मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप

युयुत्सु ·

युयुत्सु 13/05/2025 - 12:31
आज शरद पवार यांच्या तोंडी छापून आलेले विधान (अमेरीकेची मदत घ्यायची काय गरज? -म०टा०) केवळ संतापजनक नाही तर सैन्यदलांच्या कामगिरीचा अपमान करणारे आहे. या गृहस्थांनी काश्मिरप्रश्नावर स्वत: संरक्षण मंत्री असताना कोणतीही ठोस पवले उचललेली नाहीत.

युयुत्सु 13/05/2025 - 12:40
सरकारचे समझौता करून सरकारचे चुकले असे ज्यांना वाटते त्यांनी clausewitz याचे ऑन वॉर आणि सन त्सु याचे द आर्ट ऑफ वॉर ही पुस्तके १ल्या कव्हर पासून शेवटच्या कव्हर पर्यंत वाचावी आणि मग मतप्रदर्शन करावे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 13/05/2025 - 13:22
तसा फिल येणे स्वाभाविक आहे पण देश कसा चालवला जातो हे मला बर्‍यापै़की जवळून बघायला मिळाले आहे. कोणत्याही आक्रमक भूमिकेत आपले नुकसान कमीतकमी ठेवणे शहाणपणाचे आहे. धाडसी निर्णय घेतल्यावर जनता कशी उलट्या बोंबा मारते ते नोटबंदीच्या वेळेला बघायला मिळाले.

कंजूस 13/05/2025 - 13:16
१.जगात अगोदरच दोन युद्धे प्रलंबित आहेत. २. ट्रंपने पूर्वीच पाकिस्तानची मदत थांबवली होती. ३. आइएमएफमध्ये इतर देशही पुंजी लावतात आणि मग त्यातून कर्ज दिले जाते. ४. त्या कर्जाचे वितरण करायचे का नाही यावर विचार केला जाईल असे ट्रंपने पाकला सांगितल्यावर पाकने शस्त्र संधीच्या वार्ता सुरू केल्या. ५. पाकच्या विनंतीला मान देऊन किती टक्के आणि कोणत्या अटींवर संधी करायची ते भारताच्या अधिकारात आहे. बघू पुढे काय होते. यावर विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहे. इंदिरा गांधी बऱ्याच होत्या असे कॉन्ग्रेसने म्हटले आहे.परंतू आता बांगला देश भारताला कसा भारी पडत आहे, वाकुल्या दाखवत आहे ते आपण पाहतोच आहोत.

शस्त्र संधी? नंतर बहुतेक लोकं नाराज आहेत. ह्या माघे मीडियाने वाढवलेल्या अवास्तव अपेक्षा कारण असू शकेल का? म्हणजे ८ मेच्या रात्री आपण इस्लामबादवर तिरंगा फडकावणार होतो, त्यामानाणे अतिरेक्याच्या नऊ अड्डयावर आणि पाकिस्तानचे नऊ दहा एअर बेस उद्वस्थ केले म्हणजे त्यामानाने फारच मामुली गोष्ट. युद्धात कांय धडा घायचा तो आपली आर्मी घेईलच पण सरकारने मात्र आपल्या मीडियावर कारवाई केलीच पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर मात्र आपलं लॉन्ग टर्म मध्ये फार मोठं नुकसान होणार आहे.जगताला एकही देश आणि आपले नागरिक सुद्धा आपल्या मीडियाला सिरिअसली घेत नाहीत किंवा घेणार नाहीत.

मारवा 13/05/2025 - 15:37
मोठ्या मोठ्या शहरात शंभर सव्वाशे माणसे मारल्यावर. जो महाभयानक हल्ला मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानवर सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनात लढवलेला होता. तेव्हा त्यांनी जे हल्ले केलेले होते ते.थेट पाकिस्तानचेही बाहेर जाऊन थेट अफगाणिस्तान पर्यंत धडकत होते. त्याकवेळेस जितके आतंकवादी तळ पाकिस्तनांचे उध्वस्त केले होते ती निव्वळ ऐतिहासिक अशी कामगिरी होती. आजही पाकिस्तानी लोकांमध्ये सोनिया आणि मनमोहन या नावांची दहशत 2008 च्या हल्ल्यामुळे बसलेली आहे. तेव्हा चीन आणि अमेरिका मनमोहन यांच्या इतक्या भयानक दबावात होते की युद्ध थांबेपर्यंत त्यांनी चक्क विपश्यना आणि ध्यानधारणा करत मौन बाळगले होते.

In reply to by मारवा

बाय द वे, मा.पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जी कामगिरी केली त्यामुळे आपण खुश असाल ना ? की नाही. -दिलीप बिरुटे

मी भाजपा समर्थक असलो तरी मोदींची थेट भाषणे पाहत नाही. ती एकंदरीत रटाळ असतात. त्यापेक्षा मला अमित शहा यांची रोखठोक आणि टू द पॉईंट शैली आवडते.

In reply to by धर्मराजमुटके

सोत्रि 14/05/2025 - 07:01
टू द पॉईंट!! - (पॅाईंटेड) सोकाजी

ट्रम्प ह्यांनी जे वक्तव्य केले त्यातून पडद्यामागे काय घडले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. विधान १- आम्हाला भारताबरोबर खूप व्यापार करायचा आहे. विधान २- आम्हाला पाकिस्तानबरोबरही खूप व्यापार करायचा आहे. "I said let’s do some trade," Trump said Trump said he had offered trade incentives to both New Delhi and Islamabad to de-escalate tensions. पुन्हा ट्रम्प तात्यांनी दाखवुन दिले - की मला दोन्ही देश सारखेच आहेत. आता हे वक्तव्य जर खोटे आहे तर भारत/पाकिस्तानतर्फे काही खुलासा आला का? "की ट्रम्प खोटे बोलत आहेत? की नेहमीप्रमाणे समर्थक म्हणणार- "मोदींनी कशाला खुलासा करायचा? ट्रम्प वाट्टेल ते बोलतील" किती जवान मारले गेले, किती जखमी झाले ह्याची माहिती आता तरी मिळू शकेल का? https://economictimes.indiatimes.com/news/india/i-said-lets-do-some-trade-trump-reaffirms-claim-of-brokering-india-pakistan-military-truce/articleshow/121144312.cms?from=mdr

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 14/05/2025 - 16:36
सौ० कुरसुंदीकर आपण फारच "उथळपणे" या घटनांचे विश्लेषण करत आहात. मला स्वतःला पुढील विश्लेषण जास्त वास्तववादी वाटते. https://www.youtube.com/watch?v=vNbjwnNdEGM

प्रश्न ५ ट्रंप यांनी शस्त्रसंधीचे क्रेडीट घेण्याने भारताचे कसलेही नुकसान झालेले नाही भारत पाकिस्तानला धडा शिकवणार होता(निदान तशी अपेक्षा होती). ट्रम्प ह्यांनी मध्यस्थी केली(व्यापार वाढवुया म्हणून) असे ते म्हणतात. मग युद्धबंदी झाली. म्हणजे व्यापार वाढणार म्हणून भारताने अमेरिकेला होकार दिला असाच अर्थ निघतो ना? आणि "पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात. मग प्रश्न असा पडतो की ऑपरेशन सिंदूरने नक्की काय साधले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

"पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात.
तसे पाकिस्तानी अधिकारी असे बरेच काही बोलत असतात. इतका मार खाऊनही आम्हीच जिंकलो असा दावाही ते करत आहेतच. म्हणून लगेच असल्या बाष्कळ दाव्यांची दखल घेऊन त्यावर प्रतिक्रिया देत बसायचे का? जर आपण नुसत्या पीओकेमध्येच नाही तर पंजाबमध्ये पण बिनबोभाट हल्ले करू शकत असू आणि पाकड्यांचे १०-१२ हवाईतळ उध्वस्त करू शकत असू तर ते ऑपरेशन सिंदूरचे यशस्वी फलित मानायचे की नाही? आपले सैन्य काय बोलत आहे त्यावर विश्वास ठेवायचा नाही पण कुठचातरी वायझेड पाकडा लष्करी अधिकारी काहीतरी बरळला म्हणून आपल्याच सैन्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे- हो की नाही माई?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने स्पष्ट सांगितलंय की अमेरेकीने कोणताही माध्यस्थीचा role play केला नाही आणि मान्यही नाही. मोदींनी पण घटनाक्रम भाषणात सांगितला आहे. पण ट्रम्पच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा असेल तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना आहे हे मान्य कराव लागेल.

In reply to by युयुत्सु

२६-११ चा हल्ला झाला होता तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता. इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार? काँग्रेसचा राजा आज सत्तेवर असता तर भाजपावाल्यांनी त्याचा राजीनामा मागितला असता की नाही?

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 16/05/2025 - 16:53
कुठले युध्द? मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा सामना केला नाही. कुणीही प्रश्नच विचारू नये असा सुरक्षित किल्ला त्यांना लाभला आहे. दुसरे म्हणजे त्यांनी काहिही केले तरी त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारे लक्षावधी लोक त्यांनी तयार केले आहेत. उदा. जातनिहाय जनगणनेला केलेला विरोध पूर्ण १८० अंशात मत बदलून समर्थन केले, तरी समर्थक ब्र ही काढत नाहीत, नव्हे आता हेच कसे बरोबर हे सांगत आहेत्त. एवढ्या मोठ्या संखेने इतके एकनिष्ठ (स्वत:चा विचार नसलेले) समर्थक इतर कोणत्याही नेत्याला लाभले नव्हते. कसले युध्द?

युयुत्सु 14/05/2025 - 19:12
इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार?> सर्व माहिती यथावकाश (युद्ध थांबल्यावर) बाहेर येतेच, इतकंच आत्ता सांगू शकतो.

युयुत्सु 14/05/2025 - 19:15
तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता.> मला संदर्भ कळला नाही. कृपया स्पष्ट्/नि:संदिग्ध लिहील्यास आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजणे सोपे जाईल.

युयुत्सु 13/05/2025 - 12:31
आज शरद पवार यांच्या तोंडी छापून आलेले विधान (अमेरीकेची मदत घ्यायची काय गरज? -म०टा०) केवळ संतापजनक नाही तर सैन्यदलांच्या कामगिरीचा अपमान करणारे आहे. या गृहस्थांनी काश्मिरप्रश्नावर स्वत: संरक्षण मंत्री असताना कोणतीही ठोस पवले उचललेली नाहीत.

युयुत्सु 13/05/2025 - 12:40
सरकारचे समझौता करून सरकारचे चुकले असे ज्यांना वाटते त्यांनी clausewitz याचे ऑन वॉर आणि सन त्सु याचे द आर्ट ऑफ वॉर ही पुस्तके १ल्या कव्हर पासून शेवटच्या कव्हर पर्यंत वाचावी आणि मग मतप्रदर्शन करावे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 13/05/2025 - 13:22
तसा फिल येणे स्वाभाविक आहे पण देश कसा चालवला जातो हे मला बर्‍यापै़की जवळून बघायला मिळाले आहे. कोणत्याही आक्रमक भूमिकेत आपले नुकसान कमीतकमी ठेवणे शहाणपणाचे आहे. धाडसी निर्णय घेतल्यावर जनता कशी उलट्या बोंबा मारते ते नोटबंदीच्या वेळेला बघायला मिळाले.

कंजूस 13/05/2025 - 13:16
१.जगात अगोदरच दोन युद्धे प्रलंबित आहेत. २. ट्रंपने पूर्वीच पाकिस्तानची मदत थांबवली होती. ३. आइएमएफमध्ये इतर देशही पुंजी लावतात आणि मग त्यातून कर्ज दिले जाते. ४. त्या कर्जाचे वितरण करायचे का नाही यावर विचार केला जाईल असे ट्रंपने पाकला सांगितल्यावर पाकने शस्त्र संधीच्या वार्ता सुरू केल्या. ५. पाकच्या विनंतीला मान देऊन किती टक्के आणि कोणत्या अटींवर संधी करायची ते भारताच्या अधिकारात आहे. बघू पुढे काय होते. यावर विरोधी पक्ष जोरदार टीका करत आहे. इंदिरा गांधी बऱ्याच होत्या असे कॉन्ग्रेसने म्हटले आहे.परंतू आता बांगला देश भारताला कसा भारी पडत आहे, वाकुल्या दाखवत आहे ते आपण पाहतोच आहोत.

शस्त्र संधी? नंतर बहुतेक लोकं नाराज आहेत. ह्या माघे मीडियाने वाढवलेल्या अवास्तव अपेक्षा कारण असू शकेल का? म्हणजे ८ मेच्या रात्री आपण इस्लामबादवर तिरंगा फडकावणार होतो, त्यामानाणे अतिरेक्याच्या नऊ अड्डयावर आणि पाकिस्तानचे नऊ दहा एअर बेस उद्वस्थ केले म्हणजे त्यामानाने फारच मामुली गोष्ट. युद्धात कांय धडा घायचा तो आपली आर्मी घेईलच पण सरकारने मात्र आपल्या मीडियावर कारवाई केलीच पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर मात्र आपलं लॉन्ग टर्म मध्ये फार मोठं नुकसान होणार आहे.जगताला एकही देश आणि आपले नागरिक सुद्धा आपल्या मीडियाला सिरिअसली घेत नाहीत किंवा घेणार नाहीत.

मारवा 13/05/2025 - 15:37
मोठ्या मोठ्या शहरात शंभर सव्वाशे माणसे मारल्यावर. जो महाभयानक हल्ला मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानवर सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनात लढवलेला होता. तेव्हा त्यांनी जे हल्ले केलेले होते ते.थेट पाकिस्तानचेही बाहेर जाऊन थेट अफगाणिस्तान पर्यंत धडकत होते. त्याकवेळेस जितके आतंकवादी तळ पाकिस्तनांचे उध्वस्त केले होते ती निव्वळ ऐतिहासिक अशी कामगिरी होती. आजही पाकिस्तानी लोकांमध्ये सोनिया आणि मनमोहन या नावांची दहशत 2008 च्या हल्ल्यामुळे बसलेली आहे. तेव्हा चीन आणि अमेरिका मनमोहन यांच्या इतक्या भयानक दबावात होते की युद्ध थांबेपर्यंत त्यांनी चक्क विपश्यना आणि ध्यानधारणा करत मौन बाळगले होते.

In reply to by मारवा

बाय द वे, मा.पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जी कामगिरी केली त्यामुळे आपण खुश असाल ना ? की नाही. -दिलीप बिरुटे

मी भाजपा समर्थक असलो तरी मोदींची थेट भाषणे पाहत नाही. ती एकंदरीत रटाळ असतात. त्यापेक्षा मला अमित शहा यांची रोखठोक आणि टू द पॉईंट शैली आवडते.

In reply to by धर्मराजमुटके

सोत्रि 14/05/2025 - 07:01
टू द पॉईंट!! - (पॅाईंटेड) सोकाजी

ट्रम्प ह्यांनी जे वक्तव्य केले त्यातून पडद्यामागे काय घडले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. विधान १- आम्हाला भारताबरोबर खूप व्यापार करायचा आहे. विधान २- आम्हाला पाकिस्तानबरोबरही खूप व्यापार करायचा आहे. "I said let’s do some trade," Trump said Trump said he had offered trade incentives to both New Delhi and Islamabad to de-escalate tensions. पुन्हा ट्रम्प तात्यांनी दाखवुन दिले - की मला दोन्ही देश सारखेच आहेत. आता हे वक्तव्य जर खोटे आहे तर भारत/पाकिस्तानतर्फे काही खुलासा आला का? "की ट्रम्प खोटे बोलत आहेत? की नेहमीप्रमाणे समर्थक म्हणणार- "मोदींनी कशाला खुलासा करायचा? ट्रम्प वाट्टेल ते बोलतील" किती जवान मारले गेले, किती जखमी झाले ह्याची माहिती आता तरी मिळू शकेल का? https://economictimes.indiatimes.com/news/india/i-said-lets-do-some-trade-trump-reaffirms-claim-of-brokering-india-pakistan-military-truce/articleshow/121144312.cms?from=mdr

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 14/05/2025 - 16:36
सौ० कुरसुंदीकर आपण फारच "उथळपणे" या घटनांचे विश्लेषण करत आहात. मला स्वतःला पुढील विश्लेषण जास्त वास्तववादी वाटते. https://www.youtube.com/watch?v=vNbjwnNdEGM

प्रश्न ५ ट्रंप यांनी शस्त्रसंधीचे क्रेडीट घेण्याने भारताचे कसलेही नुकसान झालेले नाही भारत पाकिस्तानला धडा शिकवणार होता(निदान तशी अपेक्षा होती). ट्रम्प ह्यांनी मध्यस्थी केली(व्यापार वाढवुया म्हणून) असे ते म्हणतात. मग युद्धबंदी झाली. म्हणजे व्यापार वाढणार म्हणून भारताने अमेरिकेला होकार दिला असाच अर्थ निघतो ना? आणि "पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात. मग प्रश्न असा पडतो की ऑपरेशन सिंदूरने नक्की काय साधले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

"पुन्हा हल्ला करा, आम्ही तयार आहोत" असे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सरळ म्हणतात.
तसे पाकिस्तानी अधिकारी असे बरेच काही बोलत असतात. इतका मार खाऊनही आम्हीच जिंकलो असा दावाही ते करत आहेतच. म्हणून लगेच असल्या बाष्कळ दाव्यांची दखल घेऊन त्यावर प्रतिक्रिया देत बसायचे का? जर आपण नुसत्या पीओकेमध्येच नाही तर पंजाबमध्ये पण बिनबोभाट हल्ले करू शकत असू आणि पाकड्यांचे १०-१२ हवाईतळ उध्वस्त करू शकत असू तर ते ऑपरेशन सिंदूरचे यशस्वी फलित मानायचे की नाही? आपले सैन्य काय बोलत आहे त्यावर विश्वास ठेवायचा नाही पण कुठचातरी वायझेड पाकडा लष्करी अधिकारी काहीतरी बरळला म्हणून आपल्याच सैन्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे- हो की नाही माई?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने स्पष्ट सांगितलंय की अमेरेकीने कोणताही माध्यस्थीचा role play केला नाही आणि मान्यही नाही. मोदींनी पण घटनाक्रम भाषणात सांगितला आहे. पण ट्रम्पच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा असेल तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना आहे हे मान्य कराव लागेल.

In reply to by युयुत्सु

२६-११ चा हल्ला झाला होता तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता. इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार? काँग्रेसचा राजा आज सत्तेवर असता तर भाजपावाल्यांनी त्याचा राजीनामा मागितला असता की नाही?

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 16/05/2025 - 16:53
कुठले युध्द? मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांचा सामना केला नाही. कुणीही प्रश्नच विचारू नये असा सुरक्षित किल्ला त्यांना लाभला आहे. दुसरे म्हणजे त्यांनी काहिही केले तरी त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारे लक्षावधी लोक त्यांनी तयार केले आहेत. उदा. जातनिहाय जनगणनेला केलेला विरोध पूर्ण १८० अंशात मत बदलून समर्थन केले, तरी समर्थक ब्र ही काढत नाहीत, नव्हे आता हेच कसे बरोबर हे सांगत आहेत्त. एवढ्या मोठ्या संखेने इतके एकनिष्ठ (स्वत:चा विचार नसलेले) समर्थक इतर कोणत्याही नेत्याला लाभले नव्हते. कसले युध्द?

युयुत्सु 14/05/2025 - 19:12
इकडे किती सैनिक धारातीर्थी पडले आहेत? हल्ला करणारे ते चौघे कुठे आहेत? बी एस एफ्,आर्मीचे सैनिकांचे कडक पहारे असताना नियंत्रण रेषेपासुन २०० कि.मी.आत हे दहशतवादी आलेच कसे? ह्याची उत्तरे कोण कधी देणार?> सर्व माहिती यथावकाश (युद्ध थांबल्यावर) बाहेर येतेच, इतकंच आत्ता सांगू शकतो.

युयुत्सु 14/05/2025 - 19:15
तेव्हा राजाचा सरदार दिवसातून अनेक्वेळा कपडे बदलतो म्हणून स्वकीयांनी सरदाराचा राजीनामा घेतला होता.> मला संदर्भ कळला नाही. कृपया स्पष्ट्/नि:संदिग्ध लिहील्यास आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजणे सोपे जाईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मोदींचे भाषण आणि त्यावर घेतलेले बालीश आक्षेप https://youtu.be/oq35bx7ktEM?si=SHdxD8Kmglr2iXD5 माझी उत्तरे प्रश्न १ - समझौत्याची घोषणा भारत आणि पाक यांच्या ऐवजी त्रयस्थ पक्षाने करणे केव्हाही हितावह. जो पक्ष समझौत्याची भाषा करतो तो कमकुवत मानला जाऊ शकतो. भारताने अशी घोषणा केली असती तर पाकला आयते कोलीत मिळाले असते. प्रश्न २ भारताच्या परराष्ट्र नीतीची कोणतीही अडचण झाली असे मला वाटत नाही. कोणत्याही युद्धात सन्मान्य माघार विजया इतकीच महत्त्वाची असते.

तीट

अनन्त्_यात्री ·

निनाद 21/08/2025 - 14:59
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गणेशा 21/08/2025 - 15:09
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम

निनाद 21/08/2025 - 14:59
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गणेशा 21/08/2025 - 15:09
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम
लेखनविषय:
ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा "

आजीच्या घरातली गंमत

लाल गेंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
एक चिमणी, दोन चिमणी, तीन चिमण्या आल्या दारी, पटापटा चोचीमध्ये, धान्य घेऊन गेल्या घरी ।। आजी म्हणाली चिमणी बाई, आज का ग तुझी घाई ?, चिमणी म्हणाली टाकून दाणा, आज जायचयं एका लग्नाला ।। घरी जाते, नाश्ता करते, घालते पोरांना ही जेवायला, पोरांची नाटकं रोज नवी, कशी पुरवावी सांगा मजला? ।। आजी म्हणाली खरंए बाई, खाण्याची नाटकं नवी नाही, तुला उद्या देईन पोळी पोरांना दे करून गोळी ।। तिकडून आली आजीची नात, रोजचं नवं गाणं गात, आश्चर्याने आजीला म्हणते कशी, चिमणीची भाषा कळते कशी?

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

शशिकांत ओक ·

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.

एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्चाची ओळख करून देणार्‍या अनुभवकथनमालिकेची उत्तम सुरुवात. धन्यवाद ओक साहेब. पुभाप्र.

गवि 13/05/2025 - 14:57
पुढील भागाची उत्सुकता. मीही साधारण त्याच काळात पुणे विमानतळावर सिव्हिल एअरलाइनमधे नोकरी करत होतो. रोजच्या रोज दोन वेळा, अगदी रविवार धरून रोज, त्या ATC टॉवरमध्ये फ्लाईट प्लॅन फाईल करायला आणि ADC वगैरे क्रमांक मिळवायला मला जावे लागे. माझी बाईक घेऊन मी त्या सुखोई, जागवार विमानांच्या अगदी जवळून एप्रन एरिया ओलांडून टॉवरमधे जात असे. एरवी ही विमाने दुरून देखील बघायला मिळणे दुरापास्त. त्या आवारात हेल्मेट अत्यावश्यक होते आणि एन्ट्री पास. टॉवरमध्ये वरती प्रत्यक्ष कंट्रोलवर फ्लाईट लेफ्टनंट, विंग कमांडर असे, बहुधा वयाने बरेच सिनियर असे अधिकारी असत. एक शिडी खाली उतरून पोटमजला होता, त्यात कॉपल लेव्हलचा कर्मचारी फ्लाईट प्लॅनच्याच कामासाठी बसलेला असे. त्या सर्वांशी फार चांगली मैत्री झाली होती. कॉपल कनोजिया हा अत्यंत सुस्वभावी आणि स्नेहपूर्ण स्वभावाचा अधिकारी तिथे नेहमी असायचा. त्याच्याशी गप्पा रंगत असत. मुळात फार थोड्या सिव्हिल सर्विस लोकांना एअरफोर्स स्टेशनमधे इतक्या आत जाण्याचे भाग्य लाभते. पुणे, गोवा अशा एअरफोर्स विमानतळावरच ते शक्य आहे. एअरपोर्ट फी, चार्जेस या निमित्ताने अकाऊंट विभागात आणि मेटार (हवामान रिपोर्ट) साठी हवामान विभागात देखील जाणे येणे असे. तिथेही बहुतांश लोक सार्जंट आणि कॉपल असत. लेखाच्या निमित्ताने या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

सौंदाळा 14/05/2025 - 19:57
छानच लिहिले आहे. कॉपल पांडे सारखे निस्वार्थी लोक विरळाच. पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 15/05/2025 - 16:34
धन्यवाद धाग्यावर प्रतिसादाबद्दल. आपण म्हणता ते बरोबर आहे. कॉपल पांडे सारखे लोक विरळा असतात. म्हणून ते लक्षात राहतात.

शशिकांत ओक 24/05/2025 - 00:13
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा पहिला भाग वाचून खूप आनंद झाला. विंग कमांडर शशिकांत ओक (नि.) यांनी मांडलेली ही प्रस्तावना आणि पहिला भाग वाचकांना खिळवून ठेवतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: प्रस्तावना: एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे दर्शन प्रस्तावना वाचकाला कॉर्पल पांडे नावाच्या एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. पांडे हे केवळ एक वायुसैनिक नसून, ते एक देशभक्त, कवी मनाचे चित्रकार, माणुसकीची जाण असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे लेखक सांगतात. 'एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस' ही उपमा त्यांची बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवते. लेखकाने पांडे यांच्याकडून घेतलेली मदत आणि त्या मदतीचे 'सोने' झाल्याचे नमूद करून, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि निष्ठेवर प्रकाश टाकला आहे. ही लेखमाला केवळ आठवणी नसून, एका सैनिकाच्या आदर्शांचा दस्तऐवज आहे आणि त्यातून वाचकांनी प्रेरणा घ्यावी, अशी लेखकाची सदिच्छा आहे. ही प्रस्तावना वाचकांच्या मनात कॉर्पल पांडे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण करते आणि पुढील भागांची प्रतीक्षा करण्यास प्रवृत्त करते. पांडे यांनी माणुसकीची खरी व्याख्या समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, केवळ माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदनेशी एकरूप होण्याची त्यांची ही भावना लेखकाला निशब्द करते. "रस्त्यावर आणि ढिगाऱ्याखाली शेकडो मृत आणि जखमी लोक होते – ती पण माझ्यासारखीच माणसंच होती. ते माझे नातेवाईक नव्हते का?" या विचारामुळे लेखकाच्या डोळ्यांत पाणी येते. पांडे यांचा निर्भीडपणा, सेवाभाव आणि करुणा स्पष्ट दिसते. शेवटी, पांडे यांनी १५ दिवसांची रजा घेतल्याचे, मित्रांकडून पैसे उधार घेतल्याचे आणि कॅमेरा सोबत घेऊन मदतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. लेखकाने त्यांना पुढच्या बचाव विमानात पाठवण्यासाठी कॅप्टनशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कथानकात एक अनपेक्षित ट्विस्ट आहे: "पण तसे घडणार नव्हते!" यामुळे पुढील भागाबद्दलची उत्सुकता अधिक वाढते. एकंदरीत, हा भाग कॉर्पल पांडे यांच्या कलात्मकता, नम्रता, शिस्त, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांची अद्वितीय माणुसकी आणि सेवावृत्ती अधोरेखित करतो. विंग कमांडर ओक यांनी अत्यंत प्रभावीपणे कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पहिला पैलू उलगडला आहे. वरील रसग्रहण जेमिनी विद्याधर यांनी केले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

प्रस्तावना कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.

मनी छंद गुलकंद

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!

The Killers

भागो ·
लेखनविषय:
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे. हेमिंग्वेशी माझी पहिली मुठभेड झाली ती “फेअरवेल टू आर्म्स” च्या मराठी भाषांतराच्या वाचनाने. माझ्या आठवणीप्रमाणे हे USIS प्रणीत पुस्तक होते. ते वाचल्यावर अस्पष्टशी जाणीव झाली की अरे हे काहीतरी अपूर्व पुस्तक आहे. माझ्या तोडक्या मराठी वाचनात असे काही वाचले नव्हते. इंग्रजीची केवळ अक्षर ओळख झाली होती. इंग्रजी वाचन करणे खूप दूरची गोष्ट होती. पुढे कधीतरी महाराष्ट्राचा संबंध तुटला. सगळ्या देशात भटकंती सुरु झाली. वाचन केवळ टेक्निकल गोष्टीपुरते मर्यादित झाले. हेमिंग्वे विस्मरणात गेला.

(ढू आय डी)

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

मार्गी ·

OBAMA80 11/05/2025 - 08:15
सुंदर लेख व अनुभव मांडले आहेत तुम्ही तुमच्या आजीबद्दल. पूर्वीचे लोक खरच मुलखावेगळे होते. फोटोतल्या त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू व प्रसन्नता खरच मन प्रसन्न करणारी आहे.

OBAMA80 11/05/2025 - 08:15
सुंदर लेख व अनुभव मांडले आहेत तुम्ही तुमच्या आजीबद्दल. पूर्वीचे लोक खरच मुलखावेगळे होते. फोटोतल्या त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू व प्रसन्नता खरच मन प्रसन्न करणारी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

माध्यमांची आरडाओरड

युयुत्सु ·

"घरातील सर्वांना ट्रेन केले" म्हणजे नक्की काय काय शिकवले आहे? आणि कसे शिकवले आहे? तुम्हाला सविस्तर प्रतिसाद लिहिता आला तर बघा, खूप बरं होईल.. कारण प्रत्यक्ष अनुभव कोणत्याही बाबतीत एक पाऊल पुढे असतो म्हणतात...

In reply to by शैलेश लांजेकर

युयुत्सु 10/05/2025 - 07:54
अ. घरात किमान १५ दिवस पुरेल इतकी कोरडी शिधा साठवून ठेवा. ब. ३ दिवस पुरेल एवढे पिण्याचे पाणी व २ बादल्या सामान्य पाणी अग्निशमनासाठी ठेवा. शक्य असल्यास ५ किलोचा फायर एक्स्टिंग्विशर घरी ठेवा (अंदाजे किंमत ₹१८००/-). क. प्रथमोपचार पेटी पूर्ण व अद्ययावत ठेवा. सर्व औषधे १५ दिवस पुरतील इतकी ठेवा. ड. १० ते १५ फूट लांबीची व ०.७५ इंच व्यासाची रबरी नळी (जोडणीसह) ठेवा. इ. वाहनात किमान १०० ते १५० किमी प्रवासासाठी इंधन भरून ठेवा. फ. बँकेची महत्त्वाची कामे पुढील २ दिवसांत पूर्ण करा आणि १५ दिवस पुरेल एवढी रोख रक्कम जवळ ठेवा (नेट बँकिंग/UPI व बँक व्यवहार विस्कळीत होऊ शकतात). ग. सर्व ओळखपत्रे हाताशी ठेवा. बाहेर जाताना गळ्यात अडकवून ठेवा. विमा, मालमत्ता कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. ह. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी ७ दिवसांच्या बाहेर राहण्याच्या तयारीसाठी छोट्या बॅगा तयार ठेवा. इ. घराच्या काचांवर क्रॉस आकृतीत पारदर्शक Tixo टेप लावा – एक आडवा व एक उभा, तसेच एक तिरपा क्रॉस. स्फोट झाल्यास काचांचे तुकडे उडून लागण्यापासून बचाव होतो. ज. काळोखाच्या सूचना आल्यावर खिडक्यांना झाकण्यासाठी तपकिरी कागद व चिकट टेप तयार ठेवा. झ. प्रथमोपचार, जखमींना वाहून नेणे व अग्निशमन याचा सराव करा. ञ. कोणतीही हानी झाल्यानंतर घाबरून न जाता शांतता राखा, रस्ते अनावश्यक गर्दीने भरू देऊ नका. ट. युद्ध सुरु झाल्यावर सायंकाळचे कार्यक्रम, पार्ट्या रद्द करा. ठ. परिस्थितीविषयी सामान्य संदेश सोशल मीडियावर पाठवून मोबाईल नेटवर्कला भार देऊ नका. सार्वजनिक माहितीतून कोणतीही बातमी पसरवू नका. शुभ सकाळ/फार्सिकल मेसेजेस टाळा. मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा. ड. पोलीस, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स यांचे क्रमांक जवळ ठेवा. ढ. घरातील प्रत्येकास सुरक्षित जागा – कॉलम आणि बीम यांचे संगम बिंदू – माहित असाव्यात. ण. बाल्कनी, जिने व लिफ्ट्स या सर्वात असुरक्षित जागा आहेत. त. गॅस सिलेंडर राखीव ठेवा. वापरत नसल्यास रेग्युलेटर बंद ठेवा. थ. प्रत्येकासाठी दोन मास्क ठेवा. स्फोटाजवळ असल्यास, ओलसर करून वापरा. वरील सूचना व्हॉटसअ‍ॅप्वर आल्या होत्या. पण त्या ७१च्या युद्धाची आठवण करून देतात. यातील अनेक सूचना कशा अमलात आणायच्या हे मी घरात समजाऊन सांगितले आहे.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 10/05/2025 - 08:05
यात माझी स्वतःची भर ० राज्याबाहेरचा प्रवास शक्यतो टाळावा ० आपण राहतो त्या भागात हल्ला/घातपात याचा धोका किती याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा. उदा० पुण्यात पाषाण, खडकी, हिंजवडी अशा भागाना पेठांपेक्षा जास्त धोका आहे. ० वैयक्तिक औषधांचा साठा मी ३ महिन्यांसाठी केला आहे ० अग्निशमन यंत्र अमेझॉनवरून ऑर्डर केले आहे.

In reply to by युयुत्सु

Bhakti 10/05/2025 - 10:43
मला तर उद्या खडकीला जायचं आहे,जाऊ का नको मग?? अशी नावं थेट माध्यमांवर लिहू नये.हीच प्रतिक्रिया पूर्ण सोमिवर फिरेल मग लोकांमध्ये भीती पसरेल.

In reply to by युयुत्सु

धन्यवाद!! आता मी पण या सूचनांनुसार माझी वैयक्तिक आणि कुटुंबाची तयारी कितपत आहे ते बघतो आणि आवश्यक असल्यास सुधारणा करायला घेतो.. आता आणखी उशीर नको...

nutanm 12/05/2025 - 07:05
मी ७१ चे युद्ध चान्गलेच अनुभवलेय कारण जरी मुम्बईचया उपनगरात रहात होतो तरी मुंबई असलयाने blackout, महागाई वडिलाचा तुटपन्जा पगार आणिकच कमी येणे व महागाई व गरिबीचया गर्तेत अधिकच ढकलले जाणे याचा फारच दाहक अनुभव वयाचया १४ वया वर्षी घवावा लागणे फारच वाईट.

गवि 12/05/2025 - 07:35
सध्याच्या काळात, म्हणजे आपण प्रसंगी स्वतःच्या घरी देखील गूगल मॅप्स - जीपीएस - वापरून पोचतो, त्या काळात पहिल्या दुसऱ्या महायुद्धासारखे किंवा सत्तरच्या दशकात होते तसे अंधार करून (चिकटपट्टीने खिडकीला कागद वगैरे लावत ब्लॅक आऊट करून) शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे हा एक हास्यास्पद उपाय वाटतो. आपल्या इतर यंत्रणा सक्षम आहेत शत्रूंची विमाने डिटेक्ट करून रोखायला. आणि सीमेच्या आत अनेक किलोमीटर तर येणे जवळपास अशक्य आहे आपल्या इथे.

In reply to by गवि

सहमत. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती पाहता अशा तात्पुरत्या अंधाराचा फारसा फायदा तितकासा होत नसावा असे वाटते. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 12/05/2025 - 10:57
सत्तरच्या दशकात होते तसे अंधार करून (चिकटपट्टीने खिडकीला कागद वगैरे लावत ब्लॅक आऊट करून) शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे हा एक हास्यास्पद उपाय वाटतो. पाकिस्तानकडून येणारी सर्वच अस्त्रे काही जिपीएस वर आधारित नाहीत. केवळ अत्याधुनिक क्षेपणास्त्रे यात जिपी एस वर आधारित लक्ष्य वेधाची सोय आहे परंतु अशा एका अस्त्राची किंमत काही कोटी रुपये असते. बरेच ड्रोन उडवणारे पाकिस्तानात बसून ड्रोन च्या कॅमेऱ्यावर दिसणाऱ्या लक्ष्यावर वरून बॉम्ब टाकतात ज्याची किंमत एक लाखापेक्षा कमी आहे. अशा स्थितीत आपण दिवाळी केली तर त्यांची आयती सोय होते. अशा फडतूस ड्रोन उडवण्यासाठी आकाश किंवा S ४०० प्रणालीतील क्षेपणास्त्र वापरणे म्हणजे उंदीर मारायला तोफ गोळा वापरल्या सारखे होईल. म्हणून हि असली स्वस्त ड्रोन उडवायला बोफोर्सची L ७० हि तोफ वापरली जाते,. ह्या तोफेच्या गोळ्याचा व्यास ४ सेमी असतो आणि या तोफेची ३०० गोळे एका मिनोटात मारण्याची क्षमता आहे. याला लेसर रेंज फाईंडर बसवलेला असतो. यामुळे लक्षाचे अंतर आणि वेग अचूक मोजून त्यावर याचे गोळे मारून असली फडतुस ड्रोन उडवली जातात. याचा टप्पा १२ किमी पर्यंत असतो रात्रीच्या वेळेस आपले शहर जर झगमगाट असेल तर अशी द्रोण पाहणे आपल्याला कठीण होते मग लेसर रेंज फाईंडर मधून त्यावर गोळे वर्षाव करणे कठीण जाते. https://en.wikipedia.org/wiki/Bofors_40_mm_Automatic_Gun_L/70 याशिवाय जर आपली विमानविरोधी संरक्षण यंत्रणा नीट काम करत नसेल तर शत्रूची विमाने आपल्या हद्दीत प्रवेश करू शकली तर त्यांना सुद्धा लक्ष्य स्पष्ट दिसत असेल तर साधे बॉम्ब टाकणे अगदी सोपे जाते. एका स्काल्प बॉम्बची किंमत २० कोटी रुपये आहे तेंव्हा असा बॉम्ब हाय व्हॅल्यू टार्गेट असेल तरच वापरणे परवडते त्यापेक्षा विमान उडवून बॉम्ब टाकून परत येणे हे किती तरी स्वस्त पडते या कारणांमुळे रात्री ब्लॅक आऊट करून शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे आवश्यक ठरते.

युयुत्सु 12/05/2025 - 13:36
पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याजवळ हल्ला झाल्याने किरणोत्सर्ग चालू झाल्याची बातमी जर खरी असेल तर माझ्या दृष्टीने आपण हे युद्ध जिंकले आहे. किरणोत्सर्ग आटोक्यात आणताना त्यांचा दम निघेल हे नक्की.

"घरातील सर्वांना ट्रेन केले" म्हणजे नक्की काय काय शिकवले आहे? आणि कसे शिकवले आहे? तुम्हाला सविस्तर प्रतिसाद लिहिता आला तर बघा, खूप बरं होईल.. कारण प्रत्यक्ष अनुभव कोणत्याही बाबतीत एक पाऊल पुढे असतो म्हणतात...

In reply to by शैलेश लांजेकर

युयुत्सु 10/05/2025 - 07:54
अ. घरात किमान १५ दिवस पुरेल इतकी कोरडी शिधा साठवून ठेवा. ब. ३ दिवस पुरेल एवढे पिण्याचे पाणी व २ बादल्या सामान्य पाणी अग्निशमनासाठी ठेवा. शक्य असल्यास ५ किलोचा फायर एक्स्टिंग्विशर घरी ठेवा (अंदाजे किंमत ₹१८००/-). क. प्रथमोपचार पेटी पूर्ण व अद्ययावत ठेवा. सर्व औषधे १५ दिवस पुरतील इतकी ठेवा. ड. १० ते १५ फूट लांबीची व ०.७५ इंच व्यासाची रबरी नळी (जोडणीसह) ठेवा. इ. वाहनात किमान १०० ते १५० किमी प्रवासासाठी इंधन भरून ठेवा. फ. बँकेची महत्त्वाची कामे पुढील २ दिवसांत पूर्ण करा आणि १५ दिवस पुरेल एवढी रोख रक्कम जवळ ठेवा (नेट बँकिंग/UPI व बँक व्यवहार विस्कळीत होऊ शकतात). ग. सर्व ओळखपत्रे हाताशी ठेवा. बाहेर जाताना गळ्यात अडकवून ठेवा. विमा, मालमत्ता कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. ह. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी ७ दिवसांच्या बाहेर राहण्याच्या तयारीसाठी छोट्या बॅगा तयार ठेवा. इ. घराच्या काचांवर क्रॉस आकृतीत पारदर्शक Tixo टेप लावा – एक आडवा व एक उभा, तसेच एक तिरपा क्रॉस. स्फोट झाल्यास काचांचे तुकडे उडून लागण्यापासून बचाव होतो. ज. काळोखाच्या सूचना आल्यावर खिडक्यांना झाकण्यासाठी तपकिरी कागद व चिकट टेप तयार ठेवा. झ. प्रथमोपचार, जखमींना वाहून नेणे व अग्निशमन याचा सराव करा. ञ. कोणतीही हानी झाल्यानंतर घाबरून न जाता शांतता राखा, रस्ते अनावश्यक गर्दीने भरू देऊ नका. ट. युद्ध सुरु झाल्यावर सायंकाळचे कार्यक्रम, पार्ट्या रद्द करा. ठ. परिस्थितीविषयी सामान्य संदेश सोशल मीडियावर पाठवून मोबाईल नेटवर्कला भार देऊ नका. सार्वजनिक माहितीतून कोणतीही बातमी पसरवू नका. शुभ सकाळ/फार्सिकल मेसेजेस टाळा. मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा. ड. पोलीस, अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स यांचे क्रमांक जवळ ठेवा. ढ. घरातील प्रत्येकास सुरक्षित जागा – कॉलम आणि बीम यांचे संगम बिंदू – माहित असाव्यात. ण. बाल्कनी, जिने व लिफ्ट्स या सर्वात असुरक्षित जागा आहेत. त. गॅस सिलेंडर राखीव ठेवा. वापरत नसल्यास रेग्युलेटर बंद ठेवा. थ. प्रत्येकासाठी दोन मास्क ठेवा. स्फोटाजवळ असल्यास, ओलसर करून वापरा. वरील सूचना व्हॉटसअ‍ॅप्वर आल्या होत्या. पण त्या ७१च्या युद्धाची आठवण करून देतात. यातील अनेक सूचना कशा अमलात आणायच्या हे मी घरात समजाऊन सांगितले आहे.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 10/05/2025 - 08:05
यात माझी स्वतःची भर ० राज्याबाहेरचा प्रवास शक्यतो टाळावा ० आपण राहतो त्या भागात हल्ला/घातपात याचा धोका किती याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा. उदा० पुण्यात पाषाण, खडकी, हिंजवडी अशा भागाना पेठांपेक्षा जास्त धोका आहे. ० वैयक्तिक औषधांचा साठा मी ३ महिन्यांसाठी केला आहे ० अग्निशमन यंत्र अमेझॉनवरून ऑर्डर केले आहे.

In reply to by युयुत्सु

Bhakti 10/05/2025 - 10:43
मला तर उद्या खडकीला जायचं आहे,जाऊ का नको मग?? अशी नावं थेट माध्यमांवर लिहू नये.हीच प्रतिक्रिया पूर्ण सोमिवर फिरेल मग लोकांमध्ये भीती पसरेल.

In reply to by युयुत्सु

धन्यवाद!! आता मी पण या सूचनांनुसार माझी वैयक्तिक आणि कुटुंबाची तयारी कितपत आहे ते बघतो आणि आवश्यक असल्यास सुधारणा करायला घेतो.. आता आणखी उशीर नको...

nutanm 12/05/2025 - 07:05
मी ७१ चे युद्ध चान्गलेच अनुभवलेय कारण जरी मुम्बईचया उपनगरात रहात होतो तरी मुंबई असलयाने blackout, महागाई वडिलाचा तुटपन्जा पगार आणिकच कमी येणे व महागाई व गरिबीचया गर्तेत अधिकच ढकलले जाणे याचा फारच दाहक अनुभव वयाचया १४ वया वर्षी घवावा लागणे फारच वाईट.

गवि 12/05/2025 - 07:35
सध्याच्या काळात, म्हणजे आपण प्रसंगी स्वतःच्या घरी देखील गूगल मॅप्स - जीपीएस - वापरून पोचतो, त्या काळात पहिल्या दुसऱ्या महायुद्धासारखे किंवा सत्तरच्या दशकात होते तसे अंधार करून (चिकटपट्टीने खिडकीला कागद वगैरे लावत ब्लॅक आऊट करून) शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे हा एक हास्यास्पद उपाय वाटतो. आपल्या इतर यंत्रणा सक्षम आहेत शत्रूंची विमाने डिटेक्ट करून रोखायला. आणि सीमेच्या आत अनेक किलोमीटर तर येणे जवळपास अशक्य आहे आपल्या इथे.

In reply to by गवि

सहमत. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती पाहता अशा तात्पुरत्या अंधाराचा फारसा फायदा तितकासा होत नसावा असे वाटते. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 12/05/2025 - 10:57
सत्तरच्या दशकात होते तसे अंधार करून (चिकटपट्टीने खिडकीला कागद वगैरे लावत ब्लॅक आऊट करून) शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे हा एक हास्यास्पद उपाय वाटतो. पाकिस्तानकडून येणारी सर्वच अस्त्रे काही जिपीएस वर आधारित नाहीत. केवळ अत्याधुनिक क्षेपणास्त्रे यात जिपी एस वर आधारित लक्ष्य वेधाची सोय आहे परंतु अशा एका अस्त्राची किंमत काही कोटी रुपये असते. बरेच ड्रोन उडवणारे पाकिस्तानात बसून ड्रोन च्या कॅमेऱ्यावर दिसणाऱ्या लक्ष्यावर वरून बॉम्ब टाकतात ज्याची किंमत एक लाखापेक्षा कमी आहे. अशा स्थितीत आपण दिवाळी केली तर त्यांची आयती सोय होते. अशा फडतूस ड्रोन उडवण्यासाठी आकाश किंवा S ४०० प्रणालीतील क्षेपणास्त्र वापरणे म्हणजे उंदीर मारायला तोफ गोळा वापरल्या सारखे होईल. म्हणून हि असली स्वस्त ड्रोन उडवायला बोफोर्सची L ७० हि तोफ वापरली जाते,. ह्या तोफेच्या गोळ्याचा व्यास ४ सेमी असतो आणि या तोफेची ३०० गोळे एका मिनोटात मारण्याची क्षमता आहे. याला लेसर रेंज फाईंडर बसवलेला असतो. यामुळे लक्षाचे अंतर आणि वेग अचूक मोजून त्यावर याचे गोळे मारून असली फडतुस ड्रोन उडवली जातात. याचा टप्पा १२ किमी पर्यंत असतो रात्रीच्या वेळेस आपले शहर जर झगमगाट असेल तर अशी द्रोण पाहणे आपल्याला कठीण होते मग लेसर रेंज फाईंडर मधून त्यावर गोळे वर्षाव करणे कठीण जाते. https://en.wikipedia.org/wiki/Bofors_40_mm_Automatic_Gun_L/70 याशिवाय जर आपली विमानविरोधी संरक्षण यंत्रणा नीट काम करत नसेल तर शत्रूची विमाने आपल्या हद्दीत प्रवेश करू शकली तर त्यांना सुद्धा लक्ष्य स्पष्ट दिसत असेल तर साधे बॉम्ब टाकणे अगदी सोपे जाते. एका स्काल्प बॉम्बची किंमत २० कोटी रुपये आहे तेंव्हा असा बॉम्ब हाय व्हॅल्यू टार्गेट असेल तरच वापरणे परवडते त्यापेक्षा विमान उडवून बॉम्ब टाकून परत येणे हे किती तरी स्वस्त पडते या कारणांमुळे रात्री ब्लॅक आऊट करून शत्रूच्या विमानांपासून शहर किंवा महत्वाची ठिकाणे लपवणे आवश्यक ठरते.

युयुत्सु 12/05/2025 - 13:36
पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्याजवळ हल्ला झाल्याने किरणोत्सर्ग चालू झाल्याची बातमी जर खरी असेल तर माझ्या दृष्टीने आपण हे युद्ध जिंकले आहे. किरणोत्सर्ग आटोक्यात आणताना त्यांचा दम निघेल हे नक्की.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग... एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे? त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला. आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.

अलविदा हिट्मॅन

कपिलमुनी ·

काल रोहीटच्या निवृत्तीची बातमी दिसली आणि मग कळलं 'कसोटी क्रिकेट मधून' निवृत्त होतोय. आपण चांगला आढावा घेतला आहे, रोहीतची फलंदाजी बघायला मजा येते. आयपीएल मधेही रोहीत खेळला की चांगल्या धावा होतील आणि सामना जिंकू असे वाटत असतेल. रोहिटची कसोटी कारकिर्द आठवत राहील. एक म्हणून लक्षात नाही, त्याचं खेळणं, त्याची शैली त्याचे ड्राइव्ह, सगळंच वेगळं आणि हवंहवंसं. -दिलीप बिरुटे

सौंदाळा 08/05/2025 - 19:51
छान लेख. जोरात न मारता केवळ टाईमिंगवर खेळणार्‍या काही निवडक फलंदाजांमधील अप्रतिम फलंदाज. आता असे फलंदाज कमीच राहीले आहेत. सगळे हार्डहिटर. माझ्या मते रोहीत कसोटी फलंदाज म्हणून सामान्य होता पण ट२० आणि एकदिवसीय सामन्यात केवळ लाजवाब. आगामी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा रोहीतचा निर्धार आहे असे वाटत आहे. तो असला तर मज्जा येणार बघायला.
निवृत्ती आणि पुढचा प्रवास
पासून पुढच्या ओळी नॉस्टेलजिक करुन गेल्या.

गवि 10/05/2025 - 09:34
समयोचित लेख. काल बातमी ऐकली होती. पण युद्धवार्ता, चर्चा वगैरेच्या धामधुमीत ती बातमी आणि हा धागा काहीसा दुर्लक्षित राहणार असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही त्याची कारकीर्द बाकी आहे ही समाधानाची गोष्ट.

रो गेला नि को पण जायच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती स्वीकारली असती तर समायोचक ठरले असते. को पण निवृत्त होईल अशी दाट शक्यता आहे. एक दिवसीय सामने तसेही आता कमी झाले आहेत , त्यामुळे उगाच रेंगाळण्यात अर्थ नाही कदाचित uncapped रुल साठी असेल. त्याचे भारतीय क्रिकेट मधील योगदान निश्चितच दखलपात्र आहे .

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/05/2025 - 15:21
ओह आता हा प्रतिसाद बघूनच याबद्दल समजले. कसोटी संघात तरुण यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची जबाबदारी वाढणार. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल की अजून कोण ? या लगोपाठच्या दोन निवृत्यांमुळे भारतात कसोटी क्रिकेट उतरणीला लागू नये एवढीच इच्छा.

बदल हि काळाची गरज आहे . तसेही दोघे कसोटी क्रिकेट मध्ये सध्याच्या काळात पुरेशी चमक दाखवत नव्हते. अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल , रेड्डी नि नायर कोणी ना कोणी जागा भरून काढेल. सद्य IPL मोसमानंतर धोनी ने निवृत्ती जाहीर केली ती वेळ या दोघांनी स्वतःवर येऊ दिली नाही हे विशेष.

फारएन्ड 18/05/2025 - 02:17
छान लिहीले आहे. मागच्या दशकातील बिग-५ च्या निवृत्तीनंतर पुढच्या लोकांचा बराच खेळ मी पाहिलेला आहे पण इतकी डिटेल माहिती नाही. यातल्या कित्येक गोष्टी लक्षात नव्ह्त्या, तर कित्येक माहीतच नव्हत्या. आवडले वाचायला. मला इतक्यात बघितलेल्या दोन आठवणी आहेत - २०२३ च्या वर्ल्ड कप फायनल नंतरची निराशा आणि मागच्या वर्षी अमेरिकेत टी-२० जिंकल्यावरचा आनंद. रोहित शर्माबद्दल मला एक पॅटर्न कायम लक्षात राहिलेला आहे - तो जेव्हा विचित्र, आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारायला जातो तेव्हा तो फॉर्म मधे नाही हे जाणवते. कारण एरव्ही त्याचा "लेझी एलिगन्स" सहज दिसतो. नजीकच्या काळातील त्याचे बरेच षटकार हे मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या आर्क मधले आहेत. पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०९ मारले होते, तेव्हा त्यातील १६ षटकार हे चौफेर होते. ते फार छान आहेत पाहायला. कसोटीत मात्र मला तो फारसा लक्षात नाही. या लेखातील उल्लेख पाहून आता शोधायला हव्या त्या क्लिप्स. आता कोहलीवरही येउ दे लेख. सचिन, दादा वगैरेंचा पूर्ण प्रवास जसा एकेकाळी ट्रॅक केला आहे तसा या नंतरच्या खेळाडूंचा केलेला नाही. त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.

काल रोहीटच्या निवृत्तीची बातमी दिसली आणि मग कळलं 'कसोटी क्रिकेट मधून' निवृत्त होतोय. आपण चांगला आढावा घेतला आहे, रोहीतची फलंदाजी बघायला मजा येते. आयपीएल मधेही रोहीत खेळला की चांगल्या धावा होतील आणि सामना जिंकू असे वाटत असतेल. रोहिटची कसोटी कारकिर्द आठवत राहील. एक म्हणून लक्षात नाही, त्याचं खेळणं, त्याची शैली त्याचे ड्राइव्ह, सगळंच वेगळं आणि हवंहवंसं. -दिलीप बिरुटे

सौंदाळा 08/05/2025 - 19:51
छान लेख. जोरात न मारता केवळ टाईमिंगवर खेळणार्‍या काही निवडक फलंदाजांमधील अप्रतिम फलंदाज. आता असे फलंदाज कमीच राहीले आहेत. सगळे हार्डहिटर. माझ्या मते रोहीत कसोटी फलंदाज म्हणून सामान्य होता पण ट२० आणि एकदिवसीय सामन्यात केवळ लाजवाब. आगामी एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचा रोहीतचा निर्धार आहे असे वाटत आहे. तो असला तर मज्जा येणार बघायला.
निवृत्ती आणि पुढचा प्रवास
पासून पुढच्या ओळी नॉस्टेलजिक करुन गेल्या.

गवि 10/05/2025 - 09:34
समयोचित लेख. काल बातमी ऐकली होती. पण युद्धवार्ता, चर्चा वगैरेच्या धामधुमीत ती बातमी आणि हा धागा काहीसा दुर्लक्षित राहणार असे वाटते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही त्याची कारकीर्द बाकी आहे ही समाधानाची गोष्ट.

रो गेला नि को पण जायच्या मार्गावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती स्वीकारली असती तर समायोचक ठरले असते. को पण निवृत्त होईल अशी दाट शक्यता आहे. एक दिवसीय सामने तसेही आता कमी झाले आहेत , त्यामुळे उगाच रेंगाळण्यात अर्थ नाही कदाचित uncapped रुल साठी असेल. त्याचे भारतीय क्रिकेट मधील योगदान निश्चितच दखलपात्र आहे .

In reply to by कपिलमुनी

सौंदाळा 12/05/2025 - 15:21
ओह आता हा प्रतिसाद बघूनच याबद्दल समजले. कसोटी संघात तरुण यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची जबाबदारी वाढणार. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल की अजून कोण ? या लगोपाठच्या दोन निवृत्यांमुळे भारतात कसोटी क्रिकेट उतरणीला लागू नये एवढीच इच्छा.

बदल हि काळाची गरज आहे . तसेही दोघे कसोटी क्रिकेट मध्ये सध्याच्या काळात पुरेशी चमक दाखवत नव्हते. अय्यर, सर्फराज, ध्रुव जुरेल , रेड्डी नि नायर कोणी ना कोणी जागा भरून काढेल. सद्य IPL मोसमानंतर धोनी ने निवृत्ती जाहीर केली ती वेळ या दोघांनी स्वतःवर येऊ दिली नाही हे विशेष.

फारएन्ड 18/05/2025 - 02:17
छान लिहीले आहे. मागच्या दशकातील बिग-५ च्या निवृत्तीनंतर पुढच्या लोकांचा बराच खेळ मी पाहिलेला आहे पण इतकी डिटेल माहिती नाही. यातल्या कित्येक गोष्टी लक्षात नव्ह्त्या, तर कित्येक माहीतच नव्हत्या. आवडले वाचायला. मला इतक्यात बघितलेल्या दोन आठवणी आहेत - २०२३ च्या वर्ल्ड कप फायनल नंतरची निराशा आणि मागच्या वर्षी अमेरिकेत टी-२० जिंकल्यावरचा आनंद. रोहित शर्माबद्दल मला एक पॅटर्न कायम लक्षात राहिलेला आहे - तो जेव्हा विचित्र, आउट ऑफ कॅरेक्टर शॉट मारायला जातो तेव्हा तो फॉर्म मधे नाही हे जाणवते. कारण एरव्ही त्याचा "लेझी एलिगन्स" सहज दिसतो. नजीकच्या काळातील त्याचे बरेच षटकार हे मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या आर्क मधले आहेत. पण जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०९ मारले होते, तेव्हा त्यातील १६ षटकार हे चौफेर होते. ते फार छान आहेत पाहायला. कसोटीत मात्र मला तो फारसा लक्षात नाही. या लेखातील उल्लेख पाहून आता शोधायला हव्या त्या क्लिप्स. आता कोहलीवरही येउ दे लेख. सचिन, दादा वगैरेंचा पूर्ण प्रवास जसा एकेकाळी ट्रॅक केला आहे तसा या नंतरच्या खेळाडूंचा केलेला नाही. त्यामुळे वाचण्यात इंटरेस्ट आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.” hitman थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय? क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी ही कला आहे, आणि रोहित म्हणजे त्या कलेचा एक लाडका चित्रकार.