मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वच्छता आणि आपली मानसिकता

वडापाव ·

याची सुरवात शाळेपासून व्हायला हवी. आपण प्रबोधनाच फुगा कष्टाने फुगवायचा अन कुणीतरी त्याला फक्त टाचणी लावयची. प्रबोधन व शिक्षा या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने उपाययोजना हवी.मला तर हे भाबडे स्वप्न वाटते.

सविता००१ 04/08/2014 - 16:52
लोकल मधे तर हा अनुभव जवळ जवळ दररोज येतो. आपण सांगायला गेलो तर व्हीलन ठरतो चक्क! परवा एक मुलगी शीच पर्समधले नको असलेले कागद, रॅपर्स आणि काय काय खिडकीतून बाहेर टाकत होती. तिच्याकडे पाहिलं तर म्हणाली की क्या हुआ? बाहर फेक रही हू. मग सरळ म्हणाले- सब कचरा प्लास्टिक का है! जब वॉटर क्लॉगिंग होगा तब आप जैसे लोगों की वजह से हम सबको भुगतना पडेगा! तर म्हणे सब ऐसाही करते है! काय म्हणणार? जर सीट्खाली कुणी कचरा टाकायला लागलं तर मात्र उचलायलाच लावते मी. आणि बहुतेक वेळा इतर जणीही येतात माझ्याबरोबर. पण एकूण चित्र निराशाजनकच आहे

ज्या नैतिक अधिकाराने तुम्ही हे ईतरांना सांगता त्याच नैतिक अधिकाराने एखाद्या परदेशात राहुन आलेल्या / राहणार्‍या व्यक्तीला हे सांगण्याचा अधिकार का नाही? 'तुम्ही परदेशात राहणारे लोकचं ईथे येउन वाहतुकीचे नियम मोडता किंवा तिकडे बरे शिक्षेच्या (मराठीतली) धाकानी थुंकत नाही, ईथे आल्याबरोबर थुंकता ई.ई.' स्विपींग स्टेटमेंट्स जसे केले जातात तसाच सूर शेवट्च्या पॅराचा वाटतोय. बाकी लेख खूप कळकळीनी लिहिलाय हे जाणवलं. परदेशात जाण्यापुर्वी ३५ वर्षे ईथेच होते. तेंव्हा या विषयावर अगदी आम्च्या सोसायटीपासुन प्रयत्न केलाय. अगदी बेसिक गोष्ट म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवणे. त्यासाठी आधी '२-२ कचरा बादल्या कोण ठेवणार? फाल्तु खर्च..' ई. ऐकले म्हणुन पदरमोड करुन घरटी एक एक्स्ट्रा कचरा बादली आणुन दिली. अपेक्षा ईतकीच होती की ओल्या कचर्‍याच्या बादलिच्या तळाशी वर्तमानपत्राचा एक तुकडा लावावा जेणेकरुन कचरा नेणारीला पण सोयीचे होइल. हाईट म्हणजे त्यावर पण 'रद्दीचे पैसे बुडतायेत..' असली कारणे दिली गेली. कसाबसा हा प्रकल्प लोकांच्या गळी उतरवण्यात तब्बल ५ महिने यशस्वी झालो. पण हाय रे दैवा ...परदेशात गेलो आणि सुट्टीवर आले होते तेंव्हा परिस्थिती 'जैसे थे' झाली होती. आणि आता परदेशस्थ झालामुळे काही बोलण्याचा अधिकार मी गमावून बसले होते. 'राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा..' ईतकच सांगते की ईथे लाज वाटते म्हणुन परदेशी जाणं ईतक सोप्प नहिये हो.... माफ करा..पण या फोरम ला देशी-परदेशी असं क्षुद्र वळण देण्याची ईच्छा नाहिये. आपल्या एकूण 1,236,344,631 लोकसंख्येपैकी सुमारे फक्त २५,०००,००० लोकं परदेश्स्थ भारतिय आहेत. ईतकेच ध्यानात घ्यावे.

यसवायजी 04/08/2014 - 17:25
अल्मोस्ट सगळा लेख आवडला होता. पण... राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? याचा कडक निषेढ. बोलू द्या जे खरं आहे त्याबद्द्ल. उद्या म्हणाल तिकडच्या राजकारण, सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर याबद्द्लसुद्धा बोलायचं नाही. अरे बोललंच पाहिजे. राग येउद्या ज्यांना येतोय.

In reply to by यसवायजी

योग्य बोललास.ह्यांचे एक मित्र युरोपचा दौरा करून आले होते. तेथे प्रत्येक स्टेशनावर्,स्टेशनाबाहेर कचर्‍याचे डबे योग्य अंतरावर ठिकठिकाणी ठेवले होते.गर्दीच्या ठिकाणी, शॉपिंग मॉलच्या बाहेर्,आतही तीच परिस्थिती. रस्त्यावर कचरा टाकू नका सांगणे ठीक पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? पान खाणे ही आपली परंपरा पण पानाच्या गादीबाहेर थुंकण्याची व्यवस्था नसेल तर लोक थुंकणारच ना? थुंकू नयेत म्हणून गुटखा,पानमसाल्यावर बंदी घालण्याची हिंमत आहे? तर ती ही नाही. तो दाणे खाणारा कुणी होता, त्या डब्यात कचरा टाकायची व्यवस्था होती? की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत? अर्थातच होय ! माणुस सुसंस्कृत असला तर हा प्रश्न मनात येणारच नाही. कारण, एकाने केलेली चूक (प्रशासनाने कचरापेटी न ठेवणे) आपण दुसरी चूक (कचरा जमिनीवर टाकणे) करून सुधारू शकत नाही. हा प्रश्न भारतात विचारणार्‍यांच्या मनाला तो सिंगापूरसारख्या सर्वव्यापी कायद्याचा बडगा असणार्‍या ठिकाणी (जवळपास कचरापेटी नसली तरीसुद्धा) शिवत नाही... असा अनुभव आहे ;)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी 04/08/2014 - 19:17
पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही. मेंटॅलिटी महत्वाची. एक उदा. बघा. न्युरेंबर्ग ते मुंबई व्हाया इस्तांबूल फ्लाईट होती. सगळ्या जागा भरल्या होत्या. न्युरेंबर्ग ते इस्तांबूल अल्मोस्ट सगळं युरोपियन पब्लिक होतं. ८०% लोक इस्तांबूलला उतरले. आता इस्तांबूलला सगळे भारतीय चढले. मजा बघा.. फ्लाईट तीच. प्रवाशांची संख्या तितकीच. व्यवस्था/सुविधाही तितक्याच. पण इस्तांबूल पर्यंत अगदी स्वच्छ असलेल्या फ्लाईटम्ध्ये, मुंबईपर्यंतच्या प्रवासात वॉशरूमची काय हालत झाली होती विचारू नका. काही सिटवर तर चॉकलेट्/बिस्कीटपुड्यांचे रॅपर, कागदी पेले तसेच टाकले होते लोकांनी.

In reply to by यसवायजी

रेवती 04/08/2014 - 19:24
भयानक सहमत. आधी आधी व्यवस्थाही तशीच ठेवण्याचा विमान व्यवस्थापनाचा प्रयत्न असतो हो, नंतर लोक ऐकतच नाहीत म्हटल्यावर ते दुर्लक्ष करायला लागतात, हळूहळू सर्व्हीसवर परिणाम झाल्याच्या बोंबा लोकांकडून ऐकायला येतात पण काय करणार? वेळेत विमान सुटले आणि सगळे वेळेत झाले तर ठीक पण दोनेकवेळा काही अपरिहार्य कारणाने (हवामान) विमान जेंव्ह दुसर्‍या तळावर उतरवण्याची वेळ आली तेंव्हा या कचराकुंडीत बसणे असह्य झाल्याची चिडचिड चालली होती. आपणच कचरा करायचा व आपणच चिडायचे याला कोण काय करणार?

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 04/08/2014 - 17:59
ऑफ कोर्स अधिकार आहे. परदेशातल्यांनी बोलायचं काम नै म्हण्णारी लोकं तद्दन यूसलेस असतात. स्वतः कै करायचंही नै अन इतरांनी सांगितलेलं ऐकायचंही नाही. बरं हे इतर म्हंजे कुणी परदेशातले नव्हेत, हिकडचेच थोड्या वर्षांपूर्वी तिकडं गेलेले लोक. ते परके होतीलही कदाचित काही शे वर्षांनी. पण आत्ता तरी ते आपलेच आहेत. उगा फुकटचा माज आहे झालं.

In reply to by कवितानागेश

+१ माउ!! 'आपला' समजलं तर स्वच्छता ई. ची काही नैतिक जबाबदारी येत असावी. 'आपल्या बापाचा...' समजलं तर "कोई क्या कर लेगा.."

वडापाव 04/08/2014 - 17:50
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता. सरसकटीकरणाचा उद्देश नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना खुपायला नको. आणि ट्रेनमध्ये कचरापेटी नाही म्हणून कचरा वाटेल तिथे टाकायची काय गरज? खिसा नावाची गोष्ट असते कपड्यांना. घरी घेऊन जावा आणि घरच्या कचरापेटीत टाकावा.

In reply to by वडापाव

बॅटमॅन 04/08/2014 - 17:57
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता.
स्वदेशातले दांभिक का बरे वगळलेत? दांभिक नामक जमात पुण्यभू मातृभूमध्ये अस्तित्वातच नाही असा नोबेलप्राप्त शोध तर नै ना ओ लावलात?

राही 04/08/2014 - 17:55
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.

वडापाव 04/08/2014 - 18:10
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.
बरोबर आहे. पण कोणी कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसलं की डोकं फिरतं. शक्य तितक्या चांगल्या भाषेत सांगतो. नेहमी जमतंच असं नाही.

शांतपणे "शिकलेले दिसता. मग असे का केलेत?" असे विचारतो. ९०% लोक खजील होतात. पण त्यातले १०% लोकच कचरा उचलून कचरापेटीत टाकतात. उरलेले ८०% दुसर्‍या वेळेस तसे करणार नाहित असा विचार करून संघर्ष ताळतो. पण जे १० टक्के उद्दामपणा दाखवतात त्यांना चार लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने "अशिक्षित" आणि "संस्कृतीहीन (uncivilised, antisocial)" असल्याचे सांगतो.

रेवती 04/08/2014 - 18:42
हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हे वगळता बाकी लेख आवडला. लै बोलून झालय आधीच! जाऊ दे! जुने धागे बघावेत. खोदकाम करावे लागेल पण सापडतील. त्यावरील पूर्वीच्या सदस्यांची (त्यात मीही आलेच) वादावादी वगैरे वाचायला मिळेल. बराच शब्दकचरा झाला होता! ;)

यसवायजी 04/08/2014 - 19:04
वरच्या लेखात आणी परवाच्याच या लेखात एक साम्य आहे. जरी उद्देश चांगला असला तरी ही 'मास'साठी दिलेली भाषणे वाटतात. परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो. पण कंट्रोल उदय कंट्रोल.. (नॉन्-एशीतला,देशी,ब्लू कॉलर कामगार)- SYG

In reply to by यसवायजी

सूड 04/08/2014 - 19:52
>>परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो काही अंशी का होईना, सहमत !!

मराठे 04/08/2014 - 20:05
एक दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या स्काऊटची काही ग्रूप-अ‍ॅक्टीविटी होती म्हणून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कळलं की, प्रत्येक मुलाला पिशवी, हातमोजे देऊन शाळेच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिशव्या/बाटल्या इत्यादी कचरा गोळा करणार होते. हे कळल्यावर दोन तीन भारतीय पालक मुलाला घेऊन परत गेले! मुलं आनंदाने एकत्र काम करत होती. रस्त्याच्या कडेला आपल्याकडे असतो एवढा कचरा इथे नसतो हे पण खरं म्हणा. (ही गोष्ट गंमत म्हणून घरी आई बाबांकडे फोन केला तेव्हा बोललो तेव्हा नातवाला 'असलं' काम करायला लावल्याबद्धल त्यांनी मलाच झाप झाप झापलं.)

मला वाटतं मोठ्ठा सामाजिक बदल घडविताना २० वर्षांवरील लोकांना लक्ष्य करण्याऐवजी लहान मुलांना लक्ष्य करावे. त्यांना 'घडवावे'. मातीचे काठ ओले असताना वळविता येतात तद्वत ह्या मुलांवर योग्य ते संस्कार केले तर भविष्यात 'चांगले' संस्कार करणारे पालक तयार होतील आणि सामाजिक बदलाचे सुपरिणाम दिसू लागतील. प्रत्येकाने स्वतः बरोबरच आपल्या मुलांवर असे प्रत्यक्ष कृतीचे संस्कार करावेत आणि सुज्ञ समाजाचे स्वप्न साकार होताना पाहावे. परदेशात गेल्यावर अनेक बाबतीतला संस्कृतीतला 'वेगळेपणा' दिसायला आणि जाणवायला लागतो. अप्रत्यक्षरित्या आपले प्रबोधनच होते. भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्या लोकांची उदासिनता आपल्याला सलत राहते. आपण स्वच्छतेचे (नव्याने शिकलेले नियम) पाळतोच पण इतरत्र दिसण्यार्‍या चित्रावर भाष्य करून लोक प्रबोधनाचा प्रयत्न करतो. त्यांना विरोध करून, त्यांचा पाणउतारा करून आपण समाज प्रबोधन करू इच्छिणार्‍या 'शिक्षकां'नाच समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत असे होईल. भारतात राहणारे आणि परदेशातून परतलेले भारतिय ह्या सर्वांनीच पुढाकार घेऊन ही समस्या सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याकडे सुशिक्षित/अशिक्षित सर्वच जणं देवस्थानांच्या पदयात्राकाढून रस्त्यांवर कचरा आणि नदीकाठी मलमुत्र विसर्जन करतात. का? तर म्हणे त्याने (पदयात्रेने) आत्मिक समाधान मिळतं. अत्मिक समाधान आणि इच्छाशक्तीत वाढ करण्यासाठी हा एकच मार्ग आहे का? ह्याचा विचार करावा. आणि खरोखर हा एकच मार्ग असेल तर वरील अस्वच्छता कशी टाळता येईल ह्याचा विचार करावा. त्याच बरोबर पैसे भरून वापरायची स्वच्छतागृहे सर्वत्र असावीत. ते नगरपालिका/परिषदांनी उपलब्ध करून द्यावे. हि गोष्ट अगदी खरी आहे की परदेशात (युरोप-अमेरिकेत. त्यालाच आपण परदेश मानतो आणि संबोधितो) ठिकठिकाणी अगदी स्वच्छ स्वच्छ्तागृहे असतात. ठिकठिकाणी कचर्‍याच्या पेट्या असतात. अगदी रेल्वेतही पाहिल्या आहेत. मोठमोठ्या सार्वजनिक ठिकाणी, जसे बसस्थानक, विमानतळ, रेल्वेस्टेशन, बाग-बगिचे इत्यादी इत्यादी, सफाई कामगार 'काम करीत' फिरत असतात. जनता आणि प्रशासन दोघांनीही आपापली जबाबदारी ओळखून वागायला पाहिजे. मुंबईतली सुलभ शौचालये त्या मानाने बरी असतात. पुण्यात जी सार्वजनिक मुतारी नांवाची गोष्ट असते त्याच्या १० फुटांच्या परिसरातही पाऊल ठेवता येत नाही. अगदी अडलेल्या माणसाने काय करायचे? शेवटी नाईलाजाने त्यालाही कुठेतरी उभ्या केलेल्या ट्रकच्या मागे जाऊन कार्यभाग अक्षरशः 'उरकावा' लागतो. हल्ली जरा बरेच मॉल्स झाल्याने तिथली स्वच्छतागृहे तरी बरी असतात असा अनुभव आहे. पुण्यात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. मुंबईत कधी पाहिली नव्हती. पण त्यांची अवस्थाही (बाहेरुनच) पुरुष स्वच्छतागृहांपेक्षा कांही वेगळी दिसत नाही. तात्पर्य, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा (त्या साठी स्वतः चांगले वागा) आणि प्रशासनालाही सोयी पुरवायला भाग पाडा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर सरकार बंदी घालते. म्हणजे जनतेने अमुकएक मायक्रॉन खालील पिशव्या वापरू नयेत नाहितर १०००/- रुपये दंड वगैरे घोषित करतात. अरे पण त्याच्या निर्मितीवरच का बंधन घालीत नाहीत? गुटखा, तंबाखू, पान ह्याच्या निर्मितीवरच बंदी का आणित नाहीत? इथे मस्कतमध्ये गुटखा, तंबाखू, पान ह्यावर बंदी आहे. चोरून मिळतात ह्या गोष्टी पण पकडले गेल्यास सरळ तुरुंगवास असल्याकारणाने चोरून खाणार्‍यांचे प्रमाण अगदी अत्यल्प, म्हणजे शेकड्यात मोजता येणार नाही एव्हढे कमी आहे. त्यामुळे कुठेही पचापच थुंकल्याचे सडासमार्जन नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह चांगली आहेत. शिवाय प्रत्येक मॉल, उपहारगृहाला स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. आणि तिथे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची माणसे वरचेवर भेटी देऊन व्यवस्था नीट ठेवली आहे की नाही हे तपासतात. असो. मी तरी इथे मस्कतात येऊन आणि 'परदेश' वार्‍यांमधून बरेच कांही शिकलो आणि भारतात आल्यावर हेच सर्व नियम स्वतः पाळतो आणि इतरांनीही पाळावेत म्हणून आग्रही असतो. माझ्या मुलालाही अगदी ४-५ वर्षांचा असल्यापासून ह्या सवयी लावल्या आहेत. आणि गरज भासल्यास नातवालाही चांगल्या सवयी लावेन.

कविता१९७८ 05/08/2014 - 10:14
लेख आवडला , पण मला ही वाटतंय की कदाचित तुम्ही त्या मुलाला रागाच्या भरात बोलण्याऐवजी व्यवस्थीत शब्दात समज दिली असती तर कदाचित त्याने ऐकलं असतं कारण तुम्ही त्याला भर ट्रेन मधे असे बोललात तर त्यालाही इगो हर्ट झाला असेलच की, कुणालाही असे अनोळखी माणसाने भडकणे आवडत नाही.

याची सुरवात शाळेपासून व्हायला हवी. आपण प्रबोधनाच फुगा कष्टाने फुगवायचा अन कुणीतरी त्याला फक्त टाचणी लावयची. प्रबोधन व शिक्षा या दोन्ही पातळ्यांवर सातत्याने उपाययोजना हवी.मला तर हे भाबडे स्वप्न वाटते.

सविता००१ 04/08/2014 - 16:52
लोकल मधे तर हा अनुभव जवळ जवळ दररोज येतो. आपण सांगायला गेलो तर व्हीलन ठरतो चक्क! परवा एक मुलगी शीच पर्समधले नको असलेले कागद, रॅपर्स आणि काय काय खिडकीतून बाहेर टाकत होती. तिच्याकडे पाहिलं तर म्हणाली की क्या हुआ? बाहर फेक रही हू. मग सरळ म्हणाले- सब कचरा प्लास्टिक का है! जब वॉटर क्लॉगिंग होगा तब आप जैसे लोगों की वजह से हम सबको भुगतना पडेगा! तर म्हणे सब ऐसाही करते है! काय म्हणणार? जर सीट्खाली कुणी कचरा टाकायला लागलं तर मात्र उचलायलाच लावते मी. आणि बहुतेक वेळा इतर जणीही येतात माझ्याबरोबर. पण एकूण चित्र निराशाजनकच आहे

ज्या नैतिक अधिकाराने तुम्ही हे ईतरांना सांगता त्याच नैतिक अधिकाराने एखाद्या परदेशात राहुन आलेल्या / राहणार्‍या व्यक्तीला हे सांगण्याचा अधिकार का नाही? 'तुम्ही परदेशात राहणारे लोकचं ईथे येउन वाहतुकीचे नियम मोडता किंवा तिकडे बरे शिक्षेच्या (मराठीतली) धाकानी थुंकत नाही, ईथे आल्याबरोबर थुंकता ई.ई.' स्विपींग स्टेटमेंट्स जसे केले जातात तसाच सूर शेवट्च्या पॅराचा वाटतोय. बाकी लेख खूप कळकळीनी लिहिलाय हे जाणवलं. परदेशात जाण्यापुर्वी ३५ वर्षे ईथेच होते. तेंव्हा या विषयावर अगदी आम्च्या सोसायटीपासुन प्रयत्न केलाय. अगदी बेसिक गोष्ट म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवणे. त्यासाठी आधी '२-२ कचरा बादल्या कोण ठेवणार? फाल्तु खर्च..' ई. ऐकले म्हणुन पदरमोड करुन घरटी एक एक्स्ट्रा कचरा बादली आणुन दिली. अपेक्षा ईतकीच होती की ओल्या कचर्‍याच्या बादलिच्या तळाशी वर्तमानपत्राचा एक तुकडा लावावा जेणेकरुन कचरा नेणारीला पण सोयीचे होइल. हाईट म्हणजे त्यावर पण 'रद्दीचे पैसे बुडतायेत..' असली कारणे दिली गेली. कसाबसा हा प्रकल्प लोकांच्या गळी उतरवण्यात तब्बल ५ महिने यशस्वी झालो. पण हाय रे दैवा ...परदेशात गेलो आणि सुट्टीवर आले होते तेंव्हा परिस्थिती 'जैसे थे' झाली होती. आणि आता परदेशस्थ झालामुळे काही बोलण्याचा अधिकार मी गमावून बसले होते. 'राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा..' ईतकच सांगते की ईथे लाज वाटते म्हणुन परदेशी जाणं ईतक सोप्प नहिये हो.... माफ करा..पण या फोरम ला देशी-परदेशी असं क्षुद्र वळण देण्याची ईच्छा नाहिये. आपल्या एकूण 1,236,344,631 लोकसंख्येपैकी सुमारे फक्त २५,०००,००० लोकं परदेश्स्थ भारतिय आहेत. ईतकेच ध्यानात घ्यावे.

यसवायजी 04/08/2014 - 17:25
अल्मोस्ट सगळा लेख आवडला होता. पण... राग येतो तो या लाजेचं निमित्त करून परदेशी जाऊन तिथल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुक करणा-यांचा. तुम्ही जा ना तुम्हाला हवं तिथे, पण तिथे कसं चांगलं आहे, आणि त्यामानाने इथे कसं फडतूस आहे, हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? याचा कडक निषेढ. बोलू द्या जे खरं आहे त्याबद्द्ल. उद्या म्हणाल तिकडच्या राजकारण, सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर याबद्द्लसुद्धा बोलायचं नाही. अरे बोललंच पाहिजे. राग येउद्या ज्यांना येतोय.

In reply to by यसवायजी

योग्य बोललास.ह्यांचे एक मित्र युरोपचा दौरा करून आले होते. तेथे प्रत्येक स्टेशनावर्,स्टेशनाबाहेर कचर्‍याचे डबे योग्य अंतरावर ठिकठिकाणी ठेवले होते.गर्दीच्या ठिकाणी, शॉपिंग मॉलच्या बाहेर्,आतही तीच परिस्थिती. रस्त्यावर कचरा टाकू नका सांगणे ठीक पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? पान खाणे ही आपली परंपरा पण पानाच्या गादीबाहेर थुंकण्याची व्यवस्था नसेल तर लोक थुंकणारच ना? थुंकू नयेत म्हणून गुटखा,पानमसाल्यावर बंदी घालण्याची हिंमत आहे? तर ती ही नाही. तो दाणे खाणारा कुणी होता, त्या डब्यात कचरा टाकायची व्यवस्था होती? की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

की टर्फले,पिशव्या बॅगेतच ठेवायच्या कचर्‍याचा डबा शोधत? अर्थातच होय ! माणुस सुसंस्कृत असला तर हा प्रश्न मनात येणारच नाही. कारण, एकाने केलेली चूक (प्रशासनाने कचरापेटी न ठेवणे) आपण दुसरी चूक (कचरा जमिनीवर टाकणे) करून सुधारू शकत नाही. हा प्रश्न भारतात विचारणार्‍यांच्या मनाला तो सिंगापूरसारख्या सर्वव्यापी कायद्याचा बडगा असणार्‍या ठिकाणी (जवळपास कचरापेटी नसली तरीसुद्धा) शिवत नाही... असा अनुभव आहे ;)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यसवायजी 04/08/2014 - 19:17
पण कचरा टाकायला डबे नकोत, तशी व्यवस्था नको? प्रश्न फक्त व्यवस्थेचा नाही. मेंटॅलिटी महत्वाची. एक उदा. बघा. न्युरेंबर्ग ते मुंबई व्हाया इस्तांबूल फ्लाईट होती. सगळ्या जागा भरल्या होत्या. न्युरेंबर्ग ते इस्तांबूल अल्मोस्ट सगळं युरोपियन पब्लिक होतं. ८०% लोक इस्तांबूलला उतरले. आता इस्तांबूलला सगळे भारतीय चढले. मजा बघा.. फ्लाईट तीच. प्रवाशांची संख्या तितकीच. व्यवस्था/सुविधाही तितक्याच. पण इस्तांबूल पर्यंत अगदी स्वच्छ असलेल्या फ्लाईटम्ध्ये, मुंबईपर्यंतच्या प्रवासात वॉशरूमची काय हालत झाली होती विचारू नका. काही सिटवर तर चॉकलेट्/बिस्कीटपुड्यांचे रॅपर, कागदी पेले तसेच टाकले होते लोकांनी.

In reply to by यसवायजी

रेवती 04/08/2014 - 19:24
भयानक सहमत. आधी आधी व्यवस्थाही तशीच ठेवण्याचा विमान व्यवस्थापनाचा प्रयत्न असतो हो, नंतर लोक ऐकतच नाहीत म्हटल्यावर ते दुर्लक्ष करायला लागतात, हळूहळू सर्व्हीसवर परिणाम झाल्याच्या बोंबा लोकांकडून ऐकायला येतात पण काय करणार? वेळेत विमान सुटले आणि सगळे वेळेत झाले तर ठीक पण दोनेकवेळा काही अपरिहार्य कारणाने (हवामान) विमान जेंव्ह दुसर्‍या तळावर उतरवण्याची वेळ आली तेंव्हा या कचराकुंडीत बसणे असह्य झाल्याची चिडचिड चालली होती. आपणच कचरा करायचा व आपणच चिडायचे याला कोण काय करणार?

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 04/08/2014 - 17:59
ऑफ कोर्स अधिकार आहे. परदेशातल्यांनी बोलायचं काम नै म्हण्णारी लोकं तद्दन यूसलेस असतात. स्वतः कै करायचंही नै अन इतरांनी सांगितलेलं ऐकायचंही नाही. बरं हे इतर म्हंजे कुणी परदेशातले नव्हेत, हिकडचेच थोड्या वर्षांपूर्वी तिकडं गेलेले लोक. ते परके होतीलही कदाचित काही शे वर्षांनी. पण आत्ता तरी ते आपलेच आहेत. उगा फुकटचा माज आहे झालं.

In reply to by कवितानागेश

+१ माउ!! 'आपला' समजलं तर स्वच्छता ई. ची काही नैतिक जबाबदारी येत असावी. 'आपल्या बापाचा...' समजलं तर "कोई क्या कर लेगा.."

वडापाव 04/08/2014 - 17:50
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता. सरसकटीकरणाचा उद्देश नव्हता. ज्यांनी प्रयत्न केला त्यांना खुपायला नको. आणि ट्रेनमध्ये कचरापेटी नाही म्हणून कचरा वाटेल तिथे टाकायची काय गरज? खिसा नावाची गोष्ट असते कपड्यांना. घरी घेऊन जावा आणि घरच्या कचरापेटीत टाकावा.

In reply to by वडापाव

बॅटमॅन 04/08/2014 - 17:57
शेवटचा प्यॅरा परदेशी स्थायिक झालेल्यांतल्या किंवा होऊ पाहणा-यांतल्या hypocrites/दांभिकाना उद्देशून होता.
स्वदेशातले दांभिक का बरे वगळलेत? दांभिक नामक जमात पुण्यभू मातृभूमध्ये अस्तित्वातच नाही असा नोबेलप्राप्त शोध तर नै ना ओ लावलात?

राही 04/08/2014 - 17:55
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.

वडापाव 04/08/2014 - 18:10
आपण आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मात्र, आपल्या सांगण्याला उपदेशाचे किंवा लेक्चरचे स्वरूप कधीही येऊ देऊ नये. नेहेमी 'शॉर्ट अँड स्वीट' असावे. आवाज चढा लावू नये. सुरुवात नेहमी 'माफ करा, पण हे कागद तुम्ही प्लीज खाली टाकू नका,हवंतर माझ्याकडे द्या' अशी नम्र असावी. स्वतःजवळ एक प्लॅस्टिक बॅग बाळगावी. कोणी एखाद्याने निर्लज्जपणे कचराकागद देऊ केले तर ते निर्विकारपणे त्या पिशवीत टाकावे आणि जाताजाता सोयीच्या कचराकुंडीत टाकावे. माझा या बाबतीतला अनुभव अतिशय सकारात्मक आहे. बहुतेक लोक खजील होतात, सॉरी म्हणतात. १)कधीही रागावू नये.२) आपण मोठे समाजकार्य अथवा समाजसेवा करीत आहोत, उपकार करीत आहोत असा आव कृतीतून दिसू तर नयेच पण मनातही येऊ नये. हसतमुखाने सांगितल्यावर लोक ऐकतात. कोणी ऐकलं नाही तर सोडून द्यावं, वाद घालू नये. खट्टूही होऊ नये.
बरोबर आहे. पण कोणी कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसलं की डोकं फिरतं. शक्य तितक्या चांगल्या भाषेत सांगतो. नेहमी जमतंच असं नाही.

शांतपणे "शिकलेले दिसता. मग असे का केलेत?" असे विचारतो. ९०% लोक खजील होतात. पण त्यातले १०% लोकच कचरा उचलून कचरापेटीत टाकतात. उरलेले ८०% दुसर्‍या वेळेस तसे करणार नाहित असा विचार करून संघर्ष ताळतो. पण जे १० टक्के उद्दामपणा दाखवतात त्यांना चार लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने "अशिक्षित" आणि "संस्कृतीहीन (uncivilised, antisocial)" असल्याचे सांगतो.

रेवती 04/08/2014 - 18:42
हे बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? हे वगळता बाकी लेख आवडला. लै बोलून झालय आधीच! जाऊ दे! जुने धागे बघावेत. खोदकाम करावे लागेल पण सापडतील. त्यावरील पूर्वीच्या सदस्यांची (त्यात मीही आलेच) वादावादी वगैरे वाचायला मिळेल. बराच शब्दकचरा झाला होता! ;)

यसवायजी 04/08/2014 - 19:04
वरच्या लेखात आणी परवाच्याच या लेखात एक साम्य आहे. जरी उद्देश चांगला असला तरी ही 'मास'साठी दिलेली भाषणे वाटतात. परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो. पण कंट्रोल उदय कंट्रोल.. (नॉन्-एशीतला,देशी,ब्लू कॉलर कामगार)- SYG

In reply to by यसवायजी

सूड 04/08/2014 - 19:52
>>परदेशी जाणार्‍यांना, मॉलमध्ये फिरणार्‍यांना, एसीत बसणार्‍यांना सरसकट नावे ठेवली की टाळ्या नक्कीच मिळतात हो काही अंशी का होईना, सहमत !!

मराठे 04/08/2014 - 20:05
एक दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या स्काऊटची काही ग्रूप-अ‍ॅक्टीविटी होती म्हणून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कळलं की, प्रत्येक मुलाला पिशवी, हातमोजे देऊन शाळेच्या समोरच्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या पिशव्या/बाटल्या इत्यादी कचरा गोळा करणार होते. हे कळल्यावर दोन तीन भारतीय पालक मुलाला घेऊन परत गेले! मुलं आनंदाने एकत्र काम करत होती. रस्त्याच्या कडेला आपल्याकडे असतो एवढा कचरा इथे नसतो हे पण खरं म्हणा. (ही गोष्ट गंमत म्हणून घरी आई बाबांकडे फोन केला तेव्हा बोललो तेव्हा नातवाला 'असलं' काम करायला लावल्याबद्धल त्यांनी मलाच झाप झाप झापलं.)

मला वाटतं मोठ्ठा सामाजिक बदल घडविताना २० वर्षांवरील लोकांना लक्ष्य करण्याऐवजी लहान मुलांना लक्ष्य करावे. त्यांना 'घडवावे'. मातीचे काठ ओले असताना वळविता येतात तद्वत ह्या मुलांवर योग्य ते संस्कार केले तर भविष्यात 'चांगले' संस्कार करणारे पालक तयार होतील आणि सामाजिक बदलाचे सुपरिणाम दिसू लागतील. प्रत्येकाने स्वतः बरोबरच आपल्या मुलांवर असे प्रत्यक्ष कृतीचे संस्कार करावेत आणि सुज्ञ समाजाचे स्वप्न साकार होताना पाहावे. परदेशात गेल्यावर अनेक बाबतीतला संस्कृतीतला 'वेगळेपणा' दिसायला आणि जाणवायला लागतो. अप्रत्यक्षरित्या आपले प्रबोधनच होते. भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपल्या लोकांची उदासिनता आपल्याला सलत राहते. आपण स्वच्छतेचे (नव्याने शिकलेले नियम) पाळतोच पण इतरत्र दिसण्यार्‍या चित्रावर भाष्य करून लोक प्रबोधनाचा प्रयत्न करतो. त्यांना विरोध करून, त्यांचा पाणउतारा करून आपण समाज प्रबोधन करू इच्छिणार्‍या 'शिक्षकां'नाच समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत असे होईल. भारतात राहणारे आणि परदेशातून परतलेले भारतिय ह्या सर्वांनीच पुढाकार घेऊन ही समस्या सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्याकडे सुशिक्षित/अशिक्षित सर्वच जणं देवस्थानांच्या पदयात्राकाढून रस्त्यांवर कचरा आणि नदीकाठी मलमुत्र विसर्जन करतात. का? तर म्हणे त्याने (पदयात्रेने) आत्मिक समाधान मिळतं. अत्मिक समाधान आणि इच्छाशक्तीत वाढ करण्यासाठी हा एकच मार्ग आहे का? ह्याचा विचार करावा. आणि खरोखर हा एकच मार्ग असेल तर वरील अस्वच्छता कशी टाळता येईल ह्याचा विचार करावा. त्याच बरोबर पैसे भरून वापरायची स्वच्छतागृहे सर्वत्र असावीत. ते नगरपालिका/परिषदांनी उपलब्ध करून द्यावे. हि गोष्ट अगदी खरी आहे की परदेशात (युरोप-अमेरिकेत. त्यालाच आपण परदेश मानतो आणि संबोधितो) ठिकठिकाणी अगदी स्वच्छ स्वच्छ्तागृहे असतात. ठिकठिकाणी कचर्‍याच्या पेट्या असतात. अगदी रेल्वेतही पाहिल्या आहेत. मोठमोठ्या सार्वजनिक ठिकाणी, जसे बसस्थानक, विमानतळ, रेल्वेस्टेशन, बाग-बगिचे इत्यादी इत्यादी, सफाई कामगार 'काम करीत' फिरत असतात. जनता आणि प्रशासन दोघांनीही आपापली जबाबदारी ओळखून वागायला पाहिजे. मुंबईतली सुलभ शौचालये त्या मानाने बरी असतात. पुण्यात जी सार्वजनिक मुतारी नांवाची गोष्ट असते त्याच्या १० फुटांच्या परिसरातही पाऊल ठेवता येत नाही. अगदी अडलेल्या माणसाने काय करायचे? शेवटी नाईलाजाने त्यालाही कुठेतरी उभ्या केलेल्या ट्रकच्या मागे जाऊन कार्यभाग अक्षरशः 'उरकावा' लागतो. हल्ली जरा बरेच मॉल्स झाल्याने तिथली स्वच्छतागृहे तरी बरी असतात असा अनुभव आहे. पुण्यात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. मुंबईत कधी पाहिली नव्हती. पण त्यांची अवस्थाही (बाहेरुनच) पुरुष स्वच्छतागृहांपेक्षा कांही वेगळी दिसत नाही. तात्पर्य, आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा (त्या साठी स्वतः चांगले वागा) आणि प्रशासनालाही सोयी पुरवायला भाग पाडा. प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर सरकार बंदी घालते. म्हणजे जनतेने अमुकएक मायक्रॉन खालील पिशव्या वापरू नयेत नाहितर १०००/- रुपये दंड वगैरे घोषित करतात. अरे पण त्याच्या निर्मितीवरच का बंधन घालीत नाहीत? गुटखा, तंबाखू, पान ह्याच्या निर्मितीवरच बंदी का आणित नाहीत? इथे मस्कतमध्ये गुटखा, तंबाखू, पान ह्यावर बंदी आहे. चोरून मिळतात ह्या गोष्टी पण पकडले गेल्यास सरळ तुरुंगवास असल्याकारणाने चोरून खाणार्‍यांचे प्रमाण अगदी अत्यल्प, म्हणजे शेकड्यात मोजता येणार नाही एव्हढे कमी आहे. त्यामुळे कुठेही पचापच थुंकल्याचे सडासमार्जन नाही. सार्वजनिक स्वच्छतागृह चांगली आहेत. शिवाय प्रत्येक मॉल, उपहारगृहाला स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. आणि तिथे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची माणसे वरचेवर भेटी देऊन व्यवस्था नीट ठेवली आहे की नाही हे तपासतात. असो. मी तरी इथे मस्कतात येऊन आणि 'परदेश' वार्‍यांमधून बरेच कांही शिकलो आणि भारतात आल्यावर हेच सर्व नियम स्वतः पाळतो आणि इतरांनीही पाळावेत म्हणून आग्रही असतो. माझ्या मुलालाही अगदी ४-५ वर्षांचा असल्यापासून ह्या सवयी लावल्या आहेत. आणि गरज भासल्यास नातवालाही चांगल्या सवयी लावेन.

कविता१९७८ 05/08/2014 - 10:14
लेख आवडला , पण मला ही वाटतंय की कदाचित तुम्ही त्या मुलाला रागाच्या भरात बोलण्याऐवजी व्यवस्थीत शब्दात समज दिली असती तर कदाचित त्याने ऐकलं असतं कारण तुम्ही त्याला भर ट्रेन मधे असे बोललात तर त्यालाही इगो हर्ट झाला असेलच की, कुणालाही असे अनोळखी माणसाने भडकणे आवडत नाही.
लेखनप्रकार
माझं डोकं हटलं होतं. कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. त्याच विचारात घरी परतत होतो. दुपारची वेळ होती. त्यामुळे साहजिकच वातावरण तापलेलं होतं. ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. माझ्यासमोर एक माझ्याच वयाचा, कृश शरीरयष्टीचा (हे महत्त्वाचं आहे) मुलगा दाणे खात बसला होता. दाण्याची सालं खाली टाकत होता. ज्या प्लॅस्टीकच्या पिशवीतून खात होता ती पिशवी खाऊन झाल्यावर त्याने खिडकीतून बाहेर फेकून दिली. मी हा सगळा प्रकार मुकाट्याने बघत होतो. त्याने खिशातून दुसरी पिशवी काढून त्यातनं पुन्हा दाणे खायला आणि साल खाली टाकायला सुरुवात केल्यावर मात्र माझा ताबा सुटला. आधीच डोकं भडकलेलं असल्याने बोलण्यात चेव सुद्धा होताच.

माफ करायचं...

धन्या ·

सौंदाळा 04/08/2014 - 15:52
छान लेख. आवडला, पटला पण कळत पण वळत नाही धन्या :( अनेक विचार मनात येतात. एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या 04/08/2014 - 16:16
एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

प्यारे१ 04/08/2014 - 15:59
लिखाण आवडलं. माफ करावंच पण माफ करताना अहंकार आडवा येऊ देऊ नये. कालांतरानं मी(च) एकटा शहाणा असा गैरसमज होऊ शकतो. बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.

In reply to by प्यारे१

धन्या 04/08/2014 - 16:09
बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.
हे एव्हढं कळलं की माफ करणं खुप सोपं जातं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपला मनस्ताप कमी होतो. :)

In reply to by धन्या

प्यारे१ 04/08/2014 - 16:18
दारुचा अम्मल नि स्वभावाचा अम्मल सारखाच. बर्‍याचदा ती व्यक्ती एखाद्या घटनेनंतर नेमकी कशी वागेल हे 'प्रेडीक्ट' करता येतं. नि 'अशी नाही वागणार तर कशी वागणार' असा प्रश्न पडून त्रास न होता मौज वाटते. ;) (अर्थात स्वभावाचा त्रास त्या व्यक्तीलाच होत असेल तर तिला समजावण्याचा प्रयत्न करावा. न ऐकल्यास 'अच्छा' म्हणावं.)

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. पण आता हे वाचुन माफ केलं.. ह्यासाठी नाही की त्या व्यक्तीकडुनही चुका होऊ शकतात वगैरे विचार केला... ह्यासाठी की आपल्याला आपणच त्रास करुन घ्यावा मुळात कुणाचीच एवढी लायकी नसते... शिवाय ह्या जन्मातलं इथेच भोगुन जायचयं.. तेव्हा कधी ना कधी न्याय होईलच.. बरंय.. आज अजुन एक विषय संपवला! धन्यवाद...!

In reply to by पिलीयन रायडर

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. असे लोक असणारच ही बेशर्त स्विकृती केलेली बरी :)

मैत्र 04/08/2014 - 16:18
का कुणास ठाऊक, अशाच विविध विचारांच्या फेर्‍यात होतो /आहे. पण या संयत, नेमक्या शब्दांनी काहीसं शांत केलं आहे मनाला. एका दिवसात / एका मिनिटात पचवता नाही येणार हा विचार. पण किमान प्रयत्न तर सुरू झाला आणि त्यासाठी काही प्रमाणात लॉजिकल, अभिनिवेश किंवा हेच कसं बरोबर असा कसलाही आग्रह न धरणारा हा लेख नक्कीच कारणीभूत आहे आणि पुढेही उपयोगी पडेल. अनेक धन्यवाद !!

तिमा 04/08/2014 - 16:24
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. सूडाची भावना न ठेवणे शक्य आहे पण काही झालेच नव्हते असे आपल्या मनाला पटवणे कसे शक्य आहे ?

In reply to by तिमा

धन्या 04/08/2014 - 16:42
झालेली घटना पुर्णतः पुसून टाकता येत नाही.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं. ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे. मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
तसेच,
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे.

In reply to by तिमा

विलासराव 07/08/2014 - 00:20
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. प्रथमतः धन्याचं या जीवनाच्या सर्वात महत्वपुर्ण अंगावरील लेखाबद्दल अभिनन्दन. खुपच गहन विषय आहे हा. प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने यावर उपाय शोधत असतोच हे आलेल्या प्रतिसादांवरुन दिसुन येइल. पण मला तिमांचा हा ( तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे)प्रश्न सर्वात मूळ आणी महत्वाचा वाटला. या विषयाबद्दल माझा अनुभव . जीवनामधे दुख: आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही. मग ते दुख: म्हणजे आहे तरी काय? याचा खरच कोणी तटस्थपणे मागोवा घेइल तर लक्षात येइल की ढोबळमानाने दुख: म्हणजे कुठलीही गोष्ट( व्यक्ती,घटणा,स्थीती,परीस्थीती)माझ्या मनाविरुध्द होणे.याउलट मनाप्रमाणे होणे म्हणजेच सुख. मग आता मन म्हणजे काय? मन ही सर्वात वेगवान आणी गुन्तागुन्तीची प्रक्रीया आहे.ही स्वतः अनुभवाच्या पातळीवर समजुन घेतल्याशिवाय आपण जेजे करु ते आपल्याला दुक्खातच लोटेल. अगदी आत्ता सुखद वाटणारी घटनाही थोड्याच काळात दुक्खात बदलेल/बदलते. हे आपल्याला आपल्याच तटस्थ निरीक्षणाने लक्षात येइल. तर यासाठी मनाला समजुन घ्यावे लागेल. मनाचे साधारणपणे दोन भाग असतात. पहीला चेतन मन. यानेच आपले रोजचे व्यवहार पार पाडत असतो. अनेक चांगल्या वाईट घटनांवर चिंतन मनन करुन आपण निर्णय घेत असतो. निरीक्षण केलेत तर असे दिसुन येईल की मनाच्या विचलीत अवस्थेत जे निर्णय घेतले त्यात काही ना काही त्रुटी असेल अन मन विचलीत नसताना जे काही कराल ते योग्य असेल.आपले मन काहीही करताना द्वन्द्वात असते मग बर्याचदा चुकीच्या गोष्टी घडुन पश्चाताप करावा लागतो हेही दुक्खदच.मग करायचे काय? मन शांत ठेवुन व्यवहार करणे, ते तर आपल्याला कळते पण कसे करायचे ते वळत नाही. मग मनाचे आणखी सुक्ष्मपणे निरीक्षण करायचे. खरच लक्षपुर्वक पाहीले तर आपले मन हे दोन क्षेत्रात रमते. एकतर भुतकाळात ( ते त्याने असे केले, मला समजत नव्हते तेंव्हा, आता भेटेल तर मग दाखवतो. नाहीतर मी विश्वास ठेवला म्हनुन फसलो अश्या अनंत तर्‍हा असो.) नाहीतर लगेच भविष्यात उडी मारते ( मी दोन वर्षानी अमुक पदावर असेल, मग मला या पावर असतील, मग मी लोकांचे भले करण्याचे निर्णय घेउ शकेल, कींवा माझेच भले करु शकेल , अमुक करेल नी तमुक करेल, थोडक्यात स्वप्नरंजण). जगामधे जो अन्याय होतो तो त्या व्यक्तीच्या/ समाज्याच्या कल्याणाच्या नावावर सर्वात मोठ्या प्रमाणात होतो हे दिसुन येइल , खासकरुन धर्माच्या नावावर. अगदी कुटूंबातही अशी उदाहरणे सापडतील.मग आण्खी लक्षपुर्वक पहा. तर असे दिसुन येईल मन भुतकाळात असु की भविष्यात दोनच गोष्टीत रमते. जेजे प्रिय ते सुखद आनी जेजे अप्रिय तेते दुखद. सुखद आठवण असेल तर तासंतास त्या आठवन/ घटणा मनाच्या रंग मंचावर पहाण्यात निघुन जातात,मनाला प्रसन्न वाटते. तसेच दुखद आठवणी आपल्याला पुन्हापुन्हा दुखः देतात मग आपण त्या मनातुन काढुन टाकण्यासाठी पुन्हा चांगल्या घटणा आठवतो/ कींवा मित्राला फोन लावतो/ सिनेमाला जातो/ फिरायला जातो/ व्यसन करतो अशा अनेक गोष्टी. कारण त्या दुखद गोष्टीचा त्रास नको म्हनुन आपण असे उपाय योजतो. मग ज्या घटणेमुळे व्याकुळता आली ती दाबली जाते अंतरमनात आनी आपले चेतन मन त्या सिनेमात रमुन जाते आनी आपल्याला बरे वाटते . आनी असे वाटते की त्या व्याकुळतेतुन सुटका झाली. होतेही पण तात्पुरती, कारण तिचा पुर्ण निचरा न होता ती अतरमनात जाते. परत त्या व्याकुळतेशी संबंधीत काही घटणा घडली तर ती पुन्हा प्रकट होते आनी आपण पुन्हापुन्हा व्याकुळ्/दुक्खी होतो. मग उपाय काय तर त्या व्याकुळतेचा पुर्णपणे निचरा/इरेज करणे की तीच पुन्हा आपल्याला त्रास देउ शकणार नाही. हे कसे शक्य आहे यावर आपल्या संतांनी/ऋषीमुनिंनी खुपच प्रयोग केले तर त्यांच्या लक्षात आले की चेतन मन हा मनाचा फार लहान हिस्सा आहे. आपल्याला सुख/दुक्ख/आनंद कुठे होतो तर आपल्या शरीराच्या आतमधे. घटणा बाहेर जरी घडली तरी सुख/दुक्ख/आनंद हे शरीरात होते. मग त्यांनी आतमधे डोकवायला सुरवात केली आनी एकेक रहस्य बाहेर येउ लागले. ते सारे आपल्याला धर्मग्रथांत/ संत साहित्यात आजही सापडेल. सगळ्यांना माहीत आहे मला राग येतो ,त्याचा त्रास मला होतो तसा मझ्या सभोवतालच्या लोकांना /वातावरनालाही होत. जेंव्हा मी दुक्खी असतो तेंव्हा मी ते दुक्खः माझ्यापुरतेच सिमीत न ठेवता त्याचे वितरण करतो आनी आजुबाजुच्या लोकांना/वातावरनाला दुक्खी करुन टाकतो ( कळत नकळत). मग ज्यांनी अंतर्मनाचा अभ्यास केला त्यांच्या हे लक्षात आले की चेतन मन सुद्धा स्वतंत्र नाही आहे. अंतर्मन जास्त बलवान आहे. चेतन मनाने कुठलेही संकल्प करा ते संपुर्णपणे सिद्द्दीस नेता येत नाहीत कारण अंतरमन त्याचे काहीही ऐकत नाही, त्याची अंतरमनावर काहिही हुकुमत नाही, सगळ्या समस्यांचे माहेरघर म्हणजे हे अंतर्मन. मग त्यांनी अनेक साधनाविधी शोधल्या त्यांचे तत्कालीक फायदेही झालेत , आजही होताहेत. मग अनेक संशोधनानंतर गौतम बुद्धांनी अंतर्मन पुर्ण शुद्ध करण्याची विद्या विपश्यना शोधुन काढली. जी आज भारतात आनी जगातही अनेक केंद्रांमार्फत मोफत शिकवली जाते. मी स्वतः विपश्यनेचा साडेतीन वर्षांपसुन नियमीत अभ्यास करतोय त्यामुळे वरील गोष्टी जरी विपश्यनाचार्य गोयंका सांगत असले तरी मी याचा घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ईथे लिहीत आहे. एका जरी माणसाला यातून लाभ झाला/ प्रेरणा मिळाली आनी त्यांना मार्ग मिळाला तर माझे हे लिहीण्याचे सार्थक झाले एवढाच उद्देश. इथे अनेकांनी विपश्यना केलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की नियमीत अभ्यास करा आनी वर्षातुन एकदा कोर्स करा. खरी साधना २०/३०/४५/६० दिवसांत चालु होते. १० दिवसांचे शिबीर तर पुर्वतयारी आहे अंतरमनात खोलवर उतरन्याची. मी कालच ३० दिवसांचे शिबीर करुन आलोय आनी पुर्ण शुद्ध मनाने हे सांगतो वर लिहिलेला प्रत्येक शब्दन्शब्द माझ्या स्वतःच्या अनुभवावर उतरलेला आहे. कुठलीही पोपटपंची यात नाही. आता सागळ्या शंका मिटल्यात मार्गाबद्दल. पुर्णपणे यावर चालण्याचा निर्धार केलाय अगदी मरेपर्यंत. जेवढे अंतर्मन साफ होते त्यात्या वेगवेगळ्या अनुभुती येताहेत पण त्या काही महत्वाच्या नाहीहेत. रहायचय तर याच समाज्यात. सुखद/दुह्खद घटनांमधे मन जराही विचलीत होउ न देता समता ठेवणे हीच खरी कसोटी. फार लांबचा रस्ता आहे कारण आपण जमा केलेले संस्कार. हेच अडचणीत आणतात. या साधानेने ते इरेज होतात. जेंव्हा चांगला/ वाईट अगदी शेवटचाही संस्कार इरेज होईल तीच संपुर्ण दुखःमुक्ती. आपण जमा केलेले चांगले/ वाइट संस्कार हीच मनाची कंडीशनींग. तीचा संपुर्ण निचरा म्हणजेच मुक्ती. ही इगतपुरीची माहीती http://www.dhamma.org/en/schedules/schgiri# हे जगातील केंद्र http://www.dhamma.org/en/maps#001

In reply to by विलासराव

अर्धवटराव 07/08/2014 - 19:19
सुख म्हणजे वेदना अनुकुला आणि दु:ख म्हणजे वेदना प्रतिकुला असं म्हणतात. विपश्यनेने अंतर्मनातील संस्कार धुतल्या जातात हे छान समजुन सांगितलं तुम्ही. एक शंका... अंतर्मनात अनुभव कोरले जाणं हा आपल्या इव्हॉल्युशन प्रोसेसचा एक भाग आहे. जर असं इरेझींग केलं तर अजाणते प्रॉब्लेम्स येऊ शकतील ना भविष्यात...

In reply to by अर्धवटराव

विलासराव 08/08/2014 - 09:17
प्रयत्न करुन पहातो.तीन प्रकारचे संस्कार आपण बनवत असतो जाणता/अजाणता. १) हे जे कोरले जातात. पण पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखे ते नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. २)हे वाळुवर ओढलेल्या रेषेसारखे. हे जास्त वेळ टिकतात पण तरीही हेही नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. ३)हे पाषाणावर कोरलेल्या रेषेसारखे. आपण ज्या मनाशी खुनगाठ बांधतो( चांगल्या अथवा वाईट), हे सर्वात खतरनाक. जसं की कुणाची हत्या केली. हसत हसत काही काणी कोणाची हत्या करत नाही. त्यासाठी कीतीतरी वेळा मनात क्रोध जागवतो, पुन्हा-पुन्हा जागवतो,प्रत्येक वेळेस जेंव्हा माणुस मनावर क्रोध जागवतो त्या प्रत्येक वेळेस आधीच्या क्रोधात तो आणखी तेल टाकतो, असे करत करत जेंव्हा आधी भडका उडतो,तेव्हा बेभान होउन हत्या करतो आनी नंतर पस्चाताप. आता दुसरी बाजु. मी रोज दारु प्यायचो अगोदर. जवळपास १५ वर्षे. खुप आनंद वाटायचा. खायच-प्यायच आनी कोणालाही न दुखावता आनंदात रहायचो. आता यात काय वाईट अशी माझी समजुत होती. मुळात होतं काय की दारु प्यायल्याने संपुर्ण शरिरात अतिसुक्ष्म संवेदना निर्माण होतात हे आपल्याला समजत नाही. त्या ईतक्या सुखद वाटतात की मन त्यात समाधीस्त झाल्यासारखे होते. आनंद वाटतो. पण त्या केमीकल्सचा प्रभाव जसजसा कमी होतो तसतसा वाटणारा आनंदही कमी होतो. मग मन तो पुन्हा-पुन्हा आठवायचा प्रयत्न करते. आनी जेंव्हा त्याचा प्रभाव नाहीसा होतो तेंव्हा परत त्याचे पाय बारकडे वळतात. हीच ती दारुची होणारी आसक्ती. जितकी सवय जुणी तितकीच ती सुटणे दुरापास्त. आता मी कधीतरी पहील्यांदा दारू प्यायलेलो असतो त्याअगोदरही मी जगत असतोच ना? त्या अगोदर ही आसक्ती नव्हतीच ना? मी जेंव्हा पहिल्या शिबीराला गेलो आनी परत आलो तेंव्हा मला काय झालेय ते अंदाजच आला नाही. घरी आलो मित्र यायचे रोजचे बरोबर पिणारे. मला इच्छाच व्हायची नाही. १ दिवस,२ दिवस, १ आठवडा, १ महीना, १ वर्ष आणी आता साडेतीन वार्षे झालीत एकदाही ईच्छा झाली नाही. झालं काय. झालं असं की शिबीरात जी साधना केली त्यात माझे दारु पिउन जामा केलेले सर्व संस्कार पुसले गेले. मला सोडावी लागली नाही. तर सुटली. मी जर एखाद्या डॉ.कडे गेलो असतो दारु सोडवायला तर त्यांनी इतकी जुनी सवय म्हणल्यावर साईडइफेक्ट होउ नये म्हनून हळुहळू कमी करण्याचा सल्ला तर नक्कीच दिला असता. म्हणुन आपल्याला असे वाटते की. तुम्ही जर गुलाबजामुन पहील्याप्रथम खाल्ला तर किती आवडतो. तुम्ही तो निखःळ खात नाही तर लगेच नकळत आसक्ती निर्माण करतो. आनी त्याची चव मेंदुवर कोरुन टाकता. त्या आधी आपण ही चव घेतलेली नसते. त्याअगोदरही आपण जगतच असतो ना? मग आपण परत दुसर्यांदा गुलाबजामुन खातो, तोंडात टाकल्याबरोबर मन प्रोसेसींग करुन काही क्षणात तुम्ही म्हणता आज खाल्लेला गुलाबजामुन अगोदरच्या ईतका चवदार नाही किंवा याउलट. आनी जे कृष्णमुर्ती म्हणतात तशी ही तुलनेची साखळी चालु रहाते. हीच ती कंडीशनींग. पण जर मन समतेत असले तर तुम्ही आधीची कुठलीच तुलना न करता या क्षणी , याच क्षणात उपस्थीत राहुन आजच्या गुलाबजामुनची चव चाखु शकता तेही मनावर न कोरता.ही प्रोसेस इतकी वेगवान होते की ती आपल्याला पकडता येत नाही. हेच सर्व ध्यानात हळुहळु पकडता येते आनी प्रत्यक्ष अनुभवाने आपण बर्याच प्रमाणात वर्तमानात जगायला लागतो. वर्तमानात समतेत जगणे म्हणजे काहीही मेंदुवर कोरले न जाणे. खरतर ध्यान आपण करत नसतो, आपण फक्त जे घटतय ते साक्षीभावाने( तटस्थपणे) पहात असतो. ही नैसर्गीक प्रक्रीया आहे की जेंव्हा तुम्ही या संवेदनांकडे तटस्थपणे पहाता तेव्हा नवीन संस्कार बनत नाहीत. आनी नवीन बनत नसतील आनी तरीही तुम्ही तटस्थपणे पहाल तर जुने जमा झालेले संस्कार आपोआप वर येतात आनी आताही तुम्ही समतेत( चांगले/वाईट अशी प्रतिक्रिया देत नसाल) असाल तर ते नैसर्गीकपणे पुसुन टाकले जातात. हे आपणाला ध्यानात पुर्णपणे ध्यानात येते. आनी मग बोध होतो की जो काही संवेदनांचा खेळ चाललाय तिथे आपली मर्जी जराही चालत नाही. जेवढी आपण सुखद/दुखःद अशी प्रतिक्रिया देतो , तेवढी तेवढी तॉ जो सुखद/ दुखद संस्कार आपण आणखी द्रुढ ( सोप्या भाषेत वाढ )करतो, परीणामी आपले सुख /दु:ख वाढते. हीच ती कोण्या बुध्दाची बोधी, ज्याने ते स्वतः मुक्त झाले आनी करुणेने इतरांना शिकवले. गोयंका गुरुजी वारंवार सांगतात एका सिध्द्दार्थ गौतममधे बोधी जागली त्याने फक्त एकच मनुष्य मुक्त झाला तो म्हणजे फक्त सिध्द्दार्थ गौतम. बाकीच्यांना मार्ग सांगीतला. जे चालले त्या मार्गावरुन ते मुक्त झाले. जे कुणाची क्रुपा होईल ( अगदी बुध्दाची का होईना) ते वंचीत राहिले आनी भवचक्रात फिरत राहीले. प्रयत्न केलाय पहा काय वाटते, हे असे आहे जसे घरातील बल्ब. हाय फ्रीक्वेंन्सीवर लागतो-विझतो.पण आपल्या डोळ्यांच्या शक्तीपलीकडे असल्याने सलग लागल्याचा भास होतो तसेच. म्हणुन विपश्यनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त महत्वाचे. नुसतेच बुद्धीने हे सर्व पटले तरी लाभ होत नाही. अनुभच घ्यावा लागेल तेंव्हा शंका मिटतील.

In reply to by विलासराव

अर्धवटराव 10/08/2014 - 22:47
ध्यानाची प्रक्रिया आणि परिणाम तुम्ही स्वानुभवाने सांगताय हे मला माहित आहे.. नो डाऊट अबाउट इट. माझा प्रश्न वेगळा आहे. जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस हि सर्व प्रक्रिया संस्कार मनावर कोरल्यामुळे होते. जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. भूतकाळातील आठवणी वर्तमानात सुख-दु:ख रूपाने अनुभवता येणे व तदनुषंगाने भविष्यातल्या सुख-दु:खाचा तीव्र विचार करणे हे शरीर बदलास आवष्यक असे प्रारुप निसर्गाने निर्माण केले. त्यात व्यत्यय आणल्यास काय परिणाम होतील आपल्याला माहित नाहि...

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश 10/08/2014 - 23:02
जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. >>> याबद्दल जरा शंका आहे. माकडाचे इव्होल्युशन होउन माणूस होणार आहे असं वाटत नाही. कदाचित जास्त उत्तम/ शक्तिवान माकडच होउ शकेल. असो. पण ध्यानामुळे संवेदना थांबत नाहीत, किंवा शिक्षणही थांबत नाही. नक्की काय होतय आणि ते कसे होतय हे कळायला सुरुवात होते. आपोआपच मन शांत निवांत होत असल्यानी सात्त्विकता वाढते. करुणा वाढते. कृतज्ञता वाढते. भिती कमी होते. त्यामुळे 'योग्य' तेच शिक्षण आणि त्याप्रमाणे बदल होत रहातात.

In reply to by अर्धवटराव

विलासराव 11/08/2014 - 00:18
जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस. हे याच क्रमाने झाले असणार किंवा नाही मला माहीत नाही. पण बुद्धांनी बर्याच भिक्षुंच्या प्रश्नांना वेळोवेळी उत्तरे दिली आहेत त्यानुसार मनुष्य ध्यानाच्या सहाय्याने वरच्या उदा: देव्/ब्रह्म्मा योनीमधे जाउ शकतो. किंवा अंतर्मनात असलेल्या पशुवत संस्कारच्या प्रभावाने पुन्हा मागच्या ( पशुप्राणी किंवा ईतर) योनीत जन्म घेतो. हे आता कोणालही पटणार नाही. आणी त्याची गरजही नाही.तुम्ही जेंव्हा कधी ध्यानात उतराल तेंव्हाच तुम्हाला या गोष्टी हळुहळु (जशी साधना वाढेल)लक्षात येतील. ज्यांनी कधी ध्यान केले नाही ते ही गोष्ट तर्काच्या आधारे अनुभवु शकत नाहीत. संपुर्ण मुक्ती खुपच लांबची गोष्ट आहे. पण आता उदाहरणच द्यायचे झाले तर माझं पिणं बंद झाले, नॉनव्हेज खाणे बंद झाले, माझा क्रोध पुर्ण गेला तर नाही पण आता तो आलाच तर बर्याचदा मी त्रागा करुन घेत नाही, माझे माझ्याशी ज्या लोकांचे सबंध दुरावले होते ते जवळपास ९०% तरी पुर्ववत झालेत. मी स्वतः माझी चुक होती की नव्हती याचा विचार न करता माफी मागीतली आणी समोरच्या व्यक्तिंनीही मला माफ केले, माझ्या व्यवसायात मी जी थोडीफार लबाडी करायचो ती मी पुर्णपणे बंद केली अशा अनेक गोष्टीत जो बदल झालाय तेवढी तेवढी मुक्ती( त्या त्या गोष्टींपासुन) मीळाली की नाही? तुमच्या प्रश्नाच मी रेडीमेड उत्तर देउही शकेल कदाचीत पण ते माझ्या अनुभवावर उतरलेले नसेल. म्हणुन इथेच थांबतो. चर्चा दुसरीकडेच भटकेल. बुद्धांनी संपुर्ण मार्ग अगदी मधे लागणार्या थांब्यांसह सांगीतलेला आहे. त्यांनीच काय अगदी तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगामधे साधनेच्या अवस्थांचे निसंदीग्ध वर्णन केलेले आहे. पण ते वाचुन कोणीही संत होउ शकत नाही, ती अवस्था अनुभवु शकत नाही. तुम्ही ध्यान कारायला सुरवात करा तुमच्या स्वतःच्या अनुभुतीवर त्या अवस्था उतरतील. बाजारात साखळीचे अभंग म्हणुन तुकाराम महाराजांचे १२ अभंग असलेले पुस्तक मीळते. ते वाचा आणी विपश्यना करा तुम्हाला खात्री होईल की ती संपुर्णपणे विपश्यना आहे. माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. म्हणुन मी म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुमचा प्रश्न बरोबर आहे पण त्याला मी जे काही उत्तर देईल त्यातुन असे अनेक प्रश्न निर्माण होतील. मुळात जे माझ्या अनुभवावर उतरले नाही त्यावर मी बोलुच नये. जे वर मला झालेले लाभ सांगीतले आहेत तीच एका चांगल्या जीवनाची सुरवात नाही का? तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडलेच होते. पण जसजशी साधना उन्नत होते तसतसे बरेचसे प्रश्न आपोआप विलीन होउन जातात. त्यातुनही काही राहिलेच तर गुरुजी त्यांचे निवारण (बुध्दांचे सुत्र स्पष्ट करुन) करतात या मोठ्या शिबीरामधे.

In reply to by विलासराव

सूड 11/08/2014 - 15:21
विलासरावांचे प्रतिसाद बर्‍याच प्रश्नांची उत्तरं देऊन गेले. याआधी अपर्णातैंच्या एका प्रतिसादाने असा लख्ख उजेड पडला होता डोक्यात!! :) >>माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. नोटेड.

In reply to by कवितानागेश

विलासराव 08/08/2014 - 08:52
माउ जरी मला विपश्यनेची अगोदर माहीती होती तरी मी मी तुमचे काय ध्यान आहे हे वाचल्याबरोबर मला पुन्हा प्रेरना मिळाली. आनी मी शिबीराला गेलो. या शिबीरात तर खुपच गहन साधना झाली, आणी तुम्हाला तर मी खुप मंगलमैत्री दिली. पोहोचली का?

In reply to by यशोधरा

विलासराव 08/08/2014 - 10:02
मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वरांचे पसायदान. साधना केल्याने जेवढे काही पुण्य अर्जीत केले त्याचे वितरण सर्व जिवमात्रांचे(द्रुष्य-अद्रुष्य) कल्याण होवो, ते आपल्या विकारांपासुन (षढरिपु) मुक्त होवो अशी प्रार्थना.पुण्य म्हणजे जेजे केल्याने तुमचे मन निर्मळ होते तेते.

अज्याबात माफ करायचं नाय कोनाला ... चान्स मिळाला की कचकुन बदला घ्यायचा... अकीलीज कसं म्हनाला तसं म्हनायच " You sack of wine! Before my time is done, I will look down on your corpse and smile." *diablo*

In reply to by सूड

अग्ने यत्ते तपस्तेन तं प्रति तप योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।१ । । अग्ने यत्ते हरस्तेन तं प्रति हर योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।२ । । अग्ने यत्तेऽर्चिस्तेन तं प्रत्यर्च योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।३ । । अग्ने यत्ते शोचिस्तेन तं प्रति शोच योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।४ । । अग्ने यत्ते तेजस्तेन तं अतेजसं कृणु योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।५ । ।

अथर्ववेद संहिता

*diablo*

In reply to by स्पा

बॅटमॅन 04/08/2014 - 18:12
त्यांचे प्रताप इतके मोठे होते की सर्व लोक वैदिकांना टरकून असत. इतका मोठा शब्दार्णव, पण त्यालाही या प्रतापाने पिऊन टाकले ;)

In reply to by सूड

सूड हे घे रे अजुन एक रेफरन्स सापडला " न श्रेय: सततं तेजो न नित्यम श्रेयस क्षमा। तस्मान्नित्यं क्षमा तात पंडितैरपवादिना।।"

महाभारत . वनपर्व २८ -६ -८

हेच आमचे ह्या विषयावरील अंतिम मत !! येवढे बोलुन मी माझे चार शब्द सम्पवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 04/08/2014 - 23:48
आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना. तेव्हा ते शक्य होतं आज ते शक्य नाही. तलवार, धनुष्यबाण, गदा अमुक तमुक हे वापरुन सूड घेणाराला तेव्हा प्रतिष्ठा होती. आज ते शक्य नाही. आज दंबुका घेऊन मुडदे पाडून सूड घेणाराला भारतीय दंडविधान कायद्यानं शिक्षा करतं. माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. गल्ली, समाज, देश वगैरेसाठी वरचं (गीता, वैदिक) सगळं मान्य आहे. मात्र त्यामध्ये कर्तव्यबुद्धी म्हणून सूड घेणं हे जास्त परिणामकारक ठरेल. असंही भावनांच्या आहारी जाऊन काहीही करणं त्रासदायकच. परवा कुठल्या तरी 'सरां'च्या वॉलवर सूडाची/रागाची भावना म्हणजे हाती जळता निखारा घेणं, दुसर्‍याला देताना आपला हात पोळला जातो असं काहीसं वाचलं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 05/08/2014 - 00:02
तेव्हाही शक्य होतं अन आत्ताही शक्य आहे. फक्त धनुष्यबाण-तलवार यांच्याऐवजी वाग्बाण, योग्य ठिकाणी चुगली, इ. अनेक दिव्यास्त्रे लागू पडतात. हे झालं बाहेरच्यांचं. बाकी कधी कधी प्रसंग असेही येतात जेव्हा घरचे म्हणवणारे माजतात तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. का? तर नात्यांचं तथाकथित पावित्र्य जपायचा मक्ता फक्त एकाने घेतलेला नसतो, नसावा. कुटुंब अन कौटुंबिक म्हंजे कित्ती छान छान इ.इ. म्हणणार्‍यांना कदाचित हे पटणार नाही, पण अशावेळी 'अर्थार्थी जीवलोकोऽयं न कश्चित्कस्यचित्प्रियः' हे लक्षात ठेवले तर बरे पडते. कैकदा आतले बाहेरच्यांपेक्षा परके होतात, तर बाहेरचे आतल्यांच्या वर क्लोज होतात. असो.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 05/08/2014 - 00:49
सूडातून तात्कालिक समाधान मिळतं. नंतर उरतं ते भकासपण. अर्थात पशूवत वर्तन असणारांना, आततायी (जमीन लुबाडणारा, घराला आग लावणारा, बाईवर हात टाकणारा इ.इ.) माणसांना माणूसपणाची ट्रीटमेण्ट देऊन चालत नाहीच्च. तिथं तुकडाच पाडायचा. पण तोही योग्य प्रकारे. अर्थात तिथंही हिंसेचा मार्ग स्विकारावा असं वाटत नाही. बलवंतांची क्षमा म्हणण्याइतपत बल आपल्यापाशी असलं तरच काही जमतं. ते नसलं तर कमवावं. ह्या सगळ्यात सूडाची भावना आत पेटून आपण का त्रास करुन घ्यावा पण? समोरचा बर्‍याचदा आपल्याच पैशावर खाऊन पिऊन ऐश करतोय नि आपण जळत बसतो. सांगितलंय कुणी? शांतपणं लढता येतं की. फरगिव्ह बट डोण्ट फरगेट. (माणसाला नाही तर वृत्तीला) वाग्बाण, चुगल्या वगैरेचे उपाय आहेत पण ते आपल्यावर देखील उलटू शकतातच. बाकी दिवस बदलतात, बाजू पलटतात, क्वचित कधी माणूस देखील बदलतो. सगळं होतं. सबुरी ठेवायची. नुसती बडबड नाही उपयोगाची. घरातल्या माणसांबद्दल विसंगती सोसणं हा उत्तम उपाय असतो. भावाभावांची भांडणं सोडवताना प.पू. गोंदवलेकर महारजांचं उदाहरण ऐकलंय. जमीनीचा काही वाद होता. भावानं ह्यांच्यावर केस केली. कोर्टात तारखेला गेले. हिअरींग झाली नंतर भावाला म्हणे चल जेवायला. भाऊ धुमसतोय. हे म्हणे अरे पैसे देऊन वकील केलेत आपण. लढताहेत की ते. आपण आता का भांडायचं? डोकं शांत, मन शांत.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 05/08/2014 - 01:13
हॅ हॅ हॅ. नुसती बडबड जशी उपयोगाची नसते तसाच सबुरीचा उपदेशही नुस्ता कामाचा नै. अन विसंगती सोसणं हे एका मर्यादेपर्यंत ठीके. बाकी गोंदवलेकर महाराजांशी काय स्पर्धा करायची इच्छा / कुवत नाही त्यामुळे त्यांच्या उदाहरणाने काही होणार नाही. अशी उदा. सांगून कूल पॉइंट्स मिळतील, प्रत्यक्ष आचरताना फेफे उडेल. तितका दम असतो कुणात? ते एक असोच. पेटण्यात काहीच हर्कत नाही, फक्त स्वतःचा त्रास कमी केला की झालं. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नाहीत हे लक्षात येणं महत्त्वाचं. असो, शेवटी प्रगोने दिलेली अथर्ववेदातली प्रार्थनाच शिरोधार्य आहे या बाबतीत.(त्रेतायुग-कलियुगाच्या फंड्यापलीकडची सार्वकालिक आहे, इन केस अर्थ पाहिला नसेल तर कळावे म्हणून..)

In reply to by प्यारे१

धन्या 05/08/2014 - 00:09
>> माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. अगदी नेमके लिहीलं आहेस प्रशांत. कदाचित प्रगोंच्या सुदैवाने त्यांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं नसावं. त्यामुळे मी लिहीलेलं त्यांच्यापर्यंत पोहचलेलंच नाही. प्रगो, तुमच्या प्रतिसादांवरुन माझा हा लेख तुमच्या अनुभवविश्वापलिकडचा आहे असं मला वाटतं. You are unable to tune to what I have written. सारांश, तुम्ही सुखी आहात.

In reply to by प्यारे१

"आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं.".... आणि बायकोचा सूड घेण्याची हिम्मत नसते....*ok* *OK*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 04/08/2014 - 17:30
अगदी सहमत. असा क्षमाशील विचार छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला असता तर काय झाले असते असा क्षणभर विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. धनाजीराव मापी क्रा प्न मोह अवर्ला नै.

In reply to by बॅटमॅन

धन्या 04/08/2014 - 18:42
हरकत नाही. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

In reply to by धन्या

आमच्या मते भावना ह्या मनाचा आणि त्यामुळे शरीराचा अविभाज्य भाग आहेत , शिवाय , आपले शरीर हीच आपली सर्वात मोठ्ठी अ‍ॅसेट मालमत्ता असतेच . म्हणुन भावनिक जखमा ह्याही शाररिक इजा आणि आर्थिक/ मालम्त्तेचे नुकसान ह्यांच्यामधे अंतर्भुत होतात त्यामुळे त्यांन्ना स्वतंत्र नियम लावता येणार नाही :) आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुधोळच्या बाजी घोरपड्याची गोष्ट ऐकली नाही काय धनाजीराव ? बाजी घोरपड्याने १६४८ मधे शहाजी राजांना कैद करण्यात आदीलशहाला मदत केली , त्याचा वचपा १६६४ मधे महाराजांनी घेतला महाराजांनी खुद्द स्वतः बाजीला कंठ्स्नान घातले (इतिहास नक्की माहीत नाही पण सीरीयल मधे तरी हेच दाखवले आहे ) ! त्यातही विशेष म्हणजे "बाजीला जिवंत सोडु नये" अशा आशयाचे जिजाउ मा साहेबांचे पत्र आहे. !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 04/08/2014 - 19:22
बाजीला महाराजांनी मारले हे खरेच आहे. तो सर्व प्रकार निव्वळ स्ट्रॅटेजिक-डिप्लोम्याटिक होता असे म्हणवत नाही खास.

In reply to by बॅटमॅन

सहमत. आणि त्या धाडीत मुधोळकरांच्या कुटुंबातली आणि नात्यातली किमान १०० माणसे तरी कापली होती.

In reply to by प्रसाद गोडबोले

यसवायजी 04/08/2014 - 19:28
रैट्ट. बहुतेक विवेकानंदांची गोष्ट आहे. माकडे त्रास देत असतील तर किती वेळ दुर्लक्ष करणार? एकदाच हिसका दावला की माकडचाळे बंद. & then, this part of your life is called as "मनःशांती" (साभार- pursuit of Happyness‎)

भिंगरी 04/08/2014 - 17:06
(माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे) आकस सोडणे महत्वाचे. नाहीतर माफ केले म्हणायचे आणि मनात आकस धरुन रहायचे त्यामुळे स्वत:लाही त्रास आणि दुसर्यालाही त्रास

In reply to by यसवायजी

धन्या 04/08/2014 - 17:25
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

In reply to by धन्या

यसवायजी 04/08/2014 - 17:32
मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.
गुन्हेगारांच्या शिक्षेबाबत आपलं काय मत आहे?

In reply to by यसवायजी

धन्या 04/08/2014 - 18:40
गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. मात्र ती त्याला धडा शिकवायला (अद्दल घडवायला) म्हणून नव्हे तर त्याने केलेल्या चुकीची जाणिव त्याला होऊन त्याने शहाणं व्हावं म्हणून. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

एसमाळी 04/08/2014 - 17:15
एखाद्याला केलेल्या चुकीबद्दल माफ करणे मला तरी जमणार नाही.चुक केलीस ना,मग त्याचे परिणाम तुला भोगायलाच लावीन.कदाचीत याला डुख धरुन राहणे असे ही म्हणु शकता.

In reply to by एसमाळी

धन्या 04/08/2014 - 17:28
माफ करणे म्हणजे समोरच्याचे कसेही वागणे चालवून घेणे नव्हे. समोरच्या व्यक्तीच्या त्रासदायक/हानीकारक वर्तनाला शब्दांतून अथवा कृतीतून योग्य ते उत्तर दयावेच. मात्र त्यात आकसाची किंवा बदला घेण्याची भावना नसावी. झालेल्या गोष्टीला चिकटून राहू नये.

कवितानागेश 04/08/2014 - 17:37
खूप आवडलं. माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे. हेतर खूपच छान आहे. :) पण तरीही एकीकडे प्रगोशी सहमत व्हायचा मोह होतोय!! :P

डूख धरणे, बदला घेणे, आकस ठेवणे वगैरे वगैरे टाळणं शक्य असतं. पण हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे असा गैरसमज पसरू न देणं हेही पाहावं लागतं. तसंच, अशा प्रत्येक व्यक्तीची नोंद मनांत करून ठेवणं, आपल्या पुढच्या वाटचालीत ती व्यक्ती समोर आल्यास आपल्या वागण्याची तर्‍हा ठरवून ठेवावीच लागते. तुम्ही माफ करता म्हणून समोरचा माणूस येताजाता तुमचा पाणउतारा करुन स्वतःचा 'स्व' कुरवाळू पाहात असेल तर कानाखाली काडकन आवाज काढायची ताकद मनगटात आणि हिम्मत मनांत ठेवावी लागते. ते नाही केलं तर आत्मसन्मानाला धक्का पोहोचून तणाव (स्ट्रेस) वाढू शकतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिगो 20/08/2014 - 16:26
पेठकरकाकांच्या प्रतिसादाशी सहमत.. ह्यावरुन एका हिंदी कवितेच्या ओळी आठवल्या.. "क्षमा शोभती उस भुजंग को, जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहीत विनीत सरल हो |"

राही 04/08/2014 - 18:06
लेख अतिशय आवडला. बहुतांशी सहमत. विखार, क्रोध या नकारात्मक भावनांनी मनातली जागा व्यापली की आनंद, समाधान अशा सकारात्मक बाबी दूर, बाहेर लोटल्या जातात. आपली कार्यशक्ती कमी होते आणि उद्दिष्टावरील लक्ष विचलित होते.

विटेकर 04/08/2014 - 18:13
आवडले आणि पटले देखील ! बदल्याच्या आगीत शत्रुपक्षाला नुकसान होईल तेव्हा होईल..पण तो पर्यन्त आपणच पेटविलेल्या वणव्यात आपलीच राख होत जाते ... मानसिक त्रास तर होत असतोच पण नकळत शरिरावरही आघात होत असतो .. आपण कणा - कणाने मरत असतो आपल्याच विचार- शृंखलानी आपणच बेडीत अडकतो.. आणि असल्या विचारानी बाहेरच्या परिस्थितीत शष्प देखील फरक पडत नाही ... !

vikramaditya 04/08/2014 - 19:00
आपल्याला त्रास देणारी व्यक्ती पुन्हा तसे करणार नाही ह्यासाठी गड सुरक्षित करावा आणि माफी देवुन टाकावी पण "आपल्या मनात". त्या व्यक्तिबरोबर मात्र फार सावधपणेच वागावे. पण ती व्यक्ती / घटना मनात ठेवुन माफी देणे कठीण. One needs to forget as well as forgive.

लेखातील काही मते पटली तर काही पटली नाहीत. ह.घ्या: मी बाकी कोणालाही माफ करेन पण फेसबुकावर कॅन्डी क्रशची रिक्वेस्ट पाठवणार्‍या कोणालाही माफ करू शकणार नाही :)

पैसा 04/08/2014 - 22:02
मला वाटतं, दुसर्‍याला माफ करण्याआधी स्वतःला माफ करता आले पाहिजे. माझ्या हातूनही चुका होतात, मला कोणी फसवू शकतं, माझा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, मला कोणी वाईट वागवलं आणि त्याचा प्रतिकार करता आला नाही असंही होऊ शकतं. आणि त्याबद्दल स्वतःला जर माफ केलं तर दुसर्‍याला माफ करणं फार सोपं होईल. बहुतेकवेळा दुसरा असा कसा वागला यापेक्षाही मला या घटनेबद्दल काही करता येत नाहीये ही भावना जास्त त्रासदायक असते.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन 11/08/2014 - 05:31
अत्यंत सहमत. बहुतेक वेळा बोलणारा बोलून जातो आणि त्याला त्याचक्षणी सडेतोड उत्तर का सुचले नाही याबद्दल स्वतःचाच राग येत राहतो. मग असंच म्हणायला हवं होतं आणि तसंच करायला पाहिजे होतं हे मनाचे खेळ काहीकाळ चालू राहतात. पुढच्यावेळी पुन्हा अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितपणे कोणीतरी काहीतरी बोलतो आणि मनाचे खेळ चालू राहतात. बरं सूड किंवा बदला घेण्याएवढीही त्या माणसांना किंमत द्यायची इच्छा नसते; मग अशावेळी अशा माणसाचं बोलणं ऐकून घ्यावं लागण्याचा बावळटपणा घडल्याबद्दल स्वतःलाच माफ करणे याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही. विशेषतः मनमभोळ्सट, साध्यासुध्या आणि भोळ्सट लोकांना तथाकथित व्यवहारी व स्मार्ट लोकांकडून असे अनुभव वारंवार येतात. त्यासाठी आधी स्वतःला क्षमा करण्याची कला साध्य होणे महत्त्वाचे असते.

अर्धवटराव 04/08/2014 - 23:01
धन्या शेठ, लेख आवडला. ज्यानी कोणि आगळीक केली ति त्याची मानसीक अपरिहार्यता होती, त्यामुळे तो तसा वागला, त्याच्याबद्दल सहानुभुती-दया वाटावी... असले विचार केल्याने माफिनामा आपसूक पास होतो म्हणतात (आपण त्या वाटेला फार जात नाहि) बर्‍याचदा आगळीक करणार्‍याचं काहि वाईट झालं कि आपला बदला अ‍ॅटोमॅटीक पूर्ण झाल्याचं समाधान लाभतं, किंवा दुश्मनकोभि ऐसे दिन ना देखने पडे टाईप काहि भोग त्याच्या वाटेला आले कि एक सहाजीक माणुसकिची भावना म्हणुन देखील त्याच्याबद्दल दया उत्पन्न होते व सहाजीक क्षमादान होतं. पण प्रयत्नपूर्वक मनापासुन क्षमा करायला फार मोठं मन लागतं हे नक्की.

खटपट्या 05/08/2014 - 01:59
बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण समोरच्याला वाटते की हा आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीं आणि मग तो आपला अजून पाणउतारा करू पाहतो. समोरच्याला माफ करायला हरकत नाही पण त्याने तिथेच थांबले पाहिजे यासाठी इशारा तर द्यावाच लागणार. साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी

सौंदाळा 04/08/2014 - 15:52
छान लेख. आवडला, पटला पण कळत पण वळत नाही धन्या :( अनेक विचार मनात येतात. एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या 04/08/2014 - 16:16
एक चुक माफ करु शकतो नव्हे करतोच पण सारखे तेच झाले तर डोकं फिरतं
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

प्यारे१ 04/08/2014 - 15:59
लिखाण आवडलं. माफ करावंच पण माफ करताना अहंकार आडवा येऊ देऊ नये. कालांतरानं मी(च) एकटा शहाणा असा गैरसमज होऊ शकतो. बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.

In reply to by प्यारे१

धन्या 04/08/2014 - 16:09
बर्‍याचदा व्यक्ती स्वभावाच्या रेट्यानुसार वागते. त्यात तिचं स्वतःचंच काही चालत नाही. गुलामी असते स्वभावाची झालं.
हे एव्हढं कळलं की माफ करणं खुप सोपं जातं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपला मनस्ताप कमी होतो. :)

In reply to by धन्या

प्यारे१ 04/08/2014 - 16:18
दारुचा अम्मल नि स्वभावाचा अम्मल सारखाच. बर्‍याचदा ती व्यक्ती एखाद्या घटनेनंतर नेमकी कशी वागेल हे 'प्रेडीक्ट' करता येतं. नि 'अशी नाही वागणार तर कशी वागणार' असा प्रश्न पडून त्रास न होता मौज वाटते. ;) (अर्थात स्वभावाचा त्रास त्या व्यक्तीलाच होत असेल तर तिला समजावण्याचा प्रयत्न करावा. न ऐकल्यास 'अच्छा' म्हणावं.)

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. पण आता हे वाचुन माफ केलं.. ह्यासाठी नाही की त्या व्यक्तीकडुनही चुका होऊ शकतात वगैरे विचार केला... ह्यासाठी की आपल्याला आपणच त्रास करुन घ्यावा मुळात कुणाचीच एवढी लायकी नसते... शिवाय ह्या जन्मातलं इथेच भोगुन जायचयं.. तेव्हा कधी ना कधी न्याय होईलच.. बरंय.. आज अजुन एक विषय संपवला! धन्यवाद...!

In reply to by पिलीयन रायडर

केलं.. मिपावरच्याच एका आयडीला माफ केलं... आयुष्यात कधी कुणावर तडकलं नसेल एवढं डोकं ह्या व्यक्तिमुळे फिरलं होतं.. असे लोक असणारच ही बेशर्त स्विकृती केलेली बरी :)

मैत्र 04/08/2014 - 16:18
का कुणास ठाऊक, अशाच विविध विचारांच्या फेर्‍यात होतो /आहे. पण या संयत, नेमक्या शब्दांनी काहीसं शांत केलं आहे मनाला. एका दिवसात / एका मिनिटात पचवता नाही येणार हा विचार. पण किमान प्रयत्न तर सुरू झाला आणि त्यासाठी काही प्रमाणात लॉजिकल, अभिनिवेश किंवा हेच कसं बरोबर असा कसलाही आग्रह न धरणारा हा लेख नक्कीच कारणीभूत आहे आणि पुढेही उपयोगी पडेल. अनेक धन्यवाद !!

तिमा 04/08/2014 - 16:24
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. सूडाची भावना न ठेवणे शक्य आहे पण काही झालेच नव्हते असे आपल्या मनाला पटवणे कसे शक्य आहे ?

In reply to by तिमा

धन्या 04/08/2014 - 16:42
झालेली घटना पुर्णतः पुसून टाकता येत नाही.
माफ करणे म्हणजे मनातील कडवटपणा, राग आणि सुडाच्या भावनेचा त्याग करणं. ज्या शब्दांनी किंवा ज्या कृतीने आपण दुखावलो आहोत ते आपल्यासोबत राहणारच आहे. मात्र त्या गोष्टीची आपल्यावरील पकड सैल होते.
तसेच,
माफ करणे म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीने दुखावले आहे ही वस्तूस्थिती नाकारणे नव्हे. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शब्दांचे किंवा कृतीचे समर्थनही नव्हे.
माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे.

In reply to by तिमा

विलासराव 07/08/2014 - 00:20
लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे. प्रथमतः धन्याचं या जीवनाच्या सर्वात महत्वपुर्ण अंगावरील लेखाबद्दल अभिनन्दन. खुपच गहन विषय आहे हा. प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने यावर उपाय शोधत असतोच हे आलेल्या प्रतिसादांवरुन दिसुन येइल. पण मला तिमांचा हा ( तरी ते आपल्या मनांतून इरेज करणं अशक्य आहे)प्रश्न सर्वात मूळ आणी महत्वाचा वाटला. या विषयाबद्दल माझा अनुभव . जीवनामधे दुख: आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही. मग ते दुख: म्हणजे आहे तरी काय? याचा खरच कोणी तटस्थपणे मागोवा घेइल तर लक्षात येइल की ढोबळमानाने दुख: म्हणजे कुठलीही गोष्ट( व्यक्ती,घटणा,स्थीती,परीस्थीती)माझ्या मनाविरुध्द होणे.याउलट मनाप्रमाणे होणे म्हणजेच सुख. मग आता मन म्हणजे काय? मन ही सर्वात वेगवान आणी गुन्तागुन्तीची प्रक्रीया आहे.ही स्वतः अनुभवाच्या पातळीवर समजुन घेतल्याशिवाय आपण जेजे करु ते आपल्याला दुक्खातच लोटेल. अगदी आत्ता सुखद वाटणारी घटनाही थोड्याच काळात दुक्खात बदलेल/बदलते. हे आपल्याला आपल्याच तटस्थ निरीक्षणाने लक्षात येइल. तर यासाठी मनाला समजुन घ्यावे लागेल. मनाचे साधारणपणे दोन भाग असतात. पहीला चेतन मन. यानेच आपले रोजचे व्यवहार पार पाडत असतो. अनेक चांगल्या वाईट घटनांवर चिंतन मनन करुन आपण निर्णय घेत असतो. निरीक्षण केलेत तर असे दिसुन येईल की मनाच्या विचलीत अवस्थेत जे निर्णय घेतले त्यात काही ना काही त्रुटी असेल अन मन विचलीत नसताना जे काही कराल ते योग्य असेल.आपले मन काहीही करताना द्वन्द्वात असते मग बर्याचदा चुकीच्या गोष्टी घडुन पश्चाताप करावा लागतो हेही दुक्खदच.मग करायचे काय? मन शांत ठेवुन व्यवहार करणे, ते तर आपल्याला कळते पण कसे करायचे ते वळत नाही. मग मनाचे आणखी सुक्ष्मपणे निरीक्षण करायचे. खरच लक्षपुर्वक पाहीले तर आपले मन हे दोन क्षेत्रात रमते. एकतर भुतकाळात ( ते त्याने असे केले, मला समजत नव्हते तेंव्हा, आता भेटेल तर मग दाखवतो. नाहीतर मी विश्वास ठेवला म्हनुन फसलो अश्या अनंत तर्‍हा असो.) नाहीतर लगेच भविष्यात उडी मारते ( मी दोन वर्षानी अमुक पदावर असेल, मग मला या पावर असतील, मग मी लोकांचे भले करण्याचे निर्णय घेउ शकेल, कींवा माझेच भले करु शकेल , अमुक करेल नी तमुक करेल, थोडक्यात स्वप्नरंजण). जगामधे जो अन्याय होतो तो त्या व्यक्तीच्या/ समाज्याच्या कल्याणाच्या नावावर सर्वात मोठ्या प्रमाणात होतो हे दिसुन येइल , खासकरुन धर्माच्या नावावर. अगदी कुटूंबातही अशी उदाहरणे सापडतील.मग आण्खी लक्षपुर्वक पहा. तर असे दिसुन येईल मन भुतकाळात असु की भविष्यात दोनच गोष्टीत रमते. जेजे प्रिय ते सुखद आनी जेजे अप्रिय तेते दुखद. सुखद आठवण असेल तर तासंतास त्या आठवन/ घटणा मनाच्या रंग मंचावर पहाण्यात निघुन जातात,मनाला प्रसन्न वाटते. तसेच दुखद आठवणी आपल्याला पुन्हापुन्हा दुखः देतात मग आपण त्या मनातुन काढुन टाकण्यासाठी पुन्हा चांगल्या घटणा आठवतो/ कींवा मित्राला फोन लावतो/ सिनेमाला जातो/ फिरायला जातो/ व्यसन करतो अशा अनेक गोष्टी. कारण त्या दुखद गोष्टीचा त्रास नको म्हनुन आपण असे उपाय योजतो. मग ज्या घटणेमुळे व्याकुळता आली ती दाबली जाते अंतरमनात आनी आपले चेतन मन त्या सिनेमात रमुन जाते आनी आपल्याला बरे वाटते . आनी असे वाटते की त्या व्याकुळतेतुन सुटका झाली. होतेही पण तात्पुरती, कारण तिचा पुर्ण निचरा न होता ती अतरमनात जाते. परत त्या व्याकुळतेशी संबंधीत काही घटणा घडली तर ती पुन्हा प्रकट होते आनी आपण पुन्हापुन्हा व्याकुळ्/दुक्खी होतो. मग उपाय काय तर त्या व्याकुळतेचा पुर्णपणे निचरा/इरेज करणे की तीच पुन्हा आपल्याला त्रास देउ शकणार नाही. हे कसे शक्य आहे यावर आपल्या संतांनी/ऋषीमुनिंनी खुपच प्रयोग केले तर त्यांच्या लक्षात आले की चेतन मन हा मनाचा फार लहान हिस्सा आहे. आपल्याला सुख/दुक्ख/आनंद कुठे होतो तर आपल्या शरीराच्या आतमधे. घटणा बाहेर जरी घडली तरी सुख/दुक्ख/आनंद हे शरीरात होते. मग त्यांनी आतमधे डोकवायला सुरवात केली आनी एकेक रहस्य बाहेर येउ लागले. ते सारे आपल्याला धर्मग्रथांत/ संत साहित्यात आजही सापडेल. सगळ्यांना माहीत आहे मला राग येतो ,त्याचा त्रास मला होतो तसा मझ्या सभोवतालच्या लोकांना /वातावरनालाही होत. जेंव्हा मी दुक्खी असतो तेंव्हा मी ते दुक्खः माझ्यापुरतेच सिमीत न ठेवता त्याचे वितरण करतो आनी आजुबाजुच्या लोकांना/वातावरनाला दुक्खी करुन टाकतो ( कळत नकळत). मग ज्यांनी अंतर्मनाचा अभ्यास केला त्यांच्या हे लक्षात आले की चेतन मन सुद्धा स्वतंत्र नाही आहे. अंतर्मन जास्त बलवान आहे. चेतन मनाने कुठलेही संकल्प करा ते संपुर्णपणे सिद्द्दीस नेता येत नाहीत कारण अंतरमन त्याचे काहीही ऐकत नाही, त्याची अंतरमनावर काहिही हुकुमत नाही, सगळ्या समस्यांचे माहेरघर म्हणजे हे अंतर्मन. मग त्यांनी अनेक साधनाविधी शोधल्या त्यांचे तत्कालीक फायदेही झालेत , आजही होताहेत. मग अनेक संशोधनानंतर गौतम बुद्धांनी अंतर्मन पुर्ण शुद्ध करण्याची विद्या विपश्यना शोधुन काढली. जी आज भारतात आनी जगातही अनेक केंद्रांमार्फत मोफत शिकवली जाते. मी स्वतः विपश्यनेचा साडेतीन वर्षांपसुन नियमीत अभ्यास करतोय त्यामुळे वरील गोष्टी जरी विपश्यनाचार्य गोयंका सांगत असले तरी मी याचा घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ईथे लिहीत आहे. एका जरी माणसाला यातून लाभ झाला/ प्रेरणा मिळाली आनी त्यांना मार्ग मिळाला तर माझे हे लिहीण्याचे सार्थक झाले एवढाच उद्देश. इथे अनेकांनी विपश्यना केलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की नियमीत अभ्यास करा आनी वर्षातुन एकदा कोर्स करा. खरी साधना २०/३०/४५/६० दिवसांत चालु होते. १० दिवसांचे शिबीर तर पुर्वतयारी आहे अंतरमनात खोलवर उतरन्याची. मी कालच ३० दिवसांचे शिबीर करुन आलोय आनी पुर्ण शुद्ध मनाने हे सांगतो वर लिहिलेला प्रत्येक शब्दन्शब्द माझ्या स्वतःच्या अनुभवावर उतरलेला आहे. कुठलीही पोपटपंची यात नाही. आता सागळ्या शंका मिटल्यात मार्गाबद्दल. पुर्णपणे यावर चालण्याचा निर्धार केलाय अगदी मरेपर्यंत. जेवढे अंतर्मन साफ होते त्यात्या वेगवेगळ्या अनुभुती येताहेत पण त्या काही महत्वाच्या नाहीहेत. रहायचय तर याच समाज्यात. सुखद/दुह्खद घटनांमधे मन जराही विचलीत होउ न देता समता ठेवणे हीच खरी कसोटी. फार लांबचा रस्ता आहे कारण आपण जमा केलेले संस्कार. हेच अडचणीत आणतात. या साधानेने ते इरेज होतात. जेंव्हा चांगला/ वाईट अगदी शेवटचाही संस्कार इरेज होईल तीच संपुर्ण दुखःमुक्ती. आपण जमा केलेले चांगले/ वाइट संस्कार हीच मनाची कंडीशनींग. तीचा संपुर्ण निचरा म्हणजेच मुक्ती. ही इगतपुरीची माहीती http://www.dhamma.org/en/schedules/schgiri# हे जगातील केंद्र http://www.dhamma.org/en/maps#001

In reply to by विलासराव

अर्धवटराव 07/08/2014 - 19:19
सुख म्हणजे वेदना अनुकुला आणि दु:ख म्हणजे वेदना प्रतिकुला असं म्हणतात. विपश्यनेने अंतर्मनातील संस्कार धुतल्या जातात हे छान समजुन सांगितलं तुम्ही. एक शंका... अंतर्मनात अनुभव कोरले जाणं हा आपल्या इव्हॉल्युशन प्रोसेसचा एक भाग आहे. जर असं इरेझींग केलं तर अजाणते प्रॉब्लेम्स येऊ शकतील ना भविष्यात...

In reply to by अर्धवटराव

विलासराव 08/08/2014 - 09:17
प्रयत्न करुन पहातो.तीन प्रकारचे संस्कार आपण बनवत असतो जाणता/अजाणता. १) हे जे कोरले जातात. पण पाण्यावर ओढलेल्या रेषेसारखे ते नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. २)हे वाळुवर ओढलेल्या रेषेसारखे. हे जास्त वेळ टिकतात पण तरीही हेही नैसर्गीकपणे पुसले जातात. आपल्याला काहीही करावे लागत नाही. ३)हे पाषाणावर कोरलेल्या रेषेसारखे. आपण ज्या मनाशी खुनगाठ बांधतो( चांगल्या अथवा वाईट), हे सर्वात खतरनाक. जसं की कुणाची हत्या केली. हसत हसत काही काणी कोणाची हत्या करत नाही. त्यासाठी कीतीतरी वेळा मनात क्रोध जागवतो, पुन्हा-पुन्हा जागवतो,प्रत्येक वेळेस जेंव्हा माणुस मनावर क्रोध जागवतो त्या प्रत्येक वेळेस आधीच्या क्रोधात तो आणखी तेल टाकतो, असे करत करत जेंव्हा आधी भडका उडतो,तेव्हा बेभान होउन हत्या करतो आनी नंतर पस्चाताप. आता दुसरी बाजु. मी रोज दारु प्यायचो अगोदर. जवळपास १५ वर्षे. खुप आनंद वाटायचा. खायच-प्यायच आनी कोणालाही न दुखावता आनंदात रहायचो. आता यात काय वाईट अशी माझी समजुत होती. मुळात होतं काय की दारु प्यायल्याने संपुर्ण शरिरात अतिसुक्ष्म संवेदना निर्माण होतात हे आपल्याला समजत नाही. त्या ईतक्या सुखद वाटतात की मन त्यात समाधीस्त झाल्यासारखे होते. आनंद वाटतो. पण त्या केमीकल्सचा प्रभाव जसजसा कमी होतो तसतसा वाटणारा आनंदही कमी होतो. मग मन तो पुन्हा-पुन्हा आठवायचा प्रयत्न करते. आनी जेंव्हा त्याचा प्रभाव नाहीसा होतो तेंव्हा परत त्याचे पाय बारकडे वळतात. हीच ती दारुची होणारी आसक्ती. जितकी सवय जुणी तितकीच ती सुटणे दुरापास्त. आता मी कधीतरी पहील्यांदा दारू प्यायलेलो असतो त्याअगोदरही मी जगत असतोच ना? त्या अगोदर ही आसक्ती नव्हतीच ना? मी जेंव्हा पहिल्या शिबीराला गेलो आनी परत आलो तेंव्हा मला काय झालेय ते अंदाजच आला नाही. घरी आलो मित्र यायचे रोजचे बरोबर पिणारे. मला इच्छाच व्हायची नाही. १ दिवस,२ दिवस, १ आठवडा, १ महीना, १ वर्ष आणी आता साडेतीन वार्षे झालीत एकदाही ईच्छा झाली नाही. झालं काय. झालं असं की शिबीरात जी साधना केली त्यात माझे दारु पिउन जामा केलेले सर्व संस्कार पुसले गेले. मला सोडावी लागली नाही. तर सुटली. मी जर एखाद्या डॉ.कडे गेलो असतो दारु सोडवायला तर त्यांनी इतकी जुनी सवय म्हणल्यावर साईडइफेक्ट होउ नये म्हनून हळुहळू कमी करण्याचा सल्ला तर नक्कीच दिला असता. म्हणुन आपल्याला असे वाटते की. तुम्ही जर गुलाबजामुन पहील्याप्रथम खाल्ला तर किती आवडतो. तुम्ही तो निखःळ खात नाही तर लगेच नकळत आसक्ती निर्माण करतो. आनी त्याची चव मेंदुवर कोरुन टाकता. त्या आधी आपण ही चव घेतलेली नसते. त्याअगोदरही आपण जगतच असतो ना? मग आपण परत दुसर्यांदा गुलाबजामुन खातो, तोंडात टाकल्याबरोबर मन प्रोसेसींग करुन काही क्षणात तुम्ही म्हणता आज खाल्लेला गुलाबजामुन अगोदरच्या ईतका चवदार नाही किंवा याउलट. आनी जे कृष्णमुर्ती म्हणतात तशी ही तुलनेची साखळी चालु रहाते. हीच ती कंडीशनींग. पण जर मन समतेत असले तर तुम्ही आधीची कुठलीच तुलना न करता या क्षणी , याच क्षणात उपस्थीत राहुन आजच्या गुलाबजामुनची चव चाखु शकता तेही मनावर न कोरता.ही प्रोसेस इतकी वेगवान होते की ती आपल्याला पकडता येत नाही. हेच सर्व ध्यानात हळुहळु पकडता येते आनी प्रत्यक्ष अनुभवाने आपण बर्याच प्रमाणात वर्तमानात जगायला लागतो. वर्तमानात समतेत जगणे म्हणजे काहीही मेंदुवर कोरले न जाणे. खरतर ध्यान आपण करत नसतो, आपण फक्त जे घटतय ते साक्षीभावाने( तटस्थपणे) पहात असतो. ही नैसर्गीक प्रक्रीया आहे की जेंव्हा तुम्ही या संवेदनांकडे तटस्थपणे पहाता तेव्हा नवीन संस्कार बनत नाहीत. आनी नवीन बनत नसतील आनी तरीही तुम्ही तटस्थपणे पहाल तर जुने जमा झालेले संस्कार आपोआप वर येतात आनी आताही तुम्ही समतेत( चांगले/वाईट अशी प्रतिक्रिया देत नसाल) असाल तर ते नैसर्गीकपणे पुसुन टाकले जातात. हे आपणाला ध्यानात पुर्णपणे ध्यानात येते. आनी मग बोध होतो की जो काही संवेदनांचा खेळ चाललाय तिथे आपली मर्जी जराही चालत नाही. जेवढी आपण सुखद/दुखःद अशी प्रतिक्रिया देतो , तेवढी तेवढी तॉ जो सुखद/ दुखद संस्कार आपण आणखी द्रुढ ( सोप्या भाषेत वाढ )करतो, परीणामी आपले सुख /दु:ख वाढते. हीच ती कोण्या बुध्दाची बोधी, ज्याने ते स्वतः मुक्त झाले आनी करुणेने इतरांना शिकवले. गोयंका गुरुजी वारंवार सांगतात एका सिध्द्दार्थ गौतममधे बोधी जागली त्याने फक्त एकच मनुष्य मुक्त झाला तो म्हणजे फक्त सिध्द्दार्थ गौतम. बाकीच्यांना मार्ग सांगीतला. जे चालले त्या मार्गावरुन ते मुक्त झाले. जे कुणाची क्रुपा होईल ( अगदी बुध्दाची का होईना) ते वंचीत राहिले आनी भवचक्रात फिरत राहीले. प्रयत्न केलाय पहा काय वाटते, हे असे आहे जसे घरातील बल्ब. हाय फ्रीक्वेंन्सीवर लागतो-विझतो.पण आपल्या डोळ्यांच्या शक्तीपलीकडे असल्याने सलग लागल्याचा भास होतो तसेच. म्हणुन विपश्यनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणे जास्त महत्वाचे. नुसतेच बुद्धीने हे सर्व पटले तरी लाभ होत नाही. अनुभच घ्यावा लागेल तेंव्हा शंका मिटतील.

In reply to by विलासराव

अर्धवटराव 10/08/2014 - 22:47
ध्यानाची प्रक्रिया आणि परिणाम तुम्ही स्वानुभवाने सांगताय हे मला माहित आहे.. नो डाऊट अबाउट इट. माझा प्रश्न वेगळा आहे. जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस हि सर्व प्रक्रिया संस्कार मनावर कोरल्यामुळे होते. जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. भूतकाळातील आठवणी वर्तमानात सुख-दु:ख रूपाने अनुभवता येणे व तदनुषंगाने भविष्यातल्या सुख-दु:खाचा तीव्र विचार करणे हे शरीर बदलास आवष्यक असे प्रारुप निसर्गाने निर्माण केले. त्यात व्यत्यय आणल्यास काय परिणाम होतील आपल्याला माहित नाहि...

In reply to by अर्धवटराव

कवितानागेश 10/08/2014 - 23:02
जेनेटीक बदल असेच होतात. शरीर संवेदनेला सुख-दु:खांच्या संवेदनेचा प्रखर आधार असल्याशिवाय इह्वॉल्युशन प्रोसेस होत नाहि. >>> याबद्दल जरा शंका आहे. माकडाचे इव्होल्युशन होउन माणूस होणार आहे असं वाटत नाही. कदाचित जास्त उत्तम/ शक्तिवान माकडच होउ शकेल. असो. पण ध्यानामुळे संवेदना थांबत नाहीत, किंवा शिक्षणही थांबत नाही. नक्की काय होतय आणि ते कसे होतय हे कळायला सुरुवात होते. आपोआपच मन शांत निवांत होत असल्यानी सात्त्विकता वाढते. करुणा वाढते. कृतज्ञता वाढते. भिती कमी होते. त्यामुळे 'योग्य' तेच शिक्षण आणि त्याप्रमाणे बदल होत रहातात.

In reply to by अर्धवटराव

विलासराव 11/08/2014 - 00:18
जलचराचे उभयचर, उभयचराचे भूचर, माकड ते माणुस. हे याच क्रमाने झाले असणार किंवा नाही मला माहीत नाही. पण बुद्धांनी बर्याच भिक्षुंच्या प्रश्नांना वेळोवेळी उत्तरे दिली आहेत त्यानुसार मनुष्य ध्यानाच्या सहाय्याने वरच्या उदा: देव्/ब्रह्म्मा योनीमधे जाउ शकतो. किंवा अंतर्मनात असलेल्या पशुवत संस्कारच्या प्रभावाने पुन्हा मागच्या ( पशुप्राणी किंवा ईतर) योनीत जन्म घेतो. हे आता कोणालही पटणार नाही. आणी त्याची गरजही नाही.तुम्ही जेंव्हा कधी ध्यानात उतराल तेंव्हाच तुम्हाला या गोष्टी हळुहळु (जशी साधना वाढेल)लक्षात येतील. ज्यांनी कधी ध्यान केले नाही ते ही गोष्ट तर्काच्या आधारे अनुभवु शकत नाहीत. संपुर्ण मुक्ती खुपच लांबची गोष्ट आहे. पण आता उदाहरणच द्यायचे झाले तर माझं पिणं बंद झाले, नॉनव्हेज खाणे बंद झाले, माझा क्रोध पुर्ण गेला तर नाही पण आता तो आलाच तर बर्याचदा मी त्रागा करुन घेत नाही, माझे माझ्याशी ज्या लोकांचे सबंध दुरावले होते ते जवळपास ९०% तरी पुर्ववत झालेत. मी स्वतः माझी चुक होती की नव्हती याचा विचार न करता माफी मागीतली आणी समोरच्या व्यक्तिंनीही मला माफ केले, माझ्या व्यवसायात मी जी थोडीफार लबाडी करायचो ती मी पुर्णपणे बंद केली अशा अनेक गोष्टीत जो बदल झालाय तेवढी तेवढी मुक्ती( त्या त्या गोष्टींपासुन) मीळाली की नाही? तुमच्या प्रश्नाच मी रेडीमेड उत्तर देउही शकेल कदाचीत पण ते माझ्या अनुभवावर उतरलेले नसेल. म्हणुन इथेच थांबतो. चर्चा दुसरीकडेच भटकेल. बुद्धांनी संपुर्ण मार्ग अगदी मधे लागणार्या थांब्यांसह सांगीतलेला आहे. त्यांनीच काय अगदी तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगामधे साधनेच्या अवस्थांचे निसंदीग्ध वर्णन केलेले आहे. पण ते वाचुन कोणीही संत होउ शकत नाही, ती अवस्था अनुभवु शकत नाही. तुम्ही ध्यान कारायला सुरवात करा तुमच्या स्वतःच्या अनुभुतीवर त्या अवस्था उतरतील. बाजारात साखळीचे अभंग म्हणुन तुकाराम महाराजांचे १२ अभंग असलेले पुस्तक मीळते. ते वाचा आणी विपश्यना करा तुम्हाला खात्री होईल की ती संपुर्णपणे विपश्यना आहे. माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. म्हणुन मी म्हणतो की प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुमचा प्रश्न बरोबर आहे पण त्याला मी जे काही उत्तर देईल त्यातुन असे अनेक प्रश्न निर्माण होतील. मुळात जे माझ्या अनुभवावर उतरले नाही त्यावर मी बोलुच नये. जे वर मला झालेले लाभ सांगीतले आहेत तीच एका चांगल्या जीवनाची सुरवात नाही का? तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडलेच होते. पण जसजशी साधना उन्नत होते तसतसे बरेचसे प्रश्न आपोआप विलीन होउन जातात. त्यातुनही काही राहिलेच तर गुरुजी त्यांचे निवारण (बुध्दांचे सुत्र स्पष्ट करुन) करतात या मोठ्या शिबीरामधे.

In reply to by विलासराव

सूड 11/08/2014 - 15:21
विलासरावांचे प्रतिसाद बर्‍याच प्रश्नांची उत्तरं देऊन गेले. याआधी अपर्णातैंच्या एका प्रतिसादाने असा लख्ख उजेड पडला होता डोक्यात!! :) >>माझ्याकडे होते ते मी किसनरावांना दिलेले आहे. नोटेड.

In reply to by कवितानागेश

विलासराव 08/08/2014 - 08:52
माउ जरी मला विपश्यनेची अगोदर माहीती होती तरी मी मी तुमचे काय ध्यान आहे हे वाचल्याबरोबर मला पुन्हा प्रेरना मिळाली. आनी मी शिबीराला गेलो. या शिबीरात तर खुपच गहन साधना झाली, आणी तुम्हाला तर मी खुप मंगलमैत्री दिली. पोहोचली का?

In reply to by यशोधरा

विलासराव 08/08/2014 - 10:02
मंगलमैत्री म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वरांचे पसायदान. साधना केल्याने जेवढे काही पुण्य अर्जीत केले त्याचे वितरण सर्व जिवमात्रांचे(द्रुष्य-अद्रुष्य) कल्याण होवो, ते आपल्या विकारांपासुन (षढरिपु) मुक्त होवो अशी प्रार्थना.पुण्य म्हणजे जेजे केल्याने तुमचे मन निर्मळ होते तेते.

अज्याबात माफ करायचं नाय कोनाला ... चान्स मिळाला की कचकुन बदला घ्यायचा... अकीलीज कसं म्हनाला तसं म्हनायच " You sack of wine! Before my time is done, I will look down on your corpse and smile." *diablo*

In reply to by सूड

अग्ने यत्ते तपस्तेन तं प्रति तप योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।१ । । अग्ने यत्ते हरस्तेन तं प्रति हर योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।२ । । अग्ने यत्तेऽर्चिस्तेन तं प्रत्यर्च योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।३ । । अग्ने यत्ते शोचिस्तेन तं प्रति शोच योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।४ । । अग्ने यत्ते तेजस्तेन तं अतेजसं कृणु योऽस्मान्द्वेष्टि यं वयं द्विष्मः । ।५ । ।

अथर्ववेद संहिता

*diablo*

In reply to by स्पा

बॅटमॅन 04/08/2014 - 18:12
त्यांचे प्रताप इतके मोठे होते की सर्व लोक वैदिकांना टरकून असत. इतका मोठा शब्दार्णव, पण त्यालाही या प्रतापाने पिऊन टाकले ;)

In reply to by सूड

सूड हे घे रे अजुन एक रेफरन्स सापडला " न श्रेय: सततं तेजो न नित्यम श्रेयस क्षमा। तस्मान्नित्यं क्षमा तात पंडितैरपवादिना।।"

महाभारत . वनपर्व २८ -६ -८

हेच आमचे ह्या विषयावरील अंतिम मत !! येवढे बोलुन मी माझे चार शब्द सम्पवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 04/08/2014 - 23:48
आन्ना, आन्ना शांत घ्या आन्ना. तेव्हा ते शक्य होतं आज ते शक्य नाही. तलवार, धनुष्यबाण, गदा अमुक तमुक हे वापरुन सूड घेणाराला तेव्हा प्रतिष्ठा होती. आज ते शक्य नाही. आज दंबुका घेऊन मुडदे पाडून सूड घेणाराला भारतीय दंडविधान कायद्यानं शिक्षा करतं. माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. गल्ली, समाज, देश वगैरेसाठी वरचं (गीता, वैदिक) सगळं मान्य आहे. मात्र त्यामध्ये कर्तव्यबुद्धी म्हणून सूड घेणं हे जास्त परिणामकारक ठरेल. असंही भावनांच्या आहारी जाऊन काहीही करणं त्रासदायकच. परवा कुठल्या तरी 'सरां'च्या वॉलवर सूडाची/रागाची भावना म्हणजे हाती जळता निखारा घेणं, दुसर्‍याला देताना आपला हात पोळला जातो असं काहीसं वाचलं.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 05/08/2014 - 00:02
तेव्हाही शक्य होतं अन आत्ताही शक्य आहे. फक्त धनुष्यबाण-तलवार यांच्याऐवजी वाग्बाण, योग्य ठिकाणी चुगली, इ. अनेक दिव्यास्त्रे लागू पडतात. हे झालं बाहेरच्यांचं. बाकी कधी कधी प्रसंग असेही येतात जेव्हा घरचे म्हणवणारे माजतात तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. का? तर नात्यांचं तथाकथित पावित्र्य जपायचा मक्ता फक्त एकाने घेतलेला नसतो, नसावा. कुटुंब अन कौटुंबिक म्हंजे कित्ती छान छान इ.इ. म्हणणार्‍यांना कदाचित हे पटणार नाही, पण अशावेळी 'अर्थार्थी जीवलोकोऽयं न कश्चित्कस्यचित्प्रियः' हे लक्षात ठेवले तर बरे पडते. कैकदा आतले बाहेरच्यांपेक्षा परके होतात, तर बाहेरचे आतल्यांच्या वर क्लोज होतात. असो.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 05/08/2014 - 00:49
सूडातून तात्कालिक समाधान मिळतं. नंतर उरतं ते भकासपण. अर्थात पशूवत वर्तन असणारांना, आततायी (जमीन लुबाडणारा, घराला आग लावणारा, बाईवर हात टाकणारा इ.इ.) माणसांना माणूसपणाची ट्रीटमेण्ट देऊन चालत नाहीच्च. तिथं तुकडाच पाडायचा. पण तोही योग्य प्रकारे. अर्थात तिथंही हिंसेचा मार्ग स्विकारावा असं वाटत नाही. बलवंतांची क्षमा म्हणण्याइतपत बल आपल्यापाशी असलं तरच काही जमतं. ते नसलं तर कमवावं. ह्या सगळ्यात सूडाची भावना आत पेटून आपण का त्रास करुन घ्यावा पण? समोरचा बर्‍याचदा आपल्याच पैशावर खाऊन पिऊन ऐश करतोय नि आपण जळत बसतो. सांगितलंय कुणी? शांतपणं लढता येतं की. फरगिव्ह बट डोण्ट फरगेट. (माणसाला नाही तर वृत्तीला) वाग्बाण, चुगल्या वगैरेचे उपाय आहेत पण ते आपल्यावर देखील उलटू शकतातच. बाकी दिवस बदलतात, बाजू पलटतात, क्वचित कधी माणूस देखील बदलतो. सगळं होतं. सबुरी ठेवायची. नुसती बडबड नाही उपयोगाची. घरातल्या माणसांबद्दल विसंगती सोसणं हा उत्तम उपाय असतो. भावाभावांची भांडणं सोडवताना प.पू. गोंदवलेकर महारजांचं उदाहरण ऐकलंय. जमीनीचा काही वाद होता. भावानं ह्यांच्यावर केस केली. कोर्टात तारखेला गेले. हिअरींग झाली नंतर भावाला म्हणे चल जेवायला. भाऊ धुमसतोय. हे म्हणे अरे पैसे देऊन वकील केलेत आपण. लढताहेत की ते. आपण आता का भांडायचं? डोकं शांत, मन शांत.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 05/08/2014 - 01:13
हॅ हॅ हॅ. नुसती बडबड जशी उपयोगाची नसते तसाच सबुरीचा उपदेशही नुस्ता कामाचा नै. अन विसंगती सोसणं हे एका मर्यादेपर्यंत ठीके. बाकी गोंदवलेकर महाराजांशी काय स्पर्धा करायची इच्छा / कुवत नाही त्यामुळे त्यांच्या उदाहरणाने काही होणार नाही. अशी उदा. सांगून कूल पॉइंट्स मिळतील, प्रत्यक्ष आचरताना फेफे उडेल. तितका दम असतो कुणात? ते एक असोच. पेटण्यात काहीच हर्कत नाही, फक्त स्वतःचा त्रास कमी केला की झालं. या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नाहीत हे लक्षात येणं महत्त्वाचं. असो, शेवटी प्रगोने दिलेली अथर्ववेदातली प्रार्थनाच शिरोधार्य आहे या बाबतीत.(त्रेतायुग-कलियुगाच्या फंड्यापलीकडची सार्वकालिक आहे, इन केस अर्थ पाहिला नसेल तर कळावे म्हणून..)

In reply to by प्यारे१

धन्या 05/08/2014 - 00:09
>> माझ्या मते लेखातल्या माफीचा विषय हा रोजच्या अनुभवातल्या लोकांबद्दलचा आहे. बाहेरचं नंतर बघू, घरातल्या घरातले राडे का कमी असतात? आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं. 'तुम होते जो दुश्मन कोई बात क्या थी' असली लफडी अस्तात. बाहेरच्यांना रेमटवणं काहीही करुन, दोन देऊन घेऊन, पैशाचा, बळाचा वापर करुन शक्य होतं. आपल्या आपल्यात शक्यच नसतं. अगदी नेमके लिहीलं आहेस प्रशांत. कदाचित प्रगोंच्या सुदैवाने त्यांना अशा अनुभवांना सामोरं जावं लागलं नसावं. त्यामुळे मी लिहीलेलं त्यांच्यापर्यंत पोहचलेलंच नाही. प्रगो, तुमच्या प्रतिसादांवरुन माझा हा लेख तुमच्या अनुभवविश्वापलिकडचा आहे असं मला वाटतं. You are unable to tune to what I have written. सारांश, तुम्ही सुखी आहात.

In reply to by प्यारे१

"आईवडील, भाऊ, बहीण, सासू सुना , मुलं ह्यांच्याबाबत सूड घेणं शक्य नसतं.".... आणि बायकोचा सूड घेण्याची हिम्मत नसते....*ok* *OK*

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 04/08/2014 - 17:30
अगदी सहमत. असा क्षमाशील विचार छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला असता तर काय झाले असते असा क्षणभर विचार मनात आल्यावाचून राहिला नाही. धनाजीराव मापी क्रा प्न मोह अवर्ला नै.

In reply to by बॅटमॅन

धन्या 04/08/2014 - 18:42
हरकत नाही. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

In reply to by धन्या

आमच्या मते भावना ह्या मनाचा आणि त्यामुळे शरीराचा अविभाज्य भाग आहेत , शिवाय , आपले शरीर हीच आपली सर्वात मोठ्ठी अ‍ॅसेट मालमत्ता असतेच . म्हणुन भावनिक जखमा ह्याही शाररिक इजा आणि आर्थिक/ मालम्त्तेचे नुकसान ह्यांच्यामधे अंतर्भुत होतात त्यामुळे त्यांन्ना स्वतंत्र नियम लावता येणार नाही :) आणि महाराजांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मुधोळच्या बाजी घोरपड्याची गोष्ट ऐकली नाही काय धनाजीराव ? बाजी घोरपड्याने १६४८ मधे शहाजी राजांना कैद करण्यात आदीलशहाला मदत केली , त्याचा वचपा १६६४ मधे महाराजांनी घेतला महाराजांनी खुद्द स्वतः बाजीला कंठ्स्नान घातले (इतिहास नक्की माहीत नाही पण सीरीयल मधे तरी हेच दाखवले आहे ) ! त्यातही विशेष म्हणजे "बाजीला जिवंत सोडु नये" अशा आशयाचे जिजाउ मा साहेबांचे पत्र आहे. !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 04/08/2014 - 19:22
बाजीला महाराजांनी मारले हे खरेच आहे. तो सर्व प्रकार निव्वळ स्ट्रॅटेजिक-डिप्लोम्याटिक होता असे म्हणवत नाही खास.

In reply to by बॅटमॅन

सहमत. आणि त्या धाडीत मुधोळकरांच्या कुटुंबातली आणि नात्यातली किमान १०० माणसे तरी कापली होती.

In reply to by प्रसाद गोडबोले

यसवायजी 04/08/2014 - 19:28
रैट्ट. बहुतेक विवेकानंदांची गोष्ट आहे. माकडे त्रास देत असतील तर किती वेळ दुर्लक्ष करणार? एकदाच हिसका दावला की माकडचाळे बंद. & then, this part of your life is called as "मनःशांती" (साभार- pursuit of Happyness‎)

भिंगरी 04/08/2014 - 17:06
(माफ करणे म्हणजे मनातील आकस सोडून देणे) आकस सोडणे महत्वाचे. नाहीतर माफ केले म्हणायचे आणि मनात आकस धरुन रहायचे त्यामुळे स्वत:लाही त्रास आणि दुसर्यालाही त्रास

In reply to by यसवायजी

धन्या 04/08/2014 - 17:25
अशा वेळीही माफ करायचं. मात्र माफ करण्यापूर्वी किंवा करताना आपला गड सुरक्षित आहे ना याचीही काळजी घ्यायची. दुसर्‍याला माफ करताना आपलं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दयायचं. काही वेळेला समोरच्याच्या कृतीला उत्तर म्हणून आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील. आपलं नुकसान टाळण्यासाठी ती आवश्यक बाब असेल. मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.

In reply to by धन्या

यसवायजी 04/08/2014 - 17:32
मात्र तसे करत असताना मनात आकसाची किंवा धडा शिकवण्याची भावना नसावी.
गुन्हेगारांच्या शिक्षेबाबत आपलं काय मत आहे?

In reply to by यसवायजी

धन्या 04/08/2014 - 18:40
गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. मात्र ती त्याला धडा शिकवायला (अद्दल घडवायला) म्हणून नव्हे तर त्याने केलेल्या चुकीची जाणिव त्याला होऊन त्याने शहाणं व्हावं म्हणून. माझ्या लेखाचा रोख भावनिक जखमांकडे आहे. शारिरीक इजा किंवा आर्थिक वा मालमत्तेच्या नुकसानीकडे नाही. दुसर्‍या प्रकारामध्ये काय करायचे याचा विचार करण्यासाठी वेगळ्या व्यवस्था असतात. :)

एसमाळी 04/08/2014 - 17:15
एखाद्याला केलेल्या चुकीबद्दल माफ करणे मला तरी जमणार नाही.चुक केलीस ना,मग त्याचे परिणाम तुला भोगायलाच लावीन.कदाचीत याला डुख धरुन राहणे असे ही म्हणु शकता.

In reply to by एसमाळी

धन्या 04/08/2014 - 17:28
माफ करणे म्हणजे समोरच्याचे कसेही वागणे चालवून घेणे नव्हे. समोरच्या व्यक्तीच्या त्रासदायक/हानीकारक वर्तनाला शब्दांतून अथवा कृतीतून योग्य ते उत्तर दयावेच. मात्र त्यात आकसाची किंवा बदला घेण्याची भावना नसावी. झालेल्या गोष्टीला चिकटून राहू नये.

कवितानागेश 04/08/2014 - 17:37
खूप आवडलं. माफ करणे म्हणजे दुसर्‍या व्यक्तीबद्दलच्या कडवटपणाभोवती घुटमळत असलेल्या मनाला मुक्त करणे. हेतर खूपच छान आहे. :) पण तरीही एकीकडे प्रगोशी सहमत व्हायचा मोह होतोय!! :P

डूख धरणे, बदला घेणे, आकस ठेवणे वगैरे वगैरे टाळणं शक्य असतं. पण हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे असा गैरसमज पसरू न देणं हेही पाहावं लागतं. तसंच, अशा प्रत्येक व्यक्तीची नोंद मनांत करून ठेवणं, आपल्या पुढच्या वाटचालीत ती व्यक्ती समोर आल्यास आपल्या वागण्याची तर्‍हा ठरवून ठेवावीच लागते. तुम्ही माफ करता म्हणून समोरचा माणूस येताजाता तुमचा पाणउतारा करुन स्वतःचा 'स्व' कुरवाळू पाहात असेल तर कानाखाली काडकन आवाज काढायची ताकद मनगटात आणि हिम्मत मनांत ठेवावी लागते. ते नाही केलं तर आत्मसन्मानाला धक्का पोहोचून तणाव (स्ट्रेस) वाढू शकतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

चिगो 20/08/2014 - 16:26
पेठकरकाकांच्या प्रतिसादाशी सहमत.. ह्यावरुन एका हिंदी कवितेच्या ओळी आठवल्या.. "क्षमा शोभती उस भुजंग को, जिसके पास गरल हो, उसको क्या जो दंतहीन विषरहीत विनीत सरल हो |"

राही 04/08/2014 - 18:06
लेख अतिशय आवडला. बहुतांशी सहमत. विखार, क्रोध या नकारात्मक भावनांनी मनातली जागा व्यापली की आनंद, समाधान अशा सकारात्मक बाबी दूर, बाहेर लोटल्या जातात. आपली कार्यशक्ती कमी होते आणि उद्दिष्टावरील लक्ष विचलित होते.

विटेकर 04/08/2014 - 18:13
आवडले आणि पटले देखील ! बदल्याच्या आगीत शत्रुपक्षाला नुकसान होईल तेव्हा होईल..पण तो पर्यन्त आपणच पेटविलेल्या वणव्यात आपलीच राख होत जाते ... मानसिक त्रास तर होत असतोच पण नकळत शरिरावरही आघात होत असतो .. आपण कणा - कणाने मरत असतो आपल्याच विचार- शृंखलानी आपणच बेडीत अडकतो.. आणि असल्या विचारानी बाहेरच्या परिस्थितीत शष्प देखील फरक पडत नाही ... !

vikramaditya 04/08/2014 - 19:00
आपल्याला त्रास देणारी व्यक्ती पुन्हा तसे करणार नाही ह्यासाठी गड सुरक्षित करावा आणि माफी देवुन टाकावी पण "आपल्या मनात". त्या व्यक्तिबरोबर मात्र फार सावधपणेच वागावे. पण ती व्यक्ती / घटना मनात ठेवुन माफी देणे कठीण. One needs to forget as well as forgive.

लेखातील काही मते पटली तर काही पटली नाहीत. ह.घ्या: मी बाकी कोणालाही माफ करेन पण फेसबुकावर कॅन्डी क्रशची रिक्वेस्ट पाठवणार्‍या कोणालाही माफ करू शकणार नाही :)

पैसा 04/08/2014 - 22:02
मला वाटतं, दुसर्‍याला माफ करण्याआधी स्वतःला माफ करता आले पाहिजे. माझ्या हातूनही चुका होतात, मला कोणी फसवू शकतं, माझा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, मला कोणी वाईट वागवलं आणि त्याचा प्रतिकार करता आला नाही असंही होऊ शकतं. आणि त्याबद्दल स्वतःला जर माफ केलं तर दुसर्‍याला माफ करणं फार सोपं होईल. बहुतेकवेळा दुसरा असा कसा वागला यापेक्षाही मला या घटनेबद्दल काही करता येत नाहीये ही भावना जास्त त्रासदायक असते.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन 11/08/2014 - 05:31
अत्यंत सहमत. बहुतेक वेळा बोलणारा बोलून जातो आणि त्याला त्याचक्षणी सडेतोड उत्तर का सुचले नाही याबद्दल स्वतःचाच राग येत राहतो. मग असंच म्हणायला हवं होतं आणि तसंच करायला पाहिजे होतं हे मनाचे खेळ काहीकाळ चालू राहतात. पुढच्यावेळी पुन्हा अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितपणे कोणीतरी काहीतरी बोलतो आणि मनाचे खेळ चालू राहतात. बरं सूड किंवा बदला घेण्याएवढीही त्या माणसांना किंमत द्यायची इच्छा नसते; मग अशावेळी अशा माणसाचं बोलणं ऐकून घ्यावं लागण्याचा बावळटपणा घडल्याबद्दल स्वतःलाच माफ करणे याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही. विशेषतः मनमभोळ्सट, साध्यासुध्या आणि भोळ्सट लोकांना तथाकथित व्यवहारी व स्मार्ट लोकांकडून असे अनुभव वारंवार येतात. त्यासाठी आधी स्वतःला क्षमा करण्याची कला साध्य होणे महत्त्वाचे असते.

अर्धवटराव 04/08/2014 - 23:01
धन्या शेठ, लेख आवडला. ज्यानी कोणि आगळीक केली ति त्याची मानसीक अपरिहार्यता होती, त्यामुळे तो तसा वागला, त्याच्याबद्दल सहानुभुती-दया वाटावी... असले विचार केल्याने माफिनामा आपसूक पास होतो म्हणतात (आपण त्या वाटेला फार जात नाहि) बर्‍याचदा आगळीक करणार्‍याचं काहि वाईट झालं कि आपला बदला अ‍ॅटोमॅटीक पूर्ण झाल्याचं समाधान लाभतं, किंवा दुश्मनकोभि ऐसे दिन ना देखने पडे टाईप काहि भोग त्याच्या वाटेला आले कि एक सहाजीक माणुसकिची भावना म्हणुन देखील त्याच्याबद्दल दया उत्पन्न होते व सहाजीक क्षमादान होतं. पण प्रयत्नपूर्वक मनापासुन क्षमा करायला फार मोठं मन लागतं हे नक्की.

खटपट्या 05/08/2014 - 01:59
बऱ्याच वेळेला आपण माफ करतो पण समोरच्याला वाटते की हा आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीं आणि मग तो आपला अजून पाणउतारा करू पाहतो. समोरच्याला माफ करायला हरकत नाही पण त्याने तिथेच थांबले पाहिजे यासाठी इशारा तर द्यावाच लागणार. साम, दाम दंड भेद हेच बरे वाटते कधी कधी
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्यात केव्हा ना केव्हा आपण कुणाकडून तरी दुखावले जातो. कधी शब्दांनी तर कधी कृतीने. मनाला जखम होते. कधी वरच्या वर तर कधी खोलवर. वरच्या वर झालेली जखम थोडासा काळ जाताच भरुन येते. खोलवर झालेली जखम मात्र अधिकाधिक खोलवर जात राहते. ठुसठुसत राहते, मनाला वेदना देत राहते. माणसाला राग येतो, मन कडवटपणाने भरुन जाते.

पिझ्झा ऑन (थीन क्रस्ट) ब्रेड!!!

दिपक.कुवेत ·

ब़जरबट्टू 04/08/2014 - 15:05
आवडला... *ok* झक्कास... ( स्वगत :- हे एक स्मायल्यांचे बेष्ट्र झाले राव.... *ok* *biggrin* *mosking* *new_russian* *drinks* )

सविता००१ 04/08/2014 - 15:30
काय बेक्कार माणूस आहेस रे तू....... सतत छळवाद आणि तोही सुंदर. काय करावं आम्ही? *sad*

पैसा 04/08/2014 - 15:33
हा दुष्ट माणूस आला परत! पण यावेळची पाकृ जरा सोप्पी आहे! करून बघेन!

अनन्न्या 04/08/2014 - 18:13
मस्त आवडती डीश! मी पण फ्राय पॅनमध्येच करते पिझ्झा, त्या वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या मिळत नाहीत.

भाते 04/08/2014 - 19:58
नक्की करून बघेन. श्रावण संपल्यावर चिअर्स! चहाबरोबर खाण्यापेक्षा, श्रावण संपल्यावर, रंगीत पाण्याबरोबर चकणा म्हणुन खायला आवडेल. अर्थातच, तोपर्यंत पावसात स्वत: करून खायला आवडेल. याआधीच्या सोमवारी टाकलेल्या पाकृ माफ. :) श्रावण संपेपर्यंत अश्याच शाकाहारी पाकृ आणखी येऊदे.

भूक..भंयंकर चाळवणारे फोटू! ;) आणि वर्णनंही! *biggrin* शेवटाच्या फोटुतले दोन्ही,कल्पनेनी(म्हणजे माझ्या मनानी केलेल्या! *man_in_love* ) उचलून...वचावचा खाऊन टाकणेत आलेले आहेत! *i-m_so_happy*

दिपक.कुवेत 06/08/2014 - 10:43
अजुन एक कल्पना सुचली आहे. जर पिझ्झा नको असेल तर सॉस तसाच ठेवुन भोपळि मिरच्या, कांदा, उकडलेले बटाटे आणि काकड्या गोल कापुन पिझ्झा चिझ सॅन्डविच बनवु शकतो. पिझ्झा चा फ्लेवर आणि सॅन्डविच ची मजा...दोन्हिहि.

In reply to by दिपक.कुवेत

अनन्त अवधुत 13/08/2014 - 05:50
एक तर आहे हीच पाककृती तोंडचे पाणीपिपासू आहे , त्यात आणखी उपप्रकार कशाला. येत्या शनिवारी / रविवारी मुख्य पाकृ करून पाहण्यात येईल.

इशा१२३ 12/08/2014 - 09:59
मस्त!!मी वाटीने ब्रेड गोल कापून घेते.आणि छोटे पिझ्झा बनवते असेच. पण पिझ्झा सॉसची कृती मला नविन.आवडली.मी तयार सॉस वा एखादे स्प्रेड वापरते.असा ताजा सॉस करेन आता.याची चव नक्कीच जास्त छान लागत असेल.

विशारद 09/09/2014 - 20:13
आल्मोस्ट असाच पिझ्झा केला होता. फक्त मैदा पोटात नको जायला, म्हणून देसी चवी वापरल्या होत्या. पिझ्झा बेस म्हणून थालिपीठ वापरले होते. शिवाय चिली फ्लेक्स वापरले होते सर्व्ह करताना...

In reply to by विशारद

दिपक.कुवेत 10/09/2014 - 11:10
थालीपीठ पिझ्झा बेस म्हणून वापरायला ठिक आहे पण भाजणीला मुळातच स्वःताची अशी एक चव असते त्यात पिझ्झा आयटम घातले तर चवींचाच पिझ्झा होईल. मैदा अगदिच टाळायचाच असेल तर मल्टि ग्रेन किंवा बाउन ब्रेड वापरु शकतो. ब्रेडच टाळायचा असेल तर बेस्ट आपल्या कणकेच्या पोळ्या/फुलके (जरा जाडसर लाटलेल्या).

दिपक.कुवेत 10/09/2014 - 21:26
भाकरी (पातळ लाटलेली) किंवा पिटा ब्रेड हे ऑप्शन्स आहेत. जाडसर डोसा किंवा उत्तपा कितपत क्रिस्प होईल शंका आहे. पातळ डोसा क्रिस्प/कुरकुरीत असतो पण त्यावर टॉपिंग्ज बसणार नाहित. बेसीकली ज्या पदार्थाचा बेस जाड आहे आणि शेकल्यावर क्रिस्प होउ शकतो असं काहिहि चालेल.

ब़जरबट्टू 04/08/2014 - 15:05
आवडला... *ok* झक्कास... ( स्वगत :- हे एक स्मायल्यांचे बेष्ट्र झाले राव.... *ok* *biggrin* *mosking* *new_russian* *drinks* )

सविता००१ 04/08/2014 - 15:30
काय बेक्कार माणूस आहेस रे तू....... सतत छळवाद आणि तोही सुंदर. काय करावं आम्ही? *sad*

पैसा 04/08/2014 - 15:33
हा दुष्ट माणूस आला परत! पण यावेळची पाकृ जरा सोप्पी आहे! करून बघेन!

अनन्न्या 04/08/2014 - 18:13
मस्त आवडती डीश! मी पण फ्राय पॅनमध्येच करते पिझ्झा, त्या वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या मिळत नाहीत.

भाते 04/08/2014 - 19:58
नक्की करून बघेन. श्रावण संपल्यावर चिअर्स! चहाबरोबर खाण्यापेक्षा, श्रावण संपल्यावर, रंगीत पाण्याबरोबर चकणा म्हणुन खायला आवडेल. अर्थातच, तोपर्यंत पावसात स्वत: करून खायला आवडेल. याआधीच्या सोमवारी टाकलेल्या पाकृ माफ. :) श्रावण संपेपर्यंत अश्याच शाकाहारी पाकृ आणखी येऊदे.

भूक..भंयंकर चाळवणारे फोटू! ;) आणि वर्णनंही! *biggrin* शेवटाच्या फोटुतले दोन्ही,कल्पनेनी(म्हणजे माझ्या मनानी केलेल्या! *man_in_love* ) उचलून...वचावचा खाऊन टाकणेत आलेले आहेत! *i-m_so_happy*

दिपक.कुवेत 06/08/2014 - 10:43
अजुन एक कल्पना सुचली आहे. जर पिझ्झा नको असेल तर सॉस तसाच ठेवुन भोपळि मिरच्या, कांदा, उकडलेले बटाटे आणि काकड्या गोल कापुन पिझ्झा चिझ सॅन्डविच बनवु शकतो. पिझ्झा चा फ्लेवर आणि सॅन्डविच ची मजा...दोन्हिहि.

In reply to by दिपक.कुवेत

अनन्त अवधुत 13/08/2014 - 05:50
एक तर आहे हीच पाककृती तोंडचे पाणीपिपासू आहे , त्यात आणखी उपप्रकार कशाला. येत्या शनिवारी / रविवारी मुख्य पाकृ करून पाहण्यात येईल.

इशा१२३ 12/08/2014 - 09:59
मस्त!!मी वाटीने ब्रेड गोल कापून घेते.आणि छोटे पिझ्झा बनवते असेच. पण पिझ्झा सॉसची कृती मला नविन.आवडली.मी तयार सॉस वा एखादे स्प्रेड वापरते.असा ताजा सॉस करेन आता.याची चव नक्कीच जास्त छान लागत असेल.

विशारद 09/09/2014 - 20:13
आल्मोस्ट असाच पिझ्झा केला होता. फक्त मैदा पोटात नको जायला, म्हणून देसी चवी वापरल्या होत्या. पिझ्झा बेस म्हणून थालिपीठ वापरले होते. शिवाय चिली फ्लेक्स वापरले होते सर्व्ह करताना...

In reply to by विशारद

दिपक.कुवेत 10/09/2014 - 11:10
थालीपीठ पिझ्झा बेस म्हणून वापरायला ठिक आहे पण भाजणीला मुळातच स्वःताची अशी एक चव असते त्यात पिझ्झा आयटम घातले तर चवींचाच पिझ्झा होईल. मैदा अगदिच टाळायचाच असेल तर मल्टि ग्रेन किंवा बाउन ब्रेड वापरु शकतो. ब्रेडच टाळायचा असेल तर बेस्ट आपल्या कणकेच्या पोळ्या/फुलके (जरा जाडसर लाटलेल्या).

दिपक.कुवेत 10/09/2014 - 21:26
भाकरी (पातळ लाटलेली) किंवा पिटा ब्रेड हे ऑप्शन्स आहेत. जाडसर डोसा किंवा उत्तपा कितपत क्रिस्प होईल शंका आहे. पातळ डोसा क्रिस्प/कुरकुरीत असतो पण त्यावर टॉपिंग्ज बसणार नाहित. बेसीकली ज्या पदार्थाचा बेस जाड आहे आणि शेकल्यावर क्रिस्प होउ शकतो असं काहिहि चालेल.
Final 1 साहित्यः पिझ्झा सॉस साठि:(करायचा कंटाळा असेल तर रेडिमेड बाजारात मिळतो) १. लालबुंद टोमॅटो - ३ २. ४ ते ५ पाकळ्या लसुण ३. १ छोटा बाउल ऑलिव्ह ऑईल ४. १/२ छोटा बाउल टोमॅटो केचप ५. पिझ्झा सीझनींग (हे रेडिमेड मिळतं) - २ चमचे ६.

मन रे .....

सुहास.. ·
लेखनविषय:
भकास सारीपटावर कुरतडलेल्या स्वप्नांसकट सीतेच्या नकारालाही रावणल्यालं मन ! मांगल्याचा ओढीमध्ये निर्जीव कातळासवे पदस्पर्शाच्या आभासात राऊळल्याल मन ! चंचल पाऊसवेळी कोपर्‍यावरच्या झाडाखाली नाजुक बोटाच्यां गुफणीत, क्षणभर स्थिरावल्याल मन ! शमेना देह तपन जन्मदुखः अशोकवृक्षाचे सुखाच्या मृत्युभयाला वांझोटल्याल मन ! विचारकल्लोळीचा वाकस एकांती समुद्रस्पर्धेत विश्वकर्माच्या रंगसंगतीत माणुसघाण्यावल्याल मन ! सडा रक्तचिखलाचा तुडविला अनवाणी सफेद संगमवरावर डागाळल्याल मन !

एका संध्याकाळेचा निरोप….!

वटवट ·

psajid 04/08/2014 - 11:31
खूप छान कथा आणि मधून - मधून येणारी मनातील काव्यमय भावना ! दोन्हीही अप्रतिम !

ये बाबा किती त्रास देणार आम्हाला अजून. आपल्या सर्व भावना वाचक म्हणुन अगदी पुरेपुर उतरत आहे, इतक तरलं आणि सुंदर लिहिता तुम्ही की आम्ही वाचक तुम्हा दोघांना पाहात आहोत असा अनुभव येतो. अरे, त्याला म्हणावं काही काळजी करु नकोस. इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा. अजून काय लिहू. लेखन काल वाचलं आणि आज प्रतिसाद लिहितोय. त्रास होतो हो, तुमचं लेखन वाचतांना. बरं समजूत तरी कोणी कोणाची घालायची. आपली समजुत काढणं अवघड आणि आम्हाला प्रतिसाद लिहिणं अवघड होतं. सध्या पाऊस पडतोय. आभाळ भरुन येतं. मित्रा, आपलं लेखन वाचून इकडे आम्हालाही त्रास होतो रे बाबा...! टेक केअर. -दिलीप बिरुटे (आभाळ पावसात तिच्या आठवणीत भिजत असलेला)

In reply to by स्पंदना

(ढासळलेली दरड) अरे बापरे! खाली किती जणांचे प्राण गेले असतील आणि कितीक 'जखमी' अजूनही जखमा कुरुवाळत बसले असतील.

आभाळाचं आणि डोळ्यांचं किती वेगळं असतं नै. जेव्हढा जास्त पाउस पडेल तेव्हढं आभाळ जास्त मोकळं आणि स्वच्छ होतं. बघायला खूप छान वाटतं आणि डोळे…आधीपेक्षा जास्त लाल आणि हळवे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा झरण्याचा बॅकलॉग ते दुसर्यांचा डोळ्यातून भरून काढतात>>> क्काय बोलावं??? कसलं लिहताय राव तुम्ही… अगदी सुन्न होऊन जातो वाचणारा…. हे असलं लिहित नका ना जाऊ…. त्रास होतो ना मग दिवसभर…. हा लेख वाचल्यावर लगेच नाही प्रतिक्रिया देऊ शकलो… जरा नॉर्मल आल्यावरच हे खरडायला घेतलं… इतकं त्रास देणारं लिखाण फार कमी वेळा पाहण्यात येतं ओ… सगळंच्या सगळं, तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. ताकदीनं लिहीलंत.. आणि त्याजोडीनं येणार्या कवितेच्या ओळी… अगदी स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स करून टाकत होत्या… तोडलंत राव तोडलंत… …. डॉक्टर म्हणतात तसं , "इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा..." आमचं पण तेच म्हणणं आहे. (अर्थात हे म्हणणं कितपत योग्य आहे माहित नाही… पण तरीही…) देव करो आणि तुमच्या लिखाणाला दृष्ट नं लागो…. - तुमचा पंखा…

In reply to by सूड

प्यारे१ 11/08/2014 - 17:54
काळ्यांची आशा असते तर संध्या असू शकत नाही का त्यांच्या भावकीमध्ये? आणि एवढं भावनिक म्हणजे नक्की त्यांच्याच जवळच्या नात्यात असणार. (वटवटराव हलकं घ्या हो)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

तो… हलका माणूसच हलके घेतो… वटवट राव हेही हलकेच घ्या…. च्यायला इथे प्रतिसाद एडीटच नाही करता येत… एकदा गेला कि गेला.. *sad*

psajid 04/08/2014 - 11:31
खूप छान कथा आणि मधून - मधून येणारी मनातील काव्यमय भावना ! दोन्हीही अप्रतिम !

ये बाबा किती त्रास देणार आम्हाला अजून. आपल्या सर्व भावना वाचक म्हणुन अगदी पुरेपुर उतरत आहे, इतक तरलं आणि सुंदर लिहिता तुम्ही की आम्ही वाचक तुम्हा दोघांना पाहात आहोत असा अनुभव येतो. अरे, त्याला म्हणावं काही काळजी करु नकोस. इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा. अजून काय लिहू. लेखन काल वाचलं आणि आज प्रतिसाद लिहितोय. त्रास होतो हो, तुमचं लेखन वाचतांना. बरं समजूत तरी कोणी कोणाची घालायची. आपली समजुत काढणं अवघड आणि आम्हाला प्रतिसाद लिहिणं अवघड होतं. सध्या पाऊस पडतोय. आभाळ भरुन येतं. मित्रा, आपलं लेखन वाचून इकडे आम्हालाही त्रास होतो रे बाबा...! टेक केअर. -दिलीप बिरुटे (आभाळ पावसात तिच्या आठवणीत भिजत असलेला)

In reply to by स्पंदना

(ढासळलेली दरड) अरे बापरे! खाली किती जणांचे प्राण गेले असतील आणि कितीक 'जखमी' अजूनही जखमा कुरुवाळत बसले असतील.

आभाळाचं आणि डोळ्यांचं किती वेगळं असतं नै. जेव्हढा जास्त पाउस पडेल तेव्हढं आभाळ जास्त मोकळं आणि स्वच्छ होतं. बघायला खूप छान वाटतं आणि डोळे…आधीपेक्षा जास्त लाल आणि हळवे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा झरण्याचा बॅकलॉग ते दुसर्यांचा डोळ्यातून भरून काढतात>>> क्काय बोलावं??? कसलं लिहताय राव तुम्ही… अगदी सुन्न होऊन जातो वाचणारा…. हे असलं लिहित नका ना जाऊ…. त्रास होतो ना मग दिवसभर…. हा लेख वाचल्यावर लगेच नाही प्रतिक्रिया देऊ शकलो… जरा नॉर्मल आल्यावरच हे खरडायला घेतलं… इतकं त्रास देणारं लिखाण फार कमी वेळा पाहण्यात येतं ओ… सगळंच्या सगळं, तसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. ताकदीनं लिहीलंत.. आणि त्याजोडीनं येणार्या कवितेच्या ओळी… अगदी स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स करून टाकत होत्या… तोडलंत राव तोडलंत… …. डॉक्टर म्हणतात तसं , "इतकं जीवापाड प्रेम केलं ना की ते जशाच तसं सुरक्षीत मुद्दल आणि व्याजासह परत फेड मिळेल, फक्त धीर धरा..." आमचं पण तेच म्हणणं आहे. (अर्थात हे म्हणणं कितपत योग्य आहे माहित नाही… पण तरीही…) देव करो आणि तुमच्या लिखाणाला दृष्ट नं लागो…. - तुमचा पंखा…

In reply to by सूड

प्यारे१ 11/08/2014 - 17:54
काळ्यांची आशा असते तर संध्या असू शकत नाही का त्यांच्या भावकीमध्ये? आणि एवढं भावनिक म्हणजे नक्की त्यांच्याच जवळच्या नात्यात असणार. (वटवटराव हलकं घ्या हो)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

तो… हलका माणूसच हलके घेतो… वटवट राव हेही हलकेच घ्या…. च्यायला इथे प्रतिसाद एडीटच नाही करता येत… एकदा गेला कि गेला.. *sad*
लेखनविषय:
लेखनप्रकार
वेळ: एक संध्याकाळ .... तसं पहायला गेलं तर त्याच्या तिच्या आयुष्यात संध्याकाळचं महत्व अनन्यसाधारण… त्याच्या तिच्या असंख्य क्षणाची मूक साक्षीदारंच ती… त्यांच्या "क्षणांना" झालेली सुरुवात… त्यांनी गाठलेली सर्वोच्च पातळी… त्यांचे रुसवे-फुगवे….

नाते गंधाशी.

भिंगरी ·

खटपट्या 04/08/2014 - 09:52
मला आवणारे काही वास !! नवीन वह्या पुस्तकांचा वास घरी रंग मारल्यावर येणारा वास. सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद करताना येणारा वास. मातीचा वास, रातराणीचा वास. संध्याकाळी धुपारत फिरवताना येणारा वास कोणत्याही हॉटेल जवळून जाताना येणारा वास, पेट्रोल चा वास, रॉकेल चा वास. गवत कापल्यावर येणारा विशिष्ट वास.

In reply to by खटपट्या

भिंगरी 04/08/2014 - 10:21
नवीन कपड्यांचा वास, बाळ बाळंतणीचा वास (धुरीचा) सोळा सोमवारच्या प्रसादाचा वास (हा वास मला आमच्या येथील माळीबुवांची आठवण देतो.ते हे उपवास मोठ्या श्रद्धेने करायचे आणि आम्ही त्यांच्या प्रसादाची वाट पाहायचो.)

आनन्दा 04/08/2014 - 16:07
एका जिवलग नातलगाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे शव नेताना लावलेल्या मोगरा अगरबत्ती आणि निलगिरीचा एकत्र झालेला गंध आजही कुठे जाणवला तर मला तो 'मृत्यूचा गंध'च वाटतो.
खरच!!

तिमा 04/08/2014 - 16:37
कानातल्या कुड्या काढल्यावर सुटणारा ब्युटिरिक अ‍ॅसिडचा वास कचर्‍याची बादली उघडल्यावर येणारा कुजका वास सोसायटीचे ड्रेनेज तुंबून बाहेर पसरणार्‍या पीतरसाचा वास पावसाळ्यांत कारमधे दरवाजा उघडताक्षणी येणारा कुबट वास हे वास तर आवडत नाहीच, पण केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!

In reply to by तिमा

"केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!" म्हणजे काय? नाही म्हणजे एखादा वास मोहक किंवा निर्मोहक (मराठीत अनप्लेझन्ट ) असणं हे समजू शकतो. पण 'तिरस्करणीय' वास म्हणजे काय? खरोखरीच शंका आहे, कॄपया फाट्यावर मारू नये.....

In reply to by तिमा

भिंगरी 15/03/2015 - 23:44
पिंपाच्या खाली मेलेल्या उंदराचा वास तो पिंपाखालचा उंदीर मिळेपर्यंत जीव नकोसा झाला होता.

अगोचर 05/08/2014 - 02:36
नवीन रस्ता करताना बाजुला डांबर जाळतात त्याचा वास, मला शाळेत सहाविच्या सुमारास सायकल नी जायचो त्याची आठवण करून देतो. कडक उन्हाळ्यात भर दुपारी गाडी उघडली असता येणारा वास शालांत परिक्षेची आठवण करुन देतो, त्यावेळी दुपारी बारा-एकला संपायचे पेपर. उपहार गृहांसमोरून सायकल दामटताना येणारे भजी / सामोसे यांचा हवाहवासा वास आणि एसटी मधे लांबच्या प्रवासात (विशेषतः वळणावळणाच्या घाटानंतर) प्रवासाच्या शेवटी शेवटी कोंदाटणारा अणि कधी एकदा बाहेर पडु असे वाटायला लावणारा वासही आठवतो. आजकाल गाडीत एसी लावुन काचा वर केल्या की असले वास येत नाहीत. लिहिता लिहिता वाटले कि आत्ता लिहिलेले सगळे वास रस्त्याशीच निगडीत आहेत. असो !

बहुगुणी 05/08/2014 - 04:50
छान धागा, बरेच आठवणीत दडलेले गंध (आणि काही नावडते दर्पही!) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार! काही मजेशीर माहिती खाली देतो आहे, पण त्याआधी थोडंसं गंधामागचं शास्त्र (कंटाळवाणं होणार नाही अशी आशा आहे): आपल्याला केक, फळं, फुलं, अत्तर, कांदा इत्यादिंपैकी कसलाही वास येतो म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू/ पदार्थाच्या पृष्ठभागावरून सहज विलग होऊ शकणारे रासायनिक कण (volatile molecules) जेंव्हा aerosol (मराठी शब्द?) बनून हवेत उसळतात आणि आपल्या नाकाच्या मागे असणार्‍या एका छोट्याशा पातळ पापुद्र्यावरच्या असंख्य मज्जा-पेशींवर (olfactory receptor neurons) जाऊन आदळतात. या पेशींच्या पृष्ठभागावर लक्षावधी प्रत्येकी निरनिराळे गंध ओळखणारे गंधग्राहक रेणू (olfactory receptors) असतात. यांद्वारे हजारो निरनिराळे गंध आपलं नाक 'ओळखू' शकतं. यांतला प्रत्येक रेणू एका जनुकापासून encode झालेला असतो. जर एखाद्या गंधग्राहकाचं जनुक कार्यरत नसेल (उदाहरणार्थ कापराचा गंधग्राहक रेणू), तर ते गंधज्ञान त्या व्यक्तींना नसतं. आता शुद्ध स्टील (ज्यापासून कुठलेच volatile molecules निघत नाहीत) अशा पृष्ठभागांना कसलाच वास येत नाही. याउलट फुलं, फळं वगैरेंमध्ये ester प्रकारचे गोडसर रेणू असतात जे आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. (केळातलं आयसोअ‍ॅमिल अ‍ॅसिटेट एस्टर, किंवा मोसंब्यातलं ऑक्टिल अ‍ॅसिटेट एस्टर ही काही उदाहरणं.) Scents तयार करणार्‍या कंपन्या असे एस्टर्स रासायनिक प्रकियेने तयार करून विकतात. वरती मृद्गंधाचा उल्लेख आलाय. तो येतो कोरड्या मातीतल्या आणि पाला-पाचोळ्यावरच्या अ‍ॅक्टिनोमायसिटिस (Actinomycetes) या बॅक्टेरियांमुळे, पहिली सर पडली की या बॅक्टेरियांचे spores (मराठी शब्द?) हवेत उसळतात आणि आपल्याला एक distinctive, earthy सुवास येतो. ही झाली थोडीशी 'गंधगाथा'! आता सुरूवातीला म्हंटलं ती गंमतः आपल्याला कृत्रिम गंधनिर्मिती करता येते हे माणसाला कळलं, पण असा गंध एकाकडून दुसर्‍याला 'digitally' पाठवता येईल का? इ-मेल द्वारे, किंवा एखाद्या संस्थळाच्या माध्यमातून? कोण जाणे, भविष्यात मिपाच्या संस्थळावर 'स्वगृहा'वर आळं की मिसळपावाचा तर्रीदार गंध, किंवा पेठकर साहेब, सानिकाताई, गणपा, दिपक.कुवेत, स्वातिदिनेश वगैरे बल्लवाचार्यांच्या पाककृती उघडल्या की त्यांचा सुगंध, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचेल का? तर या अफलातून संशोधनाची ही किंचितशी झलकः डिजिसेंट्स ही एक लई भारी आयडिया असलेली कंपनी २००१ साली सुरू तर झाली, पण लवकरच 'झोपली'! का त्याची थोडीशी कारणमीमांसा इथे वाचायला मिळेल. अशीच दुसरी कंपनी होती सेनेक्स, याचीही आंतर्जालावर आता काही माहिती मिळत नाही. पण हार्वर्ड विद्यापीठात निर्माण होणारं ओ-नोट हे संशोधन मात्र बाजारात येण्याची शक्यता आहे. In fact, त्यांचं ओ-फोन नावाचं आय फोन चं अ‍ॅप उपलब्ध झालं आहे. त्यांच्याच ओ-स्नॅप या अ‍ॅप द्वारे आता आय-फोन धारकांना एकमेकांना फोटोबरोबर 'गंध' पाठवणं शक्य आहे म्हणे. लोणी, बाल्सॅमिक व्हिनेगार, आंबट दही, खोबरं अशा एकूण ३२ प्रकारच्या गंधाच्या मिश्रणातून २०००० प्रकारच्या 'नोट्स' तयार होतात, त्यापैकी निवडक तुम्ही तयार करून oNote द्वारा पाठवू शकता. यासाठी आय फोन ब्लूटूथने oPhone Duo नावाच्या smelling station hotspot ला जोडलेला हवा, ज्यातील oChips (एक प्रकारच्या ink cartridge) द्वारे हा गंध 'छापला' जातो, आणि तुम्हाला त्याची अनुभुती मिळते. (याचं अँड्रॉईड अ‍ॅप काही सापडलं नाही, येईलही कदाचित लवकरच.) मग काय तर, है कोई रसायनशास्त्री लाल जो मिपाके गंधोंको दुनियाभरमें पहुंचा दे?

तान्ह्या बाळाला चण्याचं पीठ लावून आंघोळ घातल्यावर त्याच्या उबदार अंगाला येणारा सुवास फारच निष्पाप वाटतो. तर, शिकेकाईने न्हायलेल्या पत्नीच्या अंगाचा वास वेगळ्याच भावना जागवतो.

भिंगरी 06/08/2014 - 09:55
धन्यवाद बहुगुणीजी, शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल. तशी थोडीफार माहिती होती पण आपण सविस्तर दिलीत. पेठकर सर , शिकेकाईचा सुगंध अजूनही 'हिरवा' ............

भिंगरी 06/08/2014 - 10:31
वा! खूप माहितीपूर्ण लेख सुबोधजी नवविवाहितांनी जरूर वाचवा.

सूड 11/08/2014 - 18:36
उकडीवरचं झाकण काढल्यानंतर येणारा वास, अनंत, चाफ्याच्या फुलांचा वास्...याहूनही आवडणारा 'पार्क अव्हेन्यु अल्टर इगो' डिओचा वास..याच्या तोडीचा दुसरा डिओ अजून मिळालेला नाही. :)

खटपट्या 04/08/2014 - 09:52
मला आवणारे काही वास !! नवीन वह्या पुस्तकांचा वास घरी रंग मारल्यावर येणारा वास. सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद करताना येणारा वास. मातीचा वास, रातराणीचा वास. संध्याकाळी धुपारत फिरवताना येणारा वास कोणत्याही हॉटेल जवळून जाताना येणारा वास, पेट्रोल चा वास, रॉकेल चा वास. गवत कापल्यावर येणारा विशिष्ट वास.

In reply to by खटपट्या

भिंगरी 04/08/2014 - 10:21
नवीन कपड्यांचा वास, बाळ बाळंतणीचा वास (धुरीचा) सोळा सोमवारच्या प्रसादाचा वास (हा वास मला आमच्या येथील माळीबुवांची आठवण देतो.ते हे उपवास मोठ्या श्रद्धेने करायचे आणि आम्ही त्यांच्या प्रसादाची वाट पाहायचो.)

आनन्दा 04/08/2014 - 16:07
एका जिवलग नातलगाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याचे शव नेताना लावलेल्या मोगरा अगरबत्ती आणि निलगिरीचा एकत्र झालेला गंध आजही कुठे जाणवला तर मला तो 'मृत्यूचा गंध'च वाटतो.
खरच!!

तिमा 04/08/2014 - 16:37
कानातल्या कुड्या काढल्यावर सुटणारा ब्युटिरिक अ‍ॅसिडचा वास कचर्‍याची बादली उघडल्यावर येणारा कुजका वास सोसायटीचे ड्रेनेज तुंबून बाहेर पसरणार्‍या पीतरसाचा वास पावसाळ्यांत कारमधे दरवाजा उघडताक्षणी येणारा कुबट वास हे वास तर आवडत नाहीच, पण केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!

In reply to by तिमा

"केमिकल लॅबमधे असलेल्या 'पायपेरिडिन' या रसायनाचा तिरस्करणीय वास!" म्हणजे काय? नाही म्हणजे एखादा वास मोहक किंवा निर्मोहक (मराठीत अनप्लेझन्ट ) असणं हे समजू शकतो. पण 'तिरस्करणीय' वास म्हणजे काय? खरोखरीच शंका आहे, कॄपया फाट्यावर मारू नये.....

In reply to by तिमा

भिंगरी 15/03/2015 - 23:44
पिंपाच्या खाली मेलेल्या उंदराचा वास तो पिंपाखालचा उंदीर मिळेपर्यंत जीव नकोसा झाला होता.

अगोचर 05/08/2014 - 02:36
नवीन रस्ता करताना बाजुला डांबर जाळतात त्याचा वास, मला शाळेत सहाविच्या सुमारास सायकल नी जायचो त्याची आठवण करून देतो. कडक उन्हाळ्यात भर दुपारी गाडी उघडली असता येणारा वास शालांत परिक्षेची आठवण करुन देतो, त्यावेळी दुपारी बारा-एकला संपायचे पेपर. उपहार गृहांसमोरून सायकल दामटताना येणारे भजी / सामोसे यांचा हवाहवासा वास आणि एसटी मधे लांबच्या प्रवासात (विशेषतः वळणावळणाच्या घाटानंतर) प्रवासाच्या शेवटी शेवटी कोंदाटणारा अणि कधी एकदा बाहेर पडु असे वाटायला लावणारा वासही आठवतो. आजकाल गाडीत एसी लावुन काचा वर केल्या की असले वास येत नाहीत. लिहिता लिहिता वाटले कि आत्ता लिहिलेले सगळे वास रस्त्याशीच निगडीत आहेत. असो !

बहुगुणी 05/08/2014 - 04:50
छान धागा, बरेच आठवणीत दडलेले गंध (आणि काही नावडते दर्पही!) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार! काही मजेशीर माहिती खाली देतो आहे, पण त्याआधी थोडंसं गंधामागचं शास्त्र (कंटाळवाणं होणार नाही अशी आशा आहे): आपल्याला केक, फळं, फुलं, अत्तर, कांदा इत्यादिंपैकी कसलाही वास येतो म्हणजे काय? तर एखाद्या वस्तू/ पदार्थाच्या पृष्ठभागावरून सहज विलग होऊ शकणारे रासायनिक कण (volatile molecules) जेंव्हा aerosol (मराठी शब्द?) बनून हवेत उसळतात आणि आपल्या नाकाच्या मागे असणार्‍या एका छोट्याशा पातळ पापुद्र्यावरच्या असंख्य मज्जा-पेशींवर (olfactory receptor neurons) जाऊन आदळतात. या पेशींच्या पृष्ठभागावर लक्षावधी प्रत्येकी निरनिराळे गंध ओळखणारे गंधग्राहक रेणू (olfactory receptors) असतात. यांद्वारे हजारो निरनिराळे गंध आपलं नाक 'ओळखू' शकतं. यांतला प्रत्येक रेणू एका जनुकापासून encode झालेला असतो. जर एखाद्या गंधग्राहकाचं जनुक कार्यरत नसेल (उदाहरणार्थ कापराचा गंधग्राहक रेणू), तर ते गंधज्ञान त्या व्यक्तींना नसतं. आता शुद्ध स्टील (ज्यापासून कुठलेच volatile molecules निघत नाहीत) अशा पृष्ठभागांना कसलाच वास येत नाही. याउलट फुलं, फळं वगैरेंमध्ये ester प्रकारचे गोडसर रेणू असतात जे आपल्या नाकापर्यंत पोहोचतात. (केळातलं आयसोअ‍ॅमिल अ‍ॅसिटेट एस्टर, किंवा मोसंब्यातलं ऑक्टिल अ‍ॅसिटेट एस्टर ही काही उदाहरणं.) Scents तयार करणार्‍या कंपन्या असे एस्टर्स रासायनिक प्रकियेने तयार करून विकतात. वरती मृद्गंधाचा उल्लेख आलाय. तो येतो कोरड्या मातीतल्या आणि पाला-पाचोळ्यावरच्या अ‍ॅक्टिनोमायसिटिस (Actinomycetes) या बॅक्टेरियांमुळे, पहिली सर पडली की या बॅक्टेरियांचे spores (मराठी शब्द?) हवेत उसळतात आणि आपल्याला एक distinctive, earthy सुवास येतो. ही झाली थोडीशी 'गंधगाथा'! आता सुरूवातीला म्हंटलं ती गंमतः आपल्याला कृत्रिम गंधनिर्मिती करता येते हे माणसाला कळलं, पण असा गंध एकाकडून दुसर्‍याला 'digitally' पाठवता येईल का? इ-मेल द्वारे, किंवा एखाद्या संस्थळाच्या माध्यमातून? कोण जाणे, भविष्यात मिपाच्या संस्थळावर 'स्वगृहा'वर आळं की मिसळपावाचा तर्रीदार गंध, किंवा पेठकर साहेब, सानिकाताई, गणपा, दिपक.कुवेत, स्वातिदिनेश वगैरे बल्लवाचार्यांच्या पाककृती उघडल्या की त्यांचा सुगंध, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचेल का? तर या अफलातून संशोधनाची ही किंचितशी झलकः डिजिसेंट्स ही एक लई भारी आयडिया असलेली कंपनी २००१ साली सुरू तर झाली, पण लवकरच 'झोपली'! का त्याची थोडीशी कारणमीमांसा इथे वाचायला मिळेल. अशीच दुसरी कंपनी होती सेनेक्स, याचीही आंतर्जालावर आता काही माहिती मिळत नाही. पण हार्वर्ड विद्यापीठात निर्माण होणारं ओ-नोट हे संशोधन मात्र बाजारात येण्याची शक्यता आहे. In fact, त्यांचं ओ-फोन नावाचं आय फोन चं अ‍ॅप उपलब्ध झालं आहे. त्यांच्याच ओ-स्नॅप या अ‍ॅप द्वारे आता आय-फोन धारकांना एकमेकांना फोटोबरोबर 'गंध' पाठवणं शक्य आहे म्हणे. लोणी, बाल्सॅमिक व्हिनेगार, आंबट दही, खोबरं अशा एकूण ३२ प्रकारच्या गंधाच्या मिश्रणातून २०००० प्रकारच्या 'नोट्स' तयार होतात, त्यापैकी निवडक तुम्ही तयार करून oNote द्वारा पाठवू शकता. यासाठी आय फोन ब्लूटूथने oPhone Duo नावाच्या smelling station hotspot ला जोडलेला हवा, ज्यातील oChips (एक प्रकारच्या ink cartridge) द्वारे हा गंध 'छापला' जातो, आणि तुम्हाला त्याची अनुभुती मिळते. (याचं अँड्रॉईड अ‍ॅप काही सापडलं नाही, येईलही कदाचित लवकरच.) मग काय तर, है कोई रसायनशास्त्री लाल जो मिपाके गंधोंको दुनियाभरमें पहुंचा दे?

तान्ह्या बाळाला चण्याचं पीठ लावून आंघोळ घातल्यावर त्याच्या उबदार अंगाला येणारा सुवास फारच निष्पाप वाटतो. तर, शिकेकाईने न्हायलेल्या पत्नीच्या अंगाचा वास वेगळ्याच भावना जागवतो.

भिंगरी 06/08/2014 - 09:55
धन्यवाद बहुगुणीजी, शास्त्रीय माहिती दिल्याबद्दल. तशी थोडीफार माहिती होती पण आपण सविस्तर दिलीत. पेठकर सर , शिकेकाईचा सुगंध अजूनही 'हिरवा' ............

भिंगरी 06/08/2014 - 10:31
वा! खूप माहितीपूर्ण लेख सुबोधजी नवविवाहितांनी जरूर वाचवा.

सूड 11/08/2014 - 18:36
उकडीवरचं झाकण काढल्यानंतर येणारा वास, अनंत, चाफ्याच्या फुलांचा वास्...याहूनही आवडणारा 'पार्क अव्हेन्यु अल्टर इगो' डिओचा वास..याच्या तोडीचा दुसरा डिओ अजून मिळालेला नाही. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
गंध ........... आपल्या जीवनात गंध हा अविभाज्य घटक आहे.(फक्त ज्यांना वासच येत नाही त्यांचे माहित नाही.)पण सर्वसाधारणपणे गंधाशी आपले जीवन निगडीत असते. सुगंधाशी जवळीक आणि दुर्गंधापासून पलायन ही सर्वसामान्यपणे गंधाविषयीची प्रतिक्षिप्त क्रिया. लहानपणापासून ते आत्तापर्यंत निरनिराळ्या गंधांशी काही आठवणी जोडलेल्या आहेत.काही सुखदायक काही वेदनादायक. लहानपणी सुट्टीमध्ये गावी जायचो (संसरी, नाशिक) त्याकाळी घरात चुली असायच्या.त्यात जळण म्हणून गोवऱ्या जाळल्या जायच्या.तो धूर घरातील सर्व वस्तूंना प्रेमाने आपल्या कवेत घ्यायचा.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१३

अत्रुप्त आत्मा ·

हा भागही आवडला ! अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे! बोलके शब्द !

आमच्या लग्नातला, कानपिळीचा प्रसंग उभा राहिला. मेहूण्याला आधीच तंबी दिली होती, तू काय एकदाच कान पिळशील.पण तुझी बहिण रोज माझे कान उपटणार आहेच.त्यामुळे तिच्यासाठी तरी थोडा कान शिल्लक ठेव. त्याने बिचार्‍याने मुकाटपणे फोटो पुरता माझ्या कानाला हात लावला.आता तो माझ्या तंबीला घाबरला, की आदल्या दिवशीच्या बियरला जागला, हे त्याचे त्यालाच ठावूक. अर्थात, नंतरच्या भाऊबीजेला, बियर-पार्टीला मात्र न चुकता आला. असो, बियर पण बर्‍याच वेळा कामी येते.

रेवती 04/08/2014 - 01:38
छान लिहिलय हो गुर्जी! त्या मख्ख भावाचा किस्सा वाचून हसू आले. कानपिळीचा खरा अर्थ समजला. आता तुमचे लगीन कधी होतेय याची संपूर्ण मिपागाव वाट पाहतेय.

भिंगरी 04/08/2014 - 06:54
मला खरंच कानपिळीचा अर्थ माहित नव्हता. आमच्याकडे तर नवरीचा भाऊ बोटात बारीक खडा घेऊन कान पिळतो. कान चांगलाच लाल होतो. बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.

In reply to by भिंगरी

@बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.>>>. यात धार्मिक लोकसहभागानीच.. नविन/जुनी = आवश्यक रुढि पडेल..पडली पाहिजे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 04/08/2014 - 16:18
होळकरशाही वरून आठवलं, कात्रजहून हडपसरला येत असताना वाटेत हांडेवाडीच्या आसपास एके ठिकाणी 'शिंदे-होळकर शुभविवाह' अशी पाटी वाचून क्षणभर फिस्सकन हसू आलं होतं.

प्रचेतस 06/08/2014 - 09:53
गुर्जींंचे संवाद ऐकणे ही पर्वणी असते. लै भारी झालाय हा भाग.

कंजूस 07/08/2014 - 17:12
मजेदार लिहिता . लग्नात गमतीजमती होतातच पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते .

In reply to by कंजूस

मोठ्या वयाच्या नवरानवरीला पण विधींचे / मंत्रांचे अर्थ जाणून घेण्याची फारशी इच्छा असतेच असे नाही ;) लग्नसमारंभ म्हणजे लग्नाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता घेण्याचा विधी इतकेच बहुदा समजले जाते. यावरून लग्नात कोणाचा काय स्वार्थ असतो त्याबद्दल एक संस्कृत श्लोक आहे त्याची आठवण झाली पण शब्द आठवत नाहीत... विहिणीना चांगले कपडे, दागीने वगैरे घालून मिरवायला, इतरेजनांना मेजवानी ओरपायला,... असे काहीसे... श्लोकासाठी, बॅटमन यांना आवताण... बॅटमन यांना आवताण...

In reply to by सूड

यकदम् कर्रेट्टम् ॥ :) बघा म्हणजे. कोणाला काय हवे ते फार पूर्वीपासूनच माहीत होते की नाही ? ;) माणुसप्राणी फार पूर्वीपासूनच लै हुश्श्यार हाय :)

In reply to by कंजूस

@पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते.>>> विवाहसंस्कारात चालणारे "हे सगळे प्रकार" आंम्ही लोक कधिही करायला सांगत नाही,लग्नसोहळा हा लोकसहभागानी असल्या हजारो गोष्टी घेऊन येत आलेला आहे/राहिल. चालू जमान्यातले(गेल्या१५ वर्षातले..) न वर देवाच्या ;) चपला/बुटाडं पळविणे.माळा घालताना-उचलणे..इत्यादी.. गुरुजिंनी सांगण्याचा काहि संमंध दिसतो का? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 07/08/2014 - 19:41
>>संमंध दिसतो का? मला तरी असा संमंध, देवचार, मुंजा वैगरे काही दिसलेला नाही. आता त्या संमंधाचा या संमंधाशी काही 'संबंध' आहे का ते माहित नाही. ;)

हा भागही आवडला ! अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे! बोलके शब्द !

आमच्या लग्नातला, कानपिळीचा प्रसंग उभा राहिला. मेहूण्याला आधीच तंबी दिली होती, तू काय एकदाच कान पिळशील.पण तुझी बहिण रोज माझे कान उपटणार आहेच.त्यामुळे तिच्यासाठी तरी थोडा कान शिल्लक ठेव. त्याने बिचार्‍याने मुकाटपणे फोटो पुरता माझ्या कानाला हात लावला.आता तो माझ्या तंबीला घाबरला, की आदल्या दिवशीच्या बियरला जागला, हे त्याचे त्यालाच ठावूक. अर्थात, नंतरच्या भाऊबीजेला, बियर-पार्टीला मात्र न चुकता आला. असो, बियर पण बर्‍याच वेळा कामी येते.

रेवती 04/08/2014 - 01:38
छान लिहिलय हो गुर्जी! त्या मख्ख भावाचा किस्सा वाचून हसू आले. कानपिळीचा खरा अर्थ समजला. आता तुमचे लगीन कधी होतेय याची संपूर्ण मिपागाव वाट पाहतेय.

भिंगरी 04/08/2014 - 06:54
मला खरंच कानपिळीचा अर्थ माहित नव्हता. आमच्याकडे तर नवरीचा भाऊ बोटात बारीक खडा घेऊन कान पिळतो. कान चांगलाच लाल होतो. बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.

In reply to by भिंगरी

@बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.>>>. यात धार्मिक लोकसहभागानीच.. नविन/जुनी = आवश्यक रुढि पडेल..पडली पाहिजे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 04/08/2014 - 16:18
होळकरशाही वरून आठवलं, कात्रजहून हडपसरला येत असताना वाटेत हांडेवाडीच्या आसपास एके ठिकाणी 'शिंदे-होळकर शुभविवाह' अशी पाटी वाचून क्षणभर फिस्सकन हसू आलं होतं.

प्रचेतस 06/08/2014 - 09:53
गुर्जींंचे संवाद ऐकणे ही पर्वणी असते. लै भारी झालाय हा भाग.

कंजूस 07/08/2014 - 17:12
मजेदार लिहिता . लग्नात गमतीजमती होतातच पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते .

In reply to by कंजूस

मोठ्या वयाच्या नवरानवरीला पण विधींचे / मंत्रांचे अर्थ जाणून घेण्याची फारशी इच्छा असतेच असे नाही ;) लग्नसमारंभ म्हणजे लग्नाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता घेण्याचा विधी इतकेच बहुदा समजले जाते. यावरून लग्नात कोणाचा काय स्वार्थ असतो त्याबद्दल एक संस्कृत श्लोक आहे त्याची आठवण झाली पण शब्द आठवत नाहीत... विहिणीना चांगले कपडे, दागीने वगैरे घालून मिरवायला, इतरेजनांना मेजवानी ओरपायला,... असे काहीसे... श्लोकासाठी, बॅटमन यांना आवताण... बॅटमन यांना आवताण...

In reply to by सूड

यकदम् कर्रेट्टम् ॥ :) बघा म्हणजे. कोणाला काय हवे ते फार पूर्वीपासूनच माहीत होते की नाही ? ;) माणुसप्राणी फार पूर्वीपासूनच लै हुश्श्यार हाय :)

In reply to by कंजूस

@पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते.>>> विवाहसंस्कारात चालणारे "हे सगळे प्रकार" आंम्ही लोक कधिही करायला सांगत नाही,लग्नसोहळा हा लोकसहभागानी असल्या हजारो गोष्टी घेऊन येत आलेला आहे/राहिल. चालू जमान्यातले(गेल्या१५ वर्षातले..) न वर देवाच्या ;) चपला/बुटाडं पळविणे.माळा घालताना-उचलणे..इत्यादी.. गुरुजिंनी सांगण्याचा काहि संमंध दिसतो का? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सूड 07/08/2014 - 19:41
>>संमंध दिसतो का? मला तरी असा संमंध, देवचार, मुंजा वैगरे काही दिसलेला नाही. आता त्या संमंधाचा या संमंधाशी काही 'संबंध' आहे का ते माहित नाही. ;)
लेखनप्रकार
http://misalpav.com/node/28048 >>> आणि मग "गुर्जी..प्लीज तुंम्ही सांगा ना एखादा ठेवणीतला..उखाणा" अश्या विनंत्या सुरु होतात.मग आंम्ही ............,चं नाव घेऊन,बांधते मंगल गाsssssठ गुर्जी आले मदतीला,कारण नव्हता उखाणा पाsssssठ!!! असा टाइम'बॉम्ब उडवतो... मग फोटुवाल्यांसह सगळे बेजान हसतात,आणि...खेळ पुढे सरकतो! ============== होम म्हटला की मग तो वास्तूशांतिचा असो, किंवा हा विवाहहोम असो.

(कॉफी कशी करावी?)

पुण्याचे वटवाघूळ ·

नूतन सावंत 30/04/2015 - 11:36
तुमची कॉफी छानच लागत असेल पण या पद्धतीनेही करून पहा कधीतरी.एक कप कॉफीसाठी रिकामा कप घेऊन त्यात एक चमचा साखर व आवडीप्रमाणे अर्धा ते पाउण चमचा नेस्कॅफे घालून मोजून चार थेंब पाणी घालून चमच्याने घोटायला सुरुवात करावी.साधारण मिनिटभर र्घोटावे लागते.या अवधीत साखर वितळून मश्रन फिके चॉकलेटी दिसू लागते.त्यावर कपभर उकळते दुध ओतून ढवळावे,स्वादस्ष्ट फेसाळलेली कॉफी तयार.वासानेच समाधान होते.

In reply to by नूतन सावंत

या पद्धतीने कॉफी मस्त लागते. फक्त कॉफी घोटतांना चार थेंब पाण्याच्याऐवजी बर्फाचा एक खडा टाकून घोटते.

In reply to by नूतन सावंत

एकदम मस्स्त फेस येतो. कुठेतरी घरगुती एस्प्रेस्सो तयार करायची पद्धत म्हणून हा प्रकार वाचला होता. (मी पाण्याऐवजी अर्धा-एक चमचा दूध टाकतो. आणि बहुतेक वेळा थंडगार दूधाने ग्लास भरतो)

तिमा 01/05/2015 - 20:42
कॉफी कशीही करा, पण पिण्यापूर्वी एक चमचा कंडेन्स्ड मिल्क घाला आणि ढवळा. अमृततुल्य चव येते.

झकास 01/05/2015 - 21:36
मद्रास कॉफी म्हणजे नक्की काय? filter coffee का?

नूतन सावंत 30/04/2015 - 11:36
तुमची कॉफी छानच लागत असेल पण या पद्धतीनेही करून पहा कधीतरी.एक कप कॉफीसाठी रिकामा कप घेऊन त्यात एक चमचा साखर व आवडीप्रमाणे अर्धा ते पाउण चमचा नेस्कॅफे घालून मोजून चार थेंब पाणी घालून चमच्याने घोटायला सुरुवात करावी.साधारण मिनिटभर र्घोटावे लागते.या अवधीत साखर वितळून मश्रन फिके चॉकलेटी दिसू लागते.त्यावर कपभर उकळते दुध ओतून ढवळावे,स्वादस्ष्ट फेसाळलेली कॉफी तयार.वासानेच समाधान होते.

In reply to by नूतन सावंत

या पद्धतीने कॉफी मस्त लागते. फक्त कॉफी घोटतांना चार थेंब पाण्याच्याऐवजी बर्फाचा एक खडा टाकून घोटते.

In reply to by नूतन सावंत

एकदम मस्स्त फेस येतो. कुठेतरी घरगुती एस्प्रेस्सो तयार करायची पद्धत म्हणून हा प्रकार वाचला होता. (मी पाण्याऐवजी अर्धा-एक चमचा दूध टाकतो. आणि बहुतेक वेळा थंडगार दूधाने ग्लास भरतो)

तिमा 01/05/2015 - 20:42
कॉफी कशीही करा, पण पिण्यापूर्वी एक चमचा कंडेन्स्ड मिल्क घाला आणि ढवळा. अमृततुल्य चव येते.

झकास 01/05/2015 - 21:36
मद्रास कॉफी म्हणजे नक्की काय? filter coffee का?
एक कप कॉफीला अर्धा कप पाणी ...दोन चमचे साखर घाला...एक चमचा कॉफी घाला... उकळा ...बाजूला दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवा. कॉफी चांगली २ मिनिटे मुरु द्या आणि मग अर्धा कप दुध घाला. हि सर्वसामान्य पद्धत. पण कॉफी 'नक्की' कशी करावी ???

चहा नक्की कसा करावा ??

अत्रन्गि पाउस ·

चित्रगुप्त 03/08/2014 - 17:25
अगदी पहाटे मी स्वतःपुरता चहा करून पितो तो असा: अगदी थोडेसे पाणी घेऊन त्यात पाऊण कप दूध, एक चमचा साखर घालून उकळवतो. मग त्यात एक लहान चमचा टाटा गोल्ड चहापत्ती टाकून जरासे उकळवल्यावर थोडेसे आले किसून टाकतो. पुन्हा अल्पकाळ उकळल्यावर बनलेला पाऊण कप चहा पितो. सकाळी घरची मंडळी उठल्यावर जो जसा चहा बनवेल, तो अर्धा कप घेतो, आवडला नाही, तर टाकून देतो.

आयुर्हित 03/08/2014 - 17:29
शास्त्रिय पद्धतः १)एका चीनीमातीच्या सुरईमध्ये १ ग्रॅम चहा पावडर(ग्रिन्/ब्लॅक्/व्हाईट)टाकावी. २)मातीच्या माठातले/तांबाच्या हंड्यातील सामान्य तापमान असलेले २४० मिलीलिटर पाणी एका स्टीलच्या पातेल्यात घ्यावे व चुल्यावर्/हॉटप्लेट्/गॅस ठेवावे व खळ्खळ उकळी फुटल्यावर लगेचच चहा टाकलेल्या सुरईत ओतावे व सुरईचे झाकण बंद करावे. ३)ग्रिन टी साठी ३ ते ४ मिनिटे,ब्लॅक टी साठी ४ ते ६ मिनिटे व व्हाईट टी साठी ३ मिनिटे झाल्यावर सुरईतील तयार चहा कपात गाळून घ्यावा व शक्यतो तसाच प्यावा. ४)ब्लॅक टी बरोबर अर्धा लिंबू पिळुन प्याला तरी चालेल. ४)काही लोकांना दुध टाकून घ्यायचे असेल तर साय नसलेले दुधच टाकावे. ५)पांढरी साखर सर्वात वाईट असते. त्यामूळे साखर न घालता मध/गूळ घालावा.नाहिच तर ब्राऊन शुगर घालावी.

कंजूस 03/08/2014 - 20:14
मला दुधाट चहा नाही आवडत .शंकरविलास छाप चहाची राडपण नको असते .पाण्यात साखर टाकून उकळल्यावर चहा पावडर टाकून जरासेच उकळून गाळायचा .दुध पाण्यात तापवायचे (गैसवर पसरट भांडयात पाणी ठेवून त्यात दुधाचे भांडे ठेवायचे ).सरळ गैसवरच तापवल्याने रापते आणि दुधाचा वास चहाला येतो .हे दुध घातले की झाला माझा पहिला चहा .केलेला ,करून ठेवलेला चहा पुन्हा गरम करून पीत नाही .चहा आणि लग्न रिपेअर होत नाहीत असे माझे वैयक्तिक मत .रेल्वे प्रवासात डिपवाला शक्यतो टाळतो .असे पण तोंड धुवायला गरम पाणी म्हणून घ्यावे लागते कधीकधी .

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 10/08/2014 - 22:56
रेल्वे प्रवासात डिपवाला चहा साखरेचा असतो, म्हणून बिनासाखरेचा चहा मिळतो का म्हणून अनेक वर्शांपूर्वी एकदा आगगाडीतल्या चहा बनवणारापर्यंत पहुचलो. तिथे जे पाणी चहासाठी वापरत होते, ते बघून आजतागायत रेल्वेतला चहा- कॉफी प्यायची हिंमत झालेली नाही.

In reply to by चित्रगुप्त

खटपट्या 11/08/2014 - 08:20
मागे एकदा रेल्वेतील संडासच्या नळाचे पाणी चहासाठी वापरत आहेत असे टीवीवर दाखवले होते.

रमेश आठवले 03/08/2014 - 20:57
चहा दुधासह उकळून पिण्याची पद्धत आपल्याकडे आहे. इतर देशात कोरा पिण्याची किंवा पाणी उकळल्यावर दुध पाणी मिश्रण करून पिण्याची पद्धत आहे. त्यातसुद्धा कपात आधी दुध आणि मग पाणी घातल्याने चहा जास्त चांगला होतो अशी मान्यता आहे. जपानमध्ये काही जण एकत्र चहा पीत असले तर चहा पिण्याचा औपचारिक समारंभ होतो. इंग्लंड मध्ये हाय टी म्हणजे चहा बरोबर काही नास्त्याचे पदार्थ असा करतात.

सर्व प्रथम साखर पत्ती सोबत पाणी उकलु द्यायचे आणि मग दूध टाकल्यावर थोडं उकळु द्यायचं आणि मग चहा घ्यायचा..! मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! *sad*

मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! Sad
बिरुटे सर, माझ्या मते या प्रकारची नकारात्मक भूमिका घेण्याचं कारण नाही. मिपावर अनेक अत्यंत वाचनीय लेख येतात. तसंच हे संवादमाध्यम असल्यामुळे कुठच्याही साध्याशा विषयावरूनही संवाद सुरू होऊ शकतो. अशा संवाद साधण्याच्या प्रयत्नाला फालतू म्हणून हिणवणं ठीक वाटलं नाही. आणि अशा मौजमजेच्या धाग्यांचीही परंपरा मिपावर आहे - उदाहरणार्थ गुलाबजामच्या पाकाचं काय करता येईल? यावर पराने दिलेली पाकातल्या वड्यांची कृती विसरता येईल का? किंवा त्यानंतर आलेला 'आंबे कसे निवडावे?' हा धागा पहा. तो काही लांबी, विषयाची व्याप्ती, लेखनातलं लालित्य, या कुठच्याच निकषावर या 'चहा कसा करावा?' पेक्षा अधिक सरस नाही. त्या लेखाला तुम्हीच भरपूर प्रतिसाद देऊन तो धागा वाचनीय केलेला आहे. शेवटी धागा काय आहे यापेक्षा प्रतिसाद कसे येतात यावर दर्जा ठरतो.

In reply to by राजेश घासकडवी

स.न.वि.वि. मिपावर वाचनीय लेख असतात, उत्तम चर्चा होतात, मिपासारखं अभिव्यक्त होण्यासाठी माहितीबरोबर आनंद मिळविण्यासाठी मिपासारखं समृद्ध असं संकेतस्थळ आंतरजालावर दुसरं कोणतं नाही. (टाळ्या) मिपाचं अजून कौतुक केलं असतं पण अनेकांना त्रास होतो म्हणुन आवरतो (लै भारी) पूर्वी काय होतं आणि काय होतं आता त्याची तुलना करण्यापेक्षा आता उत्तम काय व्यक्त होता ते झालं पाहिजे, ते आलं पाहिजे, असेच निरर्थक धागे यायला लागला की मग बोअर होतं, (मला तरी) प्रतिसादाचं रतीब घालायचं तर ते कसेही घालता येतात. (अंडे घालूनही चहा करता येतो) आम्हीही पूर्वी असे रतीब घातले आहेत. आता कोणी तसं करु नये, असे माझं मत नाही. पण,कुछ हटके नको का, असं माझं व्यक्तिगत मत आहे. (टाळ्या) आताही चहा झाली की लगेच पहा इथे कॉफी आली. चहाचा धागाही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करता आला असता. पाण्यात साखर विलायची, सुंठ, घालण्याच्या पद्धती, उकळण्याच्या पद्धती, गवती चहा, कोरा चहा वीथ लिंबू, आरोग्यासाठी फायदे तोटे, जालावरचा विदा, असं काही असलं की मग धाग्यापेक्षा प्रतिसाद भारी होतात, हे मान्यच. आणि असेच लेखन आलं पाहिजे असं मला वाट्तं (टाळ्या) उद्या ढुंगण कसं धुवायचं याच्यावर धागे काढायचेत का (हशा) अशा धाग्यात माहिती असेल पण काही संकेत नको का पाळायला ? साहित्य हा समाजाचा आरसा असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे घडतं ते अधिक सकसपणे जालावरील लेखनात आलं पहिजे. भाषा, माणूस, लेखन, मैत्री आणि विचारांचे आदानप्रदान ही आंतरजालाची देणगी आहे, तिचा योग्य वापर झाला तर मिपासारखं संकेतस्थळं अजून समृद्ध होईल असे मला वाट्ते. एवढे बोलून मी थांबतो. (टाळ्या) अवांतर : मी एवढा चांगला प्रतिसाद लिहिला आहे. कृपया उपप्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादापेक्षा सरस प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करु नये, करायचा असेल तर तो मला व्य.नि. ने करावा. *smile* -दिलीप बिरुटे

पेट थेरपी 04/08/2014 - 06:05
पाणी गरम करून ठेवाच्चं. मग त्यात दीड चमचा साखर- पांढरीच घालाच्ची. त्यास उकळी फुटू लागली की चहा पत्ती( सोसयटी/ रेड लेबल) एक चहाचा चमचा घालाच्ची. आमच्या लहानपणी चहा-साखरेचे बारके डबे स्टीलचे मिळत त्याबरोबर चहाचा व साखरेचा चमचा मिळे. साखरेचा अंमळ मोठा असतो. शेजारी गॅसवर, ताजे असले तर बरे, दूध गरम करायला ठेवायचे. चहाला उकळल्यावर लगेच गॅस बंद करून चहावर झाकण ठेवायचे. चहा मुरू द्यायचा. मग तो गाळायचा व त्यात दूध घालायचे. आवडी प्रमाणे. आमच्या सासूबाही फार दुधाचा चहा करतात तर आम्हास तो मस्त चहा कलरचाच आवडतो. बरोबरीने एखादे मारी/ मोनाको बिस्किट पुडा घ्यायचा. व गरमच प्यायचा. ग्रीन टी मला आजिबातच आवडला नाही. जालीय वाद किंवा ताजा हार्ड कॉपी पेपर ह्याबरोबर अश्या चहाचे घुटके घ्यावे. २० मिनीटे अति सुखाची जातात.

मदनबाण 04/08/2014 - 09:19
कधी काळी तमिळनाडु मधील चहाच्या मळ्यात मनसोक्त बागडलो होतो त्याची आठवण आली. :) मला एकदा तरी काश्मिरी कहावा प्यायची इच्छा आहे. :) आता चहाचा आणि मळ्याचा विषय आलाच आहे तर दोन फोटु देतो. :) चहाची तोडणी करणार्‍या स्त्रीया. P1 मी आणि चहाचा मळा. { एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. ;) माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. } P2 (चहा प्रेमी} :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. Wink माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. वेल डन ! डर डर के जिये तो क्या जिये !! “To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 04/08/2014 - 09:55
“To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच वाह... क्या बात हय ! :) धन्स. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

धन्या 04/08/2014 - 14:37
बाणाच्या स्वतःच्या फोटोतील "विठ्ठल" पोजला आता "मिपा पोज" म्हणावयास हरकत नाही. बाकी आम्ही चहा करण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही टपरीवर, हॉटेलात, कॅफेटेरीयात जिथे कुठे मिळेल तिथे चहा पितो. अगदी अ‍ॅसिडीटी होईपर्यंत, तोंड येईपर्यंत. तोंड आले की चहा पिणे थांबवतो, तोंडाला आतून स्मायलोजेल लावतो आणि तोंड जाण्याची वाट पाहतो. तोंड गेले की पुन्हा चहा पिणे सुरु. :)

तिमा 04/08/2014 - 09:59
दिल्ली स्टेशनवर एकदा रेल्वे स्टॉलवर चहा मागितला होता. त्याने चहाची पूड गाळण्यात टाकली आणि वरुन उकळते पाणी+ दूध याची धार ओतली. खाली फिल्टर झालेल्या रसायनाची चव अगदी ओळखीची वाटत होती. डोक्याला जरा ताण दिल्यावर लक्षांत आले की ती ओळखीची चव पाण्याची होती! इतका वाईट चहा मी आयुष्यात प्रथमच प्यायलो.

आनन्दिता 04/08/2014 - 10:06
एक पातेलं घ्या हातात उंच धरून त्यातून बल्बकडे पहा बुडाला भोक नसावे…. चहा बनायच्या आधीच गळू शकतो ! सिलेंडर, पाईप चं लीकेज तपासून घ्यावे जाम बेक्कार बाबा … अख्खा माणुस जळू शकतो ! आता साखर, पावडर, दुधाच्या शोधात निघावं हा सगळा मामला … फडताळातच कुठेतरी मिळू शकतो ! पाण्यात साखर, पावडर उकळायला ठेवावी पाचेक मिनिट तरी लागतात तेव्हढ्या वेळात आरामात कुठेतरी लोळू शकतो ! वेलचीची चिमट टाकून दार लावायला धावावे शेजार्याचीच जात ती… तुमच्याकडे चहा बनतोय झटक्यात त्यांना कळू शकते ! उगीच ते येणार, हॅ हॅ हॅ .. चहा केलात वाटतं कोणी सांगितलंय… आपण हे टाळू शकतो ! इथे वेळ येते ती दुध टाकायची यावेळी थोडं सावध हं… नैतर चहा पातेल्याच्या बाहेर पळू शकतो ! हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! सांडशी मात्र सापडायलाच हवी फालतुमधे हात पोळू शकतो! बघत बघता झाला की हो चहा तुमचा भुरका मारा किंवा कसाही जो तो त्याच्या पद्धतीने गिळू शकतो !

In reply to by आनन्दिता

@हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif =============== दुत्त दुत्त आ...नंन्दिता! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif मिपा जिल्बिकर संघात तुझे स्वागत आहे.. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

सुहास.. 04/08/2014 - 10:15
एक उकळलेले गरम पाणी सोडल , तर सगळाच चहा हा चविष्ट प्रकार असतो. १ ) गुळाचा चहा , गावाकडे गेलो की सहसा गुळाचाच चहा होतो , गुळचट जरी असला तरी , जर गवती असेल तर क्लास च वाटतो प्यायला !! हेल्दी असतो म्हणे ... २ ) तमीलनाडु कडे स्टॉलवर चहा बनवायची पध्दत आणि त्यामुळे त्याला येणारी चव वेगळीच असते , एकीकडे चहाच पाणी गरम होत असते , दुसरीकडे दुध , सर्व्ह करताना, चहाकरी , ;) आधी स्टीलच्या वा ग्लासमध्ये साखर घालतो, आणि मग दोन ग्लास मध्ये मग फिरवुन मग देण्यात येतो ..मस्त !! ३ ) इराण्याकडचा चहा , पुणे , कॅम्पात , दोनचार ठिकाणी अजुन ही मिळतो ..एक अतिशय वेगळी चव असते. ४ ) पुणेरी पध्दत तर सर्व सर्वश्रुत आहे , त्यात चहाला येणार रंग आणि गंध ही शामील होतात, अगदी दुकानाच्या शेजारुन गेले तरी सुंगध दरवळुन जातो. ५ ) मी माझ्या काही गुजराती मित्रांकडे ( होय , पुण्यातच ;) ) मसाला चहा प्यायलो आहे . त्या ला येणारा सुगंध आणि चव ही वेगळीच असते . माझ...मला पुर्ण दुधाचा, ते ही पाकीटाच दुध नाही, ताज, थोडं आलं आणि इलायची घालुन, जर्मनच्या पातेल्यात केलेला, स्टीलच्या ग्लास मध्ये आवडतो. पसंद अपनी अपनी

अनुप कोहळे 04/08/2014 - 10:25
अर्धा कप पाणी घ्यावे, त्यात आलं आणी विलायची कुटून घालावी. उकळी आल्यावर त्यात एक चमचा प्रति कप प्रमाणे चहा पत्ती टाकावी. चांगले उकळू द्यावे. नंतर त्यात आर्धा कप दूध घालवे आणि रंग आपल्या आवडीनुसार येई पर्यंत उकळू द्यावे. कपात गाळून पारले G बरोबर आस्वाद घ्यावा......

In reply to by आयुर्हित

आनन्दिता 04/08/2014 - 18:40
काका भारी गेस !! पण प्रस्तुत कवितेत अत्रंगी पाउस यांना चहा कसा करायचा हे सांगितले आहे त्यामुळे इथे त्यांच्या बायकोच्या रुमालाबद्दल लिहिलंय.. सो बेटर लक नेक्स्ट टाइम हं!! *biggrin*

गणपा 04/08/2014 - 14:00
चहाच्या वाटेला फारसा जात नाही पण जर जोडीला फारसाण असेल तर मग त्यासारखं दुसरं अमृत नाही. गरमा गरम चहात बचका भर ताजं फरसाण टाकावं. २ मिनीटांनी चमच्याने ते ओरपावं आणि मग मगात उरलेल्या चहाला जी चव येते यवं रे यवं...

In reply to by गणपा

गम्पाभौ ... आपल्या सारख्या तज्ञ लोकांचा प्रतिसाद आल्याने फार बरे वाटले ...चहा + फरसाण तडक करून बघण्यात येईल.... __/\__

पैसा 04/08/2014 - 14:50
चिं. वि. जोशींच्या एका चिमणराव लेखात मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी "चहा कसा करतात?" हा प्रश्न विचारल्यावर तिने "आम्ही किनै, चहाला राकेलची फोडणी देतो!" हे उत्तर दिल्याचं आठवलं! *biggrin* बाकी चहा अजिबात उकळायचा नाही आणि काफी मात्र मस्त उकळायची हे माझे आवडते प्रकार. मोठ्या हाटेलांमधे हमखास थंड चहा मिळतो तर रस्त्यावर एकदम मस्त तरतरी आणणारा हा सर्वसामान्य अनुभव आहे. केरळच्या नेत्रावती वगैरे रेल्वेत "चाया" नावाने काफीसारखं लागणारं एक कसलंतरी पांचट पेय देतात. चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!

In reply to by पैसा

राकेलची फोडणी >>> =))
चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!
=)) पै.तै, चार चमचे साखर ....बापरे ...मग ह्या पाककृतीला "सुधारस" म्हणावे असा एक बदल सुचवत आहे *biggrin*

In reply to by पैसा

मी नोकरीत असताना माझ्या ऑफिसमधे एक 'भट' आडनावाचा महाभाग होता. त्याला एका कपात ७ चमचे साखर लागायची. (डॉक्टरांनी सांगितलय अशी थाप ठोकायचा) त्याचा चहा (?) कधी चुकून आपल्या टेबलवर आला आणि एक घोट घेतला तरी दिवसभर त्रास व्हायचा.

बॅटमॅन 04/08/2014 - 15:17
चहा अन कॉफीसारख्या उत्तेजक पेयांपासून दूर असल्याने आमचा पास. पण प्रतिसाद रोचक आहेत, वाचायला मजा येते आहे. (कधीमधी ग्रीन टी (मित्रभाषेत गोमूत्र) पिणारा) बट्टमण्ण.

बॅटमॅन 04/08/2014 - 16:06
इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण गीतेतली रेशिपी कुणी ट्राय करताना दिसत नाही. भगवंत म्हणतात, 'सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो |" अर्थात, सर्वांनी चहा करावा तो सन्नि नामक विशिष्ट ष्टोव्हवरतीच. तसे केल्यास तो हृदयात जाऊन बसतो.

In reply to by बॅटमॅन

असंका 04/08/2014 - 19:14
मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। याचाही अर्थ सांगून उपकृत करावे ही विनंती. ही पोह्यांची रेसिपी असावी काय?

In reply to by असंका

बॅटमॅन 04/08/2014 - 19:26
गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच गहन आहे, अतएव एका वाक्याचे अनेक अर्थ असतात. पैकी वरील वाक्याचा 'भूक लागून माजल्यागत केल्यास ज्ञानी माणूस पोहे करतो' हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ 'माजलेल्या स्मृतीला जाणून नमक घालून पोहे करावे' हा एक अर्थ आहे. शिवाय 'मतदान कुणाला केले याची स्मृती कळू न देण्यासाठी म्हणून पोहावे' असाही अर्थ आहे पण तो इतका प्रचलित नाही. हे माझ्या अल्पबुद्धीला समजतील इतकेच अर्थ दिलेले आहेत. पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.
किंव्वा संक्षी *biggrin*

In reply to by बॅटमॅन

असंका 05/08/2014 - 10:01
वा वा! धन्य झालो प्रभू!! आणि इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा चहा आणला असं मानणार्या लोकांनी याचा विचार अवश्य करावा...

यशोधरा 05/08/2014 - 07:25
चहाचे आधण चढवायचे साखर घालून आणि मग पाण्याला उकळी फुटली की त्यात चहापत्ती टाकून २० एक सेकंदांनी गॅस बंद करायचा. पत्ती मुरायला हवी. चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातला जातो - ते कॉमन आहे - पण कधी आधण उकळताना त्यात हळदीचं पान घालून पहा. सुरेख स्वाद येतो चहाला. चहा गाळून घ्यायचा आणि कपात ओतताना दूध घालायचं असल्यास, आधी दूध घालून त्यावर चहा ओतायचा. अहाहा!

सूड 11/08/2014 - 15:05
>>चहा 'नक्की' कसा करावा ?? मित्राला विचारावं, बाबा रे नक्की चहा पाजणारेस ना? तो हो म्हणाला तर चहा 'नक्की' होतो आणि आपण निश्चिंत!!

चित्रगुप्त 03/08/2014 - 17:25
अगदी पहाटे मी स्वतःपुरता चहा करून पितो तो असा: अगदी थोडेसे पाणी घेऊन त्यात पाऊण कप दूध, एक चमचा साखर घालून उकळवतो. मग त्यात एक लहान चमचा टाटा गोल्ड चहापत्ती टाकून जरासे उकळवल्यावर थोडेसे आले किसून टाकतो. पुन्हा अल्पकाळ उकळल्यावर बनलेला पाऊण कप चहा पितो. सकाळी घरची मंडळी उठल्यावर जो जसा चहा बनवेल, तो अर्धा कप घेतो, आवडला नाही, तर टाकून देतो.

आयुर्हित 03/08/2014 - 17:29
शास्त्रिय पद्धतः १)एका चीनीमातीच्या सुरईमध्ये १ ग्रॅम चहा पावडर(ग्रिन्/ब्लॅक्/व्हाईट)टाकावी. २)मातीच्या माठातले/तांबाच्या हंड्यातील सामान्य तापमान असलेले २४० मिलीलिटर पाणी एका स्टीलच्या पातेल्यात घ्यावे व चुल्यावर्/हॉटप्लेट्/गॅस ठेवावे व खळ्खळ उकळी फुटल्यावर लगेचच चहा टाकलेल्या सुरईत ओतावे व सुरईचे झाकण बंद करावे. ३)ग्रिन टी साठी ३ ते ४ मिनिटे,ब्लॅक टी साठी ४ ते ६ मिनिटे व व्हाईट टी साठी ३ मिनिटे झाल्यावर सुरईतील तयार चहा कपात गाळून घ्यावा व शक्यतो तसाच प्यावा. ४)ब्लॅक टी बरोबर अर्धा लिंबू पिळुन प्याला तरी चालेल. ४)काही लोकांना दुध टाकून घ्यायचे असेल तर साय नसलेले दुधच टाकावे. ५)पांढरी साखर सर्वात वाईट असते. त्यामूळे साखर न घालता मध/गूळ घालावा.नाहिच तर ब्राऊन शुगर घालावी.

कंजूस 03/08/2014 - 20:14
मला दुधाट चहा नाही आवडत .शंकरविलास छाप चहाची राडपण नको असते .पाण्यात साखर टाकून उकळल्यावर चहा पावडर टाकून जरासेच उकळून गाळायचा .दुध पाण्यात तापवायचे (गैसवर पसरट भांडयात पाणी ठेवून त्यात दुधाचे भांडे ठेवायचे ).सरळ गैसवरच तापवल्याने रापते आणि दुधाचा वास चहाला येतो .हे दुध घातले की झाला माझा पहिला चहा .केलेला ,करून ठेवलेला चहा पुन्हा गरम करून पीत नाही .चहा आणि लग्न रिपेअर होत नाहीत असे माझे वैयक्तिक मत .रेल्वे प्रवासात डिपवाला शक्यतो टाळतो .असे पण तोंड धुवायला गरम पाणी म्हणून घ्यावे लागते कधीकधी .

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 10/08/2014 - 22:56
रेल्वे प्रवासात डिपवाला चहा साखरेचा असतो, म्हणून बिनासाखरेचा चहा मिळतो का म्हणून अनेक वर्शांपूर्वी एकदा आगगाडीतल्या चहा बनवणारापर्यंत पहुचलो. तिथे जे पाणी चहासाठी वापरत होते, ते बघून आजतागायत रेल्वेतला चहा- कॉफी प्यायची हिंमत झालेली नाही.

In reply to by चित्रगुप्त

खटपट्या 11/08/2014 - 08:20
मागे एकदा रेल्वेतील संडासच्या नळाचे पाणी चहासाठी वापरत आहेत असे टीवीवर दाखवले होते.

रमेश आठवले 03/08/2014 - 20:57
चहा दुधासह उकळून पिण्याची पद्धत आपल्याकडे आहे. इतर देशात कोरा पिण्याची किंवा पाणी उकळल्यावर दुध पाणी मिश्रण करून पिण्याची पद्धत आहे. त्यातसुद्धा कपात आधी दुध आणि मग पाणी घातल्याने चहा जास्त चांगला होतो अशी मान्यता आहे. जपानमध्ये काही जण एकत्र चहा पीत असले तर चहा पिण्याचा औपचारिक समारंभ होतो. इंग्लंड मध्ये हाय टी म्हणजे चहा बरोबर काही नास्त्याचे पदार्थ असा करतात.

सर्व प्रथम साखर पत्ती सोबत पाणी उकलु द्यायचे आणि मग दूध टाकल्यावर थोडं उकळु द्यायचं आणि मग चहा घ्यायचा..! मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! *sad*

मनातल्या मनात : च्यायला, असले फ़ालतू धागे मिपावर येतील असं कधी वाटलं नव्हतं !! मिपाचा प्रवास कुठून कुठे सुरु आहे राव !!!! Sad
बिरुटे सर, माझ्या मते या प्रकारची नकारात्मक भूमिका घेण्याचं कारण नाही. मिपावर अनेक अत्यंत वाचनीय लेख येतात. तसंच हे संवादमाध्यम असल्यामुळे कुठच्याही साध्याशा विषयावरूनही संवाद सुरू होऊ शकतो. अशा संवाद साधण्याच्या प्रयत्नाला फालतू म्हणून हिणवणं ठीक वाटलं नाही. आणि अशा मौजमजेच्या धाग्यांचीही परंपरा मिपावर आहे - उदाहरणार्थ गुलाबजामच्या पाकाचं काय करता येईल? यावर पराने दिलेली पाकातल्या वड्यांची कृती विसरता येईल का? किंवा त्यानंतर आलेला 'आंबे कसे निवडावे?' हा धागा पहा. तो काही लांबी, विषयाची व्याप्ती, लेखनातलं लालित्य, या कुठच्याच निकषावर या 'चहा कसा करावा?' पेक्षा अधिक सरस नाही. त्या लेखाला तुम्हीच भरपूर प्रतिसाद देऊन तो धागा वाचनीय केलेला आहे. शेवटी धागा काय आहे यापेक्षा प्रतिसाद कसे येतात यावर दर्जा ठरतो.

In reply to by राजेश घासकडवी

स.न.वि.वि. मिपावर वाचनीय लेख असतात, उत्तम चर्चा होतात, मिपासारखं अभिव्यक्त होण्यासाठी माहितीबरोबर आनंद मिळविण्यासाठी मिपासारखं समृद्ध असं संकेतस्थळ आंतरजालावर दुसरं कोणतं नाही. (टाळ्या) मिपाचं अजून कौतुक केलं असतं पण अनेकांना त्रास होतो म्हणुन आवरतो (लै भारी) पूर्वी काय होतं आणि काय होतं आता त्याची तुलना करण्यापेक्षा आता उत्तम काय व्यक्त होता ते झालं पाहिजे, ते आलं पाहिजे, असेच निरर्थक धागे यायला लागला की मग बोअर होतं, (मला तरी) प्रतिसादाचं रतीब घालायचं तर ते कसेही घालता येतात. (अंडे घालूनही चहा करता येतो) आम्हीही पूर्वी असे रतीब घातले आहेत. आता कोणी तसं करु नये, असे माझं मत नाही. पण,कुछ हटके नको का, असं माझं व्यक्तिगत मत आहे. (टाळ्या) आताही चहा झाली की लगेच पहा इथे कॉफी आली. चहाचा धागाही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करता आला असता. पाण्यात साखर विलायची, सुंठ, घालण्याच्या पद्धती, उकळण्याच्या पद्धती, गवती चहा, कोरा चहा वीथ लिंबू, आरोग्यासाठी फायदे तोटे, जालावरचा विदा, असं काही असलं की मग धाग्यापेक्षा प्रतिसाद भारी होतात, हे मान्यच. आणि असेच लेखन आलं पाहिजे असं मला वाट्तं (टाळ्या) उद्या ढुंगण कसं धुवायचं याच्यावर धागे काढायचेत का (हशा) अशा धाग्यात माहिती असेल पण काही संकेत नको का पाळायला ? साहित्य हा समाजाचा आरसा असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे घडतं ते अधिक सकसपणे जालावरील लेखनात आलं पहिजे. भाषा, माणूस, लेखन, मैत्री आणि विचारांचे आदानप्रदान ही आंतरजालाची देणगी आहे, तिचा योग्य वापर झाला तर मिपासारखं संकेतस्थळं अजून समृद्ध होईल असे मला वाट्ते. एवढे बोलून मी थांबतो. (टाळ्या) अवांतर : मी एवढा चांगला प्रतिसाद लिहिला आहे. कृपया उपप्रतिसाद देऊन माझ्या प्रतिसादापेक्षा सरस प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करु नये, करायचा असेल तर तो मला व्य.नि. ने करावा. *smile* -दिलीप बिरुटे

पेट थेरपी 04/08/2014 - 06:05
पाणी गरम करून ठेवाच्चं. मग त्यात दीड चमचा साखर- पांढरीच घालाच्ची. त्यास उकळी फुटू लागली की चहा पत्ती( सोसयटी/ रेड लेबल) एक चहाचा चमचा घालाच्ची. आमच्या लहानपणी चहा-साखरेचे बारके डबे स्टीलचे मिळत त्याबरोबर चहाचा व साखरेचा चमचा मिळे. साखरेचा अंमळ मोठा असतो. शेजारी गॅसवर, ताजे असले तर बरे, दूध गरम करायला ठेवायचे. चहाला उकळल्यावर लगेच गॅस बंद करून चहावर झाकण ठेवायचे. चहा मुरू द्यायचा. मग तो गाळायचा व त्यात दूध घालायचे. आवडी प्रमाणे. आमच्या सासूबाही फार दुधाचा चहा करतात तर आम्हास तो मस्त चहा कलरचाच आवडतो. बरोबरीने एखादे मारी/ मोनाको बिस्किट पुडा घ्यायचा. व गरमच प्यायचा. ग्रीन टी मला आजिबातच आवडला नाही. जालीय वाद किंवा ताजा हार्ड कॉपी पेपर ह्याबरोबर अश्या चहाचे घुटके घ्यावे. २० मिनीटे अति सुखाची जातात.

मदनबाण 04/08/2014 - 09:19
कधी काळी तमिळनाडु मधील चहाच्या मळ्यात मनसोक्त बागडलो होतो त्याची आठवण आली. :) मला एकदा तरी काश्मिरी कहावा प्यायची इच्छा आहे. :) आता चहाचा आणि मळ्याचा विषय आलाच आहे तर दोन फोटु देतो. :) चहाची तोडणी करणार्‍या स्त्रीया. P1 मी आणि चहाचा मळा. { एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. ;) माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. } P2 (चहा प्रेमी} :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

एक्का काकांचे फोटो पाहुन,आता मलाही माझा फोटु द्यावा वाटला. Wink माझ्या चेहर्‍यावर अंमळ ऊन आल्याने डोळे चीनी झाले आहेत. वेल डन ! डर डर के जिये तो क्या जिये !! “To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 04/08/2014 - 09:55
“To be world-class, one needs to set standards, not chase them.” --- आम्हीच वाह... क्या बात हय ! :) धन्स. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Becky from The Block... Becky G - {Cover Up on J LO}

In reply to by मदनबाण

धन्या 04/08/2014 - 14:37
बाणाच्या स्वतःच्या फोटोतील "विठ्ठल" पोजला आता "मिपा पोज" म्हणावयास हरकत नाही. बाकी आम्ही चहा करण्याच्या भानगडीत पडत नाही. आम्ही टपरीवर, हॉटेलात, कॅफेटेरीयात जिथे कुठे मिळेल तिथे चहा पितो. अगदी अ‍ॅसिडीटी होईपर्यंत, तोंड येईपर्यंत. तोंड आले की चहा पिणे थांबवतो, तोंडाला आतून स्मायलोजेल लावतो आणि तोंड जाण्याची वाट पाहतो. तोंड गेले की पुन्हा चहा पिणे सुरु. :)

तिमा 04/08/2014 - 09:59
दिल्ली स्टेशनवर एकदा रेल्वे स्टॉलवर चहा मागितला होता. त्याने चहाची पूड गाळण्यात टाकली आणि वरुन उकळते पाणी+ दूध याची धार ओतली. खाली फिल्टर झालेल्या रसायनाची चव अगदी ओळखीची वाटत होती. डोक्याला जरा ताण दिल्यावर लक्षांत आले की ती ओळखीची चव पाण्याची होती! इतका वाईट चहा मी आयुष्यात प्रथमच प्यायलो.

आनन्दिता 04/08/2014 - 10:06
एक पातेलं घ्या हातात उंच धरून त्यातून बल्बकडे पहा बुडाला भोक नसावे…. चहा बनायच्या आधीच गळू शकतो ! सिलेंडर, पाईप चं लीकेज तपासून घ्यावे जाम बेक्कार बाबा … अख्खा माणुस जळू शकतो ! आता साखर, पावडर, दुधाच्या शोधात निघावं हा सगळा मामला … फडताळातच कुठेतरी मिळू शकतो ! पाण्यात साखर, पावडर उकळायला ठेवावी पाचेक मिनिट तरी लागतात तेव्हढ्या वेळात आरामात कुठेतरी लोळू शकतो ! वेलचीची चिमट टाकून दार लावायला धावावे शेजार्याचीच जात ती… तुमच्याकडे चहा बनतोय झटक्यात त्यांना कळू शकते ! उगीच ते येणार, हॅ हॅ हॅ .. चहा केलात वाटतं कोणी सांगितलंय… आपण हे टाळू शकतो ! इथे वेळ येते ती दुध टाकायची यावेळी थोडं सावध हं… नैतर चहा पातेल्याच्या बाहेर पळू शकतो ! हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! सांडशी मात्र सापडायलाच हवी फालतुमधे हात पोळू शकतो! बघत बघता झाला की हो चहा तुमचा भुरका मारा किंवा कसाही जो तो त्याच्या पद्धतीने गिळू शकतो !

In reply to by आनन्दिता

@हाय रे दैवा! गाळणी मिळेना? बायकोचा रुमाल आणा तिला काय कळतंय… नंतर साबण लावून पिळू शकतो ! >> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif =============== दुत्त दुत्त आ...नंन्दिता! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif मिपा जिल्बिकर संघात तुझे स्वागत आहे.. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

सुहास.. 04/08/2014 - 10:15
एक उकळलेले गरम पाणी सोडल , तर सगळाच चहा हा चविष्ट प्रकार असतो. १ ) गुळाचा चहा , गावाकडे गेलो की सहसा गुळाचाच चहा होतो , गुळचट जरी असला तरी , जर गवती असेल तर क्लास च वाटतो प्यायला !! हेल्दी असतो म्हणे ... २ ) तमीलनाडु कडे स्टॉलवर चहा बनवायची पध्दत आणि त्यामुळे त्याला येणारी चव वेगळीच असते , एकीकडे चहाच पाणी गरम होत असते , दुसरीकडे दुध , सर्व्ह करताना, चहाकरी , ;) आधी स्टीलच्या वा ग्लासमध्ये साखर घालतो, आणि मग दोन ग्लास मध्ये मग फिरवुन मग देण्यात येतो ..मस्त !! ३ ) इराण्याकडचा चहा , पुणे , कॅम्पात , दोनचार ठिकाणी अजुन ही मिळतो ..एक अतिशय वेगळी चव असते. ४ ) पुणेरी पध्दत तर सर्व सर्वश्रुत आहे , त्यात चहाला येणार रंग आणि गंध ही शामील होतात, अगदी दुकानाच्या शेजारुन गेले तरी सुंगध दरवळुन जातो. ५ ) मी माझ्या काही गुजराती मित्रांकडे ( होय , पुण्यातच ;) ) मसाला चहा प्यायलो आहे . त्या ला येणारा सुगंध आणि चव ही वेगळीच असते . माझ...मला पुर्ण दुधाचा, ते ही पाकीटाच दुध नाही, ताज, थोडं आलं आणि इलायची घालुन, जर्मनच्या पातेल्यात केलेला, स्टीलच्या ग्लास मध्ये आवडतो. पसंद अपनी अपनी

अनुप कोहळे 04/08/2014 - 10:25
अर्धा कप पाणी घ्यावे, त्यात आलं आणी विलायची कुटून घालावी. उकळी आल्यावर त्यात एक चमचा प्रति कप प्रमाणे चहा पत्ती टाकावी. चांगले उकळू द्यावे. नंतर त्यात आर्धा कप दूध घालवे आणि रंग आपल्या आवडीनुसार येई पर्यंत उकळू द्यावे. कपात गाळून पारले G बरोबर आस्वाद घ्यावा......

In reply to by आयुर्हित

आनन्दिता 04/08/2014 - 18:40
काका भारी गेस !! पण प्रस्तुत कवितेत अत्रंगी पाउस यांना चहा कसा करायचा हे सांगितले आहे त्यामुळे इथे त्यांच्या बायकोच्या रुमालाबद्दल लिहिलंय.. सो बेटर लक नेक्स्ट टाइम हं!! *biggrin*

गणपा 04/08/2014 - 14:00
चहाच्या वाटेला फारसा जात नाही पण जर जोडीला फारसाण असेल तर मग त्यासारखं दुसरं अमृत नाही. गरमा गरम चहात बचका भर ताजं फरसाण टाकावं. २ मिनीटांनी चमच्याने ते ओरपावं आणि मग मगात उरलेल्या चहाला जी चव येते यवं रे यवं...

In reply to by गणपा

गम्पाभौ ... आपल्या सारख्या तज्ञ लोकांचा प्रतिसाद आल्याने फार बरे वाटले ...चहा + फरसाण तडक करून बघण्यात येईल.... __/\__

पैसा 04/08/2014 - 14:50
चिं. वि. जोशींच्या एका चिमणराव लेखात मुलीला बघायला आलेल्या पाहुण्यांनी "चहा कसा करतात?" हा प्रश्न विचारल्यावर तिने "आम्ही किनै, चहाला राकेलची फोडणी देतो!" हे उत्तर दिल्याचं आठवलं! *biggrin* बाकी चहा अजिबात उकळायचा नाही आणि काफी मात्र मस्त उकळायची हे माझे आवडते प्रकार. मोठ्या हाटेलांमधे हमखास थंड चहा मिळतो तर रस्त्यावर एकदम मस्त तरतरी आणणारा हा सर्वसामान्य अनुभव आहे. केरळच्या नेत्रावती वगैरे रेल्वेत "चाया" नावाने काफीसारखं लागणारं एक कसलंतरी पांचट पेय देतात. चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!

In reply to by पैसा

राकेलची फोडणी >>> =))
चहामधे साखर किती घालायची हा एक ज्वलंत प्रश्न. माझ्या सासर्‍यांना एका कपाला कमीत कमी ४ चमचे साखर लागते. तो चहा तुम्ही कोणी पिऊच शकणार नाही!
=)) पै.तै, चार चमचे साखर ....बापरे ...मग ह्या पाककृतीला "सुधारस" म्हणावे असा एक बदल सुचवत आहे *biggrin*

In reply to by पैसा

मी नोकरीत असताना माझ्या ऑफिसमधे एक 'भट' आडनावाचा महाभाग होता. त्याला एका कपात ७ चमचे साखर लागायची. (डॉक्टरांनी सांगितलय अशी थाप ठोकायचा) त्याचा चहा (?) कधी चुकून आपल्या टेबलवर आला आणि एक घोट घेतला तरी दिवसभर त्रास व्हायचा.

बॅटमॅन 04/08/2014 - 15:17
चहा अन कॉफीसारख्या उत्तेजक पेयांपासून दूर असल्याने आमचा पास. पण प्रतिसाद रोचक आहेत, वाचायला मजा येते आहे. (कधीमधी ग्रीन टी (मित्रभाषेत गोमूत्र) पिणारा) बट्टमण्ण.

बॅटमॅन 04/08/2014 - 16:06
इतक्या रेशिप्या पाहिल्या, पण गीतेतली रेशिपी कुणी ट्राय करताना दिसत नाही. भगवंत म्हणतात, 'सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो |" अर्थात, सर्वांनी चहा करावा तो सन्नि नामक विशिष्ट ष्टोव्हवरतीच. तसे केल्यास तो हृदयात जाऊन बसतो.

In reply to by बॅटमॅन

असंका 04/08/2014 - 19:14
मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। याचाही अर्थ सांगून उपकृत करावे ही विनंती. ही पोह्यांची रेसिपी असावी काय?

In reply to by असंका

बॅटमॅन 04/08/2014 - 19:26
गीताग्रंथ हा समुद्राप्रमाणेच गहन आहे, अतएव एका वाक्याचे अनेक अर्थ असतात. पैकी वरील वाक्याचा 'भूक लागून माजल्यागत केल्यास ज्ञानी माणूस पोहे करतो' हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ 'माजलेल्या स्मृतीला जाणून नमक घालून पोहे करावे' हा एक अर्थ आहे. शिवाय 'मतदान कुणाला केले याची स्मृती कळू न देण्यासाठी म्हणून पोहावे' असाही अर्थ आहे पण तो इतका प्रचलित नाही. हे माझ्या अल्पबुद्धीला समजतील इतकेच अर्थ दिलेले आहेत. पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.

In reply to by बॅटमॅन

पण या गीतासागरात अजून किती अर्थ लपलेत ते एक भगवान श्रीकृष्णच जाणोत.
किंव्वा संक्षी *biggrin*

In reply to by बॅटमॅन

असंका 05/08/2014 - 10:01
वा वा! धन्य झालो प्रभू!! आणि इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा चहा आणला असं मानणार्या लोकांनी याचा विचार अवश्य करावा...

यशोधरा 05/08/2014 - 07:25
चहाचे आधण चढवायचे साखर घालून आणि मग पाण्याला उकळी फुटली की त्यात चहापत्ती टाकून २० एक सेकंदांनी गॅस बंद करायचा. पत्ती मुरायला हवी. चहामध्ये आलं किंवा गवती चहा घातला जातो - ते कॉमन आहे - पण कधी आधण उकळताना त्यात हळदीचं पान घालून पहा. सुरेख स्वाद येतो चहाला. चहा गाळून घ्यायचा आणि कपात ओतताना दूध घालायचं असल्यास, आधी दूध घालून त्यावर चहा ओतायचा. अहाहा!

सूड 11/08/2014 - 15:05
>>चहा 'नक्की' कसा करावा ?? मित्राला विचारावं, बाबा रे नक्की चहा पाजणारेस ना? तो हो म्हणाला तर चहा 'नक्की' होतो आणि आपण निश्चिंत!!
एक कप चहाला पाउण कप पाणी ...उकळा ...दीड चमचा चहा घाला ...२ मिनिटे मुरु द्या आणि मग हवे तेवढे दुध घाला हि सर्वसामान्य पद्धत पण चहा 'नक्की' कसा करावा ???

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

पिंपातला उंदीर ·

एस 03/08/2014 - 11:49
मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन होईल तेव्हा होईल. पण सध्याच्या वातावरणात मिपावर तुमच्या लेखाचं वेगळंच मापन होण्याची शक्यता आहे. कदाचित हा लेख अजून एक-दीड वर्षांनी आला तर थोडे जमिनीवर येऊन लोक प्रतिसाद देतील. आत्ताच्या घडीला चिखलफेकच होईल असे वाटते. वाचनखूण साठवली आहे. दोनेक वर्षांनी सविस्तर प्रतिसाद देईन. तोपर्यंत भविष्यकाळ डॉ. सिंग यांचे चित्रण कसे रंगवतोय हे पहायला पाहिजे.

In reply to by एस

मला खात्री आहे की जर मनमोहन सिंग यांनी आपले चरित्लिहीतेले तर आणि त्यात खुल्लम खुल्ल लिहीले तर बरीच धक्कादायक माहिती बाहेर पडेल ! चरित्र न लिहीण्यची करंगळी चिरुन शपथ घेण्यास त्यांणा भाग पाडले गेले असावे.

तिमा 03/08/2014 - 12:16
लेख विचार करायला लावणारा आहे. सर्वसामान्य नागरिकाला अजूनही, मनमोहन यांच्याविषयी व्यक्तिगत आदर आहे.पण एरवी तोंड न उघडणारे मनमोहन, नटवरसिंगांवर मात्र लगेच भाष्य करतात, याचे आश्चर्य वाटते. खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही. इतक्या बुद्धिमान माणसाला आपण घटनाबाह्य काम करत होतो याची जाण नसावी हे खेदकारक आहे. स्वतः प्रामाणिक असताना त्यांनी सोनियांची दादागिरी का चालवून घेतली आणि आत्मसन्मानासाठी वेळीच राजीनामा का दिला नाही, हेच तर मोठे कोडे आहे आणि त्याचे कारण प्रत्येक सुजाण नागरिकाला जाणून घेण्याची इच्छा आहे.

In reply to by तिमा

नितिन थत्ते 03/08/2014 - 19:20
>>खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही सोनिया गांधींना सरकारी फायली वाचून त्यातले काही आकलन होत असे असा गंभीर आरोप इथे केला जात आहे. ;)

In reply to by नितिन थत्ते

त्याना कळत नसेल. पण त्यांनी ठेवले होते ना सल्लागार समितीत एनजीओवाले. कदाचित म्हणूनच मनमोहन मनातून संपूर्ण उतरले. तसेही युपीए-१ कसे आले हेच मोठे कोडे आहे मला.

In reply to by तिमा

रमेश आठवले 03/08/2014 - 21:21
सोनियाने बहाल केलेले पद स्वीकारताना त्यांना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कदाचित कल्पना नसावी. पण काही काळा नंतर सोनियाच्या हातातली बाहुली म्हणून प्रतिमा निर्माण झाल्यावर ही पदाचा मोह त्याना सुटला नाही हे खरे.

मोदी तरी काय करत आहेत, ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, संघाच्या कार्यालयातून आदेश निघताच नेमणूका व निर्णय होत आहेत. हे कोणती घटनादत्त कामं करत आहेत... मनमोहन सोनियांना विचारुन काम करत होते, तिथे मोदी मोहन भागवतांच्या क्लिअरन्सची वाट पहात असतात,मोडस ऑपरेंडी तीच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 04/08/2014 - 11:07
नगरसेवकपदी निवडुन आलेले लोक बघता संघाच्या लोकांची खरेचे " ती " लायकी आहे असे वाटत नाही. आता त्यांनी एक किंगमेकरची भूमिका वठवली आहे ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव 07/08/2014 - 17:55
कसले किंगमेकर नि कसले काय संपूर्ण भारतात मोदींची हवा होती. लोकांनी विकासासाठी मोदींना मत दिले इथे संघ कसा काय किंगमेकर बनला. बर्याच तरुणांना संघ नावाची एखादी संघटना आहे हे हि माहित नाही. हा सारा मोदींचा करिष्मा आहे. संघाचा पाठींबा पूर्वीपासून भाजपला आहे कधी एवढे बहुमत मिळाले होते का ? म्हणतात न यशात अनेक भागीदार असतात नि अपयश एकट्याचेच असते तसला प्रकार आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मोहन भागवत आणि सोनिया गांधी ह्यांमध्ये खूप फरक आहे … मुळात मानला तर… मानाय्चाच नसेल तर विषयच संपला…. मोहन भागवत कोणत्याही घराण्याच्या आशीर्वादाने आलेले नाहीत… आपण संघाच्या एकंदरीतच स्ट्रक्चरचा अभ्यास करावा…. (आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे…)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

प्रश्न भागवत वा गांधींच्या कॅलिबरचा नाही, प्रश्न आहे घटनाबाह्य सरकार चालवण्याचा .... मनमोहन सिंगना आरोपिच्या पिंजर्यात उभे करताना मोदींना सूट द्यायची व कारण सांगायचे कि मोहन भागवत तथाकथित राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे असे चालणार नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा जेंव्हा सल्ला घेतो (कि जो समाजाबद्दल जागरूक आहे) आणि ती व्यक्ती जर त्या पात्रतेची असेल तर त्या विचारण्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं…. माझ्या माहितीनुसार एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही….

In reply to by एक स्पष्टवक्ता..

विटेकर 06/08/2014 - 10:55
धर्मसत्तेचा(पक्षी सन्यस्त / व्रतस्थ लोक )राजसत्तेवर अन्कुश ही भारतातील परंपराच आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसतील. १. अगदी प्राचीन उदाहरण - वेन राजा , हा अन्यायकारी राजा जेव्हा प्रजेला त्रास देऊ लागला तेव्हा साधु-संतानी चक्क त्याला मारले, त्याच्याच शरीरापासून पृथुची निर्मिती झाली. आणि मग पृथुने राज्य केले. २. अगदी राक्षसांच्या राज्यात देखील शुक्राचार्यांची महती होतीच. ३. श्रीरामाचा राज्यभिषेक झाल्यावर श्रीरामाने उद्घोषणा केली की मी दंड्नीय नाही, तेव्हा वसिष्ठांनी त्याच्या मस्तकावर आपल्या धर्म दंडाने थोपटले आणि सांगितले, तू चक्रवर्ती आहेस पण धर्मदंडाखाली दंडनीय ही आहेस. ४. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त ५. विद्यारण्य स्वामी - हरीहर बुक्क ६.समर्थ रामदास - शिवाजी महाराज ७.अगदी अलिकडच्या काळात - महात्मा गांधी - काँन्ग्रेस ८. जे.पी. - जनता पार्टी तेव्हा सत्ताबाह्य सत्ताकेन्द्र असणे नवीन नाही . मध्ययुगीन अंधकाराच्या काळात देखील भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी आमची संतमंडळीच लोकान्चे खरे राजे होते.. मुस्लिम आणि ब्रिटिश शासन असले तरीही ! या देशाची संस्कृती आणि परंपराच अशी आहे की सत्ताकारणाने इथले जनमत बदलत नाही ! या देशाच्या समाजकारणाची नाडी धर्माच्या हातात आहे .... आणि धर्माला ग्लानी जरुर येते .. तो नष्ट होत नाही !! म्हणून तर युनान मिश्र रोमा सारे मिटे जहां से कुछ् हम ही है की हस्ती मिटती नही हमारी तेव्हा जेवढा सल्लागार निस्पृह आणि विरागी , तितके शासन चांगले हा सरळ सरळ नियम आहे. सत्ता कोणाचे येवो आथवा जावो .. भारतीय मानसिकतेत बदल घडवायचा असेल तर समाजकारण करावे लागते आणि असाच माणूस भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनतो. सत्तापिपासू लोकांना भारतीय त्यांची योग्य जागा दाखवतातच ! फक्त वेळ लागतो..... It's big fat white elephant .. it moves very slowly , you can not make him to run !

In reply to by विटेकर

भारत देश प्रजासत्ताक आहे, धर्मसत्ता वगैरेच्या भ्रमातून बाहेर यावे.आपण ऐकविसाव्या शतकात आहोत मध्ययुगात नाही. एका विशिष्ट धर्माला राष्ट्रीय धर्म घोषीत करुन इतर धर्मीयांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतुन वगळणार्या संघटनेच्या मार्गदर्शनाची गरज भारतातसारख्या प्रजासत्ताक देशाला नाही ,अर्थात अशा संघटनेकडे आश्रीत म्हणुन राहीलेले लोक त्यांचेच सल्ले ऐकणार व लोकशाहीला व्यवस्थेला दरकिनार करणार, यात नवे ते काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 07/08/2014 - 15:59
काय खर बोलता होत तुम्ही .. साला लक्षात च आले नाही आपण एकविसाव्या शतकात आहोत ते ! तुमची मळमळ मात्र अगदी अर्वाचीन काळातील वाटते ..

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 16/08/2014 - 19:16
मला वाटते धर्म शब्दाचा अर्थ आपल्याला कळला नाही आहे. धर्म शब्दाचा अर्थ देवतेची पूजा करण्याची पद्धती नव्हे अपितु आपल्या धर्मात धर्म शब्दाचा अर्थ मानवाने जे धारण केले आहे ते. अर्थात मनसा वाचा कर्मणा व्यवहार ज्याच्या माध्यमातून मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करतो. मनु ने धर्म के दस लक्षण सांगितले आहे: धृति: क्षमा दमोऽस्‍तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह: । धीर्विद्या सत्‍यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‌ ।। (मनुस्‍मृति ६.९२ ( धैर्य , क्षमा , संयम , चोरी न करणे , शौच ( स्वच्छता ), इन्द्रियांना वश मध्ये ठेवणे , बुद्धि , विद्या , सत्य और क्रोध न करणे.) राजाला वरील धर्माचे पालन करणे आवश्यक होते. अन्यथा त्याला पदच्युत करण्याचा अधिकार जनतेला होता.

In reply to by एक स्पष्टवक्ता..

एक्सपर्ट अँडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही
मोहन भागवत व आरेसेस एक्स्पर्ट आहेत ह्याचा कोणता विदा आपल्याकडे आहे? मोहन भागवत /संघ हिंदु हिंदुत्व वगैरेच्या व्याख्या करतात, इतर कुठल्या क्षेत्रात त्यांचे एक्सपर्टाईज आहेत? भाजपसारखा राजकीय पक्ष असताना अर्थ विज्ञान तंत्रज्ञान सहकार ई ई प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती व संस्था असताना ,आम्ही आरेसेसकडून एक्सपर्ट एडव्हाईस घेतो असे सांगणे याचे दोन अर्थ निघतात, मोदी सरकार दूधखुळे आहे अथवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ईमानेइतबारे काम करणारे गुलाम आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हे बघा आता विरोधाला विरोधंच जर करायचा असेल तर विषयच संपला…. मुळात हा असा साला घेण्यात चुकीचं काय आहे हेच मला नाहीये समजत… जर तो सल्ला चुकीचा निघाला तर शंका काढण्यात अर्थ आहे असं माझं स्पष्ट मत आहे…. आणि उरला विषय एक्सपर्टाईचा …. आत्तापर्यंत ह्या देशातले बहुतांश निर्णय हे एक्सपर्टाईज वर विसंबूनच घेतले गेले ना?? काय झालं त्यांचं …. आणि रा.स्वं.संघाइतकी शिस्तबद्ध संघटना आपल्या देशात तरी नाही. जिथे जिथे आपली सरकारी (प्रशिक्षित) यंत्रणा नाही जाऊ शकत. तिथे जाऊन ते त्यांची मदतच करतात… थोडेसे डोळे किलकिले जरी करून बघितलेत ना तरी वस्तुस्थिती समजेल… पण अडचण काय झालीये माहितीये… साठ वर्षाच्या मूर्ख आणि बिनडोक सरकारमुळे "दुधखुळे" आणि "गुलाम" हे दोनच शब्द आपल्याला (इथे फक्त तुम्हाला असे म्हणायचे नाही कृगैन) इतके अंगवळणी पडलेत… कि पोह्यावर शेव घालावी तसे हे शब्द आपण शिपडत असतो…. असो… कावीळ झालेल्याला काय सांगावं जग पिवळं नाही म्हणून…. \

In reply to by एक स्पष्टवक्ता..

ठीकाय मग, मनमोहन गांधी घराण्याचा एक्सपर्ट एडव्हाईस घेत होते व मोदी संघाचा घेतात, घटनाबाह्य कुणीच नाही यावर तरी शिक्कामोर्तब करुयात!

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात फक्त आणि फक्त गांधी घराण्यामुळे एक्सपर्टाईज मिळतो?? हा एक कळीचा प्रश्न आहे. गांधी ह्या नावाऐवजी जर जोशी, जाधव अशी नावं असती तर कोणी कुत्रं तरी वार्याला उभं राहिलं असतं का? समजत नाहीये कि समजून घ्यायचं नाहीये हेच कळत नाहीये नानासाहेब…

In reply to by एक स्पष्टवक्ता..

चित्रगुप्त 10/08/2014 - 22:40
.... आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे… याचे उदाहरण मी बघितले आहे. मी रहातो, त्या दिल्लीजवळच्या फरिदाबाद स्टेशनावर काही वर्षांपूर्वी मध्यरात्री फार मोठा रेल्वे अपघात झाला. सर्वात आधीतर आसपासच्या झोपडपट्टीतल्या लोकांनी यथेच्छ लूट केली (नंतर पोलिसांना घरा-घरातून सूटकेसा वगैरे सापडल्या) नंतर पहाटेपासून संघाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्य सुरू केले. गंमत म्हणजे टीव्ही वरील बातम्यात उघड दिसत असूनही संघाच्या कार्याचा उल्लेखही केला गेला नाही.

In reply to by खटपट्या

संघाचे लोक आपत्तीकाळात काम करायला जातात कि जाहीरात? जर कामच करत असतील तर जाहीरात होत नाही म्हणुन का रडगाणे गावे ? एका राष्ट्रवादी "संघटनेने राश्ट्रकार्याची प्रसिद्धीच झाली नाही हो !" ,अशी आरोळी ठोकण्यात काय अर्थ आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

खटपट्या 11/08/2014 - 00:57
प्रसिद्धी नको पण अनुल्लेख हि नको. (मी काही संघाचा कार्यकर्ता किंवा प्रचारक नाही. पण रोजच्या बातम्यांमध्ये संघाचे लोक दिसत होते) जे आहे ते आहे. नाकारून काय उपयोग. बाकी कोणत्या संघटनेचे लोक हे काम करत असतील तर त्यांचाही उल्लेख आला पाहिजे.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 11/08/2014 - 14:03
लाखातले एक बोल्लात ! या निमित्त तुमचा शनवारवाड्यावर सत्कारच करायला हवा ! हे कसले राष्ट्रवादी ? हे तर जाहीरात वादी ! अशी जाहीरात करतात आणि छुप्या मार्गाने सत्ता हस्तगत करतात... यांचे कशाला करायला हवयं कोड कौतुक ? असतील जात आपत्ती निवारणासाठी , त्याचे काय विशेष ! पण काय आहे ना , भोळ्या भाबड्या जनतेला कळतच नाही हो, कर्तृत्ववान ( आणि तो ही त्यागी घराण्यातील )राजपुत्राला निवडून द्यायचे सोडून एका संघाच्या प्रचारकाला निवडून दिले ? पण नानासाहेब , तुम्ही एक काम कराच... कसं करुन महाराष्ट्रात तरी चड्डीवाले लोक सत्तेवर येणार नाहीत असं पहा ! भोळ्या भाब्ड्या जनतेसाठी तुम्ही एवढे कराचं ! अहो हे लोक राजधानी मुंबई हून नागपूरला नेतील हो ! वाचवा !

In reply to by एक स्पष्टवक्ता..

नुकतेच घडलेले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता माळीण साठी एखादे हजार कोटींचे प्याकेज येऊ द्या. तेथे राष्ट्रवादी आणि आय कान्ग्रेसवाले लगेच पोचतील. मग काय होईल हे सर्वांना माहीत आहेच !

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रतापराव 07/08/2014 - 17:44
नानासाहेब नमो हे संघाचे ऐकत असतील असे वाटत नाही.संघाच्या पुढे हो हो करून ते स्वताचेच अजेंडे राबवणार नि संघाच्या तोंडाला पाने पुसणार. ते कर्तुत्ववान नेते आहेत भाजपला जो विजय मिळाला तो मोदींमुळे संघामुळे नाही. हे सार्यांना चांगलेच ठावूक आहे.

In reply to by प्रतापराव

मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते पक्के संघिष्ट आहेत. संघाच्या आदेशावरुन त्यांची कार्यपद्धती ठरते .मंत्रीमंडळासारख्या महत्वाच्या बाबीत संघाच्या पदाधिकार्यांशी उघड चर्चा कशासाठी चालली होती? ज्यांना मंत्रीपद हवे होते ते दिल्ली संघमुख्यालयात कशासाठी जात होते? लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली. मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता.मनमोहन व मोदी रीमोटकंट्रोल्डच आहेत ,त्यामुळे किंगमेकर वगैरे उपमा आरेसेसला देताना सोनिया गांधी घटनाबाह्य सरकार चालवतात असा आरोप करणे हे' आपला तो बाब्या' या प्रकारच्या मानसिकतेचे लक्षण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळेसायेब, हे दोनही नेते रिमोट कंट्रोलने नियंत्रित आहेत हे (केवळ वादासाठी) मानल्यावरही खालील वस्तूस्थिती नाकारणे जरा कठीणच आहे. एका बाजूला दहा वर्षे केंद्रसरकारमध्ये सत्ताधारी असणारा आणि प्रशासन व भ्रष्टाचारावर काबू ठेवण्यात असफल झालेला आणि शिवाय निवडणूक निकाली पद्धतिने हारलेला नेता (आता हे केवळ विरोधी नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही मान्य केले आहे) आणि दुसर्‍या बाजूला विकासाचे राजकारण करत (हे काँग्रेसच्या केंद्रिय सरकारनेच त्याच्या अनेक खात्यांनी गुजरात सरकारच्या अनेक उपक्रमांना दिलेल्या पारितोषींकांच्या व्दारा मान्य केले आहे) सतत चारदा निकाली बहुमताने निवडून आलेला नेता... यांची खरं तर तुलनाच होऊ शकत नाही. तरीही, एक सावध नागरीक म्हणून नविन नेत्याला योग्य तो काळ (साधारण वर्षभरतरी) दिल्यावरच नविन नेत्याच्या पात्रते-अपात्रतेबद्दल काही म्हणणे शक्य होईल, हा समतोल विचार होईल. केवळ आपल्या पक्षाच्या विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणूण लगेच त्याच्या नावाने शंख करण्यापेक्षा, जो नेता देशाचे (म्हणजे पर्यायाने आपणा सर्व नागरिकांचे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे) भले पाहतो त्याला संधी आणि पाठिंबा देण्याची सारासारबुद्धी दाखवण्याची जबाबदारी स्वतःला सुजाण आणि विचारवंत समजणार्‍या नागरिकांवर आहे, नाही का ? अजून महत्वाचे: केवळ विरोधी पक्षाचे काम आहे म्हणून देशाच्या भल्या कामाला आंधळेपणाने विरोध करण्यापेक्षा आणि आपल्या पक्षाच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालण्यापेक्षा; स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना "तसे किंवा त्यापेक्षा जास्त चांगले काम का केले नाहीत" हे विचारण्याचा सुजाणपणा आणि धमक जेव्हा लोक दाखवू लागतिल तेव्हाच देशाचे (आणि पर्यायांने लोकांचे) भले व्हायला सुरुवात होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बर्याच अंशी सहमत, परंतु फक्त मोदीच विकास करतात असे काही नाही.इतरही अनेकजण चांगली कामं करत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

जे कोणी खरोखर चांगले काम करतात त्या सगळ्याचेही कौतूक करायलाच पाहिजे ! एकाचे अपयश झाकण्यासाठी इतरांचे पाय ओढण्याने काय साधणार आहे ? जगात चांगले काम करायचा मक्ता फक्त एकाच पक्षाला / व्यक्तीला आहे हाच विचार बुद्धीमत्तेच्या कमतरतेचे लक्षण नाही काय ? मग चांगले काम करणार्‍याचे पाय ओढण्यापेक्षा त्याला संधी आणि मदत करणेच शहाणपणा नाही काय ? तसेच खूप संधी मिळून असफल झालेल्या आणि आताच संधी मिळालेल्यांची तुलना करणे शास्त्रिय विचार नसून केवळ राजकीय कांगावा असतो हे वाचकांच्या ध्यानात येणार नाही असे समजणे म्हणजे (अ) "वाचकांना अक्कल नाही असे समजणे" किंवा (आ) "आपल्याला कमी समज आहे हे न उमजणे" या दोन पर्यायांपैकी एकच असते. त्यांतला कोणता पर्याय खरा आहे हे समजणे मात्र प्रत्येकाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे. कांगाव्यांच्या उदाहरणांनी भारताचा गेल्या सहा शतकांचा इतिहास खच्चून भरलेला आहे. तरीही प्रत्यक्षात परिणाकारक काम न करता कांगावाखोरपणा करत तुंबडी भरणार्‍यांना पाठिंबा देण्याने आपण आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान करून घेत आहोत हे कळण्याची समज-उमज अजुनही काही भारतियांत नाही असेच खेदाने म्हणावे लागते. भारतासारख्या विशाल देशाचा विकास कोणी एकच माणूस करणे शक्य नाही. तसा मोदींनी दावा केल्याचे मला तरी आढळले नाही. उलट पायाला स्पर्श करणे वगैरे सारख्या प्रथा बंद व्हाव्या असे म्हणणाराही हाच पहिला नेता भारताने पाहिला. त्याविरुद्ध एकाच कुटुंबातील मोजक्या माणसांकडे भारत गहाण असल्यासारखे वागणार्‍या आणि त्यांच्या घरी झाडूवाल्याचे काम करायला तयार असल्याची माध्यमांत उघडपणे जाहिरात करणार्‍या पाठीराख्यांची मोठी फौज आहे हे अख्ख्या भारताला माहीत आहेच. आता भारताला गरज आहे ती फक्त बोलबच्चन न राहता, जनतेची दिशाभूल न करता आणि स्वतःच्या / बगबच्च्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता, खरोखरच खरेपणाने काम करणार्‍या नेत्याची... अर्थात अश्या लोकशाही नेत्यालाही त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक स्तरांच्या कार्यकर्त्यांची गरज असतेच. पण लायक नेत्याविना कार्यकर्ते म्हणजे केवळ स्वर्थाकरिता एकत्र आलेल्या बाजाबुणग्यांची फौज बनते... आणि मग ज्या फौजेने रक्षण करायचे तीच लूट्मार करू लागते ! आनंदाची गोष्ट अशी की भारतीय जनात बराच काळ बोटेच काय पण पूर्ण हात पोळल्यावर का होईना वरचे सत्य हळू हळू समजू लागली आहे अशीच लक्षणे आहेत. अर्थात भारताचे भले करण्यात अनेकांचे अयोग्य वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाणार यात काही शंका नाहीच, तेव्हा असे सगळे लोक कांगावा करणारच नाहीत असा समज करून घेणे वास्तवाला धरून होणार नाही हेही सत्य आहेच ! असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 11/08/2014 - 14:11
"लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली." इतक्या महत्वाच्या प्रसंगी आपण तिथे उपस्थित होता.. हे वाचून आमचे डोळे पाणावले , आपल्याबद्दलच्या आतीव आदराने आणि स्नेहाने आमचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले आहेत..कधी एकदा तुमचा सत्कार करतो असे झाले आहे .. नानासाहेबांच्या सत्कारासाठी ताबडतोब समिती स्थापन करावी अशी मी मिपा व्यवस्थापनाला विनंती करतो.. नानासाहेब ... . . . .. . नानासाहेब , तोपर्यन्त आमच्यासाठी आपल्या चरणांचे zerox इथे डकवावे .. अशी मी तुम्हांला नम्र विनंती करतो... ( भावविभोर ) विटेकर

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दा 18/08/2014 - 14:05
ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, कॉण्ट्रॅडिक्ट्स विथ मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता. हेन्स प्रूव्हड!!

In reply to by आनन्दा

या न्यायाने गोबेल्सही जर्मनीचा लोकशाही मार्गाने निवडून आलेला नेता होता असे तुम्ही म्हणाल.....

In reply to by नानासाहेब नेफळे

मोदी ह्यांनी अनधिकृत बांधकामे गुजरात मध्ये तोडली त्यात काही मंदिरे सुद्धा होती ह्यामुळे संघाच्या इतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर भरपूर शिव्याशाप दिले तेथे मोदिनी दुर्लक्ष केले. संघ कधीही भांडवल शाहीचा पुरस्कर्ता नव्हता. मोदिनी मात्र भांडवल शाहीतर्फे समाजात सुब्बता आणून सत्ता जिंकण्याचा मूलमंत्र संघाला दाखवून दिला . हा मूलमंत्र आधीच्या भाजप नेत्यांना म्हणजे अडवाणी , वाजपेयी महाजन ह्यांना कळला असता तर मंदिर मुद्दा न उकरत केवळ पल्लेदार भाषणे देत त्यांनी सत्ता मिळवण्याचे मनसुबे रचले नसते गुजराती जनतेने तीनवेळा मोदींना सत्ता संघामुळे नाही तर त्याच्या कार्यामुळे दिली हेच मध्य प्रदेश व गोव्याच्या बाबतीत म्हणता येईल. संघाचे मार्गदर्शन नेहमीच भाजपला होते पण मोदींना संघाचा नाही तर अदानी व अंबानी चा दलाल असण्याचा आरोप होणे ह्याचा अर्थ नेफळे साहेबांना कळला

अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू. हे श्रेय अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग याना जितके आहे त्यापेक्षा जास्त त्यावेळचे पंतप्रधान राव यांना आहे. ज्या "दैदिप्यमान" किंवा "धाडसी" सुधारणांचे निर्णय त्या काळात घेतले आणि राबवले गेले ते (एक्झेक्युटीव्ह सत्ताकेंद्राच्या) पंतप्रधानाच्या निर्णयाशिवाय आणि सक्रिय पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते. आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . जेव्हा तेच किंवा तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधान म्हणून अंगावर पडली तेव्हा मनमोहन निर्णय पक्षाघाताची (डिसिजन पॅरॅलिसिस) ची शिकार झाले. एवढेच नव्हे तर "मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्याकडून भ्रष्टाचार न होण्याची काळजी घेत लोकोपयोगी कामे करून घेणे" हे पंतप्रधानांचे मुख्य कर्तव्य करण्यात ते असमर्थ ठरले. म्हणजे "शासक म्हणून असलेल्या कार्यक्षमतेचा / पात्रतेचा अभाव" ही अपकिर्ती त्यांना स्विकाराविच लागेल. त्यांच्या कार्यकालात पंतप्रधानावर नियंत्रण ठेवणारे अशासकिय सत्ताकेंद्र होते हे मान्य करूनही; मनमोहन यांच्या सारख्या विव्दानाला त्याचा अर्थ आणि त्यामुळे त्यांच्यावर येणारी अधिक जबाबदारी कळली नसावी हे म्हणणे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान होईल. हे सत्य जमेस धरूनही मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार याबातीतची शासकिय व नैतीक जबाबदारी पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर होती हे त्यांना माहित असणारच. पण त्यांनी अश्याबाबतीत शासकिय तर सोडाच पण नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी कोणतेही ठाम पाऊल उचलल्याचे दिसले नाही... केवळ शक्य तेवढे मौन पाळणे पसंत केले. अश्या कृतींमुळे त्यांच्या अग्रक्रमसूचीत इतर काही गोष्टी देशाच्या हितसंबंद्धांच्या वरच्या जागी होत्या हेच सूचीत होते. उत्तम शासकाच्या गुणधर्मसूचीत शैक्षणिक आणि बौधिक पात्रता महत्वाची असते, पण प्रशासकीय आणि नैतिक पात्रता त्यापेक्षा खूप वरच्या जागी असणे आवश्यक असते. मनमोहन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अग्रक्रमसूचीत या विकल्पांची जागा उलटी झालेली दिसते. त्यामुळे कारणांच्या बाबतीत मतभेद असले तरी इतिहासात, "एक विद्वान (अ‍ॅकॅडेनिशियन) असलेला चांगला नोकरशहा (ब्युरोक्रॅट) पण शासन करण्यात असफल व सत्तेतून केव्हा पायउतार व्हावे हे ठरवण्यात असमर्थ ठरलेला शासक" अशीच त्यांची नोंद होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@इस्पिकचा इक्का उत्तम विश्लेषण . पण याच निकषावर UPA-1 च यश आणि २००९ मधील मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेस ला सार्वत्रिक निवडणुकीत मिळवून दिलेलं यश याची पण कारण मीमांसा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल

In reply to by पिंपातला उंदीर

मृत्युन्जय 04/08/2014 - 11:58
मला वाटते युपीए १ च्या कार्याबद्दल एकुणच लोकांना फार कमी माहिती आहे. कारण ठळक यश असे कदाचित त्यांच्या वाट्ञाला आले नाही. २जी स्कॅम मात्र गळ्यात पडला. व्यक्तिशः मला वाटते २जी स्कॅम जेवढा मोठा बनवला गेला तेवढा मोठा तो नव्हताच. त्याचे खरे स्वरुप लोकांसमोर आणि न्यायिक अधिकार्‍यांसमोर आणण्यात युपीए २ ला अपयश आले आणि त्यानंतरच्या एकुणच गोंधळात संपुर्ण उद्योगजगतातली विश्वासार्हता त्यांनी गमावली. मिळकत करात रिट्रोस्पेक्टिव्ह बदल केले गेले जे सर्वमान्य पद्धतीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे विश्वासार्हता अजुन गंडली. ही २ मुख्य अपयशे युपीए १ ची आहेत. शिवाय युपीए १ बरेच कसरती करण्यातच गेले. जे काम केले ते कदाचित लोकांपर्यंत पोचलीच नाहित. त्यामुळे त्यांनी काही चांगली कामे केलीच असतील तर ती झाकोळली गेली. त्यामुळे युपीए १ च्या चांगल्या कामगिरीवर कोणी प्रकाश टाकला तर बरे होइल. युपीए २ ने अर्थातच निलाजरेपणाची आणि कुशासनाची कमाल गाठली होती. त्यामुळे इतिहास ममोंना कसे लक्षात ठेवील याबाबत फारश्या शंका नाहित.

In reply to by मृत्युन्जय

संपत 04/08/2014 - 12:47
माझ्या अल्प माहितीनुसार युपीए १ चे यश १. जी डी पी > ८% २. कृषी उत्पनात लक्षणीय वाढ झाली होती ३. फिस्कल डेफिसिट खूप कमी झाले होते. बहुधा ४ % पेक्षा कमी. ४. औद्यागिक आणि भांडवल वृद्धी दुप्पट झाली होती ५. रुपया वधारला होता. बाकी मनरेगा,कर्ज माफिसारख्या सारख्या योजना होत्या ज्या काहींच्या मते अतिशय चांगल्या तर काहींच्या मते अतिशय वाईट होत्या.

In reply to by संपत

हे युपीए-१ चे यश की युपीए-१ च्या काळात दिसलेले रिझल्ट्स? जर युपीए-१ इतके चांगले आणि सक्षम होते तर युपीए-२ च्या काळात इतकी अनागोंदी का माजली? तुम्ही जे म्हणत आहात ते यश वाजपेयी-३ सरकारच्या चांगल्या धोरणांचे रिझल्ट युपीए-१ च्या काळात लागले होते आणि त्याचे श्रेय फुकट युपीएने लाटले होते.युपीएपेक्षा एन.डी.ए ने सरकार आणि अर्थव्यवस्था नक्कीच चांगली सांभाळली होती.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

संपत 04/08/2014 - 13:30
इतकी अनागोंदी का माजली?
हाच प्रश्न मलाही पडलाय. पण युपीए ने जवळपास ६-७ वर्षे प्रगती (तेही २००८ नंतरच्या जागतिक मंदीत) केली याचे सर्व श्रेय वाजपेयी सरकारला देणे मला पटत नाही. फार तर पहिल्या दोन वर्षांचे देता येईल.

अनुप ढेरे 03/08/2014 - 15:07
सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते .
हे नाही समजलं. २००९ मध्ये कॉग्रेसला बहुमत होतं???

@अनुप ढेरे थोडी mistake झाली . कॉंग्रेस ने २०० चा पल्ला ओलांडला आणि UPA ला एकूण बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्या . पण कोणावर अवलंबून राहण्याची गरज कमी राहिली .

संपत 03/08/2014 - 15:20
छान लेख.मी स्वतः गोंधळात आहे कि युपीए १ आणि २ मध्ये एवढा फरक का पडला? एवढी अकार्यक्षमता अचानक कुठून आली? घोटाळ्यांच्या आरोपामुळे कि जागतिक मंदीमुळे ? सोनियाच्या हस्तक्षेपामुळे म्हणावे तर तो युपीए १ मध्येही असेलच कि. खर तर २००९ च्या विजयानंतर सिंग अधिक धडाडीने काम करतील अशी अपेक्षा होती. मला तरी काहीच कळले नाही. अर्थात जागतिक मंदीची धग भारताला फारशी लागून न देण्याचे श्रेय युपीए २ ला द्यावेच लागेल.

चौकटराजा 03/08/2014 - 16:43
भारतात व्यापार व उत्पादन जग खुले केले गेले याचे प्रमुख कारण आमच्या उद्यीगपतींचा वा शास्त्रज्ञांची नालायकी. १९४७ ते १९९१ या सालात आपण साधी लहान बल्बची विजेची स्वस्त माळ निर्माण करायला शिकलो नाही. एन सी एल काढून किती नोबेल मिळाली या काळात ? सबब लोकसंख्येशी स्पर्धा करेल असा उत्पादनाचा दर्जा व पुरवठा दोन्ही ही नव्हते. रिक्षा घ्यायची तर दहा वर्षे वाट पहावी लागायची ही एक महत्वाच्या सर्वजनिक सेवेची अवस्था होती. मुलभूत सशीधनाच्या नावाने एक क्राय्जेनिक इन्जिनाचे सन्मान्य उदा सोडले तर बोंब आहे. आजही भारीभारी सर्जिकल उपकरणे भारतात तयार होत नाहीत. मॉलमधील बर्याचशा वस्तू दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक नाहीत. ( उदा स्प्रे ) आरोग्य शिक्षण सार्वजनिक वहातुक ई ला पराकोटीचे महत्व येणे गरजेचे आहे पण ही थेट उत्पादक क्षेत्रे नसल्याने त्यावर जीडीपी मधील नगण्य पैसा खर्च होतो.आपले खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकरणे . खाजगी क्षेत्राला संधी देऊन सरकारी बाबूना खाबूगिरीपासून लांब ठेवून सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करून जनतेला भांडवल दारांच्या ताब्यात देणे या खेरीज बर्याच देशातील सरकाराना गत्यंतर नव्हते.त्यात नरसिंहरावानी ते केले त्यात वेगळे काही नाही. त्यानी समाजवादाचा अत्यंविधी केला. त्याचे काही चांगले परिणाम समाजाला दिसत आहेत. श्रीमंत लोकांसाठी थेट द्रुतगति मार्ग झाला तर त्यावरून गरीब माणूस कोल्हापूरवरून परळ ला जाउन शकतो. ही समाजवादी मुव्हच ठरली आहे. म्हणून कदाचित माझी ऐतिहासिक प्रधानमंत्री म्हणून नोंद होईल असे मनमोहन जी म्हणत आहेत. नरेम्द्र मोदी अजून रवीशास्त्री सारखे खेळत आहेत. भारतातील भ्रष्टाचार व जीवनावश्यक वस्तूंची महागाई या बाबत एकही क्रांतिकारी विचार त्यांचेकडे नसावा. सबब ते ही मौनी बाबा झाले आहेत. अजूनही भारतीय माणसाचे सार्वजनिक कॅरॅक्टर एतके खराब दर्जाचे आहे की त्याना त्याच्या लायकीचेच सरकार मिळत आहे मिळणार आहे. जे चांगले वाईट घडत आहे त्याचे श्रेय जनतेला तसेच सर्वसाक्षी काळाला ही आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 03/08/2014 - 22:48
कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते. "इतिहास लिहण्या आधी तो घडवावा लागतो... जे आपले आत्ताचे प्रंतप्रधान करत आहेत. तसेच कॉमन वेल्थ गेम्स मधे आपल्या देशातील खेळाडुंनी घडवला आहे. :) नरेंद मोदींचे नेपाळ मधील आजचे भाषण :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

एसमाळी 03/08/2014 - 18:04
मी 2004 ते 2009 या upa 1 च्या काळातील भरभराटीचे श्रेय Nda 1 ला देईन.कारण धोरणाचा परिणाम दिसायला काही वर्षाचा काळ जावा लागतो.upa 2च्या काळातील अधोगती upa1 मध्येच चालु झालती.फरक एवढाच की upa 2 मध्ये सगळ उघड झाल.

माननीय मनमोहन सिंग एक उत्कृष्ठ नोकर (एक्प्लॉई वा टीम मेंबर ह्या अर्थाने) नक्कीच होते,परंतु त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण (एम्प्लॉयर अथवा टीम लीडर बनण्याची क्षमता) खरोखर होते का? हा कळीचा मुद्दा आहे. तुलना करायचीच झाल्यास त्यांची तुलना मी सचिन तेंडुलकरशी करेन. सचिन एक उत्कृष्ठ खेळाडु होता पण कधीही एक उत्कृष्ठ कप्तान नाही बनु शकला. ही बाब विचारात घेता पुस्तकाचे An Accidental Prime Minister हे शीर्षकच बरेच काही सांगुन जाते.

हुप्प्या 03/08/2014 - 20:47
आजवरच्या इतिहासात सर्वश्रेष्ट, सर्वात कणखर, भारताला सुवर्णयुगात नेऊन पोचवणारा, ही भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम करुन दाखवणारा, असामान्य वक्ता, कुठलेही भाषण घ्या, ऐकत रहावेसे वाटेल, धीरोदात्त, जनतेशी वरचेवर संवाद साधण्याची हातोटी, अप्रिय असले तर हिताचे निर्णय त्वरित घेण्यात कुठलीही हयगय न करणारा, रिमोटवर चालणारा कळसूत्री बाहुला आहे असा संशयही येऊ नये असा पारदर्शक कारभार, कमालीचा स्वच्छ, कुठल्या सहकार्‍याचे पाऊल वाकडे पडते आहे असा संशय आला तरी तात्काळ त्याची उचलबांगडी करणारा रामशास्त्री बाण्याचा नि:स्पृह. असा महाप्रतापी नेता भारताला लाभला हे भारताचे अहोभाग्यच. असा धुरंधर काँग्रेस पक्षात निर्माण व्हावा हे त्या पक्षाचे पूर्वजन्मीचे पुण्य असावे. ह्या महामानवाला माझे कोटीकोटी दंडवत!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नक्की कोणती लेखमाला? गुजरात विकासाचे मृगजळ की सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे की मिपावरील सगळ्यात अजरामर लेखमाला---रूणझुणु रूणझुणु रे भ्रमरा (बेशर्त स्विकृती आठवते का?) :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आनन्दा 04/08/2014 - 12:03
बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. :)

In reply to by आनन्दा

बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. Smile
हहपुवा

बाकी त्या न्युक्लिअर डिलची काहिही वासलात का लागेना त्या निमिताने त्यांनी बंगालमधील (आणि केरळमधील) स्वतःला ढुढ्ढाचार्य समजणार्‍या लाल तोंडाच्या मस्तवाल माकडांना त्यांची जागा दाखवून दिली हे मनमोहनसिंगांचे श्रेय नक्कीच आहे.

विनोद१८ 04/08/2014 - 23:21
मला वाटते म.मोंना आपल्या एकुण कर्तबगारीचा व पदाचा परिणामकारक असा प्रभाव पाडता आला नाही चांगली १० वर्षे संधी मिळुनसुद्धा, ते नेहमीच कुणाचेतरी ओशाळ्यासारखे असे वागताना दिसले, मक्खपणे वावरले. त्यांनी काही राजकारण केले व आपल्याच पक्षाला आपल्या प्रभावाखाली घेउन त्याचे व देशाचे समर्थपणे नेत्रुत्व पंतप्रधान म्हणुन केले असे भासले नाही, त्यांचा खंबीर असा आधार कधीच कुणाला वाटला नाही, नेहमीच आश्रितासारखे वाटायचे, वागण्यात मोकळेपणा नव्हता. किंबहुना मी या खंड्प्राय देशाचा सामर्थ्यसंपन्न पंतप्रधान आहे हे ते विसरले होते किंवा असे म्हणता येइल ते या देशाचे सर्वशक्तिमान नायक आहेत असे सर्वसामान्यजनांच्या मनावर बिंबवण्यात अयशस्वी ठरले, अगदी बरीच चांगली कामे करुनसुद्धा.

अर्धवटराव 05/08/2014 - 00:53
इतीहास ममोंचं योग्य परिक्षण करु शकेल असं वाटत नाहि. कर्तबगारीशुण्य राजपुत्र आणि असमाधानी राणि यांची मर्जी सांभाळत एका हुषार आणि सज्जन प्रधानाचं जे व्हायचं तेच झालं. अशी परिस्थिती निकट भविष्यात यायचे चान्सेस कमि आहेत. त्यामुळे ममोंवर सर्वात अधिकृत कमेण्ट्स त्यांच्या सहकार्‍यांचीच असतील, व सध्यातरी ति वाईट आहेत.

बहुगुणी 05/08/2014 - 02:48
द इकॉनॉमिस्ट या अमेरिकन नियतकालिकातील भारताविषयीचे जवळजवळ सर्वच लेख (आणि भारतीय नावाच्याच लेखकांनी/ लेखिकांनी लिहिलेले!) भारतद्वेष्टे (India-bashing) या प्रकारात मोडत असल्याचं माझं मत आहे, पण त्यांचा ३ मे २०१४ चा अंक याबाबतीत किंचित अपवाद वाटला. त्यातला Man out of time या लेखात काही मुद्दे चांगले मांडले आहेत. एक माणूस म्हणून नि:स्वार्थी असलेल्या मनमोहन सिंग यांचं एकीकडे राज्यकर्ता म्हणून काय चुकलं, किंवा दुसरीकडे त्यांनी घेतलेले कोणते निर्णय दूरदृष्टीचे / देशाच्या दृष्टीने भले होते, याचं विश्लेषण वाचनीय आहे. निवडणू़क निकाल जाहीर व्हायच्या आधी आठवडाभर आलेल्या या लेखात ही telling वाक्ये होती: "Mr Singh keeps a characteristic silence, but is an inevitable target for the BJP. The most spiteful critics, though, come from his own party. Congress expects a heavy defeat when national election results are broadcast on May 16th. It needs a scapegoat." अर्थात, सर्वच मुद्दे मला पटले नाहीत, पण शेवटी 'द इकॉनॉमिस्ट मधलं लिखाण आहे' म्हणून सोडून दिलं, discount :-) याच लेखावर आलेल्या प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत.

स्पार्टाकस 06/08/2014 - 10:00
मनमोहन सिंग यांची काही खास वक्तव्ये :- "देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे. नानावाटी आयोगाने १९८४ च्या दंगलीत जगदीश टायटलर दोषी आहेत हे जाहीर केल्यावर "जगदीश टायटलर निर्दोष आहे. मी त्यांना मंत्रीमंडळातून मुळीच काढणार नाही." "कॉमनवेल्थ खेळांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही." "ए. राजा निर्दोष आहे." "अण्णा हजारेंनी निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे आणि मग जनलोकपाल आणावा!" स्वतः मनमोहन सिंग राज्यसभेचे सभासद आहेत. "राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाथाने योग्य आहेत!" "शिबू सोरेन, लालू यादव यांना मंत्रीमंडळातून काढणार नाही!" "चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही!" "महगाईसाठी शरद पवार जबाबदार आहेत!" विरोधाभासाचा सर्वोत्कॄष्ठ नमुना! "मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे मला भ्रष्टाचाराविरुध्द काही करता येत नाही!" "मी दुर्बल नाही, कणखर आहे!" "मी कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही!" दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केल्यावर, "या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण दोषी आहेत! मी नाही!" "नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे देशास घातक!" हे राजकीय विरोध म्हणून सोडून देता येईल. मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते. परंतु त्यांनी राबवलेल्या निर्णयांचं श्रेय नरसिंहराव यांचं काहीच नाही का? नरसिंहराव यांच्या काळात गांधी घराण्याची लुडबूड राजकारणात नव्हती त्यामुळे आर्थीक उदारीकरणाचे निर्णय राबवताना अन्न सुरक्षा योजनेसारख्या आतबट्ट्याच्या व्यवहाराला केवळ आले सोनियाच्या मना म्हणून राबवावे लागले नव्हते. परंतु, पंतप्रधान म्हणून त्यांनी फक्त 'येस बॉस!' इतकेच आपले इतिकर्तव्य मानले.

In reply to by स्पार्टाकस

प्रसाद१९७१ 07/08/2014 - 18:10
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. ममोंनी बरीच पदे भुषवली पण कुठल्याच पदावर लक्षणीय काम केले नाही. एकेकाळी ममो सरकारीकरणाच्या बाजुला होते कारण इंदीरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर उदारीकरणाच्या बाजुने झाले कारण राव साहेब आले. त्यांना स्वताचे काही मत नाही आणि सत्व पण नाही. वरुन हुकुम आला की कागद्पत्र फक्त तयार करायची.

प्रतापराव 07/08/2014 - 18:46
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. >>>>> नाही हो इतकही कमी लेखू नका त्यांना रावांशी त्यांची तुलना करू नका. माझ्या समजुतीप्रमाणे रावांवर हर्षद मेहताकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता त्या काळात ती बरीच मोठी रक्कम होती. ममो ह्यांच्यावर असले आरोप कधी झाले नाहीत.

भाते 07/08/2014 - 23:34
काही अपवाद वगळता, वरच्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मनमोहन सिंग यांचे फक्त युपीए १ आणि २ या काळातले मुल्यांकन केले आहे. वरच्या प्रतिक्रिया वाचुन 'इतिहास मनमोहन सिंग यांचे (पंतप्रधान म्हणुन) मूल्यमापन कसे करेल ?' असे धाग्याचे शीर्षक आहे का अशी शंका आली. पंतप्रधान म्हणुन त्यांना कितीही नावे ठेवली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ - ८५) पासुन, भारताच्या योजना आयोगाचे ऊपाध्यक्ष (१९८५ - ८७), भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार (१९९० - ९१) आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री ही त्यांची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.

धाग्यावर Score Settling होत आहे का ? मनमोहन २००९ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत घेऊन का निवडून आले याचे तटस्थ विश्लेषण करण्यात कुणालाच रस नाही का ? कारण इथे अनेक लोक जस म्हणत आहे तसे मनमोहन अकार्यक्षम , कळसूत्री बाहुले असते तर लोकांनी त्यांना सलग दुसरी टर्म दिलीच नसती . अटलजींना (सलग २ पूर्ण काळ टर्म ) पण हि संधी लोकांनी दिल्या नाहीत मात्र भारतीय जनतेनी हा विश्वास मनमोहन यांच्यावर दाखवला . कुछ तो बात होगी . मी स्वतहा मोदी यांचा 'भक्त ' नाही . पण त्यांचे मूल्यमापन अजून ५ वर्षांनी केल्या जावे असे माझे मत आहे . चांगल्याला चांगले म्हण्याला काय हरकत आहे . नाहीतर आंधळेपण पोटी मोदी भक्तांनी जेखालच्या पातळीचे bashing केल ते आणि मोदी यांच जे हनन चालू आहे ते याच्यात फारसा गुणात्मक फरक नाही असे मला वाटते . बाकी हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे . यापूर्वी त्यांनी इंडिया shining चा भोपळा फोडला होता मोदी अपयशी ठरले त्यांना पण जनता बाहेरचा रस्ता दाखवेलच . चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते

In reply to by पिंपातला उंदीर

संपत 11/08/2014 - 17:08
हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे ह्याच्याशी सहमत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल हा विश्वास बळकट करणारे आहेत. बाकी युपीए १ चे यश मी वर नमूद केले आहे. त्याचे श्रेय मनमोहन सिंघना देण्याचे नाकारणे अयोग्य आहे.

चौकटराजा 11/08/2014 - 16:40
चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते ] आपले हे वाक्य मोलाचे आहे. या धाग्यात मी वर दिलेला प्रतिसाद काय सांगतो ? त्यातूनही मला वाटते की यातील यश काळाचे व अपयश हे मनमोहन यांचे आहे. कारण ते काय किंवा जाणता राजा(?) शरद पवार यांचे आरोग्य, शिक्षण, न्यायदान व निवडणूक प्रक्रिया या बाबीवर अजिबात लक्ष नाही. हे अनेक कॉंग्रेसी व भाजपा नेत्यांचे असेच आहे. भाजपा चा कारभार दगडापेक्षा वीट मऊ इतपतच ठीक चालेल. व हे कट्ट्रर भाजप वाल्यानाही ठाउक आहे. कारण सलमान गजाआड जाउ नये अशीच न्यायव्यवस्था हवी असाच दोघांचा अप्रोच आहे.

विवेकपटाईत 16/08/2014 - 18:59
देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत बाबी , सडक, रेल्वे, कृषी साठी लागणारी सिचाई सुविधा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाजपायी सरकार ने ५ वर्षात जितके कार्य केले त्याचा १/४ कार्य ही गेल्या १० वर्षात झाले नाही. वाजपायी सरकार जर पुन्हा जिंकले असते तर चतुर्भुज योजना केंव्हाच पूर्ण झाली असती.dfc चे कार्य ही पूर्ण झाले असते. काही नदी जोड प्रकल्प ही पूर्ण झाले असते. रोजगार आणि देशाचा आर्थिक विकास कित्येक पट वाढला असता. मनमोहन सरकारने सर्वप्रथम नदी जोड प्रकल्पाला कचरा पेटी दाखविली आणि सडक आणि रेल्वे दोन्ही आधार भूत बाबींवर खर्च कमी केला. का? याचे उत्तर कोण देणार. आज ८० टक्के माल रस्त्यावरून न्यावा लागतो आहे त्या मुले वाहतूक खर्च कित्येकपट वाढला. देशाचा बिकास खुंटला. UPA-I मधेच मूलभूत बाबींवर दुर्लक्ष करण्यात आले. सर्व बाबतीत पीछेहाट झाली तरीही UPA पुन्हा जिंकली कारण विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव होता. बाकी निवडणूक जिंकायचे म्हणाल तर केजरीवाल सारखा व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकतो. बाकी अधिक बोलू शकत नाही.

एस 03/08/2014 - 11:49
मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन होईल तेव्हा होईल. पण सध्याच्या वातावरणात मिपावर तुमच्या लेखाचं वेगळंच मापन होण्याची शक्यता आहे. कदाचित हा लेख अजून एक-दीड वर्षांनी आला तर थोडे जमिनीवर येऊन लोक प्रतिसाद देतील. आत्ताच्या घडीला चिखलफेकच होईल असे वाटते. वाचनखूण साठवली आहे. दोनेक वर्षांनी सविस्तर प्रतिसाद देईन. तोपर्यंत भविष्यकाळ डॉ. सिंग यांचे चित्रण कसे रंगवतोय हे पहायला पाहिजे.

In reply to by एस

मला खात्री आहे की जर मनमोहन सिंग यांनी आपले चरित्लिहीतेले तर आणि त्यात खुल्लम खुल्ल लिहीले तर बरीच धक्कादायक माहिती बाहेर पडेल ! चरित्र न लिहीण्यची करंगळी चिरुन शपथ घेण्यास त्यांणा भाग पाडले गेले असावे.

तिमा 03/08/2014 - 12:16
लेख विचार करायला लावणारा आहे. सर्वसामान्य नागरिकाला अजूनही, मनमोहन यांच्याविषयी व्यक्तिगत आदर आहे.पण एरवी तोंड न उघडणारे मनमोहन, नटवरसिंगांवर मात्र लगेच भाष्य करतात, याचे आश्चर्य वाटते. खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही. इतक्या बुद्धिमान माणसाला आपण घटनाबाह्य काम करत होतो याची जाण नसावी हे खेदकारक आहे. स्वतः प्रामाणिक असताना त्यांनी सोनियांची दादागिरी का चालवून घेतली आणि आत्मसन्मानासाठी वेळीच राजीनामा का दिला नाही, हेच तर मोठे कोडे आहे आणि त्याचे कारण प्रत्येक सुजाण नागरिकाला जाणून घेण्याची इच्छा आहे.

In reply to by तिमा

नितिन थत्ते 03/08/2014 - 19:20
>>खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही सोनिया गांधींना सरकारी फायली वाचून त्यातले काही आकलन होत असे असा गंभीर आरोप इथे केला जात आहे. ;)

In reply to by नितिन थत्ते

त्याना कळत नसेल. पण त्यांनी ठेवले होते ना सल्लागार समितीत एनजीओवाले. कदाचित म्हणूनच मनमोहन मनातून संपूर्ण उतरले. तसेही युपीए-१ कसे आले हेच मोठे कोडे आहे मला.

In reply to by तिमा

रमेश आठवले 03/08/2014 - 21:21
सोनियाने बहाल केलेले पद स्वीकारताना त्यांना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कदाचित कल्पना नसावी. पण काही काळा नंतर सोनियाच्या हातातली बाहुली म्हणून प्रतिमा निर्माण झाल्यावर ही पदाचा मोह त्याना सुटला नाही हे खरे.

मोदी तरी काय करत आहेत, ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, संघाच्या कार्यालयातून आदेश निघताच नेमणूका व निर्णय होत आहेत. हे कोणती घटनादत्त कामं करत आहेत... मनमोहन सोनियांना विचारुन काम करत होते, तिथे मोदी मोहन भागवतांच्या क्लिअरन्सची वाट पहात असतात,मोडस ऑपरेंडी तीच आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 04/08/2014 - 11:07
नगरसेवकपदी निवडुन आलेले लोक बघता संघाच्या लोकांची खरेचे " ती " लायकी आहे असे वाटत नाही. आता त्यांनी एक किंगमेकरची भूमिका वठवली आहे ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

प्रतापराव 07/08/2014 - 17:55
कसले किंगमेकर नि कसले काय संपूर्ण भारतात मोदींची हवा होती. लोकांनी विकासासाठी मोदींना मत दिले इथे संघ कसा काय किंगमेकर बनला. बर्याच तरुणांना संघ नावाची एखादी संघटना आहे हे हि माहित नाही. हा सारा मोदींचा करिष्मा आहे. संघाचा पाठींबा पूर्वीपासून भाजपला आहे कधी एवढे बहुमत मिळाले होते का ? म्हणतात न यशात अनेक भागीदार असतात नि अपयश एकट्याचेच असते तसला प्रकार आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मोहन भागवत आणि सोनिया गांधी ह्यांमध्ये खूप फरक आहे … मुळात मानला तर… मानाय्चाच नसेल तर विषयच संपला…. मोहन भागवत कोणत्याही घराण्याच्या आशीर्वादाने आलेले नाहीत… आपण संघाच्या एकंदरीतच स्ट्रक्चरचा अभ्यास करावा…. (आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे…)

In reply to by एक स्पष्टवक्ता..

प्रश्न भागवत वा गांधींच्या कॅलिबरचा नाही, प्रश्न आहे घटनाबाह्य सरकार चालवण्याचा .... मनमोहन सिंगना आरोपिच्या पिंजर्यात उभे करताना मोदींना सूट द्यायची व कारण सांगायचे कि मोहन भागवत तथाकथित राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे असे चालणार नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा जेंव्हा सल्ला घेतो (कि जो समाजाबद्दल जागरूक आहे) आणि ती व्यक्ती जर त्या पात्रतेची असेल तर त्या विचारण्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं…. माझ्या माहितीनुसार एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही….

In reply to by एक स्पष्टवक्ता..

विटेकर 06/08/2014 - 10:55
धर्मसत्तेचा(पक्षी सन्यस्त / व्रतस्थ लोक )राजसत्तेवर अन्कुश ही भारतातील परंपराच आहे. इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसतील. १. अगदी प्राचीन उदाहरण - वेन राजा , हा अन्यायकारी राजा जेव्हा प्रजेला त्रास देऊ लागला तेव्हा साधु-संतानी चक्क त्याला मारले, त्याच्याच शरीरापासून पृथुची निर्मिती झाली. आणि मग पृथुने राज्य केले. २. अगदी राक्षसांच्या राज्यात देखील शुक्राचार्यांची महती होतीच. ३. श्रीरामाचा राज्यभिषेक झाल्यावर श्रीरामाने उद्घोषणा केली की मी दंड्नीय नाही, तेव्हा वसिष्ठांनी त्याच्या मस्तकावर आपल्या धर्म दंडाने थोपटले आणि सांगितले, तू चक्रवर्ती आहेस पण धर्मदंडाखाली दंडनीय ही आहेस. ४. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त ५. विद्यारण्य स्वामी - हरीहर बुक्क ६.समर्थ रामदास - शिवाजी महाराज ७.अगदी अलिकडच्या काळात - महात्मा गांधी - काँन्ग्रेस ८. जे.पी. - जनता पार्टी तेव्हा सत्ताबाह्य सत्ताकेन्द्र असणे नवीन नाही . मध्ययुगीन अंधकाराच्या काळात देखील भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी आमची संतमंडळीच लोकान्चे खरे राजे होते.. मुस्लिम आणि ब्रिटिश शासन असले तरीही ! या देशाची संस्कृती आणि परंपराच अशी आहे की सत्ताकारणाने इथले जनमत बदलत नाही ! या देशाच्या समाजकारणाची नाडी धर्माच्या हातात आहे .... आणि धर्माला ग्लानी जरुर येते .. तो नष्ट होत नाही !! म्हणून तर युनान मिश्र रोमा सारे मिटे जहां से कुछ् हम ही है की हस्ती मिटती नही हमारी तेव्हा जेवढा सल्लागार निस्पृह आणि विरागी , तितके शासन चांगले हा सरळ सरळ नियम आहे. सत्ता कोणाचे येवो आथवा जावो .. भारतीय मानसिकतेत बदल घडवायचा असेल तर समाजकारण करावे लागते आणि असाच माणूस भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनतो. सत्तापिपासू लोकांना भारतीय त्यांची योग्य जागा दाखवतातच ! फक्त वेळ लागतो..... It's big fat white elephant .. it moves very slowly , you can not make him to run !

In reply to by विटेकर

भारत देश प्रजासत्ताक आहे, धर्मसत्ता वगैरेच्या भ्रमातून बाहेर यावे.आपण ऐकविसाव्या शतकात आहोत मध्ययुगात नाही. एका विशिष्ट धर्माला राष्ट्रीय धर्म घोषीत करुन इतर धर्मीयांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतुन वगळणार्या संघटनेच्या मार्गदर्शनाची गरज भारतातसारख्या प्रजासत्ताक देशाला नाही ,अर्थात अशा संघटनेकडे आश्रीत म्हणुन राहीलेले लोक त्यांचेच सल्ले ऐकणार व लोकशाहीला व्यवस्थेला दरकिनार करणार, यात नवे ते काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 07/08/2014 - 15:59
काय खर बोलता होत तुम्ही .. साला लक्षात च आले नाही आपण एकविसाव्या शतकात आहोत ते ! तुमची मळमळ मात्र अगदी अर्वाचीन काळातील वाटते ..

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 16/08/2014 - 19:16
मला वाटते धर्म शब्दाचा अर्थ आपल्याला कळला नाही आहे. धर्म शब्दाचा अर्थ देवतेची पूजा करण्याची पद्धती नव्हे अपितु आपल्या धर्मात धर्म शब्दाचा अर्थ मानवाने जे धारण केले आहे ते. अर्थात मनसा वाचा कर्मणा व्यवहार ज्याच्या माध्यमातून मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करतो. मनु ने धर्म के दस लक्षण सांगितले आहे: धृति: क्षमा दमोऽस्‍तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह: । धीर्विद्या सत्‍यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‌ ।। (मनुस्‍मृति ६.९२ ( धैर्य , क्षमा , संयम , चोरी न करणे , शौच ( स्वच्छता ), इन्द्रियांना वश मध्ये ठेवणे , बुद्धि , विद्या , सत्य और क्रोध न करणे.) राजाला वरील धर्माचे पालन करणे आवश्यक होते. अन्यथा त्याला पदच्युत करण्याचा अधिकार जनतेला होता.

In reply to by एक स्पष्टवक्ता..

एक्सपर्ट अँडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही
मोहन भागवत व आरेसेस एक्स्पर्ट आहेत ह्याचा कोणता विदा आपल्याकडे आहे? मोहन भागवत /संघ हिंदु हिंदुत्व वगैरेच्या व्याख्या करतात, इतर कुठल्या क्षेत्रात त्यांचे एक्सपर्टाईज आहेत? भाजपसारखा राजकीय पक्ष असताना अर्थ विज्ञान तंत्रज्ञान सहकार ई ई प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती व संस्था असताना ,आम्ही आरेसेसकडून एक्सपर्ट एडव्हाईस घेतो असे सांगणे याचे दोन अर्थ निघतात, मोदी सरकार दूधखुळे आहे अथवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ईमानेइतबारे काम करणारे गुलाम आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

हे बघा आता विरोधाला विरोधंच जर करायचा असेल तर विषयच संपला…. मुळात हा असा साला घेण्यात चुकीचं काय आहे हेच मला नाहीये समजत… जर तो सल्ला चुकीचा निघाला तर शंका काढण्यात अर्थ आहे असं माझं स्पष्ट मत आहे…. आणि उरला विषय एक्सपर्टाईचा …. आत्तापर्यंत ह्या देशातले बहुतांश निर्णय हे एक्सपर्टाईज वर विसंबूनच घेतले गेले ना?? काय झालं त्यांचं …. आणि रा.स्वं.संघाइतकी शिस्तबद्ध संघटना आपल्या देशात तरी नाही. जिथे जिथे आपली सरकारी (प्रशिक्षित) यंत्रणा नाही जाऊ शकत. तिथे जाऊन ते त्यांची मदतच करतात… थोडेसे डोळे किलकिले जरी करून बघितलेत ना तरी वस्तुस्थिती समजेल… पण अडचण काय झालीये माहितीये… साठ वर्षाच्या मूर्ख आणि बिनडोक सरकारमुळे "दुधखुळे" आणि "गुलाम" हे दोनच शब्द आपल्याला (इथे फक्त तुम्हाला असे म्हणायचे नाही कृगैन) इतके अंगवळणी पडलेत… कि पोह्यावर शेव घालावी तसे हे शब्द आपण शिपडत असतो…. असो… कावीळ झालेल्याला काय सांगावं जग पिवळं नाही म्हणून…. \

In reply to by एक स्पष्टवक्ता..

ठीकाय मग, मनमोहन गांधी घराण्याचा एक्सपर्ट एडव्हाईस घेत होते व मोदी संघाचा घेतात, घटनाबाह्य कुणीच नाही यावर तरी शिक्कामोर्तब करुयात!

In reply to by नानासाहेब नेफळे

मुळात फक्त आणि फक्त गांधी घराण्यामुळे एक्सपर्टाईज मिळतो?? हा एक कळीचा प्रश्न आहे. गांधी ह्या नावाऐवजी जर जोशी, जाधव अशी नावं असती तर कोणी कुत्रं तरी वार्याला उभं राहिलं असतं का? समजत नाहीये कि समजून घ्यायचं नाहीये हेच कळत नाहीये नानासाहेब…

In reply to by एक स्पष्टवक्ता..

चित्रगुप्त 10/08/2014 - 22:40
.... आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे… याचे उदाहरण मी बघितले आहे. मी रहातो, त्या दिल्लीजवळच्या फरिदाबाद स्टेशनावर काही वर्षांपूर्वी मध्यरात्री फार मोठा रेल्वे अपघात झाला. सर्वात आधीतर आसपासच्या झोपडपट्टीतल्या लोकांनी यथेच्छ लूट केली (नंतर पोलिसांना घरा-घरातून सूटकेसा वगैरे सापडल्या) नंतर पहाटेपासून संघाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्य सुरू केले. गंमत म्हणजे टीव्ही वरील बातम्यात उघड दिसत असूनही संघाच्या कार्याचा उल्लेखही केला गेला नाही.

In reply to by खटपट्या

संघाचे लोक आपत्तीकाळात काम करायला जातात कि जाहीरात? जर कामच करत असतील तर जाहीरात होत नाही म्हणुन का रडगाणे गावे ? एका राष्ट्रवादी "संघटनेने राश्ट्रकार्याची प्रसिद्धीच झाली नाही हो !" ,अशी आरोळी ठोकण्यात काय अर्थ आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

खटपट्या 11/08/2014 - 00:57
प्रसिद्धी नको पण अनुल्लेख हि नको. (मी काही संघाचा कार्यकर्ता किंवा प्रचारक नाही. पण रोजच्या बातम्यांमध्ये संघाचे लोक दिसत होते) जे आहे ते आहे. नाकारून काय उपयोग. बाकी कोणत्या संघटनेचे लोक हे काम करत असतील तर त्यांचाही उल्लेख आला पाहिजे.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 11/08/2014 - 14:03
लाखातले एक बोल्लात ! या निमित्त तुमचा शनवारवाड्यावर सत्कारच करायला हवा ! हे कसले राष्ट्रवादी ? हे तर जाहीरात वादी ! अशी जाहीरात करतात आणि छुप्या मार्गाने सत्ता हस्तगत करतात... यांचे कशाला करायला हवयं कोड कौतुक ? असतील जात आपत्ती निवारणासाठी , त्याचे काय विशेष ! पण काय आहे ना , भोळ्या भाबड्या जनतेला कळतच नाही हो, कर्तृत्ववान ( आणि तो ही त्यागी घराण्यातील )राजपुत्राला निवडून द्यायचे सोडून एका संघाच्या प्रचारकाला निवडून दिले ? पण नानासाहेब , तुम्ही एक काम कराच... कसं करुन महाराष्ट्रात तरी चड्डीवाले लोक सत्तेवर येणार नाहीत असं पहा ! भोळ्या भाब्ड्या जनतेसाठी तुम्ही एवढे कराचं ! अहो हे लोक राजधानी मुंबई हून नागपूरला नेतील हो ! वाचवा !

In reply to by एक स्पष्टवक्ता..

नुकतेच घडलेले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता माळीण साठी एखादे हजार कोटींचे प्याकेज येऊ द्या. तेथे राष्ट्रवादी आणि आय कान्ग्रेसवाले लगेच पोचतील. मग काय होईल हे सर्वांना माहीत आहेच !

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रतापराव 07/08/2014 - 17:44
नानासाहेब नमो हे संघाचे ऐकत असतील असे वाटत नाही.संघाच्या पुढे हो हो करून ते स्वताचेच अजेंडे राबवणार नि संघाच्या तोंडाला पाने पुसणार. ते कर्तुत्ववान नेते आहेत भाजपला जो विजय मिळाला तो मोदींमुळे संघामुळे नाही. हे सार्यांना चांगलेच ठावूक आहे.

In reply to by प्रतापराव

मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते पक्के संघिष्ट आहेत. संघाच्या आदेशावरुन त्यांची कार्यपद्धती ठरते .मंत्रीमंडळासारख्या महत्वाच्या बाबीत संघाच्या पदाधिकार्यांशी उघड चर्चा कशासाठी चालली होती? ज्यांना मंत्रीपद हवे होते ते दिल्ली संघमुख्यालयात कशासाठी जात होते? लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली. मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता.मनमोहन व मोदी रीमोटकंट्रोल्डच आहेत ,त्यामुळे किंगमेकर वगैरे उपमा आरेसेसला देताना सोनिया गांधी घटनाबाह्य सरकार चालवतात असा आरोप करणे हे' आपला तो बाब्या' या प्रकारच्या मानसिकतेचे लक्षण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळेसायेब, हे दोनही नेते रिमोट कंट्रोलने नियंत्रित आहेत हे (केवळ वादासाठी) मानल्यावरही खालील वस्तूस्थिती नाकारणे जरा कठीणच आहे. एका बाजूला दहा वर्षे केंद्रसरकारमध्ये सत्ताधारी असणारा आणि प्रशासन व भ्रष्टाचारावर काबू ठेवण्यात असफल झालेला आणि शिवाय निवडणूक निकाली पद्धतिने हारलेला नेता (आता हे केवळ विरोधी नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही मान्य केले आहे) आणि दुसर्‍या बाजूला विकासाचे राजकारण करत (हे काँग्रेसच्या केंद्रिय सरकारनेच त्याच्या अनेक खात्यांनी गुजरात सरकारच्या अनेक उपक्रमांना दिलेल्या पारितोषींकांच्या व्दारा मान्य केले आहे) सतत चारदा निकाली बहुमताने निवडून आलेला नेता... यांची खरं तर तुलनाच होऊ शकत नाही. तरीही, एक सावध नागरीक म्हणून नविन नेत्याला योग्य तो काळ (साधारण वर्षभरतरी) दिल्यावरच नविन नेत्याच्या पात्रते-अपात्रतेबद्दल काही म्हणणे शक्य होईल, हा समतोल विचार होईल. केवळ आपल्या पक्षाच्या विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणूण लगेच त्याच्या नावाने शंख करण्यापेक्षा, जो नेता देशाचे (म्हणजे पर्यायाने आपणा सर्व नागरिकांचे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे) भले पाहतो त्याला संधी आणि पाठिंबा देण्याची सारासारबुद्धी दाखवण्याची जबाबदारी स्वतःला सुजाण आणि विचारवंत समजणार्‍या नागरिकांवर आहे, नाही का ? अजून महत्वाचे: केवळ विरोधी पक्षाचे काम आहे म्हणून देशाच्या भल्या कामाला आंधळेपणाने विरोध करण्यापेक्षा आणि आपल्या पक्षाच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालण्यापेक्षा; स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना "तसे किंवा त्यापेक्षा जास्त चांगले काम का केले नाहीत" हे विचारण्याचा सुजाणपणा आणि धमक जेव्हा लोक दाखवू लागतिल तेव्हाच देशाचे (आणि पर्यायांने लोकांचे) भले व्हायला सुरुवात होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बर्याच अंशी सहमत, परंतु फक्त मोदीच विकास करतात असे काही नाही.इतरही अनेकजण चांगली कामं करत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

जे कोणी खरोखर चांगले काम करतात त्या सगळ्याचेही कौतूक करायलाच पाहिजे ! एकाचे अपयश झाकण्यासाठी इतरांचे पाय ओढण्याने काय साधणार आहे ? जगात चांगले काम करायचा मक्ता फक्त एकाच पक्षाला / व्यक्तीला आहे हाच विचार बुद्धीमत्तेच्या कमतरतेचे लक्षण नाही काय ? मग चांगले काम करणार्‍याचे पाय ओढण्यापेक्षा त्याला संधी आणि मदत करणेच शहाणपणा नाही काय ? तसेच खूप संधी मिळून असफल झालेल्या आणि आताच संधी मिळालेल्यांची तुलना करणे शास्त्रिय विचार नसून केवळ राजकीय कांगावा असतो हे वाचकांच्या ध्यानात येणार नाही असे समजणे म्हणजे (अ) "वाचकांना अक्कल नाही असे समजणे" किंवा (आ) "आपल्याला कमी समज आहे हे न उमजणे" या दोन पर्यायांपैकी एकच असते. त्यांतला कोणता पर्याय खरा आहे हे समजणे मात्र प्रत्येकाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे. कांगाव्यांच्या उदाहरणांनी भारताचा गेल्या सहा शतकांचा इतिहास खच्चून भरलेला आहे. तरीही प्रत्यक्षात परिणाकारक काम न करता कांगावाखोरपणा करत तुंबडी भरणार्‍यांना पाठिंबा देण्याने आपण आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान करून घेत आहोत हे कळण्याची समज-उमज अजुनही काही भारतियांत नाही असेच खेदाने म्हणावे लागते. भारतासारख्या विशाल देशाचा विकास कोणी एकच माणूस करणे शक्य नाही. तसा मोदींनी दावा केल्याचे मला तरी आढळले नाही. उलट पायाला स्पर्श करणे वगैरे सारख्या प्रथा बंद व्हाव्या असे म्हणणाराही हाच पहिला नेता भारताने पाहिला. त्याविरुद्ध एकाच कुटुंबातील मोजक्या माणसांकडे भारत गहाण असल्यासारखे वागणार्‍या आणि त्यांच्या घरी झाडूवाल्याचे काम करायला तयार असल्याची माध्यमांत उघडपणे जाहिरात करणार्‍या पाठीराख्यांची मोठी फौज आहे हे अख्ख्या भारताला माहीत आहेच. आता भारताला गरज आहे ती फक्त बोलबच्चन न राहता, जनतेची दिशाभूल न करता आणि स्वतःच्या / बगबच्च्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता, खरोखरच खरेपणाने काम करणार्‍या नेत्याची... अर्थात अश्या लोकशाही नेत्यालाही त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक स्तरांच्या कार्यकर्त्यांची गरज असतेच. पण लायक नेत्याविना कार्यकर्ते म्हणजे केवळ स्वर्थाकरिता एकत्र आलेल्या बाजाबुणग्यांची फौज बनते... आणि मग ज्या फौजेने रक्षण करायचे तीच लूट्मार करू लागते ! आनंदाची गोष्ट अशी की भारतीय जनात बराच काळ बोटेच काय पण पूर्ण हात पोळल्यावर का होईना वरचे सत्य हळू हळू समजू लागली आहे अशीच लक्षणे आहेत. अर्थात भारताचे भले करण्यात अनेकांचे अयोग्य वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाणार यात काही शंका नाहीच, तेव्हा असे सगळे लोक कांगावा करणारच नाहीत असा समज करून घेणे वास्तवाला धरून होणार नाही हेही सत्य आहेच ! असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

विटेकर 11/08/2014 - 14:11
"लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली." इतक्या महत्वाच्या प्रसंगी आपण तिथे उपस्थित होता.. हे वाचून आमचे डोळे पाणावले , आपल्याबद्दलच्या आतीव आदराने आणि स्नेहाने आमचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले आहेत..कधी एकदा तुमचा सत्कार करतो असे झाले आहे .. नानासाहेबांच्या सत्कारासाठी ताबडतोब समिती स्थापन करावी अशी मी मिपा व्यवस्थापनाला विनंती करतो.. नानासाहेब ... . . . .. . नानासाहेब , तोपर्यन्त आमच्यासाठी आपल्या चरणांचे zerox इथे डकवावे .. अशी मी तुम्हांला नम्र विनंती करतो... ( भावविभोर ) विटेकर

In reply to by नानासाहेब नेफळे

आनन्दा 18/08/2014 - 14:05
ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, कॉण्ट्रॅडिक्ट्स विथ मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता. हेन्स प्रूव्हड!!

In reply to by आनन्दा

या न्यायाने गोबेल्सही जर्मनीचा लोकशाही मार्गाने निवडून आलेला नेता होता असे तुम्ही म्हणाल.....

In reply to by नानासाहेब नेफळे

मोदी ह्यांनी अनधिकृत बांधकामे गुजरात मध्ये तोडली त्यात काही मंदिरे सुद्धा होती ह्यामुळे संघाच्या इतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर भरपूर शिव्याशाप दिले तेथे मोदिनी दुर्लक्ष केले. संघ कधीही भांडवल शाहीचा पुरस्कर्ता नव्हता. मोदिनी मात्र भांडवल शाहीतर्फे समाजात सुब्बता आणून सत्ता जिंकण्याचा मूलमंत्र संघाला दाखवून दिला . हा मूलमंत्र आधीच्या भाजप नेत्यांना म्हणजे अडवाणी , वाजपेयी महाजन ह्यांना कळला असता तर मंदिर मुद्दा न उकरत केवळ पल्लेदार भाषणे देत त्यांनी सत्ता मिळवण्याचे मनसुबे रचले नसते गुजराती जनतेने तीनवेळा मोदींना सत्ता संघामुळे नाही तर त्याच्या कार्यामुळे दिली हेच मध्य प्रदेश व गोव्याच्या बाबतीत म्हणता येईल. संघाचे मार्गदर्शन नेहमीच भाजपला होते पण मोदींना संघाचा नाही तर अदानी व अंबानी चा दलाल असण्याचा आरोप होणे ह्याचा अर्थ नेफळे साहेबांना कळला

अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू. हे श्रेय अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग याना जितके आहे त्यापेक्षा जास्त त्यावेळचे पंतप्रधान राव यांना आहे. ज्या "दैदिप्यमान" किंवा "धाडसी" सुधारणांचे निर्णय त्या काळात घेतले आणि राबवले गेले ते (एक्झेक्युटीव्ह सत्ताकेंद्राच्या) पंतप्रधानाच्या निर्णयाशिवाय आणि सक्रिय पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते. आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . जेव्हा तेच किंवा तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधान म्हणून अंगावर पडली तेव्हा मनमोहन निर्णय पक्षाघाताची (डिसिजन पॅरॅलिसिस) ची शिकार झाले. एवढेच नव्हे तर "मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्याकडून भ्रष्टाचार न होण्याची काळजी घेत लोकोपयोगी कामे करून घेणे" हे पंतप्रधानांचे मुख्य कर्तव्य करण्यात ते असमर्थ ठरले. म्हणजे "शासक म्हणून असलेल्या कार्यक्षमतेचा / पात्रतेचा अभाव" ही अपकिर्ती त्यांना स्विकाराविच लागेल. त्यांच्या कार्यकालात पंतप्रधानावर नियंत्रण ठेवणारे अशासकिय सत्ताकेंद्र होते हे मान्य करूनही; मनमोहन यांच्या सारख्या विव्दानाला त्याचा अर्थ आणि त्यामुळे त्यांच्यावर येणारी अधिक जबाबदारी कळली नसावी हे म्हणणे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान होईल. हे सत्य जमेस धरूनही मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार याबातीतची शासकिय व नैतीक जबाबदारी पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर होती हे त्यांना माहित असणारच. पण त्यांनी अश्याबाबतीत शासकिय तर सोडाच पण नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी कोणतेही ठाम पाऊल उचलल्याचे दिसले नाही... केवळ शक्य तेवढे मौन पाळणे पसंत केले. अश्या कृतींमुळे त्यांच्या अग्रक्रमसूचीत इतर काही गोष्टी देशाच्या हितसंबंद्धांच्या वरच्या जागी होत्या हेच सूचीत होते. उत्तम शासकाच्या गुणधर्मसूचीत शैक्षणिक आणि बौधिक पात्रता महत्वाची असते, पण प्रशासकीय आणि नैतिक पात्रता त्यापेक्षा खूप वरच्या जागी असणे आवश्यक असते. मनमोहन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अग्रक्रमसूचीत या विकल्पांची जागा उलटी झालेली दिसते. त्यामुळे कारणांच्या बाबतीत मतभेद असले तरी इतिहासात, "एक विद्वान (अ‍ॅकॅडेनिशियन) असलेला चांगला नोकरशहा (ब्युरोक्रॅट) पण शासन करण्यात असफल व सत्तेतून केव्हा पायउतार व्हावे हे ठरवण्यात असमर्थ ठरलेला शासक" अशीच त्यांची नोंद होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@इस्पिकचा इक्का उत्तम विश्लेषण . पण याच निकषावर UPA-1 च यश आणि २००९ मधील मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेस ला सार्वत्रिक निवडणुकीत मिळवून दिलेलं यश याची पण कारण मीमांसा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल

In reply to by पिंपातला उंदीर

मृत्युन्जय 04/08/2014 - 11:58
मला वाटते युपीए १ च्या कार्याबद्दल एकुणच लोकांना फार कमी माहिती आहे. कारण ठळक यश असे कदाचित त्यांच्या वाट्ञाला आले नाही. २जी स्कॅम मात्र गळ्यात पडला. व्यक्तिशः मला वाटते २जी स्कॅम जेवढा मोठा बनवला गेला तेवढा मोठा तो नव्हताच. त्याचे खरे स्वरुप लोकांसमोर आणि न्यायिक अधिकार्‍यांसमोर आणण्यात युपीए २ ला अपयश आले आणि त्यानंतरच्या एकुणच गोंधळात संपुर्ण उद्योगजगतातली विश्वासार्हता त्यांनी गमावली. मिळकत करात रिट्रोस्पेक्टिव्ह बदल केले गेले जे सर्वमान्य पद्धतीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे विश्वासार्हता अजुन गंडली. ही २ मुख्य अपयशे युपीए १ ची आहेत. शिवाय युपीए १ बरेच कसरती करण्यातच गेले. जे काम केले ते कदाचित लोकांपर्यंत पोचलीच नाहित. त्यामुळे त्यांनी काही चांगली कामे केलीच असतील तर ती झाकोळली गेली. त्यामुळे युपीए १ च्या चांगल्या कामगिरीवर कोणी प्रकाश टाकला तर बरे होइल. युपीए २ ने अर्थातच निलाजरेपणाची आणि कुशासनाची कमाल गाठली होती. त्यामुळे इतिहास ममोंना कसे लक्षात ठेवील याबाबत फारश्या शंका नाहित.

In reply to by मृत्युन्जय

संपत 04/08/2014 - 12:47
माझ्या अल्प माहितीनुसार युपीए १ चे यश १. जी डी पी > ८% २. कृषी उत्पनात लक्षणीय वाढ झाली होती ३. फिस्कल डेफिसिट खूप कमी झाले होते. बहुधा ४ % पेक्षा कमी. ४. औद्यागिक आणि भांडवल वृद्धी दुप्पट झाली होती ५. रुपया वधारला होता. बाकी मनरेगा,कर्ज माफिसारख्या सारख्या योजना होत्या ज्या काहींच्या मते अतिशय चांगल्या तर काहींच्या मते अतिशय वाईट होत्या.

In reply to by संपत

हे युपीए-१ चे यश की युपीए-१ च्या काळात दिसलेले रिझल्ट्स? जर युपीए-१ इतके चांगले आणि सक्षम होते तर युपीए-२ च्या काळात इतकी अनागोंदी का माजली? तुम्ही जे म्हणत आहात ते यश वाजपेयी-३ सरकारच्या चांगल्या धोरणांचे रिझल्ट युपीए-१ च्या काळात लागले होते आणि त्याचे श्रेय फुकट युपीएने लाटले होते.युपीएपेक्षा एन.डी.ए ने सरकार आणि अर्थव्यवस्था नक्कीच चांगली सांभाळली होती.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

संपत 04/08/2014 - 13:30
इतकी अनागोंदी का माजली?
हाच प्रश्न मलाही पडलाय. पण युपीए ने जवळपास ६-७ वर्षे प्रगती (तेही २००८ नंतरच्या जागतिक मंदीत) केली याचे सर्व श्रेय वाजपेयी सरकारला देणे मला पटत नाही. फार तर पहिल्या दोन वर्षांचे देता येईल.

अनुप ढेरे 03/08/2014 - 15:07
सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते .
हे नाही समजलं. २००९ मध्ये कॉग्रेसला बहुमत होतं???

@अनुप ढेरे थोडी mistake झाली . कॉंग्रेस ने २०० चा पल्ला ओलांडला आणि UPA ला एकूण बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्या . पण कोणावर अवलंबून राहण्याची गरज कमी राहिली .

संपत 03/08/2014 - 15:20
छान लेख.मी स्वतः गोंधळात आहे कि युपीए १ आणि २ मध्ये एवढा फरक का पडला? एवढी अकार्यक्षमता अचानक कुठून आली? घोटाळ्यांच्या आरोपामुळे कि जागतिक मंदीमुळे ? सोनियाच्या हस्तक्षेपामुळे म्हणावे तर तो युपीए १ मध्येही असेलच कि. खर तर २००९ च्या विजयानंतर सिंग अधिक धडाडीने काम करतील अशी अपेक्षा होती. मला तरी काहीच कळले नाही. अर्थात जागतिक मंदीची धग भारताला फारशी लागून न देण्याचे श्रेय युपीए २ ला द्यावेच लागेल.

चौकटराजा 03/08/2014 - 16:43
भारतात व्यापार व उत्पादन जग खुले केले गेले याचे प्रमुख कारण आमच्या उद्यीगपतींचा वा शास्त्रज्ञांची नालायकी. १९४७ ते १९९१ या सालात आपण साधी लहान बल्बची विजेची स्वस्त माळ निर्माण करायला शिकलो नाही. एन सी एल काढून किती नोबेल मिळाली या काळात ? सबब लोकसंख्येशी स्पर्धा करेल असा उत्पादनाचा दर्जा व पुरवठा दोन्ही ही नव्हते. रिक्षा घ्यायची तर दहा वर्षे वाट पहावी लागायची ही एक महत्वाच्या सर्वजनिक सेवेची अवस्था होती. मुलभूत सशीधनाच्या नावाने एक क्राय्जेनिक इन्जिनाचे सन्मान्य उदा सोडले तर बोंब आहे. आजही भारीभारी सर्जिकल उपकरणे भारतात तयार होत नाहीत. मॉलमधील बर्याचशा वस्तू दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक नाहीत. ( उदा स्प्रे ) आरोग्य शिक्षण सार्वजनिक वहातुक ई ला पराकोटीचे महत्व येणे गरजेचे आहे पण ही थेट उत्पादक क्षेत्रे नसल्याने त्यावर जीडीपी मधील नगण्य पैसा खर्च होतो.आपले खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकरणे . खाजगी क्षेत्राला संधी देऊन सरकारी बाबूना खाबूगिरीपासून लांब ठेवून सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करून जनतेला भांडवल दारांच्या ताब्यात देणे या खेरीज बर्याच देशातील सरकाराना गत्यंतर नव्हते.त्यात नरसिंहरावानी ते केले त्यात वेगळे काही नाही. त्यानी समाजवादाचा अत्यंविधी केला. त्याचे काही चांगले परिणाम समाजाला दिसत आहेत. श्रीमंत लोकांसाठी थेट द्रुतगति मार्ग झाला तर त्यावरून गरीब माणूस कोल्हापूरवरून परळ ला जाउन शकतो. ही समाजवादी मुव्हच ठरली आहे. म्हणून कदाचित माझी ऐतिहासिक प्रधानमंत्री म्हणून नोंद होईल असे मनमोहन जी म्हणत आहेत. नरेम्द्र मोदी अजून रवीशास्त्री सारखे खेळत आहेत. भारतातील भ्रष्टाचार व जीवनावश्यक वस्तूंची महागाई या बाबत एकही क्रांतिकारी विचार त्यांचेकडे नसावा. सबब ते ही मौनी बाबा झाले आहेत. अजूनही भारतीय माणसाचे सार्वजनिक कॅरॅक्टर एतके खराब दर्जाचे आहे की त्याना त्याच्या लायकीचेच सरकार मिळत आहे मिळणार आहे. जे चांगले वाईट घडत आहे त्याचे श्रेय जनतेला तसेच सर्वसाक्षी काळाला ही आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 03/08/2014 - 22:48
कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते. "इतिहास लिहण्या आधी तो घडवावा लागतो... जे आपले आत्ताचे प्रंतप्रधान करत आहेत. तसेच कॉमन वेल्थ गेम्स मधे आपल्या देशातील खेळाडुंनी घडवला आहे. :) नरेंद मोदींचे नेपाळ मधील आजचे भाषण :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

एसमाळी 03/08/2014 - 18:04
मी 2004 ते 2009 या upa 1 च्या काळातील भरभराटीचे श्रेय Nda 1 ला देईन.कारण धोरणाचा परिणाम दिसायला काही वर्षाचा काळ जावा लागतो.upa 2च्या काळातील अधोगती upa1 मध्येच चालु झालती.फरक एवढाच की upa 2 मध्ये सगळ उघड झाल.

माननीय मनमोहन सिंग एक उत्कृष्ठ नोकर (एक्प्लॉई वा टीम मेंबर ह्या अर्थाने) नक्कीच होते,परंतु त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण (एम्प्लॉयर अथवा टीम लीडर बनण्याची क्षमता) खरोखर होते का? हा कळीचा मुद्दा आहे. तुलना करायचीच झाल्यास त्यांची तुलना मी सचिन तेंडुलकरशी करेन. सचिन एक उत्कृष्ठ खेळाडु होता पण कधीही एक उत्कृष्ठ कप्तान नाही बनु शकला. ही बाब विचारात घेता पुस्तकाचे An Accidental Prime Minister हे शीर्षकच बरेच काही सांगुन जाते.

हुप्प्या 03/08/2014 - 20:47
आजवरच्या इतिहासात सर्वश्रेष्ट, सर्वात कणखर, भारताला सुवर्णयुगात नेऊन पोचवणारा, ही भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम करुन दाखवणारा, असामान्य वक्ता, कुठलेही भाषण घ्या, ऐकत रहावेसे वाटेल, धीरोदात्त, जनतेशी वरचेवर संवाद साधण्याची हातोटी, अप्रिय असले तर हिताचे निर्णय त्वरित घेण्यात कुठलीही हयगय न करणारा, रिमोटवर चालणारा कळसूत्री बाहुला आहे असा संशयही येऊ नये असा पारदर्शक कारभार, कमालीचा स्वच्छ, कुठल्या सहकार्‍याचे पाऊल वाकडे पडते आहे असा संशय आला तरी तात्काळ त्याची उचलबांगडी करणारा रामशास्त्री बाण्याचा नि:स्पृह. असा महाप्रतापी नेता भारताला लाभला हे भारताचे अहोभाग्यच. असा धुरंधर काँग्रेस पक्षात निर्माण व्हावा हे त्या पक्षाचे पूर्वजन्मीचे पुण्य असावे. ह्या महामानवाला माझे कोटीकोटी दंडवत!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नक्की कोणती लेखमाला? गुजरात विकासाचे मृगजळ की सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे की मिपावरील सगळ्यात अजरामर लेखमाला---रूणझुणु रूणझुणु रे भ्रमरा (बेशर्त स्विकृती आठवते का?) :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आनन्दा 04/08/2014 - 12:03
बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. :)

In reply to by आनन्दा

बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. Smile
हहपुवा

बाकी त्या न्युक्लिअर डिलची काहिही वासलात का लागेना त्या निमिताने त्यांनी बंगालमधील (आणि केरळमधील) स्वतःला ढुढ्ढाचार्य समजणार्‍या लाल तोंडाच्या मस्तवाल माकडांना त्यांची जागा दाखवून दिली हे मनमोहनसिंगांचे श्रेय नक्कीच आहे.

विनोद१८ 04/08/2014 - 23:21
मला वाटते म.मोंना आपल्या एकुण कर्तबगारीचा व पदाचा परिणामकारक असा प्रभाव पाडता आला नाही चांगली १० वर्षे संधी मिळुनसुद्धा, ते नेहमीच कुणाचेतरी ओशाळ्यासारखे असे वागताना दिसले, मक्खपणे वावरले. त्यांनी काही राजकारण केले व आपल्याच पक्षाला आपल्या प्रभावाखाली घेउन त्याचे व देशाचे समर्थपणे नेत्रुत्व पंतप्रधान म्हणुन केले असे भासले नाही, त्यांचा खंबीर असा आधार कधीच कुणाला वाटला नाही, नेहमीच आश्रितासारखे वाटायचे, वागण्यात मोकळेपणा नव्हता. किंबहुना मी या खंड्प्राय देशाचा सामर्थ्यसंपन्न पंतप्रधान आहे हे ते विसरले होते किंवा असे म्हणता येइल ते या देशाचे सर्वशक्तिमान नायक आहेत असे सर्वसामान्यजनांच्या मनावर बिंबवण्यात अयशस्वी ठरले, अगदी बरीच चांगली कामे करुनसुद्धा.

अर्धवटराव 05/08/2014 - 00:53
इतीहास ममोंचं योग्य परिक्षण करु शकेल असं वाटत नाहि. कर्तबगारीशुण्य राजपुत्र आणि असमाधानी राणि यांची मर्जी सांभाळत एका हुषार आणि सज्जन प्रधानाचं जे व्हायचं तेच झालं. अशी परिस्थिती निकट भविष्यात यायचे चान्सेस कमि आहेत. त्यामुळे ममोंवर सर्वात अधिकृत कमेण्ट्स त्यांच्या सहकार्‍यांचीच असतील, व सध्यातरी ति वाईट आहेत.

बहुगुणी 05/08/2014 - 02:48
द इकॉनॉमिस्ट या अमेरिकन नियतकालिकातील भारताविषयीचे जवळजवळ सर्वच लेख (आणि भारतीय नावाच्याच लेखकांनी/ लेखिकांनी लिहिलेले!) भारतद्वेष्टे (India-bashing) या प्रकारात मोडत असल्याचं माझं मत आहे, पण त्यांचा ३ मे २०१४ चा अंक याबाबतीत किंचित अपवाद वाटला. त्यातला Man out of time या लेखात काही मुद्दे चांगले मांडले आहेत. एक माणूस म्हणून नि:स्वार्थी असलेल्या मनमोहन सिंग यांचं एकीकडे राज्यकर्ता म्हणून काय चुकलं, किंवा दुसरीकडे त्यांनी घेतलेले कोणते निर्णय दूरदृष्टीचे / देशाच्या दृष्टीने भले होते, याचं विश्लेषण वाचनीय आहे. निवडणू़क निकाल जाहीर व्हायच्या आधी आठवडाभर आलेल्या या लेखात ही telling वाक्ये होती: "Mr Singh keeps a characteristic silence, but is an inevitable target for the BJP. The most spiteful critics, though, come from his own party. Congress expects a heavy defeat when national election results are broadcast on May 16th. It needs a scapegoat." अर्थात, सर्वच मुद्दे मला पटले नाहीत, पण शेवटी 'द इकॉनॉमिस्ट मधलं लिखाण आहे' म्हणून सोडून दिलं, discount :-) याच लेखावर आलेल्या प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत.

स्पार्टाकस 06/08/2014 - 10:00
मनमोहन सिंग यांची काही खास वक्तव्ये :- "देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे. नानावाटी आयोगाने १९८४ च्या दंगलीत जगदीश टायटलर दोषी आहेत हे जाहीर केल्यावर "जगदीश टायटलर निर्दोष आहे. मी त्यांना मंत्रीमंडळातून मुळीच काढणार नाही." "कॉमनवेल्थ खेळांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही." "ए. राजा निर्दोष आहे." "अण्णा हजारेंनी निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे आणि मग जनलोकपाल आणावा!" स्वतः मनमोहन सिंग राज्यसभेचे सभासद आहेत. "राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाथाने योग्य आहेत!" "शिबू सोरेन, लालू यादव यांना मंत्रीमंडळातून काढणार नाही!" "चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही!" "महगाईसाठी शरद पवार जबाबदार आहेत!" विरोधाभासाचा सर्वोत्कॄष्ठ नमुना! "मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे मला भ्रष्टाचाराविरुध्द काही करता येत नाही!" "मी दुर्बल नाही, कणखर आहे!" "मी कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही!" दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केल्यावर, "या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण दोषी आहेत! मी नाही!" "नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे देशास घातक!" हे राजकीय विरोध म्हणून सोडून देता येईल. मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते. परंतु त्यांनी राबवलेल्या निर्णयांचं श्रेय नरसिंहराव यांचं काहीच नाही का? नरसिंहराव यांच्या काळात गांधी घराण्याची लुडबूड राजकारणात नव्हती त्यामुळे आर्थीक उदारीकरणाचे निर्णय राबवताना अन्न सुरक्षा योजनेसारख्या आतबट्ट्याच्या व्यवहाराला केवळ आले सोनियाच्या मना म्हणून राबवावे लागले नव्हते. परंतु, पंतप्रधान म्हणून त्यांनी फक्त 'येस बॉस!' इतकेच आपले इतिकर्तव्य मानले.

In reply to by स्पार्टाकस

प्रसाद१९७१ 07/08/2014 - 18:10
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. ममोंनी बरीच पदे भुषवली पण कुठल्याच पदावर लक्षणीय काम केले नाही. एकेकाळी ममो सरकारीकरणाच्या बाजुला होते कारण इंदीरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर उदारीकरणाच्या बाजुने झाले कारण राव साहेब आले. त्यांना स्वताचे काही मत नाही आणि सत्व पण नाही. वरुन हुकुम आला की कागद्पत्र फक्त तयार करायची.

प्रतापराव 07/08/2014 - 18:46
मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे. १९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. >>>>> नाही हो इतकही कमी लेखू नका त्यांना रावांशी त्यांची तुलना करू नका. माझ्या समजुतीप्रमाणे रावांवर हर्षद मेहताकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता त्या काळात ती बरीच मोठी रक्कम होती. ममो ह्यांच्यावर असले आरोप कधी झाले नाहीत.

भाते 07/08/2014 - 23:34
काही अपवाद वगळता, वरच्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मनमोहन सिंग यांचे फक्त युपीए १ आणि २ या काळातले मुल्यांकन केले आहे. वरच्या प्रतिक्रिया वाचुन 'इतिहास मनमोहन सिंग यांचे (पंतप्रधान म्हणुन) मूल्यमापन कसे करेल ?' असे धाग्याचे शीर्षक आहे का अशी शंका आली. पंतप्रधान म्हणुन त्यांना कितीही नावे ठेवली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ - ८५) पासुन, भारताच्या योजना आयोगाचे ऊपाध्यक्ष (१९८५ - ८७), भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार (१९९० - ९१) आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री ही त्यांची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.

धाग्यावर Score Settling होत आहे का ? मनमोहन २००९ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत घेऊन का निवडून आले याचे तटस्थ विश्लेषण करण्यात कुणालाच रस नाही का ? कारण इथे अनेक लोक जस म्हणत आहे तसे मनमोहन अकार्यक्षम , कळसूत्री बाहुले असते तर लोकांनी त्यांना सलग दुसरी टर्म दिलीच नसती . अटलजींना (सलग २ पूर्ण काळ टर्म ) पण हि संधी लोकांनी दिल्या नाहीत मात्र भारतीय जनतेनी हा विश्वास मनमोहन यांच्यावर दाखवला . कुछ तो बात होगी . मी स्वतहा मोदी यांचा 'भक्त ' नाही . पण त्यांचे मूल्यमापन अजून ५ वर्षांनी केल्या जावे असे माझे मत आहे . चांगल्याला चांगले म्हण्याला काय हरकत आहे . नाहीतर आंधळेपण पोटी मोदी भक्तांनी जेखालच्या पातळीचे bashing केल ते आणि मोदी यांच जे हनन चालू आहे ते याच्यात फारसा गुणात्मक फरक नाही असे मला वाटते . बाकी हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे . यापूर्वी त्यांनी इंडिया shining चा भोपळा फोडला होता मोदी अपयशी ठरले त्यांना पण जनता बाहेरचा रस्ता दाखवेलच . चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते

In reply to by पिंपातला उंदीर

संपत 11/08/2014 - 17:08
हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे ह्याच्याशी सहमत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल हा विश्वास बळकट करणारे आहेत. बाकी युपीए १ चे यश मी वर नमूद केले आहे. त्याचे श्रेय मनमोहन सिंघना देण्याचे नाकारणे अयोग्य आहे.

चौकटराजा 11/08/2014 - 16:40
चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते ] आपले हे वाक्य मोलाचे आहे. या धाग्यात मी वर दिलेला प्रतिसाद काय सांगतो ? त्यातूनही मला वाटते की यातील यश काळाचे व अपयश हे मनमोहन यांचे आहे. कारण ते काय किंवा जाणता राजा(?) शरद पवार यांचे आरोग्य, शिक्षण, न्यायदान व निवडणूक प्रक्रिया या बाबीवर अजिबात लक्ष नाही. हे अनेक कॉंग्रेसी व भाजपा नेत्यांचे असेच आहे. भाजपा चा कारभार दगडापेक्षा वीट मऊ इतपतच ठीक चालेल. व हे कट्ट्रर भाजप वाल्यानाही ठाउक आहे. कारण सलमान गजाआड जाउ नये अशीच न्यायव्यवस्था हवी असाच दोघांचा अप्रोच आहे.

विवेकपटाईत 16/08/2014 - 18:59
देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत बाबी , सडक, रेल्वे, कृषी साठी लागणारी सिचाई सुविधा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाजपायी सरकार ने ५ वर्षात जितके कार्य केले त्याचा १/४ कार्य ही गेल्या १० वर्षात झाले नाही. वाजपायी सरकार जर पुन्हा जिंकले असते तर चतुर्भुज योजना केंव्हाच पूर्ण झाली असती.dfc चे कार्य ही पूर्ण झाले असते. काही नदी जोड प्रकल्प ही पूर्ण झाले असते. रोजगार आणि देशाचा आर्थिक विकास कित्येक पट वाढला असता. मनमोहन सरकारने सर्वप्रथम नदी जोड प्रकल्पाला कचरा पेटी दाखविली आणि सडक आणि रेल्वे दोन्ही आधार भूत बाबींवर खर्च कमी केला. का? याचे उत्तर कोण देणार. आज ८० टक्के माल रस्त्यावरून न्यावा लागतो आहे त्या मुले वाहतूक खर्च कित्येकपट वाढला. देशाचा बिकास खुंटला. UPA-I मधेच मूलभूत बाबींवर दुर्लक्ष करण्यात आले. सर्व बाबतीत पीछेहाट झाली तरीही UPA पुन्हा जिंकली कारण विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव होता. बाकी निवडणूक जिंकायचे म्हणाल तर केजरीवाल सारखा व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकतो. बाकी अधिक बोलू शकत नाही.
I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे .