मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ह्या गांधींचं करायचं काय ???

छोटा डॉन ·

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 20:18
डानराव, छान लेख, तुम्ही उगाच मनाला लाउन घेउ नका राव. गांधींचे तुम्ही काहीही करु शकत नाही, कारण तुम्ही (म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या विचारसरणीचे लोक) मतदान करत नाही, केलं तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण एक भिंगरी अन एक साडी या जोरावर मतदान करणारे हजारो लाख्खो आहेत, अहो तुमच्या मताला विचारतय कोण ? परिणामी गांधी अन त्यांचे भाटच येनकेनप्रकारे निवडुन येणार अन तुम्ही परत हात चोळत बसणार. चोट्ट्या भामट्यांचा धंदा आहे हो, एका रात्रित शिश्टीम बदलते ती फक्त पिक्चरात !

विदेश गुरुवार, 04/17/2008 - 18:39
आपण काही करू शकत नाही. ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे. फक्त विचारच करण्याखेरीज आपल्याला(-च असलेल्या मेंदूला)पर्याय नाही. "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" खुलाशाचा अर्थ-"नाही"च्या जागी "आहे"असा घेणारेच आहेत. तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं जग ही रंगभूमी आहे आणि पक्षपल्टू /होत्याचे नव्हते कलाकार राजकीय रंगभूमीवर अगणितच! मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो. भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबात; बरे का छोटा (-पण विचाराने मोठा) डॉन!

शितल गुरुवार, 04/17/2008 - 19:03
आपल्या देशात, देशा पेक्षा पक्ष मोठा कसा होईल हेच पाहिले जाते, आणि कॉग्रेस पक्षा एवढा जातीचे राजकारण करून निवड्णुक लढवणारा दुसरा पक्ष नसेल.

In reply to by शितल

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 19:07
पक्ष-बिक्ष सारे छू. आपण आणि आपले खिसे कसे मोठे होतील हे पाहिले जाते. त्यासाठी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. आज त्याचा निषेध - उद्या त्यालाच पाठिंबा.

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 19:08
एका रात्रित शिश्टीम बदलते ती फक्त पिक्चरात !
भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबात;
सहमत.

In reply to by मनस्वी

छोटा डॉन गुरुवार, 04/17/2008 - 19:12
"भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबा"" असं बिलकूल नाही, परिस्थीती खरच बदलू शकते ... आत्ता लगेच का ? कदाचित याचे उत्तर नाही असे आहे ... कोण बदलणार ? प्रत्येकाने शक्य तेवढे प्रतत्न करावेत .... शेवटी " शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरी नको" ही मनोवॄत्ती कोठेतरी सोडावी लागेल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

पटले डानराव तुमचे नाहीतर आम्ही म्हणत बसलो आहोत 'शिवाजी व्हावा शेजारच्या घरात, मावळा त्याच्या पलीकडच्या घरात, मग तुम्ही?? आम्ही मात्र राहणार स्वराज्यात." ;) अहो हे आजचे नाही हे तर फार पूर्वीचेच आहे. शांत राहून संधीची वाट पहाणे हे उत्तम. पुण्याचे पेशवे

मानस गुरुवार, 04/17/2008 - 20:12
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली तेव्हा ते सोळा वर्षांचे होते, त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते ४७ वर्षांचे होते. साधारणपणे तुमच्या मते कुठल्या वर्षी एखाद्याने पंतप्रधान व्हावे? जगातला सगळ्यात लहान पंतप्रधान ३४ वर्षांचा होता (२००४ साली). ह्यात मी राहुल गांधीची बाजू घेत आहे असे नाही, पण सध्या ह्या जगात "युवा" ह्या एका शक्तिची फार मोठी गरज आहे. हेच उद्याचे प्रतिनिधी आहेत,आशास्थानं आहेत. मी तर म्हणेन, वयाच्या ६५ वर्षानतंर निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे. निदान राहुल गांधी इतर राजकीय पुढार्‍यांच्या मुलांसारखा "व्यसनाधीन" तरी नाही. काँग्रेस काय, भाजप काय सगळे एका माळेचे मणी. तरीसुद्धा फक्त वय लहान आहे म्हणजे देश चालवता येत नाही, हे काही खरं नाही.

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 21:06
डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी. राजकारणाचे जाउद्या / चॅनेल वाल्यांचे पण जाउद्या. ते पोटासाठी कोणालाही कसेही प्रोजेक्ट करतात . सबसे तेज म्हणत अमरसिंगना महात्मा बनवतात आणि राज ठाकरेना व्हीलन बनवतात. पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर? कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का? एका विश्वनाथ प्रतापाने काय प्रताप केले ते तुम्ही जाणताच.त्यांच्या एका निर्णयानी भरातात केव्हढी दुफळी माजली. आडवाणी तेंव्हा रथ यात्रा काढत भारताला एक करायचा प्रयत्न करत होते. बाबरी मशीदीचा मुद्दा त्याना केवळ लोकाना चघळायला देण्यासाठी हवा होता हे लपुन राहीले नाही. भारत आणि इराण किंवा पाकिस्तान यांच्यात फारसा फरक राहीला नसता. राहुल गांधी बद्दल आज जे बोलले जात आहे तेच राजीव गांधींबद्दल बोलले गेले होते. तसेच इन्दीरा गान्धींबद्दल बोलले गेले होते. त्यांची तर " गुंगी गुडीया" अशी हेटाळणी केली गेली होती. एक स्टॉप गॅप ऍरेन्जमेन्ट अशीच त्यांची छबी बनली होती. देशाला जर दिशा द्यायची असेल तर नव्या विचारांची व्यक्तीच पंतप्रधानपदी असावी लागते. कसाही असला तरी हिटलरने जर्मनी ला नवी दिशा दीली. सद्दाम ने इराक उभा केला.सद्दाम असेपर्यन्त इराक मध्ये कोणतीही जातीयवादी शक्ती नव्हती. इराक एक सार्वभौम आणि पुढारलेले राष्ट्र होते. दुर्दैवाने आपल्या देशाला काही काळ देवेगौडांसारखे महान पन्त्प्रधान मिळाले होते ज्यानी काहीही केले नाही. तिसरी आघाडी कोणत्या आणि कसल्या लोकानी बांधली आहे ते सर्वच जाणतात. नव्याअ रक्ताला वाव मिळाला पाहीजे हे नुसते बोलायचे आणि वेळ आली की त्यांच्यावर टीका करायची. राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही. त्यांच्या कडे नव्या कल्पना असु शकतील. त्या ते आमलात आणु शकतील मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्‍या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्‍या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्‍या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल का? गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते? राहुल गांधी हे एक संयमी व्यक्तीमत्व आहे हे तरी मान्य करा. ते कदाचीत त्यांच्या शिक्षणा नुसार भारताला राजीव गांधी नी जशी नवी दिशा दिली तसेच काहीतरी करुन दाखवतील अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. गांधी घराण्याची पार्श्वभुमी त्याना लोकांचा पाठींबा मिळवुन देइल.हा त्यांचा ऍडीशनल यु एस पी असु शकतो.

In reply to by विजुभाऊ

मानस गुरुवार, 04/17/2008 - 21:41
विजुभाऊ ... तुमच्या सर्व मतांशी मी सहमत आहे. कुठलाही राजकारणाचा अनुभव नसताना राजीव गांधींनी देशाला एक वेगळी दिशा मिळवून दिली. आज आपण "टेलीकम्युनिकेशन्स" क्षेत्रात तसेच "ईंटरनेट" द्वारे जे काही करतो आहे, त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर कधीही असे वाटले नाही की त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. खरंतर राहुल गांधी सारखे तरुण, तडफदार व्यक्तिमत्वाची माणसं ह्या देशाला हवी आहेत.

In reply to by मानस

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:08
आम्हालाही समजू दे. आमच्याकडे इन्टरनेट येण्यामध्ये राजीवचे काय नक्की महान कर्तृत्व होते बरे? आपल्या म्हणण्याप्रमाणे राजीव नसता तर आज भारतात इन्टरनेट नसते? जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 22:57
जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? जगात भारता इतके सॉफ्ट वेयर तज्ञ कोणत्या देशात आहेत ते सांगा ना? भारतातली वाहन क्रान्ती त्यांच्यामुळे झाली. हे तरी खुल्या दिलाने मान्य करा.

In reply to by ऐश्वर्या राय

देवदत्त गुरुवार, 04/17/2008 - 23:25
इंटरनेट आले असते की नाही ते नक्की सांगता येत नाही. परंतु जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या? ह्याचा अर्थ पूर्ण जगात फक्त राजीव गांधींनीच हे कार्य केले असा काढायचा आहे का? हे काम भारतात राजीव गांधींमुळे झाले असे त्यांचे म्हणणे असेल.

In reply to by नीलकांत

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:14
एकमेकाचे कौतुक करू अवघे होऊ खूष. 'मिसळपावी'परंपराच आहे ना? इथले सारे 'कंपू' सभासद एकमेकांची थोपटण्यात (पाठ हो! तुम्हाला काय मी तात्या वाटले का वाह्यात लिहायला?) अगदी तत्पर असतात. अहो रुपम् अहो ध्वनी!

In reply to by ऐश्वर्या राय

नीलकांत गुरुवार, 04/17/2008 - 23:11
ह्या प्रतिक्रियेला मनापासून उत्तर एवढेच की शक्य असल्यास कुठल्याही विषयावर उत्तर देताना लेखक विसरा आणि स्वतःच मत द्या, असं असावं, असं वाटतं. बाकी तुम्हासारख्या मिसळपावच्या परंपरा कोळून प्यायलेल्यांना मी पामर ते काय सांगणार? एवढंच म्हणू शकतो की एवढ्यात मिसळपावच्या परंपरेबद्दल लेख येत असेल तर तो विनोदी वगैरे आहे का अशी शंका येते. :-) बाकी तुम्ही ही काही लिहा की राव, त्याला आमच्या भाषेत 'नेट' लागतो असं म्हणतात, कुठं ते विचारू नका. ;-) नीलकांत

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन Fri, 04/18/2008 - 12:48
विजूभाउ, प्रथम मी सांगतो की मला ह्या मिडीयाबद्दल काहीही बोलायचे नाही, आजचा मिडीया त्या योग्यतेचा राहिलेला नाही त्यामुळे तो कुण्ला हिरो ठरवतो आनि कुणाला व्हिलन ह्या गोष्टी सध्या बाजूला राहूदेत ... "पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर? कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का?' हा मुद्दा मला अमान्य. कुठला नेता म्हनाला म्हनून देशात नव्या गोष्टी, वने तंत्रज्ञान आले हे पण अमान्य. नेता नवी दिशा देतो हे मान्य पन सर्व प्रगतींच्या योजनांची आखणी व अंमलबजावणी ही आपल्या "नोकरशाह" वर्गाकडून केली जाते हे खरे सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल की लालूजींनी रेल्वे फायद्यात आणली, मी म्हणेन की रेल्वे खात्यात काम करणार्‍या नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्‍यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली, नेट आले, भारी गाड्या आल्या हे झूट.... फरक असा की ते फक्त त्यावेळी सत्तेत होते.... "राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही." एवढा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही त्यासाठी. आणि बाकी बिरूदांचे म्हणाल तर मला नाही वाटत की गांधी घराण्यावर असे आरोप करण्याची कुणाची छाती आहे. अहो खुद्द "संजय गांधी " एवढा नादान, गुंड, उर्मट होता तरी सगळे मुग गिळून शांत होते. आज तर "राहूल" युवराज आहे. मला असे नाही म्हणायचे की राहूलचे कॅरेक्टर चांगले नाही पण तो मुद्दा ठरू शकत नाही. "पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्‍या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्‍या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्‍या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल ?" हम्म. मुद्दा मान्य पण माझे वैयक्तीक मोदींबद्दल असे मत नाही ... मायावती तर दखल न घेण्याच्या लायकीची ... "गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते?"' मुद्दा विचार करन्याजोगा नक्कीच आहे. मी पण पुण्याई वापरली असती पण सध्या जी नाटके चालू आहेत ती चालू दिली नसती. अर्जून्सिंगासारख्या "हुजर्‍यांनी" नक्कीच फटकारले असते... बाकी राहूलने जरूर पंतप्रधान व्हावे, ह्यात चिडचिड व त्रागा करण्यासारखे काही नाही व करूनही काही उपयोग नाही. पण कमीत कमी त्याआधी त्याने स्वतला सिद्ध करावे ... दुसरे घोड्यावर बसवतात म्हणून लगेच गुडघ्याला बाशिंग बांधू नये एवढीच अपेक्षा... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 13:27
नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्‍यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली बिनतोड मुद्दा, पटले. पण असेही वाटले की "दगडापेक्षा वीट मउ" एटलिष्ट मम म्हणाले हे ही नसे थोडके !

पान्डू हवालदार गुरुवार, 04/17/2008 - 21:09
सगळॅ तसेच ... बळासाहेब उद्ध्व ला प्रोजेक्ट करतात ... पवार सहेब पोरिला ... मग ही घराणे शाही नाही का .... काहीही म्हणा .. कोन्ग्रेस ला पर्याय नाही ...म्हण जे "गान्धी" ला पर्याय नाही ... तसेही कोणत्याही शाळ्कर्री मुलाला विचरा ... "गान्धी" कोण ... उत्तर मिळेल .. "सोनिया गान्धी" :) देशाची सुन .. ;)

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 21:37
पान्डोबा बाकी काही जमले नाही तरी जरा कलफलक वापरायला शिका. किती दिवस त्याच त्याच चुका करत रहाणार तुम्ही.

नीलकांत गुरुवार, 04/17/2008 - 21:46
पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल]. ह्या बद्दल म्हणाल तर ही कॉंग्रेसची परंपराच आहे. आपली घराणेनिष्ठा सिध्द करा आणि पुढच्या वेळी संभाव्य उमेदवारांमध्ये अग्रमान मिळवा. सोनीयाच्या घरी जाऊन त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी मन वळवणार्‍यांमध्ये आपले पवार साहेब सुध्दा होते की, मॅडमवर निष्ठा दाखवल्याचे फळ सुशिलकुमारांना नेहमीच भेटलेले आहे, चाकुरकर पाटलांना गृहमंत्रीपदाचा मान या निष्ठेपायीच आहे हो. आता एकदा कबड्डी खेळायचं म्हटल्यावर हाफपॅन्ट घालत नाही म्हणून कसं चालेल? त्यामुळे हे असं चालायचंच , याचा पुढे फायदा होतो असं कॉग्रेसचा इतिहास सांगतो. दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता ही घटना घडल्यानंतर एका महिण्यानंतर प्रसारमाध्यमांना याची माहिती झाली. एक महिना जूनी का होईना, प्रसारमाध्यमांना याची दखल घ्यावीशी वाटली. त्या आधी प्रियंका एका लक्ष्मी-नारायणाच्या मंदीरात पुजा करायला गेल्या याचा मात्र उल्लेख नव्हता. तर आपल्या पित्याच्या मारेकरीला भेटायला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गोडसे परिवाराशी सुध्दा गांधी परिवाराशी संबंध होता. त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. येथे एका गोष्टीकडे लक्ष वेधता येईल, की राहूलच्या आधी प्रियंकानेच आपल्या आईसाठी प्रचार केला आहे. त्यावेळी तिचं नाव प्रियंका गांधी असंच कॉग्रेसवाले सांगत होते. तीने मात्र आवर्जून आपलं नाव वढेरा असल्याचं सांगीतलं. मग त्यातून पळवाटा काढल्या की, प्रियंका गांधी - वढेरा किंवा नुस्तंच प्रियंका म्हणावं. राहूल पंतप्रधान बनावेत का नाही? - भारताच्या घटनेनुसार वय वर्षे २५ पुर्ण झालेला भारतीय नागरीक पंतप्रधान बनु शकतो. त्यामुळे राहूल गांधी पंतप्रधान बनण्यास पात्र आहेत. त्यांची सर्वात मोठी आणि सर्वात प्राथमिक पात्रता म्हणजे ते 'गांधी' आहेत हीच आहे, हे मला, तुम्हाला आणि खुद्द राहूलला सुध्दा मान्य आहे. पंतप्रधान पदी या पुर्वी खुप मोठी माणसं बसली आहेत हे खरं आहे. सध्याच्या परिस्थितीत एवढ्या अल्पमतात राहूल पंतप्रधान होणं पसंत सुध्दा करणार नाहीत. मात्र येत्या नाही तर त्या पुढच्या वेळीतरी आपली प्रतिमा पंतप्रधान पदासाठी तयार करण्याची ही सुरूवात आहे. माझं वैयक्तीक मत मात्र राहूलने बहूमतात येऊन पंतप्रधान बनावं असंच आहे. कारण नवीन रक्त आहे, जग आणि तत्रज्ञान आदींशी ओळख आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पदाला पक्षांतर्गत आव्हाने नसतील. म्हणजेच निश्चींतपणे आणि कणखरपणे निर्णय घेता येतील. राहीलं अनुभवाचं तर त्यासाठी अनेक महत्वाची लोकं आजंच त्यांच्या भोवताली आहेत की ! आणि शेवटी कोण पंतप्रधान व्हावं हे आपली सार्वभौम जनता ठरवेल. एक मात्र सांगता येईल की, 'राहूल पंतप्रधान व्हावेत.' हे वाक्य एवढं साधं नाही महाराजा ! अहो बाकी सोडा, आमच्या बारामतीकर सायबांनीसुद्धा हाच घोष लावलाय. आता कुणाची बिशाद आहे या वाकयाचं व्याकरण चालवायची? नीलकांत

In reply to by नीलकांत

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:20
अहो तेच ना ते, विदेशी महिला पंतप्रधान नको म्हणून वेगळा पक्ष काढणारे? परवा त्यांनीच तर त्याच विदेशी बाईला पंतप्रधानपदासाठी पाठींबा जाहीर केला की हो. वाक्याचे व्याकरण बरोबर आहे पण शुध्द्लेखन नाही. आणि अर्थ मात्र भयंकर आहे..पंतप्रधान असा शब्द आहे..जर चुकून कधी अचूक लिहायची इच्छा झालीच तर असूदे माहिती म्हणून लिहिले. आता तात्या परत कसे भडकतात त्याची मज्जा ;-)

मैत्र गुरुवार, 04/17/2008 - 22:21
याचा अर्थ असा होतो कि पर्याय नाही म्हणून त्यातल्या त्यात बरा कोण त्याला पंतप्रधान पद द्या... लायक आहे म्हणून किंवा खरंच तोच पाहिजे म्हणून नाही... दगडापेक्षा वीट मऊ... दोन्ही लागणारच ना ? घराणेशाही .. ती महाभारता पासुन आहे... आणि काँग्रेस च्या उघड घराणे शाही ला विरोध करणार्‍यांनी स्वतः सुद्धा केली आहे (पक्षी: शिवसेना आणि बारामती)... पण राजपुत्र राजा होण्याची तयारी केली जात होती... आता फक्त ती राज कारण म्हणजे मतांचं राजकारण कसं करायचं आणि सोयीस्कर युत्या कशा करायच्या यापुरतं च मर्यादित आहे... कोणत्याही लोक प्रतिनिधीला काही शिक्षण ज्ञान किंवा किमान खात्याची माहिती सुद्धा नसते हा सामान्य आणि गृहीत अनुभव आहे .. आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच...

नीलकांत गुरुवार, 04/17/2008 - 22:43
आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच... हे मात्र एकदम सही रे सही. नीलकांत

पं नेहरू समर्थक व विरोधक दोघांनी वाचावे असे पुस्तक An explosive book which must be read both by admirers & critisizers of Pandit Nehru ( First Prime Minister of India)पं. नेहरू यांचे समर्थक व विरोधक दोघांनी जरूर वाचावे असे आश्चर्याचे धक्के देणारे एक नवे पुस्तक. http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=44441327930350077&pid=1207574261477&aid=1207212398 खुलासा: ही माहिती मी एक जागरूक वाचक ह्या नात्याने देत आहे व माझा लेखक/प्रकाशक यांच्याशी कुठलाच संबंध नाही व त्यांनी मला नेमलेलेही नाही.लेखकाच्या सर्वच मताशी मी सहमत असेनच असे नाही.दिनांक ६ एप्रिल रोजी नागपूरला पुस्तकावर जाहिर चर्चा झाली.त्यात सर्वश्री मुज़फ्फर हुसेन(पद्मश्री),डॉ. वि.स.जोग,डॉ.कुमार शास्त्री व डॉ.किशोर महाबळ यांनी विचार मांडले.शेवटी लेखक डॉ. नि.र.व~हाडपांडे यांनी शंका समाधान केले. वृत्तांत ७ एप्रिलच्या सकाळ व इतर वर्तमानपत्रांत आला आहे.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

नीलकांत Fri, 04/18/2008 - 10:42
देशावर उपकार करण्याची क्षमता कुणातच नाही. फार फार ह्या लोकांच्या हातात त्याकाळी देशाची सत्ता होती आणि त्यावेळी यांनी चुकांपेक्षा चांगली कामे जास्त केली. म्हणून त्यांचं देशाच्या पायाभरणीत योगदान मान्य करावं. पण स्वातंत्र्यानंतर यांनीच देशाला दिशा दिली... सोबत पुढंचं वाक्य जर का असं असेल की... हे नसते तर देश इथवर आलाच नसता, तर हे मात्र चुक. देश इथवर आला असताच. देश प्रगती करतो याला जेवढे नेते जवाबदार असतात त्याही पेक्षा देशाची जनता जवाबदार असते. याचा प्रत्यय आपल्या शेजारी देशांकडे पाहून यावा. आमच्या नेत्यांच्या धोरणाला जनतेने उत्तम साथ दिली म्हणून आपण इथवर आलो. नेहरूंच्या काळीसुध्दा नेहरूंना उत्तम पर्याय उपलब्ध होते. मात्र आता या जर तर ला अर्थ नाही. नेहरुंनी देश निर्माणासाठी खुप कष्ट घेतले हे जसं मान्य करावं तसंच त्यांनी खुप घोडचुका केल्या आहेत हे सुध्दा मान्य करावं. आज गांधी-नेहरूंना उगाच विरोध किंवा उगाच अनुनय करण्यात राजकिय सोडला तर अन्य कसलाच फायदा नाही. ते होते त्यांनी त्यांचं योगदान दिलं, त्यांच्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारलेल्या बहुद्देशीय प्रकल्पांचा लाभ आजही होतो आहे, त्यांनी देशाला नवी दिशा दिली. मात्र त्याच वेळी त्यांच्या स्वप्नाळू भुमिकेमुळे काश्मिर प्रश्न रेंगाळला आहे, चीनचं आक्रमण आणि पराभव यांचं श्रेय सुध्दा त्यांचंच. याच शल्यात ते गेले. असे अनेकानेक मुद्दे येथे देता येतील. विषयांतर होईल म्हणून थांबतो. आपला चर्चा विषय आहे की भारताला तरूण पंतप्रधान हवा की नको. लायकी वयानुसार ठरते की नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 11:05
विषयांतराबद्दल क्षमस्व पण राजकारणासारख्या विषयावरसुद्धा लिहीतांना त्याच्या लिखाणात कधीच कुठला अभिनिवेष नसतो, नीलकांताचे कौतुक वाटते. :) मी स्वत: प्रयत्न करुनही अजिबात साध्य करु शकलो नाही आजतागायत. अभिनंदन नीलकांत.

विद्याधर३१ Fri, 04/18/2008 - 07:46
तरुण रक्त वगैरे ठीक आहे. पण डायरेक्ट पंतप्रधानपद ?? आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही. विद्याधर

विसोबा खेचर Fri, 04/18/2008 - 09:51
छान चर्चा सुरू आहे, वाचून जरा टाईमपास झाला! ;) बाकी, हल्लीचं राजकारण हा माझ्या आवाक्याबाहेरचा आणि बुद्धीपलिकडचा विषय आहे... चालू द्या... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

एक Fri, 04/18/2008 - 23:30
आजचं राजकारण आणि बुद्धी यांचा काही संबंध राहिला आहे का? बिन मणक्याची पाठ, दोन हात (वरच्यांचे पाय पकड्ण्यासाठी) आणि जीभ (वरच्यांचे *** चाट्ण्यासाठी, किंवा गुणगान गाण्यासाठी) असली कि पुरे.. *** == वरच्याच्या मनात येईल तो अवयव. यापैकी कुठलही क्वालिफिकेशन तुमच्या आमच्याकडे नाही. त्यामुळे आपण बाहेरच बसलेलं बरं, काय म्हणता?

नीलकांत Fri, 04/18/2008 - 10:25
भारतात निवडून आलेला कुणीही पंतप्रधान होऊ शकतो. लोकसभेच्या निवडणूकीसाठी उभे राहण्याची वयाची पात्रता आहे २५ वर्षे. ती राहूलनी पुर्ण केली आहेत. येत्या निवडणूकीत जर का तो बहूमत (आता हे शक्य नाही) किंवा बहूमताच्या जवळ जर गेला आणि त्याची इच्छा झाली पंतप्रधान व्हायची तर त्याला अडवणार कोण? याचा अर्थ मला या देशाचा पंतप्रधान केवळ राहूलच व्हावा असं वाटतं असं नाही. मात्र राहूल गांधी पंतप्रधान झाल्याने देशाचं काही नुकसान होईल असंही वाटत नाही. उलट झालंच तर , राहूलला आपल्या खुर्चीची चिंता नसल्यामुळे तो जास्त निश्चिंतपणे भारताच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकेल असं वाटतं. सध्या देशाची परिस्थिती पाहता, प्रादेशीक पक्षांना आलेलं महत्व लक्षात घेऊन असं म्हणता येईल की कुठलाही एक पक्ष बहूमतात येणं शक्य नाही. त्यामुळे येत्या काळात ज्याला जास्त गतीनं आणि योग्य असं राजकारण करता येईल तो पंतप्रधान पदाच्या जवळ जाईल. ह्यात मात्र राहूल कच्चा असण्याची शक्य आहे. कारण अशी गळेकापू स्पर्धा त्याने कधीच अनुभवलेली नसेल. राहूलसाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून काही वर्षांपुर्वी खुप फार्मात असलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना मध्यप्रदेशात लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आले. कॉग्रेसच्या परंपरेप्रमाणेच सारं घडतंय. सध्या राहूल आपला ग्रुप बनवताहेत, सचिन पायलट, मिलींद देवरा आदी नवी मंडळी सुध्दा सोबत आहेत. ज्यांना काँग्रेस आवडत नाही त्यांनी निवडणूकीत कॉग्रेसला हरवावं. म्हणजे वादच मिटला. या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणार्‍या परिवारांतून सुध्दा आता युवराज आणि युवराज्ञी समोर येताहेत. या युवराज्ञी बद्दल वरचाच उल्लेख करता येईल की प्रमोद महाजनांच्या मुलीच्या नावात महाजन कायम ठेवून मग त्यांना समोर आणल्या गेले आहे. गोपीनाथरावांचे सुपुत्र सुध्दा राज्यस्तरीय पदाधिकारी आहेत. 'परिवारा'च्या भाषेत जवाबदारी किंवा दायित्व असा शब्द आहे. आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही. हे मात्र पटले, केतकरांना काय वाटतं हे मात्र कुणीही सांगू शकतो. ;-) सोबतच काही नावं देतो पंतप्रधान झालेल्यांची, देवेगौडा, चंद्रशेखर आणि इंद्रकुमार गुजराल. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 10:39
>>या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो. अम्म्म .. टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत. >>गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे. अहो राजकारण हा पिढीजात धंदा आहे त्यांचा !

In reply to by आनंदयात्री

मदनबाण Fri, 04/18/2008 - 10:58
टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत. ज्याला जे मिळेल ते त्याने ओरबाडुन घ्यावे अजुन काय !!!!! हे राजकारणी म्हणजे आपल्या देशाला चिकटलेली गोचीड आहेत..... (१०० मै से ९९ धोकेबाज ) असे समजणारा..... मदनबाण

इनोबा म्हणे Fri, 04/18/2008 - 16:30
'आम्ही पंतप्रधानपदासाठी इच्छूक नाही' असे आम्ही आत्ताच जाहीर करतो. मागाहून उगाच वाद नकोत. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

अजय जोशी Sat, 04/19/2008 - 16:40
आज कोणीही महात्मा नाही, नलिनी म्हणजे नथुराम नाही. आपला बे-सुमार अजय जोशी

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 20:18
डानराव, छान लेख, तुम्ही उगाच मनाला लाउन घेउ नका राव. गांधींचे तुम्ही काहीही करु शकत नाही, कारण तुम्ही (म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या विचारसरणीचे लोक) मतदान करत नाही, केलं तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण एक भिंगरी अन एक साडी या जोरावर मतदान करणारे हजारो लाख्खो आहेत, अहो तुमच्या मताला विचारतय कोण ? परिणामी गांधी अन त्यांचे भाटच येनकेनप्रकारे निवडुन येणार अन तुम्ही परत हात चोळत बसणार. चोट्ट्या भामट्यांचा धंदा आहे हो, एका रात्रित शिश्टीम बदलते ती फक्त पिक्चरात !

विदेश गुरुवार, 04/17/2008 - 18:39
आपण काही करू शकत नाही. ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे. फक्त विचारच करण्याखेरीज आपल्याला(-च असलेल्या मेंदूला)पर्याय नाही. "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" खुलाशाचा अर्थ-"नाही"च्या जागी "आहे"असा घेणारेच आहेत. तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं जग ही रंगभूमी आहे आणि पक्षपल्टू /होत्याचे नव्हते कलाकार राजकीय रंगभूमीवर अगणितच! मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो. भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबात; बरे का छोटा (-पण विचाराने मोठा) डॉन!

शितल गुरुवार, 04/17/2008 - 19:03
आपल्या देशात, देशा पेक्षा पक्ष मोठा कसा होईल हेच पाहिले जाते, आणि कॉग्रेस पक्षा एवढा जातीचे राजकारण करून निवड्णुक लढवणारा दुसरा पक्ष नसेल.

In reply to by शितल

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 19:07
पक्ष-बिक्ष सारे छू. आपण आणि आपले खिसे कसे मोठे होतील हे पाहिले जाते. त्यासाठी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. आज त्याचा निषेध - उद्या त्यालाच पाठिंबा.

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 19:08
एका रात्रित शिश्टीम बदलते ती फक्त पिक्चरात !
भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबात;
सहमत.

In reply to by मनस्वी

छोटा डॉन गुरुवार, 04/17/2008 - 19:12
"भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबा"" असं बिलकूल नाही, परिस्थीती खरच बदलू शकते ... आत्ता लगेच का ? कदाचित याचे उत्तर नाही असे आहे ... कोण बदलणार ? प्रत्येकाने शक्य तेवढे प्रतत्न करावेत .... शेवटी " शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरी नको" ही मनोवॄत्ती कोठेतरी सोडावी लागेल ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

पटले डानराव तुमचे नाहीतर आम्ही म्हणत बसलो आहोत 'शिवाजी व्हावा शेजारच्या घरात, मावळा त्याच्या पलीकडच्या घरात, मग तुम्ही?? आम्ही मात्र राहणार स्वराज्यात." ;) अहो हे आजचे नाही हे तर फार पूर्वीचेच आहे. शांत राहून संधीची वाट पहाणे हे उत्तम. पुण्याचे पेशवे

मानस गुरुवार, 04/17/2008 - 20:12
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली तेव्हा ते सोळा वर्षांचे होते, त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते ४७ वर्षांचे होते. साधारणपणे तुमच्या मते कुठल्या वर्षी एखाद्याने पंतप्रधान व्हावे? जगातला सगळ्यात लहान पंतप्रधान ३४ वर्षांचा होता (२००४ साली). ह्यात मी राहुल गांधीची बाजू घेत आहे असे नाही, पण सध्या ह्या जगात "युवा" ह्या एका शक्तिची फार मोठी गरज आहे. हेच उद्याचे प्रतिनिधी आहेत,आशास्थानं आहेत. मी तर म्हणेन, वयाच्या ६५ वर्षानतंर निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे. निदान राहुल गांधी इतर राजकीय पुढार्‍यांच्या मुलांसारखा "व्यसनाधीन" तरी नाही. काँग्रेस काय, भाजप काय सगळे एका माळेचे मणी. तरीसुद्धा फक्त वय लहान आहे म्हणजे देश चालवता येत नाही, हे काही खरं नाही.

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 21:06
डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी. राजकारणाचे जाउद्या / चॅनेल वाल्यांचे पण जाउद्या. ते पोटासाठी कोणालाही कसेही प्रोजेक्ट करतात . सबसे तेज म्हणत अमरसिंगना महात्मा बनवतात आणि राज ठाकरेना व्हीलन बनवतात. पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर? कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का? एका विश्वनाथ प्रतापाने काय प्रताप केले ते तुम्ही जाणताच.त्यांच्या एका निर्णयानी भरातात केव्हढी दुफळी माजली. आडवाणी तेंव्हा रथ यात्रा काढत भारताला एक करायचा प्रयत्न करत होते. बाबरी मशीदीचा मुद्दा त्याना केवळ लोकाना चघळायला देण्यासाठी हवा होता हे लपुन राहीले नाही. भारत आणि इराण किंवा पाकिस्तान यांच्यात फारसा फरक राहीला नसता. राहुल गांधी बद्दल आज जे बोलले जात आहे तेच राजीव गांधींबद्दल बोलले गेले होते. तसेच इन्दीरा गान्धींबद्दल बोलले गेले होते. त्यांची तर " गुंगी गुडीया" अशी हेटाळणी केली गेली होती. एक स्टॉप गॅप ऍरेन्जमेन्ट अशीच त्यांची छबी बनली होती. देशाला जर दिशा द्यायची असेल तर नव्या विचारांची व्यक्तीच पंतप्रधानपदी असावी लागते. कसाही असला तरी हिटलरने जर्मनी ला नवी दिशा दीली. सद्दाम ने इराक उभा केला.सद्दाम असेपर्यन्त इराक मध्ये कोणतीही जातीयवादी शक्ती नव्हती. इराक एक सार्वभौम आणि पुढारलेले राष्ट्र होते. दुर्दैवाने आपल्या देशाला काही काळ देवेगौडांसारखे महान पन्त्प्रधान मिळाले होते ज्यानी काहीही केले नाही. तिसरी आघाडी कोणत्या आणि कसल्या लोकानी बांधली आहे ते सर्वच जाणतात. नव्याअ रक्ताला वाव मिळाला पाहीजे हे नुसते बोलायचे आणि वेळ आली की त्यांच्यावर टीका करायची. राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही. त्यांच्या कडे नव्या कल्पना असु शकतील. त्या ते आमलात आणु शकतील मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्‍या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्‍या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्‍या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल का? गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते? राहुल गांधी हे एक संयमी व्यक्तीमत्व आहे हे तरी मान्य करा. ते कदाचीत त्यांच्या शिक्षणा नुसार भारताला राजीव गांधी नी जशी नवी दिशा दिली तसेच काहीतरी करुन दाखवतील अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. गांधी घराण्याची पार्श्वभुमी त्याना लोकांचा पाठींबा मिळवुन देइल.हा त्यांचा ऍडीशनल यु एस पी असु शकतो.

In reply to by विजुभाऊ

मानस गुरुवार, 04/17/2008 - 21:41
विजुभाऊ ... तुमच्या सर्व मतांशी मी सहमत आहे. कुठलाही राजकारणाचा अनुभव नसताना राजीव गांधींनी देशाला एक वेगळी दिशा मिळवून दिली. आज आपण "टेलीकम्युनिकेशन्स" क्षेत्रात तसेच "ईंटरनेट" द्वारे जे काही करतो आहे, त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर कधीही असे वाटले नाही की त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. खरंतर राहुल गांधी सारखे तरुण, तडफदार व्यक्तिमत्वाची माणसं ह्या देशाला हवी आहेत.

In reply to by मानस

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:08
आम्हालाही समजू दे. आमच्याकडे इन्टरनेट येण्यामध्ये राजीवचे काय नक्की महान कर्तृत्व होते बरे? आपल्या म्हणण्याप्रमाणे राजीव नसता तर आज भारतात इन्टरनेट नसते? जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 22:57
जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? जगात भारता इतके सॉफ्ट वेयर तज्ञ कोणत्या देशात आहेत ते सांगा ना? भारतातली वाहन क्रान्ती त्यांच्यामुळे झाली. हे तरी खुल्या दिलाने मान्य करा.

In reply to by ऐश्वर्या राय

देवदत्त गुरुवार, 04/17/2008 - 23:25
इंटरनेट आले असते की नाही ते नक्की सांगता येत नाही. परंतु जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या? ह्याचा अर्थ पूर्ण जगात फक्त राजीव गांधींनीच हे कार्य केले असा काढायचा आहे का? हे काम भारतात राजीव गांधींमुळे झाले असे त्यांचे म्हणणे असेल.

In reply to by नीलकांत

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:14
एकमेकाचे कौतुक करू अवघे होऊ खूष. 'मिसळपावी'परंपराच आहे ना? इथले सारे 'कंपू' सभासद एकमेकांची थोपटण्यात (पाठ हो! तुम्हाला काय मी तात्या वाटले का वाह्यात लिहायला?) अगदी तत्पर असतात. अहो रुपम् अहो ध्वनी!

In reply to by ऐश्वर्या राय

नीलकांत गुरुवार, 04/17/2008 - 23:11
ह्या प्रतिक्रियेला मनापासून उत्तर एवढेच की शक्य असल्यास कुठल्याही विषयावर उत्तर देताना लेखक विसरा आणि स्वतःच मत द्या, असं असावं, असं वाटतं. बाकी तुम्हासारख्या मिसळपावच्या परंपरा कोळून प्यायलेल्यांना मी पामर ते काय सांगणार? एवढंच म्हणू शकतो की एवढ्यात मिसळपावच्या परंपरेबद्दल लेख येत असेल तर तो विनोदी वगैरे आहे का अशी शंका येते. :-) बाकी तुम्ही ही काही लिहा की राव, त्याला आमच्या भाषेत 'नेट' लागतो असं म्हणतात, कुठं ते विचारू नका. ;-) नीलकांत

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन Fri, 04/18/2008 - 12:48
विजूभाउ, प्रथम मी सांगतो की मला ह्या मिडीयाबद्दल काहीही बोलायचे नाही, आजचा मिडीया त्या योग्यतेचा राहिलेला नाही त्यामुळे तो कुण्ला हिरो ठरवतो आनि कुणाला व्हिलन ह्या गोष्टी सध्या बाजूला राहूदेत ... "पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर? कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का?' हा मुद्दा मला अमान्य. कुठला नेता म्हनाला म्हनून देशात नव्या गोष्टी, वने तंत्रज्ञान आले हे पण अमान्य. नेता नवी दिशा देतो हे मान्य पन सर्व प्रगतींच्या योजनांची आखणी व अंमलबजावणी ही आपल्या "नोकरशाह" वर्गाकडून केली जाते हे खरे सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल की लालूजींनी रेल्वे फायद्यात आणली, मी म्हणेन की रेल्वे खात्यात काम करणार्‍या नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्‍यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली, नेट आले, भारी गाड्या आल्या हे झूट.... फरक असा की ते फक्त त्यावेळी सत्तेत होते.... "राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही." एवढा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही त्यासाठी. आणि बाकी बिरूदांचे म्हणाल तर मला नाही वाटत की गांधी घराण्यावर असे आरोप करण्याची कुणाची छाती आहे. अहो खुद्द "संजय गांधी " एवढा नादान, गुंड, उर्मट होता तरी सगळे मुग गिळून शांत होते. आज तर "राहूल" युवराज आहे. मला असे नाही म्हणायचे की राहूलचे कॅरेक्टर चांगले नाही पण तो मुद्दा ठरू शकत नाही. "पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्‍या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्‍या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्‍या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल ?" हम्म. मुद्दा मान्य पण माझे वैयक्तीक मोदींबद्दल असे मत नाही ... मायावती तर दखल न घेण्याच्या लायकीची ... "गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते?"' मुद्दा विचार करन्याजोगा नक्कीच आहे. मी पण पुण्याई वापरली असती पण सध्या जी नाटके चालू आहेत ती चालू दिली नसती. अर्जून्सिंगासारख्या "हुजर्‍यांनी" नक्कीच फटकारले असते... बाकी राहूलने जरूर पंतप्रधान व्हावे, ह्यात चिडचिड व त्रागा करण्यासारखे काही नाही व करूनही काही उपयोग नाही. पण कमीत कमी त्याआधी त्याने स्वतला सिद्ध करावे ... दुसरे घोड्यावर बसवतात म्हणून लगेच गुडघ्याला बाशिंग बांधू नये एवढीच अपेक्षा... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 13:27
नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्‍यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली बिनतोड मुद्दा, पटले. पण असेही वाटले की "दगडापेक्षा वीट मउ" एटलिष्ट मम म्हणाले हे ही नसे थोडके !

पान्डू हवालदार गुरुवार, 04/17/2008 - 21:09
सगळॅ तसेच ... बळासाहेब उद्ध्व ला प्रोजेक्ट करतात ... पवार सहेब पोरिला ... मग ही घराणे शाही नाही का .... काहीही म्हणा .. कोन्ग्रेस ला पर्याय नाही ...म्हण जे "गान्धी" ला पर्याय नाही ... तसेही कोणत्याही शाळ्कर्री मुलाला विचरा ... "गान्धी" कोण ... उत्तर मिळेल .. "सोनिया गान्धी" :) देशाची सुन .. ;)

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 21:37
पान्डोबा बाकी काही जमले नाही तरी जरा कलफलक वापरायला शिका. किती दिवस त्याच त्याच चुका करत रहाणार तुम्ही.

नीलकांत गुरुवार, 04/17/2008 - 21:46
पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल]. ह्या बद्दल म्हणाल तर ही कॉंग्रेसची परंपराच आहे. आपली घराणेनिष्ठा सिध्द करा आणि पुढच्या वेळी संभाव्य उमेदवारांमध्ये अग्रमान मिळवा. सोनीयाच्या घरी जाऊन त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी मन वळवणार्‍यांमध्ये आपले पवार साहेब सुध्दा होते की, मॅडमवर निष्ठा दाखवल्याचे फळ सुशिलकुमारांना नेहमीच भेटलेले आहे, चाकुरकर पाटलांना गृहमंत्रीपदाचा मान या निष्ठेपायीच आहे हो. आता एकदा कबड्डी खेळायचं म्हटल्यावर हाफपॅन्ट घालत नाही म्हणून कसं चालेल? त्यामुळे हे असं चालायचंच , याचा पुढे फायदा होतो असं कॉग्रेसचा इतिहास सांगतो. दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता ही घटना घडल्यानंतर एका महिण्यानंतर प्रसारमाध्यमांना याची माहिती झाली. एक महिना जूनी का होईना, प्रसारमाध्यमांना याची दखल घ्यावीशी वाटली. त्या आधी प्रियंका एका लक्ष्मी-नारायणाच्या मंदीरात पुजा करायला गेल्या याचा मात्र उल्लेख नव्हता. तर आपल्या पित्याच्या मारेकरीला भेटायला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गोडसे परिवाराशी सुध्दा गांधी परिवाराशी संबंध होता. त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. येथे एका गोष्टीकडे लक्ष वेधता येईल, की राहूलच्या आधी प्रियंकानेच आपल्या आईसाठी प्रचार केला आहे. त्यावेळी तिचं नाव प्रियंका गांधी असंच कॉग्रेसवाले सांगत होते. तीने मात्र आवर्जून आपलं नाव वढेरा असल्याचं सांगीतलं. मग त्यातून पळवाटा काढल्या की, प्रियंका गांधी - वढेरा किंवा नुस्तंच प्रियंका म्हणावं. राहूल पंतप्रधान बनावेत का नाही? - भारताच्या घटनेनुसार वय वर्षे २५ पुर्ण झालेला भारतीय नागरीक पंतप्रधान बनु शकतो. त्यामुळे राहूल गांधी पंतप्रधान बनण्यास पात्र आहेत. त्यांची सर्वात मोठी आणि सर्वात प्राथमिक पात्रता म्हणजे ते 'गांधी' आहेत हीच आहे, हे मला, तुम्हाला आणि खुद्द राहूलला सुध्दा मान्य आहे. पंतप्रधान पदी या पुर्वी खुप मोठी माणसं बसली आहेत हे खरं आहे. सध्याच्या परिस्थितीत एवढ्या अल्पमतात राहूल पंतप्रधान होणं पसंत सुध्दा करणार नाहीत. मात्र येत्या नाही तर त्या पुढच्या वेळीतरी आपली प्रतिमा पंतप्रधान पदासाठी तयार करण्याची ही सुरूवात आहे. माझं वैयक्तीक मत मात्र राहूलने बहूमतात येऊन पंतप्रधान बनावं असंच आहे. कारण नवीन रक्त आहे, जग आणि तत्रज्ञान आदींशी ओळख आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पदाला पक्षांतर्गत आव्हाने नसतील. म्हणजेच निश्चींतपणे आणि कणखरपणे निर्णय घेता येतील. राहीलं अनुभवाचं तर त्यासाठी अनेक महत्वाची लोकं आजंच त्यांच्या भोवताली आहेत की ! आणि शेवटी कोण पंतप्रधान व्हावं हे आपली सार्वभौम जनता ठरवेल. एक मात्र सांगता येईल की, 'राहूल पंतप्रधान व्हावेत.' हे वाक्य एवढं साधं नाही महाराजा ! अहो बाकी सोडा, आमच्या बारामतीकर सायबांनीसुद्धा हाच घोष लावलाय. आता कुणाची बिशाद आहे या वाकयाचं व्याकरण चालवायची? नीलकांत

In reply to by नीलकांत

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:20
अहो तेच ना ते, विदेशी महिला पंतप्रधान नको म्हणून वेगळा पक्ष काढणारे? परवा त्यांनीच तर त्याच विदेशी बाईला पंतप्रधानपदासाठी पाठींबा जाहीर केला की हो. वाक्याचे व्याकरण बरोबर आहे पण शुध्द्लेखन नाही. आणि अर्थ मात्र भयंकर आहे..पंतप्रधान असा शब्द आहे..जर चुकून कधी अचूक लिहायची इच्छा झालीच तर असूदे माहिती म्हणून लिहिले. आता तात्या परत कसे भडकतात त्याची मज्जा ;-)

मैत्र गुरुवार, 04/17/2008 - 22:21
याचा अर्थ असा होतो कि पर्याय नाही म्हणून त्यातल्या त्यात बरा कोण त्याला पंतप्रधान पद द्या... लायक आहे म्हणून किंवा खरंच तोच पाहिजे म्हणून नाही... दगडापेक्षा वीट मऊ... दोन्ही लागणारच ना ? घराणेशाही .. ती महाभारता पासुन आहे... आणि काँग्रेस च्या उघड घराणे शाही ला विरोध करणार्‍यांनी स्वतः सुद्धा केली आहे (पक्षी: शिवसेना आणि बारामती)... पण राजपुत्र राजा होण्याची तयारी केली जात होती... आता फक्त ती राज कारण म्हणजे मतांचं राजकारण कसं करायचं आणि सोयीस्कर युत्या कशा करायच्या यापुरतं च मर्यादित आहे... कोणत्याही लोक प्रतिनिधीला काही शिक्षण ज्ञान किंवा किमान खात्याची माहिती सुद्धा नसते हा सामान्य आणि गृहीत अनुभव आहे .. आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच...

नीलकांत गुरुवार, 04/17/2008 - 22:43
आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच... हे मात्र एकदम सही रे सही. नीलकांत

पं नेहरू समर्थक व विरोधक दोघांनी वाचावे असे पुस्तक An explosive book which must be read both by admirers & critisizers of Pandit Nehru ( First Prime Minister of India)पं. नेहरू यांचे समर्थक व विरोधक दोघांनी जरूर वाचावे असे आश्चर्याचे धक्के देणारे एक नवे पुस्तक. http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=44441327930350077&pid=1207574261477&aid=1207212398 खुलासा: ही माहिती मी एक जागरूक वाचक ह्या नात्याने देत आहे व माझा लेखक/प्रकाशक यांच्याशी कुठलाच संबंध नाही व त्यांनी मला नेमलेलेही नाही.लेखकाच्या सर्वच मताशी मी सहमत असेनच असे नाही.दिनांक ६ एप्रिल रोजी नागपूरला पुस्तकावर जाहिर चर्चा झाली.त्यात सर्वश्री मुज़फ्फर हुसेन(पद्मश्री),डॉ. वि.स.जोग,डॉ.कुमार शास्त्री व डॉ.किशोर महाबळ यांनी विचार मांडले.शेवटी लेखक डॉ. नि.र.व~हाडपांडे यांनी शंका समाधान केले. वृत्तांत ७ एप्रिलच्या सकाळ व इतर वर्तमानपत्रांत आला आहे.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

नीलकांत Fri, 04/18/2008 - 10:42
देशावर उपकार करण्याची क्षमता कुणातच नाही. फार फार ह्या लोकांच्या हातात त्याकाळी देशाची सत्ता होती आणि त्यावेळी यांनी चुकांपेक्षा चांगली कामे जास्त केली. म्हणून त्यांचं देशाच्या पायाभरणीत योगदान मान्य करावं. पण स्वातंत्र्यानंतर यांनीच देशाला दिशा दिली... सोबत पुढंचं वाक्य जर का असं असेल की... हे नसते तर देश इथवर आलाच नसता, तर हे मात्र चुक. देश इथवर आला असताच. देश प्रगती करतो याला जेवढे नेते जवाबदार असतात त्याही पेक्षा देशाची जनता जवाबदार असते. याचा प्रत्यय आपल्या शेजारी देशांकडे पाहून यावा. आमच्या नेत्यांच्या धोरणाला जनतेने उत्तम साथ दिली म्हणून आपण इथवर आलो. नेहरूंच्या काळीसुध्दा नेहरूंना उत्तम पर्याय उपलब्ध होते. मात्र आता या जर तर ला अर्थ नाही. नेहरुंनी देश निर्माणासाठी खुप कष्ट घेतले हे जसं मान्य करावं तसंच त्यांनी खुप घोडचुका केल्या आहेत हे सुध्दा मान्य करावं. आज गांधी-नेहरूंना उगाच विरोध किंवा उगाच अनुनय करण्यात राजकिय सोडला तर अन्य कसलाच फायदा नाही. ते होते त्यांनी त्यांचं योगदान दिलं, त्यांच्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारलेल्या बहुद्देशीय प्रकल्पांचा लाभ आजही होतो आहे, त्यांनी देशाला नवी दिशा दिली. मात्र त्याच वेळी त्यांच्या स्वप्नाळू भुमिकेमुळे काश्मिर प्रश्न रेंगाळला आहे, चीनचं आक्रमण आणि पराभव यांचं श्रेय सुध्दा त्यांचंच. याच शल्यात ते गेले. असे अनेकानेक मुद्दे येथे देता येतील. विषयांतर होईल म्हणून थांबतो. आपला चर्चा विषय आहे की भारताला तरूण पंतप्रधान हवा की नको. लायकी वयानुसार ठरते की नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 11:05
विषयांतराबद्दल क्षमस्व पण राजकारणासारख्या विषयावरसुद्धा लिहीतांना त्याच्या लिखाणात कधीच कुठला अभिनिवेष नसतो, नीलकांताचे कौतुक वाटते. :) मी स्वत: प्रयत्न करुनही अजिबात साध्य करु शकलो नाही आजतागायत. अभिनंदन नीलकांत.

विद्याधर३१ Fri, 04/18/2008 - 07:46
तरुण रक्त वगैरे ठीक आहे. पण डायरेक्ट पंतप्रधानपद ?? आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही. विद्याधर

विसोबा खेचर Fri, 04/18/2008 - 09:51
छान चर्चा सुरू आहे, वाचून जरा टाईमपास झाला! ;) बाकी, हल्लीचं राजकारण हा माझ्या आवाक्याबाहेरचा आणि बुद्धीपलिकडचा विषय आहे... चालू द्या... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

एक Fri, 04/18/2008 - 23:30
आजचं राजकारण आणि बुद्धी यांचा काही संबंध राहिला आहे का? बिन मणक्याची पाठ, दोन हात (वरच्यांचे पाय पकड्ण्यासाठी) आणि जीभ (वरच्यांचे *** चाट्ण्यासाठी, किंवा गुणगान गाण्यासाठी) असली कि पुरे.. *** == वरच्याच्या मनात येईल तो अवयव. यापैकी कुठलही क्वालिफिकेशन तुमच्या आमच्याकडे नाही. त्यामुळे आपण बाहेरच बसलेलं बरं, काय म्हणता?

नीलकांत Fri, 04/18/2008 - 10:25
भारतात निवडून आलेला कुणीही पंतप्रधान होऊ शकतो. लोकसभेच्या निवडणूकीसाठी उभे राहण्याची वयाची पात्रता आहे २५ वर्षे. ती राहूलनी पुर्ण केली आहेत. येत्या निवडणूकीत जर का तो बहूमत (आता हे शक्य नाही) किंवा बहूमताच्या जवळ जर गेला आणि त्याची इच्छा झाली पंतप्रधान व्हायची तर त्याला अडवणार कोण? याचा अर्थ मला या देशाचा पंतप्रधान केवळ राहूलच व्हावा असं वाटतं असं नाही. मात्र राहूल गांधी पंतप्रधान झाल्याने देशाचं काही नुकसान होईल असंही वाटत नाही. उलट झालंच तर , राहूलला आपल्या खुर्चीची चिंता नसल्यामुळे तो जास्त निश्चिंतपणे भारताच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकेल असं वाटतं. सध्या देशाची परिस्थिती पाहता, प्रादेशीक पक्षांना आलेलं महत्व लक्षात घेऊन असं म्हणता येईल की कुठलाही एक पक्ष बहूमतात येणं शक्य नाही. त्यामुळे येत्या काळात ज्याला जास्त गतीनं आणि योग्य असं राजकारण करता येईल तो पंतप्रधान पदाच्या जवळ जाईल. ह्यात मात्र राहूल कच्चा असण्याची शक्य आहे. कारण अशी गळेकापू स्पर्धा त्याने कधीच अनुभवलेली नसेल. राहूलसाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून काही वर्षांपुर्वी खुप फार्मात असलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना मध्यप्रदेशात लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आले. कॉग्रेसच्या परंपरेप्रमाणेच सारं घडतंय. सध्या राहूल आपला ग्रुप बनवताहेत, सचिन पायलट, मिलींद देवरा आदी नवी मंडळी सुध्दा सोबत आहेत. ज्यांना काँग्रेस आवडत नाही त्यांनी निवडणूकीत कॉग्रेसला हरवावं. म्हणजे वादच मिटला. या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणार्‍या परिवारांतून सुध्दा आता युवराज आणि युवराज्ञी समोर येताहेत. या युवराज्ञी बद्दल वरचाच उल्लेख करता येईल की प्रमोद महाजनांच्या मुलीच्या नावात महाजन कायम ठेवून मग त्यांना समोर आणल्या गेले आहे. गोपीनाथरावांचे सुपुत्र सुध्दा राज्यस्तरीय पदाधिकारी आहेत. 'परिवारा'च्या भाषेत जवाबदारी किंवा दायित्व असा शब्द आहे. आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही. हे मात्र पटले, केतकरांना काय वाटतं हे मात्र कुणीही सांगू शकतो. ;-) सोबतच काही नावं देतो पंतप्रधान झालेल्यांची, देवेगौडा, चंद्रशेखर आणि इंद्रकुमार गुजराल. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री Fri, 04/18/2008 - 10:39
>>या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो. अम्म्म .. टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत. >>गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे. अहो राजकारण हा पिढीजात धंदा आहे त्यांचा !

In reply to by आनंदयात्री

मदनबाण Fri, 04/18/2008 - 10:58
टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत. ज्याला जे मिळेल ते त्याने ओरबाडुन घ्यावे अजुन काय !!!!! हे राजकारणी म्हणजे आपल्या देशाला चिकटलेली गोचीड आहेत..... (१०० मै से ९९ धोकेबाज ) असे समजणारा..... मदनबाण

इनोबा म्हणे Fri, 04/18/2008 - 16:30
'आम्ही पंतप्रधानपदासाठी इच्छूक नाही' असे आम्ही आत्ताच जाहीर करतो. मागाहून उगाच वाद नकोत. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

अजय जोशी Sat, 04/19/2008 - 16:40
आज कोणीही महात्मा नाही, नलिनी म्हणजे नथुराम नाही. आपला बे-सुमार अजय जोशी
ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे. पहिल्यांदा मी नेहमीचच आहे म्हणून दुर्लक्ष करून विसरण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री "बघूया काय चाललय देशात" म्हणून "टी व्ही" लावला तर तेच नाटक चालू. अशी सणक आली ना मस्तकात कि विचारू नका, म्हणूनच हा लेख लिहण्याचा खटाटोप .... आत ह्यात गांधींचा काय संमंध ? पण मी ज्या लोकांबद्दल बोलतोय ते महात्मा गांधी नसून आजचे ढोंगी गांधी म्हणजे अनुक्रमे "सोनिया ग़ांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा [ सोईसाठी ग़ांधी , कारण त्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही ]." एकूण दोन घटना आहेत ..... १.

गमतीदार ऊखाणे.

विवेकवि ·

शितल गुरुवार, 04/17/2008 - 21:03
काय हो लग्नाच्या सीझन चालला आहे म्हणुन हे उखाणे की काय ?

वडापाव Fri, 04/18/2008 - 13:08
मस्त आहेत, उखाणे लिहायला अन् वाचायला मलाही मजा येते. मी सुध्दा काही उखाणे सुचल्यावर लिहीन म्हणतो. आपला नम्र, वडापाव

सत्या Wed, 04/23/2008 - 13:38
रावणाला आला राग बिभिशण हसल्यावर............... रावणाला आला राग बिभिशण हसल्यावर............... .......रावा॑चे नाव घेते ......ला बसल्यावर.....!!!!!!!!!!!!!

सत्या Wed, 04/23/2008 - 13:46
रावनाच्या देशात रम आणि वोड्का........... ......राव दिस्ल्यावर सर्वानि मिळुन झोड्पा.

शितल गुरुवार, 04/17/2008 - 21:03
काय हो लग्नाच्या सीझन चालला आहे म्हणुन हे उखाणे की काय ?

वडापाव Fri, 04/18/2008 - 13:08
मस्त आहेत, उखाणे लिहायला अन् वाचायला मलाही मजा येते. मी सुध्दा काही उखाणे सुचल्यावर लिहीन म्हणतो. आपला नम्र, वडापाव

सत्या Wed, 04/23/2008 - 13:38
रावणाला आला राग बिभिशण हसल्यावर............... रावणाला आला राग बिभिशण हसल्यावर............... .......रावा॑चे नाव घेते ......ला बसल्यावर.....!!!!!!!!!!!!!

सत्या Wed, 04/23/2008 - 13:46
रावनाच्या देशात रम आणि वोड्का........... ......राव दिस्ल्यावर सर्वानि मिळुन झोड्पा.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पुण्यात औन्ध मधे बंगला उभा आहे ऐटित जळू नका लोकहो ... राव आहे आय़् टीत पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' , ........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक, .... आहेत आमचे फार नाजुक. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर............ आहे रेडा. अधिकमासात आईने दिली चांदिची परात, सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात. मिताली बिल्डींग,तिसरा मजला घर नं - ११ , घराला लावली घंटी, वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, ...

कोंढाणा

उदय सप्रे ·

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 11:58
झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ! दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा !
हर हर महादेव ! काश, हम भी होते उस जमाने में... - (मावळखोर्‍यात फिरणारा ढाण्या छावा) ध मा ल.

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 14:14
झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा !
काव्य आवडले.

सागर गुरुवार, 04/17/2008 - 14:56
उदय मित्रा, नेहमीप्रमाणेच जोशपूर्ण काव्य आहे. झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ! या चार ओळी तर मस्तच शिवाजी महाराजांच्या काळच्या इतिहासावरचा अधिकार आणि तुझी प्रतिभाही शब्दां-शब्दांतून दिसते... असेच लिहित रहा आणि समस्त महाराष्ट्राला शिवरायांच्या तेजाने भारुन टाक... आजच्या रयतेला आणि नेत्यांनाही अशा प्रेरणेची गरज आहे. (शिवरायांच्या सुराज्याची पुन्हा स्वप्ने पाहणारा) सागर

उदय सप्रे गुरुवार, 04/17/2008 - 16:27
प्रतिक्रियांबध्दल आभार ! मला वाटले होते की शेवटच्या ४ ओळींनी तानाजी च्या स्वराज्याच्या प्रायोरिटीज् आणि आपण रायबाच्या लग्नात नसलो तरी चालेल पण आपला बाप "शिवबा" ही कसर नक्कीच भरून काढेल असा विश्वास आणि म्हणूनच हक्कचे शिवबांस सांगणे पण दिसते , हे सर्व बघुन डोळ्यांत पाणी येईल..... दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा !

In reply to by उदय सप्रे

सागर गुरुवार, 04/17/2008 - 17:51
मित्रा तानाजीची अवस्था आणि शेवटचे कडवे - डोळ्यांत पाणी तर येणारच पण मी उल्लेखिलेल्या ओळींमुळे त्वेष आणि जोश दोन्हीही येतो. सध्या तरी आपल्या समाजाला अश्रू गाळण्यापेक्षा त्वेषाची आणि जोशाची गरज जास्त आहे बाकी प्रत्येक शब्दन् शब्द टच् करणारा आहे यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी (मावळा) सागर

विदेश गुरुवार, 04/17/2008 - 16:35
कोंढाणा- कोढाणा यातील मी काय वाचू! माझ्या अल्पमतीनुसार कोंडाणा वाचू का? पुन्हा गैरसमज नको-(काव्य उत्तमच आहे याबद्दल दुमत नाहीच)

उदय सप्रे गुरुवार, 04/17/2008 - 16:50
या किल्ल्यावर फार पूर्वी कौडिण्य ॠषींचे वास्तव्य होते , पण गडाचे नाव लिहिताना इतिहासात "कोंढाणा" असेच म्हणतात असे मला वाटते. आम्ही पण अल्पमतीच आहोत , आमचा काहीही गैरसमज नाहिये साहेब कुणाहीबध्द्ल , "कोढाणा" ही टंकलेखनातील चूक आहे - म्हणून जाहीर माफी मागतो ! उदय सप्रे

विसोबा खेचर गुरुवार, 04/17/2008 - 17:20
सुंदर कविता... तानाजी मालुसरे की जय! महाराजांच्या या छाव्याला मिसळपाव परिवाराचा मानाचा मुजरा...! तात्या.

प्राजु Fri, 04/18/2008 - 09:29
अतिशय सुंदर कविता. 'गड आला पण माझा सिंह गेला' इतिहासात वाचलेले हे शिवरायांचे शब्द आठवले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे Fri, 04/18/2008 - 11:13
प्राजु, अभिप्रायबध्दल धन्यवाद ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यापासूनच स्फूर्ती घेऊन माझे ब्लॉग्ज तयार केले आहेत , सवड मिळेल तेंव्हा बघा आणि मला अभिप्राय जरूर कळवा. कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ आपला मित्र, उदय सप्रे

विकास Fri, 04/18/2008 - 22:53
कविता आवडली. चित्र मात्र दिसत नाही आहे. बाकी एक अवांतर आठवणः काही वर्षांपुर्वीची (भारतातील - महाराष्ट्रातील) - मित्र मित्र बोलत असताना "सिंहगड" हा शब्द आला. त्यावेळी एका मराठी मुलाने प्रश्न विचारला - म्हणजे तोच नं, ज्याचा "सिंहासारखा शेप" आहे तो? ;)

प्रमोद देव Fri, 04/18/2008 - 23:15
उदयराव हे एक काव्य म्हणून उत्तम आहे पण त्यात एक ऐतिहासिक चूक आहे. ही चूक सुधारता आली तर पाहा. झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ह्यामध्ये तानाजीने उदयभानाला छाटलेले नाहीये तर ते त्याच्या मामाने... शेलारमामाने छाटलेय. उदयभानाशी लढताना तानाजी कामी आला हा इतिहास आहे. अर्थात तानाजीच्या हौतात्म्यामुळे शिवाजी महाराजांनी कोंडाण्याचे नाव बदलून सिंहगड(तानाजी म्हणजे सिंह ... असे महाराज म्हणाले) केले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

उदय सप्रे Tue, 04/22/2008 - 09:57
प्रमोदकाका, आणखीन एक लिहायचं अनावधानानं राहून गेलं : "सिंहगड" हे नांव फार आधीपासून प्रचलित होते , तानाजीच्या स्मॄतीप्रित्यर्थ महाराजांनी कोंढाणयाचे नांव बदलून "सिंहगड" केले हा एक पाठ्यपुस्तकी कल्पनाविलास आहे ! "गड आला पण माझा सिंह गेला" ही पण कल्पनाच आहे पण ती तानाजीच्या हौतात्म्याला अगदी साजेशी आणि महाराजांच्या माणसांवरील प्रेम करण्याच्या स्वभावाशी अगदी सुसंगत अशीच आहे - त्यामुळे हे लिहिणार्‍या लेखकाच्या कल्पनाशक्तीला सलाम !

उदय सप्रे Sat, 04/19/2008 - 09:37
प्रमोदकाका, सर्वप्रथम तुमच्या या पत्राबध्दल आभार ! कारण कविता वास्तवाचे भान ठेवून वाचणारे खूप कमी लोक असतात आणि तुम्ही त्या खूप कमी लोकांतील एक आहात हे जाणवले. काही स्पष्टीकरण : १. राजा शिवछत्रपती आवृत्ती १४ वी , पान ७७७ पहा : तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानला बसला ! उदयभानचा शिलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला ! दोन्हीही महप्रचंड शिखरे एकदम एकांच क्षणी धरणीवर कोसळली ! २. छत्रपती शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर्-तिसरी आवृत्ती- पान ३४० : दोघेही वीर मोठे शूर्,बलवान असल्याकारणाने त्यांची झटापट बराच वेळ मोठ्या निकराने झाली.दोघांसही पुष्कळ जखमा झाल्या आणि शेवटी परस्परांचे वार परस्परांच्या वर्मी लागून ते दोघेही एकाच वेळी समरभूमीवर चित् होऊन गतप्राण झाले. ३. श्रीमान योगी - रणजीत देसाई - अठरावी आवृत्ती - पान ६२१-तानाजीचा भाऊ सूर्याजी राजेंना तानाजीच्या बलिदानाची हकीकत सांगताना म्हणाला : उदयभानूच्या तडाख्यानं त्यांची ढाल तुटली.डाव्या हातावर वार झेलीत तानाजी उदयभानूला भिडले; आणि काय होतय् ,हे कळायच्या आत दोघेही जमिनीवर कोसळले ! प्रमोदकाका, यातील संदर्भ क्रमांक १ व २ यांचा शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील अधिकार वादातीत आहे. क्रमांक ३ - कै.रणजीत देसाई हे भाषाप्रभू आणि म्हणूनच माझा आदर्श आहेत , त्यांचा संदर्भ ऐतिहासिक दृष्ट्या दिलेला नाही , माझा मानाचा मुजरा म्हणून दिला आहे ! शेलारमामांनी उदयभानूस छाटले नव्हते ! हा शाळेतील पाठ्यपुस्तकातील भाग वाटत आहे - तरीही तुम्ही मला संदर्भ दाखवा , मी चूक नक्कीच सुधारीन ! यत फक्त मावळे ३०० होते की ४०० हाच वाद आहे पण त्यामुळे जास्त संख्या असलेल्या गनिमांपुढे कमी मावळे झुंजले या सत्यास गालबोट लागत नाही ! "ऐतिहासिक काव्य किंवा कादंबरी लिहीत असताना कल्पनाविलास करता येतो पण ऐतिहासिक सत्य डावलता येत नाही !"याची विनम्र जाणीव मला आहे कारण संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त वादळी व्यक्तीमत्वावर मी कादंबरी लिहीत आहे त्यामुळे असले विवाद उद्भवणार याची मी मनाची पूर्वतयारी केली आहे. या उत्तरामधे आपल्याबध्दल कुठलाही आकस वा गैरसमज नाहिये ह्याची कृपया नोंद घ्यावी , उलट एक सुजाण आणि दक्ष वाचक मला लाभल्याबध्दल आणि हे व्यासपीठ मला दिल्याबध्दल तुमचे आणि मि.पा. चे कोटी कोटी आभार ! आपल्याशी प्रत्यक्ष भेट वा बोलायला आवडेल. आपला विनम्र, उदय सप्रे भ्रमणध्वनी : ९९६७५ ४२७०३

In reply to by उदय सप्रे

प्रमोद देव Tue, 04/22/2008 - 11:39
उदय माझे इतिहासाचे वाचन आणि ज्ञानही मर्यादित आहे. आम्हाला दुसरीत एक नाट्यप्रवेश होता ... गड आला,पण सिंह गेला! त्यावेळी तो मला मुखोद्गत होता. त्यात जे म्हटले होते त्याप्रमाणे... मी म्हटलंय. बाकी माझ्याकडे अजून काही माहिती नाही. जे काही पाठ्य पुस्तकात वाचले त्यालाच आम्ही भाबडेपणाने खरा इतिहास मानतो. तेव्हा तुम्ही म्हणता आहात तेच जास्त खरे असेल असे मी गृहीत धरतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विशाल कुलकर्णी गुरुवार, 08/13/2009 - 12:58
जबरदस्त कविता ! मिपाची जुनी पाने चाळताना आज खजिनाच सापडतो आहे. सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....!

आशिष सुर्वे गुरुवार, 08/13/2009 - 13:11
'कोंढाण'' ... निश:ब्द! इतिहासावरील चर्चा वाचून आनंद झाला.. अशा चर्चा होणे फार गरजेचे आहे असे मला वाटते.. ज्ञानात फार मोलाची भर पडतेय. हर् हर् महादेव!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

मदनबाण गुरुवार, 08/13/2009 - 13:25
सुंदर कविता... :) दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा ! अप्रतिम !!! मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 08/13/2009 - 19:41
आम्ही तोरणा चढत होतो.. एक आज्जी भेटल्या , त्या म्हणाल्या " आर दमताय काय ? आमचा शेलारमामा अर्ध्या तासात चढायचा" आमच्या अडानी मित्राला शेलारमामा कोण हेच माहीत नाही तो म्हणाला आणा शेलारमामाला जर १/२ तासात चढला तर १००० रुपये देयिन आम्ही हसुन हसुन दमलो . नंतर त्याला चुक कळल्यावर चेहरा त्याचा बघण्यासारखा झाला होता

फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 08/13/2009 - 19:43
दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा ! हे आवडले कविता पण आवडली

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 11:58
झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ! दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा !
हर हर महादेव ! काश, हम भी होते उस जमाने में... - (मावळखोर्‍यात फिरणारा ढाण्या छावा) ध मा ल.

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 14:14
झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा !
काव्य आवडले.

सागर गुरुवार, 04/17/2008 - 14:56
उदय मित्रा, नेहमीप्रमाणेच जोशपूर्ण काव्य आहे. झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ! या चार ओळी तर मस्तच शिवाजी महाराजांच्या काळच्या इतिहासावरचा अधिकार आणि तुझी प्रतिभाही शब्दां-शब्दांतून दिसते... असेच लिहित रहा आणि समस्त महाराष्ट्राला शिवरायांच्या तेजाने भारुन टाक... आजच्या रयतेला आणि नेत्यांनाही अशा प्रेरणेची गरज आहे. (शिवरायांच्या सुराज्याची पुन्हा स्वप्ने पाहणारा) सागर

उदय सप्रे गुरुवार, 04/17/2008 - 16:27
प्रतिक्रियांबध्दल आभार ! मला वाटले होते की शेवटच्या ४ ओळींनी तानाजी च्या स्वराज्याच्या प्रायोरिटीज् आणि आपण रायबाच्या लग्नात नसलो तरी चालेल पण आपला बाप "शिवबा" ही कसर नक्कीच भरून काढेल असा विश्वास आणि म्हणूनच हक्कचे शिवबांस सांगणे पण दिसते , हे सर्व बघुन डोळ्यांत पाणी येईल..... दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा !

In reply to by उदय सप्रे

सागर गुरुवार, 04/17/2008 - 17:51
मित्रा तानाजीची अवस्था आणि शेवटचे कडवे - डोळ्यांत पाणी तर येणारच पण मी उल्लेखिलेल्या ओळींमुळे त्वेष आणि जोश दोन्हीही येतो. सध्या तरी आपल्या समाजाला अश्रू गाळण्यापेक्षा त्वेषाची आणि जोशाची गरज जास्त आहे बाकी प्रत्येक शब्दन् शब्द टच् करणारा आहे यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी (मावळा) सागर

विदेश गुरुवार, 04/17/2008 - 16:35
कोंढाणा- कोढाणा यातील मी काय वाचू! माझ्या अल्पमतीनुसार कोंडाणा वाचू का? पुन्हा गैरसमज नको-(काव्य उत्तमच आहे याबद्दल दुमत नाहीच)

उदय सप्रे गुरुवार, 04/17/2008 - 16:50
या किल्ल्यावर फार पूर्वी कौडिण्य ॠषींचे वास्तव्य होते , पण गडाचे नाव लिहिताना इतिहासात "कोंढाणा" असेच म्हणतात असे मला वाटते. आम्ही पण अल्पमतीच आहोत , आमचा काहीही गैरसमज नाहिये साहेब कुणाहीबध्द्ल , "कोढाणा" ही टंकलेखनातील चूक आहे - म्हणून जाहीर माफी मागतो ! उदय सप्रे

विसोबा खेचर गुरुवार, 04/17/2008 - 17:20
सुंदर कविता... तानाजी मालुसरे की जय! महाराजांच्या या छाव्याला मिसळपाव परिवाराचा मानाचा मुजरा...! तात्या.

प्राजु Fri, 04/18/2008 - 09:29
अतिशय सुंदर कविता. 'गड आला पण माझा सिंह गेला' इतिहासात वाचलेले हे शिवरायांचे शब्द आठवले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

उदय सप्रे Fri, 04/18/2008 - 11:13
प्राजु, अभिप्रायबध्दल धन्यवाद ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यापासूनच स्फूर्ती घेऊन माझे ब्लॉग्ज तयार केले आहेत , सवड मिळेल तेंव्हा बघा आणि मला अभिप्राय जरूर कळवा. कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ आपला मित्र, उदय सप्रे

विकास Fri, 04/18/2008 - 22:53
कविता आवडली. चित्र मात्र दिसत नाही आहे. बाकी एक अवांतर आठवणः काही वर्षांपुर्वीची (भारतातील - महाराष्ट्रातील) - मित्र मित्र बोलत असताना "सिंहगड" हा शब्द आला. त्यावेळी एका मराठी मुलाने प्रश्न विचारला - म्हणजे तोच नं, ज्याचा "सिंहासारखा शेप" आहे तो? ;)

प्रमोद देव Fri, 04/18/2008 - 23:15
उदयराव हे एक काव्य म्हणून उत्तम आहे पण त्यात एक ऐतिहासिक चूक आहे. ही चूक सुधारता आली तर पाहा. झुंजला मर्द घेऊन चारशे मावळे - ताना वाघ ढाणा छाटून उदयभानूस , जिंकला मध्यरातीस गड कोंढाणा ह्यामध्ये तानाजीने उदयभानाला छाटलेले नाहीये तर ते त्याच्या मामाने... शेलारमामाने छाटलेय. उदयभानाशी लढताना तानाजी कामी आला हा इतिहास आहे. अर्थात तानाजीच्या हौतात्म्यामुळे शिवाजी महाराजांनी कोंडाण्याचे नाव बदलून सिंहगड(तानाजी म्हणजे सिंह ... असे महाराज म्हणाले) केले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

उदय सप्रे Tue, 04/22/2008 - 09:57
प्रमोदकाका, आणखीन एक लिहायचं अनावधानानं राहून गेलं : "सिंहगड" हे नांव फार आधीपासून प्रचलित होते , तानाजीच्या स्मॄतीप्रित्यर्थ महाराजांनी कोंढाणयाचे नांव बदलून "सिंहगड" केले हा एक पाठ्यपुस्तकी कल्पनाविलास आहे ! "गड आला पण माझा सिंह गेला" ही पण कल्पनाच आहे पण ती तानाजीच्या हौतात्म्याला अगदी साजेशी आणि महाराजांच्या माणसांवरील प्रेम करण्याच्या स्वभावाशी अगदी सुसंगत अशीच आहे - त्यामुळे हे लिहिणार्‍या लेखकाच्या कल्पनाशक्तीला सलाम !

उदय सप्रे Sat, 04/19/2008 - 09:37
प्रमोदकाका, सर्वप्रथम तुमच्या या पत्राबध्दल आभार ! कारण कविता वास्तवाचे भान ठेवून वाचणारे खूप कमी लोक असतात आणि तुम्ही त्या खूप कमी लोकांतील एक आहात हे जाणवले. काही स्पष्टीकरण : १. राजा शिवछत्रपती आवृत्ती १४ वी , पान ७७७ पहा : तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानला बसला ! उदयभानचा शिलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला ! दोन्हीही महप्रचंड शिखरे एकदम एकांच क्षणी धरणीवर कोसळली ! २. छत्रपती शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर्-तिसरी आवृत्ती- पान ३४० : दोघेही वीर मोठे शूर्,बलवान असल्याकारणाने त्यांची झटापट बराच वेळ मोठ्या निकराने झाली.दोघांसही पुष्कळ जखमा झाल्या आणि शेवटी परस्परांचे वार परस्परांच्या वर्मी लागून ते दोघेही एकाच वेळी समरभूमीवर चित् होऊन गतप्राण झाले. ३. श्रीमान योगी - रणजीत देसाई - अठरावी आवृत्ती - पान ६२१-तानाजीचा भाऊ सूर्याजी राजेंना तानाजीच्या बलिदानाची हकीकत सांगताना म्हणाला : उदयभानूच्या तडाख्यानं त्यांची ढाल तुटली.डाव्या हातावर वार झेलीत तानाजी उदयभानूला भिडले; आणि काय होतय् ,हे कळायच्या आत दोघेही जमिनीवर कोसळले ! प्रमोदकाका, यातील संदर्भ क्रमांक १ व २ यांचा शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील अधिकार वादातीत आहे. क्रमांक ३ - कै.रणजीत देसाई हे भाषाप्रभू आणि म्हणूनच माझा आदर्श आहेत , त्यांचा संदर्भ ऐतिहासिक दृष्ट्या दिलेला नाही , माझा मानाचा मुजरा म्हणून दिला आहे ! शेलारमामांनी उदयभानूस छाटले नव्हते ! हा शाळेतील पाठ्यपुस्तकातील भाग वाटत आहे - तरीही तुम्ही मला संदर्भ दाखवा , मी चूक नक्कीच सुधारीन ! यत फक्त मावळे ३०० होते की ४०० हाच वाद आहे पण त्यामुळे जास्त संख्या असलेल्या गनिमांपुढे कमी मावळे झुंजले या सत्यास गालबोट लागत नाही ! "ऐतिहासिक काव्य किंवा कादंबरी लिहीत असताना कल्पनाविलास करता येतो पण ऐतिहासिक सत्य डावलता येत नाही !"याची विनम्र जाणीव मला आहे कारण संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त वादळी व्यक्तीमत्वावर मी कादंबरी लिहीत आहे त्यामुळे असले विवाद उद्भवणार याची मी मनाची पूर्वतयारी केली आहे. या उत्तरामधे आपल्याबध्दल कुठलाही आकस वा गैरसमज नाहिये ह्याची कृपया नोंद घ्यावी , उलट एक सुजाण आणि दक्ष वाचक मला लाभल्याबध्दल आणि हे व्यासपीठ मला दिल्याबध्दल तुमचे आणि मि.पा. चे कोटी कोटी आभार ! आपल्याशी प्रत्यक्ष भेट वा बोलायला आवडेल. आपला विनम्र, उदय सप्रे भ्रमणध्वनी : ९९६७५ ४२७०३

In reply to by उदय सप्रे

प्रमोद देव Tue, 04/22/2008 - 11:39
उदय माझे इतिहासाचे वाचन आणि ज्ञानही मर्यादित आहे. आम्हाला दुसरीत एक नाट्यप्रवेश होता ... गड आला,पण सिंह गेला! त्यावेळी तो मला मुखोद्गत होता. त्यात जे म्हटले होते त्याप्रमाणे... मी म्हटलंय. बाकी माझ्याकडे अजून काही माहिती नाही. जे काही पाठ्य पुस्तकात वाचले त्यालाच आम्ही भाबडेपणाने खरा इतिहास मानतो. तेव्हा तुम्ही म्हणता आहात तेच जास्त खरे असेल असे मी गृहीत धरतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विशाल कुलकर्णी गुरुवार, 08/13/2009 - 12:58
जबरदस्त कविता ! मिपाची जुनी पाने चाळताना आज खजिनाच सापडतो आहे. सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....!

आशिष सुर्वे गुरुवार, 08/13/2009 - 13:11
'कोंढाण'' ... निश:ब्द! इतिहासावरील चर्चा वाचून आनंद झाला.. अशा चर्चा होणे फार गरजेचे आहे असे मला वाटते.. ज्ञानात फार मोलाची भर पडतेय. हर् हर् महादेव!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

मदनबाण गुरुवार, 08/13/2009 - 13:25
सुंदर कविता... :) दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा ! अप्रतिम !!! मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 08/13/2009 - 19:41
आम्ही तोरणा चढत होतो.. एक आज्जी भेटल्या , त्या म्हणाल्या " आर दमताय काय ? आमचा शेलारमामा अर्ध्या तासात चढायचा" आमच्या अडानी मित्राला शेलारमामा कोण हेच माहीत नाही तो म्हणाला आणा शेलारमामाला जर १/२ तासात चढला तर १००० रुपये देयिन आम्ही हसुन हसुन दमलो . नंतर त्याला चुक कळल्यावर चेहरा त्याचा बघण्यासारखा झाला होता

फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 08/13/2009 - 19:43
दिसणार कंदीबी न्हाई आऊ झेंडा तुमाला "हिरवा" म्यां निंगालो म्होरं , शिवबा, रायाची वरात पर् तुमी फिरवा ! हे आवडले कविता पण आवडली
लेखनविषय:
आपल्या लेकाच्या - रायबाच्या लग्नाचे आवतण अर्थात् आमंत्रण द्यायला आलेल्या तानाजीला जिजाऊंच्या मनातील सल ऐकून रहावले नाही आणि आवतण द्यायच्या ऐवजी तो जिजाऊंचे हे आवतण स्वीकारून कोढाणा केवळ चारशे मावळे आणि भाऊ सूर्याजी यांच्यासह जिंकून मृत्यूला सामोरा गेला !

प्रियांकांची संवेदना

विजुभाऊ ·

व्यंकट गुरुवार, 04/17/2008 - 08:30
प्रियांका संवेदनशील असेल पण लेखक डोक्यात गेला. हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. ( अवांतर: संपादकांच्या जिभेचा रंग पहाण्याचे कुतूहल जागृत झाले आहे. ) व्यंकट

In reply to by व्यंकट

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/17/2008 - 21:31
आज सकाळी वाचला हा लेख लोकसत्तेत मला आधीपासून केतकर फारसे ( तुमच्याइतके) डोक्यात जात नाहीत.... पण तरी हा लेख म्हणजे लांगूलचालन वाटला... अगदी विशाल सह्याद्री सारखा अन्क वाचतो आहोत असे वाटले....

विकास गुरुवार, 04/17/2008 - 17:17
ह्या लेखातील पहीले वाक्य त्यावेळेस संगणकाच्या अवती भवती नसलेल्या आमच्या सहचारीणीस बोलून विचारले की हे कोणी लिहीले असेल. मी कधी लोकसत्तेतील अग्रलेख वाचायला जात नाही ह्याची कल्पना असुनही लगेच उत्तर आले, "अर्थातच....!" मराठीत असल्या लेखनाला काय म्हणावे हे माहीत नाही पण सुमारसाहेब राज्यसभेचे सभासदस्यत्व मिळाले नाही तरी स्वामीनिष्ठा सोडत नाहीत हे बघून त्यांच्याबद्दल कौतुक वाटले... एक तर त्यांना खरेच तसे वाटते अथवा कधीतरी तरी खासदार होऊ अशा आशेने (की आशाळभूतपणे?) ते अजुनही लिहीत आहेत? मला तरी दुसरेच वाटते. बाकी असले लेख आणि प्रियांकाचा पब्लिसिटी स्टंट मधे सामान्याला बुद्धीबळातील प्यादी केले जाते. काही झाले तरी काँग्रेसला आज तामिळनाडू मिळू शकत नाही... करूणानिधीच्या करूणेची गरज राष्ट्रीय पातळीवर पण आहे, दमुकचे लिट्टे बद्दलचे मत काँग्रेसला माहीत आहेच... तेंव्हा असले काहीतरी करायचे बाहेर येऊन एकतर्फी बोलायचे (ते खरे खोटे / नलीनी काही सांगू शकणार नाही कारण ती तर तुरूंगातच) आणि मग असले अग्रलेख वाचून आपण म्हणायचे वा वा किती छान! बाकी मला हा अग्रलेख वाचताना अजून एक गंमत वाटली - हे संपादक महाशय स्वतःला सेक्यूलर म्हणणार, हिंदूत्वावाद्यांना येथेच्छ कुठेही बडवणार. तरी त्या बाबबतीत आता जरा ते सुधारलेत असे वाटतेय. पुर्वीचे असते तर बुश - प्युटीनला भेटले या वरलिहीतांना पण संघपरीवाराल शिव्या दिल्या असत्या...पण सर्वधर्म समभावात असल्या विषयी लिहीताना अद्वैत, गीता वगैरे आठवते... असो. प्रियांका चांगली का वाईट या विषयी मी काही बोलत नाही. ती राजकारणात आहे आणि राजकारण करत आहे. त्यात गैर काही नाही. पण आपण ते राजकारण न समजता, आपले रुमाल, पिळून पाणी निघेपर्यंत आसवांनी ओले करण्याचे काही कारण नाही इतकेच म्हणावेसे वाटते. त्या मानाने खर्‍या अर्थी हृदयस्पर्शी गोष्ट वाटली होती ती राहूल गांधींची (आठवते त्याप्रमाणे, जरी मला त्यांच्याबद्दल राजकारणी म्हणून कौतूक नसले तरी): राजीव गांधीच्या अंत्यसंस्कारांनंतर ते सरळ त्यांच्या अंगरक्षकाच्या घरी (ज्याची पण त्यात हत्या झाली होती), गेले त्याच्या लहान बाळाबरोबर न बोलता थोडे खेळले, घरच्यांशी संवाद केला आणि परत आले.

मुक्तसुनीत गुरुवार, 04/17/2008 - 19:35
प्रियांका गांधी आणि राहुल गांधींच्या अलिकडील बातम्या वाचल्या. वाचताना झालेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. हे दोघे जे करत आहेत (प्रियांका तुरुंगातील अतिरेक्याला भेटणे, राहुल गांधींचे अचानक होटेलमधून उठून आदिवासींच्या घरी जाणे आणि तेथे रात्र काढणे ) त्यामधे राजकारण आहे यात शंका नाही. अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. इंदिरा गांधी आणीबाणीपूर्व काळात आपल्या करिश्म्याचा असा वापर करीत; राजीव गांधींचा तर मृत्यूच , सुरक्षिततेचे कवच ओलांडून लोकांमधे मिसळताना झाला. तेव्हा इन्स्टंट लोकप्रियता, भावनांना हात घालणे , प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हे सर्व यातून घडते आणि एक डोळा त्यावर ठेवूनच हे केले जाते हे निश्चित. पण वरील बातम्या वाचताना त्यातील एक अंग थोडे हृदयस्पर्शी वाटले हे मी येथे प्रामाणिकपणे मान्य करतो. काँग्रेस हा पक्ष सरंजामशाही विचारांचा , चमच्यांनी , भ्रष्टाचारी लोकांनी , गुंडांनी वर्षानुवर्षे चालवलेला आहे या आणि यासारख्या सर्व सिनिक (आणि खर्‍या) गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून त्याबद्दल विचार करतो तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये. इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच !

In reply to by मुक्तसुनीत

विकास गुरुवार, 04/17/2008 - 21:21
>>>.... तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. तो करूणेचा स्पर्श मी आधी म्हणल्याप्रमाणे राजीव अंत्यसंस्कारांनंतर राहूलच्या वागण्यात दिसला. बाकी आत्ताचे वर्तन हे राजकारण जसे आहे तसेच त्यात होत असलेली माध्यमांची मदत हे पण आहे. >>>इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच ! तुम्हाला काय वाटते माध्यमे त्याला प्रसिद्धी देतील का? आणि दिली तरी ती सरळ देतील का? आता या संदर्भात सर्वार्थाने ज्वलंत उदाहरण देतो (वाद होऊ शकेल या अर्थी) : नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही). स्वतः इतर मागासवर्गीय, गुजरात विकास चांगला केला असे अनेकांकडून (गुजराथी लोकांकडून ) ऐकले होते. पण फारतर ५०% खरे समजायचो... निवडणूकींच्या वेळेस त्यांच्या विरुद्ध माध्यमांनी तमाशा केला. ते भ्रष्टाचारी नाहीत हे सांगताना काय म्हणणार तर ते ब्रम्हचारी आहेत त्यामुळे गरजा कमी! सुमार रावांचा तर काय तेंव्हा नुसता थयथयाट चालला होता. पण तसे गांधी घराण्याबद्दल घडते का? "मोठा वृक्ष कोसळला तर सभोवताली छोट्या गोष्टी उध्वस्त होवू शकतात" असे म्हणत राजीव गांधीनी ३००० शिखांची हत्या एका वाक्यात "जस्टीफाय" केली. कोणी काही म्हणाले? आज तुम्ही अमेरिकेत पहाल तर आजही लक्षात येईल की सर्वसाधारण पणे शिख समाज हा इतर भारतीयांपासून लांब राहतो. अर्थात माझे चांगले ओळखीचे आहेत तरी देखील सांखिकी निरीक्षण केले त्यावर बोलतोय. भारतात सुवरणमंदीरात आणि दिल्लीच्या गुरूद्वारात भिंन्द्रनवालेचा फोटो लावला जातो(तो मी स्वतः पाहीला आहे आणि त्याबद्दल चे कौतूक ही तिथेच ऐकले आहे गेल्या २ वर्षात). अर्थात या बद्दल माध्यमे काही बोलणार नाहीत...आणि हो,राहूल गांधींना बॉस्टनला (काही वर्षांपूर्वी ) पकडले होते, त्याची माहीती काही राजकारण्यांनी मागायचा प्रयत्न केला (माहीती अधिकार वापरून) तरी स्टेट डिपार्टमेंट देत नाही... पण हे आपल्याकडे सांगितले जाते का? आता अमेरिकेतील हिलरी-ओबामाबद्दलचे बघा. माध्यमे एकाला कसे जवळ करतात आणि दुसर्‍यास बाजूला. अगदी काल सीएनएनवर परत पाहीले..असो. यात काही गांधी घराण्याबद्दलचा द्वेष नाही, राग नाही, पण असलाच तर माध्यमांच्या बद्दल आक्षेप आहे.

In reply to by मुक्तसुनीत

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 04/17/2008 - 21:29
अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये.
Public memory is always short लोकांच्या मनात बिंबणारी कृती ही जर निवडणुकीच्या टप्प्यात असलेल्या काळात झाली तर तिचा फायदा पक्षाला होतो. राजीव गांधींच्या हत्ये वेळी सहानुभुतीची लाटेचा फायदा काँग्रेसला झाला होता. अहो आपल्या शत्रुने देखील जर मन हेलावणारी कृती केली तर आपल्याला काही काळ शत्रुत्वाचा विसर पडतो. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम Fri, 04/18/2008 - 07:25
मुक्तसुनीतजी, अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. नेहरुंचे ह्या विषयी एखादे उदाहरण देऊ शकाल का? -बगाराम

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम Fri, 04/18/2008 - 08:00
किस्से वाचले पण त्यामध्ये तर नेहरूंची स्तुतीच केली आहे तुमचा रोख काहीसा उलटा वाटल्याने विचारणा केली. असो. लगोलग दिलेल्या दुव्या बद्दल आभारी आहे

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 21:34
विकासराव ; गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? विकासराव तुम्हाला गुजरातबद्दल फारसे काही माहीत नाही. थोडे संदर्भ वाचा डॉ गणेश देवींचे "वानप्रस्थ" वाचा तुम्हाला कलेल तिथे काय चालले होते. तेजगढच्या आदीवासी भागात मोदी समर्थकानी कसे थैमान घातले होते ते कळेल. गुजरात मधला सामान्य माणूस एकमेकापसुन कसा दुरावला गेला आहे ते लक्षात येईल

In reply to by विजुभाऊ

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:30
थोडेसे तर्काशी संबंध ठेवून लिहायचा प्रयत्न तरी करा. गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे त्याशिवाय माध्यमांच्या प्रभावाच्या याकाळात माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला? आणि तुम्ही सांगितली तसली पुस्तके पैशाला पासरी मिळतात. तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ Fri, 04/18/2008 - 06:19
ऐश्वर्या राय भाऊ साहेब तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात म्हणजे नक्की काय? ती पुस्तके निदान वाचली तरी जातात. "पांचजन्य" तर तुमचे आपले लोक ही वाचत नाहीत. सरळ मुलाला बसायला देण्यासाठी वापरतात. राहता राहीले ते मी सुचवलेले पुस्तक. त्या पुस्तकात सदर संदर्भातले केवळ एक प्रकरण आहे. अर्थात तुम्हाच्या वाचनात काहीच येत नसेल तर मी बापुडवाणा तरी काय करणार. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो? असलो नसलो तरी सर्‍हदय नकीच आहे. माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते दहशती खाली जगणे कधी अनुभवले आहे तुम्ही? अन्यथा तसा तर्क केला नसता तुम्ही. असो .जालाच्या महाजालात जगणार्‍याना प्रत्यक्ष जगण्याच्या वेदना कशा जाणवणार. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला राज्य कर्तेच जेंव्हा असे वर्तन करतात तेंव्हा त्या शासनास कल्याणकारी शासन म्हणायचे की कोणते.मोदी प्रेमामुळे अन्ध होण्यापेक्षा कावीळ बरी म्हणायची गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे ? पाहीले आहे गुजरात ला जाऊन? केवळ गांधी नगर ,बडोदा ,सुरेन्द्र नगर, आणि सूरत म्हणजे गुजरात नव्हे. असो तर्काच्या जगात आणि वास्तव जगात हा फरक असणारच की

In reply to by विजुभाऊ

बगाराम Fri, 04/18/2008 - 07:15
विजुभाऊ तुमची प्रतिक्रिया आवडली. पण दुर्दैवाने आज 'ऐश्वर्या राय' नावने लिहिणार्‍या व्यक्तिंसारखे अतिरेकी विचार करणारे आपल्या समाजात वाढत आहेत. आणि वाईट म्हणजे त्यातले बरेचसे चांगले शिकले सवरलेले लोक आहेत.

In reply to by विजुभाऊ

जिथे जिथे हींदू मुस्लिम दंगली झाल्या आहेत तिथे तिथे हे प्रकार घडलेच आहेत. जेव्हा याप्रकारची कृत्ये होतात तेव्हा ती फक्त युध्द म्हणूनच होतात.थोड्याबहूत फरकाने ईस्रायल ने जे हल्ले पॅलेस्टाईन वर केले आहेत त्यातही अशाच स्त्रिया किंवा मुले मृत्यूमुखी पडली आहेत. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा बुध्दी गहाण पडत असते आणि लोक जे काही करतात ते केवळ एक युध्द या भावनेनेच करतात. त्यामुळे जर गर्भार स्त्रिया दंगलीत मारल्या गेल्या म्हणून शोक करायचा असेल तर सर्व देशातल्या दंगलींचा विचार करा. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बगाराम Fri, 04/18/2008 - 07:22
पुण्याचे पेशवे राव, मलापण पूर्वी तुमच्यासारखेच वाटायचे. पण आता आपल्याकडे गुगल आहे. गुगल मध्ये गुजरात दंगल असे टाकून त्यावरील आकडेवारी वाचलीत तर डोळे पांढरे होतील. माझेही झाले. इतक्या प्रमाणात केलेल्या कत्तलीची तुलना अफ्रिकेतल्या यादवी युद्धांशीच होऊ शकते. -बगाराम

In reply to by बगाराम

विद्याधर३१ Fri, 04/18/2008 - 07:54
यावर मोदींचा विजय झाला नसून गुजराती जनतेने त्याना निवडून दिले आहे.(सो कॉल्ड मिडियाने कितीही विरोध केला तरी) विद्याधर

In reply to by विजुभाऊ

विकास Fri, 04/18/2008 - 02:26
नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही).
मी उदाहरण देताना सुरवातीस वरील वाक्य म्हणले होते. कारण तेच आहे की आपण - त्यात तुम्ही-आम्ही सर्वच आलो, माध्यमांमधील वाचून कोणाएकाच्या बाजूने अथवा विरुद्ध स्वतःची मते तयार करतो. बहुतांशी अशी मते तयार करताना ती काँग्रेस आणि साम्यवादींच्या बाजूने होतात. हिंदूत्ववादी असे म्हणले रे म्हणले की संपले हा गुंडच असणार, दहशतवादी, "फॅनॅटीक" सर्वच आले. आता आपल्याच प्रतिसादातील मजा बघा ना - ३००० शिखांना मारले गेले या बद्दल आपण काही बोलत नाही आहात. आधी मुद्दा आणला नाही पण नक्षलवाद्यांनी किती सामान्यांना मारले आणि अजून कायदा कसा हातात आहे ते माहीत आहे का? सनदी अधिकार्‍यांना मारले आहे... पण त्या बद्दल बोलले जाणार नाही. कारण त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. त्याहुनही आधीचे उकरायचे तर गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात किती लोकं मेली कितीजणांची घरं उध्वस्त झाली या बद्दल बोलले गेले कधी का आता बोलले जाते? इतके सर्व करून काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांबद्द्ल कोणी बोलणार नाही. मग मोदींबद्दलच का इतका आकस? - ते मोदी म्हणून, की हिंदूत्ववादी म्हणून, का अल्पसंख्यांकांच्या विरोधात झाले म्हणून का केवळ मानवतेच्या विरुद्ध झाले म्हणून. दुर्दैवाने यातील शेवटचे कारण सोडल्यास इतर तिन्ही कारणे या मागे आहेत असे म्हणावे लागते. मी असे म्हणत नाही की म्हणून गुजराथला प्रसिद्धी देऊ नका पण असा "आप पर" भाव कसा चालतो आपल्याला? आणि हे मी आपल्याला उद्देशून म्हणत नाही आहे तर माध्यमांना आणि तथाकथीत विचारवंत असे कसे वागतात हा प्रश्न आहे. बरं इतके आहे तर त्यांना मते कशी मिळू शकली आणि ती देखील अशा ठिकाणी जेथे त्यांना मिळण्याची शक्यता नव्हती? मग माध्यमांचे असे काय चुकले? हा सर्व वाद कोणा एका व्यक्तीची / विचाराची बा़जू घेण्यासाठी नाही तर निव्वळ विचार करताना आपण माध्यमांचे वाचत स्वतःचे विचारस्वातंत्र्य कसे गमवून बसलो आहोत या संदर्भात आहे.

ऋषिकेश गुरुवार, 04/17/2008 - 22:37
सुमार केतकरी चाटण खासदरकी मिळण्यासाठी नियमित घेत राहवे हाच निष्कर्श बाकी अग्रलेखाने अंमळ करमणूक झाली हे खरेच ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अनामिका Sat, 04/19/2008 - 17:50
परवा ती प्रियांका आणि नलिनीच्या भेटीची बातमी दुरचित्रवाहिनीवर बघितल्यापासुन कधी एकदा केतकरांच्या चिरंजिवानी अर्थात कुमार केतकरांनी उधळलेली स्तुतीसुमने "लोकसत्ता" मधे वाचतेय असे झाले होते.पण काही केल्या ती "लोकसत्ताचे "आंतरजालावरील पान काही उघडत नव्हते.म्हणुन तोंडसुख घ्यायला आणि प्रतिक्रिया देण्यास अंमळ उशिरच झाला! केतकरांनी त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे हुजरेगिरी केली हे उघड! ......वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा असावी ! पण, काहीही म्हणा !प्रियांकाचे टायमिंग जरा चुकलेच किंवा वाहिनीच्या गांधी नेहरु समर्थकांना ही बातमी जरा उशिरानेच समजली(कि जाणीवपुर्वक उशिराने दिली गेली ते काँग्रेसचे भाटच जाणोत). भेटीच्या दिवशीच माहित झाले असते तर झुंबड करुन त्या तथाकथित संवेदनशील भेटीचे थेट प्रक्षेपण दाखवता आले असते. गेलाबाजार किमान संत नलीनी आणि सुपुत्री प्रियांका यांची गळाभेट आणि संभाषण याची देही याची डोळा भारतीय जनतेला बघता आला असते. राजीव यांचा अंत ज्याप्रकारे झाला ते अतिशय दुखदायी होते हे अगदी खरेच ...........पण म्हणुन त्यांना का मारले ?याचा शोध घेण्याची संवेदना व इच्छा एकदम अशी अचानक त्यांची सोनपुतळी लेक प्रियांका हिच्यामधे कुठुन जागृत झाली देव जाणो? त्याही पेक्षा या भेटिचे कुठल्याही प्रकारचे भांडवल (राजकीय भांडवल)करु नये अशी विनंती तिने प्रसारमाध्यमांना केली होती(असे नुसतेच म्हणायचे बरं का!).पण ते कुठले ऐकायला?ही बातमी लाळघोटेपणा करत सगळ्यात आधी कोण दाखवतो यासाठी स्पर्धाच लागली होती. प्रियांकाने म्हणे शंका बोलुन दाखवली की "तिच्या वडिलांच्या हत्येमागे लिबरेशन टायगर अर्थात लिट्टे बरोबर स्थानीक राजकिय पक्षाचा देखिल हात असु शकतो". आता हे सांगायला प्रियांका कशाला हवी ?शेंबड पोर देखिल सांगेल. आणि राजीव हत्येचा शोध चालू असताना सध्या जे UPA चे घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी काही पक्षाच्या लोकांची नावे देखिल संशयितांच्या यादीत होती. नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला?आणि बहुदा केतकर पण विसरलेच यांची नावे घ्यायला! केतकरांची सवय थोडीफार बदलतेय बहुदा? हे नेहरु गांधी घराणे भारतीय जनतेची दिशाभुल करण्याचा आपला वडिलोपार्जित उद्योग(धंदा असे वाचावे) कधी बंद करणार देवच(सोनीयादेवीच) जाणो बहुतेक केतकर आहेत तो पर्यंत तरी हे असेच चालु राहणार यात शंका नाही! सदरची प्रतिक्रिया मी मायबोली वर देखिल दिली होती. काही आक्षेप असल्यास उडवु नेमस्तक उडवु शकतात. (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका"

In reply to by अनामिका

विकास Sat, 04/19/2008 - 20:56
आपला प्रतिसाद आवडला. मस्त आहे. >>>नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला? या संदर्भात: एकदा बीबीसी वर प्रियांकाची कुठल्यातरी निवडणूकीच्या थोडे आधी मुलाखत ऐकली होती. त्यात तीला बीबीसी वार्ताहार खोचून खोचून प्रश्न विचारत होता जेणे करून ती संघ/संघपरीवार/भाजपा वगैरे वर नेहेमीचे आरोप करेल. पण ती शेवटपर्यंत तसे बोलली नाही. जे काही सामाजीक प्रश्न आहेत ते सर्वत्र आहेत आणि ते उखडून काढले पाहीजेत अशा अर्थाचे ती म्हणाली. वरील प्रसंगामुळे मला तिचे राजकारणी म्हणून नक्कीच appreciation करावेसे वाटले/केले जरी याचा अर्थ मी काही तीला / ती म्हणले त्यांना मत दिले असते असा नसला तरी... परदेशात अथवा परदेशी वृत्तसंस्थांशी/कार्यक्रमात अशा पद्धतीचे ऐकलेले दुसरे म्हणजे पि.व्ही. नरसिंहराव आणि भाजपचे काही नेते.

अनामिका Sat, 04/19/2008 - 17:57
प्रियांकाने नलिनीची घेतलेली भेट ही तुरुंगाचे सगळे नियम धाब्यावर बसवुन घेतली आहे असे निष्पन्न झाले आहे. इथे वाचा. http://www.hindu.com/2008/04/18/stories/2008041854781002.htm (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका

थिटे मास्तर Fri, 07/28/2017 - 03:03
हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. छानच प्रतिसाद होता गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? वाचुनच चर्र झाल...अस पशुवत कोणिहि कोणाहि बरोबर करु नये. मि काय म्हणतो विजुभाउ कि गुजरात दंगलित एकमेव दोषी ठरवलेल्या व्यक्ति ला तर झाडुन सगळ्या तपास यंत्रणांनि / न्यायालयांनि निर्दोष सोडले पण त्यानंतही भारतात अशा घटना घडल्या आहेत, घडतायत त्याचे ताजे उदाहण म्हणजे बंगाल मध्ये सरकारी छत्रछायेखालि अहिंसक आणि आदर्श अशा धर्माच्या लोकांचा चाललेला नंगानाच, ह्यावर आपण जर काहि आपले विचार व्यक्त केलेत तर बर होईल कारण वर एका प्रतिसादात आपण म्हटलय कि गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? मग बंगाल मध्ये मरणारे तुमच्यासाठि माणसे नाहित का हो ? चिक्कार उदाहरण आहेत सध्या फक्त बंगालचाच उल्लेख केलाय, हा धागा वर काढणे किंवा ह्यावर प्रतिक्रिया देण्याचा उद्देश एव्हढाच आहे कि आपल्याला गुजरात दंगलिचि सातारा (महाराष्ट्रात) राहुन जर एव्हढि माहिति होति तर त्याच्या फार पुर्वि घडलेल्या दुर्दैवि अशा मुंबई दंगलिबाबत आपल्या सारखा पुरोगामि माणुस अनभिज्ञ कसा ? ईतका कि धागा काढुन मिपाकरांस विचारावे लागले कि "१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले "" खफ वर आपण ताकाला जाउन भांडे लपविण्याचा ईन्कार केलाय. तुर्तास एव्हढेच जर माझ्या ह्या प्रतिसादाला उत्तर आले तर मग छानपैकि राहुल आणि प्रियांका वर लिहिन म्हणतो.

व्यंकट गुरुवार, 04/17/2008 - 08:30
प्रियांका संवेदनशील असेल पण लेखक डोक्यात गेला. हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. ( अवांतर: संपादकांच्या जिभेचा रंग पहाण्याचे कुतूहल जागृत झाले आहे. ) व्यंकट

In reply to by व्यंकट

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/17/2008 - 21:31
आज सकाळी वाचला हा लेख लोकसत्तेत मला आधीपासून केतकर फारसे ( तुमच्याइतके) डोक्यात जात नाहीत.... पण तरी हा लेख म्हणजे लांगूलचालन वाटला... अगदी विशाल सह्याद्री सारखा अन्क वाचतो आहोत असे वाटले....

विकास गुरुवार, 04/17/2008 - 17:17
ह्या लेखातील पहीले वाक्य त्यावेळेस संगणकाच्या अवती भवती नसलेल्या आमच्या सहचारीणीस बोलून विचारले की हे कोणी लिहीले असेल. मी कधी लोकसत्तेतील अग्रलेख वाचायला जात नाही ह्याची कल्पना असुनही लगेच उत्तर आले, "अर्थातच....!" मराठीत असल्या लेखनाला काय म्हणावे हे माहीत नाही पण सुमारसाहेब राज्यसभेचे सभासदस्यत्व मिळाले नाही तरी स्वामीनिष्ठा सोडत नाहीत हे बघून त्यांच्याबद्दल कौतुक वाटले... एक तर त्यांना खरेच तसे वाटते अथवा कधीतरी तरी खासदार होऊ अशा आशेने (की आशाळभूतपणे?) ते अजुनही लिहीत आहेत? मला तरी दुसरेच वाटते. बाकी असले लेख आणि प्रियांकाचा पब्लिसिटी स्टंट मधे सामान्याला बुद्धीबळातील प्यादी केले जाते. काही झाले तरी काँग्रेसला आज तामिळनाडू मिळू शकत नाही... करूणानिधीच्या करूणेची गरज राष्ट्रीय पातळीवर पण आहे, दमुकचे लिट्टे बद्दलचे मत काँग्रेसला माहीत आहेच... तेंव्हा असले काहीतरी करायचे बाहेर येऊन एकतर्फी बोलायचे (ते खरे खोटे / नलीनी काही सांगू शकणार नाही कारण ती तर तुरूंगातच) आणि मग असले अग्रलेख वाचून आपण म्हणायचे वा वा किती छान! बाकी मला हा अग्रलेख वाचताना अजून एक गंमत वाटली - हे संपादक महाशय स्वतःला सेक्यूलर म्हणणार, हिंदूत्वावाद्यांना येथेच्छ कुठेही बडवणार. तरी त्या बाबबतीत आता जरा ते सुधारलेत असे वाटतेय. पुर्वीचे असते तर बुश - प्युटीनला भेटले या वरलिहीतांना पण संघपरीवाराल शिव्या दिल्या असत्या...पण सर्वधर्म समभावात असल्या विषयी लिहीताना अद्वैत, गीता वगैरे आठवते... असो. प्रियांका चांगली का वाईट या विषयी मी काही बोलत नाही. ती राजकारणात आहे आणि राजकारण करत आहे. त्यात गैर काही नाही. पण आपण ते राजकारण न समजता, आपले रुमाल, पिळून पाणी निघेपर्यंत आसवांनी ओले करण्याचे काही कारण नाही इतकेच म्हणावेसे वाटते. त्या मानाने खर्‍या अर्थी हृदयस्पर्शी गोष्ट वाटली होती ती राहूल गांधींची (आठवते त्याप्रमाणे, जरी मला त्यांच्याबद्दल राजकारणी म्हणून कौतूक नसले तरी): राजीव गांधीच्या अंत्यसंस्कारांनंतर ते सरळ त्यांच्या अंगरक्षकाच्या घरी (ज्याची पण त्यात हत्या झाली होती), गेले त्याच्या लहान बाळाबरोबर न बोलता थोडे खेळले, घरच्यांशी संवाद केला आणि परत आले.

मुक्तसुनीत गुरुवार, 04/17/2008 - 19:35
प्रियांका गांधी आणि राहुल गांधींच्या अलिकडील बातम्या वाचल्या. वाचताना झालेल्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. हे दोघे जे करत आहेत (प्रियांका तुरुंगातील अतिरेक्याला भेटणे, राहुल गांधींचे अचानक होटेलमधून उठून आदिवासींच्या घरी जाणे आणि तेथे रात्र काढणे ) त्यामधे राजकारण आहे यात शंका नाही. अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. इंदिरा गांधी आणीबाणीपूर्व काळात आपल्या करिश्म्याचा असा वापर करीत; राजीव गांधींचा तर मृत्यूच , सुरक्षिततेचे कवच ओलांडून लोकांमधे मिसळताना झाला. तेव्हा इन्स्टंट लोकप्रियता, भावनांना हात घालणे , प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हे सर्व यातून घडते आणि एक डोळा त्यावर ठेवूनच हे केले जाते हे निश्चित. पण वरील बातम्या वाचताना त्यातील एक अंग थोडे हृदयस्पर्शी वाटले हे मी येथे प्रामाणिकपणे मान्य करतो. काँग्रेस हा पक्ष सरंजामशाही विचारांचा , चमच्यांनी , भ्रष्टाचारी लोकांनी , गुंडांनी वर्षानुवर्षे चालवलेला आहे या आणि यासारख्या सर्व सिनिक (आणि खर्‍या) गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून त्याबद्दल विचार करतो तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये. इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच !

In reply to by मुक्तसुनीत

विकास गुरुवार, 04/17/2008 - 21:21
>>>.... तेव्हा या प्रसंगांमधल्या करुणेचा स्पर्श कुठेतरी होतो असे वाटले. तो करूणेचा स्पर्श मी आधी म्हणल्याप्रमाणे राजीव अंत्यसंस्कारांनंतर राहूलच्या वागण्यात दिसला. बाकी आत्ताचे वर्तन हे राजकारण जसे आहे तसेच त्यात होत असलेली माध्यमांची मदत हे पण आहे. >>>इतर पक्षांच्या राजकारण्याना यातून शिकण्यासारखे आहे. भावनांशी खेळणे इतरांनाही शक्य आहे. पण प्रियांका-राहुल यांच्यासारख्यांचा "क्लास" इतराना दाखवता येईल का हीदेखील शंका आहेच ! तुम्हाला काय वाटते माध्यमे त्याला प्रसिद्धी देतील का? आणि दिली तरी ती सरळ देतील का? आता या संदर्भात सर्वार्थाने ज्वलंत उदाहरण देतो (वाद होऊ शकेल या अर्थी) : नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही). स्वतः इतर मागासवर्गीय, गुजरात विकास चांगला केला असे अनेकांकडून (गुजराथी लोकांकडून ) ऐकले होते. पण फारतर ५०% खरे समजायचो... निवडणूकींच्या वेळेस त्यांच्या विरुद्ध माध्यमांनी तमाशा केला. ते भ्रष्टाचारी नाहीत हे सांगताना काय म्हणणार तर ते ब्रम्हचारी आहेत त्यामुळे गरजा कमी! सुमार रावांचा तर काय तेंव्हा नुसता थयथयाट चालला होता. पण तसे गांधी घराण्याबद्दल घडते का? "मोठा वृक्ष कोसळला तर सभोवताली छोट्या गोष्टी उध्वस्त होवू शकतात" असे म्हणत राजीव गांधीनी ३००० शिखांची हत्या एका वाक्यात "जस्टीफाय" केली. कोणी काही म्हणाले? आज तुम्ही अमेरिकेत पहाल तर आजही लक्षात येईल की सर्वसाधारण पणे शिख समाज हा इतर भारतीयांपासून लांब राहतो. अर्थात माझे चांगले ओळखीचे आहेत तरी देखील सांखिकी निरीक्षण केले त्यावर बोलतोय. भारतात सुवरणमंदीरात आणि दिल्लीच्या गुरूद्वारात भिंन्द्रनवालेचा फोटो लावला जातो(तो मी स्वतः पाहीला आहे आणि त्याबद्दल चे कौतूक ही तिथेच ऐकले आहे गेल्या २ वर्षात). अर्थात या बद्दल माध्यमे काही बोलणार नाहीत...आणि हो,राहूल गांधींना बॉस्टनला (काही वर्षांपूर्वी ) पकडले होते, त्याची माहीती काही राजकारण्यांनी मागायचा प्रयत्न केला (माहीती अधिकार वापरून) तरी स्टेट डिपार्टमेंट देत नाही... पण हे आपल्याकडे सांगितले जाते का? आता अमेरिकेतील हिलरी-ओबामाबद्दलचे बघा. माध्यमे एकाला कसे जवळ करतात आणि दुसर्‍यास बाजूला. अगदी काल सीएनएनवर परत पाहीले..असो. यात काही गांधी घराण्याबद्दलचा द्वेष नाही, राग नाही, पण असलाच तर माध्यमांच्या बद्दल आक्षेप आहे.

In reply to by मुक्तसुनीत

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 04/17/2008 - 21:29
अर्थात, जर का अशा छोट्या घटनांनी एरवी विचार करणार्‍या, चार बुके शिकलेल्या व्यक्तिंच्या भावनाना कुठेतरी स्पर्श होत असेल आणि क्षणभर त्याना पूर्वीच्या पापांचा विसर पडत असेल तर मग निरक्षर जनतेने मतदानाच्या वेळी "पंज्या"वर शिक्का मारला तर नवल वाटू नये.
Public memory is always short लोकांच्या मनात बिंबणारी कृती ही जर निवडणुकीच्या टप्प्यात असलेल्या काळात झाली तर तिचा फायदा पक्षाला होतो. राजीव गांधींच्या हत्ये वेळी सहानुभुतीची लाटेचा फायदा काँग्रेसला झाला होता. अहो आपल्या शत्रुने देखील जर मन हेलावणारी कृती केली तर आपल्याला काही काळ शत्रुत्वाचा विसर पडतो. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम Fri, 04/18/2008 - 07:25
मुक्तसुनीतजी, अशा स्वरूपाचे राजकारण नेहरूंपासून चालत आलेले आहे आणि होते. नेहरुंचे ह्या विषयी एखादे उदाहरण देऊ शकाल का? -बगाराम

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम Fri, 04/18/2008 - 08:00
किस्से वाचले पण त्यामध्ये तर नेहरूंची स्तुतीच केली आहे तुमचा रोख काहीसा उलटा वाटल्याने विचारणा केली. असो. लगोलग दिलेल्या दुव्या बद्दल आभारी आहे

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 21:34
विकासराव ; गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? विकासराव तुम्हाला गुजरातबद्दल फारसे काही माहीत नाही. थोडे संदर्भ वाचा डॉ गणेश देवींचे "वानप्रस्थ" वाचा तुम्हाला कलेल तिथे काय चालले होते. तेजगढच्या आदीवासी भागात मोदी समर्थकानी कसे थैमान घातले होते ते कळेल. गुजरात मधला सामान्य माणूस एकमेकापसुन कसा दुरावला गेला आहे ते लक्षात येईल

In reply to by विजुभाऊ

ऐश्वर्या राय गुरुवार, 04/17/2008 - 22:30
थोडेसे तर्काशी संबंध ठेवून लिहायचा प्रयत्न तरी करा. गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे त्याशिवाय माध्यमांच्या प्रभावाच्या याकाळात माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला? आणि तुम्ही सांगितली तसली पुस्तके पैशाला पासरी मिळतात. तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ Fri, 04/18/2008 - 06:19
ऐश्वर्या राय भाऊ साहेब तुमच्यासारखेच काविळ झालेले ती लिहितात व तुमच्यासारखेच ती वाचतात म्हणजे नक्की काय? ती पुस्तके निदान वाचली तरी जातात. "पांचजन्य" तर तुमचे आपले लोक ही वाचत नाहीत. सरळ मुलाला बसायला देण्यासाठी वापरतात. राहता राहीले ते मी सुचवलेले पुस्तक. त्या पुस्तकात सदर संदर्भातले केवळ एक प्रकरण आहे. अर्थात तुम्हाच्या वाचनात काहीच येत नसेल तर मी बापुडवाणा तरी काय करणार. तुम्ही कम्युनिस्ट आहात का हो? असलो नसलो तरी सर्‍हदय नकीच आहे. माध्यमांनी इतका प्रयत्न करूनही मोदी असे प्रचंड विजयी झाले नसते दहशती खाली जगणे कधी अनुभवले आहे तुम्ही? अन्यथा तसा तर्क केला नसता तुम्ही. असो .जालाच्या महाजालात जगणार्‍याना प्रत्यक्ष जगण्याच्या वेदना कशा जाणवणार. पोट चिरण्याची घटना इतकाच गेल्या ५ वर्षांचा इतिहास आहे का तिथला राज्य कर्तेच जेंव्हा असे वर्तन करतात तेंव्हा त्या शासनास कल्याणकारी शासन म्हणायचे की कोणते.मोदी प्रेमामुळे अन्ध होण्यापेक्षा कावीळ बरी म्हणायची गुजरातचा विकास गुजराती लोकांना होतो आहे असे वाटत आहे ? पाहीले आहे गुजरात ला जाऊन? केवळ गांधी नगर ,बडोदा ,सुरेन्द्र नगर, आणि सूरत म्हणजे गुजरात नव्हे. असो तर्काच्या जगात आणि वास्तव जगात हा फरक असणारच की

In reply to by विजुभाऊ

बगाराम Fri, 04/18/2008 - 07:15
विजुभाऊ तुमची प्रतिक्रिया आवडली. पण दुर्दैवाने आज 'ऐश्वर्या राय' नावने लिहिणार्‍या व्यक्तिंसारखे अतिरेकी विचार करणारे आपल्या समाजात वाढत आहेत. आणि वाईट म्हणजे त्यातले बरेचसे चांगले शिकले सवरलेले लोक आहेत.

In reply to by विजुभाऊ

जिथे जिथे हींदू मुस्लिम दंगली झाल्या आहेत तिथे तिथे हे प्रकार घडलेच आहेत. जेव्हा याप्रकारची कृत्ये होतात तेव्हा ती फक्त युध्द म्हणूनच होतात.थोड्याबहूत फरकाने ईस्रायल ने जे हल्ले पॅलेस्टाईन वर केले आहेत त्यातही अशाच स्त्रिया किंवा मुले मृत्यूमुखी पडली आहेत. आणि जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा बुध्दी गहाण पडत असते आणि लोक जे काही करतात ते केवळ एक युध्द या भावनेनेच करतात. त्यामुळे जर गर्भार स्त्रिया दंगलीत मारल्या गेल्या म्हणून शोक करायचा असेल तर सर्व देशातल्या दंगलींचा विचार करा. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बगाराम Fri, 04/18/2008 - 07:22
पुण्याचे पेशवे राव, मलापण पूर्वी तुमच्यासारखेच वाटायचे. पण आता आपल्याकडे गुगल आहे. गुगल मध्ये गुजरात दंगल असे टाकून त्यावरील आकडेवारी वाचलीत तर डोळे पांढरे होतील. माझेही झाले. इतक्या प्रमाणात केलेल्या कत्तलीची तुलना अफ्रिकेतल्या यादवी युद्धांशीच होऊ शकते. -बगाराम

In reply to by बगाराम

विद्याधर३१ Fri, 04/18/2008 - 07:54
यावर मोदींचा विजय झाला नसून गुजराती जनतेने त्याना निवडून दिले आहे.(सो कॉल्ड मिडियाने कितीही विरोध केला तरी) विद्याधर

In reply to by विजुभाऊ

विकास Fri, 04/18/2008 - 02:26
नरेन्द्र मोदींचे (मी काही समर्थक नाही, पण माध्यमांच्या निरीक्षण करण्यासाठी) - तुर्तास गुजरात दंगल बाजूस ठेवा (त्यांना क्षमा करा/करू नका/विसरून जा/महत्व देऊ नका असे काहीच म्हणत नाही).
मी उदाहरण देताना सुरवातीस वरील वाक्य म्हणले होते. कारण तेच आहे की आपण - त्यात तुम्ही-आम्ही सर्वच आलो, माध्यमांमधील वाचून कोणाएकाच्या बाजूने अथवा विरुद्ध स्वतःची मते तयार करतो. बहुतांशी अशी मते तयार करताना ती काँग्रेस आणि साम्यवादींच्या बाजूने होतात. हिंदूत्ववादी असे म्हणले रे म्हणले की संपले हा गुंडच असणार, दहशतवादी, "फॅनॅटीक" सर्वच आले. आता आपल्याच प्रतिसादातील मजा बघा ना - ३००० शिखांना मारले गेले या बद्दल आपण काही बोलत नाही आहात. आधी मुद्दा आणला नाही पण नक्षलवाद्यांनी किती सामान्यांना मारले आणि अजून कायदा कसा हातात आहे ते माहीत आहे का? सनदी अधिकार्‍यांना मारले आहे... पण त्या बद्दल बोलले जाणार नाही. कारण त्याला प्रसिद्धी दिली जात नाही. त्याहुनही आधीचे उकरायचे तर गांधीहत्येनंतर महाराष्ट्रात आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात किती लोकं मेली कितीजणांची घरं उध्वस्त झाली या बद्दल बोलले गेले कधी का आता बोलले जाते? इतके सर्व करून काँग्रेस आणि मार्क्सवाद्यांबद्द्ल कोणी बोलणार नाही. मग मोदींबद्दलच का इतका आकस? - ते मोदी म्हणून, की हिंदूत्ववादी म्हणून, का अल्पसंख्यांकांच्या विरोधात झाले म्हणून का केवळ मानवतेच्या विरुद्ध झाले म्हणून. दुर्दैवाने यातील शेवटचे कारण सोडल्यास इतर तिन्ही कारणे या मागे आहेत असे म्हणावे लागते. मी असे म्हणत नाही की म्हणून गुजराथला प्रसिद्धी देऊ नका पण असा "आप पर" भाव कसा चालतो आपल्याला? आणि हे मी आपल्याला उद्देशून म्हणत नाही आहे तर माध्यमांना आणि तथाकथीत विचारवंत असे कसे वागतात हा प्रश्न आहे. बरं इतके आहे तर त्यांना मते कशी मिळू शकली आणि ती देखील अशा ठिकाणी जेथे त्यांना मिळण्याची शक्यता नव्हती? मग माध्यमांचे असे काय चुकले? हा सर्व वाद कोणा एका व्यक्तीची / विचाराची बा़जू घेण्यासाठी नाही तर निव्वळ विचार करताना आपण माध्यमांचे वाचत स्वतःचे विचारस्वातंत्र्य कसे गमवून बसलो आहोत या संदर्भात आहे.

ऋषिकेश गुरुवार, 04/17/2008 - 22:37
सुमार केतकरी चाटण खासदरकी मिळण्यासाठी नियमित घेत राहवे हाच निष्कर्श बाकी अग्रलेखाने अंमळ करमणूक झाली हे खरेच ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अनामिका Sat, 04/19/2008 - 17:50
परवा ती प्रियांका आणि नलिनीच्या भेटीची बातमी दुरचित्रवाहिनीवर बघितल्यापासुन कधी एकदा केतकरांच्या चिरंजिवानी अर्थात कुमार केतकरांनी उधळलेली स्तुतीसुमने "लोकसत्ता" मधे वाचतेय असे झाले होते.पण काही केल्या ती "लोकसत्ताचे "आंतरजालावरील पान काही उघडत नव्हते.म्हणुन तोंडसुख घ्यायला आणि प्रतिक्रिया देण्यास अंमळ उशिरच झाला! केतकरांनी त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे हुजरेगिरी केली हे उघड! ......वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे राज्यसभेच्या खासदारकीची अपेक्षा असावी ! पण, काहीही म्हणा !प्रियांकाचे टायमिंग जरा चुकलेच किंवा वाहिनीच्या गांधी नेहरु समर्थकांना ही बातमी जरा उशिरानेच समजली(कि जाणीवपुर्वक उशिराने दिली गेली ते काँग्रेसचे भाटच जाणोत). भेटीच्या दिवशीच माहित झाले असते तर झुंबड करुन त्या तथाकथित संवेदनशील भेटीचे थेट प्रक्षेपण दाखवता आले असते. गेलाबाजार किमान संत नलीनी आणि सुपुत्री प्रियांका यांची गळाभेट आणि संभाषण याची देही याची डोळा भारतीय जनतेला बघता आला असते. राजीव यांचा अंत ज्याप्रकारे झाला ते अतिशय दुखदायी होते हे अगदी खरेच ...........पण म्हणुन त्यांना का मारले ?याचा शोध घेण्याची संवेदना व इच्छा एकदम अशी अचानक त्यांची सोनपुतळी लेक प्रियांका हिच्यामधे कुठुन जागृत झाली देव जाणो? त्याही पेक्षा या भेटिचे कुठल्याही प्रकारचे भांडवल (राजकीय भांडवल)करु नये अशी विनंती तिने प्रसारमाध्यमांना केली होती(असे नुसतेच म्हणायचे बरं का!).पण ते कुठले ऐकायला?ही बातमी लाळघोटेपणा करत सगळ्यात आधी कोण दाखवतो यासाठी स्पर्धाच लागली होती. प्रियांकाने म्हणे शंका बोलुन दाखवली की "तिच्या वडिलांच्या हत्येमागे लिबरेशन टायगर अर्थात लिट्टे बरोबर स्थानीक राजकिय पक्षाचा देखिल हात असु शकतो". आता हे सांगायला प्रियांका कशाला हवी ?शेंबड पोर देखिल सांगेल. आणि राजीव हत्येचा शोध चालू असताना सध्या जे UPA चे घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी काही पक्षाच्या लोकांची नावे देखिल संशयितांच्या यादीत होती. नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला?आणि बहुदा केतकर पण विसरलेच यांची नावे घ्यायला! केतकरांची सवय थोडीफार बदलतेय बहुदा? हे नेहरु गांधी घराणे भारतीय जनतेची दिशाभुल करण्याचा आपला वडिलोपार्जित उद्योग(धंदा असे वाचावे) कधी बंद करणार देवच(सोनीयादेवीच) जाणो बहुतेक केतकर आहेत तो पर्यंत तरी हे असेच चालु राहणार यात शंका नाही! सदरची प्रतिक्रिया मी मायबोली वर देखिल दिली होती. काही आक्षेप असल्यास उडवु नेमस्तक उडवु शकतात. (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका"

In reply to by अनामिका

विकास Sat, 04/19/2008 - 20:56
आपला प्रतिसाद आवडला. मस्त आहे. >>>नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला? या संदर्भात: एकदा बीबीसी वर प्रियांकाची कुठल्यातरी निवडणूकीच्या थोडे आधी मुलाखत ऐकली होती. त्यात तीला बीबीसी वार्ताहार खोचून खोचून प्रश्न विचारत होता जेणे करून ती संघ/संघपरीवार/भाजपा वगैरे वर नेहेमीचे आरोप करेल. पण ती शेवटपर्यंत तसे बोलली नाही. जे काही सामाजीक प्रश्न आहेत ते सर्वत्र आहेत आणि ते उखडून काढले पाहीजेत अशा अर्थाचे ती म्हणाली. वरील प्रसंगामुळे मला तिचे राजकारणी म्हणून नक्कीच appreciation करावेसे वाटले/केले जरी याचा अर्थ मी काही तीला / ती म्हणले त्यांना मत दिले असते असा नसला तरी... परदेशात अथवा परदेशी वृत्तसंस्थांशी/कार्यक्रमात अशा पद्धतीचे ऐकलेले दुसरे म्हणजे पि.व्ही. नरसिंहराव आणि भाजपचे काही नेते.

अनामिका Sat, 04/19/2008 - 17:57
प्रियांकाने नलिनीची घेतलेली भेट ही तुरुंगाचे सगळे नियम धाब्यावर बसवुन घेतली आहे असे निष्पन्न झाले आहे. इथे वाचा. http://www.hindu.com/2008/04/18/stories/2008041854781002.htm (केतकारांचे लिखाण नजरेसमोर देखिल धरु न शकणारी) "अनामिका

थिटे मास्तर Fri, 07/28/2017 - 03:03
हे गांधी परिवाराचं काँग्रेसचं मुखपत्र आहे काय? तसं असल्यास लेख उत्तमच झालाय. छानच प्रतिसाद होता गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? वाचुनच चर्र झाल...अस पशुवत कोणिहि कोणाहि बरोबर करु नये. मि काय म्हणतो विजुभाउ कि गुजरात दंगलित एकमेव दोषी ठरवलेल्या व्यक्ति ला तर झाडुन सगळ्या तपास यंत्रणांनि / न्यायालयांनि निर्दोष सोडले पण त्यानंतही भारतात अशा घटना घडल्या आहेत, घडतायत त्याचे ताजे उदाहण म्हणजे बंगाल मध्ये सरकारी छत्रछायेखालि अहिंसक आणि आदर्श अशा धर्माच्या लोकांचा चाललेला नंगानाच, ह्यावर आपण जर काहि आपले विचार व्यक्त केलेत तर बर होईल कारण वर एका प्रतिसादात आपण म्हटलय कि गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणे आणि तसे करणार्‍या व्यक्तीला संरक्षण देणे हे म्हणजे गुजरातचा विकास करणे होते का? मग बंगाल मध्ये मरणारे तुमच्यासाठि माणसे नाहित का हो ? चिक्कार उदाहरण आहेत सध्या फक्त बंगालचाच उल्लेख केलाय, हा धागा वर काढणे किंवा ह्यावर प्रतिक्रिया देण्याचा उद्देश एव्हढाच आहे कि आपल्याला गुजरात दंगलिचि सातारा (महाराष्ट्रात) राहुन जर एव्हढि माहिति होति तर त्याच्या फार पुर्वि घडलेल्या दुर्दैवि अशा मुंबई दंगलिबाबत आपल्या सारखा पुरोगामि माणुस अनभिज्ञ कसा ? ईतका कि धागा काढुन मिपाकरांस विचारावे लागले कि "१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले "" खफ वर आपण ताकाला जाउन भांडे लपविण्याचा ईन्कार केलाय. तुर्तास एव्हढेच जर माझ्या ह्या प्रतिसादाला उत्तर आले तर मग छानपैकि राहुल आणि प्रियांका वर लिहिन म्हणतो.
राजकाराणा पलिकडे जाउन विचार करणारी अशीही माणसे असतात. एक चांगला लेख. जरुर वाचा प्रियांकांची संवेदना: http://loksatta.com/daily/20080417/edt.htm

टीप देणे

बगाराम ·

व्यंकट गुरुवार, 04/17/2008 - 09:05
अमेरिकेत आहात काय? अमेरिकेत सिस्टीम अनफेअर आहे, ४-६ डॉलर्स ताशी पगार मिळतो. शक्यतो सगळे वेटर्स पार्ट टाईम असतात. मालकानी योग्य पगार द्यायला हवा पण तसे होत नाही, कारण टीप्सचे कल्चर आहे. बसबॉय्स आणि इतर कर्मचार्‍यांबरोबर टीप्स वाटून घ्याव्या लागतात. मी १०% द्यायचो, पण एक मित्र होता तो येथे शिकत होता, तो म्हणाला की यू नीड टू वर्क एज वेटर टू अप्रिशिएट टीप्स. वेटर्स २०% अपेक्षा ठेवतात. ६ पेक्षा अधीक लोक असतील तर १८% बीलात आपोआप ग्रॅच्युईटी मिळवूनच बील येतं. आणि सर्विस म्हणजे काय तर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणा पर्यंत ताट नेणे. अमेरिकन सरकार ८% टीप्स गृहीत धरून वेटर्सकडून टॅक्स मागतं असं सुद्धा मला त्या मित्राने सांगितलं होतं. ४-५ स्टार मधे गेल्यास डिनर टेबलवर बसल्याबसल्याच टीप देणे अपेक्षीत असते, आणि जातांना पण :) वॅलेट पार्कींग करता सुद्धा द्यावीच लागते. उपायः १. वेटर सर्वीस असलेल्या हॉटेल्स मधे जाऊ नये. २. बफे असल्यास टीप्स नाही दिल्यातरी चालतात. भारतीय, अमेरिकन असं काही नसत टीप्स करता, इट्स जस्ट कल्चर. मी अस ऐकून आहे की, बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये, विशेषतः साउथ आणि इस्ट युरोप. व्यंकट

In reply to by व्यंकट

स्वाती दिनेश गुरुवार, 04/17/2008 - 11:58
बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये मी जर्मनीत राहते आणि इथे टीप दिली जाते.रेस्टॉरंटच काय तर टॅक्सीड्रायव्हरही टीपची अपेक्षा करतो.जर्मनीच नव्हे तर फ्रान्स,इटली,स्पेन आदि देशातही वेटर्सची टीपची अपेक्षा असते. टीप अजिबात 'न स्वीकारणारे' लोक(म्हणजे आपण बक्षिसी देऊ केली तरी न घेणारे) मी तरी फक्त जपान मध्ये पाहिले आहेत. स्वाती

धनंजय गुरुवार, 04/17/2008 - 09:10
(येथे तपशील अमेरिकेचा आहे.) मलाही तसाच डोक्याला त्रास पूर्वी होत असे. पण काही माहिती कळून वेगळे वाटू लागले. अमेरिकेत बहुतेक मजूर व्यवसायांकरिता तासाला कमीतकमी काही पगार द्यावा लागतो. तसा कायदा आहे. परंतु हॉटेल मजुरांना १५% टीप मिळते असे गृहीत धरून त्यांना कमी पगार दिला तर चालतो. इंडियन रेस्टॉरंटवाले काही वेगळे नाहीत. ही येथील अनिष्ट (पण कायदेशीर) प्रथा आहे. माझ्या मते हॉटेलमालकाने पूर्ण पगार द्यावा आणि मला टीप द्यायची भीड पडू नये. पण त्या विचित्र कायद्याला वेटर, टेबल पुसणारा पोर्‍या, हे जबाबदार नाहीत. म्हणून त्या अनिष्ट कायद्याला लाथ घातली, तर ती त्यांच्या पोटावर लागू नये. म्हणून मी १५% टीप तरी देतोच. मेनूमधून किमतीला ५% कर आणि १५% टीप = २०% अधिभार जोडतो, ती "खरी" किंमत मानतो. आणि त्या किमतीला परवडला, तरच पदार्थ मागवतो. (कमीतकमी पगारावर दिवसाला ८ तास काम केले तर उदरनिर्वाह जेमतेम चालतो, हे लक्षात असू द्यावे.)

चतुरंग गुरुवार, 04/17/2008 - 20:48
होय मी ही एकूण बिलावर (त्यात ५% टॅक्स असतोच) १० ते १२ % एवढी टीप देतो. पूर्ण पगार न दिल्याने तिथे काम करणार्‍यांना तोशीस पडते. बरेचदा विद्यार्थीही सुटीत काम करीत असतात. त्यांना थोडे पैसे आपल्याकडून मिळाले तर हरकत नसावी असे वाटते. त्यामुळे अगदी कायद्यावर डोळा ठेऊन वागण्यात किंवा त्रास करुन घेण्यात अर्थ नाही. चतुरंग

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 21:19
इथे काही गुजराथ्यांनी आता एक कॉमन डब्बा ठेवायला सुरुवात केलेय हवी तेवढी टीप टाकायची आणि मग ते वाटून घेतात. तिथे थोडी कमी टाकलॉ तरी चालते. पण नॉर्मल ठीकाणी मिनिमम १५% देतेच्...फक्त रेस्टॉरंट कशाला अगदी ब्यूटी पार्लर मधे गेलं तरी द्यावी लागते की १५%

एक गुरुवार, 04/17/2008 - 22:29
जर खरोखरच सर्विस चांगली मिळत असेल तर टीप वाढवतो सुद्धा. पण जर वेटर उर्मटपणा करत असेल. ऑर्डर केलेलं अन्न नीट नसेल तर तर एक डॉलर सुद्धा टीप देत नाही..हे अनुभव मला ९९% भारतीय रेस्टॉरंट मधेच आले..(मी कॅलिफोर्निया संबंधीत लिहितो आहे.. इतर ठिकाणी माहित नाही) इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. (उत्सुक लोकांनी "पॅसेज टू ईंडिया" मधे जाऊन बघावे). या उलट पुण्यातल्या उडूपी हॉटेल्स.. कधीही जा. वेटर हसून स्वागत करतो. त्यांना इथल्या वेटर्स पेक्षा प्रचंड काम असतं (हे मी अत्यंत जवळून बघितलं आहे.) त्यांना मात्र मी हात न राखता टीप देतो..

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 23:32
इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. १००% सहमत.. असं केलं होतं "चौपाटी" मधल्या एका वेटरने आणि जेवण तर सॉलीड टुकार तिथे नाही दिली मी अज्जिबात टीप....

बगाराम Fri, 04/18/2008 - 08:03
एक रावांना माझा मुद्दा बरोब्बर समजला आहे. अहो कधी कधी इंडियन रेस्टोरंट मध्ये मालकच जेवण आणून वाढताना बघायला मिळतो मग अश्या वेळेस टीप द्यावी का? कारण मग वरचे सगळे पगारतुन शोषण केलेले मुद्दे वगैरे गैरे ठरतात. अश्यावेळेस वरील लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल. -बगाराम

व्यंकट गुरुवार, 04/17/2008 - 09:05
अमेरिकेत आहात काय? अमेरिकेत सिस्टीम अनफेअर आहे, ४-६ डॉलर्स ताशी पगार मिळतो. शक्यतो सगळे वेटर्स पार्ट टाईम असतात. मालकानी योग्य पगार द्यायला हवा पण तसे होत नाही, कारण टीप्सचे कल्चर आहे. बसबॉय्स आणि इतर कर्मचार्‍यांबरोबर टीप्स वाटून घ्याव्या लागतात. मी १०% द्यायचो, पण एक मित्र होता तो येथे शिकत होता, तो म्हणाला की यू नीड टू वर्क एज वेटर टू अप्रिशिएट टीप्स. वेटर्स २०% अपेक्षा ठेवतात. ६ पेक्षा अधीक लोक असतील तर १८% बीलात आपोआप ग्रॅच्युईटी मिळवूनच बील येतं. आणि सर्विस म्हणजे काय तर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणा पर्यंत ताट नेणे. अमेरिकन सरकार ८% टीप्स गृहीत धरून वेटर्सकडून टॅक्स मागतं असं सुद्धा मला त्या मित्राने सांगितलं होतं. ४-५ स्टार मधे गेल्यास डिनर टेबलवर बसल्याबसल्याच टीप देणे अपेक्षीत असते, आणि जातांना पण :) वॅलेट पार्कींग करता सुद्धा द्यावीच लागते. उपायः १. वेटर सर्वीस असलेल्या हॉटेल्स मधे जाऊ नये. २. बफे असल्यास टीप्स नाही दिल्यातरी चालतात. भारतीय, अमेरिकन असं काही नसत टीप्स करता, इट्स जस्ट कल्चर. मी अस ऐकून आहे की, बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये, विशेषतः साउथ आणि इस्ट युरोप. व्यंकट

In reply to by व्यंकट

स्वाती दिनेश गुरुवार, 04/17/2008 - 11:58
बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये मी जर्मनीत राहते आणि इथे टीप दिली जाते.रेस्टॉरंटच काय तर टॅक्सीड्रायव्हरही टीपची अपेक्षा करतो.जर्मनीच नव्हे तर फ्रान्स,इटली,स्पेन आदि देशातही वेटर्सची टीपची अपेक्षा असते. टीप अजिबात 'न स्वीकारणारे' लोक(म्हणजे आपण बक्षिसी देऊ केली तरी न घेणारे) मी तरी फक्त जपान मध्ये पाहिले आहेत. स्वाती

धनंजय गुरुवार, 04/17/2008 - 09:10
(येथे तपशील अमेरिकेचा आहे.) मलाही तसाच डोक्याला त्रास पूर्वी होत असे. पण काही माहिती कळून वेगळे वाटू लागले. अमेरिकेत बहुतेक मजूर व्यवसायांकरिता तासाला कमीतकमी काही पगार द्यावा लागतो. तसा कायदा आहे. परंतु हॉटेल मजुरांना १५% टीप मिळते असे गृहीत धरून त्यांना कमी पगार दिला तर चालतो. इंडियन रेस्टॉरंटवाले काही वेगळे नाहीत. ही येथील अनिष्ट (पण कायदेशीर) प्रथा आहे. माझ्या मते हॉटेलमालकाने पूर्ण पगार द्यावा आणि मला टीप द्यायची भीड पडू नये. पण त्या विचित्र कायद्याला वेटर, टेबल पुसणारा पोर्‍या, हे जबाबदार नाहीत. म्हणून त्या अनिष्ट कायद्याला लाथ घातली, तर ती त्यांच्या पोटावर लागू नये. म्हणून मी १५% टीप तरी देतोच. मेनूमधून किमतीला ५% कर आणि १५% टीप = २०% अधिभार जोडतो, ती "खरी" किंमत मानतो. आणि त्या किमतीला परवडला, तरच पदार्थ मागवतो. (कमीतकमी पगारावर दिवसाला ८ तास काम केले तर उदरनिर्वाह जेमतेम चालतो, हे लक्षात असू द्यावे.)

चतुरंग गुरुवार, 04/17/2008 - 20:48
होय मी ही एकूण बिलावर (त्यात ५% टॅक्स असतोच) १० ते १२ % एवढी टीप देतो. पूर्ण पगार न दिल्याने तिथे काम करणार्‍यांना तोशीस पडते. बरेचदा विद्यार्थीही सुटीत काम करीत असतात. त्यांना थोडे पैसे आपल्याकडून मिळाले तर हरकत नसावी असे वाटते. त्यामुळे अगदी कायद्यावर डोळा ठेऊन वागण्यात किंवा त्रास करुन घेण्यात अर्थ नाही. चतुरंग

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 21:19
इथे काही गुजराथ्यांनी आता एक कॉमन डब्बा ठेवायला सुरुवात केलेय हवी तेवढी टीप टाकायची आणि मग ते वाटून घेतात. तिथे थोडी कमी टाकलॉ तरी चालते. पण नॉर्मल ठीकाणी मिनिमम १५% देतेच्...फक्त रेस्टॉरंट कशाला अगदी ब्यूटी पार्लर मधे गेलं तरी द्यावी लागते की १५%

एक गुरुवार, 04/17/2008 - 22:29
जर खरोखरच सर्विस चांगली मिळत असेल तर टीप वाढवतो सुद्धा. पण जर वेटर उर्मटपणा करत असेल. ऑर्डर केलेलं अन्न नीट नसेल तर तर एक डॉलर सुद्धा टीप देत नाही..हे अनुभव मला ९९% भारतीय रेस्टॉरंट मधेच आले..(मी कॅलिफोर्निया संबंधीत लिहितो आहे.. इतर ठिकाणी माहित नाही) इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. (उत्सुक लोकांनी "पॅसेज टू ईंडिया" मधे जाऊन बघावे). या उलट पुण्यातल्या उडूपी हॉटेल्स.. कधीही जा. वेटर हसून स्वागत करतो. त्यांना इथल्या वेटर्स पेक्षा प्रचंड काम असतं (हे मी अत्यंत जवळून बघितलं आहे.) त्यांना मात्र मी हात न राखता टीप देतो..

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 23:32
इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. १००% सहमत.. असं केलं होतं "चौपाटी" मधल्या एका वेटरने आणि जेवण तर सॉलीड टुकार तिथे नाही दिली मी अज्जिबात टीप....

बगाराम Fri, 04/18/2008 - 08:03
एक रावांना माझा मुद्दा बरोब्बर समजला आहे. अहो कधी कधी इंडियन रेस्टोरंट मध्ये मालकच जेवण आणून वाढताना बघायला मिळतो मग अश्या वेळेस टीप द्यावी का? कारण मग वरचे सगळे पगारतुन शोषण केलेले मुद्दे वगैरे गैरे ठरतात. अश्यावेळेस वरील लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल. -बगाराम
मी सध्या परदेशात राहतो. इथे बर्‍याचदा वेगवेगळ्या हाटेलात जाऊन आम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. पण इथे टिप देणे हि फार मोठी भानगड आहे. झालेल्या बिलावर १५-१८% टीप देणे जीवावर येते राव. आपल्याकडे ५-१० रुपये टीप दिली की भागायचे पण ५-१० डॉलर नुसते टीपचे द्यावे लागतात तेव्हा नुसता जळफळाट होतो. आमच्या मित्रमंडळात ह्यावर नेहेमीच चर्चा होते की बाकीच्या हॉटेलात ठीक आहे पण 'इंडीयन रेस्टॉरंट' मध्ये गेल्यावर पण तितकीच टीप द्यावी का? तुम्ही काय करता? -बगाराम

स्वप्नातलं गाव ... !

संदीप चित्रे ·

शितल गुरुवार, 04/17/2008 - 06:36
एकदम समुद्र किनारी वसलेल्या गावातील घरात नेऊन सोडलेत, छान, स॑दिप खरे न॑तर तुमचे ना॑व स॑दिप चित्रे.

चित्रा गुरुवार, 04/17/2008 - 07:04
छान कविता, आवडली. अलिबाग-मुरूड किनार्‍याची आठवण झाली. अशाच येऊ देत कविता अजून.

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 19:31
आवडली. चित्रेसाहेब खूपच छान कविता. अजून येऊद्यात. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन Fri, 05/09/2008 - 20:01
तीन टिंब एवढ्याच साठी की इतक्या सुंदर कवितेला नुसतं शब्दात प्रतिसाद देणं अवघड आहे. त्या टुमदार गावाची इथं बसल्या बसल्या सफर घडवलीस ,मित्रा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मन Fri, 05/09/2008 - 20:03
मला ही कविता इतकी आवडलिये, की सगळ्या दोस्तांना मेल करावी म्हणतोय(तुमच्या नावा सकट), पण अर्थातच, तुमची परवानगी असेल तरच. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

झकासराव Fri, 05/09/2008 - 20:35
चित्रे , तुमच्या स्वप्नामधल्या गावाला चित्रांच परिमाण द्या की अजुन छान वाटेल :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मदनबाण Sat, 05/10/2008 - 01:57
फारच सुंदर...... समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! > हे फार आवडल...... (शिंपले वेचणारा) मदनबाण.....

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 08:04
फारच छान . आवडली कविता. समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! ही २ कडवी तर मस्तच. कोकणात समुद्र किनारी असलेलं गाव डोळ्यासमोर उभं रहातं. -- ईश्वरी

गणपा Sat, 05/10/2008 - 18:31
मस्त रे संदिप... आवडली कविता.. कविता वाचुन गाव परत एकदा डोळ्यपुढं उभ राहिल. - (मनान गावात पोहोचलेला..) गणपा.

शितल गुरुवार, 04/17/2008 - 06:36
एकदम समुद्र किनारी वसलेल्या गावातील घरात नेऊन सोडलेत, छान, स॑दिप खरे न॑तर तुमचे ना॑व स॑दिप चित्रे.

चित्रा गुरुवार, 04/17/2008 - 07:04
छान कविता, आवडली. अलिबाग-मुरूड किनार्‍याची आठवण झाली. अशाच येऊ देत कविता अजून.

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 19:31
आवडली. चित्रेसाहेब खूपच छान कविता. अजून येऊद्यात. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन Fri, 05/09/2008 - 20:01
तीन टिंब एवढ्याच साठी की इतक्या सुंदर कवितेला नुसतं शब्दात प्रतिसाद देणं अवघड आहे. त्या टुमदार गावाची इथं बसल्या बसल्या सफर घडवलीस ,मित्रा. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

मन Fri, 05/09/2008 - 20:03
मला ही कविता इतकी आवडलिये, की सगळ्या दोस्तांना मेल करावी म्हणतोय(तुमच्या नावा सकट), पण अर्थातच, तुमची परवानगी असेल तरच. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

झकासराव Fri, 05/09/2008 - 20:35
चित्रे , तुमच्या स्वप्नामधल्या गावाला चित्रांच परिमाण द्या की अजुन छान वाटेल :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मदनबाण Sat, 05/10/2008 - 01:57
फारच सुंदर...... समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! > हे फार आवडल...... (शिंपले वेचणारा) मदनबाण.....

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 08:04
फारच छान . आवडली कविता. समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! ही २ कडवी तर मस्तच. कोकणात समुद्र किनारी असलेलं गाव डोळ्यासमोर उभं रहातं. -- ईश्वरी

गणपा Sat, 05/10/2008 - 18:31
मस्त रे संदिप... आवडली कविता.. कविता वाचुन गाव परत एकदा डोळ्यपुढं उभ राहिल. - (मनान गावात पोहोचलेला..) गणपा.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! लाकडी घर, टेकडीवर गाव उतरतं छत .. काचेचा ताव गुलाबी थंडी धवल वर्षाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! न्हाली दव, ऊबदार सकाळ नेसूनि रंग ये….संध्याकाळ चंदेरी उधळण चांदण्या वाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! जगती कोण, चुकला धाव? मनी आपलं.. एक जपावं गाव स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

स्वप्नातलं गाव ... !

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! लाकडी घर, टेकडीवर गाव उतरतं छत .. काचेचा ताव गुलाबी थंडी धवल वर्षाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! न्हाली दव, ऊबदार सकाळ नेसूनि रंग ये….संध्याकाळ चंदेरी उधळण चांदण्या वाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! जगती कोण, चुकला धाव? मनी आपलं.. एक जपावं गाव स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !

एप्रिल फळ (६)

विजुभाऊ ·

धनंजय गुरुवार, 04/17/2008 - 00:16
लेखात द्या की विजुभाऊ. लेख प्रतिसादांसरशी मागे-पुढे पळत आहेत - माझे सर्व मागचेच वाचून नाही झालेत - शोधता नाकी नऊ येत आहेत. छान चालू आहे.

In reply to by धनंजय

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 07:39
बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन त्या अगोदर हे पहा http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५)

इनोबा म्हणे गुरुवार, 04/17/2008 - 00:30
डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्‍यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते. हे अगदी बरोबर बोललात. द्राक्ष खाल्ली की आम्हाला एखादा 'स्मॉल पेग' मारल्यासारखे वाटते. भरपूर भूक लागलेली असताना अर्धवट जेवण करुन ताटावरुन उठावे तसे वाटतेय. जरा मोठे भाग लिहा की.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

शक्तिमान Sat, 03/14/2009 - 13:33
असेच म्हणतो... >>उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. आम्हीतर सध्या मि.पा.वरचे लेख वाचता वाचता द्राक्षं खातो... अहाहा...

स्वाती राजेश गुरुवार, 04/17/2008 - 01:01
सुरवात द्राक्षांची छान केलीत. गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. अगदी बरोबर......... पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे. पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.....

चतुरंग गुरुवार, 04/17/2008 - 01:17
द्राक्षे खात खात सुहास शिरवळकर तर अगदी चोक्कस!;) परत एकदा त्या आमच्या जुन्या घरात मनाने जाऊन आलो, तळमजल्यावरची तीच थंडगार खोली, अंगावर एक पातळशी चादर आणि जाड तक्क्या उशाला घेऊन सतरंजीवर पहुडणे आणि अशीच पुस्तकं वाचत वाचत डुलकी काढणे.....काय काय मागे सुटून गेलंय;(( द्राक्षाचे घड म्हणलात ना विजूभाऊ आणि आमची इंजिनियरिंगची एक आठवण जागी झाली. आमच्या कॉलेजच्या समोर द्राक्षाचे मळे होते. ह्या एप्रिल-मेच्या दिवसात आम्ही तिथे दुपारी जात असू. तिथे मळेवाल्याला पैसे दिले की हवी तेवढी द्राक्षे तिथेच बसून खाता येत, एकच नियम बाहेर घेऊन जायची नाहीत - अहो आम्हाला काय फरक पडतोय? इथे न्यायची आहेत कोणाला? आम्ही मित्रमंडळी दुपारभर तिथे पडीक असू आणि मनमुराद द्राक्षे हादडून संध्याकाळीच बाहेर! वा अजूनही आठवले की डोळ्यांवर धुंदी येते;;)) चतुरंग

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 09:36
उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड
विजुभाऊ, हाही भाग छान झाला आहे.

सहज गुरुवार, 04/17/2008 - 10:06
विजुभाउ तुमचे ही लेखमाला म्हणजे मेजवानी आहे. पण काय राव त्या जांभळांची आठवण करुन दिलीत.. हाय तडपतोय.

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 10:07
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे, असाच बिनाकोयीचा आंबा आला तर काय मजा येइल नाही ! दुपारचा आराम एन्जॉय करायच्या आठवणी मस्त, आम्ही अजुनही तो आनंद १५ दिवस- महिनाभरानी घेतोच :)

In reply to by आनंदयात्री

स्वाती दिनेश गुरुवार, 04/17/2008 - 11:44
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे आजही बीयावाली द्राक्षेच ( हिरवी आणि काळी,लाल )आमच्या इथे जास्त मिळतात,सीडलेस खूप कमी मिळतात. बिनकोयीचा आंबा झकास! विजुभाऊ,द्राक्षांचे वर्णन छान! स्वाती

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 11:30
हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्‍यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
ओहोहो !!! क्या बात है रसिकलाल विजुभाऊ! आईशप्पथ, चतुरंगराव, काय सॉल्लीड मजा येत असेल ना? भर मळ्यात बसुन पाहिजे तेव्हढी द्राक्षं हादडायची, मित्रांच्या रेवड्या उडवायच्या, आणि बोलता बोलता तिथेच ढेकळांत जागा शोधून लोळत पडायचं....चुकुन दिसलाच एखादा कोल्हा तर दगड-धोंडे घेऊन त्याच्या मागं पळायचं...भर उन्हात पळापळ करुन दमल्यावर कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून ल्यॅ-ल्यॅ करत कसं तरी परत बसल्या जागी यायचं आणि पुन्हा द्राक्षं हादडायला सुरुवात करायची! हाय! जुने दिवस आठवले.
थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते
...और ये लगा चौका ! बाकी, स्वातीताईच्या,
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.
ह्या वाक्याशी आपण १०००००००००००% सहमत. -(उन्हाळ्याच्या सुट्टीत 'बरसात चांदण्यांची' वाचताना रडलेला) ध मा ल.

धनंजय गुरुवार, 04/17/2008 - 00:16
लेखात द्या की विजुभाऊ. लेख प्रतिसादांसरशी मागे-पुढे पळत आहेत - माझे सर्व मागचेच वाचून नाही झालेत - शोधता नाकी नऊ येत आहेत. छान चालू आहे.

In reply to by धनंजय

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 07:39
बरोबर आहे मी ही सूचना आमलात आणेन त्या अगोदर हे पहा http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५)

इनोबा म्हणे गुरुवार, 04/17/2008 - 00:30
डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्‍यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते. हे अगदी बरोबर बोललात. द्राक्ष खाल्ली की आम्हाला एखादा 'स्मॉल पेग' मारल्यासारखे वाटते. भरपूर भूक लागलेली असताना अर्धवट जेवण करुन ताटावरुन उठावे तसे वाटतेय. जरा मोठे भाग लिहा की.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

शक्तिमान Sat, 03/14/2009 - 13:33
असेच म्हणतो... >>उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. आम्हीतर सध्या मि.पा.वरचे लेख वाचता वाचता द्राक्षं खातो... अहाहा...

स्वाती राजेश गुरुवार, 04/17/2008 - 01:01
सुरवात द्राक्षांची छान केलीत. गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. अगदी बरोबर......... पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे. पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.....

चतुरंग गुरुवार, 04/17/2008 - 01:17
द्राक्षे खात खात सुहास शिरवळकर तर अगदी चोक्कस!;) परत एकदा त्या आमच्या जुन्या घरात मनाने जाऊन आलो, तळमजल्यावरची तीच थंडगार खोली, अंगावर एक पातळशी चादर आणि जाड तक्क्या उशाला घेऊन सतरंजीवर पहुडणे आणि अशीच पुस्तकं वाचत वाचत डुलकी काढणे.....काय काय मागे सुटून गेलंय;(( द्राक्षाचे घड म्हणलात ना विजूभाऊ आणि आमची इंजिनियरिंगची एक आठवण जागी झाली. आमच्या कॉलेजच्या समोर द्राक्षाचे मळे होते. ह्या एप्रिल-मेच्या दिवसात आम्ही तिथे दुपारी जात असू. तिथे मळेवाल्याला पैसे दिले की हवी तेवढी द्राक्षे तिथेच बसून खाता येत, एकच नियम बाहेर घेऊन जायची नाहीत - अहो आम्हाला काय फरक पडतोय? इथे न्यायची आहेत कोणाला? आम्ही मित्रमंडळी दुपारभर तिथे पडीक असू आणि मनमुराद द्राक्षे हादडून संध्याकाळीच बाहेर! वा अजूनही आठवले की डोळ्यांवर धुंदी येते;;)) चतुरंग

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 09:36
उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड
विजुभाऊ, हाही भाग छान झाला आहे.

सहज गुरुवार, 04/17/2008 - 10:06
विजुभाउ तुमचे ही लेखमाला म्हणजे मेजवानी आहे. पण काय राव त्या जांभळांची आठवण करुन दिलीत.. हाय तडपतोय.

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 10:07
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे, असाच बिनाकोयीचा आंबा आला तर काय मजा येइल नाही ! दुपारचा आराम एन्जॉय करायच्या आठवणी मस्त, आम्ही अजुनही तो आनंद १५ दिवस- महिनाभरानी घेतोच :)

In reply to by आनंदयात्री

स्वाती दिनेश गुरुवार, 04/17/2008 - 11:44
बी असणारे द्राक्ष पण असते/असायचे हे नविनच कळ्ळे आजही बीयावाली द्राक्षेच ( हिरवी आणि काळी,लाल )आमच्या इथे जास्त मिळतात,सीडलेस खूप कमी मिळतात. बिनकोयीचा आंबा झकास! विजुभाऊ,द्राक्षांचे वर्णन छान! स्वाती

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 11:30
हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्‍यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
ओहोहो !!! क्या बात है रसिकलाल विजुभाऊ! आईशप्पथ, चतुरंगराव, काय सॉल्लीड मजा येत असेल ना? भर मळ्यात बसुन पाहिजे तेव्हढी द्राक्षं हादडायची, मित्रांच्या रेवड्या उडवायच्या, आणि बोलता बोलता तिथेच ढेकळांत जागा शोधून लोळत पडायचं....चुकुन दिसलाच एखादा कोल्हा तर दगड-धोंडे घेऊन त्याच्या मागं पळायचं...भर उन्हात पळापळ करुन दमल्यावर कुत्र्यासारखी जीभ बाहेर काढून ल्यॅ-ल्यॅ करत कसं तरी परत बसल्या जागी यायचं आणि पुन्हा द्राक्षं हादडायला सुरुवात करायची! हाय! जुने दिवस आठवले.
थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते
...और ये लगा चौका ! बाकी, स्वातीताईच्या,
पण यावेळी आम्ही झोपत नसू कारण एकदा सुहास शिरवळकरचे पुस्तक हातात आले तर ते संपल्या नंतरच उठायचे.
ह्या वाक्याशी आपण १०००००००००००% सहमत. -(उन्हाळ्याच्या सुट्टीत 'बरसात चांदण्यांची' वाचताना रडलेला) ध मा ल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते. रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते. असेच रमत गमत जात असलो तर मधेच एखादे फलांचे दुकान लक्ष्य वेधुन घेते.