Skip to main content

धर्म

सात वारांची भारतीय पद्धती

लेखक निनाद यांनी सोमवार, 15/01/2024 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.) तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.

वार्तालाप: कर्माची फळे आणि आधि भौतिक ताप

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 07/12/2023 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात. एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.

मनाचा पहिला श्लोक

लेखक arunjoshi123 यांनी रविवार, 03/09/2023 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनाचा पहिला श्लोक मनाचा पहिला श्लोक कोणीही का समजून घ्यावा? मनाचा पहिला श्लोक समजून घेणे ही एक आध्यात्मिक गरज नसून एक साधी सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे. आपले जीवन सुरळीतपणे जगण्याकरता आपण आपल्या ब्रह्मांडाचे एक साधे विभाजन करू शकतो. आपला देह, आपले मन किंवा आपला सूक्ष्म देह, आपला भोवताल, आपल्या समजेच्या आणि भोवतालच्या पलीकडचे अशा चार विभागात हे साधे सोपे विभाजन होऊ शकते. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या त्यांच्या ग्रंथामध्ये या चारही बाबींचे सविस्तर विवरण केलेले आहे.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

लेखक शीतलउवाच यांनी रविवार, 27/08/2023 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

लेखक शीतलउवाच यांनी शनिवार, 26/08/2023 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो. तो – आज काय सुट्टी आहे का? ते – नाही. तो – मग कामावर का जात नाही ? ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ? तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे…. ते – बरं पुढे ? तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल…. ते –बरं मग? तो – मग काय, निवान्त बसता येईल .. ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की…..

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

लेखक शीतलउवाच यांनी शनिवार, 26/08/2023 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय.

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 17/08/2023 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक केंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भुते तया अधोगती. समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.

एक संध्याकाळ हिमालयाच्या कुशीत ... देकार्त, फोरीए अन् माऊलींसोबत !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 12/08/2023 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिराशेजारी घर असण्याचे काही फायदे असतात काही तोटे . तोटे म्हणजे बोलायलाच नको. कधीमधी अधुनमधुन काही ना काही ढ्यँड ढ्यँड ढ्यँड चालु असतेच . शिवाय तक्रार करायची सोय नाही. पण कदाचित हाच फायदा आहे . ही ही भोळ्याभाबड्या लोकांची प्रदर्शनप्रचुर भक्ती कम डोंबार्‍याचा खेळ पाहुनही शांत रहाता येणं ही एक साधनाच आहे म्हणा ! पण कधी कधी काहीतरी चांगलं कानावर पडतं अन बरं वाटतं. असेच नेहमीसारखीच दुपार. काहीबाही कोडींग करत बसलेलो. स्पीकरर्वर काही तरी चालु होतेच . पण आवाज कमी होता अन मंजुळही होता त्यामुळे त्याच्याकडे "लक्षपुर्वक दुर्लक्ष" करता येत होते.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

रामाचा प्रभाव

लेखक आकाश खोत यांनी गुरुवार, 30/03/2023 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षीच्या गुढीपाडव्याला पहाटे तुळशीबागेतल्या राम मंदिरात सायकलवर गेलो होतो. तिथे गणपतीबाप्पा, राम लक्ष्मण जानकी, महादेव आणि इतर देवतांच्या दर्शनाने नववर्षाची सुंदर सुरुवात झाली.  बाहेर नववर्ष शोभा यात्रेसाठी तयारी चालु होती.