मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

युयुत्सु ·

युयुत्सु 19/04/2025 - 16:47
फक्त वानगीदाखल - १. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-predict-whether-youll-be-a-conservative-or-a-liberal/280677/ २. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254 " Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."

विवेकपटाईत 21/04/2025 - 18:28
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्‍यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात. उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय. मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.

युयुत्सु 21/04/2025 - 20:14
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 22/04/2025 - 12:20
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 01/05/2025 - 20:23
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?

युयुत्सु 21/04/2025 - 20:15
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 27/04/2025 - 17:22
@ मुक्त विहारि मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्‍या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्‍यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by युयुत्सु

तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर, खालील काही साईट देतो. https://www.rss.org/hindi/ https://vanvasi.org/ ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या. आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा. संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...

In reply to by युयुत्सु

RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या... मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो.... स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता? असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता.... आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 27/04/2025 - 20:51
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे. परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल. संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.." तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल... ते पण हुकलेलेच होते.

In reply to by युयुत्सु

https://vanvasi.org/our-team/ ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत. स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...

युयुत्सु 28/04/2025 - 07:24
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society." https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans

सुबोध खरे 01/05/2025 - 10:31
कशाला चर्चा करायची? जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले. बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?

In reply to by सुबोध खरे

RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे... आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 02/05/2025 - 10:02
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?

युयुत्सु 02/05/2025 - 10:19
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.

सुबोध खरे 02/05/2025 - 10:57
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही. लोल

युयुत्सु 30/06/2025 - 12:06
https://www.youtube.com/watch?v=962u6MAwp2I कालच हा व्हिडीओ बघितला आणि माझी वर घेतलेली भूमिका परत एकदा तपासली (जी बरोबर होती). सदर गृहस्थ युपिएससी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत शांतपणे, अभिनिवेश मध्ये न आणता शिकवतात म्हणुन मी अधून्मधून यांचे व्हीडीओ बघत असतो. परिवर्तनाची मागणी करणारे, त्याच्या बाजूने उभे राहणारे ते डावे आणि "जैसे थे" वादी/परंपरावादी उजवे अशी ही मांडणी आहे.

गामा पैलवान 30/06/2025 - 18:29
युयुत्सु,
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 30/06/2025 - 18:48
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला?> समजा अ ही एक व्यक्ती आहे. तीने दावा केला की "मी सनातनी" आहे आणि समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?" तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात दोन्ही पक्ष काय उत्तर देणार, याची मला उत्सूकता आहे.

सुबोध खरे 30/06/2025 - 18:56
मुळात कोर्टात टिकेल अशी व्याख्या देण्याचा प्रसंग उद्भवला आहे का? साधं सरळ आहे ज्या व्यक्ती ने दावा केला की "मी सनातनी" आहे तिला तो दावा सिद्ध करायला सांगतात. त्या व्यक्तीने दिलेले संदर्भ किंवा पुरावे आणि सध्या कायदयात असेलल्या तरतुदीप्रमाणे न्यायालय निर्णय देतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक नाही.

सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 30/06/2025 - 19:51
सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?> अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नि:संदिग्ध व्याख्या असणे आवश्यक ठरते.

गामा पैलवान 01/07/2025 - 00:00
युयुत्सु,
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"
सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.

युयुत्सु 19/04/2025 - 16:47
फक्त वानगीदाखल - १. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-predict-whether-youll-be-a-conservative-or-a-liberal/280677/ २. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254 " Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."

विवेकपटाईत 21/04/2025 - 18:28
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्‍यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात. उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय. मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.

युयुत्सु 21/04/2025 - 20:14
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 22/04/2025 - 12:20
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म 01/05/2025 - 20:23
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?

युयुत्सु 21/04/2025 - 20:15
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 27/04/2025 - 17:22
@ मुक्त विहारि मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्‍या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्‍यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by युयुत्सु

तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर, खालील काही साईट देतो. https://www.rss.org/hindi/ https://vanvasi.org/ ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या. आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा. संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...

In reply to by युयुत्सु

RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या... मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो.... स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता? असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता.... आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 27/04/2025 - 20:51
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे. परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल. संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.." तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल... ते पण हुकलेलेच होते.

In reply to by युयुत्सु

https://vanvasi.org/our-team/ ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत. स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...

युयुत्सु 28/04/2025 - 07:24
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society." https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans

सुबोध खरे 01/05/2025 - 10:31
कशाला चर्चा करायची? जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले. बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?

In reply to by सुबोध खरे

RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे... आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु 02/05/2025 - 10:02
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?

युयुत्सु 02/05/2025 - 10:19
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.

सुबोध खरे 02/05/2025 - 10:57
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही. लोल

युयुत्सु 30/06/2025 - 12:06
https://www.youtube.com/watch?v=962u6MAwp2I कालच हा व्हिडीओ बघितला आणि माझी वर घेतलेली भूमिका परत एकदा तपासली (जी बरोबर होती). सदर गृहस्थ युपिएससी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत शांतपणे, अभिनिवेश मध्ये न आणता शिकवतात म्हणुन मी अधून्मधून यांचे व्हीडीओ बघत असतो. परिवर्तनाची मागणी करणारे, त्याच्या बाजूने उभे राहणारे ते डावे आणि "जैसे थे" वादी/परंपरावादी उजवे अशी ही मांडणी आहे.

गामा पैलवान 30/06/2025 - 18:29
युयुत्सु,
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 30/06/2025 - 18:48
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला?> समजा अ ही एक व्यक्ती आहे. तीने दावा केला की "मी सनातनी" आहे आणि समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?" तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात दोन्ही पक्ष काय उत्तर देणार, याची मला उत्सूकता आहे.

सुबोध खरे 30/06/2025 - 18:56
मुळात कोर्टात टिकेल अशी व्याख्या देण्याचा प्रसंग उद्भवला आहे का? साधं सरळ आहे ज्या व्यक्ती ने दावा केला की "मी सनातनी" आहे तिला तो दावा सिद्ध करायला सांगतात. त्या व्यक्तीने दिलेले संदर्भ किंवा पुरावे आणि सध्या कायदयात असेलल्या तरतुदीप्रमाणे न्यायालय निर्णय देतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक नाही.

सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 30/06/2025 - 19:51
सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?> अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नि:संदिग्ध व्याख्या असणे आवश्यक ठरते.

गामा पैलवान 01/07/2025 - 00:00
युयुत्सु,
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"
सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत... ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे.

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

Bhakti ·

प्रचेतस 19/04/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/04/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.

प्रचेतस 19/04/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/04/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.
लेखनप्रकार
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा

युयुत्सु ·

आग्या१९९० 18/04/2025 - 12:17
असताना त्याने मला न मागता काही सूचना केल्या, तसेच "असे का करत नाही?" असे विचारले रोचक आहे. बऱ्याचदा आपण एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने अभ्यास करत असतो, मार्गदर्शक असेल तर त्यात सुधारणा होऊ शकते. ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 18/04/2025 - 12:21
ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.
ग्रोकचा नवीन अवतार (ग्रोक स्टुडीओ) अवश्य पहा!

आग्या१९९० 18/04/2025 - 12:17
असताना त्याने मला न मागता काही सूचना केल्या, तसेच "असे का करत नाही?" असे विचारले रोचक आहे. बऱ्याचदा आपण एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने अभ्यास करत असतो, मार्गदर्शक असेल तर त्यात सुधारणा होऊ शकते. ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 18/04/2025 - 12:21
ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.
ग्रोकचा नवीन अवतार (ग्रोक स्टुडीओ) अवश्य पहा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा ==================== === मंडळी, अपेक्षेप्रमाणे युयुत्सुनेट या खेपेला चांगलंच गंडलं. पण क्लेमास्पेस डायाग्रॅमने मात्र लाज राखली... मिपावर भाकीते प्रसिद्ध करायला लागल्यापासून माझ्या या अभ्यासाला एक शिस्त आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे ए०आय० सारखा "दिव्यातला राक्षस" मला न थकता "आता काय करू?" असा प्रश्न सतत विचारत असतो. सगळ्याना पटणार नाही आणि पटावे अशी माझी अपेक्षा पण नाही. पण ए० आय० आता मानवासारखा जागृत झाल्याचा अनुभव मी अर्धा डझनवेळा तरी घेतला आहे. आता तर हद्द झाली.

पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

विजुभाऊ ·

चित्रगुप्त 17/04/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 17/04/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस 17/04/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti 17/04/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख 26/04/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.

चित्रगुप्त 17/04/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 17/04/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस 17/04/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti 17/04/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख 26/04/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय पुस्तक : लढा आळशीपणाशी लेखक: चकोर शाह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस. परिचय कर्ता : चकोर शाह. रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री: इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की. या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते.

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

जर्द पिवळी दुपार

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त 18/04/2025 - 23:00
जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

In reply to by चित्रगुप्त

"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

वामन देशमुख 20/04/2025 - 14:50
"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!

चित्रगुप्त 18/04/2025 - 23:00
जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

In reply to by चित्रगुप्त

"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

वामन देशमुख 20/04/2025 - 14:50
"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!
लेखनविषय:
जर्द पिवळी दुपार दार ठोठावत येते आत आत कोंडलेले झळीनेच धुमसते घोर फुफाटा धुळीचा अणु रेणू तापलेला मृगजळाच्या काठाशी निवडुंग फोफावला गारव्याची शीळ निळी दूर विजनी घुमते तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते

वकील

युयुत्सु ·

माहितगार 16/04/2025 - 17:20
.. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता. ..
अशा वाक्यांबाबत साशंकता वाटते. मला विशेषतः राज्यसभेतील आणि अंशतः लोकसभेतील वकिलांच्या आणि विवीध पक्ष प्रवक्ते वकीलांच्या पडद्यामागचे रोल्स काय असतात याचे बरेच कुतुहल आहे ( irrespective of political parties)

सोत्रि 17/04/2025 - 06:06
आजकाल एखादा वकील काही कारणाने तडफडतांना दिसला तर मला खूप आनंद होतो.
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ह्या लेखातील 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल. तुम्ही करत असलेलं इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान आणि स्वरैक्य ध्यान यांची परिणामकता वाढवायचा प्रयत्न करावा लागेल. - (मुमुक्षु) सोकाजी

युयुत्सु 17/04/2025 - 07:52
श्री० सोकाजी प्रतिसादाबद्दल आभार! मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल हा निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतो. त्याची कारणे येणे प्रमाणे- ० आपण माझे ध्यानमार्गातले गुरु/मार्गदर्शक नसल्याने मी आपले वरील मूल्यमापन विचारात घेऊ शकत नाही. एखाद्या "तोट्यामुळे", "अपयशा"मुळे एखादे तंत्र्/उपचार फेल गेलं असं म्हणणे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ० पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही. त्यात व्यावहारिक अडचणी (आणि धोके) असतात याची तुम्हाला कल्पना नसली तरी मला आहे. शिवाय एकदा मी राग नाहीसा होणे म्हणजे काय ते चांगले अनुभवले आहे. याबाबतीत मी "अनुभवी साधकांपेक्षा" एखादा न्युरो सायंटिस्ट काय म्हणतो याला जास्त महत्त्व देईन. ० बरेच लोक आयडीयल आणि ऑप्टीमल यात दोन संकल्पनांमध्ये गल्लत करतात. एखाद्याचे आदर्श वजन ७०-८० किलो असायला हवे पण त्याने जर त्रास वाढणार असेल तर त्या आदर्श स्थितीला अर्थ नाही. मग ५-१० किलो किंवा जेव्हढे कमी करणे शक्य आहे तेव्हढे कमी करणे पण शहाणपणाचे ठरते. . हा प्रतिसाद शक्य तितक्या सौम्य आणि सभ्य भाषेत देऊ शकलो ते ध्यानाने प्राप्त झालेल्या सिद्धींमुळेच...तेव्हा माझ्या ध्यानसाधनेबद्दल तुम्ही निश्चिंत असावे ही विनंति.

सोत्रि 17/04/2025 - 10:58
पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही
ओके, ह्या स्पष्टीकरणबद्दल धन्यवाद. ही भूमीका आधिच माहिती असती तर माझा आधिचा प्रतिसाद दिला नसता, त्यामुळेच निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतोय. - (समंजस) सोकाजी

माहितगार 16/04/2025 - 17:20
.. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता. ..
अशा वाक्यांबाबत साशंकता वाटते. मला विशेषतः राज्यसभेतील आणि अंशतः लोकसभेतील वकिलांच्या आणि विवीध पक्ष प्रवक्ते वकीलांच्या पडद्यामागचे रोल्स काय असतात याचे बरेच कुतुहल आहे ( irrespective of political parties)

सोत्रि 17/04/2025 - 06:06
आजकाल एखादा वकील काही कारणाने तडफडतांना दिसला तर मला खूप आनंद होतो.
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ह्या लेखातील 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल. तुम्ही करत असलेलं इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान आणि स्वरैक्य ध्यान यांची परिणामकता वाढवायचा प्रयत्न करावा लागेल. - (मुमुक्षु) सोकाजी

युयुत्सु 17/04/2025 - 07:52
श्री० सोकाजी प्रतिसादाबद्दल आभार! मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल हा निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतो. त्याची कारणे येणे प्रमाणे- ० आपण माझे ध्यानमार्गातले गुरु/मार्गदर्शक नसल्याने मी आपले वरील मूल्यमापन विचारात घेऊ शकत नाही. एखाद्या "तोट्यामुळे", "अपयशा"मुळे एखादे तंत्र्/उपचार फेल गेलं असं म्हणणे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ० पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही. त्यात व्यावहारिक अडचणी (आणि धोके) असतात याची तुम्हाला कल्पना नसली तरी मला आहे. शिवाय एकदा मी राग नाहीसा होणे म्हणजे काय ते चांगले अनुभवले आहे. याबाबतीत मी "अनुभवी साधकांपेक्षा" एखादा न्युरो सायंटिस्ट काय म्हणतो याला जास्त महत्त्व देईन. ० बरेच लोक आयडीयल आणि ऑप्टीमल यात दोन संकल्पनांमध्ये गल्लत करतात. एखाद्याचे आदर्श वजन ७०-८० किलो असायला हवे पण त्याने जर त्रास वाढणार असेल तर त्या आदर्श स्थितीला अर्थ नाही. मग ५-१० किलो किंवा जेव्हढे कमी करणे शक्य आहे तेव्हढे कमी करणे पण शहाणपणाचे ठरते. . हा प्रतिसाद शक्य तितक्या सौम्य आणि सभ्य भाषेत देऊ शकलो ते ध्यानाने प्राप्त झालेल्या सिद्धींमुळेच...तेव्हा माझ्या ध्यानसाधनेबद्दल तुम्ही निश्चिंत असावे ही विनंति.

सोत्रि 17/04/2025 - 10:58
पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही
ओके, ह्या स्पष्टीकरणबद्दल धन्यवाद. ही भूमीका आधिच माहिती असती तर माझा आधिचा प्रतिसाद दिला नसता, त्यामुळेच निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतोय. - (समंजस) सोकाजी
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे... आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता.

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त 16/04/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 16/04/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ 16/04/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी 16/04/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 16/04/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त 16/04/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 16/04/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ 16/04/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी 16/04/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 16/04/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,