नात्यात असली एकमेकाच्या, तरी गोत्यात आणतात
मला नेहेमी प्रश्न पडतो, माणसं अशी का वागतात?
लहानगे भांडतात, क्षणात विसरुन एक होतात
मोठेपणीच हेवेदावे, मनात धरुन का ठेवतात?
वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात
सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात?
परक्यांना जवळ करतात, कारण मोठी ठरतात
कळत नसणार का त्यांना, आपल्यांत खोटी ठरतात?
मानभावी वागत जातात, संभावित जगत जातात,
त्याचा अर्थ असा नव्हता, असं कसं म्हणत राहतात?
वर्षामागे वर्षे जातात, प्रेमाचे बंध विरुन जातात
मनामधे मरत मरत अशी कशी झुरुन जातात?
कुणाची गरज नाही, तेच मग ठरवून ठेवतात
इकडे तिकडे चौकशी कशी बरं करत रहातात?
दारातही मरणाच
मस्त
In reply to मस्त by चेतन
धन्यवाद!!
स्वागत!
लय झकास की...
In reply to लय झकास की... by फटू
धन्यवाद!!
मस्त,
व्वा!