मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पट्टदकल १: काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर, गळगनाथ आणि संगमेश्वर मंदिरे

प्रचेतस ·

माहितीपूर्ण लेखन म्हणजे वल्ली असा एक अलिखित नियमच झाला आहे. पट्टदकल्लूचा प्रवास आवडला. काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर या लहान मंदिरांबरोबर, गळगनाथ आणि संगमेश्वर ही मंदिरंही आम्ही आपल्या लेखनातून पाहिली. सर्वच छायाचित्रे सुंदर आली आहेत. नंबर एकचं छायाचित्र अजून मोठ्या आकारात टाकलं असतं तर, अजुन आवडलं असतं. बाकी, मंदिरांच्या वेगवेगळ्या शैली त्यांची रचना सविस्तर माहिती देणारं लेखन मनापासून आवडलं. वल्लीशेठ लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

सुंदर प्रचि!! आज फक्त प्रचि बघितली, लेख नंतर निवांतपणे वाचणार. आणि हो, मालिकाही परत वाचायला लागेलच, कारण हा लेख एक वर्षानंतर आला आहे, त्यामुळे लिंक गेली आहे. पुढचे भाग जरा पटापट येउंद्या. तुमच्या लेखांमुळे कुठल्याही मंदीरात गेलो की मूर्तीकामाकडे नीट बघायला शिकतो आहे, कधी कधी थोडेफार कळतेही. बरेचदा कळत नाही. पण बघण्याची नजर आली हेही नसे थोडके. आभार!!

कंजूस Tue, 05/06/2025 - 18:09
एक सूचना .... इथे कधी भेट दिली हे लिहावे. धागा वेगळा वाचल्यास त्यावेळी कसे होते याची नोंद होते. जावे कसे हेसुद्धा द्या. जरा वरवर पाहिले झाल्यास किती वेळ लागेल याचा अंदाज. कुणाकडे अर्धा दिवस असेल तर त्याचा उपयोग होतो. ------------- माझा अनुभव - पर्यटक अर्ध्या तासात दर्शन उरकतात, गाईड घेत नाहीत.

In reply to by कंजूस

प्रचेतस Fri, 05/09/2025 - 20:20
धन्यवाद काका, मुळात आधीच्या लेखांमध्ये तपशीलवार माहिती दिली होती त्यामुळे येथे द्विरुक्ती होईल म्हणून दिले नाही. तरी पुढच्या भागात अजून थोडे तपशील देण्याच्या दृष्टीने लिहितो. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथे मंदिरशैली, तसेच मूर्तीशास्त्र माहिती असल्याने गाईड आम्ही तरी घेतला नव्हता. त्यावाचून काही अडले पण नाही. मात्र येथे जाणाऱ्या पर्यटकांनी (ज्यांना मूर्तीशास्त्र माहिती नाही त्यांनी) तो आवर्जून घ्यावा अन्यथा येथे मंदिरे स्वतःच पाहणे अवघड आहे. मग ते केवळ भोज्याला शिवून आल्यासारखे होईल.

In reply to by प्रचेतस

कंजूस गुरुवार, 05/22/2025 - 19:25
तुम्हीच गाईड आहात. पण इतर लोक काय करतात ते मी पाहिले. मुख्य म्हणजे खूप जाहिराती करूनही बदामी, हंपी दुर्लक्षितच राहिले होते. सहल आयोजकांनीही लक्ष दिले नव्हते कारण विचारणा होत नव्हती. पुण्यातील एका सहल आयोजकांची जाहिरात पाहिली त्यात हा भाग अधिक गोकर्ण, मुर्डेश्वर, श्रींगेरी धरून पंचाऐंशी हजार रु दाखवले होते.(२०१९) कोण जाणार आणि काय समजणार? बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल ही एक मोहीम होती ज्यामध्ये दगड कापून रचून देवळे बांधण्याचे प्रयोग झाले. या अगोदर चौथ्या शतकाच्या अगोदर गुंफा खोदून त्यात देवळे झाली परंतू तशा योग्य जागा लवकरच संपल्या. परदेशांत घुमट किंवा कमानी बांधल्या जात होत्या पण ती पद्धत वापरली गेली नाही. दगडांच्या मोठ्या लाद्या ठेवून मजले, शिखरं बांधण्यात आली. कापलेले दगड सांधा मारून जोडताना त्यात मूर्तीही कोरल्या. पूर्ण त्रिमिती मूर्तींऐवजी अर्धउठाव पद्धत वापरली आणि काम सोपे केले. काम भराभर करण्याच्या प्रयत्नांत मूर्तींचे चेहरे आणि भाव मात्र कायमचे गायब झाले/ होत गेले.

In reply to by कंजूस

प्रचेतस Fri, 05/23/2025 - 08:44
आजही हंपी, बदामी दुर्लक्षितच आहे. हंपी मात्र आज जरा ट्रॅव्हल कंपन्यांच्या रडारवर आलेलं आहे. बदामी मात्र अजूनही नाही. पट्टदकल, ऐहोळेला तर फारसं कुणी जातच नाही, मग महाकूट तर सोडूनच द्या. आणि जे आहे ते चांगलंच आहे त्यामुळे. शिवाय ही ठिकाणी लीजर टुरिझममध्ये येत नाहीत, भरपूर पायपीटीची तयारी हवी, मूर्ती समजायला हव्यात. बदामीचा उपयोग तर हंपीला जाण्याआधी एक स्टेपिंग स्टोन म्हणून केला जातो. केवळ एखादा मुक्काम करुन किंवा तोही न करताच दिवसा बदामी लेणी करुन लोक रात्री मुक्कामाला हंपीत जातात.

श्वेता२४ गुरुवार, 05/22/2025 - 12:42
तुमची सर्व भटकंती अगदी माहितीपूर्ण असते. मी ज्यावेळी जाईन तेव्हा तुमच्या लेखातील माहितीआधारे सर्व पाहिन, गाईडची गरजच नाही! :))

सस्नेह Sat, 05/24/2025 - 21:38
सुरेख फोटो आणि रोचक माहिती ! पट्टदकल पाहिले आहे. कलाकृती श्रेष्ठ आहेत यात वादच नाही. पण कुठेतरी एक भकासपणा जाणवत राहिला जो बदामघी- ऐहोळेत नाही.

In reply to by सस्नेह

प्रचेतस Sun, 05/25/2025 - 08:38
पट्टदकल मला तरी अजिबात भकास वाटलं नाही, उलट मुख्य विरुपाक्ष मंदिरात अजूनही पूजा चालू असल्याने एक प्रकारचा जीवंतपणा वाटतो. शिवाय इथल्या मूर्ती खूप जास्त प्रमाणात सुस्थितीत आहेत. मुस्लिम आक्रमणाचा फटका येथे अत्यंत कमी प्रमाणात बसलेला दिसतो. शिवाय इथले लालसर बदामी रंगाची मंदिरे दिवसाच्या कोणत्याही वेळेत विविध लोभस रूपे दाखवतात.

In reply to by प्रचेतस

किल्लेदार Mon, 05/26/2025 - 17:30
म्हणालात ते खरं आहे. पट्टडकल ची मंदिरे जास्त सुस्थितीत आणि जास्त कलाकुसर असलेली आहेत. मलाही इथली व्हाइब बदामीपेक्षा जास्त सकारात्मक वाटली.

कपिलमुनी Tue, 05/27/2025 - 08:09
ऍप बनवून जिथे पर्यटक उभा आहे तिथल्या मूर्तींची माहिती त्याच्या भाषेत देता येऊ शकते. फ्रान्स मध्ये म्युझियम साठी असे अँप असलेले हेडफोन भाड्याने देतात .. गाईड नसेल तेव्हा हे फार उपयोगी आहे.. भारतात अशा सुविधा अभावानेच दिसतात

In reply to by कपिलमुनी

कंजूस Tue, 05/27/2025 - 09:28
आपण करायचं का? पण नकोच. भारतीय प्रेक्षक लाखात दोन असतील की त्यांना माहिती घेत स्वतंत्र फिरायचं असतं. "आम्ही असे गेलो, असं गिळलं, असे राहिलो" एवढंच करायचं असतं. त्यांच्या ओळखीचे कुणी गेले असतील त्यांचं ऐकलं की लगेच तिथे जायचं असतं. आणि मुख्य म्हणजे आयोजित सहलीतच.

दुर्गविहारी Wed, 06/11/2025 - 19:16
मंदीर शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आयहोळ किंवा बदामीपेक्षा पट्टदकल महत्वाचे आहे, मात्र इथे रहाण्याची कोणतीही सोय नाहॉ, खाण्याची सोयही जेमतेम होते, त्यामुळे आयहोळ ते बदामी या दरम्यानचा थांबा म्हणून पर्यटक पट्टदकलला थांबतात. आता पट्टदकलला सोयी होत आहेत असे कानावर आले आहे. वास्तविक पट्टदकल हि मंदीर निर्मितीची प्रयोगशाळा म्हणायला हवी. इथे नागर ( कलिंग नागर किंवा रेखा नागर ) द्रविड अश्या दोन्ही शैलीची मंदीरे पहायला मिळतात. वरिल लेखातील गळगनाथ मंदीराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सांधार पध्दतीचे आहे ( सांधार म्हणजे प्रदक्षिणा पथ मंदीराच्या आतून असतो ) कोल्हापुरच्या अंबाबाई मंदीराचा प्रदक्षिणा पथ असाच आत आहे. अनेक मजली मंदिरे आणि सांधार पध्दतीची मंदीरे हे चालुक्याकालीन बांधणीचे वैशिष्ट्य ! बाकी लेख नेहमीप्रमाणे सुरेख आणि प्रकाशचित्रे अप्रतिम !

माहितीपूर्ण लेखन म्हणजे वल्ली असा एक अलिखित नियमच झाला आहे. पट्टदकल्लूचा प्रवास आवडला. काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर या लहान मंदिरांबरोबर, गळगनाथ आणि संगमेश्वर ही मंदिरंही आम्ही आपल्या लेखनातून पाहिली. सर्वच छायाचित्रे सुंदर आली आहेत. नंबर एकचं छायाचित्र अजून मोठ्या आकारात टाकलं असतं तर, अजुन आवडलं असतं. बाकी, मंदिरांच्या वेगवेगळ्या शैली त्यांची रचना सविस्तर माहिती देणारं लेखन मनापासून आवडलं. वल्लीशेठ लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

सुंदर प्रचि!! आज फक्त प्रचि बघितली, लेख नंतर निवांतपणे वाचणार. आणि हो, मालिकाही परत वाचायला लागेलच, कारण हा लेख एक वर्षानंतर आला आहे, त्यामुळे लिंक गेली आहे. पुढचे भाग जरा पटापट येउंद्या. तुमच्या लेखांमुळे कुठल्याही मंदीरात गेलो की मूर्तीकामाकडे नीट बघायला शिकतो आहे, कधी कधी थोडेफार कळतेही. बरेचदा कळत नाही. पण बघण्याची नजर आली हेही नसे थोडके. आभार!!

कंजूस Tue, 05/06/2025 - 18:09
एक सूचना .... इथे कधी भेट दिली हे लिहावे. धागा वेगळा वाचल्यास त्यावेळी कसे होते याची नोंद होते. जावे कसे हेसुद्धा द्या. जरा वरवर पाहिले झाल्यास किती वेळ लागेल याचा अंदाज. कुणाकडे अर्धा दिवस असेल तर त्याचा उपयोग होतो. ------------- माझा अनुभव - पर्यटक अर्ध्या तासात दर्शन उरकतात, गाईड घेत नाहीत.

In reply to by कंजूस

प्रचेतस Fri, 05/09/2025 - 20:20
धन्यवाद काका, मुळात आधीच्या लेखांमध्ये तपशीलवार माहिती दिली होती त्यामुळे येथे द्विरुक्ती होईल म्हणून दिले नाही. तरी पुढच्या भागात अजून थोडे तपशील देण्याच्या दृष्टीने लिहितो. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथे मंदिरशैली, तसेच मूर्तीशास्त्र माहिती असल्याने गाईड आम्ही तरी घेतला नव्हता. त्यावाचून काही अडले पण नाही. मात्र येथे जाणाऱ्या पर्यटकांनी (ज्यांना मूर्तीशास्त्र माहिती नाही त्यांनी) तो आवर्जून घ्यावा अन्यथा येथे मंदिरे स्वतःच पाहणे अवघड आहे. मग ते केवळ भोज्याला शिवून आल्यासारखे होईल.

In reply to by प्रचेतस

कंजूस गुरुवार, 05/22/2025 - 19:25
तुम्हीच गाईड आहात. पण इतर लोक काय करतात ते मी पाहिले. मुख्य म्हणजे खूप जाहिराती करूनही बदामी, हंपी दुर्लक्षितच राहिले होते. सहल आयोजकांनीही लक्ष दिले नव्हते कारण विचारणा होत नव्हती. पुण्यातील एका सहल आयोजकांची जाहिरात पाहिली त्यात हा भाग अधिक गोकर्ण, मुर्डेश्वर, श्रींगेरी धरून पंचाऐंशी हजार रु दाखवले होते.(२०१९) कोण जाणार आणि काय समजणार? बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल ही एक मोहीम होती ज्यामध्ये दगड कापून रचून देवळे बांधण्याचे प्रयोग झाले. या अगोदर चौथ्या शतकाच्या अगोदर गुंफा खोदून त्यात देवळे झाली परंतू तशा योग्य जागा लवकरच संपल्या. परदेशांत घुमट किंवा कमानी बांधल्या जात होत्या पण ती पद्धत वापरली गेली नाही. दगडांच्या मोठ्या लाद्या ठेवून मजले, शिखरं बांधण्यात आली. कापलेले दगड सांधा मारून जोडताना त्यात मूर्तीही कोरल्या. पूर्ण त्रिमिती मूर्तींऐवजी अर्धउठाव पद्धत वापरली आणि काम सोपे केले. काम भराभर करण्याच्या प्रयत्नांत मूर्तींचे चेहरे आणि भाव मात्र कायमचे गायब झाले/ होत गेले.

In reply to by कंजूस

प्रचेतस Fri, 05/23/2025 - 08:44
आजही हंपी, बदामी दुर्लक्षितच आहे. हंपी मात्र आज जरा ट्रॅव्हल कंपन्यांच्या रडारवर आलेलं आहे. बदामी मात्र अजूनही नाही. पट्टदकल, ऐहोळेला तर फारसं कुणी जातच नाही, मग महाकूट तर सोडूनच द्या. आणि जे आहे ते चांगलंच आहे त्यामुळे. शिवाय ही ठिकाणी लीजर टुरिझममध्ये येत नाहीत, भरपूर पायपीटीची तयारी हवी, मूर्ती समजायला हव्यात. बदामीचा उपयोग तर हंपीला जाण्याआधी एक स्टेपिंग स्टोन म्हणून केला जातो. केवळ एखादा मुक्काम करुन किंवा तोही न करताच दिवसा बदामी लेणी करुन लोक रात्री मुक्कामाला हंपीत जातात.

श्वेता२४ गुरुवार, 05/22/2025 - 12:42
तुमची सर्व भटकंती अगदी माहितीपूर्ण असते. मी ज्यावेळी जाईन तेव्हा तुमच्या लेखातील माहितीआधारे सर्व पाहिन, गाईडची गरजच नाही! :))

सस्नेह Sat, 05/24/2025 - 21:38
सुरेख फोटो आणि रोचक माहिती ! पट्टदकल पाहिले आहे. कलाकृती श्रेष्ठ आहेत यात वादच नाही. पण कुठेतरी एक भकासपणा जाणवत राहिला जो बदामघी- ऐहोळेत नाही.

In reply to by सस्नेह

प्रचेतस Sun, 05/25/2025 - 08:38
पट्टदकल मला तरी अजिबात भकास वाटलं नाही, उलट मुख्य विरुपाक्ष मंदिरात अजूनही पूजा चालू असल्याने एक प्रकारचा जीवंतपणा वाटतो. शिवाय इथल्या मूर्ती खूप जास्त प्रमाणात सुस्थितीत आहेत. मुस्लिम आक्रमणाचा फटका येथे अत्यंत कमी प्रमाणात बसलेला दिसतो. शिवाय इथले लालसर बदामी रंगाची मंदिरे दिवसाच्या कोणत्याही वेळेत विविध लोभस रूपे दाखवतात.

In reply to by प्रचेतस

किल्लेदार Mon, 05/26/2025 - 17:30
म्हणालात ते खरं आहे. पट्टडकल ची मंदिरे जास्त सुस्थितीत आणि जास्त कलाकुसर असलेली आहेत. मलाही इथली व्हाइब बदामीपेक्षा जास्त सकारात्मक वाटली.

कपिलमुनी Tue, 05/27/2025 - 08:09
ऍप बनवून जिथे पर्यटक उभा आहे तिथल्या मूर्तींची माहिती त्याच्या भाषेत देता येऊ शकते. फ्रान्स मध्ये म्युझियम साठी असे अँप असलेले हेडफोन भाड्याने देतात .. गाईड नसेल तेव्हा हे फार उपयोगी आहे.. भारतात अशा सुविधा अभावानेच दिसतात

In reply to by कपिलमुनी

कंजूस Tue, 05/27/2025 - 09:28
आपण करायचं का? पण नकोच. भारतीय प्रेक्षक लाखात दोन असतील की त्यांना माहिती घेत स्वतंत्र फिरायचं असतं. "आम्ही असे गेलो, असं गिळलं, असे राहिलो" एवढंच करायचं असतं. त्यांच्या ओळखीचे कुणी गेले असतील त्यांचं ऐकलं की लगेच तिथे जायचं असतं. आणि मुख्य म्हणजे आयोजित सहलीतच.

दुर्गविहारी Wed, 06/11/2025 - 19:16
मंदीर शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आयहोळ किंवा बदामीपेक्षा पट्टदकल महत्वाचे आहे, मात्र इथे रहाण्याची कोणतीही सोय नाहॉ, खाण्याची सोयही जेमतेम होते, त्यामुळे आयहोळ ते बदामी या दरम्यानचा थांबा म्हणून पर्यटक पट्टदकलला थांबतात. आता पट्टदकलला सोयी होत आहेत असे कानावर आले आहे. वास्तविक पट्टदकल हि मंदीर निर्मितीची प्रयोगशाळा म्हणायला हवी. इथे नागर ( कलिंग नागर किंवा रेखा नागर ) द्रविड अश्या दोन्ही शैलीची मंदीरे पहायला मिळतात. वरिल लेखातील गळगनाथ मंदीराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सांधार पध्दतीचे आहे ( सांधार म्हणजे प्रदक्षिणा पथ मंदीराच्या आतून असतो ) कोल्हापुरच्या अंबाबाई मंदीराचा प्रदक्षिणा पथ असाच आत आहे. अनेक मजली मंदिरे आणि सांधार पध्दतीची मंदीरे हे चालुक्याकालीन बांधणीचे वैशिष्ट्य ! बाकी लेख नेहमीप्रमाणे सुरेख आणि प्रकाशचित्रे अप्रतिम !

कृष्णविवर

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
शतसूर्यांची जळती बिंबे गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे स्थळकाळाची अदय शृंखला तटतट तोडून हिंडत आहे क्षुधा अपरिमित अंतर्यामी धगधग पेटून उठली आहे आदिम स्वाहाकार सूक्त का पुनश्च अविरत गुंजत आहे? विज्ञानाचे नियम तोकडे- विपरित त्यांच्या घडते आहे भवताला घोटात गिळुनिया कृष्णविवर हे हिंडत आहे "विझत्या सूर्यावरती लट्टू नार नवेली पृथ्वी आहे" कृष्णविवर संतप्त होऊनी अथक स्वतःला कोसत आहे

राजा माझा

लाल गेंडा ·

कर्नलतपस्वी Tue, 05/06/2025 - 03:44
निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे.... ।। आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा

In reply to by कर्नलतपस्वी

लाल गेंडा Tue, 05/06/2025 - 09:43
आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा !! हे खरे आहे आणि असेच व्हावे हि प्रार्थना ....

कर्नलतपस्वी Tue, 05/06/2025 - 03:44
निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे.... ।। आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा

In reply to by कर्नलतपस्वी

लाल गेंडा Tue, 05/06/2025 - 09:43
आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा !! हे खरे आहे आणि असेच व्हावे हि प्रार्थना ....
लेखनविषय:
तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड सहयाद्री असो वा सागरी राज्य करतो, राजा माझा || शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज देशी असो वा विदेशी जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥ दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी रयतेला न्याय देतो सर्वांसाठी समान, राजा माझा || हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सर्व धर्म समान मानतो सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।। निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु मनातला तिमीर दूर करतो ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा || निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त ·

युयुत्सु Mon, 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु Mon, 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि Mon, 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त Mon, 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि Mon, 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

कर्नलतपस्वी Mon, 05/05/2025 - 20:17
ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य Mon, 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि Mon, 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस Sun, 05/11/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.

युयुत्सु Mon, 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु Mon, 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि Mon, 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त Mon, 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि Mon, 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

कर्नलतपस्वी Mon, 05/05/2025 - 20:17
ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य Mon, 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि Mon, 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस Sun, 05/11/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

कळविण्यास आनंद वाटतो की...

युयुत्सु ·

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु गुरुवार, 05/08/2025 - 09:27
कुत्र्यांमध्ये पण भरपूर वैफ़ल्यग्रस्तता आढळते याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?> बंदीस्त आयुष्य जगणार्‍या सर्व (भावना असणार्‍या) जीवांमध्ये वैफल्य असणं स्वाभाविक आहे. तसं निरीक्षण डेस्मण्ड मॉरीसने आपल्या "ह्युमन झू" या पुस्तकात नोंदवले आहे.

युयुत्सु गुरुवार, 05/08/2025 - 10:37
कृपया लिंक तपासावी.> तुमच्या गैरसोईबद्दल दिलगीर आहे. पण माझ्याकडे लिंक उघडत आहे. लेखाची असंपादित आवृत्ती इथे टाकायचा प्रय्त्न करतो.

गामा पैलवान Fri, 07/18/2025 - 01:56
मॉस्कोमधील काही भटके कुत्रे अन्नशोधार्थ मेट्रोतनं वेगवेगळ्या ठिकाणी जायला शिकलेत. संबंधित इंग्रजी लेख : https://www.iflscience.com/dogs-in-moscow-know-how-to-use-metro-trains-and-theyre-now-part-of-commuting-life-80034 रोचक वाटला म्हणून लेख उद्धृत केलाय. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 07/18/2025 - 07:45
रोचक! आणि या दुव्याबद्दल धन्यवाद! हा प्रकार अनेक ठिकाणी दिसतो. हे त्यांना कुणी शिकवलेले नाही. हे जुळवून घेणं आहे (अडाप्टेशन) आहे. चीनमध्ये कुत्र्यांसाठी शाळा पण आहेत- https://www.youtube.com/watch?v=_i8rcXFDogk तसेच त्यांना शाळेत नेण्याआणण्यासाठी बसेस पण असतात-https://youtu.be/zN2YnElLQv0?si=Lu4OzMLP6kJCqFab

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु गुरुवार, 05/08/2025 - 09:27
कुत्र्यांमध्ये पण भरपूर वैफ़ल्यग्रस्तता आढळते याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?> बंदीस्त आयुष्य जगणार्‍या सर्व (भावना असणार्‍या) जीवांमध्ये वैफल्य असणं स्वाभाविक आहे. तसं निरीक्षण डेस्मण्ड मॉरीसने आपल्या "ह्युमन झू" या पुस्तकात नोंदवले आहे.

युयुत्सु गुरुवार, 05/08/2025 - 10:37
कृपया लिंक तपासावी.> तुमच्या गैरसोईबद्दल दिलगीर आहे. पण माझ्याकडे लिंक उघडत आहे. लेखाची असंपादित आवृत्ती इथे टाकायचा प्रय्त्न करतो.

गामा पैलवान Fri, 07/18/2025 - 01:56
मॉस्कोमधील काही भटके कुत्रे अन्नशोधार्थ मेट्रोतनं वेगवेगळ्या ठिकाणी जायला शिकलेत. संबंधित इंग्रजी लेख : https://www.iflscience.com/dogs-in-moscow-know-how-to-use-metro-trains-and-theyre-now-part-of-commuting-life-80034 रोचक वाटला म्हणून लेख उद्धृत केलाय. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 07/18/2025 - 07:45
रोचक! आणि या दुव्याबद्दल धन्यवाद! हा प्रकार अनेक ठिकाणी दिसतो. हे त्यांना कुणी शिकवलेले नाही. हे जुळवून घेणं आहे (अडाप्टेशन) आहे. चीनमध्ये कुत्र्यांसाठी शाळा पण आहेत- https://www.youtube.com/watch?v=_i8rcXFDogk तसेच त्यांना शाळेत नेण्याआणण्यासाठी बसेस पण असतात-https://youtu.be/zN2YnElLQv0?si=Lu4OzMLP6kJCqFab
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, मला काही वर्षांपूर्वी फेसबुकमुळे छंद जडला - जगभर पाळीव म्हणून मनुष्याच्या संपर्कात वाढलेल्या प्राण्य़ांची रिल्स मधून निरिक्षणे करण्याचा. यात मुख्यत्वे कुत्री आणि इतर प्राणी, पक्षी यांचा समावेश होता. यापूर्वी मी अनेक नामवंत मानववंश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा परिचय करून घेतला होता. फेसबुक वरील रिल्स मुळे डेस्मण्ड मॉरीसच्या अनेक निरीक्षणावर शिक्कामोर्तब झाले. उदा० क्रॉस स्पिसीज मेटींग, प्राण्यांमध्ये पण हस्त/स्वमैथुनाच्या नैसर्गिक प्रवृत्ती अ्सतात, हे बघायला मिळाले.

लैराईदेवी जत्रा चेंगराचेंगरी

बाजीगर ·

आत्ता कवितेच्या माध्यमातून लैरादेवीच्या दुर्घटनेची बातमी पाहिली. दुर्दैवी सगळं. अनेकदा अशा गर्दींची चर्चा होते. लोक विसरुन जातात आणि अशा दुर्घटना घडतात. -दिलीप बिरुटे

आत्ता कवितेच्या माध्यमातून लैरादेवीच्या दुर्घटनेची बातमी पाहिली. दुर्दैवी सगळं. अनेकदा अशा गर्दींची चर्चा होते. लोक विसरुन जातात आणि अशा दुर्घटना घडतात. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट माणसाचा जीव. रोज मरताहेत अकाली कशी करावी कीव? गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा जमले होते 40 हजार नऊ शे सतरा. गेले होते आशीर्वाद घेण्या, मिरवणुकीत सहभाग देण्या. करण्या कुटुंबाची हौस आणि मुलांची थोडी मौज. मिरवणुकीदरम्यान, एका ठिकाणी उतार, लोकांना नाही कळले ना रांग, नाही कतार गोंधळात लोक पडले, काही जोरात ओरडले एकमेकांवर लागले पडू बायका,मुले लागले रडू झाली भयानक चेंगराचेंगरी, 7 जण जागीच मेले, जशी मेंढरी 80 जण जखमी झाले त्यांना हॉस्पिटल नेले. संयोजकांचा आहेच दोष, तसेच भक्तांचा उन्माद जोश. मागे मांढरादेवी च्या जत्रेत मेले अनेक, कोर्ट शोधू शकले नाही कारण एक

धामणस्करांची 'वोक' कविता

माहितगार ·

सोत्रि Fri, 05/09/2025 - 05:21
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या.. मी पुन्हा तरूण ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.
सुपर्ब!! पद्यातलं जास्त काही कळत नाही पण हे कविता खुप खोलवर पोहोचली. - (गद्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

मूकवाचक Fri, 05/09/2025 - 09:56
एकत्र 'बसलो' असताना माझे डोके जड झाले, तेव्हा उसळत्या तारूण्याची माझी लेक मला म्हणाली: द्या इकडे. मी ग्लास तत्काळ मुलीच्या हाती सोपवला चखण्यासहित. मुलीनेही ग्लास हातात घेतला नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित बूर्झ्वापण फाट्यावर मारल्याच्या. .... मी लगेच भानावर, अट्ट्ल बेवड्यासारखा लेक लोळतेय आपल्याच वांतीत आधुनिकतेचा सोस नडलेली

गवि Sat, 05/10/2025 - 10:03
विसर्जनाची कविता पहिल्यांदा वाचण्यात आली तेव्हाच हा कवी सॉलिड आहे हे जाणवले होते. मराठीत वेगवेगळ्या शैलीचे खणखणीत दर्जेदार कवी आणि कवयित्री होते आणि आहेत. बाकीबाब, कोलटकर, महानोर, ग्रेस वगैरे परंपरा आहेच.

सोत्रि Fri, 05/09/2025 - 05:21
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती जड झाली, तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या.. मी पुन्हा तरूण ययातीसारखा; माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्याने वाकलेला.
सुपर्ब!! पद्यातलं जास्त काही कळत नाही पण हे कविता खुप खोलवर पोहोचली. - (गद्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

मूकवाचक Fri, 05/09/2025 - 09:56
एकत्र 'बसलो' असताना माझे डोके जड झाले, तेव्हा उसळत्या तारूण्याची माझी लेक मला म्हणाली: द्या इकडे. मी ग्लास तत्काळ मुलीच्या हाती सोपवला चखण्यासहित. मुलीनेही ग्लास हातात घेतला नीट सावरून, तर मी एका दैवी आनंदात अकल्पित बूर्झ्वापण फाट्यावर मारल्याच्या. .... मी लगेच भानावर, अट्ट्ल बेवड्यासारखा लेक लोळतेय आपल्याच वांतीत आधुनिकतेचा सोस नडलेली

गवि Sat, 05/10/2025 - 10:03
विसर्जनाची कविता पहिल्यांदा वाचण्यात आली तेव्हाच हा कवी सॉलिड आहे हे जाणवले होते. मराठीत वेगवेगळ्या शैलीचे खणखणीत दर्जेदार कवी आणि कवयित्री होते आणि आहेत. बाकीबाब, कोलटकर, महानोर, ग्रेस वगैरे परंपरा आहेच.
लेखनप्रकार
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.

राहून गेलं !

आजी ·

चित्रगुप्त Sat, 05/03/2025 - 22:17
खूप छान लिहीले आहे आजी. माझेही असे काही वेळा झालेले आहे, आणि त्या मित्रांना पुन्हा भेटण्याची उत्सुकता संपून गेलेली आहे.

आजी आवडलं गं लेखन. नेहमीच्याच रसाळ शैलीची गोष्ट. आपल्या घराशेजारी असे बांधकाम चालू असले की, एक नवीनच डोकेदुखी वाढते. सहन करण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. माझ्या घराशेजारी असेच एक बांधकाम वर्षभर सुरु होतं. दिवसभर काही नाही, पण रात्री येणारी चोरीची वाळु असावी, रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे चार वाजेपर्यंत त्या गाड्यांच्या प्रवास सुरु असायचा. काय तो मानसिक त्रास विचारु नका. आपल्या मैत्रीणींच्या गप्पांचे विषय आणि आपल्या कल्पनेतील विचार यातल्या गोष्टी भारी होत्या. काळ बराच पुढे निघून गेलेला असतो आयुष्यातील अनुभवांनी आपण कुठल्या कुठे गेलेलो असतो. काही काळ ज्यांच्याबरोबर गेला त्या काळातील आठवणींची एक व्हॅल्यु असते. काही रमतात काही नाही तेव्हा हे असं व्हायचंच. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Fri, 05/23/2025 - 11:18
असाच काहीसा अनुभव मलाही आलाय. तोही दहावी संपल्यानंतर ५ वर्षातच. तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारायला आवडेल.

विवेकपटाईत Sat, 05/24/2025 - 10:05
एकदा जो व्यक्ति आपल्या आयुष्यातून निघून गेला. नंतर 30 एक वर्षांनंतर भेटला. त्याच्याशी मोकळपणे पूर्वीसारखे संवाद करणे कठीण असते. हा अनुभव सर्वांनाच येते.

चित्रगुप्त Sat, 05/03/2025 - 22:17
खूप छान लिहीले आहे आजी. माझेही असे काही वेळा झालेले आहे, आणि त्या मित्रांना पुन्हा भेटण्याची उत्सुकता संपून गेलेली आहे.

आजी आवडलं गं लेखन. नेहमीच्याच रसाळ शैलीची गोष्ट. आपल्या घराशेजारी असे बांधकाम चालू असले की, एक नवीनच डोकेदुखी वाढते. सहन करण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. माझ्या घराशेजारी असेच एक बांधकाम वर्षभर सुरु होतं. दिवसभर काही नाही, पण रात्री येणारी चोरीची वाळु असावी, रात्री अकरा वाजेपासून तर पहाटे चार वाजेपर्यंत त्या गाड्यांच्या प्रवास सुरु असायचा. काय तो मानसिक त्रास विचारु नका. आपल्या मैत्रीणींच्या गप्पांचे विषय आणि आपल्या कल्पनेतील विचार यातल्या गोष्टी भारी होत्या. काळ बराच पुढे निघून गेलेला असतो आयुष्यातील अनुभवांनी आपण कुठल्या कुठे गेलेलो असतो. काही काळ ज्यांच्याबरोबर गेला त्या काळातील आठवणींची एक व्हॅल्यु असते. काही रमतात काही नाही तेव्हा हे असं व्हायचंच. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Fri, 05/23/2025 - 11:18
असाच काहीसा अनुभव मलाही आलाय. तोही दहावी संपल्यानंतर ५ वर्षातच. तुमच्याशी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारायला आवडेल.

विवेकपटाईत Sat, 05/24/2025 - 10:05
एकदा जो व्यक्ति आपल्या आयुष्यातून निघून गेला. नंतर 30 एक वर्षांनंतर भेटला. त्याच्याशी मोकळपणे पूर्वीसारखे संवाद करणे कठीण असते. हा अनुभव सर्वांनाच येते.
लेखनविषय:
मध्यंतरी एका मैत्रिणीकडे गेले होते. म्हणजे आम्ही तिघी शाळेतल्या मैत्रीणी एका मैत्रिणीच्या घरात एकत्र जमलो होतो. दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत गप्पा मारायच्या असा बेत होता. मी त्या मैत्रीणीकडे कुसुमकडे वेळेवर पोहोचले. माझी दुसरी मैत्रीण विजू तीही वेळेवर आली. व्हॉट्सॲप ग्रुप बनून दोन तीन वर्षे झाली असली तरी विजू मला समोरासमोर मात्र शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर आजच भेटत होती. सुरुवातीलाच आम्ही गळाभेट घेतली. विजूबरोबर तिचा नवरा होता. कुसुमचा नवराही घरात होताच. आम्ही सगळे स्थानापन्न झालो. माझ्या लक्षात आलं की कुसुमच्या फ्लॅटच्या खिडकीबाहेरून बांधकामाच्या ड्रिलिंग मशीनचा कर्कश्श आवाज येतोय.

योगक्षेमं वहाम्यहम्

Jayant Naik ·

अहो त्या पुजाऱ्याने फक्त तुम्हाला चार पैसे मागितले, तुळजापुरात गेला असतात तर पुजाऱ्याने तुमच्या हातावर ड्रग्स चे पाकीट ठेवले असते मागाल त्या =)))) पण विनोदाचा भाग सोडा. ही ही अवस्था सर्वच मंदिरात आहेत. पोटार्थी लोकांनी मंदिरातील पुजारी , कर्मचारी वगैरे जागा ढापलेल्या आहेत. नुकताच त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन आलो, तिथे झक मारत पैसे भरून VIP दर्शन करत असतानाही अरुणा शिरसाट नावाच्या महिला कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केली. ( देवाच्या समोर उभा होतो, खोटे नाही बोलणार, CCTV रेकॉर्डिंग आहे, शंभू महादेव साक्ष आहे) मी रीतसर कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवून आलो. मी माझे कर्म केले, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल न होईल, मला त्याच्याशी घेणेदेणे नाही. मला फळाची आशा नाही. मी माझा कर्मयोग नेटाने पूर्ण केला. त्यानंतर पुढेच असलेल्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात जाऊन बसलो. तिथे मात्र चक्क समाधी जवळ बसूनही 10-15 मिनिटं कोणी काही बोललं नाही. नंतर दादाच बोलला - " तुला लेका आता काय गरज पडलेय मंदिरं बिंदिरे फिरायची. तू ज्याच्या मंदिरात जात आहेस तो तोच आहेस - तत्त्वमसि । अजून काही संदेह , शंका आहे का तुझ्या मनात ?" मी हसलो, तोही हसला. मी दादाला विनम्र नमस्कार केला आणि बाहेर पडलो. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायीं । तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥ आतां मी न करी भ्रांतीचे भ्रमण । वृत्तीसी मार्जन केलें असे ॥२॥ एकार्णव झाला तरंगु बुडाला । तैसा देह झाला एकरूप ॥३॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें नवल केलें । तारूं हरविले मृगजळी ॥४॥

मूकवाचक Sun, 05/04/2025 - 11:55
प्रपंच कुणाला चुकला आहे? मग तो पुजारी असो की कलावंत. जसा राजाश्रय नाहीसा झाला, तशी या लोकांना लोकाश्रयावर अवलंबून राहण्याची वेळ आली. देव मंदिरात नाही, आत आहे वगैरे सगळे ठीक आहे. तशी उमज आली की अध्यात्मातली वणवण आपोआप संपते. अध्यात्माला नाहक चिकटलेला सामाजिक आणि राजकीय चिकटा दूर होतो. बाह्याकडची धाव संपून आंतरिक यात्रा सुरू होते. एवढी परिपक्वता ज्यांच्या अंगी नाही, त्यांची सगुण भक्ती/ बाह्य सोपस्कारांची गरज पूर्ण करण्यात फारसे गैर असे काही नाही. तशी व्यवस्था समाजात असणे गरजेचे आहे. बहुधा जगाच्या पाठीवर सगळीकडे अशी व्यवस्था असते. भाविकांनी आपणहून पुजारी/ गुरव वगैरे लोकांचा योगक्षेम/ चरितार्थ चालण्यासाठी लोकाश्रय दिला तर प्रश्न मिटेल. राजाश्रय मिळाल्यानेदेखील प्रश्न सुटेल. चवली पावलीपासून करोडोंमधे ज्या समाजात भ्रष्टाचार सर्वदूर पसरला आहे, त्यात योगक्षेम चालवणे फारसे सोपे नाही. शिक्षण महर्षि ते वैद्यकीय व्यावसायिक सगळेच लोक लुबाडत असताना सामान्य माणूस गप्प असतो, कारण प्रतिकार करणे महाग पडू शकते. व्यावहारिक बाजूचा विचार न करता समाजातल्या कोणत्याही एखाद्या घटकाकडून आदर्शवादाची अपेक्षा ठेवणे फोल ठरेल. असो.

In reply to by मूकवाचक

वामन देशमुख Sun, 05/04/2025 - 13:21
व्यावहारिक बाजूचा विचार न करता समाजातल्या कोणत्याही एखाद्या घटकाकडून आदर्शवादाची अपेक्षा ठेवणे फोल ठरेल. असो.
विशेषतः या वाक्याशी आणि एकूणच प्रतिसादाशी सहमत आहे.

In reply to by मूकवाचक

Jayant Naik Mon, 05/05/2025 - 10:29
शिक्षक , पुजारी , न्यायाधीश , सैन्यातील जवान आणि अधिकारी ,पंतप्रधान,,मुख्य मंत्री , शंकराचार्य हे सर्व लोक आपली कर्तव्ये धर्म म्हणून पर पाडतील आणि फक्त पैसा हेच ध्येय म्हणून वर्तन करणार नाहीत अशी आमची आपली भाबडी समजूत होती. होती. हळूहळू ती नष्ट होते आहे. माझा कसा भ्रमनिरास होतो आहे हे या प्रसंगातून दिसतेच आहे.

सोत्रि Sun, 05/04/2025 - 14:43
पुजारी हे नेहमीच आदरणीय अशी शिकवण
इथेच गडबड झाली. - (देव कुठेही नसतो हे जाणणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

ह्यावरून एक विनोद आठवला ... आम्ही लहानपणी व्याकरण शिकत असताना वर्गातील एका विद्यार्थ्याने पुजारी ह्या शब्दाचा संधिविग्रह पूजा +अरि अर्थात पूजेचा शत्रू म्हणजे पुजारी असा केला होता =)))) - ( देवाचा अभाव असलेले स्थानच नाही हे अनुभवणारा ) प्रगोजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 05/05/2025 - 06:27
पूजा +अरि अर्थात पूजेचा शत्रू म्हणजे पुजारी
Oxymoron :=)) - (विनोदी) सोकाजी

In reply to by सोत्रि

Jayant Naik Mon, 05/05/2025 - 10:31
एकदम मान्य . मुळातच चूक झाली. आमच्यावर असे संस्कार करणाऱ्यांची आणि त्याला चिकटून बसणारे आम्ही यांची !

अहो त्या पुजाऱ्याने फक्त तुम्हाला चार पैसे मागितले, तुळजापुरात गेला असतात तर पुजाऱ्याने तुमच्या हातावर ड्रग्स चे पाकीट ठेवले असते मागाल त्या =)))) पण विनोदाचा भाग सोडा. ही ही अवस्था सर्वच मंदिरात आहेत. पोटार्थी लोकांनी मंदिरातील पुजारी , कर्मचारी वगैरे जागा ढापलेल्या आहेत. नुकताच त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन आलो, तिथे झक मारत पैसे भरून VIP दर्शन करत असतानाही अरुणा शिरसाट नावाच्या महिला कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केली. ( देवाच्या समोर उभा होतो, खोटे नाही बोलणार, CCTV रेकॉर्डिंग आहे, शंभू महादेव साक्ष आहे) मी रीतसर कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवून आलो. मी माझे कर्म केले, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल न होईल, मला त्याच्याशी घेणेदेणे नाही. मला फळाची आशा नाही. मी माझा कर्मयोग नेटाने पूर्ण केला. त्यानंतर पुढेच असलेल्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात जाऊन बसलो. तिथे मात्र चक्क समाधी जवळ बसूनही 10-15 मिनिटं कोणी काही बोललं नाही. नंतर दादाच बोलला - " तुला लेका आता काय गरज पडलेय मंदिरं बिंदिरे फिरायची. तू ज्याच्या मंदिरात जात आहेस तो तोच आहेस - तत्त्वमसि । अजून काही संदेह , शंका आहे का तुझ्या मनात ?" मी हसलो, तोही हसला. मी दादाला विनम्र नमस्कार केला आणि बाहेर पडलो. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायीं । तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥ आतां मी न करी भ्रांतीचे भ्रमण । वृत्तीसी मार्जन केलें असे ॥२॥ एकार्णव झाला तरंगु बुडाला । तैसा देह झाला एकरूप ॥३॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलें नवल केलें । तारूं हरविले मृगजळी ॥४॥

मूकवाचक Sun, 05/04/2025 - 11:55
प्रपंच कुणाला चुकला आहे? मग तो पुजारी असो की कलावंत. जसा राजाश्रय नाहीसा झाला, तशी या लोकांना लोकाश्रयावर अवलंबून राहण्याची वेळ आली. देव मंदिरात नाही, आत आहे वगैरे सगळे ठीक आहे. तशी उमज आली की अध्यात्मातली वणवण आपोआप संपते. अध्यात्माला नाहक चिकटलेला सामाजिक आणि राजकीय चिकटा दूर होतो. बाह्याकडची धाव संपून आंतरिक यात्रा सुरू होते. एवढी परिपक्वता ज्यांच्या अंगी नाही, त्यांची सगुण भक्ती/ बाह्य सोपस्कारांची गरज पूर्ण करण्यात फारसे गैर असे काही नाही. तशी व्यवस्था समाजात असणे गरजेचे आहे. बहुधा जगाच्या पाठीवर सगळीकडे अशी व्यवस्था असते. भाविकांनी आपणहून पुजारी/ गुरव वगैरे लोकांचा योगक्षेम/ चरितार्थ चालण्यासाठी लोकाश्रय दिला तर प्रश्न मिटेल. राजाश्रय मिळाल्यानेदेखील प्रश्न सुटेल. चवली पावलीपासून करोडोंमधे ज्या समाजात भ्रष्टाचार सर्वदूर पसरला आहे, त्यात योगक्षेम चालवणे फारसे सोपे नाही. शिक्षण महर्षि ते वैद्यकीय व्यावसायिक सगळेच लोक लुबाडत असताना सामान्य माणूस गप्प असतो, कारण प्रतिकार करणे महाग पडू शकते. व्यावहारिक बाजूचा विचार न करता समाजातल्या कोणत्याही एखाद्या घटकाकडून आदर्शवादाची अपेक्षा ठेवणे फोल ठरेल. असो.

In reply to by मूकवाचक

वामन देशमुख Sun, 05/04/2025 - 13:21
व्यावहारिक बाजूचा विचार न करता समाजातल्या कोणत्याही एखाद्या घटकाकडून आदर्शवादाची अपेक्षा ठेवणे फोल ठरेल. असो.
विशेषतः या वाक्याशी आणि एकूणच प्रतिसादाशी सहमत आहे.

In reply to by मूकवाचक

Jayant Naik Mon, 05/05/2025 - 10:29
शिक्षक , पुजारी , न्यायाधीश , सैन्यातील जवान आणि अधिकारी ,पंतप्रधान,,मुख्य मंत्री , शंकराचार्य हे सर्व लोक आपली कर्तव्ये धर्म म्हणून पर पाडतील आणि फक्त पैसा हेच ध्येय म्हणून वर्तन करणार नाहीत अशी आमची आपली भाबडी समजूत होती. होती. हळूहळू ती नष्ट होते आहे. माझा कसा भ्रमनिरास होतो आहे हे या प्रसंगातून दिसतेच आहे.

सोत्रि Sun, 05/04/2025 - 14:43
पुजारी हे नेहमीच आदरणीय अशी शिकवण
इथेच गडबड झाली. - (देव कुठेही नसतो हे जाणणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

ह्यावरून एक विनोद आठवला ... आम्ही लहानपणी व्याकरण शिकत असताना वर्गातील एका विद्यार्थ्याने पुजारी ह्या शब्दाचा संधिविग्रह पूजा +अरि अर्थात पूजेचा शत्रू म्हणजे पुजारी असा केला होता =)))) - ( देवाचा अभाव असलेले स्थानच नाही हे अनुभवणारा ) प्रगोजी

In reply to by प्रसाद गोडबोले

सोत्रि Mon, 05/05/2025 - 06:27
पूजा +अरि अर्थात पूजेचा शत्रू म्हणजे पुजारी
Oxymoron :=)) - (विनोदी) सोकाजी

In reply to by सोत्रि

Jayant Naik Mon, 05/05/2025 - 10:31
एकदम मान्य . मुळातच चूक झाली. आमच्यावर असे संस्कार करणाऱ्यांची आणि त्याला चिकटून बसणारे आम्ही यांची !
लेखनविषय:
लेखनप्रकार
योगक्षेमं वहाम्यहम् काही दिवसापूर्वी दक्षिणेतील एका देऊळात जायचा योग आला. मध्यभागी मुख्य देव किंवा देवता यांचे देऊळ आणि आजूबाजूला इतर देवी देवता यांची छोटी छोटी देऊळे असा नेहमी असतो असा प्रकार इथेही होता. आम्ही मुख्य देवतेचे दर्शन घेऊन अगदी समाधानी होऊन बाहेर पडलो. बाहेरच एक हुंडी होती तिथे आमच्या मनात होते तितके पैसे अर्पण करून बाहेर जायचा मार्गावरून चालू लागलो. अगदी शेजारीच आणखी एक देऊळ होते ,रात्र झाली असल्याने ते आता बंद होते पण त्या देऊळाच्या बाहेरच देवाकडे पाठ करून खुर्चीवर त्या देऊळाचे पुजारी बसले होते.

ज्ञानेश्वरी- भाग-२- चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या !

मारवा ·

अनन्त्_यात्री Sat, 05/03/2025 - 10:10
पूर्वी ऐसी अक्षरेवर आलेला हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. या लेखाचा भाग १ ही इथे प्रकाशित करावा ही श्री. मारवा यांना विनंती

Jayant Naik Sun, 05/11/2025 - 09:30
अती उत्तम लेख. पण इतका वर्षाव एकाच लेखात आमच्या अल्प बुद्धीला झेपत नाही. 2/3 भाग करायला हवे होते. एकदा वाचून समजणे कठीण आहे. परत परत वाचणे जरूर आहे.

स्वधर्म Mon, 05/12/2025 - 16:55
संत ज्ञानेश्वरांच्या अलौकीक प्रतिभेतून काय काय रत्ने बाहेर येतील ते सांगता येत नाही. पण त्यांचा आस्वाद घेणे प्रत्येकाला जमत नाही. आपल्या या लेखामुळे ज्ञानेश्वरीत नक्की केवढी ज्ञानाची, भाषेची श्रीमंती आहे ते समजले. खूप खूप धन्यवाद.

स्वधर्म Mon, 05/12/2025 - 17:06
ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत वापरावा हे अद्भूत आहे! ही एक ओतकामाची प्राचीन पध्दत (५००० वर्षे) आंम्ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसर्या वर्षी शिकल्याचे आठवते. कदाचित डिप्लोमाला असेल. इनव्हेस्टमेंट कास्टींग किंवा लॉस्ट वॅक्स कास्टींग. पहिल्यांदा आपल्याला हवा तसा आकार मेणाने बनवायचा आणि नंतर तो आतच ठेऊन अगदी बारीक वाळूत त्याचा साचा बनवायचा. नंतर जेंव्हा गरम धातूरस त्यात ओतला जातो तेंव्हा मेण वितळून बाहेर पडते व धातू त्या साच्याचा आकार घेतो. यात मूस/ फर्नेस महत्वाची नाही तर पध्दत महत्वाची. अगदी तंतोतंत (अ‍ॅक्युरेट) ओतकामासाठी ही पध्द्त वापरली जाते अजूनही. https://en.wikipedia.org/wiki/Investment_casting

In reply to by स्वधर्म

मारवा Mon, 05/12/2025 - 17:40
तै भुतसृष्टीची पडे टांकसाळ ॥ सातव्या अध्यायात एकामागोमाग तीन श्लोक गीतेचे जे येतात त्याचा अर्थ साधारण असा, की प्रकृती चे दोन प्रकार आहेत अपरा आणि परा. अपरा आठ प्रकारांनी भिन्न आहे पृथ्वी,जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आणि दुसरी जी परा प्रकृती आहे ती जीवस्वरुप आहे व तिने हे सर्व विश्व धारण केलेले आहे. आणि सर्व जगातील प्राणिमात्र सजीव या दोन प्रकृतीपासुन निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगाचा आदि-अंत मीच (श्रीकृष्ण) आहे असे वर्णन यात येते, आता हि सुक्ष्म प्रकृती जेव्हा स्थुला ची निर्मीती करते तेव्हाचे वर्णन ज्ञानेश्वर टांकसाळ चे रुपक वापरुन करतात. त्याकाळची टांकसाळ त्यांनी बघितली असेल, गंमत म्हणजे इतकी आध्यात्मिक अमुर्त संकल्पना समजवण्यासाठी टांकसाळ हे एकदम भौतिक व्यावहारीक जगाचे उदाहरण ते छान वापरतात. कुठली नाणे पाडणारी टांकसाळ यांनी बघितली असेल का ? तेव्हाची राजाची की राजाने नेमलेल्या खाजगी होत्या ? यातील चतुर्विधु ठसा समान मुल्याचा व स्तर मात्र भिन्न हे नेमकं कशाच्या संदर्भात आहे कळल नाही. चातुर्वण्यासंबधी असेल अस वाटलं पण समान मुल्य मग म्हटल नसतं एनी आयडिया ? चौर्‍याशी लक्ष योनींसाठी तितके थरा हे तस स्पष्ट आहे. आणि हा शब्द टांक मला अगोदर नाणं असा अर्थ वाटला होता टाका यावरुन असेल अस वाटलं होत, दो टके का आदमी , तेरी दो टके की नौकरी मेरा लाखो का सावन वगैरे पण त्याचा अर्थ ठसा निघाला एक फ़ेमस मराठी आडनाव आहे मुकुंद टांकसाळे का काहीतरी. रुपक जरा कठीण झाल हे माऊलींच्याही लक्षात आलेल दिसतय म्हणुन ते म्हणतात हे रुपक परि असो. सरळ समजुन घे... ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जै स्थुळाचिया आंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे, टांकसाळ । चतुर्विधु ठसा, उमटों लागे आपैसा, मोला तरी सरसा, परी थरचि आनान। होती चौर्‍यांशी लक्ष थरा, येरा मिति नेणिजे भांडारा, भरे आदिशून्यांचा गाभारा, नाणेयांसी। ऎसे एकतुके पांचभौतिक, पडती बहुवस टांक, मग तिये समृद्धिचे लेख, प्रकृतीचि धरी । जे आंखूनि नाणें विस्तारी, पाठी तयांची आटणी करी, माजी कर्माकर्माचिया व्यव्हारीं, प्रवर्तु दावी। हे रुपक परि असो, सांगो उघड जैसे परियेसों, तरी नामरुपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे। आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं, बिंब येथ आन नाहीं, म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं, जगासि मी।(अ-७ ओ-२२ ते २८) कोडें- आवडीने, सरसा- सारखा , आनान -निरनिराळ्या, एकतुके - एकसारखे, टांक- ठसे, लेख- गणना ( लेखापाल यावरुनच), अतिसो- विस्तार , अवसान-लय अर्थ- ही सुक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थुल महाभुतांच्या अंगांना घडविते, तेव्हा भुतसृष्टीची टांकसाळ सुरु होते. या टांकसाळीतुन निर्माण होणा‍र्‍या प्राणरुपी टाकीचे चार नमुन्यांचे ठसे आपोआप उमटु लागतात. त्यांचे मुल्य समान असले तरी स्तर मात्र भिन्न आहेत. यांचे स्तर चौर्‍यांशी लक्ष आहेत, इतरांची तर गणतीच नाही, अशा असंख्य नाण्यांनी आदिप्रकृतीचा गाभारा खचाखच भरुन जातो. अशा प्रकारे पंचमहाभुतांची सारख्या परिमाणाची इतकी विपुल नाणी पडतात की एकट्या प्रकृतीलाच त्याच्या समृद्धीचा लेखा जोखा ठेवता येतो. मग प्रकृती या जीवरुपी नाण्यांचा कस लावुन , ठसा मारुन विस्तार करते. त्याचीच ती नंतर आटणी करते, मध्यंतरी (माजी) च्या काळात ती त्याच्याद्वारे कर्म-अकर्माचा व्यवहार चालवुन दाखवीते. अर्जुना आता हे रुपक पुरे झाले, आता उघड सोप्या शब्दात सांगतो ते ऎक, हा नाम रुपा चा विवीधतेचा पसारा प्रकृतिच करत असते. आणि ही प्रकृति तर माझ्या ठिकाणी अधिष्ठान रुपाने भासते. यात खोटे काहीच नाही, म्हणुन मीच जगाच्या उत्त्पत्ती- स्थिती- लयाला कारणीभुत आहे.

मारवा Mon, 05/12/2025 - 17:50
ऐसी अक्षरे वरील याच वरील लेखाच्या एका प्रतिसादात श्री अरविंद कोल्हटकरांनी ही फार सुंदर रोचक अशी माहिती तेव्हा दिलेली होती. ती इथे मूळ लेखाला समर्पक आणि उपयुक्त आहे म्हणून. इथे देण्याचा मोह आवरत नाहीय. अध्यात्म, योगसाधना अशा विषयांत काहीच गोडी आणि गति नसल्याने त्याबाबत टीकाटिप्पणी करू शकत नाही पण वरील चर्चेतील तीन मुद्द्यांंविषयी थोडे मतप्रदर्शन करू शकतो. प्रथम चकोर पक्षी. चकोर पक्ष्याभोवती संस्कृत वाङ्मयामध्ये प्रचलित दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें-। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टि पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो. त्विषं चकोराय सुधां सुराय। कलामपि स्वावयवं हराय। ददज्जयत्येष समस्तमस्य। कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥ उत्तरनैषधचरित २२.६५ (चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात् हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे. मृषा निशानाथमह: सुधा वा हरेदसौ वा न जराविनाशौ। पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥ उत्तरनैषधचरित २२.१०२. चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ति देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत? स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा। अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय: पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥ सौंदर्यलहरी ६३. तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात. दुसरा म्हणजे मुशीतील वितळणारे मेण. मला वाटते की हा उल्लेख धातूचे ओतीव पुतळे करण्याच्या जगभरच्या अनेक संस्कृतींना प्राचीन काळापासून माहीत असलेल्या lost wax casting पद्धतीला अनुसरून आहे. ह्या पद्धतीमध्ये ज्याचा ओतीव पुतळा/प्रतिकृति करायची आहे अशा व्यक्ति/मूळ गोष्टीची मेणामध्ये प्रतिकृति करायची. नंतर तिला कसल्याहि hard plaster ने - उदा चिकण माती, हल्ली प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात - लिंपण करायचे. ते पूर्ण सुकवायचे. सुकल्यानंतर ते मुशीमध्ये भाजायचे म्हणजे आतील मेळ द्रवरूप होते. ते ओतून द्यायचे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत धातूचा रस ओतायचा. तो रस पूर्णपणे थंड होऊन धातु घट्ट झाला की बाहेरचे लिंपण फोडून दूर करायचे म्हणजे धातूमधील ओतीव पुतळा/प्रतिकृति शिल्लक उरते. अखेर टांकसाळ म्हणजे टंकशाला. ह्यावर माझ्याच 'पैसाअडका इत्यादि' ह्या जुन्या लेखातील संदर्भाचा भाग येथे देतो. "टका - १)१६ शिवराई, २)४ पैसे, ३)१ आणा, ४)उत्तर हिंदुस्तानात २ पैसे, ५)गुजरातमध्ये ३ पैसे. (दाते-कर्वे.) तसेच ’घरटका’ घरावर कर, 'लग्नटका’ लग्नावर कर.(मोल्सवर्थ.) उत्तर हिंदुस्तानात दोन पैसे, चांदीचे नाणे.(चतुर्वेदी.) (’अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर आटा टका सेर खाजा’ - अंधेर नगरीत विचित्र राज्य, आटा आणि मिठाई, दोन्हीचा भाव सारखाच - शेराला एक टका. ’सब घोडे बारा टके’ - सगळे घोडे एकाच किमतीचे - बारा टके, one size fits all. सोनटक्का = सोन्याचे नाणे. मूळ संस्कृत ’टङ्क’, ठसा उठवून केलेले नाणे, a punch-marked coin. त्यावरून ’टङ्कशाला’ टांगसाळ. बंगाली भाषेत টাকা टाका हे बोलीभाषेतील रुपयाचे नाव असून बांगलादेशाच्या चलनाचेहि तेच नाव आहे.)"

सस्नेह Sat, 05/24/2025 - 19:51
मारवाजी शतश: धन्यवाद या लेखासाठी. काय त्या ज्वलंत उपमा आणि विलक्षण वर्णन ! सवडीने वाचावा असा हा लेख असल्याने वाखू साठवून दमादमाने रसपान करत वाचते आहे. शिवाय एका वाचनात संपूर्ण आकलन होणार नाही सो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. __/\__

Bhakti Sun, 05/25/2025 - 18:46
जैसे शारदिचिये चंद्र कळे। माजि अमृत कण कोवळे। ते वेचिती मने मवाळे। चकोर तलगे। याचा अर्थ असा की, हा ग्रंथ मी सुद्धा तुम्हासाठी सिद्ध केला आहे यामागे सर्वस्व सद्गुरूंची असीम कृपा असून निश्चितच हा ग्रंथ माझ्या श्रोत्यांना आनंद देणार आहे असा निर्विवाद आशावाद व्यक्त होताना दिसतो. चकोराचे पिल्लू जसे अमृतकण सेवन करते तसे आपण या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा आपण मागील अमृतकल सहज लिलया स्वीकारून आनंदाची परमोच्य सीमा गाठावी. आपण माझ्या अज्ञानाची जाणीव ठेवून या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे, आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत ते जे नाजूक नाजूक सांगितले आहे ते भगवंताचे प्रेम आहे ते मला कळत नाही म्हणून लहान होऊन सेवन करा, चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञान कण निश्चितच मिळतील. संदर्भ -ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीमधील मनाची भूमिका लेखक-प्रो.डॉ.मार्तंड दिवाकर कुलकर्णी नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन खरोखरच ही ओवी खुपच सुंदर अभ्यासपूर्ण आहे.त्यात हे वाचनात आले, म्हणून इथे दिली.अजूनही वाचनात आल्यावर नक्की देईन. बाकी ,नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन हे पुस्तक आळंदी संस्थानाने नुकतेच माऊलींच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्सर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केले आहे.खुप सुंदर आहे, नक्की वाचा!

अनन्त्_यात्री Sat, 05/03/2025 - 10:10
पूर्वी ऐसी अक्षरेवर आलेला हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. या लेखाचा भाग १ ही इथे प्रकाशित करावा ही श्री. मारवा यांना विनंती

Jayant Naik Sun, 05/11/2025 - 09:30
अती उत्तम लेख. पण इतका वर्षाव एकाच लेखात आमच्या अल्प बुद्धीला झेपत नाही. 2/3 भाग करायला हवे होते. एकदा वाचून समजणे कठीण आहे. परत परत वाचणे जरूर आहे.

स्वधर्म Mon, 05/12/2025 - 16:55
संत ज्ञानेश्वरांच्या अलौकीक प्रतिभेतून काय काय रत्ने बाहेर येतील ते सांगता येत नाही. पण त्यांचा आस्वाद घेणे प्रत्येकाला जमत नाही. आपल्या या लेखामुळे ज्ञानेश्वरीत नक्की केवढी ज्ञानाची, भाषेची श्रीमंती आहे ते समजले. खूप खूप धन्यवाद.

स्वधर्म Mon, 05/12/2025 - 17:06
ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत वापरावा हे अद्भूत आहे! ही एक ओतकामाची प्राचीन पध्दत (५००० वर्षे) आंम्ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसर्या वर्षी शिकल्याचे आठवते. कदाचित डिप्लोमाला असेल. इनव्हेस्टमेंट कास्टींग किंवा लॉस्ट वॅक्स कास्टींग. पहिल्यांदा आपल्याला हवा तसा आकार मेणाने बनवायचा आणि नंतर तो आतच ठेऊन अगदी बारीक वाळूत त्याचा साचा बनवायचा. नंतर जेंव्हा गरम धातूरस त्यात ओतला जातो तेंव्हा मेण वितळून बाहेर पडते व धातू त्या साच्याचा आकार घेतो. यात मूस/ फर्नेस महत्वाची नाही तर पध्दत महत्वाची. अगदी तंतोतंत (अ‍ॅक्युरेट) ओतकामासाठी ही पध्द्त वापरली जाते अजूनही. https://en.wikipedia.org/wiki/Investment_casting

In reply to by स्वधर्म

मारवा Mon, 05/12/2025 - 17:40
तै भुतसृष्टीची पडे टांकसाळ ॥ सातव्या अध्यायात एकामागोमाग तीन श्लोक गीतेचे जे येतात त्याचा अर्थ साधारण असा, की प्रकृती चे दोन प्रकार आहेत अपरा आणि परा. अपरा आठ प्रकारांनी भिन्न आहे पृथ्वी,जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आणि दुसरी जी परा प्रकृती आहे ती जीवस्वरुप आहे व तिने हे सर्व विश्व धारण केलेले आहे. आणि सर्व जगातील प्राणिमात्र सजीव या दोन प्रकृतीपासुन निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगाचा आदि-अंत मीच (श्रीकृष्ण) आहे असे वर्णन यात येते, आता हि सुक्ष्म प्रकृती जेव्हा स्थुला ची निर्मीती करते तेव्हाचे वर्णन ज्ञानेश्वर टांकसाळ चे रुपक वापरुन करतात. त्याकाळची टांकसाळ त्यांनी बघितली असेल, गंमत म्हणजे इतकी आध्यात्मिक अमुर्त संकल्पना समजवण्यासाठी टांकसाळ हे एकदम भौतिक व्यावहारीक जगाचे उदाहरण ते छान वापरतात. कुठली नाणे पाडणारी टांकसाळ यांनी बघितली असेल का ? तेव्हाची राजाची की राजाने नेमलेल्या खाजगी होत्या ? यातील चतुर्विधु ठसा समान मुल्याचा व स्तर मात्र भिन्न हे नेमकं कशाच्या संदर्भात आहे कळल नाही. चातुर्वण्यासंबधी असेल अस वाटलं पण समान मुल्य मग म्हटल नसतं एनी आयडिया ? चौर्‍याशी लक्ष योनींसाठी तितके थरा हे तस स्पष्ट आहे. आणि हा शब्द टांक मला अगोदर नाणं असा अर्थ वाटला होता टाका यावरुन असेल अस वाटलं होत, दो टके का आदमी , तेरी दो टके की नौकरी मेरा लाखो का सावन वगैरे पण त्याचा अर्थ ठसा निघाला एक फ़ेमस मराठी आडनाव आहे मुकुंद टांकसाळे का काहीतरी. रुपक जरा कठीण झाल हे माऊलींच्याही लक्षात आलेल दिसतय म्हणुन ते म्हणतात हे रुपक परि असो. सरळ समजुन घे... ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जै स्थुळाचिया आंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे, टांकसाळ । चतुर्विधु ठसा, उमटों लागे आपैसा, मोला तरी सरसा, परी थरचि आनान। होती चौर्‍यांशी लक्ष थरा, येरा मिति नेणिजे भांडारा, भरे आदिशून्यांचा गाभारा, नाणेयांसी। ऎसे एकतुके पांचभौतिक, पडती बहुवस टांक, मग तिये समृद्धिचे लेख, प्रकृतीचि धरी । जे आंखूनि नाणें विस्तारी, पाठी तयांची आटणी करी, माजी कर्माकर्माचिया व्यव्हारीं, प्रवर्तु दावी। हे रुपक परि असो, सांगो उघड जैसे परियेसों, तरी नामरुपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे। आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं, बिंब येथ आन नाहीं, म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं, जगासि मी।(अ-७ ओ-२२ ते २८) कोडें- आवडीने, सरसा- सारखा , आनान -निरनिराळ्या, एकतुके - एकसारखे, टांक- ठसे, लेख- गणना ( लेखापाल यावरुनच), अतिसो- विस्तार , अवसान-लय अर्थ- ही सुक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थुल महाभुतांच्या अंगांना घडविते, तेव्हा भुतसृष्टीची टांकसाळ सुरु होते. या टांकसाळीतुन निर्माण होणा‍र्‍या प्राणरुपी टाकीचे चार नमुन्यांचे ठसे आपोआप उमटु लागतात. त्यांचे मुल्य समान असले तरी स्तर मात्र भिन्न आहेत. यांचे स्तर चौर्‍यांशी लक्ष आहेत, इतरांची तर गणतीच नाही, अशा असंख्य नाण्यांनी आदिप्रकृतीचा गाभारा खचाखच भरुन जातो. अशा प्रकारे पंचमहाभुतांची सारख्या परिमाणाची इतकी विपुल नाणी पडतात की एकट्या प्रकृतीलाच त्याच्या समृद्धीचा लेखा जोखा ठेवता येतो. मग प्रकृती या जीवरुपी नाण्यांचा कस लावुन , ठसा मारुन विस्तार करते. त्याचीच ती नंतर आटणी करते, मध्यंतरी (माजी) च्या काळात ती त्याच्याद्वारे कर्म-अकर्माचा व्यवहार चालवुन दाखवीते. अर्जुना आता हे रुपक पुरे झाले, आता उघड सोप्या शब्दात सांगतो ते ऎक, हा नाम रुपा चा विवीधतेचा पसारा प्रकृतिच करत असते. आणि ही प्रकृति तर माझ्या ठिकाणी अधिष्ठान रुपाने भासते. यात खोटे काहीच नाही, म्हणुन मीच जगाच्या उत्त्पत्ती- स्थिती- लयाला कारणीभुत आहे.

मारवा Mon, 05/12/2025 - 17:50
ऐसी अक्षरे वरील याच वरील लेखाच्या एका प्रतिसादात श्री अरविंद कोल्हटकरांनी ही फार सुंदर रोचक अशी माहिती तेव्हा दिलेली होती. ती इथे मूळ लेखाला समर्पक आणि उपयुक्त आहे म्हणून. इथे देण्याचा मोह आवरत नाहीय. अध्यात्म, योगसाधना अशा विषयांत काहीच गोडी आणि गति नसल्याने त्याबाबत टीकाटिप्पणी करू शकत नाही पण वरील चर्चेतील तीन मुद्द्यांंविषयी थोडे मतप्रदर्शन करू शकतो. प्रथम चकोर पक्षी. चकोर पक्ष्याभोवती संस्कृत वाङ्मयामध्ये प्रचलित दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें-। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टि पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो. त्विषं चकोराय सुधां सुराय। कलामपि स्वावयवं हराय। ददज्जयत्येष समस्तमस्य। कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥ उत्तरनैषधचरित २२.६५ (चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात् हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे. मृषा निशानाथमह: सुधा वा हरेदसौ वा न जराविनाशौ। पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥ उत्तरनैषधचरित २२.१०२. चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ति देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत? स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा। अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय: पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥ सौंदर्यलहरी ६३. तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात. दुसरा म्हणजे मुशीतील वितळणारे मेण. मला वाटते की हा उल्लेख धातूचे ओतीव पुतळे करण्याच्या जगभरच्या अनेक संस्कृतींना प्राचीन काळापासून माहीत असलेल्या lost wax casting पद्धतीला अनुसरून आहे. ह्या पद्धतीमध्ये ज्याचा ओतीव पुतळा/प्रतिकृति करायची आहे अशा व्यक्ति/मूळ गोष्टीची मेणामध्ये प्रतिकृति करायची. नंतर तिला कसल्याहि hard plaster ने - उदा चिकण माती, हल्ली प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात - लिंपण करायचे. ते पूर्ण सुकवायचे. सुकल्यानंतर ते मुशीमध्ये भाजायचे म्हणजे आतील मेळ द्रवरूप होते. ते ओतून द्यायचे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत धातूचा रस ओतायचा. तो रस पूर्णपणे थंड होऊन धातु घट्ट झाला की बाहेरचे लिंपण फोडून दूर करायचे म्हणजे धातूमधील ओतीव पुतळा/प्रतिकृति शिल्लक उरते. अखेर टांकसाळ म्हणजे टंकशाला. ह्यावर माझ्याच 'पैसाअडका इत्यादि' ह्या जुन्या लेखातील संदर्भाचा भाग येथे देतो. "टका - १)१६ शिवराई, २)४ पैसे, ३)१ आणा, ४)उत्तर हिंदुस्तानात २ पैसे, ५)गुजरातमध्ये ३ पैसे. (दाते-कर्वे.) तसेच ’घरटका’ घरावर कर, 'लग्नटका’ लग्नावर कर.(मोल्सवर्थ.) उत्तर हिंदुस्तानात दोन पैसे, चांदीचे नाणे.(चतुर्वेदी.) (’अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर आटा टका सेर खाजा’ - अंधेर नगरीत विचित्र राज्य, आटा आणि मिठाई, दोन्हीचा भाव सारखाच - शेराला एक टका. ’सब घोडे बारा टके’ - सगळे घोडे एकाच किमतीचे - बारा टके, one size fits all. सोनटक्का = सोन्याचे नाणे. मूळ संस्कृत ’टङ्क’, ठसा उठवून केलेले नाणे, a punch-marked coin. त्यावरून ’टङ्कशाला’ टांगसाळ. बंगाली भाषेत টাকা टाका हे बोलीभाषेतील रुपयाचे नाव असून बांगलादेशाच्या चलनाचेहि तेच नाव आहे.)"

सस्नेह Sat, 05/24/2025 - 19:51
मारवाजी शतश: धन्यवाद या लेखासाठी. काय त्या ज्वलंत उपमा आणि विलक्षण वर्णन ! सवडीने वाचावा असा हा लेख असल्याने वाखू साठवून दमादमाने रसपान करत वाचते आहे. शिवाय एका वाचनात संपूर्ण आकलन होणार नाही सो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. __/\__

Bhakti Sun, 05/25/2025 - 18:46
जैसे शारदिचिये चंद्र कळे। माजि अमृत कण कोवळे। ते वेचिती मने मवाळे। चकोर तलगे। याचा अर्थ असा की, हा ग्रंथ मी सुद्धा तुम्हासाठी सिद्ध केला आहे यामागे सर्वस्व सद्गुरूंची असीम कृपा असून निश्चितच हा ग्रंथ माझ्या श्रोत्यांना आनंद देणार आहे असा निर्विवाद आशावाद व्यक्त होताना दिसतो. चकोराचे पिल्लू जसे अमृतकण सेवन करते तसे आपण या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा आपण मागील अमृतकल सहज लिलया स्वीकारून आनंदाची परमोच्य सीमा गाठावी. आपण माझ्या अज्ञानाची जाणीव ठेवून या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे, आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत ते जे नाजूक नाजूक सांगितले आहे ते भगवंताचे प्रेम आहे ते मला कळत नाही म्हणून लहान होऊन सेवन करा, चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञान कण निश्चितच मिळतील. संदर्भ -ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीमधील मनाची भूमिका लेखक-प्रो.डॉ.मार्तंड दिवाकर कुलकर्णी नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन खरोखरच ही ओवी खुपच सुंदर अभ्यासपूर्ण आहे.त्यात हे वाचनात आले, म्हणून इथे दिली.अजूनही वाचनात आल्यावर नक्की देईन. बाकी ,नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन हे पुस्तक आळंदी संस्थानाने नुकतेच माऊलींच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्सर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केले आहे.खुप सुंदर आहे, नक्की वाचा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥ ज्ञानेश्वरी वाचतांना वाचकाचे काय होते माझा अनुभव सांगतो सर्वात अगोदर ज्ञानेश्वर आपल्याला मराठी पहिली च्या वर्गात बसवतात. आपलं मराठी भाषेचं ज्ञान तर जाऊच द्या शब्दसंग्रह कीती तोकडा आहे हे दाखवुन देतात. ज्ञानेश्वरीतल्या नुसत्या मराठी शब्दांवर एक फ़ार मोठं प्रकरण होइल. वाचतांना अनेक ठिकाणी सेरेनडिपीटी चा अनुभव येतो अनेक सुखद धक्के अनेक ओव्यांमधुन आपल्याला बसतच असतात.ज्ञानेश्वरी तशी सरळ वाचता येत नाही, एक झालं की दुसरां अध्याय अस होत नाहीच.