मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फेसबुकी सुंद्री आणि नवकवी

खटासि खट ·

अभ्या.. 30/01/2016 - 22:02
बिपिन वर्टी नायतर चंद्रकांत महामिने दिवाली अंकात असल्या कथा लिहायचे. ज्ञानेश सोनारानी काढलेली मधुरा इम्याजिन झाली डोळ्यासमोर. पुलेशु

In reply to by अभ्या..

बोका-ए-आझम 31/01/2016 - 02:25
अ.वा.वर्टी असतील ते. असल्या कथा लिहिणारे अजून एक म्हणजे श्रीकांत मुंदरगी.

In reply to by अभ्या..

नाखु 01/02/2016 - 09:15
डॉ आहेत ते शिवाय अशोक पाटोळे आणि इंद्रायणी सावकारही अश्या कथा देत आवाज किंवा जत्रा मध्ये. चित्रे ज्ञानेश सोनारांपेक्षा पत्कींची असतील तर नक्की उठावदार+ठसठशीत असतील अशी नम्र नोंद करतो. जत्रा ,आवाज मोहिनी आणि अश्या दिवाळी अंकांचा एकनिष्ठ वाचक नाखु.

अजया 31/01/2016 - 08:55
:) मस्तच! असे एक खरोखरीचे प्रोफाईल नुकतेच बघण्यात आल्याने जास्तच मजा वाटली. त्या बाईंनी घाण कॅमेर्याने काढलेला धुरकट फोटो तिच्या प्रोफाईलवर टाकलाय.त्या धुरकटपणाला नशिले नैन वगैरे कमेंट करणारे अनेक मजनू आणि त्या कमेंटा लाइक करणारी ती सुंद्री हे बघून बरेच मनोरंजन झाले होते!

माहितगार 31/01/2016 - 09:19
:) मस्तच ! काही वेळा लेखक कविचे एखादे लेखन वाचनात येते मग तुम्ही त्या लेखक अथवा कविची प्रोफाईल धुंडाळून त्याने अजून काय लिहिले आहे ते शोधून वाचता तसेच ही कथा वाचून वाटले. आपले मागचे काही मिपावर प्रकाशित लेखन काढून वाचले त्यातील नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद, अध:पतन, विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?, शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय हे आवडण्यात आले.

अभ्या.. 30/01/2016 - 22:02
बिपिन वर्टी नायतर चंद्रकांत महामिने दिवाली अंकात असल्या कथा लिहायचे. ज्ञानेश सोनारानी काढलेली मधुरा इम्याजिन झाली डोळ्यासमोर. पुलेशु

In reply to by अभ्या..

बोका-ए-आझम 31/01/2016 - 02:25
अ.वा.वर्टी असतील ते. असल्या कथा लिहिणारे अजून एक म्हणजे श्रीकांत मुंदरगी.

In reply to by अभ्या..

नाखु 01/02/2016 - 09:15
डॉ आहेत ते शिवाय अशोक पाटोळे आणि इंद्रायणी सावकारही अश्या कथा देत आवाज किंवा जत्रा मध्ये. चित्रे ज्ञानेश सोनारांपेक्षा पत्कींची असतील तर नक्की उठावदार+ठसठशीत असतील अशी नम्र नोंद करतो. जत्रा ,आवाज मोहिनी आणि अश्या दिवाळी अंकांचा एकनिष्ठ वाचक नाखु.

अजया 31/01/2016 - 08:55
:) मस्तच! असे एक खरोखरीचे प्रोफाईल नुकतेच बघण्यात आल्याने जास्तच मजा वाटली. त्या बाईंनी घाण कॅमेर्याने काढलेला धुरकट फोटो तिच्या प्रोफाईलवर टाकलाय.त्या धुरकटपणाला नशिले नैन वगैरे कमेंट करणारे अनेक मजनू आणि त्या कमेंटा लाइक करणारी ती सुंद्री हे बघून बरेच मनोरंजन झाले होते!

माहितगार 31/01/2016 - 09:19
:) मस्तच ! काही वेळा लेखक कविचे एखादे लेखन वाचनात येते मग तुम्ही त्या लेखक अथवा कविची प्रोफाईल धुंडाळून त्याने अजून काय लिहिले आहे ते शोधून वाचता तसेच ही कथा वाचून वाटले. आपले मागचे काही मिपावर प्रकाशित लेखन काढून वाचले त्यातील नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद, अध:पतन, विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?, शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय हे आवडण्यात आले.
मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत.

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

पुणे मुंग्रापं ·

काही प्रमाणात सहमत , पण पूर्णतः नाही. छोटया मोठ्या प्रमाणात वसुली ठीक आहे, पण मोठ्या रकमेचा दावा असेल तर कर्मचाऱ्यावर अन्याय होईल . अगोदरच आपल्या इथे सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. त्यात कामाचा ताण अधिक .वर अशा प्रकारची वसूली मागे लागली तर जरा जास्तच अवघड होईल .

In reply to by संदीप डांगे

साहेब , हा जोक नाहीये . माझ्याकडे विदा नाहीये पण बहुतांशी सरकारी अॉफिसेस मधे अक्षरशः ४०-५०% कर्मचारी आहेत. "सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारचे जावई" ही संकल्पना कधीच कालबाह्य झालीए.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 25/01/2016 - 10:48
विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे किती टक्के कर्मचारी आहेत ह्यापेक्षा किती लोक शिस्तीत काम करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सर्वच घटक 'आमच्यावर कसा अन्याय होतो' ह्याची रडगाणी गात असतात. म्हणजे ते खरेच असते असे नाही. प्रत्येक गोष्टीला दुसर्‍या बाजूही असतात. @ मोदकजी, इथे कुठे सरसकटीकरण दिसले? अपवाद आणि वेरियेशन्स प्रत्येक बाबतीत जगात आहेत. पण मी नेहमी सरसकटीकरण करुनच बोलतो हा समजही तुम्ही माझ्याबाबतीत करत असलेल्या सरसकटीकरणाचा पुरावा आहे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 11:55
इथे कुठे सरसकटीकरण दिसले? सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण - जोक करता काय राव? सरकारी नोकर म्हणजे नक्की कोणते नोकर तुम्ही गृहीत धरले आहेत? पुणे म्युन्सीपालिटीमध्ये उंदीर मारणार्‍या लोकांपासून ते सीमेवर लढणारे जवान सगळेच सरकारी नोकर आहेत. सगळेच जण पाट्या टाकत काम करतात असे म्हणायचे आहे का? ..आणि एकदा "सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण" हा जोक आहे असे मान्य केल्यानंतर त्यामध्ये अपवाद असतात, वेरियेशन्स असतात वगैरे गोष्टी तुमच्या मूळ विधानालाच छेद देत नाहीत का? तुम्ही नेहमीच सरसकटीकरण करत नाही असे माझ्या स्वाक्षरीवरून तुमच्या लक्षात येईल असे वाटले होते. ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 12:10
मोदकजी, आक्षेप नेमका कशावर आहे? "काही" किंवा "बहुतेक" असे शब्द न वापरता लिहिले म्हणून काय? मूळ प्रतिसादात उगा यांनीही सरसकटीकरण केले आहे ते आपणास मान्य आहे का? त्यांचेच सरसकटीकरण उचलून मी 'जोक' म्हटलंय. ते माझे मत समजा. किंवा सरकारी नोकरांबाबत समाजात रूढ असलेली प्रतिमा समजा. एवढ्यासाठी लगेच अंगावर येण्याची तगमग नेमकी कशासाठी आहे? बाकी तुम्ही सूज्ञ आहात. एखादाच शब्द पकडून गुर्हाळ घालणे पटत नै बॉ. जोक आहे, जोकसारखा घ्या. त्यासाठीही विदा / स्पष्टीकरण मागायला लागणे जरा अतिच होते. तसे असेल तर जगातले सगळे जोक बाद होतील व कोणीच कोणावर कसलेही विनोद करू नये असे बळजबरीचे वातावरण होईल.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 12:35
आक्षेप याच्यावर आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना दुसर्‍या व्यक्तीच्या कामाप्रती थोडे संवेदनशील असावे आणि थोडाफार आदर द्यावा. तुमच्या वाक्यातून जाणारा संदेश चुकीचा आहे असे माझे मत आहे म्हणून उपप्रतिसाद दिला. मूळ प्रतिसादाशी बाडीस नसल्याने "अंशतः" शब्द वापरला आहे. ..मुळात आपण सगळे जण २४ तास आदर्शवत् वागतो का? मी सुद्धा आत्ता ऑफिसमध्ये मिपामिपा खेळतच आहे. तुमच्या व्यवसायामध्येही असे पाट्या टाकणारे लोक असतीलच मग (कदाचित तुम्हाला सरकारी नोकरांचा वाईट अनुभव आला असेल म्हणून) सरकारी नोकरांवर असलेला कामाचा ताण हा जोक कसाकाय असू शकेल?

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 13:03
मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला शब्दच्छल करायचा असेल तर करा खुशाल. कामाबद्दल जोक नसून कामाच्या 'ताणा'बद्दल आहे हे आपणांस कळले नाही काय? ज्या वेगाने सरकारी ऑफिसात फायली सरकतात, ज्या वेगाने शासकिय निर्णय राबवले जातात, ज्या वेगाने जनतेला सेवा मिळते त्याबाबतीत आपण व सामान्यपणे सर्व नागरिक "ग्राहकांप्रति जबाबदार असलेल्या" सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या दर्जाबद्दल समाधानी असाल तर प्रश्नच उद्भवत नाही. सीमेवरचे सैनिक, इत्यादी चर्चेत आणून तुम्ही नको तिकडे विषय ताणताय असे वाटत नाही काय? प्रस्तुत धाग्यात ज्या सरकारी कर्मचार्‍यांच्या उत्तरदायित्वावर लिहिले आहे त्या सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या 'ताणा'बद्दल आहे जोक. पटत नसेल तर सोडून द्या. एवढं छिद्रान्वेषी व्हायची गरज तर वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

विदा काढा मग बोलू...
सरकारी खात्यातील माहिती सहजासहजी उपलब्ध नाही . आणि तेवढा वेळही नाही . पण तरीही एक लिंक मिळाली . भारतात सरकारी डॉक्टर कमी आहेत याची. शिवाय तुम्हीही lack of employees in government of india / maharashtra वगैरे गुगल करू शकता. पोलिसांची कमतरता आहेच हे तर तुम्हाला माहीत असेलच. शिवाय कोर्टात न्यायाधीशांची कमतरता वगैरे मुद्देही मध्यंतरी गाजलेच. वादासाठी वाद नाही सर , पण खरंच सरकारी कर्मचाऱ्यांना पण ताण असतो. विचार करा आपल्याला ज्या पिएमटीमध्ये चढणंही अवघड असते त्यात कंडक्टर नावाचा स.क. दिवसभर तिकीट काढत असतो. तुमच्या मित्र वा नातेवाईकांपैकी कुणी क्लास 3-2 स.क. असेल ना तर त्याला विचारा कसं अन् किती काम असतं ते. जिप मधे कुणी असेल ना क्लास 1 मित्र त्याला विचारा ४थी पास जिप अध्यक्ष मिटींगमधे उभे करतो तेव्हा कसं वाटतं ते. संदिप भाऊ, घराच्या बांधकामाच्या वेळी मला नप मधे बरंच काम पडायचं तिथे अक्षरशः ५ मिनिटे पण बसावेसे वाटत नसे. अशी अस्वच्छता होती पण तेथील कर्मचारी ८-१० तास बसत असत. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे . पाट्या टाकणारे कर्मचारी नाहीतच असे माझे म्हणजे नाही. पण सक म्हणजे रिकामटेकडे अथवा कामचुकारच हा मुद्दा पटला नाही इतकेच...

In reply to by मोदक

नाखु 23/01/2016 - 14:40
सरकारी खात्यात याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची सवय असल्याने "बकरा" शोधून खापर फोडले जाईल. अवांतर :आता तर अगदी केंद्रीय उत्पादन शुलक ते विक्री कर पर्यंत "कंत्राटी" कामगार काम करताना दिसतात "बाबू लोक" निवांत्पणे त्यांच्यावर डाफरताना दिसतात तेव्हा जबाबदारी बिचार्या ग्राहकाने शोधणे आले. प्रत्ययवादी नाखु

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:49
जे अधिकारी /कर्मचारी ग्राहकांच्या नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्याकडून ही नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . BOI National Swasthya Bima या योजनेखाली माझी मिडिक्लेम पॉलिसी होती. National Insurance Company मार्फत BOI ही योजना राबवते. विम्याचा वार्षिक हप्ता कस्टमरच्या अकाऊंटला डेबीट करुन NIC कडे पाठवायचा अशी लेड डाऊन प्रोसेस आहे. माझी पॉलिसी गेली अनेक वर्ष चालू होती. मागच्या वर्षी मात्र NIC नं बँकेला महिनाभर आधी पूर्व सूचना देऊनही बँकेनं प्रिमियम न भरल्यानं पॉलिसी लॅप्स झाली आणि मला पत्नीच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च स्वतःच्या पैश्यानी करावा लागला. या परिस्थितीत बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?

विजुभाऊ 25/01/2016 - 10:21
बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?
हो. त्या पूर्वी तुम्ही बँकेला तशा प्रकारच्या सुविधांसाठी सांगितलेले आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. एक शंका: एखादे कंपनी त्यांच्या वस्तुच्या सोबत काही मोफत सुविधा पुरवत असेल आणि जर त्या मोफत पुरवलेल्या सुविधेत काही तृटी आढळून आल्या तर अशा तृटींसाठी ग्राहक न्य्नायालयात जाता येते का?

In reply to by विजुभाऊ

विवेक ठाकूर 25/01/2016 - 12:00
आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. BOI-NSB ही योजनाच तशी आहे.

पैसा 25/01/2016 - 13:01
जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून पैसा न पैसा वसूल करतात. अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 15:51
अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.
ह्या बद्दल शंका वाटते. उद्योगपतींनी गेल्या २ दशकात काही लाख कोटींची कर्ज न फेडल्यामुळे एन पी ए झाली आहेत. ही रक्कम बँकेच्या कर्मचार्‍यांकडुन वसुल केली गेली आहे असे अजिबात वाटत नाही. उलट ही कर्ज देणारे रीटायर होऊन पेन्शन घेत असतील.

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 16:35
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 16:48
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.
पैसाताई - तुम्हाला असे म्हणायचे आहे की मल्या सारख्या लोकांना कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांवर काही कारवाई झाली आहे? कमीत कमी ७ बँकांचे शेकडो ( हो शेकडो ) अधिकारी मल्यांच्या कंपनीला कर्ज देण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत? तसेही रीटायर्मेंट बेनिफीट थांबवुन ह्या अधिकार्‍यांना काही फरक पडणार नाही, कारण ही असली कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल .

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 17:21
त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत?
एकेक केसबद्दल माहिती नाही. कारण स्टाफसंबंधीची माहिती बँकाकडून कधीच उघड होत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगितली. सर्व एन पी ए च्या बाबत जबाबदारी निश्चित होते मग अधिकारी एक दोन असोत की शेकड्यात असोत. आणि जबाबदार ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होते. ती नक्की काय असेल हे मी सांगू शकणार नाही.
कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल
शक्य आहे. आमच्या सिंडिकेट बँकेच्या एका माजी सी एम डी ला मधे अशाच प्रकरणात अटक झाली होती.

नाखु 25/01/2016 - 16:30
यादी The All India Bank Employees Association has released a list of top defaulters to public sector banks and no prizes for guessing who tops the list. It is Vijay Mallya's Kingfisher Airlines. The airline company, which has remained grounded for more than one year, has Rs 2,673 crore worth of dues to public sector banks. The company has more than Rs 7,000 crore debt and banks have been trying their best to recover the amount. According to media reports, SBI, which has the largest exposure of Rs 1,600 crore to the troubled company, had moved to take over Kingfisher Villa, Mallya's bungalow in Goa. However, Mallya got a relief as a local court restrained the banks from taking over the villa and ordered status quo. AFPAFP At a recent function in Goa, Mallya had blamed all but himself for Kingfisher's ills. The second big defaulter is Mumbai-based Winsome Diamonds, which has Rs 2,660 crore loan from banks. The association has asked the government take steps to address the alarming rise of non-performing assets in the banking sector. It has asked the government to publish the list of defaulters on bank loans of Rs 1 crore and above and urged to make wilful default a criminal offence. मूळ स्त्रोत्र असोसिएशन्चे अधिक्रुत प्रेस रिलिज DO YOU KNOW DAYLIGHT ROBBERY ? Bad Loans in Public Sector Banks (March 2008) Rs. 39,000 crores Bad Loans in Public Sector Banks (March 2013) Rs. 1,64,000 crores Bad Loans in Public Sector Banks ( September 2013) Rs. 2,36,000 crores Bad Loans restructured & shown as good loans Rs. 3,25,000 crores Fresh Bad loans in the last 7 years Rs. 4,95,000 crores Profits transferred and adjusted for provisions towards bad loans (2008 to 13) Rs. 1,40,000 crores: Bad Loans in 172 Corporate Accounts (Rs.100 crores and above) Rs. 37,000 crores Bad Loans constituted by top 4 defaulters in PSBs Rs. 23,000 crores Bad Loans in top 30 bad loan accounts in 24 Banks Rs. 70,300 crores Bad Loans ( Suit Filed ) in 3250 Accounts (Rs. 1 crore & above) Rs. 43,795 crores

Bad loans written off in the last 13 years Rs. 2,04,000 crores

आणि हे जर खरे असेल तर सामान्य नागरिकांचे किती पैसे हडपले गेले आहेत या बँकाचे शेअर होल्डर आणि कायदेतज्ञ /सल्लागार/ विचारवंत कसे मूग गिळून गप्प बसले आहेत. मिपा जाणकारांनी प्रकाश्/कंदील्/दिवा दाखवावा मुकाट वाचक नाखु

In reply to by प्रसाद१९७१

त्यांच्या बरोबर मजा मारत होती आणि जोडीने आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून ओरबाडत होते. कधीतरी पार्टी बंद व्यायची गरज होती पण ते कधी होइल माहिती नाही.

काही प्रमाणात सहमत , पण पूर्णतः नाही. छोटया मोठ्या प्रमाणात वसुली ठीक आहे, पण मोठ्या रकमेचा दावा असेल तर कर्मचाऱ्यावर अन्याय होईल . अगोदरच आपल्या इथे सरकारी कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. त्यात कामाचा ताण अधिक .वर अशा प्रकारची वसूली मागे लागली तर जरा जास्तच अवघड होईल .

In reply to by संदीप डांगे

साहेब , हा जोक नाहीये . माझ्याकडे विदा नाहीये पण बहुतांशी सरकारी अॉफिसेस मधे अक्षरशः ४०-५०% कर्मचारी आहेत. "सरकारी कर्मचारी म्हणजे सरकारचे जावई" ही संकल्पना कधीच कालबाह्य झालीए.

In reply to by उगा काहितरीच

संदीप डांगे 25/01/2016 - 10:48
विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे किती टक्के कर्मचारी आहेत ह्यापेक्षा किती लोक शिस्तीत काम करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सर्वच घटक 'आमच्यावर कसा अन्याय होतो' ह्याची रडगाणी गात असतात. म्हणजे ते खरेच असते असे नाही. प्रत्येक गोष्टीला दुसर्‍या बाजूही असतात. @ मोदकजी, इथे कुठे सरसकटीकरण दिसले? अपवाद आणि वेरियेशन्स प्रत्येक बाबतीत जगात आहेत. पण मी नेहमी सरसकटीकरण करुनच बोलतो हा समजही तुम्ही माझ्याबाबतीत करत असलेल्या सरसकटीकरणाचा पुरावा आहे.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 11:55
इथे कुठे सरसकटीकरण दिसले? सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण - जोक करता काय राव? सरकारी नोकर म्हणजे नक्की कोणते नोकर तुम्ही गृहीत धरले आहेत? पुणे म्युन्सीपालिटीमध्ये उंदीर मारणार्‍या लोकांपासून ते सीमेवर लढणारे जवान सगळेच सरकारी नोकर आहेत. सगळेच जण पाट्या टाकत काम करतात असे म्हणायचे आहे का? ..आणि एकदा "सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण" हा जोक आहे असे मान्य केल्यानंतर त्यामध्ये अपवाद असतात, वेरियेशन्स असतात वगैरे गोष्टी तुमच्या मूळ विधानालाच छेद देत नाहीत का? तुम्ही नेहमीच सरसकटीकरण करत नाही असे माझ्या स्वाक्षरीवरून तुमच्या लक्षात येईल असे वाटले होते. ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 12:10
मोदकजी, आक्षेप नेमका कशावर आहे? "काही" किंवा "बहुतेक" असे शब्द न वापरता लिहिले म्हणून काय? मूळ प्रतिसादात उगा यांनीही सरसकटीकरण केले आहे ते आपणास मान्य आहे का? त्यांचेच सरसकटीकरण उचलून मी 'जोक' म्हटलंय. ते माझे मत समजा. किंवा सरकारी नोकरांबाबत समाजात रूढ असलेली प्रतिमा समजा. एवढ्यासाठी लगेच अंगावर येण्याची तगमग नेमकी कशासाठी आहे? बाकी तुम्ही सूज्ञ आहात. एखादाच शब्द पकडून गुर्हाळ घालणे पटत नै बॉ. जोक आहे, जोकसारखा घ्या. त्यासाठीही विदा / स्पष्टीकरण मागायला लागणे जरा अतिच होते. तसे असेल तर जगातले सगळे जोक बाद होतील व कोणीच कोणावर कसलेही विनोद करू नये असे बळजबरीचे वातावरण होईल.

In reply to by संदीप डांगे

मोदक 25/01/2016 - 12:35
आक्षेप याच्यावर आहे की आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना दुसर्‍या व्यक्तीच्या कामाप्रती थोडे संवेदनशील असावे आणि थोडाफार आदर द्यावा. तुमच्या वाक्यातून जाणारा संदेश चुकीचा आहे असे माझे मत आहे म्हणून उपप्रतिसाद दिला. मूळ प्रतिसादाशी बाडीस नसल्याने "अंशतः" शब्द वापरला आहे. ..मुळात आपण सगळे जण २४ तास आदर्शवत् वागतो का? मी सुद्धा आत्ता ऑफिसमध्ये मिपामिपा खेळतच आहे. तुमच्या व्यवसायामध्येही असे पाट्या टाकणारे लोक असतीलच मग (कदाचित तुम्हाला सरकारी नोकरांचा वाईट अनुभव आला असेल म्हणून) सरकारी नोकरांवर असलेला कामाचा ताण हा जोक कसाकाय असू शकेल?

In reply to by मोदक

संदीप डांगे 25/01/2016 - 13:03
मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला शब्दच्छल करायचा असेल तर करा खुशाल. कामाबद्दल जोक नसून कामाच्या 'ताणा'बद्दल आहे हे आपणांस कळले नाही काय? ज्या वेगाने सरकारी ऑफिसात फायली सरकतात, ज्या वेगाने शासकिय निर्णय राबवले जातात, ज्या वेगाने जनतेला सेवा मिळते त्याबाबतीत आपण व सामान्यपणे सर्व नागरिक "ग्राहकांप्रति जबाबदार असलेल्या" सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या दर्जाबद्दल समाधानी असाल तर प्रश्नच उद्भवत नाही. सीमेवरचे सैनिक, इत्यादी चर्चेत आणून तुम्ही नको तिकडे विषय ताणताय असे वाटत नाही काय? प्रस्तुत धाग्यात ज्या सरकारी कर्मचार्‍यांच्या उत्तरदायित्वावर लिहिले आहे त्या सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाच्या 'ताणा'बद्दल आहे जोक. पटत नसेल तर सोडून द्या. एवढं छिद्रान्वेषी व्हायची गरज तर वाटत नाही.

In reply to by संदीप डांगे

विदा काढा मग बोलू...
सरकारी खात्यातील माहिती सहजासहजी उपलब्ध नाही . आणि तेवढा वेळही नाही . पण तरीही एक लिंक मिळाली . भारतात सरकारी डॉक्टर कमी आहेत याची. शिवाय तुम्हीही lack of employees in government of india / maharashtra वगैरे गुगल करू शकता. पोलिसांची कमतरता आहेच हे तर तुम्हाला माहीत असेलच. शिवाय कोर्टात न्यायाधीशांची कमतरता वगैरे मुद्देही मध्यंतरी गाजलेच. वादासाठी वाद नाही सर , पण खरंच सरकारी कर्मचाऱ्यांना पण ताण असतो. विचार करा आपल्याला ज्या पिएमटीमध्ये चढणंही अवघड असते त्यात कंडक्टर नावाचा स.क. दिवसभर तिकीट काढत असतो. तुमच्या मित्र वा नातेवाईकांपैकी कुणी क्लास 3-2 स.क. असेल ना तर त्याला विचारा कसं अन् किती काम असतं ते. जिप मधे कुणी असेल ना क्लास 1 मित्र त्याला विचारा ४थी पास जिप अध्यक्ष मिटींगमधे उभे करतो तेव्हा कसं वाटतं ते. संदिप भाऊ, घराच्या बांधकामाच्या वेळी मला नप मधे बरंच काम पडायचं तिथे अक्षरशः ५ मिनिटे पण बसावेसे वाटत नसे. अशी अस्वच्छता होती पण तेथील कर्मचारी ८-१० तास बसत असत. अर्थात ही नाण्याची एक बाजू आहे . पाट्या टाकणारे कर्मचारी नाहीतच असे माझे म्हणजे नाही. पण सक म्हणजे रिकामटेकडे अथवा कामचुकारच हा मुद्दा पटला नाही इतकेच...

In reply to by मोदक

नाखु 23/01/2016 - 14:40
सरकारी खात्यात याच्या त्याच्याकडे बोट दाखवायची सवय असल्याने "बकरा" शोधून खापर फोडले जाईल. अवांतर :आता तर अगदी केंद्रीय उत्पादन शुलक ते विक्री कर पर्यंत "कंत्राटी" कामगार काम करताना दिसतात "बाबू लोक" निवांत्पणे त्यांच्यावर डाफरताना दिसतात तेव्हा जबाबदारी बिचार्या ग्राहकाने शोधणे आले. प्रत्ययवादी नाखु

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:49
जे अधिकारी /कर्मचारी ग्राहकांच्या नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्याकडून ही नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . BOI National Swasthya Bima या योजनेखाली माझी मिडिक्लेम पॉलिसी होती. National Insurance Company मार्फत BOI ही योजना राबवते. विम्याचा वार्षिक हप्ता कस्टमरच्या अकाऊंटला डेबीट करुन NIC कडे पाठवायचा अशी लेड डाऊन प्रोसेस आहे. माझी पॉलिसी गेली अनेक वर्ष चालू होती. मागच्या वर्षी मात्र NIC नं बँकेला महिनाभर आधी पूर्व सूचना देऊनही बँकेनं प्रिमियम न भरल्यानं पॉलिसी लॅप्स झाली आणि मला पत्नीच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च स्वतःच्या पैश्यानी करावा लागला. या परिस्थितीत बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?

विजुभाऊ 25/01/2016 - 10:21
बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे दावा दाखल करुन खर्च वसूल करता येईल का?
हो. त्या पूर्वी तुम्ही बँकेला तशा प्रकारच्या सुविधांसाठी सांगितलेले आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. एक शंका: एखादे कंपनी त्यांच्या वस्तुच्या सोबत काही मोफत सुविधा पुरवत असेल आणि जर त्या मोफत पुरवलेल्या सुविधेत काही तृटी आढळून आल्या तर अशा तृटींसाठी ग्राहक न्य्नायालयात जाता येते का?

In reply to by विजुभाऊ

विवेक ठाकूर 25/01/2016 - 12:00
आहे हे सिद्ध करावे लागेल. तसेच ब्यांक अशा सुविधा पुरवण्यासाठी बांधील आहे का हे पहावे लागेल. BOI-NSB ही योजनाच तशी आहे.

पैसा 25/01/2016 - 13:01
जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून पैसा न पैसा वसूल करतात. अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 15:51
अगदी एखादा अकांउंट एन पी ए सुद्धा कोणामुळे झाला याची जबाबदारी निश्चित करून वसुली करतात.
ह्या बद्दल शंका वाटते. उद्योगपतींनी गेल्या २ दशकात काही लाख कोटींची कर्ज न फेडल्यामुळे एन पी ए झाली आहेत. ही रक्कम बँकेच्या कर्मचार्‍यांकडुन वसुल केली गेली आहे असे अजिबात वाटत नाही. उलट ही कर्ज देणारे रीटायर होऊन पेन्शन घेत असतील.

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 16:35
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ 25/01/2016 - 16:48
लहान कर्जे वसूल करून घेतात. उद्योगपतींची कोटींनी कर्जे असतात ती मात्र कुठून वसून करणार? जबाबदार अधिकार्‍याचे रिटायरमेंट बेनिफिट थांबवतात आणि ती कर्ज शेवट राईट ऑफ करतात.
पैसाताई - तुम्हाला असे म्हणायचे आहे की मल्या सारख्या लोकांना कर्ज देणार्‍या बँक अधिकार्‍यांवर काही कारवाई झाली आहे? कमीत कमी ७ बँकांचे शेकडो ( हो शेकडो ) अधिकारी मल्यांच्या कंपनीला कर्ज देण्यासाठी जबाबदार आहेत. त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत? तसेही रीटायर्मेंट बेनिफीट थांबवुन ह्या अधिकार्‍यांना काही फरक पडणार नाही, कारण ही असली कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल .

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 25/01/2016 - 17:21
त्यांचे रीटायर्मेंट बेनिफिट थांबवले आहेत?
एकेक केसबद्दल माहिती नाही. कारण स्टाफसंबंधीची माहिती बँकाकडून कधीच उघड होत नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगितली. सर्व एन पी ए च्या बाबत जबाबदारी निश्चित होते मग अधिकारी एक दोन असोत की शेकड्यात असोत. आणि जबाबदार ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होते. ती नक्की काय असेल हे मी सांगू शकणार नाही.
कर्ज मंजुर करण्यात् त्यांच्य रीटायरमेंट ची सोय झालीच असेल
शक्य आहे. आमच्या सिंडिकेट बँकेच्या एका माजी सी एम डी ला मधे अशाच प्रकरणात अटक झाली होती.

नाखु 25/01/2016 - 16:30
यादी The All India Bank Employees Association has released a list of top defaulters to public sector banks and no prizes for guessing who tops the list. It is Vijay Mallya's Kingfisher Airlines. The airline company, which has remained grounded for more than one year, has Rs 2,673 crore worth of dues to public sector banks. The company has more than Rs 7,000 crore debt and banks have been trying their best to recover the amount. According to media reports, SBI, which has the largest exposure of Rs 1,600 crore to the troubled company, had moved to take over Kingfisher Villa, Mallya's bungalow in Goa. However, Mallya got a relief as a local court restrained the banks from taking over the villa and ordered status quo. AFPAFP At a recent function in Goa, Mallya had blamed all but himself for Kingfisher's ills. The second big defaulter is Mumbai-based Winsome Diamonds, which has Rs 2,660 crore loan from banks. The association has asked the government take steps to address the alarming rise of non-performing assets in the banking sector. It has asked the government to publish the list of defaulters on bank loans of Rs 1 crore and above and urged to make wilful default a criminal offence. मूळ स्त्रोत्र असोसिएशन्चे अधिक्रुत प्रेस रिलिज DO YOU KNOW DAYLIGHT ROBBERY ? Bad Loans in Public Sector Banks (March 2008) Rs. 39,000 crores Bad Loans in Public Sector Banks (March 2013) Rs. 1,64,000 crores Bad Loans in Public Sector Banks ( September 2013) Rs. 2,36,000 crores Bad Loans restructured & shown as good loans Rs. 3,25,000 crores Fresh Bad loans in the last 7 years Rs. 4,95,000 crores Profits transferred and adjusted for provisions towards bad loans (2008 to 13) Rs. 1,40,000 crores: Bad Loans in 172 Corporate Accounts (Rs.100 crores and above) Rs. 37,000 crores Bad Loans constituted by top 4 defaulters in PSBs Rs. 23,000 crores Bad Loans in top 30 bad loan accounts in 24 Banks Rs. 70,300 crores Bad Loans ( Suit Filed ) in 3250 Accounts (Rs. 1 crore & above) Rs. 43,795 crores

Bad loans written off in the last 13 years Rs. 2,04,000 crores

आणि हे जर खरे असेल तर सामान्य नागरिकांचे किती पैसे हडपले गेले आहेत या बँकाचे शेअर होल्डर आणि कायदेतज्ञ /सल्लागार/ विचारवंत कसे मूग गिळून गप्प बसले आहेत. मिपा जाणकारांनी प्रकाश्/कंदील्/दिवा दाखवावा मुकाट वाचक नाखु

In reply to by प्रसाद१९७१

त्यांच्या बरोबर मजा मारत होती आणि जोडीने आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून ओरबाडत होते. कधीतरी पार्टी बंद व्यायची गरज होती पण ते कधी होइल माहिती नाही.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

मदत हवी आहे - द. ग. गोडसे ( समंदे तलाश )

मनो ·

अनंत छंदी 06/01/2016 - 13:01
आहे हे पुस्तक माझ्याकडे, पण गावाला असलेल्या माझ्या पुस्तकसंग्रहात आहे. चक्कर होईल तेव्हा फोटो काढून डकवू शकेन.

अनंत छंदी 06/01/2016 - 13:01
आहे हे पुस्तक माझ्याकडे, पण गावाला असलेल्या माझ्या पुस्तकसंग्रहात आहे. चक्कर होईल तेव्हा फोटो काढून डकवू शकेन.
द. ग. गोडसे यांचे समंदे तलाश हे पुस्तक कुणाकडे आहे का - त्यातल्या एका लेखाची (सवाई माधवराव शनिवार वाड्यातील चित्राबद्दलचा लेख ) संदर्भासाठी गरज आहे. सध्या भारताबाहेर असल्यामुळे पुण्यात अथवा इतर ठिकाणी जाणे शक्य नाही. जर कुणी त्या लेखाचे फोटो पाठवू शकेल तर मदत होईल. धन्यवाद

स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ

माहितगार ·

असंका 08/01/2016 - 13:23
अ. भितीच्या भावनेची गरज असते का ? होय. गरज असते. धोके जाणवून त्यापासून तयारी करण्यासाठी भितीची गरज असते. ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते. क. तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ? मला बहुतेक उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. आणि मरणाची भिती वाटायला हवी असंही वाटतं. पण छोट्या छोट्या गोष्टींनीच मी इतका घाबरून जातो, की मरणाचा तर मी विचारही करत नाही. ड. भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ? असुरक्षिततेची भावना हा शब्दप्रयोग मी अगोदर ऐकलेला नाही. कशासंदर्भात तो वापरला जातो ते कळलं तर त्यात आणि भितीत फरक आहे का ते सांगता येइल. इ. असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ? भविष्यात काय होणार आहे, त्याचा अंदाज बांधता न आल्याने किंवा जे होइल त्याला तोंड देण्यात आपण कमी पडू शकतो ही भावना म्हणजे भिती. त्यानेच असुरक्षित वाटतं. ते वाटत राहिल्याने, आपली पुरेशी तयारी झालेली नाही, अजून तयारी करायला हवी अशी जाणीव होत रहाते. त्यामुळे ही भावना तयारी करून घेण्यासाठी आवश्यक असावी. तो एक कुणीतरी कॉम्प्युटरमधला मोठा माणूस होता, तो म्हणला होता ना की ओन्ली द पॅरानॉइड्स सर्वाइव..! फ. तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ? म्हणजे काय ते कळलं नाही..काही उदाहरण दिलंत तर सांगता येइल. ग. (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ? मन घट्ट करून. दुसरा काय पर्याय? ह. काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ? काळजी हे सारखेच शब्द दोन्हीत असले, तरी अर्थात जमीन आस्मानाचा फरक आहे. काळजी घेणे म्हणजे काही तरी विशिष्ट कृती करणे अपेक्षित आहे. काळजी करणे म्हणजे एक मनाची स्थिती आहे.

प्रसाद१९७१ 08/01/2016 - 14:06
ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते.
हे जरा कळले नाही. बर्‍याच वेळेस, ज्ञान वाढले की पण भीती वाढते. उलट "अज्ञानात सुख असते" असे काहीतरी म्हणतात. काही उदा १. हे खाल्ले की तो रोग होतो वगैरे. अर्धवट ज्ञानामुळे, काही बारीक सारीक दुखले तरी कँसर पासुन अजुन कुठला तरी मोठा रोग झाला आहे अशी भिती वाटते. इत्यादी. २. एखाद्या रस्त्यावर, एरीयात गावगुंडांचा धोका आहे असे कोणी सांगितले की त्या एरीयातुन जाताना भिती वाटते. पुर्वी जरी एखाद्या अंधार्‍या ठीकाणुन गेलो असलो, पण कोणी तिथल्या भुताचा अनुभव सांगितला की पुढच्या वेळेला जाताना भिती वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

असंका 08/01/2016 - 14:35
तुम्हाला न कळायला काय झालंय? फिरकी घेताय गरीबाची अन काय... मुळात मी भितीच्या अस्ण्या नसण्याबद्दल बोलत नसून कमी जास्ती भिती वाटण्याब्द्दल बोलतोय . अशी वस्तू/स्थिती जिच्याबद्दल काहीच माहिती नाही तीला मी अज्ञात म्हणतोय. जसं भूत. किंवा अंधारी खोली. किंवा सरळ अंधार. जसजशी माहिती मिळायला लागते, तसतसं आपल्याला त्यापासून नक्की काय धोका आहे ते ठरवता यायला लागतं. त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या माहितीचा उप्योग करून घेता येतो, अन एकंदरीत भिती कमी होतेच. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती बघू- १. हे खाल्ले की तो रोग होतो. हे झालं ज्ञान. आता या वस्तूला अज्ञात म्हणणं शक्य नाही. याउलट अशी एखादी वस्तू जी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. टाकाल का तोंडात अशीच्या अशी उचलून? कसची भिती जास्त आहे? समजा केळं खाल्लं, पेरू खाल्ला की मला सर्दी होते. पण कमीत कमी हे खायचे पदार्थ आहेत हे तरी मला माहित आहे? त्यामुळे मी तत्काळ मरणार नाही हेही मला माहित आहे. पण जंगलात गेल्यावर कितीही आकर्षक फळं मला दिसली आणि त्यांची मला माहिती नसली, तरी मी त्यांच्याकडे बघणार पण नाही. कारण ती फळं मला अज्ञात आहेत. अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असेल हे मान्य, पण जर त्याची जाणीव असेल तर भिती कमी होते. पूर्ण ज्ञान ज्याला आहे असे लोक कमीच असणार. त्यामुळे निर्णय घेण्यास पुरेसे ज्ञान मिळाले की भिती कमी होते. २. गावगुंड - ही ज्ञात गोष्ट आहे. अज्ञातापेक्षा कमी तयारीने गेलात तरी चालेल. पण अज्ञात ठिकाणी जाताना काय तयारीने जायचं हेच माहित नसतं. कुठली भिती जास्त असेल ? मात्र भुताबद्दल मला शंभर टक्के मान्य आहे आपलं म्हणणं! एवढंच काय, माझी भितीची व्याख्याच मी भूतांच्याबद्दलच्या भितीवरून बेतलेली आहे. भूत कुणी बघितलेलं आहे का हो? सगळ्यांनी? कुणीतरी तरी असेल ज्याने भूत बघितलेलं नाही? तरी ते घाबरतात? ही कसची भिती असते? तर अज्ञाताची!! भूत कसं असेल तेच माहित नाही, तरी भिती तर वाटते! का? कारण हेच की माहित नाही!

In reply to by असंका

असंका 18/01/2016 - 09:14
ओ धागाकर्तेसाहेब, तुम्ही तर धाग्याचा गाभाच बदलून टाकला. सहज जाणवलं म्हणून- माझा हा वरचा प्रतिसाद म्हणजे आपल्या नव्या ४ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे - "नोन डेविल".

In reply to by असंका

माहितगार 18/01/2016 - 10:43
ओह, नवे प्रश्न जोडताना प्रश्नांचा क्रम बदलू शकतो ह लक्षात घेतले नाही. नवे प्रश्न जोडताना प्रश्न गट १ , २ असे उल्लेख करतो म्हणजे कन्फ्युजन टळण्यास मदत होईल, -उद्देश अधिक प्रश्न जोडणे आणि अधिक लोकांना चर्चेत सहभागी करून घेणे आहे; चर्चेचा गाभा सुरक्षा विषयक दृष्टिकोण हाच आहे- लक्ष वेधल्या बद्दल आणि चर्चा सहभागाबद्दल आभारी आहे.

असंका 08/01/2016 - 14:59
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ? हे फार तांत्रिक शब्द दिसताहेत. हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांच्यासाठी सोडावा का हा प्रश्न? कारण हे सुरक्षिततेचे स्तर इ. असतात ही गोष्टच माझ्यासाठी एक नवीन माहिती आहे. उगा फेकाफेक करू शकतो, पण या उत्तराला काय मार्क थोडीच आहेत? * सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ? केवढे अवघड अवघड शब्द वापरता हो! अर्थ लावतानाच दिवस जाइल! मुळात मी आला दिवस घालवण्यावर विश्वास ठेवत असल्याने हे सगळं काही मी करत नाही - फक्त इंशुरन्स मी शक्य तेवढे काढून ठेवलेले आहेत. गाडी, मेडीक्लेम आणि लाइफ. * कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ? ते कुठले प्रिन्सिपल आहे ना- ८५/१०/५% वालं ते वापरतो. आपण अनेक गोष्टींची काळजी करतो, त्यातील ८५% (की असलंच काहीतरी %) गोष्टी कधीच वास्तवात येत नाहीत. १०% गोष्टी वास्तवात होउ शकतात अशी ५०% शक्यता असते. आणि ५% गोष्टी मात्र होतातच. आता या कुठल्या गोष्टी कुठल्या कॅटेगरीत घालायच्या ते थोडा अनुभव वापरूनच ठरवावे लागते. * विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ? ज्या गोष्टींनी आपण काळजीत आहोत, त्या जर याच्याशी मुळात संबंधित नसतील, तर असा संबंध मांडणे म्हणजे मनाचे खेळ असतील. एरवीही ते मनाचे खेळच असतील. पण अनेकदा त्या खेळांचा खरोखर उप्योग होतो असं पाहिलेलं आहे. * मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल शेवटच्या दोन प्रश्नांवर परत येतो.

माहितगार 17/01/2016 - 13:12
काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.

चलत मुसाफिर 17/01/2016 - 15:31
शारीरिक आकर्षण ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. ते विविधप्रकारे व्यक्त होत असते. परंतु मानवी संस्कृती अनेक कारणांमुळे (काही योग्य, काही अयोग्य) त्यावर नानाविध बंधने टाकते. त्यातही देशोदेशी, वंशोवंशी फरक असतो. परिणामी, या आकर्षणाचे काही पैलू आपोआप "चांगले" तर काही "वाईट" ठरवले जातात. जिथे "वाईट" पैलू दिसतात, त्याबद्दल भीती किंवा घृणा निर्माण होते. विशेषतः पूर्वीय देशांत, शारीरिक आकर्षण हीच काहीतरी लज्जास्पद, कलंकसमान गोष्ट आहे असा टोकाचा दृढ समज आढळून येतो. परिणामी या विषयावर निकोप चर्चा होऊ शकत नाही. बहुसंख्य लैंगिक गुन्हे हे शारीरिक गरजेपोटी होत नसून बलदर्शनाच्या मानसिक गरजेपोटी होत असतात. परंतु हे समजून घेण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल, तर त्यावर उपाय शोधणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यातूनच मग "भरचौकात फाशी द्या", किंवा "खच्ची करून टाका" अशा आक्रस्ताळ्या मध्यमवर्गीय मागण्या पुढे येतात.

लाडू. 18/01/2016 - 15:47
माझी वैयक्तीक मते: १) चांगली वाईट नजर स्त्रीला कळते अस म्हणतात. आणि ते खर आहे. घराबाहेर कुठेही, मग ते बाजारात असो किना ऑफिस मध्ये, ओळखीचा किंवा अनोळखी पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो ते लगेच कळते. विशिष्ट वेळी, अगदी लक्ष नसतानाहि, आपल्याला ओढणी सावरायची गरज आहे हे अचानक मेंदूत चमकून जात. आणि त्यावेळी निरीक्षण केल्यास कोणीतरी आपल्याकडे पाहत असतच. अस वाटल्याने किंवा वाईट नजर कळल्यानं नेहमीच असुरक्षित वाटत अस नाही. ऑफिस किंवा घराजवळ, पूर्णपणे सुरक्षित आहोत आपण हे माहित असते. पण अनोळखी ठिकाणी, किंवा रात्री एकटी असताना थोडी भीती वाटू शकते. २) विशिष्ट प्रकारच्या पेहरावाने या नजरावर काहीच फरक पडत नाही. प्रत्येक पुरुष त्याच्यावरच्या संस्कारांप्रमाणे वागतो अस मला वाटत. अशी खूप उदाहरण मी अनुभवलीत, चांगली पण आणि वाईट पण, पेह्रवणे त्यांच्यावर फार फरक पडला नाही. (उदा. ऑफिस मध्ये, शनिवारी आम्ही कॅजुअल्स घालू शकतो. पण काही विशिष्ट माणसांची नजर कोणत्याही दिवशी तेवढीच वाईट असते) ४) परिचित अपरिचित जास्त फरक नाही पडत. एकंदरीतच माणूस आणि त्याची नजर कळतेच. अपरिचित माणूस सुद्धा बऱ्याचदा कम्फर्टेबल वाटू शकतो ५) सध्या मी विवाहित नाही. विवाह होईल अजून ४ महिन्यात. पण ८ वर्षाचं नात, आणि त्यानंतरच्या विश्वासावरून, एवढ नक्कीच सांगू शकते, मस्तानी सम स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा हेवा वाटत नाही. एखाद्या स्त्रीचे कौतुक जरी माझ्या जोडीदाराने माझ्या समोर केले तरी ते तेवढ्यापुरतेच असेल असे मला वाटते. ६) नात्यांना नावे देणे मला पटत नाही. आणि त्याने सुरक्षिततेचा मुद्दा बदलत नाही

१) चांगली अथवा वाईट नजर म्हणजे काय -ती कशी ठरवली जाते ? विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने वाईट नजरांचा पाठलाग होतो असे तुम्हाला वाटते का ? असे वाटल्याने तुम्हाला/ तुमच्या परिचीतांपैकी/बद्दल कुणाला अथवा असुरक्षीत वाटते का ?
एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलेलं आपल्याला आवडलं तर ती नजर चांगली. बघितलेलं आवडलं नाही, हे शब्दांशिवाय त्या व्यक्तीलाही समजून पुन्हा आपल्याकडे बघायला सुरुवात केली तर ती वाईट नजर. कपडे आणि नजरेचा संबंध नाही (कारण चांगलं किंवा वाईट हे आपल्या विचार, बुद्धी, मतावर अवलंबून असतं). मला किंवा माझ्या परिचयातल्या कोणालाही गरजेपेक्षा अधिक किंवा मुद्दाम लक्ष देण्याइतपत असुरक्षित वाटत नाही. (असुरक्षितता डिजिटल होय किंवा नाही छाप नसते.)
२) विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने तुमच्या मनात काही 'कल्पना' येतात म्हणून त्या तशाच इतरांच्या मनात येतात असे तुम्हाला वाटते का ? इतरांच्या मनात 'कल्पना' येतात म्हणून तुम्हाला असुरक्षीत वाटते का ? मनातील अयोग्य 'कल्पना'ंची लोक परोक्ष-अपरोक्ष चर्चा करतात अशा चर्चा ऐकुन तुम्हाला या विषयावर असुरक्षीत वाटते का ?
काही लोकांच्या मनात माझ्यात मनात असतात तसेच विचार येतात आणि काहींच्या मनात येत नाही. कोणतीही व्यक्ती जगातल्या अर्ध्या लोकांना "फार्फार" आवडेल हे अशक्य आहे. लोकांच्या विचारांमुळे असुरक्षित वाटत नाही. चर्चांमुळेही असुरक्षित वाटत नाही.
३) तुमच्या नात्यातील-परिचयातील-गल्लीतील-गावातील-जातीतील-धर्मातील एखादी स्त्री परपुरषाशी मोकळेपणाने बोलली-वागली तर तुम्हाला काय वाटते अटेंशन डेफीशीट वाटते-हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ?
सगळ्याचं होलसेल उत्तर - नाही.
४) एकुण सांख्यिकीय आकडेवारी स्त्री परिचीत पुरुषांपेक्षा अपरीचीत पुरुषांकडून अधिक असुरक्षीत असल्याचे सुचवत नाही तरीही अपरीचीत पुरुषांबद्दल असुरक्षेची भावना अधीक असते का ?
नाही. दोन कारणं आहेत - १. गविंनी याबद्दल कुठेतरी लिहिलंय. या गोष्टीचा मला त्रास होणारच नाही, अशी भावना असते. २. तर्क असा की सांख्यिकीचे आकडे एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होतातच असं नाही. आणि ओळखीच्या लोकांवर संशय घेत राहिले तर माझं आयुष्य कधी जगू? असा प्रश्न पडतो.
५) स्त्रीयांना कोणकोणत्या परिस्थीतीत असुरक्षीत वाटते ? समजा एखाद्या विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याच्या आसपास मस्तानीसम स्त्री आली किंवा त्याचे दुसर्‍या स्त्रीकडे लक्ष गेले तर त्या मस्तानीच्या स्त्रीत्वाच्या प्रदर्शनाचा अटेंशन डेफीशीट वाटते -हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
स्त्रिया एकसाची विचार करतात, अशा या प्रश्नांतल्या गृहितकाबद्दल मला होलसेल असुरक्षितता वाटते. एरवी मला कोणत्याही कारणास्तव, व्यक्तीमुळे लक्ष देण्याइतपत असुरक्षितता वाटलेली नाही. माझ्या बऱ्या अर्ध्याला मैत्रिणी नाहीत (आणि मला चिक्कार मित्र आहेत) या कारणास्तव मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
६) नात्यांना नाव दिल्याने जसे की- भाऊ ताई इत्यादी- स्त्रीयांना अधीक सुरक्षीत वाटते का ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
ऐडीया नाही. मी असली नावं देत नाही. मला अदितीताई वगैरे म्हणणारे लोक मला गळेपडू आणि/किंवा लाचार वाटतात. पण असुरक्षित? कब्बी नै!
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ?
उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचं प्रमाण मराठी भाषांतर हवं.
८) अल्पवयीन पाल्यांच्या बद्दलच्या (खासकरून मुलींच्या) (अ)सुरक्षीततेच्या बद्दल भावनांचे विचारांचे स्वरुप कसे असते ?
असुरक्षितता ही असुरक्षितताच असते. कधी सॉलिड, कधी लिक्विड अशी नसावी; हा अंदाज. मी शाळकरी वयाची असताना आईची तीच-ती कल्जियुक्त 'लेक्चरं' ऐकून कधीमधी "आई, मला कोणी काही केलं नाही तर मीच घरातून पळून जाईन; म्हणूनतरी लेक्चरं आवर" असं वाक्य तोंडावर येत असे. ते मी नियमाने गिळत असे.
९) उपरोक्त (अ)सुअरक्षीततेच्या भावना तुम्ही कशा हँडल करता ? इतर लोक कसे हँडल करतात ? (अ)सुअरक्षीततेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने कशा हँडल केल्या जाऊ शकतील असे तुम्हाला वाटते?
मला अशा काही भावना नाहीत. लोकांचं लोकं सांगतील. भावनांवर नियंत्रणाबाबत जेनेरिक काही बोलण्यासाठी कोणी मानसोपचारतज्ञ गाठलेले बरे. बाकीचे प्रश्न नंतर वाचेन. सध्या गृहपाठ म्हणून सुरक्षितता हा शब्द तीनशेचौदा वेळा चोप्य-पस्ते करा ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितगार 19/01/2016 - 10:10
तुमच्या सगळ्यात शेवटच्या वाक्यासाठी सर्वप्रथम एक स्मायली.
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ? (प्रश्नोत्तरे गटक्र.२)
हा प्रश्न लहानपणी आई-किंवा वडील इतर व्यक्तींशी (भिन्न-लिंगी व्यक्तीशी) मोकळेपणाने बोलले तर असुरक्षीत वाटले होते का? खास करून सावत्र आई किंवा सावत्र वडील यांच्या बद्दलच्या कथा जसे की ध्रूवबाळ हि लहानपणीच ऐकण्यास मिळाली तर त्या वयात असुरक्षित वाटले असू शकते का ? कदाचित अटेंशन डेफिसीटमुळे बाल वयात मुले आई-वडीलांजवळ बसलीतरी मध्ये जाऊन बसताना दिसतात; पण खासकरून ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना असुरक्षीत वाटत असण्याची आणि त्यातून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका अधिक कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

In reply to by माहितगार

माहितगार 19/01/2016 - 10:27
ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना त्याची आधी पासून सवय असून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका कमी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

माहितगार 19/01/2016 - 10:44
खालील प्रश्नाचे उत्तर देण्या इतपत मिपावर मुस्लिम अथवा मुस्लिमांशी घनिष्ट संबंध असलेल्या व्यक्ति आहेत का माहित नाही तरीही (प्रश्नोत्तरे गट २) प्रश्न ७ मधील प्रश्नात खालील उपप्रश्न जोडता येऊ शकतील. खरेतर हेच प्रश्न ज्या कुटूंबातील एक पालक घटस्फोट घेते अथवा अधिक विवाह करते अथवा पुर्नविवाहाने आयुष्यात नवा साथीदार आणते त्यांच्यासाठीही लागू पडावेत. (कृपया केवळ वाद अथवा टिकेकरता म्हणून या प्रश्नाची इतरेजनांनी उत्तरे देऊ नयेत केवळ ज्यांचा अशा प्रश्नांशी सरळ सामना झाला आहे त्यांच्यासाठीच हे प्रश्न आहेत अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार) १) वडीलांच्या तोंडी तलाकाच्या अधिकारामुळे -किंवा घरातील घटस्फोटाच्या पातळीवरील वादंगांनी- तुम्हाला (तुम्ही मुस्लिम असल्यास) अथवा तुमच्या मुस्लिम मित्राला (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? २) पतीने अथवा वडीलांनी एका पेक्षा अधिक विवाह-(अथवा संबंध)-केल्यामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ३) आई-किंवा वडीलांच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ४) घरातील अपत्ये असलेल्या विधवा स्त्रीच्या- (विधवा पुरषांना काय म्हणतात शब्द आठवत नाहीए) पुरुषाच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने भावना काय होती

असंका 08/01/2016 - 13:23
अ. भितीच्या भावनेची गरज असते का ? होय. गरज असते. धोके जाणवून त्यापासून तयारी करण्यासाठी भितीची गरज असते. ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते. क. तुम्हाला कशा कशाची भिती वाटते ? मला बहुतेक उंचीची आणि पाण्याची भिती वाटते. आणि मरणाची भिती वाटायला हवी असंही वाटतं. पण छोट्या छोट्या गोष्टींनीच मी इतका घाबरून जातो, की मरणाचा तर मी विचारही करत नाही. ड. भिती आणि असुरक्षतेची भावना या एकच गोष्टी आहेत का वेगवेगळ्या ? असुरक्षिततेची भावना हा शब्दप्रयोग मी अगोदर ऐकलेला नाही. कशासंदर्भात तो वापरला जातो ते कळलं तर त्यात आणि भितीत फरक आहे का ते सांगता येइल. इ. असुरक्षीत का वाटते ? असुरक्षीततेच्या भावनेची गरज असते का ? भविष्यात काय होणार आहे, त्याचा अंदाज बांधता न आल्याने किंवा जे होइल त्याला तोंड देण्यात आपण कमी पडू शकतो ही भावना म्हणजे भिती. त्यानेच असुरक्षित वाटतं. ते वाटत राहिल्याने, आपली पुरेशी तयारी झालेली नाही, अजून तयारी करायला हवी अशी जाणीव होत रहाते. त्यामुळे ही भावना तयारी करून घेण्यासाठी आवश्यक असावी. तो एक कुणीतरी कॉम्प्युटरमधला मोठा माणूस होता, तो म्हणला होता ना की ओन्ली द पॅरानॉइड्स सर्वाइव..! फ. तुम्हाला स्वत:ला अथवा इतरांमध्ये कोणकोणत्या असुरक्षीततेच्या भावना आढळतात ? म्हणजे काय ते कळलं नाही..काही उदाहरण दिलंत तर सांगता येइल. ग. (अ)सुरक्षीततेची भावना कशी सांभाळता/ सांभाळावी ? मन घट्ट करून. दुसरा काय पर्याय? ह. काळजी घेणे आणि काळजी करणे यात फरक कसा करावा ? असा फरक करणे तुम्हाला जमते का ? काळजी हे सारखेच शब्द दोन्हीत असले, तरी अर्थात जमीन आस्मानाचा फरक आहे. काळजी घेणे म्हणजे काही तरी विशिष्ट कृती करणे अपेक्षित आहे. काळजी करणे म्हणजे एक मनाची स्थिती आहे.

प्रसाद१९७१ 08/01/2016 - 14:06
ब. भिती का वाटते ? अज्ञाताची जाणीव होणे म्हणजे भिती. जसजशी अज्ञानाची भावना कमी होते, तसतशी भिती कमी होउ लागते.
हे जरा कळले नाही. बर्‍याच वेळेस, ज्ञान वाढले की पण भीती वाढते. उलट "अज्ञानात सुख असते" असे काहीतरी म्हणतात. काही उदा १. हे खाल्ले की तो रोग होतो वगैरे. अर्धवट ज्ञानामुळे, काही बारीक सारीक दुखले तरी कँसर पासुन अजुन कुठला तरी मोठा रोग झाला आहे अशी भिती वाटते. इत्यादी. २. एखाद्या रस्त्यावर, एरीयात गावगुंडांचा धोका आहे असे कोणी सांगितले की त्या एरीयातुन जाताना भिती वाटते. पुर्वी जरी एखाद्या अंधार्‍या ठीकाणुन गेलो असलो, पण कोणी तिथल्या भुताचा अनुभव सांगितला की पुढच्या वेळेला जाताना भिती वाटते.

In reply to by प्रसाद१९७१

असंका 08/01/2016 - 14:35
तुम्हाला न कळायला काय झालंय? फिरकी घेताय गरीबाची अन काय... मुळात मी भितीच्या अस्ण्या नसण्याबद्दल बोलत नसून कमी जास्ती भिती वाटण्याब्द्दल बोलतोय . अशी वस्तू/स्थिती जिच्याबद्दल काहीच माहिती नाही तीला मी अज्ञात म्हणतोय. जसं भूत. किंवा अंधारी खोली. किंवा सरळ अंधार. जसजशी माहिती मिळायला लागते, तसतसं आपल्याला त्यापासून नक्की काय धोका आहे ते ठरवता यायला लागतं. त्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या माहितीचा उप्योग करून घेता येतो, अन एकंदरीत भिती कमी होतेच. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती बघू- १. हे खाल्ले की तो रोग होतो. हे झालं ज्ञान. आता या वस्तूला अज्ञात म्हणणं शक्य नाही. याउलट अशी एखादी वस्तू जी तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. टाकाल का तोंडात अशीच्या अशी उचलून? कसची भिती जास्त आहे? समजा केळं खाल्लं, पेरू खाल्ला की मला सर्दी होते. पण कमीत कमी हे खायचे पदार्थ आहेत हे तरी मला माहित आहे? त्यामुळे मी तत्काळ मरणार नाही हेही मला माहित आहे. पण जंगलात गेल्यावर कितीही आकर्षक फळं मला दिसली आणि त्यांची मला माहिती नसली, तरी मी त्यांच्याकडे बघणार पण नाही. कारण ती फळं मला अज्ञात आहेत. अर्धवट ज्ञान हे जास्त धोकादायक असेल हे मान्य, पण जर त्याची जाणीव असेल तर भिती कमी होते. पूर्ण ज्ञान ज्याला आहे असे लोक कमीच असणार. त्यामुळे निर्णय घेण्यास पुरेसे ज्ञान मिळाले की भिती कमी होते. २. गावगुंड - ही ज्ञात गोष्ट आहे. अज्ञातापेक्षा कमी तयारीने गेलात तरी चालेल. पण अज्ञात ठिकाणी जाताना काय तयारीने जायचं हेच माहित नसतं. कुठली भिती जास्त असेल ? मात्र भुताबद्दल मला शंभर टक्के मान्य आहे आपलं म्हणणं! एवढंच काय, माझी भितीची व्याख्याच मी भूतांच्याबद्दलच्या भितीवरून बेतलेली आहे. भूत कुणी बघितलेलं आहे का हो? सगळ्यांनी? कुणीतरी तरी असेल ज्याने भूत बघितलेलं नाही? तरी ते घाबरतात? ही कसची भिती असते? तर अज्ञाताची!! भूत कसं असेल तेच माहित नाही, तरी भिती तर वाटते! का? कारण हेच की माहित नाही!

In reply to by असंका

असंका 18/01/2016 - 09:14
ओ धागाकर्तेसाहेब, तुम्ही तर धाग्याचा गाभाच बदलून टाकला. सहज जाणवलं म्हणून- माझा हा वरचा प्रतिसाद म्हणजे आपल्या नव्या ४ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे - "नोन डेविल".

In reply to by असंका

माहितगार 18/01/2016 - 10:43
ओह, नवे प्रश्न जोडताना प्रश्नांचा क्रम बदलू शकतो ह लक्षात घेतले नाही. नवे प्रश्न जोडताना प्रश्न गट १ , २ असे उल्लेख करतो म्हणजे कन्फ्युजन टळण्यास मदत होईल, -उद्देश अधिक प्रश्न जोडणे आणि अधिक लोकांना चर्चेत सहभागी करून घेणे आहे; चर्चेचा गाभा सुरक्षा विषयक दृष्टिकोण हाच आहे- लक्ष वेधल्या बद्दल आणि चर्चा सहभागाबद्दल आभारी आहे.

असंका 08/01/2016 - 14:59
* सुरक्षीततेचे गरज, स्तर कोणकोणते असतात ? हे फार तांत्रिक शब्द दिसताहेत. हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यांच्यासाठी सोडावा का हा प्रश्न? कारण हे सुरक्षिततेचे स्तर इ. असतात ही गोष्टच माझ्यासाठी एक नवीन माहिती आहे. उगा फेकाफेक करू शकतो, पण या उत्तराला काय मार्क थोडीच आहेत? * सुरक्षीततेची सुयोग्य काळजी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी भविष्यातील शक्यतांचा वेध कसा घ्यावा/ घेता ? जोखीम व्यवस्थापन कसे करता ? केवढे अवघड अवघड शब्द वापरता हो! अर्थ लावतानाच दिवस जाइल! मुळात मी आला दिवस घालवण्यावर विश्वास ठेवत असल्याने हे सगळं काही मी करत नाही - फक्त इंशुरन्स मी शक्य तेवढे काढून ठेवलेले आहेत. गाडी, मेडीक्लेम आणि लाइफ. * कोणती भिती/काळजी/असुरक्षततेची भावना अनाठायी असते ? अनाठायी भिती/काळजी/असुरक्षततेची भावना कशी टाळावी तुम्ही कशी टाळता ? ते कुठले प्रिन्सिपल आहे ना- ८५/१०/५% वालं ते वापरतो. आपण अनेक गोष्टींची काळजी करतो, त्यातील ८५% (की असलंच काहीतरी %) गोष्टी कधीच वास्तवात येत नाहीत. १०% गोष्टी वास्तवात होउ शकतात अशी ५०% शक्यता असते. आणि ५% गोष्टी मात्र होतातच. आता या कुठल्या गोष्टी कुठल्या कॅटेगरीत घालायच्या ते थोडा अनुभव वापरूनच ठरवावे लागते. * विश्वास, श्रद्धा यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल ? ज्या गोष्टींनी आपण काळजीत आहोत, त्या जर याच्याशी मुळात संबंधित नसतील, तर असा संबंध मांडणे म्हणजे मनाचे खेळ असतील. एरवीही ते मनाचे खेळच असतील. पण अनेकदा त्या खेळांचा खरोखर उप्योग होतो असं पाहिलेलं आहे. * मिथके, कथा, धर्मसंस्थाप्रणित विश्वास, श्रद्धा, माहिती आणि तत्त्वज्ञान यांचा (अ)सुरक्षीततेच्या भावनेशी सहसंबंध कसा मांडता येईल शेवटच्या दोन प्रश्नांवर परत येतो.

माहितगार 17/01/2016 - 13:12
काथ्याकुटात असलेल्या भारतीय संस्कृती साठी ही चांगली गोष्ट आहे का? धाग्यावरून पोषाख फॅशन हेही अनेक कंगोरे असलेले विषय आहेत परंतु त्या संबंधाने (अ)सुरक्षीतते भावना असते का या बद्द्ल तुम्हाला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी काही नवे प्रश्न धागा लेखात जोडतो आहे.

चलत मुसाफिर 17/01/2016 - 15:31
शारीरिक आकर्षण ही संपूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे. ते विविधप्रकारे व्यक्त होत असते. परंतु मानवी संस्कृती अनेक कारणांमुळे (काही योग्य, काही अयोग्य) त्यावर नानाविध बंधने टाकते. त्यातही देशोदेशी, वंशोवंशी फरक असतो. परिणामी, या आकर्षणाचे काही पैलू आपोआप "चांगले" तर काही "वाईट" ठरवले जातात. जिथे "वाईट" पैलू दिसतात, त्याबद्दल भीती किंवा घृणा निर्माण होते. विशेषतः पूर्वीय देशांत, शारीरिक आकर्षण हीच काहीतरी लज्जास्पद, कलंकसमान गोष्ट आहे असा टोकाचा दृढ समज आढळून येतो. परिणामी या विषयावर निकोप चर्चा होऊ शकत नाही. बहुसंख्य लैंगिक गुन्हे हे शारीरिक गरजेपोटी होत नसून बलदर्शनाच्या मानसिक गरजेपोटी होत असतात. परंतु हे समजून घेण्याची क्षमता किंवा इच्छाशक्ती समाजात नसेल, तर त्यावर उपाय शोधणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यातूनच मग "भरचौकात फाशी द्या", किंवा "खच्ची करून टाका" अशा आक्रस्ताळ्या मध्यमवर्गीय मागण्या पुढे येतात.

लाडू. 18/01/2016 - 15:47
माझी वैयक्तीक मते: १) चांगली वाईट नजर स्त्रीला कळते अस म्हणतात. आणि ते खर आहे. घराबाहेर कुठेही, मग ते बाजारात असो किना ऑफिस मध्ये, ओळखीचा किंवा अनोळखी पुरुष आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतो ते लगेच कळते. विशिष्ट वेळी, अगदी लक्ष नसतानाहि, आपल्याला ओढणी सावरायची गरज आहे हे अचानक मेंदूत चमकून जात. आणि त्यावेळी निरीक्षण केल्यास कोणीतरी आपल्याकडे पाहत असतच. अस वाटल्याने किंवा वाईट नजर कळल्यानं नेहमीच असुरक्षित वाटत अस नाही. ऑफिस किंवा घराजवळ, पूर्णपणे सुरक्षित आहोत आपण हे माहित असते. पण अनोळखी ठिकाणी, किंवा रात्री एकटी असताना थोडी भीती वाटू शकते. २) विशिष्ट प्रकारच्या पेहरावाने या नजरावर काहीच फरक पडत नाही. प्रत्येक पुरुष त्याच्यावरच्या संस्कारांप्रमाणे वागतो अस मला वाटत. अशी खूप उदाहरण मी अनुभवलीत, चांगली पण आणि वाईट पण, पेह्रवणे त्यांच्यावर फार फरक पडला नाही. (उदा. ऑफिस मध्ये, शनिवारी आम्ही कॅजुअल्स घालू शकतो. पण काही विशिष्ट माणसांची नजर कोणत्याही दिवशी तेवढीच वाईट असते) ४) परिचित अपरिचित जास्त फरक नाही पडत. एकंदरीतच माणूस आणि त्याची नजर कळतेच. अपरिचित माणूस सुद्धा बऱ्याचदा कम्फर्टेबल वाटू शकतो ५) सध्या मी विवाहित नाही. विवाह होईल अजून ४ महिन्यात. पण ८ वर्षाचं नात, आणि त्यानंतरच्या विश्वासावरून, एवढ नक्कीच सांगू शकते, मस्तानी सम स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा हेवा वाटत नाही. एखाद्या स्त्रीचे कौतुक जरी माझ्या जोडीदाराने माझ्या समोर केले तरी ते तेवढ्यापुरतेच असेल असे मला वाटते. ६) नात्यांना नावे देणे मला पटत नाही. आणि त्याने सुरक्षिततेचा मुद्दा बदलत नाही

१) चांगली अथवा वाईट नजर म्हणजे काय -ती कशी ठरवली जाते ? विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने वाईट नजरांचा पाठलाग होतो असे तुम्हाला वाटते का ? असे वाटल्याने तुम्हाला/ तुमच्या परिचीतांपैकी/बद्दल कुणाला अथवा असुरक्षीत वाटते का ?
एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बघितलेलं आपल्याला आवडलं तर ती नजर चांगली. बघितलेलं आवडलं नाही, हे शब्दांशिवाय त्या व्यक्तीलाही समजून पुन्हा आपल्याकडे बघायला सुरुवात केली तर ती वाईट नजर. कपडे आणि नजरेचा संबंध नाही (कारण चांगलं किंवा वाईट हे आपल्या विचार, बुद्धी, मतावर अवलंबून असतं). मला किंवा माझ्या परिचयातल्या कोणालाही गरजेपेक्षा अधिक किंवा मुद्दाम लक्ष देण्याइतपत असुरक्षित वाटत नाही. (असुरक्षितता डिजिटल होय किंवा नाही छाप नसते.)
२) विशीष्ट प्रकारे पेहराव केल्याने तुमच्या मनात काही 'कल्पना' येतात म्हणून त्या तशाच इतरांच्या मनात येतात असे तुम्हाला वाटते का ? इतरांच्या मनात 'कल्पना' येतात म्हणून तुम्हाला असुरक्षीत वाटते का ? मनातील अयोग्य 'कल्पना'ंची लोक परोक्ष-अपरोक्ष चर्चा करतात अशा चर्चा ऐकुन तुम्हाला या विषयावर असुरक्षीत वाटते का ?
काही लोकांच्या मनात माझ्यात मनात असतात तसेच विचार येतात आणि काहींच्या मनात येत नाही. कोणतीही व्यक्ती जगातल्या अर्ध्या लोकांना "फार्फार" आवडेल हे अशक्य आहे. लोकांच्या विचारांमुळे असुरक्षित वाटत नाही. चर्चांमुळेही असुरक्षित वाटत नाही.
३) तुमच्या नात्यातील-परिचयातील-गल्लीतील-गावातील-जातीतील-धर्मातील एखादी स्त्री परपुरषाशी मोकळेपणाने बोलली-वागली तर तुम्हाला काय वाटते अटेंशन डेफीशीट वाटते-हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ?
सगळ्याचं होलसेल उत्तर - नाही.
४) एकुण सांख्यिकीय आकडेवारी स्त्री परिचीत पुरुषांपेक्षा अपरीचीत पुरुषांकडून अधिक असुरक्षीत असल्याचे सुचवत नाही तरीही अपरीचीत पुरुषांबद्दल असुरक्षेची भावना अधीक असते का ?
नाही. दोन कारणं आहेत - १. गविंनी याबद्दल कुठेतरी लिहिलंय. या गोष्टीचा मला त्रास होणारच नाही, अशी भावना असते. २. तर्क असा की सांख्यिकीचे आकडे एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होतातच असं नाही. आणि ओळखीच्या लोकांवर संशय घेत राहिले तर माझं आयुष्य कधी जगू? असा प्रश्न पडतो.
५) स्त्रीयांना कोणकोणत्या परिस्थीतीत असुरक्षीत वाटते ? समजा एखाद्या विवाहीत स्त्रीच्या नवर्‍याच्या आसपास मस्तानीसम स्त्री आली किंवा त्याचे दुसर्‍या स्त्रीकडे लक्ष गेले तर त्या मस्तानीच्या स्त्रीत्वाच्या प्रदर्शनाचा अटेंशन डेफीशीट वाटते -हेवा वाटतो?- दुष्वास वाटतो?- असुरक्षीत वाटते ? असुरक्षीत वाटत असेल तर त्यामागची कारण मिमांसा काय असते ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
स्त्रिया एकसाची विचार करतात, अशा या प्रश्नांतल्या गृहितकाबद्दल मला होलसेल असुरक्षितता वाटते. एरवी मला कोणत्याही कारणास्तव, व्यक्तीमुळे लक्ष देण्याइतपत असुरक्षितता वाटलेली नाही. माझ्या बऱ्या अर्ध्याला मैत्रिणी नाहीत (आणि मला चिक्कार मित्र आहेत) या कारणास्तव मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.
६) नात्यांना नाव दिल्याने जसे की- भाऊ ताई इत्यादी- स्त्रीयांना अधीक सुरक्षीत वाटते का ? (याचे उत्तर मुख्यत्वे स्त्रीयांकडून अभिप्रेत आहे)
ऐडीया नाही. मी असली नावं देत नाही. मला अदितीताई वगैरे म्हणणारे लोक मला गळेपडू आणि/किंवा लाचार वाटतात. पण असुरक्षित? कब्बी नै!
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ?
उत्तर देण्यासाठी या प्रश्नाचं प्रमाण मराठी भाषांतर हवं.
८) अल्पवयीन पाल्यांच्या बद्दलच्या (खासकरून मुलींच्या) (अ)सुरक्षीततेच्या बद्दल भावनांचे विचारांचे स्वरुप कसे असते ?
असुरक्षितता ही असुरक्षितताच असते. कधी सॉलिड, कधी लिक्विड अशी नसावी; हा अंदाज. मी शाळकरी वयाची असताना आईची तीच-ती कल्जियुक्त 'लेक्चरं' ऐकून कधीमधी "आई, मला कोणी काही केलं नाही तर मीच घरातून पळून जाईन; म्हणूनतरी लेक्चरं आवर" असं वाक्य तोंडावर येत असे. ते मी नियमाने गिळत असे.
९) उपरोक्त (अ)सुअरक्षीततेच्या भावना तुम्ही कशा हँडल करता ? इतर लोक कसे हँडल करतात ? (अ)सुअरक्षीततेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने कशा हँडल केल्या जाऊ शकतील असे तुम्हाला वाटते?
मला अशा काही भावना नाहीत. लोकांचं लोकं सांगतील. भावनांवर नियंत्रणाबाबत जेनेरिक काही बोलण्यासाठी कोणी मानसोपचारतज्ञ गाठलेले बरे. बाकीचे प्रश्न नंतर वाचेन. सध्या गृहपाठ म्हणून सुरक्षितता हा शब्द तीनशेचौदा वेळा चोप्य-पस्ते करा ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितगार 19/01/2016 - 10:10
तुमच्या सगळ्यात शेवटच्या वाक्यासाठी सर्वप्रथम एक स्मायली.
७) व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधांवरूनच्या असुरक्षीततेच्या भावना/अनुभव कोणकोणत्या आणि किती लहानपणापासूनच्या आठवतात वय, अनुभव, माहिती आणि ज्ञानानुसार आपल्या त्या भावना आणि अनुभवांकडे पाहण्यात/दृष्टीकोणात कोणकोणती परिवर्तने आली ? (प्रश्नोत्तरे गटक्र.२)
हा प्रश्न लहानपणी आई-किंवा वडील इतर व्यक्तींशी (भिन्न-लिंगी व्यक्तीशी) मोकळेपणाने बोलले तर असुरक्षीत वाटले होते का? खास करून सावत्र आई किंवा सावत्र वडील यांच्या बद्दलच्या कथा जसे की ध्रूवबाळ हि लहानपणीच ऐकण्यास मिळाली तर त्या वयात असुरक्षित वाटले असू शकते का ? कदाचित अटेंशन डेफिसीटमुळे बाल वयात मुले आई-वडीलांजवळ बसलीतरी मध्ये जाऊन बसताना दिसतात; पण खासकरून ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना असुरक्षीत वाटत असण्याची आणि त्यातून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका अधिक कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

In reply to by माहितगार

माहितगार 19/01/2016 - 10:27
ज्या मुला-मुलींची आई अथवा ताई या नाते आणि वयाने मोठे असलेल्या स्त्रीया स्वभावाने बोलण्यास मोकळ्या असतील तर अशा मुलांना अथवा लहान भावांना त्याची आधी पासून सवय असून पुढील जिवनातील स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची भूमिका कमी कंझर्वेटीव्ह राहण्याची शक्यता असू शकेल का ?

माहितगार 19/01/2016 - 10:44
खालील प्रश्नाचे उत्तर देण्या इतपत मिपावर मुस्लिम अथवा मुस्लिमांशी घनिष्ट संबंध असलेल्या व्यक्ति आहेत का माहित नाही तरीही (प्रश्नोत्तरे गट २) प्रश्न ७ मधील प्रश्नात खालील उपप्रश्न जोडता येऊ शकतील. खरेतर हेच प्रश्न ज्या कुटूंबातील एक पालक घटस्फोट घेते अथवा अधिक विवाह करते अथवा पुर्नविवाहाने आयुष्यात नवा साथीदार आणते त्यांच्यासाठीही लागू पडावेत. (कृपया केवळ वाद अथवा टिकेकरता म्हणून या प्रश्नाची इतरेजनांनी उत्तरे देऊ नयेत केवळ ज्यांचा अशा प्रश्नांशी सरळ सामना झाला आहे त्यांच्यासाठीच हे प्रश्न आहेत अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार) १) वडीलांच्या तोंडी तलाकाच्या अधिकारामुळे -किंवा घरातील घटस्फोटाच्या पातळीवरील वादंगांनी- तुम्हाला (तुम्ही मुस्लिम असल्यास) अथवा तुमच्या मुस्लिम मित्राला (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? २) पतीने अथवा वडीलांनी एका पेक्षा अधिक विवाह-(अथवा संबंध)-केल्यामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ३) आई-किंवा वडीलांच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने बाल वयातील भावना काय होती आणि ती मोठेपणी बदलत गेली का ? ४) घरातील अपत्ये असलेल्या विधवा स्त्रीच्या- (विधवा पुरषांना काय म्हणतात शब्द आठवत नाहीए) पुरुषाच्या पुर्नविवाहामुळे (अ)सुरक्षितते संदर्भाने भावना काय होती
(अ)सुरक्षीततेची भावना आणि भिती हे तसे खूप सारे कंगोरे असलेले, व्यापक पट असलेले विषय आहेत.

सुहास शिरवळकरांची पुस्तके आणि मी

अजिंक्य विश्वास ·

In reply to by दमामि

कादंबरीची थोडक्यात रूपरेषा सांगाल का? म्हणजे मी नाव सांगू शकेन. पाळंमुळं ही रहस्य कादंबरी आहे.

In reply to by दमामि

ते नारायण धारपांचे पुस्तक असावे. साठे-फायकस नावाचे. सुहास शिरवळकरांचे असे एकही पुस्तक नाहीये.

In reply to by अजिंक्य विश्वास

अजय सोनार 03/08/2019 - 08:45
सुहास शिरवळकर यांचे सावी तल्यारखान ही व्यक्तिरेखा असलेले पुस्तकाचे नाव काय आहे?

In reply to by अजय सोनार

गड्डा झब्बू 03/08/2019 - 12:04
नक्की नाही आठवत पण बहुतेक 'अट्टल' आहे. सावी तल्यारखान, चांदनी आणि निकी अशी मुख्य पात्रे असलेले ते पुस्तक मला खूप आवडले होते.

आदूबाळ 10/12/2015 - 12:08
वाह ये बात! तुम्हाला शुभेच्छा. माझ्या काही सुशिप्रेमी मित्रांना विचारतो. तुमच्याकडे सुशिलेखनाची समग्र सूची आहे का? याआधी भा रा भागवतांच्या लेखनाची सूची बनवण्याच्या कामात मी भाग घेतला होता. मुख्य पात्र (protagonist), प्रकाशन वर्ष, प्रकार वगैरे अनेक प्रकारे सूची बनवली होती. तसं काही करायचं असल्यास नक्की मदत करू शकेन.

In reply to by आदूबाळ

माझ्याकडे समग्र सुहास शिरवळकर यादी आहे. नवीन बदलांसकट परिपूर्ण आहे. तुम्हाला हवी असल्यास इथे देतो. जर पुस्तके मिळाली तर नक्कीच खूप मोठी मदत होईल.

In reply to by आदूबाळ

कादंबरी: वेशीपलीकडे, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वन्डर ट्वेल्व्ह, मुक्ती, कोवळीक, तलखी, इन्सानियत, सालम, सॉरी सर, जमीन-आसमान, वास्तविक, जाई, अंतिम, क्षणोक्षणी, स्वीकृत, थरारक, पहाटवारा, दुनियादारी, दास्तान, तलाश, बरसात चांदण्याची, समांतर, असीम, कोसळ, प्रतिकार, प्रयास, बंदिस्त, समथिंग, रुपमती, निदान, काटेरी, म्हणून, सनसनाटी, तुकडा-तुकडा चंद्र, जाता-येता, थोडक्यात असं, अखेर, महापर्व, ओ गॉड, क्षितिज, व्रतस्थ, गढूळ, कल्पान्त, अंमल, डेड-एन्ड, स्पेल बाऊन्ड, हिन्दोस्ता हमारा, लटकंती, झूम, सत्र, राजरोस, मधुचंद्र, न्याय-अन्याय, हृदयस्पर्श, क्षण-क्षण आयुष्य, झालं-गेलं, काळंशार, झलक, पाळंमुळं, चूक-भूल देणे-घेणे, हमखास, क्रमश:, काळंबेरं, सावधान, पळभर जन, निमित्तमात्र, सूत्रबध्द, स्टार हन्टर्स, वर्चस्व, कळप, लूप-होल रहस्यकथांची अद्ययावत यादी: गोल्ड हेवन, थर्‌राट, गुणगुण, खजिना, सहज, कायद्याचे हात, झंझावाती, माध्यम, बिनशर्त, सराईत, शैतान-घर, अनुभव, निराकार, अफलातून, मर्डर-हाऊस, शैताली, जबरदस्त, आवारा, तो, लास्ट बुलेट, किल-क्रेझी, गाफील, हव्यास, पोलादी, पहाडी, काळे युग, ऑपरेशन बुलेट, सन्नाटा, मातम, कलंक, सॉलीड, नकार, गिधाड, जिवघेणा, स्टुपिड, असह्य, अट्टल, शॅली-शॅली, कोल्ड-ब्लड, ऑर्डर-ऑर्डर, अज्ञात, खुनी पाऊस, पांचाली, इज्जत, सफाई, भयानक, भन्नाट, शोला, ब्लॅक कोब्रा, चक्रव्यूह, प्राक्तन, चॅलेंज, मंत्रजागर, जाणीव, सौदागर, उस्ताद, टेरिफिक, डेड-शॉट, इलेवन्थ अवर, जिव्हारी, ज्वेल-थीफ, सायलेन्स प्लीज, संशय, डाऊन-लेव्हल, कट्टर, ट्रेलर-गर्ल, हॅलो-हॅलो, मरणोत्तर, आक्रोश, वॉन्टेड, हिरवी नजर, पडद्याआड, मध्यरात्री, टॉवर हाऊस, ज्वाला कथा-संग्रह: एक फक्त एकच, थँक यू मि.न्यूजपेपर, कथा-पौर्णिमा, इथून-तिथून, एव्हरीथिंग सो सिंपल, माहौल, शेडस्‌, मूड्‌स, मर्मबंध, मेख, संदेह सदर-लेखन: इत्यादी-इत्यादी, वर्तुळातील माणसं, फलश्रुती, असो कुमार/बाल वाड्‌:मय: स्वर्गावर स्वारी, गर्वहरण, बक्षीस, मठ्ठ आज्ञाधारक, मूर्खांचा पाहुणचार नभोनाट्य/ एकांकिका: हात तिच्या, मानवाय तस्मै नम:, आवर्तन, मास्टर प्लॅन, जस्ट हॅपनिंग इतर भाषांमध्ये अनुवादित झालेले साहित्य: कन्नड: समांतर, हृदयस्पर्श स्वत: शिरवळकरांनी एक डायरी मेन्टेन केली होती , त्यात वर्षांप्रमाणे प्रकाशित झालेल्या साहित्याची वर्गवार नोंदणी आहे. ती डायरी त्यांच्या सुवाच्य आणि देखण्या अक्षरात आहे. एकदा मला त्याचे फोटोज्‌ मिळाले तर नक्की मी पोस्ट करेन.

In reply to by अजिंक्य विश्वास

प्रचेतस 10/12/2015 - 22:02
यादी पाहता जाणवून गेलं की मी कुमार/बाल वाड्‌:मय, आणि नभोनाट्य/एकांकिका सोडलं तर अगदी सगळंच साहित्य वाचलंय.

महासंग्राम 10/12/2015 - 12:48
अजिंक्य, दिवाळी आधी आपण सुगंधा काकुंसोबत मारलेल्या गप्पा आणि त्यात्यून उलगडत गेलेले सुशी भन्नाटच होते. अगदी अविस्मरणीय अनुभव होता तो

मोगा 10/12/2015 - 13:07
मस्त. माझे लाडके लेखक. सगळी पुस्तके अनेकदा वाचली होती.

कलंत्री 10/12/2015 - 14:45
प्रिय अ.वि., आपले लेखक प्रेम वाखाणण्याजोगे आहे. आपणाबरोबर गप्पा मारायला नक्कीच आवडेल. कलंत्री

In reply to by कलंत्री

लेखकप्रेम तर आहेच, त्याबरोबर त्यांचे साहित्य सुद्धा आवडते. त्यातील गुण-दोषांसकट! मला देखील गप्पा मारायला आवडेल. अवांतर: सुगंधा काकू आणि सम्राट शिरवळकर गप्पा मारण्यात एकदम दिलखुलास आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना वेळ वाया गेला असे कधीच वाटत नाही. शिरवळकर त्यांतून निरनिराळ्या रोलस्‌ आणि त्यातील बारकाव्यांसकट अनुभवायला मिळतात. त्यांना मी भेटलो आहे, ते देखील ६ वेळा , हे माझे नशीब. बाकी काय?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

ऑनलाईन पीडीएफ‌ उपलब्ध नाहीयेत. पण बुकगंगा डॉट कॉम वर काही मर्यादीत काळापर्यंत ठराविक पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध आहेत. धन्यवाद. (अवांतर- जर आपल्याला काही अश्या ऑनलाईन पीडीएफ दिसल्या तर कृपया आवर्जून कळवा. ही पायरसी असेल आणि आम्हांला तसा रिपोर्ट करणे सोईस्कर जाईल.)

नूतन सावंत 12/12/2015 - 00:38
तुम्ही एका हळव्या कोपऱ्याला स्पर्श केला आहे.जे पुस्तक दिसेल ते वाचण्याच्या वयात सुशि हातात पडले.साधारण सातवी आठवीत असेन तेव्हा.त्यवेळी दीड रुपयाला एक याप्रमाणे दरमहा गुरुनाथ नाईक,सुशि,शरदचंद वाळिंबे,बाबुराव अर्नाळकर,राजा पारगावकर यांची पुस्तके प्रकाशित होत असत.माझ्या वडिलांचा वर्तमानपत्र व्यवसाय असल्याने ही सारी पुस्तके आमच्याकडे येत असत,,एक मामेभाऊ ती दरमहा विकत घेत असे.त्याच्य्मुळे खूप नवे लेखकही माहिती झाले.तर त्याला देण्याची पुस्तके घरी ठेवलेली असत आणि त्या पाच सहा किंवा त्याहूनही जास्त पुस्तकांचा फडशा माझी,आई,माझा लहान भाऊ,आणि मी पडत असे.बंधू (मामेभाऊ)पप्पांना गमतीने म्हणत असे,"ओ मामा,मला सेकंड हॅंड पुस्तके मिळतात." माझे वडील अगदी व्यावसायिकपणे त्याला सागंत,"हे बघ,तू स्टॉलवरून घेत जा.घरी ठेवायला तूच सांगतोस." आता न आई, न पपा,न लहान भाऊ,न मामेभाऊ,न सुशि आणि उरल्यात फक्त आठवणी आणि पुस्तके. या यादीत 'ताशर',कसं नाही. माझ्याकडे काही पुस्तके आहेत.रद्दीत घेतलेली.त्या पाहून मी तुम्हाला हवी असलेली पुस्तके नक्की देईन.सध्या बाहेरगावी आहे .२२ नंतर संपर्क साधेन.

In reply to by नूतन सावंत

नक्की. तुम्ही म्हणता ती ’ताशर’ ही कादंबरी नसून शिरवळकरांच्या ’सनसनाटी’ ह्या कादंबरीमधील एक हत्यार आहे. माझे आवडते पुस्तक! मला वाचायला मिळालेल्या कॉपीत पुस्तकाची शेवटची पाने नव्हती आणि म्हणूनच हे पुस्तक शोधता-शोधता बाकीची पुस्तके वाचायला मिळाली. माझी शिरवळकरांची पुस्तके वाचायची सुरूवात ह्या ’दिड-दोन रूपये’ वाल्या मालांपासूनच झाली होती. तुम्हाला तुमच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर तुम्ही फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेजवर शेअर करू शकता. तुम्ही आमचा फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेज सुद्धा फॉलो करू शकता. ही ग्रूपची लिंक- https://www.facebook.com/groups/suhasshirvalkar/ ही पेजची लिंक- https://www.facebook.com/sushi.fanpage/?ref=bookmarks धन्यवाद

सिरुसेरि 12/12/2015 - 23:21
तुमच्या सुशि यांच्या पुस्तकांच्या यादीमध्ये "सुन्न" हे पुस्तक आहे ना . फिरोझ ईराणीची साहसकथा आहे .

महासंग्राम 15/11/2016 - 16:51
आज आपल्या लाडक्या सु.शिं.चा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सुशिंच्या ग्रूप आणि पेजवर काही खास आठवणी, किस्से आणि माहिती शेअर करणार आहोत. आपल्याकडेही काही लेख, आठवण, किस्से अथवा फोटोज्‌ असल्यास ते कृपया मेसेज करा अथवा ग्रूपवर पोस्ट करु शकता आपली परवानगी घेऊन ते लेख, आठवणी किस्से आणि फोटोज्‌ आम्ही आपल्या सु.शि. पेजवर आपल्या नावासहीत पोस्ट करू.

In reply to by दमामि

कादंबरीची थोडक्यात रूपरेषा सांगाल का? म्हणजे मी नाव सांगू शकेन. पाळंमुळं ही रहस्य कादंबरी आहे.

In reply to by दमामि

ते नारायण धारपांचे पुस्तक असावे. साठे-फायकस नावाचे. सुहास शिरवळकरांचे असे एकही पुस्तक नाहीये.

In reply to by अजिंक्य विश्वास

अजय सोनार 03/08/2019 - 08:45
सुहास शिरवळकर यांचे सावी तल्यारखान ही व्यक्तिरेखा असलेले पुस्तकाचे नाव काय आहे?

In reply to by अजय सोनार

गड्डा झब्बू 03/08/2019 - 12:04
नक्की नाही आठवत पण बहुतेक 'अट्टल' आहे. सावी तल्यारखान, चांदनी आणि निकी अशी मुख्य पात्रे असलेले ते पुस्तक मला खूप आवडले होते.

आदूबाळ 10/12/2015 - 12:08
वाह ये बात! तुम्हाला शुभेच्छा. माझ्या काही सुशिप्रेमी मित्रांना विचारतो. तुमच्याकडे सुशिलेखनाची समग्र सूची आहे का? याआधी भा रा भागवतांच्या लेखनाची सूची बनवण्याच्या कामात मी भाग घेतला होता. मुख्य पात्र (protagonist), प्रकाशन वर्ष, प्रकार वगैरे अनेक प्रकारे सूची बनवली होती. तसं काही करायचं असल्यास नक्की मदत करू शकेन.

In reply to by आदूबाळ

माझ्याकडे समग्र सुहास शिरवळकर यादी आहे. नवीन बदलांसकट परिपूर्ण आहे. तुम्हाला हवी असल्यास इथे देतो. जर पुस्तके मिळाली तर नक्कीच खूप मोठी मदत होईल.

In reply to by आदूबाळ

कादंबरी: वेशीपलीकडे, ऑब्जेक्शन युवर ऑनर, वन्डर ट्वेल्व्ह, मुक्ती, कोवळीक, तलखी, इन्सानियत, सालम, सॉरी सर, जमीन-आसमान, वास्तविक, जाई, अंतिम, क्षणोक्षणी, स्वीकृत, थरारक, पहाटवारा, दुनियादारी, दास्तान, तलाश, बरसात चांदण्याची, समांतर, असीम, कोसळ, प्रतिकार, प्रयास, बंदिस्त, समथिंग, रुपमती, निदान, काटेरी, म्हणून, सनसनाटी, तुकडा-तुकडा चंद्र, जाता-येता, थोडक्यात असं, अखेर, महापर्व, ओ गॉड, क्षितिज, व्रतस्थ, गढूळ, कल्पान्त, अंमल, डेड-एन्ड, स्पेल बाऊन्ड, हिन्दोस्ता हमारा, लटकंती, झूम, सत्र, राजरोस, मधुचंद्र, न्याय-अन्याय, हृदयस्पर्श, क्षण-क्षण आयुष्य, झालं-गेलं, काळंशार, झलक, पाळंमुळं, चूक-भूल देणे-घेणे, हमखास, क्रमश:, काळंबेरं, सावधान, पळभर जन, निमित्तमात्र, सूत्रबध्द, स्टार हन्टर्स, वर्चस्व, कळप, लूप-होल रहस्यकथांची अद्ययावत यादी: गोल्ड हेवन, थर्‌राट, गुणगुण, खजिना, सहज, कायद्याचे हात, झंझावाती, माध्यम, बिनशर्त, सराईत, शैतान-घर, अनुभव, निराकार, अफलातून, मर्डर-हाऊस, शैताली, जबरदस्त, आवारा, तो, लास्ट बुलेट, किल-क्रेझी, गाफील, हव्यास, पोलादी, पहाडी, काळे युग, ऑपरेशन बुलेट, सन्नाटा, मातम, कलंक, सॉलीड, नकार, गिधाड, जिवघेणा, स्टुपिड, असह्य, अट्टल, शॅली-शॅली, कोल्ड-ब्लड, ऑर्डर-ऑर्डर, अज्ञात, खुनी पाऊस, पांचाली, इज्जत, सफाई, भयानक, भन्नाट, शोला, ब्लॅक कोब्रा, चक्रव्यूह, प्राक्तन, चॅलेंज, मंत्रजागर, जाणीव, सौदागर, उस्ताद, टेरिफिक, डेड-शॉट, इलेवन्थ अवर, जिव्हारी, ज्वेल-थीफ, सायलेन्स प्लीज, संशय, डाऊन-लेव्हल, कट्टर, ट्रेलर-गर्ल, हॅलो-हॅलो, मरणोत्तर, आक्रोश, वॉन्टेड, हिरवी नजर, पडद्याआड, मध्यरात्री, टॉवर हाऊस, ज्वाला कथा-संग्रह: एक फक्त एकच, थँक यू मि.न्यूजपेपर, कथा-पौर्णिमा, इथून-तिथून, एव्हरीथिंग सो सिंपल, माहौल, शेडस्‌, मूड्‌स, मर्मबंध, मेख, संदेह सदर-लेखन: इत्यादी-इत्यादी, वर्तुळातील माणसं, फलश्रुती, असो कुमार/बाल वाड्‌:मय: स्वर्गावर स्वारी, गर्वहरण, बक्षीस, मठ्ठ आज्ञाधारक, मूर्खांचा पाहुणचार नभोनाट्य/ एकांकिका: हात तिच्या, मानवाय तस्मै नम:, आवर्तन, मास्टर प्लॅन, जस्ट हॅपनिंग इतर भाषांमध्ये अनुवादित झालेले साहित्य: कन्नड: समांतर, हृदयस्पर्श स्वत: शिरवळकरांनी एक डायरी मेन्टेन केली होती , त्यात वर्षांप्रमाणे प्रकाशित झालेल्या साहित्याची वर्गवार नोंदणी आहे. ती डायरी त्यांच्या सुवाच्य आणि देखण्या अक्षरात आहे. एकदा मला त्याचे फोटोज्‌ मिळाले तर नक्की मी पोस्ट करेन.

In reply to by अजिंक्य विश्वास

प्रचेतस 10/12/2015 - 22:02
यादी पाहता जाणवून गेलं की मी कुमार/बाल वाड्‌:मय, आणि नभोनाट्य/एकांकिका सोडलं तर अगदी सगळंच साहित्य वाचलंय.

महासंग्राम 10/12/2015 - 12:48
अजिंक्य, दिवाळी आधी आपण सुगंधा काकुंसोबत मारलेल्या गप्पा आणि त्यात्यून उलगडत गेलेले सुशी भन्नाटच होते. अगदी अविस्मरणीय अनुभव होता तो

मोगा 10/12/2015 - 13:07
मस्त. माझे लाडके लेखक. सगळी पुस्तके अनेकदा वाचली होती.

कलंत्री 10/12/2015 - 14:45
प्रिय अ.वि., आपले लेखक प्रेम वाखाणण्याजोगे आहे. आपणाबरोबर गप्पा मारायला नक्कीच आवडेल. कलंत्री

In reply to by कलंत्री

लेखकप्रेम तर आहेच, त्याबरोबर त्यांचे साहित्य सुद्धा आवडते. त्यातील गुण-दोषांसकट! मला देखील गप्पा मारायला आवडेल. अवांतर: सुगंधा काकू आणि सम्राट शिरवळकर गप्पा मारण्यात एकदम दिलखुलास आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना वेळ वाया गेला असे कधीच वाटत नाही. शिरवळकर त्यांतून निरनिराळ्या रोलस्‌ आणि त्यातील बारकाव्यांसकट अनुभवायला मिळतात. त्यांना मी भेटलो आहे, ते देखील ६ वेळा , हे माझे नशीब. बाकी काय?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

ऑनलाईन पीडीएफ‌ उपलब्ध नाहीयेत. पण बुकगंगा डॉट कॉम वर काही मर्यादीत काळापर्यंत ठराविक पुस्तकांचे ई-बुक्स उपलब्ध आहेत. धन्यवाद. (अवांतर- जर आपल्याला काही अश्या ऑनलाईन पीडीएफ दिसल्या तर कृपया आवर्जून कळवा. ही पायरसी असेल आणि आम्हांला तसा रिपोर्ट करणे सोईस्कर जाईल.)

नूतन सावंत 12/12/2015 - 00:38
तुम्ही एका हळव्या कोपऱ्याला स्पर्श केला आहे.जे पुस्तक दिसेल ते वाचण्याच्या वयात सुशि हातात पडले.साधारण सातवी आठवीत असेन तेव्हा.त्यवेळी दीड रुपयाला एक याप्रमाणे दरमहा गुरुनाथ नाईक,सुशि,शरदचंद वाळिंबे,बाबुराव अर्नाळकर,राजा पारगावकर यांची पुस्तके प्रकाशित होत असत.माझ्या वडिलांचा वर्तमानपत्र व्यवसाय असल्याने ही सारी पुस्तके आमच्याकडे येत असत,,एक मामेभाऊ ती दरमहा विकत घेत असे.त्याच्य्मुळे खूप नवे लेखकही माहिती झाले.तर त्याला देण्याची पुस्तके घरी ठेवलेली असत आणि त्या पाच सहा किंवा त्याहूनही जास्त पुस्तकांचा फडशा माझी,आई,माझा लहान भाऊ,आणि मी पडत असे.बंधू (मामेभाऊ)पप्पांना गमतीने म्हणत असे,"ओ मामा,मला सेकंड हॅंड पुस्तके मिळतात." माझे वडील अगदी व्यावसायिकपणे त्याला सागंत,"हे बघ,तू स्टॉलवरून घेत जा.घरी ठेवायला तूच सांगतोस." आता न आई, न पपा,न लहान भाऊ,न मामेभाऊ,न सुशि आणि उरल्यात फक्त आठवणी आणि पुस्तके. या यादीत 'ताशर',कसं नाही. माझ्याकडे काही पुस्तके आहेत.रद्दीत घेतलेली.त्या पाहून मी तुम्हाला हवी असलेली पुस्तके नक्की देईन.सध्या बाहेरगावी आहे .२२ नंतर संपर्क साधेन.

In reply to by नूतन सावंत

नक्की. तुम्ही म्हणता ती ’ताशर’ ही कादंबरी नसून शिरवळकरांच्या ’सनसनाटी’ ह्या कादंबरीमधील एक हत्यार आहे. माझे आवडते पुस्तक! मला वाचायला मिळालेल्या कॉपीत पुस्तकाची शेवटची पाने नव्हती आणि म्हणूनच हे पुस्तक शोधता-शोधता बाकीची पुस्तके वाचायला मिळाली. माझी शिरवळकरांची पुस्तके वाचायची सुरूवात ह्या ’दिड-दोन रूपये’ वाल्या मालांपासूनच झाली होती. तुम्हाला तुमच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर तुम्ही फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेजवर शेअर करू शकता. तुम्ही आमचा फेसबुकवरचा ऑफिशिअल ग्रूप आणि पेज सुद्धा फॉलो करू शकता. ही ग्रूपची लिंक- https://www.facebook.com/groups/suhasshirvalkar/ ही पेजची लिंक- https://www.facebook.com/sushi.fanpage/?ref=bookmarks धन्यवाद

सिरुसेरि 12/12/2015 - 23:21
तुमच्या सुशि यांच्या पुस्तकांच्या यादीमध्ये "सुन्न" हे पुस्तक आहे ना . फिरोझ ईराणीची साहसकथा आहे .

महासंग्राम 15/11/2016 - 16:51
आज आपल्या लाडक्या सु.शिं.चा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सुशिंच्या ग्रूप आणि पेजवर काही खास आठवणी, किस्से आणि माहिती शेअर करणार आहोत. आपल्याकडेही काही लेख, आठवण, किस्से अथवा फोटोज्‌ असल्यास ते कृपया मेसेज करा अथवा ग्रूपवर पोस्ट करु शकता आपली परवानगी घेऊन ते लेख, आठवणी किस्से आणि फोटोज्‌ आम्ही आपल्या सु.शि. पेजवर आपल्या नावासहीत पोस्ट करू.
मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये. मी त्यांच्या ’थर्‌राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो.

रॉयल कॅफेसाठी मदत हवी.

विलासराव ·

कवितानागेश 08/12/2015 - 01:54
एअर फ्रायर चा अलीकडेच एकधागा निघाला होता, स्वाती दिनेश यांचा. एकन्दरीत उपयोगी वस्तू आहे, पण वीजेचे कंजम्पशन किती होते ते बघून वापरा. तुम्हाला एखादी वस्तू हाफ फ्राय करून ठेऊन आयत्या वेळेस गरम करून द्यायची असेल तर भरतीच्या वेळेस सगळे त ळू न ठेऊन नंतर एयर फ्रायर वापरणे चालू शकेल कदाचित. प्रयोग करून बघा. पाणी शुद्ध करणारे यंत्र घ्या. पण फ़क्त युव्ही पुरे.

रेवती 08/12/2015 - 03:59
सॅलडसाठी ज्या पानांच्या भाज्या वापराल किंवा नेहमीच्या कोथिंबिरीसाठीही सॅलड स्पिनर मिळतो पण ते उपकरण घरगुती वापरासाठी आहे. एयर फ्रायरमध्ये वेळ लागेल असे वाटते. रेस्टॉरंटसाठी रेसिप्या आठवल्यास लगेच देते. पोटॅटो चिप्स हे पारंपारिक तर्‍हेने तळल्यास वेळ कमी लागेल मात्र मोठा फ्रायर घ्यावा असे वाटते जो उपहारगृहांसाठी बनवलेला असतो.

संदीप डांगे 08/12/2015 - 04:11
मुंबईत दोन तीन कंपन्या आहेत ज्या हॉटेल, कॅफे, रेस्तराँ साठी इंडक्शन कुकींग रेंज देत आहेत. त्यात सगळ्या प्रकारची आकाराची इंडक्शन कुकिंग टॉप्स मिळतील. बजेट व कामाच्या व्यापानुसार निवडू शकता. ४० ते ८० टक्क्यांपर्यंत गॅसबील वाचू शकते. http://www.cooktek.com/

रेवती 08/12/2015 - 05:17
तुमच्याकडे सध्या कोणते स्नॅक प्रकार मेन्यूवर आहेत ते कळवल्यास वेगळे सुचवता येतील. सध्यातरी कोथिंबीर वडी व चीज कॉर्न टोस्ट सुचतायत. व्हाईट सॉसमध्ये भाज्या,चीज घालून टोस्ट करणे. चीज कॉर्न बॉल्सही सगळ्यांना आवडतात. अर्थात हे उपहारगृहासाठी किती सोयिचे ठरतील बघायला हवे.

कविता१९७८ 08/12/2015 - 10:42
कॅफे कुठल्या साईडला आहे?? तो बोईसरला नाहीये, बाहेरच्या माणसांना ईथे यायचे असेल तर बोईसर स्टेशनला उतरावे लागेल. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल कारण रहदारीचा रस्ता आहे पण जर ते महागाव रोडला असेल तर क्रुष्णा विनाईलस या एका कंपनी शिवाय आणि टाटा हाउसिंग काॅलनीशिवाय तिथे काही नाही , सर्व आदीवासी पाडे आणि डोंगर आहेत. त्यामुळे कॅफे कुठे आहे ते सांगाल का ??

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 10:55
या भागात बहुतकरुन बटाटेवडे , समोसे, डोसे, चायनीज भेळ, चायनीज भजी , भेळ, पाणीपुरी , दाभेली, शेवपुरी यासारखे पदार्थ खाल्ले जातात, सॅंडविचेस ही भरपुर प्रमाणात खाल्ली जात नाहीत, जवळ्पास एकच कॉलेज आहे "थीम इंजिनियरींग" ते जवळ असेल तर सँडविचेस चालु शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या ठेवल्या तर उत्तम. पाव भाजी ही गर्दी बघुन किंवा कमी प्रमाणात पाहुन ठेवु शकता.

In reply to by कविता१९७८

विलासराव 08/12/2015 - 13:11
सर्वांना धन्यवाद. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल अगदी या रस्त्यावर नाही. पण या रोडवर जे गेट आहे त्यातून आतमधे आल्यावर साधारण ५० मीटर आहे. शनिवार रविवार मुंबईचे पब्लिक येते. साधारणपने पराठे,इडली ,पोहे,पूरी भाजी, भजी, मिसळ पाव, भेळ, वडापाव आणि सैंडविच हे चालते. त्यात पाहिले चार जास्त. थिम् कॉलेजची काही मुले टाटामधे रहातात, २ टीचर पण आहेत. ते येतात. पण कॉलेज ५ ते ६ मी. अंतरावर आहे. आता बाहेर मेनरोडवर फलक लावतो. वॉटर प्यूरीफायर ,फ्रायर कोणत्या कंपनीचा चांगला? त्यात काय काय करता येऊ शकते? किम्मत? अशी माहिती मिळाली तर बारे होईल. पावभाजी आणि तवापुलाव चालेल असे वाटतेय.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:36
आॅमलेट पाव अन बुर्जी पाव चालु शकतील, चायनीज सुप चालु शकतील. चिकन भुजीन्ग भरपुर चालेल

In reply to by विलासराव

नाव आडनाव 09/12/2015 - 21:35
पाककॄतींतलं जास्त काही माहित नाही, पण एकदा घरी पोह्यात कांद्याएवजी कोबी टाकला होता. मला लई आवडले होते पोहे. ट्राय करून बघा एकदा. आवडले तर असाही एक ऑप्शन होइल.

कंजूस 08/12/2015 - 13:43
त्या भागात समोसा-पाव फार चालतो ना? सूरण-बटाटा घालून व्हेज कटलेट्स पाव ट्राइ करा. आलू पालक,पनीर पालक ( अमूल मारके )करायला सोपे आहे. उसळ पाव,भजी-पाव. झीरो-B चे पाणी देता येईल.

रॉयल कॅफे काय आहे? तुमचा कॅफे आहे का? जनरली हे पदार्थ पटकन होत असावेत:- बॉइल्ड एग्स, ऑम्लेट-पाव, मॅगी, सॅण्डविच तयार करुन ठेवण्यासारखे पदार्थ :- मिसळ , पोहे , उपमा , वडे ऑन द स्पॉट बनवता येतील असे पदार्थः- भेळ, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी टाईप चाट पॅक्ड पदार्थः- लेझ / कुरकुरे , सॉफ्ट ड्रिंक्स , चिक्की, चणे / फुटाणे / शेंगदाणे इ. हटके पदार्थः- पणिनी / पनिनी , पास्ता , कोल्ड कॉफी (दुर्गा किंवा तत्सम), नाचोज + साल्सा डिप वरुन मेल्ट्ड चीझ, कप पिझ्झा, जलजिरा टाईप सोडा

गवि 08/12/2015 - 14:39
भुजिंग लिहायलाच आलो होतो पण वर अन्यत्र ते सुचवलेलं दिसत आहे. मज्जा म्हणून रॉयल कॅफेवर कट्टा "न्यावा" की काय असा शिरेस विचार आला. पण खरोखर चार्जेबल बेसिसवर होणार असेल तरच. नाहीतर मिपाकर म्हणून फुकटेपणा करण्यात मजा नाही.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 14:51
कॅफेच्या दुसर्‍या बाजुच्या रस्त्याने आत गेल्यास छोटे डोंगर अन टेकडया आहेत, नदी आहे, परीसर अगदी शांत आहे. आदीवासी वस्ती, शेते , पाट असं पाहायला मिळेल , ट्रेकींग करु शकाल.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:54
लहानपणी या टेकड्यांवर आणि डोंगरांवर गेलेय मी , आजो़ळ आहे माझे ते. तिथे अरुणा ईराणीचे फार्म हाउसही आहे, लहानपणी तिथे कलिंगड खायला जायचो आम्ही. पण हे सगळे टाटा हाउसिंगच्या दुसर्‍या बाजुला म्हणजे कॅफेच्या कॉलनीच्या उजव्या बाजुला आहे.

In reply to by कविता१९७८

गवि 08/12/2015 - 15:06
परिसराची खूप माहिती आणि जवळीकही दिसते आहे. भारतात असाल तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत कट्टा ठरवावा मिपाकरांनी.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 15:19
भारतातच आहे, कॅफेजवळ, मीही सतत भटकंती करत असल्याने उपस्थितीचं सांगु शकत नाही पण माहीती देउ शकेन. हा कॅफे बोईसरपासुन ३-४ कीमी अंतरावर आहे, येणार असाल तर बाय रोड किंवा बाय ट्रेन ने कसे यायचे सांगु शकेन.

विलासराव 08/12/2015 - 16:06
सांगायचे राहिलेच. रॉयल कॅफे प्यूअर व्हेज आहे. नॉनव्हेज भरपूर चालेल पण मला त्यात रस नाही. @ पिलियन रायडर: होय मी चालु केलाय रॉयल कॅफे. @गवी: कधीही कट्टा करा. पण व्हेज. आणि मुक्कामी कटटा केला तरी चालेल. आपला फ्लॅट रिकामाच हाय.

In reply to by विलासराव

अभ्या.. 08/12/2015 - 18:37
थालीपीठापेक्षा धपाटे ठेवा. आमच्या इथे बृयाच हॉटेलात डिश मिळते. दोन धपाटी, दही, शेंगाचटनी आणि थॉडासा मिरच्याचा ठेचा. स्नॅक्स म्हणून पण चालतो अन जेवण म्हणून पण.

In reply to by अभ्या..

विलासराव 08/12/2015 - 22:48
रेसिपी दया . म्हणजे तुम्हालाच धापाटे खायला घालतो. लवकर बनवा बॅनर. बॅनर पाहूनच कॅफेला गर्दी केलि पाहिजे लोकांनी असा.

In reply to by विलासराव

स्रुजा 08/12/2015 - 23:35
अरे वा, हे छान आहे व्हेज आहे ते ! साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, इडली, दावणगिरी डोसा, कोथिंबीर वडी, अळु वडी, थालिपीठ, शेव भाजी, मोठ्या उपासांना म्हणजे कार्तिकी , आषाढी एकादशीला वगैरे ऑर्डर घेऊन भगर आमटी वगैरे पण ठेवु शकता. शिवाय ठेपले, पराठे, वेग वेगळे ज्युसेस, भाजी भाकरी, पिठलं भाकरी, तांदळाची भाकरी आणि वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे प्रकारांवर उड्या पडतात. व्हेज कटलेट्स, उपासाची कचोरी हे प्रकार देखील नेहमी ठेवता येतील. मिसळ, बटाटावडा यांचा उल्लेख आलाच आहे. हेल्दी मिसळ पण ठेवु शकता. उपासाची मिसळ पण लोकप्रिय आहे. अजुन ही सुचतं तसं सांगेन. कवि, एकदा खरंच जाऊयात आणि मी तुला घेऊन जाणार च. त्यात मदत करते वगैरे चालणार नाही :)

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:43
ईथे शक्यतो उपवासाचे पदार्थ लोक घरी करतात त्यामुळे त्याची शचक्यता कमी, उपवासाची भगर आमटी वैगरे ईथला लोकल पदार्थ नाही

In reply to by कविता१९७८

स्रुजा 08/12/2015 - 23:50
अगं हो पण कॉलेज ची मुलं येतात म्हणतात ना ते. त्यांना उपासाला येता येईल. शिवाय काही कर्मचारी जे घरी राहत नाहीत वगैरे.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:56
मी काही म्हणतीये कारण माझा जन्मच बोईसरचा आहे, मला ईथला एरीया माहीतीये, ही जागा ईस्टलाआहे अन एम आय डी सी एरीया बर्‍याच लाम्ब वेस्टला जिथे मी राहते, ईस्टला जायला जास्त वाहने नाहीत, स्वत:चे वाहन असेल तरच जाणे सोयीचे पडते.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 09/12/2015 - 00:05
आजकाल कुठल्या काॅलेजची पोरे उपवास करतात गं, मी सांगतीये कारण ईथे बरेचजण खुप खर्च करुन काही सुरु करतात पण कालांतराने त्यांना पब्लिक नुसार बदल करावे लागतात. हा अनुभव आहे. ईथे कामगार वर्ग जास्त राहतो, नाॅनवेजचे प्रमाण जास्त या सर्व गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात कारण खाण्याच्या पदार्थांचे शेल्फ लाईफ खुप कमी असते.

In reply to by कविता१९७८

एमसीए करत असताना आमच्या होस्टेलच्या मेसच्या जेवणाच्या चवीला कंटाळून मी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शनिवारचा उपास करणे सुरू केले. दुपारच्या जेवणात छान ताट भरून साबुदाणा खिचडी व वाटीभर दही मिळत असे. चवही एकदम चांगली असायची. योगायोगाने त्या सेमिस्टरमध्ये माझा दुसर्‍या सेमिस्टर पासून बॅक असणारा प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हा पेपर क्लिअर झाला. त्यावर माझ्या ज्युनियर मंडळींनी, मी शनिवारचा उपास धरल्यानेच तो पेपर निघाला अशी आवई उठवून अनेकांना शनिवारचा उपास धरण्यास प्रवृत्त केले. उपासाचे पदार्थ चविबाबतीत आकर्षक असल्याने उपास न करणारेही आनंदाने खातात. भविष्यात अमेरिकेत मराठी फास्ट फूड उपहारगृह सुरू करून साबुदाणा वडा या पदार्थाचा ब्रॅन्ड बनवावा असे स्वप्न आहे. विलासरावांना रॉयल कॅफेच्या पुरर्रचनेसाठी शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

अभ्या.. 09/12/2015 - 00:25
प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हे टायपणारा माणूस पुनर्रचना टायपू शकत नाही??? ह्या कैतरीच कै ;) हल्केच घे हो श्रीरंगा. तू दुरुस्ती करायला येशीलच खात्री आहे.

In reply to by अभ्या..

प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिजची आठवण निघाली की अजुनही हात थरथरतात रे अभ्या!! पुणे विद्यापीठातून मॅनेजमेंट स्ट्रीमचे एमसीए करणार्‍यांना कधी विचार याबाबत ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

स्रुजा 09/12/2015 - 00:31
हाहाहा, हो मी पण मंगळवारी आणि शनिवारी भक्तीभावाने सा. खिचडी आणि सा. वडे खायचे दह्या बरोबर. एक ऑर्डर माझी असायची च दर आठवड्याला. कॉलेज मधली मुलं उपास करत नसली तरी त्यांचे काहीही मोटीव्हेशन्स असु शकतात उपासाचे पदार्थ खायला.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:48
साबुदाण्याची खिचडी ठेवतो. मी विसरलो होतो लिहायला. बाकी माझी जी काही संकल्पना आहे कॅफेची ती तुम्ही नेमकी पकडलीत. वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे क्या बात कही आपने? एकदम नेमके. तुम्ही याच. कविता ताईहि येतिलच.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:56
हो या ना. मी चालु केला तेव्हाच सर्व मिपाकरांना आमंत्रण दिल होत खरडफळयावर. आपले मिपाकर शिद यांनी पहिला मान मिळवलाय भेट देण्याचा.

In reply to by विलासराव

साबुदाण्याची खिचडी ठेवतो. विलासराव, खिचडी बरोबर काकडीची दह्यातली कोशिंबीर पण देत जा. खिचडी काकडी माझ्या आवडत्या डिश पैकी एक आहे. त्या बरोबर अजून एक पदार्थ म्हणजे उपासाची मिसळ. दाण्याची आमटी, साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, उपासाचा चिवडा असे बरेच पदार्थ घालुन बनवला जातो. पैजारबुवा,

कविता१९७८ 08/12/2015 - 16:29
सध्या इथे चायनीज भजी (मंचुरीयन) हे खुप खपले जाते, चहा बरोबर मस्त लागते, पास्त्याचा प्रकार इतका चालणार नाही कदाचित, प्रॉपर बोईसर मधे डोमिनोज पिझ्झा आहे , सुरुवातीला १५ दिवस खच्चुन गर्दी असायची पण आता कुणीच दिसत नाही , थोडी फार होम डीलेव्हरी आहे, टाकोज पण एकाच ठेलेवाला (हो ठेलाच लावलाय त्याने) ठेवतो. म्हणजे हटके पदार्थांना प्रॉपर बोईसर मधेच वाव नाही तर हे बोईसर हुन जरा लांब आहे. सिजलर्सचं पण तेच.

एखाद्या हटके पदार्थासाठी फेमस असेल कॅफे तर खास तोच पदार्थ खायला मंडळी येतात. शिवाय एकच पदार्थ मोठ्या प्रमाणात ठेवणे सोपे जात असावे. बाकी पदार्थ थोड्या प्रमाणात ठेवायचे. म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?

विलासराव 08/12/2015 - 16:53
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 08/12/2015 - 16:56
पराठ्यामधे माझी एक ईनोवेटीव रेसिपी आहे , व्य नि करते, बघा उपयोगी आली तर, गुजराथी मिटक्या मारुन खातात हा अनुभव आहे :)

विलासराव 08/12/2015 - 16:55
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर. वेगवेगळ्या फ्लेवरच्या चटणींचा वाटा फार मोठा असतो या गोष्टी फेमस होण्यात. त्यांच्याही रेसिपीज दिल्या तर् बरे होईल.

In reply to by विलासराव

गवि 08/12/2015 - 17:12
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). जालावर लाखो रेसिपीज आहेत. मिसळपावचा पाककृती विभाग धुंडाळणं अजिबात अवघड नाही. पण कोणीही कितीही रेसिपीज दिल्या तरी खुद्द स्वतः तिथल्या गिर्‍हाईकांचा कल पाहून पदार्थ इम्प्रूव्ह करत नेणं याची आवड असणं लाँग टर्ममधे अत्यावश्यक आहे. वेळप्रसंगी तुमचे आचारी उपलब्ध नसतील तरी तुम्ही तितक्याच किंवा जास्त चवीने स्वहस्ते बरेचसे पदार्थ बनवू शकत असलात तर दीर्घकालीन फायद्याचं आहे. कोणीतरी पाकृ देईल आणि कोणीतरी अन्य त्यानुसार बनवेल हे ठीक आहे, पण खुद्द प्रयोग करणं हा फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे. नाहीतर तो फेमस वडापाव / मिसळ फेमस होताच अन्य कोणासोबत तरी पलायन करु शकते.

In reply to by गवि

विलासराव 08/12/2015 - 22:43
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? मी खवय्या होतो आधी. जवळपास २५ वर्ष मी हॉटेलमधे खाल्लय. तेव्हा मला नेहमी वाटायच की आपण एक बार चालु करायचा. त्यावेळी मई ड्रिंक घ्यायचो. आवड खायची होती. बनवायची नव्हती आणि नाही. खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). काही प्रयोग केले नाहीत. एका आमच्याच् कॉलनीमधील बाईंना मदत म्हणून मी फायनांस केला आणि त्यांनी कॅफे चालवायचे असे ठरले होते. बाई भलत्याच् स्मार्ट निघाल्या. ३ महिन्यातच सोडला कॅफे आणि घरून मेस चालवतात आता. मी आहे विपश्यनेच्या २ महिन्याच्या शिबिरात सेवेला. मग माझ्या पुतन्याने ते जमील तसे चालु ठेवले आहे. बराच आर्थिक फटकाही देऊन गेल्यात. असो. आता बचेंगे तो और भी लडेंगे अशी आनीबानीची वेळ आलिया म्हणून हां प्रपंच. मी ७ ते ८ महीने इगतपुरीलाच असतो. आता पुतन्याला तयार करून ही लढाई लढायचीय. आपली चांगली बाजू म्हणजे स्वच्छता आणि चांगले मटेरियल वापरतो. एक कट्टा जमवाच. त्यादिवशी रेग्युलर कॅफे बंद ठेवू. आपण आपल्यासाठी फ़क्त पाहिजे ते मेनू बनवु. आणि धमाल कट्टा करू. माझा फ्लॅट आहेच. बाजुचाही गरज असल्यास मिळेल. पार्किगची आणि जागेची कसलीच अड़चन नाही. ठाण्यावरुन गाडीने दीड दोन तास लागतील. भिवंडी, वाड़ा, मनोर मस्त रस्ता आहे. बघा कस जमताय ते. ३१ डिसेम्बर जमात असेल तरी माझी हरकत नाही.कधीही या.मी ४ फेब्रुवारी पर्यन्त फ्री आहे. जानेवारीत १२ दिवस सोडून.

In reply to by विलासराव

pacificready 08/12/2015 - 23:32
पुतण्या तुमची कंपनी बघतोय ना? की तो भाऊ? बाकी माझ्या काकाचा पांचगणी मध्ये वडापाव चा गाडा आहे. रोज उपस्थित असणं अत्यंत आवश्यक असतंच असतं. Consistancy विथ गुड टेस्ट शुड बी द की.

In reply to by pacificready

विलासराव 08/12/2015 - 23:43
आपली कंपनी बघतो तो चुलत भाऊ. कॅफे पहातो तो पुतन्या. मला थाम्बायला वेळ नाहीना महाराज.आपन जाणताच सर्वकाही.

कंजूस 08/12/2015 - 23:24
हॅाटेलची थोडी उमेदवारी( वेटर) करून धंद्यात शिरायला पाहिजे खरं म्हणजे.गिह्राइक आलं नाही तर पदार्थ कसे वाचवायचे हे मागे गेल्यावरच कळतं.ते कुठे गुगलून नाही मिळत.रेसिप्या वेगळ्या आणि हॅाटेलात डिश म्हणून देणं वेगळं.मालकाच्या भुमिकेतून कसं वागायचं ते कुठे उघडपणे लिहिता येत नाही.

कविता१९७८ 09/12/2015 - 10:36
ईथे नारळाची झाडे भरपुर आहेत , कुठल्याही वाडीतुन तुम्हाला आख्खी शहाळी 5-6 रु. मधे मिळतील, पिकअप वाले २०-५०रु फेरी अशा दराने आणुन देतात, ती कापुन पाणी पाउचमधे पॅक करुन विकु शकता, प्रवासात वैगरे लोकं नारळाचे पाणी जास्त प्रीफर करतात.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 09/12/2015 - 10:59
हो चिंचणीला वाडीत स्वत: जाउन भरपुर नारळ घेतले तर मिळतात. थोडी घासघीस करावी लागते. तेच बाहेर एक शहाळे कमीत कमी २५ रु. ना विकले जाते. ठेलेवाले भैये तसंच करतात.

कविता१९७८ 09/12/2015 - 14:24
वर कुणी तरी झुणका भाकर वैगरे सुचवलय, झुणका भाकर , ज्वारीची कडक भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे पदार्थ चालण्यासारखे आहेत कारण हे पदार्थ लोकल नाहीयेत, बाहेरुन नोकरीसाठी आलेली लोकं हे सर्व घरच्या घरीच बनवतात त्यामुळे बाकीच्यांना आवडत असुन फारसे खायला मिळत नाहीत , बोईसरला झुणका भाकर केंद्र असुनही तिथे वडापावच विकला जातो, इथे कुठल्याही हॉटेलात सध्या असे पदार्थ मिळत नाहीयेत त्यामुळे असे पदार्थ चालण्यासारखे आहेत.

कवितानागेश 08/12/2015 - 01:54
एअर फ्रायर चा अलीकडेच एकधागा निघाला होता, स्वाती दिनेश यांचा. एकन्दरीत उपयोगी वस्तू आहे, पण वीजेचे कंजम्पशन किती होते ते बघून वापरा. तुम्हाला एखादी वस्तू हाफ फ्राय करून ठेऊन आयत्या वेळेस गरम करून द्यायची असेल तर भरतीच्या वेळेस सगळे त ळू न ठेऊन नंतर एयर फ्रायर वापरणे चालू शकेल कदाचित. प्रयोग करून बघा. पाणी शुद्ध करणारे यंत्र घ्या. पण फ़क्त युव्ही पुरे.

रेवती 08/12/2015 - 03:59
सॅलडसाठी ज्या पानांच्या भाज्या वापराल किंवा नेहमीच्या कोथिंबिरीसाठीही सॅलड स्पिनर मिळतो पण ते उपकरण घरगुती वापरासाठी आहे. एयर फ्रायरमध्ये वेळ लागेल असे वाटते. रेस्टॉरंटसाठी रेसिप्या आठवल्यास लगेच देते. पोटॅटो चिप्स हे पारंपारिक तर्‍हेने तळल्यास वेळ कमी लागेल मात्र मोठा फ्रायर घ्यावा असे वाटते जो उपहारगृहांसाठी बनवलेला असतो.

संदीप डांगे 08/12/2015 - 04:11
मुंबईत दोन तीन कंपन्या आहेत ज्या हॉटेल, कॅफे, रेस्तराँ साठी इंडक्शन कुकींग रेंज देत आहेत. त्यात सगळ्या प्रकारची आकाराची इंडक्शन कुकिंग टॉप्स मिळतील. बजेट व कामाच्या व्यापानुसार निवडू शकता. ४० ते ८० टक्क्यांपर्यंत गॅसबील वाचू शकते. http://www.cooktek.com/

रेवती 08/12/2015 - 05:17
तुमच्याकडे सध्या कोणते स्नॅक प्रकार मेन्यूवर आहेत ते कळवल्यास वेगळे सुचवता येतील. सध्यातरी कोथिंबीर वडी व चीज कॉर्न टोस्ट सुचतायत. व्हाईट सॉसमध्ये भाज्या,चीज घालून टोस्ट करणे. चीज कॉर्न बॉल्सही सगळ्यांना आवडतात. अर्थात हे उपहारगृहासाठी किती सोयिचे ठरतील बघायला हवे.

कविता१९७८ 08/12/2015 - 10:42
कॅफे कुठल्या साईडला आहे?? तो बोईसरला नाहीये, बाहेरच्या माणसांना ईथे यायचे असेल तर बोईसर स्टेशनला उतरावे लागेल. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल कारण रहदारीचा रस्ता आहे पण जर ते महागाव रोडला असेल तर क्रुष्णा विनाईलस या एका कंपनी शिवाय आणि टाटा हाउसिंग काॅलनीशिवाय तिथे काही नाही , सर्व आदीवासी पाडे आणि डोंगर आहेत. त्यामुळे कॅफे कुठे आहे ते सांगाल का ??

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 10:55
या भागात बहुतकरुन बटाटेवडे , समोसे, डोसे, चायनीज भेळ, चायनीज भजी , भेळ, पाणीपुरी , दाभेली, शेवपुरी यासारखे पदार्थ खाल्ले जातात, सॅंडविचेस ही भरपुर प्रमाणात खाल्ली जात नाहीत, जवळ्पास एकच कॉलेज आहे "थीम इंजिनियरींग" ते जवळ असेल तर सँडविचेस चालु शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या ठेवल्या तर उत्तम. पाव भाजी ही गर्दी बघुन किंवा कमी प्रमाणात पाहुन ठेवु शकता.

In reply to by कविता१९७८

विलासराव 08/12/2015 - 13:11
सर्वांना धन्यवाद. कॅफे जर नॅशनल हायवे नं ८ आणि बोईसरला जोडणार्‍या रस्त्यावर असेल तर फ्रायर उपयोगी पडेल अगदी या रस्त्यावर नाही. पण या रोडवर जे गेट आहे त्यातून आतमधे आल्यावर साधारण ५० मीटर आहे. शनिवार रविवार मुंबईचे पब्लिक येते. साधारणपने पराठे,इडली ,पोहे,पूरी भाजी, भजी, मिसळ पाव, भेळ, वडापाव आणि सैंडविच हे चालते. त्यात पाहिले चार जास्त. थिम् कॉलेजची काही मुले टाटामधे रहातात, २ टीचर पण आहेत. ते येतात. पण कॉलेज ५ ते ६ मी. अंतरावर आहे. आता बाहेर मेनरोडवर फलक लावतो. वॉटर प्यूरीफायर ,फ्रायर कोणत्या कंपनीचा चांगला? त्यात काय काय करता येऊ शकते? किम्मत? अशी माहिती मिळाली तर बारे होईल. पावभाजी आणि तवापुलाव चालेल असे वाटतेय.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:36
आॅमलेट पाव अन बुर्जी पाव चालु शकतील, चायनीज सुप चालु शकतील. चिकन भुजीन्ग भरपुर चालेल

In reply to by विलासराव

नाव आडनाव 09/12/2015 - 21:35
पाककॄतींतलं जास्त काही माहित नाही, पण एकदा घरी पोह्यात कांद्याएवजी कोबी टाकला होता. मला लई आवडले होते पोहे. ट्राय करून बघा एकदा. आवडले तर असाही एक ऑप्शन होइल.

कंजूस 08/12/2015 - 13:43
त्या भागात समोसा-पाव फार चालतो ना? सूरण-बटाटा घालून व्हेज कटलेट्स पाव ट्राइ करा. आलू पालक,पनीर पालक ( अमूल मारके )करायला सोपे आहे. उसळ पाव,भजी-पाव. झीरो-B चे पाणी देता येईल.

रॉयल कॅफे काय आहे? तुमचा कॅफे आहे का? जनरली हे पदार्थ पटकन होत असावेत:- बॉइल्ड एग्स, ऑम्लेट-पाव, मॅगी, सॅण्डविच तयार करुन ठेवण्यासारखे पदार्थ :- मिसळ , पोहे , उपमा , वडे ऑन द स्पॉट बनवता येतील असे पदार्थः- भेळ, पाणीपुरी, शेव बटाटा पुरी टाईप चाट पॅक्ड पदार्थः- लेझ / कुरकुरे , सॉफ्ट ड्रिंक्स , चिक्की, चणे / फुटाणे / शेंगदाणे इ. हटके पदार्थः- पणिनी / पनिनी , पास्ता , कोल्ड कॉफी (दुर्गा किंवा तत्सम), नाचोज + साल्सा डिप वरुन मेल्ट्ड चीझ, कप पिझ्झा, जलजिरा टाईप सोडा

गवि 08/12/2015 - 14:39
भुजिंग लिहायलाच आलो होतो पण वर अन्यत्र ते सुचवलेलं दिसत आहे. मज्जा म्हणून रॉयल कॅफेवर कट्टा "न्यावा" की काय असा शिरेस विचार आला. पण खरोखर चार्जेबल बेसिसवर होणार असेल तरच. नाहीतर मिपाकर म्हणून फुकटेपणा करण्यात मजा नाही.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 14:51
कॅफेच्या दुसर्‍या बाजुच्या रस्त्याने आत गेल्यास छोटे डोंगर अन टेकडया आहेत, नदी आहे, परीसर अगदी शांत आहे. आदीवासी वस्ती, शेते , पाट असं पाहायला मिळेल , ट्रेकींग करु शकाल.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 08/12/2015 - 14:54
लहानपणी या टेकड्यांवर आणि डोंगरांवर गेलेय मी , आजो़ळ आहे माझे ते. तिथे अरुणा ईराणीचे फार्म हाउसही आहे, लहानपणी तिथे कलिंगड खायला जायचो आम्ही. पण हे सगळे टाटा हाउसिंगच्या दुसर्‍या बाजुला म्हणजे कॅफेच्या कॉलनीच्या उजव्या बाजुला आहे.

In reply to by कविता१९७८

गवि 08/12/2015 - 15:06
परिसराची खूप माहिती आणि जवळीकही दिसते आहे. भारतात असाल तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत कट्टा ठरवावा मिपाकरांनी.

In reply to by गवि

कविता१९७८ 08/12/2015 - 15:19
भारतातच आहे, कॅफेजवळ, मीही सतत भटकंती करत असल्याने उपस्थितीचं सांगु शकत नाही पण माहीती देउ शकेन. हा कॅफे बोईसरपासुन ३-४ कीमी अंतरावर आहे, येणार असाल तर बाय रोड किंवा बाय ट्रेन ने कसे यायचे सांगु शकेन.

विलासराव 08/12/2015 - 16:06
सांगायचे राहिलेच. रॉयल कॅफे प्यूअर व्हेज आहे. नॉनव्हेज भरपूर चालेल पण मला त्यात रस नाही. @ पिलियन रायडर: होय मी चालु केलाय रॉयल कॅफे. @गवी: कधीही कट्टा करा. पण व्हेज. आणि मुक्कामी कटटा केला तरी चालेल. आपला फ्लॅट रिकामाच हाय.

In reply to by विलासराव

अभ्या.. 08/12/2015 - 18:37
थालीपीठापेक्षा धपाटे ठेवा. आमच्या इथे बृयाच हॉटेलात डिश मिळते. दोन धपाटी, दही, शेंगाचटनी आणि थॉडासा मिरच्याचा ठेचा. स्नॅक्स म्हणून पण चालतो अन जेवण म्हणून पण.

In reply to by अभ्या..

विलासराव 08/12/2015 - 22:48
रेसिपी दया . म्हणजे तुम्हालाच धापाटे खायला घालतो. लवकर बनवा बॅनर. बॅनर पाहूनच कॅफेला गर्दी केलि पाहिजे लोकांनी असा.

In reply to by विलासराव

स्रुजा 08/12/2015 - 23:35
अरे वा, हे छान आहे व्हेज आहे ते ! साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, इडली, दावणगिरी डोसा, कोथिंबीर वडी, अळु वडी, थालिपीठ, शेव भाजी, मोठ्या उपासांना म्हणजे कार्तिकी , आषाढी एकादशीला वगैरे ऑर्डर घेऊन भगर आमटी वगैरे पण ठेवु शकता. शिवाय ठेपले, पराठे, वेग वेगळे ज्युसेस, भाजी भाकरी, पिठलं भाकरी, तांदळाची भाकरी आणि वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे प्रकारांवर उड्या पडतात. व्हेज कटलेट्स, उपासाची कचोरी हे प्रकार देखील नेहमी ठेवता येतील. मिसळ, बटाटावडा यांचा उल्लेख आलाच आहे. हेल्दी मिसळ पण ठेवु शकता. उपासाची मिसळ पण लोकप्रिय आहे. अजुन ही सुचतं तसं सांगेन. कवि, एकदा खरंच जाऊयात आणि मी तुला घेऊन जाणार च. त्यात मदत करते वगैरे चालणार नाही :)

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:43
ईथे शक्यतो उपवासाचे पदार्थ लोक घरी करतात त्यामुळे त्याची शचक्यता कमी, उपवासाची भगर आमटी वैगरे ईथला लोकल पदार्थ नाही

In reply to by कविता१९७८

स्रुजा 08/12/2015 - 23:50
अगं हो पण कॉलेज ची मुलं येतात म्हणतात ना ते. त्यांना उपासाला येता येईल. शिवाय काही कर्मचारी जे घरी राहत नाहीत वगैरे.

In reply to by स्रुजा

कविता१९७८ 08/12/2015 - 23:56
मी काही म्हणतीये कारण माझा जन्मच बोईसरचा आहे, मला ईथला एरीया माहीतीये, ही जागा ईस्टलाआहे अन एम आय डी सी एरीया बर्‍याच लाम्ब वेस्टला जिथे मी राहते, ईस्टला जायला जास्त वाहने नाहीत, स्वत:चे वाहन असेल तरच जाणे सोयीचे पडते.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८ 09/12/2015 - 00:05
आजकाल कुठल्या काॅलेजची पोरे उपवास करतात गं, मी सांगतीये कारण ईथे बरेचजण खुप खर्च करुन काही सुरु करतात पण कालांतराने त्यांना पब्लिक नुसार बदल करावे लागतात. हा अनुभव आहे. ईथे कामगार वर्ग जास्त राहतो, नाॅनवेजचे प्रमाण जास्त या सर्व गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात कारण खाण्याच्या पदार्थांचे शेल्फ लाईफ खुप कमी असते.

In reply to by कविता१९७८

एमसीए करत असताना आमच्या होस्टेलच्या मेसच्या जेवणाच्या चवीला कंटाळून मी शेवटच्या सेमिस्टरमध्ये शनिवारचा उपास करणे सुरू केले. दुपारच्या जेवणात छान ताट भरून साबुदाणा खिचडी व वाटीभर दही मिळत असे. चवही एकदम चांगली असायची. योगायोगाने त्या सेमिस्टरमध्ये माझा दुसर्‍या सेमिस्टर पासून बॅक असणारा प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हा पेपर क्लिअर झाला. त्यावर माझ्या ज्युनियर मंडळींनी, मी शनिवारचा उपास धरल्यानेच तो पेपर निघाला अशी आवई उठवून अनेकांना शनिवारचा उपास धरण्यास प्रवृत्त केले. उपासाचे पदार्थ चविबाबतीत आकर्षक असल्याने उपास न करणारेही आनंदाने खातात. भविष्यात अमेरिकेत मराठी फास्ट फूड उपहारगृह सुरू करून साबुदाणा वडा या पदार्थाचा ब्रॅन्ड बनवावा असे स्वप्न आहे. विलासरावांना रॉयल कॅफेच्या पुरर्रचनेसाठी शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

अभ्या.. 09/12/2015 - 00:25
प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिज हे टायपणारा माणूस पुनर्रचना टायपू शकत नाही??? ह्या कैतरीच कै ;) हल्केच घे हो श्रीरंगा. तू दुरुस्ती करायला येशीलच खात्री आहे.

In reply to by अभ्या..

प्रॉबॅबिलिटिज अ‍ॅन्ड कॉम्बिनेटोरिजची आठवण निघाली की अजुनही हात थरथरतात रे अभ्या!! पुणे विद्यापीठातून मॅनेजमेंट स्ट्रीमचे एमसीए करणार्‍यांना कधी विचार याबाबत ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

स्रुजा 09/12/2015 - 00:31
हाहाहा, हो मी पण मंगळवारी आणि शनिवारी भक्तीभावाने सा. खिचडी आणि सा. वडे खायचे दह्या बरोबर. एक ऑर्डर माझी असायची च दर आठवड्याला. कॉलेज मधली मुलं उपास करत नसली तरी त्यांचे काहीही मोटीव्हेशन्स असु शकतात उपासाचे पदार्थ खायला.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:48
साबुदाण्याची खिचडी ठेवतो. मी विसरलो होतो लिहायला. बाकी माझी जी काही संकल्पना आहे कॅफेची ती तुम्ही नेमकी पकडलीत. वालाचं बिरडं , भरली वांगी वगैरे क्या बात कही आपने? एकदम नेमके. तुम्ही याच. कविता ताईहि येतिलच.

In reply to by स्रुजा

विलासराव 08/12/2015 - 23:56
हो या ना. मी चालु केला तेव्हाच सर्व मिपाकरांना आमंत्रण दिल होत खरडफळयावर. आपले मिपाकर शिद यांनी पहिला मान मिळवलाय भेट देण्याचा.

In reply to by विलासराव

साबुदाण्याची खिचडी ठेवतो. विलासराव, खिचडी बरोबर काकडीची दह्यातली कोशिंबीर पण देत जा. खिचडी काकडी माझ्या आवडत्या डिश पैकी एक आहे. त्या बरोबर अजून एक पदार्थ म्हणजे उपासाची मिसळ. दाण्याची आमटी, साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, उपासाचा चिवडा असे बरेच पदार्थ घालुन बनवला जातो. पैजारबुवा,

कविता१९७८ 08/12/2015 - 16:29
सध्या इथे चायनीज भजी (मंचुरीयन) हे खुप खपले जाते, चहा बरोबर मस्त लागते, पास्त्याचा प्रकार इतका चालणार नाही कदाचित, प्रॉपर बोईसर मधे डोमिनोज पिझ्झा आहे , सुरुवातीला १५ दिवस खच्चुन गर्दी असायची पण आता कुणीच दिसत नाही , थोडी फार होम डीलेव्हरी आहे, टाकोज पण एकाच ठेलेवाला (हो ठेलाच लावलाय त्याने) ठेवतो. म्हणजे हटके पदार्थांना प्रॉपर बोईसर मधेच वाव नाही तर हे बोईसर हुन जरा लांब आहे. सिजलर्सचं पण तेच.

एखाद्या हटके पदार्थासाठी फेमस असेल कॅफे तर खास तोच पदार्थ खायला मंडळी येतात. शिवाय एकच पदार्थ मोठ्या प्रमाणात ठेवणे सोपे जात असावे. बाकी पदार्थ थोड्या प्रमाणात ठेवायचे. म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना?

विलासराव 08/12/2015 - 16:53
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 08/12/2015 - 16:56
पराठ्यामधे माझी एक ईनोवेटीव रेसिपी आहे , व्य नि करते, बघा उपयोगी आली तर, गुजराथी मिटक्या मारुन खातात हा अनुभव आहे :)

विलासराव 08/12/2015 - 16:55
म्हण्जे रॉयल कॅफेचा फेमस वडापाव / मिसळ असे काही तरी पब्लिसिटीला पण चांगले असेल ना? असाच विचार आहे. पराठ्यामधे विविधता लागेल. वडापाव ,समोसा व मिसळ चालेल. मिपावरच्या रेसीपीजच्या लिंकपन दया कोणी सापडल्या तर. वेगवेगळ्या फ्लेवरच्या चटणींचा वाटा फार मोठा असतो या गोष्टी फेमस होण्यात. त्यांच्याही रेसिपीज दिल्या तर् बरे होईल.

In reply to by विलासराव

गवि 08/12/2015 - 17:12
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). जालावर लाखो रेसिपीज आहेत. मिसळपावचा पाककृती विभाग धुंडाळणं अजिबात अवघड नाही. पण कोणीही कितीही रेसिपीज दिल्या तरी खुद्द स्वतः तिथल्या गिर्‍हाईकांचा कल पाहून पदार्थ इम्प्रूव्ह करत नेणं याची आवड असणं लाँग टर्ममधे अत्यावश्यक आहे. वेळप्रसंगी तुमचे आचारी उपलब्ध नसतील तरी तुम्ही तितक्याच किंवा जास्त चवीने स्वहस्ते बरेचसे पदार्थ बनवू शकत असलात तर दीर्घकालीन फायद्याचं आहे. कोणीतरी पाकृ देईल आणि कोणीतरी अन्य त्यानुसार बनवेल हे ठीक आहे, पण खुद्द प्रयोग करणं हा फॅक्टर सर्वात महत्वाचा आहे. नाहीतर तो फेमस वडापाव / मिसळ फेमस होताच अन्य कोणासोबत तरी पलायन करु शकते.

In reply to by गवि

विलासराव 08/12/2015 - 22:43
विलासराव. एक महत्वाचा प्रश्न. तुम्ही स्वतः खवय्ये / पाकशास्त्राची आवड असलेले आहात का? मी खवय्या होतो आधी. जवळपास २५ वर्ष मी हॉटेलमधे खाल्लय. तेव्हा मला नेहमी वाटायच की आपण एक बार चालु करायचा. त्यावेळी मई ड्रिंक घ्यायचो. आवड खायची होती. बनवायची नव्हती आणि नाही. खुद्द तुम्ही मसाले, स्वाद वगैरेबाबत काही प्रयोग केले आहेत का? असतील तर काय केले हे सांगितल्यास मजा येईल (ट्रेड सिक्रेट नसल्यास). काही प्रयोग केले नाहीत. एका आमच्याच् कॉलनीमधील बाईंना मदत म्हणून मी फायनांस केला आणि त्यांनी कॅफे चालवायचे असे ठरले होते. बाई भलत्याच् स्मार्ट निघाल्या. ३ महिन्यातच सोडला कॅफे आणि घरून मेस चालवतात आता. मी आहे विपश्यनेच्या २ महिन्याच्या शिबिरात सेवेला. मग माझ्या पुतन्याने ते जमील तसे चालु ठेवले आहे. बराच आर्थिक फटकाही देऊन गेल्यात. असो. आता बचेंगे तो और भी लडेंगे अशी आनीबानीची वेळ आलिया म्हणून हां प्रपंच. मी ७ ते ८ महीने इगतपुरीलाच असतो. आता पुतन्याला तयार करून ही लढाई लढायचीय. आपली चांगली बाजू म्हणजे स्वच्छता आणि चांगले मटेरियल वापरतो. एक कट्टा जमवाच. त्यादिवशी रेग्युलर कॅफे बंद ठेवू. आपण आपल्यासाठी फ़क्त पाहिजे ते मेनू बनवु. आणि धमाल कट्टा करू. माझा फ्लॅट आहेच. बाजुचाही गरज असल्यास मिळेल. पार्किगची आणि जागेची कसलीच अड़चन नाही. ठाण्यावरुन गाडीने दीड दोन तास लागतील. भिवंडी, वाड़ा, मनोर मस्त रस्ता आहे. बघा कस जमताय ते. ३१ डिसेम्बर जमात असेल तरी माझी हरकत नाही.कधीही या.मी ४ फेब्रुवारी पर्यन्त फ्री आहे. जानेवारीत १२ दिवस सोडून.

In reply to by विलासराव

pacificready 08/12/2015 - 23:32
पुतण्या तुमची कंपनी बघतोय ना? की तो भाऊ? बाकी माझ्या काकाचा पांचगणी मध्ये वडापाव चा गाडा आहे. रोज उपस्थित असणं अत्यंत आवश्यक असतंच असतं. Consistancy विथ गुड टेस्ट शुड बी द की.

In reply to by pacificready

विलासराव 08/12/2015 - 23:43
आपली कंपनी बघतो तो चुलत भाऊ. कॅफे पहातो तो पुतन्या. मला थाम्बायला वेळ नाहीना महाराज.आपन जाणताच सर्वकाही.

कंजूस 08/12/2015 - 23:24
हॅाटेलची थोडी उमेदवारी( वेटर) करून धंद्यात शिरायला पाहिजे खरं म्हणजे.गिह्राइक आलं नाही तर पदार्थ कसे वाचवायचे हे मागे गेल्यावरच कळतं.ते कुठे गुगलून नाही मिळत.रेसिप्या वेगळ्या आणि हॅाटेलात डिश म्हणून देणं वेगळं.मालकाच्या भुमिकेतून कसं वागायचं ते कुठे उघडपणे लिहिता येत नाही.

कविता१९७८ 09/12/2015 - 10:36
ईथे नारळाची झाडे भरपुर आहेत , कुठल्याही वाडीतुन तुम्हाला आख्खी शहाळी 5-6 रु. मधे मिळतील, पिकअप वाले २०-५०रु फेरी अशा दराने आणुन देतात, ती कापुन पाणी पाउचमधे पॅक करुन विकु शकता, प्रवासात वैगरे लोकं नारळाचे पाणी जास्त प्रीफर करतात.

In reply to by विलासराव

कविता१९७८ 09/12/2015 - 10:59
हो चिंचणीला वाडीत स्वत: जाउन भरपुर नारळ घेतले तर मिळतात. थोडी घासघीस करावी लागते. तेच बाहेर एक शहाळे कमीत कमी २५ रु. ना विकले जाते. ठेलेवाले भैये तसंच करतात.

कविता१९७८ 09/12/2015 - 14:24
वर कुणी तरी झुणका भाकर वैगरे सुचवलय, झुणका भाकर , ज्वारीची कडक भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे पदार्थ चालण्यासारखे आहेत कारण हे पदार्थ लोकल नाहीयेत, बाहेरुन नोकरीसाठी आलेली लोकं हे सर्व घरच्या घरीच बनवतात त्यामुळे बाकीच्यांना आवडत असुन फारसे खायला मिळत नाहीत , बोईसरला झुणका भाकर केंद्र असुनही तिथे वडापावच विकला जातो, इथे कुठल्याही हॉटेलात सध्या असे पदार्थ मिळत नाहीयेत त्यामुळे असे पदार्थ चालण्यासारखे आहेत.
मला रॉयल कॅफेसाठी वॉटर फ़िल्टर \कूलर, एअर फ्रायर\माइक्रो ओवन, वेफर्स अथवा सलाद बनवन्यासाठी काय वापरावे ही माहिती हवी आहे. काय योग्य राहील. फ्रायरचे आणि ओवनचे फायदे तोटे. वॉटर फिल्टरचे पाणी खरोखर काही शारीरिक नुकसान न करणारे असते का? अशी चर्चा अपेक्षीत आहे. झालाच तर सहज सोप्या पण टेस्टी आणि नाविन्यपूर्ण स्नैक्स च्या रेसिपीज सुचवल्यात तर सोने पे सुहागा. #मिपाच्या नियमात बसत नसेल तर धागा अप्रकाशीत केला तरी चालेल.

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

चित्रगुप्त ·

कंजूस 19/10/2015 - 08:46
वावावा इतरांनाही नक्कीच उपयोगी.भारतीय खाणेपद्धतीमध्ये खूप बदल झालेत त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.जाडजूड पण घट्ट शरिराचे परदेशी लोक पाहण्यात येतात.सत्तरीतही तरतरीत दिसतात.काम न करण्याची अथवा कष्टाची कामे इतरांवर ढकलून आपण आराम करायला बघायचे नंतर उगाचच जिमवगैरे चालू करायचे.आणखी बय्राच अपप्रवृत्ती आपल्याकडे थोर लोकं अवलंबतात आणि मुलांचा हेच योग्य असा समज होतो. तुम्ही असं करत होता असं म्हणत नाहीये परंतू एक निरीक्षण होते.बय्राच माता मुलांस हाइ प्रोटिन आहार चरवतात नंतर मुलं मोठं शरीर धारण करतात परंतू कामाची आवड उत्पन्न करत नाहीत. लेखातील फोटो ,मांडणी ,सादरीकरण मस्त झालंय.

मांत्रिक 19/10/2015 - 08:57
उत्तम लेख! मला अजूनतरी हेल्थ समस्या नाहीत. पण किमान आठवड्यातून १ दिवस तरी ज्यूसाहार नक्कीच करणार. कृपया भारतात उपलब्ध भाज्या व फळे वापरून ज्यूस कसे करायचे याची कुठे वेबसाईट आहे का? किंवा पुस्तक? कृपया जास्त माहिती व्यनी कराल? एक जवळची व्यक्ती सतत आजारी असते. कारण काही कळतच नाही. त्यांना ही माहीती नक्की देईन. बाकी अतिशय उपकारक माहिती.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक 19/10/2015 - 09:04
आठवड्यातून किमान एक दिवस ज्यूसाहार केला तर फायदे मिळतील की उगाच करायचं म्हणून केल्यासारखं होईल? जास्त दिवस करावे लागेल का? बाकी जादा माहिती कृपया व्यनी करा.

चित्रगुप्त 19/10/2015 - 09:28
आठवड्यातून किमान एक दिवस ज्यूसाहार केला तरी काही न काही फायदे नक्कीच मिळतील. मुख्य म्हणजे जूसाहाराची आवड लागेल, आणि पुढे कधीतरी जमेल तेंव्हा आठवडाभर करणे सोपे जाईल. जूस खेरीज नारळपाणी, ताक, पातळ लस्सी, स्मूदी, कढी, सोलकढी, सूप, सार, पातळ वरण, सांबार, लिंबूपाणी, पाण्यात आले, ओवा, जिरे, बडिशेप वगैरे घालून उकळवून गाळून घेतलेले पेय, असे द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घेण्यानेही चांगला फायदा होतो. चहा ऐवजी साधा ग्रीन टी पिणे उत्तम. ज्यांना पोट वा वजन कमी करण्याची आवश्यकता नसेल, त्यांनाही पोट/आतडी कमालीची साफ झाल्याने अनेक फायदे मिळतातच. आपल्याइकडे भाजीपाला नाल्याच्या घाण पाण्यातही उगवला जातो, त्यातील धोका टाळण्यासाठी वाटल्यास गाजर, पालेभाज्या, बीटरूट वगैरे उकळत्या पाण्यात ठेऊन नंतर अन्य फळे, केळी, खजूर, दही इ. सोबत मिक्सर मधून काढून शिवाय पातळ करण्यासाठी पाणी घालून परत फिरवावे. हे पेय सुद्धा उत्तम काम करते. हे तर रोज करता येण्यासारखे आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 27/10/2015 - 11:55
आज अनेक दिवसांनी मिपावर प्रवेश केला आणि पाहतो तो ही गर्दी...! जुसीय आहार आणि त्याचे प्रत्यक्ष अनुभवाने विदित केलेले चित्रगुप्तांचे सिद्धहस्त लेखन ! 14500 वर क्लिक्स, 250 च्यावर प्रतिसाद...! अबब... ! वा.. !वा...! परंतु शेवटी इतक्या लोकांपैकी एकही ‘चित्रगुप्तांच्या अनुभवावरून शहाणा होऊन, मी लागलो कामाला’ असे म्हणणारा वाचनात आढळला नाही!’ प्रत्यक्ष पोहायला न उतरता, ‘काहो, फार गार असेल ना पाणी?, खोल किती असेल? अशा --- चौकशा, शंका, विचक्षणाकरून, तर कधी सर्व थापा आहेत, लेखन तद्दन्न खोटे आहे.’ अशी भडास काढणाऱ्या विविध वैचारिक महाभागांनी ‘करीन मग’ या उक्तीप्रमाणे वर्तन करायचे ठरवलेले दिसते. असो. धाग्यातील मुद्देसूद मांडलेली माहिती, आकर्षक फोटो आणि विचारणांना सविस्तर आणि प्रामाणिक उत्तर देण्यातून या प्रश्नाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरवातीचा संकोच टाकून, विविध आकृती बंधातून आपल्या पोटात काय काय दडलेले असते याचे साक्षात दर्शन करवून एक नवा पायंडा पाडलेला हा धागा वाचून मी व पत्नी प्रत्यक्ष कामाला लागलो. प्रथम एरंडेलतेलाने पोटातील कृमी असल्या तर आधीच पहाणी करून, काही ‘सापडले’ नाही अशी खात्री करून, पैशाकडे न पाहता काल लगेच नवा जूसर आणला. आज माझ्या बाबत दुसरा दिवस. आता यापुढे काय काय घडले याचा आढावा सादर करेन.

In reply to by शशिकांत ओक

सुबोध खरे 27/10/2015 - 12:49
एरंडेलतेलाने पोटातील कृमी असल्या तर ओक साहेब एरंडेल सारखे रेचक घेण्यापेक्षा मी आपणास एक बेन्डेक्स ची गोळी घ्या असे सुचवेन. ( किंमत रुपये ८ फक्त). याने सर्व किडे कृमी नष्ट होतील.

In reply to by सुबोध खरे

शशिकांत ओक 27/10/2015 - 16:55
हवाईदलातील नोकरीमध्ये असल्यापासून अशा गोळ्या खायची प्रॅक्टीस आहे.यावेळी प्रत्यक्ष पुरावा सादरीकरण महत्वाचे वाटल्याने बालपणातील एरंडेल तेल थेरपी करून मग रसथेरपीचा मार्ग सुलभ करायला बरे पडेल, हे सुचले...

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 27/10/2015 - 17:15
डॉक्टर साहेब एरंडेल वगैरे रेचके व औषधे, त्यांचा होणारा बरावाईट परिणाम, कृमी का आणि कश्या होतात आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम, याबद्दल सविस्तर माहिती सवडीनुसार देता येईल का? पर्गेटिव्ह आणि लॅक्झेटिव्ह अशी दोन प्रकारची रेचके असतात असे वाचले आहे, यात काय फरक असतो?

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे 27/10/2015 - 20:43
चित्रगुप्त साहेब पर्गेटिव्ह आणि लॅक्झेटिव्ह यात पूर्वी फरक त्यांच्या शक्ती मधील होता पण आजकाल इतक्या तर्हेची औषधे बद्धकोष्ठावर निघाली आहेत कि त्यातील फरक धूसर झाला आहे. पूर्वी लॅक्झेटिव्ह म्हणजे सौम्य समजली जात असत म्हणजे लिक्विड पाराफिन किंवा क्रिमाफिन सारखी आणी पर्गेटिव्ह म्हणजे तीव्र रेचके एरंडेल सारखी ज्याने पोटात मुरडा( COLIC) होतो ती समजली जात. पूर्वी एरंडेल तेल पोट साफ होण्यासाठी देत असत याचे कारण त्याच्या तीव्र रेचक प्रभावाने पोटात असलेले काही जंत आणी कृमी( जंत मोठा असतो १५-३० सेमी आणी कृमी लहान असतात १ सेमी) सुद्धा बाहेर पडत असत म्हणून असा समज झाला होता कि ते जंत निर्मूलक आहे म्हणून (सगळे जंत/ कृमी त्याने बाहेर पडत नाहीत). जंत कसे होतात. जंतांचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेत त्याची अंडी असतात. हि अंडी सोनखताद्वारे भाज्या/ पालेभाज्यांवर येतात. तेंव्हा आपण भाज्या आणी फळे नीट धुवून खाल्ली नाही तर हि अंडी पोटात जाऊन आपल्याला जंतांचा प्रादुर्भाव होतो. दुसरे कारण आपण आपला मळ( विष्ठा) धुतल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या नखाच्या कोपर्यात कृमीची अंडी राहून जातात आणी आपल्या खाण्याद्वारे आपल्याला परत संसर्ग होतो( सेल्फ इन्फेक्शन). जंत रोज २ लाख अंडी देतात आणी कृमी ५-१० हजार या दराने आपल्या स्वतःच्या हाताद्वारे सुद्धा आपल्याला किती जंत/ कृमींचा संसर्ग होऊ शकतो हे समजून घ्यावे. रस काढण्यापूर्वी आपण घेत असलेल्या भाज्या गाजर मुळा बटाटा रताळे किंवा जमिनीवर असणारी फळे स्ट्रोबेरी, रास्पबेरी, काकडी, भोपळा टोमाटो हे सुद्धा स्वच्छ का धुवून घ्यावेयाचे हे कारण आहे. या कारणास्तव आम्ही( डॉक्टर) आपल्याला विशेषतः लहान मुलांना दर ६ महिन्यांनी जंताचे औषध द्यायचा सल्ला देतो. बेन्डेक्स किंवा दुसरे अल्बेंडाझोल असलेल्या औषधाची किंमत १२- १४ रुपये आहे. हि गोळी गोड असून चघळून खायची. याने जाणताना लकवा मारतो आणी ते शौचाद्वारे पडून जातात. हे औषध शरीरात शोषले जात नसल्याने इतर लोक साइड इफेक्ट बदल आरडा ओरडा करतात तसे होण्याची शक्यता नाही. मुलांनी किंवा मोठ्यांनी दर सहा महिन्यानी हे औषध एकदा घ्यावे.याच्या बरोबर रेचक घेण्याची आवश्यकता नाही. जंत -https://en.wikipedia.org/wiki/Ascaris_lumbricoides कृमी https://en.wikipedia.org/wiki/Necator_americanus

In reply to by सुबोध खरे

मला लहानपणी (९-१० वर्षाचा असताना) जंताचा (मी इतके दिवस जंतच म्हणत होतो. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते ५-१० मिमि लांबीचे होते-कृमी) खूप त्रास होता. एकदा आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला "झेंटेल" ही गोळी दिली होती. एका स्ट्रिपमध्ये एकच गोळी. गोड. चघळून खाण्यासाठी. नंतर २ दिवसात हजारो-लाखो (!) कृमी पडून गेले. नंतर परत कधी तसा त्रास झाला नाही. आता शोधल्यावर कळले की त्यात Albendazole असते.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 29/10/2015 - 01:46
डॉ. खरे साहेब: कृमी व जंतांबद्दलच्या माहितीबद्दल अनेक आभार. माझे अजूनही काही प्रश्न आहेतः १. पोटात जंत व कृमी असल्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय दुष्परिणाम घडून येत असतो? २. आपण खात असलेले अन्न ही मंडळी खाऊन पुष्ट होतात, आणि खाल्ल्यापैकी बरेचसे आपल्या 'अंगी लागत' नाही, अशी जी सार्वत्रिक समजूत असते, ती सत्य आहे का? ३. हे कृमी व जंत काही पदार्थ त्यांच्या शरीरातून निष्कासित करतात का? असल्यास त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ? ४. औषध घेऊन जंत व कृमी नष्ट झाल्यावर मूळव्याध वा फिस्टूला बरा होतो का ? ५. पाश्चात्त्य डॉक्टरी विद्येप्रमाणे या दोन्हींवर कायमचे इलाज काय आहेत ? ६. चरबी विषयी: मुळात जास्तीची चरबी शरिरात निर्माण कशी होते, आणि पोटावर तिचे थर का निर्माण होतात ? तूप वगैरे चरबीयुक्त जिन्नस अजिबात घेतले नाहीत, परंतु अन्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाण्यानेही चरबी साठत जाते का? चर्बीतही 'चांगली चरबी' आणि 'वाईट चरबी' असे काही असते का? ७. 'सूज' मह्णजे नेमका काय पदार्थ असतो? सूज कश्यामुळे येते आणि कमी होते ? सूज अपायकारक असते की उपकारक ? ८. मांड्यांवर आणि नितंबांवर वगैरे 'सेल्युलाईट' जे जमा होते, ती चरबीच असते की आणखी काही? ते कमी करता येते का? कसे ? ९. जिला आयुर्वेदात 'आम' वा 'आव' म्हणतात तो पदार्थ शरीरात कसा निर्माण होतो, आणि कुठे कुठे साठतो? त्याचे परिणाम ? लिहिता लिहीता बरेच प्रश्न सुचले. सवडीप्रमाणे शंकासमाधान करावे ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे 31/10/2015 - 10:33
कृमी आणि जंतांच्या प्रादुर्भावामुळे आपल्या शरीराला अन्न आणी प्रथिनांची कमतरता जाणवते. तसेच ते रक्त शोषत असल्याने आणि त्यांच्या सूक्ष्म चाव्याच्या ठिकाणाहून बारीक बारीक रक्तस्त्राव होत असल्याने पंडुरोग(ANEMIA) होतो. याचा परिणाम सर्वात जास्त बालकांमध्ये होतो आणी ते कुपोषण आणी रोगाला पटकन बळी पडू शकतात. खेड्यात जेथे लोक उघड्यावर शौचास जातात तेथे त्यांच्या पायातून या कृमींच्या अळ्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे खेड्यातील गरीब बालके हि याचे सर्वात जास्त बळी आहेत. तेथे मुलांच्या पोटात अक्षरशः लक्षावधी जंत आणी कृमी आढळतात ज्यामुळे त्या मुलांना भूक लागत नाही खाल्लेले अन्न अंगी लागत नाही आणी कुपोषण होते. कृमींच्या या अळ्या आपल्या फुप्फुसातून जात असताना खोकला होतो आणी अलर्जीचा त्रास होतो. https://en.wikipedia.org/wiki/Hookworm_infection https://en.wikipedia.org/wiki/Ascariasis कृमी/ जंत यांच्यावर बेन्डेक्स किंवा तत्सम औषध घेतले तर ते सहज नष्ट होऊ शकतात. खेड्यात किंवा गरीब वस्तीत काम करताना आम्ही कोणत्याही कारणासाठी आलेल्या मुलांना एक बेन्डेक्स ची गोळी समोरच खायला देत असू. जितक्या जास्त मुलांना तुम्ही ते द्याल तितके (COMMUNITY LOAD OF WORMS) कमी होते. कारण हि मुले परत परत बाहेरच शौचास जातात आणी जंतांची अंडी किंवा अळ्य़ा शरीरात प्रवेश केल्याने प्रादुर्भाव होऊन येतात. जितक्या लोकांच्या पोटातील जंत तुम्ही नष्ट कराल तितली त्यांची पसरण थांबेल. डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांना संडास उपलब्ध करू शकत नाही( ते काम सरकारचे आहे)पण निदान त्यांचे स्वतःचे जंत संसर्ग आणी समाजात त्यांनी पसरवण्याची शक्यता कमी करता येते. कृमी/ जंत यांचा आणी मुळव्याध किंवा फिस्च्युला यांचा संबंध नाही. मुळव्याध, फिशर आणी फिस्तूला (हे तिन्ही आजार एकदमच) आमच्या वडिलांना होते. ते शाल्यक्रीयेने बरे झाले आणी गेली ३२ वर्षे( १९८३ ते आता) त्यांना त्याचा काही त्रास नाही. उन्हाळा असो कि तिखट खाल्ले. (आता ८० व्या वर्षी ते तिखट फारसे खात नाहीत हे अलाहिदा) आपले प्रश्न ६-९ यांची उत्तरे जरा सावकाशीने सविस्तरपणे देतो.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 04/11/2016 - 03:04
आपले प्रश्न ६-९ यांची उत्तरे जरा सावकाशीने सविस्तरपणे देतो.
डॉ. खरे साहेब, आज वर्षभरानंतर पुन्हा हा धागा वाचताना मी विचारलेल्या वरील शंकांचे समाधान होणे राहून गेले असल्याचे दिसले, तरी कृपया यबद्दल माहिती दिल्यास फार चांगले होईल.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 06/11/2015 - 02:11
डॉक्टर साहेब, कसे कुणास ठाऊक आपण माझ्या प्रश्नांची दिलेली उत्तरे नजरेतून निसटली. ती आत्ता वाचली. अनेक आभार. अन्य उत्तरांच्या प्रतिक्षेत.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 27/10/2015 - 12:51
व्वा ओक साहेब . निसंदिग्धपणे आम्ही प्रत्यक्ष भाग सुरु केले आहे म्हणणारे तुम्ही पहिले . शुभेच्छा , आणि पुढील प्रतिसादाच्या अपेक्षेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 30/10/2015 - 00:18
मित्रांनो, गीतोपदेश हितकारक मानतात. कर्मण्ये... मा फलेशू कदाचन वगैरे. फळाची अपेक्षा न ठेवून काम करत रहा. मी गेले ४ दिवसांसाठी फक्त फलाहारावर दिवस घालवतोय. गीतेचे ग्रंथ फडताळात सरकवून सामान्य भोजनाची आशा सोडून मिक्सर, जूसर आणि इतर भांडीकुंडी घासून साफसफाईचे काम करत वजन कमी करण्यासाठीची फलेच्छा बाळगून आहे...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 07/11/2015 - 10:53
चित्रगुप्त आणि सर्व रसिक मंडळी हो...
सामान्य भोजनाची आशा सोडून मिक्सर, जूसर आणि इतर भांडीकुंडी घासून साफसफाईचे काम करत, गीतेचे ग्रंथ फडताळात सरकवून, वजन कमी करण्यासाठीची फलेच्छा बाळगून आहे...म्हणणाऱ्या ओकांचा
दहा दिवसाची एकत्र रिपोर्ट ... ओक आणि कंपनीच्या लोटपोट बाजारात उलथापालथ... 83.4 वरून वजन 4.4 किलोने खाली गडगडले...पोटातील प्राण्यांच्यात घबराट... असे काही बाही कोठा समाचार पत्रातून भडक मथळ्यात आले होते म्हणे. त्यावर अनेक अनुभवी व जेष्ठ कृमींनी चर्चा करून असे कधी काळी होत असते. आपल्याला घाबरून जायचे कारण नाही. 8-10 दिवसांनी परिस्थिती पुन्हा मूळपदावर येईल असा पक्का अंदाज दिला म्हणतात... उगीच आपापली कौतुकपत्रे परत करायच्या नादी लागून नका असा पोक्त अनाहूत उपदेश ही दिला म्हणे... त्यांची आज्ञा शिसावंद्य मानून ओकांनी जास्त वेळ त्यांची परिक्षा घ्यायची नाही असा विचार करून पुन्हा रसाहारावर नियंत्रण आणल्याचे वृत्त कोठा समाचारात प्रसिद्ध झाले आणि सर्वत्र पुन्हा आनंदी आनंदाचे वातावरण झाले....

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 07/11/2015 - 13:29
ओक साहेब, तुम्ही 10 दिवस रसाहार केलात हे वाचून आनंद झाला परंतु तुमचा हा रिपोर्ट गोंधळात टाकणारा आहे. ज्यांना हा प्रयोग करून बघायचा आहे त्यांना नेमके काय झाले, केले हे समजणार नाही . तरी ते नीट विशद केले पाहिजे . दिवसातून कितीदा, कसला कसला रस घेतला, कसकसा परिणाम होत गेला, आणखी काही खाल्ले की नाही वगैरे सर्व तपशीलवार लिहावे ही विनंती .

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 07/11/2015 - 15:00
ओक साहेब, तुम्ही 10 दिवस रसाहार केलात हे वाचून आनंद झाला परंतु तुमचा हा रिपोर्ट गोंधळात टाकणारा आहे. ज्यांना हा प्रयोग करून बघायचा आहे त्यांना नेमके काय झाले, केले हे समजणार नाही . तरी ते नीट विशद केले पाहिजे . दिवसातून कितीदा, कसला कसला रस घेतला, कसकसा परिणाम होत गेला, आणखी काही खाल्ले की नाही वगैरे सर्व तपशीलवार लिहावे ही विनंती .

In reply to by dadadarekar

चित्रगुप्त 19/10/2015 - 10:20
जूस एकत्र करावा. दिवसभर जर जूसिंग करायचे असेल, तर एकेका रंगाच्या भाज्या-फळे घेऊन वेगवेगळे रस घेऊ शकता. यात अमूकच करावे, असा काही नियम नाही. आवडीनुसार वेगवेगळे प्रयोग करून बघावेत. रसात साखर मिसळू नये. कारली, मेथी, पालक, काकडी, दुधी भोपळा, वगैरेही घालू शकता. निरनिराळ्या रंगांच्या भाज्या-फळात निरनिराळी पोषकद्रव्ये असतात. त्यांची शास्त्रीय नावे वगैरे किचकट माहिती मिळवण्यापेक्षा निरनिराळे रंग ओळखणे सोपे.

In reply to by सुहास पाटील

सुबोध खरे 19/10/2015 - 11:19
रस-आहारावर वीस दिवस दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो हे सांगण्यासाठी डॉक्टर कशाला लागतो? एका गोळीत काम होणारा डॉक्टर त्यांना हवा असतो मग चिकन टिक्का, पनीर कबाब आणि मटण हंडी हाणायला बरे. एक अतिविशाल महिला आहार तज्ञाकडे गेली. पूर्ण दिवसाचा आणी आठवड्याचा आहार त्याने लिहून दिला त्यावर तिने त्यांना विचारले डॉक्टर हा आहार तुम्ही लिहून दिला आहे तो जेवणाच्या अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर? आपली अशी परिस्थिती आहे.

वा वा वा ! मस्त अनुभवसिध्द माहीतीपुर्ण लेख ! अभिनंदन ! आम्हालाही आमचे वजन ७२ वरुन ६५ वर आणायचे आहे , पण मटन भाकरीचा अन ग्लेन्लिव्हेट चा मोह काही सुटत नाही तेव्हा तुर्तास होणे अवघड आहे :(

सुबोध खरे 19/10/2015 - 11:44
कमी वजन म्हणजे निरोगी हे चुकीचे आहे परंतु "प्रमाणात" वजन असणे म्हणजे निरोगी हे बरोबर. आपल्या वय आणि उंचीप्रमाणे वजन प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्या टप्प्याच्या( range) पेक्षा कमी किंवा जास्त असू नये एवढेच.

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट 19/10/2015 - 11:52
एक्जॅक्टली. वजन या आकड्याला आपण इतकं अनन्यसाधारण महत्व देऊन ठेवलंय, की त्याचे कारक, स्नायू, हाडं, बीएमआय, फॅट%, हे आणि इतर अनेक व्हायटल पॅरामिटर्स फाट्यावर मारले जातात. जे खरं तर क्रिटिकल आहे. "वजन कमी करायचंय" इज अ व्हेरी राँग थॉट टू स्टार्ट विथ अ‍ॅट फर्स्ट प्लेस.

वेल्लाभट 19/10/2015 - 11:57
चित्रगुप्तसाहेब तुमचं कौतुक आहे तुमचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे. आणि डेडिकेशन घेण्यासारखं आहे. फक्त काळजी इतकीच घ्या की यू आर्न्ट लूजिंग युअर मसल मास व्हेन यू लूज वेट. कारण त्यातून इतर वेगळे धोके असतात. इथली डॉक्टर मंडळी सांगतीलच. पण ही शॉक डाएट्स, किंवा वेट लॉस डाएट्स जरा जपून करावी, माहिती घेऊन. बाकी अनेक मुद्द्यांशी सहमत. सगळंच शक्य होत नसलं रोजच्या आयुष्यात तरीही निग्रह पक्का असेल तर होऊ शकतं. बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस.

तर्राट जोकर 19/10/2015 - 11:58
माझे वय ३५ आहे, गेल्या १२ वर्षांपासून व्यायाम सुटला. पूर्वी बॉडीबिल्डर होतो. आता फुगलो आहे नुस्ता. बसून काम, आहार-व्यायामकडे दुर्लक्ष. आज उंची ५' ६" वजन ९५ किलो. लेखात वर्णन केलेली, "आता काही होऊ शकत नाही" या विचारापर्यंत आलो, पण एवढाही उशीर झाला नाही हेही कळते आहे. कुठलाही प्रकार सुरू केला की निरुत्साहामुळे जास्त दिवस टिकत नाही. वजन ६८ वर आणायचे आहे. यासाठी कसं प्लानिंग करावं यावर डॉक्टर्स व चित्रगुप्त मार्गदर्शन करतील का?

In reply to by खटपट्या

कसले सपाट पोट आणि कसले काय ...भम्पक पणा इथेच नाही तर परदेशात सुद्धा आहे ....स्वत:ची शी बघतात म्हणे ....कोणत्या lab मध्ये टेस्ट केली ...रिपोर्ट दाखवा ... ..वांग्याचा आणि काकडीचा रस पिऊन काहीही होत नाही .... काळसर्पाचा फोटो एडीट केलेला आहे ....पोटातून तंतुमय किडे कधीच निघत नाहीत ...डोम्बल ... फ्रीडम फ्रॉम बोट्म च्या परवाच्या टोकियो परिषदेत शिन्कीबोका हेच हेच बोम्बलला ... आमच्या पथी ची करा टवाळी आणि मग होऊ द्या ......

In reply to by तर्राट जोकर

चित्रगुप्त 19/10/2015 - 16:53
@ तर्राट जोकरः अजिबात निराश होण्याचे कारण नाही, तुमच्याकडे अजून भरपूर वेळ्/आयुष्य आहे. माझे वय जास्त आणि मूळव्याधीसारखी समस्या असूनही अल्पावधीत त्यातून मुक्त होता आले, तस्मात हा उपाय रामबाण आहे, हे निश्चित. वजन कमी करण्याबाबद एका वेळी फक्त ५ किलो कमी करण्याचे ध्येय ठेऊन सुरुवात करावी, असे वाटते. तेवढे साध्य झाले की दुसरा टप्पा काही दिवस सामान्य आहार घेतल्यानंतर परत सुरू घेऊन करता येईल. एका वेळी दहा-पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस जूसिंग करू नका. माझा मुलगा डॉक्टर असल्याने मी निश्चिंतपणे जास्त दिवस करू शकलो. व्यायामाबद्दल सांगायचे तर माझ्यामते एकदम जिम, वजने वगैरेंपेक्षा योगासने, ताई ची, सायकलिंग, आणि हलके व्यायाम ठीक रहातील. पोहणे शक्य असेल तर अतिउत्तम. संपर्कात रहा.

In reply to by चित्रगुप्त

तर्राट जोकर 19/10/2015 - 17:17
धन्यवाद उत्तराबद्दल. ५ केजी अ टाइम ही टप्पा पद्धत योग्य राहील. माझे झाले की वडिलांनाही सांगेन, त्यांनाही ३० वर्षे मूळव्याधीचा त्रास आहे.

In reply to by तर्राट जोकर

चित्रगुप्त 29/10/2015 - 01:56
तजो: तुम्ही जूसिंग वगैरे करालच, परंतु तुमच्या वडिलांना जर ३० वर्षांपासून मूळव्याध आहे, तर ताबडतोब त्यांना जूसिंग सुरू करवा. त्यांची नीट काळजी घ्या. या कामाला अग्रक्रम द्यावा, असे सांगावेसे वाटते.

वेल्लाभट 19/10/2015 - 11:59
बाकी ते, सर्प, किडे बिडे अगदी तंतोतंत खरं की जरासं एक्झॅगरेटेड? :) सहज विचारतोय. इट्स ऑफुली अमेझिंग. आय मीन मला असं झालं की... 'आर यू किडिंग मी?'

In reply to by वेल्लाभट

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... मीही हेच विचारणार होतो ते किडे पाहुन वाटले ... चित्रगुप्त काका , अमेरिकेला जायच्या आधी चीन कंबोडिया व्हेयेतनाम वगैरे मधे जाऊन झुरंळं बिरळं खाउन् आले होते काय ? =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 19/10/2015 - 17:10
वाचायला जरा घाण वाटेल, म्हणून मी लिहिले नव्हते, पण आता लिहीतो. पाच-सात दिवस जे जूसिंग करणार असतील त्यांनी विष्ठा कशी होते याचे परिक्षण करण्यासाठी अर्धी-पाऊण बादली पाणी घेऊन त्यात करावी. म्हणजे तरंगणार्‍या कृमी सहज दिसून येतील. माझ्या लेखातील सर्व फोटो जालावरून घेतलेले आहेत. त्यातील कृमींसारखेच तंतुमय आकार होते.

In reply to by वेल्लाभट

चित्रगुप्त 19/10/2015 - 17:03
@ वेल्लाभटः 'काळसर्प' हे नाव मी गमतीने पोटातून निघालेल्या घाणीला दिले. मात्र अक्षरशः हातभर लांब, काळ्या रबरासारखी गुंडाळी निघाली होती. अर्थात विसेक वर्षे मी फिस्टुलाचा रोगी आणि १-२ महिन्यांपासून मूळव्याध झालेली असल्याने माझ्या आतड्यात वर्षानुवर्षे साठलेली घाण होती, ती एकदम निघाली म्हणून असे दिसले. सर्वांच्याच पोटात एवढे असेल असे नाही. 'कोलोन प्ल्युकॉईड' असे गुगलले की अनेक फोटो मिळतील. गेल्या वर्षी आणि पुन्हा या वर्षी वीस-पंचवीस दिवस मी जूसिंग केले. दोन्ही वेळी सुरुवातीचे काही दिवस तंतुमय आकार निघाले. जालावर हुडकल्यावर ते परजीवी कृमी असावेत, असा तर्क मी केला. लॅब मधे वगैरे त्यांचे परिक्षण केलेले नाही.

In reply to by चित्रगुप्त

वेल्लाभट 19/10/2015 - 17:07
आयला! हे सॉलिड आहे. आय मीन.. स्केरी ! कमाल आहे तुमची सिरियसली. भारीच. आणि इतका जुना विकार नाहीसा होतो म्हणजे कुछ तो बात है नक्कीच. सहीए बॉस.

सुबोध खरे 19/10/2015 - 11:59
वजन हे फक्त वय आणि उंची या मापात न धरता बारीक बांधा मध्यम बांधा आणि मोठा बांधा या प्रमाणे पण गृहीत धरले पाहिजे पहा http://www.medindia.net/patients/calculators/height_weight_foradults.asp

In reply to by सुबोध खरे

डॉक साब, शरीर प्रकारात १ एक्टोमोर्फिक २ एंडोमोर्फिक ३ एक्सऑमोर्फिक अश्या तीन प्रकारच्या बॉडी फ्रेम्स असलेले ऐकले होते, ह्यावर अजुन प्रकाश टाकू शकाल काय?

चित्रगुप्त 19/10/2015 - 12:08
हा जो रसाहाराचा प्रयोग केला, त्यातून मूळव्याध, फिस्टुला वगैरे बरे होईल, पोटाचा घेर आणि वजन कमी होईल, अशी मला कल्पनाही नव्हती, त्यामुळे हे घडून आल्याचा अतिशय आनंद झाला. 'पोटातला काळसर्प' याची तर कल्पनाही केली नव्हती. आहारातील कॅलरी वगैरेंचाही विचार केला नव्हता. काहीतरी नवीन, वेगळे करून बघण्याची आवड आणि तयारी यातूनच पूर्वी विपश्यनेचा कोर्सही केला होता, तेंव्हा त्यातून अनेक वर्षांची पाठदुखी सुद्धा अशीच अनपेक्षितपणे कायमची बंद झाली होती. माझे वजन ७५-७६ किलो झालेले होते (वय ६४, उंची ५'५") ते ७०-७१ झाले. जिना कष्टाने चढू शकत होतो, तो धावत सुद्धा चढू लागलो. शरीरात 'फाजील' चरबी किती आहे, हे कळावे यासाठी काही खात्रीलायक पद्धत आहे का?

चित्रगुप्त 19/10/2015 - 12:16
बारीक बांधा - मध्यम बांधा - मोठा बांधा यालाच आयुर्वेदात 'वात - पित्त - कफ प्रकृती म्हणतात ना? 'काहीही मेहनत न करता' सुद्धा वात प्रकृतीच्या लोकांच्या जास्त कॅलरी खर्च होतात, पित्त वाल्यांच्या मध्यम आणि कफ वाल्यांच्या अगदी कमी असे ऐकले आहे.

In reply to by चित्रगुप्त

मांत्रिक 19/10/2015 - 13:12
माझ्या थोडया फार अभ्यासानुसार वात पित्त कफ हे मानवी शरीरात पुढील भूमिका बजावतातः १) वात वियोग(dissociation), चलनवलन, हालवाली, चेतना, विघटन, उत्सर्जन यांच्याशी संबंधित आहे. २) पित्त रुपांतरण(transformation), पचन, ऊर्जा, तेज, उष्णता, पोटातील अग्नि/भूक, यांच्याशी संबंधित आहे. ३) कफ संघटन(association), शीतलता, पौष्टिकता, वृद्धी, धारणा यांच्याशी संबंधित आहे. शरीरातील सर्व क्रिया या ३ कॅटॅगरीत बसतात. उदा. एखाद्या लहान अर्भकात कफ हा स्वतःच्या असोसिएशन गुणाधर्मामुळे भराभरा पेशींची, हाडांची वाढ घडवून आणतो. पित्त हा ग्रहण केलेल्या अन्नाचे पचन घडवून आणतो. शरीराला आवश्यक अशी ऊर्जा, तेज पुरवतो. तर वात हा शारीरिक हालचाली, स्नायूंच्या ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया, खेळणे इ. क्रियांना मदत करतो. बाकी तज्ञ मंडळीच सांगू शकतील. मिपावर आनंदा हा आयडी बहुतेक आयुर्वैदिक वैद्य आहेत, असे आठवते.

चित्रगुप्तसाहेब, खूप दिवस वाट पाहयला लावल्यानंतर पाताळेश्वर कट्ट्यांत सांगितलेला कालसर्पवियोगलेख आला... आणि तोही तुमच्या खास शैलीत आणि यथार्थ सुंदर चित्रांसहित ! आता परत एकदा मिपाकट्टाज्यूसभक्षण करायला पुण्यात लवकरच या ! :)

कंजूस 19/10/2015 - 12:23
आमच्या कंपनीचे डॅाक्टरांनी नोकरीच्यावेळी मेडिकल टेस्ट करतांना- १) एक रबरी हातोडीने गुडघ्यांवर ( तिथे मेंदू असतो असं मेडीकल शास्त्रतरी मानत नसावेत ) आणि ढोपरांवर ठोकून पाहिले, २) स्टेथो• ने छातीचे ठोके मोजले, दीर्घ श्वास घेण्यास सांगून मोजले, जागेवरच दोन मिनीटे उड्या मारायला सांगून त्यानंतर मोजले, ३) छातीचं माप श्वास घेण्याअगोदर व नंतर मोजले. ४) वजन घेतले. ५) खोकायला सांगुन पोटाखालचे रिफ्लेक्स पाहिले, ६) आणि( काही लैंगिक रोग वगैरे). ओके म्हणाल्यावर मी त्यांना विचारले बास इतक्या टेस्ट पुरेशा असतात? " होय यातून बरेच कळते." गावातले शेतकरी दहा किलो+ चा नांगर तीन चार किमी खांद्यावर नेतात तो पाहून वाटते असेल यांचे वजन नव्वद किलो तर काय बिघडते?

काका अभिनंदन!! फळांचे ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच? आणि कच्च्या भाज्या पोटात जाताना अनेक जण असेही म्हणतात की न शिजवल्याने त्याचाही त्रास होऊ शकतो. हे कितपत खरे आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ बॅट्याला वजन कमी करायला कोणी सांगितले ???!!!... बहुतेक आंतरजालावर सापडलेला तज्ञ असावा ;) मात्र, बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे रोज अर्धा ते पाऊण तास तरी घाम येऊन नाडीचे ठोके १२० पर्यंत वाढतील इतपत व्यायाम करायला पाहिजे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाखु 20/10/2015 - 09:35
कुणाच्या तरी नजरेत "मावत" नसावा किंवा

भरला

असावा म्हणून हे वजन कमी करण्याचे त्याच्या डोक्यात आले आहे असे आमचा मिपा नगरीचा वार्ताहर कळवतो. दैनीक सध्या आनंद तर्फे कट्टेकर्यांच्या माहीती करता प्रसारीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 20/10/2015 - 12:27
दिसत नसले तरी वजन बरेच आहे ओ. ७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे. अगोदर ७५ होते ते आता हळू हळू व्यायामाने ७२ पर्यंत आणलेय.

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 20/10/2015 - 14:35
बॅट्या लेका तुला गरज नाही बे कमी करायची. मलाच ३ किलो तरी कमी करावे असे वाटू लागलेय. सध्यातरी वन्डे ज्युसडे करायला काहि हरकत नाही. नंतर टेस्ट खेळून पाहावी.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 20/10/2015 - 14:41
नाय बे अभ्या, गरज नक्कीच आहे. नुसते बघून कळत नाय पण तीनचार महिन्यांचे पाप (या शब्दप्रयोगासाठी पोपशास्त्री यांचे पोरगीपटाव शास्त्र पहावे.) तरी नक्कीच आहे त्याचे परिमार्जन करण्याची नितांत गरज आहे. =)) तूही लाग कामाला. वजन कमी केल्यावर खास सपाटपोटप्रीत्यर्थ ज्यूसकट्टा करू.

In reply to by बॅटमॅन

अनुमोदन . फक्त मोबिलीटीच नव्हे तर strength stamina speed agility चारही पाहिजे ! कोणताही ट्रेक करताना आता मला जे साठवलेले ६-८ किलो एक्स्ट्रा फॅट आहे ते जाणवते राव .

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 20/10/2015 - 15:01
आयडियली पाहता खांद्यावर ९-१० किलो वजनाची सॅक घेऊन राजगडसारखा ट्रेक तसा बर्‍यापैकी सहजपणे करता आला पाहिजे. ही अपेक्षा तशी बरीच जास्त आहे सद्यस्थितीकडे पाहता, पण असे काही लक्ष्य समोर ठेवले तर थोडे थोडे करत करत सुधारणा होईल असे वाटते.

चांगला लेख ! मात्र याबरोबरच शादी के पहले आणि शादी के बाद चा फोटो ( आय मीन सुरुवातीचा फोटो आणि प्रयोगानंतरचा फोटो) टाकला असता तर आमच्यासारख्यांना जरा जास्त प्रेरणा मिळाली असती !

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 20/10/2015 - 12:03
पहले और बाद चे फोटो द्यायचे आहेत, पण अद्याप कंबरेचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही (३८ वरुन ३३ वर आली, पण २८-३० वर यायची इच्छा आहे) शिवाय ते सिक्स अ‍ॅब वगैरे जमले तर उत्तमच.

dadadarekar 19/10/2015 - 12:37
आजपासून सुरु केले. दोन काकडी , दोन गाजर , एक सफरचंद , दोन संत्री , थोडी मेथी व चार टोम्याटो. मिस्करातून फिरवून थोडे पाणी घातले. अर्धा लिटर लिक्विड तयार झाले. यात पाणी घातले तर चालते ना ? साखर मीठ घातले नाही. चोथा गाळला नव्हता. चोथ्यासकटच प्यालो. सोबत लिंबू सरबत. संध्याकाळी थोडे दूध , दही , के ळी व खजूर ज्युस करायचा आहे.

चित्रगुप्त 19/10/2015 - 12:53
न शिजवलेल्या भाज्या-फळे हे पचायला कठीण (त्यामुळे अयोग्य), आणी शिजवल्याने त्यातले व्हिटॅमिन वगैरे नष्ट होतात, या दोन्हीवरचा एकत्रित उपाय म्हणजे जूस. नुस्ती कच्ची फळे खाल्ल्यास त्यांचा चोथा शरीराबाहेर टाकायला पचन-संस्थेला एक-दोन दिवस काम करावे लागते, त्यामुळे आतड्यात वर्षानुवर्षे साचलेली घाण बाहेर काढायला मोकळीक मिळत नाही. जूसरद्वारे चोथा आधीच काढून टाकून आपण फक्त पाणी आणि पोषकद्रव्ये घेत असल्याने ते काम सहजपणे केले जाते. शिवाय आतड्यातील परजीवी जंतु (parasites) हे मुख्यतः शर्करा आणि starch वर जगत असतात, त्यांच्या अभावी ते मरून बाहेर पडतात, परिणामी भूक कमी लागू लागते, गोड, मैद्याचे पदार्थ वगैरे खाण्याची इच्छा मावळते. Gluten युक्त धान्ये विशेषतः गहू (मैदा, कणीक इ. चे पदार्थ) पचणे (पोटात विघटित होणे) कठीण असल्याने ते शरिरात हानिकारक द्रव्ये निर्माण करत असतात. त्या ऐवजी ज्वार, बाजरी इ. ची भाकरी वा अठरा धान्याची भाजणी खाणे उत्तम. खरेतर दुग्धजन्य पदार्थ (दूध, खवा, मिठाया) पण कमी करणे बरे. मी लेखाच्या शेवटी दिलेला तूनळीवरील 'Fat, Sick and Nearly Dead' हा व्हिडियो अवश्य बघावा.

In reply to by dadadarekar

मांत्रिक 19/10/2015 - 13:18
आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो. दादूस काय चाललंय काय? एकतर आगोबैनं सुरुवात! मग जुसर हा प्रेमळ उच्चार. मग मिश्किल मिस्कर? चोथ्यासकट कसे प्यालात? चोथा एकतर गिळावा लागणारच किंवा चावावा तरी लागणार?

In reply to by चित्रगुप्त

चोथा चांगला असतो ना शरीराला? पोट साफ होण्यासाठी फायबरयुक्त आहार असावा असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. की हे असे फक्त डाएट पुरते (शरीरशुद्धी पुरतेच..) करायचे असुन नंतर रोजचाच आहार घ्यायचा आहे? अजुन काही शंका, -मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. वीकांताला हे प्रयोग केले तर मदत होईल का? -मध्यंतरी शंखप्रक्षालनासंबंधी पण वाचले होते ज्यात काही विशिष्ट व्यायाम आणि पाणी पिणे ह्याची सांगड घालुन १८-२० ग्लास पाणी पिऊन पोट साफ केले जाते. ह्या क्रियेतही आतडे साफ होत असतील ना? पण तेव्हा असा "काळसर्प" बाहेर पडल्याचे कधी ऐकले नाही. किंवा पंचक्र्मातही बहुदा विरेचनात पोट साफ होते तेव्हाही असे काही बाहेर पडल्याचे ऐकले नाही. ह्या मागे काय करण असु शकेल?

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 19/10/2015 - 13:38
>>> मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. रात्री पाच सात बदाम भिजवून सकाळी सालं काढून खाणे. मस्त एनर्जी टिकते. याबरोबर सुका मेवा कमी क्वांटम मध्ये जास्त एनर्जी देतोच. बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम. ज्युस बनवल्यास साखर अजिबात नको. डॉक्टरांना प्रश्न - कार्ब्स काही दिवस पूर्ण बंद केले तर काय होईल?

In reply to by प्यारे१

चित्रगुप्त 19/10/2015 - 13:59
बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम.
हे एरवी, म्हणजे जेंव्हा आपण पोळी, भात वगैरे आहार घेत असतो, तेंव्हा ठीक, परंतु शरीर-शुद्धीसाठी रसाहार घ्यायच्या दिवसात ते योग्य नाही, याचे कारण मी एका प्रतिसादात दिलेच आहे. समजा, एक टोपलीभर भाज्या-फळे आपण घेतली तर ती सर्व कच्ची एका दिवसात आपण खाऊ शकत नाही, आणि खाणेही योग्य नाही, मात्र त्यांचा रस सुमारे तीन-चार ग्लास निघेल, तो मात्र आपण सहज पिऊ शकतो, त्यातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळतातच, परंतु चोथा बाहेर टाकून देण्याच्या कामात पचनसंस्था गुंतून रहात नाही, परिणामी जुनी साचलेली घाण काढणे शक्य होते.

In reply to by चित्रगुप्त

dadadarekar 19/10/2015 - 14:08
इतर काहीच न खाल्ल्याने तो काळपट संडास तयार झाला आहे. त्यात आधीची घाण व फळभाज्यातील रंगद्रव्ये दोन्ही असणार.

In reply to by चित्रगुप्त

dadadarekar 19/10/2015 - 13:13
त्यामुळे कच्ची फळे व भाज्या खाव्या लागतील. सकाळी मिक्स जुस दूपारी फळे व भाज्या. रात्री फ्रुट जुस दही घालून ( पंचामृत टाइप) थोडेसे दूध घालावे लागेल. त्यातून क्यालशियम व विट डी मिळेल. ते भाज्या / फळात नसते. यात मोड आलेले गहू , कडधान्ये घेता येतील का ? ... आमची एक एच आय व्ही पेशंट रोज कोर्फड गर , मोड आलेले गहू व कडधानुये खाते.. औषधेही आहेत. तीची तब्येत अगदी निरोगी आहे.

कंजूस 19/10/2015 - 08:46
वावावा इतरांनाही नक्कीच उपयोगी.भारतीय खाणेपद्धतीमध्ये खूप बदल झालेत त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.जाडजूड पण घट्ट शरिराचे परदेशी लोक पाहण्यात येतात.सत्तरीतही तरतरीत दिसतात.काम न करण्याची अथवा कष्टाची कामे इतरांवर ढकलून आपण आराम करायला बघायचे नंतर उगाचच जिमवगैरे चालू करायचे.आणखी बय्राच अपप्रवृत्ती आपल्याकडे थोर लोकं अवलंबतात आणि मुलांचा हेच योग्य असा समज होतो. तुम्ही असं करत होता असं म्हणत नाहीये परंतू एक निरीक्षण होते.बय्राच माता मुलांस हाइ प्रोटिन आहार चरवतात नंतर मुलं मोठं शरीर धारण करतात परंतू कामाची आवड उत्पन्न करत नाहीत. लेखातील फोटो ,मांडणी ,सादरीकरण मस्त झालंय.

मांत्रिक 19/10/2015 - 08:57
उत्तम लेख! मला अजूनतरी हेल्थ समस्या नाहीत. पण किमान आठवड्यातून १ दिवस तरी ज्यूसाहार नक्कीच करणार. कृपया भारतात उपलब्ध भाज्या व फळे वापरून ज्यूस कसे करायचे याची कुठे वेबसाईट आहे का? किंवा पुस्तक? कृपया जास्त माहिती व्यनी कराल? एक जवळची व्यक्ती सतत आजारी असते. कारण काही कळतच नाही. त्यांना ही माहीती नक्की देईन. बाकी अतिशय उपकारक माहिती.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक 19/10/2015 - 09:04
आठवड्यातून किमान एक दिवस ज्यूसाहार केला तर फायदे मिळतील की उगाच करायचं म्हणून केल्यासारखं होईल? जास्त दिवस करावे लागेल का? बाकी जादा माहिती कृपया व्यनी करा.

चित्रगुप्त 19/10/2015 - 09:28
आठवड्यातून किमान एक दिवस ज्यूसाहार केला तरी काही न काही फायदे नक्कीच मिळतील. मुख्य म्हणजे जूसाहाराची आवड लागेल, आणि पुढे कधीतरी जमेल तेंव्हा आठवडाभर करणे सोपे जाईल. जूस खेरीज नारळपाणी, ताक, पातळ लस्सी, स्मूदी, कढी, सोलकढी, सूप, सार, पातळ वरण, सांबार, लिंबूपाणी, पाण्यात आले, ओवा, जिरे, बडिशेप वगैरे घालून उकळवून गाळून घेतलेले पेय, असे द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घेण्यानेही चांगला फायदा होतो. चहा ऐवजी साधा ग्रीन टी पिणे उत्तम. ज्यांना पोट वा वजन कमी करण्याची आवश्यकता नसेल, त्यांनाही पोट/आतडी कमालीची साफ झाल्याने अनेक फायदे मिळतातच. आपल्याइकडे भाजीपाला नाल्याच्या घाण पाण्यातही उगवला जातो, त्यातील धोका टाळण्यासाठी वाटल्यास गाजर, पालेभाज्या, बीटरूट वगैरे उकळत्या पाण्यात ठेऊन नंतर अन्य फळे, केळी, खजूर, दही इ. सोबत मिक्सर मधून काढून शिवाय पातळ करण्यासाठी पाणी घालून परत फिरवावे. हे पेय सुद्धा उत्तम काम करते. हे तर रोज करता येण्यासारखे आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 27/10/2015 - 11:55
आज अनेक दिवसांनी मिपावर प्रवेश केला आणि पाहतो तो ही गर्दी...! जुसीय आहार आणि त्याचे प्रत्यक्ष अनुभवाने विदित केलेले चित्रगुप्तांचे सिद्धहस्त लेखन ! 14500 वर क्लिक्स, 250 च्यावर प्रतिसाद...! अबब... ! वा.. !वा...! परंतु शेवटी इतक्या लोकांपैकी एकही ‘चित्रगुप्तांच्या अनुभवावरून शहाणा होऊन, मी लागलो कामाला’ असे म्हणणारा वाचनात आढळला नाही!’ प्रत्यक्ष पोहायला न उतरता, ‘काहो, फार गार असेल ना पाणी?, खोल किती असेल? अशा --- चौकशा, शंका, विचक्षणाकरून, तर कधी सर्व थापा आहेत, लेखन तद्दन्न खोटे आहे.’ अशी भडास काढणाऱ्या विविध वैचारिक महाभागांनी ‘करीन मग’ या उक्तीप्रमाणे वर्तन करायचे ठरवलेले दिसते. असो. धाग्यातील मुद्देसूद मांडलेली माहिती, आकर्षक फोटो आणि विचारणांना सविस्तर आणि प्रामाणिक उत्तर देण्यातून या प्रश्नाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरवातीचा संकोच टाकून, विविध आकृती बंधातून आपल्या पोटात काय काय दडलेले असते याचे साक्षात दर्शन करवून एक नवा पायंडा पाडलेला हा धागा वाचून मी व पत्नी प्रत्यक्ष कामाला लागलो. प्रथम एरंडेलतेलाने पोटातील कृमी असल्या तर आधीच पहाणी करून, काही ‘सापडले’ नाही अशी खात्री करून, पैशाकडे न पाहता काल लगेच नवा जूसर आणला. आज माझ्या बाबत दुसरा दिवस. आता यापुढे काय काय घडले याचा आढावा सादर करेन.

In reply to by शशिकांत ओक

सुबोध खरे 27/10/2015 - 12:49
एरंडेलतेलाने पोटातील कृमी असल्या तर ओक साहेब एरंडेल सारखे रेचक घेण्यापेक्षा मी आपणास एक बेन्डेक्स ची गोळी घ्या असे सुचवेन. ( किंमत रुपये ८ फक्त). याने सर्व किडे कृमी नष्ट होतील.

In reply to by सुबोध खरे

शशिकांत ओक 27/10/2015 - 16:55
हवाईदलातील नोकरीमध्ये असल्यापासून अशा गोळ्या खायची प्रॅक्टीस आहे.यावेळी प्रत्यक्ष पुरावा सादरीकरण महत्वाचे वाटल्याने बालपणातील एरंडेल तेल थेरपी करून मग रसथेरपीचा मार्ग सुलभ करायला बरे पडेल, हे सुचले...

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 27/10/2015 - 17:15
डॉक्टर साहेब एरंडेल वगैरे रेचके व औषधे, त्यांचा होणारा बरावाईट परिणाम, कृमी का आणि कश्या होतात आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम, याबद्दल सविस्तर माहिती सवडीनुसार देता येईल का? पर्गेटिव्ह आणि लॅक्झेटिव्ह अशी दोन प्रकारची रेचके असतात असे वाचले आहे, यात काय फरक असतो?

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे 27/10/2015 - 20:43
चित्रगुप्त साहेब पर्गेटिव्ह आणि लॅक्झेटिव्ह यात पूर्वी फरक त्यांच्या शक्ती मधील होता पण आजकाल इतक्या तर्हेची औषधे बद्धकोष्ठावर निघाली आहेत कि त्यातील फरक धूसर झाला आहे. पूर्वी लॅक्झेटिव्ह म्हणजे सौम्य समजली जात असत म्हणजे लिक्विड पाराफिन किंवा क्रिमाफिन सारखी आणी पर्गेटिव्ह म्हणजे तीव्र रेचके एरंडेल सारखी ज्याने पोटात मुरडा( COLIC) होतो ती समजली जात. पूर्वी एरंडेल तेल पोट साफ होण्यासाठी देत असत याचे कारण त्याच्या तीव्र रेचक प्रभावाने पोटात असलेले काही जंत आणी कृमी( जंत मोठा असतो १५-३० सेमी आणी कृमी लहान असतात १ सेमी) सुद्धा बाहेर पडत असत म्हणून असा समज झाला होता कि ते जंत निर्मूलक आहे म्हणून (सगळे जंत/ कृमी त्याने बाहेर पडत नाहीत). जंत कसे होतात. जंतांचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेत त्याची अंडी असतात. हि अंडी सोनखताद्वारे भाज्या/ पालेभाज्यांवर येतात. तेंव्हा आपण भाज्या आणी फळे नीट धुवून खाल्ली नाही तर हि अंडी पोटात जाऊन आपल्याला जंतांचा प्रादुर्भाव होतो. दुसरे कारण आपण आपला मळ( विष्ठा) धुतल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या नखाच्या कोपर्यात कृमीची अंडी राहून जातात आणी आपल्या खाण्याद्वारे आपल्याला परत संसर्ग होतो( सेल्फ इन्फेक्शन). जंत रोज २ लाख अंडी देतात आणी कृमी ५-१० हजार या दराने आपल्या स्वतःच्या हाताद्वारे सुद्धा आपल्याला किती जंत/ कृमींचा संसर्ग होऊ शकतो हे समजून घ्यावे. रस काढण्यापूर्वी आपण घेत असलेल्या भाज्या गाजर मुळा बटाटा रताळे किंवा जमिनीवर असणारी फळे स्ट्रोबेरी, रास्पबेरी, काकडी, भोपळा टोमाटो हे सुद्धा स्वच्छ का धुवून घ्यावेयाचे हे कारण आहे. या कारणास्तव आम्ही( डॉक्टर) आपल्याला विशेषतः लहान मुलांना दर ६ महिन्यांनी जंताचे औषध द्यायचा सल्ला देतो. बेन्डेक्स किंवा दुसरे अल्बेंडाझोल असलेल्या औषधाची किंमत १२- १४ रुपये आहे. हि गोळी गोड असून चघळून खायची. याने जाणताना लकवा मारतो आणी ते शौचाद्वारे पडून जातात. हे औषध शरीरात शोषले जात नसल्याने इतर लोक साइड इफेक्ट बदल आरडा ओरडा करतात तसे होण्याची शक्यता नाही. मुलांनी किंवा मोठ्यांनी दर सहा महिन्यानी हे औषध एकदा घ्यावे.याच्या बरोबर रेचक घेण्याची आवश्यकता नाही. जंत -https://en.wikipedia.org/wiki/Ascaris_lumbricoides कृमी https://en.wikipedia.org/wiki/Necator_americanus

In reply to by सुबोध खरे

मला लहानपणी (९-१० वर्षाचा असताना) जंताचा (मी इतके दिवस जंतच म्हणत होतो. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते ५-१० मिमि लांबीचे होते-कृमी) खूप त्रास होता. एकदा आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला "झेंटेल" ही गोळी दिली होती. एका स्ट्रिपमध्ये एकच गोळी. गोड. चघळून खाण्यासाठी. नंतर २ दिवसात हजारो-लाखो (!) कृमी पडून गेले. नंतर परत कधी तसा त्रास झाला नाही. आता शोधल्यावर कळले की त्यात Albendazole असते.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 29/10/2015 - 01:46
डॉ. खरे साहेब: कृमी व जंतांबद्दलच्या माहितीबद्दल अनेक आभार. माझे अजूनही काही प्रश्न आहेतः १. पोटात जंत व कृमी असल्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय दुष्परिणाम घडून येत असतो? २. आपण खात असलेले अन्न ही मंडळी खाऊन पुष्ट होतात, आणि खाल्ल्यापैकी बरेचसे आपल्या 'अंगी लागत' नाही, अशी जी सार्वत्रिक समजूत असते, ती सत्य आहे का? ३. हे कृमी व जंत काही पदार्थ त्यांच्या शरीरातून निष्कासित करतात का? असल्यास त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ? ४. औषध घेऊन जंत व कृमी नष्ट झाल्यावर मूळव्याध वा फिस्टूला बरा होतो का ? ५. पाश्चात्त्य डॉक्टरी विद्येप्रमाणे या दोन्हींवर कायमचे इलाज काय आहेत ? ६. चरबी विषयी: मुळात जास्तीची चरबी शरिरात निर्माण कशी होते, आणि पोटावर तिचे थर का निर्माण होतात ? तूप वगैरे चरबीयुक्त जिन्नस अजिबात घेतले नाहीत, परंतु अन्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाण्यानेही चरबी साठत जाते का? चर्बीतही 'चांगली चरबी' आणि 'वाईट चरबी' असे काही असते का? ७. 'सूज' मह्णजे नेमका काय पदार्थ असतो? सूज कश्यामुळे येते आणि कमी होते ? सूज अपायकारक असते की उपकारक ? ८. मांड्यांवर आणि नितंबांवर वगैरे 'सेल्युलाईट' जे जमा होते, ती चरबीच असते की आणखी काही? ते कमी करता येते का? कसे ? ९. जिला आयुर्वेदात 'आम' वा 'आव' म्हणतात तो पदार्थ शरीरात कसा निर्माण होतो, आणि कुठे कुठे साठतो? त्याचे परिणाम ? लिहिता लिहीता बरेच प्रश्न सुचले. सवडीप्रमाणे शंकासमाधान करावे ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

सुबोध खरे 31/10/2015 - 10:33
कृमी आणि जंतांच्या प्रादुर्भावामुळे आपल्या शरीराला अन्न आणी प्रथिनांची कमतरता जाणवते. तसेच ते रक्त शोषत असल्याने आणि त्यांच्या सूक्ष्म चाव्याच्या ठिकाणाहून बारीक बारीक रक्तस्त्राव होत असल्याने पंडुरोग(ANEMIA) होतो. याचा परिणाम सर्वात जास्त बालकांमध्ये होतो आणी ते कुपोषण आणी रोगाला पटकन बळी पडू शकतात. खेड्यात जेथे लोक उघड्यावर शौचास जातात तेथे त्यांच्या पायातून या कृमींच्या अळ्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे खेड्यातील गरीब बालके हि याचे सर्वात जास्त बळी आहेत. तेथे मुलांच्या पोटात अक्षरशः लक्षावधी जंत आणी कृमी आढळतात ज्यामुळे त्या मुलांना भूक लागत नाही खाल्लेले अन्न अंगी लागत नाही आणी कुपोषण होते. कृमींच्या या अळ्या आपल्या फुप्फुसातून जात असताना खोकला होतो आणी अलर्जीचा त्रास होतो. https://en.wikipedia.org/wiki/Hookworm_infection https://en.wikipedia.org/wiki/Ascariasis कृमी/ जंत यांच्यावर बेन्डेक्स किंवा तत्सम औषध घेतले तर ते सहज नष्ट होऊ शकतात. खेड्यात किंवा गरीब वस्तीत काम करताना आम्ही कोणत्याही कारणासाठी आलेल्या मुलांना एक बेन्डेक्स ची गोळी समोरच खायला देत असू. जितक्या जास्त मुलांना तुम्ही ते द्याल तितके (COMMUNITY LOAD OF WORMS) कमी होते. कारण हि मुले परत परत बाहेरच शौचास जातात आणी जंतांची अंडी किंवा अळ्य़ा शरीरात प्रवेश केल्याने प्रादुर्भाव होऊन येतात. जितक्या लोकांच्या पोटातील जंत तुम्ही नष्ट कराल तितली त्यांची पसरण थांबेल. डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांना संडास उपलब्ध करू शकत नाही( ते काम सरकारचे आहे)पण निदान त्यांचे स्वतःचे जंत संसर्ग आणी समाजात त्यांनी पसरवण्याची शक्यता कमी करता येते. कृमी/ जंत यांचा आणी मुळव्याध किंवा फिस्च्युला यांचा संबंध नाही. मुळव्याध, फिशर आणी फिस्तूला (हे तिन्ही आजार एकदमच) आमच्या वडिलांना होते. ते शाल्यक्रीयेने बरे झाले आणी गेली ३२ वर्षे( १९८३ ते आता) त्यांना त्याचा काही त्रास नाही. उन्हाळा असो कि तिखट खाल्ले. (आता ८० व्या वर्षी ते तिखट फारसे खात नाहीत हे अलाहिदा) आपले प्रश्न ६-९ यांची उत्तरे जरा सावकाशीने सविस्तरपणे देतो.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 04/11/2016 - 03:04
आपले प्रश्न ६-९ यांची उत्तरे जरा सावकाशीने सविस्तरपणे देतो.
डॉ. खरे साहेब, आज वर्षभरानंतर पुन्हा हा धागा वाचताना मी विचारलेल्या वरील शंकांचे समाधान होणे राहून गेले असल्याचे दिसले, तरी कृपया यबद्दल माहिती दिल्यास फार चांगले होईल.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 06/11/2015 - 02:11
डॉक्टर साहेब, कसे कुणास ठाऊक आपण माझ्या प्रश्नांची दिलेली उत्तरे नजरेतून निसटली. ती आत्ता वाचली. अनेक आभार. अन्य उत्तरांच्या प्रतिक्षेत.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 27/10/2015 - 12:51
व्वा ओक साहेब . निसंदिग्धपणे आम्ही प्रत्यक्ष भाग सुरु केले आहे म्हणणारे तुम्ही पहिले . शुभेच्छा , आणि पुढील प्रतिसादाच्या अपेक्षेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 30/10/2015 - 00:18
मित्रांनो, गीतोपदेश हितकारक मानतात. कर्मण्ये... मा फलेशू कदाचन वगैरे. फळाची अपेक्षा न ठेवून काम करत रहा. मी गेले ४ दिवसांसाठी फक्त फलाहारावर दिवस घालवतोय. गीतेचे ग्रंथ फडताळात सरकवून सामान्य भोजनाची आशा सोडून मिक्सर, जूसर आणि इतर भांडीकुंडी घासून साफसफाईचे काम करत वजन कमी करण्यासाठीची फलेच्छा बाळगून आहे...

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 07/11/2015 - 10:53
चित्रगुप्त आणि सर्व रसिक मंडळी हो...
सामान्य भोजनाची आशा सोडून मिक्सर, जूसर आणि इतर भांडीकुंडी घासून साफसफाईचे काम करत, गीतेचे ग्रंथ फडताळात सरकवून, वजन कमी करण्यासाठीची फलेच्छा बाळगून आहे...म्हणणाऱ्या ओकांचा
दहा दिवसाची एकत्र रिपोर्ट ... ओक आणि कंपनीच्या लोटपोट बाजारात उलथापालथ... 83.4 वरून वजन 4.4 किलोने खाली गडगडले...पोटातील प्राण्यांच्यात घबराट... असे काही बाही कोठा समाचार पत्रातून भडक मथळ्यात आले होते म्हणे. त्यावर अनेक अनुभवी व जेष्ठ कृमींनी चर्चा करून असे कधी काळी होत असते. आपल्याला घाबरून जायचे कारण नाही. 8-10 दिवसांनी परिस्थिती पुन्हा मूळपदावर येईल असा पक्का अंदाज दिला म्हणतात... उगीच आपापली कौतुकपत्रे परत करायच्या नादी लागून नका असा पोक्त अनाहूत उपदेश ही दिला म्हणे... त्यांची आज्ञा शिसावंद्य मानून ओकांनी जास्त वेळ त्यांची परिक्षा घ्यायची नाही असा विचार करून पुन्हा रसाहारावर नियंत्रण आणल्याचे वृत्त कोठा समाचारात प्रसिद्ध झाले आणि सर्वत्र पुन्हा आनंदी आनंदाचे वातावरण झाले....

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 07/11/2015 - 13:29
ओक साहेब, तुम्ही 10 दिवस रसाहार केलात हे वाचून आनंद झाला परंतु तुमचा हा रिपोर्ट गोंधळात टाकणारा आहे. ज्यांना हा प्रयोग करून बघायचा आहे त्यांना नेमके काय झाले, केले हे समजणार नाही . तरी ते नीट विशद केले पाहिजे . दिवसातून कितीदा, कसला कसला रस घेतला, कसकसा परिणाम होत गेला, आणखी काही खाल्ले की नाही वगैरे सर्व तपशीलवार लिहावे ही विनंती .

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 07/11/2015 - 15:00
ओक साहेब, तुम्ही 10 दिवस रसाहार केलात हे वाचून आनंद झाला परंतु तुमचा हा रिपोर्ट गोंधळात टाकणारा आहे. ज्यांना हा प्रयोग करून बघायचा आहे त्यांना नेमके काय झाले, केले हे समजणार नाही . तरी ते नीट विशद केले पाहिजे . दिवसातून कितीदा, कसला कसला रस घेतला, कसकसा परिणाम होत गेला, आणखी काही खाल्ले की नाही वगैरे सर्व तपशीलवार लिहावे ही विनंती .

In reply to by dadadarekar

चित्रगुप्त 19/10/2015 - 10:20
जूस एकत्र करावा. दिवसभर जर जूसिंग करायचे असेल, तर एकेका रंगाच्या भाज्या-फळे घेऊन वेगवेगळे रस घेऊ शकता. यात अमूकच करावे, असा काही नियम नाही. आवडीनुसार वेगवेगळे प्रयोग करून बघावेत. रसात साखर मिसळू नये. कारली, मेथी, पालक, काकडी, दुधी भोपळा, वगैरेही घालू शकता. निरनिराळ्या रंगांच्या भाज्या-फळात निरनिराळी पोषकद्रव्ये असतात. त्यांची शास्त्रीय नावे वगैरे किचकट माहिती मिळवण्यापेक्षा निरनिराळे रंग ओळखणे सोपे.

In reply to by सुहास पाटील

सुबोध खरे 19/10/2015 - 11:19
रस-आहारावर वीस दिवस दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो हे सांगण्यासाठी डॉक्टर कशाला लागतो? एका गोळीत काम होणारा डॉक्टर त्यांना हवा असतो मग चिकन टिक्का, पनीर कबाब आणि मटण हंडी हाणायला बरे. एक अतिविशाल महिला आहार तज्ञाकडे गेली. पूर्ण दिवसाचा आणी आठवड्याचा आहार त्याने लिहून दिला त्यावर तिने त्यांना विचारले डॉक्टर हा आहार तुम्ही लिहून दिला आहे तो जेवणाच्या अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर? आपली अशी परिस्थिती आहे.

वा वा वा ! मस्त अनुभवसिध्द माहीतीपुर्ण लेख ! अभिनंदन ! आम्हालाही आमचे वजन ७२ वरुन ६५ वर आणायचे आहे , पण मटन भाकरीचा अन ग्लेन्लिव्हेट चा मोह काही सुटत नाही तेव्हा तुर्तास होणे अवघड आहे :(

सुबोध खरे 19/10/2015 - 11:44
कमी वजन म्हणजे निरोगी हे चुकीचे आहे परंतु "प्रमाणात" वजन असणे म्हणजे निरोगी हे बरोबर. आपल्या वय आणि उंचीप्रमाणे वजन प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्या टप्प्याच्या( range) पेक्षा कमी किंवा जास्त असू नये एवढेच.

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट 19/10/2015 - 11:52
एक्जॅक्टली. वजन या आकड्याला आपण इतकं अनन्यसाधारण महत्व देऊन ठेवलंय, की त्याचे कारक, स्नायू, हाडं, बीएमआय, फॅट%, हे आणि इतर अनेक व्हायटल पॅरामिटर्स फाट्यावर मारले जातात. जे खरं तर क्रिटिकल आहे. "वजन कमी करायचंय" इज अ व्हेरी राँग थॉट टू स्टार्ट विथ अ‍ॅट फर्स्ट प्लेस.

वेल्लाभट 19/10/2015 - 11:57
चित्रगुप्तसाहेब तुमचं कौतुक आहे तुमचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे. आणि डेडिकेशन घेण्यासारखं आहे. फक्त काळजी इतकीच घ्या की यू आर्न्ट लूजिंग युअर मसल मास व्हेन यू लूज वेट. कारण त्यातून इतर वेगळे धोके असतात. इथली डॉक्टर मंडळी सांगतीलच. पण ही शॉक डाएट्स, किंवा वेट लॉस डाएट्स जरा जपून करावी, माहिती घेऊन. बाकी अनेक मुद्द्यांशी सहमत. सगळंच शक्य होत नसलं रोजच्या आयुष्यात तरीही निग्रह पक्का असेल तर होऊ शकतं. बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस.

तर्राट जोकर 19/10/2015 - 11:58
माझे वय ३५ आहे, गेल्या १२ वर्षांपासून व्यायाम सुटला. पूर्वी बॉडीबिल्डर होतो. आता फुगलो आहे नुस्ता. बसून काम, आहार-व्यायामकडे दुर्लक्ष. आज उंची ५' ६" वजन ९५ किलो. लेखात वर्णन केलेली, "आता काही होऊ शकत नाही" या विचारापर्यंत आलो, पण एवढाही उशीर झाला नाही हेही कळते आहे. कुठलाही प्रकार सुरू केला की निरुत्साहामुळे जास्त दिवस टिकत नाही. वजन ६८ वर आणायचे आहे. यासाठी कसं प्लानिंग करावं यावर डॉक्टर्स व चित्रगुप्त मार्गदर्शन करतील का?

In reply to by खटपट्या

कसले सपाट पोट आणि कसले काय ...भम्पक पणा इथेच नाही तर परदेशात सुद्धा आहे ....स्वत:ची शी बघतात म्हणे ....कोणत्या lab मध्ये टेस्ट केली ...रिपोर्ट दाखवा ... ..वांग्याचा आणि काकडीचा रस पिऊन काहीही होत नाही .... काळसर्पाचा फोटो एडीट केलेला आहे ....पोटातून तंतुमय किडे कधीच निघत नाहीत ...डोम्बल ... फ्रीडम फ्रॉम बोट्म च्या परवाच्या टोकियो परिषदेत शिन्कीबोका हेच हेच बोम्बलला ... आमच्या पथी ची करा टवाळी आणि मग होऊ द्या ......

In reply to by तर्राट जोकर

चित्रगुप्त 19/10/2015 - 16:53
@ तर्राट जोकरः अजिबात निराश होण्याचे कारण नाही, तुमच्याकडे अजून भरपूर वेळ्/आयुष्य आहे. माझे वय जास्त आणि मूळव्याधीसारखी समस्या असूनही अल्पावधीत त्यातून मुक्त होता आले, तस्मात हा उपाय रामबाण आहे, हे निश्चित. वजन कमी करण्याबाबद एका वेळी फक्त ५ किलो कमी करण्याचे ध्येय ठेऊन सुरुवात करावी, असे वाटते. तेवढे साध्य झाले की दुसरा टप्पा काही दिवस सामान्य आहार घेतल्यानंतर परत सुरू घेऊन करता येईल. एका वेळी दहा-पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस जूसिंग करू नका. माझा मुलगा डॉक्टर असल्याने मी निश्चिंतपणे जास्त दिवस करू शकलो. व्यायामाबद्दल सांगायचे तर माझ्यामते एकदम जिम, वजने वगैरेंपेक्षा योगासने, ताई ची, सायकलिंग, आणि हलके व्यायाम ठीक रहातील. पोहणे शक्य असेल तर अतिउत्तम. संपर्कात रहा.

In reply to by चित्रगुप्त

तर्राट जोकर 19/10/2015 - 17:17
धन्यवाद उत्तराबद्दल. ५ केजी अ टाइम ही टप्पा पद्धत योग्य राहील. माझे झाले की वडिलांनाही सांगेन, त्यांनाही ३० वर्षे मूळव्याधीचा त्रास आहे.

In reply to by तर्राट जोकर

चित्रगुप्त 29/10/2015 - 01:56
तजो: तुम्ही जूसिंग वगैरे करालच, परंतु तुमच्या वडिलांना जर ३० वर्षांपासून मूळव्याध आहे, तर ताबडतोब त्यांना जूसिंग सुरू करवा. त्यांची नीट काळजी घ्या. या कामाला अग्रक्रम द्यावा, असे सांगावेसे वाटते.

वेल्लाभट 19/10/2015 - 11:59
बाकी ते, सर्प, किडे बिडे अगदी तंतोतंत खरं की जरासं एक्झॅगरेटेड? :) सहज विचारतोय. इट्स ऑफुली अमेझिंग. आय मीन मला असं झालं की... 'आर यू किडिंग मी?'

In reply to by वेल्लाभट

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... मीही हेच विचारणार होतो ते किडे पाहुन वाटले ... चित्रगुप्त काका , अमेरिकेला जायच्या आधी चीन कंबोडिया व्हेयेतनाम वगैरे मधे जाऊन झुरंळं बिरळं खाउन् आले होते काय ? =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 19/10/2015 - 17:10
वाचायला जरा घाण वाटेल, म्हणून मी लिहिले नव्हते, पण आता लिहीतो. पाच-सात दिवस जे जूसिंग करणार असतील त्यांनी विष्ठा कशी होते याचे परिक्षण करण्यासाठी अर्धी-पाऊण बादली पाणी घेऊन त्यात करावी. म्हणजे तरंगणार्‍या कृमी सहज दिसून येतील. माझ्या लेखातील सर्व फोटो जालावरून घेतलेले आहेत. त्यातील कृमींसारखेच तंतुमय आकार होते.

In reply to by वेल्लाभट

चित्रगुप्त 19/10/2015 - 17:03
@ वेल्लाभटः 'काळसर्प' हे नाव मी गमतीने पोटातून निघालेल्या घाणीला दिले. मात्र अक्षरशः हातभर लांब, काळ्या रबरासारखी गुंडाळी निघाली होती. अर्थात विसेक वर्षे मी फिस्टुलाचा रोगी आणि १-२ महिन्यांपासून मूळव्याध झालेली असल्याने माझ्या आतड्यात वर्षानुवर्षे साठलेली घाण होती, ती एकदम निघाली म्हणून असे दिसले. सर्वांच्याच पोटात एवढे असेल असे नाही. 'कोलोन प्ल्युकॉईड' असे गुगलले की अनेक फोटो मिळतील. गेल्या वर्षी आणि पुन्हा या वर्षी वीस-पंचवीस दिवस मी जूसिंग केले. दोन्ही वेळी सुरुवातीचे काही दिवस तंतुमय आकार निघाले. जालावर हुडकल्यावर ते परजीवी कृमी असावेत, असा तर्क मी केला. लॅब मधे वगैरे त्यांचे परिक्षण केलेले नाही.

In reply to by चित्रगुप्त

वेल्लाभट 19/10/2015 - 17:07
आयला! हे सॉलिड आहे. आय मीन.. स्केरी ! कमाल आहे तुमची सिरियसली. भारीच. आणि इतका जुना विकार नाहीसा होतो म्हणजे कुछ तो बात है नक्कीच. सहीए बॉस.

सुबोध खरे 19/10/2015 - 11:59
वजन हे फक्त वय आणि उंची या मापात न धरता बारीक बांधा मध्यम बांधा आणि मोठा बांधा या प्रमाणे पण गृहीत धरले पाहिजे पहा http://www.medindia.net/patients/calculators/height_weight_foradults.asp

In reply to by सुबोध खरे

डॉक साब, शरीर प्रकारात १ एक्टोमोर्फिक २ एंडोमोर्फिक ३ एक्सऑमोर्फिक अश्या तीन प्रकारच्या बॉडी फ्रेम्स असलेले ऐकले होते, ह्यावर अजुन प्रकाश टाकू शकाल काय?

चित्रगुप्त 19/10/2015 - 12:08
हा जो रसाहाराचा प्रयोग केला, त्यातून मूळव्याध, फिस्टुला वगैरे बरे होईल, पोटाचा घेर आणि वजन कमी होईल, अशी मला कल्पनाही नव्हती, त्यामुळे हे घडून आल्याचा अतिशय आनंद झाला. 'पोटातला काळसर्प' याची तर कल्पनाही केली नव्हती. आहारातील कॅलरी वगैरेंचाही विचार केला नव्हता. काहीतरी नवीन, वेगळे करून बघण्याची आवड आणि तयारी यातूनच पूर्वी विपश्यनेचा कोर्सही केला होता, तेंव्हा त्यातून अनेक वर्षांची पाठदुखी सुद्धा अशीच अनपेक्षितपणे कायमची बंद झाली होती. माझे वजन ७५-७६ किलो झालेले होते (वय ६४, उंची ५'५") ते ७०-७१ झाले. जिना कष्टाने चढू शकत होतो, तो धावत सुद्धा चढू लागलो. शरीरात 'फाजील' चरबी किती आहे, हे कळावे यासाठी काही खात्रीलायक पद्धत आहे का?

चित्रगुप्त 19/10/2015 - 12:16
बारीक बांधा - मध्यम बांधा - मोठा बांधा यालाच आयुर्वेदात 'वात - पित्त - कफ प्रकृती म्हणतात ना? 'काहीही मेहनत न करता' सुद्धा वात प्रकृतीच्या लोकांच्या जास्त कॅलरी खर्च होतात, पित्त वाल्यांच्या मध्यम आणि कफ वाल्यांच्या अगदी कमी असे ऐकले आहे.

In reply to by चित्रगुप्त

मांत्रिक 19/10/2015 - 13:12
माझ्या थोडया फार अभ्यासानुसार वात पित्त कफ हे मानवी शरीरात पुढील भूमिका बजावतातः १) वात वियोग(dissociation), चलनवलन, हालवाली, चेतना, विघटन, उत्सर्जन यांच्याशी संबंधित आहे. २) पित्त रुपांतरण(transformation), पचन, ऊर्जा, तेज, उष्णता, पोटातील अग्नि/भूक, यांच्याशी संबंधित आहे. ३) कफ संघटन(association), शीतलता, पौष्टिकता, वृद्धी, धारणा यांच्याशी संबंधित आहे. शरीरातील सर्व क्रिया या ३ कॅटॅगरीत बसतात. उदा. एखाद्या लहान अर्भकात कफ हा स्वतःच्या असोसिएशन गुणाधर्मामुळे भराभरा पेशींची, हाडांची वाढ घडवून आणतो. पित्त हा ग्रहण केलेल्या अन्नाचे पचन घडवून आणतो. शरीराला आवश्यक अशी ऊर्जा, तेज पुरवतो. तर वात हा शारीरिक हालचाली, स्नायूंच्या ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया, खेळणे इ. क्रियांना मदत करतो. बाकी तज्ञ मंडळीच सांगू शकतील. मिपावर आनंदा हा आयडी बहुतेक आयुर्वैदिक वैद्य आहेत, असे आठवते.

चित्रगुप्तसाहेब, खूप दिवस वाट पाहयला लावल्यानंतर पाताळेश्वर कट्ट्यांत सांगितलेला कालसर्पवियोगलेख आला... आणि तोही तुमच्या खास शैलीत आणि यथार्थ सुंदर चित्रांसहित ! आता परत एकदा मिपाकट्टाज्यूसभक्षण करायला पुण्यात लवकरच या ! :)

कंजूस 19/10/2015 - 12:23
आमच्या कंपनीचे डॅाक्टरांनी नोकरीच्यावेळी मेडिकल टेस्ट करतांना- १) एक रबरी हातोडीने गुडघ्यांवर ( तिथे मेंदू असतो असं मेडीकल शास्त्रतरी मानत नसावेत ) आणि ढोपरांवर ठोकून पाहिले, २) स्टेथो• ने छातीचे ठोके मोजले, दीर्घ श्वास घेण्यास सांगून मोजले, जागेवरच दोन मिनीटे उड्या मारायला सांगून त्यानंतर मोजले, ३) छातीचं माप श्वास घेण्याअगोदर व नंतर मोजले. ४) वजन घेतले. ५) खोकायला सांगुन पोटाखालचे रिफ्लेक्स पाहिले, ६) आणि( काही लैंगिक रोग वगैरे). ओके म्हणाल्यावर मी त्यांना विचारले बास इतक्या टेस्ट पुरेशा असतात? " होय यातून बरेच कळते." गावातले शेतकरी दहा किलो+ चा नांगर तीन चार किमी खांद्यावर नेतात तो पाहून वाटते असेल यांचे वजन नव्वद किलो तर काय बिघडते?

काका अभिनंदन!! फळांचे ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच? आणि कच्च्या भाज्या पोटात जाताना अनेक जण असेही म्हणतात की न शिजवल्याने त्याचाही त्रास होऊ शकतो. हे कितपत खरे आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ बॅट्याला वजन कमी करायला कोणी सांगितले ???!!!... बहुतेक आंतरजालावर सापडलेला तज्ञ असावा ;) मात्र, बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे रोज अर्धा ते पाऊण तास तरी घाम येऊन नाडीचे ठोके १२० पर्यंत वाढतील इतपत व्यायाम करायला पाहिजे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाखु 20/10/2015 - 09:35
कुणाच्या तरी नजरेत "मावत" नसावा किंवा

भरला

असावा म्हणून हे वजन कमी करण्याचे त्याच्या डोक्यात आले आहे असे आमचा मिपा नगरीचा वार्ताहर कळवतो. दैनीक सध्या आनंद तर्फे कट्टेकर्यांच्या माहीती करता प्रसारीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 20/10/2015 - 12:27
दिसत नसले तरी वजन बरेच आहे ओ. ७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे. अगोदर ७५ होते ते आता हळू हळू व्यायामाने ७२ पर्यंत आणलेय.

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 20/10/2015 - 14:35
बॅट्या लेका तुला गरज नाही बे कमी करायची. मलाच ३ किलो तरी कमी करावे असे वाटू लागलेय. सध्यातरी वन्डे ज्युसडे करायला काहि हरकत नाही. नंतर टेस्ट खेळून पाहावी.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 20/10/2015 - 14:41
नाय बे अभ्या, गरज नक्कीच आहे. नुसते बघून कळत नाय पण तीनचार महिन्यांचे पाप (या शब्दप्रयोगासाठी पोपशास्त्री यांचे पोरगीपटाव शास्त्र पहावे.) तरी नक्कीच आहे त्याचे परिमार्जन करण्याची नितांत गरज आहे. =)) तूही लाग कामाला. वजन कमी केल्यावर खास सपाटपोटप्रीत्यर्थ ज्यूसकट्टा करू.

In reply to by बॅटमॅन

अनुमोदन . फक्त मोबिलीटीच नव्हे तर strength stamina speed agility चारही पाहिजे ! कोणताही ट्रेक करताना आता मला जे साठवलेले ६-८ किलो एक्स्ट्रा फॅट आहे ते जाणवते राव .

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 20/10/2015 - 15:01
आयडियली पाहता खांद्यावर ९-१० किलो वजनाची सॅक घेऊन राजगडसारखा ट्रेक तसा बर्‍यापैकी सहजपणे करता आला पाहिजे. ही अपेक्षा तशी बरीच जास्त आहे सद्यस्थितीकडे पाहता, पण असे काही लक्ष्य समोर ठेवले तर थोडे थोडे करत करत सुधारणा होईल असे वाटते.

चांगला लेख ! मात्र याबरोबरच शादी के पहले आणि शादी के बाद चा फोटो ( आय मीन सुरुवातीचा फोटो आणि प्रयोगानंतरचा फोटो) टाकला असता तर आमच्यासारख्यांना जरा जास्त प्रेरणा मिळाली असती !

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 20/10/2015 - 12:03
पहले और बाद चे फोटो द्यायचे आहेत, पण अद्याप कंबरेचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही (३८ वरुन ३३ वर आली, पण २८-३० वर यायची इच्छा आहे) शिवाय ते सिक्स अ‍ॅब वगैरे जमले तर उत्तमच.

dadadarekar 19/10/2015 - 12:37
आजपासून सुरु केले. दोन काकडी , दोन गाजर , एक सफरचंद , दोन संत्री , थोडी मेथी व चार टोम्याटो. मिस्करातून फिरवून थोडे पाणी घातले. अर्धा लिटर लिक्विड तयार झाले. यात पाणी घातले तर चालते ना ? साखर मीठ घातले नाही. चोथा गाळला नव्हता. चोथ्यासकटच प्यालो. सोबत लिंबू सरबत. संध्याकाळी थोडे दूध , दही , के ळी व खजूर ज्युस करायचा आहे.

चित्रगुप्त 19/10/2015 - 12:53
न शिजवलेल्या भाज्या-फळे हे पचायला कठीण (त्यामुळे अयोग्य), आणी शिजवल्याने त्यातले व्हिटॅमिन वगैरे नष्ट होतात, या दोन्हीवरचा एकत्रित उपाय म्हणजे जूस. नुस्ती कच्ची फळे खाल्ल्यास त्यांचा चोथा शरीराबाहेर टाकायला पचन-संस्थेला एक-दोन दिवस काम करावे लागते, त्यामुळे आतड्यात वर्षानुवर्षे साचलेली घाण बाहेर काढायला मोकळीक मिळत नाही. जूसरद्वारे चोथा आधीच काढून टाकून आपण फक्त पाणी आणि पोषकद्रव्ये घेत असल्याने ते काम सहजपणे केले जाते. शिवाय आतड्यातील परजीवी जंतु (parasites) हे मुख्यतः शर्करा आणि starch वर जगत असतात, त्यांच्या अभावी ते मरून बाहेर पडतात, परिणामी भूक कमी लागू लागते, गोड, मैद्याचे पदार्थ वगैरे खाण्याची इच्छा मावळते. Gluten युक्त धान्ये विशेषतः गहू (मैदा, कणीक इ. चे पदार्थ) पचणे (पोटात विघटित होणे) कठीण असल्याने ते शरिरात हानिकारक द्रव्ये निर्माण करत असतात. त्या ऐवजी ज्वार, बाजरी इ. ची भाकरी वा अठरा धान्याची भाजणी खाणे उत्तम. खरेतर दुग्धजन्य पदार्थ (दूध, खवा, मिठाया) पण कमी करणे बरे. मी लेखाच्या शेवटी दिलेला तूनळीवरील 'Fat, Sick and Nearly Dead' हा व्हिडियो अवश्य बघावा.

In reply to by dadadarekar

मांत्रिक 19/10/2015 - 13:18
आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो. दादूस काय चाललंय काय? एकतर आगोबैनं सुरुवात! मग जुसर हा प्रेमळ उच्चार. मग मिश्किल मिस्कर? चोथ्यासकट कसे प्यालात? चोथा एकतर गिळावा लागणारच किंवा चावावा तरी लागणार?

In reply to by चित्रगुप्त

चोथा चांगला असतो ना शरीराला? पोट साफ होण्यासाठी फायबरयुक्त आहार असावा असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. की हे असे फक्त डाएट पुरते (शरीरशुद्धी पुरतेच..) करायचे असुन नंतर रोजचाच आहार घ्यायचा आहे? अजुन काही शंका, -मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. वीकांताला हे प्रयोग केले तर मदत होईल का? -मध्यंतरी शंखप्रक्षालनासंबंधी पण वाचले होते ज्यात काही विशिष्ट व्यायाम आणि पाणी पिणे ह्याची सांगड घालुन १८-२० ग्लास पाणी पिऊन पोट साफ केले जाते. ह्या क्रियेतही आतडे साफ होत असतील ना? पण तेव्हा असा "काळसर्प" बाहेर पडल्याचे कधी ऐकले नाही. किंवा पंचक्र्मातही बहुदा विरेचनात पोट साफ होते तेव्हाही असे काही बाहेर पडल्याचे ऐकले नाही. ह्या मागे काय करण असु शकेल?

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ 19/10/2015 - 13:38
>>> मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. रात्री पाच सात बदाम भिजवून सकाळी सालं काढून खाणे. मस्त एनर्जी टिकते. याबरोबर सुका मेवा कमी क्वांटम मध्ये जास्त एनर्जी देतोच. बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम. ज्युस बनवल्यास साखर अजिबात नको. डॉक्टरांना प्रश्न - कार्ब्स काही दिवस पूर्ण बंद केले तर काय होईल?

In reply to by प्यारे१

चित्रगुप्त 19/10/2015 - 13:59
बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम.
हे एरवी, म्हणजे जेंव्हा आपण पोळी, भात वगैरे आहार घेत असतो, तेंव्हा ठीक, परंतु शरीर-शुद्धीसाठी रसाहार घ्यायच्या दिवसात ते योग्य नाही, याचे कारण मी एका प्रतिसादात दिलेच आहे. समजा, एक टोपलीभर भाज्या-फळे आपण घेतली तर ती सर्व कच्ची एका दिवसात आपण खाऊ शकत नाही, आणि खाणेही योग्य नाही, मात्र त्यांचा रस सुमारे तीन-चार ग्लास निघेल, तो मात्र आपण सहज पिऊ शकतो, त्यातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळतातच, परंतु चोथा बाहेर टाकून देण्याच्या कामात पचनसंस्था गुंतून रहात नाही, परिणामी जुनी साचलेली घाण काढणे शक्य होते.

In reply to by चित्रगुप्त

dadadarekar 19/10/2015 - 14:08
इतर काहीच न खाल्ल्याने तो काळपट संडास तयार झाला आहे. त्यात आधीची घाण व फळभाज्यातील रंगद्रव्ये दोन्ही असणार.

In reply to by चित्रगुप्त

dadadarekar 19/10/2015 - 13:13
त्यामुळे कच्ची फळे व भाज्या खाव्या लागतील. सकाळी मिक्स जुस दूपारी फळे व भाज्या. रात्री फ्रुट जुस दही घालून ( पंचामृत टाइप) थोडेसे दूध घालावे लागेल. त्यातून क्यालशियम व विट डी मिळेल. ते भाज्या / फळात नसते. यात मोड आलेले गहू , कडधान्ये घेता येतील का ? ... आमची एक एच आय व्ही पेशंट रोज कोर्फड गर , मोड आलेले गहू व कडधानुये खाते.. औषधेही आहेत. तीची तब्येत अगदी निरोगी आहे.
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by यशोधरा

सतिश गावडे 07/10/2015 - 13:27
मंग तसा परतिसादात लिवायचा ना गमतीत लिवलाय म्हनून. आमी शिरेसली घ्यातला नसता. मापी बिपी काय नाय वो. चालतो सग्ला.

In reply to by यशोधरा

रेवती 08/10/2015 - 00:12
ओह! स्वारी, पाह्यले नव्हते. मला वाटलं की ठिकाणाचे नाव आहे. तू जसजशी पुढे जात राहशील तसतसे, निदान जेंव्हा शक्य आहे तेंव्हा ठिकाणाचे नाव कळवत राहिलीस तरी मजा वाटेल.

लै भारी कट्टा झालेला दिसतोय. उत्सवमूर्ती लैच उत्साहे ब्वॉ. बाकी वर्णचाची इष्टाइल लैच आवडली. फोटो मोजकेच पण उत्तम.
त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे.
मराठी सुद्दलेकणाचे नेमके काय काढकाय? पिसं काढणार की काय? ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

त्यांनी कट्ट्यामधे मी सुद्दलेकणाचे काढणार असचं म्हणलेलं होतं. त्यामुळे क्लास, वर्ग का पिसं हा प्रश्णं येणारा काळचं ठरवेल.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 05/10/2015 - 22:42
झेपलं नाय असं नाही. जीभेवरलं पडजीभेवर ढकलावं लागलं इतकंच. तोच प्रश्न चिमणने अक्षरधारासमोर विचारला तेव्हा त्याला यथोचित उत्तर दिलेलं आहे. =))

बॅटमॅन 05/10/2015 - 21:29
वृत्तान्त मस्तच कप्तानसाहेब. पाताळेश्वर ते सुकान्ता ते पुढे अक्षरधारा व मेहता अशा सर्व टप्प्यांत मज्या आली. कप्तान जॅक स्पॅरो, नाखुनकाका, चि.नाखु आणि दिव्यश्री तसेच यमन व पगला गजोधर या सदस्यांशी प्रथमच भेट झाली. (रुमालटाकुनठेवलाआहेतरिनंतरलिहितो) (नाखुकाकांच्यास्पेसबारचाफॅनबॅट्मॅन)

यमन 05/10/2015 - 22:10
यशो ताई आणि माझी पहिली ओळख … " काय खाताय ? मला पण " …. अशी झाली . कॅप्टन राव …तुम्ही खाण्याच्या पदार्थांची नावं कशी विसराल ? १०/१० मार्क . जाताना रीकामे कुकीज चे डबे दिव्यश्री ताई च्या फारीन च्या " खाउणी भरूण णेले" हे. वे. सा. न. ल. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला .

माझी टाईमलाईन पारचं गंडली ब्वॉ ह्यावेळी. जाउंदे आता वल्लींनी एक वृत्तांत लिहावा अशी मागणी =))व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व

In reply to by प्रचेतस

हे बघा बुवांबरोबरच्या कट्ट्याचं वर्णन त्यांचे चहातेचं णीट करु शकतील की नाही. आम्हाला त्यांनी रांगेतही उभं केलं नाही. तस्मात त्या कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही लिहावा हि मागणी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचेतस 05/10/2015 - 22:31
खी खी खी. तो उपवृत्तान्त आम्ही लिहूच. नाखुनकाका जरा अधिकच समरसतेने लिहितील. =)) बाकी गुर्जींच्या चाहत्यांच्या रांगेत खूप लंबर असल्याने ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 05/10/2015 - 22:39
चिमणराव तुम्ही म्हणता तसे तुम्ही काय हल्क, बैल वगैरे कॅटेगरीतले दिसत नाहीत ओ. आपल्या वल्ल्याएवढेच तर आहात. मी पण जरा दोन चार किलो वाढवलो तर वल्ल्याएवढा होईन. :) उंचीला बी अम्मळ तेवढाच हाय.

In reply to by अभ्या..

मी काडीपैलवानापासुन तेवढा फुगलोय, आता हळु हळु कमी व्हायला लागलोय. :/...!!! :(!!!! एक साल बाद फिरसे बारिक होएंगा/

In reply to by प्रचेतस

@ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.>>> असो! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif .............. समांतर धुबुकागोबा-तवामारातृप्त http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/frying-pan-smash.gif ......................... अतीसमांतर :- बाकिचे फोटू कुठ्ठायत? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

@बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन वल्लींना गुद्दे हाणले.>> ह्हूं!!! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ते त्या हत्तीनी माझा छळ सुरू केला म्हणून! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif @नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chainsaw.gif उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला>>> दुष्ट हल कट http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shotgun.gifचिमण! हत्ती पाठोपाठ स्वतःही माझ्यावर गोळीबार केला... ते नै सांगत .. ल्लुल्लुल्लुल्लु! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif @(त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) >> बघ बघ त्या हत्तीचाच गुण लागला तुला. स्वतः करुन दुसय्राच्या अंगावर ढकलून द्यायचा... दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif @आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला.>>> आं sssssssss http://www.sherv.net/cm/emo/angry/pulling-hair-out.gif इसका बदला लिया जाएगा.. http://www.sherv.net/cm/emoticons/war/smiley-with-bomb.gifअगली भ्येट में बराब्बर लिया जाएगा @नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला.>> त्याचा तिथच घेतला की https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ...................... सूड! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/gun.gif

हे घ्या अजून काही फोटो. पाताळेश्वराच्या आवारातील वटवृक्षाखाली गहन चर्चा करून ब्रम्हज्ञान प्राप्त करून घेताना मिपाकर...  . सुकांता आदरातिथ्याची तयारी करत असताना गफ्फांत वेळ घालविणारे मिपाकर आणि त्यांच्या मागे मिपाकरांना पाहण्यासाठी उसळलेला अथांग जनसागर...  . जेवणाबरोबर जेवणाइतक्याच चविष्ट गप्पांचा आस्वाद घेताना...  . बुवांच्या आगमनानंतर बुवांनी (आणि बुवांच्या संबंधात) उपस्थित केलेल्या/झालेल्या मुद्द्यांवर सुकांताच्या बाहेर जमलेले चर्चासत्र...  . पांगापांग व्हायला सुरुवात होण्यापूर्वी काढलेला गृपफोटो...  .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१) वल्ली तात्यांना निळ्या रंगाच्या फ्रेश कलरच्या शर्टात पाहुन साश्चर्य आणंड वाटला . २) त्यांची काळ्या टी शर्ट ची परंपरा चिमणरावांनी चालु ठेवली आहे असे एक सुक्ष्म ऑब्झर्वेशन केले आहे ३) पन्नासरावांच्या जगप्रसिध्द मिशांना मोठ्ठी दाद देण्यात येत आहे ४) नाखुनकाका घुश्श्याने गावडे सरांकडे का बरे पहात आहेत ? गावडे सरांनी त्यांना बोलताना थांबवले की काय ? ५) पाठीवर स्यॅक घेवुन आलेल्या लोकांच्या स्यॅक मधे काय काय असेल ह्याचा साधारण अंदाज बांधता येत आहे ! ६) आणि अखेरीस अखेरच्या फोटोत शेवटी अगोबाने अतृप्त अत्म्याला झपाटलेच हे स्पष्ट होत आहे ! कट्टा मिस झाल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे - प्रगो

रेवती 06/10/2015 - 00:47
भारी झाला की कट्टा! सगळे फोटू पाहून मजा वाटतिये. अगदी पुण्यात गेल्यासारखं वाटतय. मिपाकरांची पुढची पिढी या सगळ्यामध्ये मोठी होतिये. एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन. चांगली बातमी आहे. सुकांताला जाऊन बहुतेक ११ वर्षे झालीत. चिमणबाळाने शेवटी लिहिलाच वृत्तांत. आधी मला खात्री वाटत नव्हती. कबूल केल्यानुसार सगळेजण आले. यशोसारखी महा बिझी सदस्याही आली होती म्हणजे मिपावरील प्रेम बघा! दिव्यश्रीने यशोला रेवती म्हटल्याचे वाचले. यावर काही बोलायचे नाही. तू भेट आता!

In reply to by मुक्त विहारि

नाखु 06/10/2015 - 08:27
आकुर्डीला आलात की लगेचच. बाकी बाबा (महाराजांना) आमचा नमस्कार सांगणे. मुवींच्या बाबांच्या असंख्य भक्तगणांपैकी एक

सगळे फोटो बघुन मनापासुन दुख्ख: झाले. किमान २५ किलोने अजुन हलके होणे भाग आहे. राक्षस वाटतोय मी सगळ्यांपुढे :/!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! दुत्तं दुत्तं बारिक लोक्स!! :/

पैसा 06/10/2015 - 10:02
लै भारी वृत्तांत आणि फटु! जाम धमाल! पुणेकरांनी चहाचा विषय काढल्याबरोबर अख्ख्या एअरटेलला धक्का बसून कॉल ड्रॉप झाला, म्हणजे बघा! तेवढ्यात मुविंना नंबर लागल्यामुळे बाकी मंडळींची खबर घेता आली नै. पण ती दिव्यश्रीने चांगलीच घेतल्याचे कळते. अनाहितांतर्फे दिव्यश्रीला स्टँडिंग ओव्हेशन! हे सगळेजण धोकट्या घेऊन का फिरत आहेत ते मात्र कळले नाई!

इरसाल 06/10/2015 - 12:23
मस्त मज्जा केलेली दिसतेय. बॅट्याचे डोळे स्वप्नाळु आहेत की पेंगुळलेले !!!!!!

उत्तम कट्ट्याचा अत्युत्तम वृत्तांत. डॉक्टरसाहेबांच्या मुलाचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला पण पार्टी ड्यू हे विसरू नका. (कॅश पाठवलीत तरी चालेल.) सर्व कट्टेबाजांचे अभिनंदन. मी येतो आहे पुन्हा डिसेंबरात.

कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे, वृत्तांत वाचून फ्राफुतला इनो संपवला. स्वाती

In reply to by यशोधरा

सतिश गावडे 07/10/2015 - 13:27
मंग तसा परतिसादात लिवायचा ना गमतीत लिवलाय म्हनून. आमी शिरेसली घ्यातला नसता. मापी बिपी काय नाय वो. चालतो सग्ला.

In reply to by यशोधरा

रेवती 08/10/2015 - 00:12
ओह! स्वारी, पाह्यले नव्हते. मला वाटलं की ठिकाणाचे नाव आहे. तू जसजशी पुढे जात राहशील तसतसे, निदान जेंव्हा शक्य आहे तेंव्हा ठिकाणाचे नाव कळवत राहिलीस तरी मजा वाटेल.

लै भारी कट्टा झालेला दिसतोय. उत्सवमूर्ती लैच उत्साहे ब्वॉ. बाकी वर्णचाची इष्टाइल लैच आवडली. फोटो मोजकेच पण उत्तम.
त्या जर्मनीमधे विवाहमंडळ तसचं मराठी सुद्दलेकणाचे काढणार असल्याची खात्रीशीत वार्ता कळलेली आहे.
मराठी सुद्दलेकणाचे नेमके काय काढकाय? पिसं काढणार की काय? ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

त्यांनी कट्ट्यामधे मी सुद्दलेकणाचे काढणार असचं म्हणलेलं होतं. त्यामुळे क्लास, वर्ग का पिसं हा प्रश्णं येणारा काळचं ठरवेल.

In reply to by टवाळ कार्टा

सूड 05/10/2015 - 22:42
झेपलं नाय असं नाही. जीभेवरलं पडजीभेवर ढकलावं लागलं इतकंच. तोच प्रश्न चिमणने अक्षरधारासमोर विचारला तेव्हा त्याला यथोचित उत्तर दिलेलं आहे. =))

बॅटमॅन 05/10/2015 - 21:29
वृत्तान्त मस्तच कप्तानसाहेब. पाताळेश्वर ते सुकान्ता ते पुढे अक्षरधारा व मेहता अशा सर्व टप्प्यांत मज्या आली. कप्तान जॅक स्पॅरो, नाखुनकाका, चि.नाखु आणि दिव्यश्री तसेच यमन व पगला गजोधर या सदस्यांशी प्रथमच भेट झाली. (रुमालटाकुनठेवलाआहेतरिनंतरलिहितो) (नाखुकाकांच्यास्पेसबारचाफॅनबॅट्मॅन)

यमन 05/10/2015 - 22:10
यशो ताई आणि माझी पहिली ओळख … " काय खाताय ? मला पण " …. अशी झाली . कॅप्टन राव …तुम्ही खाण्याच्या पदार्थांची नावं कशी विसराल ? १०/१० मार्क . जाताना रीकामे कुकीज चे डबे दिव्यश्री ताई च्या फारीन च्या " खाउणी भरूण णेले" हे. वे. सा. न. ल. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला .

माझी टाईमलाईन पारचं गंडली ब्वॉ ह्यावेळी. जाउंदे आता वल्लींनी एक वृत्तांत लिहावा अशी मागणी =))व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व

In reply to by प्रचेतस

हे बघा बुवांबरोबरच्या कट्ट्याचं वर्णन त्यांचे चहातेचं णीट करु शकतील की नाही. आम्हाला त्यांनी रांगेतही उभं केलं नाही. तस्मात त्या कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही लिहावा हि मागणी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचेतस 05/10/2015 - 22:31
खी खी खी. तो उपवृत्तान्त आम्ही लिहूच. नाखुनकाका जरा अधिकच समरसतेने लिहितील. =)) बाकी गुर्जींच्या चाहत्यांच्या रांगेत खूप लंबर असल्याने ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 05/10/2015 - 22:39
चिमणराव तुम्ही म्हणता तसे तुम्ही काय हल्क, बैल वगैरे कॅटेगरीतले दिसत नाहीत ओ. आपल्या वल्ल्याएवढेच तर आहात. मी पण जरा दोन चार किलो वाढवलो तर वल्ल्याएवढा होईन. :) उंचीला बी अम्मळ तेवढाच हाय.

In reply to by अभ्या..

मी काडीपैलवानापासुन तेवढा फुगलोय, आता हळु हळु कमी व्हायला लागलोय. :/...!!! :(!!!! एक साल बाद फिरसे बारिक होएंगा/

In reply to by प्रचेतस

@ते बहुधा कुणालाच स्थाण देत नसावेतसे दिसते.>>> असो! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif .............. समांतर धुबुकागोबा-तवामारातृप्त http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/frying-pan-smash.gif ......................... अतीसमांतर :- बाकिचे फोटू कुठ्ठायत? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

@बुवांनी आधी आल्या आल्या अगोबा हत्ती, रानडुक्कर वगैरे चार-पाच प्राण्यांची नावं घेउन वल्लींना गुद्दे हाणले.>> ह्हूं!!! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ते त्या हत्तीनी माझा छळ सुरू केला म्हणून! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif @नंतर मी अजिबात काही केलेलं नसताना http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chainsaw.gif उगाचं चिमण्या बिमण्या म्हणुन खांद्यावर हेल्मेट आपटलं, चार सहा गुद्दे घातले आणि हात पिरगाळला>>> दुष्ट हल कट http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shotgun.gifचिमण! हत्ती पाठोपाठ स्वतःही माझ्यावर गोळीबार केला... ते नै सांगत .. ल्लुल्लुल्लुल्लु! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif @(त्यामुळे वृत्तांत लिहायला उशिर झाला) >> बघ बघ त्या हत्तीचाच गुण लागला तुला. स्वतः करुन दुसय्राच्या अंगावर ढकलून द्यायचा... दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif @आणि नंतर स्वतःला लागलं म्हणुन हात चोळत बसले (हात चोळताना त्यामधे काहितरी दुसरही चोळलं गेलं असल्याचा भास सगळ्यांना झाला.>>> आं sssssssss http://www.sherv.net/cm/emo/angry/pulling-hair-out.gif इसका बदला लिया जाएगा.. http://www.sherv.net/cm/emoticons/war/smiley-with-bomb.gifअगली भ्येट में बराब्बर लिया जाएगा @नंतर बुवांचे गाल (रागाने नव्हे) जरावेळ फुगीर वाटत होते हा भाग अलाहिदा. सगळ्यांनी बुवांना कट्ट्याला नं आल्याचा सामुहिक जाब विचारला. =)). धोत्रास हात घालणे हा प्रयोग काहिजणांनी करुन पाहिला.>> त्याचा तिथच घेतला की https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ...................... सूड! http://www.sherv.net/cm/emoticons/guns/gun.gif

हे घ्या अजून काही फोटो. पाताळेश्वराच्या आवारातील वटवृक्षाखाली गहन चर्चा करून ब्रम्हज्ञान प्राप्त करून घेताना मिपाकर...  . सुकांता आदरातिथ्याची तयारी करत असताना गफ्फांत वेळ घालविणारे मिपाकर आणि त्यांच्या मागे मिपाकरांना पाहण्यासाठी उसळलेला अथांग जनसागर...  . जेवणाबरोबर जेवणाइतक्याच चविष्ट गप्पांचा आस्वाद घेताना...  . बुवांच्या आगमनानंतर बुवांनी (आणि बुवांच्या संबंधात) उपस्थित केलेल्या/झालेल्या मुद्द्यांवर सुकांताच्या बाहेर जमलेले चर्चासत्र...  . पांगापांग व्हायला सुरुवात होण्यापूर्वी काढलेला गृपफोटो...  .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१) वल्ली तात्यांना निळ्या रंगाच्या फ्रेश कलरच्या शर्टात पाहुन साश्चर्य आणंड वाटला . २) त्यांची काळ्या टी शर्ट ची परंपरा चिमणरावांनी चालु ठेवली आहे असे एक सुक्ष्म ऑब्झर्वेशन केले आहे ३) पन्नासरावांच्या जगप्रसिध्द मिशांना मोठ्ठी दाद देण्यात येत आहे ४) नाखुनकाका घुश्श्याने गावडे सरांकडे का बरे पहात आहेत ? गावडे सरांनी त्यांना बोलताना थांबवले की काय ? ५) पाठीवर स्यॅक घेवुन आलेल्या लोकांच्या स्यॅक मधे काय काय असेल ह्याचा साधारण अंदाज बांधता येत आहे ! ६) आणि अखेरीस अखेरच्या फोटोत शेवटी अगोबाने अतृप्त अत्म्याला झपाटलेच हे स्पष्ट होत आहे ! कट्टा मिस झाल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे - प्रगो

रेवती 06/10/2015 - 00:47
भारी झाला की कट्टा! सगळे फोटू पाहून मजा वाटतिये. अगदी पुण्यात गेल्यासारखं वाटतय. मिपाकरांची पुढची पिढी या सगळ्यामध्ये मोठी होतिये. एक्काकाकांच्या चिरंजिवांचे अभिनंदन. चांगली बातमी आहे. सुकांताला जाऊन बहुतेक ११ वर्षे झालीत. चिमणबाळाने शेवटी लिहिलाच वृत्तांत. आधी मला खात्री वाटत नव्हती. कबूल केल्यानुसार सगळेजण आले. यशोसारखी महा बिझी सदस्याही आली होती म्हणजे मिपावरील प्रेम बघा! दिव्यश्रीने यशोला रेवती म्हटल्याचे वाचले. यावर काही बोलायचे नाही. तू भेट आता!

In reply to by मुक्त विहारि

नाखु 06/10/2015 - 08:27
आकुर्डीला आलात की लगेचच. बाकी बाबा (महाराजांना) आमचा नमस्कार सांगणे. मुवींच्या बाबांच्या असंख्य भक्तगणांपैकी एक

सगळे फोटो बघुन मनापासुन दुख्ख: झाले. किमान २५ किलोने अजुन हलके होणे भाग आहे. राक्षस वाटतोय मी सगळ्यांपुढे :/!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! दुत्तं दुत्तं बारिक लोक्स!! :/

पैसा 06/10/2015 - 10:02
लै भारी वृत्तांत आणि फटु! जाम धमाल! पुणेकरांनी चहाचा विषय काढल्याबरोबर अख्ख्या एअरटेलला धक्का बसून कॉल ड्रॉप झाला, म्हणजे बघा! तेवढ्यात मुविंना नंबर लागल्यामुळे बाकी मंडळींची खबर घेता आली नै. पण ती दिव्यश्रीने चांगलीच घेतल्याचे कळते. अनाहितांतर्फे दिव्यश्रीला स्टँडिंग ओव्हेशन! हे सगळेजण धोकट्या घेऊन का फिरत आहेत ते मात्र कळले नाई!

इरसाल 06/10/2015 - 12:23
मस्त मज्जा केलेली दिसतेय. बॅट्याचे डोळे स्वप्नाळु आहेत की पेंगुळलेले !!!!!!

उत्तम कट्ट्याचा अत्युत्तम वृत्तांत. डॉक्टरसाहेबांच्या मुलाचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला पण पार्टी ड्यू हे विसरू नका. (कॅश पाठवलीत तरी चालेल.) सर्व कट्टेबाजांचे अभिनंदन. मी येतो आहे पुन्हा डिसेंबरात.

कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे, वृत्तांत वाचून फ्राफुतला इनो संपवला. स्वाती
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.