मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

मार्गी ·
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन

मार्गी ·

चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !

चाळीस वर्ष वैद्यकीय सेवेशी निगडित कार्यरत असल्यामुळे आदरणीय काका काकू किती मोलाचे कार्य करत आहेत त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

चौथा कोनाडा 20/12/2024 - 11:24
काका- काकू‌ तसे इतरांपेक्षा खूप वेगळे. विशिष्ट ध्येय समोर ठेवून व स्वत:च्या आवडीनुसार जगण्याचं सूत्र ठरवून एकमेकांचे साथीदार बनले. दोघंही तसे मुळात हाडाचे पत्रकार. काकू तर खूप संघर्ष करून समोर आलेली व बंडखोर विचारधारेची पत्रकार. खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यरत असलेली. कला- चित्रकला, मंडल आर्ट ते रद्दी पेपरच्या कलाकृतींपासून पत्रकारिता, अनुवाद व कालांतराने आरोग्याच्या क्षेत्रात काम असा तिचा आवाका. काकासुद्धा तसा. नातेवाईकांसाठी व पुतण्यांसाठी विशेष जिव्हाळ्याचा. सदैव हसतमुख चेहरा आणि कोणत्याही गंभीर विषयामध्येही विनोदबुद्धी शोधणारा. ज्याचं इंग्रजी ऐकावं व वाचत राहावं असा! त्याबरोबरच खूप मोठा व्यासंग असलेला.
काकूला नाजुक तब्येतीच्या अनेक मर्यादा असून आणि पत्रकार म्हणूना काकाला वेळेची बंधनं असूनही दोघांनी हे काम पुढे नेलं. किडनीच्या रुग्णांच्या पलीकडे जाऊन टोकाच्या स्थितीमध्ये असलेल्या (terminally ill) रुग्णांसोबत व कँसर रुग्णांसोबत काम सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या अनुभवातून ते इतर रुग्णांचे वाटाडे बनत गेले.
खरंच... दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती _/\_ त्यांच्या या सत्कर्माला मनःपुर्वक शुभेच्छा !
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट ✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत ✪ "मला मरण हवंय!" ✪ देखभाल करणार्‍यांसमोरच्या अडचणी ✪ मोबाईल व्यसनमुक्ती ✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव ✪ योग्य वेळी थांबण्याची कला नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!

मदत हवी आहे,,,

भम्पक ·

गवि 19/08/2024 - 10:58
श्री म माटेच. सहित्यधारा या त्यांच्या लेख संग्रहातून तो लेख घेतला आहे. दुवा: https://archive.org/stream/Balbharati/Series%202%20Std%207th_djvu.txt

In reply to by गवि

भम्पक 19/08/2024 - 11:35
बाबोव ..... एका झटक्यात डोक्यातली पिरपिर शांत. धन्यवाद गवि जी.... काही मिनिटात तुम्ही किती दिवसांच्या प्रश्नाला मूठमाती दिली.... कृपया ,फटक्यात ओळखले कसे त्यावर थोडं सांगावे ..

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 11:55
बालभारती आणि त्यातले धडे, त्याबद्दल असलेला नॉस्टॅल्जिया हा सामाईक धागा. त्यामुळे अधिक रस वाटून आठवणे अधिक शोधाशोध असे केल्यावर* सापडले पटकन. आता मी एक प्रश्न टाकतो. याच काळात एका कोणत्या तरी इयत्तेत एका लेखकाचा धडा होता. त्यात तो डॉक्टर असतो म्हणा किंवा तत्सम प्रसिद्ध प्रोफेशनल. आणि तो एकदा फुटबॉल खेळतो, त्यात बहुधा जखमी होतो म्हणा किंवा तत्सम काहीतरी. यातील सार असे की नेहमीचे करियर चालू असताना वेगळेच काहीतरी अनपेक्षित करायला जाणे यातील नावीन्य. हा धडा कोणाचा होता ते आठवत नाही. संदर्भ सापडत नाही. डॉ. अवचट असावेत की काय अशीही शंका येते. पण बाकी काहीच आठवत नाही. * बालभारती कंटेंट ऑनलाईन आर्काईव्ह रुपात उपलब्ध आहे हे आठवत होते.

In reply to by गवि

गवि 19/08/2024 - 12:00
या धड्याचा शेवट काहीसा असा होता. तंतोतंत नव्हे पण आशय. बातमीचा मथळा / शीर्षक हा डॉक्टरांना दुखापत असा न असता डॉक्टरांचे अभिनंदन असा असायला हवा होता.

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 12:06
तुमच्या प्रतिसादात स्मायली किंवा टोकेरी कंस असतील तर ते काढून टाकून पुन्हा प्रकाशित करा. टोकेरी कंसामुळे टेक्स्ट एच टी एम एल टॅग सारखे समजले जाते आणि दिसत नाही.

गवि 19/08/2024 - 10:58
श्री म माटेच. सहित्यधारा या त्यांच्या लेख संग्रहातून तो लेख घेतला आहे. दुवा: https://archive.org/stream/Balbharati/Series%202%20Std%207th_djvu.txt

In reply to by गवि

भम्पक 19/08/2024 - 11:35
बाबोव ..... एका झटक्यात डोक्यातली पिरपिर शांत. धन्यवाद गवि जी.... काही मिनिटात तुम्ही किती दिवसांच्या प्रश्नाला मूठमाती दिली.... कृपया ,फटक्यात ओळखले कसे त्यावर थोडं सांगावे ..

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 11:55
बालभारती आणि त्यातले धडे, त्याबद्दल असलेला नॉस्टॅल्जिया हा सामाईक धागा. त्यामुळे अधिक रस वाटून आठवणे अधिक शोधाशोध असे केल्यावर* सापडले पटकन. आता मी एक प्रश्न टाकतो. याच काळात एका कोणत्या तरी इयत्तेत एका लेखकाचा धडा होता. त्यात तो डॉक्टर असतो म्हणा किंवा तत्सम प्रसिद्ध प्रोफेशनल. आणि तो एकदा फुटबॉल खेळतो, त्यात बहुधा जखमी होतो म्हणा किंवा तत्सम काहीतरी. यातील सार असे की नेहमीचे करियर चालू असताना वेगळेच काहीतरी अनपेक्षित करायला जाणे यातील नावीन्य. हा धडा कोणाचा होता ते आठवत नाही. संदर्भ सापडत नाही. डॉ. अवचट असावेत की काय अशीही शंका येते. पण बाकी काहीच आठवत नाही. * बालभारती कंटेंट ऑनलाईन आर्काईव्ह रुपात उपलब्ध आहे हे आठवत होते.

In reply to by गवि

गवि 19/08/2024 - 12:00
या धड्याचा शेवट काहीसा असा होता. तंतोतंत नव्हे पण आशय. बातमीचा मथळा / शीर्षक हा डॉक्टरांना दुखापत असा न असता डॉक्टरांचे अभिनंदन असा असायला हवा होता.

In reply to by भम्पक

गवि 19/08/2024 - 12:06
तुमच्या प्रतिसादात स्मायली किंवा टोकेरी कंस असतील तर ते काढून टाकून पुन्हा प्रकाशित करा. टोकेरी कंसामुळे टेक्स्ट एच टी एम एल टॅग सारखे समजले जाते आणि दिसत नाही.
साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय. तसे मी बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मेल केलाय पण त्यांचे उत्तर काही येईना. आता मिपाकरांनाच विचारतो कि आपल्या वाचनात हा लेख आला असेल तर कृपया त्याच्या लेखकाचे नाव कळवावे. माझ्या मते श्री . म.

महिलादिन-एक चितंन

कर्नलतपस्वी ·

हा लेख सुटला होता वाचनातुन. लेखात काही काही कोट्या भारी आहेत हो!! अवांतर-- एक राजा होता. त्याने दवंडी पिटवली, सर्व पुरुषांनी राजवाड्यात जमावे. सगळे जमले. पुढची सूचना--जो बायकोचा बैल असेल त्याने सफरचंद घेउन जावे आणि जो नसेल त्याने घोडा न्यावा. अर्थतच सफरचंदाची टोपली रिकामी झाली. शेवटी एक महापुरुष घोडा घ्यायला आला. राजाने त्याचा सत्कार केला. सगळे घरी गेले. हा महापुरुष दुसरे दिवशी परत आला. राजाने विचारले "काय झाले" तर म्हणतो "बायको म्हणाली, काळा घोडा अशुभ असतो, बदलुन पांढरा आणा" म्हणुन परत आलोय. राजाने डोक्याला हात लावला आणि त्यालाही सफरचंद दिले. बाकी हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, तो सोडवायला आपण काय सुपरमॅन थोडीच आहोत? तुम्ही चहा करत रहा, आम्ही पीत राहु, काय?

In reply to by nutanm

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे. हे एक विडंबन आहे. नवरा बायकोचे नाते इतके घनिष्ट असते की बरेचवेळा आपण हे विसरतो की नात्या शिवाय प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत, विश्व,आवड निवड वेगळी असते.त्यात दुसर्‍याची ढवळाढवळ नको वाटते. अगदी एक मताने चालणाऱ्या नवरा किंवा बायकोची सुद्धा.मग थोडी चिडचिड होते. आजच्याच भाषेत कधीतरीच एकमेकाला स्पेस द्यायला हवी. लग्न म्हणजे थ्री लेग रेस. कधीतरी थ्री लेग रेस करता बांधलेले पाय मोकळे करून मुक्त पळावे व पुन्हा एकदा थ्री लेग रेस नव्या जोमाने सुरू करावी. हा विचार धरून हे विडंबन लिहीण्याचा प्रयत्न.

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा संग हा चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा : आरती प्रभू

विवेकपटाईत 26/03/2023 - 14:16
मस्त. घरात नवऱ्याने राष्ट्रपती आणि रेव्हेन्यू मंत्र्याचे पदभार सांभाळावा आणि बायकोने प्रधानमंत्री सहित बाकी सर्व पदे. हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

चित्रगुप्त 26/07/2023 - 04:31
मस्त हो कर्नल भौ. पूर्वी वाचायची राहून गेले होतेसे दिसते.
चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली.
-- यावरून हा धागा आठवला. वाचून घ्या एकदा.

हा लेख सुटला होता वाचनातुन. लेखात काही काही कोट्या भारी आहेत हो!! अवांतर-- एक राजा होता. त्याने दवंडी पिटवली, सर्व पुरुषांनी राजवाड्यात जमावे. सगळे जमले. पुढची सूचना--जो बायकोचा बैल असेल त्याने सफरचंद घेउन जावे आणि जो नसेल त्याने घोडा न्यावा. अर्थतच सफरचंदाची टोपली रिकामी झाली. शेवटी एक महापुरुष घोडा घ्यायला आला. राजाने त्याचा सत्कार केला. सगळे घरी गेले. हा महापुरुष दुसरे दिवशी परत आला. राजाने विचारले "काय झाले" तर म्हणतो "बायको म्हणाली, काळा घोडा अशुभ असतो, बदलुन पांढरा आणा" म्हणुन परत आलोय. राजाने डोक्याला हात लावला आणि त्यालाही सफरचंद दिले. बाकी हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, तो सोडवायला आपण काय सुपरमॅन थोडीच आहोत? तुम्ही चहा करत रहा, आम्ही पीत राहु, काय?

In reply to by nutanm

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे. हे एक विडंबन आहे. नवरा बायकोचे नाते इतके घनिष्ट असते की बरेचवेळा आपण हे विसरतो की नात्या शिवाय प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत, विश्व,आवड निवड वेगळी असते.त्यात दुसर्‍याची ढवळाढवळ नको वाटते. अगदी एक मताने चालणाऱ्या नवरा किंवा बायकोची सुद्धा.मग थोडी चिडचिड होते. आजच्याच भाषेत कधीतरीच एकमेकाला स्पेस द्यायला हवी. लग्न म्हणजे थ्री लेग रेस. कधीतरी थ्री लेग रेस करता बांधलेले पाय मोकळे करून मुक्त पळावे व पुन्हा एकदा थ्री लेग रेस नव्या जोमाने सुरू करावी. हा विचार धरून हे विडंबन लिहीण्याचा प्रयत्न.

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा संग हा चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा : आरती प्रभू

विवेकपटाईत 26/03/2023 - 14:16
मस्त. घरात नवऱ्याने राष्ट्रपती आणि रेव्हेन्यू मंत्र्याचे पदभार सांभाळावा आणि बायकोने प्रधानमंत्री सहित बाकी सर्व पदे. हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

चित्रगुप्त 26/07/2023 - 04:31
मस्त हो कर्नल भौ. पूर्वी वाचायची राहून गेले होतेसे दिसते.
चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली.
-- यावरून हा धागा आठवला. वाचून घ्या एकदा.
अस्वीकरण-सदर विडंबन केवळ मनोरंजना साठी लिहीले आहे. वाचल्यानंतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी आगोदरच क्षमा मागतो. बोले तो आज जागतीक महिला दिन है l क्या बात करते हो! मै तो हर रोज महिला दिन मनाता हूँ l सुबह उठते ही उसके लिये एक कप चाय बनाता हूँ l सच कहता हूँ... सुबह शाम हर कोई मुझे आयना दिखाती है l फिर भी, हर महिला मेरे लिये मायनारखती है l कविवर्य बा.भ.

गाण्यासंदर्भात मदत हवी आहे.

शाहिर ·
खालील गाण्याचे अर्धेच शब्द उपलब्ध आहेत.. मिपाकरांना विनंती हे गाणे पूर्णपणे उपलब्ध असल्यास इथे पोस्ट करावे. धन्यवाद! मी पाया पडते पदर पसरते सवत मला हो आणू नका || घरात होती आई ची मी लाडकी गळसरी बापाच्या मोटेला दोर रेशमाचे शेंदरी गोगलगाय मी अशी नखानं येता - जाता खुडू नका मी पाया पडते ..........

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

अनुनाद ·

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

... अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे!

मार्गी ·

नेहमी प्रमाणेच कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा ही लेख मनाला स्पर्शुन गेला. प्रेरणादायी अनुभव, असे वेगळे काही वाचताना मिळणारा आनंद काही औरच असतो. लिहित रहा पैजारबुवा,

मार्गी 10/06/2022 - 14:54
वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. हा विषय खरंच मोठा आहे. अनेकदा मूल १० वर्षांचं होईपर्यंतही पालकांना हा विकार कळालेला नसतो. त्यामुळे उपचार व ट्रेनिंगसाठी उशीर होत जातो. जागरूकता वाढणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.

नगरी 14/06/2022 - 14:18
मला कुमार सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की प्रसव काळात काही गडबड झाली तरी ऑटिझम होतो का?

In reply to by नगरी

मार्गी 16/06/2022 - 11:49
तज्ज्ञ मंडळी सांगू शकतीलच. मी मुलांचं सत्र घेताना थोडी माहिती घेतली होती. त्यामध्ये दिलं होतं की, आईचं वय ३५ च्या पेक्षा जास्त असेल तर असे विकार गर्भामध्ये होण्याची शक्यता थोडी जास्त असते. शिवाय गर्भधारणेमध्ये/ प्रसुतीमध्ये काही अपघात झाल्यासही असं होण्याची शक्यता असते. हे विकार एका अर्थाने स्थिती असल्यामुळे बरे जरी होत नसले तरी त्या रेंजमध्ये तसे मुलं पुष्कळ शिकू शकतात व काही जण नक्कीच स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. गरज असते ती तशी सांगड घालून देण्याची. असो. पुनश्च धन्यवाद.

नेहमी प्रमाणेच कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा ही लेख मनाला स्पर्शुन गेला. प्रेरणादायी अनुभव, असे वेगळे काही वाचताना मिळणारा आनंद काही औरच असतो. लिहित रहा पैजारबुवा,

मार्गी 10/06/2022 - 14:54
वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. हा विषय खरंच मोठा आहे. अनेकदा मूल १० वर्षांचं होईपर्यंतही पालकांना हा विकार कळालेला नसतो. त्यामुळे उपचार व ट्रेनिंगसाठी उशीर होत जातो. जागरूकता वाढणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.

नगरी 14/06/2022 - 14:18
मला कुमार सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की प्रसव काळात काही गडबड झाली तरी ऑटिझम होतो का?

In reply to by नगरी

मार्गी 16/06/2022 - 11:49
तज्ज्ञ मंडळी सांगू शकतीलच. मी मुलांचं सत्र घेताना थोडी माहिती घेतली होती. त्यामध्ये दिलं होतं की, आईचं वय ३५ च्या पेक्षा जास्त असेल तर असे विकार गर्भामध्ये होण्याची शक्यता थोडी जास्त असते. शिवाय गर्भधारणेमध्ये/ प्रसुतीमध्ये काही अपघात झाल्यासही असं होण्याची शक्यता असते. हे विकार एका अर्थाने स्थिती असल्यामुळे बरे जरी होत नसले तरी त्या रेंजमध्ये तसे मुलं पुष्कळ शिकू शकतात व काही जण नक्कीच स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. गरज असते ती तशी सांगड घालून देण्याची. असो. पुनश्च धन्यवाद.
✪ नागपूरमध्ये विशेष मुलांसोबत भेट ✪ विशेष मुलांसोबत चालू असलेल्या कामाची ओळख ✪ स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज? ✪ ये शाम मस्तानी! ✪ मळभ हटताना ✪ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ✪ गरज फक्त सोबत देण्याची सर्वांना नमस्कार. नुकताच नागपूरमध्ये एक सुंदर अनुभव घेता आला. तो अनुभव व त्यासंदर्भात मनात आलेले विचार आपण सर्वांसोबत शेअर करावेसे वाटले. नागपूरमध्ये विशेष मुलांना भेटण्याचा योग आला. काही कामामुळे नागपूरला जाण्य़ाचा योग आला व तिथल्या परिचितांची भेट घेण्याचं ठरवलं. मनमंदिर नेटवर्कमुळे जोडल्या गेलेल्या मंडळींना भेटायची उत्सुकता होती.

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

माहितगार ·

गॉडजिला 27/05/2021 - 10:31
उत्तर हो असेल तर आपला पास, मिपाचे माननीय व जबाबदार साहित्य संपादक हे सर्व हाताळायला त्यांचे ते समर्थ होते आणी आहेत त्यांना सदस्यांकडून या विषयासंबंधी कसल्याही स्पष्टीकरणाची गरज न्हवती आणि नाही असा माझा ठाम विश्वास आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 11:23
* उपरोक्त नविन नियमावलीत नमुद मर्यादा सर्वसामान्यांना लागू होणार आहेत आणि समाज माध्यमांना स्पष्टीकरण मागण्याचा अधिकारही सर्वसामान्यांना देणार आहेत. लागू समाज माध्यमांना होत असली तरी सर्वसमान्य व्यक्तींना सुयोग्य प्रमाणात अंकुश ठेवण्यास जागा निर्माण होते त्यामुळे सकारात्मकपणे पहाणे श्रेयस्कर असावे. * नियमावली केवळ मिपा नव्हे सर्वच समाज माध्यमांना लागू होत असल्यामुळे महत्वाची सर्वसामान्यांच्या माहितीसाठी महत्वाची आहे, आणि इतरांनाही मिपाबाह्य परिस्थितीत सहज वापरली जावी म्हणूनच उपलब्ध केले जाणारे अनुवाद कॉपीराईट फ्री प्रताधिकारमुक्त राहील असे नमुद केले आहे. * मी मिपाचा सर्वसामान्य सदस्य आहे मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे मी इतर सर्वांप्रमाणे अधून मधून मिपा निती इत्यादीवर सभ्य पण कठोर टिकाही करतो, सर्वसामान्यांना साहाय्यभूत कायदे विषयक बाबींवर लेखन ते अनुवाद (मिपाशी संबंध असो नसो) मी नेहमीच पुढाकार घेतला आहे हा ही त्याचाच भाग आहे.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 13:10
आपण मिपाचेच सर्वसामान्य सदस्य आहात मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे हे मान्य आहे... ... तरीही मिपा व्यवस्थापन आपण धाग्यात दिलेल्या नियमावलीचा जो अर्थ स्पष्ट करण्यास सक्षम आहे त्याचेच मिपावर पालन करायचे कि त्या प्रत्यक्ष नियमावलीचे पालन करत मिपावर राहायचे कि मिपाने ती नियमावली मिपासाठी सुधारित केल्यावर त्याचे पालन करत मिपावर नांदायचे याबाबत अत्यन्त कन्फ्युज झालो असल्याने मिपा साहित्य मंडळानेच यावर प्रकाश टाकणे योग्य असे माझे मन झाले आहे. कारण एकदा मिपाने माझ्या कन्फ्युजन मधे क्लेरीटी दिली कि त्याआधारे यापूर्वी मिपावर प्रसिद्ध असलेला व मी ही वाचलेला कोण कोणता मजकूर उडवावा लागेल यावर मि खनबीरपणे मार्गदर्शन करू शकतो असे मला सकृत दर्शनी इंग्रजीतील नियमावली वाचून खात्रीने वाटत आहे...

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:31
नविन नियमावली धोरणात जोडण्यासाठी सुविधादात्यांना आपण विनंती/आग्रह करु शकता. भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली सुप्रीम कोर्टाचे निकाल लक्षात घेऊन यांची प्रधानता बंधनकारक असणे अभिप्रेतच असते. त्या नंतर तुमचे सुविधादाते जसे मिसळपाव यांनी जारी केलेली नियमावलीतून अधिकचे काही जोडले असेल (आणि भारतीय कायद्यास अनुसरुन असेल) ते ते सर्व लागू होणे अभिप्रेत असावे. नविन नियमावली उपरोक्त नियमांचा माध्यम सेवादात्यांच्या नियमावलीत समावेश करण्याचा आदेश देते. पण जरी काही सेवासुविधा दात्यांनी हयगय केली तरी भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली व कोर्टाचे निकाल लागू रहातातच यात कन्फ्युजन खुपसा वाव आणि कारण दिसत नाही, म्हणून आपले कन्फ्युजन समजले नाही.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 15:56
मी मिपावर कोणत्या गोष्टी ठेवल्या नाही पाहीजेत यावर खनबीरपणे मार्गदर्शन करायला सक्षम आहे याची मला खात्री पटली आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 17:53
एकुणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयाचा आवाका आणि बारकाव्यांची संख्या मोठी आहे. सर्वांनाच अगदी चांगले इंग्रजी समजणार्‍यांनाही ईंग्रजीभाषेतील कायदा आणि नियमावलीत वापलेल्या भाषेचे सर्व बारकावे आणि काँटेक्स्ट ठाऊक असतातच असे नाही. त्यामुळे आधी अनुवादास प्राधान्य, मग स्वतः नियमावलीचे पालन करणे आणि मग इतरांनी पालनाचा आग्रह हा अधिक श्रेयस्कर मार्ग असावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. अनेक आभार

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र कोड) नियम 2021 भाग I व्याख्या .— (1) (डब्ल्यू) ̳ सोशल मीडिया इंटरमीडियरी ’म्हणजे एक मध्यस्थ जो प्रामुख्याने किंवा पूर्णपणे दोन किंवा अधिक वापरकर्त्यांमधील ऑनलाइन संवाद सक्षम करतो आणि त्यास सेवा वापरुन माहिती तयार, अपलोड, सामायिकरण, प्रसारित, सुधारित किंवा प्रवेश करण्याची परवानगी देतो; (एक्स) ̳ वापरकर्त्याचा अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ती जो माहिती, होस्टिंग, प्रकाशन, सामायिकरण, व्यवहार, पहाणे, प्रदर्शित करणे, डाउनलोड करणे किंवा अपलोड करणे या उद्देशाने मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या कोणत्याही संगणकाच्या संसाधनावर प्रवेश मिळविते किंवा त्याचा उपयोग करीत असेल आणि ज्यात वापरण्यात सहभागी असलेल्या इतर लोकांचा समावेश असेल अशा संगणक स्त्रोत आणि पत्ता आणि प्रवर्तक; (वाय.) 'खाते खाते' म्हणजे मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या वापरकर्त्याची खाते नोंदणी आणि त्यात प्रोफाइल, खाती, पृष्ठे, हँडल आणि इतर तत्सम समावेश ज्याचा उपयोग मध्यस्थ किंवा प्रकाशकाद्वारे ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे. 3 भाग II. (१) (बी) (i) दुसर्‍या व्यक्तीचे आहे आणि ज्याचा वापरकर्त्यास कोणताही हक्क नाही; (ii) बदनामीकारक, अश्लिल, अश्लील, अर्धांगवायू, शारीरिक गोपनीयतेसह, दुसर्‍याच्या गोपनीयतेस आक्रमक आहे, लिंगाच्या आधारावर अपमान किंवा छळ करणे, निंदनीय, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, पैशाच्या लँडिंग किंवा जुगाराशी संबंधित किंवा प्रोत्साहित करणे किंवा अन्यथा विसंगत अंमलात असलेल्या कायद्यांसह किंवा त्याविरूद्ध; (iii) मुलासाठी हानिकारक आहे; (iv) कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करते; (v) सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन; (vi) संदेशाच्या उत्पत्तीबद्दल पत्ता किंवा दिशाभूल करतो किंवा मुद्दाम खोटी किंवा दिशाभूल करणारी कोणतीही माहिती जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर संप्रेषित करते परंतु कदाचित त्यास तथ्य म्हणून समजले जाऊ शकते; (vii) दुसर्‍या व्यक्तीची तोतयागिरी करते; (viii) भारताची ऐक्य, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका आहे किंवा कोणत्याही संज्ञेय गुन्ह्यासंबंधी चिथावणी दिली जाते किंवा कोणत्याही गुन्ह्याचा तपास रोखू शकतो किंवा इतर देशाचा अपमान करतो आहे; (ix) मध्ये सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणत्याही संगणक कोड, कोणत्याही संगणकाच्या संसाधनाची कार्यक्षमता व्यत्यय आणणे, नष्ट करणे किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेली फाईल किंवा प्रोग्राम आहे; (एक्स) हे स्पष्टपणे खोटे आणि चुकीचे आहे आणि एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा एजन्सीला आर्थिक फायद्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्यासाठी चुकीच्या मार्गाने किंवा छळविण्याच्या उद्देशाने हे कोणत्याही स्वरूपात लिहिले किंवा प्रकाशित केले गेले आहे; 3 भाग II. (२) (बी) या उपनियमांतर्गत एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या प्राप्तीनंतर मध्यस्थाने, चोवीस तासांच्या आत, अशा सामग्रीच्या संबंधात जे या स्वरूपाचे प्राथमिक स्वरूप आहे अशी सामग्री जी अशा व्यक्तीचे खाजगी क्षेत्र उघड करते, अशा व्यक्तीस पूर्ण किंवा आंशिक नग्नतेने दर्शवते किंवा अशा व्यक्तीस कोणत्याही लैंगिक कृतीत किंवा आचरणामध्ये दाखवते किंवा चित्रण करते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तोतयागिरीच्या स्वरुपात आहे अशा कृत्रिमरित्या मोर्फेड प्रतिमांसह वैयक्तिकरित्या, त्याद्वारे होस्ट केलेले, संग्रहित, प्रकाशित केलेले किंवा प्रसारित केलेल्या अशा सामग्रीमध्ये प्रवेश काढून टाकण्यासाठी किंवा अक्षम करण्यासाठी सर्व वाजवी आणि व्यवहार्य उपाय करणे. टीप : गूगल ट्रांसलेट या एप्लीकेशनमधे भाषांतर करुन इथे टाकलेय. थोड़ा वेळ मिळाला की काही शब्द बदलून वाक्य रचना आणि अर्थ लागेल असे बदल करीन. किंवा कोणीही केले तरी चालेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 14:42
धन्यवाद, कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. आपण दिलेले मशिन ट्रान्सलेशन मी गुगल डॉक मध्ये सेव्ह केले आहे. सावकाशीने वेळ देईन. * उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. अनेक आभार

In reply to by माहितगार

>>कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. हम्म. ओके. व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच. >>उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. हे कायम उपयोगी पडणारे आहे. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 17:58
व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच.
हो त्यात साहाय्य हवेच आहे कारण माझी स्वतःची भाषा बर्‍याच जणांना बर्‍याच वेळा अवजड का बोजड वाटते. पण सुलभीकरण करताना एखाद्या शब्दात कायदेविषयक बारकावे असतील तर ते सुटावयास नको म्हणून अनुवाद एखाद दोन संस्करणातून गेलेला बरा पडेल असे वाटते. अनेक आभार

माझं पण 'उत्तरदायित्वास नकार लागू' ( माहीतगारसेठ) हेही प्रकरण सविस्तर समजून सांगा. च्यायला, उगाच काही लचांड नको. -दिलीप बिरुटे (सावध)

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:49
कायद्याच्या अभ्यासकांना सल्लागारपदांच्या संधीचे नवे क्षेत्र खुले होताना दिसते आहे.

गॉडजिला 27/05/2021 - 10:31
उत्तर हो असेल तर आपला पास, मिपाचे माननीय व जबाबदार साहित्य संपादक हे सर्व हाताळायला त्यांचे ते समर्थ होते आणी आहेत त्यांना सदस्यांकडून या विषयासंबंधी कसल्याही स्पष्टीकरणाची गरज न्हवती आणि नाही असा माझा ठाम विश्वास आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 11:23
* उपरोक्त नविन नियमावलीत नमुद मर्यादा सर्वसामान्यांना लागू होणार आहेत आणि समाज माध्यमांना स्पष्टीकरण मागण्याचा अधिकारही सर्वसामान्यांना देणार आहेत. लागू समाज माध्यमांना होत असली तरी सर्वसमान्य व्यक्तींना सुयोग्य प्रमाणात अंकुश ठेवण्यास जागा निर्माण होते त्यामुळे सकारात्मकपणे पहाणे श्रेयस्कर असावे. * नियमावली केवळ मिपा नव्हे सर्वच समाज माध्यमांना लागू होत असल्यामुळे महत्वाची सर्वसामान्यांच्या माहितीसाठी महत्वाची आहे, आणि इतरांनाही मिपाबाह्य परिस्थितीत सहज वापरली जावी म्हणूनच उपलब्ध केले जाणारे अनुवाद कॉपीराईट फ्री प्रताधिकारमुक्त राहील असे नमुद केले आहे. * मी मिपाचा सर्वसामान्य सदस्य आहे मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे मी इतर सर्वांप्रमाणे अधून मधून मिपा निती इत्यादीवर सभ्य पण कठोर टिकाही करतो, सर्वसामान्यांना साहाय्यभूत कायदे विषयक बाबींवर लेखन ते अनुवाद (मिपाशी संबंध असो नसो) मी नेहमीच पुढाकार घेतला आहे हा ही त्याचाच भाग आहे.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 13:10
आपण मिपाचेच सर्वसामान्य सदस्य आहात मिपा प्रशासनाचा प्रतिनिधी नव्हे हे मान्य आहे... ... तरीही मिपा व्यवस्थापन आपण धाग्यात दिलेल्या नियमावलीचा जो अर्थ स्पष्ट करण्यास सक्षम आहे त्याचेच मिपावर पालन करायचे कि त्या प्रत्यक्ष नियमावलीचे पालन करत मिपावर राहायचे कि मिपाने ती नियमावली मिपासाठी सुधारित केल्यावर त्याचे पालन करत मिपावर नांदायचे याबाबत अत्यन्त कन्फ्युज झालो असल्याने मिपा साहित्य मंडळानेच यावर प्रकाश टाकणे योग्य असे माझे मन झाले आहे. कारण एकदा मिपाने माझ्या कन्फ्युजन मधे क्लेरीटी दिली कि त्याआधारे यापूर्वी मिपावर प्रसिद्ध असलेला व मी ही वाचलेला कोण कोणता मजकूर उडवावा लागेल यावर मि खनबीरपणे मार्गदर्शन करू शकतो असे मला सकृत दर्शनी इंग्रजीतील नियमावली वाचून खात्रीने वाटत आहे...

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:31
नविन नियमावली धोरणात जोडण्यासाठी सुविधादात्यांना आपण विनंती/आग्रह करु शकता. भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली सुप्रीम कोर्टाचे निकाल लक्षात घेऊन यांची प्रधानता बंधनकारक असणे अभिप्रेतच असते. त्या नंतर तुमचे सुविधादाते जसे मिसळपाव यांनी जारी केलेली नियमावलीतून अधिकचे काही जोडले असेल (आणि भारतीय कायद्यास अनुसरुन असेल) ते ते सर्व लागू होणे अभिप्रेत असावे. नविन नियमावली उपरोक्त नियमांचा माध्यम सेवादात्यांच्या नियमावलीत समावेश करण्याचा आदेश देते. पण जरी काही सेवासुविधा दात्यांनी हयगय केली तरी भारतीय राज्यघटना ती नुसार पारीत कायदे आणि नियमावली व कोर्टाचे निकाल लागू रहातातच यात कन्फ्युजन खुपसा वाव आणि कारण दिसत नाही, म्हणून आपले कन्फ्युजन समजले नाही.

In reply to by माहितगार

गॉडजिला 27/05/2021 - 15:56
मी मिपावर कोणत्या गोष्टी ठेवल्या नाही पाहीजेत यावर खनबीरपणे मार्गदर्शन करायला सक्षम आहे याची मला खात्री पटली आहे.

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 17:53
एकुणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयाचा आवाका आणि बारकाव्यांची संख्या मोठी आहे. सर्वांनाच अगदी चांगले इंग्रजी समजणार्‍यांनाही ईंग्रजीभाषेतील कायदा आणि नियमावलीत वापलेल्या भाषेचे सर्व बारकावे आणि काँटेक्स्ट ठाऊक असतातच असे नाही. त्यामुळे आधी अनुवादास प्राधान्य, मग स्वतः नियमावलीचे पालन करणे आणि मग इतरांनी पालनाचा आग्रह हा अधिक श्रेयस्कर मार्ग असावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. अनेक आभार

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र कोड) नियम 2021 भाग I व्याख्या .— (1) (डब्ल्यू) ̳ सोशल मीडिया इंटरमीडियरी ’म्हणजे एक मध्यस्थ जो प्रामुख्याने किंवा पूर्णपणे दोन किंवा अधिक वापरकर्त्यांमधील ऑनलाइन संवाद सक्षम करतो आणि त्यास सेवा वापरुन माहिती तयार, अपलोड, सामायिकरण, प्रसारित, सुधारित किंवा प्रवेश करण्याची परवानगी देतो; (एक्स) ̳ वापरकर्त्याचा अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ती जो माहिती, होस्टिंग, प्रकाशन, सामायिकरण, व्यवहार, पहाणे, प्रदर्शित करणे, डाउनलोड करणे किंवा अपलोड करणे या उद्देशाने मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या कोणत्याही संगणकाच्या संसाधनावर प्रवेश मिळविते किंवा त्याचा उपयोग करीत असेल आणि ज्यात वापरण्यात सहभागी असलेल्या इतर लोकांचा समावेश असेल अशा संगणक स्त्रोत आणि पत्ता आणि प्रवर्तक; (वाय.) 'खाते खाते' म्हणजे मध्यस्थ किंवा प्रकाशकाच्या वापरकर्त्याची खाते नोंदणी आणि त्यात प्रोफाइल, खाती, पृष्ठे, हँडल आणि इतर तत्सम समावेश ज्याचा उपयोग मध्यस्थ किंवा प्रकाशकाद्वारे ऑफर केलेल्या सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहे. 3 भाग II. (१) (बी) (i) दुसर्‍या व्यक्तीचे आहे आणि ज्याचा वापरकर्त्यास कोणताही हक्क नाही; (ii) बदनामीकारक, अश्लिल, अश्लील, अर्धांगवायू, शारीरिक गोपनीयतेसह, दुसर्‍याच्या गोपनीयतेस आक्रमक आहे, लिंगाच्या आधारावर अपमान किंवा छळ करणे, निंदनीय, वांशिक किंवा वांशिकदृष्ट्या आक्षेपार्ह, पैशाच्या लँडिंग किंवा जुगाराशी संबंधित किंवा प्रोत्साहित करणे किंवा अन्यथा विसंगत अंमलात असलेल्या कायद्यांसह किंवा त्याविरूद्ध; (iii) मुलासाठी हानिकारक आहे; (iv) कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन करते; (v) सध्या अस्तित्त्वात असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन; (vi) संदेशाच्या उत्पत्तीबद्दल पत्ता किंवा दिशाभूल करतो किंवा मुद्दाम खोटी किंवा दिशाभूल करणारी कोणतीही माहिती जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर संप्रेषित करते परंतु कदाचित त्यास तथ्य म्हणून समजले जाऊ शकते; (vii) दुसर्‍या व्यक्तीची तोतयागिरी करते; (viii) भारताची ऐक्य, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व, परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका आहे किंवा कोणत्याही संज्ञेय गुन्ह्यासंबंधी चिथावणी दिली जाते किंवा कोणत्याही गुन्ह्याचा तपास रोखू शकतो किंवा इतर देशाचा अपमान करतो आहे; (ix) मध्ये सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणत्याही संगणक कोड, कोणत्याही संगणकाच्या संसाधनाची कार्यक्षमता व्यत्यय आणणे, नष्ट करणे किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेली फाईल किंवा प्रोग्राम आहे; (एक्स) हे स्पष्टपणे खोटे आणि चुकीचे आहे आणि एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा एजन्सीला आर्थिक फायद्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्यासाठी चुकीच्या मार्गाने किंवा छळविण्याच्या उद्देशाने हे कोणत्याही स्वरूपात लिहिले किंवा प्रकाशित केले गेले आहे; 3 भाग II. (२) (बी) या उपनियमांतर्गत एखाद्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या प्राप्तीनंतर मध्यस्थाने, चोवीस तासांच्या आत, अशा सामग्रीच्या संबंधात जे या स्वरूपाचे प्राथमिक स्वरूप आहे अशी सामग्री जी अशा व्यक्तीचे खाजगी क्षेत्र उघड करते, अशा व्यक्तीस पूर्ण किंवा आंशिक नग्नतेने दर्शवते किंवा अशा व्यक्तीस कोणत्याही लैंगिक कृतीत किंवा आचरणामध्ये दाखवते किंवा चित्रण करते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तोतयागिरीच्या स्वरुपात आहे अशा कृत्रिमरित्या मोर्फेड प्रतिमांसह वैयक्तिकरित्या, त्याद्वारे होस्ट केलेले, संग्रहित, प्रकाशित केलेले किंवा प्रसारित केलेल्या अशा सामग्रीमध्ये प्रवेश काढून टाकण्यासाठी किंवा अक्षम करण्यासाठी सर्व वाजवी आणि व्यवहार्य उपाय करणे. टीप : गूगल ट्रांसलेट या एप्लीकेशनमधे भाषांतर करुन इथे टाकलेय. थोड़ा वेळ मिळाला की काही शब्द बदलून वाक्य रचना आणि अर्थ लागेल असे बदल करीन. किंवा कोणीही केले तरी चालेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 14:42
धन्यवाद, कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. आपण दिलेले मशिन ट्रान्सलेशन मी गुगल डॉक मध्ये सेव्ह केले आहे. सावकाशीने वेळ देईन. * उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. अनेक आभार

In reply to by माहितगार

>>कायदाविषयास अनुरुप अधिक सुयोग्य पारिभाषिक शब्द व वाक्यरचना उपलब्ध होण्यासाठी दोन तीन संस्करणातून अद्ययावत करावे लागेल. हम्म. ओके. व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच. >>उद्या कुणि तुमच्या लेखनामुळे आमची दिशाभूल झाली असे म्हणावयास नको आणि माहितीची खात्री करून घेण्याची जबाबदारी माहितीच्या वापरकर्त्याची असते याचे स्मरण देण्यासाठी उत्तरदायीत्वास नकार नमुद केलेला बरा पडतो. हे कायम उपयोगी पडणारे आहे. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 27/05/2021 - 17:58
व्यस्थित आणि सुटसुटीत अर्थ लावण्यासाठी एक प्रयत्न करुन पाहीनच.
हो त्यात साहाय्य हवेच आहे कारण माझी स्वतःची भाषा बर्‍याच जणांना बर्‍याच वेळा अवजड का बोजड वाटते. पण सुलभीकरण करताना एखाद्या शब्दात कायदेविषयक बारकावे असतील तर ते सुटावयास नको म्हणून अनुवाद एखाद दोन संस्करणातून गेलेला बरा पडेल असे वाटते. अनेक आभार

माझं पण 'उत्तरदायित्वास नकार लागू' ( माहीतगारसेठ) हेही प्रकरण सविस्तर समजून सांगा. च्यायला, उगाच काही लचांड नको. -दिलीप बिरुटे (सावध)

In reply to by गॉडजिला

माहितगार 27/05/2021 - 14:49
कायद्याच्या अभ्यासकांना सल्लागारपदांच्या संधीचे नवे क्षेत्र खुले होताना दिसते आहे.
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

दिवाळी अंक 2020

मुक्त विहारि ·

लक्की आहात. मी अजून लायब्ररीच्या फेऱयाच मारतेय. यावर्षीचं काही खरं नाहीय बरेच अंक ॲानलाईन आहेत.

मराठी_माणूस 11/03/2021 - 12:18
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो
ही खुप चांगली सवय आहे. दिवाळी अंक हा आपल्य संस्क्रूतीचाच एक भाग आहे आणि ती टिकवुन ठेवायची असेल तर प्रत्येकाने यथाशक्ती काही अंक विकत घ्यावेत. दिवाळी अंक काढणार्‍यांना त्यातुन प्रोत्साहन मिळते.

In reply to by मराठी_माणूस

सुक्या 12/03/2021 - 00:41
सहमत. मी आवर्जुन आवाज / जत्रा / सकाळ चा दिवाळी अंक मागवतो भारतातुन. पार्सल ला पैसे लागतात परंतु त्याला किंमत नाही. माझे बरेच अंक मित्र परीवारात विखुरले गेले आहेत .. आता कोण वाचत असेल माहीत नाही. त्यामुळे संग्रह असा झालाच नाही.

चौथा कोनाडा 11/03/2021 - 12:49
मी देखील २-४ अंक घ्यायचो, मग ४-५ महिन्यांनंतर जवळच्या स्टॉलवरुन इतर घ्यायचो. ऑन-लाईन अवांतर वाचन वाढल्याने गेली २-३ वर्षे यात खंड पडलाय. २०२० या कोविड वर्षीची गोष्ट्च वेगळी होती.

उत्खनक 11/03/2021 - 21:46
तुमच्या कडे मग चंद्रकांत खोतांच्या "अबकडई" चे अंक असतील काय? काहीच अंक असावेत.. कारण खोतांनी नंतर ते बंद करून टाकले.. बर्‍याच वर्षांपासून शोधतोय.

nutanm 11/03/2021 - 21:59
पुरूषस्पंदन, भटकंती,किल्ले (किल्लयांवरील, नांव नीट आठवत नाही.इतिहासावरील,प्रवासावर, हेरकथांचे असल्यास,युद्ध, किशोर आवडत असल्यास, अमृत व वरील. सर्व. वेगवेगळे विषय, जास्तीत जास्त. विविध विषय वाचण्यास मला आवडतात.हल्ली इतिहास, भूगोल खूप आवडतात.

लक्की आहात. मी अजून लायब्ररीच्या फेऱयाच मारतेय. यावर्षीचं काही खरं नाहीय बरेच अंक ॲानलाईन आहेत.

मराठी_माणूस 11/03/2021 - 12:18
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो
ही खुप चांगली सवय आहे. दिवाळी अंक हा आपल्य संस्क्रूतीचाच एक भाग आहे आणि ती टिकवुन ठेवायची असेल तर प्रत्येकाने यथाशक्ती काही अंक विकत घ्यावेत. दिवाळी अंक काढणार्‍यांना त्यातुन प्रोत्साहन मिळते.

In reply to by मराठी_माणूस

सुक्या 12/03/2021 - 00:41
सहमत. मी आवर्जुन आवाज / जत्रा / सकाळ चा दिवाळी अंक मागवतो भारतातुन. पार्सल ला पैसे लागतात परंतु त्याला किंमत नाही. माझे बरेच अंक मित्र परीवारात विखुरले गेले आहेत .. आता कोण वाचत असेल माहीत नाही. त्यामुळे संग्रह असा झालाच नाही.

चौथा कोनाडा 11/03/2021 - 12:49
मी देखील २-४ अंक घ्यायचो, मग ४-५ महिन्यांनंतर जवळच्या स्टॉलवरुन इतर घ्यायचो. ऑन-लाईन अवांतर वाचन वाढल्याने गेली २-३ वर्षे यात खंड पडलाय. २०२० या कोविड वर्षीची गोष्ट्च वेगळी होती.

उत्खनक 11/03/2021 - 21:46
तुमच्या कडे मग चंद्रकांत खोतांच्या "अबकडई" चे अंक असतील काय? काहीच अंक असावेत.. कारण खोतांनी नंतर ते बंद करून टाकले.. बर्‍याच वर्षांपासून शोधतोय.

nutanm 11/03/2021 - 21:59
पुरूषस्पंदन, भटकंती,किल्ले (किल्लयांवरील, नांव नीट आठवत नाही.इतिहासावरील,प्रवासावर, हेरकथांचे असल्यास,युद्ध, किशोर आवडत असल्यास, अमृत व वरील. सर्व. वेगवेगळे विषय, जास्तीत जास्त. विविध विषय वाचण्यास मला आवडतात.हल्ली इतिहास, भूगोल खूप आवडतात.
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो. नमनाला, इतके तेल भरपूर झाले. आता मुळ मुद्द्याकडे येतो.... ह्यावर्षी खालील अंक घेतले 1. उत्तमकथा 2. आवाज, पाटकर 3. साप्ताहिक सकाळ 4. लोकमत, दीपोत्सव 5. दीपावली 6. लोकसत्ता 7. जत्रा, मेनका प्रकाशन 8. जत्रा, महाराष्ट्राची 9. किस्त्रीम 10. धनंजय 11. मौज 12. माहेर 13. ऋतुरंग 14. मोहिनी 15. पद्मगंधा 16.