राहणी
पोटभर जेवा !
तर मंडळी देशात सगळं कसा आनंदी आनंद आहे ! अहो कसा नसणार आपल्या नेत्यांनी पोटभर जेवणाची सोय केली आहे.राज बब्बर म्हणतात १२ रु आजपण मुंबईत पोटभर जेवण मिळते. तर त्यांच्याच पक्षातील रशिद मसुद यांनी तर फक्त ५ रु दिल्लीत पोटभर जेवण मिळेते. दिल्ली मुंबई पेक्षा इतके स्वस्त आहे आणि ५ रु च्या जेवणासाठी मुंबईत १२ रु मोजावे लागतात त्यामुळे मुंबईतल्या महागाईचा मी निषेध नोंदवतो.
प्रथम तुजं पाहता........!!!
एका ऑस्ट्रेलिअन शॉर्ट स्टोरीवर आधारित.
मुळ कथा Hate at First Sight , Kathy Lette
मदत हवी आहे
नमस्कार,
कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो.
आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख!
भारताचं खरं दुर्दैव
नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात.
निमित्त कॉफीचं
वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.
वैभवने मला हुकूम सोडला. “साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.”
(कॅन्टीन कॅन्टीन...)
प्रेरणेचा स्त्रोत : आमच्या मित्राचा हा लेख!
हाफिसच्या कॅन्टीनात मागच्याच आठवड्यात घडलेला एक किस्सा..
जेवता जेवता मध्येच एखाद्याने चमत्कारीक आवाज काढल्याने "तो मी नव्हेच" असे दाखवत इतरत्र बघत कसे तोंड लपवावे हे कळणार्या प्रसंगांपैकी एक प्रसंग..
दुपारचे जेवण सुरू होते..
माझ्या डब्यातील भाजी आणि आमच्या वडगाव बुद्रूकच्या हापिसातील एका दुसर्या सहकार्याची भाजी हि काही केल्या संपतच नव्हती...
आणि अचानक 'टुर्रर्रऽऽऽ' असा बारीकसा पण बर्यापैकी ऐकायला जाईलसा आवाज आमच्या टेबलावर झाला..
'सायलेंट स्प्रिंग'चा झंझावात
हल्ली शहरात, खेडयात कोठेही गेले तरी संध्याकाळ होताना घराची दारे खिडक्या बंद करण्याची सर्वांची लगबग दिसते. कारण? डास. आणि मग सुरू होते चर्चा डासांच्या वाढत्या प्रतिकारशक्तीची आणि त्यांना रोखण्यास कमकुवत ठरलेल्या ’डीडीटी’ ची! डीडीटीच्या फवारणीचे प्रमाण वाढवायला पाहिजे; ग्रामपंचायत अथवा महापालिकेने त्याची फवारणी जरा जास्त वेळा केली पाहिजे असे चर्चेच्या ओघात मत जोरदारपणे मांडले जाते. मग कोणीतरी जाणकार ’डीडीटी माणसांसाठी कसे घातक आह” हे सांगतात. अशा चर्चा लहानपणापासून इतक्या वेळी आपण ऐकलेल्या आहेत, की त्याचे मला स्वतःला फारसे गांभीर्य कधी जाणवत नसे.
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
आत्ता पर्यंत मला लोकांनी अनेक प्रश्न "साप" या विषयावर विचारले पण सगळ्या लोकांचा आवडता प्रश्न म्हणजे "तू साप कसे काय पकडायला लागलास ?" या प्रश्नाचे उत्तर सुरवातीला मी खूप प्रामाणिक पणे द्यायचो, आणि मला खूप वेळा विचित्र (खवचट!) प्रतिक्रिया मिळायच्या. त्यामुळे नंतर नंतर लोकं बघून मी उत्तरे द्यायला शिकलो.
श्रावण बाळ
तो बसला होता …. हताश …. भिंतीला पाठ लावून ….
मांड्यांच्या बेचकीत डोकं आणि डोक्यावर स्वतःच्याच हातांचा आधार ….
त्याचे अर्धोन्मीलित डोळे आणि पापण्यांच्या ओल्या कडा ….
पाठीवर पडलेल्या मायेच्या प्रत्येक स्पर्शागणिक निघालेला हुंदका ….
सांत्वनाचे शब्द ऐकत फुटलेले आसवांचे बांध ….
एकाच रेषेत घरंगळत विसावणारे अश्रू ….
जमिनीवर पडून हळूहळू नाहीसे होत होते ….
पण दुःख असं हवेत विरतं का?
ओठ विलग झाले तर क्वचितच निघणारे अस्फुट शब्द ….
अर्थहीन …..
त्याला तर सगळंच निरर्थक …
येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अगम्य शब्दां सारखे…