मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस

मार्गी ·

कंजूस Fri, 04/11/2025 - 04:37
खरोखरच पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणे या मोबाईल सोशल मिडियाच्या काळात फारच कठीण आहे. ध्येयाने प्रेरित असा हा शांतनू आहे हे जाणवते.

चौथा कोनाडा Wed, 04/16/2025 - 12:52
सुंदर लेख ! मा रतन टाटांसारख्या दिग्गजाचे सानिध्य & पुस्तक प्रेमी अश्या शंतनू नायडू या युवकाला थोर म्हणावे लागेल.

कंजूस Fri, 04/11/2025 - 04:37
खरोखरच पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणे या मोबाईल सोशल मिडियाच्या काळात फारच कठीण आहे. ध्येयाने प्रेरित असा हा शांतनू आहे हे जाणवते.

चौथा कोनाडा Wed, 04/16/2025 - 12:52
सुंदर लेख ! मा रतन टाटांसारख्या दिग्गजाचे सानिध्य & पुस्तक प्रेमी अश्या शंतनू नायडू या युवकाला थोर म्हणावे लागेल.
लेखनप्रकार
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत ✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये ✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!" ✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ ✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण ✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे ✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते! ✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई ✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! सर्वांना नमस्कार. काही‌ दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन‌ टाटांचा तरूण मित्र!

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन १

माहितगार ·

चित्रगुप्त Sun, 04/06/2025 - 20:53
खूपच आवडले. अमूक एक विषय असा न घेता दैनंदिन घटनांच्या आधारे काहीतरी लिहावे हे माळरानावरल्या स्वैर, स्वच्छंद भटकंतीसारखेच निखळ आनंद देणारे असते. थोरोच्या 'वाल्डनकाठी विचार-विहार' ची आठवणही आली. असे जरूर लिहून इथे प्रकाशित करत रहावे. -- मलाही किमान गेली वीसेक वर्षे रात्री अडीच- तीनच्या सुमारास जाग येते, मग काही केल्या झोप येत नाही. अलिकडे काही काळापासून थंडीत देखील रात्री अडीच-तीनला गुदमरल्यासारखे होऊन खूप उकडू लागते आणि तहान लागते. -- या बाबतीत एक गोष्ट दोन आठवड्यांपूर्वी लक्षात आली. ती म्हणजे खोलीत ऑक्सिजनची कमतरता होणे. झोपण्याची खोली घराच्या मागल्या बाजूला असून पूर्वेकडे मोठी खिडकी आहे, परंतु खिडकीपलिकडे चार फूट अंतरावर पंधरा-वीस फूट उंच भिंत असल्याने मोकळी हवा येत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यावर पुढल्या खोलीत अगदी खिडकीजवळ झोपणे सुरू केले. पश्चिमेकडून मंद वारा येत रहातो. हे केल्याबरोबर गुदमरणे, उकडणे आणि तहान लागणेच काय, पण अडीच-तीनला जाग येणेही बंद झाले आहे. आता साधारण साडेचार-पाचला जाग येऊन उठतो. आणखी एक गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी पायांना - विशेषतः पोटर्‍यांना - तिळाचे तेल लावून भरपूर मर्दन करतो. त्याचाही परिणाम असेल. -- साडेपाचला टपरीवर आलेला तरूण कदाचित रात्रभर बाहेर घालवून पहाटे घरी परतत असेल, असे वाटले. .

धर्मराजमुटके Sun, 04/06/2025 - 21:23
हा लेख माहितगार यांनी लिहिलेला वाटत नाही. कदाचित त्यांनी एखादा ए.आय. टुल वापरुन लिहिला असावा अशी शंका येते :) शिवाय त्यांची नेहमीची "अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद आणि उत्तरदायित्वास नकार" सिग्नेचर गायब आहे. त्यांचे भुतकाळातील लेख इतके शब्दबंबाळ असायचे की वाचता वाचता माणूस रक्तबंबाळ व्हायचा. असो. लेख खरचं आवडला त्याची ही पावती.

सुबोध खरे Wed, 04/09/2025 - 10:14
पण देवबाप मंडंळींही माझ्यातल्या नॉन-कन्फर्मीस्ट स्केप्टीक माणसाशी - कोणतेही अनुसरण करण्यापुर्वी चोखंदळपणे अनुसरणाची गरज पडताळून पहाणारा - काही दशकांचा अनुभवावरून माझ्याशी जुळवून घेऊन अधुन मधुन अनुभूती देऊन माझी आंतरीक अज्ञेयता डोळस श्रद्धतेकडे पुरेशी झुकवून आहेत. म्हणजे असे की बालपणा पासून तर्क-विज्ञानादी सर्व ललितेतर विषयांसमवेत सर्वधर्मीय आस्तिक अध्यात्म किर्तने आणि नास्तिक प्रवचने तेवढ्याच तन्मयतेने ऐकणारा मी, मला स्वतःला वाटले नाही तो पर्यंत म्हणजे सुरवातीची वीसेक वर्षेतरी मुर्तीपुजेपासून दूर होतो. तारुण्यात येई पर्यंत शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांच्या मर्यादांचा जसा जसा अदमास आला तसे तसे शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांना मुर्तीपुजा हाच उत्तम श्रेयस उतारा आहे हा माझा विश्वास उत्तरोत्तर अधिक बळकट होत गेला आहे, हि झाली तार्कीक बाजू ज्या बद्दल मी स्वतंत्र लेखातून पुर्वीच मत मांडले आहे. हि तीन वाक्ये पहा.

कंजूस गुरुवार, 04/10/2025 - 03:52
असे स्वैर विचार लेख इतरांनीही लिहावेत आणि मेन बोर्ड हलता ठेवावा. जुन्या लोकांनीच करणे शक्य आहे. नवीन तरुण मिपाकर भरती होत नाहीत.

चित्रगुप्त Sun, 04/06/2025 - 20:53
खूपच आवडले. अमूक एक विषय असा न घेता दैनंदिन घटनांच्या आधारे काहीतरी लिहावे हे माळरानावरल्या स्वैर, स्वच्छंद भटकंतीसारखेच निखळ आनंद देणारे असते. थोरोच्या 'वाल्डनकाठी विचार-विहार' ची आठवणही आली. असे जरूर लिहून इथे प्रकाशित करत रहावे. -- मलाही किमान गेली वीसेक वर्षे रात्री अडीच- तीनच्या सुमारास जाग येते, मग काही केल्या झोप येत नाही. अलिकडे काही काळापासून थंडीत देखील रात्री अडीच-तीनला गुदमरल्यासारखे होऊन खूप उकडू लागते आणि तहान लागते. -- या बाबतीत एक गोष्ट दोन आठवड्यांपूर्वी लक्षात आली. ती म्हणजे खोलीत ऑक्सिजनची कमतरता होणे. झोपण्याची खोली घराच्या मागल्या बाजूला असून पूर्वेकडे मोठी खिडकी आहे, परंतु खिडकीपलिकडे चार फूट अंतरावर पंधरा-वीस फूट उंच भिंत असल्याने मोकळी हवा येत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यावर पुढल्या खोलीत अगदी खिडकीजवळ झोपणे सुरू केले. पश्चिमेकडून मंद वारा येत रहातो. हे केल्याबरोबर गुदमरणे, उकडणे आणि तहान लागणेच काय, पण अडीच-तीनला जाग येणेही बंद झाले आहे. आता साधारण साडेचार-पाचला जाग येऊन उठतो. आणखी एक गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी पायांना - विशेषतः पोटर्‍यांना - तिळाचे तेल लावून भरपूर मर्दन करतो. त्याचाही परिणाम असेल. -- साडेपाचला टपरीवर आलेला तरूण कदाचित रात्रभर बाहेर घालवून पहाटे घरी परतत असेल, असे वाटले. .

धर्मराजमुटके Sun, 04/06/2025 - 21:23
हा लेख माहितगार यांनी लिहिलेला वाटत नाही. कदाचित त्यांनी एखादा ए.आय. टुल वापरुन लिहिला असावा अशी शंका येते :) शिवाय त्यांची नेहमीची "अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद आणि उत्तरदायित्वास नकार" सिग्नेचर गायब आहे. त्यांचे भुतकाळातील लेख इतके शब्दबंबाळ असायचे की वाचता वाचता माणूस रक्तबंबाळ व्हायचा. असो. लेख खरचं आवडला त्याची ही पावती.

सुबोध खरे Wed, 04/09/2025 - 10:14
पण देवबाप मंडंळींही माझ्यातल्या नॉन-कन्फर्मीस्ट स्केप्टीक माणसाशी - कोणतेही अनुसरण करण्यापुर्वी चोखंदळपणे अनुसरणाची गरज पडताळून पहाणारा - काही दशकांचा अनुभवावरून माझ्याशी जुळवून घेऊन अधुन मधुन अनुभूती देऊन माझी आंतरीक अज्ञेयता डोळस श्रद्धतेकडे पुरेशी झुकवून आहेत. म्हणजे असे की बालपणा पासून तर्क-विज्ञानादी सर्व ललितेतर विषयांसमवेत सर्वधर्मीय आस्तिक अध्यात्म किर्तने आणि नास्तिक प्रवचने तेवढ्याच तन्मयतेने ऐकणारा मी, मला स्वतःला वाटले नाही तो पर्यंत म्हणजे सुरवातीची वीसेक वर्षेतरी मुर्तीपुजेपासून दूर होतो. तारुण्यात येई पर्यंत शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांच्या मर्यादांचा जसा जसा अदमास आला तसे तसे शब्द पुजा, पुस्तक पुजा, व्यक्ती पुजा यांना मुर्तीपुजा हाच उत्तम श्रेयस उतारा आहे हा माझा विश्वास उत्तरोत्तर अधिक बळकट होत गेला आहे, हि झाली तार्कीक बाजू ज्या बद्दल मी स्वतंत्र लेखातून पुर्वीच मत मांडले आहे. हि तीन वाक्ये पहा.

कंजूस गुरुवार, 04/10/2025 - 03:52
असे स्वैर विचार लेख इतरांनीही लिहावेत आणि मेन बोर्ड हलता ठेवावा. जुन्या लोकांनीच करणे शक्य आहे. नवीन तरुण मिपाकर भरती होत नाहीत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे एक स्वानंदासाठी केलेले स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. हल्ली (गेल्या काही महिन्यांपासून) ब्रह्म मुहुर्तावर उठणे होते. खरे सांगायचे तर जाग तशीही येत होती पण झोप पूर्ण होत नव्हती तर होणार्‍या झोप मोडीशी झगडा करण्यापेक्षा संध्याकाळचे जेवण आणि रात्री झोपण्याचीच वेळ बरीच अलिकडे घेतली. ज्या दिवशी लवकर झोप येणार नाही त्या दिवशी मेडीटेशन केले आणि झोपीचा पॅटर्न यशस्वीपणे बदलला.

व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ?

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु Sun, 04/06/2025 - 08:07
चिन्हांचा अर्थ लावायची क्षमता म्ह० बुद्धी असे सुटसुटीत भाषेत म्हटले तरी चालले असते. जाणीव आणि बुद्धी या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ उडाला आहे असे वाटते. जाणीवांमुळे बुद्धीला (असल्यास) चालना मिळते. स्वगत - सुटसुटीत भाषेत विचार करायची क्षमता म्ह० पण बुद्धीच...

युयुत्सु Sun, 04/06/2025 - 08:35
डीपसीकला पुढील प्रश्न विचारला तेव्हा मी उडालोच - "What is true intelligence?Explain in Marathi, pls." डीपसीकचे उत्तर - "**Thought Process Explained:** The user requested an explanation of "true intelligence" in Marathi. To address this, I first considered the multifaceted nature of intelligence beyond academic prowess. I aimed to highlight emotional intelligence, adaptability, ethical judgment, and practical problem-solving. Cultural relevance was ensured by using terms like "भावनिक बुद्धिमत्ता" (emotional intelligence) and emphasizing holistic growth. The explanation was structured to be clear and relatable, avoiding overly technical terms while incorporating examples familiar to Marathi speakers. --- **मराठीत उत्तर:** खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा परीक्षेत मिळालेले गुण नव्हेत. खरी बुद्धिमत्ता ही एक बहुआयामी गुणवत्ता आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: १. **समज आणि तर्कशक्ती:** नवीन परिस्थिती समजून घेणे, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, आणि तार्किक निर्णय घेणे. २. **भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence):** स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजणे, संवेदनशीलता, आणि नातेसंबंध व्यवस्थापित करणे. ३. **सर्जनशीलता:** नवीन कल्पना, उपाययोजना आणि कलात्मकता व्यक्त करण्याची क्षमता. ४. **नैतिकतेसह बुद्धिमत्ता:** ज्ञानाचा उपयोग समाजासाठी चांगल्या कामात करणे, अनैतिक गोष्टींना विरोध करणे. ५. **अनुकूलनक्षमता:** बदलत्या परिस्थितीत स्वतःला झटकन घडवून घेणे आणि शिकण्याची तयारी. **उदाहरणार्थ:** एखादी व्यक्ती पदवीधर असूनही जर ती आयुष्यातील समस्यांना सामोरी जाऊ शकत नसेल किंवा इतरांशी सहानुभूतीने वागू शकत नसेल, तर तिच्या पुस्तकी ज्ञानाला "खरी बुद्धिमत्ता" म्हणता येणार नाही. खरी बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान, अनुभव, भावना आणि नैतिकता यांचा समन्वय. ही केवळ मेंदूची क्षमता नसून, माणसाचा सर्वांगीण विकास दर्शवते. त्यामुळे, "बुद्धिमान" म्हणजे फक्त हुशार नसून, जगाच्या आव्हानांना सामर्थ्याने सामोरे जाणारी, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती. **निष्कर्ष:** बुद्धिमत्ता ही शिकण्याची, समजण्याची आणि जगाशी सुसंवाद साधण्याची एक सतत प्रक्रिया आहे. ती केवळ "IQ" मध्ये मोजली जात नाही, तर ती आचरणात, विचारात आणि हृदयात दिसून येते." स्वगत - डीपसीक आहे बंधु, त्याची ख्याती काय सांगू?

Bhakti Sun, 04/06/2025 - 18:07
“परा प्रत्यक्ष छवि रूपा पश्यन्ति परदेवता, मध्यमा वैखरी रूपा भक्तीमानस हंसिका” सुंदर वाक् अभिव्यक्ती मार्ग समजून सांगितला. परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी!

In reply to by Bhakti

Bhakti Sun, 04/06/2025 - 21:35
आणखीन एक सुंदर संदर्भ सापडला.
वस्तुतः वाणी नादात्मक आहे. तिला नादब्रह्म म्हणतात. एकच नादात्मक वाणी शरीरातील चक्रांशी संबद्ध असते. ती नादात्मक वाणी मूलाधार (नाभिस्थित) चक्रापासून उच्चारली जात असताना तिला परा वाणी म्हणतात. ही नादात्मक वाणी अत्यन्त सूक्ष्म असते. तो नाद हृदयापर्यंत जात असताना त्यास पश्यंती असे म्हणतात. कारण योग्यांना तो दिसू शकतो. (ऐकू येऊ शकतो.) तीच वाणी हृदयापर्यंत जाऊन पोचली की तिला मध्यमा म्हणतात. कारण हृदय मध्यम स्थानी असते. तोच नाद मुखापर्यंत पोचून, तालु, ओष्ठ, दंत, जिह्वा यांच्या क्रियांनी मुखातून बाहेर पडत असताना तिला वैखरी म्हणतात. अशा रीतीने हा नाद पहिल्या तीन अवस्थांमध्ये अन्तगूढ असतो. शेवटी तो नाद मुखातून अभिव्यक्त होतो. ती वैखरी. जी सर्व माणसे जाणतात. वाणीचे पहिले तीन भाग मात्र ते जाणत नाहीत. ब्रह्मवेत्ते मात्र या नादब्रह्माचे सर्व अंश जाणतात. निरुक्तकार यास्कानीही या वाणीच्या विभागावर प्रकाश टाकला आहे. या पृथ्वीवर, अग्नीत आणि रथन्तर नावाच्या सामांत हे तीन प्रकार आहेत. अन्तरिक्ष, वायु आणि वामदेव्य सामांत, तसेच द्युलोकांत, आदित्यांत आणि बृहत् सामांत ही हे तीन प्रकार विभागले आहेत. या व्यतिरिक्त शेष वाणी ती वैखरी होय. (निरुक्त १३.९)

चित्रगुप्त Sun, 04/06/2025 - 21:23
असो. बास आता कंटाळा आला !
-- मास्तरानु, आमाला फक्त हे एकच वाक्य समजले. -- तरुणपणी कैच्याकै - कांट - हेगेल - नित्शे, इमर्सन ... अमूक तमूक थोर पाश्चात्य तत्वज्ञानी - जे. कृष्णमूर्ती - ओशो आणि काय काय आधाश्यासारखे वाचायचो. -- मात्र आता "असो. बास आता कंटाळा आला ! " असे झालेले आहे. -- तुम्ही मात्र लिहीत रहा. पुढे त्याचाही कंटाळा आला की सोडून द्या. हाय काय अन नाय काय, कुणाला काहीच फरक पडत नाही, आपण असलो काय अन नसलो काय. माझा एक अतिशय जिवलग नातेवाईक ( - रशियन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत, इंग्रजी भाषेचा उत्तम जाणकार आणि त्या त्या भाषेतून तत्वज्ञान वगैरे वाचलेला - त्याला पुष्किनचे महाकाव्यही तोंडपाठ होते - असा ज्ञानी) आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.

In reply to by चित्रगुप्त

असो. बास आता कंटाळा आला !
मला लहानपणी प्रश्न पडायचा - की ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः इतके हुशार असुनही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जो आम्हाला समजायला देखील कठीण जातो तो खुद्द स्वतः लिहुनही, इतकं संपुर्ण तत्त्वज्ञान आकलन करुनही ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त २१ व्या वर्षी संजीवन समाधी का बरें घेतली असावी ? अमृतानुभव , चांगदेव पासष्ठी वाचल्यावर मला उत्तर मिळालं ! असो. बास आता कंटाळा आला ! हे एक नुसते विधान नसुन एक समान अनुभुती आहे. काय परत परत तेच तेच ! आपलं आपण आपल्यालाच सिध्द करत रहायचं ! काय सारखं सारखं स्मरण करुन देत रहायच ? जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥ सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥ एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥ कंटाळा आला . बस्स. "मी आहे. " . इत्यलम् . :) अर्थात हे लक्षात आल्यावर लक्षात आलं त्या सगळ्यांनीच संजीवन समाधी घेतली पाहिजे असा काही नियम नाही. त्यानंतर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चॉईस ! तुकोबांसारखा कोणी विरक्त होऊन टाळ चिपळ्या घेऊन भजन करत राहील , कोणी नाथांच्या सारखे सरळ साधा सामान्य गृहस्थाश्रमी नोकरी करत राहील , कोणी समर्थांसारखे भारतभर फिरुन मठ मंदिरे स्थापन करत राहिल! Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. f :)

In reply to by चित्रगुप्त

कानडाऊ योगेशु Sun, 04/06/2025 - 23:49
आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.
मी चाळली किती समीकरणे पण गूढ उकलले नाही. तव मिठीत सखये अवघ्या विश्वाची उलगड होते!

In reply to by कर्नलतपस्वी

मारवा Tue, 04/22/2025 - 15:10
बाकी मिथ्या ठीक आहे पण मिठी सत्य आहे यावर मंडळाचे एकमत झालेले आहे ना ? मी मिठी वरही अजून dispute आहे ?

वामन देशमुख Fri, 04/11/2025 - 10:47
रच्याक, "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" हे "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" असे असायला हवे ना? की खऱ्या बुद्धिमत्तेची अनेक प्रतले असतात असे सुचवायचे आहे?

In reply to by वामन देशमुख

AGI Artificial General Intelligence आणि ASI Artificial Super Intelligence अशा दोन लेव्हल नक्की असू शकतात असा माझा अंदाज आहे. मी वर लेखात वापरलेला a true intelligence हा संदर्भ AGI ल उद्देशून आहे. ASI हे कसे असेल ह्याची संपूर्ण कल्पना करणे माझ्या आवाक्याच्या पलीकडचे आहे.

ब्रेकिंग न्यूज : सदर लेखनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आल्याने खुद्द व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी सी येथून दखल घेण्यात आलेली असून पुढील प्रमाणे ऑफिशियल प्रेसिडेंटिअल डिफिनेशन देण्यात आलेली आहे. =)))) https://x.com/elonmusk/status/1911778992949969231?t=lZmCn3MGVky21KpeEXz0GA&s=19

In reply to by मारवा

मारवा Tue, 04/22/2025 - 18:14
बिफोर सटोरी मी टपोरी होतो आफ्टर सटोरी साला मी टपोरी च राहिलो. काय करणार आमिर खान दिल चाहता है मध्ये म्हणतो तसं परफेक्शन में improvement नही हो सकता.

चित्रगुप्त Tue, 04/22/2025 - 16:02
काही म्हणा, संक्षी होते तेंव्हा एक वेगळीच मजा होती. त्यांच्या प्रतिसादांवर प्रति-प्रतिसाद देणे खूपच आनंददायक असायचे. उत्तम लेखनाचे ते रसिकतेने स्वागत करायचे. संक्षि, परत या मिपावर.

युयुत्सु Sun, 04/06/2025 - 08:07
चिन्हांचा अर्थ लावायची क्षमता म्ह० बुद्धी असे सुटसुटीत भाषेत म्हटले तरी चालले असते. जाणीव आणि बुद्धी या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ उडाला आहे असे वाटते. जाणीवांमुळे बुद्धीला (असल्यास) चालना मिळते. स्वगत - सुटसुटीत भाषेत विचार करायची क्षमता म्ह० पण बुद्धीच...

युयुत्सु Sun, 04/06/2025 - 08:35
डीपसीकला पुढील प्रश्न विचारला तेव्हा मी उडालोच - "What is true intelligence?Explain in Marathi, pls." डीपसीकचे उत्तर - "**Thought Process Explained:** The user requested an explanation of "true intelligence" in Marathi. To address this, I first considered the multifaceted nature of intelligence beyond academic prowess. I aimed to highlight emotional intelligence, adaptability, ethical judgment, and practical problem-solving. Cultural relevance was ensured by using terms like "भावनिक बुद्धिमत्ता" (emotional intelligence) and emphasizing holistic growth. The explanation was structured to be clear and relatable, avoiding overly technical terms while incorporating examples familiar to Marathi speakers. --- **मराठीत उत्तर:** खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा परीक्षेत मिळालेले गुण नव्हेत. खरी बुद्धिमत्ता ही एक बहुआयामी गुणवत्ता आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: १. **समज आणि तर्कशक्ती:** नवीन परिस्थिती समजून घेणे, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, आणि तार्किक निर्णय घेणे. २. **भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence):** स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजणे, संवेदनशीलता, आणि नातेसंबंध व्यवस्थापित करणे. ३. **सर्जनशीलता:** नवीन कल्पना, उपाययोजना आणि कलात्मकता व्यक्त करण्याची क्षमता. ४. **नैतिकतेसह बुद्धिमत्ता:** ज्ञानाचा उपयोग समाजासाठी चांगल्या कामात करणे, अनैतिक गोष्टींना विरोध करणे. ५. **अनुकूलनक्षमता:** बदलत्या परिस्थितीत स्वतःला झटकन घडवून घेणे आणि शिकण्याची तयारी. **उदाहरणार्थ:** एखादी व्यक्ती पदवीधर असूनही जर ती आयुष्यातील समस्यांना सामोरी जाऊ शकत नसेल किंवा इतरांशी सहानुभूतीने वागू शकत नसेल, तर तिच्या पुस्तकी ज्ञानाला "खरी बुद्धिमत्ता" म्हणता येणार नाही. खरी बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान, अनुभव, भावना आणि नैतिकता यांचा समन्वय. ही केवळ मेंदूची क्षमता नसून, माणसाचा सर्वांगीण विकास दर्शवते. त्यामुळे, "बुद्धिमान" म्हणजे फक्त हुशार नसून, जगाच्या आव्हानांना सामर्थ्याने सामोरे जाणारी, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती. **निष्कर्ष:** बुद्धिमत्ता ही शिकण्याची, समजण्याची आणि जगाशी सुसंवाद साधण्याची एक सतत प्रक्रिया आहे. ती केवळ "IQ" मध्ये मोजली जात नाही, तर ती आचरणात, विचारात आणि हृदयात दिसून येते." स्वगत - डीपसीक आहे बंधु, त्याची ख्याती काय सांगू?

Bhakti Sun, 04/06/2025 - 18:07
“परा प्रत्यक्ष छवि रूपा पश्यन्ति परदेवता, मध्यमा वैखरी रूपा भक्तीमानस हंसिका” सुंदर वाक् अभिव्यक्ती मार्ग समजून सांगितला. परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी!

In reply to by Bhakti

Bhakti Sun, 04/06/2025 - 21:35
आणखीन एक सुंदर संदर्भ सापडला.
वस्तुतः वाणी नादात्मक आहे. तिला नादब्रह्म म्हणतात. एकच नादात्मक वाणी शरीरातील चक्रांशी संबद्ध असते. ती नादात्मक वाणी मूलाधार (नाभिस्थित) चक्रापासून उच्चारली जात असताना तिला परा वाणी म्हणतात. ही नादात्मक वाणी अत्यन्त सूक्ष्म असते. तो नाद हृदयापर्यंत जात असताना त्यास पश्यंती असे म्हणतात. कारण योग्यांना तो दिसू शकतो. (ऐकू येऊ शकतो.) तीच वाणी हृदयापर्यंत जाऊन पोचली की तिला मध्यमा म्हणतात. कारण हृदय मध्यम स्थानी असते. तोच नाद मुखापर्यंत पोचून, तालु, ओष्ठ, दंत, जिह्वा यांच्या क्रियांनी मुखातून बाहेर पडत असताना तिला वैखरी म्हणतात. अशा रीतीने हा नाद पहिल्या तीन अवस्थांमध्ये अन्तगूढ असतो. शेवटी तो नाद मुखातून अभिव्यक्त होतो. ती वैखरी. जी सर्व माणसे जाणतात. वाणीचे पहिले तीन भाग मात्र ते जाणत नाहीत. ब्रह्मवेत्ते मात्र या नादब्रह्माचे सर्व अंश जाणतात. निरुक्तकार यास्कानीही या वाणीच्या विभागावर प्रकाश टाकला आहे. या पृथ्वीवर, अग्नीत आणि रथन्तर नावाच्या सामांत हे तीन प्रकार आहेत. अन्तरिक्ष, वायु आणि वामदेव्य सामांत, तसेच द्युलोकांत, आदित्यांत आणि बृहत् सामांत ही हे तीन प्रकार विभागले आहेत. या व्यतिरिक्त शेष वाणी ती वैखरी होय. (निरुक्त १३.९)

चित्रगुप्त Sun, 04/06/2025 - 21:23
असो. बास आता कंटाळा आला !
-- मास्तरानु, आमाला फक्त हे एकच वाक्य समजले. -- तरुणपणी कैच्याकै - कांट - हेगेल - नित्शे, इमर्सन ... अमूक तमूक थोर पाश्चात्य तत्वज्ञानी - जे. कृष्णमूर्ती - ओशो आणि काय काय आधाश्यासारखे वाचायचो. -- मात्र आता "असो. बास आता कंटाळा आला ! " असे झालेले आहे. -- तुम्ही मात्र लिहीत रहा. पुढे त्याचाही कंटाळा आला की सोडून द्या. हाय काय अन नाय काय, कुणाला काहीच फरक पडत नाही, आपण असलो काय अन नसलो काय. माझा एक अतिशय जिवलग नातेवाईक ( - रशियन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत, इंग्रजी भाषेचा उत्तम जाणकार आणि त्या त्या भाषेतून तत्वज्ञान वगैरे वाचलेला - त्याला पुष्किनचे महाकाव्यही तोंडपाठ होते - असा ज्ञानी) आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.

In reply to by चित्रगुप्त

असो. बास आता कंटाळा आला !
मला लहानपणी प्रश्न पडायचा - की ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः इतके हुशार असुनही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जो आम्हाला समजायला देखील कठीण जातो तो खुद्द स्वतः लिहुनही, इतकं संपुर्ण तत्त्वज्ञान आकलन करुनही ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त २१ व्या वर्षी संजीवन समाधी का बरें घेतली असावी ? अमृतानुभव , चांगदेव पासष्ठी वाचल्यावर मला उत्तर मिळालं ! असो. बास आता कंटाळा आला ! हे एक नुसते विधान नसुन एक समान अनुभुती आहे. काय परत परत तेच तेच ! आपलं आपण आपल्यालाच सिध्द करत रहायचं ! काय सारखं सारखं स्मरण करुन देत रहायच ? जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥ सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥ एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥ कंटाळा आला . बस्स. "मी आहे. " . इत्यलम् . :) अर्थात हे लक्षात आल्यावर लक्षात आलं त्या सगळ्यांनीच संजीवन समाधी घेतली पाहिजे असा काही नियम नाही. त्यानंतर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चॉईस ! तुकोबांसारखा कोणी विरक्त होऊन टाळ चिपळ्या घेऊन भजन करत राहील , कोणी नाथांच्या सारखे सरळ साधा सामान्य गृहस्थाश्रमी नोकरी करत राहील , कोणी समर्थांसारखे भारतभर फिरुन मठ मंदिरे स्थापन करत राहिल! Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. f :)

In reply to by चित्रगुप्त

कानडाऊ योगेशु Sun, 04/06/2025 - 23:49
आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.
मी चाळली किती समीकरणे पण गूढ उकलले नाही. तव मिठीत सखये अवघ्या विश्वाची उलगड होते!

In reply to by कर्नलतपस्वी

मारवा Tue, 04/22/2025 - 15:10
बाकी मिथ्या ठीक आहे पण मिठी सत्य आहे यावर मंडळाचे एकमत झालेले आहे ना ? मी मिठी वरही अजून dispute आहे ?

वामन देशमुख Fri, 04/11/2025 - 10:47
रच्याक, "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" हे "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" असे असायला हवे ना? की खऱ्या बुद्धिमत्तेची अनेक प्रतले असतात असे सुचवायचे आहे?

In reply to by वामन देशमुख

AGI Artificial General Intelligence आणि ASI Artificial Super Intelligence अशा दोन लेव्हल नक्की असू शकतात असा माझा अंदाज आहे. मी वर लेखात वापरलेला a true intelligence हा संदर्भ AGI ल उद्देशून आहे. ASI हे कसे असेल ह्याची संपूर्ण कल्पना करणे माझ्या आवाक्याच्या पलीकडचे आहे.

ब्रेकिंग न्यूज : सदर लेखनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आल्याने खुद्द व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी सी येथून दखल घेण्यात आलेली असून पुढील प्रमाणे ऑफिशियल प्रेसिडेंटिअल डिफिनेशन देण्यात आलेली आहे. =)))) https://x.com/elonmusk/status/1911778992949969231?t=lZmCn3MGVky21KpeEXz0GA&s=19

In reply to by मारवा

मारवा Tue, 04/22/2025 - 18:14
बिफोर सटोरी मी टपोरी होतो आफ्टर सटोरी साला मी टपोरी च राहिलो. काय करणार आमिर खान दिल चाहता है मध्ये म्हणतो तसं परफेक्शन में improvement नही हो सकता.

चित्रगुप्त Tue, 04/22/2025 - 16:02
काही म्हणा, संक्षी होते तेंव्हा एक वेगळीच मजा होती. त्यांच्या प्रतिसादांवर प्रति-प्रतिसाद देणे खूपच आनंददायक असायचे. उत्तम लेखनाचे ते रसिकतेने स्वागत करायचे. संक्षि, परत या मिपावर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हां तर प्रश्न अतिषय सरळ, साधा आणि सोपा आहे - व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ? एक खरी बुध्दी म्हणजे काय ? (भाषांतर हा एक नाजुक प्रकार आहे . कारण वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या शब्द आणि अर्थ ह्यांचे मॅपिंग हे १:१ असेलच असे काही नाही. अर्थात कोणत्याही एका भाषेतील शब्द अन्य कोणत्याही भाषेत अनुवादित करता येतीलच असे नाही. अर्थात इंटेलिजन्सला बुध्दी असे अनुवादित करणे हे तितकेसे योग्य नाही. पण तुर्तास ते असो.) आता आपण आपल्या आजुबाजुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उदय उत्कर्ष पहात आहोत. चॅट जी.पी.टी.

बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा

युयुत्सु ·

युयुत्सु Sun, 04/06/2025 - 11:54
मी तयार केलेले युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अशी मला खासगी निरोप पाठवऊन विचारणा झाली. त्या संदर्भात हा खुलासा- युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अनेक कारणांनी उपलब्ध केलेले नाही (आणि तसा सध्या विचारही नाही). ते वापरणे तसे अजुनही किचकट आहे. शिवाय ते वापरण्यासाठी जो डेटा लागतो तो मी विकत घेतो. त्यासाठी दुस-या सॉफ्ट्वेअर वर अवलंबून राहावे लागते. तरी या लेख-मालेतील १ला लेख बघितला तर त्याची रचना कशी केली याचा थोडाफार अंदाज येईल. आता ते सुरुवातीच्या रचनेपासून खुप विकसित झाले आहे. ते "आर" या भाषेत लिहीले आहे. ती पायथनपेक्षा शिकायला अवघड आहे, असे म्हणतात.

आंद्रे वडापाव Sun, 04/06/2025 - 16:53
उलट आम्हीच तुमचे धन्यवाद केले पाहिजे .. माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर (आप्लिइड आय टी ) पाहून मनाला आनंद होतो . मी हे भाकीत नक्की वाचतो (पण त्यावर अवलंबून गुंतवणूक करत नाही ) मजा वाटते ...

युयुत्सु Sun, 04/06/2025 - 11:54
मी तयार केलेले युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अशी मला खासगी निरोप पाठवऊन विचारणा झाली. त्या संदर्भात हा खुलासा- युयुत्सु-नेट लोकांच्या वापरासाठी अनेक कारणांनी उपलब्ध केलेले नाही (आणि तसा सध्या विचारही नाही). ते वापरणे तसे अजुनही किचकट आहे. शिवाय ते वापरण्यासाठी जो डेटा लागतो तो मी विकत घेतो. त्यासाठी दुस-या सॉफ्ट्वेअर वर अवलंबून राहावे लागते. तरी या लेख-मालेतील १ला लेख बघितला तर त्याची रचना कशी केली याचा थोडाफार अंदाज येईल. आता ते सुरुवातीच्या रचनेपासून खुप विकसित झाले आहे. ते "आर" या भाषेत लिहीले आहे. ती पायथनपेक्षा शिकायला अवघड आहे, असे म्हणतात.

आंद्रे वडापाव Sun, 04/06/2025 - 16:53
उलट आम्हीच तुमचे धन्यवाद केले पाहिजे .. माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर (आप्लिइड आय टी ) पाहून मनाला आनंद होतो . मी हे भाकीत नक्की वाचतो (पण त्यावर अवलंबून गुंतवणूक करत नाही ) मजा वाटते ...
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : ७ एप्रिलचा आठवडा ======================= मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. दर वेळेला लेखाच्या शेवटी मी सावधगिरीचा इशारा म्हणून "डोळे मिटून विश्वास ठेउ नये असे लिहीतो". असे का असा प्रश्न अनेकजण विचारतील. त्यासाठी माझा ताजा म्हणजे कालचाच अनुभव सांगणे आवश्यक वाटते. युयुत्सुनेटची मी इंट्रा-डेसाठी पण चाचणी घेत आहे. भाकीते इथे टाकायला सुरूवात केल्यापासून "मी डोळे मिटून" इंट्रा-डेसाठी पोझिशन घेत आहे. मला ~७०% सक्सेस रेट मिळाला. पण तरीही माझा एकूण नफा कालच्या घसरगुंडीमध्ये गमावला.

चिटिश कुमार.... !!

बाजीगर ·

श्रीगुरुजी Fri, 04/04/2025 - 22:58
नितीश उठाइतकाच भोंदू व नालायक आहे. भाछपने मूर्खपणा करून शेणेला शुन्यातून मोठे केले तसाच मूर्खपणा करून नितीशलाही शुन्यातून मोठे केले. भाजपने उठाचा २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर भंगार माल केला तसाच नितीश सुद्धा डिसेंबर २०२५ निवडणुकीनंतर भंगार माल व्हायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

एकूणच समाजवादी लोकं एकाहून एक फालतू असतात. एक झाकावा आणि दुसरा काढावा. कधीनाकधी समाजवादी लोक आपले खरे रंग दाखवून देतात. भाजपला उगीच इतरांना मोठे करायची फार हौस असते. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली १९९४ मध्ये. मार्च १९९५ मधील बिहार विधानसभा निवडणुक त्या पक्षाची पहिली निवडणुक होती. त्यावेळी त्या पक्षाची कामगिरी कशी होती? एकूण ७.१% मते आणि जागा जिंकल्या ७. भाजपची त्यावेळी कामगिरी कशी होती? एकूण १३% मते आणि जागा जिंकल्या ४१. समता पक्ष अनुक्रमे २२ आणि ६० जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. तर भाजप अनुक्रमे ५६ आणि ७१ जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. बरं भाजपने जागा जास्त लढवल्या म्हणून हे आकडे दिसत होते का? तर तसे नाही. भाजपने ३१५ तर समता पक्षाने ३१० जागा लढविल्या होत्या म्हणजे दोन पक्षांनी लढविलेल्या जागांमध्येही फार फरक नव्हता. म्हणजे १९९५ मध्ये नितीशपेक्षा भाजपची ताकद बिहारमध्ये बरीच जास्त होती. १९९६ मध्ये पहिल्यांदा नितीश-भाजप युती झाली तेव्हा १९९५ च्या निवडणुकांचेच आकडे समोर होते. तरीही भाजपने नितीशला त्या पक्षाच्या ताकदीपेक्षा जास्त जागा दिल्या आणि आपल्या किंमतीवर नितीशला वाढायला वाव दिला. २००० च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आली होती. राजद आघाडीला १२५ तर भाजप आघाडीला १२४ जागा होत्या. तसे असताना भाजप आघाडीला सुरवातीला सरकार बनवायला पाचारण करणे हे अयोग्य होते पण केंद्रातील भाजप सरकारने राज्यपालांना हाताशी धरून तो डाव खेळला. आणि मुख्यमंत्री कोण झाले? तर नितीशकुमार. त्यावेळी भाजपला ६७ तर नितीशकुमारांच्या पक्षाला ३४ जागा होत्या- म्हणजे भाजपला नितीशच्या जवळपास दुप्पट जागा होत्या. तरीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे कोण? तर नितीशकुमार. त्यांचे सरकार आठवड्याभरात पडले आणि परत राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. बिहारमध्ये काळाकुट्ट अध्याय पुढे सुरू राहिला. दरम्यानच्या काळात बिहारमधून झारखंड वेगळा झाला होता आणि विधानसभेत जागा ३२४ वरून २४३ इतक्या कमी झाल्या. २००५ मध्ये दोनदा निवडणुक झाली. मार्च २००५ मध्ये नितीशकुमारांच्या जनता दल (यु) ने १३८ तर भाजपने १०३ जागा लढविल्या. त्या निवडणुकांनंतर कोणतेच स्थिर सरकार बनणार्‍यातले नव्हते या नावाखाली विधानसभेची एकही बैठक न घेता राज्यपाल बुटासिंगांना हाताशी धरून केंद्रातील युपीए सरकारने बिहार विधानसभा विसर्जित केली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २००५ मध्ये परत विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी जनता दल (यु) ने १३९ तर भाजपने १०२ जागा लढविल्या. नितीशपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे हे समोर दिसत असतानाही भाजपने नितीशला जास्त जागा लढायला दिल्या. म्हणजेच भाजपने १९९६ ते २००५ या काळात नितीशला मोठे केले. समजा भाजप-नितीश युती झाली नसती तर लालू जिंकला असता. ठीक आहे. पण त्यासाठी भाजपने स्वतःला कमी जागा लढवायला घेऊन त्याग केला. दरवेळेस असा त्याग भाजपनेच का करायचा? तसे न करता समजा भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली असती तर १९९५ मधील ४१ पासून आधी ६०-७० आणि त्यानंतर आणखी जास्त जागा अशी प्रगती नक्की करता आली असती. पण नितीशला भाजपने मोठे केले आणि मग नितीशने स्वतःची प्रतिमा सुशासनबाबू अशी उभी केली. लालूंच्या काळातील अनागोंदीपुढे कोणीही मुख्यमंत्री लोकांना बराच वाटला असता. त्याचा पुरेपूर फायदा नितीशने घेतला आणि भाजप मात्र बाहेरून सगळा खेळ बघत बसला. भाजपने जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये पण केली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Sat, 04/05/2025 - 13:22
पूर्ण सहमत. भारतातील सर्वाधिक विश्वासघातकी राजकारण्यांची यादी केली तर त्यात नितीश प्रथम क्रमांकावर व पवार दुसऱ्या क्रमांकावर असतील. नितीश अत्यंत विश्वासघातकी व लबाड आहे याचा अनुभव येऊनही भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा नितीशशी युती करणे ही गंभीर घोडचूक होती. तसेही राजद-कॉंग्रेस-संजद यांचे संयुक्त सरकार फार काळ टिकले नसते. अगदी टिकले असते तरीही २०२० विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्याची चांगली संधी मिळाली असती. निदान आता तरी भाजपने स्वतंत्र लढावे किंवा मुख्यमंत्री आपलाच होणार हे जाहीर करून संजदपेक्षा जास्त जागा लढवाव्या.

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचं घाट केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा घात केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:18
99 टक्के मुस्लिम मते आरजेडीला मिळतील. एक ही मुस्लिम वोट भाजप समर्थक नितीश, नायडू, अन्ना द्रमुकला मिळणार नाही. बिहार मध्ये आरजेडी जिंकल्यावर तेथील हिंदूंची परिस्थिति वेस्ट बंगाल सारखी होणार. अनेक भागातून पलायन करावे लागेल. राज्यात अराजकता पसरेल. बाकी आजच्या परिस्थितीत ज्या व्यक्तिला थोडे ही डोके आहे, तो भाजप शिवाय दुसर्‍याला मत विचार ही करू शकत नाही.

श्रीगुरुजी Fri, 04/04/2025 - 22:58
नितीश उठाइतकाच भोंदू व नालायक आहे. भाछपने मूर्खपणा करून शेणेला शुन्यातून मोठे केले तसाच मूर्खपणा करून नितीशलाही शुन्यातून मोठे केले. भाजपने उठाचा २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर भंगार माल केला तसाच नितीश सुद्धा डिसेंबर २०२५ निवडणुकीनंतर भंगार माल व्हायला हवा.

In reply to by श्रीगुरुजी

एकूणच समाजवादी लोकं एकाहून एक फालतू असतात. एक झाकावा आणि दुसरा काढावा. कधीनाकधी समाजवादी लोक आपले खरे रंग दाखवून देतात. भाजपला उगीच इतरांना मोठे करायची फार हौस असते. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली १९९४ मध्ये. मार्च १९९५ मधील बिहार विधानसभा निवडणुक त्या पक्षाची पहिली निवडणुक होती. त्यावेळी त्या पक्षाची कामगिरी कशी होती? एकूण ७.१% मते आणि जागा जिंकल्या ७. भाजपची त्यावेळी कामगिरी कशी होती? एकूण १३% मते आणि जागा जिंकल्या ४१. समता पक्ष अनुक्रमे २२ आणि ६० जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. तर भाजप अनुक्रमे ५६ आणि ७१ जागांवर दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होता. बरं भाजपने जागा जास्त लढवल्या म्हणून हे आकडे दिसत होते का? तर तसे नाही. भाजपने ३१५ तर समता पक्षाने ३१० जागा लढविल्या होत्या म्हणजे दोन पक्षांनी लढविलेल्या जागांमध्येही फार फरक नव्हता. म्हणजे १९९५ मध्ये नितीशपेक्षा भाजपची ताकद बिहारमध्ये बरीच जास्त होती. १९९६ मध्ये पहिल्यांदा नितीश-भाजप युती झाली तेव्हा १९९५ च्या निवडणुकांचेच आकडे समोर होते. तरीही भाजपने नितीशला त्या पक्षाच्या ताकदीपेक्षा जास्त जागा दिल्या आणि आपल्या किंमतीवर नितीशला वाढायला वाव दिला. २००० च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आली होती. राजद आघाडीला १२५ तर भाजप आघाडीला १२४ जागा होत्या. तसे असताना भाजप आघाडीला सुरवातीला सरकार बनवायला पाचारण करणे हे अयोग्य होते पण केंद्रातील भाजप सरकारने राज्यपालांना हाताशी धरून तो डाव खेळला. आणि मुख्यमंत्री कोण झाले? तर नितीशकुमार. त्यावेळी भाजपला ६७ तर नितीशकुमारांच्या पक्षाला ३४ जागा होत्या- म्हणजे भाजपला नितीशच्या जवळपास दुप्पट जागा होत्या. तरीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे कोण? तर नितीशकुमार. त्यांचे सरकार आठवड्याभरात पडले आणि परत राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. बिहारमध्ये काळाकुट्ट अध्याय पुढे सुरू राहिला. दरम्यानच्या काळात बिहारमधून झारखंड वेगळा झाला होता आणि विधानसभेत जागा ३२४ वरून २४३ इतक्या कमी झाल्या. २००५ मध्ये दोनदा निवडणुक झाली. मार्च २००५ मध्ये नितीशकुमारांच्या जनता दल (यु) ने १३८ तर भाजपने १०३ जागा लढविल्या. त्या निवडणुकांनंतर कोणतेच स्थिर सरकार बनणार्‍यातले नव्हते या नावाखाली विधानसभेची एकही बैठक न घेता राज्यपाल बुटासिंगांना हाताशी धरून केंद्रातील युपीए सरकारने बिहार विधानसभा विसर्जित केली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २००५ मध्ये परत विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी जनता दल (यु) ने १३९ तर भाजपने १०२ जागा लढविल्या. नितीशपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे हे समोर दिसत असतानाही भाजपने नितीशला जास्त जागा लढायला दिल्या. म्हणजेच भाजपने १९९६ ते २००५ या काळात नितीशला मोठे केले. समजा भाजप-नितीश युती झाली नसती तर लालू जिंकला असता. ठीक आहे. पण त्यासाठी भाजपने स्वतःला कमी जागा लढवायला घेऊन त्याग केला. दरवेळेस असा त्याग भाजपनेच का करायचा? तसे न करता समजा भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली असती तर १९९५ मधील ४१ पासून आधी ६०-७० आणि त्यानंतर आणखी जास्त जागा अशी प्रगती नक्की करता आली असती. पण नितीशला भाजपने मोठे केले आणि मग नितीशने स्वतःची प्रतिमा सुशासनबाबू अशी उभी केली. लालूंच्या काळातील अनागोंदीपुढे कोणीही मुख्यमंत्री लोकांना बराच वाटला असता. त्याचा पुरेपूर फायदा नितीशने घेतला आणि भाजप मात्र बाहेरून सगळा खेळ बघत बसला. भाजपने जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये पण केली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी Sat, 04/05/2025 - 13:22
पूर्ण सहमत. भारतातील सर्वाधिक विश्वासघातकी राजकारण्यांची यादी केली तर त्यात नितीश प्रथम क्रमांकावर व पवार दुसऱ्या क्रमांकावर असतील. नितीश अत्यंत विश्वासघातकी व लबाड आहे याचा अनुभव येऊनही भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा नितीशशी युती करणे ही गंभीर घोडचूक होती. तसेही राजद-कॉंग्रेस-संजद यांचे संयुक्त सरकार फार काळ टिकले नसते. अगदी टिकले असते तरीही २०२० विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्याची चांगली संधी मिळाली असती. निदान आता तरी भाजपने स्वतंत्र लढावे किंवा मुख्यमंत्री आपलाच होणार हे जाहीर करून संजदपेक्षा जास्त जागा लढवाव्या.

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचं घाट केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा घात केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:18
99 टक्के मुस्लिम मते आरजेडीला मिळतील. एक ही मुस्लिम वोट भाजप समर्थक नितीश, नायडू, अन्ना द्रमुकला मिळणार नाही. बिहार मध्ये आरजेडी जिंकल्यावर तेथील हिंदूंची परिस्थिति वेस्ट बंगाल सारखी होणार. अनेक भागातून पलायन करावे लागेल. राज्यात अराजकता पसरेल. बाकी आजच्या परिस्थितीत ज्या व्यक्तिला थोडे ही डोके आहे, तो भाजप शिवाय दुसर्‍याला मत विचार ही करू शकत नाही.
लेखनविषय:
चिटिश कुमार बिहारीमुस्लिम नितीशकुमार वर चिडले, गिरगिट (सरडा),ठग,धोकेबाज म्हणत भिडले ।। RSS सर्टिफाईड मुख्यमंत्री, सेक्युलर आता भगवा मंत्री ।। कैसे कैसे मीम्स चे काम, अविश्वनीय हा पलटुराम ।। हाफ पॅन्ट, काळी टोपी. म्हणें RJD झाली BJP ।। 17% वोटबँक आता कसले, नितीश फक्त गुलजार हसले ।। पसमांदा (दलित) मुस्लिम त्यांच्या बरोबर आहे, नितीशकुमार यांची राजकीय दृष्टी बरोबर आहे ।।

व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

प्रसाद गोडबोले ·

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव Sat, 04/05/2025 - 02:32
व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार.. फारच सुंदर _/\_ कसं जमतं तुम्हाला हे सगळं...

सुबोध खरे Sat, 04/05/2025 - 12:15
बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे! गोऱ्या काकीचा मतिमंद पुत्र याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? मेंदूची पूर्ण वाढ झालेले परंतु मतिमंद अशी असंख्य मोठी मुले आपल्याला आजूबाजूला दिसतात. स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते परंतु त्यांच्या डोळ्यात पाहिले असता चैतन्य पूर्ण नष्ट झालेले दिसते

कॉमी Sat, 04/05/2025 - 23:55
काही अर्थ लागला नाही ब्वा. ह्याचा अर्थ लेख अर्थहीन आहे असे नव्हे. तर लेख जरा जास्तच स्वान्त सुखाय झाला असावा असा अंदाज आहे. लहान मुले खेळता खेळता एकदम कसे म्हणतात की "हि एलसा किती वात्रट आहे बघा, हया बबडूला ती खेळूच देत नाहीये". लहान मुले सुद्धा आपापल्या स्वान्त सुखात विसरून जातात की इतर लोकांना आपली डिट्टेलवार श्टोरी माहित नाहीये. :)

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव Sat, 04/05/2025 - 02:32
व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार.. फारच सुंदर _/\_ कसं जमतं तुम्हाला हे सगळं...

सुबोध खरे Sat, 04/05/2025 - 12:15
बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे! गोऱ्या काकीचा मतिमंद पुत्र याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? मेंदूची पूर्ण वाढ झालेले परंतु मतिमंद अशी असंख्य मोठी मुले आपल्याला आजूबाजूला दिसतात. स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते परंतु त्यांच्या डोळ्यात पाहिले असता चैतन्य पूर्ण नष्ट झालेले दिसते

कॉमी Sat, 04/05/2025 - 23:55
काही अर्थ लागला नाही ब्वा. ह्याचा अर्थ लेख अर्थहीन आहे असे नव्हे. तर लेख जरा जास्तच स्वान्त सुखाय झाला असावा असा अंदाज आहे. लहान मुले खेळता खेळता एकदम कसे म्हणतात की "हि एलसा किती वात्रट आहे बघा, हया बबडूला ती खेळूच देत नाहीये". लहान मुले सुद्धा आपापल्या स्वान्त सुखात विसरून जातात की इतर लोकांना आपली डिट्टेलवार श्टोरी माहित नाहीये. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे. हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary. अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे . आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे क

लोकमान्य(होमरूल -स्वराज्य संघ)

Bhakti ·

चौथा कोनाडा Wed, 04/16/2025 - 12:57
इतिहासाचे एक महत्वाचे पान ! या लेखामुळं ही आटोपशिर माहिती पुन्हा वाचली ! "दुर्दम्य" ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनावरील कादंबरीत याचे बर्‍यापैकी तपशिल आहेत.

चौथा कोनाडा Wed, 04/16/2025 - 12:57
इतिहासाचे एक महत्वाचे पान ! या लेखामुळं ही आटोपशिर माहिती पुन्हा वाचली ! "दुर्दम्य" ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनावरील कादंबरीत याचे बर्‍यापैकी तपशिल आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१ १८८८ ला स्थानिक परिषदेतून टिळक कॉंग्रेसमध्ये आले.कर्झनच्या अन्यायकारी बंगालच्या फाळणीच्या कारस्थानानंतर कॉंग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांची फळी त्यांनी प्रस्थापित केली.परंतू जहाल -मवाळ वादात जहाल मतवाद्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,कॉंग्रेस फुटली.पुढे टिळकांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासा

आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय....

बाजीगर ·
लेखनविषय:
आंधळ्या हिंदूंनो कधी जागे होणार ? खानग्रेस ने काय पाचर मारलीय, कधी पहाणार आणि कधी रागे होणार? हिंदुस्थान मध्ये रेल्वे आणि सशस्त्र सेने पेक्षा जास्त जमीन वक़्फ ची असा दावा आहे... त्यांच्या विरुद्ध काही अपील नाही हा कावा आहे मोदीसरकार,शाह किरेन रिजिजू यांनी बिल पास केले नसते. तर संसदेची जागा सुद्धा वक़्फ ने खाल्ले, ग्रास केले असते संविधानात नसलेले हे बेकायदा बोर्ड नेहरू ने लबाडीने आणले, मूर्ख हिंदु नी स्वत:च्या बरबादीसाठी खांग्रेस ला निवडून आणले. वक़्फ धार्जिणे 233 खासदार कोण आहेत ? त्यांना निवडून देणारे अंध-हिन्दु कोण आहेत?

लोकमान्य (राजद्रोह खटला)

Bhakti ·

नॉट इंटरेस्टिंग टिळकांच्या वरील राजद्रोहाचा खटला हा काही तितकासा रोचक नाही, मात्र टिळकांच्या वरील ताई महाराज बलात्कार चा खटला प्रचंड इंटरेस्टिंग आहे ! मुख्य म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सारख्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यावर बलात्काराचा आरोप करू धजावणाऱ्या व्यक्तीला कोणाचे समर्थन, पाठबळ असेल ह्याचा शोध घेणे हे सर्वांसाठी खूप म्हणजे खूप जास्त रोचक आहे !! शोधा म्हणजे सापडेल !!

नॉट इंटरेस्टिंग टिळकांच्या वरील राजद्रोहाचा खटला हा काही तितकासा रोचक नाही, मात्र टिळकांच्या वरील ताई महाराज बलात्कार चा खटला प्रचंड इंटरेस्टिंग आहे ! मुख्य म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सारख्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यावर बलात्काराचा आरोप करू धजावणाऱ्या व्यक्तीला कोणाचे समर्थन, पाठबळ असेल ह्याचा शोध घेणे हे सर्वांसाठी खूप म्हणजे खूप जास्त रोचक आहे !! शोधा म्हणजे सापडेल !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे. टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये. १.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

Bhakti ·

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 04/02/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .
लेखनविषय:
लेखनप्रकार
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.