मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(एखाद्या नवोदित लेखकाचा टांगणीला लागतो जीव)

सोत्रि ·

In reply to by अत्रुप्त आत्मा

अहो मिपावरील नव्या सदस्यांच्या अंगी मिपा बाणा (अंगावर आले तर शिंगावर घ्या) यावा यासाठीचे ते विशेष प्रयत्न आहेत असे आम्ही मानतो.

In reply to by ५० फक्त

किचेन 16/06/2012 - 19:25
१०० टक्के सहमत. कंपुबाजिच्या राजकारणामुळे अनेक चांगले लेखक अन्य संकेत्स्थळांकडे वळ्तायत.कधि कधि कंपुबाजिमुळे एखादा फालतु लेखहि शम्भरी गाठतो.

मिपा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मी फार पूर्वी अर्ज केला होता. परंतु काही कारणांनी तो प्रशासकांनी स्वीकृत केला नाही. कदाचित त्यांच्या पात्रतेच्या निकषांत मी बसलो नसेन. शालेय बाळकडू मनोगताच्या शाळेत मिळाले होतेच मग तेथेच अधिक धडे गिरवले. काही महिन्यांपूर्वी मिपा महाविद्यालयात पुन्हा अर्ज केला. या खेपेस मात्र सहजपणे मिळाला. जसे १२ वीत कमी गुण मिळाल्याने अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नाही. अन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी अभासक्रमातील नापास विद्यार्थ्यांमुळे वरील वर्षाला सहज प्रवेश मिळतो तसे काहीसे झाले. मिपा प्राचार्यांनी (प्रशासकांनी) दिलेल्या संधीबाबत मी सदैव त्यांचा ऋणी राहीन व परा गुरुजींचा एक आदर्श विद्यार्थी होऊन दाखवेन...

प्रचेतस 16/06/2012 - 08:29
नवोदित लेखकापेक्षाही आम्हा नवकवींची अवस्था जास्त दारूण आहे हो सोत्री अण्णा. ही जुनी खोंडं नवोदित लेखकाच्या धाग्यांवर प्रतिसाद देणार नाहीत पण आम्हा नवकवींच्या धाग्यांवर मात्र झुंडीनं हल्ला करणार, नवकवींचं जगणं मुश्किल करणार, ट्यार्पी नको पण प्रतिसाद आवर अशी अवस्था होणार. अहो आता तुम्हाला काय सांगायचे. -- एक नवकवी.

लेख अंमळ विनोदी आहे. पण,
...त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
या वाक्याबद्दल डब्बल ऑब्जेक्शन. पहिल्या प्रथम तुम्ही सं. मं. ला क्रूरकर्मा म्हणत आहात. असं म्हणणं योग्य नाही. तुम्ही आधिकारिक धोरणं वाचली नाहीत का? दुसरी चूक म्हणजे नव्यांपेक्षा तुम्ही, परा, सुनील वगैरे जुन्या खोंडांचेच धागे उडलेले मी पाहिले आहेत.

In reply to by राजेश घासकडवी

छोटा डॉन 16/06/2012 - 11:37
>>लेख अंमळ विनोदी आहे. संपुर्ण सहमती, आजकाल गुर्जींशी सहमत व्हायची वेळ फार कमी वेळा येते त्यामुळे इथे मी कुतकृत्य झालो आहे अक्षरश: >>दुसरी चूक म्हणजे नव्यांपेक्षा तुम्ही, परा, सुनील वगैरे जुन्या खोंडांचेच धागे उडलेले मी पाहिले आहेत. होय ! इनफॅक्ट मी गुर्जींसारख्या जालमहर्षींचे धागे उडताना पाहिले आहेत, आता बोला. ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

जेनी... 16/06/2012 - 22:17
मला यात कुठेच विनोद नाइ दिसत ... कि बळेच हसायचं....??? टोचर्‍या सत्याला विनोदाची शाल पांघरायची, ओढुनतानुन चेहेर्‍यावर खळखळाटी हास्य आनायचं आणी " मेलो , वारल्या गेलो , आता फुटलो " असल्या प्रतिसादांचे नारळ धाग्याला सप्रेम (?). भेट द्यायचे. त्यापेक्षा सत्याला सत्य समजुनच त्याचा सत्कार करावा ...

In reply to by प्यारे१

सोत्रि 16/06/2012 - 13:56
लेखनप्रेरणेमागची 'प्रेरणा' कुणाची हे समजले तर जास्त बरे होईल.
शॉ वॉलेसची रॉयल चॅलेंज (एक खंबा ३ जणांत) ;) - (प्रेरणादायी) सोकाजी

जोयबोय 16/06/2012 - 10:10
आपण असे हतबल होउ नका. प्रत्येक जण कधी ना ़कधी नवोदित होता. ह्या जुन्या खोंडांना काय घाबरायचे. तुमचे सृजन चालु द्या.

मोदक 16/06/2012 - 10:15
अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. तुमच्या म्हणजे नक्की कुणाकुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहते??? :-D

In reply to by मोदक

त्यांची मिपावरील सेवाज्येष्ठता लक्षात घेता कुणाचीही यास हरकत नसावी...

काय सोत्री, वेळ जात नाही का हल्ली ?? एखादे छानसे मॉकटेल देऊन सोडा की हो. हे निरर्थक धागे काढून काय मिळते आहे ? (तुम्ही इगो इश्यू न करता मुद्दा समजून घ्याल हे माहीत आहे म्हणून मुद्दाम स्पष्ट लिहितो आहे)

निश 16/06/2012 - 11:14
सोत्री साहेब, अस जुन्या लोकाना खोड म्हणण बर नाही. खर ते आपले अमुल्य विचार प्रकट करत असतात. बहुमोल सल्ले देत असतात. त्या सल्ल्यांचा लिखाणात उपयोगही होतो. आणी तसही नवे काय जुन काय तुमच्या सारख्या मायबाप जाणकार वाचक हा ईथे आहे मग काय नविन काय किंवा जुने काय लेखक व कवी येथे येतच राहतात. आता काही जुनी लोक नव्या लोकांच्या लेखावर किंवा कवितेवर कंपुबाजी करुन हल्ले करत असतीलही त्याला काय करणार आपण एकच लक्ष्यात ठेवा हत्ती व कुत्रे ह्यांची म्हण. त्यांमुळे ह्या गोष्टिंकडे लक्ष न देणे चांगले. तुमच्या लेखांचा पंखा निश. (मी लोकांच्या वाटेला कधीच जात नाही पण माझी वाट कोणी अडवली तर मग मी मदमस्त हत्ती सारखा वाट अडवण्यार्‍याला उडवुन लावतो.)

नाना चेंगट 16/06/2012 - 11:20
लेखातील पहिले वाक्य वाचले. >>>अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो बाब्बॉ !! लगेच प्रेषक आणि वेळ पाहिली. >>>प्रेषक सोत्रि Sat, 16/06/2012 - 06:14 सक्काळी सक्काळीच ? खुलासा झाला. :) किती चेष्टा करावी सोत्रि? ऑ !! अच्रत बाव्लत !! :)

आपली फेणीची बाटली आमच्याकडे जमा झालेली आहे. तेंव्हा धागा परत घेताय, का कसे ?
त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते.
च्यायला मग ज्यांना आम्ही 'जुनी खोंडे' समजतो त्यांना काय म्हणावे ?

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन 16/06/2012 - 11:50
असे म्हणणे हा नान्याचा खोडसाळपणा आहे इतकेच म्हणतो. असहमत आहेच, इनफॅक्ट असहमत होण्यासाठीच मी आंतरजालावर येतो. - छोटा डॉन

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 16/06/2012 - 11:51
अरे तू म्हणतोस ती (यात माझेही नाव घालतोस की काय असा पूर्वीपासून संशय आहे मला) प्राचीन खोंडे असावीत. तुझ्यासाठी तू 'नव-प्राचीन' किंवा 'नव-वृद्ध' खोंड अशी क्याटेगरी करावी लागेल बहुधा. (फेणीमधे आमचाही हिस्सा मान्य केलात तर प्रतिसाद मागे घेण्याचा अवश्य विचार करू.) (मी असा कसा, असा कसा, जुना की नवा?) रमताराम

In reply to by रमताराम

नान्या व ररा ह्यांच्याशी किंचित सहमत व असहमत. कोणाचे नाव कोणत्या पुराणात अथवा वेदात आले आहे त्या वरुन त्यांचा कालखंड व उपाधी शोधावी असे सुचवावेसे वाटते. प्राणिनी

jaypal 16/06/2012 - 18:19
आपापली नाडी तपासुन घ्यावी आणि 'परा" मानसशास्त्राचा आभ्यास वाढवावा हे उत्तम

विजुभाऊ 16/06/2012 - 18:23
नान्या ररा आणि परा ह्यांच्याशी किंचित सहमत व असहमत. कोण वैदीक कोण नादीक कोण हे कसे ठरवणार? अवांतर पण महत्वाचे: जुनी खोडं की जुनी खोंडं? किती अनुस्वार द्यायचे? पराला खोड म्हणावे की खोंड?

In reply to by विजुभाऊ

रमताराम 16/06/2012 - 20:01
पराला खोड म्हणावे की खोंड? सोप्पय. जो वागतो तो खोंड नि जे वागतो ती खोड. (हाणतंय परा आता.) ( 'वार्‍यावरची वरात' आठवा: जो वाजिवतो तो कदम आनि ज्ये वाजिवतो ते र्‍हिदम. ;) )

शिल्पा ब 17/06/2012 - 00:42
हे अजिबात खरं नाही. असे लेखकु हे लांब लांब प्रतिसाद (जवळ जवळ प्रत्येक धाग्यावर) देउन स्वतःच स्वत:ला विचारजंत बनण्यासाठी उत्तेजन देताना पाहीलेलं आहे हे नम्रपणे नमुद करु इच्छिते. ( आता प्रतिसाद लांब लचक असले तरी अर्थपुर्ण असतात असं नव्हे. आणि एक राहीलंचः आपल्या लेखांवर कोणी अन कशा प्रतिक्रीया द्याव्यात याची मागणी करणारे महाभाग सुद्धा आहेतच. अन लोकांनी फाट्यावर मारल्यावर वैयक्तीक होउन थयथयाट करतात हे मजेशीर.

काय लिहिले आहे ह्यापेक्षा कोणी लिहिले आहे ह्यावरून प्रतिसादांचा ओघ सुरु होतो. आपल्या वयक्तिक आयुष्यातील समस्यांचा परिपाक म्हणूनच की काय अनेक लेखांवर वैचारिक अल्सर ,झाल्यासारख्या प्रतिसाद देऊन किंबहुना तेच आपले वैशिष्टे बनविणारे सुद्धा येथे आहेच की

जेनी... 17/06/2012 - 01:07
निनाद शी सहमत... एखादा लेखक प्रसिद्ध असेल तर मग त्याच्या लेखावर तुमचा फॅन वैग्रे असलं काहितरि चिकटवल जातं .... बर्‍याचदा कितीहि नावाजलेला लेखक असो , पण त्याच्या बर्‍याच गोश्टी पटत नाहित ... पण असं लिहायची हिम्मत होत नाहि.. नाहितर ह्यांचा कंपू तयारच अस्तो हल्ला चढवायला...

In reply to by जेनी...

शिल्पा ब 17/06/2012 - 01:41
अहो म्याडम, हे मिपा आहे. एखादा विचार पटत नसेल तर तसं खणकाउन सांगायचं बिनधास्त. जे फॅन आहेत ते लिहितील तसं. अन समजा केवळ तुम्हाला आवडलं नाही असं तुम्ही लिहिल्याने जर कोणी हल्ला बिल्ला करत असेल तर संपादक मंडळ आहेच. रेवती आज्जी संपादीका आहेत असं ऐकुन आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अहो मिपावरील नव्या सदस्यांच्या अंगी मिपा बाणा (अंगावर आले तर शिंगावर घ्या) यावा यासाठीचे ते विशेष प्रयत्न आहेत असे आम्ही मानतो.

In reply to by ५० फक्त

किचेन 16/06/2012 - 19:25
१०० टक्के सहमत. कंपुबाजिच्या राजकारणामुळे अनेक चांगले लेखक अन्य संकेत्स्थळांकडे वळ्तायत.कधि कधि कंपुबाजिमुळे एखादा फालतु लेखहि शम्भरी गाठतो.

मिपा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मी फार पूर्वी अर्ज केला होता. परंतु काही कारणांनी तो प्रशासकांनी स्वीकृत केला नाही. कदाचित त्यांच्या पात्रतेच्या निकषांत मी बसलो नसेन. शालेय बाळकडू मनोगताच्या शाळेत मिळाले होतेच मग तेथेच अधिक धडे गिरवले. काही महिन्यांपूर्वी मिपा महाविद्यालयात पुन्हा अर्ज केला. या खेपेस मात्र सहजपणे मिळाला. जसे १२ वीत कमी गुण मिळाल्याने अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नाही. अन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी अभासक्रमातील नापास विद्यार्थ्यांमुळे वरील वर्षाला सहज प्रवेश मिळतो तसे काहीसे झाले. मिपा प्राचार्यांनी (प्रशासकांनी) दिलेल्या संधीबाबत मी सदैव त्यांचा ऋणी राहीन व परा गुरुजींचा एक आदर्श विद्यार्थी होऊन दाखवेन...

प्रचेतस 16/06/2012 - 08:29
नवोदित लेखकापेक्षाही आम्हा नवकवींची अवस्था जास्त दारूण आहे हो सोत्री अण्णा. ही जुनी खोंडं नवोदित लेखकाच्या धाग्यांवर प्रतिसाद देणार नाहीत पण आम्हा नवकवींच्या धाग्यांवर मात्र झुंडीनं हल्ला करणार, नवकवींचं जगणं मुश्किल करणार, ट्यार्पी नको पण प्रतिसाद आवर अशी अवस्था होणार. अहो आता तुम्हाला काय सांगायचे. -- एक नवकवी.

लेख अंमळ विनोदी आहे. पण,
...त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
या वाक्याबद्दल डब्बल ऑब्जेक्शन. पहिल्या प्रथम तुम्ही सं. मं. ला क्रूरकर्मा म्हणत आहात. असं म्हणणं योग्य नाही. तुम्ही आधिकारिक धोरणं वाचली नाहीत का? दुसरी चूक म्हणजे नव्यांपेक्षा तुम्ही, परा, सुनील वगैरे जुन्या खोंडांचेच धागे उडलेले मी पाहिले आहेत.

In reply to by राजेश घासकडवी

छोटा डॉन 16/06/2012 - 11:37
>>लेख अंमळ विनोदी आहे. संपुर्ण सहमती, आजकाल गुर्जींशी सहमत व्हायची वेळ फार कमी वेळा येते त्यामुळे इथे मी कुतकृत्य झालो आहे अक्षरश: >>दुसरी चूक म्हणजे नव्यांपेक्षा तुम्ही, परा, सुनील वगैरे जुन्या खोंडांचेच धागे उडलेले मी पाहिले आहेत. होय ! इनफॅक्ट मी गुर्जींसारख्या जालमहर्षींचे धागे उडताना पाहिले आहेत, आता बोला. ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

जेनी... 16/06/2012 - 22:17
मला यात कुठेच विनोद नाइ दिसत ... कि बळेच हसायचं....??? टोचर्‍या सत्याला विनोदाची शाल पांघरायची, ओढुनतानुन चेहेर्‍यावर खळखळाटी हास्य आनायचं आणी " मेलो , वारल्या गेलो , आता फुटलो " असल्या प्रतिसादांचे नारळ धाग्याला सप्रेम (?). भेट द्यायचे. त्यापेक्षा सत्याला सत्य समजुनच त्याचा सत्कार करावा ...

In reply to by प्यारे१

सोत्रि 16/06/2012 - 13:56
लेखनप्रेरणेमागची 'प्रेरणा' कुणाची हे समजले तर जास्त बरे होईल.
शॉ वॉलेसची रॉयल चॅलेंज (एक खंबा ३ जणांत) ;) - (प्रेरणादायी) सोकाजी

जोयबोय 16/06/2012 - 10:10
आपण असे हतबल होउ नका. प्रत्येक जण कधी ना ़कधी नवोदित होता. ह्या जुन्या खोंडांना काय घाबरायचे. तुमचे सृजन चालु द्या.

मोदक 16/06/2012 - 10:15
अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. तुमच्या म्हणजे नक्की कुणाकुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहते??? :-D

In reply to by मोदक

त्यांची मिपावरील सेवाज्येष्ठता लक्षात घेता कुणाचीही यास हरकत नसावी...

काय सोत्री, वेळ जात नाही का हल्ली ?? एखादे छानसे मॉकटेल देऊन सोडा की हो. हे निरर्थक धागे काढून काय मिळते आहे ? (तुम्ही इगो इश्यू न करता मुद्दा समजून घ्याल हे माहीत आहे म्हणून मुद्दाम स्पष्ट लिहितो आहे)

निश 16/06/2012 - 11:14
सोत्री साहेब, अस जुन्या लोकाना खोड म्हणण बर नाही. खर ते आपले अमुल्य विचार प्रकट करत असतात. बहुमोल सल्ले देत असतात. त्या सल्ल्यांचा लिखाणात उपयोगही होतो. आणी तसही नवे काय जुन काय तुमच्या सारख्या मायबाप जाणकार वाचक हा ईथे आहे मग काय नविन काय किंवा जुने काय लेखक व कवी येथे येतच राहतात. आता काही जुनी लोक नव्या लोकांच्या लेखावर किंवा कवितेवर कंपुबाजी करुन हल्ले करत असतीलही त्याला काय करणार आपण एकच लक्ष्यात ठेवा हत्ती व कुत्रे ह्यांची म्हण. त्यांमुळे ह्या गोष्टिंकडे लक्ष न देणे चांगले. तुमच्या लेखांचा पंखा निश. (मी लोकांच्या वाटेला कधीच जात नाही पण माझी वाट कोणी अडवली तर मग मी मदमस्त हत्ती सारखा वाट अडवण्यार्‍याला उडवुन लावतो.)

नाना चेंगट 16/06/2012 - 11:20
लेखातील पहिले वाक्य वाचले. >>>अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो बाब्बॉ !! लगेच प्रेषक आणि वेळ पाहिली. >>>प्रेषक सोत्रि Sat, 16/06/2012 - 06:14 सक्काळी सक्काळीच ? खुलासा झाला. :) किती चेष्टा करावी सोत्रि? ऑ !! अच्रत बाव्लत !! :)

आपली फेणीची बाटली आमच्याकडे जमा झालेली आहे. तेंव्हा धागा परत घेताय, का कसे ?
त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते.
च्यायला मग ज्यांना आम्ही 'जुनी खोंडे' समजतो त्यांना काय म्हणावे ?

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन 16/06/2012 - 11:50
असे म्हणणे हा नान्याचा खोडसाळपणा आहे इतकेच म्हणतो. असहमत आहेच, इनफॅक्ट असहमत होण्यासाठीच मी आंतरजालावर येतो. - छोटा डॉन

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 16/06/2012 - 11:51
अरे तू म्हणतोस ती (यात माझेही नाव घालतोस की काय असा पूर्वीपासून संशय आहे मला) प्राचीन खोंडे असावीत. तुझ्यासाठी तू 'नव-प्राचीन' किंवा 'नव-वृद्ध' खोंड अशी क्याटेगरी करावी लागेल बहुधा. (फेणीमधे आमचाही हिस्सा मान्य केलात तर प्रतिसाद मागे घेण्याचा अवश्य विचार करू.) (मी असा कसा, असा कसा, जुना की नवा?) रमताराम

In reply to by रमताराम

नान्या व ररा ह्यांच्याशी किंचित सहमत व असहमत. कोणाचे नाव कोणत्या पुराणात अथवा वेदात आले आहे त्या वरुन त्यांचा कालखंड व उपाधी शोधावी असे सुचवावेसे वाटते. प्राणिनी

jaypal 16/06/2012 - 18:19
आपापली नाडी तपासुन घ्यावी आणि 'परा" मानसशास्त्राचा आभ्यास वाढवावा हे उत्तम

विजुभाऊ 16/06/2012 - 18:23
नान्या ररा आणि परा ह्यांच्याशी किंचित सहमत व असहमत. कोण वैदीक कोण नादीक कोण हे कसे ठरवणार? अवांतर पण महत्वाचे: जुनी खोडं की जुनी खोंडं? किती अनुस्वार द्यायचे? पराला खोड म्हणावे की खोंड?

In reply to by विजुभाऊ

रमताराम 16/06/2012 - 20:01
पराला खोड म्हणावे की खोंड? सोप्पय. जो वागतो तो खोंड नि जे वागतो ती खोड. (हाणतंय परा आता.) ( 'वार्‍यावरची वरात' आठवा: जो वाजिवतो तो कदम आनि ज्ये वाजिवतो ते र्‍हिदम. ;) )

शिल्पा ब 17/06/2012 - 00:42
हे अजिबात खरं नाही. असे लेखकु हे लांब लांब प्रतिसाद (जवळ जवळ प्रत्येक धाग्यावर) देउन स्वतःच स्वत:ला विचारजंत बनण्यासाठी उत्तेजन देताना पाहीलेलं आहे हे नम्रपणे नमुद करु इच्छिते. ( आता प्रतिसाद लांब लचक असले तरी अर्थपुर्ण असतात असं नव्हे. आणि एक राहीलंचः आपल्या लेखांवर कोणी अन कशा प्रतिक्रीया द्याव्यात याची मागणी करणारे महाभाग सुद्धा आहेतच. अन लोकांनी फाट्यावर मारल्यावर वैयक्तीक होउन थयथयाट करतात हे मजेशीर.

काय लिहिले आहे ह्यापेक्षा कोणी लिहिले आहे ह्यावरून प्रतिसादांचा ओघ सुरु होतो. आपल्या वयक्तिक आयुष्यातील समस्यांचा परिपाक म्हणूनच की काय अनेक लेखांवर वैचारिक अल्सर ,झाल्यासारख्या प्रतिसाद देऊन किंबहुना तेच आपले वैशिष्टे बनविणारे सुद्धा येथे आहेच की

जेनी... 17/06/2012 - 01:07
निनाद शी सहमत... एखादा लेखक प्रसिद्ध असेल तर मग त्याच्या लेखावर तुमचा फॅन वैग्रे असलं काहितरि चिकटवल जातं .... बर्‍याचदा कितीहि नावाजलेला लेखक असो , पण त्याच्या बर्‍याच गोश्टी पटत नाहित ... पण असं लिहायची हिम्मत होत नाहि.. नाहितर ह्यांचा कंपू तयारच अस्तो हल्ला चढवायला...

In reply to by जेनी...

शिल्पा ब 17/06/2012 - 01:41
अहो म्याडम, हे मिपा आहे. एखादा विचार पटत नसेल तर तसं खणकाउन सांगायचं बिनधास्त. जे फॅन आहेत ते लिहितील तसं. अन समजा केवळ तुम्हाला आवडलं नाही असं तुम्ही लिहिल्याने जर कोणी हल्ला बिल्ला करत असेल तर संपादक मंडळ आहेच. रेवती आज्जी संपादीका आहेत असं ऐकुन आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. जुन्या मिपाकरांच्या लेखांवर तुम्ही अगदी मिटक्या मारून प्रतिसादावर प्रतिसाद देता, पण नवोदीत लेखकांना फाट्यावर मारता.

सांगे वडिलांची कीर्ती.....

राजघराणं ·

रमताराम 16/05/2012 - 16:53
पालथ्या घड्यांवर पाणी ओतण्याची लै हौस ब्वॉ तुम्हाला. उद्ध्वस्त धर्मशाळा मधील कॉम्रेड कुलकर्णी म्हणतो ना तसे 'लिहून बोलून या देशाला जागवता येत नाही.' गोधडीत सुस्त पडून राहणार्‍या नि हात बाहेर कढून कोणत्याही घोषणेला - कोणती ते ऐकण्याची समजून घेण्याची तसदी न घेता थेट - खच्चून 'जय' म्हणण्यापुरती हालचाल करणार्‍यांच्या देशात असे शब्द 'केवळ बापुडे वारा' असतात साहेब. असो. लिखाण आवडले/पटले हे वे. सां. न. ल.

In reply to by रमताराम

जय राजघराणं, जय रमताराम. आम्ही या दोघांना पूर्वज मानणार आणि त्यांना देव बनवून त्यांचा उदोउदो करणार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. ररा व मा.* अदिती दोघेही जन्मजात संस्कृतीभंजक असल्याने त्यांच्या प्रतिक्रिया दुर्लक्षीत केल्या आहेत. *माजोरी भारतीय संस्कृती महान होती, महान आहे आणि महान राहील !

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 17/05/2012 - 13:22
ए वेताळा, मी विक्रम नाही त्यामुळे माझ्या बोकांडी बसायचे नाय हां.

In reply to by रमताराम

ए वेताळा, मी विक्रम नाही त्यामुळे माझ्या बोकांडी बसायचे नाय हां.
मी काय के. सी. बोकाडीया आहे का ? ;) परिष कणेकर

प्यारे१ 16/05/2012 - 16:57
>>>>समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही. हे आवडलं. >>>हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम ! हॅ हॅ हॅ. कळत नाही असं म्हणायचंय? वळणं महत्त्वाचं माऊली!

पैसा 16/05/2012 - 19:42
विस्तार आवडला. (फक्त >>"मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे." याबद्दल जरा शंका आहे)

राजघराणे यांचा अजून एक उत्तम लेख. पूर्णपणे पटला. जर प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या पिढीकडून ज्ञान घेऊन त्यात आपली भर टाकून किंवा काळानुरूप सुधारणा करून पुढच्या पिढीकडे ते ज्ञान हस्तांतरीत करत असेल तर याचा अर्थ नव्या पिढीकडे जुन्या पिढीपेक्षा अधिक योग्य आणि अधिक काळानुरूप ज्ञान असते असा त्याचा अर्थ झाला. मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. मला वाटते की जर नव्या पिढीकडे जास्त ज्ञान असेल तर जे काही जुने आहे ते by default अयोग्य मानून त्यात जर उपयोगी काही असले तर तेच घ्यावे. by default अयोग्य का? कारण पूर्वी जेव्हा केव्हा त्या गोष्टी तयार केल्या त्यापेक्षा आताच्या पिढीकडे अधिक आणि काळानुरूप ज्ञान आहे तेव्हा पूर्वी लक्षात न आलेल्या काही गोष्टी असतील तर त्या आताच्या पिढीच्या लक्षात यायला जास्त स्कोप आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

अर्धवटराव 17/05/2012 - 21:26
याला म्हणतात आधुनीक विचार... >>मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. -- इतरत्र जाऊ दे... मिपावरील असले कोण ज्ञानपाषाण आहेत ते कळु दे एकदा... मग बघा काय गदर माजवतो त्यांच्या विरुद्ध !! अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मृगनयनी 17/05/2012 - 23:05
रा.घ. ..ठीक आहे लेख! आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे | शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास हे वाक्य आवडले. * पूर्वीच्या काळी उपवासाचे स्वरूप अत्यन्त वेगळे होते. लोकं फलाहार आणि पाणी घ्यायचे. काही लोक निर्जळी उपवास करायचे. मुळात उपवासाचा उद्देश हा 'काही विशिष्ट गोष्टी खाणे' असा नसून अत्यंत जरूरीपुरते कमीतकमी अन्न खाऊन परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करणे हा होय. कमी आणि जरूरीपुरते अन्न घेतल्याने सुस्ती येत नाही. व मन सतर्क राहते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी (शक्य असेल तर फक्त ) लिम्बूपाणी घेणे केव्हाही चान्गले! कारण त्यामुळे माणसाच्या चित्तवृत्ती तर शान्त राहतातच. पण चमचमीत अन्नाच्या योगेकरून बळावलेल्या मानसिक आणि बौद्धिक अर्थहीन तर्क-वितर्कांनाही आळा बसतो. तसेच कोणतेही सन्त-महात्मे कधीच कुणाला उपास करायला सांगत नाही व यापूर्वीही कधी असे कुणा सन्तांनी सांगितलेलेही दिसत नाही. काही खादाड लोकांना 'उपवास' या शब्दाचा अर्थ व महत्व माहित नसल्याने (व कदाचित त्यांच्या बापजाद्यानाही माहित नसल्याने ) त्यांनी उपवासाच्या दिवशी साबुदाणा, बटाटे हे पोर्तुगीजांनी आणलेले पदार्थ चमचमीत पद्धतीने प्रिपेअर करून खायला सुरुवात केली. काही ठिकाणी उपवासाला तान्दूळ खातात. काही ठिकाणी भेंडी चालते.. काही ठिकाणी चालत नाही... बर्‍याच ठिकाणी साबुदाण्याचे पापड, वरईची आमटी, दाण्याची चटणी इ. पदार्थ खाऊन उपवास साजरा केला जातो. त्यामुळे "एकादशी दुप्पट खाशी" होते. व "उपवास" .. उपवास राहत नाही.. काही डॉक्टर लोक कॅलरीज आणि वजन वाढलेल्या लोकांना "उपवास" करायला सांगतात!. पावसाळ्यात हवा, पाणी यातील बदलामुळे वारंवार पोटदुखी, जन्तूसंसर्ग तसेच इतर अनेक रोग इतर ऋतुंपेक्षा जास्त प्रमाणात फैलावतात. त्यामुळे पावसाळ्यात म्हणजेच -आषाढ, श्रावण, भाद्रपदात विविध धार्मिक कारणांसाठी उपवास करण्याचे नियम आपल्या खूप जुन्या पूर्वजांनी घालून दिलेले आहेत. श्रावणी सोमवार, मन्गळागौर, नागचतुर्थी, हरतालिका, श्रावणी शुक्रवार.. असे विविध दिवस आपल्या अति जुन्या पूर्वजांनी उपवासासाठी निवडलेत. कारण आरोग्यविषयक कारणे देण्यापेक्षा धार्मिक कारणे दिलीत.. तर लोक त्याचे श्रद्धेने पालन करतात.. हे त्यांना माहित होते. किम्बहुना ती ह्युमन मेन्टॅलिटी आहे. अर्थात या धार्मिक कारणांमागे आपल्या अति जुन्या पूर्वजांची पुढच्या पिढीबद्दलची सद्भावनाच होती. परन्तु आत्ता बदलत्या काळानुसार आपल्या अति जुन्या पूर्वजांचे या विचारांमागचे शास्त्र लक्षात न घेता फक्त कर्मकांडात लोक अडकले. आणि तेच संस्कार त्या कर्मकांडी लोकांनी पुढच्या पिढीवर केले. त्यामुळे उपवास आणि इतरही बर्‍याच धार्मिक गोष्टींमागचे तत्व न समजल्यामुळे 'उपवासा'चा पार बोर्‍या वाजवला गेला. आणि ग्लोबलायझेशनमुळे आणि कर्मकांडामुळे पसरलेल्या व दृढ झालेल्या अर्धवट माहितीमुळे बर्‍याच लोकांना आपल्या अति जुन्या पूर्वजांचे विचार मूर्खपणाचे वाटतात.. असो.. आता अमेरिका किन्वा युरोप मधले शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या या अति जुन्या पूर्वजांच्या सन्शोधनाचा अभ्यास करून त्यांचे निष्कर्ष .. पुन्हा स्वतःच्या नावाने नव्या कव्हरमध्ये जगासमोर आणतील.. तेव्हा आपल्या लोकांना त्याचे महत्व कळेल!! त्यामुळे कधी कधी नव्हे बर्‍याचदा "जुने ते सोने" असते... फक्त ते सोने आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यासाठी नुसते सोने विकणार्‍यापेक्षा सोने पारखणार्‍याची संगत धरणे केव्हाही उचित ठरेल. :) || जय जय रघुवीर समर्थ || :)

दादा कोंडके 17/05/2012 - 11:54
समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत.
खरय. आणि हे सगळं व्हायला आताच्या आणि पुढच्या पिढ्यांत एव्हढी समज येइल की देव, आणि धर्माचं अधिष्ठान की काय म्हणतात त्याची काहिही गरज नाही. उलट आत्तापर्यंत याचा दुष्परिणामच मानवजातीला भोगावे लागले आहेत हे पटेल. अशी आशा आहे. :)

चिरोटा 17/05/2012 - 12:52
लेख आवडला.
बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते
हे कशावरून ? उपवास न करणार्‍यांना हे माहित असते का? की उपवास करणार्‍या व्यक्ती जुनाट,बुरसटलेल्या विचारांच्या असतात असे आपले मत आहे?

In reply to by चिरोटा

विकास 17/05/2012 - 23:12
उपवासाच्या दिवशी "आपल्या" नेहमीच्या गोष्टी खाणे आपण टाळायचे असते. आता बटाटा हा जर परकीय असला तर "आपला" नाही अथवा "नेहमीचा" देखील नाही. म्हणून उपवासास चालत असावा. ;)

बॅटमॅन 17/05/2012 - 13:57
>>हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - असे नुकतेच अ‍ॅडमने ईव्हला म्हटल्याचे वाचनात आले असे पुलंच्या पुस्तकात वाचल्याचे आठवले.

रमताराम 17/05/2012 - 16:19
तुमच्यासाठी आमचा एक आवडत्या कथेतील छोटा भाग... अर्थात जीएंचा. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पर्वतापलिकडचा सम्राट ही कोरड्या झालेल्या म्हातार्‍या बायकांची भाकडकथा आहे! तुमची नृत्य वेडगळपणाची आहेत! निसर्गाचं चक्र अविरतपणे फिरत असतं. पावसाळा येतो तो तुमच्या नृत्यांनी खूष होऊन नव्हे; किंवा तो येतो ते तुम्ही अत्यंत सद्गुणी, निसर्गाचे लाडके आहात म्हणून नव्हे. तुम्ही केवळ पावसाचा उपयोग करता इतकंच. तुम्ही तुमची आडदांड नृत्यं थांबवलीत किंवा तुम्ही सारेच नष्ट होऊन गेलात तरी पावसाळ्यात पाऊस हा निर्विकारपणे पडत राहिलंच! पण एका बाबतीत मात्र मी चुकलो. मला वाटलं होतं या अदृष्य बेड्या हातावरून पडताच निदान एकाला तरी मुक्त वाटेल. मला त्याबद्दल कृतज्ञता नको होती, कारण आता मी त्यापलिकडे गेलो आहे. कृतज्ञता नव्हे तर निदान एकाला तरी मुक्त केल्याचा आनंद मला हवा होता. पण हातापायात या अवजड बेड्या शतकानुशतके घालून तुम्ही इतके अपंग झाला आहात की आता त्यांच्याशिवाय चालणं तुम्हाला अशक्यच वाटतं. तुमच्या झापडी काढून मी तुमच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला. एकंदरीने मुक्तता अशी बाहेरून देता येत नाही हेच खरं. त्यासाठी आतूनच उकळी यावी लागते. मी तुमची प्रतारणा केली याचं खरं म्हणजे तुम्हाला दु:ख नाही, तर ती प्रतारणा आहे हे दाखवण्याचं धैर्य मी दाखवलं याचा तुम्हाला संताप आहे. तुम्ही अज्ञ आहातच पण आपण अज्ञ आहोत हे जाणण्याचं पहिलं पाऊलदेखील तुम्हाला उचलता येत नाही इतके तुम्ही अपंग, क्षुद्र होऊन बसला आहात! मी तुम्हाला काही शिकवू शकलो नाही, पण ही एक गोष्ट मात्र मी स्वत: या क्षणी शिकलो! -कळसूत्र (काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी) >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पर्वतापलिकडील सम्राट हे एक रूपक आहे हे वेगळे सांगायला नकोच. :)

विकास 17/05/2012 - 19:52
लेख - मुक्तक म्हणून आवडले आणि प्रामाणिक वाटले. (बाकी आपल्या मिपाआयडीवरून आपण वाडवडीलांची किर्ती तर सांगत नसता असे वाटले. ;) ह.घ्या.). मात्र आपले प्रामाणिक विचार संपूर्णपणे पटले असे म्हणणार नाही. कारण बर्‍याचदा अशा विषयांचे प्रामाणिकपणे केलेले विस्तार हे समाजात चाललेल्या अथवा स्वतः निरीक्षण केलेल्या अनुचितीत गोष्टींना/प्रथांना प्रतिक्रीया म्हणून असतात म्हणून लंबक दुसर्‍या टोकाला जातो... त्यामुळेच y=mx+c अशा साध्या समिकरणाने मांडलेले असतात आणि वास्तव तसे नसते. संतमंडळींपासून अगदी अधुनिक साहीत्यिकांपर्यंत अनेकांनी मांडलेले अनेक चपखल विचार मला आवडतात. ते केवळ मराठी, हिंदी भारतीयच असतात असे नाही, तर इंग्रजीतले पण असू शकतात. अनेकदा असे वाचलेले ऐनवेळेस आपोआप आठवते आणि मार्गदर्शक अथवा समुपदेशक ठरते, अर्थात तसे घेण्याची तयारी आणि इच्छा असली तर... "ज्ञानासम नसे काही, पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये | " असेच काहीसे. समर्थांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे त्यातलेच आहेत. रामदासांनी दासबोधाच्या ज्या दशकात, "आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥" असे लिहीले त्याच दशकात नंतरच्या (दहाव्या) समासात, "समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥" असे देखील म्हणलेले आहे. अर्थात हे (म्हणजे पढतमुर्खाचे लक्षण) आपल्यासाठी म्हणलेले नाही हे स्पष्ट करतो! तसा गैरसमज नसावा. पण असे महाभाग बर्‍याचदा जालावर आणि वास्तवात देखील दिसतात-भेटतात इतकेच म्हणेन. पण स्वतः तंगड्या वर करून बसायचे आणि बापजाद्यांच्या किर्तीबद्दल बोलायचे, हे जसे मूर्खपणाचे लक्षण आहे, तसेच केवळ जुने आहे वगैरे म्हणत तुच्छ लेखायचे कारण देखील नसते...दुर्दैवाने तसे बर्‍याचदा घडताना दिसते. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " यांचा खरेच विचार करायचा असेल तर तो आपल्या स्थलकालपरीस्थितीस योग्य असा करावा का फ्रान्समधे अठराव्या शतकात मांडले म्हणून ते घटनाकारांनी १९५० साली तसे लिहून ठेवले म्हणून (पक्षी: परत भूतकाळाची किर्ती) करावा ह्याचा देखील विचार करायला हवा. जे स्वदेशी विपत्ती भोगत वडीलांची किर्ती करणारे असतात त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूक आहे हे निश्चित... कारण समर्थानी सांगितले आहेच. :-) पण जे तसे वागत नाहीत ते नक्की "समता, न्याय, बंधुभाव, व्यक्तीस्वातंत्र्य" हे स्वतःपुरतेच मर्यादीत ठेवतात का सर्वांसाठी आणि सर्वांच्या नजरेतून त्याचा विचार करतात हे महत्वाचे आहे. सरते शेवटी नुसतीच वडीलांची किर्ती सांगणे हे जसे माझ्या लेखी निर्विवाद मुर्खपणाचे आहे तसेच त्याला मान्यच न करणे अथवा त्याची (चांगल्या गोष्टींची) लाज वाटण्यासारखे वागणे हे देखील काही शहाणपणाचे ठरत नाही. "सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे" असेच काहीसे... जे चैतन्य / सचेतन असते ते तसे असे पर्यंत कालातीतच असते. केव्ळ जुने म्हणत तुच्छ लेखणे गरजेचे नाही आणि आमचे म्हणत नुसतेच भजायची तर त्याहूनही गरज नाही... म्हणूनच विचारात समतोल आणि सारासार विवेकबुद्धी असणे देखील महत्वाचे आहे असे वाटते... नाहीतर केवळ पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय (ट्रेडीशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी) तयार करण्याची स्फुर्ती देणार्‍या माशेलकरांना आणि त्यांच्या शास्त्रज्ञ चमूला देखील आपण हकनाक दासबोधातील दशक दहावा, समास पहिला (मुर्खांची लक्षणे) मध्ये वर्गिकृत करू...

In reply to by विकास

अर्धवटराव 17/05/2012 - 21:40
मिपावरचा एक धर्ममार्तंड तरी सापडला... पण तुम्ही आमच्या गुडबुकातले... तुमच्या विरुद्ध गदर कसा करावा??? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

विकास 17/05/2012 - 22:08
मिपावरचा एक धर्ममार्तंड तरी सापडला... ऑ? मी लपलो कधी होतो? उगाचच संशोधक असल्याचे क्रेडीट घेण्याचा प्रकार आहे.. ;) तुमच्या आधीच्या प्रतिसादातील खालील वाक्याचा "धर्ममार्तंड" सापडण्याशी संबंध आहे असे समजतो. मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. "जे काही जुने आहे ते by default योग्य मानणे" जसे अयोग्य तसेच "एखादी गोष्ट योग्य मानणारे, ती गोष्ट केवळ जुनी आहे म्हणजे "सगळेच जुने by default योग्य मानतात" असे समजून त्यांना धर्ममार्तंड मानणे देखील अयोग्यच. :-) पण तुम्ही आमच्या गुडबुकातले... तुमच्या विरुद्ध गदर कसा करावा??? अहो महाराज, असे गुडबुक वगैरे ठेवायचे नसते. पटले तर पटले, नाही पटले तर नाही पटले म्हणायचे, आणि बरळत आहे असे वाटले तर टिका करायची... तसे नाही केले तर आमचा पण बुवा/बाबा करून टाकाल तुम्ही. :-)

In reply to by विकास

दादा कोंडके 17/05/2012 - 23:53
सरते शेवटी नुसतीच वडीलांची किर्ती सांगणे हे जसे माझ्या लेखी निर्विवाद मुर्खपणाचे आहे तसेच त्याला मान्यच न करणे अथवा त्याची (चांगल्या गोष्टींची) लाज वाटण्यासारखे वागणे हे देखील काही शहाणपणाचे ठरत नाही.
म्हणजे परत एकदम दुसर्‍या टोकाचं उदाहरण दिलं की युक्तीवाद सोप्पा होतो. खरतर अ‍ॅब्सुल्यूटली कुठलीच गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली वाईट नसते. तीची योग्यता-चांगूलपणा सापेक्ष असतो. तात्कालीक सामाजिक परिस्थितीवर बरच काही अवलंबून असतं. सध्याची (भारतातली) सामाजिक परिस्थिती बघितलीकी तुम्हाला असं वाटत नाही का या व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय म्हणून? खरतर, एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर पूर्विच्या लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ नये. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " इ. इ. बद्दल सध्याचा समाज जास्त प्रगल्भ आहे असं माझं सपष्ट मत आहे. :)

In reply to by दादा कोंडके

अर्धवटराव 18/05/2012 - 00:13
>>खरतर, एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर पूर्विच्या लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ नये. -- एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर कुठल्याच लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ :) अर्धवटराव

In reply to by दादा कोंडके

विकास 18/05/2012 - 00:56
म्हणजे परत एकदम दुसर्‍या टोकाचं उदाहरण दिलं की युक्तीवाद सोप्पा होतो. हा युक्तीवाद नसून वास्तव आहे. आंधळा अभिमान नको म्हणताना लाज वाटते असे सांगणे बर्‍याचदा ऐकतो-वाचतो. म्हणूनच आधीच्या प्रतिसादात, "केवळ जुने म्हणत तुच्छ लेखणे गरजेचे नाही आणि आमचे म्हणत नुसतेच भजायची तर त्याहूनही गरज नाही..." असे देखील म्हणले होते... खरतर अ‍ॅब्सुल्यूटली कुठलीच गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली वाईट नसते. तीची योग्यता-चांगूलपणा सापेक्ष असतो. तात्कालीक सामाजिक परिस्थितीवर बरच काही अवलंबून असतं. हेच तर म्हणणे आहे. सध्याची (भारतातली) सामाजिक परिस्थिती बघितलीकी तुम्हाला असं वाटत नाही का या व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय म्हणून? कोणी समर्थांच्या ओव्यांचे उदाहरण दिले अथवा कोणी पुलंनी केलेली संस्कृतीची व्याख्या सांगितली तर त्यात व्यक्तीपूजा शोधायची का? रामदासांना कालचे म्हणून हिणवायचे असेल तर मग जीए तरी आजचे कुठे आहेत? ते पण आता कालचेच आहेत की? मग त्यांचे विचार सांगणे म्हणजे काय व्यक्तीपूजा समजायची? हे मी रमताराम यांना उद्देशून लिहीलेले नाही. त्यांनी दिलेल्या उदाहरणात मला काही गैर वाटत नाही जितके मला रामदासांचे अथवा इतर कुणाचे नाव घेणे गैर वाटत नाही. जी ए अथवा पुलच कशाला मिर्झा गालीब चे शेर सुनावत त्याचे विचार ऐकवणारे किती असतात? एखाद्याला एखाद्याचे लेखन, विचार, सांगायची पद्धत अपील होते तर एखाद्याला त्याच व्यक्तीची न होता दुसर्‍या कुणाची तरी होते... त्या दोन्ही व्यक्ती काही व्यक्तीपूजा करत नसतात तर निव्वळ कुणाचे तरी अ‍ॅप्रिशिएट करत असतात. तात्पर्य: तुमच्या प्रश्नातले "व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय" हे मला १०० काय १०००% मान्य आहे. मात्र त्याला जबाबदार असलेली व्यक्तीपूजा वेगळीच आहे असे वाटते: उदाहरणादाखलः (२००९ च्या विदा प्रमाणे) ५२ केंद्रसरकार प्रकल्प, ५२ (विविध्)राज्य सरकार प्रकल्प, ९८ शैक्षणिक संस्था, ६ विमानतळे/बंदरे, ९३ रुग्णालये, ७४ रस्ते, इमारती, स्थाने, आणि १५ राष्ट्रीय उद्याने ही एकट्या राजीव गांधींच्या नावावर आहेत. तेच इतर अनेक राजकीय नेत्यांचे दिसेल. बरं हे सगळे करदात्याच्या पैशाने परत पैसे खात खात... अजून बरेच काही असे लिहीता येईल. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " इ. इ. बद्दल सध्याचा समाज जास्त प्रगल्भ आहे असं माझं सपष्ट मत आहे. तसे वाटत नाही. "समता, न्याय, बंधुभाव, व्यक्तीस्वातंत्र्य" हे जर माझ्या टर्म अँड कंडीशनवर चालले असेल तरच मी त्या बाबतीत प्रगल्भ राहीन असा रोख बर्‍याचदा समाजात दिसतो त्यामुळेच तर सामाजीक प्रश्न तयार होतात, झालेत...

यकु 17/05/2012 - 21:08
रामदास हे एकच शहाणे जगात होऊन गेले, आणि त्यानंतर शहाणपणा, मूर्खपणाची व्याख्याच कुणाला करता येणार नाही असा राजघराणं यांचा समज दिसतो. स्वतः लग्न टाळून* रामदास
संसार करावा नेटका
असा उपदेश करु शकतात याला तुम्ही काय म्हणाल? *टाळून म्हणतोय, लग्नाच्या बोहल्यावरुन पळून म्हणत नाहीय याची नोंद घ्यावी, परवा कुरुंदकरांच्या एका व्याख्यानात बोहल्यावरुन पळून जाण्याच्या दंतकथेबद्दल पटेल असा विचार ऐकला

In reply to by यकु

अर्धवटराव 17/05/2012 - 21:44
इतरांनी उगाच भावनेच्या भरात/क्षणीक तावातावाने वा एखाद्या उसण्या झपाटलेपणाने भारुन जाऊन संसाराकडे पाठ फिरऊ नये.. इतकच ;) अर्धवटराव

In reply to by यकु

अर्धवटराव 17/05/2012 - 22:45
>>कोण युजी? -- यु = तुम्ही, जी=आदरर्थी वगैरे काय लावायचं असतं ते.. म्हणे बाबाजी, नेताजी, भाऊजी, रावजी वगैरे... शिल्पा मॅडम तुमचेच मौलीक विचार विस्ताराने मांडायची विनंती करताहेत :)

In reply to by यकु

विकास 17/05/2012 - 22:50
दशक बारावा : विवेकवैराग्य समास पहिला : विमळ लक्षण मधील पहीलाच श्लोक/वचन/ओवी जे काही म्हणायचे आहे, ते असे आहे: पहीला श्लोक तुम्ही (संसार करा नेटका) म्हणालात तो आहे तर उर्वरीत अजून संदर्भ लागण्यासाठी देत आहे:
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥ प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥ परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगिसी । अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥
रामदासांनी दासबोधाच्या पहील्याच समासात या ग्रंथाचे काय वर्णन केले आहे?
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥
एका अर्थी मानवी विचार आणि त्याने प्रभावीत होणारे आचार या संदर्भातला हा एक संदर्भग्रंथ आहे. विविध समासांमध्ये विविध वृत्ती-प्रवृत्तींची लक्षणे आणि त्यासंदर्भातील वर्तन देखील सांगितली आहे. अर्थात काळ लक्षात घेतला तर त्यास भक्तिमार्ग म्हणले आहे, पण तो जास्त करून व्यावहारीक ग्रंथ आहे असे एकूण वाचल्यावर वाटते. ते काही प्रत्येकाला आधी प्रपंच करा म्हणून सांगत नाहीत तर प्रापंचिक माणसाने काय करावे हे सांगत आहेत. आधी जी संसाराची जबाबदारी घेतली आहे ती नीट पाळा आणि मग लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जा. :-) तसे केले नसल्याने काय झाले ह्याचे मोठे उदाहरण त्यांच्या आधी काही शतके "विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचे" होतेच पण त्या व्यतिरीक्त देखील अनेकदा घडलेले असू शकते. संदर्भग्रंथ लेखक हे निरीक्षणाधारीत संकलन करतो. तेच रामदासांनी येथे केले आहे. नाहीतर उद्या म्हणाल स्वतःला पोरे न होता,
लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली । बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥ लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं । ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥
असे कसे ते म्हणू शकतात? :-) संदर्भ ग्रंथातील अनेक गोष्टी या इतरांनी पण इतरत्र मांडलेल्या असू शकतात. रामदासांनी त्या ओवीबद्ध करून चपखल शब्दात सांगत समाजाला त्यांच्या पद्धतीने जागृक आणि व्यावहारीक करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते अनेकदा सांगितले जाते. नाहीतर "मूर्ख" या शब्दाच्या डिक्शनरी अर्थावरून चर्चा कशी होऊ शकेल? :-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 18/05/2012 - 12:02
आलं तिच्यायला काड्या सारायला. अवांतर: 'परा' हाच 'परशुराम' आहे असे आम्हाला आतल्या गोटातून समजले. त्याच्या परशुचे पाणी करून त्याने कळफलकाला पाजले आहे नि त्यामुळे त्याच्या कळफलकाने भल्याभल्या क्षत्रियांची दाणादाण उडवण्याचे कार्य अवलंबलेले दिसते. (आठवा कालच केलेली 'नि:सदस्य मिपा करण्याची घोषणा.)

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 18/05/2012 - 12:38
चांगलं तुला विष्णूचा अवतार म्हणतोय तर म्हणे चिखलफेक. चांगलं समुद्र सारून (कुठे? असला हलकट प्रश्न विचारू नकोस) भूमी निर्माण केल्याचे श्रेय दिले तुला तर म्हणे प्रतिवाद करता येत नाही. छ्या: जाउं द्या झालं. ज्याचं करायला जाव भलं... (स्वगतः आणि मला वाटलं होतं खूष होऊन त्या कोणशाशा राजाच्या जसं राज्य स्वाधीन केलेस तसे आपला क्याफे माझ्या स्वाधीन करून तू तपश्चर्येला निघून जाशील.)

In reply to by रमताराम

नाना चेंगट 18/05/2012 - 12:39
>>>आपला क्याफे माझ्या स्वाधीन करून तू तपश्चर्येला निघून जाशील.) सौदर्यफुफाट्याचा मोह पडला वाटतं म्हातार्‍याला...

In reply to by नाना चेंगट

रमताराम 18/05/2012 - 13:47
चोराच्या वाटा चोराला ठाऊक. उघड आहे हे. पर्‍याच्या क्याफेचा मोह पडायला दुसरे काय कारण असणार, ते शेजारचं दांडगं कुत्र? पण हे हितं झाईर करायची काय गरज होती? तुला पार्टनरशिप देणार होतोच की.

कवितानागेश 17/05/2012 - 23:09
चांगला लेख. आपल्या वडलांची किंवा ज्यांचे वाक्य न वाक्य प्रमाण मानले जाते अश्या कुठल्याही बाबांची किर्ती सांगता न बसता स्वतः काहीतरी पराक्रम करावा असे समर्थ रामदासांना सांगायचय असे मला वाटते. किर्ती सांगू नये याचा अर्थ वृथा अभिमान बाळगू नये आणि तो लोकांवर लादू नये असा होतो, पण त्यांच्याबद्दल अजिबातच आदर/ आपलेपणा ठेवू नये आणि जुने ते सगळे फेकूनच द्यावे असाही होत नाही, हा समन्वय कुणीच साधताना दिसत नाही. त्यामुळे मला हल्ली फक्त करुणाष्टके आठवतात! :)

In reply to by कवितानागेश

रमताराम 18/05/2012 - 10:12
हा समन्वय कुणीच साधताना दिसत नाही. किंचित दुरुस्ती. 'कुणीच' दिसत नाही हे खरे नाही. असे लोक असतातच, फक्त ते अल्पमतात असतात. हे लोक सारासारविवेकाचा आधार घेत असल्याने ते नेहमीच आपल्या बाजूला असतील याची खात्री दोन्ही बाजूकडच्यांना नसते. त्यामुळे एक मत विरोधात व्यक्त केले त्यांनी की लगेच त्यांच्यावर 'तिकडचा' असा शिक्का मारून मोकळे होतात. असा शिक्का दोन्हीकडून पडल्याने त्यांचा तिसराच पंथ होतो. मूलत: सामाजिक प्राणी असल्याने माणसाला जमावाचा भाग असणे अधिक सुरक्षित वाटते. अल्पमतात राहण्यातली असुरक्षितता सहन न होऊन त्यातील भावनिकदृष्ट्या कमकुवत लोक निरूपायाने हा नाहीतर तो झेंडा खांद्यावर घेऊन जमावात सामील होतात. तिसरा गट आणखीनच अल्पमतात जातो. आणखी एक म्हणजे विचारहीन लोकांना हे लोक आज एका बाजूने बोलतात नि उद्या दुसर्‍या बाजूने एवढेच दिसते. त्यावरून हे दुटप्पी आहेत असा आक्षेप घेतला जातो. यात आपली समज कमी पडत असेल नि वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी त्या विसंगत नाहीत अशी शंकादेखील जमावात राहून फाजील आत्मविश्वास कमावलेल्यांना येत नाही. आपल्या आजूबाजूला असे लोक असतात, आपण त्यांची दखल घेत नाही इतकेच.

In reply to by कवितानागेश

प्यारे१ 18/05/2012 - 10:26
>>>त्यामुळे मला हल्ली फक्त करुणाष्टके आठवतात! मला याबरोबर च 'कल्याण करी रामराया' देखील आठवतं! अपराधी जन चुकतचि गेले| .... कोठे जावे काय करावे|....

मृत्युन्जय 18/05/2012 - 10:27
आपल्यातल्या जुन्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान न वाटणे हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स चे लक्षण आहे. बाकी या विषयावर या आधीच इतके लिहिले आहे की परत घसा (किंवा कळफलक) खरवडावा असे अजिबात वाटत नाही. दळण चालु द्यावे.

In reply to by मृत्युन्जय

आपल्यातल्या जुन्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान न वाटणे हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स चे लक्षण आहे
"असे मला वाटते" हे तीन शब्द शेवटी लिहायला विसरलात का? मला तर "आपण" म्हणजे नक्की कोण हा प्रश्न नेहमी पडतो. म्हणजे उदाहरणार्थ "मी" म्हणजे (आत्मा वगैरे भगवद्गीतेतील संकल्पना बाजूला ठेवल्या तर) एक अडनाव धारण करणारा/ अमक्या जातीचा /पुण्यातील एका भागात राहणारा/पुण्यात राहणारा/ मराठी भाषिक/ हिंदू/ भारतीय की केवळ एक माणूस? तेव्हा "आपण" म्हणजे कोण हे आपली रेफरन्स फ्रेम किती लहान/मोठी आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच एखाद्याची फ्रेम खूपच लहान असेल तर त्याला "मी" म्हणजे केवळ एखादे अडनाव असलेल्या घरात जन्माला आलेला असे वाटेल तर फ्रेम बरीच मोठी असेल तर त्याला "मी" म्हणजे एक माणूस किंवा एक सजीव असे वाटेल. तेव्हा "आपल्या" गोष्टी म्हणजे नक्की कोणाच्या गोष्टी हे सांगितलेत तर बरे होईल. दुसरे म्हणजे "अभिमान" म्हणजे नक्की काय हे पण मला कळलेले नाही. एक मिपा आणि ऐसी अक्षरे विदुषी म्हणतात त्याप्रमाणे रमाकांत आचरेकरांना सचिनचा अभिमान असणे समजू शकतो. कारण सचिनला घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण मी मराठी आणि सचिनही मराठी म्हणून मला सचिनचा अभिमान (त्याच धर्तीवर "आपल्या" पूर्वजांनी काहीतरी केले त्याचा अभिमान) वृथा आहे. तुम्ही उत्तर देणार नाही याची माहिती आहे. पण परत कधी "आपल्या" गोष्टींचा "अभिमान" हा विचार कराल तेव्हा "आपण" म्हणजे नक्की कोण आणि "अभिमान" म्हणजे नक्की काय याचा जरूर विचार करा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मृत्युन्जय 18/05/2012 - 14:09
मी उत्तर देणार नाही असे जे आपल्याला वाटते ते अतिशय बरोबरच आहे. मी उत्तर देणारही नव्हतो. पण आम्ही पडलो ररांचे फ्यान. त्यांच्यासारखेच " काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही" असे म्हणुन आम्ही एकदा शेवटचे उत्तर देतो. त्याला तुम्ही तेच तेच शिळ्या कढीला ऊत आणणारे प्रतिवाद करणार हे ही माहिती आहे . मग मीही माझ्या शिळ्या कढीला ऊत आणायला जावे अशी तुमची इच्छा असणार त्याला मी अर्थातच उत्तर देणार नाही कारण हा या विषयावरचा शेवटचाच प्रतिसाद आहे. "असे मला वाटते" हे तीन शब्द शेवटी लिहायला विसरलात का? सचिन तेंडुलकर हा आजघडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे हे वक्तव्य करताना "असे मला वाटते" असे लिहायची गरज नसते. त्याच्यावर आक्षेप घेणारेही काही लोक असतातच. त्यांना हे मत पटायचे नाहीच पण म्हणुन सचिन तेंडुलकरला सर्वोत्तम मानणार्‍यांनी "असे मला वाटते" असे म्हणायची गरज नाही. असेही ९९% वक्तव्य हे " असे मला वाटते" या प्रकारातच मोडले पाहिजे. स्वतः आईनस्टाईन ने (शास्त्रीय) पुराव्यानिशी साबित केलेले काही सिंद्धांतही नंतर म्हणे खोटे ठरले. तो जिवंत असला असता बिचारा तर आज तुम्ही त्यालाही त्याच्या प्रत्येक सिद्धांतानंतर "असे मला वाटते" असे म्हणायला लावले असते. तुमची इच्छा अशीही असु शकते की प्रत्येक बापाने त्याच्या मुलांबद्दल " ही माझी मुले आहेत" असे म्हणल्यानंतर "असे मला वाटते" हे शब्द जोडावेत. त्याचीही खात्री कोण देउ शकते ना कारण? एक प्रकारे ते ही मतच असते. तर मित्रा प्रत्येक मत हे " असे मला वाटते" सदरातच मोडते. प्रत्येक वेळेस " मला असे वाटते" असे म्हणणे केवळ अयोग्य नाही तर हास्यास्पद ठरेल. मला तर "आपण" म्हणजे नक्की कोण हा प्रश्न नेहमी पडतो. हे बघ मित्रा मी बेसिकातला गोंधळ दूर नाही करु शकत. त्यासाठी तु स्वत:च मेहनत घेतली पाहिजे (अरे तुरे केलेले चालेल ना. नसेल तर कृपया इथे किंवा खरडवहीत तसे सांग.) म्हणजे उदाहरणार्थ "मी" म्हणजे (आत्मा वगैरे भगवद्गीतेतील संकल्पना बाजूला ठेवल्या तर) एक अडनाव धारण करणारा/ अमक्या जातीचा /पुण्यातील एका भागात राहणारा/पुण्यात राहणारा/ मराठी भाषिक/ हिंदू/ भारतीय की केवळ एक माणूस? तेव्हा "आपण" म्हणजे कोण हे आपली रेफरन्स फ्रेम किती लहान/मोठी आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच एखाद्याची फ्रेम खूपच लहान असेल तर त्याला "मी" म्हणजे केवळ एखादे अडनाव असलेल्या घरात जन्माला आलेला असे वाटेल तर फ्रेम बरीच मोठी असेल तर त्याला "मी" म्हणजे एक माणूस किंवा एक सजीव असे वाटेल. तेव्हा "आपल्या" गोष्टी म्हणजे नक्की कोणाच्या गोष्टी हे सांगितलेत तर बरे होईल. मी / आपण / आपला हा संदर्भ व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष, घटनासापेक्ष आणी अजुन बराच काही सापेक्ष आहे. तर तो असा व्याख्येत बसवु पाहणे वेडगळपणाचे ठरेल. त्या त्या वेळी जे योग्य ठरेल तसा निर्णय घेणे योग्य ठरेल. मी / आपण / माझा ही आपली आयडेंटिटी झाली. ती काही एका फ्रेम मध्ये बसवता येणार नाही. वेळप्रसंगानुसार त्याचा आकार कमी जास्त करणे महत्वाचे. "मी " इतर काहीही असलो तरी एक सजीव माणूस नक्की असतो. ( माणूस किंवा सजीव असे तुम्ही का म्हटले असावे? सगळे सजीव हे मानव नसतात हे मान्य पण म्हणुन मनुष्याची ऐवजी मी स्वतःला सजीव समजले तर काही फरक पडेल काय?). मला वाटते आपल्या इतर सगळ्या आयडेंटिटीज त्याच्या खालच्या. म्हणजे असे बघा. एकाच वेळेस मी ब्राह्मण / मराठा / मागसवर्गीय ही असू शकतो. हिंदी / मराठी / बंगालीही असू शकतो. महाराष्ट्रीयन / बिहारी / बंगालीही असू शकतो भारतीय / इंग्रज / फ्रेंच / स्विसही असू शकतो , हिंदु / ज्यु / ख्रिश्चनही असू शकतो. मी जर महाराष्ट्रीयन मराठी ब्राह्मणा भारतीय असेन तर मला या सगळ्यांचा अभिमान असण्यात नक्की काय गैर आहे हे कळत नाही. जर मी यापैकी काहीही म्हणुन जन्म घेतला यात माझे कर्तुत्व काहीही नाही तसेच मी माणूस असण्यातही माझे कर्तुत्व काहीच नाही. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी स्वतःला मनुष्याच्या फ्रेममध्ये जरी बसवले आणी इतर फ्रेम्स जरी झुगारुन दिल्या तरी त्या मुळे नक्की फरक काय पडतो (काहीच पडत नाही) दुसरे म्हणजे "अभिमान" म्हणजे नक्की काय हे पण मला कळलेले नाही. परत तेच म्मित्रा. मी बेसिकातला गोंधळ दूर करु शकत नाही................ तु एखादा शब्दकोष बघावास हे उत्तम . एक मिपा आणि ऐसी अक्षरे विदुषी म्हणतात त्याप्रमाणे रमाकांत आचरेकरांना सचिनचा अभिमान असणे समजू शकतो. कारण सचिनला घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण मी मराठी आणि सचिनही मराठी म्हणून मला सचिनचा अभिमान (त्याच धर्तीवर "आपल्या" पूर्वजांनी काहीतरी केले त्याचा अभिमान) वृथा आहे. अभिमान आपल्या गोष्टींचा वाटतो. इतरांबद्दल फारतर कौतुक वाटु शकते. तुमचा मुलाने * कुठल्याही क्षेत्रात उत्तम यश मिळाले तर तो वाटतो तो आनंद + अभिमान. दूसर्‍याच्या मुलाने तेच यश मिळवले तर (जर असूय / द्वेष वगैरे वाटला नाही तर) हे वाटते ते कौतुक. कुठलीही गोष्ट आपली मानली की त्याचा अभिमान वाटतो इतके साधे समीकरण आहे. या केसमध्ये सचिन मराठी म्हणुन त्याचा अभिमान न वाटता मला वाटते तो भारतीय म्हणुन लोकांना त्याचा अभिमान वाटतो. तो भारतीय असण्याबरोबरच मराठीही आहे हा बोनस असू शकतो आणि सीकेपी लोकांसाठी तो कायस्थ आहे हा अजुन एक अभिमानाचा मुद्दा असू शकतो. त्यात अभिमान वाटण्यासारखे काय आहे हा प्रश्न वेगळा पण अभिमान वाटत असेल तर काय प्रॉब्लेम आहे हा मुख्य प्रश्न आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आंबेडकरांचे घ्या. ते स्वतः मागासवर्गीय होते आणी त्यांनी समाजात एक उच्च स्थान स्वतःसाठी बनवले या गोष्टीतुन प्रेरणा घेउनच आज लाखो मागसवर्गीयांनी स्वत:चा उत्कर्ष साधला आहे. इथे आंबेडकरांचेही त्यांच्यासारखेच मागसवर्गीय असणे त्या लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरले, अजुनही ठरते आहे. मागासवर्गीयांनी इतिहासाच्या त्या पानावरुन प्रेरणा घेतली. तसेच जगातल्या प्रत्येक समाजातील लोक इतिहासातील कुठल्यातरी गोष्तीवरुन प्रेरणा घेउ शकतात. मुख्य मुद्दा आहे की तुम्हाला त्या अभिमानाचे प्रेरणेत रुपांतर करता येते की नाही. पण मुळात अभिमानच नसेल तर प्रेरणा मिळणार नाही. त्यामुळेच आपल्या (सॉरी सॉरी आमच्या. तुम्ही वेगळे नाही का. विश्वचि माझे घर वगैरे वगैरे) तर आमच्या पुर्वजांचा आमच्या लोकांना अभिमान असला पाहिजे . उत्कर्ष साधण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे (तो एकच नाही हे मात्र नमूद करु इच्छितो. तुमच्यासारख्या काही लोकांना त्या टीच भर आणि फुटकळ इतिहासाचा शष्प अभिमान नसूनसुद्धा तुम्ही उत्कर्ष साधला आहेच की. त्याशिवाय याचीही नोंद घेतली पाहिजे की इतिहासाचा वृथा अभिमान असणारे आमच्यासारखे काही लोक किडे मकोडीकी जिंदगी जी रहे है) लॉर्ड मॅकॉलेच्या नावावर एक विचार नेहमीच खपवला जातो: I have travelled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in the country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation." आता हा विचार त्या बिचार्‍या (स्वतःच्याच शब्दावर आक्षेप घ्यावासा वाटतो आहे पण ते नंतर कधीतरी) मॅकॉलेच्या नावावर फुकाचा खपवला जातो ही गोष्ट वेगळी पण जे लिहिले आहे ते (म्हणजे विचार) चुकीचे आहे असे 'मला तरी वाटत नाही'. थोडक्यात बोलायचे झाले तर अभिमान वाटणे हे "आपलेपणा" वाटण्याचे द्योतक आहे आणि या आपलेपणातूनच राष्ट्रनिर्मिती होते. नाहितर मला माझ्या भारतीय असण्याचा अभिमान वाटणार नाही आणि मग भारत काय पाकिस्तान काय एकच असा विचारही चुकीचा ठरणार नाही. तुम्ही उत्तर देणार नाही याची माहिती आहे. बायस बायस म्हणातात तो हाच काय? मला या मुर्खपणाचा आणि प्रतिवादीकडुन केल्या जाणार्‍या त्याच त्याच प्रतिवादाचा कंटाळा आला आहे हे बरोब्बर ओळखले म्हणुन तुम्ही असे लिहिले असेल तर मात्र मला तुमचा अभिमान वाटतो बर का. ;) पण परत कधी "आपल्या" गोष्टींचा "अभिमान" हा विचार कराल तेव्हा "आपण" म्हणजे नक्की कोण आणि "अभिमान" म्हणजे नक्की काय याचा जरूर विचार करा. मी नक्कीच विचार केलेला आहे. पण त्या गोष्टी तुम्हालाच नीटश्या कळल्या नसल्याने (असे तुम्हीच म्हणालात हे मी इथे नम्रपणे नमूद करु इच्छितो) तुमचा थोडा गोधळ उडालेला असू शकतो. तरी पुढच्या वेळेस या किंवा श्या प्रकारच्या वक्तव्यांवर आक्षेप घेण्यापुर्वी या दोन गोष्टींचा तुम्हीच नीटसा विचार करावा असा सल्ला देतो.

In reply to by मृत्युन्जय

हा प्रतिसाद सगळ्याच अभिमान्यांना उद्देशून आहे. तुमच्यासारख्या अभिमान्यांना subjective आणि objective मधला फरक माहित नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. सचिन तेंडुलकर हा आघाडीचा फलंदाज आहे हे दिलेले उदाहरण अत्यंत हास्यास्पद आहे. सचिनने १०० शतके केली, ३०-३२ हजार रन्स काढल्या आणि तितकी शतके/धावा इतर कोणाही फलंदाजाने काढलेल्या नाहीत हे कोणालाही सहजपणे पडताळून बघता येईल. तेव्हा सचिन हा धावा/शतके या बाबतीत आघाडीचा फलंदाज आहे हे झाले objective statement. आईनस्टाईनने किंवा कोणाही शास्त्रज्ञाने मांडलेली समीकरणे त्या विषयाची पाहिजे तेवढी माहिती असलेल्या कोणालाही पडताळून बघता येतील. आणि ती चुकीची असली तर ती नाकारताही येतील. तेव्हा ही समीकरणे ही objective statement असतात. पण सचिन सर्वात "तंत्रशुध्द" फलंदाज आहे असे कोणी म्हटले तर ते झाले subjective statement. कारण नक्की कोणाला तंत्रशुध्द म्हणावे याविषयीचा एक ठोकताळा नक्कीच नाही आणि म्हणून कोणी सचिनला तंत्रशुध्द म्हणेल कोणी म्हणणार नाही. तेव्हा कोणत्याही subjective statement ला "माझ्या मते" हे qualification असतेच. त्याच धर्तीवर तुमचे न्यूनगंडावरील वाक्य झाले. अर्थात हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेले डोळे झाकून स्विकारणाऱ्यांना असे काहीतरी लिहिलेलेच objective वाटत असल्यामुळे एवढा साधा फरकही तुम्हाला कळला नाही यात काहीही आश्चर्य करण्यासारखे नाही.
हे बघ मित्रा मी बेसिकातला गोंधळ दूर नाही करु शकत. त्यासाठी तु स्वत:च मेहनत घेतली पाहिजे
माझ्या बेसिकमध्ये कसलाही गोंधळ नाही (तसा गोंधळ माझ्यात आहे असे तुम्हा अभिमान्यांना वाटत असले तर मी योग्य मार्गावर आहे याचे सर्वात मोठे प्रशस्तीपत्रक आहे ते माझ्यासाठी). आणि इतरांना माझ्यात वाटत असलेले "बेसिक गोंधळ" दूर करण्यापेक्षा इतर अनंत पटीने अधिक इंटरेस्टींग गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे आहेत आणि मी त्या करतोही.
पण मुळात अभिमानच नसेल तर प्रेरणा मिळणार नाही.
अजिबात नाही.मला स्वत:ला मला काही न करता on platter मिळालेल्या एकाही गोष्टीचा अभिमान नाही तरीही कोणत्याही प्रेरणेत मी कमी आहे असे कोणी म्हणत असेल तर अशा गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष. साध्या शब्दात म्हणायचे तर मुळातल्या अनाठायी अभिमानाचे समर्थन करण्यासाठी त्या अभिमान्यांनी "अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हे निखालस धाधांत खोटे वारंवार ठासून सांगितले आहे. मुळात माणूस गुहेतून बाहेर आला आणि शेती करायला लागला तेव्हा आपले पोट भरणे आणि सुरक्षितता या प्रेरणा त्याच्याकडे होत्याच की. तेव्हा कसला अभिमान होता त्याच्याकडे? धर्म-जाती-परंपरा या सगळ्या नंतरच्या काळातला अर्थात गुहेतून बाहेर येताना माणसाला त्या गोष्टींचा "अभिमान" नव्हता. तरीही माणसाने प्रगती केलीच ना? तेव्हा "मुळात अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हा मुद्दा पूर्णपणे बाद.
लॉर्ड मॅकॉलेच्या नावावर एक विचार नेहमीच खपवला जातो
आता अभिमान्यांना का एका इंग्रजाने म्हटलेल्या वाक्याचा आधार घ्यावा लागत आहे? (धर्म-जात आणि फालतूचे अभिमान याच्या अनंतपट पुढे निघून गेलेले)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मृत्युन्जय 18/05/2012 - 16:21
हा प्रतिसाद सगळ्याच अभिमान्यांना उद्देशून आहे. माझा प्रतिसाद सगळ्याच वाट चुकलेल्यांना आहे तुमच्यासारख्या अभिमान्यांना subjective आणि objective मधला फरक माहित नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. तुमच्यासारख्या वाट चुकलेल्यांना आपण आणि अभिमान हेच मुळात काय आहे ते कळत नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. सचिन तेंडुलकर हा आघाडीचा फलंदाज आहे हे दिलेले उदाहरण अत्यंत हास्यास्पद आहे. सचिनने १०० शतके केली, ३०-३२ हजार रन्स काढल्या आणि तितकी शतके/धावा इतर कोणाही फलंदाजाने काढलेल्या नाहीत हे कोणालाही सहजपणे पडताळून बघता येईल. तेव्हा सचिन हा धावा/शतके या बाबतीत आघाडीचा फलंदाज आहे हे झाले objective statement. चुकीचा प्रतिवाद. नेहमीप्रमाणेच "सिलेक्टिव रीडिंग" का काय ते. मी आघाडीचा फलंदाज असे म्हटले नव्हते तर सर्वोत्तम फलंदाज म्हटले होते. त्याच्या धावा सर्वाधिक आहेत म्हणजे तो सर्वोत्तम होत नाही. तुमचा प्रतिवाद मान्य करायचा झाल्यासच माझे वक्तव्य subjective statement आहे. पण तुम्ही प्रतिसाद वाचण्याचे कष्ट घेता कुठे. तुमच्या मनात आपणच काय ते बरोबर असे घोळत असते. त्यामुळे तुम्हाला ज्या मुद्द्यावर भांडायचे आहे तो समोरच्याने मांडला नसला तरी तु असेच म्हणालास असे म्हणुन भांडता येते. मुळात तुम्ही चुकीच्या मुद्द्यावरच प्रतिवाद केलेला असल्याने बाकीचा प्रतिसाद प्रत्त्युत्तर देण्यासारखा आहे असे मला वाटत नाही. तरी देतो आहे. उगाच उद्या तुम्ही प्रतिसाद देणारच नाही हे माहिती होते असली बाष्कळ बडबड करायला नको. आईनस्टाईनने किंवा कोणाही शास्त्रज्ञाने मांडलेली समीकरणे त्या विषयाची पाहिजे तेवढी माहिती असलेल्या कोणालाही पडताळून बघता येतील. आणि ती चुकीची असली तर ती नाकारताही येतील. तेव्हा ही समीकरणे ही objective statement असतात. सिद्धांत काय हो गॅलेलियोचेही खोडले गेले. कोपर्निकसचेही खोडले गेले आणि चुकीचे असलेले आइन्स्टाइनचे मात्र (त्या वेळेस) खोडले गेले नाहीत. त्यामुळे समीकरणे पडताळुन बघणे आणी ती खोडणे या प्रकाराला फारसा अर्थ आहे असे वाटत नाही. जर शास्त्रीय समीकरणे खोडले जाउ शकतात तर मग ज्यात मानवी भावभावना गुंतलेल्या आहेत ती समीकरणे आणि ते सिद्धांत तर नक्की खोडले जाउ शकतात. त्यात काय विशेष. आंबेडकरांचे उदाहरण जाणीवपुर्व़क टाळलेले दिसते आहे. चांगले आहे चांगले आहे. मग आता मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) चे उदाहरणही विचारात घ्या. विज्ञानवादी सावरकरांचे दाखले नेहमी देतात. त्यांनी राष्ट्रवाद पेटवण्याकरता या इतिहासाच्या अभिमानाचाच आधार शोधला हे मात्र विसरले जाते. तेव्हा कोणत्याही subjective statement ला "माझ्या मते" हे qualification असतेच. त्याच धर्तीवर तुमचे न्यूनगंडावरील वाक्य झाले. मी आधीच म्हटले आहे असेही ९९% वक्तव्य हे " असे मला वाटते" या प्रकारातच मोडले पाहिजे. बहुतेक सग्ळी मते ही subjective statement प्रकारात मोडतात आणि त्याला qualification असतेच. तसे ते अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना सुद्धा असते. पण त्यांना "Laws of Economics" म्हटले जाते. दैनंदिन जीवनात अश्या हजारो गोष्टी असतात. तिथे " असे मला वाटते" प्रत्येक वेळेस म्हणने मुर्खपणाचे ठरेल. म्हणजे एखाद्याने त्याच्या बायकोशी बोलताना असे म्हणायचे " माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मला वाटते. तुझेही माझ्यावर प्रेम असावे असे मला वाटते. तु ----- ची मुलगी आहेस असे मला वाटते" थोबाड रंगवुन घेण्याचा प्रकार झाला की हो हा. अर्थात हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेले डोळे झाकून स्विकारणाऱ्यांना असे काहीतरी लिहिलेलेच objective वाटत असल्यामुळे एवढा साधा फरकही तुम्हाला कळला नाही यात काहीही आश्चर्य करण्यासारखे नाही. हजारो वर्षांपुर्वी लिहिलेले आमच्या (आपल्या नाही हो म्हटलेले. राग नसावा) लोकांनी लिहिलेले आहे म्हणुन त्यावर डोळे झाकुन काट मारणार्‍या तुमच्यासारख्या लोकांना नीरक्षीरविवेकबुद्धी नसल्याने काय योग्य काय अयोग्य काय ग्राह्य काय अग्राह्य हे कळत नाही यात काहीही आश्चर्य करण्यासारखे नाही. हेच जर गोर्‍यांनी लिहिले असते तर तुम्ही त्यांच्या समृद्ध इतिहासाचे गोडवे गायले असते की हो. आता इतके लिहुन परत म्हणायचे मला काळा इंग्रज म्हणुन नका म्हणुन. अवघड आहे. माझ्या बेसिकमध्ये कसलाही गोंधळ नाही अर्रे बाबा तुच ओरडुन ओरडुन म्हणालास "मला कळत नाही". मग मी तरी काय करणार. तुला असे म्हणायचे आहे का की "गोंधळ नाही आहे कारण मुळात काहीच नाही आहे" (तसा गोंधळ माझ्यात आहे असे तुम्हा अभिमान्यांना वाटत असले तर मी योग्य मार्गावर आहे याचे सर्वात मोठे प्रशस्तीपत्रक आहे ते माझ्यासाठी). जमवा हो जमवा भरपुर प्रशस्तिपत्रके जमवा. बादवे " मार्ग योग्य आहे " असे वाटणे सब्जेक्टिव्ह असते का हो? आणि इतरांना माझ्यात वाटत असलेले "बेसिक गोंधळ" दूर करण्यापेक्षा इतर अनंत पटीने अधिक इंटरेस्टींग गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे आहेत आणि मी त्या करतोही. हॅ हॅ हॅ. दिसतेच आहे ते. अजिबात नाही.मला स्वत:ला मला काही न करता on platter मिळालेल्या एकाही गोष्टीचा अभिमान नाही तरीही कोणत्याही प्रेरणेत मी कमी आहे असे कोणी म्हणत असेल तर अशा गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष. बघा. तुम्ही नीट वाचत नाही हेच खरे. मी तुमचे उदाहरण आधीच मान्य केले होते की नाही. वाचा बर परत एकदा, वाचाल तर वाचाल. तुम्ही वाचण्यापेक्षा दुर्लक्षच जास्त करता ब्वॉ. त्यामुळेच नीट प्रतिवाद करु शकत नाही. बर ते आंबेडकर, मार्टिन क्युथर किंग वगैरेंचे काय करायचे? साध्या शब्दात म्हणायचे तर मुळातल्या अनाठायी अभिमानाचे समर्थन करण्यासाठी त्या अभिमान्यांनी "अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हे निखालस धाधांत खोटे वारंवार ठासून सांगितले आहे. "असे मला वाटत"" असे लिहायचे विसरलात का हो? मुळात माणूस गुहेतून बाहेर आला आणि शेती करायला लागला तेव्हा आपले पोट भरणे आणि सुरक्षितता या प्रेरणा त्याच्याकडे होत्याच की. तेव्हा कसला अभिमान होता त्याच्याकडे? त्यामुळेच तो गुहेत राहत होता. तो संभोगही करायचा. त्यासाठी त्याला प्रेरणा आणी अभिमानाची गरज नव्हती. तुम्हाला अभिमान कशासाठी वाटला पाहिजे ते एवढी डोकेफोड करुन कळत नसेल तर मी तरी काय करणार? तुम्हाला मुळात अभिमान म्हणजे काय तेच कळालेले नाही म्हणा. धर्म-जाती-परंपरा या सगळ्या नंतरच्या काळातला अर्थात गुहेतून बाहेर येताना माणसाला त्या गोष्टींचा "अभिमान" नव्हता. नव्हताच. त्याच गुहेतल्या माणसाने नंतर धर्म जात परंपरा शोधल्या, प्रगतीच्या टप्प्यावर. नाहितर तो गुहेतच होता की. असो धर्म, जात परंपराचा अभिमान त्या आहेत म्हणुन नाही आहे तर त्याय काहितरी चांगले आहे म्हणून त्यांचा अभिमान आहे. माझ्या धर्माचा अभिमान असणे म्हणजे इतर धर्मांचा (मानवधर्माचा सुद्धा) तिटकारा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मग अभिमान असल्याने काय बिघडले उलट ते प्रेरणा वगैरे ...... (त्याच त्याच गोष्टी लिहुन तुम्हाला येत नसेल हो पण मला कनै खुप कंटाळा येतो) तरीही माणसाने प्रगती केलीच ना? तेव्हा "मुळात अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हा मुद्दा पूर्णपणे बाद. प्रगती करण्यापुर्वी तो एक समाज म्हणुन उदयाला आला हे तुम्ही विसरता आहात. EVOLUTION आणी GROWTH मधला फरक ओळखायला शिका. तुम्ही उदाहरणे EVOLUTION ची देता आहात कारण माणूस गुहेतुन बाहेर येउन जाळा पेटवायला लागला हे EVOLUTION झाले. त्याने वीज शोधली ही प्रगती झाली. तोपर्यंत मानवजाती बर्‍याच छोट्या मोठ्या समाजात विभागली गेली होती. आणि मग त्या वेगवेगळ्या समाजांची प्रगती वेगवेगळ्या टप्प्यत झाली जरी मानवजातीची उत्क्रांती साधारण एकाचवेळेस झाली असली तरीही. त्यामुळे तुमचाच मुद्दा पुर्णपणे बाद. आता अभिमान्यांना का एका इंग्रजाने म्हटलेल्या वाक्याचा आधार घ्यावा लागत आहे? अर्रे मित्रा. तु नीट वाचतोस का रे? वाचलेले तुला नीट कळते का रे? कळालेले तु नीट व्यक्त करु शकतोस का रे? मी असे कुठे म्हटले आहे की हे वाक्य एका इंग्रजाने म्हटले आहे म्हणुन? ते त्याच्या नावावर खपवले जाते बाळा. तो नाही म्हटलेला ते. हो. खरंच. बादवे हे वाक्य एका इंग्रजाचे असले असते तरी त्याने काही बिघडले असते असे मला वाटत नाही. आपल्या संस्कृतीचा आणी परंपरेचा अभिमान आहे म्हणजे दुसर्‍याच्या संस्कृतीचा आणी परंपरेचा आदर नाही असे कुठल्या मुर्खाने सांगितले तुम्हाला? की ही तुमचीच जाण / अक्कल / समज वगैरे? असे बघ. आम्ही जे जे उत्तम उदात्त असेल ते सगळे अंगिकारतो. तुम्हाला अजुन नीटसे कळालेले दिसत नाही आहे की आम्हाला आमच्या इतिहासाचा अभिमान आहे म्हणजे आम्ही अजुन रथातुन हिंडत नाही किंवा धनुष्यबाणाने युद्ध करण्याचा पुरस्कार करत नाही. तर आम्ही आधुनिकतेची कास धरतो. आज इंग्रज आपल्यापेक्षा वरचढ आहे हे जाणुन असतो. मुख्य मुद्दा हाच आहे की तो वेगळा आणी मी वेगळा हे माहिती असल्याने आम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रगती करण्यची इच्छा धरतो. आपल्या इतिहासाचा अभिमान असणे म्हणजे गोर्‍यांनी इतिहासात किंवा वर्तमानात माती खाल्ली असा समज करुन घेणे असे का वाटते तुम्हाला? चांगली गोष्ट फक्त इग्रजाकडुन आलेली आहे म्हणुन नाकारणारा असा कुठला आपल्या इतिहासाचा अभिमान असणारा माणूस भेटला आहे तुम्हाला? एकदा भेट घडवा. भर बाजारात पूजा बांधेन म्हणतो त्याची, (धर्म-जात आणि फालतूचे अभिमान याच्या अनंतपट पुढे निघून गेलेले) धर्म, जात आणि फालतूचे अभिमान याचा संसर्गदेखील न झालेला पण तरीही योग्य गोष्टींचा अभिमान बाळगावा याची जाण असणारा मृत्युंजय ************** मी बहुतेक सर्व संस्थळांवर एकाच नावाने वावरतो

In reply to by मृत्युन्जय

अर्धवटराव 18/05/2012 - 22:50
अहो अभिमानी... तुम्हाला मृत्युला जिंकल्याचा भलेहि अभिमान असेल, पण पाषाणावर डोके आपटुन पाषाण फोडण्याच्या पराक्रमाचा अभिमान आम्हि तुम्हाला बाळगु देणार नाहि हे पक्कं ध्यानात असु द्या. किती टेंगुळं आलित हो डोक्याला... काहि दवापाणि देऊ काय? अर्धवटराव

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

क्लिंटन 18/05/2012 - 18:39
वटवाघूळ/हत्ती/सिंह, तुमची मिपा प्रोफाईल बघितली. तुम्ही दोन वर्षांपासून मिसळपाववर आहात असे दिसते पण दोन वर्षे मिपावर असलेल्या इतर अनेकांपेक्षा तुमचे लेखन कमी आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा मिपावर जास्त लिहित नव्हता आणि आता लिहिणे सुरू केले आहे असे दिसते. मी मिपावर अगदी पहिल्या दिवसापासूनचा सदस्य आहे आणि माझ्या आलेल्या अनुभवातून एक अनाहूत सल्ला देतो. मला उलटे लटकवायचे असेल तर जरूर लटकावा. धर्म-अभिमान किंवा तत्सम विषय आले ना की दोन्ही बाजू एकमेकांना विरूध्द एक्सट्रीमचे असे लेबल देऊन मोकळे होतात. म्हणजे तुम्ही आपली जुन्यातली एखादी गोष्ट टाकाऊ आहे असे म्हणालात की संस्कृतीवादी लगेच "तुम्हाला आपले सगळे वाईट दिसते", "काळे इंग्रज" असे लेबल लावून मोकळे होतात. त्याचबरोबर जुन्याचा अभिमानाचा विषय आला की आधुनिकतावादी त्यांना पुराणात रमणारे इत्यादी लेबले लावून मोकळे होतात. या सगळ्यात कोणत्याच गोष्टीवर साधकबाधक चर्चा होऊ शकत नाही आणि चर्चा अधिकाधिक वैयक्तिक पातळीवर जाते. (जसे इथेही बघायला मिळत आहे). मी पण हा प्रकार अनेकदा बघून शेवटी I have learnt it hard way. आणि ते ही अगदी अलीकडच्या काळात (गेल्या महिन्यात) मला प्रकर्षाने समजले. त्यावरूनच हा अनाहूत सल्ला देतो. असे वाद घालून काहीही उपयोग नसतो.कारण दोन्ही बाजू आपले म्हणणे सोडत नाहीत. आणि एखाद्या बाजूला जरी दुसरी बाजू (अंशतः) पटली तरी त्यापूर्वी इतक्या हिरीरीने मांडलेली आपलीच बाजू नाकारायचे धैर्य बहुतेकांकडे नसते म्हणून दोन्ही बाजू आपल्याच मताचे अधिकाधिक जोराने समर्थन करू बघतात.मग चर्चा वैयक्तिक पातळीवर उतरायला वेळ लागत नाही आणि काही शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी "ग्रुप डिस्कशन" असते त्यात जो आरडा-ओरडा होतो तो इथे लिखित स्वरूपात होतो. बहुतेक वेळा कोणतीही एक बाजू १००% काळी किंवा १००% पांढरी नसते तर दोन्ही बाजूंमध्ये करड्याच्या छटा असतात. पण हे मान्य कोणी करत नाही किंवा वाढलेल्या टेंपरेचरमध्ये ते मान्य करू शकत नाही. या सगळ्यातून काही निष्पन्न होते का?ज्या पध्दतीने तुमची आणि मृत्युंजय यांचे वादविवाद चालू आहेत त्यावरून थोडी तरी कटूता राहणारच असे माझ्या बालबुध्दीला वाटते. मागच्या मिपा कट्ट्याला मी ठाण्याला गेलो होतो. तिथे वेगवेगळ्या आय्.डी घेऊन लिहिणारे मिपाकर प्रत्यक्ष भेटायला मिळाले. छान मजा आली. आता अशा एखाद्या कट्ट्यात अशा टेंपरेचर वाढलेल्या चर्चेतला प्रतिपक्षी सामोरा आला तर तुम्ही १००% मजा करू शकाल का? कुठेतरी मनाच्या कोपर्यात विचार येईलच ना-- "हाच तो लेकाचा माझ्याशी वाद घालणारा"!! तसा विचार नाही आला तर उत्तम पण तशी शक्यता अगदी ०% आहे हे तुम्हीही नाकारू शकणार नाही. तेव्हा वटवाघूळ/हत्ती/सिंह राव, जरा दमाने घ्या.तुमची मते ठाम आहेत असे दिसते ही चांगली गोष्ट आहे पण त्याच बरोबर अशी मते मांडून आपण इतर कोणाच्या वर्मी घाव घालत नाही ना (आणि त्या व्यक्तीला प्रत्युत्तर द्यायला भाग पाडत नाही ना) याचा पण विचार करा. हे सगळे मला स्वतःला अशा अनेक चर्चा/वादविवादांमध्ये अगदी हिरीरीने भाग घेतल्यानंतर समजले आहे.आता यापुढे तर मी कोणत्याही controversy वाल्या चर्चांपासून मला स्वतःला अगदी कटाक्षाने लांब ठेवणार आहे. बघा पटले तर. पुढील लेखनाला शुभेच्छा.

डॉक्टरसाहेब लेख आवडला. समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. अगदी खरंय.......!!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'अ' ने 'ब' ला जातीवरून एखादा हिणकस टोमणा मारला, की 'अ'ला "वा काय निबर हाणलाय!" अशी शाबासकी देणे म्हणजे 'समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची व्यापक प्रमाणावर चर्चा चालू होणे' होय. छान आहे बॉ व्याख्या. एकदम आवडेश.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट 18/05/2012 - 13:23
तुला आधुनिकतेचे वारे अजून लागलेले नाहीत परा.... अर्थात हाच परा आणि प्रा यांतला फरक असतो.. जरी प आणि र हे अक्षर समान असले तरी :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 18/05/2012 - 14:14
तु तुझी फ्रेम बरीच मोठी करण्याची आवश्यकता आहे परा. तुझी मी पणाची किंवा आपलेपणाची भावना अजुनही " जाती " वर येउन थांबते आहे त्यामुळे असे होते आहे. फ्रेम मोठी करा असे सुचवतो

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 18/05/2012 - 15:11
पडदाच हलवा. त्याच्याजागी मोठी फ्रेम लावा. पडद्यामागून सूत्रे हलवण्यासाठी तुमच्याकडे डु आयडी आहेत काय? असतील तर पुढचे नियम तर तुम्ही कोळून प्यायलाच आहात. पण सावधान प्रत्येकवेळेस वेगळ्या "फ्रेममधुन" घुसत जा.

यकु 18/05/2012 - 17:39
विकास, तुमच्या सविस्तर निरुपणाबद्दल;-) धन्यवाद :) वर दिलेल्या प्रतिसादातून मला वेगळाच प्रतिवाद अपेक्षित होता. तो झालेला नाही म्हणून ‍मी तिकडे शिरत नाही. रामदासांनी साडेतीन चारशे वर्षांपूर्वी (नक्की माहित नाही) भले काहीही सांगितलं असेल, लोकांना त्याचा आधार घेऊन 'दुसर्‍या' कुणालातरी मूर्ख ठरविण्‍याचा भलता किडा असतो - दुसर्‍या कुणाला तरी हे महत्त्वाचं. रामदास वाचणार्‍या किती लोकांना मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:च मूर्खपणा समजलाय? शक्यच नाही, ती सगळी मूर्खलक्षणे नेहमीच 'दुसर्‍या कुणालातरी' लागू होतात. रामदासांनी लिहिलेलं मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:चा मूर्खपणा समजलेल्या कुणाचाही स्वानुभव ऐकायला आवडेल, अगदी राजघराणं यांचाही किंवा विकास यांचाही ;-) ह. घ्‍या. आपली काही जानी दुष्‍मनी नाही, so no offences, any type of score settling intended ;-) राजघराणं यांनी ओवीचा आधार घेऊन लिहिलेला लेख आणि तुम्ही वर || एका अर्थी मानवी विचार आणि त्याने प्रभावीत होणारे आचार या संदर्भातला हा एक संदर्भग्रंथ आहे || म्हटलेलं आहे त्याअर्थी त्या ग्रंथाचा कदाचित राजघराणं आणि तुम्ही सांगोपांग अभ्यास केलेला असेल, म्हणून मी दोघांचाही स्वानुभव विचारण्‍याचं धाष्‍टर्य करतोय, मूर्खनाम लक्षणचाच असायला पाहिजे असं काही नाही, रामदासांनी केलेल्या उपदेशाच्या आधारावर कुणाही वाचणार्‍याला झालेला स्वत:च्या जीवनाच्या कुठल्याही अंगातला कुठलाही स्वानुभव चालू शकेल. #I guarantee you, you wouldn't have anything to tell from your personal experience based on दासबोध. Even if you tell something putting some things from here & some things from there, that is not going to touch your personal & practical life, that much I guarantee. मी एवढ्‍या आत्मविश्‍वासानं हे का सांगू शकतोय? तर मूळातच 'दासबोध' या ग्रंथाची उपयुक्तता फक्त 'कोट' करण्‍यापुरती आहे - #because दासबोध doesn't deal with fundamental problem of creation & operation of THOUGHT in our life. So anyone reading दासबोध will only be able in giving continuity to the same age old THOUGHT originated in the head of रामदास sitting in the cave of शिवथरघळ ! #Yes, thought can travel from an age to another age - because all the living organisims (including that of राजघराणं & विकास & यकु & all others who read, listen etc) are unfortunately capable for only such a thing. त्यामुळे विकास यांनी 'मानवी विचार आणि त्याने प्रभावित होणारे आचार या संदर्भातला हा संदर्भग्रंथ आहे' म्हटलेलं आहे त्यावर पुन्हा एकवार विचार करुन पहावा. मानवी विचार आणि त्याने प्रभावित होणारे आचार असं म्हणण्‍यातून विकास यांना 'पिढ्यान पिढ्‍यांपासूनच्या विचारांचे सातत्य' हे अपेक्षित आहे की नाही हे मला माहीत नाही - वास्तवात मात्र सुस्पष्‍टपणे पिढ्यान पिढ्‍यांचा विचार आणि त्याने प्रभावित झालेला आचारच चालत आलेला दिसतो की नाही? उदाहरणार्थ शहाणपणा नावाचं जे काही असेल ते आणि मूर्खपणा नावाचं जे काही असेल ते कुणी आईच्या पोटातून सोबत घेऊन येत नाही. हे अमकं म्हणजे शहाणपणा, ते तमकं म्हणजे मूर्खपणा, ते तमकं म्हणजे अक्कल हुशारी, याला हे म्हणतात - त्याला ते म्हणतात हे सगळं आय‍डेंटिफिकेशन कोण देतं? आणि हे असं कसल्याही प्रकारचं आयडेंटिफिकेशनच नसेल तर? त्या अस्तित्वात आलेल्या human organism चं free from any type of identifications जगणं कसं असेल हे पहायचं असेल तर युजी कृष्‍णमूर्ती हे एक उत्तम उदाहरण आहे. कारण त्यांनी या सगळ्या गोष्‍टी कुठलाही पंथ, धर्म किंवा विचारसरणीला जन्म न घालता या सगळ्या गोष्‍टींची चर्चा purely physical & psychological functions of an identificationless body च्या functions च्या आधारावर न थकता केली आहे. राजघराणं यांनी वर लिहिलेल्या लेखात || हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते || वगैरे म्हटलं असलं तरी 'ज्ञान' या शब्दाचा 'चांगले विचार, कृत्यांची बरी/वाईट अशी पारख' या अगदी रुढ अर्थानं केलेला वापरच त्यातून दिसून येतो. खरोखर 'ज्ञान' नावाचं खरोखर जे काही असेल ते फक्त 'विचारांच्या मृत कक्षेत' राहू शकत नाही, #if really is there any wisdom in whatever holy scripture you may wish to quote, that invariably needs to go in practically in your marrow of bone & each & every cell in your physical existance. खरोखर ते जर ज्ञान असेल, तर that will blast inside of your living organism & you will know the real thing, until then you go on giving continuity only to all types of THOUGHTS & will try to prove anybody & everybody a fool, a wise man & all the types of identifications so on, but you will not be able to live through the real thing. जर खरोखर 'ज्ञान' नावाचं जे काही असेल ते पिढ्‍यान पिढ्‍यांपासून चालत आलं असतं तर ते फक्त 'सांगे वडीलांची किर्ती तो येक मूर्ख' या रामदासांच्या वचनाच्या आधारावर दुसर्‍या कुणालाही मूर्ख किंवा आणखी कसलाच ठरविण्‍यासाठी वापरलं गेलं नसतं, त्या ज्ञानाचा (ते जर खरोखर ज्ञान असतं तर) आधी कोट करणार्‍याच्या मेंदुत, शरीराच्या प्रत्येक पेशीत स्फोट झाला असता, #so whatever discussion there is in the article above, that is only a continuity of thought, that is not ज्ञान! मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, ज्ञान चालत येत नाही - ज्ञान असेल तर ते ज्याला झालं असेल त्याची पुढची पिढीनिर्मितीची संभाव्यता खलास करतं. त्यामुळं भगवान बुद्धाला तो बुद्ध होण्यापूर्वीचा राहुल हा मुलगा असू शकतो, बुद्ध झाल्यानंतर ते आणखी कोणा पिढी पुढे चालवणार्‍याला जन्म देऊ शकत नाहीत, ना महावीरांना ते तीर्थंकर झाल्यानंतर वंश चालवता येऊ शकतो - तथाकथित धर्म मात्र चालवता येऊ शकतात, धर्मांना जन्म देता येऊ शकतो, रामदास 'रामदासी' या पंथाला जन्म देऊ शकतात - कारण ते 'विचारांच्या माध्‍यमातून' आपल्यापर्यंत येतात आणि 'ज्ञानप्राप्तीच्या' दिशेने जाण्‍याचा प्रयत्न करतात. # मराठीत लिहित असताना मध्‍येच इंग्रजी वाक्ये का? तर ती का आली आहेत मला पण माहित नाही, मुद्दाम ठरवून लिहिलेली नाहीत एवढं नक्की I can't help.. ती जर आली आहेत तशीच लिहिली नाहीत तर मी प्रतिसादच देऊ शकत नाही. May be trails & traces of THOUGHTS when I tried to understand functional UG through my thinking machine. ;-)

In reply to by यकु

मन१ 18/05/2012 - 18:15
इंग्लिश वाक्ये रोमन लिपी(का इंग्लिश तिच्यायला?) मधून व मराठी वाक्ये देवनागरीतून लिहिल्याबद्दल यक्कुचे जाहिर आभार. तुला शत शत वेळेस thanks. तू जे काही express करायचा प्रयत्न करतोयस ते as always नीटसे समजले नाही, पण तुझा attempt सुरु ठेव.

In reply to by यकु

स्वानन्द 18/05/2012 - 18:41
>>ञान! मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, ज्ञान चालत येत नाही - ज्ञान असेल तर ते ज्याला झालं असेल त्याची पुढची पिढीनिर्मितीची संभाव्यता खलास करतं. हा तुझा स्वानुभव आहे का?

In reply to by स्वानन्द

यकु 18/05/2012 - 19:38
>>हा तुझा स्वानुभव आहे का? --- कगार पर हूं ;-) अनुभव पूर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाहीय.. सकाळी उठलं की ऑफिस ;-)

In reply to by यकु

स्वानन्द 18/05/2012 - 22:40
:P पण मग तू पुढची पिढी निर्माण करू शकणार नाहीस ( ट्राय करून सुद्धा )हे एवढ्यातच कसं कळलं तुला? अनुभवाशिवायच असं विधान कसं काय केलं आहेस?

In reply to by स्वानन्द

यकु 18/05/2012 - 23:02
>>पण मग तू पुढची पिढी निर्माण करू शकणार नाहीस ( ट्राय करून सुद्धा )हे एवढ्यातच कसं कळलं तुला? अनुभवाशिवायच असं विधान कसं काय केलं आहेस? ---- आधीच्यांच्या झालेल्या नाहीत त्यावरुन ;-) आत्ता पिढी निर्माण होऊच शकते की ;-) आमची एक बायॉलॉजीमध्‍ये M.Tech केलेली मैत्रिण 'तु तुझे हार्मोन वाया घालवतो आहेस' असं नेहमी म्हणत रहाते - म्हटलं बाई, ती हार्मोन जिथं जायची तिथं गेल्यानंतर काय तयार होतं आणि किती लफडी मागे लागतात हे म‍ाहितीय ना? ;-) पुढचे तमाशे होण्यापेक्षा ती हार्मोन वाया गेलेलीच बरी ;-) माझी हार्मोन वाया जाण्‍याबद्दल फारच वाईट वाटत असेल तुला खोली नंबर चारसो बीस उघडीच असते, आ जाओ ;-)

In reply to by यकु

विकास 18/05/2012 - 19:59
त्या ग्रंथाचा कदाचित राजघराणं आणि तुम्ही सांगोपांग अभ्यास केलेला असेल म्हणजे? अभ्यास न करताच एखाद्या ग्रंथाला, व्यक्तीला नावे ठेवायची असतात असे म्हणायचे आहे का? रामदासांनी साडेतीन चारशे वर्षांपूर्वी (नक्की माहित नाही) भले काहीही सांगितलं असेल, लोकांना त्याचा आधार घेऊन 'दुसर्‍या' कुणालातरी मूर्ख ठरविण्‍याचा भलता किडा असतो - दुसर्‍या कुणाला तरी हे महत्त्वाचं. एखादे वाक्य जेंव्हा चपखल वाटते तेंव्हा वापरले जाते. अगदी राजघराणं यांचाही किंवा विकास यांचाही ;) ह. घ्‍या. आपली काही जानी दुष्‍मनी नाही, गैरसमज नाही आणि जानी अथवा किरकोळ देखील दुष्मनी नाही. :-) तरी देखील आता या संदर्भात माझ्या या परत परत त्याच / तत्सम विषयांवरच्या त्याच अर्थाच्या प्रतिसादांचा विचार करताना येथे वापरले जाणारे एक कोटेशन आठवले:
Insanity is repeating the same mistakes* and expecting different results.
;) (* येथे mistake म्हणजे परत परत समजावण्याची चूक इतकाच घ्यावात. विचारात mistake असा घेऊ नये. ;) ) आता हे वाक्य काही रामदासांचे नाही तरी देखील वापरले जाते. त्याचा मूलस्त्रोत नक्की माहीत नाही तरी देखील ते बेन फ्रँकलीन ते आईन्स्टाईनचा संदर्भ देऊन वापरले जाते! अगदी क्लिंटनने देखील त्याचा उपयोग त्याच्या पहील्या निवडणूकीत बूश आणि रिपब्लीकन विरोधात केला होता. त्याचे दुसरे असेच मूर्ख संबोधणारे विधान, जे देखील अनेकदा वापरताना पाहीले आहे ते, "it's economy stupid"! थोडक्यात ह्याचा रामदास हे संत, साधू वगैरे होते ह्याच्याशी संबंध नसून त्या चपखल वाक्याशी आहे. आता असेच तुकारामाच्या, "तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा" ह्या ओळींचा उपयोग केला जातो... गुगलले तर समजेल की हे वाक्य त्या अर्थाने "सांगे वडीलांची किर्ती" पेक्षा अधिक वापरले गेले आहे... मग काय तुकारामाच्या गाथेची उपयुक्तता पण आपण चघळायची का? रामदासांनी केलेल्या उपदेशाच्या आधारावर कुणाही वाचणार्‍याला झालेला स्वत:च्या जीवनाच्या कुठल्याही अंगातला कुठलाही स्वानुभव चालू शकेल. सर्वप्रथम रामदासांचे साहीत्य झाले अथवा गीता झाली अथवा इतर तसे अनेक भारतीय प्राचीन/हिंदू साहीत्य झाले (तुर्तास रामदासांवरच बोलूया अवांतर नको) - त्यात नीट वाचल्यास उपदेशाऐवजी निरीक्षणे दिसतील - शास्त्रीय भाषेत बोलायचे तर प्रॉपर्टीज आणि त्यांचे इफेक्ट्स... तसे करण्यात आणि ते देखील सोप्या भाषेत, रामदास आणि तुकाराम हे अग्रेसर आहेत असे वाटते. विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥ बरें शोधिल्यावीण बोलों नको हो । जनीं चालणें शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥ जयाचेनी संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे ॥ तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीनें मती राम सोडी (आता यात "राम" शब्द आला म्हणून लगेच "राम राम" म्हणू नका ;) ) सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं ॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ हे आणि असे अनेक सांगता येईल. म्हणले तर नुसतेच "कोट्स" आणि म्हणले तर मार्गदर्शक... माझ्या आधीच्या/चर्चेस दिलेल्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे केवळ रामदासांचेच नाही तर अनेकांचे विचार हे कधी कधी मार्गदर्शक/समुपदेशक ठरू शकतात. एखाद्याला ठरतील. आता तुम्हाला युजींचे विचार भावतात मला इतर अनेकांचे... फक्त एकाचेच नाही कारण बालकवींनी म्हणल्याप्रमाणे, "सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे" असे मला आवडते. असो. तर मूळातच 'दासबोध' या ग्रंथाची उपयुक्तता फक्त 'कोट' करण्‍यापुरती आहे इतर कोणी त्या व्यतिरीक्त उपयुक्तता आहे असे येथे अथवा इतरत्र म्हणलेले दिसले आहे का ? नसल्यास हा विषयच का आला? त्याच बरोबर कोट काय केले जाते तर जे कधी कधी पटू शकते ते आणि त्यामुळे कधी कधी त्यातून काहीतरी सुचू देखील शकते, पटकन समजू शकते, मार्ग दिसू शकतो ते... ते अगदी काही रामदासांचेच असते असे नाही तर तुकाराम असतील, ज्ञानेश्वरादी संत असतील, बहीणाबाई असतील अथवा जगातल्या कुठल्याही भाषेतील विचारवंत असतील...आता काय या सगळ्यांच्या लेखनाचे/विचाराचे valuation करणार का? जर खरोखर 'ज्ञान' नावाचं जे काही असेल ते पिढ्‍यान पिढ्‍यांपासून चालत आलं असतं तर ते फक्त 'सांगे वडीलांची किर्ती तो येक मूर्ख' या रामदासांच्या वचनाच्या आधारावर दुसर्‍या कुणालाही मूर्ख किंवा आणखी कसलाच ठरविण्‍यासाठी वापरलं गेलं नसतं, म्हणूनच जे केवळ (कुठल्याही) ग्रंथातील एकाच वाक्याला चिकटून बसले असतील त्यांना रामदासांनी त्याच समासात, ""समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥" असे म्हणले आहे. :-) कारण याच दासबोधात सछिष्य लक्षणे आहेत, सात्विकाची, राजसीकाची, लक्षणे आहेत, स्वगुणपरीक्षा आहे वगैरे वगैरे.. रामदास 'रामदासी' या पंथाला जन्म देऊ शकतात - कारण ते 'विचारांच्या माध्‍यमातून' आपल्यापर्यंत येतात आणि 'ज्ञानप्राप्तीच्या' दिशेने जाण्‍याचा प्रयत्न करतात. हे वाक्य डोक्यावरून गेले... :( नक्की तुम्ही बाजूनी बोलत आहात का विरुद्ध हेच समजले नाही त्यामुळे कुठूनही बोललो तरी बोंब! ;) तरी देखील एक टिपण्णी: (इतिहास-निरीक्षण म्हणून, बचाव/टिका म्हणून नाही) रामदासांनी रामदासी संप्रदाय म्हणून तयार केला का ह्याबद्दल मला जरा डाऊट आहे. नक्की माहीत नाही. आणि तसा तो त्यांनी अथवा त्यांच्या शिष्यगणांनी त्यांच्या पश्चात तयार केला असला तरी तो चांगल्या-वाईट कुठल्याच अर्थाने प्रभावी ठरला असे वाटत नाही. असो.

In reply to by विकास

यकु 18/05/2012 - 20:24
मी फक्त 'विचार' आणि 'ज्ञान' यांचं पुढील पिढीकडे चालत येणं याबद्दल वर दिलेल्या प्रतिसादात उहापोह केला आहे - Whatever I have said that operates practically in my life & no need to say, in human organism sitting here which is responding. So what I see from your reply above is only bundles of thoughts & honestly I do not see myself in position to tell you about how you are expressing, what is really behind those various expressions of thoughts. :) Even if I go expounding on queries raised, more queries will be raised because what I basically see there is CONTINUITY OF THOUGHT, no matter whose those thoughts are. :) So I withdraw myself.

In reply to by यकु

अर्धवटराव 18/05/2012 - 20:57
यक्कु यक्कु.... अरे मित्रा काहि कळेल असं टंक ना रे... थांब आता... हा संपूर्ण वीकएण्ड तुझ्या वरच्या प्रतिक्रियेला समर्पीत करुन एक फर्रास "विचार" मांडतो.. अर्धवटराव

In reply to by यकु

अर्धवटराव 18/05/2012 - 21:37
>>रामदासांनी साडेतीन चारशे वर्षांपूर्वी (नक्की माहित नाही) भले काहीही सांगितलं असेल, लोकांना त्याचा आधार घेऊन 'दुसर्‍या' कुणालातरी मूर्ख ठरविण्‍याचा भलता किडा असतो - दुसर्‍या कुणाला तरी हे महत्त्वाचं. रामदास वाचणार्‍या किती लोकांना मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:च मूर्खपणा समजलाय? शक्यच नाही, -- यक्कु, तुमचं चुक्याच. आम्हाला तर दासबोधातील मुर्खलक्षणं वाचुन आमच्या अर्धवटपणाची अत्यंत प्रकर्षाने जाणिव झालि. मग त्यावर आम्हि भरपुर विचार केला. शेवटी "अर्धवटराव" अशी सार्थ उपाधी धारण करुन मिपावर अवतरलो. त्यानंतर बरेच लोकं या आयडीची उसनवारी मागु लागले... पण आम्हि ताकास तुर लागु दिला नाहि. अर्धवटराव

In reply to by यकु

अर्धवटराव 18/05/2012 - 22:46
यक्कु... दिसामाजी काहितरी लिहीत जावे ( समर्थांनीच म्हटलय बहुतेक ;) ) म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच !!! >>रामदासांनी लिहिलेलं मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:चा मूर्खपणा समजलेल्या कुणाचाही स्वानुभव ऐकायला आवडेल -- स्वानुभव भरपुर आहेत रे मित्रा.. पण नको त्याची आठवण आता. असो. >>तर मूळातच 'दासबोध' या ग्रंथाची उपयुक्तता फक्त 'कोट' करण्‍यापुरती आहे - -- मला नाहि वाटत. आपल्या मनाच्या अगदी तळापर्यंत मुरलेल्या, काहि उमगणार्‍या आणि बर्‍याचश्या न उमगणार्‍या भावना-विचारांचा कोलाहल आपले सध्याचे वर्तन घडवत असतो. या कोलाहलातुन वाट काढायची जेंव्हा इच्छा होते तेंव्हा त्यातला प्रत्येक स्वर स्वच्छ्पणे ऐकुन घेउन त्याचे समाधान करावे लागते. अश्यावेळी दासबोधासारखे एंप्लीफाईंग मशीन आपल्याला मदत करते >>#because दासबोध doesn't deal with fundamental problem of creation & operation of THOUGHT in our life. -- इट डज. इफ यु फाईंड दॅट आफ्टर स्टडींग दासबोध युर थॉट्स हॅव्ह चेंज्ड देन इट हॅज डन इट्स जॉब वेल्ल. विचारांचे परिवर्तन, सुस्पष्टता हि विचार प्रक्रियेच्या मुळावर आणि अंगावर काम केल्याशिवाय येऊ शकत नाहि. >> So anyone reading दासबोध will only be able in giving continuity to the same age old THOUGHT originated in the head of रामदास sitting in the cave of शिवथरघळ ! -- दासबोध रचण्याचा हा उद्देश मात्र नव्हता . समर्थांना आपले विचार पुढे चालवायला फक्त एक संदर्भग्रंथ निर्माण करायचा म्हणुन नव्हता... तर मनुष्यमात्राने आपले प्रोब्लेम अगदी मुळापासुन सोडवायला काहि मदत झाली तर बरं या उद्देशाने दासबोध रचण्यात आला. >>#Yes, thought can travel from an age to another age - because all the living organisims (including that of राजघराणं & विकास & यकु & all others who read, listen etc) are unfortunately capable for only such a thing. -- विचारांना पाय नसतात. माणुस नावाचा जो काहि हाडामासाचा लगदा आहे तो पिढ्यानपिढ्या सतत बदलत जरी असला तरी त्याला शरिरामार्फत येणारे अनुभव बर्‍यापैकी सारखे असतात. माझ्या आजोबांनी साखर खाल्ली, त्यांना ति गोड लागली. त्यांनी माझ्या वडीलांना साखर खाउ घातली, त्यांनाहि गोड लगली. मग मी खाल्ली.. माझाही अनुभव वेगळा नाहि. अश्याप्रकारे "साखर गोड असते" या विचाराचा प्रवास झाला. जर ज्यु. अर्धवटरावांच्या जिभेला काहि प्रोब्लेम झाला आणि त्यांची चव ओळखण्याची क्षमता रुद्ध झाली तर हा विचार माझ्या पिढीवर येऊन संपला. आता प्रत्येकाची गोड चवीची परिभाषा सारखीच असते काय हा मुद्दा निराळा. >>जर खरोखर 'ज्ञान' नावाचं जे काही असेल ते पिढ्‍यान पिढ्‍यांपासून चालत आलं असतं तर ते फक्त 'सांगे वडीलांची किर्ती तो येक मूर्ख' या रामदासांच्या वचनाच्या आधारावर दुसर्‍या कुणालाही मूर्ख किंवा आणखी कसलाच ठरविण्‍यासाठी वापरलं गेलं नसतं, त्या ज्ञानाचा (ते जर खरोखर ज्ञान असतं तर) आधी कोट करणार्‍याच्या मेंदुत, शरीराच्या प्रत्येक पेशीत स्फोट झाला असता, #so whatever discussion there is in the article above, that is only a continuity of thought, that is not ज्ञान! -- आपल्याला आलेल्या प्रत्येक अनुभवाचं, विचाराचं अल्टीमेट स्वरुप म्हणजे पेशींमध्ये झालेला स्फोटच आहे. त्या स्फोटात किती क्षमतेचा दारुगोळा भरला आहे त्यावरुन पेशींचं डॅमेजींग अवलंबुन आहे. तो "युरेका युरेका" ओरडत नागवा धावत जाणारा वै़ज्ञानीक कोण हो तो... त्याला त्यावेळी जे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्याच्या मेंदुंच्या पेशींत जे विस्फोट झाले त्यामुळेच तो त्या वेळेपुरते सामाजीक सभ्यतेचे नियम विसरु शकला. >> मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, -- होय. त्या विचारांचा उद्देशच तसलं आयडेंटीफिकेशन देणं आहे. जर संदर्भ बदलले तर ते विचार देखील बदलतील. >>ज्ञान चालत येत नाही - -- येप्स. १०० % अ‍ॅग्री. >>ज्ञान असेल तर ते ज्याला झालं असेल त्याची पुढची पिढीनिर्मितीची संभाव्यता खलास करतं. त्यामुळं भगवान बुद्धाला तो बुद्ध होण्यापूर्वीचा राहुल हा मुलगा असू शकतो, बुद्ध झाल्यानंतर ते आणखी कोणा पिढी पुढे चालवणार्‍याला जन्म देऊ शकत नाहीत, ना महावीरांना ते तीर्थंकर झाल्यानंतर वंश चालवता येऊ शकतो --म्हणजे जननक्षमताच नष्ट होते असं म्हणताय कि काय ?? त्यामागचा कार्यकारण भाव काय असावा?? >>रामदास 'रामदासी' या पंथाला जन्म देऊ शकतात - कारण ते 'विचारांच्या माध्‍यमातून' आपल्यापर्यंत येतात आणि 'ज्ञानप्राप्तीच्या' दिशेने जाण्‍याचा प्रयत्न करतात. -- रामदासी पंथावरचं आजपर्यंतच मी वाचलेलं सर्वात सुंदर भाष्य. ( पण तुला हेच अभिप्रेत होतं काय रे यक्कु?? )

In reply to by अर्धवटराव

यकु 18/05/2012 - 23:38
>>स्वानुभव भरपुर आहेत रे मित्रा.. पण नको त्याची आठवण आता. असो. -- हॅहॅहॅ. असो. :) >>अश्यावेळी दासबोधासारखे एंप्लीफाईंग मशीन आपल्याला मदत करते -- मे बी ;-) रामदास आणि कंपनीची प्रॉडक्ट कधी त्यातून फार सखोल अनुभव घ्‍यायचा म्हणून वापरुन पाहिली नाहीत ;-) युजी आणि कंपनीवर आमचा ज्यादा विश्वास हो ;-) >>इट डज. इफ यु फाईंड दॅट आफ्टर स्टडींग दासबोध युर थॉट्स हॅव्ह चेंज्ड देन इट हॅज डन इट्स जॉब वेल्ल. विचारांचे परिवर्तन, सुस्पष्टता हि विचार प्रक्रियेच्या मुळावर आणि अंगावर काम केल्याशिवाय येऊ शकत नाहि. -- परिवर्तन, सुस्पष्‍टता वगैरे येत असेल पण, तेवढ्‍यानं काही होत नाही ना - even if, as you say, we may achieve transformed thoughts or thoughts with clarity, still we are driven by thought itself - atleast until now that has remained a moving force & I know how bad it is :p >>तर मनुष्यमात्राने आपले प्रोब्लेम अगदी मुळापासुन सोडवायला काहि मदत झाली तर बरं या उद्देशाने दासबोध रचण्यात आला. --- याबद्दल दासबोधाला सादर वंदनच :) >>आपल्याला आलेल्या प्रत्येक अनुभवाचं, विचाराचं अल्टीमेट स्वरुप म्हणजे पेशींमध्ये झालेला स्फोटच आहे. त्या स्फोटात किती क्षमतेचा दारुगोळा भरला आहे त्यावरुन पेशींचं डॅमेजींग अवलंबुन आहे. तो "युरेका युरेका" ओरडत नागवा धावत जाणारा वै़ज्ञानीक कोण हो तो... त्याला त्यावेळी जे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्याच्या मेंदुंच्या पेशींत जे विस्फोट झाले त्यामुळेच तो त्या वेळेपुरते सामाजीक सभ्यतेचे नियम विसरु शकला. --- आय डिफर :) >> मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, -- होय. त्या विचारांचा उद्देशच तसलं आयडेंटीफिकेशन देणं आहे. जर संदर्भ बदलले तर ते विचार देखील बदलतील. --- रामदासांचे विचार टार्गेट करण्‍याचा हेतु नाहीच, :) आयडेंटीफिकेशन आपल्यात आत्ता आहे, हे आयडेंटीफिकेशन ज्यांच्यात राहिलेलं नाही ते म्हणतात सगळ्या गोष्‍टींचं आयडेंटिफिकेशन नष्‍ट झालं की तुमची सगळी फ्रंटीयर्स मोडून पडतील - विचारांचा प्रश्‍न नाहीच. >>येप्स. १०० % अ‍ॅग्री. --- पार्टी ! ;-) >>म्हणजे जननक्षमताच नष्ट होते असं म्हणताय कि काय ?? त्यामागचा कार्यकारण भाव काय असावा?? --- हो, ज्यांनी पूर्ण अनुभव घेतलाय त्यांच्याबद्दल तसं ऐकून आहे. कार्यकारण भाव हाच की सगळ्या प्रकारचं आयडेंटीफिकेशन नष्‍ट होतं. विचारांचं बिल्‍ड अप होऊ शकत नाही, त्यामुळं समोर बाई आहे की पुरुष आहे हेच समजू शकत नाही. अर्थातच सेक्स ग्लँड्स कार्यरत असतात, पण त्यांतून स्रवणार्‍या सामग्रीला बाहेर पडून कुणात तरी शिरण्‍याची ओढ नसते, सेक्स ग्लँडसमुळे तयार होणारी ड्राइव्ह मेंदुत प्रवेशते असं ऐकून आहे - similar explaination as described in age old Yogic literature, but don't know anything practically. >>>रामदासी पंथावरचं आजपर्यंतच मी वाचलेलं सर्वात सुंदर भाष्य. ( पण तुला हेच अभिप्रेत होतं काय रे यक्कु?? ) -- नाही, भाष्‍य करणं अपेक्षित नव्हंत, आशयाच्या ओघात आलेलं फक्त एक विधान. :)

In reply to by यकु

अर्धवटराव 19/05/2012 - 05:30
>>युजी आणि कंपनीवर आमचा ज्यादा विश्वास हो -- मज्जा :) >> परिवर्तन, सुस्पष्‍टता वगैरे येत असेल पण, तेवढ्‍यानं काही होत नाही ना - even if, as you say, we may achieve transformed thoughts or thoughts with clarity, still we are driven by thought itself - atleast until now that has remained a moving force & I know how bad it is -- आय थिंक आय नो व्हॉट यु आर सेईंग. पण आम्हि सध्या विचारांच्या आवर्तनातच स्वतःला सुरक्षीत समजतोय. त्यापलिकडचा काहि "विचार" येत नाहि :) >>......वै़ज्ञानीक कोण हो तो... त्याला त्यावेळी जे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्याच्या मेंदुंच्या पेशींत जे विस्फोट झाले त्यामुळेच तो त्या वेळेपुरते सामाजीक सभ्यतेचे नियम विसरु शकला. >>>>>आय डिफर -- ह्म्म्म. मग मला तुम्ही काय म्हणताय हे काहिच कळलं नाहि :) >>--- पार्टी ! -- एनी टाईम रेडी :) >>...सेक्स ग्लँडसमुळे तयार होणारी ड्राइव्ह मेंदुत प्रवेशते -- गो* कपळात जाणे म्हणजे हेच असावे काय ?? ;) >>नाही, भाष्‍य करणं अपेक्षित नव्हंत, आशयाच्या ओघात आलेलं फक्त एक विधान. -- म्हणजे अजुन तरी तुझ्यात विस्फोट वगैरे झालेले दिसत नाहित ;) एकदा भेट बाबा त्यापुर्वी. अर्धवटराव

राजघराणं 19/05/2012 - 01:49
धागा हिट. लेख तसा अंमळ सामान्य (फालतूच) होता. तरिही हिट ! अहो आश्चर्यम. यक्कू तेरे साथ बैठना पडेंगा.... सेक्स ग्लेंड काय... पेशितले प्रस्फोट काय ..... कै च्या कै ... पार्टी .. मेरे तरफसे

रमताराम 16/05/2012 - 16:53
पालथ्या घड्यांवर पाणी ओतण्याची लै हौस ब्वॉ तुम्हाला. उद्ध्वस्त धर्मशाळा मधील कॉम्रेड कुलकर्णी म्हणतो ना तसे 'लिहून बोलून या देशाला जागवता येत नाही.' गोधडीत सुस्त पडून राहणार्‍या नि हात बाहेर कढून कोणत्याही घोषणेला - कोणती ते ऐकण्याची समजून घेण्याची तसदी न घेता थेट - खच्चून 'जय' म्हणण्यापुरती हालचाल करणार्‍यांच्या देशात असे शब्द 'केवळ बापुडे वारा' असतात साहेब. असो. लिखाण आवडले/पटले हे वे. सां. न. ल.

In reply to by रमताराम

जय राजघराणं, जय रमताराम. आम्ही या दोघांना पूर्वज मानणार आणि त्यांना देव बनवून त्यांचा उदोउदो करणार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. ररा व मा.* अदिती दोघेही जन्मजात संस्कृतीभंजक असल्याने त्यांच्या प्रतिक्रिया दुर्लक्षीत केल्या आहेत. *माजोरी भारतीय संस्कृती महान होती, महान आहे आणि महान राहील !

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 17/05/2012 - 13:22
ए वेताळा, मी विक्रम नाही त्यामुळे माझ्या बोकांडी बसायचे नाय हां.

In reply to by रमताराम

ए वेताळा, मी विक्रम नाही त्यामुळे माझ्या बोकांडी बसायचे नाय हां.
मी काय के. सी. बोकाडीया आहे का ? ;) परिष कणेकर

प्यारे१ 16/05/2012 - 16:57
>>>>समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही. हे आवडलं. >>>हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम ! हॅ हॅ हॅ. कळत नाही असं म्हणायचंय? वळणं महत्त्वाचं माऊली!

पैसा 16/05/2012 - 19:42
विस्तार आवडला. (फक्त >>"मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे." याबद्दल जरा शंका आहे)

राजघराणे यांचा अजून एक उत्तम लेख. पूर्णपणे पटला. जर प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या पिढीकडून ज्ञान घेऊन त्यात आपली भर टाकून किंवा काळानुरूप सुधारणा करून पुढच्या पिढीकडे ते ज्ञान हस्तांतरीत करत असेल तर याचा अर्थ नव्या पिढीकडे जुन्या पिढीपेक्षा अधिक योग्य आणि अधिक काळानुरूप ज्ञान असते असा त्याचा अर्थ झाला. मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. मला वाटते की जर नव्या पिढीकडे जास्त ज्ञान असेल तर जे काही जुने आहे ते by default अयोग्य मानून त्यात जर उपयोगी काही असले तर तेच घ्यावे. by default अयोग्य का? कारण पूर्वी जेव्हा केव्हा त्या गोष्टी तयार केल्या त्यापेक्षा आताच्या पिढीकडे अधिक आणि काळानुरूप ज्ञान आहे तेव्हा पूर्वी लक्षात न आलेल्या काही गोष्टी असतील तर त्या आताच्या पिढीच्या लक्षात यायला जास्त स्कोप आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

अर्धवटराव 17/05/2012 - 21:26
याला म्हणतात आधुनीक विचार... >>मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. -- इतरत्र जाऊ दे... मिपावरील असले कोण ज्ञानपाषाण आहेत ते कळु दे एकदा... मग बघा काय गदर माजवतो त्यांच्या विरुद्ध !! अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मृगनयनी 17/05/2012 - 23:05
रा.घ. ..ठीक आहे लेख! आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे | शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास हे वाक्य आवडले. * पूर्वीच्या काळी उपवासाचे स्वरूप अत्यन्त वेगळे होते. लोकं फलाहार आणि पाणी घ्यायचे. काही लोक निर्जळी उपवास करायचे. मुळात उपवासाचा उद्देश हा 'काही विशिष्ट गोष्टी खाणे' असा नसून अत्यंत जरूरीपुरते कमीतकमी अन्न खाऊन परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करणे हा होय. कमी आणि जरूरीपुरते अन्न घेतल्याने सुस्ती येत नाही. व मन सतर्क राहते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी (शक्य असेल तर फक्त ) लिम्बूपाणी घेणे केव्हाही चान्गले! कारण त्यामुळे माणसाच्या चित्तवृत्ती तर शान्त राहतातच. पण चमचमीत अन्नाच्या योगेकरून बळावलेल्या मानसिक आणि बौद्धिक अर्थहीन तर्क-वितर्कांनाही आळा बसतो. तसेच कोणतेही सन्त-महात्मे कधीच कुणाला उपास करायला सांगत नाही व यापूर्वीही कधी असे कुणा सन्तांनी सांगितलेलेही दिसत नाही. काही खादाड लोकांना 'उपवास' या शब्दाचा अर्थ व महत्व माहित नसल्याने (व कदाचित त्यांच्या बापजाद्यानाही माहित नसल्याने ) त्यांनी उपवासाच्या दिवशी साबुदाणा, बटाटे हे पोर्तुगीजांनी आणलेले पदार्थ चमचमीत पद्धतीने प्रिपेअर करून खायला सुरुवात केली. काही ठिकाणी उपवासाला तान्दूळ खातात. काही ठिकाणी भेंडी चालते.. काही ठिकाणी चालत नाही... बर्‍याच ठिकाणी साबुदाण्याचे पापड, वरईची आमटी, दाण्याची चटणी इ. पदार्थ खाऊन उपवास साजरा केला जातो. त्यामुळे "एकादशी दुप्पट खाशी" होते. व "उपवास" .. उपवास राहत नाही.. काही डॉक्टर लोक कॅलरीज आणि वजन वाढलेल्या लोकांना "उपवास" करायला सांगतात!. पावसाळ्यात हवा, पाणी यातील बदलामुळे वारंवार पोटदुखी, जन्तूसंसर्ग तसेच इतर अनेक रोग इतर ऋतुंपेक्षा जास्त प्रमाणात फैलावतात. त्यामुळे पावसाळ्यात म्हणजेच -आषाढ, श्रावण, भाद्रपदात विविध धार्मिक कारणांसाठी उपवास करण्याचे नियम आपल्या खूप जुन्या पूर्वजांनी घालून दिलेले आहेत. श्रावणी सोमवार, मन्गळागौर, नागचतुर्थी, हरतालिका, श्रावणी शुक्रवार.. असे विविध दिवस आपल्या अति जुन्या पूर्वजांनी उपवासासाठी निवडलेत. कारण आरोग्यविषयक कारणे देण्यापेक्षा धार्मिक कारणे दिलीत.. तर लोक त्याचे श्रद्धेने पालन करतात.. हे त्यांना माहित होते. किम्बहुना ती ह्युमन मेन्टॅलिटी आहे. अर्थात या धार्मिक कारणांमागे आपल्या अति जुन्या पूर्वजांची पुढच्या पिढीबद्दलची सद्भावनाच होती. परन्तु आत्ता बदलत्या काळानुसार आपल्या अति जुन्या पूर्वजांचे या विचारांमागचे शास्त्र लक्षात न घेता फक्त कर्मकांडात लोक अडकले. आणि तेच संस्कार त्या कर्मकांडी लोकांनी पुढच्या पिढीवर केले. त्यामुळे उपवास आणि इतरही बर्‍याच धार्मिक गोष्टींमागचे तत्व न समजल्यामुळे 'उपवासा'चा पार बोर्‍या वाजवला गेला. आणि ग्लोबलायझेशनमुळे आणि कर्मकांडामुळे पसरलेल्या व दृढ झालेल्या अर्धवट माहितीमुळे बर्‍याच लोकांना आपल्या अति जुन्या पूर्वजांचे विचार मूर्खपणाचे वाटतात.. असो.. आता अमेरिका किन्वा युरोप मधले शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या या अति जुन्या पूर्वजांच्या सन्शोधनाचा अभ्यास करून त्यांचे निष्कर्ष .. पुन्हा स्वतःच्या नावाने नव्या कव्हरमध्ये जगासमोर आणतील.. तेव्हा आपल्या लोकांना त्याचे महत्व कळेल!! त्यामुळे कधी कधी नव्हे बर्‍याचदा "जुने ते सोने" असते... फक्त ते सोने आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यासाठी नुसते सोने विकणार्‍यापेक्षा सोने पारखणार्‍याची संगत धरणे केव्हाही उचित ठरेल. :) || जय जय रघुवीर समर्थ || :)

दादा कोंडके 17/05/2012 - 11:54
समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत.
खरय. आणि हे सगळं व्हायला आताच्या आणि पुढच्या पिढ्यांत एव्हढी समज येइल की देव, आणि धर्माचं अधिष्ठान की काय म्हणतात त्याची काहिही गरज नाही. उलट आत्तापर्यंत याचा दुष्परिणामच मानवजातीला भोगावे लागले आहेत हे पटेल. अशी आशा आहे. :)

चिरोटा 17/05/2012 - 12:52
लेख आवडला.
बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते
हे कशावरून ? उपवास न करणार्‍यांना हे माहित असते का? की उपवास करणार्‍या व्यक्ती जुनाट,बुरसटलेल्या विचारांच्या असतात असे आपले मत आहे?

In reply to by चिरोटा

विकास 17/05/2012 - 23:12
उपवासाच्या दिवशी "आपल्या" नेहमीच्या गोष्टी खाणे आपण टाळायचे असते. आता बटाटा हा जर परकीय असला तर "आपला" नाही अथवा "नेहमीचा" देखील नाही. म्हणून उपवासास चालत असावा. ;)

बॅटमॅन 17/05/2012 - 13:57
>>हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - असे नुकतेच अ‍ॅडमने ईव्हला म्हटल्याचे वाचनात आले असे पुलंच्या पुस्तकात वाचल्याचे आठवले.

रमताराम 17/05/2012 - 16:19
तुमच्यासाठी आमचा एक आवडत्या कथेतील छोटा भाग... अर्थात जीएंचा. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पर्वतापलिकडचा सम्राट ही कोरड्या झालेल्या म्हातार्‍या बायकांची भाकडकथा आहे! तुमची नृत्य वेडगळपणाची आहेत! निसर्गाचं चक्र अविरतपणे फिरत असतं. पावसाळा येतो तो तुमच्या नृत्यांनी खूष होऊन नव्हे; किंवा तो येतो ते तुम्ही अत्यंत सद्गुणी, निसर्गाचे लाडके आहात म्हणून नव्हे. तुम्ही केवळ पावसाचा उपयोग करता इतकंच. तुम्ही तुमची आडदांड नृत्यं थांबवलीत किंवा तुम्ही सारेच नष्ट होऊन गेलात तरी पावसाळ्यात पाऊस हा निर्विकारपणे पडत राहिलंच! पण एका बाबतीत मात्र मी चुकलो. मला वाटलं होतं या अदृष्य बेड्या हातावरून पडताच निदान एकाला तरी मुक्त वाटेल. मला त्याबद्दल कृतज्ञता नको होती, कारण आता मी त्यापलिकडे गेलो आहे. कृतज्ञता नव्हे तर निदान एकाला तरी मुक्त केल्याचा आनंद मला हवा होता. पण हातापायात या अवजड बेड्या शतकानुशतके घालून तुम्ही इतके अपंग झाला आहात की आता त्यांच्याशिवाय चालणं तुम्हाला अशक्यच वाटतं. तुमच्या झापडी काढून मी तुमच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला. एकंदरीने मुक्तता अशी बाहेरून देता येत नाही हेच खरं. त्यासाठी आतूनच उकळी यावी लागते. मी तुमची प्रतारणा केली याचं खरं म्हणजे तुम्हाला दु:ख नाही, तर ती प्रतारणा आहे हे दाखवण्याचं धैर्य मी दाखवलं याचा तुम्हाला संताप आहे. तुम्ही अज्ञ आहातच पण आपण अज्ञ आहोत हे जाणण्याचं पहिलं पाऊलदेखील तुम्हाला उचलता येत नाही इतके तुम्ही अपंग, क्षुद्र होऊन बसला आहात! मी तुम्हाला काही शिकवू शकलो नाही, पण ही एक गोष्ट मात्र मी स्वत: या क्षणी शिकलो! -कळसूत्र (काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी) >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> पर्वतापलिकडील सम्राट हे एक रूपक आहे हे वेगळे सांगायला नकोच. :)

विकास 17/05/2012 - 19:52
लेख - मुक्तक म्हणून आवडले आणि प्रामाणिक वाटले. (बाकी आपल्या मिपाआयडीवरून आपण वाडवडीलांची किर्ती तर सांगत नसता असे वाटले. ;) ह.घ्या.). मात्र आपले प्रामाणिक विचार संपूर्णपणे पटले असे म्हणणार नाही. कारण बर्‍याचदा अशा विषयांचे प्रामाणिकपणे केलेले विस्तार हे समाजात चाललेल्या अथवा स्वतः निरीक्षण केलेल्या अनुचितीत गोष्टींना/प्रथांना प्रतिक्रीया म्हणून असतात म्हणून लंबक दुसर्‍या टोकाला जातो... त्यामुळेच y=mx+c अशा साध्या समिकरणाने मांडलेले असतात आणि वास्तव तसे नसते. संतमंडळींपासून अगदी अधुनिक साहीत्यिकांपर्यंत अनेकांनी मांडलेले अनेक चपखल विचार मला आवडतात. ते केवळ मराठी, हिंदी भारतीयच असतात असे नाही, तर इंग्रजीतले पण असू शकतात. अनेकदा असे वाचलेले ऐनवेळेस आपोआप आठवते आणि मार्गदर्शक अथवा समुपदेशक ठरते, अर्थात तसे घेण्याची तयारी आणि इच्छा असली तर... "ज्ञानासम नसे काही, पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये | " असेच काहीसे. समर्थांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे त्यातलेच आहेत. रामदासांनी दासबोधाच्या ज्या दशकात, "आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥" असे लिहीले त्याच दशकात नंतरच्या (दहाव्या) समासात, "समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥" असे देखील म्हणलेले आहे. अर्थात हे (म्हणजे पढतमुर्खाचे लक्षण) आपल्यासाठी म्हणलेले नाही हे स्पष्ट करतो! तसा गैरसमज नसावा. पण असे महाभाग बर्‍याचदा जालावर आणि वास्तवात देखील दिसतात-भेटतात इतकेच म्हणेन. पण स्वतः तंगड्या वर करून बसायचे आणि बापजाद्यांच्या किर्तीबद्दल बोलायचे, हे जसे मूर्खपणाचे लक्षण आहे, तसेच केवळ जुने आहे वगैरे म्हणत तुच्छ लेखायचे कारण देखील नसते...दुर्दैवाने तसे बर्‍याचदा घडताना दिसते. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " यांचा खरेच विचार करायचा असेल तर तो आपल्या स्थलकालपरीस्थितीस योग्य असा करावा का फ्रान्समधे अठराव्या शतकात मांडले म्हणून ते घटनाकारांनी १९५० साली तसे लिहून ठेवले म्हणून (पक्षी: परत भूतकाळाची किर्ती) करावा ह्याचा देखील विचार करायला हवा. जे स्वदेशी विपत्ती भोगत वडीलांची किर्ती करणारे असतात त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूक आहे हे निश्चित... कारण समर्थानी सांगितले आहेच. :-) पण जे तसे वागत नाहीत ते नक्की "समता, न्याय, बंधुभाव, व्यक्तीस्वातंत्र्य" हे स्वतःपुरतेच मर्यादीत ठेवतात का सर्वांसाठी आणि सर्वांच्या नजरेतून त्याचा विचार करतात हे महत्वाचे आहे. सरते शेवटी नुसतीच वडीलांची किर्ती सांगणे हे जसे माझ्या लेखी निर्विवाद मुर्खपणाचे आहे तसेच त्याला मान्यच न करणे अथवा त्याची (चांगल्या गोष्टींची) लाज वाटण्यासारखे वागणे हे देखील काही शहाणपणाचे ठरत नाही. "सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे" असेच काहीसे... जे चैतन्य / सचेतन असते ते तसे असे पर्यंत कालातीतच असते. केव्ळ जुने म्हणत तुच्छ लेखणे गरजेचे नाही आणि आमचे म्हणत नुसतेच भजायची तर त्याहूनही गरज नाही... म्हणूनच विचारात समतोल आणि सारासार विवेकबुद्धी असणे देखील महत्वाचे आहे असे वाटते... नाहीतर केवळ पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय (ट्रेडीशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी) तयार करण्याची स्फुर्ती देणार्‍या माशेलकरांना आणि त्यांच्या शास्त्रज्ञ चमूला देखील आपण हकनाक दासबोधातील दशक दहावा, समास पहिला (मुर्खांची लक्षणे) मध्ये वर्गिकृत करू...

In reply to by विकास

अर्धवटराव 17/05/2012 - 21:40
मिपावरचा एक धर्ममार्तंड तरी सापडला... पण तुम्ही आमच्या गुडबुकातले... तुमच्या विरुद्ध गदर कसा करावा??? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

विकास 17/05/2012 - 22:08
मिपावरचा एक धर्ममार्तंड तरी सापडला... ऑ? मी लपलो कधी होतो? उगाचच संशोधक असल्याचे क्रेडीट घेण्याचा प्रकार आहे.. ;) तुमच्या आधीच्या प्रतिसादातील खालील वाक्याचा "धर्ममार्तंड" सापडण्याशी संबंध आहे असे समजतो. मिपावरील आणि इतरही "धर्ममार्तंड" जे काही जुने आहे ते by default योग्य मानतात. "जे काही जुने आहे ते by default योग्य मानणे" जसे अयोग्य तसेच "एखादी गोष्ट योग्य मानणारे, ती गोष्ट केवळ जुनी आहे म्हणजे "सगळेच जुने by default योग्य मानतात" असे समजून त्यांना धर्ममार्तंड मानणे देखील अयोग्यच. :-) पण तुम्ही आमच्या गुडबुकातले... तुमच्या विरुद्ध गदर कसा करावा??? अहो महाराज, असे गुडबुक वगैरे ठेवायचे नसते. पटले तर पटले, नाही पटले तर नाही पटले म्हणायचे, आणि बरळत आहे असे वाटले तर टिका करायची... तसे नाही केले तर आमचा पण बुवा/बाबा करून टाकाल तुम्ही. :-)

In reply to by विकास

दादा कोंडके 17/05/2012 - 23:53
सरते शेवटी नुसतीच वडीलांची किर्ती सांगणे हे जसे माझ्या लेखी निर्विवाद मुर्खपणाचे आहे तसेच त्याला मान्यच न करणे अथवा त्याची (चांगल्या गोष्टींची) लाज वाटण्यासारखे वागणे हे देखील काही शहाणपणाचे ठरत नाही.
म्हणजे परत एकदम दुसर्‍या टोकाचं उदाहरण दिलं की युक्तीवाद सोप्पा होतो. खरतर अ‍ॅब्सुल्यूटली कुठलीच गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली वाईट नसते. तीची योग्यता-चांगूलपणा सापेक्ष असतो. तात्कालीक सामाजिक परिस्थितीवर बरच काही अवलंबून असतं. सध्याची (भारतातली) सामाजिक परिस्थिती बघितलीकी तुम्हाला असं वाटत नाही का या व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय म्हणून? खरतर, एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर पूर्विच्या लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ नये. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " इ. इ. बद्दल सध्याचा समाज जास्त प्रगल्भ आहे असं माझं सपष्ट मत आहे. :)

In reply to by दादा कोंडके

अर्धवटराव 18/05/2012 - 00:13
>>खरतर, एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर पूर्विच्या लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ नये. -- एक ऐतिहासिक दस्तावेज आणि साहित्यीक मुल्य सोडलं तर कुठल्याच लिखाणाला फारसं गंभीरपणे घेउ :) अर्धवटराव

In reply to by दादा कोंडके

विकास 18/05/2012 - 00:56
म्हणजे परत एकदम दुसर्‍या टोकाचं उदाहरण दिलं की युक्तीवाद सोप्पा होतो. हा युक्तीवाद नसून वास्तव आहे. आंधळा अभिमान नको म्हणताना लाज वाटते असे सांगणे बर्‍याचदा ऐकतो-वाचतो. म्हणूनच आधीच्या प्रतिसादात, "केवळ जुने म्हणत तुच्छ लेखणे गरजेचे नाही आणि आमचे म्हणत नुसतेच भजायची तर त्याहूनही गरज नाही..." असे देखील म्हणले होते... खरतर अ‍ॅब्सुल्यूटली कुठलीच गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली वाईट नसते. तीची योग्यता-चांगूलपणा सापेक्ष असतो. तात्कालीक सामाजिक परिस्थितीवर बरच काही अवलंबून असतं. हेच तर म्हणणे आहे. सध्याची (भारतातली) सामाजिक परिस्थिती बघितलीकी तुम्हाला असं वाटत नाही का या व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय म्हणून? कोणी समर्थांच्या ओव्यांचे उदाहरण दिले अथवा कोणी पुलंनी केलेली संस्कृतीची व्याख्या सांगितली तर त्यात व्यक्तीपूजा शोधायची का? रामदासांना कालचे म्हणून हिणवायचे असेल तर मग जीए तरी आजचे कुठे आहेत? ते पण आता कालचेच आहेत की? मग त्यांचे विचार सांगणे म्हणजे काय व्यक्तीपूजा समजायची? हे मी रमताराम यांना उद्देशून लिहीलेले नाही. त्यांनी दिलेल्या उदाहरणात मला काही गैर वाटत नाही जितके मला रामदासांचे अथवा इतर कुणाचे नाव घेणे गैर वाटत नाही. जी ए अथवा पुलच कशाला मिर्झा गालीब चे शेर सुनावत त्याचे विचार ऐकवणारे किती असतात? एखाद्याला एखाद्याचे लेखन, विचार, सांगायची पद्धत अपील होते तर एखाद्याला त्याच व्यक्तीची न होता दुसर्‍या कुणाची तरी होते... त्या दोन्ही व्यक्ती काही व्यक्तीपूजा करत नसतात तर निव्वळ कुणाचे तरी अ‍ॅप्रिशिएट करत असतात. तात्पर्य: तुमच्या प्रश्नातले "व्यक्तीपूजेमूळे/त्यांच्या बद्दलच्या फुकाच्या अभिमानामूळे जास्त लूस्कान होतय" हे मला १०० काय १०००% मान्य आहे. मात्र त्याला जबाबदार असलेली व्यक्तीपूजा वेगळीच आहे असे वाटते: उदाहरणादाखलः (२००९ च्या विदा प्रमाणे) ५२ केंद्रसरकार प्रकल्प, ५२ (विविध्)राज्य सरकार प्रकल्प, ९८ शैक्षणिक संस्था, ६ विमानतळे/बंदरे, ९३ रुग्णालये, ७४ रस्ते, इमारती, स्थाने, आणि १५ राष्ट्रीय उद्याने ही एकट्या राजीव गांधींच्या नावावर आहेत. तेच इतर अनेक राजकीय नेत्यांचे दिसेल. बरं हे सगळे करदात्याच्या पैशाने परत पैसे खात खात... अजून बरेच काही असे लिहीता येईल. "समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य " इ. इ. बद्दल सध्याचा समाज जास्त प्रगल्भ आहे असं माझं सपष्ट मत आहे. तसे वाटत नाही. "समता, न्याय, बंधुभाव, व्यक्तीस्वातंत्र्य" हे जर माझ्या टर्म अँड कंडीशनवर चालले असेल तरच मी त्या बाबतीत प्रगल्भ राहीन असा रोख बर्‍याचदा समाजात दिसतो त्यामुळेच तर सामाजीक प्रश्न तयार होतात, झालेत...

यकु 17/05/2012 - 21:08
रामदास हे एकच शहाणे जगात होऊन गेले, आणि त्यानंतर शहाणपणा, मूर्खपणाची व्याख्याच कुणाला करता येणार नाही असा राजघराणं यांचा समज दिसतो. स्वतः लग्न टाळून* रामदास
संसार करावा नेटका
असा उपदेश करु शकतात याला तुम्ही काय म्हणाल? *टाळून म्हणतोय, लग्नाच्या बोहल्यावरुन पळून म्हणत नाहीय याची नोंद घ्यावी, परवा कुरुंदकरांच्या एका व्याख्यानात बोहल्यावरुन पळून जाण्याच्या दंतकथेबद्दल पटेल असा विचार ऐकला

In reply to by यकु

अर्धवटराव 17/05/2012 - 21:44
इतरांनी उगाच भावनेच्या भरात/क्षणीक तावातावाने वा एखाद्या उसण्या झपाटलेपणाने भारुन जाऊन संसाराकडे पाठ फिरऊ नये.. इतकच ;) अर्धवटराव

In reply to by यकु

अर्धवटराव 17/05/2012 - 22:45
>>कोण युजी? -- यु = तुम्ही, जी=आदरर्थी वगैरे काय लावायचं असतं ते.. म्हणे बाबाजी, नेताजी, भाऊजी, रावजी वगैरे... शिल्पा मॅडम तुमचेच मौलीक विचार विस्ताराने मांडायची विनंती करताहेत :)

In reply to by यकु

विकास 17/05/2012 - 22:50
दशक बारावा : विवेकवैराग्य समास पहिला : विमळ लक्षण मधील पहीलाच श्लोक/वचन/ओवी जे काही म्हणायचे आहे, ते असे आहे: पहीला श्लोक तुम्ही (संसार करा नेटका) म्हणालात तो आहे तर उर्वरीत अजून संदर्भ लागण्यासाठी देत आहे:
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥ प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥ परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगिसी । अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥
रामदासांनी दासबोधाच्या पहील्याच समासात या ग्रंथाचे काय वर्णन केले आहे?
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥
एका अर्थी मानवी विचार आणि त्याने प्रभावीत होणारे आचार या संदर्भातला हा एक संदर्भग्रंथ आहे. विविध समासांमध्ये विविध वृत्ती-प्रवृत्तींची लक्षणे आणि त्यासंदर्भातील वर्तन देखील सांगितली आहे. अर्थात काळ लक्षात घेतला तर त्यास भक्तिमार्ग म्हणले आहे, पण तो जास्त करून व्यावहारीक ग्रंथ आहे असे एकूण वाचल्यावर वाटते. ते काही प्रत्येकाला आधी प्रपंच करा म्हणून सांगत नाहीत तर प्रापंचिक माणसाने काय करावे हे सांगत आहेत. आधी जी संसाराची जबाबदारी घेतली आहे ती नीट पाळा आणि मग लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जा. :-) तसे केले नसल्याने काय झाले ह्याचे मोठे उदाहरण त्यांच्या आधी काही शतके "विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचे" होतेच पण त्या व्यतिरीक्त देखील अनेकदा घडलेले असू शकते. संदर्भग्रंथ लेखक हे निरीक्षणाधारीत संकलन करतो. तेच रामदासांनी येथे केले आहे. नाहीतर उद्या म्हणाल स्वतःला पोरे न होता,
लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली । बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥ लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं । ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥
असे कसे ते म्हणू शकतात? :-) संदर्भ ग्रंथातील अनेक गोष्टी या इतरांनी पण इतरत्र मांडलेल्या असू शकतात. रामदासांनी त्या ओवीबद्ध करून चपखल शब्दात सांगत समाजाला त्यांच्या पद्धतीने जागृक आणि व्यावहारीक करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते अनेकदा सांगितले जाते. नाहीतर "मूर्ख" या शब्दाच्या डिक्शनरी अर्थावरून चर्चा कशी होऊ शकेल? :-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 18/05/2012 - 12:02
आलं तिच्यायला काड्या सारायला. अवांतर: 'परा' हाच 'परशुराम' आहे असे आम्हाला आतल्या गोटातून समजले. त्याच्या परशुचे पाणी करून त्याने कळफलकाला पाजले आहे नि त्यामुळे त्याच्या कळफलकाने भल्याभल्या क्षत्रियांची दाणादाण उडवण्याचे कार्य अवलंबलेले दिसते. (आठवा कालच केलेली 'नि:सदस्य मिपा करण्याची घोषणा.)

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 18/05/2012 - 12:38
चांगलं तुला विष्णूचा अवतार म्हणतोय तर म्हणे चिखलफेक. चांगलं समुद्र सारून (कुठे? असला हलकट प्रश्न विचारू नकोस) भूमी निर्माण केल्याचे श्रेय दिले तुला तर म्हणे प्रतिवाद करता येत नाही. छ्या: जाउं द्या झालं. ज्याचं करायला जाव भलं... (स्वगतः आणि मला वाटलं होतं खूष होऊन त्या कोणशाशा राजाच्या जसं राज्य स्वाधीन केलेस तसे आपला क्याफे माझ्या स्वाधीन करून तू तपश्चर्येला निघून जाशील.)

In reply to by रमताराम

नाना चेंगट 18/05/2012 - 12:39
>>>आपला क्याफे माझ्या स्वाधीन करून तू तपश्चर्येला निघून जाशील.) सौदर्यफुफाट्याचा मोह पडला वाटतं म्हातार्‍याला...

In reply to by नाना चेंगट

रमताराम 18/05/2012 - 13:47
चोराच्या वाटा चोराला ठाऊक. उघड आहे हे. पर्‍याच्या क्याफेचा मोह पडायला दुसरे काय कारण असणार, ते शेजारचं दांडगं कुत्र? पण हे हितं झाईर करायची काय गरज होती? तुला पार्टनरशिप देणार होतोच की.

कवितानागेश 17/05/2012 - 23:09
चांगला लेख. आपल्या वडलांची किंवा ज्यांचे वाक्य न वाक्य प्रमाण मानले जाते अश्या कुठल्याही बाबांची किर्ती सांगता न बसता स्वतः काहीतरी पराक्रम करावा असे समर्थ रामदासांना सांगायचय असे मला वाटते. किर्ती सांगू नये याचा अर्थ वृथा अभिमान बाळगू नये आणि तो लोकांवर लादू नये असा होतो, पण त्यांच्याबद्दल अजिबातच आदर/ आपलेपणा ठेवू नये आणि जुने ते सगळे फेकूनच द्यावे असाही होत नाही, हा समन्वय कुणीच साधताना दिसत नाही. त्यामुळे मला हल्ली फक्त करुणाष्टके आठवतात! :)

In reply to by कवितानागेश

रमताराम 18/05/2012 - 10:12
हा समन्वय कुणीच साधताना दिसत नाही. किंचित दुरुस्ती. 'कुणीच' दिसत नाही हे खरे नाही. असे लोक असतातच, फक्त ते अल्पमतात असतात. हे लोक सारासारविवेकाचा आधार घेत असल्याने ते नेहमीच आपल्या बाजूला असतील याची खात्री दोन्ही बाजूकडच्यांना नसते. त्यामुळे एक मत विरोधात व्यक्त केले त्यांनी की लगेच त्यांच्यावर 'तिकडचा' असा शिक्का मारून मोकळे होतात. असा शिक्का दोन्हीकडून पडल्याने त्यांचा तिसराच पंथ होतो. मूलत: सामाजिक प्राणी असल्याने माणसाला जमावाचा भाग असणे अधिक सुरक्षित वाटते. अल्पमतात राहण्यातली असुरक्षितता सहन न होऊन त्यातील भावनिकदृष्ट्या कमकुवत लोक निरूपायाने हा नाहीतर तो झेंडा खांद्यावर घेऊन जमावात सामील होतात. तिसरा गट आणखीनच अल्पमतात जातो. आणखी एक म्हणजे विचारहीन लोकांना हे लोक आज एका बाजूने बोलतात नि उद्या दुसर्‍या बाजूने एवढेच दिसते. त्यावरून हे दुटप्पी आहेत असा आक्षेप घेतला जातो. यात आपली समज कमी पडत असेल नि वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी त्या विसंगत नाहीत अशी शंकादेखील जमावात राहून फाजील आत्मविश्वास कमावलेल्यांना येत नाही. आपल्या आजूबाजूला असे लोक असतात, आपण त्यांची दखल घेत नाही इतकेच.

In reply to by कवितानागेश

प्यारे१ 18/05/2012 - 10:26
>>>त्यामुळे मला हल्ली फक्त करुणाष्टके आठवतात! मला याबरोबर च 'कल्याण करी रामराया' देखील आठवतं! अपराधी जन चुकतचि गेले| .... कोठे जावे काय करावे|....

मृत्युन्जय 18/05/2012 - 10:27
आपल्यातल्या जुन्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान न वाटणे हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स चे लक्षण आहे. बाकी या विषयावर या आधीच इतके लिहिले आहे की परत घसा (किंवा कळफलक) खरवडावा असे अजिबात वाटत नाही. दळण चालु द्यावे.

In reply to by मृत्युन्जय

आपल्यातल्या जुन्या आणि चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान न वाटणे हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स चे लक्षण आहे
"असे मला वाटते" हे तीन शब्द शेवटी लिहायला विसरलात का? मला तर "आपण" म्हणजे नक्की कोण हा प्रश्न नेहमी पडतो. म्हणजे उदाहरणार्थ "मी" म्हणजे (आत्मा वगैरे भगवद्गीतेतील संकल्पना बाजूला ठेवल्या तर) एक अडनाव धारण करणारा/ अमक्या जातीचा /पुण्यातील एका भागात राहणारा/पुण्यात राहणारा/ मराठी भाषिक/ हिंदू/ भारतीय की केवळ एक माणूस? तेव्हा "आपण" म्हणजे कोण हे आपली रेफरन्स फ्रेम किती लहान/मोठी आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच एखाद्याची फ्रेम खूपच लहान असेल तर त्याला "मी" म्हणजे केवळ एखादे अडनाव असलेल्या घरात जन्माला आलेला असे वाटेल तर फ्रेम बरीच मोठी असेल तर त्याला "मी" म्हणजे एक माणूस किंवा एक सजीव असे वाटेल. तेव्हा "आपल्या" गोष्टी म्हणजे नक्की कोणाच्या गोष्टी हे सांगितलेत तर बरे होईल. दुसरे म्हणजे "अभिमान" म्हणजे नक्की काय हे पण मला कळलेले नाही. एक मिपा आणि ऐसी अक्षरे विदुषी म्हणतात त्याप्रमाणे रमाकांत आचरेकरांना सचिनचा अभिमान असणे समजू शकतो. कारण सचिनला घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण मी मराठी आणि सचिनही मराठी म्हणून मला सचिनचा अभिमान (त्याच धर्तीवर "आपल्या" पूर्वजांनी काहीतरी केले त्याचा अभिमान) वृथा आहे. तुम्ही उत्तर देणार नाही याची माहिती आहे. पण परत कधी "आपल्या" गोष्टींचा "अभिमान" हा विचार कराल तेव्हा "आपण" म्हणजे नक्की कोण आणि "अभिमान" म्हणजे नक्की काय याचा जरूर विचार करा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मृत्युन्जय 18/05/2012 - 14:09
मी उत्तर देणार नाही असे जे आपल्याला वाटते ते अतिशय बरोबरच आहे. मी उत्तर देणारही नव्हतो. पण आम्ही पडलो ररांचे फ्यान. त्यांच्यासारखेच " काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही" असे म्हणुन आम्ही एकदा शेवटचे उत्तर देतो. त्याला तुम्ही तेच तेच शिळ्या कढीला ऊत आणणारे प्रतिवाद करणार हे ही माहिती आहे . मग मीही माझ्या शिळ्या कढीला ऊत आणायला जावे अशी तुमची इच्छा असणार त्याला मी अर्थातच उत्तर देणार नाही कारण हा या विषयावरचा शेवटचाच प्रतिसाद आहे. "असे मला वाटते" हे तीन शब्द शेवटी लिहायला विसरलात का? सचिन तेंडुलकर हा आजघडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे हे वक्तव्य करताना "असे मला वाटते" असे लिहायची गरज नसते. त्याच्यावर आक्षेप घेणारेही काही लोक असतातच. त्यांना हे मत पटायचे नाहीच पण म्हणुन सचिन तेंडुलकरला सर्वोत्तम मानणार्‍यांनी "असे मला वाटते" असे म्हणायची गरज नाही. असेही ९९% वक्तव्य हे " असे मला वाटते" या प्रकारातच मोडले पाहिजे. स्वतः आईनस्टाईन ने (शास्त्रीय) पुराव्यानिशी साबित केलेले काही सिंद्धांतही नंतर म्हणे खोटे ठरले. तो जिवंत असला असता बिचारा तर आज तुम्ही त्यालाही त्याच्या प्रत्येक सिद्धांतानंतर "असे मला वाटते" असे म्हणायला लावले असते. तुमची इच्छा अशीही असु शकते की प्रत्येक बापाने त्याच्या मुलांबद्दल " ही माझी मुले आहेत" असे म्हणल्यानंतर "असे मला वाटते" हे शब्द जोडावेत. त्याचीही खात्री कोण देउ शकते ना कारण? एक प्रकारे ते ही मतच असते. तर मित्रा प्रत्येक मत हे " असे मला वाटते" सदरातच मोडते. प्रत्येक वेळेस " मला असे वाटते" असे म्हणणे केवळ अयोग्य नाही तर हास्यास्पद ठरेल. मला तर "आपण" म्हणजे नक्की कोण हा प्रश्न नेहमी पडतो. हे बघ मित्रा मी बेसिकातला गोंधळ दूर नाही करु शकत. त्यासाठी तु स्वत:च मेहनत घेतली पाहिजे (अरे तुरे केलेले चालेल ना. नसेल तर कृपया इथे किंवा खरडवहीत तसे सांग.) म्हणजे उदाहरणार्थ "मी" म्हणजे (आत्मा वगैरे भगवद्गीतेतील संकल्पना बाजूला ठेवल्या तर) एक अडनाव धारण करणारा/ अमक्या जातीचा /पुण्यातील एका भागात राहणारा/पुण्यात राहणारा/ मराठी भाषिक/ हिंदू/ भारतीय की केवळ एक माणूस? तेव्हा "आपण" म्हणजे कोण हे आपली रेफरन्स फ्रेम किती लहान/मोठी आहे यावर अवलंबून असते. म्हणजेच एखाद्याची फ्रेम खूपच लहान असेल तर त्याला "मी" म्हणजे केवळ एखादे अडनाव असलेल्या घरात जन्माला आलेला असे वाटेल तर फ्रेम बरीच मोठी असेल तर त्याला "मी" म्हणजे एक माणूस किंवा एक सजीव असे वाटेल. तेव्हा "आपल्या" गोष्टी म्हणजे नक्की कोणाच्या गोष्टी हे सांगितलेत तर बरे होईल. मी / आपण / आपला हा संदर्भ व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष, घटनासापेक्ष आणी अजुन बराच काही सापेक्ष आहे. तर तो असा व्याख्येत बसवु पाहणे वेडगळपणाचे ठरेल. त्या त्या वेळी जे योग्य ठरेल तसा निर्णय घेणे योग्य ठरेल. मी / आपण / माझा ही आपली आयडेंटिटी झाली. ती काही एका फ्रेम मध्ये बसवता येणार नाही. वेळप्रसंगानुसार त्याचा आकार कमी जास्त करणे महत्वाचे. "मी " इतर काहीही असलो तरी एक सजीव माणूस नक्की असतो. ( माणूस किंवा सजीव असे तुम्ही का म्हटले असावे? सगळे सजीव हे मानव नसतात हे मान्य पण म्हणुन मनुष्याची ऐवजी मी स्वतःला सजीव समजले तर काही फरक पडेल काय?). मला वाटते आपल्या इतर सगळ्या आयडेंटिटीज त्याच्या खालच्या. म्हणजे असे बघा. एकाच वेळेस मी ब्राह्मण / मराठा / मागसवर्गीय ही असू शकतो. हिंदी / मराठी / बंगालीही असू शकतो. महाराष्ट्रीयन / बिहारी / बंगालीही असू शकतो भारतीय / इंग्रज / फ्रेंच / स्विसही असू शकतो , हिंदु / ज्यु / ख्रिश्चनही असू शकतो. मी जर महाराष्ट्रीयन मराठी ब्राह्मणा भारतीय असेन तर मला या सगळ्यांचा अभिमान असण्यात नक्की काय गैर आहे हे कळत नाही. जर मी यापैकी काहीही म्हणुन जन्म घेतला यात माझे कर्तुत्व काहीही नाही तसेच मी माणूस असण्यातही माझे कर्तुत्व काहीच नाही. मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी स्वतःला मनुष्याच्या फ्रेममध्ये जरी बसवले आणी इतर फ्रेम्स जरी झुगारुन दिल्या तरी त्या मुळे नक्की फरक काय पडतो (काहीच पडत नाही) दुसरे म्हणजे "अभिमान" म्हणजे नक्की काय हे पण मला कळलेले नाही. परत तेच म्मित्रा. मी बेसिकातला गोंधळ दूर करु शकत नाही................ तु एखादा शब्दकोष बघावास हे उत्तम . एक मिपा आणि ऐसी अक्षरे विदुषी म्हणतात त्याप्रमाणे रमाकांत आचरेकरांना सचिनचा अभिमान असणे समजू शकतो. कारण सचिनला घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण मी मराठी आणि सचिनही मराठी म्हणून मला सचिनचा अभिमान (त्याच धर्तीवर "आपल्या" पूर्वजांनी काहीतरी केले त्याचा अभिमान) वृथा आहे. अभिमान आपल्या गोष्टींचा वाटतो. इतरांबद्दल फारतर कौतुक वाटु शकते. तुमचा मुलाने * कुठल्याही क्षेत्रात उत्तम यश मिळाले तर तो वाटतो तो आनंद + अभिमान. दूसर्‍याच्या मुलाने तेच यश मिळवले तर (जर असूय / द्वेष वगैरे वाटला नाही तर) हे वाटते ते कौतुक. कुठलीही गोष्ट आपली मानली की त्याचा अभिमान वाटतो इतके साधे समीकरण आहे. या केसमध्ये सचिन मराठी म्हणुन त्याचा अभिमान न वाटता मला वाटते तो भारतीय म्हणुन लोकांना त्याचा अभिमान वाटतो. तो भारतीय असण्याबरोबरच मराठीही आहे हा बोनस असू शकतो आणि सीकेपी लोकांसाठी तो कायस्थ आहे हा अजुन एक अभिमानाचा मुद्दा असू शकतो. त्यात अभिमान वाटण्यासारखे काय आहे हा प्रश्न वेगळा पण अभिमान वाटत असेल तर काय प्रॉब्लेम आहे हा मुख्य प्रश्न आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आंबेडकरांचे घ्या. ते स्वतः मागासवर्गीय होते आणी त्यांनी समाजात एक उच्च स्थान स्वतःसाठी बनवले या गोष्टीतुन प्रेरणा घेउनच आज लाखो मागसवर्गीयांनी स्वत:चा उत्कर्ष साधला आहे. इथे आंबेडकरांचेही त्यांच्यासारखेच मागसवर्गीय असणे त्या लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरले, अजुनही ठरते आहे. मागासवर्गीयांनी इतिहासाच्या त्या पानावरुन प्रेरणा घेतली. तसेच जगातल्या प्रत्येक समाजातील लोक इतिहासातील कुठल्यातरी गोष्तीवरुन प्रेरणा घेउ शकतात. मुख्य मुद्दा आहे की तुम्हाला त्या अभिमानाचे प्रेरणेत रुपांतर करता येते की नाही. पण मुळात अभिमानच नसेल तर प्रेरणा मिळणार नाही. त्यामुळेच आपल्या (सॉरी सॉरी आमच्या. तुम्ही वेगळे नाही का. विश्वचि माझे घर वगैरे वगैरे) तर आमच्या पुर्वजांचा आमच्या लोकांना अभिमान असला पाहिजे . उत्कर्ष साधण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे (तो एकच नाही हे मात्र नमूद करु इच्छितो. तुमच्यासारख्या काही लोकांना त्या टीच भर आणि फुटकळ इतिहासाचा शष्प अभिमान नसूनसुद्धा तुम्ही उत्कर्ष साधला आहेच की. त्याशिवाय याचीही नोंद घेतली पाहिजे की इतिहासाचा वृथा अभिमान असणारे आमच्यासारखे काही लोक किडे मकोडीकी जिंदगी जी रहे है) लॉर्ड मॅकॉलेच्या नावावर एक विचार नेहमीच खपवला जातो: I have travelled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in the country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation." आता हा विचार त्या बिचार्‍या (स्वतःच्याच शब्दावर आक्षेप घ्यावासा वाटतो आहे पण ते नंतर कधीतरी) मॅकॉलेच्या नावावर फुकाचा खपवला जातो ही गोष्ट वेगळी पण जे लिहिले आहे ते (म्हणजे विचार) चुकीचे आहे असे 'मला तरी वाटत नाही'. थोडक्यात बोलायचे झाले तर अभिमान वाटणे हे "आपलेपणा" वाटण्याचे द्योतक आहे आणि या आपलेपणातूनच राष्ट्रनिर्मिती होते. नाहितर मला माझ्या भारतीय असण्याचा अभिमान वाटणार नाही आणि मग भारत काय पाकिस्तान काय एकच असा विचारही चुकीचा ठरणार नाही. तुम्ही उत्तर देणार नाही याची माहिती आहे. बायस बायस म्हणातात तो हाच काय? मला या मुर्खपणाचा आणि प्रतिवादीकडुन केल्या जाणार्‍या त्याच त्याच प्रतिवादाचा कंटाळा आला आहे हे बरोब्बर ओळखले म्हणुन तुम्ही असे लिहिले असेल तर मात्र मला तुमचा अभिमान वाटतो बर का. ;) पण परत कधी "आपल्या" गोष्टींचा "अभिमान" हा विचार कराल तेव्हा "आपण" म्हणजे नक्की कोण आणि "अभिमान" म्हणजे नक्की काय याचा जरूर विचार करा. मी नक्कीच विचार केलेला आहे. पण त्या गोष्टी तुम्हालाच नीटश्या कळल्या नसल्याने (असे तुम्हीच म्हणालात हे मी इथे नम्रपणे नमूद करु इच्छितो) तुमचा थोडा गोधळ उडालेला असू शकतो. तरी पुढच्या वेळेस या किंवा श्या प्रकारच्या वक्तव्यांवर आक्षेप घेण्यापुर्वी या दोन गोष्टींचा तुम्हीच नीटसा विचार करावा असा सल्ला देतो.

In reply to by मृत्युन्जय

हा प्रतिसाद सगळ्याच अभिमान्यांना उद्देशून आहे. तुमच्यासारख्या अभिमान्यांना subjective आणि objective मधला फरक माहित नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. सचिन तेंडुलकर हा आघाडीचा फलंदाज आहे हे दिलेले उदाहरण अत्यंत हास्यास्पद आहे. सचिनने १०० शतके केली, ३०-३२ हजार रन्स काढल्या आणि तितकी शतके/धावा इतर कोणाही फलंदाजाने काढलेल्या नाहीत हे कोणालाही सहजपणे पडताळून बघता येईल. तेव्हा सचिन हा धावा/शतके या बाबतीत आघाडीचा फलंदाज आहे हे झाले objective statement. आईनस्टाईनने किंवा कोणाही शास्त्रज्ञाने मांडलेली समीकरणे त्या विषयाची पाहिजे तेवढी माहिती असलेल्या कोणालाही पडताळून बघता येतील. आणि ती चुकीची असली तर ती नाकारताही येतील. तेव्हा ही समीकरणे ही objective statement असतात. पण सचिन सर्वात "तंत्रशुध्द" फलंदाज आहे असे कोणी म्हटले तर ते झाले subjective statement. कारण नक्की कोणाला तंत्रशुध्द म्हणावे याविषयीचा एक ठोकताळा नक्कीच नाही आणि म्हणून कोणी सचिनला तंत्रशुध्द म्हणेल कोणी म्हणणार नाही. तेव्हा कोणत्याही subjective statement ला "माझ्या मते" हे qualification असतेच. त्याच धर्तीवर तुमचे न्यूनगंडावरील वाक्य झाले. अर्थात हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेले डोळे झाकून स्विकारणाऱ्यांना असे काहीतरी लिहिलेलेच objective वाटत असल्यामुळे एवढा साधा फरकही तुम्हाला कळला नाही यात काहीही आश्चर्य करण्यासारखे नाही.
हे बघ मित्रा मी बेसिकातला गोंधळ दूर नाही करु शकत. त्यासाठी तु स्वत:च मेहनत घेतली पाहिजे
माझ्या बेसिकमध्ये कसलाही गोंधळ नाही (तसा गोंधळ माझ्यात आहे असे तुम्हा अभिमान्यांना वाटत असले तर मी योग्य मार्गावर आहे याचे सर्वात मोठे प्रशस्तीपत्रक आहे ते माझ्यासाठी). आणि इतरांना माझ्यात वाटत असलेले "बेसिक गोंधळ" दूर करण्यापेक्षा इतर अनंत पटीने अधिक इंटरेस्टींग गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे आहेत आणि मी त्या करतोही.
पण मुळात अभिमानच नसेल तर प्रेरणा मिळणार नाही.
अजिबात नाही.मला स्वत:ला मला काही न करता on platter मिळालेल्या एकाही गोष्टीचा अभिमान नाही तरीही कोणत्याही प्रेरणेत मी कमी आहे असे कोणी म्हणत असेल तर अशा गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष. साध्या शब्दात म्हणायचे तर मुळातल्या अनाठायी अभिमानाचे समर्थन करण्यासाठी त्या अभिमान्यांनी "अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हे निखालस धाधांत खोटे वारंवार ठासून सांगितले आहे. मुळात माणूस गुहेतून बाहेर आला आणि शेती करायला लागला तेव्हा आपले पोट भरणे आणि सुरक्षितता या प्रेरणा त्याच्याकडे होत्याच की. तेव्हा कसला अभिमान होता त्याच्याकडे? धर्म-जाती-परंपरा या सगळ्या नंतरच्या काळातला अर्थात गुहेतून बाहेर येताना माणसाला त्या गोष्टींचा "अभिमान" नव्हता. तरीही माणसाने प्रगती केलीच ना? तेव्हा "मुळात अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हा मुद्दा पूर्णपणे बाद.
लॉर्ड मॅकॉलेच्या नावावर एक विचार नेहमीच खपवला जातो
आता अभिमान्यांना का एका इंग्रजाने म्हटलेल्या वाक्याचा आधार घ्यावा लागत आहे? (धर्म-जात आणि फालतूचे अभिमान याच्या अनंतपट पुढे निघून गेलेले)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मृत्युन्जय 18/05/2012 - 16:21
हा प्रतिसाद सगळ्याच अभिमान्यांना उद्देशून आहे. माझा प्रतिसाद सगळ्याच वाट चुकलेल्यांना आहे तुमच्यासारख्या अभिमान्यांना subjective आणि objective मधला फरक माहित नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. तुमच्यासारख्या वाट चुकलेल्यांना आपण आणि अभिमान हेच मुळात काय आहे ते कळत नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. सचिन तेंडुलकर हा आघाडीचा फलंदाज आहे हे दिलेले उदाहरण अत्यंत हास्यास्पद आहे. सचिनने १०० शतके केली, ३०-३२ हजार रन्स काढल्या आणि तितकी शतके/धावा इतर कोणाही फलंदाजाने काढलेल्या नाहीत हे कोणालाही सहजपणे पडताळून बघता येईल. तेव्हा सचिन हा धावा/शतके या बाबतीत आघाडीचा फलंदाज आहे हे झाले objective statement. चुकीचा प्रतिवाद. नेहमीप्रमाणेच "सिलेक्टिव रीडिंग" का काय ते. मी आघाडीचा फलंदाज असे म्हटले नव्हते तर सर्वोत्तम फलंदाज म्हटले होते. त्याच्या धावा सर्वाधिक आहेत म्हणजे तो सर्वोत्तम होत नाही. तुमचा प्रतिवाद मान्य करायचा झाल्यासच माझे वक्तव्य subjective statement आहे. पण तुम्ही प्रतिसाद वाचण्याचे कष्ट घेता कुठे. तुमच्या मनात आपणच काय ते बरोबर असे घोळत असते. त्यामुळे तुम्हाला ज्या मुद्द्यावर भांडायचे आहे तो समोरच्याने मांडला नसला तरी तु असेच म्हणालास असे म्हणुन भांडता येते. मुळात तुम्ही चुकीच्या मुद्द्यावरच प्रतिवाद केलेला असल्याने बाकीचा प्रतिसाद प्रत्त्युत्तर देण्यासारखा आहे असे मला वाटत नाही. तरी देतो आहे. उगाच उद्या तुम्ही प्रतिसाद देणारच नाही हे माहिती होते असली बाष्कळ बडबड करायला नको. आईनस्टाईनने किंवा कोणाही शास्त्रज्ञाने मांडलेली समीकरणे त्या विषयाची पाहिजे तेवढी माहिती असलेल्या कोणालाही पडताळून बघता येतील. आणि ती चुकीची असली तर ती नाकारताही येतील. तेव्हा ही समीकरणे ही objective statement असतात. सिद्धांत काय हो गॅलेलियोचेही खोडले गेले. कोपर्निकसचेही खोडले गेले आणि चुकीचे असलेले आइन्स्टाइनचे मात्र (त्या वेळेस) खोडले गेले नाहीत. त्यामुळे समीकरणे पडताळुन बघणे आणी ती खोडणे या प्रकाराला फारसा अर्थ आहे असे वाटत नाही. जर शास्त्रीय समीकरणे खोडले जाउ शकतात तर मग ज्यात मानवी भावभावना गुंतलेल्या आहेत ती समीकरणे आणि ते सिद्धांत तर नक्की खोडले जाउ शकतात. त्यात काय विशेष. आंबेडकरांचे उदाहरण जाणीवपुर्व़क टाळलेले दिसते आहे. चांगले आहे चांगले आहे. मग आता मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) चे उदाहरणही विचारात घ्या. विज्ञानवादी सावरकरांचे दाखले नेहमी देतात. त्यांनी राष्ट्रवाद पेटवण्याकरता या इतिहासाच्या अभिमानाचाच आधार शोधला हे मात्र विसरले जाते. तेव्हा कोणत्याही subjective statement ला "माझ्या मते" हे qualification असतेच. त्याच धर्तीवर तुमचे न्यूनगंडावरील वाक्य झाले. मी आधीच म्हटले आहे असेही ९९% वक्तव्य हे " असे मला वाटते" या प्रकारातच मोडले पाहिजे. बहुतेक सग्ळी मते ही subjective statement प्रकारात मोडतात आणि त्याला qualification असतेच. तसे ते अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना सुद्धा असते. पण त्यांना "Laws of Economics" म्हटले जाते. दैनंदिन जीवनात अश्या हजारो गोष्टी असतात. तिथे " असे मला वाटते" प्रत्येक वेळेस म्हणने मुर्खपणाचे ठरेल. म्हणजे एखाद्याने त्याच्या बायकोशी बोलताना असे म्हणायचे " माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मला वाटते. तुझेही माझ्यावर प्रेम असावे असे मला वाटते. तु ----- ची मुलगी आहेस असे मला वाटते" थोबाड रंगवुन घेण्याचा प्रकार झाला की हो हा. अर्थात हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेले डोळे झाकून स्विकारणाऱ्यांना असे काहीतरी लिहिलेलेच objective वाटत असल्यामुळे एवढा साधा फरकही तुम्हाला कळला नाही यात काहीही आश्चर्य करण्यासारखे नाही. हजारो वर्षांपुर्वी लिहिलेले आमच्या (आपल्या नाही हो म्हटलेले. राग नसावा) लोकांनी लिहिलेले आहे म्हणुन त्यावर डोळे झाकुन काट मारणार्‍या तुमच्यासारख्या लोकांना नीरक्षीरविवेकबुद्धी नसल्याने काय योग्य काय अयोग्य काय ग्राह्य काय अग्राह्य हे कळत नाही यात काहीही आश्चर्य करण्यासारखे नाही. हेच जर गोर्‍यांनी लिहिले असते तर तुम्ही त्यांच्या समृद्ध इतिहासाचे गोडवे गायले असते की हो. आता इतके लिहुन परत म्हणायचे मला काळा इंग्रज म्हणुन नका म्हणुन. अवघड आहे. माझ्या बेसिकमध्ये कसलाही गोंधळ नाही अर्रे बाबा तुच ओरडुन ओरडुन म्हणालास "मला कळत नाही". मग मी तरी काय करणार. तुला असे म्हणायचे आहे का की "गोंधळ नाही आहे कारण मुळात काहीच नाही आहे" (तसा गोंधळ माझ्यात आहे असे तुम्हा अभिमान्यांना वाटत असले तर मी योग्य मार्गावर आहे याचे सर्वात मोठे प्रशस्तीपत्रक आहे ते माझ्यासाठी). जमवा हो जमवा भरपुर प्रशस्तिपत्रके जमवा. बादवे " मार्ग योग्य आहे " असे वाटणे सब्जेक्टिव्ह असते का हो? आणि इतरांना माझ्यात वाटत असलेले "बेसिक गोंधळ" दूर करण्यापेक्षा इतर अनंत पटीने अधिक इंटरेस्टींग गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे आहेत आणि मी त्या करतोही. हॅ हॅ हॅ. दिसतेच आहे ते. अजिबात नाही.मला स्वत:ला मला काही न करता on platter मिळालेल्या एकाही गोष्टीचा अभिमान नाही तरीही कोणत्याही प्रेरणेत मी कमी आहे असे कोणी म्हणत असेल तर अशा गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष. बघा. तुम्ही नीट वाचत नाही हेच खरे. मी तुमचे उदाहरण आधीच मान्य केले होते की नाही. वाचा बर परत एकदा, वाचाल तर वाचाल. तुम्ही वाचण्यापेक्षा दुर्लक्षच जास्त करता ब्वॉ. त्यामुळेच नीट प्रतिवाद करु शकत नाही. बर ते आंबेडकर, मार्टिन क्युथर किंग वगैरेंचे काय करायचे? साध्या शब्दात म्हणायचे तर मुळातल्या अनाठायी अभिमानाचे समर्थन करण्यासाठी त्या अभिमान्यांनी "अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हे निखालस धाधांत खोटे वारंवार ठासून सांगितले आहे. "असे मला वाटत"" असे लिहायचे विसरलात का हो? मुळात माणूस गुहेतून बाहेर आला आणि शेती करायला लागला तेव्हा आपले पोट भरणे आणि सुरक्षितता या प्रेरणा त्याच्याकडे होत्याच की. तेव्हा कसला अभिमान होता त्याच्याकडे? त्यामुळेच तो गुहेत राहत होता. तो संभोगही करायचा. त्यासाठी त्याला प्रेरणा आणी अभिमानाची गरज नव्हती. तुम्हाला अभिमान कशासाठी वाटला पाहिजे ते एवढी डोकेफोड करुन कळत नसेल तर मी तरी काय करणार? तुम्हाला मुळात अभिमान म्हणजे काय तेच कळालेले नाही म्हणा. धर्म-जाती-परंपरा या सगळ्या नंतरच्या काळातला अर्थात गुहेतून बाहेर येताना माणसाला त्या गोष्टींचा "अभिमान" नव्हता. नव्हताच. त्याच गुहेतल्या माणसाने नंतर धर्म जात परंपरा शोधल्या, प्रगतीच्या टप्प्यावर. नाहितर तो गुहेतच होता की. असो धर्म, जात परंपराचा अभिमान त्या आहेत म्हणुन नाही आहे तर त्याय काहितरी चांगले आहे म्हणून त्यांचा अभिमान आहे. माझ्या धर्माचा अभिमान असणे म्हणजे इतर धर्मांचा (मानवधर्माचा सुद्धा) तिटकारा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मग अभिमान असल्याने काय बिघडले उलट ते प्रेरणा वगैरे ...... (त्याच त्याच गोष्टी लिहुन तुम्हाला येत नसेल हो पण मला कनै खुप कंटाळा येतो) तरीही माणसाने प्रगती केलीच ना? तेव्हा "मुळात अभिमान नसेल तर प्रेरणा मिळणार नाही" हा मुद्दा पूर्णपणे बाद. प्रगती करण्यापुर्वी तो एक समाज म्हणुन उदयाला आला हे तुम्ही विसरता आहात. EVOLUTION आणी GROWTH मधला फरक ओळखायला शिका. तुम्ही उदाहरणे EVOLUTION ची देता आहात कारण माणूस गुहेतुन बाहेर येउन जाळा पेटवायला लागला हे EVOLUTION झाले. त्याने वीज शोधली ही प्रगती झाली. तोपर्यंत मानवजाती बर्‍याच छोट्या मोठ्या समाजात विभागली गेली होती. आणि मग त्या वेगवेगळ्या समाजांची प्रगती वेगवेगळ्या टप्प्यत झाली जरी मानवजातीची उत्क्रांती साधारण एकाचवेळेस झाली असली तरीही. त्यामुळे तुमचाच मुद्दा पुर्णपणे बाद. आता अभिमान्यांना का एका इंग्रजाने म्हटलेल्या वाक्याचा आधार घ्यावा लागत आहे? अर्रे मित्रा. तु नीट वाचतोस का रे? वाचलेले तुला नीट कळते का रे? कळालेले तु नीट व्यक्त करु शकतोस का रे? मी असे कुठे म्हटले आहे की हे वाक्य एका इंग्रजाने म्हटले आहे म्हणुन? ते त्याच्या नावावर खपवले जाते बाळा. तो नाही म्हटलेला ते. हो. खरंच. बादवे हे वाक्य एका इंग्रजाचे असले असते तरी त्याने काही बिघडले असते असे मला वाटत नाही. आपल्या संस्कृतीचा आणी परंपरेचा अभिमान आहे म्हणजे दुसर्‍याच्या संस्कृतीचा आणी परंपरेचा आदर नाही असे कुठल्या मुर्खाने सांगितले तुम्हाला? की ही तुमचीच जाण / अक्कल / समज वगैरे? असे बघ. आम्ही जे जे उत्तम उदात्त असेल ते सगळे अंगिकारतो. तुम्हाला अजुन नीटसे कळालेले दिसत नाही आहे की आम्हाला आमच्या इतिहासाचा अभिमान आहे म्हणजे आम्ही अजुन रथातुन हिंडत नाही किंवा धनुष्यबाणाने युद्ध करण्याचा पुरस्कार करत नाही. तर आम्ही आधुनिकतेची कास धरतो. आज इंग्रज आपल्यापेक्षा वरचढ आहे हे जाणुन असतो. मुख्य मुद्दा हाच आहे की तो वेगळा आणी मी वेगळा हे माहिती असल्याने आम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रगती करण्यची इच्छा धरतो. आपल्या इतिहासाचा अभिमान असणे म्हणजे गोर्‍यांनी इतिहासात किंवा वर्तमानात माती खाल्ली असा समज करुन घेणे असे का वाटते तुम्हाला? चांगली गोष्ट फक्त इग्रजाकडुन आलेली आहे म्हणुन नाकारणारा असा कुठला आपल्या इतिहासाचा अभिमान असणारा माणूस भेटला आहे तुम्हाला? एकदा भेट घडवा. भर बाजारात पूजा बांधेन म्हणतो त्याची, (धर्म-जात आणि फालतूचे अभिमान याच्या अनंतपट पुढे निघून गेलेले) धर्म, जात आणि फालतूचे अभिमान याचा संसर्गदेखील न झालेला पण तरीही योग्य गोष्टींचा अभिमान बाळगावा याची जाण असणारा मृत्युंजय ************** मी बहुतेक सर्व संस्थळांवर एकाच नावाने वावरतो

In reply to by मृत्युन्जय

अर्धवटराव 18/05/2012 - 22:50
अहो अभिमानी... तुम्हाला मृत्युला जिंकल्याचा भलेहि अभिमान असेल, पण पाषाणावर डोके आपटुन पाषाण फोडण्याच्या पराक्रमाचा अभिमान आम्हि तुम्हाला बाळगु देणार नाहि हे पक्कं ध्यानात असु द्या. किती टेंगुळं आलित हो डोक्याला... काहि दवापाणि देऊ काय? अर्धवटराव

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

क्लिंटन 18/05/2012 - 18:39
वटवाघूळ/हत्ती/सिंह, तुमची मिपा प्रोफाईल बघितली. तुम्ही दोन वर्षांपासून मिसळपाववर आहात असे दिसते पण दोन वर्षे मिपावर असलेल्या इतर अनेकांपेक्षा तुमचे लेखन कमी आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा मिपावर जास्त लिहित नव्हता आणि आता लिहिणे सुरू केले आहे असे दिसते. मी मिपावर अगदी पहिल्या दिवसापासूनचा सदस्य आहे आणि माझ्या आलेल्या अनुभवातून एक अनाहूत सल्ला देतो. मला उलटे लटकवायचे असेल तर जरूर लटकावा. धर्म-अभिमान किंवा तत्सम विषय आले ना की दोन्ही बाजू एकमेकांना विरूध्द एक्सट्रीमचे असे लेबल देऊन मोकळे होतात. म्हणजे तुम्ही आपली जुन्यातली एखादी गोष्ट टाकाऊ आहे असे म्हणालात की संस्कृतीवादी लगेच "तुम्हाला आपले सगळे वाईट दिसते", "काळे इंग्रज" असे लेबल लावून मोकळे होतात. त्याचबरोबर जुन्याचा अभिमानाचा विषय आला की आधुनिकतावादी त्यांना पुराणात रमणारे इत्यादी लेबले लावून मोकळे होतात. या सगळ्यात कोणत्याच गोष्टीवर साधकबाधक चर्चा होऊ शकत नाही आणि चर्चा अधिकाधिक वैयक्तिक पातळीवर जाते. (जसे इथेही बघायला मिळत आहे). मी पण हा प्रकार अनेकदा बघून शेवटी I have learnt it hard way. आणि ते ही अगदी अलीकडच्या काळात (गेल्या महिन्यात) मला प्रकर्षाने समजले. त्यावरूनच हा अनाहूत सल्ला देतो. असे वाद घालून काहीही उपयोग नसतो.कारण दोन्ही बाजू आपले म्हणणे सोडत नाहीत. आणि एखाद्या बाजूला जरी दुसरी बाजू (अंशतः) पटली तरी त्यापूर्वी इतक्या हिरीरीने मांडलेली आपलीच बाजू नाकारायचे धैर्य बहुतेकांकडे नसते म्हणून दोन्ही बाजू आपल्याच मताचे अधिकाधिक जोराने समर्थन करू बघतात.मग चर्चा वैयक्तिक पातळीवर उतरायला वेळ लागत नाही आणि काही शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी "ग्रुप डिस्कशन" असते त्यात जो आरडा-ओरडा होतो तो इथे लिखित स्वरूपात होतो. बहुतेक वेळा कोणतीही एक बाजू १००% काळी किंवा १००% पांढरी नसते तर दोन्ही बाजूंमध्ये करड्याच्या छटा असतात. पण हे मान्य कोणी करत नाही किंवा वाढलेल्या टेंपरेचरमध्ये ते मान्य करू शकत नाही. या सगळ्यातून काही निष्पन्न होते का?ज्या पध्दतीने तुमची आणि मृत्युंजय यांचे वादविवाद चालू आहेत त्यावरून थोडी तरी कटूता राहणारच असे माझ्या बालबुध्दीला वाटते. मागच्या मिपा कट्ट्याला मी ठाण्याला गेलो होतो. तिथे वेगवेगळ्या आय्.डी घेऊन लिहिणारे मिपाकर प्रत्यक्ष भेटायला मिळाले. छान मजा आली. आता अशा एखाद्या कट्ट्यात अशा टेंपरेचर वाढलेल्या चर्चेतला प्रतिपक्षी सामोरा आला तर तुम्ही १००% मजा करू शकाल का? कुठेतरी मनाच्या कोपर्यात विचार येईलच ना-- "हाच तो लेकाचा माझ्याशी वाद घालणारा"!! तसा विचार नाही आला तर उत्तम पण तशी शक्यता अगदी ०% आहे हे तुम्हीही नाकारू शकणार नाही. तेव्हा वटवाघूळ/हत्ती/सिंह राव, जरा दमाने घ्या.तुमची मते ठाम आहेत असे दिसते ही चांगली गोष्ट आहे पण त्याच बरोबर अशी मते मांडून आपण इतर कोणाच्या वर्मी घाव घालत नाही ना (आणि त्या व्यक्तीला प्रत्युत्तर द्यायला भाग पाडत नाही ना) याचा पण विचार करा. हे सगळे मला स्वतःला अशा अनेक चर्चा/वादविवादांमध्ये अगदी हिरीरीने भाग घेतल्यानंतर समजले आहे.आता यापुढे तर मी कोणत्याही controversy वाल्या चर्चांपासून मला स्वतःला अगदी कटाक्षाने लांब ठेवणार आहे. बघा पटले तर. पुढील लेखनाला शुभेच्छा.

डॉक्टरसाहेब लेख आवडला. समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. अगदी खरंय.......!!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'अ' ने 'ब' ला जातीवरून एखादा हिणकस टोमणा मारला, की 'अ'ला "वा काय निबर हाणलाय!" अशी शाबासकी देणे म्हणजे 'समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची व्यापक प्रमाणावर चर्चा चालू होणे' होय. छान आहे बॉ व्याख्या. एकदम आवडेश.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट 18/05/2012 - 13:23
तुला आधुनिकतेचे वारे अजून लागलेले नाहीत परा.... अर्थात हाच परा आणि प्रा यांतला फरक असतो.. जरी प आणि र हे अक्षर समान असले तरी :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 18/05/2012 - 14:14
तु तुझी फ्रेम बरीच मोठी करण्याची आवश्यकता आहे परा. तुझी मी पणाची किंवा आपलेपणाची भावना अजुनही " जाती " वर येउन थांबते आहे त्यामुळे असे होते आहे. फ्रेम मोठी करा असे सुचवतो

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 18/05/2012 - 15:11
पडदाच हलवा. त्याच्याजागी मोठी फ्रेम लावा. पडद्यामागून सूत्रे हलवण्यासाठी तुमच्याकडे डु आयडी आहेत काय? असतील तर पुढचे नियम तर तुम्ही कोळून प्यायलाच आहात. पण सावधान प्रत्येकवेळेस वेगळ्या "फ्रेममधुन" घुसत जा.

यकु 18/05/2012 - 17:39
विकास, तुमच्या सविस्तर निरुपणाबद्दल;-) धन्यवाद :) वर दिलेल्या प्रतिसादातून मला वेगळाच प्रतिवाद अपेक्षित होता. तो झालेला नाही म्हणून ‍मी तिकडे शिरत नाही. रामदासांनी साडेतीन चारशे वर्षांपूर्वी (नक्की माहित नाही) भले काहीही सांगितलं असेल, लोकांना त्याचा आधार घेऊन 'दुसर्‍या' कुणालातरी मूर्ख ठरविण्‍याचा भलता किडा असतो - दुसर्‍या कुणाला तरी हे महत्त्वाचं. रामदास वाचणार्‍या किती लोकांना मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:च मूर्खपणा समजलाय? शक्यच नाही, ती सगळी मूर्खलक्षणे नेहमीच 'दुसर्‍या कुणालातरी' लागू होतात. रामदासांनी लिहिलेलं मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:चा मूर्खपणा समजलेल्या कुणाचाही स्वानुभव ऐकायला आवडेल, अगदी राजघराणं यांचाही किंवा विकास यांचाही ;-) ह. घ्‍या. आपली काही जानी दुष्‍मनी नाही, so no offences, any type of score settling intended ;-) राजघराणं यांनी ओवीचा आधार घेऊन लिहिलेला लेख आणि तुम्ही वर || एका अर्थी मानवी विचार आणि त्याने प्रभावीत होणारे आचार या संदर्भातला हा एक संदर्भग्रंथ आहे || म्हटलेलं आहे त्याअर्थी त्या ग्रंथाचा कदाचित राजघराणं आणि तुम्ही सांगोपांग अभ्यास केलेला असेल, म्हणून मी दोघांचाही स्वानुभव विचारण्‍याचं धाष्‍टर्य करतोय, मूर्खनाम लक्षणचाच असायला पाहिजे असं काही नाही, रामदासांनी केलेल्या उपदेशाच्या आधारावर कुणाही वाचणार्‍याला झालेला स्वत:च्या जीवनाच्या कुठल्याही अंगातला कुठलाही स्वानुभव चालू शकेल. #I guarantee you, you wouldn't have anything to tell from your personal experience based on दासबोध. Even if you tell something putting some things from here & some things from there, that is not going to touch your personal & practical life, that much I guarantee. मी एवढ्‍या आत्मविश्‍वासानं हे का सांगू शकतोय? तर मूळातच 'दासबोध' या ग्रंथाची उपयुक्तता फक्त 'कोट' करण्‍यापुरती आहे - #because दासबोध doesn't deal with fundamental problem of creation & operation of THOUGHT in our life. So anyone reading दासबोध will only be able in giving continuity to the same age old THOUGHT originated in the head of रामदास sitting in the cave of शिवथरघळ ! #Yes, thought can travel from an age to another age - because all the living organisims (including that of राजघराणं & विकास & यकु & all others who read, listen etc) are unfortunately capable for only such a thing. त्यामुळे विकास यांनी 'मानवी विचार आणि त्याने प्रभावित होणारे आचार या संदर्भातला हा संदर्भग्रंथ आहे' म्हटलेलं आहे त्यावर पुन्हा एकवार विचार करुन पहावा. मानवी विचार आणि त्याने प्रभावित होणारे आचार असं म्हणण्‍यातून विकास यांना 'पिढ्यान पिढ्‍यांपासूनच्या विचारांचे सातत्य' हे अपेक्षित आहे की नाही हे मला माहीत नाही - वास्तवात मात्र सुस्पष्‍टपणे पिढ्यान पिढ्‍यांचा विचार आणि त्याने प्रभावित झालेला आचारच चालत आलेला दिसतो की नाही? उदाहरणार्थ शहाणपणा नावाचं जे काही असेल ते आणि मूर्खपणा नावाचं जे काही असेल ते कुणी आईच्या पोटातून सोबत घेऊन येत नाही. हे अमकं म्हणजे शहाणपणा, ते तमकं म्हणजे मूर्खपणा, ते तमकं म्हणजे अक्कल हुशारी, याला हे म्हणतात - त्याला ते म्हणतात हे सगळं आय‍डेंटिफिकेशन कोण देतं? आणि हे असं कसल्याही प्रकारचं आयडेंटिफिकेशनच नसेल तर? त्या अस्तित्वात आलेल्या human organism चं free from any type of identifications जगणं कसं असेल हे पहायचं असेल तर युजी कृष्‍णमूर्ती हे एक उत्तम उदाहरण आहे. कारण त्यांनी या सगळ्या गोष्‍टी कुठलाही पंथ, धर्म किंवा विचारसरणीला जन्म न घालता या सगळ्या गोष्‍टींची चर्चा purely physical & psychological functions of an identificationless body च्या functions च्या आधारावर न थकता केली आहे. राजघराणं यांनी वर लिहिलेल्या लेखात || हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते || वगैरे म्हटलं असलं तरी 'ज्ञान' या शब्दाचा 'चांगले विचार, कृत्यांची बरी/वाईट अशी पारख' या अगदी रुढ अर्थानं केलेला वापरच त्यातून दिसून येतो. खरोखर 'ज्ञान' नावाचं खरोखर जे काही असेल ते फक्त 'विचारांच्या मृत कक्षेत' राहू शकत नाही, #if really is there any wisdom in whatever holy scripture you may wish to quote, that invariably needs to go in practically in your marrow of bone & each & every cell in your physical existance. खरोखर ते जर ज्ञान असेल, तर that will blast inside of your living organism & you will know the real thing, until then you go on giving continuity only to all types of THOUGHTS & will try to prove anybody & everybody a fool, a wise man & all the types of identifications so on, but you will not be able to live through the real thing. जर खरोखर 'ज्ञान' नावाचं जे काही असेल ते पिढ्‍यान पिढ्‍यांपासून चालत आलं असतं तर ते फक्त 'सांगे वडीलांची किर्ती तो येक मूर्ख' या रामदासांच्या वचनाच्या आधारावर दुसर्‍या कुणालाही मूर्ख किंवा आणखी कसलाच ठरविण्‍यासाठी वापरलं गेलं नसतं, त्या ज्ञानाचा (ते जर खरोखर ज्ञान असतं तर) आधी कोट करणार्‍याच्या मेंदुत, शरीराच्या प्रत्येक पेशीत स्फोट झाला असता, #so whatever discussion there is in the article above, that is only a continuity of thought, that is not ज्ञान! मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, ज्ञान चालत येत नाही - ज्ञान असेल तर ते ज्याला झालं असेल त्याची पुढची पिढीनिर्मितीची संभाव्यता खलास करतं. त्यामुळं भगवान बुद्धाला तो बुद्ध होण्यापूर्वीचा राहुल हा मुलगा असू शकतो, बुद्ध झाल्यानंतर ते आणखी कोणा पिढी पुढे चालवणार्‍याला जन्म देऊ शकत नाहीत, ना महावीरांना ते तीर्थंकर झाल्यानंतर वंश चालवता येऊ शकतो - तथाकथित धर्म मात्र चालवता येऊ शकतात, धर्मांना जन्म देता येऊ शकतो, रामदास 'रामदासी' या पंथाला जन्म देऊ शकतात - कारण ते 'विचारांच्या माध्‍यमातून' आपल्यापर्यंत येतात आणि 'ज्ञानप्राप्तीच्या' दिशेने जाण्‍याचा प्रयत्न करतात. # मराठीत लिहित असताना मध्‍येच इंग्रजी वाक्ये का? तर ती का आली आहेत मला पण माहित नाही, मुद्दाम ठरवून लिहिलेली नाहीत एवढं नक्की I can't help.. ती जर आली आहेत तशीच लिहिली नाहीत तर मी प्रतिसादच देऊ शकत नाही. May be trails & traces of THOUGHTS when I tried to understand functional UG through my thinking machine. ;-)

In reply to by यकु

मन१ 18/05/2012 - 18:15
इंग्लिश वाक्ये रोमन लिपी(का इंग्लिश तिच्यायला?) मधून व मराठी वाक्ये देवनागरीतून लिहिल्याबद्दल यक्कुचे जाहिर आभार. तुला शत शत वेळेस thanks. तू जे काही express करायचा प्रयत्न करतोयस ते as always नीटसे समजले नाही, पण तुझा attempt सुरु ठेव.

In reply to by यकु

स्वानन्द 18/05/2012 - 18:41
>>ञान! मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, ज्ञान चालत येत नाही - ज्ञान असेल तर ते ज्याला झालं असेल त्याची पुढची पिढीनिर्मितीची संभाव्यता खलास करतं. हा तुझा स्वानुभव आहे का?

In reply to by स्वानन्द

यकु 18/05/2012 - 19:38
>>हा तुझा स्वानुभव आहे का? --- कगार पर हूं ;-) अनुभव पूर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाहीय.. सकाळी उठलं की ऑफिस ;-)

In reply to by यकु

स्वानन्द 18/05/2012 - 22:40
:P पण मग तू पुढची पिढी निर्माण करू शकणार नाहीस ( ट्राय करून सुद्धा )हे एवढ्यातच कसं कळलं तुला? अनुभवाशिवायच असं विधान कसं काय केलं आहेस?

In reply to by स्वानन्द

यकु 18/05/2012 - 23:02
>>पण मग तू पुढची पिढी निर्माण करू शकणार नाहीस ( ट्राय करून सुद्धा )हे एवढ्यातच कसं कळलं तुला? अनुभवाशिवायच असं विधान कसं काय केलं आहेस? ---- आधीच्यांच्या झालेल्या नाहीत त्यावरुन ;-) आत्ता पिढी निर्माण होऊच शकते की ;-) आमची एक बायॉलॉजीमध्‍ये M.Tech केलेली मैत्रिण 'तु तुझे हार्मोन वाया घालवतो आहेस' असं नेहमी म्हणत रहाते - म्हटलं बाई, ती हार्मोन जिथं जायची तिथं गेल्यानंतर काय तयार होतं आणि किती लफडी मागे लागतात हे म‍ाहितीय ना? ;-) पुढचे तमाशे होण्यापेक्षा ती हार्मोन वाया गेलेलीच बरी ;-) माझी हार्मोन वाया जाण्‍याबद्दल फारच वाईट वाटत असेल तुला खोली नंबर चारसो बीस उघडीच असते, आ जाओ ;-)

In reply to by यकु

विकास 18/05/2012 - 19:59
त्या ग्रंथाचा कदाचित राजघराणं आणि तुम्ही सांगोपांग अभ्यास केलेला असेल म्हणजे? अभ्यास न करताच एखाद्या ग्रंथाला, व्यक्तीला नावे ठेवायची असतात असे म्हणायचे आहे का? रामदासांनी साडेतीन चारशे वर्षांपूर्वी (नक्की माहित नाही) भले काहीही सांगितलं असेल, लोकांना त्याचा आधार घेऊन 'दुसर्‍या' कुणालातरी मूर्ख ठरविण्‍याचा भलता किडा असतो - दुसर्‍या कुणाला तरी हे महत्त्वाचं. एखादे वाक्य जेंव्हा चपखल वाटते तेंव्हा वापरले जाते. अगदी राजघराणं यांचाही किंवा विकास यांचाही ;) ह. घ्‍या. आपली काही जानी दुष्‍मनी नाही, गैरसमज नाही आणि जानी अथवा किरकोळ देखील दुष्मनी नाही. :-) तरी देखील आता या संदर्भात माझ्या या परत परत त्याच / तत्सम विषयांवरच्या त्याच अर्थाच्या प्रतिसादांचा विचार करताना येथे वापरले जाणारे एक कोटेशन आठवले:
Insanity is repeating the same mistakes* and expecting different results.
;) (* येथे mistake म्हणजे परत परत समजावण्याची चूक इतकाच घ्यावात. विचारात mistake असा घेऊ नये. ;) ) आता हे वाक्य काही रामदासांचे नाही तरी देखील वापरले जाते. त्याचा मूलस्त्रोत नक्की माहीत नाही तरी देखील ते बेन फ्रँकलीन ते आईन्स्टाईनचा संदर्भ देऊन वापरले जाते! अगदी क्लिंटनने देखील त्याचा उपयोग त्याच्या पहील्या निवडणूकीत बूश आणि रिपब्लीकन विरोधात केला होता. त्याचे दुसरे असेच मूर्ख संबोधणारे विधान, जे देखील अनेकदा वापरताना पाहीले आहे ते, "it's economy stupid"! थोडक्यात ह्याचा रामदास हे संत, साधू वगैरे होते ह्याच्याशी संबंध नसून त्या चपखल वाक्याशी आहे. आता असेच तुकारामाच्या, "तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा" ह्या ओळींचा उपयोग केला जातो... गुगलले तर समजेल की हे वाक्य त्या अर्थाने "सांगे वडीलांची किर्ती" पेक्षा अधिक वापरले गेले आहे... मग काय तुकारामाच्या गाथेची उपयुक्तता पण आपण चघळायची का? रामदासांनी केलेल्या उपदेशाच्या आधारावर कुणाही वाचणार्‍याला झालेला स्वत:च्या जीवनाच्या कुठल्याही अंगातला कुठलाही स्वानुभव चालू शकेल. सर्वप्रथम रामदासांचे साहीत्य झाले अथवा गीता झाली अथवा इतर तसे अनेक भारतीय प्राचीन/हिंदू साहीत्य झाले (तुर्तास रामदासांवरच बोलूया अवांतर नको) - त्यात नीट वाचल्यास उपदेशाऐवजी निरीक्षणे दिसतील - शास्त्रीय भाषेत बोलायचे तर प्रॉपर्टीज आणि त्यांचे इफेक्ट्स... तसे करण्यात आणि ते देखील सोप्या भाषेत, रामदास आणि तुकाराम हे अग्रेसर आहेत असे वाटते. विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥ बरें शोधिल्यावीण बोलों नको हो । जनीं चालणें शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥ जयाचेनी संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे ॥ तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीनें मती राम सोडी (आता यात "राम" शब्द आला म्हणून लगेच "राम राम" म्हणू नका ;) ) सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं ॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ हे आणि असे अनेक सांगता येईल. म्हणले तर नुसतेच "कोट्स" आणि म्हणले तर मार्गदर्शक... माझ्या आधीच्या/चर्चेस दिलेल्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे केवळ रामदासांचेच नाही तर अनेकांचे विचार हे कधी कधी मार्गदर्शक/समुपदेशक ठरू शकतात. एखाद्याला ठरतील. आता तुम्हाला युजींचे विचार भावतात मला इतर अनेकांचे... फक्त एकाचेच नाही कारण बालकवींनी म्हणल्याप्रमाणे, "सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे" असे मला आवडते. असो. तर मूळातच 'दासबोध' या ग्रंथाची उपयुक्तता फक्त 'कोट' करण्‍यापुरती आहे इतर कोणी त्या व्यतिरीक्त उपयुक्तता आहे असे येथे अथवा इतरत्र म्हणलेले दिसले आहे का ? नसल्यास हा विषयच का आला? त्याच बरोबर कोट काय केले जाते तर जे कधी कधी पटू शकते ते आणि त्यामुळे कधी कधी त्यातून काहीतरी सुचू देखील शकते, पटकन समजू शकते, मार्ग दिसू शकतो ते... ते अगदी काही रामदासांचेच असते असे नाही तर तुकाराम असतील, ज्ञानेश्वरादी संत असतील, बहीणाबाई असतील अथवा जगातल्या कुठल्याही भाषेतील विचारवंत असतील...आता काय या सगळ्यांच्या लेखनाचे/विचाराचे valuation करणार का? जर खरोखर 'ज्ञान' नावाचं जे काही असेल ते पिढ्‍यान पिढ्‍यांपासून चालत आलं असतं तर ते फक्त 'सांगे वडीलांची किर्ती तो येक मूर्ख' या रामदासांच्या वचनाच्या आधारावर दुसर्‍या कुणालाही मूर्ख किंवा आणखी कसलाच ठरविण्‍यासाठी वापरलं गेलं नसतं, म्हणूनच जे केवळ (कुठल्याही) ग्रंथातील एकाच वाक्याला चिकटून बसले असतील त्यांना रामदासांनी त्याच समासात, ""समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥" असे म्हणले आहे. :-) कारण याच दासबोधात सछिष्य लक्षणे आहेत, सात्विकाची, राजसीकाची, लक्षणे आहेत, स्वगुणपरीक्षा आहे वगैरे वगैरे.. रामदास 'रामदासी' या पंथाला जन्म देऊ शकतात - कारण ते 'विचारांच्या माध्‍यमातून' आपल्यापर्यंत येतात आणि 'ज्ञानप्राप्तीच्या' दिशेने जाण्‍याचा प्रयत्न करतात. हे वाक्य डोक्यावरून गेले... :( नक्की तुम्ही बाजूनी बोलत आहात का विरुद्ध हेच समजले नाही त्यामुळे कुठूनही बोललो तरी बोंब! ;) तरी देखील एक टिपण्णी: (इतिहास-निरीक्षण म्हणून, बचाव/टिका म्हणून नाही) रामदासांनी रामदासी संप्रदाय म्हणून तयार केला का ह्याबद्दल मला जरा डाऊट आहे. नक्की माहीत नाही. आणि तसा तो त्यांनी अथवा त्यांच्या शिष्यगणांनी त्यांच्या पश्चात तयार केला असला तरी तो चांगल्या-वाईट कुठल्याच अर्थाने प्रभावी ठरला असे वाटत नाही. असो.

In reply to by विकास

यकु 18/05/2012 - 20:24
मी फक्त 'विचार' आणि 'ज्ञान' यांचं पुढील पिढीकडे चालत येणं याबद्दल वर दिलेल्या प्रतिसादात उहापोह केला आहे - Whatever I have said that operates practically in my life & no need to say, in human organism sitting here which is responding. So what I see from your reply above is only bundles of thoughts & honestly I do not see myself in position to tell you about how you are expressing, what is really behind those various expressions of thoughts. :) Even if I go expounding on queries raised, more queries will be raised because what I basically see there is CONTINUITY OF THOUGHT, no matter whose those thoughts are. :) So I withdraw myself.

In reply to by यकु

अर्धवटराव 18/05/2012 - 20:57
यक्कु यक्कु.... अरे मित्रा काहि कळेल असं टंक ना रे... थांब आता... हा संपूर्ण वीकएण्ड तुझ्या वरच्या प्रतिक्रियेला समर्पीत करुन एक फर्रास "विचार" मांडतो.. अर्धवटराव

In reply to by यकु

अर्धवटराव 18/05/2012 - 21:37
>>रामदासांनी साडेतीन चारशे वर्षांपूर्वी (नक्की माहित नाही) भले काहीही सांगितलं असेल, लोकांना त्याचा आधार घेऊन 'दुसर्‍या' कुणालातरी मूर्ख ठरविण्‍याचा भलता किडा असतो - दुसर्‍या कुणाला तरी हे महत्त्वाचं. रामदास वाचणार्‍या किती लोकांना मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:च मूर्खपणा समजलाय? शक्यच नाही, -- यक्कु, तुमचं चुक्याच. आम्हाला तर दासबोधातील मुर्खलक्षणं वाचुन आमच्या अर्धवटपणाची अत्यंत प्रकर्षाने जाणिव झालि. मग त्यावर आम्हि भरपुर विचार केला. शेवटी "अर्धवटराव" अशी सार्थ उपाधी धारण करुन मिपावर अवतरलो. त्यानंतर बरेच लोकं या आयडीची उसनवारी मागु लागले... पण आम्हि ताकास तुर लागु दिला नाहि. अर्धवटराव

In reply to by यकु

अर्धवटराव 18/05/2012 - 22:46
यक्कु... दिसामाजी काहितरी लिहीत जावे ( समर्थांनीच म्हटलय बहुतेक ;) ) म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच !!! >>रामदासांनी लिहिलेलं मूर्खनाम लक्षण वाचून स्वत:चा मूर्खपणा समजलेल्या कुणाचाही स्वानुभव ऐकायला आवडेल -- स्वानुभव भरपुर आहेत रे मित्रा.. पण नको त्याची आठवण आता. असो. >>तर मूळातच 'दासबोध' या ग्रंथाची उपयुक्तता फक्त 'कोट' करण्‍यापुरती आहे - -- मला नाहि वाटत. आपल्या मनाच्या अगदी तळापर्यंत मुरलेल्या, काहि उमगणार्‍या आणि बर्‍याचश्या न उमगणार्‍या भावना-विचारांचा कोलाहल आपले सध्याचे वर्तन घडवत असतो. या कोलाहलातुन वाट काढायची जेंव्हा इच्छा होते तेंव्हा त्यातला प्रत्येक स्वर स्वच्छ्पणे ऐकुन घेउन त्याचे समाधान करावे लागते. अश्यावेळी दासबोधासारखे एंप्लीफाईंग मशीन आपल्याला मदत करते >>#because दासबोध doesn't deal with fundamental problem of creation & operation of THOUGHT in our life. -- इट डज. इफ यु फाईंड दॅट आफ्टर स्टडींग दासबोध युर थॉट्स हॅव्ह चेंज्ड देन इट हॅज डन इट्स जॉब वेल्ल. विचारांचे परिवर्तन, सुस्पष्टता हि विचार प्रक्रियेच्या मुळावर आणि अंगावर काम केल्याशिवाय येऊ शकत नाहि. >> So anyone reading दासबोध will only be able in giving continuity to the same age old THOUGHT originated in the head of रामदास sitting in the cave of शिवथरघळ ! -- दासबोध रचण्याचा हा उद्देश मात्र नव्हता . समर्थांना आपले विचार पुढे चालवायला फक्त एक संदर्भग्रंथ निर्माण करायचा म्हणुन नव्हता... तर मनुष्यमात्राने आपले प्रोब्लेम अगदी मुळापासुन सोडवायला काहि मदत झाली तर बरं या उद्देशाने दासबोध रचण्यात आला. >>#Yes, thought can travel from an age to another age - because all the living organisims (including that of राजघराणं & विकास & यकु & all others who read, listen etc) are unfortunately capable for only such a thing. -- विचारांना पाय नसतात. माणुस नावाचा जो काहि हाडामासाचा लगदा आहे तो पिढ्यानपिढ्या सतत बदलत जरी असला तरी त्याला शरिरामार्फत येणारे अनुभव बर्‍यापैकी सारखे असतात. माझ्या आजोबांनी साखर खाल्ली, त्यांना ति गोड लागली. त्यांनी माझ्या वडीलांना साखर खाउ घातली, त्यांनाहि गोड लगली. मग मी खाल्ली.. माझाही अनुभव वेगळा नाहि. अश्याप्रकारे "साखर गोड असते" या विचाराचा प्रवास झाला. जर ज्यु. अर्धवटरावांच्या जिभेला काहि प्रोब्लेम झाला आणि त्यांची चव ओळखण्याची क्षमता रुद्ध झाली तर हा विचार माझ्या पिढीवर येऊन संपला. आता प्रत्येकाची गोड चवीची परिभाषा सारखीच असते काय हा मुद्दा निराळा. >>जर खरोखर 'ज्ञान' नावाचं जे काही असेल ते पिढ्‍यान पिढ्‍यांपासून चालत आलं असतं तर ते फक्त 'सांगे वडीलांची किर्ती तो येक मूर्ख' या रामदासांच्या वचनाच्या आधारावर दुसर्‍या कुणालाही मूर्ख किंवा आणखी कसलाच ठरविण्‍यासाठी वापरलं गेलं नसतं, त्या ज्ञानाचा (ते जर खरोखर ज्ञान असतं तर) आधी कोट करणार्‍याच्या मेंदुत, शरीराच्या प्रत्येक पेशीत स्फोट झाला असता, #so whatever discussion there is in the article above, that is only a continuity of thought, that is not ज्ञान! -- आपल्याला आलेल्या प्रत्येक अनुभवाचं, विचाराचं अल्टीमेट स्वरुप म्हणजे पेशींमध्ये झालेला स्फोटच आहे. त्या स्फोटात किती क्षमतेचा दारुगोळा भरला आहे त्यावरुन पेशींचं डॅमेजींग अवलंबुन आहे. तो "युरेका युरेका" ओरडत नागवा धावत जाणारा वै़ज्ञानीक कोण हो तो... त्याला त्यावेळी जे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्याच्या मेंदुंच्या पेशींत जे विस्फोट झाले त्यामुळेच तो त्या वेळेपुरते सामाजीक सभ्यतेचे नियम विसरु शकला. >> मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, -- होय. त्या विचारांचा उद्देशच तसलं आयडेंटीफिकेशन देणं आहे. जर संदर्भ बदलले तर ते विचार देखील बदलतील. >>ज्ञान चालत येत नाही - -- येप्स. १०० % अ‍ॅग्री. >>ज्ञान असेल तर ते ज्याला झालं असेल त्याची पुढची पिढीनिर्मितीची संभाव्यता खलास करतं. त्यामुळं भगवान बुद्धाला तो बुद्ध होण्यापूर्वीचा राहुल हा मुलगा असू शकतो, बुद्ध झाल्यानंतर ते आणखी कोणा पिढी पुढे चालवणार्‍याला जन्म देऊ शकत नाहीत, ना महावीरांना ते तीर्थंकर झाल्यानंतर वंश चालवता येऊ शकतो --म्हणजे जननक्षमताच नष्ट होते असं म्हणताय कि काय ?? त्यामागचा कार्यकारण भाव काय असावा?? >>रामदास 'रामदासी' या पंथाला जन्म देऊ शकतात - कारण ते 'विचारांच्या माध्‍यमातून' आपल्यापर्यंत येतात आणि 'ज्ञानप्राप्तीच्या' दिशेने जाण्‍याचा प्रयत्न करतात. -- रामदासी पंथावरचं आजपर्यंतच मी वाचलेलं सर्वात सुंदर भाष्य. ( पण तुला हेच अभिप्रेत होतं काय रे यक्कु?? )

In reply to by अर्धवटराव

यकु 18/05/2012 - 23:38
>>स्वानुभव भरपुर आहेत रे मित्रा.. पण नको त्याची आठवण आता. असो. -- हॅहॅहॅ. असो. :) >>अश्यावेळी दासबोधासारखे एंप्लीफाईंग मशीन आपल्याला मदत करते -- मे बी ;-) रामदास आणि कंपनीची प्रॉडक्ट कधी त्यातून फार सखोल अनुभव घ्‍यायचा म्हणून वापरुन पाहिली नाहीत ;-) युजी आणि कंपनीवर आमचा ज्यादा विश्वास हो ;-) >>इट डज. इफ यु फाईंड दॅट आफ्टर स्टडींग दासबोध युर थॉट्स हॅव्ह चेंज्ड देन इट हॅज डन इट्स जॉब वेल्ल. विचारांचे परिवर्तन, सुस्पष्टता हि विचार प्रक्रियेच्या मुळावर आणि अंगावर काम केल्याशिवाय येऊ शकत नाहि. -- परिवर्तन, सुस्पष्‍टता वगैरे येत असेल पण, तेवढ्‍यानं काही होत नाही ना - even if, as you say, we may achieve transformed thoughts or thoughts with clarity, still we are driven by thought itself - atleast until now that has remained a moving force & I know how bad it is :p >>तर मनुष्यमात्राने आपले प्रोब्लेम अगदी मुळापासुन सोडवायला काहि मदत झाली तर बरं या उद्देशाने दासबोध रचण्यात आला. --- याबद्दल दासबोधाला सादर वंदनच :) >>आपल्याला आलेल्या प्रत्येक अनुभवाचं, विचाराचं अल्टीमेट स्वरुप म्हणजे पेशींमध्ये झालेला स्फोटच आहे. त्या स्फोटात किती क्षमतेचा दारुगोळा भरला आहे त्यावरुन पेशींचं डॅमेजींग अवलंबुन आहे. तो "युरेका युरेका" ओरडत नागवा धावत जाणारा वै़ज्ञानीक कोण हो तो... त्याला त्यावेळी जे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्याच्या मेंदुंच्या पेशींत जे विस्फोट झाले त्यामुळेच तो त्या वेळेपुरते सामाजीक सभ्यतेचे नियम विसरु शकला. --- आय डिफर :) >> मूर्खपणा, शहाणपणा अमकं ढमकं असलं आयडेंटीफिकेशन विचारांच्या माध्‍यमातून पिढ्‍यान पिढ्यांपर्यंत चालत येतं, -- होय. त्या विचारांचा उद्देशच तसलं आयडेंटीफिकेशन देणं आहे. जर संदर्भ बदलले तर ते विचार देखील बदलतील. --- रामदासांचे विचार टार्गेट करण्‍याचा हेतु नाहीच, :) आयडेंटीफिकेशन आपल्यात आत्ता आहे, हे आयडेंटीफिकेशन ज्यांच्यात राहिलेलं नाही ते म्हणतात सगळ्या गोष्‍टींचं आयडेंटिफिकेशन नष्‍ट झालं की तुमची सगळी फ्रंटीयर्स मोडून पडतील - विचारांचा प्रश्‍न नाहीच. >>येप्स. १०० % अ‍ॅग्री. --- पार्टी ! ;-) >>म्हणजे जननक्षमताच नष्ट होते असं म्हणताय कि काय ?? त्यामागचा कार्यकारण भाव काय असावा?? --- हो, ज्यांनी पूर्ण अनुभव घेतलाय त्यांच्याबद्दल तसं ऐकून आहे. कार्यकारण भाव हाच की सगळ्या प्रकारचं आयडेंटीफिकेशन नष्‍ट होतं. विचारांचं बिल्‍ड अप होऊ शकत नाही, त्यामुळं समोर बाई आहे की पुरुष आहे हेच समजू शकत नाही. अर्थातच सेक्स ग्लँड्स कार्यरत असतात, पण त्यांतून स्रवणार्‍या सामग्रीला बाहेर पडून कुणात तरी शिरण्‍याची ओढ नसते, सेक्स ग्लँडसमुळे तयार होणारी ड्राइव्ह मेंदुत प्रवेशते असं ऐकून आहे - similar explaination as described in age old Yogic literature, but don't know anything practically. >>>रामदासी पंथावरचं आजपर्यंतच मी वाचलेलं सर्वात सुंदर भाष्य. ( पण तुला हेच अभिप्रेत होतं काय रे यक्कु?? ) -- नाही, भाष्‍य करणं अपेक्षित नव्हंत, आशयाच्या ओघात आलेलं फक्त एक विधान. :)

In reply to by यकु

अर्धवटराव 19/05/2012 - 05:30
>>युजी आणि कंपनीवर आमचा ज्यादा विश्वास हो -- मज्जा :) >> परिवर्तन, सुस्पष्‍टता वगैरे येत असेल पण, तेवढ्‍यानं काही होत नाही ना - even if, as you say, we may achieve transformed thoughts or thoughts with clarity, still we are driven by thought itself - atleast until now that has remained a moving force & I know how bad it is -- आय थिंक आय नो व्हॉट यु आर सेईंग. पण आम्हि सध्या विचारांच्या आवर्तनातच स्वतःला सुरक्षीत समजतोय. त्यापलिकडचा काहि "विचार" येत नाहि :) >>......वै़ज्ञानीक कोण हो तो... त्याला त्यावेळी जे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्याच्या मेंदुंच्या पेशींत जे विस्फोट झाले त्यामुळेच तो त्या वेळेपुरते सामाजीक सभ्यतेचे नियम विसरु शकला. >>>>>आय डिफर -- ह्म्म्म. मग मला तुम्ही काय म्हणताय हे काहिच कळलं नाहि :) >>--- पार्टी ! -- एनी टाईम रेडी :) >>...सेक्स ग्लँडसमुळे तयार होणारी ड्राइव्ह मेंदुत प्रवेशते -- गो* कपळात जाणे म्हणजे हेच असावे काय ?? ;) >>नाही, भाष्‍य करणं अपेक्षित नव्हंत, आशयाच्या ओघात आलेलं फक्त एक विधान. -- म्हणजे अजुन तरी तुझ्यात विस्फोट वगैरे झालेले दिसत नाहित ;) एकदा भेट बाबा त्यापुर्वी. अर्धवटराव

राजघराणं 19/05/2012 - 01:49
धागा हिट. लेख तसा अंमळ सामान्य (फालतूच) होता. तरिही हिट ! अहो आश्चर्यम. यक्कू तेरे साथ बैठना पडेंगा.... सेक्स ग्लेंड काय... पेशितले प्रस्फोट काय ..... कै च्या कै ... पार्टी .. मेरे तरफसे
लेखनविषय:
लेखनप्रकार
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ.

|| चिरन्जीवी परशुराम ||

मृगनयनी ·

राजघराणं 14/05/2012 - 15:41
कामधेनूने ते बन्धन एका क्षणार्धात सोडून जमीनीवर जोराने पाय आपटले. व क्षणार्धात तेथे हजारो गाई उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी शिन्गे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्यास ठार मारले. व कामधेनू पुनश्च जमदग्निंच्या जवळ येऊन उभी राहिली. :) सैनीक सातसो और गायी हजारो बहुत नाइन्साफी है ! बाकी तापट जमदग्नी आणी युधखोर परशूरामाकडे असलेल्या गायीने मालकांचे गुण घेतले काय ?

In reply to by पियुशा

ह्या इतिहासापासुन अनभिज्ञ असतील बरेच ,माझ्यासारखे
इतिहास ??? तुमच्या शाळेचे नाव सांगाच हो एकदा !!!!!!! :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पियुशा 15/05/2012 - 10:57
वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन बॉस्को स्कुल :) ह्या इतिहासापासुन म्हणजे परशुरामाच्या इतिहासापासुन म्हणतेय मी निट वाचा जरा ;)

In reply to by पियुशा

प्यारे१ 15/05/2012 - 11:08
@ वि.मे. कुठं डोकं फोडतोय बे?????? डान बास को हाय ते! जान दे ना! ;) इतिहास काय पुराण काय? कि फर्क पैन्दा? काल झालेलं ते पण इतिहासच असतंय आणि रामाच्या खापरपणजोबांचं पण इतिहासच!

In reply to by पियुशा

वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन बॉस्को स्कुल
अरे व्वा !!! डॉन बॉस्को का !!!! मग तुम्ही बोलता ते बरोबरच असणार की. चुकलेच माझे. इतिहासच असणार ते. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पियुशा 15/05/2012 - 14:54
@ वि.मे. पुराण अन इतिहास हा फरक मला कळला नाही .ही माझी चुक :( माझ्या शाळेचा काय दोष ? उगा शाळेला नाव ठॅवायच कारण नाय !!!

JAGOMOHANPYARE 14/05/2012 - 15:57
पोटातील अमृत ... रावणाच्या कथेतही असेच आहे.. राम रावणाचे मुंडके तोडतो, पण ते पुन्हा उगवते.. बिभीषण रामाला रावण्च्या पोटात अमृत असल्याचे सांगून आधी तिथे बाण मारायला सांगतो.. एकच क्लायमॅक्स

"नन्तर अम्बिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परन्तु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्र बाहूंचे वरदान असल्यामुळे एकीकडे परशुराम सहस्त्रार्जुनाचे हात तोडत आहे.. व दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत.. असे चालले. उत्प्न्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. एकवीस वेळा असे घडल्यावर परशुराम चिन्तीत झाला. यामुळेच "परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली." असे म्हटले जाते." हे माहित न्हवते.

In reply to by मुक्त विहारि

मृगनयनी 14/05/2012 - 16:30
@ मुक्तविहारी'जी.. ह्म्म्म !... बर्‍याचदा अनेकांना प्रश्न पडतो.. की एक्दा पृथ्वी नि:क्षत्रिय झाल्यावर पुन्हा २० वेळा ती कशीकाय नि:क्षत्रिय होऊ शकेल.. ? तर कार्तवीर्यार्जुनाचे २१ वेळा हात तोडणे.. म्हणजे त्याच्या ठायी असलेली अनुचित क्षत्रिय शक्ती नष्ट करणे.... जी त्याच्या वारंवार उत्पन्न होणार्‍या सहस्त्रहातांमधून बाहेर येत होती.. कार्तवीर्यार्जुनाच्या आधीच त्याच्या सहयोगी च समविचारी क्षत्रियांचा नाश एकदाच परशुरामाने केला होता.

In reply to by मृगनयनी

पृथ्वी नि:क्षत्रिय केली म्हणजे काय केले ह्याचे फार छान उत्तर आमच्या पुप्याने इथे दिले आहे. ते कृपया वाचावे.

इनिगोय 14/05/2012 - 16:26
"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा" अशी सुरुवात असलेला एक श्लोक ऐकण्यात आला होता. "यस्य स्मरणमात्रेण गतम् नष्टम् च लभ्यते" असा त्याचा शेवट असावा. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो, असे म्हणतात. याबद्दल काही अधिक माहिती आहे का? (हे परशुरामाशी नाही तरी कथेतल्या खलनायकाशी संबंधित असावे.) आणि
"जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला."
"चरू" म्हणजे काय?

In reply to by इनिगोय

मृगनयनी 14/05/2012 - 16:41
"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा" अशी सुरुवात असलेला एक श्लोक ऐकण्यात आला होता. "यस्य स्मरणमात्रेण गतम् नष्टम् च लभ्यते" असा त्याचा शेवट असावा. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो, असे म्हणतात. याबद्दल काही अधिक माहिती आहे का? (हे परशुरामाशी नाही तरी कथेतल्या खलनायकाशी संबंधित असावे.) सहमत इनिगोय'जी.. "कार्तवीर्यार्जुननाम राजा बाहुसहस्त्रवान.. तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते" असा तो श्लोक आहे. आणि तो याच कार्तवीर्यार्जुन म्हणजे सहस्त्रार्जुनाशी सम्बंधित आहे. दत्तगुरुंनी दिलेल्या आशीर्वादानुसार त्याच्या हजारो हातांच्या साहाय्याने तो ती वस्तू शोधून देतो, अशी सम्कल्पना आहे. आणि "जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला." "चरू" म्हणजे काय? "चरू" म्हणजे अधिकारी ऋषींनी उचित मंत्राच्या साह्याने अभिमन्त्रित केलेले एक वेगळ्या प्रकारचे पाणी किन्वा द्रव्य. त्या त्या मन्त्रशक्तीनुसार हे अभिमन्त्रित द्रव्य सोने, माती, इ. च्या कलशात ठेवले जाते. व ते ज्या व्यक्तीसाठी किन्वा एखाद्या कारणासाठी बनवले असते.. ते फक्त त्याच व्यक्तीने सांगितलेल्या वेळी प्राशन करणे जरूरी असते. शिव-शक्ती, ब्रह्माशक्ती, विष्णुशक्ती इ. ना मन्त्राद्वारे पाचारण करून त्यांचे तेज अभिमन्त्रित करून "चरु" बनवले जात असत.

In reply to by इनिगोय

रेवती 16/05/2012 - 03:51
अनुभव सांगितला तर हसाल पण माझी आजी कोणाचं काही हरवलं की हा श्लोक म्हणायला सांगायची. मी तो लिहून कपाटाच्या दारच्या आत चिकटवला होता......वयाच्या दहाव्या वर्षी. आता माझं हरवून हरवून काय हरवणार? पुस्तक, शाळेतील शिवणाचे सामान इ. हो, मिळाले. एक आवडता रुमाल मात्र मिळाला नव्हता. आता गंमत वाटते पण त्यावेळी मी या श्लोकाची फ्यान होते. :)

In reply to by मिसळपाव

किचेन 18/05/2012 - 14:46
किती वेळा म्हणायचं हा श्लोक? माझ्या गाडीची चावी हरवलीये...चावीवाल्याला बोलावान्याआधी एकदा हा श्लोकही वापरून बघते. ;)

अमृत 14/05/2012 - 17:03
वाचायला मिळाली. छान लिहीलयं.फक्त तो 'अ‍ॅक्च्युली' शब्द खटकला. पौराणिक विषयांवर आणखी वाचायला आवडेल. अमृत

jaypal 14/05/2012 - 20:48
कौतुक / उदत्तीकरण करणारी भंपक कथा. स्वतःचा जिव वचवण्यासाठी आईची हत्या करणारे पुजले जातात हेच खर दुर्दैव. केवळ विचार मनी आला म्हणुन जिव घ्यायचा :-(. ही असली पुरुषप्रधान संस्क्रुतीचा उदोउदो करणारी गोष्ट मोठ्य भक्तीभावाने ऐकली व सांगीतली जाते तेही २०१२ मधे :-( नव-याच्या अंगी धमक असती तर मुलांना वध करायाला सांगीतलाच नसता.

In reply to by jaypal

शिल्पा ब 14/05/2012 - 21:26
तुमच्यासारख्या लोकांना आपल्या भारतीय इतिहासाची काडीइतकीही माहीती नाही तरीही असे अर्थहीन प्रतिसाद देत आहात हे पाहुन मनाला अनंत यातना झाल्या. मुळ लेखाविषयी : परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. अगदी खरं आहे, अन म्हणुनच तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे कारण नुसत्या ऐकीव माहीतीवर हा लेख लिहिलेला नाही हे दिसत आहे. म्हणुनच "तो परशुराम" असं एकेरी संबोधलं आहे हे दखलपात्रच आहे. क्रोध ही सुद्धा एक देवता आहे ही एक नविन माहीती मिळाली त्याबद्दल धन्यवाद. फक्त एक दुरुस्ती सुचवते, पटतंय का पहा: तिनेच आपल्या पुत्राला -रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरन्जीवी बनवले होते. या मधे "होते" च्या ऐवजी "आहे" असं असायला हवं ना? लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते. भारत माता की जय.

In reply to by शिल्पा ब

दादा कोंडके 14/05/2012 - 22:22
लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते.
ह्या वाक्या नंतर ;) ही स्मायली राहिली काय?

In reply to by शिल्पा ब

मृगनयनी 14/05/2012 - 22:43
लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते. तुम्हाला "सुसंस्कृत" म्हणायचे आहे का? :)

In reply to by मृगनयनी

शिल्पा ब 14/05/2012 - 23:47
हो हो...आपण सुसंस्कृत आहात हेच म्हणायचंय...अर्थात आधीच्या प्रतिसादात टायपो नसल्याने तो आपल्याला दिसला नसावा असं गृहीत धरते.

In reply to by jaypal

मृगनयनी 14/05/2012 - 22:09
@ jaipal - "परशुरामाने आपल्या आईला पुन्हा जिवन्त केले".. हे आपल्याकडून सोईस्करपणे विसरले जातेय.... "आईची हत्या परशुरामास का करावी लागली" याचे विस्तृत विश्लेषण लेखात दिलेले आहे. :) क्षत्रिय राजा असूनही ऋषी-मुनींची सम्पत्ती बळकावणार्‍या, त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या, गाय दिली नाही म्हणून एका ऋषीची हत्या करणार्‍या, केवळ अधिकार गाजवण्यासाठी सर्वांचा छळ करणार्‍या "सहस्त्रार्जुना"बद्दल आपले काय मत आहे? तसेच सहस्त्रार्जुनाच्या "संस्कृती"स आपण नक्की काय म्हणू इच्छिता?

In reply to by मृगनयनी

रमताराम 14/05/2012 - 22:30
आईवर हत्यार चालवणे हा अश्लाघ्यपणा केला तिथेच सारे संपले. नंतर जिवंत केले वगैरे पोराटोरांना सांगण्याच्या गोष्टी. खल्लास. (आमचा हा पहिला नि शेवटचा प्रतिसाद). (जामदग्न्य कुलोत्पन्न असूनही परशुरामाचे कृत्य अश्लाघ्य नि निंदनीय मानणारा) रमताराम अवांतर: पॉपकॉर्न हवेत का कोणाला.

In reply to by रमताराम

अँग्री बर्ड 14/05/2012 - 23:59
आता जामदग्न्य कुलोत्पन्न असून सुद्धा जर श्री परशुराम आईवर शस्त्र चालवतात हे तुम्ही धरून चालता तर मग परत तिला जिवंत केले हे मान्य करायला तुमचे काय जाते ? की नुसता विरोधासाठी म्हणून विरोध करायचा ?

In reply to by अँग्री बर्ड

रमताराम 15/05/2012 - 09:53
शस्त्र चालवल्याने हत्या होते याचे असंख्य पुरावे आमच्या आसपास आहेत त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे अवघड नाही. जिवंत करता येते याचा एक पुरावा दाखवा मग आम्ही मानू. आणि आम्ही अमान्य करण्याचा प्रश्न येतोच कुठे, खुद्द परशुरामाच्या 'त्या कृत्याचे समर्थक'च हे मान्य करतात ना. (खरंतर हे अध्याहृत होतेच पण नाहीच समजले तर उलगडून सांगतोच) 'जर तुम्ही म्हणता तसे कृत्य घडले असेल तर ते अश्लाघ्य, निंदनीय होते.' हा प्रतिसाद आहे. घडले की घडले नाही याचा आमच्या जगण्यावर वा विचारावर काडीचा परिणाम होत नाही, सबब आम्ही त्याचा विचारही करत नाही. घडले असा दावा 'तुम्ही' केलात तर वरचा प्रतिसाद लागू, नाही केलात तर बल्ले बल्ले. हॅरी पॉटरने एखाद्या ड्रॅगनला मारले हे योग्य केले की नाही यावर आम्ही आमचे मत देऊ शकतो, ते त्या पुस्तकातील लिखाणावर आधारित असते. याचा अर्थ खरंच हॅरी पॉटर अस्तित्त्वात आहे, तो जादूगार आहे नि अस्तित्त्वात असलेल्या एखाद्या ड्रॅगनला त्याने ठार मारले यावर आमचा विश्वास आहे असा नसतो. साहित्यिक प्रश्न असतो तो नि उत्तरही त्या संदर्भातच घ्यायचे असते. (चमत्कार वगैरे शाळकरी कल्पनांमधून केव्हाच बाहेर आलेला) रमताराम ता.क. (हा मात्र 'नक्की' शेवटचा प्रतिसाद, कारण याच प्रतिसादाच्या स्वरूपावरून इथून प्रतिसादाची 'डिग्री' - श्लेष अपेक्षित - वाढत जाणार त्यामुळे प्रतिवाद करण्यात फार अर्थ नाही.)

स्पंदना 15/05/2012 - 05:26
चौंडकाबद्दल लिहायच राहिल का? राहिल असेल तर मी सांगते. १) चौंडक, जे आपण जोगत्यांच्या (जोगवा मागत येणार्‍या लोकांच्या ) हातात पहातो , या वाद्याचा निर्माण इतिहास सांगतेय मी. जे एकवीस वेळा क्षत्रिय निर्मुलन केल गेल त्यात स्त्रिया मारल्या गेल्या नव्ह्त्या. अन अश्या चौल क्षत्रिया??????मला नक्की घराण आठवत नाही आहे, पण या क्षत्रियांचा वध केल्यावर त्यांच्या स्त्रीया परत श्री श्री श्री भगवान परशुरामांना शरण गेल्या , अन आता आम्ही विधवा झाल्याने आम्ही कसे जगावे असे विचारु लागल्या. तेंव्हा या श्री श्री श्री महात्म्याने युद्धभुमीवर पडलेल्या त्या क्षत्रियांच्या कवट्यांना त्यांचीच आतडी लावुन हे चर्मवाद्य वाजवत जोगवा मागत फिरा असा आदेश दिला , जो आजही आपण अस्तित्वात पहातो. या बद्दल्च विवेचन का नाही आल या लेखात. बा द वे, रेणुकेच्या गडावर जे ब्राम्हण लोक धर्माच्या नावाखाली करुन राहिले त्या बद्दल त्यांचा निर्वंश कोण करणार? २) परशुरामाला 'अवतार' न मानता 'अंशअवतार ' म्हंटल जात.

In reply to by स्पंदना

मृगनयनी 18/05/2012 - 19:31
चौंडक, जे आपण जोगत्यांच्या (जोगवा मागत येणार्‍या लोकांच्या ) हातात पहातो , या वाद्याचा निर्माण इतिहास सांगतेय मी. जे एकवीस वेळा क्षत्रिय निर्मुलन केल गेल त्यात स्त्रिया मारल्या गेल्या नव्ह्त्या. अन अश्या चौल क्षत्रिया??????मला नक्की घराण आठवत नाही आहे, पण या क्षत्रियांचा वध केल्यावर त्यांच्या स्त्रीया परत श्री श्री श्री भगवान परशुरामांना शरण गेल्या , अन आता आम्ही विधवा झाल्याने आम्ही कसे जगावे असे विचारु लागल्या. तेंव्हा या श्री श्री श्री महात्म्याने युद्धभुमीवर पडलेल्या त्या क्षत्रियांच्या कवट्यांना त्यांचीच आतडी लावुन हे चर्मवाद्य वाजवत जोगवा मागत फिरा असा आदेश दिला , जो आजही आपण अस्तित्वात पहातो. या बद्दल्च विवेचन का नाही आल या लेखात. @ aparna akshay.. "बेटासूर" नावाच्या एका दैत्याचा वध करून त्याच्या नसा आणि शिरा कापून त्या त्याच्या कापलेल्या डोक्याच्या ब्रह्मरन्ध्रात रोवून (ब्रह्मरन्ध्र- डोक्याचा किन्वा कवटीचा वरचा असा भाग.. ज्यामधून आत्मा बाहेर पडतो.. व व्यक्ती मृत होते.) त्याचे एक वाद्य बनवले. (यामध्ये आतड्याचा वापर कुठेही झालेला नाही.) व "तितृणं" "तितृणं" असा आवाज करत वाजवत परशुराम रेणुकामातेपाशी आला. ते वाद्य (ज्याला बोली बाषेत तुणतुणं म्हणतात) रेणुकामातेने जोगत्यांना दिले. पुढे हे वाद्य बनवण्यासाठी पशूंच्या चामड्यांचा वापर होऊ लागला. 'गोन्धळी लोक' रेणुकामातेस आपले आद्यदैवत मानतात.

चित्रा 15/05/2012 - 08:34
परशुराम - सीता- दत्तगुरु-- शिवयोगी एकनाथ इ. सगळे एकाच कथेत कसे असे प्रश्न पडतात. कथा म्हणून ठीक आहे. पण आत्ता अचानक ही सर्व कथा लिहीण्याचे काही खास कारण आहे का? (अवांतर: एक सुचवते- अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा. )

In reply to by चित्रा

मृगनयनी 15/05/2012 - 11:12
परशुराम - सीता- दत्तगुरु-- शिवयोगी एकनाथ इ. सगळे एकाच कथेत कसे असे प्रश्न पडतात. कृतयुगात जन्मलेले भगवान परशुराम "चिरन्जीवी" होते. ते कृतयुगातही होते, त्यानन्तरच्या त्रेतायुगातही होते. त्यामुळेच तर त्यांनी मिथिलेच्या जनकराजाकडे जाऊन भगवान शन्करांनी दिलेले "शिवधनुष्य" त्यास दिले. व सीतास्वयंवरात ठेवण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर जेव्हा रामाने ते शिवधनुष्य मोडून स्वयंवर जिन्कले, तेव्हा परशुराम स्वतः तिथे आले होते. व राम-सीतेला आशीर्वादही दिला होता. त्यानन्तर द्वापारयुगातही परशुराम होते. फक्त ब्राह्मणांनाच ते अस्त्रविद्या शिकवित असत. परन्तु एकदा कर्णाने स्वतः ब्राह्मण असल्याचे सांगून परशुरामांकडून अस्त्रविद्या शिकून घेतली. परन्तु एका भुन्ग्यामुळे तो ब्राह्मण नसल्याचे उघडकीस आले. व "ती अस्त्रविद्या तुला स्वसंरक्षणासाठी उपयोगी पडणार नाही" असा परशुरामाने कर्णास शाप दिला. आता कलीयुगामध्येही जेव्हा अजून अडीच हजार वर्षांनी कल्की-अवतार होईल, तेव्हा कल्कीचे गुरु हे भगवान- परशुरामच असतील. (सन्दर्भ- कल्की पुराण) तसेच "दत्तगुरुं"चे अस्तित्व अनादिकालापासून आहे. कलियुगात दत्तगुरुंनी -नृसिंहसरस्वती, चिदम्बरम स्वामी, साईबाबा, स्वामी समर्थ इ गुरुंच्या माध्यमातून स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे दिलेले आहेत. शिवयोगी- एकनाथ आणि जोगिन्दर हे सत्ययुगातील दोन शिवयोगी होते. ज्यांनी जमदग्निंच्या क्रोधामुळे आश्रमाबाहेर पडलेल्या रेणुकामातेला आसरा देऊन उपदेश केला होता. यामधल्या "एकनाथां"चा व महाराष्ट्रातील कलीयुगीन सन्त- पैठणचे एकनाथ यांचा काहीही सम्बंध नाही. कथा म्हणून ठीक आहे. पण आत्ता अचानक ही सर्व कथा लिहीण्याचे काही खास कारण आहे का? हो.. हा लेख टंकण्यामागे एक कारणही आहे. एका कुठल्याश्या लेखात सप्तचिरंजीवींपैकी एक- भगवान परशुरामांचे वर्णन- 'अविवेकी सूडवृत्ती' वगैरे केले होते. जे न पटणारे होते. तसेच समाजात परशुरामांबद्दल अनेक गैरसमज आहेत.. ते दूर व्हावे असेही मला वाटत होते.. त्यामुळे हा लेख टंकून भगवान परशुरामांबद्दल माहिती सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे. बाकी आपले 'अवांतर' काही पटण्यासारखे व काही न पटण्यासारखे आहे. परन्तु माझ्या लेखामुळे कुणाला काही नवीन माहिती कळत असेल किन्वा माहित असलेल्या गोष्टी पुन्हा रिवाईज होत असतील.. तर मला आनन्दच आहे! तसेच ज्यांना माझ्या लेखातील काही / पूर्ण गोष्टी आवडत नसतील.. तर तेही लोक त्यांची मते मान्डतातच की!.. आणि त्यामुळे होणारा फायदा असा, की वेगवेगळ्या 'आयडी'च्या मनोवृत्तीची आपल्याला कल्पना येऊ शकते. त्यांचे विचार आपल्याला कळतात.. त्यांची एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल काय मतं आहे.. हे आपल्याला समजते... त्यांची भाषाशैली कळते. ओव्हरऑल मेन्टॅलिटी कळते. :) ;) =)) =)) उदाहरणार्थः- jaypal आणि रमताराम या दोन आयडींच्या विचारांमध्ये खूप साधर्म्य आहे. फक्त फरक इतकाच आहे, की 'रमताराम' हे जमदग्निंच्या कुळातले आहेत. आणि jaypal जमदग्निंच्या कुळातले नाहीयेत. त्यामुळे परशुरामाबद्दल वाईट बोलताना 'रमताराम' यांच्यापेक्षा jaypal यांची भाषाशैली जास्त हार्श आहे. आणि jaypal यांचा "जमदग्नि" ऋषींवर जास्त राग आहे, हेही जाणवते. .. बाकी दोघांची मेन्टॅलिटी साधारण सारखीच्च आहे!! :)

In reply to by मृगनयनी

शिल्पा ब 15/05/2012 - 11:58
तसेच "दत्तगुरुं"चे अस्तित्व अनादिकालापासून आहे. आपला व्यासंग पाहुन वरील वाक्यासंदर्भात एक प्रश्न मनात आला आहे त्याचे उत्तर मिळेल अशी आशा करते. प्रश्न असा: अनादिकाल केव्हा सुरु होतो? नै म्हणजे मधे डायनोसोर वगैरे येउन लोपसुद्धा पावले असे पुरावे आहेत त्यामुळे त्यावेळेस ही वेगळी मानवजात कुठे राहात असे? त्यांचा शीतयुगात कसा निभाव लागला हे वाचायला आवडेल. तसेच अजुन एक म्हणजे, कल्की पुराण लिहिणारे कोण आहेत? अन जिथे पुढच्या सेकंदाला काय होणार हे माहीत नाही तिथे त्यांनी कलियुगात कुठे, कोण अन कसा जन्म घेणार अन त्याचे गुरु कोण असणार वगैरे कशाच्या आधारावर सांगितले की जे तुम्ही सत्यच्च आहे असे मानता? बाकी लोकांची मेंटॅलिटी कळते हे अगदी योग्य निरीक्षण आहे हे नमुद करु इच्छिते.

In reply to by मृगनयनी

jaypal 15/05/2012 - 11:59
>>की 'रमताराम' हे जमदग्निंच्या कुळातले आहेत. आणि jaypal जमदग्निंच्या कुळातले नाहीयेत. "एकमेकांची कुळ शोधुन कोण श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? अशी भांडण लावायची आणि हरी हरी करत मजा बघायची" अश्या कथा ईथे देण्या मागे तुमचा हा छुपा अजेंडा असावा अशी दाट शक्याता होती ती आता निश्चित झाली. उगा मिपा करांची मेन्टॅलिटी वा मनोवृत्तीची तपासणी करण्याची तुम्हाला गरज काय? बहुदा खुप वेळ आहे तुमच्या कडे काड्या सारायला. रीकामा ** कुडाला तंबड्या लावी. तुम्हाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा :-). मिपा वरील वातावरण गढुळ / दुषीत होण्या पुर्वीच संपादक मंडळ वेळीच लक्ष घालतील ही खात्री. :-) जन्माला महत्त्व न देता कर्माला महत्त्व देणारा. जयपाल

In reply to by jaypal

मृगनयनी 15/05/2012 - 13:44
@ जयपाल, मुळात "रमताराम" यांनी ते स्वतः जमदग्नि कुळातले आहेत.. असे एका प्रतिसादात सांगितलेले आहे ( कारण त्यांना त्यांचे कुळगोत्र माहित आहे. ;) ) तर परशुरामाच्या वडिलांबद्दल -पक्षी : जमदग्निंबद्दल बोलताना आपण आपल्या प्रतिसादात नव-याच्या अंगी धमक असती तर मुलांना वध करायाला सांगीतलाच नसता. असे काहीसे टंकलेले आहे. त्यामुळे एकन्दर परशुरामाबद्दल, जमदग्निंबद्दलचा (ब्रिगेडी) द्वेष तुमच्या प्रतिसादातून दिसत होता. मी कुणाचेही कुळ-गोत्र वगैरे काढलेले नाही. व ते जाणून घ्यायची माझी इच्छाही नाही.. त्यामुळे आपले एकमेकांची कुळ शोधुन कोण श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? अशी भांडण लावायची आणि हरी हरी करत मजा बघायची हे तर्क वितर्क सपशेल फोल ठरतात. उगा मिपा करांची मेन्टॅलिटी वा मनोवृत्तीची तपासणी करण्याची तुम्हाला गरज काय? मला हे विचारणारे तुम्ही कोण? :) बहुदा खुप वेळ आहे तुमच्या कडे काड्या सारायला. रीकामा ** कुडाला तंबड्या लावी. हेच वाक्य मी तुमच्याबद्दलही बोलू शकते! :) तुम्हाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा Smile. जिचा वाढदिवस आहे.. तिला शुभेच्छा दिल्यात.. तर सत्कारणी लागतील!! :) मिपा वरील वातावरण गढुळ / दुषीत होण्या पुर्वीच संपादक मंडळ वेळीच लक्ष घालतील ही खात्री. Smile हे तुम्ही कन्फेशन देत आहात का?.. तसं असेल तर आनन्दच आहे.. :) ;)

In reply to by मृगनयनी

lakhu risbud 15/05/2012 - 16:56
चला आता दुधाची घुसळण सुरु झाली आहे,त्यातून क्रमाक्रमाने ताक,लोणी,तूप असे "शेलके"(??) पदार्थ वेगळे निघणार आहेत आणि "जड" "अशुद्ध" (??) असे पदार्थ खाली राहणार. आता प्रत्येक बाजूने त्यांचे "मानबिंदू" COPYRIGHT( © ), REGISTER ( ® ), TRADEMARK ( ™ ) वगैरे करावीत म्हणजे अनाठायी वाद होणार नाही . अवांतर: सध्या CALCIUM CARBONATE टाकून आंबे पिकवले जातात अशी खबर आहे तेव्हा खरेदी करणार्यांनी काळजी घ्यावी.

आगाऊ कार्टा 15/05/2012 - 10:58
मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा- जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली.. तेव्हा चिरन्जीवी परशुरामाने जनकराजास सान्गितले, की "हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल.. त्याच्याशीच हिचा विवाह होईल." त्यानुसार महाविष्णुच्या सातव्या अवतारात प्रभू रामचन्द्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली व सीतेने त्यांस वरले. प्रत्यंचा म्हणजे धनुष्याला लावण्यात येणारी दोरी.. त्यामुळे ती मोडण्याचा प्रश्नच येत नाही. ही प्रत्यंचा केवळ युद्धाच्या वेळीच धनुष्यावर चढवण्यात येत असे भगवान परशुरामांनी जनकराजाला सांगितले की या शिवधुन्याष्यावर जो प्रत्यंचा चढवील त्याच्याशीच तू सीतेचा विवाह कर. मुळात धनुष्याची काठी सरळ असते. प्रत्यंचा चढविण्यासाठी ती काठी वाकवावी लागते. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढविण्यासाठी ते वाकवले तेव्हा ते मोडले (प्रत्यंचा नव्हे). शिवधनुष्याचा भंग झाल्याचे कळताच भगवान परशुराम अत्यंत क्रोधित होऊन तात्काळ तेथे आले आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण चढवण्याचे आव्हान दिले. प्रभू रामचंद्रांनी परशुरामांना आणि शिवधनुष्याला वंदन करून ते हाती घेऊन त्याच्यावर बाण चढवला. एकदा धनुष्यावर चढवलेला बाण लक्ष्यभेद केल्याशिवाय परत घेत येत नसल्यामुळे श्रीरामांनी परशुरामांना विचारले की हा बाण कुठे सोडू? तेव्हा परशुराम म्हणाले की माझे शिवधनुष्य तू ज्याअर्थी पेललेस त्याअर्थी माझे अवतार कार्य पूर्ण झाले, तेव्हा तू हा बाण माझ्यावरच सोड. परंतू श्रीरामांनी तसे करण्यास नकार दिला. तेव्हा परशुराम म्हणाले की असे असेल तर तू हा बाण सोडून माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग नष्ट करून टाक. तेव्हा श्रीरामांनी भगवान परशुरामाच्या आज्ञेप्रमाणे तो बाण सोडला. त्यानंतर भगवान परशुराम आपले शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांच्या हाती सुपूर्द करुन तेथून निघून गेले.

In reply to by आगाऊ कार्टा

किचेन 18/05/2012 - 14:58
काहीच कळलं नाही.म्हणजे परशुरामांनी स्वत:च स्वत:साठी नरक मागून घेतला? दुसरी गोष्ट म्हणजे परशुराम आणि राम हे दोन्ही विष्णूचे अवतार.जर एक अवतार आधीच पृथ्वीवर आहे तर दुसर्या अवताराने पृथ्वीवर यायची घाई का करावी.( साई बाबांचे अवतार आणि विश्नुचे अवतारात फरक असणारच न )

In reply to by आगाऊ कार्टा

आनंदी गोपाळ 18/05/2012 - 14:58
दोन वेळा कसे मोडले?
प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढविण्यासाठी ते वाकवले तेव्हा ते मोडले (प्रत्यंचा नव्हे). शिवधनुष्याचा भंग झाल्याचे कळताच भगवान परशुराम अत्यंत क्रोधित होऊन तात्काळ तेथे आले आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण चढवण्याचे आव्हान दिले. प्रभू रामचंद्रांनी परशुरामांना आणि शिवधनुष्याला वंदन करून ते हाती घेऊन त्याच्यावर बाण चढवला.
आधी पण पूर्ण करताना मोडले, मग परत परशुरामास मारण्यासाठी परत प्रत्यंचा कशी काय चढली? मोडक्या धनुष्याने बाण कसा मारता येईल??

शिल्पा ब 15/05/2012 - 11:05
तेव्हा परशुराम म्हणाले की असे असेल तर तू हा बाण सोडून माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग नष्ट करून टाक. म्हणजे नेमका कुठे बाण सोडला अन काय नष्ट केलं असं समजायचं? प्रतिकात्मक किंवा रुपकात्मक असा विचार केला तरी नेमकं काय केलं असावं?

In reply to by शिल्पा ब

गवि 15/05/2012 - 11:16
मारला असेल बाण योग्य जागी कुठेतरी अन केला असेल रस्ता बंद.. आमचा हपीसचा रस्ताही ठामपाने अनेक शस्त्रांच्या साहाय्याने बंद करुन टाकला आहे गेला महिनाभर. तुम्हाला उगाच नसत्या शंका.. भोचक शंका काढून आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी शंका घेणे अतएव त्याची चेष्टा करणे बंद करावे ही विनंती.

In reply to by गवि

दादा कोंडके 15/05/2012 - 11:49
मारला असेल बाण योग्य जागी कुठेतरी अन केला असेल रस्ता बंद
सहमत! पुराणात एव्हडे चिमीत्कार होतात, तसच रामाने स्वर्गात अप-डाउन करणार्‍या पुष्पक इमानाचं टायर बाणाने पम्पचर केलं असेल. व्हॉट इज अँड व्हॉट नॉट! :)
भोचक शंका काढून आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी शंका घेणे अतएव त्याची चेष्टा करणे बंद करावे ही विनंती.
अनुमोदन!

In reply to by दादा कोंडके

शिल्पा ब 15/05/2012 - 12:01
गवि अन दादा तुम्हा दोघांचाही निषेध. मी माझं ज्ञान वाढवायचा प्रयत्न करतेय तर तुम्ही त्यात असा खोडा घालु नये ही विनंती. आमच्या पुराणाविषयीच्या इतिहासाच्या शंकांना भोचक म्हणुन तुम्ही या भारतभुमीच्या इतिहासाचा अपमान करीत आहात हे लक्षात घ्यावे ही अजुन एक विनंती.

In reply to by jaypal

५० फक्त 15/05/2012 - 12:36
मग नाय तर काय, असेल राम त्याकाळच्या संस्थळावरचा संपादक, असतील त्याच्याकडे अ‍ॅडमिनचे राईट, एखाद्या प्रतिसादाला बुच मारलं असेल अन झालं,

In reply to by गवि

मृत्युन्जय 15/05/2012 - 12:46
जी गोष्ट व्यासांना नाही माहिती ती त्या नैनीला काय विचारता बे? Then unto Dasaratha's son who said so, Rama of Bhrigu's line replied, 'A truce to all crafty speech, O king! Take this bow.' At this, Rama the son of Dasaratha, took in anger from the hands of Rama of Bhrigu's line that celestial bow that had dealt death to the foremost of Kshatriyas. And, O Bharata, the mighty hero smilingly strung that bow without the least exertion, and with its twang loud as the thunder-rattle, affrighted all creatures. And Rama, the son of Dasaratha, then, addressing Rama of Bhrigu's said, 'Here, I have strung this bow. What else, O Brahmana, shall I do for thee?' Then Rama, the son of Jamadagni, gave unto the illustrious son of Dasaratha a celestial arrow and said, 'Placing this on the bow-string, draw to thy ear, O hero!' "Lomasa continued, 'Hearing this, Dasaratha's son blazed up in wrath and said, 'I have heard what thou hast said, and even pardoned thee. O son of Bhrigu's race, thou art full of vanity. Through the Grandsire's grace thou hast obtained energy that is superior to that of the Kshatriyas. And it is for this that thou insultest me. Behold me now in my native form: I give thee sight.' Then Rama of Bhrigu's race beheld in the body of Dasaratha's son the Adityas with the Vasus, the Rudras, the Sadhyas with the Marutas, the Pitris, Hutasana, the stellar constellations and the planets, the Gandharvas, the Rakshasas, the Yakshas, the Rivers, the tirthas, those eternal Rishis identified with Brahma and called the Valkhilyas, the celestial Rishis, the Seas and Mountains, the Vedas with the Upanishads and Vashats and the sacrifices, the Samans in their living form, the Science of weapons, O Bharata, and the Clouds with rain and lightning, O Yudhishthira! And the illustrious Vishnu then shot that shaft. And at this the earth was filled with sounds of thunder, and burning meteors. O Bharata, began to flash through the welkin. And showers of dust and rain fell upon the surface of the earth. And whirlwinds and frightful sounds convulsed everything, and the earth herself began to quake. And shot by the hand of Rama, that shalt, confounding by its energy the other Rama, came back blazing into Rama's hands. And Bhargava, who had thus been deprived of his senses, regaining consciousness and life, bowed unto Rama--that manifestation of Vishnu's power. And commanded by Vishnu, he proceeded to the mountains of Mahendra. And thenceforth that great ascetic began to dwell there, in terror and shame. And after the expiration of a year, the Pitris, beholding Rama dwelling there deprived of energy, his pride quelled, and himself sunk in affliction, said unto him, 'O son, having approached Vishnu, thy behaviour towards him was not proper. He deserveth for aye worship and respect in the three worlds. Go, O son, to that sacred river which goeth by name of Vadhusara! Bathing in all the tirthas of that stream, thou wilt regain thy energy! There in that river is the tirthas called Diptoda where thy grandsire Bhrigu, O Rama, in the celestial age had practised ascetic penances of great merit.' Thus addressed by them, Rama, O son of Kunti, did what the Pitris bade him, and obtained back at this tirtha, O son of Pandu, the energy he had lost.

JAGOMOHANPYARE 15/05/2012 - 12:30
ख्रिशचनांच्यात अवतार नसतात हे किती चांगलं आहे नै? नाही तर ज्यु लोक अत्याचार करत होते, म्हणून देवाने हिटलरचा अवतार घेऊन त्यांचा नायनाट केला. असेही एखादे पुराण निघाले असते.

In reply to by JAGOMOHANPYARE

५० फक्त 15/05/2012 - 15:18
आपली भुर्जपत्रावर लिहिली ती पुराणं अन त्यांनी काढला तो सिनेमा, हा भेदभाव कधी मिटणार कुणास ठाउक ? अजुन एक ५-५० शे वर्षांनी त्याचंही पुराण होईलच की,

चिगो 15/05/2012 - 13:44
परशुरामाचा माझ्यापुरतं महत्त्व : परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आणि मला त्याचं उत्तर आल्याने चांगले इंप्रेशन पडले असावे कदाचित.. परशुरामांबद्दल मला असलेली माहिती.. त्यांच्या आई-वडीलांचे नाव, व बापाच्या ऑर्डरवरुन आईची हत्या केली, हे पुराण.. जोगवामधील "लल्लाटी भंडार" ह्या गाण्यावरुन पुनर्जिवित झालेल्या रेणूकामातेलाच "यल्लम्मा" मानतात, हेही कळलं. अरुणाचल प्रदेशमधे एक "परशुराम कुंड" आहे. परशुरामाने मातृहत्या करुन त्याचा परशु इथे धुतला, असे मानतात. इथुनच जवळून "लोहीत" नदी वाहते (लोहीत म्हणजे रक्त), जी पुढे जावून ब्रम्हपुत्रेला मिळते.. ह्या मातृहत्याकारकशस्त्रप्राक्षलणामुळे ब्रम्हपुत्रेचे पाणी गढूळ असुन, हा नद पुजनीय नाही, असे माननारे मानतात..

In reply to by चिगो

परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता
कुठच्या कंपनीत हो? नाही म्हणजे माहिती असलेले बरे कारण उद्या मला पण तिथेच इंटरव्ह्यूला जायचे असेल तर परशुराम वाचायला हवा

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

चिगो 15/05/2012 - 14:37
संघ लोक सेवा आयोगाच्या इंटरव्युत विचारला होता.. आता आधीच्या चार-पाच जणांना इंटेलेक्चुअल टायपातले प्रश्न इचारुन बोर्डाचा चेअरमॅन पिकला होता, की तो टैमपास करत होता, की आमचं थोबाड पाहून त्याने हा प्रश्न विचारला हे त्याचं त्याला माहीत.. :D असं म्हणतात की ह्या इंटरव्युत "सूर्याखालच्या कुठल्याही विषयावर" (Anything under the Sun चा स्वैर अनुवाद) प्रश्न विचारला जाऊ शकतो.. त्याचंच उदाहरण समजा.. ;-)

In reply to by चिगो

बालगंधर्व 17/05/2012 - 15:25
चिगो, आमच्या क्रर्नाट्कात रेणुका देवीची २ रुपे मानतत. एक यल्लम्मा आणि दुसरी मरिअम्मा. परशुराम्ने रेणुका देवीबरोबरच तिच्या एका मेइत्रिणीचे पण डोके उडवले. अणि नन्तर चुकुन त्या दोन्ही मुंडक्याची अदलाबदली झाली व रेणुका देवीचे डोके तिच्या मएत्रीनीला आणि मेत्रिनीचे डोके रेनुकादेवीला बसवले गेले. ज्यला रेणुकादेवीचे डोके ते- यल्लम्मा आणि ज्याला तिच्या मेइत्रिणीचे डोके ती मरिअम्मा असे मानतात. अनि दोन्हीची पुजा करतात. आमच्या कडे सोउन्दत्ती या गावाला यल्लम्माचे खुप महतत्व आहे. पोत्तुराज मरीअम्माच्या नावाने स्वत>च्या अंगावर फट्के मरुन घेतो.

प्रचेतस 15/05/2012 - 14:20
मृगनयनीने सांगितलेली परशुरामाची कथा दत्तगुरु, एकनाथ व जोगिनाथ यांवरून तर नाथपंथीच आहे हे सिद्ध होते. कल्की पुराण, विष्णू पुराण, गरूड पुराण आदी पुराणे अलीकडच्या काळात म्हणजे चौथ्या, पाचव्या शतकात आकारास आली, साहजिकच त्यात दत्तांचे उल्लेख आढळतात. दत्त ही वैदिक देवता नव्हे. महाभारतातही दत्ताचा उल्लेख एकदाच येतो तो सुद्धा परशुराम उपाख्यानातच. त्यामुळे हा भाग प्रक्षिप्त असावा असे मानायला पुरेसा वाव आहे. महाभारतात आरण्यक पर्वात परशुराम उपाख्यान आले आहे. जमदग्नी शीघ्रकोपी होते इतकाच उल्लेख आहे. क्रोधदेवता प्रसन्न होण्याचा काहीही उल्लेख नाही. आख्यानानुसार सहस्त्रार्जुन जमदग्नींच्या धेनूचे बळजबरीने हरण करून नेतो. इथे ही धेनू कामधेनू दाखवलेली नाही. ती तर गरीब बिचारी हतबल गाय दाखवलीय. (गाईच्या शरीरातून सैनिक बाहेर पडण्याचा प्रसंग वसिष्ठ-विश्वामित्राच्या आख्यानात आहे. राजा विश्वामित्र नंदिनीचे हरण करण्यासाठी येतात तेव्हा हतबल वसिष्ठ नंदिनीलाच सांगतात की तूच आता स्वतःला वाचव तेव्हा नंदिनीच्या मुखातून, शेपटातून विविध सैनिक उत्त्पन्न होऊन विश्वामित्राचा पराभव करतात.) परशुरामाला धेनूचे हरण झाल्याचे जमदग्नींकडून समजते तेव्हा तो कार्तवीर्याचा वध करतो. हजार हात पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असे महाभारतात काहीही नाही. पित्याचा वध पाहून चिडलेली सहस्त्रार्जुनाची मुले जमदग्नींच्या आश्रमात घुसून जमदग्नींचा वध करतात. शोकाकूल परशूराम पृथ्वी नि:क्षत्रिय करीन अशी प्रतिज्ञा करून सहस्त्रार्जुनाचा निर्वंश करतो व पुन्हा पुन्हा अशी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करतो. आणि काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात. बाकी परशुराम जरी चिरंजीवी म्हणून प्रसिद्ध असला तरी त्याचाही मृत्यु अटळ आहे असे महाभारतात म्हटले आहे. द्रोणपर्वात अभिमन्यू वधानंतर शोकाकुल झालेल्या युधिष्ठिराला समजावण्यासाठी नारद त्याला षोडशराजकीय आख्यान ऐकवतात. त्यात मांधाता, दाशरथी राम इत्यादी राजांबरोबरच परशुरामाचेही छोटेसे आख्यान आहे. नारद म्हणतात-....हे सृंजया !, चार श्रेष्ठ गोष्टींमुळे तुझ्या पुत्रापेक्षा अधिक श्रेष्ठ असलेला परशुरामही मृत्यु पावणार आहे. तेव्हा यज्ञ न करणार्‍या आणि दान न देणार्‍या तुझ्या पुत्राविषयी तू शोक करू नकोस. सृंजया हे तुझ्यापेक्षाही कित्येक पटीने श्रेष्ठ असलेले आधी मेलेले आहेत आणि पुढेही मरतील.

In reply to by प्रचेतस

दिगम्भा 15/05/2012 - 18:57
आपल्या पत्नीच्या पोटीचा कोणाहीपासून झालेला पुत्र (कानीन पुत्र) हा बीजक्षेत्रन्यायाने (पक्ष्याच्या द्वारे शेतात पडलेल्या बीजापासून उत्पन्न झालेले धान्य हे शेतकर्‍याच्या मालकीचे असते) औरस पुत्राच्या इतक्याच योग्यतेचा मानावा असा शास्त्रनियम आहे. याच न्यायाने युधिष्ठिर व अन्य पांडव हे पांडूचे पुत्र मानले गेले. तेव्हा पुतण्याचे नाते आणले नाही तरी अभिमन्यु युधिष्ठिराचा पुत्र होतो.

In reply to by दिगम्भा

दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? --- धागा आवडला. प्रतिसाद तेवढे रंजक नाहीत. गवि, परा, ५० फक्त, शिल्पा ब इत्यादी सर्व होतकरू लोकांनी पुराणातून रंजकता शिकावी अशी नम्र विनंती. बेटर लक नेक्स्ट टाईम.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

JAGOMOHANPYARE 15/05/2012 - 19:54
दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? ----------- हेच विचारायचे होते ......... प्रजा ही राजाचा जणू पुत्र असते.. या न्यायानेही नागरीक अभिमन्यु राजा युधिष्ठीराचा पुत्र होतो, असेही मग उत्तर येईल :)

In reply to by प्रचेतस

५० फक्त 15/05/2012 - 15:23
काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात - जी पृथ्वी परशुरामाने दान केली, त्याच पृथ्विवरच्या महेंद्र पर्वतावर त्याला जायला सांगण्यामागं काय उद्देश असावा, याबद्द्ल कुणी सांगेल का ? की महेंद्र पर्वत हा पृथ्बी अनेक्स मध्ये होता /आहे.

In reply to by ५० फक्त

पैसा 15/05/2012 - 19:35
काश्यप ऋषींना पृथ्वी दान केल्यानंतर दान केलेल्या जमिनीवर कसं राहणार? म्हणून परशुरामाने समुद्र हटवून नवीन अशी कोकण भूमी (कुमारी भूमी) तयार केली आणि काही लोकांना तिथे नेऊन वसाहती केल्या अशी एक कथा आहे. त्यामुळे कोकणात परशुरामाची देवळे आढळतात. तसंच जोगेश्वरी (जोगुळांबा) म्हणजेच रेणुका असल्यामुळे कोकणातल्या अनेक लोकांची कुलदेवता जोगेश्वरी आहे.

सहज 15/05/2012 - 14:33
सध्या श्री भगवान परशुराम (व सप्त चिरंजीव मंडळातले अन्य) कुठे असतात व काय करतात? कोणी सांगू शकेल काय?

In reply to by गवि

कवटी 15/05/2012 - 15:15
खरय गवि. आपण भेटल पाहिजे... टचमधे राहिले पाहिजे... ऐनवेळी कोण कुठय विचारल तर पत्ता लागत नाही. मी पन नवीमुंबैत नोकरी करतो

In reply to by गवि

५० फक्त 15/05/2012 - 15:20
तरी म्हणलं होतं तुम्हाला पुणे गेटच्या कट्ट्याला मला तुमच्या फेसबुकात अ‍ॅड करुन घ्या, टच मध्ये राहु, पण तुम्हाला पटलंच नाही, असो आता तरी करा अ‍ॅड. बाकी ऑर्कुटवर सगळे एकत्र होतं ना आपण, ते ऑर्कुट बंद झालं अन मग फार अवघड झालं आहे सगळं.

In reply to by गवि

सूड 16/05/2012 - 00:52
खरंच एक कट्टा करायला हवा राव, म्हणजे भेट तरी होईल. जाहीर धागा काढला तर कदाचित पंचपतिव्रता, सोळा मातृका, चौसष्ट योगिनी, देवकन्या, नागकन्या आसरांच्या स्वार्‍यांसह हजेरी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजघराणं 14/05/2012 - 15:41
कामधेनूने ते बन्धन एका क्षणार्धात सोडून जमीनीवर जोराने पाय आपटले. व क्षणार्धात तेथे हजारो गाई उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी शिन्गे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्यास ठार मारले. व कामधेनू पुनश्च जमदग्निंच्या जवळ येऊन उभी राहिली. :) सैनीक सातसो और गायी हजारो बहुत नाइन्साफी है ! बाकी तापट जमदग्नी आणी युधखोर परशूरामाकडे असलेल्या गायीने मालकांचे गुण घेतले काय ?

In reply to by पियुशा

ह्या इतिहासापासुन अनभिज्ञ असतील बरेच ,माझ्यासारखे
इतिहास ??? तुमच्या शाळेचे नाव सांगाच हो एकदा !!!!!!! :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पियुशा 15/05/2012 - 10:57
वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन बॉस्को स्कुल :) ह्या इतिहासापासुन म्हणजे परशुरामाच्या इतिहासापासुन म्हणतेय मी निट वाचा जरा ;)

In reply to by पियुशा

प्यारे१ 15/05/2012 - 11:08
@ वि.मे. कुठं डोकं फोडतोय बे?????? डान बास को हाय ते! जान दे ना! ;) इतिहास काय पुराण काय? कि फर्क पैन्दा? काल झालेलं ते पण इतिहासच असतंय आणि रामाच्या खापरपणजोबांचं पण इतिहासच!

In reply to by पियुशा

वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन बॉस्को स्कुल
अरे व्वा !!! डॉन बॉस्को का !!!! मग तुम्ही बोलता ते बरोबरच असणार की. चुकलेच माझे. इतिहासच असणार ते. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पियुशा 15/05/2012 - 14:54
@ वि.मे. पुराण अन इतिहास हा फरक मला कळला नाही .ही माझी चुक :( माझ्या शाळेचा काय दोष ? उगा शाळेला नाव ठॅवायच कारण नाय !!!

JAGOMOHANPYARE 14/05/2012 - 15:57
पोटातील अमृत ... रावणाच्या कथेतही असेच आहे.. राम रावणाचे मुंडके तोडतो, पण ते पुन्हा उगवते.. बिभीषण रामाला रावण्च्या पोटात अमृत असल्याचे सांगून आधी तिथे बाण मारायला सांगतो.. एकच क्लायमॅक्स

"नन्तर अम्बिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परन्तु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्र बाहूंचे वरदान असल्यामुळे एकीकडे परशुराम सहस्त्रार्जुनाचे हात तोडत आहे.. व दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत.. असे चालले. उत्प्न्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. एकवीस वेळा असे घडल्यावर परशुराम चिन्तीत झाला. यामुळेच "परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली." असे म्हटले जाते." हे माहित न्हवते.

In reply to by मुक्त विहारि

मृगनयनी 14/05/2012 - 16:30
@ मुक्तविहारी'जी.. ह्म्म्म !... बर्‍याचदा अनेकांना प्रश्न पडतो.. की एक्दा पृथ्वी नि:क्षत्रिय झाल्यावर पुन्हा २० वेळा ती कशीकाय नि:क्षत्रिय होऊ शकेल.. ? तर कार्तवीर्यार्जुनाचे २१ वेळा हात तोडणे.. म्हणजे त्याच्या ठायी असलेली अनुचित क्षत्रिय शक्ती नष्ट करणे.... जी त्याच्या वारंवार उत्पन्न होणार्‍या सहस्त्रहातांमधून बाहेर येत होती.. कार्तवीर्यार्जुनाच्या आधीच त्याच्या सहयोगी च समविचारी क्षत्रियांचा नाश एकदाच परशुरामाने केला होता.

In reply to by मृगनयनी

पृथ्वी नि:क्षत्रिय केली म्हणजे काय केले ह्याचे फार छान उत्तर आमच्या पुप्याने इथे दिले आहे. ते कृपया वाचावे.

इनिगोय 14/05/2012 - 16:26
"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा" अशी सुरुवात असलेला एक श्लोक ऐकण्यात आला होता. "यस्य स्मरणमात्रेण गतम् नष्टम् च लभ्यते" असा त्याचा शेवट असावा. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो, असे म्हणतात. याबद्दल काही अधिक माहिती आहे का? (हे परशुरामाशी नाही तरी कथेतल्या खलनायकाशी संबंधित असावे.) आणि
"जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला."
"चरू" म्हणजे काय?

In reply to by इनिगोय

मृगनयनी 14/05/2012 - 16:41
"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा" अशी सुरुवात असलेला एक श्लोक ऐकण्यात आला होता. "यस्य स्मरणमात्रेण गतम् नष्टम् च लभ्यते" असा त्याचा शेवट असावा. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो, असे म्हणतात. याबद्दल काही अधिक माहिती आहे का? (हे परशुरामाशी नाही तरी कथेतल्या खलनायकाशी संबंधित असावे.) सहमत इनिगोय'जी.. "कार्तवीर्यार्जुननाम राजा बाहुसहस्त्रवान.. तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते" असा तो श्लोक आहे. आणि तो याच कार्तवीर्यार्जुन म्हणजे सहस्त्रार्जुनाशी सम्बंधित आहे. दत्तगुरुंनी दिलेल्या आशीर्वादानुसार त्याच्या हजारो हातांच्या साहाय्याने तो ती वस्तू शोधून देतो, अशी सम्कल्पना आहे. आणि "जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला." "चरू" म्हणजे काय? "चरू" म्हणजे अधिकारी ऋषींनी उचित मंत्राच्या साह्याने अभिमन्त्रित केलेले एक वेगळ्या प्रकारचे पाणी किन्वा द्रव्य. त्या त्या मन्त्रशक्तीनुसार हे अभिमन्त्रित द्रव्य सोने, माती, इ. च्या कलशात ठेवले जाते. व ते ज्या व्यक्तीसाठी किन्वा एखाद्या कारणासाठी बनवले असते.. ते फक्त त्याच व्यक्तीने सांगितलेल्या वेळी प्राशन करणे जरूरी असते. शिव-शक्ती, ब्रह्माशक्ती, विष्णुशक्ती इ. ना मन्त्राद्वारे पाचारण करून त्यांचे तेज अभिमन्त्रित करून "चरु" बनवले जात असत.

In reply to by इनिगोय

रेवती 16/05/2012 - 03:51
अनुभव सांगितला तर हसाल पण माझी आजी कोणाचं काही हरवलं की हा श्लोक म्हणायला सांगायची. मी तो लिहून कपाटाच्या दारच्या आत चिकटवला होता......वयाच्या दहाव्या वर्षी. आता माझं हरवून हरवून काय हरवणार? पुस्तक, शाळेतील शिवणाचे सामान इ. हो, मिळाले. एक आवडता रुमाल मात्र मिळाला नव्हता. आता गंमत वाटते पण त्यावेळी मी या श्लोकाची फ्यान होते. :)

In reply to by मिसळपाव

किचेन 18/05/2012 - 14:46
किती वेळा म्हणायचं हा श्लोक? माझ्या गाडीची चावी हरवलीये...चावीवाल्याला बोलावान्याआधी एकदा हा श्लोकही वापरून बघते. ;)

अमृत 14/05/2012 - 17:03
वाचायला मिळाली. छान लिहीलयं.फक्त तो 'अ‍ॅक्च्युली' शब्द खटकला. पौराणिक विषयांवर आणखी वाचायला आवडेल. अमृत

jaypal 14/05/2012 - 20:48
कौतुक / उदत्तीकरण करणारी भंपक कथा. स्वतःचा जिव वचवण्यासाठी आईची हत्या करणारे पुजले जातात हेच खर दुर्दैव. केवळ विचार मनी आला म्हणुन जिव घ्यायचा :-(. ही असली पुरुषप्रधान संस्क्रुतीचा उदोउदो करणारी गोष्ट मोठ्य भक्तीभावाने ऐकली व सांगीतली जाते तेही २०१२ मधे :-( नव-याच्या अंगी धमक असती तर मुलांना वध करायाला सांगीतलाच नसता.

In reply to by jaypal

शिल्पा ब 14/05/2012 - 21:26
तुमच्यासारख्या लोकांना आपल्या भारतीय इतिहासाची काडीइतकीही माहीती नाही तरीही असे अर्थहीन प्रतिसाद देत आहात हे पाहुन मनाला अनंत यातना झाल्या. मुळ लेखाविषयी : परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. अगदी खरं आहे, अन म्हणुनच तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे कारण नुसत्या ऐकीव माहीतीवर हा लेख लिहिलेला नाही हे दिसत आहे. म्हणुनच "तो परशुराम" असं एकेरी संबोधलं आहे हे दखलपात्रच आहे. क्रोध ही सुद्धा एक देवता आहे ही एक नविन माहीती मिळाली त्याबद्दल धन्यवाद. फक्त एक दुरुस्ती सुचवते, पटतंय का पहा: तिनेच आपल्या पुत्राला -रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरन्जीवी बनवले होते. या मधे "होते" च्या ऐवजी "आहे" असं असायला हवं ना? लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते. भारत माता की जय.

In reply to by शिल्पा ब

दादा कोंडके 14/05/2012 - 22:22
लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते.
ह्या वाक्या नंतर ;) ही स्मायली राहिली काय?

In reply to by शिल्पा ब

मृगनयनी 14/05/2012 - 22:43
लेखिकेसारख्या धार्मिक अन सुसंकृत लोकांची देशाला खुप गरज आहे हे पुन्हा नमुद करु इच्छिते. तुम्हाला "सुसंस्कृत" म्हणायचे आहे का? :)

In reply to by मृगनयनी

शिल्पा ब 14/05/2012 - 23:47
हो हो...आपण सुसंस्कृत आहात हेच म्हणायचंय...अर्थात आधीच्या प्रतिसादात टायपो नसल्याने तो आपल्याला दिसला नसावा असं गृहीत धरते.

In reply to by jaypal

मृगनयनी 14/05/2012 - 22:09
@ jaipal - "परशुरामाने आपल्या आईला पुन्हा जिवन्त केले".. हे आपल्याकडून सोईस्करपणे विसरले जातेय.... "आईची हत्या परशुरामास का करावी लागली" याचे विस्तृत विश्लेषण लेखात दिलेले आहे. :) क्षत्रिय राजा असूनही ऋषी-मुनींची सम्पत्ती बळकावणार्‍या, त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या, गाय दिली नाही म्हणून एका ऋषीची हत्या करणार्‍या, केवळ अधिकार गाजवण्यासाठी सर्वांचा छळ करणार्‍या "सहस्त्रार्जुना"बद्दल आपले काय मत आहे? तसेच सहस्त्रार्जुनाच्या "संस्कृती"स आपण नक्की काय म्हणू इच्छिता?

In reply to by मृगनयनी

रमताराम 14/05/2012 - 22:30
आईवर हत्यार चालवणे हा अश्लाघ्यपणा केला तिथेच सारे संपले. नंतर जिवंत केले वगैरे पोराटोरांना सांगण्याच्या गोष्टी. खल्लास. (आमचा हा पहिला नि शेवटचा प्रतिसाद). (जामदग्न्य कुलोत्पन्न असूनही परशुरामाचे कृत्य अश्लाघ्य नि निंदनीय मानणारा) रमताराम अवांतर: पॉपकॉर्न हवेत का कोणाला.

In reply to by रमताराम

अँग्री बर्ड 14/05/2012 - 23:59
आता जामदग्न्य कुलोत्पन्न असून सुद्धा जर श्री परशुराम आईवर शस्त्र चालवतात हे तुम्ही धरून चालता तर मग परत तिला जिवंत केले हे मान्य करायला तुमचे काय जाते ? की नुसता विरोधासाठी म्हणून विरोध करायचा ?

In reply to by अँग्री बर्ड

रमताराम 15/05/2012 - 09:53
शस्त्र चालवल्याने हत्या होते याचे असंख्य पुरावे आमच्या आसपास आहेत त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे अवघड नाही. जिवंत करता येते याचा एक पुरावा दाखवा मग आम्ही मानू. आणि आम्ही अमान्य करण्याचा प्रश्न येतोच कुठे, खुद्द परशुरामाच्या 'त्या कृत्याचे समर्थक'च हे मान्य करतात ना. (खरंतर हे अध्याहृत होतेच पण नाहीच समजले तर उलगडून सांगतोच) 'जर तुम्ही म्हणता तसे कृत्य घडले असेल तर ते अश्लाघ्य, निंदनीय होते.' हा प्रतिसाद आहे. घडले की घडले नाही याचा आमच्या जगण्यावर वा विचारावर काडीचा परिणाम होत नाही, सबब आम्ही त्याचा विचारही करत नाही. घडले असा दावा 'तुम्ही' केलात तर वरचा प्रतिसाद लागू, नाही केलात तर बल्ले बल्ले. हॅरी पॉटरने एखाद्या ड्रॅगनला मारले हे योग्य केले की नाही यावर आम्ही आमचे मत देऊ शकतो, ते त्या पुस्तकातील लिखाणावर आधारित असते. याचा अर्थ खरंच हॅरी पॉटर अस्तित्त्वात आहे, तो जादूगार आहे नि अस्तित्त्वात असलेल्या एखाद्या ड्रॅगनला त्याने ठार मारले यावर आमचा विश्वास आहे असा नसतो. साहित्यिक प्रश्न असतो तो नि उत्तरही त्या संदर्भातच घ्यायचे असते. (चमत्कार वगैरे शाळकरी कल्पनांमधून केव्हाच बाहेर आलेला) रमताराम ता.क. (हा मात्र 'नक्की' शेवटचा प्रतिसाद, कारण याच प्रतिसादाच्या स्वरूपावरून इथून प्रतिसादाची 'डिग्री' - श्लेष अपेक्षित - वाढत जाणार त्यामुळे प्रतिवाद करण्यात फार अर्थ नाही.)

स्पंदना 15/05/2012 - 05:26
चौंडकाबद्दल लिहायच राहिल का? राहिल असेल तर मी सांगते. १) चौंडक, जे आपण जोगत्यांच्या (जोगवा मागत येणार्‍या लोकांच्या ) हातात पहातो , या वाद्याचा निर्माण इतिहास सांगतेय मी. जे एकवीस वेळा क्षत्रिय निर्मुलन केल गेल त्यात स्त्रिया मारल्या गेल्या नव्ह्त्या. अन अश्या चौल क्षत्रिया??????मला नक्की घराण आठवत नाही आहे, पण या क्षत्रियांचा वध केल्यावर त्यांच्या स्त्रीया परत श्री श्री श्री भगवान परशुरामांना शरण गेल्या , अन आता आम्ही विधवा झाल्याने आम्ही कसे जगावे असे विचारु लागल्या. तेंव्हा या श्री श्री श्री महात्म्याने युद्धभुमीवर पडलेल्या त्या क्षत्रियांच्या कवट्यांना त्यांचीच आतडी लावुन हे चर्मवाद्य वाजवत जोगवा मागत फिरा असा आदेश दिला , जो आजही आपण अस्तित्वात पहातो. या बद्दल्च विवेचन का नाही आल या लेखात. बा द वे, रेणुकेच्या गडावर जे ब्राम्हण लोक धर्माच्या नावाखाली करुन राहिले त्या बद्दल त्यांचा निर्वंश कोण करणार? २) परशुरामाला 'अवतार' न मानता 'अंशअवतार ' म्हंटल जात.

In reply to by स्पंदना

मृगनयनी 18/05/2012 - 19:31
चौंडक, जे आपण जोगत्यांच्या (जोगवा मागत येणार्‍या लोकांच्या ) हातात पहातो , या वाद्याचा निर्माण इतिहास सांगतेय मी. जे एकवीस वेळा क्षत्रिय निर्मुलन केल गेल त्यात स्त्रिया मारल्या गेल्या नव्ह्त्या. अन अश्या चौल क्षत्रिया??????मला नक्की घराण आठवत नाही आहे, पण या क्षत्रियांचा वध केल्यावर त्यांच्या स्त्रीया परत श्री श्री श्री भगवान परशुरामांना शरण गेल्या , अन आता आम्ही विधवा झाल्याने आम्ही कसे जगावे असे विचारु लागल्या. तेंव्हा या श्री श्री श्री महात्म्याने युद्धभुमीवर पडलेल्या त्या क्षत्रियांच्या कवट्यांना त्यांचीच आतडी लावुन हे चर्मवाद्य वाजवत जोगवा मागत फिरा असा आदेश दिला , जो आजही आपण अस्तित्वात पहातो. या बद्दल्च विवेचन का नाही आल या लेखात. @ aparna akshay.. "बेटासूर" नावाच्या एका दैत्याचा वध करून त्याच्या नसा आणि शिरा कापून त्या त्याच्या कापलेल्या डोक्याच्या ब्रह्मरन्ध्रात रोवून (ब्रह्मरन्ध्र- डोक्याचा किन्वा कवटीचा वरचा असा भाग.. ज्यामधून आत्मा बाहेर पडतो.. व व्यक्ती मृत होते.) त्याचे एक वाद्य बनवले. (यामध्ये आतड्याचा वापर कुठेही झालेला नाही.) व "तितृणं" "तितृणं" असा आवाज करत वाजवत परशुराम रेणुकामातेपाशी आला. ते वाद्य (ज्याला बोली बाषेत तुणतुणं म्हणतात) रेणुकामातेने जोगत्यांना दिले. पुढे हे वाद्य बनवण्यासाठी पशूंच्या चामड्यांचा वापर होऊ लागला. 'गोन्धळी लोक' रेणुकामातेस आपले आद्यदैवत मानतात.

चित्रा 15/05/2012 - 08:34
परशुराम - सीता- दत्तगुरु-- शिवयोगी एकनाथ इ. सगळे एकाच कथेत कसे असे प्रश्न पडतात. कथा म्हणून ठीक आहे. पण आत्ता अचानक ही सर्व कथा लिहीण्याचे काही खास कारण आहे का? (अवांतर: एक सुचवते- अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा. )

In reply to by चित्रा

मृगनयनी 15/05/2012 - 11:12
परशुराम - सीता- दत्तगुरु-- शिवयोगी एकनाथ इ. सगळे एकाच कथेत कसे असे प्रश्न पडतात. कृतयुगात जन्मलेले भगवान परशुराम "चिरन्जीवी" होते. ते कृतयुगातही होते, त्यानन्तरच्या त्रेतायुगातही होते. त्यामुळेच तर त्यांनी मिथिलेच्या जनकराजाकडे जाऊन भगवान शन्करांनी दिलेले "शिवधनुष्य" त्यास दिले. व सीतास्वयंवरात ठेवण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर जेव्हा रामाने ते शिवधनुष्य मोडून स्वयंवर जिन्कले, तेव्हा परशुराम स्वतः तिथे आले होते. व राम-सीतेला आशीर्वादही दिला होता. त्यानन्तर द्वापारयुगातही परशुराम होते. फक्त ब्राह्मणांनाच ते अस्त्रविद्या शिकवित असत. परन्तु एकदा कर्णाने स्वतः ब्राह्मण असल्याचे सांगून परशुरामांकडून अस्त्रविद्या शिकून घेतली. परन्तु एका भुन्ग्यामुळे तो ब्राह्मण नसल्याचे उघडकीस आले. व "ती अस्त्रविद्या तुला स्वसंरक्षणासाठी उपयोगी पडणार नाही" असा परशुरामाने कर्णास शाप दिला. आता कलीयुगामध्येही जेव्हा अजून अडीच हजार वर्षांनी कल्की-अवतार होईल, तेव्हा कल्कीचे गुरु हे भगवान- परशुरामच असतील. (सन्दर्भ- कल्की पुराण) तसेच "दत्तगुरुं"चे अस्तित्व अनादिकालापासून आहे. कलियुगात दत्तगुरुंनी -नृसिंहसरस्वती, चिदम्बरम स्वामी, साईबाबा, स्वामी समर्थ इ गुरुंच्या माध्यमातून स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे दिलेले आहेत. शिवयोगी- एकनाथ आणि जोगिन्दर हे सत्ययुगातील दोन शिवयोगी होते. ज्यांनी जमदग्निंच्या क्रोधामुळे आश्रमाबाहेर पडलेल्या रेणुकामातेला आसरा देऊन उपदेश केला होता. यामधल्या "एकनाथां"चा व महाराष्ट्रातील कलीयुगीन सन्त- पैठणचे एकनाथ यांचा काहीही सम्बंध नाही. कथा म्हणून ठीक आहे. पण आत्ता अचानक ही सर्व कथा लिहीण्याचे काही खास कारण आहे का? हो.. हा लेख टंकण्यामागे एक कारणही आहे. एका कुठल्याश्या लेखात सप्तचिरंजीवींपैकी एक- भगवान परशुरामांचे वर्णन- 'अविवेकी सूडवृत्ती' वगैरे केले होते. जे न पटणारे होते. तसेच समाजात परशुरामांबद्दल अनेक गैरसमज आहेत.. ते दूर व्हावे असेही मला वाटत होते.. त्यामुळे हा लेख टंकून भगवान परशुरामांबद्दल माहिती सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे. बाकी आपले 'अवांतर' काही पटण्यासारखे व काही न पटण्यासारखे आहे. परन्तु माझ्या लेखामुळे कुणाला काही नवीन माहिती कळत असेल किन्वा माहित असलेल्या गोष्टी पुन्हा रिवाईज होत असतील.. तर मला आनन्दच आहे! तसेच ज्यांना माझ्या लेखातील काही / पूर्ण गोष्टी आवडत नसतील.. तर तेही लोक त्यांची मते मान्डतातच की!.. आणि त्यामुळे होणारा फायदा असा, की वेगवेगळ्या 'आयडी'च्या मनोवृत्तीची आपल्याला कल्पना येऊ शकते. त्यांचे विचार आपल्याला कळतात.. त्यांची एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल काय मतं आहे.. हे आपल्याला समजते... त्यांची भाषाशैली कळते. ओव्हरऑल मेन्टॅलिटी कळते. :) ;) =)) =)) उदाहरणार्थः- jaypal आणि रमताराम या दोन आयडींच्या विचारांमध्ये खूप साधर्म्य आहे. फक्त फरक इतकाच आहे, की 'रमताराम' हे जमदग्निंच्या कुळातले आहेत. आणि jaypal जमदग्निंच्या कुळातले नाहीयेत. त्यामुळे परशुरामाबद्दल वाईट बोलताना 'रमताराम' यांच्यापेक्षा jaypal यांची भाषाशैली जास्त हार्श आहे. आणि jaypal यांचा "जमदग्नि" ऋषींवर जास्त राग आहे, हेही जाणवते. .. बाकी दोघांची मेन्टॅलिटी साधारण सारखीच्च आहे!! :)

In reply to by मृगनयनी

शिल्पा ब 15/05/2012 - 11:58
तसेच "दत्तगुरुं"चे अस्तित्व अनादिकालापासून आहे. आपला व्यासंग पाहुन वरील वाक्यासंदर्भात एक प्रश्न मनात आला आहे त्याचे उत्तर मिळेल अशी आशा करते. प्रश्न असा: अनादिकाल केव्हा सुरु होतो? नै म्हणजे मधे डायनोसोर वगैरे येउन लोपसुद्धा पावले असे पुरावे आहेत त्यामुळे त्यावेळेस ही वेगळी मानवजात कुठे राहात असे? त्यांचा शीतयुगात कसा निभाव लागला हे वाचायला आवडेल. तसेच अजुन एक म्हणजे, कल्की पुराण लिहिणारे कोण आहेत? अन जिथे पुढच्या सेकंदाला काय होणार हे माहीत नाही तिथे त्यांनी कलियुगात कुठे, कोण अन कसा जन्म घेणार अन त्याचे गुरु कोण असणार वगैरे कशाच्या आधारावर सांगितले की जे तुम्ही सत्यच्च आहे असे मानता? बाकी लोकांची मेंटॅलिटी कळते हे अगदी योग्य निरीक्षण आहे हे नमुद करु इच्छिते.

In reply to by मृगनयनी

jaypal 15/05/2012 - 11:59
>>की 'रमताराम' हे जमदग्निंच्या कुळातले आहेत. आणि jaypal जमदग्निंच्या कुळातले नाहीयेत. "एकमेकांची कुळ शोधुन कोण श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? अशी भांडण लावायची आणि हरी हरी करत मजा बघायची" अश्या कथा ईथे देण्या मागे तुमचा हा छुपा अजेंडा असावा अशी दाट शक्याता होती ती आता निश्चित झाली. उगा मिपा करांची मेन्टॅलिटी वा मनोवृत्तीची तपासणी करण्याची तुम्हाला गरज काय? बहुदा खुप वेळ आहे तुमच्या कडे काड्या सारायला. रीकामा ** कुडाला तंबड्या लावी. तुम्हाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा :-). मिपा वरील वातावरण गढुळ / दुषीत होण्या पुर्वीच संपादक मंडळ वेळीच लक्ष घालतील ही खात्री. :-) जन्माला महत्त्व न देता कर्माला महत्त्व देणारा. जयपाल

In reply to by jaypal

मृगनयनी 15/05/2012 - 13:44
@ जयपाल, मुळात "रमताराम" यांनी ते स्वतः जमदग्नि कुळातले आहेत.. असे एका प्रतिसादात सांगितलेले आहे ( कारण त्यांना त्यांचे कुळगोत्र माहित आहे. ;) ) तर परशुरामाच्या वडिलांबद्दल -पक्षी : जमदग्निंबद्दल बोलताना आपण आपल्या प्रतिसादात नव-याच्या अंगी धमक असती तर मुलांना वध करायाला सांगीतलाच नसता. असे काहीसे टंकलेले आहे. त्यामुळे एकन्दर परशुरामाबद्दल, जमदग्निंबद्दलचा (ब्रिगेडी) द्वेष तुमच्या प्रतिसादातून दिसत होता. मी कुणाचेही कुळ-गोत्र वगैरे काढलेले नाही. व ते जाणून घ्यायची माझी इच्छाही नाही.. त्यामुळे आपले एकमेकांची कुळ शोधुन कोण श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? अशी भांडण लावायची आणि हरी हरी करत मजा बघायची हे तर्क वितर्क सपशेल फोल ठरतात. उगा मिपा करांची मेन्टॅलिटी वा मनोवृत्तीची तपासणी करण्याची तुम्हाला गरज काय? मला हे विचारणारे तुम्ही कोण? :) बहुदा खुप वेळ आहे तुमच्या कडे काड्या सारायला. रीकामा ** कुडाला तंबड्या लावी. हेच वाक्य मी तुमच्याबद्दलही बोलू शकते! :) तुम्हाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा Smile. जिचा वाढदिवस आहे.. तिला शुभेच्छा दिल्यात.. तर सत्कारणी लागतील!! :) मिपा वरील वातावरण गढुळ / दुषीत होण्या पुर्वीच संपादक मंडळ वेळीच लक्ष घालतील ही खात्री. Smile हे तुम्ही कन्फेशन देत आहात का?.. तसं असेल तर आनन्दच आहे.. :) ;)

In reply to by मृगनयनी

lakhu risbud 15/05/2012 - 16:56
चला आता दुधाची घुसळण सुरु झाली आहे,त्यातून क्रमाक्रमाने ताक,लोणी,तूप असे "शेलके"(??) पदार्थ वेगळे निघणार आहेत आणि "जड" "अशुद्ध" (??) असे पदार्थ खाली राहणार. आता प्रत्येक बाजूने त्यांचे "मानबिंदू" COPYRIGHT( © ), REGISTER ( ® ), TRADEMARK ( ™ ) वगैरे करावीत म्हणजे अनाठायी वाद होणार नाही . अवांतर: सध्या CALCIUM CARBONATE टाकून आंबे पिकवले जातात अशी खबर आहे तेव्हा खरेदी करणार्यांनी काळजी घ्यावी.

आगाऊ कार्टा 15/05/2012 - 10:58
मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा- जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली.. तेव्हा चिरन्जीवी परशुरामाने जनकराजास सान्गितले, की "हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल.. त्याच्याशीच हिचा विवाह होईल." त्यानुसार महाविष्णुच्या सातव्या अवतारात प्रभू रामचन्द्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली व सीतेने त्यांस वरले. प्रत्यंचा म्हणजे धनुष्याला लावण्यात येणारी दोरी.. त्यामुळे ती मोडण्याचा प्रश्नच येत नाही. ही प्रत्यंचा केवळ युद्धाच्या वेळीच धनुष्यावर चढवण्यात येत असे भगवान परशुरामांनी जनकराजाला सांगितले की या शिवधुन्याष्यावर जो प्रत्यंचा चढवील त्याच्याशीच तू सीतेचा विवाह कर. मुळात धनुष्याची काठी सरळ असते. प्रत्यंचा चढविण्यासाठी ती काठी वाकवावी लागते. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढविण्यासाठी ते वाकवले तेव्हा ते मोडले (प्रत्यंचा नव्हे). शिवधनुष्याचा भंग झाल्याचे कळताच भगवान परशुराम अत्यंत क्रोधित होऊन तात्काळ तेथे आले आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण चढवण्याचे आव्हान दिले. प्रभू रामचंद्रांनी परशुरामांना आणि शिवधनुष्याला वंदन करून ते हाती घेऊन त्याच्यावर बाण चढवला. एकदा धनुष्यावर चढवलेला बाण लक्ष्यभेद केल्याशिवाय परत घेत येत नसल्यामुळे श्रीरामांनी परशुरामांना विचारले की हा बाण कुठे सोडू? तेव्हा परशुराम म्हणाले की माझे शिवधनुष्य तू ज्याअर्थी पेललेस त्याअर्थी माझे अवतार कार्य पूर्ण झाले, तेव्हा तू हा बाण माझ्यावरच सोड. परंतू श्रीरामांनी तसे करण्यास नकार दिला. तेव्हा परशुराम म्हणाले की असे असेल तर तू हा बाण सोडून माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग नष्ट करून टाक. तेव्हा श्रीरामांनी भगवान परशुरामाच्या आज्ञेप्रमाणे तो बाण सोडला. त्यानंतर भगवान परशुराम आपले शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांच्या हाती सुपूर्द करुन तेथून निघून गेले.

In reply to by आगाऊ कार्टा

किचेन 18/05/2012 - 14:58
काहीच कळलं नाही.म्हणजे परशुरामांनी स्वत:च स्वत:साठी नरक मागून घेतला? दुसरी गोष्ट म्हणजे परशुराम आणि राम हे दोन्ही विष्णूचे अवतार.जर एक अवतार आधीच पृथ्वीवर आहे तर दुसर्या अवताराने पृथ्वीवर यायची घाई का करावी.( साई बाबांचे अवतार आणि विश्नुचे अवतारात फरक असणारच न )

In reply to by आगाऊ कार्टा

आनंदी गोपाळ 18/05/2012 - 14:58
दोन वेळा कसे मोडले?
प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्या शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढविण्यासाठी ते वाकवले तेव्हा ते मोडले (प्रत्यंचा नव्हे). शिवधनुष्याचा भंग झाल्याचे कळताच भगवान परशुराम अत्यंत क्रोधित होऊन तात्काळ तेथे आले आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण चढवण्याचे आव्हान दिले. प्रभू रामचंद्रांनी परशुरामांना आणि शिवधनुष्याला वंदन करून ते हाती घेऊन त्याच्यावर बाण चढवला.
आधी पण पूर्ण करताना मोडले, मग परत परशुरामास मारण्यासाठी परत प्रत्यंचा कशी काय चढली? मोडक्या धनुष्याने बाण कसा मारता येईल??

शिल्पा ब 15/05/2012 - 11:05
तेव्हा परशुराम म्हणाले की असे असेल तर तू हा बाण सोडून माझा स्वर्गात जाण्याचा मार्ग नष्ट करून टाक. म्हणजे नेमका कुठे बाण सोडला अन काय नष्ट केलं असं समजायचं? प्रतिकात्मक किंवा रुपकात्मक असा विचार केला तरी नेमकं काय केलं असावं?

In reply to by शिल्पा ब

गवि 15/05/2012 - 11:16
मारला असेल बाण योग्य जागी कुठेतरी अन केला असेल रस्ता बंद.. आमचा हपीसचा रस्ताही ठामपाने अनेक शस्त्रांच्या साहाय्याने बंद करुन टाकला आहे गेला महिनाभर. तुम्हाला उगाच नसत्या शंका.. भोचक शंका काढून आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी शंका घेणे अतएव त्याची चेष्टा करणे बंद करावे ही विनंती.

In reply to by गवि

दादा कोंडके 15/05/2012 - 11:49
मारला असेल बाण योग्य जागी कुठेतरी अन केला असेल रस्ता बंद
सहमत! पुराणात एव्हडे चिमीत्कार होतात, तसच रामाने स्वर्गात अप-डाउन करणार्‍या पुष्पक इमानाचं टायर बाणाने पम्पचर केलं असेल. व्हॉट इज अँड व्हॉट नॉट! :)
भोचक शंका काढून आपल्या सांस्कृतिक ठेव्याविषयी शंका घेणे अतएव त्याची चेष्टा करणे बंद करावे ही विनंती.
अनुमोदन!

In reply to by दादा कोंडके

शिल्पा ब 15/05/2012 - 12:01
गवि अन दादा तुम्हा दोघांचाही निषेध. मी माझं ज्ञान वाढवायचा प्रयत्न करतेय तर तुम्ही त्यात असा खोडा घालु नये ही विनंती. आमच्या पुराणाविषयीच्या इतिहासाच्या शंकांना भोचक म्हणुन तुम्ही या भारतभुमीच्या इतिहासाचा अपमान करीत आहात हे लक्षात घ्यावे ही अजुन एक विनंती.

In reply to by jaypal

५० फक्त 15/05/2012 - 12:36
मग नाय तर काय, असेल राम त्याकाळच्या संस्थळावरचा संपादक, असतील त्याच्याकडे अ‍ॅडमिनचे राईट, एखाद्या प्रतिसादाला बुच मारलं असेल अन झालं,

In reply to by गवि

मृत्युन्जय 15/05/2012 - 12:46
जी गोष्ट व्यासांना नाही माहिती ती त्या नैनीला काय विचारता बे? Then unto Dasaratha's son who said so, Rama of Bhrigu's line replied, 'A truce to all crafty speech, O king! Take this bow.' At this, Rama the son of Dasaratha, took in anger from the hands of Rama of Bhrigu's line that celestial bow that had dealt death to the foremost of Kshatriyas. And, O Bharata, the mighty hero smilingly strung that bow without the least exertion, and with its twang loud as the thunder-rattle, affrighted all creatures. And Rama, the son of Dasaratha, then, addressing Rama of Bhrigu's said, 'Here, I have strung this bow. What else, O Brahmana, shall I do for thee?' Then Rama, the son of Jamadagni, gave unto the illustrious son of Dasaratha a celestial arrow and said, 'Placing this on the bow-string, draw to thy ear, O hero!' "Lomasa continued, 'Hearing this, Dasaratha's son blazed up in wrath and said, 'I have heard what thou hast said, and even pardoned thee. O son of Bhrigu's race, thou art full of vanity. Through the Grandsire's grace thou hast obtained energy that is superior to that of the Kshatriyas. And it is for this that thou insultest me. Behold me now in my native form: I give thee sight.' Then Rama of Bhrigu's race beheld in the body of Dasaratha's son the Adityas with the Vasus, the Rudras, the Sadhyas with the Marutas, the Pitris, Hutasana, the stellar constellations and the planets, the Gandharvas, the Rakshasas, the Yakshas, the Rivers, the tirthas, those eternal Rishis identified with Brahma and called the Valkhilyas, the celestial Rishis, the Seas and Mountains, the Vedas with the Upanishads and Vashats and the sacrifices, the Samans in their living form, the Science of weapons, O Bharata, and the Clouds with rain and lightning, O Yudhishthira! And the illustrious Vishnu then shot that shaft. And at this the earth was filled with sounds of thunder, and burning meteors. O Bharata, began to flash through the welkin. And showers of dust and rain fell upon the surface of the earth. And whirlwinds and frightful sounds convulsed everything, and the earth herself began to quake. And shot by the hand of Rama, that shalt, confounding by its energy the other Rama, came back blazing into Rama's hands. And Bhargava, who had thus been deprived of his senses, regaining consciousness and life, bowed unto Rama--that manifestation of Vishnu's power. And commanded by Vishnu, he proceeded to the mountains of Mahendra. And thenceforth that great ascetic began to dwell there, in terror and shame. And after the expiration of a year, the Pitris, beholding Rama dwelling there deprived of energy, his pride quelled, and himself sunk in affliction, said unto him, 'O son, having approached Vishnu, thy behaviour towards him was not proper. He deserveth for aye worship and respect in the three worlds. Go, O son, to that sacred river which goeth by name of Vadhusara! Bathing in all the tirthas of that stream, thou wilt regain thy energy! There in that river is the tirthas called Diptoda where thy grandsire Bhrigu, O Rama, in the celestial age had practised ascetic penances of great merit.' Thus addressed by them, Rama, O son of Kunti, did what the Pitris bade him, and obtained back at this tirtha, O son of Pandu, the energy he had lost.

JAGOMOHANPYARE 15/05/2012 - 12:30
ख्रिशचनांच्यात अवतार नसतात हे किती चांगलं आहे नै? नाही तर ज्यु लोक अत्याचार करत होते, म्हणून देवाने हिटलरचा अवतार घेऊन त्यांचा नायनाट केला. असेही एखादे पुराण निघाले असते.

In reply to by JAGOMOHANPYARE

५० फक्त 15/05/2012 - 15:18
आपली भुर्जपत्रावर लिहिली ती पुराणं अन त्यांनी काढला तो सिनेमा, हा भेदभाव कधी मिटणार कुणास ठाउक ? अजुन एक ५-५० शे वर्षांनी त्याचंही पुराण होईलच की,

चिगो 15/05/2012 - 13:44
परशुरामाचा माझ्यापुरतं महत्त्व : परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आणि मला त्याचं उत्तर आल्याने चांगले इंप्रेशन पडले असावे कदाचित.. परशुरामांबद्दल मला असलेली माहिती.. त्यांच्या आई-वडीलांचे नाव, व बापाच्या ऑर्डरवरुन आईची हत्या केली, हे पुराण.. जोगवामधील "लल्लाटी भंडार" ह्या गाण्यावरुन पुनर्जिवित झालेल्या रेणूकामातेलाच "यल्लम्मा" मानतात, हेही कळलं. अरुणाचल प्रदेशमधे एक "परशुराम कुंड" आहे. परशुरामाने मातृहत्या करुन त्याचा परशु इथे धुतला, असे मानतात. इथुनच जवळून "लोहीत" नदी वाहते (लोहीत म्हणजे रक्त), जी पुढे जावून ब्रम्हपुत्रेला मिळते.. ह्या मातृहत्याकारकशस्त्रप्राक्षलणामुळे ब्रम्हपुत्रेचे पाणी गढूळ असुन, हा नद पुजनीय नाही, असे माननारे मानतात..

In reply to by चिगो

परशुरामाबद्दल इंटरव्युमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता
कुठच्या कंपनीत हो? नाही म्हणजे माहिती असलेले बरे कारण उद्या मला पण तिथेच इंटरव्ह्यूला जायचे असेल तर परशुराम वाचायला हवा

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

चिगो 15/05/2012 - 14:37
संघ लोक सेवा आयोगाच्या इंटरव्युत विचारला होता.. आता आधीच्या चार-पाच जणांना इंटेलेक्चुअल टायपातले प्रश्न इचारुन बोर्डाचा चेअरमॅन पिकला होता, की तो टैमपास करत होता, की आमचं थोबाड पाहून त्याने हा प्रश्न विचारला हे त्याचं त्याला माहीत.. :D असं म्हणतात की ह्या इंटरव्युत "सूर्याखालच्या कुठल्याही विषयावर" (Anything under the Sun चा स्वैर अनुवाद) प्रश्न विचारला जाऊ शकतो.. त्याचंच उदाहरण समजा.. ;-)

In reply to by चिगो

बालगंधर्व 17/05/2012 - 15:25
चिगो, आमच्या क्रर्नाट्कात रेणुका देवीची २ रुपे मानतत. एक यल्लम्मा आणि दुसरी मरिअम्मा. परशुराम्ने रेणुका देवीबरोबरच तिच्या एका मेइत्रिणीचे पण डोके उडवले. अणि नन्तर चुकुन त्या दोन्ही मुंडक्याची अदलाबदली झाली व रेणुका देवीचे डोके तिच्या मएत्रीनीला आणि मेत्रिनीचे डोके रेनुकादेवीला बसवले गेले. ज्यला रेणुकादेवीचे डोके ते- यल्लम्मा आणि ज्याला तिच्या मेइत्रिणीचे डोके ती मरिअम्मा असे मानतात. अनि दोन्हीची पुजा करतात. आमच्या कडे सोउन्दत्ती या गावाला यल्लम्माचे खुप महतत्व आहे. पोत्तुराज मरीअम्माच्या नावाने स्वत>च्या अंगावर फट्के मरुन घेतो.

प्रचेतस 15/05/2012 - 14:20
मृगनयनीने सांगितलेली परशुरामाची कथा दत्तगुरु, एकनाथ व जोगिनाथ यांवरून तर नाथपंथीच आहे हे सिद्ध होते. कल्की पुराण, विष्णू पुराण, गरूड पुराण आदी पुराणे अलीकडच्या काळात म्हणजे चौथ्या, पाचव्या शतकात आकारास आली, साहजिकच त्यात दत्तांचे उल्लेख आढळतात. दत्त ही वैदिक देवता नव्हे. महाभारतातही दत्ताचा उल्लेख एकदाच येतो तो सुद्धा परशुराम उपाख्यानातच. त्यामुळे हा भाग प्रक्षिप्त असावा असे मानायला पुरेसा वाव आहे. महाभारतात आरण्यक पर्वात परशुराम उपाख्यान आले आहे. जमदग्नी शीघ्रकोपी होते इतकाच उल्लेख आहे. क्रोधदेवता प्रसन्न होण्याचा काहीही उल्लेख नाही. आख्यानानुसार सहस्त्रार्जुन जमदग्नींच्या धेनूचे बळजबरीने हरण करून नेतो. इथे ही धेनू कामधेनू दाखवलेली नाही. ती तर गरीब बिचारी हतबल गाय दाखवलीय. (गाईच्या शरीरातून सैनिक बाहेर पडण्याचा प्रसंग वसिष्ठ-विश्वामित्राच्या आख्यानात आहे. राजा विश्वामित्र नंदिनीचे हरण करण्यासाठी येतात तेव्हा हतबल वसिष्ठ नंदिनीलाच सांगतात की तूच आता स्वतःला वाचव तेव्हा नंदिनीच्या मुखातून, शेपटातून विविध सैनिक उत्त्पन्न होऊन विश्वामित्राचा पराभव करतात.) परशुरामाला धेनूचे हरण झाल्याचे जमदग्नींकडून समजते तेव्हा तो कार्तवीर्याचा वध करतो. हजार हात पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असे महाभारतात काहीही नाही. पित्याचा वध पाहून चिडलेली सहस्त्रार्जुनाची मुले जमदग्नींच्या आश्रमात घुसून जमदग्नींचा वध करतात. शोकाकूल परशूराम पृथ्वी नि:क्षत्रिय करीन अशी प्रतिज्ञा करून सहस्त्रार्जुनाचा निर्वंश करतो व पुन्हा पुन्हा अशी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करतो. आणि काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात. बाकी परशुराम जरी चिरंजीवी म्हणून प्रसिद्ध असला तरी त्याचाही मृत्यु अटळ आहे असे महाभारतात म्हटले आहे. द्रोणपर्वात अभिमन्यू वधानंतर शोकाकुल झालेल्या युधिष्ठिराला समजावण्यासाठी नारद त्याला षोडशराजकीय आख्यान ऐकवतात. त्यात मांधाता, दाशरथी राम इत्यादी राजांबरोबरच परशुरामाचेही छोटेसे आख्यान आहे. नारद म्हणतात-....हे सृंजया !, चार श्रेष्ठ गोष्टींमुळे तुझ्या पुत्रापेक्षा अधिक श्रेष्ठ असलेला परशुरामही मृत्यु पावणार आहे. तेव्हा यज्ञ न करणार्‍या आणि दान न देणार्‍या तुझ्या पुत्राविषयी तू शोक करू नकोस. सृंजया हे तुझ्यापेक्षाही कित्येक पटीने श्रेष्ठ असलेले आधी मेलेले आहेत आणि पुढेही मरतील.

In reply to by प्रचेतस

दिगम्भा 15/05/2012 - 18:57
आपल्या पत्नीच्या पोटीचा कोणाहीपासून झालेला पुत्र (कानीन पुत्र) हा बीजक्षेत्रन्यायाने (पक्ष्याच्या द्वारे शेतात पडलेल्या बीजापासून उत्पन्न झालेले धान्य हे शेतकर्‍याच्या मालकीचे असते) औरस पुत्राच्या इतक्याच योग्यतेचा मानावा असा शास्त्रनियम आहे. याच न्यायाने युधिष्ठिर व अन्य पांडव हे पांडूचे पुत्र मानले गेले. तेव्हा पुतण्याचे नाते आणले नाही तरी अभिमन्यु युधिष्ठिराचा पुत्र होतो.

In reply to by दिगम्भा

दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? --- धागा आवडला. प्रतिसाद तेवढे रंजक नाहीत. गवि, परा, ५० फक्त, शिल्पा ब इत्यादी सर्व होतकरू लोकांनी पुराणातून रंजकता शिकावी अशी नम्र विनंती. बेटर लक नेक्स्ट टाईम.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

JAGOMOHANPYARE 15/05/2012 - 19:54
दिगम्भा, अभिमन्यू सुभद्रेचा ना? का सुभद्राही मागून आणलेली भिक्षा, अर्थात वस्तू समजली गेली? ----------- हेच विचारायचे होते ......... प्रजा ही राजाचा जणू पुत्र असते.. या न्यायानेही नागरीक अभिमन्यु राजा युधिष्ठीराचा पुत्र होतो, असेही मग उत्तर येईल :)

In reply to by प्रचेतस

५० फक्त 15/05/2012 - 15:23
काश्यप ऋषींना पृथ्वी दान करतो तेव्हा ह्याने परत क्षत्रिय संहार करू नये म्हणून काश्यप त्या महेंद्र पर्वतावर जाण्यास सांगतात - जी पृथ्वी परशुरामाने दान केली, त्याच पृथ्विवरच्या महेंद्र पर्वतावर त्याला जायला सांगण्यामागं काय उद्देश असावा, याबद्द्ल कुणी सांगेल का ? की महेंद्र पर्वत हा पृथ्बी अनेक्स मध्ये होता /आहे.

In reply to by ५० फक्त

पैसा 15/05/2012 - 19:35
काश्यप ऋषींना पृथ्वी दान केल्यानंतर दान केलेल्या जमिनीवर कसं राहणार? म्हणून परशुरामाने समुद्र हटवून नवीन अशी कोकण भूमी (कुमारी भूमी) तयार केली आणि काही लोकांना तिथे नेऊन वसाहती केल्या अशी एक कथा आहे. त्यामुळे कोकणात परशुरामाची देवळे आढळतात. तसंच जोगेश्वरी (जोगुळांबा) म्हणजेच रेणुका असल्यामुळे कोकणातल्या अनेक लोकांची कुलदेवता जोगेश्वरी आहे.

सहज 15/05/2012 - 14:33
सध्या श्री भगवान परशुराम (व सप्त चिरंजीव मंडळातले अन्य) कुठे असतात व काय करतात? कोणी सांगू शकेल काय?

In reply to by गवि

कवटी 15/05/2012 - 15:15
खरय गवि. आपण भेटल पाहिजे... टचमधे राहिले पाहिजे... ऐनवेळी कोण कुठय विचारल तर पत्ता लागत नाही. मी पन नवीमुंबैत नोकरी करतो

In reply to by गवि

५० फक्त 15/05/2012 - 15:20
तरी म्हणलं होतं तुम्हाला पुणे गेटच्या कट्ट्याला मला तुमच्या फेसबुकात अ‍ॅड करुन घ्या, टच मध्ये राहु, पण तुम्हाला पटलंच नाही, असो आता तरी करा अ‍ॅड. बाकी ऑर्कुटवर सगळे एकत्र होतं ना आपण, ते ऑर्कुट बंद झालं अन मग फार अवघड झालं आहे सगळं.

In reply to by गवि

सूड 16/05/2012 - 00:52
खरंच एक कट्टा करायला हवा राव, म्हणजे भेट तरी होईल. जाहीर धागा काढला तर कदाचित पंचपतिव्रता, सोळा मातृका, चौसष्ट योगिनी, देवकन्या, नागकन्या आसरांच्या स्वार्‍यांसह हजेरी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लेखनप्रकार
परशुराम ;- भगवान महाविष्णुचा सहावा अवतार असणार्‍या "परशुरामा"बद्दल काही जातीय कारणास्तव बरीच उलटीसुलटी चर्चा ऐकायला मिळते. परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. परन्तु परशुरामाचे खरे रूप अत्यन्त सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे. तसेच त्याने कोणावरही कुठलाही अन्याय केलेला नाही...उलट भगवान परशुरामामुळे लोकांचे कल्याणच झाले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख! - महिष्मती नगरीचा क्षत्रियकुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु-दत्तात्रेय कृपेने पुत्रपाप्ती झाली. त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन.

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

चैतन्य गौरान्गप्रभु ·

बहुगुणी 22/04/2012 - 23:05
चै गो: वसुंधरा दिवसाचं निमित्त साधून फार uplifting लेख लिहिलात, धन्यवाद! जादव पायेंग ची दखल इतर देशातल्या लोकांनी जितकी घेतली तितकी भारतीयांनी नाही. जालावर शोधून त्याचं प्रकाशचित्र इथे टाकतोयः

श्रीरंग 23/04/2012 - 00:20
सुंदर लेख! खूप खूप धन्यवाद! असंख्य कतृत्वशून्य फडतूस तथाकथित सेलेब्रिटीजची टीव्ही वरची गर्दी दिसली, की अशा खरोखरच्या उत्तुंग लोकांकडे माध्यमांचं होत असलेलं दुर्लक्ष पाहून खंत वाटते.

कौतिक राव 23/04/2012 - 00:57
आप्ल्या राज्यात चान्गला स्कोप आहे जादवान्ना!! या महापुरुशा ला आपल्या देशाचा पर्यावरण मन्त्री का करु नये.. अशी एक कारणे दाखवा नोटीस काढायला हवी..

स्पंदना 23/04/2012 - 07:26
बोलती बंद झाली . अरण्य ? अरण्य उभा केल यान? बापरे. एकच सुचना 'ब्रम्हपुत्र' हा 'नद' आहे. या प्रवाहाचा पात्रविस्तार अन लांबी यावर आधारित हा एक्मेव 'नद ' म्हणुन ओळखला जाणारा प्रवाह .

In reply to by नेत्रेश

स्पंदना 14/08/2013 - 05:22
नद हा अतिविशाल पात्र अन प्र्चंद ओघ असलेला प्रवाह असावा अस मला वाटतय. पण कायमच ब्रह्मपुत्र नदीचा उल्लेख नद असा ऐकला आहे. http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090408084705AAmCsMx

निशदे 24/04/2012 - 00:48
फारच समयोचित आणि माहितीपूर्ण लेख. असे कितीएक ध्येयवेडे प्रसिद्धीची तमा न बाळगता आपल्या मार्गाने जात असतील. धन्यवाद चैतन्य..... :)

पैसा 24/04/2012 - 19:16
अगदी समयोचित लेख आणि उत्तम ओळख. असे कितीतरी लोक हवे आहेत तरच आपली जंगलं वाचतील.

मन१ 24/04/2012 - 19:39
आभाळाएवढ्या कार्याला सलाम. खरच कुणा एकट्याला एवधं सगळं जमेल ह्यावर विश्वास बसत नाही. शंका:- त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय सध्या काय? तो पूर्वी (जंगल उभारणीच्या काळात) काय करायचा? किंवा तो हे कसे करु शकला? ह्याच सर्व शंका मला बिहारमधील "पहाडबाबा" ह्या थोर माणसाबद्दलही आहेत.

बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. हे वाक्य त्या लेखात आहे. माझ्या मते आपल्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यात आहे.

एस 12/02/2013 - 23:40
मिपावर पर्यावरणाबद्दल फारसे लेख आलेले वाचण्यात नाहीत. बहुसंख्य मिपाकर पर्यावरणाच्या बाबतीत 'मला काय त्याचे?' असे आहेत की काय असाही माझा ग्रह झालाय. पण हा लेख मात्र फार आवडला. काही दुवे येथे देत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या खूपशा गोष्टी करण्याआधी आपण विचार करायला शिकूयात ही आशा. http://www.storyofstuff.org/ लाखमालाची गोष्ट - http://vimeo.com/10132338

सुबोध खरे 12/02/2013 - 23:46
चैतन्य गौरान्गप्रभु आपल्याला सुंदर लेखाबद्दल सलाम जादव पायेंग यांना साष्टांग दंडवत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण

अभ्या.. 13/02/2013 - 02:06
सुरेख, एकदम अप्रतिम अशी ओळख करुन दिलीत. अत्यंत उत्तम अशा लेखनाबद्दल चैतन्य साहेबांना धन्यवाद.

बॅटमॅन 14/02/2013 - 19:10
अप्रतिम कार्याचे वर्णन करणारा मस्त लेख. कसा सुटला नजरेतून काय माहिती. या अशा लोकांबद्दल आपण काहीही लिहिणे म्हणजे नळाने समुद्राचे वर्णन करणे होय. असो. काही मासिकांतून याबद्दल आधी वाचलं होतं, या लेखाच्या निमित्ताने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, बहुत बहुत धन्यवाद :)

NiluMP 16/02/2013 - 00:56
एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.

vrushali n 14/08/2013 - 10:39
तोन्डात बोटे घालणारी बाहुली...

माहितीबद्दल अनेक धन्यवाद ! अशी माणसेच खरे मानवतेचे काम करत आहेत... बाकीचे सगळे टिव्हीच्या शोधातले बगळे ! जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली इथे बहुतेक "...आसाम सरकारला..." असे म्हणायचे असावे.

आधी वाचनात आला नव्हता. आता यशोधराने उत्खनन करून हा लेख वर काढल्यावर नजर पडली. खूप छान आणि प्रेरणादायी माहीती आहे. आपापल्या शहरात, राहत्या जागेच्या आजूबाजूस किमान ५ तरी झाडे लावण्याचा (आणि वाढवण्याचा) संकल्प करूयात.

जुइ 23/08/2013 - 22:27
अप्रतिम लेख आणि कल्पनाही करू शकत नाही असे काम केलेल्या व्यक्ति ची ओळख करुन दिल्याब्दल अनेक धन्यवाद!!

मनिष 30/04/2014 - 13:06
हा फार म्हणजे फारच आश्वासक लेख आहे! ह्या माणसाविषयी कुठेतरी वाचल्याचे आठवते..पण हा सविस्तर लेख खुपच आवडला. फारसे प्रतिसाद मिळाले नाही म्हणून फार वाईट वाटायची गरज नाही. प्रतिसाद काय पुणे Vs. xyzपुर वरच्या कुठल्याही धाग्याला मिळतील...पण असे लेख आणि ती माणसे लक्षात राहतात, ते महत्वाचे नाही का?

In reply to by मनिष

यशोधरा 30/04/2014 - 19:50
परवा पैसाताईने फेसबुकवर लिंक शेअर केली होती. तिथेफेबुआवर spiritual ecology असे सर्च करा, त्यांच्या भिंतीवर सापडेल. त्यावरुनच खाली दिलेला उतारा कॉपी केला आहे- Indian man single-handedly plants a 1,360-acre forest (and changes the story) Jadav Payeng turned a barren sandbar in northern India into a lush new forest ecosystem. A little more than 30 years ago, a teenager named Jadav "Molai" Payeng began burying seeds along a barren sandbar near his birthplace in northern India's Assam region to grow a refuge for wildlife. Not long after, he decided to dedicate his life to this endeavor, so he moved to the site so he could work full-time creating a lush new forest ecosystem. Incredibly, the spot today hosts a sprawling 1,360 acres of jungle that Payeng planted — single-handedly. The Times of India recently caught up with Payeng in his remote forest lodge to learn more about how he came to leave such an indelible mark on the landscape. It all started way back in 1979, when floods washed a large number of snakes ashore on the sandbar. One day, after the waters had receded, Payeng, only 16 then, found the place dotted with the dead reptiles. That was the turning point of his life. "The snakes died in the heat, without any tree cover. I sat down and wept over their lifeless forms. It was carnage. I alerted the forest department and asked them if they could grow trees there. They said nothing would grow there. Instead, they asked me to try growing bamboo. It was painful, but I did it. There was nobody to help me. Nobody was interested," says Payeng, now 47. While it's taken years for Payeng's remarkable dedication to planting to receive some well-deserved recognition internationally, it didn't take long for wildlife in the region to benefit from the manufactured forest. Demonstrating a keen understanding of ecological balance, Payeng even transplanted ants to his burgeoning ecosystem to bolster its natural harmony. Soon the shadeless sandbar was transformed into a self-functioning environment where a menagerie of creatures could dwell. The forest, called the Molai woods, now serves as a safe haven for numerous birds, deer, rhinos, tigers and elephants — species increasingly at risk from habitat loss. Despite the conspicuousness of Payeng's project, forestry officials in the region first learned of this new forest in 2008 — and since then they've come to recognize his efforts as truly remarkable, but perhaps not enough. "We're amazed at Payeng," says Gunin Saikia, assistant conservator of Forests. "He has been at it for 30 years. Had he been in any other country, he would have been made a hero."

असामान्य कार्य आहे हे. लेख आवडलाच. आपल्या आजूबाजूची झाडे टिकवून ठेवण्यात आणि अगदी घरातल्या बागेत काही नवीन वाढवण्यात जरी यश आले तरी अंश रूपाने त्यांच्या कार्याला मदत होईल.

चिगो 01/05/2014 - 09:58
सालं घरासमोरच "गार्डन" वाढवायला जमत नाही आम्हाला, आणि हा ग्रेट माणूस जंगल निर्माण करतो? ग्रेटच !! जादव पायेंगच्या जिद्दीला सलाम..

In reply to by चिगो

सखी 06/05/2014 - 22:03
असचं म्हणते. यशोधरा लेख वरती काढल्याबद्दल तुझेही आभार!

बहुगुणी 02/05/2014 - 03:15
जादव पायेंग विषयीचा हा व्हिडिओ; ४:१५-४:३५ या वेळात लक्ष देऊन पहा, रोमांच उठतील... दोन वर्षांपूर्वी या लेखावर पहिली प्रतिक्रिया दिली होती, अजूनही वाचकांना हा लेख वाचावासा वाटतो यातच बरंच काही आलं. पण या निमित्ताने एक आवाहन करावंसं वाटतं... मिपाकर जगभरात अनेक ठिकाणी कट्टे करतात. प्रत्येक कट्टेकर्‍याने येतांना एक रोपटं घेऊन यावं, आणि कट्ट्यानंतर जवळच्या मोकळ्या सार्वजनिक बागेत / जमिनीत (किंवा घर / हॉटेल मालकाची परवानगी असेल तर चक्क घराबाहेरच्या / हॉटेलाबाहेरच्या मोकळ्या जागेत) ही रोपं लावावीत. कुणास ठाऊक, कल्पना पटली आणि प्रत्यक्षात आली तर भविष्यात अगदी जादव पायेंगचं जंगल नाही तरी जगभरात बरीचशी मिपा-मिनी-उद्यानं तयार होतील :-)

नुकतेच १३ वे गिरिमित्र संमेलन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न झाले. जादेव पायेंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने ज्या भटक्यांना त्यांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांना अगदी जवळून त्यांच्याशी मोडका तोडका का होईना संवाद साधता आला. त्यांच्या अफाट कार्याची माहिती सर्वाना झाली. मिपावरील आपल्या लेखामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली होती ती पूर्ण झाली. मिपाला आणि आपल्याला मनापासून धन्यवाद.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

बहुगुणी 15/07/2014 - 20:13
गिरिमित्र संमेलनाविषयीही लिहा, वाचायला आवडेल. थोडंसं संबंधितः कालच एक विरोप वाचायला मिळाला; त्यानुसार 'कल्पवृक्ष' ही संस्था 'सह्याद्री - एक अनमोल ठेवा' हे ४०० पानी पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, प्रत्येकी २०० रुपये किंमतीस हे उपलब्ध असेल. याविषयीची आधिक माहिती विरोपातून खाली देतो आहे (ज्यांना या प्रकाशन प्रकल्पात काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी व्यनितून संपर्क केला तर त्यांची प्रकल्प-चालकांशी इ-गाठ घालून देउ शकेन): We are happy to announce that our Marathi handbook on the Sahyadri region of Maharashtra - "Sahyadri - Nisargacha Anmol Theva" is ready to go to print. The mountain ranges of the Western Ghats of Maharashtra – popularly known as the Sahyadris – is a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.

In reply to by यशोधरा

बहुगुणी 13/01/2016 - 02:15
उपलब्धता: BNHS India: http://bnhs.org/bnhs/index.php?option=com_virtuemart&view=productdetails&virtuemart_product_id=244&virtuemart_category_id=13&Itemid=652 बुकगंगा: http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5722580869706533510 Sahyadri - Nisargacha Anmol Theva Rs. 490/- 200pgs all photos in colour Published by Sakaal Papers in Marathi कल्पवृक्षच्या दुव्यावरून थोडी माहिती: This handbook on the Sahyadri region of Maharashtra focuses on mountain ranges of the Western Ghats of Maharashtra , popularly known as the Sahyadri s , forming a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra. An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context. The book will be of interest to teachers, environment educators, the government officials (specially Education dept, Forest Department, and Tribal department), wildlife tourists, groups involved in tourism, NGOs and concerned individuals. We would be happy to give a discount on bulk order (above 5) or if there is genuine need for a concession (for e.g. use in a rural school). PDF Sampler (A selection of random pages): http://kalpavriksh.org/images/Publications/Sahyadribooksampler.pdf

In reply to by बहुगुणी

यशोधरा 13/01/2016 - 09:54
धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क संस्थेनी पुरस्कृत केलेले एक प्रदर्शन पाहिले होते, तिथे ते पुस्तक पाहिले मी.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने जादेव पायेंग यांची म.टा. मधे प्रसिध्द झालेली मुलाखत. पैजारबुवा,

बहुगुणी 22/04/2012 - 23:05
चै गो: वसुंधरा दिवसाचं निमित्त साधून फार uplifting लेख लिहिलात, धन्यवाद! जादव पायेंग ची दखल इतर देशातल्या लोकांनी जितकी घेतली तितकी भारतीयांनी नाही. जालावर शोधून त्याचं प्रकाशचित्र इथे टाकतोयः

श्रीरंग 23/04/2012 - 00:20
सुंदर लेख! खूप खूप धन्यवाद! असंख्य कतृत्वशून्य फडतूस तथाकथित सेलेब्रिटीजची टीव्ही वरची गर्दी दिसली, की अशा खरोखरच्या उत्तुंग लोकांकडे माध्यमांचं होत असलेलं दुर्लक्ष पाहून खंत वाटते.

कौतिक राव 23/04/2012 - 00:57
आप्ल्या राज्यात चान्गला स्कोप आहे जादवान्ना!! या महापुरुशा ला आपल्या देशाचा पर्यावरण मन्त्री का करु नये.. अशी एक कारणे दाखवा नोटीस काढायला हवी..

स्पंदना 23/04/2012 - 07:26
बोलती बंद झाली . अरण्य ? अरण्य उभा केल यान? बापरे. एकच सुचना 'ब्रम्हपुत्र' हा 'नद' आहे. या प्रवाहाचा पात्रविस्तार अन लांबी यावर आधारित हा एक्मेव 'नद ' म्हणुन ओळखला जाणारा प्रवाह .

In reply to by नेत्रेश

स्पंदना 14/08/2013 - 05:22
नद हा अतिविशाल पात्र अन प्र्चंद ओघ असलेला प्रवाह असावा अस मला वाटतय. पण कायमच ब्रह्मपुत्र नदीचा उल्लेख नद असा ऐकला आहे. http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090408084705AAmCsMx

निशदे 24/04/2012 - 00:48
फारच समयोचित आणि माहितीपूर्ण लेख. असे कितीएक ध्येयवेडे प्रसिद्धीची तमा न बाळगता आपल्या मार्गाने जात असतील. धन्यवाद चैतन्य..... :)

पैसा 24/04/2012 - 19:16
अगदी समयोचित लेख आणि उत्तम ओळख. असे कितीतरी लोक हवे आहेत तरच आपली जंगलं वाचतील.

मन१ 24/04/2012 - 19:39
आभाळाएवढ्या कार्याला सलाम. खरच कुणा एकट्याला एवधं सगळं जमेल ह्यावर विश्वास बसत नाही. शंका:- त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय सध्या काय? तो पूर्वी (जंगल उभारणीच्या काळात) काय करायचा? किंवा तो हे कसे करु शकला? ह्याच सर्व शंका मला बिहारमधील "पहाडबाबा" ह्या थोर माणसाबद्दलही आहेत.

बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. हे वाक्य त्या लेखात आहे. माझ्या मते आपल्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यात आहे.

एस 12/02/2013 - 23:40
मिपावर पर्यावरणाबद्दल फारसे लेख आलेले वाचण्यात नाहीत. बहुसंख्य मिपाकर पर्यावरणाच्या बाबतीत 'मला काय त्याचे?' असे आहेत की काय असाही माझा ग्रह झालाय. पण हा लेख मात्र फार आवडला. काही दुवे येथे देत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या खूपशा गोष्टी करण्याआधी आपण विचार करायला शिकूयात ही आशा. http://www.storyofstuff.org/ लाखमालाची गोष्ट - http://vimeo.com/10132338

सुबोध खरे 12/02/2013 - 23:46
चैतन्य गौरान्गप्रभु आपल्याला सुंदर लेखाबद्दल सलाम जादव पायेंग यांना साष्टांग दंडवत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण

अभ्या.. 13/02/2013 - 02:06
सुरेख, एकदम अप्रतिम अशी ओळख करुन दिलीत. अत्यंत उत्तम अशा लेखनाबद्दल चैतन्य साहेबांना धन्यवाद.

बॅटमॅन 14/02/2013 - 19:10
अप्रतिम कार्याचे वर्णन करणारा मस्त लेख. कसा सुटला नजरेतून काय माहिती. या अशा लोकांबद्दल आपण काहीही लिहिणे म्हणजे नळाने समुद्राचे वर्णन करणे होय. असो. काही मासिकांतून याबद्दल आधी वाचलं होतं, या लेखाच्या निमित्ताने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, बहुत बहुत धन्यवाद :)

NiluMP 16/02/2013 - 00:56
एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.

vrushali n 14/08/2013 - 10:39
तोन्डात बोटे घालणारी बाहुली...

माहितीबद्दल अनेक धन्यवाद ! अशी माणसेच खरे मानवतेचे काम करत आहेत... बाकीचे सगळे टिव्हीच्या शोधातले बगळे ! जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली इथे बहुतेक "...आसाम सरकारला..." असे म्हणायचे असावे.

आधी वाचनात आला नव्हता. आता यशोधराने उत्खनन करून हा लेख वर काढल्यावर नजर पडली. खूप छान आणि प्रेरणादायी माहीती आहे. आपापल्या शहरात, राहत्या जागेच्या आजूबाजूस किमान ५ तरी झाडे लावण्याचा (आणि वाढवण्याचा) संकल्प करूयात.

जुइ 23/08/2013 - 22:27
अप्रतिम लेख आणि कल्पनाही करू शकत नाही असे काम केलेल्या व्यक्ति ची ओळख करुन दिल्याब्दल अनेक धन्यवाद!!

मनिष 30/04/2014 - 13:06
हा फार म्हणजे फारच आश्वासक लेख आहे! ह्या माणसाविषयी कुठेतरी वाचल्याचे आठवते..पण हा सविस्तर लेख खुपच आवडला. फारसे प्रतिसाद मिळाले नाही म्हणून फार वाईट वाटायची गरज नाही. प्रतिसाद काय पुणे Vs. xyzपुर वरच्या कुठल्याही धाग्याला मिळतील...पण असे लेख आणि ती माणसे लक्षात राहतात, ते महत्वाचे नाही का?

In reply to by मनिष

यशोधरा 30/04/2014 - 19:50
परवा पैसाताईने फेसबुकवर लिंक शेअर केली होती. तिथेफेबुआवर spiritual ecology असे सर्च करा, त्यांच्या भिंतीवर सापडेल. त्यावरुनच खाली दिलेला उतारा कॉपी केला आहे- Indian man single-handedly plants a 1,360-acre forest (and changes the story) Jadav Payeng turned a barren sandbar in northern India into a lush new forest ecosystem. A little more than 30 years ago, a teenager named Jadav "Molai" Payeng began burying seeds along a barren sandbar near his birthplace in northern India's Assam region to grow a refuge for wildlife. Not long after, he decided to dedicate his life to this endeavor, so he moved to the site so he could work full-time creating a lush new forest ecosystem. Incredibly, the spot today hosts a sprawling 1,360 acres of jungle that Payeng planted — single-handedly. The Times of India recently caught up with Payeng in his remote forest lodge to learn more about how he came to leave such an indelible mark on the landscape. It all started way back in 1979, when floods washed a large number of snakes ashore on the sandbar. One day, after the waters had receded, Payeng, only 16 then, found the place dotted with the dead reptiles. That was the turning point of his life. "The snakes died in the heat, without any tree cover. I sat down and wept over their lifeless forms. It was carnage. I alerted the forest department and asked them if they could grow trees there. They said nothing would grow there. Instead, they asked me to try growing bamboo. It was painful, but I did it. There was nobody to help me. Nobody was interested," says Payeng, now 47. While it's taken years for Payeng's remarkable dedication to planting to receive some well-deserved recognition internationally, it didn't take long for wildlife in the region to benefit from the manufactured forest. Demonstrating a keen understanding of ecological balance, Payeng even transplanted ants to his burgeoning ecosystem to bolster its natural harmony. Soon the shadeless sandbar was transformed into a self-functioning environment where a menagerie of creatures could dwell. The forest, called the Molai woods, now serves as a safe haven for numerous birds, deer, rhinos, tigers and elephants — species increasingly at risk from habitat loss. Despite the conspicuousness of Payeng's project, forestry officials in the region first learned of this new forest in 2008 — and since then they've come to recognize his efforts as truly remarkable, but perhaps not enough. "We're amazed at Payeng," says Gunin Saikia, assistant conservator of Forests. "He has been at it for 30 years. Had he been in any other country, he would have been made a hero."

असामान्य कार्य आहे हे. लेख आवडलाच. आपल्या आजूबाजूची झाडे टिकवून ठेवण्यात आणि अगदी घरातल्या बागेत काही नवीन वाढवण्यात जरी यश आले तरी अंश रूपाने त्यांच्या कार्याला मदत होईल.

चिगो 01/05/2014 - 09:58
सालं घरासमोरच "गार्डन" वाढवायला जमत नाही आम्हाला, आणि हा ग्रेट माणूस जंगल निर्माण करतो? ग्रेटच !! जादव पायेंगच्या जिद्दीला सलाम..

In reply to by चिगो

सखी 06/05/2014 - 22:03
असचं म्हणते. यशोधरा लेख वरती काढल्याबद्दल तुझेही आभार!

बहुगुणी 02/05/2014 - 03:15
जादव पायेंग विषयीचा हा व्हिडिओ; ४:१५-४:३५ या वेळात लक्ष देऊन पहा, रोमांच उठतील... दोन वर्षांपूर्वी या लेखावर पहिली प्रतिक्रिया दिली होती, अजूनही वाचकांना हा लेख वाचावासा वाटतो यातच बरंच काही आलं. पण या निमित्ताने एक आवाहन करावंसं वाटतं... मिपाकर जगभरात अनेक ठिकाणी कट्टे करतात. प्रत्येक कट्टेकर्‍याने येतांना एक रोपटं घेऊन यावं, आणि कट्ट्यानंतर जवळच्या मोकळ्या सार्वजनिक बागेत / जमिनीत (किंवा घर / हॉटेल मालकाची परवानगी असेल तर चक्क घराबाहेरच्या / हॉटेलाबाहेरच्या मोकळ्या जागेत) ही रोपं लावावीत. कुणास ठाऊक, कल्पना पटली आणि प्रत्यक्षात आली तर भविष्यात अगदी जादव पायेंगचं जंगल नाही तरी जगभरात बरीचशी मिपा-मिनी-उद्यानं तयार होतील :-)

नुकतेच १३ वे गिरिमित्र संमेलन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न झाले. जादेव पायेंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने ज्या भटक्यांना त्यांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांना अगदी जवळून त्यांच्याशी मोडका तोडका का होईना संवाद साधता आला. त्यांच्या अफाट कार्याची माहिती सर्वाना झाली. मिपावरील आपल्या लेखामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली होती ती पूर्ण झाली. मिपाला आणि आपल्याला मनापासून धन्यवाद.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

बहुगुणी 15/07/2014 - 20:13
गिरिमित्र संमेलनाविषयीही लिहा, वाचायला आवडेल. थोडंसं संबंधितः कालच एक विरोप वाचायला मिळाला; त्यानुसार 'कल्पवृक्ष' ही संस्था 'सह्याद्री - एक अनमोल ठेवा' हे ४०० पानी पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, प्रत्येकी २०० रुपये किंमतीस हे उपलब्ध असेल. याविषयीची आधिक माहिती विरोपातून खाली देतो आहे (ज्यांना या प्रकाशन प्रकल्पात काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी व्यनितून संपर्क केला तर त्यांची प्रकल्प-चालकांशी इ-गाठ घालून देउ शकेन): We are happy to announce that our Marathi handbook on the Sahyadri region of Maharashtra - "Sahyadri - Nisargacha Anmol Theva" is ready to go to print. The mountain ranges of the Western Ghats of Maharashtra – popularly known as the Sahyadris – is a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.

In reply to by यशोधरा

बहुगुणी 13/01/2016 - 02:15
उपलब्धता: BNHS India: http://bnhs.org/bnhs/index.php?option=com_virtuemart&view=productdetails&virtuemart_product_id=244&virtuemart_category_id=13&Itemid=652 बुकगंगा: http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5722580869706533510 Sahyadri - Nisargacha Anmol Theva Rs. 490/- 200pgs all photos in colour Published by Sakaal Papers in Marathi कल्पवृक्षच्या दुव्यावरून थोडी माहिती: This handbook on the Sahyadri region of Maharashtra focuses on mountain ranges of the Western Ghats of Maharashtra , popularly known as the Sahyadri s , forming a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region. This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra. An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context. The book will be of interest to teachers, environment educators, the government officials (specially Education dept, Forest Department, and Tribal department), wildlife tourists, groups involved in tourism, NGOs and concerned individuals. We would be happy to give a discount on bulk order (above 5) or if there is genuine need for a concession (for e.g. use in a rural school). PDF Sampler (A selection of random pages): http://kalpavriksh.org/images/Publications/Sahyadribooksampler.pdf

In reply to by बहुगुणी

यशोधरा 13/01/2016 - 09:54
धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क संस्थेनी पुरस्कृत केलेले एक प्रदर्शन पाहिले होते, तिथे ते पुस्तक पाहिले मी.

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने जादेव पायेंग यांची म.टा. मधे प्रसिध्द झालेली मुलाखत. पैजारबुवा,
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

मृत्युन्जय ·

धन्या 09/04/2012 - 17:32
वाचावे ते नवलच... मिपाकर लेखनविषयाच्या साथीला अलगद बळी पडतात ब्वॉ. कर्ण झाला, कुंती झाली, कृष्णही झाला पण चिंता करण्याचं कारण नाही. अजून महाभारतातील बरीच प्रभावी पात्रे बाकी आहेत. अजून येऊदया ;)

In reply to by मृत्युन्जय

धन्या 09/04/2012 - 18:17
तुम्ही लिहा. श्रीकृष्णाच्या निजधामाला जाण्यावरही कुणी लिहा की राव. केव्हापासून ते व्याधाचा बाण अंगठयाला लागून निजधामाला जाणं आणि रुक्मिणीच्या पाठी पाठी येऊन दिंडीरवनात येऊन अठ्ठावीस युगे वीटेवर उभे राहणे यातलं कोडं सुटत नाहीये.

In reply to by धन्या

मृत्युन्जय 09/04/2012 - 18:30
नका हो असली कोडी सोडवत बसू. कोनीतरी तुम्हाला लगेच भागवतातले दाखले देइल की कृष्ण एकाचवेळेस त्याच्या १६१०८ स्त्रियांबरोबर रत होउ शकत असे आणि त्याचवेळेस तो त्याची राजधर्माची कामेदेखील करत असे. ही सर्व कृष्णाची माया होती वगैरे. कृष्णदेखील एक माणूसच होता हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणुनच हा लेख. त्यातील राजकारणासाठी हा लेख लिहिला आणी ज्या प्रकारचे राजकारण आहे त्यासाठी माणूस असणे आवश्यक आहे. कृष्णाने कसे पद्धतशीरपणे सर्व शत्रुंना संपवले हे दाखवण्यासाठी हा लेख. वर्तुळ पुर्ण झाले वगैरे सगळे अनुषंगिक.

प्रचेतस 09/04/2012 - 17:35
उत्तम लेख. पण काहीसा एकांगी वाटला. कृष्णाने युद्ध थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण दुर्योधनाच्या हटवादीपणापुढे त्यालाही नमते घ्यावे लागले. पांडवांनी युद्धानंतर पुढे अश्वमेधादीक असे बरेच श्रौतयाग केले. यादवांनी असे केल्याचे दाखले मिळत नाहीत. यदुवंश फक्त वज्राच्या रूपानेच जिवंत राहिला. वज्रानंतर इंद्रपस्थाचे पुढे काय झाले ते माहीत नाही. द्वारका तर लयास गेली. पण परिक्षितानंतर जनमेजय अशी कुरुवंशीयांची साखळी चालूच राहिली (मातुल घराण्याच्या नावाने ते कधीच ओळखले गेले नाहीत)

In reply to by प्रचेतस

प्रास 09/04/2012 - 17:57
वल्लीशेठांशी सहमत आहे. लेख काहीसा एकांगी आणि आधीच निश्चित केलेल्या शेवटाकडे जाणारा वाटला. वल्ली म्हणतायत तसं परिक्षित, जनमेजय हे कुरू वंशीय म्हणूनच राहिले, मानले गेले तरी त्यांच्यातलं यादवांचं रक्त काहीसं दुर्लक्षित राहतं हे खरंच. एकूण लेख चांगलाच झालाय फक्त उपरोल्लेखित बाबी वगळता. आणखी एक सुधारणा सुचवतो.
तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन.
असं नसून अनुचे वंशजच यवन म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याकडून यज्ञाधिकार काढलेला असल्यामुळे त्यांना म्लेंच्छ ही संज्ञा मिळाल्याचे वाचलेले आठवते आहे.

In reply to by प्रास

प्रचेतस 09/04/2012 - 20:02
तुर्वसुंलाच निर्वंश होण्याचा शाप मिळाला होता. शिवाय त्याला तू म्लेच्छांचा राजा होशील असेही म्हटले होते. म्लेंच्छ हे अरबी लोक. (म्लेंच्छ आणि यवन हे दोन्ही वेगळे) तर अनुचा यज्ञयागाचा अधिकार हिरावला गेला होता. ह्या अनुने पुढे सध्याच्या ग्रीसच्या जागी राज्य स्थापन केले असावे. त्या प्रांताला मौर्यकाळात आयोनिया म्हटले जात असे. आयोनियावरून आलेले ते यवन(ग्रीक) अशी व्युत्पत्ती रूढ झाली.

In reply to by प्रास

प्यारे१ 10/04/2012 - 11:39
>>>लेख काहीसा एकांगी आणि आधीच निश्चित केलेल्या शेवटाकडे जाणारा वाटला. वल्ली म्हणतायत तसं परिक्षित, जनमेजय हे कुरू वंशीय म्हणूनच राहिले, मानले गेले तरी त्यांच्यातलं यादवांचं रक्त काहीसं दुर्लक्षित राहतं हे खरंच आमचे मत अधोरेखित शब्दांना! कृष्णाला पण आज हा लेख वाचून 'मायला, मला असं करायचं होतं काय?' असं वाटेल! त्याचं काय आहे? कोणी काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आम्ही फक्त आमचं मत मांडलं. झैरातः चष्मे घ्या चष्मे! आमचे येथे पांढर्‍याला 'डार्क काळं' (डार्क मधला क पूर्ण) नि काळ्याला 'शुभ्र पांढरं' दाखवणारे चष्मे घाऊक दरात बनवून मिळतील...! :)

In reply to by प्रचेतस

धन्या 09/04/2012 - 18:24
कृष्णाने युद्ध थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण दुर्योधनाच्या हटवादीपणापुढे त्यालाही नमते घ्यावे लागले.
या वाक्याला जोरदार आक्षेप. कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार असून "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम" म्हणत भूतलावर अवतरला होता. कौरव पांडव केवळ निमित्तमात्र होते. कर्ता करविता श्रीकृष्ण होता. तोच पृथ्वीवरील दुर्जनांचा भार उतरण्यासाठी या सार्‍या लिला घडवत होता.

In reply to by धन्या

प्रचेतस 09/04/2012 - 19:54
कर्ता करविता श्रीकृष्ण होता
नाही हो धनाजीसाहेब. हतोत्साहीत झालेल्या अर्जुनाला प्रोत्साहित करण्यासाठी हा केलेला एक उपदेश होता. उपदेशात समजावण्याच्या दृष्टीने कमीअधिक सांगितले जातेच. ;) बाकी व्यासांनी केलेले कृष्णाचे चित्रण त्याला माणूस कल्पूनच केले आहे. कृष्णाची जी काही चमत्कारी वर्णने आली आहेत ती जास्त करून प्रक्षिप्त आहेत,

In reply to by प्रचेतस

धन्या 09/04/2012 - 20:11
बाकी व्यासांनी केलेले कृष्णाचे चित्रण त्याला माणूस कल्पूनच केले आहे. कृष्णाची जी काही चमत्कारी वर्णने आली आहेत ती जास्त करून प्रक्षिप्त आहेत.
वल्लीशेठ, माझ्या प्रतिक्रियेत उपहास होता हो. :( महाभारत खरंच घडलं होतं की नाही हे तो भगवान श्रीकृष्णच जाणे. पण जर महाभारत हे काव्य मानलं तर "जय" लिहिणार्‍या व्यासांच्या प्रतिभाशक्तीला दाद दयावी तेव्हढी कमीच आहे. मानवी नात्यांमधील गुंतागुंतीचे, माणसांच्या गुणावगुणांचे इतकं सुंदर चित्रण दुसर्‍या कुणीच केलं नसेल.

तिमा 09/04/2012 - 19:29
वर्तुळ हे 'पू' दीर्घ लिहिल्याशिवाय 'पूर्ण' होऊ शकत नाही. भैरप्पांनी सुद्धा कोणालाही देवत्व न देता 'वस्तुनिष्ठ' दृष्टिकोन ठेवून याविषयांत चांगले लिहिले आहे. तसा प्रयत्न तुम्ही केल्याबद्दल आभार. पण तरीही लेख समतोल वाटला नाही हे नोंदवू इच्छितो. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. अवांतर : सध्ध्याच्या राजकारणातील कोणी 'यादव' पण अशा निरंकुश सत्तेची स्वप्ने पहात असेल का ?

पैसा 09/04/2012 - 19:39
अनेक ठिकाणी असलेली बरीच माहिती एकत्र करण्याचं काम छान केलं आहे. म्हणजे असं की हे सगळे तुकदे आपल्याला माहिती असतात. पण त्यांचा आपापसात काय संबंध असतो यावर आपण फार विचार करत नाही. लेख उत्तम. वेगळी काही तत्थ्य असतील त्याबद्दल चर्चा व्हायला नक्कीच जागा आहे.

चित्रगुप्त 09/04/2012 - 20:18
कौरव - पान्डव शत्रुत्वाखेरीज महाभारतीय युद्धाची कारणे आणखी काय काय असावीत, यावर थोडासा प्रकाश या लेखातून पडतो, परन्तु ज्या विराट प्रमाणावर हे युद्ध झाले, आणि त्यात त्याकाळचे अनेकानेक राजे सहभागी झाले, ते बघता आणखीही व्यापक असे तात्कालीन राजकारण यात असावे, असे वाटते. म्हणजे कौरवांच्या वा पांडवांच्या बाजूने लढण्यात त्या त्या राजांचा काय फायदा होणार होता, वगैरेवर वाचायला मिळाल्यास उत्तम.

मन१ 09/04/2012 - 21:16
महाभारतावर येणार्‍या लेख्,प्रतिसादांपैकी एक श्रेष्ठ लेख. मलाही काहिसे असेच वाटायचे पण उगा लोकापवदाचा त्रास कशाला ओढून घ्या म्हणून सोडून देत होतो. अर्थात, इतके उत्तम मलाही मांडाता आले नसतेच. बादवे लग्नसंबंध ठेवणारे कुरु आणि यदु एकाच वंशातले? ययातीच्या? शांतम पापम्...शांतम पापम.... सगोत्री झालं की ते! आज त्याच कुरुंचे वंशज म्हणवणारे आर्यावर्ताच्या भूमीत ऑनर किलिंग का करत सुटले आहेत म्हणे मग? त्यांना द्यायचा का हा दाखला? बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला? एक दोन ठिकाणी सामराज्य हा शब्द खटकला. काशी-मथुरा-इंद्रप्रस्थ्-हस्तिनापूर ही थोड्याफार फरकाने सिटी स्टेट्सच* होती. *अथेन्स्,स्पार्टा,ट्रॉय्,मॅसिडोनिया ह्या ग्रीक शहर राज्यांप्रमाणेच

In reply to by मन१

धन्या 09/04/2012 - 21:32
बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला?
पॉईंट आहे. :)

In reply to by मन१

बॅटमॅन 10/04/2012 - 01:23
>>>बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला? प्रभाव कसा आणि कधी कमी होत गेला ते नाही माहिती. पण रामपुत्र लवाने लाहोर शहर स्थापिले अशी माहिती वाचलेली आठवते. तसेच रामाचा महाभारतकालीन वंशज म्हणजे अयोध्येचा राजा बृहद्बल , हा युद्धात कौरवांच्या बाजूने लढला. http://en.wikipedia.org/wiki/Ikshvaku_dynasty

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 10/04/2012 - 13:16
नाही कोसल वेगळे. अयोध्या वेगळी. दिर्गज्ञाचा उल्लेख अर्जुनाच्या राजसूयाच्या वेळच्या लढाईत आणि कर्णाच्या दिग्विजयाच्या वेळेस येतो.

In reply to by मृत्युन्जय

sagarpdy 10/04/2012 - 15:19
बाकी जास्त माहिती नाही, पण ईयत्ता ६ वी च्या ईतिहासाच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे 'कोसल' ची राजधानी 'अयोध्या ' होय. [कोसल हे प्राचीन भारतातील सर्वात मोठ्या ४ राज्यांपैकी एक]. हि माहिती येथेही सापडेल. नंतर च्या काळात कोसल राज्याचीच 'versions' अस्तीत्त्वात आली. ' दिर्गज्ञ' हा त्यातील मूळ राज्यावर राज्य करीत होता आणि ब्रुहद्बल या दक्षिण कोसालावर.

In reply to by मन१

मृत्युन्जय 10/04/2012 - 10:57
कुरु आणि यदु एकाच वंशातले? ययातीच्या? शांतम पापम्...शांतम पापम.... सगोत्री झालं की ते! हॅ हॅ हॅ. याला समगोत्री म्हणताय होय हो? वेद / पुराणकालीन बाकीचे वैवाहिक संबंध ऐकले तर दरदरुन घाम फुटेल त्या खाप पंचायतीला :)

@कृष्णदेखील एक माणूसच होता हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणुनच हा लेख. ह्याच दृष्टीकोनातून थोर अर्थतज्ञ गिरीश जकाडिया ह्यांचे मराठीमधील हे अप्रतिम पुस्तक आंतराष्ट्रीय ख्यातीच्या हा मारवाडी मनुष्य महाराष्ट्रात जन्मल्यामुळे स्वतः १०० टक्के महाराष्ट्रीयन समजतो. ह्यांनी बहुतांशी पुस्तके हि मायमराठी मध्ये लिहिली आहे. त्यात एन्रोन कंपनीचा उदयास्त वंश ह्यां कांदबरीत तर स्वतःचे आत्मचरित्र व त्याजोगे मारवाडी समाजाचे जीवन शैली व मानसिकता त्यांनी एका मारवाड्याची गोष्ट मध्ये साकारली आहे. http://www.girishjakhotiya.hdfcbanksmartbuy.com/Products/Jakhotiya-And-Associates-Books-Marathi/Jakhotiya--Associates/Krishna-Niti-%28Marathi%29/pid-471298.aspx कृष्णाने एका मात्तबर महास्त्ते प्रमाणे दुधाचे राजकारणासाठी हे महाभारत घडवून आणले. हे अर्थ शास्त्रीय दृष्ट्या प्रस्तुत पुस्तकातून सांगितले आहे. एका वेगळ्या दृष्टीकोनातून महाभारताकडे पाहणारे डॉ गिरीश किंवा आपले धनंजय ह्यांची मते एखाद्याला पटो अगर ना पटो मात्र एका वेगळ्या चष्म्यातून ह्या विषयाकडे पाहायला ते वाचकांना प्रवृत्त करतात.

कवितानागेश 09/04/2012 - 21:48
पुरुच्या वंशात मात्र पौरव (अथवा कौरव ) जन्माला आले आणि त्याचे वंषज कुरु म्हणुन प्रसिद्ध झाले.> ही माहिती कुठुन मिळाली? --चुरुचुरु मुरुमाउ ;)

In reply to by कवितानागेश

प्रचेतस 10/04/2012 - 08:46
महाभारतात आहे की सगळा ययातीवंश. पुरुनंतर कित्येक पिढ्यांनंतर दुष्यंत, भरत झाले, त्यानंतर अजमीढ इ.राजांनंतर काही पिढ्यांनी संवर्तन राजा झाला. ह्या संवर्तनाचा पुत्र कुरु.

निशदे 10/04/2012 - 01:39
चांगली माहिती. कृष्ण आद्य राजकारणी होता. अतिशय धूर्तपणे सगळे डाव खेळत राहिला........ कौतुक करावे अशी cunning बुद्धिमत्ता.

सूर्यपुत्र 10/04/2012 - 12:00
त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.
असे असूनही त्याची शापवाणी खरी ठरण्याची कारणे काय? कारण शापवाणी खरी ठरण्यासाठी ब्रम्हचर्याचे, नैतिकतेचे अधिष्ठान वगैरे लागते असे ऐकीवात होते.... -सूर्यपुत्र.

In reply to by सूर्यपुत्र

मृत्युन्जय 10/04/2012 - 15:08
हा नियम बापाने मुलांना द्यायच्या शापांना लागू होत नसावा बहुधा. अन्यथा पित्याच्या विषयसुखासाठी भीष्मप्रतिज्ञा करणार्‍या भीष्माला त्याच्याच पित्याकडुन इच्छामरणाचा आशिर्वाद मिळुनही उपयोग नव्हता :) असो. ययाति राजधर्म विसरला होता हे वि स खांडेकरांच्या ययातिमधुन घेतलेले आहे. मूळ महाभारतानुसार तो न्यायी राजा होता आणि त्याने प्रजेची काळजी घेत १००० वर्षांपेक्षा आधिक काळ राज्य केले.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 10/04/2012 - 15:14
>>>मूळ महाभारतानुसार तो न्यायी राजा होता आणि त्याने प्रजेची काळजी घेत १००० वर्षांपेक्षा आधिक काळ राज्य केले. ___/\___ चालूच द्या आतातर! ह्याला म्हणायचं पराचा कावळा करणं! आधी संदर्भ सोडून/ चुकीचे संदर्भ घेऊन काहीबाही लिहायचं नी नंतर.... आपापली इन्टरप्रिटेशन्स आकारत बसायचं.

लेख अतिशय सुरेख आणि मुद्देसुद आहे. अशा प्रकारे दुसरी बाजू मांडणारे लिखाण देखील येणे आवश्यकच आहे. अर्थात 'एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो' ह्या जालावरच्या सुप्रसिद्ध वाक्याची पुन्हा एकदा काही प्रतिक्रिया वाचून प्रचिती आलीच. महाभारतात सगळी प्यादीच. खेळाडू दोनच : एक श्रीकृष्ण आणि दुसरा शकुनी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश 10/04/2012 - 18:42
परिकथेतील राजकुमार साहेब , एकदम सहमत ह्या वाक्याशी... महाभारतात सगळी प्यादीच. खेळाडू दोनच : एक श्रीकृष्ण आणि दुसरा शकुनी. खरय हेच दोघे होते जे खर तर डोक्याने लढत होते. दोघांमध्येही कुटनिती पुरे पुर भरली होती. श्रीकृष्ण याने त्याचा वापर योग्य वेळी केला तर शकुनी त्याच बाबतित थोडा कमी पडला. नाहितर द्युताच्या प्रसंगी जरासंधाच्या हाडाचे फासे हे तर शकुनीच्या अस्सल कुटनितीची परिसीमा म्हणता येइल.

In reply to by निश

५० फक्त 10/04/2012 - 19:15
माझ्या माहितीनुसार आणि अल्पमतीनुसार जरासंध हिंदु असावा, तो मेल्यावर त्याला जाळलं असेल मग त्याची हाडं कुठुन आली फासे करायला,? हां आता जरासंध नावाचा हत्ती होता असं उत्तर आलं की झालं वर्तुळ पुर्ण.

In reply to by ५० फक्त

निश 11/04/2012 - 11:04
५० फक्त साहेब, माणुस मेल्यानंतर त्याला जाळतात मग तो सगळा मेल्यानंतर त्याची राख व हाडे ही असतात उरलेली त्यालाच अस्थि अस म्हणतात आपल्या हिंदुन मध्ये. अगदी देव इन्द्राच वज्र देखील दधिची ह्या मुनींच्या हाडापासुन बनल आहे.

In reply to by निश

शिल्पा ब 11/04/2012 - 11:08
अगदी देव इन्द्राच वज्र देखील दधिची ह्या मुनींच्या हाडापासुन बनल आहे. हे अस्त्र कुठे बघायला मिळेल?

In reply to by शिल्पा ब

५० फक्त 11/04/2012 - 11:21
दुरुस्तीला टाकलंय, पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये, जॉईंट रिप्लेसमेंट करायची आहे त्याची. ते झालं की मग मिळेल बघायला.

In reply to by शिल्पा ब

हे अस्त्र कुठे बघायला मिळेल?
कुठेही दिसते. अहो हेच काय, सुदर्शन चक्र, आमच्या गणपती बाप्पाचा पाश, शंकराचा त्रिशूळ सगळे सगळे दिसते. फक्त माणूस पुण्यवान हवा.

प्रचेतस 04/05/2016 - 17:33
पुन्हा लेख वाचून मस्त वाटले. ययातीच्या पाचापैकी तिघा पुत्रांची नावे ऋग्वेदात दाशराज्ञ सूक्तात येतात. हे सूक्त महाभारतापेक्षा प्राचीन आहे. त्यात तुर्वसुला इंद्र सिंधू नदी पार करुन देतो तर अनूला रणांगणावर मारतो तर दुह्युला पाण्यात बुडवतो. महाभारतकारांनी हे तीन पुत्र ययाती कथाविस्तार करण्यासाठी महाभारतात घेतले असावेत.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 04/05/2016 - 17:59
दाशराज्ञ युद्धावर एक लेख लिही की रे. मला थोडीफार माहिती आहे पण फार विस्कळीत. शिवाय ऋग्वेद देखील वाचलेला नाही. वाचला तरी क्॑ळणार नाही

प्रचेतस 04/05/2016 - 18:03
प्रयत्न करतो. दाशराज्ञ सूक्तात तशी अल्प माहिती आहे. आणि ऋग्वेदाच्या इतरही मंडलात विखुरलेली आहे. अचूक संदर्भ शोधणे तसे जिकिरीचे आहे.

Bhakti 05/09/2023 - 19:52
ओह ,ययाती यान्चा देखिल यात समावेश आहे तर..

धन्या 09/04/2012 - 17:32
वाचावे ते नवलच... मिपाकर लेखनविषयाच्या साथीला अलगद बळी पडतात ब्वॉ. कर्ण झाला, कुंती झाली, कृष्णही झाला पण चिंता करण्याचं कारण नाही. अजून महाभारतातील बरीच प्रभावी पात्रे बाकी आहेत. अजून येऊदया ;)

In reply to by मृत्युन्जय

धन्या 09/04/2012 - 18:17
तुम्ही लिहा. श्रीकृष्णाच्या निजधामाला जाण्यावरही कुणी लिहा की राव. केव्हापासून ते व्याधाचा बाण अंगठयाला लागून निजधामाला जाणं आणि रुक्मिणीच्या पाठी पाठी येऊन दिंडीरवनात येऊन अठ्ठावीस युगे वीटेवर उभे राहणे यातलं कोडं सुटत नाहीये.

In reply to by धन्या

मृत्युन्जय 09/04/2012 - 18:30
नका हो असली कोडी सोडवत बसू. कोनीतरी तुम्हाला लगेच भागवतातले दाखले देइल की कृष्ण एकाचवेळेस त्याच्या १६१०८ स्त्रियांबरोबर रत होउ शकत असे आणि त्याचवेळेस तो त्याची राजधर्माची कामेदेखील करत असे. ही सर्व कृष्णाची माया होती वगैरे. कृष्णदेखील एक माणूसच होता हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणुनच हा लेख. त्यातील राजकारणासाठी हा लेख लिहिला आणी ज्या प्रकारचे राजकारण आहे त्यासाठी माणूस असणे आवश्यक आहे. कृष्णाने कसे पद्धतशीरपणे सर्व शत्रुंना संपवले हे दाखवण्यासाठी हा लेख. वर्तुळ पुर्ण झाले वगैरे सगळे अनुषंगिक.

प्रचेतस 09/04/2012 - 17:35
उत्तम लेख. पण काहीसा एकांगी वाटला. कृष्णाने युद्ध थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण दुर्योधनाच्या हटवादीपणापुढे त्यालाही नमते घ्यावे लागले. पांडवांनी युद्धानंतर पुढे अश्वमेधादीक असे बरेच श्रौतयाग केले. यादवांनी असे केल्याचे दाखले मिळत नाहीत. यदुवंश फक्त वज्राच्या रूपानेच जिवंत राहिला. वज्रानंतर इंद्रपस्थाचे पुढे काय झाले ते माहीत नाही. द्वारका तर लयास गेली. पण परिक्षितानंतर जनमेजय अशी कुरुवंशीयांची साखळी चालूच राहिली (मातुल घराण्याच्या नावाने ते कधीच ओळखले गेले नाहीत)

In reply to by प्रचेतस

प्रास 09/04/2012 - 17:57
वल्लीशेठांशी सहमत आहे. लेख काहीसा एकांगी आणि आधीच निश्चित केलेल्या शेवटाकडे जाणारा वाटला. वल्ली म्हणतायत तसं परिक्षित, जनमेजय हे कुरू वंशीय म्हणूनच राहिले, मानले गेले तरी त्यांच्यातलं यादवांचं रक्त काहीसं दुर्लक्षित राहतं हे खरंच. एकूण लेख चांगलाच झालाय फक्त उपरोल्लेखित बाबी वगळता. आणखी एक सुधारणा सुचवतो.
तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन.
असं नसून अनुचे वंशजच यवन म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याकडून यज्ञाधिकार काढलेला असल्यामुळे त्यांना म्लेंच्छ ही संज्ञा मिळाल्याचे वाचलेले आठवते आहे.

In reply to by प्रास

प्रचेतस 09/04/2012 - 20:02
तुर्वसुंलाच निर्वंश होण्याचा शाप मिळाला होता. शिवाय त्याला तू म्लेच्छांचा राजा होशील असेही म्हटले होते. म्लेंच्छ हे अरबी लोक. (म्लेंच्छ आणि यवन हे दोन्ही वेगळे) तर अनुचा यज्ञयागाचा अधिकार हिरावला गेला होता. ह्या अनुने पुढे सध्याच्या ग्रीसच्या जागी राज्य स्थापन केले असावे. त्या प्रांताला मौर्यकाळात आयोनिया म्हटले जात असे. आयोनियावरून आलेले ते यवन(ग्रीक) अशी व्युत्पत्ती रूढ झाली.

In reply to by प्रास

प्यारे१ 10/04/2012 - 11:39
>>>लेख काहीसा एकांगी आणि आधीच निश्चित केलेल्या शेवटाकडे जाणारा वाटला. वल्ली म्हणतायत तसं परिक्षित, जनमेजय हे कुरू वंशीय म्हणूनच राहिले, मानले गेले तरी त्यांच्यातलं यादवांचं रक्त काहीसं दुर्लक्षित राहतं हे खरंच आमचे मत अधोरेखित शब्दांना! कृष्णाला पण आज हा लेख वाचून 'मायला, मला असं करायचं होतं काय?' असं वाटेल! त्याचं काय आहे? कोणी काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आम्ही फक्त आमचं मत मांडलं. झैरातः चष्मे घ्या चष्मे! आमचे येथे पांढर्‍याला 'डार्क काळं' (डार्क मधला क पूर्ण) नि काळ्याला 'शुभ्र पांढरं' दाखवणारे चष्मे घाऊक दरात बनवून मिळतील...! :)

In reply to by प्रचेतस

धन्या 09/04/2012 - 18:24
कृष्णाने युद्ध थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण दुर्योधनाच्या हटवादीपणापुढे त्यालाही नमते घ्यावे लागले.
या वाक्याला जोरदार आक्षेप. कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार असून "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम" म्हणत भूतलावर अवतरला होता. कौरव पांडव केवळ निमित्तमात्र होते. कर्ता करविता श्रीकृष्ण होता. तोच पृथ्वीवरील दुर्जनांचा भार उतरण्यासाठी या सार्‍या लिला घडवत होता.

In reply to by धन्या

प्रचेतस 09/04/2012 - 19:54
कर्ता करविता श्रीकृष्ण होता
नाही हो धनाजीसाहेब. हतोत्साहीत झालेल्या अर्जुनाला प्रोत्साहित करण्यासाठी हा केलेला एक उपदेश होता. उपदेशात समजावण्याच्या दृष्टीने कमीअधिक सांगितले जातेच. ;) बाकी व्यासांनी केलेले कृष्णाचे चित्रण त्याला माणूस कल्पूनच केले आहे. कृष्णाची जी काही चमत्कारी वर्णने आली आहेत ती जास्त करून प्रक्षिप्त आहेत,

In reply to by प्रचेतस

धन्या 09/04/2012 - 20:11
बाकी व्यासांनी केलेले कृष्णाचे चित्रण त्याला माणूस कल्पूनच केले आहे. कृष्णाची जी काही चमत्कारी वर्णने आली आहेत ती जास्त करून प्रक्षिप्त आहेत.
वल्लीशेठ, माझ्या प्रतिक्रियेत उपहास होता हो. :( महाभारत खरंच घडलं होतं की नाही हे तो भगवान श्रीकृष्णच जाणे. पण जर महाभारत हे काव्य मानलं तर "जय" लिहिणार्‍या व्यासांच्या प्रतिभाशक्तीला दाद दयावी तेव्हढी कमीच आहे. मानवी नात्यांमधील गुंतागुंतीचे, माणसांच्या गुणावगुणांचे इतकं सुंदर चित्रण दुसर्‍या कुणीच केलं नसेल.

तिमा 09/04/2012 - 19:29
वर्तुळ हे 'पू' दीर्घ लिहिल्याशिवाय 'पूर्ण' होऊ शकत नाही. भैरप्पांनी सुद्धा कोणालाही देवत्व न देता 'वस्तुनिष्ठ' दृष्टिकोन ठेवून याविषयांत चांगले लिहिले आहे. तसा प्रयत्न तुम्ही केल्याबद्दल आभार. पण तरीही लेख समतोल वाटला नाही हे नोंदवू इच्छितो. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. अवांतर : सध्ध्याच्या राजकारणातील कोणी 'यादव' पण अशा निरंकुश सत्तेची स्वप्ने पहात असेल का ?

पैसा 09/04/2012 - 19:39
अनेक ठिकाणी असलेली बरीच माहिती एकत्र करण्याचं काम छान केलं आहे. म्हणजे असं की हे सगळे तुकदे आपल्याला माहिती असतात. पण त्यांचा आपापसात काय संबंध असतो यावर आपण फार विचार करत नाही. लेख उत्तम. वेगळी काही तत्थ्य असतील त्याबद्दल चर्चा व्हायला नक्कीच जागा आहे.

चित्रगुप्त 09/04/2012 - 20:18
कौरव - पान्डव शत्रुत्वाखेरीज महाभारतीय युद्धाची कारणे आणखी काय काय असावीत, यावर थोडासा प्रकाश या लेखातून पडतो, परन्तु ज्या विराट प्रमाणावर हे युद्ध झाले, आणि त्यात त्याकाळचे अनेकानेक राजे सहभागी झाले, ते बघता आणखीही व्यापक असे तात्कालीन राजकारण यात असावे, असे वाटते. म्हणजे कौरवांच्या वा पांडवांच्या बाजूने लढण्यात त्या त्या राजांचा काय फायदा होणार होता, वगैरेवर वाचायला मिळाल्यास उत्तम.

मन१ 09/04/2012 - 21:16
महाभारतावर येणार्‍या लेख्,प्रतिसादांपैकी एक श्रेष्ठ लेख. मलाही काहिसे असेच वाटायचे पण उगा लोकापवदाचा त्रास कशाला ओढून घ्या म्हणून सोडून देत होतो. अर्थात, इतके उत्तम मलाही मांडाता आले नसतेच. बादवे लग्नसंबंध ठेवणारे कुरु आणि यदु एकाच वंशातले? ययातीच्या? शांतम पापम्...शांतम पापम.... सगोत्री झालं की ते! आज त्याच कुरुंचे वंशज म्हणवणारे आर्यावर्ताच्या भूमीत ऑनर किलिंग का करत सुटले आहेत म्हणे मग? त्यांना द्यायचा का हा दाखला? बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला? एक दोन ठिकाणी सामराज्य हा शब्द खटकला. काशी-मथुरा-इंद्रप्रस्थ्-हस्तिनापूर ही थोड्याफार फरकाने सिटी स्टेट्सच* होती. *अथेन्स्,स्पार्टा,ट्रॉय्,मॅसिडोनिया ह्या ग्रीक शहर राज्यांप्रमाणेच

In reply to by मन१

धन्या 09/04/2012 - 21:32
बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला?
पॉईंट आहे. :)

In reply to by मन१

बॅटमॅन 10/04/2012 - 01:23
>>>बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला? प्रभाव कसा आणि कधी कमी होत गेला ते नाही माहिती. पण रामपुत्र लवाने लाहोर शहर स्थापिले अशी माहिती वाचलेली आठवते. तसेच रामाचा महाभारतकालीन वंशज म्हणजे अयोध्येचा राजा बृहद्बल , हा युद्धात कौरवांच्या बाजूने लढला. http://en.wikipedia.org/wiki/Ikshvaku_dynasty

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 10/04/2012 - 13:16
नाही कोसल वेगळे. अयोध्या वेगळी. दिर्गज्ञाचा उल्लेख अर्जुनाच्या राजसूयाच्या वेळच्या लढाईत आणि कर्णाच्या दिग्विजयाच्या वेळेस येतो.

In reply to by मृत्युन्जय

sagarpdy 10/04/2012 - 15:19
बाकी जास्त माहिती नाही, पण ईयत्ता ६ वी च्या ईतिहासाच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे 'कोसल' ची राजधानी 'अयोध्या ' होय. [कोसल हे प्राचीन भारतातील सर्वात मोठ्या ४ राज्यांपैकी एक]. हि माहिती येथेही सापडेल. नंतर च्या काळात कोसल राज्याचीच 'versions' अस्तीत्त्वात आली. ' दिर्गज्ञ' हा त्यातील मूळ राज्यावर राज्य करीत होता आणि ब्रुहद्बल या दक्षिण कोसालावर.

In reply to by मन१

मृत्युन्जय 10/04/2012 - 10:57
कुरु आणि यदु एकाच वंशातले? ययातीच्या? शांतम पापम्...शांतम पापम.... सगोत्री झालं की ते! हॅ हॅ हॅ. याला समगोत्री म्हणताय होय हो? वेद / पुराणकालीन बाकीचे वैवाहिक संबंध ऐकले तर दरदरुन घाम फुटेल त्या खाप पंचायतीला :)

@कृष्णदेखील एक माणूसच होता हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणुनच हा लेख. ह्याच दृष्टीकोनातून थोर अर्थतज्ञ गिरीश जकाडिया ह्यांचे मराठीमधील हे अप्रतिम पुस्तक आंतराष्ट्रीय ख्यातीच्या हा मारवाडी मनुष्य महाराष्ट्रात जन्मल्यामुळे स्वतः १०० टक्के महाराष्ट्रीयन समजतो. ह्यांनी बहुतांशी पुस्तके हि मायमराठी मध्ये लिहिली आहे. त्यात एन्रोन कंपनीचा उदयास्त वंश ह्यां कांदबरीत तर स्वतःचे आत्मचरित्र व त्याजोगे मारवाडी समाजाचे जीवन शैली व मानसिकता त्यांनी एका मारवाड्याची गोष्ट मध्ये साकारली आहे. http://www.girishjakhotiya.hdfcbanksmartbuy.com/Products/Jakhotiya-And-Associates-Books-Marathi/Jakhotiya--Associates/Krishna-Niti-%28Marathi%29/pid-471298.aspx कृष्णाने एका मात्तबर महास्त्ते प्रमाणे दुधाचे राजकारणासाठी हे महाभारत घडवून आणले. हे अर्थ शास्त्रीय दृष्ट्या प्रस्तुत पुस्तकातून सांगितले आहे. एका वेगळ्या दृष्टीकोनातून महाभारताकडे पाहणारे डॉ गिरीश किंवा आपले धनंजय ह्यांची मते एखाद्याला पटो अगर ना पटो मात्र एका वेगळ्या चष्म्यातून ह्या विषयाकडे पाहायला ते वाचकांना प्रवृत्त करतात.

कवितानागेश 09/04/2012 - 21:48
पुरुच्या वंशात मात्र पौरव (अथवा कौरव ) जन्माला आले आणि त्याचे वंषज कुरु म्हणुन प्रसिद्ध झाले.> ही माहिती कुठुन मिळाली? --चुरुचुरु मुरुमाउ ;)

In reply to by कवितानागेश

प्रचेतस 10/04/2012 - 08:46
महाभारतात आहे की सगळा ययातीवंश. पुरुनंतर कित्येक पिढ्यांनंतर दुष्यंत, भरत झाले, त्यानंतर अजमीढ इ.राजांनंतर काही पिढ्यांनी संवर्तन राजा झाला. ह्या संवर्तनाचा पुत्र कुरु.

निशदे 10/04/2012 - 01:39
चांगली माहिती. कृष्ण आद्य राजकारणी होता. अतिशय धूर्तपणे सगळे डाव खेळत राहिला........ कौतुक करावे अशी cunning बुद्धिमत्ता.

सूर्यपुत्र 10/04/2012 - 12:00
त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.
असे असूनही त्याची शापवाणी खरी ठरण्याची कारणे काय? कारण शापवाणी खरी ठरण्यासाठी ब्रम्हचर्याचे, नैतिकतेचे अधिष्ठान वगैरे लागते असे ऐकीवात होते.... -सूर्यपुत्र.

In reply to by सूर्यपुत्र

मृत्युन्जय 10/04/2012 - 15:08
हा नियम बापाने मुलांना द्यायच्या शापांना लागू होत नसावा बहुधा. अन्यथा पित्याच्या विषयसुखासाठी भीष्मप्रतिज्ञा करणार्‍या भीष्माला त्याच्याच पित्याकडुन इच्छामरणाचा आशिर्वाद मिळुनही उपयोग नव्हता :) असो. ययाति राजधर्म विसरला होता हे वि स खांडेकरांच्या ययातिमधुन घेतलेले आहे. मूळ महाभारतानुसार तो न्यायी राजा होता आणि त्याने प्रजेची काळजी घेत १००० वर्षांपेक्षा आधिक काळ राज्य केले.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 10/04/2012 - 15:14
>>>मूळ महाभारतानुसार तो न्यायी राजा होता आणि त्याने प्रजेची काळजी घेत १००० वर्षांपेक्षा आधिक काळ राज्य केले. ___/\___ चालूच द्या आतातर! ह्याला म्हणायचं पराचा कावळा करणं! आधी संदर्भ सोडून/ चुकीचे संदर्भ घेऊन काहीबाही लिहायचं नी नंतर.... आपापली इन्टरप्रिटेशन्स आकारत बसायचं.

लेख अतिशय सुरेख आणि मुद्देसुद आहे. अशा प्रकारे दुसरी बाजू मांडणारे लिखाण देखील येणे आवश्यकच आहे. अर्थात 'एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो' ह्या जालावरच्या सुप्रसिद्ध वाक्याची पुन्हा एकदा काही प्रतिक्रिया वाचून प्रचिती आलीच. महाभारतात सगळी प्यादीच. खेळाडू दोनच : एक श्रीकृष्ण आणि दुसरा शकुनी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश 10/04/2012 - 18:42
परिकथेतील राजकुमार साहेब , एकदम सहमत ह्या वाक्याशी... महाभारतात सगळी प्यादीच. खेळाडू दोनच : एक श्रीकृष्ण आणि दुसरा शकुनी. खरय हेच दोघे होते जे खर तर डोक्याने लढत होते. दोघांमध्येही कुटनिती पुरे पुर भरली होती. श्रीकृष्ण याने त्याचा वापर योग्य वेळी केला तर शकुनी त्याच बाबतित थोडा कमी पडला. नाहितर द्युताच्या प्रसंगी जरासंधाच्या हाडाचे फासे हे तर शकुनीच्या अस्सल कुटनितीची परिसीमा म्हणता येइल.

In reply to by निश

५० फक्त 10/04/2012 - 19:15
माझ्या माहितीनुसार आणि अल्पमतीनुसार जरासंध हिंदु असावा, तो मेल्यावर त्याला जाळलं असेल मग त्याची हाडं कुठुन आली फासे करायला,? हां आता जरासंध नावाचा हत्ती होता असं उत्तर आलं की झालं वर्तुळ पुर्ण.

In reply to by ५० फक्त

निश 11/04/2012 - 11:04
५० फक्त साहेब, माणुस मेल्यानंतर त्याला जाळतात मग तो सगळा मेल्यानंतर त्याची राख व हाडे ही असतात उरलेली त्यालाच अस्थि अस म्हणतात आपल्या हिंदुन मध्ये. अगदी देव इन्द्राच वज्र देखील दधिची ह्या मुनींच्या हाडापासुन बनल आहे.

In reply to by निश

शिल्पा ब 11/04/2012 - 11:08
अगदी देव इन्द्राच वज्र देखील दधिची ह्या मुनींच्या हाडापासुन बनल आहे. हे अस्त्र कुठे बघायला मिळेल?

In reply to by शिल्पा ब

५० फक्त 11/04/2012 - 11:21
दुरुस्तीला टाकलंय, पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये, जॉईंट रिप्लेसमेंट करायची आहे त्याची. ते झालं की मग मिळेल बघायला.

In reply to by शिल्पा ब

हे अस्त्र कुठे बघायला मिळेल?
कुठेही दिसते. अहो हेच काय, सुदर्शन चक्र, आमच्या गणपती बाप्पाचा पाश, शंकराचा त्रिशूळ सगळे सगळे दिसते. फक्त माणूस पुण्यवान हवा.

प्रचेतस 04/05/2016 - 17:33
पुन्हा लेख वाचून मस्त वाटले. ययातीच्या पाचापैकी तिघा पुत्रांची नावे ऋग्वेदात दाशराज्ञ सूक्तात येतात. हे सूक्त महाभारतापेक्षा प्राचीन आहे. त्यात तुर्वसुला इंद्र सिंधू नदी पार करुन देतो तर अनूला रणांगणावर मारतो तर दुह्युला पाण्यात बुडवतो. महाभारतकारांनी हे तीन पुत्र ययाती कथाविस्तार करण्यासाठी महाभारतात घेतले असावेत.

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय 04/05/2016 - 17:59
दाशराज्ञ युद्धावर एक लेख लिही की रे. मला थोडीफार माहिती आहे पण फार विस्कळीत. शिवाय ऋग्वेद देखील वाचलेला नाही. वाचला तरी क्॑ळणार नाही

प्रचेतस 04/05/2016 - 18:03
प्रयत्न करतो. दाशराज्ञ सूक्तात तशी अल्प माहिती आहे. आणि ऋग्वेदाच्या इतरही मंडलात विखुरलेली आहे. अचूक संदर्भ शोधणे तसे जिकिरीचे आहे.

Bhakti 05/09/2023 - 19:52
ओह ,ययाती यान्चा देखिल यात समावेश आहे तर..
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

पुन्हा सालं 'वैचारिक'

यकु ·

In reply to by गवि

यकु 13/03/2012 - 15:00
नाय हो.. नाय.. भांग नाय.. आज सकाळीच आलोय गावाकडून आणि आता ऑफिसमध्‍ये आहे.. ढुष्क्लेमर टाकावं म्हटलं होतं.. पण पुन्हा म्हटलं आपणच कशाला आठवण करुन द्यायची ;-)

मूकवाचक 13/03/2012 - 16:43
नेहेमीप्रमाणेच भन्नाट, चाकोरीबाहेरचे (ऑफबीट) आणि शैलीदार लिखाण. वैचारिक गोपाळकाला मस्त जमला आहे. पुलेशु.

चौकटराजा 13/03/2012 - 19:16
यशवंत बुवानी फार फार तप केले. मग त्याना देव प्रसन्न झाला. देव म्हणाला " माग काय मागायचे ते !" यशवंतबुवा म्हणाले " नियंत्या, ईशा मला दुसर्‍याला चक्कर आणण्याचे सामर्थ्य दे ! " देव म्हणाला "मी मागे एकाला विचार करायला चौथी मिति दिली आहे, आता माझ्याकडे पाचवी मिति शिल्लक आहे. देउ का ? बुवा म्हणाले" त्याने काय होणार ? " देव उत्तरला " अरे आताशी त्याना ३ मिति माहितायत तू डायरेक्ट पाचवीत शिरलास की ते सगळे फेल .....चक्क्कर ... चक्क्क्क.......................र "

चौकटराजा 13/03/2012 - 19:17
यशवंत बुवानी फार फार तप केले. मग त्याना देव प्रसन्न झाला. देव म्हणाला " माग काय मागायचे ते !" यशवंतबुवा म्हणाले " नियंत्या, ईशा मला दुसर्‍याला चक्कर आणण्याचे सामर्थ्य दे ! " देव म्हणाला "मी मागे एकाला विचार करायला चौथी मिति दिली आहे, आता माझ्याकडे पाचवी मिति शिल्लक आहे. देउ का ? बुवा म्हणाले" त्याने काय होणार ? " देव उत्तरला " अरे आताशी त्याना ३ मिति माहितायत तू डायरेक्ट पाचवीत शिरलास की ते सगळे फेल .....चक्क्कर ... चक्क्क्क.......................र "

पैसा 13/03/2012 - 20:14
अजिब्बात विचार करू नकोस! ऊठ आणि एक कार्टून फिल्म बघून ये.

उत्क्रांती हा सोन्यासारखा शब्द कचकड्यासारखा वापरलेला पाहून वाईट वाटलं. बाकीच्या शब्दांविषयी मला या शब्दाइतकी आस्था नाही म्हणून त्यांचा निरर्थक वापर तितका बोचला नाही.

मन१ 13/03/2012 - 23:09
"बाळ , अध्यात्मातही आधी चमच्या चमच्यानं प्यावं म्हणजे मग अजीर्ण होत नाही" असं काहिसं"आमचे देवासचे काकाजी "तुझे आहे तुजपाशी" मध्ये म्हणत होते ब्वा. बादवे, हल्ली कुठल्या मंदिरातील तीर्थप्राशन करता ते कळले तर बरे होइल.

यकु 14/03/2012 - 13:25
मायला एवढं सोपं, साध्‍या रोजच्या शब्दांत लिहिलंय कुठलेही जडजंबाल शब्द, बोजड संकल्पना नाहीत तरीही अवघड, चक्कर येणारं वगैरे झालंय म्हणजे कमाल आहे. ठिक. आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो.

In reply to by यकु

प्यारे१ 14/03/2012 - 14:27
>>>आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो. अरे येशा, कसं व्हायचं रे तुझं? औट ऑफ द बॉक्स वि चार करणं सोड्णार म्हणतोस? मग आमच्यात आणि तुझ्यात फरक तो काय राहिल रे चोच्या? बाकी, काही लोकांची काहीही प्रतिक्रिया आली म्हणजे लेख छान छान आहे असंच मानायचं असतं बरं... कौतुकाची परा- आपलं - परिसीमा आहे ती. ;) तुला जे भावेल ते लिही बरं तू. २००० नाहीतरी २-५ वर्षांनी तरी वाचून लोक लेखाला 'चान चान' नी लेखकाला 'द्रष्टा' म्हणतातच रे!

In reply to by प्यारे१

यकु 14/03/2012 - 14:48
>>>>>>अरे येशा, कसं व्हायचं रे तुझं? औट ऑफ द बॉक्स वि चार करणं सोड्णार म्हणतोस? मग आमच्यात आणि तुझ्यात फरक तो काय राहिल रे चोच्या? बाकी, काही लोकांची काहीही प्रतिक्रिया आली म्हणजे लेख छान छान आहे असंच मानायचं असतं बरं... कौतुकाची परा- आपलं - परिसीमा आहे ती. तुला जे भावेल ते लिही बरं तू. २००० नाहीतरी २-५ वर्षांनी तरी वाचून लोक लेखाला 'चान चान' नी लेखकाला 'द्रष्टा' म्हणतातच रे! -------- बास का राव? औट ऑफ द बॉक्स वगैरे विचार असतील नसतील माहित नाही आणि माझ्यात तुमच्यातला फरकही माहित नाही. पण छान छान प्रतिक्रिया चुकूनही येऊ नयेत असं नक्कीच वाटतं. कौतुक वगैरे कुणाला मनापासून वाटत असेल त्यासाठी मी कृतज्ञ आहे. मुळात हे असलं लिहिण्‍याचा धंदाच यासाठी करतो की असले विचार कितपत बरोबर आहेत आणि ते कुणीकडे घेऊन जाणारे आहेत हे सांगणारे लोक इथे असतील.. पण कधीही बघा, समोरासमोर येऊन लोक चर्चा करीत नाहीत.. कुत्सित शेरेबाजीला तोटा नाही.. छान छान, वा वा वगैरे तर चालूच असते आणि मला त्याचा सोस नाहीय हे बरंय. जेव्हा वेळ येईल तेव्हा मला खरोखरचा, प्रॅक्टीकल, क्षणात परिणाम दाखवणारे उपाय देणारा 'द्रष्‍टा' व्हायला नक्कीच आवडेल. सध्‍या फक्त ‍तापदायक स्वर काढीत रियाझ सुरु आहे आणि त्यामुळं दोस्तलोक प‍रेशान आहेत. :) थँक्स तुझ्‍या दिलखुलास प्रतिसादामुळं हे लिहिण्‍याची संधी मिळाली म्हणून.

In reply to by यकु

मायला एवढं सोपं, साध्‍या रोजच्या शब्दांत लिहिलंय कुठलेही जडजंबाल शब्द, बोजड संकल्पना नाहीत तरीही अवघड, चक्कर येणारं वगैरे झालंय म्हणजे कमाल आहे. ठिक. आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो.
असेल असेल.. पण यक्कुशेठ कडून आम्हाला असल्या लिखाणाची अपेक्षा नाही. तुम्ही उगा हुच्चभ्रुंच्या नादाला लागलात का काय अशी शंका मनात डोकावली. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

यकु 14/03/2012 - 14:58
>>>>>पण यक्कुशेठ कडून आम्हाला असल्या लिखाणाची अपेक्षा नाही. --- पाठवून द्या तो तुमच्या मंदाकिनी का कोण तिचा अर्धवट ड्राफ्ट. पुरा करुन टाकतो. लै लै मज्जा येईल आणि ताटकळत राहिलेल्या पब्लिकचा दुवा पण मिळेल. ;-) हाकानाका

विजुभाऊ 14/03/2012 - 14:47
अज्ञाताचे ज्ञान व्हावे ही यज्ञयुगापासून मानवाला वटायचे. पण अज्ञात ज्ञात होऊ शकते याचे ज्ञान व्हायला एकोणविसावे शतक उजाडावे लागले. ज्ञातापासून अज्ञाता पर्यन्तचा प्रवास हा खरेतर स्वतःला शोधण्याचाच प्रकार आहे

गवि 14/03/2012 - 15:31
गांभीर्याने चर्चा होत नाही हा यशवंताचा मुद्दा मान्य करुन माझी प्रतिक्रिया लिहायला बसलो आहे.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ?
हे प्रश्न एकाच मूळ प्रश्नाशी नेता येतात तो प्रश्न म्हणजे "का?". "काय?"ची उत्तरं शोधत खूप खूप शोध लावत आपण जगत राहतो. "काय?"च्या उत्तरांनी "उपयोगी" शोध लागतात.. पण "का?" चं उत्तर कशानेच मिळत नाही. त्याविषयी विचार केला तर कोंडल्यासारखा फील येऊन पुन्हापुन्हा मनात प्रश्न आदळतात.. नाही केला तर काही होत नाही.. पण तरीही आपण आहोत हे गृहीत धरलं की "का?" चं उत्तर जाणण्याच्या पलीकडे आपण आलेले असतो.. "काय?" मधे जशी उपयुक्तता आहे तशी "का?" मधे नाही.. चटका का बसतो? या प्रश्नात "का?" आलेला असला तरी तो फसवा आहे.. या प्रश्नाचा अर्थ "चटका बसतो म्हणजे काय?" असा होतो.. चटका "का" बसतो याला अर्थ नाही.. या प्रश्नाचं उत्तरही चटक्यामागची प्रक्रिया काय हे सांगतं. नंतर चटका बसण्याचे "फायदे"ही सांगतं. पण मुळात चटका बसावा अशी ईशणा कोणाची अन का? हे सांगणं आपल्या मितीत म्हणा किंवा ज्यामुळे आपण जिवंत आहोत असं आपण म्हणतो त्या स्थितीमुळे म्हणा, अशक्य आहे.. अशावेळी विज्ञान किंवा तत्सम माध्यमांतून काही उत्तर मिळणार नाही हे लक्षात घेऊन पुलंचं खालील पत्र वाचावं, असं सांगावंसं वाटतं.. इथे पेस्ट करतोय. अवांतर वाटणारा काही भाग काढून टाकला आहे.. महत्वाचा काही बोल्ड केला आहे. यातलं एक वाक्य मी प्रासच्या यूजींवर लिहिलेल्या धाग्यावरही डकवलं होतं: प्रिय चंदू रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९॰३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला - फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे. तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच. तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं - नाटकं लिहायची - विनोदी साहित्य लिहायचं-गायचं - गाणी करायची - कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे. तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू - कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो. हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का? जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की - गोर्की - डिकन्स - शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल! लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable? माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो. कळावे, भाई

In reply to by गवि

यकु 14/03/2012 - 16:13
प्रतिसादाबद्दल थँक्यू गवि. पुलंचे लिखाण आणि त्यांचा जीवन जगण्याचा दृष्‍टीकोन मलाही आवडतो.. आणि अशा लेखकांमुळंच काकणभर अधिक आनंदात जगतो. पण आयुष्‍याची एवढीच आखीव मर्यादा नसते (तुम्हाला वाईट वाटणार नाहीय हे मला माहित आहे म्हणून सांगतो, उठसूठ पुलंच्या काकाजीची उद्धरणे देणारे दोस्त झीट आणतात. अरे तो काय एकटाच माणूस होऊन गेला काय तुमच्याकडे कसं जगावं हे सांगणारा? मान्य आहे महान होता, पण तेच तेच किती?) आणि ती जगणार्‍याच्या नेहमीच हातातही नसते. जिकडं जसं ओढलं जाईल, फरफटवलं जाईल तसं जाणं होतं. मुळात कसं जगावं हा प्रश्न नाहीच. का? हा प्रश्न आहे. आणि आहे हे असंच आहे हे उत्तर नाही, परिस्थिती आहे. का? चा विचार नाही केला तरी काही फरक पडत नाही असा माझा अनुभव नाही.

In reply to by यकु

गवि 14/03/2012 - 16:24
अरे यात पुलं कसे महान किंवा "जीवन त्यांना कळले हो.." असं काही काही म्हणायचं नाहीये.. तसं नाहीच आहे मुळात. काहीजणांना जीवन मला कळलं नाही याचा अ‍ॅक्सेप्टन्स येतो आणि त्यांना आनंद मिळतो इतकंच सांगायचं आहे..
का? चा विचार नाही केला तरी काही फरक पडत नाही असा माझा अनुभव नाही.
अर्थाची छटा वेगळी आहे.. जगण्याच्या अन उपयुक्ततेच्या नजरेने "का?" चा विचार न करता जगता येतं म्हणून त्याचा फारसा विचार होत नाही अशा अँगलने म्हणू इच्छितो..
पण आयुष्‍याची एवढीच आखीव मर्यादा नसते
असते...ते मान्य न करण्याने गुदमरा होतो..

In reply to by गवि

यकु 14/03/2012 - 16:38
>>>>अरे यात पुलं कसे महान किंवा "जीवन त्यांना कळले हो.." असं काही काही म्हणायचं नाहीये.. तसं नाहीच आहे मुळात. ----- नाही मलाही तसं म्हणायचं नाहीय.. पण सारखं सारखं सखाराम गटणे आणि तुझे आहे तुजपाशीमधले किंवा पुलंचे तसलेच ड्वायलॉग बोर होतात ना हो.. ते म्हणालो मी. आणखीही काही लोक असतीलच की. बाकी पुलं/ पुलंचे लिखाण प्रत्येकाच्याच अंगात किती भिनले आहेतच हे वेगळे सांगणे नलगे.. >>>>अर्थाची छटा वेगळी आहे.. जगण्याच्या अन उपयुक्ततेच्या नजरेने "का?" चा विचार न करता जगता येतं म्हणून त्याचा फारसा विचार होत नाही अशा अँगलने म्हणू इच्छितो.. ----- :) >>>>असते...ते मान्य न करण्याने गुदमरा होतो.. ----- नैसर्गिकपणेच मान्य होत नाही आणि गुदमरा होतो. ठरवून सगळं अमान्य करायला इथे कुणाला नसती आकाबाया सुचलीय.

In reply to by गवि

नगरीनिरंजन 14/03/2012 - 17:01
सहमत हो गवि. 'का?' याला 'चुकून' किंवा 'योगायोगाने' असे उत्तर असू शकते. रानात फूल फुलले म्हणून ढोल-ताशे वाजत नाहीत आणि ते सुकले म्हणून कोणी सूतक पाळत नाही तसेच जन्माला आलास ते का याचे उत्तर द्यायला कोणीही बांधिल नाही. ज्याला हवे त्याने शोधण्यात आयुष्य वेचावे; तसेही चुकून निर्माण झालेल्या या जाणिवेचा पुंजका कोणी कसा उधळायचा ते त्याचे त्याने ठरवायचे आहे. मरण चाहूल उतरते भूल रानातले फूल असे आयुष्य कशास फुलले कशास सुकले कुणा उमगले असे आयुष्य

In reply to by नगरीनिरंजन

यकु 14/03/2012 - 17:14
>>> तसेही चुकून निर्माण झालेल्या या जाणिवेचा पुंजका कोणी कसा उधळायचा ते त्याचे त्याने ठरवायचे आहे. ---- वाक्य आवडले. मर्मभेदी असा आयडी घ्‍या तुम्ही ननि. बाकी त्या चुकून निर्माण जाणीवेचा पुंजका सध्‍या तरी लहान मुलं म्हातार्‍या उडवतात तसे उडवतोय. :)

चौकटराजा 14/03/2012 - 16:37
वास्तविक मी माझाच अध्यात्मिक गुरू आहे असे सांगत असतो. पण पीयेल ना मी त्या स्थानी मानतो. मी तसे त्याना फोनवरून बोललोही. तर म्हणाले माझा आता बुवा होणार . मी म्हणालो तुमच्या व माझ्या वाढदिवसात एकाच दिवसाचा फरक असला( वयाने अंतर बरेच तरी मी ७/११ ते ८/११ म्हणून गमतीने म्हणत " आशीर्वाद द्या ) तरी मी मांडीला मांडी लावायला कधीच येणार नाही. आदर राखून दुरूनच पाहीन . मी शेवटपरर्यंत त्याना भेटायला गेलो नाही. पण त्यानी दिलेली एक शिकवण इथे देतो. एखादी घटना ही निसर्ग पातळीवर निरर्थकच असते. माणसाची त्याच्याकडे पहाण्याची संवय वा दृष्टी त्या घटनेचा अर्थ ठरवीत असते. मतभेद हे आपल्यामुळे निर्माण होत असतात ते आपले अ‍ॅट्रीब्यूट आहे घटनेचे नव्हे. हा मी त्याचा काढलेला अर्थ !

मन१ 14/03/2012 - 22:43
स्वतःला पुरेसा काम्धंदा नसलेल्याने इतरांच्या कामधंद्याचा वेळ खराब करण्यासाठी धागा काढलेला दिसतोय. गविंच्या प्रतिसादामुळे मात्र धागा वाचनखूणेत नेउन ठेवतो आहे.

In reply to by मन१

स्पंदना 16/03/2012 - 17:56
पण मग गवींना असा प्रतिसाद द्यावा लागला हे ही या धाग्याच यश नव्हे का? नसेल जमल अगदी पुलं सारख शब्द बांधण, पण ते पुल !, अन इथे तोच प्रश्न गुंता घेउन एक सेन्सीटिव्ह मन. मला तर दोन्ही एकाच पातळीचे वाटतात. म्हण्जे यश्वंतचा प्रश्न पुलं मुळ उलगडला म्हणा हवा तर. यशवंत सुरेख! अन गवींना काही म्हणायची गरज नसावी होय ना?

In reply to by मन१

स्पंदना 17/03/2012 - 05:58
पण मी थोडाफार जाणते त्याला त्याच्या लिखाणातुन अन प्रतिसादातुन. भात शिजलाय बघायला अख्ख पातेल कशाला पाट्यावर घायच नाही का? एखाद शित पुरत, मला.

राघव 16/03/2012 - 18:35
तुझं युजींपासूनचं जवळ जवळ प्रत्येक लेखन वाचलेलं आहे. प्रतिसाद दिलेत / नाही दिलेत तो भाग निराळा. पण अगोदरपासूनच तुझं लेखन आवडत आलेलं आहे. शैलीच सर्व बोलून जाते. :) एक वेगळंच सुचलं म्हणून - अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवतांना बरेचदा असं होतं की एखाद्यानं आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीचं बरंचसं बनवून ठेवलं असतं. गूगल आजोबा नेहमीच त्याकामी मदत करतात. ते तसंच्या तसं आपण वापरत नाही. आपल्याला हव्या त्या पद्धतीनं त्यात बदल करतो अन् मग वापरतो. पण बहुतेकजण सुरुवातीपासून सर्व बनवायच्या फंदात पडत नाहीत. हे मात्र खरं की ते सगळं आपण स्वतःच बनवण्यात खूप मझा येतो.. ते समाधान वेगळंच. आणि आपण बनवलेलं अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर जेव्हा खरोखर युजरच्या कामास येतं तेही सुख निराळंच. आपला कोणताही विचार प्रत्यक्षात उतरवल्यावर जे समाधान मिळतं ते शास्त्रज्ञांना मिळणार्‍या समाधानाहून कुठेच कमी नाही. पण तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे कष्ट लागतात ना त्याचं नावंच ते. त्यासाठी तहानभूक विसरून आपण काम करतो अन् मग ते मिळतं. बाकी तुलासुद्धा जिथे अडचणी येतात तिथे म्या पामराची काय बिशाद काही बोलायची..!! शुभम्

In reply to by राघव

यकु 16/03/2012 - 19:08
तुझ्‍या प्रतिक्रियेबद्दल थँक्स राघव. >>>आपला कोणताही विचार प्रत्यक्षात उतरवल्यावर जे समाधान मिळतं ते शास्त्रज्ञांना मिळणार्‍या समाधानाहून कुठेच कमी नाही. पण तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे कष्ट लागतात ना त्याचं नावंच ते. त्यासाठी तहानभूक विसरून आपण काम करतो अन् मग ते मिळतं. --- हे ठिक आहे. मनात आलेला विचार, तो मूर्त रुपात येणं, मग त्यातून मानवी जीवनात उपयुक्त नवनिर्मिती, तिचा आनंद हे सगळं ठिकच. पण इथं एक होतंय की हे असेच नव्हे तर 'सगळेच विचार आपल्याला वापरुन घेतात', त्यात सगळे नष्‍ट होऊन जातात. मग हे असंच नष्‍ट होऊन जाणंच खरं जीवन (कारण सगळे यावर सहमत आहेत) आहे की खरं जीवन कुणाकडून जगलंच जात नाही? हा गुंता आहे.

In reply to by यकु

राघव 18/03/2012 - 00:10
विचार आपल्याला वापरून घेतात असा विचार येण्याचं कारण मुळात काय असावं? माझ्या मते, विचारांचं ध्येय ठरलेलं असेल तर असा विचार येत नाही. ध्येय ठरलं नसेल तर ते विचारांचं जहाज दिशाहीन भरकटणारंच. आता ध्येय कोणतं असायला हवं? हा प्रश्न वैयक्तिक आहे. ज्याला ज्या विचारांनी समाधान मिळतं ते त्याचं ध्येय ठरतं. प्रत्येकच जण कळत-नकळत असाच जगतो. जेव्हा या ध्येयाची जाणीव होते, तेव्हा ते योग्य की अयोग्य हा प्रश्न येतो. आता हे ठरवणार कोण? त्यासाठी काहीएक अधिकार तर हवाच ना? तो अधिकार ज्याचा, तीच व्यक्ती ते सांगू शकेल. प्रत्येकासाठी ही व्यक्ती कदाचित निराळी. पण त्या व्यक्तीला अधिकार आहे किंवा नाही ते आपल्याला कसं कळणार हा प्रश्न येतो. जोवर त्या व्यक्तीचं म्हणणं आपल्याला समाधान देतं तोवर आपण त्याचं ऐकणार. नाही पटणार तेव्हा? सोडून देणार? कशावरून त्या व्यक्तीचा मूळ हेतू समजला आपल्याला? कशावरून आपण ठरवणार? प्रश्नांना सीमा नाही. उत्तरांना आहे. तर्क संपतो तिथं उत्तरं सुचत नाहीत. कोण किती तर्क लावणार यावर किती वेळ उत्तरं देणार हे अवलंबून असतं. अन् उत्तर हे स्वतःच नवीन प्रश्नांना जन्म देऊन जातं. थांबायचं कुठं हे आपल्याच हाती आहे. त्यालाच शरणागती म्हणतात. अजुन काही नाही. राघव

५० फक्त 16/03/2012 - 19:26
उत्तम धागा, अशा ब-याचश्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत असा डांगोरा पिटायला मला आवडतं, पण त्यावर चर्चा करायला आवडत नाही. असा डांगोरा केला की समोरची माणसं स्वतामध्ये काहीतरी न्युन्य का नुन्य , का असंच काहीतरी आहे असं समजायला लागतात, आणि बाकीच्या रेघा लहान म्हणुन माझी रेघ मोठी दिसते, निदान जाणवते. आणि मग पुन्हा जाणुन बुजुन निर्माण केलेल्या या जाणिवेचा पुंजका मी, कसा आणि कुठं उधळायचा या स्वप्नरंजनात म्हणा किंवा प्लँनिंगमध्ये मी पुन्हा दंग होतो. असो, अजुन पुरी १५ वर्षे आहेत, अजुन असे बरेच पुंजके ब-याच ठिकाणी उधळायचे आहेत, एक आशा आहे की एखाद्यातरी पुंजक्यातुन एक बी बाहेर पडेल आणि रुजेल,कुठंतरी पुन्हा एक पुंजका होण्यासाठी आणि सुरु करेल पुन्हा एक शोध त्या पुंजका उधळणा-याचा.

In reply to by ५० फक्त

यकु 16/03/2012 - 19:35
>>>अशा ब-याचश्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत असा डांगोरा पिटायला मला आवडतं, पण त्यावर चर्चा करायला आवडत नाही. --- आता तुमच्या आवडीला थोडी मुरड घाला. आणि इथं चर्चा करा, वर सगळे करताहेतच की. >>> असा डांगोरा केला की समोरची माणसं स्वतामध्ये काहीतरी न्युन्य का नुन्य , का असंच काहीतरी आहे असं समजायला लागतात, --- लोकांना जिथेतिथे 'मी' घेऊन जायची सवय असते. सर्वकाळ, सर्वक्षणी, सर्वठिकाणी तुलना. डांगोरा वगैरेची काळजी सोडूनच दिलेली बरी - एरव्ही हमाम में सभी नंगे होते है.

In reply to by गवि

यकु 13/03/2012 - 15:00
नाय हो.. नाय.. भांग नाय.. आज सकाळीच आलोय गावाकडून आणि आता ऑफिसमध्‍ये आहे.. ढुष्क्लेमर टाकावं म्हटलं होतं.. पण पुन्हा म्हटलं आपणच कशाला आठवण करुन द्यायची ;-)

मूकवाचक 13/03/2012 - 16:43
नेहेमीप्रमाणेच भन्नाट, चाकोरीबाहेरचे (ऑफबीट) आणि शैलीदार लिखाण. वैचारिक गोपाळकाला मस्त जमला आहे. पुलेशु.

चौकटराजा 13/03/2012 - 19:16
यशवंत बुवानी फार फार तप केले. मग त्याना देव प्रसन्न झाला. देव म्हणाला " माग काय मागायचे ते !" यशवंतबुवा म्हणाले " नियंत्या, ईशा मला दुसर्‍याला चक्कर आणण्याचे सामर्थ्य दे ! " देव म्हणाला "मी मागे एकाला विचार करायला चौथी मिति दिली आहे, आता माझ्याकडे पाचवी मिति शिल्लक आहे. देउ का ? बुवा म्हणाले" त्याने काय होणार ? " देव उत्तरला " अरे आताशी त्याना ३ मिति माहितायत तू डायरेक्ट पाचवीत शिरलास की ते सगळे फेल .....चक्क्कर ... चक्क्क्क.......................र "

चौकटराजा 13/03/2012 - 19:17
यशवंत बुवानी फार फार तप केले. मग त्याना देव प्रसन्न झाला. देव म्हणाला " माग काय मागायचे ते !" यशवंतबुवा म्हणाले " नियंत्या, ईशा मला दुसर्‍याला चक्कर आणण्याचे सामर्थ्य दे ! " देव म्हणाला "मी मागे एकाला विचार करायला चौथी मिति दिली आहे, आता माझ्याकडे पाचवी मिति शिल्लक आहे. देउ का ? बुवा म्हणाले" त्याने काय होणार ? " देव उत्तरला " अरे आताशी त्याना ३ मिति माहितायत तू डायरेक्ट पाचवीत शिरलास की ते सगळे फेल .....चक्क्कर ... चक्क्क्क.......................र "

पैसा 13/03/2012 - 20:14
अजिब्बात विचार करू नकोस! ऊठ आणि एक कार्टून फिल्म बघून ये.

उत्क्रांती हा सोन्यासारखा शब्द कचकड्यासारखा वापरलेला पाहून वाईट वाटलं. बाकीच्या शब्दांविषयी मला या शब्दाइतकी आस्था नाही म्हणून त्यांचा निरर्थक वापर तितका बोचला नाही.

मन१ 13/03/2012 - 23:09
"बाळ , अध्यात्मातही आधी चमच्या चमच्यानं प्यावं म्हणजे मग अजीर्ण होत नाही" असं काहिसं"आमचे देवासचे काकाजी "तुझे आहे तुजपाशी" मध्ये म्हणत होते ब्वा. बादवे, हल्ली कुठल्या मंदिरातील तीर्थप्राशन करता ते कळले तर बरे होइल.

यकु 14/03/2012 - 13:25
मायला एवढं सोपं, साध्‍या रोजच्या शब्दांत लिहिलंय कुठलेही जडजंबाल शब्द, बोजड संकल्पना नाहीत तरीही अवघड, चक्कर येणारं वगैरे झालंय म्हणजे कमाल आहे. ठिक. आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो.

In reply to by यकु

प्यारे१ 14/03/2012 - 14:27
>>>आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो. अरे येशा, कसं व्हायचं रे तुझं? औट ऑफ द बॉक्स वि चार करणं सोड्णार म्हणतोस? मग आमच्यात आणि तुझ्यात फरक तो काय राहिल रे चोच्या? बाकी, काही लोकांची काहीही प्रतिक्रिया आली म्हणजे लेख छान छान आहे असंच मानायचं असतं बरं... कौतुकाची परा- आपलं - परिसीमा आहे ती. ;) तुला जे भावेल ते लिही बरं तू. २००० नाहीतरी २-५ वर्षांनी तरी वाचून लोक लेखाला 'चान चान' नी लेखकाला 'द्रष्टा' म्हणतातच रे!

In reply to by प्यारे१

यकु 14/03/2012 - 14:48
>>>>>>अरे येशा, कसं व्हायचं रे तुझं? औट ऑफ द बॉक्स वि चार करणं सोड्णार म्हणतोस? मग आमच्यात आणि तुझ्यात फरक तो काय राहिल रे चोच्या? बाकी, काही लोकांची काहीही प्रतिक्रिया आली म्हणजे लेख छान छान आहे असंच मानायचं असतं बरं... कौतुकाची परा- आपलं - परिसीमा आहे ती. तुला जे भावेल ते लिही बरं तू. २००० नाहीतरी २-५ वर्षांनी तरी वाचून लोक लेखाला 'चान चान' नी लेखकाला 'द्रष्टा' म्हणतातच रे! -------- बास का राव? औट ऑफ द बॉक्स वगैरे विचार असतील नसतील माहित नाही आणि माझ्यात तुमच्यातला फरकही माहित नाही. पण छान छान प्रतिक्रिया चुकूनही येऊ नयेत असं नक्कीच वाटतं. कौतुक वगैरे कुणाला मनापासून वाटत असेल त्यासाठी मी कृतज्ञ आहे. मुळात हे असलं लिहिण्‍याचा धंदाच यासाठी करतो की असले विचार कितपत बरोबर आहेत आणि ते कुणीकडे घेऊन जाणारे आहेत हे सांगणारे लोक इथे असतील.. पण कधीही बघा, समोरासमोर येऊन लोक चर्चा करीत नाहीत.. कुत्सित शेरेबाजीला तोटा नाही.. छान छान, वा वा वगैरे तर चालूच असते आणि मला त्याचा सोस नाहीय हे बरंय. जेव्हा वेळ येईल तेव्हा मला खरोखरचा, प्रॅक्टीकल, क्षणात परिणाम दाखवणारे उपाय देणारा 'द्रष्‍टा' व्हायला नक्कीच आवडेल. सध्‍या फक्त ‍तापदायक स्वर काढीत रियाझ सुरु आहे आणि त्यामुळं दोस्तलोक प‍रेशान आहेत. :) थँक्स तुझ्‍या दिलखुलास प्रतिसादामुळं हे लिहिण्‍याची संधी मिळाली म्हणून.

In reply to by यकु

मायला एवढं सोपं, साध्‍या रोजच्या शब्दांत लिहिलंय कुठलेही जडजंबाल शब्द, बोजड संकल्पना नाहीत तरीही अवघड, चक्कर येणारं वगैरे झालंय म्हणजे कमाल आहे. ठिक. आता सर्वांसाठी प्रॅक्टीकल नसेल तो विचार त्याज्य मानतो.
असेल असेल.. पण यक्कुशेठ कडून आम्हाला असल्या लिखाणाची अपेक्षा नाही. तुम्ही उगा हुच्चभ्रुंच्या नादाला लागलात का काय अशी शंका मनात डोकावली. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

यकु 14/03/2012 - 14:58
>>>>>पण यक्कुशेठ कडून आम्हाला असल्या लिखाणाची अपेक्षा नाही. --- पाठवून द्या तो तुमच्या मंदाकिनी का कोण तिचा अर्धवट ड्राफ्ट. पुरा करुन टाकतो. लै लै मज्जा येईल आणि ताटकळत राहिलेल्या पब्लिकचा दुवा पण मिळेल. ;-) हाकानाका

विजुभाऊ 14/03/2012 - 14:47
अज्ञाताचे ज्ञान व्हावे ही यज्ञयुगापासून मानवाला वटायचे. पण अज्ञात ज्ञात होऊ शकते याचे ज्ञान व्हायला एकोणविसावे शतक उजाडावे लागले. ज्ञातापासून अज्ञाता पर्यन्तचा प्रवास हा खरेतर स्वतःला शोधण्याचाच प्रकार आहे

गवि 14/03/2012 - 15:31
गांभीर्याने चर्चा होत नाही हा यशवंताचा मुद्दा मान्य करुन माझी प्रतिक्रिया लिहायला बसलो आहे.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ?
हे प्रश्न एकाच मूळ प्रश्नाशी नेता येतात तो प्रश्न म्हणजे "का?". "काय?"ची उत्तरं शोधत खूप खूप शोध लावत आपण जगत राहतो. "काय?"च्या उत्तरांनी "उपयोगी" शोध लागतात.. पण "का?" चं उत्तर कशानेच मिळत नाही. त्याविषयी विचार केला तर कोंडल्यासारखा फील येऊन पुन्हापुन्हा मनात प्रश्न आदळतात.. नाही केला तर काही होत नाही.. पण तरीही आपण आहोत हे गृहीत धरलं की "का?" चं उत्तर जाणण्याच्या पलीकडे आपण आलेले असतो.. "काय?" मधे जशी उपयुक्तता आहे तशी "का?" मधे नाही.. चटका का बसतो? या प्रश्नात "का?" आलेला असला तरी तो फसवा आहे.. या प्रश्नाचा अर्थ "चटका बसतो म्हणजे काय?" असा होतो.. चटका "का" बसतो याला अर्थ नाही.. या प्रश्नाचं उत्तरही चटक्यामागची प्रक्रिया काय हे सांगतं. नंतर चटका बसण्याचे "फायदे"ही सांगतं. पण मुळात चटका बसावा अशी ईशणा कोणाची अन का? हे सांगणं आपल्या मितीत म्हणा किंवा ज्यामुळे आपण जिवंत आहोत असं आपण म्हणतो त्या स्थितीमुळे म्हणा, अशक्य आहे.. अशावेळी विज्ञान किंवा तत्सम माध्यमांतून काही उत्तर मिळणार नाही हे लक्षात घेऊन पुलंचं खालील पत्र वाचावं, असं सांगावंसं वाटतं.. इथे पेस्ट करतोय. अवांतर वाटणारा काही भाग काढून टाकला आहे.. महत्वाचा काही बोल्ड केला आहे. यातलं एक वाक्य मी प्रासच्या यूजींवर लिहिलेल्या धाग्यावरही डकवलं होतं: प्रिय चंदू रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९॰३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला - फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे. तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच. तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं - नाटकं लिहायची - विनोदी साहित्य लिहायचं-गायचं - गाणी करायची - कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे. तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू - कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो. हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का? जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की - गोर्की - डिकन्स - शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल! लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable? माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो. कळावे, भाई

In reply to by गवि

यकु 14/03/2012 - 16:13
प्रतिसादाबद्दल थँक्यू गवि. पुलंचे लिखाण आणि त्यांचा जीवन जगण्याचा दृष्‍टीकोन मलाही आवडतो.. आणि अशा लेखकांमुळंच काकणभर अधिक आनंदात जगतो. पण आयुष्‍याची एवढीच आखीव मर्यादा नसते (तुम्हाला वाईट वाटणार नाहीय हे मला माहित आहे म्हणून सांगतो, उठसूठ पुलंच्या काकाजीची उद्धरणे देणारे दोस्त झीट आणतात. अरे तो काय एकटाच माणूस होऊन गेला काय तुमच्याकडे कसं जगावं हे सांगणारा? मान्य आहे महान होता, पण तेच तेच किती?) आणि ती जगणार्‍याच्या नेहमीच हातातही नसते. जिकडं जसं ओढलं जाईल, फरफटवलं जाईल तसं जाणं होतं. मुळात कसं जगावं हा प्रश्न नाहीच. का? हा प्रश्न आहे. आणि आहे हे असंच आहे हे उत्तर नाही, परिस्थिती आहे. का? चा विचार नाही केला तरी काही फरक पडत नाही असा माझा अनुभव नाही.

In reply to by यकु

गवि 14/03/2012 - 16:24
अरे यात पुलं कसे महान किंवा "जीवन त्यांना कळले हो.." असं काही काही म्हणायचं नाहीये.. तसं नाहीच आहे मुळात. काहीजणांना जीवन मला कळलं नाही याचा अ‍ॅक्सेप्टन्स येतो आणि त्यांना आनंद मिळतो इतकंच सांगायचं आहे..
का? चा विचार नाही केला तरी काही फरक पडत नाही असा माझा अनुभव नाही.
अर्थाची छटा वेगळी आहे.. जगण्याच्या अन उपयुक्ततेच्या नजरेने "का?" चा विचार न करता जगता येतं म्हणून त्याचा फारसा विचार होत नाही अशा अँगलने म्हणू इच्छितो..
पण आयुष्‍याची एवढीच आखीव मर्यादा नसते
असते...ते मान्य न करण्याने गुदमरा होतो..

In reply to by गवि

यकु 14/03/2012 - 16:38
>>>>अरे यात पुलं कसे महान किंवा "जीवन त्यांना कळले हो.." असं काही काही म्हणायचं नाहीये.. तसं नाहीच आहे मुळात. ----- नाही मलाही तसं म्हणायचं नाहीय.. पण सारखं सारखं सखाराम गटणे आणि तुझे आहे तुजपाशीमधले किंवा पुलंचे तसलेच ड्वायलॉग बोर होतात ना हो.. ते म्हणालो मी. आणखीही काही लोक असतीलच की. बाकी पुलं/ पुलंचे लिखाण प्रत्येकाच्याच अंगात किती भिनले आहेतच हे वेगळे सांगणे नलगे.. >>>>अर्थाची छटा वेगळी आहे.. जगण्याच्या अन उपयुक्ततेच्या नजरेने "का?" चा विचार न करता जगता येतं म्हणून त्याचा फारसा विचार होत नाही अशा अँगलने म्हणू इच्छितो.. ----- :) >>>>असते...ते मान्य न करण्याने गुदमरा होतो.. ----- नैसर्गिकपणेच मान्य होत नाही आणि गुदमरा होतो. ठरवून सगळं अमान्य करायला इथे कुणाला नसती आकाबाया सुचलीय.

In reply to by गवि

नगरीनिरंजन 14/03/2012 - 17:01
सहमत हो गवि. 'का?' याला 'चुकून' किंवा 'योगायोगाने' असे उत्तर असू शकते. रानात फूल फुलले म्हणून ढोल-ताशे वाजत नाहीत आणि ते सुकले म्हणून कोणी सूतक पाळत नाही तसेच जन्माला आलास ते का याचे उत्तर द्यायला कोणीही बांधिल नाही. ज्याला हवे त्याने शोधण्यात आयुष्य वेचावे; तसेही चुकून निर्माण झालेल्या या जाणिवेचा पुंजका कोणी कसा उधळायचा ते त्याचे त्याने ठरवायचे आहे. मरण चाहूल उतरते भूल रानातले फूल असे आयुष्य कशास फुलले कशास सुकले कुणा उमगले असे आयुष्य

In reply to by नगरीनिरंजन

यकु 14/03/2012 - 17:14
>>> तसेही चुकून निर्माण झालेल्या या जाणिवेचा पुंजका कोणी कसा उधळायचा ते त्याचे त्याने ठरवायचे आहे. ---- वाक्य आवडले. मर्मभेदी असा आयडी घ्‍या तुम्ही ननि. बाकी त्या चुकून निर्माण जाणीवेचा पुंजका सध्‍या तरी लहान मुलं म्हातार्‍या उडवतात तसे उडवतोय. :)

चौकटराजा 14/03/2012 - 16:37
वास्तविक मी माझाच अध्यात्मिक गुरू आहे असे सांगत असतो. पण पीयेल ना मी त्या स्थानी मानतो. मी तसे त्याना फोनवरून बोललोही. तर म्हणाले माझा आता बुवा होणार . मी म्हणालो तुमच्या व माझ्या वाढदिवसात एकाच दिवसाचा फरक असला( वयाने अंतर बरेच तरी मी ७/११ ते ८/११ म्हणून गमतीने म्हणत " आशीर्वाद द्या ) तरी मी मांडीला मांडी लावायला कधीच येणार नाही. आदर राखून दुरूनच पाहीन . मी शेवटपरर्यंत त्याना भेटायला गेलो नाही. पण त्यानी दिलेली एक शिकवण इथे देतो. एखादी घटना ही निसर्ग पातळीवर निरर्थकच असते. माणसाची त्याच्याकडे पहाण्याची संवय वा दृष्टी त्या घटनेचा अर्थ ठरवीत असते. मतभेद हे आपल्यामुळे निर्माण होत असतात ते आपले अ‍ॅट्रीब्यूट आहे घटनेचे नव्हे. हा मी त्याचा काढलेला अर्थ !

मन१ 14/03/2012 - 22:43
स्वतःला पुरेसा काम्धंदा नसलेल्याने इतरांच्या कामधंद्याचा वेळ खराब करण्यासाठी धागा काढलेला दिसतोय. गविंच्या प्रतिसादामुळे मात्र धागा वाचनखूणेत नेउन ठेवतो आहे.

In reply to by मन१

स्पंदना 16/03/2012 - 17:56
पण मग गवींना असा प्रतिसाद द्यावा लागला हे ही या धाग्याच यश नव्हे का? नसेल जमल अगदी पुलं सारख शब्द बांधण, पण ते पुल !, अन इथे तोच प्रश्न गुंता घेउन एक सेन्सीटिव्ह मन. मला तर दोन्ही एकाच पातळीचे वाटतात. म्हण्जे यश्वंतचा प्रश्न पुलं मुळ उलगडला म्हणा हवा तर. यशवंत सुरेख! अन गवींना काही म्हणायची गरज नसावी होय ना?

In reply to by मन१

स्पंदना 17/03/2012 - 05:58
पण मी थोडाफार जाणते त्याला त्याच्या लिखाणातुन अन प्रतिसादातुन. भात शिजलाय बघायला अख्ख पातेल कशाला पाट्यावर घायच नाही का? एखाद शित पुरत, मला.

राघव 16/03/2012 - 18:35
तुझं युजींपासूनचं जवळ जवळ प्रत्येक लेखन वाचलेलं आहे. प्रतिसाद दिलेत / नाही दिलेत तो भाग निराळा. पण अगोदरपासूनच तुझं लेखन आवडत आलेलं आहे. शैलीच सर्व बोलून जाते. :) एक वेगळंच सुचलं म्हणून - अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवतांना बरेचदा असं होतं की एखाद्यानं आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीचं बरंचसं बनवून ठेवलं असतं. गूगल आजोबा नेहमीच त्याकामी मदत करतात. ते तसंच्या तसं आपण वापरत नाही. आपल्याला हव्या त्या पद्धतीनं त्यात बदल करतो अन् मग वापरतो. पण बहुतेकजण सुरुवातीपासून सर्व बनवायच्या फंदात पडत नाहीत. हे मात्र खरं की ते सगळं आपण स्वतःच बनवण्यात खूप मझा येतो.. ते समाधान वेगळंच. आणि आपण बनवलेलं अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर जेव्हा खरोखर युजरच्या कामास येतं तेही सुख निराळंच. आपला कोणताही विचार प्रत्यक्षात उतरवल्यावर जे समाधान मिळतं ते शास्त्रज्ञांना मिळणार्‍या समाधानाहून कुठेच कमी नाही. पण तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे कष्ट लागतात ना त्याचं नावंच ते. त्यासाठी तहानभूक विसरून आपण काम करतो अन् मग ते मिळतं. बाकी तुलासुद्धा जिथे अडचणी येतात तिथे म्या पामराची काय बिशाद काही बोलायची..!! शुभम्

In reply to by राघव

यकु 16/03/2012 - 19:08
तुझ्‍या प्रतिक्रियेबद्दल थँक्स राघव. >>>आपला कोणताही विचार प्रत्यक्षात उतरवल्यावर जे समाधान मिळतं ते शास्त्रज्ञांना मिळणार्‍या समाधानाहून कुठेच कमी नाही. पण तो प्रत्यक्षात येण्यासाठी जे कष्ट लागतात ना त्याचं नावंच ते. त्यासाठी तहानभूक विसरून आपण काम करतो अन् मग ते मिळतं. --- हे ठिक आहे. मनात आलेला विचार, तो मूर्त रुपात येणं, मग त्यातून मानवी जीवनात उपयुक्त नवनिर्मिती, तिचा आनंद हे सगळं ठिकच. पण इथं एक होतंय की हे असेच नव्हे तर 'सगळेच विचार आपल्याला वापरुन घेतात', त्यात सगळे नष्‍ट होऊन जातात. मग हे असंच नष्‍ट होऊन जाणंच खरं जीवन (कारण सगळे यावर सहमत आहेत) आहे की खरं जीवन कुणाकडून जगलंच जात नाही? हा गुंता आहे.

In reply to by यकु

राघव 18/03/2012 - 00:10
विचार आपल्याला वापरून घेतात असा विचार येण्याचं कारण मुळात काय असावं? माझ्या मते, विचारांचं ध्येय ठरलेलं असेल तर असा विचार येत नाही. ध्येय ठरलं नसेल तर ते विचारांचं जहाज दिशाहीन भरकटणारंच. आता ध्येय कोणतं असायला हवं? हा प्रश्न वैयक्तिक आहे. ज्याला ज्या विचारांनी समाधान मिळतं ते त्याचं ध्येय ठरतं. प्रत्येकच जण कळत-नकळत असाच जगतो. जेव्हा या ध्येयाची जाणीव होते, तेव्हा ते योग्य की अयोग्य हा प्रश्न येतो. आता हे ठरवणार कोण? त्यासाठी काहीएक अधिकार तर हवाच ना? तो अधिकार ज्याचा, तीच व्यक्ती ते सांगू शकेल. प्रत्येकासाठी ही व्यक्ती कदाचित निराळी. पण त्या व्यक्तीला अधिकार आहे किंवा नाही ते आपल्याला कसं कळणार हा प्रश्न येतो. जोवर त्या व्यक्तीचं म्हणणं आपल्याला समाधान देतं तोवर आपण त्याचं ऐकणार. नाही पटणार तेव्हा? सोडून देणार? कशावरून त्या व्यक्तीचा मूळ हेतू समजला आपल्याला? कशावरून आपण ठरवणार? प्रश्नांना सीमा नाही. उत्तरांना आहे. तर्क संपतो तिथं उत्तरं सुचत नाहीत. कोण किती तर्क लावणार यावर किती वेळ उत्तरं देणार हे अवलंबून असतं. अन् उत्तर हे स्वतःच नवीन प्रश्नांना जन्म देऊन जातं. थांबायचं कुठं हे आपल्याच हाती आहे. त्यालाच शरणागती म्हणतात. अजुन काही नाही. राघव

५० फक्त 16/03/2012 - 19:26
उत्तम धागा, अशा ब-याचश्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत असा डांगोरा पिटायला मला आवडतं, पण त्यावर चर्चा करायला आवडत नाही. असा डांगोरा केला की समोरची माणसं स्वतामध्ये काहीतरी न्युन्य का नुन्य , का असंच काहीतरी आहे असं समजायला लागतात, आणि बाकीच्या रेघा लहान म्हणुन माझी रेघ मोठी दिसते, निदान जाणवते. आणि मग पुन्हा जाणुन बुजुन निर्माण केलेल्या या जाणिवेचा पुंजका मी, कसा आणि कुठं उधळायचा या स्वप्नरंजनात म्हणा किंवा प्लँनिंगमध्ये मी पुन्हा दंग होतो. असो, अजुन पुरी १५ वर्षे आहेत, अजुन असे बरेच पुंजके ब-याच ठिकाणी उधळायचे आहेत, एक आशा आहे की एखाद्यातरी पुंजक्यातुन एक बी बाहेर पडेल आणि रुजेल,कुठंतरी पुन्हा एक पुंजका होण्यासाठी आणि सुरु करेल पुन्हा एक शोध त्या पुंजका उधळणा-याचा.

In reply to by ५० फक्त

यकु 16/03/2012 - 19:35
>>>अशा ब-याचश्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत असा डांगोरा पिटायला मला आवडतं, पण त्यावर चर्चा करायला आवडत नाही. --- आता तुमच्या आवडीला थोडी मुरड घाला. आणि इथं चर्चा करा, वर सगळे करताहेतच की. >>> असा डांगोरा केला की समोरची माणसं स्वतामध्ये काहीतरी न्युन्य का नुन्य , का असंच काहीतरी आहे असं समजायला लागतात, --- लोकांना जिथेतिथे 'मी' घेऊन जायची सवय असते. सर्वकाळ, सर्वक्षणी, सर्वठिकाणी तुलना. डांगोरा वगैरेची काळजी सोडूनच दिलेली बरी - एरव्ही हमाम में सभी नंगे होते है.
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं. वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो.

मावळतीचा सूर्य

रेशा ·

पैसा 28/02/2012 - 00:38
मुंबईला इतका छान समुद्र आहे हेच बहुतेकाना धावताना विसरायला होत असेल! समुद्राचं आणि किनार्‍याचं शब्दचित्र छान जमलंय!

गणेशा 28/02/2012 - 00:58
छान लिहिले आहे. अवांतर : नरिमन पॉईंटला जॉब ला असताना, रोज रुम वर लोअर परेल ला बाईक ने जाताना, कट्ट्यावर शांतपणे घालवलेले क्षण आठवले. आणि आठवद्यात एकदातरी रात्री १२ नंतर मित्राबरोबर कट्ट्यावर येत असलेलो आठवले. मस्त. मुंबईकर होऊनही शांतपणात अनुभवलेले ते क्षण मस्तच होते. धन्यवाद .. हा पण तो समुद्रच कदाचीत सांगत असेन.. थांबु नका.. सुर्यास्तीचा सुर्य पुन्हा भेटीला येइइन .. चालत रहा.. अविरत

अन्या दातार 28/02/2012 - 08:08
लेख चांगलाच जमलाय. वादच नाही. काही लेखनप्रकारांची निवड कळली नाही. शुभेच्छा: कुणाला आहेत यात शुभेच्छा? सद्भावना: कुणासाठी सद्भावना? अभिनंदन: कुणाचे? चौकशी: कशाबद्दल? बातमी: कुठे आहे बातमी? शिफारस: काय शिफारस करत आहात लेखातून?? माध्यमवेध: सदर लेखातून कोणत्या माध्यमाचा वेध घेतला आहे? सल्ला: काय सल्ला आहे तुमचा? (लेखनप्रकार निवडीबाबत आम्ही नक्कीच सल्ला देऊ शकतो ;) ) प्रश्नोत्तरे: कौबक आहे का?? मदत: काय मदत पाहिजे? लेखातून तरी काही मदत हवीये असं दिसत तरी नाही. समीक्षा: कशाची समीक्षा आहे या लेखात? भाषांतर: अच्छा, मूळ लेख कोणत्या भाषेत आहे म्हणे?

रेशा 29/02/2012 - 22:19
खरचं खुप सुंदर असतो सुर्यास्त .. खुप सुंदर क्षण .. :) प्रोत्साहनासाठी मनापासुन धन्यवाद :) लेखन प्रकारांची निवड हे येथे नविन असल्यामुळे उडालेला गोंधळ आहे... ती सुधारणा करेन नक्कीच

पैसा 28/02/2012 - 00:38
मुंबईला इतका छान समुद्र आहे हेच बहुतेकाना धावताना विसरायला होत असेल! समुद्राचं आणि किनार्‍याचं शब्दचित्र छान जमलंय!

गणेशा 28/02/2012 - 00:58
छान लिहिले आहे. अवांतर : नरिमन पॉईंटला जॉब ला असताना, रोज रुम वर लोअर परेल ला बाईक ने जाताना, कट्ट्यावर शांतपणे घालवलेले क्षण आठवले. आणि आठवद्यात एकदातरी रात्री १२ नंतर मित्राबरोबर कट्ट्यावर येत असलेलो आठवले. मस्त. मुंबईकर होऊनही शांतपणात अनुभवलेले ते क्षण मस्तच होते. धन्यवाद .. हा पण तो समुद्रच कदाचीत सांगत असेन.. थांबु नका.. सुर्यास्तीचा सुर्य पुन्हा भेटीला येइइन .. चालत रहा.. अविरत

अन्या दातार 28/02/2012 - 08:08
लेख चांगलाच जमलाय. वादच नाही. काही लेखनप्रकारांची निवड कळली नाही. शुभेच्छा: कुणाला आहेत यात शुभेच्छा? सद्भावना: कुणासाठी सद्भावना? अभिनंदन: कुणाचे? चौकशी: कशाबद्दल? बातमी: कुठे आहे बातमी? शिफारस: काय शिफारस करत आहात लेखातून?? माध्यमवेध: सदर लेखातून कोणत्या माध्यमाचा वेध घेतला आहे? सल्ला: काय सल्ला आहे तुमचा? (लेखनप्रकार निवडीबाबत आम्ही नक्कीच सल्ला देऊ शकतो ;) ) प्रश्नोत्तरे: कौबक आहे का?? मदत: काय मदत पाहिजे? लेखातून तरी काही मदत हवीये असं दिसत तरी नाही. समीक्षा: कशाची समीक्षा आहे या लेखात? भाषांतर: अच्छा, मूळ लेख कोणत्या भाषेत आहे म्हणे?

रेशा 29/02/2012 - 22:19
खरचं खुप सुंदर असतो सुर्यास्त .. खुप सुंदर क्षण .. :) प्रोत्साहनासाठी मनापासुन धन्यवाद :) लेखन प्रकारांची निवड हे येथे नविन असल्यामुळे उडालेला गोंधळ आहे... ती सुधारणा करेन नक्कीच
लेखनविषय:
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

हस्ताक्षरातील अक्षर...

डॉ.श्रीराम दिवटे ·

यकु 24/01/2012 - 12:25
डाक्टरसायबा लेख मस्त जमलाय.. अंगठेबहाद्दर तेवढे प्रामाणिक आणि सहीवाले तेवढे लुच्चे असे गृहितक सोडता सगळा आवडला. कागदावर लिहायची वेळ आली तर मी तरी दौतीतली शाई दरवेळी अंगावर सांडून घेऊन का होईना पण फौंटन पेनानेच लिहीतो.. आणि चांगला दिसेल तो फाऊंटन पेन विकत घेतो.. कधी फक्त आपल्यालाच कळेल असं, कधी लफ्पेदार, कधी कर्सिव्ह अक्षरं काढण्‍यात जो आनंद आहे तो विरळाच.. मला कर्सिव्ह येत नव्हती म्हणून मी मुद्दाम बाळबोध धडे गिरवून ती शिकून घेतली आहे.. (अक्षरप्रेमी) यशवंत

हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचे थेट निदान करता येते असे मी कुठे वाचल्याचे स्मरत नाही. परंतु, काही कयास मात्र बांधता येतात. तेही ज्यांचे हस्ताक्षर चांगले ते चांगल्या स्वभावाचे आणि ज्यांचे हस्ताक्षर वाईट ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास कुठलेही शास्त्र काढीत नाही असे मला वाटते. हस्ताक्षरातील वळण, गोलाई, अक्षरांना जोडणारी रेषा काढणे, अक्षर रेषेवर किंवा रेषेखाली किंवा रेषेला जोडून काढणे, हस्ताक्षराखाली (सही खाली) रेष ओढणे, टिंब देणे, वेलांट्यांची पद्धत, उकारांची पद्धत, उद्गारचिन्हांचा, अवतरणचिन्हांचा वापर, अनुस्वार 'टिंब' की 'पोकळ गोल', दाब देऊन केलेले लिखाण, समास सोडण्याची पद्धत, दोन अक्षरातील - दोनशब्दातील समान-असमान अंतर, चुकीचा शब्द किंवा अक्षर त्यावर गिरवून सुधारणे, फक्त काट मारून नव्याने लिहिणे, चुकीच्या शब्दाला संपुर्ण काळवटून नविन शब्द लिहीणे, लिखाणातील टापटिप अशा अनेक प्रकारांचा अभ्यास करून लेखकाच्या स्वभावविशेषाचा अंदाज बांधला जातो. गुन्ह्यांचा शोध लावताना, शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याच्या कामी ह्या शास्त्राचा बराच फायदा होतो असे म्हणतात. हल्लीच्या काळात हस्ताक्षर मागे पडत असले तरी अजून तरी सही, व्यक्तिगत बँक चेक, काही प्रमाणातील, संगणकावर उतरविण्याआधीचे, कच्चे लिखाण, एका ओळीच्या सुचना, संदेश, खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी अशा अनेक ठि़काणी हस्तलिखिताचा वापर होतो. आणि जसे हस्ताक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचे तंत्र आहे तसेच पुढे-मागे संगणकिय लिखाणावरूनही स्वभावाचा अंदाज बांधण्याचे शास्त्र विकसित होईल, कोणी सांगावे?

विजुभाऊ 24/01/2012 - 13:52
मी गेले कित्येक महिने हाताने काही लिहीलेच नाहिय्ये. सहीसुद्धा केलेले नहिय्ये. सध्या अशी परिस्थिती आहे की टायपिम्ग करणे हे लिहिण्यापेक्षा लवकर जमतेय. हस्ताक्षर दिवसेदिवस गचाळपणात पहिल्या नंबरावर येण्याचा प्रयत्न करायला लागलेय.

प्रचेतस 24/01/2012 - 14:27
सन्माननीय स्पाकांकाच्या या लेखाची आठवण झाली. आता युबिस्लेट ७ एकदाचा त्यांच्या हातात पडल्यावर उरलेसुरले हस्ताक्षरही संपून जाईल की काय असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

यकु 24/01/2012 - 14:38
+1 स्पा काकांनी फार छान लिहीले होते. 'मिपादिवंगत' सदस्या शुचिआजींनी त्या धाग्यावर दिलेली कविता.. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१|| चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२|| शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३|| नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४|| पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५|| -कवयित्री - इंदिरा संत

In reply to by यकु

चतुरंग 25/01/2012 - 09:17
यकु, इंदिरा संतांची अतिशय भावगर्भ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :) किती साधे, सोपे, नेहेमीच्या वापरातले शब्द आहेत पण काव्य केवढं अर्थपूर्ण आहे! वा!! (आनंदी) रंगा

वपाडाव 24/01/2012 - 16:41
माननीय डॉक्टरांनी नवजात संस्थळाचे सदस्यत्व घेतलेले दिसतेय... तिकडे कदाचित शुद्धलेखनाला फाट्यावर मारत नसावेत म्हणुन इकडे येउन डॉक्टरांनी गळा काढलाय असे दिसते...

पैसा 24/01/2012 - 23:37
कोणत्याही वादाशिवायच्या स्वच्छ लेखाबद्दल अभिनंदन! लेख आवडला, म्हणजे डॉक्टर लोकांची अक्षराच्या बाबतीत बाजू मांडणारा आहे, ते काम व्यवस्थित केलंय. आता जर फार लिहायचे प्रसंग येत नसतील, तर अक्षर निदान सुवाच्च काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हस्ताक्षर दिन साजरा करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ब्वॉ! रोज कसला तरी दिन असतोच! हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्वाबद्दल पेठकर काकांनी सविस्तर लिहिलंच आहे, आणखी लिहीत नाही. एक शंका आहे, डॉक्टरसाहेब जेव्हा प्रेम करायच्या वयात असतील, तेव्हा एसेमेस, ईमेल्स काही नसावं, मग तेव्हाचे डॉक्टरलोक प्रेमपत्र कशी लिहीत असत? आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का? ;)

In reply to by पैसा

अन्या दातार 25/01/2012 - 08:47
......आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
इतका कशाला बभ्रा करायचा? सरळ केमिस्ट पोरींनाच लिहित असतील. आता याचे पण फायदे सांगत बसायचे का? ;)

In reply to by पैसा

मी-सौरभ 25/01/2012 - 13:40
ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
असं केल्याने एका डॉक्टरची प्रेयसी केमिस्ट बरोबर पळून गेली म्हणे

In reply to by मी-सौरभ

मन१ 25/01/2012 - 14:01
भटकलेला मुल्ला मशिदीतच सापडणार किंवा भटकलेला बेअव्डा गुत्त्यातच सापडणार म्हणतात तसा पळालेला केमिस्ट फार्मसीत किंवा दवाखान्यात सापडतो असे म्हणावे काय? ;)

आजकाल अशी हज्जारो शास्त्र दिवसागणिक निघत आहेत...लेख चांगला लिहिलाय,पण अमच्या हिशेबी हे प्रकरण म्हणजे मागच्या पानावरुन पुढे चालू इतकेच...!

चतुरंग 25/01/2012 - 09:35
हस्ताक्षरावरुन आठवले ते हस्ताक्षरतज्ज्ञ सप्तर्षी. अहमदनगरला मोरेश्वर त्र्यंबक सप्तर्षी म्हणून हस्ताक्षरतज्ज्ञ होते त्यांची खास शिकवणी लावून माझे आणि बहिणीचे हस्ताक्षर सुधारले होते. म्हणजे खरोखर फायदा झाला आहे. अजूनही माझे हस्ताक्षर बरेच चांगले आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येक अक्षराचे वळण कसे असले पाहिजे, अक्षराची सुरुवात कुठून आणि शेवट कुठे झाला पाहिजे हे दर्शवणारे अतिशय अभ्यासपूर्ण तक्ते तयार केलेले होते. दगडी पाटीवर खिळ्याने अक्षरे कोरुन त्यांनी पाट्या तयार करुन दिल्या होत्या त्यावर गिरवून मी अक्षर घोटलेले होते. मला स्पर्धेत बक्षिसेही मिळालेली होती. माझेच नव्हे तर आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुलामुलींची अक्षरे उत्तम होती. (गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! ;) ) हस्ताक्षर चांगले असावे याबाबत मी अजूनही आग्रही असतो. चांगल्या अक्षराचे मनात अतिशय चांगले प्रतिबिंब तयार होते यात शंका नाही. इथून पुढे संगणक आणि इतर माध्यमांमुळे लिहिण्याची सवय संपल्यात जमा होत जाईल असे दिसते. परंतु हाताने लिहिलेला कोणताही मजकूर तुम्हाला जास्त जिव्हाळ्याचा वाटतो आणि वाटत राहील किंबहुना इथून पुढे जशी त्याची वानवा होत जाईल तसे त्याचे महत्त्व अधिकच वाढेल. (सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

In reply to by चतुरंग

वपाडाव 25/01/2012 - 16:57
(गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! )
आजोबा, सरळ सरळ असं का नाही म्हणत... खंडहर देखके इमारत कैसी रही होगी इसका पता चलता है ! बाकी, पर्‍याशी सहमत ...

In reply to by वपाडाव

चतुरंग 25/01/2012 - 18:46
चांगल्या अक्षराला खंडहर वगैरे कसलं म्हणतोस! मराठी, मराठी उपमा सुचत नाहीत तुम्हाला हाच दोष आहे! ;) -रंगाजोबा

सुहास.. 25/01/2012 - 19:58
हम्म ! छान लेख , हस्ताक्षरा शी कधी ही वावडे नाही, राहिली गोष्ट लेखनाची , मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे अजुन लिहायची सवय गेली नाही. ( अर्थात तो माझी पत्रे वाचु शकतो , यातच माझ्या हस्ताक्षर कसे आहे हे समजते ;) )

In reply to by सुहास..

वपाडाव 25/01/2012 - 20:15
मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो.
आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न.... --------------------- ऐटीत संगणक वापरत असलो तरी पेनाने पत्रे लिहिणार आहे.

पाषाणभेद 25/01/2012 - 21:20
>>> आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. डॉक्टर लोकांचे अक्षर खराब असते हा निखालस खोटा समज आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो की काय डायग्नॉसीस आहे ते न समजावे म्हणून डॉक्टर लोकं मुद्दाम खराब अक्षरात प्रिस्र्कीप्शन लिहीतात. (प्रिस्र्कीप्शन म्हणजे केवळ गोळ्या औषधे लिहीलेली चिठ्ठी समजू नका. त्यावर, त्याच्या पाठीमागे डॉक्टर लोकं डायग्नॉसीस, काठी ठोकताळे लिहीत असतात.) माझा एक बेंच पार्टनर प्रतिथयश डॉक्टर झालेला आहे. त्याच्या अन माझ्या अक्षरांची स्पर्धा चालत असे. (माझे अक्षर चांगले आहे असे मी म्हणत नाही, पण त्याचे अक्षर शालेयकालात माझ्यापेक्षा चांगले होते.) यावर उपाय म्हणून काही डॉक्टरांनी प्रिंटेड प्रिस्क्रीप्शन दिल्याचे आठवते. प्रिस्र्कीप्शनवर गोळ्या औषधांचे मुख्य कंटेटच लिहणे अपेक्षीत असते (ब्रांड नेम आदी नको.) हे खरे आहे का? कोणी जाणकार समजून सांगेल काय? लेख छान आहेच.

यकु 24/01/2012 - 12:25
डाक्टरसायबा लेख मस्त जमलाय.. अंगठेबहाद्दर तेवढे प्रामाणिक आणि सहीवाले तेवढे लुच्चे असे गृहितक सोडता सगळा आवडला. कागदावर लिहायची वेळ आली तर मी तरी दौतीतली शाई दरवेळी अंगावर सांडून घेऊन का होईना पण फौंटन पेनानेच लिहीतो.. आणि चांगला दिसेल तो फाऊंटन पेन विकत घेतो.. कधी फक्त आपल्यालाच कळेल असं, कधी लफ्पेदार, कधी कर्सिव्ह अक्षरं काढण्‍यात जो आनंद आहे तो विरळाच.. मला कर्सिव्ह येत नव्हती म्हणून मी मुद्दाम बाळबोध धडे गिरवून ती शिकून घेतली आहे.. (अक्षरप्रेमी) यशवंत

हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचे थेट निदान करता येते असे मी कुठे वाचल्याचे स्मरत नाही. परंतु, काही कयास मात्र बांधता येतात. तेही ज्यांचे हस्ताक्षर चांगले ते चांगल्या स्वभावाचे आणि ज्यांचे हस्ताक्षर वाईट ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास कुठलेही शास्त्र काढीत नाही असे मला वाटते. हस्ताक्षरातील वळण, गोलाई, अक्षरांना जोडणारी रेषा काढणे, अक्षर रेषेवर किंवा रेषेखाली किंवा रेषेला जोडून काढणे, हस्ताक्षराखाली (सही खाली) रेष ओढणे, टिंब देणे, वेलांट्यांची पद्धत, उकारांची पद्धत, उद्गारचिन्हांचा, अवतरणचिन्हांचा वापर, अनुस्वार 'टिंब' की 'पोकळ गोल', दाब देऊन केलेले लिखाण, समास सोडण्याची पद्धत, दोन अक्षरातील - दोनशब्दातील समान-असमान अंतर, चुकीचा शब्द किंवा अक्षर त्यावर गिरवून सुधारणे, फक्त काट मारून नव्याने लिहिणे, चुकीच्या शब्दाला संपुर्ण काळवटून नविन शब्द लिहीणे, लिखाणातील टापटिप अशा अनेक प्रकारांचा अभ्यास करून लेखकाच्या स्वभावविशेषाचा अंदाज बांधला जातो. गुन्ह्यांचा शोध लावताना, शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याच्या कामी ह्या शास्त्राचा बराच फायदा होतो असे म्हणतात. हल्लीच्या काळात हस्ताक्षर मागे पडत असले तरी अजून तरी सही, व्यक्तिगत बँक चेक, काही प्रमाणातील, संगणकावर उतरविण्याआधीचे, कच्चे लिखाण, एका ओळीच्या सुचना, संदेश, खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी अशा अनेक ठि़काणी हस्तलिखिताचा वापर होतो. आणि जसे हस्ताक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचे तंत्र आहे तसेच पुढे-मागे संगणकिय लिखाणावरूनही स्वभावाचा अंदाज बांधण्याचे शास्त्र विकसित होईल, कोणी सांगावे?

विजुभाऊ 24/01/2012 - 13:52
मी गेले कित्येक महिने हाताने काही लिहीलेच नाहिय्ये. सहीसुद्धा केलेले नहिय्ये. सध्या अशी परिस्थिती आहे की टायपिम्ग करणे हे लिहिण्यापेक्षा लवकर जमतेय. हस्ताक्षर दिवसेदिवस गचाळपणात पहिल्या नंबरावर येण्याचा प्रयत्न करायला लागलेय.

प्रचेतस 24/01/2012 - 14:27
सन्माननीय स्पाकांकाच्या या लेखाची आठवण झाली. आता युबिस्लेट ७ एकदाचा त्यांच्या हातात पडल्यावर उरलेसुरले हस्ताक्षरही संपून जाईल की काय असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

यकु 24/01/2012 - 14:38
+1 स्पा काकांनी फार छान लिहीले होते. 'मिपादिवंगत' सदस्या शुचिआजींनी त्या धाग्यावर दिलेली कविता.. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१|| चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२|| शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३|| नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४|| पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५|| -कवयित्री - इंदिरा संत

In reply to by यकु

चतुरंग 25/01/2012 - 09:17
यकु, इंदिरा संतांची अतिशय भावगर्भ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :) किती साधे, सोपे, नेहेमीच्या वापरातले शब्द आहेत पण काव्य केवढं अर्थपूर्ण आहे! वा!! (आनंदी) रंगा

वपाडाव 24/01/2012 - 16:41
माननीय डॉक्टरांनी नवजात संस्थळाचे सदस्यत्व घेतलेले दिसतेय... तिकडे कदाचित शुद्धलेखनाला फाट्यावर मारत नसावेत म्हणुन इकडे येउन डॉक्टरांनी गळा काढलाय असे दिसते...

पैसा 24/01/2012 - 23:37
कोणत्याही वादाशिवायच्या स्वच्छ लेखाबद्दल अभिनंदन! लेख आवडला, म्हणजे डॉक्टर लोकांची अक्षराच्या बाबतीत बाजू मांडणारा आहे, ते काम व्यवस्थित केलंय. आता जर फार लिहायचे प्रसंग येत नसतील, तर अक्षर निदान सुवाच्च काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हस्ताक्षर दिन साजरा करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ब्वॉ! रोज कसला तरी दिन असतोच! हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्वाबद्दल पेठकर काकांनी सविस्तर लिहिलंच आहे, आणखी लिहीत नाही. एक शंका आहे, डॉक्टरसाहेब जेव्हा प्रेम करायच्या वयात असतील, तेव्हा एसेमेस, ईमेल्स काही नसावं, मग तेव्हाचे डॉक्टरलोक प्रेमपत्र कशी लिहीत असत? आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का? ;)

In reply to by पैसा

अन्या दातार 25/01/2012 - 08:47
......आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
इतका कशाला बभ्रा करायचा? सरळ केमिस्ट पोरींनाच लिहित असतील. आता याचे पण फायदे सांगत बसायचे का? ;)

In reply to by पैसा

मी-सौरभ 25/01/2012 - 13:40
ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
असं केल्याने एका डॉक्टरची प्रेयसी केमिस्ट बरोबर पळून गेली म्हणे

In reply to by मी-सौरभ

मन१ 25/01/2012 - 14:01
भटकलेला मुल्ला मशिदीतच सापडणार किंवा भटकलेला बेअव्डा गुत्त्यातच सापडणार म्हणतात तसा पळालेला केमिस्ट फार्मसीत किंवा दवाखान्यात सापडतो असे म्हणावे काय? ;)

आजकाल अशी हज्जारो शास्त्र दिवसागणिक निघत आहेत...लेख चांगला लिहिलाय,पण अमच्या हिशेबी हे प्रकरण म्हणजे मागच्या पानावरुन पुढे चालू इतकेच...!

चतुरंग 25/01/2012 - 09:35
हस्ताक्षरावरुन आठवले ते हस्ताक्षरतज्ज्ञ सप्तर्षी. अहमदनगरला मोरेश्वर त्र्यंबक सप्तर्षी म्हणून हस्ताक्षरतज्ज्ञ होते त्यांची खास शिकवणी लावून माझे आणि बहिणीचे हस्ताक्षर सुधारले होते. म्हणजे खरोखर फायदा झाला आहे. अजूनही माझे हस्ताक्षर बरेच चांगले आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येक अक्षराचे वळण कसे असले पाहिजे, अक्षराची सुरुवात कुठून आणि शेवट कुठे झाला पाहिजे हे दर्शवणारे अतिशय अभ्यासपूर्ण तक्ते तयार केलेले होते. दगडी पाटीवर खिळ्याने अक्षरे कोरुन त्यांनी पाट्या तयार करुन दिल्या होत्या त्यावर गिरवून मी अक्षर घोटलेले होते. मला स्पर्धेत बक्षिसेही मिळालेली होती. माझेच नव्हे तर आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुलामुलींची अक्षरे उत्तम होती. (गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! ;) ) हस्ताक्षर चांगले असावे याबाबत मी अजूनही आग्रही असतो. चांगल्या अक्षराचे मनात अतिशय चांगले प्रतिबिंब तयार होते यात शंका नाही. इथून पुढे संगणक आणि इतर माध्यमांमुळे लिहिण्याची सवय संपल्यात जमा होत जाईल असे दिसते. परंतु हाताने लिहिलेला कोणताही मजकूर तुम्हाला जास्त जिव्हाळ्याचा वाटतो आणि वाटत राहील किंबहुना इथून पुढे जशी त्याची वानवा होत जाईल तसे त्याचे महत्त्व अधिकच वाढेल. (सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

In reply to by चतुरंग

वपाडाव 25/01/2012 - 16:57
(गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! )
आजोबा, सरळ सरळ असं का नाही म्हणत... खंडहर देखके इमारत कैसी रही होगी इसका पता चलता है ! बाकी, पर्‍याशी सहमत ...

In reply to by वपाडाव

चतुरंग 25/01/2012 - 18:46
चांगल्या अक्षराला खंडहर वगैरे कसलं म्हणतोस! मराठी, मराठी उपमा सुचत नाहीत तुम्हाला हाच दोष आहे! ;) -रंगाजोबा

सुहास.. 25/01/2012 - 19:58
हम्म ! छान लेख , हस्ताक्षरा शी कधी ही वावडे नाही, राहिली गोष्ट लेखनाची , मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे अजुन लिहायची सवय गेली नाही. ( अर्थात तो माझी पत्रे वाचु शकतो , यातच माझ्या हस्ताक्षर कसे आहे हे समजते ;) )

In reply to by सुहास..

वपाडाव 25/01/2012 - 20:15
मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो.
आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न.... --------------------- ऐटीत संगणक वापरत असलो तरी पेनाने पत्रे लिहिणार आहे.

पाषाणभेद 25/01/2012 - 21:20
>>> आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. डॉक्टर लोकांचे अक्षर खराब असते हा निखालस खोटा समज आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो की काय डायग्नॉसीस आहे ते न समजावे म्हणून डॉक्टर लोकं मुद्दाम खराब अक्षरात प्रिस्र्कीप्शन लिहीतात. (प्रिस्र्कीप्शन म्हणजे केवळ गोळ्या औषधे लिहीलेली चिठ्ठी समजू नका. त्यावर, त्याच्या पाठीमागे डॉक्टर लोकं डायग्नॉसीस, काठी ठोकताळे लिहीत असतात.) माझा एक बेंच पार्टनर प्रतिथयश डॉक्टर झालेला आहे. त्याच्या अन माझ्या अक्षरांची स्पर्धा चालत असे. (माझे अक्षर चांगले आहे असे मी म्हणत नाही, पण त्याचे अक्षर शालेयकालात माझ्यापेक्षा चांगले होते.) यावर उपाय म्हणून काही डॉक्टरांनी प्रिंटेड प्रिस्क्रीप्शन दिल्याचे आठवते. प्रिस्र्कीप्शनवर गोळ्या औषधांचे मुख्य कंटेटच लिहणे अपेक्षीत असते (ब्रांड नेम आदी नको.) हे खरे आहे का? कोणी जाणकार समजून सांगेल काय? लेख छान आहेच.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!

डॉ.श्रीराम दिवटे ·

धन्या 05/01/2012 - 23:01
अप्रतिम चित्रपट परीक्षण. छान जमलंय. चित्रपटाचा जो विषय आहे त्यात तुमचा हातखंडा असल्यामुळे खुपच सुंदर लिहिलंय तुम्ही. तुमच्या याच शैलीत गेल्या वर्षी आलेल्या डेल्ली बेली चित्रपटाचे परीक्षणही वाचायला आवडले असते. अजून येऊ दया.

५० फक्त 05/01/2012 - 23:17
चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे, आणि दांभिकतेचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम दाखवला आहे, विद्या बालन जबरदस्त दिसली आहे, डिटेलिंग एकदम मस्त आहे

शाहिर 06/01/2012 - 08:40
रटाळ परीक्षण बाळबोध स्टोरी सांगावा असा सांगितला आहे..आणि शेवट सांगुन ज्यांनी बघितला नाही त्यांची उत्सुकता घालवलीत. स्पॉयलर आहे हे परीक्षण.. >>त्या गाण्यात छातीवरचा पदर पाडून डान्स करायला कोणीही तयार होत नाहीत, तेव्हा ही तयार होते... पाठीवर कोरडे / आसुड मारुन घेण्यास कोणी तयार नसते म्हणून रेश्मा ( विद्या बालन) तयार होते.. बाकी तुमच्याकडुन पदर पाडण्याच्या विषयाचीच अपेक्षा आहे... तुमची जिलेबी टाकुन झाली ...आता प्रतिसाद द्यायला याल अशी अपेक्षा नाही

In reply to by शाहिर

गणामास्तर 06/01/2012 - 10:03
>>बाळबोध स्टोरी सांगावा असा सांगितला आहे..आणि शेवट सांगुन ज्यांनी बघितला नाही त्यांची उत्सुकता घालवलीत. स्पॉयलर आहे हे परीक्षण.. सहमत आहे.. अनुप..

In reply to by गणामास्तर

प्रचेतस 06/01/2012 - 10:05
अहो पण ज्यांनी पाहिला नाही आणि ज्यांना पाहायची इच्छा नाही त्यांचे इथे ष्टोरी वाचून फुकटातच काम झाले ना?

In reply to by मी-सौरभ

प्रचेतस 06/01/2012 - 10:16
मग सिल्क स्मिताचे वरीजनल चित्रपट बघा की. पिच्चर मधली रेश्मा, शकीला ही नावे पाहून पूर्वी पाहिलेल्या काही चित्रपटांमधील याच नावाच्या नट्यांची आठौण आली. ;)

आत्मशून्य 06/01/2012 - 15:42
बाकि सिरीयल किसर इमेज असेल तरीही इम्रान हाशमीची कॅरॅक्टर्स तुलनेत व्हर्सटाइलच असतात. आपले पहिल्या फळीतले हिरे त्याच त्या छापाचे रोल करताना इम्रान हाशमीने मात्र कॉलेज बॉय , पोलीस इन्सपेक्टर, कॉन आर्टीस्ट ते अगदी प्रथीतयश गँगस्टर पर्यंत बरेच विवीध कॅरॅक्टर्स निभावले आहेत... म्हणूनच आवडतो. तुशार बद्दल काय बोलणार ? कॉलेजमधिल नाटकात काम करु पाहणारे होतकरु नवाभिनेत्यांसार्खाच तो पडद्यावर अजुनही चाचपडताना दिसतो.. खरतर त्यांच्या पेक्षाही बावळट... विद्या बालन .. हम्म्म...... छान अभिनेत्री आहे पण सेक्स अपिल....परीणीता अप्रतिमच पण गुरु मधील तिचा माधवन सोबत लिपलॉक बघतानाही सेन्सुअल वाटत न्हवती... ना इश्किया बघताना तसं वातावरण थेटरमधे दाटलं होतं... (माधुरी अथवा शेरॉन स्टोनचे चित्रपट थेट्रात पहायला जा म्हणजे कळेल काय नेमकं काय म्हणतोय ते) पण अभिनयाने ती सर्वच जिंकते.. शेवटी प्रत्येक गुणी अभिनेत्री माधुरी थोडीच असणार... राहता राहीले माननिय धागाकर्ते... बस्स उनका नाम ही काफि है.... ;)

किचेन 07/01/2012 - 17:15
सगळेच्या सगळे प्रसंग थोडक्यात लिहिलेत.अहो थोड तरी सोदायाचात प्रेक्षकांसाठी.अगदी इम्रान हाश्मीला ती आत्महत्या करणार आहे याचा साक्षात्कार कसा होतो तेही सांगितलाय.मान्य अहि हा सिनेमा बघण्यासाठी आहे पण त्याला एक उत्कृस्थ कथानाखी आहे.आता हि काय करेल अशी उत्सुकता सिनेमा बघताना वाटत असते.तुम्ही हे परीक्षण लिहून ती घालवलीत. थोडक्यात लहान मुलगा सिनेमा बघून त्याच वर्णन कस करेल ते तुम्ही सांगितलाय. इम्रान हाश्मी एका गाण्यात किस्न्याच काम सुरेख रीतीने पार पाडतो.

धन्या 05/01/2012 - 23:01
अप्रतिम चित्रपट परीक्षण. छान जमलंय. चित्रपटाचा जो विषय आहे त्यात तुमचा हातखंडा असल्यामुळे खुपच सुंदर लिहिलंय तुम्ही. तुमच्या याच शैलीत गेल्या वर्षी आलेल्या डेल्ली बेली चित्रपटाचे परीक्षणही वाचायला आवडले असते. अजून येऊ दया.

५० फक्त 05/01/2012 - 23:17
चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे, आणि दांभिकतेचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम दाखवला आहे, विद्या बालन जबरदस्त दिसली आहे, डिटेलिंग एकदम मस्त आहे

शाहिर 06/01/2012 - 08:40
रटाळ परीक्षण बाळबोध स्टोरी सांगावा असा सांगितला आहे..आणि शेवट सांगुन ज्यांनी बघितला नाही त्यांची उत्सुकता घालवलीत. स्पॉयलर आहे हे परीक्षण.. >>त्या गाण्यात छातीवरचा पदर पाडून डान्स करायला कोणीही तयार होत नाहीत, तेव्हा ही तयार होते... पाठीवर कोरडे / आसुड मारुन घेण्यास कोणी तयार नसते म्हणून रेश्मा ( विद्या बालन) तयार होते.. बाकी तुमच्याकडुन पदर पाडण्याच्या विषयाचीच अपेक्षा आहे... तुमची जिलेबी टाकुन झाली ...आता प्रतिसाद द्यायला याल अशी अपेक्षा नाही

In reply to by शाहिर

गणामास्तर 06/01/2012 - 10:03
>>बाळबोध स्टोरी सांगावा असा सांगितला आहे..आणि शेवट सांगुन ज्यांनी बघितला नाही त्यांची उत्सुकता घालवलीत. स्पॉयलर आहे हे परीक्षण.. सहमत आहे.. अनुप..

In reply to by गणामास्तर

प्रचेतस 06/01/2012 - 10:05
अहो पण ज्यांनी पाहिला नाही आणि ज्यांना पाहायची इच्छा नाही त्यांचे इथे ष्टोरी वाचून फुकटातच काम झाले ना?

In reply to by मी-सौरभ

प्रचेतस 06/01/2012 - 10:16
मग सिल्क स्मिताचे वरीजनल चित्रपट बघा की. पिच्चर मधली रेश्मा, शकीला ही नावे पाहून पूर्वी पाहिलेल्या काही चित्रपटांमधील याच नावाच्या नट्यांची आठौण आली. ;)

आत्मशून्य 06/01/2012 - 15:42
बाकि सिरीयल किसर इमेज असेल तरीही इम्रान हाशमीची कॅरॅक्टर्स तुलनेत व्हर्सटाइलच असतात. आपले पहिल्या फळीतले हिरे त्याच त्या छापाचे रोल करताना इम्रान हाशमीने मात्र कॉलेज बॉय , पोलीस इन्सपेक्टर, कॉन आर्टीस्ट ते अगदी प्रथीतयश गँगस्टर पर्यंत बरेच विवीध कॅरॅक्टर्स निभावले आहेत... म्हणूनच आवडतो. तुशार बद्दल काय बोलणार ? कॉलेजमधिल नाटकात काम करु पाहणारे होतकरु नवाभिनेत्यांसार्खाच तो पडद्यावर अजुनही चाचपडताना दिसतो.. खरतर त्यांच्या पेक्षाही बावळट... विद्या बालन .. हम्म्म...... छान अभिनेत्री आहे पण सेक्स अपिल....परीणीता अप्रतिमच पण गुरु मधील तिचा माधवन सोबत लिपलॉक बघतानाही सेन्सुअल वाटत न्हवती... ना इश्किया बघताना तसं वातावरण थेटरमधे दाटलं होतं... (माधुरी अथवा शेरॉन स्टोनचे चित्रपट थेट्रात पहायला जा म्हणजे कळेल काय नेमकं काय म्हणतोय ते) पण अभिनयाने ती सर्वच जिंकते.. शेवटी प्रत्येक गुणी अभिनेत्री माधुरी थोडीच असणार... राहता राहीले माननिय धागाकर्ते... बस्स उनका नाम ही काफि है.... ;)

किचेन 07/01/2012 - 17:15
सगळेच्या सगळे प्रसंग थोडक्यात लिहिलेत.अहो थोड तरी सोदायाचात प्रेक्षकांसाठी.अगदी इम्रान हाश्मीला ती आत्महत्या करणार आहे याचा साक्षात्कार कसा होतो तेही सांगितलाय.मान्य अहि हा सिनेमा बघण्यासाठी आहे पण त्याला एक उत्कृस्थ कथानाखी आहे.आता हि काय करेल अशी उत्सुकता सिनेमा बघताना वाटत असते.तुम्ही हे परीक्षण लिहून ती घालवलीत. थोडक्यात लहान मुलगा सिनेमा बघून त्याच वर्णन कस करेल ते तुम्ही सांगितलाय. इम्रान हाश्मी एका गाण्यात किस्न्याच काम सुरेख रीतीने पार पाडतो.
दी क्लिन (बोल्ड) पिक्चर! त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो... कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे. थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो... ती एक अल्लड मुलगी- रेश्मा.

प्रासंगिक-१

डॉ.श्रीराम दिवटे ·

चिरोटा 18/11/2011 - 13:17
वाचनिय लेख. ह्या सगळ्या सट्ट्यामागे अभिषेक बच्चन असल्याचे बोलले जाते.अभिनय नाही पण आपल्याला निदान "हे" तरी करता येते हे त्याला जगाला सांगायचे होते.

मदनबाण 18/11/2011 - 13:27
छन लिहले आहे... ऑनलाईन लॉटरी खेळण्याचे पेव सध्या फुटले आहे. हे का लिहले ते मला नाय समजले. ! सेलिब्रेटींची कोणतीही ‘जर-तर’ मधली वैयक्तिक गोष्ट अशी सार्वजनिक चर्चेत ओढून त्यावर सट्टा खेळणे कितपत योग्य आहे? अयोग्यच ! अर्थात पैश्याचे वेड असणार्‍या कुठल्याच गोष्टी गैर वाटत नाही...

रेवती 18/11/2011 - 21:17
ऐश्वर्याला बाळ होणार असल्याची बातमीच विसरून गेले होते. ती बाळंत झाल्यावरही सगळ्यात शेवटी कळणारी मीच असेन बहुतेक!;) बाकी या गोष्टीवर सट्टा वगैरे खेळणारे लोक गाढव म्हटले पाहिजेत.

चिरोटा 18/11/2011 - 13:17
वाचनिय लेख. ह्या सगळ्या सट्ट्यामागे अभिषेक बच्चन असल्याचे बोलले जाते.अभिनय नाही पण आपल्याला निदान "हे" तरी करता येते हे त्याला जगाला सांगायचे होते.

मदनबाण 18/11/2011 - 13:27
छन लिहले आहे... ऑनलाईन लॉटरी खेळण्याचे पेव सध्या फुटले आहे. हे का लिहले ते मला नाय समजले. ! सेलिब्रेटींची कोणतीही ‘जर-तर’ मधली वैयक्तिक गोष्ट अशी सार्वजनिक चर्चेत ओढून त्यावर सट्टा खेळणे कितपत योग्य आहे? अयोग्यच ! अर्थात पैश्याचे वेड असणार्‍या कुठल्याच गोष्टी गैर वाटत नाही...

रेवती 18/11/2011 - 21:17
ऐश्वर्याला बाळ होणार असल्याची बातमीच विसरून गेले होते. ती बाळंत झाल्यावरही सगळ्यात शेवटी कळणारी मीच असेन बहुतेक!;) बाकी या गोष्टीवर सट्टा वगैरे खेळणारे लोक गाढव म्हटले पाहिजेत.
लेखनविषय:
3