मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

...याचा अगोदर बंदोबस्त करा!

युयुत्सु ·

श्रीगुरुजी Tue, 04/01/2025 - 10:34
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या नकाशात दाखवेल. म्हणून मग प्रतिक्रिया देत बसायची का? चीन आपल्या नकाशात चिनी नाव देऊन अरूणाचल प्रदेश दाखवितो आणि ईशान्य भारतातील अनेक शहरांना स्वतः दिलेली चिनी नावे दाखवितो. असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे. डोकलाम व गलवान येथे भारताने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. इतर बाबतीत दुर्लक्ष करणेच योग्य. दशकानुदशके युरोप, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे भारतीय नकाशात जम्मू काश्मीर दाखवित नव्हते. सार्वमत घजण्यास सातत्याने नकार देऊन व ३७० कलम काढून टाकून भारताने योग्य प्रतिक्रिया जगाला दिली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 10:54
असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.> कायद्याच्या भाषेत गप्प बसणे याला संमती आहे असे सहसा मानले जाते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 04/01/2025 - 12:23
कसला कायदा? कोणी लागू केला हा कायदा? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांसाठी कायदे, राज्यघटना असलं काही नसतं. आम्ही म्हणू तोच कायदा असतो. सूज्ञ देश इतर देशांच्या मूर्खपणावर योग्य वेळी कृतीतून उत्तर देतात. संज्या राऊतसारखे रोज उठून बरळत नाहीत.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ गुरुवार, 04/03/2025 - 11:48
काल पाकिस्तानातले लोक वक्फ च्या विरोधात प्रतिक्रीया देत होते. भुंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसले / दगड मारून घालवत बसलोतर पुढे जाताच येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 12:31
+ १ कोणत्याही भारतीय नेत्याने अरूणाचल प्रदेशला भेट दिली की चीन संतापून आक्षेप घेतो. अश्या वेळी चीनला उत्तर देत बसायचे का? भारत चीनच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून भेटी सुरूच ठेवून कृतीतून योग्य संदेश देतो.

आंद्रे वडापाव Tue, 04/01/2025 - 10:47
युयुत्सुजी , सोडून द्या विषय ... सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ... त्यातून त्यांना वेळ मिळाला की ,नंतर त्यांच्या दृष्टीने शुल्लक बाबींकडे ते बघतील , अशी अपेक्षा ठेवूया ..

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:53
सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ...> होय तर! पण मला कुणाल कामराची अंबानी वरची कॉमेडी पातळी सोडून केलेली वाटली...

विवेकपटाईत Tue, 04/01/2025 - 12:34
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने त्याचा नक्षा दाखवितो. स्वप्नील नेहरूजींच्या मूर्खपणाने आपण देशाचा हिस्सा गमविला. आज परिस्थिति 2014 पेक्षा अधिक उत्तम आहे. आपले सैन्य पहिल्या पेक्षा जास्त शक्तीशाली आहे. त्यामुळे चीन आता 1962 सारखा धाडस करू शकत नाही. बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.

सुबोध खरे Tue, 04/01/2025 - 20:31
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन हा आहे , यावर चीनने १९५० पासून आपला दावा सांगितलेला आहे. कोणताही संदर्भहीन प्रतिसाद देण्याऐवजी त्याबद्दल पूर्ण वाचून घ्यावे

मूकवाचक Wed, 04/02/2025 - 11:54
चीनने गिळंकृत केलेला भूभाग परत मिळावा यासाठी गोमूत्र आणि शेणावर संशोधन होत आहे?

In reply to by मूकवाचक

मलाही हाच प्रश्न पडला आहे . महत्वाच्या विषयावरील लेखात सदरहू लेखकाने ही असंबद्ध उल्लेख का बरे केले असावेत ? की हा ही लेखकाच्या पूर्वग्रहदूषित विशिष्व्ठ व्यक्तीद्वेषी विचारसरणीचा अजून एक पुरावा असावा ?

विअर्ड विक्स Wed, 04/02/2025 - 15:14
त्या नकाशात अक्साई चीन हा चीनच्या नकाशात दाखवलाय पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवलाय याबद्दल खरे तर आपण चीनचे आभार मानले पाहिजे. अश्या अनेक आंतरराष्ट्रीय बातमीदार वाहिनी भारताचे वेगवेगळे नकाशे दाखवतात. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 06:58
खोड्या कोण काढतं यावर त्याचे गांभीर्य ठरतं. लहान मुलाने खोडी काढली आणि नुकसान फार नसेल तर दूर्लक्ष केलं जातंं, मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. नेहरूंच्या चूका उगाळण्यात ज्यांची "समरसता" एकवटली आहेत, ते सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपांना कसलेच उत्तर देत नाही, हे फार गमतीशीर आहे. पण ते जाउ दे, सतत दिशाभूल करत राहणा-यांकडून, सतत गोलपोस्ट हलवणा-यांकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. स्वगत- डावे हे जर 'वाळवी' असतील तर उजव्यांना 'बुरशी' का म्हणू नये?

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 08:11
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 09:44
चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे पहिली ७० वर्षे जसे त्यांना अतिकडक महाभयंकर आणि अतिभयंकर महाकडक खलिते पाठवत होते तसे करायला हवे. चिनी नेतृत्व घाबरगुंडी उडून आत्महत्या करेल

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 09:47
त्यापेक्षा हिंदी चिनी भाई भाई गाणे म्हणत भांगडा केला तर चीन घाबरून घामाघूम होईल.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 09:52
...किंवा गंगेच्या काठावर चीनचा नि:पात करण्यासाठी नियमित अनुष्ठाने करावित. अघोरी साधूंच्या तपःसामर्थ्याने जमीन परत मिळवता येईल यावर मोठे निधी मंजूर करून, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करावे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 11:06
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी असले प्रकार केल्याने १९४७ व १९६२ मध्ये मोठा भूभाग गमवावा लागला. आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही. मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने आपणास उठासारखे आचरट प्रतिसाद द्यावे लागत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 11:09
मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने > आपली निष्कर्ष क्षमता कौतुकास्पद आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 11:14
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही हाच निष्कर्ष काढेल. काही समर्पक आणि तार्किक उत्तर असते तर ते केव्हाच दिले गेले असते. पण ते नसल्याने आचरटपणा करावा लागला.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 15:18
आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.> श्रीगुरुजी, कृपया ६:३७ मि०पासून ही मुलाखत बघावी. डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे (नोबेल पुरस्कार विजेत्या बरोबर संशोधन करणे हे येरागबाळ्याचं काम नाही. ) https://www.youtube.com/watch?v=hknB9QIDuvs

In reply to by युयुत्सु

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/03/2025 - 17:07
एखादा कितीही हुशार असुदे पण तो “खरं “ बोलत असेल तर आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!

In reply to by युयुत्सु

टीपीके गुरुवार, 04/03/2025 - 22:34
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल

In reply to by टीपीके

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 09:58
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
ते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.

In reply to by टीपीके

युयुत्सु Fri, 04/04/2025 - 10:49
तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल> "तुमच्या" या शब्दाला माझा आक्षेप! तुम्ही रागा आणि सोगा बद्दल बोलत असाल तर मी त्यांच्या बद्दल कधी, केव्हा आणी कुठे "ममत्व" दाखवले होते. मला बुद्धीवंतांचे आकर्षण आहे त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.

In reply to by युयुत्सु

त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.
बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत. रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/article32663931.ece आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-banks-to-corporates-colossal-mistake-says-raghuram-rajan-as-workers-plan-strike/articleshow/81494577.cms. असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे. राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा. r1 r2 r3 r4 हे सगळे बघितल्यावर राजनविषयी पूर्वी असलेला आदर गेलाच. त्यांच्याच फॉल्टलाईन्स या २०१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात काही तज्ञांविषयी त्यांनी लिहिले आहे की असे लोक बिघडलेल्या घडाळ्याप्रमाणे असतात. म्हणजे काही झाले तरी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतात. मग काही वर्षांनंतर हेच वर्णन त्यांच्याविषयी पण लागू व्हायला लागले असे म्हणायचे का? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत न येणार्‍या अनेक गोष्टींवर विनाकारण जाहीरपणे भाष्य केले होते. एक व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून त्यांना स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे. पण अशा मोठ्या पदांवर गेल्यावर त्या पदाशी संबंधित गोष्टींवरच बोलणे अपेक्षित असते. राजन यांच्या पूर्वी कोणत्याही गव्हर्नरने अशी जाहीर वक्तव्ये केली नव्हती. किंबहुना बहुसंख्य लोकांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण हे पण माहित नसायचे. पण राजन आल्यावर मात्र मधून मधून पत्रकार परिषदा, कुठेकुठे अर्थव्यवस्थेतील मोनेटरी पॉलिसीवर वगैरे भाषण असेल तरी मग पुरस्कारवापसी वर वगैरे सरकारला अनाहूत सल्ले देणे वगैरे गोष्टी त्या पदाला साजेशा होत्या असे वाटत नाही. लॉक डाऊन सुरू झाल्यावर महिन्याभरात ते राहुल गांधींशी दीड-दोन तास गुगल मीटवर बोलले होते. रागाचे सोडून द्या. तो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. पण राजन यांचे काय? असे वरीष्ठ प्रोफेसर कामाच्या वेळेतला दीड-दोन तास असा सहजासहजी देत नाहीत. अशा मोठ्या विद्यापीठातील मोठ्या प्रोफेसरना भेटणे हे त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना पण इतके सोपे नसते. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांच्या फक्त थिसीस डिफेन्सला ते जातात. बाकी त्यांना मार्गदर्शन वगैरे पी.एच.डी चे विद्यार्थी किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्च असिस्टंट करतात कारण या प्रोफेसरना त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळत नसेल इतके ते व्यस्त असतील तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कुठून वेळ मिळणार? तरीही या तथाकथित चर्चेसाठी राजनना दीड-दोन तास मिळाले. आणि त्या चर्चेतून राजनना कसलाही अर्थबोध होणार नव्हता याची त्यांनाच नाही तर सगळ्या दुनियेला खात्री. याचा अर्थ काय समजवा? भविष्यात जर कधी दुर्दैवाने सेक्युलर सरकार आले तर त्यात आपल्याला अर्थमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा? (आणि मनमोहनसिंगांचे जसे पोतेरे झाले तसे आपलेही झाले तरी चालेल असे?) . असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का? अमेरिकन फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होण्यापूर्वी काही महिने म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये अमेरिकेत वायोमिंग राज्यात जॅकसन होल या छोटेखानी शहरात जगातील महत्वाच्या अर्थतज्ञांची परिषद झाली होती. त्या ठिकाणी मला वाटते दरवर्षी ही मंडळी भेटतात. तर २००५ च्या त्या परिषदेत बाकी सगळे ग्रीनस्पॅनवर स्तुतीसुमने उधळत असताना रघुराम राजन यांनी HAS FINANCIAL DEVELOPMENT MADE THE WORLD RISKIER? हा पेपर प्रसिध्द केला होता. त्यात त्यांनी २००८ चे संकट येईल असे भाकित केले होते असे म्हटले जाते. त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात या पेपरचा उल्लेख वाचला. त्यानंतरही प्रत्यक्ष पेपर वाचायचा दीड-दोन वर्षे आळस केला होता. पण २०१८ मध्ये शेवटी तो पेपर वाचलाच. त्यात पान ४० वर पेपरचे सार म्हणून त्यांनी नक्की काय लिहिले आहे हे इथे कॉपी-पेस्ट करतो--- Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. In such an eventuality, it is possible the losses that emanate from a financial catastrophe cannot be entirely borne by current generations and are best shared with future generations. Some of the mechanisms for sharing such systematic risks with future generations such as (defined benefit) social security are being changed. While there are gains from doing so, and from ensuring their sustainability, we need to ensure that the inter-generational risk sharing mechanism they offer is not overly weakened. We also need to continue improving the intrinsic flexibility of our economies, so as to better ride out the downturns that, almost inevitably, will occur. म्हणजे काय तर राजन स्वतः २००८ सारख्या घटनेला low probability but highly costly downturn असे म्हणत आहेत. याचाच अर्थ असे काही व्हायची शक्यता कमी आहे पण तसे झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे ते म्हणतात. राजन स्वतःच एखादी गोष्ट व्हायची शक्यता कमी आहे असे म्हणत असतील तर ती गोष्ट होणार याचे भाकित त्यांनी केले होते असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निवाडा वाचकांवरच सोडतो. अर्थात इतर लोक असे काही होईल याची शक्यता शून्य आहे असे म्हणत असतील आणि राजन त्याची शक्यता कमी आहे (म्हणजे शून्यपेक्षा जास्त) असे म्हणत असतील तर इतरांपेक्षा नक्कीच जास्त श्रेय राजनना द्यायला हवे पण तसे काही होणार याचे भाकित त्यांनी केले होते हे म्हणणे कितपत योग्य आहे? दुसरे म्हणजे असे काही झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे राजन म्हणतात ती किंमत किती? तर याच नाही तर पुढच्या पिढ्यांना (अनेकवचनी) पण कदाचित त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल!! हे म्हणणे कैच्याकै नाही झाले का? प्रत्येक वेळेस रघुराम राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे' हे शेपूट आलेच म्हणून समजायचे. २००८ च्या संकटाचे भाकित करणारे रघुराम राजन हेच एकमेव होते का? तसे अजिबात नाही. २००८ मध्ये नक्की काय चालू आहे हे समजण्याइतकी माहिती मला नव्हती पण नंतरच्या काळात या प्रकरणाविषयी माहिती गोळा केली. तेव्हा समजले की अनेकांनी २००८ चा इशारा आधीच दिला होता. त्यात Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी, पीटर शिफ, मायकेल बरी ही मला माहिती असलेली नावे आहेत. मला माहित नसलेली इतरही अनेक नावे अशी असतील. वर म्हटल्याप्रमाणे २०१३ पासून दरवर्षी 'आता २००८ सारखे संकट परत येणार हो.....' असले लांडगा आला रे आला चे इशारे राजन देत सुटले होते तसे इशारे मायकेल बरी, पीटर शीफ वगैरे देत सुटले होते का? ते रघुराम राजन करत होते. आणि मधल्या वर्षांमध्ये राजन यांची भाकिते चुकल्यानंतर त्यांना त्याविषयी प्रश्न किती माध्यमांनी विचारला? आणि परत राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे...' हे शेपूट आजही येतेच. २०२३ मध्ये अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बॅंक वगैरे संकटात आल्यावर अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले (प्रत्यक्षात छापले नाहीत तर त्या इलेक्ट्रॉनिक एन्ट्री होत्या) म्हणून आता बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे राजन म्हणत आहेत. त्याच राजननी २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान भारताने काय करावे असा सल्ला दिला होता? तर तो पुढील ट्विटमध्ये बघा- https://x.com/AbhishBanerj/status/1644159805198675975 r6 असे पैसे छापून कसलीच समस्या सुटत नाही तर उलट महागाईचा भडका उडतो हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. आणि हे मोठे नोबेल मिळवायच्या योग्यतेचे एम.आय.टी मधील पी.एच.डी प्रकांडपंडीत अर्थशास्त्री काय म्हणत होते- तर नोटा छापा. असल्या माणसाच्या तथाकथित विद्वत्तेवर विसंबून राहून मोदींच्या सरकारने नोटा छापल्या नाहीत हे आपले मोठे सुदैव. काय उपयोग असतो असल्या प्रकांडपंडित लोकांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वत्तेचा? भविष्याबद्दल त्यांनी काही आडाखे बांधावेत तर ते किती वेळा फसले आहेत हे राजन यांच्याच उदाहरणावरून कित्येकदा दिसून आले आहे. म्हणजे भविष्याविषयी यांचे आडाखे इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही सामान्य माणसापेक्षा किती अधिक अचूक असतात? जानेवारी २०२३ मध्ये हे रघुराम राजन रागाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि त्यानंतर म्हणाले होते की २०२२-२३ मध्ये ५% जीडीपी वाढ झाली तरी खूप झाले. आणि प्रत्यक्षात वाढ ७% च्या आसपास झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९ महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान ७ महिन्यांचा विदा हाताशी असताना यांचा अंदाज काय तर ५% वाढ झाले तरी खूप झाले. प्रत्यक्षात आकडे आल्यावर आपला अंदाज चुकला हे मान्य करायचा प्रांजळपणाही त्यांच्याकडे नाही आणि हे जगभर मिरवत २००८ ची झूल अंगावर पांघरून गंडणारी परत नवी भाकिते करणार आणि परत लांडगा आला रे आलाचे इशारे देत सुटणार. जेव्हा प्रत्यक्षात लांडगा आला त्यावेळेस मात्र यांचे इशारे कुठे जातात काय माहित. आणि आहेतच इथले युयुत्सुंसारखे लोक नुसती एम.आय.टीची डिग्री दिसली की राजन म्हणेल ती पूर्वदिशा मानणारे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु Fri, 04/04/2025 - 14:22
श्री० चंद्रसूर्यकुमार, प्रदीर्घ आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! क्षणभर आपण तुम्ही म्हणता ते सर्व १००% सत्य आहे, असे मानू या. पण मी वेगळा विचार करणारा माणूस आहे. आता हेच बघा- तुमच्या दाव्याप्रमाणे प्रा० राजन यांची भाकीते दणदणीत आपटली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!! त्या अर्थी सत्य काही तरी वेगळे असले पाहिजे... सध्या तरी ते शोधणे मला शक्य नाही.

In reply to by युयुत्सु

इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!
त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही. दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार? दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्‍याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे Fri, 04/04/2025 - 18:34
जगातले सर्व ज्ञान हि केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या काही संस्था आहेत. आणि तेथे तुम्ही crème de la crème आहेत असे विद्यार्थ्यांवर ठसवलेहि जाते. त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यातले सगळेच कळते किंवा आपण सर्वज्ञ आहोत असा गैर समज होणे साहजिक असते. आणि मग आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिथला प्रत्येक विद्यार्थी तितकाच हुशार आहे असाही कित्येक लोकांचा (गैर) समज होतो. पण म्हणून वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.
दोन नाही. तीन- एम.आय.टी पण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Tue, 04/08/2025 - 22:35
चंद्रसूर्यकुमारजी, राजन यांची भाकिते कशी तोंडावर आपटली, ते पटवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. पण आपले महानेते किती वेळा खोटे बोलले आहेत, त्यांचे आर्थिक निर्णय किती वेळा चुकले आहेत, याबाबत आपण काही रिसर्च केला आहे का? उदा. नोटबंदीच्या वेळेस केलेले दावे व प्रत्यक्ष परिणाम. अन्यथा नावडतीचे मीठ अळणी या उक्तीप्रमाणे ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अमूल्य योगदान दिले त्या मनमोहन सिंग व राजन यांना चूक दाखवण्यातच आपली मेहनत खर्ची पडायची.

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 12:05
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचंचा भाग दाखवलेला आहे. तर तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला हे का विचारले नाही कि हा जर भारताचा भाग आहे तर चीन चा China-Pakistan Economic Corridor मधला काराकोरम महामार्ग या भागातून कसा जातो? अक्सई चीन या भागाबद्दल सुद्धा न वाचताच येथे टिप्पणी केली आपले पूर्वग्रह असे उघडे पडण्यापूर्वी एवढा निष्काळजीपणा दाखवणे आपल्या अफाट बुद्धिमत्तेला शोभत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाला हरवू शकत नाही हेच खरे असो

भारताला एकाहून एक विज्ञाननिष्ठ पंतप्रधान मिळाले होते- जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंग वगैरे. त्या काळात शेणावर संशोधन होत नव्हते आणि भारतातील सामान्य लोकही बाहेर पडताना बॅगेत दोन-चार नोबेल पारितोषिकाची पदके बरोबर घेऊनच बाहेर पडायचे. काय वेळ आली आहे देशावर गेल्या ११ वर्षात.

Vichar Manus Fri, 04/04/2025 - 21:18
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य सेन यांना काहीच कळत नाही, खरे अर्थ तज्ञ म्हणजे नोटबंदी चा सल्ला देणारे बोकील, शक्तीकांत दास आणि आपल्या सन्माननीय अर्थमंत्री

In reply to by Vichar Manus

आंद्रे वडापाव Sat, 04/05/2025 - 01:20
गेल्या १० , १२ वर्षातील मोदीयुगाची वर्षे सोडली.... तर पूर्वीच्या या राष्ट्रद्रोही सरकारनी आणि राजन सारख्या विद्वानांनी.. जी डी पी ग्रोथ ८ , १० % च्या अन्मॅनेजेबल झोन मधे ठेवून देशाचे वाटोळे केले... आणि राजन ला नावे ठेवणाऱ्या विद्वान आणि त्याचे पदवीधारक पंतप्रधान या राष्ट्रप्रेमीनी ती ग्रोथ ७ मग ६ मग आता ५.५ अशी हळू हळू कमी करत आणत, भारताचा पूर्वीचा गुदमरुन टाकणाऱ्या वेगापासून, मोकळा श्वास घेता येण्या जोग्या हिंदू ग्रोथ रेट वर आणून ठेवला आणि आपण हिंदू असल्याचा पुरावा दिला.. थोड थांबा अजून हा रेट कमी होऊन... सगळ्यांना फकीर बनवून अध्यात्माच्या मार्गावर घेऊनच जातील हे... तुमच्या सारख्या वैषयिक सुखात रममाण राहु पाहणाऱ्या लोकांना, त्यांचा तुम्हाला सनातन वैराग्याकडे घेऊन जाण्याचा भगीरथ प्रयत्न दिसणारं नाही...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Sat, 04/05/2025 - 09:41
जाऊ द्या हो मोदी तर आले आहेत आणि २४० च आले म्हणून भूभू : कार करणारे सर्व सध्या सुतकात आहेत कारण आता वक्फचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालंय म्हणजेच मोदी सरकार "एकदम स्थिर" आहे हे हि निश्चित झालं म्हणजे आता २०२९ पर्यंत रडणेच तुमच्या नशिबात आलंय. आणि अधिक दुर्दैव असेल तर २०३४ पर्यंत रडणं नशिबात येईल. तेंव्हा पहा कसं काय करायचं ते. बाकी आचार्य अत्रेंनी १९६० साली लिहिलेलं विडंबन आठवतंय. व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी. गेली ११ वर्षे निदान हा फास सुटला आहे आणि हिंदू आता मोकळेपणाने श्वास घेतोय हे हि नसे थोडके.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Sat, 04/05/2025 - 09:56
खरं तर दोन्ही सभागृहात विधेयक अमान्य झालं होतं, पण मतयंत्रात गडबड करून विधेयक संमत केल्याचं दाखविलं गेलं. रडणाऱ्याने रडत रहावे हसणाऱ्याने हसत रहावे, रडता रडता एक दिवस हसणाऱ्याचे हास्य घ्यावे. - निंदा करूनघेकर

श्रीगुरुजी Tue, 04/01/2025 - 10:34
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या नकाशात दाखवेल. म्हणून मग प्रतिक्रिया देत बसायची का? चीन आपल्या नकाशात चिनी नाव देऊन अरूणाचल प्रदेश दाखवितो आणि ईशान्य भारतातील अनेक शहरांना स्वतः दिलेली चिनी नावे दाखवितो. असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे. डोकलाम व गलवान येथे भारताने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. इतर बाबतीत दुर्लक्ष करणेच योग्य. दशकानुदशके युरोप, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे भारतीय नकाशात जम्मू काश्मीर दाखवित नव्हते. सार्वमत घजण्यास सातत्याने नकार देऊन व ३७० कलम काढून टाकून भारताने योग्य प्रतिक्रिया जगाला दिली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 10:54
असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.> कायद्याच्या भाषेत गप्प बसणे याला संमती आहे असे सहसा मानले जाते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 04/01/2025 - 12:23
कसला कायदा? कोणी लागू केला हा कायदा? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांसाठी कायदे, राज्यघटना असलं काही नसतं. आम्ही म्हणू तोच कायदा असतो. सूज्ञ देश इतर देशांच्या मूर्खपणावर योग्य वेळी कृतीतून उत्तर देतात. संज्या राऊतसारखे रोज उठून बरळत नाहीत.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ गुरुवार, 04/03/2025 - 11:48
काल पाकिस्तानातले लोक वक्फ च्या विरोधात प्रतिक्रीया देत होते. भुंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसले / दगड मारून घालवत बसलोतर पुढे जाताच येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 12:31
+ १ कोणत्याही भारतीय नेत्याने अरूणाचल प्रदेशला भेट दिली की चीन संतापून आक्षेप घेतो. अश्या वेळी चीनला उत्तर देत बसायचे का? भारत चीनच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून भेटी सुरूच ठेवून कृतीतून योग्य संदेश देतो.

आंद्रे वडापाव Tue, 04/01/2025 - 10:47
युयुत्सुजी , सोडून द्या विषय ... सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ... त्यातून त्यांना वेळ मिळाला की ,नंतर त्यांच्या दृष्टीने शुल्लक बाबींकडे ते बघतील , अशी अपेक्षा ठेवूया ..

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:53
सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ...> होय तर! पण मला कुणाल कामराची अंबानी वरची कॉमेडी पातळी सोडून केलेली वाटली...

विवेकपटाईत Tue, 04/01/2025 - 12:34
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने त्याचा नक्षा दाखवितो. स्वप्नील नेहरूजींच्या मूर्खपणाने आपण देशाचा हिस्सा गमविला. आज परिस्थिति 2014 पेक्षा अधिक उत्तम आहे. आपले सैन्य पहिल्या पेक्षा जास्त शक्तीशाली आहे. त्यामुळे चीन आता 1962 सारखा धाडस करू शकत नाही. बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.

सुबोध खरे Tue, 04/01/2025 - 20:31
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन हा आहे , यावर चीनने १९५० पासून आपला दावा सांगितलेला आहे. कोणताही संदर्भहीन प्रतिसाद देण्याऐवजी त्याबद्दल पूर्ण वाचून घ्यावे

मूकवाचक Wed, 04/02/2025 - 11:54
चीनने गिळंकृत केलेला भूभाग परत मिळावा यासाठी गोमूत्र आणि शेणावर संशोधन होत आहे?

In reply to by मूकवाचक

मलाही हाच प्रश्न पडला आहे . महत्वाच्या विषयावरील लेखात सदरहू लेखकाने ही असंबद्ध उल्लेख का बरे केले असावेत ? की हा ही लेखकाच्या पूर्वग्रहदूषित विशिष्व्ठ व्यक्तीद्वेषी विचारसरणीचा अजून एक पुरावा असावा ?

विअर्ड विक्स Wed, 04/02/2025 - 15:14
त्या नकाशात अक्साई चीन हा चीनच्या नकाशात दाखवलाय पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवलाय याबद्दल खरे तर आपण चीनचे आभार मानले पाहिजे. अश्या अनेक आंतरराष्ट्रीय बातमीदार वाहिनी भारताचे वेगवेगळे नकाशे दाखवतात. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 06:58
खोड्या कोण काढतं यावर त्याचे गांभीर्य ठरतं. लहान मुलाने खोडी काढली आणि नुकसान फार नसेल तर दूर्लक्ष केलं जातंं, मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. नेहरूंच्या चूका उगाळण्यात ज्यांची "समरसता" एकवटली आहेत, ते सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपांना कसलेच उत्तर देत नाही, हे फार गमतीशीर आहे. पण ते जाउ दे, सतत दिशाभूल करत राहणा-यांकडून, सतत गोलपोस्ट हलवणा-यांकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. स्वगत- डावे हे जर 'वाळवी' असतील तर उजव्यांना 'बुरशी' का म्हणू नये?

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 08:11
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 09:44
चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे पहिली ७० वर्षे जसे त्यांना अतिकडक महाभयंकर आणि अतिभयंकर महाकडक खलिते पाठवत होते तसे करायला हवे. चिनी नेतृत्व घाबरगुंडी उडून आत्महत्या करेल

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 09:47
त्यापेक्षा हिंदी चिनी भाई भाई गाणे म्हणत भांगडा केला तर चीन घाबरून घामाघूम होईल.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 09:52
...किंवा गंगेच्या काठावर चीनचा नि:पात करण्यासाठी नियमित अनुष्ठाने करावित. अघोरी साधूंच्या तपःसामर्थ्याने जमीन परत मिळवता येईल यावर मोठे निधी मंजूर करून, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करावे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 11:06
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी असले प्रकार केल्याने १९४७ व १९६२ मध्ये मोठा भूभाग गमवावा लागला. आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही. मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने आपणास उठासारखे आचरट प्रतिसाद द्यावे लागत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 11:09
मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने > आपली निष्कर्ष क्षमता कौतुकास्पद आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी गुरुवार, 04/03/2025 - 11:14
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही हाच निष्कर्ष काढेल. काही समर्पक आणि तार्किक उत्तर असते तर ते केव्हाच दिले गेले असते. पण ते नसल्याने आचरटपणा करावा लागला.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु गुरुवार, 04/03/2025 - 15:18
आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.> श्रीगुरुजी, कृपया ६:३७ मि०पासून ही मुलाखत बघावी. डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे (नोबेल पुरस्कार विजेत्या बरोबर संशोधन करणे हे येरागबाळ्याचं काम नाही. ) https://www.youtube.com/watch?v=hknB9QIDuvs

In reply to by युयुत्सु

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/03/2025 - 17:07
एखादा कितीही हुशार असुदे पण तो “खरं “ बोलत असेल तर आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!

In reply to by युयुत्सु

टीपीके गुरुवार, 04/03/2025 - 22:34
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल

In reply to by टीपीके

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 09:58
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
ते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.

In reply to by टीपीके

युयुत्सु Fri, 04/04/2025 - 10:49
तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल> "तुमच्या" या शब्दाला माझा आक्षेप! तुम्ही रागा आणि सोगा बद्दल बोलत असाल तर मी त्यांच्या बद्दल कधी, केव्हा आणी कुठे "ममत्व" दाखवले होते. मला बुद्धीवंतांचे आकर्षण आहे त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.

In reply to by युयुत्सु

त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.
बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत. रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/article32663931.ece आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-banks-to-corporates-colossal-mistake-says-raghuram-rajan-as-workers-plan-strike/articleshow/81494577.cms. असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे. राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा. r1 r2 r3 r4 हे सगळे बघितल्यावर राजनविषयी पूर्वी असलेला आदर गेलाच. त्यांच्याच फॉल्टलाईन्स या २०१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात काही तज्ञांविषयी त्यांनी लिहिले आहे की असे लोक बिघडलेल्या घडाळ्याप्रमाणे असतात. म्हणजे काही झाले तरी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतात. मग काही वर्षांनंतर हेच वर्णन त्यांच्याविषयी पण लागू व्हायला लागले असे म्हणायचे का? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत न येणार्‍या अनेक गोष्टींवर विनाकारण जाहीरपणे भाष्य केले होते. एक व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून त्यांना स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे. पण अशा मोठ्या पदांवर गेल्यावर त्या पदाशी संबंधित गोष्टींवरच बोलणे अपेक्षित असते. राजन यांच्या पूर्वी कोणत्याही गव्हर्नरने अशी जाहीर वक्तव्ये केली नव्हती. किंबहुना बहुसंख्य लोकांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण हे पण माहित नसायचे. पण राजन आल्यावर मात्र मधून मधून पत्रकार परिषदा, कुठेकुठे अर्थव्यवस्थेतील मोनेटरी पॉलिसीवर वगैरे भाषण असेल तरी मग पुरस्कारवापसी वर वगैरे सरकारला अनाहूत सल्ले देणे वगैरे गोष्टी त्या पदाला साजेशा होत्या असे वाटत नाही. लॉक डाऊन सुरू झाल्यावर महिन्याभरात ते राहुल गांधींशी दीड-दोन तास गुगल मीटवर बोलले होते. रागाचे सोडून द्या. तो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. पण राजन यांचे काय? असे वरीष्ठ प्रोफेसर कामाच्या वेळेतला दीड-दोन तास असा सहजासहजी देत नाहीत. अशा मोठ्या विद्यापीठातील मोठ्या प्रोफेसरना भेटणे हे त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना पण इतके सोपे नसते. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांच्या फक्त थिसीस डिफेन्सला ते जातात. बाकी त्यांना मार्गदर्शन वगैरे पी.एच.डी चे विद्यार्थी किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्च असिस्टंट करतात कारण या प्रोफेसरना त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळत नसेल इतके ते व्यस्त असतील तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कुठून वेळ मिळणार? तरीही या तथाकथित चर्चेसाठी राजनना दीड-दोन तास मिळाले. आणि त्या चर्चेतून राजनना कसलाही अर्थबोध होणार नव्हता याची त्यांनाच नाही तर सगळ्या दुनियेला खात्री. याचा अर्थ काय समजवा? भविष्यात जर कधी दुर्दैवाने सेक्युलर सरकार आले तर त्यात आपल्याला अर्थमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा? (आणि मनमोहनसिंगांचे जसे पोतेरे झाले तसे आपलेही झाले तरी चालेल असे?) . असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का? अमेरिकन फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होण्यापूर्वी काही महिने म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये अमेरिकेत वायोमिंग राज्यात जॅकसन होल या छोटेखानी शहरात जगातील महत्वाच्या अर्थतज्ञांची परिषद झाली होती. त्या ठिकाणी मला वाटते दरवर्षी ही मंडळी भेटतात. तर २००५ च्या त्या परिषदेत बाकी सगळे ग्रीनस्पॅनवर स्तुतीसुमने उधळत असताना रघुराम राजन यांनी HAS FINANCIAL DEVELOPMENT MADE THE WORLD RISKIER? हा पेपर प्रसिध्द केला होता. त्यात त्यांनी २००८ चे संकट येईल असे भाकित केले होते असे म्हटले जाते. त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात या पेपरचा उल्लेख वाचला. त्यानंतरही प्रत्यक्ष पेपर वाचायचा दीड-दोन वर्षे आळस केला होता. पण २०१८ मध्ये शेवटी तो पेपर वाचलाच. त्यात पान ४० वर पेपरचे सार म्हणून त्यांनी नक्की काय लिहिले आहे हे इथे कॉपी-पेस्ट करतो--- Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. In such an eventuality, it is possible the losses that emanate from a financial catastrophe cannot be entirely borne by current generations and are best shared with future generations. Some of the mechanisms for sharing such systematic risks with future generations such as (defined benefit) social security are being changed. While there are gains from doing so, and from ensuring their sustainability, we need to ensure that the inter-generational risk sharing mechanism they offer is not overly weakened. We also need to continue improving the intrinsic flexibility of our economies, so as to better ride out the downturns that, almost inevitably, will occur. म्हणजे काय तर राजन स्वतः २००८ सारख्या घटनेला low probability but highly costly downturn असे म्हणत आहेत. याचाच अर्थ असे काही व्हायची शक्यता कमी आहे पण तसे झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे ते म्हणतात. राजन स्वतःच एखादी गोष्ट व्हायची शक्यता कमी आहे असे म्हणत असतील तर ती गोष्ट होणार याचे भाकित त्यांनी केले होते असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निवाडा वाचकांवरच सोडतो. अर्थात इतर लोक असे काही होईल याची शक्यता शून्य आहे असे म्हणत असतील आणि राजन त्याची शक्यता कमी आहे (म्हणजे शून्यपेक्षा जास्त) असे म्हणत असतील तर इतरांपेक्षा नक्कीच जास्त श्रेय राजनना द्यायला हवे पण तसे काही होणार याचे भाकित त्यांनी केले होते हे म्हणणे कितपत योग्य आहे? दुसरे म्हणजे असे काही झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे राजन म्हणतात ती किंमत किती? तर याच नाही तर पुढच्या पिढ्यांना (अनेकवचनी) पण कदाचित त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल!! हे म्हणणे कैच्याकै नाही झाले का? प्रत्येक वेळेस रघुराम राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे' हे शेपूट आलेच म्हणून समजायचे. २००८ च्या संकटाचे भाकित करणारे रघुराम राजन हेच एकमेव होते का? तसे अजिबात नाही. २००८ मध्ये नक्की काय चालू आहे हे समजण्याइतकी माहिती मला नव्हती पण नंतरच्या काळात या प्रकरणाविषयी माहिती गोळा केली. तेव्हा समजले की अनेकांनी २००८ चा इशारा आधीच दिला होता. त्यात Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी, पीटर शिफ, मायकेल बरी ही मला माहिती असलेली नावे आहेत. मला माहित नसलेली इतरही अनेक नावे अशी असतील. वर म्हटल्याप्रमाणे २०१३ पासून दरवर्षी 'आता २००८ सारखे संकट परत येणार हो.....' असले लांडगा आला रे आला चे इशारे राजन देत सुटले होते तसे इशारे मायकेल बरी, पीटर शीफ वगैरे देत सुटले होते का? ते रघुराम राजन करत होते. आणि मधल्या वर्षांमध्ये राजन यांची भाकिते चुकल्यानंतर त्यांना त्याविषयी प्रश्न किती माध्यमांनी विचारला? आणि परत राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे...' हे शेपूट आजही येतेच. २०२३ मध्ये अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बॅंक वगैरे संकटात आल्यावर अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले (प्रत्यक्षात छापले नाहीत तर त्या इलेक्ट्रॉनिक एन्ट्री होत्या) म्हणून आता बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे राजन म्हणत आहेत. त्याच राजननी २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान भारताने काय करावे असा सल्ला दिला होता? तर तो पुढील ट्विटमध्ये बघा- https://x.com/AbhishBanerj/status/1644159805198675975 r6 असे पैसे छापून कसलीच समस्या सुटत नाही तर उलट महागाईचा भडका उडतो हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. आणि हे मोठे नोबेल मिळवायच्या योग्यतेचे एम.आय.टी मधील पी.एच.डी प्रकांडपंडीत अर्थशास्त्री काय म्हणत होते- तर नोटा छापा. असल्या माणसाच्या तथाकथित विद्वत्तेवर विसंबून राहून मोदींच्या सरकारने नोटा छापल्या नाहीत हे आपले मोठे सुदैव. काय उपयोग असतो असल्या प्रकांडपंडित लोकांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वत्तेचा? भविष्याबद्दल त्यांनी काही आडाखे बांधावेत तर ते किती वेळा फसले आहेत हे राजन यांच्याच उदाहरणावरून कित्येकदा दिसून आले आहे. म्हणजे भविष्याविषयी यांचे आडाखे इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही सामान्य माणसापेक्षा किती अधिक अचूक असतात? जानेवारी २०२३ मध्ये हे रघुराम राजन रागाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि त्यानंतर म्हणाले होते की २०२२-२३ मध्ये ५% जीडीपी वाढ झाली तरी खूप झाले. आणि प्रत्यक्षात वाढ ७% च्या आसपास झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९ महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान ७ महिन्यांचा विदा हाताशी असताना यांचा अंदाज काय तर ५% वाढ झाले तरी खूप झाले. प्रत्यक्षात आकडे आल्यावर आपला अंदाज चुकला हे मान्य करायचा प्रांजळपणाही त्यांच्याकडे नाही आणि हे जगभर मिरवत २००८ ची झूल अंगावर पांघरून गंडणारी परत नवी भाकिते करणार आणि परत लांडगा आला रे आलाचे इशारे देत सुटणार. जेव्हा प्रत्यक्षात लांडगा आला त्यावेळेस मात्र यांचे इशारे कुठे जातात काय माहित. आणि आहेतच इथले युयुत्सुंसारखे लोक नुसती एम.आय.टीची डिग्री दिसली की राजन म्हणेल ती पूर्वदिशा मानणारे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु Fri, 04/04/2025 - 14:22
श्री० चंद्रसूर्यकुमार, प्रदीर्घ आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! क्षणभर आपण तुम्ही म्हणता ते सर्व १००% सत्य आहे, असे मानू या. पण मी वेगळा विचार करणारा माणूस आहे. आता हेच बघा- तुमच्या दाव्याप्रमाणे प्रा० राजन यांची भाकीते दणदणीत आपटली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!! त्या अर्थी सत्य काही तरी वेगळे असले पाहिजे... सध्या तरी ते शोधणे मला शक्य नाही.

In reply to by युयुत्सु

इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!
त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही. दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार? दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्‍याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे Fri, 04/04/2025 - 18:34
जगातले सर्व ज्ञान हि केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या काही संस्था आहेत. आणि तेथे तुम्ही crème de la crème आहेत असे विद्यार्थ्यांवर ठसवलेहि जाते. त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यातले सगळेच कळते किंवा आपण सर्वज्ञ आहोत असा गैर समज होणे साहजिक असते. आणि मग आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिथला प्रत्येक विद्यार्थी तितकाच हुशार आहे असाही कित्येक लोकांचा (गैर) समज होतो. पण म्हणून वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.
दोन नाही. तीन- एम.आय.टी पण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Tue, 04/08/2025 - 22:35
चंद्रसूर्यकुमारजी, राजन यांची भाकिते कशी तोंडावर आपटली, ते पटवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. पण आपले महानेते किती वेळा खोटे बोलले आहेत, त्यांचे आर्थिक निर्णय किती वेळा चुकले आहेत, याबाबत आपण काही रिसर्च केला आहे का? उदा. नोटबंदीच्या वेळेस केलेले दावे व प्रत्यक्ष परिणाम. अन्यथा नावडतीचे मीठ अळणी या उक्तीप्रमाणे ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अमूल्य योगदान दिले त्या मनमोहन सिंग व राजन यांना चूक दाखवण्यातच आपली मेहनत खर्ची पडायची.

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 12:05
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचंचा भाग दाखवलेला आहे. तर तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला हे का विचारले नाही कि हा जर भारताचा भाग आहे तर चीन चा China-Pakistan Economic Corridor मधला काराकोरम महामार्ग या भागातून कसा जातो? अक्सई चीन या भागाबद्दल सुद्धा न वाचताच येथे टिप्पणी केली आपले पूर्वग्रह असे उघडे पडण्यापूर्वी एवढा निष्काळजीपणा दाखवणे आपल्या अफाट बुद्धिमत्तेला शोभत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाला हरवू शकत नाही हेच खरे असो

भारताला एकाहून एक विज्ञाननिष्ठ पंतप्रधान मिळाले होते- जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंग वगैरे. त्या काळात शेणावर संशोधन होत नव्हते आणि भारतातील सामान्य लोकही बाहेर पडताना बॅगेत दोन-चार नोबेल पारितोषिकाची पदके बरोबर घेऊनच बाहेर पडायचे. काय वेळ आली आहे देशावर गेल्या ११ वर्षात.

Vichar Manus Fri, 04/04/2025 - 21:18
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य सेन यांना काहीच कळत नाही, खरे अर्थ तज्ञ म्हणजे नोटबंदी चा सल्ला देणारे बोकील, शक्तीकांत दास आणि आपल्या सन्माननीय अर्थमंत्री

In reply to by Vichar Manus

आंद्रे वडापाव Sat, 04/05/2025 - 01:20
गेल्या १० , १२ वर्षातील मोदीयुगाची वर्षे सोडली.... तर पूर्वीच्या या राष्ट्रद्रोही सरकारनी आणि राजन सारख्या विद्वानांनी.. जी डी पी ग्रोथ ८ , १० % च्या अन्मॅनेजेबल झोन मधे ठेवून देशाचे वाटोळे केले... आणि राजन ला नावे ठेवणाऱ्या विद्वान आणि त्याचे पदवीधारक पंतप्रधान या राष्ट्रप्रेमीनी ती ग्रोथ ७ मग ६ मग आता ५.५ अशी हळू हळू कमी करत आणत, भारताचा पूर्वीचा गुदमरुन टाकणाऱ्या वेगापासून, मोकळा श्वास घेता येण्या जोग्या हिंदू ग्रोथ रेट वर आणून ठेवला आणि आपण हिंदू असल्याचा पुरावा दिला.. थोड थांबा अजून हा रेट कमी होऊन... सगळ्यांना फकीर बनवून अध्यात्माच्या मार्गावर घेऊनच जातील हे... तुमच्या सारख्या वैषयिक सुखात रममाण राहु पाहणाऱ्या लोकांना, त्यांचा तुम्हाला सनातन वैराग्याकडे घेऊन जाण्याचा भगीरथ प्रयत्न दिसणारं नाही...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Sat, 04/05/2025 - 09:41
जाऊ द्या हो मोदी तर आले आहेत आणि २४० च आले म्हणून भूभू : कार करणारे सर्व सध्या सुतकात आहेत कारण आता वक्फचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालंय म्हणजेच मोदी सरकार "एकदम स्थिर" आहे हे हि निश्चित झालं म्हणजे आता २०२९ पर्यंत रडणेच तुमच्या नशिबात आलंय. आणि अधिक दुर्दैव असेल तर २०३४ पर्यंत रडणं नशिबात येईल. तेंव्हा पहा कसं काय करायचं ते. बाकी आचार्य अत्रेंनी १९६० साली लिहिलेलं विडंबन आठवतंय. व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी. गेली ११ वर्षे निदान हा फास सुटला आहे आणि हिंदू आता मोकळेपणाने श्वास घेतोय हे हि नसे थोडके.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Sat, 04/05/2025 - 09:56
खरं तर दोन्ही सभागृहात विधेयक अमान्य झालं होतं, पण मतयंत्रात गडबड करून विधेयक संमत केल्याचं दाखविलं गेलं. रडणाऱ्याने रडत रहावे हसणाऱ्याने हसत रहावे, रडता रडता एक दिवस हसणाऱ्याचे हास्य घ्यावे. - निंदा करूनघेकर
लेखनविषय:
लेखनप्रकार
रोज नित्यक्रमाने ताजी ए० आय० न्युज युटयुब वर बघत असताना हा व्हिडीओ नजरेस पडला.

(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)

अनन्त्_यात्री ·
हे ताडपत्रीवाल्या, गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू, फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका, ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव हे नगर सेवका, नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे हे पालक मंत्र्या, महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे हे विदग्ध साहित्यिका, मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव हे हायबरनेटिंग कविवर्या

ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर

युयुत्सु ·

स्वधर्म Mon, 03/31/2025 - 16:41
ग्रोकबद्दल लेख असला तरी प्राणायामाने शेवट केला आहे, म्हणून... व्यायाम जितका सूक्ष्म पातळीचा तेवढी त्याचा परिणामकारकता जास्त असा माझा अनुभव आहे. जसे की जीम > योगासने > प्राणायाम > ध्यान हे चढत्या श्रेणीने परिणाम देतात असे वाटते. याचा अर्थात वयाशीही संबंध असावा.

In reply to by स्वधर्म

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:22
@स्वधर्म प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावर माझी एका डॉ०बरोबर काही वर्षापूर्वी झाली होती. व्यायामाने शरीरातील सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात आणि उर्जेची पातळी, चयापचय वाढतो. प्राणायाम शरीराला शांत करतो कारण परानुकंपी नाड्या (पॅरासिम्पथेटीक नर्व्हस सिस्टम) कार्यान्वित होते. त्यामुळे व्यायामानंतर प्राणायाम लगेच करू नये. व्यायाम शक्यतो सकाळी आणि प्राणायाम संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी केला तर जास्त परिणामकारक होतो. जीम आणि योगासने मूलतः वेगवेगळे आरोग्यप्राप्तीचे मार्ग आहेत, असे माझे मत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:28
त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे त्याने का मागू नयेत? ते काही भीक मागत नाहीत. तुमच्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला मागतात. एखादी गोष्ट हौसेने एक दोन वेळा करणं वेगळं आणि त्यावर अवलंबून राहून त्यांच्याकडून सतत उत्तरं मिळवत राहाणं वेगळं नाही का?

In reply to by कंजूस

तेच काम “माझी” चॅट जीपीटी फुकटात करून देते! इलॉन मस्क च आहे ना ग्रोक? इतका पैसा असून पण पैसा पैसा करतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:28
@अमरेंद्र बाहुबली माझ्याकडे उत्तरासाठी पैसे मागत होता> मला वरील उत्तरे पैसे न टाकता मिळाली. :)

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:24
Grok ने एवढं सविस्तर उत्तर शोधून दिले हे पाहून आनंद झाला. -------------------- कॅन्सर का होतो किंवा तरुणांचं का होतो याचं उत्तर त्याने ताण( stress) हे दिलं आहे. "तुम्हाला हा रोग stressमुळे झाला होता हे" असं डॉक्टरांकडून ऐकल्यावर कोणत्याही रुग्णाला बरे वाटतेच. ताण( stress) आपल्याला आहे याला रुग्ण सहमत होतोच. मग त्याने जर रोग होत असतील आणि ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो. किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला. ____________ बाकी एआइ जे काही करत आहे ते स्तुत्यच आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:27
@कंजूस ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो.> पूर्वी ताण नव्हता असा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल. पण पूर्वी प्रदूषण नक्की कमी होते. ताण + प्रदूषण हे सर्वात घातक कॉम्बिनेशन आहे याची जाणीव फार थोड्या लोकाना असते.

In reply to by युयुत्सु

कंजूस Mon, 03/31/2025 - 21:09
जाणिवा राहतात दूर अंधाऱ्या कोपऱ्यात आणि व्यवहार येतो रस्त्यावर. गावांत काही कमाई नसली की तरुण येतात शहरातल्या भणंग वस्तीत. जाणीवा जपून पोट भरत नसते. प्रदुषणाने शरिराची झीज लवकर भरून येत नाही. म्हणजे स्वच्छ कोरड्या हवेत झोपल्याने लगेच ताजेतवाने होता येते तसे शहरी प्रदुषणी हवेत होत नाही. ताण हे मानसिक आणि आर्थिक असतात. चिंता म्हणू. तीही शरिराला खाते. विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 14:59
विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.> याबाबत मात्र सहमत. कारण निसर्गाने सर्वांना क्षमतांची समान वाटणी केलेली नाही.

चौथा कोनाडा Mon, 03/31/2025 - 19:31
किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला.
माझ्याही मनात असाच विचार आलाय .. मोठा ताण आणि त्यवरुन मनात तणाव निर्माण होणे याला अनेक वेळा सामोरे गेलोय ... देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही. स्व-समुपदेशनाने ताण घालवण्यास बराच उपयोग झाला. उत्तम छंद आणि कला यामुळे झाले असावे का ? योग- प्राणायाम मी क्वचितच करतो.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:37
देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही.> माफक प्रमाणात देवधर्म, जपजाप्य याचे आधुनिक विज्ञानाला तसे वावडे नाही. पण त्याचे अवडंबर माजवणे, बाबा/बुवांच्या आहारी जाऊन आयुष्याचा ताबा बाबा/बुवाना देणे आणि स्वत्व गमावणे धोकादायक आहे.

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 10:06
कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हा एक मोठा गैरसमज आहे. इजिप्त मधील ममीज मध्ये हाडाचा , स्तनांचा आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसाच ल्युकेमिया सापडला आहे. याचा अर्थ कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हे गृहीतक मुळापासूनच चूक आहे. https://www.oncnursingnews.com/view/oldest-known-cancer-cases-found-in-egyptian-mummies https://www.science.org/content/article/mummy-has-oldest-case-prostate-cancer-ancient-egypt तसेच जुन्या काळात ताणतणाव नव्हता हा तितकाच मोठा गैरसमज. निसर्गाच्या भयंकर तांडवाबद्दल असलेले असंख्य गैरसमज हे मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण करत असत. उदा ढगफुटी पासून ते भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी आणि वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ. याशिवाय उद्याचे जेवण मिळेल कि नाही पासून हिंस्त्र श्वापदे साप विंचू यांशी होणार रोजचा सामना हे मानवाचे ताणतणाव वाढवणारे असंख्य मुद्दे होतेच. केवळ १०० वर्षांपूर्वी अकाली मृत्यू होणे हि सामान्य बाब होती यामुळे येणारी मानसिक अस्थिरता स्त्रियांची रोजची होती स्त्रियांची असंख्य व्रतवैकल्ये यापासून मानसिक आधार शोधण्यासाठीच तर जन्माला आली. १९४७ साली आपले सरासरी आयुष्यमान ३२ होते. म्हणजेच सामान्य जनता अशा कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना होण्याअगोदरच कैलासवासी होत असे. हे म्हणजे युद्धात निघण्यापूर्वीच साप चावून मृत्यू येण्यासारखे होते. बाकी आधुनिक काळातील प्रदूषण हे म्हणजे कुणीही कधी ही पिळावी अशी बेवारशी बकरी आहे. घरगुती चुलीच्या प्रदूषणामुळे होणारे असंख्य मृत्यू याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. Poverty condemns half of humanity across the globe to cook with solid fuels on inefficient stoves. Smoke in homes from these cook stoves is the fourth greatest risk factor for death and disease in the world’s poorest countries, and is linked to 1.6 million deaths per year. https://www.co2balance.com/smoke-the-killer-in-the-kitchen/ NEW DELHI: Indoor air pollution (IAP), resulting from chulhas burning wood, coal and animal dung as fuel, is claiming a shocking 500,000 lives in India every year, most of whom are women and children. According to the World Health Organisation, India accounts for 80% of the 600,000 premature deaths that occur in south-east Asia annually due to exposure to IAP. https://timesofindia.indiatimes.com/india/indoor-air-pollution-is-the-biggest-killer/articleshow/1790711.cms बाकी ताणतणावामुळे कोणताही रोग होते हे बऱ्याच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या स्वमतांध लोकांचे आवडते गृहीतक आहे. उत्तम उदाहरण म्हणजे एके काळी सिफिलिस हा गुप्तरोग सुद्धा ताणतणावामुळे होतो असा मोठा गैरसमज त्याकाळातील अतिहुशार लोकांनी पस्रवलेला होता. अर्थात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी हा रोग treponema pallidum या जंतूंमुळे होतो आणि नंतर त्यावर पेनिसिलीनसारखे रामबाण औषध निघाल्यामुळे हा रोग आता औषधालाही दिसत नाही हि एक गंमत आहे. गुणसूत्रांवरील चार बुकं वाचून आणि ग्रोक बिक वापरून काही दिवसात डॉक्टर होणे हे तितके सोपे नाही

In reply to by सुबोध खरे

दीपक११७७ गुरुवार, 04/03/2025 - 13:52
यावरून शहरात प्रदूषणामुळे ....किडकी बीजे तयार होतात... त्यातून किडके मुलं जन्माला येतात या संशोधनाला छेद जातो

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:25
एआई ग्रोक असो की इतर, अंतरजालावर जे फीड असेल तेच उत्तर येईल. जर एखाद्या विषयात चुकीची फीड जास्त असेल तर चुकीचे उत्तर मिळेल. त्यामुळे एआई 100 टक्के विश्वास ठेवणे केंव्हाही उचित नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 08:41
श्री० पटाईत, तुमचे ए०आय० चे ज्ञान फारच जुजबी आहे, असे खेदाने म्हणावे लागते आणी तुमच्या लिखाणाची एकूण खोली बघता, तसेच काही इतर बाबी लक्षात घेता त्यात फार भर पडेल असेही वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त Mon, 04/14/2025 - 22:40
'क' व्यक्ती 'ख' विषयी जे बोलते, त्यातून ऐकण्या - वाचणार्‍याला 'ख' पेक्षा 'क' विषयीच जास्त माहिती मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. असो.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु Tue, 04/15/2025 - 07:03
श्री० चित्रगुप्त, एकदम बरोबर बोललात. मला पण अशीच माहिती खालील प्रतिसादाच्या भाषेतून मिळाली होती.
बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.
https://www.misalpav.com/comment/1191564#comment-1191564

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 14:34
अगदी. ही गोष्ट सार्वत्रिकच आहेसे दिसते. ('अगदी' हा शब्द आपण अगदी सहजतेने वापरतो, पण आत्ता जरा निवांतपणे अ-ग- दी असा वाचल्यावर अंमळ मौज वाटली. अजबच शब्द आहे हा. याची व्युत्पत्ती कुणाला ठाऊक आहे का ?

स्वधर्म Mon, 03/31/2025 - 16:41
ग्रोकबद्दल लेख असला तरी प्राणायामाने शेवट केला आहे, म्हणून... व्यायाम जितका सूक्ष्म पातळीचा तेवढी त्याचा परिणामकारकता जास्त असा माझा अनुभव आहे. जसे की जीम > योगासने > प्राणायाम > ध्यान हे चढत्या श्रेणीने परिणाम देतात असे वाटते. याचा अर्थात वयाशीही संबंध असावा.

In reply to by स्वधर्म

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:22
@स्वधर्म प्रतिसादाबद्दल धन्यवाद! तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावर माझी एका डॉ०बरोबर काही वर्षापूर्वी झाली होती. व्यायामाने शरीरातील सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात आणि उर्जेची पातळी, चयापचय वाढतो. प्राणायाम शरीराला शांत करतो कारण परानुकंपी नाड्या (पॅरासिम्पथेटीक नर्व्हस सिस्टम) कार्यान्वित होते. त्यामुळे व्यायामानंतर प्राणायाम लगेच करू नये. व्यायाम शक्यतो सकाळी आणि प्राणायाम संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी केला तर जास्त परिणामकारक होतो. जीम आणि योगासने मूलतः वेगवेगळे आरोग्यप्राप्तीचे मार्ग आहेत, असे माझे मत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:28
त्यांनी केलेल्या कष्टाचे पैसे त्याने का मागू नयेत? ते काही भीक मागत नाहीत. तुमच्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला मागतात. एखादी गोष्ट हौसेने एक दोन वेळा करणं वेगळं आणि त्यावर अवलंबून राहून त्यांच्याकडून सतत उत्तरं मिळवत राहाणं वेगळं नाही का?

In reply to by कंजूस

तेच काम “माझी” चॅट जीपीटी फुकटात करून देते! इलॉन मस्क च आहे ना ग्रोक? इतका पैसा असून पण पैसा पैसा करतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:28
@अमरेंद्र बाहुबली माझ्याकडे उत्तरासाठी पैसे मागत होता> मला वरील उत्तरे पैसे न टाकता मिळाली. :)

कंजूस Mon, 03/31/2025 - 18:24
Grok ने एवढं सविस्तर उत्तर शोधून दिले हे पाहून आनंद झाला. -------------------- कॅन्सर का होतो किंवा तरुणांचं का होतो याचं उत्तर त्याने ताण( stress) हे दिलं आहे. "तुम्हाला हा रोग stressमुळे झाला होता हे" असं डॉक्टरांकडून ऐकल्यावर कोणत्याही रुग्णाला बरे वाटतेच. ताण( stress) आपल्याला आहे याला रुग्ण सहमत होतोच. मग त्याने जर रोग होत असतील आणि ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो. किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला. ____________ बाकी एआइ जे काही करत आहे ते स्तुत्यच आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:27
@कंजूस ते आता वाढायला लागलेत याचा अर्थ पूर्वी ताण नव्हताच/ पूर्वीपेक्षा ताणाचे प्रमाण वाढले आहे / लोकांना ताण होतो त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक असा होतो.> पूर्वी ताण नव्हता असा निष्कर्ष काढणे अयोग्य होईल. पण पूर्वी प्रदूषण नक्की कमी होते. ताण + प्रदूषण हे सर्वात घातक कॉम्बिनेशन आहे याची जाणीव फार थोड्या लोकाना असते.

In reply to by युयुत्सु

कंजूस Mon, 03/31/2025 - 21:09
जाणिवा राहतात दूर अंधाऱ्या कोपऱ्यात आणि व्यवहार येतो रस्त्यावर. गावांत काही कमाई नसली की तरुण येतात शहरातल्या भणंग वस्तीत. जाणीवा जपून पोट भरत नसते. प्रदुषणाने शरिराची झीज लवकर भरून येत नाही. म्हणजे स्वच्छ कोरड्या हवेत झोपल्याने लगेच ताजेतवाने होता येते तसे शहरी प्रदुषणी हवेत होत नाही. ताण हे मानसिक आणि आर्थिक असतात. चिंता म्हणू. तीही शरिराला खाते. विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 14:59
विज्ञानाने शोधलं भरपूर पण ते अवलंबताच येत नाही हीच अडचण आहे.> याबाबत मात्र सहमत. कारण निसर्गाने सर्वांना क्षमतांची समान वाटणी केलेली नाही.

चौथा कोनाडा Mon, 03/31/2025 - 19:31
किंवा पूर्वी ताणाला सहन करायची क्षमता काही लोकांच्यात अधिक असावी हेसुद्धा म्हणता येईल. प्राणायाम किंवा नामस्मरण किंवा जप करणे हे ताण पचवण्यासाठी वेळकाढूपणा आणण्याची क्लुप्ती यापलिकडे काही नसणार. ज्याचा त्याचा प्रश्न किंवा समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा म्हणता येईल. काही लोक कामाला सुरुवात करताना किंवा जीवनात मार्गक्रमण करताना यापुढे काय होईल ते पाहू, आपले आपण प्रयत्न करून नाही जमल्यास सोडून देऊ या विचाराचेही असू शकतात. म्हणजे हे लोक ताण येण्याच्या अगोदरच त्याला पचवून टाकतात. मग असं झालं किंवा ही प्रवृत्ती ठेवली तर ताणातून शारिरीक बिघाड आणि कॅन्सर होईलच कशाला.
माझ्याही मनात असाच विचार आलाय .. मोठा ताण आणि त्यवरुन मनात तणाव निर्माण होणे याला अनेक वेळा सामोरे गेलोय ... देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही. स्व-समुपदेशनाने ताण घालवण्यास बराच उपयोग झाला. उत्तम छंद आणि कला यामुळे झाले असावे का ? योग- प्राणायाम मी क्वचितच करतो.

In reply to by चौथा कोनाडा

युयुत्सु Mon, 03/31/2025 - 19:37
देवाची किंवा कोणत्याही बाबा, स्वामी, महारा़ज यांना प्रार्थना करत बसलो नाही.> माफक प्रमाणात देवधर्म, जपजाप्य याचे आधुनिक विज्ञानाला तसे वावडे नाही. पण त्याचे अवडंबर माजवणे, बाबा/बुवांच्या आहारी जाऊन आयुष्याचा ताबा बाबा/बुवाना देणे आणि स्वत्व गमावणे धोकादायक आहे.

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2025 - 10:06
कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हा एक मोठा गैरसमज आहे. इजिप्त मधील ममीज मध्ये हाडाचा , स्तनांचा आणि प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग तसाच ल्युकेमिया सापडला आहे. याचा अर्थ कर्करोग हा आधुनिक काळाचा शाप आहे हे गृहीतक मुळापासूनच चूक आहे. https://www.oncnursingnews.com/view/oldest-known-cancer-cases-found-in-egyptian-mummies https://www.science.org/content/article/mummy-has-oldest-case-prostate-cancer-ancient-egypt तसेच जुन्या काळात ताणतणाव नव्हता हा तितकाच मोठा गैरसमज. निसर्गाच्या भयंकर तांडवाबद्दल असलेले असंख्य गैरसमज हे मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण करत असत. उदा ढगफुटी पासून ते भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी आणि वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ. याशिवाय उद्याचे जेवण मिळेल कि नाही पासून हिंस्त्र श्वापदे साप विंचू यांशी होणार रोजचा सामना हे मानवाचे ताणतणाव वाढवणारे असंख्य मुद्दे होतेच. केवळ १०० वर्षांपूर्वी अकाली मृत्यू होणे हि सामान्य बाब होती यामुळे येणारी मानसिक अस्थिरता स्त्रियांची रोजची होती स्त्रियांची असंख्य व्रतवैकल्ये यापासून मानसिक आधार शोधण्यासाठीच तर जन्माला आली. १९४७ साली आपले सरासरी आयुष्यमान ३२ होते. म्हणजेच सामान्य जनता अशा कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना होण्याअगोदरच कैलासवासी होत असे. हे म्हणजे युद्धात निघण्यापूर्वीच साप चावून मृत्यू येण्यासारखे होते. बाकी आधुनिक काळातील प्रदूषण हे म्हणजे कुणीही कधी ही पिळावी अशी बेवारशी बकरी आहे. घरगुती चुलीच्या प्रदूषणामुळे होणारे असंख्य मृत्यू याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. Poverty condemns half of humanity across the globe to cook with solid fuels on inefficient stoves. Smoke in homes from these cook stoves is the fourth greatest risk factor for death and disease in the world’s poorest countries, and is linked to 1.6 million deaths per year. https://www.co2balance.com/smoke-the-killer-in-the-kitchen/ NEW DELHI: Indoor air pollution (IAP), resulting from chulhas burning wood, coal and animal dung as fuel, is claiming a shocking 500,000 lives in India every year, most of whom are women and children. According to the World Health Organisation, India accounts for 80% of the 600,000 premature deaths that occur in south-east Asia annually due to exposure to IAP. https://timesofindia.indiatimes.com/india/indoor-air-pollution-is-the-biggest-killer/articleshow/1790711.cms बाकी ताणतणावामुळे कोणताही रोग होते हे बऱ्याच अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या स्वमतांध लोकांचे आवडते गृहीतक आहे. उत्तम उदाहरण म्हणजे एके काळी सिफिलिस हा गुप्तरोग सुद्धा ताणतणावामुळे होतो असा मोठा गैरसमज त्याकाळातील अतिहुशार लोकांनी पस्रवलेला होता. अर्थात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी हा रोग treponema pallidum या जंतूंमुळे होतो आणि नंतर त्यावर पेनिसिलीनसारखे रामबाण औषध निघाल्यामुळे हा रोग आता औषधालाही दिसत नाही हि एक गंमत आहे. गुणसूत्रांवरील चार बुकं वाचून आणि ग्रोक बिक वापरून काही दिवसात डॉक्टर होणे हे तितके सोपे नाही

In reply to by सुबोध खरे

दीपक११७७ गुरुवार, 04/03/2025 - 13:52
यावरून शहरात प्रदूषणामुळे ....किडकी बीजे तयार होतात... त्यातून किडके मुलं जन्माला येतात या संशोधनाला छेद जातो

विवेकपटाईत Mon, 04/14/2025 - 08:25
एआई ग्रोक असो की इतर, अंतरजालावर जे फीड असेल तेच उत्तर येईल. जर एखाद्या विषयात चुकीची फीड जास्त असेल तर चुकीचे उत्तर मिळेल. त्यामुळे एआई 100 टक्के विश्वास ठेवणे केंव्हाही उचित नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 08:41
श्री० पटाईत, तुमचे ए०आय० चे ज्ञान फारच जुजबी आहे, असे खेदाने म्हणावे लागते आणी तुमच्या लिखाणाची एकूण खोली बघता, तसेच काही इतर बाबी लक्षात घेता त्यात फार भर पडेल असेही वाटत नाही.

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त Mon, 04/14/2025 - 22:40
'क' व्यक्ती 'ख' विषयी जे बोलते, त्यातून ऐकण्या - वाचणार्‍याला 'ख' पेक्षा 'क' विषयीच जास्त माहिती मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद. असो.

In reply to by चित्रगुप्त

युयुत्सु Tue, 04/15/2025 - 07:03
श्री० चित्रगुप्त, एकदम बरोबर बोललात. मला पण अशीच माहिती खालील प्रतिसादाच्या भाषेतून मिळाली होती.
बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.
https://www.misalpav.com/comment/1191564#comment-1191564

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 14:34
अगदी. ही गोष्ट सार्वत्रिकच आहेसे दिसते. ('अगदी' हा शब्द आपण अगदी सहजतेने वापरतो, पण आत्ता जरा निवांतपणे अ-ग- दी असा वाचल्यावर अंमळ मौज वाटली. अजबच शब्द आहे हा. याची व्युत्पत्ती कुणाला ठाऊक आहे का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर ========================= भारतीय समाजात अजुनही ए०आय० बद्दल जी किरकिर चालू आहे, त्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यात "ग्रोक" या ए०आय० वर बरेच जण चिखलफेक करत असल्याने मला ग्रोक बद्दल उत्सूकता निर्माण झाली आणि तथ्य शोधायला सुरुवात केली. माझ्या ग्रोक बरोबरच्या संवादात त्याने मला कोणतीच तर्‍हेवाईक उत्तरे दिली नाहीत, पण त्याने केलेल्या "लिटरेचर सर्व्हेने" मी अचंबित झालो. नेमके याच वेळेस माझ्या ओळखीच्या एका डॉ०नी मला एका सेमिनारमध्ये व्याख्यान देणार असल्याचे सांगितले.

रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन

बाजीगर ·
लेखनविषय:
रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन (1925--2025) हा गुढी पाडवा नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS शताब्दी वर्ष मोदी जी करणार साजरा सहर्ष ।। मरणप्राय,मुर्दाड हिंदूंना डॉ.हेगडेवार यांनी दिला हिंदुत्ववाद ... चाणक्या सारखा केला खानग्रेस शी वाद ।। खानग्रेस ने केली, अनेक वेळा बंदी, राष्ट्रप्रेमी RSS सदैव देशाला वंदी ।। स्वयंसेवक करतात, निःस्वार्थी काम, कामातच ते, शोधतात राम ।। रा.स्व.सं.जगातील ही सर्वात मोठी संघटना, RSS शताब्दी वर्ष ही आहे मोठी घटना ।।

पावश्या लवकर आलाय का......!!!!

कर्नलतपस्वी ·

श्रीगुरुजी Sun, 03/30/2025 - 09:05
सुंदर चित्रे! काही वर्षांपूर्वी पावश्या अंगणातील वृक्षावर आला होता. बराच वेळ बसून आवाज काढत होता. मी तात्काळ काही प्रकाशचित्रे घेतली होती.

कंजूस Sun, 03/30/2025 - 09:23
गुढी पाडव्याची सुरुवात चांगली केली आहे. पावशा अजून पाहिला नाही कधी. तो काळा पांढरा चातक मात्र पाहिला आहे अलिबागमध्ये. टिटवीची अंडी लहानपणी सांगली जिल्ह्यात पाहिली आहेत. ही टिटवी लाल लोळीची आहे. एकूण तुमच्या परिसरात पक्षीगण भरपूर आहेत. असेच राहोत.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव Sun, 03/30/2025 - 21:07
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by Bhakti

मिसळपाव Tue, 04/01/2025 - 01:41
ओह, हा पावश्या होय? थँक्यू. एका जुन्या हिंदी गाण्यात हा बॅकग्राउंडला गातोय!! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

कर्नलतपस्वी Sun, 03/30/2025 - 12:35
होय, बहाव्याचा बहर सुद्धा अतिशय कमी होता. या सर्व खुणांमुळे पाऊस किती व केंव्हा हा एक प्रश्न मनात थैमान घालत आहेत. टिटवीची अंडी बघून अंदाज बांधता येईल असे वाटते.

कर्नलतपस्वी Sun, 03/30/2025 - 12:42
शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक अजूनही पारंपरिक भविष्यवाण्यांवर आणि पंचांगांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारे येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे अधिकृत भाकीत जाहीर होणार आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अता अर्थात हे सर्व अंदाज आहेत. काही जरी असले तरी जल ही जीवन आहे तेव्हां भविष्यात निसर्ग संवर्धन आणी संरक्षण हे महत्वाचे ठरते.

सस्नेह Sun, 03/30/2025 - 12:54
इथेही भरपूर पक्षी आहेत पण नावे माहीत नाहीत, अभ्यास नाही पक्ष्यांचा. पहाटे कोकिळा , खंड्या आणि बरेच पक्षी जोरदार किलकिलाट करून सहाला उठायला भाग पाडतात. दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

कर्नलतपस्वी Sun, 03/30/2025 - 14:30
दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का. माळ मुनीया,बुलबुल , सुर्यपक्षी रारखे छोटे जीव त्याच घरट्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हां घरटे सुरक्षित असल्यामुळेच ते परत परत येतात. बाकी कावळा,घार, शिक्रा,कोतवाल सारखे दबंग पक्षी जीवावर आल्या सारखे एकावर एक काड्या रचून ओबडधोबड घरटे बनवतात ते पावसाळ्यात वाहून जाते. ते पुढील मोसमात नवीन बनवतात. म्हणूनच, कदाचित "चिमणे चिमणे दार उघड", अशी कावळ्या चिमणीची गोष्ट बनली असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

सस्नेह Sun, 03/30/2025 - 18:16
छान राहतात मुनिया. कबुतरांसारखं घाण करत नाहीत. काहीच त्रास नसतो त्यांचा. करमणूक होते चांगली त्यांना पाहताना :)

कंजूस Sun, 03/30/2025 - 15:23
मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. .. तेव्हा गवताची लांब पाती मिळतात. पिलं झाल्यावर सप्टेंबरमध्ये किडेही भरपूर असतात पण मुनिया किडे खात नसावेत. त्यांना लागते गवताचे कोवळे बी ते मात्र भरपूर असते. म्हणून मुनिया जूनमध्ये घर बांधत नाहीत. आमच्या बाल्कनीत आहे एक. तीन वर्षं एक जोडी येते. नंतर घरट्याचे तोंड बंद करून जातात.

In reply to by कंजूस

सस्नेह Sun, 03/30/2025 - 18:14
घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार होते. पण आधी महिना दीड महिना टेहळणी आणि साहित्य जमवाजमवी चालू असते त्यांची. बाकी, मुनिया जुनेच घरटे वापरतात हे नव्हते माहिती. मी आपलं जुनं घरटं वाळून काड्या पडू लागल्या की काढून टाकते. यावर्षी नाही काढत आता :)

कंजूस Sun, 03/30/2025 - 15:48
बहाव्याचा आजचा फोटो. जवळच रस्त्यावर फुलला आहे. केरळचा राज्य वृक्ष . त्यांच्या नवीन वर्षाला(विशू) फुललेला असतो. १४एप्रिल २०२५ ...........

सौन्दर्य Mon, 03/31/2025 - 23:29
१९९३ ला मी बडोद्याला राहत होतो. त्यावर्षीच्या जुलै महिन्यात टिटवीच्या एका जोड्याने आमच्या घराच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर अंडी दिली होती. यथावकाश त्यातून दोन पिल्ले बाहेर येऊन ती टेरेसभर फिरायची. ती जणूकाही कोंबडीची लहान पिल्ले पायांना उंच काठ्या बांधून चालतात तशी दिसायची. कधीकधी त्यातले एखाद चुकार पिल्लू टेरेसवरून खाली अंगणात पडायचे, अश्यावेळी टिटवीची जोडी सतत 'टीटीव, टीटीव' ओरडत आमच्यासमोरून उडायची. त्यांचे ते ओरडणे ऐकून आम्हाला जाणवायचे की त्यांना काहीतरी हवे आहे. नीट बघितल्यावर कळायचे की तिचे पिल्लू खाली पडले आहे. जवळजवळ वीस फूट उंचीवरून पडून देखील त्यांना फारशी इजा झालेली नसायची. मग त्यांना मी सुपात उचलून परत टेरेसवर नेऊन ठेवायचो. सुपात अशासाठी की काही पक्षांत माणसाचा स्पर्श झाला तर पिल्लाना मारून टाकतात असे ऐकले होते म्हणून. असे बऱ्याच वेळा घडायचे व त्या पिल्लाना परत टेरेसवर नेऊन ठेवण्याचे काम करायला लागायचे. टिटवी बहुधा अंडी जमिनीवरच देते, परंतु जर तिने अंडी उंचावर दिली तर त्यावर्षी पाऊस जास्त पडणार असे स्थानिक लोकं बोलायची. आणि खरंच त्यावर्षी खूप पाऊस पडला होता. पक्ष्यांना हे कसे कळत असावे ? हीच टिटवीची जोडी, उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर मच्छरदाणी लावून झोपायचो त्यावेळी सूर्योदय झाला रे झाला, मच्छरदाणीवर उडत त्यांच्या टीटीव, टीटीव भाषेत आम्हाला जागे करायची. एखाद्या रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आम्ही जर नाही उठलो तर चोचीने आमची पांघरुणे ओढायची. इतक्या जवळून टिटवी तेव्हा पहिल्यांदा व शेवटची पाहिली .

श्रीगुरुजी Mon, 03/31/2025 - 23:55
आमच्या सज्जात एका कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूस लालगाल्या बुलबुलने अगदी लहान घरटे केले आहे. नुकतीच पिल्ले झाली आहेत. खरं तर बुलबुल साधारणपणे पावसाळा सुरू झाला की घरटे करतात व साधारणपणे ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मार्च महिन्यात पहिल्यांदाच बुलबुलांना पिल्ले झालेली पाहिली. आज त्या लहानश्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडले. सज्जात गवताचा आभास निर्माण करणारे हिरव्या रंगाचे जाजम असल्याने पिल्लास फार लागले नसावे. जवळपास दोन तास पिल्लू चोच वासून आवाज काढत होते. त्याचे आईबाबा आलटून पालटून घरट्यावर बसून उर्वरीत पिल्लांना पकडून आणलेले फुलपाखरू किंवा नाकतोडा वगैरे भरवत होते, परंतु खाली पडलेल्या पिल्लाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होते. मी बराच वेळ प्रतीक्षा करीत होतो की एकदा तेथून बुलबुल दांपत्य उडून गेले की पिल्लास उचलून घरट्यात ठेवावे. परंतु बराच वेळ दोघांपैकी एक तरी बुलबुल घरट्यावर असायचाच/चीच. मागील वर्षी अंगणात जास्वंदीच्या रोपावर असेच घरटे होते व फुले काढण्यास जवळ जायला लागलो की बुलबुल अत्यंत वेगाने तोंडासमोर येऊन जवळपास तोंडास स्पर्श होईल इतपत जवळ येऊन उडायचा. त्यामुळे बुलबुल घरट्यावर बसलेला असताना पिल्लू उचलून घरट्यात ठेवणे शक्य नव्हते. शेवटी एकदाचे दोन्ही बुलबुल खाद्य आणण्यासाठी उडून गेल्यानंतर मी घाईघाईने लहानशी शिडी घरट्याजवळ लावून एका कागद ओंजळीसारखा करून पिल्लू कागदात घेऊन शिडीवरून अगदी सावकाश घरट्यात सोडले. सायंकाळी पाहिले तर त्या पिल्लास बुलबुल दांपत्याने स्वीकारले होते व सर्व पिल्लांना खाद्य भरविणे सुरू होते.

मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग साठी गेलो होतो, बरेच दिवस पडून असल्याने त्या पवनचक्कीवर कबुतरानी प्रचंड घाण केली होती, कमीत कमी ३०० अंडी तरी असावीत, सर्व अंडी वरून खाली फेकायला माणसे पाठवली, ती लोक पाप करायला तयार होईनात, शेवटी कसेतरी एक दोन लोक तयार केले नी त्यांनी ते काम केले.

श्रीगुरुजी Sun, 03/30/2025 - 09:05
सुंदर चित्रे! काही वर्षांपूर्वी पावश्या अंगणातील वृक्षावर आला होता. बराच वेळ बसून आवाज काढत होता. मी तात्काळ काही प्रकाशचित्रे घेतली होती.

कंजूस Sun, 03/30/2025 - 09:23
गुढी पाडव्याची सुरुवात चांगली केली आहे. पावशा अजून पाहिला नाही कधी. तो काळा पांढरा चातक मात्र पाहिला आहे अलिबागमध्ये. टिटवीची अंडी लहानपणी सांगली जिल्ह्यात पाहिली आहेत. ही टिटवी लाल लोळीची आहे. एकूण तुमच्या परिसरात पक्षीगण भरपूर आहेत. असेच राहोत.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव Sun, 03/30/2025 - 21:07
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by Bhakti

मिसळपाव Tue, 04/01/2025 - 01:41
ओह, हा पावश्या होय? थँक्यू. एका जुन्या हिंदी गाण्यात हा बॅकग्राउंडला गातोय!! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

कर्नलतपस्वी Sun, 03/30/2025 - 12:35
होय, बहाव्याचा बहर सुद्धा अतिशय कमी होता. या सर्व खुणांमुळे पाऊस किती व केंव्हा हा एक प्रश्न मनात थैमान घालत आहेत. टिटवीची अंडी बघून अंदाज बांधता येईल असे वाटते.

कर्नलतपस्वी Sun, 03/30/2025 - 12:42
शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक अजूनही पारंपरिक भविष्यवाण्यांवर आणि पंचांगांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारे येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे अधिकृत भाकीत जाहीर होणार आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अता अर्थात हे सर्व अंदाज आहेत. काही जरी असले तरी जल ही जीवन आहे तेव्हां भविष्यात निसर्ग संवर्धन आणी संरक्षण हे महत्वाचे ठरते.

सस्नेह Sun, 03/30/2025 - 12:54
इथेही भरपूर पक्षी आहेत पण नावे माहीत नाहीत, अभ्यास नाही पक्ष्यांचा. पहाटे कोकिळा , खंड्या आणि बरेच पक्षी जोरदार किलकिलाट करून सहाला उठायला भाग पाडतात. दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

कर्नलतपस्वी Sun, 03/30/2025 - 14:30
दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का. माळ मुनीया,बुलबुल , सुर्यपक्षी रारखे छोटे जीव त्याच घरट्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हां घरटे सुरक्षित असल्यामुळेच ते परत परत येतात. बाकी कावळा,घार, शिक्रा,कोतवाल सारखे दबंग पक्षी जीवावर आल्या सारखे एकावर एक काड्या रचून ओबडधोबड घरटे बनवतात ते पावसाळ्यात वाहून जाते. ते पुढील मोसमात नवीन बनवतात. म्हणूनच, कदाचित "चिमणे चिमणे दार उघड", अशी कावळ्या चिमणीची गोष्ट बनली असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

सस्नेह Sun, 03/30/2025 - 18:16
छान राहतात मुनिया. कबुतरांसारखं घाण करत नाहीत. काहीच त्रास नसतो त्यांचा. करमणूक होते चांगली त्यांना पाहताना :)

कंजूस Sun, 03/30/2025 - 15:23
मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. .. तेव्हा गवताची लांब पाती मिळतात. पिलं झाल्यावर सप्टेंबरमध्ये किडेही भरपूर असतात पण मुनिया किडे खात नसावेत. त्यांना लागते गवताचे कोवळे बी ते मात्र भरपूर असते. म्हणून मुनिया जूनमध्ये घर बांधत नाहीत. आमच्या बाल्कनीत आहे एक. तीन वर्षं एक जोडी येते. नंतर घरट्याचे तोंड बंद करून जातात.

In reply to by कंजूस

सस्नेह Sun, 03/30/2025 - 18:14
घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार होते. पण आधी महिना दीड महिना टेहळणी आणि साहित्य जमवाजमवी चालू असते त्यांची. बाकी, मुनिया जुनेच घरटे वापरतात हे नव्हते माहिती. मी आपलं जुनं घरटं वाळून काड्या पडू लागल्या की काढून टाकते. यावर्षी नाही काढत आता :)

कंजूस Sun, 03/30/2025 - 15:48
बहाव्याचा आजचा फोटो. जवळच रस्त्यावर फुलला आहे. केरळचा राज्य वृक्ष . त्यांच्या नवीन वर्षाला(विशू) फुललेला असतो. १४एप्रिल २०२५ ...........

सौन्दर्य Mon, 03/31/2025 - 23:29
१९९३ ला मी बडोद्याला राहत होतो. त्यावर्षीच्या जुलै महिन्यात टिटवीच्या एका जोड्याने आमच्या घराच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर अंडी दिली होती. यथावकाश त्यातून दोन पिल्ले बाहेर येऊन ती टेरेसभर फिरायची. ती जणूकाही कोंबडीची लहान पिल्ले पायांना उंच काठ्या बांधून चालतात तशी दिसायची. कधीकधी त्यातले एखाद चुकार पिल्लू टेरेसवरून खाली अंगणात पडायचे, अश्यावेळी टिटवीची जोडी सतत 'टीटीव, टीटीव' ओरडत आमच्यासमोरून उडायची. त्यांचे ते ओरडणे ऐकून आम्हाला जाणवायचे की त्यांना काहीतरी हवे आहे. नीट बघितल्यावर कळायचे की तिचे पिल्लू खाली पडले आहे. जवळजवळ वीस फूट उंचीवरून पडून देखील त्यांना फारशी इजा झालेली नसायची. मग त्यांना मी सुपात उचलून परत टेरेसवर नेऊन ठेवायचो. सुपात अशासाठी की काही पक्षांत माणसाचा स्पर्श झाला तर पिल्लाना मारून टाकतात असे ऐकले होते म्हणून. असे बऱ्याच वेळा घडायचे व त्या पिल्लाना परत टेरेसवर नेऊन ठेवण्याचे काम करायला लागायचे. टिटवी बहुधा अंडी जमिनीवरच देते, परंतु जर तिने अंडी उंचावर दिली तर त्यावर्षी पाऊस जास्त पडणार असे स्थानिक लोकं बोलायची. आणि खरंच त्यावर्षी खूप पाऊस पडला होता. पक्ष्यांना हे कसे कळत असावे ? हीच टिटवीची जोडी, उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर मच्छरदाणी लावून झोपायचो त्यावेळी सूर्योदय झाला रे झाला, मच्छरदाणीवर उडत त्यांच्या टीटीव, टीटीव भाषेत आम्हाला जागे करायची. एखाद्या रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आम्ही जर नाही उठलो तर चोचीने आमची पांघरुणे ओढायची. इतक्या जवळून टिटवी तेव्हा पहिल्यांदा व शेवटची पाहिली .

श्रीगुरुजी Mon, 03/31/2025 - 23:55
आमच्या सज्जात एका कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूस लालगाल्या बुलबुलने अगदी लहान घरटे केले आहे. नुकतीच पिल्ले झाली आहेत. खरं तर बुलबुल साधारणपणे पावसाळा सुरू झाला की घरटे करतात व साधारणपणे ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मार्च महिन्यात पहिल्यांदाच बुलबुलांना पिल्ले झालेली पाहिली. आज त्या लहानश्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडले. सज्जात गवताचा आभास निर्माण करणारे हिरव्या रंगाचे जाजम असल्याने पिल्लास फार लागले नसावे. जवळपास दोन तास पिल्लू चोच वासून आवाज काढत होते. त्याचे आईबाबा आलटून पालटून घरट्यावर बसून उर्वरीत पिल्लांना पकडून आणलेले फुलपाखरू किंवा नाकतोडा वगैरे भरवत होते, परंतु खाली पडलेल्या पिल्लाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होते. मी बराच वेळ प्रतीक्षा करीत होतो की एकदा तेथून बुलबुल दांपत्य उडून गेले की पिल्लास उचलून घरट्यात ठेवावे. परंतु बराच वेळ दोघांपैकी एक तरी बुलबुल घरट्यावर असायचाच/चीच. मागील वर्षी अंगणात जास्वंदीच्या रोपावर असेच घरटे होते व फुले काढण्यास जवळ जायला लागलो की बुलबुल अत्यंत वेगाने तोंडासमोर येऊन जवळपास तोंडास स्पर्श होईल इतपत जवळ येऊन उडायचा. त्यामुळे बुलबुल घरट्यावर बसलेला असताना पिल्लू उचलून घरट्यात ठेवणे शक्य नव्हते. शेवटी एकदाचे दोन्ही बुलबुल खाद्य आणण्यासाठी उडून गेल्यानंतर मी घाईघाईने लहानशी शिडी घरट्याजवळ लावून एका कागद ओंजळीसारखा करून पिल्लू कागदात घेऊन शिडीवरून अगदी सावकाश घरट्यात सोडले. सायंकाळी पाहिले तर त्या पिल्लास बुलबुल दांपत्याने स्वीकारले होते व सर्व पिल्लांना खाद्य भरविणे सुरू होते.

मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग साठी गेलो होतो, बरेच दिवस पडून असल्याने त्या पवनचक्कीवर कबुतरानी प्रचंड घाण केली होती, कमीत कमी ३०० अंडी तरी असावीत, सर्व अंडी वरून खाली फेकायला माणसे पाठवली, ती लोक पाप करायला तयार होईनात, शेवटी कसेतरी एक दोन लोक तयार केले नी त्यांनी ते काम केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
gudhi ---- हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा . ------ चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे.

'भारताच्या ललाटरेषा' -लेखक- शं .रा.देवळे (ऐसी अक्षरे -२४)

Bhakti ·

ताई बराच मोठा लेख लिहिलास! एक सुधारणा, तापी आणि तिची एक उपनदी यांच्या संगमावर धुळ्यापासून वायव्येस सुमारे २५ मैलांवर 'प्रकाश' नावाचे एक पवित्र स्थळ आहे प्रकाशा धुळ्यापासून १०० किमीवर आहे. गोमती व तापीचा संगम तिथे आहे. बाकी कमी रहदारीमुळे धुळे नंदुरबार आणी जळगाव जिल्ह्यातील तापीच्या किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे नी धरणे अतिशय सुंदर आहेत.

ताई बराच मोठा लेख लिहिलास! एक सुधारणा, तापी आणि तिची एक उपनदी यांच्या संगमावर धुळ्यापासून वायव्येस सुमारे २५ मैलांवर 'प्रकाश' नावाचे एक पवित्र स्थळ आहे प्रकाशा धुळ्यापासून १०० किमीवर आहे. गोमती व तापीचा संगम तिथे आहे. बाकी कमी रहदारीमुळे धुळे नंदुरबार आणी जळगाव जिल्ह्यातील तापीच्या किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे नी धरणे अतिशय सुंदर आहेत.
लेखनविषय:
सिंधूनदी sindhu हिमालयातील मानसरोवर जलाशयातून निघालेला सिंधूचा तो स्रोत तेथून सरळ वायव्येकडे धावत जातो. काश्मीरच्या लद्दाख भागातून हिमालयाला वळसा घालून काराकोरम पर्वताच्या पायथ्याशी जातो. गिलगिटजवळून ही नदी दक्षिणेकडे वळते. तेथे सिंधूला स्वाती नदी येऊन मिळते.

बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

युयुत्सु Sun, 03/30/2025 - 09:57
मंडळी, मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते तेव्हा ती टिकाऊ असते का या बाबत मतमतांतरे व्यक्त होतात. अशा वेळेला विश्वास नक्की कुणावर ठेवायचा? टिकाऊ रॅलीची काही संख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये असतात. आत्ताच २१ मार्चला संपलेल्या आठवड्यात मार्केटने अपेक्षेप्रमाणे उसळी मारली. पण ही टिकाऊ आहे की नाही यावर काही तज्‍ज्ञांनी शंका व्यक्त केल्या. मी यातले तथ्य तपासण्यासाठी एक संख्याशास्त्रीय़ चाचणी (माझ्या आकलनानुसार) वापरून तपासायचे ठरवले. त्या अगोदर ही चाचणी भूतकाळातील टिकाऊ उसळ्या व्यवस्थित ओळखते का हे डीपसिकच्या मदतीने तपासले. माझे प्राथमिक समाधान झाल्याने २१ मार्चला संपलेल्या आठवड्यातील रॅलीला ही कसोटी लावून बघितली. तेव्हा ही रॅली टिकाऊ नाही असे उत्तर मिळाले. याचा एक अर्थ असा की अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक भविष्यावर तितकासा विश्वास नाही... आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 10:03
आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...
आजच्या शुभ दिवशी , आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या भाकिता ला जास्त किंमत आहे , मुहूर्तावर खरेदी करण्याच्या प्रथे पेक्षा ... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ! सर्वाना ...

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 09:46
या नि पुढच्या आठवड्यात कामाचे चार दिवस आहेत, त्यापुढच्या आठवड्यात तर तीनच दिवस आहेत. तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का? ---
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्स्! सर्व व्यापारी, गुंतवणूकदार यांना हे वर्ष भरपूर नफ्याचे व परताव्याचे जावो ही शुभेच्छा!

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:49
पण ते जाऊ दे... समजा यामूळे जरी भाकीत चुकले तरी मॉडेल स्वत:ला अ‍ॅडजस्ट करते आणि पुढच्या भाकीतासाठी तयार होते. तेव्हा या कालावधीतील भाकीते जास्त काळजीपूर्वक घेणे किंवा भाकीतेच न करणे ... हा हा हा!

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:35
तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का?> प्रश्न चांगला आहे. याचा माझ्या मॉडेल मध्ये विचार केलेला नाही. त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही कारण त्याचा विचार न करता भाकीते ब-यापैकी बरोबर ठरत आहेत. कामकाजाचे दिवस वाढले तर भाकीत चुकायची शक्यता आहे - कारण अधिक वेळ मिळाल्याने अधिक शक्यता निर्माण होतात. त्यामुळे भाकीत चुकू शकते. तसंच मला या पेक्षा प्रभावी घटक म्हणजे जागतिक बाजारांचा समावेश करायला आवडेल (ते आपल्या बाजारांवर प्रभाव पाडतात) पण सध्या माझ्याकडे पुरेशी कंप्युट पॉवर नाही आणि विश्वासार्ह आणि अखंडित डेटा नाही. तेव्हा सध्या जोपर्यंत I5+8GB आणि I7+16GB या दोन मशिन्स वर भागतंय तेव्हढ पुरेसे आहे. स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 10:05
आज शेवटचा दिवस आहे. बाजार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दक्षिणेकडे जात आहे.
स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...
मतभिन्नतेच्या आदरासहित: स्वतःच्याच, चांगल्या विषयावर काढलेल्या लेखमालेवर तुम्ही स्वतःच (वादाला तोंड फुटू शकते असे) अवांतर करू नये असे वाटते. आधीच चांगली-चांगली मिपाखरे इथल्या कर्कश्य कबुतरांच्या त्रासाला कंटाळून इथून उडून गेली आहेत, जी राहिली आहेत तीही जायला नकोत.

युयुत्सु Sun, 03/30/2025 - 09:57
मंडळी, मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते तेव्हा ती टिकाऊ असते का या बाबत मतमतांतरे व्यक्त होतात. अशा वेळेला विश्वास नक्की कुणावर ठेवायचा? टिकाऊ रॅलीची काही संख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये असतात. आत्ताच २१ मार्चला संपलेल्या आठवड्यात मार्केटने अपेक्षेप्रमाणे उसळी मारली. पण ही टिकाऊ आहे की नाही यावर काही तज्‍ज्ञांनी शंका व्यक्त केल्या. मी यातले तथ्य तपासण्यासाठी एक संख्याशास्त्रीय़ चाचणी (माझ्या आकलनानुसार) वापरून तपासायचे ठरवले. त्या अगोदर ही चाचणी भूतकाळातील टिकाऊ उसळ्या व्यवस्थित ओळखते का हे डीपसिकच्या मदतीने तपासले. माझे प्राथमिक समाधान झाल्याने २१ मार्चला संपलेल्या आठवड्यातील रॅलीला ही कसोटी लावून बघितली. तेव्हा ही रॅली टिकाऊ नाही असे उत्तर मिळाले. याचा एक अर्थ असा की अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक भविष्यावर तितकासा विश्वास नाही... आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 10:03
आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...
आजच्या शुभ दिवशी , आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या भाकिता ला जास्त किंमत आहे , मुहूर्तावर खरेदी करण्याच्या प्रथे पेक्षा ... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ! सर्वाना ...

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 09:46
या नि पुढच्या आठवड्यात कामाचे चार दिवस आहेत, त्यापुढच्या आठवड्यात तर तीनच दिवस आहेत. तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का? ---
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्स्! सर्व व्यापारी, गुंतवणूकदार यांना हे वर्ष भरपूर नफ्याचे व परताव्याचे जावो ही शुभेच्छा!

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:49
पण ते जाऊ दे... समजा यामूळे जरी भाकीत चुकले तरी मॉडेल स्वत:ला अ‍ॅडजस्ट करते आणि पुढच्या भाकीतासाठी तयार होते. तेव्हा या कालावधीतील भाकीते जास्त काळजीपूर्वक घेणे किंवा भाकीतेच न करणे ... हा हा हा!

युयुत्सु Tue, 04/01/2025 - 11:35
तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का?> प्रश्न चांगला आहे. याचा माझ्या मॉडेल मध्ये विचार केलेला नाही. त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही कारण त्याचा विचार न करता भाकीते ब-यापैकी बरोबर ठरत आहेत. कामकाजाचे दिवस वाढले तर भाकीत चुकायची शक्यता आहे - कारण अधिक वेळ मिळाल्याने अधिक शक्यता निर्माण होतात. त्यामुळे भाकीत चुकू शकते. तसंच मला या पेक्षा प्रभावी घटक म्हणजे जागतिक बाजारांचा समावेश करायला आवडेल (ते आपल्या बाजारांवर प्रभाव पाडतात) पण सध्या माझ्याकडे पुरेशी कंप्युट पॉवर नाही आणि विश्वासार्ह आणि अखंडित डेटा नाही. तेव्हा सध्या जोपर्यंत I5+8GB आणि I7+16GB या दोन मशिन्स वर भागतंय तेव्हढ पुरेसे आहे. स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Fri, 04/04/2025 - 10:05
आज शेवटचा दिवस आहे. बाजार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दक्षिणेकडे जात आहे.
स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...
मतभिन्नतेच्या आदरासहित: स्वतःच्याच, चांगल्या विषयावर काढलेल्या लेखमालेवर तुम्ही स्वतःच (वादाला तोंड फुटू शकते असे) अवांतर करू नये असे वाटते. आधीच चांगली-चांगली मिपाखरे इथल्या कर्कश्य कबुतरांच्या त्रासाला कंटाळून इथून उडून गेली आहेत, जी राहिली आहेत तीही जायला नकोत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे. माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता.

सौगात-ए-मोदी

बाजीगर ·

श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2025 - 20:27
उत्तम काव्य! परंतु खालील ओळ चुकीची आहे. करदात्यांचा अपमान, ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या। नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥ -भर्तृहरि

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा Wed, 04/02/2025 - 22:03
ह्याचा अर्थच नाय कळला..
कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,

काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =)) -दिलीप बिरुटे ( गाजर ए कोबीचा फॅन )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 22:05
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!

श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2025 - 20:27
उत्तम काव्य! परंतु खालील ओळ चुकीची आहे. करदात्यांचा अपमान, ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या। नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥ -भर्तृहरि

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा Wed, 04/02/2025 - 22:03
ह्याचा अर्थच नाय कळला..
कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,

काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =)) -दिलीप बिरुटे ( गाजर ए कोबीचा फॅन )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.

वामन देशमुख Tue, 04/01/2025 - 22:05
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!
लेखनविषय:
म्हणे सौगात-ए-मोदी भाजपा देणार ईदी !! कमी करण्या हेट, मोदी देणार भेट ।। विरोध रेवडी संस्कृतीला, काय म्हणावे या कृती ला? नको हे लांगुलचालन, आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।। मते मिळणार नाहीत, नाही का तुम्हा माहित ।। करदात्यांचा अपमान, थांबवा फुकट सामान ।।

'भाबडी', स्लोलर्नरतेची आजची कहाणी?

माहितगार ·

चित्रगुप्त गुरुवार, 03/27/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस गुरुवार, 03/27/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/10/2025 - 16:16
अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म गुरुवार, 04/10/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.

चित्रगुप्त गुरुवार, 03/27/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस गुरुवार, 03/27/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/10/2025 - 16:16
अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म गुरुवार, 04/10/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची.

असत्यवक्ता स्वर्णकेश:

युयुत्सु ·

आंद्रे वडापाव Wed, 03/26/2025 - 10:36
कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् | मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥

सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्? दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? | यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||

हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे ! आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे . आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत ! थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्‍याखुर्‍या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही ! वेलकम टू द रीअ‍ॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:24
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .> पूर्णपणे असहमत! ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 13:26
ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते.
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका.. त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. . राम ...

In reply to by आंद्रे वडापाव

अहाहा ! मनःपुर्वक धन्यवाद ! "राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत ! "हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा , " बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्‍या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !! मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला ! मनःपुर्वक धन्यवाद ! रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क © राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:41
श्री० गोडबोले, तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.

In reply to by युयुत्सु

हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही! माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे ! ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्‍या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्‍या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप ! वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही ! असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला ! बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. " =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 21:47
लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
अभ्यास वाढवा...

In reply to by आंद्रे वडापाव

Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 08:50
The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office. #https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !! त्यामुळे... असोच ... केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।

असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥ तात्यांवरील टिकेला खाली उत्तर! ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः। स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥

आंद्रे वडापाव Wed, 03/26/2025 - 10:36
कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् | मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥

सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्? दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? | यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||

हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे ! आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे . आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत ! थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्‍याखुर्‍या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही ! वेलकम टू द रीअ‍ॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:24
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .> पूर्णपणे असहमत! ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 13:26
ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते.
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका.. त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. . राम ...

In reply to by आंद्रे वडापाव

अहाहा ! मनःपुर्वक धन्यवाद ! "राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत ! "हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा , " बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्‍या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !! मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला ! मनःपुर्वक धन्यवाद ! रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क © राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sat, 03/29/2025 - 09:41
श्री० गोडबोले, तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.

In reply to by युयुत्सु

हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही! माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे ! ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्‍या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्‍या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप ! वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही ! असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला ! बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. " =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sat, 03/29/2025 - 21:47
लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
अभ्यास वाढवा...

In reply to by आंद्रे वडापाव

Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Sun, 03/30/2025 - 08:50
The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office. #https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !! त्यामुळे... असोच ... केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।

असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥ तात्यांवरील टिकेला खाली उत्तर! ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः। स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥
लेखनविषय:
Composed with the help of DeepSeek - असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥