मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अयोध्या काशी यात्रा!

अमरेंद्र बाहुबली ·

कंजूस Tue, 04/22/2025 - 17:01
खूप छान फिरवलेत. असे फोटो लेखन नवनवीन जागेंचं टाकत राहा. रात्रीचे घाटांचे फोटो चांगले आले आहेत. वेळ कमी असल्याने सारनाथ राहिलंच. पण ज्ञानवापीचा काशी मंदिरासह फोटो आवडला.

In reply to by कंजूस

हो, काशीत बरच काही पाहण्यासारखे आहे हे कर्नल साहेबानी कळवले, नंतर लक्षात आले की एक दिवस उशिराचे तिकीट बुक करायला हवे होते, कर्नल साहेबानी दिलेली यादी. इथे संग्रही राहील. अकबराचा किल्ला बघा. डोंबराजाचा आशिर्वाद घेऊन या. दशाश्वमेध,मनकर्णीका,अहिल्याबाई होळकर असे एकुण अस्सी घाट आहेत. वेणीदान, पिंडदान,स्वताचे श्राद्ध असे अनेक इहलोकी सुख व परलोक स्वर्ग प्राप्तीचे मार्ग सुकर करून घ्या. विश्वनाथाचे दर्शन घ्या. ग्यानवापी बघून घ्या. नेहरूंचे जन्म स्थान आनंद भवन बघून घ्या. तुलसीचौरा भेट द्या. कबीरांना त्यांचे गुरू रामानंद भेटले तो घाट बघा. तुलसीदास मंदिर व संपुर्ण रामायण संग्रहालय, कृष्ण संग्रहालय बघून घ्या. बनारस विद्यापीठ जवळच सारनाथ बोधवाक्य आणी स्तुप बघून घ्या. बेडमी पुरी भाजी जरूर खा. बनारसी पान,मलाई पान चव घ्या.लस्सी,चाट खाऊन वजा. आमच्या सुनबाईंना बनारसी सिल्क साडी जरूर आणा. किती लिहू..... जाऊ देत जेव्हढे दिसेल तेव्हढे बघून,खाऊन घ्या. बाकी काही केले नाही तरी गंगाजल जरूर भरून आणा. बरेच लोकांच्या कामाला येईल. मी पाच लिटर दोन हजार चार मधे भरून आणले होते. आतापर्यंत आर्धे झाले आहे.

चित्रगुप्त Tue, 04/22/2025 - 17:51
प्रवासवर्णन आणि फोटो खूपच छान. असेच फिरत रहा आणि लिहीत रहा. शुभेच्छा. अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा त्यांच्या राज्यकर्तृत्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत संपूर्ण भारतभर हजारो मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा आणि यात्रेकरूंकरिता सुविधा निर्माण केल्या. -- अहिल्याबाईंनी बांधलेली महत्त्वाची मंदिरे आणि धार्मिक स्थळांवरील बांधकामे: १. काशी (वाराणसी): काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७८० साली केला.त्यांनी मंदिराभोवती घाट, धर्मशाळा व यात्रेकरूंसाठी विश्रामस्थळे बांधली.वाराणसीतील गंगेवर 'अहिल्याघाट' आजही त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध आहे. २. प्रयाग (अलाहाबाद): संगमाजवळ घाट व यात्रेकरूंकरिता धर्मशाळा त्यांनी उभारली. कुंभमेळ्याच्या वेळी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. ३. रामेश्वर (तामिळनाडू): रामेश्वरम मंदिरातील मुख्य मंडपाचे (गाभाऱ्याचे) पुनर्निर्माण त्यांनी केले.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व विहिरींची सोय केली. ४. द्वारका (गुजरात): द्वारकाधीश मंदिराचे संरक्षण, मरम्मत आणि सौंदर्यीकरण.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व अन्नछत्र. ५. बद्रीनाथ व गंगोत्री (उत्तराखंड): दुर्गम ठिकाणी असूनसुद्धा, त्यांनी धार्मिक यात्रांसाठी सुरक्षित घाट व विश्रांतीस्थळे उभारली.पाणी व अन्नाची सोय यात्रेकरूंना उपलब्ध करून दिली. ६. अयोध्या: श्रीराम मंदिर परिसरात घाट व पूजास्थळांचे जिर्णोद्धार. अयोध्येतील मंदिरांना आर्थिक व स्थापत्य सहाय्य. महाराष्ट्रातील कार्य: ७. पंढरपूर (विठोबा मंदिर): पंढरपूर येथे घाटांचे बांधकाम व यात्रेकरूंना धर्मशाळांची सुविधा. विठोबा मंदिर परिसरात विहिरी व पाण्याची सोय. ८. नाशिक (गोदावरी किनारा): पंचवटी परिसर: रामघाट, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा आणि श्रीराम मंदिर यांसारखी बांधकामे केली. त्र्यंबकेश्वर: कुशावर्त घाटावर पूल बांधला. गोदावरी नदीच्या काठी घाट व स्नानस्थळांचे बांधकाम. कुंभमेळ्यासाठी यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा. ९. उज्जैन (महाकाल मंदिर): महाकालेश्वर मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार. अहिल्याबाई स्वतः उज्जैनमध्ये काही काळ राहिल्या होत्या आणि तेथे अनेक शैव मंदिरांचे पुनर्बांधणी केली. १०. पुणे आणि इतर ठिकाणी: पुण्यात काही धर्मशाळा व सार्वजनिक विहिरी.सामान्य जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वास्तविक सामाजिक गरजा पूर्ण करणारी बांधकामे. इतर सामाजिक बांधकामे: १०० पेक्षा जास्त विहिरी, तलाव आणि जलाशय त्यांनी बांधले जेव्हा दुष्काळ पडत असे. अनेक गावांमध्ये जलव्यवस्था आणि अन्नछत्र चालवली. स्त्रियांसाठी सुरक्षित स्नानस्थळे व विश्रांतीगृहे. अहिल्याबाईंच्या बांधकामाचा एक खास नमुना म्हणजे त्यांनी कुठेही फक्त मूर्ती नव्हे तर संपूर्ण मंदिर संकुल, त्याच्या आजूबाजूच्या परिसरासहित उभारले. त्यांनी वास्तुशास्त्र व धार्मिक गरजा यांचा मिलाफ साधला. अहिल्याबाई होळकर यांच्या या कार्यांमुळे त्यांना "पुण्यश्लोक" म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बांधकामांचा वारसा आजही भारतभर पाहायला मिळतो.

In reply to by चित्रगुप्त

खरोखर अहिल्याबाई होळकर दैवी स्त्री होत्या, सोरटी सोमनाथ पासून ते रामेश्वरचे मंदिर, प्रत्येक धर्मिक स्थळी अहिल्याबाईंनी सढळ हाताने मदत करून मंदिरे, घाट बांधले आहेत. अहिल्याबाईना मी मनापासून वंदन करतो! _/\_

कर्नलतपस्वी Tue, 04/22/2025 - 18:58
फोटो आवडले. पहिली वारी १९८४, दुसरी वारी १९८८. तिसरी वारी होते का बघावे लागेल. बाबरी मशिदीचा मुळ ढांचा, मग समतल जमिन असे बघावयास मिळाले. आता मंदिर बघावयास हवे. बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. त्यामुळे आपली तक्रार निकाली काढण्यात आली आहे. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. उत्तर भारतातील नावाडी मराठीत बोलताना दिसले या मुळे हिन्दी आंदोलन सौम्य होणार काय? (ह.घ्या.) लेख आवडला.

In reply to by कर्नलतपस्वी

तटस्थ प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार कर्नलसाहेब! बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. खरे तर मंदिरातच इतकं महाभयंकर थकवा आला होता की इतर कुठे जायची ईच्छाच मेली. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. सहमत, पण पायपीट इतकी ठेवलीय की वरून अस्मानी नी खाली सुलतानी संकट भासावे. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. बरोबर पन अनेक जागा अश्या बनवलेल्या असतात की जिथे लोक आठवण म्हणून फोटो कधी शकतात, मूळ मंदिरात नाही पण मंदिर परिसरात. अयोध्येत अश्या गोष्टी जाणून बुजून न केल्यासारख्या वाटतात. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. मराठी माणसाने आजही ठरवले ना की फक्त मराठीतच बोलायचे तर अख्खा भारत वर्षभराच्या आत मराठी शिकेल. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. ह्याबद्दल माफी, काशी विश्वेश्वर हिंदूंचे सर्वात पवित्र मंदिर आहे ना? त्यामुळे उपमा दिली, पण अयोध्येत खरोखर हाल आहेत. :( लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. नाही, उलट आहे कर्नल साहेब, पूर्वीचा गालीच्छपणा नी बकालपणा बहुतेक पर्यटन स्थळानवरुन गेलाय, हॉटेल्स चांगल्या नी स्वस्त मिळतात, रस्ते स्वच्छ आहेत, कर्मचारी नम्र नी प्रशिक्षित दिसत होते, पोलीस नी सैन्यही अदबीने बोलत होते, स्थानिकांचीही दादागिरी गुंडागर्दी नव्हती. गंगा कमालीची स्वच्छ होती, अगदी गंगेमध्येच फ्लोटिंग चेंजिंग रूमही होते! ह्याबाबतीत मी योगीजीना नक्कीच धन्यवाद देईन! अयोध्याही पायपीट सोडली तर मस्त केलीय. गैरसोय अशी नव्हती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Tue, 04/22/2025 - 21:42
शंभर टक्के सहमत. १९८४ मधे दशाश्वमेध घाटावरून विश्वनाथ मंदिराकडे येताना वाटत होते की गटारातून चालतोय.

In reply to by कर्नलतपस्वी

अरे रे , गंगेचे हे हाल कल्पना करुनच कसेतरी वाटते. तरीही कर्नल साहेब एक यात्रा काढाच! रेल्वेने २४ तासात पोहोचाल. घाट मंदिर फिरून या. सौंदर्य टिपून या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माहितगार Wed, 04/23/2025 - 08:16
मागच्या एका उन्हाळ्यात माझ्या चुलत भावासोबत मप्र ग्वाल्हेर आग्रा उप्र मथुरा वृंदावन झाले. माझ्या भावाला भाजपा बद्दल बर्‍यापैकी आदर आहे. मथुरेपेक्षा वृंदावन मधील अस्वच्छता त्याच्याही डोक्यात गेली. हेमामालिनीने इतक्या वर्षात काय केले असा स्वाभाविक प्रश्न त्याने व्यक्त करुन दाखवला. ग्वाल्हेर मधल्या ईमारती देखण्या आहेत पण जुन्या ग्वाल्हेर मध्ये अस्वच्छता बरीच आहे. तेथिल खूपच कचोरी आणि गुलाबजाम स्थानिकांमध्ये खूपच लोकप्रीय आहेत. आपल्याकडेही माश्यांकडे दुर्लक्ष केले जाते पण उत्तरेत बाहेर अस्वच्छेतेसोबत माश्यांचे मोठे प्रमाण भयंकर समीकरण वाटले. परकीय लोक भारतात ट्रीप मारली की पोट बिघडते अशी तक्रार करतात तसे बाहेरचे कमीत कमी खाऊन माझी ओव्हर ऑल इम्युनिटी बरी असूनही पोट बिघडले होते. बाहुबलींनी खाण्याबद्दल काही तक्रार केली नाही म्हणजे त्यांच्या जठराच्या बाहुबलीत्वाला आदर आणि माझी नजर ना लागो हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

धन्यवाद माहितगार साहेब, खरे तर माझे जठर खरोखर ताकदवान आहे, काहीही पचवून घेते नी त्रासही होत नाही. बाकी मी सध्या डायटवर आहे. बाहेरचे पदार्थ पूर्णत वर्ज्य. जेवणात मो चांगले स्वच्छ टापटीप हॉटेल पाहून फक्त दोन मिस्सी रोट्या खाल्ल्या, तसेच दशाश्वमेध घाटाजवळच अतिशय स्वच्छ असे उडुपी होटल आहे तिथे नाश्ता केला. त्यामुळे बाहेर जेवणाचा संबंध फार कमी आला.

चांगलं लिहिलंय. जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती कारण माहिती नाही पण ही असली मंदिर आवडतच नाहीत. एकतर ती मंदिर वाटतच नाहीत. कदाचित पंढरपूर, तुळजापूर सारखी बघण्यात आली म्हणून आवडत नसतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

बरोबर! दगडी बांधकामाच्या मंदिरातील सौंदर्य नी थंडावा ह्या असल्या मंदिरात आजीबात जाणवत नाही. ना तिथे भाव जागृत होतो ना भक्ती. संगमरवरी दगडात जर देवाची मूर्ती असेल तर मग तर मंदिरातून पळू पळू वाटू लागते.

कर्नलतपस्वी Wed, 04/23/2025 - 05:46
तसे नव्हते म्हणायचे. गंगा तेव्हां सुद्धा इतकीच स्वच्छ व सुंदर होती. एक रस्ता जो घाटावरून मंदिराकडे यायचा तो खुपच चिंचोळा,दोन्ही बाजुला गलिच्छ दुकाने व कचऱ्याचे ढीग होते. दुर्गंधी व घराघरातून येणाऱे घाण पाणी वाहत होते.

Bhakti Wed, 04/23/2025 - 08:37
सुंदर लिहिलंय! बाळ खुपच गोंडस आहे.मंदिर आणि मस्जिद किती परिणामकारक फोटो आहे,स्तब्ध! ॐ श्री काशी विश्वेश्वराय नमः। काश्यां हि काशीति पुरं प्रसिद्धं, सर्वपापक्षयं नृणां स्यात् सदा। यत्र शिवः साक्षात् विराजते, तस्मै नमः काश्यां निवासिने।। ते घाट,काशी विश्वेश्वर पाहायची खुप इच्छा आहे.

श्वेता२४ Wed, 04/23/2025 - 14:05
अतिशय जिवंत वर्णन शैली आहे तुमची!!! फोटो सुद्धा खूप सुंदर आले आहेत... डायट मुळे तुम्ही तिथे काही खाल्ले नाहीत असे लिहिले असले तरी वाराणसी हे तेथील विविध उत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे .मी भविष्यात काशीला जाणार आहे त्यावेळी तेथील स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणे यावरही माझा विशेष भर असणार आहे.... बघूया कधी योग येतोय....

In reply to by श्वेता२४

धन्यवाद श्वेता! काशीला नक्की जा! फक्त भक्ती म्हणून नाही तर पर्यटनस्थळ म्हणूनही काशी सुंदर आहे!

विअर्ड विक्स Wed, 04/23/2025 - 16:07
वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) असो. आपण वर्णन केलेली स्थळे मी लखनौ ला राहत असताना ३वेळेस पाहिलेली आहेत. त्यामुळे थोडे अधिकारवाणीने पुढील गोष्टी सांगतोय १. भर उन्हाळयात उत्तर प्रदेशातील कुठल्याही पर्यटन स्थळी गेल्यास उन्हाचा भयंकर त्रास होतो, यांत पूर्वांचलचे उन थोडे जरा जास्तच भाजून काढते. केल्याने पर्यटन, रामजन्म प्रहरी आपला दर्शनयोग होता असे समजून गोड मानणे. २. अयोध्येला जाऊन मंदिराच्या भव्यतेवर व सुरक्षा व्यवस्थेवर आपले वर्णन वाचले. हनुमान गांधी, सीता कि रसोई , इत्यादी पाहणे गरजेचे आहे. पण आजकाल ज्याप्रमाणे लालबागच्या राजामुळे त्या परिसरातील इतर गणपती दर्शनाची लोकानां तेवढी उत्सुकता राहत नाही, तसेच काहीसे या ठिकाणांचे झाले आहे.मंदिराच्या उंचीसाठी हनुमान गढीची उंची रेफेरेंस पॉईंट आहे, गढी चे दर्शन घेतले असते तर मुद्दा कळला असता, असो. मंदिराआधी तंबूतले राम पाहण्यासाठीसुद्धा तेवढीच गर्दी व्हायची. त्यावेळेस मोबाइल व तत्सम वस्तू फार लांब ठेवाव्या लागत, तंबूत ३ स्तरीय सुरक्षा होती. ती अनुभवली असती तर त्यावर वैतागून आपण एक वेगळा लेख लिहिला असता. माझ्यावेळेस दर्शनासाठी इतका वेळ मोडला कि माझ्या ड्रायव्हरला मला काही बरे वाईट झाले असे वाटल्याने तो सगळीकडे मला शोधू लागला, नशीब गाडी घेऊन परत नाही गेला :). माझा ड्राइवर हा गोरखपूरचाच होता. शरयू नदीकाठी बांध बांधून उदंचन केंद्राद्वारे एक कृत्रिम घाट बनवलेला आहे. येथे जाऊन स्नान केले कि सर्व थकवा जातो. ३. मी गाडी गोरखपूरहून घेऊन गेलो होतो. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. ४. वाराणसी - आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . मी स्वतः पर्यावरण अभियंता असल्याने अधिकरवाणीने सांगतोय. संकटमोचन मंदिर हे कालभैरव मंदिरापेक्षा भव्य आहे . कालभैरव मंदिर कॉरिडॉरचे काम मी गेलो असताना चालू होते , आता पूर्ण झाले असल्यास भव्यता जाणवेल. विशवनाथ मंदिर दर्शन आणि IIT BHU काशी विशवनाथ ह्याबद्दल माहिती घेऊन IIT BHU मंदिर जरूर पाहण्यासारखे आहे. बाकी एकूण ८४ घाट आहेत, संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. ५. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे.

In reply to by विअर्ड विक्स

सर्वप्रथम, प्रतिसादाबद्दल आभार. वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) खरेतर निपक्षपतिपणेच लिहिले आहे, ऊन सोडले तरीही पायपीट खुपच आहे राममंदिरासाठी, त्यामुळे जे जसे दिसले तसे लिहिलेय, गंगा स्वच्छ मिळाल्याचेही लेखात लिहिलेच आहे की. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. मंदिर भव्य नी सुंदर आहे, लेख लिहायचे मनात नसल्याने बाहेरील तळ्याचा फोटू घेतला नाही, मंदिराच्या भव्यतेसाठी रेफरन्स ला मी मंदिर समोर उभा आहे. आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. ह्या बाबतीत सहमत, सकाळी ११ वाजता प्रचंड मोठी रांग होती, हे लेखात लिहायचे राहिले, आम्ही ४ ला जाऊनही आम्हाला १.५ तास लागले तर ह्या लोकाना दर्शनाला नक्की ८ तास लागले असतील, रंग केवढी असावी तर? मंदिर सोडून वाराणसीच्या ५ - १० गल्ली बोळा ओलांडून प्रत्येक गेटवर पुढे गेलेली होती, बरे झाले त्या गप्पिष्ठ प्रोफेसरने मला रात्रीच दर्शन घ्या असा मोलाचा सल्ला देऊन ठेवला होता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . धन्यवाद, पैलतिराबद्द्ल नावड्यांनी नंतर सांगितले तो पर्यंत इकडे डुबकी मारल्या गेली होती, पण पाणी बरेच स्वच्छ मिळाले. संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. वाराणसीम्हणजे मंदिर नी गंगेत डुबकी एवढेच मला वाटले होते नाहीतर आणखी एक दिवसाचा वाढीव प्लॅन केला असता. नंतर जसजसे कळत गेले तसतसे लक्षात आले, पुढील वेळी चांगला मोठा प्लॅन करणार. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे. पुढीलवेळी जाणे झाले तर नक्की पाहीन, रंकाळाही पहायचाय.

कंजूस Tue, 04/22/2025 - 17:01
खूप छान फिरवलेत. असे फोटो लेखन नवनवीन जागेंचं टाकत राहा. रात्रीचे घाटांचे फोटो चांगले आले आहेत. वेळ कमी असल्याने सारनाथ राहिलंच. पण ज्ञानवापीचा काशी मंदिरासह फोटो आवडला.

In reply to by कंजूस

हो, काशीत बरच काही पाहण्यासारखे आहे हे कर्नल साहेबानी कळवले, नंतर लक्षात आले की एक दिवस उशिराचे तिकीट बुक करायला हवे होते, कर्नल साहेबानी दिलेली यादी. इथे संग्रही राहील. अकबराचा किल्ला बघा. डोंबराजाचा आशिर्वाद घेऊन या. दशाश्वमेध,मनकर्णीका,अहिल्याबाई होळकर असे एकुण अस्सी घाट आहेत. वेणीदान, पिंडदान,स्वताचे श्राद्ध असे अनेक इहलोकी सुख व परलोक स्वर्ग प्राप्तीचे मार्ग सुकर करून घ्या. विश्वनाथाचे दर्शन घ्या. ग्यानवापी बघून घ्या. नेहरूंचे जन्म स्थान आनंद भवन बघून घ्या. तुलसीचौरा भेट द्या. कबीरांना त्यांचे गुरू रामानंद भेटले तो घाट बघा. तुलसीदास मंदिर व संपुर्ण रामायण संग्रहालय, कृष्ण संग्रहालय बघून घ्या. बनारस विद्यापीठ जवळच सारनाथ बोधवाक्य आणी स्तुप बघून घ्या. बेडमी पुरी भाजी जरूर खा. बनारसी पान,मलाई पान चव घ्या.लस्सी,चाट खाऊन वजा. आमच्या सुनबाईंना बनारसी सिल्क साडी जरूर आणा. किती लिहू..... जाऊ देत जेव्हढे दिसेल तेव्हढे बघून,खाऊन घ्या. बाकी काही केले नाही तरी गंगाजल जरूर भरून आणा. बरेच लोकांच्या कामाला येईल. मी पाच लिटर दोन हजार चार मधे भरून आणले होते. आतापर्यंत आर्धे झाले आहे.

चित्रगुप्त Tue, 04/22/2025 - 17:51
प्रवासवर्णन आणि फोटो खूपच छान. असेच फिरत रहा आणि लिहीत रहा. शुभेच्छा. अहिल्याबाई होळकर यांचा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा त्यांच्या राज्यकर्तृत्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत संपूर्ण भारतभर हजारो मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा आणि यात्रेकरूंकरिता सुविधा निर्माण केल्या. -- अहिल्याबाईंनी बांधलेली महत्त्वाची मंदिरे आणि धार्मिक स्थळांवरील बांधकामे: १. काशी (वाराणसी): काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी १७८० साली केला.त्यांनी मंदिराभोवती घाट, धर्मशाळा व यात्रेकरूंसाठी विश्रामस्थळे बांधली.वाराणसीतील गंगेवर 'अहिल्याघाट' आजही त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध आहे. २. प्रयाग (अलाहाबाद): संगमाजवळ घाट व यात्रेकरूंकरिता धर्मशाळा त्यांनी उभारली. कुंभमेळ्याच्या वेळी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. ३. रामेश्वर (तामिळनाडू): रामेश्वरम मंदिरातील मुख्य मंडपाचे (गाभाऱ्याचे) पुनर्निर्माण त्यांनी केले.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व विहिरींची सोय केली. ४. द्वारका (गुजरात): द्वारकाधीश मंदिराचे संरक्षण, मरम्मत आणि सौंदर्यीकरण.यात्रेकरूंकरिता धर्मशाळा व अन्नछत्र. ५. बद्रीनाथ व गंगोत्री (उत्तराखंड): दुर्गम ठिकाणी असूनसुद्धा, त्यांनी धार्मिक यात्रांसाठी सुरक्षित घाट व विश्रांतीस्थळे उभारली.पाणी व अन्नाची सोय यात्रेकरूंना उपलब्ध करून दिली. ६. अयोध्या: श्रीराम मंदिर परिसरात घाट व पूजास्थळांचे जिर्णोद्धार. अयोध्येतील मंदिरांना आर्थिक व स्थापत्य सहाय्य. महाराष्ट्रातील कार्य: ७. पंढरपूर (विठोबा मंदिर): पंढरपूर येथे घाटांचे बांधकाम व यात्रेकरूंना धर्मशाळांची सुविधा. विठोबा मंदिर परिसरात विहिरी व पाण्याची सोय. ८. नाशिक (गोदावरी किनारा): पंचवटी परिसर: रामघाट, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा आणि श्रीराम मंदिर यांसारखी बांधकामे केली. त्र्यंबकेश्वर: कुशावर्त घाटावर पूल बांधला. गोदावरी नदीच्या काठी घाट व स्नानस्थळांचे बांधकाम. कुंभमेळ्यासाठी यात्रेकरूंसाठी विशेष सुविधा. ९. उज्जैन (महाकाल मंदिर): महाकालेश्वर मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार. अहिल्याबाई स्वतः उज्जैनमध्ये काही काळ राहिल्या होत्या आणि तेथे अनेक शैव मंदिरांचे पुनर्बांधणी केली. १०. पुणे आणि इतर ठिकाणी: पुण्यात काही धर्मशाळा व सार्वजनिक विहिरी.सामान्य जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वास्तविक सामाजिक गरजा पूर्ण करणारी बांधकामे. इतर सामाजिक बांधकामे: १०० पेक्षा जास्त विहिरी, तलाव आणि जलाशय त्यांनी बांधले जेव्हा दुष्काळ पडत असे. अनेक गावांमध्ये जलव्यवस्था आणि अन्नछत्र चालवली. स्त्रियांसाठी सुरक्षित स्नानस्थळे व विश्रांतीगृहे. अहिल्याबाईंच्या बांधकामाचा एक खास नमुना म्हणजे त्यांनी कुठेही फक्त मूर्ती नव्हे तर संपूर्ण मंदिर संकुल, त्याच्या आजूबाजूच्या परिसरासहित उभारले. त्यांनी वास्तुशास्त्र व धार्मिक गरजा यांचा मिलाफ साधला. अहिल्याबाई होळकर यांच्या या कार्यांमुळे त्यांना "पुण्यश्लोक" म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बांधकामांचा वारसा आजही भारतभर पाहायला मिळतो.

In reply to by चित्रगुप्त

खरोखर अहिल्याबाई होळकर दैवी स्त्री होत्या, सोरटी सोमनाथ पासून ते रामेश्वरचे मंदिर, प्रत्येक धर्मिक स्थळी अहिल्याबाईंनी सढळ हाताने मदत करून मंदिरे, घाट बांधले आहेत. अहिल्याबाईना मी मनापासून वंदन करतो! _/\_

कर्नलतपस्वी Tue, 04/22/2025 - 18:58
फोटो आवडले. पहिली वारी १९८४, दुसरी वारी १९८८. तिसरी वारी होते का बघावे लागेल. बाबरी मशिदीचा मुळ ढांचा, मग समतल जमिन असे बघावयास मिळाले. आता मंदिर बघावयास हवे. बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. त्यामुळे आपली तक्रार निकाली काढण्यात आली आहे. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. उत्तर भारतातील नावाडी मराठीत बोलताना दिसले या मुळे हिन्दी आंदोलन सौम्य होणार काय? (ह.घ्या.) लेख आवडला.

In reply to by कर्नलतपस्वी

तटस्थ प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार कर्नलसाहेब! बाकी,आयोध्येत हनुमान गढी,कनक भवन,शरयूचा घाट बघावयास हवा होता. काळाराम मंदिरातील पुजारी देशपांडे होते आता माहित नाही. खरे तर मंदिरातच इतकं महाभयंकर थकवा आला होता की इतर कुठे जायची ईच्छाच मेली. आयोध्येत दुपारी बारा वाजता प्रभू जरी फिरले असते तरी त्यांना सुद्धा तुमच्या एवढेच उन लागले असते. सहमत, पण पायपीट इतकी ठेवलीय की वरून अस्मानी नी खाली सुलतानी संकट भासावे. हल्ली भ्रमणध्वनी चित्रिकरणास सर्वत्र बंदी आहे. बरोबर पन अनेक जागा अश्या बनवलेल्या असतात की जिथे लोक आठवण म्हणून फोटो कधी शकतात, मूळ मंदिरात नाही पण मंदिर परिसरात. अयोध्येत अश्या गोष्टी जाणून बुजून न केल्यासारख्या वाटतात. सर्वच पर्यटन स्थळावर भारतीय व विदेशी भाषा मोडकी तोडकी का होईना एक व्यवसायाचा भाग झाला आहे. तसेही मराठा साम्राज्य भारतभर असल्याने मोठे मोठे मराठा सरदार चहूकडे होते. नंतर पीढ्यान पिढ्या तिथेच वाढल्या. त्यामुळेच मराठी वावर सगळीकडेच आहे. मराठी माणसाने आजही ठरवले ना की फक्त मराठीतच बोलायचे तर अख्खा भारत वर्षभराच्या आत मराठी शिकेल. काशी विश्वनाथ मंदिराची तुलना मक्के बरोबर केलेली तुलना व रामजन्मभूमी मुस्लिमांच्या ताब्यात असती तर एवढे हाल नसते झाले हे वाक्य सुद्धा पटले नाही. ह्याबद्दल माफी, काशी विश्वेश्वर हिंदूंचे सर्वात पवित्र मंदिर आहे ना? त्यामुळे उपमा दिली, पण अयोध्येत खरोखर हाल आहेत. :( लोकसंख्यावाढ आणी पर्यटनाची आवड ,उंचावलेले जीवनमान यामुळे सर्वत्र गर्दी व गैरसोय या दोघी बहिणी हातात हात घालून बागडताना हमखास दिसतात. नाही, उलट आहे कर्नल साहेब, पूर्वीचा गालीच्छपणा नी बकालपणा बहुतेक पर्यटन स्थळानवरुन गेलाय, हॉटेल्स चांगल्या नी स्वस्त मिळतात, रस्ते स्वच्छ आहेत, कर्मचारी नम्र नी प्रशिक्षित दिसत होते, पोलीस नी सैन्यही अदबीने बोलत होते, स्थानिकांचीही दादागिरी गुंडागर्दी नव्हती. गंगा कमालीची स्वच्छ होती, अगदी गंगेमध्येच फ्लोटिंग चेंजिंग रूमही होते! ह्याबाबतीत मी योगीजीना नक्कीच धन्यवाद देईन! अयोध्याही पायपीट सोडली तर मस्त केलीय. गैरसोय अशी नव्हती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Tue, 04/22/2025 - 21:42
शंभर टक्के सहमत. १९८४ मधे दशाश्वमेध घाटावरून विश्वनाथ मंदिराकडे येताना वाटत होते की गटारातून चालतोय.

In reply to by कर्नलतपस्वी

अरे रे , गंगेचे हे हाल कल्पना करुनच कसेतरी वाटते. तरीही कर्नल साहेब एक यात्रा काढाच! रेल्वेने २४ तासात पोहोचाल. घाट मंदिर फिरून या. सौंदर्य टिपून या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माहितगार Wed, 04/23/2025 - 08:16
मागच्या एका उन्हाळ्यात माझ्या चुलत भावासोबत मप्र ग्वाल्हेर आग्रा उप्र मथुरा वृंदावन झाले. माझ्या भावाला भाजपा बद्दल बर्‍यापैकी आदर आहे. मथुरेपेक्षा वृंदावन मधील अस्वच्छता त्याच्याही डोक्यात गेली. हेमामालिनीने इतक्या वर्षात काय केले असा स्वाभाविक प्रश्न त्याने व्यक्त करुन दाखवला. ग्वाल्हेर मधल्या ईमारती देखण्या आहेत पण जुन्या ग्वाल्हेर मध्ये अस्वच्छता बरीच आहे. तेथिल खूपच कचोरी आणि गुलाबजाम स्थानिकांमध्ये खूपच लोकप्रीय आहेत. आपल्याकडेही माश्यांकडे दुर्लक्ष केले जाते पण उत्तरेत बाहेर अस्वच्छेतेसोबत माश्यांचे मोठे प्रमाण भयंकर समीकरण वाटले. परकीय लोक भारतात ट्रीप मारली की पोट बिघडते अशी तक्रार करतात तसे बाहेरचे कमीत कमी खाऊन माझी ओव्हर ऑल इम्युनिटी बरी असूनही पोट बिघडले होते. बाहुबलींनी खाण्याबद्दल काही तक्रार केली नाही म्हणजे त्यांच्या जठराच्या बाहुबलीत्वाला आदर आणि माझी नजर ना लागो हि शुभेच्छा.

In reply to by माहितगार

धन्यवाद माहितगार साहेब, खरे तर माझे जठर खरोखर ताकदवान आहे, काहीही पचवून घेते नी त्रासही होत नाही. बाकी मी सध्या डायटवर आहे. बाहेरचे पदार्थ पूर्णत वर्ज्य. जेवणात मो चांगले स्वच्छ टापटीप हॉटेल पाहून फक्त दोन मिस्सी रोट्या खाल्ल्या, तसेच दशाश्वमेध घाटाजवळच अतिशय स्वच्छ असे उडुपी होटल आहे तिथे नाश्ता केला. त्यामुळे बाहेर जेवणाचा संबंध फार कमी आला.

चांगलं लिहिलंय. जैन मंदिरांसारखं पांढऱ्या फरशीचं मंदिर, बाहेर छोट्या छोट्या मूर्ती कारण माहिती नाही पण ही असली मंदिर आवडतच नाहीत. एकतर ती मंदिर वाटतच नाहीत. कदाचित पंढरपूर, तुळजापूर सारखी बघण्यात आली म्हणून आवडत नसतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

बरोबर! दगडी बांधकामाच्या मंदिरातील सौंदर्य नी थंडावा ह्या असल्या मंदिरात आजीबात जाणवत नाही. ना तिथे भाव जागृत होतो ना भक्ती. संगमरवरी दगडात जर देवाची मूर्ती असेल तर मग तर मंदिरातून पळू पळू वाटू लागते.

कर्नलतपस्वी Wed, 04/23/2025 - 05:46
तसे नव्हते म्हणायचे. गंगा तेव्हां सुद्धा इतकीच स्वच्छ व सुंदर होती. एक रस्ता जो घाटावरून मंदिराकडे यायचा तो खुपच चिंचोळा,दोन्ही बाजुला गलिच्छ दुकाने व कचऱ्याचे ढीग होते. दुर्गंधी व घराघरातून येणाऱे घाण पाणी वाहत होते.

Bhakti Wed, 04/23/2025 - 08:37
सुंदर लिहिलंय! बाळ खुपच गोंडस आहे.मंदिर आणि मस्जिद किती परिणामकारक फोटो आहे,स्तब्ध! ॐ श्री काशी विश्वेश्वराय नमः। काश्यां हि काशीति पुरं प्रसिद्धं, सर्वपापक्षयं नृणां स्यात् सदा। यत्र शिवः साक्षात् विराजते, तस्मै नमः काश्यां निवासिने।। ते घाट,काशी विश्वेश्वर पाहायची खुप इच्छा आहे.

श्वेता२४ Wed, 04/23/2025 - 14:05
अतिशय जिवंत वर्णन शैली आहे तुमची!!! फोटो सुद्धा खूप सुंदर आले आहेत... डायट मुळे तुम्ही तिथे काही खाल्ले नाहीत असे लिहिले असले तरी वाराणसी हे तेथील विविध उत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे .मी भविष्यात काशीला जाणार आहे त्यावेळी तेथील स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणे यावरही माझा विशेष भर असणार आहे.... बघूया कधी योग येतोय....

In reply to by श्वेता२४

धन्यवाद श्वेता! काशीला नक्की जा! फक्त भक्ती म्हणून नाही तर पर्यटनस्थळ म्हणूनही काशी सुंदर आहे!

विअर्ड विक्स Wed, 04/23/2025 - 16:07
वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) असो. आपण वर्णन केलेली स्थळे मी लखनौ ला राहत असताना ३वेळेस पाहिलेली आहेत. त्यामुळे थोडे अधिकारवाणीने पुढील गोष्टी सांगतोय १. भर उन्हाळयात उत्तर प्रदेशातील कुठल्याही पर्यटन स्थळी गेल्यास उन्हाचा भयंकर त्रास होतो, यांत पूर्वांचलचे उन थोडे जरा जास्तच भाजून काढते. केल्याने पर्यटन, रामजन्म प्रहरी आपला दर्शनयोग होता असे समजून गोड मानणे. २. अयोध्येला जाऊन मंदिराच्या भव्यतेवर व सुरक्षा व्यवस्थेवर आपले वर्णन वाचले. हनुमान गांधी, सीता कि रसोई , इत्यादी पाहणे गरजेचे आहे. पण आजकाल ज्याप्रमाणे लालबागच्या राजामुळे त्या परिसरातील इतर गणपती दर्शनाची लोकानां तेवढी उत्सुकता राहत नाही, तसेच काहीसे या ठिकाणांचे झाले आहे.मंदिराच्या उंचीसाठी हनुमान गढीची उंची रेफेरेंस पॉईंट आहे, गढी चे दर्शन घेतले असते तर मुद्दा कळला असता, असो. मंदिराआधी तंबूतले राम पाहण्यासाठीसुद्धा तेवढीच गर्दी व्हायची. त्यावेळेस मोबाइल व तत्सम वस्तू फार लांब ठेवाव्या लागत, तंबूत ३ स्तरीय सुरक्षा होती. ती अनुभवली असती तर त्यावर वैतागून आपण एक वेगळा लेख लिहिला असता. माझ्यावेळेस दर्शनासाठी इतका वेळ मोडला कि माझ्या ड्रायव्हरला मला काही बरे वाईट झाले असे वाटल्याने तो सगळीकडे मला शोधू लागला, नशीब गाडी घेऊन परत नाही गेला :). माझा ड्राइवर हा गोरखपूरचाच होता. शरयू नदीकाठी बांध बांधून उदंचन केंद्राद्वारे एक कृत्रिम घाट बनवलेला आहे. येथे जाऊन स्नान केले कि सर्व थकवा जातो. ३. मी गाडी गोरखपूरहून घेऊन गेलो होतो. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. ४. वाराणसी - आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . मी स्वतः पर्यावरण अभियंता असल्याने अधिकरवाणीने सांगतोय. संकटमोचन मंदिर हे कालभैरव मंदिरापेक्षा भव्य आहे . कालभैरव मंदिर कॉरिडॉरचे काम मी गेलो असताना चालू होते , आता पूर्ण झाले असल्यास भव्यता जाणवेल. विशवनाथ मंदिर दर्शन आणि IIT BHU काशी विशवनाथ ह्याबद्दल माहिती घेऊन IIT BHU मंदिर जरूर पाहण्यासारखे आहे. बाकी एकूण ८४ घाट आहेत, संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. ५. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे.

In reply to by विअर्ड विक्स

सर्वप्रथम, प्रतिसादाबद्दल आभार. वास वर्णन हे नि:पक्षी भावाने लिहिले असते तर अधिक भावले असते. ( पक्ष - राजकीय पक्ष) खरेतर निपक्षपतिपणेच लिहिले आहे, ऊन सोडले तरीही पायपीट खुपच आहे राममंदिरासाठी, त्यामुळे जे जसे दिसले तसे लिहिलेय, गंगा स्वच्छ मिळाल्याचेही लेखात लिहिलेच आहे की. गोरक्षनाथांचे मंदिर प्रेक्षणीय आहे , बाहेरील तळे व मंदिर संकुलाचे प्रकाशचित्र टाकले असते तर वाचकांना मंदिरची भव्यता समजली असती. मंदिर भव्य नी सुंदर आहे, लेख लिहायचे मनात नसल्याने बाहेरील तळ्याचा फोटू घेतला नाही, मंदिराच्या भव्यतेसाठी रेफरन्स ला मी मंदिर समोर उभा आहे. आपण निवडलेली दर्शनाची वेळ हि सर्वात कमी गर्दीची वेळ आहे. सकाळी सात नंतर आपण मंदिर परिसरात गेले असता तर अयोध्येच्या दुप्पट रांगेचे सुख ( का त्रास) आपणास अनुभवायास मिळाला असता. ह्या बाबतीत सहमत, सकाळी ११ वाजता प्रचंड मोठी रांग होती, हे लेखात लिहायचे राहिले, आम्ही ४ ला जाऊनही आम्हाला १.५ तास लागले तर ह्या लोकाना दर्शनाला नक्की ८ तास लागले असतील, रंग केवढी असावी तर? मंदिर सोडून वाराणसीच्या ५ - १० गल्ली बोळा ओलांडून प्रत्येक गेटवर पुढे गेलेली होती, बरे झाले त्या गप्पिष्ठ प्रोफेसरने मला रात्रीच दर्शन घ्या असा मोलाचा सल्ला देऊन ठेवला होता. वाराणसीत स्नान करावयाचे असल्यास बोट घेऊन पैलतीरी स्नान करावे. पाणी बरे असते. घाटाच्या बाजूस पाणी चांगले मिळण्याची शक्यता शून्य आहे कारण तेथेच मलमूत्र वाहिनी चे उदंचन केंद्र आहे . धन्यवाद, पैलतिराबद्द्ल नावड्यांनी नंतर सांगितले तो पर्यंत इकडे डुबकी मारल्या गेली होती, पण पाणी बरेच स्वच्छ मिळाले. संध्याकाळची गंगा आरती एकदा तरी अनुभवावी. वाराणसीम्हणजे मंदिर नी गंगेत डुबकी एवढेच मला वाटले होते नाहीतर आणखी एक दिवसाचा वाढीव प्लॅन केला असता. नंतर जसजसे कळत गेले तसतसे लक्षात आले, पुढील वेळी चांगला मोठा प्लॅन करणार. गोरखपूर - येथील तलावाच्या आसपास फिरला नसाल तर अवश्य जाणे , रंकाळ्याची आठवण येईल फार सुंदर बनवला आहे. पुढीलवेळी जाणे झाले तर नक्की पाहीन, रंकाळाही पहायचाय.
लेखनविषय:
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली यांना अयोध्या-काशी जाण्याचा योग आला! काही कामानिमित्त मला उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जावे लागले. काम आटोपून १ दिवस होता म्हणून जवळच १३४ किमीवरील अयोध्येतही जाऊन यावे असा विचार केला. गोरखपूरहून बस पकडून अयोध्येत पोहोचलो. राममंदिराबद्दल आस्था होती आणि बाबरी कांडाबद्दल बरेच काही ऐकून असल्याने उत्सुकता होतीच. अयोध्येत पोहोचल्यावर राममंदिराच्या दिशेने जाणारा “रामपथ” पाहिला – अतिशय छान बनवलाय, वॉकिंग ट्रॅकसह! घरांचे अतिक्रमण तोडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. रस्ता मोठा केल्याचे आवडले. त्यामुळे रहदारीला व परिसराला शोभा आली.

Schindler List शिंडलर लिस्ट

Bhakti ·

युद्धपट अनेक आहेत, पण प्रत्यक्ष युद्धाचा एकही क्षण न दाखवता युद्धाची दाहकता अतिशय तीव्रतेने हा सिनेमा दाखवतो. हा सिनेमा पाहिल्यानंतरच मी नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचायला सुरू केले तेव्हा हा रिव्हीव्ह लिहिला होता. यादी श्री शिंडलरची हा सिनेमा पाहिला. त्यानंतर मिपावरिल जन्या वादळी चर्चा वाचल्या त्यावरून आजपासून “नाझी भस्मासुराचा उदयास्त” वाचायला सुरुवात करणार आहे. शनिवार वाड्या जवळील लायब्रेरीत हार्डकोपी मिळवायला गेलो होतो पण काल बंद होती मग इंटरनेटवरून सॉफ्टकोपी डालो केली. जर हिटलर नी रशिया एकत्र असते नी जर्मनी दुसरे महायुद्ध जिंकते तर काय परिस्थिती असती ह्यावरून चॅट जीपीटी नी यूट्यूब ला भांडावून सोडलंय. पण एक खतरनाक फोटो पाहिला. आख्या युरोपवर नाझी जर्मनीचा झेंडा. - पहिले महायुद्ध १० वेळा वाचूनही शष्प काही कळाले नाही काय झाले नी काय नाही ते, दुसरे महायुद्ध त्यामानाने बरेच सुटसुटीत आहे. बहुतेक इतिहास वाचणाऱ्यांना सोप्या जाव्यात त्याप्रमाणे हिटलरने योजना आखल्या असाव्यात. -फ्रान्स जिंकल्यावर तेथे नाझी पक्षाचे झेंडे का लावले?? ( जर्मनी देशाच्या ऐवजी?) -हिटलर ने रशियावर हल्ल्याचा मुर्खपणा का केला? (७६% सेना हिटलरची रशिया विरुद्ध लढतानाच संपली) -इंग्लंडचे चांगले दनकून कंबरडे मोडले नाही ह्या बद्दल मला फार म्हणजे फार वाईट वाटते. - पोलंड सारखा देश नाहक भरडला गेला फार म्हणजे फार वाईट वाटले त्या देशाबद्दल. आजही बिचारा देश निरुपद्रवी आहे. भारताने पोलंडला सप्रेम भेट म्हणून दोन अणुबॉम्ब देऊन टाकावेत असे मला वाटते. ( म्हणजे उद्या तिसरे महायुद्ध पेटलेच तर एक मॉस्को वर टाकायला नी एक बर्लिन वर टाकायला कामात येईल, उद्या मी पंतप्रधान झालो तर चोरून एखाद डझन अणुबॉम्ब पोलंड ला देईन) -समझा रशिया नी जर्मनी एकत्र असते तर आज जगाचा नकाशा वेगळा दिसला असता नाही?? -हिटलर चे चिन्ह स्वस्तिक होते असे आईला दाखवले तर ती बोलली. “देवभोळा होता बिचारा” :) - हिटलरशी पहिला संबंध शाळेत आला तो एका पंकज नावाच्या मित्राला “पंक्या हिटलर” म्हणायचे त्यावरून. ह्यामागची कथा माहित केली तेव्हा कळले की पंकज चे वडील खूप तापट स्वभावाचे आहेत म्हणून घराजवळ त्यांना “हिटलर” म्हणायचे. :) हेल हिटलर - हिटलर फॅनबॉय अमरेंद्र बाहुबली ( ज्यू हत्याकांडाशी फारकत घेऊन) (हिटलर फॅनबॉय तेव्हा होतो, नंतर चान्सुकू सरानी हिटलर कसा होता ह्याबद्दल सविस्तर सांगितल्यावर माझे मतपरिवर्तन झाले, त्यांनी मतपरिवर्तन केले नसते तर मी कदाचित हिटलर युथ (भारत प्रांत) स्थापली असती! )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Mon, 04/21/2025 - 16:39
हिटलर विषयी काय माहिती अल्लड हुल्लड वयात सर्वांनाच क्रेझ/उत्सुकता असते असं निरीक्षण आहे.मलापण युद्ध, त्यातलं राजकारण काहीच कळत नव्हतं तेव्हा 'माइन काम्फ' हिटलरच आत्मचरित्र वाचायची खुप इच्छा होती.नंतर बरेच खरं समजल्यावर ती दूर झाली.हिटलर एक सैतान होता.

In reply to by Bhakti

एका इंग्रज की अमेरिकन अधिकाऱ्याला हिटलरचे शेवटचे १० दिवस कसे गेले ह्याची माहिती घ्यायला पाठवले. त्याने माहिती गोळा करून रिपोर्ट केला नी नंतर त्या माहितीवर पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचा खप प्रचंड झाला, इतका की त्या लेखकावर आरोप लागले की जिवंतपणी जे काम गोब्बेल्सने केले तेच काम ह्या पुस्तकाने हिटलर मेल्यावर केले त्या पुस्तकावर आधारित डाउनफॉल नावाचा सिनेमा आला होता. हिटलरची क्रेझ होती हे मात्र खरे! मूर्ख जपान्यांनी अमेरिकेऐवजी रशियावर हल्ला केला असता तर आज जगाचा नकाशा फार म्हणजे फार वेगळा असता!

विवेकपटाईत Mon, 04/21/2025 - 18:08
हिटलर ही प्रवृती आहे. पूर्वी ही आणि आज ही अनेक विक्षिप्त विजेते पराजित लोकांचा सर्वनाश करतात. भारताच्या इतिहासात हिटलर सारखे अनेक विजेते होऊन गेले आहे ज्यांनी सामान्य नागरिकांची क्रूरतेने हत्या केली आहे. एक उदाहरण मुगल बादशाह अकबर ने ही चित्तोड जिंकल्यावर तिथल्या 34000 निर्दोष नागरिकांचा कत्लेआम केला होता. फरक एवढाच, अकबराच्या अधीन असलेल्या एक ही राजपूत सरदाराने लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

In reply to by विवेकपटाईत

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 11:42
सहमत आहे.. पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये हिंदूंचे नृशंस हत्याकांड होत असताना देखील, कुणीही मदतीला गेले नाहीत आणि आज देखील त्या देशांत हीच परिस्थिती आहे...

nutanm गुरुवार, 04/24/2025 - 05:47
हिटलर बददलचा उतज्ञुकतेने मी तयिची प्रथज्ञी इवहा ब्राउन तयनचे शेवटचे घार दिवस लगन सनाराचे तिचया आग्रहामुळे फकत चार दिवसाचा ससार व शेवटचे विष घेऊन मरतानाचे व मेलयावर दुसरया कोणी लिहिलेले शेवटचा दिवसव हिटलरने सागितलयाप्रमाणे प्रेते जाळून शत्रूने विटबना करू नये महणून हिटलरचया महणणयानुसार जाळून राख पण बगलयाबाहेरचया झाडाना घालायला लावणे हे सरव ईवहा ब्राऊनने मरेपरयत व मेलयावर कोणी विसवासू अधिकारयाने केलेले सविस्तर वर्णन मी वाचलेय. पण ईवहा ब्राउनचे हिटलरवर खूप प्रेम दाखवलेय व चार दिवसाचे लगन व सन्सार करून हिठलरवरचयाप्रेमाने प्रमास आननदाने मरणाला आत्महतयेला हिटलरचया सागणयावरून मिठी मारते मरणाला खूप करूण वर्णन मी वाचलेय पण हिटलर बददल वौ तयाचे जीवृदेणे बददल खूप वाचलेय व शेवटाबददलची ऊत्सुकताही मधे अचानक एक पुसतक हाती पडले तयामुळे पूर्ण झाली.

nutanm गुरुवार, 04/24/2025 - 06:27
शत्रूचयि हाती आपले प्रेत पडूनये विटबना होऊ नये मुसोलीनी व तयाचया प्रेयसी सारखी महणून हिटलर ननतर जिवनत रहाणारया हाताखालचया अधिकारयाना दोघाचया प्रेतची सविसतर विलहेवाट लावणे जाळणे वननतर राख पण बनगलया भोवतीचया झाडाना टाकणे सर्व सविसतर सूचना देऊन दोघे प्रेयसी व हिटलर सवता जीव देतात व काहीच राखही शत्रूचया हाती लागू नये ही वयवससधा करून दोघे जालीम विष घेतात व १०/०१५ मिनिटात जीव जातो मग पुढील सरव हिटलरया सूचनाप्रमाणे दोघाचया क्रिया पार पडतात तयाचे विश्वासू हाताखा पण क्षलचया लोकाकङून. पण ईतिहासात मी हे पण वाचलेय की पराभूत राजे कधी विटनबनेचया भितीमुळे जीव देत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात व प्राण ठेवतात जीव देणे विटबनेचया भितीने असे कदापी करत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात, लढून पराक्रम गाजवून आपला मराठयाचा ईतिहास हेच सागतो . शेवटचा बाजीराव हरणारी का होईना लढाई लढतो व नतर शरण जातो व पुढे बिठूरवा कसे जीवन वयतीत करतो याचेही एक पुसतक आहे ते वाचलेय.

राजो Fri, 04/25/2025 - 11:56
एकाच वेळी शिन्डलर्स लिस्ट आणि ज्युरासिक पार्क या दोन्ही चित्रपटांचं चित्रिकरण चालू होतं. स्पिलबर्गनं दोन्ही यशस्वीरित्या दिग्दर्शित करुन हे आव्हान लिलया पेललं. अप्रतिम चित्रपट. एक ऑस्कर विजेता. दुसरा माईल्स्टोन. हॅट्स ऑफ!!

युद्धपट अनेक आहेत, पण प्रत्यक्ष युद्धाचा एकही क्षण न दाखवता युद्धाची दाहकता अतिशय तीव्रतेने हा सिनेमा दाखवतो. हा सिनेमा पाहिल्यानंतरच मी नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचायला सुरू केले तेव्हा हा रिव्हीव्ह लिहिला होता. यादी श्री शिंडलरची हा सिनेमा पाहिला. त्यानंतर मिपावरिल जन्या वादळी चर्चा वाचल्या त्यावरून आजपासून “नाझी भस्मासुराचा उदयास्त” वाचायला सुरुवात करणार आहे. शनिवार वाड्या जवळील लायब्रेरीत हार्डकोपी मिळवायला गेलो होतो पण काल बंद होती मग इंटरनेटवरून सॉफ्टकोपी डालो केली. जर हिटलर नी रशिया एकत्र असते नी जर्मनी दुसरे महायुद्ध जिंकते तर काय परिस्थिती असती ह्यावरून चॅट जीपीटी नी यूट्यूब ला भांडावून सोडलंय. पण एक खतरनाक फोटो पाहिला. आख्या युरोपवर नाझी जर्मनीचा झेंडा. - पहिले महायुद्ध १० वेळा वाचूनही शष्प काही कळाले नाही काय झाले नी काय नाही ते, दुसरे महायुद्ध त्यामानाने बरेच सुटसुटीत आहे. बहुतेक इतिहास वाचणाऱ्यांना सोप्या जाव्यात त्याप्रमाणे हिटलरने योजना आखल्या असाव्यात. -फ्रान्स जिंकल्यावर तेथे नाझी पक्षाचे झेंडे का लावले?? ( जर्मनी देशाच्या ऐवजी?) -हिटलर ने रशियावर हल्ल्याचा मुर्खपणा का केला? (७६% सेना हिटलरची रशिया विरुद्ध लढतानाच संपली) -इंग्लंडचे चांगले दनकून कंबरडे मोडले नाही ह्या बद्दल मला फार म्हणजे फार वाईट वाटते. - पोलंड सारखा देश नाहक भरडला गेला फार म्हणजे फार वाईट वाटले त्या देशाबद्दल. आजही बिचारा देश निरुपद्रवी आहे. भारताने पोलंडला सप्रेम भेट म्हणून दोन अणुबॉम्ब देऊन टाकावेत असे मला वाटते. ( म्हणजे उद्या तिसरे महायुद्ध पेटलेच तर एक मॉस्को वर टाकायला नी एक बर्लिन वर टाकायला कामात येईल, उद्या मी पंतप्रधान झालो तर चोरून एखाद डझन अणुबॉम्ब पोलंड ला देईन) -समझा रशिया नी जर्मनी एकत्र असते तर आज जगाचा नकाशा वेगळा दिसला असता नाही?? -हिटलर चे चिन्ह स्वस्तिक होते असे आईला दाखवले तर ती बोलली. “देवभोळा होता बिचारा” :) - हिटलरशी पहिला संबंध शाळेत आला तो एका पंकज नावाच्या मित्राला “पंक्या हिटलर” म्हणायचे त्यावरून. ह्यामागची कथा माहित केली तेव्हा कळले की पंकज चे वडील खूप तापट स्वभावाचे आहेत म्हणून घराजवळ त्यांना “हिटलर” म्हणायचे. :) हेल हिटलर - हिटलर फॅनबॉय अमरेंद्र बाहुबली ( ज्यू हत्याकांडाशी फारकत घेऊन) (हिटलर फॅनबॉय तेव्हा होतो, नंतर चान्सुकू सरानी हिटलर कसा होता ह्याबद्दल सविस्तर सांगितल्यावर माझे मतपरिवर्तन झाले, त्यांनी मतपरिवर्तन केले नसते तर मी कदाचित हिटलर युथ (भारत प्रांत) स्थापली असती! )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Mon, 04/21/2025 - 16:39
हिटलर विषयी काय माहिती अल्लड हुल्लड वयात सर्वांनाच क्रेझ/उत्सुकता असते असं निरीक्षण आहे.मलापण युद्ध, त्यातलं राजकारण काहीच कळत नव्हतं तेव्हा 'माइन काम्फ' हिटलरच आत्मचरित्र वाचायची खुप इच्छा होती.नंतर बरेच खरं समजल्यावर ती दूर झाली.हिटलर एक सैतान होता.

In reply to by Bhakti

एका इंग्रज की अमेरिकन अधिकाऱ्याला हिटलरचे शेवटचे १० दिवस कसे गेले ह्याची माहिती घ्यायला पाठवले. त्याने माहिती गोळा करून रिपोर्ट केला नी नंतर त्या माहितीवर पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचा खप प्रचंड झाला, इतका की त्या लेखकावर आरोप लागले की जिवंतपणी जे काम गोब्बेल्सने केले तेच काम ह्या पुस्तकाने हिटलर मेल्यावर केले त्या पुस्तकावर आधारित डाउनफॉल नावाचा सिनेमा आला होता. हिटलरची क्रेझ होती हे मात्र खरे! मूर्ख जपान्यांनी अमेरिकेऐवजी रशियावर हल्ला केला असता तर आज जगाचा नकाशा फार म्हणजे फार वेगळा असता!

विवेकपटाईत Mon, 04/21/2025 - 18:08
हिटलर ही प्रवृती आहे. पूर्वी ही आणि आज ही अनेक विक्षिप्त विजेते पराजित लोकांचा सर्वनाश करतात. भारताच्या इतिहासात हिटलर सारखे अनेक विजेते होऊन गेले आहे ज्यांनी सामान्य नागरिकांची क्रूरतेने हत्या केली आहे. एक उदाहरण मुगल बादशाह अकबर ने ही चित्तोड जिंकल्यावर तिथल्या 34000 निर्दोष नागरिकांचा कत्लेआम केला होता. फरक एवढाच, अकबराच्या अधीन असलेल्या एक ही राजपूत सरदाराने लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला नाही.

In reply to by विवेकपटाईत

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 11:42
सहमत आहे.. पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये हिंदूंचे नृशंस हत्याकांड होत असताना देखील, कुणीही मदतीला गेले नाहीत आणि आज देखील त्या देशांत हीच परिस्थिती आहे...

nutanm गुरुवार, 04/24/2025 - 05:47
हिटलर बददलचा उतज्ञुकतेने मी तयिची प्रथज्ञी इवहा ब्राउन तयनचे शेवटचे घार दिवस लगन सनाराचे तिचया आग्रहामुळे फकत चार दिवसाचा ससार व शेवटचे विष घेऊन मरतानाचे व मेलयावर दुसरया कोणी लिहिलेले शेवटचा दिवसव हिटलरने सागितलयाप्रमाणे प्रेते जाळून शत्रूने विटबना करू नये महणून हिटलरचया महणणयानुसार जाळून राख पण बगलयाबाहेरचया झाडाना घालायला लावणे हे सरव ईवहा ब्राऊनने मरेपरयत व मेलयावर कोणी विसवासू अधिकारयाने केलेले सविस्तर वर्णन मी वाचलेय. पण ईवहा ब्राउनचे हिटलरवर खूप प्रेम दाखवलेय व चार दिवसाचे लगन व सन्सार करून हिठलरवरचयाप्रेमाने प्रमास आननदाने मरणाला आत्महतयेला हिटलरचया सागणयावरून मिठी मारते मरणाला खूप करूण वर्णन मी वाचलेय पण हिटलर बददल वौ तयाचे जीवृदेणे बददल खूप वाचलेय व शेवटाबददलची ऊत्सुकताही मधे अचानक एक पुसतक हाती पडले तयामुळे पूर्ण झाली.

nutanm गुरुवार, 04/24/2025 - 06:27
शत्रूचयि हाती आपले प्रेत पडूनये विटबना होऊ नये मुसोलीनी व तयाचया प्रेयसी सारखी महणून हिटलर ननतर जिवनत रहाणारया हाताखालचया अधिकारयाना दोघाचया प्रेतची सविसतर विलहेवाट लावणे जाळणे वननतर राख पण बनगलया भोवतीचया झाडाना टाकणे सर्व सविसतर सूचना देऊन दोघे प्रेयसी व हिटलर सवता जीव देतात व काहीच राखही शत्रूचया हाती लागू नये ही वयवससधा करून दोघे जालीम विष घेतात व १०/०१५ मिनिटात जीव जातो मग पुढील सरव हिटलरया सूचनाप्रमाणे दोघाचया क्रिया पार पडतात तयाचे विश्वासू हाताखा पण क्षलचया लोकाकङून. पण ईतिहासात मी हे पण वाचलेय की पराभूत राजे कधी विटनबनेचया भितीमुळे जीव देत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात व प्राण ठेवतात जीव देणे विटबनेचया भितीने असे कदापी करत नाहीत मरणाला शूरपणे सामोरे जातात, लढून पराक्रम गाजवून आपला मराठयाचा ईतिहास हेच सागतो . शेवटचा बाजीराव हरणारी का होईना लढाई लढतो व नतर शरण जातो व पुढे बिठूरवा कसे जीवन वयतीत करतो याचेही एक पुसतक आहे ते वाचलेय.

राजो Fri, 04/25/2025 - 11:56
एकाच वेळी शिन्डलर्स लिस्ट आणि ज्युरासिक पार्क या दोन्ही चित्रपटांचं चित्रिकरण चालू होतं. स्पिलबर्गनं दोन्ही यशस्वीरित्या दिग्दर्शित करुन हे आव्हान लिलया पेललं. अप्रतिम चित्रपट. एक ऑस्कर विजेता. दुसरा माईल्स्टोन. हॅट्स ऑफ!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
Q दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने । युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥ अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना. खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली. द

अभिनंदन !!

कपिलमुनी ·

हा पुरस्कार मिळण्यामागे माझा धर्म सुधारणावादी असलेला दृष्टिकोन आणि त्या पद्धतीने अनुषंगाने आलेले वर्तन हे कारणीभूत ठरले . पुरोगामी मताच्या तसेच सनातनी मताच्या दोन्हीही प्रकारच्या लोकांनी यातील काही दोष उणिवा दाखवल्या . काहींनी तीव्र टीका केल्या .या सर्व गोष्टींचा विचार करून आजही मी ही धर्म सुधारणा वादाची भूमिका घेऊनच पुढे चालतो आहे .याही पुढे चालेन . त्याचे कुठेतरी दखल घेतली गेली आणि ती गोष्ट याच संस्थाळावर आमच्या मित्रानी जाहीर केली . . .दोन्ही गोष्टींचा आनंद वाटला . . मित्रवर्य कपिलमुनी यांचे मनःपूर्वक धन्यवाद . तसेच माझ्या या भूमिकेवर याच संस्थाळावरती माझ्यावर ज्यांनी साधक बाधक टीका केली आणि माझ्या विचारांना सुधारण्यास प्रवृत्त केले ,त्या सर्वांचे विशेष धन्यवाद .

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिमी Mon, 05/05/2025 - 14:43
मन:पूर्वक अभिनंदन गुरुजी.. सगळ्या मिपाकरांसाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी भरपूर शुभेच्छा..

आत्मा साहेबांचे अभिनंदन, सोशल मीडिया वगैरेवर गरळ ओकण्याला हिंदुत्ववादी कार्य समजणाऱ्यांच्या तोंडावर ही चपराक आहे, प्रत्यक्ष जमिनीवर कार्य करणारे खरोखरीच आदरणीय असतात. बाकी हे अभिराम दीक्षित विदेशात डॉलर मध्ये खेळतात नि इथे लोकाना प्रोत्साहन वगैर देतात, स्वत करा ना काहीतरी कार्य म्हणावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Mon, 04/21/2025 - 14:53
प्रोत्साहन देणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. ते सुद्धा सामाजीक सद्भावना सौहार्द वाढवण्यासाठी. बाकी इतरही काही करतात त्याने सद्भावना वाढते का हे सुज्ञ मिपाकरांना वेगळे सांगायची गरज नाही. एक तर घोडा म्हणा किवा चतुर म्हणा....

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेब ज्याने काहीतरी कार्य केलाय तो प्रोत्साहन देत आयल तर समजू शकतो, उदा. तुम्ही मला सैन्यात जा म्हणून प्रोत्साहन दिले तर ते लागू होईल, पण ज्याच्या खानदानात सैन्य काय असते ते कुणी पाहिले नाही तो प्रोत्सावू लागला सैन्यात जा म्हणून तर कसे होईल?

कर्नलतपस्वी Mon, 04/21/2025 - 14:46
सामाजिक समरसता एक प्रभावी मार्ग आहे. त्पाचा योग्य उपयोग करून समाज प्रबोधन केलेत.अतिशय स्तुत्य आहे. अर्थात फलश्रुतीही तेव्हढीच महत्वाची व इतरेजनासाठी प्रेरणादायक . अभिनंदन.

वामन देशमुख Mon, 04/21/2025 - 16:43
अतृप्त आत्मा, अक्षय्य हिंदू पुरस्कार २०२५ मधील ‘सामाजिक समरसता’ या सन्माननीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! समाजामध्ये खर्‍या अर्थाने समरसता निर्माण करणं ही जितकी कठीण, तितकीच अत्यावश्यक आणि काळाची गरज आहे. हे कार्य तुम्ही निःस्वार्थ भावनेने आणि समाजप्रेमाने करत आहात याचा एक मिपाखरु म्हणून अभिमान आहे. आपल्या कामामुळे समाजातील जाती-धर्माच्या भिंती गळून पडाव्यात, माणुसकी आणि आपुलकीचा सेतू निर्माण व्हावा, हीच खरी हिंदुत्वाची शिकवण तुम्ही कृतीतून दाखवून दिली आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका मिपाखराचा सन्मान होणं ही केवळ आनंदाचीच नाही तर अभिमानाची बाब आहे. "अक्षय्य हिंदू पुरस्कार" हा तुमच्या कार्याची पावती तर आहेच, पण भविष्यातील तुमच्या प्रेरणादायी प्रवासासाठी एक शिदोरी ठरेल यात शंका नाही. - द्येस्मुक् राव्

विअर्ड विक्स Sat, 04/26/2025 - 23:00
अतृप्त आत्मा अभिनंदन. स्वतः पौरोहित्य क्षेत्रात असूनसुद्धा धर्मशास्त्रातील थोतांड वा लोकांचे गैरसमज या संदर्भातील यांचे लेखन वाचले आहे. अर्चना तिवारी यांचे राजधर्म चे तुनळीवरील व्हिडीओ पहिले आहेत. त्यांचे रिपोर्टींग चांगले असते. बाकी पुरस्कार प्राप्त लोकांबद्दल माहिती नाही . तेव्हा यासंदर्भांतील प्रत्येक व्यक्तिविशेष कोणी लेख टंकला तर आभार.

हा पुरस्कार मिळण्यामागे माझा धर्म सुधारणावादी असलेला दृष्टिकोन आणि त्या पद्धतीने अनुषंगाने आलेले वर्तन हे कारणीभूत ठरले . पुरोगामी मताच्या तसेच सनातनी मताच्या दोन्हीही प्रकारच्या लोकांनी यातील काही दोष उणिवा दाखवल्या . काहींनी तीव्र टीका केल्या .या सर्व गोष्टींचा विचार करून आजही मी ही धर्म सुधारणा वादाची भूमिका घेऊनच पुढे चालतो आहे .याही पुढे चालेन . त्याचे कुठेतरी दखल घेतली गेली आणि ती गोष्ट याच संस्थाळावर आमच्या मित्रानी जाहीर केली . . .दोन्ही गोष्टींचा आनंद वाटला . . मित्रवर्य कपिलमुनी यांचे मनःपूर्वक धन्यवाद . तसेच माझ्या या भूमिकेवर याच संस्थाळावरती माझ्यावर ज्यांनी साधक बाधक टीका केली आणि माझ्या विचारांना सुधारण्यास प्रवृत्त केले ,त्या सर्वांचे विशेष धन्यवाद .

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिमी Mon, 05/05/2025 - 14:43
मन:पूर्वक अभिनंदन गुरुजी.. सगळ्या मिपाकरांसाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायला आवडेल.. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी भरपूर शुभेच्छा..

आत्मा साहेबांचे अभिनंदन, सोशल मीडिया वगैरेवर गरळ ओकण्याला हिंदुत्ववादी कार्य समजणाऱ्यांच्या तोंडावर ही चपराक आहे, प्रत्यक्ष जमिनीवर कार्य करणारे खरोखरीच आदरणीय असतात. बाकी हे अभिराम दीक्षित विदेशात डॉलर मध्ये खेळतात नि इथे लोकाना प्रोत्साहन वगैर देतात, स्वत करा ना काहीतरी कार्य म्हणावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कर्नलतपस्वी Mon, 04/21/2025 - 14:53
प्रोत्साहन देणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. ते सुद्धा सामाजीक सद्भावना सौहार्द वाढवण्यासाठी. बाकी इतरही काही करतात त्याने सद्भावना वाढते का हे सुज्ञ मिपाकरांना वेगळे सांगायची गरज नाही. एक तर घोडा म्हणा किवा चतुर म्हणा....

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेब ज्याने काहीतरी कार्य केलाय तो प्रोत्साहन देत आयल तर समजू शकतो, उदा. तुम्ही मला सैन्यात जा म्हणून प्रोत्साहन दिले तर ते लागू होईल, पण ज्याच्या खानदानात सैन्य काय असते ते कुणी पाहिले नाही तो प्रोत्सावू लागला सैन्यात जा म्हणून तर कसे होईल?

कर्नलतपस्वी Mon, 04/21/2025 - 14:46
सामाजिक समरसता एक प्रभावी मार्ग आहे. त्पाचा योग्य उपयोग करून समाज प्रबोधन केलेत.अतिशय स्तुत्य आहे. अर्थात फलश्रुतीही तेव्हढीच महत्वाची व इतरेजनासाठी प्रेरणादायक . अभिनंदन.

वामन देशमुख Mon, 04/21/2025 - 16:43
अतृप्त आत्मा, अक्षय्य हिंदू पुरस्कार २०२५ मधील ‘सामाजिक समरसता’ या सन्माननीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! समाजामध्ये खर्‍या अर्थाने समरसता निर्माण करणं ही जितकी कठीण, तितकीच अत्यावश्यक आणि काळाची गरज आहे. हे कार्य तुम्ही निःस्वार्थ भावनेने आणि समाजप्रेमाने करत आहात याचा एक मिपाखरु म्हणून अभिमान आहे. आपल्या कामामुळे समाजातील जाती-धर्माच्या भिंती गळून पडाव्यात, माणुसकी आणि आपुलकीचा सेतू निर्माण व्हावा, हीच खरी हिंदुत्वाची शिकवण तुम्ही कृतीतून दाखवून दिली आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका मिपाखराचा सन्मान होणं ही केवळ आनंदाचीच नाही तर अभिमानाची बाब आहे. "अक्षय्य हिंदू पुरस्कार" हा तुमच्या कार्याची पावती तर आहेच, पण भविष्यातील तुमच्या प्रेरणादायी प्रवासासाठी एक शिदोरी ठरेल यात शंका नाही. - द्येस्मुक् राव्

विअर्ड विक्स Sat, 04/26/2025 - 23:00
अतृप्त आत्मा अभिनंदन. स्वतः पौरोहित्य क्षेत्रात असूनसुद्धा धर्मशास्त्रातील थोतांड वा लोकांचे गैरसमज या संदर्भातील यांचे लेखन वाचले आहे. अर्चना तिवारी यांचे राजधर्म चे तुनळीवरील व्हिडीओ पहिले आहेत. त्यांचे रिपोर्टींग चांगले असते. बाकी पुरस्कार प्राप्त लोकांबद्दल माहिती नाही . तेव्हा यासंदर्भांतील प्रत्येक व्यक्तिविशेष कोणी लेख टंकला तर आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार

मिपाकर अतृप्त आत्मा यांचे अभिनंदन !

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र

युयुत्सु ·

योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी- "शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...." https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?

युयुत्सु Mon, 04/21/2025 - 11:30
फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.

In reply to by युयुत्सु

मूकवाचक Mon, 04/21/2025 - 14:44
उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.

योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी- "शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...." https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?

युयुत्सु Mon, 04/21/2025 - 11:30
फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.

In reply to by युयुत्सु

मूकवाचक Mon, 04/21/2025 - 14:44
उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री० देवेन्द्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र स० न० वि० वि० सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स. मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे - ० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे.

शर्यत

बिपीन सुरेश सांगळे ·

कर्नलतपस्वी Sat, 04/19/2025 - 22:29
आम्हांला असाच लहानपणी मराठीत धडा होता. बैलांच्या बैलांना आंघोळ घालतात चांगलं चुकलं खायला घालतात. त्यांना कामाला जुंपत नसे. गावच्या पाटलाला तालुकायाला जायचे असते. तो बळीला म्हणतो गाडी जुंप. बळी नाही म्हणतो.पाटलाला राग येतो नंतर गावातले कुणी तरी जखमी होते. बळी पटकन गाडी जुंपून त्या जखमीला तालुक्याला नेतो. ......

बैलगाडा शर्यतीचा मनस्वी तिरस्कार असल्याने कथा आवडली नाही. माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते !

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Sun, 04/20/2025 - 14:21
+ १ स्वत:च्या मजेसाठी मुक्या प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो. बैलांना जोरात पळण्यासाठी दारू पाजणे, कानात लाल मुंग्या सोडणे, शेपटी पिरगाळणे, शेपटीला चावणे, खिळे असलेला चाबूक मारणे, दाभण टोचणे असे अत्याचार केले जातात.

माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते ! ???...

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

माणूसगाडा शर्यत म्हणजे बैलाला आरामात उभे राहता येईल एवढा एक गाडा तयार करायचा अन् तो ओढायला माणसांना जुंपायचे, त्यां माणसांच्या मानगुटीवर त्या गाड्यांचे ओझे लादून त्यांना पळायला लावायचे तेही पायात चप्पल न घालता. काय सुंदर मनोरंजन होईल ना बैलांचे !!

कर्नलतपस्वी Sat, 04/19/2025 - 22:29
आम्हांला असाच लहानपणी मराठीत धडा होता. बैलांच्या बैलांना आंघोळ घालतात चांगलं चुकलं खायला घालतात. त्यांना कामाला जुंपत नसे. गावच्या पाटलाला तालुकायाला जायचे असते. तो बळीला म्हणतो गाडी जुंप. बळी नाही म्हणतो.पाटलाला राग येतो नंतर गावातले कुणी तरी जखमी होते. बळी पटकन गाडी जुंपून त्या जखमीला तालुक्याला नेतो. ......

बैलगाडा शर्यतीचा मनस्वी तिरस्कार असल्याने कथा आवडली नाही. माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते !

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Sun, 04/20/2025 - 14:21
+ १ स्वत:च्या मजेसाठी मुक्या प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल करणाऱ्यांचा तिटकारा वाटतो. बैलांना जोरात पळण्यासाठी दारू पाजणे, कानात लाल मुंग्या सोडणे, शेपटी पिरगाळणे, शेपटीला चावणे, खिळे असलेला चाबूक मारणे, दाभण टोचणे असे अत्याचार केले जातात.

माणूसगाडा शर्यतीत आकाश आणि आप्पांनी एकत्र मिळून गाडा जीवाच्या आकांताने पळवला , अन् शेवटी बक्षीस स्वीकारताना स्टेजवर दोघेही रक्त ओकून मेले अशी काहीशी कथा असती तर आवडले असते ! ???...

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

माणूसगाडा शर्यत म्हणजे बैलाला आरामात उभे राहता येईल एवढा एक गाडा तयार करायचा अन् तो ओढायला माणसांना जुंपायचे, त्यां माणसांच्या मानगुटीवर त्या गाड्यांचे ओझे लादून त्यांना पळायला लावायचे तेही पायात चप्पल न घालता. काय सुंदर मनोरंजन होईल ना बैलांचे !!
लेखनविषय:
शर्यत ------------------------------------------------------------------------------------- ‘आक्या, यंदा तुमचा शर्यत जिंकायचा काहीच चान्स नाही ! ‘ राक्या म्हणाला. तसं आकाशला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं कारण त्याचे अप्पा दवाखान्यात होते. संध्याकाळची वेळ. शाळा सुटलेली . पोरं घोळक्याने घरी चाललेली . त्यावेळची ही चर्चा. आकाश आणि राकेश दोघे एकाच वर्गात होते .आठवी तुकडी क मध्ये. त्यांचं गाव मध्यम आकारात पसरलेलं होतं. हिरवं, निसर्गसंपन्न आणि शेत जमिनींचं.

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

युयुत्सु ·

युयुत्सु Sat, 04/19/2025 - 16:47
फक्त वानगीदाखल - १. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-predict-whether-youll-be-a-conservative-or-a-liberal/280677/ २. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254 " Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."

विवेकपटाईत Mon, 04/21/2025 - 18:28
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्‍यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात. उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय. मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.

युयुत्सु Mon, 04/21/2025 - 20:14
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Tue, 04/22/2025 - 12:20
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म गुरुवार, 05/01/2025 - 20:23
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?

युयुत्सु Mon, 04/21/2025 - 20:15
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु Sun, 04/27/2025 - 17:22
@ मुक्त विहारि मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्‍या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्‍यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by युयुत्सु

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 18:01
तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर, खालील काही साईट देतो. https://www.rss.org/hindi/ https://vanvasi.org/ ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या. आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा. संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...

In reply to by युयुत्सु

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 19:45
RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या... मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो.... स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता? असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता.... आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sun, 04/27/2025 - 20:51
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे. परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल. संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 22:48
कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.." तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल... ते पण हुकलेलेच होते.

In reply to by युयुत्सु

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 22:41
https://vanvasi.org/our-team/ ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत. स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...

युयुत्सु Mon, 04/28/2025 - 07:24
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society." https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans

सुबोध खरे गुरुवार, 05/01/2025 - 10:31
कशाला चर्चा करायची? जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले. बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2025 - 11:12
RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे... आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु Fri, 05/02/2025 - 10:02
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?

युयुत्सु Fri, 05/02/2025 - 10:19
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.

सुबोध खरे Fri, 05/02/2025 - 10:57
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही. लोल

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 12:06
https://www.youtube.com/watch?v=962u6MAwp2I कालच हा व्हिडीओ बघितला आणि माझी वर घेतलेली भूमिका परत एकदा तपासली (जी बरोबर होती). सदर गृहस्थ युपिएससी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत शांतपणे, अभिनिवेश मध्ये न आणता शिकवतात म्हणुन मी अधून्मधून यांचे व्हीडीओ बघत असतो. परिवर्तनाची मागणी करणारे, त्याच्या बाजूने उभे राहणारे ते डावे आणि "जैसे थे" वादी/परंपरावादी उजवे अशी ही मांडणी आहे.

गामा पैलवान Mon, 06/30/2025 - 18:29
युयुत्सु,
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 18:48
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला?> समजा अ ही एक व्यक्ती आहे. तीने दावा केला की "मी सनातनी" आहे आणि समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?" तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात दोन्ही पक्ष काय उत्तर देणार, याची मला उत्सूकता आहे.

सुबोध खरे Mon, 06/30/2025 - 18:56
मुळात कोर्टात टिकेल अशी व्याख्या देण्याचा प्रसंग उद्भवला आहे का? साधं सरळ आहे ज्या व्यक्ती ने दावा केला की "मी सनातनी" आहे तिला तो दावा सिद्ध करायला सांगतात. त्या व्यक्तीने दिलेले संदर्भ किंवा पुरावे आणि सध्या कायदयात असेलल्या तरतुदीप्रमाणे न्यायालय निर्णय देतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक नाही.

सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 19:51
सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?> अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नि:संदिग्ध व्याख्या असणे आवश्यक ठरते.

गामा पैलवान Tue, 07/01/2025 - 00:00
युयुत्सु,
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"
सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.

युयुत्सु Sat, 04/19/2025 - 16:47
फक्त वानगीदाखल - १. https://www.theatlantic.com/politics/archive/2013/10/can-your-genes-predict-whether-youll-be-a-conservative-or-a-liberal/280677/ २. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0160289624000254 " Intelligence is correlated with a range of left-wing and liberal political beliefs. This may suggest intelligence directly alters our political views. Alternatively, the association may be confounded or mediated by socioeconomic and environmental factors. We studied the effect of intelligence within a sample of over 300 biological and adoptive families, using both measured IQ and polygenic scores for cognitive performance and educational attainment. We found both IQ and polygenic scores significantly predicted all six of our political scales. Polygenic scores predicted social liberalism and lower authoritarianism, within-families. Intelligence was able to significantly predict social liberalism and lower authoritarianism, within families, even after controlling for socioeconomic variables. Our findings may provide the strongest causal inference to date of intelligence directly affecting political beliefs."

विवेकपटाईत Mon, 04/21/2025 - 18:28
आता पर्यन्त वाचलेला सर्वात विनोदी लेख. बुद्धिमान व्यक्ति नेहमी सकारात्मक विचार करतात. ते स्वत: आणि समाजाचा विकास करतात. ते उजव्या विचार सरणीचे असतात. नकारात्मक विचाराने ग्रसित व्यक्ति डाव्या विचारसरणीचे होतात. स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे नुकसान करतात. भारताचे उदा. घ्या. प. बंगाल आणि बिहारचे उद्योग डाव्या विचारसरणीच्या नेत्याने उध्वस्त केले. ज्या राज्यांत डाव्यांचा प्रभाव कमी होता तिथे उद्योगांचा विकास झाला. कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला. डाव्या विचारांचे शेतकरी नेता. चक्का जाम करतात. आंदोलन करून राज्याचे नुकसान करतात. उजव्या विचारधारेचे शेतकरी नेता आता पर्यन्त तीन फूड पार्क सहित 80 जास्ती प्रोसेसिंग यूनिट स्थापित करून काही लाख लोकांना रोजगार आणि लाखो शेतकर्‍यांना शेतीचे नवीन विकल्प उपलब्ध करून देतात. उजव्यानी स्त्री वर अत्याचार केले याचे प्रमाण नाही. उजव्या देशांत स्त्री शोषण कमी आहे. भारतात तर 498 किंवा स्त्री शोषण आरोपला घाबरून पुरूष आत्महत्या करतात. पण डाव्या देशांत स्त्रीयांचे शोषण सामान्य आहे कारण सत्तेवर असलेले डाव्यांची इच्छा म्हणजे न्याय. मानसिक रूपेण विकृत आणि पुरुषार्थहीन व्यक्ति डाव्या विचारधारेचे होतात.

युयुत्सु Mon, 04/21/2025 - 20:14
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत Tue, 04/22/2025 - 12:20
संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून समाज सेवेचे कार्य करणे शिकविले जाते. बाकी डावे मुळातच आळशी असतात. बिना काम करता फक्त प्रचार करून पैसा कमवायची मनोवृती त्यांच्यात ठासलेली असते. दिल्लीत काळे पांढरे कपडे घालून डावे पथ नाट्य कलाकार ही हजारपेक्षा जास्त रोजचे घेतात. शिवाय "खाना-पींना".

In reply to by विवेकपटाईत

स्वधर्म गुरुवार, 05/01/2025 - 20:23
>> संघ शिक्षा वर्गात प्रचारापासून दूर राहून संघात 'प्रचारक' म्हणून पदच असते ना? त्यांचे कामच मुळी संघाचा व त्याच्या विचारांचा प्रचार करणे हे असते, नाही का?

युयुत्सु Mon, 04/21/2025 - 20:15
संघ शिक्षा वर्गात प्रचारकी थाटाच्या आणि परिणामकारक अशा सोशल मीडिया पोस्ट कशा लिहायच्या यावर जास्तीत जास्त कार्यशाळा आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु Sun, 04/27/2025 - 17:22
@ मुक्त विहारि मी सर्व विचारसरणींचे आदर करणार्‍या वातावरणात वाढलो. २०२४ च्या निवडणूकीपर्यंत मला संघाबद्दल बर्‍यापैकी आदर होता. निवडणूक ज्वर जसा शिगेला पोचला तसा संघाच्या तळागातल्या कार्यकर्त्यांचा उन्माद त्रासदायक ठरला. त्यात संघ कार्य्कर्त्यांच्या बालीश आणि विकृत मानसिकतेचे जवळून दर्शन झाले. फार काय भारत हे कधिच "हिंदुराष्ट्र" होऊ शकणार नाही, या कडवट सत्याचे यथार्थ ज्ञान झाले (याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही). मोदी सत्तेवर येण्यापूर्वीचा संघ आणि नंतरचा संघ यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

In reply to by युयुत्सु

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 18:01
तुम्हाला खरोखरच संघाचे कार्य समजावून घ्यायचे असेल तर, खालील काही साईट देतो. https://www.rss.org/hindi/ https://vanvasi.org/ ह्या साईटला भेट द्या आणि त्यांच्या एखाद्या सामाजिक उपक्रमात जरूर भाग घ्या. आणि ते पण नाही जमले तर, तुम्ही ज्या शहरात राहता त्या जिल्ह्यातील प्रचारकाला जरूर भेटा. संघटन में शक्ती हैं..... आणि राष्ट्र उभारणी साठी, त्याचीच तर गरज असते...

In reply to by युयुत्सु

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 19:45
RSS च्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घ्या... मी RSS च्या शाखेत जात नाही. पण RSS च्या दोन उपक्रमांना आर्थिक मदत जरूर करतो.... स्वतः भाग न घेता, तुम्ही एकांगी विचार कसा काय करू शकता? असो, तुम्ही खूप शिकलेले दिसता.... आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sun, 04/27/2025 - 20:51
सोडा हो. संघावर जन्मापासून टीका होतेय. ३ वेळा बंदी सुद्धा आणली होती. संघाचे नेते, प्रचारक व स्वयंसेवक तुरूंगात डांबले होते. सरकारी कर्मचाऱ्यांना संघाशी कोणताही संबंध ठेवण्यास बंदी होती. एखादा संघाशी संबंधित आहे असे समजले की त्याला झुरळासारखे लांब ढकलले जायचे. परंतु ९९ वर्षांनतरही संघ नुसताच टिकला नाही तर अधिकाधिक बलवान होऊन सर्व क्षेत्रात पसरला आहे व उत्तरोत्तर अजून बलवान होईल. संघाला संपवायला निघालेले केव्हाच बाराच्या भावात गेले, पण संघाला साधा ओरखडा सुद्धा काढू शकले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 22:48
कुठल्याही संघटनेची माहिती घ्यायची असेल तर त्या संघटनेत स्वतः सामील व्हा किंवा आपल्या विश्वासू व्यक्ती मार्फत ती माहिती जाणून घ्या.... संदर्भ... "कौटिल्याचे अर्थशास्त्र.." तुम्ही जर, "मुसाफिर" हे पुस्तक, लेखक अच्युत गोडबोले,वाचले असेल तर, मी काय म्हणत आहे, ते पण नक्की समजेल... ते पण हुकलेलेच होते.

In reply to by युयुत्सु

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 22:41
https://vanvasi.org/our-team/ ह्यात पत्ते आणि फोन नंबर दिले आहेत. स्वतः जा, चौकशी करा, त्यांचे कार्य स्वतः बघा आणि मग जे काही बरे वाईट समजेल ते इथे जरूर सांगा...

युयुत्सु Mon, 04/28/2025 - 07:24
As the researchers defined them, right-wing authoritarians are people who ascribe to conservative ideologies and so-called "traditional values" who advocate for "punitive measures for social control," while left-wing authoritarians are interested in "violently overthrow[ing] and [penalizing] the current structures of authority and power in society." https://futurism.com/neoscope/authoritarian-brain-scans

सुबोध खरे गुरुवार, 05/01/2025 - 10:31
कशाला चर्चा करायची? जगात असलेली सर्व डावी राष्ट्रे रसातळाला गेली किंवा त्यांनी डावी विचारसरणी सोडून दिली म्हणून प्रगती करू शकले. बाकी (तथाकथित)अति उच्च बुद्धिमत्ता असलेले डावे लोक लोकशाही राष्ट्रांत मोठा पगार घेऊन उजव्या विचारसरणी वर गरळ ओकताना सर्वच लोकशाही राष्ट्रांत दिसतात. खाल्ल्या घरचे वासे मोजणारे लोक जगात कमी आहेत का?

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2025 - 11:12
RSSच्या विरोधात ह्यांची वैचारिक भूमिका आहे... आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

युयुत्सु Fri, 05/02/2025 - 10:02
आणि गंमत अशी आहे की, नुह बाबतीत, संदेशखाली बाबतीत, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारा बाबतीत,हे महाशय कधीही बोलले नाहीत...
मला जे प्रश्न जास्त भेडसावतात त्यावर मी प्राधान्याने बोलू इच्छितो. ज्या प्रश्नांचा माझा अभ्यास नाही त्यावर मी का बोलू?

युयुत्सु Fri, 05/02/2025 - 10:19
आज संघाच्या लोकांची मदत घेणं म्हणजे - "आवळा देऊन कोहळा काढायचा" किंवा "चवलीची मदत आणि रुपयाची वसुली" असा प्रकार असतो. एकवेळ सावकाराचं कर्ज फिटेल पण संघाचे "उपकार" फिटत नाहीत. घरात घुसून घरातल्या व्यवहारात नाकं खुपसणे, आणी सतत दिशाभूल, चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे, हे वेगळेच असते. भाजपा अजून संघा इतका नतद्रष्ट बनला नाहीये, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.

सुबोध खरे Fri, 05/02/2025 - 10:57
चुकीचे सल्ले देत बसायचे, नको ती अक्कल शिकवणे हि काही हुच्च लोकांची मक्तेदारी असते त्यात दुसर्यांनी नाक खुपसलेले अजिबात चालत नाही. लोल

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 12:06
https://www.youtube.com/watch?v=962u6MAwp2I कालच हा व्हिडीओ बघितला आणि माझी वर घेतलेली भूमिका परत एकदा तपासली (जी बरोबर होती). सदर गृहस्थ युपिएससी च्या विद्यार्थ्यांना अत्यंत शांतपणे, अभिनिवेश मध्ये न आणता शिकवतात म्हणुन मी अधून्मधून यांचे व्हीडीओ बघत असतो. परिवर्तनाची मागणी करणारे, त्याच्या बाजूने उभे राहणारे ते डावे आणि "जैसे थे" वादी/परंपरावादी उजवे अशी ही मांडणी आहे.

गामा पैलवान Mon, 06/30/2025 - 18:29
युयुत्सु,
(याचे वानगीदाखल उदा० म्हणजे मला आजवर "सनातन धर्म" या संकल्पनेची कोर्टात टिकेल अशी व्याख्या कुणीही देऊ शकलेले नाही)
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला? जीवन म्हणजे life याची निश्चित व सुस्पष्ट व्याख्या उपलब्ध नाही. तरीपण जिवंत आणि मृत असा फरक सर्वत्र केला जातो. अगदी कोर्टातही केला जातो. तिथेही खुनाच्या केसेस उभ्या राहतातच ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 18:48
सनातन धर्माची कोर्टात टिकणारी व्याख्या म्हणजे नेमकं काय ? आणि ती करायचीच कशाला?> समजा अ ही एक व्यक्ती आहे. तीने दावा केला की "मी सनातनी" आहे आणि समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?" तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टात दोन्ही पक्ष काय उत्तर देणार, याची मला उत्सूकता आहे.

सुबोध खरे Mon, 06/30/2025 - 18:56
मुळात कोर्टात टिकेल अशी व्याख्या देण्याचा प्रसंग उद्भवला आहे का? साधं सरळ आहे ज्या व्यक्ती ने दावा केला की "मी सनातनी" आहे तिला तो दावा सिद्ध करायला सांगतात. त्या व्यक्तीने दिलेले संदर्भ किंवा पुरावे आणि सध्या कायदयात असेलल्या तरतुदीप्रमाणे न्यायालय निर्णय देतं. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आवश्यक नाही.

सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु Mon, 06/30/2025 - 19:51
सनातनी म्हणजे नक्की कोण हेच पुरेसे स्पष्ट नसेल तर मग काही लोक एखाद्याला पुराणमतवादी आणि सनातनी नक्की कोणत्या आधारावर म्हणत असतील?> अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नि:संदिग्ध व्याख्या असणे आवश्यक ठरते.

गामा पैलवान Tue, 07/01/2025 - 00:00
युयुत्सु,
समजा हा दावा जर एखाद्या समूहाला मान्य झाला नाही आणि प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट दोघानाही विचारेल - "सनातनी म्हणजे काय?"
सनातन धर्मावर कोणाचीही मालकी नाही. त्यामुळे कोणी सनातनी असल्याचा दावा मान्य वा अमान्य करायचा प्रश्न येतंच नाही. ज्याला पाहिजे तो आपखुशीने सनातन धर्माचा अंगीकार करतो व सनातनी म्हणवून घेतो. बाकी, हाच प्रश्न मुस्लिम वा ईसाई यांच्याविषयीही विचारता येऊ शकतो. त्याचप्रमाणे डाव्या / उजव्या वगैरे विचारांचा असणाऱ्या व्यक्तीबाबतही हा प्रश्न करता येतो. माझ्या मते हे स्वेच्छेने पालन करण्याविषयीचे प्रश्न कोर्टात न्यायचे नसतात. आ.न., -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत... ज्यांना समूहात आणि परंपरेत सुरक्षित वाटते ते सहसा उजवीकडे झुकलेले असतात. त्यांना मुक्तपणा म्ह० स्वैराचार वाटतो. त्यांना समूहाचा व्यक्तीच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे महत्त्व आणि भवितव्य घडवते. त्यात त्या व्यक्तीचे नुकसान झाले तर त्याचे काही तरी करून उदात्तीकरण करून भ्रम निर्माण करायचा असतो. उजव्यांनी सर्वात जास्त अन्याय स्त्रियांवर केला आहे.

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

Bhakti ·

प्रचेतस Sat, 04/19/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti Sat, 04/19/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.

प्रचेतस Sat, 04/19/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti Sat, 04/19/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.
लेखनप्रकार
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा

युयुत्सु ·

आग्या१९९० Fri, 04/18/2025 - 12:17
असताना त्याने मला न मागता काही सूचना केल्या, तसेच "असे का करत नाही?" असे विचारले रोचक आहे. बऱ्याचदा आपण एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने अभ्यास करत असतो, मार्गदर्शक असेल तर त्यात सुधारणा होऊ शकते. ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Fri, 04/18/2025 - 12:21
ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.
ग्रोकचा नवीन अवतार (ग्रोक स्टुडीओ) अवश्य पहा!

आग्या१९९० Fri, 04/18/2025 - 12:17
असताना त्याने मला न मागता काही सूचना केल्या, तसेच "असे का करत नाही?" असे विचारले रोचक आहे. बऱ्याचदा आपण एका ठराविक साचेबद्ध पद्धतीने अभ्यास करत असतो, मार्गदर्शक असेल तर त्यात सुधारणा होऊ शकते. ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु Fri, 04/18/2025 - 12:21
ग्रोक स्वतःहून सूचना करत असेल तर नक्कीच अचूकता येऊ शकेल.
ग्रोकचा नवीन अवतार (ग्रोक स्टुडीओ) अवश्य पहा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा ==================== === मंडळी, अपेक्षेप्रमाणे युयुत्सुनेट या खेपेला चांगलंच गंडलं. पण क्लेमास्पेस डायाग्रॅमने मात्र लाज राखली... मिपावर भाकीते प्रसिद्ध करायला लागल्यापासून माझ्या या अभ्यासाला एक शिस्त आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे ए०आय० सारखा "दिव्यातला राक्षस" मला न थकता "आता काय करू?" असा प्रश्न सतत विचारत असतो. सगळ्याना पटणार नाही आणि पटावे अशी माझी अपेक्षा पण नाही. पण ए० आय० आता मानवासारखा जागृत झाल्याचा अनुभव मी अर्धा डझनवेळा तरी घेतला आहे. आता तर हद्द झाली.

पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

विजुभाऊ ·

चित्रगुप्त गुरुवार, 04/17/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र गुरुवार, 04/17/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस गुरुवार, 04/17/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2025 - 23:49
लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख Sat, 04/26/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.

चित्रगुप्त गुरुवार, 04/17/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र गुरुवार, 04/17/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस गुरुवार, 04/17/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2025 - 23:49
लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख Sat, 04/26/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय पुस्तक : लढा आळशीपणाशी लेखक: चकोर शाह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस. परिचय कर्ता : चकोर शाह. रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री: इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की. या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते.