मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...

ॐकार ·

मन 28/05/2008 - 15:01
केले आहेत साहेब आपण. म्या पामराची यथाशक्ती उत्तरे:- १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? "केवळ" शब्द खटकतो.संस्कृतचा प्रभाव नक्किच आहे. त्याशिवाय अतिप्रचंड प्रमाणात तत्सम आणि तद्भव (संस्कृत मधुन आलेले) शब्द दिसले नसते. उदा:- "केवळ्,शब्द्,प्रभाव्,आहे, दिसणे,प्रचंड्,अति" हे सगळेच संस्कृतातुन आलेले शब्द आहेत. २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाय बुवा. नेहमीच्या वापरातील खिडकी,कुर्ता ह्या आणी अशा अनेक शब्दांचा काय बी तरास होत नाय. पण रझिया-सुलतान चित्रपटासरखं "शहीद्-ए-उल्फत, उल्फत -ई- अमानत" वगैरे सरळ बाउन्सर जातात राव. मम्हंजे असल हाय फंडु उर्दु येत नाय. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते. भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? हो.पण क्वचितच. उबळ येते भाषा-शुद्धी वगैरेची;पण ती तात्कालिक असते. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? अजुन तरी असले शब्द सुचवण्याची भरीव कामगिरी केली नाय. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ही लेखी भाषा वाटते.मी तासन्तास टी व्ही वर कार्यक्रम पाहतो. (मराठि शब्द वापरणे म्हण्जे अवघडच वापरावेत असं काही नाही.) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? जन्मात नाय. ते "पंक्चर"च झाले आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नक्की कळ्ळं नाय. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? हो. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? हो. फोन केला होता. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचतुर मराठी प्राध्यापकांनी नाव मोठं होण्याची हौस म्हणुन जगासमोर आपले विचार कळकळ म्हणुन मांडले आणि त्यांची मौज जाहली. "स्वान्त सुखाय" कळ्ळ नाय. ह्ये "स्वांत सुखाय" अस नाय लिवता येनार का? का म्हणुन नाही लिहिता येणार? आपलेच, जन सामान्यांचे मन

In reply to by मन

राजे 28/05/2008 - 16:49
अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते. भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं. हेच म्हणतो व असाच विचार करतो :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 28/05/2008 - 15:11
बर्‍याच फारसी शब्दांचा अर्थ मराठीत येताना अर्थ बदललेला असतो. उदा : हौस /हौशी हे शब्द फारसी हवस या शब्दावरुन आले आहेत. ("आता हा अर्थ माहीत झाल्यावर अमुकतमुक बाई फार हौशी आहेत हो .........") धमु किंवा अन्द्या याना फार हौस आहे. ही वाक्ये कशी वाटतील. असे अनेक शब्द आहेत . उदा "वकुब" हा ही अर्थ बदलुन आलेला शब्द मूळ अर्थ :शिक्षण. "विलायत" मुळ अर्थ :स्वतःचा देश. अशा शब्दांचे काय करायचे?

ऋचा 28/05/2008 - 15:27
कागद हा शब्द अरबी आहे तो "कागज" ह्या शब्दावरुन आलाय

हर्षद बर्वे 28/05/2008 - 16:47
आत्मपरीक्षण करून प्रश्न्नांची उत्तरे देउच...पण तात्काळ द्यावेसे वाटलेले प्रश्न रूपी ऊत्तर.... १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? ऊ.: कोणाच्या ? हे १०) तुम्ही काल तुमच्या स्वतःच्या घरी फोन केला होता का?....असे विचारावयास पाहीजे होते....!!!

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? नाही २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? नाही ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?होय ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) तीन वेळेस ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? पंक्चरच होते. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? दुरध्वनी करत नाही, शक्यतो फोनच करतो. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? तिकीटच काढावे लागते. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' = व्यवहारचातुर्य यावरुन आपण कोणत्या निष्कर्षावर पोहचणार आहात याची आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे. :) -दिलीप बिरुटे

प्रियाली 28/05/2008 - 17:52
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो.
स्स्सही!! आपला तो बाब्या आणि दुसर्‍यांचे ते कार्टे हा मराठी बाणा येथेही दिसला. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? मुद्दा पहिला: केवळ संस्कृत भाषेचा आहे असे वाटत नाही. मराठी भाषा हे अनेक संस्कृत, प्राकृत आणि परदेशी भाषांचे मिश्रण असावे. तसे म्हणायला गेले तर संस्कृत भाषा तरी स्वदेशी का म्हणावी? अफगाणिस्तान आणि त्याही पलीकडील प्रदेशातून अवेस्तासदृश भाषा तथाकथित आर्यांनी भारतात आणली असावी. तिला संस्कृत म्हणण्याचे धाडस करणे मला अयोग्य वाटते. आता, या भटक्या लोकांची मानसिकता बघू किंवा त्या आधी तिथून पुढे वसलेल्या लोकांची मानसिकता बघा. द. आशियात आणि भारताच्या पूर्व किनार्‍यावर येथिल लोक वसल्याचे सांगितले जाते. उदा. ख्मेर घराणे किंवा पल्लव राजघराणे. दोघांचा इतिहास असा की येथे स्थलांतरित झालेले हे तथाकथित आर्य/ ब्राह्मण इ. मूळ लोकांत मिसळून गेले. त्यांनी स्थानिक बायकांशी लग्न केले आणि स्थानिक राजकारणात-समाजकारणात भाग घेऊ लागले. भाषा, कला, साहित्य यांना त्यांनी आपलेसे केले. त्यानंतर हजारो वर्षांनी आलेल्या पारशांनी स्थानिक बायकांशी लग्न केले नसले तरी ते येथील संस्कृतीत मिसळून गेले. भाषा शिकले. याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. दौपदी, तात्यांचे लाडके कृष्णद्वैपायन व्यास ;), कृष्ण इ. यामुळेच रंगाने सावळे आहेत. हा फाफटपसारा सोडून पुढे पाहिले तर त्यांनी आणलेली भाषा येथील स्थानिक भाषेशी मिळून संस्कृत भाषेची निर्मिती झाली असावी असे मला वाटते आणि हा निष्कर्ष खरा मानला तर संस्कृत ही भाषा स्वदेशी म्हणता यावी पण मग प्राकृत तिची आई असे म्हणणे अयोग्य ठरू नये. असो, मला मराठी ही भाषा केवळ संस्कृत भाषेतून जन्मली हे पटत नाही. प्राकृत भाषांचा प्रभाव मराठी आणि संस्कृत दोहोंवर असावा. मुद्दा दुसरा: मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी. मुद्दा तिसरा: ब्रिटिश येऊन काही शे वर्षे झाली. परंतु, मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार नाही आणि जर कोणी तसा आडाखा बांधू इच्छित नसेल त्यांनी संस्कृत आपली आपली म्हणून घोष का करावा? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? हो असे जाणवते. उदा. परवाच एका स्नेह्यांनी प्रत्युत्त्पन्नमती या (मराठी?) शब्दाचा अर्थ विचारला. वाक्य वाचले असता त्याचा अर्थ मला हजरजबाबी असा वाटला. माझ्यामते प्रत्युत्त्पन्नमती या टंगट्विस्टरपेक्षा हजरजबाबी हा शब्द वापरणे मला आवडेल. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नेहमीच नाही आणि बोलताना नाही पण कधीतरी लिहिताना ध्यानात येते. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? अजिबात नाही आणि तसे करणार्‍या महाभागांवर मला नेहमी हसू येते. जो शब्द मुळात भाषेत नाहीच, तो संस्कृतातून हुडकून आणण्याची कला मला नाही आणि शिकायचीही नाही. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? जर ते शब्द सोपे सुटसुटीत असतील तर हो. मागे एका महाशयांनी सिगरेटला श्वेतवर्णीधूम्रकंडिका असा शब्द सुचवला होता, तर दुसर्‍या एका ठिकाणी कॉजवे साठी काजवाट हा शब्द सुचवला होता. मला काजवाट हा शब्द आवडला. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) एकदाच वाचला. कुडोस टू मराठी वेबसाईट्स! मी टीव्हीवर अर्ध्या तासाची सिरिअल पाहते. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? हो! मागच्या हिवाळ्यात बाहेर ४ डी फॅ. असताना टायर बदलले आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? नाही पण माझ्या डॉक्टर भाचीला जी इथे टुरिस्ट विसावर आली आहे तिला सेलफोन वरून लॉग डिस्टन्स कॉल केला होता. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? नाही आता मी स्वत्:ची कार वापरते. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' स्वतःच्या करमणुकीसाठी अवांतरः माझ्या उत्तरांत जे मराठी आहे तेच मराठी मी ही चार संकेतस्थळे सोडून सहसा बोलते.

In reply to by प्रियाली

विकास 28/05/2008 - 21:13
याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. या संदर्भात दोन बाजूने बोलणारे आहेत - आर्य भारतात बाहेरून आले असे आणि ते खोटे असे. बाहेरून आलेल्यांचा मूळ मुद्दा हा मॅक्समुल्लरच्या मूट तत्वावर आधारीत आहे - भारतीय भाषा ह्या स्वतःच्या जीवावर नेटीव्ह लोकं समृद्ध करू शकणार नाहीत असा. मग त्यात द्वारका, "नसलेल्या" सरस्वती नदीचा उल्लेख वगैरे घातले. पण आता उपग्रहांनी(का मी सॅटेलाईट म्हणले पाहीजे?:-)) घेतलेल्या छायाचित्रांप्रमाणे बरेच काही सांगीतले गेले आहे. त्यामुळे आधी "आर्यन इन्व्हेजन" (त्यामुळे आर्य/अनार्य अशी भिंत तयार करणे - त्यातून इतर राजकारण) होते ते आता, "आर्यन मायग्रेशन" झाले. मग त्याला "थियरी" असे म्हणू लागले. थोडक्यात आर्य भारतात बाहेरून आले हा केवळ एक तात्विक सिद्धांत मानला जाऊ लागला, निरीक्षण नाही.

In reply to by विकास

प्रियाली 28/05/2008 - 21:25
मॅक्समुल्लरला सध्या बाजूला ठेवू. मध्य आशियातून अनेक ठीकाणी, तुर्कस्थान, आफ्रिका, द. आशिया इ. कडे स्थलांतर झाले हा इतिहास आहे, त्या अनुषंगाने त्यांचे भारतात स्थलांतर करणे मला शक्य वाटते. अर्थातच, भूकंप झाला किंवा पूर आला म्हणून झालेले हे स्थलांतर नव्हे. टप्प्याटप्प्याने झालेले स्थलांतर आहे. थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे.

In reply to by प्रियाली

विकास 28/05/2008 - 21:55
थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे. इतकेच मला म्हणावेसे वाटत होते. आपली लिहीण्याच्या ओघात त्या संदर्भात केलेली विधाने होती, ज्याचा अर्थ, तसेच नक्की आहे असा होऊ शकतो पण "नाण्याची दुसरी बाजू"असू शकते असे दाखवले, इतकेच..

मन 28/05/2008 - 17:27
आणखी एक नव्या (शुद्ध?) मराठी शब्दाची आम्हाला उबळ आलिये. स्चूटरचं टायर पंक्चर होतं. = वाहनाचं चाक छिद्रित झालं. कसा काय वाटला हा वापर? आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by प्रियाली

मनस्वी 28/05/2008 - 18:12
चाकनळी / चाकनलिका / चाकथर / चाकाच्छादन ...?? चाकथर / चाकाच्छादन योग्य वाटते म्हणजे टायर ट्युबला चाकथर-नळी म्हणता येईल. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

टायर = वायूयुक्त धाव कसे वाटते? कारण बैलगाडीच्या चाकावर नाही का लोखंडी धाव बसवत? तशी ही वायूयुक्त धाव. :) पुण्याचे पेशवे

मन 28/05/2008 - 18:08
व्हायला काय हरकत आहे? आपल्या सोयीनं इंग्लिश मध्ये नाय का जुन्या शब्दाचे नवे अर्थ बनतात.(जुन्या अर्थाच्या जवळ जाणारे) जसे की "I'll fly tommorrow" म्हणजे " मी उद्या पंख लावुन पक्ष्याप्रमाणे उडेन" असा शब्दशः अर्थ न घेता "मी उद्या विमानात चढेन्/बसेन आणि ते विमान उडेल." असा अर्थ घेणं अपेक्षित आहे. असे अनेकानेक उपयोग इम्ग्लिश मध्ये आहेत, नवनवीन रोज पडताहेत, म्हणुनच तर तिचा तथाकथित झपाट्याने प्रसार वगैरे होतोय. केलं तसच मराठित बिघडलं कुठं बॉस? आपलेच, जनसामान्यांचे मन,

आर्य 28/05/2008 - 18:08
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही हे पृथःकरण केवळ कठीणच २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही - आपण त्यांना आपल्या प्रमाणे बदलून घेतो. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? फारसा नाही ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? प्रयत्न करतो पण जमतेच असे नाही ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय, सांगाना काय पाहिजे ते सरळ असं १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो रोज १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' दृक/ श्राव्य /भाष्य किंवा लिखीत स्वरुपातील दुसर्‍याला समजावण्या साठी वापलेली ऐक सांकेतीक पद्धत आहे भाषा म्हणजे. हे माध्यम सर्वजण आपली मते / भावना / विचार प्रभावी पणे दुसर्‍या पर्यंत पोहचवण्या करीता वापरात, मग यात अन्य भाषेतील शब्द आल्यास बिधडलं कुठे. समजा समोरचाच जर दुसरी भाषा जणत (चांभाराच्या देवाला चपलीची पुजा) असेल तर आपण आपली भाषा बदलतोच ना ? शेवटी गरज आपल्याला पण आहे, आणि बर्‍याच लोकांना भाषेचा अडसर नसतोच. आता बोली भाषेत प्रांत, समाज, व्यवसाय, व्यवहार, काळ, आणि विचार याप्रमाणे भाषेत फरक पडणारच. अन्या भाषेतील शब्द, आपले भाषा ज्ञान संमृद्ध करायला आणि वाङमय सौंदर्य वाढवायला केले पाहीजे. भाषा शास्त्राचा तांत्रिक आणि तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास, प्रथम संस्कृत भाषेत पाणीनीने - अष्टाध्यायी मधे केला. आता मला सांगा कॉम्पुटरचा शोधच आत्त लागला मग हा शब्द तुमच्या जुन्या कोशात कसा असेल? ईतिहासात जाऊन अकबरा विचारा बोर्डींग पास / लॉग ईन म्हणजे काय? बहुभाषीक (आर्य)

विजुभाऊ 28/05/2008 - 18:19
कोणतिही भाषा ही इतर भाषांतील शब्द आत्मसात करुन समृद्ध बनते. आज इंग्रजीतही बरेचसे परभाषीक शब्द आहेत. फिनीश भाषेत बर्फाला २३ प्रकारचे शब्द आहेत. तेव्हढे मराठीत असणे शक्य नाही. कारण भौगोलीक आहे. तसेच नव्या तंत्रज्ञानामुळे नवे शब्द जसे च्या तसे येतात उदा : बिट्स / बाईट्स / हर्ट्झ /व्होल्टेज गिग्या मेग्या ई. यासाठी योग्य प्रतिशब्द असणार नाही. फ्रिजर फ्रिज आणि शितकपाट हे वेगवेगळे आहेत. मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार हेच इंग्रजीबद्दल ही म्हणता येईल तसेच इतर कोणत्याही भाषेबद्दल म्हणता येईल. हिंदी भाषेत तर कितितरी शब्द इतर भाशेतील आहेत. तकनीक / त्रासदी (टेक्नीक / ट्रॅजेडी ) हे शब्द हिंदी वाटत नाहीत हे म्हणणे अवघड आहे. कोनतीही भाषा ही केवळ एक दोन भाषासंकरातुन जन्म घेत नाही. भाषा ही जिवंत रहावी म्हणुन ती प्रवाही असावी लागते.नवे शब्द येणे, नवे संस्कार आले नाहीत तर ती मृत होते. कपाट हा मराठी शब्द नाही ( कबर्ड) त्या ऐवजी फडताळ हा शब्द कोण वापरतो आता. भाषेत नवे शब्द येत रहाणार जुने शब्द कालबाह्य होत रहणार. आजच्या जागतीक खेड्याच्या जमान्यात स्थलकालाच्या मर्यादा / भाषेच्या मर्यादा रहाणार नाहीत. मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी. हे अर्ध सत्य आहे. समाज भाषेची गरज ही राज्यकर्त्यांवरुन ठरवतो. इंग्रजी ही चलनी भाषा आहे म्हणुन आपण इंग्रजी शिकतो. दुसर्‍या महायुद्धात हिटलरची सरशी झाली असती तर आज आपल्या मराठीवर जर्मन भाषेच पगडा असता. जयंत नारळीकरांच्या म्हणण्यानुसार पानिपताच्या महायुद्धात जर विश्वासराव भाऊ मारला/बेपत्ता झाला नसता तर इतिहासाला कलाटणी मिळुन इंग्रजीवर आज मराठीचा पगडा असता. ( अवांतर :एके काळी इंग्रजी भाषेवर फ्रेंच चे आक्रमण होतेय म्हणुन इंग्रज रडत असत)

In reply to by विजुभाऊ

मन 28/05/2008 - 18:55
उत्तिर्ण आणि अनुत्तिर्ण वापरा. स्वगतः- पन शिंच त्ये तर लैच पुस्तकी भाषेतलं वाटायलय. आपलाच, मनोबा

धनंजय 28/05/2008 - 20:00
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? "केवळ" नाही. अनेक भाषांचा प्रभाव आहे, आणि स्वतःचे बदल करण्याची अंगची लकब मराठीत आहे. २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? जाणवत नाही. रुळलेले शब्द सहज समजले, उच्चारले तरच त्यांना "रुळलेले" म्हणतो. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? ९९% असा विचार करत नाही. क्वचित करतो. काव्यात एकापाठोपाठ एक उच्चार एकाच स्रोतातले असल्यास जिभेला सोपे जाते. "हावभावातला डौल" (दोन्ही मराठमोळे शब्द); "हरकतीतली नजाकत" (दोन्ही अरबीतून आलेलेसंस्कृत)"कटाक्षातील कमनीयता" (दोन्ही जवळजवळ संस्कृत) असे वापरतो. "हरकतीतील कमनीयता" किंवा "कटाक्षातील नजाकत" असे मिश्रण कानाला खटकते, म्हणून वापरत नाही. असे प्रसंग क्वचितच येतात. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? माझ्या मते रुळलेला कुठलाच शब्द अशुद्ध नसतो. न रुळलेल्या शब्दाला प्रतिशब्द सुचवायचा मोह कधीकधी होतो. परंतु चपखल प्रतिशब्द सुचवायची माझी प्रतिभा नसल्यामुळे मी तो मोह टाळतो. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? मी सहसा असे शब्द सुचवत नाही. पण लोकांनी सुचवलेले शब्द आवडल्यास ते वापरतो. उदाहरणार्थ : "संकेतस्थळ" आणि "विदागार". ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ० तास. (एकदा वाचला.) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? माझ्या गाडीचे टायर "पंचर" होते ("पंक्चर" नव्हे) इतकाच फरक. "टायर"चा "वाल" बदलताना कधीकधी "पान्ह्या"चा उपयोग करतो. (ठायर, व्हॅल्व्ह आणि स्पॅनर नव्हे.) जर एखाद्या इंग्रजी शब्दाचा मराठमोळा उच्चार रुळलेला असेल, तर मराठी बोलताना तो मराठमोळा उच्चार मी वापरतो, इंग्रजीत बोलताना इंग्रजी उच्चार वापरतो. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. "शुद्ध"लेखन नामक काही कल्पनाच मला मान्य नाही. "शुद्ध"लेखन हा शब्द "प्रमाणलेखन" या अर्थी काही लोक वापरतात."व्यापारात आणि वर्तमानपत्रांत प्रमाणलेखन सोयीचे आहे," अशा प्रकारात मी मोडतो. पण हा पर्याय दिलेला नाही. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय. (पण टिकेट काढले नाही.) १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य.

विकास 28/05/2008 - 21:52
मला एक मूलभूत प्रश्न आहे: आपण बर्‍याचदा भाषाशुद्धी करत असतो का भाषाविकास? जर भाषाविकास करायच नसता तर "गमभन" सारखी टंकलेखन व्यवस्था का बरं तयार करावीशी वाटली असती? संकेतस्थळपरवलीचा शब्द, खरडवही , वगैरे शब्द तयार करताना तुम्ही आम्ही काय सकाळी शुचिर्भूत होऊन सोवळ्यात बसून शब्द तयार करत असतो का आणि मग पाणि शिंपडून म्हणतो की हां आता भाषेचा हा भाग शुद्ध केला! मग तेंव्हा आपण म्हणतो का की नेट म्हणले तर काय बिघडले? व्य. नि. काय प्रकार आहे? वगैरे? आपण "नेटा"ने मराठी लिहीण्याचा प्रयत्न करतो. सुचले नाहीत तर येथील मित्रमंडळींना प्रतिशब्द सुचवायला सांगतो. हे सर्व आपण म्हणता त्यात म्हणजे, "'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ"" यातील कशात धराल? आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते). मला माझी भाषा आवडते. त्या भाषेचा विकास व्हावा असे मला वाटते. त्या अर्थाने नित्यनूतन शब्द जर तयार झाले तर कुठे बिघडले? आज जर "गुगल" हा शब्द इंग्रजीत तयार झाला असे समजून ऑक्सफर्ड डिक्शनरीत (शब्दकोशात) घातला जातो तर आपण नवीन शब्द केले आणि हो ते संस्कृतप्रचूर अथवा संस्कृतोद्भव असले म्हणून बिघडले कोठे? शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.
विलक्षणः शब्दकोशः विद्यते तव भारती | व्ययेन वर्धते नित्यम क्षयं गच्छती संग्रहात || हे सरस्वती देवी तुझा शब्दकोश हा (धनकोशापेक्षा) वेगळाच आहे! कारण तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा स होतो.
थोडक्यात जे काही शब्द आहेत ते जर लोकांना आवडले तर ते तगतील नाहीतर दुसरे आहेतच. आता शब्दाच्या इष्टाईल मुळे मला "दुग्धशर्करायुक्तघनघट्टगोल" खायला आवडतो असे म्हणायला आवडते. पण काय करणार लोकांना नुसतेच "पेढा" म्हणलेले आवडते म्हणून तोच शब्द रूढ झाला! असो. बाकी भाषा, संस्कृती ह्यातील नाविन्य विचित्र वाटणे हा कधीकधी सवयीचा परीणाम असतो. अमेरिकेत (कुठल्याही परभागात) येतो तेंव्हा अनेक गोष्टी/शब्द (अर्थात इंग्रजी) नवीन वाटायच्या, विचित्र वाटायच्या, पण नंतर त्यातील अर्थ समजणे आणि पचनी पडणे सहज होऊन जाते. पण त्याच बरोबर काही गोष्टी भारताळलेल्या ह्या अमेरीकेत जास्त करू लागलो (मुद्दाम नाही, पण सवयीने). उ.दा: मराठी माणसाशी फोनवर बोलताना आपोआप "नमस्कार मी विकास बोलतोय" असेच तोंडातून बाहेर येते. (आणि बोलणार्‍याला पण आश्चर्य वाटत नाही). तर अमराठी भारतीय माणसांशी बोलताना आपसूक "नमस्ते" येते. येथे अनेक विद्यापिठातील तरूण भारतीय पिढी (अमेरिकेत जन्मलेली) अनुभवली - ते लगेच नमस्ते म्हणतात. मधे एकदा बॉस्टनला उतरल्यावर कस्टमचा अधिकारी पण सुअहास्यवदनाने हात जोडून "नमस्ते, वेलकम होम" असे म्हणाला आणि समजले की बघता बघता "नमस्ते" किती सहज सर्वत्र पसरलेला शब्द झाला ते!

In reply to by विकास

प्रियाली 28/05/2008 - 21:56
शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.
हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का?

In reply to by प्रियाली

कोलबेर 28/05/2008 - 21:59
'आमचा सन इन लॉ येत्या विकेंडला स्टेट्स ला फ्याय करणार आहे'. असले धेडगुजरी मराठी कानाला खटकते उच्छाद आणते हे नक्की. पण हे सुधारण्यासाठी प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द सुचवत राहणे हा उपाय मलाही पटत नाही. इतर भाषांमधुन (इंग्रजी,संस्कृत,अरबी,फारसी,पाली, इ.इ.)आलेले जे शब्द बर्‍यापै़की रुळले आहेत त्यांच्यासाठी प्रतिशब्द नको असे मला वाटते. अवांतर : प्रतिशब्द वाले जसे 'प्रतिशब्द सुचवा' अश्या याद्या तयार करतात तशीच एक 'प्रतिशब्द नको' अशी यादी देखिल बनवावी आणि त्यात खालील शब्द टाकत जावे उदा. पेन टेबल सिगरेट टायर

In reply to by प्रियाली

विकास 28/05/2008 - 22:23
हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का? अट्टहास कुठूनही होऊ शकतो. जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का? बाकी प्रश्नाचे (नवीन शब्दांची गरज) उत्तर माझ्याच वरील प्रतिसादात मिळेलः आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते). संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे. मग ते आपल्या नावात आहे आणि इतरत्रही आहे. जेंव्हा वेबसाईटला संकेतस्थळ शब्द ज्याने कोणी सुचवला त्याला काही मुद्दाम संस्कॄत आठवावे लागले नाही. त्याचबरोबर व्यक्तिगत निरोप म्हणताना त्यात संस्कृतप्रचूर असावे असा अट्टहासपण कोणी धरला नाही... म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.

In reply to by विकास

कोलबेर 28/05/2008 - 22:31
संस्कृत हवे/नको असा दोन्हीही अट्टहास नको हे मान्य पण,
संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.
हे मात्र पटले नाही. मूळ मुद्दा आहे इतर भाषेतील शब्द मराठीत येण्याचा. ते शब्द इतर संस्कृत सोडून इतर कुठल्याही भाषेतील असले तर लगेच बर्‍याच जणांचा झिनोफोबीया बळावतो आणि तेच जर संस्कृतमधले असले तर मात्र लगेच 'संस्कृत ही मराठीची जननी' असा युक्तिवाद करुन स्विकारण्याकडे कल असतो. त्यामूळे 'संस्कृत हवे' हा अट्टहास (मला तरी) अधिक वाटतो.

In reply to by विकास

प्रियाली 28/05/2008 - 22:32
जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का? जर कोणी प्रतिशब्द द्या म्हटल्यावर लगेच संस्कृतप्रचुर शब्द पोतडीतून काढत असेल तर त्याला विरोध अजिबात अयोग्य नाही. वरील उदाहरण पहा, टायरला चाकनळी पासून सर्व शब्द सुचवले आहेत त्यात मराठी भाषेत वापरले जाणारे नळीपासून वायूपर्यंत अनेक शब्द आहेत. जेव्हा प्रतिशब्द दिला जातो आणि तो संस्कृतातून चटकन काढला जातो तेव्हा मायमराठीवर अन्याय करताय असे वाटत नाही का? मराठमोळ्या भाषेत तसा पर्याय नसावा असे का वाटते. सिगरेटला धूरकांडी शब्द न सुचता श्वेतवर्णीधूर्मकंडिका का सुचतो?
संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे.
हे शब्द का आले? लक्षात घ्या, संस्कृताशी आणि संस्कृत शब्दांशी मला काहीही वाकडे नाही परंतु साधे मराठी शब्द मिळत असता संस्कृतातून अवजड शब्द शोधणे, प्रचलीत आणि नव्याने आलेल्या इंग्रजी शब्दांना संस्कृतच वाचवू शकते असा ग्रह करणे (करून ठेवणे) हे अयोग्य वाटते.
म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.
दुर्दैवाने, आपल्याला असे वाटते म्हणजे इतर काय म्हणतात याकडे आपले दुर्लक्ष होऊन फक्त चर्चा भरकटली, इतरांनी विरोध केला याकडेच आपले लक्ष केंद्रित झालेले वाटले.

In reply to by कोलबेर

विजुभाऊ 29/05/2008 - 10:36
विडी आणि सिगरेट मधला फरक खाकी प्यान्ट आणी सफेद पायजम्यातील फरका इतका स्वच्छ आहे. फार तर सिगारेटला इंग्रजी विडी म्हणुयात.बाकी सफेद घोळदार प्यान्ट ही पायजम्यासारखीच दिसते.

In reply to by विकास

वरील प्रतिसादाशी सहमत आहे. शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो. 'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो. पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.' विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत.

विसोबा खेचर 29/05/2008 - 00:43
अरे काय रे ही भाषेची ट्यांव ट्यांव लावली आहे रे तुम्ही लोकांनी! कसल्या रे लेको वांझोट्या चर्चा करत बसता? :) अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे! का उगाच मिपाची जागा फुकट घालवताय? :)) नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला! :)) साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला? भाषाविषयक आणि शुद्धलेखनाबाबत त्या वाळिंब्यासारख्या वांझोट्या चर्चा न करता किती सुंदर काव्यनिर्मिती केली त्यांनी! :) आमची भांडीवाली बाई सीताबाई, दारुड्या नवर्‍याच्या कथाकहाण्या आणि कप्प्लेन्टी आमच्या मातोश्रीस अगदी चोख व खणखणीत भाषेत कथन करत असते! त्या बिचारीला लिहिता-वाचता येत नसून ती पक्की आंगठेबहाद्दर आहे. पण कुठलिही चर्चा न करता तिचंदेखील मराठी भाषेवर अगदी उत्तम प्रभूत्व आहे असं मी म्हणेन! आणि तुम्ही लेको लांब चेहेरे करून कसल्या चर्चा करत बसलाहात रे?! छ्या! :) असो, आज बुधवार असल्यामुळे मी अंमळ कलम १८५ च्या अमलाखाली आहे. उद्या बघतो एकेकाला! :)) आपला, (भाषाप्रभू) तात्या वाळिंबे.

In reply to by विसोबा खेचर

विकास 29/05/2008 - 00:55
:T अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे! L) एकदा कुठल्या भाषेत, कुठले शब्द वापरून, व्याकरण नावाचे प्रकरण कसे वापरावे, संस्कृत प्रचूर शब्द की फारसे नसलेले फार्सी शब्द वापरून अथवा त्यांची पाळेमुळे ठरवून कसे लिहावे हे ठरले की मग आपण सुचवत असलेल्या संदर्भात लिहू... ;)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 01:11
नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला
अहो मिसळपावावरचे छुपे मनोगती कोण हे शोधण्यासाठीच अशा चर्चा करत होतो =)) कधी हाकलपट्टी करायची सांगा.
साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला?
हो ना आणि कधी संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधत होत्या असेही ऐकलेले नाही :P :))

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:56
एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. अहो मालक! हे कदाचित आपणही कबूल कराल की इथे मंडळींनी आपल्या नेहमीच्या सहजसोप्या मराठी भाषेत(मग त्यात काही रुळलेले विंग्रजी शब्द आले तरी चालतील), भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, व्याकरणाचा कुठलाही आव न आणता, मराठी भाषेची काय ती जबाबदारी आपल्याच डोक्यावर आहे या भ्रमात न राहता लेखन करावं हेच धोरंण पहिल्यापासून अवलंबलं गेलं आहे. यात आपल्याला कुठलाही विरोधाभास दिसत असेल तर ती इतर संस्थळांची लागण समजावी. कृपया मिसळपावच्या माथी असे आरोप करू नयेत..! १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? छ्या! मुळीच नाही! २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही, ही मला वेडझवेगिरी वाटते आणि मी ती करत नाही! :) ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? आज्याबात नाय! ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? मी कुठलेही मराठी शब्द सुचवत नाही. जे लहानपणापासून शाळेत, आईबापाकडून, व इतरत्र ऐकत आलेलो आहे तेच मीही वापरतो. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) एखाद तास. हा प्रश्न मी एकदाच वाचला. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही! :) ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? हो! :) ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (म्हण्जे आपली येष्टी हो!) माझ्या 'बा'ची नाही! :) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - भाषाशुद्धी आणि शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) आपला, (कातकरी समाजाच्या भाषेत रमणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ॐकार 29/05/2008 - 13:20
उपहासात्मक प्रश्न आपल्याला कळले नसतील असे मला वाटत नाही. मराठी शब्द सुचवा अथवा सावरकरांनी सुचवले म्हणून डोळे बंद करून ते मराठी शब्द वापरा हे दोन्ही उपद्व्याप माझ्या दृष्टीने हास्यास्पदच आहेत. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या. ह्या तुमच्या विधानात तुम्ही आत्ता मांडलेल्या मतांशी सुसंगती आहे काय? पूर्वग्रहदूषित वृत्ती आणि नजर सगळ्याच वेबसाईट्स वरच्या सदस्यांत आहे. मिपाही त्याला अपवाद नाही. इतर ठिकाणी विरोधाभास नाही तर अट्टाहास आहे इतकाच काय तो फरक. पूर्वग्रहदूषित वृत्ती नाकारता येत नाही. पण किमान त्यात सुधारणा तरी करता येऊ शकते. मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो. दिलेल्या प्रश्नांतून किमान प्रत्येकाने स्वतःचे मत काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी फार आहे. बिनबुडाचे आरोप करायची मला हौस नाही.

In reply to by ॐकार

विकास 29/05/2008 - 16:49
मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो. हे वाक्य एकदम भावले. :-)

चित्रा 30/05/2008 - 17:23
बराच धुरळा उडून गेलेला दिसतोय. तरी मत नोंदवते! १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही, फारसी शब्द अनेक आहेत (कदाचित शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीच्या सुमारास वापरात आले असावेत). २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? - नाही. जे शब्द माहिती आहेत त्यामुळे नाही. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? - कधीतरी करते. आवड म्हणून. एकदा बसवर लिहीलेला ___ साबण वापरो असा वाक्यप्रयोग वाचून दचकायला झाले होते! ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? - नाही. पण एखाद्या अर्थाच्या जवळपास जाणारे दोन तीन शब्द माहिती असावेत असे वाटते. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? - हो, वापरते. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) " शून्य तास". एकदाच वाचला. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? शीतकपाट हा शब्द फ्रीजला प्रतिशब्द म्हणून योग्य नाही . मला इथे सर्किट यांनी सोप्या प्रतिशब्दांचे गुणधर्म सांगणारा एक मस्त लेख लिहीला होता त्याची आठवण झाली. (हल्ली सर्किट कुठे असतात?). ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही . शुद्धलेखनाला "शुद्ध" म्हणण्याची गरज नाही, पण काही एक प्रमाण असावे या मताची मी आहे. नियम तोडणे हा स्थायीभाव बनू नये. आणि एकदा नियम तोडणे मान्य केले की मग कुठचेही नियम तोडले तरी चालले पाहिजेत. मग हे चालेल आणि ते नाही असा दुजाभाव नको. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य. मी असे समजते की मी लिहीलेले लोकांना त्रास न होता वाचता आले पाहिजे. तसे झाल्यास मला जे सांगायचे आहे ते ज्यांना वाचता येते अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोचेल.

In reply to by चित्रा

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. मी देखील एकदा या संदर्भात टायर भ्रष्ट झाला असे ऐकले होते. त्यावर त्या पोर्‍याला मालकाने सांगितले भ्रष्ट नाही बरष्ट झाला असे म्हणतात. =)) पुण्याचे पेशवे

गणा मास्तर 02/06/2008 - 11:50
खुप चर्चा झालीये पण राहवत नाही. शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो. 'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो. पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.' विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत. या पेठकर काकांच्या मताशी सहमत. मी पायरीवर बसलो होतो. नशिबानी इथपर्यंत आलो. असे सहज बोलता येत असताना उगीच मी स्टेअरवर बसलो होतो. डेस्टिनीने इथपर्यंत आलो. असली विचित्र भाषा वापरणे चुकीचे वाटते.

In reply to by तळेकर

चतुरंग 02/06/2008 - 15:40
आणि तेही मूळ लेखक/कवी ह्यांच्या नावाचा उल्लेख न करता देणे मिपाच्या धोरणात बसत नाही. सदरहू लिखाण काढून टाकण्यात येत आहे. चतुरंग

मन 28/05/2008 - 15:01
केले आहेत साहेब आपण. म्या पामराची यथाशक्ती उत्तरे:- १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? "केवळ" शब्द खटकतो.संस्कृतचा प्रभाव नक्किच आहे. त्याशिवाय अतिप्रचंड प्रमाणात तत्सम आणि तद्भव (संस्कृत मधुन आलेले) शब्द दिसले नसते. उदा:- "केवळ्,शब्द्,प्रभाव्,आहे, दिसणे,प्रचंड्,अति" हे सगळेच संस्कृतातुन आलेले शब्द आहेत. २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाय बुवा. नेहमीच्या वापरातील खिडकी,कुर्ता ह्या आणी अशा अनेक शब्दांचा काय बी तरास होत नाय. पण रझिया-सुलतान चित्रपटासरखं "शहीद्-ए-उल्फत, उल्फत -ई- अमानत" वगैरे सरळ बाउन्सर जातात राव. मम्हंजे असल हाय फंडु उर्दु येत नाय. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते. भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? हो.पण क्वचितच. उबळ येते भाषा-शुद्धी वगैरेची;पण ती तात्कालिक असते. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? अजुन तरी असले शब्द सुचवण्याची भरीव कामगिरी केली नाय. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ही लेखी भाषा वाटते.मी तासन्तास टी व्ही वर कार्यक्रम पाहतो. (मराठि शब्द वापरणे म्हण्जे अवघडच वापरावेत असं काही नाही.) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? जन्मात नाय. ते "पंक्चर"च झाले आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नक्की कळ्ळं नाय. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? हो. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? हो. फोन केला होता. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचतुर मराठी प्राध्यापकांनी नाव मोठं होण्याची हौस म्हणुन जगासमोर आपले विचार कळकळ म्हणुन मांडले आणि त्यांची मौज जाहली. "स्वान्त सुखाय" कळ्ळ नाय. ह्ये "स्वांत सुखाय" अस नाय लिवता येनार का? का म्हणुन नाही लिहिता येणार? आपलेच, जन सामान्यांचे मन

In reply to by मन

राजे 28/05/2008 - 16:49
अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते. भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं. हेच म्हणतो व असाच विचार करतो :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ 28/05/2008 - 15:11
बर्‍याच फारसी शब्दांचा अर्थ मराठीत येताना अर्थ बदललेला असतो. उदा : हौस /हौशी हे शब्द फारसी हवस या शब्दावरुन आले आहेत. ("आता हा अर्थ माहीत झाल्यावर अमुकतमुक बाई फार हौशी आहेत हो .........") धमु किंवा अन्द्या याना फार हौस आहे. ही वाक्ये कशी वाटतील. असे अनेक शब्द आहेत . उदा "वकुब" हा ही अर्थ बदलुन आलेला शब्द मूळ अर्थ :शिक्षण. "विलायत" मुळ अर्थ :स्वतःचा देश. अशा शब्दांचे काय करायचे?

ऋचा 28/05/2008 - 15:27
कागद हा शब्द अरबी आहे तो "कागज" ह्या शब्दावरुन आलाय

हर्षद बर्वे 28/05/2008 - 16:47
आत्मपरीक्षण करून प्रश्न्नांची उत्तरे देउच...पण तात्काळ द्यावेसे वाटलेले प्रश्न रूपी ऊत्तर.... १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? ऊ.: कोणाच्या ? हे १०) तुम्ही काल तुमच्या स्वतःच्या घरी फोन केला होता का?....असे विचारावयास पाहीजे होते....!!!

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? नाही २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? नाही ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?होय ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) तीन वेळेस ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? पंक्चरच होते. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? दुरध्वनी करत नाही, शक्यतो फोनच करतो. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? तिकीटच काढावे लागते. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' = व्यवहारचातुर्य यावरुन आपण कोणत्या निष्कर्षावर पोहचणार आहात याची आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे. :) -दिलीप बिरुटे

प्रियाली 28/05/2008 - 17:52
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो.
स्स्सही!! आपला तो बाब्या आणि दुसर्‍यांचे ते कार्टे हा मराठी बाणा येथेही दिसला. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? मुद्दा पहिला: केवळ संस्कृत भाषेचा आहे असे वाटत नाही. मराठी भाषा हे अनेक संस्कृत, प्राकृत आणि परदेशी भाषांचे मिश्रण असावे. तसे म्हणायला गेले तर संस्कृत भाषा तरी स्वदेशी का म्हणावी? अफगाणिस्तान आणि त्याही पलीकडील प्रदेशातून अवेस्तासदृश भाषा तथाकथित आर्यांनी भारतात आणली असावी. तिला संस्कृत म्हणण्याचे धाडस करणे मला अयोग्य वाटते. आता, या भटक्या लोकांची मानसिकता बघू किंवा त्या आधी तिथून पुढे वसलेल्या लोकांची मानसिकता बघा. द. आशियात आणि भारताच्या पूर्व किनार्‍यावर येथिल लोक वसल्याचे सांगितले जाते. उदा. ख्मेर घराणे किंवा पल्लव राजघराणे. दोघांचा इतिहास असा की येथे स्थलांतरित झालेले हे तथाकथित आर्य/ ब्राह्मण इ. मूळ लोकांत मिसळून गेले. त्यांनी स्थानिक बायकांशी लग्न केले आणि स्थानिक राजकारणात-समाजकारणात भाग घेऊ लागले. भाषा, कला, साहित्य यांना त्यांनी आपलेसे केले. त्यानंतर हजारो वर्षांनी आलेल्या पारशांनी स्थानिक बायकांशी लग्न केले नसले तरी ते येथील संस्कृतीत मिसळून गेले. भाषा शिकले. याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. दौपदी, तात्यांचे लाडके कृष्णद्वैपायन व्यास ;), कृष्ण इ. यामुळेच रंगाने सावळे आहेत. हा फाफटपसारा सोडून पुढे पाहिले तर त्यांनी आणलेली भाषा येथील स्थानिक भाषेशी मिळून संस्कृत भाषेची निर्मिती झाली असावी असे मला वाटते आणि हा निष्कर्ष खरा मानला तर संस्कृत ही भाषा स्वदेशी म्हणता यावी पण मग प्राकृत तिची आई असे म्हणणे अयोग्य ठरू नये. असो, मला मराठी ही भाषा केवळ संस्कृत भाषेतून जन्मली हे पटत नाही. प्राकृत भाषांचा प्रभाव मराठी आणि संस्कृत दोहोंवर असावा. मुद्दा दुसरा: मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी. मुद्दा तिसरा: ब्रिटिश येऊन काही शे वर्षे झाली. परंतु, मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार नाही आणि जर कोणी तसा आडाखा बांधू इच्छित नसेल त्यांनी संस्कृत आपली आपली म्हणून घोष का करावा? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? हो असे जाणवते. उदा. परवाच एका स्नेह्यांनी प्रत्युत्त्पन्नमती या (मराठी?) शब्दाचा अर्थ विचारला. वाक्य वाचले असता त्याचा अर्थ मला हजरजबाबी असा वाटला. माझ्यामते प्रत्युत्त्पन्नमती या टंगट्विस्टरपेक्षा हजरजबाबी हा शब्द वापरणे मला आवडेल. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नेहमीच नाही आणि बोलताना नाही पण कधीतरी लिहिताना ध्यानात येते. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? अजिबात नाही आणि तसे करणार्‍या महाभागांवर मला नेहमी हसू येते. जो शब्द मुळात भाषेत नाहीच, तो संस्कृतातून हुडकून आणण्याची कला मला नाही आणि शिकायचीही नाही. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? जर ते शब्द सोपे सुटसुटीत असतील तर हो. मागे एका महाशयांनी सिगरेटला श्वेतवर्णीधूम्रकंडिका असा शब्द सुचवला होता, तर दुसर्‍या एका ठिकाणी कॉजवे साठी काजवाट हा शब्द सुचवला होता. मला काजवाट हा शब्द आवडला. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) एकदाच वाचला. कुडोस टू मराठी वेबसाईट्स! मी टीव्हीवर अर्ध्या तासाची सिरिअल पाहते. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? हो! मागच्या हिवाळ्यात बाहेर ४ डी फॅ. असताना टायर बदलले आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? नाही पण माझ्या डॉक्टर भाचीला जी इथे टुरिस्ट विसावर आली आहे तिला सेलफोन वरून लॉग डिस्टन्स कॉल केला होता. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? नाही आता मी स्वत्:ची कार वापरते. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' स्वतःच्या करमणुकीसाठी अवांतरः माझ्या उत्तरांत जे मराठी आहे तेच मराठी मी ही चार संकेतस्थळे सोडून सहसा बोलते.

In reply to by प्रियाली

विकास 28/05/2008 - 21:13
याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. या संदर्भात दोन बाजूने बोलणारे आहेत - आर्य भारतात बाहेरून आले असे आणि ते खोटे असे. बाहेरून आलेल्यांचा मूळ मुद्दा हा मॅक्समुल्लरच्या मूट तत्वावर आधारीत आहे - भारतीय भाषा ह्या स्वतःच्या जीवावर नेटीव्ह लोकं समृद्ध करू शकणार नाहीत असा. मग त्यात द्वारका, "नसलेल्या" सरस्वती नदीचा उल्लेख वगैरे घातले. पण आता उपग्रहांनी(का मी सॅटेलाईट म्हणले पाहीजे?:-)) घेतलेल्या छायाचित्रांप्रमाणे बरेच काही सांगीतले गेले आहे. त्यामुळे आधी "आर्यन इन्व्हेजन" (त्यामुळे आर्य/अनार्य अशी भिंत तयार करणे - त्यातून इतर राजकारण) होते ते आता, "आर्यन मायग्रेशन" झाले. मग त्याला "थियरी" असे म्हणू लागले. थोडक्यात आर्य भारतात बाहेरून आले हा केवळ एक तात्विक सिद्धांत मानला जाऊ लागला, निरीक्षण नाही.

In reply to by विकास

प्रियाली 28/05/2008 - 21:25
मॅक्समुल्लरला सध्या बाजूला ठेवू. मध्य आशियातून अनेक ठीकाणी, तुर्कस्थान, आफ्रिका, द. आशिया इ. कडे स्थलांतर झाले हा इतिहास आहे, त्या अनुषंगाने त्यांचे भारतात स्थलांतर करणे मला शक्य वाटते. अर्थातच, भूकंप झाला किंवा पूर आला म्हणून झालेले हे स्थलांतर नव्हे. टप्प्याटप्प्याने झालेले स्थलांतर आहे. थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे.

In reply to by प्रियाली

विकास 28/05/2008 - 21:55
थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे. इतकेच मला म्हणावेसे वाटत होते. आपली लिहीण्याच्या ओघात त्या संदर्भात केलेली विधाने होती, ज्याचा अर्थ, तसेच नक्की आहे असा होऊ शकतो पण "नाण्याची दुसरी बाजू"असू शकते असे दाखवले, इतकेच..

मन 28/05/2008 - 17:27
आणखी एक नव्या (शुद्ध?) मराठी शब्दाची आम्हाला उबळ आलिये. स्चूटरचं टायर पंक्चर होतं. = वाहनाचं चाक छिद्रित झालं. कसा काय वाटला हा वापर? आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by प्रियाली

मनस्वी 28/05/2008 - 18:12
चाकनळी / चाकनलिका / चाकथर / चाकाच्छादन ...?? चाकथर / चाकाच्छादन योग्य वाटते म्हणजे टायर ट्युबला चाकथर-नळी म्हणता येईल. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

टायर = वायूयुक्त धाव कसे वाटते? कारण बैलगाडीच्या चाकावर नाही का लोखंडी धाव बसवत? तशी ही वायूयुक्त धाव. :) पुण्याचे पेशवे

मन 28/05/2008 - 18:08
व्हायला काय हरकत आहे? आपल्या सोयीनं इंग्लिश मध्ये नाय का जुन्या शब्दाचे नवे अर्थ बनतात.(जुन्या अर्थाच्या जवळ जाणारे) जसे की "I'll fly tommorrow" म्हणजे " मी उद्या पंख लावुन पक्ष्याप्रमाणे उडेन" असा शब्दशः अर्थ न घेता "मी उद्या विमानात चढेन्/बसेन आणि ते विमान उडेल." असा अर्थ घेणं अपेक्षित आहे. असे अनेकानेक उपयोग इम्ग्लिश मध्ये आहेत, नवनवीन रोज पडताहेत, म्हणुनच तर तिचा तथाकथित झपाट्याने प्रसार वगैरे होतोय. केलं तसच मराठित बिघडलं कुठं बॉस? आपलेच, जनसामान्यांचे मन,

आर्य 28/05/2008 - 18:08
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही हे पृथःकरण केवळ कठीणच २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही - आपण त्यांना आपल्या प्रमाणे बदलून घेतो. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? फारसा नाही ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? प्रयत्न करतो पण जमतेच असे नाही ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय, सांगाना काय पाहिजे ते सरळ असं १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो रोज १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' दृक/ श्राव्य /भाष्य किंवा लिखीत स्वरुपातील दुसर्‍याला समजावण्या साठी वापलेली ऐक सांकेतीक पद्धत आहे भाषा म्हणजे. हे माध्यम सर्वजण आपली मते / भावना / विचार प्रभावी पणे दुसर्‍या पर्यंत पोहचवण्या करीता वापरात, मग यात अन्य भाषेतील शब्द आल्यास बिधडलं कुठे. समजा समोरचाच जर दुसरी भाषा जणत (चांभाराच्या देवाला चपलीची पुजा) असेल तर आपण आपली भाषा बदलतोच ना ? शेवटी गरज आपल्याला पण आहे, आणि बर्‍याच लोकांना भाषेचा अडसर नसतोच. आता बोली भाषेत प्रांत, समाज, व्यवसाय, व्यवहार, काळ, आणि विचार याप्रमाणे भाषेत फरक पडणारच. अन्या भाषेतील शब्द, आपले भाषा ज्ञान संमृद्ध करायला आणि वाङमय सौंदर्य वाढवायला केले पाहीजे. भाषा शास्त्राचा तांत्रिक आणि तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास, प्रथम संस्कृत भाषेत पाणीनीने - अष्टाध्यायी मधे केला. आता मला सांगा कॉम्पुटरचा शोधच आत्त लागला मग हा शब्द तुमच्या जुन्या कोशात कसा असेल? ईतिहासात जाऊन अकबरा विचारा बोर्डींग पास / लॉग ईन म्हणजे काय? बहुभाषीक (आर्य)

विजुभाऊ 28/05/2008 - 18:19
कोणतिही भाषा ही इतर भाषांतील शब्द आत्मसात करुन समृद्ध बनते. आज इंग्रजीतही बरेचसे परभाषीक शब्द आहेत. फिनीश भाषेत बर्फाला २३ प्रकारचे शब्द आहेत. तेव्हढे मराठीत असणे शक्य नाही. कारण भौगोलीक आहे. तसेच नव्या तंत्रज्ञानामुळे नवे शब्द जसे च्या तसे येतात उदा : बिट्स / बाईट्स / हर्ट्झ /व्होल्टेज गिग्या मेग्या ई. यासाठी योग्य प्रतिशब्द असणार नाही. फ्रिजर फ्रिज आणि शितकपाट हे वेगवेगळे आहेत. मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार हेच इंग्रजीबद्दल ही म्हणता येईल तसेच इतर कोणत्याही भाषेबद्दल म्हणता येईल. हिंदी भाषेत तर कितितरी शब्द इतर भाशेतील आहेत. तकनीक / त्रासदी (टेक्नीक / ट्रॅजेडी ) हे शब्द हिंदी वाटत नाहीत हे म्हणणे अवघड आहे. कोनतीही भाषा ही केवळ एक दोन भाषासंकरातुन जन्म घेत नाही. भाषा ही जिवंत रहावी म्हणुन ती प्रवाही असावी लागते.नवे शब्द येणे, नवे संस्कार आले नाहीत तर ती मृत होते. कपाट हा मराठी शब्द नाही ( कबर्ड) त्या ऐवजी फडताळ हा शब्द कोण वापरतो आता. भाषेत नवे शब्द येत रहाणार जुने शब्द कालबाह्य होत रहणार. आजच्या जागतीक खेड्याच्या जमान्यात स्थलकालाच्या मर्यादा / भाषेच्या मर्यादा रहाणार नाहीत. मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी. हे अर्ध सत्य आहे. समाज भाषेची गरज ही राज्यकर्त्यांवरुन ठरवतो. इंग्रजी ही चलनी भाषा आहे म्हणुन आपण इंग्रजी शिकतो. दुसर्‍या महायुद्धात हिटलरची सरशी झाली असती तर आज आपल्या मराठीवर जर्मन भाषेच पगडा असता. जयंत नारळीकरांच्या म्हणण्यानुसार पानिपताच्या महायुद्धात जर विश्वासराव भाऊ मारला/बेपत्ता झाला नसता तर इतिहासाला कलाटणी मिळुन इंग्रजीवर आज मराठीचा पगडा असता. ( अवांतर :एके काळी इंग्रजी भाषेवर फ्रेंच चे आक्रमण होतेय म्हणुन इंग्रज रडत असत)

In reply to by विजुभाऊ

मन 28/05/2008 - 18:55
उत्तिर्ण आणि अनुत्तिर्ण वापरा. स्वगतः- पन शिंच त्ये तर लैच पुस्तकी भाषेतलं वाटायलय. आपलाच, मनोबा

धनंजय 28/05/2008 - 20:00
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? "केवळ" नाही. अनेक भाषांचा प्रभाव आहे, आणि स्वतःचे बदल करण्याची अंगची लकब मराठीत आहे. २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? जाणवत नाही. रुळलेले शब्द सहज समजले, उच्चारले तरच त्यांना "रुळलेले" म्हणतो. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? ९९% असा विचार करत नाही. क्वचित करतो. काव्यात एकापाठोपाठ एक उच्चार एकाच स्रोतातले असल्यास जिभेला सोपे जाते. "हावभावातला डौल" (दोन्ही मराठमोळे शब्द); "हरकतीतली नजाकत" (दोन्ही अरबीतून आलेलेसंस्कृत)"कटाक्षातील कमनीयता" (दोन्ही जवळजवळ संस्कृत) असे वापरतो. "हरकतीतील कमनीयता" किंवा "कटाक्षातील नजाकत" असे मिश्रण कानाला खटकते, म्हणून वापरत नाही. असे प्रसंग क्वचितच येतात. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? माझ्या मते रुळलेला कुठलाच शब्द अशुद्ध नसतो. न रुळलेल्या शब्दाला प्रतिशब्द सुचवायचा मोह कधीकधी होतो. परंतु चपखल प्रतिशब्द सुचवायची माझी प्रतिभा नसल्यामुळे मी तो मोह टाळतो. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? मी सहसा असे शब्द सुचवत नाही. पण लोकांनी सुचवलेले शब्द आवडल्यास ते वापरतो. उदाहरणार्थ : "संकेतस्थळ" आणि "विदागार". ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ० तास. (एकदा वाचला.) ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? माझ्या गाडीचे टायर "पंचर" होते ("पंक्चर" नव्हे) इतकाच फरक. "टायर"चा "वाल" बदलताना कधीकधी "पान्ह्या"चा उपयोग करतो. (ठायर, व्हॅल्व्ह आणि स्पॅनर नव्हे.) जर एखाद्या इंग्रजी शब्दाचा मराठमोळा उच्चार रुळलेला असेल, तर मराठी बोलताना तो मराठमोळा उच्चार मी वापरतो, इंग्रजीत बोलताना इंग्रजी उच्चार वापरतो. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. "शुद्ध"लेखन नामक काही कल्पनाच मला मान्य नाही. "शुद्ध"लेखन हा शब्द "प्रमाणलेखन" या अर्थी काही लोक वापरतात."व्यापारात आणि वर्तमानपत्रांत प्रमाणलेखन सोयीचे आहे," अशा प्रकारात मी मोडतो. पण हा पर्याय दिलेला नाही. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय. (पण टिकेट काढले नाही.) १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य.

विकास 28/05/2008 - 21:52
मला एक मूलभूत प्रश्न आहे: आपण बर्‍याचदा भाषाशुद्धी करत असतो का भाषाविकास? जर भाषाविकास करायच नसता तर "गमभन" सारखी टंकलेखन व्यवस्था का बरं तयार करावीशी वाटली असती? संकेतस्थळपरवलीचा शब्द, खरडवही , वगैरे शब्द तयार करताना तुम्ही आम्ही काय सकाळी शुचिर्भूत होऊन सोवळ्यात बसून शब्द तयार करत असतो का आणि मग पाणि शिंपडून म्हणतो की हां आता भाषेचा हा भाग शुद्ध केला! मग तेंव्हा आपण म्हणतो का की नेट म्हणले तर काय बिघडले? व्य. नि. काय प्रकार आहे? वगैरे? आपण "नेटा"ने मराठी लिहीण्याचा प्रयत्न करतो. सुचले नाहीत तर येथील मित्रमंडळींना प्रतिशब्द सुचवायला सांगतो. हे सर्व आपण म्हणता त्यात म्हणजे, "'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ"" यातील कशात धराल? आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते). मला माझी भाषा आवडते. त्या भाषेचा विकास व्हावा असे मला वाटते. त्या अर्थाने नित्यनूतन शब्द जर तयार झाले तर कुठे बिघडले? आज जर "गुगल" हा शब्द इंग्रजीत तयार झाला असे समजून ऑक्सफर्ड डिक्शनरीत (शब्दकोशात) घातला जातो तर आपण नवीन शब्द केले आणि हो ते संस्कृतप्रचूर अथवा संस्कृतोद्भव असले म्हणून बिघडले कोठे? शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.
विलक्षणः शब्दकोशः विद्यते तव भारती | व्ययेन वर्धते नित्यम क्षयं गच्छती संग्रहात || हे सरस्वती देवी तुझा शब्दकोश हा (धनकोशापेक्षा) वेगळाच आहे! कारण तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा स होतो.
थोडक्यात जे काही शब्द आहेत ते जर लोकांना आवडले तर ते तगतील नाहीतर दुसरे आहेतच. आता शब्दाच्या इष्टाईल मुळे मला "दुग्धशर्करायुक्तघनघट्टगोल" खायला आवडतो असे म्हणायला आवडते. पण काय करणार लोकांना नुसतेच "पेढा" म्हणलेले आवडते म्हणून तोच शब्द रूढ झाला! असो. बाकी भाषा, संस्कृती ह्यातील नाविन्य विचित्र वाटणे हा कधीकधी सवयीचा परीणाम असतो. अमेरिकेत (कुठल्याही परभागात) येतो तेंव्हा अनेक गोष्टी/शब्द (अर्थात इंग्रजी) नवीन वाटायच्या, विचित्र वाटायच्या, पण नंतर त्यातील अर्थ समजणे आणि पचनी पडणे सहज होऊन जाते. पण त्याच बरोबर काही गोष्टी भारताळलेल्या ह्या अमेरीकेत जास्त करू लागलो (मुद्दाम नाही, पण सवयीने). उ.दा: मराठी माणसाशी फोनवर बोलताना आपोआप "नमस्कार मी विकास बोलतोय" असेच तोंडातून बाहेर येते. (आणि बोलणार्‍याला पण आश्चर्य वाटत नाही). तर अमराठी भारतीय माणसांशी बोलताना आपसूक "नमस्ते" येते. येथे अनेक विद्यापिठातील तरूण भारतीय पिढी (अमेरिकेत जन्मलेली) अनुभवली - ते लगेच नमस्ते म्हणतात. मधे एकदा बॉस्टनला उतरल्यावर कस्टमचा अधिकारी पण सुअहास्यवदनाने हात जोडून "नमस्ते, वेलकम होम" असे म्हणाला आणि समजले की बघता बघता "नमस्ते" किती सहज सर्वत्र पसरलेला शब्द झाला ते!

In reply to by विकास

प्रियाली 28/05/2008 - 21:56
शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.
हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का?

In reply to by प्रियाली

कोलबेर 28/05/2008 - 21:59
'आमचा सन इन लॉ येत्या विकेंडला स्टेट्स ला फ्याय करणार आहे'. असले धेडगुजरी मराठी कानाला खटकते उच्छाद आणते हे नक्की. पण हे सुधारण्यासाठी प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द सुचवत राहणे हा उपाय मलाही पटत नाही. इतर भाषांमधुन (इंग्रजी,संस्कृत,अरबी,फारसी,पाली, इ.इ.)आलेले जे शब्द बर्‍यापै़की रुळले आहेत त्यांच्यासाठी प्रतिशब्द नको असे मला वाटते. अवांतर : प्रतिशब्द वाले जसे 'प्रतिशब्द सुचवा' अश्या याद्या तयार करतात तशीच एक 'प्रतिशब्द नको' अशी यादी देखिल बनवावी आणि त्यात खालील शब्द टाकत जावे उदा. पेन टेबल सिगरेट टायर

In reply to by प्रियाली

विकास 28/05/2008 - 22:23
हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का? अट्टहास कुठूनही होऊ शकतो. जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का? बाकी प्रश्नाचे (नवीन शब्दांची गरज) उत्तर माझ्याच वरील प्रतिसादात मिळेलः आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते). संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे. मग ते आपल्या नावात आहे आणि इतरत्रही आहे. जेंव्हा वेबसाईटला संकेतस्थळ शब्द ज्याने कोणी सुचवला त्याला काही मुद्दाम संस्कॄत आठवावे लागले नाही. त्याचबरोबर व्यक्तिगत निरोप म्हणताना त्यात संस्कृतप्रचूर असावे असा अट्टहासपण कोणी धरला नाही... म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.

In reply to by विकास

कोलबेर 28/05/2008 - 22:31
संस्कृत हवे/नको असा दोन्हीही अट्टहास नको हे मान्य पण,
संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.
हे मात्र पटले नाही. मूळ मुद्दा आहे इतर भाषेतील शब्द मराठीत येण्याचा. ते शब्द इतर संस्कृत सोडून इतर कुठल्याही भाषेतील असले तर लगेच बर्‍याच जणांचा झिनोफोबीया बळावतो आणि तेच जर संस्कृतमधले असले तर मात्र लगेच 'संस्कृत ही मराठीची जननी' असा युक्तिवाद करुन स्विकारण्याकडे कल असतो. त्यामूळे 'संस्कृत हवे' हा अट्टहास (मला तरी) अधिक वाटतो.

In reply to by विकास

प्रियाली 28/05/2008 - 22:32
जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का? जर कोणी प्रतिशब्द द्या म्हटल्यावर लगेच संस्कृतप्रचुर शब्द पोतडीतून काढत असेल तर त्याला विरोध अजिबात अयोग्य नाही. वरील उदाहरण पहा, टायरला चाकनळी पासून सर्व शब्द सुचवले आहेत त्यात मराठी भाषेत वापरले जाणारे नळीपासून वायूपर्यंत अनेक शब्द आहेत. जेव्हा प्रतिशब्द दिला जातो आणि तो संस्कृतातून चटकन काढला जातो तेव्हा मायमराठीवर अन्याय करताय असे वाटत नाही का? मराठमोळ्या भाषेत तसा पर्याय नसावा असे का वाटते. सिगरेटला धूरकांडी शब्द न सुचता श्वेतवर्णीधूर्मकंडिका का सुचतो?
संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे.
हे शब्द का आले? लक्षात घ्या, संस्कृताशी आणि संस्कृत शब्दांशी मला काहीही वाकडे नाही परंतु साधे मराठी शब्द मिळत असता संस्कृतातून अवजड शब्द शोधणे, प्रचलीत आणि नव्याने आलेल्या इंग्रजी शब्दांना संस्कृतच वाचवू शकते असा ग्रह करणे (करून ठेवणे) हे अयोग्य वाटते.
म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.
दुर्दैवाने, आपल्याला असे वाटते म्हणजे इतर काय म्हणतात याकडे आपले दुर्लक्ष होऊन फक्त चर्चा भरकटली, इतरांनी विरोध केला याकडेच आपले लक्ष केंद्रित झालेले वाटले.

In reply to by कोलबेर

विजुभाऊ 29/05/2008 - 10:36
विडी आणि सिगरेट मधला फरक खाकी प्यान्ट आणी सफेद पायजम्यातील फरका इतका स्वच्छ आहे. फार तर सिगारेटला इंग्रजी विडी म्हणुयात.बाकी सफेद घोळदार प्यान्ट ही पायजम्यासारखीच दिसते.

In reply to by विकास

वरील प्रतिसादाशी सहमत आहे. शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो. 'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो. पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.' विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत.

विसोबा खेचर 29/05/2008 - 00:43
अरे काय रे ही भाषेची ट्यांव ट्यांव लावली आहे रे तुम्ही लोकांनी! कसल्या रे लेको वांझोट्या चर्चा करत बसता? :) अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे! का उगाच मिपाची जागा फुकट घालवताय? :)) नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला! :)) साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला? भाषाविषयक आणि शुद्धलेखनाबाबत त्या वाळिंब्यासारख्या वांझोट्या चर्चा न करता किती सुंदर काव्यनिर्मिती केली त्यांनी! :) आमची भांडीवाली बाई सीताबाई, दारुड्या नवर्‍याच्या कथाकहाण्या आणि कप्प्लेन्टी आमच्या मातोश्रीस अगदी चोख व खणखणीत भाषेत कथन करत असते! त्या बिचारीला लिहिता-वाचता येत नसून ती पक्की आंगठेबहाद्दर आहे. पण कुठलिही चर्चा न करता तिचंदेखील मराठी भाषेवर अगदी उत्तम प्रभूत्व आहे असं मी म्हणेन! आणि तुम्ही लेको लांब चेहेरे करून कसल्या चर्चा करत बसलाहात रे?! छ्या! :) असो, आज बुधवार असल्यामुळे मी अंमळ कलम १८५ च्या अमलाखाली आहे. उद्या बघतो एकेकाला! :)) आपला, (भाषाप्रभू) तात्या वाळिंबे.

In reply to by विसोबा खेचर

विकास 29/05/2008 - 00:55
:T अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे! L) एकदा कुठल्या भाषेत, कुठले शब्द वापरून, व्याकरण नावाचे प्रकरण कसे वापरावे, संस्कृत प्रचूर शब्द की फारसे नसलेले फार्सी शब्द वापरून अथवा त्यांची पाळेमुळे ठरवून कसे लिहावे हे ठरले की मग आपण सुचवत असलेल्या संदर्भात लिहू... ;)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 29/05/2008 - 01:11
नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला
अहो मिसळपावावरचे छुपे मनोगती कोण हे शोधण्यासाठीच अशा चर्चा करत होतो =)) कधी हाकलपट्टी करायची सांगा.
साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला?
हो ना आणि कधी संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधत होत्या असेही ऐकलेले नाही :P :))

विसोबा खेचर 29/05/2008 - 10:56
एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. अहो मालक! हे कदाचित आपणही कबूल कराल की इथे मंडळींनी आपल्या नेहमीच्या सहजसोप्या मराठी भाषेत(मग त्यात काही रुळलेले विंग्रजी शब्द आले तरी चालतील), भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, व्याकरणाचा कुठलाही आव न आणता, मराठी भाषेची काय ती जबाबदारी आपल्याच डोक्यावर आहे या भ्रमात न राहता लेखन करावं हेच धोरंण पहिल्यापासून अवलंबलं गेलं आहे. यात आपल्याला कुठलाही विरोधाभास दिसत असेल तर ती इतर संस्थळांची लागण समजावी. कृपया मिसळपावच्या माथी असे आरोप करू नयेत..! १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? छ्या! मुळीच नाही! २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही, ही मला वेडझवेगिरी वाटते आणि मी ती करत नाही! :) ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? आज्याबात नाय! ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? मी कुठलेही मराठी शब्द सुचवत नाही. जे लहानपणापासून शाळेत, आईबापाकडून, व इतरत्र ऐकत आलेलो आहे तेच मीही वापरतो. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) एखाद तास. हा प्रश्न मी एकदाच वाचला. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही! :) ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? हो! :) ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (म्हण्जे आपली येष्टी हो!) माझ्या 'बा'ची नाही! :) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - भाषाशुद्धी आणि शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :) आपला, (कातकरी समाजाच्या भाषेत रमणारा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ॐकार 29/05/2008 - 13:20
उपहासात्मक प्रश्न आपल्याला कळले नसतील असे मला वाटत नाही. मराठी शब्द सुचवा अथवा सावरकरांनी सुचवले म्हणून डोळे बंद करून ते मराठी शब्द वापरा हे दोन्ही उपद्व्याप माझ्या दृष्टीने हास्यास्पदच आहेत. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या. ह्या तुमच्या विधानात तुम्ही आत्ता मांडलेल्या मतांशी सुसंगती आहे काय? पूर्वग्रहदूषित वृत्ती आणि नजर सगळ्याच वेबसाईट्स वरच्या सदस्यांत आहे. मिपाही त्याला अपवाद नाही. इतर ठिकाणी विरोधाभास नाही तर अट्टाहास आहे इतकाच काय तो फरक. पूर्वग्रहदूषित वृत्ती नाकारता येत नाही. पण किमान त्यात सुधारणा तरी करता येऊ शकते. मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो. दिलेल्या प्रश्नांतून किमान प्रत्येकाने स्वतःचे मत काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी फार आहे. बिनबुडाचे आरोप करायची मला हौस नाही.

In reply to by ॐकार

विकास 29/05/2008 - 16:49
मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो. हे वाक्य एकदम भावले. :-)

चित्रा 30/05/2008 - 17:23
बराच धुरळा उडून गेलेला दिसतोय. तरी मत नोंदवते! १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही, फारसी शब्द अनेक आहेत (कदाचित शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीच्या सुमारास वापरात आले असावेत). २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? - नाही. जे शब्द माहिती आहेत त्यामुळे नाही. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? - कधीतरी करते. आवड म्हणून. एकदा बसवर लिहीलेला ___ साबण वापरो असा वाक्यप्रयोग वाचून दचकायला झाले होते! ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? - नाही. पण एखाद्या अर्थाच्या जवळपास जाणारे दोन तीन शब्द माहिती असावेत असे वाटते. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? - हो, वापरते. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) " शून्य तास". एकदाच वाचला. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? शीतकपाट हा शब्द फ्रीजला प्रतिशब्द म्हणून योग्य नाही . मला इथे सर्किट यांनी सोप्या प्रतिशब्दांचे गुणधर्म सांगणारा एक मस्त लेख लिहीला होता त्याची आठवण झाली. (हल्ली सर्किट कुठे असतात?). ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही . शुद्धलेखनाला "शुद्ध" म्हणण्याची गरज नाही, पण काही एक प्रमाण असावे या मताची मी आहे. नियम तोडणे हा स्थायीभाव बनू नये. आणि एकदा नियम तोडणे मान्य केले की मग कुठचेही नियम तोडले तरी चालले पाहिजेत. मग हे चालेल आणि ते नाही असा दुजाभाव नको. १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य. मी असे समजते की मी लिहीलेले लोकांना त्रास न होता वाचता आले पाहिजे. तसे झाल्यास मला जे सांगायचे आहे ते ज्यांना वाचता येते अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोचेल.

In reply to by चित्रा

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. मी देखील एकदा या संदर्भात टायर भ्रष्ट झाला असे ऐकले होते. त्यावर त्या पोर्‍याला मालकाने सांगितले भ्रष्ट नाही बरष्ट झाला असे म्हणतात. =)) पुण्याचे पेशवे

गणा मास्तर 02/06/2008 - 11:50
खुप चर्चा झालीये पण राहवत नाही. शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो. 'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो. पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.' विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत. या पेठकर काकांच्या मताशी सहमत. मी पायरीवर बसलो होतो. नशिबानी इथपर्यंत आलो. असे सहज बोलता येत असताना उगीच मी स्टेअरवर बसलो होतो. डेस्टिनीने इथपर्यंत आलो. असली विचित्र भाषा वापरणे चुकीचे वाटते.

In reply to by तळेकर

चतुरंग 02/06/2008 - 15:40
आणि तेही मूळ लेखक/कवी ह्यांच्या नावाचा उल्लेख न करता देणे मिपाच्या धोरणात बसत नाही. सदरहू लिखाण काढून टाकण्यात येत आहे. चतुरंग
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?

महाराष्ट्राची जिवनरेखा........

अमोल केळकर ·

मनस्वी 28/05/2008 - 12:49
६० वर्षांच्या एस्. टी. ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! एस्. टी. चिरायु होवो तसेच अधिक कार्यक्षम बनो, स्वच्छ-टापटीप राहो आणि खेडोपाडी पोहोचो. ज्या खेडी-वस्त्यांनी अजून एस्. टी. चे तोंडही पाहिले नाही तिथे एस्. टी. पोहोचो. जिथे गावातून शहरांना दिवसातून फक्त एकदाच एस्. टी. जाते तिथे तिची फ्रीक्वेन्सी वाढो. एस्. टी. कामगारांची वेतनश्रेणी वाढो आणि कामातील हेक्टीकपणा कमी होवो. जय एस्. टी. महामंडळ. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 28/05/2008 - 12:54
ताम्हीणी घाटातील एस्. टी... गुगलवर मिळाला! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

कुंदन 28/05/2008 - 13:19
असेच म्हणतो ... >> ह्या वर्शी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे राजकारणी लोक जर महामंडळापासून दूर राहिले तर नफा होत राहिल. तोट्याला कारणीभूत आहे ती राजकारणी लोकांची ढवळा ढवळ.... ( येष्टी प्रेमी...) ...कुंदन

In reply to by कुंदन

छोटा डॉन 28/05/2008 - 13:23
आहे असेच म्हणतो ... अवांतर : ह्या वर्षी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे ह्याबद्दल आमच्या भागाचे "आमदार व एस टी महमंडळाचे अध्यक्ष श्री. सुधाकरपंत परिचारक " यांचे अभिनंदन छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

जय एसटी महामंडळ... ... फायद्यात आले पाहून आनंद वाटला... आणि मनस्वी, फोटो अप्रतिम... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आर्य 28/05/2008 - 18:24
मी पायी, सायकल, बस, रेल्वे अगदी विमान प्रवासही केलेत. पण हे सगळे दुरवर नेतात च्यायला. पण एस.टी नेच माणसे खर्‍या अर्थाने जवळ येतात. हात दखवा बस थांबवा =; एसटी चा प्रवासी (आर्य)

विकास 29/05/2008 - 00:21
प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी हे ब्रिदवाक्य बर्‍यापैकी पाळलेली ही एक संस्था आहे. लहानपणापासून अनेकदा अनुभव घेतला आहे. प्रत्येक ठिकाणचे एसटी स्टँड हा एक बघणीय प्रकार असतो. प्रत्येक ठिकाणचे विविध अनुभव. रात्रीच्या एस्ट्यांना रातराणि हा शब्द पाहून खूप गंमत वाटायची! ड्रायव्हर-कंडक्टरचे पण बर्‍याचदा चांगले अनुभव आले आहेत. बाकी एसटीतील प्रवास वर्णन म्हणल्यावर हमखास आठवते ती पुलंची म्हैस आणि महाराष्ट्रातील एसटी नसेल, पण -बाँबे टू गोवा मधील एस टी आणि त्यातील अमिताभ, केस्टो, ललीता पवार इत्यादी...

मराठी_माणूस 29/05/2008 - 16:40
हे बव्हंशी खरे आहे. महाराष्ट्रात कानाकोपर्‍यात एसटि जाते. खाजगी वहतुक हि फक्त जिथे पैसा आहे तिथेच चालवलि जाते . चालकसाठी मात्र काहितरी शीस्ती चे बंधन असावे. कारण आपल्या खाजगी गाडी ने एका गावाहुन दुसर्‍या गावि जाताना एसटी पासुन सावध रहावे लागते. ओव्हरटेक करताना ते काहि बघत नाहित , तुंबलेल्या रहदारीत बस तशिच दामटुन पुढे नेउन अधिक अडथळा निर्माण करतात.

भोचक 29/05/2008 - 17:37
एरवी महाराष्ट्रातल्या एसटी ला लोक नावं ठेवतात. तिच्या खाजगीकरणाची आरोळी ठोकतात. पण आपली 'यष्टी' किती चांगली आहे हे इतर राज्यांत गेल्याशिवाय कळत नाही. मध्य प्रदेशात रहाताना येणारा इथल्या 'ट्रेवल्स'चा अनुभव नक्की वाचा. मग तुम्हाला 'गड्या आपली यष्टीच बरी असे वाटल्याशिवाय रहाणार नाही. http://www.misalpav.com/node/1542

अवन 31/05/2008 - 10:48
आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. लहानपणापासून केलेल्या एस टी प्रवासामुळे, मला तर महाराष्ट्राची ओळख झाली. कोणत्याही एस टी स्टँडवर गेल्यावर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या पाट्या वाचणे हे शिक्षण फार मोठे. पुणे-भोर, मुंबई-आटपाडी (पुणे, सातारा, कराड, विटा, भिवघाट मार्गे), परळ-भूम. त्यातून सर्वात इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे पाटीवरचे व्हायामार्गे. किंवा एकाच नावाची दोन-दोन गावे कळणे. कर्जत एक रायगडात, एक अहमदनगरात. हे शिक्षण पुस्तकातलं नाही, एस टी स्टँडवरचं. कोणत्याही गावात आज एस टी पोचलीये. आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. (पूर्वी आठवडाबाजाराची जादा गाडी असायची.) "गाव तिथे एसटी", "हात दाखवा गाडी थांबवा", "जनता गाडी" यातूनच एस टी ची सामान्य लोकांशी जवळीक जपतं, एस टी SMS वर वेळापत्रक देण्याची उडी मारतेय. आज व्यावसायिक गणितात, एस टी नफा दाखवतेयं, याचे श्रेय एस टी च्या कर्मचार्‍यांचेसुध्दा आहे. एकीकडे शहरांमधून स्पर्धात्मक व्यावसायिक सेवा देणे आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून सेवा देणे, या तारेवरच्या कसरतीत एस टी ची आगेकूच चालू राहो. अधिक http://msrtc.maharashtra.gov.in/ http://www.loksatta.com/daily/20080531/rajay.htm

In reply to by अवन

विसोबा खेचर 31/05/2008 - 18:39
आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. अगदी खरं! आम्हा को़कणवासीयांचं आणि यष्टीचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गेली अनेक वर्ष यष्टीबाई आमची सेवा करते आहे! :) माझ्याही यष्टी महामंडळास लाख लाख शुभेच्छा! आपला, (परळहून सुटणार्‍या 'मुंबई-देवगड' लाल डब्याचा प्रेमी) तात्या.

अमोल केळकर 31/05/2008 - 11:00
आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. काही ठिकाणी ( मुख्यतः कोकणात) गावात येणार्‍या एस टी वरुन वेळेचा अंदाज बांधला जातो.

चतुरंग 02/06/2008 - 18:45
पूर्वी भरपूर प्रवास केलाय. माणसे - माणसे आणि गावे-गावे जोडणार्‍या यश्टीला आमचा सलाम आणि शंभरीच्या वाटचालीला शुभेच्छा! एक आठवण - माझा एक शाळूसोबती झक्कपैकी कंडक्टर (वाहक - काय छान शब्द आहे ना!) झाला तेव्हा आम्ही अचंबित झालो होतो (कारण वर्गमित्रांपैकी कोणी कंडक्टर वगैरे होऊ शकतो असे वाटलेच नव्हते. आपली नोकरीबाबत विचार करण्याची परिमिती किती सीमित असते हे कळून नंतर हसू आले!). नंतर तो वाहक असलेल्या गाडीतून ३-४ वेळा प्रवासाचा योग आला. गप्पा मारताना विचारले की ह्या नोकरीकडे कसा वळलास तेव्हा म्हणाला "मला माणसांची आवड. सतत लोकसंपर्कात रहायला इतकं चांगलं दुसरं ठिकाण कुठलं? शिवाय बोलायला फार कोणी नसलं तर तिकिटे वाटून झाली पुस्तकं वाचत बसतो." त्यानं त्याच्या पेटीतून चांगली चांगली मराठी पुस्तके काढून दाखवली. चतुरंग

मनस्वी 28/05/2008 - 12:49
६० वर्षांच्या एस्. टी. ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! एस्. टी. चिरायु होवो तसेच अधिक कार्यक्षम बनो, स्वच्छ-टापटीप राहो आणि खेडोपाडी पोहोचो. ज्या खेडी-वस्त्यांनी अजून एस्. टी. चे तोंडही पाहिले नाही तिथे एस्. टी. पोहोचो. जिथे गावातून शहरांना दिवसातून फक्त एकदाच एस्. टी. जाते तिथे तिची फ्रीक्वेन्सी वाढो. एस्. टी. कामगारांची वेतनश्रेणी वाढो आणि कामातील हेक्टीकपणा कमी होवो. जय एस्. टी. महामंडळ. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 28/05/2008 - 12:54
ताम्हीणी घाटातील एस्. टी... गुगलवर मिळाला! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

कुंदन 28/05/2008 - 13:19
असेच म्हणतो ... >> ह्या वर्शी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे राजकारणी लोक जर महामंडळापासून दूर राहिले तर नफा होत राहिल. तोट्याला कारणीभूत आहे ती राजकारणी लोकांची ढवळा ढवळ.... ( येष्टी प्रेमी...) ...कुंदन

In reply to by कुंदन

छोटा डॉन 28/05/2008 - 13:23
आहे असेच म्हणतो ... अवांतर : ह्या वर्षी एस्. टी ला चक्क नफा झाला आहे ह्याबद्दल आमच्या भागाचे "आमदार व एस टी महमंडळाचे अध्यक्ष श्री. सुधाकरपंत परिचारक " यांचे अभिनंदन छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

जय एसटी महामंडळ... ... फायद्यात आले पाहून आनंद वाटला... आणि मनस्वी, फोटो अप्रतिम... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आर्य 28/05/2008 - 18:24
मी पायी, सायकल, बस, रेल्वे अगदी विमान प्रवासही केलेत. पण हे सगळे दुरवर नेतात च्यायला. पण एस.टी नेच माणसे खर्‍या अर्थाने जवळ येतात. हात दखवा बस थांबवा =; एसटी चा प्रवासी (आर्य)

विकास 29/05/2008 - 00:21
प्रवाशांच्या सेवेसाठी एस टी हे ब्रिदवाक्य बर्‍यापैकी पाळलेली ही एक संस्था आहे. लहानपणापासून अनेकदा अनुभव घेतला आहे. प्रत्येक ठिकाणचे एसटी स्टँड हा एक बघणीय प्रकार असतो. प्रत्येक ठिकाणचे विविध अनुभव. रात्रीच्या एस्ट्यांना रातराणि हा शब्द पाहून खूप गंमत वाटायची! ड्रायव्हर-कंडक्टरचे पण बर्‍याचदा चांगले अनुभव आले आहेत. बाकी एसटीतील प्रवास वर्णन म्हणल्यावर हमखास आठवते ती पुलंची म्हैस आणि महाराष्ट्रातील एसटी नसेल, पण -बाँबे टू गोवा मधील एस टी आणि त्यातील अमिताभ, केस्टो, ललीता पवार इत्यादी...

मराठी_माणूस 29/05/2008 - 16:40
हे बव्हंशी खरे आहे. महाराष्ट्रात कानाकोपर्‍यात एसटि जाते. खाजगी वहतुक हि फक्त जिथे पैसा आहे तिथेच चालवलि जाते . चालकसाठी मात्र काहितरी शीस्ती चे बंधन असावे. कारण आपल्या खाजगी गाडी ने एका गावाहुन दुसर्‍या गावि जाताना एसटी पासुन सावध रहावे लागते. ओव्हरटेक करताना ते काहि बघत नाहित , तुंबलेल्या रहदारीत बस तशिच दामटुन पुढे नेउन अधिक अडथळा निर्माण करतात.

भोचक 29/05/2008 - 17:37
एरवी महाराष्ट्रातल्या एसटी ला लोक नावं ठेवतात. तिच्या खाजगीकरणाची आरोळी ठोकतात. पण आपली 'यष्टी' किती चांगली आहे हे इतर राज्यांत गेल्याशिवाय कळत नाही. मध्य प्रदेशात रहाताना येणारा इथल्या 'ट्रेवल्स'चा अनुभव नक्की वाचा. मग तुम्हाला 'गड्या आपली यष्टीच बरी असे वाटल्याशिवाय रहाणार नाही. http://www.misalpav.com/node/1542

अवन 31/05/2008 - 10:48
आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. लहानपणापासून केलेल्या एस टी प्रवासामुळे, मला तर महाराष्ट्राची ओळख झाली. कोणत्याही एस टी स्टँडवर गेल्यावर येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांच्या पाट्या वाचणे हे शिक्षण फार मोठे. पुणे-भोर, मुंबई-आटपाडी (पुणे, सातारा, कराड, विटा, भिवघाट मार्गे), परळ-भूम. त्यातून सर्वात इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे पाटीवरचे व्हायामार्गे. किंवा एकाच नावाची दोन-दोन गावे कळणे. कर्जत एक रायगडात, एक अहमदनगरात. हे शिक्षण पुस्तकातलं नाही, एस टी स्टँडवरचं. कोणत्याही गावात आज एस टी पोचलीये. आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. (पूर्वी आठवडाबाजाराची जादा गाडी असायची.) "गाव तिथे एसटी", "हात दाखवा गाडी थांबवा", "जनता गाडी" यातूनच एस टी ची सामान्य लोकांशी जवळीक जपतं, एस टी SMS वर वेळापत्रक देण्याची उडी मारतेय. आज व्यावसायिक गणितात, एस टी नफा दाखवतेयं, याचे श्रेय एस टी च्या कर्मचार्‍यांचेसुध्दा आहे. एकीकडे शहरांमधून स्पर्धात्मक व्यावसायिक सेवा देणे आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकीतून सेवा देणे, या तारेवरच्या कसरतीत एस टी ची आगेकूच चालू राहो. अधिक http://msrtc.maharashtra.gov.in/ http://www.loksatta.com/daily/20080531/rajay.htm

In reply to by अवन

विसोबा खेचर 31/05/2008 - 18:39
आज एस टी साठाव्या वर्षात गेली , हे कळले तेव्हा वाट्ले, आपल्याच कुटुंबातल्या कोणीतरी साठी गाठली आहे. अगदी खरं! आम्हा को़कणवासीयांचं आणि यष्टीचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. गेली अनेक वर्ष यष्टीबाई आमची सेवा करते आहे! :) माझ्याही यष्टी महामंडळास लाख लाख शुभेच्छा! आपला, (परळहून सुटणार्‍या 'मुंबई-देवगड' लाल डब्याचा प्रेमी) तात्या.

अमोल केळकर 31/05/2008 - 11:00
आजही खेडोपाडी मुलांना मोठ्या गावातल्या शाळांच्या वेळा सांभाळता येतील अशा एस टी च्या फेर्‍या आखल्या आहेत. काही ठिकाणी ( मुख्यतः कोकणात) गावात येणार्‍या एस टी वरुन वेळेचा अंदाज बांधला जातो.

चतुरंग 02/06/2008 - 18:45
पूर्वी भरपूर प्रवास केलाय. माणसे - माणसे आणि गावे-गावे जोडणार्‍या यश्टीला आमचा सलाम आणि शंभरीच्या वाटचालीला शुभेच्छा! एक आठवण - माझा एक शाळूसोबती झक्कपैकी कंडक्टर (वाहक - काय छान शब्द आहे ना!) झाला तेव्हा आम्ही अचंबित झालो होतो (कारण वर्गमित्रांपैकी कोणी कंडक्टर वगैरे होऊ शकतो असे वाटलेच नव्हते. आपली नोकरीबाबत विचार करण्याची परिमिती किती सीमित असते हे कळून नंतर हसू आले!). नंतर तो वाहक असलेल्या गाडीतून ३-४ वेळा प्रवासाचा योग आला. गप्पा मारताना विचारले की ह्या नोकरीकडे कसा वळलास तेव्हा म्हणाला "मला माणसांची आवड. सतत लोकसंपर्कात रहायला इतकं चांगलं दुसरं ठिकाण कुठलं? शिवाय बोलायला फार कोणी नसलं तर तिकिटे वाटून झाली पुस्तकं वाचत बसतो." त्यानं त्याच्या पेटीतून चांगली चांगली मराठी पुस्तके काढून दाखवली. चतुरंग
महाराष्ट्राची जिवनरेखा........ नाही पणती नाही चिरा !! कालच्या लोकसत्ता मधील या बातमीने लक्ष वेधुन घेतले. याचा घोषवारा असा होता की ३१ मे ला आपल्या एस्.टी ला ६० वर्षे पुर्ण होणार आहेत. मात्र म.रा.प.म. आणी राज्य शासन यांना याचे अजिबात सोयर सुतक नाही. वाईट वाटले ही बातमी वाचुन. १ जुन १९४८ ला पुणे - अहमदनगर मार्गावर एस्.टी ची पहिली बस धावली. तेव्हापासुन आजपर्यंत आपल्या असंख्य बसेसद्वारे महाराष्ट्राच्या काना़कोपर्‍यात पोहचलेले एस्.टी चे जाळे अचंबीत करणारे आहे. लहाणपणी एस्.टी शी माझे जिव्हाळ्याचे नाते होते.

आमची संगीता

आनंद घारे ·

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:54
हल्ली सगळं 'महा' असतं! 'महा'गायक, 'महा'गायिका, 'महा'अंतीम फेरी! :) स्वगत - 'महा'गायक, 'महा'गायिका म्हणजे काय असतं कुणास ठाऊक! एकदा आमच्या अण्णांना विचारलं पाहिजे! :) असो, संगीताला पुढील वाटचालीकरता 'महा'शुभेच्छा! अवांतर - मतांचा जोगवा मागण्याची ही पध्दत मला मनापासून आवडत नसली तरी या वेळेला मात्र 'आमच्या संगीता'ला भरभरून एसेमेस आणि फोनद्वारा मते मिळावीत मतांचा जोगवा नव्हे! मी त्याला मतांची 'भीक' असं म्हणेन!! (असो, प्रत्येकाची मतं!) अवांतर - या संदर्भात मी ही कविता लिहिली होती! तात्या.

अमोल केळकर 28/05/2008 - 11:38
त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी गायलेली सर्व गाणी आवडली. संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा !! केळकर

त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी गायलेली सर्व गाणी आवडली. संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा !! ......................डिट्टो.................................

मनस्वी 28/05/2008 - 14:13
संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन. अवांतर : संगीता चितळे मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच ४० वर्षांच्या वाटत नाहीत. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

संगीता चितळे मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच ४० वर्षांच्या वाटत नाहीत. हेच आम्ही म्हंटले असते तर लगेच 'गाणे ऐकता की गायिकेला बघत बसता. डर्टी माइंड..!' असे कोणीतरी ऐकवले असते.

वरदा 28/05/2008 - 17:43
पाहिलं नाही सारेगम..त्यांच्या गाण्याची यू ट्यूब वरची एखादी लिंक देईल का कुणी प्लीज?

चकली 29/05/2008 - 00:02
इथे आहेत सा रे गा मा चे भाग अवांतर : इथे थोडेफार recipe videos पण आहेत. दुवा चकली http://chakali.blogspot.com

वरदा 29/05/2008 - 00:10
आता घरी जाऊन ऐकतेच नक्की.... बाकी संगीता ताईंना माझ्याही शुभेच्छा!

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:54
हल्ली सगळं 'महा' असतं! 'महा'गायक, 'महा'गायिका, 'महा'अंतीम फेरी! :) स्वगत - 'महा'गायक, 'महा'गायिका म्हणजे काय असतं कुणास ठाऊक! एकदा आमच्या अण्णांना विचारलं पाहिजे! :) असो, संगीताला पुढील वाटचालीकरता 'महा'शुभेच्छा! अवांतर - मतांचा जोगवा मागण्याची ही पध्दत मला मनापासून आवडत नसली तरी या वेळेला मात्र 'आमच्या संगीता'ला भरभरून एसेमेस आणि फोनद्वारा मते मिळावीत मतांचा जोगवा नव्हे! मी त्याला मतांची 'भीक' असं म्हणेन!! (असो, प्रत्येकाची मतं!) अवांतर - या संदर्भात मी ही कविता लिहिली होती! तात्या.

अमोल केळकर 28/05/2008 - 11:38
त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी गायलेली सर्व गाणी आवडली. संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा !! केळकर

त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी गायलेली सर्व गाणी आवडली. संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा !! ......................डिट्टो.................................

मनस्वी 28/05/2008 - 14:13
संगीता चितळे तसेच श्री. यज्ञेश्वर लिंबेकर यांचे अभिनंदन. अवांतर : संगीता चितळे मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच ४० वर्षांच्या वाटत नाहीत. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

संगीता चितळे मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच ४० वर्षांच्या वाटत नाहीत. हेच आम्ही म्हंटले असते तर लगेच 'गाणे ऐकता की गायिकेला बघत बसता. डर्टी माइंड..!' असे कोणीतरी ऐकवले असते.

वरदा 28/05/2008 - 17:43
पाहिलं नाही सारेगम..त्यांच्या गाण्याची यू ट्यूब वरची एखादी लिंक देईल का कुणी प्लीज?

चकली 29/05/2008 - 00:02
इथे आहेत सा रे गा मा चे भाग अवांतर : इथे थोडेफार recipe videos पण आहेत. दुवा चकली http://chakali.blogspot.com

वरदा 29/05/2008 - 00:10
आता घरी जाऊन ऐकतेच नक्की.... बाकी संगीता ताईंना माझ्याही शुभेच्छा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
अणुशक्तीनगरातली वसाहत वसवायला नुकतीच सुरुवात झाली होती त्या सुमारासच आम्ही तिथे रहायला गेलो. त्या काळात वाहतूकीची आणि संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती. सगळेच रहिवासी नव्याने आलेले असल्यामुळे विशेष ओळखी नव्हत्या. त्यामुळे आपण आपल्या माणसांपासून दूर कुठल्या आडरानांत रहात असल्यासारखे वाटायचे. त्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत आपल्या लोकांसारखी दिसणारी, बोलणारी आणि वागणारी माणसे भेटली की जरा चांगले वाटत असे. त्या काळात तिथे लिमये कुटुंबाची अशीच भेट झाली आणि स्नेह जमला. श्रीयुत त्यांच्या कामात मग्न असायचे तसेच त्यांना ब्रिज, बॅडमिंटन वगैरे खेळांची आवड होती. सौ. गृहकृत्यदक्ष गृहिणी होत्या.

अनादि मी अनंत मी...

विकास ·

धनंजय 28/05/2008 - 07:43
यातले अनेक शब्द रोजवापरात आलेले आहेत. ही असामान्य प्रतिभा म्हणावी.

आजानुकर्ण 28/05/2008 - 08:06
सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. (नम्र) आजानुकर्ण मात्र, भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे. :B एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. #o अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. उदा. दूध, मासा, डुक्कर, कोंबडा असे रोजच्या वापरातले शब्द सोडून भाषाशुद्धी करून सोवळे केलेले दुग्ध, मत्स्य, वराह, कुक्कुट असे शब्द वापरण्याचा आग्रह भाषाशुद्धी करणारे सफाईकामगार करतात. #:S अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ;)) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? (|: आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. ~X( आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 08:32
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते! कोलू राहिला दूर, आधी एक सबंध दिवस नारळ तरी सोलून दाखव, किंवा बिनधास्त भर समुद्रात उडी मारून दाखव, किंवा बेरीसायबाला त्याच्याच कैदेत असतांना निडरपणे, 'पण ब्रिटिश राजवट या देशात ५० वर्षे टिकेल काय?' हा प्रश्न विचारून दाखव आणि मग अगदी हव्वी तेवढी मतं मांड म्हणावं तात्यारावांबद्दल! आला मोठा मतं मांडणारा फोकलिचा!! =)) असो, बाकी चालू द्या! आपला, (कट्टर सावरकरभक्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 28/05/2008 - 08:48
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते!
सहमत आहे ... बाकी सावरकरांचे कर्तुत्व पहायचे सोडून असल्या फालतू गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणे ह्यालाच कदाचीत "काँग्रेसी मानसीकता" म्हणत असावेत ... असो. विषयांतर नको ... "न घेतले हे व्रत अंधतेने " अशी भुमीका असणार्‍या "स्वातंत्रसुर्य तात्याराव सावरकरांच्या " स्मॄतीस आमचे अभिवादन ... (कट्टर सावरकरभक्त!) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:17
कोलू पिसण्याचा आणि भाषाविषयक धोरणांचा काही संबंध म्या अडाण्याला स्पष्ट कराल का तात्यासाहेब. (वरच्या आळीतला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 11:15
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. सावरकरानी जेवढे म्हणुन प्रती शब्द दिलेत ते शक्यतो मराठी शब्दच दिले आहेत. जिथे शक्य नाही तिथे आई (संस्कृत ही मराठीची आईच)कडून काही शब्द घेतले तर काय बिघडले? का त्यानी फारसी वा अरबी भाषेतील शब्द घ्यायला पाहिजे होते? इंग्रजी, फारसी,उर्दू,अरबी शब्द काढून संस्कृतप्रचूर शब्द दिल्याने मराठीचे अत्यंत नुकसान कसे काय झाले? अंदमानात कोलू पिसत असतानाही मातृभूमी आणि मातृभाषे बद्दल विचार करणार्‍या महामानवाला वंदन!

In reply to by आंबोळी

आजानुकर्ण 28/05/2008 - 11:34
दिनांक क्रमांक उपस्थित प्रतिवृत्त नगरपालिका महापालिका महापौर पर्यवेक्षक विश्वस्त त्वर्य/त्वरित गणसंख्या स्तंभ मूल्य शुल्क हुतात्मा निर्बंध शिरगणती विशेषांक सार्वमत झरणी नभोवाणी दूरदर्शन चित्रपट मध्यंतर अर्थसंकल्प क्रीडांगण प्राचार्य विधिमंडळ क्रमांक बोलपट नेपथ्य वेशभूषा दिग्दर्शक प्राध्यापक मुख्याध्यापक शस्त्रसंधी टपाल दूरध्वनी ध्वनिक्षेपक परीक्षक तारण संचलन गतिमान नेतृत्व सेवानिवृत्त वेतन यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? संस्कृत ही मराठीची आई आहे. मग फारसी आणि अरबी काय पूतना मावश्या आहेत का? ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आपला (पूतनामामा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 13:14
मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? इथे प्रश्न नुकसान भरून निघण्याचा नसून तुम्ही उपस्थीत केलेल्या मराठीचे अत्यंत नुकसान झाले याचा आहे. या शब्दांमुळे असे काय नुकसान झाले हो मराठीचे? आणि पुतनामावशी अरबी/फारसी शब्द वापरुन असा काय फायदा होणार होता मराठीचा? त्वर्य, हुतात्मा, मूल्य हे शब्द जर अवघड आहेत तर प्लेबिसाइट,अर्जंट,शहीद वगैरे शब्द सोप्पे कसे ते ही सांगा. सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आयला..... मग मराठीला बिचकून ते कुठली भाषा वापरतात? अरबी , फारसी की इंग्रजी?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:06
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. हे विधान खोटं वाटत असेल तर बिरूटेसरांनी येथे येऊन हे खोटे आहे हे सांगावे - मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली.

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:22
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. यात संस्कृतच्या नाळेचा काय संबंध? आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:29
का कळून घ्यायचं नाहीये...म्हणजे कळून घ्यायचं नसेलच तर हा शेवटचा प्रतिसाद.
आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? तसे नसल्यास हा उगीच शब्दच्छल कशाला? इंग्रजी भाषा भारतात वापरली जाते. तिची परिस्थिती संस्कृत, अरबी किंवा फारसीप्रमाणे नाही तेव्हा तिला एकाच तागडीत का तोलताय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:49
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे.ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? हे मामासाहेबांचे(कर्ण) वाक्य काय सुचवते? संस्कृतातून नवे शब्द आणा आणि अत्ता प्रचलित मराठी शब्दांच्या ऐवजी वापरा असेही कोणी म्हणत नाही (उदा.डुक्कराला वराह्,कोंबड्याला कुक्कुट). पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले? वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:59
पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?
हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.
वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?
या वाक्यावरून वाद सुरू झाला म्हणून वाद वाढवण्यासाठी टॉल क्लेम्स करावेत असे आहे काय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 19:13
मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. अहो प्रियाली ताई हेच तर सांगतोय मी..... तुम्हाला अरबी-फारसी शब्द जवळचे वाटतायत तर तुम्ही ते वापरा. सावरकराना संस्कृत शब्द जवळचे वाटले म्हणुन त्यानी ते आणले.... दोघांच्याही मराठीप्रेमाविषयी शंका घेण्याचा प्रश्नच असु नये... पण सावरकरानी मराठीचे नुकसान केले अश्या दुगाण्या लोक का झाडातायत ?

In reply to by प्रियाली

मराठी भाषेचा स्वतंत्र असा प्रवास होईपर्यंत संस्कृत शब्दांनी, रचनांनी, मराठीची दुर्दशाच झाली असे वाटायला लागते. प्रमाण संस्कृत जेव्हा बोलल्या जात असावी तेव्हा बहुजनांना इतर भाषेकडे वळवले असले तरी प्रारंभीच्या मराठीला संस्कृत शब्दांच्या भरणांमुळे बीचकावे लागेल अशी अवस्था नक्कीच असेल, तसे नसते तर प्राकृत बरोबरचा मराठी भाषेचा प्रवास अधिक जोमदारपणे झाला असता असे म्हणन्यास हरकत नसावी असे वाटते. मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली. इतिहासाच्या एका जाणकार अभ्यासकांने, सतत ज्यांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतात, अनेक ऐतिहासिक संदर्भासहीत लेखन असते, अशा लेखन करणा-या एका लेखकाने केलेले कौतुक अभ्यासाचे बळ देते. आपले मनापासून आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 15:13
तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. बाकी, सावरकरांना प्रणाम. त्यांनी आपल्या परीने कार्य केले. त्यांनी दिलेले सर्व शब्द स्वीकारावे असे तर नाही. जे शब्द रूजू होतात ते आपोआप स्वीकारले जातात, जे होत नाहीत ते मागे पडतात. भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 15:52
"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. मला फारसी, मागधी, पाली भाषा येत असत्या तर शब्द जरूर सांगितला होता. दुर्दैवाने, शाळेत संस्कृतच शिकवली, तरीही एखाद्या मराठी शब्दाला संस्कृत शब्द सुचवा असे सांगितले तर तेही मला जमायचे नाही. असो, तुमची शंका हास्यास्पद आहे.

In reply to by प्रियाली

अभिज्ञ 28/05/2008 - 16:48
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी? हे कळत नाही... आणि मग फारसीच का? हिब्रु, स्वाहीली, सिंहली झालेच तर आफ्रिकेतील भाषा यांचा विचार का नाही करायचा? असो. विषय फारच भरकटत चाललाय.... आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. अतिअवांतर :१) संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. म्हणजे संस्कृत येत असणार्‍यानी मारुन मुटकून बाकीच्या भाषांची गळचेपी केली. २)भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते. ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आंबोळी 28/05/2008 - 17:01
आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. सहमत. प्रशासकीय सेवेतील लोकाना जाज्वल्य देशा/भाषाभिमानापेक्षा सेवा महत्वाची असते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 18:43
फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी?
मग संस्कृतात तरी का करावी? मजेशीरच दिसताय.
ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.
आणि चष्मे उतरवल्याशिवाय कळणारही नाही. मारून मुटकून भाषेची गळचेपी करणे आणि मारून मुटकून भाषा तयार करणे या एकच गोष्टी आहेत काय? हाहा!!

In reply to by प्रियाली

कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या. पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे. दुसर्‍याला उपदेश करणे सोपे असते पण स्वतः ते आचरणात आणणे अवघड असते. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रियाली 28/05/2008 - 20:25
कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या.
हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.
पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.
संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. :=)) पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.

In reply to by प्रियाली

तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही. वरील विधाने आपल्याच वेगवेगळ्या प्रतिसादातून निवडली आहेत. आता ठरवा बुवा आचरट कोण ते. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. संस्कृताचा चष्मा नाही का? मग कोणता बरे??? संस्कृत मराठीची आई हा संस्कृताचा चष्मा नाही होत का? वा! मला चष्मे कळत नाहीत का ! असेल बॉ.. आम्ही नाही ना तुमच्यासारखे भाषातज्ञ. संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. : पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा. आपण हसे लोकाला आणि *** आपल्या नाकाला. अशी सध्या गत तुमची मला वाटत आहे. हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे. अहो आता 'संस्कृताला मराठीची जननी' म्हटलेले तुम्हाला नाही ना सहन होत तसेच आहे इतरांचे. त्याना उगाच पाली का फारसी काय त्या भाषा मराठीच्या जनन्या का काय ते म्हटलेले नाही सहन होत. (आचरट) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मन 28/05/2008 - 20:28
बर्‍याच अंशी सहमत. आजही जर मराठीतील मूळ शब्द काढुन पाहिले, तर संस्कृत शब्दांचा किंवा संस्कृत मधुइन आलेल्या शब्दांचा भरणा जास्त असावा असं वाटतं. अगदि लेखन शैली पासुन. मराठी डाविकडुन उजवीकडे लिहितात (संस्कृत प्रमाणे) अरबी उजवीकडुन डावीकडे. मराठित अरबी शब्द आले, त्या काळात आख्ख्या भारतावर इस्लामिक पगडा चढला होता. खुद्द मोठ मोठ्या मराठा सरदारांची नावं पीर्-जी, शेखु-जी,शहा-जी,मौला-जी अशी ठेवली जात होती. (मग इथल्या भाषेमध्ये या शब्दांचा प्रवेश झाला त्यात नवीन काय?) आता ती/तशी नावं सुद्धा अगदि मराठी संस्कृतीला धरुन आहे का? तशी नावं तुम्ही आज ठेवाल का? आपलाच, मनोबा

In reply to by अभिज्ञ

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का. अभियांत्रिकी, या शद्बाला पाली भाषेत ' सिप्पस्तथ्य' असा शब्द आहे. सिप्प = शिल्प स्तथ्य = शास्त्र शिल्पशास्त्र . बाकी भाषेचे जाणकार भेटल्यावर 'अभियांत्रिकी' शब्दास पर्यायी शब्द असल्यास इथे नक्कीच टंकेन :) चुभुदेघे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by अभिज्ञ

मन 28/05/2008 - 17:58
"अभियांत्रिकी"चे पर्यायी शब्द या भाषांत आहेत ते:- फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- बिरुटे सरांनी दिलेला शब्द स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हां मिळाले? आता सांगा,हे शब्द कशासाठी हवे आहेत? मला तरी ह्या "अभियांत्रिकी"साठी पर्यायी शब्द शोधत बसायचं प्रयोजन कळलं नाही. आपण स्पष्ट केलत, तर खरच बर होइल. आपलाच, मनोबा

In reply to by मन

अभिज्ञ 28/05/2008 - 18:13
फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? अभिज्ञ

In reply to by आजानुकर्ण

सहज 28/05/2008 - 09:03
>>सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व.

In reply to by सहज

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:16
धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व. हा हा हा! हे मस्त! :))

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 09:26
सावरकरांनी सुचवलेली भाषाशुद्धी ही परभाषेतील शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द तयार करण्यासंदर्भात होती. त्यात त्यांना जे वाटले तसे शब्द त्यांनी तयार केले. प्राकृत भाषेतील शब्दांना संस्कृतप्रचूर केल्याचे ऐकलेले नाही. आपण म्हणलेल्या शब्दांबद्दल (दूध, मासा, डुक्कर, कोंबडा इत्यादी) आणि त्यांच्या नेहेमीच्या वापराबद्दल त्यांना काही पडले असेल असे वाटत नाही. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. म्हणजे इतर भाषातज्ञ आणि भाषावैज्ञानिकांनी म्हणलेले बरोबर ... बरं मग अशा भाषातज्ञांचे नक्की योगदान तरी काय? माधवरावांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल शंका नाही, पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार हा एक प्रश्न येतोच. बाकी सरकारने शासकीय मराठी भाषा तयार करताना काय केले हा वेगळाच मुद्दा आहे. त्यांच्या हयातीत तर तमाम काँग्रेसची सरकारे होती - ज्यांना सावरकरांबद्दल फार प्रेम होते अशातला भाग नाही... म्हणून आपण म्हणत असलेला मुद्दा योग्य जरी वाटला तरी सावरकरांसंदर्भात (आणि या लेखा/चर्चेसंदर्भात) थोडाफार अवांतर वाटला. अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. हे बाकी बरोबर. त्यासाठी मूळ बातमीतील खालील परीच्छेद वाचल्यावर त्यांच्या इतर लेखात/बातम्यात काय अवस्था असते असा विचार माझ्याही डोक्यात आला होता...
आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं.

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:21
धन्यवाद विकासराव, तुमचा प्रतिसाद जरा संयमित आणि भक्तीच्या नशेखाली दिलेला नाही असे दिसते पण
पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! अहो सावरकरांचाच वारसा अनेक वर्षे त्यांनी पुढे चालवला आणि उतारवयात आपले भाषाविषयक धोरण चुकीचे आहे ही जाणीव झाल्यावर भाषाशुद्धीवर सडकून टीका केली आणि पुन्हा म्लेंच्छ आणि यवनांचे फारसी-अरबी शब्द जोमाने वापरले. (चकित) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 19:46
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! सर्वप्रथम मी माधव ज्युलीयनना सावरकरांचे शत्रू अथवा विरोधक वगैरे म्हणले असे मला तरी वाटत नाही. माझा मुद्दा सरळ होता, जो माणूस स्वतःच्या टोपण नाव म्हणून "ज्युलीयन" हा शब्द वापरतो त्याचे भाषा विषयी सावरकरांशी मतभेद असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. शिवाय माझे तेथे असेही म्हणणे होते की जे कोणी भाषाततज्ञ वगैरे आहेत (ज्यांचे सावरकरांशी त्या संदर्भात मतभेद होते, असे) त्यांचे नक्की भाषेच्या बाबतीत एक तज्ञ म्हणून योगदान काय होते? पण, आपण ह्या मूळ मुद्यांना बुद्धीवादीपणा दाखवण्याच्या नशेत बगल मारलीत. सावरकरांना वाटले की मराठी भाषेत परभाषेतील शब्दांना समान तयार शब्द होऊ शकतात आणि त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होऊ शकते, त्यांनी तसे केले. त्यावर आपला आक्षेप काय, तर, "यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? ... ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते." म्हणजे आपला मुद्दा हा संस्कृत भाषेवर आणि संस्कृत प्रचुर शब्द वापरले यावर आहे. बाकी त्वर्य हा शब्द मला माहीत नाही पण हुतात्मा आणि मूल्य हे शब्द नक्की कोणाला वापरताना बिचकायला होते ते माहीत नाही.... तसे म्हणाल तर "अजानु" आणि "कर्ण" असे दोन संस्कृतप्रचूर शब्द वापरून केलेले नाव देखील आम्हाला वापरताना बिचकायला होते (ह.घ्या.) तेंव्हा एखादे फार्सी नाव कसे सुचले नाही याचे पण आश्चर्य वाटते. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण मराठी भाषेतील संस्कृतोद्भव शब्द हे वजा केल्यास ना धड तुम्हाला लिहीता येईल ना धड तुम्हाला आवडणारे अधुनीक अथवा संतसाहीत्य पुरे होऊ शकेल. "न लगे मुक्ती आणि संपदा" असे म्हणत तुकारामाने संस्कृत शब्द का वापरले, त्यामुळे सामान्य "हे ची दान देगा देवा" असे म्हणताना बिचकून जातात असे उद्या म्हणाल... (ह. घ्या.) थोडक्यात तुम्ही संस्कृतशी नाळ आहे असे माना अथवा मानू नका, तो केवळ शब्दच्छल आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे आपल्याला समजत नसेल तरच आश्चर्य आहे. आता थोडेफार भक्ती आणि नशेबद्दल मी काही कुणाएका भक्तसंप्रदायतील नाही ज्याचे जे आवडते/भावते त्याला तेथे हार घालायला मला कमी वाटत नाही. थोडक्यात ज्याच्यात जे चांगले दिसते त्याचे तेव्हढ्यापुरते गुणगान करतो. नाहीतर, "गुणगाईन आवडे हेची माझी सर्व जोडी" असे म्हणायचा मला अधिकार कसा राहील? आणि राहता राहीली नशा - त्यात काही फक्त भक्तीचाच सहभाग नसतो तर एखादी गोष्ट एकेरी पद्धतीने पाहत, मनात वेगवेगळी ओझी बाळगत आकसाने बघणार्‍या वृत्तीचापण सहभाग असतो, इतकेच म्हणावेसे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 28/05/2008 - 21:46
ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये इंग्रजीचा नको इतका पुरस्कार होणार आणि अनावश्यक इंग्रजी शब्द घुसडले जाणार हे निश्चितच आहे. हे 'अनावश्यक' शब्द काढून टाकून त्याला पर्यायी सुटसुटीत मराठी शब्द रुळवणे हे गरजेचे होते/आहे. त्यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. पण काही ठीकाणी हा आग्रह जेव्हा 'हट्ट' बनतो तेव्हा वाद उत्पन्न होतो. उदा. वरील यादीतील काही शब्द - झरणी - हा शब्द मी आयुष्यत कधीही वापरला नाही. 'शाईचे पेन' हा सुटसुटीत प्रकार शाळेत असल्यापासून वापारला. वेतन - 'पगार' हा रुळलेला (कोणत्या का भाषेतला असेना!) शब्द उपलब्ध असताना 'वेतन' हा (आणखी दुसरर्‍या भाषेतुन उधार आणलेला) शब्द लादण्याचे काय कारण? सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही.

In reply to by कोलबेर

विकास 28/05/2008 - 22:10
सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही. कारण सोप्पे आहे! लेख लिहीताना केवळ त्यांची १२५ वी जयंती आहे त्यानिमित्ताने नुसते अभिवादन लिहीण्याऐवजी आणि दरवेळेस त्यांची उडी अथवा अंदमान लिहीण्याऐवजी म.टा. मधे आयती शब्दांची यादी लिहीली होती ती येथे दिली आणि त्यांची एक वेगळीच ओळख दिली. पण झाले भलतेच. रामेश्वरची चर्चा सोमेश्वर जाऊन आदळली... सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आणि त्यांना सक्रीयराजकारणात येण्याची बंदी असताना भाषाशुद्धि आणि इतर सामाजीक कामाने लोकजागृती सुरू केली. थोडक्यात जे काही शस्त्र हातात होते त्याचा उपयोग प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्रिटीशांच्या विरोधातील धार वाढवायला करणे हा उद्देश. झरणी हा शब्द आपण दाखवल्यावर वाचला आणि "व्हॉट अ पेन!" असे उद्गार डोक्यात आले :-) थोडक्यात प्रत्येक शब्द पटला पाहीजे असे कोण म्हणते? पण उद्देश समजणे महत्वाचे. पण त्या ऐवजी संस्कृत आणि इतर असला वाद चालू झाला. "रत्नागिरीला असताना सावरकरांकडे गुप्तपणे इतिहासकार र.गो.सरदेसाई त्यांना भेटायला गेले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की लोकं मला भेटायला घाबरतात कारण असा एक समज आहे की माझ्याशी संबंध आला तर काही तरी त्रासच होणार, तेंव्हा तुम्ही कसे आलात? " बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत!

In reply to by विकास

मन 28/05/2008 - 23:02
>> बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत! +१. आपलाच, मनोबा

स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. तात्यांचा भाषाशुद्धीचा प्रयत्न खरोखरच फार उत्तम आहे असे वाटते. एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. मुळात मग नवीन शब्द सुचवण्याचे प्रयोजनच काय जर तो वापरायचा नसेल तर? मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. आणि वरील मते ही फक्त आपल्यालाच भाषेतले काहीतरी कळते असा पुरोगामी अहंकार जोपासणार्‍याची असतात असे मला वाटते. अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? असाच एक बदनाम कोष शिवाजी महाराजानी 'राज्यव्यवहारकोष'या नावाने मराठी भाषा फारसीच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी तयार करवून घेतला होता. त्यामुळे भाषाशुद्धीचा प्रयत्न मला मुळीच भंपक वाटत नाही. (सनातनी) पुण्याचे पेशवे

प्रमोद देव 28/05/2008 - 08:57
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेल्या महान कार्याच्या १लक्षांश जरी कार्य आपल्या सारख्यांना करता आले तरी आपण कृतकृत्य होऊ. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:14
काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . सहमत आहे! अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. अवांतर - फडके, टिळक, चाफेकर, सावरकर, कान्हेरे, या मंडळींनीही मधल्या आळीला अभिमान वाटावा असे कर्य केले आहे! :) असो, आपण विषय काढलात म्हणून चोख उत्तर द्यावं लागलं, नाहीतर आम्हाला कोणत्याही आळीत शिरण्याची काहीही आवश्यकता नव्हती! मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखन एन्करेज करत नाही! तात्या.

राजे 28/05/2008 - 09:00
स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. !!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव 28/05/2008 - 09:54
"मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. हे पुलंचे वाक्य आहे आणि ते कोणत्या संदर्भातले आहे हे मी तात्यासारख्या भाईकाका भक्ताला सांगावे लागतेय हे काही बरे नाही. मधल्या आळीतल्या लोकांच्या गुणांना नव्हे तर अवगुणांना उद्देशून हे वाक्य आहे.(हिणकस शेरा मारण्याची वृत्ती) बाकी वैयक्तिक रित्या मी जातीपातींचा समर्थक मुळीच नाही हेही इथे नमूद करतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:12
भाषाशुद्धीच्या नावाने गावगोंधळ घालणार्‍यांना माधव जूलियन हे स्वतः भाषाशुद्धिसाठी झटणारे होते हे माहिती नसावे हे दुर्दैव व त्यांच्या अडाणीपणाचे प्रदर्शन करणारे आहे. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन माधवरावांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली आणि स्वतःच्या चांगल्या कवितांची वाट लावली. भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी आता आमच्या लक्षात आली आहे. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते आपला, (समजूतदार) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 10:31
भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी पातळी कुणाची काढतोस रे? जा की मग उच्च पातळी असलेल्यांकडे! विषय आहे तो तात्यारावांनी इंग्रजी भाषेतल्या काही शब्दांकरता मराठी भाषेत काही शब्द सुचवले आहेत याचा! मूळ विषय काय आहे हे लक्षात न घेता विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे अवांतर लेखन करणार्‍यांनी प्रथम स्वत:ची बौद्धिक पातळी पाहावी आणि मग इतरांना पातळीच्या गप्पा शिकवाव्यात! केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या.

गणा मास्तर 28/05/2008 - 10:20
मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखनाला प्रोत्साहन देउ नये. सावरकरांचे जातपातनिर्मुलन कार्य पण लक्षात घ्यायला हवे. रत्नगिरीतले 'पतित पावन मंदीर' याची साक्ष देत उभे आहे.

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:49
आमचे काही प्रतिसाद उडालेले दिसताहेत :) आपला, (संशोधक) आजानुकर्ण

नीलकांत 28/05/2008 - 10:55
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, मराठी तसेच भारतीय तरूणांना क्रांतीकार्यासाठी प्रेरणास्त्रोत निर्माणाचे कार्य, भारतीय समाजातील जातीपाती निर्मुलनासाठी कार्य, त्यांचा मुळातच लढवय्या असलेला स्वभाव, त्याचे लेखन, काव्य आदी क्षेत्रातील वावर, त्यांना मराठीचा असलेला अभिमान.... या सर्वांचा मी चाहता आहे. नीलकांत

विसुनाना 28/05/2008 - 14:19
स्वातंत्र्यवीराला माझे कोटी,कोटी प्रणाम... म.टा. ऑनलाईन पुरवणीची 'सलाम सावरकर' ही पंचलाईन खटकली. 'प्रणाम सावरकर' असे योग्य दिसले असते. मी संस्कृताळलेला आहे असे समजू नये. सावरकरांना ते अधिक आवडले असते, नाही का? - बस, इतकेच!

शशांक 28/05/2008 - 14:19
सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे
स्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही. बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.

भोचक 28/05/2008 - 15:15
भाषाशुद्धीचा उहापोह पुष्कळच झाला आहे. त्याची मुख्य सुत्रे दोन १. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द काय ते आपण वापरू नयेत. मग ते जुने असोवत वा नवे. आपले तदर्थक शब्द मारून जे परशब्द रूळतात त्याने काही आपली शब्दसंपत्ती वाढत नाही. २. ज्या अर्थाचे शब्द त्या वस्तू आपल्याकडे नसल्याने मुळातच नाहीत किंवा नवी न पाडणे शक्य नाही, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. जसे. कोट, बूट आदी. ही भाषाशुद्धीची दोन सुत्रे नीट वाचून लक्षात ठेवली तर तिच्यावर घेतले जाणारे ९० टक्के आक्षेप आपोआप नाहीसे होतील. याच तत्वाला अनुसरून मी अनेक नवे मराठी शब्द निर्मिले आहेत. (सावरकर विविध भाषणे पुस्तकातून)

मन 28/05/2008 - 16:07
थोर कार्य्,प्रेरणादायक आणि मार्गदर्शक विचार. ह्याशिवाय काय म्हणणार. बाकी, "भाषा शुद्धी"चा विषय काढुन त्यांचे उणे-दुणे काढणं म्हणजे जरा जास्तिच वाटतयं. हे म्हणजे, "शिवाजी जर आठ-आठ बायका करुन रामाचा आदर्श मोडणार असतील, तर थोर कसे ठरतात? " किंवा "जर गौतम बुद्ध आनी त्याचं अहिंसा तत्वज्ञान महान असेल, तर त्याची पायमल्ली करणार्‍यांना नराधम का म्हणु नये"? (किंवा हिंसा करणारे महान असतील अतर बुद्धाला कमी का लेखु नये?) असले प्रश्न विचारण्यासारखं आहे. किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे:- "शिवाजीनं थेट युद्ध न करता दगाबाजीनं शाहिस्त्यास हाणला. आपल्याच आश्रयदात्या पुरंदराच्या किल्लेदारास बंदी करुन किल्ल्यावर कब्जा केला. कित्येक तह्,वाटाघाटी चुटकीसरशी मोडल्या." हे कसं वाटतं वाचायला? हे चुक आहे ह्याचं कारणच मुळी आपण लक्षात घेतो तत्कालीन स्थिती, उप्लब्ध पर्याय आणि कृती मागचा उद्देश. ह्याच निकषांवर शिवाजी ठरतात छत्रपती, गौतम बुद्ध ठरतो महात्मा(की भगवान?) आणि सावरकर ठरतात एक जाज्व्ल्य, अतुलनीय कार्य असणारे स्फुर्तिदायी चारित्र्याचे स्वातंत्र्यवीर. थोर माणसं, मोठं कार्य हे मोठच असतं.त्यातील वादग्रस्त भागासहित, त्यातील आपल्या असहमतीसहित. चंद्र सुंदर असतो डागांसहित. (मलिनम् अपि हिमांशु लक्ष्-लक्ष्मीं तनोति| ) आपलेच, जनसामान्यांचे मन

चतुरंग 28/05/2008 - 19:05
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! सावरकरांच्या अतुलनीय क्रांतिकारी देशभक्तीबरोबरच त्यांची भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन आणि इतरही कार्ये ही देशप्रेमातूनच उमलली होती. इतकेच नव्हे तर त्यांची काव्ये, नाटके, पुस्तके इत्यादी सर्व मातृभूमीला केंद्रस्थानी ठेवूनच निर्मिलेले दिसते. त्यांनी सुचविलेले बहुसंख्य मराठी शब्द हे आज व्यवहारात रुढ झालेले आहेत आणि थोडेफार होऊ शकले नाहीत पण त्यामुळे त्यांचे कार्य अजिबात छोटे ठरत नाही. मराठी प्रतिशब्द सुचवण्यामागे त्यांचे जाज्वल्ल्य मातृभूमी प्रेमच आहे. ज्या काळात त्यांनी ते केले त्या काळाचे संदर्भ, पारतंत्र्याचे, गुलामगिरीचे संदर्भ सोडून त्याकडे बघितले तर ते अन्यायकारक ठरेल. काही शब्द जड/अवघड वाटल्याने सामान्य माणसे मराठीकडे वळली नाहीत किंवा बिचकली असे मानण्याचे काही कारण दिसत नाही. उलट अल्पशिक्षित सामान्य माणसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारी माणसेच 'कुर्‍हाडीचा दांडा' ठरली की काय असे मानायला मात्र भरपूर वाव आहे. :) ते शब्द वापरले गेले नाहीत म्हणजे सूचना टाकाऊ होत्या असे नव्हे. किंवा त्यांचे भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेणार्‍या इतर माणसांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका (जसे माधव ज्यूलियन) ह्या त्यांच्या वैयक्तिक होत्या त्याचे खापर सावरकरांच्या माथी फोडण्याची गल्लत आपण करता कामा नये. असो. सावरकर महान होते, द्रष्टे होते आणि राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. त्यांना त्रिवार वंदन. चतुरंग

वळू 28/05/2008 - 19:06
सकाळी सारसबागेवरून जाताना मुद्दाम थांबलो अन आपपोआप हात जोडले गेले. ह्या माणसाबद्दल जे काय ऐकलं वाचलं आहे त्यावरून एक कळतं की शंभर नंबरी अस्सल घडीव सोन्याचा माणूस होता. 'ने मजसि ने' वाचताना समजतं की हा 'माझ्या देशावर राज्य करनार्‍या गोर्‍यांचा खूनी' नाही तर देशप्रेमान पेटलेला एक धगधगीत लोखंडाचा गोळा होता. 'जयो ऽस्तुते' मधल्या एक एक शब्दाला तलवारीची धार आहे. 'शतजन्म शोधितांना' असो... 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' असो... वा बाजीप्रभूंचा पोवाडा असो.... असं वाटतं की ह्या माणसानं एक हिन्दुस्थानाशिवाय बाकी कशाचा विचारही केला नाही. सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! - वळू

ऍडीजोशी 28/05/2008 - 19:33
उच्चाराला सोपे असलेले इतर भाषांतील शब्द वापरणे हा निव्वाळ आळशी पणा आहे असे मला वाटते. कारण आपण सरसकट दुसरी भाषा बोलत नाही. त्यातले फक्त सोयीस्कर शब्दच उचलतो. आणि बर्‍याच पिढ्यांनी केलेल्या ह्या आळसामुळेच इतर भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेत. भाषाषुद्धीला संकुचीतपणा म्हणणार्‍यांची कीव करावीशी वाटते. अवांतर - अमेरिकेत गेलेली मराठी कुटूंबे आपल्या मुलांना 'प्रॉपर' मराठी यावं ह्याचा अग्रह का धरतात? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

मन 28/05/2008 - 19:46
म्हणुनच मग आपण लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका असला का कोणता शब्द तो बिंदास वापरावा आळस झटकुन. कशाला उगिच सिग्नल्,ट्रेन्,बटन असले "विदेशी" शब्द वापरायचे? अवांतरः-""लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका " येव्हढ्या पट्टिची मर्‍हाटी मला येत नाय. शिकवण्या घेण्यास तयार हाय का कोण? एक शंका:- मर्‍हाटीचा आग्रह करणारे लोक महाविद्यालयाच्या शेवटल्या वर्षाला म्हणतात"अंतिम वर्ष" मग पदवी-प्रदान करण्याच्या विधीला काय "अंत्य्-विधी " म्हणणार का? आणि सकाळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास ऍडमिशन ऐवजी "प्रातर्विधी" म्हणणार का? ह्.घ्या. आपलाच, मनोबा

सावरकरा॑वरचा गुप्त-पोलिसा॑चा पहारा स्वात॑त्र्य मिळाल्यावरही.. अगदी त्या॑च्या मृत्यूपर्य॑त कायम होता हे सावरकरा॑चे अ॑गरक्षक अप्पा कासार ह्या॑च्या मुलाखतीते वाचलेले आठवते आणि काळजाला घरे पडतात. तसेच मणिश॑कर अय्यर सारख्या निवृत्त आयएएस अधिकार्‍याने (म्हणजे एका बुद्धीमान माणसाने, इतर बुद्धू म॑त्र्यासारखा नाही) अ॑दमान येथील सावरकर-वचने बेमूर्वतखोरपणे काढलेली आठवतात आणि पुन्हा खूप वाईट वाटते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अ॑दमान बेटावर पाऊल ठेवणार्‍या सावरकरा॑नी पहिलेच उदगार काढले होते, " उद्या भारत स्वत॑त्र झाल्यावर हेच अ॑दमान भारतीय नाविक दलाचा तळ म्हणून वापरता येईल!" केव्हढे द्रष्टेपण! असा महामानव पुन्हा होणे नाही.. त्या॑ना कोटी कोटी प्रणाम

चिन्या१९८५ 02/06/2008 - 00:34
येथे सावरकरांनी संस्कृतप्रचुर मराठी आणले म्हणुन माधव ज्युलियन यांचे मत देउन बराच घोळ घातला गेलाय. मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्.पुल स्वतः दिग्गज साहीत्यिक होते त्यामुळे त्यांचे म्हणने लक्षात घेणे जरूरीचे आहे.तर पुल म्हणतात सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत. याप्रकारे सावरकरांच्या भाषाशुध्दीवर टिका करणार्‍यांना उत्तर पुलंनी दिले आहे. एक नविन प्रकार इथे वाचला तो म्हणजे 'संस्कृतप्रचुर शब्दांमुळे बहुजन समाज मराठीला बिचकुन राहु लागला'. याच भाषणात पुढे पुलंनी एक घटना सांगितलीय ती अशी. काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला. आता एका छोट्याशा खेड्यातल्या दलित स्त्रीया २५ वर्षांपुर्वी न घाबरता बिनचुकपणे ' जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत गाउ शकतात तर आजचे सुशिक्षीत बहुजन अशा भाषेला का बिचकतात्??आणि ते बिचकतात याला काही तथ्य आहे का?? आम्हाला तर असे बिचकणे काही दिसले नाही. आणि बिचकतात म्हणजे नक्की काय करतात???

In reply to by चिन्या१९८५

विकेड बनी 02/06/2008 - 02:24
आमची ५० शीची अशिक्षित मोलकरीण आमच्या पोराच्या सोबतीनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणते ना तेव्हा असेच शहारे येतात आमच्या अंगावर. गाणं आलं, गाता आलं, म्हणजे भाषा येते का राव? पण, आमची अडाणी ठकू गाते तेव्हा मजा वाटते आणि कौतुकही. पु. लंना तेच वाटलं.

चिन्या१९८५ 02/06/2008 - 02:40
काय लोक बोलतील सांगता येत नाही. अहो,पुल त्या लोकांमधे गेल्यावर त्यांचाशी बोलले नसतील का???त्या लोकांच्या बोलण्यातुन त्यांना कळले असेलच ना काय ते??????आणि 'जयोस्तुते' हे स्तोत्र तसे अवघड आहे. ट्विंकल ट्विंकली तशी गोष्ट नाही. त्या मोलकरणिला शेक्स्पिअरचे साहीत्य अथवा इतर अवघड कविता म्हणायला सांगा म्हणजे लक्षात येईल काय ते. मुख्य मुद्दा हा आहे की बहुजन जर बिचकत असते तर त्यांनी कुठलही दुसर साध गाण म्हटल असत. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती तेच गाण म्हणायची. ट्विंकल ट्विंकलची आणि जयोस्तुतेची तुलना करणे म्हणजे माणसाचे बोलणे आणि पोपटाचे बोलणे यांची तुलना करण्यासारखे आहे.

धनंजय 28/05/2008 - 07:43
यातले अनेक शब्द रोजवापरात आलेले आहेत. ही असामान्य प्रतिभा म्हणावी.

आजानुकर्ण 28/05/2008 - 08:06
सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. (नम्र) आजानुकर्ण मात्र, भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे. :B एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. #o अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. उदा. दूध, मासा, डुक्कर, कोंबडा असे रोजच्या वापरातले शब्द सोडून भाषाशुद्धी करून सोवळे केलेले दुग्ध, मत्स्य, वराह, कुक्कुट असे शब्द वापरण्याचा आग्रह भाषाशुद्धी करणारे सफाईकामगार करतात. #:S अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ;)) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? (|: आपला, (स्पष्ट) आजानुकर्ण अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. ~X( आपला, (तौलनिक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 08:32
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते! कोलू राहिला दूर, आधी एक सबंध दिवस नारळ तरी सोलून दाखव, किंवा बिनधास्त भर समुद्रात उडी मारून दाखव, किंवा बेरीसायबाला त्याच्याच कैदेत असतांना निडरपणे, 'पण ब्रिटिश राजवट या देशात ५० वर्षे टिकेल काय?' हा प्रश्न विचारून दाखव आणि मग अगदी हव्वी तेवढी मतं मांड म्हणावं तात्यारावांबद्दल! आला मोठा मतं मांडणारा फोकलिचा!! =)) असो, बाकी चालू द्या! आपला, (कट्टर सावरकरभक्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 28/05/2008 - 08:48
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. माधवरावांनी देशाकरता अवघा एक दिवस जरी कोलू पिसला असता तरी मूळव्याध कशी होते हे त्यांना लगेच समजले असते!
सहमत आहे ... बाकी सावरकरांचे कर्तुत्व पहायचे सोडून असल्या फालतू गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणे ह्यालाच कदाचीत "काँग्रेसी मानसीकता" म्हणत असावेत ... असो. विषयांतर नको ... "न घेतले हे व्रत अंधतेने " अशी भुमीका असणार्‍या "स्वातंत्रसुर्य तात्याराव सावरकरांच्या " स्मॄतीस आमचे अभिवादन ... (कट्टर सावरकरभक्त!) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:17
कोलू पिसण्याचा आणि भाषाविषयक धोरणांचा काही संबंध म्या अडाण्याला स्पष्ट कराल का तात्यासाहेब. (वरच्या आळीतला) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 11:15
अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. सावरकरानी जेवढे म्हणुन प्रती शब्द दिलेत ते शक्यतो मराठी शब्दच दिले आहेत. जिथे शक्य नाही तिथे आई (संस्कृत ही मराठीची आईच)कडून काही शब्द घेतले तर काय बिघडले? का त्यानी फारसी वा अरबी भाषेतील शब्द घ्यायला पाहिजे होते? इंग्रजी, फारसी,उर्दू,अरबी शब्द काढून संस्कृतप्रचूर शब्द दिल्याने मराठीचे अत्यंत नुकसान कसे काय झाले? अंदमानात कोलू पिसत असतानाही मातृभूमी आणि मातृभाषे बद्दल विचार करणार्‍या महामानवाला वंदन!

In reply to by आंबोळी

आजानुकर्ण 28/05/2008 - 11:34
दिनांक क्रमांक उपस्थित प्रतिवृत्त नगरपालिका महापालिका महापौर पर्यवेक्षक विश्वस्त त्वर्य/त्वरित गणसंख्या स्तंभ मूल्य शुल्क हुतात्मा निर्बंध शिरगणती विशेषांक सार्वमत झरणी नभोवाणी दूरदर्शन चित्रपट मध्यंतर अर्थसंकल्प क्रीडांगण प्राचार्य विधिमंडळ क्रमांक बोलपट नेपथ्य वेशभूषा दिग्दर्शक प्राध्यापक मुख्याध्यापक शस्त्रसंधी टपाल दूरध्वनी ध्वनिक्षेपक परीक्षक तारण संचलन गतिमान नेतृत्व सेवानिवृत्त वेतन यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? संस्कृत ही मराठीची आई आहे. मग फारसी आणि अरबी काय पूतना मावश्या आहेत का? ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आपला (पूतनामामा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आंबोळी 28/05/2008 - 13:14
मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? इथे प्रश्न नुकसान भरून निघण्याचा नसून तुम्ही उपस्थीत केलेल्या मराठीचे अत्यंत नुकसान झाले याचा आहे. या शब्दांमुळे असे काय नुकसान झाले हो मराठीचे? आणि पुतनामावशी अरबी/फारसी शब्द वापरुन असा काय फायदा होणार होता मराठीचा? त्वर्य, हुतात्मा, मूल्य हे शब्द जर अवघड आहेत तर प्लेबिसाइट,अर्जंट,शहीद वगैरे शब्द सोप्पे कसे ते ही सांगा. सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते. आयला..... मग मराठीला बिचकून ते कुठली भाषा वापरतात? अरबी , फारसी की इंग्रजी?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:06
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. हे विधान खोटं वाटत असेल तर बिरूटेसरांनी येथे येऊन हे खोटे आहे हे सांगावे - मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली.

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:22
मराठीचे नुकसान असे झाले की संस्कृताशी नाळ नसणारा बहुजन समाज मराठीपासून बिचकून राहू लागला. यात संस्कृतच्या नाळेचा काय संबंध? आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:29
का कळून घ्यायचं नाहीये...म्हणजे कळून घ्यायचं नसेलच तर हा शेवटचा प्रतिसाद.
आणि संस्कृताशी नाळ नसल्याने मराठीपासून बिचकून रहाणारा बहुजन समाज अरबी फारसी इंग्रजी शब्दाला का बिचकत नाही ? का त्याची नाळ या भाषांशी जोडली गेली आहे?
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? तसे नसल्यास हा उगीच शब्दच्छल कशाला? इंग्रजी भाषा भारतात वापरली जाते. तिची परिस्थिती संस्कृत, अरबी किंवा फारसीप्रमाणे नाही तेव्हा तिला एकाच तागडीत का तोलताय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 18:49
संस्कृतातून आणलेले नवे शब्द नकोत म्हणजे अरबी, फारसीतील हवे असे कोणी म्हटले आहे? जरा दाखवाल का? भाषाशुद्धी ही भंपक कल्पना आहे असे माझे सध्या मत झाले आहे.ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? हे मामासाहेबांचे(कर्ण) वाक्य काय सुचवते? संस्कृतातून नवे शब्द आणा आणि अत्ता प्रचलित मराठी शब्दांच्या ऐवजी वापरा असेही कोणी म्हणत नाही (उदा.डुक्कराला वराह्,कोंबड्याला कुक्कुट). पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले? वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 18:59
पण जे अरबी, फारसीतील शब्द मराठीत होते त्याला सावरकरानी संस्कृतप्रचूर शब्द (जे अरबी फारसी पेक्षा मराठीला नक्किच जवळचे आहेत)दिले तर काय बिघडले?
हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे.
वाद सुरु झाला तो सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे (हे मी परत परत सांगतोय) या वाक्या वरुन. सावरकरानी जे फारसी/अरबी/इंग्रजी शब्दांच्या ऐवजी संस्कृतप्रचूर शब्द मराठी भाषेत आणले त्याने मराठीचे असे काय नुकसान झाले?
या वाक्यावरून वाद सुरू झाला म्हणून वाद वाढवण्यासाठी टॉल क्लेम्स करावेत असे आहे काय?

In reply to by प्रियाली

आंबोळी 28/05/2008 - 19:13
मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. अहो प्रियाली ताई हेच तर सांगतोय मी..... तुम्हाला अरबी-फारसी शब्द जवळचे वाटतायत तर तुम्ही ते वापरा. सावरकराना संस्कृत शब्द जवळचे वाटले म्हणुन त्यानी ते आणले.... दोघांच्याही मराठीप्रेमाविषयी शंका घेण्याचा प्रश्नच असु नये... पण सावरकरानी मराठीचे नुकसान केले अश्या दुगाण्या लोक का झाडातायत ?

In reply to by प्रियाली

मराठी भाषेचा स्वतंत्र असा प्रवास होईपर्यंत संस्कृत शब्दांनी, रचनांनी, मराठीची दुर्दशाच झाली असे वाटायला लागते. प्रमाण संस्कृत जेव्हा बोलल्या जात असावी तेव्हा बहुजनांना इतर भाषेकडे वळवले असले तरी प्रारंभीच्या मराठीला संस्कृत शब्दांच्या भरणांमुळे बीचकावे लागेल अशी अवस्था नक्कीच असेल, तसे नसते तर प्राकृत बरोबरचा मराठी भाषेचा प्रवास अधिक जोमदारपणे झाला असता असे म्हणन्यास हरकत नसावी असे वाटते. मी बिरूटे सरांना मनोगतावर फक्त आवडले, बरे वाटले असे मोजके प्रतिसाद देताना पाहिले आहे. मला तर एकदा ती कोणाची तरी खुशमस्करी ओळख असावी असे वाटले होते. हळू हळू उपक्रमावर आणि मिपावर - मराठीच्या बोजडीकरणावर ताशेरे ओढले जाऊ लागले तेव्हा सरांची प्रतिभा आम्हाला कळू लागली. इतिहासाच्या एका जाणकार अभ्यासकांने, सतत ज्यांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण असतात, अनेक ऐतिहासिक संदर्भासहीत लेखन असते, अशा लेखन करणा-या एका लेखकाने केलेले कौतुक अभ्यासाचे बळ देते. आपले मनापासून आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by आंबोळी

प्रियाली 28/05/2008 - 15:13
तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. बाकी, सावरकरांना प्रणाम. त्यांनी आपल्या परीने कार्य केले. त्यांनी दिलेले सर्व शब्द स्वीकारावे असे तर नाही. जे शब्द रूजू होतात ते आपोआप स्वीकारले जातात, जे होत नाहीत ते मागे पडतात. भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 15:52
"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का.
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. मला फारसी, मागधी, पाली भाषा येत असत्या तर शब्द जरूर सांगितला होता. दुर्दैवाने, शाळेत संस्कृतच शिकवली, तरीही एखाद्या मराठी शब्दाला संस्कृत शब्द सुचवा असे सांगितले तर तेही मला जमायचे नाही. असो, तुमची शंका हास्यास्पद आहे.

In reply to by प्रियाली

अभिज्ञ 28/05/2008 - 16:48
या भाषांत विशेषतः फारसीत असे शब्द नसावेत का? आणि नसतील तर का नाहीत याचा जरा विचार करा. फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी? हे कळत नाही... आणि मग फारसीच का? हिब्रु, स्वाहीली, सिंहली झालेच तर आफ्रिकेतील भाषा यांचा विचार का नाही करायचा? असो. विषय फारच भरकटत चाललाय.... आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. अतिअवांतर :१) संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. म्हणजे संस्कृत येत असणार्‍यानी मारुन मुटकून बाकीच्या भाषांची गळचेपी केली. २)भाषा ही मारून मुटकून तयार करता येत नाही. ती प्रवाही राहून वाहताना शब्द स्वीकारत-नाकारत जाते. ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही. अभिज्ञ

In reply to by अभिज्ञ

आंबोळी 28/05/2008 - 17:01
आक्षेप फक्त सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे या वाक्याला आहे. असे शब्द वापरुन मराठीचे अत्यंत नुकसान काय झाले? अवांतरः यातून फक्त मिसळ्पाववर वाद चालू करणे या पलिकडे मला तरी काहिच उद्देश दिसत नाही. सहमत. प्रशासकीय सेवेतील लोकाना जाज्वल्य देशा/भाषाभिमानापेक्षा सेवा महत्वाची असते.

In reply to by अभिज्ञ

प्रियाली 28/05/2008 - 18:43
फारसीत एखादा शब्द नाही तर का नाही याची चिंता मराठी लोकानी कशाला करावी?
मग संस्कृतात तरी का करावी? मजेशीरच दिसताय.
ही परस्पर विरोधी वाक्ये टाकण्यामागचे प्रयोजन कळाले नाही.
आणि चष्मे उतरवल्याशिवाय कळणारही नाही. मारून मुटकून भाषेची गळचेपी करणे आणि मारून मुटकून भाषा तयार करणे या एकच गोष्टी आहेत काय? हाहा!!

In reply to by प्रियाली

कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या. पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे. दुसर्‍याला उपदेश करणे सोपे असते पण स्वतः ते आचरणात आणणे अवघड असते. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रियाली 28/05/2008 - 20:25
कदाचित तुम्हाला नसेल अभिमान संस्कृतचा, तुम्हाला वाटत असतील फारसी आणि काय त्या भाषा मराठीच्या जनन्या.
हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही.
पण काही लोकाना संस्कृत जवळची वाटते त्यात तात्याराव पण आलेच, त्याना तुम्ही संस्कृताचे चष्मे चढवलेले लोक म्हणता. मग मला तर तुम्ही फारसीचे आणि काय त्या भाषांचे चष्मे चढवून स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या वाटता. तुम्ही एखाद्याला चष्मा काढायला सांगत असाल तर तो तुम्हीदेखील स्वतः सर्वप्रथम काढला पाहीजे.
संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. :=)) पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा.

In reply to by प्रियाली

तर मग महाराष्ट्री, फारसी, मागधी, पाली, पैशाची कोण बॉ? बाप का काय? तसे असल्यास एक आई आणि इतके बाप असणार्‍या पोरास काय म्हणतात हे सांगणे न लगे. तेव्हा उगीच टॉल क्लेम्स नकोत. हे कशाला माझ्या नावावर थोपवताय? मी कोणालाच कोणाची जननी म्हटल्याचे आठवत नाही. वरील विधाने आपल्याच वेगवेगळ्या प्रतिसादातून निवडली आहेत. आता ठरवा बुवा आचरट कोण ते. संस्कृत आमची आई हा घोष हजारो वर्षे जपणार्‍यांनी या भाषांची गळचेपी केली हे सत्य जरा चष्मे काढून पहायला शिका. संस्कृताचा चष्मा नाही का? मग कोणता बरे??? संस्कृत मराठीची आई हा संस्कृताचा चष्मा नाही होत का? वा! मला चष्मे कळत नाहीत का ! असेल बॉ.. आम्ही नाही ना तुमच्यासारखे भाषातज्ञ. संस्कृताचा चष्मा!!! हे कधी म्हटले? चष्मे कसले हे आधी कळून घ्या आचरटपणाची धन्य आहे. : पेशव्यांकडून आणि काय अपेक्षा असणार म्हणा. आपण हसे लोकाला आणि *** आपल्या नाकाला. अशी सध्या गत तुमची मला वाटत आहे. हे तुम्हाला वाटते, अनेकांना तसे वाटत नसेल ही कल्पना सहन होत नाही का पटत नाही? मला बोजड संस्कृतप्रचूर शब्द अरबी-फारसीपेक्षा अजिबात जवळचे वाटत नाहीत. उदाहरण बाजूच्या चर्चेत दिलेले आहे. अहो आता 'संस्कृताला मराठीची जननी' म्हटलेले तुम्हाला नाही ना सहन होत तसेच आहे इतरांचे. त्याना उगाच पाली का फारसी काय त्या भाषा मराठीच्या जनन्या का काय ते म्हटलेले नाही सहन होत. (आचरट) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मन 28/05/2008 - 20:28
बर्‍याच अंशी सहमत. आजही जर मराठीतील मूळ शब्द काढुन पाहिले, तर संस्कृत शब्दांचा किंवा संस्कृत मधुइन आलेल्या शब्दांचा भरणा जास्त असावा असं वाटतं. अगदि लेखन शैली पासुन. मराठी डाविकडुन उजवीकडे लिहितात (संस्कृत प्रमाणे) अरबी उजवीकडुन डावीकडे. मराठित अरबी शब्द आले, त्या काळात आख्ख्या भारतावर इस्लामिक पगडा चढला होता. खुद्द मोठ मोठ्या मराठा सरदारांची नावं पीर्-जी, शेखु-जी,शहा-जी,मौला-जी अशी ठेवली जात होती. (मग इथल्या भाषेमध्ये या शब्दांचा प्रवेश झाला त्यात नवीन काय?) आता ती/तशी नावं सुद्धा अगदि मराठी संस्कृतीला धरुन आहे का? तशी नावं तुम्ही आज ठेवाल का? आपलाच, मनोबा

In reply to by अभिज्ञ

"अभियांत्रिकी" ह्या शब्दाला "फारसी,मागधी,पाली भाषेतील पर्यायी शब्द सांगाल का. अभियांत्रिकी, या शद्बाला पाली भाषेत ' सिप्पस्तथ्य' असा शब्द आहे. सिप्प = शिल्प स्तथ्य = शास्त्र शिल्पशास्त्र . बाकी भाषेचे जाणकार भेटल्यावर 'अभियांत्रिकी' शब्दास पर्यायी शब्द असल्यास इथे नक्कीच टंकेन :) चुभुदेघे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by अभिज्ञ

मन 28/05/2008 - 17:58
"अभियांत्रिकी"चे पर्यायी शब्द या भाषांत आहेत ते:- फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- बिरुटे सरांनी दिलेला शब्द स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हां मिळाले? आता सांगा,हे शब्द कशासाठी हवे आहेत? मला तरी ह्या "अभियांत्रिकी"साठी पर्यायी शब्द शोधत बसायचं प्रयोजन कळलं नाही. आपण स्पष्ट केलत, तर खरच बर होइल. आपलाच, मनोबा

In reply to by मन

अभिज्ञ 28/05/2008 - 18:13
फारसी,:- पुर्झा-आलम्-गिरी मागधी:- आब्बीयात्तिणी (अभियांत्रिकी चा अप्-भ्रंश, जसे "आर्य "चे "आयरियाणं" किंवा "साधु"चे "साहु/शाहु" बनते तसेच. ) पाली:- सिप्पस्तथ्य स्वाहिली:- हुलुलो-ले-एंजि-रत्ते-पासो हे शब्द दिल्या बद्दल श्री मनोबा व प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना धन्यवाद. हे शब्द "कर्णाला" (कानाला) अवघड वाटतायत की अभियांत्रिकी अवघड वाटतोय? अभिज्ञ

In reply to by आजानुकर्ण

सहज 28/05/2008 - 09:03
>>सावरकरांना वंदन त्यांच्या निष्ठांबद्दल शंका घेणे अगदी त्यांच्या शत्रूलाही शक्य नाही. धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व.

In reply to by सहज

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:16
धन्यवाद (नम्र) आजानुकर्ण साहेब!! वरच्या निष्कर्षाप्रत यायला तुम्हाला एकदा तरी तुमचा "शंकाचिकित्सक" सुरु करण्याचा त्रास झाला त्याबद्दल मात्र क्षमस्व. हा हा हा! हे मस्त! :))

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 09:26
सावरकरांनी सुचवलेली भाषाशुद्धी ही परभाषेतील शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द तयार करण्यासंदर्भात होती. त्यात त्यांना जे वाटले तसे शब्द त्यांनी तयार केले. प्राकृत भाषेतील शब्दांना संस्कृतप्रचूर केल्याचे ऐकलेले नाही. आपण म्हणलेल्या शब्दांबद्दल (दूध, मासा, डुक्कर, कोंबडा इत्यादी) आणि त्यांच्या नेहेमीच्या वापराबद्दल त्यांना काही पडले असेल असे वाटत नाही. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. म्हणजे इतर भाषातज्ञ आणि भाषावैज्ञानिकांनी म्हणलेले बरोबर ... बरं मग अशा भाषातज्ञांचे नक्की योगदान तरी काय? माधवरावांच्या मराठी भाषेतील योगदानाबद्दल शंका नाही, पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार हा एक प्रश्न येतोच. बाकी सरकारने शासकीय मराठी भाषा तयार करताना काय केले हा वेगळाच मुद्दा आहे. त्यांच्या हयातीत तर तमाम काँग्रेसची सरकारे होती - ज्यांना सावरकरांबद्दल फार प्रेम होते अशातला भाग नाही... म्हणून आपण म्हणत असलेला मुद्दा योग्य जरी वाटला तरी सावरकरांसंदर्भात (आणि या लेखा/चर्चेसंदर्भात) थोडाफार अवांतर वाटला. अवांतरः सावरकरांनी निर्माण केलेल्या शब्दांमधील किती शब्द मटामध्ये वापरले जातात याचा अभ्यास करायला हवा. हे बाकी बरोबर. त्यासाठी मूळ बातमीतील खालील परीच्छेद वाचल्यावर त्यांच्या इतर लेखात/बातम्यात काय अवस्था असते असा विचार माझ्याही डोक्यात आला होता...
आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ’ , ‘ यू सी ’ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं.

In reply to by विकास

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:21
धन्यवाद विकासराव, तुमचा प्रतिसाद जरा संयमित आणि भक्तीच्या नशेखाली दिलेला नाही असे दिसते पण
पण जी व्यक्ती टोपणनाव पण "जुलीयन" असे घेते त्यांना सावरकरांची भाषा कशी आवडणार
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! अहो सावरकरांचाच वारसा अनेक वर्षे त्यांनी पुढे चालवला आणि उतारवयात आपले भाषाविषयक धोरण चुकीचे आहे ही जाणीव झाल्यावर भाषाशुद्धीवर सडकून टीका केली आणि पुन्हा म्लेंच्छ आणि यवनांचे फारसी-अरबी शब्द जोमाने वापरले. (चकित) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विकास 28/05/2008 - 19:46
हे वाचून आश्चर्य वाटले. एका सावरकरभक्ताला दुसरा सावरकरभक्त माहिती नसावा. अरेरे! सर्वप्रथम मी माधव ज्युलीयनना सावरकरांचे शत्रू अथवा विरोधक वगैरे म्हणले असे मला तरी वाटत नाही. माझा मुद्दा सरळ होता, जो माणूस स्वतःच्या टोपण नाव म्हणून "ज्युलीयन" हा शब्द वापरतो त्याचे भाषा विषयी सावरकरांशी मतभेद असले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. शिवाय माझे तेथे असेही म्हणणे होते की जे कोणी भाषाततज्ञ वगैरे आहेत (ज्यांचे सावरकरांशी त्या संदर्भात मतभेद होते, असे) त्यांचे नक्की भाषेच्या बाबतीत एक तज्ञ म्हणून योगदान काय होते? पण, आपण ह्या मूळ मुद्यांना बुद्धीवादीपणा दाखवण्याच्या नशेत बगल मारलीत. सावरकरांना वाटले की मराठी भाषेत परभाषेतील शब्दांना समान तयार शब्द होऊ शकतात आणि त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होऊ शकते, त्यांनी तसे केले. त्यावर आपला आक्षेप काय, तर, "यापैकी कोणते शब्द संस्कृतशी संबंध नसलेले पण तरीही मराठी आहेत हे सांगू शकता का? ... ते शब्द असताना मराठीचे काय नुकसान होत होते जे या संस्कृत शब्दांमुळे भरून निघाले? याउलट त्वर्य, हुतात्मा, मूल्य या अवघड शब्दांमुळे सामान्यजन मराठी वापरायला बिचकायला लागले असे वाटते." म्हणजे आपला मुद्दा हा संस्कृत भाषेवर आणि संस्कृत प्रचुर शब्द वापरले यावर आहे. बाकी त्वर्य हा शब्द मला माहीत नाही पण हुतात्मा आणि मूल्य हे शब्द नक्की कोणाला वापरताना बिचकायला होते ते माहीत नाही.... तसे म्हणाल तर "अजानु" आणि "कर्ण" असे दोन संस्कृतप्रचूर शब्द वापरून केलेले नाव देखील आम्हाला वापरताना बिचकायला होते (ह.घ्या.) तेंव्हा एखादे फार्सी नाव कसे सुचले नाही याचे पण आश्चर्य वाटते. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण मराठी भाषेतील संस्कृतोद्भव शब्द हे वजा केल्यास ना धड तुम्हाला लिहीता येईल ना धड तुम्हाला आवडणारे अधुनीक अथवा संतसाहीत्य पुरे होऊ शकेल. "न लगे मुक्ती आणि संपदा" असे म्हणत तुकारामाने संस्कृत शब्द का वापरले, त्यामुळे सामान्य "हे ची दान देगा देवा" असे म्हणताना बिचकून जातात असे उद्या म्हणाल... (ह. घ्या.) थोडक्यात तुम्ही संस्कृतशी नाळ आहे असे माना अथवा मानू नका, तो केवळ शब्दच्छल आहे, पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. हे आपल्याला समजत नसेल तरच आश्चर्य आहे. आता थोडेफार भक्ती आणि नशेबद्दल मी काही कुणाएका भक्तसंप्रदायतील नाही ज्याचे जे आवडते/भावते त्याला तेथे हार घालायला मला कमी वाटत नाही. थोडक्यात ज्याच्यात जे चांगले दिसते त्याचे तेव्हढ्यापुरते गुणगान करतो. नाहीतर, "गुणगाईन आवडे हेची माझी सर्व जोडी" असे म्हणायचा मला अधिकार कसा राहील? आणि राहता राहीली नशा - त्यात काही फक्त भक्तीचाच सहभाग नसतो तर एखादी गोष्ट एकेरी पद्धतीने पाहत, मनात वेगवेगळी ओझी बाळगत आकसाने बघणार्‍या वृत्तीचापण सहभाग असतो, इतकेच म्हणावेसे वाटते.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर 28/05/2008 - 21:46
ब्रिटीशांच्या राजवटी मध्ये इंग्रजीचा नको इतका पुरस्कार होणार आणि अनावश्यक इंग्रजी शब्द घुसडले जाणार हे निश्चितच आहे. हे 'अनावश्यक' शब्द काढून टाकून त्याला पर्यायी सुटसुटीत मराठी शब्द रुळवणे हे गरजेचे होते/आहे. त्यासाठी सावरकरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. पण काही ठीकाणी हा आग्रह जेव्हा 'हट्ट' बनतो तेव्हा वाद उत्पन्न होतो. उदा. वरील यादीतील काही शब्द - झरणी - हा शब्द मी आयुष्यत कधीही वापरला नाही. 'शाईचे पेन' हा सुटसुटीत प्रकार शाळेत असल्यापासून वापारला. वेतन - 'पगार' हा रुळलेला (कोणत्या का भाषेतला असेना!) शब्द उपलब्ध असताना 'वेतन' हा (आणखी दुसरर्‍या भाषेतुन उधार आणलेला) शब्द लादण्याचे काय कारण? सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही.

In reply to by कोलबेर

विकास 28/05/2008 - 22:10
सावरकरांची राष्ट्रभक्ती/देशप्रेम वादातीत आहे (अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादतील पहिले वाक्य देखिल असेच आहे) त्याची गल्लत भाषाशुध्दी प्रकल्पाशी का घातली ते समजले नाही. कारण सोप्पे आहे! लेख लिहीताना केवळ त्यांची १२५ वी जयंती आहे त्यानिमित्ताने नुसते अभिवादन लिहीण्याऐवजी आणि दरवेळेस त्यांची उडी अथवा अंदमान लिहीण्याऐवजी म.टा. मधे आयती शब्दांची यादी लिहीली होती ती येथे दिली आणि त्यांची एक वेगळीच ओळख दिली. पण झाले भलतेच. रामेश्वरची चर्चा सोमेश्वर जाऊन आदळली... सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना आणि त्यांना सक्रीयराजकारणात येण्याची बंदी असताना भाषाशुद्धि आणि इतर सामाजीक कामाने लोकजागृती सुरू केली. थोडक्यात जे काही शस्त्र हातात होते त्याचा उपयोग प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्रिटीशांच्या विरोधातील धार वाढवायला करणे हा उद्देश. झरणी हा शब्द आपण दाखवल्यावर वाचला आणि "व्हॉट अ पेन!" असे उद्गार डोक्यात आले :-) थोडक्यात प्रत्येक शब्द पटला पाहीजे असे कोण म्हणते? पण उद्देश समजणे महत्वाचे. पण त्या ऐवजी संस्कृत आणि इतर असला वाद चालू झाला. "रत्नागिरीला असताना सावरकरांकडे गुप्तपणे इतिहासकार र.गो.सरदेसाई त्यांना भेटायला गेले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की लोकं मला भेटायला घाबरतात कारण असा एक समज आहे की माझ्याशी संबंध आला तर काही तरी त्रासच होणार, तेंव्हा तुम्ही कसे आलात? " बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत!

In reply to by विकास

मन 28/05/2008 - 23:02
>> बिचारे सावरकर पाचवीला पुजलेले वाद त्यांच्या १२५ व्या जयंतीला एका चर्चेत पण सुटू शकत नाहीत! +१. आपलाच, मनोबा

स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. तात्यांचा भाषाशुद्धीचा प्रयत्न खरोखरच फार उत्तम आहे असे वाटते. एखाद्या शब्दाला पर्यायी म्हणून प्रतिशब्द सुचवणे योग्य. मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. मुळात मग नवीन शब्द सुचवण्याचे प्रयोजनच काय जर तो वापरायचा नसेल तर? मात्र तो मूळ शब्द आपल्या भाषेची हानी करत आहे असे मानून केवळ नवीन शब्दच वापरण्याचा भाषाशौद्धिक आग्रह हा उच्चनीचतेच्या अनाठायी अहंकारातून येतो असे वाटते. अनेक भाषातज्ज्ञांनी व भाषावैज्ञानिकांनी माधवराव पटवर्धन (कवी माधव जूलियन), सावरकर यांच्या भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषा संस्कृतच्या दावणीला बांधण्याच्या प्रयत्नांमुळे मराठीचे अत्यंत नुकसान झाले आहे हे मत मांडले आहे. आणि वरील मते ही फक्त आपल्यालाच भाषेतले काहीतरी कळते असा पुरोगामी अहंकार जोपासणार्‍याची असतात असे मला वाटते. अशा''बदनामकोशांप्रीत्यर्थ' बनवलेल्या सरकारी (की शासकीय ) मराठी पासून जनता दूर राहणार नाही तर काय? असाच एक बदनाम कोष शिवाजी महाराजानी 'राज्यव्यवहारकोष'या नावाने मराठी भाषा फारसीच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी तयार करवून घेतला होता. त्यामुळे भाषाशुद्धीचा प्रयत्न मला मुळीच भंपक वाटत नाही. (सनातनी) पुण्याचे पेशवे

प्रमोद देव 28/05/2008 - 08:57
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलेल्या महान कार्याच्या १लक्षांश जरी कार्य आपल्या सारख्यांना करता आले तरी आपण कृतकृत्य होऊ. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 28/05/2008 - 09:14
काही क्षुद्र जंतुंनी त्यांच्याविरुद्ध काहीही अकलेचे तारे तोडले तरी सावरकरांची थोरवी यत्किंचतही कमी होत नाही . सहमत आहे! अर्थात असे करण्यात त्या संबंधित लोकांनी मात्र "मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. अवांतर - फडके, टिळक, चाफेकर, सावरकर, कान्हेरे, या मंडळींनीही मधल्या आळीला अभिमान वाटावा असे कर्य केले आहे! :) असो, आपण विषय काढलात म्हणून चोख उत्तर द्यावं लागलं, नाहीतर आम्हाला कोणत्याही आळीत शिरण्याची काहीही आवश्यकता नव्हती! मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखन एन्करेज करत नाही! तात्या.

राजे 28/05/2008 - 09:00
स्वातंत्र्यवीराला माझे शतशः प्रणाम. !!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव 28/05/2008 - 09:54
"मधल्या आळीचे नाव" सार्थ केलेय. हे पुलंचे वाक्य आहे आणि ते कोणत्या संदर्भातले आहे हे मी तात्यासारख्या भाईकाका भक्ताला सांगावे लागतेय हे काही बरे नाही. मधल्या आळीतल्या लोकांच्या गुणांना नव्हे तर अवगुणांना उद्देशून हे वाक्य आहे.(हिणकस शेरा मारण्याची वृत्ती) बाकी वैयक्तिक रित्या मी जातीपातींचा समर्थक मुळीच नाही हेही इथे नमूद करतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:12
भाषाशुद्धीच्या नावाने गावगोंधळ घालणार्‍यांना माधव जूलियन हे स्वतः भाषाशुद्धिसाठी झटणारे होते हे माहिती नसावे हे दुर्दैव व त्यांच्या अडाणीपणाचे प्रदर्शन करणारे आहे. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन माधवरावांनी भाषाशुद्धीची चळवळ चालवली आणि स्वतःच्या चांगल्या कवितांची वाट लावली. भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी आता आमच्या लक्षात आली आहे. केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते आपला, (समजूतदार) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 28/05/2008 - 10:31
भाषाशुद्धीबाबतची इथली एकूण जाणीव आणि चर्चेची एकंदर बौद्धिक पातळी पातळी कुणाची काढतोस रे? जा की मग उच्च पातळी असलेल्यांकडे! विषय आहे तो तात्यारावांनी इंग्रजी भाषेतल्या काही शब्दांकरता मराठी भाषेत काही शब्द सुचवले आहेत याचा! मूळ विषय काय आहे हे लक्षात न घेता विकासरावांनी म्हटल्याप्रमाणे अवांतर लेखन करणार्‍यांनी प्रथम स्वत:ची बौद्धिक पातळी पाहावी आणि मग इतरांना पातळीच्या गप्पा शिकवाव्यात! केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते हो! काय म्हणणं आहे मग? तात्या.

गणा मास्तर 28/05/2008 - 10:20
मिसळपाव डॉट कॉम जातपातविषयक लेखनाला प्रोत्साहन देउ नये. सावरकरांचे जातपातनिर्मुलन कार्य पण लक्षात घ्यायला हवे. रत्नगिरीतले 'पतित पावन मंदीर' याची साक्ष देत उभे आहे.

आजानुकर्ण 28/05/2008 - 10:49
आमचे काही प्रतिसाद उडालेले दिसताहेत :) आपला, (संशोधक) आजानुकर्ण

नीलकांत 28/05/2008 - 10:55
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, मराठी तसेच भारतीय तरूणांना क्रांतीकार्यासाठी प्रेरणास्त्रोत निर्माणाचे कार्य, भारतीय समाजातील जातीपाती निर्मुलनासाठी कार्य, त्यांचा मुळातच लढवय्या असलेला स्वभाव, त्याचे लेखन, काव्य आदी क्षेत्रातील वावर, त्यांना मराठीचा असलेला अभिमान.... या सर्वांचा मी चाहता आहे. नीलकांत

विसुनाना 28/05/2008 - 14:19
स्वातंत्र्यवीराला माझे कोटी,कोटी प्रणाम... म.टा. ऑनलाईन पुरवणीची 'सलाम सावरकर' ही पंचलाईन खटकली. 'प्रणाम सावरकर' असे योग्य दिसले असते. मी संस्कृताळलेला आहे असे समजू नये. सावरकरांना ते अधिक आवडले असते, नाही का? - बस, इतकेच!

शशांक 28/05/2008 - 14:19
सावरकरांनी निर्माण केलेल्या काही वापरातील मराठी शब्दांची यादी आहे
स्तंभ, मूल्य, शुल्क, वेशभूषा, परीक्षक, गतिमान, नेतृत्व हे शब्द 'निर्माण' (तयार?) केलेले वाटत नाहीत. वेतन या शब्दाविषयी नक्की माहीत नाही पण हा शब्द हिंदीतही वापरला जातो. (उदा. वेतन तो हम पूरा लेंगे, दंड चाहे दस बार कर लिजिये - चुपके चुपके) बातमीदाराने कश्याच्या आधाराने हे लिहिले आहे ते नमूद केलेले नाही. बातमीतील "इतर (फारसी/इंग्रजी) भाषांमधील शब्द म्हणजे आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत" हा विचार काही पटला नाही.

भोचक 28/05/2008 - 15:15
भाषाशुद्धीचा उहापोह पुष्कळच झाला आहे. त्याची मुख्य सुत्रे दोन १. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द काय ते आपण वापरू नयेत. मग ते जुने असोवत वा नवे. आपले तदर्थक शब्द मारून जे परशब्द रूळतात त्याने काही आपली शब्दसंपत्ती वाढत नाही. २. ज्या अर्थाचे शब्द त्या वस्तू आपल्याकडे नसल्याने मुळातच नाहीत किंवा नवी न पाडणे शक्य नाही, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. जसे. कोट, बूट आदी. ही भाषाशुद्धीची दोन सुत्रे नीट वाचून लक्षात ठेवली तर तिच्यावर घेतले जाणारे ९० टक्के आक्षेप आपोआप नाहीसे होतील. याच तत्वाला अनुसरून मी अनेक नवे मराठी शब्द निर्मिले आहेत. (सावरकर विविध भाषणे पुस्तकातून)

मन 28/05/2008 - 16:07
थोर कार्य्,प्रेरणादायक आणि मार्गदर्शक विचार. ह्याशिवाय काय म्हणणार. बाकी, "भाषा शुद्धी"चा विषय काढुन त्यांचे उणे-दुणे काढणं म्हणजे जरा जास्तिच वाटतयं. हे म्हणजे, "शिवाजी जर आठ-आठ बायका करुन रामाचा आदर्श मोडणार असतील, तर थोर कसे ठरतात? " किंवा "जर गौतम बुद्ध आनी त्याचं अहिंसा तत्वज्ञान महान असेल, तर त्याची पायमल्ली करणार्‍यांना नराधम का म्हणु नये"? (किंवा हिंसा करणारे महान असतील अतर बुद्धाला कमी का लेखु नये?) असले प्रश्न विचारण्यासारखं आहे. किंवा आणखी एक उदाहरण म्हणजे:- "शिवाजीनं थेट युद्ध न करता दगाबाजीनं शाहिस्त्यास हाणला. आपल्याच आश्रयदात्या पुरंदराच्या किल्लेदारास बंदी करुन किल्ल्यावर कब्जा केला. कित्येक तह्,वाटाघाटी चुटकीसरशी मोडल्या." हे कसं वाटतं वाचायला? हे चुक आहे ह्याचं कारणच मुळी आपण लक्षात घेतो तत्कालीन स्थिती, उप्लब्ध पर्याय आणि कृती मागचा उद्देश. ह्याच निकषांवर शिवाजी ठरतात छत्रपती, गौतम बुद्ध ठरतो महात्मा(की भगवान?) आणि सावरकर ठरतात एक जाज्व्ल्य, अतुलनीय कार्य असणारे स्फुर्तिदायी चारित्र्याचे स्वातंत्र्यवीर. थोर माणसं, मोठं कार्य हे मोठच असतं.त्यातील वादग्रस्त भागासहित, त्यातील आपल्या असहमतीसहित. चंद्र सुंदर असतो डागांसहित. (मलिनम् अपि हिमांशु लक्ष्-लक्ष्मीं तनोति| ) आपलेच, जनसामान्यांचे मन

चतुरंग 28/05/2008 - 19:05
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! सावरकरांच्या अतुलनीय क्रांतिकारी देशभक्तीबरोबरच त्यांची भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन आणि इतरही कार्ये ही देशप्रेमातूनच उमलली होती. इतकेच नव्हे तर त्यांची काव्ये, नाटके, पुस्तके इत्यादी सर्व मातृभूमीला केंद्रस्थानी ठेवूनच निर्मिलेले दिसते. त्यांनी सुचविलेले बहुसंख्य मराठी शब्द हे आज व्यवहारात रुढ झालेले आहेत आणि थोडेफार होऊ शकले नाहीत पण त्यामुळे त्यांचे कार्य अजिबात छोटे ठरत नाही. मराठी प्रतिशब्द सुचवण्यामागे त्यांचे जाज्वल्ल्य मातृभूमी प्रेमच आहे. ज्या काळात त्यांनी ते केले त्या काळाचे संदर्भ, पारतंत्र्याचे, गुलामगिरीचे संदर्भ सोडून त्याकडे बघितले तर ते अन्यायकारक ठरेल. काही शब्द जड/अवघड वाटल्याने सामान्य माणसे मराठीकडे वळली नाहीत किंवा बिचकली असे मानण्याचे काही कारण दिसत नाही. उलट अल्पशिक्षित सामान्य माणसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारी माणसेच 'कुर्‍हाडीचा दांडा' ठरली की काय असे मानायला मात्र भरपूर वाव आहे. :) ते शब्द वापरले गेले नाहीत म्हणजे सूचना टाकाऊ होत्या असे नव्हे. किंवा त्यांचे भाषाशुद्धीचे कार्य पुढे नेणार्‍या इतर माणसांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिका (जसे माधव ज्यूलियन) ह्या त्यांच्या वैयक्तिक होत्या त्याचे खापर सावरकरांच्या माथी फोडण्याची गल्लत आपण करता कामा नये. असो. सावरकर महान होते, द्रष्टे होते आणि राहतील. त्यांच्या कार्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो. त्यांना त्रिवार वंदन. चतुरंग

वळू 28/05/2008 - 19:06
सकाळी सारसबागेवरून जाताना मुद्दाम थांबलो अन आपपोआप हात जोडले गेले. ह्या माणसाबद्दल जे काय ऐकलं वाचलं आहे त्यावरून एक कळतं की शंभर नंबरी अस्सल घडीव सोन्याचा माणूस होता. 'ने मजसि ने' वाचताना समजतं की हा 'माझ्या देशावर राज्य करनार्‍या गोर्‍यांचा खूनी' नाही तर देशप्रेमान पेटलेला एक धगधगीत लोखंडाचा गोळा होता. 'जयो ऽस्तुते' मधल्या एक एक शब्दाला तलवारीची धार आहे. 'शतजन्म शोधितांना' असो... 'हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' असो... वा बाजीप्रभूंचा पोवाडा असो.... असं वाटतं की ह्या माणसानं एक हिन्दुस्थानाशिवाय बाकी कशाचा विचारही केला नाही. सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! - वळू

ऍडीजोशी 28/05/2008 - 19:33
उच्चाराला सोपे असलेले इतर भाषांतील शब्द वापरणे हा निव्वाळ आळशी पणा आहे असे मला वाटते. कारण आपण सरसकट दुसरी भाषा बोलत नाही. त्यातले फक्त सोयीस्कर शब्दच उचलतो. आणि बर्‍याच पिढ्यांनी केलेल्या ह्या आळसामुळेच इतर भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेत. भाषाषुद्धीला संकुचीतपणा म्हणणार्‍यांची कीव करावीशी वाटते. अवांतर - अमेरिकेत गेलेली मराठी कुटूंबे आपल्या मुलांना 'प्रॉपर' मराठी यावं ह्याचा अग्रह का धरतात? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

मन 28/05/2008 - 19:46
म्हणुनच मग आपण लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका असला का कोणता शब्द तो बिंदास वापरावा आळस झटकुन. कशाला उगिच सिग्नल्,ट्रेन्,बटन असले "विदेशी" शब्द वापरायचे? अवांतरः-""लोहपथ्-अग्निरथगामिनी-आवक्-जावक -पट्टिका " येव्हढ्या पट्टिची मर्‍हाटी मला येत नाय. शिकवण्या घेण्यास तयार हाय का कोण? एक शंका:- मर्‍हाटीचा आग्रह करणारे लोक महाविद्यालयाच्या शेवटल्या वर्षाला म्हणतात"अंतिम वर्ष" मग पदवी-प्रदान करण्याच्या विधीला काय "अंत्य्-विधी " म्हणणार का? आणि सकाळच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यास ऍडमिशन ऐवजी "प्रातर्विधी" म्हणणार का? ह्.घ्या. आपलाच, मनोबा

सावरकरा॑वरचा गुप्त-पोलिसा॑चा पहारा स्वात॑त्र्य मिळाल्यावरही.. अगदी त्या॑च्या मृत्यूपर्य॑त कायम होता हे सावरकरा॑चे अ॑गरक्षक अप्पा कासार ह्या॑च्या मुलाखतीते वाचलेले आठवते आणि काळजाला घरे पडतात. तसेच मणिश॑कर अय्यर सारख्या निवृत्त आयएएस अधिकार्‍याने (म्हणजे एका बुद्धीमान माणसाने, इतर बुद्धू म॑त्र्यासारखा नाही) अ॑दमान येथील सावरकर-वचने बेमूर्वतखोरपणे काढलेली आठवतात आणि पुन्हा खूप वाईट वाटते. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अ॑दमान बेटावर पाऊल ठेवणार्‍या सावरकरा॑नी पहिलेच उदगार काढले होते, " उद्या भारत स्वत॑त्र झाल्यावर हेच अ॑दमान भारतीय नाविक दलाचा तळ म्हणून वापरता येईल!" केव्हढे द्रष्टेपण! असा महामानव पुन्हा होणे नाही.. त्या॑ना कोटी कोटी प्रणाम

चिन्या१९८५ 02/06/2008 - 00:34
येथे सावरकरांनी संस्कृतप्रचुर मराठी आणले म्हणुन माधव ज्युलियन यांचे मत देउन बराच घोळ घातला गेलाय. मला १९८३ साली पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग इथे टाकावासा वाटतोय्.पुल स्वतः दिग्गज साहीत्यिक होते त्यामुळे त्यांचे म्हणने लक्षात घेणे जरूरीचे आहे.तर पुल म्हणतात सावरकरांचे विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे.मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक घटक असतो.सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राजवटीच्या गुलामगिरीतुन ,अवलबिद्वातुन वाचवण हा विवेक सावरकरांच्या भाषाशुध्दीच्या चळवळीमागे होता.वास्तविक इंग्रजीवर त्यांच चांगलच प्रभुत्व होत.मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळचा इंग्रजी उतारा ते स्मरणाने घडाघड म्हणायचे.कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्यम मानले नाही.त्यांना अमान्य होत ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतील शब्दांची घुसखोरी चालू देण.सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजवुन घेतली नाही,त्यांनी त्यांच्या भाषाशुध्दीची चेष्टा केली.हे शब्द रुढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली.पण ते सरकारी शब्दांच्या टाकसळीत तयार केलेले शब्द नव्हते.एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती.सरकारात मोले घातले रडाया (का खरडाया) या भावनेने भाषाशुध्दीचे पगारी कर्मचारी जेंव्हा बसतात तेंव्हा 'घे इकडची इंग्रजी डिक्शनरी अन कर त्याचा मराठी शब्दकोष'असा व्यवहार चालतो.सावरकरांना तो शब्द कोशात पडुन रहाणारा नको होता.तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता.त्यांनी रीपोर्टरला 'वार्ताहर' हा शब्द निर्माण केला.वार्ता खेचुन आणणारा.इथे इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द असे न होता एक कविनिर्मित प्रतिमा तयार झाली.प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले.हे शब्द सावरकरनिर्मित आहेत याचादेखील लोकांना विसर पडला.आज महाराष्ट्रात लोकांना मेयरपेक्षा महापौरच जास्त परीचित आहे.वृत्तपत्राच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक शब्द त्यांनी दिले आहेत.तीच गोष्ट चित्रपटसृष्टीची. दिग्दर्शक,संकलन्,ध्वनीमुद्रण,पटकथा ही त्यांचीच निर्मिती.मराठीला त्यांच हे स्वत्व जागवण्यासाठी दिलेले एक मोठ देण आहे.शिवाय ते एक उत्तम वक्ते असल्याने शब्दनिर्मिती करताना उच्चारातील सोपेपणाही त्यांनी सांभाळला.पुष्कळदा मला वाटत की भाषेचे सामर्थ्य म्हणजे काय ,ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडुन सावरकरांचे 'माणसाचा देव्,विश्वाचा देव',दीन शब्दात संस्कृती हे निबंध मोठ्यानी म्हणुन घ्यावेत. याप्रकारे सावरकरांच्या भाषाशुध्दीवर टिका करणार्‍यांना उत्तर पुलंनी दिले आहे. एक नविन प्रकार इथे वाचला तो म्हणजे 'संस्कृतप्रचुर शब्दांमुळे बहुजन समाज मराठीला बिचकुन राहु लागला'. याच भाषणात पुढे पुलंनी एक घटना सांगितलीय ती अशी. काही वर्षांपुर्वी मी सांगलीमधे म्हैसाळ म्हणुन एक गाव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा एक प्रयोग आहे तो पहायला गेलो होतो.भारताच्या उत्तम शेति प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे .एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रीयांच्या अंगावर लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नसायची म्हणुन त्यांच झोपडीच्या बाहेर पडण मुश्किल होतं. त्या समारंभाला आम्ही गेलो तेंव्हा त्या दलित वस्तीतील सर्व स्त्रीपुरुष आपल्याकडे लग्नसमारंभाला जावे तसा पोषाख करुन तिथे जमली होती.सहकारी शेतीने त्यांच्या आयुष्यात आर्थिक परीवर्तन घडवुन आणल होत आणि ते केवळ आर्थिक परीवर्तन नव्हत हे लगेच माझ्या लक्षात आलं.त्या स्त्रीया समारंभाला गाणे म्हणनार होत्या.हल्ली कुठेही सभेला गेलो की गाणी ऐकावी लागतात. ती बहुदा सिनेमातली अथवा प्रसंगाला साजेशी अशी तिथल्याच शाळेतल्या गुरुजींनी कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करुन जुळवलेली स्वागतपर पद्द्य.आणि येथे पेटीवाल्यांनी सुर धरला,तबलजींनी ठेका सुरु केला आणि अस्खलीत वाणित त्या दलित भगिनींनी गाणे सुरु केले ' जयोस्तुते,श्री महन्मंगले श्रीवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती' . माझ्या अंगावर सर् कन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारण्यासाठी,त्यांना मोकळेपणानी गाता याव ,बागडता याव म्हणुन सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करीत ज्या सावरकरांनी जीवाच रान केल त्या सावरकरांनी रचलेल हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रीया बिनचुकपणे उत्तम सुरतालात गात होत्या.एखाद्याच पुण्य फळाला जाण म्हणजे काय याचा मला त्याक्षणी अनुभव आला. आता एका छोट्याशा खेड्यातल्या दलित स्त्रीया २५ वर्षांपुर्वी न घाबरता बिनचुकपणे ' जयोस्तुते श्री महन्मंगले' हे गीत गाउ शकतात तर आजचे सुशिक्षीत बहुजन अशा भाषेला का बिचकतात्??आणि ते बिचकतात याला काही तथ्य आहे का?? आम्हाला तर असे बिचकणे काही दिसले नाही. आणि बिचकतात म्हणजे नक्की काय करतात???

In reply to by चिन्या१९८५

विकेड बनी 02/06/2008 - 02:24
आमची ५० शीची अशिक्षित मोलकरीण आमच्या पोराच्या सोबतीनं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणते ना तेव्हा असेच शहारे येतात आमच्या अंगावर. गाणं आलं, गाता आलं, म्हणजे भाषा येते का राव? पण, आमची अडाणी ठकू गाते तेव्हा मजा वाटते आणि कौतुकही. पु. लंना तेच वाटलं.

चिन्या१९८५ 02/06/2008 - 02:40
काय लोक बोलतील सांगता येत नाही. अहो,पुल त्या लोकांमधे गेल्यावर त्यांचाशी बोलले नसतील का???त्या लोकांच्या बोलण्यातुन त्यांना कळले असेलच ना काय ते??????आणि 'जयोस्तुते' हे स्तोत्र तसे अवघड आहे. ट्विंकल ट्विंकली तशी गोष्ट नाही. त्या मोलकरणिला शेक्स्पिअरचे साहीत्य अथवा इतर अवघड कविता म्हणायला सांगा म्हणजे लक्षात येईल काय ते. मुख्य मुद्दा हा आहे की बहुजन जर बिचकत असते तर त्यांनी कुठलही दुसर साध गाण म्हटल असत. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती तेच गाण म्हणायची. ट्विंकल ट्विंकलची आणि जयोस्तुतेची तुलना करणे म्हणजे माणसाचे बोलणे आणि पोपटाचे बोलणे यांची तुलना करण्यासारखे आहे.
लेखनविषय:
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला... असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

सहज

चेतन ·

अरुण मनोहर 28/05/2008 - 06:42
सहजपणे जे मनात येते सच्च्या मनाने कागदावर उतरते सहज प्रतिक्रीया व्यक्त करवते फसलेले अथवा यशस्वी लिखाण ते! लगे रहो चेतनभाई......

चेतन 28/05/2008 - 12:22
धन्यवाद अरुणजी... सहजासहजी प्रतिक्रिया न मिळणारा (सहज चेतन) #:S अवांतरः किती सहजपणे प्रतिक्रिया दिलेय

In reply to by सहज

चेतन 28/05/2008 - 12:43
"सहज" मिसळपाववर टंकल्यावर हे लक्षात आलं ! माफी असावी महाराज (असा काही आमचा इरादा नव्हता) कॉपीराइटमध्ये सहजपणे अडकलेला (नुसताच् चेतन) 8} अवांतरः आता गातो एक वर्ल्ड फेमस गीत - "हे काय नशीबी आले" एव्हढही काही निराश नाहि केलं (हे आपलं सहज मनात आलं म्हणुन हो)

In reply to by चेतन

सहज 28/05/2008 - 14:18
चेतनसाहेब गंमत केली. माफी कसली. मिपावर सगळे हसत खेळत असते.. मुख्य सांगायचेच विसरलो. कविता मस्त "सहज" जमल्यात. अजुन येऊ देत.

विसोबा खेचर 28/05/2008 - 13:21
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || हेच सर्वात महत्वाचे! :) वा चेतनराव, छोटेखानी परंतु सुंदर कविता...! तात्या.

सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
चेतन,

कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली.
लिहित राहा, र्‍ह्दयास भिडणार्‍या कविता अशाच जन्मल्या आहेत.

 

अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :)
'' सहज चालतो, सहज बोलतो
 संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो, 
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
( सहजराव,(  ह. घ्या. ))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे 28/05/2008 - 16:52
'' सहज चालतो, सहज बोलतो संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो. सहज येतो, सहज जातो, सहज वाचतो, सहज चावतो तयाला 'सहज' असे म्हणतो'' जबरा !!!!!!!! :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेतन 29/05/2008 - 19:29
धन्यवाद तात्या, बिरुटे सर, अरुणजी , सहजराव, सतिश अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य बिरुटे सर मस्त लिहलयं अशिच काही व्यक्तिचित्रं लिहा मजा येइल वाचायला (तात्यांना स्पर्धा) तुर्त दि:गमुढ चेतन :T

अरुण मनोहर 28/05/2008 - 06:42
सहजपणे जे मनात येते सच्च्या मनाने कागदावर उतरते सहज प्रतिक्रीया व्यक्त करवते फसलेले अथवा यशस्वी लिखाण ते! लगे रहो चेतनभाई......

चेतन 28/05/2008 - 12:22
धन्यवाद अरुणजी... सहजासहजी प्रतिक्रिया न मिळणारा (सहज चेतन) #:S अवांतरः किती सहजपणे प्रतिक्रिया दिलेय

In reply to by सहज

चेतन 28/05/2008 - 12:43
"सहज" मिसळपाववर टंकल्यावर हे लक्षात आलं ! माफी असावी महाराज (असा काही आमचा इरादा नव्हता) कॉपीराइटमध्ये सहजपणे अडकलेला (नुसताच् चेतन) 8} अवांतरः आता गातो एक वर्ल्ड फेमस गीत - "हे काय नशीबी आले" एव्हढही काही निराश नाहि केलं (हे आपलं सहज मनात आलं म्हणुन हो)

In reply to by चेतन

सहज 28/05/2008 - 14:18
चेतनसाहेब गंमत केली. माफी कसली. मिपावर सगळे हसत खेळत असते.. मुख्य सांगायचेच विसरलो. कविता मस्त "सहज" जमल्यात. अजुन येऊ देत.

विसोबा खेचर 28/05/2008 - 13:21
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || हेच सर्वात महत्वाचे! :) वा चेतनराव, छोटेखानी परंतु सुंदर कविता...! तात्या.

सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी |
शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी ||
कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा |
सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा ||
चेतन,

कविता कशी असावी असा अर्थ सांगणारी कविता आवडली.
लिहित राहा, र्‍ह्दयास भिडणार्‍या कविता अशाच जन्मल्या आहेत.

 

अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य :)
'' सहज चालतो, सहज बोलतो
 संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो.
सहज येतो, सहज जातो, 
सहज वाचतो, सहज चावतो
तयाला 'सहज' असे म्हणतो''
( सहजराव,(  ह. घ्या. ))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे 28/05/2008 - 16:52
'' सहज चालतो, सहज बोलतो संस्थळावर सहज असतो, सहज गस्त घालतो. सहज येतो, सहज जातो, सहज वाचतो, सहज चावतो तयाला 'सहज' असे म्हणतो'' जबरा !!!!!!!! :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चेतन 29/05/2008 - 19:29
धन्यवाद तात्या, बिरुटे सर, अरुणजी , सहजराव, सतिश अवातंर : सहज, नावाच्या सदस्यावर काव्य आहे की काय असेच वाटले, नसेल तर आमचे हे काव्य बिरुटे सर मस्त लिहलयं अशिच काही व्यक्तिचित्रं लिहा मजा येइल वाचायला (तात्यांना स्पर्धा) तुर्त दि:गमुढ चेतन :T
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सहज अशी ही कल्पना कवितेत उमलावी | शब्दांच्या या विश्वात सहजपणे रमावी || कवितेतील भावार्थ सहजपणे कळावा | सहजच् तो ह्रुदयास् जाउन भिडावा || ~X( सहज सहज करताकरता हे काय झाले? शब्द कसे वाढले? हे सहजच् नाही कळाले सहजच् मनातुन ते, कागदावर (जालावर) उतरले वाचुन बघितल्यावर हे, हात सहजच् कपाळाकडे वळाले... :T सहज चेतन

एक स्वप्न प्रवास.(६)

विजुभाऊ ·

खरोखर ढगात गेल्यासारखे वाटत आहे. माताय्, पण ते डायपर प्रकरण जरा डोक्यावरून गेले बघा. सुंदर कल्पना आहे. उडणारा ढग. (डायपरवाला) पुण्याचे पेशवे

राजे 27/05/2008 - 10:46
मस्तच ! सगळेच सोनेरी ... दात पण ? वा ! वा काय कल्पना आहे सोनेरी दात :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ढगातला स्वप्न प्रवास मस्त रंगवलाय. ढिलायन्सचे ढग प्रवास ही कल्पना तर अफाटच. फक्त पेशवे म्हणतात तसे डायपर प्रकरण जरा डोक्यावरुन गेले. आणि ढगातल्या कल्पनेचा शेवट मात्र तुम्हाला आजीच्या आठवणीकडे घेऊन गेला, तो प्रसंग आम्हालाही 'टच' करुन गेला.

विजुभाऊ, कल्पनाशक्ती चांगली आहे. दोन पेग जरा जास्त झाले की 'ढगात' गेल्यासारखे वाटते. अनेकदा अनुभव घेताला आहे, त्यामुळेच 'ढगायन' आवडले. पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?

धमाल मुलगा 27/05/2008 - 17:34
फुल्टू विजुभाऊ !!!! आयला,
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस"
धिरुभाई काय आनंदला असेल तिकडं..स्वर्गात / नरकात जिथं कुठं असेल तिथं.
मला उगाचच झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
अग्गग्गग्गग्गग्ग !!! हे लय बेकार राव :) पिवळा गॉगल काय, डायपर काय... जोरात आहे गाडी... आणि पेस्तनजी इथंपण आला का? वा वा वा....
ह्या पारशांना देवाने "ढ" चा उच्चार करायला जिभीमधे काही एक्स्ट्रा स्नायु दिले असावेत अशी मला नेहमी शन्का येते. ते जसा "ढ्" चा उच्चार करतात तसा उच्चार इतर कोणत्याच जमातीच्या इसमाना जमत नाही.
कबुतरखान्यापाशी शिकलेत ते...खुद्द कबुतरांकडून! एकदम "केम डार्लिंग = गुटुर्गुम्" सापडली का पीठ दळणारी म्हातारी? केव्हढं होतं हो ते जातं? सांगा बुवा लवकर!

लेख छान लिहिला आहे.... ढगाची सफर मस्त वर्णन केले आहे.... "ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस". इथे पण आहे का? त्यांची सर्व्हिस...:) आता माझे पाय लटलट कापु लागले हुडहुडी मुळे दात एकमेकांवर आपटुन त्रिताल आडाचौताल आणि दादरा हे सगळे ताल द्रुत् लयीत वाजू लागले.:) मस्त कल्पना आहे..मि.इंडिया ची.... बाकी तुमच्या बरोबर आम्हालाही ढगात नेले......

वरदा 27/05/2008 - 22:30
हा भाग पण ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस ही ही ही ही......खरच येईल एक दिवस असली सर्व्हीस सांगता येत नाही..... मला त्या ढगात पीठ दळणार्‍या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली. ह्म्म्म मलाही बघायचय्...आता पुढचा भाग कधी?

आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस! (धम्या, ह. घे.:)) पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो? पेठकरकाका, जियो!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 28/05/2008 - 07:30
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस!
आयच्या गावात .... अगदी "अंतु बर्वा" की हो आमच्या कोकणचा ... विजूभाऊ जाउन या हो .... बरं, एकटं जाताय की बरोबर कोणी [ कुटुंब किंवा तुमची पी.ए. , कसेही ] आहे ? काही नाही हो, उगाच देवयानीची कथा आठवली आणि डोक्यात किडा आला. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन 27/05/2008 - 23:46
येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

विजुभाऊ 28/05/2008 - 10:44
:O येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. हे अजब आहे रे. येउ द्या पटकन पुढले भागही असे म्हणायचे आणि त्याच वेळी पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन असेही म्हणायचे. : रे भाऊ ...तुझ्या प्रतिसादाने बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ :O

शितल 28/05/2008 - 00:46
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. (ह.घ्या.) मजेशीर कल्पना.

In reply to by शितल

>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. मी ह्यावर काहीच बोलत नाही........

छोटा डॉन 28/05/2008 - 07:38
विजूभाऊ, कसलं "ढ"बरदस्त [ बहुतेक जबरदस्त हा शब्द चुकीचा आहे] लिहता हो तुम्ही ... सही है, लगे रहो !!!
झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
हा हा हा .... आयला आपल्या ढोळ्यासमोर ढायरेक्ट चित्र आले त्याचे ... पण घाबरनेका नही, कुछ नही होता है ...
त्या देखण्या सुंदर हडळीला येताना पाहीले. मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
काय सांगता, तुम्ही पाय बघायचा प्रयत्न केलात !!! आयला आमची कार्टी असती तर त्यांनी *******, जाऊ दे, नंतर कधीतरी ... बाकी पेठकरकाका म्हणत्तात तसे ढुमच्या हॄदयात "ढक्-ढक" झाले की नाही ??? पु"ढ"च्या भागाची वाट पाहत आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण 28/05/2008 - 07:56
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस ही सुविधा पण ढिलायन्स ते ढिलायन्स विनामुल्य असेल बहुतेक !!!!! हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात एकदम मान्य.....म्हणुनच तर मी असे चलचित्रपट पाहु शकतो.... एवढ माल दिसणार भुत दुसर्‍या दुनियेत काय कामाच...? तो स्वर्गीय सोनेरी द्रवपदार्थ ओठाला लावला......ह्या...पार फ़सलो. ते शुद्ध पाणी होते. सात्विक जल... बरोबर ना ? (वडाच्या पारावर झोके घेणारा झोटिंग) मदनबाण.....

मनस्वी 28/05/2008 - 10:27
"ढिलायन्स" नाव सह्हीच! >>हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात असे काही नाही बरंका विजुभाऊ.. हॅल्लो ब्रदर मधला सलमान, पहेली मधला शाहरुख, भूतनाथ मधला बच्चन बरे दाखवलेले की. आणि पेठकरकाका म्हणतात तसे तुमच्या हॄदयात "ढग-ढग" झाले की नाही ??? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा 30/05/2008 - 01:31
विजुभाऊ पुढच्या भागाची वाट पाहतेय्....आज हाच भाग पुन्हा वाचुन परत हसत बसले होते......

खरोखर ढगात गेल्यासारखे वाटत आहे. माताय्, पण ते डायपर प्रकरण जरा डोक्यावरून गेले बघा. सुंदर कल्पना आहे. उडणारा ढग. (डायपरवाला) पुण्याचे पेशवे

राजे 27/05/2008 - 10:46
मस्तच ! सगळेच सोनेरी ... दात पण ? वा ! वा काय कल्पना आहे सोनेरी दात :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ढगातला स्वप्न प्रवास मस्त रंगवलाय. ढिलायन्सचे ढग प्रवास ही कल्पना तर अफाटच. फक्त पेशवे म्हणतात तसे डायपर प्रकरण जरा डोक्यावरुन गेले. आणि ढगातल्या कल्पनेचा शेवट मात्र तुम्हाला आजीच्या आठवणीकडे घेऊन गेला, तो प्रसंग आम्हालाही 'टच' करुन गेला.

विजुभाऊ, कल्पनाशक्ती चांगली आहे. दोन पेग जरा जास्त झाले की 'ढगात' गेल्यासारखे वाटते. अनेकदा अनुभव घेताला आहे, त्यामुळेच 'ढगायन' आवडले. पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?

धमाल मुलगा 27/05/2008 - 17:34
फुल्टू विजुभाऊ !!!! आयला,
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस"
धिरुभाई काय आनंदला असेल तिकडं..स्वर्गात / नरकात जिथं कुठं असेल तिथं.
मला उगाचच झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
अग्गग्गग्गग्गग्ग !!! हे लय बेकार राव :) पिवळा गॉगल काय, डायपर काय... जोरात आहे गाडी... आणि पेस्तनजी इथंपण आला का? वा वा वा....
ह्या पारशांना देवाने "ढ" चा उच्चार करायला जिभीमधे काही एक्स्ट्रा स्नायु दिले असावेत अशी मला नेहमी शन्का येते. ते जसा "ढ्" चा उच्चार करतात तसा उच्चार इतर कोणत्याच जमातीच्या इसमाना जमत नाही.
कबुतरखान्यापाशी शिकलेत ते...खुद्द कबुतरांकडून! एकदम "केम डार्लिंग = गुटुर्गुम्" सापडली का पीठ दळणारी म्हातारी? केव्हढं होतं हो ते जातं? सांगा बुवा लवकर!

लेख छान लिहिला आहे.... ढगाची सफर मस्त वर्णन केले आहे.... "ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस". इथे पण आहे का? त्यांची सर्व्हिस...:) आता माझे पाय लटलट कापु लागले हुडहुडी मुळे दात एकमेकांवर आपटुन त्रिताल आडाचौताल आणि दादरा हे सगळे ताल द्रुत् लयीत वाजू लागले.:) मस्त कल्पना आहे..मि.इंडिया ची.... बाकी तुमच्या बरोबर आम्हालाही ढगात नेले......

वरदा 27/05/2008 - 22:30
हा भाग पण ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस ही ही ही ही......खरच येईल एक दिवस असली सर्व्हीस सांगता येत नाही..... मला त्या ढगात पीठ दळणार्‍या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली. ह्म्म्म मलाही बघायचय्...आता पुढचा भाग कधी?

आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस! (धम्या, ह. घे.:)) पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो? पेठकरकाका, जियो!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 28/05/2008 - 07:30
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो! आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे.... खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस!
आयच्या गावात .... अगदी "अंतु बर्वा" की हो आमच्या कोकणचा ... विजूभाऊ जाउन या हो .... बरं, एकटं जाताय की बरोबर कोणी [ कुटुंब किंवा तुमची पी.ए. , कसेही ] आहे ? काही नाही हो, उगाच देवयानीची कथा आठवली आणि डोक्यात किडा आला. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन 27/05/2008 - 23:46
येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. आपलाच, मनोबा

In reply to by मन

विजुभाऊ 28/05/2008 - 10:44
:O येउ द्या पटकन पुढले भागही. तुर्तास गडबडित आहे. पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन. हे अजब आहे रे. येउ द्या पटकन पुढले भागही असे म्हणायचे आणि त्याच वेळी पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन असेही म्हणायचे. : रे भाऊ ...तुझ्या प्रतिसादाने बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ :O

शितल 28/05/2008 - 00:46
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. (ह.घ्या.) मजेशीर कल्पना.

In reply to by शितल

>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते. पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. मी ह्यावर काहीच बोलत नाही........

छोटा डॉन 28/05/2008 - 07:38
विजूभाऊ, कसलं "ढ"बरदस्त [ बहुतेक जबरदस्त हा शब्द चुकीचा आहे] लिहता हो तुम्ही ... सही है, लगे रहो !!!
झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
हा हा हा .... आयला आपल्या ढोळ्यासमोर ढायरेक्ट चित्र आले त्याचे ... पण घाबरनेका नही, कुछ नही होता है ...
त्या देखण्या सुंदर हडळीला येताना पाहीले. मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
काय सांगता, तुम्ही पाय बघायचा प्रयत्न केलात !!! आयला आमची कार्टी असती तर त्यांनी *******, जाऊ दे, नंतर कधीतरी ... बाकी पेठकरकाका म्हणत्तात तसे ढुमच्या हॄदयात "ढक्-ढक" झाले की नाही ??? पु"ढ"च्या भागाची वाट पाहत आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण 28/05/2008 - 07:56
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस ही सुविधा पण ढिलायन्स ते ढिलायन्स विनामुल्य असेल बहुतेक !!!!! हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात एकदम मान्य.....म्हणुनच तर मी असे चलचित्रपट पाहु शकतो.... एवढ माल दिसणार भुत दुसर्‍या दुनियेत काय कामाच...? तो स्वर्गीय सोनेरी द्रवपदार्थ ओठाला लावला......ह्या...पार फ़सलो. ते शुद्ध पाणी होते. सात्विक जल... बरोबर ना ? (वडाच्या पारावर झोके घेणारा झोटिंग) मदनबाण.....

मनस्वी 28/05/2008 - 10:27
"ढिलायन्स" नाव सह्हीच! >>हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात असे काही नाही बरंका विजुभाऊ.. हॅल्लो ब्रदर मधला सलमान, पहेली मधला शाहरुख, भूतनाथ मधला बच्चन बरे दाखवलेले की. आणि पेठकरकाका म्हणतात तसे तुमच्या हॄदयात "ढग-ढग" झाले की नाही ??? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा 30/05/2008 - 01:31
विजुभाऊ पुढच्या भागाची वाट पाहतेय्....आज हाच भाग पुन्हा वाचुन परत हसत बसले होते......
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

असेही एक पैलतीर (भाग तीन)

अरुण मनोहर ·

फटू 27/05/2008 - 10:40
तुमच्या या लेखन मालिकेतील पहीला भाग अगदी आम्ही संगणक अभियंता असूनही भूसापेक्ष स्थीर उपग्रहाप्रमाणे डोक्यावरून छत्तीस हजार किलोमीटर उंचावरून गेला.... पण दुसरा आणि तिसरा भाग खूप छान लिहिले आहेत तुम्ही... खूप वाईट वाटतं अशा भूक्कड दूरदर्शन मालिका जेव्हा आमची लोकं डोळे फाडफाडून पाहतात... का त्याना कळत नाही की समोरं त्या टी व्ही नावाच्या खोक्यात जे काही चालू आहे ते सगळं आभासी आणि फसवं आहे.... अशा मालिका बनवणं हा काही लोकांचा धंदा आहे हे आपण समजू शकतो... पण पाहणा~यांचं काय... का ते आपली डोकी गहाण ठेवतात.... मला एक प्रसंग मागे घडलेला प्रसंग आठवतो.... मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो... मी आतल्या खोलीत आराम करत होतो... बाहेरच्या खोलीमध्ये वहीनी कुठली तरी मालिका पाहत होत्या. अचानक वहीनी 'अरेरे' म्हणत विव्हळू लागल्या. मी धास्तावून काय झालं हे पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत आलो तर कळलं की वहीनी जी मालिका पाहत होत्या त्या मालिकेची नायिका रीक्षाची ठोकर लागून पडली होती... मी मित्राच्या घरी असल्यामुळे मला डोक्यावर हात मारुन नाही घेता आला पण मनातल्या मनात त्या वहीनीना नमस्कार मात्र जरूर घातला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

गिरिजा 27/05/2008 - 16:12
या मध्ये एक गोष्ट अजुन.. प्रत्येक वाक्याला (खरतर शब्दा-शब्दाला) त्या scene मधल्या सगळयान्ची तोण्ड दाखवणे. (|:

विसोबा खेचर 27/05/2008 - 16:28
अरूणशेठ, झकास निरिक्षण, मस्तच लिहिलं आहे. पाणी वाढवण्याचे आणि उत्कंठा ताणण्याचे सगळे प्वाईंट्स अगदी बरोब्बर आहेत, तंतोतंत पटले! :) तात्या.

"बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.) रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.) खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना...." पुर्वी झी टि.व्ही. नविन असताना एक 'तारा' नावाची सिरीयल लागायची त्यात अक्षरश: हेच व्हायच. ती कधी संपली ते त्या ताराला नवनीत निशानलाही माहीत नसेल. सोप ची कथा साबणावर घरसत नेण्याचा मान 'जुनून' नावाच्या भयाकारी सिरीयला जातो. त्याच्याच पुढे पाउल टाकून तेरा पती सिर्फ मेरा है करण्याचा मान 'स्वाभिमान'ला द्यावा लागेल . या सिरीयलचा शेवट पाहील्याच सांगणारे काही खोटारडे या जगात आहेत. यात अजुन एका सिरीयलचा उल्लेख करावा लागेल 'चन्द्रकांता' एक राजकुमारी आणि एक राजकुमार यांची परीकथा पण किती खेचावी. त्या दोघांशी काहीही संबध नसलेली क्रुत्तिका देसाई तिन रोल करून पैसा कमवून गेली.

फटू 27/05/2008 - 10:40
तुमच्या या लेखन मालिकेतील पहीला भाग अगदी आम्ही संगणक अभियंता असूनही भूसापेक्ष स्थीर उपग्रहाप्रमाणे डोक्यावरून छत्तीस हजार किलोमीटर उंचावरून गेला.... पण दुसरा आणि तिसरा भाग खूप छान लिहिले आहेत तुम्ही... खूप वाईट वाटतं अशा भूक्कड दूरदर्शन मालिका जेव्हा आमची लोकं डोळे फाडफाडून पाहतात... का त्याना कळत नाही की समोरं त्या टी व्ही नावाच्या खोक्यात जे काही चालू आहे ते सगळं आभासी आणि फसवं आहे.... अशा मालिका बनवणं हा काही लोकांचा धंदा आहे हे आपण समजू शकतो... पण पाहणा~यांचं काय... का ते आपली डोकी गहाण ठेवतात.... मला एक प्रसंग मागे घडलेला प्रसंग आठवतो.... मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो... मी आतल्या खोलीत आराम करत होतो... बाहेरच्या खोलीमध्ये वहीनी कुठली तरी मालिका पाहत होत्या. अचानक वहीनी 'अरेरे' म्हणत विव्हळू लागल्या. मी धास्तावून काय झालं हे पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत आलो तर कळलं की वहीनी जी मालिका पाहत होत्या त्या मालिकेची नायिका रीक्षाची ठोकर लागून पडली होती... मी मित्राच्या घरी असल्यामुळे मला डोक्यावर हात मारुन नाही घेता आला पण मनातल्या मनात त्या वहीनीना नमस्कार मात्र जरूर घातला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

गिरिजा 27/05/2008 - 16:12
या मध्ये एक गोष्ट अजुन.. प्रत्येक वाक्याला (खरतर शब्दा-शब्दाला) त्या scene मधल्या सगळयान्ची तोण्ड दाखवणे. (|:

विसोबा खेचर 27/05/2008 - 16:28
अरूणशेठ, झकास निरिक्षण, मस्तच लिहिलं आहे. पाणी वाढवण्याचे आणि उत्कंठा ताणण्याचे सगळे प्वाईंट्स अगदी बरोब्बर आहेत, तंतोतंत पटले! :) तात्या.

"बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.) रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.) खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना...." पुर्वी झी टि.व्ही. नविन असताना एक 'तारा' नावाची सिरीयल लागायची त्यात अक्षरश: हेच व्हायच. ती कधी संपली ते त्या ताराला नवनीत निशानलाही माहीत नसेल. सोप ची कथा साबणावर घरसत नेण्याचा मान 'जुनून' नावाच्या भयाकारी सिरीयला जातो. त्याच्याच पुढे पाउल टाकून तेरा पती सिर्फ मेरा है करण्याचा मान 'स्वाभिमान'ला द्यावा लागेल . या सिरीयलचा शेवट पाहील्याच सांगणारे काही खोटारडे या जगात आहेत. यात अजुन एका सिरीयलचा उल्लेख करावा लागेल 'चन्द्रकांता' एक राजकुमारी आणि एक राजकुमार यांची परीकथा पण किती खेचावी. त्या दोघांशी काहीही संबध नसलेली क्रुत्तिका देसाई तिन रोल करून पैसा कमवून गेली.
3

काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :) -- भाग दुसरा.

विसोबा खेचर ·

ऍडीजोशी 26/05/2008 - 19:23
लै भारी. मिसळीसारखंच चमचमीत आणि झक्कास :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

आरं आरं तात्या, ह्यो काय गोंधळ घातलास रं? तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! ह्ये म्हंजे शेवंता सातारकरणीचा नाच "गडकरी रंगायतन" मधी पायल्यासारखं वाटतंय!!:) आरं तमाशाची मजा उघड्या फडातच आसतीय!! आमी हिथेच मागं वाचलं होतं, "बेंड फुटेपर्यंत तिखट मिसळ खानं ही भटा-बामनाची कामं नव्हंत, त्येला मराठा न्हायतर बहुजनसमाजच लागतोय!" किती समजदार ल्येखक व्हता राव त्यो!! आता न्हायी बगायला गावायचे ल्येका आसले पावरबाज लेखक!!:)) मापी कर, पायजे तर आमची शिकार कर (न्हायतरी हल्ली मिपावरचा लई पापुलर खेळ हाय त्यो!!!:)) आनि मुंडकं टांगून ठीव तुज्या भित्तीवर आमचं! पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? टकुरं औट झाल्येला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 26/05/2008 - 21:39
परतीसाद लै आवडला बरंका!! डांबीसकाका अता तुमीबी टाका लिवुन एक झनझनीत मिसळ चरित्र! तेवडं शेवटी 'मिसळ खाल्य्याने ऍशीडीटी वाडते' असलं सोशल म्यासेज टाकू नका म्हंजी झालं :)) ह घ्या! न्हायतर म्हनाल आमिबी पॉप्युलर खेळ खेळालोय!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 26/05/2008 - 21:52
तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! हा हा हा! डांबिसा, आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? :) पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? पण मला सांग डांबिसा, 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? मिसळीचं व्यक्तिचित्रं रंगवताना मी थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. 'ठसकेबाज' हे एक महत्वाचं लक्षण आहे हे खरं, परंतु या एकाच विशेषणावर मिसळ थांबते का? टकुरं औट झाल्येला, हा हा हा! अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? चालायचंच! :) बाय द वे, तूही रंगव मिसळीचं व्यक्तिचित्रं! ते माझ्यापेक्षा निश्चित कितीतरी सरस असेल याची मला खात्री आहे आणि मला ते वाचायला आवडेल! शिवाय, खाद्यपदार्थांची व्यक्तिचित्रं/आत्मचरित्र या मी चालू केलेल्या लेखनप्रकारात एक मोलाची भरही पडेल! मला त्यात समाधानच असेल! :) तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? त्ये बी खरंच!! :)) आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! :)) थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!!:) अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? आता तूच ईषय काडलास म्हनून बोलतो (न्हायतर 'त्या' धाग्यावर आमी कायसुदिक बोल्लेलो न्हायी) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? पर्तिक्रिया दिलेल्या मिपाकरांची मोजनी करून बघ (एका मिपाकराचं मत एकदाच मोजून हो! म्हंजे रिगिंग न करता!!:)) गावितमास्तर आवडलेली लोकं, न आवडलेल्या लोकांपेक्षा अनेकपटींनी जास्त हायेत, र्‍हातूस कंच्या गावात!! मान ताठ ठीवून फिरनारा,:) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 26/05/2008 - 23:49
आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! हम्म! तसे आम्ही तरबेज लेखक आहोत पण आम्हाला सगळंच जमतं असं नाही! आम्हाला जसं जमलं तसं आम्ही लिहिलं आहे.. :) व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! हम्म! या मुद्द्यावर आपल्या दोघांचा नजरिया वेगळा आहे. आमच्या मते मिसळीत ठसकेबाजाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत! आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! हो पण ठसक्याव्यतिरिक्त मिसळीत अनेक गोष्टी आहेत असं आम्ही आधीच म्हटलं आहे त्यामुळे केवळ मिसळ झणझणीत असते म्हणून मुद्दाम ओढूनताणून त्यात ठसका आणावासा असं आम्हाला वाटला नाही! शिवाय आम्हाला ठसक्याची भाषा १००% जमली असती असंही नव्हे, त्यामुळे आम्ही आपलं आमच्या बोलीभाषेत लिहायचा प्रयत्न केला आहे. नाहीतर धड शहरी नाही आणि धड खेडवळ ठसक्याची नाही असा घेडगुजरीपणा झाला असता! ;) आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. हम्म! हे मात्र खरं! नाहीतर उद्या आम्ही संगीतावर एखादा अवजड लेख लिहून मोकळे होऊ आणि त्यात तुम्हाला 'सा' देखील लावता यायचा नाही! :) आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!! छे रे! अरे या तात्याचे विरोधक/समिक्षक अगदी चिक्कार आहेत! त्यात तू एक! तेव्हा रागावू कशाला सायबा?! :) आणि माझे मुद्दे मला कितीही खरे वाटत असले तरी 'लेखन मिसळीसारखंच ठसकेबाजच हवं होतं!' या तुझ्या मुद्द्याचा मी आत्ताही आदरच करतो! :) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? इतरांच्या प्रतिसादांचा आदर करून गावित मास्तर फसला असंच मी म्हणेन! :) आपला, (आंतरजालीय व्यक्तिचित्रकार) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 27/05/2008 - 08:05
दे टाळी! चल, साला तुझं पण खरं! असेच वरचेवर कान पिळत रहा, त्यातूनच एकमेकांचे विचार एकमेकांना कळतात, सुधारणेस वाव मिळतो! :) झणझणीत, ठसकेबाज, गावरान, चव्हाण ष्टाईल लिहिलं नाही एवढं मात्र खरं! कदाचित लिहिता आलं असतं किंवा नाही याचीही शंका होती, त्यामुळे ती ष्टाईल न चोखा़ळता माझ्याच भाषेत लिहीलं! शंकर पाटील, व्यंकटेशतात्या, ना धो महानोर यांची ष्टाईल, यांचा बाज, मनात कुठेतरी इतका पक्का आहे की त्या बाजाला हात घालताना उगीच त्या गावरान भाषेच्या ताजमहालाला माझ्यासारख्या शहरी मुंबईकराने आपली वीट का लावावी हाच कळीचा मुद्दा होता..! तुझा, (मिसळप्रेमी) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

प्रियाली 26/05/2008 - 22:20
हाहा! प्रतिसाद आवडला. मिसळ बाई असती तर पद्मा चव्हाण नाहीतर उषा चव्हाणसारखी दिसली असती. मादक, तिखट आणि सणसणीत ;-) उगीच इथे गरज नसताना उषाकिरणची (तशी ती इतरत्र मला आवडते) आठवण झाली अवांतरः च्या**! या नेटावर या दोघींचा एकही धडाकेबाज फोटु नाही.

In reply to by प्रियाली

धमाल मुलगा 27/05/2008 - 13:51
आईशप्पथ!!! काय जब्बरा डोकं चाललय :) मस्तच. माझ्या डोळ्यापुढे 'गुपचुप गुपचुप' मधल्या पद्मा चव्हाण आल्या...बाथटबमधल्या... 'पाहिले ना मी तुला..' गाण्याच्या वेळच्या..... मिसळही आता मला अशीच मादक दिसणार यापुढे. बाकी, ताटली/वाडग्याच्या टबात, तर्रीमध्ये पहुडलेल्या मिसळीच्या चेहर्‍यावरही बाथटबातल्या पद्मा चव्हाणांसारखेच भाव असतील नाही का? :) तात्याबा, मिसळ आख्यान मस्तच.
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
क्या बात है! एकदम खरं.

लेख एखाद्या उत्तम मिसळी सारखा फक्कड जमला आहे. प्रियालीताईंशी सहमत. मिसळ बाई असती तर उषा नाही तर पद्मा चव्हाण सारखी दिसली असती. १००%, वादच नाही. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ 27/05/2008 - 19:21
मिसळ बाप्या असती तर............? नाना पाटेकर..........हे एकमेव उदाहरण डोळ्यापुढे येते. उगाच राजा गोसावी / रमेश देव आठवत नाहीत.

फटू 26/05/2008 - 23:22
लय भारी... तुमच्या मिसळीच्या झणझणीत वर्णनाने आमच्या तोंडाला पाणी सुटले .... (अमेरिकेत असल्यामुळे झणझणीत मिसळ खाणे शक्य नसलेला एक अभागी जीव) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पक्या 27/05/2008 - 21:26
मिसळीचे व्यक्तिचित्रण छान झाले आहे. हे लिहीताना गावरान भाषा टाळली ते बरे झाले. असेच वाचायला छान वाटतयं . चटपटीत, खुमासदार. फक्त सन्केतस्थळ आणि मीपाकर हा उल्लेख नको होता ..त्यामुळे ते जास्त वैयक्तिक वाटतय. जनरल मिसळीबाबत लिहीलेलं वाटत नाही. ह्यावरचे पहिले २ परिच्छेद सोडले तर बाकी मिसळ उत्तम जमली आहे. 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! मिसळ नुसतीच ठसकेबाज असेल तर फक्त आग आग च होणार. त्या ठसक्यांनीच माणूस बेजार होऊन जाईल. ती चमचमीत, चटपटीत ,चविष्ट , परत परत खावीशी वाटेल अशीच हवी. -- (मिसळप्रेमी ) पक्या

मुक्तसुनीत 27/05/2008 - 04:42
तात्या, नेहमीप्रमाणे , तुमचा हाही लेख जमलाय. आणि हा लेख जमणारच ! मिसळपाव नि तुम्ही म्हणजे जिवाशिवाची भेटच की ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' हे आम्हाला जमो न जमो , ज्याना ते जमले त्याना आमचा पहिला सलाम ! अहो म्हणून तर इथे यायचे !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 27/05/2008 - 12:23
मस्त जमलेय, तुमच्या शैलीनुसार अन या मालिकेतल्या आधीच्या पदार्थांच्या वर्णनाला सुसंगत असेच वर्णन आहे. आवडले. >>परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे मस्तच ... पुढेमागे मिसळ अन पावाची प्रेमकहाणी पण लिहुन टाका .. लै लै भारी होईल ..

शितल 27/05/2008 - 04:55
तात्या, मिसळी सारखाच चवदार लेख, आणि फोटो ही एकदम बेस्ट, तुम्ही असे लिहिल्यावर आम्हाला ते पदार्थ करायचा आणखी ऊत येतो. परवाचे लग्नाच्या वाढदिवसाला मैत्रीणी॑साठी मिसळ केली होती. सगळ्याजणी खुश.

झणझणीत मिसळीचं आत्मनिवेदन आवडलं !!! ''जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...! हे बाकी लै भारी, हे मिसळीचे निवेदन की तात्याचं निवेदन असा विचार आला, पण लगेच उत्तरही मिळालं 'दो जीस्म मगर एक जान है हम' अवांतर : आपला स्वभावही आम्हाला मिसळीसारखा झणझणीतच वाटतो. फक्त मिसळीत स्वीट नसते इतकाच काय तो फरक :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे 27/05/2008 - 13:55
हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन 27/05/2008 - 08:24
तात्या तुमचे मिसळ आख्यान खरचं जबरा झाले आहे ... मिसळीबद्दल इतके तुम्ही लिहले आहे की ते वाचून आज दुपारी आमचा रॉयल लंच म्हणजे राईस्-सांबार खाणे अवघड आहे. रविवारी मिसळ खायला जावेच लागणार मग ती भले ३५ रुपये प्रती प्लेट का असेना !!!
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
हे बाकी खरं हा...
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
एकदम अव्वल नंबरी बात. आमचा पण अनुभव काही असाच आहे ...
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
वाह, क्या बात है. मस्त !!! एकंदरीत मिसळाअख्यान हे चमचमीत आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चेतन 27/05/2008 - 11:34
तात्या फोटुबघुन तोंडाला पाणी सुटलं (का खिजवताय राव) :''( आता दिवसभर मिसळ कायं डोळ्यासमोरुन जायचि नायं लोकं माझ्या चमचमीतपणावरच प्रेम करत असावेत १०००% खरं अवांतर : थोडि चमचमीत मिसळ झालि असति तरं आणखिन मजा आलि असती मिसळिवर ताव मारणारा चेतन

अरुण मनोहर 27/05/2008 - 12:53
>>> तुम्ही हॉटेलात गेलात तर तुम्हाला अगदी दहा पदार्थांची नावं असलेला बोर्ड दिसतो. परंतु त्यात 'चमचमीत मिसळ' हे नांव वाचताचक्षणी, 'अरे वा! मिसळपण आहे का?!' असा विचार तुमच्या मनात डोकावून जातो की नाही ते सांगा बरं! >>> अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! मानल तुम्हाला तात्या. इन्टरनेट हॉटेलातील मिपाचे खूप झकास वर्णन केलेत. --- खवय्या.

'तोडलंत हो तात्या तुम्ही, तोडलंत अगदी.' झकास वर्णन आणि जीभ जमीनीपर्यंत बाहेर यावी असा फोटो...स्स्स्स्स्स्स्स! खासच. लाल भडक, तेजतर्रार तर्रीत पावाचा तुकडा बुडवून चारही बाजूंनी लालबूंद होऊन बाहेर येतो आणि पहिलाच घास बनून जिभेवर विसावतो त्या बरोबर ठण्, ठण्, ठण्, ठण् असा खणखणीत ढोलकीचा ताल कानावर पडून लावंण्यवती तमासगिरनीची जी जीवघेणी अदा सुरू होते ती मिसळ संपली तरी कानात, मनात निनादत राहते. रोम, रोम पुलकित होऊन जीव मस्तपैकी तरंगत राहतो आणि तोंडून उत्स्फुर्त दाद जाते..... व्वाह! मिसळ...!

मनस्वी 27/05/2008 - 14:54
तात्या मिसळीचे आत्मचरित्र आवडले. पण चिंच-गूळ टाकल्यासारखे वाटले. तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 27/05/2008 - 15:52
तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय? मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का! मलाही वाचायला आवडेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी 27/05/2008 - 18:55
म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय?
का नाही! (तात्या.. हा जोक चांगला होता.)
मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का!
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं!
मलाही वाचायला आवडेल!
तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 28/05/2008 - 11:08
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं! तुला 'गमक' म्हणायचे आहे की 'गिमिक'? 'गमक'असेल तर तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु 'गिमिक' म्हणायचं असेल तर मला ते बरोबर वाटत नाही.. तिखटजाळपाणा हे मिसळीचं एक वैशिष्ठ्य आहे हे नक्कीच मान्य! परंतु तिखटजाळपणा हा चवदारपणापुढे शेवटी केवळ एक गिमिकच ठरतो असं मला वाटतं! मी हा लेख लिहिताना गिमिक्स पेक्षा गमकांना अधिक महत्व दिलं आहे. हां, आता त्यात मी कितपत यशस्वी झालो आहे ह भाग वेगळा! तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं! राईट? :) आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील! निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 28/05/2008 - 11:18
मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं!
मनस्वी, तात्या म्हणतायत ते बरोबर आहे ... तु खरच लिही .... प्रतिसाद देणारे काय कसेही देतील, आपण त्यातुन चांगले तेवढे घ्यायचे ... बाकी रंगाचा बेरंग करायला काही "माकडे" टपलेली असतात पण घाबरनेका नही ... आपण असल्या लोकांना पुरुन उरु !!! तेव्हा टाक तुझा लेख !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी 28/05/2008 - 12:23
तात्या.. इथे मला 'गमक' आणि 'गिमिक' मधला फरक कळत नाही आणि डायरेक्ट लेख वगैरे लिहू??
असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का?
बरोबर आहे.. पण पाच-दहा काय.. एकदा जरी सुचले नीट काहीतरी तरी खूप.
आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील!
घाबरले ना मी!
निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?
तेव्हा टाक तुझा लेख !!!
काही खरं नाही.. आता मनावर घेतलेच पाहिजे.. बघते.. प्रयत्न करून बघते. राईट! :)
नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...!
थोडा वेळ लागेल. पण नक्कीच टाकेन. मोटिव्हेशनसाठी धन्यवाद तात्या. आणि तुझ्या शब्दांबद्दल थँक्स् डान्या. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा 27/05/2008 - 19:06
आहे मिसळाख्यान.... आता एकदा केली पाहिजे...

मिसळीचे आत्मकथन आवडले.. अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! अगदी खरे.... कुठेही जा तिची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात....कुठे मटकी, कुठे मसुर, कुठे टोमॅटो , तर कुठे चिंचेचा कोळ.... तिच्यात काही फरक पडत नाही... मस्त चमचमीत, चविष्ट मिसळीचे कथन......

ईश्वरी 27/05/2008 - 22:32
तात्या, तुमची चमचमीत मिसळ आवडली. तुम्ही लोकं पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे असं तो स्वत:च मला एकदा म्हणाला होता. मस्त वर्णन. शब्दयोजना ही समर्पक झाली आहे. मला वाटते एखाद्या लेखकाला एकवेळ व्यक्तीचित्रण सहज जमेल पण असे पदार्थचित्रण लिहीणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला ते सहज जमले. तुमचा हा लेखनप्रकार खूप आवडला. ईश्वरी

चकली 27/05/2008 - 22:56
मिसळ चा फोटो काढताना मिसळीची चव वाचकांपर्यंत पोचावी हा हेतु होता. आज मिसळीच्या फोटो ला जे काही सांगता आले नसेल ते तुम्ही शब्दात मांडलेत ! चकली http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर 28/05/2008 - 11:13
बरेवाईट प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

ऍडीजोशी 26/05/2008 - 19:23
लै भारी. मिसळीसारखंच चमचमीत आणि झक्कास :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

आरं आरं तात्या, ह्यो काय गोंधळ घातलास रं? तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! ह्ये म्हंजे शेवंता सातारकरणीचा नाच "गडकरी रंगायतन" मधी पायल्यासारखं वाटतंय!!:) आरं तमाशाची मजा उघड्या फडातच आसतीय!! आमी हिथेच मागं वाचलं होतं, "बेंड फुटेपर्यंत तिखट मिसळ खानं ही भटा-बामनाची कामं नव्हंत, त्येला मराठा न्हायतर बहुजनसमाजच लागतोय!" किती समजदार ल्येखक व्हता राव त्यो!! आता न्हायी बगायला गावायचे ल्येका आसले पावरबाज लेखक!!:)) मापी कर, पायजे तर आमची शिकार कर (न्हायतरी हल्ली मिपावरचा लई पापुलर खेळ हाय त्यो!!!:)) आनि मुंडकं टांगून ठीव तुज्या भित्तीवर आमचं! पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? टकुरं औट झाल्येला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 26/05/2008 - 21:39
परतीसाद लै आवडला बरंका!! डांबीसकाका अता तुमीबी टाका लिवुन एक झनझनीत मिसळ चरित्र! तेवडं शेवटी 'मिसळ खाल्य्याने ऍशीडीटी वाडते' असलं सोशल म्यासेज टाकू नका म्हंजी झालं :)) ह घ्या! न्हायतर म्हनाल आमिबी पॉप्युलर खेळ खेळालोय!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 26/05/2008 - 21:52
तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!! हा हा हा! डांबिसा, आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? :) पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं? पण मला सांग डांबिसा, 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? मिसळीचं व्यक्तिचित्रं रंगवताना मी थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. 'ठसकेबाज' हे एक महत्वाचं लक्षण आहे हे खरं, परंतु या एकाच विशेषणावर मिसळ थांबते का? टकुरं औट झाल्येला, हा हा हा! अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? चालायचंच! :) बाय द वे, तूही रंगव मिसळीचं व्यक्तिचित्रं! ते माझ्यापेक्षा निश्चित कितीतरी सरस असेल याची मला खात्री आहे आणि मला ते वाचायला आवडेल! शिवाय, खाद्यपदार्थांची व्यक्तिचित्रं/आत्मचरित्र या मी चालू केलेल्या लेखनप्रकारात एक मोलाची भरही पडेल! मला त्यात समाधानच असेल! :) तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? त्ये बी खरंच!! :)) आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! :)) थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!!:) अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? आता तूच ईषय काडलास म्हनून बोलतो (न्हायतर 'त्या' धाग्यावर आमी कायसुदिक बोल्लेलो न्हायी) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? पर्तिक्रिया दिलेल्या मिपाकरांची मोजनी करून बघ (एका मिपाकराचं मत एकदाच मोजून हो! म्हंजे रिगिंग न करता!!:)) गावितमास्तर आवडलेली लोकं, न आवडलेल्या लोकांपेक्षा अनेकपटींनी जास्त हायेत, र्‍हातूस कंच्या गावात!! मान ताठ ठीवून फिरनारा,:) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 26/05/2008 - 23:49
आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!! हम्म! तसे आम्ही तरबेज लेखक आहोत पण आम्हाला सगळंच जमतं असं नाही! आम्हाला जसं जमलं तसं आम्ही लिहिलं आहे.. :) व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! हम्म! या मुद्द्यावर आपल्या दोघांचा नजरिया वेगळा आहे. आमच्या मते मिसळीत ठसकेबाजाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत! आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!! हो पण ठसक्याव्यतिरिक्त मिसळीत अनेक गोष्टी आहेत असं आम्ही आधीच म्हटलं आहे त्यामुळे केवळ मिसळ झणझणीत असते म्हणून मुद्दाम ओढूनताणून त्यात ठसका आणावासा असं आम्हाला वाटला नाही! शिवाय आम्हाला ठसक्याची भाषा १००% जमली असती असंही नव्हे, त्यामुळे आम्ही आपलं आमच्या बोलीभाषेत लिहायचा प्रयत्न केला आहे. नाहीतर धड शहरी नाही आणि धड खेडवळ ठसक्याची नाही असा घेडगुजरीपणा झाला असता! ;) आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. हम्म! हे मात्र खरं! नाहीतर उद्या आम्ही संगीतावर एखादा अवजड लेख लिहून मोकळे होऊ आणि त्यात तुम्हाला 'सा' देखील लावता यायचा नाही! :) आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!! छे रे! अरे या तात्याचे विरोधक/समिक्षक अगदी चिक्कार आहेत! त्यात तू एक! तेव्हा रागावू कशाला सायबा?! :) आणि माझे मुद्दे मला कितीही खरे वाटत असले तरी 'लेखन मिसळीसारखंच ठसकेबाजच हवं होतं!' या तुझ्या मुद्द्याचा मी आत्ताही आदरच करतो! :) आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला? इतरांच्या प्रतिसादांचा आदर करून गावित मास्तर फसला असंच मी म्हणेन! :) आपला, (आंतरजालीय व्यक्तिचित्रकार) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 27/05/2008 - 08:05
दे टाळी! चल, साला तुझं पण खरं! असेच वरचेवर कान पिळत रहा, त्यातूनच एकमेकांचे विचार एकमेकांना कळतात, सुधारणेस वाव मिळतो! :) झणझणीत, ठसकेबाज, गावरान, चव्हाण ष्टाईल लिहिलं नाही एवढं मात्र खरं! कदाचित लिहिता आलं असतं किंवा नाही याचीही शंका होती, त्यामुळे ती ष्टाईल न चोखा़ळता माझ्याच भाषेत लिहीलं! शंकर पाटील, व्यंकटेशतात्या, ना धो महानोर यांची ष्टाईल, यांचा बाज, मनात कुठेतरी इतका पक्का आहे की त्या बाजाला हात घालताना उगीच त्या गावरान भाषेच्या ताजमहालाला माझ्यासारख्या शहरी मुंबईकराने आपली वीट का लावावी हाच कळीचा मुद्दा होता..! तुझा, (मिसळप्रेमी) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

प्रियाली 26/05/2008 - 22:20
हाहा! प्रतिसाद आवडला. मिसळ बाई असती तर पद्मा चव्हाण नाहीतर उषा चव्हाणसारखी दिसली असती. मादक, तिखट आणि सणसणीत ;-) उगीच इथे गरज नसताना उषाकिरणची (तशी ती इतरत्र मला आवडते) आठवण झाली अवांतरः च्या**! या नेटावर या दोघींचा एकही धडाकेबाज फोटु नाही.

In reply to by प्रियाली

धमाल मुलगा 27/05/2008 - 13:51
आईशप्पथ!!! काय जब्बरा डोकं चाललय :) मस्तच. माझ्या डोळ्यापुढे 'गुपचुप गुपचुप' मधल्या पद्मा चव्हाण आल्या...बाथटबमधल्या... 'पाहिले ना मी तुला..' गाण्याच्या वेळच्या..... मिसळही आता मला अशीच मादक दिसणार यापुढे. बाकी, ताटली/वाडग्याच्या टबात, तर्रीमध्ये पहुडलेल्या मिसळीच्या चेहर्‍यावरही बाथटबातल्या पद्मा चव्हाणांसारखेच भाव असतील नाही का? :) तात्याबा, मिसळ आख्यान मस्तच.
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
क्या बात है! एकदम खरं.

लेख एखाद्या उत्तम मिसळी सारखा फक्कड जमला आहे. प्रियालीताईंशी सहमत. मिसळ बाई असती तर उषा नाही तर पद्मा चव्हाण सारखी दिसली असती. १००%, वादच नाही. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ 27/05/2008 - 19:21
मिसळ बाप्या असती तर............? नाना पाटेकर..........हे एकमेव उदाहरण डोळ्यापुढे येते. उगाच राजा गोसावी / रमेश देव आठवत नाहीत.

फटू 26/05/2008 - 23:22
लय भारी... तुमच्या मिसळीच्या झणझणीत वर्णनाने आमच्या तोंडाला पाणी सुटले .... (अमेरिकेत असल्यामुळे झणझणीत मिसळ खाणे शक्य नसलेला एक अभागी जीव) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पक्या 27/05/2008 - 21:26
मिसळीचे व्यक्तिचित्रण छान झाले आहे. हे लिहीताना गावरान भाषा टाळली ते बरे झाले. असेच वाचायला छान वाटतयं . चटपटीत, खुमासदार. फक्त सन्केतस्थळ आणि मीपाकर हा उल्लेख नको होता ..त्यामुळे ते जास्त वैयक्तिक वाटतय. जनरल मिसळीबाबत लिहीलेलं वाटत नाही. ह्यावरचे पहिले २ परिच्छेद सोडले तर बाकी मिसळ उत्तम जमली आहे. 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? व्हऽऽऽऽऽऽय! कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! मिसळ नुसतीच ठसकेबाज असेल तर फक्त आग आग च होणार. त्या ठसक्यांनीच माणूस बेजार होऊन जाईल. ती चमचमीत, चटपटीत ,चविष्ट , परत परत खावीशी वाटेल अशीच हवी. -- (मिसळप्रेमी ) पक्या

मुक्तसुनीत 27/05/2008 - 04:42
तात्या, नेहमीप्रमाणे , तुमचा हाही लेख जमलाय. आणि हा लेख जमणारच ! मिसळपाव नि तुम्ही म्हणजे जिवाशिवाची भेटच की ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' हे आम्हाला जमो न जमो , ज्याना ते जमले त्याना आमचा पहिला सलाम ! अहो म्हणून तर इथे यायचे !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 27/05/2008 - 12:23
मस्त जमलेय, तुमच्या शैलीनुसार अन या मालिकेतल्या आधीच्या पदार्थांच्या वर्णनाला सुसंगत असेच वर्णन आहे. आवडले. >>परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे मस्तच ... पुढेमागे मिसळ अन पावाची प्रेमकहाणी पण लिहुन टाका .. लै लै भारी होईल ..

शितल 27/05/2008 - 04:55
तात्या, मिसळी सारखाच चवदार लेख, आणि फोटो ही एकदम बेस्ट, तुम्ही असे लिहिल्यावर आम्हाला ते पदार्थ करायचा आणखी ऊत येतो. परवाचे लग्नाच्या वाढदिवसाला मैत्रीणी॑साठी मिसळ केली होती. सगळ्याजणी खुश.

झणझणीत मिसळीचं आत्मनिवेदन आवडलं !!! ''जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...! हे बाकी लै भारी, हे मिसळीचे निवेदन की तात्याचं निवेदन असा विचार आला, पण लगेच उत्तरही मिळालं 'दो जीस्म मगर एक जान है हम' अवांतर : आपला स्वभावही आम्हाला मिसळीसारखा झणझणीतच वाटतो. फक्त मिसळीत स्वीट नसते इतकाच काय तो फरक :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे 27/05/2008 - 13:55
हेच म्हणतो ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन 27/05/2008 - 08:24
तात्या तुमचे मिसळ आख्यान खरचं जबरा झाले आहे ... मिसळीबद्दल इतके तुम्ही लिहले आहे की ते वाचून आज दुपारी आमचा रॉयल लंच म्हणजे राईस्-सांबार खाणे अवघड आहे. रविवारी मिसळ खायला जावेच लागणार मग ती भले ३५ रुपये प्रती प्लेट का असेना !!!
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
हे बाकी खरं हा...
पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
एकदम अव्वल नंबरी बात. आमचा पण अनुभव काही असाच आहे ...
जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!
वाह, क्या बात है. मस्त !!! एकंदरीत मिसळाअख्यान हे चमचमीत आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चेतन 27/05/2008 - 11:34
तात्या फोटुबघुन तोंडाला पाणी सुटलं (का खिजवताय राव) :''( आता दिवसभर मिसळ कायं डोळ्यासमोरुन जायचि नायं लोकं माझ्या चमचमीतपणावरच प्रेम करत असावेत १०००% खरं अवांतर : थोडि चमचमीत मिसळ झालि असति तरं आणखिन मजा आलि असती मिसळिवर ताव मारणारा चेतन

अरुण मनोहर 27/05/2008 - 12:53
>>> तुम्ही हॉटेलात गेलात तर तुम्हाला अगदी दहा पदार्थांची नावं असलेला बोर्ड दिसतो. परंतु त्यात 'चमचमीत मिसळ' हे नांव वाचताचक्षणी, 'अरे वा! मिसळपण आहे का?!' असा विचार तुमच्या मनात डोकावून जातो की नाही ते सांगा बरं! >>> अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! मानल तुम्हाला तात्या. इन्टरनेट हॉटेलातील मिपाचे खूप झकास वर्णन केलेत. --- खवय्या.

'तोडलंत हो तात्या तुम्ही, तोडलंत अगदी.' झकास वर्णन आणि जीभ जमीनीपर्यंत बाहेर यावी असा फोटो...स्स्स्स्स्स्स्स! खासच. लाल भडक, तेजतर्रार तर्रीत पावाचा तुकडा बुडवून चारही बाजूंनी लालबूंद होऊन बाहेर येतो आणि पहिलाच घास बनून जिभेवर विसावतो त्या बरोबर ठण्, ठण्, ठण्, ठण् असा खणखणीत ढोलकीचा ताल कानावर पडून लावंण्यवती तमासगिरनीची जी जीवघेणी अदा सुरू होते ती मिसळ संपली तरी कानात, मनात निनादत राहते. रोम, रोम पुलकित होऊन जीव मस्तपैकी तरंगत राहतो आणि तोंडून उत्स्फुर्त दाद जाते..... व्वाह! मिसळ...!

मनस्वी 27/05/2008 - 14:54
तात्या मिसळीचे आत्मचरित्र आवडले. पण चिंच-गूळ टाकल्यासारखे वाटले. तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 27/05/2008 - 15:52
तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती. म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय? मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का! मलाही वाचायला आवडेल! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी 27/05/2008 - 18:55
म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय?
का नाही! (तात्या.. हा जोक चांगला होता.)
मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का!
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं!
मलाही वाचायला आवडेल!
तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 28/05/2008 - 11:08
हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं! तुला 'गमक' म्हणायचे आहे की 'गिमिक'? 'गमक'असेल तर तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु 'गिमिक' म्हणायचं असेल तर मला ते बरोबर वाटत नाही.. तिखटजाळपाणा हे मिसळीचं एक वैशिष्ठ्य आहे हे नक्कीच मान्य! परंतु तिखटजाळपणा हा चवदारपणापुढे शेवटी केवळ एक गिमिकच ठरतो असं मला वाटतं! मी हा लेख लिहिताना गिमिक्स पेक्षा गमकांना अधिक महत्व दिलं आहे. हां, आता त्यात मी कितपत यशस्वी झालो आहे ह भाग वेगळा! तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं! राईट? :) आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील! निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर! नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 28/05/2008 - 11:18
मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं!
मनस्वी, तात्या म्हणतायत ते बरोबर आहे ... तु खरच लिही .... प्रतिसाद देणारे काय कसेही देतील, आपण त्यातुन चांगले तेवढे घ्यायचे ... बाकी रंगाचा बेरंग करायला काही "माकडे" टपलेली असतात पण घाबरनेका नही ... आपण असल्या लोकांना पुरुन उरु !!! तेव्हा टाक तुझा लेख !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी 28/05/2008 - 12:23
तात्या.. इथे मला 'गमक' आणि 'गिमिक' मधला फरक कळत नाही आणि डायरेक्ट लेख वगैरे लिहू??
असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का?
बरोबर आहे.. पण पाच-दहा काय.. एकदा जरी सुचले नीट काहीतरी तरी खूप.
आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील!
घाबरले ना मी!
निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?
तेव्हा टाक तुझा लेख !!!
काही खरं नाही.. आता मनावर घेतलेच पाहिजे.. बघते.. प्रयत्न करून बघते. राईट! :)
नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...!
थोडा वेळ लागेल. पण नक्कीच टाकेन. मोटिव्हेशनसाठी धन्यवाद तात्या. आणि तुझ्या शब्दांबद्दल थँक्स् डान्या. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा 27/05/2008 - 19:06
आहे मिसळाख्यान.... आता एकदा केली पाहिजे...

मिसळीचे आत्मकथन आवडले.. अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान! अगदी खरे.... कुठेही जा तिची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात....कुठे मटकी, कुठे मसुर, कुठे टोमॅटो , तर कुठे चिंचेचा कोळ.... तिच्यात काही फरक पडत नाही... मस्त चमचमीत, चविष्ट मिसळीचे कथन......

ईश्वरी 27/05/2008 - 22:32
तात्या, तुमची चमचमीत मिसळ आवडली. तुम्ही लोकं पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे असं तो स्वत:च मला एकदा म्हणाला होता. मस्त वर्णन. शब्दयोजना ही समर्पक झाली आहे. मला वाटते एखाद्या लेखकाला एकवेळ व्यक्तीचित्रण सहज जमेल पण असे पदार्थचित्रण लिहीणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला ते सहज जमले. तुमचा हा लेखनप्रकार खूप आवडला. ईश्वरी

चकली 27/05/2008 - 22:56
मिसळ चा फोटो काढताना मिसळीची चव वाचकांपर्यंत पोचावी हा हेतु होता. आज मिसळीच्या फोटो ला जे काही सांगता आले नसेल ते तुम्ही शब्दात मांडलेत ! चकली http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर 28/05/2008 - 11:13
बरेवाईट प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.
लेखनप्रकार
3

ढाकचा बहिरी - एक अनुभव. (भाग ३)

धमाल मुलगा ·

विजुभाऊ 26/05/2008 - 15:55
दॅट्स लाईक धमु स्टाईल. रे........ अगदी आपण सोबत आहोत असे वाटले वाचताना..... झकास व्यंकटेश माडगुळकरचे आणि माणसांचा दिवस सुरु झाला आठवले

आनंदयात्री 26/05/2008 - 15:58
च्यामारी काय काय दिव्य केलित रे भो ! लै भारी ! संत्या लटकला तेव्हा खतरनाक भिती वाटली असेल नै. आमचा एक ओळखीचा असाच आमच्या मराठवाड्यातल्या म्हैसमाळच्या डोंगरावरच्या दरीत कोसळुन गेला होता, पोरासोरांच्या हाती रडणे सोडुन काही लागलेच नव्हते, पोलिसांना पण बॉडी २ दिवसांनी मिळाली होती. :( . थँक गॉड फॉर संत्या.

राजे 26/05/2008 - 16:11
वा ! वा ! धमु... तु व तुझे मित्र तर सेम आहात रे :) पुढील वेळी आम्हाला ही बोलवा ! बाकी रिस्क मोठीच घेतली होती तुम्ही लोकांनी ! लेखन देखील मस्त झाले आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋचा 26/05/2008 - 16:16
जब्राट रे!!!! =D> लै डेरींग केला भौ तुमी पण अस वाटलं की मी पण आहे तिथे खुप छन लिहीलं आहेस. एकदम झक्कास!!!

मनस्वी 26/05/2008 - 16:21
त्या बोगद्यातून येणारा सुर्यप्रकाश एकदम स्टेजावर उभ्या असलेल्या खास कलाकारावर टाकलेल्या स्पॉटलाईटप्रमाणे दरीतल्या भातखाचरांवर पडला होता. बाकीचं झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
ढाक्या.. काय मस्त दिसत असेल रे ते दृश्य!
"गुमनाम है कोई...बदनाम है कोई..."
ही हा हा.. अमल्याने सहीच टाकला!
अजुन एक सिगारेटचं पाकिट आम्ही सिगरेटच्या थोटकांची मातीत भाल्यासारखी रोऊन काढलेली रांगोळी
वा वा
खिचडी खाऊन वर चहा पिऊन जी काही ताणून दिली,
रात्री १२-१ वाजता खिचडी खायला अन् चहा प्यायला काय मज्जा आली असेल!
घरी पोहोचलो तर ५ मिनिटं मला कोणी आत घ्यायलाच तयार नाही... पॅन्टवर शेवाळं लागलेलं, ओल्या कपड्यांच्या कुबट वास, हाता-तोंडाला अजुनही कुठेकुठे माती राहिलेली, चेहर्‍यावर प्रचंड थकवा..... पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
उतरतानाचा प्रवास लयीच थ्रिलींग.. ढाक्या मस्तच अनुभव.. खूपच आवडला आणि ३ भाग ते पण लवकर टाकण्यात यश आल्याबद्दल अभिनंदन! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा 26/05/2008 - 16:31
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." सही वाक्य!!!

In reply to by ऋचा

मनस्वी 26/05/2008 - 16:34
कौतुक माझे नाही तर महागुरुंचे करा! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

चेतन 26/05/2008 - 16:49
तुफान लिहलयं रावं! "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." आधीच जंगल, त्यात अंधार, त्यात टरकलेली ! हे लेकाचं सरळपणानं कधी काही करतच नाही सही रे (बरी गाणि सुचतात अशावेळी) "ए...मी नाय काय केलं हां...हे कमळ्या आपोआपच सांडतंय सारखं" मस्तचं भाउ मित्रांमधली खास पुणेरी प्रतिक्रीया पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही भडकमकर क्लास लावलेस वाटतं =)) ट्रेक मात्र सही... होता आणि लिहलायसंपण मस्तं आवडला (ट्रेकप्रेमी) शेर्पा चेतन (अगदी तात्यांच्य इश्टाईलमध्ये)

भलामोठा काळपट ढग सुर्याला आपल्या मागं दडवण्याचा प्रयत्न करत होता. झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या. हळुहळु हा सोनेरी-रुपेरी रंग कधी तांबूस होत गेला आणि त्यात अंधाराचं काजळ कधी मिसळत गेलं हे कळलंच नाही. अंधारानं चांगलेच हातपाय पसरलेले. सावल्या आणि उंच गवताने निर्माण केलेला दिशाभ्रम ढाक बहिरीतल्या वरील शब्दरचनांनी आम्हाला भुरळ घातली आणि आपला प्रवास आम्ही अनुभवत गेलो. अमल्याचं "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." वातावरणातील गूढता वाढवते. संत्याचं लटकणे, परतीचा मार्ग सापडत नसल्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता. आणि लढाई जिंकलेल्या मावळ्याचा चेहरा तरळून गेला. अप्रतिम वर्णनाचे अनुभव लेखन आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुश्श..आलात बाबा सुखरुप एकदाचे परत, अगदी थरारक प्रवास! सृष्टीचेटूक शब्द आवडला. स्वाती

ऍडीजोशी 26/05/2008 - 17:01
शाब्बास मेरे बब्बर शेर :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

शरुबाबा 26/05/2008 - 17:33
साला चकवा लागला यार आपल्याला, एकदा असाच अनुभव घेतलेला शरुबाबा

प्रमोद देव 26/05/2008 - 18:51
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुमीत 27/05/2008 - 13:02
धमाल्या, अरे अक्षरक्षः जगलो तुझा अनुभव. लिहिले तर छान आहेसच पण तुमचा अनुभव्......जबराच यार.

चित्तथरारक अनुभव कथन. अगदी आपणही त्या कंपूचेच एक (घाबरलेले) सदस्य आहोत ही भावना अगदी शेवट पर्यंत साथ करीत होती. जबरदस्त. अभिनंदन.

धमाल मुलगा 27/05/2008 - 14:55
धन्यवाद मंडळी... माझं हे वेडंवाकडं काहीबाही लिहिलेलं गोड मानून घेतलंत, कौतुक केलंत, आवडलंही तुम्हाला...बस्स, आणखी काय हवं आपल्याला? शरुबाबा, चकव्याचा किस्सा आम्हालापण सांग ना :)
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय!
बास...बास....बास...... साक्षात गुरुदेवांनी ही अशी पावती द्यावी ह्याहुन मोठं काय बक्षीस असावं आमच्यासाठी? ह्याचसाठी केला होता अट्टाहास...लेखाचा शेवट गोड व्हावा :) गुरुदेव, आमचा हा अनुभव तुमच्या चरणि अर्पण !!!!

शितल 27/05/2008 - 17:55
मस्त रे धमाल्या, अरे वाचताना पुढे काय असा विचार सतत मनात येतो. सही, एकदम जबरान अनुभव आहे तुझ्या पाठीशी. आणि तु ते शब्दात ही छान मा॑डलेस, तुला शब्बाशी.

वरदा 27/05/2008 - 18:39
एकदम सह्ही मी ह्या विकांताला छोट्याश्या ट्रेक ला जाउन आले तर रविवारचा अख्खा सोमवार दमलेय म्हणून बसले होते..कसं केलत रे एवढं तुम्ही मानलं बॉ तुम्हाला... लिहिलयस खूप मस्त असं वाटलं आम्ही पण चालतोय एक बॅटरी घेऊन तुमच्या बरोबर.....

चतुरंग 27/05/2008 - 21:00
इतक्या ओघवत्या भाषेत ट्रेक लिहिलयस की बस! प्रकाशचित्रे चुकल्याची रुखरुख वाट्ली पण तुझ्या वर्णनाने काही अंशी तरी सूर्यास्त डोळ्यांसमोर उभा केला! एकदम मस्त. (स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! ;) ) चतुरंग

तो चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. वाचतांनाच जी एफ झाली. तुझ्य निधड्या छातीला व रसाळ ओघवत्या वर्णनाला त्रिवार वंदन. आम्ही आयुष्यात एवढे साहस केले नाही. तरी संत्या व कमळ्या तुमच्याबरोबर कसे हे कोडेच आहे. पण पुढला ट्रेक जरा ऑर्गनाइज्ड असू देत. पोटोबाची आबाळ करू नका. तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता? सुधीर कांदळकर.

पक्या 27/05/2008 - 22:08
धमाल्या , जियो मेरे यार. एकदम थरारक अनुभव. धाडसी ट्रेक केला तुम्ही राव. आणि लेखाबद्द्ल तर काय लिहावे? अप्रतिम. डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग उभा राहतोय. प्रत्यक्षात जो अनुभव जगलास तो हुबेहुब लेखात उतरवलास. अनुभव जबरा असला तरी कथा रंगवून सांगायची हातोटी सगळ्यांकडेच असते असे नाही. तू तर ते काम ही झकास केलंस. आणि ते ढग आणि सुर्याचे वर्णन ... वा वा क्या बात है ! खल्लास. -- पक्या

ईश्वरी 27/05/2008 - 22:43
फारच छान लिहीलंत. तुमचा पूर्ण प्रवास डोळयासमोर उभा राहिला. लेख आवडला. ट्रेक चा अनुभव पण एकदम जबरदस्त. चढताना , उतरताना ..दोन्ही प्रवास थरारक. ईश्वरी

छोटा डॉन 28/05/2008 - 08:43
धमाल्या जबरा अनुभव आहे बाबा तुझा. आमालाबी असं दर्‍याखोर्‍यातुन भटाकायला एके काळी लै आवडायचं पण "एक प्रकरण" लै महागत पडल्याने आम्ही कानाला खडा लावला ... हे सर्व वाचायला मजा येते पण हे सर्व अनुभवताना किती लागते व किती नशा चढते ते फक्त करणारे जाणतात ... असो. तुझ्या नजरेने माझी पण "ढाकचा बहिरी" ची सफर पुर्ण झाली ... सुर्यास्ताचे वर्णन केवळ "झ...का...स !!!" मस्त वातते रे दिवसभर पायपीट केल्यावर एखाद्या खोपच्यात पार आडवे पडून सुर्यास्त बघण्यात. फोटॉ नाही टाकलास, पण त्यात तुझी चुक नाही, ती वेळच अशी असते की कशाकशाचे भान रहात नाही मग फोटो काढणे तर दुरच .... जेवढे आपल्या चिमुकल्या डोळ्याने बघता येते तेवढे नजरेत साठवुन घ्यायचे, फोटो वगैरे सर्व फॉर्मालिटी झाल्या ... बाकी तुमची टीम झकास होती . बहुतेक सर्व "गँग" मध्ये तु वर्णन केलेल्या व्यक्ती सापडतातच .... त्याशिवाय मज्जा पण येत नाही म्हणा ... "कॅम्प फायर" केल्याशिवाय ह्या व्रताची सांगता होत नाही, मस्त "शेकोटी" पेटवायची मग त्या उबेत व प्रकाशात गाणी म्हणा, गप्पा ठोका किंवा इतर काही "असात्विक कार्यक्रम" केल्याशिवाय "ट्रेकिंग" पुर्ण होते असे मी मानत नाही ... ट्रेक ऑर्गनाईज असणे वगैरे मी मानत नाही, त्यात मजा नाहीच !!! मस्त .... अजुन असतील तर टाक [ आम्ही आपलं सगळ्यात शेवटी प्रतिक्रीया देतोच ...] अवांतर : सवडीने आम्ही पण "आमच्या माथेरान डोंगराच्या चढणीची कथा" टाकूच ... अतिअवांतर : च्यायला अपली एक अशी मस्त गँग काढून कुठेतरी जायला पाहिजे. लै धमाल येईल ... विजूभाऊम्च्या डोक्यात आहेत थोडे प्लॅन, बघू काय होतेय ते !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा 03/06/2008 - 12:52
धन्यवाद चतुरंगराव, सुधीरकाका, ईश्वरी, शितल, वरदा, वळु, पक्या, डानराव !!! चतुरंगराव,
(स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! )
खर्रं की काय? कुठली वाक्य हो? सांगा ना, सांगा ना! आमच्या सु.शि. ची छाप आहे म्हणता ह्यातल्या वाक्यांवर? लै भारी! कित्ती वर्षं झाली बरं सु.शि. वाचायलाच नाही मिळाला :( परत एकदा पुस्तकांचं कपाट उचकायला हवं बॉ! सुधीरकाका,
तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता?
आमचा एक नियम आहे. कोणत्याही गड-किल्ल्यावर जाताना / खुद्द तिथे दारु नेणे / पिणे नाही. ह्यामागे २ कारणे आहेत. एक म्हणजे भावनिक...महाराजांच्या गडा-किल्ल्यांवर सह्याद्रीच्या कुशीत कित्येक मावळ्यांनी जीवाची कुरवंडी केली राखणीपायी..तिथे जाऊन दारु प्यायची? थुत् तिच्यामायला त्या पिण्यार्‍यांच्या! दुसरं कारण म्हणजे दारु पिऊन झिंगल्यावर तोल सांभाळणे अवघड होऊन बसल्यावर नसते जीवाचे खेळ होऊन बसतात्..ते टाळण्यासाठी! :) संत्या आणि कमळ्या खरंच आमच्या कंपूत मिसाळलेच कसे हे कोडं अजुनही सुटलेलं नाही. पण बरं होतं ते होते ते...आमच्या आचरटपणाला थोडासा शहाणपणाचा लगाम घालायचे बिचारे :) डान्या... लेका नुसतेच संदर्भ काय देतोस? लिही की मेल्या...'ते प्रकरण' वर काहीतरी! - (ढाक्या) ध मा ल.

झकासराव 03/06/2008 - 20:31
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. सुर्यास्ताच वर्णन खल्लास. कित्येक वाक्य वाचुन गडबडा लोळेपर्यंत हसलो रे. :) तुझी लिखाणाची शैली छान आहे रे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

विसोबा खेचर 04/06/2008 - 00:02
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. हेच म्हणतो...! धमाल्या अजूनही असेच जोरदार अनुभवकथण येऊ दे रे.. तात्या.

अभिज्ञ 07/06/2008 - 23:17
प्रतिक्रिया देण्य़ास उशीर झाल्या बद्दल दिलगिर आहोत. धमाल राव आपला लेख वाचून धमाल आली.जबरदस्त लिहिले आहेस. सुंदर लेखन.अभिनंदन. बाकी आपल्या फ़ोटोग्राफ़सवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषत: कोंडेश्वराचे मंदिर पाहून......... आपल्यासारखाच ढाक बहिरी ट्रेक करायला आम्ही काही पोरे पोरे ९५च्या उन्हाळ्य़ात गेलो होतो. नुसताच ढाक नको म्हणून राजमाची-ढाक असे करायचे ठरले. पहिल्या रात्री लोणावळ्यातून सुरुवात करुन पहाटे राजमाचीला पोहोचलो. तिथे एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी दुपारी ढाक कडे प्रयाण केले.त्यातच आमच्यात २-३ नवखे होते त्यांना हे काही झेपेल असे वाटले नाही.त्यांनी राजमाचीवरुनच परतीची वाट पकडलि. राहीलो आम्ही ४ जणच. रमतगमत वाटचाल करत,वाट शोधत,चुकामुक वगैरे सर्व होऊन कोंडेश्वराच्या मंदिरात पोहोचयला बराच उशीर म्हणजे साधारण संध्याकाळचे सात वाजले असावेत. ब-यापैकी अंधार पडला होता.मंदिरात पोहोचता पोहोचता वाटेत संघाच्या मुलांचा एक ग्रुप भेटला. त्यातल्या दोघा तिघांनी इथे एक वाघ फ़िरतोय,कालच रात्री इथे एक गाय मारलीय ,तुम्ही चोघेच आहात,तेंव्हा काळजी घ्या वगैरे सांगून आमची पार तंतरून टाकली.आता वाघ वगैरे फ़िरतोय म्हंटल्यावर आम्ही सर्वचजण जाम हादरलो होतो. बरोबर कांदा कापायची सुरी सोडली तर एकहि हत्यार नव्हते.हि संघाची पोरे तर मस्त पैकी छ-याची बंदूक घेउन फ़िरत होते. आता काय करायचे अशाच विवंचनेत सर्व मंडळि होती. कोंडेश्वराच्या मंदिरातच स्वयंपाक उरकून जेवणॆ करून घेतली.मंदिराला तेंव्हा दार वगैरे नव्हते.त्यामूळॆ गाभा-यात झोपायचे ठरले. आत जाउन बघितले तर गाभा-यालाही दरवाजा नाही.एक मोठा पत्रा लावून गाभारा बंद करायचि सोय. तोच पत्रा कसाबसा आतून उभा केला.त्याला आधाराला आमच्या सैक लावल्या. दिवसभर भटकल्यामुळे सगळॆच जण दमले होते.तरी पण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आळीपाळीने जागायचे ठरवले. प्रत्येकी ३ तास जागायचे ठरले.एकाला आधीच ताप चढला होता,त्याने हे जागणॆ वगैरे आपल्याला जमणार नाही म्हणून हात वरती केले. त्यामुळे राहीलो आम्हि ३ जणच.माझी जागायची वेळ रात्री १२ ते ३ अशी ठरली.मी ३ वाजता दुस-याला उठवायचे आणी बाकी त्याने सांभाळायचे ठरले. त्याप्रमाणे आमची निजानीज झाली. आमचा पहीला जागणारा चाप्टर निघाला.त्याने १०.३० वाजताच मला उठवून बारा वाजले आता तुझी पाळि म्हणुन स्वत: झोपी गेला. मी पण आपला उठून पहारा देत बसलो.बर गाभा-यात तर गुडूप अंधार.एक वातीचा दिवा जळत ठेवला होता. खुद्द गाभा-यातच झोपलो होतो त्यामूळॆ सिगारेट वगैरे प्यायची काहि हिंमत झाली नाही.बाहेरून चित्रविचित्र आवाज येत होते. उगाच नसते भास होत होते.माझी तर पार तंतरून गेली होती. कशीबशी ३ वाजायची वाट पहात बसलो.आता वाजतील,मग वाजतील करत अंदाजे ३ एक तासाने पुढच्याला उठवायला गेलो.त्याने हातातले घड्याळ पाहून मला सांगितले कि आताशी १ वाजतोय.मी ३ वाजल्याशिवाय उठणार नाही. मी पहिल्यावर चडफ़डत परत ३ वाजायची वाट पहात बसलो.३ वाजता त्याला उठवायला गेलो तर भाई मुडद्यासारखा झोपला होता.अजिबात दाद देइना. आताशा मलाही झोप अनावर होत होती,बसल्या बसल्या तशीच झोप लागली.पहाटे ६ च्या आसपास गावक-यांच्या आवाजाने जाग आली. बाहेर ब-यापैकी उजाडले होते.बाहेर येउन पहिले गावक-यांकडे चौकशी केली.तेंव्हा तिथे वाघ वगैरे असला काही प्रकार नाही कळाले. आपला जाम पोपट झाला हे पाहून फ़ार चिडचिड झाली.लगिच आत येउन ह्या बाकीच्यांना लाथा घालुन उठवले. रात्रभर झोप नाही.आधिच २ दिवसाचे कष्ट.पाहून ढाकची भैरी रद्द करायचा निर्णय घेतला.काय सांगा ढाक करून परत येता येता संध्याकाळ व्हायची आणि परत इथे मुक्काम करायला लागायचा. तसेच तिकडुन जांबोरीला जाउन ST ने तळॆगांव व तिथून लोकलने घर गाठले. त्यांनंतर ढाक भैरी करायचा योग परत काही आला नाही.या आधी २ वेळा तिथे गेलो होतो.परंतु चतुरंग हयांनी म्हंटल्या प्रमाणॆ कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ह्याच्याशी १००% सहमत. आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचलो खरे पण थोडेसे स्थूल असल्यामुळॆ गुहेत प्रवेश करताना जाम लागली होती.तो प्रकार काही जमला नाही. त्या गुहेत नक्की काय आहे हे आज आपले फ़ोटो पाहून कळाले. अभिज्ञ .

विजुभाऊ 26/05/2008 - 15:55
दॅट्स लाईक धमु स्टाईल. रे........ अगदी आपण सोबत आहोत असे वाटले वाचताना..... झकास व्यंकटेश माडगुळकरचे आणि माणसांचा दिवस सुरु झाला आठवले

आनंदयात्री 26/05/2008 - 15:58
च्यामारी काय काय दिव्य केलित रे भो ! लै भारी ! संत्या लटकला तेव्हा खतरनाक भिती वाटली असेल नै. आमचा एक ओळखीचा असाच आमच्या मराठवाड्यातल्या म्हैसमाळच्या डोंगरावरच्या दरीत कोसळुन गेला होता, पोरासोरांच्या हाती रडणे सोडुन काही लागलेच नव्हते, पोलिसांना पण बॉडी २ दिवसांनी मिळाली होती. :( . थँक गॉड फॉर संत्या.

राजे 26/05/2008 - 16:11
वा ! वा ! धमु... तु व तुझे मित्र तर सेम आहात रे :) पुढील वेळी आम्हाला ही बोलवा ! बाकी रिस्क मोठीच घेतली होती तुम्ही लोकांनी ! लेखन देखील मस्त झाले आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋचा 26/05/2008 - 16:16
जब्राट रे!!!! =D> लै डेरींग केला भौ तुमी पण अस वाटलं की मी पण आहे तिथे खुप छन लिहीलं आहेस. एकदम झक्कास!!!

मनस्वी 26/05/2008 - 16:21
त्या बोगद्यातून येणारा सुर्यप्रकाश एकदम स्टेजावर उभ्या असलेल्या खास कलाकारावर टाकलेल्या स्पॉटलाईटप्रमाणे दरीतल्या भातखाचरांवर पडला होता. बाकीचं झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या.
ढाक्या.. काय मस्त दिसत असेल रे ते दृश्य!
"गुमनाम है कोई...बदनाम है कोई..."
ही हा हा.. अमल्याने सहीच टाकला!
अजुन एक सिगारेटचं पाकिट आम्ही सिगरेटच्या थोटकांची मातीत भाल्यासारखी रोऊन काढलेली रांगोळी
वा वा
खिचडी खाऊन वर चहा पिऊन जी काही ताणून दिली,
रात्री १२-१ वाजता खिचडी खायला अन् चहा प्यायला काय मज्जा आली असेल!
घरी पोहोचलो तर ५ मिनिटं मला कोणी आत घ्यायलाच तयार नाही... पॅन्टवर शेवाळं लागलेलं, ओल्या कपड्यांच्या कुबट वास, हाता-तोंडाला अजुनही कुठेकुठे माती राहिलेली, चेहर्‍यावर प्रचंड थकवा..... पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही
उतरतानाचा प्रवास लयीच थ्रिलींग.. ढाक्या मस्तच अनुभव.. खूपच आवडला आणि ३ भाग ते पण लवकर टाकण्यात यश आल्याबद्दल अभिनंदन! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ऋचा 26/05/2008 - 16:31
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." सही वाक्य!!!

In reply to by ऋचा

मनस्वी 26/05/2008 - 16:34
कौतुक माझे नाही तर महागुरुंचे करा! :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

चेतन 26/05/2008 - 16:49
तुफान लिहलयं रावं! "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." आधीच जंगल, त्यात अंधार, त्यात टरकलेली ! हे लेकाचं सरळपणानं कधी काही करतच नाही सही रे (बरी गाणि सुचतात अशावेळी) "ए...मी नाय काय केलं हां...हे कमळ्या आपोआपच सांडतंय सारखं" मस्तचं भाउ मित्रांमधली खास पुणेरी प्रतिक्रीया पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही भडकमकर क्लास लावलेस वाटतं =)) ट्रेक मात्र सही... होता आणि लिहलायसंपण मस्तं आवडला (ट्रेकप्रेमी) शेर्पा चेतन (अगदी तात्यांच्य इश्टाईलमध्ये)

भलामोठा काळपट ढग सुर्याला आपल्या मागं दडवण्याचा प्रयत्न करत होता. झाकोळून आलेलं आसमंत, एकाच ढगाच्या रुपेरी कडा, आणि हिरव्यागार दरीतल्या पोपटी भासणार्‍या भात-खाचरांचा ऊन्हाने न्हाऊन बदललेला सोनेरी अवतार. ऊन्हाच्या काही चुकार तिरिपी इकडे तिकडे सांडलेल्या, नुकत्याच स्वच्छ धुवुन काढलेल्या हिरव्या-पोपटी पानांवरती रेंगाळलेले टपोरे थेंब चमकवत ह्या सगळ्या निसर्ग-खेळाची शोभा वाढवत होत्या. हळुहळु हा सोनेरी-रुपेरी रंग कधी तांबूस होत गेला आणि त्यात अंधाराचं काजळ कधी मिसळत गेलं हे कळलंच नाही. अंधारानं चांगलेच हातपाय पसरलेले. सावल्या आणि उंच गवताने निर्माण केलेला दिशाभ्रम ढाक बहिरीतल्या वरील शब्दरचनांनी आम्हाला भुरळ घातली आणि आपला प्रवास आम्ही अनुभवत गेलो. अमल्याचं "गुमनाम है कोई...बदनाम है कोई..." वातावरणातील गूढता वाढवते. संत्याचं लटकणे, परतीचा मार्ग सापडत नसल्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता. आणि लढाई जिंकलेल्या मावळ्याचा चेहरा तरळून गेला. अप्रतिम वर्णनाचे अनुभव लेखन आवडले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुश्श..आलात बाबा सुखरुप एकदाचे परत, अगदी थरारक प्रवास! सृष्टीचेटूक शब्द आवडला. स्वाती

ऍडीजोशी 26/05/2008 - 17:01
शाब्बास मेरे बब्बर शेर :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

शरुबाबा 26/05/2008 - 17:33
साला चकवा लागला यार आपल्याला, एकदा असाच अनुभव घेतलेला शरुबाबा

प्रमोद देव 26/05/2008 - 18:51
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुमीत 27/05/2008 - 13:02
धमाल्या, अरे अक्षरक्षः जगलो तुझा अनुभव. लिहिले तर छान आहेसच पण तुमचा अनुभव्......जबराच यार.

चित्तथरारक अनुभव कथन. अगदी आपणही त्या कंपूचेच एक (घाबरलेले) सदस्य आहोत ही भावना अगदी शेवट पर्यंत साथ करीत होती. जबरदस्त. अभिनंदन.

धमाल मुलगा 27/05/2008 - 14:55
धन्यवाद मंडळी... माझं हे वेडंवाकडं काहीबाही लिहिलेलं गोड मानून घेतलंत, कौतुक केलंत, आवडलंही तुम्हाला...बस्स, आणखी काय हवं आपल्याला? शरुबाबा, चकव्याचा किस्सा आम्हालापण सांग ना :)
धमु मस्तच लिहिले आहेस. तिन्ही भाग वाचले. अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन चित्रमय झालेय. डोळ्यासमोर जीवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य तुझ्या शब्दात आहे. शेवटचा भाग तर अगदी खासच आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारे आणि रोम रोम फुलवणारे वर्णन ... खरे तर वर्णन कसले ते, तुझ्या बरोबर सहप्रवासी आहोत असे वाटण्याइतपत ... त्रिमिती चित्रपटासारखे, साक्षात अंगावर येणारा अनुभव. जाऊ दे ! खरे तर नि:शब्द झालोय!
बास...बास....बास...... साक्षात गुरुदेवांनी ही अशी पावती द्यावी ह्याहुन मोठं काय बक्षीस असावं आमच्यासाठी? ह्याचसाठी केला होता अट्टाहास...लेखाचा शेवट गोड व्हावा :) गुरुदेव, आमचा हा अनुभव तुमच्या चरणि अर्पण !!!!

शितल 27/05/2008 - 17:55
मस्त रे धमाल्या, अरे वाचताना पुढे काय असा विचार सतत मनात येतो. सही, एकदम जबरान अनुभव आहे तुझ्या पाठीशी. आणि तु ते शब्दात ही छान मा॑डलेस, तुला शब्बाशी.

वरदा 27/05/2008 - 18:39
एकदम सह्ही मी ह्या विकांताला छोट्याश्या ट्रेक ला जाउन आले तर रविवारचा अख्खा सोमवार दमलेय म्हणून बसले होते..कसं केलत रे एवढं तुम्ही मानलं बॉ तुम्हाला... लिहिलयस खूप मस्त असं वाटलं आम्ही पण चालतोय एक बॅटरी घेऊन तुमच्या बरोबर.....

चतुरंग 27/05/2008 - 21:00
इतक्या ओघवत्या भाषेत ट्रेक लिहिलयस की बस! प्रकाशचित्रे चुकल्याची रुखरुख वाट्ली पण तुझ्या वर्णनाने काही अंशी तरी सूर्यास्त डोळ्यांसमोर उभा केला! एकदम मस्त. (स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! ;) ) चतुरंग

तो चित्रपट पाहिल्यासारखे वाटले. वाचतांनाच जी एफ झाली. तुझ्य निधड्या छातीला व रसाळ ओघवत्या वर्णनाला त्रिवार वंदन. आम्ही आयुष्यात एवढे साहस केले नाही. तरी संत्या व कमळ्या तुमच्याबरोबर कसे हे कोडेच आहे. पण पुढला ट्रेक जरा ऑर्गनाइज्ड असू देत. पोटोबाची आबाळ करू नका. तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता? सुधीर कांदळकर.

पक्या 27/05/2008 - 22:08
धमाल्या , जियो मेरे यार. एकदम थरारक अनुभव. धाडसी ट्रेक केला तुम्ही राव. आणि लेखाबद्द्ल तर काय लिहावे? अप्रतिम. डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग उभा राहतोय. प्रत्यक्षात जो अनुभव जगलास तो हुबेहुब लेखात उतरवलास. अनुभव जबरा असला तरी कथा रंगवून सांगायची हातोटी सगळ्यांकडेच असते असे नाही. तू तर ते काम ही झकास केलंस. आणि ते ढग आणि सुर्याचे वर्णन ... वा वा क्या बात है ! खल्लास. -- पक्या

ईश्वरी 27/05/2008 - 22:43
फारच छान लिहीलंत. तुमचा पूर्ण प्रवास डोळयासमोर उभा राहिला. लेख आवडला. ट्रेक चा अनुभव पण एकदम जबरदस्त. चढताना , उतरताना ..दोन्ही प्रवास थरारक. ईश्वरी

छोटा डॉन 28/05/2008 - 08:43
धमाल्या जबरा अनुभव आहे बाबा तुझा. आमालाबी असं दर्‍याखोर्‍यातुन भटाकायला एके काळी लै आवडायचं पण "एक प्रकरण" लै महागत पडल्याने आम्ही कानाला खडा लावला ... हे सर्व वाचायला मजा येते पण हे सर्व अनुभवताना किती लागते व किती नशा चढते ते फक्त करणारे जाणतात ... असो. तुझ्या नजरेने माझी पण "ढाकचा बहिरी" ची सफर पुर्ण झाली ... सुर्यास्ताचे वर्णन केवळ "झ...का...स !!!" मस्त वातते रे दिवसभर पायपीट केल्यावर एखाद्या खोपच्यात पार आडवे पडून सुर्यास्त बघण्यात. फोटॉ नाही टाकलास, पण त्यात तुझी चुक नाही, ती वेळच अशी असते की कशाकशाचे भान रहात नाही मग फोटो काढणे तर दुरच .... जेवढे आपल्या चिमुकल्या डोळ्याने बघता येते तेवढे नजरेत साठवुन घ्यायचे, फोटो वगैरे सर्व फॉर्मालिटी झाल्या ... बाकी तुमची टीम झकास होती . बहुतेक सर्व "गँग" मध्ये तु वर्णन केलेल्या व्यक्ती सापडतातच .... त्याशिवाय मज्जा पण येत नाही म्हणा ... "कॅम्प फायर" केल्याशिवाय ह्या व्रताची सांगता होत नाही, मस्त "शेकोटी" पेटवायची मग त्या उबेत व प्रकाशात गाणी म्हणा, गप्पा ठोका किंवा इतर काही "असात्विक कार्यक्रम" केल्याशिवाय "ट्रेकिंग" पुर्ण होते असे मी मानत नाही ... ट्रेक ऑर्गनाईज असणे वगैरे मी मानत नाही, त्यात मजा नाहीच !!! मस्त .... अजुन असतील तर टाक [ आम्ही आपलं सगळ्यात शेवटी प्रतिक्रीया देतोच ...] अवांतर : सवडीने आम्ही पण "आमच्या माथेरान डोंगराच्या चढणीची कथा" टाकूच ... अतिअवांतर : च्यायला अपली एक अशी मस्त गँग काढून कुठेतरी जायला पाहिजे. लै धमाल येईल ... विजूभाऊम्च्या डोक्यात आहेत थोडे प्लॅन, बघू काय होतेय ते !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा 03/06/2008 - 12:52
धन्यवाद चतुरंगराव, सुधीरकाका, ईश्वरी, शितल, वरदा, वळु, पक्या, डानराव !!! चतुरंगराव,
(स्वगत - ह्याच्या वर्णनातली काही वाक्यं खात्रीच देतात की अजूनही हा धमाल्या सु.शि. ची पारायणे करत असणार! )
खर्रं की काय? कुठली वाक्य हो? सांगा ना, सांगा ना! आमच्या सु.शि. ची छाप आहे म्हणता ह्यातल्या वाक्यांवर? लै भारी! कित्ती वर्षं झाली बरं सु.शि. वाचायलाच नाही मिळाला :( परत एकदा पुस्तकांचं कपाट उचकायला हवं बॉ! सुधीरकाका,
तरी एक प्रश्न राहिलाच. शिध्यातील ब्रँड कोणता होता?
आमचा एक नियम आहे. कोणत्याही गड-किल्ल्यावर जाताना / खुद्द तिथे दारु नेणे / पिणे नाही. ह्यामागे २ कारणे आहेत. एक म्हणजे भावनिक...महाराजांच्या गडा-किल्ल्यांवर सह्याद्रीच्या कुशीत कित्येक मावळ्यांनी जीवाची कुरवंडी केली राखणीपायी..तिथे जाऊन दारु प्यायची? थुत् तिच्यामायला त्या पिण्यार्‍यांच्या! दुसरं कारण म्हणजे दारु पिऊन झिंगल्यावर तोल सांभाळणे अवघड होऊन बसल्यावर नसते जीवाचे खेळ होऊन बसतात्..ते टाळण्यासाठी! :) संत्या आणि कमळ्या खरंच आमच्या कंपूत मिसाळलेच कसे हे कोडं अजुनही सुटलेलं नाही. पण बरं होतं ते होते ते...आमच्या आचरटपणाला थोडासा शहाणपणाचा लगाम घालायचे बिचारे :) डान्या... लेका नुसतेच संदर्भ काय देतोस? लिही की मेल्या...'ते प्रकरण' वर काहीतरी! - (ढाक्या) ध मा ल.

झकासराव 03/06/2008 - 20:31
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. सुर्यास्ताच वर्णन खल्लास. कित्येक वाक्य वाचुन गडबडा लोळेपर्यंत हसलो रे. :) तुझी लिखाणाची शैली छान आहे रे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

विसोबा खेचर 04/06/2008 - 00:02
हा भाग वाचायचा राहुनच गेला होता बघ. जबरदस्त लिहिल आहेस रे. हेच म्हणतो...! धमाल्या अजूनही असेच जोरदार अनुभवकथण येऊ दे रे.. तात्या.

अभिज्ञ 07/06/2008 - 23:17
प्रतिक्रिया देण्य़ास उशीर झाल्या बद्दल दिलगिर आहोत. धमाल राव आपला लेख वाचून धमाल आली.जबरदस्त लिहिले आहेस. सुंदर लेखन.अभिनंदन. बाकी आपल्या फ़ोटोग्राफ़सवरून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषत: कोंडेश्वराचे मंदिर पाहून......... आपल्यासारखाच ढाक बहिरी ट्रेक करायला आम्ही काही पोरे पोरे ९५च्या उन्हाळ्य़ात गेलो होतो. नुसताच ढाक नको म्हणून राजमाची-ढाक असे करायचे ठरले. पहिल्या रात्री लोणावळ्यातून सुरुवात करुन पहाटे राजमाचीला पोहोचलो. तिथे एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी दुपारी ढाक कडे प्रयाण केले.त्यातच आमच्यात २-३ नवखे होते त्यांना हे काही झेपेल असे वाटले नाही.त्यांनी राजमाचीवरुनच परतीची वाट पकडलि. राहीलो आम्ही ४ जणच. रमतगमत वाटचाल करत,वाट शोधत,चुकामुक वगैरे सर्व होऊन कोंडेश्वराच्या मंदिरात पोहोचयला बराच उशीर म्हणजे साधारण संध्याकाळचे सात वाजले असावेत. ब-यापैकी अंधार पडला होता.मंदिरात पोहोचता पोहोचता वाटेत संघाच्या मुलांचा एक ग्रुप भेटला. त्यातल्या दोघा तिघांनी इथे एक वाघ फ़िरतोय,कालच रात्री इथे एक गाय मारलीय ,तुम्ही चोघेच आहात,तेंव्हा काळजी घ्या वगैरे सांगून आमची पार तंतरून टाकली.आता वाघ वगैरे फ़िरतोय म्हंटल्यावर आम्ही सर्वचजण जाम हादरलो होतो. बरोबर कांदा कापायची सुरी सोडली तर एकहि हत्यार नव्हते.हि संघाची पोरे तर मस्त पैकी छ-याची बंदूक घेउन फ़िरत होते. आता काय करायचे अशाच विवंचनेत सर्व मंडळि होती. कोंडेश्वराच्या मंदिरातच स्वयंपाक उरकून जेवणॆ करून घेतली.मंदिराला तेंव्हा दार वगैरे नव्हते.त्यामूळॆ गाभा-यात झोपायचे ठरले. आत जाउन बघितले तर गाभा-यालाही दरवाजा नाही.एक मोठा पत्रा लावून गाभारा बंद करायचि सोय. तोच पत्रा कसाबसा आतून उभा केला.त्याला आधाराला आमच्या सैक लावल्या. दिवसभर भटकल्यामुळे सगळॆच जण दमले होते.तरी पण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आळीपाळीने जागायचे ठरवले. प्रत्येकी ३ तास जागायचे ठरले.एकाला आधीच ताप चढला होता,त्याने हे जागणॆ वगैरे आपल्याला जमणार नाही म्हणून हात वरती केले. त्यामुळे राहीलो आम्हि ३ जणच.माझी जागायची वेळ रात्री १२ ते ३ अशी ठरली.मी ३ वाजता दुस-याला उठवायचे आणी बाकी त्याने सांभाळायचे ठरले. त्याप्रमाणे आमची निजानीज झाली. आमचा पहीला जागणारा चाप्टर निघाला.त्याने १०.३० वाजताच मला उठवून बारा वाजले आता तुझी पाळि म्हणुन स्वत: झोपी गेला. मी पण आपला उठून पहारा देत बसलो.बर गाभा-यात तर गुडूप अंधार.एक वातीचा दिवा जळत ठेवला होता. खुद्द गाभा-यातच झोपलो होतो त्यामूळॆ सिगारेट वगैरे प्यायची काहि हिंमत झाली नाही.बाहेरून चित्रविचित्र आवाज येत होते. उगाच नसते भास होत होते.माझी तर पार तंतरून गेली होती. कशीबशी ३ वाजायची वाट पहात बसलो.आता वाजतील,मग वाजतील करत अंदाजे ३ एक तासाने पुढच्याला उठवायला गेलो.त्याने हातातले घड्याळ पाहून मला सांगितले कि आताशी १ वाजतोय.मी ३ वाजल्याशिवाय उठणार नाही. मी पहिल्यावर चडफ़डत परत ३ वाजायची वाट पहात बसलो.३ वाजता त्याला उठवायला गेलो तर भाई मुडद्यासारखा झोपला होता.अजिबात दाद देइना. आताशा मलाही झोप अनावर होत होती,बसल्या बसल्या तशीच झोप लागली.पहाटे ६ च्या आसपास गावक-यांच्या आवाजाने जाग आली. बाहेर ब-यापैकी उजाडले होते.बाहेर येउन पहिले गावक-यांकडे चौकशी केली.तेंव्हा तिथे वाघ वगैरे असला काही प्रकार नाही कळाले. आपला जाम पोपट झाला हे पाहून फ़ार चिडचिड झाली.लगिच आत येउन ह्या बाकीच्यांना लाथा घालुन उठवले. रात्रभर झोप नाही.आधिच २ दिवसाचे कष्ट.पाहून ढाकची भैरी रद्द करायचा निर्णय घेतला.काय सांगा ढाक करून परत येता येता संध्याकाळ व्हायची आणि परत इथे मुक्काम करायला लागायचा. तसेच तिकडुन जांबोरीला जाउन ST ने तळॆगांव व तिथून लोकलने घर गाठले. त्यांनंतर ढाक भैरी करायचा योग परत काही आला नाही.या आधी २ वेळा तिथे गेलो होतो.परंतु चतुरंग हयांनी म्हंटल्या प्रमाणॆ कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ह्याच्याशी १००% सहमत. आम्ही पायथ्यापर्यंत पोहोचलो खरे पण थोडेसे स्थूल असल्यामुळॆ गुहेत प्रवेश करताना जाम लागली होती.तो प्रकार काही जमला नाही. त्या गुहेत नक्की काय आहे हे आज आपले फ़ोटो पाहून कळाले. अभिज्ञ .
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

२६ जुलै २००५ एक अनुभव !!

अमोल केळकर ·

विसोबा खेचर 26/05/2008 - 14:33
केळकरसाहेब, सुरेख, चित्रदर्शी अनुभवकथन..! आपण छानच लिहिलं आहे. २६ जुलै २००५ चा तो पाऊस सर्वच मुंबईकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील. अक्षरश: अक्राळविक्राळ प्रलय! दुसरे शब्दच नाहीत...! मीही त्या दिवशी पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी ते ठाणे चालत घरी आलो होतो. रात्री दहाचा सुमार असेल. रस्त्यावर मिट्ट अंधार, वरून अक्षरश: ढगफुटीसारखा कोसळणारा तो पाऊस, आणि सोसाट्याचा वारा अश्या अवस्थेत आम्ही काही पादचारी एकमेकांचा हात धरून रस्त्यावरून चाललो होतो. मधुनच कानठळ्या बसवणारी खणकन वीज चमके आणि त्या प्रकाशात क्षणभरच काय तो रस्ता उजळून निघे व रस्त्यावरून चालणारी इतर माणसे दिसत. पुढच्याच क्षणी पुन्हा मिट्ट अंधार! मी त्याचा आणि त्याने माझा हात धरला होता व आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेत हळूहळू मार्गक्रमणा करत होतो. मला त्या माणसाचे नावही माहीत नव्हते, ना कधी पूर्वायुष्यात त्याला भेटलो होतो, तरीही त्या क्षणी मला त्याचा खूप आधार वाटत होता! एवढ्या प्रलयसदृष परिस्थितीत एरवी केवळ एक अनोळखी चेहेरा असलेल्या किंवा माणसांच्या अफाट गर्दीत चेहेराच हरवलेल्या मुंबई शहरात माणूसकीची एक वेगळीच झलक त्या दिवशी पाहायला मिळाली, अनुभवता आली! ओळख ना पाळख नसलेली माणसं आपापल्या भागात येणारा कुणी पांथस्थ पुरात वाहून जाऊ नये म्हणून रात्रभर पावसात भिजत रस्त्यात साखळी करून उभी होती! आजूबाजूच्या इमारतीमधली माणसं येणार्‍याजाणार्‍यांना चहापाणी, बिस्किटं वगैरे देत होती! आधार देत होती, सांभाळून घेत होती! असो... आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

ऍडीजोशी 26/05/2008 - 15:28
अरे नका आठवण करून देउ त्या दिवसाची. दर वेळी पावसाळा जवळ आला की कुणी ना कुणी आपत्या 'त्या' दिवशीच्या आठवणी लिहायला घेतं. २००५ नंतरची २ वर्ष तर जरा जोरात पाऊस आला की असल्या मेल्सचाही पाऊस पडत असे. अम्ही कसे अडकलो नी सुटलो ह्याच्या कहण्यांना ऊत येई. (हे पर्सनली घेउ नये) मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये. हायवेवर दुसर्‍या दिवशी उलटून पडलेले ट्रक्स, बसेस, गाड्या, सफाचट झालेल्या झोपडपट्ट्या, मरून पडलेली गुरं, माणसं मी पाहिलेली आहेत. क्रुपा करून त्या आठवणी पुन्हा नकोत. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अमोल केळकर 26/05/2008 - 17:14
खरं आहे आपण जे म्हणता ते. नकोतच त्या वाईट आठवणी. मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये सहमत आपला (नुकतेच ग्राउंड फ्लोवरला घर घेतलेला) केळकर

ठणठणपाळ 26/05/2008 - 23:19
त्या वेळी मी नुकताच मुम्बई विद्यापीठात एम्.एस्सी करायला आलो होतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच हॉस्टेलमधे रूम मिळाली होती. हॉस्टेलमधेच असल्यामुळे आम्ही सुरक्षीत राहिलो. खाण्यापिण्याचे मात्र हाल झाले. त्यावेळी ८० जणांसाठी असलेल्या हॉस्टेलमधे ३०० हून जास्त मुलं राहिली होती. ़जी मुलं घरी जाण्यासाठी दुपारी कॅम्पसमधून बाहेर पडली त्यांची अवस्था फार वाईट झाली. टिटवाळ्याच्या पुढे राहणारी आमच्या वर्गातील एक मुलगी २८ तारखेला रात्री घरी पोहचली. माझ्या काही काही मित्रांनी २६ तारखेची रात्र बसच्या टपावर बसून काढली.

शितल 27/05/2008 - 04:51
टीव्हीवर बातम्यात पाहुन होते, असे अनुभव वाचल्यावर तर त्या परिस्थितीत मु॑बईकर ज्या पध्द्तीने समोरे गेले त्याची दाद द्यायला पाहिजे. तुम्ही छान शब्दात अनुभव मा॑डला आहेत. २६ जुलै हादिवस प्रत्येक मु॑बईकर का प्रत्येक महाराष्ट्रीयन विसरू शकणार नाही.

मदनबाण 27/05/2008 - 08:48
हो तो दिवस मीही विसरु शकत नाही,,त्या वेळी मी वसई ला कामाला होतो...संध्याकाळ झाली होती..पाऊस थांबता थांबत नव्हता..मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना विचारले की मी तर आता निघतोय...कोणी येतय का माझ्या बरोबर्?,,हो, नाही करता करता बराच वेळ गेला...शेवटी मी एकटाच निघालो..स्टेशनवर पोहचल्यावर मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना फोन करुन लोकलची स्थिती काय आहे हे सांगणार होतो..१५ मिनिटे त्या तुफान पावसात पायपीट करत वसई रेल्वे स्टेशन ला पोहचलो..पादचारी पुला वरुन खाली पाहिल्या वर खाली पाहिले तर ही तोबा गर्दी.....बराच काळ एकही लोकल न आल्याची मला खात्रीच पटली...अनेक परगावी जाणार्‍या गाड्या स्थानकावर थांबुन होत्या..या गर्दीत माझा काही पाडाव लागणार नाही याची मला खात्री पटली..मी ऑफिस मधे असलेल्या माझ्या सहकार्‍यांना लगेच फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली..आणि मी हे हे सांगितले की मी आता वसई एस टी आगारात जाणार आहे व तेथुन ठाण्याला जाणारी बस धरणार आहे.परत माझी पायपीट सुरु झाली..मोबाईल नेटवर्क फ्रीझ होत चालले होते..कारण कॉल करताना बर्‍याच वेळा कट होत होता किंवा तो लागतच नव्हता..... सरते शेवटी बस डेपो आला...तिथही तोबा गर्दी धावपळ करुन कुठली बस कुठे चालली आहे याची चौकशी केली..माझे नशीब जोरात असावे कारण ठाण्याला जाणारी बस लगेच लागली..व त्या गर्दीत बसायला ही मिळाले.. बसचा प्रवास सुरु झाला.... प्रत्येक ठिकाणी रस्तावर तुडुंब पाणी भरलेले होते...बस ड्रायवर तर अगदी सावकाश गाडी चालवत होता..आणि बहुधा त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच कारण रस्त्यावर एवढे पाणी जमा झाले होते की आता तो एखाध्या तळ्यामधुनच गाडी हाकत होता....बर आपल्या या संपंन्न देशात अजुन तरी खड्डा मुक्त असा रस्ता कोणी दाखवु शकणार आहे का? वसई चा हा मार्ग असाच खड्ड्यांनी परिपुर्ण होता.. ऑफिस मधल्या सहकार्‍यांचा मला फोन आला..ते आता वसई बस डेपो मधे होते.. त्यांनी मला सांगितले की मी धरलेली बस ही ठाण्याला जाणारी शेवटची बस होती.....आता तेथुन अजुन बस सुटणार नव्हत्या !!!!! माझी बस आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आली...मी मनात म्हंटल की या पावसात कोठेही बंद न पडता,,पंक्चर न होता ही बस इथपर्यन्त आली हे नसे थोडके.. बस आता घोडबंदर ला आली प्रचंड वाहनांची गर्दी...पाऊण तास बस मधे तसाच बसुन काधला...शेवटी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला..अंधार्,,,गाड्यांचे दिवे आणि आभाळातील तारे हे सोबतीला घेऊन पायी पायी चालणे सुरु केले अनेक किलोमीटर चाल चाल चाललो...एका उताराच्या वळणावर आलो तर पुढे पाहतो ते काय......माझ्या गळ्यापर्यंन्त पोहचेल एवढ पाणी पुढे साचलेल होत..आता काय करणार ? मी पुर्णपणे भिजलो होतो आणि चालायचा त्राण अजिबात उरला नव्हता.....पण.. एक ट्रक अचानक तिथे आला मी त्याला हात दाखवला तो थांबला मी व अजुन दोन माणसे त्या ट्रक मधे चढलो.... ट्रक मधे आत छान पैकी डिस्को लायटिंग केलेले होते... मी चालकाशी गप्पा मारायला सुरु केल्या...(मी बोलायला सुरुवात केली की काय होत...विचारु नका..)तर माझा पहिला प्रश्न त्या चालकाला किधर से आ रहे हो? तो म्हणाला श्रीनगर से मी लगेच दुसरा प्रश्न पुढे केला ...डिझल बहोत लगता होगा? टंकी फुल होगी ना? कितना लिटर की है...तो खुष...तो म्हणाला महाराष्ट्रात येण्यापुर्वी किंवा महाराष्ट्रातुन बाहेर पडल्यावर म्हणजे साऊथ साईड ला जाताना ते इंधन भरुन घेतात...कारण महाराष्ट्रात इंधन भरणे त्यांना परवडत नाही!!!!! शेवटी माझा उतरण्याची जागा आली...ट्रक चालकाचे आभार मानले पटकन खाली उडी मारली आणि परत थोडी पायपीट करुन घरी आलो..११:४५ झाले होते...ऑफिस मधुन ४:४५ ला निघालो होतो..घरच्यांच्या जिवात जिव आला... पुढचे दोन दिवस मी धड चालुही शकत नव्हतो कारण माझे पाय माझ्याशीच भरपर गप्पा मारत होते.. :) मी ही २६ तारीख कधीच विसरु शकणार नाहीए..... (अती बडबड्या) मदनबाण.....

विसोबा खेचर 26/05/2008 - 14:33
केळकरसाहेब, सुरेख, चित्रदर्शी अनुभवकथन..! आपण छानच लिहिलं आहे. २६ जुलै २००५ चा तो पाऊस सर्वच मुंबईकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील. अक्षरश: अक्राळविक्राळ प्रलय! दुसरे शब्दच नाहीत...! मीही त्या दिवशी पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी ते ठाणे चालत घरी आलो होतो. रात्री दहाचा सुमार असेल. रस्त्यावर मिट्ट अंधार, वरून अक्षरश: ढगफुटीसारखा कोसळणारा तो पाऊस, आणि सोसाट्याचा वारा अश्या अवस्थेत आम्ही काही पादचारी एकमेकांचा हात धरून रस्त्यावरून चाललो होतो. मधुनच कानठळ्या बसवणारी खणकन वीज चमके आणि त्या प्रकाशात क्षणभरच काय तो रस्ता उजळून निघे व रस्त्यावरून चालणारी इतर माणसे दिसत. पुढच्याच क्षणी पुन्हा मिट्ट अंधार! मी त्याचा आणि त्याने माझा हात धरला होता व आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेत हळूहळू मार्गक्रमणा करत होतो. मला त्या माणसाचे नावही माहीत नव्हते, ना कधी पूर्वायुष्यात त्याला भेटलो होतो, तरीही त्या क्षणी मला त्याचा खूप आधार वाटत होता! एवढ्या प्रलयसदृष परिस्थितीत एरवी केवळ एक अनोळखी चेहेरा असलेल्या किंवा माणसांच्या अफाट गर्दीत चेहेराच हरवलेल्या मुंबई शहरात माणूसकीची एक वेगळीच झलक त्या दिवशी पाहायला मिळाली, अनुभवता आली! ओळख ना पाळख नसलेली माणसं आपापल्या भागात येणारा कुणी पांथस्थ पुरात वाहून जाऊ नये म्हणून रात्रभर पावसात भिजत रस्त्यात साखळी करून उभी होती! आजूबाजूच्या इमारतीमधली माणसं येणार्‍याजाणार्‍यांना चहापाणी, बिस्किटं वगैरे देत होती! आधार देत होती, सांभाळून घेत होती! असो... आपला, (मुंबईचा कट्टर अभिमानी!) तात्या.

ऍडीजोशी 26/05/2008 - 15:28
अरे नका आठवण करून देउ त्या दिवसाची. दर वेळी पावसाळा जवळ आला की कुणी ना कुणी आपत्या 'त्या' दिवशीच्या आठवणी लिहायला घेतं. २००५ नंतरची २ वर्ष तर जरा जोरात पाऊस आला की असल्या मेल्सचाही पाऊस पडत असे. अम्ही कसे अडकलो नी सुटलो ह्याच्या कहण्यांना ऊत येई. (हे पर्सनली घेउ नये) मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये. हायवेवर दुसर्‍या दिवशी उलटून पडलेले ट्रक्स, बसेस, गाड्या, सफाचट झालेल्या झोपडपट्ट्या, मरून पडलेली गुरं, माणसं मी पाहिलेली आहेत. क्रुपा करून त्या आठवणी पुन्हा नकोत. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अमोल केळकर 26/05/2008 - 17:14
खरं आहे आपण जे म्हणता ते. नकोतच त्या वाईट आठवणी. मुंबई आणि मुंबईकरांनी त्या दिवशी जे गमावलं ते परत मिळणं शक्य नाहीये सहमत आपला (नुकतेच ग्राउंड फ्लोवरला घर घेतलेला) केळकर

ठणठणपाळ 26/05/2008 - 23:19
त्या वेळी मी नुकताच मुम्बई विद्यापीठात एम्.एस्सी करायला आलो होतो. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच हॉस्टेलमधे रूम मिळाली होती. हॉस्टेलमधेच असल्यामुळे आम्ही सुरक्षीत राहिलो. खाण्यापिण्याचे मात्र हाल झाले. त्यावेळी ८० जणांसाठी असलेल्या हॉस्टेलमधे ३०० हून जास्त मुलं राहिली होती. ़जी मुलं घरी जाण्यासाठी दुपारी कॅम्पसमधून बाहेर पडली त्यांची अवस्था फार वाईट झाली. टिटवाळ्याच्या पुढे राहणारी आमच्या वर्गातील एक मुलगी २८ तारखेला रात्री घरी पोहचली. माझ्या काही काही मित्रांनी २६ तारखेची रात्र बसच्या टपावर बसून काढली.

शितल 27/05/2008 - 04:51
टीव्हीवर बातम्यात पाहुन होते, असे अनुभव वाचल्यावर तर त्या परिस्थितीत मु॑बईकर ज्या पध्द्तीने समोरे गेले त्याची दाद द्यायला पाहिजे. तुम्ही छान शब्दात अनुभव मा॑डला आहेत. २६ जुलै हादिवस प्रत्येक मु॑बईकर का प्रत्येक महाराष्ट्रीयन विसरू शकणार नाही.

मदनबाण 27/05/2008 - 08:48
हो तो दिवस मीही विसरु शकत नाही,,त्या वेळी मी वसई ला कामाला होतो...संध्याकाळ झाली होती..पाऊस थांबता थांबत नव्हता..मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना विचारले की मी तर आता निघतोय...कोणी येतय का माझ्या बरोबर्?,,हो, नाही करता करता बराच वेळ गेला...शेवटी मी एकटाच निघालो..स्टेशनवर पोहचल्यावर मी माझ्या ऑफिस मधल्या सहकार्‍यांना फोन करुन लोकलची स्थिती काय आहे हे सांगणार होतो..१५ मिनिटे त्या तुफान पावसात पायपीट करत वसई रेल्वे स्टेशन ला पोहचलो..पादचारी पुला वरुन खाली पाहिल्या वर खाली पाहिले तर ही तोबा गर्दी.....बराच काळ एकही लोकल न आल्याची मला खात्रीच पटली...अनेक परगावी जाणार्‍या गाड्या स्थानकावर थांबुन होत्या..या गर्दीत माझा काही पाडाव लागणार नाही याची मला खात्री पटली..मी ऑफिस मधे असलेल्या माझ्या सहकार्‍यांना लगेच फोन केला आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली..आणि मी हे हे सांगितले की मी आता वसई एस टी आगारात जाणार आहे व तेथुन ठाण्याला जाणारी बस धरणार आहे.परत माझी पायपीट सुरु झाली..मोबाईल नेटवर्क फ्रीझ होत चालले होते..कारण कॉल करताना बर्‍याच वेळा कट होत होता किंवा तो लागतच नव्हता..... सरते शेवटी बस डेपो आला...तिथही तोबा गर्दी धावपळ करुन कुठली बस कुठे चालली आहे याची चौकशी केली..माझे नशीब जोरात असावे कारण ठाण्याला जाणारी बस लगेच लागली..व त्या गर्दीत बसायला ही मिळाले.. बसचा प्रवास सुरु झाला.... प्रत्येक ठिकाणी रस्तावर तुडुंब पाणी भरलेले होते...बस ड्रायवर तर अगदी सावकाश गाडी चालवत होता..आणि बहुधा त्याच्या कडे दुसरा पर्याय नव्हताच कारण रस्त्यावर एवढे पाणी जमा झाले होते की आता तो एखाध्या तळ्यामधुनच गाडी हाकत होता....बर आपल्या या संपंन्न देशात अजुन तरी खड्डा मुक्त असा रस्ता कोणी दाखवु शकणार आहे का? वसई चा हा मार्ग असाच खड्ड्यांनी परिपुर्ण होता.. ऑफिस मधल्या सहकार्‍यांचा मला फोन आला..ते आता वसई बस डेपो मधे होते.. त्यांनी मला सांगितले की मी धरलेली बस ही ठाण्याला जाणारी शेवटची बस होती.....आता तेथुन अजुन बस सुटणार नव्हत्या !!!!! माझी बस आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आली...मी मनात म्हंटल की या पावसात कोठेही बंद न पडता,,पंक्चर न होता ही बस इथपर्यन्त आली हे नसे थोडके.. बस आता घोडबंदर ला आली प्रचंड वाहनांची गर्दी...पाऊण तास बस मधे तसाच बसुन काधला...शेवटी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला..अंधार्,,,गाड्यांचे दिवे आणि आभाळातील तारे हे सोबतीला घेऊन पायी पायी चालणे सुरु केले अनेक किलोमीटर चाल चाल चाललो...एका उताराच्या वळणावर आलो तर पुढे पाहतो ते काय......माझ्या गळ्यापर्यंन्त पोहचेल एवढ पाणी पुढे साचलेल होत..आता काय करणार ? मी पुर्णपणे भिजलो होतो आणि चालायचा त्राण अजिबात उरला नव्हता.....पण.. एक ट्रक अचानक तिथे आला मी त्याला हात दाखवला तो थांबला मी व अजुन दोन माणसे त्या ट्रक मधे चढलो.... ट्रक मधे आत छान पैकी डिस्को लायटिंग केलेले होते... मी चालकाशी गप्पा मारायला सुरु केल्या...(मी बोलायला सुरुवात केली की काय होत...विचारु नका..)तर माझा पहिला प्रश्न त्या चालकाला किधर से आ रहे हो? तो म्हणाला श्रीनगर से मी लगेच दुसरा प्रश्न पुढे केला ...डिझल बहोत लगता होगा? टंकी फुल होगी ना? कितना लिटर की है...तो खुष...तो म्हणाला महाराष्ट्रात येण्यापुर्वी किंवा महाराष्ट्रातुन बाहेर पडल्यावर म्हणजे साऊथ साईड ला जाताना ते इंधन भरुन घेतात...कारण महाराष्ट्रात इंधन भरणे त्यांना परवडत नाही!!!!! शेवटी माझा उतरण्याची जागा आली...ट्रक चालकाचे आभार मानले पटकन खाली उडी मारली आणि परत थोडी पायपीट करुन घरी आलो..११:४५ झाले होते...ऑफिस मधुन ४:४५ ला निघालो होतो..घरच्यांच्या जिवात जिव आला... पुढचे दोन दिवस मी धड चालुही शकत नव्हतो कारण माझे पाय माझ्याशीच भरपर गप्पा मारत होते.. :) मी ही २६ तारीख कधीच विसरु शकणार नाहीए..... (अती बडबड्या) मदनबाण.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता काही दिवसात पाऊस चालु होईल. पावसाळा हा सर्वांना आवडतो. माझ्यासकट सर्वांच्या रम्य आठवणी पावसाशी निगडीत असतात मग ते पावसात मनसोक्त भिजणे असो वा केलेला एखादा सुंदर प्रवास असो. २६ जुलै २००५ पासुन मात्र मुंबईकरांना पाऊस म्हणले की एक प्रकारची सुप्त भीती वाटू लागली आहे. 'न भुतो न भविष्यती!' अशा प्रकारचा झालेला पाऊस जो मी अनुभवला तो शेअर करण्याचा एक प्रयत्न .