मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुमार गंधर्व जयंती - चांगला लेख

मानस ·

प्रमोद देव 09/04/2008 - 22:21
९५ वाचने होऊनही एक देखिल प्रतिसाद नाही? कुमार गंधर्वांना मिसळपावकर ओळखत नाहीत की काय? असो. कुमार गंधर्वांबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आवडला. मानसराव आपण इथे त्याचा दुवा दिलात त्याबद्दल मी तुम्हाला दुवा देतो. कुमारजी माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत. त्यांनी सहजतेने हाताळलेले विविध गानप्रकार ऐकल्याशिवाय त्यांची खरी महती कळणार नाही. निव्वळ एका फुफ्फुसावर, श्वास,दमसास कसास लावणार्‍या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी जी उंची गाठली ती एक असामान्य गोष्ट होती. असा कुमार गंधर्व पुन्हा होणे नाही. कुमारांना माझी आदरांजली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मानस 09/04/2008 - 22:41
प्रमोदकाका धन्यवाद. कुमारजींच्या जयंत्ती निमित्त त्यांची आठवण व्हावी एवढीच इच्छा होती. लेखही छोटा पण अर्थपूर्ण वाटला म्हणून हा अट्टाहास. मानस

चतुरंग 09/04/2008 - 22:52
मी लेख कालच वाचला पण काल प्रतिक्रिया देण्यास वेळ झाला नाही. कुमारजी एक असामान्य कलाकार होते ह्यात शंकाच नाही. दैवदत्त देणगीला मेहेनतीची जोड देऊन आणि फुफ्फुसांच्या विकाराचा दैवाघात समर्थपणे पचवून गाण्यात त्यांनी स्वतःचे असे विश्व उभे केले. निर्गुणी भजने ही केवळ त्यांच्यासाठीच जणू काही निर्माण झालेली असावीत असे वाटावे इतकी ती आणि ते एकरुप आहेत. 'अजुनी रुसूनि आहे' सारखी भावगीते सुध्दा केवळ त्यांनीच अमरत्वाला नेऊन ठेवली. त्यांच्या स्मृतींना माझे वंदन! चतुरंग

प्रमोद देव 09/04/2008 - 22:21
९५ वाचने होऊनही एक देखिल प्रतिसाद नाही? कुमार गंधर्वांना मिसळपावकर ओळखत नाहीत की काय? असो. कुमार गंधर्वांबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आवडला. मानसराव आपण इथे त्याचा दुवा दिलात त्याबद्दल मी तुम्हाला दुवा देतो. कुमारजी माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत. त्यांनी सहजतेने हाताळलेले विविध गानप्रकार ऐकल्याशिवाय त्यांची खरी महती कळणार नाही. निव्वळ एका फुफ्फुसावर, श्वास,दमसास कसास लावणार्‍या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी जी उंची गाठली ती एक असामान्य गोष्ट होती. असा कुमार गंधर्व पुन्हा होणे नाही. कुमारांना माझी आदरांजली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मानस 09/04/2008 - 22:41
प्रमोदकाका धन्यवाद. कुमारजींच्या जयंत्ती निमित्त त्यांची आठवण व्हावी एवढीच इच्छा होती. लेखही छोटा पण अर्थपूर्ण वाटला म्हणून हा अट्टाहास. मानस

चतुरंग 09/04/2008 - 22:52
मी लेख कालच वाचला पण काल प्रतिक्रिया देण्यास वेळ झाला नाही. कुमारजी एक असामान्य कलाकार होते ह्यात शंकाच नाही. दैवदत्त देणगीला मेहेनतीची जोड देऊन आणि फुफ्फुसांच्या विकाराचा दैवाघात समर्थपणे पचवून गाण्यात त्यांनी स्वतःचे असे विश्व उभे केले. निर्गुणी भजने ही केवळ त्यांच्यासाठीच जणू काही निर्माण झालेली असावीत असे वाटावे इतकी ती आणि ते एकरुप आहेत. 'अजुनी रुसूनि आहे' सारखी भावगीते सुध्दा केवळ त्यांनीच अमरत्वाला नेऊन ठेवली. त्यांच्या स्मृतींना माझे वंदन! चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स - एप्रिल ८, २००८ कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले...

(...लवकर ये!)

चतुरंग ·

प्राजु 09/04/2008 - 00:31
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! प्राजुताई, ओरिजिनल कवीशी काही खुन्नस आहे का तुमची? त्यांनी प्रतिकूल प्रतिसाद तर दिला नव्हता ना तुमच्या एखाद्या कवितेला? प्रतिसाद शोधून बघावे लागतील, बघता येतील. असो. मूळ कवितेला प्रतिसाद न देता विडंबनाची वारेमाप आणि धोरणी स्तुती करणारी एक जळकुकडी तुटपुंजी काव्यछाकटी व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे. तिनेच प्रतिसाद दिला की काय असे क्षणभर वाटले! असो. चालू द्या टाइमपास. एकंदरच हा प्रतिसाद म्हणजे हसून हसून पुरेवाट! ( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. अवांतर होतकरू काव्यरसिकांनी स्वतःला कवी समजून विरंगुळ्यासाठी चार कविता करणे ठीकच आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग याहूनही चांगला होऊ शकतो असे काही म्हणतील. पण मला तसे वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "स्वादुपाकाने फदफदणाऱ्या कविता पाडणाऱ्या काव्यपिसाट घरेलू कवयित्री " ह्या विषयावर पीएचडी करण्याचा माझ्या एका मित्राचा विचार आहे. त्याचे ऍबस्ट्रॅक्ट मिळाले तर इथे टाकीन म्हणतो. तूर्तास एवढेच.

In reply to by चित्तरंजन भट

चतुरंग 10/04/2008 - 02:45
( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. तुझ्या भावना समजल्या. धन्यवाद! कोणी कशी प्रतिक्रीया द्यावी हे लेखकाच्या हातात नसतेच. पण ती प्रतिक्रीया कशी घ्यायची हे मात्र असते, त्याप्रमाणे मी ती घेतलेली आहे. (माझ्या भाषेत मी ह्याला 'फॅक्टर लावणे' म्हणतो. जसे (x/y). म्हणजे x आणि y च्या किमती तुम्हाला हव्या तशा घेता येतात!;) (अवांतर - पंचपक्वान्ने जेवून पोट भरले की काही नकोसे वाटते, जसे दादांची गझल वाचून आलात तर बाकी एकदम बकवास वाटते, कधीकधी फार भूक लागलेली असली की चणे फुटाणेही अमृतासमान भासतात, तसेच काहीसे ह्या विडंबनाबाबत झाले असावे!;) चतुरंग

In reply to by चित्तरंजन भट

प्राजु 11/04/2008 - 00:32
आपला गैरसमज झाला आहे. मला विडंबन जास्ती आवडले याचा अर्थ ओरिजिनल कविता वाईट आहे असा होत नाही. मला विडंबन जास्ती आवडले... इतकाच त्याचा अर्थ आहे. कारण ते थिम थोडी वेगळी घेऊन लिहिलेले आहे. नेहमीचे विडंबन नाही. बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... यात दुमत नाही. तेव्हा गैरसमज नसावा. माझा कोणावरही राग अथवा लोभ नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सुशील 11/04/2008 - 08:36
बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... तितकीच चांगली आहे?? अरे मग मूळ कवतेपेक्षा विडंबन चांगले आहे कसे काय म्हणालात प्राजुताई? आता उगीचच सारवा सारवी करताय ना?

बेसनलाडू 09/04/2008 - 02:26
आणि सहज शब्दयोजना यांमुळे विडंबन आवडले. विडंबनातील विषयाच्या बाबतीत काहीही न बोललेलेच बरे, नाहीतर तिरक्या खेकड्याची वगैरे अवहेलना विनाकारण आणि अक्षरशः कुणाकडूनही (!) माथी येते. असो. पुढील रचनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 09/04/2008 - 02:30
आणि तो तिथे फिट्ट बसतोय असे वाटले म्हणून विडंबन प्रकाशण्याचे धाडस केले! अन्यथा विषयातल्या तोचतोच पणामुळे रटाळ झाले असते.;)! धन्यवाद! चतुरंग

सुवर्णमयी 09/04/2008 - 08:50
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. (धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते का? )

In reply to by सुवर्णमयी

केशवसुमार 09/04/2008 - 10:08
चतुरंगशेठ, डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते ! (ऑनदरॉक्स कोला पिणारा)केशवसुमार

विसोबा खेचर 09/04/2008 - 08:51
रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! हे मस्त! :)

विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती

ठणठणपाळ 09/04/2008 - 21:26
अप्रतिम शब्दरचना. कविता एकदम प्रोफेशनल कवीच्या कवितेसारखी फक्कड जमली आहे.

बाजीराव 09/04/2008 - 22:12
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती मद्य हा विषय `चावून चोथा' कसा काय होऊ शकतो?

प्राजु 09/04/2008 - 00:31
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! प्राजुताई, ओरिजिनल कवीशी काही खुन्नस आहे का तुमची? त्यांनी प्रतिकूल प्रतिसाद तर दिला नव्हता ना तुमच्या एखाद्या कवितेला? प्रतिसाद शोधून बघावे लागतील, बघता येतील. असो. मूळ कवितेला प्रतिसाद न देता विडंबनाची वारेमाप आणि धोरणी स्तुती करणारी एक जळकुकडी तुटपुंजी काव्यछाकटी व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे. तिनेच प्रतिसाद दिला की काय असे क्षणभर वाटले! असो. चालू द्या टाइमपास. एकंदरच हा प्रतिसाद म्हणजे हसून हसून पुरेवाट! ( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. अवांतर होतकरू काव्यरसिकांनी स्वतःला कवी समजून विरंगुळ्यासाठी चार कविता करणे ठीकच आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग याहूनही चांगला होऊ शकतो असे काही म्हणतील. पण मला तसे वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "स्वादुपाकाने फदफदणाऱ्या कविता पाडणाऱ्या काव्यपिसाट घरेलू कवयित्री " ह्या विषयावर पीएचडी करण्याचा माझ्या एका मित्राचा विचार आहे. त्याचे ऍबस्ट्रॅक्ट मिळाले तर इथे टाकीन म्हणतो. तूर्तास एवढेच.

In reply to by चित्तरंजन भट

चतुरंग 10/04/2008 - 02:45
( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. तुझ्या भावना समजल्या. धन्यवाद! कोणी कशी प्रतिक्रीया द्यावी हे लेखकाच्या हातात नसतेच. पण ती प्रतिक्रीया कशी घ्यायची हे मात्र असते, त्याप्रमाणे मी ती घेतलेली आहे. (माझ्या भाषेत मी ह्याला 'फॅक्टर लावणे' म्हणतो. जसे (x/y). म्हणजे x आणि y च्या किमती तुम्हाला हव्या तशा घेता येतात!;) (अवांतर - पंचपक्वान्ने जेवून पोट भरले की काही नकोसे वाटते, जसे दादांची गझल वाचून आलात तर बाकी एकदम बकवास वाटते, कधीकधी फार भूक लागलेली असली की चणे फुटाणेही अमृतासमान भासतात, तसेच काहीसे ह्या विडंबनाबाबत झाले असावे!;) चतुरंग

In reply to by चित्तरंजन भट

प्राजु 11/04/2008 - 00:32
आपला गैरसमज झाला आहे. मला विडंबन जास्ती आवडले याचा अर्थ ओरिजिनल कविता वाईट आहे असा होत नाही. मला विडंबन जास्ती आवडले... इतकाच त्याचा अर्थ आहे. कारण ते थिम थोडी वेगळी घेऊन लिहिलेले आहे. नेहमीचे विडंबन नाही. बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... यात दुमत नाही. तेव्हा गैरसमज नसावा. माझा कोणावरही राग अथवा लोभ नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सुशील 11/04/2008 - 08:36
बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... तितकीच चांगली आहे?? अरे मग मूळ कवतेपेक्षा विडंबन चांगले आहे कसे काय म्हणालात प्राजुताई? आता उगीचच सारवा सारवी करताय ना?

बेसनलाडू 09/04/2008 - 02:26
आणि सहज शब्दयोजना यांमुळे विडंबन आवडले. विडंबनातील विषयाच्या बाबतीत काहीही न बोललेलेच बरे, नाहीतर तिरक्या खेकड्याची वगैरे अवहेलना विनाकारण आणि अक्षरशः कुणाकडूनही (!) माथी येते. असो. पुढील रचनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग 09/04/2008 - 02:30
आणि तो तिथे फिट्ट बसतोय असे वाटले म्हणून विडंबन प्रकाशण्याचे धाडस केले! अन्यथा विषयातल्या तोचतोच पणामुळे रटाळ झाले असते.;)! धन्यवाद! चतुरंग

सुवर्णमयी 09/04/2008 - 08:50
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. (धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते का? )

In reply to by सुवर्णमयी

केशवसुमार 09/04/2008 - 10:08
चतुरंगशेठ, डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते ! (ऑनदरॉक्स कोला पिणारा)केशवसुमार

विसोबा खेचर 09/04/2008 - 08:51
रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! हे मस्त! :)

विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती

ठणठणपाळ 09/04/2008 - 21:26
अप्रतिम शब्दरचना. कविता एकदम प्रोफेशनल कवीच्या कवितेसारखी फक्कड जमली आहे.

बाजीराव 09/04/2008 - 22:12
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती मद्य हा विषय `चावून चोथा' कसा काय होऊ शकतो?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कवि प्रदीप यांची सुंदर कविता '....लवकर ये' ही आमची प्रेरणा:) (ग्लासातला बर्फाचा तुकडा मदिरेला विनवतोय अशी कल्पना! म्हणजे शुध्द मराठीत 'ऑन दि रॉक्स!;) रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! थंडगार एकटाच खणखणतो... देहाची वाफ किती दवडवितो... किणकिणतो, डुचमळतो अन् म्हणतो - -`सोड सोड तू बाटली; लवकर ये `! तेच भक्त; तूच मदिरा त्यांची! पेग 'विसावा' पुन्हा 'पेटली' त्यांची! ऐक जरा; ऐक आरोळी त्यांची! पेग तो आता भर...लवकर ये ! सांग त्यांना वाट किती दावू मी? का सांग; त्यांची वाट अशी लावू मी ? वाट बघत कोरडा का राहू मी ?

असम्भव

आंबोळी ·

अभिज्ञ 08/04/2008 - 23:50
माझे नशीब अत्यंत चांगले असावे म्हणुन कि काय इथे हल्ली बेंगलोरात माझ्याकडे झी मराठी दिसत नाही. त्यामुळेच माझी ह्या "असंभव" त्रासातून मुक्तता झाली आहे. परंतु माझ्या केबल वाल्याने इ टि.व्हि. मराठी सूरु केल्याने हा "असंभव" त्रास मला "ह्या गोजिरवाण्या घरा"तून व्हायला लागलाय. माझ्या मते "ह्या गोजिरवाण्या घरात" हि मालिका "असंभव" पेक्षा जास्त "असंभव" वाटते. ह्या थोर मालिकेचि हि काहि क्षणचित्रे... १.कुटुंबाचे आडनाव "परांजपे". २.घरातल्या मुलिचा पहिला घटस्फोट,मग दुस-याशी लग्न.मग परत तिथे घटस्फोट.मग परत पहिल्या नव-याशी परत लग्न. ३.घरातला थोरला मुलगा "उंडगा" असतो.तो गॅरेज चालविणे,सुपा-या घेणे असलि कामे करत असतो. ४.धा़कट्या मुलाच्या पहिल्या बायकोचा विनयभंग होउन तिची आत्महत्या.मग त्याचे दुसरे लग्न.दुस-या बायकोचे तिच्या नंणदेच्या दुस-या नव-याबरोबर असणारे अफेअर..... त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अशा एक से एक प्रसंगातून हि मालिका पुढे पुढे सरकत राहते. मालिकेतील आता बरेचसे कलाकार जाउन त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा. असल्या अतर्क्य घटनांनी भरलेली हि मालिका "या गोजिरवाण्या घरात" अशा नावाने दाखवल्यावर मला तर ती असंभव पेक्षा हि असंभव वाटते. असंभव,या गोजिरवाण्या घरात सारख्या टुकार मालिका कधि बंद होतील हे देवच जाणो.कदाचित त्या बंद झाल्या कि नाहि हे पहायला पुनर्जन्मच घ्यावा लागेल असे आता मला वाटायला लागले आहे. असो... अबब

In reply to by अभिज्ञ

बेसनलाडू 09/04/2008 - 02:37
अजून हा बकवास प्रकार पाहण्यात आलेला नाही, पण प्रतिसादातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा, यावरून भारतात जाईन तेव्हा निदान ही मालिका तरी पाहणार नाही, असा आताच कानाला खडा लावला आहे. त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अहो म्हणूनच नाव 'असंभव' दिलेय ना! ;) :)) (संभावित)बेसनलाडू

प्राजु 09/04/2008 - 00:21
हे एकच विशेषण आहे. माझा आजकाल या मालिकांशी काहिही संबंध नाही.. पण अबब, आपण जी क्षणचित्रे दिलीत त्यावरून त्या मालिकेच्या दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची कीव येते आहे. सुखी आहे मी.. इथल्या "एव्हरिबडी लव्हज् रेमंड्स" सारख्या मालिकांमध्ये - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 09/04/2008 - 08:25
मी कुठल्याच मालिका बघत नाही. तो मी स्वत:च्या रसिकतेचा अपमान समजतो. सर्व मालिका एकापेक्षा एक फालतू असतात! मला या मालिकावाल्यांच्या क्रिएटीव्हीटीची कीव येते. फार पूर्वी मात्र काही मोजक्याच मालिका माझ्या खूप लाडक्या होत्या- त्यापैकी- अडोसपडोस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, नुक्कड, ये है जिंदगी, उडान, इत्यादी. कविता चौधरी या विलक्षण बोलक्या चेहेर्‍याच्या अभिनेत्रीची उडान ही मालिका मला खूप आवडली होती. आता अश्या मालिका होतच नाहीत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरे काय तात्या आठवण काढलीस? या मालिका मी ही आवडीने पाहत असे.खरंच मजा यायची .. आता गेली कितीतरी वर्षे हिंदी,मराठी चॅनेल्सचा काही संपर्कच नाही म्हणून संबंधही उरला नाही .त्याचं पूर्वी थोडं वाईट वाटत असे, पण इथे चाललेल्या चर्चातून समजते आहे की मालिका काय किवा रिऍलिटी शोज काय सगळे बकवास आहे! त्यामुळे आता ही चॅनेले आणि त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत याचे अजिबात वाईट वाटत नाहीये. स्वाती

In reply to by राजमुद्रा

छोटा डॉन 09/04/2008 - 16:30
मी घरी गेल्यावर साधारणता ३-४ भाग बघितले होते.... असह्य असह्य म्हणतात ते हेच असावे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भोचक 09/04/2008 - 14:56
मी टिव्हीवर सारेगमपव्यतिरिक्त एकही मालिकात्मक कार्यक्रम बघत नाही. पण हा एक कार्यक्रम बघत असताना झळकणार्‍या मालिकांच्या जाहिरातींमुळे त्यात काय चालले आहे ते कळते. त्याच्या भयानक जाहिराती पाहूनच त्या मालिकांत काय चालले याचा अंदाज येतो. वहिनीसाहेब नावाच्या मालिकेच्या जाहिरातीत सतत कुणी कुणाला मारताना दाखविले जाते. तेही इतक्या ओंगळपणे की त्याची किळस वाटते. याचा लहान मुलांवरही मोठा परिणाम होतो. माझी दोन वर्षाची मुलगी नेमकी अनेकदा टिव्हीसमोर असायची. त्यावेळी तिला जाणवणार्‍या विचित्र फिलींग आम्हाला लक्षात आल्या. आता अशी एखादी जाहिरात लागली की हे बघायचं नाही ना, असं ती आम्हाला विचारते. त्यामुळे अनेकदा या जाहिराती पाहताना संताप अनावर होतो. लोक (कुठले?) पहातात म्हणून काहीही अतर्क्य आणि किळसवाणे दाखविणार्‍या या दिग्दर्शकांचा आणि लेखकांना जाहिररित्या चाबकाने फोडून काढावे अशी इच्छा होते. या सुखांनो या नावाच्या मालिकेची जाहिरात बघताना या सगळ्यांना खरोखरच सुखाची गरज आहे, त्यामुळे त्यांना तातडीने सुख पॅक करून पाठवून देऊन मालिका बंद करावी असा सल्ला द्यावासा वाटतो. तीच कथा कळत नकळतची. एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं हे आपल्या डोक्याच्या पलीकडचे आहे. दुसर्‍यांची दुःखे, रडारड, भांडण, लफडी यातून मनोरंजन काय होत असेल? त्यामुळे अशा मालिकांवर बंदी घालावी या मताचा मी आहे. अत्यंत सुंदर मालिकांचाही एक काळ दूरदर्शनवर होता. तो वाहिनींच्या बाजारीकरणाच्या सुरवातीबरोबरच संपला. दुर्देव. मालिकांच्या फेर्‍यापासून अलिप्त रहाणारा (भोचक)

अन्जलि 09/04/2008 - 15:34
सग्ल्यअ मलिकामधे एक्च दखव्ले अहे. य सुखनो मधे पन नव्ररअ मर्तो खुन होतो. कलत नकलत मधे पन खुन होतो सग्लिकदे सर्खिच रदरद. घरि गेल्यवर फ्रेश होन्यसथि विरन्गुला म्हनुन कहि बघवे तर हे असे. पुर्विचे सग्ले दिगर्शक कोथे गेले?

In reply to by अन्जलि

विजुभाऊ 10/04/2008 - 13:17
अंजली ताई मराठी कळ फलक नीट वापरा. तुमचे नावही देवनागरीत करुन घ्या तुमची रदरद वाचुन आम्हाला रदु येते..... रदुन रदुन शाल्खे दोले पुशनाला विजुभाऊ

एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं आणि त्यात जहिरातीत ती विचारते, मी करतेय ते बरोबर आहे का? .. विनोदी कुठली.... आधी इतके उद्योग केलेस तेव्हा विचारलेस का आम्हाला?? अं..? लब्बाड... !!!

या सिरीयल १ महिन्यानी जरी पाहील्या तरी, तिथेच असतात. कोल्हापुरातील रंकाळ्याजवळील नंदी सारखे तीळ भर पुढे, गहूभर मागे.. मिसळपाव वरील सदस्य यापेक्षा सकस, आणि छान सिरीयल काढू शकतील असे माझे मत...

उदय सप्रे 09/04/2008 - 16:11
अ सिरिअल इज अ प्रोग्राम व्हेअर वी "नो" "सी रिअल" ! प्रत्यक्षात घडणारे काहीच येथे दिसत नाही. एक अनुभव म्हणून सांगतो : झी वरील "हास्य सम्राट"चे ऑडिशन , स्थळ : दादर , वेळ - ठरवलेली सकाळी ८ , परिक्षक - विजय कदम यांचे आगमन ११.४५ वाजता, एकूण लोक ऑडिशन साठी ४५० + , २ हॉल्मधे कोंबलेले, प्रत्येकाला फक्त ३ मिनिटे वेळ, दुसर्‍या हॉल्मधे स्क्रीनिंग्साठी "स्पॉट" बॉय टाईप्चे लोक्.....मी शिव्या घालून आलो..... झी वर २ सिरिअल्स खरेच चांगल्या होत्या : मेघ दाटले (१३ भाग) आणि "श्रीयुत गंगाधर टिपरे" बास ! बाकी अधुरी एक कहाणी पासून वादळाची वाट पर्यंत एक्दम भिक्कार !

In reply to by मदनबाण

विद्याधर३१ 09/04/2008 - 19:46
४०५ आनंदवन, प्रपंच, झोका..........देव चालले ( पिंपळपान) या सारख्या सुन्दर मालिकांच्या आठवणी जाग्या झाल्या. (प्रतिमा कुलकर्णी यांच्या नवीन मालिकेची चातकासारखी वाट बघणारा..) विद्याधर आवांतर: प्रपंच पुन्हा चालु झाल्यास बघण्यास उत्सुक आहे.

मनस्वी 09/04/2008 - 16:17
सगळ्यात वीट आणतो तो आदेश बांदेकर. त्याच्या गरीब विनोदबुद्धीचा कहर आहे. आता तर २-२ मालिकांत आहे!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 09/04/2008 - 16:19
आणि कोट्या करतो त्याही अपमानास्पद ! त्याला एकदा सोडाच मिपाकरांच्या घोळक्यात...आयुष्यभर लक्षात राहतील असले जब्राट इनोद होतील त्याच्यावर!!!

वरदा 09/04/2008 - 17:44
होती टिपरे.. ह्या गोजिरवाण्या घरात मी ३ वर्षापूर्वी तिथे असताना पाहिली होती अजूनही चालू आहे ती????? काय भयंकर लोक आहेत्...पाणी घालून घालून आता त्यात डाळ राहीलीच नाहीये म्हणावं..फक्त पाणी.....:((((

ह्या मालिका म्हणजे 'सिरियल किलर्स' असतात. ऍनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी, हिस्ट्री, नॅशनल जिऑग्रॅफी , एखादी मराठी बातम्यांची वाहिनी , मी मराठीवरील 'दिलखुलास' आणि काही कुकरी शोज एवढे पुरते मला.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 10/04/2008 - 12:57
पोगो चॅनेल पण मस्त आहे.. एकदम नो टेन्शन. त्यावरील मॅड, गॅग्ज, मिस्टर बीन, तकेशीज कॅसल आणि जावेद जाफरीची कॉमेन्ट्री एकदम टाईमपास.

देवदत्त 09/04/2008 - 20:38
हेच... मी तरी असल्या मालिका बघत नाही. बघायचे काय तर जे १, २ थोड्या दिवसांत संपेल. उदा. कोपरखळी, कॉमेडी.कॉम, सी, आय. डी., ऑफिस ऑफिस, वगैरे वगैरे. ३ वर्षांपूर्वीपर्यंत जमेल त्या चांगल्या मालिका बघत होतो. उदा. टिपरे, ४०५ आनंदवन, झोका, प्रपंच, दुनियादारी. (आता तर नावे ही आठवत नाही) नाही तर आहेच, सिनेमा एके सिनेमा. ;) आणखी एक, काही मालिका नवीन असतात तेव्हाच पहायच्या. नव्याची नवलाई. सध्या तरी मी एन डी टी व्ही इमॅजीन वर जस्सूबेन जयंतीलाल जोशी की ज्वाईंट फॅमिली आवर्जून बघतो. निदान सुरुवातीला तरी पाहण्यास चांगले आहे. तात्या, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या मालिका मी पाहिल्या होत्या, थोड्याफार आठवतातही, पण त्यातील अडोस पडोसचे नावच आता आठवते आहे. त्यात काय कोण असायचे ते आठवत नाही. अर्थात तेव्हा मी फार लहान होतो. त्यावेळी मालिकांच्या नावांवरून आम्ही (की कुणीतरी) एक लांब परिच्छेद (संवाद) तयार केला होता. नीटसा आठवत नाही. आठवला तर नक्की लिहीन.

अविनाश ओगले 09/04/2008 - 22:29
वरील चर्चा वाचल्यावर मिसळपाव वरील माझे संथ चालते मालिका ही हे विडंबन आठ्वले. विशेषतः कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... या ओळी...

आनंद घारे 10/04/2008 - 19:07
मिपाचे सदस्य नाहीत हे उघड आहे कारण एकादी तरी सकारात्मक प्रतिक्रिया आली असती. पण ते लोक आपल्या आजूबाजूलाच अस्तित्वात असतात ना? त्यांना बहुधा मिसळपाव आवडत नसावी. जर कोणाला डिस्कव्हरी किंवा नॅशनल ज्यॉग्राफिक असे कांही पहावेसे वाटत असेल तर घरातले इतर लोक त्यांना ते पाहू देतात काय? असंभव या मालिकेबद्दल जे लिहिले गेले आहे त्याशी मीसुद्धा सहमत आहे. तरीही मला त्यातल्या त्यात तीच मालिका बरी वाटते, त्यामुळे मी ती (शिव्या घालत घालत) पाहतो.

सभ्य इसम 10/04/2008 - 22:32
मनापासून आवडलेल्या मालिका: चिमणराव, गजरा, चाळ नावाची वाचाळ वस्ती, प्रपंच, झोका, ४०५ आनंदवन, श्रीयुत गंगाधर टिपरे... न आवडलेल्या मालिका- सर्वच्या सर्वं daily soaps... हिंदी मालिकांची पिल्लं अजुन काय?? मराठी बातमी पत्रं म्हणायचं झालं तर स्टार माझा हे.. हिंदी बातमीपत्रांचं (Zee News, Aaj Tak, India TV) पिल्लू आहे.... तरी बरं अजुन रात्री भूतांचे घाणेरडे कार्यक्रम दाखवत नाहीत .. बातमी पत्रातील लोक फार वाईट मराठी बोलतात....आणि विषयही पोरकट असतात.. झी २४ तास बद्दल काही कल्पना नाही...टाटा स्काय ची कृपा... ई टीव्ही वरच्या बातम्या माहितीपुर्वक असतात... मी मराठी वर दिलखुलास हा एकच कार्यक्रम पाहिला आहे...बरा वाटला.. प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती ह्या दोघांची भिकार मालिका लागते ह्या वाहिनी वर... १ प्रश्न आहे.... आज काल टि. व्ही. वर "जो बोले सिकन्दर"ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते.. (कसली त्याचा वाद नाही आहे... ) मला हे कळ्त नाही, संध्याकाळी सर्व कुटुंब मिळून जर एखादी मालिका पाहत असेल, आणि हया जाहिरातेतला मनुष्य जोरजोरात कबड्डी कबड्डी (इथ्ये शब्द बदललेला.....) तर काय करावं??.... हे सोडा.... "छान छान गोष्टी" ह्या लहान मुल्लांच्या कार्यक्रमाच्या मध्ये ही जाहिरात मध्ये दाखवली जाते... ह्या मागचा उद्देश्य तो काय... (हे शेवटचे मूळ विषयाला सोडून होते, पण टी. व्ही. चा विषय आल्याने, मनातले मोकळे करावेसे वाटले..) मोहित्यांचा केतन (अवघाची संसार मालिका आणि त्यातली Fool पात्रं ह्यांच्याशी काहीही संबंध नसलेले मोहिते..) अवांतरः खालची link काळ्जीपूर्वक click करा...कारण मला फार मोठा धक्का बसला...तेव्हा तुम्हाला Heart problem असेल तर शक्यतो टाळा...विशेषतः दुसरी link .. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=27493788 http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=27493788&tid=2514141917995359885&na=3&nst=11&nid=27493788-2514141917995359885-2529485362263600398 Orkut मध्ये अशी community सुद्धा असू शकते??

झकासराव 10/04/2008 - 22:58
नीना कुलकर्णी आणि तिचा नवरा दिलिप कुलकर्णी यांची "नायक" ह्या मालिकेचा कसा काय उल्लेख नाहिये??? ती छानच होती. टिपरे चे रीपिट टेलेकास्ट पाहिले मी. मस्त आहे. :)

एक 11/04/2008 - 00:21
साईन्फिल्ड्स. जेरी साईन्फिल्डची निरिक्षणशक्ति आणि विनोदबुद्धी विलक्षण आहे. या बाबतीत त्याची तुलना कधी कधी पु.लं शी कराविशी वाटते. युट्यब वर हा त्याचा एक स्टँडप शो पण आहे.. http://www.youtube.com/watch?v=qY5AVBSjTAQ हुज लाईन इज इट एनी वे? स्पिन सिटी. एव्हरीबडी लव्ह्ज रेमंड.. (यातला म्हातारा तर माझा फेवरेट आहे.) यातला कुठ्लाही एपिसोड कधीही कितीही वेळाअ बघितला तरी छान वाटतो. मी असं ऐकलं की या सिरीयल्स भारतात पण लागतात. आई वडील इथे आले होते तेव्हा त्यांच्या साठी म्हणून सोनी आणि झी चॅनेल्स घेतले. मला कल्पना नव्हती ते तिकडे या चॅनेल्स ना एवढे वैतागले होते..इथे आल्यानंतर त्यांनी वर दिलेल्या सिरीयल्स बघायलाच सुरुवात केली..

अभिज्ञ 08/04/2008 - 23:50
माझे नशीब अत्यंत चांगले असावे म्हणुन कि काय इथे हल्ली बेंगलोरात माझ्याकडे झी मराठी दिसत नाही. त्यामुळेच माझी ह्या "असंभव" त्रासातून मुक्तता झाली आहे. परंतु माझ्या केबल वाल्याने इ टि.व्हि. मराठी सूरु केल्याने हा "असंभव" त्रास मला "ह्या गोजिरवाण्या घरा"तून व्हायला लागलाय. माझ्या मते "ह्या गोजिरवाण्या घरात" हि मालिका "असंभव" पेक्षा जास्त "असंभव" वाटते. ह्या थोर मालिकेचि हि काहि क्षणचित्रे... १.कुटुंबाचे आडनाव "परांजपे". २.घरातल्या मुलिचा पहिला घटस्फोट,मग दुस-याशी लग्न.मग परत तिथे घटस्फोट.मग परत पहिल्या नव-याशी परत लग्न. ३.घरातला थोरला मुलगा "उंडगा" असतो.तो गॅरेज चालविणे,सुपा-या घेणे असलि कामे करत असतो. ४.धा़कट्या मुलाच्या पहिल्या बायकोचा विनयभंग होउन तिची आत्महत्या.मग त्याचे दुसरे लग्न.दुस-या बायकोचे तिच्या नंणदेच्या दुस-या नव-याबरोबर असणारे अफेअर..... त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अशा एक से एक प्रसंगातून हि मालिका पुढे पुढे सरकत राहते. मालिकेतील आता बरेचसे कलाकार जाउन त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा. असल्या अतर्क्य घटनांनी भरलेली हि मालिका "या गोजिरवाण्या घरात" अशा नावाने दाखवल्यावर मला तर ती असंभव पेक्षा हि असंभव वाटते. असंभव,या गोजिरवाण्या घरात सारख्या टुकार मालिका कधि बंद होतील हे देवच जाणो.कदाचित त्या बंद झाल्या कि नाहि हे पहायला पुनर्जन्मच घ्यावा लागेल असे आता मला वाटायला लागले आहे. असो... अबब

In reply to by अभिज्ञ

बेसनलाडू 09/04/2008 - 02:37
अजून हा बकवास प्रकार पाहण्यात आलेला नाही, पण प्रतिसादातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा, यावरून भारतात जाईन तेव्हा निदान ही मालिका तरी पाहणार नाही, असा आताच कानाला खडा लावला आहे. त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अहो म्हणूनच नाव 'असंभव' दिलेय ना! ;) :)) (संभावित)बेसनलाडू

प्राजु 09/04/2008 - 00:21
हे एकच विशेषण आहे. माझा आजकाल या मालिकांशी काहिही संबंध नाही.. पण अबब, आपण जी क्षणचित्रे दिलीत त्यावरून त्या मालिकेच्या दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची कीव येते आहे. सुखी आहे मी.. इथल्या "एव्हरिबडी लव्हज् रेमंड्स" सारख्या मालिकांमध्ये - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 09/04/2008 - 08:25
मी कुठल्याच मालिका बघत नाही. तो मी स्वत:च्या रसिकतेचा अपमान समजतो. सर्व मालिका एकापेक्षा एक फालतू असतात! मला या मालिकावाल्यांच्या क्रिएटीव्हीटीची कीव येते. फार पूर्वी मात्र काही मोजक्याच मालिका माझ्या खूप लाडक्या होत्या- त्यापैकी- अडोसपडोस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, नुक्कड, ये है जिंदगी, उडान, इत्यादी. कविता चौधरी या विलक्षण बोलक्या चेहेर्‍याच्या अभिनेत्रीची उडान ही मालिका मला खूप आवडली होती. आता अश्या मालिका होतच नाहीत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अरे काय तात्या आठवण काढलीस? या मालिका मी ही आवडीने पाहत असे.खरंच मजा यायची .. आता गेली कितीतरी वर्षे हिंदी,मराठी चॅनेल्सचा काही संपर्कच नाही म्हणून संबंधही उरला नाही .त्याचं पूर्वी थोडं वाईट वाटत असे, पण इथे चाललेल्या चर्चातून समजते आहे की मालिका काय किवा रिऍलिटी शोज काय सगळे बकवास आहे! त्यामुळे आता ही चॅनेले आणि त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत याचे अजिबात वाईट वाटत नाहीये. स्वाती

In reply to by राजमुद्रा

छोटा डॉन 09/04/2008 - 16:30
मी घरी गेल्यावर साधारणता ३-४ भाग बघितले होते.... असह्य असह्य म्हणतात ते हेच असावे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भोचक 09/04/2008 - 14:56
मी टिव्हीवर सारेगमपव्यतिरिक्त एकही मालिकात्मक कार्यक्रम बघत नाही. पण हा एक कार्यक्रम बघत असताना झळकणार्‍या मालिकांच्या जाहिरातींमुळे त्यात काय चालले आहे ते कळते. त्याच्या भयानक जाहिराती पाहूनच त्या मालिकांत काय चालले याचा अंदाज येतो. वहिनीसाहेब नावाच्या मालिकेच्या जाहिरातीत सतत कुणी कुणाला मारताना दाखविले जाते. तेही इतक्या ओंगळपणे की त्याची किळस वाटते. याचा लहान मुलांवरही मोठा परिणाम होतो. माझी दोन वर्षाची मुलगी नेमकी अनेकदा टिव्हीसमोर असायची. त्यावेळी तिला जाणवणार्‍या विचित्र फिलींग आम्हाला लक्षात आल्या. आता अशी एखादी जाहिरात लागली की हे बघायचं नाही ना, असं ती आम्हाला विचारते. त्यामुळे अनेकदा या जाहिराती पाहताना संताप अनावर होतो. लोक (कुठले?) पहातात म्हणून काहीही अतर्क्य आणि किळसवाणे दाखविणार्‍या या दिग्दर्शकांचा आणि लेखकांना जाहिररित्या चाबकाने फोडून काढावे अशी इच्छा होते. या सुखांनो या नावाच्या मालिकेची जाहिरात बघताना या सगळ्यांना खरोखरच सुखाची गरज आहे, त्यामुळे त्यांना तातडीने सुख पॅक करून पाठवून देऊन मालिका बंद करावी असा सल्ला द्यावासा वाटतो. तीच कथा कळत नकळतची. एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं हे आपल्या डोक्याच्या पलीकडचे आहे. दुसर्‍यांची दुःखे, रडारड, भांडण, लफडी यातून मनोरंजन काय होत असेल? त्यामुळे अशा मालिकांवर बंदी घालावी या मताचा मी आहे. अत्यंत सुंदर मालिकांचाही एक काळ दूरदर्शनवर होता. तो वाहिनींच्या बाजारीकरणाच्या सुरवातीबरोबरच संपला. दुर्देव. मालिकांच्या फेर्‍यापासून अलिप्त रहाणारा (भोचक)

अन्जलि 09/04/2008 - 15:34
सग्ल्यअ मलिकामधे एक्च दखव्ले अहे. य सुखनो मधे पन नव्ररअ मर्तो खुन होतो. कलत नकलत मधे पन खुन होतो सग्लिकदे सर्खिच रदरद. घरि गेल्यवर फ्रेश होन्यसथि विरन्गुला म्हनुन कहि बघवे तर हे असे. पुर्विचे सग्ले दिगर्शक कोथे गेले?

In reply to by अन्जलि

विजुभाऊ 10/04/2008 - 13:17
अंजली ताई मराठी कळ फलक नीट वापरा. तुमचे नावही देवनागरीत करुन घ्या तुमची रदरद वाचुन आम्हाला रदु येते..... रदुन रदुन शाल्खे दोले पुशनाला विजुभाऊ

एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं आणि त्यात जहिरातीत ती विचारते, मी करतेय ते बरोबर आहे का? .. विनोदी कुठली.... आधी इतके उद्योग केलेस तेव्हा विचारलेस का आम्हाला?? अं..? लब्बाड... !!!

या सिरीयल १ महिन्यानी जरी पाहील्या तरी, तिथेच असतात. कोल्हापुरातील रंकाळ्याजवळील नंदी सारखे तीळ भर पुढे, गहूभर मागे.. मिसळपाव वरील सदस्य यापेक्षा सकस, आणि छान सिरीयल काढू शकतील असे माझे मत...

उदय सप्रे 09/04/2008 - 16:11
अ सिरिअल इज अ प्रोग्राम व्हेअर वी "नो" "सी रिअल" ! प्रत्यक्षात घडणारे काहीच येथे दिसत नाही. एक अनुभव म्हणून सांगतो : झी वरील "हास्य सम्राट"चे ऑडिशन , स्थळ : दादर , वेळ - ठरवलेली सकाळी ८ , परिक्षक - विजय कदम यांचे आगमन ११.४५ वाजता, एकूण लोक ऑडिशन साठी ४५० + , २ हॉल्मधे कोंबलेले, प्रत्येकाला फक्त ३ मिनिटे वेळ, दुसर्‍या हॉल्मधे स्क्रीनिंग्साठी "स्पॉट" बॉय टाईप्चे लोक्.....मी शिव्या घालून आलो..... झी वर २ सिरिअल्स खरेच चांगल्या होत्या : मेघ दाटले (१३ भाग) आणि "श्रीयुत गंगाधर टिपरे" बास ! बाकी अधुरी एक कहाणी पासून वादळाची वाट पर्यंत एक्दम भिक्कार !

In reply to by मदनबाण

विद्याधर३१ 09/04/2008 - 19:46
४०५ आनंदवन, प्रपंच, झोका..........देव चालले ( पिंपळपान) या सारख्या सुन्दर मालिकांच्या आठवणी जाग्या झाल्या. (प्रतिमा कुलकर्णी यांच्या नवीन मालिकेची चातकासारखी वाट बघणारा..) विद्याधर आवांतर: प्रपंच पुन्हा चालु झाल्यास बघण्यास उत्सुक आहे.

मनस्वी 09/04/2008 - 16:17
सगळ्यात वीट आणतो तो आदेश बांदेकर. त्याच्या गरीब विनोदबुद्धीचा कहर आहे. आता तर २-२ मालिकांत आहे!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा 09/04/2008 - 16:19
आणि कोट्या करतो त्याही अपमानास्पद ! त्याला एकदा सोडाच मिपाकरांच्या घोळक्यात...आयुष्यभर लक्षात राहतील असले जब्राट इनोद होतील त्याच्यावर!!!

वरदा 09/04/2008 - 17:44
होती टिपरे.. ह्या गोजिरवाण्या घरात मी ३ वर्षापूर्वी तिथे असताना पाहिली होती अजूनही चालू आहे ती????? काय भयंकर लोक आहेत्...पाणी घालून घालून आता त्यात डाळ राहीलीच नाहीये म्हणावं..फक्त पाणी.....:((((

ह्या मालिका म्हणजे 'सिरियल किलर्स' असतात. ऍनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी, हिस्ट्री, नॅशनल जिऑग्रॅफी , एखादी मराठी बातम्यांची वाहिनी , मी मराठीवरील 'दिलखुलास' आणि काही कुकरी शोज एवढे पुरते मला.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 10/04/2008 - 12:57
पोगो चॅनेल पण मस्त आहे.. एकदम नो टेन्शन. त्यावरील मॅड, गॅग्ज, मिस्टर बीन, तकेशीज कॅसल आणि जावेद जाफरीची कॉमेन्ट्री एकदम टाईमपास.

देवदत्त 09/04/2008 - 20:38
हेच... मी तरी असल्या मालिका बघत नाही. बघायचे काय तर जे १, २ थोड्या दिवसांत संपेल. उदा. कोपरखळी, कॉमेडी.कॉम, सी, आय. डी., ऑफिस ऑफिस, वगैरे वगैरे. ३ वर्षांपूर्वीपर्यंत जमेल त्या चांगल्या मालिका बघत होतो. उदा. टिपरे, ४०५ आनंदवन, झोका, प्रपंच, दुनियादारी. (आता तर नावे ही आठवत नाही) नाही तर आहेच, सिनेमा एके सिनेमा. ;) आणखी एक, काही मालिका नवीन असतात तेव्हाच पहायच्या. नव्याची नवलाई. सध्या तरी मी एन डी टी व्ही इमॅजीन वर जस्सूबेन जयंतीलाल जोशी की ज्वाईंट फॅमिली आवर्जून बघतो. निदान सुरुवातीला तरी पाहण्यास चांगले आहे. तात्या, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या मालिका मी पाहिल्या होत्या, थोड्याफार आठवतातही, पण त्यातील अडोस पडोसचे नावच आता आठवते आहे. त्यात काय कोण असायचे ते आठवत नाही. अर्थात तेव्हा मी फार लहान होतो. त्यावेळी मालिकांच्या नावांवरून आम्ही (की कुणीतरी) एक लांब परिच्छेद (संवाद) तयार केला होता. नीटसा आठवत नाही. आठवला तर नक्की लिहीन.

अविनाश ओगले 09/04/2008 - 22:29
वरील चर्चा वाचल्यावर मिसळपाव वरील माझे संथ चालते मालिका ही हे विडंबन आठ्वले. विशेषतः कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... या ओळी...

आनंद घारे 10/04/2008 - 19:07
मिपाचे सदस्य नाहीत हे उघड आहे कारण एकादी तरी सकारात्मक प्रतिक्रिया आली असती. पण ते लोक आपल्या आजूबाजूलाच अस्तित्वात असतात ना? त्यांना बहुधा मिसळपाव आवडत नसावी. जर कोणाला डिस्कव्हरी किंवा नॅशनल ज्यॉग्राफिक असे कांही पहावेसे वाटत असेल तर घरातले इतर लोक त्यांना ते पाहू देतात काय? असंभव या मालिकेबद्दल जे लिहिले गेले आहे त्याशी मीसुद्धा सहमत आहे. तरीही मला त्यातल्या त्यात तीच मालिका बरी वाटते, त्यामुळे मी ती (शिव्या घालत घालत) पाहतो.

सभ्य इसम 10/04/2008 - 22:32
मनापासून आवडलेल्या मालिका: चिमणराव, गजरा, चाळ नावाची वाचाळ वस्ती, प्रपंच, झोका, ४०५ आनंदवन, श्रीयुत गंगाधर टिपरे... न आवडलेल्या मालिका- सर्वच्या सर्वं daily soaps... हिंदी मालिकांची पिल्लं अजुन काय?? मराठी बातमी पत्रं म्हणायचं झालं तर स्टार माझा हे.. हिंदी बातमीपत्रांचं (Zee News, Aaj Tak, India TV) पिल्लू आहे.... तरी बरं अजुन रात्री भूतांचे घाणेरडे कार्यक्रम दाखवत नाहीत .. बातमी पत्रातील लोक फार वाईट मराठी बोलतात....आणि विषयही पोरकट असतात.. झी २४ तास बद्दल काही कल्पना नाही...टाटा स्काय ची कृपा... ई टीव्ही वरच्या बातम्या माहितीपुर्वक असतात... मी मराठी वर दिलखुलास हा एकच कार्यक्रम पाहिला आहे...बरा वाटला.. प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती ह्या दोघांची भिकार मालिका लागते ह्या वाहिनी वर... १ प्रश्न आहे.... आज काल टि. व्ही. वर "जो बोले सिकन्दर"ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते.. (कसली त्याचा वाद नाही आहे... ) मला हे कळ्त नाही, संध्याकाळी सर्व कुटुंब मिळून जर एखादी मालिका पाहत असेल, आणि हया जाहिरातेतला मनुष्य जोरजोरात कबड्डी कबड्डी (इथ्ये शब्द बदललेला.....) तर काय करावं??.... हे सोडा.... "छान छान गोष्टी" ह्या लहान मुल्लांच्या कार्यक्रमाच्या मध्ये ही जाहिरात मध्ये दाखवली जाते... ह्या मागचा उद्देश्य तो काय... (हे शेवटचे मूळ विषयाला सोडून होते, पण टी. व्ही. चा विषय आल्याने, मनातले मोकळे करावेसे वाटले..) मोहित्यांचा केतन (अवघाची संसार मालिका आणि त्यातली Fool पात्रं ह्यांच्याशी काहीही संबंध नसलेले मोहिते..) अवांतरः खालची link काळ्जीपूर्वक click करा...कारण मला फार मोठा धक्का बसला...तेव्हा तुम्हाला Heart problem असेल तर शक्यतो टाळा...विशेषतः दुसरी link .. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=27493788 http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=27493788&tid=2514141917995359885&na=3&nst=11&nid=27493788-2514141917995359885-2529485362263600398 Orkut मध्ये अशी community सुद्धा असू शकते??

झकासराव 10/04/2008 - 22:58
नीना कुलकर्णी आणि तिचा नवरा दिलिप कुलकर्णी यांची "नायक" ह्या मालिकेचा कसा काय उल्लेख नाहिये??? ती छानच होती. टिपरे चे रीपिट टेलेकास्ट पाहिले मी. मस्त आहे. :)

एक 11/04/2008 - 00:21
साईन्फिल्ड्स. जेरी साईन्फिल्डची निरिक्षणशक्ति आणि विनोदबुद्धी विलक्षण आहे. या बाबतीत त्याची तुलना कधी कधी पु.लं शी कराविशी वाटते. युट्यब वर हा त्याचा एक स्टँडप शो पण आहे.. http://www.youtube.com/watch?v=qY5AVBSjTAQ हुज लाईन इज इट एनी वे? स्पिन सिटी. एव्हरीबडी लव्ह्ज रेमंड.. (यातला म्हातारा तर माझा फेवरेट आहे.) यातला कुठ्लाही एपिसोड कधीही कितीही वेळाअ बघितला तरी छान वाटतो. मी असं ऐकलं की या सिरीयल्स भारतात पण लागतात. आई वडील इथे आले होते तेव्हा त्यांच्या साठी म्हणून सोनी आणि झी चॅनेल्स घेतले. मला कल्पना नव्हती ते तिकडे या चॅनेल्स ना एवढे वैतागले होते..इथे आल्यानंतर त्यांनी वर दिलेल्या सिरीयल्स बघायलाच सुरुवात केली..
हि मालीका सुरवातीला त्यातील गूढतेमुळे बरी होती. पण आता विषय खुप ताणायला लागलेत. सासू-सुनेच्य मालिकेतील मधले २-४ भाग बुडले तरी जसा काही फरक पडत नाही तसे आता या मालिकेचे झाले आहे. त्यातील चान्गली लोके फारच बावळट आहेत. सुलेखाची आई , बाळ,शुभ्रा, प्रिया,इन्स्पेकटर भोसले, डोक्तोर , आदी,आजोबा हे एकमेकाशी या प्रोब्लेम विषयी अजिबात बोलत नाहित. (दुर्दैवाने यातले बरेचसे एकाच घरात रहातात किन्वा दिवसातून किमान एकदा तरी भेटतात.) या उलट सुलेखा लोकान्समोर रडारडी करुन त्याना सहज गन्डवते..... हे फारच बालिश आहे.

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ४

छोटा डॉन ·

छोटा डॉन 08/04/2008 - 20:44
अरे सॉरी यार, गडबडीने शेवटी "क्रमशः" लिहायचे राहून गेले .... तेवढे आहे असे समजून वाचा .... अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

एक 11/04/2008 - 00:02
"अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ....." अरे.. भें****, नक्की शिवी कळाली नाही तर देणार्‍याच्या भावना निट कळत नाहीत ना म्हणून मागच्या वेळी विचारलं. आता सांग बरं मी तुला वरती "भेंडी" म्हणालो का अजुनकाही...;) आमच्यात मित्राला नावाने हाक फक्त आजुबाजुला घरातले लोकं असतील तर मारतात.. एरव्ही भ पासून होणारी सर्वनामं वापरतो..त्यामुळे वर दिलेली "भें****," तू ह. घे.

इनोबा म्हणे 08/04/2008 - 20:56
शाब्बास रे डॉन्या... गेंड्याची आणि खेकड्याची(तिरक्या चालीचा)चांगली जोडी जमवली आहेस. तेवढं अनुष्का वैनीला लवकर आणायचं बघ आता. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

कल्पनारंजन म्हणून चांगले आहे. मिसळपाव पुणे खादाडी सम्मेलन म्हणजे दारूड्यांचे सम्मेलन वाटते आहे. लिखाणाचा 'तोल' सांभळल्यास अजून मजा येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

छोटा डॉन 08/04/2008 - 23:55
मला पण हे क्लीक झालं होतं पण ह्यातला काही पार्ट वगळून जर दुसर्‍यात टाकला असता तर त्याचा तोल ढासळला असता... हो पण सध्या आहे ते अतिच होत आहे असं वाटतयं.... हा पार्ट फक्त "दारू" या विषयाला वाहिलेला होता ... पुढच्या वेळी काळजी घेईन ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिज्ञ 09/04/2008 - 00:15
ह्या भागात फारच वहावत गेला आहेस.तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला. पहिले ३हि भाग बरेच बरे होते. इथे मात्र साफ निराशा झाली. पूढच्या भागात नक्कि काळजि घे. अबब.

आंबोळी 09/04/2008 - 00:25
तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला ह. ह.पु.वा. लै बेस्ट उपमा दिलीत अबबराव छोटा डॉन ये भाग कुछ जम्या नही. पुढच्या भागात काळजी घे. (पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारा) आम्बोळी

विसोबा खेचर 09/04/2008 - 08:43
त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले. :) असो, वरील मंडळींशी सहमत... लेखन घसरत, घरंगळत गेल्यासारखे वाटते. कदाचित दारू हा विषय असल्यामुळे असेल! :) परंतु हा भाग बराच कंटाळवाणा वाटला. ओढूनताणून रंजकता आणण्याच्या प्रयत्न केला आहे असे वाटले. मागचा भागही मला विशेष आवडला नव्हता! कोई बात नही! पुढील भागांकरता अनेकोत्तम शुभेच्छा! पुढील भागात कुठेही कंटाळवाणे न वाटता निखळ रंजकता असावी ही अपेक्षा. असो, प्रामाणिक मत. राग नसावा...! तात्या.

आनंदयात्री 09/04/2008 - 11:12
बाकी लोक काही म्हणोत डान्या आपण मात्र पोट दुखेस्तोर हसलो बुवा. सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु, प्रतिसांदाचे अजिबात मनावर घेउ नकोस. आणी असे संमेलन जरका खरेच झाले तर ८०% घटना अशाच होतिल, अन हो, दारु नसली तरी. आता अनुष्का वाला पार्ट टाक लवकर.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 09/04/2008 - 13:19
सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु म्हणजे तुम्हाला कोण म्हणायचे आहे? त्यात मी असेन तर कृपया मला वगळा ही विनंती! मी सोकॉल्ड की कुठला, मोठा मात्र नक्कीच नाही! शिवाय कुणाची फुल्टू वगैरे केली आहे अस मला तरी वाटत नाही! असो, पुढील भागत माझ्या नांवाचा उल्लेख न आल्यास मला ते अधिक आवडेल अशी छोट्या डॉनला नम्र विनंती! पुढे मर्जी त्याची! तात्या.

In reply to by आनंदयात्री

झंप्या 10/04/2008 - 04:24
काय राव? असल्या रद्दी लिखाणाला संजोपरावांच्या वगैरे पंगतीत बसवुन तुमची महान अभिरुची अशी पब्लिकली का दाखवताय?

धमाल मुलगा 09/04/2008 - 11:35
पुन्हा एकदा "आकाशातून पडली लाकड॑..." !!!!!
ग्लास सुमारांकडे सरकवून म्हणाला "शेठ, म्हणा चांग भलं आणि हाणा टॉप टू बॉटम " केशवसुमार " मी पीत नाही राव, मागच्यावेळीस झालं ना सगळं". धमाल " घ्या हो, काही नाही होत, आम्ही आहोत ना सगळे.
च्यामारी, केसुशेठला कळल॑ तर खुन्नस खाऊन ते माझ्यावरच एखाद॑ विड॑बन करतील ना भौ!
विजूभाउ " हासलं एकदाच . मला वाटलं किक बसली की काय ? म्हणून एकढ गप्प गप्प आहे."
जबरान् !!! :-)))
मध्येच बोलणे तोडून " तू गप्प बस शिंच्या, आता जर काही बोललास तर अंगठे धरून उभा करीन ..." आंद्या " कुणाचे ?" डांबिसकाका "सांगू काय कुनाचे ते, घरून आणा रे त्याला इकडे "
आयला, आंद्याला तर एकदम चंपकच करुन टाकलाय :-))
इनोबा "जाउ दे, जाउ दे, शांत बसा. चिल्ल चिल्ल " धमाल " काय अजून बर्फ पाहिजे ? सर्दी होइल राजे सकाळी ...
भले...गुरु !!! बाकी, गेंड्याची कातडी, 'तुझा पगार किती, तु पितो किती' इ.इ. खत्तरनाक !!!! फुटलोच :-)) असो, हा भाग जरी वहावत गेल्यासारखा वाटला तरी, अहो, 'घेतल्यावर' विषय वहावतच जातात की, क्काय? हरकत इल्ले...हरकत इल्ले.
शेवटी तात्याच " बास करा रे फोकलीच्यांनो, साला रात्रीचा १ वाजला तरी ही * अजून हितं * * **. बास आता "
सह्ही!!! अस॑ घडल॑ तर तात्याबा नक्कीच असे करवदतील :-))) आपल्याला तर बॉ मज्जा वाटली वाचायला. डॉन्या आता अनुष्का येऊदे......आणि एक र्‍हवल॑च की...आपल्या सगळ्या ताईलोकांना दिल॑स धाडून तुळशीबागेत..आता त्या॑च्या रेवड्या कशा उडवणार????

छोटा डॉन 09/04/2008 - 16:27
ही लेखनमाला सुरु करण्याचा आधी मी यासाठी बेस म्हणून संजोपरावांचा" खयाली पुलाव", बिरूटेशेठचा "तात्या मनोगतावर परतला" व माझाच "मी जर हा असतो " हे लेख घेतले. यामागची माझी धारणा म्हणजे एक निखळ विनोदी व करमणूक प्रधान लेख माला लिहावी अशी होती. त्यात कुणाची खेचण्याचा, घेण्याचा वा कुनावर टिका करण्याचा ऊद्देश कधीही नव्हता ... पण का कोण जाणे, ह्या लेखांचा उद्देश मी कोणाची तरी खेचतो आहे अथवा मारतो आहे असा व्हायला लागला व तसे प्रतिसाद ही येऊ लागले. माझा हा उद्देश कधीही नव्हता. जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. कदाचित त्यामुळे "तात्यांनी" पुढच्या लेखात जमल्यास माझा समावेश नको अशी विनंती केली. हा माझ्यासाठी धक्का होता. आता तात्याच काय कुणाचेही नाव ओगळून पुढे जाणे मला शक्य नाही.... दुसरे म्हणजे पहिल्यांदा थोडे माझ्याकडून बरे लिहले गेले पण आता थोडा "तोल" ढासळत आहे. मला पण मागच्या भागापासून याची जाणीव झाली होती. कदाचीत " एकामागून एक भाग प्रसिद्ध करण्यामागची माझी गडबड" हे त्याचे कारण असावे. त्यामुळे लेख दिवसेंदिवस "कंटाळावाणे व ओढून ताणूण आणल्यासारखे" व्हायला लागले. ही लेखनाशी बेईमानी ठरते. आता वरचे मुद्दे आणि लेखनमालेचा मुळ उद्देश हरवत चालल्याने माझ्यासमोर " ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. ह्या लेखनमालेत मी ज्या ज्या लो़कांची नकळतपणे घेतली अथवा मारली त्यांना " मनापासून सॉरी" बोलून मी ही लेखनमाला बंद केल्याचे नमूद करू ईच्छितो. आता यापुढे "मिपा" वर " मिपा सदस्यांचा समावेश" असलेले कोनतेही लेखन मी करणार नाही हा निर्णय मी घेतो ... आत्तपर्यंत ज्या लोकांनी आत्मीयतेने प्रतिसाद व सल्ले दिले त्यांचे आभार. बाकी आपले चालूच राहिल ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 09/04/2008 - 16:34
" ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. निषेध .. निषेध .. निषेध. (अरे लोकं दुसरीकडे दुसर्‍या प्रकारच्या लिखांनांच्या बंद करा - बंद करा म्हणुन मागे लागतात तरीदेखिल ..... अन तु आपले काय उगाचच)

रामदास 09/04/2008 - 17:17
वाईट्ट लिहिलं तर लोकं वाचणार नाहीत.विसरून जातील. एवढंच. चुका सापेक्श असतात.

धमाल मुलगा 09/04/2008 - 17:21
ह्यावर मी फक्त इतकेच म्हणेन... खरंच वाईट वाटलं...हे सगळं हलकंफुलकं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, तरी असं घडावं हे काही पटलं नाही. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! -(व्यथित) ध मा ल.

छोटे डॊन यांना स. न. वि. वि. मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास लेखनाचा आम्ही नेहमीच आस्वाद घेतो. आपल्या लेखनाने काही क्षण आनंदात जातात. कोण काय म्हणतंय ? कोणाचा प्रतिसाद कसा येतोय ? कोण कशाचा बदला घेतोय ? या प्रश्नांचा फारसा विचार करु नये असे वाटते ? आपल्याला लिहावसं वाटतं ना ? बिंधास्त लिहित राहा !!! :) दिलीपभाय ( छोटा डॊन गॆंगचा ) (शार्प शुटर )

झंप्या 10/04/2008 - 04:29
फ ह ड ह तु स लिखाण!! मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती. चला शेवटी निदान चौथ्या भागाला तरी मंडळी जागी झाली म्हणायची!! पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात त्यांचे एवढे मनावर घेऊ नका डॉन भाऊ.

In reply to by झंप्या

विजुभाऊ 10/04/2008 - 11:47
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? असो बापुडे....काही लोकाना गुळाची चव काय ? खरे तर मला हेअसे लिहायची ईच्छा नव्हती. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! हेच खरे....तेवढाच व्यथीत विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 10/04/2008 - 12:01
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? 'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे... (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! हेच म्हणतो... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे.... हा हा हा! (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! सहमत आहे...... (व्यथित) टिंग्या

In reply to by झंप्या

छोटा डॉन 10/04/2008 - 16:06
अतिज्ञानी टिकाकार महाशय "झंप्या " आपण आपल्या अमुल्य वेळातून काही वेळ काढून माझ्यासारख्या फडतूस लेखकाचे लेखन वाचून त्याव्र प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. नाही तर कोण आजकाल कुणाला असे "डायरेक्ट सत्य" सांगतो हो ... आता तुमच्या भाषेत सांगायचे तर "पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात " वा. वा. चांगलचं ओळखलं आहेत आपण "मिपा करांना" आता भविष्यात माझ्याकडून पुन्हा असे फडतूस लिखाण येऊ नये यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.... पण यात एक गोम आहे. आपण पडला एक "फडतूस टिकाकार", माणसाला जेव्हा स्वताच्या मनाने "४ ओळी" पण लिहता येत नाही तेव्हा तो टिकाकार होतो असे माझे मत आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या वाटचालीच्या अनुशंगाने आपण "किती महान फडतूस टिकाकार" आहात हे तर सिद्ध होतेच पण आता आपण स्वता विचार करून ४ ओळी लिहून दाखवाव्यात मग दुसर्‍याच्या लेखावर मत द्यावे, कसे ! पण मला खात्री आहे, आपण असे करणार नाही कारण आपण पडलात एक "फडतूस टिकाकार", स्वता लिहणे आपल्या तत्वात बसत नाही कारण लिहले तर लोक काय प्रतिक्रिया देतील त्या वाचून आपल्याला एक तर झीट येईल किंवा नैराश्य येऊन "अंगाला राख फासून हिमालयात जाण्याशिवाय" दुसरा पर्याय राहणार नाही, आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे पण आपण तो न देणे आपल्या हिताचे. बाकी "परवरदिगार आपको सलामत रख्खे" एवढेच आम्ही म्हणू एच्छितो ... आपल्या अपेक्षेतला फडतूस लेखक छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 10/04/2008 - 16:25
अरे छोटा डॉन, सोडून दे रे! तू कशाला उगाच मनाला लावून घेतो एवढं? च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. काल आनंदयात्रीमुळे माझा काही गैरसमज झाला होता त्यामुळे रागाच्या भरात 'यापुढे माझा उल्लेख करू नये' असं मी लिहून गेलो होतो. साला, चुकलंच माझं. मला मोठ्या मनाने माफ कर आणि पुढचा भाग अगदी बिनधास्त लिही. तो नक्की चांगला होईल याची मला खात्री आहे! हो, 'लेखन कंटाळवाणं होत आहे' असं माझं मत मी अवश्य दिलं होतं पण त्यात तुझं लेखन अधिकाधिक उत्तम व्हावं हाच प्रामाणिक हेतू होता. तुला दुखावण्याचा किंवा तुझा हिरमोड करण्याचा कुठलाच उद्देश नव्हता! याची कृपया खात्री असू दे! आणि हो, मी काही कुणी झंप्या नाही. मी स्वत:ही लेखन करतो त्यामुळे माझ्या एखाद्या प्रतिकूल प्रतिसादातील टीका तू सकारात्मक घेशील/घ्यावीस असं वाटतं! तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! अर्थात, घाई कुठलीच करू नकोस. टेक युवर ओन टाईम भिडू! अगदी सवडीने लिही, तब्येतीत लिही! आणखी काय लिहू बॉस?! तुझा, तात्या.

In reply to by छोटा डॉन

झंप्या 11/04/2008 - 07:58
अरे बापरे! डॉन साहेब भलतेच चिडलात की तुम्ही आमच्यावर! आयला मग तुमच्यात आणि त्या कविकिटकांमध्ये काय हो फरक? आख्खी ग्यांग*च सोडलीत माझ्यावर चावायला! आज येउन बघतोय तर एकदम १३ प्रतिसाद!!! असो... आम्ही पण आमचा प्रतिसाद 'काहीचे इम्बॅलन्सड लेखन वाटले' असाच देउ इच्छीतो हो! आता ठीक आहे? तुम्ही आता लिहाच राव ५वा भाग आम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊ. मग झालं? आणखी काय लिहू? *पूर्वी ज्या प्रकाराला कंपू म्हणायचे त्याला आजकाल ग्यांग म्हणतात म्हणे. कालाय तस्मै नमः

लडदू 10/04/2008 - 15:50
रेफरन्स लागत नाहीत पण मला तरी मज्जा आली वाचताना. असो. ================================= खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

वरदा 10/04/2008 - 17:35
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. आता कसं बोल्लात... तुम्ही छान लिहिताय निखळ मनोरंजनाचं उद्दीष्ट आहे इथे काही वैचारीक लेख लिहित नाहीयात तुम्ही मला तरी काही वाईट दिसत नाही... आता आणा बरं अनुष्का वहीनीला..कधीची ताटकळून कंटाळलेय ती...

धमाल मुलगा 10/04/2008 - 17:47
जरा डोळे उघडून नीट वाच... काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते समजुन घे.... तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, मी असे आम्ही सगळे म्हणतोय की तू लिहीच जे झालं ते झालं...नेऊन घाल तिकडं बारा गडगड्याच्या विहिरीत ! एव्हढे सगळे तुला म्हणताहेत, आता मात्र तुला "पब्लीक डिमांड के खातीर" लिहितं व्हावंच लागेल. हवं तर गडबड नको करुस, निवांत लिही...पण देख भिडू, अगर नही लिख्ख्या तो अपुनके इनुभाऊको बोल के तेरा गेमईच बजा डालेंगा...क्या समझा? आता पुढचा भाग.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... [ अर्र तिच्या....वहिनी लिहायचं राहिलंच की...तात्या धरुन मारणार बहुतेक :-)) ]

मदनबाण 10/04/2008 - 17:54
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. च्यायला डॉन्या जर तुला मानसीक त्रास होऊ लागला तर तुझ्या गॅगच कस व्हायच? :) प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता,:-- मग कशाला एव्हडे टेंशन घेतोस? तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! हे तात्या म्हणाले आहेत और क्या चाहिये तुम्हे ? (मि.पा.प्रेमी) मदनबाण

छोटा डॉन 10/04/2008 - 17:58
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, धमाल सर्वांचे धन्यवाद ... आपल्या अशा प्रोत्साहनाची गरज होती ... मी नक्की टाकतो पुढचा भाग पण मला थोडा वेळ हवा कारण पहिले मी थोडे शांत होतो आणि पुढचे भाग अधिक कसे मनोरंजक होतील याकडे बघतो ... "तात्यांचे" खास करून अधिक धन्यवाद , कारण त्यांनाच काय मिपा वरच्या कुनालाच वगळून मला पुढे जाणे शक्य नाही... थोडा वेळ द्या मी आपणास निराश करणार नाही. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 11/04/2008 - 00:05
तात्या कशाने वैतागले..तुम्ही अनुष्का वहिनीला ताटकळत ठेवलत ना म्हणून्...दारू कसली पीत बसता अनुष्का वहीनी येणार त्याची तयारी करा ना..आम्ही आणलं पण तुळशीबागेतून गिफ्ट...:)

विद्याधर३१ 11/04/2008 - 09:24
मी प्रतिक्रीया फारश्या देत नाहि. कारण जे आवडते त्याला आधीच तसे प्रतिसाद आलेले असतात त्याला नुसते मम म्हणावे लागते. काही वेळा लॉगीन होताना (ऑफिसमध्ये) नेटवर्क स्लो असल्याने एरर येते. पण याचा अर्थ असा नाही की जे प्रतिक्रीया देत नाहित पण वाचतात त्यना तो लेख आवडत नाहि. त्यामुळे कोणा एकाच्या विपर्यास्त प्रतिक्रियेमुळे लेखन बंद करावे. कारण माझ्यासारखे खूपजण असतील. जोपर्यन्त वैयक्तीक टीका होत नाही तोपर्यन्त लेखन बंद करु नये.. प्रतिसाद येतील किंवा नाहि याकडे फारसे लक्ष न देता लिहित रहावे हि विनंती... अवांतरः आत्तापर्यंत या लेखाची ७०८ वाचने झाली आहेत. विद्याधर

मनापासुन 11/04/2008 - 17:42
डॉन काका... इथल्या सगळ्या काकां पासुन एक शिका . कितीही झाले काही झाले तरी मागे हटायचे नाही. प्रसंगी अखंडीत लिहीत रहायचे. अहो शिवराय सुद्धा कधी तरी घोड्यावरुन पडले असतील. आपण तर साधी माणसे. सायकल चालवायला शिकताना कधी पडला नाही असला माणुस दाखवा. लेख लिहीत रहायचे. त्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर आपाल्यात तरी सुधारणा होते किंवा लोकाना आपली सवय होते. त्या केकता कपूर तै पासुन बाकी काही नाही तरी हे मात्र शिकण्यासारखे आहे. उगाच नाही तिचे नाव होते. उद्या आणखी दहा पन्ध्रा वर्षाने तिचे नाव भारतातल्या मोठ्या निर्मात्यांच्यात घेतले जाईल्.(ऋषीदा/ सत्यजीत रे/ शान्तारम बापू सोबत) जो चिन्ता करनेका है वो जन्ताच करेगी. सर दुखा उनका दुखेगा अपनेकु क्या ? उतना सिर्फ वो सरदर्द की गोली वाली कम्पनीसे रॉयल्टी लेने का क्या? डॉन काका...भाऊ हे सगळे मनापासुन बरका तुम लिखते र्रहो ... हम डोका संभालते है...

In reply to by मनापासुन

डॉन काका... ह्या छोट्या डॉन्याला "डॉनकाका" केल्याबद्द्ल आम्ही तुमच्यावर अतिशय, प्रचंड, म्हणजे अगदी तुडूंब प्रसन्न झालो आहोत!!!:)) आत्तापर्यंत आम्हाला चिडवत होता, शिंचा!! डॉन्या, आता झाला की नाही काका-क्लब मध्ये दाखल?:)) हा, हा, हा!!!! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 13/04/2008 - 12:04
अहो मनापासून भाऊ, वय काय हो तुमचे ? नाही माझे वय २४ आहे तेव्हा मला काका म्हणायलातुम्ही साधारणता "२-५" वर्षाचे असायला हवे . च्यायला मला पार काका करून टाकलेत राव तुम्ही ... ... ह.घ्या. बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही "काका" ठरायला सध्या एकदम "नालायक" आहोत ... डांबिसकाका पर्सनली नका घेऊ ... ह.घ्या ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... आम्हीही नाही!! सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... सिगारेट ओढत नाही. सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!! उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आम्हीही नाही. म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:)) आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!! आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:))) वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:)))))))) तुझ्या बारशाला जेवलेला, डांबिसकाका :)))))

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 14/04/2008 - 19:53
"सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!" २ प्रोब्लेम आहेत, सकाळी लवकर उठणे आणि केव्हाही उठल्यवर व्यायाम करणे. हेच जमत नाही, सांगा काय करायचे ते ... "म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))" हे बाकी खरं, मानलं आणि पटलं .... आता फक्त समवयस्कांना सांभाळा . "आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!" म्हणून तर आम्ही तुम्हाला "गुरु" मानतो .... "आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))" आता काय बोलायचे बॉ ? हाताची घडी आणि तोंडावर बोट ... आमच्या जखमेवर मिठ चोळता आहात हे लक्षात ठेवा. येतील येतील , आमचेही दिवस येतील .... ह. घ्या. "पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))" तसं म्हणाल तर फायदाच आहे पण आपल्या "इंटेग्रीटीचे " काय ? ज्याच्या बारशाला आपण जेवला आहात तो छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 15/04/2008 - 11:35
म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))
आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. :-)
छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!
महत्वाचा शव्द आठवणीने टाकण्याची हातोटी आवडली. उगाच काकूंचे 'आब्जेक्षण' नको, काय?
आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))
:) :) :) :) आजि म्या ब्रम्ह पाहिले गा! काकोबा....धन्य.. धन्य आहात हो !!!!!
हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))
लाख मोलाचा सवाल ! आत्ता बोला की रे!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 29/12/2014 - 14:54
इयर एंडला एकदम नॉस्टल्जीक झालोय डान्या परत ल्ह्ययला घे नव्याने असले काहितरी

विजुभाऊ 13/04/2008 - 20:00
डॉन काका :))))) जब्बर दस्त... " डॉन की तलाश ११ मुल्को की पुलीस कर रही है" आता डॉन काका म्हंटले की हेच वाक्य कसे वाटते बघा डॉन काका वयोमानामुळे डोक्यावर परिणाम झाला आणि गिरणीतुन दळण आणायला गेले तेकोठे गायब झाले तेच कळत नाहिये. लवकर आले तर मारुतरायाला ११ रुईची पाने वाहीन हो" किंवा " बेते सो जा नही तो छोटा डॉन आ जायेगा" हे वाक्य असे होईल "गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 14/04/2008 - 19:55
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ" सत्यकाम जाबाली . हा हा हा ... अवांतर : कशाला घेता विजूभाऊ माझी राव ? मी काय घोडं मारलं आहे ? च्यायला हे डॉन काका म्हणजे "विकतच श्राद्ध" झालं आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 15/04/2008 - 11:39
"गम्प्या(!) झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन.
हाणा तिच्याआयला! एकदम भिरभिरं !
डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
मग ती..'तात्याकाम जाबली' आणि 'तात्या ख्रिस्त' ची गोष्ट कधी सांगनाल डॉनकाका? काय हो विजुभाऊ...सांगा ना!

छोटा डॉन 08/04/2008 - 20:44
अरे सॉरी यार, गडबडीने शेवटी "क्रमशः" लिहायचे राहून गेले .... तेवढे आहे असे समजून वाचा .... अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

एक 11/04/2008 - 00:02
"अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ....." अरे.. भें****, नक्की शिवी कळाली नाही तर देणार्‍याच्या भावना निट कळत नाहीत ना म्हणून मागच्या वेळी विचारलं. आता सांग बरं मी तुला वरती "भेंडी" म्हणालो का अजुनकाही...;) आमच्यात मित्राला नावाने हाक फक्त आजुबाजुला घरातले लोकं असतील तर मारतात.. एरव्ही भ पासून होणारी सर्वनामं वापरतो..त्यामुळे वर दिलेली "भें****," तू ह. घे.

इनोबा म्हणे 08/04/2008 - 20:56
शाब्बास रे डॉन्या... गेंड्याची आणि खेकड्याची(तिरक्या चालीचा)चांगली जोडी जमवली आहेस. तेवढं अनुष्का वैनीला लवकर आणायचं बघ आता. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

कल्पनारंजन म्हणून चांगले आहे. मिसळपाव पुणे खादाडी सम्मेलन म्हणजे दारूड्यांचे सम्मेलन वाटते आहे. लिखाणाचा 'तोल' सांभळल्यास अजून मजा येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

छोटा डॉन 08/04/2008 - 23:55
मला पण हे क्लीक झालं होतं पण ह्यातला काही पार्ट वगळून जर दुसर्‍यात टाकला असता तर त्याचा तोल ढासळला असता... हो पण सध्या आहे ते अतिच होत आहे असं वाटतयं.... हा पार्ट फक्त "दारू" या विषयाला वाहिलेला होता ... पुढच्या वेळी काळजी घेईन ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिज्ञ 09/04/2008 - 00:15
ह्या भागात फारच वहावत गेला आहेस.तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला. पहिले ३हि भाग बरेच बरे होते. इथे मात्र साफ निराशा झाली. पूढच्या भागात नक्कि काळजि घे. अबब.

आंबोळी 09/04/2008 - 00:25
तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला ह. ह.पु.वा. लै बेस्ट उपमा दिलीत अबबराव छोटा डॉन ये भाग कुछ जम्या नही. पुढच्या भागात काळजी घे. (पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारा) आम्बोळी

विसोबा खेचर 09/04/2008 - 08:43
त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले. :) असो, वरील मंडळींशी सहमत... लेखन घसरत, घरंगळत गेल्यासारखे वाटते. कदाचित दारू हा विषय असल्यामुळे असेल! :) परंतु हा भाग बराच कंटाळवाणा वाटला. ओढूनताणून रंजकता आणण्याच्या प्रयत्न केला आहे असे वाटले. मागचा भागही मला विशेष आवडला नव्हता! कोई बात नही! पुढील भागांकरता अनेकोत्तम शुभेच्छा! पुढील भागात कुठेही कंटाळवाणे न वाटता निखळ रंजकता असावी ही अपेक्षा. असो, प्रामाणिक मत. राग नसावा...! तात्या.

आनंदयात्री 09/04/2008 - 11:12
बाकी लोक काही म्हणोत डान्या आपण मात्र पोट दुखेस्तोर हसलो बुवा. सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु, प्रतिसांदाचे अजिबात मनावर घेउ नकोस. आणी असे संमेलन जरका खरेच झाले तर ८०% घटना अशाच होतिल, अन हो, दारु नसली तरी. आता अनुष्का वाला पार्ट टाक लवकर.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर 09/04/2008 - 13:19
सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु म्हणजे तुम्हाला कोण म्हणायचे आहे? त्यात मी असेन तर कृपया मला वगळा ही विनंती! मी सोकॉल्ड की कुठला, मोठा मात्र नक्कीच नाही! शिवाय कुणाची फुल्टू वगैरे केली आहे अस मला तरी वाटत नाही! असो, पुढील भागत माझ्या नांवाचा उल्लेख न आल्यास मला ते अधिक आवडेल अशी छोट्या डॉनला नम्र विनंती! पुढे मर्जी त्याची! तात्या.

In reply to by आनंदयात्री

झंप्या 10/04/2008 - 04:24
काय राव? असल्या रद्दी लिखाणाला संजोपरावांच्या वगैरे पंगतीत बसवुन तुमची महान अभिरुची अशी पब्लिकली का दाखवताय?

धमाल मुलगा 09/04/2008 - 11:35
पुन्हा एकदा "आकाशातून पडली लाकड॑..." !!!!!
ग्लास सुमारांकडे सरकवून म्हणाला "शेठ, म्हणा चांग भलं आणि हाणा टॉप टू बॉटम " केशवसुमार " मी पीत नाही राव, मागच्यावेळीस झालं ना सगळं". धमाल " घ्या हो, काही नाही होत, आम्ही आहोत ना सगळे.
च्यामारी, केसुशेठला कळल॑ तर खुन्नस खाऊन ते माझ्यावरच एखाद॑ विड॑बन करतील ना भौ!
विजूभाउ " हासलं एकदाच . मला वाटलं किक बसली की काय ? म्हणून एकढ गप्प गप्प आहे."
जबरान् !!! :-)))
मध्येच बोलणे तोडून " तू गप्प बस शिंच्या, आता जर काही बोललास तर अंगठे धरून उभा करीन ..." आंद्या " कुणाचे ?" डांबिसकाका "सांगू काय कुनाचे ते, घरून आणा रे त्याला इकडे "
आयला, आंद्याला तर एकदम चंपकच करुन टाकलाय :-))
इनोबा "जाउ दे, जाउ दे, शांत बसा. चिल्ल चिल्ल " धमाल " काय अजून बर्फ पाहिजे ? सर्दी होइल राजे सकाळी ...
भले...गुरु !!! बाकी, गेंड्याची कातडी, 'तुझा पगार किती, तु पितो किती' इ.इ. खत्तरनाक !!!! फुटलोच :-)) असो, हा भाग जरी वहावत गेल्यासारखा वाटला तरी, अहो, 'घेतल्यावर' विषय वहावतच जातात की, क्काय? हरकत इल्ले...हरकत इल्ले.
शेवटी तात्याच " बास करा रे फोकलीच्यांनो, साला रात्रीचा १ वाजला तरी ही * अजून हितं * * **. बास आता "
सह्ही!!! अस॑ घडल॑ तर तात्याबा नक्कीच असे करवदतील :-))) आपल्याला तर बॉ मज्जा वाटली वाचायला. डॉन्या आता अनुष्का येऊदे......आणि एक र्‍हवल॑च की...आपल्या सगळ्या ताईलोकांना दिल॑स धाडून तुळशीबागेत..आता त्या॑च्या रेवड्या कशा उडवणार????

छोटा डॉन 09/04/2008 - 16:27
ही लेखनमाला सुरु करण्याचा आधी मी यासाठी बेस म्हणून संजोपरावांचा" खयाली पुलाव", बिरूटेशेठचा "तात्या मनोगतावर परतला" व माझाच "मी जर हा असतो " हे लेख घेतले. यामागची माझी धारणा म्हणजे एक निखळ विनोदी व करमणूक प्रधान लेख माला लिहावी अशी होती. त्यात कुणाची खेचण्याचा, घेण्याचा वा कुनावर टिका करण्याचा ऊद्देश कधीही नव्हता ... पण का कोण जाणे, ह्या लेखांचा उद्देश मी कोणाची तरी खेचतो आहे अथवा मारतो आहे असा व्हायला लागला व तसे प्रतिसाद ही येऊ लागले. माझा हा उद्देश कधीही नव्हता. जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. कदाचित त्यामुळे "तात्यांनी" पुढच्या लेखात जमल्यास माझा समावेश नको अशी विनंती केली. हा माझ्यासाठी धक्का होता. आता तात्याच काय कुणाचेही नाव ओगळून पुढे जाणे मला शक्य नाही.... दुसरे म्हणजे पहिल्यांदा थोडे माझ्याकडून बरे लिहले गेले पण आता थोडा "तोल" ढासळत आहे. मला पण मागच्या भागापासून याची जाणीव झाली होती. कदाचीत " एकामागून एक भाग प्रसिद्ध करण्यामागची माझी गडबड" हे त्याचे कारण असावे. त्यामुळे लेख दिवसेंदिवस "कंटाळावाणे व ओढून ताणूण आणल्यासारखे" व्हायला लागले. ही लेखनाशी बेईमानी ठरते. आता वरचे मुद्दे आणि लेखनमालेचा मुळ उद्देश हरवत चालल्याने माझ्यासमोर " ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. ह्या लेखनमालेत मी ज्या ज्या लो़कांची नकळतपणे घेतली अथवा मारली त्यांना " मनापासून सॉरी" बोलून मी ही लेखनमाला बंद केल्याचे नमूद करू ईच्छितो. आता यापुढे "मिपा" वर " मिपा सदस्यांचा समावेश" असलेले कोनतेही लेखन मी करणार नाही हा निर्णय मी घेतो ... आत्तपर्यंत ज्या लोकांनी आत्मीयतेने प्रतिसाद व सल्ले दिले त्यांचे आभार. बाकी आपले चालूच राहिल ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 09/04/2008 - 16:34
" ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. निषेध .. निषेध .. निषेध. (अरे लोकं दुसरीकडे दुसर्‍या प्रकारच्या लिखांनांच्या बंद करा - बंद करा म्हणुन मागे लागतात तरीदेखिल ..... अन तु आपले काय उगाचच)

रामदास 09/04/2008 - 17:17
वाईट्ट लिहिलं तर लोकं वाचणार नाहीत.विसरून जातील. एवढंच. चुका सापेक्श असतात.

धमाल मुलगा 09/04/2008 - 17:21
ह्यावर मी फक्त इतकेच म्हणेन... खरंच वाईट वाटलं...हे सगळं हलकंफुलकं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, तरी असं घडावं हे काही पटलं नाही. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! -(व्यथित) ध मा ल.

छोटे डॊन यांना स. न. वि. वि. मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास लेखनाचा आम्ही नेहमीच आस्वाद घेतो. आपल्या लेखनाने काही क्षण आनंदात जातात. कोण काय म्हणतंय ? कोणाचा प्रतिसाद कसा येतोय ? कोण कशाचा बदला घेतोय ? या प्रश्नांचा फारसा विचार करु नये असे वाटते ? आपल्याला लिहावसं वाटतं ना ? बिंधास्त लिहित राहा !!! :) दिलीपभाय ( छोटा डॊन गॆंगचा ) (शार्प शुटर )

झंप्या 10/04/2008 - 04:29
फ ह ड ह तु स लिखाण!! मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती. चला शेवटी निदान चौथ्या भागाला तरी मंडळी जागी झाली म्हणायची!! पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात त्यांचे एवढे मनावर घेऊ नका डॉन भाऊ.

In reply to by झंप्या

विजुभाऊ 10/04/2008 - 11:47
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? असो बापुडे....काही लोकाना गुळाची चव काय ? खरे तर मला हेअसे लिहायची ईच्छा नव्हती. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! हेच खरे....तेवढाच व्यथीत विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 10/04/2008 - 12:01
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? 'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे... (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! हेच म्हणतो... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे.... हा हा हा! (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! सहमत आहे...... (व्यथित) टिंग्या

In reply to by झंप्या

छोटा डॉन 10/04/2008 - 16:06
अतिज्ञानी टिकाकार महाशय "झंप्या " आपण आपल्या अमुल्य वेळातून काही वेळ काढून माझ्यासारख्या फडतूस लेखकाचे लेखन वाचून त्याव्र प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. नाही तर कोण आजकाल कुणाला असे "डायरेक्ट सत्य" सांगतो हो ... आता तुमच्या भाषेत सांगायचे तर "पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात " वा. वा. चांगलचं ओळखलं आहेत आपण "मिपा करांना" आता भविष्यात माझ्याकडून पुन्हा असे फडतूस लिखाण येऊ नये यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.... पण यात एक गोम आहे. आपण पडला एक "फडतूस टिकाकार", माणसाला जेव्हा स्वताच्या मनाने "४ ओळी" पण लिहता येत नाही तेव्हा तो टिकाकार होतो असे माझे मत आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या वाटचालीच्या अनुशंगाने आपण "किती महान फडतूस टिकाकार" आहात हे तर सिद्ध होतेच पण आता आपण स्वता विचार करून ४ ओळी लिहून दाखवाव्यात मग दुसर्‍याच्या लेखावर मत द्यावे, कसे ! पण मला खात्री आहे, आपण असे करणार नाही कारण आपण पडलात एक "फडतूस टिकाकार", स्वता लिहणे आपल्या तत्वात बसत नाही कारण लिहले तर लोक काय प्रतिक्रिया देतील त्या वाचून आपल्याला एक तर झीट येईल किंवा नैराश्य येऊन "अंगाला राख फासून हिमालयात जाण्याशिवाय" दुसरा पर्याय राहणार नाही, आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे पण आपण तो न देणे आपल्या हिताचे. बाकी "परवरदिगार आपको सलामत रख्खे" एवढेच आम्ही म्हणू एच्छितो ... आपल्या अपेक्षेतला फडतूस लेखक छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर 10/04/2008 - 16:25
अरे छोटा डॉन, सोडून दे रे! तू कशाला उगाच मनाला लावून घेतो एवढं? च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. काल आनंदयात्रीमुळे माझा काही गैरसमज झाला होता त्यामुळे रागाच्या भरात 'यापुढे माझा उल्लेख करू नये' असं मी लिहून गेलो होतो. साला, चुकलंच माझं. मला मोठ्या मनाने माफ कर आणि पुढचा भाग अगदी बिनधास्त लिही. तो नक्की चांगला होईल याची मला खात्री आहे! हो, 'लेखन कंटाळवाणं होत आहे' असं माझं मत मी अवश्य दिलं होतं पण त्यात तुझं लेखन अधिकाधिक उत्तम व्हावं हाच प्रामाणिक हेतू होता. तुला दुखावण्याचा किंवा तुझा हिरमोड करण्याचा कुठलाच उद्देश नव्हता! याची कृपया खात्री असू दे! आणि हो, मी काही कुणी झंप्या नाही. मी स्वत:ही लेखन करतो त्यामुळे माझ्या एखाद्या प्रतिकूल प्रतिसादातील टीका तू सकारात्मक घेशील/घ्यावीस असं वाटतं! तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! अर्थात, घाई कुठलीच करू नकोस. टेक युवर ओन टाईम भिडू! अगदी सवडीने लिही, तब्येतीत लिही! आणखी काय लिहू बॉस?! तुझा, तात्या.

In reply to by छोटा डॉन

झंप्या 11/04/2008 - 07:58
अरे बापरे! डॉन साहेब भलतेच चिडलात की तुम्ही आमच्यावर! आयला मग तुमच्यात आणि त्या कविकिटकांमध्ये काय हो फरक? आख्खी ग्यांग*च सोडलीत माझ्यावर चावायला! आज येउन बघतोय तर एकदम १३ प्रतिसाद!!! असो... आम्ही पण आमचा प्रतिसाद 'काहीचे इम्बॅलन्सड लेखन वाटले' असाच देउ इच्छीतो हो! आता ठीक आहे? तुम्ही आता लिहाच राव ५वा भाग आम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊ. मग झालं? आणखी काय लिहू? *पूर्वी ज्या प्रकाराला कंपू म्हणायचे त्याला आजकाल ग्यांग म्हणतात म्हणे. कालाय तस्मै नमः

लडदू 10/04/2008 - 15:50
रेफरन्स लागत नाहीत पण मला तरी मज्जा आली वाचताना. असो. ================================= खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

वरदा 10/04/2008 - 17:35
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. आता कसं बोल्लात... तुम्ही छान लिहिताय निखळ मनोरंजनाचं उद्दीष्ट आहे इथे काही वैचारीक लेख लिहित नाहीयात तुम्ही मला तरी काही वाईट दिसत नाही... आता आणा बरं अनुष्का वहीनीला..कधीची ताटकळून कंटाळलेय ती...

धमाल मुलगा 10/04/2008 - 17:47
जरा डोळे उघडून नीट वाच... काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते समजुन घे.... तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, मी असे आम्ही सगळे म्हणतोय की तू लिहीच जे झालं ते झालं...नेऊन घाल तिकडं बारा गडगड्याच्या विहिरीत ! एव्हढे सगळे तुला म्हणताहेत, आता मात्र तुला "पब्लीक डिमांड के खातीर" लिहितं व्हावंच लागेल. हवं तर गडबड नको करुस, निवांत लिही...पण देख भिडू, अगर नही लिख्ख्या तो अपुनके इनुभाऊको बोल के तेरा गेमईच बजा डालेंगा...क्या समझा? आता पुढचा भाग.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... [ अर्र तिच्या....वहिनी लिहायचं राहिलंच की...तात्या धरुन मारणार बहुतेक :-)) ]

मदनबाण 10/04/2008 - 17:54
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. च्यायला डॉन्या जर तुला मानसीक त्रास होऊ लागला तर तुझ्या गॅगच कस व्हायच? :) प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता,:-- मग कशाला एव्हडे टेंशन घेतोस? तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! हे तात्या म्हणाले आहेत और क्या चाहिये तुम्हे ? (मि.पा.प्रेमी) मदनबाण

छोटा डॉन 10/04/2008 - 17:58
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, धमाल सर्वांचे धन्यवाद ... आपल्या अशा प्रोत्साहनाची गरज होती ... मी नक्की टाकतो पुढचा भाग पण मला थोडा वेळ हवा कारण पहिले मी थोडे शांत होतो आणि पुढचे भाग अधिक कसे मनोरंजक होतील याकडे बघतो ... "तात्यांचे" खास करून अधिक धन्यवाद , कारण त्यांनाच काय मिपा वरच्या कुनालाच वगळून मला पुढे जाणे शक्य नाही... थोडा वेळ द्या मी आपणास निराश करणार नाही. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 11/04/2008 - 00:05
तात्या कशाने वैतागले..तुम्ही अनुष्का वहिनीला ताटकळत ठेवलत ना म्हणून्...दारू कसली पीत बसता अनुष्का वहीनी येणार त्याची तयारी करा ना..आम्ही आणलं पण तुळशीबागेतून गिफ्ट...:)

विद्याधर३१ 11/04/2008 - 09:24
मी प्रतिक्रीया फारश्या देत नाहि. कारण जे आवडते त्याला आधीच तसे प्रतिसाद आलेले असतात त्याला नुसते मम म्हणावे लागते. काही वेळा लॉगीन होताना (ऑफिसमध्ये) नेटवर्क स्लो असल्याने एरर येते. पण याचा अर्थ असा नाही की जे प्रतिक्रीया देत नाहित पण वाचतात त्यना तो लेख आवडत नाहि. त्यामुळे कोणा एकाच्या विपर्यास्त प्रतिक्रियेमुळे लेखन बंद करावे. कारण माझ्यासारखे खूपजण असतील. जोपर्यन्त वैयक्तीक टीका होत नाही तोपर्यन्त लेखन बंद करु नये.. प्रतिसाद येतील किंवा नाहि याकडे फारसे लक्ष न देता लिहित रहावे हि विनंती... अवांतरः आत्तापर्यंत या लेखाची ७०८ वाचने झाली आहेत. विद्याधर

मनापासुन 11/04/2008 - 17:42
डॉन काका... इथल्या सगळ्या काकां पासुन एक शिका . कितीही झाले काही झाले तरी मागे हटायचे नाही. प्रसंगी अखंडीत लिहीत रहायचे. अहो शिवराय सुद्धा कधी तरी घोड्यावरुन पडले असतील. आपण तर साधी माणसे. सायकल चालवायला शिकताना कधी पडला नाही असला माणुस दाखवा. लेख लिहीत रहायचे. त्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर आपाल्यात तरी सुधारणा होते किंवा लोकाना आपली सवय होते. त्या केकता कपूर तै पासुन बाकी काही नाही तरी हे मात्र शिकण्यासारखे आहे. उगाच नाही तिचे नाव होते. उद्या आणखी दहा पन्ध्रा वर्षाने तिचे नाव भारतातल्या मोठ्या निर्मात्यांच्यात घेतले जाईल्.(ऋषीदा/ सत्यजीत रे/ शान्तारम बापू सोबत) जो चिन्ता करनेका है वो जन्ताच करेगी. सर दुखा उनका दुखेगा अपनेकु क्या ? उतना सिर्फ वो सरदर्द की गोली वाली कम्पनीसे रॉयल्टी लेने का क्या? डॉन काका...भाऊ हे सगळे मनापासुन बरका तुम लिखते र्रहो ... हम डोका संभालते है...

In reply to by मनापासुन

डॉन काका... ह्या छोट्या डॉन्याला "डॉनकाका" केल्याबद्द्ल आम्ही तुमच्यावर अतिशय, प्रचंड, म्हणजे अगदी तुडूंब प्रसन्न झालो आहोत!!!:)) आत्तापर्यंत आम्हाला चिडवत होता, शिंचा!! डॉन्या, आता झाला की नाही काका-क्लब मध्ये दाखल?:)) हा, हा, हा!!!! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 13/04/2008 - 12:04
अहो मनापासून भाऊ, वय काय हो तुमचे ? नाही माझे वय २४ आहे तेव्हा मला काका म्हणायलातुम्ही साधारणता "२-५" वर्षाचे असायला हवे . च्यायला मला पार काका करून टाकलेत राव तुम्ही ... ... ह.घ्या. बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही "काका" ठरायला सध्या एकदम "नालायक" आहोत ... डांबिसकाका पर्सनली नका घेऊ ... ह.घ्या ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... आम्हीही नाही!! सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... सिगारेट ओढत नाही. सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!! उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आम्हीही नाही. म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:)) आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!! आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:))) वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:)))))))) तुझ्या बारशाला जेवलेला, डांबिसकाका :)))))

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 14/04/2008 - 19:53
"सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!" २ प्रोब्लेम आहेत, सकाळी लवकर उठणे आणि केव्हाही उठल्यवर व्यायाम करणे. हेच जमत नाही, सांगा काय करायचे ते ... "म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))" हे बाकी खरं, मानलं आणि पटलं .... आता फक्त समवयस्कांना सांभाळा . "आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!" म्हणून तर आम्ही तुम्हाला "गुरु" मानतो .... "आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))" आता काय बोलायचे बॉ ? हाताची घडी आणि तोंडावर बोट ... आमच्या जखमेवर मिठ चोळता आहात हे लक्षात ठेवा. येतील येतील , आमचेही दिवस येतील .... ह. घ्या. "पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))" तसं म्हणाल तर फायदाच आहे पण आपल्या "इंटेग्रीटीचे " काय ? ज्याच्या बारशाला आपण जेवला आहात तो छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा 15/04/2008 - 11:35
म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))
आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. :-)
छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!
महत्वाचा शव्द आठवणीने टाकण्याची हातोटी आवडली. उगाच काकूंचे 'आब्जेक्षण' नको, काय?
आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))
:) :) :) :) आजि म्या ब्रम्ह पाहिले गा! काकोबा....धन्य.. धन्य आहात हो !!!!!
हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))
लाख मोलाचा सवाल ! आत्ता बोला की रे!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 29/12/2014 - 14:54
इयर एंडला एकदम नॉस्टल्जीक झालोय डान्या परत ल्ह्ययला घे नव्याने असले काहितरी

विजुभाऊ 13/04/2008 - 20:00
डॉन काका :))))) जब्बर दस्त... " डॉन की तलाश ११ मुल्को की पुलीस कर रही है" आता डॉन काका म्हंटले की हेच वाक्य कसे वाटते बघा डॉन काका वयोमानामुळे डोक्यावर परिणाम झाला आणि गिरणीतुन दळण आणायला गेले तेकोठे गायब झाले तेच कळत नाहिये. लवकर आले तर मारुतरायाला ११ रुईची पाने वाहीन हो" किंवा " बेते सो जा नही तो छोटा डॉन आ जायेगा" हे वाक्य असे होईल "गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन 14/04/2008 - 19:55
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ" सत्यकाम जाबाली . हा हा हा ... अवांतर : कशाला घेता विजूभाऊ माझी राव ? मी काय घोडं मारलं आहे ? च्यायला हे डॉन काका म्हणजे "विकतच श्राद्ध" झालं आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 15/04/2008 - 11:39
"गम्प्या(!) झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन.
हाणा तिच्याआयला! एकदम भिरभिरं !
डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
मग ती..'तात्याकाम जाबली' आणि 'तात्या ख्रिस्त' ची गोष्ट कधी सांगनाल डॉनकाका? काय हो विजुभाऊ...सांगा ना!
लेखनविषय:
3

कुठ कुठ जायाचे जाळ्यात -२

सुवर्णमयी ·

प्राजु 08/04/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ 08/04/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी 08/04/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन 08/04/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री 09/04/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर 09/04/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी 09/04/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण 10/04/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण

प्राजु 08/04/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ 08/04/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी 08/04/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन 08/04/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री 09/04/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर 09/04/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी 09/04/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण 10/04/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

माझी फजिती....

धमाल मुलगा ·

नारदाचार्य 08/04/2008 - 17:50
धमाल्याच्या स्टाईलमधली काही फजिती वाचायला मिळेल म्हणून आलो आणि फजिती झाली.

In reply to by नारदाचार्य

धमाल मुलगा 08/04/2008 - 18:28
नारदाचार्य, आम्ही सतत ग॑डतच असतो. मी वरचा किस्सा केवळ सुरुवात म्हणून दिलाय. जरा इतरा॑चे झालेले पोपट कळूदे, मग आम्ही पण आमचा झालेला सप्तर॑गी पोपट सा॑गतो की :-))) घ्या तिच्याआयला, मोठ्या हौसेन॑ धागा चालू केला आणि पहिलीच प्रतिक्रिया आमच्या बोका॑डी बसणारी आली...घ्या आमची अजुन एक फजिती !! :-)))) बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-)) - (ग॑डलेला) ध मा ल.

नारदाचार्य 08/04/2008 - 17:58
वाटलं होतं, धमाल्या आता छान माप काढेल. त्याऐवजी त्यानं,
बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-))
असं लिहून पुन्हा गंडवलं. मानलं रे. तुझ्याच भाषेत सांगायचं तर फुटलो...

विजुभाऊ 08/04/2008 - 18:20
मी आणि माझे ३ चुलत असे चौघे भाऊ सांगलीला निघलो होतो. वाटेत एक शेतकरी गाडीत माक्याची कणसे भरताना दिसला. आम्ही आमची गाडी थांबवली.षेतकरी दादाला काही कणसे देता का अशी विचारणा केली. त्या शेतकर्‍याने चांगली पोतेभरुन कणसे आमच्या गाडीत टाकली. माझ्या भावाने त्या शेतकर्‍याला कणासाचे पैसे किती म्हणुन विचारले....शेतकरी दादा पैसे घ्यायला नको म्हणाले... मी त्याना मोठ्या उदार पणे म्हंटले की पैसे घ्याना तुमचे नुकसान का करुन घेताय.. शेतकरी त्यावर सहज म्हणाला "काय राव उगाच नुकसानाचं बोलताय्..त्यात नुकसान कसलं..ते तुमच्या पोटात तरी जाइल अहो डुकरं ईतके नुकसान करतात्.....चार डुकरे जास्त लागली म्हणुन समजू..... आम्ही एकमेकांकडे पाहीले........एकुण चौघेजण होतो ना......... .......एक (गाढव ) रान डुक्कर ठरलेला विजुभाऊ

प्राजु 08/04/2008 - 19:42
११वीत असताना, बाबांनी मला स्कूटी घेऊन दिली. थाटात ती स्कूटी घेऊन मी निघाले होते. कॉलेज जवळ एका मैत्रिणीच्या बाबांचे ऑफिस होते. तिथे ती मैत्रिण थांबत असे. तिथुन तिला घेऊन कॉलेजला जाणे हा नित्याचा क्रम. अशिच एकेदिवशी ऑफिसच्या खाली जाऊन, तिथून तिला जोरात हाक मारली. तिने बाल्कनीतून ५ मिन्टे थांब असे सांगितले. मी तशीच स्कूटिवर बसून रहिले होते... इतक्यात...गुडघ्यापर्यंत नऊवारी साडी नेसलेली म्हातरी बाई आली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती कसली तरी. ती एका हाताने सावरत ती माझ्या जवळ आली. काही काळ मला नुसतीच बघत उभी राहिली. मी लक्ष दिले नाही. मग ती जवळ आली, म्हणाली, " दुरड्या पोचल्यात की ग तिकडं.." मी पुन्हा दुर्लक्ष केलं... ती : पोरी, अगं दुरड्या पोच्ल्यात की थितं.... मी :( निर्विकार पणे) पोचूदेत कि मग, मी काय करू? ती : समदी जमली हायेत तिथं.. आन् तू हितचं... मला आता थोडासा राग आला. मी : तुमच्या त्या दुरड्या म्हणजे काय मला माहिती नाही आणि तुम्हीही जावा जिथं सगळी जमली आहेत तिथं.. ती : (प्रेमाने) असं करू नये पोरी, चल माज्या संगट चल.. मी न्हेते तुला.. माझ्या रागाचा पारा चढायला लागला. तरिही जास्तीत जास्त संयमाने मी तिला म्हणाले.. "बाई, हे बघा.. तुम्ही निघा आता.. मलाही कामं आहेत.." इतक्यात माझी मैत्रिण खाली आली . ती बाई : " म्या तुजं काय बी ऐकनार नाही, तुला घेउनच जानार आहे...." असं म्हणत माझा हात धरला तिने.. मी आता एकदमच भडकले.. मी : ओ बाई, सोडा ना... काय हा मुर्खपणा आहे..? माझी मैत्रिणही तिला ओरडू लागली. ती बाई : मला माहित हाय.. लग्नाच्या मांडवातून तू पळून आली हायेस्...म्या तुला घेऊनच जानार.. तिचं हे वाक्य ऐकून मी ब्लास्ट का काय म्हणतात तेच झाले.. "ओ बाई... उगिच काहीही बडबडू नका... जावा बरं.. .." आणखी काही बोलणार इतक्यात त्या बिल्डिंग मधले एक दुकानदार अमचा गोंधळ ऐकून बाहेर आले.. आणि त्यांनी त्या बाईला हाकलून लावले. मला म्हणाले.. त्या बाईच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला असावा. आम्ही तिथून निघालो..पण राग मात्र शांत झाला नव्हता माझा. हळू हळू शांत झाला. कॉलेज मध्ये येईपर्यंत दोघीही एकमेकीशी काहिच बोललो नाही.... कॉलेज मध्ये स्कूटी पार्क करताना मी नी मैत्रिणीने एकमेकीकडे बघितले आणि दोघिना एकदमच जोरात हसू आले...झालेल्या प्रकारचे. (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री 08/04/2008 - 23:58
माझ्या लग्नाच्या ३-४ दिवस आधीची गोष्ट.. (होणारा) नवरा अगदी आयत्यावेळेलाच लग्नाला आल्यामुळे त्याच सगळं शॉपिंग बाकी होतं.. मग आम्ही आमच्या घराजवळच्या जयहींदमधे गेलो.. २ शेरवानी आवडल्या.. पण आई-बाबा नव्हते बरोबर, म्हणून संध्याकाळी त्यांना बरोबर घेऊन शॉपिंग उरकून टाकावी असा विचार केला.. पण एक शेरवानी बुक करून ठेवावी म्हणून आम्ही काऊंटरपाशी आलो.. नवर्याने ५०० रू. देऊन शेरवानी बुक करून काउंटरपाशी ठेवली आणि निघाला... तेवढ्यात मी माझं अती-बावळट डोकं चालवलं, आणि त्या माणसाला म्हणाले "अहो, शेरवानी द्या की.. तिथे कुठे ठेवताय!! " :)))) आणि नवर्‍याकडे असं पाहीलं जसं काही तो पण विसरत होता आणि मी किती हुशार!! (४-५ हजारांची शेरवानी कुणी ५०० ला देईल का अशी!! ) तिकडे नवर्‍याला , आता हात जोडू की पाया पडू असं झालं होतं... तेवढ्यात मला माझा यडपटपणा कळला..आणि हसत आम्ही निघालो ! काउंटर वरच्या माणसाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता!! :)

चतुरंग 09/04/2008 - 00:31
त्यावेळी बहुदा माझे अभियांत्रिकीचे तिसरे वर्ष होते. मी मावशीकडे रहात होतो. एरवी बसने जात असलो तरी परीक्षेच्या काळात वेळ वाचावा म्हणून मी काकांची जुनी स्कूटर घेऊन जात असे. त्याप्रमाणे मी आणि माझा वर्गमित्र स्कूटवरुन परीक्षेला चाललेलो. नेहेमीप्रमाणेच अभ्यास 'नीट' झालेला असल्यामुळे, तो मागे बसून मोठ्याने नोट्स वाचत होता आणि मी गाडी चालवत ऐकत होतो! जून महिन्यातला पहिलाच आठवडा होता. पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या होत्या. रस्ते किंचित ओलसरच होते. आमच्या कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्याला दोन - तीन अतीशय झोकदार वळणे होती. त्यातल्याच एका वळणावर आमची गाडी पोचली. तिथे बहुदा ऑइल सांडलेले होते, त्यावर पावसाचे पाणी, मग काय विचारता एकदम ऑईल-स्केटिंगच! आमची गाडी अलगद घसरली, स्पीड अत्यंत कमी होता कारण लक्ष नोट्स ऐकण्याकडे होते, हलकेच घसरलेल्या स्कूटरवरुन मी बुद्कन खाली रस्त्यावर कधी आलो ते मलाच समजले नाही. त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. मी पोट धरुन रस्त्यावर पडल्या पडल्याच हसत होतो आणी पलीकडे माझा मित्र हसत होता! (नंतर नीट बघितले तेव्हा स्कूटरचे मागचे टायर पूर्ण गोटा होते असे दिसले;)) अजूनही आम्ही भेटलो की त्या आठवणीवरुन घसरतोच! चतुरंग

प्राजु 09/04/2008 - 00:38
त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. अहो तुम्हीच काय.. हे वाचून मी सुद्धा पोट धरून हसले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 09/04/2008 - 10:07
शाळेतल्या दिवसांनमधील गोष्ट आहे, बहुतेक मी ८ वी मधे होतो, वार्षिक परि़क्षेचे वेळापत्रक एका नोटिस बोर्ड वर लावले होते. ते लिहुन घेण्यासाठी मुलांची गर्दी जमा झाली होती.मी सुद्धा त्या गर्दी मधे उभा राहुन वेळापत्रक लिहुन घेतले. सरते शेवटी परिक्षेचा दिवस उजाडला, एक एक पेपर होत गेले आणि आता फक्त २/३ पेपरच बाकी होते. इतिहासाच्या पेपर ची माझी पूर्ण तयारी झाली होती आणि आज तो पेपर होता,मी वर्गात जाऊन बसलो आणि परिक्षक पेपर वाटण्याची वाट पाहु लागलो..... शेवटी पेपर माझ्या हाती लागला आणि तो मी आधी पुर्ण वाचुन मग सोडवण्यास घेणार होतो,,,,,पण हे काय?इतिहासाच्या जागी भुगोलाचा पेपर? मला तर काहीच कळेनाच मी माझ्या पुढील मुलास विचारले काय रे आज इतिहासाचा पेपर आहे ना? तो म्हणाला नाही भुगोलाचा.....(याचा अर्थ इतिहासाचा पेपेर दोन दिवसानंतर आहे.) एका क्षणात माझ्या लक्षात आले गर्दी मधे उभे राहुन वेळापत्रक लिहुन घेण्यात माझ्या कडुन एक छोटी चुक झाली होती,,,,,,(छोटी?) त्या क्षणी वर्गातली सगळी बाकडी माझ्या भोवती गरागरा फिरतायत असे वाटायला लागले,इतिहासातील अतिरथी महारथी जाऊन आता बिनमोसमी वादळी वारे वाहायला लागले होते..... शेवटी मी माझ्या डोक्यातील होकायंत्राप्रमाणे भरकटलेल्या विचारांना आवरायचे ठरवले..... आणि पेपर लिहावयास घेतला,,,,, मी फक्त लिहीत गेलो..... निकालाचा दिवस उजाडला:----- मला इतिहासापेक्षा भुगोलात जास्त मार्क मिळाले होते!!!!! ( धमालजी आपला मि.पा वरील छोटा मदन दा) मदनबाण

In reply to by मदनबाण

अगदी अशीच फजिती माझी बी.कॉम्. ला झाली. स्टॅटीस्टीक्सच्या पेपरला मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करून गेलो होतो. हातात पेपर आला आणि मेंदूत काळोख पसरला....... अर्धातास आढ्याकडे नजर लावून बसल्यावर स्टॅटचे एक- एक फॉर्म्युले आठवायला लागले. वर्ष फुकट गेले नाही. नशीब.

In reply to by प्रभाकर पेठकर

लंबूटांग 13/04/2008 - 22:24
७वी च्या स्कॉलरशिप च्या परिक्षेच्या वेळेस बुद्धिमत्ता चाचणी चा पेपर समजून आत गेलो. सर्व पेपर सोडवून संपत आला आणि शेवटी ग्राफ बघितल्यावर शंका आली बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपर मधे ग्राफ्स कसे आणि तेव्हा पेटली की हा गणिताचा पेपर आहे. आणि सगळ्यात जास्ती मार्क्स गणितातच मिळाले.

In reply to by मदनबाण

नीलकांत 15/04/2008 - 18:12
अंतीम वर्षाच्या परिक्षेच्यावेळी असाच अनुभव गाठीशी आहे. माझ्या जवळ वेगळी पुस्तके आणि इतरांजवळ इतर, आता परिक्षेच्या वेळी पुस्तके म्हणजे... अहो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढतो. ( सुरुवात कधी करतो ते विचारू नका) पण पेपर छान गेला व निकाल सुध्दा उत्तम. नीलकांत

भाग्यश्री 09/04/2008 - 10:19
ही फजिती नाही म्हणता येणार.. नवर्‍याचा आगाऊपणा म्हणा.. किंवा शिक्षकांची फजिती!! :) तो शाळेत असताना त्याने पेपर मधे असंख्य तारे तोडलेत.. त्यातले १-२.. म्हणी पूर्ण करा असा प्रश्न होता.. बळी तो ----- आणि याने लिहीलं, "बळी तो राजाचा माळी !" आणि इंग्रजी च्या पेपर मधे काहीतरी गोपाल आणि सीता वर ४-५ ओळी दिल्या होत्या, आणि खाली प्रश्न होता.. who is gopal ? his answer was.... gopal is seeta !! :D मला त्या शिक्षकांचे एक्स्प्रेशन्स पाहायला आवडलं असतं!! :))

आनंदयात्री 09/04/2008 - 10:40
सगळ्यात मोठी फजिती काही डिश्टींग्युइश करता येत नाय भो, दर २-४ दिवसाला आमचा कुठे न कुठे पोपट होतच असतो. आत्ता काल परवाचीच गोष्ट हाय, आम्ही गेल्तु पोरगी पहायला, पहायला म्हणजे तिला हाटेलित भेटायला हो. मोठ्या श्टायलीत मोठ्ठ्या मोठ्ठ्या आर्डरी सोडल्या अन जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की पाकिट आम्ही हापिसातल्या आमच्या कप्प्यातच विसरलो. अस्सा गोरामोरा झालो मी ! माझे खर्रकन उतरलेले तोंड पाहुन हुशार पोरगी काय समजायचे ते समजली अन पैसे देउन मोकळी झाली !

मनस्वी 09/04/2008 - 16:10
शनिवार, वेळ अंदाजे सकाळचे ११-१२. मी आणि माझी मैत्रीण एन् सी सी ची परेड संपून स्कूटीवरून सुसाट घरी चाललो होतो. मी चालवत होते आणि मैत्रिण मागे. आमच्या समोरची रिक्षा तुफान वेगात होती आणि आमची स्कूटीपण त्याच वेगात.. काही सेकंदात अचानक रिक्षेने डावीकडे टर्न घेतला...... आणि आम्ही झूपकन समोरच्या उंच डिव्हायडरच्या वर! गाडीला खाडकन ब्रेक लावला.. त्या उंच डिव्हायडरवर ती स्कूटी आणि स्कूटीवर आम्ही दोघी ते पण एन् सी सी च्या ड्रेसमध्ये असे दृष्य. काही सेकंदातच काय झाले ते लक्षात आले. तेवढ्यात शेजारील मोटारसायकलवरचे २ तरुण आले.. त्यांनी आमची गाडी खाली काढून दिली आणि आम्ही तिथून धूम ठोकली :) आणि घरी आल्यावर जे हसत सुटलो...

वरदा 09/04/2008 - 19:12
मज्जा आली वाचून... मी इथे अमेरीकेत आल्यावर पहिल्यांदा बर्फ साफ करायला घेतला.. नवरा सांगत होता नको जाऊस तरी म्हटलं मी जाऊन दुसरं शॉवेल आणते...आणि बोलत बोलत चाल्ले होते... नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:))) असली भयंकर आपटले साष्टांग नमस्कार घातला आणि नेमकी शेजारची बाई तेव्हा बर्फाचे फोटो काढत होती तिच्या कॅमेराने अगदी बरोब्बर माझाच फोटो काढला...सगळ्या बिल्डींगला करमणूक झाली...मी शेकली गेले त्याचं काय :))))))

In reply to by वरदा

लंबूटांग 13/04/2008 - 22:27
नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:)))
हा हा हा..

शितल 09/04/2008 - 22:24
माझी फजीती हे सदर छान आहे. मला ही फजीती आठवते पण दुसर्‍याची पाहिलेली.

अनिकेत 09/04/2008 - 23:03
अगदी २ दिवसापूर्वीची गोष्ट... मी सध्या दिल्लीला आलो आहे. २ दिवसांपूर्वी कनॉट प्लेस मधे एका जुना लूक असलेल्या रेस्टॉरंटात गेलो.. तिथल्या आगाऊ वेटरने मला वय विचारले...मी म्हटले २४... त्याने मला पाटी दाखवली...दारू २५ च्या वरच्यांना देणार......असला पोपट झालाय... असला कसला कायदा दिल्लीत? मुंबई/केरळात असे नसते हो..... :( अनिकेत ता.क.: काल मी वय २६ सांगितले.... :)

देवदत्त 09/04/2008 - 23:12
छान मजा चालली आहे एकमेकांच्या फजित्या वाचत ;) चालू द्या... जमल्यास (काही असल्यास) मीही लिहिन.

शितल 13/04/2008 - 03:59
आम्ही ५ ते ६ मैत्रिणी बसने कॉलेजला जात असु, इ॑जिनिअरि॑गची ही मुले बसला असायची, बसला गर्दी असल्यामुळे कधी कधीच बसायला जागा मिळे, एके दिवशी एकदम पुढे जागा मिळाली, मी व माझी मैत्रिण बसलो, आमच्या समोरच्या सीट (ड्रायव्हरच्या पाठी मागच्या बाजुला असलेली) मुले बसली होती, समोर मुले असल्यामुळे आम्ही दोघी ही खिड्कीतुन बाहेर पहात होतो, इतक्यात जोराच ब्रेक लागला, आणि आम्ही समोरच्या॑चा अ॑गावर कोसळ्लो, आणि बसची सीट उचकुन आमच्या पाठीवर पडली, उभे असलेल्या काही मुला॑नी मग बसची सीट उचलली, मग आम्ही दोघी उभे राहिलो, समोर पाहतो ते काय, आम्ही ज्या॑च्या अ॑गावर कोसळ्लो त्या पैकी एका मुला॑ने डोळे ब॑द केलेले, एक ओशाळ्लेला आणि एक हसत, उभ्या असलेल्या मैत्रिणी आणि सीन पाहिलेले हसत होते, आमच्या ओठी हसु, पडल्यामुळे लाज, आणि पाठीला लागल्यामुळे डोळ्यातुन पाणी. मग, उभे असलेल्या २ मुला॑नी बसची सीट पाठुन हाता॑नी धरली, आणि समोर बसलेल्या॑नी पायानी आणि आमचा प्रवास चालु. न॑तर ८ दिवस बसमध्ये बसायला जागा मिळाली की बसची सीट उचकते का ते पाहुनच बसत होतो.

(सन २००३) आम्ही सगळे विद्यार्थीमित्र पुण्यातच दुसर्‍या कॉलेजमध्ये एक व्याख्यान ऐकण्यास आलो होतो. ग्रूपमधल्या एकाचे नुकतेच लग्न ठरले होते व त्याची वाग्दत्त वधू त्याला मोबाईलवर दर तासाला एक फोन करीत असे. व्याख्यान सुरू होऊन दीड तास झाला तरी त्याला तिचा फोन काही आला नाही (त्याचे लक्ष तिथेच होते) म्हणून तो अस्वस्थ होता. शेवटी व्याख्यान स॑पल्यावर ऑडिटोरीयममधले दिवे लागल्यावर त्याने खिशातून मोबाईल काढला.. बघतो तो त्याने मोबाईल समजून टिव्हीचा रिमोटच बरोबर आणला होता..!! तो एकदम खजील झाला आणि 'तिच्या' रोषाच्या भीतीने घरी पळत सुटला..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

वैभव 28/05/2008 - 18:22
अरे घराजवल्ल एक चोरी झाली........ चोराने CD Player चोरून नेला. घरात काकु चोराला लाखोली वाहत होती. काकुला म्ह्ट्ले "झाले ते झाले ......काय दु:ख करत बसलाय" काकु ने म्ह्ट्ले "कप्पाळ माझे...........चोराने सोबत T.V चे रिमोट नेले" ग्राऊन्ड वर आमची हसुन हसुन पुरेवाट झाली.

मी दुसरीत असतानाची ही गोष्ट. नुकताच कांजिण्यांच्या आजारातून उठलो होतो. महिनाभर शाळा चुकल्याने घरच्यांनी झालेला अभ्यास भरुन काढायला जवळच एका क्लासला नाव घातले होते. कांजिण्यांच्या फोडांचे वण पुर्णपणे जाण्यासाठी सारखे औषध लावावे लागत असल्याने स्वारी उघडीच पुर्ण घरभर फिरत असायची. त्या दिवशी दुपारी क्लास होता.घरी बाबा थांबणार होते.आई बाहेर गेली होती.पटकन आवरुन मी क्लासला जायला निघालो. साधारण निम्मे अंतर गेलो असेन. समोरुन एक मुलगी आली आणि माझ्याकडे बघुन खुदकन हसली. मला काही तरी विचित्र वाटले. मनात विचार आला...बहुतेक पँटची चेन लावायची राहिली....म्हणुन खाली बघतो तर काय...मी खाली पँटच घातली नव्हती....म्हणजे अंडर्वेअर घालुन मी क्लासला जायला निघालो होतो....तसाच पळत पळत मी परत घरी आलो.. दार उघडताच बाबांना कळुन चुकले..मी कसा पॅंट न घालता क्लासला गेलो होतो..ते पण मला बघुन हसायला लागले...शेवटी पॅंट घालुन परत व्यवस्थितपणे क्लासला गेलो...

धमाल मुलगा 15/04/2008 - 17:37
गेल्या रविवारी, एका मित्राचं 'गुपचुप शुभमंगल' उरकून घरी आलो. उन्हामुळे पार वेड लागायची वेळ आली होती...जरा पंखा चालू करुन बहिणाबाईंशी गप्पा मारत बसलो, हातात घराची किल्ली होती, तिच्याशी चाळा चालू होता. एक दहा मिनिटांत भगिनीदेवी मैत्रिणीकडे गेल्या. म्हणलं चला जरा खाली जाऊन मस्त कोकम सरबत घेऊ, आणि परत येऊन देऊ ताणून... कसलं काय? घराची किल्लीच सापडायला तयार नाही. आख्खं घर पालथं घातलं...नो किल्ली सापडिंग ! म्हणलं च्यायला, ही काय भुताटकी आहे? शेजारच्या काकूंचं दार वाजवलं, भर शनवारातल्या इमारतीतलं शेजारच्या घराचं दार वाजवायचं तेही टळटळीत दुपारी...आणि रविवारच्या म्हणजे.... तरीही हिम्मत करुन दार वाजवलं. अपेक्षेप्रमाणे झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा पुढे आला. म्हणालो, "काकू, माझी घराची किल्ली सापडत नाहीय्ये! तुमच्याकडे ठेवलेली स्पेअर किल्ली देता का जरा?" तर ह्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक काकू माझ्याकडे बघून फिस्सकन हसल्या...आणि मग फिदीफिदी...खुदुखुदु...शेवटी खो खो हसायला लागल्या. म्हणलं 'बाई गंडली बहुतेक. दुपारचं जागरण सोसवलं नसेल'............. तर ह्या आमच्या काकूंनी माझ्या कानाशी हात नेला, आणि मी खेळता-खेळता कानावर अडकवलेली किल्ली काढून हातात दिली. .......आणि संध्याकाळपर्यंत आख्ख्या सोसायटीत ही बातमी 'सबसे तेज' पोहोचवली.आता मला येता जाता कानकोंड्यासारखं होतं ना राव...जो उठतो तो चेष्टा करतो :-(

In reply to by धमाल मुलगा

नंदन 16/04/2008 - 00:12
झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा -- वा! भडकमकर क्लासेसच्या नाट्यसमीक्षकी भाषेत बोलायचे तर चित्रदर्शी आणि चपखल शब्दयोजना :) बाकी कानाला किल्ली लावल्याने 'कान'कोंड्यासारखं होणं, हेही बेष्ट धमुराव :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धमाल मुलगा 16/04/2008 - 13:41
थ्यांक्यू थ्यांक्यू हां ! हेही बेष्ट धमुराव :) धमु नका ना म्हणू...असं म्हणून कळवळलो !!!! :-) आपला, (कळवळ्या) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 16/04/2008 - 13:50
आंटी मत कहो ना च्या श्टाईल मधे धम्या "धमु नका ना म्हणू" असे म्हणतांना डोळ्यासमोर आला ! (आंटी वरुन काहीही गैरसमज नसावा, सदरहु आंटी ही "हम पांच" या मालिकेतली खरीखरी आंटी (काकु या अर्थाने) आहे.)

वरदा 15/04/2008 - 20:11
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?

In reply to by वरदा

धमाल मुलगा 16/04/2008 - 13:44
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?
ह्या: खुंटी समजलो असतो तर सदरा, पायजमा नसता का टांगला? आयला, बरं झालो खुंटी नाही समजलो....कानाला पायजमा टांगून शेजारच्या काकूंचं दार वाजवायला गेलो असतो तर? बरं दिसतं का ते? - (मती 'खुंट'लेला ) ध मा ल.

माझ्या दादाने पहीलीला शाळेत पेपरात लिहीले होते प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी प्र. वाक्यातील कर्ता व कर्म यांचे स्त्रिलिंगी रुप करून योग्य क्रियापद वापरा. वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' खीखीखी.... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 16/04/2008 - 13:48
प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी !
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली'
आता काय बोलायचं ह्याच्यावर? एकच प्रतिक्रिया चपखल बसतेय...खीखीखी....खुखुखु...खोखोखो....ख्याख्याख्या...

In reply to by धमाल मुलगा

भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी ! परांजपे??

वरदा 17/04/2008 - 01:15
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' झक्कासच..प्रतिक्रीया सुचतच नाही..... मती 'खुंट'लेला ध मा ल माझीच खुंटली आता मती....:))))))

वरदा 17/04/2008 - 01:21
लिहिलेला निबंध...विषय दिवाळी.. मला दिवाळी खूप आवडते कारण शाळेला सुट्टी असते. दिवाळीत आम्हा लहान मुलांची मजा असते. आई बाबा मला नवीन कपडे आणतात. फटाकेही आणतात. आम्ही घरी चकल्या, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे बनवतो. आकाशकंदील लावतो. किल्ला बनवतो. रांगोळी काढतो. मला ह्या वर्षीची दिवाळी आवडली. मी नविन कपडे घातले. मी चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि अनारसे खाल्ले. मी आकाशकंदील लावला. मी किल्ला बनवला. मी रांगोळी काढली. मला दिवाळी आवडली. सगळ्या वर्गात अशी लाज काढली होती बाईंनी, अगं वर्तमान आणि भूतकाळातले दोन पॅरा लिहून निबंध होत नाही म्हणून...

वेदश्री 27/04/2008 - 21:18
४थीमध्ये होते तेव्हाची गोष्ट. इतिहासाच्या करकरेबाई इत्तक्या वेगाने वर्गपाठासाठीचे प्रश्न सांगायच्या की त्या वेगाने लिहायला मला जमायचेच नाही.. इतरांचे माहिती नाही काय करायचे ते. सुरूवात केली तेव्हा मी तिसरा प्रश्न सांगून संपायची वेळ आली तेव्हा पहिला प्रश्न लिहून संपवला होता.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सांगा असं ओरडले मी. बाईंनी त्रासिक नजरेने माझ्याकडे पाहिले.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सुरू झाली राजधानी एक्प्रेस. :( २-३दा मी परतपरत सांगायला सांगितले आणि बाईंनी पाठीत धपाटा घालून पटापट लिही सांगितले. मला रागच आला. मग कानावर पडेल तो शब्द मी शॉर्टकट करायला सुरूवात केली.. शिवाजीमहाराजांचा जन्म कधी झाला? असे त्या म्हणाल्या की मी शिमचाजकझा? असे लिहून काढत गेले.. वेग मॅच होत होता. मी स्वतःच्या हुशारीवर खुश झाले. बाईंनी १००+ प्रश्न सांगितले होते ( प्रत्येक वाक्यावर त्यांनी एक प्रश्न बनवला होता जेणेकरून अख्खा धडा वाचून होईल म्हणे ! ) आणि उद्या उत्तरे लिहून आणा म्हणाल्या ! घरी गेल्यावर प्रश्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न करायला लागले तर त्या शब्दजंजाळाचा अर्थ लागेल तर शप्पथ ! उद्या वर्गात वाट लागणार या विचाराने मी तोंड उतरवून बसले होते तर आई आली म्हणे की कोणत्या प्रश्नाला अडली आहेस? मी सांगते उत्तर.. आणि मी म्हणाले की.. शिमचाजकझा?!!! ~~~~ गोसावीबाई मराठी शिकवायला होत्या ३रीला. एकदा त्यांनी एक कविता पाठ करून यायला सांगितली होती, पाठ करून गेले होते. ती कविता वहीत लिहून काढ आणि आण तपासायला २० मिनिटात म्हणाल्या. मी १० मिनिटात लिहून काढली आणि नेली वही तपासायला.. बाईंनी माझ्याकडे रागाने पाहिले, पाठीत धपाटा घातला. हकनाक अन्याय सहन करणे रक्तातच नाही माझ्या.. माझा सरळ सवाल - का मारलं मला? काय चुकलंय कवितेत? एक्कत्तरी शुद्धलेखनाची चूक आहे का? की शब्द चुकलेत सांगा. यावर बाई म्हणाल्या की - मी तुला कविता लिहायला सांगितली होती, धडा नाही. कवितेसारखी लिहून आण ! ~~~~ काळजात ( कॉलेजमध्ये ) असताना एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअरींगच्या क्लासटेस्टच्या वेळी मला पाठांतरातला एक शब्द आठवायला तयार नाही. पाठांतरात माझा बेडा नेहमीच गर्क असल्याने मी एक युक्ती केली होती.. प्रत्येक प्रश्न त्याच्या उत्तरासकट एका चित्रपटगीताशी लिंक केला होता. ते गाणे लावून बसून मी ते उत्तर पाठ करायचे. गाणे आणि उत्तर दोन्ही सायमल्टेनिअसली पाठ व्हायचे.. वांदा असायचा ते गाणे योग्यवेळी सुचण्याचा ! क्लासटेस्टच्या दिवशी नेमके सकाळी मी - जब कोई बात बिगड जाए - गाणे ऐकलेले रेडिओवर आणि तेच माझ्या तोंडून सारखे गुणगुणले जात होते. दुसरे गाणे आठवेल तर शप्पथ ! त्याचेच लिरिक्स लिहून काढले मी उत्तरपत्रिकेत शेवटी आणि माझा त्या टेस्टमध्ये हायेस्ट होता वर्गात !

चला माझी ओळख माझ्या फजितीने करून देतो मी कॉलेजात असतानाचा हा माझा धावण्याचा (रनिन्ग चा व्यायाम) किस्सा १ नुकतीच व्यायामशाळा जॉईन केली होती. तिथे लंगोट वापरण कंपल्सरी होत. त्याच महत्व मनावर ठसवल्याने मग मी धावतानाही तोच वापरला. एकदा रस्त्यावरून धावताना अचानक खुप हलक हलक वाटू लागल. आणि.... इथे माझा तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम

चतुरंग 22/05/2008 - 17:39
हाप प्यांटित व्हता का फुलप्यांटित? न्हाई म्हनजे हाप आसल तर लोकांना माग पिसारा सुटल्यावानि देखनं दिसनार आनि फुल आसल तर बावचळल्यावानि येडंवाकडं पळत सुटनार, म्हनून इच्चारलं! ;) चतुरंग

ऋचा 22/05/2008 - 18:08
एकदा मी आणि माझा मित्र रार्ती क्लास करुन घरी येत होतो. ह्कुप अंधार होता आणि वीज गायब होती. रस्त्यावरचे दीवे नेहमीप्रमाणे बंद. आम्ही जोरात बोलत येत होतो कारण कोणीच नव्हत रस्त्यावर आणि अचानक मित्राचा आवाज येईना मी जाम टरकले... :S रस्त्यावर कोणी नाही आणि ह्याचा आवाज अचानक बंद. मग त्याने एकदम हाक मारली मला (आधी बर वाटल चला तो आहे) पण कुठेच चाहुल लागेना.. आणि गेलेले दीवे एकदम आले. आणि माझी हसुन ह्सुन वाट लागली. माझा मित्र १ म्हशीवरुन पडला आणि तो बोलत नव्हता कारण त्याला कळलं नाही की तो पडला कसा? =)) आणि ती म्हैस शांतपणे त्याच्याकडे पाहुन दात विचकत रवंथ करत होती. आम्ही जाम हसत घरी हे कारण आम्हाला पुढे खुप दीवस पुरलं हसण्यासठी.

तर अता दुसरा किस्सा साधारण ९२ सालातली गोष्ट इयत्ता १२ वी त गेलो होतो. मी आमच्या कल्याणातल्या जेल जवळ सकाळी धावायला जायचो. अर्थात जेल ही त्या काळी गावाबाहेर होती. तिथून सुर्योदय फार छान दिसायचा. मी पहाटेच निघायचो. माझा अवतार म्हणजे ढगळ पांढरा टी शर्ट आणि त्यातून घातलेय अस वाटेल इतपत डोकावणारी चड्डी आणि शूज रस्ता स्मशानावरून जायचा. त्यादिवशी रस्त्यावर नेहमीचे चेहरे दिसेनात. मी धास्तावलो. तेव्हढ्यात माझ्या लक्षात आल की शुजची लेस सुटलेय. मी स्मशाना पर्यंत पोचलो होतो आणि समोरची आधारवाडी मिट्ट काळोखात होती. तरीही मी ठरवल की घाबरायच नाही थोड्या वेळात सकाळ होईलच... लेस बांधायला थांबलो इतक्यात शेजारून एक सायकल गेली. मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला. मला पाहून हा का घाबरला असेल ... थोडी गम्मत वाटली पण लगेच लक्षात आल की असचा प्रसंग आपल्याही बाबतीत घडला तर..... लगेच मागल्या पावली पळात सुटलो. घरी आलो तर अजुन जाग दिसत नव्हती. बाथरूम मधे हात पाय धुत असताना घड्याळात लक्ष गेल (हो आमच्या सुज्ञ भगीनीने तिथे एक घड्याळ लावल होत आमच्यासाठी). नुकतेच साडेतीन होत होते.....

In reply to by निरंजन मालशे

भम्पक 19/11/2016 - 10:43
मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला.

ऋचा 23/05/2008 - 17:12
अरे यार काय रे क्रमशः @) वाचायला मुड आला तर ह्याच क्रमशः

विसोबा खेचर 24/05/2008 - 04:44
वा! सगळ्यांच्या फजित्या वाचल्या. मौज वाटली! :) आपला, (अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वरदा 29/05/2008 - 00:15
कशी फजिती झाली हेही सांगा की नुसतं काय अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!

भिंगरी 10/10/2014 - 15:24
एक स्त्री असल्याने माझी फजिती लिहू की नको असे वाटत होते.पण बाकिच्यांच्या फजित्या वाचून धैर्य आले. मी ६ वीत असतानाचा प्रसंग. शारिरीक शिक्षण या तासाला आम्हाला कवायतीसाठी मैदानात नेले. कवायतीला सुरुवात झाली आणि काही वेळातच माझी वेगळीच कवायत चालू झाली. झाले असे की त्या वेळी सरसकट सगळे नाडीच्या चड्ड्या वापरत असत. कवायत करता करता चड्डीची नाडी खेचल्या गेल्याने सैल झाली. आता सरांनी म्हटले लेफ्ट की मी डावा हात पुढे करून उजव्या हाताने स्कर्टच्यावरून चड्डी धरून ठेवी,आणि सरांने म्हटले राईट की मी उजवा हात पुढे करून डाव्या हाताने चड्डी धरून ठेवी.असे काही काळ चालले होते थोड्यावेळाने सरांच्या लक्षात आले.आणि किंचित हसत त्यांनी खुणेनेच मला जायला सांगितले.बापरे अजुनही मला अंगावर शहारा येतो की जर सरांच्या लक्षात नसते आले तर?

सुहास.. 10/10/2014 - 15:41
@ मदनबाणः हे माझे उत्खनन नव्हे. उगाच चारीत्र्य हनन करू नये >> ओ विजुभाउ, म्हणजे ज्याचे आहे त्याचे करावे का ;) @ मदनबाणः हे माझे उत्खनन आहे. आपण दोघेही मनन करु यात.

रेवती 10/10/2014 - 18:39
एका दिवसात एकच भाषा बोलणारे आपल्यात आता कोणी फारसे नसतील. त्यामुळे एका भाषेतील शब्द दुसर्‍या भाषेत वापरले जाणे, काही शब्द दुसरे वापरतायत म्हणून वापरणे यातून वेगळे अर्थ निघू शकतात. रोज मराठी, विंग्रजी आणि हिंदी या ३ भाषा आपल्याकडून मुख्यत्वे वापरल्या जातात. कालच एका हिंदी भाषिक फ्यामिलीला जेवणाचे आमंत्रण देताना मी काय बोलले की तुम्ही माझ्याकडे या ऐवजी आम्ही तुमच्याकडे येतो असा अर्थ झाला. माझे काहीतरी चुकले हे समजले पण सुधारेपर्यंत तिची हसून पुरेवाट झाली. मग दुसर्या हिंदीवाल्यांना फोन केला. एरवी मैत्रिणी सारखी वागणारी मी तिच्याशी बातम्या देताना हिंदी बोलावे तसे बोलत होते. ती हसायला लागली. उदा. "आप हमारे घर खानेपे आओगे तो हमे बडी खुशी होगी" असले काही ऐकू ती चक्रावली .

अगदी कहर धागा आहे हा , लंगोटी , चावी , पर्वती , मोरी .. हसून वशाड मेलो (सौजन्य मीपा ) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- कॉलेजात असताना कुठलासा धुमकेतू आला होता म्हणून खगोल कॅंप होता , रात्री बराच वेळ धुमकेतू दर्शन घेतल आणि मध्य रात्री साधारण २:०० च्या सुमारास हॉस्टेल वर परत येत होतो , मित्रानी लुना एकदम फास्ट मारली होती , एका क्षणात आमच्या डोळ्या पुढे धूमकेतू चमकला , डोळे विस्फरुन परत बघितल तर डोळ्या समोर खरच आकाशातील धूमकेतू दिसत होता , नंतर दोस्तानी संगितल की लुनाच्या दोन्ही चाकाच्या मध्ये डुककर घुसल होतो आणि लुना रस्त्यावर उलटली होती आणि आम्ही दोघ रस्त्यावर पार उताणे पडलो होतो ... :) एकदम टांगा (लुना) पालटी घोडे फरार

मा़झ्या १०वी नंतर १-२ वर्षांची गोष्ट आहे (२००३-२००४). त्या वेळी माझ्या लंगोटी मित्राच्या ताईसाठी मॅट्रिमोनी साईट्स वर रजिस्ट्रेशन वगैरे चं का चाललं होतं. ह्या भ्**ला माझा ई-मेल चा पासवर्ड त्याला माहीत होता. ह्यानी परस्पर माझं अकाऊंट रजिस्टर आणि व्हेरिफाय केलं. वरती घरचा लँडलाईन नंबर देऊन ठेवला. जेमतेम ७-८ दिवसांनी नेमके पिताश्री घरी असताना फोन आला. ते संभाषण असं होतं साधारणं. पिताश्री : नमस्कार, दातार बोलतोय. वधुबंधु वर्तक : नमस्कार. मी अमुक अमुक वर्तक बोलतोय. तुमचा मुलगा लग्नाचा आहे असं कळलय. आमच्या अपेक्षांमधे तुमचा मुलगा बसतोय. पिताश्री (आमरिश पुरींचे वटारलेले डोळे करुन अस्सल सानुनासिक स्वरामधे) : कोणी सांगीतलं आपल्याला? वधुबंधु वर्तक (बहुतेक चपापलेल्या आवाजात) : अहो, अमुक अमुल वेबसाईटवरुन माहिती मिळाली म्हणुन फोन केलाय. पिताश्री : आमचा बैल आत्ता हाप पँटीतुन फुल पँटीत आलाय. बालविवाह मान्य असेल तर भेटु. तुम्हाला चुकीची माहिती मिळालिये हो. आत्ताशिक कार्टं कॉलेजात जायला लागलाय. फोन कट केल्यावर नंतर भलं मोठ रामायण घडलय. अस्सल को.ब्रां.ची जीभ किती तिरकी वळु शकते त्याचा ह्याची देही अनुभव घेतलाय. अकाऊंट डी-अ‍ॅक्टीव्हेट करेपर्यंत अजुन ३-४ फोन येउन गेले वेगवेगळे. शिवाय हे नक्की कसं झालं ते ऑलमोस्ट ६-७ महिन्यानी समजलं. =))

In reply to by Pradip kale

एस 07/11/2014 - 00:02
मी तर मोबाईलवरून आक्ख्या लेखांचे मुद्रितशोधन करतो! ;-) सोप्पंय मोबाईलवरून मिपावर मराठी टंकन करणं. इथेच उजवीकडे मदत आहे की. http://www.misalpav.com/node/1312 प्रयत्न करा.

परवा मॉल मध्ये गेलो होतो तर बायका आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन आत सोडत होते.. मी बायकांच्या लाईन मधुन पुढे आले आणि शेजारुन नवरा पुरुषांच्या लाइन मधुन.. मी पुढे येऊन गडबडीने नवर्‍याचा हात धरायला गेलेच की तो हात एकदम दचकला... तिरप्या नजरेतुन पाहीलं.. मागे नवरा दिसला आणि मी जो हात पकडायला निघाले होते त्याचा मुळ मालक हात छातीशी घेऊन घाबरुन माझ्याकडे पहात होता... नवरा भयानक पेटला होता हे वेगळं सांगायला नको!!! बरं ह्यातुन काही बोध घेऊन जरा ताळ्यावर राहुन जगात वावरावं ना... २ च दिवसानी ऑफिसमध्ये तरातरा वॉशरुम मध्ये घुसले.. समोर एक पुरुष बेसीनसमोर गोठुन आरशातुन माझ्याकडे पहात होता.. "सॉरी..सॉरी.." म्हणत धुम ठोकली... (ह्यात टेक्निकली माझी चुक नव्हती.. आमच्या नव्या हापिसात सगळे फ्लोअर्स अगदी डिट्टो सेम आहेत.. पण स्त्री-पुरुषांचे वॉशरुम मात्र आलटुन पालटुन डावीकडे - उजवीकडे आहेत..हे मला माहित नव्हतं.. मी माझ्या फ्लोअरच्या सवयीने डावीकडे घुसले..!! )

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 07/11/2014 - 15:48
हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड माझ्या हातूनही होत असे. लेडीजसाठी डच शब्द आहे dames आणि जेंटलमेनसाठी शब्द आहे heren. चिन्हं असतील तर प्रॉब्लेम नसायचा. पण नुसते शब्द लिहिलेले असतील तर गोंधळ - dames हा शब्दही स्त्री-निदर्शक (उदा. Dame Judy Dench) आणि heren ही (his and her मधलं her). मग काय, देवाचं नाव घेऊन घुसायचं कुठेतरी!

In reply to by आदूबाळ

शिद 07/11/2014 - 18:57
स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे. 'herr' म्हणजे 'Mr'. सुरुवातीला कळायचंच नाही. कोणी दुसरा माणूस ज्या दरवाजानं जात असेल तर त्याच्या मागोमाग जायचं, असं करावं लागे.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 07/11/2014 - 18:51
हा हा हा. डोळ्यासमोर पिराने दुसर्‍या मनुक्षाचा हात धरलाय हे दृष्य आलं आणि फिस्सकन हसले. वॉशरूम बाबत मी अजूनतरी असे काही केले नाहीये पण मुलगा साधारण मोठा झाल्यावर माझ्याबरोबर मॉलमध्ये महिलांच्या रेस्टरुमला येत नसे. त्याचे त्याला पुरुष विभागाकडे जायचे असे. बरे, आपले काम उरकून यावे तर तसे नाही. उगीच याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ असे करत वेळ काढत असे, तर कधी खरेच गर्दी असे. नवरा बरोबर नसला तर पंचाईत! मी वाट बघून नको नको ते सगळे विचार, काळज्या करून झाल्यावर एकदा बाहेरूनच जोरजोरात हाक मारू लागले. सुदैवाने सगळे बाप्ये समजूतदार होते. कोणी हरकत घेतली नाही.

पिशी अबोली 10/11/2014 - 21:26
मी आजच चांगली फजिती करून घेतलीये. माझं डेटा पॅक संपत आलं होतं हे मला माहीत होतं. पण काल रात्री तर डेटा चांगलाच शिल्लक होता आणि सकाळपासून मात्र मेन बॅलन्स मधून पैसे जात होते. मी नेहमीप्रमाणे चिडले, आयडियाला शिव्या घातल्या, आणि संध्याकाळी फुल भांडायच्या इराद्याने कस्टमर केअर ला फोन लावला. कधी नव्हे तो कुणीतरी नीट बोलता येणारा माणूस होता. त्याने मागचा रिचार्ज वगैरे माहिती नीट शोधून काढली. वॅलिडिटी सांगताना तो म्हणाला, 'आज १० तारीख आहे'. मी अगदी तोर्‍यात उत्तर दिलं-'आज ९ तारीख आहे, आणि माझी डेटा वॅलिडिटी ९ तारखेपर्यंत होती हे मला चांगलंच माहीत आहे.' तो शांतपणे म्हणाला, 'आज १० तारीख आहे मॅम'. मग माझ्या लक्षात आलं, आज खरोखरच १० तारीख आहे.. ;) त्याला कितीतरी वेळा सॉरी म्हणून मी फोन ठेवला.. आता 'काय काय नमुने फोन करतात' असं तो सगळ्यांना सांगत असेल.. =))

नारदाचार्य 08/04/2008 - 17:50
धमाल्याच्या स्टाईलमधली काही फजिती वाचायला मिळेल म्हणून आलो आणि फजिती झाली.

In reply to by नारदाचार्य

धमाल मुलगा 08/04/2008 - 18:28
नारदाचार्य, आम्ही सतत ग॑डतच असतो. मी वरचा किस्सा केवळ सुरुवात म्हणून दिलाय. जरा इतरा॑चे झालेले पोपट कळूदे, मग आम्ही पण आमचा झालेला सप्तर॑गी पोपट सा॑गतो की :-))) घ्या तिच्याआयला, मोठ्या हौसेन॑ धागा चालू केला आणि पहिलीच प्रतिक्रिया आमच्या बोका॑डी बसणारी आली...घ्या आमची अजुन एक फजिती !! :-)))) बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-)) - (ग॑डलेला) ध मा ल.

नारदाचार्य 08/04/2008 - 17:58
वाटलं होतं, धमाल्या आता छान माप काढेल. त्याऐवजी त्यानं,
बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-))
असं लिहून पुन्हा गंडवलं. मानलं रे. तुझ्याच भाषेत सांगायचं तर फुटलो...

विजुभाऊ 08/04/2008 - 18:20
मी आणि माझे ३ चुलत असे चौघे भाऊ सांगलीला निघलो होतो. वाटेत एक शेतकरी गाडीत माक्याची कणसे भरताना दिसला. आम्ही आमची गाडी थांबवली.षेतकरी दादाला काही कणसे देता का अशी विचारणा केली. त्या शेतकर्‍याने चांगली पोतेभरुन कणसे आमच्या गाडीत टाकली. माझ्या भावाने त्या शेतकर्‍याला कणासाचे पैसे किती म्हणुन विचारले....शेतकरी दादा पैसे घ्यायला नको म्हणाले... मी त्याना मोठ्या उदार पणे म्हंटले की पैसे घ्याना तुमचे नुकसान का करुन घेताय.. शेतकरी त्यावर सहज म्हणाला "काय राव उगाच नुकसानाचं बोलताय्..त्यात नुकसान कसलं..ते तुमच्या पोटात तरी जाइल अहो डुकरं ईतके नुकसान करतात्.....चार डुकरे जास्त लागली म्हणुन समजू..... आम्ही एकमेकांकडे पाहीले........एकुण चौघेजण होतो ना......... .......एक (गाढव ) रान डुक्कर ठरलेला विजुभाऊ

प्राजु 08/04/2008 - 19:42
११वीत असताना, बाबांनी मला स्कूटी घेऊन दिली. थाटात ती स्कूटी घेऊन मी निघाले होते. कॉलेज जवळ एका मैत्रिणीच्या बाबांचे ऑफिस होते. तिथे ती मैत्रिण थांबत असे. तिथुन तिला घेऊन कॉलेजला जाणे हा नित्याचा क्रम. अशिच एकेदिवशी ऑफिसच्या खाली जाऊन, तिथून तिला जोरात हाक मारली. तिने बाल्कनीतून ५ मिन्टे थांब असे सांगितले. मी तशीच स्कूटिवर बसून रहिले होते... इतक्यात...गुडघ्यापर्यंत नऊवारी साडी नेसलेली म्हातरी बाई आली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती कसली तरी. ती एका हाताने सावरत ती माझ्या जवळ आली. काही काळ मला नुसतीच बघत उभी राहिली. मी लक्ष दिले नाही. मग ती जवळ आली, म्हणाली, " दुरड्या पोचल्यात की ग तिकडं.." मी पुन्हा दुर्लक्ष केलं... ती : पोरी, अगं दुरड्या पोच्ल्यात की थितं.... मी :( निर्विकार पणे) पोचूदेत कि मग, मी काय करू? ती : समदी जमली हायेत तिथं.. आन् तू हितचं... मला आता थोडासा राग आला. मी : तुमच्या त्या दुरड्या म्हणजे काय मला माहिती नाही आणि तुम्हीही जावा जिथं सगळी जमली आहेत तिथं.. ती : (प्रेमाने) असं करू नये पोरी, चल माज्या संगट चल.. मी न्हेते तुला.. माझ्या रागाचा पारा चढायला लागला. तरिही जास्तीत जास्त संयमाने मी तिला म्हणाले.. "बाई, हे बघा.. तुम्ही निघा आता.. मलाही कामं आहेत.." इतक्यात माझी मैत्रिण खाली आली . ती बाई : " म्या तुजं काय बी ऐकनार नाही, तुला घेउनच जानार आहे...." असं म्हणत माझा हात धरला तिने.. मी आता एकदमच भडकले.. मी : ओ बाई, सोडा ना... काय हा मुर्खपणा आहे..? माझी मैत्रिणही तिला ओरडू लागली. ती बाई : मला माहित हाय.. लग्नाच्या मांडवातून तू पळून आली हायेस्...म्या तुला घेऊनच जानार.. तिचं हे वाक्य ऐकून मी ब्लास्ट का काय म्हणतात तेच झाले.. "ओ बाई... उगिच काहीही बडबडू नका... जावा बरं.. .." आणखी काही बोलणार इतक्यात त्या बिल्डिंग मधले एक दुकानदार अमचा गोंधळ ऐकून बाहेर आले.. आणि त्यांनी त्या बाईला हाकलून लावले. मला म्हणाले.. त्या बाईच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला असावा. आम्ही तिथून निघालो..पण राग मात्र शांत झाला नव्हता माझा. हळू हळू शांत झाला. कॉलेज मध्ये येईपर्यंत दोघीही एकमेकीशी काहिच बोललो नाही.... कॉलेज मध्ये स्कूटी पार्क करताना मी नी मैत्रिणीने एकमेकीकडे बघितले आणि दोघिना एकदमच जोरात हसू आले...झालेल्या प्रकारचे. (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री 08/04/2008 - 23:58
माझ्या लग्नाच्या ३-४ दिवस आधीची गोष्ट.. (होणारा) नवरा अगदी आयत्यावेळेलाच लग्नाला आल्यामुळे त्याच सगळं शॉपिंग बाकी होतं.. मग आम्ही आमच्या घराजवळच्या जयहींदमधे गेलो.. २ शेरवानी आवडल्या.. पण आई-बाबा नव्हते बरोबर, म्हणून संध्याकाळी त्यांना बरोबर घेऊन शॉपिंग उरकून टाकावी असा विचार केला.. पण एक शेरवानी बुक करून ठेवावी म्हणून आम्ही काऊंटरपाशी आलो.. नवर्याने ५०० रू. देऊन शेरवानी बुक करून काउंटरपाशी ठेवली आणि निघाला... तेवढ्यात मी माझं अती-बावळट डोकं चालवलं, आणि त्या माणसाला म्हणाले "अहो, शेरवानी द्या की.. तिथे कुठे ठेवताय!! " :)))) आणि नवर्‍याकडे असं पाहीलं जसं काही तो पण विसरत होता आणि मी किती हुशार!! (४-५ हजारांची शेरवानी कुणी ५०० ला देईल का अशी!! ) तिकडे नवर्‍याला , आता हात जोडू की पाया पडू असं झालं होतं... तेवढ्यात मला माझा यडपटपणा कळला..आणि हसत आम्ही निघालो ! काउंटर वरच्या माणसाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता!! :)

चतुरंग 09/04/2008 - 00:31
त्यावेळी बहुदा माझे अभियांत्रिकीचे तिसरे वर्ष होते. मी मावशीकडे रहात होतो. एरवी बसने जात असलो तरी परीक्षेच्या काळात वेळ वाचावा म्हणून मी काकांची जुनी स्कूटर घेऊन जात असे. त्याप्रमाणे मी आणि माझा वर्गमित्र स्कूटवरुन परीक्षेला चाललेलो. नेहेमीप्रमाणेच अभ्यास 'नीट' झालेला असल्यामुळे, तो मागे बसून मोठ्याने नोट्स वाचत होता आणि मी गाडी चालवत ऐकत होतो! जून महिन्यातला पहिलाच आठवडा होता. पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या होत्या. रस्ते किंचित ओलसरच होते. आमच्या कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्याला दोन - तीन अतीशय झोकदार वळणे होती. त्यातल्याच एका वळणावर आमची गाडी पोचली. तिथे बहुदा ऑइल सांडलेले होते, त्यावर पावसाचे पाणी, मग काय विचारता एकदम ऑईल-स्केटिंगच! आमची गाडी अलगद घसरली, स्पीड अत्यंत कमी होता कारण लक्ष नोट्स ऐकण्याकडे होते, हलकेच घसरलेल्या स्कूटरवरुन मी बुद्कन खाली रस्त्यावर कधी आलो ते मलाच समजले नाही. त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. मी पोट धरुन रस्त्यावर पडल्या पडल्याच हसत होतो आणी पलीकडे माझा मित्र हसत होता! (नंतर नीट बघितले तेव्हा स्कूटरचे मागचे टायर पूर्ण गोटा होते असे दिसले;)) अजूनही आम्ही भेटलो की त्या आठवणीवरुन घसरतोच! चतुरंग

प्राजु 09/04/2008 - 00:38
त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. अहो तुम्हीच काय.. हे वाचून मी सुद्धा पोट धरून हसले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 09/04/2008 - 10:07
शाळेतल्या दिवसांनमधील गोष्ट आहे, बहुतेक मी ८ वी मधे होतो, वार्षिक परि़क्षेचे वेळापत्रक एका नोटिस बोर्ड वर लावले होते. ते लिहुन घेण्यासाठी मुलांची गर्दी जमा झाली होती.मी सुद्धा त्या गर्दी मधे उभा राहुन वेळापत्रक लिहुन घेतले. सरते शेवटी परिक्षेचा दिवस उजाडला, एक एक पेपर होत गेले आणि आता फक्त २/३ पेपरच बाकी होते. इतिहासाच्या पेपर ची माझी पूर्ण तयारी झाली होती आणि आज तो पेपर होता,मी वर्गात जाऊन बसलो आणि परिक्षक पेपर वाटण्याची वाट पाहु लागलो..... शेवटी पेपर माझ्या हाती लागला आणि तो मी आधी पुर्ण वाचुन मग सोडवण्यास घेणार होतो,,,,,पण हे काय?इतिहासाच्या जागी भुगोलाचा पेपर? मला तर काहीच कळेनाच मी माझ्या पुढील मुलास विचारले काय रे आज इतिहासाचा पेपर आहे ना? तो म्हणाला नाही भुगोलाचा.....(याचा अर्थ इतिहासाचा पेपेर दोन दिवसानंतर आहे.) एका क्षणात माझ्या लक्षात आले गर्दी मधे उभे राहुन वेळापत्रक लिहुन घेण्यात माझ्या कडुन एक छोटी चुक झाली होती,,,,,,(छोटी?) त्या क्षणी वर्गातली सगळी बाकडी माझ्या भोवती गरागरा फिरतायत असे वाटायला लागले,इतिहासातील अतिरथी महारथी जाऊन आता बिनमोसमी वादळी वारे वाहायला लागले होते..... शेवटी मी माझ्या डोक्यातील होकायंत्राप्रमाणे भरकटलेल्या विचारांना आवरायचे ठरवले..... आणि पेपर लिहावयास घेतला,,,,, मी फक्त लिहीत गेलो..... निकालाचा दिवस उजाडला:----- मला इतिहासापेक्षा भुगोलात जास्त मार्क मिळाले होते!!!!! ( धमालजी आपला मि.पा वरील छोटा मदन दा) मदनबाण

In reply to by मदनबाण

अगदी अशीच फजिती माझी बी.कॉम्. ला झाली. स्टॅटीस्टीक्सच्या पेपरला मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करून गेलो होतो. हातात पेपर आला आणि मेंदूत काळोख पसरला....... अर्धातास आढ्याकडे नजर लावून बसल्यावर स्टॅटचे एक- एक फॉर्म्युले आठवायला लागले. वर्ष फुकट गेले नाही. नशीब.

In reply to by प्रभाकर पेठकर

लंबूटांग 13/04/2008 - 22:24
७वी च्या स्कॉलरशिप च्या परिक्षेच्या वेळेस बुद्धिमत्ता चाचणी चा पेपर समजून आत गेलो. सर्व पेपर सोडवून संपत आला आणि शेवटी ग्राफ बघितल्यावर शंका आली बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपर मधे ग्राफ्स कसे आणि तेव्हा पेटली की हा गणिताचा पेपर आहे. आणि सगळ्यात जास्ती मार्क्स गणितातच मिळाले.

In reply to by मदनबाण

नीलकांत 15/04/2008 - 18:12
अंतीम वर्षाच्या परिक्षेच्यावेळी असाच अनुभव गाठीशी आहे. माझ्या जवळ वेगळी पुस्तके आणि इतरांजवळ इतर, आता परिक्षेच्या वेळी पुस्तके म्हणजे... अहो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढतो. ( सुरुवात कधी करतो ते विचारू नका) पण पेपर छान गेला व निकाल सुध्दा उत्तम. नीलकांत

भाग्यश्री 09/04/2008 - 10:19
ही फजिती नाही म्हणता येणार.. नवर्‍याचा आगाऊपणा म्हणा.. किंवा शिक्षकांची फजिती!! :) तो शाळेत असताना त्याने पेपर मधे असंख्य तारे तोडलेत.. त्यातले १-२.. म्हणी पूर्ण करा असा प्रश्न होता.. बळी तो ----- आणि याने लिहीलं, "बळी तो राजाचा माळी !" आणि इंग्रजी च्या पेपर मधे काहीतरी गोपाल आणि सीता वर ४-५ ओळी दिल्या होत्या, आणि खाली प्रश्न होता.. who is gopal ? his answer was.... gopal is seeta !! :D मला त्या शिक्षकांचे एक्स्प्रेशन्स पाहायला आवडलं असतं!! :))

आनंदयात्री 09/04/2008 - 10:40
सगळ्यात मोठी फजिती काही डिश्टींग्युइश करता येत नाय भो, दर २-४ दिवसाला आमचा कुठे न कुठे पोपट होतच असतो. आत्ता काल परवाचीच गोष्ट हाय, आम्ही गेल्तु पोरगी पहायला, पहायला म्हणजे तिला हाटेलित भेटायला हो. मोठ्या श्टायलीत मोठ्ठ्या मोठ्ठ्या आर्डरी सोडल्या अन जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की पाकिट आम्ही हापिसातल्या आमच्या कप्प्यातच विसरलो. अस्सा गोरामोरा झालो मी ! माझे खर्रकन उतरलेले तोंड पाहुन हुशार पोरगी काय समजायचे ते समजली अन पैसे देउन मोकळी झाली !

मनस्वी 09/04/2008 - 16:10
शनिवार, वेळ अंदाजे सकाळचे ११-१२. मी आणि माझी मैत्रीण एन् सी सी ची परेड संपून स्कूटीवरून सुसाट घरी चाललो होतो. मी चालवत होते आणि मैत्रिण मागे. आमच्या समोरची रिक्षा तुफान वेगात होती आणि आमची स्कूटीपण त्याच वेगात.. काही सेकंदात अचानक रिक्षेने डावीकडे टर्न घेतला...... आणि आम्ही झूपकन समोरच्या उंच डिव्हायडरच्या वर! गाडीला खाडकन ब्रेक लावला.. त्या उंच डिव्हायडरवर ती स्कूटी आणि स्कूटीवर आम्ही दोघी ते पण एन् सी सी च्या ड्रेसमध्ये असे दृष्य. काही सेकंदातच काय झाले ते लक्षात आले. तेवढ्यात शेजारील मोटारसायकलवरचे २ तरुण आले.. त्यांनी आमची गाडी खाली काढून दिली आणि आम्ही तिथून धूम ठोकली :) आणि घरी आल्यावर जे हसत सुटलो...

वरदा 09/04/2008 - 19:12
मज्जा आली वाचून... मी इथे अमेरीकेत आल्यावर पहिल्यांदा बर्फ साफ करायला घेतला.. नवरा सांगत होता नको जाऊस तरी म्हटलं मी जाऊन दुसरं शॉवेल आणते...आणि बोलत बोलत चाल्ले होते... नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:))) असली भयंकर आपटले साष्टांग नमस्कार घातला आणि नेमकी शेजारची बाई तेव्हा बर्फाचे फोटो काढत होती तिच्या कॅमेराने अगदी बरोब्बर माझाच फोटो काढला...सगळ्या बिल्डींगला करमणूक झाली...मी शेकली गेले त्याचं काय :))))))

In reply to by वरदा

लंबूटांग 13/04/2008 - 22:27
नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:)))
हा हा हा..

शितल 09/04/2008 - 22:24
माझी फजीती हे सदर छान आहे. मला ही फजीती आठवते पण दुसर्‍याची पाहिलेली.

अनिकेत 09/04/2008 - 23:03
अगदी २ दिवसापूर्वीची गोष्ट... मी सध्या दिल्लीला आलो आहे. २ दिवसांपूर्वी कनॉट प्लेस मधे एका जुना लूक असलेल्या रेस्टॉरंटात गेलो.. तिथल्या आगाऊ वेटरने मला वय विचारले...मी म्हटले २४... त्याने मला पाटी दाखवली...दारू २५ च्या वरच्यांना देणार......असला पोपट झालाय... असला कसला कायदा दिल्लीत? मुंबई/केरळात असे नसते हो..... :( अनिकेत ता.क.: काल मी वय २६ सांगितले.... :)

देवदत्त 09/04/2008 - 23:12
छान मजा चालली आहे एकमेकांच्या फजित्या वाचत ;) चालू द्या... जमल्यास (काही असल्यास) मीही लिहिन.

शितल 13/04/2008 - 03:59
आम्ही ५ ते ६ मैत्रिणी बसने कॉलेजला जात असु, इ॑जिनिअरि॑गची ही मुले बसला असायची, बसला गर्दी असल्यामुळे कधी कधीच बसायला जागा मिळे, एके दिवशी एकदम पुढे जागा मिळाली, मी व माझी मैत्रिण बसलो, आमच्या समोरच्या सीट (ड्रायव्हरच्या पाठी मागच्या बाजुला असलेली) मुले बसली होती, समोर मुले असल्यामुळे आम्ही दोघी ही खिड्कीतुन बाहेर पहात होतो, इतक्यात जोराच ब्रेक लागला, आणि आम्ही समोरच्या॑चा अ॑गावर कोसळ्लो, आणि बसची सीट उचकुन आमच्या पाठीवर पडली, उभे असलेल्या काही मुला॑नी मग बसची सीट उचलली, मग आम्ही दोघी उभे राहिलो, समोर पाहतो ते काय, आम्ही ज्या॑च्या अ॑गावर कोसळ्लो त्या पैकी एका मुला॑ने डोळे ब॑द केलेले, एक ओशाळ्लेला आणि एक हसत, उभ्या असलेल्या मैत्रिणी आणि सीन पाहिलेले हसत होते, आमच्या ओठी हसु, पडल्यामुळे लाज, आणि पाठीला लागल्यामुळे डोळ्यातुन पाणी. मग, उभे असलेल्या २ मुला॑नी बसची सीट पाठुन हाता॑नी धरली, आणि समोर बसलेल्या॑नी पायानी आणि आमचा प्रवास चालु. न॑तर ८ दिवस बसमध्ये बसायला जागा मिळाली की बसची सीट उचकते का ते पाहुनच बसत होतो.

(सन २००३) आम्ही सगळे विद्यार्थीमित्र पुण्यातच दुसर्‍या कॉलेजमध्ये एक व्याख्यान ऐकण्यास आलो होतो. ग्रूपमधल्या एकाचे नुकतेच लग्न ठरले होते व त्याची वाग्दत्त वधू त्याला मोबाईलवर दर तासाला एक फोन करीत असे. व्याख्यान सुरू होऊन दीड तास झाला तरी त्याला तिचा फोन काही आला नाही (त्याचे लक्ष तिथेच होते) म्हणून तो अस्वस्थ होता. शेवटी व्याख्यान स॑पल्यावर ऑडिटोरीयममधले दिवे लागल्यावर त्याने खिशातून मोबाईल काढला.. बघतो तो त्याने मोबाईल समजून टिव्हीचा रिमोटच बरोबर आणला होता..!! तो एकदम खजील झाला आणि 'तिच्या' रोषाच्या भीतीने घरी पळत सुटला..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

वैभव 28/05/2008 - 18:22
अरे घराजवल्ल एक चोरी झाली........ चोराने CD Player चोरून नेला. घरात काकु चोराला लाखोली वाहत होती. काकुला म्ह्ट्ले "झाले ते झाले ......काय दु:ख करत बसलाय" काकु ने म्ह्ट्ले "कप्पाळ माझे...........चोराने सोबत T.V चे रिमोट नेले" ग्राऊन्ड वर आमची हसुन हसुन पुरेवाट झाली.

मी दुसरीत असतानाची ही गोष्ट. नुकताच कांजिण्यांच्या आजारातून उठलो होतो. महिनाभर शाळा चुकल्याने घरच्यांनी झालेला अभ्यास भरुन काढायला जवळच एका क्लासला नाव घातले होते. कांजिण्यांच्या फोडांचे वण पुर्णपणे जाण्यासाठी सारखे औषध लावावे लागत असल्याने स्वारी उघडीच पुर्ण घरभर फिरत असायची. त्या दिवशी दुपारी क्लास होता.घरी बाबा थांबणार होते.आई बाहेर गेली होती.पटकन आवरुन मी क्लासला जायला निघालो. साधारण निम्मे अंतर गेलो असेन. समोरुन एक मुलगी आली आणि माझ्याकडे बघुन खुदकन हसली. मला काही तरी विचित्र वाटले. मनात विचार आला...बहुतेक पँटची चेन लावायची राहिली....म्हणुन खाली बघतो तर काय...मी खाली पँटच घातली नव्हती....म्हणजे अंडर्वेअर घालुन मी क्लासला जायला निघालो होतो....तसाच पळत पळत मी परत घरी आलो.. दार उघडताच बाबांना कळुन चुकले..मी कसा पॅंट न घालता क्लासला गेलो होतो..ते पण मला बघुन हसायला लागले...शेवटी पॅंट घालुन परत व्यवस्थितपणे क्लासला गेलो...

धमाल मुलगा 15/04/2008 - 17:37
गेल्या रविवारी, एका मित्राचं 'गुपचुप शुभमंगल' उरकून घरी आलो. उन्हामुळे पार वेड लागायची वेळ आली होती...जरा पंखा चालू करुन बहिणाबाईंशी गप्पा मारत बसलो, हातात घराची किल्ली होती, तिच्याशी चाळा चालू होता. एक दहा मिनिटांत भगिनीदेवी मैत्रिणीकडे गेल्या. म्हणलं चला जरा खाली जाऊन मस्त कोकम सरबत घेऊ, आणि परत येऊन देऊ ताणून... कसलं काय? घराची किल्लीच सापडायला तयार नाही. आख्खं घर पालथं घातलं...नो किल्ली सापडिंग ! म्हणलं च्यायला, ही काय भुताटकी आहे? शेजारच्या काकूंचं दार वाजवलं, भर शनवारातल्या इमारतीतलं शेजारच्या घराचं दार वाजवायचं तेही टळटळीत दुपारी...आणि रविवारच्या म्हणजे.... तरीही हिम्मत करुन दार वाजवलं. अपेक्षेप्रमाणे झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा पुढे आला. म्हणालो, "काकू, माझी घराची किल्ली सापडत नाहीय्ये! तुमच्याकडे ठेवलेली स्पेअर किल्ली देता का जरा?" तर ह्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक काकू माझ्याकडे बघून फिस्सकन हसल्या...आणि मग फिदीफिदी...खुदुखुदु...शेवटी खो खो हसायला लागल्या. म्हणलं 'बाई गंडली बहुतेक. दुपारचं जागरण सोसवलं नसेल'............. तर ह्या आमच्या काकूंनी माझ्या कानाशी हात नेला, आणि मी खेळता-खेळता कानावर अडकवलेली किल्ली काढून हातात दिली. .......आणि संध्याकाळपर्यंत आख्ख्या सोसायटीत ही बातमी 'सबसे तेज' पोहोचवली.आता मला येता जाता कानकोंड्यासारखं होतं ना राव...जो उठतो तो चेष्टा करतो :-(

In reply to by धमाल मुलगा

नंदन 16/04/2008 - 00:12
झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा -- वा! भडकमकर क्लासेसच्या नाट्यसमीक्षकी भाषेत बोलायचे तर चित्रदर्शी आणि चपखल शब्दयोजना :) बाकी कानाला किल्ली लावल्याने 'कान'कोंड्यासारखं होणं, हेही बेष्ट धमुराव :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धमाल मुलगा 16/04/2008 - 13:41
थ्यांक्यू थ्यांक्यू हां ! हेही बेष्ट धमुराव :) धमु नका ना म्हणू...असं म्हणून कळवळलो !!!! :-) आपला, (कळवळ्या) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 16/04/2008 - 13:50
आंटी मत कहो ना च्या श्टाईल मधे धम्या "धमु नका ना म्हणू" असे म्हणतांना डोळ्यासमोर आला ! (आंटी वरुन काहीही गैरसमज नसावा, सदरहु आंटी ही "हम पांच" या मालिकेतली खरीखरी आंटी (काकु या अर्थाने) आहे.)

वरदा 15/04/2008 - 20:11
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?

In reply to by वरदा

धमाल मुलगा 16/04/2008 - 13:44
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?
ह्या: खुंटी समजलो असतो तर सदरा, पायजमा नसता का टांगला? आयला, बरं झालो खुंटी नाही समजलो....कानाला पायजमा टांगून शेजारच्या काकूंचं दार वाजवायला गेलो असतो तर? बरं दिसतं का ते? - (मती 'खुंट'लेला ) ध मा ल.

माझ्या दादाने पहीलीला शाळेत पेपरात लिहीले होते प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी प्र. वाक्यातील कर्ता व कर्म यांचे स्त्रिलिंगी रुप करून योग्य क्रियापद वापरा. वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' खीखीखी.... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा 16/04/2008 - 13:48
प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी !
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली'
आता काय बोलायचं ह्याच्यावर? एकच प्रतिक्रिया चपखल बसतेय...खीखीखी....खुखुखु...खोखोखो....ख्याख्याख्या...

In reply to by धमाल मुलगा

भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी ! परांजपे??

वरदा 17/04/2008 - 01:15
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' झक्कासच..प्रतिक्रीया सुचतच नाही..... मती 'खुंट'लेला ध मा ल माझीच खुंटली आता मती....:))))))

वरदा 17/04/2008 - 01:21
लिहिलेला निबंध...विषय दिवाळी.. मला दिवाळी खूप आवडते कारण शाळेला सुट्टी असते. दिवाळीत आम्हा लहान मुलांची मजा असते. आई बाबा मला नवीन कपडे आणतात. फटाकेही आणतात. आम्ही घरी चकल्या, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे बनवतो. आकाशकंदील लावतो. किल्ला बनवतो. रांगोळी काढतो. मला ह्या वर्षीची दिवाळी आवडली. मी नविन कपडे घातले. मी चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि अनारसे खाल्ले. मी आकाशकंदील लावला. मी किल्ला बनवला. मी रांगोळी काढली. मला दिवाळी आवडली. सगळ्या वर्गात अशी लाज काढली होती बाईंनी, अगं वर्तमान आणि भूतकाळातले दोन पॅरा लिहून निबंध होत नाही म्हणून...

वेदश्री 27/04/2008 - 21:18
४थीमध्ये होते तेव्हाची गोष्ट. इतिहासाच्या करकरेबाई इत्तक्या वेगाने वर्गपाठासाठीचे प्रश्न सांगायच्या की त्या वेगाने लिहायला मला जमायचेच नाही.. इतरांचे माहिती नाही काय करायचे ते. सुरूवात केली तेव्हा मी तिसरा प्रश्न सांगून संपायची वेळ आली तेव्हा पहिला प्रश्न लिहून संपवला होता.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सांगा असं ओरडले मी. बाईंनी त्रासिक नजरेने माझ्याकडे पाहिले.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सुरू झाली राजधानी एक्प्रेस. :( २-३दा मी परतपरत सांगायला सांगितले आणि बाईंनी पाठीत धपाटा घालून पटापट लिही सांगितले. मला रागच आला. मग कानावर पडेल तो शब्द मी शॉर्टकट करायला सुरूवात केली.. शिवाजीमहाराजांचा जन्म कधी झाला? असे त्या म्हणाल्या की मी शिमचाजकझा? असे लिहून काढत गेले.. वेग मॅच होत होता. मी स्वतःच्या हुशारीवर खुश झाले. बाईंनी १००+ प्रश्न सांगितले होते ( प्रत्येक वाक्यावर त्यांनी एक प्रश्न बनवला होता जेणेकरून अख्खा धडा वाचून होईल म्हणे ! ) आणि उद्या उत्तरे लिहून आणा म्हणाल्या ! घरी गेल्यावर प्रश्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न करायला लागले तर त्या शब्दजंजाळाचा अर्थ लागेल तर शप्पथ ! उद्या वर्गात वाट लागणार या विचाराने मी तोंड उतरवून बसले होते तर आई आली म्हणे की कोणत्या प्रश्नाला अडली आहेस? मी सांगते उत्तर.. आणि मी म्हणाले की.. शिमचाजकझा?!!! ~~~~ गोसावीबाई मराठी शिकवायला होत्या ३रीला. एकदा त्यांनी एक कविता पाठ करून यायला सांगितली होती, पाठ करून गेले होते. ती कविता वहीत लिहून काढ आणि आण तपासायला २० मिनिटात म्हणाल्या. मी १० मिनिटात लिहून काढली आणि नेली वही तपासायला.. बाईंनी माझ्याकडे रागाने पाहिले, पाठीत धपाटा घातला. हकनाक अन्याय सहन करणे रक्तातच नाही माझ्या.. माझा सरळ सवाल - का मारलं मला? काय चुकलंय कवितेत? एक्कत्तरी शुद्धलेखनाची चूक आहे का? की शब्द चुकलेत सांगा. यावर बाई म्हणाल्या की - मी तुला कविता लिहायला सांगितली होती, धडा नाही. कवितेसारखी लिहून आण ! ~~~~ काळजात ( कॉलेजमध्ये ) असताना एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअरींगच्या क्लासटेस्टच्या वेळी मला पाठांतरातला एक शब्द आठवायला तयार नाही. पाठांतरात माझा बेडा नेहमीच गर्क असल्याने मी एक युक्ती केली होती.. प्रत्येक प्रश्न त्याच्या उत्तरासकट एका चित्रपटगीताशी लिंक केला होता. ते गाणे लावून बसून मी ते उत्तर पाठ करायचे. गाणे आणि उत्तर दोन्ही सायमल्टेनिअसली पाठ व्हायचे.. वांदा असायचा ते गाणे योग्यवेळी सुचण्याचा ! क्लासटेस्टच्या दिवशी नेमके सकाळी मी - जब कोई बात बिगड जाए - गाणे ऐकलेले रेडिओवर आणि तेच माझ्या तोंडून सारखे गुणगुणले जात होते. दुसरे गाणे आठवेल तर शप्पथ ! त्याचेच लिरिक्स लिहून काढले मी उत्तरपत्रिकेत शेवटी आणि माझा त्या टेस्टमध्ये हायेस्ट होता वर्गात !

चला माझी ओळख माझ्या फजितीने करून देतो मी कॉलेजात असतानाचा हा माझा धावण्याचा (रनिन्ग चा व्यायाम) किस्सा १ नुकतीच व्यायामशाळा जॉईन केली होती. तिथे लंगोट वापरण कंपल्सरी होत. त्याच महत्व मनावर ठसवल्याने मग मी धावतानाही तोच वापरला. एकदा रस्त्यावरून धावताना अचानक खुप हलक हलक वाटू लागल. आणि.... इथे माझा तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम

चतुरंग 22/05/2008 - 17:39
हाप प्यांटित व्हता का फुलप्यांटित? न्हाई म्हनजे हाप आसल तर लोकांना माग पिसारा सुटल्यावानि देखनं दिसनार आनि फुल आसल तर बावचळल्यावानि येडंवाकडं पळत सुटनार, म्हनून इच्चारलं! ;) चतुरंग

ऋचा 22/05/2008 - 18:08
एकदा मी आणि माझा मित्र रार्ती क्लास करुन घरी येत होतो. ह्कुप अंधार होता आणि वीज गायब होती. रस्त्यावरचे दीवे नेहमीप्रमाणे बंद. आम्ही जोरात बोलत येत होतो कारण कोणीच नव्हत रस्त्यावर आणि अचानक मित्राचा आवाज येईना मी जाम टरकले... :S रस्त्यावर कोणी नाही आणि ह्याचा आवाज अचानक बंद. मग त्याने एकदम हाक मारली मला (आधी बर वाटल चला तो आहे) पण कुठेच चाहुल लागेना.. आणि गेलेले दीवे एकदम आले. आणि माझी हसुन ह्सुन वाट लागली. माझा मित्र १ म्हशीवरुन पडला आणि तो बोलत नव्हता कारण त्याला कळलं नाही की तो पडला कसा? =)) आणि ती म्हैस शांतपणे त्याच्याकडे पाहुन दात विचकत रवंथ करत होती. आम्ही जाम हसत घरी हे कारण आम्हाला पुढे खुप दीवस पुरलं हसण्यासठी.

तर अता दुसरा किस्सा साधारण ९२ सालातली गोष्ट इयत्ता १२ वी त गेलो होतो. मी आमच्या कल्याणातल्या जेल जवळ सकाळी धावायला जायचो. अर्थात जेल ही त्या काळी गावाबाहेर होती. तिथून सुर्योदय फार छान दिसायचा. मी पहाटेच निघायचो. माझा अवतार म्हणजे ढगळ पांढरा टी शर्ट आणि त्यातून घातलेय अस वाटेल इतपत डोकावणारी चड्डी आणि शूज रस्ता स्मशानावरून जायचा. त्यादिवशी रस्त्यावर नेहमीचे चेहरे दिसेनात. मी धास्तावलो. तेव्हढ्यात माझ्या लक्षात आल की शुजची लेस सुटलेय. मी स्मशाना पर्यंत पोचलो होतो आणि समोरची आधारवाडी मिट्ट काळोखात होती. तरीही मी ठरवल की घाबरायच नाही थोड्या वेळात सकाळ होईलच... लेस बांधायला थांबलो इतक्यात शेजारून एक सायकल गेली. मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला. मला पाहून हा का घाबरला असेल ... थोडी गम्मत वाटली पण लगेच लक्षात आल की असचा प्रसंग आपल्याही बाबतीत घडला तर..... लगेच मागल्या पावली पळात सुटलो. घरी आलो तर अजुन जाग दिसत नव्हती. बाथरूम मधे हात पाय धुत असताना घड्याळात लक्ष गेल (हो आमच्या सुज्ञ भगीनीने तिथे एक घड्याळ लावल होत आमच्यासाठी). नुकतेच साडेतीन होत होते.....

In reply to by निरंजन मालशे

भम्पक 19/11/2016 - 10:43
मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला.

ऋचा 23/05/2008 - 17:12
अरे यार काय रे क्रमशः @) वाचायला मुड आला तर ह्याच क्रमशः

विसोबा खेचर 24/05/2008 - 04:44
वा! सगळ्यांच्या फजित्या वाचल्या. मौज वाटली! :) आपला, (अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वरदा 29/05/2008 - 00:15
कशी फजिती झाली हेही सांगा की नुसतं काय अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!

भिंगरी 10/10/2014 - 15:24
एक स्त्री असल्याने माझी फजिती लिहू की नको असे वाटत होते.पण बाकिच्यांच्या फजित्या वाचून धैर्य आले. मी ६ वीत असतानाचा प्रसंग. शारिरीक शिक्षण या तासाला आम्हाला कवायतीसाठी मैदानात नेले. कवायतीला सुरुवात झाली आणि काही वेळातच माझी वेगळीच कवायत चालू झाली. झाले असे की त्या वेळी सरसकट सगळे नाडीच्या चड्ड्या वापरत असत. कवायत करता करता चड्डीची नाडी खेचल्या गेल्याने सैल झाली. आता सरांनी म्हटले लेफ्ट की मी डावा हात पुढे करून उजव्या हाताने स्कर्टच्यावरून चड्डी धरून ठेवी,आणि सरांने म्हटले राईट की मी उजवा हात पुढे करून डाव्या हाताने चड्डी धरून ठेवी.असे काही काळ चालले होते थोड्यावेळाने सरांच्या लक्षात आले.आणि किंचित हसत त्यांनी खुणेनेच मला जायला सांगितले.बापरे अजुनही मला अंगावर शहारा येतो की जर सरांच्या लक्षात नसते आले तर?

सुहास.. 10/10/2014 - 15:41
@ मदनबाणः हे माझे उत्खनन नव्हे. उगाच चारीत्र्य हनन करू नये >> ओ विजुभाउ, म्हणजे ज्याचे आहे त्याचे करावे का ;) @ मदनबाणः हे माझे उत्खनन आहे. आपण दोघेही मनन करु यात.

रेवती 10/10/2014 - 18:39
एका दिवसात एकच भाषा बोलणारे आपल्यात आता कोणी फारसे नसतील. त्यामुळे एका भाषेतील शब्द दुसर्‍या भाषेत वापरले जाणे, काही शब्द दुसरे वापरतायत म्हणून वापरणे यातून वेगळे अर्थ निघू शकतात. रोज मराठी, विंग्रजी आणि हिंदी या ३ भाषा आपल्याकडून मुख्यत्वे वापरल्या जातात. कालच एका हिंदी भाषिक फ्यामिलीला जेवणाचे आमंत्रण देताना मी काय बोलले की तुम्ही माझ्याकडे या ऐवजी आम्ही तुमच्याकडे येतो असा अर्थ झाला. माझे काहीतरी चुकले हे समजले पण सुधारेपर्यंत तिची हसून पुरेवाट झाली. मग दुसर्या हिंदीवाल्यांना फोन केला. एरवी मैत्रिणी सारखी वागणारी मी तिच्याशी बातम्या देताना हिंदी बोलावे तसे बोलत होते. ती हसायला लागली. उदा. "आप हमारे घर खानेपे आओगे तो हमे बडी खुशी होगी" असले काही ऐकू ती चक्रावली .

अगदी कहर धागा आहे हा , लंगोटी , चावी , पर्वती , मोरी .. हसून वशाड मेलो (सौजन्य मीपा ) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- कॉलेजात असताना कुठलासा धुमकेतू आला होता म्हणून खगोल कॅंप होता , रात्री बराच वेळ धुमकेतू दर्शन घेतल आणि मध्य रात्री साधारण २:०० च्या सुमारास हॉस्टेल वर परत येत होतो , मित्रानी लुना एकदम फास्ट मारली होती , एका क्षणात आमच्या डोळ्या पुढे धूमकेतू चमकला , डोळे विस्फरुन परत बघितल तर डोळ्या समोर खरच आकाशातील धूमकेतू दिसत होता , नंतर दोस्तानी संगितल की लुनाच्या दोन्ही चाकाच्या मध्ये डुककर घुसल होतो आणि लुना रस्त्यावर उलटली होती आणि आम्ही दोघ रस्त्यावर पार उताणे पडलो होतो ... :) एकदम टांगा (लुना) पालटी घोडे फरार

मा़झ्या १०वी नंतर १-२ वर्षांची गोष्ट आहे (२००३-२००४). त्या वेळी माझ्या लंगोटी मित्राच्या ताईसाठी मॅट्रिमोनी साईट्स वर रजिस्ट्रेशन वगैरे चं का चाललं होतं. ह्या भ्**ला माझा ई-मेल चा पासवर्ड त्याला माहीत होता. ह्यानी परस्पर माझं अकाऊंट रजिस्टर आणि व्हेरिफाय केलं. वरती घरचा लँडलाईन नंबर देऊन ठेवला. जेमतेम ७-८ दिवसांनी नेमके पिताश्री घरी असताना फोन आला. ते संभाषण असं होतं साधारणं. पिताश्री : नमस्कार, दातार बोलतोय. वधुबंधु वर्तक : नमस्कार. मी अमुक अमुक वर्तक बोलतोय. तुमचा मुलगा लग्नाचा आहे असं कळलय. आमच्या अपेक्षांमधे तुमचा मुलगा बसतोय. पिताश्री (आमरिश पुरींचे वटारलेले डोळे करुन अस्सल सानुनासिक स्वरामधे) : कोणी सांगीतलं आपल्याला? वधुबंधु वर्तक (बहुतेक चपापलेल्या आवाजात) : अहो, अमुक अमुल वेबसाईटवरुन माहिती मिळाली म्हणुन फोन केलाय. पिताश्री : आमचा बैल आत्ता हाप पँटीतुन फुल पँटीत आलाय. बालविवाह मान्य असेल तर भेटु. तुम्हाला चुकीची माहिती मिळालिये हो. आत्ताशिक कार्टं कॉलेजात जायला लागलाय. फोन कट केल्यावर नंतर भलं मोठ रामायण घडलय. अस्सल को.ब्रां.ची जीभ किती तिरकी वळु शकते त्याचा ह्याची देही अनुभव घेतलाय. अकाऊंट डी-अ‍ॅक्टीव्हेट करेपर्यंत अजुन ३-४ फोन येउन गेले वेगवेगळे. शिवाय हे नक्की कसं झालं ते ऑलमोस्ट ६-७ महिन्यानी समजलं. =))

In reply to by Pradip kale

एस 07/11/2014 - 00:02
मी तर मोबाईलवरून आक्ख्या लेखांचे मुद्रितशोधन करतो! ;-) सोप्पंय मोबाईलवरून मिपावर मराठी टंकन करणं. इथेच उजवीकडे मदत आहे की. http://www.misalpav.com/node/1312 प्रयत्न करा.

परवा मॉल मध्ये गेलो होतो तर बायका आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन आत सोडत होते.. मी बायकांच्या लाईन मधुन पुढे आले आणि शेजारुन नवरा पुरुषांच्या लाइन मधुन.. मी पुढे येऊन गडबडीने नवर्‍याचा हात धरायला गेलेच की तो हात एकदम दचकला... तिरप्या नजरेतुन पाहीलं.. मागे नवरा दिसला आणि मी जो हात पकडायला निघाले होते त्याचा मुळ मालक हात छातीशी घेऊन घाबरुन माझ्याकडे पहात होता... नवरा भयानक पेटला होता हे वेगळं सांगायला नको!!! बरं ह्यातुन काही बोध घेऊन जरा ताळ्यावर राहुन जगात वावरावं ना... २ च दिवसानी ऑफिसमध्ये तरातरा वॉशरुम मध्ये घुसले.. समोर एक पुरुष बेसीनसमोर गोठुन आरशातुन माझ्याकडे पहात होता.. "सॉरी..सॉरी.." म्हणत धुम ठोकली... (ह्यात टेक्निकली माझी चुक नव्हती.. आमच्या नव्या हापिसात सगळे फ्लोअर्स अगदी डिट्टो सेम आहेत.. पण स्त्री-पुरुषांचे वॉशरुम मात्र आलटुन पालटुन डावीकडे - उजवीकडे आहेत..हे मला माहित नव्हतं.. मी माझ्या फ्लोअरच्या सवयीने डावीकडे घुसले..!! )

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ 07/11/2014 - 15:48
हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड माझ्या हातूनही होत असे. लेडीजसाठी डच शब्द आहे dames आणि जेंटलमेनसाठी शब्द आहे heren. चिन्हं असतील तर प्रॉब्लेम नसायचा. पण नुसते शब्द लिहिलेले असतील तर गोंधळ - dames हा शब्दही स्त्री-निदर्शक (उदा. Dame Judy Dench) आणि heren ही (his and her मधलं her). मग काय, देवाचं नाव घेऊन घुसायचं कुठेतरी!

In reply to by आदूबाळ

शिद 07/11/2014 - 18:57
स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे. 'herr' म्हणजे 'Mr'. सुरुवातीला कळायचंच नाही. कोणी दुसरा माणूस ज्या दरवाजानं जात असेल तर त्याच्या मागोमाग जायचं, असं करावं लागे.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 07/11/2014 - 18:51
हा हा हा. डोळ्यासमोर पिराने दुसर्‍या मनुक्षाचा हात धरलाय हे दृष्य आलं आणि फिस्सकन हसले. वॉशरूम बाबत मी अजूनतरी असे काही केले नाहीये पण मुलगा साधारण मोठा झाल्यावर माझ्याबरोबर मॉलमध्ये महिलांच्या रेस्टरुमला येत नसे. त्याचे त्याला पुरुष विभागाकडे जायचे असे. बरे, आपले काम उरकून यावे तर तसे नाही. उगीच याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ असे करत वेळ काढत असे, तर कधी खरेच गर्दी असे. नवरा बरोबर नसला तर पंचाईत! मी वाट बघून नको नको ते सगळे विचार, काळज्या करून झाल्यावर एकदा बाहेरूनच जोरजोरात हाक मारू लागले. सुदैवाने सगळे बाप्ये समजूतदार होते. कोणी हरकत घेतली नाही.

पिशी अबोली 10/11/2014 - 21:26
मी आजच चांगली फजिती करून घेतलीये. माझं डेटा पॅक संपत आलं होतं हे मला माहीत होतं. पण काल रात्री तर डेटा चांगलाच शिल्लक होता आणि सकाळपासून मात्र मेन बॅलन्स मधून पैसे जात होते. मी नेहमीप्रमाणे चिडले, आयडियाला शिव्या घातल्या, आणि संध्याकाळी फुल भांडायच्या इराद्याने कस्टमर केअर ला फोन लावला. कधी नव्हे तो कुणीतरी नीट बोलता येणारा माणूस होता. त्याने मागचा रिचार्ज वगैरे माहिती नीट शोधून काढली. वॅलिडिटी सांगताना तो म्हणाला, 'आज १० तारीख आहे'. मी अगदी तोर्‍यात उत्तर दिलं-'आज ९ तारीख आहे, आणि माझी डेटा वॅलिडिटी ९ तारखेपर्यंत होती हे मला चांगलंच माहीत आहे.' तो शांतपणे म्हणाला, 'आज १० तारीख आहे मॅम'. मग माझ्या लक्षात आलं, आज खरोखरच १० तारीख आहे.. ;) त्याला कितीतरी वेळा सॉरी म्हणून मी फोन ठेवला.. आता 'काय काय नमुने फोन करतात' असं तो सगळ्यांना सांगत असेल.. =))
राम राम मंडळी ! काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला! इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का? चला, सुरुवात मी करतो. इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता. साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो.

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

धोंडोपंत ·

सन्दीप 08/04/2008 - 18:15
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा. सन्दीप

In reply to by सन्दीप

धमाल मुलगा 08/04/2008 - 18:21
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी. त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी. -ध मा ल.

In reply to by सन्दीप

मनस्वी 08/04/2008 - 18:26
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे. हघ्या. अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.

विसोबा खेचर 09/04/2008 - 09:09
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. चला, बरं झालं! :) कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्‍या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :) बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;)) मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :) बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही. तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :) आणि यात काही स्त्रियाही असतात का? तात्या.

धोंडोपंत 09/04/2008 - 14:34
तात्या, तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल. आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा. कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता. कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता. त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात. आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?" आमचे उत्तर एवढेच असते:- खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 09/04/2008 - 16:59
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :) आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :) आपला, (खाऊनपिऊन सुखी!) तात्या. :)

वरदा 09/04/2008 - 17:35
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

In reply to by वरदा

मनस्वी 09/04/2008 - 18:08
कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

धोंडोपंत 10/04/2008 - 10:24
वरदाताई, कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे. सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सन्दीप 08/04/2008 - 18:15
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा. सन्दीप

In reply to by सन्दीप

धमाल मुलगा 08/04/2008 - 18:21
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी. त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी. -ध मा ल.

In reply to by सन्दीप

मनस्वी 08/04/2008 - 18:26
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे. हघ्या. अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.

विसोबा खेचर 09/04/2008 - 09:09
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. चला, बरं झालं! :) कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्‍या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :) बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;)) मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :) बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही. तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :) आणि यात काही स्त्रियाही असतात का? तात्या.

धोंडोपंत 09/04/2008 - 14:34
तात्या, तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल. आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा. कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता. कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता. त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात. आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?" आमचे उत्तर एवढेच असते:- खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 09/04/2008 - 16:59
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :) आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :) आपला, (खाऊनपिऊन सुखी!) तात्या. :)

वरदा 09/04/2008 - 17:35
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

In reply to by वरदा

मनस्वी 09/04/2008 - 18:08
कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

धोंडोपंत 10/04/2008 - 10:24
वरदाताई, कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे. सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे. मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय. मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल. मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले.

मॅडोनाला हवंय भारतीय मुल - येक बातमि

शरुबाबा ·

छोटा डॉन 08/04/2008 - 15:48
कल्पना चांगली आहे .... परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???" कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण 08/04/2008 - 16:00
तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा Madonna on David Letterman http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.

शरुबाबा 08/04/2008 - 16:07
ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑

धमाल मुलगा 08/04/2008 - 16:55
काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय? भारतीय पोर हव॑ म्हणे... आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-)) तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑???? आन् हे विजुभाऊ...
ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑. फुटलो ना मी !!! असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल. आपला, - (सावध) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 08/04/2008 - 17:00
"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????" मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ... नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक .... मज्जा आली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ठणठणपाळ

धमाल मुलगा 09/04/2008 - 10:16
तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.
नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-) - (चावरा) ध मा ल.

छोटा डॉन 08/04/2008 - 15:48
कल्पना चांगली आहे .... परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???" कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण 08/04/2008 - 16:00
तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा Madonna on David Letterman http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.

शरुबाबा 08/04/2008 - 16:07
ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑

धमाल मुलगा 08/04/2008 - 16:55
काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय? भारतीय पोर हव॑ म्हणे... आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-)) तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑???? आन् हे विजुभाऊ...
ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑. फुटलो ना मी !!! असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल. आपला, - (सावध) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 08/04/2008 - 17:00
"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????" मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ... नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक .... मज्जा आली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ठणठणपाळ

धमाल मुलगा 09/04/2008 - 10:16
तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.
नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-) - (चावरा) ध मा ल.
लेखनविषय:
'मटेरिअल गर्ल' मॅडोनाला भारताच्या संस्कृतीची भूरळ पडली आहे. तिने भारतातिल एक मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे . दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2933868.cms

वासंतिक पेय

स्वाती दिनेश ·

बेसनलाडू 08/04/2008 - 12:31
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! (प्रवासी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु 08/04/2008 - 19:01
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

बेसनलाडू 09/04/2008 - 00:23
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :) (शीघ्रप्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर 08/04/2008 - 12:31
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :) स्वाती, चिअर्स! मला दुसर्‍या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है.... समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्‍या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.

In reply to by स्वाती दिनेश

धन्यवाद स्वाती दिनेश, खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.

In reply to by अन्जलि

अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा). तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल. शुभेच्छा! स्वाती

वरदा 08/04/2008 - 19:03
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....

नावावरूनच आकर्षक दिसते..... नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..

केशवसुमार 08/04/2008 - 19:42
काय योगा योग.. आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि..... संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर.. टूक टूक.. (तृप्त)केशवसुमार

बेसनलाडू 08/04/2008 - 12:31
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! (प्रवासी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु 08/04/2008 - 19:01
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

बेसनलाडू 09/04/2008 - 00:23
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :) (शीघ्रप्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर 08/04/2008 - 12:31
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :) स्वाती, चिअर्स! मला दुसर्‍या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है.... समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्‍या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.

In reply to by स्वाती दिनेश

धन्यवाद स्वाती दिनेश, खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.

In reply to by अन्जलि

अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा). तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल. शुभेच्छा! स्वाती

वरदा 08/04/2008 - 19:03
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....

नावावरूनच आकर्षक दिसते..... नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..

केशवसुमार 08/04/2008 - 19:42
काय योगा योग.. आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि..... संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर.. टूक टूक.. (तृप्त)केशवसुमार
Taxonomy upgrade extras
वासंतिक पेयाखेरीज चैत्रोत्सव कसा बरं पूर्ण होणार?
प्रकार-१ ५,६ कैर्‍या,साधारण ३ वाट्या साखर/गूळ(कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे),मीठ,केशर,वेलदोडे कैर्‍या उकडून घ्याव्यात. गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो.

चैत्रोत्सव!

स्वाती दिनेश ·

धमाल मुलगा 08/04/2008 - 11:33
स्वातीताई झि॑दाबाद!
घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.
आणि आम्ही आईन॑ कितीही नको नको म्हणल॑ तरी हा हळदीकु॑कवाचा 'मेन्यु' ल॑पास करुन गच्चीवर जाऊन हादडत बसु !!!!

बेसनलाडू 08/04/2008 - 11:39
सोबत पन्ह्याची कृती पण टाकाच स्वातीताई :) (डाळपन्हेप्रेमी)बेसनलाडू

प्रमोद देव 08/04/2008 - 11:41
अजून आंब्याची डाळ,पन्हं आलं कसं नाही. लहानपणी हे सगळं आई जेव्हा करायची ना तेव्हा आम्ही त्यात मदत करत असू... त्याची आठवण यायला लागलेय. पण हाय.... गेले ते दिवस! असो. आपण सगळे करा मजा. आम्ही आठवणीतच रमतो. :)

विसोबा खेचर 08/04/2008 - 11:51
वा स्वाती, आंब्याची डाळ मस्तच! पण पन्हं कुठाय? :) चैत्रातल्या हळदीकुंकवात पन्हं न देता नुसती आंब्याची डाळ देऊनच कटवणार आहेस की काय? :) आपला, (चाळीतल्या चैत्रातल्या हळदीकुंकवात बायामाणसात नसती लुडबूड करणारा!) तात्या.

चतुरंग 08/04/2008 - 20:16
वा वा काय आठवण दिलीत हो स्वातीताई! आईला हळदीकुंकवाला लागेल त्याच्या दुप्पट डाळ भिजवायला लागे कारण आमची मदत म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे ह्याचेच जेवण करणे अशी असे!;) पन्हे संपेपर्यंत पाणी प्यायचेच नाही असा जणू अलिखित नियमच असे. ते वेलदोडे घातलेलं, सोनेरी रंगाच्या पन्ह्याचं, मंद सुवासानं घमघमणारं मोठं पातेलं तसंच अजून डोळ्यांसमोर आहे;) चतुरंग

प्राजु 08/04/2008 - 20:25
कैरीची डाळ, पन्हे.... प्राजक्ता, थांब २-३ दिवस थांब जरा.... मग आहेच.. स्वाती, ...रेसिपी छान - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा 08/04/2008 - 11:33
स्वातीताई झि॑दाबाद!
घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.
आणि आम्ही आईन॑ कितीही नको नको म्हणल॑ तरी हा हळदीकु॑कवाचा 'मेन्यु' ल॑पास करुन गच्चीवर जाऊन हादडत बसु !!!!

बेसनलाडू 08/04/2008 - 11:39
सोबत पन्ह्याची कृती पण टाकाच स्वातीताई :) (डाळपन्हेप्रेमी)बेसनलाडू

प्रमोद देव 08/04/2008 - 11:41
अजून आंब्याची डाळ,पन्हं आलं कसं नाही. लहानपणी हे सगळं आई जेव्हा करायची ना तेव्हा आम्ही त्यात मदत करत असू... त्याची आठवण यायला लागलेय. पण हाय.... गेले ते दिवस! असो. आपण सगळे करा मजा. आम्ही आठवणीतच रमतो. :)

विसोबा खेचर 08/04/2008 - 11:51
वा स्वाती, आंब्याची डाळ मस्तच! पण पन्हं कुठाय? :) चैत्रातल्या हळदीकुंकवात पन्हं न देता नुसती आंब्याची डाळ देऊनच कटवणार आहेस की काय? :) आपला, (चाळीतल्या चैत्रातल्या हळदीकुंकवात बायामाणसात नसती लुडबूड करणारा!) तात्या.

चतुरंग 08/04/2008 - 20:16
वा वा काय आठवण दिलीत हो स्वातीताई! आईला हळदीकुंकवाला लागेल त्याच्या दुप्पट डाळ भिजवायला लागे कारण आमची मदत म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे ह्याचेच जेवण करणे अशी असे!;) पन्हे संपेपर्यंत पाणी प्यायचेच नाही असा जणू अलिखित नियमच असे. ते वेलदोडे घातलेलं, सोनेरी रंगाच्या पन्ह्याचं, मंद सुवासानं घमघमणारं मोठं पातेलं तसंच अजून डोळ्यांसमोर आहे;) चतुरंग

प्राजु 08/04/2008 - 20:25
कैरीची डाळ, पन्हे.... प्राजक्ता, थांब २-३ दिवस थांब जरा.... मग आहेच.. स्वाती, ...रेसिपी छान - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
Taxonomy upgrade extras
वसंत आल्याची वर्दी कोकिळकुहुने दिली आहेच.मिपावरही 'एप्रिलफळे' आणि 'लोणची' तेच सर्वांना सांगत आहेत. घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.असा चैत्रोत्सव साजरा होत असताना आंबे पिकल्याची चाहूल लागेल आणि मग आमरसपुरीच्या मेजवान्या झडतील.