मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी केलेला एक प्रयत्न !!

खटपट्या ·

अक्शु गुरुवार, 06/26/2014 - 12:25
वा फारच सुरेख काढलंय चित्र.मला सुरुवातीला वाचताना(scroll down न केल्याने)वाटत होत की रंगीत चित्र असेल.पण हे तर रंगीत पेक्षाही भारी वाटतंय.वेगळा प्रयत्न आवडला.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/26/2014 - 12:35
अतिशय सुरेख चित्र. अभिनंदन. फक्त प्रतिबिंबात स्वतःलाच पाहताना वाघोबांच्या अंगावर 'डर के मारे रोंगटे खडे' झालेले दिसताहेत.

एस गुरुवार, 06/26/2014 - 13:40
मस्तच. अजून येऊद्या. आणि छायाचित्र घेताना लेन्सचा कोन चित्राच्या पृष्ठभागाला लंबरूप ठेवा म्हणजे अजून छान फोटो येईल.

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 13:53
या स्वतंत्र पोस्टबद्दल अभिनंदन. तुम्ही अजून चित्रं अपलोड करायचा वादा केलायं. चित्रकलेसाठी जरुर वेळ काढा.

बबन ताम्बे गुरुवार, 06/26/2014 - 19:33
अप्रतिम ! १. चित्राची साईझ काय आहे? २. भिंतीवर डायरेक्ट ऑइल पेंट लावला की आधी थोडे घासून प्रायमर लावला?

In reply to by बबन ताम्बे

खटपट्या गुरुवार, 06/26/2014 - 23:59
भिंत घासून प्रायमर लावला पाहिजे खर तर. पण आळसामुळे नाही केले. मागील भिंत मैट फिनिश ची होती म्हणून मग डायरेक्ट कलर चढवला. चित्राची साइज चार फुट X दोन फुट आहे

मराठे गुरुवार, 06/26/2014 - 20:31
चित्र सुरेख आलंय, पाण्यावरील तरंगांमुळे सावली वेगळी दिसणं बरोबर आहे पण सावली तरंगाशी मॅच होत नसल्यामुळे थोडी विचित्र वाटतेय. (आगाऊ सुचना: फोटो जर समोरून काढलात आणि पुरेसा प्रकाश असेल (जास्त नको) तर कदाचीत नीट दिसेल)

निखळानंद Sat, 06/28/2014 - 15:52
फक्त 'हे मी काढलेले चित्र !' अश्या प्रकारे इथे न 'फेकता' त्याच्या निर्मिती चे तपशीलवार वर्णन दिल्यामुळे इतरांनाही त्यातून स्फूर्ती मिळू शकेल.. चित्र फार छान ! कल्पना भन्नाट ! पुढील प्रयोगांसाठी शुभेछा ..

In reply to by खटपट्या

प्यारे१ Sun, 06/29/2014 - 20:37
पाण्यात वाघ पाणी प्यायला लागलेला आहे, जीभ लावली पाण्याला तिथं पाण्याची वर्तुळं निर्माण होणारच की.... इतर भाग सुद्धा त्या अनुषंगानं बदलणार... प्रतिबिंब काय घंटा दिसणारे हलत्या पाण्यात? चित्रात बदल नको असं वैयक्तिक मत आहे.

In reply to by प्यारे१

प्यारे१ Sun, 06/29/2014 - 20:40
आणखी एकः त्या वर्तुळाच्या रेघा तेवढ्या वाघाचं तोंड पाण्याला लागतंय ती जागा केंद्रस्थानाशी धरुन पर्स्पेक्टीव्ह धरुन वाढवाव्या लागतील. ती जी ड्रॅगन ची मान वाटतेय तिथं.

सुधीर Mon, 06/30/2014 - 12:55
सुरेख, चित्र काढण्यामागच्या हेतूमुळे मलाही प्रेरणा मिळाली. :)

खटपट्या Mon, 10/09/2017 - 13:00
नमस्कार बरेच दिवस मिपावर येणे झाले नव्हते म्हणून उत्तर देता आले नाही. ज्यांना चित्र दिसत नाही त्यांच्यासाठी चित्र परत देत आहे. क्रुपया एका टॅबमधे फेसबुक लॉगइन चालू ठेवा आणि दुसर्‍या टॅबमधे मिपा उघडा. बघा दिसते का... abcd

अक्शु गुरुवार, 06/26/2014 - 12:25
वा फारच सुरेख काढलंय चित्र.मला सुरुवातीला वाचताना(scroll down न केल्याने)वाटत होत की रंगीत चित्र असेल.पण हे तर रंगीत पेक्षाही भारी वाटतंय.वेगळा प्रयत्न आवडला.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/26/2014 - 12:35
अतिशय सुरेख चित्र. अभिनंदन. फक्त प्रतिबिंबात स्वतःलाच पाहताना वाघोबांच्या अंगावर 'डर के मारे रोंगटे खडे' झालेले दिसताहेत.

एस गुरुवार, 06/26/2014 - 13:40
मस्तच. अजून येऊद्या. आणि छायाचित्र घेताना लेन्सचा कोन चित्राच्या पृष्ठभागाला लंबरूप ठेवा म्हणजे अजून छान फोटो येईल.

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 13:53
या स्वतंत्र पोस्टबद्दल अभिनंदन. तुम्ही अजून चित्रं अपलोड करायचा वादा केलायं. चित्रकलेसाठी जरुर वेळ काढा.

बबन ताम्बे गुरुवार, 06/26/2014 - 19:33
अप्रतिम ! १. चित्राची साईझ काय आहे? २. भिंतीवर डायरेक्ट ऑइल पेंट लावला की आधी थोडे घासून प्रायमर लावला?

In reply to by बबन ताम्बे

खटपट्या गुरुवार, 06/26/2014 - 23:59
भिंत घासून प्रायमर लावला पाहिजे खर तर. पण आळसामुळे नाही केले. मागील भिंत मैट फिनिश ची होती म्हणून मग डायरेक्ट कलर चढवला. चित्राची साइज चार फुट X दोन फुट आहे

मराठे गुरुवार, 06/26/2014 - 20:31
चित्र सुरेख आलंय, पाण्यावरील तरंगांमुळे सावली वेगळी दिसणं बरोबर आहे पण सावली तरंगाशी मॅच होत नसल्यामुळे थोडी विचित्र वाटतेय. (आगाऊ सुचना: फोटो जर समोरून काढलात आणि पुरेसा प्रकाश असेल (जास्त नको) तर कदाचीत नीट दिसेल)

निखळानंद Sat, 06/28/2014 - 15:52
फक्त 'हे मी काढलेले चित्र !' अश्या प्रकारे इथे न 'फेकता' त्याच्या निर्मिती चे तपशीलवार वर्णन दिल्यामुळे इतरांनाही त्यातून स्फूर्ती मिळू शकेल.. चित्र फार छान ! कल्पना भन्नाट ! पुढील प्रयोगांसाठी शुभेछा ..

In reply to by खटपट्या

प्यारे१ Sun, 06/29/2014 - 20:37
पाण्यात वाघ पाणी प्यायला लागलेला आहे, जीभ लावली पाण्याला तिथं पाण्याची वर्तुळं निर्माण होणारच की.... इतर भाग सुद्धा त्या अनुषंगानं बदलणार... प्रतिबिंब काय घंटा दिसणारे हलत्या पाण्यात? चित्रात बदल नको असं वैयक्तिक मत आहे.

In reply to by प्यारे१

प्यारे१ Sun, 06/29/2014 - 20:40
आणखी एकः त्या वर्तुळाच्या रेघा तेवढ्या वाघाचं तोंड पाण्याला लागतंय ती जागा केंद्रस्थानाशी धरुन पर्स्पेक्टीव्ह धरुन वाढवाव्या लागतील. ती जी ड्रॅगन ची मान वाटतेय तिथं.

सुधीर Mon, 06/30/2014 - 12:55
सुरेख, चित्र काढण्यामागच्या हेतूमुळे मलाही प्रेरणा मिळाली. :)

खटपट्या Mon, 10/09/2017 - 13:00
नमस्कार बरेच दिवस मिपावर येणे झाले नव्हते म्हणून उत्तर देता आले नाही. ज्यांना चित्र दिसत नाही त्यांच्यासाठी चित्र परत देत आहे. क्रुपया एका टॅबमधे फेसबुक लॉगइन चालू ठेवा आणि दुसर्‍या टॅबमधे मिपा उघडा. बघा दिसते का... abcd
लेखनविषय:
लेखनप्रकार
संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. - --------------------------------------------------------------------------------- बरेच दिवसापासून आमच्या हिचे म्हणणे होते कि आपण हॉल मधील या दर्शनी भिंतीवर काहीतरी चांगले चित्र लावले पाहिजे. बाजारात बरेच फिरलो पण चित्र काही पसंत पडेना. देवाचा/गणपतीचा मोठा फोटो लावावा तर त्या भिंतीपलीकडे नेमके बाथरूम आणि शौचालय येत होते. याच भिंतीवर चित्र लावण्याचे कारण हे कि पलीकडच्या बाथरूम ची ओल सदैव भिंतीच्या पायथ्याशी दिसते व कोणी आले कि तिकडे लक्ष जाते.

एकलव्य..

vaibhav deshmukh ·

एस Mon, 07/07/2014 - 10:32
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत

आयुर्हित Mon, 07/07/2014 - 10:40
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.

एस Mon, 07/07/2014 - 10:32
छान केलीय कविता. काही व्याकरण-शुद्धलेखनाच्या चुका टाळा. उदा: माञ -> मात्र निश्चिल -> निश्चल धर्नुधर -> धनुर्धर नजरात -> नजरांत

आयुर्हित Mon, 07/07/2014 - 10:40
कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो अभिनंदन, खुप चांगला संदेश दिला आहे.
लेखनविषय:
एकलव्य.... कित्येक शतके उलटली युगांतरे झाली सत्तांतर घडले मी माञ स्थिर आहे त्याच सहानुभूतींच्या बंदिस्त नजरेत.. कोणी नाकारले म्हणूनच शांत निश्चिल मूर्तीच्या साक्षीनेच मी लक्ष्यावर असंख्य बाण सोडले मी धर्नुधर झालो रक्ताळलेल्या चार बोटांचा श्रेष्ठ शिष्यही झालो तेव्हाच; त्या हाताकडे पाहताना दु: खाचा लवलेशही नव्हता मुद्रेवर पण; मी डगमगलो ढासळलो तुमच्या अनुत्तरीत प्रश्नात? तुमच्या सहानुभूतीच्या नजरात? तुमच्या पाणावलेल्या इतिहासात? तुमच्या या पराजित युगात...!

ध्वनी प्रदुषण

फटू ·

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/26/2014 - 06:33
सद्विचारांचं लहान वय... लहान वयातले सद्विचार... ================== ़़ धन्या,भाच्याला "छोटा रक्षक" हे आय.डी.नेम घ्यायला लाव! फटू कायतरीच वाटतय.

नाखु गुरुवार, 06/26/2014 - 08:49
भाचा पण कमी नाही. खरच कर्णकर्कश वाजवणार्यांना दंडापेक्षाही जालीम उपाय केला पाहीजे.आणि सगळ्या लग्न्-तोरण्-(वाय झेड) डे मिरवणूकांवर काण्ठाळी ध्वनीभिंती/बोंबाट ढोल पथक असेल तर बंदी पाहीजे.फक्त संचलन असेल, न आवाज करता तर ठीक. आत्मुदांना अनुमोदन.

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 09:46
धन्यवाद मंडळी. इतर मिपाकरांच्या माहितीसाठी, हा छोटेखानी लेख माझ्या भाच्याने लिहिला आहे. दहा वर्षांचा असल्यामुळे तो मिपावरील सर्वात लहान लेखक आहे असे म्हणण्यास हरकत नाही. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 12:43
असेच म्हणतो. जरा चांगला आयडी घे. तूर्त त्याचे कै वाटणार नै, पण ५-६ वर्षांत वाटेल-बरंच काही वाटेल ;)

In reply to by धन्या

बाळ सप्रे गुरुवार, 06/26/2014 - 14:16
१० वर्षाच्या फटुचे अभिनंदन.. धाग्याचा विषय, शुद्धलेखन वगैरे खासच.. बाकी वाचून आणि वयापरत्वे प्रगल्भता वाढेलच!!

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 10:14
वा! सर्वांत लहान लेखक असूनही एकोळी धागा नै काढला हे सर्वांत जास्ती आवडलं. नैतर वय कितीही असलं तरी एकोळी काड्या टाकून पसार होणारे लोक पाहिले की फटूचं कौतुकच वाटतं. :) कीपिटप फटु!

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश गुरुवार, 06/26/2014 - 13:44
+१ या वयात तेही मराठीत लिहितोय याचे कौतुक आहे. कीप इट अप! :)

In reply to by ऋषिकेश

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 14:08
त्याच्या शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. या निमिताने मला गमभनकार ओंकार जोशी यांचे आभार मानायचे आहेत. गमभन ही सुविधा त्यांनी ईतकी सुलभ बनवली आहे की अगदी मराठी माध्यमातून शिकणारा दहा वर्षांचा मुलगासुद्धा गमभन वापरुन आंतरजालावर मराठीतून आपले विचार व्यक्त करु शकतो.

यशोधरा गुरुवार, 06/26/2014 - 11:42
फटु, मिपावर स्वागत :) छान लिहिले आहेस. ध्वनी प्रदूषणाबाबत एकदम सहमत! अजूनही लिही वेगळया वेगळ्या विषयांवर.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 12:16
बघा, बघा. (वयाने) लहान मिपाकर (पण) किती प्रगल्भ धागा काढताहेत ! कोण म्हणतो मिपाला (आणि पर्यायाने भारताला) भविष्य नाही ?! काही दिवसापूर्वीच्या कट्ट्यात चमक दिसली होतीच म्हणा ;) नव्या नवयुवक मिपाकराचे स्वागत !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 06/26/2014 - 13:43
छान रे फटू. अजून लिही या विषयावर. रच्याकने तुझा आयडी जर 'धन्याचा भाचा' असाच ठेवला तर बेटर र्‍हाईल. काय म्हण्तोस? :-)

In reply to by एस

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/26/2014 - 13:58
त्यापेक्षा स्वतःचे नांवच आयडी म्हणून घेतले तर मामाच्या छायेतून लवकर बाहेर पडेल आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देईल.

In reply to by अनुप ढेरे

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 14:22
म्हणजे वयाच्या तिसर्‍या चौथ्या वर्षापासून सदस्य असणं अपेक्षित आहे. (कोण रे तो मानसिक वयाबद्दल बोलतोय? ;) )

In reply to by गवि

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 14:56
माझ्या धनाजीराव वाकडे (आताचा धन्या हा आयडी) डुआयडी म्हणून वापरायचा माझा विचार होता. नव्हे तसा वापर मी सुरुही केला होता. मात्र मिपाकरांनी "धनाजीरावांना" "नाना चेंगटांचा" नवा अवतार समजायला सुरुवात केली. याच दरम्यान मी धनाजीराव म्हणूनच पन्नास फक्त, वल्ली आणि इतरांना प्रत्यक्ष भेटलो. मग फटू आयडीचा वापर बंद करुन धनाजीराव वाकडे म्हणूनच लिहू लागलो. यानिमिताने एक गोष्ट माझ्या नव्याने लक्षात आली, मी मिपावर सहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. :)

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 14:45
मिपावर स्वागत! तुला जे काही आवडेल ते लिहीत जा. धन्या, इथल्या बाकी गोंधळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घे रे!

वपाडाव Fri, 06/27/2014 - 20:17
लेकरु त्याच्या मामासारखंच व्यासंगिक आहे म्हणा की... काकणभर सरसच आहे म्हणा... येउंदेत. लीमौजेटचा किस्सा वाचण्यास उत्सुक. टीप-एका गाडीमागे वाचलेले वाक्य माझी बाइक उडत नाही, हॉर्न वाजौला तरीही...

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/26/2014 - 06:33
सद्विचारांचं लहान वय... लहान वयातले सद्विचार... ================== ़़ धन्या,भाच्याला "छोटा रक्षक" हे आय.डी.नेम घ्यायला लाव! फटू कायतरीच वाटतय.

नाखु गुरुवार, 06/26/2014 - 08:49
भाचा पण कमी नाही. खरच कर्णकर्कश वाजवणार्यांना दंडापेक्षाही जालीम उपाय केला पाहीजे.आणि सगळ्या लग्न्-तोरण्-(वाय झेड) डे मिरवणूकांवर काण्ठाळी ध्वनीभिंती/बोंबाट ढोल पथक असेल तर बंदी पाहीजे.फक्त संचलन असेल, न आवाज करता तर ठीक. आत्मुदांना अनुमोदन.

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 09:46
धन्यवाद मंडळी. इतर मिपाकरांच्या माहितीसाठी, हा छोटेखानी लेख माझ्या भाच्याने लिहिला आहे. दहा वर्षांचा असल्यामुळे तो मिपावरील सर्वात लहान लेखक आहे असे म्हणण्यास हरकत नाही. :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 12:43
असेच म्हणतो. जरा चांगला आयडी घे. तूर्त त्याचे कै वाटणार नै, पण ५-६ वर्षांत वाटेल-बरंच काही वाटेल ;)

In reply to by धन्या

बाळ सप्रे गुरुवार, 06/26/2014 - 14:16
१० वर्षाच्या फटुचे अभिनंदन.. धाग्याचा विषय, शुद्धलेखन वगैरे खासच.. बाकी वाचून आणि वयापरत्वे प्रगल्भता वाढेलच!!

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 10:14
वा! सर्वांत लहान लेखक असूनही एकोळी धागा नै काढला हे सर्वांत जास्ती आवडलं. नैतर वय कितीही असलं तरी एकोळी काड्या टाकून पसार होणारे लोक पाहिले की फटूचं कौतुकच वाटतं. :) कीपिटप फटु!

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश गुरुवार, 06/26/2014 - 13:44
+१ या वयात तेही मराठीत लिहितोय याचे कौतुक आहे. कीप इट अप! :)

In reply to by ऋषिकेश

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 14:08
त्याच्या शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. या निमिताने मला गमभनकार ओंकार जोशी यांचे आभार मानायचे आहेत. गमभन ही सुविधा त्यांनी ईतकी सुलभ बनवली आहे की अगदी मराठी माध्यमातून शिकणारा दहा वर्षांचा मुलगासुद्धा गमभन वापरुन आंतरजालावर मराठीतून आपले विचार व्यक्त करु शकतो.

यशोधरा गुरुवार, 06/26/2014 - 11:42
फटु, मिपावर स्वागत :) छान लिहिले आहेस. ध्वनी प्रदूषणाबाबत एकदम सहमत! अजूनही लिही वेगळया वेगळ्या विषयांवर.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 12:16
बघा, बघा. (वयाने) लहान मिपाकर (पण) किती प्रगल्भ धागा काढताहेत ! कोण म्हणतो मिपाला (आणि पर्यायाने भारताला) भविष्य नाही ?! काही दिवसापूर्वीच्या कट्ट्यात चमक दिसली होतीच म्हणा ;) नव्या नवयुवक मिपाकराचे स्वागत !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 06/26/2014 - 13:43
छान रे फटू. अजून लिही या विषयावर. रच्याकने तुझा आयडी जर 'धन्याचा भाचा' असाच ठेवला तर बेटर र्‍हाईल. काय म्हण्तोस? :-)

In reply to by एस

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/26/2014 - 13:58
त्यापेक्षा स्वतःचे नांवच आयडी म्हणून घेतले तर मामाच्या छायेतून लवकर बाहेर पडेल आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देईल.

In reply to by अनुप ढेरे

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 14:22
म्हणजे वयाच्या तिसर्‍या चौथ्या वर्षापासून सदस्य असणं अपेक्षित आहे. (कोण रे तो मानसिक वयाबद्दल बोलतोय? ;) )

In reply to by गवि

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 14:56
माझ्या धनाजीराव वाकडे (आताचा धन्या हा आयडी) डुआयडी म्हणून वापरायचा माझा विचार होता. नव्हे तसा वापर मी सुरुही केला होता. मात्र मिपाकरांनी "धनाजीरावांना" "नाना चेंगटांचा" नवा अवतार समजायला सुरुवात केली. याच दरम्यान मी धनाजीराव म्हणूनच पन्नास फक्त, वल्ली आणि इतरांना प्रत्यक्ष भेटलो. मग फटू आयडीचा वापर बंद करुन धनाजीराव वाकडे म्हणूनच लिहू लागलो. यानिमिताने एक गोष्ट माझ्या नव्याने लक्षात आली, मी मिपावर सहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. :)

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 14:45
मिपावर स्वागत! तुला जे काही आवडेल ते लिहीत जा. धन्या, इथल्या बाकी गोंधळाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घे रे!

वपाडाव Fri, 06/27/2014 - 20:17
लेकरु त्याच्या मामासारखंच व्यासंगिक आहे म्हणा की... काकणभर सरसच आहे म्हणा... येउंदेत. लीमौजेटचा किस्सा वाचण्यास उत्सुक. टीप-एका गाडीमागे वाचलेले वाक्य माझी बाइक उडत नाही, हॉर्न वाजौला तरीही...
आपला कान काचेचा असता तर केव्हाच फुटला असता. याचे कारण आपण घरात टीव्ही रेडीयो स्पीकर मोठ्या आवाजात लावतो. याचा आपल्याला कायमचा त्रास होऊ शकतो. जर आपल्याला ऐकायचे असेल तर दुसर्‍यांना त्रास होऊ नये एव्हढ्या लहान आवाजात लावावेत. आपण गाड्यांचे हॉर्न ट्रॅफिक असल्यावर वाजवतो तसेच कारण नसताना पुढे सिग्नल लाल असतो आणि आपण हॉर्न वाजवतो. त्याचा लोकांना त्रास होतो. लग्नाची वरात, दिवाळी, मिरवणूकीत आपण फटाके फोडतो, डीजे लावतो. त्याचा आपल्या कानांना त्रास होतो. आपल्या कानाचा पडदा नाजुक असल्यामुळे त्याला ईजा होऊ शकते आणि माणुस कायमचा बहिरा होऊ शकतो.

ड्रेस्डेन - प्राग - २

मधुरा देशपांडे ·

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 00:07
सुंदर चित्रे आणि प्रवासवर्णन. काचांवरची चित्रे सुरेख आहेत. प्रागमधली पाकीटमारी वाचून माझे अ‍ॅम्स्टरडॅममध्ये मारले गेलेले पाकीट आठवले !

हुकुमीएक्का गुरुवार, 06/26/2014 - 00:19
         फोटो व माहिती आवडली. दुसर्‍या फोटोमधील मुलाने खाली दिलेल्या व्हिडीयोमधील Trick वापरली आहे. फरक इतकाच की व्हिडीयोमध्ये एकच व्यक्ती आहे. आणि वरील फोटोमध्ये अजून एक ट्रिक वापरली असल्याने खाली बसलेल्या मुलाने काठी हातात पकडली आहे.

प्राग आमच्या शहरापासून काही तासावर असल्याने पाहण्यात आले , मजा आली मात्र पूर्व जर्मनी बद्दल आमच्या कुटुंबाचे प्रतिकूल मत असल्याने ,तेथे काय पाहण्यासारखे आहे ,असा काहीसा भाव असल्याने तेथे जाणे झाले नाही , तुझ्या प्रवास वर्णनावरून आनंद मानून घेतो किंवा एखादा मिपाकर जर्मन दौरा आखत असेल तर त्याच्या सोबत जाण्याचा नक्की बेत आखेल.

अजया गुरुवार, 06/26/2014 - 07:32
भाग आवडलाच. त्याचबरोबर एखादे तरी युरोपिअन पर्यटन स्थळ थोडे का होइना खराब केले आहे, हवामान खात्याने अंदाज चुकवणे,गर्दी ,डबकी हे वाचून अंमळ जळजळ शांत झाली !!

चौकटराजा गुरुवार, 06/26/2014 - 08:34
प्रागचे चर्च तसे प्रसिद्ध आहे. आपण त्याचे यथार्थ दर्शन घडविले आहे. स्टेन्ड ग्लास विण्डोज हे युरोपियन चर्च मधील खास दालन आहे. आपण दाखविलेल्या त्या घड्याळातील वरच्या दोन खिडक्या विशिष्ट वेळेस उघडतात.व त्यातून सरदाराच्या वेषातील बाहुल्या डोकावतात. पुढील लेखासाठी धन्यवाद !

असंका गुरुवार, 06/26/2014 - 09:36
गेल्या अनेक दिवसांपासून मिपा वरील प्रवासवर्णनांमध्ये मानवी स्पर्श जवळजवळ दिसतच नव्हता. आपल्या या प्रवासवर्णनात पहिल्यांदाच तो दिसला. याबद्दल आपले कितीही अभिनंदन केले तरी कमीच आहे.... प्रवास म्हणजे काहितरी प्रेक्षणिय स्थळ बघायला जाणे आणि प्रवासवर्णन म्हणजे त्या स्थळाचे फोटो आणि त्या फोटोंचे वर्णन एवढाच अलिकडे अर्थ उरला असताना, एक बदल आपल्या लेखातून वाचायला मिळाला. त्याबद्दल धन्यवाद, आणि पुढील लेखासाठी शुभेच्छा!

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 10:56
इए काका, हुकुमीएक्का, निनाद, यशो, अजया, स्वॅप्स, चौकटराजा, कंफ्युज्ड अकौंटंट सगळ्यांचे आभार. @ निनाद, अगदी जवळ असल्याने एकदा जायला हरकत नाही असे वाटते. हिवाळ्यात गर्दी कमी असेल तर कदाचित अजून बरे पडेल. ड्रेस्डेन विषयी लिहीनच अजून. तिथे तर मी परत जायला तयार आहे एवढे आवडले. :) @अजया आणि स्वॅप्स - हो अशी ठिकाणे आहेत युरोपात देखील. कारण तेवढीच बॉलीवूड किंवा इतरही माध्यमातून जास्त दिसली आहेत आणि मग साहजिकच सगळे जग तिथे येतं. इतर काही मात्र मुख्य स्थळांपेक्षा सुंदर असून थोडी मागे पडली आहेत. त्यातल्या काहींविषयी लिहायचा विचार आहे. @चौकटराजा- चर्च विषयीच्या अधिक माहितीकरिता विशेष धन्यवाद. लेखात म्हटल्याप्रमाणे इथे अजून वेळ घालवायला आवडला असता पण गर्दीमुळे शक्य झाले नाही.

सस्नेह गुरुवार, 06/26/2014 - 15:06
अन फोटो तर भारीच. चर्चची भव्यता डोळ्यात भरते. चित्रेही सुंदर आहेत. पर्यटनस्थळांची गैरव्यवस्था हा भारताचाच मक्ता आहे हा गैरसमज दूर झाला ! *sad*

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 22:57
स्वाती ताई, राजेंद्र मेहेंदळे, सूड, स्नेहांकिता ताई, प्रशांत आवले, धन्यवाद. @राजेंद्र मेहेंदळे - अतिरंजित बराच जवळ जाणारा वाटतोय. धन्यवाद.

पैसा Mon, 06/30/2014 - 10:49
प्रवासवर्णन आवडलं. फिरताना असा एखादा तरी निराशाजनक अनुभव आला तर इतर ठिकाणी चांगल्या व्यवस्थेचं कौतुक करता येतं. फोटो खसच आलेत! पैसे गेले नाहीत हे नशीब. फिरायला जाताना जास्त पैसे जवळ न ठेवणे शहाणपणाचेच!

साती Tue, 07/01/2014 - 14:33
पुढच्याच आठवड्यात 'अहो' प्रागला जाणार आहेत. त्यामुळे आमच्यासाठी अगदी समयोचित. तिथे जेवणाखाण्याचे काय ऑप्शन्स?

In reply to by साती

धन्यवाद. जेवणासाठी - तुमचे अहो शाकाहारी असतील तर खूपच कमी ऑप्शन्स मिळतील. प्राग किंवा चेक चा एखादा खास खाद्यप्रकार माहित नाही. येथील डम्पलिंग्स बद्दल ऐकले आहे पण खाल्ले नाहीत. पण चिकन सहज मिळेल, त्यासोबत उकडलेले बटाटे किंवा सॅलड इ. शाकाहारी असतील तर फ्रेंच फ्राइज, आणि व्हेज पिझ्झा किंवा व्हेज बर्गर तत्सम प्रकार. बटाट्याचे चिप्स, रोल्ड पेस्ट्रीज, इत्यादी प्रकार रस्त्यावर छोट्या गाड्यांवर मिळतील. या रोल्ड पेस्ट्रीज पूर्व युरोपातील वैशिष्ट्य आहे. मस्त लागतात.

In reply to by मधुरा देशपांडे

साती Wed, 07/02/2014 - 10:38
चिकन मटण खातात त्यामुळे चालून जाईल. सुवेनियर म्हणून आणण्यासाठी काय खास असेल तर सुचवा. (तसेही अहो खरेदीत काय प्रकाश पाडणार ते माहितच आहे. :) )

In reply to by साती

तिथले खगोलशास्त्रीय घड्याळ किंवा किल्ल्याचा देखावा वगैरे. चार्ल्स ब्रिज आणि किल्ल्याची रेखाटने पण छान मिळू शकतात. पण या रस्त्यावर विकणाऱ्या लोकांकडून शक्य तेवढे बार्गेन करण्याचा प्रयत्न करायचा. पर्यटक बघून फसवणूक होऊ शकते.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 00:07
सुंदर चित्रे आणि प्रवासवर्णन. काचांवरची चित्रे सुरेख आहेत. प्रागमधली पाकीटमारी वाचून माझे अ‍ॅम्स्टरडॅममध्ये मारले गेलेले पाकीट आठवले !

हुकुमीएक्का गुरुवार, 06/26/2014 - 00:19
         फोटो व माहिती आवडली. दुसर्‍या फोटोमधील मुलाने खाली दिलेल्या व्हिडीयोमधील Trick वापरली आहे. फरक इतकाच की व्हिडीयोमध्ये एकच व्यक्ती आहे. आणि वरील फोटोमध्ये अजून एक ट्रिक वापरली असल्याने खाली बसलेल्या मुलाने काठी हातात पकडली आहे.

प्राग आमच्या शहरापासून काही तासावर असल्याने पाहण्यात आले , मजा आली मात्र पूर्व जर्मनी बद्दल आमच्या कुटुंबाचे प्रतिकूल मत असल्याने ,तेथे काय पाहण्यासारखे आहे ,असा काहीसा भाव असल्याने तेथे जाणे झाले नाही , तुझ्या प्रवास वर्णनावरून आनंद मानून घेतो किंवा एखादा मिपाकर जर्मन दौरा आखत असेल तर त्याच्या सोबत जाण्याचा नक्की बेत आखेल.

अजया गुरुवार, 06/26/2014 - 07:32
भाग आवडलाच. त्याचबरोबर एखादे तरी युरोपिअन पर्यटन स्थळ थोडे का होइना खराब केले आहे, हवामान खात्याने अंदाज चुकवणे,गर्दी ,डबकी हे वाचून अंमळ जळजळ शांत झाली !!

चौकटराजा गुरुवार, 06/26/2014 - 08:34
प्रागचे चर्च तसे प्रसिद्ध आहे. आपण त्याचे यथार्थ दर्शन घडविले आहे. स्टेन्ड ग्लास विण्डोज हे युरोपियन चर्च मधील खास दालन आहे. आपण दाखविलेल्या त्या घड्याळातील वरच्या दोन खिडक्या विशिष्ट वेळेस उघडतात.व त्यातून सरदाराच्या वेषातील बाहुल्या डोकावतात. पुढील लेखासाठी धन्यवाद !

असंका गुरुवार, 06/26/2014 - 09:36
गेल्या अनेक दिवसांपासून मिपा वरील प्रवासवर्णनांमध्ये मानवी स्पर्श जवळजवळ दिसतच नव्हता. आपल्या या प्रवासवर्णनात पहिल्यांदाच तो दिसला. याबद्दल आपले कितीही अभिनंदन केले तरी कमीच आहे.... प्रवास म्हणजे काहितरी प्रेक्षणिय स्थळ बघायला जाणे आणि प्रवासवर्णन म्हणजे त्या स्थळाचे फोटो आणि त्या फोटोंचे वर्णन एवढाच अलिकडे अर्थ उरला असताना, एक बदल आपल्या लेखातून वाचायला मिळाला. त्याबद्दल धन्यवाद, आणि पुढील लेखासाठी शुभेच्छा!

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 10:56
इए काका, हुकुमीएक्का, निनाद, यशो, अजया, स्वॅप्स, चौकटराजा, कंफ्युज्ड अकौंटंट सगळ्यांचे आभार. @ निनाद, अगदी जवळ असल्याने एकदा जायला हरकत नाही असे वाटते. हिवाळ्यात गर्दी कमी असेल तर कदाचित अजून बरे पडेल. ड्रेस्डेन विषयी लिहीनच अजून. तिथे तर मी परत जायला तयार आहे एवढे आवडले. :) @अजया आणि स्वॅप्स - हो अशी ठिकाणे आहेत युरोपात देखील. कारण तेवढीच बॉलीवूड किंवा इतरही माध्यमातून जास्त दिसली आहेत आणि मग साहजिकच सगळे जग तिथे येतं. इतर काही मात्र मुख्य स्थळांपेक्षा सुंदर असून थोडी मागे पडली आहेत. त्यातल्या काहींविषयी लिहायचा विचार आहे. @चौकटराजा- चर्च विषयीच्या अधिक माहितीकरिता विशेष धन्यवाद. लेखात म्हटल्याप्रमाणे इथे अजून वेळ घालवायला आवडला असता पण गर्दीमुळे शक्य झाले नाही.

सस्नेह गुरुवार, 06/26/2014 - 15:06
अन फोटो तर भारीच. चर्चची भव्यता डोळ्यात भरते. चित्रेही सुंदर आहेत. पर्यटनस्थळांची गैरव्यवस्था हा भारताचाच मक्ता आहे हा गैरसमज दूर झाला ! *sad*

मधुरा देशपांडे गुरुवार, 06/26/2014 - 22:57
स्वाती ताई, राजेंद्र मेहेंदळे, सूड, स्नेहांकिता ताई, प्रशांत आवले, धन्यवाद. @राजेंद्र मेहेंदळे - अतिरंजित बराच जवळ जाणारा वाटतोय. धन्यवाद.

पैसा Mon, 06/30/2014 - 10:49
प्रवासवर्णन आवडलं. फिरताना असा एखादा तरी निराशाजनक अनुभव आला तर इतर ठिकाणी चांगल्या व्यवस्थेचं कौतुक करता येतं. फोटो खसच आलेत! पैसे गेले नाहीत हे नशीब. फिरायला जाताना जास्त पैसे जवळ न ठेवणे शहाणपणाचेच!

साती Tue, 07/01/2014 - 14:33
पुढच्याच आठवड्यात 'अहो' प्रागला जाणार आहेत. त्यामुळे आमच्यासाठी अगदी समयोचित. तिथे जेवणाखाण्याचे काय ऑप्शन्स?

In reply to by साती

धन्यवाद. जेवणासाठी - तुमचे अहो शाकाहारी असतील तर खूपच कमी ऑप्शन्स मिळतील. प्राग किंवा चेक चा एखादा खास खाद्यप्रकार माहित नाही. येथील डम्पलिंग्स बद्दल ऐकले आहे पण खाल्ले नाहीत. पण चिकन सहज मिळेल, त्यासोबत उकडलेले बटाटे किंवा सॅलड इ. शाकाहारी असतील तर फ्रेंच फ्राइज, आणि व्हेज पिझ्झा किंवा व्हेज बर्गर तत्सम प्रकार. बटाट्याचे चिप्स, रोल्ड पेस्ट्रीज, इत्यादी प्रकार रस्त्यावर छोट्या गाड्यांवर मिळतील. या रोल्ड पेस्ट्रीज पूर्व युरोपातील वैशिष्ट्य आहे. मस्त लागतात.

In reply to by मधुरा देशपांडे

साती Wed, 07/02/2014 - 10:38
चिकन मटण खातात त्यामुळे चालून जाईल. सुवेनियर म्हणून आणण्यासाठी काय खास असेल तर सुचवा. (तसेही अहो खरेदीत काय प्रकाश पाडणार ते माहितच आहे. :) )

In reply to by साती

तिथले खगोलशास्त्रीय घड्याळ किंवा किल्ल्याचा देखावा वगैरे. चार्ल्स ब्रिज आणि किल्ल्याची रेखाटने पण छान मिळू शकतात. पण या रस्त्यावर विकणाऱ्या लोकांकडून शक्य तेवढे बार्गेन करण्याचा प्रयत्न करायचा. पर्यटक बघून फसवणूक होऊ शकते.
ड्रेस्डेन - प्राग - १ प्राग ही चेक रिपब्लिक या देशाची राजधानी. ड्रेस्डेन पर्यंत जातोय तर मग प्राग ला जाऊन येऊ शकतो हे खरं तर कारण. चेक हा देश शेंगेन देशांमध्ये येतो त्यामुळे शेंगेन देशांमधील व्हिसा इथे चालतो. परंतु या देशाचे चलन मात्र वेगळे आहे. ड्रेस्डेन मध्ये असतानाच क्रोन घेतले होते. ड्रेस्डेन ते प्राग हा २ तासांचा प्रवास आहे. ट्रेन चे आरक्षण आधीच केले होते. या रेल्वेत केबिन्स होते आणि प्रत्येक केबिन मध्ये ६ जणांसाठी बसण्याची सोय होती. आम्ही एका केबिन मध्ये बसलो तेव्हा तिथे एकच जण बसला होता.

बायकांचे संसारींग-माझा अनुभव

संजय क्षीरसागर ·

In reply to by एस

भाते गुरुवार, 06/26/2014 - 09:33
पुरुषांचे ड्रायव्हिंग/डायेटिंग आणि हा धागा वाचल्यावर माझ्याही मनात हाच विचार आला होता. मिपाच्या समुद्रात ऊडी मारून शोध घेतल्यावर हा मोती मिळाला. यासारखे चांगले धागे शोधुन वर काढल्यास आपल्या ज्ञानात बरीच भर पडेल. :)

ब़जरबट्टू गुरुवार, 06/26/2014 - 11:39
छान लिव्हलय.... :) बाकी पिरा, पैसा, व रेवतीताईशी सहमत.... :)) इन अडवान्स... म्हणजे संक्षी म्हंटल्यावर येथे जे काही होणार तेला पुर्ण अणूमोडन इन अडवान्स....

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 12:59
विडंबन एक से बढकर एक आहेत. "तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत" हे वाक्य तर जाम आवडुन गेलं आहे स्पेशली त्यातला तो डांगडींग शब्द.

In reply to by लंबूटांग

(अर्थात माझं संसारींग हा विषय परत कधीतरी)
....लक्षपूर्वक न वाचता प्रतिसादाची घाई (पुन्हा) नडली!

In reply to by संजय क्षीरसागर

लंबूटांग Fri, 06/27/2014 - 01:38
....विरोधाभासी लिहण्याची आणि सोयीस्करपणे दुर्लक्ष करायची, सवय (पुन्हा) नडली!
माझा अनुभव भलतचं सांगतो
पण ते सुद्धा मध्यरात्री किंवा मग एकदम काही डल्ला मारायच्या वेळी बोलतात.
इतरांच्या संसारींगचा अनुभव रात्री बेरात्री जागून घेतला म्हणायचा का? अरे हो तिथेही बायकोला घेऊन का? वैयक्तिक म्हणून नाही पण लेखात
गेली दीडदशकं मी सगळीकडे माझी बायको घेवून जातोयं
असे वाचले म्हणून विचारले. असो, विडंबन काही खास वाटले नाही, ठीक आहे. पुलेशु.

In reply to by लंबूटांग

ती माझ्या संसाराची कहाणी असण्यापेक्षा जगाची कथा आहे. बहुतेक सर्व प्रतिसादकांना पोस्ट आवडलीये म्हणजे अर्थ पोहोचलायं. तुमच्या प्रतिसादातून वैयक्तिक निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न फसल्यानं तुम्ही नाराज झालात. सो आय डोंट केअर.

मदनबाण Fri, 06/27/2014 - 07:10
टुकार ! इतरांसाठी... डांगडींग असा नसुन डिंगडाँग असा आहे... { संदर्भ :- पाखरु गुजगोष्टी शब्दकोष} ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन

In reply to by मदनबाण

बाय द वे, लेखनाच्या अषयाशी सुसंगत शब्द, डांगडींग असाच आहे (संदर्भ : तरुणाईची बोली भाषा). `डिंगडाँग' हा डोअरबेलचा आवाज आहे.

In reply to by मराठी कथालेखक

त्याच्याशी एखादा रिलेट होईल, एखादा नाही. आपण निदान पिडलं तरी नाही कुणाला हे काय कमीये?

In reply to by एस

भाते गुरुवार, 06/26/2014 - 09:33
पुरुषांचे ड्रायव्हिंग/डायेटिंग आणि हा धागा वाचल्यावर माझ्याही मनात हाच विचार आला होता. मिपाच्या समुद्रात ऊडी मारून शोध घेतल्यावर हा मोती मिळाला. यासारखे चांगले धागे शोधुन वर काढल्यास आपल्या ज्ञानात बरीच भर पडेल. :)

ब़जरबट्टू गुरुवार, 06/26/2014 - 11:39
छान लिव्हलय.... :) बाकी पिरा, पैसा, व रेवतीताईशी सहमत.... :)) इन अडवान्स... म्हणजे संक्षी म्हंटल्यावर येथे जे काही होणार तेला पुर्ण अणूमोडन इन अडवान्स....

दिपक.कुवेत गुरुवार, 06/26/2014 - 12:59
विडंबन एक से बढकर एक आहेत. "तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत" हे वाक्य तर जाम आवडुन गेलं आहे स्पेशली त्यातला तो डांगडींग शब्द.

In reply to by लंबूटांग

(अर्थात माझं संसारींग हा विषय परत कधीतरी)
....लक्षपूर्वक न वाचता प्रतिसादाची घाई (पुन्हा) नडली!

In reply to by संजय क्षीरसागर

लंबूटांग Fri, 06/27/2014 - 01:38
....विरोधाभासी लिहण्याची आणि सोयीस्करपणे दुर्लक्ष करायची, सवय (पुन्हा) नडली!
माझा अनुभव भलतचं सांगतो
पण ते सुद्धा मध्यरात्री किंवा मग एकदम काही डल्ला मारायच्या वेळी बोलतात.
इतरांच्या संसारींगचा अनुभव रात्री बेरात्री जागून घेतला म्हणायचा का? अरे हो तिथेही बायकोला घेऊन का? वैयक्तिक म्हणून नाही पण लेखात
गेली दीडदशकं मी सगळीकडे माझी बायको घेवून जातोयं
असे वाचले म्हणून विचारले. असो, विडंबन काही खास वाटले नाही, ठीक आहे. पुलेशु.

In reply to by लंबूटांग

ती माझ्या संसाराची कहाणी असण्यापेक्षा जगाची कथा आहे. बहुतेक सर्व प्रतिसादकांना पोस्ट आवडलीये म्हणजे अर्थ पोहोचलायं. तुमच्या प्रतिसादातून वैयक्तिक निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न फसल्यानं तुम्ही नाराज झालात. सो आय डोंट केअर.

मदनबाण Fri, 06/27/2014 - 07:10
टुकार ! इतरांसाठी... डांगडींग असा नसुन डिंगडाँग असा आहे... { संदर्भ :- पाखरु गुजगोष्टी शब्दकोष} ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन

In reply to by मदनबाण

बाय द वे, लेखनाच्या अषयाशी सुसंगत शब्द, डांगडींग असाच आहे (संदर्भ : तरुणाईची बोली भाषा). `डिंगडाँग' हा डोअरबेलचा आवाज आहे.

In reply to by मराठी कथालेखक

त्याच्याशी एखादा रिलेट होईल, एखादा नाही. आपण निदान पिडलं तरी नाही कुणाला हे काय कमीये?
लेखनविषय:
पुरुषांचं स्ट्रायव्हिंग हा जसा तमाम स्त्रीवर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच बायकांचं संसारींग हा पण आहे. पण याकडे तमाम स्री वर्ग जाणूनबुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर स्त्री-पुरुष हे गेली हजारो वर्ष डांगडींग करत आले आहेत. महाभारतात नाही का, पाच पुरुष एकीशी लग्न करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या १००% स्त्रीयांना संसाराचे नियम हे दोन्हीकडून पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये.

मनमोहक बाली : ०५ : गोआ गजा, मास आणि उबुद

डॉ सुहास म्हात्रे ·

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 00:45
बालीतील निसर्ग व समाजजीवन एकमेकाला इतके पूरक आहेत आणि एकमेकात अकृत्रिमरीत्या इतके बेमालूम मिसळून गेलेले आहेत की एकदा शहरी भागांच्या बाहेर पडलो की त्यांना वेगळे करणे शक्य होत नाही... लोक जंगलात-निसर्गात राहतात की जंगलाने-निसर्गाने लोकवस्त्यांत शिरकाव केला आहे हा प्रश्न पडावा अशीच काहीशी अवस्था आहे. भारतीय कधी याचा आदर्श घेतील? मास मधील मुखवटे तर अगदी जीवंतच वाटतात. अगदी खरे आहे ही सफर म्हणजे डोळ्यांना केवळ मेजवानीच!

खटपट्या गुरुवार, 06/26/2014 - 12:30
सर्व चित्रे जबरदस्त !!! गजगुहेचे मुख तर अंगावर काटा आणतंय झाडाच्या मुळांवर काढलेला फोटो अप्रतिम गणपतीला नेसवलेले वस्त्र लुंगी किंवा चादरी सदृष्य वाटतेय :) वाचतोय

In reply to by खटपट्या

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 22:32
ती लुंगीच असते. इंडोनेशिया आणि मलेशियात त्याला सरोंग म्हणतात. मुर्ती, पवित्र समजले जाणारी झाडे आणि इतर गोष्टी या सगळ्यांना ह्या नेसवल्या जाण्यार्‍या सरोंगमध्ये पांढर्‍या, काळ्या आणि कधी कधी तांबड्या रंगाच्या चौकडी असतात.

प्रचेतस गुरुवार, 06/26/2014 - 16:10
अफाट सुंदर आहे हे सर्व. गोआ गजा तर लै भारी. वृक्षाची पसरत गेलेली मूळं पाहून लॉर्ड ऑफ द रिंग्सः द टू टॉवर्स मधल्या फॅन्गॉर्न जंगलाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 06/26/2014 - 16:34
हेच म्हणणार होतो. फक्त त्या झाडाचे फोटो काढण्यासाठी बालीला जावेसे वाटतंय. तिथे एकदा ह्या कोनाने, एकदा त्या कोनाने, कधी वाकून, झोपून, आडवातिडवा पडून मी चिखल-शेवाळाने भरलोय आणि मग एकदाचा उठून युरेका युरेका असं ओरडतोय असं दृश्य डोळ्यांसमोर आले. :-D

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 22:38
:) ते झाड विशेष होते हे नक्कीच. आजही त्याचे फोटो पाहिले की वाटते अजून काही फोटो काढायला हवे होते. पण गडबडीत राहून गेले. :(

सस्नेह गुरुवार, 06/26/2014 - 20:37
तुम्ही या सफरी स्वतःच्या आनंदासाठी करण्याऐवजी आमच्या नेत्रसुखासाठीच करता असे वाटते. अन्यथा इतके निगुतीने सर्व बारकावे टिपणारे फोटो कोण कुणासाठी काढते ?

In reply to by सस्नेह

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 22:45
हे भटकंतीचे फोटो निवृत्त झाल्यावर वारंवार नजरेखाली घालता येणारा खजिना म्हणून साठवतो आहे (कंजूस बनिया त्याचा खजिना वारंवार मोजत बसला आहे असे दृश्य नजरेसमोर आणा :) ). अचानक मिपावर लिहायला लागलो आणि खर्‍या प्रयोगाची रंगीत तालिम सुरू झाली :)

पैसा Sun, 06/29/2014 - 21:04
या गुहेच्या द्वातावरील कलाकुसर जबरदस्तच आहे! आतले गणोबा पण जाम आवडले. हिरवी भातखाचरेही फार आवडली.

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 00:45
बालीतील निसर्ग व समाजजीवन एकमेकाला इतके पूरक आहेत आणि एकमेकात अकृत्रिमरीत्या इतके बेमालूम मिसळून गेलेले आहेत की एकदा शहरी भागांच्या बाहेर पडलो की त्यांना वेगळे करणे शक्य होत नाही... लोक जंगलात-निसर्गात राहतात की जंगलाने-निसर्गाने लोकवस्त्यांत शिरकाव केला आहे हा प्रश्न पडावा अशीच काहीशी अवस्था आहे. भारतीय कधी याचा आदर्श घेतील? मास मधील मुखवटे तर अगदी जीवंतच वाटतात. अगदी खरे आहे ही सफर म्हणजे डोळ्यांना केवळ मेजवानीच!

खटपट्या गुरुवार, 06/26/2014 - 12:30
सर्व चित्रे जबरदस्त !!! गजगुहेचे मुख तर अंगावर काटा आणतंय झाडाच्या मुळांवर काढलेला फोटो अप्रतिम गणपतीला नेसवलेले वस्त्र लुंगी किंवा चादरी सदृष्य वाटतेय :) वाचतोय

In reply to by खटपट्या

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 22:32
ती लुंगीच असते. इंडोनेशिया आणि मलेशियात त्याला सरोंग म्हणतात. मुर्ती, पवित्र समजले जाणारी झाडे आणि इतर गोष्टी या सगळ्यांना ह्या नेसवल्या जाण्यार्‍या सरोंगमध्ये पांढर्‍या, काळ्या आणि कधी कधी तांबड्या रंगाच्या चौकडी असतात.

प्रचेतस गुरुवार, 06/26/2014 - 16:10
अफाट सुंदर आहे हे सर्व. गोआ गजा तर लै भारी. वृक्षाची पसरत गेलेली मूळं पाहून लॉर्ड ऑफ द रिंग्सः द टू टॉवर्स मधल्या फॅन्गॉर्न जंगलाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 06/26/2014 - 16:34
हेच म्हणणार होतो. फक्त त्या झाडाचे फोटो काढण्यासाठी बालीला जावेसे वाटतंय. तिथे एकदा ह्या कोनाने, एकदा त्या कोनाने, कधी वाकून, झोपून, आडवातिडवा पडून मी चिखल-शेवाळाने भरलोय आणि मग एकदाचा उठून युरेका युरेका असं ओरडतोय असं दृश्य डोळ्यांसमोर आले. :-D

In reply to by एस

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 22:38
:) ते झाड विशेष होते हे नक्कीच. आजही त्याचे फोटो पाहिले की वाटते अजून काही फोटो काढायला हवे होते. पण गडबडीत राहून गेले. :(

सस्नेह गुरुवार, 06/26/2014 - 20:37
तुम्ही या सफरी स्वतःच्या आनंदासाठी करण्याऐवजी आमच्या नेत्रसुखासाठीच करता असे वाटते. अन्यथा इतके निगुतीने सर्व बारकावे टिपणारे फोटो कोण कुणासाठी काढते ?

In reply to by सस्नेह

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/26/2014 - 22:45
हे भटकंतीचे फोटो निवृत्त झाल्यावर वारंवार नजरेखाली घालता येणारा खजिना म्हणून साठवतो आहे (कंजूस बनिया त्याचा खजिना वारंवार मोजत बसला आहे असे दृश्य नजरेसमोर आणा :) ). अचानक मिपावर लिहायला लागलो आणि खर्‍या प्रयोगाची रंगीत तालिम सुरू झाली :)

पैसा Sun, 06/29/2014 - 21:04
या गुहेच्या द्वातावरील कलाकुसर जबरदस्तच आहे! आतले गणोबा पण जाम आवडले. हिरवी भातखाचरेही फार आवडली.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

पुरुषांचं डायेटिंग -- माझा अनुभव

सस्नेह ·

एस Wed, 06/25/2014 - 20:06
पुरुषांच्या ढेरीबद्दल म्हणजे शरीराच्या एका महत्त्वाच्या अवयवाबद्दल असे जाहीरपणे काहीही बोलले जातेय हे पाहून एक मिपाकर म्हणून... वैग्रे वैग्रे (संमं, इकडे लक्श द्या, हे कुठल्या धोरणात बसतं वैग्रे वैग्रे.) त्यात भर म्हणून पुरुष त्यात कायकाय ढकलत असतात याचेही चर्वितचर्वण आपले वर्णन उघडपणे चालवले आहे. जणू काही बेटर हाफ् ला ढेरी नसतेच. आमची ढेरी तर तुमची कंबर. आमचे चरणे हे हादडणे आणि तुमचे चरणे काय तोंडी लावणे असते? आणि काही करा पुरुषच जबाबदार. ही पाळी तुमच्या गेल्या हज्जारो वर्षांच्या सैपाकामुळेच ओढवली नाय काय? तरी याचा पंक्तीपुरता विदा गोळा करून नि:पक्षपातीपणे स्यूडोस्ट्याटीस्टीक्स वैग्रे वैग्रे निष्कर्श काढावे आणि मग मांडावे अशी णम्र इनंती. असो, ढेरी ही ढेरी असते. त्यात स्त्रियांची ढेरी आणि पुरुषांची ढेरी असे काही नसते. एकमेकांच्या इंचांचे मोजमाप करण्यात काही हशील नाही. तुमच्या जेवणावळ्या सोप्प्या होवोत या शुभेच्छा देऊन आणि एवढे(च) बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जै म्हाराष्ट्र! (पार्श्वसंगीतात कडाम् कुडूम् असा आवाज...!!!)

In reply to by एस

सस्नेह Wed, 06/25/2014 - 21:12
तुमी तर नाराज झाले की भौ ! अवो, मस्ती मस्तीका मामला है, समजून घ्या ना ! बाकी ढेरी ही लिंगसापेक्ष नसावी यावर सहमत.

In reply to by सस्नेह

एस Wed, 06/25/2014 - 22:28
तुमी तर शीरियस झाल्या की तै! अवो, आमचाबी इडंबनविडंबन का मामला है, हसून घ्या ना थोडं ! बाकी विडंबन हे हास्यनिरपेक्ष नसावे ह्यावर एकमत. ;-)

वपाडाव Wed, 06/25/2014 - 20:17
अगदीच मिळमिळीत... उगाच खुमासदार वेग्रे म्हणौन धाग्याचा ट्यार्पी वाढौ नये... असो... दोन-चार रायते, पाप्डं अन कश्मीरी पुलावाची कमतर्ता माझ्यासारख्या व्हेज माणसाला जाणौली... -- फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो --

In reply to by वपाडाव

सूड Wed, 06/25/2014 - 21:05
ह्या धाग्याच्या निमित्ताने का होईना आपण अज्ञातवासातून बाहेर आलात हेही नसे थोडके. लोकं व्यनितून चवकशी करायलीत तुमच्याबद्दल, कुटं हायसा?

केदार-मिसळपाव Wed, 06/25/2014 - 20:18
अजुन एकाही समारंभात चिकण, आईस्कीम, टंदुरी अथवा फ्रुट्सालाड असे कोणतेही पदार्थ आलेले नाहीत. आम्ही आपले बटाटा भाजी, वांग्याची भाजी, गेलाबाजार चक्रीची भाजी आणि पोळ्या, भात, वरण झालेच तर कांदा-टमाट्याची कोशिंबीर इतक्यावरच भागवतो. त्यामुळे तो ढेरीचा प्रश्ण आमच्यापुरता तरी निकालात.

पिंगू Wed, 06/25/2014 - 20:53
काय राव ढेरी आपला जीव की प्राण. सध्या सायकलिंगमुळे ढेरी आटोक्यात आलीये, पण पंगतीला हादडायची सवय तरी जात नाय.. बाकी जय हो ढेरीपुराण..

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 21:10
नाही हो. अस काही नाहीये. मी रोज ३ पोळ्या खातो पण अगदी शिडशिडीत दिसणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन ५-६ पोळ्या खाऊन जातात. माझा स्पीड जेमतेम मिनिटाला अर्धी पोळी एवढा असतो. नि ह्या पोरी २ मिनिटात पोळ्या...

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 21:42
इतके पाप्याचं पितर दिसणारे समोर येईल ते हादडतात तरी ढेरी कै धरत नै अन आम्ही साला आंध्रा मेसमध्ये भात वरपला तरी ढेरी!!! बहुत नाइन्साफी ए!!!!

In reply to by बॅटमॅन

सस्नेह Wed, 06/25/2014 - 21:50
साक्षात हभप प्यारेमहाराजांना 'पाप्या' म्हणतोस..? वाल्गुदेया, कुठे फेडशील ही 'पापे' ? भात सोड अन पोळ्या खा पोळ्या ! 'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा ! *nea*

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ गुरुवार, 06/26/2014 - 15:26
पापी' पेट का सवाल है ब्याट्या. ह्या "पापी" त अन लहान मुलांची घेतो त्या पापीत नक्की काय फरक आहे रे? पापी हा शब्द पाप या शब्दावरून डीराईव्ह केलेला आहे का?

In reply to by सस्नेह

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 22:00
भात इ. सोडण्याबद्दलचा सल्ला विचारार्ह आहेच, परंतु
'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा !
याच्याशी अंमळ असहमती दर्शवितो. ढेरी कमी झाल्यावर 'पापे' कमी होतील असे समहौ वाटत नाही ;)

In reply to by बॅटमॅन

सूड Wed, 06/25/2014 - 22:16
ए तू ऋजुता दिवेकर नावाच्या बाईंची पुस्तकं वाच.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईच्या हातचंही जेवतात.. बायकोच्या हातचंही जेवतात.. बहीणीच्या हातचंही जेवतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या डब्यात काहिही भरुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते दिलेलं मुकाट्याने खातात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर स्वयंपाकाच्या बाबतीत डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी.. -मिलियन वायडर ;)

In reply to by मदनबाण

एस गुरुवार, 06/26/2014 - 08:18
अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!' असे पुस्तक काढलंय आणि त्याला वल्लीशेठ बोरकरांची प्रस्तावना* लाभली आहे आणि उभ्या महाराष्ट्रात लोक ते वाचून आडवे झाले आहेत असं काहीसं स्वप्न पडलं आम्हांला काल...! ;-) *(ऋजुतातैंच्या पुस्तकाला जिने प्रस्तावना लिहिलीयं तिचा फॅन)

In reply to by एस

सूड गुरुवार, 06/26/2014 - 16:49
>>अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!' अत्रुप्त दिवेकरांनी पुस्तक काढलं तर त्याचं नाव काहीसं असं असेल, "माझीच ढेरी तरी खायची चोरी". ;)

विवेकपटाईत Wed, 06/25/2014 - 21:27
तीव्र निषेध, *stop* बायकोच्या हातचे जे मिळते तेच खावे लागते किबहुना पोटात ढकलावे लागते. स्वाद घेत घेत न खाल्या मुळे जेवण पचत नाही. परिणाम ढेरी निघते. त्यात पुरुषाँचा काय दोष. शिवाय जिथे स्वादिष्ट मेजवानी असेल तिथे आम्ही भरपूर ताव मारला त्यात आमची काय चूक. *mamba*

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 16:18
ते त्यांचं त्यांचं बघून घेतील की. फुक्कट सल्ला द्या म्हणून कुणी विचारायला आलंय का हो तुम्हांला? जिथेतिथे उपदेश-एरंडेल पाजत बस्ता ते? की संस्थळावर लिहिले म्हणून कोणीही यावे आणि सल्ले देत बसावे असं आहे?

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर गुरुवार, 06/26/2014 - 16:34
त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना.. तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी.. तुम्ही लोकांच्यात नाक खुपसणं आणि काड्या सारणं कधी बंद करणार? तुम्ही अगोदर ही फुकट फौजदारी बंद करा.. (हो.. हा सल्ला आहे..) इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना... उगाच प्रतिसाद हुंगत कशाला फिरता.. बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच.. (ह्या माणसाला एकदा(चा) रामराम ठोकलेला कळत का नसावा?)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 16:37
'चोर तो चोर वरती शिरजोर' ही म्हण संदर्भासहित स्पष्ट केल्याबद्दल अतिशय धन्यवाद!!!

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर गुरुवार, 06/26/2014 - 16:39
तुम्ही तर बर्‍याच म्हणी अनेक दिवसांपासुन सार्थ करत आहात.. पण असो.. तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही.. जमल्यास गप बसा.. (आग्रह नाही..)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 16:43
तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही..
म्हणून अजून खाली रसातळाला जाता, होय की नाही? बाकी ज्याची त्याची समज वगैरे...चालायचंच!

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा गुरुवार, 06/26/2014 - 16:55
माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल काय वाटेल ते समजा... :)
त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना..
इथे पिरा"भाईं"शी सहमत
तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी..
नैच्च करत आहे कुणी...पण जो सल्ला आहे तो यापेक्षा जालीम आहे त्याचे काय :)
इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना...
हेच पिरा"भाईं"नासुध्धा लागु पडते...पण दिलाच ना आगव सल्ला =))
बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच..
ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों... साभार - इस्माईल"भाय" चार्मिनारांवालें ;)

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 17:05
ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों...
अर्रे टवाळभाई, इत्ते साल मिपामिनार पे बैठे तो क्या खाला लोगांका टेन्शन लेनेकु? हमारी इज्जतां सस्ती नै होती कि कोई बी आये आउर बैगन मे मिलाकर भुर्ता बनाके खाये! ऐसा नै होता टवाळभै, पूरी प्लॅनिंग करनी पडती! अब हम लोगां रहते मुद्देपे, वो लोगां रहते फाटेपे! अब ह्यांसे व्हां जाना बोले तो पूरा एक मेगाबायटी प्रतिसाद होता यारो =))

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा गुरुवार, 06/26/2014 - 17:38
कहर.. =)) अर्रे संक्षीभाईं..अर्रे हमारे ब्याट्याभाईंकी लडाईं हो गयीं भाई खालालोगांसे...जर्रा कुच उप्परनीचे हुआ तो आप संभालल्येओ खालांलोगोंको ....अर्रे भ ब्याट्याभाईं...संक्षीभाई बोलरेले है तुम्हारे लिये खालालोगां क्या पुरा संमं संभाललेंगे... (आल लाईन बीजी आ रहा है ;) ) संक्षींनी ह.घे. हि विनंती :)

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 17:48
परसो मिपापुरेमें क्या लडाई हुवी मालूम...चिंध्या लडाई हुई..मै टवाळ, बुवा, वल्ली, सूड, धन्या पूरे गये थे लोगां..मैं क्या करा बोले तो कंपुटरपे बोटां दबादबाके वो लिखा वो लिखा, घाप घीप घाप घीप घाप घीप =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 18:02
हे असं होतं बघा स्नेहातै, आता आवडला ना एखादी गोष्ट की त्याचा पार भुगा केल्याशिवाय पुरुषांना चैन पडत नाही... मग समोर 'स्माईल'भाई असो, की आईसक्रीम असो की तंदूरी असो की आणखी काही .... (चाणाक्ष वाचक ओळखतीलच ;) ) डायेट कोलमडते ते असं. ;)

In reply to by प्यारे१

टवाळ कार्टा गुरुवार, 06/26/2014 - 18:54
तुम लोगां सिरेस कायकु लेते यारों ...मिपा के पठ्ठे हैं...१-२ साल से मिपा पे बैठा हुवा हु...मेरी कुच इज्जत हैं यारों ...तुम लोगां क्यातोबी संमझे रे मेरेकू

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 19:12
खल्लास =)) मेरेकु बोर मार्रा पार्टी मे, लांग ड्राईव्ह पे जाना बोली. अम मै क्या करां, उने बोल री बोल के ले गया. पयले पाकृ के धागे में फटु देखे, फिर जिलब्या देखा हाउर फिर ह्यां आये सीद्धाइच प्रतिसाद-प्रतिसाद खेलते. उन्हे बोली, बॅटू, मेरेकु जिलबी होना. वहीं फिर 'मोकलाया' वाली जिल्बी खिलाया उसकू, पाच-पाच डब्बा भरके जिलब्या खाये. फिर मेरेकु बोली, तुम किधर जानावाना मत, ऐसा कैसा होता? अब उने बोल री बोल के मै गया रूमपे, अब रातभर क्या हुवा नक्कॉ पूछू =))

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 23:32
अरे वो २-३ पेज में कौन किसकू प्रतिसाद दिया मेरेकु कुछ नै समझा रे...जबतर उसी एक पेजपे उनकू प्रतिसाद नै देता तबतक मेरा टंकनकंडु शांत नै होयेगा रे ;)

In reply to by रेवती

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 11:58
कोणता ? एकदा प्रतिसाद देवुन झाल्यावर सहसा माझ्या लक्षात रहात नाही ... शॉर्ट टर्म मेमरी लॉस *wacko* एकदोन वेळा तर मीच माझ्या जुन्या प्रतिसादांशी कॉन्ट्रॅडिक्टरी बोललोय ...एकाच धाग्यावर *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

रेवती गुरुवार, 06/26/2014 - 15:21
तुम्हाला एका चारचाकीवाल्या म्याडमनी दोन वाहनांच्या फटीतून नो असे म्हणत जाऊ दिले नाही तो प्रतिसाद विडंबायचा प्रयत्न केला हो, पण जम्या नै.

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:41
भीतीदायक धागा आहे! *ROFL* मात्र अनघाच्या धाग्यावर सुपारी घेतल्यासारखे प्रतिसाद देणारे या धाग्यावर कधी सुरू होतात याची वाट बघत आहे! *blum3* लिखाण नेहमीप्रमाणेच खास स्नेहांकिता स्टायल!

एस Wed, 06/25/2014 - 20:06
पुरुषांच्या ढेरीबद्दल म्हणजे शरीराच्या एका महत्त्वाच्या अवयवाबद्दल असे जाहीरपणे काहीही बोलले जातेय हे पाहून एक मिपाकर म्हणून... वैग्रे वैग्रे (संमं, इकडे लक्श द्या, हे कुठल्या धोरणात बसतं वैग्रे वैग्रे.) त्यात भर म्हणून पुरुष त्यात कायकाय ढकलत असतात याचेही चर्वितचर्वण आपले वर्णन उघडपणे चालवले आहे. जणू काही बेटर हाफ् ला ढेरी नसतेच. आमची ढेरी तर तुमची कंबर. आमचे चरणे हे हादडणे आणि तुमचे चरणे काय तोंडी लावणे असते? आणि काही करा पुरुषच जबाबदार. ही पाळी तुमच्या गेल्या हज्जारो वर्षांच्या सैपाकामुळेच ओढवली नाय काय? तरी याचा पंक्तीपुरता विदा गोळा करून नि:पक्षपातीपणे स्यूडोस्ट्याटीस्टीक्स वैग्रे वैग्रे निष्कर्श काढावे आणि मग मांडावे अशी णम्र इनंती. असो, ढेरी ही ढेरी असते. त्यात स्त्रियांची ढेरी आणि पुरुषांची ढेरी असे काही नसते. एकमेकांच्या इंचांचे मोजमाप करण्यात काही हशील नाही. तुमच्या जेवणावळ्या सोप्प्या होवोत या शुभेच्छा देऊन आणि एवढे(च) बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जै म्हाराष्ट्र! (पार्श्वसंगीतात कडाम् कुडूम् असा आवाज...!!!)

In reply to by एस

सस्नेह Wed, 06/25/2014 - 21:12
तुमी तर नाराज झाले की भौ ! अवो, मस्ती मस्तीका मामला है, समजून घ्या ना ! बाकी ढेरी ही लिंगसापेक्ष नसावी यावर सहमत.

In reply to by सस्नेह

एस Wed, 06/25/2014 - 22:28
तुमी तर शीरियस झाल्या की तै! अवो, आमचाबी इडंबनविडंबन का मामला है, हसून घ्या ना थोडं ! बाकी विडंबन हे हास्यनिरपेक्ष नसावे ह्यावर एकमत. ;-)

वपाडाव Wed, 06/25/2014 - 20:17
अगदीच मिळमिळीत... उगाच खुमासदार वेग्रे म्हणौन धाग्याचा ट्यार्पी वाढौ नये... असो... दोन-चार रायते, पाप्डं अन कश्मीरी पुलावाची कमतर्ता माझ्यासारख्या व्हेज माणसाला जाणौली... -- फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो --

In reply to by वपाडाव

सूड Wed, 06/25/2014 - 21:05
ह्या धाग्याच्या निमित्ताने का होईना आपण अज्ञातवासातून बाहेर आलात हेही नसे थोडके. लोकं व्यनितून चवकशी करायलीत तुमच्याबद्दल, कुटं हायसा?

केदार-मिसळपाव Wed, 06/25/2014 - 20:18
अजुन एकाही समारंभात चिकण, आईस्कीम, टंदुरी अथवा फ्रुट्सालाड असे कोणतेही पदार्थ आलेले नाहीत. आम्ही आपले बटाटा भाजी, वांग्याची भाजी, गेलाबाजार चक्रीची भाजी आणि पोळ्या, भात, वरण झालेच तर कांदा-टमाट्याची कोशिंबीर इतक्यावरच भागवतो. त्यामुळे तो ढेरीचा प्रश्ण आमच्यापुरता तरी निकालात.

पिंगू Wed, 06/25/2014 - 20:53
काय राव ढेरी आपला जीव की प्राण. सध्या सायकलिंगमुळे ढेरी आटोक्यात आलीये, पण पंगतीला हादडायची सवय तरी जात नाय.. बाकी जय हो ढेरीपुराण..

प्यारे१ Wed, 06/25/2014 - 21:10
नाही हो. अस काही नाहीये. मी रोज ३ पोळ्या खातो पण अगदी शिडशिडीत दिसणार्‍या पोरीही मला ओव्हरटेक करुन ५-६ पोळ्या खाऊन जातात. माझा स्पीड जेमतेम मिनिटाला अर्धी पोळी एवढा असतो. नि ह्या पोरी २ मिनिटात पोळ्या...

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 21:42
इतके पाप्याचं पितर दिसणारे समोर येईल ते हादडतात तरी ढेरी कै धरत नै अन आम्ही साला आंध्रा मेसमध्ये भात वरपला तरी ढेरी!!! बहुत नाइन्साफी ए!!!!

In reply to by बॅटमॅन

सस्नेह Wed, 06/25/2014 - 21:50
साक्षात हभप प्यारेमहाराजांना 'पाप्या' म्हणतोस..? वाल्गुदेया, कुठे फेडशील ही 'पापे' ? भात सोड अन पोळ्या खा पोळ्या ! 'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा ! *nea*

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ गुरुवार, 06/26/2014 - 15:26
पापी' पेट का सवाल है ब्याट्या. ह्या "पापी" त अन लहान मुलांची घेतो त्या पापीत नक्की काय फरक आहे रे? पापी हा शब्द पाप या शब्दावरून डीराईव्ह केलेला आहे का?

In reply to by सस्नेह

बॅटमॅन Wed, 06/25/2014 - 22:00
भात इ. सोडण्याबद्दलचा सल्ला विचारार्ह आहेच, परंतु
'पापे' कमी होतील अन ढेरीसुद्धा !
याच्याशी अंमळ असहमती दर्शवितो. ढेरी कमी झाल्यावर 'पापे' कमी होतील असे समहौ वाटत नाही ;)

In reply to by बॅटमॅन

सूड Wed, 06/25/2014 - 22:16
ए तू ऋजुता दिवेकर नावाच्या बाईंची पुस्तकं वाच.. त्यात त्या म्हणतात.. "...सांगायला वाईट वाटतं पण जास्त चुका बायकांच्या असतात.. पुरुषांच चुका फक्त दोन.. एक की ते आईच्या हातचंही जेवतात.. बायकोच्या हातचंही जेवतात.. बहीणीच्या हातचंही जेवतात.. " दुसरी चुक नक्की काय ते आठवत नाही पण काहीतरी "बायका त्यांच्या डब्यात काहिही भरुन देतात.. त्यांच्या बिचार्‍यांच हेच चुकतं की ते दिलेलं मुकाट्याने खातात.." तुझा आत्मा शांsssssत होईल..!! (त्या बाई अजुनही काय काय बरळतात.. बायकांनी नवर्‍या समोर स्वयंपाकाच्या बाबतीत डोकं चालवु नये.. अगदी अंतराळवीर असलात तरी भाकरी यायला हवीच.. वगैर वगैरे.. पुरुष विभागच्या प्रवक्त्या म्हणुन पुरुषांच्या साईडनी तुझ्यापेक्षा जास्त भांडतील..!!) बाकी मी तुझ्या प्रतिसादाला काहीहि म्हणलेलं नाही हयाची नोंद घ्यावी.. -मिलियन वायडर ;)

In reply to by मदनबाण

एस गुरुवार, 06/26/2014 - 08:18
अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!' असे पुस्तक काढलंय आणि त्याला वल्लीशेठ बोरकरांची प्रस्तावना* लाभली आहे आणि उभ्या महाराष्ट्रात लोक ते वाचून आडवे झाले आहेत असं काहीसं स्वप्न पडलं आम्हांला काल...! ;-) *(ऋजुतातैंच्या पुस्तकाला जिने प्रस्तावना लिहिलीयं तिचा फॅन)

In reply to by एस

सूड गुरुवार, 06/26/2014 - 16:49
>>अत्रुप्त दिवेकरांनी 'ढेरीबिरी दे सोडून, तू खा दणकून!' अत्रुप्त दिवेकरांनी पुस्तक काढलं तर त्याचं नाव काहीसं असं असेल, "माझीच ढेरी तरी खायची चोरी". ;)

विवेकपटाईत Wed, 06/25/2014 - 21:27
तीव्र निषेध, *stop* बायकोच्या हातचे जे मिळते तेच खावे लागते किबहुना पोटात ढकलावे लागते. स्वाद घेत घेत न खाल्या मुळे जेवण पचत नाही. परिणाम ढेरी निघते. त्यात पुरुषाँचा काय दोष. शिवाय जिथे स्वादिष्ट मेजवानी असेल तिथे आम्ही भरपूर ताव मारला त्यात आमची काय चूक. *mamba*

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 16:18
ते त्यांचं त्यांचं बघून घेतील की. फुक्कट सल्ला द्या म्हणून कुणी विचारायला आलंय का हो तुम्हांला? जिथेतिथे उपदेश-एरंडेल पाजत बस्ता ते? की संस्थळावर लिहिले म्हणून कोणीही यावे आणि सल्ले देत बसावे असं आहे?

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर गुरुवार, 06/26/2014 - 16:34
त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना.. तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी.. तुम्ही लोकांच्यात नाक खुपसणं आणि काड्या सारणं कधी बंद करणार? तुम्ही अगोदर ही फुकट फौजदारी बंद करा.. (हो.. हा सल्ला आहे..) इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना... उगाच प्रतिसाद हुंगत कशाला फिरता.. बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच.. (ह्या माणसाला एकदा(चा) रामराम ठोकलेला कळत का नसावा?)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 16:37
'चोर तो चोर वरती शिरजोर' ही म्हण संदर्भासहित स्पष्ट केल्याबद्दल अतिशय धन्यवाद!!!

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर गुरुवार, 06/26/2014 - 16:39
तुम्ही तर बर्‍याच म्हणी अनेक दिवसांपासुन सार्थ करत आहात.. पण असो.. तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही.. जमल्यास गप बसा.. (आग्रह नाही..)

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 16:43
तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही..
म्हणून अजून खाली रसातळाला जाता, होय की नाही? बाकी ज्याची त्याची समज वगैरे...चालायचंच!

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा गुरुवार, 06/26/2014 - 16:55
माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल काय वाटेल ते समजा... :)
त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना..
इथे पिरा"भाईं"शी सहमत
तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी..
नैच्च करत आहे कुणी...पण जो सल्ला आहे तो यापेक्षा जालीम आहे त्याचे काय :)
इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना...
हेच पिरा"भाईं"नासुध्धा लागु पडते...पण दिलाच ना आगव सल्ला =))
बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच..
ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों... साभार - इस्माईल"भाय" चार्मिनारांवालें ;)

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 17:05
ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों...
अर्रे टवाळभाई, इत्ते साल मिपामिनार पे बैठे तो क्या खाला लोगांका टेन्शन लेनेकु? हमारी इज्जतां सस्ती नै होती कि कोई बी आये आउर बैगन मे मिलाकर भुर्ता बनाके खाये! ऐसा नै होता टवाळभै, पूरी प्लॅनिंग करनी पडती! अब हम लोगां रहते मुद्देपे, वो लोगां रहते फाटेपे! अब ह्यांसे व्हां जाना बोले तो पूरा एक मेगाबायटी प्रतिसाद होता यारो =))

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा गुरुवार, 06/26/2014 - 17:38
कहर.. =)) अर्रे संक्षीभाईं..अर्रे हमारे ब्याट्याभाईंकी लडाईं हो गयीं भाई खालालोगांसे...जर्रा कुच उप्परनीचे हुआ तो आप संभालल्येओ खालांलोगोंको ....अर्रे भ ब्याट्याभाईं...संक्षीभाई बोलरेले है तुम्हारे लिये खालालोगां क्या पुरा संमं संभाललेंगे... (आल लाईन बीजी आ रहा है ;) ) संक्षींनी ह.घे. हि विनंती :)

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 17:48
परसो मिपापुरेमें क्या लडाई हुवी मालूम...चिंध्या लडाई हुई..मै टवाळ, बुवा, वल्ली, सूड, धन्या पूरे गये थे लोगां..मैं क्या करा बोले तो कंपुटरपे बोटां दबादबाके वो लिखा वो लिखा, घाप घीप घाप घीप घाप घीप =))

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 18:02
हे असं होतं बघा स्नेहातै, आता आवडला ना एखादी गोष्ट की त्याचा पार भुगा केल्याशिवाय पुरुषांना चैन पडत नाही... मग समोर 'स्माईल'भाई असो, की आईसक्रीम असो की तंदूरी असो की आणखी काही .... (चाणाक्ष वाचक ओळखतीलच ;) ) डायेट कोलमडते ते असं. ;)

In reply to by प्यारे१

टवाळ कार्टा गुरुवार, 06/26/2014 - 18:54
तुम लोगां सिरेस कायकु लेते यारों ...मिपा के पठ्ठे हैं...१-२ साल से मिपा पे बैठा हुवा हु...मेरी कुच इज्जत हैं यारों ...तुम लोगां क्यातोबी संमझे रे मेरेकू

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन गुरुवार, 06/26/2014 - 19:12
खल्लास =)) मेरेकु बोर मार्रा पार्टी मे, लांग ड्राईव्ह पे जाना बोली. अम मै क्या करां, उने बोल री बोल के ले गया. पयले पाकृ के धागे में फटु देखे, फिर जिलब्या देखा हाउर फिर ह्यां आये सीद्धाइच प्रतिसाद-प्रतिसाद खेलते. उन्हे बोली, बॅटू, मेरेकु जिलबी होना. वहीं फिर 'मोकलाया' वाली जिल्बी खिलाया उसकू, पाच-पाच डब्बा भरके जिलब्या खाये. फिर मेरेकु बोली, तुम किधर जानावाना मत, ऐसा कैसा होता? अब उने बोल री बोल के मै गया रूमपे, अब रातभर क्या हुवा नक्कॉ पूछू =))

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन Fri, 06/27/2014 - 23:32
अरे वो २-३ पेज में कौन किसकू प्रतिसाद दिया मेरेकु कुछ नै समझा रे...जबतर उसी एक पेजपे उनकू प्रतिसाद नै देता तबतक मेरा टंकनकंडु शांत नै होयेगा रे ;)

In reply to by रेवती

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 11:58
कोणता ? एकदा प्रतिसाद देवुन झाल्यावर सहसा माझ्या लक्षात रहात नाही ... शॉर्ट टर्म मेमरी लॉस *wacko* एकदोन वेळा तर मीच माझ्या जुन्या प्रतिसादांशी कॉन्ट्रॅडिक्टरी बोललोय ...एकाच धाग्यावर *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

रेवती गुरुवार, 06/26/2014 - 15:21
तुम्हाला एका चारचाकीवाल्या म्याडमनी दोन वाहनांच्या फटीतून नो असे म्हणत जाऊ दिले नाही तो प्रतिसाद विडंबायचा प्रयत्न केला हो, पण जम्या नै.

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:41
भीतीदायक धागा आहे! *ROFL* मात्र अनघाच्या धाग्यावर सुपारी घेतल्यासारखे प्रतिसाद देणारे या धाग्यावर कधी सुरू होतात याची वाट बघत आहे! *blum3* लिखाण नेहमीप्रमाणेच खास स्नेहांकिता स्टायल!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची प्रेरणा (अनघाताई, कृपया ह घ्यावे.) बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये.

भाव चलित कुंडली आणि इतर षोडशवर्ग कुंडल्या ....

निमिष सोनार ·

धन्या Wed, 06/25/2014 - 17:18
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
ज्योतिष हे शास्त्र नाही. बाकी चालू दया.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Fri, 06/27/2014 - 18:00
यू सी, द व्होल कंट्री ऑफ द सिस्टम इज जक्स्टापोजिशन्ड बाय द हीमोग्लोबीन इन द अ‍ॅट्मोस्फिअर बिकॉज यू आर अ सोफिस्टिकेटेड र्‍हिटोरिसिअन इन-टोक्सिकेटेड बाय द एक्झिब्युरन्स ऑफ युअर ओन व्हर्बोसिटी...

In reply to by धन्या

ज्योतिष हे शास्त्र नाही
>>> आमच्या भावना दुखावल्या :D निमिषराव तुम्ही घाबरु नका , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,ही घ्या उत्तरे निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? >> ह्या प्रश्न्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काळी फॉस ६, ३० -------------- हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या Aethusea-------- Fool”s Parsley तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या Argentnum Nitricum ------ नावाचे एक औषध आहे, साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो. :D

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 19:26
आमच्या भावना दुखावल्या
फारच ब्वा नाजूक तुमच्या भावना. अगदी उठल्या बसल्या* दुखावतात. * हे नेमकं काय आहे सांगायची गरज नसावी. ;)

In reply to by धन्या

धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ... ओम फट स्वाहा a

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 19:38
थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ...
भानामती करणे हे वाईट कर्म आहे. त्याची चित्रगुप्ताच्या वहीत नोंद होऊन ते तुमच्या संचित कर्मात जमा होईल. अणि योग्य वेळ येताच या संचित कर्माचे क्रियमाण कर्मात रुपांतर होऊन त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतील. एक लक्षात ठेवा, कर्माचा सिद्धांत कुणालाच सोडत नसतो.

In reply to by धन्या

कर्माच्या सिध्दांताला .... सिध्दांत कर्मेला आम्ही काली फॉसीफोरम ६ ३० देतो ... शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन ... मग तो बाधत नाही =))

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 19:53
खर्‍या ज्योतिषाचा तोडग्यांवर विश्वास नसतो. त्याच्या दृष्टीने तोडगे हे थोतांड असते. एकदा ग्रहदशेचा फेरा आला की त्या व्यक्तीला तुमच्या शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन दिलेले काली फॉसीफोरम ६ ३० ही वाचवू शकणार नाही. च्यायला जे तोडग्यांनी, अंगारे-धुपारे, गंडे-तावित वापरुन किंवा कसलीशी पोथी वाचून बदलता येतं ते प्राक्तन कसलं :D

In reply to by धन्या

सूड Wed, 06/25/2014 - 19:59
>>काली फॉसीफोरम ६ ३० ही कोणती पट्टी म्हणे गाण्याची? पाचेक महिन्यापूर्वी मी पांढरी सहावर सरगम आणि छोटे छोटे अलंकार वाजवत असे, आताशा सराव मोडलाय. ;)

In reply to by धन्या

अरे मुढ बालका तुझा अजुन लक्षात आलेले नाही काली फॉसीफोरम म्हणजे साक्षात आत्मतत्व ! त्याला कसली आलीये ग्रहदशा ? एकदा का ते घेतले की तुम्ही तद्रुपच होवुन जाता ...मग काय मज्जाच मजा ... नैन छिंदन्ति शस्त्राणि नैन दहति पावका: =))

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 20:14
क्षमा असावी महाराज. आमचे ज्ञान महाराष्ट्र शासनाच्या पाठयपुस्तक महामंडळाने छापलेल्या विज्ञानाच्या पुस्तकातील न्युटनच्या नियमांपुरतेच मर्यादीत आहे. नाही म्हणायला अभियांत्रिकीला असताना ओहमच्या नियमाचा अभ्यास केला होता. परंतू काम संगणकाच्या क्षेत्रात करत असल्यामुळे आता तोही विसरलो आहे.

In reply to by S.प्रशांत

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 09:50
ओहम आणि सोहम राहू द्या बाजूला. मला हल्ली "कोहम" हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर कुठल्या कुंडलीत पाहावे, लग्न कुंडली, भाव चलित कुंडली की नवमांश कुंडली?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 01:45
पाश्चिमात्य पद्ध्तीप्रमाणे दिलेल्या तारखा आणि राशी यावरुन फक्त सुर्यराशी(सन साइन)विचारात घ्याव्यात, असे वाटते.

In reply to by आयुर्हित

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 09:57
भारतीय वैदिक ज्योतिष हे भारतीय तिथींवरुन पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास समजली जाते. मात्र इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जे दैनिक/साप्ताहिक/मासिक वगैरे भविष्य येते ते त्यामधल्या राशी या व्यक्तीच्या इंग्रजी महिन्याच्या जन्मतारखेवरुन ठरतात. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिष आणि पश्चिमात्य ज्योतिष यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्‍या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by धन्या

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 10:45
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by धन्या

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 10:45
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by धन्या

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 10:47
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशी आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे गुरुवार, 06/26/2014 - 12:13
एकंदरित वैदिक ज्योतिष ३० पट जास्त पॉवरफुल आहे (१०पट जास्त घटक गुणिले ३ प्रतिसाद) :-)

In reply to by बाळ सप्रे

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 14:32
हॅ हॅ हॅ .. साहेबांना माहित नाही अशी गोष्ट नाही बघा जगी.. 'शहाणे करून सोडावे जन' अगदी व्रत आहे हो यांचे.

In reply to by धन्या

Prajakta२१ गुरुवार, 06/26/2014 - 10:28
तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास नव्हे तर लग्न रास असते आणि चंद्र ज्या राशीत असतो ती जन्म रास समजली जाते साडेसाती किंवा ग्रहदशा ह्या जन्मराशीवरून ठरतात भारतीय पद्धतीत लग्न रस आणि जन्म रास ह्या दोन्हींचे analysis करून भविष्य सांगतात

In reply to by Prajakta२१

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 12:49
धन्यवाद. बरेच दिवस वापरात नसल्यामुळे माझे तेलुगू भाषा आणि ज्योतिष या विषयाचे (शास्त्र नव्हे!) ज्ञान विस्मरणात गेले आहे.

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:59
साध्या लग्नकुंडली वरून आणि सध्याची (गोचरि)ग्रहस्थितीवरून भविष्य सांगता आले पाहिजे .केवळ राजयोग आहे म्हणून काही प्रत्येकाच्या गळ्यात माळ घालायला हत्ती फिरत नसतात .इति वराहमिहिर .चांगली ग्रहस्थिती आल्यावर जातकाच्या परिस्थितीनुसार चांगल्या गोष्टी घडतात .याकरिता जातकाने महत्वाकांक्षा ठेवून पुढे प्रगती करण्याचे कष्ट सतत घ्यायला हवेत .दुसऱ्या पायरीवर असेल तर तो चौथ्यावर नेण्याचे काम ग्रह करतील .त्याने कष्ट करून नवव्या पायरीवर गेल्यास तो अकराव्यावर जाईल . बाकी लग्न कुंडलीला भावचलित आणि नवमांशाप्रमाणे करून दशमातल्या डोक्यावरच्या ग्रहाला अष्टमात सरकवणे म्हणजे चण्याच्या पुडीला चपाट करून त्याचे विमान बनवण्याचा अट्टाहास होय .

In reply to by सूड

धन्या Wed, 06/25/2014 - 19:47
काहीजण त्याला शास्त्र मानणार॥
शास्त्र मानणे हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. काहींच्या मते ज्योतिष हे शास्त्र आहे आणि काहींच्या मते नाही. इथे शास्त्र "मानण्याचा" प्रश्नच येत नाही.

कपिलमुनी Wed, 06/25/2014 - 20:34
डिस्क्लेमर टाकले असताना सुद्धा लोक इथे येउन गोंधळ घालतात.. नाही पटत तर धाग्याकडे दुर्लक्ष करावे. ज्याचा भाव त्याचा देव ! बाकीच्यानी दगड म्हणा किंवा इतर काही.. पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा

धन्या Wed, 06/25/2014 - 20:43
पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा
तो आहेच. मात्र
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही.
एकदा धागा टाकल्यावर चर्चा तर होणारच. या संस्थळाचे सदस्य म्हणून तो अधिकार प्रत्येकाला आहे. काही आक्षेपार्ह आढळल्यास संपादक मंडळ लिखाणास कात्री लावतेच की. जर विरोधी मते असणार्‍या लोकांनी मते मांडू नयेत अशी ईच्छा असेल तर "बंदिस्त समूह" असणारीही संकेतस्थळे आहेत. तिकडे आपले समूह बनवून "अहो रुपम अहो ध्वनी"चा घोष करावा.

मुळात कुंडली हा बेसच निराधार असेल, तर मग ती भावचलित असली काय की लग्न कुंडली, सर्वच भाकीते अंदाजपंचे दाहोदरसे ठरणार. जर धाग्यावर चर्चा अपेक्षित असेल, तर ज्यावर इमारत बांधायची तो पाया भक्कम हवा.

सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 08:38
'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते. खास ज्योतिषशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (गंभीर , शिस्तबद्ध ,सुनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मायबोली' नाही !), ज्या ठिकाणी फक्त ज्योतिषशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न या संस्थळावर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल. ही संस्थळे ईंग्रजी भाषेत आहेत पण आपल्याला ती अडचण भासणार नाही.

In reply to by सरळमार्गी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 10:55
>>>>'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही असं कै नै हं. मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे, असे वाटते. बाकी, लिहिणा-यांची मर्जी. -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

इरसाल Fri, 06/27/2014 - 14:19
+२ पण मी संपादक नाही हं !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 11:11
मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही
>>> ह्यावर अत्यंत विनम्रपणे आक्षेप नोंदवत आहे ... परवाच एका धाग्यावर झालेले एका प्रश्नाचे संपादन अत्यंत एकांगी होते असे वाटले (http://www.misalpav.com/comment/590391#comment-590391) टीका करण्याचा उद्देश नाहीये ... फक्त आपले विधान मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही हे पुर्ण सत्य नाही इतकेच नोंदवु इच्छितो ! -----------------------------------------------

प्लीज माझा आयडी डीलीट करु नका ...प्लीज प्लीज प्लीज

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरील काही सदस्यांना ज्योतिष विषयाचे वावडे आहे. इतकेच नाही तर अशी लोकं ज्योतिषावर कुठलाही धागा आले की अक्षरश: चेकाळतात. विरोधाला विरोध नाही, पण धागा पूर्णपणे हायज्याक केला जातो. इतका की तिथे कुठल्याही प्रकारची चर्चाच होणे शक्य नाही. हे म्हणजे साधारण रोडीजच्या ग्रुप डिस्कशन मध्ये लोकं (किंवा संसदेत खासदार) आरडओरडा करून इतरांना बोलूच देत नाहीत, त्याचे जालिय रूप वाटते.

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:50
शिनेर सदस्य धाग्यावर अवांतर करताना आणि एक ज्येष्ठ संपादक धुमाकूळ घालताना बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. *blush*

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 12:56
सर लिहिण्याला आक्षेप नाहीच. आक्षेप आहे तो विरोधी मते असणार्‍यांनी आपली मते मांडूच नयेत या पवित्र्याला. कुणीही उठावं आणि केवळ काकतालिय न्यायाने खर्‍या ठरणार्‍या भाकितांना शास्त्र म्हणावे यालाही आमचा विरोध नाही. मात्र ते त्यांचे वैयक्तिक मत असावं. मिसळपावसारख्या मुक्त व्यासपीठावर अशी विधाने केल्यावर त्याला विरोध करुच नये हे म्हणणे पटत नाही. विशेष म्हणजे धागाकर्ते धागा टाकल्यांनतर इकडे फिरकलेच नाहीत. धाग्यावरील आक्षेपांना त्यांनी उत्तर देणे ही तर खुप दुरची गोष्ट झाली.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 06/26/2014 - 11:42
पूर्वी उधृत केलेले माझेच वाक्य पुन्हा लिहीतो "आपला तो संतुलित विचार आणि दुसर्‍याचा तो अतिरेक असतो". @ निमिष,मला जोतिषात काही गती नाही. काही काही ज्योतिषी अचूक भविष्य वर्तवताना पाहीले आहेत. सनातन प्रभातमधे छापून आलेले एका गोपालकृष्णन किंवा तत्सम ज्योतिषाचे अंदाज ९५ % ठरल्याचे या इलेक्शनला अनुभवले. त्याबद्दल कुतुहल मात्र वाटते.

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 12:06
स.मं.चा एक्स्लुझीव अधिकार आहे, तसाच धोरणाच्या मर्यादेत राहून चर्चा करण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार आहे. नाही तर एकमार्गी मतं रेटणार्‍या चर्चांचा उपयोग तो काय?
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे
तोच तर चर्चा विषय आहे. त्यांना पाया भक्कम आहे हे दाखवून देऊ द्या.
काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे
मग डायरी आणि संकेतस्थळात फरक काय? योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 12:54
>>> योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? हे असंच लिहायचंय का @@@ प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? @@@ असं लिहायचंय?

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 12:41
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. >>> उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? १२ व्या स्थानाचे >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? अर्थातच राशी कुंडली >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? नक्की माहिती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ज्ञानव Mon, 06/30/2014 - 10:00
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. ग्रहांचे अंश हे ग्रहांचे स्थान ठरवतात जर चलित कुंडलीत ग्रह एक घर मागे पुढे होत असेल तर चलित कुंडलीत त्याचे जे घर आहे ते लक्षात घ्यावे लागते. पण नुसतेच चलित कि नवमाश, राशी चंद्र असे चालत नाही तर प्रश्नानुसार कुंडली बघतात असा अनुभव आहे. पण >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. हे हि तितकेच खरे. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? >>>>अर्थातच राशी कुंडली मुळात कुंडली एकच असते पण त्याची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे असल्याने ज्योतिषाने स्वकष्टार्जित तारतम्य वापरून फलादेश द्यायचा असतो पण सामन्यतः शिष्य, वाचन आणि गुरूने जेवढे सांगितले तेव्हढेच डोके चालवतात आणि गोंधळ होतो. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? >>>>नक्की माहिती नाही. पास. तुम्ही जर ज्योतिषाचा अभ्यास करत असाल तर मुळात तुमचा ज्योतिषी म्हणून त्या विषयाबाबत काय दृष्टीकोन आहे तेही मांडा म्हणजे उदा. "गुरु हा अर्थ कारणाचा कारक आहे" असे बरेच ज्योतिषी सांगतात ह्या वाक्याचा तुम्ही काय अर्थ लावता? किंवा एखादे तत्सम वाक्य तुम्ही उलगडून सांगा ज्याने माझ्या ज्ञानात ही भर पडेल.

सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 12:46
>>>> मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. बिरुटे साहेब मिपा ला वावडे नसेल हो पण मिपाकरा^ना बर्‍याच विषयाची आलर्जी आहे त्याचे काय? >>> चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?

In reply to by सरळमार्गी

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 14:17
परा या सदस्यानं म्हटलं होतं की संकेतस्थळावरचं लेखन हे खिडकीत बसण्यासारखं आहे, मग कुणी शुकशुक केलं तर तक्रार करण्यात अर्थ नाही. बाय द वे, लेखकानं किंवा कुणीही कुंडली, आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारण नि:संदिग्धपणे दाखवून द्यावा. कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे. आणि आय चॅलेंज यू, ओन धिस फोरम, तुम्ही कुंडली आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारणभाव वैज्ञानिक सत्यतेच्या निकषांवर सिद्ध करु शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 14:31
कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे.
वैज्ञानिक सत्याची कसोटी इतक्या स्पष्ट आणि सोप्या शब्दांत मांडण्यासाठी धन्यवाद.

In reply to by धन्या

अर्धवटराव Mon, 06/30/2014 - 08:28
हे वैज्ञानीक कसोटीचं सत्य आहे. आणि त्यात एक अत्यंत (सर्वात?) महत्वाचा क्लॉज म्हणजे "इन गिव्हन कंडीशन्स". हा एक क्लॉज सत्याची कसोट्यांपासुन फारकत करतो. वैज्ञानीक सत्य असं कसोट्यांवर तोलण्याइतपत पंगू नाहि. असो.

म्हैस गुरुवार, 06/26/2014 - 13:14
का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?
exactly . संपादकांच नियंत्रण नसल्यामुळे (किवा संपादक ) पक्षपात करतात ह्याचं चांगला उदाहरण माझ्याकडे आहे. आणि बर्याच लोकांना इथे कुठलीही गोष्ट समजून घेण्यात किवा चर्चा करण्यात रस नसून स्वताच्या अर्धवट , तोकड्या माहितीच्या आधारे किवा आपल्या अर्धवट अकलेच्या आधारे फक्त चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच करण्यात रस आहे.

सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 15:13
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? भारतात प्रामुख्याने क्षेत्र कुंडली (लग्न कुंडली) प्रचलित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भावचलित कुंडली तयार करण्या साठी लागणारी भावसाधनाची कोष्टके सहजासहजी उपलब्ध नसणे, अशी कोष्टकें उपलब्ध नसल्यास बरीच आकडेमोड करावी लागते, ती करणे बर्‍याच जणांना जमत नाही. मात्र आज संगणकाच्या मदतीने ही गणिते सहज सोपी झाली आहेत. राशीचक्राचे १२ भाग पाडून त्यांना १,, १२ भावात बसवणे या साठी सुमारे ३० पेक्षा जास्त पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘प्लॅसिड्स’ ही प्रणाली जास्त लोकप्रिय आहे, के.पी. मध्ये ‘प्लॅसिड्स’ प्रकाराने बनवलेली भावचलित कुंड्ली वापरतात. कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘प्लॅसिड्स’ पद्धत स्विकारली कारण त्यावेळेला फक्त याच ‘प्लॅसिड्स’ पद्धतीची भावसाधन कोष्ट्के बाजारात सहजासहजी उपलब्ध होती (अशी कोष्ट्कें उपलब्ध असणे हेच ‘प्लॅसिड्स’ च्या लोकप्रिततेचे कारण आहे). कृष्णमुर्तीना आणखी काही वर्षांचे आयुर्मान लाभले असते तर त्यांनी निश्चितच दुसरी एखादी भावसाधन प्रणाली अवलंबली असती ( बहुदा ‘कोश’ ही जर्मन ज्योतिर्विदांनी तयार केलेली प्रणाली ) किंवा त्यांनी स्वत:च एखादी नविन प्रणाली निर्माण केली असती. कोणती कुंडली वापरायची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे कोणती कुंडली वापरायची ते ज्या त्या ज्योतिर्विदाने स्वत:च्या अनुभवाच्या आधाराने ठरवावे. माझ्या मते भावचलित कुंडली वापरायची असेल तर महान गणिती ‘श्रीपती’ यांनी सुचवलेल्या पद्धतीने तयार केलेली भावचलित कुंडली वापरावी. ही वापरताना भावाच्या मध्या जवळचे ग्रह त्याच भावात व भावाच्या आरंभी वा शेवटी 5 अंशात असलेले ग्रह क्रमश: अलिकडच्या / पलिकडच्या भावात आहेत असे समजावे. हा नियम के.पी. मध्ये ही काही जण वापरतात. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? चंद्र एका राशीत साधारणपणे अडिच दिवस असतो, म्हणजेच एखाद्या संपूर्ण दिवसात तो एकाच राशीत असणार (चंद्र ज्या दिवशी राशी बदलेल तो दिवस अपवाद्) म्हणजेच त्या दिवशी जन्मलेल्या सर्व बालकांची राशी कुंडली एका सारखी असणार , कारण त्या दिवसभरात बाकीचे सर्व ग्रह ही एकाच राशीत व त्याच अंशात असणार.(दुसरा एखादा ग्रह नेमका त्याच दिवशी राशी बदलत असेल तर तो दिवस अपवाद्) मग अशा राशी कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. याउलट जन्मलग्न साधारण पणे दर दोन तासाने बदलते म्हणजेच प्रत्येक दिवसात 12 जन्मकुंडल्या शक्य असतात, दिवसभरासाठी ची एकच एक राशी कुडली पेक्षा ही प्रत्येक 2 तासाची एक वेगळी कुंडली हि परिस्थिती बरी आहे. पण तरीही त्या दोन तासाच्या कालावधीत जन्मलेल्या बालकांच्या कुंडल्या एकच राहणार पर्यायाने अशा कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. त्याला उत्तर म्हणून कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘सब’ ची कल्पना मांडून 360 अंशाच्या राशीचक्राचे 249 भाग केले , या ‘सब’ मुळे साधारण पणे दिड दोन मिनीटांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. एव्हढे करुन ही सुक्ष्मता येत नाही हे लक्षात आल्यावर श्री एस पी खुल्लर यांनी कृष्णमुर्तीनी सुचवलेल्या ‘सब’ चे पुन्हा 9 भाग केले , त्यामुळे साधारण पणे काही सेकंदांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. अर्थात श्री एस पी खुल्लर आणि कृष्णमुर्ती यांनी सुचवलेल्या या पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? या ‘भाग कुंडल्या ‘ एक प्रकारचे ‘हारमोनिक' चार्ट्स आहेत. अशी प्रत्येक कुंडली जातकाच्या आयुष्याचा एखाद्या विषिष्ठ अंगाचाच विचार करण्यासाठी असते उदा: विवाह, संतान, आयुर्दाय , आरोग्य, धन, व्यवसाय, गतजन्म, पुढचा जन्म ई. या भाग कुंडल्या सखोल अभ्यास करण्याच्या हेतूने बनवलेल्या सुपर स्पेशॅलिटी ‘कुंडल्या आहेत. जसा फरक साधा जनरल डॉकटर आणि गायनॅकोलऑजीस्ट, ईएंटी सर्जन यांच्यात असतो तसाच फरक जन्मलग्न कुंडली व भाग कुंड्ल्यांत असतो. या कुंडल्या बनवताना राशीचे 2,3,4.9 , 12 , 16, 32 असे करत 60, 120 व त्याही पलीकडे जाऊन सुक्ष्म भाग केले जातात. नाडि भविष्य कथनात 1/60 व 1/120 पद्ध्तीच्या पत्रिका वापरल्या गेल्याचे आढळते. याही पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. उदा: नवमांश पत्रिका वापरायची असेल तर जातकाच्या जन्मवेळेतील चूक 13 मीनीटंपेक्षा जास्त असता कामा नये , अन्यथा नवमांश बदलेल व पर्यायाने नवमांश कुंडली बदलेल. पण गंमत अशी की या मर्यादेचाच खुबिने उपयोग करुन घेऊन जातकची जन्मवेळ बरोबर आहे का ते ठरवता येते व चुक दुरुस्त करता येते. अर्थात हे कोणा येरा गबाळ्याचे (कुडमुड्या चे ) काम नाही हे ओघानेच आले. दोन व्यक्ती एक सारख्या नसतात, अगदि जुळ्या मुलांत सुद्धा फरक असतो, मग त्यांच्या जन्मकुंडल्याही वेगळ्याच असायला हव्यात ना? त्यासाठीच तर हे एव्हढे सुक्ष्म गणित करावे लागते. पण हे एव्हढे सगळे गणिती व्याप करणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही.

In reply to by सरळमार्गी

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 16:18
मानले आपल्याला, खुप छान प्रतिसाद दिल्याबद्दल! आपल्याकडुन या विषयावर नवे लेखही येवू द्या, हि विनंति.

In reply to by सरळमार्गी

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 16:25
उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे. प्रश्न उरतो की इतके सगळे सायास करून त्याचा उपयोग काय ? जन्माला आलेले मूल हिटलर, न्युटन, गांधी अथवा शिवराय होणार असे काही खात्रीलायकरित्या सांगता येणार असेल तर ठिक नाहीतर कामकरी ठोकळ्यांच्या मांदियाळीतले अजून एक आले आणि त्यावर या 'गणितज्ञानी' डोके फोड करून ते 'आयबीएम मध्ये काम करणार, नवी फोर्ड गाडी वयाच्या विसाव्या वर्षीच घेणार' वगैरे सूक्ष्म माहीती शोधण्यात त्यांचे ज्ञान व्यर्थ घालवावे हे काही पटत नाही.

In reply to by हाडक्या

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 16:32
उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे.
सहमत आहे. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हा विषय बाजूला ठेवून या प्रतिसादाकडे पाहिले तर प्रतिसादकर्त्याने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे हे जाणवते. असे अभ्यासू प्रतिसाद आले तर निकोप चर्चा व्हायला नक्कीच मदत होईल. विरोधी मत असणार्‍यांनी प्रतिसाद देऊ नये अशा मुजोरी भाषेने धाग्याची सुरुवात करुन मुख्य विषय एक दोन वाक्यांत गुंडाळणार्‍या धागाकर्त्याने या प्रतिसादकर्त्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. रच्याकने, ते धागाकर्ते आहेत कुठे? :)

आता आपण सविस्तर प्रतिसाद दिलायं, तेव्हा बाजू लावून धराल अशी अपेक्षा करतो. मी जर निरुत्तर झालो तर खुल्या दिलानं मान्य करीन, पण तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर ज्योतिषशास्त्र निरुपयोगी आहे हे मान्य करा. माझे हितचिंतक चर्चा भरकटवणार नाहीत आणि सर्वांसाठी ती विधायक होईल; त्याचा सगळ्यांना लाभ होईल, अशी आशा करतो. _____________________ अस्तित्वाची संरचना एखाद्या अमर्याद आणि व्यापक देहासारखी आहे. इथे प्रत्येक गोष्ट इतर प्रत्येक गोष्टीशी अनाकलनीय रितीनं जोडलेली आहे. Existence is an Organic Unity & it is a Terrific Mystery. सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे. आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे. या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे. कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही. इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्‍यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते! ______________________ तस्मात, जिथे अखिल अस्तित्वाच्या, अनेकानेक प्रक्रियाच एकमेकांशी जोडलेल्या आणि अनाकलनीय आहेत, तिथे यकःश्चित जातकाच्या व्यक्तिगत वर्तांकनाची कल्पनाच अज्ञानमूलक आहे. जर अस्तित्वाची Organic Unity ही वास्तविकता लक्षात आली तर व्यक्तिगत भविष्याचा वेध अशक्य आहे, हे सहज लक्षात येईल. कारण ज्या अस्तित्वाशी आपण एकसंध आहोत, खुद्द त्या अस्तित्वाचीच, सांप्रत स्थिती अनाकलनीय आहे... पुढच्या स्थितीची तर बातच सोडा!

In reply to by संजय क्षीरसागर

स्पा Fri, 06/27/2014 - 11:41
सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे. आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे. या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे. कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
सॉलिड प्रतिसाद , आवडेश

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या Fri, 06/27/2014 - 14:42
यनिमित्ताने देऊळ चित्रपटातील मचाणावरीलच्या दृश्यातील आण्णांचे वाक्य आठवले, "माणूस म्हणजे काळाच्या पटावरील ठीपका आहे ठीपका". नुकतेच मुंबईच्या नेहरु तारांगणला असणार्‍या शोमध्ये विश्वात पृथ्वीचे स्थान किती नगण्य आहे हे दाखवले जाते तेही आठवले. :)

In reply to by धन्या

मला एकच मुद्दा मांडायचा होता, तो म्हणजे आपण अस्तित्वाशी समरुप आहोत आणि जर त्या व्यापकतेचीच नियती अज्ञात आहे, तर `व्यक्तिगत नियती' असं काही असू शकत नाही. सरळमार्गीनं, माझ्या इतक्या निर्विवाद प्रतिवादानंतर (मुद्दा बेशर्त मान्य करण्याऐवजी), असा स्टँड घेतल्यानं -
श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!
- आय हॅड टू गीव अप. अर्थात, त्यांनी ज्योतिषास्त्रातल्या दिग्गजांची नांव लिहून पुढे म्हटलंय :
ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे?
मी त्यांना भारी पडीन यात काही कौतुक नाही कारण जे लिहीलंय ती वस्तुस्थिती आहे. प्रतिसाद देण्याचा मूळ हेतू असा होता की सदस्यांना वस्तुस्थिती विशद व्हावी. एकदा ती झाली की मग इथला कुणीही सदस्य त्या विषयातल्या कुणाही दिग्गजाला निरुत्तर करेल. आणि संकेतस्थळावरच्या चर्चा अशाप्रकारे एका निश्चित निष्कर्शाप्रत यायला हव्या, तरच त्यांचा उपयोग आहे. थोडक्यात, आपण स्वतःला अस्तित्वापासून कोणत्याही प्रकारे वेगळं करु शकत नाही, आणि अस्तित्वाला नियती नाही. तस्मात, व्यक्तिचं भविष्य हा अंदाजपंचे दाहोदरसेचा खेळ आहे. कुणीही अडलानडलेला छ जातक, तितक्याच अज्ञानी फ कडे जाऊन `अब मेरा क्या होगा काल्या?' विचारतो आणि एक निरर्थक कुंडलीनामक कागदी घोड्यावरुन, फ त्याला कल्पनेच्या दुनियेत घुमवतो. यापलिकडे ज्योतिषास्त्राला अर्थ नाही. बाय द वे,
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे त्यांना लिहु द्या ना भो
असा प्रतिसाद देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणं आहे; हे निदान जवाबदार मंडळींना तरी लक्षात (एव्हाना) यायला हवं. कारण ज्योतिर्विदांना निरुत्तर करणं फारसं अवघड नाही. पण त्याही पुढे जाऊन, पूर्वीच्या ऋषींमुनींनी केलेला ज्योतिषाचा अभ्यास, त्यांचा नेमका अध्यात्मिक निष्कर्श आणि त्यातून जगण्यासाठी मिळणारी दिशा, या सर्व गोष्टींवर सखोल चिंतन झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे, अशा प्रकारे निराधार विषयांना प्रोत्साहन देणं, सदस्यांची दिशाभूल आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी Fri, 06/27/2014 - 17:18
या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. हे वाक्य इतक्या ठामपणे लिहिण्याइतका पुरावा सापडलेला नाही. म्हणून, या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कोण आहे अथवा नाही हे माहिती नाही.

In reply to by आदिजोशी

द्यावा लागेल. `असा कुणीही नाही' म्हणणारे Null Hypothesis च्या अदर एंडला आहेत. अर्थात, तुम्ही नीट विचारपूर्वक पुढचा प्रतिसाद देऊ शकलात तर तुमच्या लक्षात येईल की, तुमच्याकडे अस्तित्वाचा कर्ता-करविता आहे याचा कोणताही पुरावा नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित Sat, 06/28/2014 - 14:03
कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
संजय क्षीरसागरजी, उचलला कळफलक आणि लागले टंकायला? असे का करता आपण? फक्त अज्ञानी लोकच असे लिहु शकतात. सत्य असे आहे १)सुर्य विझेल हे खरे आहे पण त्याला अजुन करोडो वर्षे जीवन आहे. अभी तो मै जवान हु म्हणत आत्ताशी कोठे ४५६७००००००वर्षे(प्रुथ्वीवरील वर्ष)वय झाले आहे त्याचे, म्हणजे अजुन निम्मे आयुष्य बाकि आहे हो. २)पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते हे खरे करायचे असेल तर आन्तेरस (जेष्ठ नक्षत्र/ तारा) किंवा त्याच्यावस्तुमानाएवढे क्रुष्णविवर आपल्या सुर्यमालिकेत युरेनस ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेच्या आत दाखल झाले पाहिजे, याचा अर्थ सध्या असलेल्या ५५० प्रकाशवर्षे अंतरावरुन प्रुथ्वीपासुन १८एयु अंतरावर यावे लागेल. 1 Astronomical Unit = 149,597,871 kilometers 1 light-year = 9,460,730,472,580,800 metres Redgiants ३)कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते हे खरे ठरायचे असेल तर गुरु ग्रह किंवा सुर्य आधि नष्ट झाला असेल तरच शक्य आहे. ४)कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही. हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.
इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते!
हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने! तेव्हा पुढचे काही प्रश्न विचारण्यापुर्वी ज्योतिषशास्त्रावरची कमीत कमी विस पुस्तके नीट वाचून समजावून घ्यावेत हिच नम विनंति!

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक Sat, 06/28/2014 - 14:27
ज्योतिष्याविषयी थोडी जरी सहानुभूती दाखवली, तर त्या सदस्याला लूत भरलेल्या कुत्र्यागत हाडहाड करायचे अशी शपथ घेतली आहे का तुम्हा लोकांनी?

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 15:55
ज्योतिषाच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहिले तरी त्याचे समर्थन करणे आणि त्याच्या विरुद्ध एक शब्द काढला तरी ढोंगी विज्ञानवादी इ.इ. हाडहाड करायचे या फ्याशनचे तुम्ही समर्थक आहात काय? सध्या अच्छे दिन आल्यामुळे स्यूडोसायन्सही प्युअर सायन्स होते असे वाटत असेल तर असूदे बॉ.

In reply to by बॅटमॅन

आयुर्हित Sat, 06/28/2014 - 15:18
बॅटमॅनजी, आजकाल असेच भास व्ह्यायला लागलेत वाटते! क्रुपया तज्ञांना दाखवुन लवकरात लवकर उपचार करुन घ्यावेत हि नम्र विनंति.तज्ञ काय म्हणाले यावर नविन धागाही येवु द्या! नहितर माझ्या प्रतिसादात काय चुक आहे/डोक्यावर पडल्यागतच लिहिले आहे हे तरि कळू द्या सर्वांना!

In reply to by आयुर्हित

बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 15:59
ज्योतिषाने काय सिद्ध केले आहे याबद्दलचे तुमचे गैरसमज तेच दर्शवतात ओ. पण तुम्ही नाराज कशाला होता? जगात मूर्ख बनवणार्‍यांची कायमच चलती असते. मी किंवा अन्य कुणी काही बोलल्याने ज्योतिषांची दुकाने बंद थोडीच होणारेत?

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक Sat, 06/28/2014 - 16:37
माझा प्रश्न ज्योतिष्य, सायन्स, स्युडोसायन्सविषयी नसून 'हाडहाड' करण्याविषयी होता. त्यातून संपादक मंडळाने ज्योतिष्य हा विषय मिपावर प्रतिबंधीत नाही असे स्पष्ट करूनही सातत्याने ज्योतिष्यविषयक लिहीणार्‍यांची मुस्कटदाबी करू पाहणे हा संपादक मंडळाचा अपमान आहे असा माझा तरी 'ग्रह' झालेला आहे. असो.

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 01:49
ज्योतिष विषयाबद्दल लिहिणे हे अलाउड आहे याचा अर्थ ज्योतिषावर टीका करणे ब्यान आहे हे आजच समजले. त्याला मुस्कटदाबी म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी आहे. इतकीशी टीकाही सहन करता येत नसेल तर उ पयोग काय त्याचा? बरे, इतकं लिहून कुठल्या प्रश्नाला धड उत्तर नाही ते नाही, वर आणि मुक्ताफळे ऐकून घ्या. कोण सांगितलंय? संपादक मंडळाने अपमान इ. स्वतः सांगितले तर ठीक, नपेक्षा तुमच्या प्रतिसादातून तुम्ही ज्योतिष नामक भाकडकथेचे समर्थक आहात असेच वाटू लागले आहे. पण काळजी नसावी, ज्योतिषांची दुकाने आमच्या क्षीण आवाजामुळे बंद होणार नाहीत. या विषयावर एकदा ऑफिशिअल पोझिशन क्लीअर करूनच टाका आता संमं. ज्योतिष हा विषय वर्ज्य नाही हे समजले, त्याच्यावरची टीका वर्ज्य आहे की नाही तेही एकदाचे कळूदेच. म्हणजे मग कळेल अशा धाग्यांवर छानच, मस्तच, माझ्याही दशमस्थानात अकिलीस अन त्रयोदशस्थानात दुर्योधन आहे इ.इ. कमेंटी लिहायला बरे!

In reply to by बॅटमॅन

मी काय म्हणतो, ज्योतिष ही वर्ज्य नको आणि त्याचा विरोधही. पण जे काही करायचे ते त्या त्या धाग्यावर करा ना. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही यावर मिपावर खंडीभर धागे आहेत. पाहिजे तर अजुन एक काढावा, पण जिथे तशी चर्चा अपेक्षित नाही तिथे ती न करणे सहज शक्य व्हावे. समजा मला क्रिकेट खेळ बकवास आहे किंबहुना तो खरा खेळ नाहीच आहे आणि तो खेळणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे वाटते. म्हणून मी आणि माझ्यासारख्या 10-12 लोकांनी क्रिकेटच्या प्रत्येक धाग्यावर जाऊन दंगा घालणे कितपत सभ्यपणाचे ठरेल ? Is it so hard to agree to disagree at least sometimes ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सुबोध खरे Sun, 06/29/2014 - 20:38
विमे एक फरक आहे. क्रिकेट बद्दल तुम्ही शिव्या घाला नाही तर ओव्या म्हणा माणसाच्या आयुष्यात फरक पडत नाही कारण माणसाची पुढची कोणतीही गोष्ट भारत जिंकला किंवा हरला (किंवा सामना "फिक्स" असेल तरीही) यावर अवलंबून नाही. परंतु एखादी उपचार पद्धती किंवा ज्योतिष यावर बर्याच माणसांचा पुढचा जीवनक्रम अवलंबून असण्याची "शक्यता" असते.आणि आपल्यापैकी कोणीही क्रिकेटचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध होईल असा दावा केलेला नाही. यामुळे हि तुलना एका पातळीवरची नाही. एवढे असले तरीही ज्योतिषावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येक माणसाने आपली तर तम बुद्धी वापरूनच ठरवायचे आहे.

In reply to by सुबोध खरे

मान्य आहे. मुद्दाम जरा अतार्किक उदाहरण दिले होते. दुसरे काही उदाहरण दिले असते तर वेगळा वाद निर्माण होउ शकला असता. (क्रिकेट मुळे नुकसान झालेले लोकं पाहण्यात आहेत, पण तो मुद्दा अल्लग आहे :-) ) आपल्याला न पटण्याऱ्या धाग्याचे काश्मीर करणे हा काही मार्ग नाही. याच धाग्यावरील पहिल्या अनेक प्रतिक्रिया बघा. आणि हा प्रकार आजचा नाही, खूप जुना आहे. नावे बदलतात, स्टाईल सेम :-) मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ? इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे. खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?
मी अजूनही पत्नीची पत्रिका बघितली नाही. ज्याला व्यक्तीची पारख करता येते तो पत्रिकेसारख्या छदाम गोष्टीला विचारत नाही. माझ्या लग्नपत्रिकेवर देवाचा उल्लेख नाही. मी फक्त रविवार हा सगळ्यांना सोयीचा वार पाहून, अक्षरशः एकही विधी न करता, रजिस्टर्ड मॅरेज केलं आहे. आणि सगळं उत्तम चालू आहे.
मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ?
अर्थात!
इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे.
इथे आणि तिथे यात फरक काय? अंतरजाल हा प्रबोधनाचा मिडिया आहे. तुम्ही इथे बाष्कळ चर्चा चाललीये असा गैरसमज करुन घेऊ नका.

In reply to by आयुर्हित

सूर्य विझणं, पृथ्वी परिभ्रमण कक्षेबाहेर फेकली जाणं, एखादा ग्रह पृथ्वीवर आदळणं यासरख्या घटना; दोन कारणांसाठी नमूद केल्या आहेत. एक, अस्तित्वाच्या व्यापकतेची कल्पना यावी आणि दोन, त्या मानवी नियंत्रणाच्या सर्वस्वी पलिकडे आहेत. थोडक्यात, कुंडलीसारख्या छ्दाम गोष्टीत त्या बसणं अशक्य आहे. तुम्ही थोडा जरी विचार करु शकलात तर इतक्या दूर जाण्याचीही गरज नाही. रक्ताभिसरण, पचन, अनेकविध संप्रेरकांचे स्त्रवण, उत्सर्जन, मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य यासारख्या देह जीवंत राहण्यासाठी असलेल्या अत्यंत बेसिक प्रक्रिया, जातकाच्या इच्छेपलिकडे आहेत. आता अशी कल्पना करा की एखादी बस जातकाला एका विविक्षित वेळी उडवणार आहे. तर त्या बसचालकाच्याही उपरनिर्दिष्ट शारीरिक घटना, बसच्या मेकॅनिझमचं फेल्युअर, ऐन वेळी सदर जातक (ऊडवला जाण्यासाठी) नेमक्या जागी असणं, या सर्व गोष्टी जातकाच्या आणि ज्योतिष्याच्या इच्छेपलिकडे आहेत. तस्मात, जातकाच्या जीवनात अमुक एक घटना विविक्षित वेळी घडेल हे ग्रह-तार्‍यांच्या भविष्यकालीन स्थितीवरुन, वर्तमानात विदित करणं हास्यास्पद आहे. आता पुढे -
१) कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
ही वस्तुस्थिती हरेक क्षणी आहे. यावर तुम्ही म्हटलंय `हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.' आयुष्य केव्हा संपेल हे सांगता येत नाही, हा मूळ मुद्दा आहे. जर पुढचा क्षणच अनिश्चित आहे तर भविष्यवाणीला अर्थ नाही. आणि तुम्ही म्हणतायं आयुष्य संपले तर पाहिजे! आयुष्य संपल्यावर काय करणार भविष्यवाणी? २) आपण अस्तित्वाशी समरुप आहोत. आपण काहीही केलं तरी त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. हे अस्तित्व इतकं व्यापक, अगाध आणि रहस्यमय आहे की ते एखाद्या यकःश्चित जातकाच्या कुंडलीवरनं, पुढल्या क्षणी काय रुप घेईल हे ठरवणं म्हणजे अज्ञानाची परिसिमा आहे. शिवाय कुंडली ही अखिल अस्तित्वाशी तुलना करता एका नगण्य व्यक्तीच्या जन्मवेळेची, अत्यंत तोकडी आणि अंशमात्र पॅरामिटर्स असलेली भूतकालीन घटना आहे. आणि कुंडलीचा संदर्भ घेणं म्हणजे अस्तित्व हे सदरहू व्यक्तीच्या जन्मापासून सुरु झालं असं समजणं आहे. तस्मात, जातकाच्या जन्मापूर्वीचा अस्तित्वाचा अनंत कालावधी, सोयिस्करपणे विसरणं ही सुद्धा तितकीच मूढता आहे. त्यामुळे तुमचं हे विधान :
हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने!
सर्वस्वी फोल आहे. शेवटी आपण मला ज्योतिषशस्त्रावरची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला आहे. त्यापेक्षा आपण ज्योतिषास्त्रावरची पुस्तकं वाचणं बंद केलंत तर वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित होईल.

कंजूस Fri, 06/27/2014 - 06:49
एकेक अंशापर्यँत जाऊन काय वेगळा शोध लावलेला नाही .त्यामुळे भावचलित अभ्यास निरर्थक वाटतो . आपल्याकडे चतुर्थ सुख स्थान संसारी(विशेषत: स्त्रिया) लोकांसाठी आणि व्ययस्थान साधूसंतांसाठी फार महत्त्वाचे आहे .इथे अंशात्मक चा काही उपयोग नाही .चांगले /वाईट होतेच . मुलगी सुखी होणार का हा प्रश्न सर्वाँना भेडसावत असतो .याचा निकाल लावायला एक लग्नकुंडली पुरेशी असते कशाला अंशात्मक खटाटोप करतात ? पुरुषांच्या बाबतीत हा किती कष्ट घेईल ,किती जणांचा पोशिंदा /आधार होईल हे महत्वाचे आहे .अंशात्मक भविष्य काढून सतरंजीवर बसेल का गादीवर याचा काही उपयोग नाही . जुळ्यांच्या कुंडलींचा अभ्यास हा शैक्षणिक उत्सुकतेपोटी केलेला प्रयत्न आहे .

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 10:01
माझा ज्योतिषशास्त्राचा थोडा म्हणजे अगदि प्राथमिक स्तरावरचा अभ्यास आहे, त्यादृष्टीने मी स्वत:ला अजून बिगरी ईयत्तेत आहे असेच समजतो, त्यामुळे आपण जे चर्चेचे विषय उपस्थित केले आहेत त्या विषयावर काही भाष्य करण्या इतकी माझी क्षमता नाही आणि लायकीही नाही. आपले काही लिखाण मी वाचले आहे त्यामुळे आपले चौफ्रर ज्ञान, व्यासंग किती दांडगा आहे याची मला कल्पना आहे त्यामुळे आपला हा चर्चेचा प्रस्ताव मला एकाद्या हिंदकेसरी पैलवानाने शड्डू ठोकून एखाद्या शाळकरी, शेंबड्या पोराला कुस्तीचे आमंत्रण दिल्यासारखे वाटले. आपल्याला अपेक्षित असलेली चर्चा करण्यास मी स्रर्वतोपरी असमर्थ आहे, क्षमस्व. थोडासा लहान तोंडी मोठा घास असे वाटेल, आपल्याला काही सुचवावे अशी माझी लायकीही नाही पण तरीही हा थोडासा उध्द्टपणा करतोय (त्यासाठीही आगावूच क्षमा मागतो): (1) माझा प्रतिसाद मूळ धागाकर्त्याच्या काही शंकांना माझ्या समजुती प्रमाणे उत्तर देणे हा होता. आपला चर्चा घडवून आणायचा उद्देश जरी स्त्युत्य असला तरि ह्या धाग्यावर तो करणे हे बरोबर नाही असे मला वाटते , त्यासाठी आपण दुसरा धागा काढावा असे नम्र पणे सुचवावेसे वाट्ते. मी अनेक चर्चा ग्रुप्स चा सभासद आहे , सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. संपादक मंडळाला कार्यबहुल्यामुळे कदाचित वेळ होत नसावा पण निदान आपल्या सारख्या विद्वान , सुसंस्कृत ,सर्वमान्य , वरिष्ठ सभासदांनी तरी स्वयंशिस्तीने हा नियम पाळावा असे मला मनापासून वाटते. (2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले! माझ्या अल्प माहीती प्रमाणे ,ज्योतिष या विषयातली अनेक ऋषीतुल्य व्यक्तीमत्वे सध्या हयात आहेत उदाहरणेंच द्यायची तर : पुण्यात श्री व.दा.भट , श्री जकातदार ,श्री मारटकर आहेत, मुंबईत श्री शरद उपाध्ये, श्री घोंडोपंत आपटे आहेत , ठाण्यात श्री सुनिल गोधळेकर आहेत, डोंबिवलीत श्री श्री श्र्री भट आहेत, नाशीक येथे श्री वाईकर आहेत, भोपाळ येथे श्री मदन त्रिवेदी , श्री हंसराज आहेत, रांची येथे श्री महापात्रा आहेत, बडोद्यात सौ कंकणा राठोड आहेत, नवी दिल्लीत श्री के एन राव ,सौ रिमा कोमार आहेत, इंदूर मध्ये श्री जयंत सोमण आहेत, चेन्नईत श्री के सुब्रमण्यम आहेत, हैद्रबादेत श्री पुन्नेश्वर राव ,श्री राजेंद्र निमजे (हे आय ए एस ऑफिसर आहेत) आहेत, प्रागज्योतिष्पुरात श्री संजय रथ आहेत, वाराणसी मध्ये श्री केवलराम आचार्य आहेत, अहमदबादेत श्री कनक बोस्मीया आहेत, मदुराईत श्री के भास्करन आहेत, अमेरिकेत श्री जेम्स ब्रहा , श्री रॉबर्ट स्वबोधा ,सौ लिझ ग्रीन , श्री पॉल व्होगन , श्री नोएल टील, सौ मार्था वेस्कॉट, सौ जेन हॅंपर, सौ ली लेहमन , श्री हार्त दी फऊ आहेत (जे सध्या भारतात नवी दिल्ली येथे आले आहेत) , लंडन मध्ये श्री जॉन फ्रावले आ, सौ कोमील्ला सूटन , सौ डोन्ना कनिंघॅम आहेत ,जर्मनी येथे श्री बाल्डुर रहेनोल्ड इबर्टीन आहेत, नेदर्लॅन्ड्स येथे सौ हमाकर झोंडॅग आहेत, द.कोरियात श्री टीन वीन आहेत ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे? पुन्हा एकदा मी आपण दिलेला चर्चेचा प्रस्ताव स्विकारु शकत नाही , माझी तेव्हढी क्षमता नाही काय करणार> तेव्हा या बद्दल क्षमस्व.

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 11:14
सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही.
इथे विषयाच्या मुळाशी जाउन प्रश्न विचारले गेले आहेत. अवांतर नव्हेत. जर त्याला उत्तर नसेल किंवा असे प्रश्न येउ नयेत असे वाटत असेल ज्योतिषविषयक एका क्लोजड ग्रुपची गरज आहे.. मिसळपावसारख्या खुल्या फोरमवर तशी अपेक्षा चुकिची आहे. बाकी तुमच्या यादितल्या ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे.. कुठल्याही फोरमवर!!

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 12:19
चांगला विचार आहे , मी यादी तर दिली आहे, या यादीतले सर्वच मान्यवर आहेत, प्रसिद्ध आहेत, बहुतेकांच्या स्वत:च्या वेबसाईटस, ब्लॉगज आहेत, काही फेसबुक वर आहेत, यादीतल्या 70% गुरुजनांनी ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ लिहले आहे, ते बाजारात उपलब्ध आहेत, त्या ग्रंथांत त्यांचे परिचय आहेत, संपर्कासाठीचे पत्ते आहेत. गुगल केलेततरीही बरीच माहीती त्यांच्याबद्दल मीळू शकेल .' ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे" हे मला सांगून काही उपयोग होणार नाही कारण मी थोडाच त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम बघतोय ! आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता, काय चर्चा करायची ती करु शकता, तुम्हाला कोणीही आडवलेले नाही. खरे ना ?

In reply to by सरळमार्गी

इथे कुणीही भाव चलित किंवा लग्न कुंडली दाखववून, जातकाचं भवितव्य विचारत नाहीये. तस्मात, तज्ञ असण्याचा प्रश्नच नाही. तज्ञाचा अर्थ भविष्याच्या वर्तांकनातली अचूकता आहे आणि ऋषीतुल्यांकडे जाण्यापूर्वी, ज्या कुंडलीवरुन ते भविष्यवाणी करणार, ती कुंडलीच एक निरर्थक आकृती आहे काय? असा प्रश्न आहे. ज्या विषयाचे आपण अभ्यासक आहात त्यात कुंडलीचा आणि भविष्याचा काय कार्य-कारण आहे, इतपत उत्तर तरी (चर्चेत भाग घेतल्यानं) आपल्याला माहिती असावं अशी अपेक्षा आहे. जर एखादा मुका, दुसर्‍या बहिर्‍याला गाणं ऐकवत असेल, तर दोघांनाही मैफिल चांगली चाललीये असंच वाटत राहील. मुळात मुका गाऊ शकतो का (पक्षी, कुंडली या डिझाईनला काही अर्थ आहे का) आणि बहिरा ऐकू शकतो का (पक्षी, त्या निरर्थक कागदावरनं कुणीही ऋषीतुल्य काही अंदाज बांधू शकेल का?) या प्रश्नाला उत्तर देता यायला हवं.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्ञानव Mon, 06/30/2014 - 10:20
जर मी बहिरा आहे तर मी मुक्याच्या गाण्याला का जावे? जावे तर जावे आणि तो मुकाच आहे म्हणून (मला तोंड दिले आहे म्हणून आणि ऐकू काही येतच नाही म्हणून) ओरडावे? ये हजम नाही हुआ दोस्त. (बाकी उदाहरण दोघांना हि लागू आहे म्हणजे (पक्षी : ज्योतिषाचे समर्थक आणि विरोधक)

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 13:37
यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पान इ वरुन "आपण वर्तवलेले भविष्य अचूक कसे आले" अशा कथा सोडुन मूलभूत प्रश्नाला उत्तर देण्याच्या एखाद्या प्रयत्नाची लिंक देउ शकाल का आपण??

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 14:14
त्यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पानावर त्यांनी काय लिहायचे हा त्यांचाच अधिकार आहे. त्यांनी काय लिहायचे काय नाही याची सक्ती तर करता येणार नाही. तसेच त्यांनी पूर्वी कोणाशी अशी चर्चा केली होती का, उत्तरे दिली होती का, त्याचा रिपोर्ट त्यांनी त्याच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक वर का नाही लिहला हे कशाला पाहीजे, तुम्हाला चर्चाच करायची आहे ना मग सरळ गाठा त्यांना , विचार तुमचे प्रश्न , करा चर्चा , घोडे कुठे आडलयं? ह्यातल्या बर्‍याच जणांचे निवासस्थानांचे, कार्यालयाचे पत्ते अगदि सहज उपलब्ध आहेत , तेव्हा त्यांना समक्ष भेटून चर्चा नाही का करता येणार ? त्यासाठी वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक हेच कशाला पाहिजे ? असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ? तुमच्या जागी मी असतो तर लिंका द्या, हे द्या ,ते द्या , हे नाही अन ते नाही अशा लंगड्या सबबी नक्कीच सांगत बसलो नसतो. सरळ पत्ते हुडकून काढले असते, समक्ष भेटलो असतो ,चर्चा केली असती , आहे काय आणि नाही काय , हे मला जे वाटले ,जे सहज सुचवले.ते लिहले ते सुद्धा 'लिंका' द्या अशी मागणी माझाकडे केलीत म्हणून बर का तेव्हा राग मानू नका.

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 14:31
असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ?
अहो आजच्या काळातील ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे माध्यम आहे ते. आजच्या काळात असे आक्षेप घेणे हे अज्ञान लपवण्यासाठीच घडु शकते..

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 16:13
हे मान्य , ते तसे नाही असे मी कधीच म्हणालेलो नाही. माझा आक्षेप इंटरनेट व त्या माध्यमातून होणार्‍या ज्ञान संपादनाला नाहीच आपण गैरसमज करुन घेतलेला आहे. पण त्याच बरोबर इंटरनेट आले म्हणजे ज्ञान सपादनाचे इतर् सर्व मार्ग ब्ंद करा असे तर नाही ना? त्या ज्योतिर्विदांनी आपल्याला हवी असलेली माहीती इंटरनेट माध्यमातूनच द्यावी , आपल्याशी चर्चा ही इंटरनेट माध्यमातूनच करावी हा आग्रह का? मी पड्द्या आडून शब्दप्रयोग केला त्यात काय चूक आहे कारण कोणी कसलीही आयडि घेऊन , काहीही इमेल अड्रेस वापरुन , स्वतःचा चेहेरा व ओळख लपवून काही करु शकतो ते इंटरनेट या च्या माध्यमातूनच / पड्द्या आडूनच शक्य होते ना? जेव्हा एखादी स्वच्छ हेतू असलेली, सभ्य व्यक्ती प्रत्यक्ष भेट्ते तेव्हा नाव गाव कदाचित खोटे सांगेल पण तिला निदान चेहेरा तरी लपवता येणार नाही. इंटरनेटच्या माध्यमा पेक्षा ह्या प्रत्यक्ष भेटीत जास्त खुलेपणा, पारदर्शी पणा असेल नाही का? चर्चे साठी मला धारे वर ध्ररुन काहीच साध्य होणार नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते . मी सुचवल्या प्रमाणे जर आपण या तज्ञांना , ग्रंथकारांना समक्ष भेटलात तर चांगली चर्चा होण्याची शक्यता आहे असे नाही का वाट्त आपल्याला? सगळ्यात मह्त्वाची गोष्ट 'कोण हे बाळ सप्रे ?" अस प्रश्न त्यांनाही पडू शकतो बर का, तेव्हा तुमची ही क्रेडेन्शीअल्स एकदा तपासून बघा म्हणजे झाले (फक्त ती मला सांगत बसू नका, त्याचा मला काही उपयोग नाही) . मी आधीच्या एका प्रतिसादात म्हणाल्या प्रमाणे 'सामना' बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यात व्हायला हवा, उगाच कोणीही उठावे माझ्याशी चर्चा करा म्हणावे इतकी ही तज्ञ मंडळी रिकामटेकडी, वाटेवर पडलेली नाहीत. मला वाट्ते आवश्यक तो सर्व खुलासा जो मला देणे शक्य होते तो दिला आहे , आता यावर आणखी काही चर्वण करणे म्हणजे एकतर 'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे ' असा अर्थ होइइल , सबब आणखी वितंडवाद नकोत हीच विनती.

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 16:37
अंनिस/ नारळीकर यासारख्या लोकांनी जाहीरपणे विचारल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देउ शकलेले लोक प्रत्यक्ष भेटल्यावर उत्तरे देउ शकतील हा तुमचा मुद्दा हास्यास्पद आहे.. तिथेही हे ऋषीतुल्य आम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही असा पवित्रा घेतात .. हे माहित नसल्यासारख करणे म्हणजे 'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे '..

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 11:24
बाकी तुमच्या यादितल्या धोंडोपंत आपटे यांनीदेखिल अवांतर म्हणत असल्या प्रश्नांपासुन पळ काढला आहे मिसळपाववर.. बाकी वेगळा धागा जरी काढला असेल कोणी तर चर्चेत कधी सहभागी होत नाहित ते..

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 12:28
कोणाला उत्तर द्यायचे कोणाला नाही, कोणाशी चर्चा करायची कोणाशी नाही हा धोडोंपंतांचा वैयक्तीक अधिकार आहे ,आणि तो त्यांनी वापरला असता त्यांच्यावर पळपूटेपणाचा आरोप करणे सभ्यतेचे लक्षण आहे असे मला वाटत नाही.

In reply to by सरळमार्गी

मी कुणी हिंदकेसरी मल्ल नाही आणि तुम्ही दिलेल्या दीर्घ प्रतिसादावरुन, तुम्हीही लुंगेसुंगे दिसत नाही; तस्मात चर्चा प्रस्ताव ठेवला होता. आपण चर्चेची असमर्थता दर्शवल्यानं, मी तो मागे घेतो. बिफोर आय क्लोज, आपण म्हटले आहे:
सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत.
माझा प्रतिसाद कुंडली या मुलभूत गोष्टीवरच होता, कारण ती सर्व ज्योतिषशास्त्राचा आत्मा आहे. तिच्याशिवाय ज्योतिषशास्त्राला भविष्याच्या वर्तांकनाची दिशा मिळणं असंभव आहे. थोडक्यात, ज्या होकायंत्रानं दिशा शोधायची ते गंडलेलं असेल तरी दिशा दाखवेलच, पण ती उत्तर दिशाच असेल याची खात्री नाही. एखादे वेळी आनमान धक्यानं दिशा बरोबर निघेलही पण मग ते शास्त्र नाही. तो फक्त अडल्यानडलेल्या तितक्याच अज्ञानी व्यक्तीनं दिलेला मानसिक दिलासा आहे. माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो. तद्वत ज्योतिषशास्त्रानं, मोबदला घेणारे ज्योतिषी श्रीमंत होतात. आणि जातकाच्या हाती केवळ, चातकासारखी पावसाची वाट पाहाणं उरतं.

In reply to by सरळमार्गी

धन्या Fri, 06/27/2014 - 14:38
(2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!
हे खासंच. :) तुमच्या ऋषीतुल्यांच्या यादीमधील श्री रॉबर्ट स्वबोधा आणि श्री हार्त दी फऊ या दोघांनी मिळून लिहिलेलं Light On Life: An Introduction to the Astrology of India हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकांतर्गतच खुप विरोधाभास होता. असो.

श्रीगुरुजी Fri, 06/27/2014 - 12:56
>>> माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो. दुर्दैवाने हे नमूद करावसं वाटतंय की "नामस्मरण" या विषयी आपले अत्यंत गैरसमज आहेत. तुमच्या वाक्यातील "काल्पनिक देव", "सुटकेसाठी केलेली याचना", "फक्त पुजारी गब्बर होतात", "भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं" इ. वाक्ये तुमचे नामस्मरणाविषयी मूलभूत अज्ञान अथवा गैरसमज अथवा पूर्वग्रह अथवा तिन्ही दर्शवितात. नामस्मरण ही कोणत्याही स्वरूपात केलेली याचना नसून, सुटकेसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी नामस्मरण केले जात नाही. त्याचप्रमाणे नामस्मरण करायला कोणताही पुजारी सांगत नाही किंवा तसा आदेश देत नाही. नामस्मरणामुळे भक्ताची कोणत्याही प्रसंगातून किंवा संकटातून सुटका होत नाही. तसे झाल्यास तो योगायोग असतो. त्याचा नामस्मरणाशी संबंध नसतो, कारण नामस्मरण हे संकटातून सुटण्यासाठी केले जात नाही आणि त्या हेतूने कोणी नामस्मरण केले तरी तशी सुटका होत नाही. "नामस्मरण" या विषयावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दात विवेचन केले आहे. ते आपण पूर्वग्रह व गैरसमज दूर ठेवून निव्वळ उत्सुकता या भावनेने वाचल्यास आपल्या काही शंका/कुशंका/समज/गैरसमज नक्कीच दूर होतील.

In reply to by श्रीगुरुजी

या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 06/28/2014 - 14:02
>>> नामस्मरणावर प्रदीर्घ चर्चा या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही. तुमची उत्तरे किती "समर्पक" असतात हे केजरीवालांशी संबंधित धाग्यांवर अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही वर संदर्भ दिलेल्या लिन्कवर जाण्याची गरजच नव्हती. आधीच अंदाज आला होता. परंतु तरीसुद्धा गंमत म्हणून तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला. तो प्रतिसाद म्हणजे कोणत्यातरी सभासदाने आधी दिलेल्या प्रतिसादाचा प्रतिवाद होता. तुमचा तो प्रतिवाद म्हणजे आधीच्या सभासदाने दिलेल्या एका प्रतिसादातील काही निवडक वाक्ये उचलून प्रत्येक वाक्याला प्रतिवाद म्हणून तुमचे एकच वाक्य होते. तुम्ही प्रतिवाद म्हणून दिलेली स्वत:ची वाक्ये अर्थातच अपेक्षेनुसार निरर्थक होती. अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या ५-६ वाक्यांना तुम्ही "सविस्तर व समर्पक उत्तरे" म्हणत आहात. धन्य आहे!

In reply to by श्रीगुरुजी

तिथे लिंक दिलेल्या प्रतिसादापासून पुढे चर्चा झाली आहे.
या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे
त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो:
तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला.
काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 06/30/2014 - 12:59
>>> त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो: मी ती संपूर्ण चर्चा वाचलेली आहे. त्यातील तुमचे विनोदी विचारधन व इतरांनी स्पष्टपणे त्यातील फोलपणा दाखवून दिलेले प्रतिसाद देखील वाचलेले आहे. तुम्ही माझ्या याआधीच्या प्रतिसादाला प्रत्युत्तर म्हणून त्याच चर्चेतील एक लिन्क पाठविलीत. त्या लिंकवर टिचकी मारल्यावर फक्त तुमचा एकट्याचाच एकच प्रतिसाद दिसतो. एखाद्या प्रतिसादाला "उत्तर द्या" या लिन्कवर टिचकी मारल्यावर त्या चर्चेतील फक्त तोच प्रतिसाद एका नवीन पानावर उघडतो. तुम्ही या नवीन पानाची लिन्क दिलेली आहे. मूळ धाग्याची लिन्क दिलेली नाही. आपला एकमेव प्रतिसाद म्हणजे चर्चेचे सार आहे, असा तुमचा गोड गैरसमज किंवा स्वतःबद्दल भ्रम असावा. असो. >>> काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट. आधी लिहिल्याप्रमाणे मी संपूर्ण धागा वाचला आहे व त्यातील तुमचे विनोदी प्रतिसाद देखील वाचले आहे. त्यात न समजण्यासारखं काहीच नाही. मला विनोद चांगलाच समजतो. तुमच्या प्रतिसादातील सर्व विनोद मला समजले. ज्याप्रमाणे तुमचे केजरीवाल व "आम आदमी पक्ष" यांविषयी गोड गैरसमज व भ्रम होते, तद्वत् तुमचे स्वतःविषयी गोड गैरसमज व भ्रम आहेत. ज्याप्रमाणे तुमचे भाजप व मोदींविषयी गैरसमज व पूर्वग्रह होते, तद्वत् तुमचे ज्योतिषशास्त्राविषयी व नामस्मरणाविषयी गैरसमज व पूर्वग्रह आहेत. तथापि निवडणुकपूर्व काळात व नंतर केजरीवालांच्या मर्कटलीलांमुळे तुमचे त्यांच्याविषयीचे गोड गैरसमज दूर होऊन भ्रम दूर झाला. तसेच निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजप व मोदींविषयीचे तुमचे गैरसमज व पूर्वग्रह दूर झाले. अगदी तसेच आताही होईल. काही काळातच तुमचे ज्योतिषशास्त्राविषयीचे व नामस्मरणाविषयीचे गैरसमज व पूर्वग्रह दूर होऊन तुमच्या मनातील अज्ञानरूपी काळोख दूर होऊन तुमच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडेल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सांगण्यापेक्षा, नामस्मरणावर तुमचा अनुभव, नव्या पोस्टमधे लिहा. माझं हे विधान आहे : देव हा भ्रम आहे आणि नामस्मरणानं तो गवसेल ही भ्रामक समजूत आहे. (एक कोटी रामनाम वगैरे!). नामस्मरणानं एखाद्याला देव वगैरे दिसायला लागला तर त्याचा भ्रम सघन झाला आहे याचा तो पुरावा ठरतो. थोडक्यात, नामस्मरणाची परिणिती व्यक्ती भ्रमिष्ट होण्यात होते. आता इथे उगीच केजरीवाल वगैरे बाष्कळ बडबड करण्याऐवजी नाम-महात्म्यावर स्वतंत्र लेख लिहा आणि मी माझं वरचं विधान तिथे सिद्ध करुन दाखवतो.

In reply to by श्रीगुरुजी

धन्या Fri, 06/27/2014 - 17:57
माझीही देव, नामस्मरण संदर्भातील मते बरीचशी संक्षींच्या मतांसारखीच आहेत. अर्थात ही माझी मते मागच्या दोन अडीच वर्षांत बनलेली आहेत. त्यामागे माझं या काळात मी केलेलं अफाट वाचन हे कारण आहे. मात्र अशी मते बनण्याआधी पंचवीस वर्षांहून अधिक काळ "त्याच्या ईच्छेशिवाय पानही हलत नाही" याच मताचा होतो. त्यामुळे मी कुठल्याही मतावर टीका करताना "उचलली बोटे आपटली कीबोर्डवर" असला प्रकार करत नाही. तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे ते पुस्तक माझ्याकडे आहे. हार्डबाऊंड बांधणी असलेलं, मुखपृष्ठावर महाराजांचं चित्र असलेलं हे पुस्तक पाहताक्षणी घ्यावसं वाटलं मला. मात्र अजून वाचलेलं नाही. आता जरुर वाचेन. मात्र या बाबतीतलं एक निरिक्षण असं आहे की जेव्हा देव, धर्म, नामस्मरणाच्या संदर्भात काही प्रश्न विचारला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अमक्या अध्यायात छान सांगितलंय, समर्थांनी दासबोधात अमक्या दशकाच्या अमक्या समासात हे समजावलं आहे अशीच उत्तरे मिळतात. सारांश असा की, नामस्मरण या विषयावरचे तुमचे स्वतःचे मत वाचायला आवडेल. :)

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 13:16
ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या.

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी Fri, 06/27/2014 - 13:18
>>> ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या. संपूर्ण सहमत

In reply to by मृत्युन्जय

शास्त्र ह्या शब्दाची तुमची व्याख्या तरी काय ? अवांतर : मी ऑफीसच्य डस्टबीन मधे कागदाचा बोळा अचुकपणे फेकु शकतो ५-६ फुटावरुन ! मग बोळाफेकशास्त्राविषयी काही पुस्तके लिहावीत असा मानस आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Fri, 06/27/2014 - 17:25
कोणतीही वस्तू कुठूनही फेकली तर ती सभोवतालच्या गोष्टी लक्षात घेता कुठे जाऊन पडेल हे शास्त्राने सांगता येतेच की. जरूर लिहा पुस्तक ह्या विषयावर. लोकांच्या उड्या पडतील (तुमच्यावर नव्हे, पुस्तकावर.)

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Sat, 06/28/2014 - 21:40
प्राचीन भारतीय साहित्यात ज्या 'शास्त्रां'चा उल्लेख मिळतो, त्यापैकी काही अशी: कल्पशास्त्र, व्याकरणशास्त्र,निरुक्त, ज्योतिषशास्त्र, छंदशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, कोक/कामशास्त्र, संगीतशास्त्र वगैरे... याखेरीज आणखीही असतील, त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. मलासे वाटते शालेय शिक्षणाच्या संदर्भात 'सायन्स' या शब्दाला समानार्थी म्हणून 'शास्त्र' या जुन्या संस्कृत शब्दाची योजना केली गेली, तिथेच गोची झाली, आधुनिक पाश्चात्त्य 'सायन्स' चे निकष या 'शास्त्रां' ना लावणे बरोबर नाही. अलिकडील एका धाग्यात वात पित्त कफ इ. चाचण्यांद्वारे 'सिद्ध' करता येते का वगैरे चर्चा झाली. याविषयी 'नाडिपरिक्षा' ही खरी चाचणी असते, तिथे रासायनिक चाचण्यांचे प्रयोजन नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय Sun, 06/29/2014 - 11:57
तुम्ही किती सुंदर आणि नेम धरुन कुंथता यावरही तुम्हाला पुस्तके लिहिता येतील. कशावर काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. मी स्वानुभावाधारित विधान केलेले आहे. बाकी आपली मर्जी.

चित्रगुप्त Sat, 06/28/2014 - 21:25
काही लोकांना भविष्यातील घटना आधी कळू शकतात, याचा मला स्वतःला बरेचदा अनुभव आलेला आहे, आणि लंबकाच्या सहाय्याने मी स्वतः देखील असा भविष्याचा वेध घेऊ शकलेलो आहे. या अनुभवाविषयी मागे एका धाग्यात लिहिले होते. बाकी काहीतरी सिद्ध करणे, अमूक एक शास्त्र आहे वा नाही, वगैरे चर्चांपेक्षा खरेच कुतुहल/कळकळ असेल, तर प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त श्रेयस्कर, आणि आज ना उद्या असे प्रसंग जीवनात घडून येणारच.

श्रीगुरुजी Sat, 06/28/2014 - 22:30
इथे काही मंडळींचा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही असं दिसतंय. एक प्रयोग करता येतील. या मंडळींनी मिपावर काही तज्ज्ञ ज्योतिषांना आपल्या पत्रिका द्याव्यात. त्या ज्योतिषांनी त्या पत्रिकांवरून भूतकाळातील काही घटना अचूक ओळखल्यास ज्योतिषात काहीतरी तथ्य आहे असे मानता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 01:28
ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो?

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 01:56
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि थोर कार्यकर्ते कै. नरेंद्र दाभोळकर आणि मिपाकर प्रकाश घाटपांडे यांनी एक संशोधन प्रबंध लिहिलाय ज्यात अतिशय साध्या सांख्यिकी निकषावर ज्योतिषाला तोलून पाहिले असता नाणेफेकीद्वारे रँडमलि ५०% भाकिते बरोबर येतात त्याहीपेक्षा कमी अ‍ॅक्युरसी असल्याचे आढळले आहे. ही पहा लिंक. http://www.currentscience.ac.in/Downloads/article_id_096_05_0641_0643_0.pdf फक्त ३ पानांचा हा प्रबंध आहे. यात नक्की काय चुकले आहे ते कळाले तर ज्योतिषाबद्दल अजून अभ्यास करणे सोपे होईल. पण जन्तेला ३ पानेही वाचण्यात वेळ घालवायची इच्छा नाही, शिवाय जे ज्योतिषावर टीका करतात त्यांच्यावर संपादक मंडळाचा अपमान करण्याचा अश्लाघ्य आरोप करण्यातच रस आहे. चोर ते चोर शिवाय किती ते शिरजोर!!! अतिशय खेदजनक वृत्ती आहे ही. (हे पर्सनली तुम्हांला उद्देशून नाही हेवेसांनल.)

In reply to by बॅटमॅन

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 12:21
पण तज्ञ , अभ्यासू ज्योतिर्विदाने केलेली भाकीतें नाणेफेकीच्या कौला पेक्षा जास्त तपशिलवार असतात याचा अनेकांना अनुभव आलाय, या सध्याच्या धाग्यावर सुद्धा काही सभासदांनी असे अनुभव आल्याचे लिहले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर , समजा एक २३ वर्षाचा युवक नुकतेच महाविद्यालयिन शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात आहे , या परिस्थितीत 'नाणेफेक ' केली तर उत्तर हो / नाही असेच असू शकते ना ? छापा का काटा , हेड ऑर टेल असेच असते ना तुमच्या नाण्यात ? आता तोच युवक एखाद्या तज्ञ , अभ्यासू (हे दोन्ही शब्द मी ठळक केले आहेत) ज्योतिर्विदा कडे हीच समस्या घेऊन जातो , तेव्हा त्याला 'हो' / नाही हे उत्तर तर मिळेलच त्याशिवाय
  • नोकरी कधी लागेल
  • कोणत्या प्रकाराची असेल
  • कोणत्या क्षेत्रातली असेल
  • नोकरी निमित्त सध्याचे राहण्याचे ठिकाण सोडून दूर जावे लागेल का
  • नोकरी सुखावह असेल का,
  • नोकरीत प्रगतिच्या संधी कितपत आहेत
  • नोकरीत वरिष्ठांशी संबंध कसे राहतील
  • ही मिळालेली नोकरी किती काळ टिकेल
  • नोकरी फार काळ टिकणारी नसेल तर त्याचे कारण काय असू शकेल..
  • नोकरी लाभदायक ठरेल का व्यवसाय
  • कोणत्या क्षेत्रातली नोकरी / व्यवसाय लाभदायक ठरु शकेल
  • नोकरी सांभाळून व्यवसाय करता येईल का
  • आई वडिल, भाऊ बहिण, पत्नी वा अन्य जवळच्या नात्यातल्या व्यक्तीच्या नावावर धंदा केल्यास तो लाभदायक ठरेल का
  • व्यवसायाचे योग असतील तर ते केव्हा
  • व्यवसाय स्वतंत्र करणे लाभदायक ठरेल का भागीदारीतला
  • भागीदारीतला व्यवसायच जर असेल तर भागीदार केव्हा मिळतील, ते कसे असतील
  • व्यवसाया साठी लागणारे कर्ज उपलब्ध होईल का
  • व्यवसाय करतान सरकार दरबार च्या काही अडचणीं येऊ शकतात का
  • नोकरी / व्यवसाया निमित्त परदेश गमनाचे योग आहेत का , असल्यास केव्हा
अशा अनेक अंगाने त्या तरुणास मार्गदर्शन मिळू शकते. आणि हे सर्व एका जन्मकुंड्ली वरून ( अथवा प्रश्नकुंडली) वरुन बघता येते (जीला इथे कचर्‍याचा टोपलीत फेकून दिले आहे! ) नाणेफेकीचा कौल ही इतकी माहीती देऊ शकेल? 'वडा पाव ' पण पोट भरण्याचे काम करतो म्हणून त्याची 'गुजराथी थाळी' / 'फाईव्ह कोर्स' डिनर शी तुलना करायची का?

In reply to by सरळमार्गी

धन्या Sun, 06/29/2014 - 15:45
नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात? तर मग इथे श्रीगुरुजींनी म्ह्टल्याप्रमाणे काही पत्रिकांची नोकरी संदर्भात चाचणी घेता येऊ शकते. घ्यायची का? :)

In reply to by धन्या

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 16:42
ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो? ?

In reply to by धन्या

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 16:55
>> नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात? >> हो! कै ज्योतिंद्र हसबे, कै सुरेश शहासने तसेच श्री सुनिल गोंधळेकर , श्री कनक बोस्नीया यांनी चालवलेले 'केपी झाईन' हे ई माग्याझीन (जे मोफत आहे ), श्री श्री नाथ यांचे अस्ट्रोव्हिजन हे ई माग्याझीन , श्री के. सुब्रमनीयम व श्री के हरिहरन यांनी लिहलेली सुमारे ३० च्यावर पुस्तके आणी ईतर अशी अनेक पुस्तकांमधून अशा प्रश्नांची लिलया उत्तरे दिलेल्या सोडवलेल्या शेकडो केसस्टडीज आहेत. त्या नुसत्या वरवर चाळल्या तरी कळेल. बाकी श्री राबर्ट स्वबोधांच्या पुस्तकात विसंगती आहेत असे विधान करण्या ईतपत अभ्यास / आवाका असलेल्या व्यक्तीने "नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात?" असा प्रश्न करावा याचे नवल वाटले ! 'कुछ तो गडबड है दया..."

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 03:19
तुमच्या बद्दल आणि थोर कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विषयी नितांत आदर व्यक्त करुनच हे लिहीतो आहे. माझा कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही आणि तसा अर्थ कोणीही कृपया काढू नये ही विनंती: आपण डॉ. दाभोळकर यांचा उल्लेख करतान यांच्या नावापुढे कै. लावले आहे ते अंधश्रद्धेचे प्रतिक नाही का? कै हे 'कैलासवासी' चे लघुरुप असावे अशी माझी तरी समजूत आहे, त्यात चूक असेल तर मी माझी पुढील सर्व विधाने मागे घ्यायला तयार आहे व बिनशर्त माफीही मागायला तयार आहे. मनुष्याच्या शरीरात म्हणे आत्मा असतो आणि मनुष्य मृत झाल्यावर तो आत्मा त्याच्या पार्थिव शरीरापासून अलग होतो आणि मग तो 'कैलास' किंवा 'वैकुंठ' वासी होतो ही आम्हा अंधश्रद्ध लोकांची तितकीच अंधश्रद्ध कविकल्पना! हे झाले हिंदू धर्मियांच्यात, बौद्ध / ख्रिश्चन / मुस्लीम धर्मियात सुद्धा काही वेळा ''बुद्धवासी' / 'ख्रिस्त वासी' / 'पैगबर वासी' असे लिहलेले पाहीले आहे ह्या सगळ्या अंधश्रद्धा नाहीत का? अहो कोणि बघितलाय तो आत्मा, आणी तसा तो असल्यास व्यक्ती मृत झाल्यावर त्या आत्म्याचे नक्की काय होते ? तो आत्मा कैलासाला गेलाय का वैकुंठाला का आणखी कोठे ते कसे ठरवणार, काय पुरावा आहे त्याचा ? मुळात असे कैलास, वैकुंठ वगैरे काही आहे का ? तुम्ही कै.. नामाभिधान वापरले आहेत म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या कडे असायला हवी नाही का? मग कधी सांगता आम्हाला? मी व्यक्तीशः डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मानतो, त्यांच्या विचाराचा आदर करतो, त्यांच्या नावा आधी कै. लावण्याला माझा जर सुद्धा आक्षेप नाही , कृपया गैरसमज करुन घेऊ नका. पण ज्यांची हयात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात गेली , ते काम करताना त्यांना हौतात्म्य आले त्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांना तुम्ही त्यांच्या मृत्यू नंतर आमच्या सारख्या अंधश्रद्धांच्या लायनीत उभे केलेले फारसे पटले नाही एव्हढच सांगणे आहे. मी एक सुचवू का ? जसे लष्करातल्या सेवानिवृत्त अघिकार्‍याच्या नावा नंतर कर्नल (रिटायर्ड) लिहतात तसे काही तरी नामाभिदान एखादि व्यक्ती जी 'आत्मा, कैलास, वैकुंठ ई. गोष्टी न मानणारी होती तिच्या बाबतीत वापरले पाहीजे, बघा पटते का . आणि दाभो़ळकर साहेब खरोखरिचे डॉक्टर होते तेव्हा त्यांचा उल्लेख करताना तो डॉ. नरेंद्र दाभोळकर असा व्हायला हवा , तो त्यांचा मान आहे (तुम्ही अनावधनाने विसरला आहात म्हणून ही एक नम्र विनंती, )

In reply to by सरळमार्गी

कैलासवासी असा शब्द न वापरता ... सावरकरांनी योजलेला संपूर्ण ऐहिक शब्द पुढे करतो.आपण दिवंगत म्हणतो..त्याप्रमाणे..अश्या व्यक्तिस मृत्युंगत , संबोधावे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 16:35
मृत्युंगत हा शब्द जरा उच्चारायला जड्शीळ आहे , बर्‍याच जणांना जोडाक्षरे चे , रुकारा चे उच्चार करण्याचे वांधे आहेत हे मी रोज बघतोय, खोटे वाट्त असेल लोकांना 'पुष्पगुच्छ' हा शब्द म्हणायला सांगा बघा कीती जण पहिल्याच प्रयत्नात न चुकता न अडखळता म्हणू शकतात ते ! पण मी काय म्हणतो, कैलासवासी म्हणायचे का नाही ? नसल्यास दुसरा पर्याय काय यावर एखादा स्प्येशल धागा का नाही काढत !

In reply to by सरळमार्गी

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 16:31
मुद्दा काय आणि तुम्ही बोलताय काय? मूळ पेपरबद्दल बोला. त्या पेपरमध्ये तुम्हांला चूक काय वाटतं इतकं सांगा. माझ्या प्रतिसादातलं एक वाक्य उचलून प्रतिसाद फुलवू नका. मूळ मुद्दा पेपरचा, तो सोडून मी दाभोळकरांना कै का म्हटले आणि डॉ का म्हटले नाही इ. चर्चा लक्ष वेधण्यासाठीच आहे कारण मुद्द्याचं बोलण्यासारखं तुमच्याकडे नाहीच. जे बोलायचं ते पेपरबद्दल बोला. कुणाला राजमान्य राजश्री का म्हटलं नाही आणि अमुक का म्हटलं वगैरे मुद्दे बालिश आहेत अन सर्वांत मुख्य म्ह. त्यामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. हे इतकं सोपं करूनही समजत नसेल तर इलाज नाही. आणि राहता राहिला तपशीलवार भाकिताचा मुद्दा.. ज्योतिष कितीही डीटेल्ड माहिती देण्याचा दावा करीत असूदे, काही भाकिते तरी हो/नाही या क्याटेगरीत बसतात. तिथे नाणेफेकीपेक्षा जास्ती वारंवारितेने भविष्य अचूकपणे वर्तवण्यात ते अक्षम ठरलेले आहे हे पेपरने सिद्ध केलेय. इतक्या बेसिक लेव्हलवर सुद्धा जर गंडत असेल तर बाकी फाफटपसारा काय कामाचा? 'काही भाकिते चुकतात' बद्दल सांगायचे तर, ९० आणि १० दोघेही १०० पेक्षा कमीच आहेत, पण म्हणून दोन्ही एक असा दावा असेल तर..हॅ हॅ हॅ, चालू द्या.

In reply to by अनुप ढेरे

चित्रगुप्त Sun, 06/29/2014 - 20:16
कुंडली भविष्य जास्तं अचूक असतं का नाडी भविष्य?
कुतुहलापोटी मी नाडी आणि कुंडली द्वारे भविष्य जाणून घेण्याचा उपद्व्याप केलेला आहे. नाडी मधे भविष्य असे काहीच सांगितले गेले नव्हते (माझ्या बाबतीत तरी) नुस्ते मोघम काहीतरी गोलमाल सांगितले होते, जे मला मुळीच पटले नाही. ओळखीच्या झालेल्या ज्योतिषांकडे मी बर्‍याच जणांना घेऊन गेलो, आणि बहुतेक प्रत्येकाने काही ना काही ठीक सांगितले. या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे.

In reply to by चित्रगुप्त

मूकवाचक Sun, 06/29/2014 - 20:34
"या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे." - पूर्णपणे सहमत. त्यामुळेच संख्याशास्त्रीय चाचण्यांचा निष्कर्ष निर्णायक मानणे मला तरी जमणार नाही. बाकी अस्तित्व जगड्व्याळ असणे किंवा 'अस्तित्वात' शक्यता या पातळीवर पराकोटीची अनिश्चितता असणे शक्य असणे वगैरे गोष्टी या संदर्भात 'वाईड बॉल' आहेत. असो.

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 20:40
म्हणजे गूढ अंतःप्रेरणा असेल तर 'या स्थानात अमुक योग असेल तर माणूस मरतो' छाप नियम आपोआपच रद्द झाले. मग तर १२ भागवाली कुंडली बनवणे अन ज्योतिष वर्तवणे या बाबतीतले ठोकताळे निरुपयोगीच नाहीत तर मुळातच निरर्थक आहेत. त्यामुळे गूढ अंतःप्रेरणा आणि कुंडली इ. वरून ज्योतिष वर्तवणे या दोहोंपैकी एकच गोष्ट खरी आहे असेच म्हटले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक Sun, 06/29/2014 - 20:45
दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. दोन्हीत तथ्यांश आहे. तशी प्रेरणा असलेल्या व्यक्तीला पत्रिकेचा गाईडलाईनसारखा उपयोग होऊ शकतो. मला वाटते या बाबतीतल्या शक्यता नेहेमी एक किंवा शून्य अशा बायनरी स्वरूपाच्या नसतात. हा निव्वळ गणिती प्रकार असता तर आजच्या संगणक युगात सगळे फलादेश संगणकात फीड करून सगळ्या ज्योतिष्यांना बेकार करता आले असते.

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 21:18
० किंवा १ हे बायनरी नसले म्हणून बरोबर येण्याच्या टक्केवारीला काही महत्त्व आहे की नाही? की १० मार्क आणि ९० मार्क पडलेल्या दोघांनाही १०० पेक्षा कमी म्हणून नापास करणार? बरोबर येण्याची टक्केवारी फक्त पत्रिकाधारे ज्योतिष पाहून काढली असता नाणेफेकीद्वारे येणार्‍या अचूकतेपेक्षा कमी आहे असे त्या पेपरमध्ये सिद्ध केलेले आहे. तुमचा विश्वास नसेल तर करा तसाच एक कंट्रोल्ड एक्स्पेरिमेंट आणि दाखवा रिझल्ट्स. किमान ५०% पेक्षा जास्त वेळेस तुम्ही म्हणता तसे रिझल्ट आले तर आत्ता या क्षणी तुमचं म्हणणं मान्य करतो. एका बाजूचा व्यवस्थित मांडलेला विदा मी सादर केलाय. तुम्हांला ती बाजू पटत नाही तर दुसर्‍या बाजूचा विदा नीट मांडा. इतकेही करण्याची तयारी जर नसेल तर मग आमची मुक्ताफळे बोचायचं काम नाही. निव्वळ गणिती आणि सांख्यिकीय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जर समजत नसेल तर इलाज नाही. गणिताआत २+२=४ होतात, तर सांख्यिकीत दोन 'जवळ-जवळ' किंवा 'लांब-लांब' वाटणार्‍या गोष्टी खरेच तशा आहेत किंवा नाही याचा निर्णय घ्यायचे शास्त्र आहे. काटेकोरपणा म्हणजे २+२=४ ही व्याख्या अज्ञानमूलक , शास्त्रद्वेष्टी आणि तितकीच हास्यास्पद आहे. तेव्हा निव्वळ 'मला आणि माझ्या ओळखीतल्या काही लोकांना असे अनुभव आलेत म्हणून पत्रिका बरोबर असते' याला आधार नाही. योग्य ती शिस्त पाळून साधारण ५०-१०० लोकांचा विदा जमवा आणि निष्कर्ष सांगा. या प्रयोगात लागेल तितकी सांख्यिकीय मदत मी स्वतः कराञला तयार आहे. ज्योतिषवाल्यांनी ज्योतिषाचा विदा द्यावा, त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन. तयारी असेल तर बोला, नपेक्षा मुक्ताफळे बोचतात इ.इ. टाहो बंद करा.

धन्या Wed, 06/25/2014 - 17:18
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
ज्योतिष हे शास्त्र नाही. बाकी चालू दया.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Fri, 06/27/2014 - 18:00
यू सी, द व्होल कंट्री ऑफ द सिस्टम इज जक्स्टापोजिशन्ड बाय द हीमोग्लोबीन इन द अ‍ॅट्मोस्फिअर बिकॉज यू आर अ सोफिस्टिकेटेड र्‍हिटोरिसिअन इन-टोक्सिकेटेड बाय द एक्झिब्युरन्स ऑफ युअर ओन व्हर्बोसिटी...

In reply to by धन्या

ज्योतिष हे शास्त्र नाही
>>> आमच्या भावना दुखावल्या :D निमिषराव तुम्ही घाबरु नका , आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,ही घ्या उत्तरे निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? >> ह्या प्रश्न्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काळी फॉस ६, ३० -------------- हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या Aethusea-------- Fool”s Parsley तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? उदा: नवमांश कुंडली कशी बघायची ? >> ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी हे घ्या Argentnum Nitricum ------ नावाचे एक औषध आहे, साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो. :D

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 19:26
आमच्या भावना दुखावल्या
फारच ब्वा नाजूक तुमच्या भावना. अगदी उठल्या बसल्या* दुखावतात. * हे नेमकं काय आहे सांगायची गरज नसावी. ;)

In reply to by धन्या

धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ... ओम फट स्वाहा a

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 19:38
थांबतुझ्यावर भानामतीच सोडतो ... हे घे ...
भानामती करणे हे वाईट कर्म आहे. त्याची चित्रगुप्ताच्या वहीत नोंद होऊन ते तुमच्या संचित कर्मात जमा होईल. अणि योग्य वेळ येताच या संचित कर्माचे क्रियमाण कर्मात रुपांतर होऊन त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतील. एक लक्षात ठेवा, कर्माचा सिद्धांत कुणालाच सोडत नसतो.

In reply to by धन्या

कर्माच्या सिध्दांताला .... सिध्दांत कर्मेला आम्ही काली फॉसीफोरम ६ ३० देतो ... शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन ... मग तो बाधत नाही =))

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 19:53
खर्‍या ज्योतिषाचा तोडग्यांवर विश्वास नसतो. त्याच्या दृष्टीने तोडगे हे थोतांड असते. एकदा ग्रहदशेचा फेरा आला की त्या व्यक्तीला तुमच्या शाबुदाण्याच्या पवित्र गोळ्यातुन दिलेले काली फॉसीफोरम ६ ३० ही वाचवू शकणार नाही. च्यायला जे तोडग्यांनी, अंगारे-धुपारे, गंडे-तावित वापरुन किंवा कसलीशी पोथी वाचून बदलता येतं ते प्राक्तन कसलं :D

In reply to by धन्या

सूड Wed, 06/25/2014 - 19:59
>>काली फॉसीफोरम ६ ३० ही कोणती पट्टी म्हणे गाण्याची? पाचेक महिन्यापूर्वी मी पांढरी सहावर सरगम आणि छोटे छोटे अलंकार वाजवत असे, आताशा सराव मोडलाय. ;)

In reply to by धन्या

अरे मुढ बालका तुझा अजुन लक्षात आलेले नाही काली फॉसीफोरम म्हणजे साक्षात आत्मतत्व ! त्याला कसली आलीये ग्रहदशा ? एकदा का ते घेतले की तुम्ही तद्रुपच होवुन जाता ...मग काय मज्जाच मजा ... नैन छिंदन्ति शस्त्राणि नैन दहति पावका: =))

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या Wed, 06/25/2014 - 20:14
क्षमा असावी महाराज. आमचे ज्ञान महाराष्ट्र शासनाच्या पाठयपुस्तक महामंडळाने छापलेल्या विज्ञानाच्या पुस्तकातील न्युटनच्या नियमांपुरतेच मर्यादीत आहे. नाही म्हणायला अभियांत्रिकीला असताना ओहमच्या नियमाचा अभ्यास केला होता. परंतू काम संगणकाच्या क्षेत्रात करत असल्यामुळे आता तोही विसरलो आहे.

In reply to by S.प्रशांत

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 09:50
ओहम आणि सोहम राहू द्या बाजूला. मला हल्ली "कोहम" हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर कुठल्या कुंडलीत पाहावे, लग्न कुंडली, भाव चलित कुंडली की नवमांश कुंडली?

In reply to by चित्रगुप्त

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 01:45
पाश्चिमात्य पद्ध्तीप्रमाणे दिलेल्या तारखा आणि राशी यावरुन फक्त सुर्यराशी(सन साइन)विचारात घ्याव्यात, असे वाटते.

In reply to by आयुर्हित

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 09:57
भारतीय वैदिक ज्योतिष हे भारतीय तिथींवरुन पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास समजली जाते. मात्र इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जे दैनिक/साप्ताहिक/मासिक वगैरे भविष्य येते ते त्यामधल्या राशी या व्यक्तीच्या इंग्रजी महिन्याच्या जन्मतारखेवरुन ठरतात. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिष आणि पश्चिमात्य ज्योतिष यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्‍या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by धन्या

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 10:45
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by धन्या

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 10:45
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा(चंद्रराशीचा)विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशि आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by धन्या

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 10:47
पश्चिमात्य ज्योतिषात जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय वैदिक ज्योतिषात ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय वैदिक ज्योतिषात सर्वंकश विचार होतो असे वाटते. फक्त जन्मराशीचा विचार करणे म्हणजे फक्त २१ घटक विचारात घेणे होय. व्रुत्तपत्रे कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा ज्योतिष कोणी आणि कोणता आधार मानून वर्तवले आहे हे महत्वाचे आहे. उदा: बेजान दारुवाला हे सुर्यराशी आधार मानुनच भविष्य वर्तवितात.

In reply to by आयुर्हित

बाळ सप्रे गुरुवार, 06/26/2014 - 12:13
एकंदरित वैदिक ज्योतिष ३० पट जास्त पॉवरफुल आहे (१०पट जास्त घटक गुणिले ३ प्रतिसाद) :-)

In reply to by बाळ सप्रे

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 14:32
हॅ हॅ हॅ .. साहेबांना माहित नाही अशी गोष्ट नाही बघा जगी.. 'शहाणे करून सोडावे जन' अगदी व्रत आहे हो यांचे.

In reply to by धन्या

Prajakta२१ गुरुवार, 06/26/2014 - 10:28
तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते ती रास त्या व्यक्तीची जन्म रास नव्हे तर लग्न रास असते आणि चंद्र ज्या राशीत असतो ती जन्म रास समजली जाते साडेसाती किंवा ग्रहदशा ह्या जन्मराशीवरून ठरतात भारतीय पद्धतीत लग्न रस आणि जन्म रास ह्या दोन्हींचे analysis करून भविष्य सांगतात

In reply to by Prajakta२१

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 12:49
धन्यवाद. बरेच दिवस वापरात नसल्यामुळे माझे तेलुगू भाषा आणि ज्योतिष या विषयाचे (शास्त्र नव्हे!) ज्ञान विस्मरणात गेले आहे.

कंजूस Wed, 06/25/2014 - 17:59
साध्या लग्नकुंडली वरून आणि सध्याची (गोचरि)ग्रहस्थितीवरून भविष्य सांगता आले पाहिजे .केवळ राजयोग आहे म्हणून काही प्रत्येकाच्या गळ्यात माळ घालायला हत्ती फिरत नसतात .इति वराहमिहिर .चांगली ग्रहस्थिती आल्यावर जातकाच्या परिस्थितीनुसार चांगल्या गोष्टी घडतात .याकरिता जातकाने महत्वाकांक्षा ठेवून पुढे प्रगती करण्याचे कष्ट सतत घ्यायला हवेत .दुसऱ्या पायरीवर असेल तर तो चौथ्यावर नेण्याचे काम ग्रह करतील .त्याने कष्ट करून नवव्या पायरीवर गेल्यास तो अकराव्यावर जाईल . बाकी लग्न कुंडलीला भावचलित आणि नवमांशाप्रमाणे करून दशमातल्या डोक्यावरच्या ग्रहाला अष्टमात सरकवणे म्हणजे चण्याच्या पुडीला चपाट करून त्याचे विमान बनवण्याचा अट्टाहास होय .

In reply to by सूड

धन्या Wed, 06/25/2014 - 19:47
काहीजण त्याला शास्त्र मानणार॥
शास्त्र मानणे हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. काहींच्या मते ज्योतिष हे शास्त्र आहे आणि काहींच्या मते नाही. इथे शास्त्र "मानण्याचा" प्रश्नच येत नाही.

कपिलमुनी Wed, 06/25/2014 - 20:34
डिस्क्लेमर टाकले असताना सुद्धा लोक इथे येउन गोंधळ घालतात.. नाही पटत तर धाग्याकडे दुर्लक्ष करावे. ज्याचा भाव त्याचा देव ! बाकीच्यानी दगड म्हणा किंवा इतर काही.. पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा

धन्या Wed, 06/25/2014 - 20:43
पण दुसर्‍यांच्या धागास्वातंत्र्याचा आदर करावा
तो आहेच. मात्र
ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही.
एकदा धागा टाकल्यावर चर्चा तर होणारच. या संस्थळाचे सदस्य म्हणून तो अधिकार प्रत्येकाला आहे. काही आक्षेपार्ह आढळल्यास संपादक मंडळ लिखाणास कात्री लावतेच की. जर विरोधी मते असणार्‍या लोकांनी मते मांडू नयेत अशी ईच्छा असेल तर "बंदिस्त समूह" असणारीही संकेतस्थळे आहेत. तिकडे आपले समूह बनवून "अहो रुपम अहो ध्वनी"चा घोष करावा.

मुळात कुंडली हा बेसच निराधार असेल, तर मग ती भावचलित असली काय की लग्न कुंडली, सर्वच भाकीते अंदाजपंचे दाहोदरसे ठरणार. जर धाग्यावर चर्चा अपेक्षित असेल, तर ज्यावर इमारत बांधायची तो पाया भक्कम हवा.

सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 08:38
'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते. खास ज्योतिषशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (गंभीर , शिस्तबद्ध ,सुनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मायबोली' नाही !), ज्या ठिकाणी फक्त ज्योतिषशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न या संस्थळावर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल. ही संस्थळे ईंग्रजी भाषेत आहेत पण आपल्याला ती अडचण भासणार नाही.

In reply to by सरळमार्गी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/26/2014 - 10:55
>>>>'मिसळ्पाव' हे संस्थळ ज्योतिषशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही असं कै नै हं. मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे, असे वाटते. बाकी, लिहिणा-यांची मर्जी. -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

इरसाल Fri, 06/27/2014 - 14:19
+२ पण मी संपादक नाही हं !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/26/2014 - 11:11
मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही
>>> ह्यावर अत्यंत विनम्रपणे आक्षेप नोंदवत आहे ... परवाच एका धाग्यावर झालेले एका प्रश्नाचे संपादन अत्यंत एकांगी होते असे वाटले (http://www.misalpav.com/comment/590391#comment-590391) टीका करण्याचा उद्देश नाहीये ... फक्त आपले विधान मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही हे पुर्ण सत्य नाही इतकेच नोंदवु इच्छितो ! -----------------------------------------------

प्लीज माझा आयडी डीलीट करु नका ...प्लीज प्लीज प्लीज

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरील काही सदस्यांना ज्योतिष विषयाचे वावडे आहे. इतकेच नाही तर अशी लोकं ज्योतिषावर कुठलाही धागा आले की अक्षरश: चेकाळतात. विरोधाला विरोध नाही, पण धागा पूर्णपणे हायज्याक केला जातो. इतका की तिथे कुठल्याही प्रकारची चर्चाच होणे शक्य नाही. हे म्हणजे साधारण रोडीजच्या ग्रुप डिस्कशन मध्ये लोकं (किंवा संसदेत खासदार) आरडओरडा करून इतरांना बोलूच देत नाहीत, त्याचे जालिय रूप वाटते.

पैसा गुरुवार, 06/26/2014 - 10:50
शिनेर सदस्य धाग्यावर अवांतर करताना आणि एक ज्येष्ठ संपादक धुमाकूळ घालताना बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. *blush*

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 12:56
सर लिहिण्याला आक्षेप नाहीच. आक्षेप आहे तो विरोधी मते असणार्‍यांनी आपली मते मांडूच नयेत या पवित्र्याला. कुणीही उठावं आणि केवळ काकतालिय न्यायाने खर्‍या ठरणार्‍या भाकितांना शास्त्र म्हणावे यालाही आमचा विरोध नाही. मात्र ते त्यांचे वैयक्तिक मत असावं. मिसळपावसारख्या मुक्त व्यासपीठावर अशी विधाने केल्यावर त्याला विरोध करुच नये हे म्हणणे पटत नाही. विशेष म्हणजे धागाकर्ते धागा टाकल्यांनतर इकडे फिरकलेच नाहीत. धाग्यावरील आक्षेपांना त्यांनी उत्तर देणे ही तर खुप दुरची गोष्ट झाली.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 06/26/2014 - 11:42
पूर्वी उधृत केलेले माझेच वाक्य पुन्हा लिहीतो "आपला तो संतुलित विचार आणि दुसर्‍याचा तो अतिरेक असतो". @ निमिष,मला जोतिषात काही गती नाही. काही काही ज्योतिषी अचूक भविष्य वर्तवताना पाहीले आहेत. सनातन प्रभातमधे छापून आलेले एका गोपालकृष्णन किंवा तत्सम ज्योतिषाचे अंदाज ९५ % ठरल्याचे या इलेक्शनला अनुभवले. त्याबद्दल कुतुहल मात्र वाटते.

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 12:06
स.मं.चा एक्स्लुझीव अधिकार आहे, तसाच धोरणाच्या मर्यादेत राहून चर्चा करण्याचा प्रत्येक सदस्याला अधिकार आहे. नाही तर एकमार्गी मतं रेटणार्‍या चर्चांचा उपयोग तो काय?
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे
तोच तर चर्चा विषय आहे. त्यांना पाया भक्कम आहे हे दाखवून देऊ द्या.
काही प्रश्नांंची उत्तर देता आली तर द्यावी नै तर आपण एकटेच वाचक आहोत असे समजून लिहित राहावे
मग डायरी आणि संकेतस्थळात फरक काय? योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ गुरुवार, 06/26/2014 - 12:54
>>> योग्य प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? हे असंच लिहायचंय का @@@ प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली नाहीत तर उगीच रेटून लिहीण्यात काय अर्थ आहे? @@@ असं लिहायचंय?

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 12:41
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. >>> उदा: एखादा ग्रह लग्न कुंडलीत बाराव्या ठिकाणी आहे पण भाव चलित मध्ये तो अकराव्या स्थानात आहे तर तो कोणत्या स्थानाचे फळ देईल ? १२ व्या स्थानाचे >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? अर्थातच राशी कुंडली >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? नक्की माहिती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ज्ञानव Mon, 06/30/2014 - 10:00
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. ग्रहांचे अंश हे ग्रहांचे स्थान ठरवतात जर चलित कुंडलीत ग्रह एक घर मागे पुढे होत असेल तर चलित कुंडलीत त्याचे जे घर आहे ते लक्षात घ्यावे लागते. पण नुसतेच चलित कि नवमाश, राशी चंद्र असे चालत नाही तर प्रश्नानुसार कुंडली बघतात असा अनुभव आहे. पण >>>बहुसंख्य ज्योतिषी राशी कुंडली बघूनच भविष्य सांगतात. हे हि तितकेच खरे. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? >>>>अर्थातच राशी कुंडली मुळात कुंडली एकच असते पण त्याची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे असल्याने ज्योतिषाने स्वकष्टार्जित तारतम्य वापरून फलादेश द्यायचा असतो पण सामन्यतः शिष्य, वाचन आणि गुरूने जेवढे सांगितले तेव्हढेच डोके चालवतात आणि गोंधळ होतो. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? >>>>नक्की माहिती नाही. पास. तुम्ही जर ज्योतिषाचा अभ्यास करत असाल तर मुळात तुमचा ज्योतिषी म्हणून त्या विषयाबाबत काय दृष्टीकोन आहे तेही मांडा म्हणजे उदा. "गुरु हा अर्थ कारणाचा कारक आहे" असे बरेच ज्योतिषी सांगतात ह्या वाक्याचा तुम्ही काय अर्थ लावता? किंवा एखादे तत्सम वाक्य तुम्ही उलगडून सांगा ज्याने माझ्या ज्ञानात ही भर पडेल.

सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 12:46
>>>> मिपाला कोणत्याच विषयाचं वावडं नाही. बिरुटे साहेब मिपा ला वावडे नसेल हो पण मिपाकरा^ना बर्‍याच विषयाची आलर्जी आहे त्याचे काय? >>> चर्चा करणा-या जाणकारांनी चर्चा करत राहावी. कितीही विरोध होत असला तरी आपल्या विषयाला प्रतिसादाला पुढे न्यायचं. कोण काय म्हणतं आणि का म्हणतं. आपण लिहित राहावे असे वाटते. का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?

In reply to by सरळमार्गी

संजय क्षीरसागर गुरुवार, 06/26/2014 - 14:17
परा या सदस्यानं म्हटलं होतं की संकेतस्थळावरचं लेखन हे खिडकीत बसण्यासारखं आहे, मग कुणी शुकशुक केलं तर तक्रार करण्यात अर्थ नाही. बाय द वे, लेखकानं किंवा कुणीही कुंडली, आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारण नि:संदिग्धपणे दाखवून द्यावा. कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे. आणि आय चॅलेंज यू, ओन धिस फोरम, तुम्ही कुंडली आणि भविष्यकालीन घटनांचं वर्तांकन यातला कार्यकारणभाव वैज्ञानिक सत्यतेच्या निकषांवर सिद्ध करु शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 14:31
कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन निकष आहेत. वैज्ञानिक निकषांवर जर तुम्ही कार्यकारण सिद्ध करु शकलात तर असल्या लेखनाला काही अर्थ आहे.
वैज्ञानिक सत्याची कसोटी इतक्या स्पष्ट आणि सोप्या शब्दांत मांडण्यासाठी धन्यवाद.

In reply to by धन्या

अर्धवटराव Mon, 06/30/2014 - 08:28
हे वैज्ञानीक कसोटीचं सत्य आहे. आणि त्यात एक अत्यंत (सर्वात?) महत्वाचा क्लॉज म्हणजे "इन गिव्हन कंडीशन्स". हा एक क्लॉज सत्याची कसोट्यांपासुन फारकत करतो. वैज्ञानीक सत्य असं कसोट्यांवर तोलण्याइतपत पंगू नाहि. असो.

म्हैस गुरुवार, 06/26/2014 - 13:14
का म्हणून? जर चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच होणार असेल तरी ही ? एखाद्याने माहीती मिळवण्यासाठी व अनावश्यक प्रतिसादां बद्द्ल डिस्क्लेमर टाकून धागा काढला तरीही त्याची काय गत होते ते दिसतेय, मी म्हणत असलेल्या संस्थळावर संपादक मंडळाचे कडक नियंत्रण असते त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जात नाहीत. तसे इथे का होऊ शकत नाही?
exactly . संपादकांच नियंत्रण नसल्यामुळे (किवा संपादक ) पक्षपात करतात ह्याचं चांगला उदाहरण माझ्याकडे आहे. आणि बर्याच लोकांना इथे कुठलीही गोष्ट समजून घेण्यात किवा चर्चा करण्यात रस नसून स्वताच्या अर्धवट , तोकड्या माहितीच्या आधारे किवा आपल्या अर्धवट अकलेच्या आधारे फक्त चेष्टा ,कुचेष्टा, टिंगल, ट्वाळीच करण्यात रस आहे.

सरळमार्गी गुरुवार, 06/26/2014 - 15:13
>>> निरायण भाव चलित कुंडली मधून काय बघायचे असते?? लग्न कुंडली वरून भाव फळ अचूक असते की भाव चलित कुंडली वरून ? भारतात प्रामुख्याने क्षेत्र कुंडली (लग्न कुंडली) प्रचलित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भावचलित कुंडली तयार करण्या साठी लागणारी भावसाधनाची कोष्टके सहजासहजी उपलब्ध नसणे, अशी कोष्टकें उपलब्ध नसल्यास बरीच आकडेमोड करावी लागते, ती करणे बर्‍याच जणांना जमत नाही. मात्र आज संगणकाच्या मदतीने ही गणिते सहज सोपी झाली आहेत. राशीचक्राचे १२ भाग पाडून त्यांना १,, १२ भावात बसवणे या साठी सुमारे ३० पेक्षा जास्त पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी ‘प्लॅसिड्स’ ही प्रणाली जास्त लोकप्रिय आहे, के.पी. मध्ये ‘प्लॅसिड्स’ प्रकाराने बनवलेली भावचलित कुंड्ली वापरतात. कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘प्लॅसिड्स’ पद्धत स्विकारली कारण त्यावेळेला फक्त याच ‘प्लॅसिड्स’ पद्धतीची भावसाधन कोष्ट्के बाजारात सहजासहजी उपलब्ध होती (अशी कोष्ट्कें उपलब्ध असणे हेच ‘प्लॅसिड्स’ च्या लोकप्रिततेचे कारण आहे). कृष्णमुर्तीना आणखी काही वर्षांचे आयुर्मान लाभले असते तर त्यांनी निश्चितच दुसरी एखादी भावसाधन प्रणाली अवलंबली असती ( बहुदा ‘कोश’ ही जर्मन ज्योतिर्विदांनी तयार केलेली प्रणाली ) किंवा त्यांनी स्वत:च एखादी नविन प्रणाली निर्माण केली असती. कोणती कुंडली वापरायची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे कोणती कुंडली वापरायची ते ज्या त्या ज्योतिर्विदाने स्वत:च्या अनुभवाच्या आधाराने ठरवावे. माझ्या मते भावचलित कुंडली वापरायची असेल तर महान गणिती ‘श्रीपती’ यांनी सुचवलेल्या पद्धतीने तयार केलेली भावचलित कुंडली वापरावी. ही वापरताना भावाच्या मध्या जवळचे ग्रह त्याच भावात व भावाच्या आरंभी वा शेवटी 5 अंशात असलेले ग्रह क्रमश: अलिकडच्या / पलिकडच्या भावात आहेत असे समजावे. हा नियम के.पी. मध्ये ही काही जण वापरतात. >>> लग्न कुंडली , राशी कुंडली आणि भाव चलित कुंडली यापैकी कोणती कुंडली प्रभावी असते? चंद्र एका राशीत साधारणपणे अडिच दिवस असतो, म्हणजेच एखाद्या संपूर्ण दिवसात तो एकाच राशीत असणार (चंद्र ज्या दिवशी राशी बदलेल तो दिवस अपवाद्) म्हणजेच त्या दिवशी जन्मलेल्या सर्व बालकांची राशी कुंडली एका सारखी असणार , कारण त्या दिवसभरात बाकीचे सर्व ग्रह ही एकाच राशीत व त्याच अंशात असणार.(दुसरा एखादा ग्रह नेमका त्याच दिवशी राशी बदलत असेल तर तो दिवस अपवाद्) मग अशा राशी कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. याउलट जन्मलग्न साधारण पणे दर दोन तासाने बदलते म्हणजेच प्रत्येक दिवसात 12 जन्मकुंडल्या शक्य असतात, दिवसभरासाठी ची एकच एक राशी कुडली पेक्षा ही प्रत्येक 2 तासाची एक वेगळी कुंडली हि परिस्थिती बरी आहे. पण तरीही त्या दोन तासाच्या कालावधीत जन्मलेल्या बालकांच्या कुंडल्या एकच राहणार पर्यायाने अशा कुंडली वरुन वर्तवलेले भविष्य ही एक सारखेच असणार, प्रत्यक्षात तसे आढळत नाही. त्याला उत्तर म्हणून कृष्णमुर्तीनी (के.पी. चे जनक) ‘सब’ ची कल्पना मांडून 360 अंशाच्या राशीचक्राचे 249 भाग केले , या ‘सब’ मुळे साधारण पणे दिड दोन मिनीटांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. एव्हढे करुन ही सुक्ष्मता येत नाही हे लक्षात आल्यावर श्री एस पी खुल्लर यांनी कृष्णमुर्तीनी सुचवलेल्या ‘सब’ चे पुन्हा 9 भाग केले , त्यामुळे साधारण पणे काही सेकंदांच्या फरकाने जन्माला येणार्‍या बालकांच्या पत्रिका वेगळ्या होतात. अर्थात श्री एस पी खुल्लर आणि कृष्णमुर्ती यांनी सुचवलेल्या या पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. >>> तसेच वरील ३ कुंडली सोबत इतर अनेक षोडशवर्ग कुंडल्या दिलेल्या असतात. त्या का व कशासाठी असतात? या ‘भाग कुंडल्या ‘ एक प्रकारचे ‘हारमोनिक' चार्ट्स आहेत. अशी प्रत्येक कुंडली जातकाच्या आयुष्याचा एखाद्या विषिष्ठ अंगाचाच विचार करण्यासाठी असते उदा: विवाह, संतान, आयुर्दाय , आरोग्य, धन, व्यवसाय, गतजन्म, पुढचा जन्म ई. या भाग कुंडल्या सखोल अभ्यास करण्याच्या हेतूने बनवलेल्या सुपर स्पेशॅलिटी ‘कुंडल्या आहेत. जसा फरक साधा जनरल डॉकटर आणि गायनॅकोलऑजीस्ट, ईएंटी सर्जन यांच्यात असतो तसाच फरक जन्मलग्न कुंडली व भाग कुंड्ल्यांत असतो. या कुंडल्या बनवताना राशीचे 2,3,4.9 , 12 , 16, 32 असे करत 60, 120 व त्याही पलीकडे जाऊन सुक्ष्म भाग केले जातात. नाडि भविष्य कथनात 1/60 व 1/120 पद्ध्तीच्या पत्रिका वापरल्या गेल्याचे आढळते. याही पद्धतींचा अवलंब करताना जातकाची जन्मवेळ ही तितकीच अचूक असायला हवी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. उदा: नवमांश पत्रिका वापरायची असेल तर जातकाच्या जन्मवेळेतील चूक 13 मीनीटंपेक्षा जास्त असता कामा नये , अन्यथा नवमांश बदलेल व पर्यायाने नवमांश कुंडली बदलेल. पण गंमत अशी की या मर्यादेचाच खुबिने उपयोग करुन घेऊन जातकची जन्मवेळ बरोबर आहे का ते ठरवता येते व चुक दुरुस्त करता येते. अर्थात हे कोणा येरा गबाळ्याचे (कुडमुड्या चे ) काम नाही हे ओघानेच आले. दोन व्यक्ती एक सारख्या नसतात, अगदि जुळ्या मुलांत सुद्धा फरक असतो, मग त्यांच्या जन्मकुंडल्याही वेगळ्याच असायला हव्यात ना? त्यासाठीच तर हे एव्हढे सुक्ष्म गणित करावे लागते. पण हे एव्हढे सगळे गणिती व्याप करणे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही.

In reply to by सरळमार्गी

आयुर्हित गुरुवार, 06/26/2014 - 16:18
मानले आपल्याला, खुप छान प्रतिसाद दिल्याबद्दल! आपल्याकडुन या विषयावर नवे लेखही येवू द्या, हि विनंति.

In reply to by सरळमार्गी

हाडक्या गुरुवार, 06/26/2014 - 16:25
उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे. प्रश्न उरतो की इतके सगळे सायास करून त्याचा उपयोग काय ? जन्माला आलेले मूल हिटलर, न्युटन, गांधी अथवा शिवराय होणार असे काही खात्रीलायकरित्या सांगता येणार असेल तर ठिक नाहीतर कामकरी ठोकळ्यांच्या मांदियाळीतले अजून एक आले आणि त्यावर या 'गणितज्ञानी' डोके फोड करून ते 'आयबीएम मध्ये काम करणार, नवी फोर्ड गाडी वयाच्या विसाव्या वर्षीच घेणार' वगैरे सूक्ष्म माहीती शोधण्यात त्यांचे ज्ञान व्यर्थ घालवावे हे काही पटत नाही.

In reply to by हाडक्या

धन्या गुरुवार, 06/26/2014 - 16:32
उत्तम प्रतिसाद.. ज्योतिषातील काहीही कळत नसले ( आणि इंटरेस्ट नसला ) तरी ही अभ्यासपूर्ण आणि समजायला तितकेच सोपे.
सहमत आहे. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही हा विषय बाजूला ठेवून या प्रतिसादाकडे पाहिले तर प्रतिसादकर्त्याने या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे हे जाणवते. असे अभ्यासू प्रतिसाद आले तर निकोप चर्चा व्हायला नक्कीच मदत होईल. विरोधी मत असणार्‍यांनी प्रतिसाद देऊ नये अशा मुजोरी भाषेने धाग्याची सुरुवात करुन मुख्य विषय एक दोन वाक्यांत गुंडाळणार्‍या धागाकर्त्याने या प्रतिसादकर्त्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. रच्याकने, ते धागाकर्ते आहेत कुठे? :)

आता आपण सविस्तर प्रतिसाद दिलायं, तेव्हा बाजू लावून धराल अशी अपेक्षा करतो. मी जर निरुत्तर झालो तर खुल्या दिलानं मान्य करीन, पण तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर ज्योतिषशास्त्र निरुपयोगी आहे हे मान्य करा. माझे हितचिंतक चर्चा भरकटवणार नाहीत आणि सर्वांसाठी ती विधायक होईल; त्याचा सगळ्यांना लाभ होईल, अशी आशा करतो. _____________________ अस्तित्वाची संरचना एखाद्या अमर्याद आणि व्यापक देहासारखी आहे. इथे प्रत्येक गोष्ट इतर प्रत्येक गोष्टीशी अनाकलनीय रितीनं जोडलेली आहे. Existence is an Organic Unity & it is a Terrific Mystery. सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे. आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे. या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे. कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही. इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्‍यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते! ______________________ तस्मात, जिथे अखिल अस्तित्वाच्या, अनेकानेक प्रक्रियाच एकमेकांशी जोडलेल्या आणि अनाकलनीय आहेत, तिथे यकःश्चित जातकाच्या व्यक्तिगत वर्तांकनाची कल्पनाच अज्ञानमूलक आहे. जर अस्तित्वाची Organic Unity ही वास्तविकता लक्षात आली तर व्यक्तिगत भविष्याचा वेध अशक्य आहे, हे सहज लक्षात येईल. कारण ज्या अस्तित्वाशी आपण एकसंध आहोत, खुद्द त्या अस्तित्वाचीच, सांप्रत स्थिती अनाकलनीय आहे... पुढच्या स्थितीची तर बातच सोडा!

In reply to by संजय क्षीरसागर

स्पा Fri, 06/27/2014 - 11:41
सूर्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, आपला निरंतर चालू असलेला श्वास अगणित वृक्षवल्लरींशी जोडलेला आहे, अरण्य पावसाशी आणि पृथ्वीशी जोडलेली आहेत; पाऊस अनेकानेक जलनीधींशी संलग्न आहे; त्या जलनीधींच्या अगम्य हालचालींचं चंद्राशी नातं आहे; चंद्र पृथ्वीशी एकसंध अंतर राखून आहे आणि वसुंधरा त्या चंद्रासमवेत असंख्य ग्रहमालिकांच्या अगम्य पसार्‍यातून, सूर्याशी समांतर आकर्षण ठेवत, अनंत काळ परिभ्रमण करते आहे. आणि या रहस्यांचं रहस्य असं की हे सगळं स्वयंप्रेरित आहे. या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्वच्छंद आहे. या गूढ रहस्यमयतेत प्रत्येक गोष्ट अस्तित्वातल्या इतर गोष्टीशी संलग्न असल्यानं, एका अकल्पनीय कॅलिडोस्कोपसारखी, अस्तित्वाची स्थिती हरक्षणी अगम्यपणे बदलते आहे. कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
सॉलिड प्रतिसाद , आवडेश

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या Fri, 06/27/2014 - 14:42
यनिमित्ताने देऊळ चित्रपटातील मचाणावरीलच्या दृश्यातील आण्णांचे वाक्य आठवले, "माणूस म्हणजे काळाच्या पटावरील ठीपका आहे ठीपका". नुकतेच मुंबईच्या नेहरु तारांगणला असणार्‍या शोमध्ये विश्वात पृथ्वीचे स्थान किती नगण्य आहे हे दाखवले जाते तेही आठवले. :)

In reply to by धन्या

मला एकच मुद्दा मांडायचा होता, तो म्हणजे आपण अस्तित्वाशी समरुप आहोत आणि जर त्या व्यापकतेचीच नियती अज्ञात आहे, तर `व्यक्तिगत नियती' असं काही असू शकत नाही. सरळमार्गीनं, माझ्या इतक्या निर्विवाद प्रतिवादानंतर (मुद्दा बेशर्त मान्य करण्याऐवजी), असा स्टँड घेतल्यानं -
श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!
- आय हॅड टू गीव अप. अर्थात, त्यांनी ज्योतिषास्त्रातल्या दिग्गजांची नांव लिहून पुढे म्हटलंय :
ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे?
मी त्यांना भारी पडीन यात काही कौतुक नाही कारण जे लिहीलंय ती वस्तुस्थिती आहे. प्रतिसाद देण्याचा मूळ हेतू असा होता की सदस्यांना वस्तुस्थिती विशद व्हावी. एकदा ती झाली की मग इथला कुणीही सदस्य त्या विषयातल्या कुणाही दिग्गजाला निरुत्तर करेल. आणि संकेतस्थळावरच्या चर्चा अशाप्रकारे एका निश्चित निष्कर्शाप्रत यायला हव्या, तरच त्यांचा उपयोग आहे. थोडक्यात, आपण स्वतःला अस्तित्वापासून कोणत्याही प्रकारे वेगळं करु शकत नाही, आणि अस्तित्वाला नियती नाही. तस्मात, व्यक्तिचं भविष्य हा अंदाजपंचे दाहोदरसेचा खेळ आहे. कुणीही अडलानडलेला छ जातक, तितक्याच अज्ञानी फ कडे जाऊन `अब मेरा क्या होगा काल्या?' विचारतो आणि एक निरर्थक कुंडलीनामक कागदी घोड्यावरुन, फ त्याला कल्पनेच्या दुनियेत घुमवतो. यापलिकडे ज्योतिषास्त्राला अर्थ नाही. बाय द वे,
आपला नसेल पाया भक्कम त्यांचा आहे त्यांना लिहु द्या ना भो
असा प्रतिसाद देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेणं आहे; हे निदान जवाबदार मंडळींना तरी लक्षात (एव्हाना) यायला हवं. कारण ज्योतिर्विदांना निरुत्तर करणं फारसं अवघड नाही. पण त्याही पुढे जाऊन, पूर्वीच्या ऋषींमुनींनी केलेला ज्योतिषाचा अभ्यास, त्यांचा नेमका अध्यात्मिक निष्कर्श आणि त्यातून जगण्यासाठी मिळणारी दिशा, या सर्व गोष्टींवर सखोल चिंतन झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे, अशा प्रकारे निराधार विषयांना प्रोत्साहन देणं, सदस्यांची दिशाभूल आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आदिजोशी Fri, 06/27/2014 - 17:18
या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कुणीही नाही. हे वाक्य इतक्या ठामपणे लिहिण्याइतका पुरावा सापडलेला नाही. म्हणून, या अगाध आणि अद्भुत अस्तित्वाचा कर्ता-करविता कोण आहे अथवा नाही हे माहिती नाही.

In reply to by आदिजोशी

द्यावा लागेल. `असा कुणीही नाही' म्हणणारे Null Hypothesis च्या अदर एंडला आहेत. अर्थात, तुम्ही नीट विचारपूर्वक पुढचा प्रतिसाद देऊ शकलात तर तुमच्या लक्षात येईल की, तुमच्याकडे अस्तित्वाचा कर्ता-करविता आहे याचा कोणताही पुरावा नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आयुर्हित Sat, 06/28/2014 - 14:03
कोणत्याही क्षणी सूर्य विझू शकतो, पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते, कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते. कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
संजय क्षीरसागरजी, उचलला कळफलक आणि लागले टंकायला? असे का करता आपण? फक्त अज्ञानी लोकच असे लिहु शकतात. सत्य असे आहे १)सुर्य विझेल हे खरे आहे पण त्याला अजुन करोडो वर्षे जीवन आहे. अभी तो मै जवान हु म्हणत आत्ताशी कोठे ४५६७००००००वर्षे(प्रुथ्वीवरील वर्ष)वय झाले आहे त्याचे, म्हणजे अजुन निम्मे आयुष्य बाकि आहे हो. २)पृथ्वी परिभ्रमण कक्षेच्या बाहेर अनंत अंतराळात फेकली जाऊ शकते हे खरे करायचे असेल तर आन्तेरस (जेष्ठ नक्षत्र/ तारा) किंवा त्याच्यावस्तुमानाएवढे क्रुष्णविवर आपल्या सुर्यमालिकेत युरेनस ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेच्या आत दाखल झाले पाहिजे, याचा अर्थ सध्या असलेल्या ५५० प्रकाशवर्षे अंतरावरुन प्रुथ्वीपासुन १८एयु अंतरावर यावे लागेल. 1 Astronomical Unit = 149,597,871 kilometers 1 light-year = 9,460,730,472,580,800 metres Redgiants ३)कोणताही ग्रह, केव्हाही स्वतःची भ्रमण कक्षा सोडून पृथ्वीवर आदळू शकतो आणि पृथ्वी नामशेष होऊ शकते हे खरे ठरायचे असेल तर गुरु ग्रह किंवा सुर्य आधि नष्ट झाला असेल तरच शक्य आहे. ४)कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही. हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.
इतक्या अनंत, अगम्य, अनाकलनीय वैश्विक पसार्यात, एखाद्या छ जातकाच्या जन्माला (किंवा मृत्यूला) छ्दाम सुद्धा किंमत नाही. त्याच्या जन्म वेळची विविक्षित ग्रहस्थिती, कितीही काटेकोरपणे प्रस्थाप्तित केली, तरी मुळात इतक्या अफाट अस्तित्वात, हरक्षणी बदलणारी, इतकी अगम्य परम्युटेशन्स आणि काँबिनेशन्स आहेत की एकतर त्यांचा उलगडा होणच असंभव. आणि दुसरं म्हणजे, सगळी प्रक्रियाच इतकी व्यापक आणि डायनॅमिक आहे की, एका निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी, तुम्ही विश्लेषण करायच्या आत, पुन्हा नवी स्थिती निर्माण होते!
हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने! तेव्हा पुढचे काही प्रश्न विचारण्यापुर्वी ज्योतिषशास्त्रावरची कमीत कमी विस पुस्तके नीट वाचून समजावून घ्यावेत हिच नम विनंति!

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक Sat, 06/28/2014 - 14:27
ज्योतिष्याविषयी थोडी जरी सहानुभूती दाखवली, तर त्या सदस्याला लूत भरलेल्या कुत्र्यागत हाडहाड करायचे अशी शपथ घेतली आहे का तुम्हा लोकांनी?

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 15:55
ज्योतिषाच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहिले तरी त्याचे समर्थन करणे आणि त्याच्या विरुद्ध एक शब्द काढला तरी ढोंगी विज्ञानवादी इ.इ. हाडहाड करायचे या फ्याशनचे तुम्ही समर्थक आहात काय? सध्या अच्छे दिन आल्यामुळे स्यूडोसायन्सही प्युअर सायन्स होते असे वाटत असेल तर असूदे बॉ.

In reply to by बॅटमॅन

आयुर्हित Sat, 06/28/2014 - 15:18
बॅटमॅनजी, आजकाल असेच भास व्ह्यायला लागलेत वाटते! क्रुपया तज्ञांना दाखवुन लवकरात लवकर उपचार करुन घ्यावेत हि नम्र विनंति.तज्ञ काय म्हणाले यावर नविन धागाही येवु द्या! नहितर माझ्या प्रतिसादात काय चुक आहे/डोक्यावर पडल्यागतच लिहिले आहे हे तरि कळू द्या सर्वांना!

In reply to by आयुर्हित

बॅटमॅन Sat, 06/28/2014 - 15:59
ज्योतिषाने काय सिद्ध केले आहे याबद्दलचे तुमचे गैरसमज तेच दर्शवतात ओ. पण तुम्ही नाराज कशाला होता? जगात मूर्ख बनवणार्‍यांची कायमच चलती असते. मी किंवा अन्य कुणी काही बोलल्याने ज्योतिषांची दुकाने बंद थोडीच होणारेत?

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक Sat, 06/28/2014 - 16:37
माझा प्रश्न ज्योतिष्य, सायन्स, स्युडोसायन्सविषयी नसून 'हाडहाड' करण्याविषयी होता. त्यातून संपादक मंडळाने ज्योतिष्य हा विषय मिपावर प्रतिबंधीत नाही असे स्पष्ट करूनही सातत्याने ज्योतिष्यविषयक लिहीणार्‍यांची मुस्कटदाबी करू पाहणे हा संपादक मंडळाचा अपमान आहे असा माझा तरी 'ग्रह' झालेला आहे. असो.

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 01:49
ज्योतिष विषयाबद्दल लिहिणे हे अलाउड आहे याचा अर्थ ज्योतिषावर टीका करणे ब्यान आहे हे आजच समजले. त्याला मुस्कटदाबी म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी आहे. इतकीशी टीकाही सहन करता येत नसेल तर उ पयोग काय त्याचा? बरे, इतकं लिहून कुठल्या प्रश्नाला धड उत्तर नाही ते नाही, वर आणि मुक्ताफळे ऐकून घ्या. कोण सांगितलंय? संपादक मंडळाने अपमान इ. स्वतः सांगितले तर ठीक, नपेक्षा तुमच्या प्रतिसादातून तुम्ही ज्योतिष नामक भाकडकथेचे समर्थक आहात असेच वाटू लागले आहे. पण काळजी नसावी, ज्योतिषांची दुकाने आमच्या क्षीण आवाजामुळे बंद होणार नाहीत. या विषयावर एकदा ऑफिशिअल पोझिशन क्लीअर करूनच टाका आता संमं. ज्योतिष हा विषय वर्ज्य नाही हे समजले, त्याच्यावरची टीका वर्ज्य आहे की नाही तेही एकदाचे कळूदेच. म्हणजे मग कळेल अशा धाग्यांवर छानच, मस्तच, माझ्याही दशमस्थानात अकिलीस अन त्रयोदशस्थानात दुर्योधन आहे इ.इ. कमेंटी लिहायला बरे!

In reply to by बॅटमॅन

मी काय म्हणतो, ज्योतिष ही वर्ज्य नको आणि त्याचा विरोधही. पण जे काही करायचे ते त्या त्या धाग्यावर करा ना. ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही यावर मिपावर खंडीभर धागे आहेत. पाहिजे तर अजुन एक काढावा, पण जिथे तशी चर्चा अपेक्षित नाही तिथे ती न करणे सहज शक्य व्हावे. समजा मला क्रिकेट खेळ बकवास आहे किंबहुना तो खरा खेळ नाहीच आहे आणि तो खेळणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असे वाटते. म्हणून मी आणि माझ्यासारख्या 10-12 लोकांनी क्रिकेटच्या प्रत्येक धाग्यावर जाऊन दंगा घालणे कितपत सभ्यपणाचे ठरेल ? Is it so hard to agree to disagree at least sometimes ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सुबोध खरे Sun, 06/29/2014 - 20:38
विमे एक फरक आहे. क्रिकेट बद्दल तुम्ही शिव्या घाला नाही तर ओव्या म्हणा माणसाच्या आयुष्यात फरक पडत नाही कारण माणसाची पुढची कोणतीही गोष्ट भारत जिंकला किंवा हरला (किंवा सामना "फिक्स" असेल तरीही) यावर अवलंबून नाही. परंतु एखादी उपचार पद्धती किंवा ज्योतिष यावर बर्याच माणसांचा पुढचा जीवनक्रम अवलंबून असण्याची "शक्यता" असते.आणि आपल्यापैकी कोणीही क्रिकेटचा सखोल अभ्यास केला आहे आणि त्यामुळे तुमचे जीवन समृद्ध होईल असा दावा केलेला नाही. यामुळे हि तुलना एका पातळीवरची नाही. एवढे असले तरीही ज्योतिषावर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येक माणसाने आपली तर तम बुद्धी वापरूनच ठरवायचे आहे.

In reply to by सुबोध खरे

मान्य आहे. मुद्दाम जरा अतार्किक उदाहरण दिले होते. दुसरे काही उदाहरण दिले असते तर वेगळा वाद निर्माण होउ शकला असता. (क्रिकेट मुळे नुकसान झालेले लोकं पाहण्यात आहेत, पण तो मुद्दा अल्लग आहे :-) ) आपल्याला न पटण्याऱ्या धाग्याचे काश्मीर करणे हा काही मार्ग नाही. याच धाग्यावरील पहिल्या अनेक प्रतिक्रिया बघा. आणि हा प्रकार आजचा नाही, खूप जुना आहे. नावे बदलतात, स्टाईल सेम :-) मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ? इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे. खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खरेतर यातील किती लोकांनी स्वत:चे लग्न ठरवताना बघितल्या असतील देव जाणे. कारण आजही लग्नाच्या बाजारात 95%+ लोकं पत्रिका बघतात. मग जालावरच हे पुरोगामित्व कुठून आले ?
मी अजूनही पत्नीची पत्रिका बघितली नाही. ज्याला व्यक्तीची पारख करता येते तो पत्रिकेसारख्या छदाम गोष्टीला विचारत नाही. माझ्या लग्नपत्रिकेवर देवाचा उल्लेख नाही. मी फक्त रविवार हा सगळ्यांना सोयीचा वार पाहून, अक्षरशः एकही विधी न करता, रजिस्टर्ड मॅरेज केलं आहे. आणि सगळं उत्तम चालू आहे.
मला एक सांगा, येथे समाजसुधारणेच्या उदात्त हेतूने कंठशोष करणार्या किती लोकांना तशी खरीच इच्छा असेल ?
अर्थात!
इथे प्रबोधन करता तसे बाहेरही करा म्हणावे. नातेवाईकांत कुणाच्या लग्नाचे बघत असतील तर पत्रिका बघण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करा म्हणावे.
इथे आणि तिथे यात फरक काय? अंतरजाल हा प्रबोधनाचा मिडिया आहे. तुम्ही इथे बाष्कळ चर्चा चाललीये असा गैरसमज करुन घेऊ नका.

In reply to by आयुर्हित

सूर्य विझणं, पृथ्वी परिभ्रमण कक्षेबाहेर फेकली जाणं, एखादा ग्रह पृथ्वीवर आदळणं यासरख्या घटना; दोन कारणांसाठी नमूद केल्या आहेत. एक, अस्तित्वाच्या व्यापकतेची कल्पना यावी आणि दोन, त्या मानवी नियंत्रणाच्या सर्वस्वी पलिकडे आहेत. थोडक्यात, कुंडलीसारख्या छ्दाम गोष्टीत त्या बसणं अशक्य आहे. तुम्ही थोडा जरी विचार करु शकलात तर इतक्या दूर जाण्याचीही गरज नाही. रक्ताभिसरण, पचन, अनेकविध संप्रेरकांचे स्त्रवण, उत्सर्जन, मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य यासारख्या देह जीवंत राहण्यासाठी असलेल्या अत्यंत बेसिक प्रक्रिया, जातकाच्या इच्छेपलिकडे आहेत. आता अशी कल्पना करा की एखादी बस जातकाला एका विविक्षित वेळी उडवणार आहे. तर त्या बसचालकाच्याही उपरनिर्दिष्ट शारीरिक घटना, बसच्या मेकॅनिझमचं फेल्युअर, ऐन वेळी सदर जातक (ऊडवला जाण्यासाठी) नेमक्या जागी असणं, या सर्व गोष्टी जातकाच्या आणि ज्योतिष्याच्या इच्छेपलिकडे आहेत. तस्मात, जातकाच्या जीवनात अमुक एक घटना विविक्षित वेळी घडेल हे ग्रह-तार्‍यांच्या भविष्यकालीन स्थितीवरुन, वर्तमानात विदित करणं हास्यास्पद आहे. आता पुढे -
१) कोणत्याही क्षणी, रहस्यमयपणे चाललेला, कुणाचाही श्वास बंद पडू शकतो. आणि कोणत्याही क्षणी, हृदयाचा पुढचा ठोका पडेलच, याची कुणीही हमी देऊ शकत नाही.
ही वस्तुस्थिती हरेक क्षणी आहे. यावर तुम्ही म्हटलंय `हे ही खरे ठरण्यासाठी त्याव्यक्तिचे आयुष्य संपले तर पाहीजे.' आयुष्य केव्हा संपेल हे सांगता येत नाही, हा मूळ मुद्दा आहे. जर पुढचा क्षणच अनिश्चित आहे तर भविष्यवाणीला अर्थ नाही. आणि तुम्ही म्हणतायं आयुष्य संपले तर पाहिजे! आयुष्य संपल्यावर काय करणार भविष्यवाणी? २) आपण अस्तित्वाशी समरुप आहोत. आपण काहीही केलं तरी त्यापासून वेगळे होऊ शकत नाही. हे अस्तित्व इतकं व्यापक, अगाध आणि रहस्यमय आहे की ते एखाद्या यकःश्चित जातकाच्या कुंडलीवरनं, पुढल्या क्षणी काय रुप घेईल हे ठरवणं म्हणजे अज्ञानाची परिसिमा आहे. शिवाय कुंडली ही अखिल अस्तित्वाशी तुलना करता एका नगण्य व्यक्तीच्या जन्मवेळेची, अत्यंत तोकडी आणि अंशमात्र पॅरामिटर्स असलेली भूतकालीन घटना आहे. आणि कुंडलीचा संदर्भ घेणं म्हणजे अस्तित्व हे सदरहू व्यक्तीच्या जन्मापासून सुरु झालं असं समजणं आहे. तस्मात, जातकाच्या जन्मापूर्वीचा अस्तित्वाचा अनंत कालावधी, सोयिस्करपणे विसरणं ही सुद्धा तितकीच मूढता आहे. त्यामुळे तुमचं हे विधान :
हेच तर शक्य करुन दाखविले आहे ज्योतिषशास्त्राने!
सर्वस्वी फोल आहे. शेवटी आपण मला ज्योतिषशस्त्रावरची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला आहे. त्यापेक्षा आपण ज्योतिषास्त्रावरची पुस्तकं वाचणं बंद केलंत तर वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित होईल.

कंजूस Fri, 06/27/2014 - 06:49
एकेक अंशापर्यँत जाऊन काय वेगळा शोध लावलेला नाही .त्यामुळे भावचलित अभ्यास निरर्थक वाटतो . आपल्याकडे चतुर्थ सुख स्थान संसारी(विशेषत: स्त्रिया) लोकांसाठी आणि व्ययस्थान साधूसंतांसाठी फार महत्त्वाचे आहे .इथे अंशात्मक चा काही उपयोग नाही .चांगले /वाईट होतेच . मुलगी सुखी होणार का हा प्रश्न सर्वाँना भेडसावत असतो .याचा निकाल लावायला एक लग्नकुंडली पुरेशी असते कशाला अंशात्मक खटाटोप करतात ? पुरुषांच्या बाबतीत हा किती कष्ट घेईल ,किती जणांचा पोशिंदा /आधार होईल हे महत्वाचे आहे .अंशात्मक भविष्य काढून सतरंजीवर बसेल का गादीवर याचा काही उपयोग नाही . जुळ्यांच्या कुंडलींचा अभ्यास हा शैक्षणिक उत्सुकतेपोटी केलेला प्रयत्न आहे .

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 10:01
माझा ज्योतिषशास्त्राचा थोडा म्हणजे अगदि प्राथमिक स्तरावरचा अभ्यास आहे, त्यादृष्टीने मी स्वत:ला अजून बिगरी ईयत्तेत आहे असेच समजतो, त्यामुळे आपण जे चर्चेचे विषय उपस्थित केले आहेत त्या विषयावर काही भाष्य करण्या इतकी माझी क्षमता नाही आणि लायकीही नाही. आपले काही लिखाण मी वाचले आहे त्यामुळे आपले चौफ्रर ज्ञान, व्यासंग किती दांडगा आहे याची मला कल्पना आहे त्यामुळे आपला हा चर्चेचा प्रस्ताव मला एकाद्या हिंदकेसरी पैलवानाने शड्डू ठोकून एखाद्या शाळकरी, शेंबड्या पोराला कुस्तीचे आमंत्रण दिल्यासारखे वाटले. आपल्याला अपेक्षित असलेली चर्चा करण्यास मी स्रर्वतोपरी असमर्थ आहे, क्षमस्व. थोडासा लहान तोंडी मोठा घास असे वाटेल, आपल्याला काही सुचवावे अशी माझी लायकीही नाही पण तरीही हा थोडासा उध्द्टपणा करतोय (त्यासाठीही आगावूच क्षमा मागतो): (1) माझा प्रतिसाद मूळ धागाकर्त्याच्या काही शंकांना माझ्या समजुती प्रमाणे उत्तर देणे हा होता. आपला चर्चा घडवून आणायचा उद्देश जरी स्त्युत्य असला तरि ह्या धाग्यावर तो करणे हे बरोबर नाही असे मला वाटते , त्यासाठी आपण दुसरा धागा काढावा असे नम्र पणे सुचवावेसे वाट्ते. मी अनेक चर्चा ग्रुप्स चा सभासद आहे , सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. संपादक मंडळाला कार्यबहुल्यामुळे कदाचित वेळ होत नसावा पण निदान आपल्या सारख्या विद्वान , सुसंस्कृत ,सर्वमान्य , वरिष्ठ सभासदांनी तरी स्वयंशिस्तीने हा नियम पाळावा असे मला मनापासून वाटते. (2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले! माझ्या अल्प माहीती प्रमाणे ,ज्योतिष या विषयातली अनेक ऋषीतुल्य व्यक्तीमत्वे सध्या हयात आहेत उदाहरणेंच द्यायची तर : पुण्यात श्री व.दा.भट , श्री जकातदार ,श्री मारटकर आहेत, मुंबईत श्री शरद उपाध्ये, श्री घोंडोपंत आपटे आहेत , ठाण्यात श्री सुनिल गोधळेकर आहेत, डोंबिवलीत श्री श्री श्र्री भट आहेत, नाशीक येथे श्री वाईकर आहेत, भोपाळ येथे श्री मदन त्रिवेदी , श्री हंसराज आहेत, रांची येथे श्री महापात्रा आहेत, बडोद्यात सौ कंकणा राठोड आहेत, नवी दिल्लीत श्री के एन राव ,सौ रिमा कोमार आहेत, इंदूर मध्ये श्री जयंत सोमण आहेत, चेन्नईत श्री के सुब्रमण्यम आहेत, हैद्रबादेत श्री पुन्नेश्वर राव ,श्री राजेंद्र निमजे (हे आय ए एस ऑफिसर आहेत) आहेत, प्रागज्योतिष्पुरात श्री संजय रथ आहेत, वाराणसी मध्ये श्री केवलराम आचार्य आहेत, अहमदबादेत श्री कनक बोस्मीया आहेत, मदुराईत श्री के भास्करन आहेत, अमेरिकेत श्री जेम्स ब्रहा , श्री रॉबर्ट स्वबोधा ,सौ लिझ ग्रीन , श्री पॉल व्होगन , श्री नोएल टील, सौ मार्था वेस्कॉट, सौ जेन हॅंपर, सौ ली लेहमन , श्री हार्त दी फऊ आहेत (जे सध्या भारतात नवी दिल्ली येथे आले आहेत) , लंडन मध्ये श्री जॉन फ्रावले आ, सौ कोमील्ला सूटन , सौ डोन्ना कनिंघॅम आहेत ,जर्मनी येथे श्री बाल्डुर रहेनोल्ड इबर्टीन आहेत, नेदर्लॅन्ड्स येथे सौ हमाकर झोंडॅग आहेत, द.कोरियात श्री टीन वीन आहेत ही मंड्ळी कदाचित आपल्या तोलामोलाची असावित असे मला वाट्ते (कदाचित शब्द यासाठीच वापरला की आपण या लोकांनाही भारी पडणार यात शंकाच नाही पण सामना अगदिच एकतर्फी होणार नाही असे वाटते) त्यांच्याशी चर्चा करण्यात समाधान आहे का एखाद्या नवख्या विद्यार्थ्याला चर्चेला बोलावून नामोहरम करण्यात आहे? पुन्हा एकदा मी आपण दिलेला चर्चेचा प्रस्ताव स्विकारु शकत नाही , माझी तेव्हढी क्षमता नाही काय करणार> तेव्हा या बद्दल क्षमस्व.

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 11:14
सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत. मिपा वर दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही.
इथे विषयाच्या मुळाशी जाउन प्रश्न विचारले गेले आहेत. अवांतर नव्हेत. जर त्याला उत्तर नसेल किंवा असे प्रश्न येउ नयेत असे वाटत असेल ज्योतिषविषयक एका क्लोजड ग्रुपची गरज आहे.. मिसळपावसारख्या खुल्या फोरमवर तशी अपेक्षा चुकिची आहे. बाकी तुमच्या यादितल्या ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे.. कुठल्याही फोरमवर!!

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 12:19
चांगला विचार आहे , मी यादी तर दिली आहे, या यादीतले सर्वच मान्यवर आहेत, प्रसिद्ध आहेत, बहुतेकांच्या स्वत:च्या वेबसाईटस, ब्लॉगज आहेत, काही फेसबुक वर आहेत, यादीतल्या 70% गुरुजनांनी ज्योतिषशास्त्रावर ग्रंथ लिहले आहे, ते बाजारात उपलब्ध आहेत, त्या ग्रंथांत त्यांचे परिचय आहेत, संपर्कासाठीचे पत्ते आहेत. गुगल केलेततरीही बरीच माहीती त्यांच्याबद्दल मीळू शकेल .' ऋषीतुल्यंपैकी कोणाकडुनही, वरील किंवा ज्योतिषविषयक इतर मूलभूत प्रश्नांवर समाधानकारक उत्तर ऐकण्यास आतुर आहे" हे मला सांगून काही उपयोग होणार नाही कारण मी थोडाच त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम बघतोय ! आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता, काय चर्चा करायची ती करु शकता, तुम्हाला कोणीही आडवलेले नाही. खरे ना ?

In reply to by सरळमार्गी

इथे कुणीही भाव चलित किंवा लग्न कुंडली दाखववून, जातकाचं भवितव्य विचारत नाहीये. तस्मात, तज्ञ असण्याचा प्रश्नच नाही. तज्ञाचा अर्थ भविष्याच्या वर्तांकनातली अचूकता आहे आणि ऋषीतुल्यांकडे जाण्यापूर्वी, ज्या कुंडलीवरुन ते भविष्यवाणी करणार, ती कुंडलीच एक निरर्थक आकृती आहे काय? असा प्रश्न आहे. ज्या विषयाचे आपण अभ्यासक आहात त्यात कुंडलीचा आणि भविष्याचा काय कार्य-कारण आहे, इतपत उत्तर तरी (चर्चेत भाग घेतल्यानं) आपल्याला माहिती असावं अशी अपेक्षा आहे. जर एखादा मुका, दुसर्‍या बहिर्‍याला गाणं ऐकवत असेल, तर दोघांनाही मैफिल चांगली चाललीये असंच वाटत राहील. मुळात मुका गाऊ शकतो का (पक्षी, कुंडली या डिझाईनला काही अर्थ आहे का) आणि बहिरा ऐकू शकतो का (पक्षी, त्या निरर्थक कागदावरनं कुणीही ऋषीतुल्य काही अंदाज बांधू शकेल का?) या प्रश्नाला उत्तर देता यायला हवं.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्ञानव Mon, 06/30/2014 - 10:20
जर मी बहिरा आहे तर मी मुक्याच्या गाण्याला का जावे? जावे तर जावे आणि तो मुकाच आहे म्हणून (मला तोंड दिले आहे म्हणून आणि ऐकू काही येतच नाही म्हणून) ओरडावे? ये हजम नाही हुआ दोस्त. (बाकी उदाहरण दोघांना हि लागू आहे म्हणजे (पक्षी : ज्योतिषाचे समर्थक आणि विरोधक)

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 13:37
यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पान इ वरुन "आपण वर्तवलेले भविष्य अचूक कसे आले" अशा कथा सोडुन मूलभूत प्रश्नाला उत्तर देण्याच्या एखाद्या प्रयत्नाची लिंक देउ शकाल का आपण??

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 14:14
त्यांच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक पानावर त्यांनी काय लिहायचे हा त्यांचाच अधिकार आहे. त्यांनी काय लिहायचे काय नाही याची सक्ती तर करता येणार नाही. तसेच त्यांनी पूर्वी कोणाशी अशी चर्चा केली होती का, उत्तरे दिली होती का, त्याचा रिपोर्ट त्यांनी त्याच्या वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक वर का नाही लिहला हे कशाला पाहीजे, तुम्हाला चर्चाच करायची आहे ना मग सरळ गाठा त्यांना , विचार तुमचे प्रश्न , करा चर्चा , घोडे कुठे आडलयं? ह्यातल्या बर्‍याच जणांचे निवासस्थानांचे, कार्यालयाचे पत्ते अगदि सहज उपलब्ध आहेत , तेव्हा त्यांना समक्ष भेटून चर्चा नाही का करता येणार ? त्यासाठी वेबसाईटस, ब्लॉगज , फेसबुक हेच कशाला पाहिजे ? असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ? तुमच्या जागी मी असतो तर लिंका द्या, हे द्या ,ते द्या , हे नाही अन ते नाही अशा लंगड्या सबबी नक्कीच सांगत बसलो नसतो. सरळ पत्ते हुडकून काढले असते, समक्ष भेटलो असतो ,चर्चा केली असती , आहे काय आणि नाही काय , हे मला जे वाटले ,जे सहज सुचवले.ते लिहले ते सुद्धा 'लिंका' द्या अशी मागणी माझाकडे केलीत म्हणून बर का तेव्हा राग मानू नका.

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 14:31
असे इंटरनेट्च्या माध्यमातून , पड्द्या आडून आडून का ब्ररे ?
अहो आजच्या काळातील ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे माध्यम आहे ते. आजच्या काळात असे आक्षेप घेणे हे अज्ञान लपवण्यासाठीच घडु शकते..

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 16:13
हे मान्य , ते तसे नाही असे मी कधीच म्हणालेलो नाही. माझा आक्षेप इंटरनेट व त्या माध्यमातून होणार्‍या ज्ञान संपादनाला नाहीच आपण गैरसमज करुन घेतलेला आहे. पण त्याच बरोबर इंटरनेट आले म्हणजे ज्ञान सपादनाचे इतर् सर्व मार्ग ब्ंद करा असे तर नाही ना? त्या ज्योतिर्विदांनी आपल्याला हवी असलेली माहीती इंटरनेट माध्यमातूनच द्यावी , आपल्याशी चर्चा ही इंटरनेट माध्यमातूनच करावी हा आग्रह का? मी पड्द्या आडून शब्दप्रयोग केला त्यात काय चूक आहे कारण कोणी कसलीही आयडि घेऊन , काहीही इमेल अड्रेस वापरुन , स्वतःचा चेहेरा व ओळख लपवून काही करु शकतो ते इंटरनेट या च्या माध्यमातूनच / पड्द्या आडूनच शक्य होते ना? जेव्हा एखादी स्वच्छ हेतू असलेली, सभ्य व्यक्ती प्रत्यक्ष भेट्ते तेव्हा नाव गाव कदाचित खोटे सांगेल पण तिला निदान चेहेरा तरी लपवता येणार नाही. इंटरनेटच्या माध्यमा पेक्षा ह्या प्रत्यक्ष भेटीत जास्त खुलेपणा, पारदर्शी पणा असेल नाही का? चर्चे साठी मला धारे वर ध्ररुन काहीच साध्य होणार नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते . मी सुचवल्या प्रमाणे जर आपण या तज्ञांना , ग्रंथकारांना समक्ष भेटलात तर चांगली चर्चा होण्याची शक्यता आहे असे नाही का वाट्त आपल्याला? सगळ्यात मह्त्वाची गोष्ट 'कोण हे बाळ सप्रे ?" अस प्रश्न त्यांनाही पडू शकतो बर का, तेव्हा तुमची ही क्रेडेन्शीअल्स एकदा तपासून बघा म्हणजे झाले (फक्त ती मला सांगत बसू नका, त्याचा मला काही उपयोग नाही) . मी आधीच्या एका प्रतिसादात म्हणाल्या प्रमाणे 'सामना' बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यात व्हायला हवा, उगाच कोणीही उठावे माझ्याशी चर्चा करा म्हणावे इतकी ही तज्ञ मंडळी रिकामटेकडी, वाटेवर पडलेली नाहीत. मला वाट्ते आवश्यक तो सर्व खुलासा जो मला देणे शक्य होते तो दिला आहे , आता यावर आणखी काही चर्वण करणे म्हणजे एकतर 'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे ' असा अर्थ होइइल , सबब आणखी वितंडवाद नकोत हीच विनती.

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 16:37
अंनिस/ नारळीकर यासारख्या लोकांनी जाहीरपणे विचारल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देउ शकलेले लोक प्रत्यक्ष भेटल्यावर उत्तरे देउ शकतील हा तुमचा मुद्दा हास्यास्पद आहे.. तिथेही हे ऋषीतुल्य आम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही असा पवित्रा घेतात .. हे माहित नसल्यासारख करणे म्हणजे 'वेड पांघरुन पेड्गाव ला जाणे '..

In reply to by सरळमार्गी

बाळ सप्रे Fri, 06/27/2014 - 11:24
बाकी तुमच्या यादितल्या धोंडोपंत आपटे यांनीदेखिल अवांतर म्हणत असल्या प्रश्नांपासुन पळ काढला आहे मिसळपाववर.. बाकी वेगळा धागा जरी काढला असेल कोणी तर चर्चेत कधी सहभागी होत नाहित ते..

In reply to by बाळ सप्रे

सरळमार्गी Fri, 06/27/2014 - 12:28
कोणाला उत्तर द्यायचे कोणाला नाही, कोणाशी चर्चा करायची कोणाशी नाही हा धोडोंपंतांचा वैयक्तीक अधिकार आहे ,आणि तो त्यांनी वापरला असता त्यांच्यावर पळपूटेपणाचा आरोप करणे सभ्यतेचे लक्षण आहे असे मला वाटत नाही.

In reply to by सरळमार्गी

मी कुणी हिंदकेसरी मल्ल नाही आणि तुम्ही दिलेल्या दीर्घ प्रतिसादावरुन, तुम्हीही लुंगेसुंगे दिसत नाही; तस्मात चर्चा प्रस्ताव ठेवला होता. आपण चर्चेची असमर्थता दर्शवल्यानं, मी तो मागे घेतो. बिफोर आय क्लोज, आपण म्हटले आहे:
सर्वत्र एक नियम कसोशीनी पाळला जातो तो म्हणजे मूळ धाग्याच्या विषयाला व उद्देशाला धरुनच पुढले सर्व प्रतिसाद असावेत.
माझा प्रतिसाद कुंडली या मुलभूत गोष्टीवरच होता, कारण ती सर्व ज्योतिषशास्त्राचा आत्मा आहे. तिच्याशिवाय ज्योतिषशास्त्राला भविष्याच्या वर्तांकनाची दिशा मिळणं असंभव आहे. थोडक्यात, ज्या होकायंत्रानं दिशा शोधायची ते गंडलेलं असेल तरी दिशा दाखवेलच, पण ती उत्तर दिशाच असेल याची खात्री नाही. एखादे वेळी आनमान धक्यानं दिशा बरोबर निघेलही पण मग ते शास्त्र नाही. तो फक्त अडल्यानडलेल्या तितक्याच अज्ञानी व्यक्तीनं दिलेला मानसिक दिलासा आहे. माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो. तद्वत ज्योतिषशास्त्रानं, मोबदला घेणारे ज्योतिषी श्रीमंत होतात. आणि जातकाच्या हाती केवळ, चातकासारखी पावसाची वाट पाहाणं उरतं.

In reply to by सरळमार्गी

धन्या Fri, 06/27/2014 - 14:38
(2) आपला ज्योतिषशास्त्रा वर चर्चा करण्याचा उद्देश चांगला आहे हे मान्य ,पण म्हणून काय दिसेल त्या कोणाही लुंग्यासुग्याला (म्हणजे मी) चर्चेचे प्रस्ताव देत फिरणार का ? ज्याच्याशी चर्चा करायची तो निदान आपल्या बरोबरीचा तरी आहे ह्याची खात्री तरी नको का करुन घ्यायला , श्री आद्य शंकराचार्यांनी सुद्धा वादविवादा साठी तितक्याच तोलामोलाचे श्री मंडणमिश्र बघितले हो, एखाद्या चारघरी भिक्षुकी करुन पोटाची खळगी भरणार्‍या बाळंभटाशी नाही चर्चा करत बसले!
हे खासंच. :) तुमच्या ऋषीतुल्यांच्या यादीमधील श्री रॉबर्ट स्वबोधा आणि श्री हार्त दी फऊ या दोघांनी मिळून लिहिलेलं Light On Life: An Introduction to the Astrology of India हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकांतर्गतच खुप विरोधाभास होता. असो.

श्रीगुरुजी Fri, 06/27/2014 - 12:56
>>> माझ्या इथल्या हितचिंतकांचा रोष पत्करुन, नम्रपणे नमूद करतो की, नामस्मरण ही जशी काल्पनिक देवाची सुटकेसाठी केलेली याचना आहे. त्यानं फक्त पुजारी गब्बर होतात आणि भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं निव्वळ योगायोग असतो. दुर्दैवाने हे नमूद करावसं वाटतंय की "नामस्मरण" या विषयी आपले अत्यंत गैरसमज आहेत. तुमच्या वाक्यातील "काल्पनिक देव", "सुटकेसाठी केलेली याचना", "फक्त पुजारी गब्बर होतात", "भक्तांचं प्रसंगातून सुटका होणं" इ. वाक्ये तुमचे नामस्मरणाविषयी मूलभूत अज्ञान अथवा गैरसमज अथवा पूर्वग्रह अथवा तिन्ही दर्शवितात. नामस्मरण ही कोणत्याही स्वरूपात केलेली याचना नसून, सुटकेसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी नामस्मरण केले जात नाही. त्याचप्रमाणे नामस्मरण करायला कोणताही पुजारी सांगत नाही किंवा तसा आदेश देत नाही. नामस्मरणामुळे भक्ताची कोणत्याही प्रसंगातून किंवा संकटातून सुटका होत नाही. तसे झाल्यास तो योगायोग असतो. त्याचा नामस्मरणाशी संबंध नसतो, कारण नामस्मरण हे संकटातून सुटण्यासाठी केले जात नाही आणि त्या हेतूने कोणी नामस्मरण केले तरी तशी सुटका होत नाही. "नामस्मरण" या विषयावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दात विवेचन केले आहे. ते आपण पूर्वग्रह व गैरसमज दूर ठेवून निव्वळ उत्सुकता या भावनेने वाचल्यास आपल्या काही शंका/कुशंका/समज/गैरसमज नक्कीच दूर होतील.

In reply to by श्रीगुरुजी

या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Sat, 06/28/2014 - 14:02
>>> नामस्मरणावर प्रदीर्घ चर्चा या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे. आणि त्यावर समर्पक उत्तरं दिली आहेत. मी इथे आवांतर करु इच्छित नाही. तुमची उत्तरे किती "समर्पक" असतात हे केजरीवालांशी संबंधित धाग्यांवर अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही वर संदर्भ दिलेल्या लिन्कवर जाण्याची गरजच नव्हती. आधीच अंदाज आला होता. परंतु तरीसुद्धा गंमत म्हणून तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला. तो प्रतिसाद म्हणजे कोणत्यातरी सभासदाने आधी दिलेल्या प्रतिसादाचा प्रतिवाद होता. तुमचा तो प्रतिवाद म्हणजे आधीच्या सभासदाने दिलेल्या एका प्रतिसादातील काही निवडक वाक्ये उचलून प्रत्येक वाक्याला प्रतिवाद म्हणून तुमचे एकच वाक्य होते. तुम्ही प्रतिवाद म्हणून दिलेली स्वत:ची वाक्ये अर्थातच अपेक्षेनुसार निरर्थक होती. अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या ५-६ वाक्यांना तुम्ही "सविस्तर व समर्पक उत्तरे" म्हणत आहात. धन्य आहे!

In reply to by श्रीगुरुजी

तिथे लिंक दिलेल्या प्रतिसादापासून पुढे चर्चा झाली आहे.
या प्रतिसादापासून, त्या पोस्टवर झालेली आहे
त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो:
तुम्ही दिलेल्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर संपूर्ण धागा न दिसता केवळ तुमचा स्वतःचा एकच प्रतिसाद दिसला.
काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 06/30/2014 - 12:59
>>> त्यामुळे तुम्ही चर्चा वाचलीच नाही, हे तुमचा खालील प्रतिसाद दर्शवतो: मी ती संपूर्ण चर्चा वाचलेली आहे. त्यातील तुमचे विनोदी विचारधन व इतरांनी स्पष्टपणे त्यातील फोलपणा दाखवून दिलेले प्रतिसाद देखील वाचलेले आहे. तुम्ही माझ्या याआधीच्या प्रतिसादाला प्रत्युत्तर म्हणून त्याच चर्चेतील एक लिन्क पाठविलीत. त्या लिंकवर टिचकी मारल्यावर फक्त तुमचा एकट्याचाच एकच प्रतिसाद दिसतो. एखाद्या प्रतिसादाला "उत्तर द्या" या लिन्कवर टिचकी मारल्यावर त्या चर्चेतील फक्त तोच प्रतिसाद एका नवीन पानावर उघडतो. तुम्ही या नवीन पानाची लिन्क दिलेली आहे. मूळ धाग्याची लिन्क दिलेली नाही. आपला एकमेव प्रतिसाद म्हणजे चर्चेचे सार आहे, असा तुमचा गोड गैरसमज किंवा स्वतःबद्दल भ्रम असावा. असो. >>> काही न वाचता सुद्धा, आपण जी स्वैर विचार उधळण केली आहे त्याची कल्पना असल्याने, आपल्याला कितपत समजू शकेल याची शंका होतीच. तस्मात, आपण नामस्मरण करत राहाणे इष्ट. आधी लिहिल्याप्रमाणे मी संपूर्ण धागा वाचला आहे व त्यातील तुमचे विनोदी प्रतिसाद देखील वाचले आहे. त्यात न समजण्यासारखं काहीच नाही. मला विनोद चांगलाच समजतो. तुमच्या प्रतिसादातील सर्व विनोद मला समजले. ज्याप्रमाणे तुमचे केजरीवाल व "आम आदमी पक्ष" यांविषयी गोड गैरसमज व भ्रम होते, तद्वत् तुमचे स्वतःविषयी गोड गैरसमज व भ्रम आहेत. ज्याप्रमाणे तुमचे भाजप व मोदींविषयी गैरसमज व पूर्वग्रह होते, तद्वत् तुमचे ज्योतिषशास्त्राविषयी व नामस्मरणाविषयी गैरसमज व पूर्वग्रह आहेत. तथापि निवडणुकपूर्व काळात व नंतर केजरीवालांच्या मर्कटलीलांमुळे तुमचे त्यांच्याविषयीचे गोड गैरसमज दूर होऊन भ्रम दूर झाला. तसेच निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजप व मोदींविषयीचे तुमचे गैरसमज व पूर्वग्रह दूर झाले. अगदी तसेच आताही होईल. काही काळातच तुमचे ज्योतिषशास्त्राविषयीचे व नामस्मरणाविषयीचे गैरसमज व पूर्वग्रह दूर होऊन तुमच्या मनातील अज्ञानरूपी काळोख दूर होऊन तुमच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडेल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सांगण्यापेक्षा, नामस्मरणावर तुमचा अनुभव, नव्या पोस्टमधे लिहा. माझं हे विधान आहे : देव हा भ्रम आहे आणि नामस्मरणानं तो गवसेल ही भ्रामक समजूत आहे. (एक कोटी रामनाम वगैरे!). नामस्मरणानं एखाद्याला देव वगैरे दिसायला लागला तर त्याचा भ्रम सघन झाला आहे याचा तो पुरावा ठरतो. थोडक्यात, नामस्मरणाची परिणिती व्यक्ती भ्रमिष्ट होण्यात होते. आता इथे उगीच केजरीवाल वगैरे बाष्कळ बडबड करण्याऐवजी नाम-महात्म्यावर स्वतंत्र लेख लिहा आणि मी माझं वरचं विधान तिथे सिद्ध करुन दाखवतो.

In reply to by श्रीगुरुजी

धन्या Fri, 06/27/2014 - 17:57
माझीही देव, नामस्मरण संदर्भातील मते बरीचशी संक्षींच्या मतांसारखीच आहेत. अर्थात ही माझी मते मागच्या दोन अडीच वर्षांत बनलेली आहेत. त्यामागे माझं या काळात मी केलेलं अफाट वाचन हे कारण आहे. मात्र अशी मते बनण्याआधी पंचवीस वर्षांहून अधिक काळ "त्याच्या ईच्छेशिवाय पानही हलत नाही" याच मताचा होतो. त्यामुळे मी कुठल्याही मतावर टीका करताना "उचलली बोटे आपटली कीबोर्डवर" असला प्रकार करत नाही. तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे ते पुस्तक माझ्याकडे आहे. हार्डबाऊंड बांधणी असलेलं, मुखपृष्ठावर महाराजांचं चित्र असलेलं हे पुस्तक पाहताक्षणी घ्यावसं वाटलं मला. मात्र अजून वाचलेलं नाही. आता जरुर वाचेन. मात्र या बाबतीतलं एक निरिक्षण असं आहे की जेव्हा देव, धर्म, नामस्मरणाच्या संदर्भात काही प्रश्न विचारला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अमक्या अध्यायात छान सांगितलंय, समर्थांनी दासबोधात अमक्या दशकाच्या अमक्या समासात हे समजावलं आहे अशीच उत्तरे मिळतात. सारांश असा की, नामस्मरण या विषयावरचे तुमचे स्वतःचे मत वाचायला आवडेल. :)

मृत्युन्जय Fri, 06/27/2014 - 13:16
ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या.

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी Fri, 06/27/2014 - 13:18
>>> ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारणा अचूक भविष्य वर्तवणारे ज्योतिषी पाहिलेले आहेत. पण ज्योतिष्याच्या नावाने थोतांड पसरवणारेच जास्त, बाकी चालु द्या. संपूर्ण सहमत

In reply to by मृत्युन्जय

शास्त्र ह्या शब्दाची तुमची व्याख्या तरी काय ? अवांतर : मी ऑफीसच्य डस्टबीन मधे कागदाचा बोळा अचुकपणे फेकु शकतो ५-६ फुटावरुन ! मग बोळाफेकशास्त्राविषयी काही पुस्तके लिहावीत असा मानस आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

आदिजोशी Fri, 06/27/2014 - 17:25
कोणतीही वस्तू कुठूनही फेकली तर ती सभोवतालच्या गोष्टी लक्षात घेता कुठे जाऊन पडेल हे शास्त्राने सांगता येतेच की. जरूर लिहा पुस्तक ह्या विषयावर. लोकांच्या उड्या पडतील (तुमच्यावर नव्हे, पुस्तकावर.)

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त Sat, 06/28/2014 - 21:40
प्राचीन भारतीय साहित्यात ज्या 'शास्त्रां'चा उल्लेख मिळतो, त्यापैकी काही अशी: कल्पशास्त्र, व्याकरणशास्त्र,निरुक्त, ज्योतिषशास्त्र, छंदशास्त्र, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, कोक/कामशास्त्र, संगीतशास्त्र वगैरे... याखेरीज आणखीही असतील, त्यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. मलासे वाटते शालेय शिक्षणाच्या संदर्भात 'सायन्स' या शब्दाला समानार्थी म्हणून 'शास्त्र' या जुन्या संस्कृत शब्दाची योजना केली गेली, तिथेच गोची झाली, आधुनिक पाश्चात्त्य 'सायन्स' चे निकष या 'शास्त्रां' ना लावणे बरोबर नाही. अलिकडील एका धाग्यात वात पित्त कफ इ. चाचण्यांद्वारे 'सिद्ध' करता येते का वगैरे चर्चा झाली. याविषयी 'नाडिपरिक्षा' ही खरी चाचणी असते, तिथे रासायनिक चाचण्यांचे प्रयोजन नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

मृत्युन्जय Sun, 06/29/2014 - 11:57
तुम्ही किती सुंदर आणि नेम धरुन कुंथता यावरही तुम्हाला पुस्तके लिहिता येतील. कशावर काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. मी स्वानुभावाधारित विधान केलेले आहे. बाकी आपली मर्जी.

चित्रगुप्त Sat, 06/28/2014 - 21:25
काही लोकांना भविष्यातील घटना आधी कळू शकतात, याचा मला स्वतःला बरेचदा अनुभव आलेला आहे, आणि लंबकाच्या सहाय्याने मी स्वतः देखील असा भविष्याचा वेध घेऊ शकलेलो आहे. या अनुभवाविषयी मागे एका धाग्यात लिहिले होते. बाकी काहीतरी सिद्ध करणे, अमूक एक शास्त्र आहे वा नाही, वगैरे चर्चांपेक्षा खरेच कुतुहल/कळकळ असेल, तर प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त श्रेयस्कर, आणि आज ना उद्या असे प्रसंग जीवनात घडून येणारच.

श्रीगुरुजी Sat, 06/28/2014 - 22:30
इथे काही मंडळींचा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही असं दिसतंय. एक प्रयोग करता येतील. या मंडळींनी मिपावर काही तज्ज्ञ ज्योतिषांना आपल्या पत्रिका द्याव्यात. त्या ज्योतिषांनी त्या पत्रिकांवरून भूतकाळातील काही घटना अचूक ओळखल्यास ज्योतिषात काहीतरी तथ्य आहे असे मानता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 01:28
ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो?

In reply to by श्रीगुरुजी

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 01:56
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि थोर कार्यकर्ते कै. नरेंद्र दाभोळकर आणि मिपाकर प्रकाश घाटपांडे यांनी एक संशोधन प्रबंध लिहिलाय ज्यात अतिशय साध्या सांख्यिकी निकषावर ज्योतिषाला तोलून पाहिले असता नाणेफेकीद्वारे रँडमलि ५०% भाकिते बरोबर येतात त्याहीपेक्षा कमी अ‍ॅक्युरसी असल्याचे आढळले आहे. ही पहा लिंक. http://www.currentscience.ac.in/Downloads/article_id_096_05_0641_0643_0.pdf फक्त ३ पानांचा हा प्रबंध आहे. यात नक्की काय चुकले आहे ते कळाले तर ज्योतिषाबद्दल अजून अभ्यास करणे सोपे होईल. पण जन्तेला ३ पानेही वाचण्यात वेळ घालवायची इच्छा नाही, शिवाय जे ज्योतिषावर टीका करतात त्यांच्यावर संपादक मंडळाचा अपमान करण्याचा अश्लाघ्य आरोप करण्यातच रस आहे. चोर ते चोर शिवाय किती ते शिरजोर!!! अतिशय खेदजनक वृत्ती आहे ही. (हे पर्सनली तुम्हांला उद्देशून नाही हेवेसांनल.)

In reply to by बॅटमॅन

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 12:21
पण तज्ञ , अभ्यासू ज्योतिर्विदाने केलेली भाकीतें नाणेफेकीच्या कौला पेक्षा जास्त तपशिलवार असतात याचा अनेकांना अनुभव आलाय, या सध्याच्या धाग्यावर सुद्धा काही सभासदांनी असे अनुभव आल्याचे लिहले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर , समजा एक २३ वर्षाचा युवक नुकतेच महाविद्यालयिन शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात आहे , या परिस्थितीत 'नाणेफेक ' केली तर उत्तर हो / नाही असेच असू शकते ना ? छापा का काटा , हेड ऑर टेल असेच असते ना तुमच्या नाण्यात ? आता तोच युवक एखाद्या तज्ञ , अभ्यासू (हे दोन्ही शब्द मी ठळक केले आहेत) ज्योतिर्विदा कडे हीच समस्या घेऊन जातो , तेव्हा त्याला 'हो' / नाही हे उत्तर तर मिळेलच त्याशिवाय
  • नोकरी कधी लागेल
  • कोणत्या प्रकाराची असेल
  • कोणत्या क्षेत्रातली असेल
  • नोकरी निमित्त सध्याचे राहण्याचे ठिकाण सोडून दूर जावे लागेल का
  • नोकरी सुखावह असेल का,
  • नोकरीत प्रगतिच्या संधी कितपत आहेत
  • नोकरीत वरिष्ठांशी संबंध कसे राहतील
  • ही मिळालेली नोकरी किती काळ टिकेल
  • नोकरी फार काळ टिकणारी नसेल तर त्याचे कारण काय असू शकेल..
  • नोकरी लाभदायक ठरेल का व्यवसाय
  • कोणत्या क्षेत्रातली नोकरी / व्यवसाय लाभदायक ठरु शकेल
  • नोकरी सांभाळून व्यवसाय करता येईल का
  • आई वडिल, भाऊ बहिण, पत्नी वा अन्य जवळच्या नात्यातल्या व्यक्तीच्या नावावर धंदा केल्यास तो लाभदायक ठरेल का
  • व्यवसायाचे योग असतील तर ते केव्हा
  • व्यवसाय स्वतंत्र करणे लाभदायक ठरेल का भागीदारीतला
  • भागीदारीतला व्यवसायच जर असेल तर भागीदार केव्हा मिळतील, ते कसे असतील
  • व्यवसाया साठी लागणारे कर्ज उपलब्ध होईल का
  • व्यवसाय करतान सरकार दरबार च्या काही अडचणीं येऊ शकतात का
  • नोकरी / व्यवसाया निमित्त परदेश गमनाचे योग आहेत का , असल्यास केव्हा
अशा अनेक अंगाने त्या तरुणास मार्गदर्शन मिळू शकते. आणि हे सर्व एका जन्मकुंड्ली वरून ( अथवा प्रश्नकुंडली) वरुन बघता येते (जीला इथे कचर्‍याचा टोपलीत फेकून दिले आहे! ) नाणेफेकीचा कौल ही इतकी माहीती देऊ शकेल? 'वडा पाव ' पण पोट भरण्याचे काम करतो म्हणून त्याची 'गुजराथी थाळी' / 'फाईव्ह कोर्स' डिनर शी तुलना करायची का?

In reply to by सरळमार्गी

धन्या Sun, 06/29/2014 - 15:45
नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात? तर मग इथे श्रीगुरुजींनी म्ह्टल्याप्रमाणे काही पत्रिकांची नोकरी संदर्भात चाचणी घेता येऊ शकते. घ्यायची का? :)

In reply to by धन्या

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 16:42
ज्योतिष जाणणार्‍यांना / या विषयात रुचि असणार्‍यांना इथे अशी वागणूक मिळत असताना, एकतरी तज्ञ ज्योतिर्विद मिपा वर शिल्लक राहीला असेल का ? आणि कोणी चुकुन माकुन रेंगाळत असलाच तर केवळ या अशा काही लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांच्या पत्रिका अभ्यासून कशाला उत्तरे देत बसेल? आणि का म्हणून तो आपले श्रम व वेळ ह्यांच्यावर खर्च करेल ? हे म्हणजे सापाला दुध पाजण्यातलाच प्रकार ! आणि असे कोण लागून गेले आहेत हे लोक की यांच्या विश्वास बसण्यावर / न बसण्यावर ज्योतिषशास्त्राचे भवितव्य अवलंबून आहे? नसला त्यांचा विश्वास तर नसुदे काय फरक पडतो? ?

In reply to by धन्या

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 16:55
>> नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात? >> हो! कै ज्योतिंद्र हसबे, कै सुरेश शहासने तसेच श्री सुनिल गोंधळेकर , श्री कनक बोस्नीया यांनी चालवलेले 'केपी झाईन' हे ई माग्याझीन (जे मोफत आहे ), श्री श्री नाथ यांचे अस्ट्रोव्हिजन हे ई माग्याझीन , श्री के. सुब्रमनीयम व श्री के हरिहरन यांनी लिहलेली सुमारे ३० च्यावर पुस्तके आणी ईतर अशी अनेक पुस्तकांमधून अशा प्रश्नांची लिलया उत्तरे दिलेल्या सोडवलेल्या शेकडो केसस्टडीज आहेत. त्या नुसत्या वरवर चाळल्या तरी कळेल. बाकी श्री राबर्ट स्वबोधांच्या पुस्तकात विसंगती आहेत असे विधान करण्या ईतपत अभ्यास / आवाका असलेल्या व्यक्तीने "नोकरीसंदर्भात एव्हढी सारी माहिती ज्योतिषी सांगू शकतात?" असा प्रश्न करावा याचे नवल वाटले ! 'कुछ तो गडबड है दया..."

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 03:19
तुमच्या बद्दल आणि थोर कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विषयी नितांत आदर व्यक्त करुनच हे लिहीतो आहे. माझा कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही आणि तसा अर्थ कोणीही कृपया काढू नये ही विनंती: आपण डॉ. दाभोळकर यांचा उल्लेख करतान यांच्या नावापुढे कै. लावले आहे ते अंधश्रद्धेचे प्रतिक नाही का? कै हे 'कैलासवासी' चे लघुरुप असावे अशी माझी तरी समजूत आहे, त्यात चूक असेल तर मी माझी पुढील सर्व विधाने मागे घ्यायला तयार आहे व बिनशर्त माफीही मागायला तयार आहे. मनुष्याच्या शरीरात म्हणे आत्मा असतो आणि मनुष्य मृत झाल्यावर तो आत्मा त्याच्या पार्थिव शरीरापासून अलग होतो आणि मग तो 'कैलास' किंवा 'वैकुंठ' वासी होतो ही आम्हा अंधश्रद्ध लोकांची तितकीच अंधश्रद्ध कविकल्पना! हे झाले हिंदू धर्मियांच्यात, बौद्ध / ख्रिश्चन / मुस्लीम धर्मियात सुद्धा काही वेळा ''बुद्धवासी' / 'ख्रिस्त वासी' / 'पैगबर वासी' असे लिहलेले पाहीले आहे ह्या सगळ्या अंधश्रद्धा नाहीत का? अहो कोणि बघितलाय तो आत्मा, आणी तसा तो असल्यास व्यक्ती मृत झाल्यावर त्या आत्म्याचे नक्की काय होते ? तो आत्मा कैलासाला गेलाय का वैकुंठाला का आणखी कोठे ते कसे ठरवणार, काय पुरावा आहे त्याचा ? मुळात असे कैलास, वैकुंठ वगैरे काही आहे का ? तुम्ही कै.. नामाभिधान वापरले आहेत म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या कडे असायला हवी नाही का? मग कधी सांगता आम्हाला? मी व्यक्तीशः डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मानतो, त्यांच्या विचाराचा आदर करतो, त्यांच्या नावा आधी कै. लावण्याला माझा जर सुद्धा आक्षेप नाही , कृपया गैरसमज करुन घेऊ नका. पण ज्यांची हयात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात गेली , ते काम करताना त्यांना हौतात्म्य आले त्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांना तुम्ही त्यांच्या मृत्यू नंतर आमच्या सारख्या अंधश्रद्धांच्या लायनीत उभे केलेले फारसे पटले नाही एव्हढच सांगणे आहे. मी एक सुचवू का ? जसे लष्करातल्या सेवानिवृत्त अघिकार्‍याच्या नावा नंतर कर्नल (रिटायर्ड) लिहतात तसे काही तरी नामाभिदान एखादि व्यक्ती जी 'आत्मा, कैलास, वैकुंठ ई. गोष्टी न मानणारी होती तिच्या बाबतीत वापरले पाहीजे, बघा पटते का . आणि दाभो़ळकर साहेब खरोखरिचे डॉक्टर होते तेव्हा त्यांचा उल्लेख करताना तो डॉ. नरेंद्र दाभोळकर असा व्हायला हवा , तो त्यांचा मान आहे (तुम्ही अनावधनाने विसरला आहात म्हणून ही एक नम्र विनंती, )

In reply to by सरळमार्गी

कैलासवासी असा शब्द न वापरता ... सावरकरांनी योजलेला संपूर्ण ऐहिक शब्द पुढे करतो.आपण दिवंगत म्हणतो..त्याप्रमाणे..अश्या व्यक्तिस मृत्युंगत , संबोधावे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सरळमार्गी Sun, 06/29/2014 - 16:35
मृत्युंगत हा शब्द जरा उच्चारायला जड्शीळ आहे , बर्‍याच जणांना जोडाक्षरे चे , रुकारा चे उच्चार करण्याचे वांधे आहेत हे मी रोज बघतोय, खोटे वाट्त असेल लोकांना 'पुष्पगुच्छ' हा शब्द म्हणायला सांगा बघा कीती जण पहिल्याच प्रयत्नात न चुकता न अडखळता म्हणू शकतात ते ! पण मी काय म्हणतो, कैलासवासी म्हणायचे का नाही ? नसल्यास दुसरा पर्याय काय यावर एखादा स्प्येशल धागा का नाही काढत !

In reply to by सरळमार्गी

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 16:31
मुद्दा काय आणि तुम्ही बोलताय काय? मूळ पेपरबद्दल बोला. त्या पेपरमध्ये तुम्हांला चूक काय वाटतं इतकं सांगा. माझ्या प्रतिसादातलं एक वाक्य उचलून प्रतिसाद फुलवू नका. मूळ मुद्दा पेपरचा, तो सोडून मी दाभोळकरांना कै का म्हटले आणि डॉ का म्हटले नाही इ. चर्चा लक्ष वेधण्यासाठीच आहे कारण मुद्द्याचं बोलण्यासारखं तुमच्याकडे नाहीच. जे बोलायचं ते पेपरबद्दल बोला. कुणाला राजमान्य राजश्री का म्हटलं नाही आणि अमुक का म्हटलं वगैरे मुद्दे बालिश आहेत अन सर्वांत मुख्य म्ह. त्यामुळे तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही. हे इतकं सोपं करूनही समजत नसेल तर इलाज नाही. आणि राहता राहिला तपशीलवार भाकिताचा मुद्दा.. ज्योतिष कितीही डीटेल्ड माहिती देण्याचा दावा करीत असूदे, काही भाकिते तरी हो/नाही या क्याटेगरीत बसतात. तिथे नाणेफेकीपेक्षा जास्ती वारंवारितेने भविष्य अचूकपणे वर्तवण्यात ते अक्षम ठरलेले आहे हे पेपरने सिद्ध केलेय. इतक्या बेसिक लेव्हलवर सुद्धा जर गंडत असेल तर बाकी फाफटपसारा काय कामाचा? 'काही भाकिते चुकतात' बद्दल सांगायचे तर, ९० आणि १० दोघेही १०० पेक्षा कमीच आहेत, पण म्हणून दोन्ही एक असा दावा असेल तर..हॅ हॅ हॅ, चालू द्या.

In reply to by अनुप ढेरे

चित्रगुप्त Sun, 06/29/2014 - 20:16
कुंडली भविष्य जास्तं अचूक असतं का नाडी भविष्य?
कुतुहलापोटी मी नाडी आणि कुंडली द्वारे भविष्य जाणून घेण्याचा उपद्व्याप केलेला आहे. नाडी मधे भविष्य असे काहीच सांगितले गेले नव्हते (माझ्या बाबतीत तरी) नुस्ते मोघम काहीतरी गोलमाल सांगितले होते, जे मला मुळीच पटले नाही. ओळखीच्या झालेल्या ज्योतिषांकडे मी बर्‍याच जणांना घेऊन गेलो, आणि बहुतेक प्रत्येकाने काही ना काही ठीक सांगितले. या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे.

In reply to by चित्रगुप्त

मूकवाचक Sun, 06/29/2014 - 20:34
"या सर्व प्रकारात यांत्रिक काटेकोर नियम नसून मुख्यतः अंतःप्रेरणा आणि काही वेगळ्याच (गूढ, अतर्क्य म्हणा हवे तर) पातळीवरून भविष्याची चाहूल लागत असते, असा माझा अनुभव आहे." - पूर्णपणे सहमत. त्यामुळेच संख्याशास्त्रीय चाचण्यांचा निष्कर्ष निर्णायक मानणे मला तरी जमणार नाही. बाकी अस्तित्व जगड्व्याळ असणे किंवा 'अस्तित्वात' शक्यता या पातळीवर पराकोटीची अनिश्चितता असणे शक्य असणे वगैरे गोष्टी या संदर्भात 'वाईड बॉल' आहेत. असो.

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 20:40
म्हणजे गूढ अंतःप्रेरणा असेल तर 'या स्थानात अमुक योग असेल तर माणूस मरतो' छाप नियम आपोआपच रद्द झाले. मग तर १२ भागवाली कुंडली बनवणे अन ज्योतिष वर्तवणे या बाबतीतले ठोकताळे निरुपयोगीच नाहीत तर मुळातच निरर्थक आहेत. त्यामुळे गूढ अंतःप्रेरणा आणि कुंडली इ. वरून ज्योतिष वर्तवणे या दोहोंपैकी एकच गोष्ट खरी आहे असेच म्हटले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

मूकवाचक Sun, 06/29/2014 - 20:45
दोन्ही गोष्टी खर्‍या आहेत. दोन्हीत तथ्यांश आहे. तशी प्रेरणा असलेल्या व्यक्तीला पत्रिकेचा गाईडलाईनसारखा उपयोग होऊ शकतो. मला वाटते या बाबतीतल्या शक्यता नेहेमी एक किंवा शून्य अशा बायनरी स्वरूपाच्या नसतात. हा निव्वळ गणिती प्रकार असता तर आजच्या संगणक युगात सगळे फलादेश संगणकात फीड करून सगळ्या ज्योतिष्यांना बेकार करता आले असते.

In reply to by मूकवाचक

बॅटमॅन Sun, 06/29/2014 - 21:18
० किंवा १ हे बायनरी नसले म्हणून बरोबर येण्याच्या टक्केवारीला काही महत्त्व आहे की नाही? की १० मार्क आणि ९० मार्क पडलेल्या दोघांनाही १०० पेक्षा कमी म्हणून नापास करणार? बरोबर येण्याची टक्केवारी फक्त पत्रिकाधारे ज्योतिष पाहून काढली असता नाणेफेकीद्वारे येणार्‍या अचूकतेपेक्षा कमी आहे असे त्या पेपरमध्ये सिद्ध केलेले आहे. तुमचा विश्वास नसेल तर करा तसाच एक कंट्रोल्ड एक्स्पेरिमेंट आणि दाखवा रिझल्ट्स. किमान ५०% पेक्षा जास्त वेळेस तुम्ही म्हणता तसे रिझल्ट आले तर आत्ता या क्षणी तुमचं म्हणणं मान्य करतो. एका बाजूचा व्यवस्थित मांडलेला विदा मी सादर केलाय. तुम्हांला ती बाजू पटत नाही तर दुसर्‍या बाजूचा विदा नीट मांडा. इतकेही करण्याची तयारी जर नसेल तर मग आमची मुक्ताफळे बोचायचं काम नाही. निव्वळ गणिती आणि सांख्यिकीय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जर समजत नसेल तर इलाज नाही. गणिताआत २+२=४ होतात, तर सांख्यिकीत दोन 'जवळ-जवळ' किंवा 'लांब-लांब' वाटणार्‍या गोष्टी खरेच तशा आहेत किंवा नाही याचा निर्णय घ्यायचे शास्त्र आहे. काटेकोरपणा म्हणजे २+२=४ ही व्याख्या अज्ञानमूलक , शास्त्रद्वेष्टी आणि तितकीच हास्यास्पद आहे. तेव्हा निव्वळ 'मला आणि माझ्या ओळखीतल्या काही लोकांना असे अनुभव आलेत म्हणून पत्रिका बरोबर असते' याला आधार नाही. योग्य ती शिस्त पाळून साधारण ५०-१०० लोकांचा विदा जमवा आणि निष्कर्ष सांगा. या प्रयोगात लागेल तितकी सांख्यिकीय मदत मी स्वतः कराञला तयार आहे. ज्योतिषवाल्यांनी ज्योतिषाचा विदा द्यावा, त्याचे सांख्यिकी विश्लेषण आ म्ही करू- अर्थातच सर्वांना विश्वासात घेऊन. तयारी असेल तर बोला, नपेक्षा मुक्ताफळे बोचतात इ.इ. टाहो बंद करा.
महत्वाची सुचना: ज्योतिष शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा.... चर्चेचा विषयच मुळात ज्योतिष शास्त्राशी संबंधीत आहे. त्यामुळे येथे "ज्योतिष शास्त्र खरे की खोटे" यावर चर्चा अपेक्षित नाही.

मराठी शब्दांच्या सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरण १

माहितगार ·

माहितगार Wed, 06/25/2014 - 14:07
२००७ मध्ये मराठी विक्श्नरीवरील "'मी' या शब्दलेखावर" काम करताना मी (स्वतः) एकाच शब्दाचे एकाचवेळी अनेक भारतीय भाषालिपीतील लेखन उपलब्ध होत असे जसे मराठी देवनागरीत 'मी' असे लिहिले की एका झटक्यात 'मी' उचारणाचे लेखन पुढीलप्रमाणे सर्व लिपीत मिळत असे. नंतर केवळ कॉपी पेस्टचे काम असे. (इंग्रजी (English):me; उर्दू : می ; कन्नड : ಮೀ, मल्याळम: മീ ; गुजराथी : મી ; तमिळ : மீ ; तेलुगू :మీ ; पंजाबी :ਮੀ ;संस्कृत :मी ; हिंदी : मी ; बंगाली: মী) हि सुविधा एका मराठी भाषक व्यक्तीचा ब्लॉग अथवा संकेतस्थळावरून वापरत होतो त्यांच्या आणि संकेतस्थळाच्या नावाचा नंतर विसर पडला. कुणास ठाऊक असल्यास त्या संकेतस्थळाची माहिती द्यावी. धन्यवाद

पैसा Fri, 06/27/2014 - 22:08
मजला: ही द्वितीया किंवा चतुर्थी असू शकेल. तो शब्द कसा वापरला ते पहावे लागेल. माझिया: षष्ठी आहे. मालवणीमधे मी = मियां चित्पावनीमधे मी = मे कोंकणीत मी = हांव (हांव सरळ संस्कृत अहं वरून आलेला आहे) मराठीतला आम्ही अहं ला जवळचा दिसतो. अहं च्या विभक्ती रूपांमधे मयि, मम, मह्यं "मी" दिसतो. वयं हा we ला जवळचा वाटतो. मालवणीत कोंकणीप्रमाणे मला च्या ऐवजी माका, तर तुला ऐवजी तुका वापरले जाते. आणखी आठवेल तसे लिहिते.

In reply to by पैसा

माहितगार Sat, 06/28/2014 - 13:20
सर्वनामेही भाषेत कमी असली तरी कोणत्याही भाषेची खरी ओळख असतात म्हणे कारण, सर्वनामे दुसर्‍या भाषेतील शब्दांनी रिप्लेस करून भाषेतून संवाद साधणे कठीण असते असे भाषाशास्त्रात कुठेतरी वाचले आहे म्हणून सर्वनामांनी सुरवात केली. या मालिकेत बरेच धागे काढण्याचा मानस असूनही प्रतिसादांच्या अभावाने साशंक झालो होतो. तेवढ्यात या धाग्याकरता आपला समर्पक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद आल्याने चांगले वाटले. * कादोडी/सामवेदीत मी ला म्ये म्हणत असावेत का ? (या दुव्यावर वाचून वाटले. याच दुव्यात मे महिन्याचे उच्चारणही म्ये दिसते त्यामुळे दुजोरा मिळणे म्हत्वाचे असेल. ) (सामवेदी बोलीबाबत सदस्य सूडही चर्चेत भाग घेऊ इच्छित होते तेव्हा त्यांच्या अधिक प्रतिसादांचीही प्रतिक्षा असेल.) * मजला हा शब्द गद्यापेक्षा पद्यात अधीक आढळतो असे दिसते. गूगलवर खालील प्रमाणे उपयोग आढळले. अनेक देतो आहे कारण मजला या विक्शनरी लेखाची सामुग्रीही या निमीत्ताने जमेल. (मजला शब्द इमारतीचा मजला या अर्थानेही येतो) **आज सर्व कही कसे काय झाले, मजला उमगलेच नाही! ** मजला ठाऊक नाही ** तु मजला बोलावू नकोस. **कर कर करंजी मजला आवडते. पद्यात **दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी । **तूं सांडशील मजला जरि हो निदानीं । योगेश्वरी. **तूं दूरदर्शि जननी तुज कां कळेना. मी अल्‍पबुध्दि मजला मन आकळेना । ** स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी। **जे वेड मजला लागले, **ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती. ** दिसते मजला सुखचित्र नवे -अनुराधा पौडवाल ** कुठलेच फूल आता मजला पसंत नाही ** देई सद्बुध्दी मजला ** विरहे सुकल्या कल्पुनि मजला चित्री रेखाटिता ** त्याची मजला भ्रांत नसे ** विसरणार होतीस मला तर, दिलेस का मग रुकार मजला? ** ये मजला नेयाला तू पंचमी सणाला तू पंचमी सणाला. प्रतिसादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद

In reply to by माहितगार

सूड Tue, 07/01/2014 - 21:51
>>कादोडी/सामवेदीत मी ला म्ये म्हणत असावेत का ? हो 'म्ये' हा शब्द मी साठीच वापरलेला दिसत आहे एका लेखात. आपण बनवलेल्या सामवेदीच्या पानासंदर्भात संबंधितांशी इमेल तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क केलेला आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती मिळाली की अर्थातच या बोलीसंदर्भात माझ्याही ज्ञानात भर पडेल आणि सर्वांच्या माहितीसाठी एक पानही तयार होईल विकीपीडियावर!!

In reply to by पैसा

माहितगार Sat, 06/28/2014 - 14:17
मालवणीत कोंकणीप्रमाणे मला च्या ऐवजी माका, तर तुला ऐवजी तुका वापरले जाते.
इतरही काही शब्दात ल चा क होतो का वरील उदाहरण अपवादात्मक आहे. (अवांतर : तुकाराम/ तुकाबाई/ तुकोजी अशी विशेषनामे मराठीत वापरात दिसतात. यातील तुका हा शब्द तु आणि का ? या दोन शब्दांच्या समासातून बनण्या पेक्षा कोकणी भाषेच्या प्रभावातून तुला ते तुका आला असण्याची काही शक्यता वाटते का ?) असमीज मध्ये मी ला মই (मइ- इ र्‍हस्व?) असा दिसतो उच्चारण हिंदीतील मै ला जवळचे वाटते. बेगांलीत = আমি (आमि) *इंग्रजीतील me सर्वांना परिचयाचा आहेच **Finnic भाषागट Ingrian: miä; Karelian language mie; **Kazakh: мен (kk) (men) ** Kurdish: Kurmanji: min (ku) ** Lydian: amu (प्राचीन अ‍ॅनातोलीयन आताच्या तुर्कस्थानातील प्रदेश); ** Komi-Zyrian: ме (me) (रशीयन प्रांतातील युरालीक भाषागट) **Ligurian (उत्तर इटालीयन प्रदेश) : mi ** Swahili: mimi (आफ्रीका अर्थात त्यांच्या भाषेत मीमी हा शब्द भारताशी व्यापाराचा परिणाम होताकी नाही सांगणे कठीण आहे साऊथ आफ्रीकन झुलूत Zulu: mina; नामिबीयन ǃKung: mi आणि उत्तरपश्चिमी आफ्रीकी Yoruba: mo, n, mi, असे उच्चारण दिसते. तसेच आफ्रीकन भाषांवर युरोपीय भांषांचा प्रभाव प्रचंडच असल्याने सांगणे कठीण) पण इंग्रजी विक्शनरीतील संदर्भ तपासले तर मध्य आशीया आणि आजूबाजूच्या प्रदेशात मी किंवा जवळीक असणारी उच्चारणे अधीक दिसतात. दक्षीण भारतात मी म्हणण्यासाठी तमील, कन्नड आणि मल्यालम मध्ये नान असा शब्द आहे तर तेलगूत नेनु असा शब्द आहे असे दिसते. (सौजन्य इंग्रजी विक्शनरी चु.भू.दे.घे.)

In reply to by माहितगार

पैसा Sat, 06/28/2014 - 16:55
ल चा क असं नाही ते. कारण 'सगळ्यांना' याचं कोंकणी/मालवणीत 'सगळ्यांक' देवाला = देवाक त्यांना = तांका अशी रूपे आहेत. हे काही प्रत्यय स्वतंत्रपणे विकसित झाले असावेत. पूर्वीही कधीतरी मी लिहिले होते की ज्ञानेश्वरीतील मराठी ही कोंकणीला जास्त जवळची वाटते. त्याच दरम्यान कोंकणी स्वतंत्रपणे विकसित होऊ लागली असावी. नंतर पोर्तुगीज अमंलात गोवा कोकणापासून वेगळा पडत गेला. १५६० नंतर. तेव्हा ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली असावी. याबाबत काही ठामपणे बोलण्यासाठी शौरसेनी आणि महाराष्ट्री प्राकृतबरोबर मराठी, मालवणी आणि कोंकणी यांची तुलना करावी लागेल. book इ.स. १५२६ मधलं कृष्णदास शामा या गोव्यातल्या लेखकाच्या पुस्तकाचं एक पान (आंतरजालावरून साभार) बघा. त्या काळात गोव्यात बोलल्या जाणार्‍या भाषेचा नमुना इथे दिसेल. जुनी मराठी, गोव्यातली कोंकणी आणि मंगलोरकडची कोंकणी या तिनांचे मिश्रण वाटते. तुकाराम, तुकाई, इ. विशेषनामे आहेत. त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही माहिती किंवा अंदाज नाही. कदाचित प्राकृत्/संस्कृतचे अपभ्रंश किंवा काही पूर्ण स्थानिक संदर्भ असू शकतात.

In reply to by पैसा

माहितगार Sat, 06/28/2014 - 21:14
पूर्वीही कधीतरी मी लिहिले होते की ज्ञानेश्वरीतील मराठी ही कोंकणीला जास्त जवळची वाटते.
आपला प्रतिसाद वाचून "कृष्णदास शामा" गूगलवर शोधले तर योगायोगाने बहुधा आपण म्हणताहात त्याच धाग्यावर (आमचें गोंय - भाग ११ - कोंकणी भाषा – इतिहास आणि आज) पोहोचलो. कोकणी भाषेची सगळीच माहिती माझ्या करता नवीन आहे. शोधतो आणि वाचतो आहे.

In reply to by माहितगार

पिशी अबोली Tue, 07/01/2014 - 15:26
'क' चा फॉर्म असणारा द्वितीयेचा प्रत्यय इंडो-आर्य भाषांमधे एकमेव नाही. हिंदीमधे 'उसको', 'रामको' यातही तो दिसतोच ना.. कोंकणी भाषेचा विकास काही नेहमीच मराठीवर अवलंबून नव्हता, त्यात काही स्वतंत्र गोष्टीही होत्या असे मान्य करायला हरकत नसावी. बाकी इंडो-युरोपीय भाषांमधे सर्वनामांचे फॉर्म्स सारखे सापडणं अगदीच शक्य आहे. मात्र आफ्रिकन वगैरे भाषांमधे इं.यु. भाषांच्या प्रभावामुळे हे घडण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. दोन वेगवेगळ्या भाषांमधे सारखे फॉर्म्स सापडले म्हणून त्यांचा संबंध असेलच असं नाही. केवळ योगायोग म्हणून अजिबात संबंध नसलेल्या भाषांमधे सारखेपण असल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यातही अशा इतक्या दूरच्या भाषांमधे सर्वनामे बदलण्याइतका भाषांचा प्रभाव असावा हे तर अगदीच अशक्य.

In reply to by पैसा

माहितगार Sun, 06/29/2014 - 06:41
मराठीतला आम्ही अहं ला जवळचा दिसतो. अहं च्या विभक्ती रूपांमधे मयि, मम, मह्यं "मी" दिसतो. वयं हा we ला जवळचा वाटतो.
अवेस्तन भाषेत मी शब्दा करता azǝm हा शब्द दिसतो यातील ǝ हे अक्षर AVESTAN LETTER AE ला मॅच करते (ǝ ए आणि ऐ च्या मधले अजून एक उच्चारण असेल ?) (संदर्भ: इंग्रजी विक्शनरी; इंग्रजी विकिपीडिया) azǝm हे उच्चारणे अझॆम असे काही होत असेल संस्कृत अह्म् शी जवळचे वाटते का ? (चुभूदेघे)

पिशी अबोली Tue, 07/01/2014 - 15:29
या धाग्यावर मिपावरील लोकांना अवगत असणार्‍या मराठीच्या/ मराठीशी संबंधित बोलींमधील सर्वनामांच्या विभक्तींचे संकलन झाले तरी खूप फायदा होईल.

In reply to by पिशी अबोली

माहितगार Wed, 07/02/2014 - 15:54
सहमत, ९०००च्यावर हिट्स असूनही त्या मानाने प्रतिसाद संख्या कमी असल्याने हिरमुसल्यासारखे वाटते आहे. (९००० हिट्स देणार्‍यांना आपापल्या बोली भाषा नाहीत असे कसे होईल ?) त्यातच आलेले आपले प्रोत्साहनात्मक प्रतिसाद पाहून आशा बाळगून आहे. खरे म्हणजे शब्दचर्चा जेवढी पुढे जाईल तेवढी रोचक होईल असे वाटते.

In reply to by माहितगार

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 09:44
९००० हिट्स मध्ये माझीही एक हिट आहे. एकतर ९००० हिट्स म्हणजे ९००० 'जणांनी' वाचन केले की ९००० 'वाचने' झाली? ह्यात एकाच सदस्याची २-२, ४-४ वाचने असू शकतात. दूसरे असे, भाषेविषयी तुम्हा सर्वांइतका अभ्यास नसल्याकारणाने पण धागा वाचनिय असल्यामुळे मी वाचनमात्र आहे. माझा कडून कणभर माहिती म्हणजे मस्कतच्या अरेबिकात (आखातात प्रदेशप्रदेशात अरेबिक भाषा किंचित बदलते) 'मी' ला 'अना' हा शब्द वापरतात तर 'तू' साठी 'एन्ते' हा शब्द वापरतात पण त्यात परत ज्या व्यक्तीशी आपण बोलत असतो ती जर 'स्त्री' असेल तर 'तू' साठी 'एन्ती' हा शब्द येतो. भारतिय भाषांमध्ये मल्याळम भाषेत 'मी'ला 'न्याम' हा शब्द वापरताना ऐकले आहे. गुजराथी भाषेत 'मी' साठी 'हूं' शब्द वापरतात तर 'तू' साठी 'तू'च वापरतात तसेच 'तुम्ही' साठी 'तमे' शब्द वापरतात.

विदर्भात सगळीकडे नाही, पण ग्रामीण भागात वापरले जाणारे काही शब्द/सर्वनामे मला - मपल्याला तुला - तुपल्याला माझी - मपली, माही, माह्या (माझ्या भावाला - माह्या भावाला) तुझी - तुपली आम्हाला - आम्हास्नी तुम्हाला - तुम्हास्नी ज्यांनी - ज्यास्नी त्यांना - त्यास्नी अजून आठवेल तसे लिहीत जाईन.

In reply to by मधुरा देशपांडे

माहितगार गुरुवार, 07/03/2014 - 18:38
अजून आठवेल तसे लिहीत जाईन.
अवश्य. बाकी पण वैदर्भीय मंडळी चर्चेत सामील होतील अशी आशा करूयात. झाडीबोली आणि वर्‍हाडी चर्चा बरीच वाचण्यात असते पण झाडीबोली अद्याप वाचण्यात आली नाही. कुणी झाडीबोलीचाही शब्द संग्रह आणि नमूना लेखन दुवा दिल्यास स्वागत असेल.

In reply to by माहितगार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/03/2014 - 19:13
झाडीबोलीचं पुस्तक होतं आत्ता सापडत नैये. :( ग्रंथालयात आहे उद्या शोधतो. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

सुनील Fri, 07/04/2014 - 08:54
कोकणात बर्‍याच बोली आहेत.
भाषा दर दहा कोसांवर बदलते असे म्हणतात. त्यात थोडेफार तथ्यदेखिल आहे. परंतु, हा सूक्ष्मपणे होत राहणारा बदल एका वेगळ्या बोलीत परिवर्तित होण्यासाठी केवळ अंतर (उदा १० कोस) हाच एकमेव निकष नसतो. महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा कोकणात अधिक बोली आहेत याचे प्रमुख कारण आहे भौगोलिक. कोकणात सलग ५ मैल सपाट प्रदेश नाही! एकादा डोंगर-दरी वा टेकाड अथवा खाडी आडवी येणारच! साहजिकच अगदीच आवश्यकता भासल्यासच मंडळी आपला पंचक्रोश ओलांडून बाहेर जाणार. उभे आयुष्य एखाद्या पंचक्रोशीतच घालवलेल्यांची संख्यादेखिल काही कमी नाही. आता दूर-दूरच्या प्रदेशांशी फारसा संपर्क-संवाद नसल्यामुळे बोलींचे संख्या वाढते. (पूर्वीच्या काळी, जेव्हा दळणवळणाची साधने फार नव्हती तेव्हा) हे देशावर तितक्या प्रमाणावर घडत/घडले नाही. काहीशा सपाट, पठारी प्रदेशामुळे दूरदूरच्या प्रदेशांशे सतत संपर्क येत राहतो आणि बोली/शब्दांची आदान-प्रदान होत राहते. साहजिकच, बोलींची संख्या थोडी कमी राहते.

पिशी अबोली Fri, 07/04/2014 - 11:49
पोर्तुगीज इन्क्विझिशन च्या काळात कोंकणीतील ग्रंथसंपदा जवळपास पूर्णपणे नष्ट झाली. बोलीभाषा म्हणूनही तिच्यावर अनेक मर्यादा आल्या. तरीही ती टिकून राहिली आणि तिला पर्याय नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी शेवटी धर्मप्रसारासाठी तिचा स्वीकार केला. त्यातून पुढे मिशनरी व्याकरणे तयार झाली. भाषेचे प्रमाणीकरण होण्यासाठी त्यात नियमितपणे तयार होणारे आणि वाचले जाणारे साहित्य असावे लागते. या काळात कोंकणी साहित्याची जी काही दुर्दशा झाली, त्यामुळे पुढे होऊ शकणार्‍या प्रमाणीकरणावरसुद्धा मर्यादा आल्या. पण निरनिराळ्या ठिकाणच्या आणि जातींच्या बोलींचा विकास तर होतच गेला. आणि मराठीच्या बाबतीत जसा पुण्यातील बोली तेवढी श्रेष्ठ आणि बाकीच्या अशुद्ध असा भाषकांचासुद्धा दृष्टिकोन आहे, तसा कोंकणीमधे फारसा आढळत नाही. या आणि इतर अनेक कारणांमुळे एक प्रमाण अशी कोंकणी तयार होण्याची प्रक्रिया फार हळू झाली/होत आहे. या धाग्यावर 'कोकणी' असा जो मराठीच्या बोलींमध्ये उल्लेख आहे, तो गोव्याच्या 'कोंकणी' भाषेसंदर्भात नसून, केवळ भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रात येत असल्याने 'मराठीच्या बोली' गणल्या गेलेल्या कोकणातील बोलींचा असावा असे मी गृहीत धरते. गोव्यातील कोंकणीला बोली म्हणायचेच असल्यास किमान 'मराठीची बोली' असे म्हणू नये अशी अपेक्षा आहे.

In reply to by पिशी अबोली

माहितगार Fri, 07/04/2014 - 12:15
या धाग्यासाठी अंशतः अवांतर आहे पण आपण मुद्दा काढला आहेत तेव्हा धागा लेखक म्हणून माझ अल्प स्पष्टीकरण. मी प्रमाणभाषांचा अहंकार जपत नसल्याने भाषिक उतरंडींचे वर्गीकरण व्यक्तीगत पातळीवर माझ्यादृष्टीने गौण मुद्दा आहे. भावनिक दृष्टीने गोवा माझ्यासाठी महाराष्ट्रराज्याचा अविभाज्य भाग आहे. (म्हणून गोवन कोकणी महाराष्ट्रीय-मी बृहन शब्द सुद्धा वापरत नाही- भाषा आहे महाराष्ट्रात जी भाषा बोलली जाते ती सर्व मराठीच अशी माझी मराठीची आग्रही व्याख्या आहे.) आणि अखिल भारतातील सर्वच भाषा आणि बोलींसाठी देवनागरी लिपीच्या वापराचा मी आग्रही पुरस्करताही आहे. अशा विषयांवर भूमिका व्यक्तीपरत्वे विभीन्न असू शकतात त्यांच्याशी सहमती असेलच असे नाही पण आदर असेल, माझी भूमीका कुणाला दुखावणारी असल्यास क्षमस्व. पण मुद्दा या धाग्यासाठी गौण असल्याने आपला मनमोकळा सहभाग चालू ठेवावा अशी प्रार्थना आहे. प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

पिशी अबोली Fri, 07/04/2014 - 12:26
व्यक्तिगत मतांचा इथे संबंध नाहीच आहे. भारतीय घटनेच्या 8th schedule मधील मान्यता मिळालेली कोंकणी ही भाषा आहे. संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे कोंकणीला मराठीची बोली गणली गेल्यास ते घटनेशी कॉट्राडिक्टरी ठरेल. या ठिकाणी तुमचे व्यक्तिगत मत आड येऊ नये असे वाटते. हा मुद्दा धाग्यासाठी गौण नाही असं मला वाटतं. तुमच्या यादीतील 'कोकणी' या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करावे.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 12:28
संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे कोंकणीला मराठीची बोली गणली गेल्यास ते घटनेशी कॉट्राडिक्टरी ठरेल.
ठ्ठो =)) =)) =)) शांत भाषाधारी अबोली, शांत =))

In reply to by पिशी अबोली

माहितगार Fri, 07/04/2014 - 13:01
*शांत भाषाधारी अबोली, शांत या बॅटमनरावांच्या मताशी मी सहमत आहे. माझा प्रतिसाद इतरांना देताना द्विधा मनःस्थिती झाली नसती अबोलीताईंना प्रतिसाद द्यायचा म्हणजे मी दुसर्‍यांदा विचार केला होता हे खरे. बाकी अबोलीताईंची काही ठिकाणी गल्लत होतीए. प्रथमत: संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे हे वाक्य जरा संबंधित उपक्रम मराठी विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे अस वाचाव. २) मराठी विकिपीडिया हा शासकीय प्रकल्प नव्हे. मराठी विकिपीडीया शासकीय धोरणांची नोंद घेतो पण शासकीय धोरणांशी बांधील असून फक्त शासकीय भूमीकाच मांडतो असे नव्हे. इतरही भूमीका मांडतो. ३) तुम्ही शासकीय धोरणांचा हवाला दिला असला तरी राजकीय आणि विशीष्ट पूर्वग्रहातून प्रभावीत मते म्हणून व्यक्तीगत आहेत आणि माझी व सोबत इतर अनेकांची मते वेगळी असू शकतात. आणि म्हणूनच हे सर्व धाग्याशी विषयांतर आहे हे मी मगाशीच स्पष्टही केले आहे या अर्थानेही अबोलीताईंचे मुद्दे जरासे गैर लागू ठरतात. ४) कोणत्याही चर्चेतील माझी व्यक्तीगत मते मी मराठी विकिपीडिया लेखात लादत नाही (खूप दक्ष असतो) पण इतरांच्या उल्लेखनीय मतांची समतोल दखल घेत असतो. या चर्चा धाग्यांमधून केवळ मजकुर गोळा केला जातो आहे, मराठी विकिपीडियातील लेखातील मजकुर काय असावा याची चर्चा संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर होऊन मराठी विकिपीडियातील संपादक मंडळी सामुहीक (लोकशाही नव्हे) निर्णय घेतात. तुम्हाला जेवढ्या तातडीने प्रतिक्रीया दिली तेवढ्या तातडीने मराठी विकिपीडियावरील चर्चा पानांवर मी सहसा प्रतिक्रीया देत नाही आणि माझी तटस्थता पाळत असतो इतरांची पुरेशी चर्चा झाल्या शिवाय सहसा हस्तक्षेप करत नाही त्या बद्दल चिंता नसावी. ५) पण शेवटी मराठी विकिपीडिया मराठी लोकांसाठी आहे आणि मराठी उत्कर्षार्थ जर चौकटीच्या बाहेर जाऊन काम करावे लागले तर तेही करतो. पण मुख्य म्हणजे या सर्वातून घेण्यासारखा मुद्दा मराठीची व्याख्या मी व्यापक ठेवतो संकुचीत ठेवत नाही हा सकारात्मक भाग तुम्हाला आणि सर्वांना आवडेल असा विश्वास आहे.

माहितगार Wed, 06/25/2014 - 14:07
२००७ मध्ये मराठी विक्श्नरीवरील "'मी' या शब्दलेखावर" काम करताना मी (स्वतः) एकाच शब्दाचे एकाचवेळी अनेक भारतीय भाषालिपीतील लेखन उपलब्ध होत असे जसे मराठी देवनागरीत 'मी' असे लिहिले की एका झटक्यात 'मी' उचारणाचे लेखन पुढीलप्रमाणे सर्व लिपीत मिळत असे. नंतर केवळ कॉपी पेस्टचे काम असे. (इंग्रजी (English):me; उर्दू : می ; कन्नड : ಮೀ, मल्याळम: മീ ; गुजराथी : મી ; तमिळ : மீ ; तेलुगू :మీ ; पंजाबी :ਮੀ ;संस्कृत :मी ; हिंदी : मी ; बंगाली: মী) हि सुविधा एका मराठी भाषक व्यक्तीचा ब्लॉग अथवा संकेतस्थळावरून वापरत होतो त्यांच्या आणि संकेतस्थळाच्या नावाचा नंतर विसर पडला. कुणास ठाऊक असल्यास त्या संकेतस्थळाची माहिती द्यावी. धन्यवाद

पैसा Fri, 06/27/2014 - 22:08
मजला: ही द्वितीया किंवा चतुर्थी असू शकेल. तो शब्द कसा वापरला ते पहावे लागेल. माझिया: षष्ठी आहे. मालवणीमधे मी = मियां चित्पावनीमधे मी = मे कोंकणीत मी = हांव (हांव सरळ संस्कृत अहं वरून आलेला आहे) मराठीतला आम्ही अहं ला जवळचा दिसतो. अहं च्या विभक्ती रूपांमधे मयि, मम, मह्यं "मी" दिसतो. वयं हा we ला जवळचा वाटतो. मालवणीत कोंकणीप्रमाणे मला च्या ऐवजी माका, तर तुला ऐवजी तुका वापरले जाते. आणखी आठवेल तसे लिहिते.

In reply to by पैसा

माहितगार Sat, 06/28/2014 - 13:20
सर्वनामेही भाषेत कमी असली तरी कोणत्याही भाषेची खरी ओळख असतात म्हणे कारण, सर्वनामे दुसर्‍या भाषेतील शब्दांनी रिप्लेस करून भाषेतून संवाद साधणे कठीण असते असे भाषाशास्त्रात कुठेतरी वाचले आहे म्हणून सर्वनामांनी सुरवात केली. या मालिकेत बरेच धागे काढण्याचा मानस असूनही प्रतिसादांच्या अभावाने साशंक झालो होतो. तेवढ्यात या धाग्याकरता आपला समर्पक आणि माहितीपूर्ण प्रतिसाद आल्याने चांगले वाटले. * कादोडी/सामवेदीत मी ला म्ये म्हणत असावेत का ? (या दुव्यावर वाचून वाटले. याच दुव्यात मे महिन्याचे उच्चारणही म्ये दिसते त्यामुळे दुजोरा मिळणे म्हत्वाचे असेल. ) (सामवेदी बोलीबाबत सदस्य सूडही चर्चेत भाग घेऊ इच्छित होते तेव्हा त्यांच्या अधिक प्रतिसादांचीही प्रतिक्षा असेल.) * मजला हा शब्द गद्यापेक्षा पद्यात अधीक आढळतो असे दिसते. गूगलवर खालील प्रमाणे उपयोग आढळले. अनेक देतो आहे कारण मजला या विक्शनरी लेखाची सामुग्रीही या निमीत्ताने जमेल. (मजला शब्द इमारतीचा मजला या अर्थानेही येतो) **आज सर्व कही कसे काय झाले, मजला उमगलेच नाही! ** मजला ठाऊक नाही ** तु मजला बोलावू नकोस. **कर कर करंजी मजला आवडते. पद्यात **दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी । **तूं सांडशील मजला जरि हो निदानीं । योगेश्वरी. **तूं दूरदर्शि जननी तुज कां कळेना. मी अल्‍पबुध्दि मजला मन आकळेना । ** स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी। **जे वेड मजला लागले, **ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती. ** दिसते मजला सुखचित्र नवे -अनुराधा पौडवाल ** कुठलेच फूल आता मजला पसंत नाही ** देई सद्बुध्दी मजला ** विरहे सुकल्या कल्पुनि मजला चित्री रेखाटिता ** त्याची मजला भ्रांत नसे ** विसरणार होतीस मला तर, दिलेस का मग रुकार मजला? ** ये मजला नेयाला तू पंचमी सणाला तू पंचमी सणाला. प्रतिसादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद

In reply to by माहितगार

सूड Tue, 07/01/2014 - 21:51
>>कादोडी/सामवेदीत मी ला म्ये म्हणत असावेत का ? हो 'म्ये' हा शब्द मी साठीच वापरलेला दिसत आहे एका लेखात. आपण बनवलेल्या सामवेदीच्या पानासंदर्भात संबंधितांशी इमेल तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क केलेला आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती मिळाली की अर्थातच या बोलीसंदर्भात माझ्याही ज्ञानात भर पडेल आणि सर्वांच्या माहितीसाठी एक पानही तयार होईल विकीपीडियावर!!

In reply to by पैसा

माहितगार Sat, 06/28/2014 - 14:17
मालवणीत कोंकणीप्रमाणे मला च्या ऐवजी माका, तर तुला ऐवजी तुका वापरले जाते.
इतरही काही शब्दात ल चा क होतो का वरील उदाहरण अपवादात्मक आहे. (अवांतर : तुकाराम/ तुकाबाई/ तुकोजी अशी विशेषनामे मराठीत वापरात दिसतात. यातील तुका हा शब्द तु आणि का ? या दोन शब्दांच्या समासातून बनण्या पेक्षा कोकणी भाषेच्या प्रभावातून तुला ते तुका आला असण्याची काही शक्यता वाटते का ?) असमीज मध्ये मी ला মই (मइ- इ र्‍हस्व?) असा दिसतो उच्चारण हिंदीतील मै ला जवळचे वाटते. बेगांलीत = আমি (आमि) *इंग्रजीतील me सर्वांना परिचयाचा आहेच **Finnic भाषागट Ingrian: miä; Karelian language mie; **Kazakh: мен (kk) (men) ** Kurdish: Kurmanji: min (ku) ** Lydian: amu (प्राचीन अ‍ॅनातोलीयन आताच्या तुर्कस्थानातील प्रदेश); ** Komi-Zyrian: ме (me) (रशीयन प्रांतातील युरालीक भाषागट) **Ligurian (उत्तर इटालीयन प्रदेश) : mi ** Swahili: mimi (आफ्रीका अर्थात त्यांच्या भाषेत मीमी हा शब्द भारताशी व्यापाराचा परिणाम होताकी नाही सांगणे कठीण आहे साऊथ आफ्रीकन झुलूत Zulu: mina; नामिबीयन ǃKung: mi आणि उत्तरपश्चिमी आफ्रीकी Yoruba: mo, n, mi, असे उच्चारण दिसते. तसेच आफ्रीकन भाषांवर युरोपीय भांषांचा प्रभाव प्रचंडच असल्याने सांगणे कठीण) पण इंग्रजी विक्शनरीतील संदर्भ तपासले तर मध्य आशीया आणि आजूबाजूच्या प्रदेशात मी किंवा जवळीक असणारी उच्चारणे अधीक दिसतात. दक्षीण भारतात मी म्हणण्यासाठी तमील, कन्नड आणि मल्यालम मध्ये नान असा शब्द आहे तर तेलगूत नेनु असा शब्द आहे असे दिसते. (सौजन्य इंग्रजी विक्शनरी चु.भू.दे.घे.)

In reply to by माहितगार

पैसा Sat, 06/28/2014 - 16:55
ल चा क असं नाही ते. कारण 'सगळ्यांना' याचं कोंकणी/मालवणीत 'सगळ्यांक' देवाला = देवाक त्यांना = तांका अशी रूपे आहेत. हे काही प्रत्यय स्वतंत्रपणे विकसित झाले असावेत. पूर्वीही कधीतरी मी लिहिले होते की ज्ञानेश्वरीतील मराठी ही कोंकणीला जास्त जवळची वाटते. त्याच दरम्यान कोंकणी स्वतंत्रपणे विकसित होऊ लागली असावी. नंतर पोर्तुगीज अमंलात गोवा कोकणापासून वेगळा पडत गेला. १५६० नंतर. तेव्हा ही प्रक्रिया अधिक वेगाने झाली असावी. याबाबत काही ठामपणे बोलण्यासाठी शौरसेनी आणि महाराष्ट्री प्राकृतबरोबर मराठी, मालवणी आणि कोंकणी यांची तुलना करावी लागेल. book इ.स. १५२६ मधलं कृष्णदास शामा या गोव्यातल्या लेखकाच्या पुस्तकाचं एक पान (आंतरजालावरून साभार) बघा. त्या काळात गोव्यात बोलल्या जाणार्‍या भाषेचा नमुना इथे दिसेल. जुनी मराठी, गोव्यातली कोंकणी आणि मंगलोरकडची कोंकणी या तिनांचे मिश्रण वाटते. तुकाराम, तुकाई, इ. विशेषनामे आहेत. त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही माहिती किंवा अंदाज नाही. कदाचित प्राकृत्/संस्कृतचे अपभ्रंश किंवा काही पूर्ण स्थानिक संदर्भ असू शकतात.

In reply to by पैसा

माहितगार Sat, 06/28/2014 - 21:14
पूर्वीही कधीतरी मी लिहिले होते की ज्ञानेश्वरीतील मराठी ही कोंकणीला जास्त जवळची वाटते.
आपला प्रतिसाद वाचून "कृष्णदास शामा" गूगलवर शोधले तर योगायोगाने बहुधा आपण म्हणताहात त्याच धाग्यावर (आमचें गोंय - भाग ११ - कोंकणी भाषा – इतिहास आणि आज) पोहोचलो. कोकणी भाषेची सगळीच माहिती माझ्या करता नवीन आहे. शोधतो आणि वाचतो आहे.

In reply to by माहितगार

पिशी अबोली Tue, 07/01/2014 - 15:26
'क' चा फॉर्म असणारा द्वितीयेचा प्रत्यय इंडो-आर्य भाषांमधे एकमेव नाही. हिंदीमधे 'उसको', 'रामको' यातही तो दिसतोच ना.. कोंकणी भाषेचा विकास काही नेहमीच मराठीवर अवलंबून नव्हता, त्यात काही स्वतंत्र गोष्टीही होत्या असे मान्य करायला हरकत नसावी. बाकी इंडो-युरोपीय भाषांमधे सर्वनामांचे फॉर्म्स सारखे सापडणं अगदीच शक्य आहे. मात्र आफ्रिकन वगैरे भाषांमधे इं.यु. भाषांच्या प्रभावामुळे हे घडण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. दोन वेगवेगळ्या भाषांमधे सारखे फॉर्म्स सापडले म्हणून त्यांचा संबंध असेलच असं नाही. केवळ योगायोग म्हणून अजिबात संबंध नसलेल्या भाषांमधे सारखेपण असल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यातही अशा इतक्या दूरच्या भाषांमधे सर्वनामे बदलण्याइतका भाषांचा प्रभाव असावा हे तर अगदीच अशक्य.

In reply to by पैसा

माहितगार Sun, 06/29/2014 - 06:41
मराठीतला आम्ही अहं ला जवळचा दिसतो. अहं च्या विभक्ती रूपांमधे मयि, मम, मह्यं "मी" दिसतो. वयं हा we ला जवळचा वाटतो.
अवेस्तन भाषेत मी शब्दा करता azǝm हा शब्द दिसतो यातील ǝ हे अक्षर AVESTAN LETTER AE ला मॅच करते (ǝ ए आणि ऐ च्या मधले अजून एक उच्चारण असेल ?) (संदर्भ: इंग्रजी विक्शनरी; इंग्रजी विकिपीडिया) azǝm हे उच्चारणे अझॆम असे काही होत असेल संस्कृत अह्म् शी जवळचे वाटते का ? (चुभूदेघे)

पिशी अबोली Tue, 07/01/2014 - 15:29
या धाग्यावर मिपावरील लोकांना अवगत असणार्‍या मराठीच्या/ मराठीशी संबंधित बोलींमधील सर्वनामांच्या विभक्तींचे संकलन झाले तरी खूप फायदा होईल.

In reply to by पिशी अबोली

माहितगार Wed, 07/02/2014 - 15:54
सहमत, ९०००च्यावर हिट्स असूनही त्या मानाने प्रतिसाद संख्या कमी असल्याने हिरमुसल्यासारखे वाटते आहे. (९००० हिट्स देणार्‍यांना आपापल्या बोली भाषा नाहीत असे कसे होईल ?) त्यातच आलेले आपले प्रोत्साहनात्मक प्रतिसाद पाहून आशा बाळगून आहे. खरे म्हणजे शब्दचर्चा जेवढी पुढे जाईल तेवढी रोचक होईल असे वाटते.

In reply to by माहितगार

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 09:44
९००० हिट्स मध्ये माझीही एक हिट आहे. एकतर ९००० हिट्स म्हणजे ९००० 'जणांनी' वाचन केले की ९००० 'वाचने' झाली? ह्यात एकाच सदस्याची २-२, ४-४ वाचने असू शकतात. दूसरे असे, भाषेविषयी तुम्हा सर्वांइतका अभ्यास नसल्याकारणाने पण धागा वाचनिय असल्यामुळे मी वाचनमात्र आहे. माझा कडून कणभर माहिती म्हणजे मस्कतच्या अरेबिकात (आखातात प्रदेशप्रदेशात अरेबिक भाषा किंचित बदलते) 'मी' ला 'अना' हा शब्द वापरतात तर 'तू' साठी 'एन्ते' हा शब्द वापरतात पण त्यात परत ज्या व्यक्तीशी आपण बोलत असतो ती जर 'स्त्री' असेल तर 'तू' साठी 'एन्ती' हा शब्द येतो. भारतिय भाषांमध्ये मल्याळम भाषेत 'मी'ला 'न्याम' हा शब्द वापरताना ऐकले आहे. गुजराथी भाषेत 'मी' साठी 'हूं' शब्द वापरतात तर 'तू' साठी 'तू'च वापरतात तसेच 'तुम्ही' साठी 'तमे' शब्द वापरतात.

विदर्भात सगळीकडे नाही, पण ग्रामीण भागात वापरले जाणारे काही शब्द/सर्वनामे मला - मपल्याला तुला - तुपल्याला माझी - मपली, माही, माह्या (माझ्या भावाला - माह्या भावाला) तुझी - तुपली आम्हाला - आम्हास्नी तुम्हाला - तुम्हास्नी ज्यांनी - ज्यास्नी त्यांना - त्यास्नी अजून आठवेल तसे लिहीत जाईन.

In reply to by मधुरा देशपांडे

माहितगार गुरुवार, 07/03/2014 - 18:38
अजून आठवेल तसे लिहीत जाईन.
अवश्य. बाकी पण वैदर्भीय मंडळी चर्चेत सामील होतील अशी आशा करूयात. झाडीबोली आणि वर्‍हाडी चर्चा बरीच वाचण्यात असते पण झाडीबोली अद्याप वाचण्यात आली नाही. कुणी झाडीबोलीचाही शब्द संग्रह आणि नमूना लेखन दुवा दिल्यास स्वागत असेल.

In reply to by माहितगार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/03/2014 - 19:13
झाडीबोलीचं पुस्तक होतं आत्ता सापडत नैये. :( ग्रंथालयात आहे उद्या शोधतो. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

सुनील Fri, 07/04/2014 - 08:54
कोकणात बर्‍याच बोली आहेत.
भाषा दर दहा कोसांवर बदलते असे म्हणतात. त्यात थोडेफार तथ्यदेखिल आहे. परंतु, हा सूक्ष्मपणे होत राहणारा बदल एका वेगळ्या बोलीत परिवर्तित होण्यासाठी केवळ अंतर (उदा १० कोस) हाच एकमेव निकष नसतो. महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा कोकणात अधिक बोली आहेत याचे प्रमुख कारण आहे भौगोलिक. कोकणात सलग ५ मैल सपाट प्रदेश नाही! एकादा डोंगर-दरी वा टेकाड अथवा खाडी आडवी येणारच! साहजिकच अगदीच आवश्यकता भासल्यासच मंडळी आपला पंचक्रोश ओलांडून बाहेर जाणार. उभे आयुष्य एखाद्या पंचक्रोशीतच घालवलेल्यांची संख्यादेखिल काही कमी नाही. आता दूर-दूरच्या प्रदेशांशी फारसा संपर्क-संवाद नसल्यामुळे बोलींचे संख्या वाढते. (पूर्वीच्या काळी, जेव्हा दळणवळणाची साधने फार नव्हती तेव्हा) हे देशावर तितक्या प्रमाणावर घडत/घडले नाही. काहीशा सपाट, पठारी प्रदेशामुळे दूरदूरच्या प्रदेशांशे सतत संपर्क येत राहतो आणि बोली/शब्दांची आदान-प्रदान होत राहते. साहजिकच, बोलींची संख्या थोडी कमी राहते.

पिशी अबोली Fri, 07/04/2014 - 11:49
पोर्तुगीज इन्क्विझिशन च्या काळात कोंकणीतील ग्रंथसंपदा जवळपास पूर्णपणे नष्ट झाली. बोलीभाषा म्हणूनही तिच्यावर अनेक मर्यादा आल्या. तरीही ती टिकून राहिली आणि तिला पर्याय नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी शेवटी धर्मप्रसारासाठी तिचा स्वीकार केला. त्यातून पुढे मिशनरी व्याकरणे तयार झाली. भाषेचे प्रमाणीकरण होण्यासाठी त्यात नियमितपणे तयार होणारे आणि वाचले जाणारे साहित्य असावे लागते. या काळात कोंकणी साहित्याची जी काही दुर्दशा झाली, त्यामुळे पुढे होऊ शकणार्‍या प्रमाणीकरणावरसुद्धा मर्यादा आल्या. पण निरनिराळ्या ठिकाणच्या आणि जातींच्या बोलींचा विकास तर होतच गेला. आणि मराठीच्या बाबतीत जसा पुण्यातील बोली तेवढी श्रेष्ठ आणि बाकीच्या अशुद्ध असा भाषकांचासुद्धा दृष्टिकोन आहे, तसा कोंकणीमधे फारसा आढळत नाही. या आणि इतर अनेक कारणांमुळे एक प्रमाण अशी कोंकणी तयार होण्याची प्रक्रिया फार हळू झाली/होत आहे. या धाग्यावर 'कोकणी' असा जो मराठीच्या बोलींमध्ये उल्लेख आहे, तो गोव्याच्या 'कोंकणी' भाषेसंदर्भात नसून, केवळ भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रात येत असल्याने 'मराठीच्या बोली' गणल्या गेलेल्या कोकणातील बोलींचा असावा असे मी गृहीत धरते. गोव्यातील कोंकणीला बोली म्हणायचेच असल्यास किमान 'मराठीची बोली' असे म्हणू नये अशी अपेक्षा आहे.

In reply to by पिशी अबोली

माहितगार Fri, 07/04/2014 - 12:15
या धाग्यासाठी अंशतः अवांतर आहे पण आपण मुद्दा काढला आहेत तेव्हा धागा लेखक म्हणून माझ अल्प स्पष्टीकरण. मी प्रमाणभाषांचा अहंकार जपत नसल्याने भाषिक उतरंडींचे वर्गीकरण व्यक्तीगत पातळीवर माझ्यादृष्टीने गौण मुद्दा आहे. भावनिक दृष्टीने गोवा माझ्यासाठी महाराष्ट्रराज्याचा अविभाज्य भाग आहे. (म्हणून गोवन कोकणी महाराष्ट्रीय-मी बृहन शब्द सुद्धा वापरत नाही- भाषा आहे महाराष्ट्रात जी भाषा बोलली जाते ती सर्व मराठीच अशी माझी मराठीची आग्रही व्याख्या आहे.) आणि अखिल भारतातील सर्वच भाषा आणि बोलींसाठी देवनागरी लिपीच्या वापराचा मी आग्रही पुरस्करताही आहे. अशा विषयांवर भूमिका व्यक्तीपरत्वे विभीन्न असू शकतात त्यांच्याशी सहमती असेलच असे नाही पण आदर असेल, माझी भूमीका कुणाला दुखावणारी असल्यास क्षमस्व. पण मुद्दा या धाग्यासाठी गौण असल्याने आपला मनमोकळा सहभाग चालू ठेवावा अशी प्रार्थना आहे. प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

पिशी अबोली Fri, 07/04/2014 - 12:26
व्यक्तिगत मतांचा इथे संबंध नाहीच आहे. भारतीय घटनेच्या 8th schedule मधील मान्यता मिळालेली कोंकणी ही भाषा आहे. संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे कोंकणीला मराठीची बोली गणली गेल्यास ते घटनेशी कॉट्राडिक्टरी ठरेल. या ठिकाणी तुमचे व्यक्तिगत मत आड येऊ नये असे वाटते. हा मुद्दा धाग्यासाठी गौण नाही असं मला वाटतं. तुमच्या यादीतील 'कोकणी' या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करावे.

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 12:28
संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे कोंकणीला मराठीची बोली गणली गेल्यास ते घटनेशी कॉट्राडिक्टरी ठरेल.
ठ्ठो =)) =)) =)) शांत भाषाधारी अबोली, शांत =))

In reply to by पिशी अबोली

माहितगार Fri, 07/04/2014 - 13:01
*शांत भाषाधारी अबोली, शांत या बॅटमनरावांच्या मताशी मी सहमत आहे. माझा प्रतिसाद इतरांना देताना द्विधा मनःस्थिती झाली नसती अबोलीताईंना प्रतिसाद द्यायचा म्हणजे मी दुसर्‍यांदा विचार केला होता हे खरे. बाकी अबोलीताईंची काही ठिकाणी गल्लत होतीए. प्रथमत: संबंधित उपक्रम विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे हे वाक्य जरा संबंधित उपक्रम मराठी विकिपिडियाशी संबंधित असल्यामुळे अस वाचाव. २) मराठी विकिपीडिया हा शासकीय प्रकल्प नव्हे. मराठी विकिपीडीया शासकीय धोरणांची नोंद घेतो पण शासकीय धोरणांशी बांधील असून फक्त शासकीय भूमीकाच मांडतो असे नव्हे. इतरही भूमीका मांडतो. ३) तुम्ही शासकीय धोरणांचा हवाला दिला असला तरी राजकीय आणि विशीष्ट पूर्वग्रहातून प्रभावीत मते म्हणून व्यक्तीगत आहेत आणि माझी व सोबत इतर अनेकांची मते वेगळी असू शकतात. आणि म्हणूनच हे सर्व धाग्याशी विषयांतर आहे हे मी मगाशीच स्पष्टही केले आहे या अर्थानेही अबोलीताईंचे मुद्दे जरासे गैर लागू ठरतात. ४) कोणत्याही चर्चेतील माझी व्यक्तीगत मते मी मराठी विकिपीडिया लेखात लादत नाही (खूप दक्ष असतो) पण इतरांच्या उल्लेखनीय मतांची समतोल दखल घेत असतो. या चर्चा धाग्यांमधून केवळ मजकुर गोळा केला जातो आहे, मराठी विकिपीडियातील लेखातील मजकुर काय असावा याची चर्चा संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर होऊन मराठी विकिपीडियातील संपादक मंडळी सामुहीक (लोकशाही नव्हे) निर्णय घेतात. तुम्हाला जेवढ्या तातडीने प्रतिक्रीया दिली तेवढ्या तातडीने मराठी विकिपीडियावरील चर्चा पानांवर मी सहसा प्रतिक्रीया देत नाही आणि माझी तटस्थता पाळत असतो इतरांची पुरेशी चर्चा झाल्या शिवाय सहसा हस्तक्षेप करत नाही त्या बद्दल चिंता नसावी. ५) पण शेवटी मराठी विकिपीडिया मराठी लोकांसाठी आहे आणि मराठी उत्कर्षार्थ जर चौकटीच्या बाहेर जाऊन काम करावे लागले तर तेही करतो. पण मुख्य म्हणजे या सर्वातून घेण्यासारखा मुद्दा मराठीची व्याख्या मी व्यापक ठेवतो संकुचीत ठेवत नाही हा सकारात्मक भाग तुम्हाला आणि सर्वांना आवडेल असा विश्वास आहे.
मराठी विकिपीडिया आणि त्याचे विकिस्रोत, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पांच्या माध्यमाने इतर भाषातील माहिती आणि ज्ञान मोठ्या प्रमाणात मराठीत अनुवादीत करून आणण्याची क्षमता आहे. यात चपखल आणि सुलभ मराठी शब्दांचा उपयोग व्हावा म्हणून शब्द संग्रहाची मोठीच गरज भासते. इतर ऑनलाईन शब्दकोश उपलब्ध असलेतरी शब्दांच्या सखोल अर्थछटा आणि सविस्तर व्याकरण विषयक माहिती आंतरजालावर अपवादानेच उपलब्ध असते.

भारत वि. इंग्लंड क्रिकेट मालिका - २०१४

श्रीगुरुजी ·

एस Wed, 06/25/2014 - 13:22
बीसीसीआयच्या संघाला हरवून पुन्हा फॉर्मात येण्याची इंग्लंडच्या संघाला सुवर्णसंधी आहे. :-|

In reply to by एस

अनुप ढेरे Wed, 06/25/2014 - 13:51
कुक नक्की फॉर्ममध्ये येणार. ओपनिंगला विजय/धवन ऐवजी शर्माही चालेल. गंभीरही फार दिवे लावेल असं वाटत नाही. पण वर म्हटलं तसं, ब्याटिंगची भिस्त ३-४-५, कोहलीम पुजारा आणि रहाणेवर आहे. नॉटिंगहममध्ये पहिली मॅच आहे हे पाहून झहीरची आठवण झाली. बॉलिंग मध्ये झहीर असायला पाहिजे होता. झहीर, भुवनेश्वर आणि शर्मा. प्रॅक्टिस म्याचेस आहेत २ ते चांगलं आहे. मागच्या वेळेला हार झाल्याचं कमी प्रॅक्टीस मॅचेस हे एक कारण होतं.

In reply to by एस

एस Mon, 08/18/2014 - 18:52
चला, बीसीसीआयच्या संघाला पुनरेकवार हरल्याबद्दल किंचित सहानुभूती आणि इंग्लंडच्या संघाचं विजयाबद्दल जोरदार अभिनंदन. आगामी भारत दौर्‍यातही इंग्लंडला अशाच सुवर्णसंधी पुन्हापुन्हा देत रहा बरं का रे. (इथून पुढचं जाहीर लिहिण्यासारखं नसल्याने फक्त मनातल्या मनात. कसंय, तुम्हांला जरी लाजीरवाण्या पद्धतीनं हरल्याबद्दल शब्दशः लाज वाटत नसली तरी आम्हांला अपशब्द जाहीरपणे वापरायची लोकलाज अजूनही वाटते.)

सौंदाळा Wed, 06/25/2014 - 14:18
ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो.
याऐवजी मी ईशांत शर्मा भारतात बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. असे म्हणेन. मागच्या ईग्लंड दौर्‍यावर (तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण असताना आपण सपाटुन हारलो होतो तो दौरा) ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती. बाकी कालची कसोटी थरारक झाली. अंडरसन एक चेंडु शिल्लक असताना आउट झाला. आणि हीच स्थिती श्रीलंकेची पहील्या कसोटीला होती आणि त्यांनी सामना अनिर्णयीत ठेवण्यात यश मिळवले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 16:51
>>> बाकी कालची कसोटी थरारक झाली. +१ जबरदस्त कसोटी झाली. इंग्लंडने पराभव टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा कसोटीतला फक्त १ चेंडू शिल्लक असताना त्यांना हार पत्करावी लागली. पहिल्या डावात १०८ धावांनी मागे असताना सुद्धा श्रीलंकेने झुंझून विजय मिळविला.

कपिलमुनी Wed, 06/25/2014 - 14:37
फार फार दिवसांनी क्रिकेटवर मोठा लेख आला.. प्रत्येक पिढीचे आवडते हीरो असतात.. ते रीटायर झाले की आवड कमी होते .. तसाच कहीसा झाला आहे. सध्याच्या टीम मधे अजून तरी फार इंटरेस्ट नाहिये.. बादवे ते ष्टकार नावाचा पाक्षिक मिळता का अजून ?

पामर Wed, 06/25/2014 - 16:12
ह्याच दौ-यात अजुन एक आकर्षण म्हणजे ५ जुलै रोजी क्रिकेट पंढरी-लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI' असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला आहे. MCC च्या संघात -सचिन तेंडुलकर (कर्णधार),ब्रायन लारा, राहुल द्रवीड,ब्रेट ली,शिवनारायण चंद्रपॉल व इतर खेळाडु आहेत तर उर्वरीत जगाच्या संघात- शेन वॉर्न (कर्णधार),अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मुथैया मुरलीधरन,शाहीद आफ्रिदी,केवीन पिटर्सन ,युवराज सिंग वगैरे खेळाडु आहेत.भारतात स्टार चॅनल वर हा सामना दा़खवणार आहेत. *clapping*

In reply to by पामर

असंका Wed, 06/25/2014 - 16:34
लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI'
मेलबर्न असा उच्चार आहे का? मला वाटायचे मेरिलबोन (Marylebone)!!

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 17:04
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बहुतेक मधूसुदन पानसरेला (आणि रवि बोपाराला) पाचारण करतील असं वाटतंय. केव्हिन पीटरसनलाही परत बोलावतील का? (तो परत यावा अशी इच्छा आहे)

फारएन्ड गुरुवार, 06/26/2014 - 09:36
झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 12:28
>>> झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? झहीर हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे ब्रह्मास्त्र होता. त्याने ९ सामन्यात २१ बळी घेऊन जवळपास प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. आता तो संघात नाही त्याची ३ कारणे आहेत. १) झहीर २०११ च्या विश्वचषकानंतर त्याचा फॉर्म हरपला आहे. आजतगायत त्याला फॉर्म परत मिळविता आलेला नाही. ज्या मोजक्याच सामन्यात तो खेळला, त्यात तो निष्प्रभ ठरला. आयपीएल मध्ये सुद्धा तो चमकलेला नाही. २) त्याला तंदुरूस्तीची तीव्र समस्या आहे. १-२ सलग सामने खेळले की तो मोडतो आणि नंतर ५-६ महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असतो. ३) तंदुरूस्तीमुळे त्याला पुरेसा सराव मिळत नाही व त्यामुळे तो ज्या सामन्यात खेळतो त्यात चमकत नाही. >>> रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. रोहीत शर्मा २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगला खेळला होता. परंतु एकंदरीत तो अपवाद वगळता परदेशात तो बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे. तो, अश्विन आणि ईशांत शर्मा हे धोनीचे लाडके असावेत असं वाटतंय, कारण अनेकवेळा अपयशी ठरल्यानंतर ते परत परत संघात दिसतात. >>> स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. मुनाफ २०११ च्या विश्वचषकानंतर पूर्णपणे निष्प्रभ आहे. त्याला नाही घेतलं तेच बरं केलं. >>>> सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? इरफान पठाणला गेल्या ३-४ वर्षात अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. २०१२ मध्ये बांगला देशात झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत बांगला देश विरूध्द त्याने व प्रवीणकुमारने अत्यंत सुमार गोलंदाजी करून तब्बल २९० धावांचे लक्ष्य बांगलाला सहज पार करून दिले होते. >>> गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा. सहमत! धोनीला आपल्या कर्णधारपदाच्या सुरूवातीच्या कालखंडात वरीष्ठ खेळाडूंची सतत भीति वाटायची. आपण थोडेसे अपयशी ठरलो तर आपल्याकडून कर्णधारपद हिसकावले जाऊन कोणत्यातरी वरीष्ठ खेळाडूच्या हातात नेतृत्वाची धुरा जाईल या दडपणामुळे त्याने वरीष्ठ खेळाडूंना सतत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. २००७ च्या ट-२० च्या विश्वचषकात सुद्धा त्याने वरीष्ठ खेळाडूंना ने घेण्याच्या अटीवर कर्णधारपद स्वीकारले होते. गंभीर, सेहवाग, सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, झहीर, हरभजन आणि कुंबळे या वरीष्ठ खेळाडूंपैकी ५ जण निवृत्त झाले असून उरलेले ४ जण अजून खेळत आहेत. त्यापैकी तिघेजण संघात नाहीत. त्यामुळे धोनीला फारशी भीति नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे गुरुवार, 06/26/2014 - 16:39
पठाण बद्दल सहमत. प्रवीण कुमार चालला असता. मागच्या दौर्‍यात जीव तोडून बोलिंग केली होती.

नाखु गुरुवार, 06/26/2014 - 11:17
पण ते चेन्नई सुपर किंग मध्ये आहेत हे जास्त महत्वाचे निवडीसाठी.मोहीत शर्माला पण संधी त्यामुळेच मिळाली. खरे खोटे "श्री" जाणे! आप्ण गुमान पहाणे!

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 22:33
सुरूवात तर चांगली झाली. आजच्या पहिल्याच सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारताने ४० षटकांत ४ बाद ३३३ अशी चांगली कामगिरी केली. त्यातल्या मुरली विजय (२०) व कोहली (२९) वगळता इतरांनी चांगल्या धावा केल्या. गंभीर, धवन व पुजाराने अर्धशतक केले.

श्रीगुरुजी Sun, 06/29/2014 - 21:10
पहिला सराव सामना पावसामुळे फक्त २ दिवस चालला. भारतीय फलंदाजांनी बर्‍यापैकी फलंदाजी केली. गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाल्ला. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ३ फलंदाज बाद करता आले. असो. या सामन्याच्या निमित्ताने थोडा सराव तरी झाला. अजून एक सराव सामना बाकी आहे. नंतर ९ जुलैला पहिला कसोटी सामना सुरू होईल. सध्या विश्वचषक फूटबॉल फिव्हरमध्ये आणि त्याचवेळी विम्बल्डन सुरू असताना क्रिकेट थोडे निस्तेज झाले आहे. विंडीज वि किवीज आणि इंग्लंड वि. लंका या सामन्यांच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रात येत नव्हत्या. साधारणपणे १५ जुलैनंतर क्रिकेटला परत चांगले दिवस येतील.

श्रीगुरुजी Wed, 07/02/2014 - 12:43
कालपासून भारताचा दुसरा सराव सामना डर्बीशायर विरूद्ध सुरू झाला. आधीच्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ५ फलंदाज बाद करता आले. दोन्ही सामन्यात मिळून एकूण २ दिवसांच्या गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांना जवळपास ६६५ धावांच्या मोबदल्यात फक्त ८ गडी बाद करता आले आहेत. एकंदरीत गोलंदाजांचे या दौर्‍यावर हाल होतील असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 12:46
दुसरा सराव सामना भारताने जिंकला. पहिल्या दोन्ही सराव सामन्यात भारताची फलंदाजी बर्‍यापैकी झाली. पण गोलंदाजांनी बराच मार खाल्ला. स्थानिक संघाविरूद्ध त्यांना फारसे बळी मिळविता आले नाहीत. अर्थात हे नेहमीचंच रडगांणं आहे. आता ९ जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. बघूया काय होतंय ते. सलामीला मुरली विजयला न घेता गंभीरला घेतील असं वाटतंय. रहाणे देखील आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रोहीत शर्माला बाहेर बसावं लागेल. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जडेजा आणि ईशांत शर्मा नक्की आत येतील.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा Sat, 07/05/2014 - 15:25
तो १४/१६ च्या टीममधे कसा काय येतो परत परत??? मग ११ त आला तर खरेतर आश्चर्याच्या धक्क्याने आम्ही मरायलाच पाहिजे!

In reply to by पैसा

श्रीगुरुजी Sun, 07/06/2014 - 14:07
कितीही खराब खेळले तरी शर्मा बंधू (रोहीत आणि ईशांत) हे कायम १६ जणांच्या चमूत असतात. रोहीत शर्माला २०१२ मध्ये एकूण १४ एकदिवसीय सामन्यात खेळविले होते. त्यात त्याने एकूण १६८ धावा केल्या होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १३ सामन्यात एकूण ८५ धावा होत्या. तरीसुद्धा त्याला संघातून एकदाही वगळले नव्हते. श्रीलंकेत त्याच वर्षी झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १४ धावा केल्या होत्या (सर्वाधिक ८). इतका खराब खेळ करूनसुद्धा त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात त्याला निवडले होते. त्याच्यामुळे मागील ३-४ वर्षे रहाणे संघात असून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 20:41
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारतातील क्रिकेट मालिका बहुतेकवेळा 'स्टार' वर असतात. वेस्ट इंडिज, दुबई/शारजा, द. आफ्रिका व न्यूझीलॅंड येथील मालिका टेन क्रिकेट किंवा सोनी सिक्सवर असतात. पूर्वी या मालिका 'निओ'वर असायच्या. पण आता 'निओ' क्रिकेट प्रक्षेपणातून बाहेर पडलेलं दिसतंय आणि त्यांची जागा सोनी सिक्सने घेतलेली दिसतेय.

स्पार्टाकस Fri, 07/04/2014 - 22:44
आफ्रीदीसारखा वाचाळ आणि टिनपाट खेळाडू दिग्गज कधीपासून झाला ?? केवळ अंदाधुंद बॅटींग (जीदेखील गेली काही वर्षे चालत नाही) आणि कामचलाऊ बॉलींग करणारा महान झाला?

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी Sat, 07/05/2014 - 12:54
+१ आफ्रिदीप्रमाणेच विश्व संघात टिनो बेस्ट, सिड्ल्, तमीम इक्बाल इ. "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत. तर एम सी सी च्या संघात उमर गुल, शॉन टेट, व्हिटोरी, एरॉन फिंच, रीड असे "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 17:48
हरो किंवा जिंको, पण संध्याकाळी घरी आल्यावर ईंग्लंडच्या वातावरणातील कसोटी सामने बघणे नेत्रसुखद अनुभव असतो. फक्त दादा, सचिन, द्रविड आणि हो, वीरूही नसल्याने ती मजा यंदा कितपत येईल हा प्रश्नच आहे.

श्रीगुरुजी Wed, 07/09/2014 - 20:47
पहिल्या कसोटीत आतापर्यंत बरी फलंदाजी झाली आहे. कोहली व धवन अपयशी ठरले, तर पुजारा आणि रहाणे स्थिरावल्यावर बाद झाले. एकटा मुरली विजय किल्ला लढवतोय. भारताने किमान ४०० धावा करायला हव्यात.

सौंदाळा गुरुवार, 07/10/2014 - 17:40
दुसरा दिवस, जेवण ३४२/५. चांगल्या धावा झाल्या आहेत. अजुन किमान एक सेशन तरी भारताने खेळायला पाहीजे म्हणजे सामन्यावर पकड घेण्याची संधी मिळेल.

थॉर माणूस गुरुवार, 07/10/2014 - 18:02
धोनी उपखंडाबाहेरचं पहिलं शतक मारेल का याची उत्सुकता आहे... काय ते कळेलच पुढच्याच सेशनमधे. त्यानंतर (किंवा धोनी बाद झाला तर) डाव घोषित करतील बहुतेक.

स्पार्टाकस गुरुवार, 07/10/2014 - 23:45
भुवनेश्वर आणि शमीने इंग्लंडवर बॅटींगमध्ये गिलेस्पी-मॅकग्राथ प्रयोग केला आहे! (गिलेस्पी आणि मॅकग्राथ यांनी न्यूझीलंडविरुध्द १००+ ची पार्टनरशीप केली होती. मॅकग्राथने चक्क ६३ रन्स काढल्या होत्या!) अ‍ॅलीस्टर कूकला पुन्हा एकदा सस्त्यात गाशा गुंडाळावा लागला आहे. जाडेजा कदाचीत धोकादायक ठरु शकेल. एकून टेस्ट बोअरींग होणार नाही अशी अपेक्षा आहे.

श्रीगुरुजी Fri, 07/11/2014 - 09:58
भारताला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आज इंग्लंडच्या उर्वरीत फलंदाजांना बाद करून किमान १५० धावांची भक्कम आघाडी घेतली पाहिजे. इयान बेल (आणि कदाचित मॅट प्रॉयर) हाच मोठा अडथळा आहे. उर्वरीत फलंदाज नवे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Fri, 07/11/2014 - 10:46
टू अर्ली टु से थिस.. खेळपट्टी खूपच निर्जीव आहे. आणि भारतीय गोलंदाजीची अवस्था फार काही चांगली नाहिये.. हाय स्कोरींग ड्रॉची शक्यता जास्त आहे..

आतिवास Sat, 07/12/2014 - 17:39
दोन्ही संघांच्या तळातल्या फलंदाजांनी (अर्थात रूट काही तळातला फलंदाज नाही म्हणा) जो खेळ केला, त्यावरून क्रिकेट मध्ये किती अनिश्चितता असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला!

श्रीगुरुजी Sat, 07/12/2014 - 20:53
भारतीय गोलंदाज विशेषत: इशांत शर्माने आज पुन्हा एकदा मठ्ठ बैलासारखी गोलंदाजी केली. इंद्रसेन (अ‍ॅण्डर्सन) मागील ३-४ डावात उसळत्या चेंडूवर बाद झाला होता. २९८/९ असताना तो खेळायला आल्यावर त्याला बाद करण्यासाठी शर्मा व इतरांनी त्याला सातत्याने फक्त उसळते चेंडू टाकले. पडणारा प्रत्येक चेंडू हा उसळताच असेल हे गृहीत धरून अशा चेंडूचा सामना करण्यासाठी तो आधीच तयार असायचा आणि असे सर्व चेंडू त्याने सहजगत्या खेळून काढले व भरपूर धावा करून गोलंदाजांना रडविले. उसळता चेंडू अनपेक्षितरित्या अंगावर आला तर बाद होण्याची शक्यता असते. पण येणारा प्रत्येक चेंडू हा छाती किंवा खांद्यापर्यंत उसळणार आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा असे चेंडू खेळण्याच्या तयारीनेच फलंदाज उभा असतो. इंद्रसेनला सातत्याने उसळते चेंडू टाकण्याऐवजी यॉर्कर, स्लोअर वन, आत/बाहेर जाणारे चेंडू अशी विविधता आणली असती तर तो लवकर बाद झाला असतो. असो. भारताने सुरवातीला २०२/७ व नंतर २९८/९ अशा उत्तम परिस्थितीतून मोठी आघाडी घ्यायची संधी आपल्या करंटेपणाने घालविली. आता सामना अनिर्णित होण्याचीच शक्यता आहे.

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 11:47
मला वाटते अधिकृत कसोटी सामने झाल्या पासून बहुदा हा एकच सामना असावा ज्यात दोन्ही बाजूच्या शेवटच्या भागीदारीसाठी १०० पेक्षा जास्त धावा झाल्या असाव्यात. क्रिकेट हा खेळ किती विचित्र आहे !

In reply to by आतिवास

ज्यो रूट आणि अँडरसनने भारतीय गोलंदाजाच्या नाकात दम आणला अतिशय निष्प्रभ गोलंदाजी. १९५ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि कसोटीने अनिर्नित अवस्थेकडे प्रयाण केले. शेवटच्या विकेटसाठी इतकी भागीदारी व्हावी अतिशय लज्जास्पद आहे भारतीय गोलंदाजीसाठी. बाकी, विश्वचषक फूटबॉल संपला की इकडे हजर होत राहीन. :) -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sun, 07/13/2014 - 20:34
सामना अनिर्णित होणार हे नक्की. दुसर्‍या डावात चहापानाला भारत ३४७/८. उर्वरीत वेळात भारताचे उर्वरीत फलंदाज बाद करून सामना जिंकणे इंग्लंडला अशक्य आहे. पहिले ३ दिवस भारताने वर्चस्व राखले होते. आज ५ व्या दिवशी ३९ धावांनी मागे पडलेल्या भारताची अचानक ६ बाद १८४ अशी अवस्था झाली तेव्हा भारताकडे फक्त १४५ धावांची आघाडी होती व दिवसातली किमान ७७ षटके शिल्लक होती. अचानक इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली. परंतु बिन्नी, जडेजा व भुवनेश्वर कुमार यांनी उत्तम फलंदाजी करून भारताला पराभवापासून खूप लांब नेले आणि आता उर्वरीत ३१ षटकात सामन्याचा निकाल लागणे अशक्य आहे. एकंदरीत या सामन्यात कोहली (व काही प्रमाणात धवन) वगळता इतर सर्वांनी किमान एका डावात फलंदाजीत चांगले योगदान दिले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शमी व शर्माने बर्‍यापैकी गोलंदाजी केली. अर्थात शेपटाने त्रास देण्याची परंपरा याही कसोटीत सुरू राहिली. तळाच्या २-३ फलंदाजांना बाद करणे हे भारतीय गोलंदाजांसाठी अवघड काम होऊन बसले आहे. असो. पुढील कसोटीत हाच संघ कायम राहील असे वाटते. अश्विन किंवा वरूण एरॉनला आत यायची संधी दिसत नाही. दुसरा कसोटी सामना गुरूवारी १७ जुलैला लॉर्ड्स वर सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 11:48
आजपासून दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू होतोय. खेळपट्टी हिरवीगार असण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागतोय का याचीच उत्सुकता आहे.

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 11:55
जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून पाहावे कारण जादेजापेक्षा अश्विनचे फलंदाजीचे तंत्र जास्त चांगले आहे, शिवाय त्याने शतकही झळकावलेले आहे

In reply to by स्पा

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 14:45
- जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अश्विनचे क्षेत्ररक्षण अत्यंत भिकार आहे. - फलंदाजीत अश्विनच्या तुलनेत जडेजाने फारश्या धावा केलेल्या नाहीत. - भारताबाहेर दोघेही निष्प्रभ गोलंदाज आहेत. एकंदरीत दोघांपैकी कोणालाही घेतले तरी फारसा फरक पडत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 15:16
कसोटीत क्षेत्र रक्षण टी२० किंवा एकदिवसीय सामान्यैतके महत्वाचे दिसून येत नाही, कारण अगदी एक एक धावा वाचवताना कोणी दिसत नाही अर्थात अपवाद असेलच भारतभर दोघेही कुचकामी ठरलेले असले तरी आत्ताच्या इंग्लंड च्या पिचेस आणि माग्च्या दौर्यातल्या पिचेस ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे

In reply to by स्पा

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 15:27
तेंडुलकरांच्या सचिनला पण परत खेळण्यासाठी आवताण द्यावे. इथल्या काही मिपाकरांना(मी नव्हे) त्याच्याशिवाय करमत नाही.

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 13:05
रहाणे काल मस्त खेळला. त्याला बरेच दिवस कुजवले होते. पण मागील वर्षापासून कसोटीत संधी मिळताच त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली (आतापर्यंत ७ कसोटीत ३ अर्धशतके व २ शतके). धवन पूर्ण अयशस्वी ठरतोय. पुढच्या डावात त्याने धावा केल्या नाहीत तर गंभीर नक्की आत येईल. पुढच्या कसोटीत जडेजा किंवा बिन्नीऐवजी अश्विन नक्की आत येणार. कोहलीला साधारणपणे मालिकेच्या उत्तरार्धात सूर सापडतो. तो बहुतेक तिसर्‍या कसोटीपासून फॉर्मात येईल. सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Fri, 07/18/2014 - 14:44
***सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे. -त्याचा इरफान पठाण होऊ नये, ही सदीच्छा!!

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 20:46
जर कुकची कामगिरी सुधारली नाही किंवा जर इंग्लंडला ही मालिका जिंकण्यात अपयश आले तर कुकची कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊन (कदाचित संघातूनही हकालपट्टी होऊ शकते), इयान बेल कर्णधार होऊ शकतो. कदाचित ही मालिका संपण्यापूर्वीच हा निर्णय होऊ शकेल.

श्रीगुरुजी Sat, 07/19/2014 - 21:22
सामना चांगल्या अवस्थेत आहे. तिसर्‍या दिवशी दोन्ही संघाचे डाव संपून भारत २४ धावांनी मागे आहे. पण दुसर्‍या डावात आतापर्यंत भारत १ बाद १०७ अशा उत्तम स्थितीत आहे. सामना निर्णायक होण्याची दाट शक्यता आहे. आज दिवसअखेर भारताकडे अंदाजे १६० धावांची आघाडी असेल. उद्या ४ थ्या दिवशी भारताने चहापानानंतर १ तास खेळून अंदाजे ३७५ धावांचे आव्हान दिले तर ५ व्या दिवशी इंग्लंडला हिरव्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे. इंग्लंडतर्फे अ‍ॅण्डरसन (आतापर्यंत ३ डावात ९ बळी व २ डावात १०० धावा) व भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (आतापर्यंत २ डावात ११ बळी व ३ डावात १५७ धावा) जबरदस्त कामगिरी करत आहेत.

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 20:21
मस्त सामना चाललाय. इंग्लंडला आजच्या उर्वरीत २ तासात व उद्या ५ व्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या ३१९ धावा करणे अवघड आहे. भारताला सामना जिंकून मालिकेत सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भुवनेश्वर पुन्हा एकदा चमकला. २ कसोटीत ४ डावात २०० हून अधिक धावा (त्यात ३ अर्धशतके) आणि आतापर्यंत ११ बळी ही जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आहे. मुरली विजय सुद्धा उत्तम खेळतोय. कोहली अजून अयशस्वी आहे (अनुष्काचा पायगुण ?). परंतु मालिकेच्या उत्तरार्धात तो नक्की भरात येईल.

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:32
मस्त जिंकलो. कालच लिहिल्याप्रमाणे आज भारताला चांगलीच संधी होती. अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 07/21/2014 - 21:48
तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.
आणि मग-
अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!
धन्य!! अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:25
काल ईशांतने चांगली गोलंदाजी केली हे मान्य आहे. परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे. त्याला कालच्या विजयाचे क्रेडीट आहेच. त्याच्याबरोबरीने भुवनेश्वर कुमारलाही (४४ आणि ५२ धावा आणि पहिल्या डावात ५ बळी) सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता. पहिल्या कसोटीतही भुवनेश्वरला डावलून जेम्स अ‍ॅण्डरसनला सामनावीर पुरस्कार दिला होता (भुवनेश्वर ५८ आणि नाबाद ६३ धावा आणि पहिल्या डावात ६ बळी). >>> >>> अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते. काल भुवनेश्वर कुमार खूप बळी मिळवेल असे वाटत होते. प्रत्यक्षात त्याला एकही बळी मिळाला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Tue, 07/22/2014 - 13:39
परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे
सहमत.. कालचा विजय त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइंट ठरो .. आणि याआधीचा "तो" ईशांत परत न येवो!! :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु गुरुवार, 07/24/2014 - 11:27
त्याची "केस" फारच डोळ्यावर आणी हाताबहेर झाली होती आता "सावरून" जाग्यावर येईल अशी अपेक्षा. पण काही करा भुवीचा "पठाण" करू नका!!

In reply to by नाखु

असंका Fri, 07/25/2014 - 19:35
बर्‍याच लोकांना धक्का बसला आहे म्हणे इशांतच्या खेळण्याचा! त्याने पाँटिंगची काय भंबेरी उडवली होती ती तरी आठवायची!

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 07/25/2014 - 20:51
त्याने पॉंटिंगची एकाच डावात भंबेरी उडविली होती आणि ती सुद्धा जानेवारी २००८ मध्ये (म्हणजे तब्बल साडेसहा वर्षांपूर्वी). त्यानंतर किमान २०१३ अखेरीपर्यंत तो फारसा चमकला नाही. काही सामने तर त्याच्या खराब गोलंदाजीमुळे आपण हरलो. उदाहरणार्थ नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात ७ एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यातल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ३ षटकात तब्बल ४७ धावा हव्या होत्या व त्यांचे ६ खेळाडू बाद झाले होते. दुसर्‍या कोणत्याही संघाने इतका हातात आलेला सामना क्वचितच घालविला असता. त्या सामन्यात इशांत शर्माने ४८ वे षटक टाकताना सर्व चेंडू लेगस्टंपवर आखूड टप्प्याचे किंवा फुल्टॉस या प्रकारचे टाकले. त्यात १ नोबॉलही होता ज्यावर फ्रीहिट सुद्धा मिळाली. समोर फॉकनर होता. त्याने त्या षटकात तब्बल ३४ धावा चोपून उर्वरीत २ षटकांत फक्त १३ धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण करून शेवटी जवळपास पूर्ण हरलेला सामना जिंकून दाखविला. इशांतची कामगिरी जानेवारी २००८ नंतर फारशी चांगली नव्हती. अर्थात २०१४ मध्ये तो सुधारल्यासारखा वाटतोय. जानेवारी २०१४ मध्ये द. आफ्रिकेत त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ४ बळी व दुसर्‍या डावात १ बळी अशी चांगली गोलंदाजी केली. नंतर न्यूझीलँडमध्ये दोन्ही कसोटीतल्या एकेका डावात ६-६ बळी मिळवून २ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक १६ बळी मिळविले. आणि सध्याच्या मालिकेत पहिल्या कसोटीत ३ व दुसर्‍या कसोटीत ७ बळी मिळवून "सामनावीर" झाला. एकंदरीत तब्बल ६ वर्षांनी परदेशात त्याला बळी मिळायला लागलेत. त्याचा हाच फॉर्म कायम रहावा हीच सदिच्छा!

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:32
पंचांचे काही निर्णय भारताविरूद्ध गेले नसते तर अजून सहज व लवकर सामना जिंकला नसता. दुसर्‍या डावात रहाणेच्या आर्म गार्डला लागून उडालेल्या चेंडूवर त्याला चुकीचे बाद दिले गेले. इंग्लंडच्या दुसर्‍या डावात ४ थ्या दिवशी मोईन अली जडेजाच्या गोलंदाजीवर अगदी अचूक पायचित झाला होता. पायावर चेंडू बसला तेव्हा तो क्रीजच्या आतच होता आणि रिप्लेमध्ये तो चेंडू मधल्या यष्टीवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. तरीसुद्धा धर्मसेनाने त्याला बाद दिला नव्हता. त्याच मोईन अलीने पुढे तब्बल २ तास खेळून १०१ धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या दिशेने न्यायला सुरूवात केली होती. या सामन्या साठी डी आर एस प्रणाली असती तर भारताला खूप फायदा झाला असता. जगात फक्त भारताचा डी आर एस ला विरोध आहे. या विरोधाचे कारण अनाकलनीय आहे.

तुषार काळभोर Tue, 07/22/2014 - 14:38
कूक- फॉर्म परत येतोय बहुतेक.... (संघातील स्थान राहील, कर्णधारपद जाऊ शकते, पण सध्यातरी इंग्लंडकडे दुसरा कर्णधार दिसत नाहिये.) धवन-दुसर्‍या डावातील मोजक्या धावांचा फार उपयोग होईल असे वाटत नाही, गंभीर वाट पाहतोय. बिन्नी-सध्या फक्त ३ पूर्ण गोलंदाज (भुवनेश्वर, शमी, इशांत), अन् २ 'फलंदाज-गोलंदाज' किंवा 'गोलंदाज-फलंदाज' (जडेजा अन् बिन्नी) आहेत. बहुतेक बिन्नी/जडेजा पैकी एकाला बसवून अश्विनला अंतिम संघात घेतील. (तो बर्‍यापैकी फलंदाजी सुद्धा करू शकतो.) भुवनेश्वरसुद्धा अडीनडीला उपयोगी पडू शकतो.

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 21:26
धवनला अजून एका कसोटीत संधी मिळेल. त्यातही तो अपयशी झाला तर गंभीर नक्की आत येईल. तिसर्‍या कसोटीत बिन्नीच्या जागी अश्विन आत यायची शक्यता आहे. इंग्लंडची तिसर्‍या कसोटीआधीच एक विकेट पडली आहे. तिसर्‍या कसोटीसाठी मॅट प्रॉयर च्या जागी जॉस बटलर ला यष्टीरक्षक म्हणून घेतले आहे. बेन स्टोक्स च्या जागी ख्रिस जॉर्डन किंवा ख्रिस वोक्स येण्याची देखील शक्यता आहे. इंग्लंडने खरं तर केव्हिन पीटरसन व जोनाथन ट्रॉट ला परत बोलवायला पाहिजे. जमल्यास ग्रॅमी स्वानला देखील निवृत्ती रद्द करून परत बोलवावे. भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 07/23/2014 - 10:45
भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.
त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). त्यातच हल्लीच त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता असे मित्राकडुन ऐकले होते.

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:41
>>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). लघुशंका हे कारण नसावे कारण अ‍ॅण्डरसन, पीटरसन आणि अजून एक खेळाडू या तिघांनी देखील रात्री मैदानात जाऊन खेळपट्टीवर लघुशंका केली होती. त्यातला अ‍ॅण्डरसन अजूनही संघात आहे. बहुतेक पानसरे फॉर्मात नसावा. अन्यथा भारताविरूद्ध त्याला नक्की घेतले असते.

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:53
दारूच्या नशेत खेळपट्टीवर केलेली लघुशंका असो वा दारूच्या नशेत वरच्या मजल्यावरून सोडलेली धार असो (एका बाऊन्सरच्या दुर्दैवाने तो नेमका त्याच धारखाली सापडला), दोन्ही कृती सारख्याच किळसवाण्या आहेत.

श्रीगुरुजी Mon, 07/28/2014 - 21:06
तिसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडने परत पाटा खेळपट्टी बनविली. इंग्लंड बहुतेक ५५० च्या आसपास डाव घोषित करेल असं वाटतंय. बिन्नीच्या जागी अश्विनला न घेता रोहीत शर्माला घेण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. अश्विन व रोहीत च्या फलंदाजीत फार फरक नाही, पण गोलंदाजीत खूप फरक आहे. पंकज सिंगचं दुर्दैव. त्याच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले व एक अत्यंत स्पष्ट असलेला पायचितचा निर्णय पंचांनी नाकारला. डी आर् एस् असती तर पायचित चा निर्णय भारताच्या बाजूने लागला असता. भारताचा डी आर् एस् असलेला विरोध अनाकलनीय आहे. तंत्रज्ञान हाताशी असून वापरायचे नाही या निर्णयामागे काहीच तर्कशुद्ध कारण नाही. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले श्रीनिवासन्, राजीव शुक्ला इ. मंडळी बीसीसीआय वर नागोबा सारखी वेटोळे घालून बसलेली आहेत. बीसीसीआय ची सूत्रे क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंच्या हातात असती तर असे अनाकलनीय निर्णय झाले नसते आणि कदाचित भ्रष्टाचारही कमी झाला असता. असो.

श्रीगुरुजी Tue, 07/29/2014 - 20:44
पाटा खेळपट्टीवर भारताची वाट लागलेली दिसतेय (आतापर्यंत ५ बाद २१७). एकटा रहाणे अर्धशतक काढून खिंड लढवतोय. मुरली विजय, पुजारा, कोहली आणि रोहीत शर्मा एक तासापेक्षा अधिक वेळ खेळून आणि प्रत्येक जण किमान ५२ चेंडू खेळून स्थिरावल्यावर मोठी धावसंख्या न करता बाद झाले. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑफ किंवा मधल्या यष्टीवर पडून बाहेर जाणारे चेंडू खेळणे त्याला अशक्य होताना दिसतंय. पुढच्या डावात काही केलं नाही तर गंभीर नक्कीच आत येणार. एकंदरीत परिस्थिती कठीण आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 12:45
फॉलोऑनची परिस्थिती असली तरी इंग्लंड फॉलोऑन न देता अंदाजे ३ तास फलंदाजी करून १६०-१७० धावा करून डाव घोषित करेल व दुसर्‍या डावात अंदाजे ८ तासाच्या खेळात भारतापुढे ३७५-४०० धावांचे आव्हान ठेवेल. २००१ मध्ये कलकत्त्यात दुसर्‍या कसोटीत स्टीव्ह वॉ ने भारताला फॉलोऑन दिला होता आणि नंतर भारताने लक्ष्मण-द्रविडच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर ५ व्या दिवशी १ तासानंतर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३००+ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भज्जीच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळून भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इतर सर्व देश फॉलोऑन देणे शक्य असूनही ५ व्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी टाळण्यासाठी फॉलोऑन न देता फलंदाजी करतात.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Wed, 07/30/2014 - 13:00
२००८ च्या चेन्नई कसोटित भारताने चौथ्या डावात ३८० चं आव्हान आरामात पार केलं होतं. (सेहवागमुळे ते शक्य झाले होते) त्यामुळे इंग्लंड ४५० पेक्षा कमी आव्हान ठेवील असे वाटत नाही.

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 13:18
तेव्हा फॉलोऑनची परिस्थिती नव्हती. इंग्लंडने अंदाजे ७ तासात भारताला ३७५ धावांचे आव्हान दिले तेव्हा भारताला ५ व्या दिवशी फलंदाजी करणे अवघड जाईल असाच इंग्लंडचा अंदाज होता. तसेच भारत हे आव्हान न स्वीकारता बचावात्मक खेळ करून सामना अनिर्णित ठेवायचा प्रयत्न करेल असाही इंग्लंडचा अंदाज होता. त्याला कारणही तसेच होते कारण भारताने भूतकाळात फक्त ४ वेळा ४ थ्या डावात ५ व्या दिवशी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. (१९७६ मध्ये विंडीजमध्ये तिसर्‍या कसोटीत ४०४ धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. त्यात गावसकर व विश्वनाथचे शतक, मोहिंदरचे अर्धशतक व ब्रिजेश पटेलच्या नाबाद ४९ धावांचा वाटा होता. नंतर १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताने ५ व्या कसोटीत ४७६ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ४५० धावा केल्या होत्या. नंतर १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने ४ थ्या कसोटीत ४३९ धावांचा पाठलाग करताना ८ बाद ४२९ पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर १९८६ मध्ये भारतात मद्रासमध्ये तिसर्‍या कसोटीत भारताने ३४८ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ३४७ धावा करून इतिहासातला केवळ दुसरा कसोटी सामना बरोबरीत सोडविला होता.) मात्र इतर प्रसंगी भारताने कच खाऊन ५ व्या दिवशी बचावात्मक खेळ करून सामना न हरण्याची दक्षता घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. १९८६ मध्ये इंग्लंडमधील ३ रा कसोटी सामना, १९९३ मध्ये आफ्रिकेतील ४ था कसोटी सामना, नंतर २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध आफ्रिकेतील ३ रा कसोटी सामना, २०११ मध्येच विंडीजविरूद्ध विंडीजमधील ३ रा कसोटी सामना इ.). त्यामुळेच कदाचित भारत ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करण्याचे धाडस करणार नाही असे गृहीत धरून स्ट्रॉसने डाव घोषित करून आव्हान दिले होते. पण सेहवागच्या ५८ चेंडूत ८५ धावा व सचिनचे नाबाद शतक यामुळे भारताने ३७५ धावांचे आव्हान लीलया पार करून सामना जिंकला. अर्थात त्या सामन्यात खेळपट्टी पाटा होती हे सुद्धा विसरून चालणार नाही.

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 20:47
जिंकायला ४४५ करायच्यात. अत्यंत अवघड लक्ष्य आहे. जवळपास १२० षटके ८ तासात खेळायची आहेत. जिंकणे जवळपास अशक्य आहे. सामना वाचविण्याची शक्यता देखील बरीच कमी आहे. चांगले तंत्र असलेल्या रहाणे, पुजारा व कोहलीवरच सगळी मदार आहे. इतरांची खात्री नाही. अर्थात माझे अंदाज खोटे ठरो हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

In reply to by श्रीगुरुजी

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/31/2014 - 15:16
देवपण नाही वाचवु शकला. प्रत्येक गोष्ट देवावर नका टाकु. मागची इंग्लंड मधली कसोटी मालिका विसरलात वाटते.

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 11:49
लॉर्ड्सवर भारतीय फास्ट बोलर्सनी बाउंसरवर विकेट काढल्या.. आणि आता ईंग्लिश पार्टटाइम स्पिनर्स स्पिन चांगल्याप्रकारे हाताळणार्‍या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स काढतायत ते पण ईंग्लिश खेळपट्टीवर.. दोन टोकाचे परफॉरमन्सेस !! बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. आणि हा सामना तर ऑलमोस्ट हरलाच आहे.. बाकी २ ड्रॉ करण्याचीच अपेक्षा आहे आता.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/31/2014 - 14:13
>>> बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. हे तितकेसे खरे नाही. भारताने १९६८ मध्ये न्यूझीलँड मध्ये ३-१ असा विजय मिळविला होता. १९७६-७७ मध्ये ऑस्ट्रेलियात २-३ अशी मालिका हरली होती. १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये २-० असा विजय मिळविला होता. १९७६ मध्येच भारताने न्यूझीलँडला न्यूझीलँडमध्ये २-१ असे हरविले होते. अर्थात ही तुरळक उदाहरणे आहेत. अगदी थोड्या मालिकांमध्ये भारताने एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 16:45
गेल्या दोन दशकात म्हणायचं होतं मला.. खास करुन अझरुद्दीनच्या संघाने १९९३ ला इंग्लंड्ला ३-० हरवून मायदेशात जिंकायची सवय लावल्यापासून.. त्यापूर्वी मायदेशातपण इतके जिंकत नसत..

सौंदाळा गुरुवार, 07/31/2014 - 17:55
हम्म जेवणापर्यंत सुध्दा दम धरला नाही आपल्या फलंदाजांनी. धवन, रोहीत शर्मा किंवा जडेजा, शामी, पंकजसिंग यांची गछंती होऊन गंभीर, अश्विन, अरॉन किंवा इश्वर पांडे, इशांत शर्मा आत येतील असे वाटत आहे. पुढची कसोटी ७-ऑगस्ट मँचेस्टरला होणार आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 11:07
पुढच्या सामन्यात धवन आणि रोहीत शर्मा गच्छंती होऊन गंभीर आणि अश्विन आत यावेत अशी इच्छा आहे. धवन नक्की बाहेर जाणार. परंतु रोहीत शर्मा हा धोनीचा 'ब्ल्यू आईड बॉय' असल्याने कितीही वाईट खेळला तरी तो संघात असतोच . त्यामुळे त्याची गच्छंती अवघड वाटतेय. (२०१२ मध्ये श्रीलंकेच्या दौर्‍यात ५ एकदिवसीय सामन्यात त्याने एकूण १८ धावा केल्या होत्या. तरीसुद्धा त्यानंतरच्या ट-२० मध्ये त्याला खेळवलंच. वास्तविक पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ०, ४, ४ अशी कामगिरी केल्यावर त्याला लगेच हाकलायला हवा होता. पण धोनीचा तो लाडका असल्याने त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले. पूर्वी रवी शास्त्री असाच गावसकर व डुंगरपूर यांचा कमालीचा लाडका होता.) पंकज सिंग दुर्दैवी ठरला. त्याच्या गोलंदाजीवर २ झेल सुटले. परंतु दुर्दैवाने त्यालाही कदाचित बाहेर काढून वरूण एरॉन/ईश्वर पांडे आत येण्याची शक्यता आहे. ५ गोलंदाज नको असेल तर बुद्धीमान साहा हा सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे. भारत खराब फलंदाजी, खराब गोलंदाजी व अत्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे हरला हे सत्य आहे. त्याच बरोबरीने पंचांची सदोष कामगिरी देखील इंग्लंडच्या विजयाला कारणीभूत ठरली. डी आर एस पद्धत असती तर भारताला बराच फायदा होऊ शकला असता. असो.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 08/01/2014 - 15:31
2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? आणि रोहित शर्मा एकुण किती कसोटी खेळला आहे की ज्यामुळे आपण तो लाडका असल्याचा निष्कर्ष काढला आहे?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 21:05
>>> 2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? रोहीत शर्माचे सुरवातीपासूनचे सर्व कसोटी डाव बघा (६ नोव्हेंबर २०१३ पासून आजतगायत). १७७, १११* (दोन्ही भारतात विंडीजविरूद्ध), १४, ६, ०, २५ (द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध), ७२, १९, ०, ३१* (न्यूझीलँडमध्ये किवींविरूद्ध), २८, ६ (सध्याच्या मालिकेत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध) भारतातल्या पाटा खेळपट्टीवर विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीसमोर तो २ डाव खेळला व दोन्ही डावात शतके केली. पण भारताबाहेर पडताक्षणी त्याच्या धावा बंद झाल्या. ७२ हा एकमेव डाव वगळता परदेशातील १० पैकी ९ डावात तो अपयशी आहे. त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की लागोपाठ अनेक डावात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात असतो. उदा. १७ फेब्रु २००८ ते ३ जुलै २००९ या अंदाजे साडेसोळा महिन्यांच्या कालावधीत तो एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळला. त्यात फक्त २ अर्धशतके (५८ आणि ६६)आणि एकदा ४३ व एकदा ३२ धावा केल्या होत्या. उर्वरीत २७ सामन्यात त्याने ० ते २८ च्या दरम्यान धावा केल्या होत्या. त्यात १५ वेळा त्याने एकेरी आकड्यात धावा केल्या आहेत (३१ पैकी १५ सामन्यात एकेरी धावा आणि त्यात ३ वेळा ०). तरीसुद्धा तो संघात टिकला. २०१० मध्ये त्याने तुलनेने काहीशी कामगिरी सुधारली. नंतर ११ डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१२ या अंदाजे साडेबारा महिन्यात तो एकूण १५ सामने खेळला. त्यात फक्त १ अर्धशतक (६८ धावा) होते. उर्वरीत १४ डाव तो ० ते ३३ या दरम्यान बाद झाला. त्यात १५ पैकी ८ डावात त्याने एकेरी धावा केल्या (त्यात ३ वेळा ०). जुलै २०१२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात खेळविले होते आणि त्याची कामगिरी होती ५, ०, ०, ४, ४. आश्चर्य म्हणजे या मालिकेपाठोपाठ लगेचच शेवटचा ट-२० सामना होता. ५ सामन्यात अपयशी ठरल्यावर निदान ट-२० मध्ये तरी त्याच्याऐवजी दुसर्‍या फलंदाजाला संधी द्यायला हवी होती. परंतु तो धोनीचा लाडका असल्याने या सामन्यात पण त्यालाच संधी मिळाली. त्याची कामगिरी बघता तो अनेकवेळा लागोपाठ अनेक सामने अपयशी ठरून सुद्धा त्याला वारंवार संधी मिळाल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यामुळेच रहाणेसारखा गुणी खेळाडू अनेक वर्षे संघाबाहेर राहिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 08/04/2014 - 00:54
सचिन आणि युवराजनंतर सर्वात शैलीदार फलंदाज आज रोहित शर्मा आहे. तो भरात असताना त्याचा खेळ ज्यांनी कुणी बघितला आहे ते हे अमान्य करू शकत नाहीत. मनोरंजन हा जर क्रिकेट बघण्याचा उद्देश आसेल तर रोहित एवढं मनोरंजन करणारा आज आपल्याकडे कुणीच नाही. पण हे माझं मत झालं. जसं रहाणे हा गुणी खेळाडू असल्याचं आपलं मत आहे तसंच. आपण आपली मतं स्वतंत्रपणे का मांडत नाही? माझ्या प्रश्नांच्या खालीच आपण आपली मतं मांडल्यामुळे माझा असा गैरसमज झाला की ही माझ्या प्रश्नांना आपली उत्तरे आहेत. आपल्या सोइसाठी माझे प्रश्न सोपे करुन सांगतो- 1. 2013 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या? 2. 2011 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या 3. रोहित हा आजपर्यंत सगळे मिळून एकूण किती कसोटी सामने खेळला आहे की ज्या आधाराने तो लाडका आहे असे दिसून येते?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Mon, 08/04/2014 - 12:50
रोहीतच्या कसोटी डावांची माहिती आधीच्या प्रतिसादात दिली आहे. त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. त्याची २०११ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (१२/१/२०११ ते ११/१२/२०११) (द. आफ्रिकेत) ११, ९, २३, १, ५, (वेस्ट इंडीजमध्ये) ६८*, ७*, ८६*, ३९, ५७, (इंग्लंडमध्ये) ०*, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, ९०*, ९५, २७, २१ ही कामगिरी अतिशय बोलकी आहे. परदेशात, विशेषतः आफ्रिकेत, तो कायमच अपयशी ठरताना दिसतो. ५ सामन्यांच्या मालिकेत पहिले ३ सामने अपयशी ठरूनही त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (११, ९, २३, १, ५). नंतर २०१२ मध्येही श्रीलंकेत पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ५, ०, ० अशी कामगिरी करूनसुद्धा त्याला वगळले जात नाही व उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (५,०,०,४,४). यावरून तो कर्णधाराच्या मर्जीतला आहे हे सिद्ध होतं. याच रोहीतची कामगिरी भारतात व विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीविरूद्ध एकदम सुधारते आणि त्या भांडवलावर तो संघात स्थान टिकवितो. पण इतर देशांविरूद्ध त्याची कामगिरी एकदम ढेपाळते. त्याने २०१२ मध्ये १३ एकदिवसीय सामन्यात एकूण १६८ धावा केल्या (त्यात फक्त एक अर्धशतक - ८३). ही अत्यंत खराब कामगिरी बघता त्याला एकदिवसीय सामन्यातून वगळायला हवे होते. पण तरीसुद्धा तो संघात होता. त्याची २०१३ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (२३/१/२०१३ ते ०८/१२/२०१३) (भारतामध्ये इंग्लंडविरूद्ध) ८३, ४ (चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये) ६५, ५२, १८, ३३, ९ (वेस्ट इंडिजमध्ये) ६०, ५, ४६, ४८*, ५८ (झिंबाब्वेमध्ये) २०, १, १४, ६४* (भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध) ४२, १४१*, ११, ९, ७९, २०९, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, १२, ४ (द. आफ्रिकेत) १८, १९ यावरून पुन्हा एकदा असंच दिसतंय की तो विंडीजविरूद्ध आणि बहुतेक वेळा भारतीय खेळपट्ट्यांवरच धावा करतो. इतर देशात त्याच्या धावा बहुतेक वेळा आटलेल्या दिसतात. अगदी झिंबाब्वेमध्ये सुद्धा ४ पैकी ३ डावात तो अपयशी होता. द. आफ्रिकेविरूद्ध तर तो कधीच धावा करताना दिसत नाही. त्याची २०१४ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (न्यूझीलँड मध्ये) ३, २०, ३९, ७९, ४ (बांगलादेश मध्ये) २१, १३, ५६, १८* विंडीजशिवाय इतर देशांमध्ये तो फारसा यशस्वी नसतो हे पुन्हा एकदा २०१४ वरून सिद्ध होतंय.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 08/07/2014 - 19:21
नाही हो, असं नाही. तीन वाक्यात उत्तर देता येत होतं. आपण अगोदर रोहितबद्द्ल टीका करताना कसं २०१३ मध्ये त्याने अमुक एवढे रन केले असं एका वाक्यात लिहिलं होतंत ना, तसंच. आता तुम्ही एक काम करा. खाली मी तयार वाक्यच देतो. त्यात गाळलेल्या जागा फक्त भरा- १. रोहित शर्माने २०१३ साली _____ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. २. रोहित शर्माने २०११ साली ________ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. ३. रोहित शर्मा सगळ्या मिळून आत्तापर्यंत ___ कसोटी खेळला आहे, ज्यावरून असे सिद्ध होते की तो कर्णधाराचा लाडका आहे.

देशपांडे विनायक गुरुवार, 07/31/2014 - 18:13
जडेजाने सोडलेला CATCH आणि रोहित शर्माने पहिल्या इंनिंग ला फेकलेली विकेट यामुळे हरण्याला पर्याय नाही असे दिसायला लागले होते ते शेवटी दिसलेच

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:20
वृध्दीमान साहा भारतात परतणार आहे .. बहुतेक दुखापतीमुळे. त्याच्याजागी नमन ओझाला बोलावले आहे. नमन ओझाने ऑस्ट्रेलियात ३ डावात १ द्विशतक आणि २ शतके केली आहेत त्यातही २ दा नाबाद. दोनही सामने ब्रिस्बेनच्या उसळत्या खेळपट्टीवर होते. तो वेळेत पोहोचला तर त्याची वर्णी लागावी असे वाटते. इशांत चौथा सामनाही खेळु शकणार नाही हे धोणीने कालच स्पष्ट केलय. त्यामुळे बदल होणार संघात हे नक्की. पण अति बदल टाळण्यासाठी कदाचित शमीला परत संधी मिळु शकेल. संघ असा असावा ४थ्या सामन्यासाठी असे वाटते. विजय, ओझा/ गंभीर, पुजारा, कोहली, रहाणे, धोणी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर, शमी, पांडे/ अ‍ॅरॉन

भाते गुरुवार, 08/07/2014 - 23:41
दहापैकी सहा खेळाडू शुन्यावर बाद! एका कसोटी सामन्यात सर्वाधिक खेळाडू शुन्यावर बाद होण्याचा जागतिक विक्रम काय आहे? सचिनने वयाच्या सतराव्या वर्षी इथेच आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते!

श्रीगुरुजी Mon, 08/11/2014 - 12:21
६-७ दिवस मिपा संकेतस्थळ बंद होते. तेवढ्यात चौथा कसोटी सामना सुरू होऊन ३ दिवसांत संपलादेखील. तिसर्‍या दिवशी शेवटच्या केवळ एका सत्रात भारताने ९ गडी गमावून स्वतःच्या आणि इंग्लंडच्या संघाचीही विश्रांतीची सोय केली. ते सत्र खेळून काढले असते तर उगाच चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये येऊन बसावे लागले असते आणि दिवसभर पावसाची दाट शक्यता असल्याने खेळही नाही आणि आउटिंग पण नाही अशी भारताची व इंग्लंडची कंटाळवाणी अवस्था झाली असती. ५ व्या दिवशीही तेच झाले असते. त्याऐवजी भारतीय खेळाडूंनी पटापट विकेट फेकून सर्वांचीच अडचणीतून मुक्तता केली. त्यामुळे विराट कोहलीला अनुष्काबरोबर फिरायला २ जास्त दिवस मिळाले. इतरांनाही फुकटचे २ दिवस पदरात पडले. भारताच्या पहिल्या डावात तब्बल ६ खेळाडूंनी शून्य धावा करून एका जागतिक विक्रमाची बरोबरी केली. या पराभवाबरोबर धोनी आता भारताच्या क्रिकेट इतिहासातील परदेशातील सामन्यातील सर्वाधिक अयशस्वी कर्णधार ठरलेला आहे. पूर्ण फॉर्म हरविलेल्या कुक ला भारतानेच मदतीचा हात दिला. भारताचे प्रमुख फिरकी गोलंदाज बळीसाठी झगडत असताना कामचलावू फिरकी गोलंदाज मोईन अली तब्बल १९ बळी मिळवून मुख्य गोलंदाज बनण्याचे श्रेय भारताचेच आहे. आपल्या पहिल्या बळीसाठी झगडणार्‍या बिचार्‍या पंकज सिंगला शेवटी २ बळी मिळाले हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू. असो. आता ५ व्या कसोटीसाठी भारताने जास्त विचार करू नये. उर्वरीत मोकळे दिवस सराव वगैरे सारख्या फालतू गोष्टीत वाया न घालविता शॉपिंग, आउटिंग, डेटिंग, पिकनिक इ. महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरावेत. संघ निवडीच्या वेळी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून पहिले ज्याचे नाव येईल त्याला कर्णधार करावे व उर्वरीत १० खेळाडू चिठ्ठ्या टाकून उचलावेत. कारण कोणीही संघात असले तरी काहीही फरक पडणार नाही. शेवटी पत्त्याच्या कॅटमध्ये जर सर्व ५२ पत्ते कर असले, तर कितीही वेळा पत्ते पिसले तरी काय फरक पडणार आहे?

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 17:44
लज्जास्पद पराभव. मोईन अली विकेट काढतो, जडेजा, अश्विन मात्र रिकामेच. लॉर्डस् वर जिंकलेला संघ हाच का असा प्रश्न पडलाय.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/14/2014 - 21:09
उद्यापासून शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. सुरवातीला १-० असा आघाडीवर असणारा भारत आता १-२ असा मागे पडला आहे. भारत परदेशात लागोपाठ मालिका हरत आहे. २०११ च्या विश्वचषक विजयानंतर भारत परदेशात एकूण ५ मालिका खेळला. त्यापैकी वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये भारत मालिका हरला. आता ही मालिकादेखील भारत हरण्याच्या मार्गावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत परदेशात खेळलेले १३ कसोटी सामने हरलेला आहे. याबाबतीत विक्रम ब्रायन लारा व स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर आहे. दोघेही कर्णधार असताना परदेशात एकूण १६ कसोटी सामने हरले होते. धोनी त्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. उद्या इशांत शर्मा आत येणार हे नक्की. बहुतेक पंकजसिंग बाहेर जाईल. कदाचित जडेजाच्या जागी स्टूअर्ट बिन्नी आत येऊ शकतो. बाकी सगळे "नेहमीचेच यशस्वी कलाकार" असतील. असो. निदान अंतिम कसोटीत तरी भारताने आपली गेलेली अब्रू काही प्रमाणात परत मिळवावी हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

श्रीगुरुजी Tue, 08/19/2014 - 12:15
भारतीय संघाला शिव्या द्यायची पण लाज वाटतीये. शिव्या द्यायची पण यांची लायकी नाही. लागोपाठ ३ वेळा एक-दीड सेशन मध्येच ऑलआऊट झाला याची धोनी किंवा इतर कोणालाही लाज, लज्जा, खंत, शरम इ. काहीही वाटत नाही. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटचा सत्यानाश झाला हे उघड सत्य आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलचे दुष्परिणाम २०११ मध्येच दिसू लागले होते. सचिन, द्रविड इ. चे तंत्र सुद्धा शेवटी शेवटी बिघडल्याचे दिसले त्याचे कारण आयपीएलच होते. द्रविडसारखा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज आपल्या शेवटच्या १५-१६ डावात बहुतेक वेळा त्रिफळा बाद झाला होता तो तंत्र बिघडल्यामुळेच. भारतातल्या पाटा खेळपट्ट्यांवर फलंदाजाला अनुकूल क्षेत्ररक्षक रचनेसमोर बॅट कशीही वेडीवाकडी फिरवून १५-२० चेंडू खेळून २५-३० धावा करणारे शूर वीर कसोटीत एकत्रित ३० षटके सुद्धा टिकू शकत नाहीत हे बघणे अत्यंत क्लेशदायक होते. पूर्वी गावसकर तब्बल २-२ दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करत असे. आताचे खेळाडू अर्धा तास सुद्धा टिकू शकत नाहीत हे अत्यंत दुर्दैव आहे. एवढी नामुष्की होऊनसुद्धा "उगाच आयपीएलवर जळू नका" असे अत्यंत निगरगट्टपणे धोनी बजावत होता. आयुष्यात हातात कधीही चेंडूफळी न धरलेल्या पुढार्‍यांनी जेव्हा बीसीसीआयमध्ये शिरकाव केला तेव्हाच भारतीय क्रिकेटच्या अधोगतीला सुरूवात झाली. ज्या ज्या क्षेत्रात पुढारी घुसतात त्या सर्व क्षेत्रांचा सत्यानाश होतो. भारतीय क्रिकेट सुधारण्याचे उपाय म्हणजे सर्वप्रथम या पुढार्‍यांना बीसीसीआय मधून हाकलून देणे आणि आयपीएल बंद करणे. जर आयपीएल बंद करणे शक्य नसेल तर निदान आयपीएलमध्ये न खेळणार्‍यांनाच कसोटी संघात निवडावे व आयपीएलमध्ये खेळणार्‍यांना फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळवावे. आणि तेही शक्य नसेल तर भारताने कसोटी क्रिकेट खेळणे थांबवावे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 08/20/2014 - 20:02
+१ शर्यतीचा बैल वेगळा, शेतीसाठी काम करणारा बैल वेगळा आणि 'ते' काम करणारा वळु वेगळा ;) क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 21:08
>>> 'ते' काम करणारा वळु वेगळा *LOL* >>> क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते. + १ सध्या एकच बदल लगेच करता येईल. कसोटीसाठी आयपीएल खेळलेले कमीतकमी खेळाडू निवडावेत.

श्रीगुरुजी Mon, 08/25/2014 - 12:24
आजपासून भारत वि. इंग्लंड ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. आजचा सामना ब्रिस्टलमध्ये भारतीय वेळेनुसार दु. ३ वाजता सुरू होईल. कसोटी सामन्यात माती खाल्लेल्या भारताने निदान एकदिवसीय सामन्यात तरी अब्रू राखावी. ५ सामन्यांपैकी निदान २ सामने तरी जिंकावेत. म्हणजे किमान लंगोटी तरी शाबूत राहील. आजपासून झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका यांच्यात झिंबाब्वेमध्ये तिरंगी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होत आहे. आज झिंबाब्वे वि. ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीय वेळेनुसार दु. १ वाजता सुरु होईल. आज विंडीज वि. बांगला यांच्यात देखील एकदिवसीय सामना आहे. तो सामना भा.प्र.वे. नुसार मध्यरात्री १२ वाजता सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/28/2014 - 12:47
काल चक्क जिंकलो आपण. तब्बल १३३ धावांनी जिंकलो. काही अपवाद वगळता संघातील सर्वांचीच कामगिरी उत्तम झाली. धवन आणि कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरले. कोहलीला आता काही काळ विश्रांती द्यायची वेळ आली आहे. त्याची पूर्वपुण्याई संपत आली आहे. तिकडे झिंबाब्वेमधील तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत तब्ब्ल ३२७ धावा करून सुद्धा पराभव पदरी पडला. द आफ्रिकच्या फाफडू आणि डी व्हीलिअर्स या दोघांनी वेगवान शतके झळकावून आफ्रिकेला विजयी केले. मागील ६-७ सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३०० पेक्षा अधिक धावा करूनसुद्धा सामना हरावा लागला आहे. भारतात तर भारताने २ वेळा ३५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वीरित्या गाठून ऑस्ट्रेलियाला हरविले होते. गोलंदाजांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Tue, 09/02/2014 - 15:39
आणि ह्या इंग्लिश संघाबद्द्लही काही ? तो कसोटीत किती सेशन टिकेल? दोघांचेही हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ फारच वेगळे आहेत.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:16
इंग्लंडचा एकदिवसीय संघ आणि कसोटी संघ यात बरेच बदल आहेत. प्रमुख गोलंदाज ब्रॉड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. हेल्स, मॉर्गन, गर्नी, फिन हे कसोटी मालिकेत नसलेले खेळाडू संघात आहेत. भारताचा कसोटी संघ व एकदिवसीय संघ बराचसा सारखा आहे. रैना हा एकमेव खेळाडू (आणि ४ थ्या सामन्यात आलेला धवल कुलकर्णी) सोडला तर उर्वरीत सर्वजण कसोटी संघातलेच आहेत. त्यामुळे या दोन संघात एकदिवसीय संघाचे खेळाडू घेऊन कसोटी मालिका झाली तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 09/04/2014 - 16:25
मुरली विजय आणि गौतम गंभीरने गेल्या तीनपैकी किती सामन्यात बॅटिंगची ओपनींग केली? चेतेश्वर पुजारा किती वेळा तीन/चार नंबरला आला? इशांत शर्मा, आणि वरूण आरोनने किती ओवर टाकल्या गेल्या तीन सामन्यात? एकूण पाच खेळाडू फार विचार न करता सांगता आले. मग सांगा बदल आहे की नाही?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 13:06
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला नक्की समजले नाही. आताच्या भारताच्या एकदिवसीय संघात कसोटी संघाच्या तुलनेत बरेच बदल आहेत असा तुमचा दावा असावा. हे गृहीत धरून प्रतिसाद देत आहे. आताचा भारताचा एकदिवसीय संघ पाहिला तर ११ पैकी ९ जण कसोटी संघात सुद्धा होते. फक्त रैना व धवल कुलकर्णी एकही कसोटी खेळले नाहीत. संघात फारसा बदल नाही. कसोटीत खेळलेला जवळपास सर्व संघच एकदिवसीय सामने खेळत आहे. परंतु संघाची कामगिरी अचानक सुधारली आहे. या ११ पैकी सर्वजण व कसोटी खेळलेले सर्वजण आयपीएल मध्ये नियमित खेळतात. एकंदरीत हा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांकरिता जास्त योग्य आहे. या संघातील बहुतेक जण कसोटी सामन्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे निवड समितीने विचार करून कसोटी सामन्यांसाठी पूर्ण वेगळा संघ निवडावा. कसोटी संघात स्थानिक स्पर्धा खेळलेलेच खेळाडू असावेत. आयपीएल मधील खेळाडूंना कसोटी सामन्यात खेळणे अवघड जात आहे. त्यामुळे आयपीएल मधील खेळाडूंचा कसोटी साठी विचार करू नये.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 09/05/2014 - 13:57
माझा काहीही दावा नाहिये. आपण मात्र दावा करत आहात की हा संघ कसोटीत एक सेशन पण टिकणार नाही. त्यावर माझा आपल्याला असा प्रश्न होता की मग इंग्लंडचा हा संघ किती सेशन टिकेल? कारण माझ्या मते अशी तुलना योग्य होणार नाही. कारण माझ्या मते, दोन्ही देशांचे हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ वेगळे होते. इंग्लंडने बदललेले खेळाडू आपल्याला माहित असावे कारण आपण यादी दिली आहेच. भारतानेही असे अनुरूप बदल केले आहेत. कोण कोण वगळले ते मी वर सांगितले आहेच. परत सांगतो- मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वरूण आरोन. मग आता वन डे स्पेशालिस्ट संघ - तोही विजयी संघ; कसोटीत कसा खेळेल, यावर टिप्पणीचे प्रयोजन काय?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 20:43
हा संघ कसोटीत पुन्हा एकदा अपयशी ठरेल हे उघडच आहे कारण नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत खेळलेल्या संघातले बहुतेक सर्व खेळाडू एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहेत. जे नवीन आले आहेत त्यापैकी सुरेश रैना हा कसोटीत बर्‍याच वेळा अपयशी ठरलेला आहे. म्हणजे तो येऊनही फारसा फायदा नाही. धवल कुलकर्णी अजून कसोटी खेळलेलाच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अंदाज करण्यात अर्थ नाही. या दोन्ही संघांच्या एकदिवसीय संघामध्ये जर कसोटी सामना झाला तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल कारण भारतीय संघात फारसे बदल नाहीत आणि इंग्लंड संघात काही बदल असले तरी कसोटीत भारताचा कर्दनकाळ ठरलेले कुक, रूट, अ‍ॅण्डरसन, अली, बटलर इ. मंडळी एकदिवसीय संघात आहेतच. खरं सांगायचं तर भारताने कसोटीसाठी एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य असलेला संघ खेळविला आणि इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांसाठी कसोटीसाठी योग्य असलेला संघ खेळविला. त्याचे परीणाम दोन्ही संघांना भोगावे लागले आहेत.

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:19
भारताने लागोपाठ ३ रा सामना जिंकून एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. २०११ च्या तुलनेत एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी झाली. इंग्लिश संघ एकदिवसीय सामन्यात पारच ढेपाळलेला दिसतोय. पीटरसनला काढून त्यांनी मोठी चूक केलेली आहे. बोपारा व ब्रेस्ननला बाहेर ठेवणे हीदेखील मोठी चूक आहे.

श्रीगुरुजी Sat, 09/06/2014 - 14:36
शेवटचा सामना हरून भारताने एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाची संधी घालविली. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की मालिका जिंकल्यानंतर उर्वरीत सामन्यात भारतीय संघ एकदम शिथिल पडतो. या मालिकेतही तसेच झाले. खरं तर शेवटच्या सामन्यात स्वतः धोनीने विश्रांती घेऊन संजू सॅमसनला खेळवायला हवे होते. तसेच स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा यांनादेखील संधी हवी होती. थकलेल्या भुवनेश्वरकुमारला खेळविण्यात अर्थ नव्हता. असो. आता उद्या दौर्‍यातला शेवटचा ट-२० सामना आहे. तो जिंकून शेवट गोड करावा.

एस Wed, 06/25/2014 - 13:22
बीसीसीआयच्या संघाला हरवून पुन्हा फॉर्मात येण्याची इंग्लंडच्या संघाला सुवर्णसंधी आहे. :-|

In reply to by एस

अनुप ढेरे Wed, 06/25/2014 - 13:51
कुक नक्की फॉर्ममध्ये येणार. ओपनिंगला विजय/धवन ऐवजी शर्माही चालेल. गंभीरही फार दिवे लावेल असं वाटत नाही. पण वर म्हटलं तसं, ब्याटिंगची भिस्त ३-४-५, कोहलीम पुजारा आणि रहाणेवर आहे. नॉटिंगहममध्ये पहिली मॅच आहे हे पाहून झहीरची आठवण झाली. बॉलिंग मध्ये झहीर असायला पाहिजे होता. झहीर, भुवनेश्वर आणि शर्मा. प्रॅक्टिस म्याचेस आहेत २ ते चांगलं आहे. मागच्या वेळेला हार झाल्याचं कमी प्रॅक्टीस मॅचेस हे एक कारण होतं.

In reply to by एस

एस Mon, 08/18/2014 - 18:52
चला, बीसीसीआयच्या संघाला पुनरेकवार हरल्याबद्दल किंचित सहानुभूती आणि इंग्लंडच्या संघाचं विजयाबद्दल जोरदार अभिनंदन. आगामी भारत दौर्‍यातही इंग्लंडला अशाच सुवर्णसंधी पुन्हापुन्हा देत रहा बरं का रे. (इथून पुढचं जाहीर लिहिण्यासारखं नसल्याने फक्त मनातल्या मनात. कसंय, तुम्हांला जरी लाजीरवाण्या पद्धतीनं हरल्याबद्दल शब्दशः लाज वाटत नसली तरी आम्हांला अपशब्द जाहीरपणे वापरायची लोकलाज अजूनही वाटते.)

सौंदाळा Wed, 06/25/2014 - 14:18
ईशांत शर्मा बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो.
याऐवजी मी ईशांत शर्मा भारतात बैलासारखी मट्ठपणे गोलंदाजी करतो. असे म्हणेन. मागच्या ईग्लंड दौर्‍यावर (तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण असताना आपण सपाटुन हारलो होतो तो दौरा) ईशांतने चांगली गोलंदाजी केली होती. बाकी कालची कसोटी थरारक झाली. अंडरसन एक चेंडु शिल्लक असताना आउट झाला. आणि हीच स्थिती श्रीलंकेची पहील्या कसोटीला होती आणि त्यांनी सामना अनिर्णयीत ठेवण्यात यश मिळवले.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 16:51
>>> बाकी कालची कसोटी थरारक झाली. +१ जबरदस्त कसोटी झाली. इंग्लंडने पराभव टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करूनसुद्धा कसोटीतला फक्त १ चेंडू शिल्लक असताना त्यांना हार पत्करावी लागली. पहिल्या डावात १०८ धावांनी मागे असताना सुद्धा श्रीलंकेने झुंझून विजय मिळविला.

कपिलमुनी Wed, 06/25/2014 - 14:37
फार फार दिवसांनी क्रिकेटवर मोठा लेख आला.. प्रत्येक पिढीचे आवडते हीरो असतात.. ते रीटायर झाले की आवड कमी होते .. तसाच कहीसा झाला आहे. सध्याच्या टीम मधे अजून तरी फार इंटरेस्ट नाहिये.. बादवे ते ष्टकार नावाचा पाक्षिक मिळता का अजून ?

पामर Wed, 06/25/2014 - 16:12
ह्याच दौ-यात अजुन एक आकर्षण म्हणजे ५ जुलै रोजी क्रिकेट पंढरी-लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI' असा एक प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला आहे. MCC च्या संघात -सचिन तेंडुलकर (कर्णधार),ब्रायन लारा, राहुल द्रवीड,ब्रेट ली,शिवनारायण चंद्रपॉल व इतर खेळाडु आहेत तर उर्वरीत जगाच्या संघात- शेन वॉर्न (कर्णधार),अ‍ॅडम गिलख्रिस्ट, मुथैया मुरलीधरन,शाहीद आफ्रिदी,केवीन पिटर्सन ,युवराज सिंग वगैरे खेळाडु आहेत.भारतात स्टार चॅनल वर हा सामना दा़खवणार आहेत. *clapping*

In reply to by पामर

असंका Wed, 06/25/2014 - 16:34
लॉर्ड्सला तब्बल २०० वर्ष पुर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने 'मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC)वि.Rest of the world XI'
मेलबर्न असा उच्चार आहे का? मला वाटायचे मेरिलबोन (Marylebone)!!

श्रीगुरुजी Wed, 06/25/2014 - 17:04
भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बहुतेक मधूसुदन पानसरेला (आणि रवि बोपाराला) पाचारण करतील असं वाटतंय. केव्हिन पीटरसनलाही परत बोलावतील का? (तो परत यावा अशी इच्छा आहे)

फारएन्ड गुरुवार, 06/26/2014 - 09:36
झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 12:28
>>> झहीर ला का डच्चू दिला काही कल्पना आहे का? झहीर हा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे ब्रह्मास्त्र होता. त्याने ९ सामन्यात २१ बळी घेऊन जवळपास प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता. आता तो संघात नाही त्याची ३ कारणे आहेत. १) झहीर २०११ च्या विश्वचषकानंतर त्याचा फॉर्म हरपला आहे. आजतगायत त्याला फॉर्म परत मिळविता आलेला नाही. ज्या मोजक्याच सामन्यात तो खेळला, त्यात तो निष्प्रभ ठरला. आयपीएल मध्ये सुद्धा तो चमकलेला नाही. २) त्याला तंदुरूस्तीची तीव्र समस्या आहे. १-२ सलग सामने खेळले की तो मोडतो आणि नंतर ५-६ महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असतो. ३) तंदुरूस्तीमुळे त्याला पुरेसा सराव मिळत नाही व त्यामुळे तो ज्या सामन्यात खेळतो त्यात चमकत नाही. >>> रोहित शर्मा ला मागच्या वेळेस झेपले नव्हते इंग्लंड. सध्या फॉर्मात असताना काय करतो बघू. रोहीत शर्मा २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगला खेळला होता. परंतु एकंदरीत तो अपवाद वगळता परदेशात तो बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे. तो, अश्विन आणि ईशांत शर्मा हे धोनीचे लाडके असावेत असं वाटतंय, कारण अनेकवेळा अपयशी ठरल्यानंतर ते परत परत संघात दिसतात. >>> स्विंग सपोर्ट असताना मुनाफ ला ही संधी द्यायला हवी होती. मुनाफ २०११ च्या विश्वचषकानंतर पूर्णपणे निष्प्रभ आहे. त्याला नाही घेतलं तेच बरं केलं. >>>> सध्या इरफान पठाण कोठे गायब आहे? इरफान पठाणला गेल्या ३-४ वर्षात अजिबात प्रभाव पाडता आलेला नाही. २०१२ मध्ये बांगला देशात झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत बांगला देश विरूध्द त्याने व प्रवीणकुमारने अत्यंत सुमार गोलंदाजी करून तब्बल २९० धावांचे लक्ष्य बांगलाला सहज पार करून दिले होते. >>> गंभीर ला तोंडदेखले घेतले असावे असे वाटते. धोनीशी त्याचे बरे आहे असे वाटत नाही. "खुद धोनी" सोडला तर गांगुलीच्या काळात आलेले बरेच लोक आता बाहेर आहेत. गंभीर शेवटचा बहुधा. सहमत! धोनीला आपल्या कर्णधारपदाच्या सुरूवातीच्या कालखंडात वरीष्ठ खेळाडूंची सतत भीति वाटायची. आपण थोडेसे अपयशी ठरलो तर आपल्याकडून कर्णधारपद हिसकावले जाऊन कोणत्यातरी वरीष्ठ खेळाडूच्या हातात नेतृत्वाची धुरा जाईल या दडपणामुळे त्याने वरीष्ठ खेळाडूंना सतत बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. २००७ च्या ट-२० च्या विश्वचषकात सुद्धा त्याने वरीष्ठ खेळाडूंना ने घेण्याच्या अटीवर कर्णधारपद स्वीकारले होते. गंभीर, सेहवाग, सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, झहीर, हरभजन आणि कुंबळे या वरीष्ठ खेळाडूंपैकी ५ जण निवृत्त झाले असून उरलेले ४ जण अजून खेळत आहेत. त्यापैकी तिघेजण संघात नाहीत. त्यामुळे धोनीला फारशी भीति नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे गुरुवार, 06/26/2014 - 16:39
पठाण बद्दल सहमत. प्रवीण कुमार चालला असता. मागच्या दौर्‍यात जीव तोडून बोलिंग केली होती.

नाखु गुरुवार, 06/26/2014 - 11:17
पण ते चेन्नई सुपर किंग मध्ये आहेत हे जास्त महत्वाचे निवडीसाठी.मोहीत शर्माला पण संधी त्यामुळेच मिळाली. खरे खोटे "श्री" जाणे! आप्ण गुमान पहाणे!

श्रीगुरुजी गुरुवार, 06/26/2014 - 22:33
सुरूवात तर चांगली झाली. आजच्या पहिल्याच सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारताने ४० षटकांत ४ बाद ३३३ अशी चांगली कामगिरी केली. त्यातल्या मुरली विजय (२०) व कोहली (२९) वगळता इतरांनी चांगल्या धावा केल्या. गंभीर, धवन व पुजाराने अर्धशतक केले.

श्रीगुरुजी Sun, 06/29/2014 - 21:10
पहिला सराव सामना पावसामुळे फक्त २ दिवस चालला. भारतीय फलंदाजांनी बर्‍यापैकी फलंदाजी केली. गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाल्ला. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ३ फलंदाज बाद करता आले. असो. या सामन्याच्या निमित्ताने थोडा सराव तरी झाला. अजून एक सराव सामना बाकी आहे. नंतर ९ जुलैला पहिला कसोटी सामना सुरू होईल. सध्या विश्वचषक फूटबॉल फिव्हरमध्ये आणि त्याचवेळी विम्बल्डन सुरू असताना क्रिकेट थोडे निस्तेज झाले आहे. विंडीज वि किवीज आणि इंग्लंड वि. लंका या सामन्यांच्या बातम्या सुद्धा वृत्तपत्रात येत नव्हत्या. साधारणपणे १५ जुलैनंतर क्रिकेटला परत चांगले दिवस येतील.

श्रीगुरुजी Wed, 07/02/2014 - 12:43
कालपासून भारताचा दुसरा सराव सामना डर्बीशायर विरूद्ध सुरू झाला. आधीच्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई झाली. भारतीय गोलंदाजांना दिवसभरात फक्त ५ फलंदाज बाद करता आले. दोन्ही सामन्यात मिळून एकूण २ दिवसांच्या गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांना जवळपास ६६५ धावांच्या मोबदल्यात फक्त ८ गडी बाद करता आले आहेत. एकंदरीत गोलंदाजांचे या दौर्‍यावर हाल होतील असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 12:46
दुसरा सराव सामना भारताने जिंकला. पहिल्या दोन्ही सराव सामन्यात भारताची फलंदाजी बर्‍यापैकी झाली. पण गोलंदाजांनी बराच मार खाल्ला. स्थानिक संघाविरूद्ध त्यांना फारसे बळी मिळविता आले नाहीत. अर्थात हे नेहमीचंच रडगांणं आहे. आता ९ जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होत आहे. बघूया काय होतंय ते. सलामीला मुरली विजयला न घेता गंभीरला घेतील असं वाटतंय. रहाणे देखील आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित रोहीत शर्माला बाहेर बसावं लागेल. गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, जडेजा आणि ईशांत शर्मा नक्की आत येतील.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा Sat, 07/05/2014 - 15:25
तो १४/१६ च्या टीममधे कसा काय येतो परत परत??? मग ११ त आला तर खरेतर आश्चर्याच्या धक्क्याने आम्ही मरायलाच पाहिजे!

In reply to by पैसा

श्रीगुरुजी Sun, 07/06/2014 - 14:07
कितीही खराब खेळले तरी शर्मा बंधू (रोहीत आणि ईशांत) हे कायम १६ जणांच्या चमूत असतात. रोहीत शर्माला २०१२ मध्ये एकूण १४ एकदिवसीय सामन्यात खेळविले होते. त्यात त्याने एकूण १६८ धावा केल्या होत्या. त्यापैकी एका सामन्यात ८३ व उर्वरीत १३ सामन्यात एकूण ८५ धावा होत्या. तरीसुद्धा त्याला संघातून एकदाही वगळले नव्हते. श्रीलंकेत त्याच वर्षी झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण १४ धावा केल्या होत्या (सर्वाधिक ८). इतका खराब खेळ करूनसुद्धा त्याच मालिकेतल्या ट-२० सामन्यात त्याला निवडले होते. त्याच्यामुळे मागील ३-४ वर्षे रहाणे संघात असून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी Fri, 07/04/2014 - 20:41
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व भारतातील क्रिकेट मालिका बहुतेकवेळा 'स्टार' वर असतात. वेस्ट इंडिज, दुबई/शारजा, द. आफ्रिका व न्यूझीलॅंड येथील मालिका टेन क्रिकेट किंवा सोनी सिक्सवर असतात. पूर्वी या मालिका 'निओ'वर असायच्या. पण आता 'निओ' क्रिकेट प्रक्षेपणातून बाहेर पडलेलं दिसतंय आणि त्यांची जागा सोनी सिक्सने घेतलेली दिसतेय.

स्पार्टाकस Fri, 07/04/2014 - 22:44
आफ्रीदीसारखा वाचाळ आणि टिनपाट खेळाडू दिग्गज कधीपासून झाला ?? केवळ अंदाधुंद बॅटींग (जीदेखील गेली काही वर्षे चालत नाही) आणि कामचलाऊ बॉलींग करणारा महान झाला?

In reply to by स्पार्टाकस

श्रीगुरुजी Sat, 07/05/2014 - 12:54
+१ आफ्रिदीप्रमाणेच विश्व संघात टिनो बेस्ट, सिड्ल्, तमीम इक्बाल इ. "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत. तर एम सी सी च्या संघात उमर गुल, शॉन टेट, व्हिटोरी, एरॉन फिंच, रीड असे "महान आणि दिग्गज" खेळाडू आहेत.

तुमचा अभिषेक Sat, 07/05/2014 - 17:48
हरो किंवा जिंको, पण संध्याकाळी घरी आल्यावर ईंग्लंडच्या वातावरणातील कसोटी सामने बघणे नेत्रसुखद अनुभव असतो. फक्त दादा, सचिन, द्रविड आणि हो, वीरूही नसल्याने ती मजा यंदा कितपत येईल हा प्रश्नच आहे.

श्रीगुरुजी Wed, 07/09/2014 - 20:47
पहिल्या कसोटीत आतापर्यंत बरी फलंदाजी झाली आहे. कोहली व धवन अपयशी ठरले, तर पुजारा आणि रहाणे स्थिरावल्यावर बाद झाले. एकटा मुरली विजय किल्ला लढवतोय. भारताने किमान ४०० धावा करायला हव्यात.

सौंदाळा गुरुवार, 07/10/2014 - 17:40
दुसरा दिवस, जेवण ३४२/५. चांगल्या धावा झाल्या आहेत. अजुन किमान एक सेशन तरी भारताने खेळायला पाहीजे म्हणजे सामन्यावर पकड घेण्याची संधी मिळेल.

थॉर माणूस गुरुवार, 07/10/2014 - 18:02
धोनी उपखंडाबाहेरचं पहिलं शतक मारेल का याची उत्सुकता आहे... काय ते कळेलच पुढच्याच सेशनमधे. त्यानंतर (किंवा धोनी बाद झाला तर) डाव घोषित करतील बहुतेक.

स्पार्टाकस गुरुवार, 07/10/2014 - 23:45
भुवनेश्वर आणि शमीने इंग्लंडवर बॅटींगमध्ये गिलेस्पी-मॅकग्राथ प्रयोग केला आहे! (गिलेस्पी आणि मॅकग्राथ यांनी न्यूझीलंडविरुध्द १००+ ची पार्टनरशीप केली होती. मॅकग्राथने चक्क ६३ रन्स काढल्या होत्या!) अ‍ॅलीस्टर कूकला पुन्हा एकदा सस्त्यात गाशा गुंडाळावा लागला आहे. जाडेजा कदाचीत धोकादायक ठरु शकेल. एकून टेस्ट बोअरींग होणार नाही अशी अपेक्षा आहे.

श्रीगुरुजी Fri, 07/11/2014 - 09:58
भारताला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. आज इंग्लंडच्या उर्वरीत फलंदाजांना बाद करून किमान १५० धावांची भक्कम आघाडी घेतली पाहिजे. इयान बेल (आणि कदाचित मॅट प्रॉयर) हाच मोठा अडथळा आहे. उर्वरीत फलंदाज नवे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Fri, 07/11/2014 - 10:46
टू अर्ली टु से थिस.. खेळपट्टी खूपच निर्जीव आहे. आणि भारतीय गोलंदाजीची अवस्था फार काही चांगली नाहिये.. हाय स्कोरींग ड्रॉची शक्यता जास्त आहे..

आतिवास Sat, 07/12/2014 - 17:39
दोन्ही संघांच्या तळातल्या फलंदाजांनी (अर्थात रूट काही तळातला फलंदाज नाही म्हणा) जो खेळ केला, त्यावरून क्रिकेट मध्ये किती अनिश्चितता असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला!

श्रीगुरुजी Sat, 07/12/2014 - 20:53
भारतीय गोलंदाज विशेषत: इशांत शर्माने आज पुन्हा एकदा मठ्ठ बैलासारखी गोलंदाजी केली. इंद्रसेन (अ‍ॅण्डर्सन) मागील ३-४ डावात उसळत्या चेंडूवर बाद झाला होता. २९८/९ असताना तो खेळायला आल्यावर त्याला बाद करण्यासाठी शर्मा व इतरांनी त्याला सातत्याने फक्त उसळते चेंडू टाकले. पडणारा प्रत्येक चेंडू हा उसळताच असेल हे गृहीत धरून अशा चेंडूचा सामना करण्यासाठी तो आधीच तयार असायचा आणि असे सर्व चेंडू त्याने सहजगत्या खेळून काढले व भरपूर धावा करून गोलंदाजांना रडविले. उसळता चेंडू अनपेक्षितरित्या अंगावर आला तर बाद होण्याची शक्यता असते. पण येणारा प्रत्येक चेंडू हा छाती किंवा खांद्यापर्यंत उसळणार आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा असे चेंडू खेळण्याच्या तयारीनेच फलंदाज उभा असतो. इंद्रसेनला सातत्याने उसळते चेंडू टाकण्याऐवजी यॉर्कर, स्लोअर वन, आत/बाहेर जाणारे चेंडू अशी विविधता आणली असती तर तो लवकर बाद झाला असतो. असो. भारताने सुरवातीला २०२/७ व नंतर २९८/९ अशा उत्तम परिस्थितीतून मोठी आघाडी घ्यायची संधी आपल्या करंटेपणाने घालविली. आता सामना अनिर्णित होण्याचीच शक्यता आहे.

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 11:47
मला वाटते अधिकृत कसोटी सामने झाल्या पासून बहुदा हा एकच सामना असावा ज्यात दोन्ही बाजूच्या शेवटच्या भागीदारीसाठी १०० पेक्षा जास्त धावा झाल्या असाव्यात. क्रिकेट हा खेळ किती विचित्र आहे !

In reply to by आतिवास

ज्यो रूट आणि अँडरसनने भारतीय गोलंदाजाच्या नाकात दम आणला अतिशय निष्प्रभ गोलंदाजी. १९५ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि कसोटीने अनिर्नित अवस्थेकडे प्रयाण केले. शेवटच्या विकेटसाठी इतकी भागीदारी व्हावी अतिशय लज्जास्पद आहे भारतीय गोलंदाजीसाठी. बाकी, विश्वचषक फूटबॉल संपला की इकडे हजर होत राहीन. :) -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Sun, 07/13/2014 - 20:34
सामना अनिर्णित होणार हे नक्की. दुसर्‍या डावात चहापानाला भारत ३४७/८. उर्वरीत वेळात भारताचे उर्वरीत फलंदाज बाद करून सामना जिंकणे इंग्लंडला अशक्य आहे. पहिले ३ दिवस भारताने वर्चस्व राखले होते. आज ५ व्या दिवशी ३९ धावांनी मागे पडलेल्या भारताची अचानक ६ बाद १८४ अशी अवस्था झाली तेव्हा भारताकडे फक्त १४५ धावांची आघाडी होती व दिवसातली किमान ७७ षटके शिल्लक होती. अचानक इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली. परंतु बिन्नी, जडेजा व भुवनेश्वर कुमार यांनी उत्तम फलंदाजी करून भारताला पराभवापासून खूप लांब नेले आणि आता उर्वरीत ३१ षटकात सामन्याचा निकाल लागणे अशक्य आहे. एकंदरीत या सामन्यात कोहली (व काही प्रमाणात धवन) वगळता इतर सर्वांनी किमान एका डावात फलंदाजीत चांगले योगदान दिले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, शमी व शर्माने बर्‍यापैकी गोलंदाजी केली. अर्थात शेपटाने त्रास देण्याची परंपरा याही कसोटीत सुरू राहिली. तळाच्या २-३ फलंदाजांना बाद करणे हे भारतीय गोलंदाजांसाठी अवघड काम होऊन बसले आहे. असो. पुढील कसोटीत हाच संघ कायम राहील असे वाटते. अश्विन किंवा वरूण एरॉनला आत यायची संधी दिसत नाही. दुसरा कसोटी सामना गुरूवारी १७ जुलैला लॉर्ड्स वर सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 11:48
आजपासून दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरू होतोय. खेळपट्टी हिरवीगार असण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागतोय का याचीच उत्सुकता आहे.

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 11:55
जडेजा ऐवजी, अश्विनला खेळवून पाहावे कारण जादेजापेक्षा अश्विनचे फलंदाजीचे तंत्र जास्त चांगले आहे, शिवाय त्याने शतकही झळकावलेले आहे

In reply to by स्पा

श्रीगुरुजी गुरुवार, 07/17/2014 - 14:45
- जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. अश्विनचे क्षेत्ररक्षण अत्यंत भिकार आहे. - फलंदाजीत अश्विनच्या तुलनेत जडेजाने फारश्या धावा केलेल्या नाहीत. - भारताबाहेर दोघेही निष्प्रभ गोलंदाज आहेत. एकंदरीत दोघांपैकी कोणालाही घेतले तरी फारसा फरक पडत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्पा गुरुवार, 07/17/2014 - 15:16
कसोटीत क्षेत्र रक्षण टी२० किंवा एकदिवसीय सामान्यैतके महत्वाचे दिसून येत नाही, कारण अगदी एक एक धावा वाचवताना कोणी दिसत नाही अर्थात अपवाद असेलच भारतभर दोघेही कुचकामी ठरलेले असले तरी आत्ताच्या इंग्लंड च्या पिचेस आणि माग्च्या दौर्यातल्या पिचेस ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे

In reply to by स्पा

प्रचेतस गुरुवार, 07/17/2014 - 15:27
तेंडुलकरांच्या सचिनला पण परत खेळण्यासाठी आवताण द्यावे. इथल्या काही मिपाकरांना(मी नव्हे) त्याच्याशिवाय करमत नाही.

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 13:05
रहाणे काल मस्त खेळला. त्याला बरेच दिवस कुजवले होते. पण मागील वर्षापासून कसोटीत संधी मिळताच त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली (आतापर्यंत ७ कसोटीत ३ अर्धशतके व २ शतके). धवन पूर्ण अयशस्वी ठरतोय. पुढच्या डावात त्याने धावा केल्या नाहीत तर गंभीर नक्की आत येईल. पुढच्या कसोटीत जडेजा किंवा बिन्नीऐवजी अश्विन नक्की आत येणार. कोहलीला साधारणपणे मालिकेच्या उत्तरार्धात सूर सापडतो. तो बहुतेक तिसर्‍या कसोटीपासून फॉर्मात येईल. सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Fri, 07/18/2014 - 14:44
***सध्या फक्त भुवनेश्वरकुमारनेच फलंदाजीत सातत्य दाखविले आहे. -त्याचा इरफान पठाण होऊ नये, ही सदीच्छा!!

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Fri, 07/18/2014 - 20:46
जर कुकची कामगिरी सुधारली नाही किंवा जर इंग्लंडला ही मालिका जिंकण्यात अपयश आले तर कुकची कर्णधारपदावरून हकालपट्टी होऊन (कदाचित संघातूनही हकालपट्टी होऊ शकते), इयान बेल कर्णधार होऊ शकतो. कदाचित ही मालिका संपण्यापूर्वीच हा निर्णय होऊ शकेल.

श्रीगुरुजी Sat, 07/19/2014 - 21:22
सामना चांगल्या अवस्थेत आहे. तिसर्‍या दिवशी दोन्ही संघाचे डाव संपून भारत २४ धावांनी मागे आहे. पण दुसर्‍या डावात आतापर्यंत भारत १ बाद १०७ अशा उत्तम स्थितीत आहे. सामना निर्णायक होण्याची दाट शक्यता आहे. आज दिवसअखेर भारताकडे अंदाजे १६० धावांची आघाडी असेल. उद्या ४ थ्या दिवशी भारताने चहापानानंतर १ तास खेळून अंदाजे ३७५ धावांचे आव्हान दिले तर ५ व्या दिवशी इंग्लंडला हिरव्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे. इंग्लंडतर्फे अ‍ॅण्डरसन (आतापर्यंत ३ डावात ९ बळी व २ डावात १०० धावा) व भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (आतापर्यंत २ डावात ११ बळी व ३ डावात १५७ धावा) जबरदस्त कामगिरी करत आहेत.

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 20:21
मस्त सामना चाललाय. इंग्लंडला आजच्या उर्वरीत २ तासात व उद्या ५ व्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या ३१९ धावा करणे अवघड आहे. भारताला सामना जिंकून मालिकेत सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भुवनेश्वर पुन्हा एकदा चमकला. २ कसोटीत ४ डावात २०० हून अधिक धावा (त्यात ३ अर्धशतके) आणि आतापर्यंत ११ बळी ही जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आहे. मुरली विजय सुद्धा उत्तम खेळतोय. कोहली अजून अयशस्वी आहे (अनुष्काचा पायगुण ?). परंतु मालिकेच्या उत्तरार्धात तो नक्की भरात येईल.

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:32
मस्त जिंकलो. कालच लिहिल्याप्रमाणे आज भारताला चांगलीच संधी होती. अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 07/21/2014 - 21:48
तीच गोष्ट ईशांत शर्माची. अत्यंत खराब गोलंदाजी करूनसुद्धा तो परत परत खेळताना दिसतो. निवडसमितीत किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळात किंवा दोन्हीकडे त्यांचा कोणीतरी प्रभावशाली गॉडफादर असावा.
आणि मग-
अनपेक्षितरित्या इशांत शर्माने जबरी गोलंदाजी केली. भारतीय संघाचे अभिनंदन!
धन्य!! अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:25
काल ईशांतने चांगली गोलंदाजी केली हे मान्य आहे. परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे. त्याला कालच्या विजयाचे क्रेडीट आहेच. त्याच्याबरोबरीने भुवनेश्वर कुमारलाही (४४ आणि ५२ धावा आणि पहिल्या डावात ५ बळी) सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता. पहिल्या कसोटीतही भुवनेश्वरला डावलून जेम्स अ‍ॅण्डरसनला सामनावीर पुरस्कार दिला होता (भुवनेश्वर ५८ आणि नाबाद ६३ धावा आणि पहिल्या डावात ६ बळी). >>> >>> अनपेक्षित फक्त तुम्हाला....कारण इशांतने चौथ्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या चारपैकी दोन विकेट काढल्या होत्या! त्यामुळे तो चांगले खेळणार अशी अपेक्षा ठेवणेच योग्य होते. काल भुवनेश्वर कुमार खूप बळी मिळवेल असे वाटत होते. प्रत्यक्षात त्याला एकही बळी मिळाला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे Tue, 07/22/2014 - 13:39
परंतु गेली काही वर्षे तो अत्यंत खराब गोलंदाजी करत होता हे सुद्धा सत्य आहे
सहमत.. कालचा विजय त्याच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉइंट ठरो .. आणि याआधीचा "तो" ईशांत परत न येवो!! :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु गुरुवार, 07/24/2014 - 11:27
त्याची "केस" फारच डोळ्यावर आणी हाताबहेर झाली होती आता "सावरून" जाग्यावर येईल अशी अपेक्षा. पण काही करा भुवीचा "पठाण" करू नका!!

In reply to by नाखु

असंका Fri, 07/25/2014 - 19:35
बर्‍याच लोकांना धक्का बसला आहे म्हणे इशांतच्या खेळण्याचा! त्याने पाँटिंगची काय भंबेरी उडवली होती ती तरी आठवायची!

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 07/25/2014 - 20:51
त्याने पॉंटिंगची एकाच डावात भंबेरी उडविली होती आणि ती सुद्धा जानेवारी २००८ मध्ये (म्हणजे तब्बल साडेसहा वर्षांपूर्वी). त्यानंतर किमान २०१३ अखेरीपर्यंत तो फारसा चमकला नाही. काही सामने तर त्याच्या खराब गोलंदाजीमुळे आपण हरलो. उदाहरणार्थ नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतात ७ एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यातल्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या ३ षटकात तब्बल ४७ धावा हव्या होत्या व त्यांचे ६ खेळाडू बाद झाले होते. दुसर्‍या कोणत्याही संघाने इतका हातात आलेला सामना क्वचितच घालविला असता. त्या सामन्यात इशांत शर्माने ४८ वे षटक टाकताना सर्व चेंडू लेगस्टंपवर आखूड टप्प्याचे किंवा फुल्टॉस या प्रकारचे टाकले. त्यात १ नोबॉलही होता ज्यावर फ्रीहिट सुद्धा मिळाली. समोर फॉकनर होता. त्याने त्या षटकात तब्बल ३४ धावा चोपून उर्वरीत २ षटकांत फक्त १३ धावा अशी सोपी परिस्थिती निर्माण करून शेवटी जवळपास पूर्ण हरलेला सामना जिंकून दाखविला. इशांतची कामगिरी जानेवारी २००८ नंतर फारशी चांगली नव्हती. अर्थात २०१४ मध्ये तो सुधारल्यासारखा वाटतोय. जानेवारी २०१४ मध्ये द. आफ्रिकेत त्याने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ४ बळी व दुसर्‍या डावात १ बळी अशी चांगली गोलंदाजी केली. नंतर न्यूझीलँडमध्ये दोन्ही कसोटीतल्या एकेका डावात ६-६ बळी मिळवून २ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक १६ बळी मिळविले. आणि सध्याच्या मालिकेत पहिल्या कसोटीत ३ व दुसर्‍या कसोटीत ७ बळी मिळवून "सामनावीर" झाला. एकंदरीत तब्बल ६ वर्षांनी परदेशात त्याला बळी मिळायला लागलेत. त्याचा हाच फॉर्म कायम रहावा हीच सदिच्छा!

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 13:32
पंचांचे काही निर्णय भारताविरूद्ध गेले नसते तर अजून सहज व लवकर सामना जिंकला नसता. दुसर्‍या डावात रहाणेच्या आर्म गार्डला लागून उडालेल्या चेंडूवर त्याला चुकीचे बाद दिले गेले. इंग्लंडच्या दुसर्‍या डावात ४ थ्या दिवशी मोईन अली जडेजाच्या गोलंदाजीवर अगदी अचूक पायचित झाला होता. पायावर चेंडू बसला तेव्हा तो क्रीजच्या आतच होता आणि रिप्लेमध्ये तो चेंडू मधल्या यष्टीवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. तरीसुद्धा धर्मसेनाने त्याला बाद दिला नव्हता. त्याच मोईन अलीने पुढे तब्बल २ तास खेळून १०१ धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या दिशेने न्यायला सुरूवात केली होती. या सामन्या साठी डी आर एस प्रणाली असती तर भारताला खूप फायदा झाला असता. जगात फक्त भारताचा डी आर एस ला विरोध आहे. या विरोधाचे कारण अनाकलनीय आहे.

तुषार काळभोर Tue, 07/22/2014 - 14:38
कूक- फॉर्म परत येतोय बहुतेक.... (संघातील स्थान राहील, कर्णधारपद जाऊ शकते, पण सध्यातरी इंग्लंडकडे दुसरा कर्णधार दिसत नाहिये.) धवन-दुसर्‍या डावातील मोजक्या धावांचा फार उपयोग होईल असे वाटत नाही, गंभीर वाट पाहतोय. बिन्नी-सध्या फक्त ३ पूर्ण गोलंदाज (भुवनेश्वर, शमी, इशांत), अन् २ 'फलंदाज-गोलंदाज' किंवा 'गोलंदाज-फलंदाज' (जडेजा अन् बिन्नी) आहेत. बहुतेक बिन्नी/जडेजा पैकी एकाला बसवून अश्विनला अंतिम संघात घेतील. (तो बर्‍यापैकी फलंदाजी सुद्धा करू शकतो.) भुवनेश्वरसुद्धा अडीनडीला उपयोगी पडू शकतो.

श्रीगुरुजी Tue, 07/22/2014 - 21:26
धवनला अजून एका कसोटीत संधी मिळेल. त्यातही तो अपयशी झाला तर गंभीर नक्की आत येईल. तिसर्‍या कसोटीत बिन्नीच्या जागी अश्विन आत यायची शक्यता आहे. इंग्लंडची तिसर्‍या कसोटीआधीच एक विकेट पडली आहे. तिसर्‍या कसोटीसाठी मॅट प्रॉयर च्या जागी जॉस बटलर ला यष्टीरक्षक म्हणून घेतले आहे. बेन स्टोक्स च्या जागी ख्रिस जॉर्डन किंवा ख्रिस वोक्स येण्याची देखील शक्यता आहे. इंग्लंडने खरं तर केव्हिन पीटरसन व जोनाथन ट्रॉट ला परत बोलवायला पाहिजे. जमल्यास ग्रॅमी स्वानला देखील निवृत्ती रद्द करून परत बोलवावे. भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 07/23/2014 - 10:45
भारताविरूद्ध मधुसुदन पानसरेला का घेतले नाही याचे अजून आश्चर्य वाटत आहे.
त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). त्यातच हल्लीच त्याचा घटस्फोट झाल्यामुळे तो संघनिवडीसाठी उपलब्ध नव्हता असे मित्राकडुन ऐकले होते.

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:41
>>> त्याचेदेखिल ट्रॉट्प्रमाणे संतुलन बिघडले आहे (पबमधे दारु पिऊन बांउसर्सवर मुतणे). लघुशंका हे कारण नसावे कारण अ‍ॅण्डरसन, पीटरसन आणि अजून एक खेळाडू या तिघांनी देखील रात्री मैदानात जाऊन खेळपट्टीवर लघुशंका केली होती. त्यातला अ‍ॅण्डरसन अजूनही संघात आहे. बहुतेक पानसरे फॉर्मात नसावा. अन्यथा भारताविरूद्ध त्याला नक्की घेतले असते.

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी Wed, 07/23/2014 - 12:53
दारूच्या नशेत खेळपट्टीवर केलेली लघुशंका असो वा दारूच्या नशेत वरच्या मजल्यावरून सोडलेली धार असो (एका बाऊन्सरच्या दुर्दैवाने तो नेमका त्याच धारखाली सापडला), दोन्ही कृती सारख्याच किळसवाण्या आहेत.

श्रीगुरुजी Mon, 07/28/2014 - 21:06
तिसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडने परत पाटा खेळपट्टी बनविली. इंग्लंड बहुतेक ५५० च्या आसपास डाव घोषित करेल असं वाटतंय. बिन्नीच्या जागी अश्विनला न घेता रोहीत शर्माला घेण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. अश्विन व रोहीत च्या फलंदाजीत फार फरक नाही, पण गोलंदाजीत खूप फरक आहे. पंकज सिंगचं दुर्दैव. त्याच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले व एक अत्यंत स्पष्ट असलेला पायचितचा निर्णय पंचांनी नाकारला. डी आर् एस् असती तर पायचित चा निर्णय भारताच्या बाजूने लागला असता. भारताचा डी आर् एस् असलेला विरोध अनाकलनीय आहे. तंत्रज्ञान हाताशी असून वापरायचे नाही या निर्णयामागे काहीच तर्कशुद्ध कारण नाही. आयुष्यात कधीही क्रिकेट न खेळलेले श्रीनिवासन्, राजीव शुक्ला इ. मंडळी बीसीसीआय वर नागोबा सारखी वेटोळे घालून बसलेली आहेत. बीसीसीआय ची सूत्रे क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंच्या हातात असती तर असे अनाकलनीय निर्णय झाले नसते आणि कदाचित भ्रष्टाचारही कमी झाला असता. असो.

श्रीगुरुजी Tue, 07/29/2014 - 20:44
पाटा खेळपट्टीवर भारताची वाट लागलेली दिसतेय (आतापर्यंत ५ बाद २१७). एकटा रहाणे अर्धशतक काढून खिंड लढवतोय. मुरली विजय, पुजारा, कोहली आणि रोहीत शर्मा एक तासापेक्षा अधिक वेळ खेळून आणि प्रत्येक जण किमान ५२ चेंडू खेळून स्थिरावल्यावर मोठी धावसंख्या न करता बाद झाले. धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑफ किंवा मधल्या यष्टीवर पडून बाहेर जाणारे चेंडू खेळणे त्याला अशक्य होताना दिसतंय. पुढच्या डावात काही केलं नाही तर गंभीर नक्कीच आत येणार. एकंदरीत परिस्थिती कठीण आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 12:45
फॉलोऑनची परिस्थिती असली तरी इंग्लंड फॉलोऑन न देता अंदाजे ३ तास फलंदाजी करून १६०-१७० धावा करून डाव घोषित करेल व दुसर्‍या डावात अंदाजे ८ तासाच्या खेळात भारतापुढे ३७५-४०० धावांचे आव्हान ठेवेल. २००१ मध्ये कलकत्त्यात दुसर्‍या कसोटीत स्टीव्ह वॉ ने भारताला फॉलोऑन दिला होता आणि नंतर भारताने लक्ष्मण-द्रविडच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर ५ व्या दिवशी १ तासानंतर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३००+ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भज्जीच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळून भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इतर सर्व देश फॉलोऑन देणे शक्य असूनही ५ व्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी टाळण्यासाठी फॉलोऑन न देता फलंदाजी करतात.

In reply to by श्रीगुरुजी

तुषार काळभोर Wed, 07/30/2014 - 13:00
२००८ च्या चेन्नई कसोटित भारताने चौथ्या डावात ३८० चं आव्हान आरामात पार केलं होतं. (सेहवागमुळे ते शक्य झाले होते) त्यामुळे इंग्लंड ४५० पेक्षा कमी आव्हान ठेवील असे वाटत नाही.

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 13:18
तेव्हा फॉलोऑनची परिस्थिती नव्हती. इंग्लंडने अंदाजे ७ तासात भारताला ३७५ धावांचे आव्हान दिले तेव्हा भारताला ५ व्या दिवशी फलंदाजी करणे अवघड जाईल असाच इंग्लंडचा अंदाज होता. तसेच भारत हे आव्हान न स्वीकारता बचावात्मक खेळ करून सामना अनिर्णित ठेवायचा प्रयत्न करेल असाही इंग्लंडचा अंदाज होता. त्याला कारणही तसेच होते कारण भारताने भूतकाळात फक्त ४ वेळा ४ थ्या डावात ५ व्या दिवशी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. (१९७६ मध्ये विंडीजमध्ये तिसर्‍या कसोटीत ४०४ धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वी पाठलाग केला होता. त्यात गावसकर व विश्वनाथचे शतक, मोहिंदरचे अर्धशतक व ब्रिजेश पटेलच्या नाबाद ४९ धावांचा वाटा होता. नंतर १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताने ५ व्या कसोटीत ४७६ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ४५० धावा केल्या होत्या. नंतर १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने ४ थ्या कसोटीत ४३९ धावांचा पाठलाग करताना ८ बाद ४२९ पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर १९८६ मध्ये भारतात मद्रासमध्ये तिसर्‍या कसोटीत भारताने ३४८ धावांचा पाठलाग करताना सर्वबाद ३४७ धावा करून इतिहासातला केवळ दुसरा कसोटी सामना बरोबरीत सोडविला होता.) मात्र इतर प्रसंगी भारताने कच खाऊन ५ व्या दिवशी बचावात्मक खेळ करून सामना न हरण्याची दक्षता घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. (उदा. १९८६ मध्ये इंग्लंडमधील ३ रा कसोटी सामना, १९९३ मध्ये आफ्रिकेतील ४ था कसोटी सामना, नंतर २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध आफ्रिकेतील ३ रा कसोटी सामना, २०११ मध्येच विंडीजविरूद्ध विंडीजमधील ३ रा कसोटी सामना इ.). त्यामुळेच कदाचित भारत ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करण्याचे धाडस करणार नाही असे गृहीत धरून स्ट्रॉसने डाव घोषित करून आव्हान दिले होते. पण सेहवागच्या ५८ चेंडूत ८५ धावा व सचिनचे नाबाद शतक यामुळे भारताने ३७५ धावांचे आव्हान लीलया पार करून सामना जिंकला. अर्थात त्या सामन्यात खेळपट्टी पाटा होती हे सुद्धा विसरून चालणार नाही.

श्रीगुरुजी Wed, 07/30/2014 - 20:47
जिंकायला ४४५ करायच्यात. अत्यंत अवघड लक्ष्य आहे. जवळपास १२० षटके ८ तासात खेळायची आहेत. जिंकणे जवळपास अशक्य आहे. सामना वाचविण्याची शक्यता देखील बरीच कमी आहे. चांगले तंत्र असलेल्या रहाणे, पुजारा व कोहलीवरच सगळी मदार आहे. इतरांची खात्री नाही. अर्थात माझे अंदाज खोटे ठरो हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

In reply to by श्रीगुरुजी

केदार-मिसळपाव गुरुवार, 07/31/2014 - 15:16
देवपण नाही वाचवु शकला. प्रत्येक गोष्ट देवावर नका टाकु. मागची इंग्लंड मधली कसोटी मालिका विसरलात वाटते.

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 11:49
लॉर्ड्सवर भारतीय फास्ट बोलर्सनी बाउंसरवर विकेट काढल्या.. आणि आता ईंग्लिश पार्टटाइम स्पिनर्स स्पिन चांगल्याप्रकारे हाताळणार्‍या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स काढतायत ते पण ईंग्लिश खेळपट्टीवर.. दोन टोकाचे परफॉरमन्सेस !! बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. आणि हा सामना तर ऑलमोस्ट हरलाच आहे.. बाकी २ ड्रॉ करण्याचीच अपेक्षा आहे आता.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/31/2014 - 14:13
>>> बाकी भारत परदेशात गेल्यावर मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी सामना जिंकत नाही (अपवाद पाकवरील २-१ विजय).. हे तितकेसे खरे नाही. भारताने १९६८ मध्ये न्यूझीलँड मध्ये ३-१ असा विजय मिळविला होता. १९७६-७७ मध्ये ऑस्ट्रेलियात २-३ अशी मालिका हरली होती. १९८६ मध्ये इंग्लंडमध्ये २-० असा विजय मिळविला होता. १९७६ मध्येच भारताने न्यूझीलँडला न्यूझीलँडमध्ये २-१ असे हरविले होते. अर्थात ही तुरळक उदाहरणे आहेत. अगदी थोड्या मालिकांमध्ये भारताने एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 16:45
गेल्या दोन दशकात म्हणायचं होतं मला.. खास करुन अझरुद्दीनच्या संघाने १९९३ ला इंग्लंड्ला ३-० हरवून मायदेशात जिंकायची सवय लावल्यापासून.. त्यापूर्वी मायदेशातपण इतके जिंकत नसत..

सौंदाळा गुरुवार, 07/31/2014 - 17:55
हम्म जेवणापर्यंत सुध्दा दम धरला नाही आपल्या फलंदाजांनी. धवन, रोहीत शर्मा किंवा जडेजा, शामी, पंकजसिंग यांची गछंती होऊन गंभीर, अश्विन, अरॉन किंवा इश्वर पांडे, इशांत शर्मा आत येतील असे वाटत आहे. पुढची कसोटी ७-ऑगस्ट मँचेस्टरला होणार आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 11:07
पुढच्या सामन्यात धवन आणि रोहीत शर्मा गच्छंती होऊन गंभीर आणि अश्विन आत यावेत अशी इच्छा आहे. धवन नक्की बाहेर जाणार. परंतु रोहीत शर्मा हा धोनीचा 'ब्ल्यू आईड बॉय' असल्याने कितीही वाईट खेळला तरी तो संघात असतोच . त्यामुळे त्याची गच्छंती अवघड वाटतेय. (२०१२ मध्ये श्रीलंकेच्या दौर्‍यात ५ एकदिवसीय सामन्यात त्याने एकूण १८ धावा केल्या होत्या. तरीसुद्धा त्यानंतरच्या ट-२० मध्ये त्याला खेळवलंच. वास्तविक पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ०, ४, ४ अशी कामगिरी केल्यावर त्याला लगेच हाकलायला हवा होता. पण धोनीचा तो लाडका असल्याने त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले. पूर्वी रवी शास्त्री असाच गावसकर व डुंगरपूर यांचा कमालीचा लाडका होता.) पंकज सिंग दुर्दैवी ठरला. त्याच्या गोलंदाजीवर २ झेल सुटले. परंतु दुर्दैवाने त्यालाही कदाचित बाहेर काढून वरूण एरॉन/ईश्वर पांडे आत येण्याची शक्यता आहे. ५ गोलंदाज नको असेल तर बुद्धीमान साहा हा सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे. भारत खराब फलंदाजी, खराब गोलंदाजी व अत्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे हरला हे सत्य आहे. त्याच बरोबरीने पंचांची सदोष कामगिरी देखील इंग्लंडच्या विजयाला कारणीभूत ठरली. डी आर एस पद्धत असती तर भारताला बराच फायदा होऊ शकला असता. असो.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 08/01/2014 - 15:31
2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? आणि रोहित शर्मा एकुण किती कसोटी खेळला आहे की ज्यामुळे आपण तो लाडका असल्याचा निष्कर्ष काढला आहे?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 08/01/2014 - 21:05
>>> 2012 नंतर एकदम 2014 आले का हो? आणि 2014 च्या आधी फक्त 2012 होते का? रोहीत शर्माचे सुरवातीपासूनचे सर्व कसोटी डाव बघा (६ नोव्हेंबर २०१३ पासून आजतगायत). १७७, १११* (दोन्ही भारतात विंडीजविरूद्ध), १४, ६, ०, २५ (द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध), ७२, १९, ०, ३१* (न्यूझीलँडमध्ये किवींविरूद्ध), २८, ६ (सध्याच्या मालिकेत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध) भारतातल्या पाटा खेळपट्टीवर विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीसमोर तो २ डाव खेळला व दोन्ही डावात शतके केली. पण भारताबाहेर पडताक्षणी त्याच्या धावा बंद झाल्या. ७२ हा एकमेव डाव वगळता परदेशातील १० पैकी ९ डावात तो अपयशी आहे. त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की लागोपाठ अनेक डावात अपयशी ठरूनसुद्धा तो संघात असतो. उदा. १७ फेब्रु २००८ ते ३ जुलै २००९ या अंदाजे साडेसोळा महिन्यांच्या कालावधीत तो एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळला. त्यात फक्त २ अर्धशतके (५८ आणि ६६)आणि एकदा ४३ व एकदा ३२ धावा केल्या होत्या. उर्वरीत २७ सामन्यात त्याने ० ते २८ च्या दरम्यान धावा केल्या होत्या. त्यात १५ वेळा त्याने एकेरी आकड्यात धावा केल्या आहेत (३१ पैकी १५ सामन्यात एकेरी धावा आणि त्यात ३ वेळा ०). तरीसुद्धा तो संघात टिकला. २०१० मध्ये त्याने तुलनेने काहीशी कामगिरी सुधारली. नंतर ११ डिसेंबर २०११ ते ३० डिसेंबर २०१२ या अंदाजे साडेबारा महिन्यात तो एकूण १५ सामने खेळला. त्यात फक्त १ अर्धशतक (६८ धावा) होते. उर्वरीत १४ डाव तो ० ते ३३ या दरम्यान बाद झाला. त्यात १५ पैकी ८ डावात त्याने एकेरी धावा केल्या (त्यात ३ वेळा ०). जुलै २०१२ मध्ये श्रीलंकेत झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात खेळविले होते आणि त्याची कामगिरी होती ५, ०, ०, ४, ४. आश्चर्य म्हणजे या मालिकेपाठोपाठ लगेचच शेवटचा ट-२० सामना होता. ५ सामन्यात अपयशी ठरल्यावर निदान ट-२० मध्ये तरी त्याच्याऐवजी दुसर्‍या फलंदाजाला संधी द्यायला हवी होती. परंतु तो धोनीचा लाडका असल्याने या सामन्यात पण त्यालाच संधी मिळाली. त्याची कामगिरी बघता तो अनेकवेळा लागोपाठ अनेक सामने अपयशी ठरून सुद्धा त्याला वारंवार संधी मिळाल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यामुळेच रहाणेसारखा गुणी खेळाडू अनेक वर्षे संघाबाहेर राहिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Mon, 08/04/2014 - 00:54
सचिन आणि युवराजनंतर सर्वात शैलीदार फलंदाज आज रोहित शर्मा आहे. तो भरात असताना त्याचा खेळ ज्यांनी कुणी बघितला आहे ते हे अमान्य करू शकत नाहीत. मनोरंजन हा जर क्रिकेट बघण्याचा उद्देश आसेल तर रोहित एवढं मनोरंजन करणारा आज आपल्याकडे कुणीच नाही. पण हे माझं मत झालं. जसं रहाणे हा गुणी खेळाडू असल्याचं आपलं मत आहे तसंच. आपण आपली मतं स्वतंत्रपणे का मांडत नाही? माझ्या प्रश्नांच्या खालीच आपण आपली मतं मांडल्यामुळे माझा असा गैरसमज झाला की ही माझ्या प्रश्नांना आपली उत्तरे आहेत. आपल्या सोइसाठी माझे प्रश्न सोपे करुन सांगतो- 1. 2013 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या? 2. 2011 साली रोहितने किती सामन्यात किती धावा केल्या 3. रोहित हा आजपर्यंत सगळे मिळून एकूण किती कसोटी सामने खेळला आहे की ज्या आधाराने तो लाडका आहे असे दिसून येते?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Mon, 08/04/2014 - 12:50
रोहीतच्या कसोटी डावांची माहिती आधीच्या प्रतिसादात दिली आहे. त्याची पुनरावृत्ती इथे करत नाही. त्याची २०११ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (१२/१/२०११ ते ११/१२/२०११) (द. आफ्रिकेत) ११, ९, २३, १, ५, (वेस्ट इंडीजमध्ये) ६८*, ७*, ८६*, ३९, ५७, (इंग्लंडमध्ये) ०*, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, ९०*, ९५, २७, २१ ही कामगिरी अतिशय बोलकी आहे. परदेशात, विशेषतः आफ्रिकेत, तो कायमच अपयशी ठरताना दिसतो. ५ सामन्यांच्या मालिकेत पहिले ३ सामने अपयशी ठरूनही त्याला उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (११, ९, २३, १, ५). नंतर २०१२ मध्येही श्रीलंकेत पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात ५, ०, ० अशी कामगिरी करूनसुद्धा त्याला वगळले जात नाही व उर्वरीत सर्व सामने खेळविले जातात (५,०,०,४,४). यावरून तो कर्णधाराच्या मर्जीतला आहे हे सिद्ध होतं. याच रोहीतची कामगिरी भारतात व विंडीजच्या अतिसामान्य गोलंदाजीविरूद्ध एकदम सुधारते आणि त्या भांडवलावर तो संघात स्थान टिकवितो. पण इतर देशांविरूद्ध त्याची कामगिरी एकदम ढेपाळते. त्याने २०१२ मध्ये १३ एकदिवसीय सामन्यात एकूण १६८ धावा केल्या (त्यात फक्त एक अर्धशतक - ८३). ही अत्यंत खराब कामगिरी बघता त्याला एकदिवसीय सामन्यातून वगळायला हवे होते. पण तरीसुद्धा तो संघात होता. त्याची २०१३ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (२३/१/२०१३ ते ०८/१२/२०१३) (भारतामध्ये इंग्लंडविरूद्ध) ८३, ४ (चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये) ६५, ५२, १८, ३३, ९ (वेस्ट इंडिजमध्ये) ६०, ५, ४६, ४८*, ५८ (झिंबाब्वेमध्ये) २०, १, १४, ६४* (भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध) ४२, १४१*, ११, ९, ७९, २०९, (भारतात विंडीजविरूद्ध) ७२, १२, ४ (द. आफ्रिकेत) १८, १९ यावरून पुन्हा एकदा असंच दिसतंय की तो विंडीजविरूद्ध आणि बहुतेक वेळा भारतीय खेळपट्ट्यांवरच धावा करतो. इतर देशात त्याच्या धावा बहुतेक वेळा आटलेल्या दिसतात. अगदी झिंबाब्वेमध्ये सुद्धा ४ पैकी ३ डावात तो अपयशी होता. द. आफ्रिकेविरूद्ध तर तो कधीच धावा करताना दिसत नाही. त्याची २०१४ मधील एकदिवसीय सामन्यातील कामगिरी अशी होती. (न्यूझीलँड मध्ये) ३, २०, ३९, ७९, ४ (बांगलादेश मध्ये) २१, १३, ५६, १८* विंडीजशिवाय इतर देशांमध्ये तो फारसा यशस्वी नसतो हे पुन्हा एकदा २०१४ वरून सिद्ध होतंय.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 08/07/2014 - 19:21
नाही हो, असं नाही. तीन वाक्यात उत्तर देता येत होतं. आपण अगोदर रोहितबद्द्ल टीका करताना कसं २०१३ मध्ये त्याने अमुक एवढे रन केले असं एका वाक्यात लिहिलं होतंत ना, तसंच. आता तुम्ही एक काम करा. खाली मी तयार वाक्यच देतो. त्यात गाळलेल्या जागा फक्त भरा- १. रोहित शर्माने २०१३ साली _____ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. २. रोहित शर्माने २०११ साली ________ सामन्यांमध्ये ______ धावा केल्या. ३. रोहित शर्मा सगळ्या मिळून आत्तापर्यंत ___ कसोटी खेळला आहे, ज्यावरून असे सिद्ध होते की तो कर्णधाराचा लाडका आहे.

देशपांडे विनायक गुरुवार, 07/31/2014 - 18:13
जडेजाने सोडलेला CATCH आणि रोहित शर्माने पहिल्या इंनिंग ला फेकलेली विकेट यामुळे हरण्याला पर्याय नाही असे दिसायला लागले होते ते शेवटी दिसलेच

बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 11:20
वृध्दीमान साहा भारतात परतणार आहे .. बहुतेक दुखापतीमुळे. त्याच्याजागी नमन ओझाला बोलावले आहे. नमन ओझाने ऑस्ट्रेलियात ३ डावात १ द्विशतक आणि २ शतके केली आहेत त्यातही २ दा नाबाद. दोनही सामने ब्रिस्बेनच्या उसळत्या खेळपट्टीवर होते. तो वेळेत पोहोचला तर त्याची वर्णी लागावी असे वाटते. इशांत चौथा सामनाही खेळु शकणार नाही हे धोणीने कालच स्पष्ट केलय. त्यामुळे बदल होणार संघात हे नक्की. पण अति बदल टाळण्यासाठी कदाचित शमीला परत संधी मिळु शकेल. संघ असा असावा ४थ्या सामन्यासाठी असे वाटते. विजय, ओझा/ गंभीर, पुजारा, कोहली, रहाणे, धोणी, जडेजा, अश्विन, भुवनेश्वर, शमी, पांडे/ अ‍ॅरॉन

भाते गुरुवार, 08/07/2014 - 23:41
दहापैकी सहा खेळाडू शुन्यावर बाद! एका कसोटी सामन्यात सर्वाधिक खेळाडू शुन्यावर बाद होण्याचा जागतिक विक्रम काय आहे? सचिनने वयाच्या सतराव्या वर्षी इथेच आपले पहिले कसोटी शतक झळकावले होते!

श्रीगुरुजी Mon, 08/11/2014 - 12:21
६-७ दिवस मिपा संकेतस्थळ बंद होते. तेवढ्यात चौथा कसोटी सामना सुरू होऊन ३ दिवसांत संपलादेखील. तिसर्‍या दिवशी शेवटच्या केवळ एका सत्रात भारताने ९ गडी गमावून स्वतःच्या आणि इंग्लंडच्या संघाचीही विश्रांतीची सोय केली. ते सत्र खेळून काढले असते तर उगाच चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये येऊन बसावे लागले असते आणि दिवसभर पावसाची दाट शक्यता असल्याने खेळही नाही आणि आउटिंग पण नाही अशी भारताची व इंग्लंडची कंटाळवाणी अवस्था झाली असती. ५ व्या दिवशीही तेच झाले असते. त्याऐवजी भारतीय खेळाडूंनी पटापट विकेट फेकून सर्वांचीच अडचणीतून मुक्तता केली. त्यामुळे विराट कोहलीला अनुष्काबरोबर फिरायला २ जास्त दिवस मिळाले. इतरांनाही फुकटचे २ दिवस पदरात पडले. भारताच्या पहिल्या डावात तब्बल ६ खेळाडूंनी शून्य धावा करून एका जागतिक विक्रमाची बरोबरी केली. या पराभवाबरोबर धोनी आता भारताच्या क्रिकेट इतिहासातील परदेशातील सामन्यातील सर्वाधिक अयशस्वी कर्णधार ठरलेला आहे. पूर्ण फॉर्म हरविलेल्या कुक ला भारतानेच मदतीचा हात दिला. भारताचे प्रमुख फिरकी गोलंदाज बळीसाठी झगडत असताना कामचलावू फिरकी गोलंदाज मोईन अली तब्बल १९ बळी मिळवून मुख्य गोलंदाज बनण्याचे श्रेय भारताचेच आहे. आपल्या पहिल्या बळीसाठी झगडणार्‍या बिचार्‍या पंकज सिंगला शेवटी २ बळी मिळाले हीच त्यातल्या त्यात जमेची बाजू. असो. आता ५ व्या कसोटीसाठी भारताने जास्त विचार करू नये. उर्वरीत मोकळे दिवस सराव वगैरे सारख्या फालतू गोष्टीत वाया न घालविता शॉपिंग, आउटिंग, डेटिंग, पिकनिक इ. महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरावेत. संघ निवडीच्या वेळी सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून पहिले ज्याचे नाव येईल त्याला कर्णधार करावे व उर्वरीत १० खेळाडू चिठ्ठ्या टाकून उचलावेत. कारण कोणीही संघात असले तरी काहीही फरक पडणार नाही. शेवटी पत्त्याच्या कॅटमध्ये जर सर्व ५२ पत्ते कर असले, तर कितीही वेळा पत्ते पिसले तरी काय फरक पडणार आहे?

सौंदाळा Mon, 08/11/2014 - 17:44
लज्जास्पद पराभव. मोईन अली विकेट काढतो, जडेजा, अश्विन मात्र रिकामेच. लॉर्डस् वर जिंकलेला संघ हाच का असा प्रश्न पडलाय.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/14/2014 - 21:09
उद्यापासून शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. सुरवातीला १-० असा आघाडीवर असणारा भारत आता १-२ असा मागे पडला आहे. भारत परदेशात लागोपाठ मालिका हरत आहे. २०११ च्या विश्वचषक विजयानंतर भारत परदेशात एकूण ५ मालिका खेळला. त्यापैकी वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये भारत मालिका हरला. आता ही मालिकादेखील भारत हरण्याच्या मार्गावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत परदेशात खेळलेले १३ कसोटी सामने हरलेला आहे. याबाबतीत विक्रम ब्रायन लारा व स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर आहे. दोघेही कर्णधार असताना परदेशात एकूण १६ कसोटी सामने हरले होते. धोनी त्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. उद्या इशांत शर्मा आत येणार हे नक्की. बहुतेक पंकजसिंग बाहेर जाईल. कदाचित जडेजाच्या जागी स्टूअर्ट बिन्नी आत येऊ शकतो. बाकी सगळे "नेहमीचेच यशस्वी कलाकार" असतील. असो. निदान अंतिम कसोटीत तरी भारताने आपली गेलेली अब्रू काही प्रमाणात परत मिळवावी हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

श्रीगुरुजी Tue, 08/19/2014 - 12:15
भारतीय संघाला शिव्या द्यायची पण लाज वाटतीये. शिव्या द्यायची पण यांची लायकी नाही. लागोपाठ ३ वेळा एक-दीड सेशन मध्येच ऑलआऊट झाला याची धोनी किंवा इतर कोणालाही लाज, लज्जा, खंत, शरम इ. काहीही वाटत नाही. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटचा सत्यानाश झाला हे उघड सत्य आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या आयपीएलचे दुष्परिणाम २०११ मध्येच दिसू लागले होते. सचिन, द्रविड इ. चे तंत्र सुद्धा शेवटी शेवटी बिघडल्याचे दिसले त्याचे कारण आयपीएलच होते. द्रविडसारखा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज आपल्या शेवटच्या १५-१६ डावात बहुतेक वेळा त्रिफळा बाद झाला होता तो तंत्र बिघडल्यामुळेच. भारतातल्या पाटा खेळपट्ट्यांवर फलंदाजाला अनुकूल क्षेत्ररक्षक रचनेसमोर बॅट कशीही वेडीवाकडी फिरवून १५-२० चेंडू खेळून २५-३० धावा करणारे शूर वीर कसोटीत एकत्रित ३० षटके सुद्धा टिकू शकत नाहीत हे बघणे अत्यंत क्लेशदायक होते. पूर्वी गावसकर तब्बल २-२ दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी करत असे. आताचे खेळाडू अर्धा तास सुद्धा टिकू शकत नाहीत हे अत्यंत दुर्दैव आहे. एवढी नामुष्की होऊनसुद्धा "उगाच आयपीएलवर जळू नका" असे अत्यंत निगरगट्टपणे धोनी बजावत होता. आयुष्यात हातात कधीही चेंडूफळी न धरलेल्या पुढार्‍यांनी जेव्हा बीसीसीआयमध्ये शिरकाव केला तेव्हाच भारतीय क्रिकेटच्या अधोगतीला सुरूवात झाली. ज्या ज्या क्षेत्रात पुढारी घुसतात त्या सर्व क्षेत्रांचा सत्यानाश होतो. भारतीय क्रिकेट सुधारण्याचे उपाय म्हणजे सर्वप्रथम या पुढार्‍यांना बीसीसीआय मधून हाकलून देणे आणि आयपीएल बंद करणे. जर आयपीएल बंद करणे शक्य नसेल तर निदान आयपीएलमध्ये न खेळणार्‍यांनाच कसोटी संघात निवडावे व आयपीएलमध्ये खेळणार्‍यांना फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळवावे. आणि तेही शक्य नसेल तर भारताने कसोटी क्रिकेट खेळणे थांबवावे.

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Wed, 08/20/2014 - 20:02
+१ शर्यतीचा बैल वेगळा, शेतीसाठी काम करणारा बैल वेगळा आणि 'ते' काम करणारा वळु वेगळा ;) क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/21/2014 - 21:08
>>> 'ते' काम करणारा वळु वेगळा *LOL* >>> क्रिकेटर्सचीपण आयपील, वन डे, टेस्ट अशी वर्गवारी केली पाहीजे. कमीत कमी कसोटी साठी तरी वेगळे खेळाडु पाहीजेतच असे वाटते. + १ सध्या एकच बदल लगेच करता येईल. कसोटीसाठी आयपीएल खेळलेले कमीतकमी खेळाडू निवडावेत.

श्रीगुरुजी Mon, 08/25/2014 - 12:24
आजपासून भारत वि. इंग्लंड ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. आजचा सामना ब्रिस्टलमध्ये भारतीय वेळेनुसार दु. ३ वाजता सुरू होईल. कसोटी सामन्यात माती खाल्लेल्या भारताने निदान एकदिवसीय सामन्यात तरी अब्रू राखावी. ५ सामन्यांपैकी निदान २ सामने तरी जिंकावेत. म्हणजे किमान लंगोटी तरी शाबूत राहील. आजपासून झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका यांच्यात झिंबाब्वेमध्ये तिरंगी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होत आहे. आज झिंबाब्वे वि. ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीय वेळेनुसार दु. १ वाजता सुरु होईल. आज विंडीज वि. बांगला यांच्यात देखील एकदिवसीय सामना आहे. तो सामना भा.प्र.वे. नुसार मध्यरात्री १२ वाजता सुरू होईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 08/28/2014 - 12:47
काल चक्क जिंकलो आपण. तब्बल १३३ धावांनी जिंकलो. काही अपवाद वगळता संघातील सर्वांचीच कामगिरी उत्तम झाली. धवन आणि कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरले. कोहलीला आता काही काळ विश्रांती द्यायची वेळ आली आहे. त्याची पूर्वपुण्याई संपत आली आहे. तिकडे झिंबाब्वेमधील तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत तब्ब्ल ३२७ धावा करून सुद्धा पराभव पदरी पडला. द आफ्रिकच्या फाफडू आणि डी व्हीलिअर्स या दोघांनी वेगवान शतके झळकावून आफ्रिकेला विजयी केले. मागील ६-७ सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३०० पेक्षा अधिक धावा करूनसुद्धा सामना हरावा लागला आहे. भारतात तर भारताने २ वेळा ३५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान यशस्वीरित्या गाठून ऑस्ट्रेलियाला हरविले होते. गोलंदाजांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by बाळ सप्रे

श्रीगुरुजी Sun, 08/31/2014 - 20:47
सन्घ तोच आहे, पण सामन्यान्चे फॉर्मॅट बदलले आहे. हाच सन्घ कसोटी सामन्यात २ सेशन सुद्धा टिकू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Tue, 09/02/2014 - 15:39
आणि ह्या इंग्लिश संघाबद्द्लही काही ? तो कसोटीत किती सेशन टिकेल? दोघांचेही हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ फारच वेगळे आहेत.

In reply to by असंका

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:16
इंग्लंडचा एकदिवसीय संघ आणि कसोटी संघ यात बरेच बदल आहेत. प्रमुख गोलंदाज ब्रॉड दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. हेल्स, मॉर्गन, गर्नी, फिन हे कसोटी मालिकेत नसलेले खेळाडू संघात आहेत. भारताचा कसोटी संघ व एकदिवसीय संघ बराचसा सारखा आहे. रैना हा एकमेव खेळाडू (आणि ४ थ्या सामन्यात आलेला धवल कुलकर्णी) सोडला तर उर्वरीत सर्वजण कसोटी संघातलेच आहेत. त्यामुळे या दोन संघात एकदिवसीय संघाचे खेळाडू घेऊन कसोटी मालिका झाली तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल.

In reply to by श्रीगुरुजी

असंका गुरुवार, 09/04/2014 - 16:25
मुरली विजय आणि गौतम गंभीरने गेल्या तीनपैकी किती सामन्यात बॅटिंगची ओपनींग केली? चेतेश्वर पुजारा किती वेळा तीन/चार नंबरला आला? इशांत शर्मा, आणि वरूण आरोनने किती ओवर टाकल्या गेल्या तीन सामन्यात? एकूण पाच खेळाडू फार विचार न करता सांगता आले. मग सांगा बदल आहे की नाही?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 13:06
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला नक्की समजले नाही. आताच्या भारताच्या एकदिवसीय संघात कसोटी संघाच्या तुलनेत बरेच बदल आहेत असा तुमचा दावा असावा. हे गृहीत धरून प्रतिसाद देत आहे. आताचा भारताचा एकदिवसीय संघ पाहिला तर ११ पैकी ९ जण कसोटी संघात सुद्धा होते. फक्त रैना व धवल कुलकर्णी एकही कसोटी खेळले नाहीत. संघात फारसा बदल नाही. कसोटीत खेळलेला जवळपास सर्व संघच एकदिवसीय सामने खेळत आहे. परंतु संघाची कामगिरी अचानक सुधारली आहे. या ११ पैकी सर्वजण व कसोटी खेळलेले सर्वजण आयपीएल मध्ये नियमित खेळतात. एकंदरीत हा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांकरिता जास्त योग्य आहे. या संघातील बहुतेक जण कसोटी सामन्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे निवड समितीने विचार करून कसोटी सामन्यांसाठी पूर्ण वेगळा संघ निवडावा. कसोटी संघात स्थानिक स्पर्धा खेळलेलेच खेळाडू असावेत. आयपीएल मधील खेळाडूंना कसोटी सामन्यात खेळणे अवघड जात आहे. त्यामुळे आयपीएल मधील खेळाडूंचा कसोटी साठी विचार करू नये.

In reply to by श्रीगुरुजी

असंका Fri, 09/05/2014 - 13:57
माझा काहीही दावा नाहिये. आपण मात्र दावा करत आहात की हा संघ कसोटीत एक सेशन पण टिकणार नाही. त्यावर माझा आपल्याला असा प्रश्न होता की मग इंग्लंडचा हा संघ किती सेशन टिकेल? कारण माझ्या मते अशी तुलना योग्य होणार नाही. कारण माझ्या मते, दोन्ही देशांचे हे संघ आणि कसोटी खेळलेले संघ वेगळे होते. इंग्लंडने बदललेले खेळाडू आपल्याला माहित असावे कारण आपण यादी दिली आहेच. भारतानेही असे अनुरूप बदल केले आहेत. कोण कोण वगळले ते मी वर सांगितले आहेच. परत सांगतो- मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वरूण आरोन. मग आता वन डे स्पेशालिस्ट संघ - तोही विजयी संघ; कसोटीत कसा खेळेल, यावर टिप्पणीचे प्रयोजन काय?

In reply to by असंका

श्रीगुरुजी Fri, 09/05/2014 - 20:43
हा संघ कसोटीत पुन्हा एकदा अपयशी ठरेल हे उघडच आहे कारण नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत खेळलेल्या संघातले बहुतेक सर्व खेळाडू एकदिवसीय संघात कायम ठेवण्यात आले आहेत. जे नवीन आले आहेत त्यापैकी सुरेश रैना हा कसोटीत बर्‍याच वेळा अपयशी ठरलेला आहे. म्हणजे तो येऊनही फारसा फायदा नाही. धवल कुलकर्णी अजून कसोटी खेळलेलाच नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल अंदाज करण्यात अर्थ नाही. या दोन्ही संघांच्या एकदिवसीय संघामध्ये जर कसोटी सामना झाला तर पुन्हा एकदा इंग्लंडच जिंकेल कारण भारतीय संघात फारसे बदल नाहीत आणि इंग्लंड संघात काही बदल असले तरी कसोटीत भारताचा कर्दनकाळ ठरलेले कुक, रूट, अ‍ॅण्डरसन, अली, बटलर इ. मंडळी एकदिवसीय संघात आहेतच. खरं सांगायचं तर भारताने कसोटीसाठी एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य असलेला संघ खेळविला आणि इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांसाठी कसोटीसाठी योग्य असलेला संघ खेळविला. त्याचे परीणाम दोन्ही संघांना भोगावे लागले आहेत.

श्रीगुरुजी Wed, 09/03/2014 - 14:19
भारताने लागोपाठ ३ रा सामना जिंकून एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. २०११ च्या तुलनेत एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी झाली. इंग्लिश संघ एकदिवसीय सामन्यात पारच ढेपाळलेला दिसतोय. पीटरसनला काढून त्यांनी मोठी चूक केलेली आहे. बोपारा व ब्रेस्ननला बाहेर ठेवणे हीदेखील मोठी चूक आहे.

श्रीगुरुजी Sat, 09/06/2014 - 14:36
शेवटचा सामना हरून भारताने एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यशाची संधी घालविली. बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की मालिका जिंकल्यानंतर उर्वरीत सामन्यात भारतीय संघ एकदम शिथिल पडतो. या मालिकेतही तसेच झाले. खरं तर शेवटच्या सामन्यात स्वतः धोनीने विश्रांती घेऊन संजू सॅमसनला खेळवायला हवे होते. तसेच स्टुअर्ट बिन्नी, कर्ण शर्मा यांनादेखील संधी हवी होती. थकलेल्या भुवनेश्वरकुमारला खेळविण्यात अर्थ नव्हता. असो. आता उद्या दौर्‍यातला शेवटचा ट-२० सामना आहे. तो जिंकून शेवट गोड करावा.
भारत व इंग्लंड यांच्यात इंग्लंड येथे २६ जून २०१४ ते ७ सप्टेंबर या दरम्यान क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे. या मालिकेत भारत इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ५ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने व एक २० षटकांचा सामना खेळेल. तसेच स्थानिक संघांविरूद्ध दोन ३-दिवसीय सामने व १ एकदिवसीय सामना आयोजित केलेला आहे. भारत २६ जून पासून लिस्टरशायर विरूद्ध ३ दिवसांच्या सामन्याने मालिकेचा शुभारंभ करेल व ७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या २० षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्याने मालिकेची सांगता होईल.