मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

माधुरी विनायक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साहित्यातील नवरसांत देशभक्तीच्या दहाव्या रसाची भर घालणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उर्दू आणि हिंदी गीतांची सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है ही सीडी www.savarkarsmarak.com या संकेतस्थळावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येत्या १५ ऑगस्टपर्यंत नि:शुल्क उपलब्ध आहे.

सर्दीवरील उपाय आणि अनुभव

वेल्लाभट ·

In reply to by सुहास..

वेल्लाभट 11/08/2014 - 11:55
ठाऊक आहे ! :) गरम पाण्यातून रम घ्यावी असा एक उपायही ऐकिवात आहे. फक्त धागा हेलकावे खायला लागेल म्हणून नमूद केला नव्हता.

In reply to by धन्या

नाव आडनाव 11/08/2014 - 16:47
लोक स्व"देशी" चा आग्रह धरत नाहीत आजकाल, जो तो वृद्ध सन्याश्याचा भगत झालाय :) काही लोक फलाहार (फळांचा रस) करतात तर काही गोपाळकाला (बरेच रस एकत्र).

सुहास.. 11/08/2014 - 11:58
मिपावर मध्यंतरी सर्दी वर गाढ चिंतन झाले होते , त्याबद्दल कुणी पुराण पुरुष धागे उकसुन लिंका देतील का ? ..उदा " सर्दी झाल्यावर बदललेला आवाज " म्हणजे " बम्मी, तु जेवायला आज माचे केले आहेत का ? " ;)

सौंदाळा 11/08/2014 - 12:00
६० मिलीवोडका जाळुन त्याची शिल्लक असलेली राख एक चमचा मधातुन घ्यावी. असे एका दिवसात तीनदा करावे. अक्सीर इलाज, मी करुन पाहीला नाही फक्त ऐकला आहे. स्वतःच्या जबाबदारीवर करावा ;)

१. ठेचलेलं आलं + ६० मिलि स्कॉच + गरम पाणी... २. ठेचलेली सुंठ + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... ३. ओव्याची पूड + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... अधिक विचार करता.... आलं, सुंठ आणि ओवा नसला तरी चालेल.... आणि गरम पाण्याऐवजी बर्फाचे खडे घ्यायलाही काही हरकत नाही!!!! ;)

एस 11/08/2014 - 12:30
सर्दीवरून संदीप खरेची 'यलो ऑकर' नावाची कथा आठवली. 'त्याला सर्दीही बरीच झाली होती आणि ती बरीही होत नव्हती.' 'तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला.' 'यलो ऑकर. खूपच जपून वापरावा लागतो.' 'तुझी रेष अशी बोअरिंग वाटते. नाचरी नसते. ती म्हणायची' 'माझ्या रेषांमध्ये एक अनोखे कंटाळलेपण आहे.' 'बॉस तिला तिरुअनंतपुरमला घेऊन गेला आहे - राघवने डोळा मारून सांगितली न्यूज.' असोत. सर्दी बरी होत नसली की चित्र काढायला घ्यायचे. पॅलेटमध्ये यलो ऑकर. मनात न संपणारा रिकामपणा. डाव्या हातांच्या बोटांत कालचेच विझलेले थोटूक. विझलेलेच असू देत. पेटूनतरी काय करणारेय!

In reply to by संजय क्षीरसागर

एस 12/08/2014 - 10:45
'साप्ताहिक सकाळ' मध्ये आली होती सुमारे १९९८-९९ च्या आसपास. कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती कथा होती ती. तेव्हा संदीप खरे हा 'संदीप खरे' म्हणून प्रसिद्ध झाला नव्हता बहुतेक. पण काय कथा होती ती! माझ्याजवळ कदाचित जुना अंक असेल. सापडल्यास फोटो काढून व्यनिने पाठवतो. कथेचा सारांश असा आहे: तो आर्टस्कूलमधून नुकताच बाहेर पडलेला चित्रकार. त्याचं सगळंच कसं अ‍ॅवरेज. हुशारी, यश, दु:ख, अगदी सगळंच. म्हटलं तर नेत्रदीपकही नाही, किंवा छातीला कवटाळून बसावं असं वाईटही नाही. कॉलेजातले सगळेच कुठे ना कुठे अ‍ॅड एजन्सीत पार्टटाईम चिकटलेले म्हणून हाही एका एजन्सीत जातो. तिथे त्याला 'वेणू' भेटते. त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी. बोलकी, हसरी, अगदी परी नाही तरी नीटस. तिच्या रेषा कशा तिच्यासारख्याच मस्त. ह्याची रेष मात्र बोअरिंग. सरळसोट जाणारी. 'नाचरी नसते रे तुझी रेघ.' तिला आश्चर्य. ह्याला तिच्याबद्दल काय वाटतं तो सांगू शकत नाही. थोडं बोलतातही ते आता. म्हणजे ती जास्त. तो थोडेफार गायचाही तिच्या आग्रहामुळे. एकदा पार्टीला थोडं नाचूनही दाखवलं होतं. तशातच राघवने त्याला ऑफिस सुटल्यावर ती दाखवली. 'काय?' 'अरे, तुला ठाऊक नाही? ओपन सिक्रेट आहे. तिचा नवरा रे. म्हणजे थोडा वेगळाच आहे तो. उगाच नाही ऑफिसमधले सगळे तिच्या पुढेपुढे करत! हा, पण मानलं तिला. कुणाला इतकं नाही सरकू देत.' गाडीवर त्याच्यामागे बसून ती गेली. एकदा अशीच त्याचा हात एकदम हातात घेऊन ती म्हणाली, 'तू मला आवडतोस की नाही माहीत नाही. सगळ्या जखमा कुठे बर्‍या होतात. पण छोटी असली तरी बरी न होणारी जखम त्रास देतेच ना!' दुसर्‍या दिवशी त्याने रिजाइन केलं. एक महिन्याची नोटिस. शेवटच्या दिवशी सेंडऑफ झाला. त्या तिघांतच. दुसर्‍या दिवशी बॉस तिला घेऊन तिरुअनंतपुरमला मीटिंगला गेल्याची बातमी राघवने डोळा मारून सांगितली. 'तुझी अ‍ॅनाटॉमी सुधारायला पाहिजे.' बॉस तिला म्हणायचा. 'आता काय करणारेस?' 'काही नाही. झक्क चित्रं काढणारेय. माझ्या रेषांमध्ये जिवंतपणा नाही. अनोखे कंटाळलेपण आहे. बोअरडम आहे. पण तरीही रोजच्या जगण्याचा पवित्र व्यभिचारही आहे.' पॅलेटमध्ये रंग घेऊन तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला. 'यलो ऑकर. सर म्हणायचे, वापरायला खूप अवघड. जमला की चित्राचं सोनं करतो. बिघडला की वाटोळं.'

कविता१९७८ 11/08/2014 - 16:02
लहानपणापासुन मला अ‍ॅलर्जीची सर्दी होती. जरा वातावरण थंड झाले की घशाला काटे येत, वारंवार शिंका यायच्या, सकाळी उठल्यावर किमान अर्धा तास वारंवार शिंका, पंखा लावला की शिंका , फुलांचा किंवा अत्तराचा किंवा कुठलाही उग्र वास आला की शिंका , धुळीमुळे शिंका, रोज रोज शिंका देउन देउन कंटाळायचे. मग प्राणायाम सुरु केले आणि आता ८०-९०% आटोक्यात आहे.

सविता००१ 11/08/2014 - 16:51
माझ्या नवर्‍यालाही अ‍ॅलर्जिक सर्दीचा प्रचंड त्रास होता. आता प्राणायामाने खूप आटोक्यात आहे. तरीही सुंठीचा लेप वगैरे अधुन मधुन चालते. पण नाहीतर प्रचंड औषधांनीच कंटाळायचा तो. शिवाय मग अ‍ॅसिडिटी व्हायची ती वेगळीच!

In reply to by सस्नेह

धन्या 11/08/2014 - 19:13
सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात व न घेतल्यास एक आठवड्यात बरी होते
हे वाक्य बर्‍याच आरोग्यविषयक पुस्तकांमध्ये असते. :)

In reply to by सस्नेह

सुहास.. 13/08/2014 - 21:47
खेकड्याचा रस्सा प्यावा. >>> सर्दी न होता , वर्षभर पेण्याचे सोय असल्याल आम्ही " मॅनेजर " आख्ख ऑफीस " तिकडे" शिफ्ट करु शकतो .... क्लाईंट बरोबर वट्ट असलेला वाश्याच

स्पा 11/08/2014 - 19:18
१. गरम पाण्यात बचकभर विक्स टाकायचं आणि दणकून वाफारा घ्यायचा २. नेहमीचा चायनिस वाला गाठायचा आणि कडक मंचाव सूप प्याच. ३. गरम दुधात चमचाभर हळद. छोटा चमचा सुंठ टाकून रात्री झोपताना घ्यायचं ४. खडीसाखर -कोरफडीचा गर मिक्स करून दिवसातून तीनदा :)

In reply to by धन्या

स्पा 11/08/2014 - 19:53
धन्य मिळत असावा, आम्ही घरीच लावलीये ग्यालरीत मल्टी पर्पज युज कापून फ्रीज मध्ये ठेवायची आणि रात्री झोपताना गार डोळ्यांना लावायचा, दिवसभर सिस्टिम्स वर काम करून डोळ्यांची हालत होते, त्यासाठी मस्ट. कैलास जीवन पण बेस्ट :)

In reply to by धन्या

हाडक्या 11/08/2014 - 22:14
अंम्मळ गडबड होतेय काय ? घायपात वेगळी आणि कोरफड वेगळी. घायपातीची पाने लांब असतात आणि त्या पानांचे दोर वळून तात्पुरती दोरी म्हणून जळण, भारे नेण्यासाठी भरपूर उपयोगी. कोरफड तशी नाजूक, गरवाली आणि अंगचटीला लहान. घायपात (Agave cantala अथवा agave) : http://subirimagen.infojardin.com/subida/images/opt1292629424r.jpg कोरफड (Aloe vera): http://en.wikipedia.org/wiki/Aloe_vera

सकाळी नी संध्याकाळी एक चमचा चवनप्राश खात जा मग नाष्टा करा. बहुतेक आजार जवळच येणार नाहित कारण रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असेल.

कंजूस 11/08/2014 - 19:56
जुनी पुस्तके कपाट इत्यादीची आवराआवर केल्यावर रात्री शिंका आल्यास ओळखावे की ही जुनाट धुळीची अथवा त्यात लपलेल्या बुरशिची अॅलर्जी आहे .त्यासाठी १)डॉक्टरचे औषध न घेता वरीलपैकी आवडीचे औषध चार मिपाकरांसमवेत घ्यावे , २)ट्रेकला जावे .तिथल्या मोकळ्या हवने नाक एकदाही फुरफुरत नाही परंतू परत आल्यावर पुन्हा शिंका आल्यास अॅलर्जि कन्फर्म .रात्री परवडेल असा उतारा ,गवती चहा ,इत्यादि घ्यावा . हातपाय गळताहेत ,अशक्तपणा वाटल्यास बदामाचा शिरा खावा .त्याची कृती : पाच बदाम किसावेत . चमचाभर तुपावर सावकाश भाजावेत .लालसर होऊ लागले की झाले .खडीसाखरेबरोबर खावे .शिरा एवढा गुणकारी आहे की अधूनमधून सर्वाँनाच सर्दी झाल्यासारखे वाटते .

In reply to by कंजूस

पिंगू 11/08/2014 - 21:41
ह्या शिर्‍यात एक-दोन चमचे खसखस घाला आणि मग खाऊन बघा.. टोटल विश्रांतीसाठी हा प्रकार करावा. मज्जा म्हणून करु नये.

सर्दी हा शरीराचा, टॉक्सीन्स बाहेर फेकण्याचा उपाय आहे. अशा वेळी शरीराला सहकार्य करणं हिताचं आहे. सर्दी घालवण्यासाठी केलेले उपचार शरीराच्या इनबिल्ट करेक्शन सिस्टमला खिळ घालतात. पहिली गोष्ट, सर्दीला सहकार्य करा, ती शरीर शुद्धीकरणाला मदत करतेयं. तिच्याशी पंगा घेऊ नका. या अ‍ॅटीट्यूडनं ९०% सर्दी बरी होते. शिंका येणं आणि नाक साफ करणं उत्साहानं करा. विरोध आणि चिडचिड सोडून द्या. दुसरी गोष्ट, शरीराचं तापमान कायम ठेवण्यासाठी जमेल तसं गरम पाणी प्या. रात्री झोपतांना आणि सकाळी उठल्यावर तर नक्की प्या. तिसरी गोष्ट, झोपतांना कपाळ, नाक आणि छातीला निलगिरीचं तेल (किंवा विक्स) चोळा. यानं श्वास मोकळा राहून मधे जाग येणार नाही. तुम्हाला सर्दी उपकारक वाटेल आणि दोन-तीन वर्षातनं, ती एकदा कधी तरी येईल तेव्हा तुम्ही तिची मजा घेऊ शकाल.

माहितगार 13/08/2014 - 20:15
*डीसक्लेमर खालील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे काही उपाय वर दिले आहेतच. सी व्हिटॅमीन इफेक्टीव्ह असतच पण त्या सोबतच टोमॅटो सूप किंवा कढी ही चालू शकेल. बरेच जण गरम पाणी घेतात पण जमल्यास सूप्स त्याच्या थीकनेसमुळे अधीक उत्तम ठरतात. काढ्यांचे विवीध प्रकार आहेतच. आहार घेणे नकोसे होते पण प्रत्यक्षात कॅलरीज आणि प्रोटीन्स वाढवण्याची गरज असू शकते (खास करून स्वाईन फ्लू ची शक्यता टाळण्यात मदत म्हणून कॅलरीज आणि प्रोटीन्स अत्यंत आवश्यक) म्हणून गरम वरण पिणे हाही एक चांगला उपाय. हरबर्‍याच्या दाळीचे विवीध गरम पदार्थ खाताना सहसा त्रास कमी होतो खास करून घसाही धरला असेल तर पापड, फुटाणे अथवा दाळव (याला अजून एक शब्द आहे आठवत नाहीए) भाजून वर किंचीत हळद मीठ जीरे टाकल्यास तोंडाला बरी चव येण्यास मदत होते. तोंड आलेले नसेल आणि हैशी तीखट खवय्ये असालतर तर मिरचीचा भरपूर लसूण+मिरे+लवंग+ दालचीनी आणि हळद (हे सारे तव्यावर परतून) केलेला ठेचा आणि भाकरी. काही लोक खूप पिकलेला पेरू खाण्यास सूचवतात. असाच विश्वास बसणार नाही असा जालीम उपाय म्हणजे किंचीत उपाशी पोटी चिक्कार आईस्क्रीम पाठोपाठ गरम पाणि पिऊन छान झोप घेणे, यात बहुधा हाय कॅलरी लेव्हल मदतीस धावून येत असावी. सातत्याने सर्दीचा त्रास होणार्‍यांना गरम पाण्याने स्नान टाळण्याचाही थंड पाण्याने सल्ला दिला जातो याची येथे नोंद घेता येईल. कॅलरी लेव्हल खास करून मुलांमध्ये वाढवण्यासाठी (आणि मोठ्यांनाही ठिक) मुक्त हस्ताने चॉकलेट्स द्यावीत सोबत गरम पाणी आणि पक्के व्हेजेटरीअन असालतर प्रोटीन लेव्हल वाढण्यासाठी दोन बदाम दोन काजू न मोजता पाव किलो मिक्स ड्रायफ्रूटचा पॅक फस्त करण्याची गरज असू शकते. कच्ची हळद असलेल्या काळात कच्च्या हळदीची राजस्थानी स्टाईल भाजी (पाकर्‍ विभागात मागे अस्मादीकांनी रेसिपी दिली आहे). भाजलेले लसूण हळद गूळ यांची गोळी + हळद दूध हा झोपतानाचा उपाय करत असाल तर हळद गूळ गोळी + हळद दुध घेतल्या नंतर काही न बोलणे अथवा तोंड न उघड्ण्याचे पथ्य पाळावयास हवे नाहीतर हवा तसा परिणाम न मिळण्याची शक्यता असते. आयूर्वेदाच्या बाजूला नस्य नावाची प्रक्रीया असते पण त्या साठी खूपच सिंसीयर आयुर्वेदीक वैद्याची आवश्यकता असते. खासकरून त्या पद्धतीतले कमीत कमी वाफारा अथवा शेकण्याची पद्धत माहित करून घेणे. खूपच जास्त सर्दी असेल तर गरमपाण्याची पिशवी घेऊन सरळ माथा शेकणे इफेक्टीव्ह असू शकते. वारंवार सर्दी होण्याची प्रकृती असेल तर सर्दी पुर्ण गेल्या नंतर अ‍ॅलोपथिक फेमिली फिजीशीयनच्या मदतीने अँटीव्हायरल इंजेक्शन उपयूक्त ठरू शकते असे ऐकुन आहे. * डीसक्लेमर वरील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे.

कंजूस 15/08/2014 - 13:49
डिस्क्लेमरच्या छत्रीखाली बरीच सावली आहे . हळद गुळचाच तयार पर्याय म्हणजे डेकोफ्सिन गोळया मिळतात .नाव अलोपथिक वाटले तरी आयुर्वेदिक आहे .लहान मुलांच्या सर्दी आणि खासकरून खोकल्यावर चांगला उपाय .अर्धी गोळी चुरडून चार थेँब मधात चाटवायची . नस्य करायचा सोपा आणि सुरक्षित उपाय :कपभर पाण्यात चिमुटभर मीठ विरघळवायचे हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवणे .आइड्रॉप्स टाकायच्या चोचवाल्या (नॉझल) बाटलीत ठेवले तर उत्तम .डोके मागे करून छताकडे पाहत या बॉटलमधून चार चार थेंब नाकपुडींत तासातासाने टाका .डोळयांतही टाका .चोंदलेले नाक ,कपाळात साठलेली सर्दी लगेच सैल होते .प्रवासात नेण्यास उपयोगी .डोळ्यांत कचरा गेला ,उन्हाने डोळे लाल झाले की चार थेंब टाकले की गारवा येतो .

In reply to by सुहास..

वेल्लाभट 11/08/2014 - 11:55
ठाऊक आहे ! :) गरम पाण्यातून रम घ्यावी असा एक उपायही ऐकिवात आहे. फक्त धागा हेलकावे खायला लागेल म्हणून नमूद केला नव्हता.

In reply to by धन्या

नाव आडनाव 11/08/2014 - 16:47
लोक स्व"देशी" चा आग्रह धरत नाहीत आजकाल, जो तो वृद्ध सन्याश्याचा भगत झालाय :) काही लोक फलाहार (फळांचा रस) करतात तर काही गोपाळकाला (बरेच रस एकत्र).

सुहास.. 11/08/2014 - 11:58
मिपावर मध्यंतरी सर्दी वर गाढ चिंतन झाले होते , त्याबद्दल कुणी पुराण पुरुष धागे उकसुन लिंका देतील का ? ..उदा " सर्दी झाल्यावर बदललेला आवाज " म्हणजे " बम्मी, तु जेवायला आज माचे केले आहेत का ? " ;)

सौंदाळा 11/08/2014 - 12:00
६० मिलीवोडका जाळुन त्याची शिल्लक असलेली राख एक चमचा मधातुन घ्यावी. असे एका दिवसात तीनदा करावे. अक्सीर इलाज, मी करुन पाहीला नाही फक्त ऐकला आहे. स्वतःच्या जबाबदारीवर करावा ;)

१. ठेचलेलं आलं + ६० मिलि स्कॉच + गरम पाणी... २. ठेचलेली सुंठ + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... ३. ओव्याची पूड + ६० मिली स्कॉच + गरम पाणी... अधिक विचार करता.... आलं, सुंठ आणि ओवा नसला तरी चालेल.... आणि गरम पाण्याऐवजी बर्फाचे खडे घ्यायलाही काही हरकत नाही!!!! ;)

एस 11/08/2014 - 12:30
सर्दीवरून संदीप खरेची 'यलो ऑकर' नावाची कथा आठवली. 'त्याला सर्दीही बरीच झाली होती आणि ती बरीही होत नव्हती.' 'तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला.' 'यलो ऑकर. खूपच जपून वापरावा लागतो.' 'तुझी रेष अशी बोअरिंग वाटते. नाचरी नसते. ती म्हणायची' 'माझ्या रेषांमध्ये एक अनोखे कंटाळलेपण आहे.' 'बॉस तिला तिरुअनंतपुरमला घेऊन गेला आहे - राघवने डोळा मारून सांगितली न्यूज.' असोत. सर्दी बरी होत नसली की चित्र काढायला घ्यायचे. पॅलेटमध्ये यलो ऑकर. मनात न संपणारा रिकामपणा. डाव्या हातांच्या बोटांत कालचेच विझलेले थोटूक. विझलेलेच असू देत. पेटूनतरी काय करणारेय!

In reply to by संजय क्षीरसागर

एस 12/08/2014 - 10:45
'साप्ताहिक सकाळ' मध्ये आली होती सुमारे १९९८-९९ च्या आसपास. कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती कथा होती ती. तेव्हा संदीप खरे हा 'संदीप खरे' म्हणून प्रसिद्ध झाला नव्हता बहुतेक. पण काय कथा होती ती! माझ्याजवळ कदाचित जुना अंक असेल. सापडल्यास फोटो काढून व्यनिने पाठवतो. कथेचा सारांश असा आहे: तो आर्टस्कूलमधून नुकताच बाहेर पडलेला चित्रकार. त्याचं सगळंच कसं अ‍ॅवरेज. हुशारी, यश, दु:ख, अगदी सगळंच. म्हटलं तर नेत्रदीपकही नाही, किंवा छातीला कवटाळून बसावं असं वाईटही नाही. कॉलेजातले सगळेच कुठे ना कुठे अ‍ॅड एजन्सीत पार्टटाईम चिकटलेले म्हणून हाही एका एजन्सीत जातो. तिथे त्याला 'वेणू' भेटते. त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी. बोलकी, हसरी, अगदी परी नाही तरी नीटस. तिच्या रेषा कशा तिच्यासारख्याच मस्त. ह्याची रेष मात्र बोअरिंग. सरळसोट जाणारी. 'नाचरी नसते रे तुझी रेघ.' तिला आश्चर्य. ह्याला तिच्याबद्दल काय वाटतं तो सांगू शकत नाही. थोडं बोलतातही ते आता. म्हणजे ती जास्त. तो थोडेफार गायचाही तिच्या आग्रहामुळे. एकदा पार्टीला थोडं नाचूनही दाखवलं होतं. तशातच राघवने त्याला ऑफिस सुटल्यावर ती दाखवली. 'काय?' 'अरे, तुला ठाऊक नाही? ओपन सिक्रेट आहे. तिचा नवरा रे. म्हणजे थोडा वेगळाच आहे तो. उगाच नाही ऑफिसमधले सगळे तिच्या पुढेपुढे करत! हा, पण मानलं तिला. कुणाला इतकं नाही सरकू देत.' गाडीवर त्याच्यामागे बसून ती गेली. एकदा अशीच त्याचा हात एकदम हातात घेऊन ती म्हणाली, 'तू मला आवडतोस की नाही माहीत नाही. सगळ्या जखमा कुठे बर्‍या होतात. पण छोटी असली तरी बरी न होणारी जखम त्रास देतेच ना!' दुसर्‍या दिवशी त्याने रिजाइन केलं. एक महिन्याची नोटिस. शेवटच्या दिवशी सेंडऑफ झाला. त्या तिघांतच. दुसर्‍या दिवशी बॉस तिला घेऊन तिरुअनंतपुरमला मीटिंगला गेल्याची बातमी राघवने डोळा मारून सांगितली. 'तुझी अ‍ॅनाटॉमी सुधारायला पाहिजे.' बॉस तिला म्हणायचा. 'आता काय करणारेस?' 'काही नाही. झक्क चित्रं काढणारेय. माझ्या रेषांमध्ये जिवंतपणा नाही. अनोखे कंटाळलेपण आहे. बोअरडम आहे. पण तरीही रोजच्या जगण्याचा पवित्र व्यभिचारही आहे.' पॅलेटमध्ये रंग घेऊन तो कॅनव्हासवर हलकेहलके फटकारे मारू लागला. 'यलो ऑकर. सर म्हणायचे, वापरायला खूप अवघड. जमला की चित्राचं सोनं करतो. बिघडला की वाटोळं.'

कविता१९७८ 11/08/2014 - 16:02
लहानपणापासुन मला अ‍ॅलर्जीची सर्दी होती. जरा वातावरण थंड झाले की घशाला काटे येत, वारंवार शिंका यायच्या, सकाळी उठल्यावर किमान अर्धा तास वारंवार शिंका, पंखा लावला की शिंका , फुलांचा किंवा अत्तराचा किंवा कुठलाही उग्र वास आला की शिंका , धुळीमुळे शिंका, रोज रोज शिंका देउन देउन कंटाळायचे. मग प्राणायाम सुरु केले आणि आता ८०-९०% आटोक्यात आहे.

सविता००१ 11/08/2014 - 16:51
माझ्या नवर्‍यालाही अ‍ॅलर्जिक सर्दीचा प्रचंड त्रास होता. आता प्राणायामाने खूप आटोक्यात आहे. तरीही सुंठीचा लेप वगैरे अधुन मधुन चालते. पण नाहीतर प्रचंड औषधांनीच कंटाळायचा तो. शिवाय मग अ‍ॅसिडिटी व्हायची ती वेगळीच!

In reply to by सस्नेह

धन्या 11/08/2014 - 19:13
सर्दी औषध घेतल्यास सात दिवसात व न घेतल्यास एक आठवड्यात बरी होते
हे वाक्य बर्‍याच आरोग्यविषयक पुस्तकांमध्ये असते. :)

In reply to by सस्नेह

सुहास.. 13/08/2014 - 21:47
खेकड्याचा रस्सा प्यावा. >>> सर्दी न होता , वर्षभर पेण्याचे सोय असल्याल आम्ही " मॅनेजर " आख्ख ऑफीस " तिकडे" शिफ्ट करु शकतो .... क्लाईंट बरोबर वट्ट असलेला वाश्याच

स्पा 11/08/2014 - 19:18
१. गरम पाण्यात बचकभर विक्स टाकायचं आणि दणकून वाफारा घ्यायचा २. नेहमीचा चायनिस वाला गाठायचा आणि कडक मंचाव सूप प्याच. ३. गरम दुधात चमचाभर हळद. छोटा चमचा सुंठ टाकून रात्री झोपताना घ्यायचं ४. खडीसाखर -कोरफडीचा गर मिक्स करून दिवसातून तीनदा :)

In reply to by धन्या

स्पा 11/08/2014 - 19:53
धन्य मिळत असावा, आम्ही घरीच लावलीये ग्यालरीत मल्टी पर्पज युज कापून फ्रीज मध्ये ठेवायची आणि रात्री झोपताना गार डोळ्यांना लावायचा, दिवसभर सिस्टिम्स वर काम करून डोळ्यांची हालत होते, त्यासाठी मस्ट. कैलास जीवन पण बेस्ट :)

In reply to by धन्या

हाडक्या 11/08/2014 - 22:14
अंम्मळ गडबड होतेय काय ? घायपात वेगळी आणि कोरफड वेगळी. घायपातीची पाने लांब असतात आणि त्या पानांचे दोर वळून तात्पुरती दोरी म्हणून जळण, भारे नेण्यासाठी भरपूर उपयोगी. कोरफड तशी नाजूक, गरवाली आणि अंगचटीला लहान. घायपात (Agave cantala अथवा agave) : http://subirimagen.infojardin.com/subida/images/opt1292629424r.jpg कोरफड (Aloe vera): http://en.wikipedia.org/wiki/Aloe_vera

सकाळी नी संध्याकाळी एक चमचा चवनप्राश खात जा मग नाष्टा करा. बहुतेक आजार जवळच येणार नाहित कारण रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असेल.

कंजूस 11/08/2014 - 19:56
जुनी पुस्तके कपाट इत्यादीची आवराआवर केल्यावर रात्री शिंका आल्यास ओळखावे की ही जुनाट धुळीची अथवा त्यात लपलेल्या बुरशिची अॅलर्जी आहे .त्यासाठी १)डॉक्टरचे औषध न घेता वरीलपैकी आवडीचे औषध चार मिपाकरांसमवेत घ्यावे , २)ट्रेकला जावे .तिथल्या मोकळ्या हवने नाक एकदाही फुरफुरत नाही परंतू परत आल्यावर पुन्हा शिंका आल्यास अॅलर्जि कन्फर्म .रात्री परवडेल असा उतारा ,गवती चहा ,इत्यादि घ्यावा . हातपाय गळताहेत ,अशक्तपणा वाटल्यास बदामाचा शिरा खावा .त्याची कृती : पाच बदाम किसावेत . चमचाभर तुपावर सावकाश भाजावेत .लालसर होऊ लागले की झाले .खडीसाखरेबरोबर खावे .शिरा एवढा गुणकारी आहे की अधूनमधून सर्वाँनाच सर्दी झाल्यासारखे वाटते .

In reply to by कंजूस

पिंगू 11/08/2014 - 21:41
ह्या शिर्‍यात एक-दोन चमचे खसखस घाला आणि मग खाऊन बघा.. टोटल विश्रांतीसाठी हा प्रकार करावा. मज्जा म्हणून करु नये.

सर्दी हा शरीराचा, टॉक्सीन्स बाहेर फेकण्याचा उपाय आहे. अशा वेळी शरीराला सहकार्य करणं हिताचं आहे. सर्दी घालवण्यासाठी केलेले उपचार शरीराच्या इनबिल्ट करेक्शन सिस्टमला खिळ घालतात. पहिली गोष्ट, सर्दीला सहकार्य करा, ती शरीर शुद्धीकरणाला मदत करतेयं. तिच्याशी पंगा घेऊ नका. या अ‍ॅटीट्यूडनं ९०% सर्दी बरी होते. शिंका येणं आणि नाक साफ करणं उत्साहानं करा. विरोध आणि चिडचिड सोडून द्या. दुसरी गोष्ट, शरीराचं तापमान कायम ठेवण्यासाठी जमेल तसं गरम पाणी प्या. रात्री झोपतांना आणि सकाळी उठल्यावर तर नक्की प्या. तिसरी गोष्ट, झोपतांना कपाळ, नाक आणि छातीला निलगिरीचं तेल (किंवा विक्स) चोळा. यानं श्वास मोकळा राहून मधे जाग येणार नाही. तुम्हाला सर्दी उपकारक वाटेल आणि दोन-तीन वर्षातनं, ती एकदा कधी तरी येईल तेव्हा तुम्ही तिची मजा घेऊ शकाल.

माहितगार 13/08/2014 - 20:15
*डीसक्लेमर खालील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे काही उपाय वर दिले आहेतच. सी व्हिटॅमीन इफेक्टीव्ह असतच पण त्या सोबतच टोमॅटो सूप किंवा कढी ही चालू शकेल. बरेच जण गरम पाणी घेतात पण जमल्यास सूप्स त्याच्या थीकनेसमुळे अधीक उत्तम ठरतात. काढ्यांचे विवीध प्रकार आहेतच. आहार घेणे नकोसे होते पण प्रत्यक्षात कॅलरीज आणि प्रोटीन्स वाढवण्याची गरज असू शकते (खास करून स्वाईन फ्लू ची शक्यता टाळण्यात मदत म्हणून कॅलरीज आणि प्रोटीन्स अत्यंत आवश्यक) म्हणून गरम वरण पिणे हाही एक चांगला उपाय. हरबर्‍याच्या दाळीचे विवीध गरम पदार्थ खाताना सहसा त्रास कमी होतो खास करून घसाही धरला असेल तर पापड, फुटाणे अथवा दाळव (याला अजून एक शब्द आहे आठवत नाहीए) भाजून वर किंचीत हळद मीठ जीरे टाकल्यास तोंडाला बरी चव येण्यास मदत होते. तोंड आलेले नसेल आणि हैशी तीखट खवय्ये असालतर तर मिरचीचा भरपूर लसूण+मिरे+लवंग+ दालचीनी आणि हळद (हे सारे तव्यावर परतून) केलेला ठेचा आणि भाकरी. काही लोक खूप पिकलेला पेरू खाण्यास सूचवतात. असाच विश्वास बसणार नाही असा जालीम उपाय म्हणजे किंचीत उपाशी पोटी चिक्कार आईस्क्रीम पाठोपाठ गरम पाणि पिऊन छान झोप घेणे, यात बहुधा हाय कॅलरी लेव्हल मदतीस धावून येत असावी. सातत्याने सर्दीचा त्रास होणार्‍यांना गरम पाण्याने स्नान टाळण्याचाही थंड पाण्याने सल्ला दिला जातो याची येथे नोंद घेता येईल. कॅलरी लेव्हल खास करून मुलांमध्ये वाढवण्यासाठी (आणि मोठ्यांनाही ठिक) मुक्त हस्ताने चॉकलेट्स द्यावीत सोबत गरम पाणी आणि पक्के व्हेजेटरीअन असालतर प्रोटीन लेव्हल वाढण्यासाठी दोन बदाम दोन काजू न मोजता पाव किलो मिक्स ड्रायफ्रूटचा पॅक फस्त करण्याची गरज असू शकते. कच्ची हळद असलेल्या काळात कच्च्या हळदीची राजस्थानी स्टाईल भाजी (पाकर्‍ विभागात मागे अस्मादीकांनी रेसिपी दिली आहे). भाजलेले लसूण हळद गूळ यांची गोळी + हळद दूध हा झोपतानाचा उपाय करत असाल तर हळद गूळ गोळी + हळद दुध घेतल्या नंतर काही न बोलणे अथवा तोंड न उघड्ण्याचे पथ्य पाळावयास हवे नाहीतर हवा तसा परिणाम न मिळण्याची शक्यता असते. आयूर्वेदाच्या बाजूला नस्य नावाची प्रक्रीया असते पण त्या साठी खूपच सिंसीयर आयुर्वेदीक वैद्याची आवश्यकता असते. खासकरून त्या पद्धतीतले कमीत कमी वाफारा अथवा शेकण्याची पद्धत माहित करून घेणे. खूपच जास्त सर्दी असेल तर गरमपाण्याची पिशवी घेऊन सरळ माथा शेकणे इफेक्टीव्ह असू शकते. वारंवार सर्दी होण्याची प्रकृती असेल तर सर्दी पुर्ण गेल्या नंतर अ‍ॅलोपथिक फेमिली फिजीशीयनच्या मदतीने अँटीव्हायरल इंजेक्शन उपयूक्त ठरू शकते असे ऐकुन आहे. * डीसक्लेमर वरील माहिती व्यक्तीगत अनुभव अथवा ऐकीव असू शकते. वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नव्हे.

कंजूस 15/08/2014 - 13:49
डिस्क्लेमरच्या छत्रीखाली बरीच सावली आहे . हळद गुळचाच तयार पर्याय म्हणजे डेकोफ्सिन गोळया मिळतात .नाव अलोपथिक वाटले तरी आयुर्वेदिक आहे .लहान मुलांच्या सर्दी आणि खासकरून खोकल्यावर चांगला उपाय .अर्धी गोळी चुरडून चार थेँब मधात चाटवायची . नस्य करायचा सोपा आणि सुरक्षित उपाय :कपभर पाण्यात चिमुटभर मीठ विरघळवायचे हे पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवणे .आइड्रॉप्स टाकायच्या चोचवाल्या (नॉझल) बाटलीत ठेवले तर उत्तम .डोके मागे करून छताकडे पाहत या बॉटलमधून चार चार थेंब नाकपुडींत तासातासाने टाका .डोळयांतही टाका .चोंदलेले नाक ,कपाळात साठलेली सर्दी लगेच सैल होते .प्रवासात नेण्यास उपयोगी .डोळ्यांत कचरा गेला ,उन्हाने डोळे लाल झाले की चार थेंब टाकले की गारवा येतो .
नमस्कार मिपाकर सर्दी, या जास्तीत जास्त आढळणा-या आजाराने प्रत्येक मानवाला कधी ना कधी, कमी जास्त प्रमाणात ग्रासलेलं असतंच. तर या अतिशय लोकप्रिय आजाराशी वर्षातून एखाद दोनदा माझीही नाकभेट होत असते. मग काही दिवस आम्ही एकमेकांना अजिबात दूर जाऊ देत नाही. एकत्र मिळून शिंकांचे फटाकेही फोडतो. अखेर कंटाळून मग आम्ही सोडतो एकमेकांना. असो. गमतीचा भाग वेगळा. पण या सर्दीवर अनेक उपचारपद्धतीत अनेक उपाय सांगितलेले आहेत, औषधं सांगितलेली आहेत. घरगुतीपासून ते गोळीबारापर्यंत. मला लागू झालेले काही उपाय इथे देत आहे, १) काढा - सर्दी झाली रे झाली की आई, आजीचं हे वाक्य येणारच.

हे मन सैरभैर....!

फिझा ·
लेखनविषय:
हे मन सैरभैर....! मृगजळाच्या मागे धावते तप्त उजाड वाळवंट त्यात …. मोकळं मोकळं निळं आभाळ ढग पांढराही नसे त्यात …. दिसे किनारा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. खोल खोल दाट काळोख आसवांचे काजवे त्यात … थकली पावलेही अंधारात मऊ मऊ काट्यांची वाट … दिसे कवडसा कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. बरसुनही मुसळधार कधीचे परत दाटुनी आले त्यात …… प्रत्येकाचं भिजणं वेगळं पाऊसही चिंब आज तशात ………. दिसे इंद्रधनू कुठलासा , इतक्यात ! …. उडून जाई हे मन सैरभैर ……. शांत भासतो समुद्र जरी फेकीतो लाटांवर लाट … छोटीच होडी वाचलेली , मोठी नौका गिळंकृत …….

प्रेमाची कहाणी

माम्लेदारचा पन्खा ·

मनीषा 11/08/2014 - 20:48
प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। __________ प्रेमातही जिलबीला विसरला नाहीत :) छान!

मनीषा 11/08/2014 - 20:48
प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। __________ प्रेमातही जिलबीला विसरला नाहीत :) छान!
लेखनविषय:
तुम्हा सांगतो लोकहो । लक्ष देऊनी ऐकाहो । बाकी सगळे विसरा हो । पण हे नाही ।।१।। प्रथम प्रेमाची महती । कित्येकांनी सांगितली आधी । संपल्या कितीक दौती । संपली ती शाई ।।२।। प्रथम प्रेम आयुष्यात । जशी जिलबी पाकात । जितके मुरते मनात । गोडी येई ।।२।। प्रत्येकाची वेगळी रीत । कुणी बसते झुरत । कुणी विचारे थेट । नको दिरंगाई ।।३।। कुणा नडते अति घाई । कुणा सहज सफलता येई । कुणी न धडके राही । हाती पायी ।।४।। भाग्यवंतांचे स्वप्न रंगले । उर्वरितांचे हवेत इमले । "ती"चे कुठेतरी जमले । कळलेच नाही ।।५।। आयुष्य जगणे भाग । आपापले शोधिले मार्ग । तरी मन तिचा माग । काढीत राही ।।४।। परिणाम होव

भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन

स्पार्टाकस ·

भिंगरी 11/08/2014 - 10:22
भारतीय कप्तानांना असा अनुभव आला असेल का? त्यांचे काही अनुभव असतील तर तेही येवु द्या.

योगी९०० 11/08/2014 - 12:01
विजय देवधर यांनी Ocean Triangle या पुस्तकाचे अनूवादन केले आहे तेव्हा त्यांचे नाव सुद्धा संदर्भात यावे. बाकी डाव्या बाजूचे भूत थोडेफार चार्ली चॅपलीन (आणि हिटलर ) यांच्या सारखे दिसते...!!

In reply to by योगी९००

स्पार्टाकस 11/08/2014 - 12:06
ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे देवधरांचे नाही. हे पुस्तक रिचर्ड वायनरचे डेव्हील्स ट्रँगल आणि चार्ल्स बार्लीत्झच्या ओशन ट्रँगल पुस्तकाचे एकत्र भाषांतर / संपादन आहे.

In reply to by स्पार्टाकस

योगी९०० 11/08/2014 - 12:20
थोडा घोळ झाला... ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे. विजय देवधरांचे "बर्मुडा ट्रॅंगल" आहे...त्यात हा किस्सा (फोटोसकट) वाचला होता.

एस 11/08/2014 - 12:13
वाचतोय. बाकी ही भूतछायाचित्रणकला म्हणजे शुद्ध फेकूपणा असतो हो! ;-) जाऊ द्या! पुढचा भाग आने दो!

भिंगरी 11/08/2014 - 10:22
भारतीय कप्तानांना असा अनुभव आला असेल का? त्यांचे काही अनुभव असतील तर तेही येवु द्या.

योगी९०० 11/08/2014 - 12:01
विजय देवधर यांनी Ocean Triangle या पुस्तकाचे अनूवादन केले आहे तेव्हा त्यांचे नाव सुद्धा संदर्भात यावे. बाकी डाव्या बाजूचे भूत थोडेफार चार्ली चॅपलीन (आणि हिटलर ) यांच्या सारखे दिसते...!!

In reply to by योगी९००

स्पार्टाकस 11/08/2014 - 12:06
ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे देवधरांचे नाही. हे पुस्तक रिचर्ड वायनरचे डेव्हील्स ट्रँगल आणि चार्ल्स बार्लीत्झच्या ओशन ट्रँगल पुस्तकाचे एकत्र भाषांतर / संपादन आहे.

In reply to by स्पार्टाकस

योगी९०० 11/08/2014 - 12:20
थोडा घोळ झाला... ओशन ट्रँगल हे पुस्तक बाळ भागवतांचे आहे. विजय देवधरांचे "बर्मुडा ट्रॅंगल" आहे...त्यात हा किस्सा (फोटोसकट) वाचला होता.

एस 11/08/2014 - 12:13
वाचतोय. बाकी ही भूतछायाचित्रणकला म्हणजे शुद्ध फेकूपणा असतो हो! ;-) जाऊ द्या! पुढचा भाग आने दो!
लेखनविषय:
लेखनप्रकार
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा! खात्री असणार्‍यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते.

Mr. & Mrs. – एका नाटकाचा रियालीटी शो

सोत्रि ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

मृगनयनी 11/08/2014 - 10:59
नाटकाचा पूर्वार्ध उत्तम आहे.. इन्टरवल'नन्तर जरा उरकल्यासारखा.. गुन्डाळल्यासारखा वाटतो..शेवटही अपेक्षितच घडतो... :) अजून थोडा थ्रिलिन्ग हवा होता.... लेखकाची "स्पॉन्सरशिप" ची आयडीया आणि सत्य.. व त्याचा "प्रत्येक ठिकाणी" वापर भन्नाट आहे... :) त्यामुळे रटाळ वाटत नाही... :) पैशाचेही महत्व कळते... आणि नात्यांचेही!!!! :)

psajid 11/08/2014 - 10:51
मधुरा वेलणकर खूप सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे. प्रियदर्शन जाधव एक उत्तम ताकदीचा कलाकार आहे. नाट्य आस्वाद उत्सुकता वाढवून गेला. मधुरा वेलणकर आणि नाटकाविषयीची उत्सुकता या दोन्हीसाठी नक्की पाहीन !

श्रीगुरुजी 11/08/2014 - 12:31
नाटकाचे परीक्षण बरेच सविस्तर लिहिले आहे. ते आवडले. मी या नाटकाचे मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस - एक अभिनव पण फसलेला प्रयोग हे काही महिन्यांपूर्वी परिक्षण लिहिले होते. अर्थात या नाटकाविषयी माझे मत आणि तुमचे मत पूर्णपणे भिन्न आहे.

मित्रहो 11/08/2014 - 15:39
दोन्ही परीक्षणे वाचली. चांगली लिहीली आहेत. थीम चांगली वाटते, सादरीकरण पण चांगले वाटते. प्रत्येक गोष्ट वास्तिवेकतेच्या कसोटीवरुन घासणे चांगले नाहीत. म्हणजे माहीती नसताना कुणाचे तीन महीणे शूटींग करणे. इत्यादी. मित्रहो

वेल्लाभट 12/08/2014 - 11:20
मी बघितलंय. नाटक सहीच आहे. वेगळा विषय आणि त्याचं सुपर्ब एक्झिक्यूशन. सादरीकरण. नव्या तंत्रांना वापरून. अतिशय मस्त प्रयोग. सर्व कलाकारांची कामे छान झालीयत. आणि लेखन, दिग्दर्शनही स्तुत्य. जरूर बघा!

In reply to by अत्रुप्त आत्मा

मृगनयनी 11/08/2014 - 10:59
नाटकाचा पूर्वार्ध उत्तम आहे.. इन्टरवल'नन्तर जरा उरकल्यासारखा.. गुन्डाळल्यासारखा वाटतो..शेवटही अपेक्षितच घडतो... :) अजून थोडा थ्रिलिन्ग हवा होता.... लेखकाची "स्पॉन्सरशिप" ची आयडीया आणि सत्य.. व त्याचा "प्रत्येक ठिकाणी" वापर भन्नाट आहे... :) त्यामुळे रटाळ वाटत नाही... :) पैशाचेही महत्व कळते... आणि नात्यांचेही!!!! :)

psajid 11/08/2014 - 10:51
मधुरा वेलणकर खूप सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे. प्रियदर्शन जाधव एक उत्तम ताकदीचा कलाकार आहे. नाट्य आस्वाद उत्सुकता वाढवून गेला. मधुरा वेलणकर आणि नाटकाविषयीची उत्सुकता या दोन्हीसाठी नक्की पाहीन !

श्रीगुरुजी 11/08/2014 - 12:31
नाटकाचे परीक्षण बरेच सविस्तर लिहिले आहे. ते आवडले. मी या नाटकाचे मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस - एक अभिनव पण फसलेला प्रयोग हे काही महिन्यांपूर्वी परिक्षण लिहिले होते. अर्थात या नाटकाविषयी माझे मत आणि तुमचे मत पूर्णपणे भिन्न आहे.

मित्रहो 11/08/2014 - 15:39
दोन्ही परीक्षणे वाचली. चांगली लिहीली आहेत. थीम चांगली वाटते, सादरीकरण पण चांगले वाटते. प्रत्येक गोष्ट वास्तिवेकतेच्या कसोटीवरुन घासणे चांगले नाहीत. म्हणजे माहीती नसताना कुणाचे तीन महीणे शूटींग करणे. इत्यादी. मित्रहो

वेल्लाभट 12/08/2014 - 11:20
मी बघितलंय. नाटक सहीच आहे. वेगळा विषय आणि त्याचं सुपर्ब एक्झिक्यूशन. सादरीकरण. नव्या तंत्रांना वापरून. अतिशय मस्त प्रयोग. सर्व कलाकारांची कामे छान झालीयत. आणि लेखन, दिग्दर्शनही स्तुत्य. जरूर बघा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
(चित्र: आंतरजालावरून साभार)

काल बर्‍याच दिवसांनी

भुताळी जहाज - २ - यूबी - ६५

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींचे अनुभव अनेकदा जहाजांच्याच वाट्याला येत असले तरी यात एका पाणबुडीचाही समावेश आहे - यूबी-६५ !! पहिल्या महायुध्दाला तोंड फुटल्यावर जर्मनीने ज्या अनेक पाणबुड्या बांधण्यास सुरवात केली त्यापैकी एक म्हणजे यूबी-६५. १९१६ मध्ये या हॅम्बुर्ग इथे या पाणबुडीचं बांधकाम सुरु झालं. बांधकाम सुरु असतानाच या पाणबुडीवर ती शापित असल्याचा शिक्का बसण्यास सुरवात झाली. पाणबुडीचा मुख्य सांगाडा बांधण्याचंं काम सुरु झाल्यावर आठवड्याभरातच सांगाड्याला आधार देणारे दोरखंड तुटून वर असलेला भाग दोन कामगारांवर कोसळला!

अधुरी प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
अधुरी प्रेम कहाणी *************************************** माधव जोशी मंडईत भाजी घेत होता.. माधव रिटायर्ड झाला होता..तसा संसार मार्गी लागलेलाच होता.. मोठा मुलगा लग्न करुन अमेरिकेत सेटल झालेला मुलिचे हि लग्न झाले होते ..ति बंगलोरला.. भाजी घेत असताना त्याचे बाजुला लक्ष गेले.. ति पाठमोरी उभी होति.. बहुतेक स्मिता साने च असावी... माधव तिच्या कडे गेला अन म्हणाला "तु स्मिता साने" ना.. अन तु माधव जोशी..ति हसत म्हणाली.. अरे काय...

स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं

माधुरी विनायक ·

श्रीगुरुजी 11/08/2014 - 12:39
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचना ऐकायला नक्कीच आवडतील. परंतु उर्दू समजत नसल्याने रचनांचा कितपत आस्वाद घेता येईल याविषयी साशंक आहे.

श्रीगुरुजी 11/08/2014 - 12:39
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचना ऐकायला नक्कीच आवडतील. परंतु उर्दू समजत नसल्याने रचनांचा कितपत आस्वाद घेता येईल याविषयी साशंक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य रचना आणि अंदमान येथे लिहिलेल्या उर्दू गजलांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है या ध्वनीफीतीचे प्रोमो नुकतेच ऐकले/ पाहिले. अमिताभ बच्चन यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन या ध्वनीफीतीला लाभलं आहे. जसपिंदर नरूला, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, स्वराधीश बलवल्ली, शंकर महादेवन, जावेद अली, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शान आणि साधना सरगम अशा गुणी गायकांच्या आवाजात या रचनांचा आस्वाद घेता येईल. सावरकरांच्या तीन मूळ आणि सात अनुवादित अशा एकूण १० रचनांचा समावेश या ध्वनीफीतीमध्ये आहे.

फेकूचंद...

बबन ताम्बे ·

सौंदाळा 08/08/2014 - 10:05
माझा एक मित्र नववीत असताना कार शिकला होता आणि म्हणे "एकदा कार घेऊन पुण्याहुन मुंबईला गेलो होतो, जाताना वडीलांनी चालवली आणि येताना लोणावळ्यापासुन मला दिली. लोणावळ्यात पाऊस चालु झाला जोरदार तेव्हा मी अशी गाडी पळवली की गाडीची मागची काच पुर्ण ओली आणि पुढची पुर्ण कोरडी *fool* हे असे तळेगावपर्यंत चालु होते. तिकडे थांबलो म्हणुन पुढची काच भिजली नाहीतर तशीच आणली असती पुण्यापर्यंत" *lol*

चौथा कोनाडा 11/08/2014 - 10:33
फेकुचंदचा किस्सा वाचून मस्त टाईमपास झाला. शालेय जीवनात, आमच्या वर्गातील असाच एक फेकुचंद ज्याचे वडील नेहमी त्यांच्या कापडाच्या दुकानात दिसायचे पण हा फेकु त्यांच्या नावाने बरयाच थापा मारायचा. आज काय म्हणे तर वडील इंदिरा गांधीना भेटायला गेलेत, मागच्या आठवड्यात काय म्हणे तर वडील धर्मेंद्र बरोबर फॉरेन गेले होते. वडील मात्र कायम कापडाच्या दुकानी ! त्याच्या या बाता ऐकून आमाला ज्याम हसु यायचे ! मग आमच्या इमर्जन्सीला असल्याच काही थापा आम्ही ट्विस्ट करून वापरायचो ! हा . . . हा . . . हा हा हा . . . !

योगी९०० 11/08/2014 - 10:55
तसे बरेच फेकूचंद पाहिलेत पण एका मुळे आमचा (म्हणजे मी जेथे नोकरी करत होतो त्या कंपनीचा) फायदाच झाला होता. एका मोठ्या पार्टीबरोबर आमचे डील चालू होते. त्यांनी आमचे products and services यांचे एक छान analysis केले होते. तेथील एका फेकूचंदने ते analysis स्वतः बनवले नव्हते तरी स्वतःला credit घेत होता. ह्या analysis चे मी थोडे कौतूक केले आणि मला पण हे ईमेल कर म्ह्णून सांगितले. त्या मुर्खाने ती फाईल काही न विचार करता मला ईमेल केली. त्या आमच्या product च्या analysis बरोबर आम्हाला त्यांचे budget, competition and their prices असे बरेच काही कळले. (एक्सेल च्या वेगवेगळ्या sheets वर ती माहिती होती). फाईलच्या प्रॉपर्टीमध्ये हे analysis कोणी केले हे पण समजले...!! नंतर ह्या माहितीच्या आधारे आम्ही हे deal "योग्य" त्या भावाने आमच्या पदरात पाडून घेतले...

In reply to by विटेकर

प्यारे१ 11/08/2014 - 21:17
+१११ आणि न सांगता नाव बदललं की काय असाही समज झाला. आमचे सर अशी चीटिंग करणार नाहीत बरं. ;)

In reply to by बबन ताम्बे

विटेकर 14/08/2014 - 14:57
नाय वो , तुमचे लेखन आवडतेच हो ,पण सरांच्या लेखणीची धार तुमच्याच काय अर्वाचीन मराठी सारस्वतात असे लिहिणारा कुण्णी कुण्णी नाही ! जाऊ दे, गुळाची गोडी सांगून कळत नाही , तो चाखूनच पहावा लागतो. बाकी तुमच्या गुळातही गोडवा आहे हे नमूद करतो.

विटेकर 14/08/2014 - 15:00
मी नॉन मिपाकर पब्लिकला सान्गतो .. माझा लेख प्रकाशित केलाय मिपावर आणि प्रतिसादान्चा धो धो पाऊस पडतोय... आत्तपर्यन्त ५०० झाले सुद्धा ! ( पण, खरच माझे हे स्वप्न आहे !)

मी पुर्वी मिपा वर खुप लेखन करत असे. खुप मागणी होती . माझ्या युध्यावरच्या कथा, आय टी, प्रवासवर्णने, विनोद, कविता आणि मी पाक कृती पण लिहीत असे. एका प्रतिसाद कर्त्याने तर माझ्या मिपा वरील पाक कृती चे पुस्तक काढले.आणि खुप कमाई केली. पण त्याला सोडून दिले. म्हणले जाउदे मिळवतोय चार पैसे तर मिळवूदेत बापडा. (तसा मी मोठ्या मनाचाच आहे) प्रतिसाद तर भरभरून येत असत. शेवटी सम्पादकानी विनन्ती करून मला लेखनाची थोडी विश्रांती घेण्यास भाग पाडले. अनेक सभासदाना माझा हेवा वाटतो पण लोकप्रियताच इतकी आहे की काय सांगू. असो. स्वतःची तारीफ करणे योग्य नव्हे.

बबन ताम्बे 18/08/2014 - 12:14
ऑफीसमध्ये अजून एक फेकूचन्द होता.मुली आणि बायका, याबाबतीत थापा मारण्यात त्याचा हातखंडा होता. त्याचा ब-याच वर्षांपूर्वीचा (अंदाजे २० वर्षांपूर्वीचा) किस्सा आम्ही अजुनही चघळतो. एकदा त्याने मला विचारले, "काय रे, काल बायकोला घेऊन आमच्या एरीयात फिरताना दिसला? घरी यायचे का नाही?" "अरे वेळच नव्हता. हीला गायनॅकॉलॉजिस्ट कडे घेऊन जायचे होते. तुमच्या घराजवळ त्या डॉ. .... आहेत ना, त्यांच्याकडे अपॉईंटमेंट होती." मी. "हो का?" फेकूचंद,"ती डॉक्टर ना? आपली लाईन हे बरं का !" "हो का! " मी. (च्यायचा थापाडया. मी मनात...) "मी एकदा मिसेसला तिच्याकडे घेऊन गेलो होतो. मिसेसचं चेकींग केल्यावर ती मला म्हणाली तुमचे पण चेकींग करायची गरज हे. हां मंग? आपण पण आपल्या एरीयात हँडसम हे.एक दिवस मी गेलो. मला तिने टेबलावर झोपायला सांगीतले आणि चेकींग सुरू केले. मी पण पेटलो, किसिंग बिसिंग केले. मग ती म्हटली आता बास. बाहेर पेशंट बसलेत." मी त्याला लगेच झापला. "अरे दळभद्री. थापा मारताना जरा तरी विचार करून थापा मार. ती गायनॅकॉलॉजिस्ट. आणि तुझं चेकींग ? कशाचा कशाशी काही संबंध तरी आहे का? वा रे हॅंडसम! एक डॉक्टर तुला बघताक्षणी लगेच तुझ्या गळ्यात पडायला लागली ! पारच भोट समजतो आम्हाला?" पण कसचं काय? वर निर्लज्जपणे तो हसत होता.

बबन ताम्बे 21/08/2014 - 16:53
आमचा हा फेकुचंद त्यावेळी चाळीशीत होता. आम्ही पाच सहा जण सकाळी चहा नाश्ता घेत होतो.एक दिवस ऑफेसमध्ये त्याने पुडी सोडली. फेकुचंदने सुरुवात केली."आयला काल जबरी वाचलो राव." आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे नजरा वळवल्या. आम्हाला वाटले काय अ‍ॅक्सीडंट वगैरे झाला की काय. कुणी तरी विचारले काय झाले म्हणून. "काल मित्राच्या मुलाला मुलगी बघायच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मी नव्ह्तो जात पण मित्राने खूप आग्रह केला म्हणून गेलो. पाहुण्यांच्या समोर मित्र, मी आणि मित्राचा मुलगा बसलो होतो. मुलीच्या वडीलांनी मलाच प्रश्न विचारायला सुरवात केली. मित्राला शंका आली आणि त्याने मुलीच्या वडीलांना बाजूला घेऊन सांगितले की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नवरा मुलगा तो कडेला बसलाय तो आहे. मुलीच्या वडीलांनी आश्चर्याने विचारले की तो तुमचा मुलगा आहे होय. मग माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले की तो तुमच्या बाजूला बसलेला यंग आणि हँडसम मुलगा कोण आहे? आम्ही त्यालाच नवरा मुलगा समजलो. मग मित्राने खुलासा केला की अहो तो माझा मित्र आहे म्हणून आणि त्याचे लग्न झालेले आहे. " फेकूचंद्ची पुडी संपल्याबरोबर आम्ही सगळे "ठ्ठो" जोरात ओरडलो आणि प्रचंड हसलो.

सौंदाळा 08/08/2014 - 10:05
माझा एक मित्र नववीत असताना कार शिकला होता आणि म्हणे "एकदा कार घेऊन पुण्याहुन मुंबईला गेलो होतो, जाताना वडीलांनी चालवली आणि येताना लोणावळ्यापासुन मला दिली. लोणावळ्यात पाऊस चालु झाला जोरदार तेव्हा मी अशी गाडी पळवली की गाडीची मागची काच पुर्ण ओली आणि पुढची पुर्ण कोरडी *fool* हे असे तळेगावपर्यंत चालु होते. तिकडे थांबलो म्हणुन पुढची काच भिजली नाहीतर तशीच आणली असती पुण्यापर्यंत" *lol*

चौथा कोनाडा 11/08/2014 - 10:33
फेकुचंदचा किस्सा वाचून मस्त टाईमपास झाला. शालेय जीवनात, आमच्या वर्गातील असाच एक फेकुचंद ज्याचे वडील नेहमी त्यांच्या कापडाच्या दुकानात दिसायचे पण हा फेकु त्यांच्या नावाने बरयाच थापा मारायचा. आज काय म्हणे तर वडील इंदिरा गांधीना भेटायला गेलेत, मागच्या आठवड्यात काय म्हणे तर वडील धर्मेंद्र बरोबर फॉरेन गेले होते. वडील मात्र कायम कापडाच्या दुकानी ! त्याच्या या बाता ऐकून आमाला ज्याम हसु यायचे ! मग आमच्या इमर्जन्सीला असल्याच काही थापा आम्ही ट्विस्ट करून वापरायचो ! हा . . . हा . . . हा हा हा . . . !

योगी९०० 11/08/2014 - 10:55
तसे बरेच फेकूचंद पाहिलेत पण एका मुळे आमचा (म्हणजे मी जेथे नोकरी करत होतो त्या कंपनीचा) फायदाच झाला होता. एका मोठ्या पार्टीबरोबर आमचे डील चालू होते. त्यांनी आमचे products and services यांचे एक छान analysis केले होते. तेथील एका फेकूचंदने ते analysis स्वतः बनवले नव्हते तरी स्वतःला credit घेत होता. ह्या analysis चे मी थोडे कौतूक केले आणि मला पण हे ईमेल कर म्ह्णून सांगितले. त्या मुर्खाने ती फाईल काही न विचार करता मला ईमेल केली. त्या आमच्या product च्या analysis बरोबर आम्हाला त्यांचे budget, competition and their prices असे बरेच काही कळले. (एक्सेल च्या वेगवेगळ्या sheets वर ती माहिती होती). फाईलच्या प्रॉपर्टीमध्ये हे analysis कोणी केले हे पण समजले...!! नंतर ह्या माहितीच्या आधारे आम्ही हे deal "योग्य" त्या भावाने आमच्या पदरात पाडून घेतले...

In reply to by विटेकर

प्यारे१ 11/08/2014 - 21:17
+१११ आणि न सांगता नाव बदललं की काय असाही समज झाला. आमचे सर अशी चीटिंग करणार नाहीत बरं. ;)

In reply to by बबन ताम्बे

विटेकर 14/08/2014 - 14:57
नाय वो , तुमचे लेखन आवडतेच हो ,पण सरांच्या लेखणीची धार तुमच्याच काय अर्वाचीन मराठी सारस्वतात असे लिहिणारा कुण्णी कुण्णी नाही ! जाऊ दे, गुळाची गोडी सांगून कळत नाही , तो चाखूनच पहावा लागतो. बाकी तुमच्या गुळातही गोडवा आहे हे नमूद करतो.

विटेकर 14/08/2014 - 15:00
मी नॉन मिपाकर पब्लिकला सान्गतो .. माझा लेख प्रकाशित केलाय मिपावर आणि प्रतिसादान्चा धो धो पाऊस पडतोय... आत्तपर्यन्त ५०० झाले सुद्धा ! ( पण, खरच माझे हे स्वप्न आहे !)

मी पुर्वी मिपा वर खुप लेखन करत असे. खुप मागणी होती . माझ्या युध्यावरच्या कथा, आय टी, प्रवासवर्णने, विनोद, कविता आणि मी पाक कृती पण लिहीत असे. एका प्रतिसाद कर्त्याने तर माझ्या मिपा वरील पाक कृती चे पुस्तक काढले.आणि खुप कमाई केली. पण त्याला सोडून दिले. म्हणले जाउदे मिळवतोय चार पैसे तर मिळवूदेत बापडा. (तसा मी मोठ्या मनाचाच आहे) प्रतिसाद तर भरभरून येत असत. शेवटी सम्पादकानी विनन्ती करून मला लेखनाची थोडी विश्रांती घेण्यास भाग पाडले. अनेक सभासदाना माझा हेवा वाटतो पण लोकप्रियताच इतकी आहे की काय सांगू. असो. स्वतःची तारीफ करणे योग्य नव्हे.

बबन ताम्बे 18/08/2014 - 12:14
ऑफीसमध्ये अजून एक फेकूचन्द होता.मुली आणि बायका, याबाबतीत थापा मारण्यात त्याचा हातखंडा होता. त्याचा ब-याच वर्षांपूर्वीचा (अंदाजे २० वर्षांपूर्वीचा) किस्सा आम्ही अजुनही चघळतो. एकदा त्याने मला विचारले, "काय रे, काल बायकोला घेऊन आमच्या एरीयात फिरताना दिसला? घरी यायचे का नाही?" "अरे वेळच नव्हता. हीला गायनॅकॉलॉजिस्ट कडे घेऊन जायचे होते. तुमच्या घराजवळ त्या डॉ. .... आहेत ना, त्यांच्याकडे अपॉईंटमेंट होती." मी. "हो का?" फेकूचंद,"ती डॉक्टर ना? आपली लाईन हे बरं का !" "हो का! " मी. (च्यायचा थापाडया. मी मनात...) "मी एकदा मिसेसला तिच्याकडे घेऊन गेलो होतो. मिसेसचं चेकींग केल्यावर ती मला म्हणाली तुमचे पण चेकींग करायची गरज हे. हां मंग? आपण पण आपल्या एरीयात हँडसम हे.एक दिवस मी गेलो. मला तिने टेबलावर झोपायला सांगीतले आणि चेकींग सुरू केले. मी पण पेटलो, किसिंग बिसिंग केले. मग ती म्हटली आता बास. बाहेर पेशंट बसलेत." मी त्याला लगेच झापला. "अरे दळभद्री. थापा मारताना जरा तरी विचार करून थापा मार. ती गायनॅकॉलॉजिस्ट. आणि तुझं चेकींग ? कशाचा कशाशी काही संबंध तरी आहे का? वा रे हॅंडसम! एक डॉक्टर तुला बघताक्षणी लगेच तुझ्या गळ्यात पडायला लागली ! पारच भोट समजतो आम्हाला?" पण कसचं काय? वर निर्लज्जपणे तो हसत होता.

बबन ताम्बे 21/08/2014 - 16:53
आमचा हा फेकुचंद त्यावेळी चाळीशीत होता. आम्ही पाच सहा जण सकाळी चहा नाश्ता घेत होतो.एक दिवस ऑफेसमध्ये त्याने पुडी सोडली. फेकुचंदने सुरुवात केली."आयला काल जबरी वाचलो राव." आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे नजरा वळवल्या. आम्हाला वाटले काय अ‍ॅक्सीडंट वगैरे झाला की काय. कुणी तरी विचारले काय झाले म्हणून. "काल मित्राच्या मुलाला मुलगी बघायच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मी नव्ह्तो जात पण मित्राने खूप आग्रह केला म्हणून गेलो. पाहुण्यांच्या समोर मित्र, मी आणि मित्राचा मुलगा बसलो होतो. मुलीच्या वडीलांनी मलाच प्रश्न विचारायला सुरवात केली. मित्राला शंका आली आणि त्याने मुलीच्या वडीलांना बाजूला घेऊन सांगितले की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नवरा मुलगा तो कडेला बसलाय तो आहे. मुलीच्या वडीलांनी आश्चर्याने विचारले की तो तुमचा मुलगा आहे होय. मग माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले की तो तुमच्या बाजूला बसलेला यंग आणि हँडसम मुलगा कोण आहे? आम्ही त्यालाच नवरा मुलगा समजलो. मग मित्राने खुलासा केला की अहो तो माझा मित्र आहे म्हणून आणि त्याचे लग्न झालेले आहे. " फेकूचंद्ची पुडी संपल्याबरोबर आम्ही सगळे "ठ्ठो" जोरात ओरडलो आणि प्रचंड हसलो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात कुणी ना कुणीतरी फेकूचंद उर्फ थापाडया भेटलेला असतो. मग तो ग्रुपमधला असू शकतो/शकते, ऑफीसमधला किंवा नातेवाईकांमधे पण असू शकतो/शकते.(आपण पण आयुष्यात कधीतरी फेकूगीरी केलेली असतेच. खोटं का बोला!) पण काही लोकांना सतत थापा मारायची सवयच असते. अशा लोकांना आम्ही "बंदुक्या" किंवा "ठ्ठो " असे चिडवायचो. काही काही थापा मात्र कायम लक्षात रहातात. आमच्या ऑफीसमध्ये असाच एक बंदुक्या होता. आमच्या साहेबाचा पी.ए.! साउथ इंडीयन होता. आपण त्याचे नाव अय्यर होते असे समजू. (खरे नाव देत नाही.) एक दिवस ऑफीसमधे अय्यरने मला विचारले, "क्या रे, कल दांडी मारा ऑफीसको?