✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माणसं अशी का वागतात?

च — चतुरंग, Sat, 05/31/2008 - 00:43

प्रतिक्रिया द्या
8907 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ध
धनंजय Sat, 05/31/2008 - 00:58 नवीन

हळवे भाव

हळवे भाव व्यक्त करणारी कविता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/31/2008 - 07:28 नवीन

+१

असेच म्हणतो..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मन Mon, 06/02/2008 - 19:15 नवीन

++१

खुपच आवडली कविता. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मुक्तसुनीत Sat, 05/31/2008 - 01:07 नवीन

प्रतिक्रिया

चतुरंग यांच्या कवितेमधे काही मुक्तचिंतनपर लिखाणाची बीजे आहेत. कवितेत त्या विचारांना बसविताना त्यांना पुरेसा न्याय दिला गेला नाही असे मला वाटले. माणसामाणसांमधले संबंध , त्या संबंधांमधे कधी दिसणारी अतार्किकता या बाबत एक उत्तम लेख ते लिहू शकतील. कवितेची बांधणी, गोळीबंदपणा, मुख्य म्हणजे , काव्यगुण या बाबतीमधे थोडा अपुरेपणा जाणवला.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 05/31/2008 - 01:52 नवीन

काहीसे असेच वाटते आहे

कविता बव्हंशी गद्याळ झाल्याने हेच विचार गद्य लेखनातून अधिक प्रभावीपणे मांडता आले असते, असे वाटून गेले. चूभूद्याघ्या (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विकास Sat, 05/31/2008 - 03:02 नवीन

फार आवडली

आपल्या कविता आवडतातच, पण ही फार आवडली. वपु काळ्यांचे या अर्थाचे वाक्य आठवले: बहुतांशी माणसे ही तीन शब्दांसाठी जगतात - लोक कायं म्हणतील? तसेच म्हणावेसे वाटतात की भावनाप्रधान/हळवी माणसे आपल्या कवितेतील तीन शब्दांचे प्रश्नार्थक वाक्य, कधीकधी झुरत जगतात...
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sat, 05/31/2008 - 05:50 नवीन

आवडली.

कायमचा प्रश्न. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 06:59 नवीन

सुरेख..

वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? हम्म, अगदी खरं! दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? या ओळी सर्वात सुंदर! फार बोलकी कविता केली आहेस रे रंगा! उद्या कदाचित या जगात अगदी प्रत्येक रोगावर जालीम आणि हमखास गुण येणारं औषध सापडेल, परंतु माणसाच्या स्वभावाला मात्र औषध सापडणं केवळ अशक्य आहे! :) असो.. सुरेख कविता! तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 07:22 नवीन

रंगा,

रंगा, एक सांगायचं विसरलो. तुझी कविता मला आवडली परंतु मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे यावर एखाद्या चांगला मुक्तचिंतनपर लेखही नक्कीच होऊ शकेल. तुला लिहावासा वाटला तर अवश्य लिही... आपला, (गद्य) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वरदा Sat, 05/31/2008 - 07:35 नवीन

मस्त

खूप छान लिहिलेय दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? अगदी खरं...एक आई मरत असताना तिच्याशी भांडून तिला न भेटणारी तिची सख्खी लेक पाहिलेय मी...अगदी हाच प्रश्न पडला होता की इतकी निष्ठुर कशी असु शकतात माणसं......
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/31/2008 - 09:11 नवीन

सही!!

छान लिहिलय. एकदम आवडलं. ह्या ओळी वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? खासच!!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/31/2008 - 09:25 नवीन

माणसं अशी का वागतात?

दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? आम्ही तर मरणशय्येवर असतांना म्हणू, "केले झाले क्षमुनी सगळे, तोडी संसारपाशा" माणसं सल का धरतात? आम्हांला वाटते की, कारण माणसं अप्रामाणिक असतात, स्वतःशी आणि इतरांशीही!! आमचं आपलं मत!! कविता झकासच झालीय!! चतुरंगजी, बक अप!!
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 05/31/2008 - 09:29 नवीन

सहमत!!

माणसं सल का धरतात? आम्हांला वाटते की, कारण माणसं अप्रामाणिक असतात, स्वतःशी आणि इतरांशीही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
वरदा Sat, 05/31/2008 - 09:35 नवीन

बरोबर

अगदी बरोबर काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/31/2008 - 11:52 नवीन

++१

;;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/02/2008 - 19:07 नवीन

माझ्या एका

जवळच्या व्यक्तीचे ३० मे २००८ रोजी अकाली निधन झाले. ती बातमी ऐकून, आजूबाजूच्या नात्यातल्या माणसांचे विचार ऐकून, आमच्या सर्वांतल्या नातेसंबंधांच्या कित्येक वर्षांच्या आठवणींचा पट मनात उलगडत गेला आणि त्यावेळी मनात उठलेले काहूर शब्दबद्ध करण्याखेरीज इलाज नव्हता. वरील कविता ही जवळ जवळ एकटाकी (किंवा एककळफलकी म्हणूयात) अशी लिहिली गेली. मनातून सांडणारे विचार तसेच उतरत गेले. नंतर वाचताना काही ठिकाणी गद्याचा आभास होतोय असे वाटले पण त्यात संपादन करुन नैसर्गिकता हरवायची भीती वाटली. त्यामुळे तसेच ठेवले. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांमागचा आशय समजला. ह्यावर काही गद्यही लिहिता आले तर विचार करुन ठेवीनच. सर्व आस्वादकांचे आभार. चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 06/02/2008 - 19:39 नवीन

कविता फारच आवडली.

अतिशय सुंदर कविता. ++१ अभिज्ञ
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 19:45 नवीन

कविता आवडली..

कविता ,कवितेतला विचार आवडला.ती कशी लिहिली गेली हे सांगितलेत त्यामुळे वेगळ्याच दृष्टीने वाचता आली. वयानं मोठी होताना, विचारानं लहानंच राहतात सुशिक्षित होताना, सुसंस्कृत व्हायचं का विसरतात? दारातही मरणाच्या सल मनात धरुन ठेवतात धावा करायच्या वेळी, दावा कसा उभा करतात? विशेष भावल्या. स्वाती
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Fri, 03/27/2020 - 20:10 नवीन

भिडणारं काही..

नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळे आणिक भेदून जातेय... :-(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा