मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळ!

स्वाती दिनेश ·

In reply to by विदेश

खरं तर ह्या पाववाल्यांच्या देशात पावाचे अनंत प्रकार मिळतात पण आपण मिसळ,वडा,पावभाजीबरोबर जो पाव खातो तो मात्र मिळत नाही.:( त्यामुळे इथे मिळत असलेल्यापैकी कोणत्या तरी पावाबरोबर मिसळ खावी लागते.चित्रात दिसतो आहे तो 'फ्रेंच बागेत'किवा 'फ्रेंच स्टिक' नावाचा पाव आहे,जो मिसळ ,पावभाजीबरोबर चांगला लागतो.दुसरा एक तुर्की फ्लाडन ब्रोट म्हणजे तुर्की फ्लॅट ब्रेड मिळतो तो ही चांगला लागतो. स्वाती

विसोबा खेचर 13/04/2008 - 23:51
वा स्वाती! मामिचा फोटूही दिलास ते उत्तम केलंस... मामिची पाकृही झकास.. शेवटी मी गेले त्याच्या शालेतल्या मैतरनीकडं अन तिला म्हनलं माजा यो झ्याक फोटू टाक त्येच्या मिसळपाववर.. तो बगूनशान आन रेशिपी वाचून तरी आठवान व्होईल त्याला माजी गोठ लिवाची...आन तिला म्हणल का माजी रेशिपी दे अदुगर... हो हो, आता नक्की लिहीन मिसळीचं व्यक्तिचित्रं! ;) तुझा, (शालेतला मैतर!) तात्या.

व्यंकट 14/04/2008 - 00:47
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे. ती कशी काय भिजवणार ? कुरडई बरोबर अजून एक छोटा पापड असतो; तो तर नाही? व्यंकट

In reply to by व्यंकट

कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे हो तीच पापडी,तीच खलबत्त्यात कुटायची अथवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यायची ,पाण्यात भिजवायची आणि मिसळीच्या रश्श्यात घालायची त्याने ग्रेव्हीला दाटपणा येतो. स्वाती

वरदा 15/04/2008 - 00:08
काय मस्त फोटो...बरं झालं आता रेसिपी शोधायला सोप्पी....

In reply to by विदेश

खरं तर ह्या पाववाल्यांच्या देशात पावाचे अनंत प्रकार मिळतात पण आपण मिसळ,वडा,पावभाजीबरोबर जो पाव खातो तो मात्र मिळत नाही.:( त्यामुळे इथे मिळत असलेल्यापैकी कोणत्या तरी पावाबरोबर मिसळ खावी लागते.चित्रात दिसतो आहे तो 'फ्रेंच बागेत'किवा 'फ्रेंच स्टिक' नावाचा पाव आहे,जो मिसळ ,पावभाजीबरोबर चांगला लागतो.दुसरा एक तुर्की फ्लाडन ब्रोट म्हणजे तुर्की फ्लॅट ब्रेड मिळतो तो ही चांगला लागतो. स्वाती

विसोबा खेचर 13/04/2008 - 23:51
वा स्वाती! मामिचा फोटूही दिलास ते उत्तम केलंस... मामिची पाकृही झकास.. शेवटी मी गेले त्याच्या शालेतल्या मैतरनीकडं अन तिला म्हनलं माजा यो झ्याक फोटू टाक त्येच्या मिसळपाववर.. तो बगूनशान आन रेशिपी वाचून तरी आठवान व्होईल त्याला माजी गोठ लिवाची...आन तिला म्हणल का माजी रेशिपी दे अदुगर... हो हो, आता नक्की लिहीन मिसळीचं व्यक्तिचित्रं! ;) तुझा, (शालेतला मैतर!) तात्या.

व्यंकट 14/04/2008 - 00:47
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे. ती कशी काय भिजवणार ? कुरडई बरोबर अजून एक छोटा पापड असतो; तो तर नाही? व्यंकट

In reply to by व्यंकट

कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे हो तीच पापडी,तीच खलबत्त्यात कुटायची अथवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यायची ,पाण्यात भिजवायची आणि मिसळीच्या रश्श्यात घालायची त्याने ग्रेव्हीला दाटपणा येतो. स्वाती

वरदा 15/04/2008 - 00:08
काय मस्त फोटो...बरं झालं आता रेसिपी शोधायला सोप्पी....
Taxonomy upgrade extras
राम राम पावणं.. मला तर वळिखलं असनंच म्हना तुमी.. अवो, तात्या म्हनं माज्यावर इष्टोरी लिवनार हाय म्हनून वाट बगून राहिले ना मी,पन किती दिस झालं त्यानं काय अजून लिवल नाय ते व्यकतीचित्तर का काय ते!

काही संवाद

ॐकार ·

केशवसुमार 13/04/2008 - 16:14
ॐकारशेठ, संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;) बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,... केशवसुमार

विसोबा खेचर 13/04/2008 - 16:28
ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे! संवाद बाकी छानच आहेत! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प हे मस्तच! :) बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;) असो, ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;) पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो... आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :) तात्या.

आनंदयात्री 13/04/2008 - 16:54
>>, न आढळल्यास सुदैव! एवढे कुठले सुदैव तुमचे :) छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.

केशवसुमार 13/04/2008 - 16:14
ॐकारशेठ, संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;) बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,... केशवसुमार

विसोबा खेचर 13/04/2008 - 16:28
ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे! संवाद बाकी छानच आहेत! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प हे मस्तच! :) बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;) असो, ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;) पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो... आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :) तात्या.

आनंदयात्री 13/04/2008 - 16:54
>>, न आढळल्यास सुदैव! एवढे कुठले सुदैव तुमचे :) छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.
लेखनप्रकार
आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव! संवाद १ ( वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ माध्यम : जीटॉक-चॅट स्थळ : नसत्या चौकश्या करू नका. ) १: नमस्कार २: नमस्कार १: नविन काय लिहिले? २: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही!

बेंगलोर मिपा ओसरी ...

छोटा डॉन ·

विसोबा खेचर 13/04/2008 - 12:02
"बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला. वा वा! तुमच्या बेंगलोर मिपा ओसरीकरांचे अभिनंदन रे छोट्या डॉना! :) बाय द वे, कट्ट्यापेक्षा ओसरी हा शब्द अधिक छान आहे... या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या... कुठल्या रे? आम्हालाही कळू देत की! :) यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत होण्यासाठी आमच्याही मनापासून शुभेच्छा रे छोट्या डॉना! :) बाय द वे, तात्या, धमाल मुलगा आणि मदनबाण यांच्याही नुकत्याच मिपाच्या ठाणे ओसरीवर गप्पा झाल्या. त्याचे फोटो आणि वृत्तांत लवकरच! :) मिपा धर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा! आपला, (मिसळधर्मी मिसळपावकर) तात्या.

आनंदयात्री 13/04/2008 - 12:25
"मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. शुभेच्छा, काय हवा असेल नसेल तसा रसदीचा पुरवठा करण्यास आम्ही अमात्यांना फर्मावले आहे, तेव्हा तुम्ही निश्चिंत होउन लढावे, मिपाधर्म वाढवावा! काळोख [ आगामी आकर्षण] हे भारिच !! - (उजेडातला) आंद्या

ओसरीवर छान गप्पा झालेल्या दिसत आहेत. ओसरी कट्ट्यापेक्षा आवडली. काळोख [ आगामी आकर्षण] मस्त.. :-) स्वाती

आर्य 14/04/2008 - 09:39
छोट्या डॉना! मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब मजबूत होण्यासाठी आम्हालाही सामिल करुन घ्या सद्या काही दिवसां पासून आम्ही ही बेंगलोर मुक्कामी आहोत. काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...कुठल्या आम्हालाही सांगा आपला (मराठी - दक्षिण भारतातीय) आर्य

स्वयम्भू 14/04/2008 - 12:52
फोटो काढले नाहीत कारण थरथरत्या हाताने कॅमेरा धरवत नव्हता. तरीही प्रतत्न केलेच, पण सगळे फोटो ब्लर येत होते. पुढल्या वेळी आधी फोटो काढायचे ठरवून तो नाद सोडला. माझा व्रुत्तांत लवकरच इथे देईन. आपला, स्वयम्भू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

स्वयंभू 14/04/2008 - 12:54
ही थरथर मित्रांना भेटल्याच्या आनंदाची होती. आपला, स्वयम्भू

धमाल मुलगा 15/04/2008 - 12:01
वा रे भिडू! शाब्बास. लेको पण फोटू टाकायची व्यवस्था करायची रे. आयला, आनंदातिरेकाने तुमचे हात थरथरत असले तरी, तिथली वेटरं काय सगळी लकवा भरलेली होती का काय? घ्यायचे की त्यांच्याकडून फटाफटा फ्लॅश मारुन. :-)) बेष्ट..बेष्ट.
यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
आई भवानीचा आशिर्वाद आहेच पाठीशी. मोठ्या हिकमतीने धर्म वाढवावा, नेटाने कार्य चालवावे, मुळ प्रजेसि तोशिस न पडेल ऐसि बहुत काळजी घेवोन हल्लकल्लोळ माजवावा. मुळ प्रजेसि वाकुडेपण न घेता, गोडीने कार्यभाग साधावा. आपुल्या जिव्हेवरि साखर पेरली आहेच, योग्य तो वापर करोन प्रांति भेद करावा...'वेदिके'च्या आंगणि मिपाधर्माचे रोपटे जपावे. गनिम मोठा कावेबाज आहे, आपण तुर्त थोड्या अडचणित आहा, चिंता न करावी, योग्य काळ साधून कार्य पुढे चालवावे, आपण सुज्ञ आहाच. आणखी काय सांगावे? श्री.रा.रा.सकलवज्रमंडित आनंदयात्रीसाहेबे कृपादृष्टी आपल्यावरि आहे. त्यांसि उदास न करणे ही विनंति. आपला, सरनौबत धमालराव. ("मराठ्याला दिली ओसरी, मराठा हातपाय पसरी")

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 15/04/2008 - 12:15
मिपा स्वराज्याचा दक्षिणेत विस्तार होणे ही तर 'श्रीं'चीच इच्छा ! बंगळुरदेशी सरदार डानराव यांजकरुन मोठा पराक्रम होणे हे नियतीनेच योजिले आहे, निश्चिंत राहुन कार्यभाग बहुत खुबीने साधावा, काही कमीजास्त असल्यास, काही मते-मतांतरे असल्यात सरनौबत धमालरावांबरोबर खलबते करुन योग्य तो निर्णय घ्यावा, बाकी आई भवानीचा आशिर्वाद आहेच. आपला, थोरला आनंदराव पेशवा ("भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी")

विजुभाऊ 16/04/2008 - 20:19
"माझे चुकले असे आता वाटते. मी पुणे कट्ट वृतान्त बखर लिहीली. आता हे सगळे सरदार अशा ऐतिहासीक भाषेतच बोलणार" ऐशी खबर खुद आपल्याच गोटातुन येवों लागली.खुद पेशव्यांचे कबील्यात थोरले आनन्द्राव ऐशा नामाने कोण्ही घुसखोरी केली. पेशव्यांस हे नवे नाही. त्या तोतया सदाशिवरावाची काय गत केली ते सर्व जाणताच. ये देशी पर्माण मर्हाटी ऐशी गर्जना कोण्ही करों नये ऐशी ताकीद खविन्द तात्या साहीब उल उलै मान यांच्या सांगण्यावरोन दीली गेली आहेच्.पण सर्वच सरदार मंडळी जर ऐशा बखरी भाषीतच बोलों लिहों लागली तर आम्हा समान सामान्य रयतेचे हाल. खुद खविन्दाना ये पर्कर्णी लक्ष देणेचे तसदी न पडों ऐसे करणे. मूळ बखरनवीस :विजुभाऊ कलमदाने ( सध्या: हैद्राबाद कर)

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 16/04/2008 - 20:53
आप की बातो से ऐसा लगता है की आप पर मुसीबतोंका पहाड टूट पडा है, आन्दराव जैसे घूसपैठिने आपकी रातोकी निंद हराम की है. उनकी इस जुर्रत का खामीयाजा उनको जरूर भूगतना पडेगा. चाहिये तो आप हमसे "मदद" की उम्मीद रख सकते है. आपका पैगाम मिलतेही ये बंदा अपनी वफादार, कडवी , जवाँमर्द और बहूत सारे सूरमाँसे दुरुस्त फौज आपकी "खातीरदारी" मे रवाना कर देगा. बडी बडी मैदानेजंग, शेरशहा इस फौज के साथ टकराने से खौफ खाते है. अगर आपकी रजामंदी रही तो आजही हम आपना वकील उनकी दरबारमे "आपका पैगाम" पोहचाने के लिये और "माफीनामा मुकर्रर" करने के लिये यहासे रवाना करते है ... आपकी दोस्तानगी के लिया ये बंदा हर वक्त मौजूद रहेगा शेर-ए-बंगरूळिस्तान जलालूद्दिन महमंद -ए- छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 17/04/2008 - 10:58
सरदार डानराव, तुमची हि गुस्ताखी आम्हास अजिबात रुचली नाही, फितुरांची गर्दन मारण्याचा रिवाज आहे स्वराज्यात विसरलात वाटतं ! स्वराज्यात तुमचे स्थान मानाचे, त्यास शोभेल असा पराक्रम करावा. असंगाशी संग प्राणाशी गाठ, गनिमाशी संग धरु नये, हिच विनंती, याउप्पर आपली मर्जी. -थोरला आनंदराव पेशवा

विसोबा खेचर 13/04/2008 - 12:02
"बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला. वा वा! तुमच्या बेंगलोर मिपा ओसरीकरांचे अभिनंदन रे छोट्या डॉना! :) बाय द वे, कट्ट्यापेक्षा ओसरी हा शब्द अधिक छान आहे... या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या... कुठल्या रे? आम्हालाही कळू देत की! :) यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत होण्यासाठी आमच्याही मनापासून शुभेच्छा रे छोट्या डॉना! :) बाय द वे, तात्या, धमाल मुलगा आणि मदनबाण यांच्याही नुकत्याच मिपाच्या ठाणे ओसरीवर गप्पा झाल्या. त्याचे फोटो आणि वृत्तांत लवकरच! :) मिपा धर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा! आपला, (मिसळधर्मी मिसळपावकर) तात्या.

आनंदयात्री 13/04/2008 - 12:25
"मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. शुभेच्छा, काय हवा असेल नसेल तसा रसदीचा पुरवठा करण्यास आम्ही अमात्यांना फर्मावले आहे, तेव्हा तुम्ही निश्चिंत होउन लढावे, मिपाधर्म वाढवावा! काळोख [ आगामी आकर्षण] हे भारिच !! - (उजेडातला) आंद्या

ओसरीवर छान गप्पा झालेल्या दिसत आहेत. ओसरी कट्ट्यापेक्षा आवडली. काळोख [ आगामी आकर्षण] मस्त.. :-) स्वाती

आर्य 14/04/2008 - 09:39
छोट्या डॉना! मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब मजबूत होण्यासाठी आम्हालाही सामिल करुन घ्या सद्या काही दिवसां पासून आम्ही ही बेंगलोर मुक्कामी आहोत. काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...कुठल्या आम्हालाही सांगा आपला (मराठी - दक्षिण भारतातीय) आर्य

स्वयम्भू 14/04/2008 - 12:52
फोटो काढले नाहीत कारण थरथरत्या हाताने कॅमेरा धरवत नव्हता. तरीही प्रतत्न केलेच, पण सगळे फोटो ब्लर येत होते. पुढल्या वेळी आधी फोटो काढायचे ठरवून तो नाद सोडला. माझा व्रुत्तांत लवकरच इथे देईन. आपला, स्वयम्भू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

स्वयंभू 14/04/2008 - 12:54
ही थरथर मित्रांना भेटल्याच्या आनंदाची होती. आपला, स्वयम्भू

धमाल मुलगा 15/04/2008 - 12:01
वा रे भिडू! शाब्बास. लेको पण फोटू टाकायची व्यवस्था करायची रे. आयला, आनंदातिरेकाने तुमचे हात थरथरत असले तरी, तिथली वेटरं काय सगळी लकवा भरलेली होती का काय? घ्यायचे की त्यांच्याकडून फटाफटा फ्लॅश मारुन. :-)) बेष्ट..बेष्ट.
यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
आई भवानीचा आशिर्वाद आहेच पाठीशी. मोठ्या हिकमतीने धर्म वाढवावा, नेटाने कार्य चालवावे, मुळ प्रजेसि तोशिस न पडेल ऐसि बहुत काळजी घेवोन हल्लकल्लोळ माजवावा. मुळ प्रजेसि वाकुडेपण न घेता, गोडीने कार्यभाग साधावा. आपुल्या जिव्हेवरि साखर पेरली आहेच, योग्य तो वापर करोन प्रांति भेद करावा...'वेदिके'च्या आंगणि मिपाधर्माचे रोपटे जपावे. गनिम मोठा कावेबाज आहे, आपण तुर्त थोड्या अडचणित आहा, चिंता न करावी, योग्य काळ साधून कार्य पुढे चालवावे, आपण सुज्ञ आहाच. आणखी काय सांगावे? श्री.रा.रा.सकलवज्रमंडित आनंदयात्रीसाहेबे कृपादृष्टी आपल्यावरि आहे. त्यांसि उदास न करणे ही विनंति. आपला, सरनौबत धमालराव. ("मराठ्याला दिली ओसरी, मराठा हातपाय पसरी")

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 15/04/2008 - 12:15
मिपा स्वराज्याचा दक्षिणेत विस्तार होणे ही तर 'श्रीं'चीच इच्छा ! बंगळुरदेशी सरदार डानराव यांजकरुन मोठा पराक्रम होणे हे नियतीनेच योजिले आहे, निश्चिंत राहुन कार्यभाग बहुत खुबीने साधावा, काही कमीजास्त असल्यास, काही मते-मतांतरे असल्यात सरनौबत धमालरावांबरोबर खलबते करुन योग्य तो निर्णय घ्यावा, बाकी आई भवानीचा आशिर्वाद आहेच. आपला, थोरला आनंदराव पेशवा ("भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी")

विजुभाऊ 16/04/2008 - 20:19
"माझे चुकले असे आता वाटते. मी पुणे कट्ट वृतान्त बखर लिहीली. आता हे सगळे सरदार अशा ऐतिहासीक भाषेतच बोलणार" ऐशी खबर खुद आपल्याच गोटातुन येवों लागली.खुद पेशव्यांचे कबील्यात थोरले आनन्द्राव ऐशा नामाने कोण्ही घुसखोरी केली. पेशव्यांस हे नवे नाही. त्या तोतया सदाशिवरावाची काय गत केली ते सर्व जाणताच. ये देशी पर्माण मर्हाटी ऐशी गर्जना कोण्ही करों नये ऐशी ताकीद खविन्द तात्या साहीब उल उलै मान यांच्या सांगण्यावरोन दीली गेली आहेच्.पण सर्वच सरदार मंडळी जर ऐशा बखरी भाषीतच बोलों लिहों लागली तर आम्हा समान सामान्य रयतेचे हाल. खुद खविन्दाना ये पर्कर्णी लक्ष देणेचे तसदी न पडों ऐसे करणे. मूळ बखरनवीस :विजुभाऊ कलमदाने ( सध्या: हैद्राबाद कर)

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 16/04/2008 - 20:53
आप की बातो से ऐसा लगता है की आप पर मुसीबतोंका पहाड टूट पडा है, आन्दराव जैसे घूसपैठिने आपकी रातोकी निंद हराम की है. उनकी इस जुर्रत का खामीयाजा उनको जरूर भूगतना पडेगा. चाहिये तो आप हमसे "मदद" की उम्मीद रख सकते है. आपका पैगाम मिलतेही ये बंदा अपनी वफादार, कडवी , जवाँमर्द और बहूत सारे सूरमाँसे दुरुस्त फौज आपकी "खातीरदारी" मे रवाना कर देगा. बडी बडी मैदानेजंग, शेरशहा इस फौज के साथ टकराने से खौफ खाते है. अगर आपकी रजामंदी रही तो आजही हम आपना वकील उनकी दरबारमे "आपका पैगाम" पोहचाने के लिये और "माफीनामा मुकर्रर" करने के लिये यहासे रवाना करते है ... आपकी दोस्तानगी के लिया ये बंदा हर वक्त मौजूद रहेगा शेर-ए-बंगरूळिस्तान जलालूद्दिन महमंद -ए- छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 17/04/2008 - 10:58
सरदार डानराव, तुमची हि गुस्ताखी आम्हास अजिबात रुचली नाही, फितुरांची गर्दन मारण्याचा रिवाज आहे स्वराज्यात विसरलात वाटतं ! स्वराज्यात तुमचे स्थान मानाचे, त्यास शोभेल असा पराक्रम करावा. असंगाशी संग प्राणाशी गाठ, गनिमाशी संग धरु नये, हिच विनंती, याउप्पर आपली मर्जी. -थोरला आनंदराव पेशवा
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल दि. १२ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत "बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला. आधी प्रोग्रॅमचा जास्त गाजावाजा न करता तो घेण्याचे ठरवून काल तो यशस्वी झाला. कार्यक्रमास सर्वश्री " अबब, स्वयंभू , छोटा डॉन तसेच काळोख [ आगामी आकर्षण] " उपस्थीत होते. या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या... यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.

दु:खद निधन

डॉ.प्रसाद दाढे ·

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:16
वाचून खूप वाईट वाटलं दाढेसाहेब! अजून काय लिहू? ही अशी गुणी माणसं पुन्हा होणार नाहीत! साला, गाण्याच्या गणगोतातलं कुणी गेल्याचं कळलं की खूप त्रास होतो. रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात ही नाती! तात्या.

प्रमोद देव 13/04/2008 - 11:25
दशरथ पुजारी नावाचा संगीताचा पुजारी आपल्यातून निघून गेल्यामुळे गाण्यातला गोडवाच हरपलाय असे मला वाटते. 'अशीच अमुची आई असती ' हे त्यांचे गाणे, माझे अत्यंत आवडते गाणे होते. त्याशिवाय 'अजून त्या झुडपांच्या मागे,हरी भजनाविण काळ घालवू नको रे ' अशी कितीतरी सुमधुर गाणी त्यांच्या गळ्यातून ऐकलेली आहेत. माझ्या आवडत्या संगीतकार आणि गायकांपैकी अजून एक बूजुर्ग व्यक्ती आपल्यातून निघून गेलेय. आता उरल्या फक्त आठवणी. :( पुजारी साहेबांना माझी विनम्र आदरांजली. त्यासंबंधीची बातमी येथे पाहा. अवांतरः गेल्याच महिन्यात माझे असेच एक परिचित आणि आवडते गायक आणि संगीतकार श्री. भूमानंद बोगम ह्यांचेही निधन झाले होते. त्यांनाही माझी आदरांजली. बहुधा स्वर्गात एखादे संगीत संमेलन असावे आणि त्यासाठी ह्या लोकांना पाचारण केले असावे अशी एक कल्पना मनाला चाटून गेली. ह्या सर्वांच्या जाण्याने माझे ते बालपणातील एकेक संगीत सुर हरवायला लागलेत. :( मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आनंद घारे 13/04/2008 - 11:55
आज सकाळच्याच वर्तमानपत्रात त्यांना चतुरंग संगीत सन्मान जाहीर करण्यात आल्याचे वृत्त होते आणि त्याच्या बाजूलाच ते अत्यवस्थ असल्याची बातमी होती. मृत्यू येण्यापूर्वी त्यांना या पुरस्काराबद्दल कळले तरी होते की नाही ते ठाऊक नाही. हा सन्मान थोडे दिवस आधी मिळाला असता तर....? त्यांची गाणी इतकी सुमधुर आहेत की त्यांना अशा औपचारिक शिक्क्याची गरज नव्हतीच, पण अशा देण्याने त्या सन्मानालाही सन्मान मिळतो!

या थोर संगीतकाराला माझीही श्रद्धांजली. त्यांनी संगीतबद्ध केलेली माझी काही आवडीची गाणी ...... क्षणभर उघड नयन देवा वारयावरती घेत लकेरी सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो या लाडक्या मुलांनो मृदुल करांनी छेडित तारा रे क्षणाच्या संगतीने मस्त ही हवा नभी, वाटते नवे नवे नंदाघरी नंदनवन फुलले भाग्य उजळले तुझे चरण पाहिले निरोप तुज देता, उर्मिला मी रिमझिम झरती श्रावणधारा ते नयन बोलले काहीतरी जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले अजून त्या झुडुपांच्या मागे सुमन कल्याणपूरसारख्या अतिशय गुणी गायिकेचा वापर दशरथ पुजारींयेवढा सातत्याने इतर कोणत्याही संगीतकाराने बहुधा केला नसावा. या कल्पक संगीतकाराला पुन्हा एकदा सलाम. दशरथ पुजारीसाहेबांच्या गाण्यांची संपूर्ण सूची कोणाकडे उपलब्ध असल्यास सगळ्यांशी शेअर करावी

विदेश 13/04/2008 - 13:05
सुमन कल्याणपूर आणि भावगीतातील गोडवा यांनी -दूरदर्शन नसताना- आकाशवाणीद्वारे आमचे कान खरेच श्रवणीय झाले होते. प्रमोदकाकांप्रमाणेच अनेकांच्या बालपणातील संगीताचे सूर हरवत आहेत.

अविनाश ओगले 13/04/2008 - 13:36
गाण्याच्या गणगोतातलं कुणी गेल्याचं कळलं की खूप त्रास होतो. रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात ही नाती! सहमत. दशरथ पुजारीसाहेबांच्या गाण्यांची संपूर्ण सूची कोणाकडे उपलब्ध असल्यास सगळ्यांशी शेअर करावी इथे बर्‍याच गीतांची यादी आहे. दशरथ पुजारी यांना श्रद्धांजली.

दुव्याबद्दल धन्यवाद अविनाश. या संकेतस्थळाला मी नेहेमीच भेट देतो. पण जशी काही संगीतकारांची संपूर्ण Discography उपलब्ध असल्याचं स्मरतंय तशी पुजारीसाहेबांची संपूर्ण कारकीर्दीतली गाणी इसवीसनानुसार मिळाली तर उत्तम. पुजारीसाहेबांवर एखादं चरित्रात्मक पुस्तक असल्याचं आठवतंय का कोणाला ?

In reply to by विवेक काजरेकर

केशवराव 13/04/2008 - 23:30
विवेक काजरेकर यांसी........ दशरथ पुजारी यांचे ' अजुन त्या झुडुपांच्या मागे ' या नांवाचे आत्मचरीत्र आहे. [पुजारींचा भक्त...] केशवराव.

केशवराव 13/04/2008 - 16:52
दशरथ पुजारी गेले. आणखी एक तारा निखळला. नॉस्टॅलजिक व्हायचे नाही असे म्हटले तरी कसे शक्य आहे? आमच्या भाव विश्वातला एक एक दुवा असा तुटायला लागला तर कसे व्हायचे? जुन्या तबकड्याच ऐकत बसायचे का? पुजारी साहेबांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची नांवे कुठे एकत्र मिळतील का? ईश्वर त्यांना सद्गती देवो. पुजार्यांचा भक्त...... केशवराव.

पुजारी साहेबा॑च्या काही आठवणी.. त्या॑ना पाहताच 'साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी' हीच म्हण कुणाच्याही मनात आली असती. एव्हढे अन्याय होऊनसुद्धा त्या॑च्या वाणीत कटूता कधीच नव्हती. उलट जुन्या काळातल्या ग॑मती-किस्से ते र॑गवून सा॑गत असत. त्या॑नीच मला सा॑गितलेली एक गोष्ट- एकदा ते रेडिओस्टुडिओमध्ये गेले असता त्या॑ना तेथे रफीसाहेब हातात वही घेऊन एका मराठी गाण्याचा सराव करता॑ना दिसले. पुजारीसाहेबा॑नी त्या॑ना आश्चर्या॑ने विचारले की 'तुम्ही आणि मराठी गाणे.. हे कसे?' त्यावर रफीसाहेब त्या॑ना मिष्किलपणे पण दबक्या आवाजात म्हणाले, 'अब क्या करे॑, उस श्रीका॑त ठाकरेने मुझे धमकी दी है॑ कि रफी तुम इतने सा॑ल बम्बईमे॑ होकरभी एकभी मराठी गाना नहि॑ गाया? ये नहि चलेगा..आज तो तुझे मराठी गाना गानाही पडेगा..' 'एकदम सही बात है॑' असे पुजारीसाहेबा॑नी म्हणून ठाकरे॑चे ह्या कल्पनेबद्दल अभिन॑दन केले आणि मग 'प्रभू तू दयाळूचे' रेकॉर्डी॑ग सुरू झाले.. पुजारीसाहेब अनेक वर्षे॑ गिरगावात राहात होते. पुढे डो॑बिवलीत आल्यावर आमचे व त्या॑चे कौटू॑बिक स॑ब॑ध जुळले. पण पूर्वीपासूनच त्या॑च्या गाण्या॑चा व आमचा एक वेगळाच भावनिक ब॑ध होता.साधारणपणे अडुसष्ट-एकोणसत्तरच्या सालच्या आसपास दशरथ पुजारी या॑चे 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' हे गाणे आकाशवाणीवर खूप गाजले होते. माझ्या आई-वडिला॑ना ते गाणे एव्हढे आवडले होते की त्या॑नी आपल्या प्रथम कन्येचे नाव 'मृदुला' असे ठेवले. आणि योगायोग असा की पुजारीसाहेबा॑नी आपला गाण्या॑चा अखेरचा अल्बम (शब्द जरी होते माझे) तिच्याच आवाजात काढला..

In reply to by प्रमोद देव

गेले काही वर्षे मी पुण्यात असल्यामुळे मला गुरू॑चे (स्व.पुजारीसाहेब) दर्शन खूप दिवसा॑त घडले नाही. पण आता मात्र जिवास चुटपुट लागून राहिली आहे. मी त्या॑च्याकडे हार्मोनियम शिकण्यास जात असे. (१९९६ ते ९८) त्या॑ची हार्मोनियमवर इतकी हुकूमत होती की ऐकणारा केवळ स्तिमित होत असे. ते पेटी गायकी ढ॑गाने फार नजाकतीने वाजवित असत. भावगीत गायक व स॑गीतकार असले तरी त्या॑चा हि॑दूस्थानी शास्त्रीय स॑गीताचा सखोल अभ्यास होता. मला ताल धरायला सा॑गून ते पेटीवर एखादा राग वाजवित तेव्हा कधी कधी असे वाटे की आता सम चुकणार, पण वीज कोसळावी तसे ते समेला पोहोचत आणि ऐकणार्‍या॑च्या तो॑डून वाहवा येत असे. तालाशी खेळणे त्या॑ना खूप आवडायचे; ती त्या॑च्या गुरू॑ची त्या॑ना देणगी होती. एका खाजगी मैफिलीत तर त्या॑नी प॑.चिमोटे॑वर देखील मात केली होती. तथापि प॑. चिमोटे॑बद्दल त्या॑ना खूप आदरही होता. चिमोटेच काय, बाबूजी, खळेसाहेब, वस॑त प्रभू, विश्वनाथ मोरे॑सारख्या आपल्या समवयस्क स॑गीतकारा॑बद्दलही ते निता॑त आदराने बोलत असत. (हेही त्या॑च्याकडून शिकण्यासारखे होते) त्या॑चा आणखी एक अज्ञात पैलु म्हणजे कुस्ती व व्यायामाची आवड. लहानपणी आखाड्यात डावपेच शिकल्याचे ते सा॑गत व मिष्कीलपणे मलाही व्यायाम करण्याचा सल्ला देत. त्या॑चा ज्योतिषशास्त्रावरही बराच विश्वास होता व अभ्यासही होता. माझ्या कॉलेज शिक्षणामुळे न॑तर मला त्या॑च्याकडून खूप शिकता आले नाही याचे वैषम्य आयुष्यभर राहिल पण त्या॑च्यासारख्या दिग्गज स॑गीतकाराचा काही काळ सहवास आणि गुरूकृपा लाभली याचे समाधानही वाटेल..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

दाढेसाहेब, क्षमा करा, एक चुकीची दुरुस्ती सुचवावीशी वाटते आहे. तुम्ही वर "मृदुल स्वरांनी छेडित तारा" असा दोनदा उल्लेख केला आहे. पण ते गाणं "मृदुल करांनी छेडित तारा" असं आहे.

चतुरंग 13/04/2008 - 21:10
पडद्याआड गेली की काळजात कळ येते! एक निश्चित की संगीत अमर आहे आणि चांगल्या गोष्टींचा ओघ ह्या ना त्या मार्गाने पुढे चालू रहातोच रहातो. तसा तो राहो ही सदिच्छा. दशरथ पुजारींना भावपूर्ण श्रध्दांजली. चतुरंग

ऋषिकेश 13/04/2008 - 21:27
आता मिपावर वाचलं.. वाईट वाटलं.. :( दशरथ पुजारींना विनम्र श्रध्दांजली. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत 13/04/2008 - 21:35
त्यांच्या गाण्यांशी असंख्य आठवणी निगडीत आहेत. कुणीतरी घरातले गेल्यासारखे वाटते आहे. आजीच्या पांघरूणात, मामाच्या कडेवर असताना, शेजार्‍यांकडे खेळताना , कळत-नकळत त्यांनी केलेली गाणी कानावर पडत राहिली ; अंतर्मनात कायमची वसतीस्थानी आली. आज ते गेले तरी त्यांच्या गाण्यांच्या स्मृती आहेत. त्यांनी गाण्यांवाटे दिलेल्या आनंदाचे, लहानपणाच्या आठवणींना आपल्या स्वरांनी सुगंधित केल्याचे ऋण कायमचे राहील.

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:16
वाचून खूप वाईट वाटलं दाढेसाहेब! अजून काय लिहू? ही अशी गुणी माणसं पुन्हा होणार नाहीत! साला, गाण्याच्या गणगोतातलं कुणी गेल्याचं कळलं की खूप त्रास होतो. रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात ही नाती! तात्या.

प्रमोद देव 13/04/2008 - 11:25
दशरथ पुजारी नावाचा संगीताचा पुजारी आपल्यातून निघून गेल्यामुळे गाण्यातला गोडवाच हरपलाय असे मला वाटते. 'अशीच अमुची आई असती ' हे त्यांचे गाणे, माझे अत्यंत आवडते गाणे होते. त्याशिवाय 'अजून त्या झुडपांच्या मागे,हरी भजनाविण काळ घालवू नको रे ' अशी कितीतरी सुमधुर गाणी त्यांच्या गळ्यातून ऐकलेली आहेत. माझ्या आवडत्या संगीतकार आणि गायकांपैकी अजून एक बूजुर्ग व्यक्ती आपल्यातून निघून गेलेय. आता उरल्या फक्त आठवणी. :( पुजारी साहेबांना माझी विनम्र आदरांजली. त्यासंबंधीची बातमी येथे पाहा. अवांतरः गेल्याच महिन्यात माझे असेच एक परिचित आणि आवडते गायक आणि संगीतकार श्री. भूमानंद बोगम ह्यांचेही निधन झाले होते. त्यांनाही माझी आदरांजली. बहुधा स्वर्गात एखादे संगीत संमेलन असावे आणि त्यासाठी ह्या लोकांना पाचारण केले असावे अशी एक कल्पना मनाला चाटून गेली. ह्या सर्वांच्या जाण्याने माझे ते बालपणातील एकेक संगीत सुर हरवायला लागलेत. :( मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आनंद घारे 13/04/2008 - 11:55
आज सकाळच्याच वर्तमानपत्रात त्यांना चतुरंग संगीत सन्मान जाहीर करण्यात आल्याचे वृत्त होते आणि त्याच्या बाजूलाच ते अत्यवस्थ असल्याची बातमी होती. मृत्यू येण्यापूर्वी त्यांना या पुरस्काराबद्दल कळले तरी होते की नाही ते ठाऊक नाही. हा सन्मान थोडे दिवस आधी मिळाला असता तर....? त्यांची गाणी इतकी सुमधुर आहेत की त्यांना अशा औपचारिक शिक्क्याची गरज नव्हतीच, पण अशा देण्याने त्या सन्मानालाही सन्मान मिळतो!

या थोर संगीतकाराला माझीही श्रद्धांजली. त्यांनी संगीतबद्ध केलेली माझी काही आवडीची गाणी ...... क्षणभर उघड नयन देवा वारयावरती घेत लकेरी सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो या लाडक्या मुलांनो मृदुल करांनी छेडित तारा रे क्षणाच्या संगतीने मस्त ही हवा नभी, वाटते नवे नवे नंदाघरी नंदनवन फुलले भाग्य उजळले तुझे चरण पाहिले निरोप तुज देता, उर्मिला मी रिमझिम झरती श्रावणधारा ते नयन बोलले काहीतरी जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले अजून त्या झुडुपांच्या मागे सुमन कल्याणपूरसारख्या अतिशय गुणी गायिकेचा वापर दशरथ पुजारींयेवढा सातत्याने इतर कोणत्याही संगीतकाराने बहुधा केला नसावा. या कल्पक संगीतकाराला पुन्हा एकदा सलाम. दशरथ पुजारीसाहेबांच्या गाण्यांची संपूर्ण सूची कोणाकडे उपलब्ध असल्यास सगळ्यांशी शेअर करावी

विदेश 13/04/2008 - 13:05
सुमन कल्याणपूर आणि भावगीतातील गोडवा यांनी -दूरदर्शन नसताना- आकाशवाणीद्वारे आमचे कान खरेच श्रवणीय झाले होते. प्रमोदकाकांप्रमाणेच अनेकांच्या बालपणातील संगीताचे सूर हरवत आहेत.

अविनाश ओगले 13/04/2008 - 13:36
गाण्याच्या गणगोतातलं कुणी गेल्याचं कळलं की खूप त्रास होतो. रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात ही नाती! सहमत. दशरथ पुजारीसाहेबांच्या गाण्यांची संपूर्ण सूची कोणाकडे उपलब्ध असल्यास सगळ्यांशी शेअर करावी इथे बर्‍याच गीतांची यादी आहे. दशरथ पुजारी यांना श्रद्धांजली.

दुव्याबद्दल धन्यवाद अविनाश. या संकेतस्थळाला मी नेहेमीच भेट देतो. पण जशी काही संगीतकारांची संपूर्ण Discography उपलब्ध असल्याचं स्मरतंय तशी पुजारीसाहेबांची संपूर्ण कारकीर्दीतली गाणी इसवीसनानुसार मिळाली तर उत्तम. पुजारीसाहेबांवर एखादं चरित्रात्मक पुस्तक असल्याचं आठवतंय का कोणाला ?

In reply to by विवेक काजरेकर

केशवराव 13/04/2008 - 23:30
विवेक काजरेकर यांसी........ दशरथ पुजारी यांचे ' अजुन त्या झुडुपांच्या मागे ' या नांवाचे आत्मचरीत्र आहे. [पुजारींचा भक्त...] केशवराव.

केशवराव 13/04/2008 - 16:52
दशरथ पुजारी गेले. आणखी एक तारा निखळला. नॉस्टॅलजिक व्हायचे नाही असे म्हटले तरी कसे शक्य आहे? आमच्या भाव विश्वातला एक एक दुवा असा तुटायला लागला तर कसे व्हायचे? जुन्या तबकड्याच ऐकत बसायचे का? पुजारी साहेबांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची नांवे कुठे एकत्र मिळतील का? ईश्वर त्यांना सद्गती देवो. पुजार्यांचा भक्त...... केशवराव.

पुजारी साहेबा॑च्या काही आठवणी.. त्या॑ना पाहताच 'साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी' हीच म्हण कुणाच्याही मनात आली असती. एव्हढे अन्याय होऊनसुद्धा त्या॑च्या वाणीत कटूता कधीच नव्हती. उलट जुन्या काळातल्या ग॑मती-किस्से ते र॑गवून सा॑गत असत. त्या॑नीच मला सा॑गितलेली एक गोष्ट- एकदा ते रेडिओस्टुडिओमध्ये गेले असता त्या॑ना तेथे रफीसाहेब हातात वही घेऊन एका मराठी गाण्याचा सराव करता॑ना दिसले. पुजारीसाहेबा॑नी त्या॑ना आश्चर्या॑ने विचारले की 'तुम्ही आणि मराठी गाणे.. हे कसे?' त्यावर रफीसाहेब त्या॑ना मिष्किलपणे पण दबक्या आवाजात म्हणाले, 'अब क्या करे॑, उस श्रीका॑त ठाकरेने मुझे धमकी दी है॑ कि रफी तुम इतने सा॑ल बम्बईमे॑ होकरभी एकभी मराठी गाना नहि॑ गाया? ये नहि चलेगा..आज तो तुझे मराठी गाना गानाही पडेगा..' 'एकदम सही बात है॑' असे पुजारीसाहेबा॑नी म्हणून ठाकरे॑चे ह्या कल्पनेबद्दल अभिन॑दन केले आणि मग 'प्रभू तू दयाळूचे' रेकॉर्डी॑ग सुरू झाले.. पुजारीसाहेब अनेक वर्षे॑ गिरगावात राहात होते. पुढे डो॑बिवलीत आल्यावर आमचे व त्या॑चे कौटू॑बिक स॑ब॑ध जुळले. पण पूर्वीपासूनच त्या॑च्या गाण्या॑चा व आमचा एक वेगळाच भावनिक ब॑ध होता.साधारणपणे अडुसष्ट-एकोणसत्तरच्या सालच्या आसपास दशरथ पुजारी या॑चे 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' हे गाणे आकाशवाणीवर खूप गाजले होते. माझ्या आई-वडिला॑ना ते गाणे एव्हढे आवडले होते की त्या॑नी आपल्या प्रथम कन्येचे नाव 'मृदुला' असे ठेवले. आणि योगायोग असा की पुजारीसाहेबा॑नी आपला गाण्या॑चा अखेरचा अल्बम (शब्द जरी होते माझे) तिच्याच आवाजात काढला..

In reply to by प्रमोद देव

गेले काही वर्षे मी पुण्यात असल्यामुळे मला गुरू॑चे (स्व.पुजारीसाहेब) दर्शन खूप दिवसा॑त घडले नाही. पण आता मात्र जिवास चुटपुट लागून राहिली आहे. मी त्या॑च्याकडे हार्मोनियम शिकण्यास जात असे. (१९९६ ते ९८) त्या॑ची हार्मोनियमवर इतकी हुकूमत होती की ऐकणारा केवळ स्तिमित होत असे. ते पेटी गायकी ढ॑गाने फार नजाकतीने वाजवित असत. भावगीत गायक व स॑गीतकार असले तरी त्या॑चा हि॑दूस्थानी शास्त्रीय स॑गीताचा सखोल अभ्यास होता. मला ताल धरायला सा॑गून ते पेटीवर एखादा राग वाजवित तेव्हा कधी कधी असे वाटे की आता सम चुकणार, पण वीज कोसळावी तसे ते समेला पोहोचत आणि ऐकणार्‍या॑च्या तो॑डून वाहवा येत असे. तालाशी खेळणे त्या॑ना खूप आवडायचे; ती त्या॑च्या गुरू॑ची त्या॑ना देणगी होती. एका खाजगी मैफिलीत तर त्या॑नी प॑.चिमोटे॑वर देखील मात केली होती. तथापि प॑. चिमोटे॑बद्दल त्या॑ना खूप आदरही होता. चिमोटेच काय, बाबूजी, खळेसाहेब, वस॑त प्रभू, विश्वनाथ मोरे॑सारख्या आपल्या समवयस्क स॑गीतकारा॑बद्दलही ते निता॑त आदराने बोलत असत. (हेही त्या॑च्याकडून शिकण्यासारखे होते) त्या॑चा आणखी एक अज्ञात पैलु म्हणजे कुस्ती व व्यायामाची आवड. लहानपणी आखाड्यात डावपेच शिकल्याचे ते सा॑गत व मिष्कीलपणे मलाही व्यायाम करण्याचा सल्ला देत. त्या॑चा ज्योतिषशास्त्रावरही बराच विश्वास होता व अभ्यासही होता. माझ्या कॉलेज शिक्षणामुळे न॑तर मला त्या॑च्याकडून खूप शिकता आले नाही याचे वैषम्य आयुष्यभर राहिल पण त्या॑च्यासारख्या दिग्गज स॑गीतकाराचा काही काळ सहवास आणि गुरूकृपा लाभली याचे समाधानही वाटेल..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

दाढेसाहेब, क्षमा करा, एक चुकीची दुरुस्ती सुचवावीशी वाटते आहे. तुम्ही वर "मृदुल स्वरांनी छेडित तारा" असा दोनदा उल्लेख केला आहे. पण ते गाणं "मृदुल करांनी छेडित तारा" असं आहे.

चतुरंग 13/04/2008 - 21:10
पडद्याआड गेली की काळजात कळ येते! एक निश्चित की संगीत अमर आहे आणि चांगल्या गोष्टींचा ओघ ह्या ना त्या मार्गाने पुढे चालू रहातोच रहातो. तसा तो राहो ही सदिच्छा. दशरथ पुजारींना भावपूर्ण श्रध्दांजली. चतुरंग

ऋषिकेश 13/04/2008 - 21:27
आता मिपावर वाचलं.. वाईट वाटलं.. :( दशरथ पुजारींना विनम्र श्रध्दांजली. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत 13/04/2008 - 21:35
त्यांच्या गाण्यांशी असंख्य आठवणी निगडीत आहेत. कुणीतरी घरातले गेल्यासारखे वाटते आहे. आजीच्या पांघरूणात, मामाच्या कडेवर असताना, शेजार्‍यांकडे खेळताना , कळत-नकळत त्यांनी केलेली गाणी कानावर पडत राहिली ; अंतर्मनात कायमची वसतीस्थानी आली. आज ते गेले तरी त्यांच्या गाण्यांच्या स्मृती आहेत. त्यांनी गाण्यांवाटे दिलेल्या आनंदाचे, लहानपणाच्या आठवणींना आपल्या स्वरांनी सुगंधित केल्याचे ऋण कायमचे राहील.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रसिद्ध स॑गीतकार श्री. दशरथ पुजारी या॑चे काल डो॑बिवली येथे कर्करोगाने देहावसान झाले. पुजारीसाहेबा॑चे नाव घेतले की आठवितात त्या॑नी निर्मिलेली साधी-सोपी, पण अवीट गोडीची भावगीत॑ आणि सात्विक वृत्तीची भक्तिगीत॑. त्या॑च्या गाण्याशिवाय आकाशवाणीचा तर दिवस जात नसेल. पुजारीसाहेबा॑नी स॑गीत दिलेली सुमन कल्याणपुरा॑च्या सुमधूर आवाजातील किती तरी गीत॑ रसिका॑ना आठवत असतील. 'रिम झीम करती श्रावण धारा' 'गरजत आले वारे' 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' ' अजुन त्या झुडुपा॑च्या मागे' यासारखी एक से एक सरस भावगीते आजही मनास व्याकूळ करतात. सकाळी आकाशवाणीवर 'केशवा माधवा' 'देव माझा विठू सावळा' 'हरि भजनाविण काळ' इ.

विसरणे - हसु आणि आसु

शितल ·

इनोबा म्हणे 13/04/2008 - 02:06
एखादे दिवस तुम्हालाच विसरायचे. लक्ष ठेवा. माझी आईही मला माझ्या विसरण्याच्या सवयीमुळे 'विसराळू विनू' म्हणते. मात्र तुमच्या 'हे' एवढा विसराळू नाही हा मी. लवकर आवरता घेतला आहे असे वाटते,आणखी बरेच काही लिहीता आले असते. असो. पुढील लेखनाकरिता शुभेच्छा! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

व्यंकट 13/04/2008 - 03:42
व्यक्तीचित्रण करायला तुमच्या अगदी जवळच एक चांगली वल्ली आहे म्हणजे, लेखनाकरीता शुभेच्छा!! व्यंकट

विसोबा खेचर 13/04/2008 - 09:17
तसे किस्से खुप आहेत, येऊ द्या अजूनही! ;) पण मला त्याच्या बरोबर रहाचे आहे ना ! राहा राहा, त्यांच्या बरोबरच राहा बरं! विसराळू माणसं तशी स्वभावाने खूप भली असतात. तेव्हा अश्या भल्या माणसाला सोडून न जाता त्याच्यासोबतच राहा आणि त्याची काळजी घ्या! ;) आपला, (कुणाही सोबत न राहणारा) तात्या.

विजुभाऊ 13/04/2008 - 19:50
माझा मित्र त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो आणि त्याची बायको मला रस्त्यात फिरताना भेटले. दोघांशी गप्पा मारत असताना मित्राला कोणीतरी त्याच्या ऑफिसातला भेटला. तो रस्त्याच्या पलिकदे त्याच्याशी बोलायला गेला. थोड्या वेळाने तो त्या माणसाबरोबर गेला. मित्राची बायको माझ्याशी बोलत होती . आमचे जरा लक्ष नव्हते तेवढ्यात तो मित्र कोठेतरी गायब झाला. थोड्या वेळाने मित्राच्या बायकोला मी स्कूटर वरुन मित्राच्या घरी सोडायला गेलो. पहातो तर काय हे महाशय घराच्या दारातुनच पत्नीला " मी घरात वाट पहातोय. कोठे गेली होतीस तू?" म्हणुन विचारु लागले. आपण बायकोबरोबर फिरायला गेलो होतो/ कोणीतरी भेटली आणि बायकोला विसरुन आपण तसेच घरी आलो हे या मित्राच्या गावीही नव्हते. त्याच्या बायकोचा चेहेरा मात्र या वेळी फोटो काढण्यासारखा खचितच नव्हता

मस्त आहेत किस्से :)))
अजून येऊ द्या !!!


एकदा सकाळी तर गडबडीत दाढीच्या ब्रशवर टुथ पेस्ट,

असा अनुभव आमच्याही पाठीशी आहे. :)

आपला, प्रा.डॉ. विसरभोळे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 15/04/2008 - 00:01
असा अनुभव आमच्याही 'गालांशी' आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला;)) ह.घ्या. असा अनुभव आम्हाला दातांशी आहे - कारण एकदा चुकून मी टूथब्रशवर शेविंग क्रीम घेतले होते आणि पेस्टची चव कशी बदलली म्हणून शिव्या घातल्या होत्या. नंतर लक्षात आले आणि दिवसभर 'पामोलिव दा जवाब नहीं' म्हणणार्‍या कपिलपाजीं ('जी' वर अनुस्वार दिलेला आहे!;)सारखा दात सारखे बाहेर काढून आरशासमोर जात होतो!;)) चतुरंग

शितल 14/04/2008 - 19:11
मला विसरले तर काही नाही, पण विसरुन दुसरीलाच घेऊन आले तर मग मात्र.....

छान होता लेख.... पटकन आवरता घेतलात....!!!!! अजून ही काही गोष्टी आठवल्या....एका मोठ्या प्रोफेसर कथालेखकाच्या विसरण्याबद्दलच्या गोष्टी आहेत , अर्थात त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या.... ( मला खात्री नाही त्यांच्या नावाबद्दल, म्हणून लिहित नाही..) १. एकदा आंघोळीनन्तर, कमरेला गुंडाळलेल्या टॉवेलवरून पँट चढवून दिवसभर कॉलेजात शिकवून आले.....परत आल्यावर समजले, आज एवढा वेळ असे विचित्र का वाटत होते? २. एकदा बायकोसहित दुचाकीवरून जाताना बाजारात काही कामानिमित्त उतरलेल्या बायकोला विसरून घरी परत आले......

विदेश 15/04/2008 - 09:53
सत्यनारायणाला नमस्कार केला, भटजीबुवाकडून तीर्थ घेऊन प्राशन करून, नेहमीप्रमाणे तळहात डोळ्यांवर फिरवला! क्षणभर सर्व धूसर दिसू लागले-कारण नुकताच लावलेला चष्मा काढायचा विसरलो होतो!स्वत:शीच का हसलो ते कुणाला सांगणार!

धमाल मुलगा 15/04/2008 - 17:07
पुस्तकांच्या कपाटात खिचडीची डिश? खल्लास! जबराच दिसताहेत तुमचे 'अहो' ! वर्णन थोडं-थोडं अस्मादिकांसही लागू पडतं आहे. आनंद वाटला...कोणितरी आपल्यासारखाच आहे हे कळून :-) परवाच्या रविवारी आम्ही घराच्या किल्लीची चेन (की-चेन हो) खेळता खेळता कानाला अडकवली(स्वत:च्या!) आणि बाहेर जाताना आख्खं घर पालथं घातलं...तीच किल्ली शोधत. बाकी तात्या आणि व्यंकटशी सहमत. अशी माणसं मनाने चांगली असतात. (कोण आहे रे तो...माझ्या वरच्या वाक्याचा संदर्भ ह्या वाक्याला जोडू पाहतो आहे? ) राग-बिग आला तरी विसरण्याच्या सवयीमुळे पटकन शांत होत असतील नाही? मस्त व्यक्तिचित्र लिहिता येइल ह्यावर..बघा, सवडीने टाका लिहून! आपला, - .......... एsss अरे माझं नाव काय रे?

इनोबा म्हणे 13/04/2008 - 02:06
एखादे दिवस तुम्हालाच विसरायचे. लक्ष ठेवा. माझी आईही मला माझ्या विसरण्याच्या सवयीमुळे 'विसराळू विनू' म्हणते. मात्र तुमच्या 'हे' एवढा विसराळू नाही हा मी. लवकर आवरता घेतला आहे असे वाटते,आणखी बरेच काही लिहीता आले असते. असो. पुढील लेखनाकरिता शुभेच्छा! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

व्यंकट 13/04/2008 - 03:42
व्यक्तीचित्रण करायला तुमच्या अगदी जवळच एक चांगली वल्ली आहे म्हणजे, लेखनाकरीता शुभेच्छा!! व्यंकट

विसोबा खेचर 13/04/2008 - 09:17
तसे किस्से खुप आहेत, येऊ द्या अजूनही! ;) पण मला त्याच्या बरोबर रहाचे आहे ना ! राहा राहा, त्यांच्या बरोबरच राहा बरं! विसराळू माणसं तशी स्वभावाने खूप भली असतात. तेव्हा अश्या भल्या माणसाला सोडून न जाता त्याच्यासोबतच राहा आणि त्याची काळजी घ्या! ;) आपला, (कुणाही सोबत न राहणारा) तात्या.

विजुभाऊ 13/04/2008 - 19:50
माझा मित्र त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो आणि त्याची बायको मला रस्त्यात फिरताना भेटले. दोघांशी गप्पा मारत असताना मित्राला कोणीतरी त्याच्या ऑफिसातला भेटला. तो रस्त्याच्या पलिकदे त्याच्याशी बोलायला गेला. थोड्या वेळाने तो त्या माणसाबरोबर गेला. मित्राची बायको माझ्याशी बोलत होती . आमचे जरा लक्ष नव्हते तेवढ्यात तो मित्र कोठेतरी गायब झाला. थोड्या वेळाने मित्राच्या बायकोला मी स्कूटर वरुन मित्राच्या घरी सोडायला गेलो. पहातो तर काय हे महाशय घराच्या दारातुनच पत्नीला " मी घरात वाट पहातोय. कोठे गेली होतीस तू?" म्हणुन विचारु लागले. आपण बायकोबरोबर फिरायला गेलो होतो/ कोणीतरी भेटली आणि बायकोला विसरुन आपण तसेच घरी आलो हे या मित्राच्या गावीही नव्हते. त्याच्या बायकोचा चेहेरा मात्र या वेळी फोटो काढण्यासारखा खचितच नव्हता

मस्त आहेत किस्से :)))
अजून येऊ द्या !!!


एकदा सकाळी तर गडबडीत दाढीच्या ब्रशवर टुथ पेस्ट,

असा अनुभव आमच्याही पाठीशी आहे. :)

आपला, प्रा.डॉ. विसरभोळे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 15/04/2008 - 00:01
असा अनुभव आमच्याही 'गालांशी' आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला;)) ह.घ्या. असा अनुभव आम्हाला दातांशी आहे - कारण एकदा चुकून मी टूथब्रशवर शेविंग क्रीम घेतले होते आणि पेस्टची चव कशी बदलली म्हणून शिव्या घातल्या होत्या. नंतर लक्षात आले आणि दिवसभर 'पामोलिव दा जवाब नहीं' म्हणणार्‍या कपिलपाजीं ('जी' वर अनुस्वार दिलेला आहे!;)सारखा दात सारखे बाहेर काढून आरशासमोर जात होतो!;)) चतुरंग

शितल 14/04/2008 - 19:11
मला विसरले तर काही नाही, पण विसरुन दुसरीलाच घेऊन आले तर मग मात्र.....

छान होता लेख.... पटकन आवरता घेतलात....!!!!! अजून ही काही गोष्टी आठवल्या....एका मोठ्या प्रोफेसर कथालेखकाच्या विसरण्याबद्दलच्या गोष्टी आहेत , अर्थात त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या.... ( मला खात्री नाही त्यांच्या नावाबद्दल, म्हणून लिहित नाही..) १. एकदा आंघोळीनन्तर, कमरेला गुंडाळलेल्या टॉवेलवरून पँट चढवून दिवसभर कॉलेजात शिकवून आले.....परत आल्यावर समजले, आज एवढा वेळ असे विचित्र का वाटत होते? २. एकदा बायकोसहित दुचाकीवरून जाताना बाजारात काही कामानिमित्त उतरलेल्या बायकोला विसरून घरी परत आले......

विदेश 15/04/2008 - 09:53
सत्यनारायणाला नमस्कार केला, भटजीबुवाकडून तीर्थ घेऊन प्राशन करून, नेहमीप्रमाणे तळहात डोळ्यांवर फिरवला! क्षणभर सर्व धूसर दिसू लागले-कारण नुकताच लावलेला चष्मा काढायचा विसरलो होतो!स्वत:शीच का हसलो ते कुणाला सांगणार!

धमाल मुलगा 15/04/2008 - 17:07
पुस्तकांच्या कपाटात खिचडीची डिश? खल्लास! जबराच दिसताहेत तुमचे 'अहो' ! वर्णन थोडं-थोडं अस्मादिकांसही लागू पडतं आहे. आनंद वाटला...कोणितरी आपल्यासारखाच आहे हे कळून :-) परवाच्या रविवारी आम्ही घराच्या किल्लीची चेन (की-चेन हो) खेळता खेळता कानाला अडकवली(स्वत:च्या!) आणि बाहेर जाताना आख्खं घर पालथं घातलं...तीच किल्ली शोधत. बाकी तात्या आणि व्यंकटशी सहमत. अशी माणसं मनाने चांगली असतात. (कोण आहे रे तो...माझ्या वरच्या वाक्याचा संदर्भ ह्या वाक्याला जोडू पाहतो आहे? ) राग-बिग आला तरी विसरण्याच्या सवयीमुळे पटकन शांत होत असतील नाही? मस्त व्यक्तिचित्र लिहिता येइल ह्यावर..बघा, सवडीने टाका लिहून! आपला, - .......... एsss अरे माझं नाव काय रे?
माझ्या अहो॑चा विसरणे हा ३६ गुणा॑पैकी एक गुण. ते कधी आणि काय आणि कसे विसरतील याचा नेम नाही. नविनच लग्न झाल्यावर मी खिचडी केली होती, त्या॑ना डिशमध्ये घालुन दिली , मग मी इतर कामाला लागले, हे मला विचारत आले अग! तु माझी खिचडी खाल्ली का ? मग आम्ही दोघे ही ती खिचडी शोधु लागलो, एकदाची ती पु़स्तका॑च्या कपाट मिळाली. दुसरी गंमत. आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहत होतो, तर हे, त॑द्रीत ४ मजल्यावर गेले आणि बेल कशी दिसत नाही म्हणून मग हसत खाली आले. क॑बरेला मोबाईलचे कव्हर आणि मोबाईल घरी हे तर वरचेवर असायचे.

संडे स्पेशल (मँगो सुफ्ले)

स्वाती राजेश ·

१.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. असे न वाचता काही फोडी तळाला पसराव्यात व बाकीच्या फोडींची प्युरी बनवावी.

१.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. असे न वाचता काही फोडी तळाला पसराव्यात व बाकीच्या फोडींची प्युरी बनवावी.
Taxonomy upgrade extras
विजुभाऊंच्या आंब्याच्या बनात बसून खाण्याकरता :))))))) मँगो सुफ्ले साहित्यः ४ पिकलेले आंबे २ टे.स्पून पाणी १ टे.स्पून जिलेटीन (पावडर) २ अंडी (पिवळे व पांढरे वेगळे करणे) अर्धा कप दुध अर्धा कप साखर दिड कप क्रिम सजावटी साठी वाळलेल्या खोबर्‍याचे थोडे भाजलेले पातळ काप १.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. २.पाण्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.(एका बाऊलमधे पाणी घेऊन त्यात जिलेटीन घालणे.

आजकालचे मराठी चित्रपट

अघळ पघळ ·

अगं बाई अरेच्च्या...... केदार शिन्देने अप्रतिम कॊपी केली होती...फ़ार आवडला सिनेमा.... फ़क्त ओरिजिनल सिनेमाच्या गोष्टीला जे काही मूर्ख उपकथानक ( ते बॉम्ब स्फोट करणार्‍या बाईचे कथानक)जोडले होते ते भयंकर होते... म्हणजे ओरिजिनॅलिटी दाखवली पण आवडली नाहीच.. मात्र जत्रा नावाच्या भयंकर ओरिजिनल कथानकापेक्षा ही कॉपी बरी होती.... वाईट ओरिजिनल पेक्षा बरी कॉपी बरी..... अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत.... .... स्क्रीनप्ले डायलॊग रेडी आहेत.... ... हाय का कोन प्रोडुसर??

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा 15/04/2008 - 12:07
अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत....
जबरान् ! मस्त पिक्चर..आणि मस्त आयडिया. ओ भडकमकर शेठ, मला पण एखादा रोल द्या ना तुमच्या "भंजाळलेला" मध्ये. आपला, (बोलट) ध मा ल.

अगं बाई अरेच्च्या...... केदार शिन्देने अप्रतिम कॊपी केली होती...फ़ार आवडला सिनेमा.... फ़क्त ओरिजिनल सिनेमाच्या गोष्टीला जे काही मूर्ख उपकथानक ( ते बॉम्ब स्फोट करणार्‍या बाईचे कथानक)जोडले होते ते भयंकर होते... म्हणजे ओरिजिनॅलिटी दाखवली पण आवडली नाहीच.. मात्र जत्रा नावाच्या भयंकर ओरिजिनल कथानकापेक्षा ही कॉपी बरी होती.... वाईट ओरिजिनल पेक्षा बरी कॉपी बरी..... अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत.... .... स्क्रीनप्ले डायलॊग रेडी आहेत.... ... हाय का कोन प्रोडुसर??

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा 15/04/2008 - 12:07
अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत....
जबरान् ! मस्त पिक्चर..आणि मस्त आयडिया. ओ भडकमकर शेठ, मला पण एखादा रोल द्या ना तुमच्या "भंजाळलेला" मध्ये. आपला, (बोलट) ध मा ल.
मित्रांनो आजकाल गाजलेल्या इंग्रजी चित्रपटांवर अधारीत (म्हणजेच कॉपी मारलेले) चित्रपट काढायची टूम हिंदीतून मराठीमध्ये पण आली आहे. व्हॉट विमेन वॉन्ट आणि माय कझिन विनी ह्या दोन इंग्रजी चित्रपटांवर आधारीत अग बाई अरेच्च्या आणि कायद्याच बोला हे दोन चित्रपट बरेच गाजले. ह्या नविन लाटेविषयी आपल्याला काय वाटते? मराठी शिणेमांचा दर्जा सुधारण्यासाठी हे गरजेचे आहे का? -अघळ पघळ

आतले आणि बाहेरचे... (२)

नीलकांत ·

दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री 12/04/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय 12/04/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव 12/04/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 12/04/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 13/04/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या 15/04/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण 12/04/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास 12/04/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा 12/04/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत 13/04/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 13/04/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत 13/04/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग 14/04/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना 15/04/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश 15/04/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन 15/04/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल 15/04/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे

दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री 12/04/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय 12/04/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव 12/04/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 12/04/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 13/04/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या 15/04/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण 12/04/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास 12/04/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा 12/04/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत 13/04/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 13/04/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर 13/04/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत 13/04/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग 14/04/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना 15/04/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश 15/04/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन 15/04/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल 15/04/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे
लेखनप्रकार
3

आतले आणि बाहेरचे... (१)

नीलकांत ·

इनोबा म्हणे 12/04/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास 12/04/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय 12/04/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 12/04/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज 12/04/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास 12/04/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई 12/04/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत 13/04/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग 14/04/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी 06/04/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.

इनोबा म्हणे 12/04/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास 12/04/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय 12/04/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री 12/04/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज 12/04/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास 12/04/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई 12/04/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत 13/04/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग 14/04/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी 06/04/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.
लेखनप्रकार
3

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...

भडकमकर मास्तर ·

अभिज्ञ 12/04/2008 - 15:05
आपले दोन्हि लेख फारच सुरेख झाले आहेत. > समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे फारच खास.... असेच फर्मास लेख येउ द्यात...... मि.पा. वरचा एक उत्तम आणि अप्रतिम लेख. अबब.

In reply to by अभिज्ञ

नाट्यसमीक्षक व्हा लेख एकदम झक्कास झाला आहे. समीक्षकाला मस्त ठोकलंय !!! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत .
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विदेश 12/04/2008 - 15:20
पहातो आता- एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून आम्हाला कोण अडवतो ते! (भडकमकर सर, तुमच्या मदतीने -)कमी कष्टात जास्त आदर प्राप्त करतो, जागा झालोच आहे.... प्रचंड झोप आधी काढतो....!

इनोबा म्हणे 12/04/2008 - 17:02
हा शब्दरुपी शिवधनुष्य भडकमकरांना पेलवला नाही असे खेदाने म्हणू इच्छितो. अजिबात आवडला नाही. जमलं का हो? :) लेख मस्तच... चालू दे! भडकमकर गुर्जींचा इद्यार्थी- इनोबा || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

एक 13/04/2008 - 07:24
झकास... अहो गेल्याच नोव्हेंबरला ही सगळी वाक्य ऐकली होती.. तुमच्याच स्कूलचा विद्यार्थी होता का हो? तुमच्या अभ्यासक्रमात थोडा व्यायामाचा पण समावेश करा हां. नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" जबरी लेख आहे.. अजुन एक उ. सू. : शाळेत आद्य टिकाकार म्हणून लखू रिसबूड चा फोटो लावून टाका//

In reply to by एक

नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" ओहो, त्याबद्दल लिहायचे राहिलंच..... कसं असतं, आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ..... त्या साठी मग आम्ही मणिपूरहून मागवलेले खास सेल्फ डिफेन्स स्पेशालिस्ट श्री कुड्कुड जकुंबा यान्चे दोन हात शिकवतो....

In reply to by भडकमकर मास्तर

विद्याधर३१ 13/04/2008 - 19:40
आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ... अशी अवस्था झाल्यानंतर पुढचा आठवडाभर लोकसत्त्तामधून लेख छापून आणावेत.. लोकसत्ता ( सुमार केतकर )या बाबतीत तयार आहेतच... विद्याधर

In reply to by विसोबा खेचर

एकदम मस्त! ;),.....'स्पॉन्सर्ड पंगे' हा शब्द आवडला...:) धन्यवाद तात्या... औरभी आनेदो बॉस.... अजून काही विषय सापडले आहेत , वेळ झाला की लिहिणार आहे....

होतकरू समीक्षक स्_भडक मकर यांनी जेष्ठ समीक्षकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न वरील स्फुटात(?) केला आहे. परंतू या किंचित माधव मनोहरांना हे कळलेले दिसत नाही की नुसते धोतर नेसून चिरूट ओढल्याने माणूस माधव मनोहर होत नसतो. आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात समीक्षकाला आलेले अपयश सतत सलते... देवनागरीत लिहिलेल्या शब्दांचे डबे एकापुढे एक ठेवल्याने अर्थनिर्मिती होत नसते. प्रस्तुत लेखकाच्या लिखाणाला अजिबात खोली नाही. एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया श्री. स्_भडक यांना मुळीच साधलेली नाही...... नुसती पाश्चात्य लेखक/ समीक्षकांची नामावळी टाकून लिखाणाला आशयगर्भता येईल असे लेखकाला वाटते हीच या लेखाची मर्यादा ठरते. हा विदेशी बेदाणे घातलेला देशी चिवडा पहिल्या प्रयत्नातच फसला आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. आम्ही श्री. स्_भडक यांना असा मित्रत्वाचा इशारा देऊ इच्छितो की त्यांनी समीक्षणाच्या वा समीक्षक तयार करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा आपले कौशल्य असलेले दंतवैद्यकी सारखे, लोकांचे खरे दात उपटून त्याजागी खोटे दात लावून त्यांना उल्लू बनवण्याचे व्यवसाय करावेत! डॉ. डांबिसकुमार माहूत संपादक - स्मशान टाईम्स :))) जबरदस्त ह. घ्या.!!

आंबोळी 14/04/2008 - 12:07
आम्ही किन्चित समीक्षक होतो/आहोत. आम्हाला सुरसूरी, तुटणे, बोटे शिवशिवणे हे सगळे होते.... आज पर्यन्त १-२ होतकरू लेखकान्चा आम्ही यशस्वी हिरमोड केलेला आहे. हे बेसिक क्वलिफिकेशन तुमच क्लास जोइन करायला पुरेसे आहे असे वाटते..... तरी पण स्पॊन्सर्ड पंगे,कम्पूगिरि,चक्रम वागणे हे सर्व शिकावेसे वाटते. प्रवेश कधी सुरु होतायत? (समीक्षक) आम्बोळी

सध्या तू प्रस्थापित ढुढ्ढाचार्या॑चे विदाऊट अनेस्थेशिया दात काढायला घेतलेले दिसताहेत :) बाकी तू घेतलेले 'भडकमकर' हे नाव मराठी माणसाला एकदम शोभेसे आहे (इती शिरिष कणेकर):)

धनंजय 14/04/2008 - 19:21
पण आता या लेखाबद्दल दोन शब्द चांगले बोललो. नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले.

In reply to by धनंजय

आपणास मजा आली हे वाचून फारच आनंद वाटला... नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले. हाहाहाहा......:):)..... _______________________ पण आपले आमच्या नाटकावरचे खरे समीक्षणही उत्तमच होते....

शितल 14/04/2008 - 19:51
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे तर मनापासुन आवडले, अप्रतिम लेख.

हं!! ऽऽऽ बरं लिहितात बुवा ह्ल्लीचे प्रायोगिक लेखक! सुधारणेला वाव असतो म्हणा! कमी वयात यश मिळालायला लागलं की थोड भरकटायला होतं म्हणा ! पण ठीक आहे ! तेवढ चालायचंच! एकदा सुदर्शन रंगमंचावर परिसंवाद ठेवावा. तेवढ्याच सोऽऽहम कोऽऽहम च्या गोष्टी. प्रकाश घाटपांडे

वरदा 14/04/2008 - 22:12
ऍप्टीटयूड टेस्ट द्यायला कुठे बरं येऊ?

विसुनाना 15/04/2008 - 12:52
या लेखाला चांगले म्हणावे तर नाट्यसमिक्षक होऊ शकत नाही आणि वाईट म्हणावे तर तुमच्या कंपूत सामिल होता येणार नाही... या दुग्ध्यात पडलो. त्यामुळे - "सदर लेख लिहिताना लेखकाने आपले लेखन कौशल्य, बहुश्रुतता , वाचन, मनन, चिंतन या सार्‍यांचा पुरेपूर आणि उत्कृष्ट वापर केला असला आणि लेखातील व्यंग वाचकांचे रंजन करण्यात यशस्वी ठरले असले तरी 'नाट्यसमिक्षकांना शिकवण्याचे क्लासेस काढण्याची जाहिरात' म्हणून ते अनाठायी आहे असे म्हणावेसे वाटते" -असा दोन्ही दरडींवर हात ठेवतो. :):)

धमाल मुलगा 15/04/2008 - 13:49
काहीतरी पावरबाज प्रतिक्रिया देण्याच्या विचारात होतो, पण वाईच उशीर झाला. सगळ्यांनी एव्हढं मस्त ठोकून काढलंय की आता ह्या तांत्रिकदृष्ट्या उत्तम गणल्या जाऊ शकणार्‍या लेखाच्या आशयपूर्ण खोलीच्या अभावाबद्दल लिहिण्यात काहीच हशील उरलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे. मेलेल्याला मारण्यात कसली आलीय मर्दुमकी? असो, इथे विदेशी लेखक/समिक्षकांची मांदियाळी मांडून आपल्या विद्वत्तेचे टेंभे मिरवण्याची लेखकाची अत्यंत केविलवाणी धडपड नजरेतून सुटत नाही, त्याऐवजी दस्तुरखुद्द मराठी समिक्षकांची/ लेखकांची मोलाची कामगिरी उद्घत केली गेली असती तर लेखाला योग्य तो न्याय मिळाला असता. विनाकारण ग्लोबलाईज्ड साहित्य-संदर्भाच्या अवास्तव जंत्रीपायी लेखाचा बाज हरवल्याचे ठाई ठाई जाणवते. :-)))))))))))))))) भडकमकर शेठ, पुन्हा एकदा सरपटी बॉलवर सिक्सर !!!!!
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..."
हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!!
संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम... ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके...
आईच्ची कटकट !!!! ज ह ब ह र्‍ह्या !!!!! --------------------------------------------------------------------------------- एकाच वेळी एकाहून जास्त कोर्सेस करता येऊ शकतील का ह्याची कृपया माहिती द्यावी. आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अवांतरः आतरजालावर लेखन करणे, त्या लेखनाला पोटभर (सकारात्मक) प्रतिसाद मिळवणे, आंतरजालीय समिक्षकांना 'पुरुन' उरणे ह्यावर एखादा क्रॅश-कोर्स आहे का हो गुरुजी? आपला, ध मा ल - 'फिदा' - हू? सेन !

In reply to by धमाल मुलगा

" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..." हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!! धमाल्या, आम्ही हे सारे भोगलेय.... एक महान समीक्षक आमचे एक टुकार विनोदी नाटक सहन केल्यानंतर , आम्हाला खरेच म्हणाले होते, " तुम्ही डॉक्टर असा नाहीतर कंपौंडर्...आम्हाला काय घेणे आहे? काम नीट करा म्हणजे झाले".... त्यांचे सांगणे योग्य होतेच, त्यात वादच नाही पण जी काही साहेबांची स्टाईल होती, जवाब नहीं ...साधारण ६ वर्षे झाली असतील त्या घटनेला... त्याच रात्री या लेखाचा पहिला खर्डा लिहिला... :) :)

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा 15/04/2008 - 17:43
त्याशिवाय इतक्या पोटतिडिकीनं मनातलं कागदावर उतरत नाही शेठ. आणि आम्ही काय उगाच मूक हुंदके दिले की काय? असंच सोसलंय...अगदी फुटकळ स्पॉन्सरर्सकडून...का तर पैसा फेकतो...काहीही बोलायचा हक्क आहे मला. तोच आमचा समिक्षक :-( कधीकधी लाज वाटते असल्या गोष्टी आथवल्या की..आणि राग पण...अरे, जरा तरी समोरच्याचा विचार करा लेको..असाल लय भारी समिक्षक. म्हणून काय फक्त 'उरलो मारण्यापुरता' ????

In reply to by धमाल मुलगा

आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अजून दोन तीन कोर्स सुचले आहेत्...यथावकाश माहितीपत्रक काढूच....

मनस्वी 15/04/2008 - 14:21
"नाट्यसमीक्षक व्हा" ह्याकडे अभ्यासक्रमाच्या अनुशंगाने बघता समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो. भडकमकर सरांच्या आजच्या पिढीविषयक भडभडून येणार्‍या तीव्र आत्मियतेला दाद द्यावी तितकी थोडीच! **** (५ पैकी ४ चांदण्या) - अभ्यासक्रमात "चेहेर्‍यावरील भाव निर्विकार ठेवणे" याचाही समावेश निश्चितच होतकरू अभ्यासप्रेमींसाठी फायदेशीर आणि त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल.

समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो.......त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल. ... अरे बा प रे.....तुम्हाला डायरेक्ट ऍडव्हान्स्ड कोर्सला घ्यावे म्हणतो..... आणि बेसिक कोर्सला लेक्चरर व्हा , फी माफ करून टाकू....

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी 15/04/2008 - 17:48
(स्ट्रगल करणार्यांना लेखकांना , नटांना बघू, भेटू, बसू, बोलू म्हणत झुलवत ठेवावे!) :)

अभिज्ञ 12/04/2008 - 15:05
आपले दोन्हि लेख फारच सुरेख झाले आहेत. > समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे फारच खास.... असेच फर्मास लेख येउ द्यात...... मि.पा. वरचा एक उत्तम आणि अप्रतिम लेख. अबब.

In reply to by अभिज्ञ

नाट्यसमीक्षक व्हा लेख एकदम झक्कास झाला आहे. समीक्षकाला मस्त ठोकलंय !!! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत .
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विदेश 12/04/2008 - 15:20
पहातो आता- एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून आम्हाला कोण अडवतो ते! (भडकमकर सर, तुमच्या मदतीने -)कमी कष्टात जास्त आदर प्राप्त करतो, जागा झालोच आहे.... प्रचंड झोप आधी काढतो....!

इनोबा म्हणे 12/04/2008 - 17:02
हा शब्दरुपी शिवधनुष्य भडकमकरांना पेलवला नाही असे खेदाने म्हणू इच्छितो. अजिबात आवडला नाही. जमलं का हो? :) लेख मस्तच... चालू दे! भडकमकर गुर्जींचा इद्यार्थी- इनोबा || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

एक 13/04/2008 - 07:24
झकास... अहो गेल्याच नोव्हेंबरला ही सगळी वाक्य ऐकली होती.. तुमच्याच स्कूलचा विद्यार्थी होता का हो? तुमच्या अभ्यासक्रमात थोडा व्यायामाचा पण समावेश करा हां. नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" जबरी लेख आहे.. अजुन एक उ. सू. : शाळेत आद्य टिकाकार म्हणून लखू रिसबूड चा फोटो लावून टाका//

In reply to by एक

नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" ओहो, त्याबद्दल लिहायचे राहिलंच..... कसं असतं, आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ..... त्या साठी मग आम्ही मणिपूरहून मागवलेले खास सेल्फ डिफेन्स स्पेशालिस्ट श्री कुड्कुड जकुंबा यान्चे दोन हात शिकवतो....

In reply to by भडकमकर मास्तर

विद्याधर३१ 13/04/2008 - 19:40
आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ... अशी अवस्था झाल्यानंतर पुढचा आठवडाभर लोकसत्त्तामधून लेख छापून आणावेत.. लोकसत्ता ( सुमार केतकर )या बाबतीत तयार आहेतच... विद्याधर

In reply to by विसोबा खेचर

एकदम मस्त! ;),.....'स्पॉन्सर्ड पंगे' हा शब्द आवडला...:) धन्यवाद तात्या... औरभी आनेदो बॉस.... अजून काही विषय सापडले आहेत , वेळ झाला की लिहिणार आहे....

होतकरू समीक्षक स्_भडक मकर यांनी जेष्ठ समीक्षकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न वरील स्फुटात(?) केला आहे. परंतू या किंचित माधव मनोहरांना हे कळलेले दिसत नाही की नुसते धोतर नेसून चिरूट ओढल्याने माणूस माधव मनोहर होत नसतो. आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात समीक्षकाला आलेले अपयश सतत सलते... देवनागरीत लिहिलेल्या शब्दांचे डबे एकापुढे एक ठेवल्याने अर्थनिर्मिती होत नसते. प्रस्तुत लेखकाच्या लिखाणाला अजिबात खोली नाही. एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया श्री. स्_भडक यांना मुळीच साधलेली नाही...... नुसती पाश्चात्य लेखक/ समीक्षकांची नामावळी टाकून लिखाणाला आशयगर्भता येईल असे लेखकाला वाटते हीच या लेखाची मर्यादा ठरते. हा विदेशी बेदाणे घातलेला देशी चिवडा पहिल्या प्रयत्नातच फसला आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. आम्ही श्री. स्_भडक यांना असा मित्रत्वाचा इशारा देऊ इच्छितो की त्यांनी समीक्षणाच्या वा समीक्षक तयार करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा आपले कौशल्य असलेले दंतवैद्यकी सारखे, लोकांचे खरे दात उपटून त्याजागी खोटे दात लावून त्यांना उल्लू बनवण्याचे व्यवसाय करावेत! डॉ. डांबिसकुमार माहूत संपादक - स्मशान टाईम्स :))) जबरदस्त ह. घ्या.!!

आंबोळी 14/04/2008 - 12:07
आम्ही किन्चित समीक्षक होतो/आहोत. आम्हाला सुरसूरी, तुटणे, बोटे शिवशिवणे हे सगळे होते.... आज पर्यन्त १-२ होतकरू लेखकान्चा आम्ही यशस्वी हिरमोड केलेला आहे. हे बेसिक क्वलिफिकेशन तुमच क्लास जोइन करायला पुरेसे आहे असे वाटते..... तरी पण स्पॊन्सर्ड पंगे,कम्पूगिरि,चक्रम वागणे हे सर्व शिकावेसे वाटते. प्रवेश कधी सुरु होतायत? (समीक्षक) आम्बोळी

सध्या तू प्रस्थापित ढुढ्ढाचार्या॑चे विदाऊट अनेस्थेशिया दात काढायला घेतलेले दिसताहेत :) बाकी तू घेतलेले 'भडकमकर' हे नाव मराठी माणसाला एकदम शोभेसे आहे (इती शिरिष कणेकर):)

धनंजय 14/04/2008 - 19:21
पण आता या लेखाबद्दल दोन शब्द चांगले बोललो. नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले.

In reply to by धनंजय

आपणास मजा आली हे वाचून फारच आनंद वाटला... नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले. हाहाहाहा......:):)..... _______________________ पण आपले आमच्या नाटकावरचे खरे समीक्षणही उत्तमच होते....

शितल 14/04/2008 - 19:51
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे तर मनापासुन आवडले, अप्रतिम लेख.

हं!! ऽऽऽ बरं लिहितात बुवा ह्ल्लीचे प्रायोगिक लेखक! सुधारणेला वाव असतो म्हणा! कमी वयात यश मिळालायला लागलं की थोड भरकटायला होतं म्हणा ! पण ठीक आहे ! तेवढ चालायचंच! एकदा सुदर्शन रंगमंचावर परिसंवाद ठेवावा. तेवढ्याच सोऽऽहम कोऽऽहम च्या गोष्टी. प्रकाश घाटपांडे

वरदा 14/04/2008 - 22:12
ऍप्टीटयूड टेस्ट द्यायला कुठे बरं येऊ?

विसुनाना 15/04/2008 - 12:52
या लेखाला चांगले म्हणावे तर नाट्यसमिक्षक होऊ शकत नाही आणि वाईट म्हणावे तर तुमच्या कंपूत सामिल होता येणार नाही... या दुग्ध्यात पडलो. त्यामुळे - "सदर लेख लिहिताना लेखकाने आपले लेखन कौशल्य, बहुश्रुतता , वाचन, मनन, चिंतन या सार्‍यांचा पुरेपूर आणि उत्कृष्ट वापर केला असला आणि लेखातील व्यंग वाचकांचे रंजन करण्यात यशस्वी ठरले असले तरी 'नाट्यसमिक्षकांना शिकवण्याचे क्लासेस काढण्याची जाहिरात' म्हणून ते अनाठायी आहे असे म्हणावेसे वाटते" -असा दोन्ही दरडींवर हात ठेवतो. :):)

धमाल मुलगा 15/04/2008 - 13:49
काहीतरी पावरबाज प्रतिक्रिया देण्याच्या विचारात होतो, पण वाईच उशीर झाला. सगळ्यांनी एव्हढं मस्त ठोकून काढलंय की आता ह्या तांत्रिकदृष्ट्या उत्तम गणल्या जाऊ शकणार्‍या लेखाच्या आशयपूर्ण खोलीच्या अभावाबद्दल लिहिण्यात काहीच हशील उरलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे. मेलेल्याला मारण्यात कसली आलीय मर्दुमकी? असो, इथे विदेशी लेखक/समिक्षकांची मांदियाळी मांडून आपल्या विद्वत्तेचे टेंभे मिरवण्याची लेखकाची अत्यंत केविलवाणी धडपड नजरेतून सुटत नाही, त्याऐवजी दस्तुरखुद्द मराठी समिक्षकांची/ लेखकांची मोलाची कामगिरी उद्घत केली गेली असती तर लेखाला योग्य तो न्याय मिळाला असता. विनाकारण ग्लोबलाईज्ड साहित्य-संदर्भाच्या अवास्तव जंत्रीपायी लेखाचा बाज हरवल्याचे ठाई ठाई जाणवते. :-)))))))))))))))) भडकमकर शेठ, पुन्हा एकदा सरपटी बॉलवर सिक्सर !!!!!
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..."
हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!!
संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम... ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके...
आईच्ची कटकट !!!! ज ह ब ह र्‍ह्या !!!!! --------------------------------------------------------------------------------- एकाच वेळी एकाहून जास्त कोर्सेस करता येऊ शकतील का ह्याची कृपया माहिती द्यावी. आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अवांतरः आतरजालावर लेखन करणे, त्या लेखनाला पोटभर (सकारात्मक) प्रतिसाद मिळवणे, आंतरजालीय समिक्षकांना 'पुरुन' उरणे ह्यावर एखादा क्रॅश-कोर्स आहे का हो गुरुजी? आपला, ध मा ल - 'फिदा' - हू? सेन !

In reply to by धमाल मुलगा

" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..." हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!! धमाल्या, आम्ही हे सारे भोगलेय.... एक महान समीक्षक आमचे एक टुकार विनोदी नाटक सहन केल्यानंतर , आम्हाला खरेच म्हणाले होते, " तुम्ही डॉक्टर असा नाहीतर कंपौंडर्...आम्हाला काय घेणे आहे? काम नीट करा म्हणजे झाले".... त्यांचे सांगणे योग्य होतेच, त्यात वादच नाही पण जी काही साहेबांची स्टाईल होती, जवाब नहीं ...साधारण ६ वर्षे झाली असतील त्या घटनेला... त्याच रात्री या लेखाचा पहिला खर्डा लिहिला... :) :)

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा 15/04/2008 - 17:43
त्याशिवाय इतक्या पोटतिडिकीनं मनातलं कागदावर उतरत नाही शेठ. आणि आम्ही काय उगाच मूक हुंदके दिले की काय? असंच सोसलंय...अगदी फुटकळ स्पॉन्सरर्सकडून...का तर पैसा फेकतो...काहीही बोलायचा हक्क आहे मला. तोच आमचा समिक्षक :-( कधीकधी लाज वाटते असल्या गोष्टी आथवल्या की..आणि राग पण...अरे, जरा तरी समोरच्याचा विचार करा लेको..असाल लय भारी समिक्षक. म्हणून काय फक्त 'उरलो मारण्यापुरता' ????

In reply to by धमाल मुलगा

आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अजून दोन तीन कोर्स सुचले आहेत्...यथावकाश माहितीपत्रक काढूच....

मनस्वी 15/04/2008 - 14:21
"नाट्यसमीक्षक व्हा" ह्याकडे अभ्यासक्रमाच्या अनुशंगाने बघता समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो. भडकमकर सरांच्या आजच्या पिढीविषयक भडभडून येणार्‍या तीव्र आत्मियतेला दाद द्यावी तितकी थोडीच! **** (५ पैकी ४ चांदण्या) - अभ्यासक्रमात "चेहेर्‍यावरील भाव निर्विकार ठेवणे" याचाही समावेश निश्चितच होतकरू अभ्यासप्रेमींसाठी फायदेशीर आणि त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल.

समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो.......त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल. ... अरे बा प रे.....तुम्हाला डायरेक्ट ऍडव्हान्स्ड कोर्सला घ्यावे म्हणतो..... आणि बेसिक कोर्सला लेक्चरर व्हा , फी माफ करून टाकू....

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी 15/04/2008 - 17:48
(स्ट्रगल करणार्यांना लेखकांना , नटांना बघू, भेटू, बसू, बोलू म्हणत झुलवत ठेवावे!) :)
लेखनविषय:
समजा तुम्हाला गायन वगैरे कलेत रस नसेल, तर एक थोडेसे हटके करीअर आहे त्याबद्दल मी सांगतो...