मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुठ कुठ जायाचे जाळ्यात -२

सुवर्णमयी ·

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी Tue, 04/08/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:24
सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:43
सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:38
दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी Tue, 04/08/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:24
सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:43
सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:38
दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

माझी फजिती....

धमाल मुलगा ·

नारदाचार्य Tue, 04/08/2008 - 17:50
धमाल्याच्या स्टाईलमधली काही फजिती वाचायला मिळेल म्हणून आलो आणि फजिती झाली.

In reply to by नारदाचार्य

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 18:28
नारदाचार्य, आम्ही सतत ग॑डतच असतो. मी वरचा किस्सा केवळ सुरुवात म्हणून दिलाय. जरा इतरा॑चे झालेले पोपट कळूदे, मग आम्ही पण आमचा झालेला सप्तर॑गी पोपट सा॑गतो की :-))) घ्या तिच्याआयला, मोठ्या हौसेन॑ धागा चालू केला आणि पहिलीच प्रतिक्रिया आमच्या बोका॑डी बसणारी आली...घ्या आमची अजुन एक फजिती !! :-)))) बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-)) - (ग॑डलेला) ध मा ल.

नारदाचार्य Tue, 04/08/2008 - 17:58
वाटलं होतं, धमाल्या आता छान माप काढेल. त्याऐवजी त्यानं,
बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-))
असं लिहून पुन्हा गंडवलं. मानलं रे. तुझ्याच भाषेत सांगायचं तर फुटलो...

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 18:20
मी आणि माझे ३ चुलत असे चौघे भाऊ सांगलीला निघलो होतो. वाटेत एक शेतकरी गाडीत माक्याची कणसे भरताना दिसला. आम्ही आमची गाडी थांबवली.षेतकरी दादाला काही कणसे देता का अशी विचारणा केली. त्या शेतकर्‍याने चांगली पोतेभरुन कणसे आमच्या गाडीत टाकली. माझ्या भावाने त्या शेतकर्‍याला कणासाचे पैसे किती म्हणुन विचारले....शेतकरी दादा पैसे घ्यायला नको म्हणाले... मी त्याना मोठ्या उदार पणे म्हंटले की पैसे घ्याना तुमचे नुकसान का करुन घेताय.. शेतकरी त्यावर सहज म्हणाला "काय राव उगाच नुकसानाचं बोलताय्..त्यात नुकसान कसलं..ते तुमच्या पोटात तरी जाइल अहो डुकरं ईतके नुकसान करतात्.....चार डुकरे जास्त लागली म्हणुन समजू..... आम्ही एकमेकांकडे पाहीले........एकुण चौघेजण होतो ना......... .......एक (गाढव ) रान डुक्कर ठरलेला विजुभाऊ

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:42
११वीत असताना, बाबांनी मला स्कूटी घेऊन दिली. थाटात ती स्कूटी घेऊन मी निघाले होते. कॉलेज जवळ एका मैत्रिणीच्या बाबांचे ऑफिस होते. तिथे ती मैत्रिण थांबत असे. तिथुन तिला घेऊन कॉलेजला जाणे हा नित्याचा क्रम. अशिच एकेदिवशी ऑफिसच्या खाली जाऊन, तिथून तिला जोरात हाक मारली. तिने बाल्कनीतून ५ मिन्टे थांब असे सांगितले. मी तशीच स्कूटिवर बसून रहिले होते... इतक्यात...गुडघ्यापर्यंत नऊवारी साडी नेसलेली म्हातरी बाई आली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती कसली तरी. ती एका हाताने सावरत ती माझ्या जवळ आली. काही काळ मला नुसतीच बघत उभी राहिली. मी लक्ष दिले नाही. मग ती जवळ आली, म्हणाली, " दुरड्या पोचल्यात की ग तिकडं.." मी पुन्हा दुर्लक्ष केलं... ती : पोरी, अगं दुरड्या पोच्ल्यात की थितं.... मी :( निर्विकार पणे) पोचूदेत कि मग, मी काय करू? ती : समदी जमली हायेत तिथं.. आन् तू हितचं... मला आता थोडासा राग आला. मी : तुमच्या त्या दुरड्या म्हणजे काय मला माहिती नाही आणि तुम्हीही जावा जिथं सगळी जमली आहेत तिथं.. ती : (प्रेमाने) असं करू नये पोरी, चल माज्या संगट चल.. मी न्हेते तुला.. माझ्या रागाचा पारा चढायला लागला. तरिही जास्तीत जास्त संयमाने मी तिला म्हणाले.. "बाई, हे बघा.. तुम्ही निघा आता.. मलाही कामं आहेत.." इतक्यात माझी मैत्रिण खाली आली . ती बाई : " म्या तुजं काय बी ऐकनार नाही, तुला घेउनच जानार आहे...." असं म्हणत माझा हात धरला तिने.. मी आता एकदमच भडकले.. मी : ओ बाई, सोडा ना... काय हा मुर्खपणा आहे..? माझी मैत्रिणही तिला ओरडू लागली. ती बाई : मला माहित हाय.. लग्नाच्या मांडवातून तू पळून आली हायेस्...म्या तुला घेऊनच जानार.. तिचं हे वाक्य ऐकून मी ब्लास्ट का काय म्हणतात तेच झाले.. "ओ बाई... उगिच काहीही बडबडू नका... जावा बरं.. .." आणखी काही बोलणार इतक्यात त्या बिल्डिंग मधले एक दुकानदार अमचा गोंधळ ऐकून बाहेर आले.. आणि त्यांनी त्या बाईला हाकलून लावले. मला म्हणाले.. त्या बाईच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला असावा. आम्ही तिथून निघालो..पण राग मात्र शांत झाला नव्हता माझा. हळू हळू शांत झाला. कॉलेज मध्ये येईपर्यंत दोघीही एकमेकीशी काहिच बोललो नाही.... कॉलेज मध्ये स्कूटी पार्क करताना मी नी मैत्रिणीने एकमेकीकडे बघितले आणि दोघिना एकदमच जोरात हसू आले...झालेल्या प्रकारचे. (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री Tue, 04/08/2008 - 23:58
माझ्या लग्नाच्या ३-४ दिवस आधीची गोष्ट.. (होणारा) नवरा अगदी आयत्यावेळेलाच लग्नाला आल्यामुळे त्याच सगळं शॉपिंग बाकी होतं.. मग आम्ही आमच्या घराजवळच्या जयहींदमधे गेलो.. २ शेरवानी आवडल्या.. पण आई-बाबा नव्हते बरोबर, म्हणून संध्याकाळी त्यांना बरोबर घेऊन शॉपिंग उरकून टाकावी असा विचार केला.. पण एक शेरवानी बुक करून ठेवावी म्हणून आम्ही काऊंटरपाशी आलो.. नवर्याने ५०० रू. देऊन शेरवानी बुक करून काउंटरपाशी ठेवली आणि निघाला... तेवढ्यात मी माझं अती-बावळट डोकं चालवलं, आणि त्या माणसाला म्हणाले "अहो, शेरवानी द्या की.. तिथे कुठे ठेवताय!! " :)))) आणि नवर्‍याकडे असं पाहीलं जसं काही तो पण विसरत होता आणि मी किती हुशार!! (४-५ हजारांची शेरवानी कुणी ५०० ला देईल का अशी!! ) तिकडे नवर्‍याला , आता हात जोडू की पाया पडू असं झालं होतं... तेवढ्यात मला माझा यडपटपणा कळला..आणि हसत आम्ही निघालो ! काउंटर वरच्या माणसाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता!! :)

चतुरंग Wed, 04/09/2008 - 00:31
त्यावेळी बहुदा माझे अभियांत्रिकीचे तिसरे वर्ष होते. मी मावशीकडे रहात होतो. एरवी बसने जात असलो तरी परीक्षेच्या काळात वेळ वाचावा म्हणून मी काकांची जुनी स्कूटर घेऊन जात असे. त्याप्रमाणे मी आणि माझा वर्गमित्र स्कूटवरुन परीक्षेला चाललेलो. नेहेमीप्रमाणेच अभ्यास 'नीट' झालेला असल्यामुळे, तो मागे बसून मोठ्याने नोट्स वाचत होता आणि मी गाडी चालवत ऐकत होतो! जून महिन्यातला पहिलाच आठवडा होता. पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या होत्या. रस्ते किंचित ओलसरच होते. आमच्या कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्याला दोन - तीन अतीशय झोकदार वळणे होती. त्यातल्याच एका वळणावर आमची गाडी पोचली. तिथे बहुदा ऑइल सांडलेले होते, त्यावर पावसाचे पाणी, मग काय विचारता एकदम ऑईल-स्केटिंगच! आमची गाडी अलगद घसरली, स्पीड अत्यंत कमी होता कारण लक्ष नोट्स ऐकण्याकडे होते, हलकेच घसरलेल्या स्कूटरवरुन मी बुद्कन खाली रस्त्यावर कधी आलो ते मलाच समजले नाही. त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. मी पोट धरुन रस्त्यावर पडल्या पडल्याच हसत होतो आणी पलीकडे माझा मित्र हसत होता! (नंतर नीट बघितले तेव्हा स्कूटरचे मागचे टायर पूर्ण गोटा होते असे दिसले;)) अजूनही आम्ही भेटलो की त्या आठवणीवरुन घसरतोच! चतुरंग

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:38
त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. अहो तुम्हीच काय.. हे वाचून मी सुद्धा पोट धरून हसले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Wed, 04/09/2008 - 10:07
शाळेतल्या दिवसांनमधील गोष्ट आहे, बहुतेक मी ८ वी मधे होतो, वार्षिक परि़क्षेचे वेळापत्रक एका नोटिस बोर्ड वर लावले होते. ते लिहुन घेण्यासाठी मुलांची गर्दी जमा झाली होती.मी सुद्धा त्या गर्दी मधे उभा राहुन वेळापत्रक लिहुन घेतले. सरते शेवटी परिक्षेचा दिवस उजाडला, एक एक पेपर होत गेले आणि आता फक्त २/३ पेपरच बाकी होते. इतिहासाच्या पेपर ची माझी पूर्ण तयारी झाली होती आणि आज तो पेपर होता,मी वर्गात जाऊन बसलो आणि परिक्षक पेपर वाटण्याची वाट पाहु लागलो..... शेवटी पेपर माझ्या हाती लागला आणि तो मी आधी पुर्ण वाचुन मग सोडवण्यास घेणार होतो,,,,,पण हे काय?इतिहासाच्या जागी भुगोलाचा पेपर? मला तर काहीच कळेनाच मी माझ्या पुढील मुलास विचारले काय रे आज इतिहासाचा पेपर आहे ना? तो म्हणाला नाही भुगोलाचा.....(याचा अर्थ इतिहासाचा पेपेर दोन दिवसानंतर आहे.) एका क्षणात माझ्या लक्षात आले गर्दी मधे उभे राहुन वेळापत्रक लिहुन घेण्यात माझ्या कडुन एक छोटी चुक झाली होती,,,,,,(छोटी?) त्या क्षणी वर्गातली सगळी बाकडी माझ्या भोवती गरागरा फिरतायत असे वाटायला लागले,इतिहासातील अतिरथी महारथी जाऊन आता बिनमोसमी वादळी वारे वाहायला लागले होते..... शेवटी मी माझ्या डोक्यातील होकायंत्राप्रमाणे भरकटलेल्या विचारांना आवरायचे ठरवले..... आणि पेपर लिहावयास घेतला,,,,, मी फक्त लिहीत गेलो..... निकालाचा दिवस उजाडला:----- मला इतिहासापेक्षा भुगोलात जास्त मार्क मिळाले होते!!!!! ( धमालजी आपला मि.पा वरील छोटा मदन दा) मदनबाण

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:44
अगदी अशीच फजिती माझी बी.कॉम्. ला झाली. स्टॅटीस्टीक्सच्या पेपरला मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करून गेलो होतो. हातात पेपर आला आणि मेंदूत काळोख पसरला....... अर्धातास आढ्याकडे नजर लावून बसल्यावर स्टॅटचे एक- एक फॉर्म्युले आठवायला लागले. वर्ष फुकट गेले नाही. नशीब.

In reply to by प्रभाकर पेठकर

लंबूटांग Sun, 04/13/2008 - 22:24
७वी च्या स्कॉलरशिप च्या परिक्षेच्या वेळेस बुद्धिमत्ता चाचणी चा पेपर समजून आत गेलो. सर्व पेपर सोडवून संपत आला आणि शेवटी ग्राफ बघितल्यावर शंका आली बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपर मधे ग्राफ्स कसे आणि तेव्हा पेटली की हा गणिताचा पेपर आहे. आणि सगळ्यात जास्ती मार्क्स गणितातच मिळाले.

In reply to by मदनबाण

नीलकांत Tue, 04/15/2008 - 18:12
अंतीम वर्षाच्या परिक्षेच्यावेळी असाच अनुभव गाठीशी आहे. माझ्या जवळ वेगळी पुस्तके आणि इतरांजवळ इतर, आता परिक्षेच्या वेळी पुस्तके म्हणजे... अहो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढतो. ( सुरुवात कधी करतो ते विचारू नका) पण पेपर छान गेला व निकाल सुध्दा उत्तम. नीलकांत

भाग्यश्री Wed, 04/09/2008 - 10:19
ही फजिती नाही म्हणता येणार.. नवर्‍याचा आगाऊपणा म्हणा.. किंवा शिक्षकांची फजिती!! :) तो शाळेत असताना त्याने पेपर मधे असंख्य तारे तोडलेत.. त्यातले १-२.. म्हणी पूर्ण करा असा प्रश्न होता.. बळी तो ----- आणि याने लिहीलं, "बळी तो राजाचा माळी !" आणि इंग्रजी च्या पेपर मधे काहीतरी गोपाल आणि सीता वर ४-५ ओळी दिल्या होत्या, आणि खाली प्रश्न होता.. who is gopal ? his answer was.... gopal is seeta !! :D मला त्या शिक्षकांचे एक्स्प्रेशन्स पाहायला आवडलं असतं!! :))

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 10:40
सगळ्यात मोठी फजिती काही डिश्टींग्युइश करता येत नाय भो, दर २-४ दिवसाला आमचा कुठे न कुठे पोपट होतच असतो. आत्ता काल परवाचीच गोष्ट हाय, आम्ही गेल्तु पोरगी पहायला, पहायला म्हणजे तिला हाटेलित भेटायला हो. मोठ्या श्टायलीत मोठ्ठ्या मोठ्ठ्या आर्डरी सोडल्या अन जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की पाकिट आम्ही हापिसातल्या आमच्या कप्प्यातच विसरलो. अस्सा गोरामोरा झालो मी ! माझे खर्रकन उतरलेले तोंड पाहुन हुशार पोरगी काय समजायचे ते समजली अन पैसे देउन मोकळी झाली !

मनस्वी Wed, 04/09/2008 - 16:10
शनिवार, वेळ अंदाजे सकाळचे ११-१२. मी आणि माझी मैत्रीण एन् सी सी ची परेड संपून स्कूटीवरून सुसाट घरी चाललो होतो. मी चालवत होते आणि मैत्रिण मागे. आमच्या समोरची रिक्षा तुफान वेगात होती आणि आमची स्कूटीपण त्याच वेगात.. काही सेकंदात अचानक रिक्षेने डावीकडे टर्न घेतला...... आणि आम्ही झूपकन समोरच्या उंच डिव्हायडरच्या वर! गाडीला खाडकन ब्रेक लावला.. त्या उंच डिव्हायडरवर ती स्कूटी आणि स्कूटीवर आम्ही दोघी ते पण एन् सी सी च्या ड्रेसमध्ये असे दृष्य. काही सेकंदातच काय झाले ते लक्षात आले. तेवढ्यात शेजारील मोटारसायकलवरचे २ तरुण आले.. त्यांनी आमची गाडी खाली काढून दिली आणि आम्ही तिथून धूम ठोकली :) आणि घरी आल्यावर जे हसत सुटलो...

वरदा Wed, 04/09/2008 - 19:12
मज्जा आली वाचून... मी इथे अमेरीकेत आल्यावर पहिल्यांदा बर्फ साफ करायला घेतला.. नवरा सांगत होता नको जाऊस तरी म्हटलं मी जाऊन दुसरं शॉवेल आणते...आणि बोलत बोलत चाल्ले होते... नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:))) असली भयंकर आपटले साष्टांग नमस्कार घातला आणि नेमकी शेजारची बाई तेव्हा बर्फाचे फोटो काढत होती तिच्या कॅमेराने अगदी बरोब्बर माझाच फोटो काढला...सगळ्या बिल्डींगला करमणूक झाली...मी शेकली गेले त्याचं काय :))))))

In reply to by वरदा

लंबूटांग Sun, 04/13/2008 - 22:27
नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:)))
हा हा हा..

शितल Wed, 04/09/2008 - 22:24
माझी फजीती हे सदर छान आहे. मला ही फजीती आठवते पण दुसर्‍याची पाहिलेली.

अनिकेत Wed, 04/09/2008 - 23:03
अगदी २ दिवसापूर्वीची गोष्ट... मी सध्या दिल्लीला आलो आहे. २ दिवसांपूर्वी कनॉट प्लेस मधे एका जुना लूक असलेल्या रेस्टॉरंटात गेलो.. तिथल्या आगाऊ वेटरने मला वय विचारले...मी म्हटले २४... त्याने मला पाटी दाखवली...दारू २५ च्या वरच्यांना देणार......असला पोपट झालाय... असला कसला कायदा दिल्लीत? मुंबई/केरळात असे नसते हो..... :( अनिकेत ता.क.: काल मी वय २६ सांगितले.... :)

देवदत्त Wed, 04/09/2008 - 23:12
छान मजा चालली आहे एकमेकांच्या फजित्या वाचत ;) चालू द्या... जमल्यास (काही असल्यास) मीही लिहिन.

शितल Sun, 04/13/2008 - 03:59
आम्ही ५ ते ६ मैत्रिणी बसने कॉलेजला जात असु, इ॑जिनिअरि॑गची ही मुले बसला असायची, बसला गर्दी असल्यामुळे कधी कधीच बसायला जागा मिळे, एके दिवशी एकदम पुढे जागा मिळाली, मी व माझी मैत्रिण बसलो, आमच्या समोरच्या सीट (ड्रायव्हरच्या पाठी मागच्या बाजुला असलेली) मुले बसली होती, समोर मुले असल्यामुळे आम्ही दोघी ही खिड्कीतुन बाहेर पहात होतो, इतक्यात जोराच ब्रेक लागला, आणि आम्ही समोरच्या॑चा अ॑गावर कोसळ्लो, आणि बसची सीट उचकुन आमच्या पाठीवर पडली, उभे असलेल्या काही मुला॑नी मग बसची सीट उचलली, मग आम्ही दोघी उभे राहिलो, समोर पाहतो ते काय, आम्ही ज्या॑च्या अ॑गावर कोसळ्लो त्या पैकी एका मुला॑ने डोळे ब॑द केलेले, एक ओशाळ्लेला आणि एक हसत, उभ्या असलेल्या मैत्रिणी आणि सीन पाहिलेले हसत होते, आमच्या ओठी हसु, पडल्यामुळे लाज, आणि पाठीला लागल्यामुळे डोळ्यातुन पाणी. मग, उभे असलेल्या २ मुला॑नी बसची सीट पाठुन हाता॑नी धरली, आणि समोर बसलेल्या॑नी पायानी आणि आमचा प्रवास चालु. न॑तर ८ दिवस बसमध्ये बसायला जागा मिळाली की बसची सीट उचकते का ते पाहुनच बसत होतो.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 04/13/2008 - 21:36
(सन २००३) आम्ही सगळे विद्यार्थीमित्र पुण्यातच दुसर्‍या कॉलेजमध्ये एक व्याख्यान ऐकण्यास आलो होतो. ग्रूपमधल्या एकाचे नुकतेच लग्न ठरले होते व त्याची वाग्दत्त वधू त्याला मोबाईलवर दर तासाला एक फोन करीत असे. व्याख्यान सुरू होऊन दीड तास झाला तरी त्याला तिचा फोन काही आला नाही (त्याचे लक्ष तिथेच होते) म्हणून तो अस्वस्थ होता. शेवटी व्याख्यान स॑पल्यावर ऑडिटोरीयममधले दिवे लागल्यावर त्याने खिशातून मोबाईल काढला.. बघतो तो त्याने मोबाईल समजून टिव्हीचा रिमोटच बरोबर आणला होता..!! तो एकदम खजील झाला आणि 'तिच्या' रोषाच्या भीतीने घरी पळत सुटला..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

वैभव Wed, 05/28/2008 - 18:22
अरे घराजवल्ल एक चोरी झाली........ चोराने CD Player चोरून नेला. घरात काकु चोराला लाखोली वाहत होती. काकुला म्ह्ट्ले "झाले ते झाले ......काय दु:ख करत बसलाय" काकु ने म्ह्ट्ले "कप्पाळ माझे...........चोराने सोबत T.V चे रिमोट नेले" ग्राऊन्ड वर आमची हसुन हसुन पुरेवाट झाली.

तात्या विंचू Mon, 04/14/2008 - 17:02
मी दुसरीत असतानाची ही गोष्ट. नुकताच कांजिण्यांच्या आजारातून उठलो होतो. महिनाभर शाळा चुकल्याने घरच्यांनी झालेला अभ्यास भरुन काढायला जवळच एका क्लासला नाव घातले होते. कांजिण्यांच्या फोडांचे वण पुर्णपणे जाण्यासाठी सारखे औषध लावावे लागत असल्याने स्वारी उघडीच पुर्ण घरभर फिरत असायची. त्या दिवशी दुपारी क्लास होता.घरी बाबा थांबणार होते.आई बाहेर गेली होती.पटकन आवरुन मी क्लासला जायला निघालो. साधारण निम्मे अंतर गेलो असेन. समोरुन एक मुलगी आली आणि माझ्याकडे बघुन खुदकन हसली. मला काही तरी विचित्र वाटले. मनात विचार आला...बहुतेक पँटची चेन लावायची राहिली....म्हणुन खाली बघतो तर काय...मी खाली पँटच घातली नव्हती....म्हणजे अंडर्वेअर घालुन मी क्लासला जायला निघालो होतो....तसाच पळत पळत मी परत घरी आलो.. दार उघडताच बाबांना कळुन चुकले..मी कसा पॅंट न घालता क्लासला गेलो होतो..ते पण मला बघुन हसायला लागले...शेवटी पॅंट घालुन परत व्यवस्थितपणे क्लासला गेलो...

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 17:37
गेल्या रविवारी, एका मित्राचं 'गुपचुप शुभमंगल' उरकून घरी आलो. उन्हामुळे पार वेड लागायची वेळ आली होती...जरा पंखा चालू करुन बहिणाबाईंशी गप्पा मारत बसलो, हातात घराची किल्ली होती, तिच्याशी चाळा चालू होता. एक दहा मिनिटांत भगिनीदेवी मैत्रिणीकडे गेल्या. म्हणलं चला जरा खाली जाऊन मस्त कोकम सरबत घेऊ, आणि परत येऊन देऊ ताणून... कसलं काय? घराची किल्लीच सापडायला तयार नाही. आख्खं घर पालथं घातलं...नो किल्ली सापडिंग ! म्हणलं च्यायला, ही काय भुताटकी आहे? शेजारच्या काकूंचं दार वाजवलं, भर शनवारातल्या इमारतीतलं शेजारच्या घराचं दार वाजवायचं तेही टळटळीत दुपारी...आणि रविवारच्या म्हणजे.... तरीही हिम्मत करुन दार वाजवलं. अपेक्षेप्रमाणे झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा पुढे आला. म्हणालो, "काकू, माझी घराची किल्ली सापडत नाहीय्ये! तुमच्याकडे ठेवलेली स्पेअर किल्ली देता का जरा?" तर ह्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक काकू माझ्याकडे बघून फिस्सकन हसल्या...आणि मग फिदीफिदी...खुदुखुदु...शेवटी खो खो हसायला लागल्या. म्हणलं 'बाई गंडली बहुतेक. दुपारचं जागरण सोसवलं नसेल'............. तर ह्या आमच्या काकूंनी माझ्या कानाशी हात नेला, आणि मी खेळता-खेळता कानावर अडकवलेली किल्ली काढून हातात दिली. .......आणि संध्याकाळपर्यंत आख्ख्या सोसायटीत ही बातमी 'सबसे तेज' पोहोचवली.आता मला येता जाता कानकोंड्यासारखं होतं ना राव...जो उठतो तो चेष्टा करतो :-(

In reply to by धमाल मुलगा

नंदन Wed, 04/16/2008 - 00:12
झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा -- वा! भडकमकर क्लासेसच्या नाट्यसमीक्षकी भाषेत बोलायचे तर चित्रदर्शी आणि चपखल शब्दयोजना :) बाकी कानाला किल्ली लावल्याने 'कान'कोंड्यासारखं होणं, हेही बेष्ट धमुराव :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:41
थ्यांक्यू थ्यांक्यू हां ! हेही बेष्ट धमुराव :) धमु नका ना म्हणू...असं म्हणून कळवळलो !!!! :-) आपला, (कळवळ्या) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Wed, 04/16/2008 - 13:50
आंटी मत कहो ना च्या श्टाईल मधे धम्या "धमु नका ना म्हणू" असे म्हणतांना डोळ्यासमोर आला ! (आंटी वरुन काहीही गैरसमज नसावा, सदरहु आंटी ही "हम पांच" या मालिकेतली खरीखरी आंटी (काकु या अर्थाने) आहे.)

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:53
आशेंsss ? बरां बरां... बरां झाला तू सांगितलांन आचरट मेला..एकदम करपटला कालिज !!!!!

वरदा Tue, 04/15/2008 - 20:11
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?

In reply to by वरदा

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:44
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?
ह्या: खुंटी समजलो असतो तर सदरा, पायजमा नसता का टांगला? आयला, बरं झालो खुंटी नाही समजलो....कानाला पायजमा टांगून शेजारच्या काकूंचं दार वाजवायला गेलो असतो तर? बरं दिसतं का ते? - (मती 'खुंट'लेला ) ध मा ल.

माझ्या दादाने पहीलीला शाळेत पेपरात लिहीले होते प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी प्र. वाक्यातील कर्ता व कर्म यांचे स्त्रिलिंगी रुप करून योग्य क्रियापद वापरा. वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' खीखीखी.... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:48
प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी !
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली'
आता काय बोलायचं ह्याच्यावर? एकच प्रतिक्रिया चपखल बसतेय...खीखीखी....खुखुखु...खोखोखो....ख्याख्याख्या...

In reply to by धमाल मुलगा

भडकमकर मास्तर Wed, 04/16/2008 - 14:21
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी ! परांजपे??

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 01:15
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' झक्कासच..प्रतिक्रीया सुचतच नाही..... मती 'खुंट'लेला ध मा ल माझीच खुंटली आता मती....:))))))

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 01:21
लिहिलेला निबंध...विषय दिवाळी.. मला दिवाळी खूप आवडते कारण शाळेला सुट्टी असते. दिवाळीत आम्हा लहान मुलांची मजा असते. आई बाबा मला नवीन कपडे आणतात. फटाकेही आणतात. आम्ही घरी चकल्या, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे बनवतो. आकाशकंदील लावतो. किल्ला बनवतो. रांगोळी काढतो. मला ह्या वर्षीची दिवाळी आवडली. मी नविन कपडे घातले. मी चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि अनारसे खाल्ले. मी आकाशकंदील लावला. मी किल्ला बनवला. मी रांगोळी काढली. मला दिवाळी आवडली. सगळ्या वर्गात अशी लाज काढली होती बाईंनी, अगं वर्तमान आणि भूतकाळातले दोन पॅरा लिहून निबंध होत नाही म्हणून...

वेदश्री Sun, 04/27/2008 - 21:18
४थीमध्ये होते तेव्हाची गोष्ट. इतिहासाच्या करकरेबाई इत्तक्या वेगाने वर्गपाठासाठीचे प्रश्न सांगायच्या की त्या वेगाने लिहायला मला जमायचेच नाही.. इतरांचे माहिती नाही काय करायचे ते. सुरूवात केली तेव्हा मी तिसरा प्रश्न सांगून संपायची वेळ आली तेव्हा पहिला प्रश्न लिहून संपवला होता.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सांगा असं ओरडले मी. बाईंनी त्रासिक नजरेने माझ्याकडे पाहिले.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सुरू झाली राजधानी एक्प्रेस. :( २-३दा मी परतपरत सांगायला सांगितले आणि बाईंनी पाठीत धपाटा घालून पटापट लिही सांगितले. मला रागच आला. मग कानावर पडेल तो शब्द मी शॉर्टकट करायला सुरूवात केली.. शिवाजीमहाराजांचा जन्म कधी झाला? असे त्या म्हणाल्या की मी शिमचाजकझा? असे लिहून काढत गेले.. वेग मॅच होत होता. मी स्वतःच्या हुशारीवर खुश झाले. बाईंनी १००+ प्रश्न सांगितले होते ( प्रत्येक वाक्यावर त्यांनी एक प्रश्न बनवला होता जेणेकरून अख्खा धडा वाचून होईल म्हणे ! ) आणि उद्या उत्तरे लिहून आणा म्हणाल्या ! घरी गेल्यावर प्रश्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न करायला लागले तर त्या शब्दजंजाळाचा अर्थ लागेल तर शप्पथ ! उद्या वर्गात वाट लागणार या विचाराने मी तोंड उतरवून बसले होते तर आई आली म्हणे की कोणत्या प्रश्नाला अडली आहेस? मी सांगते उत्तर.. आणि मी म्हणाले की.. शिमचाजकझा?!!! ~~~~ गोसावीबाई मराठी शिकवायला होत्या ३रीला. एकदा त्यांनी एक कविता पाठ करून यायला सांगितली होती, पाठ करून गेले होते. ती कविता वहीत लिहून काढ आणि आण तपासायला २० मिनिटात म्हणाल्या. मी १० मिनिटात लिहून काढली आणि नेली वही तपासायला.. बाईंनी माझ्याकडे रागाने पाहिले, पाठीत धपाटा घातला. हकनाक अन्याय सहन करणे रक्तातच नाही माझ्या.. माझा सरळ सवाल - का मारलं मला? काय चुकलंय कवितेत? एक्कत्तरी शुद्धलेखनाची चूक आहे का? की शब्द चुकलेत सांगा. यावर बाई म्हणाल्या की - मी तुला कविता लिहायला सांगितली होती, धडा नाही. कवितेसारखी लिहून आण ! ~~~~ काळजात ( कॉलेजमध्ये ) असताना एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअरींगच्या क्लासटेस्टच्या वेळी मला पाठांतरातला एक शब्द आठवायला तयार नाही. पाठांतरात माझा बेडा नेहमीच गर्क असल्याने मी एक युक्ती केली होती.. प्रत्येक प्रश्न त्याच्या उत्तरासकट एका चित्रपटगीताशी लिंक केला होता. ते गाणे लावून बसून मी ते उत्तर पाठ करायचे. गाणे आणि उत्तर दोन्ही सायमल्टेनिअसली पाठ व्हायचे.. वांदा असायचा ते गाणे योग्यवेळी सुचण्याचा ! क्लासटेस्टच्या दिवशी नेमके सकाळी मी - जब कोई बात बिगड जाए - गाणे ऐकलेले रेडिओवर आणि तेच माझ्या तोंडून सारखे गुणगुणले जात होते. दुसरे गाणे आठवेल तर शप्पथ ! त्याचेच लिरिक्स लिहून काढले मी उत्तरपत्रिकेत शेवटी आणि माझा त्या टेस्टमध्ये हायेस्ट होता वर्गात !

निरंजन मालशे गुरुवार, 05/22/2008 - 17:09
चला माझी ओळख माझ्या फजितीने करून देतो मी कॉलेजात असतानाचा हा माझा धावण्याचा (रनिन्ग चा व्यायाम) किस्सा १ नुकतीच व्यायामशाळा जॉईन केली होती. तिथे लंगोट वापरण कंपल्सरी होत. त्याच महत्व मनावर ठसवल्याने मग मी धावतानाही तोच वापरला. एकदा रस्त्यावरून धावताना अचानक खुप हलक हलक वाटू लागल. आणि.... इथे माझा तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम

चतुरंग गुरुवार, 05/22/2008 - 17:39
हाप प्यांटित व्हता का फुलप्यांटित? न्हाई म्हनजे हाप आसल तर लोकांना माग पिसारा सुटल्यावानि देखनं दिसनार आनि फुल आसल तर बावचळल्यावानि येडंवाकडं पळत सुटनार, म्हनून इच्चारलं! ;) चतुरंग

ऋचा गुरुवार, 05/22/2008 - 18:08
एकदा मी आणि माझा मित्र रार्ती क्लास करुन घरी येत होतो. ह्कुप अंधार होता आणि वीज गायब होती. रस्त्यावरचे दीवे नेहमीप्रमाणे बंद. आम्ही जोरात बोलत येत होतो कारण कोणीच नव्हत रस्त्यावर आणि अचानक मित्राचा आवाज येईना मी जाम टरकले... :S रस्त्यावर कोणी नाही आणि ह्याचा आवाज अचानक बंद. मग त्याने एकदम हाक मारली मला (आधी बर वाटल चला तो आहे) पण कुठेच चाहुल लागेना.. आणि गेलेले दीवे एकदम आले. आणि माझी हसुन ह्सुन वाट लागली. माझा मित्र १ म्हशीवरुन पडला आणि तो बोलत नव्हता कारण त्याला कळलं नाही की तो पडला कसा? =)) आणि ती म्हैस शांतपणे त्याच्याकडे पाहुन दात विचकत रवंथ करत होती. आम्ही जाम हसत घरी हे कारण आम्हाला पुढे खुप दीवस पुरलं हसण्यासठी.

निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 16:37
तर अता दुसरा किस्सा साधारण ९२ सालातली गोष्ट इयत्ता १२ वी त गेलो होतो. मी आमच्या कल्याणातल्या जेल जवळ सकाळी धावायला जायचो. अर्थात जेल ही त्या काळी गावाबाहेर होती. तिथून सुर्योदय फार छान दिसायचा. मी पहाटेच निघायचो. माझा अवतार म्हणजे ढगळ पांढरा टी शर्ट आणि त्यातून घातलेय अस वाटेल इतपत डोकावणारी चड्डी आणि शूज रस्ता स्मशानावरून जायचा. त्यादिवशी रस्त्यावर नेहमीचे चेहरे दिसेनात. मी धास्तावलो. तेव्हढ्यात माझ्या लक्षात आल की शुजची लेस सुटलेय. मी स्मशाना पर्यंत पोचलो होतो आणि समोरची आधारवाडी मिट्ट काळोखात होती. तरीही मी ठरवल की घाबरायच नाही थोड्या वेळात सकाळ होईलच... लेस बांधायला थांबलो इतक्यात शेजारून एक सायकल गेली. मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला. मला पाहून हा का घाबरला असेल ... थोडी गम्मत वाटली पण लगेच लक्षात आल की असचा प्रसंग आपल्याही बाबतीत घडला तर..... लगेच मागल्या पावली पळात सुटलो. घरी आलो तर अजुन जाग दिसत नव्हती. बाथरूम मधे हात पाय धुत असताना घड्याळात लक्ष गेल (हो आमच्या सुज्ञ भगीनीने तिथे एक घड्याळ लावल होत आमच्यासाठी). नुकतेच साडेतीन होत होते.....

In reply to by निरंजन मालशे

एस गुरुवार, 10/09/2014 - 21:23
अक्षरशः पोट धरधरून हसलो. बाप रे! अशीच आमचीही एक फजिती आठवली... :-D

In reply to by निरंजन मालशे

भम्पक Sat, 11/19/2016 - 10:43
मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला.

ऋचा Fri, 05/23/2008 - 17:12
अरे यार काय रे क्रमशः @) वाचायला मुड आला तर ह्याच क्रमशः

विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 04:44
वा! सगळ्यांच्या फजित्या वाचल्या. मौज वाटली! :) आपला, (अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 00:15
कशी फजिती झाली हेही सांगा की नुसतं काय अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!

भिंगरी Fri, 10/10/2014 - 15:24
एक स्त्री असल्याने माझी फजिती लिहू की नको असे वाटत होते.पण बाकिच्यांच्या फजित्या वाचून धैर्य आले. मी ६ वीत असतानाचा प्रसंग. शारिरीक शिक्षण या तासाला आम्हाला कवायतीसाठी मैदानात नेले. कवायतीला सुरुवात झाली आणि काही वेळातच माझी वेगळीच कवायत चालू झाली. झाले असे की त्या वेळी सरसकट सगळे नाडीच्या चड्ड्या वापरत असत. कवायत करता करता चड्डीची नाडी खेचल्या गेल्याने सैल झाली. आता सरांनी म्हटले लेफ्ट की मी डावा हात पुढे करून उजव्या हाताने स्कर्टच्यावरून चड्डी धरून ठेवी,आणि सरांने म्हटले राईट की मी उजवा हात पुढे करून डाव्या हाताने चड्डी धरून ठेवी.असे काही काळ चालले होते थोड्यावेळाने सरांच्या लक्षात आले.आणि किंचित हसत त्यांनी खुणेनेच मला जायला सांगितले.बापरे अजुनही मला अंगावर शहारा येतो की जर सरांच्या लक्षात नसते आले तर?

सुहास.. Fri, 10/10/2014 - 15:41
@ मदनबाणः हे माझे उत्खनन नव्हे. उगाच चारीत्र्य हनन करू नये >> ओ विजुभाउ, म्हणजे ज्याचे आहे त्याचे करावे का ;) @ मदनबाणः हे माझे उत्खनन आहे. आपण दोघेही मनन करु यात.

रेवती Fri, 10/10/2014 - 18:39
एका दिवसात एकच भाषा बोलणारे आपल्यात आता कोणी फारसे नसतील. त्यामुळे एका भाषेतील शब्द दुसर्‍या भाषेत वापरले जाणे, काही शब्द दुसरे वापरतायत म्हणून वापरणे यातून वेगळे अर्थ निघू शकतात. रोज मराठी, विंग्रजी आणि हिंदी या ३ भाषा आपल्याकडून मुख्यत्वे वापरल्या जातात. कालच एका हिंदी भाषिक फ्यामिलीला जेवणाचे आमंत्रण देताना मी काय बोलले की तुम्ही माझ्याकडे या ऐवजी आम्ही तुमच्याकडे येतो असा अर्थ झाला. माझे काहीतरी चुकले हे समजले पण सुधारेपर्यंत तिची हसून पुरेवाट झाली. मग दुसर्या हिंदीवाल्यांना फोन केला. एरवी मैत्रिणी सारखी वागणारी मी तिच्याशी बातम्या देताना हिंदी बोलावे तसे बोलत होते. ती हसायला लागली. उदा. "आप हमारे घर खानेपे आओगे तो हमे बडी खुशी होगी" असले काही ऐकू ती चक्रावली .

अगदी कहर धागा आहे हा , लंगोटी , चावी , पर्वती , मोरी .. हसून वशाड मेलो (सौजन्य मीपा ) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- कॉलेजात असताना कुठलासा धुमकेतू आला होता म्हणून खगोल कॅंप होता , रात्री बराच वेळ धुमकेतू दर्शन घेतल आणि मध्य रात्री साधारण २:०० च्या सुमारास हॉस्टेल वर परत येत होतो , मित्रानी लुना एकदम फास्ट मारली होती , एका क्षणात आमच्या डोळ्या पुढे धूमकेतू चमकला , डोळे विस्फरुन परत बघितल तर डोळ्या समोर खरच आकाशातील धूमकेतू दिसत होता , नंतर दोस्तानी संगितल की लुनाच्या दोन्ही चाकाच्या मध्ये डुककर घुसल होतो आणि लुना रस्त्यावर उलटली होती आणि आम्ही दोघ रस्त्यावर पार उताणे पडलो होतो ... :) एकदम टांगा (लुना) पालटी घोडे फरार

मा़झ्या १०वी नंतर १-२ वर्षांची गोष्ट आहे (२००३-२००४). त्या वेळी माझ्या लंगोटी मित्राच्या ताईसाठी मॅट्रिमोनी साईट्स वर रजिस्ट्रेशन वगैरे चं का चाललं होतं. ह्या भ्**ला माझा ई-मेल चा पासवर्ड त्याला माहीत होता. ह्यानी परस्पर माझं अकाऊंट रजिस्टर आणि व्हेरिफाय केलं. वरती घरचा लँडलाईन नंबर देऊन ठेवला. जेमतेम ७-८ दिवसांनी नेमके पिताश्री घरी असताना फोन आला. ते संभाषण असं होतं साधारणं. पिताश्री : नमस्कार, दातार बोलतोय. वधुबंधु वर्तक : नमस्कार. मी अमुक अमुक वर्तक बोलतोय. तुमचा मुलगा लग्नाचा आहे असं कळलय. आमच्या अपेक्षांमधे तुमचा मुलगा बसतोय. पिताश्री (आमरिश पुरींचे वटारलेले डोळे करुन अस्सल सानुनासिक स्वरामधे) : कोणी सांगीतलं आपल्याला? वधुबंधु वर्तक (बहुतेक चपापलेल्या आवाजात) : अहो, अमुक अमुल वेबसाईटवरुन माहिती मिळाली म्हणुन फोन केलाय. पिताश्री : आमचा बैल आत्ता हाप पँटीतुन फुल पँटीत आलाय. बालविवाह मान्य असेल तर भेटु. तुम्हाला चुकीची माहिती मिळालिये हो. आत्ताशिक कार्टं कॉलेजात जायला लागलाय. फोन कट केल्यावर नंतर भलं मोठ रामायण घडलय. अस्सल को.ब्रां.ची जीभ किती तिरकी वळु शकते त्याचा ह्याची देही अनुभव घेतलाय. अकाऊंट डी-अ‍ॅक्टीव्हेट करेपर्यंत अजुन ३-४ फोन येउन गेले वेगवेगळे. शिवाय हे नक्की कसं झालं ते ऑलमोस्ट ६-७ महिन्यानी समजलं. =))

In reply to by Pradip kale

एस Fri, 11/07/2014 - 00:02
मी तर मोबाईलवरून आक्ख्या लेखांचे मुद्रितशोधन करतो! ;-) सोप्पंय मोबाईलवरून मिपावर मराठी टंकन करणं. इथेच उजवीकडे मदत आहे की. http://www.misalpav.com/node/1312 प्रयत्न करा.

पिलीयन रायडर Fri, 11/07/2014 - 14:55
परवा मॉल मध्ये गेलो होतो तर बायका आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन आत सोडत होते.. मी बायकांच्या लाईन मधुन पुढे आले आणि शेजारुन नवरा पुरुषांच्या लाइन मधुन.. मी पुढे येऊन गडबडीने नवर्‍याचा हात धरायला गेलेच की तो हात एकदम दचकला... तिरप्या नजरेतुन पाहीलं.. मागे नवरा दिसला आणि मी जो हात पकडायला निघाले होते त्याचा मुळ मालक हात छातीशी घेऊन घाबरुन माझ्याकडे पहात होता... नवरा भयानक पेटला होता हे वेगळं सांगायला नको!!! बरं ह्यातुन काही बोध घेऊन जरा ताळ्यावर राहुन जगात वावरावं ना... २ च दिवसानी ऑफिसमध्ये तरातरा वॉशरुम मध्ये घुसले.. समोर एक पुरुष बेसीनसमोर गोठुन आरशातुन माझ्याकडे पहात होता.. "सॉरी..सॉरी.." म्हणत धुम ठोकली... (ह्यात टेक्निकली माझी चुक नव्हती.. आमच्या नव्या हापिसात सगळे फ्लोअर्स अगदी डिट्टो सेम आहेत.. पण स्त्री-पुरुषांचे वॉशरुम मात्र आलटुन पालटुन डावीकडे - उजवीकडे आहेत..हे मला माहित नव्हतं.. मी माझ्या फ्लोअरच्या सवयीने डावीकडे घुसले..!! )

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ Fri, 11/07/2014 - 15:48
हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड माझ्या हातूनही होत असे. लेडीजसाठी डच शब्द आहे dames आणि जेंटलमेनसाठी शब्द आहे heren. चिन्हं असतील तर प्रॉब्लेम नसायचा. पण नुसते शब्द लिहिलेले असतील तर गोंधळ - dames हा शब्दही स्त्री-निदर्शक (उदा. Dame Judy Dench) आणि heren ही (his and her मधलं her). मग काय, देवाचं नाव घेऊन घुसायचं कुठेतरी!

In reply to by आदूबाळ

शिद Fri, 11/07/2014 - 18:57
स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे. 'herr' म्हणजे 'Mr'. सुरुवातीला कळायचंच नाही. कोणी दुसरा माणूस ज्या दरवाजानं जात असेल तर त्याच्या मागोमाग जायचं, असं करावं लागे.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती Fri, 11/07/2014 - 18:51
हा हा हा. डोळ्यासमोर पिराने दुसर्‍या मनुक्षाचा हात धरलाय हे दृष्य आलं आणि फिस्सकन हसले. वॉशरूम बाबत मी अजूनतरी असे काही केले नाहीये पण मुलगा साधारण मोठा झाल्यावर माझ्याबरोबर मॉलमध्ये महिलांच्या रेस्टरुमला येत नसे. त्याचे त्याला पुरुष विभागाकडे जायचे असे. बरे, आपले काम उरकून यावे तर तसे नाही. उगीच याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ असे करत वेळ काढत असे, तर कधी खरेच गर्दी असे. नवरा बरोबर नसला तर पंचाईत! मी वाट बघून नको नको ते सगळे विचार, काळज्या करून झाल्यावर एकदा बाहेरूनच जोरजोरात हाक मारू लागले. सुदैवाने सगळे बाप्ये समजूतदार होते. कोणी हरकत घेतली नाही.

पिशी अबोली Mon, 11/10/2014 - 21:26
मी आजच चांगली फजिती करून घेतलीये. माझं डेटा पॅक संपत आलं होतं हे मला माहीत होतं. पण काल रात्री तर डेटा चांगलाच शिल्लक होता आणि सकाळपासून मात्र मेन बॅलन्स मधून पैसे जात होते. मी नेहमीप्रमाणे चिडले, आयडियाला शिव्या घातल्या, आणि संध्याकाळी फुल भांडायच्या इराद्याने कस्टमर केअर ला फोन लावला. कधी नव्हे तो कुणीतरी नीट बोलता येणारा माणूस होता. त्याने मागचा रिचार्ज वगैरे माहिती नीट शोधून काढली. वॅलिडिटी सांगताना तो म्हणाला, 'आज १० तारीख आहे'. मी अगदी तोर्‍यात उत्तर दिलं-'आज ९ तारीख आहे, आणि माझी डेटा वॅलिडिटी ९ तारखेपर्यंत होती हे मला चांगलंच माहीत आहे.' तो शांतपणे म्हणाला, 'आज १० तारीख आहे मॅम'. मग माझ्या लक्षात आलं, आज खरोखरच १० तारीख आहे.. ;) त्याला कितीतरी वेळा सॉरी म्हणून मी फोन ठेवला.. आता 'काय काय नमुने फोन करतात' असं तो सगळ्यांना सांगत असेल.. =))

नारदाचार्य Tue, 04/08/2008 - 17:50
धमाल्याच्या स्टाईलमधली काही फजिती वाचायला मिळेल म्हणून आलो आणि फजिती झाली.

In reply to by नारदाचार्य

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 18:28
नारदाचार्य, आम्ही सतत ग॑डतच असतो. मी वरचा किस्सा केवळ सुरुवात म्हणून दिलाय. जरा इतरा॑चे झालेले पोपट कळूदे, मग आम्ही पण आमचा झालेला सप्तर॑गी पोपट सा॑गतो की :-))) घ्या तिच्याआयला, मोठ्या हौसेन॑ धागा चालू केला आणि पहिलीच प्रतिक्रिया आमच्या बोका॑डी बसणारी आली...घ्या आमची अजुन एक फजिती !! :-)))) बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-)) - (ग॑डलेला) ध मा ल.

नारदाचार्य Tue, 04/08/2008 - 17:58
वाटलं होतं, धमाल्या आता छान माप काढेल. त्याऐवजी त्यानं,
बाकी, तुमची कधी फ-फ झाली नसावी, च्यायला स्वर्गापासून ते नरकापर्य॑त समस्त विश्वाची फ-फ करणारे तुम्ही! तुमची काय होणार फजिती :-))
असं लिहून पुन्हा गंडवलं. मानलं रे. तुझ्याच भाषेत सांगायचं तर फुटलो...

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 18:20
मी आणि माझे ३ चुलत असे चौघे भाऊ सांगलीला निघलो होतो. वाटेत एक शेतकरी गाडीत माक्याची कणसे भरताना दिसला. आम्ही आमची गाडी थांबवली.षेतकरी दादाला काही कणसे देता का अशी विचारणा केली. त्या शेतकर्‍याने चांगली पोतेभरुन कणसे आमच्या गाडीत टाकली. माझ्या भावाने त्या शेतकर्‍याला कणासाचे पैसे किती म्हणुन विचारले....शेतकरी दादा पैसे घ्यायला नको म्हणाले... मी त्याना मोठ्या उदार पणे म्हंटले की पैसे घ्याना तुमचे नुकसान का करुन घेताय.. शेतकरी त्यावर सहज म्हणाला "काय राव उगाच नुकसानाचं बोलताय्..त्यात नुकसान कसलं..ते तुमच्या पोटात तरी जाइल अहो डुकरं ईतके नुकसान करतात्.....चार डुकरे जास्त लागली म्हणुन समजू..... आम्ही एकमेकांकडे पाहीले........एकुण चौघेजण होतो ना......... .......एक (गाढव ) रान डुक्कर ठरलेला विजुभाऊ

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:42
११वीत असताना, बाबांनी मला स्कूटी घेऊन दिली. थाटात ती स्कूटी घेऊन मी निघाले होते. कॉलेज जवळ एका मैत्रिणीच्या बाबांचे ऑफिस होते. तिथे ती मैत्रिण थांबत असे. तिथुन तिला घेऊन कॉलेजला जाणे हा नित्याचा क्रम. अशिच एकेदिवशी ऑफिसच्या खाली जाऊन, तिथून तिला जोरात हाक मारली. तिने बाल्कनीतून ५ मिन्टे थांब असे सांगितले. मी तशीच स्कूटिवर बसून रहिले होते... इतक्यात...गुडघ्यापर्यंत नऊवारी साडी नेसलेली म्हातरी बाई आली. तिच्या डोक्यावर बुट्टी होती कसली तरी. ती एका हाताने सावरत ती माझ्या जवळ आली. काही काळ मला नुसतीच बघत उभी राहिली. मी लक्ष दिले नाही. मग ती जवळ आली, म्हणाली, " दुरड्या पोचल्यात की ग तिकडं.." मी पुन्हा दुर्लक्ष केलं... ती : पोरी, अगं दुरड्या पोच्ल्यात की थितं.... मी :( निर्विकार पणे) पोचूदेत कि मग, मी काय करू? ती : समदी जमली हायेत तिथं.. आन् तू हितचं... मला आता थोडासा राग आला. मी : तुमच्या त्या दुरड्या म्हणजे काय मला माहिती नाही आणि तुम्हीही जावा जिथं सगळी जमली आहेत तिथं.. ती : (प्रेमाने) असं करू नये पोरी, चल माज्या संगट चल.. मी न्हेते तुला.. माझ्या रागाचा पारा चढायला लागला. तरिही जास्तीत जास्त संयमाने मी तिला म्हणाले.. "बाई, हे बघा.. तुम्ही निघा आता.. मलाही कामं आहेत.." इतक्यात माझी मैत्रिण खाली आली . ती बाई : " म्या तुजं काय बी ऐकनार नाही, तुला घेउनच जानार आहे...." असं म्हणत माझा हात धरला तिने.. मी आता एकदमच भडकले.. मी : ओ बाई, सोडा ना... काय हा मुर्खपणा आहे..? माझी मैत्रिणही तिला ओरडू लागली. ती बाई : मला माहित हाय.. लग्नाच्या मांडवातून तू पळून आली हायेस्...म्या तुला घेऊनच जानार.. तिचं हे वाक्य ऐकून मी ब्लास्ट का काय म्हणतात तेच झाले.. "ओ बाई... उगिच काहीही बडबडू नका... जावा बरं.. .." आणखी काही बोलणार इतक्यात त्या बिल्डिंग मधले एक दुकानदार अमचा गोंधळ ऐकून बाहेर आले.. आणि त्यांनी त्या बाईला हाकलून लावले. मला म्हणाले.. त्या बाईच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला असावा. आम्ही तिथून निघालो..पण राग मात्र शांत झाला नव्हता माझा. हळू हळू शांत झाला. कॉलेज मध्ये येईपर्यंत दोघीही एकमेकीशी काहिच बोललो नाही.... कॉलेज मध्ये स्कूटी पार्क करताना मी नी मैत्रिणीने एकमेकीकडे बघितले आणि दोघिना एकदमच जोरात हसू आले...झालेल्या प्रकारचे. (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री Tue, 04/08/2008 - 23:58
माझ्या लग्नाच्या ३-४ दिवस आधीची गोष्ट.. (होणारा) नवरा अगदी आयत्यावेळेलाच लग्नाला आल्यामुळे त्याच सगळं शॉपिंग बाकी होतं.. मग आम्ही आमच्या घराजवळच्या जयहींदमधे गेलो.. २ शेरवानी आवडल्या.. पण आई-बाबा नव्हते बरोबर, म्हणून संध्याकाळी त्यांना बरोबर घेऊन शॉपिंग उरकून टाकावी असा विचार केला.. पण एक शेरवानी बुक करून ठेवावी म्हणून आम्ही काऊंटरपाशी आलो.. नवर्याने ५०० रू. देऊन शेरवानी बुक करून काउंटरपाशी ठेवली आणि निघाला... तेवढ्यात मी माझं अती-बावळट डोकं चालवलं, आणि त्या माणसाला म्हणाले "अहो, शेरवानी द्या की.. तिथे कुठे ठेवताय!! " :)))) आणि नवर्‍याकडे असं पाहीलं जसं काही तो पण विसरत होता आणि मी किती हुशार!! (४-५ हजारांची शेरवानी कुणी ५०० ला देईल का अशी!! ) तिकडे नवर्‍याला , आता हात जोडू की पाया पडू असं झालं होतं... तेवढ्यात मला माझा यडपटपणा कळला..आणि हसत आम्ही निघालो ! काउंटर वरच्या माणसाचा चेहरा पाहण्यालायक झाला होता!! :)

चतुरंग Wed, 04/09/2008 - 00:31
त्यावेळी बहुदा माझे अभियांत्रिकीचे तिसरे वर्ष होते. मी मावशीकडे रहात होतो. एरवी बसने जात असलो तरी परीक्षेच्या काळात वेळ वाचावा म्हणून मी काकांची जुनी स्कूटर घेऊन जात असे. त्याप्रमाणे मी आणि माझा वर्गमित्र स्कूटवरुन परीक्षेला चाललेलो. नेहेमीप्रमाणेच अभ्यास 'नीट' झालेला असल्यामुळे, तो मागे बसून मोठ्याने नोट्स वाचत होता आणि मी गाडी चालवत ऐकत होतो! जून महिन्यातला पहिलाच आठवडा होता. पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या होत्या. रस्ते किंचित ओलसरच होते. आमच्या कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्याला दोन - तीन अतीशय झोकदार वळणे होती. त्यातल्याच एका वळणावर आमची गाडी पोचली. तिथे बहुदा ऑइल सांडलेले होते, त्यावर पावसाचे पाणी, मग काय विचारता एकदम ऑईल-स्केटिंगच! आमची गाडी अलगद घसरली, स्पीड अत्यंत कमी होता कारण लक्ष नोट्स ऐकण्याकडे होते, हलकेच घसरलेल्या स्कूटरवरुन मी बुद्कन खाली रस्त्यावर कधी आलो ते मलाच समजले नाही. त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. मी पोट धरुन रस्त्यावर पडल्या पडल्याच हसत होतो आणी पलीकडे माझा मित्र हसत होता! (नंतर नीट बघितले तेव्हा स्कूटरचे मागचे टायर पूर्ण गोटा होते असे दिसले;)) अजूनही आम्ही भेटलो की त्या आठवणीवरुन घसरतोच! चतुरंग

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:38
त्याहूनही खरी धमाल पुढेच होती. कारण मी पडलो तरी स्कूटर पुढे जातच होती आणि त्यावर बसलेला माझा मित्रा तरीही नोट्स वाचतच होता!! काही अंतर पुढे जाऊन त्याचे लक्ष समोर जाताच मी नाही हे त्याला समजले (त्या वेळी त्याची माझ्याकडे पाठ असल्याने दुर्दैवाने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव मला दिसले नाहीत;) आणि तो गडबडून गेला, तो पर्यंत स्कूटर रस्त्याकडेला जाऊन पडली आणि तोही हातातल्या वहीसकट मातीत फतकल मारुन बसला. अहो तुम्हीच काय.. हे वाचून मी सुद्धा पोट धरून हसले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Wed, 04/09/2008 - 10:07
शाळेतल्या दिवसांनमधील गोष्ट आहे, बहुतेक मी ८ वी मधे होतो, वार्षिक परि़क्षेचे वेळापत्रक एका नोटिस बोर्ड वर लावले होते. ते लिहुन घेण्यासाठी मुलांची गर्दी जमा झाली होती.मी सुद्धा त्या गर्दी मधे उभा राहुन वेळापत्रक लिहुन घेतले. सरते शेवटी परिक्षेचा दिवस उजाडला, एक एक पेपर होत गेले आणि आता फक्त २/३ पेपरच बाकी होते. इतिहासाच्या पेपर ची माझी पूर्ण तयारी झाली होती आणि आज तो पेपर होता,मी वर्गात जाऊन बसलो आणि परिक्षक पेपर वाटण्याची वाट पाहु लागलो..... शेवटी पेपर माझ्या हाती लागला आणि तो मी आधी पुर्ण वाचुन मग सोडवण्यास घेणार होतो,,,,,पण हे काय?इतिहासाच्या जागी भुगोलाचा पेपर? मला तर काहीच कळेनाच मी माझ्या पुढील मुलास विचारले काय रे आज इतिहासाचा पेपर आहे ना? तो म्हणाला नाही भुगोलाचा.....(याचा अर्थ इतिहासाचा पेपेर दोन दिवसानंतर आहे.) एका क्षणात माझ्या लक्षात आले गर्दी मधे उभे राहुन वेळापत्रक लिहुन घेण्यात माझ्या कडुन एक छोटी चुक झाली होती,,,,,,(छोटी?) त्या क्षणी वर्गातली सगळी बाकडी माझ्या भोवती गरागरा फिरतायत असे वाटायला लागले,इतिहासातील अतिरथी महारथी जाऊन आता बिनमोसमी वादळी वारे वाहायला लागले होते..... शेवटी मी माझ्या डोक्यातील होकायंत्राप्रमाणे भरकटलेल्या विचारांना आवरायचे ठरवले..... आणि पेपर लिहावयास घेतला,,,,, मी फक्त लिहीत गेलो..... निकालाचा दिवस उजाडला:----- मला इतिहासापेक्षा भुगोलात जास्त मार्क मिळाले होते!!!!! ( धमालजी आपला मि.पा वरील छोटा मदन दा) मदनबाण

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:44
अगदी अशीच फजिती माझी बी.कॉम्. ला झाली. स्टॅटीस्टीक्सच्या पेपरला मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास करून गेलो होतो. हातात पेपर आला आणि मेंदूत काळोख पसरला....... अर्धातास आढ्याकडे नजर लावून बसल्यावर स्टॅटचे एक- एक फॉर्म्युले आठवायला लागले. वर्ष फुकट गेले नाही. नशीब.

In reply to by प्रभाकर पेठकर

लंबूटांग Sun, 04/13/2008 - 22:24
७वी च्या स्कॉलरशिप च्या परिक्षेच्या वेळेस बुद्धिमत्ता चाचणी चा पेपर समजून आत गेलो. सर्व पेपर सोडवून संपत आला आणि शेवटी ग्राफ बघितल्यावर शंका आली बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपर मधे ग्राफ्स कसे आणि तेव्हा पेटली की हा गणिताचा पेपर आहे. आणि सगळ्यात जास्ती मार्क्स गणितातच मिळाले.

In reply to by मदनबाण

नीलकांत Tue, 04/15/2008 - 18:12
अंतीम वर्षाच्या परिक्षेच्यावेळी असाच अनुभव गाठीशी आहे. माझ्या जवळ वेगळी पुस्तके आणि इतरांजवळ इतर, आता परिक्षेच्या वेळी पुस्तके म्हणजे... अहो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढतो. ( सुरुवात कधी करतो ते विचारू नका) पण पेपर छान गेला व निकाल सुध्दा उत्तम. नीलकांत

भाग्यश्री Wed, 04/09/2008 - 10:19
ही फजिती नाही म्हणता येणार.. नवर्‍याचा आगाऊपणा म्हणा.. किंवा शिक्षकांची फजिती!! :) तो शाळेत असताना त्याने पेपर मधे असंख्य तारे तोडलेत.. त्यातले १-२.. म्हणी पूर्ण करा असा प्रश्न होता.. बळी तो ----- आणि याने लिहीलं, "बळी तो राजाचा माळी !" आणि इंग्रजी च्या पेपर मधे काहीतरी गोपाल आणि सीता वर ४-५ ओळी दिल्या होत्या, आणि खाली प्रश्न होता.. who is gopal ? his answer was.... gopal is seeta !! :D मला त्या शिक्षकांचे एक्स्प्रेशन्स पाहायला आवडलं असतं!! :))

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 10:40
सगळ्यात मोठी फजिती काही डिश्टींग्युइश करता येत नाय भो, दर २-४ दिवसाला आमचा कुठे न कुठे पोपट होतच असतो. आत्ता काल परवाचीच गोष्ट हाय, आम्ही गेल्तु पोरगी पहायला, पहायला म्हणजे तिला हाटेलित भेटायला हो. मोठ्या श्टायलीत मोठ्ठ्या मोठ्ठ्या आर्डरी सोडल्या अन जेव्हा बिल द्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आले की पाकिट आम्ही हापिसातल्या आमच्या कप्प्यातच विसरलो. अस्सा गोरामोरा झालो मी ! माझे खर्रकन उतरलेले तोंड पाहुन हुशार पोरगी काय समजायचे ते समजली अन पैसे देउन मोकळी झाली !

मनस्वी Wed, 04/09/2008 - 16:10
शनिवार, वेळ अंदाजे सकाळचे ११-१२. मी आणि माझी मैत्रीण एन् सी सी ची परेड संपून स्कूटीवरून सुसाट घरी चाललो होतो. मी चालवत होते आणि मैत्रिण मागे. आमच्या समोरची रिक्षा तुफान वेगात होती आणि आमची स्कूटीपण त्याच वेगात.. काही सेकंदात अचानक रिक्षेने डावीकडे टर्न घेतला...... आणि आम्ही झूपकन समोरच्या उंच डिव्हायडरच्या वर! गाडीला खाडकन ब्रेक लावला.. त्या उंच डिव्हायडरवर ती स्कूटी आणि स्कूटीवर आम्ही दोघी ते पण एन् सी सी च्या ड्रेसमध्ये असे दृष्य. काही सेकंदातच काय झाले ते लक्षात आले. तेवढ्यात शेजारील मोटारसायकलवरचे २ तरुण आले.. त्यांनी आमची गाडी खाली काढून दिली आणि आम्ही तिथून धूम ठोकली :) आणि घरी आल्यावर जे हसत सुटलो...

वरदा Wed, 04/09/2008 - 19:12
मज्जा आली वाचून... मी इथे अमेरीकेत आल्यावर पहिल्यांदा बर्फ साफ करायला घेतला.. नवरा सांगत होता नको जाऊस तरी म्हटलं मी जाऊन दुसरं शॉवेल आणते...आणि बोलत बोलत चाल्ले होते... नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:))) असली भयंकर आपटले साष्टांग नमस्कार घातला आणि नेमकी शेजारची बाई तेव्हा बर्फाचे फोटो काढत होती तिच्या कॅमेराने अगदी बरोब्बर माझाच फोटो काढला...सगळ्या बिल्डींगला करमणूक झाली...मी शेकली गेले त्याचं काय :))))))

In reply to by वरदा

लंबूटांग Sun, 04/13/2008 - 22:27
नवर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आवाज नेहेमीसारखा येत होता नंतर अचानक जमीनीतून आल्यासारखा वाटला:)))
हा हा हा..

शितल Wed, 04/09/2008 - 22:24
माझी फजीती हे सदर छान आहे. मला ही फजीती आठवते पण दुसर्‍याची पाहिलेली.

अनिकेत Wed, 04/09/2008 - 23:03
अगदी २ दिवसापूर्वीची गोष्ट... मी सध्या दिल्लीला आलो आहे. २ दिवसांपूर्वी कनॉट प्लेस मधे एका जुना लूक असलेल्या रेस्टॉरंटात गेलो.. तिथल्या आगाऊ वेटरने मला वय विचारले...मी म्हटले २४... त्याने मला पाटी दाखवली...दारू २५ च्या वरच्यांना देणार......असला पोपट झालाय... असला कसला कायदा दिल्लीत? मुंबई/केरळात असे नसते हो..... :( अनिकेत ता.क.: काल मी वय २६ सांगितले.... :)

देवदत्त Wed, 04/09/2008 - 23:12
छान मजा चालली आहे एकमेकांच्या फजित्या वाचत ;) चालू द्या... जमल्यास (काही असल्यास) मीही लिहिन.

शितल Sun, 04/13/2008 - 03:59
आम्ही ५ ते ६ मैत्रिणी बसने कॉलेजला जात असु, इ॑जिनिअरि॑गची ही मुले बसला असायची, बसला गर्दी असल्यामुळे कधी कधीच बसायला जागा मिळे, एके दिवशी एकदम पुढे जागा मिळाली, मी व माझी मैत्रिण बसलो, आमच्या समोरच्या सीट (ड्रायव्हरच्या पाठी मागच्या बाजुला असलेली) मुले बसली होती, समोर मुले असल्यामुळे आम्ही दोघी ही खिड्कीतुन बाहेर पहात होतो, इतक्यात जोराच ब्रेक लागला, आणि आम्ही समोरच्या॑चा अ॑गावर कोसळ्लो, आणि बसची सीट उचकुन आमच्या पाठीवर पडली, उभे असलेल्या काही मुला॑नी मग बसची सीट उचलली, मग आम्ही दोघी उभे राहिलो, समोर पाहतो ते काय, आम्ही ज्या॑च्या अ॑गावर कोसळ्लो त्या पैकी एका मुला॑ने डोळे ब॑द केलेले, एक ओशाळ्लेला आणि एक हसत, उभ्या असलेल्या मैत्रिणी आणि सीन पाहिलेले हसत होते, आमच्या ओठी हसु, पडल्यामुळे लाज, आणि पाठीला लागल्यामुळे डोळ्यातुन पाणी. मग, उभे असलेल्या २ मुला॑नी बसची सीट पाठुन हाता॑नी धरली, आणि समोर बसलेल्या॑नी पायानी आणि आमचा प्रवास चालु. न॑तर ८ दिवस बसमध्ये बसायला जागा मिळाली की बसची सीट उचकते का ते पाहुनच बसत होतो.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 04/13/2008 - 21:36
(सन २००३) आम्ही सगळे विद्यार्थीमित्र पुण्यातच दुसर्‍या कॉलेजमध्ये एक व्याख्यान ऐकण्यास आलो होतो. ग्रूपमधल्या एकाचे नुकतेच लग्न ठरले होते व त्याची वाग्दत्त वधू त्याला मोबाईलवर दर तासाला एक फोन करीत असे. व्याख्यान सुरू होऊन दीड तास झाला तरी त्याला तिचा फोन काही आला नाही (त्याचे लक्ष तिथेच होते) म्हणून तो अस्वस्थ होता. शेवटी व्याख्यान स॑पल्यावर ऑडिटोरीयममधले दिवे लागल्यावर त्याने खिशातून मोबाईल काढला.. बघतो तो त्याने मोबाईल समजून टिव्हीचा रिमोटच बरोबर आणला होता..!! तो एकदम खजील झाला आणि 'तिच्या' रोषाच्या भीतीने घरी पळत सुटला..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

वैभव Wed, 05/28/2008 - 18:22
अरे घराजवल्ल एक चोरी झाली........ चोराने CD Player चोरून नेला. घरात काकु चोराला लाखोली वाहत होती. काकुला म्ह्ट्ले "झाले ते झाले ......काय दु:ख करत बसलाय" काकु ने म्ह्ट्ले "कप्पाळ माझे...........चोराने सोबत T.V चे रिमोट नेले" ग्राऊन्ड वर आमची हसुन हसुन पुरेवाट झाली.

तात्या विंचू Mon, 04/14/2008 - 17:02
मी दुसरीत असतानाची ही गोष्ट. नुकताच कांजिण्यांच्या आजारातून उठलो होतो. महिनाभर शाळा चुकल्याने घरच्यांनी झालेला अभ्यास भरुन काढायला जवळच एका क्लासला नाव घातले होते. कांजिण्यांच्या फोडांचे वण पुर्णपणे जाण्यासाठी सारखे औषध लावावे लागत असल्याने स्वारी उघडीच पुर्ण घरभर फिरत असायची. त्या दिवशी दुपारी क्लास होता.घरी बाबा थांबणार होते.आई बाहेर गेली होती.पटकन आवरुन मी क्लासला जायला निघालो. साधारण निम्मे अंतर गेलो असेन. समोरुन एक मुलगी आली आणि माझ्याकडे बघुन खुदकन हसली. मला काही तरी विचित्र वाटले. मनात विचार आला...बहुतेक पँटची चेन लावायची राहिली....म्हणुन खाली बघतो तर काय...मी खाली पँटच घातली नव्हती....म्हणजे अंडर्वेअर घालुन मी क्लासला जायला निघालो होतो....तसाच पळत पळत मी परत घरी आलो.. दार उघडताच बाबांना कळुन चुकले..मी कसा पॅंट न घालता क्लासला गेलो होतो..ते पण मला बघुन हसायला लागले...शेवटी पॅंट घालुन परत व्यवस्थितपणे क्लासला गेलो...

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 17:37
गेल्या रविवारी, एका मित्राचं 'गुपचुप शुभमंगल' उरकून घरी आलो. उन्हामुळे पार वेड लागायची वेळ आली होती...जरा पंखा चालू करुन बहिणाबाईंशी गप्पा मारत बसलो, हातात घराची किल्ली होती, तिच्याशी चाळा चालू होता. एक दहा मिनिटांत भगिनीदेवी मैत्रिणीकडे गेल्या. म्हणलं चला जरा खाली जाऊन मस्त कोकम सरबत घेऊ, आणि परत येऊन देऊ ताणून... कसलं काय? घराची किल्लीच सापडायला तयार नाही. आख्खं घर पालथं घातलं...नो किल्ली सापडिंग ! म्हणलं च्यायला, ही काय भुताटकी आहे? शेजारच्या काकूंचं दार वाजवलं, भर शनवारातल्या इमारतीतलं शेजारच्या घराचं दार वाजवायचं तेही टळटळीत दुपारी...आणि रविवारच्या म्हणजे.... तरीही हिम्मत करुन दार वाजवलं. अपेक्षेप्रमाणे झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा पुढे आला. म्हणालो, "काकू, माझी घराची किल्ली सापडत नाहीय्ये! तुमच्याकडे ठेवलेली स्पेअर किल्ली देता का जरा?" तर ह्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक काकू माझ्याकडे बघून फिस्सकन हसल्या...आणि मग फिदीफिदी...खुदुखुदु...शेवटी खो खो हसायला लागल्या. म्हणलं 'बाई गंडली बहुतेक. दुपारचं जागरण सोसवलं नसेल'............. तर ह्या आमच्या काकूंनी माझ्या कानाशी हात नेला, आणि मी खेळता-खेळता कानावर अडकवलेली किल्ली काढून हातात दिली. .......आणि संध्याकाळपर्यंत आख्ख्या सोसायटीत ही बातमी 'सबसे तेज' पोहोचवली.आता मला येता जाता कानकोंड्यासारखं होतं ना राव...जो उठतो तो चेष्टा करतो :-(

In reply to by धमाल मुलगा

नंदन Wed, 04/16/2008 - 00:12
झोपाळलेल्या काकूंच्या वैतागफुल्ल प्रश्नार्थक चेहरा -- वा! भडकमकर क्लासेसच्या नाट्यसमीक्षकी भाषेत बोलायचे तर चित्रदर्शी आणि चपखल शब्दयोजना :) बाकी कानाला किल्ली लावल्याने 'कान'कोंड्यासारखं होणं, हेही बेष्ट धमुराव :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:41
थ्यांक्यू थ्यांक्यू हां ! हेही बेष्ट धमुराव :) धमु नका ना म्हणू...असं म्हणून कळवळलो !!!! :-) आपला, (कळवळ्या) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Wed, 04/16/2008 - 13:50
आंटी मत कहो ना च्या श्टाईल मधे धम्या "धमु नका ना म्हणू" असे म्हणतांना डोळ्यासमोर आला ! (आंटी वरुन काहीही गैरसमज नसावा, सदरहु आंटी ही "हम पांच" या मालिकेतली खरीखरी आंटी (काकु या अर्थाने) आहे.)

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:53
आशेंsss ? बरां बरां... बरां झाला तू सांगितलांन आचरट मेला..एकदम करपटला कालिज !!!!!

वरदा Tue, 04/15/2008 - 20:11
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?

In reply to by वरदा

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:44
कानावर किल्ली काय राव कान म्हणजे काय खुंटी समजता की काय?
ह्या: खुंटी समजलो असतो तर सदरा, पायजमा नसता का टांगला? आयला, बरं झालो खुंटी नाही समजलो....कानाला पायजमा टांगून शेजारच्या काकूंचं दार वाजवायला गेलो असतो तर? बरं दिसतं का ते? - (मती 'खुंट'लेला ) ध मा ल.

माझ्या दादाने पहीलीला शाळेत पेपरात लिहीले होते प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी प्र. वाक्यातील कर्ता व कर्म यांचे स्त्रिलिंगी रुप करून योग्य क्रियापद वापरा. वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' खीखीखी.... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 13:48
प्र. चिंचवडला कोणाची समाधी आहे? उ. राजा गोसावी
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी !
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली'
आता काय बोलायचं ह्याच्यावर? एकच प्रतिक्रिया चपखल बसतेय...खीखीखी....खुखुखु...खोखोखो....ख्याख्याख्या...

In reply to by धमाल मुलगा

भडकमकर मास्तर Wed, 04/16/2008 - 14:21
भले बहाद्दर !!!!! आता पाठवा मोरया गोसावींना टाकीत. होऊन जाऊदे त्यांची आणि राजा परांजपेंची जुगलबंदी ! परांजपे??

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 01:15
वाक्य 'शंकर मोरावर बसला' माझे उत्तरः 'पार्वती मोरीवर बसली' झक्कासच..प्रतिक्रीया सुचतच नाही..... मती 'खुंट'लेला ध मा ल माझीच खुंटली आता मती....:))))))

वरदा गुरुवार, 04/17/2008 - 01:21
लिहिलेला निबंध...विषय दिवाळी.. मला दिवाळी खूप आवडते कारण शाळेला सुट्टी असते. दिवाळीत आम्हा लहान मुलांची मजा असते. आई बाबा मला नवीन कपडे आणतात. फटाकेही आणतात. आम्ही घरी चकल्या, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे बनवतो. आकाशकंदील लावतो. किल्ला बनवतो. रांगोळी काढतो. मला ह्या वर्षीची दिवाळी आवडली. मी नविन कपडे घातले. मी चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि अनारसे खाल्ले. मी आकाशकंदील लावला. मी किल्ला बनवला. मी रांगोळी काढली. मला दिवाळी आवडली. सगळ्या वर्गात अशी लाज काढली होती बाईंनी, अगं वर्तमान आणि भूतकाळातले दोन पॅरा लिहून निबंध होत नाही म्हणून...

वेदश्री Sun, 04/27/2008 - 21:18
४थीमध्ये होते तेव्हाची गोष्ट. इतिहासाच्या करकरेबाई इत्तक्या वेगाने वर्गपाठासाठीचे प्रश्न सांगायच्या की त्या वेगाने लिहायला मला जमायचेच नाही.. इतरांचे माहिती नाही काय करायचे ते. सुरूवात केली तेव्हा मी तिसरा प्रश्न सांगून संपायची वेळ आली तेव्हा पहिला प्रश्न लिहून संपवला होता.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सांगा असं ओरडले मी. बाईंनी त्रासिक नजरेने माझ्याकडे पाहिले.. दुसर्‍या प्रश्नापासून परत सुरू झाली राजधानी एक्प्रेस. :( २-३दा मी परतपरत सांगायला सांगितले आणि बाईंनी पाठीत धपाटा घालून पटापट लिही सांगितले. मला रागच आला. मग कानावर पडेल तो शब्द मी शॉर्टकट करायला सुरूवात केली.. शिवाजीमहाराजांचा जन्म कधी झाला? असे त्या म्हणाल्या की मी शिमचाजकझा? असे लिहून काढत गेले.. वेग मॅच होत होता. मी स्वतःच्या हुशारीवर खुश झाले. बाईंनी १००+ प्रश्न सांगितले होते ( प्रत्येक वाक्यावर त्यांनी एक प्रश्न बनवला होता जेणेकरून अख्खा धडा वाचून होईल म्हणे ! ) आणि उद्या उत्तरे लिहून आणा म्हणाल्या ! घरी गेल्यावर प्रश्नांचा अर्थ लावायचा प्रयत्न करायला लागले तर त्या शब्दजंजाळाचा अर्थ लागेल तर शप्पथ ! उद्या वर्गात वाट लागणार या विचाराने मी तोंड उतरवून बसले होते तर आई आली म्हणे की कोणत्या प्रश्नाला अडली आहेस? मी सांगते उत्तर.. आणि मी म्हणाले की.. शिमचाजकझा?!!! ~~~~ गोसावीबाई मराठी शिकवायला होत्या ३रीला. एकदा त्यांनी एक कविता पाठ करून यायला सांगितली होती, पाठ करून गेले होते. ती कविता वहीत लिहून काढ आणि आण तपासायला २० मिनिटात म्हणाल्या. मी १० मिनिटात लिहून काढली आणि नेली वही तपासायला.. बाईंनी माझ्याकडे रागाने पाहिले, पाठीत धपाटा घातला. हकनाक अन्याय सहन करणे रक्तातच नाही माझ्या.. माझा सरळ सवाल - का मारलं मला? काय चुकलंय कवितेत? एक्कत्तरी शुद्धलेखनाची चूक आहे का? की शब्द चुकलेत सांगा. यावर बाई म्हणाल्या की - मी तुला कविता लिहायला सांगितली होती, धडा नाही. कवितेसारखी लिहून आण ! ~~~~ काळजात ( कॉलेजमध्ये ) असताना एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअरींगच्या क्लासटेस्टच्या वेळी मला पाठांतरातला एक शब्द आठवायला तयार नाही. पाठांतरात माझा बेडा नेहमीच गर्क असल्याने मी एक युक्ती केली होती.. प्रत्येक प्रश्न त्याच्या उत्तरासकट एका चित्रपटगीताशी लिंक केला होता. ते गाणे लावून बसून मी ते उत्तर पाठ करायचे. गाणे आणि उत्तर दोन्ही सायमल्टेनिअसली पाठ व्हायचे.. वांदा असायचा ते गाणे योग्यवेळी सुचण्याचा ! क्लासटेस्टच्या दिवशी नेमके सकाळी मी - जब कोई बात बिगड जाए - गाणे ऐकलेले रेडिओवर आणि तेच माझ्या तोंडून सारखे गुणगुणले जात होते. दुसरे गाणे आठवेल तर शप्पथ ! त्याचेच लिरिक्स लिहून काढले मी उत्तरपत्रिकेत शेवटी आणि माझा त्या टेस्टमध्ये हायेस्ट होता वर्गात !

निरंजन मालशे गुरुवार, 05/22/2008 - 17:09
चला माझी ओळख माझ्या फजितीने करून देतो मी कॉलेजात असतानाचा हा माझा धावण्याचा (रनिन्ग चा व्यायाम) किस्सा १ नुकतीच व्यायामशाळा जॉईन केली होती. तिथे लंगोट वापरण कंपल्सरी होत. त्याच महत्व मनावर ठसवल्याने मग मी धावतानाही तोच वापरला. एकदा रस्त्यावरून धावताना अचानक खुप हलक हलक वाटू लागल. आणि.... इथे माझा तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम

चतुरंग गुरुवार, 05/22/2008 - 17:39
हाप प्यांटित व्हता का फुलप्यांटित? न्हाई म्हनजे हाप आसल तर लोकांना माग पिसारा सुटल्यावानि देखनं दिसनार आनि फुल आसल तर बावचळल्यावानि येडंवाकडं पळत सुटनार, म्हनून इच्चारलं! ;) चतुरंग

ऋचा गुरुवार, 05/22/2008 - 18:08
एकदा मी आणि माझा मित्र रार्ती क्लास करुन घरी येत होतो. ह्कुप अंधार होता आणि वीज गायब होती. रस्त्यावरचे दीवे नेहमीप्रमाणे बंद. आम्ही जोरात बोलत येत होतो कारण कोणीच नव्हत रस्त्यावर आणि अचानक मित्राचा आवाज येईना मी जाम टरकले... :S रस्त्यावर कोणी नाही आणि ह्याचा आवाज अचानक बंद. मग त्याने एकदम हाक मारली मला (आधी बर वाटल चला तो आहे) पण कुठेच चाहुल लागेना.. आणि गेलेले दीवे एकदम आले. आणि माझी हसुन ह्सुन वाट लागली. माझा मित्र १ म्हशीवरुन पडला आणि तो बोलत नव्हता कारण त्याला कळलं नाही की तो पडला कसा? =)) आणि ती म्हैस शांतपणे त्याच्याकडे पाहुन दात विचकत रवंथ करत होती. आम्ही जाम हसत घरी हे कारण आम्हाला पुढे खुप दीवस पुरलं हसण्यासठी.

निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 16:37
तर अता दुसरा किस्सा साधारण ९२ सालातली गोष्ट इयत्ता १२ वी त गेलो होतो. मी आमच्या कल्याणातल्या जेल जवळ सकाळी धावायला जायचो. अर्थात जेल ही त्या काळी गावाबाहेर होती. तिथून सुर्योदय फार छान दिसायचा. मी पहाटेच निघायचो. माझा अवतार म्हणजे ढगळ पांढरा टी शर्ट आणि त्यातून घातलेय अस वाटेल इतपत डोकावणारी चड्डी आणि शूज रस्ता स्मशानावरून जायचा. त्यादिवशी रस्त्यावर नेहमीचे चेहरे दिसेनात. मी धास्तावलो. तेव्हढ्यात माझ्या लक्षात आल की शुजची लेस सुटलेय. मी स्मशाना पर्यंत पोचलो होतो आणि समोरची आधारवाडी मिट्ट काळोखात होती. तरीही मी ठरवल की घाबरायच नाही थोड्या वेळात सकाळ होईलच... लेस बांधायला थांबलो इतक्यात शेजारून एक सायकल गेली. मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला. मला पाहून हा का घाबरला असेल ... थोडी गम्मत वाटली पण लगेच लक्षात आल की असचा प्रसंग आपल्याही बाबतीत घडला तर..... लगेच मागल्या पावली पळात सुटलो. घरी आलो तर अजुन जाग दिसत नव्हती. बाथरूम मधे हात पाय धुत असताना घड्याळात लक्ष गेल (हो आमच्या सुज्ञ भगीनीने तिथे एक घड्याळ लावल होत आमच्यासाठी). नुकतेच साडेतीन होत होते.....

In reply to by निरंजन मालशे

एस गुरुवार, 10/09/2014 - 21:23
अक्षरशः पोट धरधरून हसलो. बाप रे! अशीच आमचीही एक फजिती आठवली... :-D

In reply to by निरंजन मालशे

भम्पक Sat, 11/19/2016 - 10:43
मला धीर आला मी लगेच त्याच्या मागून धावू लागलो. तो सायकलस्वार थोडा थांबला मागेवळून पाहील आणि धूम पळाला.

ऋचा Fri, 05/23/2008 - 17:12
अरे यार काय रे क्रमशः @) वाचायला मुड आला तर ह्याच क्रमशः

विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 04:44
वा! सगळ्यांच्या फजित्या वाचल्या. मौज वाटली! :) आपला, (अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

वरदा गुरुवार, 05/29/2008 - 00:15
कशी फजिती झाली हेही सांगा की नुसतं काय अनेकदा, अनेक प्रकारची फजिती झालेला!

भिंगरी Fri, 10/10/2014 - 15:24
एक स्त्री असल्याने माझी फजिती लिहू की नको असे वाटत होते.पण बाकिच्यांच्या फजित्या वाचून धैर्य आले. मी ६ वीत असतानाचा प्रसंग. शारिरीक शिक्षण या तासाला आम्हाला कवायतीसाठी मैदानात नेले. कवायतीला सुरुवात झाली आणि काही वेळातच माझी वेगळीच कवायत चालू झाली. झाले असे की त्या वेळी सरसकट सगळे नाडीच्या चड्ड्या वापरत असत. कवायत करता करता चड्डीची नाडी खेचल्या गेल्याने सैल झाली. आता सरांनी म्हटले लेफ्ट की मी डावा हात पुढे करून उजव्या हाताने स्कर्टच्यावरून चड्डी धरून ठेवी,आणि सरांने म्हटले राईट की मी उजवा हात पुढे करून डाव्या हाताने चड्डी धरून ठेवी.असे काही काळ चालले होते थोड्यावेळाने सरांच्या लक्षात आले.आणि किंचित हसत त्यांनी खुणेनेच मला जायला सांगितले.बापरे अजुनही मला अंगावर शहारा येतो की जर सरांच्या लक्षात नसते आले तर?

सुहास.. Fri, 10/10/2014 - 15:41
@ मदनबाणः हे माझे उत्खनन नव्हे. उगाच चारीत्र्य हनन करू नये >> ओ विजुभाउ, म्हणजे ज्याचे आहे त्याचे करावे का ;) @ मदनबाणः हे माझे उत्खनन आहे. आपण दोघेही मनन करु यात.

रेवती Fri, 10/10/2014 - 18:39
एका दिवसात एकच भाषा बोलणारे आपल्यात आता कोणी फारसे नसतील. त्यामुळे एका भाषेतील शब्द दुसर्‍या भाषेत वापरले जाणे, काही शब्द दुसरे वापरतायत म्हणून वापरणे यातून वेगळे अर्थ निघू शकतात. रोज मराठी, विंग्रजी आणि हिंदी या ३ भाषा आपल्याकडून मुख्यत्वे वापरल्या जातात. कालच एका हिंदी भाषिक फ्यामिलीला जेवणाचे आमंत्रण देताना मी काय बोलले की तुम्ही माझ्याकडे या ऐवजी आम्ही तुमच्याकडे येतो असा अर्थ झाला. माझे काहीतरी चुकले हे समजले पण सुधारेपर्यंत तिची हसून पुरेवाट झाली. मग दुसर्या हिंदीवाल्यांना फोन केला. एरवी मैत्रिणी सारखी वागणारी मी तिच्याशी बातम्या देताना हिंदी बोलावे तसे बोलत होते. ती हसायला लागली. उदा. "आप हमारे घर खानेपे आओगे तो हमे बडी खुशी होगी" असले काही ऐकू ती चक्रावली .

अगदी कहर धागा आहे हा , लंगोटी , चावी , पर्वती , मोरी .. हसून वशाड मेलो (सौजन्य मीपा ) --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- कॉलेजात असताना कुठलासा धुमकेतू आला होता म्हणून खगोल कॅंप होता , रात्री बराच वेळ धुमकेतू दर्शन घेतल आणि मध्य रात्री साधारण २:०० च्या सुमारास हॉस्टेल वर परत येत होतो , मित्रानी लुना एकदम फास्ट मारली होती , एका क्षणात आमच्या डोळ्या पुढे धूमकेतू चमकला , डोळे विस्फरुन परत बघितल तर डोळ्या समोर खरच आकाशातील धूमकेतू दिसत होता , नंतर दोस्तानी संगितल की लुनाच्या दोन्ही चाकाच्या मध्ये डुककर घुसल होतो आणि लुना रस्त्यावर उलटली होती आणि आम्ही दोघ रस्त्यावर पार उताणे पडलो होतो ... :) एकदम टांगा (लुना) पालटी घोडे फरार

मा़झ्या १०वी नंतर १-२ वर्षांची गोष्ट आहे (२००३-२००४). त्या वेळी माझ्या लंगोटी मित्राच्या ताईसाठी मॅट्रिमोनी साईट्स वर रजिस्ट्रेशन वगैरे चं का चाललं होतं. ह्या भ्**ला माझा ई-मेल चा पासवर्ड त्याला माहीत होता. ह्यानी परस्पर माझं अकाऊंट रजिस्टर आणि व्हेरिफाय केलं. वरती घरचा लँडलाईन नंबर देऊन ठेवला. जेमतेम ७-८ दिवसांनी नेमके पिताश्री घरी असताना फोन आला. ते संभाषण असं होतं साधारणं. पिताश्री : नमस्कार, दातार बोलतोय. वधुबंधु वर्तक : नमस्कार. मी अमुक अमुक वर्तक बोलतोय. तुमचा मुलगा लग्नाचा आहे असं कळलय. आमच्या अपेक्षांमधे तुमचा मुलगा बसतोय. पिताश्री (आमरिश पुरींचे वटारलेले डोळे करुन अस्सल सानुनासिक स्वरामधे) : कोणी सांगीतलं आपल्याला? वधुबंधु वर्तक (बहुतेक चपापलेल्या आवाजात) : अहो, अमुक अमुल वेबसाईटवरुन माहिती मिळाली म्हणुन फोन केलाय. पिताश्री : आमचा बैल आत्ता हाप पँटीतुन फुल पँटीत आलाय. बालविवाह मान्य असेल तर भेटु. तुम्हाला चुकीची माहिती मिळालिये हो. आत्ताशिक कार्टं कॉलेजात जायला लागलाय. फोन कट केल्यावर नंतर भलं मोठ रामायण घडलय. अस्सल को.ब्रां.ची जीभ किती तिरकी वळु शकते त्याचा ह्याची देही अनुभव घेतलाय. अकाऊंट डी-अ‍ॅक्टीव्हेट करेपर्यंत अजुन ३-४ फोन येउन गेले वेगवेगळे. शिवाय हे नक्की कसं झालं ते ऑलमोस्ट ६-७ महिन्यानी समजलं. =))

In reply to by Pradip kale

एस Fri, 11/07/2014 - 00:02
मी तर मोबाईलवरून आक्ख्या लेखांचे मुद्रितशोधन करतो! ;-) सोप्पंय मोबाईलवरून मिपावर मराठी टंकन करणं. इथेच उजवीकडे मदत आहे की. http://www.misalpav.com/node/1312 प्रयत्न करा.

पिलीयन रायडर Fri, 11/07/2014 - 14:55
परवा मॉल मध्ये गेलो होतो तर बायका आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन आत सोडत होते.. मी बायकांच्या लाईन मधुन पुढे आले आणि शेजारुन नवरा पुरुषांच्या लाइन मधुन.. मी पुढे येऊन गडबडीने नवर्‍याचा हात धरायला गेलेच की तो हात एकदम दचकला... तिरप्या नजरेतुन पाहीलं.. मागे नवरा दिसला आणि मी जो हात पकडायला निघाले होते त्याचा मुळ मालक हात छातीशी घेऊन घाबरुन माझ्याकडे पहात होता... नवरा भयानक पेटला होता हे वेगळं सांगायला नको!!! बरं ह्यातुन काही बोध घेऊन जरा ताळ्यावर राहुन जगात वावरावं ना... २ च दिवसानी ऑफिसमध्ये तरातरा वॉशरुम मध्ये घुसले.. समोर एक पुरुष बेसीनसमोर गोठुन आरशातुन माझ्याकडे पहात होता.. "सॉरी..सॉरी.." म्हणत धुम ठोकली... (ह्यात टेक्निकली माझी चुक नव्हती.. आमच्या नव्या हापिसात सगळे फ्लोअर्स अगदी डिट्टो सेम आहेत.. पण स्त्री-पुरुषांचे वॉशरुम मात्र आलटुन पालटुन डावीकडे - उजवीकडे आहेत..हे मला माहित नव्हतं.. मी माझ्या फ्लोअरच्या सवयीने डावीकडे घुसले..!! )

In reply to by पिलीयन रायडर

आदूबाळ Fri, 11/07/2014 - 15:48
हॉलंडमध्ये हे वॉशरूम कांड माझ्या हातूनही होत असे. लेडीजसाठी डच शब्द आहे dames आणि जेंटलमेनसाठी शब्द आहे heren. चिन्हं असतील तर प्रॉब्लेम नसायचा. पण नुसते शब्द लिहिलेले असतील तर गोंधळ - dames हा शब्दही स्त्री-निदर्शक (उदा. Dame Judy Dench) आणि heren ही (his and her मधलं her). मग काय, देवाचं नाव घेऊन घुसायचं कुठेतरी!

In reply to by आदूबाळ

शिद Fri, 11/07/2014 - 18:57
स्विडीशमध्ये पण हिच बोंब आहे. 'herr' म्हणजे 'Mr'. सुरुवातीला कळायचंच नाही. कोणी दुसरा माणूस ज्या दरवाजानं जात असेल तर त्याच्या मागोमाग जायचं, असं करावं लागे.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती Fri, 11/07/2014 - 18:51
हा हा हा. डोळ्यासमोर पिराने दुसर्‍या मनुक्षाचा हात धरलाय हे दृष्य आलं आणि फिस्सकन हसले. वॉशरूम बाबत मी अजूनतरी असे काही केले नाहीये पण मुलगा साधारण मोठा झाल्यावर माझ्याबरोबर मॉलमध्ये महिलांच्या रेस्टरुमला येत नसे. त्याचे त्याला पुरुष विभागाकडे जायचे असे. बरे, आपले काम उरकून यावे तर तसे नाही. उगीच याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ असे करत वेळ काढत असे, तर कधी खरेच गर्दी असे. नवरा बरोबर नसला तर पंचाईत! मी वाट बघून नको नको ते सगळे विचार, काळज्या करून झाल्यावर एकदा बाहेरूनच जोरजोरात हाक मारू लागले. सुदैवाने सगळे बाप्ये समजूतदार होते. कोणी हरकत घेतली नाही.

पिशी अबोली Mon, 11/10/2014 - 21:26
मी आजच चांगली फजिती करून घेतलीये. माझं डेटा पॅक संपत आलं होतं हे मला माहीत होतं. पण काल रात्री तर डेटा चांगलाच शिल्लक होता आणि सकाळपासून मात्र मेन बॅलन्स मधून पैसे जात होते. मी नेहमीप्रमाणे चिडले, आयडियाला शिव्या घातल्या, आणि संध्याकाळी फुल भांडायच्या इराद्याने कस्टमर केअर ला फोन लावला. कधी नव्हे तो कुणीतरी नीट बोलता येणारा माणूस होता. त्याने मागचा रिचार्ज वगैरे माहिती नीट शोधून काढली. वॅलिडिटी सांगताना तो म्हणाला, 'आज १० तारीख आहे'. मी अगदी तोर्‍यात उत्तर दिलं-'आज ९ तारीख आहे, आणि माझी डेटा वॅलिडिटी ९ तारखेपर्यंत होती हे मला चांगलंच माहीत आहे.' तो शांतपणे म्हणाला, 'आज १० तारीख आहे मॅम'. मग माझ्या लक्षात आलं, आज खरोखरच १० तारीख आहे.. ;) त्याला कितीतरी वेळा सॉरी म्हणून मी फोन ठेवला.. आता 'काय काय नमुने फोन करतात' असं तो सगळ्यांना सांगत असेल.. =))
राम राम मंडळी ! काय मोठ्या हौसेने आलात ना वाचायला, धमाल्याची कशी फजिती झाली ते? हं...असा नाही सोडणार तुम्हाला! इथे आपण आपापली झालेली फजिती एकमेका॑ना सा॑गूया! तेव्हढीच मजा! काय? पटत॑य का? चला, सुरुवात मी करतो. इयत्ता ११वी. टवाळपणाला नुकतेच नवे धुमारे फुटलेले. सकाळी कॉलेजमध्ये गेल्यापासून एकही लेक्चर न करता, माझ्या ल॑गोटीयारसोबत आख्ख॑ कॉलेजभर ऊतमात घालत फिरत होतो. जरा क॑टाळा आला की कुठं चहाच पी, कुठं वडापाव खा असा सुखनैव दिनक्रम चालू होता. साधारणतः दुपारचे ४ - ४:३० झाले असावेत.चहाची तल्लफ आली म्हणून कॅंटीनमध्ये शिरलो.

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

धोंडोपंत ·

सन्दीप Tue, 04/08/2008 - 18:15
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा. सन्दीप

In reply to by सन्दीप

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 18:21
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी. त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी. -ध मा ल.

In reply to by सन्दीप

मनस्वी Tue, 04/08/2008 - 18:26
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे. हघ्या. अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 09:09
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. चला, बरं झालं! :) कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्‍या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :) बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;)) मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :) बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही. तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :) आणि यात काही स्त्रियाही असतात का? तात्या.

धोंडोपंत Wed, 04/09/2008 - 14:34
तात्या, तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल. आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा. कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता. कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता. त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात. आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?" आमचे उत्तर एवढेच असते:- खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 16:59
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :) आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :) आपला, (खाऊनपिऊन सुखी!) तात्या. :)

वरदा Wed, 04/09/2008 - 17:35
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

In reply to by वरदा

मनस्वी Wed, 04/09/2008 - 18:08
कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

धोंडोपंत गुरुवार, 04/10/2008 - 10:24
वरदाताई, कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे. सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वरदा गुरुवार, 04/10/2008 - 17:51
धन्यवाद काका... काका मी कन्या राशीची माझी साडेसाती कधी संपणार?

सन्दीप Tue, 04/08/2008 - 18:15
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा. सन्दीप

In reply to by सन्दीप

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 18:21
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी. त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी. -ध मा ल.

In reply to by सन्दीप

मनस्वी Tue, 04/08/2008 - 18:26
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे. हघ्या. अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 09:09
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. चला, बरं झालं! :) कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्‍या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :) बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;)) मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :) बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही. तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :) आणि यात काही स्त्रियाही असतात का? तात्या.

धोंडोपंत Wed, 04/09/2008 - 14:34
तात्या, तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल. आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा. कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता. कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता. त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात. आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?" आमचे उत्तर एवढेच असते:- खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 16:59
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :) आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :) आपला, (खाऊनपिऊन सुखी!) तात्या. :)

वरदा Wed, 04/09/2008 - 17:35
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

In reply to by वरदा

मनस्वी Wed, 04/09/2008 - 18:08
कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

धोंडोपंत गुरुवार, 04/10/2008 - 10:24
वरदाताई, कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे. सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वरदा गुरुवार, 04/10/2008 - 17:51
धन्यवाद काका... काका मी कन्या राशीची माझी साडेसाती कधी संपणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे. मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय. मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल. मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले.

मॅडोनाला हवंय भारतीय मुल - येक बातमि

शरुबाबा ·

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 15:48
कल्पना चांगली आहे .... परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???" कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण Tue, 04/08/2008 - 16:00
तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा Madonna on David Letterman http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.

शरुबाबा Tue, 04/08/2008 - 16:07
ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 16:55
काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय? भारतीय पोर हव॑ म्हणे... आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-)) तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑???? आन् हे विजुभाऊ...
ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑. फुटलो ना मी !!! असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल. आपला, - (सावध) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 17:00
"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????" मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ... नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक .... मज्जा आली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ठणठणपाळ

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 10:16
तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.
नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-) - (चावरा) ध मा ल.

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 15:48
कल्पना चांगली आहे .... परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???" कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण Tue, 04/08/2008 - 16:00
तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा Madonna on David Letterman http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.

शरुबाबा Tue, 04/08/2008 - 16:07
ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 16:55
काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय? भारतीय पोर हव॑ म्हणे... आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-)) तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑???? आन् हे विजुभाऊ...
ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑. फुटलो ना मी !!! असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल. आपला, - (सावध) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 17:00
"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????" मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ... नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक .... मज्जा आली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ठणठणपाळ

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 10:16
तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.
नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-) - (चावरा) ध मा ल.
लेखनविषय:
'मटेरिअल गर्ल' मॅडोनाला भारताच्या संस्कृतीची भूरळ पडली आहे. तिने भारतातिल एक मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे . दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2933868.cms

वासंतिक पेय

स्वाती दिनेश ·

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 12:31
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! (प्रवासी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:01
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 00:23
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :) (शीघ्रप्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 12:31
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :) स्वाती, चिअर्स! मला दुसर्‍या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है.... समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 13:32
चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्‍या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 00:13
धन्यवाद स्वाती दिनेश, खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.

In reply to by अन्जलि

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 18:46
अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा). तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल. शुभेच्छा! स्वाती

वरदा Tue, 04/08/2008 - 19:03
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 19:14
नावावरूनच आकर्षक दिसते..... नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 19:42
काय योगा योग.. आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि..... संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर.. टूक टूक.. (तृप्त)केशवसुमार

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 12:31
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! (प्रवासी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:01
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 00:23
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :) (शीघ्रप्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 12:31
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :) स्वाती, चिअर्स! मला दुसर्‍या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है.... समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 13:32
चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्‍या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 00:13
धन्यवाद स्वाती दिनेश, खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.

In reply to by अन्जलि

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 18:46
अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा). तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल. शुभेच्छा! स्वाती

वरदा Tue, 04/08/2008 - 19:03
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 19:14
नावावरूनच आकर्षक दिसते..... नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 19:42
काय योगा योग.. आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि..... संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर.. टूक टूक.. (तृप्त)केशवसुमार
Taxonomy upgrade extras
वासंतिक पेयाखेरीज चैत्रोत्सव कसा बरं पूर्ण होणार?
प्रकार-१ ५,६ कैर्‍या,साधारण ३ वाट्या साखर/गूळ(कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे),मीठ,केशर,वेलदोडे कैर्‍या उकडून घ्याव्यात. गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो.

चैत्रोत्सव!

स्वाती दिनेश ·

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:33
स्वातीताई झि॑दाबाद!
घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.
आणि आम्ही आईन॑ कितीही नको नको म्हणल॑ तरी हा हळदीकु॑कवाचा 'मेन्यु' ल॑पास करुन गच्चीवर जाऊन हादडत बसु !!!!

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 11:39
सोबत पन्ह्याची कृती पण टाकाच स्वातीताई :) (डाळपन्हेप्रेमी)बेसनलाडू

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 11:41
अजून आंब्याची डाळ,पन्हं आलं कसं नाही. लहानपणी हे सगळं आई जेव्हा करायची ना तेव्हा आम्ही त्यात मदत करत असू... त्याची आठवण यायला लागलेय. पण हाय.... गेले ते दिवस! असो. आपण सगळे करा मजा. आम्ही आठवणीतच रमतो. :)

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:51
वा स्वाती, आंब्याची डाळ मस्तच! पण पन्हं कुठाय? :) चैत्रातल्या हळदीकुंकवात पन्हं न देता नुसती आंब्याची डाळ देऊनच कटवणार आहेस की काय? :) आपला, (चाळीतल्या चैत्रातल्या हळदीकुंकवात बायामाणसात नसती लुडबूड करणारा!) तात्या.

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:16
वा वा काय आठवण दिलीत हो स्वातीताई! आईला हळदीकुंकवाला लागेल त्याच्या दुप्पट डाळ भिजवायला लागे कारण आमची मदत म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे ह्याचेच जेवण करणे अशी असे!;) पन्हे संपेपर्यंत पाणी प्यायचेच नाही असा जणू अलिखित नियमच असे. ते वेलदोडे घातलेलं, सोनेरी रंगाच्या पन्ह्याचं, मंद सुवासानं घमघमणारं मोठं पातेलं तसंच अजून डोळ्यांसमोर आहे;) चतुरंग

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:25
कैरीची डाळ, पन्हे.... प्राजक्ता, थांब २-३ दिवस थांब जरा.... मग आहेच.. स्वाती, ...रेसिपी छान - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:33
स्वातीताई झि॑दाबाद!
घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.
आणि आम्ही आईन॑ कितीही नको नको म्हणल॑ तरी हा हळदीकु॑कवाचा 'मेन्यु' ल॑पास करुन गच्चीवर जाऊन हादडत बसु !!!!

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 11:39
सोबत पन्ह्याची कृती पण टाकाच स्वातीताई :) (डाळपन्हेप्रेमी)बेसनलाडू

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 11:41
अजून आंब्याची डाळ,पन्हं आलं कसं नाही. लहानपणी हे सगळं आई जेव्हा करायची ना तेव्हा आम्ही त्यात मदत करत असू... त्याची आठवण यायला लागलेय. पण हाय.... गेले ते दिवस! असो. आपण सगळे करा मजा. आम्ही आठवणीतच रमतो. :)

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:51
वा स्वाती, आंब्याची डाळ मस्तच! पण पन्हं कुठाय? :) चैत्रातल्या हळदीकुंकवात पन्हं न देता नुसती आंब्याची डाळ देऊनच कटवणार आहेस की काय? :) आपला, (चाळीतल्या चैत्रातल्या हळदीकुंकवात बायामाणसात नसती लुडबूड करणारा!) तात्या.

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:16
वा वा काय आठवण दिलीत हो स्वातीताई! आईला हळदीकुंकवाला लागेल त्याच्या दुप्पट डाळ भिजवायला लागे कारण आमची मदत म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे ह्याचेच जेवण करणे अशी असे!;) पन्हे संपेपर्यंत पाणी प्यायचेच नाही असा जणू अलिखित नियमच असे. ते वेलदोडे घातलेलं, सोनेरी रंगाच्या पन्ह्याचं, मंद सुवासानं घमघमणारं मोठं पातेलं तसंच अजून डोळ्यांसमोर आहे;) चतुरंग

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:25
कैरीची डाळ, पन्हे.... प्राजक्ता, थांब २-३ दिवस थांब जरा.... मग आहेच.. स्वाती, ...रेसिपी छान - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
Taxonomy upgrade extras
वसंत आल्याची वर्दी कोकिळकुहुने दिली आहेच.मिपावरही 'एप्रिलफळे' आणि 'लोणची' तेच सर्वांना सांगत आहेत. घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.असा चैत्रोत्सव साजरा होत असताना आंबे पिकल्याची चाहूल लागेल आणि मग आमरसपुरीच्या मेजवान्या झडतील.

एप्रिल फळ (२)

विजुभाऊ ·

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 10:16
विजुभाऊ! तुमच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो. बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो हे तर एकदम खासम खास!

In reply to by प्रमोद देव

शक्तिमान Sat, 03/14/2009 - 12:36
बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो
एकदम जबरदस्त, खतरनाक, अल्टीमेट, लै म्हंजे लै म्हंजे लैच भारी!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:17
विजुभाऊ मस्तच !!!!! वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते व्वा क्या बात है ..... अप्रतिमच..... कैर्‍यांचा गड सर झालेला असतो खरचं (बांबुला आकडा लावुन कैरी तोडणारा) मदनबाण

खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल. विजुभाऊ काय झक्कास वर्णन केले आहे.. माझ्या घराखालची हडसन नदी माझ्या तोंडाला सुटलेल्या पाण्याने भरून वाहू लागली आहे. (कैरीवाली भेळ खाणारा) डॅनी.... पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 10:36
फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. नजरेपुढे आल॑! क्या बात है! मस्त.

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:57
अरे काय लोकहो हे काय चालवले आहेत..तिकडे प्राजु लोणच्याच्या बरण्या भरते आहे ,इकडे तुम्ही कैरीची कवतिके सांगता आहात.. आम्ही पामरांनी करावं तरी काय? नुसते उसासे टाकण्याखेरीज.. हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:56
हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! असेच म्हणतो! विजूभाऊ, अजूनही येऊ द्या! तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 11:04
विजुभाऊ, किती सुरेख लिहिताय..कौतूक करावे तेव्हढे थोडेच..जणू तुमच्या प्रतिभेला मोहोर फुटलाय..व्वा! च॑द्राला म्हणतिया उगवू नग॑स, शुक्राला म्हणतिया मावळू नग॑स..

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 11:19
बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो अहाहा विजूभाऊ....काय वर्णन केले आहे. अगदी कैरीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले हो! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

नंदन Tue, 04/08/2008 - 11:53
झकास लिहिलंय. फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. -- हे वाक्य आणि शेवटचे ट्टॉक खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 13:10
एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्.. वळवच्या सरी येतात तो पर्यंत आंब्याचा मौसम संपत आलेला असतो. पहिला पाऊस पडायच्या आधी (एप्रिल्-मे) आंब्याचा मौसम आणि त्या आधी (मार्च - एप्रिल) कैर्‍यांचा मौसम. बाकी लेखाचे दोन्ही भाग छान आहेत.

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 16:49
असहमत्...........आमच्याकडे पहीला पाउस ७ जून ला येतो...तो पर्यन्त वळीवच चालु असतो..... गारा एप्रिल च्या अखेर पडतात्........जोरदार वारे वगैरे सगळे एप्रिल मधे रामनवमी / अक्षय त्रुतिये नन्तर...

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:33
पेठकर काका असहमत्..आमच्याकडे ( सातार्‍यात)पहीला पाउस ७ जुन ला येतो......हमखास मलाही तेच म्हणायचे आहे. ७ जून पर्यंत कैर्‍या आणि आंब्यांचा मौसम संपलेला असतो. त्यामुळे वळीवाच्या पावसाने भिजलेले डोके पुसताना पहिला विचार कैर्‍यांचा येणे अस्वाभाविक वाटते. कैर्‍यांचा आणि आंब्यांचा विचार मार्च - एप्रिल - मे मध्ये जोरदार असतो. जून ७ तारखेला येणारा विचार पहिला कसा असेल? तो पर्यंत माणूस कैर्‍यांचे लोणचे टाकून तसेच भरपेट आमरस खाऊन तृप्त असतो. वळीव आला की आंब्यांचा विचार मागे पडून शाकारणी बरोबर झाली आहे की नाही ह्या चिंतेच शेतकरी असतो. शहरात पाऊस आला की आंब्यांना लोकं हात लावत नाही. आंबे पचायला जड असतात. तसेच, पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यामुळे पहिला पाऊस आला की आंब्यांचा कोणी विचार करीत नाही.

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:34
अरे त्या कैरी वर एखादा कैर्‍यांचा क्लोज अप टाक की. विजुभाऊ तुमची ईच्छा होती ना मग हे घ्या. हा याच्या पेक्षा जास्त झूम नाही करु शकत फक्त ५x झूम आहे कॅमेरामधे. (गार पन्ह आवडीने पिणारा) मदनबाण

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:40
मोजा पाहु किती कैर्‍या आहेत ते ? पटापट..... (गणितात एकदम ढ असलेला) मदनबाण

प्राजु Tue, 04/08/2008 - 21:51
वर्णन सुंदर... अगदी कैरी सारखे चमचमीत आणि आंब्यासारखे रसाळ... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:37
हेच म्हणतो ... "बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो" सर्वोत्तम ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बॅटमॅन गुरुवार, 10/17/2013 - 17:48
टॉक्क!!!!! सगळा लेख भारी पण कैरीगडच्या स्वारीचे वर्णन फार जास्त आवडले. टॉक्क!!!

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 10:16
विजुभाऊ! तुमच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो. बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो हे तर एकदम खासम खास!

In reply to by प्रमोद देव

शक्तिमान Sat, 03/14/2009 - 12:36
बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो
एकदम जबरदस्त, खतरनाक, अल्टीमेट, लै म्हंजे लै म्हंजे लैच भारी!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:17
विजुभाऊ मस्तच !!!!! वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते व्वा क्या बात है ..... अप्रतिमच..... कैर्‍यांचा गड सर झालेला असतो खरचं (बांबुला आकडा लावुन कैरी तोडणारा) मदनबाण

खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल. विजुभाऊ काय झक्कास वर्णन केले आहे.. माझ्या घराखालची हडसन नदी माझ्या तोंडाला सुटलेल्या पाण्याने भरून वाहू लागली आहे. (कैरीवाली भेळ खाणारा) डॅनी.... पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 10:36
फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. नजरेपुढे आल॑! क्या बात है! मस्त.

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:57
अरे काय लोकहो हे काय चालवले आहेत..तिकडे प्राजु लोणच्याच्या बरण्या भरते आहे ,इकडे तुम्ही कैरीची कवतिके सांगता आहात.. आम्ही पामरांनी करावं तरी काय? नुसते उसासे टाकण्याखेरीज.. हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:56
हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! असेच म्हणतो! विजूभाऊ, अजूनही येऊ द्या! तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 11:04
विजुभाऊ, किती सुरेख लिहिताय..कौतूक करावे तेव्हढे थोडेच..जणू तुमच्या प्रतिभेला मोहोर फुटलाय..व्वा! च॑द्राला म्हणतिया उगवू नग॑स, शुक्राला म्हणतिया मावळू नग॑स..

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 11:19
बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो अहाहा विजूभाऊ....काय वर्णन केले आहे. अगदी कैरीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले हो! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

नंदन Tue, 04/08/2008 - 11:53
झकास लिहिलंय. फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. -- हे वाक्य आणि शेवटचे ट्टॉक खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 13:10
एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्.. वळवच्या सरी येतात तो पर्यंत आंब्याचा मौसम संपत आलेला असतो. पहिला पाऊस पडायच्या आधी (एप्रिल्-मे) आंब्याचा मौसम आणि त्या आधी (मार्च - एप्रिल) कैर्‍यांचा मौसम. बाकी लेखाचे दोन्ही भाग छान आहेत.

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 16:49
असहमत्...........आमच्याकडे पहीला पाउस ७ जून ला येतो...तो पर्यन्त वळीवच चालु असतो..... गारा एप्रिल च्या अखेर पडतात्........जोरदार वारे वगैरे सगळे एप्रिल मधे रामनवमी / अक्षय त्रुतिये नन्तर...

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:33
पेठकर काका असहमत्..आमच्याकडे ( सातार्‍यात)पहीला पाउस ७ जुन ला येतो......हमखास मलाही तेच म्हणायचे आहे. ७ जून पर्यंत कैर्‍या आणि आंब्यांचा मौसम संपलेला असतो. त्यामुळे वळीवाच्या पावसाने भिजलेले डोके पुसताना पहिला विचार कैर्‍यांचा येणे अस्वाभाविक वाटते. कैर्‍यांचा आणि आंब्यांचा विचार मार्च - एप्रिल - मे मध्ये जोरदार असतो. जून ७ तारखेला येणारा विचार पहिला कसा असेल? तो पर्यंत माणूस कैर्‍यांचे लोणचे टाकून तसेच भरपेट आमरस खाऊन तृप्त असतो. वळीव आला की आंब्यांचा विचार मागे पडून शाकारणी बरोबर झाली आहे की नाही ह्या चिंतेच शेतकरी असतो. शहरात पाऊस आला की आंब्यांना लोकं हात लावत नाही. आंबे पचायला जड असतात. तसेच, पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यामुळे पहिला पाऊस आला की आंब्यांचा कोणी विचार करीत नाही.

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:34
अरे त्या कैरी वर एखादा कैर्‍यांचा क्लोज अप टाक की. विजुभाऊ तुमची ईच्छा होती ना मग हे घ्या. हा याच्या पेक्षा जास्त झूम नाही करु शकत फक्त ५x झूम आहे कॅमेरामधे. (गार पन्ह आवडीने पिणारा) मदनबाण

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:40
मोजा पाहु किती कैर्‍या आहेत ते ? पटापट..... (गणितात एकदम ढ असलेला) मदनबाण

प्राजु Tue, 04/08/2008 - 21:51
वर्णन सुंदर... अगदी कैरी सारखे चमचमीत आणि आंब्यासारखे रसाळ... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:37
हेच म्हणतो ... "बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो" सर्वोत्तम ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बॅटमॅन गुरुवार, 10/17/2013 - 17:48
टॉक्क!!!!! सगळा लेख भारी पण कैरीगडच्या स्वारीचे वर्णन फार जास्त आवडले. टॉक्क!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

कुठ कुठ जायाच जाळ्यात -१

सुवर्णमयी ·

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:53
हा पहिला भाग अतिशह वेल बलन्स्ड आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. खरंतर, ही सद्यस्थिती आहे. प्रत्येकाच ब्लॉग असणं.. ही गरजच बनली आहे. लेखाचा पहिला भाग सुंदर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 01:23
सोनाली, हा भाग आवडला, छान लिहिला आहेस, मोकळेपणाने लिहिला आहेस.. अभिनंदन! दुसरा भाग अद्याप वाचायचा आहे. तो उद्या जरा सवडीने वाचेन.. काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. हो, मग का नाही येणार? का येऊ नये? ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार ? असे म्हणणार्‍यांनी एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अनुभव घेतोच आहे की! काही मोजके अपवाद सोडल्यास, "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही! सोनाली, आता मला तू कदाचित असं म्हणशील की या मंडळींशी तुलना करू नकोस! तर त्यावर मी विचारेन की का तुलना करू नको? वरील सगळे उत्तुंग लेखक वाचल्यावर "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार " असंच मला आजच्या पोरांचं लेखन वाचून म्हणावंसं वाटतं! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मीही एक जालावरचा लेखक आहे, परंतु मीही ह्या आजकालच्या पोरांतच जमा आहे हेही कबूल करतो! एवढ्या प्रचंड मोठ्या मराठी जालावर सर्व सोयी हाताशी असताना, मोजके अपवाद सोडल्यास आपल्याला वरील मंडळींइतकं उत्तुंग कुठे काय वाचायला मिळतं सांग पाहू?? तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल. हम्म! करमणूक, ज्ञानवर्धन इतपत पातळीपर्यंत साहित्यिक भरारी मारली आहे हे मीही मान्य करतो. परंतु कथा/लेख/काव्य या बाबतीतल्या उत्तम ललितलेखनाबाबतीत अजून जालावर बर्‍यापैकी वानवा आहे! काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! उगाच आंतरजालावर लिहिण्याची सहज सोय आहे म्हणून कुणी कुसुमाग्रज होत नाही! त्याकरता आंतरजालाची नव्हे, तर उत्तुंग प्रतिभेची गरज आहे. आंतरजाल हे केवळ एक माध्यम आहे! यात मी आंतरजालावरील लेखकांना मुद्दामून कमी लेखतो आहे असं नव्हे! नक्कीच नव्हे! आज मिपावर, मनोगतावर, मायबोलीवर अनेक मंडळी लिहीत आहेत. मी यातलं बरचसं लेखन वाचतो. ते जर चांगलं असेल तर मलाही ते तेवढ्यापुरतं आवडतं, अगदी नक्कीच आवडतं! मीही त्या लेखनाला मनमोकळा प्रतिसाद देतो! परंतु फावल्या वेळात कधी काही जरा निवांतपणे वाचत बसायचं असेल तर आजही मला शिरुभाऊ, पुलं, दळवी, कुसुमाग्रज, यांचीच पुस्तकं काढून वाचत बसावंसं वाटतं! माझी ही वाचनभूक आणि वाचनानंद आजच्या घडीला तरी एवढ्या मोठ्या मराठी महाजालावरचा एकही लेखक भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे! आजन्म एकटे राहण्याची शपथ वगैरे घेतली असेल तर या मराठी विश्वाच्या जाळ्यात वावरतांना अतिशय सावधगिरीने वागा. शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे तेही भावभावना ( हो भाव आणि भावना ) दोन्ही असणारा...... हे बाकी बरं बोल्लीस! यापुढे सावधगिरीनेच वागत जाईन! :) मी फक्त लेखनाला अनुकूल प्रतिसाद म्हणते आहे.. विश्वास बसत नसेल तर झाडून काढा सगळे माहितीजाल याचे पुरावे कायम तिथे आहेतच. हे समजलं नाही.. तात्या.

चतुरंग Wed, 04/09/2008 - 02:26
तुझ्या लेखनातली तळमळ प्रामाणिक आहे. काही मुद्दे पाहूयात. तासाला पाच रूपये एवढ्या स्वस्ताईत पावसाळ्यात इथे तिथे दिसणार्‍या जमिनीवरील छत्र्यांसारखी ही सायबर कॅफे भारतात पसरली आहेत. शहराशहरातून थेट तालुक्याला ब्रॉडबॅंडची पावले पडू लागली आहेत. प्यायला पाणी नाही, दोन तासाहून अधिक काळ वीज नाही सिगरेट, दारू , औषधे यांच्या दुकानासारखेच इतर कुठे नाही पण निदान फोन बूथजवळ तरी एक सायबर कॅफे असलेच पाहीजे अशी अटच असावी असे वाटते. शिवाय जवळ जवळ सर्वच कंपन्यात काम करणार्‍यांना हवा तेव्हा हवा तितका आणि तोही फुकट जाळ्याशी संपर्क साधता येतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशाप्रकारे एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्राथमिक गरजेतूनतीन पिढ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात हे विश्वजाल मोठ्या शिताफीने यशस्वी झाले आहे. ( अन्न ,वस्त्र, निवारा यापेक्षा मोबाईल आणि इंटरनेट याच सध्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्य करत असाल तरच आपली गणना तरूणांमध्ये होईल लक्षात असू द्या..) कोणत्याही प्रकारचा संवाद आता दोन सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेमी व्यक्ती प्रत्यक्षपणे नाही तर दोन संगणकाद्वारे साधतात असे संशोधनाअंती आढळले आहे. 'नवीन तंत्रज्ञान आणि मूलभूत गरजा' हा मुळातच एक वेगळा आणि मोठा विषय आहे. जगात सगळीकडेच हे थोड्याफार फरकाने घडत असते. भारतासारख्या प्रगतीशील देशाला ही दरी फार प्रकर्षाने जाणवण्याची कारणे अनेक आहेत. जसे लोकसंख्या, अशिक्षितपणा, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा इ. मूलभूत गरजा पूर्ण नाहीत म्हणून नवीन तंत्रज्ञान नाकारणे हे तितकेसे बरोबर नाही कारण नवीन तंत्रज्ञानाने मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. माहितीचे आदानप्रदान हा नवीन शोधांचा पाया असतो. ताक घुसळून जसे लोणी निघते अशीच माहिती योग्य प्रकारे घुसळून नवीन शोध लागतात! अर्थात तीच एकांगी गोष्ट होऊ नये. अति सर्वत्र वर्जयेत ह्या न्यायाने सारासार विचाराने हे व्हावे ही अपेक्षा. अधुनिक जीवनशैलीमुळे संपर्काची माध्यमे बदलली आहेत हे निश्चित पण वापरणार्‍याने त्याचे डोके गहाण ठेवू नये म्हणजे माणसामाणसातला भावनेचा ओलावा सुकून जात नाही. आज सर्व काही झटकन हवे असते आणि त्यात अधिक काळ रममाण होण्याची गरजही राहिलेली नाही अशी स्थिती आहे. आपल्याच जुन्या जमान्यात रमणारे आजही आहेत, अनेक आहेत त्यामुळे या वेगाच्या रेट्यात जाळ्यावर अगदी बाबा आदमच्या काळातील माहिती सुद्धा मिळू शकेल. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. 'झटपट गोष्टी' हाच खरा गुणवत्ता घसरण्याचा केंद्रबिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाकडे पहा. कोणतीही गोष्ट अशी झटपट नसते. आज हापूसचे कलम लावले, पुढच्या महिन्यात मोहोर, त्याच्या पुढच्या महिन्यात आंबे असे कधीच नसते! मशागत आहे, निगराणी आहे, मेहेनत आहे, वाट पहाणं आहे आणि मग काही वर्षांनी जो हापूस मिळतो त्याची चव जन्मभर लक्षात रहाते! ही खरी गुणवत्ता! काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? आजच्या पोरासोरांमधे गुणवत्ता नाहीये का? जरुर आहे. पण फक्त माती काळीभोर असून चालेल का? योग्य टीकेचा नांगर, योग्य कल्पनेचे बी, योग्य प्रशंसेचा पाऊस, धीराने वाट पहाणे, आणि मगच यशाची कणसे! हल्ली पूर्ण कणीस होईपर्यंत कोणी वाटच बघत नाहीत सगळेच फक्त हुरडा खातात असे वाटते! आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, आम्ही ब्रीज खेळतो, आम्ही अमूकच वाचतो असे जे काही अभिजात अमूक तमूक आहेत ना त्यामध्ये जाळ्यात चार ओळी लिहिता आल्याच पाहिजे हे सर्वात अग्रक्रमी आहे. हे बरोबर लिहिले आहेस. प्रगती म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरात ह्याचे रहस्य आहे. प्रत्येकाचा आपापला प्राधान्यक्रम कशाला महत्व द्यायचे हे ठरवतो. शेवटी ह्या आभासी जगात वावरतानाचे नियमही थोडे वेगळे असणारच आहेत. पण ह्या जगाने माणसे जोडायचे एक नवे माध्यम दिले आहे ह्यात शंका नाही. त्याचा वापर कसा, किती करावा हे तारतम्यानेच ठरेल. पण आज मनात आलेले विचार मांडता येतात आणि लोकांपर्यंत पोहोचवता येतात, तेही लगेच हे चांगले नाही का? चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:34
चतुरंग, तुम्ही अतिशय मार्मिक, मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. अभिनंदन. काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? वावा! हे तर अगदी 'लाख पते की बात' सारखे मोलाचे! छान! किंबहुना फार दूर जायची गरजच नाही. आपण सगळे आपापल्या ज्या ज्या लाडक्यादोडक्या संकेतस्थळांवर वावरतो, त्या सगळ्याच ठिकाणी वैयक्तिक चिखलफेक थोपवत किंवा प्रसंगी तिने अंग माखून घेऊन, किती संयम राखायला हवा आणि आपले मुद्दे लावून धरून केवळ वस्तुनिष्ठ स्वरूपातला वादविवाद कसा करावा, मुद्देसूद लिहिण्याबोलण्यासाठी कशी किती मेहनत घ्यावी व चिकाटी अंगी बाळगवी - या सगळ्याचे स्वयंशिक्षण टीवी वरील झटपट तार्‍यांना मिळाले नसावे ;) (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by चतुरंग

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 04:13
चतुरंग, तुमच्या सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसादासाठी आभारी आहे. हा लेख मी कोणतीही टोकाची भूमिका घेऊन लिहिलेला नाही, माझी मते त्यात येऊ नये निव्वळ निरीक्षण यावे असा एक प्रयत्न मी सध्या करते आहे. त्याचा हा एक प्रयोग समजू. ( कदाचित फसला असेल) तंत्रज्ञानाचा फायदा मी कधी नाकारणार नाही पण तारतम्य नसेल तर नव्या सोयीच्या आहारी जाऊन नक्की आपण काय साधतो हा विचारही मनाला भेडसावतो. तुम्ही म्हणाला तशी दरी भारतात मला अधिकच जाणवली... निसर्गाचे अतिशय उत्तम उदाहरण घेतले आहे, आवडले, पटले.. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच यात हेटाळणीचा सूर लावायचा नाही. तर मनुष्यवृत्तीकडे निर्देश करायचा आहे. आज जाळ्यावर असे दोन गट आहेत जसे वास्तव जगातही आहेतच याची कल्पना मला आहे. दर्जाबद्दल कोणतीही तडजोड केली की संपलेच यावर माझा ठाम विश्वास आहे. काही मुद्दे अधिक स्पष्ट केल्याबद्दल आभार, सोनाली

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 12:46
सुवर्णमयीताई, उत्तम विषय आणि त्याची हाताळणीदेखिल छानच.
अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे शिकला तसे ही पिढी सर्व साईटसवर काय काय करायचे, कशी माहिती शोधायची , कसा संवाद साधायचा ते आईच्या पोटातच शिकली आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे.
खर॑ आहे. त्यावर चतुरंगरावांचे मुद्दे म्हणजे तर सोने पे सुहागा! पटलं.
"ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही!
तात्याबा, अहो, आपण थोडा वेळ आंतरजाल ठेवू बाजुला. जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग नक्कीच कसदार लेखन घडेल. हां, अगदी पुलं, दळवी, कुसुमाग्रज नाही पण काहीतरी सकस नक्कीच जन्माला येइल असं वाटतं. कदाचित तुम्ही म्हणाल, हा कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! पण मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला नम्र, - ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:56
धमाल्या, माझ्या प्रतिसादाची सहृदयतेने दखल घेतल्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार! :) जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. नाहीच आहेत! मान्य! परंतु जालावरही नाहीत! सोनालीने जालावरील लेखकांच्या संदर्भात लिहिले होते म्हणून मी जालावर लिहिणार्‍यांच्या लेखनाबद्दल माझे वैयक्तिक मत सांगितले, इतकेच! अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. अगदी सहमत आहे! आणि हौसेला मोल नाही! कुणीही लिहावं! :) अर्थात, त्या हौशी मंडळीत मीही आलोच! ;) कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सहमत आहे! परंतु माझा मुद्दा फक्त सोनालीच्या, "तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल." या विधानाशी निगडित होता. सध्या तरी मराठी आंतरजालावर लिहिल्या जाणार्‍या ललित साहित्याने अद्याप तरी मरायला कुठली मोठ्ठी भरारी वगैरे मारली आहे असं मला तरी वाटत नाही! कदाचित तुम्ही म्हणाल, मी कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! ए, असं मी कुठे म्हटलंय? आणि म्हणणारही नाही! मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. अगदी बरं केलंस! :) कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. धत तेरीकी! अरे मेल्या त्यात सांभाळून काय घ्यायचंय? चांगलंच लिहिलं आहेस की! :) आपला, (मराठी आंतरजालावरच्या अनेक कडमड्या ललित साहित्यिकांपैकी एक!) तात्या. अवांतर - अजून जळ्ळी भरारी वगैरे मारायला मला तरी बराच वेळ लागेल, खूप काही चांगलं लिहावं लागेल! साला, उगाच भलत्या गैरसमजात कशाला रहा? :)

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 12:51
ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. गदीमा पाडगावकर दळवी पुलं हे जणु पाळण्यात होते तेंव्हा पासुनच थोर होते असे तर नाही ना. मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 13:05
प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. ठीक आहे! नव्या पिढीने लिहून दाखवावं त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्यापेक्षा उत्तम! आम्ही निश्चित दाद देऊ! ;) मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे काहीच गैर नाही! नव्या दमाच्या लेखकांनी तेवढं थोर होऊन दाखवावं की! आमची कुठे ना आहे? :) आणि अहो मला स्वत:ला आणि माझ्यासारख्याच हौशी नव्या दमाच्या लेखकांना मनमुराद लिहिता यावं, म्हणून तर हे संस्थळ सुरू केलं!! शिवाय इतरही संस्थळं आहेत, ब्लॉग्स आहेत! नव्या दमाच्या लेखकांनी अगदी अवश्य थोर व्हावं! ;) आमची जळ्ळी ना कुठे आहे? आणि कशाला असेल? तात्या.

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Wed, 04/09/2008 - 19:43
संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. हे उदाहरण आणि तुलना मात्र ह्या जागी अगदी अयोग्य आणि गैरलागू आहे. अहो शृंगारामधे सूचकता ही फार महत्त्वाची असते. 'अंतरपट' उघडे करुन दाखवणे आणि 'अंतरंग' उघडे करुन दाखवणे ह्यात फार फार फरक आहे. म्हणूनच 'चोली के पीछे' हे बीभत्स वाटते आणि मजरुहचे हे 'नौ दो ग्यारह' मधले एस्.डी. नी स्वरबध्द केलेले आणि किशोर आशाने अमर केलेलं 'आंचल में क्या जी' हे लाडिक वाटते! अशी तुलना करुन तुम्ही त्या सगळया थोर कलावंतांचा अपमान करीत आहात असे माझे स्पष्ट मत आहे. गदीमा, पुल, दळवी हे पाळण्यात थोर होते का? हा प्रश्न फसवा आहे! पाळण्यात कोणीच थोर नसते - पण पाळण्यात पाय मात्र दिसायला लागतात! ते तसे दिसणे ही कदाचित थोर होण्याची निशाणी असू शकते. प्रोत्साहन, प्रशंसा ही नव्या दमाच्या लेखक/कवींना नक्कीच मिळायला हवी त्याखेरीज नवनिर्मिती नाही. पण नव्याकडे जाताना कुठेतरी गुणवत्तेची तुलना नको का? इतक्या वर्षांनंतर आपल्याला 'गीतरामायण' अजूनही मोहून का हो टाकते? ती रचनेतली प्रासादिकता, ते साधे पण चपखल शब्द, ती भाव पोचवण्याची ताकद ही कुठून आली? संत, पंत वाङ्मयाचा, अभंग, ओव्या, भारुडे, लावण्या, सूर, ताल ह्याचा गाढा अभ्यास आणि शिवाय प्रतिभा ह्या असामान्य संगमातून निर्माण झालेले ते महाकाव्य आहे!! आज ६० वर्षांनंतरही चि.विं.चे विनोद का हो हसवतात? त्यांच्यानंतर विनोदी लेखक पुष्कळ झाले पण त्यातले बहुतांश बाष्कळ निघाले! लिखाणातली ती निर्विषता, तो सामान्य माणसाचा भाबडेपणा, ते सडेतोड (म्हणजे अचकट-विचकट, शिव्या देऊन नव्हे!) लेखन, विसंगती, विरोध, अतिशयोक्ती ह्यातून उच्च विनोद निर्मिती हे सारे कुठे गेले? म्हणून अभ्यास हवा, चिकाटी हवी, सातत्य हवं आणि "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन|" हे ही हवंच! केवळ फळावर डोळा ठेवून अशी निर्मिती होत नसते. त्यासाठी झोकून द्यायला लागते बाकी सगळं मागोमाग येतेच!! चतुरंग

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 13:18
तात्या मिपा आम्हा लोकाना मनमुराद लिहीन्याची मस्त संधी मिळवुन देतेय त्यासाठी.इथे ओव्या आणि शिव्या खावुन आम्ही चांगले तयार होतोय. थोर होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप आहे. शेवटी लहानपणी तेंडुलकरच्या आईने त्याचे कौतुक केले असेल म्हणून्तर तो मोठा होउ शकला ना! फुटवे फुटताच क्षणी छाटले गेले तर त्याचा वृक्ष जाउदे साधे झुडुप सुद्धा होणार नाही . याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने एकमेकांची पाठ खाजवावी. सकस लिहिण्यासाठी थोडे प्रोत्साहन / थोडी शिस्त / थोड्या चुका दाखवुन देणारे बोल हेच तर आम्हाला अपेक्षीत आहे बुजुर्गांकडुन. धमाल्याने बरोबर लिहिलेय. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला एक होतकरु लेखकु...विजुभाऊ

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:53
हा पहिला भाग अतिशह वेल बलन्स्ड आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. खरंतर, ही सद्यस्थिती आहे. प्रत्येकाच ब्लॉग असणं.. ही गरजच बनली आहे. लेखाचा पहिला भाग सुंदर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 01:23
सोनाली, हा भाग आवडला, छान लिहिला आहेस, मोकळेपणाने लिहिला आहेस.. अभिनंदन! दुसरा भाग अद्याप वाचायचा आहे. तो उद्या जरा सवडीने वाचेन.. काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. हो, मग का नाही येणार? का येऊ नये? ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार ? असे म्हणणार्‍यांनी एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अनुभव घेतोच आहे की! काही मोजके अपवाद सोडल्यास, "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही! सोनाली, आता मला तू कदाचित असं म्हणशील की या मंडळींशी तुलना करू नकोस! तर त्यावर मी विचारेन की का तुलना करू नको? वरील सगळे उत्तुंग लेखक वाचल्यावर "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार " असंच मला आजच्या पोरांचं लेखन वाचून म्हणावंसं वाटतं! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मीही एक जालावरचा लेखक आहे, परंतु मीही ह्या आजकालच्या पोरांतच जमा आहे हेही कबूल करतो! एवढ्या प्रचंड मोठ्या मराठी जालावर सर्व सोयी हाताशी असताना, मोजके अपवाद सोडल्यास आपल्याला वरील मंडळींइतकं उत्तुंग कुठे काय वाचायला मिळतं सांग पाहू?? तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल. हम्म! करमणूक, ज्ञानवर्धन इतपत पातळीपर्यंत साहित्यिक भरारी मारली आहे हे मीही मान्य करतो. परंतु कथा/लेख/काव्य या बाबतीतल्या उत्तम ललितलेखनाबाबतीत अजून जालावर बर्‍यापैकी वानवा आहे! काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! उगाच आंतरजालावर लिहिण्याची सहज सोय आहे म्हणून कुणी कुसुमाग्रज होत नाही! त्याकरता आंतरजालाची नव्हे, तर उत्तुंग प्रतिभेची गरज आहे. आंतरजाल हे केवळ एक माध्यम आहे! यात मी आंतरजालावरील लेखकांना मुद्दामून कमी लेखतो आहे असं नव्हे! नक्कीच नव्हे! आज मिपावर, मनोगतावर, मायबोलीवर अनेक मंडळी लिहीत आहेत. मी यातलं बरचसं लेखन वाचतो. ते जर चांगलं असेल तर मलाही ते तेवढ्यापुरतं आवडतं, अगदी नक्कीच आवडतं! मीही त्या लेखनाला मनमोकळा प्रतिसाद देतो! परंतु फावल्या वेळात कधी काही जरा निवांतपणे वाचत बसायचं असेल तर आजही मला शिरुभाऊ, पुलं, दळवी, कुसुमाग्रज, यांचीच पुस्तकं काढून वाचत बसावंसं वाटतं! माझी ही वाचनभूक आणि वाचनानंद आजच्या घडीला तरी एवढ्या मोठ्या मराठी महाजालावरचा एकही लेखक भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे! आजन्म एकटे राहण्याची शपथ वगैरे घेतली असेल तर या मराठी विश्वाच्या जाळ्यात वावरतांना अतिशय सावधगिरीने वागा. शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे तेही भावभावना ( हो भाव आणि भावना ) दोन्ही असणारा...... हे बाकी बरं बोल्लीस! यापुढे सावधगिरीनेच वागत जाईन! :) मी फक्त लेखनाला अनुकूल प्रतिसाद म्हणते आहे.. विश्वास बसत नसेल तर झाडून काढा सगळे माहितीजाल याचे पुरावे कायम तिथे आहेतच. हे समजलं नाही.. तात्या.

चतुरंग Wed, 04/09/2008 - 02:26
तुझ्या लेखनातली तळमळ प्रामाणिक आहे. काही मुद्दे पाहूयात. तासाला पाच रूपये एवढ्या स्वस्ताईत पावसाळ्यात इथे तिथे दिसणार्‍या जमिनीवरील छत्र्यांसारखी ही सायबर कॅफे भारतात पसरली आहेत. शहराशहरातून थेट तालुक्याला ब्रॉडबॅंडची पावले पडू लागली आहेत. प्यायला पाणी नाही, दोन तासाहून अधिक काळ वीज नाही सिगरेट, दारू , औषधे यांच्या दुकानासारखेच इतर कुठे नाही पण निदान फोन बूथजवळ तरी एक सायबर कॅफे असलेच पाहीजे अशी अटच असावी असे वाटते. शिवाय जवळ जवळ सर्वच कंपन्यात काम करणार्‍यांना हवा तेव्हा हवा तितका आणि तोही फुकट जाळ्याशी संपर्क साधता येतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशाप्रकारे एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्राथमिक गरजेतूनतीन पिढ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात हे विश्वजाल मोठ्या शिताफीने यशस्वी झाले आहे. ( अन्न ,वस्त्र, निवारा यापेक्षा मोबाईल आणि इंटरनेट याच सध्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्य करत असाल तरच आपली गणना तरूणांमध्ये होईल लक्षात असू द्या..) कोणत्याही प्रकारचा संवाद आता दोन सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेमी व्यक्ती प्रत्यक्षपणे नाही तर दोन संगणकाद्वारे साधतात असे संशोधनाअंती आढळले आहे. 'नवीन तंत्रज्ञान आणि मूलभूत गरजा' हा मुळातच एक वेगळा आणि मोठा विषय आहे. जगात सगळीकडेच हे थोड्याफार फरकाने घडत असते. भारतासारख्या प्रगतीशील देशाला ही दरी फार प्रकर्षाने जाणवण्याची कारणे अनेक आहेत. जसे लोकसंख्या, अशिक्षितपणा, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा इ. मूलभूत गरजा पूर्ण नाहीत म्हणून नवीन तंत्रज्ञान नाकारणे हे तितकेसे बरोबर नाही कारण नवीन तंत्रज्ञानाने मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. माहितीचे आदानप्रदान हा नवीन शोधांचा पाया असतो. ताक घुसळून जसे लोणी निघते अशीच माहिती योग्य प्रकारे घुसळून नवीन शोध लागतात! अर्थात तीच एकांगी गोष्ट होऊ नये. अति सर्वत्र वर्जयेत ह्या न्यायाने सारासार विचाराने हे व्हावे ही अपेक्षा. अधुनिक जीवनशैलीमुळे संपर्काची माध्यमे बदलली आहेत हे निश्चित पण वापरणार्‍याने त्याचे डोके गहाण ठेवू नये म्हणजे माणसामाणसातला भावनेचा ओलावा सुकून जात नाही. आज सर्व काही झटकन हवे असते आणि त्यात अधिक काळ रममाण होण्याची गरजही राहिलेली नाही अशी स्थिती आहे. आपल्याच जुन्या जमान्यात रमणारे आजही आहेत, अनेक आहेत त्यामुळे या वेगाच्या रेट्यात जाळ्यावर अगदी बाबा आदमच्या काळातील माहिती सुद्धा मिळू शकेल. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. 'झटपट गोष्टी' हाच खरा गुणवत्ता घसरण्याचा केंद्रबिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाकडे पहा. कोणतीही गोष्ट अशी झटपट नसते. आज हापूसचे कलम लावले, पुढच्या महिन्यात मोहोर, त्याच्या पुढच्या महिन्यात आंबे असे कधीच नसते! मशागत आहे, निगराणी आहे, मेहेनत आहे, वाट पहाणं आहे आणि मग काही वर्षांनी जो हापूस मिळतो त्याची चव जन्मभर लक्षात रहाते! ही खरी गुणवत्ता! काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? आजच्या पोरासोरांमधे गुणवत्ता नाहीये का? जरुर आहे. पण फक्त माती काळीभोर असून चालेल का? योग्य टीकेचा नांगर, योग्य कल्पनेचे बी, योग्य प्रशंसेचा पाऊस, धीराने वाट पहाणे, आणि मगच यशाची कणसे! हल्ली पूर्ण कणीस होईपर्यंत कोणी वाटच बघत नाहीत सगळेच फक्त हुरडा खातात असे वाटते! आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, आम्ही ब्रीज खेळतो, आम्ही अमूकच वाचतो असे जे काही अभिजात अमूक तमूक आहेत ना त्यामध्ये जाळ्यात चार ओळी लिहिता आल्याच पाहिजे हे सर्वात अग्रक्रमी आहे. हे बरोबर लिहिले आहेस. प्रगती म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरात ह्याचे रहस्य आहे. प्रत्येकाचा आपापला प्राधान्यक्रम कशाला महत्व द्यायचे हे ठरवतो. शेवटी ह्या आभासी जगात वावरतानाचे नियमही थोडे वेगळे असणारच आहेत. पण ह्या जगाने माणसे जोडायचे एक नवे माध्यम दिले आहे ह्यात शंका नाही. त्याचा वापर कसा, किती करावा हे तारतम्यानेच ठरेल. पण आज मनात आलेले विचार मांडता येतात आणि लोकांपर्यंत पोहोचवता येतात, तेही लगेच हे चांगले नाही का? चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:34
चतुरंग, तुम्ही अतिशय मार्मिक, मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. अभिनंदन. काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? वावा! हे तर अगदी 'लाख पते की बात' सारखे मोलाचे! छान! किंबहुना फार दूर जायची गरजच नाही. आपण सगळे आपापल्या ज्या ज्या लाडक्यादोडक्या संकेतस्थळांवर वावरतो, त्या सगळ्याच ठिकाणी वैयक्तिक चिखलफेक थोपवत किंवा प्रसंगी तिने अंग माखून घेऊन, किती संयम राखायला हवा आणि आपले मुद्दे लावून धरून केवळ वस्तुनिष्ठ स्वरूपातला वादविवाद कसा करावा, मुद्देसूद लिहिण्याबोलण्यासाठी कशी किती मेहनत घ्यावी व चिकाटी अंगी बाळगवी - या सगळ्याचे स्वयंशिक्षण टीवी वरील झटपट तार्‍यांना मिळाले नसावे ;) (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by चतुरंग

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 04:13
चतुरंग, तुमच्या सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसादासाठी आभारी आहे. हा लेख मी कोणतीही टोकाची भूमिका घेऊन लिहिलेला नाही, माझी मते त्यात येऊ नये निव्वळ निरीक्षण यावे असा एक प्रयत्न मी सध्या करते आहे. त्याचा हा एक प्रयोग समजू. ( कदाचित फसला असेल) तंत्रज्ञानाचा फायदा मी कधी नाकारणार नाही पण तारतम्य नसेल तर नव्या सोयीच्या आहारी जाऊन नक्की आपण काय साधतो हा विचारही मनाला भेडसावतो. तुम्ही म्हणाला तशी दरी भारतात मला अधिकच जाणवली... निसर्गाचे अतिशय उत्तम उदाहरण घेतले आहे, आवडले, पटले.. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच यात हेटाळणीचा सूर लावायचा नाही. तर मनुष्यवृत्तीकडे निर्देश करायचा आहे. आज जाळ्यावर असे दोन गट आहेत जसे वास्तव जगातही आहेतच याची कल्पना मला आहे. दर्जाबद्दल कोणतीही तडजोड केली की संपलेच यावर माझा ठाम विश्वास आहे. काही मुद्दे अधिक स्पष्ट केल्याबद्दल आभार, सोनाली

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 12:46
सुवर्णमयीताई, उत्तम विषय आणि त्याची हाताळणीदेखिल छानच.
अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे शिकला तसे ही पिढी सर्व साईटसवर काय काय करायचे, कशी माहिती शोधायची , कसा संवाद साधायचा ते आईच्या पोटातच शिकली आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे.
खर॑ आहे. त्यावर चतुरंगरावांचे मुद्दे म्हणजे तर सोने पे सुहागा! पटलं.
"ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही!
तात्याबा, अहो, आपण थोडा वेळ आंतरजाल ठेवू बाजुला. जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग नक्कीच कसदार लेखन घडेल. हां, अगदी पुलं, दळवी, कुसुमाग्रज नाही पण काहीतरी सकस नक्कीच जन्माला येइल असं वाटतं. कदाचित तुम्ही म्हणाल, हा कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! पण मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला नम्र, - ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:56
धमाल्या, माझ्या प्रतिसादाची सहृदयतेने दखल घेतल्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार! :) जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. नाहीच आहेत! मान्य! परंतु जालावरही नाहीत! सोनालीने जालावरील लेखकांच्या संदर्भात लिहिले होते म्हणून मी जालावर लिहिणार्‍यांच्या लेखनाबद्दल माझे वैयक्तिक मत सांगितले, इतकेच! अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. अगदी सहमत आहे! आणि हौसेला मोल नाही! कुणीही लिहावं! :) अर्थात, त्या हौशी मंडळीत मीही आलोच! ;) कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सहमत आहे! परंतु माझा मुद्दा फक्त सोनालीच्या, "तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल." या विधानाशी निगडित होता. सध्या तरी मराठी आंतरजालावर लिहिल्या जाणार्‍या ललित साहित्याने अद्याप तरी मरायला कुठली मोठ्ठी भरारी वगैरे मारली आहे असं मला तरी वाटत नाही! कदाचित तुम्ही म्हणाल, मी कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! ए, असं मी कुठे म्हटलंय? आणि म्हणणारही नाही! मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. अगदी बरं केलंस! :) कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. धत तेरीकी! अरे मेल्या त्यात सांभाळून काय घ्यायचंय? चांगलंच लिहिलं आहेस की! :) आपला, (मराठी आंतरजालावरच्या अनेक कडमड्या ललित साहित्यिकांपैकी एक!) तात्या. अवांतर - अजून जळ्ळी भरारी वगैरे मारायला मला तरी बराच वेळ लागेल, खूप काही चांगलं लिहावं लागेल! साला, उगाच भलत्या गैरसमजात कशाला रहा? :)

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 12:51
ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. गदीमा पाडगावकर दळवी पुलं हे जणु पाळण्यात होते तेंव्हा पासुनच थोर होते असे तर नाही ना. मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 13:05
प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. ठीक आहे! नव्या पिढीने लिहून दाखवावं त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्यापेक्षा उत्तम! आम्ही निश्चित दाद देऊ! ;) मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे काहीच गैर नाही! नव्या दमाच्या लेखकांनी तेवढं थोर होऊन दाखवावं की! आमची कुठे ना आहे? :) आणि अहो मला स्वत:ला आणि माझ्यासारख्याच हौशी नव्या दमाच्या लेखकांना मनमुराद लिहिता यावं, म्हणून तर हे संस्थळ सुरू केलं!! शिवाय इतरही संस्थळं आहेत, ब्लॉग्स आहेत! नव्या दमाच्या लेखकांनी अगदी अवश्य थोर व्हावं! ;) आमची जळ्ळी ना कुठे आहे? आणि कशाला असेल? तात्या.

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Wed, 04/09/2008 - 19:43
संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. हे उदाहरण आणि तुलना मात्र ह्या जागी अगदी अयोग्य आणि गैरलागू आहे. अहो शृंगारामधे सूचकता ही फार महत्त्वाची असते. 'अंतरपट' उघडे करुन दाखवणे आणि 'अंतरंग' उघडे करुन दाखवणे ह्यात फार फार फरक आहे. म्हणूनच 'चोली के पीछे' हे बीभत्स वाटते आणि मजरुहचे हे 'नौ दो ग्यारह' मधले एस्.डी. नी स्वरबध्द केलेले आणि किशोर आशाने अमर केलेलं 'आंचल में क्या जी' हे लाडिक वाटते! अशी तुलना करुन तुम्ही त्या सगळया थोर कलावंतांचा अपमान करीत आहात असे माझे स्पष्ट मत आहे. गदीमा, पुल, दळवी हे पाळण्यात थोर होते का? हा प्रश्न फसवा आहे! पाळण्यात कोणीच थोर नसते - पण पाळण्यात पाय मात्र दिसायला लागतात! ते तसे दिसणे ही कदाचित थोर होण्याची निशाणी असू शकते. प्रोत्साहन, प्रशंसा ही नव्या दमाच्या लेखक/कवींना नक्कीच मिळायला हवी त्याखेरीज नवनिर्मिती नाही. पण नव्याकडे जाताना कुठेतरी गुणवत्तेची तुलना नको का? इतक्या वर्षांनंतर आपल्याला 'गीतरामायण' अजूनही मोहून का हो टाकते? ती रचनेतली प्रासादिकता, ते साधे पण चपखल शब्द, ती भाव पोचवण्याची ताकद ही कुठून आली? संत, पंत वाङ्मयाचा, अभंग, ओव्या, भारुडे, लावण्या, सूर, ताल ह्याचा गाढा अभ्यास आणि शिवाय प्रतिभा ह्या असामान्य संगमातून निर्माण झालेले ते महाकाव्य आहे!! आज ६० वर्षांनंतरही चि.विं.चे विनोद का हो हसवतात? त्यांच्यानंतर विनोदी लेखक पुष्कळ झाले पण त्यातले बहुतांश बाष्कळ निघाले! लिखाणातली ती निर्विषता, तो सामान्य माणसाचा भाबडेपणा, ते सडेतोड (म्हणजे अचकट-विचकट, शिव्या देऊन नव्हे!) लेखन, विसंगती, विरोध, अतिशयोक्ती ह्यातून उच्च विनोद निर्मिती हे सारे कुठे गेले? म्हणून अभ्यास हवा, चिकाटी हवी, सातत्य हवं आणि "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन|" हे ही हवंच! केवळ फळावर डोळा ठेवून अशी निर्मिती होत नसते. त्यासाठी झोकून द्यायला लागते बाकी सगळं मागोमाग येतेच!! चतुरंग

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 13:18
तात्या मिपा आम्हा लोकाना मनमुराद लिहीन्याची मस्त संधी मिळवुन देतेय त्यासाठी.इथे ओव्या आणि शिव्या खावुन आम्ही चांगले तयार होतोय. थोर होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप आहे. शेवटी लहानपणी तेंडुलकरच्या आईने त्याचे कौतुक केले असेल म्हणून्तर तो मोठा होउ शकला ना! फुटवे फुटताच क्षणी छाटले गेले तर त्याचा वृक्ष जाउदे साधे झुडुप सुद्धा होणार नाही . याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने एकमेकांची पाठ खाजवावी. सकस लिहिण्यासाठी थोडे प्रोत्साहन / थोडी शिस्त / थोड्या चुका दाखवुन देणारे बोल हेच तर आम्हाला अपेक्षीत आहे बुजुर्गांकडुन. धमाल्याने बरोबर लिहिलेय. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला एक होतकरु लेखकु...विजुभाऊ
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

चिंतनिका

धोंडोपंत ·

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 07:17
जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा तिथले बार उघडे असतील का? हा हा हा! आपण एक काम करूया धोंड्या! तिथले बार केव्हा उघडे असतील ही चौकशी करूनच येथून निघू म्हणजे पदरी निराशा यायची नाही! :)) आपला, (हुश्शार!) तात्या.

पंत,
सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)
असो,

आपण कोण आहोत?

आपण कोठून आलो आहोत?

आपण कोठे चाललो आहोत?


या तीनही प्रश्नांचे उत्तर  'माहित नाही' असे आहे.

(देवधर्मवाला प्रा.डॉ )

जेव्हा आपण तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले बार उघडे असतील का?


तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:))))

(दोन पेग वाला प्रा.डॉ )

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 07:17
जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा तिथले बार उघडे असतील का? हा हा हा! आपण एक काम करूया धोंड्या! तिथले बार केव्हा उघडे असतील ही चौकशी करूनच येथून निघू म्हणजे पदरी निराशा यायची नाही! :)) आपला, (हुश्शार!) तात्या.

पंत,
सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)
असो,

आपण कोण आहोत?

आपण कोठून आलो आहोत?

आपण कोठे चाललो आहोत?


या तीनही प्रश्नांचे उत्तर  'माहित नाही' असे आहे.

(देवधर्मवाला प्रा.डॉ )

जेव्हा आपण तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले बार उघडे असतील का?


तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:))))

(दोन पेग वाला प्रा.डॉ )

लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, हल्ली सर्वत्र सत्संगाचे मळे पिकले आहेत. अनेक मेडिटेशन, सेल्फ इम्प्रूव्हमेंट शिबीरे, आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे वगैरे गोष्टींचा सुळसुळाट झाला आहे. हे सर्व पाहिल्यावर आम्हीही आयुष्य जरा गंभीरपणे घेतले. आम्हांला आमच्या चिंतनातून जे नवनीत मिळाले ते असे..... .. .. आपण आयुष्यात काही वेळा गंभीरपणे विचार केला पाहिजे. अंतर्मुख होऊन स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत. ते प्रश्न म्हणजे..... आपण कोण आहोत? आपण कोठून आलो आहोत? आपण कोठे चाललो आहोत? आणि जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा .. .. .. .. .. तिथले बार उघडे असतील का? आपला, (प्रश्नबंबाळ) धोंडोपंत

लोणचं..

प्राजु ·

भोकराचे लोणचे कोकणात मोप खाल्ले जाते. आमची आई तर खूप वेळा करते भोकराचे लोणचे. त्यामुळे भोकराचे लोणचे हे गुजराथी बरोबर कोकणी म्हटले तरी हरकत नाही. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 00:49
राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. येस्स! मीही या राजस्थानी लोणच्याचा प्रेमी आहे. आमच्या शेयरबाजातात जास्तीत जास्त गुज्जू मारवाडी मंडळीच! त्यामुळे राजस्थानी लोणचं, बिकनेरी, जोधपुरी चटपटीत पदार्थ आणि मिठाया अगदी भरपूर खायला मिळतात! त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्‍याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित). हा हा हा! :) वा प्राजू, सुरेखच लेख लिहिला आहेस! तुझी लेखनकला आणि रेडियो निवेदनकलाही अशीच अगदी छान लोणच्यासारखीच मुरू दे! :) माणसाचं आयुष्यही अगदी लोणच्यासारखं मुरून लोणच्याइतकंच चविष्ट हवं! माझी म्हातारीही फार सुंदर लोणचं करते. आता लवकरच मुंबईत येतेच आहेस ना! ठीक आहे, कळली तुझी आवड. आमच्या म्हातारीस सांगून तुझ्याकरता चांगलं लोणचं करून ठेवीन. तात्याकडून आणि तात्याच्या म्हातारीकडून ती एक लहानशी भेट समज आणि जा घेऊन तुझ्या त्या अमेरीकेला! :) आपला, (मिरची-लोणच्यातला) तात्या.

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 00:51
या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? अगदी हेच म्हणणार होतो..युरोपमध्ये पण असेच होते.. मला साऊथ इंडियात मिळणारे कांद्याचे आणि छोट्या संपूर्ण कैरीचे लोणचे फार आवडते.. आर्थात अंब्याच्या लोणच्या खालोखाल.. उत्तम लेख.. ह्या लेखामुळे मला, माझा एक सहकारी मित्र १ वाटी निरस दही आणि त्यात २-३ चमचे कैरीचे लोणचे मिसळायचा आणि नुसत खायचा त्याची आठवण झाली.. (कैरीचे लोणचे आवडणारा)केशवसुमार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 01:17
कैरीचा छुंदा, बाळकैरी लोणचे, आंध्राचे घोंगुरा (अंबाडी) लोणचे ही तर माझी आवडती आहेतच. राजस्थानी लोणच्याचे वर्णन एकदम झकास! नाकात आताच बडिशेपेचा स्वाद आणि तोंडात पाणी जमा झाले (आजकाल मि.पा. वरची एकूण खाद्य वर्णने वाचताना मी कळफलकापासून अंमळ लांबच बसत होतो आता मांडीवर पेपर टॉवेल पसरुन बसावे की काय असे वाटू लागले आहे;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सहज Tue, 04/08/2008 - 08:46
लेख वाचता वाचता ४ घोट पाणी प्यायल्यासारखी लाळ गिळली!!! चांगला मुरवला आहे हा छोटासा लेख जसे भर ताटातले चमचाभर लोणचे!!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 09:42
प्राजुजी एकदम मस्त लेख आहे..... कैर्‍या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. हे मात्र अगदी खरे,,,,, या हंगामाच आईचा हातच कैर्‍या बारीक चिरून केलेल लोणच मी फस्त करुन टाकलय..... आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! (लोणचे प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 10:11
आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! अगदी सहमत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

फेसलेली मोहरी घालून 'तवशाचे' लोणचे करतात ते पण अगदी छान लागते. ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) (समाधिस्थ) डॅनी..... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:37
ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) खरय..... (मोहरीच्या अशा 'समाधी' चा प्रेमी) मदनबाण

मालवणात तर अगदी कोळंबीचे देखील लोणचे करतात म्हणे... त्याला म्हणताना 'कोलंबीचे लोन्चे' म्हणतात तिकडे. आणि एकदम करकरीत फोड वाले कैरीचे ताजे लोणचे तर किती छान लागते म्हणून सांगू हो.. हा!!!!!!!!!!!!!!!! पाणी सुटले तोंडाला.. लिंबाचे उपासाचे गोड लोणचे पण अगदी मस्त.... प्राजुताई तुम्ही तर अगदी 'जले पे नमक छीडक रही' हो... इकडे अगदीच मिळमिळीत लोणची मिळतात.... आणि काही काही पंजाबी पध्दतीची लोणची मिळतात ,ती बरी असतात पण त्यात रसना तृप्त करण्यापेक्षा 'आमचीच लाल' असे म्हणण्याकडे कल जास्त असतो. ... जसे पंजाबी पदार्थच जगात भारी आणि जगातली इतर मंडळी नुसते गवत खाऊन जगतात असे वाटते या लोकाना... अशा लोकाना मी म्हणतो "आम्ही कोकणातील ताज्या करकरीत फोडीचे आणि खमंग फोडणीचे लोणचे खाल्ले आहे, एकदा या आणि खाऊन बघा." ऐरावतावरून फिरल्यावर नंतर रेड्यावरून फिरायची ईच्छा होणार नाही. (पंजाबी गाजराच्या लोणच्याचा फॅन) डॅनी...... पुण्याचे पेशवे

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:53
प्राजु..लोणचं म्हटलं कीच अगदी पाणी सुटतं तोंडाला ..अगदी खरं ग, आणि भारताबाहेर कसली ग ती लोणची.. आपल्या लोणच्यांची सर नाही त्यांना..मी जेव्हा भारतातून इथे येते तेव्हा मिरची,आंबा,लिंबू आणि मिक्स..असे सगळे प्रकार आणि सगळ्यांचे केप्रचे मसाले घेऊन येते.आणि पुढच्या ट्रीपपर्यंत (नाइलाजाने)पुरवते. झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) स्वाती

रामदास Tue, 04/08/2008 - 11:00
काही वेळा पन्जाबी लोणच्यात मसाल्याचा तोरा डोईजड होतो. मसाला पूरक असावा. विनेगरचा अतीरेकी प्रयोग स्वाद मारून टाकतो.(अर्थातच्,व्यापारी लोणच्यात ).गुजरात मध्ये भावनगरला खूप छान्-छान लोणची मिळतात.केर चे लोणचे मी इथेच खाल्ल होत्.कानपूर ला फणसाच.लाल भरलेल्या मिर्चीच .आमचा रोजचा हान्गपळ्या दहीभाता सोबत एक ad-hoc चवीच लोणच देतो. तेहि दुपारी धकवून घेतो. पण लोणच हव हे मात्र खर.

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:03
फक्त लोणच॑ ह्या एका शब्दावर एव्हढ॑ स्फुट कोणि लिहू शकेल अस॑ जर मला कोणी सा॑गितल॑ असत॑ तर मी नक्कीच त्याला वेड्यात जमा केल॑ असत॑...असत॑, आता नाही!!! :-) मस्त. बर्‍याच दिवसा॑नी 'शेन्न्याच॑ लोणच॑' ची आठवण झाली. माझी मावशी लै म्हणजे लैच जब्रा करते ते. दुसर॑ आवडत॑ म्हणजे...आजीन॑ केलेल॑ लि॑बाच॑ लोणच॑. तेही केल्याकेल्या मुळ्ळीच खायच॑ नाही. त्याचे आजीन॑ ठरवलेले नियम आहेत. केल्यान॑तर ते चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीत भरुन वर एखाद॑ सुती फडक॑ गु॑डाळून ठेऊन द्यायच॑. आणि वर्ष-सहा महिन्या॑नी खायला काढायच॑. अरे...काय फाकडू लागत॑ !!!

नंदन Tue, 04/08/2008 - 12:08
छान लेख, अतिशय आवडला. लोणची करुन चिनी मातीच्या बरण्यांत भरल्यावर, त्या किचनमधल्या पोटमाळ्यावर ठेवायचं काम उंचीमुळे आमच्याकडे कायम लागलेलं. त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) बाकी, शाकाहारी लोणच्यांबरोबरच आंध्रात चिकन आणि कोलमीचं लोणचंही मिळतं. भरपेट जेवल्यावर शेवटचा दहीभात खाताना ही दोन्ही लोणची सुरेख संगत करतात. पुण्याच्या पेशव्यांनी म्हटलेलं कोळंबीचं कोकणी आणि सोड्यांचं लोणचंही फर्मास. बाकी गुजराती छुंदो-मेथांबो आणि तर्‍हेतर्‍हेच्या अथाणुंबद्दल (= लोणची) तर काय बोलावे. पानाची डावी बाजू इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी भरुन टाकण्यात फार कमी प्रांतीय त्यांचा हात धरु शकतील. [एक (थोडा अडाणी) प्रश्न - शेन्न्या म्हणजे काय?]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 12:46
त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) नंदन हे मस्तच ...आवडले. स्वाती

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 12:58
लोणच्यातील तेल आणि मिठाच्या प्रमाणामुळे लोणचे खाणे, मला तरी, वर्ज्य आहे. पण प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास बंदी नाही. कालच ताज्या ताज्या करकरीत कैर्‍यांचे लोणचे घातले आहे. बाजारातून आणण्या पेक्षा घरच्या लोणच्याची चव आणि शुद्धता कितीतरी जास्त असते.

ॐकार Tue, 04/08/2008 - 13:05
टकू खाल्ले आहे काय? कैर्‍या किसून , तिखट मीठ लाऊन त्याला अर्धी कच्ची मोहरीची फोडणी द्यायची. तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल! आईला टकू करायला मी अजुनही भाग पाडतो. कानडाऊ विठ्ठलु च्या चालीवर मी आईला - "कावला गं विठ्ठलु, कर ना टकू" असे म्हणत त्रास द्यायचो तो भाग निराळा.

In reply to by ॐकार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:34
मला ते आठवलं होतं पण मनात दडपून टाकलं होतं म्हणलं नको काढायला आठवणी, पण नाही तुम्हाला राहवणार नाही त्रास दिल्याशिवाय!;) चतुरंग

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 14:24
प्राजु, छान आठवणी जाग्या झाल्या... माझी आई लोणचे केले की, ते बरणीत भरून त्याला पाढरे शुभ्र फडके बांधून घट्ट बांधून ठेवत असे. त्याला दादरा कि असे काहीसे म्हणतात. पण त्याला आम्ही अरबी माणसाचे डोके म्हणत असू.:)) ते तसेच दिसायचे.... तुझा लेख वाचून तोंडाला पाणी सुटले.....आणि त्या करकरीत लोणच्यांच्या फोडींची आठवण्....व्वा काय मस्त....:)))))

प्रशांतकवळे Tue, 04/08/2008 - 17:40
जैन लोक जे लोणचे बनवतात, ते फार टिकावू असते. दिल्लीत असताना एका जैन मित्राकडे लोणचे खाल्ले होते, लिंबाचे, लोणचे कसले, पावडरच होती, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या आईने २३ वर्षापूर्वी बनवलेले... प्रशांत

प्राजु Tue, 04/08/2008 - 18:58
लोणचं प्रेमींचे मनापासून धन्यवाद.,, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Tue, 04/08/2008 - 19:05
झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) अगदी हेच म्हणते...

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 19:14
हैदराबाद ला चारमिनार पासुन थोडे जवळ लोणचे गल्ली आहे.दुकानात हौद भरुन लोणची ठेवलेली असतात. आवळ्या पासुन ते कोहळ्यापर्यन्त आणि चिकन पासुन मटनापर्यन्त सगळे प्रकार असतात. हो आणि प्रत्येक प्रकाराच्या चवी वेगळ्या असतात.

लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ.......... तुम्ही हा लेख 'आत्ता' मुद्दाम लिहीलेला दिसतोय्....म्हणजे स्वत: भारतात जाउन घरगुती लोणचं खाणार अन् आम्ही इथे कुठल्यातरी फडतूस कंपनीचं 'सो कॉल्ड' लोणचं खाणार..... हॅट्....निषेध! निषेध! निषेध! - टिंग्या :(

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:41
उगी उगी.... तुझ्यासाठी आणेन हं.. आईच्या हातच्या लोणचं... मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) चोळा....आमच्या जखमेवर 'लोणचं ' चोळा :( असो, लेख नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.....अगदी लोणच्याच्या फोडणीच्या घमघमाटासारखा! स्स्स्स्स्स्स्स्स्स्.......परत एकदा लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ.... - (लोणचंप्रेमी) टिंग्या :)

राजेन्द्र Fri, 04/11/2008 - 02:54
"तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि." कमल्कन्द (कमलाच्या देथाचे काप)

भोकराचे लोणचे कोकणात मोप खाल्ले जाते. आमची आई तर खूप वेळा करते भोकराचे लोणचे. त्यामुळे भोकराचे लोणचे हे गुजराथी बरोबर कोकणी म्हटले तरी हरकत नाही. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 00:49
राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. येस्स! मीही या राजस्थानी लोणच्याचा प्रेमी आहे. आमच्या शेयरबाजातात जास्तीत जास्त गुज्जू मारवाडी मंडळीच! त्यामुळे राजस्थानी लोणचं, बिकनेरी, जोधपुरी चटपटीत पदार्थ आणि मिठाया अगदी भरपूर खायला मिळतात! त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्‍याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित). हा हा हा! :) वा प्राजू, सुरेखच लेख लिहिला आहेस! तुझी लेखनकला आणि रेडियो निवेदनकलाही अशीच अगदी छान लोणच्यासारखीच मुरू दे! :) माणसाचं आयुष्यही अगदी लोणच्यासारखं मुरून लोणच्याइतकंच चविष्ट हवं! माझी म्हातारीही फार सुंदर लोणचं करते. आता लवकरच मुंबईत येतेच आहेस ना! ठीक आहे, कळली तुझी आवड. आमच्या म्हातारीस सांगून तुझ्याकरता चांगलं लोणचं करून ठेवीन. तात्याकडून आणि तात्याच्या म्हातारीकडून ती एक लहानशी भेट समज आणि जा घेऊन तुझ्या त्या अमेरीकेला! :) आपला, (मिरची-लोणच्यातला) तात्या.

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 00:51
या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? अगदी हेच म्हणणार होतो..युरोपमध्ये पण असेच होते.. मला साऊथ इंडियात मिळणारे कांद्याचे आणि छोट्या संपूर्ण कैरीचे लोणचे फार आवडते.. आर्थात अंब्याच्या लोणच्या खालोखाल.. उत्तम लेख.. ह्या लेखामुळे मला, माझा एक सहकारी मित्र १ वाटी निरस दही आणि त्यात २-३ चमचे कैरीचे लोणचे मिसळायचा आणि नुसत खायचा त्याची आठवण झाली.. (कैरीचे लोणचे आवडणारा)केशवसुमार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 01:17
कैरीचा छुंदा, बाळकैरी लोणचे, आंध्राचे घोंगुरा (अंबाडी) लोणचे ही तर माझी आवडती आहेतच. राजस्थानी लोणच्याचे वर्णन एकदम झकास! नाकात आताच बडिशेपेचा स्वाद आणि तोंडात पाणी जमा झाले (आजकाल मि.पा. वरची एकूण खाद्य वर्णने वाचताना मी कळफलकापासून अंमळ लांबच बसत होतो आता मांडीवर पेपर टॉवेल पसरुन बसावे की काय असे वाटू लागले आहे;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सहज Tue, 04/08/2008 - 08:46
लेख वाचता वाचता ४ घोट पाणी प्यायल्यासारखी लाळ गिळली!!! चांगला मुरवला आहे हा छोटासा लेख जसे भर ताटातले चमचाभर लोणचे!!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 09:42
प्राजुजी एकदम मस्त लेख आहे..... कैर्‍या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. हे मात्र अगदी खरे,,,,, या हंगामाच आईचा हातच कैर्‍या बारीक चिरून केलेल लोणच मी फस्त करुन टाकलय..... आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! (लोणचे प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 10:11
आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! अगदी सहमत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

फेसलेली मोहरी घालून 'तवशाचे' लोणचे करतात ते पण अगदी छान लागते. ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) (समाधिस्थ) डॅनी..... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:37
ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) खरय..... (मोहरीच्या अशा 'समाधी' चा प्रेमी) मदनबाण

मालवणात तर अगदी कोळंबीचे देखील लोणचे करतात म्हणे... त्याला म्हणताना 'कोलंबीचे लोन्चे' म्हणतात तिकडे. आणि एकदम करकरीत फोड वाले कैरीचे ताजे लोणचे तर किती छान लागते म्हणून सांगू हो.. हा!!!!!!!!!!!!!!!! पाणी सुटले तोंडाला.. लिंबाचे उपासाचे गोड लोणचे पण अगदी मस्त.... प्राजुताई तुम्ही तर अगदी 'जले पे नमक छीडक रही' हो... इकडे अगदीच मिळमिळीत लोणची मिळतात.... आणि काही काही पंजाबी पध्दतीची लोणची मिळतात ,ती बरी असतात पण त्यात रसना तृप्त करण्यापेक्षा 'आमचीच लाल' असे म्हणण्याकडे कल जास्त असतो. ... जसे पंजाबी पदार्थच जगात भारी आणि जगातली इतर मंडळी नुसते गवत खाऊन जगतात असे वाटते या लोकाना... अशा लोकाना मी म्हणतो "आम्ही कोकणातील ताज्या करकरीत फोडीचे आणि खमंग फोडणीचे लोणचे खाल्ले आहे, एकदा या आणि खाऊन बघा." ऐरावतावरून फिरल्यावर नंतर रेड्यावरून फिरायची ईच्छा होणार नाही. (पंजाबी गाजराच्या लोणच्याचा फॅन) डॅनी...... पुण्याचे पेशवे

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:53
प्राजु..लोणचं म्हटलं कीच अगदी पाणी सुटतं तोंडाला ..अगदी खरं ग, आणि भारताबाहेर कसली ग ती लोणची.. आपल्या लोणच्यांची सर नाही त्यांना..मी जेव्हा भारतातून इथे येते तेव्हा मिरची,आंबा,लिंबू आणि मिक्स..असे सगळे प्रकार आणि सगळ्यांचे केप्रचे मसाले घेऊन येते.आणि पुढच्या ट्रीपपर्यंत (नाइलाजाने)पुरवते. झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) स्वाती

रामदास Tue, 04/08/2008 - 11:00
काही वेळा पन्जाबी लोणच्यात मसाल्याचा तोरा डोईजड होतो. मसाला पूरक असावा. विनेगरचा अतीरेकी प्रयोग स्वाद मारून टाकतो.(अर्थातच्,व्यापारी लोणच्यात ).गुजरात मध्ये भावनगरला खूप छान्-छान लोणची मिळतात.केर चे लोणचे मी इथेच खाल्ल होत्.कानपूर ला फणसाच.लाल भरलेल्या मिर्चीच .आमचा रोजचा हान्गपळ्या दहीभाता सोबत एक ad-hoc चवीच लोणच देतो. तेहि दुपारी धकवून घेतो. पण लोणच हव हे मात्र खर.

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:03
फक्त लोणच॑ ह्या एका शब्दावर एव्हढ॑ स्फुट कोणि लिहू शकेल अस॑ जर मला कोणी सा॑गितल॑ असत॑ तर मी नक्कीच त्याला वेड्यात जमा केल॑ असत॑...असत॑, आता नाही!!! :-) मस्त. बर्‍याच दिवसा॑नी 'शेन्न्याच॑ लोणच॑' ची आठवण झाली. माझी मावशी लै म्हणजे लैच जब्रा करते ते. दुसर॑ आवडत॑ म्हणजे...आजीन॑ केलेल॑ लि॑बाच॑ लोणच॑. तेही केल्याकेल्या मुळ्ळीच खायच॑ नाही. त्याचे आजीन॑ ठरवलेले नियम आहेत. केल्यान॑तर ते चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीत भरुन वर एखाद॑ सुती फडक॑ गु॑डाळून ठेऊन द्यायच॑. आणि वर्ष-सहा महिन्या॑नी खायला काढायच॑. अरे...काय फाकडू लागत॑ !!!

नंदन Tue, 04/08/2008 - 12:08
छान लेख, अतिशय आवडला. लोणची करुन चिनी मातीच्या बरण्यांत भरल्यावर, त्या किचनमधल्या पोटमाळ्यावर ठेवायचं काम उंचीमुळे आमच्याकडे कायम लागलेलं. त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) बाकी, शाकाहारी लोणच्यांबरोबरच आंध्रात चिकन आणि कोलमीचं लोणचंही मिळतं. भरपेट जेवल्यावर शेवटचा दहीभात खाताना ही दोन्ही लोणची सुरेख संगत करतात. पुण्याच्या पेशव्यांनी म्हटलेलं कोळंबीचं कोकणी आणि सोड्यांचं लोणचंही फर्मास. बाकी गुजराती छुंदो-मेथांबो आणि तर्‍हेतर्‍हेच्या अथाणुंबद्दल (= लोणची) तर काय बोलावे. पानाची डावी बाजू इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी भरुन टाकण्यात फार कमी प्रांतीय त्यांचा हात धरु शकतील. [एक (थोडा अडाणी) प्रश्न - शेन्न्या म्हणजे काय?]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 12:46
त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) नंदन हे मस्तच ...आवडले. स्वाती

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 12:58
लोणच्यातील तेल आणि मिठाच्या प्रमाणामुळे लोणचे खाणे, मला तरी, वर्ज्य आहे. पण प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास बंदी नाही. कालच ताज्या ताज्या करकरीत कैर्‍यांचे लोणचे घातले आहे. बाजारातून आणण्या पेक्षा घरच्या लोणच्याची चव आणि शुद्धता कितीतरी जास्त असते.

ॐकार Tue, 04/08/2008 - 13:05
टकू खाल्ले आहे काय? कैर्‍या किसून , तिखट मीठ लाऊन त्याला अर्धी कच्ची मोहरीची फोडणी द्यायची. तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल! आईला टकू करायला मी अजुनही भाग पाडतो. कानडाऊ विठ्ठलु च्या चालीवर मी आईला - "कावला गं विठ्ठलु, कर ना टकू" असे म्हणत त्रास द्यायचो तो भाग निराळा.

In reply to by ॐकार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:34
मला ते आठवलं होतं पण मनात दडपून टाकलं होतं म्हणलं नको काढायला आठवणी, पण नाही तुम्हाला राहवणार नाही त्रास दिल्याशिवाय!;) चतुरंग

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 14:24
प्राजु, छान आठवणी जाग्या झाल्या... माझी आई लोणचे केले की, ते बरणीत भरून त्याला पाढरे शुभ्र फडके बांधून घट्ट बांधून ठेवत असे. त्याला दादरा कि असे काहीसे म्हणतात. पण त्याला आम्ही अरबी माणसाचे डोके म्हणत असू.:)) ते तसेच दिसायचे.... तुझा लेख वाचून तोंडाला पाणी सुटले.....आणि त्या करकरीत लोणच्यांच्या फोडींची आठवण्....व्वा काय मस्त....:)))))

प्रशांतकवळे Tue, 04/08/2008 - 17:40
जैन लोक जे लोणचे बनवतात, ते फार टिकावू असते. दिल्लीत असताना एका जैन मित्राकडे लोणचे खाल्ले होते, लिंबाचे, लोणचे कसले, पावडरच होती, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या आईने २३ वर्षापूर्वी बनवलेले... प्रशांत

प्राजु Tue, 04/08/2008 - 18:58
लोणचं प्रेमींचे मनापासून धन्यवाद.,, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Tue, 04/08/2008 - 19:05
झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) अगदी हेच म्हणते...

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 19:14
हैदराबाद ला चारमिनार पासुन थोडे जवळ लोणचे गल्ली आहे.दुकानात हौद भरुन लोणची ठेवलेली असतात. आवळ्या पासुन ते कोहळ्यापर्यन्त आणि चिकन पासुन मटनापर्यन्त सगळे प्रकार असतात. हो आणि प्रत्येक प्रकाराच्या चवी वेगळ्या असतात.

लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ.......... तुम्ही हा लेख 'आत्ता' मुद्दाम लिहीलेला दिसतोय्....म्हणजे स्वत: भारतात जाउन घरगुती लोणचं खाणार अन् आम्ही इथे कुठल्यातरी फडतूस कंपनीचं 'सो कॉल्ड' लोणचं खाणार..... हॅट्....निषेध! निषेध! निषेध! - टिंग्या :(

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:41
उगी उगी.... तुझ्यासाठी आणेन हं.. आईच्या हातच्या लोणचं... मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) चोळा....आमच्या जखमेवर 'लोणचं ' चोळा :( असो, लेख नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.....अगदी लोणच्याच्या फोडणीच्या घमघमाटासारखा! स्स्स्स्स्स्स्स्स्स्.......परत एकदा लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ.... - (लोणचंप्रेमी) टिंग्या :)

राजेन्द्र Fri, 04/11/2008 - 02:54
"तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि." कमल्कन्द (कमलाच्या देथाचे काप)
लेखनप्रकार
नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे..