दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले .
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित.
हे अगदी पटले.
स्वाती
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं.
काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट.
...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात ....
या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर..
(बर्याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्या बाजुमुळे व्यथित )
-आनंदयात्री
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
अगदि हेच म्हणतो...
आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा.
असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात.
अबब
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद.
अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;)
लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत
(वाचक) आजानुकर्ण सांगवीकर
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे)
वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली.
सामाजीक जाणीव जोपासणार्या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.
विचारांना चालना देणार्या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक.
वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच.
हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात.
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच.
अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/
अप्रतिम लेख!
नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच.
पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते.
हे लिखाण,
वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे.
अतिशय मुद्देसूद!
यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो.
हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे.
भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात.
अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत.
या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत.
अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले.
त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे.
तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले.
यावर काही लिहु शकाल का?
आपला
गुंडोपंत
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्या-तिसर्याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात!
अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;)
मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;)
जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित.
क्या बात है...!
वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..!
तात्या.
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ!
नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;)
त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;)
आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल!
त्यामुळे,
"आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!"
हाच एकमेव विचार उरला!
;)
असो,
तात्या.
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे.
वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला.
अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला.
भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन.
विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली.
विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या.
-------------------------------------------
कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
नीलकांत
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत.
नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले.
"आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत."
हे एकदम पटले!
झूल कधिच झुगारून दिलेला
--भ्रमरि
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.
(अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;)
चतुरंग
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास.
तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.)
हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे.
आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे.
तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात.
या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)
... फार सुंदर प्रतिसाद...
त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं?
मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून.
प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
दोन्ही भाग उत्तम!
लाखाची गोष्ट
दुसरा भागही फार आवडला
नतमस्तक!
अगदि हेच म्हणतो...
हेच म्हणतो
नीलकांता!
महापुरुषांचा पराभव
अभिनंदन
मॅट्रिक्स, आतले -बाहेरचे
ही
सुरेख..!
अगदी आत्ता आत्ताचं उदाहरण,
इरावती कर्वे
अप्रतीम
पुन्हा एकदा अभिनंदन नीलकांता!
शाबास नीलकांता...
छान लेख-
प्रगल्भ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
मैलिक लेख
गतानुगतिकता