मान्य आहे ते देश आकाराने छोटे आहेत पण ती राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. अशी राजकीय इच्छाशक्ती मला आपल्याकडे कधी असल्याचे जाणवले नाही. बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या. मुंबईचा तानसा प्रकल्प इंग्रजांनी १०० वर्षांनंतरच्या मुंबईच्या जलविषयक गरजा कल्पून बांधला होता जो अजूनही मुंबईची तहान भागवतो. आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर अशी दूरदृष्टी दाखवल्याचे दिसत नाही. पुस्तकांमध्ये विचार-बिचार लिहून ठेवणे आणि प्रत्यक्ष कृती करून देशाला त्याचा घसघशीत फायदा मिळवून देणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या समस्या निराळ्या होत्या हे मान्य आहे परंतु त्याबरोबरच प्राथमिक गरजाही तितक्याच महत्वाच्या होत्या. किंबहुना प्राथमिक गरजा या नेहमीच सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. आपले राजकारण इतके प्रगल्भ असते तर आज अशी वाट लागली नसती. स्वातंत्र्यानंतरही ६५ वर्षांनी दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या आईला वीज नसल्याने ३ मजले चढून यावे लागते. वीज किती वेळ राहील याची शाश्वती नाही; पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही; खेड्यांमध्ये १८-१८ तास लोड-शेडिंग आहे. एवढंच कशाला, राजधानी दिल्लीत १८-१८ तास वीज नव्हती १०-१५ दिवस! माझ्या आणि अनेक छोट्या छोट्या गावात लोकांचा दिवसभरातला एक पंचमांशपेक्षा जास्त वेळ दूर कुठूनतरी पाण्याची ओझी वाहण्यात जातो. उन्हातान्हात मी ३० वर्षांपूर्वी पाणी काढलेले आहे आणि आज ३० वर्षांनंतरही त्याहीपेक्षा भयंकर हाल आहेत. हे हाल आहेत २०१४ चे, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले १९४७ मध्ये! आज सगळ्या देशावर पाण्याचे संकट आहे. पाऊसच पडला नाही तर काय करणार आहोत आपण याचे उत्तर आपल्या राज्यकर्त्यांनी शोधून ठेवण्याइतपत कुवत यांच्यात होती असे मलाच काय लक्षावधी-कोट्यवधी लोकांना वाटत नाही. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी आपली पद्धत आहे. सगळं रामभरोसे! त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी चांगली कामे केली असतील; नाही असे नाही. पण एवढ्याच कालावधीमध्ये कित्येक देश आपल्या हजारपट पुढे निघून गेले याची कारणे आपण शोधली पाहिजेत. बाकी नेहरूंविषयी माझे (आणि इतरही बर्‍याच जणांचे) मत तितकेसे बरे नाही. कमला नेहरूंचे जगण्याचे हाल वाचूनच नेहरूंविषयी माझ्या मनात तिटकारा उत्पन्न झाला आहे. त्यांच्या इतर निरर्थक गोष्टींचाच (पॅरीसला कपडे धुवायला जात असत, लेडी माऊंट्बॅटन, लाल गुलाब, मुलांमध्ये प्रिय होते वगैरे छबी; छबी निर्माण करणे गांधींइतके आणि नेहरूंइतके कुणालाच जमले नाही; त्या काळात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ब्रँड केला होता यांनी)जास्त बोलबाला झाला. असो. आपल्यात भांडण कशाला? मतभिन्नतेमुळे मिपाकरांमध्ये कटूता यायला नको. नेहरू, गांधी जसे असतील तसे असतील. त्यावरून मिपाकरांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याचे कारण नाही. :-) व्यक्तीपूजा घातक ती ही अशी. ;-) त्यामुळे जाऊ द्या. नेहरू गांधी काही क्षेत्रात निर्विवाद महान होते यात शंकाच नाही. भांडण नको. मतभिन्नतेमुळे तर नकोच नको. :-) आपल्या इथल्या मतप्रदर्शनामुळे काही फरक पडत नाही मग कशाला उगीच शस्त्रे परजायची? मिल के रहेंगे तो ऐश करेंगे...काय?

In reply to by समीरसूर

हाडक्या Wed, 06/25/2014 - 19:54
हा हा हा .. भांडण कुठले हो राव. :) सामान्यत: तुमच्या मतांचा आदर वाटतो म्हणून आवर्जून असहमती नोंदवली. नेहरु, गांधी आणि इतर महत्त्वाचे भारतीय राजकारणी यांच्याबद्दल अभिनिवेशरहित भावनात्मक शेरेबाजी टाळून क्वचितच पाहिले जाते. मग बाजू घेतली तरी व्यक्ती-पूजेचे बालंट वापरून मुद्दा अदखलपात्र केला जातो ते वेगळेच. इथे बरेच मुद्दे तुम्ही मोघम वापरले आहेत, जसे की
बाकी पाणीपुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना या ब्रिटीशकालीन होत्या.
अशा मोघम अवतरणांचा पुरावा म्हणून उपयोग नाही. हे मान्य की इन्ग्रजांनी बरीच कामे केली. जशी त्यांनी त्यांच्या देशात केली तशीच त्यांनी जिथे जिथे राज्य केले तिथे तिथे जगभर केली. परत त्यांच्या स्वतःच्या देशात अजून करत आहेत. अजून पुढच्या ५० ते १०० वर्षांच्या धोरणाने करत आहेत. having said that, असे नाही म्हणता की नेहरु गांधीमुळे आपल्या इथे कामे झाली नाहीत. फक्त उदाहरणार्थ आपन भाक्रा-नांगल प्रकल्प घेऊयात. त्याचबरोबर आंतर्देशीय, आंतरराज्यीय पाणीवाटप, जल संधारण नियोजन आणि भविष्यकालीन योजनांसाठी पुरेशा तरतूदी इत्यादि अशा बर्‍याच दूरदर्शी मार्गांनी पहिल्या पिढीच्या राजकारण्यांनी (एकटे नेहरु नव्हे) पायाभरणाचे काम केले. जेवढे विचार मांडले त्यातल्या बर्‍याचशा विचारांशी प्रामाणिक राहून बरेचशे काम देखील केले. पण आता नंतरची पिढी 'धरणात मुतू का?' म्हणणारी निपजणार असेल तर त्याचा दोषदेखील नेहरु पिढीला द्यायचा हे काही खरे नाही. इतर देशात बरीचशी प्रगती ही व्यक्तीनिरपेक्ष सुव्यवस्थेच्या निर्मितीमुळे झाली, वाढली आणि आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेची वाट लावण्यामुळे वाताहत झाली इतके लक्षात घेतले तरी पुरे.
जास्त बोलबाला झाला
हे त्यांच्यापेक्षा असे करण्यात ज्यांचा फायदा (टिका करणारे आणि स्तोम माजवणारे अशा दोन्ही बाजूनी) होता त्यांनी जास्त केले असे म्हणावे वाटते.
सगळं रामभरोसे!
बाकी याच्याशी सहमत. कधी कधी पुढे काय होणार आणि कसे होणार असे वाटत राहते. आम्ही दुष्काळी भागातील असल्याने दूसर्‍या गावातूनदेखील पाण्यासाठी हिंडण्याचा अनुभव घेतलाय. पण आता पाहिल्यावर कळतंय की गावातल्या एका गटाला श्रेय मिळू नये म्हणून दूसर्‍या गटाने अडवणूक करून पाईप-लाईन येऊ दिली नव्हती कित्येक वर्षे आणि पङ सत्ताबदल झाल्यावर पहिल्या गटाने देखील तेच करणे चालू ठेवले. परिणामी अख्खा गाव पाणी पाणी करत हिंडत होता. मग जिथे अगदी गाव-पातळीपासून लोकच इतके उदासीन (की मूर्ख की आणखी काही म्हणावे) तर त्या गांधी नेहरु ला काय ऊठ-सूट दोषी धरायचे ? इतकेच.

समीरसूर Wed, 06/25/2014 - 14:54
परवा कुठल्यातरी भिकार मराठी अवार्ड शोमध्ये (जुना की नवीन आठवत नाही) तो भयानक पकाऊ स्वप्नील जोशी सूत्रसंचालन करत होता. एक पात्र येऊन त्याला शेतकरी म्हणते. स्वप्नील जोशी स्वतःला न शोभणार्‍या रुबाबदार कपड्यांकडे बघून त्या पात्राला विचारतो, "मी शेतकरी वाटतो तुला?" त्याचा स्वर असा होता की कुठे गलिच्छ शेतकरी आणि कुठे मी रुबाबदार नट! जणू शेतकरी ही शिवीच आहे! हा फोपशा स्वप्नील जोशी शेतात पिकवलेलंच अन्न खातो ना? की मंगळावरचे अन्न मागवले जाते याच्यासाठी? हा नकळत भिनलेला भेद विसरला गेला पाहिजे. साला भारतात लोकं एकमेकांचा आदर करतच नाहीत. संशय, अनादर, मग्रुरी, दुसर्‍याला कःपदार्थ समजणे म्हणजे भारतीय संस्कृती!!!

हुप्प्या गुरुवार, 06/26/2014 - 05:01
शेतकरी लोकांचे दु:ख अनेक ठिकाणी पहायला, ऐकायला, वाचायला मिळते. पण मी असे ऐकून आहे की भारतात कुणीही उठून शेतजमीन विकत घेऊन तिथे शेती करू शकत नाही. जर आज शेती करणारे शेतकरी अमाप, अलोट दु:खाने ग्रस्त असतील तर नव्या लोकांना, कुठलीही शेतकरी पार्श्वभूमी नसणार्‍यांना शेत कसायला परवानगी का दिली जात नाही? हे क्षेत्र इतके बंदिस्त का ठेवले आहे? कदाचित एखादा आयटी वा अन्य क्षेत्रातला पैसे कमावलेला माणूस काहीतरी वेगळे करुन दाखवेल. शेती इतके गांजलेले क्षेत्र असताना ते अट्टाहासाने कृषी वारसा असणार्‍याच्याच ताब्यात ठेवण्याचा भारत सरकारचा दुराग्रह अनाकलनीय आहे.

In reply to by हुप्प्या

आदिजोशी Wed, 07/16/2014 - 20:11
शेतजमीनी विकत घेऊन तिथे शेती सोडून बाकीचे सतरा धंदे केल्याने शेतजमीन कमी होत जाईल आणि अन्न तुटवडा निर्माण होईल म्हणून हा नियम आहे असे मध्यंतरी वाचनात आले होते. परंतू, हे असे होऊ नये ह्याची काळजी घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यास उत्सुक लोकांना परवानगी द्यावी ह्या मुद्द्याशी सहमत आहे.
लेखनविषय:
मेल्याशिवाय जात नाही : नागपुरी तडका

माझा बाप...
रामप्रहरी उठायचा
शेणपुंजा करायचा
नांगर घेऊन खांद्यावर
दम टाकीत चालायचा
गार गार थंडीतही
घामामध्ये भिजायचा

माझा बाप....
गायी-म्हशी चारायचा
दूधदुभते करायचा
भूमातेच्या कुशीमध्ये
मरेस्तोवर राबायचा
कांदा-मिरची-भाकर खाऊन
आला दिवस ढकलायचा....

माझा बाप....
आजारी पडला तरी
घरामध्येच कण्हायचा
औषधाला पैसा-अधला
कुठून आणू म्हणायचा
देव तरी पावेल म्हणून

मरीज़े मुहोब्बत उन्हींका फ़साना

संजय क्षीरसागर ·

तिमा Sun, 06/22/2014 - 15:24
एकदम १९८० सालांत नेऊन सोडलंत! माझी ही आवडती गजल आहे. असंच, 'मुद्दते हो गई है, चुप रहते' या गजलवरही लिहा!

मारवा Sun, 06/22/2014 - 22:21
संजय जी काय अप्रतिम आस्वाद ! तुमचा जुना लेख ज्यात तुम्ही कवि ग्रेस यांच्या कवितेच अप्रतिम रसग्रहण केल होत त्याची तीव्रतेन आठवण झाली. काव्यार्थ तरलतेने अचुक पकडणे आणि परत सुंदर शब्दात तो त्याच्या सौंदर्यस्थळां सहीत आस्वाद करुन देणे तुम्हाला फार छान जमते. आस्वादात तुमची संगीताची जाण ही दिसुन येते. तुम्ही कविता मालिका घ्या हो एखादी मजा येइल

मारवा Sun, 06/22/2014 - 22:29
ज्यांचा हा लेख वाचायचा राहीला असेल त्यांनी जरुर एकदा वाचावा. यावरील चर्चा ही निव्वळ अप्रतिम आहे. मिपाच्या क्लासिक्स मधील एक लेख ! http://www.misalpav.com/node/21296

In reply to by मारवा

पूर्ण चर्चा वाचली आणि आपले आभार मानावेसे वाटले ! धन्यवाद !!!

मेहदी हसन, गुलाम अली, नुसरत फ़तेह अली खान, फ़रिदा खा़नुम या दिग्गजांनी एकेका ग़ज़लेचं सोनं केलंय. मूड येईल तसा आवडलेल्या ग़ज़लांचा रसास्वाद, त्यातली नजा़कत आणि सूफ़ियाना अंदाज़ तुमच्यासाठी सादर करतांना आनंद होईल.

फारच सुंदर गजल आणि त्याचे रसग्रहणही छान केले आहे. बर्‍याच दिवसांनी ऐकली. याच शमा मधल्या बाकीच्या गजल पण सुरेख आहेत. - मुद्दते हो गयी है चुप रहेते - आधी रात को ये दुनिया वाले अजुनही दोन तीन चांगल्या गजल होत्या या अल्बम मधे. आता घरी जाउन ऐकणे आले.

चाणक्य Mon, 06/23/2014 - 11:24
मस्त लिहीलं आहे. छान गजल आणि त्यातले बारकावे पण छान दाखवले आहेत तुम्ही. मजा आ गया. एक वैयक्तिक मत :- रसग्रहण किंवा अनुवाद करताना खूप कंस आले की त्यातली जान निघून जाते.

In reply to by चाणक्य

त्यावेळी कंसांचा आधार घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाशी सरळ मिळणारा शब्द गज़लेत नसतो. उदाहरणार्थ :
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम
या ओळी शायर स्वतःपुरत्या म्हणतोयं, त्यात प्रेयसीचा फक्त निर्देश आहे. त्या ओळींचा शब्दशः अनुवाद केला तर शब्दांमागे दडलेला अर्थ लक्षात येणार नाही. तिच्याशी फारकत घ्यावी असं शायर सरळ म्हणत नाहीये. तो म्हणतोयं `प्रेमापासून फारकत घ्यायचा इरादा होता'; (इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन) पण तसं लिहीलं तर तो शब्दानुवाद होईल, त्यात रसमिर्मिती होणार नाही. त्यामुळे ते रसग्रहण असं करावं लागलं :
तिच्याशी फारकत घ्यावी (आणि तिला विसरुन जावं) असा इरादा (कैकदा) केला पण तिच्या त्या लाघवी हास्याची पुन्हा (पुन्हा) मोहिनी पडली.
तुम्ही तिथे कंस नाहीत असं समजून सरळ वाचलंत तर तुम्हाला मजा येईल. कंस असले तरी लेखनप्रवाहाला बाधा येणार नाही अश्या पद्धतीनंच लिहीलं गेलंय.

In reply to by चाणक्य

असंका Mon, 06/23/2014 - 13:40
मूळ गझलीमध्ये जे शब्द नाहीत पण अर्थ लावताना आवश्यक असे शब्द सरांनी कंसात टाकले आहेत. काल या कंसांचा अडथळा वाटून मी हा लेख नुस्ता वरवर वाचला. आज सकाळी कंसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून वाचून बघितला. पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. आणि किती सुरेख..

In reply to by असंका

पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. दॅटस द वे! जे सांगायला मला इतका वेळ लागला तेच तुम्ही अगदी सहज सांगून गेलात. मनःपूर्वक धन्यवाद!

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 11:47
मस्त रसास्वाद ! 'ना जाओ छोडकर' कहनेवाले ही थे हम लब्ज होटोंपे थम गये निकलते निकलते

माधुरी विनायक Mon, 06/23/2014 - 12:30
उर्दू काव्य मनापासून आवडतं, पण काही शब्द कळत नाहीत आणि त्यामुळे त्या रचनेचा आस्वाद घेता येत नाही. तुमच्या या लिखाणामुळे आणखी एका सुंदर रचनेचा आस्वाद घेता आला. धन्यवाद...

In reply to by माधुरी विनायक

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 13:22
सध्या परिक्षण नुसतं घाईघाईत वाचलय पण गझल आणि वर केलेलं परी़क्षण उत्तम असणार ह्यात शंका नाहि. ऑफिस मधे असल्यामुळे घरी जाउन निवांत एकेन. धन्यवाद एका सुंदर रचेनेबद्द्ल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 10:37
वाह संक्षीसेठ...! गझल निवड आवडली आणि अनुवादही. प्रेमात पडलेल्या माणसांना आपला अनुभव वाटावा अशी आत पोहचलेली ही गझल. तिच्या अजब वागण्यामुळे ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' हे तर अतिशय सुंदर. 'इरादा था तर्के' तर अहाहा. तिला विसरुन जावं, पुन्हा तिच्याकडे बघू नये, तिचा विचार मनातही येऊ नये, तिच्याशी फारकत घ्यावी असा विचार त्या प्रियकराच्या मनात येतो तसा हाही सर्व तसा लटका राग असतो म्हणुन मला पुढच्या ओळी खास वाटल्या. प्रियकर फ़सतो ते तिच्या त्या मोहक हसण्याला. आणि अनेकदा अशा अवस्थेतून तो सावरलाही आहे आणि पुन्हा सावरला की येरे माझ्या मागल्या प्रमाणे त्याच्या वाटेला पुन्हा इरादा तर्केचा म्हणजे ठोकरा खाण्याचा अनुभव येऊ लागतो. असो, अशाच सुंदर गझला येऊ द्या..... !
तुम्हें दिल लगानेको किसने कहा था बहेल जाएगा दिल बहेलते बहलते |
-दिलीप बिरुटे

सुधीर गुरुवार, 06/26/2014 - 22:30
रसग्रहण आवडले. "ग़ज़लांची अशी मैफिल नक्की जमवत जाईन." वाट पाहतो.

शब्दबम्बाळ Wed, 05/06/2015 - 23:21
पुन्हा पुन्हा वाचून सुद्धा मन भरत नाही! :) शेवटचे कडवे वाचल्यानंतर हे आठवले, "अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें"

ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 05/07/2015 - 20:21
वा संजयजी मस्त लिहिलय. चुप्पी / खामोशी वरुन आठवल.. उम्र भर जलता रहा दिल और खामोशि के साथ शमा को एक रात की सोज-ए-दिलि पे नाझ था मित्रहो मि आता पर्यन्त मिपा चा वाचक होतो.पण आज सदस्य झालोय आणि हि माझी पहिलि प्रतिक्रिया.

तिमा Sun, 06/22/2014 - 15:24
एकदम १९८० सालांत नेऊन सोडलंत! माझी ही आवडती गजल आहे. असंच, 'मुद्दते हो गई है, चुप रहते' या गजलवरही लिहा!

मारवा Sun, 06/22/2014 - 22:21
संजय जी काय अप्रतिम आस्वाद ! तुमचा जुना लेख ज्यात तुम्ही कवि ग्रेस यांच्या कवितेच अप्रतिम रसग्रहण केल होत त्याची तीव्रतेन आठवण झाली. काव्यार्थ तरलतेने अचुक पकडणे आणि परत सुंदर शब्दात तो त्याच्या सौंदर्यस्थळां सहीत आस्वाद करुन देणे तुम्हाला फार छान जमते. आस्वादात तुमची संगीताची जाण ही दिसुन येते. तुम्ही कविता मालिका घ्या हो एखादी मजा येइल

मारवा Sun, 06/22/2014 - 22:29
ज्यांचा हा लेख वाचायचा राहीला असेल त्यांनी जरुर एकदा वाचावा. यावरील चर्चा ही निव्वळ अप्रतिम आहे. मिपाच्या क्लासिक्स मधील एक लेख ! http://www.misalpav.com/node/21296

In reply to by मारवा

पूर्ण चर्चा वाचली आणि आपले आभार मानावेसे वाटले ! धन्यवाद !!!

मेहदी हसन, गुलाम अली, नुसरत फ़तेह अली खान, फ़रिदा खा़नुम या दिग्गजांनी एकेका ग़ज़लेचं सोनं केलंय. मूड येईल तसा आवडलेल्या ग़ज़लांचा रसास्वाद, त्यातली नजा़कत आणि सूफ़ियाना अंदाज़ तुमच्यासाठी सादर करतांना आनंद होईल.

फारच सुंदर गजल आणि त्याचे रसग्रहणही छान केले आहे. बर्‍याच दिवसांनी ऐकली. याच शमा मधल्या बाकीच्या गजल पण सुरेख आहेत. - मुद्दते हो गयी है चुप रहेते - आधी रात को ये दुनिया वाले अजुनही दोन तीन चांगल्या गजल होत्या या अल्बम मधे. आता घरी जाउन ऐकणे आले.

चाणक्य Mon, 06/23/2014 - 11:24
मस्त लिहीलं आहे. छान गजल आणि त्यातले बारकावे पण छान दाखवले आहेत तुम्ही. मजा आ गया. एक वैयक्तिक मत :- रसग्रहण किंवा अनुवाद करताना खूप कंस आले की त्यातली जान निघून जाते.

In reply to by चाणक्य

त्यावेळी कंसांचा आधार घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाशी सरळ मिळणारा शब्द गज़लेत नसतो. उदाहरणार्थ :
इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम
या ओळी शायर स्वतःपुरत्या म्हणतोयं, त्यात प्रेयसीचा फक्त निर्देश आहे. त्या ओळींचा शब्दशः अनुवाद केला तर शब्दांमागे दडलेला अर्थ लक्षात येणार नाही. तिच्याशी फारकत घ्यावी असं शायर सरळ म्हणत नाहीये. तो म्हणतोयं `प्रेमापासून फारकत घ्यायचा इरादा होता'; (इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन) पण तसं लिहीलं तर तो शब्दानुवाद होईल, त्यात रसमिर्मिती होणार नाही. त्यामुळे ते रसग्रहण असं करावं लागलं :
तिच्याशी फारकत घ्यावी (आणि तिला विसरुन जावं) असा इरादा (कैकदा) केला पण तिच्या त्या लाघवी हास्याची पुन्हा (पुन्हा) मोहिनी पडली.
तुम्ही तिथे कंस नाहीत असं समजून सरळ वाचलंत तर तुम्हाला मजा येईल. कंस असले तरी लेखनप्रवाहाला बाधा येणार नाही अश्या पद्धतीनंच लिहीलं गेलंय.

In reply to by चाणक्य

असंका Mon, 06/23/2014 - 13:40
मूळ गझलीमध्ये जे शब्द नाहीत पण अर्थ लावताना आवश्यक असे शब्द सरांनी कंसात टाकले आहेत. काल या कंसांचा अडथळा वाटून मी हा लेख नुस्ता वरवर वाचला. आज सकाळी कंसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून वाचून बघितला. पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. आणि किती सुरेख..

In reply to by असंका

पूर्ण वेगळा अनुभव मिळाला. दॅटस द वे! जे सांगायला मला इतका वेळ लागला तेच तुम्ही अगदी सहज सांगून गेलात. मनःपूर्वक धन्यवाद!

चौकटराजा Mon, 06/23/2014 - 11:47
मस्त रसास्वाद ! 'ना जाओ छोडकर' कहनेवाले ही थे हम लब्ज होटोंपे थम गये निकलते निकलते

माधुरी विनायक Mon, 06/23/2014 - 12:30
उर्दू काव्य मनापासून आवडतं, पण काही शब्द कळत नाहीत आणि त्यामुळे त्या रचनेचा आस्वाद घेता येत नाही. तुमच्या या लिखाणामुळे आणखी एका सुंदर रचनेचा आस्वाद घेता आला. धन्यवाद...

In reply to by माधुरी विनायक

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 13:22
सध्या परिक्षण नुसतं घाईघाईत वाचलय पण गझल आणि वर केलेलं परी़क्षण उत्तम असणार ह्यात शंका नाहि. ऑफिस मधे असल्यामुळे घरी जाउन निवांत एकेन. धन्यवाद एका सुंदर रचेनेबद्द्ल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 10:37
वाह संक्षीसेठ...! गझल निवड आवडली आणि अनुवादही. प्रेमात पडलेल्या माणसांना आपला अनुभव वाटावा अशी आत पोहचलेली ही गझल. तिच्या अजब वागण्यामुळे ''इरादा था तर्के़ मुहोब्बतका लेकिन फ़रेबे तबस्सुमें फिर आ गए हम'' हे तर अतिशय सुंदर. 'इरादा था तर्के' तर अहाहा. तिला विसरुन जावं, पुन्हा तिच्याकडे बघू नये, तिचा विचार मनातही येऊ नये, तिच्याशी फारकत घ्यावी असा विचार त्या प्रियकराच्या मनात येतो तसा हाही सर्व तसा लटका राग असतो म्हणुन मला पुढच्या ओळी खास वाटल्या. प्रियकर फ़सतो ते तिच्या त्या मोहक हसण्याला. आणि अनेकदा अशा अवस्थेतून तो सावरलाही आहे आणि पुन्हा सावरला की येरे माझ्या मागल्या प्रमाणे त्याच्या वाटेला पुन्हा इरादा तर्केचा म्हणजे ठोकरा खाण्याचा अनुभव येऊ लागतो. असो, अशाच सुंदर गझला येऊ द्या..... !
तुम्हें दिल लगानेको किसने कहा था बहेल जाएगा दिल बहेलते बहलते |
-दिलीप बिरुटे

सुधीर गुरुवार, 06/26/2014 - 22:30
रसग्रहण आवडले. "ग़ज़लांची अशी मैफिल नक्की जमवत जाईन." वाट पाहतो.

शब्दबम्बाळ Wed, 05/06/2015 - 23:21
पुन्हा पुन्हा वाचून सुद्धा मन भरत नाही! :) शेवटचे कडवे वाचल्यानंतर हे आठवले, "अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें"

ईश्वरसर्वसाक्षी गुरुवार, 05/07/2015 - 20:21
वा संजयजी मस्त लिहिलय. चुप्पी / खामोशी वरुन आठवल.. उम्र भर जलता रहा दिल और खामोशि के साथ शमा को एक रात की सोज-ए-दिलि पे नाझ था मित्रहो मि आता पर्यन्त मिपा चा वाचक होतो.पण आज सदस्य झालोय आणि हि माझी पहिलि प्रतिक्रिया.
लेखनविषय:
लेखनप्रकार
उस्ताद क़मर जलालवींची ही दिलकश ग़ज़ल, ग़ुलाम अलींनी यमनच्या माहौलमधे जी काय बेहद्द रंगवली आहे ती पुन्हा पुन्हा ऐकण्याजोगी आहे. इश्काचा बिमार तिचीच कहाणी अखेरपर्यंत गात राहिला.