संस्कृती

श्री गणेशोत्सव - काही ऐतिहासिक कविता - भाग ३

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
25 Sep 2023 - 1:45 am

हे सारं अघळपघळ आहे. कोठेही विचारांचा लीनीयर फ्लो नाही , एकसंधता नाही . असण्याची गरजही नाही. हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे.
_________________________________________________________

संस्कृतीविचार

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
6 Sep 2023 - 11:53 am

PBG1

संस्कृतीकलाइतिहासमुक्तकसमाजप्रवासप्रकटनआस्वादसमीक्षालेखबातमीअनुभवविरंगुळा

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

शीतलउवाच's picture
शीतलउवाच in जनातलं, मनातलं
27 Aug 2023 - 8:58 pm

सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

संस्कृतीधर्मप्रकटनविचारसमीक्षा

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

शीतलउवाच's picture
शीतलउवाच in जनातलं, मनातलं
26 Aug 2023 - 9:35 pm

गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..

संस्कृतीधर्मप्रकटनविचारसमीक्षा

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

शीतलउवाच's picture
शीतलउवाच in जनातलं, मनातलं
26 Aug 2023 - 9:26 pm

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय.

संस्कृतीधर्मप्रकटनविचारलेख

फोरिए सीरीज - अजुन एक चिंतन

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
25 Aug 2023 - 2:22 am

प्रस्तावना :
सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही.

संस्कृतीविचार

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
17 Aug 2023 - 10:38 am


श्रवणी लोभ उपजेल तेथे
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते
तया अधोगती.

संस्कृतीधर्मवाङ्मयविचारआस्वादलेख

नैवेद्य

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
14 Aug 2023 - 8:39 am

n

सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या.

कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे.

त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.

संस्कृतीविचार

वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
8 Aug 2023 - 9:07 am


दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे.
सज्जना परीस आळवावे.
महत्त्व देऊनी.

समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे. नीती कथाही म्हणतात दुर्जन आणि नीच शत्रूला थोडे बहुत देऊन संतुष्ट केले पाहिजे आणि तुल्यबळ शत्रूशी युद्ध केले पाहिजे.

संस्कृतीइतिहासवाङ्मयविचारआस्वादलेख

कथा स्मशानातील लग्नाची

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
5 Aug 2023 - 10:35 am

तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले.

संस्कृतीविडंबनसमाजआस्वादअनुभव