मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग!

मार्गी ·

मार्गी Tue, 05/06/2025 - 18:03
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती: माठ कशामुळे गार होतो? खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार? तेच पाणी, पण वेगळा अनुभव पंखा कसा काम करतो? सायकल हळु चालवण्यातली गंमत ओल्या पृष्ठभागावरून घसरणे! आडवा होणारा हात सांडणारं पाणी सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी Fri, 05/09/2025 - 20:30
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात? पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल. गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी! आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय! सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. - निरंजन वेलणकर

मार्गी Sat, 05/17/2025 - 11:12
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग! नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: ज्योत किती‌ वेळ चालेल? ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो! पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत! तुम्ही हे चॅलेंज घ्याल का? चमचा कसा तरंगेल? तरंगणारे फळ व भाज्या पाणी इकडून तिकडे नेणे! तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा! रंगांसोबत शिकूया! स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर तरंगणारा बटाटा! सोबत महत्त्वाची! बटाट्याचे लांब जाणारे कोंब बेशिस्त अक्षरे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी Sat, 05/24/2025 - 18:56
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं- प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा. गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी Sun, 06/01/2025 - 16:51
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: तरंगणारी पेन्सिल  दृष्टी भ्रम (Eye- illusions)! ओढलं जाणारं पाणी विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा! चंद्राच्या कला तयार करा ग्रहांच्या कला अंधार व प्रकाशाचा खेळ बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा  तीन काड्यांचं संतुलन सी- सॉ मागचं विज्ञान वाहणारं आणि थांबणारं पाणी सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट चुंबक तयार करा खेचले जाणारे केस इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील. - निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)

मार्गी Mon, 06/09/2025 - 17:58
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-  प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!   तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल.  गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती‌ थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा! गंमत 40. संगत का असर! वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
प्रयोग 50. हवेचा विरोध तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =? ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!

मार्गी Tue, 05/06/2025 - 18:03
मागच्या दिवसांमध्ये पोस्ट केलेले काही प्रयोग व गमती: माठ कशामुळे गार होतो? खेळाच्या मैदानात तुमची पाण्याची बाटली गार कशी ठेवणार? तेच पाणी, पण वेगळा अनुभव पंखा कसा काम करतो? सायकल हळु चालवण्यातली गंमत ओल्या पृष्ठभागावरून घसरणे! आडवा होणारा हात सांडणारं पाणी सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. धन्यवाद.

मार्गी Fri, 05/09/2025 - 20:30
प्रयोग 9. पाण्यावर वस्तु का तरंगतात? पाण्यावर वस्तु का तरंगतात ह्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? एक सोपी गोष्ट करू. कागदाची एक छोटी नाव बनवू व ती बादलीभर पाण्यात सोडू. तरणशक्ती किंवा प्लावकता (buoyancy/ upthrust) ह्या गुणधर्मामुळे वस्तु तरंगतात. तरणशक्ती हे त्या द्रवाचं बल असतं जे त्यावर पूर्णत: किंवा अंशत: बुडालेल्या वस्तुच्या वजनाला विरोध करतं. वस्तुचा तरंगण्याचा गुणधर्म ते दर्शवतं. जेव्हा लाकडासारखी एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते, तेव्हा लाकूड हे समान वजनाच्या पाण्याच्या तुलनेत कमी पाण्याचे विस्थापन करत असते (कारण त्याची घनता पाण्याहून कमी असते). जी वस्तु पाण्याच्या वजनापेक्षा कमी वजनाला विस्थापित करते, ती तरंगते. विचार करा- आपण जमिनीवर उभे राहू शकतो, कारण आपण आपल्या वजनाच्या जमिनीला फार कमी प्रमाणात विस्थापित करतो. परंतु कल्पना करा की, एकदम एखादी मोठी इमारत जमिनीवर उभी राहिली, तर तिच्यामुळे समान वजनाच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होईल व त्यामुळे इमारत जमिनीवर उभी राहू शकणार नाही तर आत जाईल. गंमत 9. तुमच्या होडीचे प्रवासी! आता तुमच्याकडे पाण्यावर तरंगणारी छोटी नाव आहे. ती तरंगू शकेल अशा प्रकारे तुम्ही त्यात काय काय ठेवू शकता? एखादं छोटं रबरबँड? एखादं छोटं इरेझर ती नेऊ शकेल? किंवा छोटं चॉकलेट? आणि समजा एखादं सॉफ्ट टॉय पाण्यावर तरंगत ठेवायचं असेल तर किती मोठी नाव लागेल? विचार करा! प्रयत्न करा! आणि अशा स्टीलच्या तीन वस्तु सांगा ज्या पाण्यावर तरंगतात! होय! सगळे प्रयोग व गमती इथे वाचता येतील. - निरंजन वेलणकर

मार्गी Sat, 05/17/2025 - 11:12
50 दिवसांसाठी 50 गमती आणि प्रयोग! नमस्कार. आजपर्यंत 17 प्रयोग व 17 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: ज्योत किती‌ वेळ चालेल? ऑक्सीजन आपल्यासाठीही आवश्यक असतो! पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत! तुम्ही हे चॅलेंज घ्याल का? चमचा कसा तरंगेल? तरंगणारे फळ व भाज्या पाणी इकडून तिकडे नेणे! तुमच्या मित्रांची नावे वापरून शब्दकोडं बनवा! रंगांसोबत शिकूया! स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर तरंगणारा बटाटा! सोबत महत्त्वाची! बटाट्याचे लांब जाणारे कोंब बेशिस्त अक्षरे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी Sat, 05/24/2025 - 18:56
नमस्कार. आजपर्यंत 24 प्रयोग व 24 गमती पोस्ट केल्या आहेत. मला त्या पोस्ट करतानाच खूप मजा येते आहे. इतके ते प्रयोग व गमती इंटरेस्टिंग आहेत. काही उदाहरणं- प्रयोग 21. आपोआप फुटणारे फुगे आपण फुग्यांसोबत थोडं खेळूया. त्यासाठी एक ट्रिक करूया. एक संत्र किंवा लिंबू घ्या. त्याची साल कापा व सालीवर दाब देऊन त्यातल्या द्रवाचे थोडे थेंब गोळा करा. हे थेंब फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही असा एक थेंब फुग्यावर सोडता, तेव्हा लगेचच फुगा फुटतो. तुम्हांला बोटसुद्धा ठेवावं लागत नाही किंवा जोर द्यावा लागत नाही! फक्त त्या द्रवाचा एक थेंब फुग्यावर सोडा, बस्स! मित्रांसोबत हे करा व हात न लावता फुगे फोडण्याची तुमची ट्रिक त्यांना दाखवा! पण हे का होतं? हे होण्याचं कारण म्हणजे त्या द्रवामध्ये फुग्याचं रबर लगेचच विरघळतं व फुग्यामध्ये एक बारीक छिद्र तयार होतं व तो फुटतो! प्रयत्न करा, हे करा व इतरांनाही दाखवा! आणि स्पर्श न करता फुगा फोडण्याचे इतर कोणते मार्ग आहेत का, ह्यावरही विचार करा. गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी Sun, 06/01/2025 - 16:51
नमस्कार. आजपर्यंत 32 प्रयोग व 32 गमती पोस्ट केल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती अशा आहेत: तरंगणारी पेन्सिल  दृष्टी भ्रम (Eye- illusions)! ओढलं जाणारं पाणी विजेच्या मदतीने आवाजाचा वेग मोजा! चंद्राच्या कला तयार करा ग्रहांच्या कला अंधार व प्रकाशाचा खेळ बटाट्यात आरपार जाणारा स्ट्रॉ स्ट्रॉ, कागद आणि पुठ्ठा  तीन काड्यांचं संतुलन सी- सॉ मागचं विज्ञान वाहणारं आणि थांबणारं पाणी सगळ्यांनी मिळून सांगायची गोष्ट चुंबक तयार करा खेचले जाणारे केस इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील. - निरंजन वेलणकर (आकाश दर्शन, ध्यान, फिटनेस व फन- लर्न)

मार्गी Mon, 06/09/2025 - 17:58
नमस्कार. आजपर्यंत 40 प्रयोग व 40 गमती पोस्ट केल्या आहेत. आजचं अपडेट-  प्रयोग 40. तुमचे होकायंत्र (कंपास) बनवा!   तुम्हांला होकायंत्र माहिती आहे का? होकायंत्र म्हणजे कंपास. तो नाही जो तुम्ही शाळेत नेता. कंपास किंवा होकायंत्र म्हणजे असं यंत्र जे उत्तर व दक्षिण दिशा दाखवतं. तुम्ही दूर कुठे असताना म्हणजे डोंगरात फिरत असाल किंवा समुद्रात जहाजामधून जात असाल तेव्हा दिशा निश्चित करण्यासाठी व रस्ता शोधण्यासाठी ते उपयोगी असतं. आपण एक होकायंत्र बनवूया! त्यासाठी तुम्हांला एक मोठं चुंबक, एक छोटी सुई व रबराचा किंवा थर्मोकॉलचा तुकडा लागेल (अशी हलकी वस्तु जी सहजपणे पाण्यावर तरंगते). एक ताटली घ्या. तिच्यात पाणी ओता. पाण्यात रबर किंवा थर्मोकॉल टाका. ते तरंगेल.  गरज असेल तर कोणाची मदत घेऊन ताटलीच्या बाजूला उत्तर व दक्षिण दिशांची खूण करा. उत्तरेला उ किंवा N आणि दक्षिणेला द किंवा S लिहा. आता सुईला चुंबकावर एकाच दिशेमध्ये 50 ते 60 वेळेस घासा. त्यासाठी 2 मिनिटे लागतील. पूर्ण सुई एकाच दिशेने घासा. त्यामुळे सुईमध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होईल. आता चुंबक झालेली सुई रबरावर किंवा थर्मोकॉलवर ठेवा. ती‌ थोडा वेळ हलेक आणि मग एकाच स्थितीमध्ये स्थिर होईल. सुईचा दक्षिण ध्रुव पृथ्वी नावाच्या विशाल चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित होईल! तुम्ही तिला हलवलं तरी ती परत उत्तर- दक्षिण अशीच स्थिर होईल. सुईचं चुंबकत्व टिकेपर्यंत हे राहील. इथे तुम्ही पाण्याचा एक माध्यम म्हणून व रबराचा एक पाया म्हणून कसा वापर केला, ह्याचंही निरीक्षण करा! गंमत 40. संगत का असर! वरच्या प्रयोगामध्ये सुईला चुंबकत्व मिळालं, कारण ती काही वेळ चुंबकाच्या सोबत राहिली. त्यामुळे सोबत म्हणजे कंपनी महत्त्वाची असते. चांगली सोबत- अच्छी संगत नेहमी उपयोगी असते! काही रोग हे संसर्गजन्य (contagious) असतात, हे तुम्हांला माहिती आहे. पण आरोग्य किंवा गुणसुद्धा तसेच असतात व ते संगतीने वाढतात. हे लक्षात ठेवा. आता आपण ह्याचा संबंध आकाशातल्या ता-यांशी जोडू. आपण ता-यांना एकमेकांच्या सोबतीने ओळखू शकतो. म्हणजे सोबत असलेले तारे व ता-यांच्या ग्रूपनुसार त्यांना ओळखू शकतो. आपण त्यांचे पॅटर्न्स किंवा आकारही लक्षात ठेवू शकतो. आता एक प्रश्न पाहा. तुम्ही रात्री जेव्हा बाहेर असाल- जंगलात किंवा डोंगरात तेव्हा तुम्ही उत्तर दिशा कशी शोधाल? कोणते तारे तुम्हांला त्यासाठी मदत करतील? ह्याचं उत्तर द्या. तुमचे मित्र किंवा मोठ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये असणं उपयोगीच पडतं! इथे सगळे प्रयोग व गमती वाचता येतील.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
प्रयोग 50. हवेचा विरोध तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =? ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार! मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यांचा वेळ कसा जाणार ही‌ पालकांची चिंता आहे. मुलांसाठी 50 गमती व प्रयोग मी आणत आहे. दररोज मी माझ्या ब्लॉगवर एक प्रयोग व एक गमतीची कृती पोस्ट करेन. ह्या प्रयोगांसाठी घरामध्ये असलेल्या गोष्टीच लागतील! हे सर्व प्रयोग व गमती करायला अगदी सोप्या आहेत. वय 8 पासून पुढची व मोठेही त्याचा आनंद घेऊ शकतात. हा पहिला प्रयोग. प्रयोग 1. पाणी कसं पडत नाही? हा आश्चर्यकारक प्रयोग मला माझ्या मुलीने- अद्विकाने करून दाखवला! एक ग्लास पाण्याने पूर्ण भरा. एक ग्लासच्या आकारापेक्षा मोठा पुठ्ठा घ्या. ग्लासपेक्षा थोडा मोठा आकार कापून घ्या.

त्यांनी हल्ला केला... आम्ही कडिनिंदा केली!

अमरेंद्र बाहुबली ·

बूंद से गई वो हौद से नहीं आती। तुम्ही 2029 पर्यंत मिसळपाववर सर्वत्र घाण करत फिरणार आहात अशी जी स्पष्टोक्ती दिली आहे त्यानंतर असे हजारो लेखन धागे प्रकाशित केले तरी काहीही उपयोग होणार नाहीये आता. 2029 निवडणूक निकालानंतर बोलू :=))))

चामुंडराय Tue, 04/29/2025 - 23:19
कडीनिंदा हा हिंदी शब्द आहे ना? की माझंच काही चुकतंय? मराठी प्रेमी आबा ह्यांनी "तीव्र निषेध" न म्हणता "कडीनिंदा" असा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य वाटले.

In reply to by चामुंडराय

भाजपेयींचा आवडता शब्द आहे, त्यांची मजल कडिनिंदा पर्यंतच!

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 02:50
आवडली. अबाच्यां देशभक्तीला राजकीय वास अबांना कमळाबांईचा खुपच त्रास जरा वळून बघा म्हणतो,जरा इतीहास, चाळून बघा म्हणतो. कुणी पेरल्या बाभळी कोण वेचतयं काटे कैच्या कै कवीता पाडायला XX का नाही वाटे उघडा डोळे बघा निट्ट, करून सवरून निगरगट्ट सरदाराने जीव तोडून सांगीतलं,पण नाही कळालं तौंड उघडायला लावू नका,बात निकलेगी तो दुर तलक जागेयी ढुंXची लंगोटी उतर जायेगी. अच्छा है.... बंद मुठ्ठी लाख की,खुल गयी तो......

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Wed, 04/30/2025 - 09:14
त्याचेच परिणाम आपण सगळे भोगत आहोत... अर्थात्, त्यांनी अद्याप धड, पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यांना हे सगळे काय कळणार?

In reply to by कर्नलतपस्वी

उघडा बंद मुठ्ठी हौद्या चर्चा! काय खरे काय खोटे कळूद्या! कळूद्या भाजपेयी खरे देशप्रेमी की फक्त इंदिरा एकटी?

हे राम....! आता आपण सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. राहिलं शब्दाऐवजी कृतीचा भाग तर, आपण पाकिस्तानातील सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. तसेच, आपल्या देशातील उत्तर प्रदेशातील लोकप्रिय असलेले '४ पीएम' या यूट्यूब चॅनलवरही सुरक्षेचे कारण देत बंदी घातली आहे, या ट्यूब वाहिनीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारला त्यांनी धारेवर धरत थेट मोदी-शहांना लक्ष्य केले होते. अजुन कवीला काय कार्यवाही अपेक्षित आहे ? अवघड हे राव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एवढेच करू शकतो आपण युट्यूब चॅनल ला बंदी याव नी त्याव! म्हणून म्हटले आहे., कधी मिळणार मायभूमीला “खरा” पुत्र? जो पाकिस्तानला दणका देईल?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी गुरुवार, 05/01/2025 - 18:27
कवीने आगोदरच स्पष्ट म्हणले आहे, "An Eye for Eye", स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुनर्विलोकन केल्यास लक्षात येईल की कुलंगी कुत्र्या सारखे वारंवार अंगावर धाऊन येतयं,नुसतेच हाड म्हणून भागणार नाही. पेकाटात लाथ घालून कंबरडेच मोडले पाहीजे. संपूर्ण परिस्थितीचे भान ठेवून व होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन प्रतिसाद दिला आहे.

मुक्त विहारि Wed, 04/30/2025 - 09:24
तुम्हाला राग येणे साहजिकच आहे... कारण हे लचांड आपल्याच, लाडक्या परमपूज्य गांधी आणि नेहरू यांनी, भारतावर लादले आहे.... आता तर तुम्हाला हे सहन पण होत नाही आणि सांगता पण येत नाही... असो, बाकी कविता आवडली. आता एखादी कविता राजस्थान स्कँडल किंवा ह्याच महिन्यात उघडकीस आलेल्या भोपाळ स्कँडल वर पण येऊ द्या. भारतातील स्त्रियांच्या अब्रूचे कसे धिंडवडे काढल्या गेले, ते पण सांगा....

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/01/2025 - 21:17
२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१३ आधीची बरीच वर्षे भारतातल्या विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणर्‍या दहशतवाद्यांच्या भटकळ मोड्युलला २०१३ पर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत केले गेले. त्या काळात केंद्रिय गृहमंत्री होते पी चिदंबरम अन सुशिल कुमार शिंदे.

बूंद से गई वो हौद से नहीं आती। तुम्ही 2029 पर्यंत मिसळपाववर सर्वत्र घाण करत फिरणार आहात अशी जी स्पष्टोक्ती दिली आहे त्यानंतर असे हजारो लेखन धागे प्रकाशित केले तरी काहीही उपयोग होणार नाहीये आता. 2029 निवडणूक निकालानंतर बोलू :=))))

चामुंडराय Tue, 04/29/2025 - 23:19
कडीनिंदा हा हिंदी शब्द आहे ना? की माझंच काही चुकतंय? मराठी प्रेमी आबा ह्यांनी "तीव्र निषेध" न म्हणता "कडीनिंदा" असा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य वाटले.

In reply to by चामुंडराय

भाजपेयींचा आवडता शब्द आहे, त्यांची मजल कडिनिंदा पर्यंतच!

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 02:50
आवडली. अबाच्यां देशभक्तीला राजकीय वास अबांना कमळाबांईचा खुपच त्रास जरा वळून बघा म्हणतो,जरा इतीहास, चाळून बघा म्हणतो. कुणी पेरल्या बाभळी कोण वेचतयं काटे कैच्या कै कवीता पाडायला XX का नाही वाटे उघडा डोळे बघा निट्ट, करून सवरून निगरगट्ट सरदाराने जीव तोडून सांगीतलं,पण नाही कळालं तौंड उघडायला लावू नका,बात निकलेगी तो दुर तलक जागेयी ढुंXची लंगोटी उतर जायेगी. अच्छा है.... बंद मुठ्ठी लाख की,खुल गयी तो......

In reply to by कर्नलतपस्वी

मुक्त विहारि Wed, 04/30/2025 - 09:14
त्याचेच परिणाम आपण सगळे भोगत आहोत... अर्थात्, त्यांनी अद्याप धड, पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यांना हे सगळे काय कळणार?

In reply to by कर्नलतपस्वी

उघडा बंद मुठ्ठी हौद्या चर्चा! काय खरे काय खोटे कळूद्या! कळूद्या भाजपेयी खरे देशप्रेमी की फक्त इंदिरा एकटी?

हे राम....! आता आपण सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. राहिलं शब्दाऐवजी कृतीचा भाग तर, आपण पाकिस्तानातील सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. तसेच, आपल्या देशातील उत्तर प्रदेशातील लोकप्रिय असलेले '४ पीएम' या यूट्यूब चॅनलवरही सुरक्षेचे कारण देत बंदी घातली आहे, या ट्यूब वाहिनीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारला त्यांनी धारेवर धरत थेट मोदी-शहांना लक्ष्य केले होते. अजुन कवीला काय कार्यवाही अपेक्षित आहे ? अवघड हे राव. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एवढेच करू शकतो आपण युट्यूब चॅनल ला बंदी याव नी त्याव! म्हणून म्हटले आहे., कधी मिळणार मायभूमीला “खरा” पुत्र? जो पाकिस्तानला दणका देईल?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी गुरुवार, 05/01/2025 - 18:27
कवीने आगोदरच स्पष्ट म्हणले आहे, "An Eye for Eye", स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुनर्विलोकन केल्यास लक्षात येईल की कुलंगी कुत्र्या सारखे वारंवार अंगावर धाऊन येतयं,नुसतेच हाड म्हणून भागणार नाही. पेकाटात लाथ घालून कंबरडेच मोडले पाहीजे. संपूर्ण परिस्थितीचे भान ठेवून व होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन प्रतिसाद दिला आहे.

मुक्त विहारि Wed, 04/30/2025 - 09:24
तुम्हाला राग येणे साहजिकच आहे... कारण हे लचांड आपल्याच, लाडक्या परमपूज्य गांधी आणि नेहरू यांनी, भारतावर लादले आहे.... आता तर तुम्हाला हे सहन पण होत नाही आणि सांगता पण येत नाही... असो, बाकी कविता आवडली. आता एखादी कविता राजस्थान स्कँडल किंवा ह्याच महिन्यात उघडकीस आलेल्या भोपाळ स्कँडल वर पण येऊ द्या. भारतातील स्त्रियांच्या अब्रूचे कसे धिंडवडे काढल्या गेले, ते पण सांगा....

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/01/2025 - 21:17
२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१३ आधीची बरीच वर्षे भारतातल्या विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणर्‍या दहशतवाद्यांच्या भटकळ मोड्युलला २०१३ पर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत केले गेले. त्या काळात केंद्रिय गृहमंत्री होते पी चिदंबरम अन सुशिल कुमार शिंदे.
लेखनविषय:
काव्यरस
२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले, आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले! २०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ, आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली. २०१५ – गुरदासपूर, ७ ठार, पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी ! २०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले, कडिनिंदा नी निर्बंध…. २०१६ – उरीत १९ जवान मारले, सर्जिकल स्ट्राईक केली, पण पुन्हा शांततेचे गीत गायले! २०

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

मार्गी ·

चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे.
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. असो.

मार्गी गुरुवार, 05/01/2025 - 15:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :) त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.

चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे.
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. असो.

मार्गी गुरुवार, 05/01/2025 - 15:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :) त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

यात्रा आणि सक्रिय सोहळे

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अशात काही सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक पातळीवर काही कार्यक्रम, मिरवणुका, शोभा यात्रा पाहिल्या. गुढी पाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त असले तरी एक साम्य होतं. कार्यक्रमाची सुरुवात कितीही पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, ज्या सण उत्सवाचं निमित्त आहे त्या महापुरुषाला किंवा देवाला वंदन करून झालं कि थोड्याच वेळात डीजेच्या भिंतीच्या भिंती लावुन गोळा झालेलं पब्लिक त्यात मुख्यत्वे अर्थातच तरुण टोळके वेडेवाकडे नाचूनच शेवट झाला. सुरुवातीची गाणी जरा निमित्ताला साजेशी असली तरी शेवटपर्यंत निमित्ताचं, औचित्याचं भान कोणालाही राहिलं नाही.

बाजाराचा कल

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"बाजाराचा कल" हे माझे सदर सध्याच्या अस्थिर वातावरणामुळे थोडे दिवस स्थगित ठेवत आहे. मागच्या आठवड्याचे युयुत्सुनेट्चे भाकीत चुकले. पण इण्ट्रा-डे मध्ये युयुत्सुनेटने तगडा पर्फॉर्मन्स दिला. माझी काय चूक होत आहे, ती पण मला समजली आहे (असे सध्या तरी वाटत आहे).  मॉरल ऑफ द स्टोरी - १. बाजारात केव्हाही पैसे मिळवता येतात २. इंट्राडे करनेका तो खुदका ए०आय० लिखके करनेका|

फाईल बंद

रम्या ·

वामन देशमुख Fri, 05/02/2025 - 10:53
हॅहॅहॅ ! खुसखुशीत कथन! द मा मिरासदारांची आठवण आली. तारक मेहता का उल्टा चष्मा ची ही आठवण आली. अजून येऊ द्या.

सौंदाळा Tue, 05/06/2025 - 14:26
मस्तच मज्जा आली वाचताना. मुलीला आजच ही गोष्ट सांगतो

स्वधर्म गुरुवार, 05/08/2025 - 16:02
>> काळ यावा तसा कल्लू आला आणि आपल्या गळ्यात पट्टा घालून गोव्याहून आपल्याला फरपटत घेऊन आला! हे भारीच! >> "हेड कॉन्स्टेबल भगवंत तांदळे, मूळ गाव डुंगुरवाडी, तालुका जत, जिल्हा सोलापूर" जत तालुका सोलापूर नसून सांगली जिल्ह्यात आहे.

वामन देशमुख Fri, 05/02/2025 - 10:53
हॅहॅहॅ ! खुसखुशीत कथन! द मा मिरासदारांची आठवण आली. तारक मेहता का उल्टा चष्मा ची ही आठवण आली. अजून येऊ द्या.

सौंदाळा Tue, 05/06/2025 - 14:26
मस्तच मज्जा आली वाचताना. मुलीला आजच ही गोष्ट सांगतो

स्वधर्म गुरुवार, 05/08/2025 - 16:02
>> काळ यावा तसा कल्लू आला आणि आपल्या गळ्यात पट्टा घालून गोव्याहून आपल्याला फरपटत घेऊन आला! हे भारीच! >> "हेड कॉन्स्टेबल भगवंत तांदळे, मूळ गाव डुंगुरवाडी, तालुका जत, जिल्हा सोलापूर" जत तालुका सोलापूर नसून सांगली जिल्ह्यात आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गोव्याचा अथांग समुद्र, निळेशार पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू. आजुबाजुला नारळी फोपळीच्या बागा, समुद्रावरून येणारा ताजा वारा. अशा छान वातावरणात पोलिस सब-इन्स्पेक्टर पाटील बायकोच्या कमरेत हात घालून, गालाला गाल चिकटवून, प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत सेल्फी काढत होते. बायको सुद्धा फारच रंगात आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच नवरा असा तिच्या हातात आला होता. दोघांचेही कुठे म्हणजे कुठेच लक्ष नव्हते. ते दिवस, तो सहवास संपूच नये असे वाटत होते. फक्त तू आणि मी, मी आणि तू. माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी. दुसरा कोणताच विचार मनात नव्हता आणि तो असण्याचे कारणही नव्हते. फौजदार फार तयारीने आले होते.

त्या पडद्याच्या पल्याड वसते

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
त्या पडद्याच्या पल्याड वसते गूढ असे "ते "काही (अंतर "त्या"च्या-माझ्या मधले घटते, कळतही नाही) भेट अटळ आहेच "त्या"ची मग वाट कशाला पाहू? (अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या अविरत टपला राहू) "अस्तित्वाच्या पूर्णविरामा- -नंतर काहीच नसते"- (माहित असले - तरी मानसी उत्कंठा का वसते?) त्या पडद्याचे धूसर दर्शन अधुनी मधुनी घडते ("जाऊनी वरती, परतुनी आले" ऐसी कुजबुज होते ) :)

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

कर्नलतपस्वी ·

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 20:29
भलते लाड करणे आता त्या देशाने बंद केले आहे... अन्न-पाणी अमेरिकेचे आणि चिंता हमासची, हे लाड तो देश आता खपवून घेत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 22:19
तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 22:38
विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/24/2025 - 21:36
अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कर्नलतपस्वी Fri, 04/25/2025 - 00:29
कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2025 - 08:15
आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

कर्नलतपस्वी Fri, 04/25/2025 - 00:42
पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या Fri, 04/25/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय Wed, 04/30/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 20:29
भलते लाड करणे आता त्या देशाने बंद केले आहे... अन्न-पाणी अमेरिकेचे आणि चिंता हमासची, हे लाड तो देश आता खपवून घेत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 22:19
तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 04/24/2025 - 22:38
विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

श्रीरंग_जोशी गुरुवार, 04/24/2025 - 21:36
अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कर्नलतपस्वी Fri, 04/25/2025 - 00:29
कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीरंग_जोशी Fri, 04/25/2025 - 08:15
आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

कर्नलतपस्वी Fri, 04/25/2025 - 00:42
पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या Fri, 04/25/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय Wed, 04/30/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई
लेखनविषय:
अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

OBAMA80 ·

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि Sat, 04/26/2025 - 00:37
केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख Sat, 04/26/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

कुमार जावडेकर Sat, 04/26/2025 - 17:26
मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:53
१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

कुमार जावडेकर Mon, 04/28/2025 - 02:05
माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 02:51
कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि Sat, 04/26/2025 - 00:37
केरळ, काश्मीर, राजस्थान आणि पश्चिम बंगाल मध्ये हिंदू अत्याचांबाबतीत, हे महाशय काही बोलले नाहीत. ज्याची त्याची विचारसरणी ....

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:26
मुक्त विहारिजी, ज्यांनी महाराज खरच वाचलेत आणि जाणलेत त्यांनाच नक्कीच कळतील महाराजांच्या भावना. महाराजांचा जुलमी कारभाराला प्रखर विरोध होता मग तो कोणत्याही धर्माचा माणूस असो. त्यांच्या काळात त्यांनी कुठल्याही इतरधर्मीयांवर अत्याचार केल्याची कोठेच नोंद नाही. माझ्यामते राष्र्टकार्यांत कधीच धर्माला स्थान नाही. नाहीतर मग पानिपतावर इर्बाहीम, स्वातंत्र्यलढ्यात असफुल्लाखान व अब्दुल कलांमाना या देशात येवढा मान मिळालाच नसता. जे राष्र्टकार्यांत धर्मांधता आणतात त्यांना ठेचलच पाहिजे...तेथे उपोषणाने प्रश्न सुटत नाहीत. माझ्या लेखाचा शेवट याकरिताच आहे.

तरुणांनी आपापसातले हेवेदावे विसरून धर्माच्या नावावर आपली पोळी शेकून घेणाऱ्या विघातक शक्तींनाच उखडून टाकायची वेळ आलेली आहे. नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल. +१ छान लिहिले आहे!

वामन देशमुख Sat, 04/26/2025 - 05:24
...नाहीतर लवकरच धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगानाच या पृथ्वीवरून संपूर्ण मानव जातीला लवकरच संपवून टाकेल.
सहमत आहे. असे झाले तर पृथ्वीवर उरलेला शेवटचा शांतिदूत असा असेल - Last Muslim on the Earth

In reply to by वामन देशमुख

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:33
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. अशा लोकांना संपवायला कोणी अवतार घ्यायची गरज नाही. हे आपापसात लढूनच संपणार. धर्म हा अफूच्या गोळीसारखा आहे...त्याची व्याप्ती घराच्या आतच योग्य..ही अफूची गोळी घेऊन लोक रस्त्यावर उतरले की त्यांची बांग्लादेशसारखी अवस्था होते. हा उन्माद देशाच्या प्रगतीला विनाशक आहेत.

कुमार जावडेकर Sat, 04/26/2025 - 17:26
मला तरी पत्र आवडलं. शिवाजी महाराजांनी 'घाऊक द्वेष' केला नाही कधी, पण तसं करणार्‍यांना योग्य समज दिली असं मला वाटतं. हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे मांडला आहे. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:53
१. स्वराज्याच्या झेंड्याला, भगवा रंग दिला नसता... २. त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नसता.... माझ्या दृष्टीने तरी, छत्रपती शिवाजी महाराज, कट्टर हिंदू होते. ते अजिबात उदारमतवादी न्हवते...

In reply to by मुक्त विहारि

कुमार जावडेकर Mon, 04/28/2025 - 02:05
माझा मुद्दा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या आजोबांची (अकबर) आठवण करून देणारं पत्र लिहिलं, दौलत खान, मदारी मेहेतर अशा अनेकांना आपल्या जवळची, महत्त्वाची पदं दिली. त्यामुळे ते घाऊक द्वेष करत नव्हते असं मला वाटतं. ते न्यायी राजे होते असं मला वाटतं.

In reply to by कुमार जावडेकर

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 02:51
कारण, ना त्यांना युद्धात ठार मारता आले ना त्यांचे धर्म परिवर्तन करण्यात आले.मग, अशा वेळी, त्यांना उदारमतवादी बनवणे हा सर्वात सोपा उपाय आहे.... एक साधा प्रश्न स्वतःला विचारा.... सतत युद्ध करण्या पेक्षा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आदिलशहाच्या दरबारात नौकरी का केली नाही? आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर, लचित बडफुकन, याने छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श का मानले? अजून एक गोष्ट लक्षांत घ्या की महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर यांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्यांना त्यांचे सेनापती पद परत दिले नाही.... माझे राजे गुणग्राहक होते पण उदारमतवादी नक्कीच न्हवते. हे ओळखायला वरील प्रसंग खूप योग्य आहे...

In reply to by मुक्त विहारि

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:47
त्यांनी रंग भगवा निवडला कारण भगवा रंग शौर्य, बलिदान और वीरतेचे प्रतीक आहे. रंगाचा आणि धर्माचा काय सबंध...मग आपल्या सणाला हिरव्या रंगाची आब्यांची पाने का बरे लावत असतील, मुलींना हिरव्या बांगड्या व हिरवे परकर पोलके का घालत असतील हो.. राज्याभिषेक करून घेऊन त्यांनी ईतरांना योग्य संदेश दिला...त्यांची लुटारू म्हणून जी संभावना व्हायची ती छत्र धरल्यावर बंद झाली. राजाला काही विशेष अधिकार लिहीले आहेत..ते फक्त राज्याभिषेकानंतरच मिळतात.

In reply to by कुमार जावडेकर

OBAMA80 Sun, 05/11/2025 - 08:37
कुमार जावडेकर धन्यवाद. खर आहे....महाराज खूप वाचलेत लहानपणापासून. त्यांनी धर्माच्या पलिकडे जाण्रे राज्य उभे केले म्हणूनच कित्येक वर्षे ते अखंडीत होते. असा माणूस आपल्या भूमीत जन्मला हे आपले भाग्य. त्यांच्या नखाच्या टोकाचीदेखील सर येणार नाही भल्याभल्यांना.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

मानवतेचं कलेवर

कर्नलतपस्वी ·

चौथा कोनाडा Wed, 04/23/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:43
त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 16:20
इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 18:47
तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 19:32
पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Tue, 04/29/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 07:33
कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.

चौथा कोनाडा Wed, 04/23/2025 - 13:34
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......
पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !

छान लिहलय कर्नल साहेब, मृतांना श्रद्धांजली. फिरायला गेलेले बिचारे मृत्यू घेऊन परत आलेत. भारताने ह्या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा! इस्राइलचे १५०० मेले त्याबदल्यात आता पर्यंत ७० हजार मारुन बदला घेतलाहे नी अजूनही सुरूच आहे. आम्ही मात्र “कडीनिंदा” करून शांत बसू अशी शक्यता जास्तय!

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Sun, 04/27/2025 - 12:43
त्यांचा आय. डी. उडाला होता, तरी पण ते लोचटपणे इथेच लोंबकळत बसले आहेत... कधी माईच्या पदराला धरतात तर कधी आग्याचे धोतर पकडतात.... ज्याला स्वत्व नाही, ते असेल लोकांच्या हेटाळणीला पात्र असतात. इथे कुणीच त्यांना भाव देत नाही...

In reply to by प्रसाद गोडबोले

आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई सैन्य सक्षम आहे, पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 16:20
इतिहास न वाचल्याचा परिणाम... अर्थात, तुम्ही अजून पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यामुळं तुम्हांला फ्रान्सचे सर्वसामान्य नागरीक आणि त्यांचा दुसऱ्या महायुद्धातील सहभाग तरी कसा काय समजणार? असो, आनंद आहे....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?
बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 18:47
तुम्ही पण त्यांना समजावून सांगायला लागलात.... पण, ते व्यक्तीद्वेष करण्यातच धन्यता मानतात. त्या रोगाला औषध नाही...

In reply to by मुक्त विहारि

व्यक्तिद्वेष करू देत, काही हरकत नाही. पण किमान पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी दम धरा. पण ते 2029 पर्यंत सतत आणि अखंड मिसळपाव वरील सर्वच लेखनात, प्रतिसादात हे असे "प्रदर्शन" करत राहणार आहेत का ? इतकाच माझा त्यांना प्रश्न आहे. बघू काय म्हणतात ते.

In reply to by प्रसाद गोडबोले

तूमची इच्छा पूर्ण होणार नाही आम्ही देशातील अशिक्षित, भ्रष्ट नी सत्तालोलपू नेत्यांचे वाभाडे काढतच राहू!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि Mon, 04/28/2025 - 19:32
पण ते एकांगी कशाला? राजस्थान बाबतीत, तुम्ही गप्प... पश्चिम बंगाल बाबतीत, तुम्ही गप्प.... नुह बाबतीत, तुम्ही गप्प. संदेशाखाली बाबतीत, तुम्ही गप्प. बरे ते जाऊ द्या.... नागपूर मध्ये दंगल झाली, त्या बाबतीत पण तुम्ही गप्प. आता तर, भोपाळ येथे जे स्कँडल उघडकीस आले आहे.त्या बाबतीत तरी काही बोला... व्यक्तीद्वेष केला की माणूस, सामाजिक भान विसरून जातो. ही तर मूलभूत विचारसरणी आहे. अर्थात् तुम्ही पंचतंत्र न वाचल्याने, तुमची विचारसरणी चुकत आहे. कुणीही येऊन, तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून जाईल.इतके हलके होऊ नका... इथे खूप उत्तम माणसे आहेत, तुमच्या अशा बालीश बुद्धीमुळे, तुम्ही त्या माणसांपासून ज्ञान घेऊ शकत नाही आहात... अजूनही वेळ गेलेली नाही. आत्मपरीक्षण करा. आज तुमचे शिकायचे वय आहे. असेच आत्ममग्न राहिलात तर, बौद्धिक वाटचाल मंद होत जाईल. पटत नसेल तर सोडून द्या. आमचे काय, आज आहोत तर उद्या नाही. पण, कुणी हिंदू वाट चुकत असेल तर बघवत नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद ! 2029 पर्यंत सुखी रहा, समाधानी रहा. ईश्वर तुमच्या मनास शांती प्रदान करो. 2029 नंतर बोलू.

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी Tue, 04/29/2025 - 00:09
कोणत्याही विषयावर धागा असूदे, कविता असू दे, क्रिकेटवर लेख असूदे . . . जेथे काही माहितगार चांगल्या माहितीचे आदानप्रदान करीत असतात, त्या विषयातील आपल्याला काहीही कळत नसले तरी हा माणूस तेथे जाऊन घाण करतोच. एखादी पंगत बसलीये, आनंदाने भोजन सुरू आहे, उदबत्त्यांचा सुवास दरवळतोय, हास्यविनोद सुरू आहे, आग्रह होतोय, लाजून उखाणे घेतले जात आहेत . . . अश्या ठिकाणी एखादा टमरेल घेऊन सर्वांदेखत तेथेच बसला तर कसा रसभंग होऊन किळस येईल, तसेच हा माणूस करतो. अनेकांनी अनेकदा सांगूनही, सदस्यत्व अनेकदा स्थगित होऊनही कणभरही बदल नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते. नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)

श्रीगुरुजी Wed, 04/23/2025 - 13:44
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत वाईट वाटले. या राक्षसांना गुहेत जाऊन जाळून टाकले पाहिजे. आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी. समोर दिसेल त्या सैनिकाला मारून टाकावे. पाकिस्तानने सर्व अतिरेकी स्वतःहून भारताच्या हवाली करावे इतका तीव्र हल्ला असावा. मला विश्वास आहे की लष्कर हल्ल्याची योजना आखत असणार.

In reply to by श्रीगुरुजी

आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.
पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?

हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळी
आपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी Wed, 04/30/2025 - 07:33
कुणीही यावे आणी टपली मारून जावे अशी परिस्थिती झालीयं. अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. . भावनिक नसून अनुभवांती बोलतोय. युद्धाचे होणारे दूरगामी परिणाम चांगलेच. माहित आहेत. ऑपरेशन विजय,पराक्रम, ब्लू स्टार, पवन अनेक ऑपरेशन्स बघीतली आहेत. भाग घेतला आहे. काश्मिरी स्थानिक लोकांकडून सैनिक, पर्यटकांना मिळणारी बागणूक अनुभवली आहे. जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील पाकिस्तान डबघाईस आले आहे. सुभं जळला पण पिळ कायम आहे.थोडा धक्का दिला तर..... चिन पाकिस्तानला मदत करून जगावर तिसरे महायुद्ध लादणार नाही .होणारे परिणाम तो जाणून आहे. जागतिक वातावरण अतिशय संवेदनशील झाले आहे. सध्या सर्वत्र भारतासाठी जागतिक कम्युनिटी फेवरेबल आहे याचा फायदा घेऊन जेव्हढी सफाई करता येईल तेव्हढी करावी. कमीत कमी काही दिवस तरी सरळ राहील. संपूर्ण जग आतिरेकी आणी आतंकवाद याने ग्रस्त आहे. पाकिस्तान ला कुणी दया दाखवेल,मदत करण्याची शक्यता खुप कमी आहे. आतंकवाद वेळीच रोखला नाही तर पुर्ण जग याचा बळी ठरेल याची कल्पना सर्वच देशांना आली आहे. अतिरेक्यांकडून मरण्यापेक्षा मारता मारता मरण्याची वेळ आली आहे. देशातील नेतृत्वाला कुठे थांबायचे हे माहीत आहे. युद्ध करून हा प्राॅब्लेम संपणार नाही पण काही दिवस थांबेल याची खात्री आहे. राजकारण, वैयक्तिक मतभेद थोडावेळ बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. ऐक्काहत्तर मधे भारताच्या मेहेरबानीवर जन्माला आलेला बांगलादेश कसे पांग फेडतोय हे आपण सर्व बघतच आहोत. इंदिराजींच्या मागे पुर्ण देश उभा होता हे जाणकारांनी विसरू नये. एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध कारवाई ही अतंकवाद संपवण्यासाठी आहे ना की धर्म युद्ध आहे. पाकिस्तान राजकीय व सैन्य नेतृत्व नेहमीच भारत विरोधी कारवाई आणी प्रपोगंडा यावरच टिकून आहे यात कुणालाच शंका नसावी.
लेखनविषय:
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......