प्रश्न
हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे.
१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?
मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा.
२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?
माझे तरी झाले आहे.
३. कर्मकांड करणार्या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय?