मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संतापजनक भाऊबंदकी

हुप्प्या ·

हुप्प्या 05/04/2014 - 21:50
केतकरांशी मी कधी सहमत असेन असे वाटले नव्हते. पण ह्याच विषयावर त्यांचा हा अग्रलेख. http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-divya-marathi-4571012-NOR.html

खटपट्या 06/04/2014 - 01:02
कंटाळा आला आहे दोघांची भांडणे ऐकून. शिवसेनेचे मनसे बरोबर पटत नाही भाजपचे शिवसेनेशी पटत नाही कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नाही मनसे चे भाजप बरोबर पटते पण एकत्र येवू शकत नाहीत कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नसताना दूर जाऊ शकत नाहीत आप चे कोणाबरोबरही पटत नाही. पण एक हाती सत्ता आणण्याएवढी ताकद नाही. मतदार गोंधळलेला आहे

विवेकपटाईत 06/04/2014 - 09:57
जगाची रीत आहे. दिल्लीत एक म्हण आहे 'बादशाह के बेटों के नसीब मे या तो तख्त (सिंहासन) होता है तख्ता . भावांना मारल्याशिवाय गादी मिळणे अशक्य. महाभारतापासून चालत आलेली रीत आहे. आता युद्ध होत नाही तर तोंडी शस्त्र चालतात. त्यात नवल काय. अनेक उदाहरणे आहेत शिंदे भाऊ बहिण, राहुल आणि वरूण (एकाला वारसा मिळाला आणि एकाला वनवास)

श्रीगुरुजी 06/04/2014 - 11:02
राज ठाकरे पवारांच्या योजनेनुसार काम करत आहे असं दिसतंय. एकीकडे पवारांना अचानक राजप्रेमाचा उमाळा आला आहे व गेल्या काही दिवसांपासून ते राज व मनसेवर स्तुतीसुमने उधळण्यात मग्न आहे. दुसरीकडे वडे, सूप, कोणी कोणाला फोन करून असे पूर्णपणे विसंगत विषय भाषणात आणून राज प्रचार भलतीकडेच नेण्यात यशस्वी झाला आहे. राजच्या योजनेला उद्धव बळी पडल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीतले मुख्य मुद्दे सोडून उद्धवला भलत्याच विषयांवर बोलणे भाग पडत आहे. मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मारकुटे 06/04/2014 - 12:42
>>>मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. अगदी योग्य !!

In reply to by मारकुटे

श्रीगुरुजी 06/04/2014 - 22:07
अगदी २ महिन्यांपूर्वीपर्यंत मनसे पक्ष म्हणून संपल्यातच जमा होता. युती व आघाडी अशा दोघांनीही मनसेला आपल्यात घेतले नव्हते. मुळात मनसेला जेमतेम ५-६ टक्के मिळाली होती. 'आप'च्या उदयानंतर महाराष्ट्रात मनसेला सुद्धा अजून एक पर्याय निर्माण होऊन मनसे पूर्णपणे निष्प्रभ पक्ष झाला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. युतीबरोबर समझोता करण्याचा पक्षांतर्गत दबाव वाढत होता. अगदी अशा नेमक्या वेळी थोरले पवार मनसेच्या मदतीला धावून आले. पक्षाची परवानगी न घेता गडकरींनी राजची भेट घेऊन राजला विनाकारण महत्त्व प्राप्त करून दिले. मनसेने लोकसभा निवडणुक लढवू नये अशी गडकरींनी अत्यंत अव्यहार्य व अतर्क्य विनंती राजला करून पूर्णपणे निष्प्रभ झालेल्या पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली व मनसे हा गंभीर दखल घेण्याजोगा पक्ष आहे असे वातावरण निर्माण केले. गडकरींनी हे पवारांच्या सूचनेनुसारच केले असावे. त्यानंतर पुण्यात सभेसाठी मैदान द्यावे असा स. प. महाविद्यालय व्यवस्थापनावर आर आर पाटलांनी दबाव आणून सेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेला सभा घेण्यासाठी मैदान मिळवून दिले. नंतर गेले काही दिवस थोरले पवार मनसेवर स्तुतीसुमने उधळत आहेत. गडकरी व पवारांचे साटेलोटे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी मनसेला आतून मदत करत आहे हेदेखील लपून राहिलेले नाही. फक्त सेना-भाजपच्या मतांमध्ये फूट पाडणे या एकमेव उद्देशासाठीच मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीने जन्माला घातलेले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे युतीचे १० उमेदवार पडले होते. तर विधानसभा निवडणुकीत मनसेच्या १३ व मतांच्या विभाजनामुळे अजून २५ अशा तब्बल ३८ जागांवर युतीचा पराभव झाला होता. गुहागरची हमखास जागासुद्धा गडकरींमुळे राष्ट्रवादीकडे जाऊन युतीने ३९ वा आमदारही घालविला. मनसे नसती तर २००९ मध्ये युती १३३ व आघाडी ११८ अशी स्थिती झाली असती व युतीला सरकार स्थापनेसाठी जोरदार संधी मिळाली असती.

जातवेद 06/04/2014 - 11:58
ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे.
म्हणजे काय कॉग्रेस ला मतदान करायचे म्हणता?

In reply to by जातवेद

हुप्प्या 06/04/2014 - 22:07
सुदैवाने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम आदमी पार्टी आहे, कित्येक ठिकाणी अन्य अपक्ष लोकही चांगले आहेत. पण असल्या स्वार्थी, निव्वळ नातेसंबंधावर आधारित हेव्यादाव्यांपेक्षा काँग्रेस वा राष्ट्रवादी बरी. असे वागून चालणार नाही इतपत धडा ह्या उन्मत्त नेत्यांना मिळावा अशी इच्छा आहे. जिथे लोकांना चार पाच किलोमीटर चालून, पायपीट करून मुलाबाळांना पाणी पाजता येते तिथे ह्यांची त्यांच्या मरणासन्न नेत्याला चिकनसूप कोणी पाजले ह्याची अहमहिका लागली आहे. उन्हाळा तोंडावर आलेला असताना जनतेला ह्या गोष्टीचे सोयरसुतक का असावे?

म.न.से, शिवसेना व बी.जे.पी ह्या व्यतिरिक्त कुणा चौथ्याला मत म्हणजे काँग्रेसला मत. आणि पुन्हा म.न.से,शिवसेना व बी.जे.पी ह्यामधील कुणा एकाला मत म्हणजे मतविभागणी. म्हणजे पुन्हा काँग्रेसलाच मत. ह्या त्रांगड्यामुळे काँग्रेसला जणु फीहीटच मिळाली आहे आणि निवडणुकीआधीच महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळाला आहे.

शिद 07/04/2014 - 17:07
अगदी मनातले लिहीले आहे... काय तो बाष्कळ्पणा चालवलाय दोघांनी. कोणाला काय फरक पडणार आहे ह्यांच्या घरातल्या अंतर्गत कुरबूरीचा. विकास काय केला कींवा काय करणार ह्या बद्दल चकार शब्द नाही फक्त ऐकमेकांवर चिखलफेक... बस्स्स.

चिरोटा 07/04/2014 - 17:30
तरी नशीब ह्यांच्या सभांना 'लाखांची गर्दी होत नाही व दोघांनाही राष्ट्रीय स्तरावर नगण्य किंमत आहे.

भाऊबंदकी हा मराठी लोकांना असलेला शापचं आहे. बस योग्य उमेदवाराला मतं द्या. जे साठ वर्ष सत्ता उपभोगुन सुद्धा विकास करु शकले नाही आणि पुढ्च्या वेळेला विकासासाठी आम्हालाच संधी द्या म्हणत आहेत त्यांना अथवा त्यांच्या पिल्लावळीला मत द्यायचं का नाही ते सुज्ञपणे ठरवा. आपण किती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स भरतो आणि त्यातुन कोणाचा विकास होतोय त्याच्यावर एक विचार होऊन जाऊ दे. :).

ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे. >>> पण यामुळे युतिची सत्ता स्थापनेची सन्धी जाइल आणि परत त्याचा फायदा कोन्ग्रेसलाच होइल. त्यापेक्शा आत्ता युतीसाथी मत देउन नन्तर होणार्या विधान्सभा निवड्णुकीत ह्या दोघान्ना धडा शिकवावा.

आयुर्हित 18/04/2014 - 20:29
माझ्या मते, राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे डोहाळे लागलेले आहेत, असेच दिसते उद्धव-राज एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे व माझ्यात कुठलेही घरगुती वाद नसून राजकीय मतभेद आहेत आणि भविष्यात कदाचित आम्ही एकत्र येऊही शकतो असे उद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत काढले आहेत. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे काहीही घडू शकते हे सांगताना उद्धव-राज एकत्र येऊही शकतात असे सूचक विधान करून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून आपले खासदार त्यांना बिनशर्त पाठिंबा देतील असे सांगत भाजपाला आपला पाठिंबा नाही व राजनाथ सिंहांना आपण महत्त्व देत नाही याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. यंदा अकरा जागांवर मनसे लोकसभेच्या निवडणुका लढवत असून त्यातील केवळ दोन जागांवर त्यांचा सामना भाजपाच्या उमेदवाराशीही आहे. बाकी ठिकाणी मनसे व शिवसेना आमने सामने आहे. भाजपाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात असले तरी मी मला पाहिजे त्या ठिकाणी उमेदवार दिल्याचे व माझी काय ताकद आहे हे निवडणुकीनंतर दिसणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

In reply to by आयुर्हित

बालगंधर्व 21/04/2014 - 16:56
भौ बनदकीए असले तरे मननेय बलासहेब थकरे गेलयापासुन शिवसेनाअमधये रम रहिला नहे. उह्दव थक्रे हे नेमी बयकासारके भनदत असतत. हेनी अस केला तेने तस केला. अमाला असा अवदत नहे. अमला तसा अवदत नहे. कुहुप बोर होताआ त्यनच भशन अयकुन. तयपेश्का राज थाक्रे च्नग्ले अहेत. ते जे बोतलाआत, ते क्रुन दकवतात. अनि जरे इथे कितिहि भनद्ले हे लोक तरे शेवते निवदुन अले/ तर मोदिसहेब प्रन्तप्रधन होनर अहेत. शरद पवर सहेब अता महतरे झलेत.

दुश्यन्त 21/04/2014 - 17:42
२००९ला मनसेचे जे आकर्षण मतदारांना होते ते आता राहिले नाही.माझे आमदार विधानसभेत ह्याव करतील त्यांव करतील वगैरे राज ठाकरे म्हणत असत.त्यांचे जे १२-१३ आमदार निवडून आले ते सभागृहात आणि बाहेर सेटिंग करत असतात. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला मदत, मुंबई-ठाणे मनपा मध्ये कॉंग्रेस-एनसीपीला मदत,नाशिकमध्ये सत्ता असून प्रभाव पाडता न येणे, टोल वगैरे आंदोलन करून मध्येच माघार घेणे यामुळे मनसेचा जोर ओसरला आहे. राज यांच भाषण तरी काय असत. त्रासिक चेहऱ्याने टीका करायची, नकला, शिव्या, मध्येच बाळासाहेबांचा येणारा उमाळा.लोक पण आता कंटाळले म्हणून सभांना पूर्वीसारखी गर्दी होत नाही त्यामुळे काही सभा बंद कराव्या लागल्या.मोदींमुळे युवा मतदार महायुतीकडे वळतोय म्हणून हे पण मोदी मोदी करत आहेत. आणि राजनाथसिंह कोण असे राज यांनी विचारणे म्हणजे खरोखर जोक आहे.मोदीना पंतप्रधान करण्यासाठीच मत द्यायचं तर मग अधिकृत महायुतीच्या उमेदवाराला का मत देवू नये असा प्रश्न मतदारांनी विचारण्यपूर्वी मनसेचे कार्यकर्तेच एकमेकांना विचारात असतील.एकूण मनसे आणि राज ठाकरे म्हणजे संभ्रम अशी लोकांची धारणा होताना दिसतेय.राज ठाकरेंनी मोदीनामाचा आधार न करता (आणि केवळ शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे न करता) प्रामुख्याने सत्ताधारी आघाडीला लक्ष्य करून प्रचार केला असता तरी मनसे केवळ शिवसेनेला अपशकून करण्यासाठीच राजकारण करत आहे अशी लोकांची धारणा झाली नसती. मात्र हे न झाल्याने आता मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस आघाडीला सपोर्ट हे समीकरण लोकांना पटवून देण्यात महायुती बर्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे.

In reply to by दुश्यन्त

सुरुवातीला स्वतः अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.वेळ पडली तर मारामारी,हाणामारी करून प्रसिद्ध व्ह्यायचा प्रयत्न करायचा. ईतर राज्यांत जनतेने तेथील स्थानिक राजकिय पक्षांना निवडून दिले.द्रमुक असो वा तृणमूल वा बिजु जनता. हा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात कधी यशस्वी का नाही झाला? केवळ टगेगिरी किती काळ करणार? (महाराष्ट्रात केव्हातरी स्थानिक पक्ष सत्तेवर येतील अशा आशेवर असणारी) माई

दुश्यन्त 21/04/2014 - 18:17
शिवसेना, मनसे आणि एनसीपी हे राज्यातले स्थानिक पक्षच आहेत.म्हणायला एनसीपीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असला तरी तो पक्ष स्थानिकच (खास करून प महाराष्ट्रात अस्तित्व असणारा) आहे. आणि एनसीपी मधील नेत्यांचे प्रताप (भ्रष्टाचार, जमिनी हडपणे, बेताल वक्तव्ये आणि जातीयवाद (मराठा सोडून इतर जाती जसे कि ओबीसी, दलित, ब्राह्मण यांचा छुपा/उघड विरोध, संभाजी बीग्रेडला रसद वगैरे)) या गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यात एकवेळ कॉंग्रेस परवडली पण एनसीपी नको असे वाटते. अर्थात एनसीपी आणि कॉंग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आर पी आय महायुती सत्तेत यायला हवी. भाकरी पालटायला हवी अन्यथा आपण काहीही केले तरी निवडून येतो या भ्रमामुळे सत्ताधार्यांचे प्रताप वाढत जातील. मनसे महायुती बरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी जाइल कि नाही माहित नाही मात्र निवणुकीनंतर महायुती + मनसे एकत्र सत्तेत येतील अशी शक्यता वाटते.असे झाले तर शिवसेना आणि मनसे हे स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता आहे. तरी राष्ट्रीय पक्षांना (भाजप/कॉंग्रेस) बरोबर न घेता स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता महाराष्ट्रात खूप कमी आहे.

हुप्प्या 05/04/2014 - 21:50
केतकरांशी मी कधी सहमत असेन असे वाटले नव्हते. पण ह्याच विषयावर त्यांचा हा अग्रलेख. http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-divya-marathi-4571012-NOR.html

खटपट्या 06/04/2014 - 01:02
कंटाळा आला आहे दोघांची भांडणे ऐकून. शिवसेनेचे मनसे बरोबर पटत नाही भाजपचे शिवसेनेशी पटत नाही कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नाही मनसे चे भाजप बरोबर पटते पण एकत्र येवू शकत नाहीत कोन्ग्रेस चे राष्ट्रवादी बरोबर पटत नसताना दूर जाऊ शकत नाहीत आप चे कोणाबरोबरही पटत नाही. पण एक हाती सत्ता आणण्याएवढी ताकद नाही. मतदार गोंधळलेला आहे

विवेकपटाईत 06/04/2014 - 09:57
जगाची रीत आहे. दिल्लीत एक म्हण आहे 'बादशाह के बेटों के नसीब मे या तो तख्त (सिंहासन) होता है तख्ता . भावांना मारल्याशिवाय गादी मिळणे अशक्य. महाभारतापासून चालत आलेली रीत आहे. आता युद्ध होत नाही तर तोंडी शस्त्र चालतात. त्यात नवल काय. अनेक उदाहरणे आहेत शिंदे भाऊ बहिण, राहुल आणि वरूण (एकाला वारसा मिळाला आणि एकाला वनवास)

श्रीगुरुजी 06/04/2014 - 11:02
राज ठाकरे पवारांच्या योजनेनुसार काम करत आहे असं दिसतंय. एकीकडे पवारांना अचानक राजप्रेमाचा उमाळा आला आहे व गेल्या काही दिवसांपासून ते राज व मनसेवर स्तुतीसुमने उधळण्यात मग्न आहे. दुसरीकडे वडे, सूप, कोणी कोणाला फोन करून असे पूर्णपणे विसंगत विषय भाषणात आणून राज प्रचार भलतीकडेच नेण्यात यशस्वी झाला आहे. राजच्या योजनेला उद्धव बळी पडल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीतले मुख्य मुद्दे सोडून उद्धवला भलत्याच विषयांवर बोलणे भाग पडत आहे. मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मारकुटे 06/04/2014 - 12:42
>>>मनसेची स्थापना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने योजना आखून केली हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. अगदी योग्य !!

In reply to by मारकुटे

श्रीगुरुजी 06/04/2014 - 22:07
अगदी २ महिन्यांपूर्वीपर्यंत मनसे पक्ष म्हणून संपल्यातच जमा होता. युती व आघाडी अशा दोघांनीही मनसेला आपल्यात घेतले नव्हते. मुळात मनसेला जेमतेम ५-६ टक्के मिळाली होती. 'आप'च्या उदयानंतर महाराष्ट्रात मनसेला सुद्धा अजून एक पर्याय निर्माण होऊन मनसे पूर्णपणे निष्प्रभ पक्ष झाला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. युतीबरोबर समझोता करण्याचा पक्षांतर्गत दबाव वाढत होता. अगदी अशा नेमक्या वेळी थोरले पवार मनसेच्या मदतीला धावून आले. पक्षाची परवानगी न घेता गडकरींनी राजची भेट घेऊन राजला विनाकारण महत्त्व प्राप्त करून दिले. मनसेने लोकसभा निवडणुक लढवू नये अशी गडकरींनी अत्यंत अव्यहार्य व अतर्क्य विनंती राजला करून पूर्णपणे निष्प्रभ झालेल्या पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली व मनसे हा गंभीर दखल घेण्याजोगा पक्ष आहे असे वातावरण निर्माण केले. गडकरींनी हे पवारांच्या सूचनेनुसारच केले असावे. त्यानंतर पुण्यात सभेसाठी मैदान द्यावे असा स. प. महाविद्यालय व्यवस्थापनावर आर आर पाटलांनी दबाव आणून सेना-भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेला सभा घेण्यासाठी मैदान मिळवून दिले. नंतर गेले काही दिवस थोरले पवार मनसेवर स्तुतीसुमने उधळत आहेत. गडकरी व पवारांचे साटेलोटे लपून राहिलेले नाही. राष्ट्रवादी मनसेला आतून मदत करत आहे हेदेखील लपून राहिलेले नाही. फक्त सेना-भाजपच्या मतांमध्ये फूट पाडणे या एकमेव उद्देशासाठीच मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीने जन्माला घातलेले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेमुळे युतीचे १० उमेदवार पडले होते. तर विधानसभा निवडणुकीत मनसेच्या १३ व मतांच्या विभाजनामुळे अजून २५ अशा तब्बल ३८ जागांवर युतीचा पराभव झाला होता. गुहागरची हमखास जागासुद्धा गडकरींमुळे राष्ट्रवादीकडे जाऊन युतीने ३९ वा आमदारही घालविला. मनसे नसती तर २००९ मध्ये युती १३३ व आघाडी ११८ अशी स्थिती झाली असती व युतीला सरकार स्थापनेसाठी जोरदार संधी मिळाली असती.

जातवेद 06/04/2014 - 11:58
ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे.
म्हणजे काय कॉग्रेस ला मतदान करायचे म्हणता?

In reply to by जातवेद

हुप्प्या 06/04/2014 - 22:07
सुदैवाने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम आदमी पार्टी आहे, कित्येक ठिकाणी अन्य अपक्ष लोकही चांगले आहेत. पण असल्या स्वार्थी, निव्वळ नातेसंबंधावर आधारित हेव्यादाव्यांपेक्षा काँग्रेस वा राष्ट्रवादी बरी. असे वागून चालणार नाही इतपत धडा ह्या उन्मत्त नेत्यांना मिळावा अशी इच्छा आहे. जिथे लोकांना चार पाच किलोमीटर चालून, पायपीट करून मुलाबाळांना पाणी पाजता येते तिथे ह्यांची त्यांच्या मरणासन्न नेत्याला चिकनसूप कोणी पाजले ह्याची अहमहिका लागली आहे. उन्हाळा तोंडावर आलेला असताना जनतेला ह्या गोष्टीचे सोयरसुतक का असावे?

म.न.से, शिवसेना व बी.जे.पी ह्या व्यतिरिक्त कुणा चौथ्याला मत म्हणजे काँग्रेसला मत. आणि पुन्हा म.न.से,शिवसेना व बी.जे.पी ह्यामधील कुणा एकाला मत म्हणजे मतविभागणी. म्हणजे पुन्हा काँग्रेसलाच मत. ह्या त्रांगड्यामुळे काँग्रेसला जणु फीहीटच मिळाली आहे आणि निवडणुकीआधीच महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळाला आहे.

शिद 07/04/2014 - 17:07
अगदी मनातले लिहीले आहे... काय तो बाष्कळ्पणा चालवलाय दोघांनी. कोणाला काय फरक पडणार आहे ह्यांच्या घरातल्या अंतर्गत कुरबूरीचा. विकास काय केला कींवा काय करणार ह्या बद्दल चकार शब्द नाही फक्त ऐकमेकांवर चिखलफेक... बस्स्स.

चिरोटा 07/04/2014 - 17:30
तरी नशीब ह्यांच्या सभांना 'लाखांची गर्दी होत नाही व दोघांनाही राष्ट्रीय स्तरावर नगण्य किंमत आहे.

भाऊबंदकी हा मराठी लोकांना असलेला शापचं आहे. बस योग्य उमेदवाराला मतं द्या. जे साठ वर्ष सत्ता उपभोगुन सुद्धा विकास करु शकले नाही आणि पुढ्च्या वेळेला विकासासाठी आम्हालाच संधी द्या म्हणत आहेत त्यांना अथवा त्यांच्या पिल्लावळीला मत द्यायचं का नाही ते सुज्ञपणे ठरवा. आपण किती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स भरतो आणि त्यातुन कोणाचा विकास होतोय त्याच्यावर एक विचार होऊन जाऊ दे. :).

ह्या दोन्ही पक्षांना (म्हणजे अर्थातच "त्या" दोघांना) लोकांनी जोरदार धूळ चारावी आणि मतपेटीतून एक सणसणीत श्रीमुखात भडकवून त्यांना शुद्धीवर आणावे. >>> पण यामुळे युतिची सत्ता स्थापनेची सन्धी जाइल आणि परत त्याचा फायदा कोन्ग्रेसलाच होइल. त्यापेक्शा आत्ता युतीसाथी मत देउन नन्तर होणार्या विधान्सभा निवड्णुकीत ह्या दोघान्ना धडा शिकवावा.

आयुर्हित 18/04/2014 - 20:29
माझ्या मते, राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे डोहाळे लागलेले आहेत, असेच दिसते उद्धव-राज एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे व माझ्यात कुठलेही घरगुती वाद नसून राजकीय मतभेद आहेत आणि भविष्यात कदाचित आम्ही एकत्र येऊही शकतो असे उद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत काढले आहेत. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे काहीही घडू शकते हे सांगताना उद्धव-राज एकत्र येऊही शकतात असे सूचक विधान करून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र बघायला मिळेल असे संकेत त्यांनी दिले आहेत. नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा असून आपले खासदार त्यांना बिनशर्त पाठिंबा देतील असे सांगत भाजपाला आपला पाठिंबा नाही व राजनाथ सिंहांना आपण महत्त्व देत नाही याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. यंदा अकरा जागांवर मनसे लोकसभेच्या निवडणुका लढवत असून त्यातील केवळ दोन जागांवर त्यांचा सामना भाजपाच्या उमेदवाराशीही आहे. बाकी ठिकाणी मनसे व शिवसेना आमने सामने आहे. भाजपाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात असले तरी मी मला पाहिजे त्या ठिकाणी उमेदवार दिल्याचे व माझी काय ताकद आहे हे निवडणुकीनंतर दिसणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

In reply to by आयुर्हित

बालगंधर्व 21/04/2014 - 16:56
भौ बनदकीए असले तरे मननेय बलासहेब थकरे गेलयापासुन शिवसेनाअमधये रम रहिला नहे. उह्दव थक्रे हे नेमी बयकासारके भनदत असतत. हेनी अस केला तेने तस केला. अमाला असा अवदत नहे. अमला तसा अवदत नहे. कुहुप बोर होताआ त्यनच भशन अयकुन. तयपेश्का राज थाक्रे च्नग्ले अहेत. ते जे बोतलाआत, ते क्रुन दकवतात. अनि जरे इथे कितिहि भनद्ले हे लोक तरे शेवते निवदुन अले/ तर मोदिसहेब प्रन्तप्रधन होनर अहेत. शरद पवर सहेब अता महतरे झलेत.

दुश्यन्त 21/04/2014 - 17:42
२००९ला मनसेचे जे आकर्षण मतदारांना होते ते आता राहिले नाही.माझे आमदार विधानसभेत ह्याव करतील त्यांव करतील वगैरे राज ठाकरे म्हणत असत.त्यांचे जे १२-१३ आमदार निवडून आले ते सभागृहात आणि बाहेर सेटिंग करत असतात. विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला मदत, मुंबई-ठाणे मनपा मध्ये कॉंग्रेस-एनसीपीला मदत,नाशिकमध्ये सत्ता असून प्रभाव पाडता न येणे, टोल वगैरे आंदोलन करून मध्येच माघार घेणे यामुळे मनसेचा जोर ओसरला आहे. राज यांच भाषण तरी काय असत. त्रासिक चेहऱ्याने टीका करायची, नकला, शिव्या, मध्येच बाळासाहेबांचा येणारा उमाळा.लोक पण आता कंटाळले म्हणून सभांना पूर्वीसारखी गर्दी होत नाही त्यामुळे काही सभा बंद कराव्या लागल्या.मोदींमुळे युवा मतदार महायुतीकडे वळतोय म्हणून हे पण मोदी मोदी करत आहेत. आणि राजनाथसिंह कोण असे राज यांनी विचारणे म्हणजे खरोखर जोक आहे.मोदीना पंतप्रधान करण्यासाठीच मत द्यायचं तर मग अधिकृत महायुतीच्या उमेदवाराला का मत देवू नये असा प्रश्न मतदारांनी विचारण्यपूर्वी मनसेचे कार्यकर्तेच एकमेकांना विचारात असतील.एकूण मनसे आणि राज ठाकरे म्हणजे संभ्रम अशी लोकांची धारणा होताना दिसतेय.राज ठाकरेंनी मोदीनामाचा आधार न करता (आणि केवळ शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे न करता) प्रामुख्याने सत्ताधारी आघाडीला लक्ष्य करून प्रचार केला असता तरी मनसे केवळ शिवसेनेला अपशकून करण्यासाठीच राजकारण करत आहे अशी लोकांची धारणा झाली नसती. मात्र हे न झाल्याने आता मनसेला मत म्हणजे कॉंग्रेस आघाडीला सपोर्ट हे समीकरण लोकांना पटवून देण्यात महायुती बर्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे.

In reply to by दुश्यन्त

सुरुवातीला स्वतः अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करायचा.वेळ पडली तर मारामारी,हाणामारी करून प्रसिद्ध व्ह्यायचा प्रयत्न करायचा. ईतर राज्यांत जनतेने तेथील स्थानिक राजकिय पक्षांना निवडून दिले.द्रमुक असो वा तृणमूल वा बिजु जनता. हा प्रयोग आपल्या महाराष्ट्रात कधी यशस्वी का नाही झाला? केवळ टगेगिरी किती काळ करणार? (महाराष्ट्रात केव्हातरी स्थानिक पक्ष सत्तेवर येतील अशा आशेवर असणारी) माई

दुश्यन्त 21/04/2014 - 18:17
शिवसेना, मनसे आणि एनसीपी हे राज्यातले स्थानिक पक्षच आहेत.म्हणायला एनसीपीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असला तरी तो पक्ष स्थानिकच (खास करून प महाराष्ट्रात अस्तित्व असणारा) आहे. आणि एनसीपी मधील नेत्यांचे प्रताप (भ्रष्टाचार, जमिनी हडपणे, बेताल वक्तव्ये आणि जातीयवाद (मराठा सोडून इतर जाती जसे कि ओबीसी, दलित, ब्राह्मण यांचा छुपा/उघड विरोध, संभाजी बीग्रेडला रसद वगैरे)) या गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यात एकवेळ कॉंग्रेस परवडली पण एनसीपी नको असे वाटते. अर्थात एनसीपी आणि कॉंग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आर पी आय महायुती सत्तेत यायला हवी. भाकरी पालटायला हवी अन्यथा आपण काहीही केले तरी निवडून येतो या भ्रमामुळे सत्ताधार्यांचे प्रताप वाढत जातील. मनसे महायुती बरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी जाइल कि नाही माहित नाही मात्र निवणुकीनंतर महायुती + मनसे एकत्र सत्तेत येतील अशी शक्यता वाटते.असे झाले तर शिवसेना आणि मनसे हे स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता आहे. तरी राष्ट्रीय पक्षांना (भाजप/कॉंग्रेस) बरोबर न घेता स्थानिक पक्ष सत्तेत येतील अशी शक्यता महाराष्ट्रात खूप कमी आहे.
गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्‍या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले. ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी.

दानत

वेल्लाभट ·

इन्दुसुता 05/04/2014 - 19:16
कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
हे विशेष आवडले. आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.

In reply to by इन्दुसुता

@आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.>>> +++१११

वेल्लाभट 06/04/2014 - 08:38
धन्यवाद ! :) @जोशी 'ले', फारएन्ड, खटपट्या, मुक्त विहारि, मधुरा देशपांडे, सानिकास्वप्निल, अत्रुप्त आत्मा, प्रशांत आवले, अनुप ढेरे, यशोधरा @इन्दुसुता: अगदी बरोब्बर बोललात.... तीच खरी कमाई, ते खरं सुख

सुंदर लेख. मिपा, हे चांगले विचार/अनुभव ह्यांचे आदानप्रदान करण्याचेही ठिकाण आहे ह्याचा विसर सदस्यांना पडलेला नाही हे पाहून बरं वाटलं. >>>>कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.

असेच कुठेतरी वाचले होते कि "पैसे गेल्याचे दु:ख होत नाही पण फसले गेल्याचे दु:ख जास्त होते." समजा तुम्ही त्याला डायरेक्ट तिकिटाऐवजी पाच रुपये मागितले असते तर त्याने ते सहजपणे दिले असते का? असा एक विचार मनात आला. यात त्याच्या दानत पणा वर व तुमच्या नाईलाजावर शंका घ्यायची नाही आहे पण एक दोनदा अश्या बाबतीत फसला गेलेला माणुस कुणाला डायरेक्ट पैसे देताना नक्कीच विचार करेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

विद्यार्थीदशेत असताना एका धाय मोकलुन रडणार्या रस्त्यावरच्या इसमाला काही रू.ची मदत केली होती पण नंतर कळले कि असाच प्रकार इतरांच्या बाबतीतही झाला होता.तेव्हापासुन कोणी गरजु ही खरेच रडत असेल तर त्यावेळी जितक्या सहजपणे खिशात हात गेला होता तितक्या सहजपणे आता जात नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

किसन शिंदे 06/04/2014 - 17:13
काही महिन्यांपुर्वी ठाणे स्टेशनबाहेर टिप टॉपसमोर संध्याकाळच्या वेळी उभं असताना बाजूच्या एका इसमाचे शब्द कानावर पडले. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि त्याला विचारत होता इथून म्हणजे ठाण्यावरून विरारला कसे यायचे? किती पैसे लागतील? माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. हे बोलताना तो कमालीचा घाबरलेला व गोंधळलेला दिसत होता. मनात विचार केला कोणीतरी बिचारा भटकलेला दिसतोय मदत करावी, म्हणून १०० रू त्याला दिले आणि कसं जायचं हे ही समजावून सांगितलं. दोनदा नको नको म्हणत तिसर्‍यांदा त्याने ते पैसे हातातून घेऊन पटकन खिशात टाकले. कोणाला तरी मदत केल्याचं समाधान मिळालं, पण ते काही दिवसच टिकलं. त्यानंतर पंधरवड्याने तोच माणूस त्याच ठिकाणी अगदी तसंच एका माणसाच्या शेजारी उभं राहून फोनवर बोलताना आढळला. :( वाटलं होतं जावून त्याची गंचाडी धरावी, पण मागून गप्प बसलो.

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे 06/04/2014 - 23:42
मलाही दादर स्थानकावर एक सभ्य आणि सुव्यवस्थित कपडे घातलेला माणूस भेटला आणि मला शुद्ध इंग्रजीत विचारू लागला कि माझे पाकीट मारले गेले आहे त्यात माझा पास, पैसे आणि क्रेडीट कार्ड पण गेले आहे आणि मला कर्जतला जायचे आहेत तर तुम्ही मला शंभर रुपये देऊ शकता का? मी यावर त्याला तशाच गोड शब्दात सांगितले साहेब तिकिटाच्या खिडकीवर चला मी तुम्हाला कर्जतचे तिकीट काढून देतो त्यावर तो सभ्य माणूस "इट्स ओके" काहीतरी पुटपुटत गर्दीत एकदम गायब झाला. हाच अनुभव माझ्या भावाला आला होता तेंव्हा त्याने हि तिकीट काढून देण्याचे सांगितल्यावर तो माणूस गायब झाला होता तेंव्हा दिसतं तसंच असतं असं नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

वेल्लाभट 07/04/2014 - 11:46
बरोबर आहे... असंही होतं. अशीही लोकं भेटतात. आमच्या भागात एक आजोबा बरेचदा असतात. छातीवर हात ठेवून कळवळून आह् ओह ... छातीत दुखतंय अस म्हणतात एखाद्याला. रिक्षाचे पैसे मागतात, अमूक नगर ला रहातो म्हणून, मुलाच्या ऑफिसला जातो तो घेऊन जाईल डॉक्टरांकडे... काहीही सांगतात आणि २५-३० रुपये घेतात. दुस-या दिवशी पुन्हा आह... छातीत दुखतंय..... दुस-या कुणाला तरी पकडायचं. असो. ज्याचे त्याला!

स्पंदना 07/04/2014 - 11:21
तुम्ही फसवत नव्हतात म्हणुम हा अनुभव समृद्ध करणारा ठरला. बाकिच्यांना अन मलाही अश्या मदत मागू व्यक्ती शहाणे करुन गेल्या. मी एकदा बस स्टँदवर पैसे कमी आहेत म्हणुन एका मुलाला पैसे मागितले तर त्याने सगळ तिकीट काढून मला मदत केली होती. ठायी ठायी अजुन अशी मदत करणारी माणसे चांगल्या मनाची माणसे आहेत म्हणुन तुम्ही आम्ही संकटातुन वाचतो. जीवंत रहातो.

सविता००१ 07/04/2014 - 12:05
छानच. मला मात्र किसन शिंदेंनी सांगितल्यासारखाच अनुभव आलाय. तिथेच. पण मी ही गप्पच बसले होते. फरक फक्त एवढाच की पैसे मागणारी व्यक्ती एक वयस्क स्त्री होती. पैसे दिल्यादिवशी मी अत्यंत समाधानी होते. पण १५ दिवसांनी फसवणुकीच्या भावनेने फार नैराश्य आलं होत खर.शेवटी आपली भावना तर सच्ची होती ना मदत करताना? आता त्या बाई आणि त्यांची वागणूक त्यांच्यापाशी असा विचार केला झालं.

इरसाल 07/04/2014 - 12:11
अजुनही माणुसकी टिकुन आहे हे पाहुन बर वाटते. देव तुम्हाला/त्या मुलाला याचं फळ जरुर देईल

प्यारे१ 07/04/2014 - 13:22
लगे रहो मुन्नाभाई च्या बाप्पूसारखं फसवणारांना 'गेट वेल सून' म्हणत यथाशक्ती मदत करणं आपण थांबवू नये. आपलंच भलं होत असतं त्यानं. समोरच्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकीटं काढून एखादा चित्रपट आपण पाहतो. रद्दड निघतो. १५० रुपये माणशी पाण्यात जातात. फसवणूकच असते की ती! चित्रपट बघणं थांबवतो का आपण? नाही. बघतोच. असो!

तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा" इथे देवाच्या जागी थेट कोण्या गरजूला दान केले असते तर चांगले झाले असते असे उगाच माझ्या नास्तिक मनाला वाटून गेले. असो, उगाच यावर आता वाद नको.. :) पण स्वताचा एक अनुभव आठवला, असेच मी एकाला तीन रुपयांचे कूपन कमी पडत असताना माझ्याकडेच दिले होते. बरोबर त्याची आई आणि बायको अशी फॅमिली होती. तो साहजिकच मला ते तीन रुपये परतवायला गेला तर मी सहजच नाकारले, जणू काही तो माझा मित्र वा ओळखीचा होता आणि दोनचार रुपयांची काय देवाणघेवाण करायची असे वाटले. अर्थात हे सहजच घडले, मी काही फारसा दानशूर गटात मोडणारा नाहीये, पण असेही होते. असो, शेवटी त्या व्यक्तीने जबरीच माझ्या हातात तीन रुपयांची चिल्लर कोंबली आणि मग थोड्यावेळाने मला जाणवले की बरोबर यार, त्याच्या दृष्टीने विचार करता तो का आपली तीन रुपयांची मेहेरबानी स्विकारेल, ते देखील पैसे नसणे हा त्याचा मूळ प्रश्न नसताना, म्हणून मी आढेवेढे न घेता अगोदरच पैसे स्विकारायला हवे होते. लेख छान आहे, असे छोटे छोटे चांगले अनुभव कागदावर उतरवणे आणि प्रकाशित करणे हे त्यापेक्षा छान आहे.

सखी 08/04/2014 - 22:46
साधा अनुभव पण चांगल्या शब्दात मांडला आहे तुम्ही.

वेल्लाभट 08/04/2014 - 23:00
@सखी,अभिषेक,आदुबाळ्,शिद, मृत्युंजय,नितिन,प्रशांत, ईरसाल, सविता, अपर्णा, राही आभार...

इन्दुसुता 05/04/2014 - 19:16
कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.
हे विशेष आवडले. आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.

In reply to by इन्दुसुता

@आपले आयुष्य श्रीमंत करून जाणारी अशीच माणसे आणि अशाच आठवणी !!! तुम्हीही कधी अशीच कुणाला मदत केली असेल ... त्यावेळी त्या व्यक्तिच्या चेहर्‍यावरचे ह्सू तुम्हालाही आनंद देवून गेले असेल..प्युअर जॉय.>>> +++१११

वेल्लाभट 06/04/2014 - 08:38
धन्यवाद ! :) @जोशी 'ले', फारएन्ड, खटपट्या, मुक्त विहारि, मधुरा देशपांडे, सानिकास्वप्निल, अत्रुप्त आत्मा, प्रशांत आवले, अनुप ढेरे, यशोधरा @इन्दुसुता: अगदी बरोब्बर बोललात.... तीच खरी कमाई, ते खरं सुख

सुंदर लेख. मिपा, हे चांगले विचार/अनुभव ह्यांचे आदानप्रदान करण्याचेही ठिकाण आहे ह्याचा विसर सदस्यांना पडलेला नाही हे पाहून बरं वाटलं. >>>>कशावर तरी विश्वास बसत नव्हता; आणि कशावरचा तरी विश्वास दृढ होत होता.

असेच कुठेतरी वाचले होते कि "पैसे गेल्याचे दु:ख होत नाही पण फसले गेल्याचे दु:ख जास्त होते." समजा तुम्ही त्याला डायरेक्ट तिकिटाऐवजी पाच रुपये मागितले असते तर त्याने ते सहजपणे दिले असते का? असा एक विचार मनात आला. यात त्याच्या दानत पणा वर व तुमच्या नाईलाजावर शंका घ्यायची नाही आहे पण एक दोनदा अश्या बाबतीत फसला गेलेला माणुस कुणाला डायरेक्ट पैसे देताना नक्कीच विचार करेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

विद्यार्थीदशेत असताना एका धाय मोकलुन रडणार्या रस्त्यावरच्या इसमाला काही रू.ची मदत केली होती पण नंतर कळले कि असाच प्रकार इतरांच्या बाबतीतही झाला होता.तेव्हापासुन कोणी गरजु ही खरेच रडत असेल तर त्यावेळी जितक्या सहजपणे खिशात हात गेला होता तितक्या सहजपणे आता जात नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

किसन शिंदे 06/04/2014 - 17:13
काही महिन्यांपुर्वी ठाणे स्टेशनबाहेर टिप टॉपसमोर संध्याकाळच्या वेळी उभं असताना बाजूच्या एका इसमाचे शब्द कानावर पडले. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि त्याला विचारत होता इथून म्हणजे ठाण्यावरून विरारला कसे यायचे? किती पैसे लागतील? माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. हे बोलताना तो कमालीचा घाबरलेला व गोंधळलेला दिसत होता. मनात विचार केला कोणीतरी बिचारा भटकलेला दिसतोय मदत करावी, म्हणून १०० रू त्याला दिले आणि कसं जायचं हे ही समजावून सांगितलं. दोनदा नको नको म्हणत तिसर्‍यांदा त्याने ते पैसे हातातून घेऊन पटकन खिशात टाकले. कोणाला तरी मदत केल्याचं समाधान मिळालं, पण ते काही दिवसच टिकलं. त्यानंतर पंधरवड्याने तोच माणूस त्याच ठिकाणी अगदी तसंच एका माणसाच्या शेजारी उभं राहून फोनवर बोलताना आढळला. :( वाटलं होतं जावून त्याची गंचाडी धरावी, पण मागून गप्प बसलो.

In reply to by किसन शिंदे

सुबोध खरे 06/04/2014 - 23:42
मलाही दादर स्थानकावर एक सभ्य आणि सुव्यवस्थित कपडे घातलेला माणूस भेटला आणि मला शुद्ध इंग्रजीत विचारू लागला कि माझे पाकीट मारले गेले आहे त्यात माझा पास, पैसे आणि क्रेडीट कार्ड पण गेले आहे आणि मला कर्जतला जायचे आहेत तर तुम्ही मला शंभर रुपये देऊ शकता का? मी यावर त्याला तशाच गोड शब्दात सांगितले साहेब तिकिटाच्या खिडकीवर चला मी तुम्हाला कर्जतचे तिकीट काढून देतो त्यावर तो सभ्य माणूस "इट्स ओके" काहीतरी पुटपुटत गर्दीत एकदम गायब झाला. हाच अनुभव माझ्या भावाला आला होता तेंव्हा त्याने हि तिकीट काढून देण्याचे सांगितल्यावर तो माणूस गायब झाला होता तेंव्हा दिसतं तसंच असतं असं नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

वेल्लाभट 07/04/2014 - 11:46
बरोबर आहे... असंही होतं. अशीही लोकं भेटतात. आमच्या भागात एक आजोबा बरेचदा असतात. छातीवर हात ठेवून कळवळून आह् ओह ... छातीत दुखतंय अस म्हणतात एखाद्याला. रिक्षाचे पैसे मागतात, अमूक नगर ला रहातो म्हणून, मुलाच्या ऑफिसला जातो तो घेऊन जाईल डॉक्टरांकडे... काहीही सांगतात आणि २५-३० रुपये घेतात. दुस-या दिवशी पुन्हा आह... छातीत दुखतंय..... दुस-या कुणाला तरी पकडायचं. असो. ज्याचे त्याला!

स्पंदना 07/04/2014 - 11:21
तुम्ही फसवत नव्हतात म्हणुम हा अनुभव समृद्ध करणारा ठरला. बाकिच्यांना अन मलाही अश्या मदत मागू व्यक्ती शहाणे करुन गेल्या. मी एकदा बस स्टँदवर पैसे कमी आहेत म्हणुन एका मुलाला पैसे मागितले तर त्याने सगळ तिकीट काढून मला मदत केली होती. ठायी ठायी अजुन अशी मदत करणारी माणसे चांगल्या मनाची माणसे आहेत म्हणुन तुम्ही आम्ही संकटातुन वाचतो. जीवंत रहातो.

सविता००१ 07/04/2014 - 12:05
छानच. मला मात्र किसन शिंदेंनी सांगितल्यासारखाच अनुभव आलाय. तिथेच. पण मी ही गप्पच बसले होते. फरक फक्त एवढाच की पैसे मागणारी व्यक्ती एक वयस्क स्त्री होती. पैसे दिल्यादिवशी मी अत्यंत समाधानी होते. पण १५ दिवसांनी फसवणुकीच्या भावनेने फार नैराश्य आलं होत खर.शेवटी आपली भावना तर सच्ची होती ना मदत करताना? आता त्या बाई आणि त्यांची वागणूक त्यांच्यापाशी असा विचार केला झालं.

इरसाल 07/04/2014 - 12:11
अजुनही माणुसकी टिकुन आहे हे पाहुन बर वाटते. देव तुम्हाला/त्या मुलाला याचं फळ जरुर देईल

प्यारे१ 07/04/2014 - 13:22
लगे रहो मुन्नाभाई च्या बाप्पूसारखं फसवणारांना 'गेट वेल सून' म्हणत यथाशक्ती मदत करणं आपण थांबवू नये. आपलंच भलं होत असतं त्यानं. समोरच्यानं काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकीटं काढून एखादा चित्रपट आपण पाहतो. रद्दड निघतो. १५० रुपये माणशी पाण्यात जातात. फसवणूकच असते की ती! चित्रपट बघणं थांबवतो का आपण? नाही. बघतोच. असो!

तीच दहा रुपयांची नोट देवासमोर ठेवली आणि म्हटलं, "त्या मुलाचं भलं कर रे बाबा" इथे देवाच्या जागी थेट कोण्या गरजूला दान केले असते तर चांगले झाले असते असे उगाच माझ्या नास्तिक मनाला वाटून गेले. असो, उगाच यावर आता वाद नको.. :) पण स्वताचा एक अनुभव आठवला, असेच मी एकाला तीन रुपयांचे कूपन कमी पडत असताना माझ्याकडेच दिले होते. बरोबर त्याची आई आणि बायको अशी फॅमिली होती. तो साहजिकच मला ते तीन रुपये परतवायला गेला तर मी सहजच नाकारले, जणू काही तो माझा मित्र वा ओळखीचा होता आणि दोनचार रुपयांची काय देवाणघेवाण करायची असे वाटले. अर्थात हे सहजच घडले, मी काही फारसा दानशूर गटात मोडणारा नाहीये, पण असेही होते. असो, शेवटी त्या व्यक्तीने जबरीच माझ्या हातात तीन रुपयांची चिल्लर कोंबली आणि मग थोड्यावेळाने मला जाणवले की बरोबर यार, त्याच्या दृष्टीने विचार करता तो का आपली तीन रुपयांची मेहेरबानी स्विकारेल, ते देखील पैसे नसणे हा त्याचा मूळ प्रश्न नसताना, म्हणून मी आढेवेढे न घेता अगोदरच पैसे स्विकारायला हवे होते. लेख छान आहे, असे छोटे छोटे चांगले अनुभव कागदावर उतरवणे आणि प्रकाशित करणे हे त्यापेक्षा छान आहे.

सखी 08/04/2014 - 22:46
साधा अनुभव पण चांगल्या शब्दात मांडला आहे तुम्ही.

वेल्लाभट 08/04/2014 - 23:00
@सखी,अभिषेक,आदुबाळ्,शिद, मृत्युंजय,नितिन,प्रशांत, ईरसाल, सविता, अपर्णा, राही आभार...
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या दिवशी ऑफिसला उशीर होणार अशी कल्पना होतीच. संध्याकाळचे सात वाजून गेले तरी काम चालू होतं. एरवी मिळणारी लिफ्ट आज मिळणार नव्हती त्यामुळे कसं जायचं याचे आडाखे मनात बांधले होते. कामाच्या व्यापात १० कसे वाजले कळलंच नाही. ट्रेन ने सगळ्यात पटकन प्रवास होईल असं म्हणून कांजूरमार्ग स्टेशन वर पोहोचलो. रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. सीएसटी च्या बाजूकडील सर्व तिकिट खिडक्या बंद होत्या. एटीव्हीएम व कूपन मशीन्स चालू होती, पण नेहमीचा ट्रेन प्रवास नसल्याने माझ्याकडे स्मार्टकार्ड किंवा कूपन यापैकी काही नव्हतं त्यामुळे पंचाईत होती.

डु आयडी !

इरसाल ·

आत्मशून्य 05/04/2014 - 16:42
नेमक्या कारणावर कधीच एकमत होणार नाही १. खोडसाळपणा = १००% २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे = ५०% - ५०% ३. उगाच दंगा करणे = ५०% - ५०% ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. = ५०% - ५०% ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. = ५०% - ५०% ६. संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%

In reply to by आत्मशून्य

संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१% मी स्वता एकेकाळी ऑर्कुटवर केलेय. युवा जोशमध्ये असताना. काय कुठे अन कसे ते पुन्हा कधीतरी. पण मुद्दा हा की एखाद्याला वाटले की त्याच्याशी काहीतरी अन्याय वा पक्षपात झाला आहे तर बंडखोरी घडू शकते. संचालकांकडे अधिकार असतो की एखाद्याच्या पोस्ट उडवा वा बॅन करा तर मग याला उत्तर म्हणून फेक प्रोफाईल वा ड्यू आयडीचे हत्यार वापरले जाऊ शकते.

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 06/04/2014 - 17:04
मिपावर बहुतांश सध्याचे संपादक हे तसे एकतर सदस्यांच्या उपद्व्यापाने वैतागलेले अथवा पद प्रिय असल्याने विवादात जाणीवपुर्वक तठस्थ भुमीका राखणारे असतात. त्यामुळे ते उघड अन्याय करायच्या फंदात पडत नाहीत व प्रथम जमाव तुमच्या विरोधात जाण्याची वाट पहायचा मार्ग पत्करतात व मग (पडद्यामागुनच) कृती करणे पसंत करतात. सामान्य सदस्य तंत्रज्ञानाने इतका प्रगत नाही की तो कोणी काटा काढला याचे इनवेस्टीगेशन स्वबळावर करु शकेल. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे खापर संपादकांवर फोडने एव्हडे सोडले तर कोणीही सामान्य सदस्य संपादकांना त्रास देण्याचा द्रवीडी प्राणायाम करायला समर्थ नाहीच. त्यात ज्या गोश्टींचा निर्णय संपादकांना घेता येत नसेल असे वाटते, तेथे डायरेक्ट थर्ड अंपायर उर्र्फ साक्षात मालकच निवाडा करतात. एक घाव दोन तुकडे, नो अपील. म्हणून वरील सर्वकरणांमुळे संपादकांना त्रास देणे हा हेतु मनात धरुन डु आयडी काढणे ही अतिशय दुर्मीळातील दुर्मीळ घटना ठरते, असे करायची कोणाची किती तिव्र इछ्चा असते-नसते हा वेगळा विषय आहे पण सध्या आपण फक्त प्रत्य्क्ष किती लोक हे करु जातील याचा विचार केला तर संपादकांना त्रास देण्याच्या हेतुने डू-आयडी काढत राहणे ही दुर्मीळातील दुर्मीळ घटनाच मानावी लागेल... नॉट टु मेंन्शन त्यासाठी पॉलीटीकली करेक्ट राहण्याचे गट्स किती मोठे लागतील :)

In reply to by आत्मशून्य

कारण माझे अनुभव ऑर्कुट समूहांवरचे आहेत. माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. आणि ते विविध हेतूने बनवले होते. तसेच इतर लोक्स सुद्धा ज्या हेतूंनी फेक प्रोफाईल बनवायचे त्यांचे हेतूही लक्षात घेतले तर त्याची हेतूनुसार टक्केवारी वेगळी निघेल. असो, मराठी संकेतस्थळांचा फारसा अनुभव नसल्याने किंवा इथे अजून खोलवर रुळलो नसल्याने सध्या आपण बोलत आहात तेच प्रमाण मानून चालतो. :)

In reply to by तुमचा अभिषेक

मदनबाण 07/04/2014 - 12:09
माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. नारायण ! नारायण ! इथे नक्कीच एकच आयडी आहे ना ? ;) @पैसाताय तू ज्यांच्या बद्धल म्हणतेस ना... ते म्हणजे कंपु नंबर १ बरं का. ;)

In reply to by मदनबाण

तो फक्त लिखाण करायला. थोडे वेगळ्या शैलीत लिहिले की त्या आयडीतून टाकतो एवढेच. बाकी तो काही लपवलाय असेही नाही. पुढे मागे येथील सक्रियता वाढली की कदाचित आणखी एखाद्याची गरज भासेलही आणि विश्वास ठेवा तो मी काढेलही. मुळात ड्यू आय डी हे प्रकरण सर्रसकट वाईट नसते हो, जर तुम्ही अभिमानाने वा किमान संकोच न बाळगता आपल्या एखाद्या आयडीची जबाबदारी घेऊ शकत असाल तर त्या आयडी बनवण्यामागचा तुमचा हेतू काहीही वाईट नव्हता हे माझे लॉजिक झाले.

In reply to by बॅटमॅन

एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल नै? >>>>>> मान गये उस्ताद.. ग्रेट मॅन थिंक्स अलाईक असे काहीसे बोलतात ना, तसे झाले हे.. खरेच एक्सेल शीटच बनवली होती, पैकी जे प्रोफाईल करंट वापरात असायचे त्यांच्यासाठी एक सामाईक मास्टर पासवर्ड होता, म्हणजे इथून तिथे उडी मारताना पासवर्ड आठवायचा त्रास नाही डोक्याला ;)

पैसा 05/04/2014 - 17:06
तुम्ही लिहिलीत ती सगळी कारणं कमी अधिक प्रमाणात असणारच. ज्या कारणांसाठी हे मिपावर येत नाहीत ती म्हणजे १. चांगले काही लिहिणे-वाचणे २. लोकांबरोबर विचाराचे आदान-प्रदान ३. आपली ओळख देणे किंबहुना आपण काहीतरी चुकीचं करत आहोत हे त्यांना चांगलंच माहित असतं आणि ते करत असताना आपल्याला कोणी पकडू नये, म्हणजे आपला संभावितपणाचा मुखवटा कायम रहावा अशी त्यांची इच्छा असते. थोडक्यात म्हणजे शिवराळ भाषा तर वापरायची आहे पण त्याचे परिणाम नकोत अशी काहीतरी मानसिकता असते. याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी. कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात. आणि आम्हा संपादकांना शंका आली की आम्ही त्यांना विचारून घेतो पण प्रॉब्लेम असा की एका ऑफिसातून/घरातून लॉग इन करणार्‍या दोन तीन लोकांचे आयपी अ‍ॅड्रेस कधी कधी एकच येतात. त्यामुळे डु आयडी कोण आहे हे साधारण कळलं तरी थेट अ‍ॅक्शन घेता येत नाही. फक्त ज्या अवतारात खोडसाळपणा केला असेल तो बॅन करणे हा एकच उपाय रहातो. पण यात एखादा माणूस चांगला अवतार जिवंत ठेवून इतर अनेक खोडसाळ अवतार घेत रहातो. याला काही औषध नाही. सगळेच लोक चांगल्या कारणाने मिपावर येतात असंही नाही. काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे. पण असे लोक माहित असले तरी ते नियमांच्या चौकटीत राहून गोंधळ घालत असल्याने तावडीत सापडत नाहीत. तुम्ही खान्देशी बोलीत लिहिलं आहे ना? बर्‍यापैकी कळलं. अधून मधून लिहीत जा. नव्या बोलीशी ओळख होईल.

In reply to by पैसा

आत्मशून्य 05/04/2014 - 18:35
कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात
नाही. आयपी हा विश्वसनीय प्रकार ठरत नाही. एक तर आयपी लपवायची इछ्चा राखणारा हे चुकवु शकतो. आणी दुसरे म्हणजे एकाच (अगदी स्टॅटीक असला तरी) आयपी वरुन दोन वेगवेगळे आयडी (अगदी एकाच वेळी) कार्यरत राहणे हीसुधा संपुर्ण निकोप गोष्ट आहे, व ते डू आयडी असण्याची शाश्वतीही नाही.
याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी.
आपल्या हेतुबद्दल शंका नाही परंतु असे सरसकटीकरण करणे टाळावेच. विशेषतः त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला चक्क डु-आयडी काढणारे विषेश दुट्प्पी आणी विषेश हरामखोर समजावेत. आपण पातळी सोडू शकतो हे जगापासुण लपवणे हा तर खरा नालायकपणा होय, न्हवे अशां महाभागाचे मुळ आयडीच डू आयडी ठरवले पाहिजेत.. पण असो, ही तात्वीक बाब आहे, व फक्त माहिती पुरेशी आहे. जालीय आचरणाच्या पातळीवर ही लागु केलीच पाहिजे असे नाही. आणी हो, राहता राहीले माझे वैयक्तीक मत. म्हणजे व्यक्ती तशा प्रवृत्ती, पण उद्या समजा मला डु आयडी काढावा वाटला तर माझ्यापुरते त्याचे नेमके काय कारण असेल.... १) खोडसाळपणा (अर्थात हा मुळ आयडीचाही भाग आहेच) २) माताय, सगळी दुनीया डुआयडी काढुन दंगा करुन गेली राव आणी आपलं मात्र हे कधीच करायचं राहीले ही चुटपुट नको. बघुया तरी डु-आयडी प्रकरणातुन किती धमाल उडवता येते ते.... :)

In reply to by आत्मशून्य

पैसा 05/04/2014 - 23:04
डु.आयडी प्रकाराबद्दल बद्दल तुम्हाला इतकी माहिती आणि कळकळ आहे हे पाहून छान वाटले! यापुढे एखादा डु. आयडी असल्याची शंका आली तर ओळखण्यासाठी तुमची मदत नक्कीच मागेन!

In reply to by पैसा

काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे.
असे का होत असावे बरे? तुमचा काय अंदाज आहे ?

In reply to by पैसा

आयच्यान सांगतो तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. कुठल्या वाक्यात नक्की? आणि हो, एकदम खरे उत्तर हवे आहे. उत्तर म्हणजे, तुमचे मत.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा 05/04/2014 - 23:33
मिपावर गोंधळ घालायला येतात. दुसरीकडे गोंधळ घालत नाहीत. तेच कारण आहे आणि परिणाम पण. आता मला गोंधळात सापडायची इच्छा नाही. त्यामुळे इति लेखनसीमा.

कंजूस 05/04/2014 - 17:55
भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून आवडलं . मला अजून बावनकशींची ओळख झाली नाही खरी पेढीवर पण मी त्यांना लेखनातून ओळखतो .डुआइडीने (?)चांगलं लिखाण केलं तरी मी वाचतो .ठिगळ सुरेख लावलं तरी बघतो . आता काही जणांकडे वेळ भरपूर आहे . "काई करु काई करु नवीन लुगडं धांडे करु ". "होळीतला नारळ पेटून ठूसफुसायचाच ,वेळीच काढला तर खोबरं गोड नाहीतर कोळसा ". या भाषेत काहीपण लिहून राहा .

In reply to by कंजूस

इरसाल 06/04/2014 - 21:41
कंजुसभौ, आवडनं बरं आपले हाइ. अहिराणीमा गैर्‍ह्या चांगल्या गोट भरेल शेतस. एक म्हण मनी भी. काम नही काय करु लुगडं फाडी दांडे करु.

जेपी 05/04/2014 - 17:55
विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे किमान 14 डुआयडी सांगु शकतो , यातील एक संपादकाचा आहे . नुकताच आं ची या मागील खरा आयडी कोण आहे हे सांगु शकतो . आशु च्या 4थ्या मुद्याशी सहमत-विश्रांती मोड ऑन

In reply to by बॅटमॅन

इरसाल 06/04/2014 - 21:38
र लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं ! ते असे आहे, तर लोकहो, मिपावर काही लोकं मनात कुठली कुठली घाण भरुन येतात आणी इथे जी काही हातावर मोजण्याइतकी चांगली लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचं सुरु करतात. मला एक समजत नाही असं करुन ह्या भ*** काय भेटत असेल आणी अश्यांमुळेच मिपाच नाव खराब होत आहे. जेव्हा बघावे तेव्हा नवा डु आयडी घेवुन इथ्थेच्च. ह्या माणसाला त्रास देवु त्या बाइला त्रास देवु. पण हा डु आयडी काढायला काय करावं लागतं ?म्हणजे समजा अस बघा मी दोन तीन इमेल आयडी काढले आणी ते वापरुन इथे लॉगीन केले पण दरवेळेस मी माझा कॉम्पुटरतर नाही ना बदलु शकत.मग असे लोक पकडले कसे जात नाहीत ?आणी ज्या लोकांना हे माहित पडते की हा डु आयडी आहे तर मग ते बोंब ठोकत नाहीत.(हे लाक्षणिक अर्थाने बर कां !)अस न करण्या त मिपावरील लोकांचा काय फायदा आहे ? तर हे माहित करण्यासाठी मी हा काथ्याकुट टाकत आहे, जसं जमेल तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन 06/04/2014 - 22:54
धन्यवाद भौ. मले अहिरानी म्हंजे मराठी विश्वकोशमा दिलेला लहानसा प्यारेग्राफच आठवतो शे. "यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याच्या शेपले मुडना काटा. नाइभौ, नाइभौ, काड तं खरी काटा, म्हने. नाइ म्हने, याना काटा काडु दे." इ.इ.इ. पूर्ण आठवत नै, पण लै मजा आली होती हे वाचून. :)

भाते 05/04/2014 - 20:54
आंचीला तुम्ही डु आयडी आहात असे खडसावल्यावर त्यानेच उलट माझ्या नावाने बोंब मारली होती. आंचीच्या __चा घो.

मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. (सगळ्यांना थोडा त्रास होईल मान्य पण मिपाच्या प्रेमासाठी तेवढं नक्कीच सहन करता येइल). जेणे करुन काय होईल की मिपा वर खातं नोंदविताना एक क्रमांक दुसर्‍यांदा संपादकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. नुसतं मिपावर डु-आयडी काढायचा म्हणुन जास्तीचे नंबर घेणारे लोकं नक्कीच कमी असतील. (जे तेवढ्यासाठी नवा नंबर घेतील त्यांच्या चिकाटीच कौतुक आणि उद्देशाचा णिशेध) डु-आयडींचे प्रमाण नक्कीच कमी करता येईल. अर्थात त्याआधी खालच्या गोष्टींचा विचार करायला लागेल. १. वन टाईम पिन अ‍ॅक्सेस मुळे मिपाच्या सर्व्हर वर किती अतिरिक्त ताण पडेल? २. जो संदेश पाठवला जाईल त्यासाठी काही खर्च येईल का? ३. आय-पी आणि भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची सांगड घालता येईल का? म्हणजे घरच्या किंवा ऑफिसच्या दुसर्‍या नंबरवरुन डु-आयडी मिळवता येणार नाही. (ऑफिसातुन एकाच आय.पी. वरुन २-४ मिपाकर वाचन किंवा लेखन करत असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल?) ४. पिन क्रमांक प्रवेश केल्यापासुन जास्तीत जास्त ३० सेकंदाच्या आत मिळेल का? बाकी असं करता येईल का ह्याबद्द्ल आपले आयटी तज्ञ लोक्स सल्ला देतीलचं. -- (हाऊ मेनी नंबर्स डज अ मॅन नीड?) जिओ मिपास्टॉय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 06/04/2014 - 08:32
व्यक्तिशः मला (एक सदस्य म्हणून) असा एखादा फोन नंबर घेतला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे सर्व्हरवर ताण वगैरे काही येऊ नये कारण तो खाते उघडताना एकदाच वापरला जाईल. पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. म्हणजे काही असे सदस्यही आहेत की ज्यांना आपली कोणतीही खाजगी माहिती इथे द्यायला नको आहे पण ते दंगेखोर नाहीत. गंभीर सदस्य आहेत.

In reply to by पैसा

>>>>> पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. सध्या आपण मेल आयडी देतो. मेल आयडीचा वापर संकेतस्थळ वापरकर्त्याने केवळ खाते उघडण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. असेच भ्रमनध्वनीच्या बाबतीत आपण कितीतरी ठिकाणी फोन रजिष्टर केलेला असतो. कामाच्या ठिकाणी, ब्यांक, अमुक-धमुक, तिथे तुमची प्रायव्हसी भंग होत नाही ? सुरक्षित असेल तिथे आपण अशी रिस्क घेतोच की मग मराठी संकेतस्थळांनी असं केलं तर काय बिघडेल ? ज्याला खाज असेल तो लिहिल नै तर राहीलं ? अशी अनेक माणसं आहेत जी उत्तम लिहितात मराठी संकेतस्थळे वाचतात पण ती मराठी संकेतस्थळावर लिहित नाही म्हणून काय संकेतस्थळं बंद पडली नाहीत. काही कच्च-बच्च लेखन येतच असतं. आज लेखनाचा दर्जा खुप उच्च नसेल पण लेखन येतच आहे की नै... तेव्हा पै भविष्यात अनेक मराठी संकेतस्थळ असं करतील. किंवा सरकार असा काही कायदा करेल की लिहिणा-या सदस्याची माहिती आवश्यक आहे, संकेतस्थळ मालक-चालक यांची माहिती हवी आहे. एक दस्तऐवज तुम्हाला दरवर्षी सरकारला द्यावा लागेल तेव्हा हा पर्याय तुम्हाला वापरावाच लागणार आहे, आज आपल्याला हे पटत नसलं तरी भविष्यात होऊ शकते असे वाटते.... लावता का शर्यत पाच-पाचशे रुपयाची ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा 06/04/2014 - 15:54
पैज अजिबात लावणार नै! भविष्यात असं होणं अगदी सहज शक्य आहे. आपले सायबर क्राईमचे कायदे आणि पोलीस अजून प्राथमिक अवस्थेत आहेत. पण पुढे कधीतरी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला लागेल. कॉपीराईट पाहिजे तर जबाबदारीही घ्यायला पाहिजे. तुमच्या बाकी बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहेच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 06/04/2014 - 16:12
कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यांत काहीच फरक नाही काय? इथे लोक टाईमपास करायला येतात. फुकट बिग ब्रदरगिरी करण्याला तुमचे समर्थन असेल असे वाटले नव्हते.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 06/04/2014 - 17:30
एखाद्याचा करमणूकीसाठी केला गेलेला 'टाईमपास' इतर ५०(/५००/५०००...इ.) जणांसाठी कधीतरी त्रासदायकही होउ शकतो. त्यासाठी 'फुकट बिग ब्रदरगिरी' काहीवेळेस करावी लागते. शिवाय कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यात फक्त 'फरक'च आहे का? 'साम्य' बिलकुल नाही का? 'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

आत्मशून्य 06/04/2014 - 17:34
'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.
मग सगळीकडे फिरा. इथे याच अशी सक्ती आहे काय ? का जे सगळीकडे तुम्ही करता तेच इथेही करायला भेटले पाहिजे हा अट्टहास त्यामागे आहे ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 06/04/2014 - 17:43
वि़कृत स्त्रिमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात आहेत सोशली त्या ती नेटाने फॉलो करते तिने इथे तेच करावे काय ? माझा एक मित्र आहे बायकोच्या ताटाखालचं मांजर. विवाहीत स्त्रियांचा जबर धसका त्याने घेतला आहे हे त्याचे सोशल एटीकेट्स पुन्हा पुन्हा हेच सिध्द करतात, त्याने इथेही तसेच वागावे काय ?

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 06/04/2014 - 17:41
बर्राच फरक आहे. सोशल एटिकेट पाळायचे तर एकतर्फी नकोत-त्याचं एक किळसवाणं उदा. मिपावर अलीकडंच पाहिलंय, ते एक असोच. बाकी साम्य काय आहे? इथे लोक कशाला येतात, काय करतात, याची मुख्य पर्पज काय, इ.इ. पाहिले तर सहज लक्षात यावे. कुणीतरी सटीसहामाशी केलेले ट्रोलिंग कंट्रोल करण्यासाठी अन्य वेळेस इतकी बंधने घालण्याचे समर्थन अतिशय हास्यास्पद आहे. बाकी काही नाही झालं तरी लोकांचा ओढाच कमी होईल. तसंही एका संस्थळात दुसर्‍यापेक्षा लै युनिक काही नसतं. अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते. तिथे व्हेरिफिकेशन गरजेचे आहे हे एकवेळ मान्य करू शकतो - कारण पर्पज वेगळी आहे. अर्थात तिथेही मतभेद आहेत, पण अनाहितावर एक पुरुष मत व्यक्त करणारा कोण नै का? म्हणून गप्प बसतो झालं. पण तोच न्याय सर्वत्र लावणे हे बालिश आहे. मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत. लोक आंजावर येतात ते प्रत्यक्ष आयुष्यापासून ब्रेक म्हणून. तिथेही असले नियम लावत बसला तर कोण येईल कशाला तुमच्याकडे? (किंवा अजून कुणीकडे) ही साधी गोष्ट लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. मिपावर असलं काही सुरू झालं तर मी तरी इथे थांबणार नाही. मी किंवा अजून कोणी गेल्याने मिपाला शष्प फरक तसाही पडणार नाही, पण मत व्यक्त केलं इतकंच. आता मत व्यक्त करणारा मी कोण टिकोजीराव? तर ज्या अ‍ॅथॉरिटीने राजकारण ते बालसंगोपनादि विषयांवर लोक बोलतात त्याच अ‍ॅथॉरिटीने मी बोलतोय. असो.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 06/04/2014 - 17:56
अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते.
मला ह्या विभागाची संकल्पना अतिशय आवडली. त्या विभागाबाबत/ अनेक सदस्यांबाबत मला अतिशय आदर व ममत्वही आहे, व उत्तरोत्तर वाढतच जाइल. पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.(कोणीत्याही त्रयस्थ व्यक्तीने ज्याचा मिपासोबत चुकुनही व दुरान्वयेही संबंध नाही त्याने ते अद्रुश्य केलेले संभाषण जरुर वाचावे आणी त्याचे मत घ्यावे) आणी हे सुधा त्यांच्या व्हेरीफाइड सदस्यांकडुन घडले. म्हणजे व्हेरीफिकेशन ही मुळात कसलीच एटीकेट्सची गॅरंटी देत नाही, उलट हुच्चभ्रुपणाचा पांघरलेल्या बुरख्या खाली जोपसलेल्या उबदार चाळीतल्या नळावरच्या भांडणाच्या एटीकेट्स मात्र सुरेख उघड्या पडल्या. आता बोला. खरे तर कारभाराची पारदर्शकता पुरेशी असते जसे १) कोणता प्रतिसाद का संपादीत/ अद्रुष्य केला गेला याची कारणमिमांसा. (ति चुकली असल्यास चुक दामटायचा हेकेखोरपणा टाळुन, खुल्या मनाने चुक सुधरायची इच्छा शक्ती). २) मिपा खुल्या विभागाच्या सदस्यांना ते स्त्रीलिंगी आहेत की पुल्लींगी हे नमुद करणे सपशेल रद्द( अनाहीतासाठी स्वतंत्र आयडीची व्यवस्था). ३) आपण संस्थळावर आहोत पिताश्रींच्या प्रॉपर्टीवर न्हवे याचे सदस्यांनी राखावयाचे भान. ४) वादविवाद असेल तर दंगा होणार हे मान्य करावे. अगदी संसदही त्यास अपवाद नसते. (आशा आहे संसद हे इथे सोशल ठिकाणच गणले जातेय)

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 22:56
पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.
तो तर नेहमीच सुरू असतो. पण त्याबद्दल काही बोलणे म्ह. पाप आहे. बाकी सहमत आहेच!

In reply to by बॅटमॅन

आनंदी गोपाळ 07/04/2014 - 08:12
मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत.
नेमक्या शब्दांत "मनोगत" लिहिले आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>>>मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. मिपाचं भविष्यातली वाटचाल माहिती नाही पण मराठी संकेतस्थळावर लिहिणा-या-वाचणा-यांचा वावर जेव्हा खुप वाढेल आणि जी काही मोजकी मराठी संकेतस्थळं असतील की जिथे लिहिण्या-वाचण्याचं वेड लागेल अशा ठिकाणी तुम्हाला 'व्यवस्थित' वावरायचं आहे तिथे भ्रमनध्वनी व्हेरीफिकेशनचा पर्याय उत्तम ठरणारच आहे. आज इनमिन साडेतीन मराठी संकेतस्थळावर तीच माणसं इकडे आणि तीच माणसं तिकडे. आपण खूप हुशार आहोत असे समजणारे शे-पाचशे लोक एकाच ठिकाणी रमू शकत नाही. संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणून लिहितो की जसे मिपावर काही कोणाशी पटलं नाही की, ती 'हुशार माणसं' कशाला लिहायचं मिपावर. फेसबूकवर लिहू. फेसबूकवर लिहून लाईक्स कमी पडायला लागले की मग ब्लॉगवर लिहायचं. तिकडे झाले की पुन्हा मनोगतावर सॉरी नमोगतावर लिहायचं. तिथे नै पटलं की पुन्हा मिपावर डु आयडीने लिहायला यायचं किंवा असलेल्या आयडीने नुसती मस्ती करायला यायचं. सतत उंटासारखे तिरपे तिरपे लिहायचं. काढलं की पुन्हा बोंबलत बसायचं असं होत असतं. मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात. जालावर मराठी संकेतस्थळाच्या बाबतीत असा व्हेरीफिकेशनचा प्रयोग वेगळ्या पद्धतीने राबवलेला अनाहिताच्या निमित्ताने दिसला यश अपयश येता काळ ठरवेल पण मला व्यक्तिगत ती एक मराठी संकेतस्थळासाठी एक उत्तम सुरुवात वाटली. भविष्यात अजून काय दडलेले असेल आज तरी मला माहिती नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by धन्या

पैसा 06/04/2014 - 16:02
मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात.
याच्याशीही भयानक सहमत आहे. एखाद्याने मेहनत घेऊन कितीही चांगलं लिहिलेलं असो, तो आमच्या कंपूत नाही ना, मग पाडा त्याचं लिखाण, प्रतिक्रिया देऊ नका असा विचार करणारी खेकड्याची मनोवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालायचं. संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. काही जण तर फक्त एखाद्याला टार्गेट करायला डु. आयडी घेऊन येतात अशीही उदाहरणं पाहिली आहेत. ही विकृती झाली. या नगांना आपली ओळख लपवायची असते कारण आपण करतोय ते बरोबर नाही हे कुठेतरी कळत असतंच ना! मग घ्या डु. आयडी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास.. 06/04/2014 - 19:02
संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. >>> लय आशावादी व्बा तुम्ही ;) फरक व्हेरियेशन चा आहे च ...पण मग म्हणुनच हल्ली प्रत्येकाला इतिहासरंजणाचा वा स्मरणरंजणाचा संसर्ग होत असावा :)

विवेकपटाईत 06/04/2014 - 09:14
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही. (पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. (कुणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नाही आहे. फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) २. दुसरे हेतू - वर उल्लेख झालेलाच आहे.

In reply to by विवेकपटाईत

खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही... ...आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. असा विचारच कधी केला नव्हता ! *unknw* आता ते खरं आहे का ते अंतर्मनात खोल्खोल / खोल्वर (यापैकी एका किंवा दोन्ही पद्धतीने) डोकावून पाहिले पाहिजे. ;) :) (...फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) हे पटलं. हे खरं असण्याची जास्त शक्यता वाटते. :) ...(पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) यात माझापण नंबर असावा अशी कल्पना करून उगाचच गार्गार वाटवून घेतलं... ही ही ही... ;) आता माझं म्हणणं किंवा शंका (ज्याला जे वाटेल ते, आम्ही लान्हपनापासून लोक्शाहीवादी हौत हो !)... "जालावरच्या सर्वच आयड्या ह्या, अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज, डू आयड्या असतात." असा आमचा सिद्धांत आहे. कारण १. "इस्पीकचा एक्का" हा मुखवटा कारण ते शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीचे नाव म्हणून वापरण्याची सामान्यपणे प्रथा नाही. ठीक आहे. २. पण जर मी "अरविंद देशमाने" या (खर्‍या वाटणार्‍या पण कल्पीत नावाने) नावाने लिहायला सुरुवात केली तर ते माझेच खरे नाव आहे हे सिद्ध होते का ??? नाही ! ३. आयडी हे खरं नाव आहे हे सिद्ध करायला प्रत्येक सभासदाला "फोटो आयडीचा" दाखला देवून मगच नाव नोंदवावे लागेल. हे होत नाही तोपर्यंत, सर्व आयडीज व्हर्चुअल असणार. मग ते त्या आयडीच्या धारकाचे खरे नाव असो वा नसो. एवढेच नाही तर... {लै खत्री 'बाल की खाल' मोड} अगदी कट्ट्याला प्रत्यक्ष भेट झालेल्या सभासदांचे सो कॉल्ड खरे नावही आपण फोटो आयडीचा पुरावा मागून खात्री करून घेत नाही. त्यामुळे तेथे ऐकलेले माझे वरचे "अरविंद देशमाने" हे नावही खोटे असू शकते, नाही का? खी...खी...खी... ;) {/लै खत्री 'बाल की खाल' मोड} एकंदरीत, "ब्रम्ह सत्यं, (जाल)जगत् मिथ्या" असे आपले पूर्वसूरी सांगून गेले ते काय उगाचच ! ;) आता आमचे ब्रम्हज्ञान (बरेच लोक मिपावर डोस देत असतात, आम्हीच काय घोडं मारलय? हमाराभी हक बनता हय भाया)... आयडीचा (लेखनाचा गुण)धर्म* पहा, शेवटी नावात काय आहे??? * धर्म : एखाद्या जीवाची/वस्तूची वागण्याची पद्धती (यात लेखनही आलेच). याला मराठीत कॅरॅक्टरिस्टिक्स असे म्हटले जाते. *** विवेकपटाईत साहेब (आता आम्हाला तुमची आय्डीच म्हाय्ती हाय म्हणून आय्डी कडेच गार्‍हाणं कर्तोय) ह घ्या. हा तुमच्या प्रतिसादावर कमी आणि जालावरच्या सर्वसाधारण समजूतींवर जास्त असा प्रतिप्रतिसाद आहे. विनोदी अंगानं लिहायचा क्शीण प्रयत्न असला तरी लॉजीकमध्ये कमी राहू नये याची खबरदारी घेतली आहे.***

आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्‍या किंदम ऋषी त्यांची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले.काही डूआयडींचे बाबतीत तसेच काहीसे असावे.

मनीषा 06/04/2014 - 12:23
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे.

In reply to by मनीषा

सुहास.. 06/04/2014 - 19:04
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे. >> +१०००० काही लोक्स हे करतात आणि काही स्वताच्या कंपुतलेच वापरतात .........

बॅटमॅन 06/04/2014 - 14:04
फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. अँटी डुआयडी लोकांचे डेस्परेशन पाहून मजा वाटते खरीच. एखादा डु आयडी ट्रोलिंग करत असेल तर सरळ उडवण्याचा पर्याय आहेच की. पण नियमात बसण्याइतपत ट्रोलिंग असेल तर इतका कपाळशूळ का उठावा कै कळ्ळं नाही. अंमळ बालिश प्रकार आहे हा सगळा.

>>>> फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. >>> पुर्ण सहमत..!! >>> अगदी सहमत. शिवाय एखाद्या शब्दाचा भलता अर्थ स्वतःवरच ओढवून घेऊन कंपूने तुटून पडणारे अन वर स्वतःच्या नैतिकतेची/बुद्धीची टिमकी वाजवणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही... >>>> असहमत..!! आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. अर्थात योग्य वातावरण हा परत सापेक्ष शब्द आहे. प्रत्येक जिवाचे योग्य वातावरणाचे निकष वेगळे असतात. त्यामुळे फोन नंबर घेणे, आधारकार्ड घेणे, ओटिपी ई.ई. त्यावरचे उपाय नाहियेत. वातावरण कसेही असले तरी योग्य वेळी थोडिफार झाडझूड करुन बहुतेक वेळा काम भागतेच. नाही भागले की व्हॅक्युम क्लिनर असतोच राखिव.!!

डुआयडी वगैरे काय नसतयं. हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जैसा मनी भाव तैसा दिसे देव ! हा मातरं येका माणसाचे येकापेक्षा ज्यादा आयडी असू शकतात. त्याला डुआयडी का बरं म्हणता ?

बॅटमॅन 06/04/2014 - 17:21
आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही.
पर्सनल उल्लेख केलेला नसतानाही एखाद्याची आई काढणारे सदस्य पाहिले आहेत. एरवी मारे संभावित असल्याच्या थाटात जगाला उपदेश करत फिरतात - पण पातळी सोडून बोलूनही वर स्वतः ढोंगीपणे उच्च नैतिक भूमिका घेणारे सदस्य. यांना तर काहीच बोलायचा हक्क नाही. यांचे खरे रंग स्वतःच दाखवून दिल्याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानले पाहिजेत. असो. (स्वप्नांची राणी यांना हा प्रतिसाद वैयक्तिकरीत्या उद्देशून नाही. ज्याला आहे त्याला कळालं तर ठीक- यद्यपि अपेक्षा नाहीच. रडीचा डाव खेळणारी पोरं माझी स्टंप आहे म्हणून मला दोनदा खेळू द्या नैतर मी स्टंपा घेऊन जातो इ.इ. थयथयाट करतात त्याप्रमाणेच एखादी गोष्ट नै पटली की झाडू घेणार्‍यांची वागणूक आहे. अन याबद्दल मी ठाम आहे. खरं बोलण्याबद्दल कुणाच्या नाकदुर्‍या काढायची गरज नाही- वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच.)

In reply to by बॅटमॅन

>>>> वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच >>>> ईतक मिपाफोबिक व्हायची काय गरज आहे म्हणते मी..? झालं यार, होउन गेलं... होता है!! मूव ऑन... मिपा मस्ट गो ऑन!!

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 07/04/2014 - 05:51
उत्तर द्यावं लागतय म्हणुन देते आहे. आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे. नुसता वितंडवाद घालणार्‍या लोकांना मग ती स्त्री असो वा पुरुष कोणताच पायबंद नसतो, कारण तोंड उघडल की आपलीच जीत झाली पाहिजे असा एक समज त्यांच्या मनात भरौन गेलेला असतो. माझी मुलगी, माझा मुलगा, माझे आई वडिल हे सार्‍यांना असतात. त्यांच्याकडे जस आपण एक स्त्री वा पुरुष म्हणुन न पाहता एक नातेवाईक म्हणुन पाहतो तसच बाहेरच्या जगात वावरताना एक स्त्री वं पुरुष म्हणुन न पाहतां एक पुर्ण व्यक्ती म्हणुन पहायला शिकाल तो सुदिन!! आणि हो उगा फालतु शब्दाला शब्द वाढवायची तसदी घेउ नये. काही विचार करुन बोलावस वाटल तर बोलावे. नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं. इति लेखन सीमा.

In reply to by स्पंदना

पिशी अबोली 07/04/2014 - 11:44
आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे.
प्रचंड सहमत.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 07/04/2014 - 12:46
नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
हेच स्वतः पाळलं असतं तर काय पाहिजे होतं? पण नियम एका साईडनेच पाळायचे असतात ना, त्याला इलाज नाही. चालूद्या!

In reply to by स्पंदना

सुनील 07/04/2014 - 13:23
नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
... आणि त्या उंचावलेल्या मानेची उंची ही अपमान केला गेलेल्या वाक्यातील शब्दांच्या व्यस्त प्रमाणात असते, हादेखिल गैरसमज हटेल तर बरं!! ;)

मनीषा 06/04/2014 - 17:28
संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. हा शोध लागणे अवघड नाही थोडेफार लेखन आणि प्रतिसाद वाचले कि बर्‍यापैकी कळते . मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. प्रचंड सहमत

सुहास.. 06/04/2014 - 19:17
चला आता मॅच सुरू झाली ... इर्‍या तुला लैच प्रश्न पडायला लागलेत हल्ली , ...असो एक अनुभव सांगतो ...मिपावर पाच वर्षे झालीत आता ... एक असाच आयडी आला होता तात्याच्या काळात, लय चालल होते, रामायण महाभारत, उठ-सुट तेच सकाळी दुपारी तेच ...तेव्हा खरं नाव घेवुन आला होता ....मी एका वेगळ्या कंपुत होतो तेव्हा, त्यातले बरेच जण मिपावर नाहीत आता ...असा झोडला होता त्याला की त्याने आयडी बंद केला ..मग तात्याला मेल पाठवुन घेतला दुसरा आयडी ... बरेच दिवस गप्प पडुन होता ..मग हळुहळू जसा कंपु पांगत गेला..तसतसा तो लिहायला लागला ...सध्या संपादकाच्या गुडबुकात असुन सगळीकडे वावरतो ....आता बोल ....सुधारित डु आयडी की सर्वसामान्य आयडी ........... दुसर उदाहरण आहे एका माजोरी आयडी च ....हे जेव्हा आलंत तेव्हा पार ईग्रंजीमध्ये च मराठी टायपाला सुरुवात केली , कविता तर त्याच्या कवितापेक्षा ऑर्कुट च्या जरा बर्‍या वाटतील अश्या ...तेव्हा त्यान ते ईग्रंजीमधलं मराठीत टाईपकरून देण्यापर्यंत मदत केली मी, आज जिथे तिथे दात दाखवत असतो आणि तोंड तर अस करतो कट्ट्याला की तो लिहुन मिपावरच काय अख्ख्या मराठी आंजावर उपकारच करतो आहे ... अशी उदाहरणे बरीच आहे , पण तु कसा यात पडला आज ... आपल्याकडं काय म्हणतात माहीत आहे ना ! ज्यांच्यामुळे अडत नाही त्याच्या फंदात पडत नाही ;)

In reply to by सुहास..

इरसाल 06/04/2014 - 22:06
सुहासभौ, सध्या काही धाग्यावर काही प्रतिसादामधे कोणी कोणी डु आयडीचे सरळ सरळ वाभाडे काढलेले दिसले तसेच काही खोडसाळ धागे काढणारे अचानक मिपा सोडुन गायबलेत आणी नवे अवतरलेत. बर्‍याच दिवसापासुन मला विचारायचे होते काही लोक हे कस शोधतात की अमुक अमुक डुआयडी आहे. म्हटले गरमागरमीचा माहोल आहे घ्या काथ्या कुटुन. बरेच दिवस पडावसं वाटल नाही पण उगाच कुठले संदर्भ कुठे लावले जातात म्हणुन रहावले गेले नाही. असो. तुम्हनाकडे गैर्‍हा किस्सा व्हतीन तेन्हामासला दोन तर वरथे मालुंग पडी ग्यात. कोन त्या कोन त्या सोंगे ? वरला उदाहरण मासला ?

चालायचेच. अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?

In reply to by चिन्मय खंडागळे

अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा? लै भारी... आवडलं. पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)

In reply to by चिन्मय खंडागळे

सुहास.. 07/04/2014 - 00:09
बॅड जोक !! ( हे म्हणजे 'डिफाईन फाईन' सारखे झाले, आणि त्यावर त्याला गुड वन ई. म्हणणारे संपादक आहेत याची नोंद घेतली, उगा ड्यु आयडी गोंधळ घालतात म्हणायचे आणि स्वतः मात्र , जिथे जरा गोंधळ दिसला तिथे हॅ हॅ हॅ करायला मोकळे, माझे स्पष्ट मत असे आहे की किमान तुम्हाला कारवाई/कंट्रोल करता येत नसेल तर टाळ्या तरी वाजवु नयेत आणि ते ही नसेल येत तर सर्वसामान्य सदस्य असल्याची टिमकी वाजवु नये )

यशोधरा 06/04/2014 - 23:05
इरसालभौ, मला अहिराणी वाचायला मजा येते आहे. सगळीच नाही समजत पण ऐकायला गोड वाटेल बहुतेक. मिपावर अहिराणी शिकवायचा धागा काढा बघू आणि शिकवा :)

In reply to by इरसाल

सूड 07/04/2014 - 13:43
>>दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो. काढा काढा. कोकणीच्या लेखांसाठी आम्ही आग्रह करुन करुन गप्प बसलो. तुम्ही निदान अहिराणीवरचे तरी लेख टाका.

दिनेश सायगल 07/04/2014 - 04:43
नुकतेच एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.

In reply to by दिनेश सायगल

एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.
हेच म्हणायला आलो होतो ...

In reply to by प्रसाद गोडबोले

सुहास.. 07/04/2014 - 11:49
हायकोर्टाची भाषा करणारे सभ्य आणि बाकी सगळे असभ्य ?? आणि भाषा सभ्य असली तरी अंतरंग मात्र नादावलेला !! ....तसे असते तर झाडामागं गुलुगुलु बोलणारं जोडप सर्वात सभ्य म्हणावे लागेल.. .... फालतुच्या संकल्पनांना जबरदस्तीने संस्थळावर थोपणवार्‍याना तिच भाषा समजते अस अनुभव आहे ..... आणि दरवेळी असे करणार्‍यांची मस्ती उतरविण्यात येईल याची नोंद घ्यावी .. भाषेबाबत कुणाच्या बापाला भीक न घालणारा

In reply to by सुहास..

भगवान श्री गौतम बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गात सर्वप्रथम येते ती "अहिंसा" ! वरील प्रतिसादात आपण केलेली वाचिक हिंसा आणि कायिक हिंसा करण्याची दिलेली धमकी पाहुन आपल्या आध्यात्मिक अधःपतना बद्दल खेद वाटला ! भगवान बुध्द आपल्याला सत्यधर्माचा मार्ग दाखवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना :)

In reply to by प्रसाद गोडबोले

सुहास.. 07/04/2014 - 18:45
बाळ प्रसाद, कुठे अष्टांग मार्ग आणि कुठे अहिंसा .?? .गल्लत झाली की काय ." अहिंसो परमोधर्म " हे जैन धर्मात .... १.सम्यक दृष्टी : आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. किंबहुना गृहस्थी जीवनातील दुःखाचे अस्तित्व आणि ते निवारण करणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांना परम सत्य मानुन त्यावर श्रद्धा ठेवणे यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे या विश्वातील अनंत प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन. वैचारिक अधिष्ठान, अविद्येचा नाश करणे, व्रत वैफल्य यातील फोलपणा समजणे. ईश्वर व आत्मा न मानणे, कोणत्याही चमत्कारांवर विश्वास न ठेवणे, ग्रंथ प्रामाण्य न मानता व्यक्तीचे मन व विचार याचे स्वातंत्र्य राखणे इत्यादी सम्यकदृष्टीची उदाहरणे सांगता येतील... सम्यक दृष्टीचे महत्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात कि, हे विश्व एक अंधारकोठडी आहे व मनुष्य हा तिच्यातील कैदी आहे, ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, अंधार इतका आहे जी, कैद्याला क्वचीतच काही दिसु शकते. कैद्याला आपण कैदी आहे हेही कळत नाही. खुप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असु शकते याबद्दल शंका वाटते. मन हे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळु शकतो, तथापि या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही कि, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतु निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल व शेवटी तो बंधमुक्त होईल. मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्वाला बंधमुक्त करु शकते. सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे..? अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे. अद्भुत कल्पनांचा त्याग करणे, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत. स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. २.सम्यक संकल्प : कोणतीही कृती करण्यापुर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे, ते शुद्ध असावे, ते वाईट विचारांपासुन मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे. उच्चस्तरांवरुन विचार केल्यास आपले मन संवेदनापासुन, विकृत इच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता आळस या सर्वांपासुन मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्तने साध्य होईल. त्याचबरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर मात कर शकतो. प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. व्यक्तीने आपली इच्छा, महत्वकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे. ज्यामुळे आपले तसेच इतरांचेच कल्याण होईल. तसेच शुद्ध ध्येय असावे. आपली महत्वकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी. शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावुनच महत्वकांक्षा बाळगावी यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही. त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते. त्यामुळे कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते. स्वार्थी किंवा दुष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते. मुर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते, जगातील कितीतरी व्यक्तींना स्वःताच्या किंवा इतरांच्या क्रुर महत्वकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात. ३.सम्यक वाचा : सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि, १. माणसाने सत्य तेच बोलावे. २. असत्य बोलु नये ३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये. ४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे. ५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये. ६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत.. ४.सम्यक कर्मांत : सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय. आपली वागणुक सदाचारी असावी. लोभाला बळी पडुन बळजबरी, चोरी किंवा व्यभिचार करु नये. सतत कार्य करावे. कार्य चिकाटीने पुर्णत्वास न्यावे. निरुपयोगी किंवा आळशी नसावे. सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय तो पुर्ण होणार नाही. कोणत्याही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करु नये. आळस किंवा घाई गडबड टाळुन आपल्या प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा किंवा अपयश येणार नाही, हि सम्यक कर्मांताची लक्षणे आहेत. कामवासनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे. त्याने कामांध होऊ नये किंवा व्यभिचार करु नये. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे. ५ सम्यक आजीविका/आहार : प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा. आपल्या धंद्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. वाईट मार्गाने जसे चोऱ्या करुन, युद्ध करुन, दारु किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करुन अनीतीला पोषक होतील अशी साधने बनवुन असा एखादा वाईट धंदा करुन त्यावर उपजीविका करु नये. तसेच आळशी राहु नये, परक्याच्या कष्टावर जगु नये. एकुण सम्यक आजीवीका म्हणजे समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्याद्वारा आपले जीवन जगणे होय. ६.सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे या प्रयत्नांनाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. सतत योग्य प्रयत केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता आहे. ७.सम्यक स्मृती : सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागरुकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय. मनाची शक्ती फार मोठी आहे, आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊ न जाते म्हणुन आपल्या मनात राग, लोभ, द्व्ष, तृष्णा, मत्सर, इ. विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे. ८.सम्यक समाधी : सम्यक समाधी म्हणजे योग्य चिंतन. आर्य अष्टांगिक मार्गातील वरील सात गोष्टींचे आपण अचुक पालन करतो कि नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सम्यक समाधी सांगितली आहे. दुःक, दुःखाचे कारण, दुःखातुन मुक्तता आणि त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी सम्यक समाधी उपयुक्त आहे. अशा एकात्म विचाराने अनेक गुंतागुंतीच्या समस्यांच्या उलगडा होतो. जीवनातील अनेक रहस्य व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद होतो. एकाग्र मनाने केलेले चिंतन म्हणजे सम्यक समाधी होय. (संपादित)

In reply to by सुहास..

प्यारे१ 07/04/2014 - 19:07
थॅन्क यु रे वाश्या! आणि वाश्याला उचकवल्याबद्दल थॅन्क यु रे पश्या! ;) गाभा (किमान वाच्यार्थानं) समजावून घेतल्यावर नंतर काहीतरी बोलायला हरकत नसावी.

In reply to by सुहास..

हे सगळ आपल्याला* करता आल तर किती बरं होईल ना! असो प्रयत्न करायला काय हरकत आहे? * आपण म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळेच

In reply to by सुहास..

आमच्या चुकीच्या , अज्ञानानाच्या, माहीतीने का होईना , तुम्ही धर्माचा परत एकदा विचार केलात ,आम्ही वर ईश्वरचरणी केलेली प्रार्थना सार्थक ठरली :) आम्हाला काय बौध्द जैन शैव वेदान्ती सारे सारखेच ...मग कधी कधी होतं इकडचं तिकडं ...पण " आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति" सो काही टेन्शन नाही :) आता तुम्हीच लिहिलेल्या खालील पॅरावर चिंतन करा ...
३.सम्यक वाचा : सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि, १. माणसाने सत्य तेच बोलावे. २. असत्य बोलु नये ३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये. ४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे. ५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये. ६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत..
मस्ती उतरवण्यात येईल किंव्वा अल्-त्रिरत्नसंघाकडे तक्रार करु ही वाक्ये नक्कीच "सम्यक" नाहीत . लवकरच तुम्हाला हे पटेल :) मग तुमची बुध्दत्वाकडे खरी वाटचाल सुरु होईल !! तुमच्या धार्मिक उन्नतीला हातभार लावल्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे :)

ऋषिकेश 07/04/2014 - 11:04
मराठी आंजावर डु आयडीला व टोपणनावांना बंदी नसावी, मात्र प्रत्येक आयडीमागचे खरे नाव फक्त मालकांना (संपादकांना वा इतर तंत्रज्ञांना नाही) सांगणे बंधनकारक असावे अशी माझी खूप जुनी भुमिका आहे. अजूनही ती तशीच आहे.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 07/04/2014 - 13:18
हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत आहे. मराठी संकेतस्थळावरच विशेष करुन तुमचे नाव सांगा, कुठे रहाता ते सांगा इत्यादी इनंत्या येत असतात. इतर विशेषतः इंग्रजी भाषिक स्थळांवर (माझा वावर साधारणतः केवळ तंत्रज्ञान देवाणघेवाण फोरमवर असतो) अशा प्रकारचा आग्रह दिसत नाही. कुणीही काहीही नाव घेतो, ओळख दिली जात नाही. तरीही त्यांच्यावर मालकवर्ग अथवा मॉडरेटर तुम्ही ड्यु आयडी आहात वगैरे कुचेष्टा करत नाहीत.* हा प्रकार केवळ मराठी स्थळांवरच जास्त दिसतो आणि चर्चिला जातो. * याला अपवाद असतील ही शक्यता मान्य अहे,

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 07/04/2014 - 14:24
मराठी संस्थळवाल्यांना नक्की कसली इन्सिक्युरिटी असते जेणेकरून हे सगळे डीटेल्स मागवावे वाटतात? वर आणि विचारतीलच, तुम्हांला डीटेल्स द्यायला काय झालं म्हणून. हा सगळा प्रकारच अत्यंत बालिश आणि तितकाच हास्यास्पद आहे. हे इंटरनेट आहे, शाळा नव्हे. टेक्नोसॅव्ही झाल्याने मनोवृत्ती बदलत नाही याचे एक उत्तम उदा. म्हणून हे नक्की सांगता येईल.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 07/04/2014 - 17:10
यामागचे कारण हे कायदेशीर दृष्ट्या आवश्यकता असे आहे. उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले तर पोलिसांनी विचारणा केल्यावर त्या व्यक्तीची माहिती मालकांकडे असली पाहिजे - किमान विदागारातून ती काढता आली पाहिजे. बाकी त्याची खरी माहिती इतरत्र कुठेही घोषित होता कामा नये! अगदी संपादकांकडेही!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 07/04/2014 - 17:24
बेकायदेशीर काम करणे हे त्या संस्थळाच्या माध्यमातून केले तर आणि तरच त्याची गरज आहे. मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की अन्य इंग्रजी फोरम्स इ. ठिकाणी मात्र इतकी टाईट सुपरव्हिजन नसते. तेव्हा प्रॉब्लेम कसा काय येत नै आणि इथेच कसा काय येतो?

In reply to by ऋषिकेश

मारकुटे 07/04/2014 - 19:27
>>>>उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले हा हा हा बेकयदेशीर काम? , म्हणजे नक्की काय? मिपावरुन वा मराठी संकेतस्थळावरुन इमेल पाठवता येत नाहीत. व्यनी खरड येते. आयपी अ‍ॅड्रेस वरुन व्यक्ती ट्रेस करायची असल्यास करता येते. बहुतांशी संकेतस्थळे द्रुपल वापरतात. त्यामधे आयडी चा सगळा लॉग असतो. त्या लॉगवरुन कोणा आयडीने काय केले हे डिट्टेल काढता येते. मध्यंतरी रच्याकन कुणी आयडीने अनेक जणांचे व्यनी वाचण्याचा उद्योग एका संकेतस्थळावर केला होता. ते सर्व लॉगच्या माध्यामातुन ह्ळूच शोधले गेले होते. आता व्यानी चोरुन वाचणे बेकायदेशीर असतांना त्यावर काही कारवाई केली गेली नाही. मग जर खरी माहिती असती तर केली गेली असती का? सांग सांग भोलानाथ अनेक संकेत स्थलावार मालकांशिवाय इतर दोन चार मदतनीस असतात अनुपस्थितीत काम करायला, हा विदा त्यांना मिलून ते वापरणार नाहीत कशाअवरुन? ऑऑऑऑ कान्ट से अनेक संकेतस्थाळाच्या मालकांनीच लोकांना टोप्या घातल्या आहेत... माणुस आहे हो शेवटी मालक सुद्धा ! होतात चुका !! मुद्दा हा की मराठी संकेतस्थळे जी बहुतांशी केवळ चर्चा वाचन आणि लेखन याच सेवा देतात तिथे खरी माहिती दिलीच पाहीजे हे बंधन निरर्थक आहे.

सूड 07/04/2014 - 13:41
>>मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?>> आहो, बोंब ठोकली होती एक आयडि समजला तेंव्हा!! सगळ्यांना कळलं होतं कोणाचा आहे तो. हात वर केलंन. मग काय करु शकता अशा वेळी?? आपलेच दात आणि आपलेच ओठ. सोडून द्यायचं. आता वर्षभर त्या आयडीनं तोंड लपवलंयन्. असो.

आत्मशून्य 07/04/2014 - 16:39
मिपावर लोक लिहायला वाचायला प्रामुख्याने येतात, हे प्रामूख्याने लेखक आणी वाचकांचे खुले व्यासपीठ आहे, मिटप डॉट कॉम न्हवे. बाकी चर्चा रोचक.

आत्मशून्य 05/04/2014 - 16:42
नेमक्या कारणावर कधीच एकमत होणार नाही १. खोडसाळपणा = १००% २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे = ५०% - ५०% ३. उगाच दंगा करणे = ५०% - ५०% ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. = ५०% - ५०% ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. = ५०% - ५०% ६. संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%

In reply to by आत्मशून्य

संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१% मी स्वता एकेकाळी ऑर्कुटवर केलेय. युवा जोशमध्ये असताना. काय कुठे अन कसे ते पुन्हा कधीतरी. पण मुद्दा हा की एखाद्याला वाटले की त्याच्याशी काहीतरी अन्याय वा पक्षपात झाला आहे तर बंडखोरी घडू शकते. संचालकांकडे अधिकार असतो की एखाद्याच्या पोस्ट उडवा वा बॅन करा तर मग याला उत्तर म्हणून फेक प्रोफाईल वा ड्यू आयडीचे हत्यार वापरले जाऊ शकते.

In reply to by तुमचा अभिषेक

आत्मशून्य 06/04/2014 - 17:04
मिपावर बहुतांश सध्याचे संपादक हे तसे एकतर सदस्यांच्या उपद्व्यापाने वैतागलेले अथवा पद प्रिय असल्याने विवादात जाणीवपुर्वक तठस्थ भुमीका राखणारे असतात. त्यामुळे ते उघड अन्याय करायच्या फंदात पडत नाहीत व प्रथम जमाव तुमच्या विरोधात जाण्याची वाट पहायचा मार्ग पत्करतात व मग (पडद्यामागुनच) कृती करणे पसंत करतात. सामान्य सदस्य तंत्रज्ञानाने इतका प्रगत नाही की तो कोणी काटा काढला याचे इनवेस्टीगेशन स्वबळावर करु शकेल. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे खापर संपादकांवर फोडने एव्हडे सोडले तर कोणीही सामान्य सदस्य संपादकांना त्रास देण्याचा द्रवीडी प्राणायाम करायला समर्थ नाहीच. त्यात ज्या गोश्टींचा निर्णय संपादकांना घेता येत नसेल असे वाटते, तेथे डायरेक्ट थर्ड अंपायर उर्र्फ साक्षात मालकच निवाडा करतात. एक घाव दोन तुकडे, नो अपील. म्हणून वरील सर्वकरणांमुळे संपादकांना त्रास देणे हा हेतु मनात धरुन डु आयडी काढणे ही अतिशय दुर्मीळातील दुर्मीळ घटना ठरते, असे करायची कोणाची किती तिव्र इछ्चा असते-नसते हा वेगळा विषय आहे पण सध्या आपण फक्त प्रत्य्क्ष किती लोक हे करु जातील याचा विचार केला तर संपादकांना त्रास देण्याच्या हेतुने डू-आयडी काढत राहणे ही दुर्मीळातील दुर्मीळ घटनाच मानावी लागेल... नॉट टु मेंन्शन त्यासाठी पॉलीटीकली करेक्ट राहण्याचे गट्स किती मोठे लागतील :)

In reply to by आत्मशून्य

कारण माझे अनुभव ऑर्कुट समूहांवरचे आहेत. माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. आणि ते विविध हेतूने बनवले होते. तसेच इतर लोक्स सुद्धा ज्या हेतूंनी फेक प्रोफाईल बनवायचे त्यांचे हेतूही लक्षात घेतले तर त्याची हेतूनुसार टक्केवारी वेगळी निघेल. असो, मराठी संकेतस्थळांचा फारसा अनुभव नसल्याने किंवा इथे अजून खोलवर रुळलो नसल्याने सध्या आपण बोलत आहात तेच प्रमाण मानून चालतो. :)

In reply to by तुमचा अभिषेक

मदनबाण 07/04/2014 - 12:09
माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. नारायण ! नारायण ! इथे नक्कीच एकच आयडी आहे ना ? ;) @पैसाताय तू ज्यांच्या बद्धल म्हणतेस ना... ते म्हणजे कंपु नंबर १ बरं का. ;)

In reply to by मदनबाण

तो फक्त लिखाण करायला. थोडे वेगळ्या शैलीत लिहिले की त्या आयडीतून टाकतो एवढेच. बाकी तो काही लपवलाय असेही नाही. पुढे मागे येथील सक्रियता वाढली की कदाचित आणखी एखाद्याची गरज भासेलही आणि विश्वास ठेवा तो मी काढेलही. मुळात ड्यू आय डी हे प्रकरण सर्रसकट वाईट नसते हो, जर तुम्ही अभिमानाने वा किमान संकोच न बाळगता आपल्या एखाद्या आयडीची जबाबदारी घेऊ शकत असाल तर त्या आयडी बनवण्यामागचा तुमचा हेतू काहीही वाईट नव्हता हे माझे लॉजिक झाले.

In reply to by बॅटमॅन

एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल नै? >>>>>> मान गये उस्ताद.. ग्रेट मॅन थिंक्स अलाईक असे काहीसे बोलतात ना, तसे झाले हे.. खरेच एक्सेल शीटच बनवली होती, पैकी जे प्रोफाईल करंट वापरात असायचे त्यांच्यासाठी एक सामाईक मास्टर पासवर्ड होता, म्हणजे इथून तिथे उडी मारताना पासवर्ड आठवायचा त्रास नाही डोक्याला ;)

पैसा 05/04/2014 - 17:06
तुम्ही लिहिलीत ती सगळी कारणं कमी अधिक प्रमाणात असणारच. ज्या कारणांसाठी हे मिपावर येत नाहीत ती म्हणजे १. चांगले काही लिहिणे-वाचणे २. लोकांबरोबर विचाराचे आदान-प्रदान ३. आपली ओळख देणे किंबहुना आपण काहीतरी चुकीचं करत आहोत हे त्यांना चांगलंच माहित असतं आणि ते करत असताना आपल्याला कोणी पकडू नये, म्हणजे आपला संभावितपणाचा मुखवटा कायम रहावा अशी त्यांची इच्छा असते. थोडक्यात म्हणजे शिवराळ भाषा तर वापरायची आहे पण त्याचे परिणाम नकोत अशी काहीतरी मानसिकता असते. याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी. कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात. आणि आम्हा संपादकांना शंका आली की आम्ही त्यांना विचारून घेतो पण प्रॉब्लेम असा की एका ऑफिसातून/घरातून लॉग इन करणार्‍या दोन तीन लोकांचे आयपी अ‍ॅड्रेस कधी कधी एकच येतात. त्यामुळे डु आयडी कोण आहे हे साधारण कळलं तरी थेट अ‍ॅक्शन घेता येत नाही. फक्त ज्या अवतारात खोडसाळपणा केला असेल तो बॅन करणे हा एकच उपाय रहातो. पण यात एखादा माणूस चांगला अवतार जिवंत ठेवून इतर अनेक खोडसाळ अवतार घेत रहातो. याला काही औषध नाही. सगळेच लोक चांगल्या कारणाने मिपावर येतात असंही नाही. काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे. पण असे लोक माहित असले तरी ते नियमांच्या चौकटीत राहून गोंधळ घालत असल्याने तावडीत सापडत नाहीत. तुम्ही खान्देशी बोलीत लिहिलं आहे ना? बर्‍यापैकी कळलं. अधून मधून लिहीत जा. नव्या बोलीशी ओळख होईल.

In reply to by पैसा

आत्मशून्य 05/04/2014 - 18:35
कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात
नाही. आयपी हा विश्वसनीय प्रकार ठरत नाही. एक तर आयपी लपवायची इछ्चा राखणारा हे चुकवु शकतो. आणी दुसरे म्हणजे एकाच (अगदी स्टॅटीक असला तरी) आयपी वरुन दोन वेगवेगळे आयडी (अगदी एकाच वेळी) कार्यरत राहणे हीसुधा संपुर्ण निकोप गोष्ट आहे, व ते डू आयडी असण्याची शाश्वतीही नाही.
याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी.
आपल्या हेतुबद्दल शंका नाही परंतु असे सरसकटीकरण करणे टाळावेच. विशेषतः त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला चक्क डु-आयडी काढणारे विषेश दुट्प्पी आणी विषेश हरामखोर समजावेत. आपण पातळी सोडू शकतो हे जगापासुण लपवणे हा तर खरा नालायकपणा होय, न्हवे अशां महाभागाचे मुळ आयडीच डू आयडी ठरवले पाहिजेत.. पण असो, ही तात्वीक बाब आहे, व फक्त माहिती पुरेशी आहे. जालीय आचरणाच्या पातळीवर ही लागु केलीच पाहिजे असे नाही. आणी हो, राहता राहीले माझे वैयक्तीक मत. म्हणजे व्यक्ती तशा प्रवृत्ती, पण उद्या समजा मला डु आयडी काढावा वाटला तर माझ्यापुरते त्याचे नेमके काय कारण असेल.... १) खोडसाळपणा (अर्थात हा मुळ आयडीचाही भाग आहेच) २) माताय, सगळी दुनीया डुआयडी काढुन दंगा करुन गेली राव आणी आपलं मात्र हे कधीच करायचं राहीले ही चुटपुट नको. बघुया तरी डु-आयडी प्रकरणातुन किती धमाल उडवता येते ते.... :)

In reply to by आत्मशून्य

पैसा 05/04/2014 - 23:04
डु.आयडी प्रकाराबद्दल बद्दल तुम्हाला इतकी माहिती आणि कळकळ आहे हे पाहून छान वाटले! यापुढे एखादा डु. आयडी असल्याची शंका आली तर ओळखण्यासाठी तुमची मदत नक्कीच मागेन!

In reply to by पैसा

काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे.
असे का होत असावे बरे? तुमचा काय अंदाज आहे ?

In reply to by पैसा

आयच्यान सांगतो तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. कुठल्या वाक्यात नक्की? आणि हो, एकदम खरे उत्तर हवे आहे. उत्तर म्हणजे, तुमचे मत.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा 05/04/2014 - 23:33
मिपावर गोंधळ घालायला येतात. दुसरीकडे गोंधळ घालत नाहीत. तेच कारण आहे आणि परिणाम पण. आता मला गोंधळात सापडायची इच्छा नाही. त्यामुळे इति लेखनसीमा.

कंजूस 05/04/2014 - 17:55
भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून आवडलं . मला अजून बावनकशींची ओळख झाली नाही खरी पेढीवर पण मी त्यांना लेखनातून ओळखतो .डुआइडीने (?)चांगलं लिखाण केलं तरी मी वाचतो .ठिगळ सुरेख लावलं तरी बघतो . आता काही जणांकडे वेळ भरपूर आहे . "काई करु काई करु नवीन लुगडं धांडे करु ". "होळीतला नारळ पेटून ठूसफुसायचाच ,वेळीच काढला तर खोबरं गोड नाहीतर कोळसा ". या भाषेत काहीपण लिहून राहा .

In reply to by कंजूस

इरसाल 06/04/2014 - 21:41
कंजुसभौ, आवडनं बरं आपले हाइ. अहिराणीमा गैर्‍ह्या चांगल्या गोट भरेल शेतस. एक म्हण मनी भी. काम नही काय करु लुगडं फाडी दांडे करु.

जेपी 05/04/2014 - 17:55
विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे किमान 14 डुआयडी सांगु शकतो , यातील एक संपादकाचा आहे . नुकताच आं ची या मागील खरा आयडी कोण आहे हे सांगु शकतो . आशु च्या 4थ्या मुद्याशी सहमत-विश्रांती मोड ऑन

In reply to by बॅटमॅन

इरसाल 06/04/2014 - 21:38
र लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं ! ते असे आहे, तर लोकहो, मिपावर काही लोकं मनात कुठली कुठली घाण भरुन येतात आणी इथे जी काही हातावर मोजण्याइतकी चांगली लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचं सुरु करतात. मला एक समजत नाही असं करुन ह्या भ*** काय भेटत असेल आणी अश्यांमुळेच मिपाच नाव खराब होत आहे. जेव्हा बघावे तेव्हा नवा डु आयडी घेवुन इथ्थेच्च. ह्या माणसाला त्रास देवु त्या बाइला त्रास देवु. पण हा डु आयडी काढायला काय करावं लागतं ?म्हणजे समजा अस बघा मी दोन तीन इमेल आयडी काढले आणी ते वापरुन इथे लॉगीन केले पण दरवेळेस मी माझा कॉम्पुटरतर नाही ना बदलु शकत.मग असे लोक पकडले कसे जात नाहीत ?आणी ज्या लोकांना हे माहित पडते की हा डु आयडी आहे तर मग ते बोंब ठोकत नाहीत.(हे लाक्षणिक अर्थाने बर कां !)अस न करण्या त मिपावरील लोकांचा काय फायदा आहे ? तर हे माहित करण्यासाठी मी हा काथ्याकुट टाकत आहे, जसं जमेल तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन 06/04/2014 - 22:54
धन्यवाद भौ. मले अहिरानी म्हंजे मराठी विश्वकोशमा दिलेला लहानसा प्यारेग्राफच आठवतो शे. "यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याच्या शेपले मुडना काटा. नाइभौ, नाइभौ, काड तं खरी काटा, म्हने. नाइ म्हने, याना काटा काडु दे." इ.इ.इ. पूर्ण आठवत नै, पण लै मजा आली होती हे वाचून. :)

भाते 05/04/2014 - 20:54
आंचीला तुम्ही डु आयडी आहात असे खडसावल्यावर त्यानेच उलट माझ्या नावाने बोंब मारली होती. आंचीच्या __चा घो.

मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. (सगळ्यांना थोडा त्रास होईल मान्य पण मिपाच्या प्रेमासाठी तेवढं नक्कीच सहन करता येइल). जेणे करुन काय होईल की मिपा वर खातं नोंदविताना एक क्रमांक दुसर्‍यांदा संपादकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. नुसतं मिपावर डु-आयडी काढायचा म्हणुन जास्तीचे नंबर घेणारे लोकं नक्कीच कमी असतील. (जे तेवढ्यासाठी नवा नंबर घेतील त्यांच्या चिकाटीच कौतुक आणि उद्देशाचा णिशेध) डु-आयडींचे प्रमाण नक्कीच कमी करता येईल. अर्थात त्याआधी खालच्या गोष्टींचा विचार करायला लागेल. १. वन टाईम पिन अ‍ॅक्सेस मुळे मिपाच्या सर्व्हर वर किती अतिरिक्त ताण पडेल? २. जो संदेश पाठवला जाईल त्यासाठी काही खर्च येईल का? ३. आय-पी आणि भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची सांगड घालता येईल का? म्हणजे घरच्या किंवा ऑफिसच्या दुसर्‍या नंबरवरुन डु-आयडी मिळवता येणार नाही. (ऑफिसातुन एकाच आय.पी. वरुन २-४ मिपाकर वाचन किंवा लेखन करत असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल?) ४. पिन क्रमांक प्रवेश केल्यापासुन जास्तीत जास्त ३० सेकंदाच्या आत मिळेल का? बाकी असं करता येईल का ह्याबद्द्ल आपले आयटी तज्ञ लोक्स सल्ला देतीलचं. -- (हाऊ मेनी नंबर्स डज अ मॅन नीड?) जिओ मिपास्टॉय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा 06/04/2014 - 08:32
व्यक्तिशः मला (एक सदस्य म्हणून) असा एखादा फोन नंबर घेतला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे सर्व्हरवर ताण वगैरे काही येऊ नये कारण तो खाते उघडताना एकदाच वापरला जाईल. पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. म्हणजे काही असे सदस्यही आहेत की ज्यांना आपली कोणतीही खाजगी माहिती इथे द्यायला नको आहे पण ते दंगेखोर नाहीत. गंभीर सदस्य आहेत.

In reply to by पैसा

>>>>> पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. सध्या आपण मेल आयडी देतो. मेल आयडीचा वापर संकेतस्थळ वापरकर्त्याने केवळ खाते उघडण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. असेच भ्रमनध्वनीच्या बाबतीत आपण कितीतरी ठिकाणी फोन रजिष्टर केलेला असतो. कामाच्या ठिकाणी, ब्यांक, अमुक-धमुक, तिथे तुमची प्रायव्हसी भंग होत नाही ? सुरक्षित असेल तिथे आपण अशी रिस्क घेतोच की मग मराठी संकेतस्थळांनी असं केलं तर काय बिघडेल ? ज्याला खाज असेल तो लिहिल नै तर राहीलं ? अशी अनेक माणसं आहेत जी उत्तम लिहितात मराठी संकेतस्थळे वाचतात पण ती मराठी संकेतस्थळावर लिहित नाही म्हणून काय संकेतस्थळं बंद पडली नाहीत. काही कच्च-बच्च लेखन येतच असतं. आज लेखनाचा दर्जा खुप उच्च नसेल पण लेखन येतच आहे की नै... तेव्हा पै भविष्यात अनेक मराठी संकेतस्थळ असं करतील. किंवा सरकार असा काही कायदा करेल की लिहिणा-या सदस्याची माहिती आवश्यक आहे, संकेतस्थळ मालक-चालक यांची माहिती हवी आहे. एक दस्तऐवज तुम्हाला दरवर्षी सरकारला द्यावा लागेल तेव्हा हा पर्याय तुम्हाला वापरावाच लागणार आहे, आज आपल्याला हे पटत नसलं तरी भविष्यात होऊ शकते असे वाटते.... लावता का शर्यत पाच-पाचशे रुपयाची ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा 06/04/2014 - 15:54
पैज अजिबात लावणार नै! भविष्यात असं होणं अगदी सहज शक्य आहे. आपले सायबर क्राईमचे कायदे आणि पोलीस अजून प्राथमिक अवस्थेत आहेत. पण पुढे कधीतरी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला लागेल. कॉपीराईट पाहिजे तर जबाबदारीही घ्यायला पाहिजे. तुमच्या बाकी बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहेच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 06/04/2014 - 16:12
कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यांत काहीच फरक नाही काय? इथे लोक टाईमपास करायला येतात. फुकट बिग ब्रदरगिरी करण्याला तुमचे समर्थन असेल असे वाटले नव्हते.

In reply to by बॅटमॅन

कवितानागेश 06/04/2014 - 17:30
एखाद्याचा करमणूकीसाठी केला गेलेला 'टाईमपास' इतर ५०(/५००/५०००...इ.) जणांसाठी कधीतरी त्रासदायकही होउ शकतो. त्यासाठी 'फुकट बिग ब्रदरगिरी' काहीवेळेस करावी लागते. शिवाय कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यात फक्त 'फरक'च आहे का? 'साम्य' बिलकुल नाही का? 'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

आत्मशून्य 06/04/2014 - 17:34
'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.
मग सगळीकडे फिरा. इथे याच अशी सक्ती आहे काय ? का जे सगळीकडे तुम्ही करता तेच इथेही करायला भेटले पाहिजे हा अट्टहास त्यामागे आहे ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 06/04/2014 - 17:43
वि़कृत स्त्रिमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात आहेत सोशली त्या ती नेटाने फॉलो करते तिने इथे तेच करावे काय ? माझा एक मित्र आहे बायकोच्या ताटाखालचं मांजर. विवाहीत स्त्रियांचा जबर धसका त्याने घेतला आहे हे त्याचे सोशल एटीकेट्स पुन्हा पुन्हा हेच सिध्द करतात, त्याने इथेही तसेच वागावे काय ?

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन 06/04/2014 - 17:41
बर्राच फरक आहे. सोशल एटिकेट पाळायचे तर एकतर्फी नकोत-त्याचं एक किळसवाणं उदा. मिपावर अलीकडंच पाहिलंय, ते एक असोच. बाकी साम्य काय आहे? इथे लोक कशाला येतात, काय करतात, याची मुख्य पर्पज काय, इ.इ. पाहिले तर सहज लक्षात यावे. कुणीतरी सटीसहामाशी केलेले ट्रोलिंग कंट्रोल करण्यासाठी अन्य वेळेस इतकी बंधने घालण्याचे समर्थन अतिशय हास्यास्पद आहे. बाकी काही नाही झालं तरी लोकांचा ओढाच कमी होईल. तसंही एका संस्थळात दुसर्‍यापेक्षा लै युनिक काही नसतं. अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते. तिथे व्हेरिफिकेशन गरजेचे आहे हे एकवेळ मान्य करू शकतो - कारण पर्पज वेगळी आहे. अर्थात तिथेही मतभेद आहेत, पण अनाहितावर एक पुरुष मत व्यक्त करणारा कोण नै का? म्हणून गप्प बसतो झालं. पण तोच न्याय सर्वत्र लावणे हे बालिश आहे. मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत. लोक आंजावर येतात ते प्रत्यक्ष आयुष्यापासून ब्रेक म्हणून. तिथेही असले नियम लावत बसला तर कोण येईल कशाला तुमच्याकडे? (किंवा अजून कुणीकडे) ही साधी गोष्ट लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. मिपावर असलं काही सुरू झालं तर मी तरी इथे थांबणार नाही. मी किंवा अजून कोणी गेल्याने मिपाला शष्प फरक तसाही पडणार नाही, पण मत व्यक्त केलं इतकंच. आता मत व्यक्त करणारा मी कोण टिकोजीराव? तर ज्या अ‍ॅथॉरिटीने राजकारण ते बालसंगोपनादि विषयांवर लोक बोलतात त्याच अ‍ॅथॉरिटीने मी बोलतोय. असो.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 06/04/2014 - 17:56
अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते.
मला ह्या विभागाची संकल्पना अतिशय आवडली. त्या विभागाबाबत/ अनेक सदस्यांबाबत मला अतिशय आदर व ममत्वही आहे, व उत्तरोत्तर वाढतच जाइल. पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.(कोणीत्याही त्रयस्थ व्यक्तीने ज्याचा मिपासोबत चुकुनही व दुरान्वयेही संबंध नाही त्याने ते अद्रुश्य केलेले संभाषण जरुर वाचावे आणी त्याचे मत घ्यावे) आणी हे सुधा त्यांच्या व्हेरीफाइड सदस्यांकडुन घडले. म्हणजे व्हेरीफिकेशन ही मुळात कसलीच एटीकेट्सची गॅरंटी देत नाही, उलट हुच्चभ्रुपणाचा पांघरलेल्या बुरख्या खाली जोपसलेल्या उबदार चाळीतल्या नळावरच्या भांडणाच्या एटीकेट्स मात्र सुरेख उघड्या पडल्या. आता बोला. खरे तर कारभाराची पारदर्शकता पुरेशी असते जसे १) कोणता प्रतिसाद का संपादीत/ अद्रुष्य केला गेला याची कारणमिमांसा. (ति चुकली असल्यास चुक दामटायचा हेकेखोरपणा टाळुन, खुल्या मनाने चुक सुधरायची इच्छा शक्ती). २) मिपा खुल्या विभागाच्या सदस्यांना ते स्त्रीलिंगी आहेत की पुल्लींगी हे नमुद करणे सपशेल रद्द( अनाहीतासाठी स्वतंत्र आयडीची व्यवस्था). ३) आपण संस्थळावर आहोत पिताश्रींच्या प्रॉपर्टीवर न्हवे याचे सदस्यांनी राखावयाचे भान. ४) वादविवाद असेल तर दंगा होणार हे मान्य करावे. अगदी संसदही त्यास अपवाद नसते. (आशा आहे संसद हे इथे सोशल ठिकाणच गणले जातेय)

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 22:56
पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.
तो तर नेहमीच सुरू असतो. पण त्याबद्दल काही बोलणे म्ह. पाप आहे. बाकी सहमत आहेच!

In reply to by बॅटमॅन

आनंदी गोपाळ 07/04/2014 - 08:12
मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत.
नेमक्या शब्दांत "मनोगत" लिहिले आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>>>मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. मिपाचं भविष्यातली वाटचाल माहिती नाही पण मराठी संकेतस्थळावर लिहिणा-या-वाचणा-यांचा वावर जेव्हा खुप वाढेल आणि जी काही मोजकी मराठी संकेतस्थळं असतील की जिथे लिहिण्या-वाचण्याचं वेड लागेल अशा ठिकाणी तुम्हाला 'व्यवस्थित' वावरायचं आहे तिथे भ्रमनध्वनी व्हेरीफिकेशनचा पर्याय उत्तम ठरणारच आहे. आज इनमिन साडेतीन मराठी संकेतस्थळावर तीच माणसं इकडे आणि तीच माणसं तिकडे. आपण खूप हुशार आहोत असे समजणारे शे-पाचशे लोक एकाच ठिकाणी रमू शकत नाही. संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणून लिहितो की जसे मिपावर काही कोणाशी पटलं नाही की, ती 'हुशार माणसं' कशाला लिहायचं मिपावर. फेसबूकवर लिहू. फेसबूकवर लिहून लाईक्स कमी पडायला लागले की मग ब्लॉगवर लिहायचं. तिकडे झाले की पुन्हा मनोगतावर सॉरी नमोगतावर लिहायचं. तिथे नै पटलं की पुन्हा मिपावर डु आयडीने लिहायला यायचं किंवा असलेल्या आयडीने नुसती मस्ती करायला यायचं. सतत उंटासारखे तिरपे तिरपे लिहायचं. काढलं की पुन्हा बोंबलत बसायचं असं होत असतं. मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात. जालावर मराठी संकेतस्थळाच्या बाबतीत असा व्हेरीफिकेशनचा प्रयोग वेगळ्या पद्धतीने राबवलेला अनाहिताच्या निमित्ताने दिसला यश अपयश येता काळ ठरवेल पण मला व्यक्तिगत ती एक मराठी संकेतस्थळासाठी एक उत्तम सुरुवात वाटली. भविष्यात अजून काय दडलेले असेल आज तरी मला माहिती नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by धन्या

पैसा 06/04/2014 - 16:02
मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात.
याच्याशीही भयानक सहमत आहे. एखाद्याने मेहनत घेऊन कितीही चांगलं लिहिलेलं असो, तो आमच्या कंपूत नाही ना, मग पाडा त्याचं लिखाण, प्रतिक्रिया देऊ नका असा विचार करणारी खेकड्याची मनोवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालायचं. संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. काही जण तर फक्त एखाद्याला टार्गेट करायला डु. आयडी घेऊन येतात अशीही उदाहरणं पाहिली आहेत. ही विकृती झाली. या नगांना आपली ओळख लपवायची असते कारण आपण करतोय ते बरोबर नाही हे कुठेतरी कळत असतंच ना! मग घ्या डु. आयडी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुहास.. 06/04/2014 - 19:02
संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. >>> लय आशावादी व्बा तुम्ही ;) फरक व्हेरियेशन चा आहे च ...पण मग म्हणुनच हल्ली प्रत्येकाला इतिहासरंजणाचा वा स्मरणरंजणाचा संसर्ग होत असावा :)

विवेकपटाईत 06/04/2014 - 09:14
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही. (पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. (कुणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नाही आहे. फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) २. दुसरे हेतू - वर उल्लेख झालेलाच आहे.

In reply to by विवेकपटाईत

खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही... ...आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. असा विचारच कधी केला नव्हता ! *unknw* आता ते खरं आहे का ते अंतर्मनात खोल्खोल / खोल्वर (यापैकी एका किंवा दोन्ही पद्धतीने) डोकावून पाहिले पाहिजे. ;) :) (...फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) हे पटलं. हे खरं असण्याची जास्त शक्यता वाटते. :) ...(पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) यात माझापण नंबर असावा अशी कल्पना करून उगाचच गार्गार वाटवून घेतलं... ही ही ही... ;) आता माझं म्हणणं किंवा शंका (ज्याला जे वाटेल ते, आम्ही लान्हपनापासून लोक्शाहीवादी हौत हो !)... "जालावरच्या सर्वच आयड्या ह्या, अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज, डू आयड्या असतात." असा आमचा सिद्धांत आहे. कारण १. "इस्पीकचा एक्का" हा मुखवटा कारण ते शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीचे नाव म्हणून वापरण्याची सामान्यपणे प्रथा नाही. ठीक आहे. २. पण जर मी "अरविंद देशमाने" या (खर्‍या वाटणार्‍या पण कल्पीत नावाने) नावाने लिहायला सुरुवात केली तर ते माझेच खरे नाव आहे हे सिद्ध होते का ??? नाही ! ३. आयडी हे खरं नाव आहे हे सिद्ध करायला प्रत्येक सभासदाला "फोटो आयडीचा" दाखला देवून मगच नाव नोंदवावे लागेल. हे होत नाही तोपर्यंत, सर्व आयडीज व्हर्चुअल असणार. मग ते त्या आयडीच्या धारकाचे खरे नाव असो वा नसो. एवढेच नाही तर... {लै खत्री 'बाल की खाल' मोड} अगदी कट्ट्याला प्रत्यक्ष भेट झालेल्या सभासदांचे सो कॉल्ड खरे नावही आपण फोटो आयडीचा पुरावा मागून खात्री करून घेत नाही. त्यामुळे तेथे ऐकलेले माझे वरचे "अरविंद देशमाने" हे नावही खोटे असू शकते, नाही का? खी...खी...खी... ;) {/लै खत्री 'बाल की खाल' मोड} एकंदरीत, "ब्रम्ह सत्यं, (जाल)जगत् मिथ्या" असे आपले पूर्वसूरी सांगून गेले ते काय उगाचच ! ;) आता आमचे ब्रम्हज्ञान (बरेच लोक मिपावर डोस देत असतात, आम्हीच काय घोडं मारलय? हमाराभी हक बनता हय भाया)... आयडीचा (लेखनाचा गुण)धर्म* पहा, शेवटी नावात काय आहे??? * धर्म : एखाद्या जीवाची/वस्तूची वागण्याची पद्धती (यात लेखनही आलेच). याला मराठीत कॅरॅक्टरिस्टिक्स असे म्हटले जाते. *** विवेकपटाईत साहेब (आता आम्हाला तुमची आय्डीच म्हाय्ती हाय म्हणून आय्डी कडेच गार्‍हाणं कर्तोय) ह घ्या. हा तुमच्या प्रतिसादावर कमी आणि जालावरच्या सर्वसाधारण समजूतींवर जास्त असा प्रतिप्रतिसाद आहे. विनोदी अंगानं लिहायचा क्शीण प्रयत्न असला तरी लॉजीकमध्ये कमी राहू नये याची खबरदारी घेतली आहे.***

आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्‍या किंदम ऋषी त्यांची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले.काही डूआयडींचे बाबतीत तसेच काहीसे असावे.

मनीषा 06/04/2014 - 12:23
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे.

In reply to by मनीषा

सुहास.. 06/04/2014 - 19:04
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे. >> +१०००० काही लोक्स हे करतात आणि काही स्वताच्या कंपुतलेच वापरतात .........

बॅटमॅन 06/04/2014 - 14:04
फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. अँटी डुआयडी लोकांचे डेस्परेशन पाहून मजा वाटते खरीच. एखादा डु आयडी ट्रोलिंग करत असेल तर सरळ उडवण्याचा पर्याय आहेच की. पण नियमात बसण्याइतपत ट्रोलिंग असेल तर इतका कपाळशूळ का उठावा कै कळ्ळं नाही. अंमळ बालिश प्रकार आहे हा सगळा.

>>>> फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. >>> पुर्ण सहमत..!! >>> अगदी सहमत. शिवाय एखाद्या शब्दाचा भलता अर्थ स्वतःवरच ओढवून घेऊन कंपूने तुटून पडणारे अन वर स्वतःच्या नैतिकतेची/बुद्धीची टिमकी वाजवणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही... >>>> असहमत..!! आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. अर्थात योग्य वातावरण हा परत सापेक्ष शब्द आहे. प्रत्येक जिवाचे योग्य वातावरणाचे निकष वेगळे असतात. त्यामुळे फोन नंबर घेणे, आधारकार्ड घेणे, ओटिपी ई.ई. त्यावरचे उपाय नाहियेत. वातावरण कसेही असले तरी योग्य वेळी थोडिफार झाडझूड करुन बहुतेक वेळा काम भागतेच. नाही भागले की व्हॅक्युम क्लिनर असतोच राखिव.!!

डुआयडी वगैरे काय नसतयं. हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जैसा मनी भाव तैसा दिसे देव ! हा मातरं येका माणसाचे येकापेक्षा ज्यादा आयडी असू शकतात. त्याला डुआयडी का बरं म्हणता ?

बॅटमॅन 06/04/2014 - 17:21
आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही.
पर्सनल उल्लेख केलेला नसतानाही एखाद्याची आई काढणारे सदस्य पाहिले आहेत. एरवी मारे संभावित असल्याच्या थाटात जगाला उपदेश करत फिरतात - पण पातळी सोडून बोलूनही वर स्वतः ढोंगीपणे उच्च नैतिक भूमिका घेणारे सदस्य. यांना तर काहीच बोलायचा हक्क नाही. यांचे खरे रंग स्वतःच दाखवून दिल्याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानले पाहिजेत. असो. (स्वप्नांची राणी यांना हा प्रतिसाद वैयक्तिकरीत्या उद्देशून नाही. ज्याला आहे त्याला कळालं तर ठीक- यद्यपि अपेक्षा नाहीच. रडीचा डाव खेळणारी पोरं माझी स्टंप आहे म्हणून मला दोनदा खेळू द्या नैतर मी स्टंपा घेऊन जातो इ.इ. थयथयाट करतात त्याप्रमाणेच एखादी गोष्ट नै पटली की झाडू घेणार्‍यांची वागणूक आहे. अन याबद्दल मी ठाम आहे. खरं बोलण्याबद्दल कुणाच्या नाकदुर्‍या काढायची गरज नाही- वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच.)

In reply to by बॅटमॅन

>>>> वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच >>>> ईतक मिपाफोबिक व्हायची काय गरज आहे म्हणते मी..? झालं यार, होउन गेलं... होता है!! मूव ऑन... मिपा मस्ट गो ऑन!!

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 07/04/2014 - 05:51
उत्तर द्यावं लागतय म्हणुन देते आहे. आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे. नुसता वितंडवाद घालणार्‍या लोकांना मग ती स्त्री असो वा पुरुष कोणताच पायबंद नसतो, कारण तोंड उघडल की आपलीच जीत झाली पाहिजे असा एक समज त्यांच्या मनात भरौन गेलेला असतो. माझी मुलगी, माझा मुलगा, माझे आई वडिल हे सार्‍यांना असतात. त्यांच्याकडे जस आपण एक स्त्री वा पुरुष म्हणुन न पाहता एक नातेवाईक म्हणुन पाहतो तसच बाहेरच्या जगात वावरताना एक स्त्री वं पुरुष म्हणुन न पाहतां एक पुर्ण व्यक्ती म्हणुन पहायला शिकाल तो सुदिन!! आणि हो उगा फालतु शब्दाला शब्द वाढवायची तसदी घेउ नये. काही विचार करुन बोलावस वाटल तर बोलावे. नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं. इति लेखन सीमा.

In reply to by स्पंदना

पिशी अबोली 07/04/2014 - 11:44
आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे.
प्रचंड सहमत.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 07/04/2014 - 12:46
नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
हेच स्वतः पाळलं असतं तर काय पाहिजे होतं? पण नियम एका साईडनेच पाळायचे असतात ना, त्याला इलाज नाही. चालूद्या!

In reply to by स्पंदना

सुनील 07/04/2014 - 13:23
नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
... आणि त्या उंचावलेल्या मानेची उंची ही अपमान केला गेलेल्या वाक्यातील शब्दांच्या व्यस्त प्रमाणात असते, हादेखिल गैरसमज हटेल तर बरं!! ;)

मनीषा 06/04/2014 - 17:28
संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. हा शोध लागणे अवघड नाही थोडेफार लेखन आणि प्रतिसाद वाचले कि बर्‍यापैकी कळते . मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. प्रचंड सहमत

सुहास.. 06/04/2014 - 19:17
चला आता मॅच सुरू झाली ... इर्‍या तुला लैच प्रश्न पडायला लागलेत हल्ली , ...असो एक अनुभव सांगतो ...मिपावर पाच वर्षे झालीत आता ... एक असाच आयडी आला होता तात्याच्या काळात, लय चालल होते, रामायण महाभारत, उठ-सुट तेच सकाळी दुपारी तेच ...तेव्हा खरं नाव घेवुन आला होता ....मी एका वेगळ्या कंपुत होतो तेव्हा, त्यातले बरेच जण मिपावर नाहीत आता ...असा झोडला होता त्याला की त्याने आयडी बंद केला ..मग तात्याला मेल पाठवुन घेतला दुसरा आयडी ... बरेच दिवस गप्प पडुन होता ..मग हळुहळू जसा कंपु पांगत गेला..तसतसा तो लिहायला लागला ...सध्या संपादकाच्या गुडबुकात असुन सगळीकडे वावरतो ....आता बोल ....सुधारित डु आयडी की सर्वसामान्य आयडी ........... दुसर उदाहरण आहे एका माजोरी आयडी च ....हे जेव्हा आलंत तेव्हा पार ईग्रंजीमध्ये च मराठी टायपाला सुरुवात केली , कविता तर त्याच्या कवितापेक्षा ऑर्कुट च्या जरा बर्‍या वाटतील अश्या ...तेव्हा त्यान ते ईग्रंजीमधलं मराठीत टाईपकरून देण्यापर्यंत मदत केली मी, आज जिथे तिथे दात दाखवत असतो आणि तोंड तर अस करतो कट्ट्याला की तो लिहुन मिपावरच काय अख्ख्या मराठी आंजावर उपकारच करतो आहे ... अशी उदाहरणे बरीच आहे , पण तु कसा यात पडला आज ... आपल्याकडं काय म्हणतात माहीत आहे ना ! ज्यांच्यामुळे अडत नाही त्याच्या फंदात पडत नाही ;)

In reply to by सुहास..

इरसाल 06/04/2014 - 22:06
सुहासभौ, सध्या काही धाग्यावर काही प्रतिसादामधे कोणी कोणी डु आयडीचे सरळ सरळ वाभाडे काढलेले दिसले तसेच काही खोडसाळ धागे काढणारे अचानक मिपा सोडुन गायबलेत आणी नवे अवतरलेत. बर्‍याच दिवसापासुन मला विचारायचे होते काही लोक हे कस शोधतात की अमुक अमुक डुआयडी आहे. म्हटले गरमागरमीचा माहोल आहे घ्या काथ्या कुटुन. बरेच दिवस पडावसं वाटल नाही पण उगाच कुठले संदर्भ कुठे लावले जातात म्हणुन रहावले गेले नाही. असो. तुम्हनाकडे गैर्‍हा किस्सा व्हतीन तेन्हामासला दोन तर वरथे मालुंग पडी ग्यात. कोन त्या कोन त्या सोंगे ? वरला उदाहरण मासला ?

चालायचेच. अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?

In reply to by चिन्मय खंडागळे

अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा? लै भारी... आवडलं. पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)

In reply to by चिन्मय खंडागळे

सुहास.. 07/04/2014 - 00:09
बॅड जोक !! ( हे म्हणजे 'डिफाईन फाईन' सारखे झाले, आणि त्यावर त्याला गुड वन ई. म्हणणारे संपादक आहेत याची नोंद घेतली, उगा ड्यु आयडी गोंधळ घालतात म्हणायचे आणि स्वतः मात्र , जिथे जरा गोंधळ दिसला तिथे हॅ हॅ हॅ करायला मोकळे, माझे स्पष्ट मत असे आहे की किमान तुम्हाला कारवाई/कंट्रोल करता येत नसेल तर टाळ्या तरी वाजवु नयेत आणि ते ही नसेल येत तर सर्वसामान्य सदस्य असल्याची टिमकी वाजवु नये )

यशोधरा 06/04/2014 - 23:05
इरसालभौ, मला अहिराणी वाचायला मजा येते आहे. सगळीच नाही समजत पण ऐकायला गोड वाटेल बहुतेक. मिपावर अहिराणी शिकवायचा धागा काढा बघू आणि शिकवा :)

In reply to by इरसाल

सूड 07/04/2014 - 13:43
>>दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो. काढा काढा. कोकणीच्या लेखांसाठी आम्ही आग्रह करुन करुन गप्प बसलो. तुम्ही निदान अहिराणीवरचे तरी लेख टाका.

दिनेश सायगल 07/04/2014 - 04:43
नुकतेच एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.

In reply to by दिनेश सायगल

एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.
हेच म्हणायला आलो होतो ...

In reply to by प्रसाद गोडबोले

सुहास.. 07/04/2014 - 11:49
हायकोर्टाची भाषा करणारे सभ्य आणि बाकी सगळे असभ्य ?? आणि भाषा सभ्य असली तरी अंतरंग मात्र नादावलेला !! ....तसे असते तर झाडामागं गुलुगुलु बोलणारं जोडप सर्वात सभ्य म्हणावे लागेल.. .... फालतुच्या संकल्पनांना जबरदस्तीने संस्थळावर थोपणवार्‍याना तिच भाषा समजते अस अनुभव आहे ..... आणि दरवेळी असे करणार्‍यांची मस्ती उतरविण्यात येईल याची नोंद घ्यावी .. भाषेबाबत कुणाच्या बापाला भीक न घालणारा

In reply to by सुहास..

भगवान श्री गौतम बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गात सर्वप्रथम येते ती "अहिंसा" ! वरील प्रतिसादात आपण केलेली वाचिक हिंसा आणि कायिक हिंसा करण्याची दिलेली धमकी पाहुन आपल्या आध्यात्मिक अधःपतना बद्दल खेद वाटला ! भगवान बुध्द आपल्याला सत्यधर्माचा मार्ग दाखवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना :)

In reply to by प्रसाद गोडबोले

सुहास.. 07/04/2014 - 18:45
बाळ प्रसाद, कुठे अष्टांग मार्ग आणि कुठे अहिंसा .?? .गल्लत झाली की काय ." अहिंसो परमोधर्म " हे जैन धर्मात .... १.सम्यक दृष्टी : आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. किंबहुना गृहस्थी जीवनातील दुःखाचे अस्तित्व आणि ते निवारण करणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांना परम सत्य मानुन त्यावर श्रद्धा ठेवणे यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे या विश्वातील अनंत प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन. वैचारिक अधिष्ठान, अविद्येचा नाश करणे, व्रत वैफल्य यातील फोलपणा समजणे. ईश्वर व आत्मा न मानणे, कोणत्याही चमत्कारांवर विश्वास न ठेवणे, ग्रंथ प्रामाण्य न मानता व्यक्तीचे मन व विचार याचे स्वातंत्र्य राखणे इत्यादी सम्यकदृष्टीची उदाहरणे सांगता येतील... सम्यक दृष्टीचे महत्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात कि, हे विश्व एक अंधारकोठडी आहे व मनुष्य हा तिच्यातील कैदी आहे, ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, अंधार इतका आहे जी, कैद्याला क्वचीतच काही दिसु शकते. कैद्याला आपण कैदी आहे हेही कळत नाही. खुप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असु शकते याबद्दल शंका वाटते. मन हे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळु शकतो, तथापि या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही कि, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतु निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल व शेवटी तो बंधमुक्त होईल. मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्वाला बंधमुक्त करु शकते. सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे..? अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे. अद्भुत कल्पनांचा त्याग करणे, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत. स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. २.सम्यक संकल्प : कोणतीही कृती करण्यापुर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे, ते शुद्ध असावे, ते वाईट विचारांपासुन मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे. उच्चस्तरांवरुन विचार केल्यास आपले मन संवेदनापासुन, विकृत इच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता आळस या सर्वांपासुन मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्तने साध्य होईल. त्याचबरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर मात कर शकतो. प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. व्यक्तीने आपली इच्छा, महत्वकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे. ज्यामुळे आपले तसेच इतरांचेच कल्याण होईल. तसेच शुद्ध ध्येय असावे. आपली महत्वकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी. शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावुनच महत्वकांक्षा बाळगावी यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही. त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते. त्यामुळे कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते. स्वार्थी किंवा दुष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते. मुर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते, जगातील कितीतरी व्यक्तींना स्वःताच्या किंवा इतरांच्या क्रुर महत्वकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात. ३.सम्यक वाचा : सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि, १. माणसाने सत्य तेच बोलावे. २. असत्य बोलु नये ३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये. ४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे. ५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये. ६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत.. ४.सम्यक कर्मांत : सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय. आपली वागणुक सदाचारी असावी. लोभाला बळी पडुन बळजबरी, चोरी किंवा व्यभिचार करु नये. सतत कार्य करावे. कार्य चिकाटीने पुर्णत्वास न्यावे. निरुपयोगी किंवा आळशी नसावे. सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय तो पुर्ण होणार नाही. कोणत्याही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करु नये. आळस किंवा घाई गडबड टाळुन आपल्या प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा किंवा अपयश येणार नाही, हि सम्यक कर्मांताची लक्षणे आहेत. कामवासनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे. त्याने कामांध होऊ नये किंवा व्यभिचार करु नये. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे. ५ सम्यक आजीविका/आहार : प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा. आपल्या धंद्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. वाईट मार्गाने जसे चोऱ्या करुन, युद्ध करुन, दारु किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करुन अनीतीला पोषक होतील अशी साधने बनवुन असा एखादा वाईट धंदा करुन त्यावर उपजीविका करु नये. तसेच आळशी राहु नये, परक्याच्या कष्टावर जगु नये. एकुण सम्यक आजीवीका म्हणजे समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्याद्वारा आपले जीवन जगणे होय. ६.सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे या प्रयत्नांनाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. सतत योग्य प्रयत केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता आहे. ७.सम्यक स्मृती : सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागरुकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय. मनाची शक्ती फार मोठी आहे, आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊ न जाते म्हणुन आपल्या मनात राग, लोभ, द्व्ष, तृष्णा, मत्सर, इ. विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे. ८.सम्यक समाधी : सम्यक समाधी म्हणजे योग्य चिंतन. आर्य अष्टांगिक मार्गातील वरील सात गोष्टींचे आपण अचुक पालन करतो कि नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सम्यक समाधी सांगितली आहे. दुःक, दुःखाचे कारण, दुःखातुन मुक्तता आणि त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी सम्यक समाधी उपयुक्त आहे. अशा एकात्म विचाराने अनेक गुंतागुंतीच्या समस्यांच्या उलगडा होतो. जीवनातील अनेक रहस्य व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद होतो. एकाग्र मनाने केलेले चिंतन म्हणजे सम्यक समाधी होय. (संपादित)

In reply to by सुहास..

प्यारे१ 07/04/2014 - 19:07
थॅन्क यु रे वाश्या! आणि वाश्याला उचकवल्याबद्दल थॅन्क यु रे पश्या! ;) गाभा (किमान वाच्यार्थानं) समजावून घेतल्यावर नंतर काहीतरी बोलायला हरकत नसावी.

In reply to by सुहास..

हे सगळ आपल्याला* करता आल तर किती बरं होईल ना! असो प्रयत्न करायला काय हरकत आहे? * आपण म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळेच

In reply to by सुहास..

आमच्या चुकीच्या , अज्ञानानाच्या, माहीतीने का होईना , तुम्ही धर्माचा परत एकदा विचार केलात ,आम्ही वर ईश्वरचरणी केलेली प्रार्थना सार्थक ठरली :) आम्हाला काय बौध्द जैन शैव वेदान्ती सारे सारखेच ...मग कधी कधी होतं इकडचं तिकडं ...पण " आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति" सो काही टेन्शन नाही :) आता तुम्हीच लिहिलेल्या खालील पॅरावर चिंतन करा ...
३.सम्यक वाचा : सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि, १. माणसाने सत्य तेच बोलावे. २. असत्य बोलु नये ३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये. ४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे. ५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये. ६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत..
मस्ती उतरवण्यात येईल किंव्वा अल्-त्रिरत्नसंघाकडे तक्रार करु ही वाक्ये नक्कीच "सम्यक" नाहीत . लवकरच तुम्हाला हे पटेल :) मग तुमची बुध्दत्वाकडे खरी वाटचाल सुरु होईल !! तुमच्या धार्मिक उन्नतीला हातभार लावल्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे :)

ऋषिकेश 07/04/2014 - 11:04
मराठी आंजावर डु आयडीला व टोपणनावांना बंदी नसावी, मात्र प्रत्येक आयडीमागचे खरे नाव फक्त मालकांना (संपादकांना वा इतर तंत्रज्ञांना नाही) सांगणे बंधनकारक असावे अशी माझी खूप जुनी भुमिका आहे. अजूनही ती तशीच आहे.

In reply to by बॅटमॅन

मारकुटे 07/04/2014 - 13:18
हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत आहे. मराठी संकेतस्थळावरच विशेष करुन तुमचे नाव सांगा, कुठे रहाता ते सांगा इत्यादी इनंत्या येत असतात. इतर विशेषतः इंग्रजी भाषिक स्थळांवर (माझा वावर साधारणतः केवळ तंत्रज्ञान देवाणघेवाण फोरमवर असतो) अशा प्रकारचा आग्रह दिसत नाही. कुणीही काहीही नाव घेतो, ओळख दिली जात नाही. तरीही त्यांच्यावर मालकवर्ग अथवा मॉडरेटर तुम्ही ड्यु आयडी आहात वगैरे कुचेष्टा करत नाहीत.* हा प्रकार केवळ मराठी स्थळांवरच जास्त दिसतो आणि चर्चिला जातो. * याला अपवाद असतील ही शक्यता मान्य अहे,

In reply to by मारकुटे

बॅटमॅन 07/04/2014 - 14:24
मराठी संस्थळवाल्यांना नक्की कसली इन्सिक्युरिटी असते जेणेकरून हे सगळे डीटेल्स मागवावे वाटतात? वर आणि विचारतीलच, तुम्हांला डीटेल्स द्यायला काय झालं म्हणून. हा सगळा प्रकारच अत्यंत बालिश आणि तितकाच हास्यास्पद आहे. हे इंटरनेट आहे, शाळा नव्हे. टेक्नोसॅव्ही झाल्याने मनोवृत्ती बदलत नाही याचे एक उत्तम उदा. म्हणून हे नक्की सांगता येईल.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश 07/04/2014 - 17:10
यामागचे कारण हे कायदेशीर दृष्ट्या आवश्यकता असे आहे. उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले तर पोलिसांनी विचारणा केल्यावर त्या व्यक्तीची माहिती मालकांकडे असली पाहिजे - किमान विदागारातून ती काढता आली पाहिजे. बाकी त्याची खरी माहिती इतरत्र कुठेही घोषित होता कामा नये! अगदी संपादकांकडेही!

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 07/04/2014 - 17:24
बेकायदेशीर काम करणे हे त्या संस्थळाच्या माध्यमातून केले तर आणि तरच त्याची गरज आहे. मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की अन्य इंग्रजी फोरम्स इ. ठिकाणी मात्र इतकी टाईट सुपरव्हिजन नसते. तेव्हा प्रॉब्लेम कसा काय येत नै आणि इथेच कसा काय येतो?

In reply to by ऋषिकेश

मारकुटे 07/04/2014 - 19:27
>>>>उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले हा हा हा बेकयदेशीर काम? , म्हणजे नक्की काय? मिपावरुन वा मराठी संकेतस्थळावरुन इमेल पाठवता येत नाहीत. व्यनी खरड येते. आयपी अ‍ॅड्रेस वरुन व्यक्ती ट्रेस करायची असल्यास करता येते. बहुतांशी संकेतस्थळे द्रुपल वापरतात. त्यामधे आयडी चा सगळा लॉग असतो. त्या लॉगवरुन कोणा आयडीने काय केले हे डिट्टेल काढता येते. मध्यंतरी रच्याकन कुणी आयडीने अनेक जणांचे व्यनी वाचण्याचा उद्योग एका संकेतस्थळावर केला होता. ते सर्व लॉगच्या माध्यामातुन ह्ळूच शोधले गेले होते. आता व्यानी चोरुन वाचणे बेकायदेशीर असतांना त्यावर काही कारवाई केली गेली नाही. मग जर खरी माहिती असती तर केली गेली असती का? सांग सांग भोलानाथ अनेक संकेत स्थलावार मालकांशिवाय इतर दोन चार मदतनीस असतात अनुपस्थितीत काम करायला, हा विदा त्यांना मिलून ते वापरणार नाहीत कशाअवरुन? ऑऑऑऑ कान्ट से अनेक संकेतस्थाळाच्या मालकांनीच लोकांना टोप्या घातल्या आहेत... माणुस आहे हो शेवटी मालक सुद्धा ! होतात चुका !! मुद्दा हा की मराठी संकेतस्थळे जी बहुतांशी केवळ चर्चा वाचन आणि लेखन याच सेवा देतात तिथे खरी माहिती दिलीच पाहीजे हे बंधन निरर्थक आहे.

सूड 07/04/2014 - 13:41
>>मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?>> आहो, बोंब ठोकली होती एक आयडि समजला तेंव्हा!! सगळ्यांना कळलं होतं कोणाचा आहे तो. हात वर केलंन. मग काय करु शकता अशा वेळी?? आपलेच दात आणि आपलेच ओठ. सोडून द्यायचं. आता वर्षभर त्या आयडीनं तोंड लपवलंयन्. असो.

आत्मशून्य 07/04/2014 - 16:39
मिपावर लोक लिहायला वाचायला प्रामुख्याने येतात, हे प्रामूख्याने लेखक आणी वाचकांचे खुले व्यासपीठ आहे, मिटप डॉट कॉम न्हवे. बाकी चर्चा रोचक.
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा. तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते. त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा, १. खोडसाळपणा २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे. ३. उगाच दंगा करणे ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. ६. संपादकांना त्रास देणे. असो.

'पर्समधील गणूचे लॉकेट शाबूत मिळाले' - हरवले ते गवसले का? व कसे? - १

शशिकांत ओक ·

छान कथा. एखादी गोष्ट हरवली कि डोक भंजाळून जाते.हे आपण अनुभवतोच. असो तो माणुस साक्षात गणपती तर नव्हता ना! अशी शंका यावी इतपत कथेचा बाज मस्त घेतला आहे.

बाबा पाटील 05/04/2014 - 20:20
तुम्हाला नक्की काय म्हणाचय्,माणसास चांगली होती का तुमच्या लॉकेटचा प्रभाव.का साक्षात गणरायाच तुम्हाला दर्शन देवुन गेले ? ? ? ? ?

In reply to by यसवायजी

आत्मशून्य 07/04/2014 - 00:03
एक कुटकथा म्हणून प्रकार फार वाचायला मिळायचा, अथवा इन्सेप्शन सारख्या चित्रपटांचा शेवटही "कूट" गणला जातो. म्हणजे गोष्ट नक्किच संपलेली असते, सांगण्यासारखे काहीच उरलेले नसते, पण Ambiguity मात्र अजुनही असते...! हा लेखनप्रकारही तसाच असावा.

जोशी 'ले' 05/04/2014 - 22:05
खरच अशी खुपशी चांगली माणसे आहेत त्या मुळेच जगरहाटी चालु आहे, हि अशी माणसे भेटली कि खात्री पटते माझ्या मिसेच्या पर्स मधुन अशीच छोटी पर्स ज्यात हजार बाराशे रुपये ,सोसायटीच्या बसचा पास ज्यात काहि फोन नंबर वगेरे नाही व काहि तिच्या द्रुष्टीने महत्वाच्या वस्तु होत्या ती रिक्षा पकडतांना पडली नंतर तब्बल 2 महिन्यां नंतर परत मिळाली .... झाले असे कि पर्स पडतांना एका फर्निचर च्या दुकानातील कारागीराने पाहिली त्याला वाटंल कि येतील त्या पर्स शोधत त्याने ती पर्स त्याच्या मालकाला दिली मालकानं ड्राॅवर मधे ठेउन दिली व विसरुन गेला तिकडे हा कारागीर 2 दिवसां नंतर यु पि ला गावी निघुन गेला ...परत आल्या वर त्याने पर्स बद्दल मालकाला विचारले ...नंतर हा भला मानुस सोसायटी आॅफिस मधे येउन घर नंबर घेउन पर्स देउन गेला. त्याला सगळेच पैसे देउ केले पण त्याने घेतले नाहि,

स्पंदना 06/04/2014 - 17:19
आत्ता नुकता साबांचा फोन आला. जानेवारीत आम्ही सगळे तेथे असताना गडबडीत कचरा (केळाची साले कचर्‍यात न टाकता खाली मोकळ्या जागेत चरणार्‍या म्हैशींना टाकायचा उद्योग करतात त्या) टाकताना यांनी कानातले पण हातात असावे ते फेकुन दिले. काल रात्री त्यांच्या स्वप्नात ते कानातले त्या खालच्या मोकळ्या जागेत असल्याचे दिसले. माताजी सकाळी उठुन गेल्या अन तेथे जाळलेल्या गवतातुन कानातलं घेउन्च वर आल्या. :)) वर आणि सांगताहेत, आता मी कुठलीतरी "अम्मा" व्हायला हरकत नसावी. ते काहीही असू दे. सापडल ना एकदाच बस. मी स्वतः किती शोधल होतं. कितीदा तो मंत्र म्हंटला होता. काय सांगु? कसल घणघणीत कानातल सोन्याच. मिळाल फार बर वाटलं.

छान कथा. एखादी गोष्ट हरवली कि डोक भंजाळून जाते.हे आपण अनुभवतोच. असो तो माणुस साक्षात गणपती तर नव्हता ना! अशी शंका यावी इतपत कथेचा बाज मस्त घेतला आहे.

बाबा पाटील 05/04/2014 - 20:20
तुम्हाला नक्की काय म्हणाचय्,माणसास चांगली होती का तुमच्या लॉकेटचा प्रभाव.का साक्षात गणरायाच तुम्हाला दर्शन देवुन गेले ? ? ? ? ?

In reply to by यसवायजी

आत्मशून्य 07/04/2014 - 00:03
एक कुटकथा म्हणून प्रकार फार वाचायला मिळायचा, अथवा इन्सेप्शन सारख्या चित्रपटांचा शेवटही "कूट" गणला जातो. म्हणजे गोष्ट नक्किच संपलेली असते, सांगण्यासारखे काहीच उरलेले नसते, पण Ambiguity मात्र अजुनही असते...! हा लेखनप्रकारही तसाच असावा.

जोशी 'ले' 05/04/2014 - 22:05
खरच अशी खुपशी चांगली माणसे आहेत त्या मुळेच जगरहाटी चालु आहे, हि अशी माणसे भेटली कि खात्री पटते माझ्या मिसेच्या पर्स मधुन अशीच छोटी पर्स ज्यात हजार बाराशे रुपये ,सोसायटीच्या बसचा पास ज्यात काहि फोन नंबर वगेरे नाही व काहि तिच्या द्रुष्टीने महत्वाच्या वस्तु होत्या ती रिक्षा पकडतांना पडली नंतर तब्बल 2 महिन्यां नंतर परत मिळाली .... झाले असे कि पर्स पडतांना एका फर्निचर च्या दुकानातील कारागीराने पाहिली त्याला वाटंल कि येतील त्या पर्स शोधत त्याने ती पर्स त्याच्या मालकाला दिली मालकानं ड्राॅवर मधे ठेउन दिली व विसरुन गेला तिकडे हा कारागीर 2 दिवसां नंतर यु पि ला गावी निघुन गेला ...परत आल्या वर त्याने पर्स बद्दल मालकाला विचारले ...नंतर हा भला मानुस सोसायटी आॅफिस मधे येउन घर नंबर घेउन पर्स देउन गेला. त्याला सगळेच पैसे देउ केले पण त्याने घेतले नाहि,

स्पंदना 06/04/2014 - 17:19
आत्ता नुकता साबांचा फोन आला. जानेवारीत आम्ही सगळे तेथे असताना गडबडीत कचरा (केळाची साले कचर्‍यात न टाकता खाली मोकळ्या जागेत चरणार्‍या म्हैशींना टाकायचा उद्योग करतात त्या) टाकताना यांनी कानातले पण हातात असावे ते फेकुन दिले. काल रात्री त्यांच्या स्वप्नात ते कानातले त्या खालच्या मोकळ्या जागेत असल्याचे दिसले. माताजी सकाळी उठुन गेल्या अन तेथे जाळलेल्या गवतातुन कानातलं घेउन्च वर आल्या. :)) वर आणि सांगताहेत, आता मी कुठलीतरी "अम्मा" व्हायला हरकत नसावी. ते काहीही असू दे. सापडल ना एकदाच बस. मी स्वतः किती शोधल होतं. कितीदा तो मंत्र म्हंटला होता. काय सांगु? कसल घणघणीत कानातल सोन्याच. मिळाल फार बर वाटलं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से...

चर्चा भाग ३: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी :मान्यताप्राप्त नकाशातज्ञ तसेच कॉपीराईट क्षेत्रातील कायदेततज्ञांची अनुपलब्धता

माहितगार ·

आत्मशून्य 05/04/2014 - 16:28
मी मनोरंजनक्षेत्रामधे स्वतःचे एक प्रोडक्ट जागतीक पातळीवर लाँच करत आहे. योगायोगाने त्याचे नाव ब्रिटनमधील मनोरंजन उद्योगातील एका दुसर्‍या प्रकारातील प्रोडक्टला (ज्या प्रकारात माझे प्रॉडक्ट मोडत नाही) आधीच वापरले गेल्याचे मला व्हिसी कडून निदर्शनास आणुन दिले गेले. आम्ही आमच्या वकिलासोबत याबाबत चर्चा करत आहोतच परंतु कतर बहुतांश चर्चात कॉपीराईट कशाला लागत नाही यावर लोकांची मते जाणून घ्यायला आवडेल.

कंजूस 05/04/2014 - 18:09
तुम्हाला हा प्रश्न का पडला ? केवळ चर्चा तीसुध्दा या क्षेत्राशी संबंधित नसलेल्या माझ्यासारख्यांनी करून काहीच उजेड पडणार नाही .आत्मशुन्य यांना प्रत्यक्ष अनुभव आहे .असे कितीजण लिहितील ही शंकाच आहे .

In reply to by कंजूस

माहितगार 06/04/2014 - 05:23
कंजूसजी, समस्या आहेत त्या सर्वांनाच आहेत जाणीव कमी जणांना असणे हा सजगतेचा प्रश्न झाला. चटके बसत नाहीत तो पर्यंत दाह कमी असतो गांभीर्य कमी असते. कायद्यांच्या बाबतीत चटके बसण्याची प्रक्रीया क्वचीत आधी सांगूनही होते पण बर्‍याचदा न सांगताही होते. अद्याप चटका बसला नाही काळजी का करावी ह्या करता मराठीतली म्हण 'सुपातले हसतात, जात्यातले ...' लागू पडते. मिपावर प्रश्न आत्ता का मांडतो आहे?, या मालिकेत कदाचित जरा उशीराने मांडला असता, श्रीकांत मोघे आणि सुधीर मोघे या बंधूद्वयांमध्ये नेमके मोठे कोण हा मराठी विकिपीडियावर चर्चेला आलेला साधा प्रश्न इकडे विचारण्या करता घेणार होतो त्यांच्या पैकी एकाचे कॉपीराइट साशंकीत असलेले छायाचित्र मराठी विकिपीडियावर कुणीतरी चढवले आहे, विकिपीडियावर लिहिणारे बर्‍याचदा शैक्षणिक उपयोगी येईल म्हणून लिहितात त्यांचा कॉपीराईट कायद्याच्या फेअर युज या तत्वाखाली आपल्याला माफ होईल असा सर्वसाधारण समज असतो पण कॉपीराइट कायद्याच माझ जिथपर्यंत ज्ञान आहे फेअर यूज हे तत्व इतर मराठी संकेतस्थळांप्रमाणेच मराठी विकिपीडियास सुद्धा लागू होत नाही असा माझा कयास आहे. या संबंधाने खात्री करून हवी आहे. मराठी विकिपीडियावर वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथे या बद्दल अधिक उहापोह केला आहे. हे झाल धागा काढण्याच तात्कालीक निमीत्त. मराठी संकेतस्थळांवर आणि मराठी विकिपीडियावर बरेच जण मराठी भाषेच्या प्रेमातून काही काम करत असतात, त्यांना अनभिज्ञतेच्या गर्तेत गाठीला एक पैशाच उत्पन्न न मिळता 'खाया पिया कुठनही गिलास फोडा बारा आना' असा प्रसंग येऊ नये या करता जरासा यत्न. कॉलेजात प्रत्यक्ष प्राचार्यांशी संपर्क करून, फेसबुक माध्यमातून संपर्क करून न होणारी गोष्ट मिपा वर धागा काढल्याने होईला का ? आपली शंका रास्तच आहे. कुणाला रस्ता सापडत नसेल तेव्हा आपण इतर चार चौघांना विचारण्याचा प्रयास करून पाहतो. समस्या जिथे आहे तेथील लोकांना जाणीव असण्याची अधिक शक्यता असू शकते. या धागा मालिकेला अपेक्षीत प्रमाणात रिस्पॉन्स नाही पण धागा काही पळून जात नाही. प्रश्न पुर्वी गांभीर्याने घेतला गेला नाही तर नंतर घेणारच नाहीत असे नाही आपण सकारात्मक होप धरून चालायचे एवढेच. माझ्या प्रतिसादाच्या लांबी बद्दल क्षमस्व. आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

आत्मशून्य 05/04/2014 - 16:28
मी मनोरंजनक्षेत्रामधे स्वतःचे एक प्रोडक्ट जागतीक पातळीवर लाँच करत आहे. योगायोगाने त्याचे नाव ब्रिटनमधील मनोरंजन उद्योगातील एका दुसर्‍या प्रकारातील प्रोडक्टला (ज्या प्रकारात माझे प्रॉडक्ट मोडत नाही) आधीच वापरले गेल्याचे मला व्हिसी कडून निदर्शनास आणुन दिले गेले. आम्ही आमच्या वकिलासोबत याबाबत चर्चा करत आहोतच परंतु कतर बहुतांश चर्चात कॉपीराईट कशाला लागत नाही यावर लोकांची मते जाणून घ्यायला आवडेल.

कंजूस 05/04/2014 - 18:09
तुम्हाला हा प्रश्न का पडला ? केवळ चर्चा तीसुध्दा या क्षेत्राशी संबंधित नसलेल्या माझ्यासारख्यांनी करून काहीच उजेड पडणार नाही .आत्मशुन्य यांना प्रत्यक्ष अनुभव आहे .असे कितीजण लिहितील ही शंकाच आहे .

In reply to by कंजूस

माहितगार 06/04/2014 - 05:23
कंजूसजी, समस्या आहेत त्या सर्वांनाच आहेत जाणीव कमी जणांना असणे हा सजगतेचा प्रश्न झाला. चटके बसत नाहीत तो पर्यंत दाह कमी असतो गांभीर्य कमी असते. कायद्यांच्या बाबतीत चटके बसण्याची प्रक्रीया क्वचीत आधी सांगूनही होते पण बर्‍याचदा न सांगताही होते. अद्याप चटका बसला नाही काळजी का करावी ह्या करता मराठीतली म्हण 'सुपातले हसतात, जात्यातले ...' लागू पडते. मिपावर प्रश्न आत्ता का मांडतो आहे?, या मालिकेत कदाचित जरा उशीराने मांडला असता, श्रीकांत मोघे आणि सुधीर मोघे या बंधूद्वयांमध्ये नेमके मोठे कोण हा मराठी विकिपीडियावर चर्चेला आलेला साधा प्रश्न इकडे विचारण्या करता घेणार होतो त्यांच्या पैकी एकाचे कॉपीराइट साशंकीत असलेले छायाचित्र मराठी विकिपीडियावर कुणीतरी चढवले आहे, विकिपीडियावर लिहिणारे बर्‍याचदा शैक्षणिक उपयोगी येईल म्हणून लिहितात त्यांचा कॉपीराईट कायद्याच्या फेअर युज या तत्वाखाली आपल्याला माफ होईल असा सर्वसाधारण समज असतो पण कॉपीराइट कायद्याच माझ जिथपर्यंत ज्ञान आहे फेअर यूज हे तत्व इतर मराठी संकेतस्थळांप्रमाणेच मराठी विकिपीडियास सुद्धा लागू होत नाही असा माझा कयास आहे. या संबंधाने खात्री करून हवी आहे. मराठी विकिपीडियावर वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथे या बद्दल अधिक उहापोह केला आहे. हे झाल धागा काढण्याच तात्कालीक निमीत्त. मराठी संकेतस्थळांवर आणि मराठी विकिपीडियावर बरेच जण मराठी भाषेच्या प्रेमातून काही काम करत असतात, त्यांना अनभिज्ञतेच्या गर्तेत गाठीला एक पैशाच उत्पन्न न मिळता 'खाया पिया कुठनही गिलास फोडा बारा आना' असा प्रसंग येऊ नये या करता जरासा यत्न. कॉलेजात प्रत्यक्ष प्राचार्यांशी संपर्क करून, फेसबुक माध्यमातून संपर्क करून न होणारी गोष्ट मिपा वर धागा काढल्याने होईला का ? आपली शंका रास्तच आहे. कुणाला रस्ता सापडत नसेल तेव्हा आपण इतर चार चौघांना विचारण्याचा प्रयास करून पाहतो. समस्या जिथे आहे तेथील लोकांना जाणीव असण्याची अधिक शक्यता असू शकते. या धागा मालिकेला अपेक्षीत प्रमाणात रिस्पॉन्स नाही पण धागा काही पळून जात नाही. प्रश्न पुर्वी गांभीर्याने घेतला गेला नाही तर नंतर घेणारच नाहीत असे नाही आपण सकारात्मक होप धरून चालायचे एवढेच. माझ्या प्रतिसादाच्या लांबी बद्दल क्षमस्व. आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी चर्चा मालिका: भाग १- भाग २ १) कार्टोग्राफर मान्यताप्राप्त नकाशांतज्ञच्या बाबतीत म्हणजे कार्टोग्राफरच्या बाबतीत खरेतर अनुपस्थित मराठी म्हणण्या पेक्षा आंतरजालावर अनुपस्थित भारतीय म्हणणे या धाग्याकरता अधिक उचीत ठरते. शासकीय यंत्रणे कडून जे काही (चुभूदेघे) कॉपीराईट नकाशे आंतरजालावर आहेत ते टेक्नीकली कॉपीराईटेड आहेत. मान्यताप्राप्त तज्ञ नसलेल्या इतरांनी बनवलेले नकाशे अचूकतेचा विश्वास देऊ शकत नाहीत.

डोंबिवली कट्टा वृत्तांत

भाते ·

पैसा 05/04/2014 - 10:54
भाते, मस्त लिहिताय तुम्ही. आता फक्त कट्ट्याचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया एवढ्यावर थांबू नका!

नंदी पॅलेस म्हणजे अगदी आमच्या अंगणात कट्टे करताय कि तुम्ही लोक!! यापुढे मला अक्षतांसकट आमंत्रण न आल्यास नंदी पॅलेस मधे कट्टा करता येणार नाही हे वेगळे सांगणे न लगे... कळावे, लोभ असावा..!!

कंजूस 05/04/2014 - 22:33
कट्टयाचा काही उद्देश असावा असं मला नेहमी वाटते .त्यात आपल्या छंदाचीच आवड असणाऱ्यांशी ओळखी आणि खादाडीची भर पडते .घारापुरीला ही हेच झाले . निनाद जर्मनीला स्थायिक असल्यामुळे फारच उत्सुकता होती .तिथले जीवन ,आहार ,आचार ,शिक्षणपध्दती या सर्वांचीच त्याने पटापट उत्तरे दिली .ज्यु० मुविला त्याने मार्गदर्शन केले .क्रिकेट आणि निवडणूका या {कंटाळवाण्या}विषयांना कल्टि मारण्यात आली .पूर्ण चार तास चर्चा झाली .शेवटी निनादने स्वत:चे बालपण ,शिक्षण ,व्यवसाय याबद्दल सांगितले .भारतीयांना परदेशांत संस्कृतीबदलामुळे बऱ्याच अडचणी येतात अथवा तडजोडी कराव्या लागतात .रुळायला थोडा वेळ लागतो । शुक्रवार असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती .

विनोद१८ 06/04/2014 - 17:44
ठरल्याप्रमाणे हा आमचा कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला. निनाद्बरोबर परिचय झाला वर भाते व कंजुस यांनी लिहील्याप्रमाणे भरपूर गप्पागोष्टी केल्या त्याचबरोबर नेहमीसारखे खाणेपिणे होतेच, आम्ही उपस्थितांनी या कट्ट्याचा अगदी मनमुराद आनंद घेतला. खाली मी काढलेल्या फोटोंची लिंक देत आहे, हे अशा पद्धतीने मी प्रथमच देत आहे, मला वाटते ते आपण सर्व पाहु शकाल. https://plus.google.com/photos/118210940635598474000/albums/5999143965353070577 @....स्वप्नांची राणी पुढ्च्यावेळी तुमच्या अंगणात नंदी पॅलेस मधे कट्टा करण्याअगोदर तुम्हाला अक्षतांसकट आमंत्रण नक्कीच देण्यात येइल त्याचा मान आपण राखावा अशी आशा व्यक्त करतो सर्व मिपाकर कट्टेकरांच्या वतीने.

In reply to by अत्रुप्त आत्मा

त्यासाठी तुम्हाला पुणे सोडून मध्यवर्ती ठिकाणाला म्हणजेच, डोंबिवलीला यावे लागेल.

असं म्हणतात कि जिथे रामकथा सुरु असेल तिथे हनुमान उपस्थित असतो. त्याप्रमाणे जिथे मिपा करांचा कट्टा असतो तिथे मुक्तविहारी हजर असतात.(तसे ते मंगळावर देखील जाऊन आले आहेत) त्यांचा फोन आला होता आणि चि. निहार सुद्धा हजर होता. निनाद यांच्याकडून जर्मनी बद्दल बरीच माहिती मिळाली. निनाद यांनी, ते काम करीत असलेले क्षेत्र का आणि कसे निवडले, हे तरुण पिढीने ऐकण्यासारखे आहे. चेंडू फळी च्या सामन्याकडे मुद्दाम पाठ करून बसल्यामुळे कट्ट्याचा पूर्ण आनंद घेता आला. कंजूस यांची प्रथमच भेट झाली. शनि, रवि वार सोडून ट्रेक करण्याची त्यांची कल्पना खूपच आवडली. डॉक्टर खरे यांनी नेहमी प्रमाणे गप्पांमध्ये जान भरली. विनोद १८ यांनी फोटो काढले आहेत ते दिसतीलच. भाते यांनी वृत्तांताची सुरवात छान करून दिली आहे. आणि शेवटी डोंबिवली स्टेशन वर निनाद आणि डॉक्टर खरे यांनी ज्या त्वरेने गाडी साठी धाव घेतली त्यावरून डॉक्टरांचा फिटनेस दिसतो त्यापेक्षा खूपच उच्च दर्जाचा आहे याही खात्री पटली. सही >शुद्ध लेखनाच्या सर्व चुका मायमराठी च्या लेकरांनी माफ केल्या नाही तरी माय मराठी नक्की माफ करेल. याची खात्री असलेला

In reply to by पिलीयन रायडर

शिद 07/04/2014 - 15:19
हे फोटो वरच नाव टाकायची आयडिया छान आहे.. आवडली!!
+१००... असेच म्हणतो. अवांतरः फोटो मध्ये सगळ्यांचे डोळे बरेच जड झालेले दिसताहेत. ;)

In reply to by शिद

भाते 07/04/2014 - 16:21
आता निनादबरोबर 'पक्षी तिर्थ कट्टा' असल्यामुळे ते तर होणारच होते. म्हणुनच इतरांची जळजळ होऊ नये याची काळजी घेऊन खादाडीचा ऊल्लेख आणि फोटो या वृत्तांतांत दिसत नाही आहे.

डॉ. सुहास खरे आणि डॉ. सुबोध खरे ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का?

In reply to by स्वप्नांची राणी

नाय हो. मी त्या "डोळे जड" वाल्या पार्टीत नव्हतो. मी ज्या वेगळ्या कट्ट्याला हजर होतो तो भर दुपारचा कोरडा कट्टा होता :( मनातल्या मनातः ओळख करून घेण्याच्या अगोदर डोळे जड होण्याइतकी परिस्थिती बिघडली नाही असा अंदाज आहे ;)

ज्यु.मुवि एकदम अनुष्का शर्मा चा भाउ असल्यासारखे दिसतायेत. म्मस्स्त वृत्तांत हो भातेसाहेब!! आणि खरच ती फोटोवर नाव घालायची आयडिया भारिये! उगाचच ते 'डाविकडुन तिसरे आणि उजविकडुन पाचवे' ची गरज नाहि.

विनोद१८ 07/04/2014 - 15:55
डॉ. सुहास खरे आणि डॉ. सुबोध खरे ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का ? नाही बरोबर आहे तुमचे, ही माझ्याकडून चूक झाली मान्य आहे. ते 'डॉ. सुबोध खरे' असेच हवे होते. पुढच्यावेळी असे होणार नाही याची काळजी घेइन. @...डॉ. सुबोध खरे : क्षमस्व. चूक लक्षात आणुन दिल्यबद्दल धन्यवाद.

कट्ट्याचा वृत्तांत व प्रतिसाद आवडले. हा माझा मिपाचा दुसरा कट्टा होता. माझ्या जन्मगावात हा कट्टा असल्याने तिथे जाण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. डॉ खरे वगळता इतर मिपाकारांशी मी पहिल्यांदा भेटत होतो. आदल्या दिवशी मूवी ह्यांनी खास सौदी अरेबियातून मला फोन केला होता. मूवी कंजूस काका.भ ट क्या खे ड वा ला ,विनोद१८ , सर्वांशी मनोसोक्त गप्पा झाल्या. कट्टा संपला तेव्हा नुसते डोळे नाही तर अंत करण सुद्धा जड झाले होते. ज्यांच्याशी आपण आभासी जगतात संपर्क साधतो , पुढे लिखाण व प्रतिसादातून एकेक व्यक्ती व त्यातील वल्ली आपल्यापुढे उलघडत जातात. पुढे ही सर्व मंडळी आपल्या भाव विश्वाचा एक भाग बनून जातात. मूवी सारखा एक कलंदर स्वतः भारतात नसले तरी माझ्या सारखा एक डोंबिवलीकर परदेशातून येउन डोंबिवलीत कट्टा करण्याची इच्छा मिपावरील एका धाग्यात व्यक्त केली म्हणून पुढाकार घेऊन कट्टा आयोजित करतात. स्वतः फोन करून आपली कट्ट्यात हजेरी लावतात हे सारे विलक्षण आहे. कट्ट्याच्या सुरवातीला भाते व माझी डोंबिवली ह्या विषयावर चर्चा झाली. पण पूर्वीचे डोंबिवली आता राहिले नाही असे चुकून सुद्धा आमच्या तोंडातून आले नाही. डॉ ह्यांचे त्यांच्या शेत्रातील अनुभव त्यांच्या तोंडून ऐकल्यावर त्यांच्या अनेक धाग्यांवर मी जी मतांतरे व्यक्त केली होती त्या बद्दल काही अंशी माझे मत परिवर्तन झाले हे ह्या निमित्ताने जाहीररीत्या मी कबूल करतो. एक डोंबिवलीकर व मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान हृदयात दृढ करून मी डोंबिवली स्टेशन वरून प्रयाण केले.

पैसा 05/04/2014 - 10:54
भाते, मस्त लिहिताय तुम्ही. आता फक्त कट्ट्याचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया एवढ्यावर थांबू नका!

नंदी पॅलेस म्हणजे अगदी आमच्या अंगणात कट्टे करताय कि तुम्ही लोक!! यापुढे मला अक्षतांसकट आमंत्रण न आल्यास नंदी पॅलेस मधे कट्टा करता येणार नाही हे वेगळे सांगणे न लगे... कळावे, लोभ असावा..!!

कंजूस 05/04/2014 - 22:33
कट्टयाचा काही उद्देश असावा असं मला नेहमी वाटते .त्यात आपल्या छंदाचीच आवड असणाऱ्यांशी ओळखी आणि खादाडीची भर पडते .घारापुरीला ही हेच झाले . निनाद जर्मनीला स्थायिक असल्यामुळे फारच उत्सुकता होती .तिथले जीवन ,आहार ,आचार ,शिक्षणपध्दती या सर्वांचीच त्याने पटापट उत्तरे दिली .ज्यु० मुविला त्याने मार्गदर्शन केले .क्रिकेट आणि निवडणूका या {कंटाळवाण्या}विषयांना कल्टि मारण्यात आली .पूर्ण चार तास चर्चा झाली .शेवटी निनादने स्वत:चे बालपण ,शिक्षण ,व्यवसाय याबद्दल सांगितले .भारतीयांना परदेशांत संस्कृतीबदलामुळे बऱ्याच अडचणी येतात अथवा तडजोडी कराव्या लागतात .रुळायला थोडा वेळ लागतो । शुक्रवार असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती .

विनोद१८ 06/04/2014 - 17:44
ठरल्याप्रमाणे हा आमचा कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला. निनाद्बरोबर परिचय झाला वर भाते व कंजुस यांनी लिहील्याप्रमाणे भरपूर गप्पागोष्टी केल्या त्याचबरोबर नेहमीसारखे खाणेपिणे होतेच, आम्ही उपस्थितांनी या कट्ट्याचा अगदी मनमुराद आनंद घेतला. खाली मी काढलेल्या फोटोंची लिंक देत आहे, हे अशा पद्धतीने मी प्रथमच देत आहे, मला वाटते ते आपण सर्व पाहु शकाल. https://plus.google.com/photos/118210940635598474000/albums/5999143965353070577 @....स्वप्नांची राणी पुढ्च्यावेळी तुमच्या अंगणात नंदी पॅलेस मधे कट्टा करण्याअगोदर तुम्हाला अक्षतांसकट आमंत्रण नक्कीच देण्यात येइल त्याचा मान आपण राखावा अशी आशा व्यक्त करतो सर्व मिपाकर कट्टेकरांच्या वतीने.

In reply to by अत्रुप्त आत्मा

त्यासाठी तुम्हाला पुणे सोडून मध्यवर्ती ठिकाणाला म्हणजेच, डोंबिवलीला यावे लागेल.

असं म्हणतात कि जिथे रामकथा सुरु असेल तिथे हनुमान उपस्थित असतो. त्याप्रमाणे जिथे मिपा करांचा कट्टा असतो तिथे मुक्तविहारी हजर असतात.(तसे ते मंगळावर देखील जाऊन आले आहेत) त्यांचा फोन आला होता आणि चि. निहार सुद्धा हजर होता. निनाद यांच्याकडून जर्मनी बद्दल बरीच माहिती मिळाली. निनाद यांनी, ते काम करीत असलेले क्षेत्र का आणि कसे निवडले, हे तरुण पिढीने ऐकण्यासारखे आहे. चेंडू फळी च्या सामन्याकडे मुद्दाम पाठ करून बसल्यामुळे कट्ट्याचा पूर्ण आनंद घेता आला. कंजूस यांची प्रथमच भेट झाली. शनि, रवि वार सोडून ट्रेक करण्याची त्यांची कल्पना खूपच आवडली. डॉक्टर खरे यांनी नेहमी प्रमाणे गप्पांमध्ये जान भरली. विनोद १८ यांनी फोटो काढले आहेत ते दिसतीलच. भाते यांनी वृत्तांताची सुरवात छान करून दिली आहे. आणि शेवटी डोंबिवली स्टेशन वर निनाद आणि डॉक्टर खरे यांनी ज्या त्वरेने गाडी साठी धाव घेतली त्यावरून डॉक्टरांचा फिटनेस दिसतो त्यापेक्षा खूपच उच्च दर्जाचा आहे याही खात्री पटली. सही >शुद्ध लेखनाच्या सर्व चुका मायमराठी च्या लेकरांनी माफ केल्या नाही तरी माय मराठी नक्की माफ करेल. याची खात्री असलेला

In reply to by पिलीयन रायडर

शिद 07/04/2014 - 15:19
हे फोटो वरच नाव टाकायची आयडिया छान आहे.. आवडली!!
+१००... असेच म्हणतो. अवांतरः फोटो मध्ये सगळ्यांचे डोळे बरेच जड झालेले दिसताहेत. ;)

In reply to by शिद

भाते 07/04/2014 - 16:21
आता निनादबरोबर 'पक्षी तिर्थ कट्टा' असल्यामुळे ते तर होणारच होते. म्हणुनच इतरांची जळजळ होऊ नये याची काळजी घेऊन खादाडीचा ऊल्लेख आणि फोटो या वृत्तांतांत दिसत नाही आहे.

डॉ. सुहास खरे आणि डॉ. सुबोध खरे ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का?

In reply to by स्वप्नांची राणी

नाय हो. मी त्या "डोळे जड" वाल्या पार्टीत नव्हतो. मी ज्या वेगळ्या कट्ट्याला हजर होतो तो भर दुपारचा कोरडा कट्टा होता :( मनातल्या मनातः ओळख करून घेण्याच्या अगोदर डोळे जड होण्याइतकी परिस्थिती बिघडली नाही असा अंदाज आहे ;)

ज्यु.मुवि एकदम अनुष्का शर्मा चा भाउ असल्यासारखे दिसतायेत. म्मस्स्त वृत्तांत हो भातेसाहेब!! आणि खरच ती फोटोवर नाव घालायची आयडिया भारिये! उगाचच ते 'डाविकडुन तिसरे आणि उजविकडुन पाचवे' ची गरज नाहि.

विनोद१८ 07/04/2014 - 15:55
डॉ. सुहास खरे आणि डॉ. सुबोध खरे ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का ? नाही बरोबर आहे तुमचे, ही माझ्याकडून चूक झाली मान्य आहे. ते 'डॉ. सुबोध खरे' असेच हवे होते. पुढच्यावेळी असे होणार नाही याची काळजी घेइन. @...डॉ. सुबोध खरे : क्षमस्व. चूक लक्षात आणुन दिल्यबद्दल धन्यवाद.

कट्ट्याचा वृत्तांत व प्रतिसाद आवडले. हा माझा मिपाचा दुसरा कट्टा होता. माझ्या जन्मगावात हा कट्टा असल्याने तिथे जाण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. डॉ खरे वगळता इतर मिपाकारांशी मी पहिल्यांदा भेटत होतो. आदल्या दिवशी मूवी ह्यांनी खास सौदी अरेबियातून मला फोन केला होता. मूवी कंजूस काका.भ ट क्या खे ड वा ला ,विनोद१८ , सर्वांशी मनोसोक्त गप्पा झाल्या. कट्टा संपला तेव्हा नुसते डोळे नाही तर अंत करण सुद्धा जड झाले होते. ज्यांच्याशी आपण आभासी जगतात संपर्क साधतो , पुढे लिखाण व प्रतिसादातून एकेक व्यक्ती व त्यातील वल्ली आपल्यापुढे उलघडत जातात. पुढे ही सर्व मंडळी आपल्या भाव विश्वाचा एक भाग बनून जातात. मूवी सारखा एक कलंदर स्वतः भारतात नसले तरी माझ्या सारखा एक डोंबिवलीकर परदेशातून येउन डोंबिवलीत कट्टा करण्याची इच्छा मिपावरील एका धाग्यात व्यक्त केली म्हणून पुढाकार घेऊन कट्टा आयोजित करतात. स्वतः फोन करून आपली कट्ट्यात हजेरी लावतात हे सारे विलक्षण आहे. कट्ट्याच्या सुरवातीला भाते व माझी डोंबिवली ह्या विषयावर चर्चा झाली. पण पूर्वीचे डोंबिवली आता राहिले नाही असे चुकून सुद्धा आमच्या तोंडातून आले नाही. डॉ ह्यांचे त्यांच्या शेत्रातील अनुभव त्यांच्या तोंडून ऐकल्यावर त्यांच्या अनेक धाग्यांवर मी जी मतांतरे व्यक्त केली होती त्या बद्दल काही अंशी माझे मत परिवर्तन झाले हे ह्या निमित्ताने जाहीररीत्या मी कबूल करतो. एक डोंबिवलीकर व मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान हृदयात दृढ करून मी डोंबिवली स्टेशन वरून प्रयाण केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कट्टा ऊत्त्सवमुर्ती निनादने सुचवल्याप्रमाणे दरवेळी एकानेच संपुर्ण वृत्तांत लिहिण्याच्या प्रथेला छेद देऊन कोणीतरी एकाने सुरुवात करून बाकीच्यांनी त्या वृत्तांतांत प्रतिसादांमधुन भर घालायची असे ठरल्याने वृत्तांतांची सुरुवात करण्याचे काम माझ्यावर ढकलण्यात आले. साडेसातच्या सुमारास नंदी पॅलेस येथे जमायचे ठरले असल्याने मी हॉटेलसमोर जाऊन इतरांची वाट पहात ऊभा होतो. माझ्या समोरच आणखी एक गृहस्थ इतर कोणाचीतरी वाट पहात ऊभे होते. निनाद आल्यावर एकमेकांची ओळख करून घेऊन आम्ही दोघे आतमध्ये शिरलो.

अनाम वीरा...

अत्रुप्त आत्मा ·

स्पंदना 05/04/2014 - 11:46
आत्मुस काव्य लिहिणारा लिहुन जातो. आपण ज्या परिस्थीती ते ऐकतो, त्या संदर्भानुरुप त्याचा उलगडा नव्याने आपणास होतो. या कवितेचही तसच झालंय. असेलही वाटला असा अर्थ तुम्हाला ज्या पद्धतिचे रसग्रहण तुम्ही केलय. मला अभंग ऐकताना सुद्धा असाच काहीसा संभ्रम पडतो.

स्पंदना 05/04/2014 - 11:46
आत्मुस काव्य लिहिणारा लिहुन जातो. आपण ज्या परिस्थीती ते ऐकतो, त्या संदर्भानुरुप त्याचा उलगडा नव्याने आपणास होतो. या कवितेचही तसच झालंय. असेलही वाटला असा अर्थ तुम्हाला ज्या पद्धतिचे रसग्रहण तुम्ही केलय. मला अभंग ऐकताना सुद्धा असाच काहीसा संभ्रम पडतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनाम वीरा.... एखादे शब्द मनावर गारुड का करून जातात? जेंव्हा जीवनाची ठराविक एक अशी काहिही समज आलेली नसते,तेंव्हाही.आणि जेंव्हा ती आलेली आहे,असा भास होत असतो,तेंव्हांही!!! हे गाणं मी पूर्विही ऐकलय...आज घरी येता येता सहज ऐकलं. आणि ते तितक्याच सहजतेनी विसरलंही गेलं! आणि अत्ता कानात परत वाजू लागलं? का??? ही रात्रीची वेळ शांत असते म्हणून? की अणखि काही? मृत्यु..हा जिवनातला अविभाज्य भाग किंवा त्याचा शेवटचा परिणाम असला,तरी तो सहज/नैसर्गिक असेल तर नकोसा(च) वाटतो!

नरसोबाची वाडी

जातवेद ·

रामपुरी 05/04/2014 - 00:46
लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यात. "नदीत पोहणे" या एकमेव आकर्षणामुळे वाडी फार आवडायची. पेढे हे दुसरं आकर्षण. (हल्ली वरच्या बाजूला नदीत सांडपाणी सोडतात हे कळाल्यापासून नदीत पाय सुद्धा टाकवत नाही)

यसवायजी 05/04/2014 - 01:13
आठवणी.. उन्हात पाय पोळत असताना ते गार पाणी... आहाहा.. नावेतून नदी पार करुन पलीकडच्या त्या मंदीरात जायला फार आवडायचे. आता आठवत नाही, कसलं मंदीर आहे हो ते??

पैसा 05/04/2014 - 08:18
एकदा सांगलीहून धावत पळत गेले होते. मुळात खूप सुंदर ठिकाण असावं. मात्र प्रचंड गर्दीमुळे देवस्थानचं दर्शन घेता आलं नाही आणि माशा आणि एकूण बकालपणा पाहून पेढे, खवा घ्यायचंही धाडस झालं नाही.

In reply to by पैसा

प्रचेतस 05/04/2014 - 08:20
सहमत आहे. खिद्रापूरच्या भेटीच्या निमित्ताने वाडीला भेट द्यायचा योग आला होता. बाजार मांडलाय नुसता.

In reply to by प्रचेतस

जातवेद 05/04/2014 - 09:09
आमच्या सवयीचा भाग आहे म्हणून कदचीत वाटत नसेल. पण क्वचित जाणर्‍यांनी शक्यतो गर्दिच्या दिवशी जाणे टाळावे बराच फरक पडतो.

कंजूस 05/04/2014 - 08:47
इथून गाडीला किक मारली की पाऊण तासात .कुठून ? जरा सांगली मिरज कोल्हा० रे स्टे /बस डेपोचे अंतर लिहाल का ? भुतं काढण्याचा प्रकार आता तिकडे चालू आहे का ?त्याबद्दल ऐकले आहे . दत्ताचे सर्वात रम्य ठिकाण (अजूनही)भिलवडी स्टेशन जवळ आहे .येथून जवळच सात किमिवर तासगावातले चांगले गणपतीचे देऊळ आहे .

In reply to by कंजूस

जातवेद 05/04/2014 - 09:01
इथून म्हणजे ईचलकरंजी. तिकडे अंतर वेळेतच मोजतात :) मी तर कधी भुतं काढण्याच्या प्रकाराचं ऐकलं नाही. तुम्ही गाणगापुर संदर्भात ऐकलं असेल.

मदनबाण 05/04/2014 - 08:58
मला सर्वात जास्त आवडणारे ठिकाण. मी जवळपास ३० वर्ष सातत्याने या जागी येतो आहे,आणि मी या बाबतीत स्वतःला फार भाग्यवान समजतो. :) या जागेशी माझे अतुट नाते आहे.लहानपणा पासुन ते आत्ता पर्यंतचा सगळा बदल मी पाहिला आहे. माझ्या नशिबाने अनेक विद्वान आणि प्रेमळ आणि आचरण संपन्न लोकांचा सहवास मला इथे झाला. त्यातलेच एक म्हणजे रामचंद्र नारायण जेरे-पुजारी {रामशास्त्री} यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृतातला कालिदास पुरस्कार देण्यात आला होता. माझ्या लहानपणी यांचे बोट धरुन मी देवपुजेसाठी जात असे.. संपूर्ण वाडी-गावाला शिस्त आणी नियम घालुन दिले ते यांनीच.त्याकाळी संपूर्ण गावात दगडांचे रस्ते होते, डांबराचे रस्ते कुठेच नव्हते. दगडांच्या रस्त्यांवरुन अनवाणी चालताना त्यावेळी पाय फार भाजायचे. पवमान {विष्णु स्तुती}ऐकायला मला फार आवडते आणि तेही इथेच देवा समोर बसुन ऐकण्याचा आनंद वेगळाच. इथे अनेक उत्सव आणि विधी पहायला आणि अनुभवायला मिळाले... कन्यागत पर्वात सुद्धा इथे काळ व्यतित करण्याचे भाग्य मला लाभले आहे. गायक अजित कडकडे यांचे सुद्धा वाडीशी जिव्हाळ्याचे नाते आहे,आणि लहानपणी कॄष्णेच्या पाण्यात बुडता-बुडता ते वाचले होते अशी त्यांची आठवण ते सांगतात. तसेच त्यांनी अनेक गाणी दत्त प्रभुंवर आणि वाडीवर गायली आहेत, त्यातली मला दत्त दत्त मुखे म्हणा, पावना दत्त्त आणि नरसोबाच्या वाडीला जाउ चला ही गाणी विशेष आवडतात. ही गाणी इथे ऐकता येतील :- http://www.smashits.com/datt-mukhe-mhnna/songs-23271.html

चावटमेला 05/04/2014 - 10:19
दत्तगुरूंच्या तीन प्रमुख ठिकाणांपैकी वाडी (हो नुसती वाडीच :)) हे माझे सर्वांत आवडते ठिकाण. लहानपणी बाबा नेहमी स्कूटरने घेवून जायचे. वाडीचा पेढा छानच, एकूणातच कृष्णाकाठी दुधाचे पदार्थ चांगलेच मिळतात. वरील एका शंकेला उत्तर सांगली ते नरसोबावाडी अंतर - २० किमी, कुरुंदवाड यष्टी पकडावी. मिरज ते नरसोबावाडी (सर्वांत जास्त सोयीचे) - १५ किमी, दर अर्ध्या तासाला कुरुंदवाड सिटी बस मिरज स्टँड वरून असते.

सस्नेह 05/04/2014 - 11:46
अजूनही महिन्या दोन महिन्यातून एकदा वाडीला जाते. दत्तगुरूंना दंडवत घालते अन पेढे घेऊन येते. आणि हो, सोमणांकडचे जेवण विसरलात काय ? ती वांग्याची भाजी, भरपूर नारळ अन कढीपत्ता घातलेली आमटी, बातात्त्याची भाजी, काकडीची गोडसर कोशिंबीर अन गाजराचे लोणचे ! वर ताजे ताक ! स्स्स !

भाते 05/04/2014 - 20:44
फेब्रुवारी महिन्यात शुक्रवारी पौर्णिमेला माझा वाडीला जायचा योग आला. सह्याद्रीने मी मुंबईहुन कोल्हापुरला गेलो. देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर मी कोल्हापुरहुन एसटीने वाडीला गेलो. पायावर पाणी घ्यायला मी खाली कृष्णा नदीच्या पायरीशी गेलो. बाजुला अर्ध्या फुटावर साबण लाऊन कपडे धुवत असलेल्या पाण्यात चुळ भरणारे भक्त मी तिथे पाहिले. नंतर ते साबणमिश्रित पाणी पिणारे हेच भक्त बसमध्ये बसल्यावर बाटलीतल्या शुद्ध पाण्याचा आग्रह करताना पाहुन मला नवल वाटले. वाडीला प्रचंड गर्दीत कसेबसे दर्शन घेऊन झाल्यावर मी कोल्हापुरला परत जाण्यासाठी सुमारे दोनच्या सुमारास बस स्थानकावर आलो. पुढल्या दोन तासांत किमान ५० बस येऊन गेल्या आणि त्यापैकी ३० कुरुंदवाडसाठी होत्या. (माझ्या सुदैवाने) चारच्या सुमारास कोल्हापुर बस आली. बसमध्ये चढायला अक्षरश: मारामारी करावी लागली. रात्रीची महालक्ष्मी चुकते कि काय अशी भीती मला वाटत होती. पण माझ्या सुदैवाने मला महालक्ष्मीमधुन मुंबईला परत यायला मिळाले. तेव्हापासुन पौर्णिमेला कोल्हापुर आणि वाडीला जायचे नाही असे मी ठरवले.

In reply to by भाते

जातवेद 06/04/2014 - 11:25
तुम्हाला महालक्ष्मीच पकडायची होती तर तुम्ही जयसिंगपूर नाहितर मिरजेला ला जायला हवे होते. ते बरे पडले असते आणि एका तासाच्या वेळेबरोबर मारामारी पण वाचली असती :) उगाच उलटे फिरून गेलात.

कंजूस 06/04/2014 - 05:12
धन्यवाद चावटमेला .भुतांची वाडी ही नाही तर .मला एक शंका आहे .दत्तावतार ,दत्त फक्त महाराष्ट्रातच (आणि गिरनार ,अबुला )आहे .दक्षिणेत त्रिमुर्ती आहे पण दत्तमहाराज ,अनुसुया इत्यादि ऐकिवात नाही .

In reply to by कंजूस

जातवेद 06/04/2014 - 11:12
श्रीपाद श्रीवल्लभ या पहिल्या दत्तावतारांचे क्षेत्र पीठापूरम् आणि कुरवपूर ही आंध्र प्रदेश मधली ठिकणे आहेत. प.पू. वासुदेवानंद सरस्वति टेंबे स्वामी महाराज आणि रंगावधूत महाराज यांचे बरेच कार्यक्षेत्र गुजरात मधे आहे. एखादा संप्रदाय किती ठिकाणी जास्त पसरला आहे त्याच्यावर त्याची योग्याता ठरत नाही. बाकी भारतात एवढे खंडीभर देव, त्यांचे अवतार आणि त्या त्या संप्रदायातले महाराज आहेत कि सर्वांनी सगळिकडे प्रसिद्ध असण्याची आवश्यकता नाही.

In reply to by जातवेद

सुहासदवन 06/04/2014 - 11:35
जो दत्त अवतार तिन्ही प्रमुख देवांचे as a strategical representation ठरू शकतो तो केवळ महाराष्ट्रक्षेत्री का म्हणून प्रसिद्ध असावा..... Practically सम्पूर्ण भारतात ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्या तिन्हींपैकी कोणाची एकाची तरी पूजा नक्कीच होते प्रत्येक राज्यात.... मार्केटिंगला अजूनही वाव असावा बहुतेक.....

In reply to by जातवेद

सुहासदवन 06/04/2014 - 13:53
उत्तरेच्या खाटू शामबाबांपासून ते दक्षिणेच्या बालाजी सारखी इतर अनेक दैवते इथे पाप्युलर होतात तर मग आपण आपल्या दैवतांची पद्धतशीर मार्केटिंग कधी करणार..... नाहीतर इथल्या cosmopolitan संस्कृतीप्रमाणे आपले देव देखील काही वर्षांनी cosmopolitan झालेले पाहावे लागतील..... कृ. मी सहज बोलतोय, केवळ वादाला प्रतिवाद म्हणून नाही.....

In reply to by सुहासदवन

दत्ता जोशी 11/10/2015 - 22:46
आपले देव, त्यांचे देव, दक्षिणेतले देव उत्तरेतले देव असा काही नसत. खातू श्याम बाबा काय, बालाजी काय, पांडुरंग काय, राम प्रभू काय सगळे श्री विष्णूच ( अवतार) . दत्त जन्माच्या वेळेला ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिघेही लहान बाळे झाले असले तरी पुढे ब्रह्म चंद्र आणि महेश दुर्वास रूपाने निघून गेले आणि दत्त+अत्री पुत्र ( ऋषी, सती अनुसूयेचे पती) म्हणून दत्तात्रेय . दत्तात्रय ( तिघे) नव्हे. दत्त महाराजांची भ्रमंती उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरात ( नर्मदा परिसर) इथे झाल्याने त्यांची पूजा या भागात जास्ती होते. श्री दत्त गुरु हे नाथ संप्रदायाचे आदीगुरु. (गहनीनाथ - निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर माउली अशी परंपरा ऐकली असेलच )नवनाथ आणि दत्त गुरूंना शैव, बौद्ध आणि जैन धर्मातही आदराचे स्थान आहे. तसेच महानुभाव पंथातले आदिगुरु म्हणजे श्री दत्त गुरूच. मुस्लिम सुफी पंथ आणि दत्तगुरूंचे नातेपण तितकेच दृढ. थोडक्यात सांगायचा तर हा खूप मोठा संप्रदाय आहे आणि त्याचे बरेच पंथ आणि उपपंथ आहेत. असो.

In reply to by तर्राट जोकर

दत्ता जोशी 12/10/2015 - 08:35
हा प्रश्न शंका म्हणून विचारला गेलाय असे गृहीत धरून उत्तर देतो. शिव, विष्णू, राम. कृष्ण, विठठल, नृसिंह. त्याच प्रमाणे श्री दत्तात्रेय हे हि देवच. वेगवेगळे दत्तावतार, नाथ, सिद्ध, संत, गौतम बुद्ध यांनी गुरु शिष्य परंपरेने साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले ते गुरु. आणि या सगळ्यांचे आद्य गुरु हे श्री विष्णू किंवा श्री दत्तात्रेय किंवा दक्षिणामूर्ती ( म्हणजे गुरुरूपातील श्री शंकर). यातील कोणीही साधकाचा गुरु असू शकतो. गुरु-शिष्य हि एक सुंदर आणि महत्वाची भारतीय परंपरा आहे. इति लेखन सीमा.

बॅटमॅन 07/04/2014 - 18:25
वाडीला जायचं तर मिरजेहून वट्ट १५ किमी अंतर आहे. सांगलीसनं सुद्धा जवळच आहे. अन बकालपणाबद्दल सहमत आहे. बाजार मांडलेला आहेच-पण गर्दी नसते तेव्हा जावं, छान वातावरण असतं. अर्थात नदी प्रदूषित आहेच म्हणा. बाकी लेख वाचून वाडीच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. मिरजेहून सायकल ताबडवत मित्र मिळून तिथे जायचो घरनं डबे घेऊन, मग कुठेतरी जागा मिळेल तसे खायचो. पेढे घेऊन, एखादी बासुंदी मारून मग परत फिरायचो. लै मज्जा.

रामदास 07/04/2014 - 21:44
श्री.म. माट्यांचा जसे लोक तसे त्यांचे देव हा लेख वाचला होता त्या लेखाची आठवण झाली. "जसे लोक तशी त्यांची देवस्थाने " खंत आहेच.

तर्राट जोकर 11/10/2015 - 21:51
गुरूचरित्रात सांगितले आहे म्हणे कि एखादी गरोदर बाई जसे चालते तशा प्रदक्षिणा घालाव्यात, काही लोक त्या बाईचे मुल आता धाउ लागले आहे आनि त्यामागून आपण पळतोय (मुलाच्या) असं चालतात.
सगळं आध्यात्म हे स्लो मध्येच आहे. लोक त्याचंही भजं करून टाकतेत....

बोका-ए-आझम 11/10/2015 - 22:08
वाडी फारच लहानपणी पाहिली होती. पण हा लेख वाचून एकदा परत जावं अशी इच्छा झाली. बाकी बकाल कुठलं तीर्थक्षेत्र नाहीये? काही जास्त काही कमी!

वाडीला एकदाच गेलो आहे. जेव्हा गेलो तेव्हा बर्‍यापैकी गर्दी होती. पण, एक नदीतली घाण सोडल्यास अनुभव चांगलाच होता. एका घरात जेवलो. करदंट खाल्लं. पेढे घेतले. बासुंदी प्यायलो मनसोक्त. तुम्ही बासुंदीचा उल्लेख केला नाहीत. फारच अप्रतिम होती. जिथे जेवलो त्यांच्याकडे घरी बनविलेली होती. ती पण मस्त आणि मग बाहेर एके ठिकाणी दुकानात प्यायलो ती ही मस्त.

बासूंदी कुरूंवाडची फेमस,हे सुधा मूर्ति चं आजोल, वाडीचे पेढे व कवठाची बर्फी,प्रसिद्ध क वठाची बर्फ़ी अन्य दुनियेत कुठं मिलत नाही,

Sanjay Uwach 12/10/2015 - 00:25
श्री नृसिंह सरस्वती यांनी, हे ठिकाण कधी काळी आपल्या तपश्र्चर्या साठी योग्य वाट्ल्याने निवडले होते . हे ठिकाण त्या काळी १ निर्जन ठिकाण २ कृष्णा पंचगंगा यांचा संगम झालेले निसर्ग रम्य ठिकाण ३. अतिशय दाट जंगल असणारे, लोक वस्ती पासून दूर असणारे अशा स्वरूपाचे होते . इथेही त्यांना लोंकानी त्रास दिल्या मुळे, त्यांनी आपल्या तपश्र्चर्या चे ठिकाण बदलावे लागले. मात्र नृसिहवाडी इथे, एका भक्त मुस्लिम सरदाराने, त्यांचे मंदिर उभा केले आहे .त्या मुळे या मंदिराला शिखर नाही आहे. आता मंदिर म्हटले कि बऱ्याच गोष्टी आल्या.लोकांची गर्दी आली . व्यापारी आले, हॉटेलवाले आले,लॉज वाले आले, अर्थात त्यांची नावे थोडी गोंडस असू शकतील उदा: भक्त धाम वगैरे वगैरे . आपल्या वेगवेगळ्या हेतूने प्रेरित होऊन येणारे भक्त आले. मला मात्र लहान पणी वाडीला जायचे आकर्षण होते ते नदीत तासन तास डुबंण्याचे व मामा कडून मिळणाऱ्या गोड गोड साखरी पेढ्यांचे. श्री. पटवर्धन नावचे बेंगलोर मधिल एक तज्ञ डॉक्टर, आपले वैभव संपन्न घरदार, हॉस्पिटल सोडुन आगदी आपल्या मृत्यू प्रर्यंत त्या मंदिरात श्री दत्तगुरुच्या सेवेला राहीलेले मी पाहीले आहेत. आर्थात जसा भाव तसा देव.

पद्मावति 12/10/2015 - 00:39
वाह, सुंदर लेख. नरसोबाच्या वाडीचं इतकं छान वर्णन तुम्ही केलंय की तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा होतेय.

दत्ता जोशी 12/10/2015 - 10:12
तोड्फोडीतून वाचलेले खिद्रापूरचे मंदीर अजूनही अप्रतीम सुंदरच. पण खिद्रापूर हे एक पर्यटन स्थळच ( site seeing )किंवा वास्तुशिल्प कला अभ्यास करण्याचे स्थळ म्हणून बघितले जाते. ( किंवा जायचे आता तिथेही यात्रा वगैरे भारत असली तर माहिती नाही) . नृसिंह वाडीला जाणारे भक्त/ भाविक असतात त्यांचा उद्देश वेगळा असतो असे मला वाटते. लहानपणी सुटीत खिद्रापूर, कोल्हापूर ज्योतिबा, पन्हाळा हि असताना ग्रुपने सायकल सहलीची ठिकाणे होती. वाडी मात्र कधीही कधी मित्रांबरोबर काही एकटा. अजूनही सांगलीला गेलो कि नृसिंह वाडी, तुंगाचा मारुती क्वचित कोल्हापूरची महालक्ष्मी हि भेटीची ठिकाणे. खिद्रापुरला जाने झाले नाही खूप वर्षात. चांगली आठवण करून दिलीत. पुढच्यावेळी सहकुटुंब खिद्रापुरला भेट नक्की. अवांतर : औदुंबर पासून हरिपूर पर्यंत सध्या मगरींचा सुळ्सुळत झालाय. भेटी देणार्यांनी खात्री केल्याशिवाय पोहायला उतरू नये. तसेच वाडीला घाटावर बर्याचदा शेवाळे असते. पाय घसरून अनेक अपघात होतात. तसेच देवळासमोर कृष्णेचा मोठा "डोह" आहे. उत्तम पोहता येत असल्याशिवाय फार आत जाणे धोकादायक. बाकी भेट देणार्यांनी बासुंदी, पेढे, मळीची ( कृष्ण काठच्या सुपीक मातीतली) देशी वांगी ( आता मिळत असली तर) नक्की आस्वाद घ्यावा. पण बासुंदीची क्वालिटी ( दाटपणा) पूर्वीप्रमाणे राहिली नाहीये असे मला वाटते. पूर्वी अगदी रबडी सारखी दाट मिळायची.

शामसुन्दर 12/10/2015 - 12:58
दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले १] . येथे मिळ्णारे मानसीक समाधान वेगळेच पेढे,बासुंदी नारळ्,हार वाले कधि घ्या घ्या म्हनुन माघे लागणार नाहीत २] . ३] . ४] . ५] . ६] .

In reply to by शामसुन्दर

दत्ता जोशी 12/10/2015 - 17:12
"दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले" खरं आहे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसणे शक्य नाही पण कृष्णेला पूर आला कि पाण्याची पातळी पहिल्या फोटोत दिसणाऱ्या गोलाकृती छतापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्ती वाढते. पाण्याची पालटली वाढू लागली आणि पाणी पादुकांवरून वाहू लागले कि दक्षिणद्वार सोहळा होतो. त्याही पेक्षा पाणी वाढू लागले कि देव वर गावात नेले जातात. पूर ओसरला कि मग विधीवत वेगवेगळ्या औषधी काढ्यांचा अभिषेक केला जातो. मस्त जुन्या आठवणी. धन्यवाद.

तुडतुडी 12/10/2015 - 15:46
अजित कडकडे यांचे 'दत्त अवधूता , दिनाच्या नाथा , दूर अजून का रे तू सद्गुरु नाथा ' मस्त गाणं आहे . तू नळीवर एक से एक दत्त भक्तीपर गाणी आहेत . माझी सगळ्यात आवडती गाणी - 'सुखद सुमंगल शुभद सुकोमल वाजली पाऊले , दारी दत्त गुरु आले ' आणि 'राजा दत्तगुरू हृदयीचा ' @कंजूस श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि कार्य आंध्र मध्ये झालं असल्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते माहित आहेत . नरसिंह सरस्वती स्वामी महारष्ट्र आणि गुलबर्गामध्ये झाल्यामुळे कर्नाटक मध्ये दत्त संप्रदाय मोठा आहे . टेंबे स्वामी आणि रंगावधूत महाराजांमुळे गुजरात मध्ये दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे .नाथ संप्रदाय संपूर्ण देशामध्ये फैलावला आहे . आणि नाथ पंथ जाणनाऱ्या प्रत्येकाला दत्त माहित असतात . त्यामुळे दक्षिणेत दत्त माहित नाहीत हा तुमचा गैरसमज आहे . त्याचा प्रसार कदाचित कमी असेल तिकडे . कारण दत्त , अनुसया आश्रम महाराष्ट्रात माहूर मध्ये झालेत . आणि काही नको ते मार्केटिंग बिर्केतिंग आपलं शांत आहे तसंच असुदे .
देव की गुरू.... नक्की काय?
दोन्हीही . तीच तर खासियत आहे

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 12/10/2015 - 15:50
श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि कार्य आंध्र मध्ये झालं असल्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते माहित आहेत .
आंध्रात कुठल्या गावी?

तुडतुडी 13/10/2015 - 12:57
आंध्रात कुठल्या गावी?
पिठापुरम मध्ये त्यांचा जन्म झाला होता . पण तिथल्या मूर्ख ब्राह्मणांनी धर्माचा जो चुकीचा अर्थ पसरवला होता त्याने त्यांची खूप निराशा झाली . अनेक वर्षे त्यांनी लोकांना खरा धर्म ,अध्यात्म समजावला . कोणाला समजून , कोणाला रागवून , कोणाला शिक्षा करून अनेक गैरसमज दूर केले. आणि धर्मस्थापना केली . त्यानंतर त्यांनी कुरवपुर हे त्यांचं कार्यक्षेत्र निवडलं .पिठपुरमच्या ब्राह्मणांना डावलून त्यांनी कुरवपुरच्या ताडी विकणाऱ्या लोकांना अध्यात्म दीक्षा दिली . त्यांच्या आईवडिलांनी स्वतः त्यांच्या घरात त्यांच्या पादुकांची स्थापना केली आहे आज त्याचं पिठापूर संस्थान झालं आहे . वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी कुरवपुरला समाधी घेतली .
मानसिक समाधान देणारे ठिकाण(पौर्णिमा सोडून)
का हो ? पौर्णिमेत असं काय आहे ?

रामपुरी 05/04/2014 - 00:46
लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यात. "नदीत पोहणे" या एकमेव आकर्षणामुळे वाडी फार आवडायची. पेढे हे दुसरं आकर्षण. (हल्ली वरच्या बाजूला नदीत सांडपाणी सोडतात हे कळाल्यापासून नदीत पाय सुद्धा टाकवत नाही)

यसवायजी 05/04/2014 - 01:13
आठवणी.. उन्हात पाय पोळत असताना ते गार पाणी... आहाहा.. नावेतून नदी पार करुन पलीकडच्या त्या मंदीरात जायला फार आवडायचे. आता आठवत नाही, कसलं मंदीर आहे हो ते??

पैसा 05/04/2014 - 08:18
एकदा सांगलीहून धावत पळत गेले होते. मुळात खूप सुंदर ठिकाण असावं. मात्र प्रचंड गर्दीमुळे देवस्थानचं दर्शन घेता आलं नाही आणि माशा आणि एकूण बकालपणा पाहून पेढे, खवा घ्यायचंही धाडस झालं नाही.

In reply to by पैसा

प्रचेतस 05/04/2014 - 08:20
सहमत आहे. खिद्रापूरच्या भेटीच्या निमित्ताने वाडीला भेट द्यायचा योग आला होता. बाजार मांडलाय नुसता.

In reply to by प्रचेतस

जातवेद 05/04/2014 - 09:09
आमच्या सवयीचा भाग आहे म्हणून कदचीत वाटत नसेल. पण क्वचित जाणर्‍यांनी शक्यतो गर्दिच्या दिवशी जाणे टाळावे बराच फरक पडतो.

कंजूस 05/04/2014 - 08:47
इथून गाडीला किक मारली की पाऊण तासात .कुठून ? जरा सांगली मिरज कोल्हा० रे स्टे /बस डेपोचे अंतर लिहाल का ? भुतं काढण्याचा प्रकार आता तिकडे चालू आहे का ?त्याबद्दल ऐकले आहे . दत्ताचे सर्वात रम्य ठिकाण (अजूनही)भिलवडी स्टेशन जवळ आहे .येथून जवळच सात किमिवर तासगावातले चांगले गणपतीचे देऊळ आहे .

In reply to by कंजूस

जातवेद 05/04/2014 - 09:01
इथून म्हणजे ईचलकरंजी. तिकडे अंतर वेळेतच मोजतात :) मी तर कधी भुतं काढण्याच्या प्रकाराचं ऐकलं नाही. तुम्ही गाणगापुर संदर्भात ऐकलं असेल.

मदनबाण 05/04/2014 - 08:58
मला सर्वात जास्त आवडणारे ठिकाण. मी जवळपास ३० वर्ष सातत्याने या जागी येतो आहे,आणि मी या बाबतीत स्वतःला फार भाग्यवान समजतो. :) या जागेशी माझे अतुट नाते आहे.लहानपणा पासुन ते आत्ता पर्यंतचा सगळा बदल मी पाहिला आहे. माझ्या नशिबाने अनेक विद्वान आणि प्रेमळ आणि आचरण संपन्न लोकांचा सहवास मला इथे झाला. त्यातलेच एक म्हणजे रामचंद्र नारायण जेरे-पुजारी {रामशास्त्री} यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृतातला कालिदास पुरस्कार देण्यात आला होता. माझ्या लहानपणी यांचे बोट धरुन मी देवपुजेसाठी जात असे.. संपूर्ण वाडी-गावाला शिस्त आणी नियम घालुन दिले ते यांनीच.त्याकाळी संपूर्ण गावात दगडांचे रस्ते होते, डांबराचे रस्ते कुठेच नव्हते. दगडांच्या रस्त्यांवरुन अनवाणी चालताना त्यावेळी पाय फार भाजायचे. पवमान {विष्णु स्तुती}ऐकायला मला फार आवडते आणि तेही इथेच देवा समोर बसुन ऐकण्याचा आनंद वेगळाच. इथे अनेक उत्सव आणि विधी पहायला आणि अनुभवायला मिळाले... कन्यागत पर्वात सुद्धा इथे काळ व्यतित करण्याचे भाग्य मला लाभले आहे. गायक अजित कडकडे यांचे सुद्धा वाडीशी जिव्हाळ्याचे नाते आहे,आणि लहानपणी कॄष्णेच्या पाण्यात बुडता-बुडता ते वाचले होते अशी त्यांची आठवण ते सांगतात. तसेच त्यांनी अनेक गाणी दत्त प्रभुंवर आणि वाडीवर गायली आहेत, त्यातली मला दत्त दत्त मुखे म्हणा, पावना दत्त्त आणि नरसोबाच्या वाडीला जाउ चला ही गाणी विशेष आवडतात. ही गाणी इथे ऐकता येतील :- http://www.smashits.com/datt-mukhe-mhnna/songs-23271.html

चावटमेला 05/04/2014 - 10:19
दत्तगुरूंच्या तीन प्रमुख ठिकाणांपैकी वाडी (हो नुसती वाडीच :)) हे माझे सर्वांत आवडते ठिकाण. लहानपणी बाबा नेहमी स्कूटरने घेवून जायचे. वाडीचा पेढा छानच, एकूणातच कृष्णाकाठी दुधाचे पदार्थ चांगलेच मिळतात. वरील एका शंकेला उत्तर सांगली ते नरसोबावाडी अंतर - २० किमी, कुरुंदवाड यष्टी पकडावी. मिरज ते नरसोबावाडी (सर्वांत जास्त सोयीचे) - १५ किमी, दर अर्ध्या तासाला कुरुंदवाड सिटी बस मिरज स्टँड वरून असते.

सस्नेह 05/04/2014 - 11:46
अजूनही महिन्या दोन महिन्यातून एकदा वाडीला जाते. दत्तगुरूंना दंडवत घालते अन पेढे घेऊन येते. आणि हो, सोमणांकडचे जेवण विसरलात काय ? ती वांग्याची भाजी, भरपूर नारळ अन कढीपत्ता घातलेली आमटी, बातात्त्याची भाजी, काकडीची गोडसर कोशिंबीर अन गाजराचे लोणचे ! वर ताजे ताक ! स्स्स !

भाते 05/04/2014 - 20:44
फेब्रुवारी महिन्यात शुक्रवारी पौर्णिमेला माझा वाडीला जायचा योग आला. सह्याद्रीने मी मुंबईहुन कोल्हापुरला गेलो. देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर मी कोल्हापुरहुन एसटीने वाडीला गेलो. पायावर पाणी घ्यायला मी खाली कृष्णा नदीच्या पायरीशी गेलो. बाजुला अर्ध्या फुटावर साबण लाऊन कपडे धुवत असलेल्या पाण्यात चुळ भरणारे भक्त मी तिथे पाहिले. नंतर ते साबणमिश्रित पाणी पिणारे हेच भक्त बसमध्ये बसल्यावर बाटलीतल्या शुद्ध पाण्याचा आग्रह करताना पाहुन मला नवल वाटले. वाडीला प्रचंड गर्दीत कसेबसे दर्शन घेऊन झाल्यावर मी कोल्हापुरला परत जाण्यासाठी सुमारे दोनच्या सुमारास बस स्थानकावर आलो. पुढल्या दोन तासांत किमान ५० बस येऊन गेल्या आणि त्यापैकी ३० कुरुंदवाडसाठी होत्या. (माझ्या सुदैवाने) चारच्या सुमारास कोल्हापुर बस आली. बसमध्ये चढायला अक्षरश: मारामारी करावी लागली. रात्रीची महालक्ष्मी चुकते कि काय अशी भीती मला वाटत होती. पण माझ्या सुदैवाने मला महालक्ष्मीमधुन मुंबईला परत यायला मिळाले. तेव्हापासुन पौर्णिमेला कोल्हापुर आणि वाडीला जायचे नाही असे मी ठरवले.

In reply to by भाते

जातवेद 06/04/2014 - 11:25
तुम्हाला महालक्ष्मीच पकडायची होती तर तुम्ही जयसिंगपूर नाहितर मिरजेला ला जायला हवे होते. ते बरे पडले असते आणि एका तासाच्या वेळेबरोबर मारामारी पण वाचली असती :) उगाच उलटे फिरून गेलात.

कंजूस 06/04/2014 - 05:12
धन्यवाद चावटमेला .भुतांची वाडी ही नाही तर .मला एक शंका आहे .दत्तावतार ,दत्त फक्त महाराष्ट्रातच (आणि गिरनार ,अबुला )आहे .दक्षिणेत त्रिमुर्ती आहे पण दत्तमहाराज ,अनुसुया इत्यादि ऐकिवात नाही .

In reply to by कंजूस

जातवेद 06/04/2014 - 11:12
श्रीपाद श्रीवल्लभ या पहिल्या दत्तावतारांचे क्षेत्र पीठापूरम् आणि कुरवपूर ही आंध्र प्रदेश मधली ठिकणे आहेत. प.पू. वासुदेवानंद सरस्वति टेंबे स्वामी महाराज आणि रंगावधूत महाराज यांचे बरेच कार्यक्षेत्र गुजरात मधे आहे. एखादा संप्रदाय किती ठिकाणी जास्त पसरला आहे त्याच्यावर त्याची योग्याता ठरत नाही. बाकी भारतात एवढे खंडीभर देव, त्यांचे अवतार आणि त्या त्या संप्रदायातले महाराज आहेत कि सर्वांनी सगळिकडे प्रसिद्ध असण्याची आवश्यकता नाही.

In reply to by जातवेद

सुहासदवन 06/04/2014 - 11:35
जो दत्त अवतार तिन्ही प्रमुख देवांचे as a strategical representation ठरू शकतो तो केवळ महाराष्ट्रक्षेत्री का म्हणून प्रसिद्ध असावा..... Practically सम्पूर्ण भारतात ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्या तिन्हींपैकी कोणाची एकाची तरी पूजा नक्कीच होते प्रत्येक राज्यात.... मार्केटिंगला अजूनही वाव असावा बहुतेक.....

In reply to by जातवेद

सुहासदवन 06/04/2014 - 13:53
उत्तरेच्या खाटू शामबाबांपासून ते दक्षिणेच्या बालाजी सारखी इतर अनेक दैवते इथे पाप्युलर होतात तर मग आपण आपल्या दैवतांची पद्धतशीर मार्केटिंग कधी करणार..... नाहीतर इथल्या cosmopolitan संस्कृतीप्रमाणे आपले देव देखील काही वर्षांनी cosmopolitan झालेले पाहावे लागतील..... कृ. मी सहज बोलतोय, केवळ वादाला प्रतिवाद म्हणून नाही.....

In reply to by सुहासदवन

दत्ता जोशी 11/10/2015 - 22:46
आपले देव, त्यांचे देव, दक्षिणेतले देव उत्तरेतले देव असा काही नसत. खातू श्याम बाबा काय, बालाजी काय, पांडुरंग काय, राम प्रभू काय सगळे श्री विष्णूच ( अवतार) . दत्त जन्माच्या वेळेला ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिघेही लहान बाळे झाले असले तरी पुढे ब्रह्म चंद्र आणि महेश दुर्वास रूपाने निघून गेले आणि दत्त+अत्री पुत्र ( ऋषी, सती अनुसूयेचे पती) म्हणून दत्तात्रेय . दत्तात्रय ( तिघे) नव्हे. दत्त महाराजांची भ्रमंती उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरात ( नर्मदा परिसर) इथे झाल्याने त्यांची पूजा या भागात जास्ती होते. श्री दत्त गुरु हे नाथ संप्रदायाचे आदीगुरु. (गहनीनाथ - निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर माउली अशी परंपरा ऐकली असेलच )नवनाथ आणि दत्त गुरूंना शैव, बौद्ध आणि जैन धर्मातही आदराचे स्थान आहे. तसेच महानुभाव पंथातले आदिगुरु म्हणजे श्री दत्त गुरूच. मुस्लिम सुफी पंथ आणि दत्तगुरूंचे नातेपण तितकेच दृढ. थोडक्यात सांगायचा तर हा खूप मोठा संप्रदाय आहे आणि त्याचे बरेच पंथ आणि उपपंथ आहेत. असो.

In reply to by तर्राट जोकर

दत्ता जोशी 12/10/2015 - 08:35
हा प्रश्न शंका म्हणून विचारला गेलाय असे गृहीत धरून उत्तर देतो. शिव, विष्णू, राम. कृष्ण, विठठल, नृसिंह. त्याच प्रमाणे श्री दत्तात्रेय हे हि देवच. वेगवेगळे दत्तावतार, नाथ, सिद्ध, संत, गौतम बुद्ध यांनी गुरु शिष्य परंपरेने साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले ते गुरु. आणि या सगळ्यांचे आद्य गुरु हे श्री विष्णू किंवा श्री दत्तात्रेय किंवा दक्षिणामूर्ती ( म्हणजे गुरुरूपातील श्री शंकर). यातील कोणीही साधकाचा गुरु असू शकतो. गुरु-शिष्य हि एक सुंदर आणि महत्वाची भारतीय परंपरा आहे. इति लेखन सीमा.

बॅटमॅन 07/04/2014 - 18:25
वाडीला जायचं तर मिरजेहून वट्ट १५ किमी अंतर आहे. सांगलीसनं सुद्धा जवळच आहे. अन बकालपणाबद्दल सहमत आहे. बाजार मांडलेला आहेच-पण गर्दी नसते तेव्हा जावं, छान वातावरण असतं. अर्थात नदी प्रदूषित आहेच म्हणा. बाकी लेख वाचून वाडीच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. मिरजेहून सायकल ताबडवत मित्र मिळून तिथे जायचो घरनं डबे घेऊन, मग कुठेतरी जागा मिळेल तसे खायचो. पेढे घेऊन, एखादी बासुंदी मारून मग परत फिरायचो. लै मज्जा.

रामदास 07/04/2014 - 21:44
श्री.म. माट्यांचा जसे लोक तसे त्यांचे देव हा लेख वाचला होता त्या लेखाची आठवण झाली. "जसे लोक तशी त्यांची देवस्थाने " खंत आहेच.

तर्राट जोकर 11/10/2015 - 21:51
गुरूचरित्रात सांगितले आहे म्हणे कि एखादी गरोदर बाई जसे चालते तशा प्रदक्षिणा घालाव्यात, काही लोक त्या बाईचे मुल आता धाउ लागले आहे आनि त्यामागून आपण पळतोय (मुलाच्या) असं चालतात.
सगळं आध्यात्म हे स्लो मध्येच आहे. लोक त्याचंही भजं करून टाकतेत....

बोका-ए-आझम 11/10/2015 - 22:08
वाडी फारच लहानपणी पाहिली होती. पण हा लेख वाचून एकदा परत जावं अशी इच्छा झाली. बाकी बकाल कुठलं तीर्थक्षेत्र नाहीये? काही जास्त काही कमी!

वाडीला एकदाच गेलो आहे. जेव्हा गेलो तेव्हा बर्‍यापैकी गर्दी होती. पण, एक नदीतली घाण सोडल्यास अनुभव चांगलाच होता. एका घरात जेवलो. करदंट खाल्लं. पेढे घेतले. बासुंदी प्यायलो मनसोक्त. तुम्ही बासुंदीचा उल्लेख केला नाहीत. फारच अप्रतिम होती. जिथे जेवलो त्यांच्याकडे घरी बनविलेली होती. ती पण मस्त आणि मग बाहेर एके ठिकाणी दुकानात प्यायलो ती ही मस्त.

बासूंदी कुरूंवाडची फेमस,हे सुधा मूर्ति चं आजोल, वाडीचे पेढे व कवठाची बर्फी,प्रसिद्ध क वठाची बर्फ़ी अन्य दुनियेत कुठं मिलत नाही,

Sanjay Uwach 12/10/2015 - 00:25
श्री नृसिंह सरस्वती यांनी, हे ठिकाण कधी काळी आपल्या तपश्र्चर्या साठी योग्य वाट्ल्याने निवडले होते . हे ठिकाण त्या काळी १ निर्जन ठिकाण २ कृष्णा पंचगंगा यांचा संगम झालेले निसर्ग रम्य ठिकाण ३. अतिशय दाट जंगल असणारे, लोक वस्ती पासून दूर असणारे अशा स्वरूपाचे होते . इथेही त्यांना लोंकानी त्रास दिल्या मुळे, त्यांनी आपल्या तपश्र्चर्या चे ठिकाण बदलावे लागले. मात्र नृसिहवाडी इथे, एका भक्त मुस्लिम सरदाराने, त्यांचे मंदिर उभा केले आहे .त्या मुळे या मंदिराला शिखर नाही आहे. आता मंदिर म्हटले कि बऱ्याच गोष्टी आल्या.लोकांची गर्दी आली . व्यापारी आले, हॉटेलवाले आले,लॉज वाले आले, अर्थात त्यांची नावे थोडी गोंडस असू शकतील उदा: भक्त धाम वगैरे वगैरे . आपल्या वेगवेगळ्या हेतूने प्रेरित होऊन येणारे भक्त आले. मला मात्र लहान पणी वाडीला जायचे आकर्षण होते ते नदीत तासन तास डुबंण्याचे व मामा कडून मिळणाऱ्या गोड गोड साखरी पेढ्यांचे. श्री. पटवर्धन नावचे बेंगलोर मधिल एक तज्ञ डॉक्टर, आपले वैभव संपन्न घरदार, हॉस्पिटल सोडुन आगदी आपल्या मृत्यू प्रर्यंत त्या मंदिरात श्री दत्तगुरुच्या सेवेला राहीलेले मी पाहीले आहेत. आर्थात जसा भाव तसा देव.

पद्मावति 12/10/2015 - 00:39
वाह, सुंदर लेख. नरसोबाच्या वाडीचं इतकं छान वर्णन तुम्ही केलंय की तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा होतेय.

दत्ता जोशी 12/10/2015 - 10:12
तोड्फोडीतून वाचलेले खिद्रापूरचे मंदीर अजूनही अप्रतीम सुंदरच. पण खिद्रापूर हे एक पर्यटन स्थळच ( site seeing )किंवा वास्तुशिल्प कला अभ्यास करण्याचे स्थळ म्हणून बघितले जाते. ( किंवा जायचे आता तिथेही यात्रा वगैरे भारत असली तर माहिती नाही) . नृसिंह वाडीला जाणारे भक्त/ भाविक असतात त्यांचा उद्देश वेगळा असतो असे मला वाटते. लहानपणी सुटीत खिद्रापूर, कोल्हापूर ज्योतिबा, पन्हाळा हि असताना ग्रुपने सायकल सहलीची ठिकाणे होती. वाडी मात्र कधीही कधी मित्रांबरोबर काही एकटा. अजूनही सांगलीला गेलो कि नृसिंह वाडी, तुंगाचा मारुती क्वचित कोल्हापूरची महालक्ष्मी हि भेटीची ठिकाणे. खिद्रापुरला जाने झाले नाही खूप वर्षात. चांगली आठवण करून दिलीत. पुढच्यावेळी सहकुटुंब खिद्रापुरला भेट नक्की. अवांतर : औदुंबर पासून हरिपूर पर्यंत सध्या मगरींचा सुळ्सुळत झालाय. भेटी देणार्यांनी खात्री केल्याशिवाय पोहायला उतरू नये. तसेच वाडीला घाटावर बर्याचदा शेवाळे असते. पाय घसरून अनेक अपघात होतात. तसेच देवळासमोर कृष्णेचा मोठा "डोह" आहे. उत्तम पोहता येत असल्याशिवाय फार आत जाणे धोकादायक. बाकी भेट देणार्यांनी बासुंदी, पेढे, मळीची ( कृष्ण काठच्या सुपीक मातीतली) देशी वांगी ( आता मिळत असली तर) नक्की आस्वाद घ्यावा. पण बासुंदीची क्वालिटी ( दाटपणा) पूर्वीप्रमाणे राहिली नाहीये असे मला वाटते. पूर्वी अगदी रबडी सारखी दाट मिळायची.

शामसुन्दर 12/10/2015 - 12:58
दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले १] . येथे मिळ्णारे मानसीक समाधान वेगळेच पेढे,बासुंदी नारळ्,हार वाले कधि घ्या घ्या म्हनुन माघे लागणार नाहीत २] . ३] . ४] . ५] . ६] .

In reply to by शामसुन्दर

दत्ता जोशी 12/10/2015 - 17:12
"दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले" खरं आहे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसणे शक्य नाही पण कृष्णेला पूर आला कि पाण्याची पातळी पहिल्या फोटोत दिसणाऱ्या गोलाकृती छतापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्ती वाढते. पाण्याची पालटली वाढू लागली आणि पाणी पादुकांवरून वाहू लागले कि दक्षिणद्वार सोहळा होतो. त्याही पेक्षा पाणी वाढू लागले कि देव वर गावात नेले जातात. पूर ओसरला कि मग विधीवत वेगवेगळ्या औषधी काढ्यांचा अभिषेक केला जातो. मस्त जुन्या आठवणी. धन्यवाद.

तुडतुडी 12/10/2015 - 15:46
अजित कडकडे यांचे 'दत्त अवधूता , दिनाच्या नाथा , दूर अजून का रे तू सद्गुरु नाथा ' मस्त गाणं आहे . तू नळीवर एक से एक दत्त भक्तीपर गाणी आहेत . माझी सगळ्यात आवडती गाणी - 'सुखद सुमंगल शुभद सुकोमल वाजली पाऊले , दारी दत्त गुरु आले ' आणि 'राजा दत्तगुरू हृदयीचा ' @कंजूस श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि कार्य आंध्र मध्ये झालं असल्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते माहित आहेत . नरसिंह सरस्वती स्वामी महारष्ट्र आणि गुलबर्गामध्ये झाल्यामुळे कर्नाटक मध्ये दत्त संप्रदाय मोठा आहे . टेंबे स्वामी आणि रंगावधूत महाराजांमुळे गुजरात मध्ये दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे .नाथ संप्रदाय संपूर्ण देशामध्ये फैलावला आहे . आणि नाथ पंथ जाणनाऱ्या प्रत्येकाला दत्त माहित असतात . त्यामुळे दक्षिणेत दत्त माहित नाहीत हा तुमचा गैरसमज आहे . त्याचा प्रसार कदाचित कमी असेल तिकडे . कारण दत्त , अनुसया आश्रम महाराष्ट्रात माहूर मध्ये झालेत . आणि काही नको ते मार्केटिंग बिर्केतिंग आपलं शांत आहे तसंच असुदे .
देव की गुरू.... नक्की काय?
दोन्हीही . तीच तर खासियत आहे

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 12/10/2015 - 15:50
श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि कार्य आंध्र मध्ये झालं असल्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते माहित आहेत .
आंध्रात कुठल्या गावी?

तुडतुडी 13/10/2015 - 12:57
आंध्रात कुठल्या गावी?
पिठापुरम मध्ये त्यांचा जन्म झाला होता . पण तिथल्या मूर्ख ब्राह्मणांनी धर्माचा जो चुकीचा अर्थ पसरवला होता त्याने त्यांची खूप निराशा झाली . अनेक वर्षे त्यांनी लोकांना खरा धर्म ,अध्यात्म समजावला . कोणाला समजून , कोणाला रागवून , कोणाला शिक्षा करून अनेक गैरसमज दूर केले. आणि धर्मस्थापना केली . त्यानंतर त्यांनी कुरवपुर हे त्यांचं कार्यक्षेत्र निवडलं .पिठपुरमच्या ब्राह्मणांना डावलून त्यांनी कुरवपुरच्या ताडी विकणाऱ्या लोकांना अध्यात्म दीक्षा दिली . त्यांच्या आईवडिलांनी स्वतः त्यांच्या घरात त्यांच्या पादुकांची स्थापना केली आहे आज त्याचं पिठापूर संस्थान झालं आहे . वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी कुरवपुरला समाधी घेतली .
मानसिक समाधान देणारे ठिकाण(पौर्णिमा सोडून)
का हो ? पौर्णिमेत असं काय आहे ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
वांग्याच्या लेखावरून वाडीचा उल्लेख आला आणि आमचा पौर्णिमाक्रम आठवला. बरेच लोक वाडीला नरसोबाची वाडी म्हणतात पण इकडे सगळे नुस्त वाडीच म्हणतात. म्हैसूर डोसाला म्हैसूर मधे नुस्ताच डोसा म्हणतात त्यातला प्रकार. दर पौर्णिमेला वाडीला जाउन यायचे हा बर्‍याच जणांचा क्रम. मीही वडिलांच्या बरोबर म्हणून बर्‍याचदा जात असे. अगदी लहानपणीची वाडी आठवते ती म्हणजे खेळणी, ताजे पेढे आणि कवठाच्या बर्फी साठी. बरेच धार्मिक कार्यक्रम वाडीलाच व्हायचे, मग वाडीच्या पुजार्‍यांची मोठी मोठी थोड्या जुन्या प्रकाराची घरे, त्यांच्याकडच्या त्या तृप्त जेवणावळी आणि कृष्णेत मनसोक्त मारलेल्या डुबक्या.

पडघम २०१४- भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश

क्लिंटन ·
यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास या भागापासून मी विविध राज्यांमधील माझे अंदाज प्रसिध्द करत आहे. सुरवात मध्य प्रदेशपासून करत आहे.

रामपुरी 04/04/2014 - 23:54
आपल्या व्यासंगाला आणि अभ्यासाला सलाम एवढ्या खोलात शिरायची आमची कुवत्/इच्छा नाही. त्यामुळे आकडे वगळून बाकीचे वाचले. भाजप जिंकेल हे वाचून संतोष जाहला. कुणीही येउ दे पण मायवती मुलायम लालू नकोत एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

पैसा 05/04/2014 - 11:06
अतिशय अभ्यासपूर्ण लेख! यामागच्या तुझ्या पूर्वतयारीची आणि अभ्यासाची थोडीशी कल्पना आहे. प्रचंड मेहनत घेऊन लिहिलेला हा या महा मालिकेतला प्रत्यक्ष अंदाज व्यक्त करणार पहिला लेख! इतकी मेहनत घेऊन हे अभ्यासपूर्ण विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद! या मालिकेतल्या पुढच्या लेखांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. प्रत्यक्ष निवडणुकींचे घोडामैदान तर आता जवळ आलेच! आमच्याकडे १२ तारखेला मतदान आहे.

ऋषिकेश 08/04/2014 - 10:09
माझ्या मते छिंदवाडाची सीट काँग्रेस हरेल, याचे मोठे कारण कमलनाथ यांच्या विरूद्धची नाराजी. आआपनेही तेथून महेश दुबेंच्या रुपात तगडा उमेदवार दिला आहे, तो कमलनाथ यांची बरीच मते खाईल त्यातुलनेत मध्यप्रदेशमध्ये आआप भाजपाची मते खाऊ शकणार नाही. दुसरे असे की छिंदवाडा म्युनिसिपल कॉर्पोरेशनही काँग्रेसने गमावली आहे, तेव्हा कमलनाथ यांनी जातीने प्रचार केला होता त्याचा उलट परिणाम झाल्याचे माझे काही तेथील स्थानिक परिचित सांगतात :) शिवाय त्यांची संसदीय कार्यमंत्री म्हणून असणारी कारकिर्द अगदीच 'वैट्ट' आहे. लोकपाल विधेयकाच्या वेळी हिवाळी सदनात घेतलेली भुमिका मतदार विसरत असतील तर भाजपा/आआप कार्यकर्ते ती त्यांना नक्की आठवून देतील. --- विदीशा: सुषमा स्वराज यांना यावेळी कठीण आव्हान आहे पण त्या निवडून येतील असे मलाही वाटते. त्यात आआपचा उमेदवार तितकासा तगडा वाटत नाही (मला नीट कल्पना नाही), मात्र तो इतर लहान पक्षांच्या मते खाण्याव्यतिरिक्त काही करू शकेल असे वाटत नाही. फक्त जर भाजपाच्या अंतर्गत बंडाळ्यांमुळे अडवाणी गटाला हेतुपुरस्सर मागे ठेवायचे ठरले (जी शक्यता अगदीच कमी आहे) तरच काही बदल होऊ शकेल. स्वतः स्वराज यांना तेथे प्रचारसभा घ्याव्या लागत आहेत व त्यांना काही प्रमाणात तेथे प्रचारात अडकवून ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे हे मात्र खरे. -- ग्वाल्हेर माझ्यामते अतिशय चुरस आहे. शिंदेंनी दोन-तीन प्रचार सभा घेतल्या तरी लोक काँग्रेसला मतदान करतील असे दिसले आहे. तिथे नीलम अगरवाल यांच्या रुपात आआपने महिला उमेदवार दिली आहे. ती कोणाची मते खाते त्यावर बरेच अवलंबून आहे. जो काय निर्णय असेल तो निसटता असेल. --- खांडवा या जागेवर आआपने आलोक अगरवाल या नर्मदा बचाव आंदोलनातील कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. गेल्या निवडणूकीत ही जागा काँग्रेसने जिंकली होती, त्यानंतर विधानसभेत मात्र भाजपाने मतांची टक्केवारी वाढवली आहे. मात्र आआप दोन्ही पक्षांची बर्‍यापैकी मते + बसपा वगैरेंची मते खाईल असे वाटते. अर्थात इथे विधानसभेत भाजपा व काँग्रेसमधील अंतर खूप आहे, तरी या बॉर्डरवरील नर्मदा प्रभावित भागाचा निर्णय लक्ष देण्यासारखा असावा. -- तसेच धारमध्ये महिला मतदार आआपच्या मागे किती जातात यावर भाजपाचा विजय अवलंबून असेल --- एकुणात आकड्याशी ढोबळ सहमती असली तरी काही जागांवर भाजपा काठावर पास तर काही ठिकाणी धक्के बसतील असे वाटाते. माझा अंदाज भाजपा: २४ काँग्रेसः २ उर्वरीत तीन (खांडवा, ग्वाल्हेर व धार) कुठल्या दिशेला जातील हे सांगणे मला कठिण वाटतेय. पण अंदाजच करायचा तर खांडवा व ग्वाल्हेर निसटता काँग्रेस विजय तर धार भाजपा विजय. (थोडक्यात २५-४) मात्र खांडव्यात आआपने चमत्कार केला तरी आश्चर्य वाटणार नाही.

रामपुरी 04/04/2014 - 23:54
आपल्या व्यासंगाला आणि अभ्यासाला सलाम एवढ्या खोलात शिरायची आमची कुवत्/इच्छा नाही. त्यामुळे आकडे वगळून बाकीचे वाचले. भाजप जिंकेल हे वाचून संतोष जाहला. कुणीही येउ दे पण मायवती मुलायम लालू नकोत एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

पैसा 05/04/2014 - 11:06
अतिशय अभ्यासपूर्ण लेख! यामागच्या तुझ्या पूर्वतयारीची आणि अभ्यासाची थोडीशी कल्पना आहे. प्रचंड मेहनत घेऊन लिहिलेला हा या महा मालिकेतला प्रत्यक्ष अंदाज व्यक्त करणार पहिला लेख! इतकी मेहनत घेऊन हे अभ्यासपूर्ण विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद! या मालिकेतल्या पुढच्या लेखांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. प्रत्यक्ष निवडणुकींचे घोडामैदान तर आता जवळ आलेच! आमच्याकडे १२ तारखेला मतदान आहे.

ऋषिकेश 08/04/2014 - 10:09
माझ्या मते छिंदवाडाची सीट काँग्रेस हरेल, याचे मोठे कारण कमलनाथ यांच्या विरूद्धची नाराजी. आआपनेही तेथून महेश दुबेंच्या रुपात तगडा उमेदवार दिला आहे, तो कमलनाथ यांची बरीच मते खाईल त्यातुलनेत मध्यप्रदेशमध्ये आआप भाजपाची मते खाऊ शकणार नाही. दुसरे असे की छिंदवाडा म्युनिसिपल कॉर्पोरेशनही काँग्रेसने गमावली आहे, तेव्हा कमलनाथ यांनी जातीने प्रचार केला होता त्याचा उलट परिणाम झाल्याचे माझे काही तेथील स्थानिक परिचित सांगतात :) शिवाय त्यांची संसदीय कार्यमंत्री म्हणून असणारी कारकिर्द अगदीच 'वैट्ट' आहे. लोकपाल विधेयकाच्या वेळी हिवाळी सदनात घेतलेली भुमिका मतदार विसरत असतील तर भाजपा/आआप कार्यकर्ते ती त्यांना नक्की आठवून देतील. --- विदीशा: सुषमा स्वराज यांना यावेळी कठीण आव्हान आहे पण त्या निवडून येतील असे मलाही वाटते. त्यात आआपचा उमेदवार तितकासा तगडा वाटत नाही (मला नीट कल्पना नाही), मात्र तो इतर लहान पक्षांच्या मते खाण्याव्यतिरिक्त काही करू शकेल असे वाटत नाही. फक्त जर भाजपाच्या अंतर्गत बंडाळ्यांमुळे अडवाणी गटाला हेतुपुरस्सर मागे ठेवायचे ठरले (जी शक्यता अगदीच कमी आहे) तरच काही बदल होऊ शकेल. स्वतः स्वराज यांना तेथे प्रचारसभा घ्याव्या लागत आहेत व त्यांना काही प्रमाणात तेथे प्रचारात अडकवून ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे हे मात्र खरे. -- ग्वाल्हेर माझ्यामते अतिशय चुरस आहे. शिंदेंनी दोन-तीन प्रचार सभा घेतल्या तरी लोक काँग्रेसला मतदान करतील असे दिसले आहे. तिथे नीलम अगरवाल यांच्या रुपात आआपने महिला उमेदवार दिली आहे. ती कोणाची मते खाते त्यावर बरेच अवलंबून आहे. जो काय निर्णय असेल तो निसटता असेल. --- खांडवा या जागेवर आआपने आलोक अगरवाल या नर्मदा बचाव आंदोलनातील कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. गेल्या निवडणूकीत ही जागा काँग्रेसने जिंकली होती, त्यानंतर विधानसभेत मात्र भाजपाने मतांची टक्केवारी वाढवली आहे. मात्र आआप दोन्ही पक्षांची बर्‍यापैकी मते + बसपा वगैरेंची मते खाईल असे वाटते. अर्थात इथे विधानसभेत भाजपा व काँग्रेसमधील अंतर खूप आहे, तरी या बॉर्डरवरील नर्मदा प्रभावित भागाचा निर्णय लक्ष देण्यासारखा असावा. -- तसेच धारमध्ये महिला मतदार आआपच्या मागे किती जातात यावर भाजपाचा विजय अवलंबून असेल --- एकुणात आकड्याशी ढोबळ सहमती असली तरी काही जागांवर भाजपा काठावर पास तर काही ठिकाणी धक्के बसतील असे वाटाते. माझा अंदाज भाजपा: २४ काँग्रेसः २ उर्वरीत तीन (खांडवा, ग्वाल्हेर व धार) कुठल्या दिशेला जातील हे सांगणे मला कठिण वाटतेय. पण अंदाजच करायचा तर खांडवा व ग्वाल्हेर निसटता काँग्रेस विजय तर धार भाजपा विजय. (थोडक्यात २५-४) मात्र खांडव्यात आआपने चमत्कार केला तरी आश्चर्य वाटणार नाही.

ए टी एम मशीन !

तुमचा अभिषेक ·

भाते 05/04/2014 - 20:06
जर सत्यकथा असेल तर तुमची काळजी वाटावी इतकी सुरेख. शेवट मात्र एखाद्या भयकथेसारखा अनपेक्षित आहे.

वेल्लाभट 05/04/2014 - 20:30
जाम आवडली... पण कथाच समजायचं याला की सत्य? असो.
आजच्या तारखेला एवढा प्रामाणिकपणा. पचायला जरा जडच.
हे खरं आहे पण तरीही तो दिसतो. कमाल आहे चायला.... परवापासून मलाही असा अनुभव आला आणि आत्तातल्या आत्ता दोन चार असेच अनुभव ऐकायला वाचायला मिळाले... काय कोणास ठाऊक... :)

In reply to by फास्टरफेणे

हा शब्द हिंदी आहे याची कल्पना नव्हती. संभव, संभाव्य, संभावित हे शब्द मराठी असावेत. यातही काही चुकत असेल तर प्लीज करेक्ट करावे.

In reply to by प्यारे१

आपणास नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही मला. मात्र माझी मराठी बरेचदा हिंदी शब्दांमध्ये गंडते हे कबूल आहे मला, मुंबैय्या बोलीभाषेचा परिणाम. जिथे चूक समजते तिथे ती सुधारायचा प्रयत्न करतो.

In reply to by तुमचा अभिषेक

प्यारे१ 07/04/2014 - 14:14
>>> संभव, संभाव्य, संभावित हे शब्द मराठी असावेत. यातही काही चुकत असेल तर प्लीज करेक्ट करावे. एकंदरच मौज वाटली. संघटनेमध्ये कार्यकारिणी सदस्यांच्या संभाव्य बदलाचा मागमूस लागू न देता पक्षश्रेष्ठींनी संभावितपणं कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच समान संधी असून आपल्यातल्याच एकाला तिकीट मिळण्याचा संभव आहे असं सांगितलं. (काय तुझी भाषा हा टाईमपास ह्या मराठी चित्रप टामधील एक संवाद आहे. धन्यवाद!)

In reply to by प्यारे१

"घटनेमध्ये कार्यकारिणी सदस्यांच्या संभाव्य बदलाचा मागमूस लागू न देता पक्षश्रेष्ठींनी संभावितपणं कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच समान संधी असून आपल्यातल्याच एकाला तिकीट मिळण्याचा संभव आहे असं सांगितलं" सॉलीड

In reply to by शुचि

आणि धन्यवाद, बाकी ते वाक्य वाचण्यातच माझी दोन मिनिटे खर्ची पडली. सहाआठ महिने पीडब्ल्यूडी बांधकाम विभागात होतो तेव्हाचे तेथील लोकांचे मराठी आठवले. मलाही तसे शिकावे लागेल बोलताच मी पळ काढला ;)

खेडूत 05/04/2014 - 23:25
कथा आवडली. (रत्नाकर मतकरी यांच्या धक्का तंत्राची आठवण झाली. त्यांची एक कथा होती आता सविस्तर आठवत नाही पण डॉक्टरांकडे अपरात्री एक रुग्ण येतो, बोलता बोलता त्याच्या पूर्वायुष्यातल्या गुन्ह्याची कबुली देतो. मग तो डॉक्टर म्हणतो जाता जाता माझ्या आजारी बहिणीला पण भेटून जा. त्या बहिणीची दोन्ही पावलेच नसतात . याच चोराने पैंजण निघत नाही म्हणून ती कापून चोरी केली असते आणि तिला आता पंचवीस वर्षानी पाहून त्याला हृदय विकाराचा झटका येतो वगैरे. . )

जयनीत 07/04/2014 - 20:02
'''''''''आता काहीच ठिक नव्हते. काहीच आलबेल नव्हते. आता माझी किंमत .... काहीच उरली नव्हती !'''''''''' कथा खुपच आवडली

कथा अर्थातच काल्पनिक. जर कोणाशी असे घडले असल्यास निव्वळ योगायोग समजावा. जर पुढेमागे घडल्यास चमत्कारीक योगायोग समजावा. ना कुठे घडलेला किस्सा ना कुठे ऐकण्या वाचण्यात आलेली बातमी. तरी कोणत्या वृत्तपत्राला रकाना भरायला म्हणून याचे कथासार बातमीच्या स्वरूपात टाकायचे असल्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक :)

भाते 05/04/2014 - 20:06
जर सत्यकथा असेल तर तुमची काळजी वाटावी इतकी सुरेख. शेवट मात्र एखाद्या भयकथेसारखा अनपेक्षित आहे.

वेल्लाभट 05/04/2014 - 20:30
जाम आवडली... पण कथाच समजायचं याला की सत्य? असो.
आजच्या तारखेला एवढा प्रामाणिकपणा. पचायला जरा जडच.
हे खरं आहे पण तरीही तो दिसतो. कमाल आहे चायला.... परवापासून मलाही असा अनुभव आला आणि आत्तातल्या आत्ता दोन चार असेच अनुभव ऐकायला वाचायला मिळाले... काय कोणास ठाऊक... :)

In reply to by फास्टरफेणे

हा शब्द हिंदी आहे याची कल्पना नव्हती. संभव, संभाव्य, संभावित हे शब्द मराठी असावेत. यातही काही चुकत असेल तर प्लीज करेक्ट करावे.

In reply to by प्यारे१

आपणास नक्की काय म्हणायचे आहे हे समजले नाही मला. मात्र माझी मराठी बरेचदा हिंदी शब्दांमध्ये गंडते हे कबूल आहे मला, मुंबैय्या बोलीभाषेचा परिणाम. जिथे चूक समजते तिथे ती सुधारायचा प्रयत्न करतो.

In reply to by तुमचा अभिषेक

प्यारे१ 07/04/2014 - 14:14
>>> संभव, संभाव्य, संभावित हे शब्द मराठी असावेत. यातही काही चुकत असेल तर प्लीज करेक्ट करावे. एकंदरच मौज वाटली. संघटनेमध्ये कार्यकारिणी सदस्यांच्या संभाव्य बदलाचा मागमूस लागू न देता पक्षश्रेष्ठींनी संभावितपणं कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच समान संधी असून आपल्यातल्याच एकाला तिकीट मिळण्याचा संभव आहे असं सांगितलं. (काय तुझी भाषा हा टाईमपास ह्या मराठी चित्रप टामधील एक संवाद आहे. धन्यवाद!)

In reply to by प्यारे१

"घटनेमध्ये कार्यकारिणी सदस्यांच्या संभाव्य बदलाचा मागमूस लागू न देता पक्षश्रेष्ठींनी संभावितपणं कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच समान संधी असून आपल्यातल्याच एकाला तिकीट मिळण्याचा संभव आहे असं सांगितलं" सॉलीड

In reply to by शुचि

आणि धन्यवाद, बाकी ते वाक्य वाचण्यातच माझी दोन मिनिटे खर्ची पडली. सहाआठ महिने पीडब्ल्यूडी बांधकाम विभागात होतो तेव्हाचे तेथील लोकांचे मराठी आठवले. मलाही तसे शिकावे लागेल बोलताच मी पळ काढला ;)

खेडूत 05/04/2014 - 23:25
कथा आवडली. (रत्नाकर मतकरी यांच्या धक्का तंत्राची आठवण झाली. त्यांची एक कथा होती आता सविस्तर आठवत नाही पण डॉक्टरांकडे अपरात्री एक रुग्ण येतो, बोलता बोलता त्याच्या पूर्वायुष्यातल्या गुन्ह्याची कबुली देतो. मग तो डॉक्टर म्हणतो जाता जाता माझ्या आजारी बहिणीला पण भेटून जा. त्या बहिणीची दोन्ही पावलेच नसतात . याच चोराने पैंजण निघत नाही म्हणून ती कापून चोरी केली असते आणि तिला आता पंचवीस वर्षानी पाहून त्याला हृदय विकाराचा झटका येतो वगैरे. . )

जयनीत 07/04/2014 - 20:02
'''''''''आता काहीच ठिक नव्हते. काहीच आलबेल नव्हते. आता माझी किंमत .... काहीच उरली नव्हती !'''''''''' कथा खुपच आवडली

कथा अर्थातच काल्पनिक. जर कोणाशी असे घडले असल्यास निव्वळ योगायोग समजावा. जर पुढेमागे घडल्यास चमत्कारीक योगायोग समजावा. ना कुठे घडलेला किस्सा ना कुठे ऐकण्या वाचण्यात आलेली बातमी. तरी कोणत्या वृत्तपत्राला रकाना भरायला म्हणून याचे कथासार बातमीच्या स्वरूपात टाकायचे असल्यास लेखकाची परवानगी घेणे आवश्यक :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
माणसाची किंमत जिथे पैश्यात मोजली जाते तो हा जमाना. तिथे एटीएम मशीन म्हणजे वजन काटा. त्यातून खडखड आवाज करत बाहेर पडणार्‍या कोर्‍या करकरीत नोटा तुमचे आजचे वजन. पाठोपाठ तुमची समाजातील पत लिहून येणारी बॅंकबॅलन्स स्लीप. आठ हजार रुपये मी काढले होते आणि शिल्लक जमा तिच्यावर दाखवत होती तब्बल चार लाख, चौसष्ट हजार, आठशे सतरा रुपये. आजची तारीख तेवीस. पगाराला आठवडा बाकी. तो झाला की हा आकडा सव्वापाचच्या घरात. महिन्याभरात मोठा खर्च न आल्यास पुढच्या महिन्याअखेरीस मी पाच लाखाच्या क्लबमध्ये हक्काने विराजमान होणार होतो. हा हिशोब लावतच मी बाहेर पडलो तर समोर तोच तो मगासचा रखवालदार. "क्या टाईम हुआ साहबजी?" ......