मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

विजुभाऊ ·

चित्रगुप्त गुरुवार, 04/17/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र गुरुवार, 04/17/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस गुरुवार, 04/17/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2025 - 23:49
लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख Sat, 04/26/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.

चित्रगुप्त गुरुवार, 04/17/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र गुरुवार, 04/17/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस गुरुवार, 04/17/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:41
आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2025 - 23:49
लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख Sat, 04/26/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय पुस्तक : लढा आळशीपणाशी लेखक: चकोर शाह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस. परिचय कर्ता : चकोर शाह. रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री: इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की. या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते.

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस गुरुवार, 04/17/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

कर्नलतपस्वी गुरुवार, 04/17/2025 - 06:45
मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा गुरुवार, 04/17/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 11:55
श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ गुरुवार, 04/17/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा गुरुवार, 04/17/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस गुरुवार, 04/17/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

कर्नलतपस्वी गुरुवार, 04/17/2025 - 06:45
मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा गुरुवार, 04/17/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 11:55
श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ गुरुवार, 04/17/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा गुरुवार, 04/17/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti गुरुवार, 04/17/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

जर्द पिवळी दुपार

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त Fri, 04/18/2025 - 23:00
जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

In reply to by चित्रगुप्त

अनन्त्_यात्री Sun, 04/20/2025 - 08:18
"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

वामन देशमुख Sun, 04/20/2025 - 14:50
"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!

चित्रगुप्त Fri, 04/18/2025 - 23:00
जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

In reply to by चित्रगुप्त

अनन्त्_यात्री Sun, 04/20/2025 - 08:18
"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

वामन देशमुख Sun, 04/20/2025 - 14:50
"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!
लेखनविषय:
जर्द पिवळी दुपार दार ठोठावत येते आत आत कोंडलेले झळीनेच धुमसते घोर फुफाटा धुळीचा अणु रेणू तापलेला मृगजळाच्या काठाशी निवडुंग फोफावला गारव्याची शीळ निळी दूर विजनी घुमते तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते

वकील

युयुत्सु ·

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:20
.. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता. ..
अशा वाक्यांबाबत साशंकता वाटते. मला विशेषतः राज्यसभेतील आणि अंशतः लोकसभेतील वकिलांच्या आणि विवीध पक्ष प्रवक्ते वकीलांच्या पडद्यामागचे रोल्स काय असतात याचे बरेच कुतुहल आहे ( irrespective of political parties)

सोत्रि गुरुवार, 04/17/2025 - 06:06
आजकाल एखादा वकील काही कारणाने तडफडतांना दिसला तर मला खूप आनंद होतो.
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ह्या लेखातील 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल. तुम्ही करत असलेलं इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान आणि स्वरैक्य ध्यान यांची परिणामकता वाढवायचा प्रयत्न करावा लागेल. - (मुमुक्षु) सोकाजी

युयुत्सु गुरुवार, 04/17/2025 - 07:52
श्री० सोकाजी प्रतिसादाबद्दल आभार! मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल हा निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतो. त्याची कारणे येणे प्रमाणे- ० आपण माझे ध्यानमार्गातले गुरु/मार्गदर्शक नसल्याने मी आपले वरील मूल्यमापन विचारात घेऊ शकत नाही. एखाद्या "तोट्यामुळे", "अपयशा"मुळे एखादे तंत्र्/उपचार फेल गेलं असं म्हणणे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ० पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही. त्यात व्यावहारिक अडचणी (आणि धोके) असतात याची तुम्हाला कल्पना नसली तरी मला आहे. शिवाय एकदा मी राग नाहीसा होणे म्हणजे काय ते चांगले अनुभवले आहे. याबाबतीत मी "अनुभवी साधकांपेक्षा" एखादा न्युरो सायंटिस्ट काय म्हणतो याला जास्त महत्त्व देईन. ० बरेच लोक आयडीयल आणि ऑप्टीमल यात दोन संकल्पनांमध्ये गल्लत करतात. एखाद्याचे आदर्श वजन ७०-८० किलो असायला हवे पण त्याने जर त्रास वाढणार असेल तर त्या आदर्श स्थितीला अर्थ नाही. मग ५-१० किलो किंवा जेव्हढे कमी करणे शक्य आहे तेव्हढे कमी करणे पण शहाणपणाचे ठरते. . हा प्रतिसाद शक्य तितक्या सौम्य आणि सभ्य भाषेत देऊ शकलो ते ध्यानाने प्राप्त झालेल्या सिद्धींमुळेच...तेव्हा माझ्या ध्यानसाधनेबद्दल तुम्ही निश्चिंत असावे ही विनंति.

सोत्रि गुरुवार, 04/17/2025 - 10:58
पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही
ओके, ह्या स्पष्टीकरणबद्दल धन्यवाद. ही भूमीका आधिच माहिती असती तर माझा आधिचा प्रतिसाद दिला नसता, त्यामुळेच निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतोय. - (समंजस) सोकाजी

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:20
.. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता. ..
अशा वाक्यांबाबत साशंकता वाटते. मला विशेषतः राज्यसभेतील आणि अंशतः लोकसभेतील वकिलांच्या आणि विवीध पक्ष प्रवक्ते वकीलांच्या पडद्यामागचे रोल्स काय असतात याचे बरेच कुतुहल आहे ( irrespective of political parties)

सोत्रि गुरुवार, 04/17/2025 - 06:06
आजकाल एखादा वकील काही कारणाने तडफडतांना दिसला तर मला खूप आनंद होतो.
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ह्या लेखातील 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल. तुम्ही करत असलेलं इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान आणि स्वरैक्य ध्यान यांची परिणामकता वाढवायचा प्रयत्न करावा लागेल. - (मुमुक्षु) सोकाजी

युयुत्सु गुरुवार, 04/17/2025 - 07:52
श्री० सोकाजी प्रतिसादाबद्दल आभार! मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल हा निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतो. त्याची कारणे येणे प्रमाणे- ० आपण माझे ध्यानमार्गातले गुरु/मार्गदर्शक नसल्याने मी आपले वरील मूल्यमापन विचारात घेऊ शकत नाही. एखाद्या "तोट्यामुळे", "अपयशा"मुळे एखादे तंत्र्/उपचार फेल गेलं असं म्हणणे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ० पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही. त्यात व्यावहारिक अडचणी (आणि धोके) असतात याची तुम्हाला कल्पना नसली तरी मला आहे. शिवाय एकदा मी राग नाहीसा होणे म्हणजे काय ते चांगले अनुभवले आहे. याबाबतीत मी "अनुभवी साधकांपेक्षा" एखादा न्युरो सायंटिस्ट काय म्हणतो याला जास्त महत्त्व देईन. ० बरेच लोक आयडीयल आणि ऑप्टीमल यात दोन संकल्पनांमध्ये गल्लत करतात. एखाद्याचे आदर्श वजन ७०-८० किलो असायला हवे पण त्याने जर त्रास वाढणार असेल तर त्या आदर्श स्थितीला अर्थ नाही. मग ५-१० किलो किंवा जेव्हढे कमी करणे शक्य आहे तेव्हढे कमी करणे पण शहाणपणाचे ठरते. . हा प्रतिसाद शक्य तितक्या सौम्य आणि सभ्य भाषेत देऊ शकलो ते ध्यानाने प्राप्त झालेल्या सिद्धींमुळेच...तेव्हा माझ्या ध्यानसाधनेबद्दल तुम्ही निश्चिंत असावे ही विनंति.

सोत्रि गुरुवार, 04/17/2025 - 10:58
पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही
ओके, ह्या स्पष्टीकरणबद्दल धन्यवाद. ही भूमीका आधिच माहिती असती तर माझा आधिचा प्रतिसाद दिला नसता, त्यामुळेच निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतोय. - (समंजस) सोकाजी
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे... आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता.

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Wed, 04/16/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार Wed, 04/16/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ Wed, 04/16/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी Wed, 04/16/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त Wed, 04/16/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार Tue, 04/15/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश Tue, 04/15/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ Wed, 04/16/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार Tue, 04/15/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश Tue, 04/15/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ Wed, 04/16/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे