मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

तुमचा अभिषेक ·

कल्पक लेखन आवडले. अभिषेक - तुम्ही हे सर्वेक्षण करण्यात घालवलेला कामाचा महत्वपूर्ण वेळ तुमच्या सुटीच्या कोट्यातून वजा का केला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. या नोटिशीचे उत्तर देण्यास कामाचा वेळ पुन्हा दवडल्यास तोही सुटीच्या कोट्यातून वगळला जाईल हे ध्यानात ठेवा...

In reply to by श्रीरंग_जोशी

एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो... बायका नाही का मालिका बघत बघत तांदूळ निवडताना आपल्या पपूबाळाचा अभ्यास घेत असतात.. बस्स तसेच मी देखील काम करता करताच थोडेफार निरीक्षण केले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पहिली वेळ असल्याने केवळ नोटिस देऊन सोडण्यात येत आहे....:-). बाकी आता तुम्ही कार्यालयातील एक समस्या शोधून काढलीच आहे तर त्यावर उपायही सुचवा :-).

In reply to by श्रीरंग_जोशी

उपाय शोधायच्या फंदात पडू नका.. समस्या कार्यालयातच राहू द्या.. उपाय शोधायच्या नादात समस्या घरात आणून ठेवाल.. ;)

In reply to by शुचि

त्या ससा कासव कथेच्या बरेच आवृत्त्या निघाल्या आहेत हं.. आपणच सांगा कोणती आपल्याला अपेक्षित आहे ते.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 18/04/2013 - 22:48
आमच्या संस्कारक्षम वयात, लहानपणी एकच आवृत्ती शिकवली जिच्याशी आम्ही ईमान राखलं. कासव जिंकतो ती. मग नंतर चलाख सशांनी आवृती चे भ्रष्टांतर केले असल्यास माहीत नाही ब्वॉ!! :)

In reply to by शुचि

चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे आहोत आणि आपण संथ कासव आहात या पॉंईंटवरच आपण हा वाद तुर्तास थांबवूया, आणि बघूया आपल्या किती कासव मैत्रीणी यावर सहमत होताहेत.. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. :)

धमाल मुलगा 18/04/2013 - 21:29
एकतर आधीच इथं ते राखीव विभागावरुन अग्निकुंड पेटलंय, अन त्यात आणि राकेल ओतायचं काम चाललंय होय? :) अभ्या लेका...स्वतःच्या हातानं चिता रचून घेतलीस की रे! आता बस बोंबलत. :D अवांतरः लेख बाकी एकदम फर्डा जमलाय हो. निरिक्षणं फिरिक्षणं एकदम खणखणीत. फक्त ते 'मेकअप शेकअप' अंमळ खटकलं...शेकअप म्हणल्यावर सगळ्या बायाबापड्या हापिसात पोचल्यावर त्या रेष्टरुममध्ये जाऊन काय मिल्कशेक वगैरे करुन पितात की काय असा प्रश्न पडला क्षणभर. :)

हा हा.. ते शेक अप चा असाही अर्थ होतो का.. बरे झाले आणखी अर्थ नाही सुचले.. कॉलेजमध्ये ग्रूपमध्ये काही काळासाठी एक पंजाबी मुलगा होता त्याच्या या असल्या वाणीने मी बराच प्रभावित झालो होतो.. चल लेक्चर बंक शंक करते है, कुछ सिगार शिगार पिते हे असेच काही बाही बोलायचा तो..

In reply to by अन्या दातार

काय ओ, लेखात लिहिले आहे ना, हे सर्वेक्षण नसून निरीक्षण आहे, ते ही ऑफिसातील शेजारच्या तब्बल दोन मुलींचे. दरवेळी मी काहीही लिहिले की पहिल्यांदा बायकोला वाचायला देतो, हाच एक लेख असा जो त्यांना आधी वाचायला दिला, त्यांची मान्यता मिळवून मगच प्रकाशित केला... अन्यथा मूळ अहवालात १२ मुद्दे होते, दोघांवर त्यांनी आक्षेप घेतला म्हणून १० झाले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

अभ्या.. 21/04/2013 - 14:18
अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते
म्हणून जरासे कन्फ्युजन झाले ओ. बाकी काही नाही. ;)

In reply to by अभ्या..

साळसकर 22/04/2013 - 13:40
राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा माझ्या धाग्यात तेवढ्या मारल्या असता तर मला तरी त्याचा फायदा झाला असता.. ही चिटींग झाली ना भाऊ.. :(

कोमल 20/04/2013 - 17:57
:) :) :) अजुन एका आंतरजाला वरील धाग्यात अशी महिती मिळाली की "भारतिय पूरुषा" पेक्शा "भारतीय महीलांच्या" कामाचा दर्जा चांगला असतो.. ;) आता बोला अभिषेकराव..

In reply to by कोमल

तुमची लिंक गंडलीय.. माझ्याकडे तरी नाही दिसतेय.. बाकी काय बोलू.. बायका जे घरकाम करतात त्याला तोड नाहीच.............. फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

कोमल 21/04/2013 - 12:11
लिंक तर गंडलीय खरीच.. पण गूगलवलात की लै लिंका मिळतात...
फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात..
आणि संत ग्यानोबांनी म्हटले आहे ना, "हे विश्वची माझे घर.." :)

In reply to by तुमचा अभिषेक

मस्त कलंदर 21/04/2013 - 13:35
अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक प्रकार आहे. तो लेखापुरता ठीक. पुढे समर्थन-त्याविषयीचा काथ्या कुटायला गेलात की विनोद संपतो. जर ते द्यायचंच असेल, तर तुमचा सँपल सेट चुकलाय.. सगळ्यात आधी ऑफिस बदला. थोडंसं अवांतरः आमच्या कॉलेजमध्ये एक साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाचे गृहस्थ कंपनीतला जॉब सोडून लेक्चररशीप करायला आले. अशी उलटी गंगा कशी काय म्हणून विचारल्यावर ,"खूप उशीर झालाय, हे आधीच करायला हवं होतं" म्हणाले. नंतर आम्हाला आपापल्या विभागातून काही काम एकत्र करायचे होते, परंतु कार्यक्रमाला उशीर होता त्यामुळे उगीच इकडे-तिकडे न करता आम्ही तिथे बसून वाट पाहायचे ठरवले. त्या अर्ध्या तासात आपल्या कॉलेजात किती कामं करावी लागतात आणि कंपनीत कसं मस्त मजेत होतं असं सांगून डोकं खायला लागले. शेवटी इतकं होतं तर आलात कशाला या क्षेत्रात असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "मला वाटलं होतं इकडं आराम असेल". म्हटलं, "देअर यू आर". आता ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतं.

In reply to by मस्त कलंदर

समर्थन कसले हो, तेवढेच दोन प्रतिसाद वाढतात अन लेख वर येतो म्हणून बळंच लिहिले.. ;)

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी. टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतात

विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
उत्तम निरीक्षण!!! लेख आवडला...!!!

पैसा 23/04/2013 - 19:17
अतिशयोक्ती म्हणून ठीक आहे. आतापर्यंत मी ज्या ज्या शाखेत्/ऑफिसात काम केले आहे, तिथून माझी बदली झाल्यानंतर माझ्या जागी दर वेळी २/३ पुरुष सद्स्यांची नेमणूक झाल्याचा गेल्या २५ वर्षातला रेकॉर्ड आहे. आता नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या शाखेतही तेच रेकॉर्ड कायम आहे.

In reply to by पैसा

क्या बात है.. तसा माझा अनुभव तोकडाच.. आतापर्यंत तीन च नोकर्‍या बदलून झाल्यात.. पैकी पहिल्या दोन कंपन्या मी जॉब सोडताच सहामहिने वर्षभरात बंद पडल्या.. अन तिसरी कंपनी रिलायन्स असल्याने अगदी बंद वगैरे नाही पडली पण मी राजीनाम्याचा पेपर सरकावला त्या दिवशीच रिलायन्सचे शेअर तेवढे गडगडले होते.. खालच्या दिशेने हं.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 23/04/2013 - 22:10
एक विनोद म्हणून लेख आवडला, पण मी लिहिलेली अतिशयोक्ती नाही. माझ्या ऑफिसात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. मी पत्ता फोन नंबर देये पाहिजे तर. कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:33
कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.
असहमत. महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त वेळ वाया घालवतात हे जसं चुकीचं वाक्य आहे तसंच हेही वाक्य चुकीचं आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:59
विधानाला आधार देणे हे तुमचे कर्तव्य आहे. हक्काबरोबर याचा विसर पडू देता कामा नये. कुठलाही दावा करणार्‍याला त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे देणे भागच असते. "अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ इज नॉट द प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स", सबब तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा तुम्हाला देणे भागच आहे. नसेल तर मग बिनबुडाचे विधान म्हणून संभावना केल्या जाईल.

In reply to by पैसा

नाही हो पैसाजी.. अविश्वास का दाखवेन.. पण मला एका गोष्टीचे नवल वाटते.. तुम्ही नोकरी सोडल्यावर मॅनेजमेंटने २-३ पुरुषांच्या जागी परत १ महिलाच का नाही घेतली?

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 09:28
महिलांना इकडे बदल्या करून टाकणे शक्य नाही. सरकारी बँकामधे बदल्यांच्या बाबतीत युनियन्सचा मोठा प्रभाव असतो. कोणालाही उचलून कुठेही टाकता येत नाही. नवी लागलेली पोरे आणि ऑफिसर्स यांना मात्र कुठेही उचलून टाकता येते. तसाच एक ऑफिसर आणि २ नव्या पोरांना आणून टाकलाय. मॅनेजरने त्यांना कंटाळून ट्रान्सफर मागितलीय असे कालच कळले.

In reply to by पैसा

म्हणजे इथे एका महिलेच्या जागी दोन पुरुषांना घेतले असा प्रकार नसून एका सिनिअरच्या जागी ज्युनिअर भरले असे झाले ना. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:09
एक सीनीयर, आणि २ ज्युनियर पुरुष. बरं, मी इथे खरडायला रिकामटेकडी आहे. तुम्ही तुमच्या हापिसची १३ मिनिटे काम करा आता.

In reply to by पैसा

ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त.. आज सुट्टी म्हणून मिपावाचन चालूय.. बाकी स्मार्ट वर्क करणार्‍यांना कधीही मरमर किंवा जास्तीचा वेळ काम करावे लागत नाही.. (हे जनरल स्टेटमेंट आहे, स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू)

In reply to by पैसा

पैसातै - यशस्वी कारकिर्दीबाबत अभिनंदन!! तुम्ही संपादकपदावरून जेव्हाही निवॄत्त व्हाल (कधीच होऊ नये असे वाटते खरं तर) तेव्हा किती नवे संपादक लागतील याचा अंदाज बांधतोय...

माझी बायको एवढे घरकाम करते की जर कधी ती मला सोडून गेली तर मला तिची कसर भरायला किमान दोन लग्ने करावी लागतील... वरची चर्चा बघून अस्से काहीसे मनात आले ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:10
हापिसात बायका ७२ मिनिटे जास्त काम करतात म्हटलं तर एवढं संशोधन केलंत आता घरात बायका किती जास्त काम करतात यावर संशोधन करा.

अनन्न्या 24/04/2013 - 11:05
हापिसचा की? ७२ मिनिटे त्यात खपली तुमची! (स्मायलि).आता प्रश्न आमच्या वेळेचा आहे म्हणून, स्वतःच्या हापिसचा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण विराम!

In reply to by अनन्न्या

चला ७२ नाही १२ मिनिटे तर घालवलीत.. हा प्रतिसाद द्यायला अन माझ्या प्रतिसादांची मोजदाद करायला... बाकी मला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त.. तर ऑफिसच वेळ काही वाया वगैरे जात नाहिये.. :)

कल्पक लेखन आवडले. अभिषेक - तुम्ही हे सर्वेक्षण करण्यात घालवलेला कामाचा महत्वपूर्ण वेळ तुमच्या सुटीच्या कोट्यातून वजा का केला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. या नोटिशीचे उत्तर देण्यास कामाचा वेळ पुन्हा दवडल्यास तोही सुटीच्या कोट्यातून वगळला जाईल हे ध्यानात ठेवा...

In reply to by श्रीरंग_जोशी

एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो... बायका नाही का मालिका बघत बघत तांदूळ निवडताना आपल्या पपूबाळाचा अभ्यास घेत असतात.. बस्स तसेच मी देखील काम करता करताच थोडेफार निरीक्षण केले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पहिली वेळ असल्याने केवळ नोटिस देऊन सोडण्यात येत आहे....:-). बाकी आता तुम्ही कार्यालयातील एक समस्या शोधून काढलीच आहे तर त्यावर उपायही सुचवा :-).

In reply to by श्रीरंग_जोशी

उपाय शोधायच्या फंदात पडू नका.. समस्या कार्यालयातच राहू द्या.. उपाय शोधायच्या नादात समस्या घरात आणून ठेवाल.. ;)

In reply to by शुचि

त्या ससा कासव कथेच्या बरेच आवृत्त्या निघाल्या आहेत हं.. आपणच सांगा कोणती आपल्याला अपेक्षित आहे ते.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 18/04/2013 - 22:48
आमच्या संस्कारक्षम वयात, लहानपणी एकच आवृत्ती शिकवली जिच्याशी आम्ही ईमान राखलं. कासव जिंकतो ती. मग नंतर चलाख सशांनी आवृती चे भ्रष्टांतर केले असल्यास माहीत नाही ब्वॉ!! :)

In reply to by शुचि

चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे आहोत आणि आपण संथ कासव आहात या पॉंईंटवरच आपण हा वाद तुर्तास थांबवूया, आणि बघूया आपल्या किती कासव मैत्रीणी यावर सहमत होताहेत.. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. :)

धमाल मुलगा 18/04/2013 - 21:29
एकतर आधीच इथं ते राखीव विभागावरुन अग्निकुंड पेटलंय, अन त्यात आणि राकेल ओतायचं काम चाललंय होय? :) अभ्या लेका...स्वतःच्या हातानं चिता रचून घेतलीस की रे! आता बस बोंबलत. :D अवांतरः लेख बाकी एकदम फर्डा जमलाय हो. निरिक्षणं फिरिक्षणं एकदम खणखणीत. फक्त ते 'मेकअप शेकअप' अंमळ खटकलं...शेकअप म्हणल्यावर सगळ्या बायाबापड्या हापिसात पोचल्यावर त्या रेष्टरुममध्ये जाऊन काय मिल्कशेक वगैरे करुन पितात की काय असा प्रश्न पडला क्षणभर. :)

हा हा.. ते शेक अप चा असाही अर्थ होतो का.. बरे झाले आणखी अर्थ नाही सुचले.. कॉलेजमध्ये ग्रूपमध्ये काही काळासाठी एक पंजाबी मुलगा होता त्याच्या या असल्या वाणीने मी बराच प्रभावित झालो होतो.. चल लेक्चर बंक शंक करते है, कुछ सिगार शिगार पिते हे असेच काही बाही बोलायचा तो..

In reply to by अन्या दातार

काय ओ, लेखात लिहिले आहे ना, हे सर्वेक्षण नसून निरीक्षण आहे, ते ही ऑफिसातील शेजारच्या तब्बल दोन मुलींचे. दरवेळी मी काहीही लिहिले की पहिल्यांदा बायकोला वाचायला देतो, हाच एक लेख असा जो त्यांना आधी वाचायला दिला, त्यांची मान्यता मिळवून मगच प्रकाशित केला... अन्यथा मूळ अहवालात १२ मुद्दे होते, दोघांवर त्यांनी आक्षेप घेतला म्हणून १० झाले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

अभ्या.. 21/04/2013 - 14:18
अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते
म्हणून जरासे कन्फ्युजन झाले ओ. बाकी काही नाही. ;)

In reply to by अभ्या..

साळसकर 22/04/2013 - 13:40
राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा माझ्या धाग्यात तेवढ्या मारल्या असता तर मला तरी त्याचा फायदा झाला असता.. ही चिटींग झाली ना भाऊ.. :(

कोमल 20/04/2013 - 17:57
:) :) :) अजुन एका आंतरजाला वरील धाग्यात अशी महिती मिळाली की "भारतिय पूरुषा" पेक्शा "भारतीय महीलांच्या" कामाचा दर्जा चांगला असतो.. ;) आता बोला अभिषेकराव..

In reply to by कोमल

तुमची लिंक गंडलीय.. माझ्याकडे तरी नाही दिसतेय.. बाकी काय बोलू.. बायका जे घरकाम करतात त्याला तोड नाहीच.............. फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

कोमल 21/04/2013 - 12:11
लिंक तर गंडलीय खरीच.. पण गूगलवलात की लै लिंका मिळतात...
फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात..
आणि संत ग्यानोबांनी म्हटले आहे ना, "हे विश्वची माझे घर.." :)

In reply to by तुमचा अभिषेक

मस्त कलंदर 21/04/2013 - 13:35
अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक प्रकार आहे. तो लेखापुरता ठीक. पुढे समर्थन-त्याविषयीचा काथ्या कुटायला गेलात की विनोद संपतो. जर ते द्यायचंच असेल, तर तुमचा सँपल सेट चुकलाय.. सगळ्यात आधी ऑफिस बदला. थोडंसं अवांतरः आमच्या कॉलेजमध्ये एक साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाचे गृहस्थ कंपनीतला जॉब सोडून लेक्चररशीप करायला आले. अशी उलटी गंगा कशी काय म्हणून विचारल्यावर ,"खूप उशीर झालाय, हे आधीच करायला हवं होतं" म्हणाले. नंतर आम्हाला आपापल्या विभागातून काही काम एकत्र करायचे होते, परंतु कार्यक्रमाला उशीर होता त्यामुळे उगीच इकडे-तिकडे न करता आम्ही तिथे बसून वाट पाहायचे ठरवले. त्या अर्ध्या तासात आपल्या कॉलेजात किती कामं करावी लागतात आणि कंपनीत कसं मस्त मजेत होतं असं सांगून डोकं खायला लागले. शेवटी इतकं होतं तर आलात कशाला या क्षेत्रात असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "मला वाटलं होतं इकडं आराम असेल". म्हटलं, "देअर यू आर". आता ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतं.

In reply to by मस्त कलंदर

समर्थन कसले हो, तेवढेच दोन प्रतिसाद वाढतात अन लेख वर येतो म्हणून बळंच लिहिले.. ;)

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी. टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतात

विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
उत्तम निरीक्षण!!! लेख आवडला...!!!

पैसा 23/04/2013 - 19:17
अतिशयोक्ती म्हणून ठीक आहे. आतापर्यंत मी ज्या ज्या शाखेत्/ऑफिसात काम केले आहे, तिथून माझी बदली झाल्यानंतर माझ्या जागी दर वेळी २/३ पुरुष सद्स्यांची नेमणूक झाल्याचा गेल्या २५ वर्षातला रेकॉर्ड आहे. आता नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या शाखेतही तेच रेकॉर्ड कायम आहे.

In reply to by पैसा

क्या बात है.. तसा माझा अनुभव तोकडाच.. आतापर्यंत तीन च नोकर्‍या बदलून झाल्यात.. पैकी पहिल्या दोन कंपन्या मी जॉब सोडताच सहामहिने वर्षभरात बंद पडल्या.. अन तिसरी कंपनी रिलायन्स असल्याने अगदी बंद वगैरे नाही पडली पण मी राजीनाम्याचा पेपर सरकावला त्या दिवशीच रिलायन्सचे शेअर तेवढे गडगडले होते.. खालच्या दिशेने हं.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 23/04/2013 - 22:10
एक विनोद म्हणून लेख आवडला, पण मी लिहिलेली अतिशयोक्ती नाही. माझ्या ऑफिसात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. मी पत्ता फोन नंबर देये पाहिजे तर. कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:33
कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.
असहमत. महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त वेळ वाया घालवतात हे जसं चुकीचं वाक्य आहे तसंच हेही वाक्य चुकीचं आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:59
विधानाला आधार देणे हे तुमचे कर्तव्य आहे. हक्काबरोबर याचा विसर पडू देता कामा नये. कुठलाही दावा करणार्‍याला त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे देणे भागच असते. "अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ इज नॉट द प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स", सबब तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा तुम्हाला देणे भागच आहे. नसेल तर मग बिनबुडाचे विधान म्हणून संभावना केल्या जाईल.

In reply to by पैसा

नाही हो पैसाजी.. अविश्वास का दाखवेन.. पण मला एका गोष्टीचे नवल वाटते.. तुम्ही नोकरी सोडल्यावर मॅनेजमेंटने २-३ पुरुषांच्या जागी परत १ महिलाच का नाही घेतली?

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 09:28
महिलांना इकडे बदल्या करून टाकणे शक्य नाही. सरकारी बँकामधे बदल्यांच्या बाबतीत युनियन्सचा मोठा प्रभाव असतो. कोणालाही उचलून कुठेही टाकता येत नाही. नवी लागलेली पोरे आणि ऑफिसर्स यांना मात्र कुठेही उचलून टाकता येते. तसाच एक ऑफिसर आणि २ नव्या पोरांना आणून टाकलाय. मॅनेजरने त्यांना कंटाळून ट्रान्सफर मागितलीय असे कालच कळले.

In reply to by पैसा

म्हणजे इथे एका महिलेच्या जागी दोन पुरुषांना घेतले असा प्रकार नसून एका सिनिअरच्या जागी ज्युनिअर भरले असे झाले ना. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:09
एक सीनीयर, आणि २ ज्युनियर पुरुष. बरं, मी इथे खरडायला रिकामटेकडी आहे. तुम्ही तुमच्या हापिसची १३ मिनिटे काम करा आता.

In reply to by पैसा

ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त.. आज सुट्टी म्हणून मिपावाचन चालूय.. बाकी स्मार्ट वर्क करणार्‍यांना कधीही मरमर किंवा जास्तीचा वेळ काम करावे लागत नाही.. (हे जनरल स्टेटमेंट आहे, स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू)

In reply to by पैसा

पैसातै - यशस्वी कारकिर्दीबाबत अभिनंदन!! तुम्ही संपादकपदावरून जेव्हाही निवॄत्त व्हाल (कधीच होऊ नये असे वाटते खरं तर) तेव्हा किती नवे संपादक लागतील याचा अंदाज बांधतोय...

माझी बायको एवढे घरकाम करते की जर कधी ती मला सोडून गेली तर मला तिची कसर भरायला किमान दोन लग्ने करावी लागतील... वरची चर्चा बघून अस्से काहीसे मनात आले ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:10
हापिसात बायका ७२ मिनिटे जास्त काम करतात म्हटलं तर एवढं संशोधन केलंत आता घरात बायका किती जास्त काम करतात यावर संशोधन करा.

अनन्न्या 24/04/2013 - 11:05
हापिसचा की? ७२ मिनिटे त्यात खपली तुमची! (स्मायलि).आता प्रश्न आमच्या वेळेचा आहे म्हणून, स्वतःच्या हापिसचा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण विराम!

In reply to by अनन्न्या

चला ७२ नाही १२ मिनिटे तर घालवलीत.. हा प्रतिसाद द्यायला अन माझ्या प्रतिसादांची मोजदाद करायला... बाकी मला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त.. तर ऑफिसच वेळ काही वाया वगैरे जात नाहिये.. :)
रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

तारे तोडण्याची स्पर्धा

प्रसाद गोडबोले ·

चाऊमेन खाणे हे वाढत्या रेप्स मागील कारण आहे - खाप पंचायत ( आत्तापर्यंत तोडलेला सर्वात मोठ्ठा तारा ...माझ्या मते ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आशु जोग 09/04/2013 - 22:45
लोकहो खाप पंचायत बद्दल आपल्याला काय माहिती आहे ? मेडीया जे दाखवते तेच सत्य मानायला लागलात तर अवघड आहे. पुढचा मागचा संदर्भ सोडून वक्तव्ये प्रसिद्ध करणे हा मेडीयाचा धंदा आहे पण त्यांनी फेकेलेले हाडूक खरे मानून चघळले तर पंचाईत(पंचायत नव्हे) होइल

तर्री 09/04/2013 - 18:28
इंडिया इज इंदिरा हे आसाम चे भूतपूर्व मुख्यमंत्री बारुवा यांचे विधान म्हणजे कोंग्रेस मधील लांगूलचालनाची कमाल.

२००५ साली राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते की, गोडबोले समितीच्या अहवालामुळेच महाराष्ट्र खड्ड्यात गेला. काही वर्षांपूर्वी उर्जा विषयाशी संबंधीत कुठल्यातरी समस्येबद्दल राज्य सरकार ने निवॄत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. राज्याची भविष्यातील उर्जा गरज हा त्या समितीला दिलेला विषय नव्हता. अहवालात संदर्भ म्हणून भविष्यातली वीजेची गरज म्हणून ढोबळ आकडेवारी डकवण्यात आली होती. शरद पवारांचे म्हणणे होते की त्या आकडेवारीच्या आधाराने राज्य सरकारने उर्जा धोरण आखले व ते फसले. राज्यभरात जोरदार भारनियमन सुरू झाले. उर्जा मंत्रालय अर्थातच राष्ट्रवादीकडे होते. दुसर्‍या दिवशीच्या बहुतांश अग्रलेखांत पवारांवर बरेच सरशंधान झाले होते की एकदाचे मान्य तर केले की महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय मग तो कसा का गेला असेना? प्रशासकीय अनुभवाच्या बाबतीत राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवारच म्हणत असतील तर राज्य खड्ड्यात गेले असण्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

In reply to by तर्री

विजुभाऊ 10/04/2013 - 20:45
સૌના સાથ સૌના વિકાસ = सर्वांची साथ सर्वांचा विकास सौ = सर्व ( मूळ शब्द सहु = सगळे )

श्रीगुरुजी 09/04/2013 - 19:45
>>> एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . त्या फ्रान्सच्या राणीचे नाव मेरी अ‍ॅन्टोनेट असे होते. पण तिची आणि आपल्या पुढार्‍यांची तुलना अप्रस्तुत आहे. ती असे काही म्हणाली होती याचा कोणताही पुरावा नाही. ही एक अफवा होती. आणि मुख्य म्हणजे ती जेव्हा असे म्हणाली असे सांगतात तेव्हा तिचे वय १४ वर्षे होते, म्हणजेच त्या वयात तिला फारशी समज नव्हती व आपण काय बोलत आहोत हे तिला समजले नव्हते. रविवारी ज्यांनी दुष्काळग्रस्तांबाबत किळसवाणे उद्गार काढले त्याचा स्पष्ट पुरावा आहे व त्यांचे वय फ्रान्सच्या राणीच्या जवळपास चौपट आहे व त्यांनी पूर्ण समजूनउमजून हे तारे तोडले आहेत.

In reply to by कापूसकोन्ड्या

काटजु सध्या आघाडीवर आहेत काय तर म्हणे संजयदत्तने गांधीगिरीचा प्रचार केलाय , खुप भोगलय म्हणुन त्याची शिक्षा माफ करा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पाचवीपर्यंत उर्दूचे शिक्षण सक्तीचे करा उर्दू ही प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी भाषा असल्याचे सांगत काटजू म्हणाले, की उर्दू ही सर्वसामान्यांची भाषा आहे. मला वाटते, की इंग्रजी, हिंदी आणि उर्दू ही प्रत्येक शाळेत सक्तीची केली पाहिजे. गुगलही उर्दूतून सुरू झाले पाहिजे. या भाषेचा वापर मोबाईलवरही टायपिंगसाठी करण्यात आला पाहिजे ६ बॉल ६ सिक्सर !! =))

इरसाल 09/04/2013 - 20:05
गिरीजा यांना उल्लेखुन नाही याची नोंद घ्यावी. "श्रीगुरुजी हे नेहमीच पुरावे देवुन लोकांना तोंडावर पाडत असतात."

विकास 09/04/2013 - 20:13
मस्त धागा.
दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
हे "तारे तोडणारे विधान" नाही त्यामुळे त्या अर्थाने नाही, पण +१ ! :-) प्रत्यक्ष तारे तोडण्यासंदर्भात नाही कारण यातील कोणत्याच व्यक्ती तितक्या "लहान" नाहीत/नव्हत्या. पण विखारी टिका करण्याच्या उद्देशाने बोलताना कधी कधी कसे जरा जास्तच बोलले जाते याची काही उदाहरणे आणि काही तारे, पण यातील कुठलेही विधान आणि व्यक्ती वरील स्पर्धेत येऊ शकेल असे वाटत नाही, त्यामुळे निव्वळ अवांतर समजावेत: (आठवणीतून सांगत आहे, दुवा नाही. चूकीचे काही असल्यास अवश्य सांगावेत)
  1. यशवंतराव चव्हाण (का शंकरराव?) आणिबाणीच्या काळात पुलंना "विदुषक" म्हणाले होते.
  2. मला वाटते विधानसभेत "सत्ताधारी - विरोधी" अशी बाचाबाची चालू असताना - एकदा शरद पवार मृणाल गोरेंना पुतना मावशी म्हणाले तर मृणाल गोरे पवारांना "कंस मामा" म्हणाल्या
  3. बाळासाहेब एकदा मृणाल गोरेंवर टिका करताना त्यांना "घॄणाल गोरे" म्हणाले होते, शरद पवारांना कांद्याचे पोते - अजून भरपूर सांगता येईल.
  4. अत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवारांवर टिकेचा भडीमार करताना - कन्नमवार की कंडमवार? असे म्हणले होते.
  5. राजीव गांधींच्या "हमे उन्हे उनकी नानी याद दिलाएंगे" विधानाने पब्लीक हसले होते (अर्थात तो त्यांनी विनोद केला नव्हता ही गोष्ट वेगळी!)
  6. मधू दंडवत्यांसारखी सन्मान्य आणि अजातशत्रू असलेली व्यक्ती एकदा म्हणाली: "हिंदूंपेक्षा मुसलमान हे जास्त भारताशी इमान राखून आहेत. कारण, मेल्यावरही ते मातीत रहातात!" (मला वाटते त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत ते त्यांचा बालेकिल्ला हरले!)
  7. इंदीरा गांधी एकदा वृत्तपत्रात येणार्‍या टिकेसंदर्भात म्हणाल्या होत्या की त्यांना काय किंमत देयची, ती उद्याची रद्दीच आहे. (त्यांच्या हत्येनंतर, त्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे रद्दीत टाकताना, या वाक्याची खूप आठवण झाली होती).

In reply to by विकास

सेनाप्रमुख शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणाले होते कांद्याचे नव्हे. त्यावर उत्तर म्हणून शरद पवार सेनाप्रमुखांना 'मैद्याचेच पोते पण रिकामे' असे म्हणाले होते :-). यावरून खालिल चर्चा आठवली :-) राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील "आधी केला ताश्कंद, नंतर केला सिमला; आता बोंबला!!!" - बाळासाहेब ठाकरे :)

युवराज म्हणतात. राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे प्रत्यक्ष ऐका. पुढचे वाक्य तर समजतच नाही शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये

बाकी सर्व जाउ दे. माननिय विश्व बन्धू गुप्ता, ज्या गोष्टित आपल्यालाithe काहीही ??ट सुद्धा कळत नसताना कसे तारेत तोडावेत? काहीही मिपा वर बरेच क्लाउड कॉम्प्युटिंग चे तद्न्य आहेत त्यांनि यावर मत नोंदवावे १.सिम वरचि माहिती ब्याटरी मध्ये जाते, २.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही. अशी वाक्ये वाचून डोक्याम्ध्ये दही जाउन विरजण लागले आहे. असो मजा करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

विकास 10/04/2013 - 19:48
आत्ता हसून घ्या लेको! पण पावसाळ्यात समजेल तुमच्या क्प्म्युटींगवर क्लाऊडमधून कसे पाणी पडते ते. ;)

In reply to by कापूसकोन्ड्या

बॅटमॅन 10/04/2013 - 14:42
पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही.
=)) =)) =)) =)) =)) =)) बापरे, डोक्यातल्या दह्याचे बाष्पीभवन होऊन जो पाऊस पडेल त्यामुळे अंतर्गत वायरिंग काम करेना झालेय.

चिरोटा 10/04/2013 - 14:05
निर्णय न घेणे हा सुद्धा निर्णय असतो.Not taking decision is also a decision. पी. व्ही. नरसिंहराव.

In reply to by चिरोटा

विकास 10/04/2013 - 19:50
पण याला तारे तोडणे म्हणता येणार नाही... "बोले तैसा चाले ... " म्हणावे लागेल. ;)

विकास 10/04/2013 - 21:00
"Indian Railways is the responsibility of Lord Vishwakarma. So is the safety of passengers... It is His duty, not mine. I have been forced to don His mantle," रेल्वेचे वाढत गेलेया अपघातांसंदर्भात, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव

मैत्र 10/04/2013 - 21:01
राजू शेट्टी यांच्या विरोधात दादांनी भाषण केले होते गेल्या निवडणूकांमध्ये की - तुम्ही मतं दिलीत तर आम्ही विकास करू म्हणजे दूध संघ, साखर कारखाने, सोयी, रस्ते वगैरे.. मतं प्रभागाप्रमाणे समजतात आता. मतं न मिळता विकास करण्याचं काही कारण नाही. जे मतदारसंघ आम्हाला निवडून देतील त्यांचाच आम्ही विकास करू.. आम्ही काही सोशल वर्क करत नाही. राजकारण करतो." नेमके शब्द माझ्या लक्षात नाहीत. शोधलं तर कदाचित मिळतील.. पण असं विधान केलं आणि त्यांचा उमेदवार दणकून पडला होता इतकं आठवतंय..

एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. कर्नाटकसोबतचे पाणीवाटप करात कृष्णेच्या पाण्यात बुडवू - तत्कालिन उपमुख्यमंत्री आर आर पाटिल (हे प्रथम नाव का वापरत नाही? राघोबा वगैरे असे आहे का?)

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 10/04/2013 - 21:07
मुंडे की बाळासाहेब? (दोघांची भुमिका तीच होती, पण हे विशिष्ठ वाक्य मला वाटते बाळासाहेबांचे होते).

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीगुरुजी 12/04/2013 - 21:00
>>> एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. मार्च १९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यावर एनरॉनबरोबरचा करार रद्द करून एनरॉन प्रकल्प खरोखरच अरबी समुद्रात बुडविला होता. त्यामुळे एनरॉनच्या रिबेका थॉमस भारतात येऊन बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व इतर संबंधितांना भेटल्यावर व कराराच्या काही कलमांचे पुनर्लेखन झाल्यावर प्रकल्प समुद्रातून बाहेर काढला. करार रद्द करण्यापूर्वी वीजेचा दर प्रति युनिट रू. २.४० इतका मान्य केलेला होता. पण नव्याने करार केल्यावर यात २० टक्के सूट देऊन प्रति युनिट रू. १.९२ इतका मान्य केला गेला. करार कसा पुन्हा जिवंत झाला, करारात कोणत्या नवीन अटी घातल्या व नंतर हा प्रकल्प का रखडला याची फारशी कल्पना नाही. पण केलेल्या घोषणेप्रमाणे निदान काही काळ तरी हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविला होता हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

घोषणेप्रमाणे काही काळ हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला होताच!! एन्रॉन दिवाळखोरीत गेली नसती तर हे प्रकरण (आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले होते) महाराष्ट्राला फारच महागात पडले असते असे तज्ञ लोकांनी म्हंटले होते तेव्हा.

मला तरी स्पष्ट आठवते की हे विधान मुंडे यांचेच होते. त्या काळात ते ऐन भरात होते. दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणू अशी घोषणा पण त्यांचीच.

In reply to by श्रीरंग_जोशी

युती शासनाच्या काळात विरोधी पक्षांच्या मोर्चात एक घोषणा असायची... महाराष्ट्रात दोनच गुंडे, जोशी मुंडे, जोशी मुंडे!! माझ्या वर्गात हजेरीच्यावेळी माझ्या नंतर मुंडे आडनाव असलेल्या वर्गमित्राचे नाव होते. हजेरी घेता घेता एक सर म्हणाले होते जोशी-मुंडे इथेही एकत्रच का? :-).

In reply to by आदूबाळ

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घडलेला प्रसंग आहे. पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपले नाव लिहून कागद सरकवला होता त्यावर योगायोगाने तो क्रम आला. अन पुढचे काही दिवस गुरूजींनी त्या कागदावरच हजेरी घेतली.

रमेश आठवले 11/04/2013 - 05:29
सध्या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल आहेत. यापूर्वी त्या राजस्तान मध्ये काँग्रेसच्या मंत्री मंडलात होत्या. त्यांच्या कडे जल संवर्धन खाते होते. त्यावेळी बेनिवाल यांनी असे विधान केले होते -राजस्तान मध्ये पडणार्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा राजस्तान सरकारच्या मालकीचा आहे.-

हुप्प्या 11/04/2013 - 06:51
अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. मला वाटते ताऊ देवीलाल ह्यांनी हरियाणाच्या शेतकर्‍यांना उद्देशून असे म्हटले की हल्ली तुमच्या शेतात पूर्वीसारखे पीक येत नाही कारण पंजाबचे सरकार त्या पाण्यातली वीज काढून घेते आणि नि:सत्त्व पाणी तुम्हाला देते!

तर्री 11/04/2013 - 11:28
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे. बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही. नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.

श्रीगुरुजी 11/04/2013 - 12:12
>>> अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. हे विधान महावीर त्यांगींचे आहे की पिलू मोदींचे याविषयी मला नक्की माहिती नाही. पण सरकारमध्ये मंत्री असणार्‍या कोणाचेही असे म्हणायचे धाडस होणार नाही हे नक्की. "अक्साई चीन या प्रदेशात गवताचे एक पातेही उगवत नाही" असे नेहरूंनी म्हटल्यावर लोकसभेत केले गेलेले मूळ विधान असे होते की, "जर असे असेल तर एखाद्याच्या डोक्यावर अजिबात केस नसतील तर ते डोके छाटले तर चालेल का?". हे विधान नेहरूंना उद्देशून आहे (नेहरूंना टक्कल होते) असा समज करून घेऊन इतर सदस्यांनी हे विधान करणार्‍याला माफी मागायला लावली होती.

श्रीगुरुजी 12/04/2013 - 14:55
>>>> काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. "मी एकवेळ संन्यास घेऊन भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये परत कधीही जाणार नाही" असे ज्या महात्म्याने म्हटले होते त्याच महात्म्याने वरील भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण नंतर अत्यंत नाईलाजाने देशाला जातीयवाद्यांपासून वाचविण्यासाठी व देशामध्ये धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी या महात्म्याला काँग्रेसमध्ये डेरेदाखल व्हावे लागले.

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

खबो जाप 12/04/2013 - 15:40
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील आल टेम फेवरेट …… एव्हढ्या साठी कि असा माणूस आपली आजोळचा आहे ह्याची लाज वाटते, वर लोक चिडवतात काय आजोळी गेला होतात आबा भेटले का ? तंबाखू खातात का ? नसतील सांगा परत चालू करा तोंड बंद राहते त्याने …. ह्या ह्या ह्या …. आता बोला ह्यावर मी काय म्हणू ………

In reply to by खबो जाप

ग्रामविकास खात्यात होते तेव्हा त्यांनी खरंच चांगले काम केले होते उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला अन तंटामुक्त गाव योजना सुरू केली ती मात्र पूर्ण फसली. गृहमंत्री पदासाठी त्यांचे व्यक्तिमत्वच साजेसे नाही त्याला ते तरी काय करणार? बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला?

श्रीगुरुजी 12/04/2013 - 20:51
"मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा" असे एक प्रख्यात शेतकरी नेते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा ते खरंच निवडणुकीला उभे राहिले तेव्हा एक कार्यकर्ता आपली पादत्राणे घेऊन त्यांना मारायला गेला. तेव्हा त्यांनी,"मी निवडणुकीला उभे राहणार नाही असे म्हणालो नव्हतो. मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा असे म्हणालो होतो. मी निवडणुकीला उभा आहे, पण मते मागणार नाही" असा युक्तीवाद त्यांनी केला होता. कोण हे नेते ओळखा पाहू?

In reply to by श्रीगुरुजी

यांनीच शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीत सामील होणे म्हणजे महासागराने गटारात सामील होणे असे म्हंटले होते. याप्रमाणेच स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर वाद झाल्यावर राष्ट्रवादी म्हणजे गरीबाची झोपडी असे शरद पवार म्हणाले होते :-).

वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा असून खरे नेते हे अडवाणी आहेत दाऊद ला आम्ही मुस्क्या बांधून फरफटात भारतात आणू नरेंद्र मोदी यानी राजधर्मच पालन कराव

In reply to by पिंपातला उंदीर

मैत्र 12/04/2013 - 21:42
शेवटचं वाक्य बहुतेकांना माहीत आहे. पण वाजपेयी यांनी यात तारे तोडलेत असं वाटत नाही. कदाचित गुजरात मध्ये काहीच घडलं नाही असं म्हणणं याला तारे तोडणे नक्की म्हणता येईल.. पण याला तर नाही. इतर दोन कोणाचे उद्गार आहेत.. विशेषतः पहिलं वाक्य तेही सांगा..

In reply to by मैत्र

पहिलं विधान गोविंदाचार्यांचं आहे. बहुधा त्यांनीच काही महिन्यांपूर्वी दिग्विजयसिंह पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्तिंपैकी एक आहे असे पण म्हंटले. दुसरं गोपिनाथरावांचं १९९५ च्या वि.स. निवडणूकीपूर्वी

In reply to by पिंपातला उंदीर

रमेश आठवले 13/04/2013 - 08:01
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=XDzMpS_rVqI . गुजरात मध्ये दंगली चालू असताना दिलेल्या भेटीत वाजपायी नेमके काय म्हणाले ते वर दिलेल्या तू नळीच्या धाग्यात ऐकता येईल . मोदी त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. वाजपायी यांनी मोदीना 'राजधर्माचे पालन करावयास सांगितले' असे विरोधी पक्ष आणि मोदी द्वेष्टे पत्रकार आणि वाहीन्या वारंवार सांगत असतात. हिटलर चा प्रसार माध्यमाचा मुख्य गोबेल्स होता. त्यांनी असे विधान केलेले आहे की जर आपण एक खोटी बातमी वारंवार ठासून सांगतली तर लोकाना ती बातमी खरी वाटू लागते. तसेच काही ह्या बातमीचे झाले आहे,

युतीशासनाच्या काळात गोपिनाथ मुंडे यांनी एकाचवेळी गृह व उर्जा ही खाती लिलया सांभाळली. १९९८ मध्ये अमरावतीला पोलिस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री या नात्याने त्यांच्या हातून होते. तेव्हा भाषण देताना गृह खात्यावरून उर्जा खात्यावर कसे गेले ते मुंडेनाही कळले नाही. अन माझ्या कारकिर्दीत लोड शेडींग कमी झाले हे म्हणण्याचा अवकाश तडक वीजपुरवठा खंडीत झाला. नशीब जनरेटरची व्यवस्था होती नाही तर गोपिनाथरावांनी वीजेचा विषय पुन्हा भाषणात कधी काढला नसता..

प्रदीप 12/04/2013 - 21:49
मार्गरेट थॅचर तिखट बोलण्याबद्दल प्रसिद्ध होत्या. येथे देत असलेले अवतरण, नक्की 'तारे तोडणे' ह्या क्यॅटेगरीत येत नाही, पण अशा तिखट बोलण्याचा एक, बर्‍यापैकी बोलबाला झालेला, नमुना आहे. त्यांच्याच कॉंझर्व्हेटीव्ह पक्षातील जॉन व्हिटींगडेल ह्या 'बॅकबेंचर' खासदारास एकदा त्या उद्वेगाने म्हणाल्या होत्या, "The trouble with you, John, is that your spine does not reach your brain".

In reply to by श्रीरंग_जोशी

हा पुरस्कार महाराष्ट्रीयन जनतेच्या करातून त्यांनी निवडलेल्या सरकार कडून घेतला. आता हे सरकार ज्यांचे देशपांडे सारख्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करते ,तेव्हा देशपांडे ह्यांना पुरस्कार स्वीकारायला काहीच वावगे नव्हते , त्याचवेळी आपल्या सरकारवर टीका करण्याचा त्याचा अधिकार सुद्धा त्यामुळे नाकारला जात नाही , ह्या प्रकारावर फटकळ नानाने एका साहित्य संमेलनात हा तुमचा अधिकार नाही असे सुनावले होते , मात्र त्यांच्यानंतर मी असे बोललोच नाही असा राजकारणी कावा केला. हाच प्रसंग लक्षात ठेवून राज ह्यांनी नाना ला ह्यावेळी तरी टिक रे असा टोला हाणला होता.

In reply to by निनाद मुक्काम …

ते विधान नानाने नाट्य संमेलनात केले होते. पु.लं. आमचे दैवत आहे त्याविषयी असे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही याखेरीज बाळासाहेब या दैवताची प्रतिमा आमच्या हृदयात आहे तिलाही धक्का लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. असे काहीसे ते होते. नेमके शब्द असेच असतील असे नाही.

रमताराम 14/04/2013 - 12:26
'इंडियात बलात्कार होतात, भारतात नाही.' हे सुप्रसिद्ध विधान नुकतेच ऐकले ते कुणाला कसे आठवले नाही ब्वॉ. (या या, ही वॉज मिसकोटेड, मिस-अन्डरस्टुड... बट सो सेज एवरिवन हू पुट्स हिज फुट इन हिज माउथ.)

In reply to by रमताराम

मैत्र 14/04/2013 - 13:42
यावर एक बराच खल करणारा धागा निघाला होता आणि ते विधान कसं संदर्भ सोडून उचलून माध्यमांनी विपर्यास केला होता हे त्यावर सिद्ध झालं होतं..

पैसा 15/04/2013 - 23:27
अगदी ऐतिहासिक विधानांच्या संकलनाबद्दल धन्यवाद!

माझ्या नावाचा जप केलात तर, बलात्कार होणार नाही आणि जर झालाच तर, तो माणुस ,नपुंसक होईल आणि ते सगळ्या जगाला समजेल.

In reply to by मुक्त विहारि

मैत्र 17/04/2013 - 11:52
ते भाषण नात्यातल्या एका गृहस्थांनी आवर्जुन पहायला लावलं. त्यांची भारावलेली मुद्रा आणि आपल्या १५-१६ वर्षाच्या मुलीला केलेला उपदेश की हे पहा आणि जप कर वगैरे.. इतकं इतकं डोक्यात गेलं सगळं.. अत्यंत कहर प्रकार आहे सगळा.. खरोखर त्या दिवशी या गोष्टींना "अंध" श्रद्धा का म्हणतात ते समजलं..

In reply to by मैत्र

तुम्ही निर्मल बाबा चा दरबार नाही का पाहीला ? ते तर ह्याही पेक्षा॑ कहर आहेत ... हा एक तोडलेला तारा पहा भक्त :"बाबा , ऑफीसमे प्रमोशन नही हो रहा " बाबा : बेटा तुम समोसे के साथ कोनसी चटनी खाते हो ? हरी या लाल ? भक्त : मुझे लाल चटनी अच्छी लगती है . बाबा :इसी वजह से कृपा अडी हुई है .कोई बात नही ... आजसे हरी चटनी खाया करो . कृपा बढ जायेगी . भक्त : :% असाच बाकी दरबारात उल्का वर्षावच सुरु असतो =))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 17/04/2013 - 16:28
चड्डी कहा से खरीदते हो? बाबाजी रोडसाईडवाली दुकान से इसीलिये किर्पा अडी है, शोरुम/ मॉल से खरीदा करो ... किर्पा आनी शुरु ओ जाएगी! बाबा में बाबा निर्मल बाबा! (कशाचाही चालीवर वाचा)

बॅटमॅन 17/04/2013 - 15:16
भारतात बलात्कार होतच नाहीत-ते इंडियात होतात. (कोण विधानकर्ता ते सांगणे न लगे) भांडारकर तो झाँकी है, शनिवारवाडा बाकी है | (इथेही तेच लागू)

वामन देशमुख 17/04/2013 - 17:52
"मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा! दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा! सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा! ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!" "जीभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अट्रॉसिटी ऍक्‍ट रद्द करा’’

तर्री 18/04/2013 - 09:04
शकील अहमद ह्यानी काल बंगलोर स्फोटानंतर अकलेचे मुरलेले तारे तोडले आहेत. "बॉम्ब स्फोटा मुळे भाजपा ला फायदा होईल"

चाऊमेन खाणे हे वाढत्या रेप्स मागील कारण आहे - खाप पंचायत ( आत्तापर्यंत तोडलेला सर्वात मोठ्ठा तारा ...माझ्या मते ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

आशु जोग 09/04/2013 - 22:45
लोकहो खाप पंचायत बद्दल आपल्याला काय माहिती आहे ? मेडीया जे दाखवते तेच सत्य मानायला लागलात तर अवघड आहे. पुढचा मागचा संदर्भ सोडून वक्तव्ये प्रसिद्ध करणे हा मेडीयाचा धंदा आहे पण त्यांनी फेकेलेले हाडूक खरे मानून चघळले तर पंचाईत(पंचायत नव्हे) होइल

तर्री 09/04/2013 - 18:28
इंडिया इज इंदिरा हे आसाम चे भूतपूर्व मुख्यमंत्री बारुवा यांचे विधान म्हणजे कोंग्रेस मधील लांगूलचालनाची कमाल.

२००५ साली राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले होते की, गोडबोले समितीच्या अहवालामुळेच महाराष्ट्र खड्ड्यात गेला. काही वर्षांपूर्वी उर्जा विषयाशी संबंधीत कुठल्यातरी समस्येबद्दल राज्य सरकार ने निवॄत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. राज्याची भविष्यातील उर्जा गरज हा त्या समितीला दिलेला विषय नव्हता. अहवालात संदर्भ म्हणून भविष्यातली वीजेची गरज म्हणून ढोबळ आकडेवारी डकवण्यात आली होती. शरद पवारांचे म्हणणे होते की त्या आकडेवारीच्या आधाराने राज्य सरकारने उर्जा धोरण आखले व ते फसले. राज्यभरात जोरदार भारनियमन सुरू झाले. उर्जा मंत्रालय अर्थातच राष्ट्रवादीकडे होते. दुसर्‍या दिवशीच्या बहुतांश अग्रलेखांत पवारांवर बरेच सरशंधान झाले होते की एकदाचे मान्य तर केले की महाराष्ट्र खड्ड्यात गेलाय मग तो कसा का गेला असेना? प्रशासकीय अनुभवाच्या बाबतीत राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवारच म्हणत असतील तर राज्य खड्ड्यात गेले असण्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

In reply to by तर्री

विजुभाऊ 10/04/2013 - 20:45
સૌના સાથ સૌના વિકાસ = सर्वांची साथ सर्वांचा विकास सौ = सर्व ( मूळ शब्द सहु = सगळे )

श्रीगुरुजी 09/04/2013 - 19:45
>>> एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . त्या फ्रान्सच्या राणीचे नाव मेरी अ‍ॅन्टोनेट असे होते. पण तिची आणि आपल्या पुढार्‍यांची तुलना अप्रस्तुत आहे. ती असे काही म्हणाली होती याचा कोणताही पुरावा नाही. ही एक अफवा होती. आणि मुख्य म्हणजे ती जेव्हा असे म्हणाली असे सांगतात तेव्हा तिचे वय १४ वर्षे होते, म्हणजेच त्या वयात तिला फारशी समज नव्हती व आपण काय बोलत आहोत हे तिला समजले नव्हते. रविवारी ज्यांनी दुष्काळग्रस्तांबाबत किळसवाणे उद्गार काढले त्याचा स्पष्ट पुरावा आहे व त्यांचे वय फ्रान्सच्या राणीच्या जवळपास चौपट आहे व त्यांनी पूर्ण समजूनउमजून हे तारे तोडले आहेत.

In reply to by कापूसकोन्ड्या

काटजु सध्या आघाडीवर आहेत काय तर म्हणे संजयदत्तने गांधीगिरीचा प्रचार केलाय , खुप भोगलय म्हणुन त्याची शिक्षा माफ करा !!

In reply to by प्रसाद गोडबोले

पाचवीपर्यंत उर्दूचे शिक्षण सक्तीचे करा उर्दू ही प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी भाषा असल्याचे सांगत काटजू म्हणाले, की उर्दू ही सर्वसामान्यांची भाषा आहे. मला वाटते, की इंग्रजी, हिंदी आणि उर्दू ही प्रत्येक शाळेत सक्तीची केली पाहिजे. गुगलही उर्दूतून सुरू झाले पाहिजे. या भाषेचा वापर मोबाईलवरही टायपिंगसाठी करण्यात आला पाहिजे ६ बॉल ६ सिक्सर !! =))

इरसाल 09/04/2013 - 20:05
गिरीजा यांना उल्लेखुन नाही याची नोंद घ्यावी. "श्रीगुरुजी हे नेहमीच पुरावे देवुन लोकांना तोंडावर पाडत असतात."

विकास 09/04/2013 - 20:13
मस्त धागा.
दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे.
हे "तारे तोडणारे विधान" नाही त्यामुळे त्या अर्थाने नाही, पण +१ ! :-) प्रत्यक्ष तारे तोडण्यासंदर्भात नाही कारण यातील कोणत्याच व्यक्ती तितक्या "लहान" नाहीत/नव्हत्या. पण विखारी टिका करण्याच्या उद्देशाने बोलताना कधी कधी कसे जरा जास्तच बोलले जाते याची काही उदाहरणे आणि काही तारे, पण यातील कुठलेही विधान आणि व्यक्ती वरील स्पर्धेत येऊ शकेल असे वाटत नाही, त्यामुळे निव्वळ अवांतर समजावेत: (आठवणीतून सांगत आहे, दुवा नाही. चूकीचे काही असल्यास अवश्य सांगावेत)
  1. यशवंतराव चव्हाण (का शंकरराव?) आणिबाणीच्या काळात पुलंना "विदुषक" म्हणाले होते.
  2. मला वाटते विधानसभेत "सत्ताधारी - विरोधी" अशी बाचाबाची चालू असताना - एकदा शरद पवार मृणाल गोरेंना पुतना मावशी म्हणाले तर मृणाल गोरे पवारांना "कंस मामा" म्हणाल्या
  3. बाळासाहेब एकदा मृणाल गोरेंवर टिका करताना त्यांना "घॄणाल गोरे" म्हणाले होते, शरद पवारांना कांद्याचे पोते - अजून भरपूर सांगता येईल.
  4. अत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवारांवर टिकेचा भडीमार करताना - कन्नमवार की कंडमवार? असे म्हणले होते.
  5. राजीव गांधींच्या "हमे उन्हे उनकी नानी याद दिलाएंगे" विधानाने पब्लीक हसले होते (अर्थात तो त्यांनी विनोद केला नव्हता ही गोष्ट वेगळी!)
  6. मधू दंडवत्यांसारखी सन्मान्य आणि अजातशत्रू असलेली व्यक्ती एकदा म्हणाली: "हिंदूंपेक्षा मुसलमान हे जास्त भारताशी इमान राखून आहेत. कारण, मेल्यावरही ते मातीत रहातात!" (मला वाटते त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणूकीत ते त्यांचा बालेकिल्ला हरले!)
  7. इंदीरा गांधी एकदा वृत्तपत्रात येणार्‍या टिकेसंदर्भात म्हणाल्या होत्या की त्यांना काय किंमत देयची, ती उद्याची रद्दीच आहे. (त्यांच्या हत्येनंतर, त्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे रद्दीत टाकताना, या वाक्याची खूप आठवण झाली होती).

In reply to by विकास

सेनाप्रमुख शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणाले होते कांद्याचे नव्हे. त्यावर उत्तर म्हणून शरद पवार सेनाप्रमुखांना 'मैद्याचेच पोते पण रिकामे' असे म्हणाले होते :-). यावरून खालिल चर्चा आठवली :-) राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील "आधी केला ताश्कंद, नंतर केला सिमला; आता बोंबला!!!" - बाळासाहेब ठाकरे :)

युवराज म्हणतात. राजकारण तुमच्या शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये पण आहे प्रत्यक्ष ऐका. पुढचे वाक्य तर समजतच नाही शर्ट मध्ये आहे आणि पॅन्ट मध्ये

बाकी सर्व जाउ दे. माननिय विश्व बन्धू गुप्ता, ज्या गोष्टित आपल्यालाithe काहीही ??ट सुद्धा कळत नसताना कसे तारेत तोडावेत? काहीही मिपा वर बरेच क्लाउड कॉम्प्युटिंग चे तद्न्य आहेत त्यांनि यावर मत नोंदवावे १.सिम वरचि माहिती ब्याटरी मध्ये जाते, २.पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही. अशी वाक्ये वाचून डोक्याम्ध्ये दही जाउन विरजण लागले आहे. असो मजा करा.

In reply to by प्रसाद गोडबोले

विकास 10/04/2013 - 19:48
आत्ता हसून घ्या लेको! पण पावसाळ्यात समजेल तुमच्या क्प्म्युटींगवर क्लाऊडमधून कसे पाणी पडते ते. ;)

In reply to by कापूसकोन्ड्या

बॅटमॅन 10/04/2013 - 14:42
पावसामुळे क्लाउड कॉम्प्युटिंग काम करत नाही.
=)) =)) =)) =)) =)) =)) बापरे, डोक्यातल्या दह्याचे बाष्पीभवन होऊन जो पाऊस पडेल त्यामुळे अंतर्गत वायरिंग काम करेना झालेय.

चिरोटा 10/04/2013 - 14:05
निर्णय न घेणे हा सुद्धा निर्णय असतो.Not taking decision is also a decision. पी. व्ही. नरसिंहराव.

In reply to by चिरोटा

विकास 10/04/2013 - 19:50
पण याला तारे तोडणे म्हणता येणार नाही... "बोले तैसा चाले ... " म्हणावे लागेल. ;)

विकास 10/04/2013 - 21:00
"Indian Railways is the responsibility of Lord Vishwakarma. So is the safety of passengers... It is His duty, not mine. I have been forced to don His mantle," रेल्वेचे वाढत गेलेया अपघातांसंदर्भात, तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव

मैत्र 10/04/2013 - 21:01
राजू शेट्टी यांच्या विरोधात दादांनी भाषण केले होते गेल्या निवडणूकांमध्ये की - तुम्ही मतं दिलीत तर आम्ही विकास करू म्हणजे दूध संघ, साखर कारखाने, सोयी, रस्ते वगैरे.. मतं प्रभागाप्रमाणे समजतात आता. मतं न मिळता विकास करण्याचं काही कारण नाही. जे मतदारसंघ आम्हाला निवडून देतील त्यांचाच आम्ही विकास करू.. आम्ही काही सोशल वर्क करत नाही. राजकारण करतो." नेमके शब्द माझ्या लक्षात नाहीत. शोधलं तर कदाचित मिळतील.. पण असं विधान केलं आणि त्यांचा उमेदवार दणकून पडला होता इतकं आठवतंय..

एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. कर्नाटकसोबतचे पाणीवाटप करात कृष्णेच्या पाण्यात बुडवू - तत्कालिन उपमुख्यमंत्री आर आर पाटिल (हे प्रथम नाव का वापरत नाही? राघोबा वगैरे असे आहे का?)

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास 10/04/2013 - 21:07
मुंडे की बाळासाहेब? (दोघांची भुमिका तीच होती, पण हे विशिष्ठ वाक्य मला वाटते बाळासाहेबांचे होते).

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीगुरुजी 12/04/2013 - 21:00
>>> एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू - तत्कालिन विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे. मार्च १९९५ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यावर एनरॉनबरोबरचा करार रद्द करून एनरॉन प्रकल्प खरोखरच अरबी समुद्रात बुडविला होता. त्यामुळे एनरॉनच्या रिबेका थॉमस भारतात येऊन बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व इतर संबंधितांना भेटल्यावर व कराराच्या काही कलमांचे पुनर्लेखन झाल्यावर प्रकल्प समुद्रातून बाहेर काढला. करार रद्द करण्यापूर्वी वीजेचा दर प्रति युनिट रू. २.४० इतका मान्य केलेला होता. पण नव्याने करार केल्यावर यात २० टक्के सूट देऊन प्रति युनिट रू. १.९२ इतका मान्य केला गेला. करार कसा पुन्हा जिवंत झाला, करारात कोणत्या नवीन अटी घातल्या व नंतर हा प्रकल्प का रखडला याची फारशी कल्पना नाही. पण केलेल्या घोषणेप्रमाणे निदान काही काळ तरी हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडविला होता हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

घोषणेप्रमाणे काही काळ हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला होताच!! एन्रॉन दिवाळखोरीत गेली नसती तर हे प्रकरण (आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले होते) महाराष्ट्राला फारच महागात पडले असते असे तज्ञ लोकांनी म्हंटले होते तेव्हा.

मला तरी स्पष्ट आठवते की हे विधान मुंडे यांचेच होते. त्या काळात ते ऐन भरात होते. दाऊदच्या मुसक्या बांधून त्याला भारतात आणू अशी घोषणा पण त्यांचीच.

In reply to by श्रीरंग_जोशी

युती शासनाच्या काळात विरोधी पक्षांच्या मोर्चात एक घोषणा असायची... महाराष्ट्रात दोनच गुंडे, जोशी मुंडे, जोशी मुंडे!! माझ्या वर्गात हजेरीच्यावेळी माझ्या नंतर मुंडे आडनाव असलेल्या वर्गमित्राचे नाव होते. हजेरी घेता घेता एक सर म्हणाले होते जोशी-मुंडे इथेही एकत्रच का? :-).

In reply to by आदूबाळ

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घडलेला प्रसंग आहे. पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपले नाव लिहून कागद सरकवला होता त्यावर योगायोगाने तो क्रम आला. अन पुढचे काही दिवस गुरूजींनी त्या कागदावरच हजेरी घेतली.

रमेश आठवले 11/04/2013 - 05:29
सध्या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल आहेत. यापूर्वी त्या राजस्तान मध्ये काँग्रेसच्या मंत्री मंडलात होत्या. त्यांच्या कडे जल संवर्धन खाते होते. त्यावेळी बेनिवाल यांनी असे विधान केले होते -राजस्तान मध्ये पडणार्या पाऊसाचा प्रत्येक थेंब हा राजस्तान सरकारच्या मालकीचा आहे.-

हुप्प्या 11/04/2013 - 06:51
अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. मला वाटते ताऊ देवीलाल ह्यांनी हरियाणाच्या शेतकर्‍यांना उद्देशून असे म्हटले की हल्ली तुमच्या शेतात पूर्वीसारखे पीक येत नाही कारण पंजाबचे सरकार त्या पाण्यातली वीज काढून घेते आणि नि:सत्त्व पाणी तुम्हाला देते!

तर्री 11/04/2013 - 11:28
त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" हे विधान माझ्या मते पिलू मोदींचे आहे. बें.नाथ पै, राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी बडे बुजुर्ग , विद्वान नेते हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. आपले दुर्दैव की त्यांना पोलिटिकल स्पेस मिळाली नाही. नेहरूंनी आपल्या चमच्यांचे , इंदिराबैनी आपल्या सुमार जी हुजूरस मर्थकांचे , राजीवजींनी आपल्या डून स्कूल च्या वाह्यात मित्रांचे आणि सोनियांनी हया ४ ही जमातीचे ऐकून राज्य केले आणि देशाची काशी केली.

श्रीगुरुजी 11/04/2013 - 12:12
>>> अक्साई चीन हा प्रदेश चीनने बळकावल्यावर आपले द्रष्टे पंतप्रधान पंडित नेहरु म्हणाले की "जाऊ द्या. तिथे गवताचे पातेही उगवत नाही". त्यावर महावीर त्यागींनी (एक मंत्री) विनोदाने म्हटले "तुमच्या टकलावरही केस उगवत नाहीत मग काय तेही देणार का?" खिलाडूवृत्ती नसणारे नेहरु ह्या विधानावर चांगलेच संतापले. हे विधान महावीर त्यांगींचे आहे की पिलू मोदींचे याविषयी मला नक्की माहिती नाही. पण सरकारमध्ये मंत्री असणार्‍या कोणाचेही असे म्हणायचे धाडस होणार नाही हे नक्की. "अक्साई चीन या प्रदेशात गवताचे एक पातेही उगवत नाही" असे नेहरूंनी म्हटल्यावर लोकसभेत केले गेलेले मूळ विधान असे होते की, "जर असे असेल तर एखाद्याच्या डोक्यावर अजिबात केस नसतील तर ते डोके छाटले तर चालेल का?". हे विधान नेहरूंना उद्देशून आहे (नेहरूंना टक्कल होते) असा समज करून घेऊन इतर सदस्यांनी हे विधान करणार्‍याला माफी मागायला लावली होती.

श्रीगुरुजी 12/04/2013 - 14:55
>>>> काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा मी तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. "मी एकवेळ संन्यास घेऊन भगवी वस्त्रे नेसून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये परत कधीही जाणार नाही" असे ज्या महात्म्याने म्हटले होते त्याच महात्म्याने वरील भीष्मप्रतिज्ञा केली होती. पण नंतर अत्यंत नाईलाजाने देशाला जातीयवाद्यांपासून वाचविण्यासाठी व देशामध्ये धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी या महात्म्याला काँग्रेसमध्ये डेरेदाखल व्हावे लागले.

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

In reply to by मैत्र

मला पण माहिती नव्हतं, गुगलवर "काँग्रेसमध्ये परत जाण्यापेक्षा " इतके तीनच शब्द टाईप केले आणि खाली अपेक्षित नाव दिसले :)

खबो जाप 12/04/2013 - 15:40
"बडे बडे शहरोंमें ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है!" - आराराबा पाटील आल टेम फेवरेट …… एव्हढ्या साठी कि असा माणूस आपली आजोळचा आहे ह्याची लाज वाटते, वर लोक चिडवतात काय आजोळी गेला होतात आबा भेटले का ? तंबाखू खातात का ? नसतील सांगा परत चालू करा तोंड बंद राहते त्याने …. ह्या ह्या ह्या …. आता बोला ह्यावर मी काय म्हणू ………

In reply to by खबो जाप

ग्रामविकास खात्यात होते तेव्हा त्यांनी खरंच चांगले काम केले होते उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता योजना. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला अन तंटामुक्त गाव योजना सुरू केली ती मात्र पूर्ण फसली. गृहमंत्री पदासाठी त्यांचे व्यक्तिमत्वच साजेसे नाही त्याला ते तरी काय करणार? बाकी त्यांचे नाव काय आहे हे कदाचित माहित असावे आपल्याला?

श्रीगुरुजी 12/04/2013 - 20:51
"मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा" असे एक प्रख्यात शेतकरी नेते म्हणाले होते. त्यानंतर जेव्हा ते खरंच निवडणुकीला उभे राहिले तेव्हा एक कार्यकर्ता आपली पादत्राणे घेऊन त्यांना मारायला गेला. तेव्हा त्यांनी,"मी निवडणुकीला उभे राहणार नाही असे म्हणालो नव्हतो. मी जर मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा असे म्हणालो होतो. मी निवडणुकीला उभा आहे, पण मते मागणार नाही" असा युक्तीवाद त्यांनी केला होता. कोण हे नेते ओळखा पाहू?

In reply to by श्रीगुरुजी

यांनीच शेतकरी संघटनेने राष्ट्रवादीत सामील होणे म्हणजे महासागराने गटारात सामील होणे असे म्हंटले होते. याप्रमाणेच स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर वाद झाल्यावर राष्ट्रवादी म्हणजे गरीबाची झोपडी असे शरद पवार म्हणाले होते :-).

वाजपेयी हा पक्षाचा मुखवटा असून खरे नेते हे अडवाणी आहेत दाऊद ला आम्ही मुस्क्या बांधून फरफटात भारतात आणू नरेंद्र मोदी यानी राजधर्मच पालन कराव

In reply to by पिंपातला उंदीर

मैत्र 12/04/2013 - 21:42
शेवटचं वाक्य बहुतेकांना माहीत आहे. पण वाजपेयी यांनी यात तारे तोडलेत असं वाटत नाही. कदाचित गुजरात मध्ये काहीच घडलं नाही असं म्हणणं याला तारे तोडणे नक्की म्हणता येईल.. पण याला तर नाही. इतर दोन कोणाचे उद्गार आहेत.. विशेषतः पहिलं वाक्य तेही सांगा..

In reply to by मैत्र

पहिलं विधान गोविंदाचार्यांचं आहे. बहुधा त्यांनीच काही महिन्यांपूर्वी दिग्विजयसिंह पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्तिंपैकी एक आहे असे पण म्हंटले. दुसरं गोपिनाथरावांचं १९९५ च्या वि.स. निवडणूकीपूर्वी

In reply to by पिंपातला उंदीर

रमेश आठवले 13/04/2013 - 08:01
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=XDzMpS_rVqI . गुजरात मध्ये दंगली चालू असताना दिलेल्या भेटीत वाजपायी नेमके काय म्हणाले ते वर दिलेल्या तू नळीच्या धाग्यात ऐकता येईल . मोदी त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. वाजपायी यांनी मोदीना 'राजधर्माचे पालन करावयास सांगितले' असे विरोधी पक्ष आणि मोदी द्वेष्टे पत्रकार आणि वाहीन्या वारंवार सांगत असतात. हिटलर चा प्रसार माध्यमाचा मुख्य गोबेल्स होता. त्यांनी असे विधान केलेले आहे की जर आपण एक खोटी बातमी वारंवार ठासून सांगतली तर लोकाना ती बातमी खरी वाटू लागते. तसेच काही ह्या बातमीचे झाले आहे,

युतीशासनाच्या काळात गोपिनाथ मुंडे यांनी एकाचवेळी गृह व उर्जा ही खाती लिलया सांभाळली. १९९८ मध्ये अमरावतीला पोलिस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री या नात्याने त्यांच्या हातून होते. तेव्हा भाषण देताना गृह खात्यावरून उर्जा खात्यावर कसे गेले ते मुंडेनाही कळले नाही. अन माझ्या कारकिर्दीत लोड शेडींग कमी झाले हे म्हणण्याचा अवकाश तडक वीजपुरवठा खंडीत झाला. नशीब जनरेटरची व्यवस्था होती नाही तर गोपिनाथरावांनी वीजेचा विषय पुन्हा भाषणात कधी काढला नसता..

प्रदीप 12/04/2013 - 21:49
मार्गरेट थॅचर तिखट बोलण्याबद्दल प्रसिद्ध होत्या. येथे देत असलेले अवतरण, नक्की 'तारे तोडणे' ह्या क्यॅटेगरीत येत नाही, पण अशा तिखट बोलण्याचा एक, बर्‍यापैकी बोलबाला झालेला, नमुना आहे. त्यांच्याच कॉंझर्व्हेटीव्ह पक्षातील जॉन व्हिटींगडेल ह्या 'बॅकबेंचर' खासदारास एकदा त्या उद्वेगाने म्हणाल्या होत्या, "The trouble with you, John, is that your spine does not reach your brain".

In reply to by श्रीरंग_जोशी

हा पुरस्कार महाराष्ट्रीयन जनतेच्या करातून त्यांनी निवडलेल्या सरकार कडून घेतला. आता हे सरकार ज्यांचे देशपांडे सारख्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करते ,तेव्हा देशपांडे ह्यांना पुरस्कार स्वीकारायला काहीच वावगे नव्हते , त्याचवेळी आपल्या सरकारवर टीका करण्याचा त्याचा अधिकार सुद्धा त्यामुळे नाकारला जात नाही , ह्या प्रकारावर फटकळ नानाने एका साहित्य संमेलनात हा तुमचा अधिकार नाही असे सुनावले होते , मात्र त्यांच्यानंतर मी असे बोललोच नाही असा राजकारणी कावा केला. हाच प्रसंग लक्षात ठेवून राज ह्यांनी नाना ला ह्यावेळी तरी टिक रे असा टोला हाणला होता.

In reply to by निनाद मुक्काम …

ते विधान नानाने नाट्य संमेलनात केले होते. पु.लं. आमचे दैवत आहे त्याविषयी असे बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही याखेरीज बाळासाहेब या दैवताची प्रतिमा आमच्या हृदयात आहे तिलाही धक्का लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. असे काहीसे ते होते. नेमके शब्द असेच असतील असे नाही.

रमताराम 14/04/2013 - 12:26
'इंडियात बलात्कार होतात, भारतात नाही.' हे सुप्रसिद्ध विधान नुकतेच ऐकले ते कुणाला कसे आठवले नाही ब्वॉ. (या या, ही वॉज मिसकोटेड, मिस-अन्डरस्टुड... बट सो सेज एवरिवन हू पुट्स हिज फुट इन हिज माउथ.)

In reply to by रमताराम

मैत्र 14/04/2013 - 13:42
यावर एक बराच खल करणारा धागा निघाला होता आणि ते विधान कसं संदर्भ सोडून उचलून माध्यमांनी विपर्यास केला होता हे त्यावर सिद्ध झालं होतं..

पैसा 15/04/2013 - 23:27
अगदी ऐतिहासिक विधानांच्या संकलनाबद्दल धन्यवाद!

माझ्या नावाचा जप केलात तर, बलात्कार होणार नाही आणि जर झालाच तर, तो माणुस ,नपुंसक होईल आणि ते सगळ्या जगाला समजेल.

In reply to by मुक्त विहारि

मैत्र 17/04/2013 - 11:52
ते भाषण नात्यातल्या एका गृहस्थांनी आवर्जुन पहायला लावलं. त्यांची भारावलेली मुद्रा आणि आपल्या १५-१६ वर्षाच्या मुलीला केलेला उपदेश की हे पहा आणि जप कर वगैरे.. इतकं इतकं डोक्यात गेलं सगळं.. अत्यंत कहर प्रकार आहे सगळा.. खरोखर त्या दिवशी या गोष्टींना "अंध" श्रद्धा का म्हणतात ते समजलं..

In reply to by मैत्र

तुम्ही निर्मल बाबा चा दरबार नाही का पाहीला ? ते तर ह्याही पेक्षा॑ कहर आहेत ... हा एक तोडलेला तारा पहा भक्त :"बाबा , ऑफीसमे प्रमोशन नही हो रहा " बाबा : बेटा तुम समोसे के साथ कोनसी चटनी खाते हो ? हरी या लाल ? भक्त : मुझे लाल चटनी अच्छी लगती है . बाबा :इसी वजह से कृपा अडी हुई है .कोई बात नही ... आजसे हरी चटनी खाया करो . कृपा बढ जायेगी . भक्त : :% असाच बाकी दरबारात उल्का वर्षावच सुरु असतो =))

In reply to by प्रसाद गोडबोले

प्यारे१ 17/04/2013 - 16:28
चड्डी कहा से खरीदते हो? बाबाजी रोडसाईडवाली दुकान से इसीलिये किर्पा अडी है, शोरुम/ मॉल से खरीदा करो ... किर्पा आनी शुरु ओ जाएगी! बाबा में बाबा निर्मल बाबा! (कशाचाही चालीवर वाचा)

बॅटमॅन 17/04/2013 - 15:16
भारतात बलात्कार होतच नाहीत-ते इंडियात होतात. (कोण विधानकर्ता ते सांगणे न लगे) भांडारकर तो झाँकी है, शनिवारवाडा बाकी है | (इथेही तेच लागू)

वामन देशमुख 17/04/2013 - 17:52
"मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा! दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा! सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा! ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!" "जीभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अट्रॉसिटी ऍक्‍ट रद्द करा’’

तर्री 18/04/2013 - 09:04
शकील अहमद ह्यानी काल बंगलोर स्फोटानंतर अकलेचे मुरलेले तारे तोडले आहेत. "बॉम्ब स्फोटा मुळे भाजपा ला फायदा होईल"
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वा

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

सोत्रि ·

विद्रोही साहित्य संमेलने एकाचवेळी एकच नव्हे तर एकाच वेळी दहा जरी झाली तरी एक साहित्याचा वाचक म्हणून त्यात काही 'आचरटपणा' आहे, असे व्यक्तिगत मला वाटत नाही. परिवर्तनाशी बांधिलकी माननारा विचार विद्रोही साहित्याने दिला. साहित्यातील एक संकुचितपणा तोडून सामान्य माणसाशी नाते जोडणारे साहित्य दिले.मराठी भाषेला समृद्धी दिली. मराठी शब्द-कोशात नसलेले असंख्य शब्द,शब्दप्रयोग, साहित्यकृतीतून आले. समग्र जीवनाचे भान देण्याचे काम विद्रोही साहित्याने दिले. देव्,ऋषि,पुराण-पुरुष, यांच्यापेक्षाही माणसाच्या सुख दु:खाचा विचार मांडायचे भान विद्रोही साहित्याने दिले माणूस साहित्याचा केंद्रबिंदु मानला. विषमता,अन्याय,माणसाचे शोषण याविरुद्धचा विचार विद्रोही साहित्यात दिसून येतो. एक विचार अनेक विचारपीठावरुन येत असेल तर त्यात काही वावगे नाही. बाकी, भालचंद्र नेमाडे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. रामाने सितेला छळलं म्हणून स्त्रियांनी राममंदिराला विरोध केला पाहिजे. साहित्य संमेलनातून साहित्यिकांना येऊ देऊ नये, हिंदु संस्कृतीतीतील अनिष्ठ रुढींविरुद्ध बंड केले तरच हिंदु संस्कृती टीकेल. देशीवाद, मौखिक साहित्यातील देशीवाद अशा कितीतरी त्यांच्या बोलण्यातल्या आवडीच्या गोष्टी आहेत, तेव्हा त्यांना त्यांच्या जागेवरुन विचार मांडतांना रसिक म्हणून काही वेगळे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

चौकटराजा 10/03/2013 - 18:56
कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो व संघटित नसतो. या तिन्ही दुर्गुणांचे प्रॉडक्ट जेवढे त्याच्या बाबतीत तेवढा तो अधिक शोषित राहतो. निरबुद्धाला उपद्रव मुल्य नसते. आळशालाही उपद्रव मुल्य नसते ( कारण उपदद्रव मुल्य हे उपयुक्ततेतून येते )व असंघटिताला तर नसतेच नसते. "शिका ,संघर्ष करा, संघटित व्हा " याचा अर्थ हा असा आहे.

In reply to by चौकटराजा

>>> कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो... छ्या...! -दिलीप बिरुटे

पैसा 10/03/2013 - 22:20
राम मंदिर वगैरे नंतर बघू. विद्रोही साहित्य म्हणजे काय? चालत आलेल्या व्यवस्थेपेक्षा वेगळा काही विचार करणारं ते विद्रोही साहित्य म्हणायला हरकत नाही. फक्त साहित्यातून सामाजिक परिवर्तन वगैरे होतं का? वादाचा मुद्दा आहे. पाहू गेल्यास वेदांचा आणि भगवद्गीतेचा अर्थ प्राकृत मर्‍हाटीत सांगणारे तुकोबा आणि ज्ञानश्वर हे पहिले विद्रोही म्हटले पाहिजेत. त्यांच्या साहित्यातून आणि वागण्यामुळे काही प्रमाणात तरी समाज परिवर्तन व्हायला मदत झाली. नंतरच्या काळात केशवसुत हे पण विद्रोही म्हटले पाहिजेत. अलिकडच्या काळात विद्रोही साहित्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. त्यातही मराठी लोकांच्या खास स्वभावाप्रमाणे गट पडणे वगैरे प्रकार झाले. चालायचंच. फक्त हे विद्रोही साहित्य एका साच्यात अडकत आहे का? तसे झाल्यास तोही प्रस्थापित साहित्याचा प्रकार होणार नाही का? त्याला 'विद्रोही' हे लेबल आणखी किती दिवस लावता येईल?

आजानुकर्ण 11/03/2013 - 23:44
नेमाड्यांचे भाषण अत्यंत झकास. शिवाजीसंदर्भातील टिप्पणी विशेष आवडली. मदारी मेहतर, काझी हैदर, नूरखान बेग, इब्राहिमखान गारदी वगैरे शिवाजीच्या अत्यंत विश्वासातील आणि महत्त्वाच्या पदांवरील, स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुसलमानांची प्रेरणा घेऊन सध्याच्या मुसलमानांनी शिवाजीची आयडेंटिटी क्लेम करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे शिवाजीनेच बांधलेल्या अफजलखानाच्या कबरीचे वादही मिटवता येतील. रामाबाबतचे 'कृष्ण हा एक मामुली डायवर होता वगैरे' पठडीतील वक्तव्य हे खास नेमाडे स्टाईल. भाषणाचा दुवा दिल्याबद्दल सोत्रि यांचे खास आभार.

विकास 16/03/2013 - 01:12
नेमाड्यांच्या भाषणाचा दुवा आवडला. त्यात वादग्रस्त असे काही वाटले नाही. बोलण्याची पद्धत देखील आवडली. पंचविशीला सिटीझनशिपचे शिक्षण मिळायला लागते मग वंदेमातरम वगैरे म्हणायला लागायला लागते, हे वाक्य जरा बुचकळ्यात टाकणारे आहे. त्याव्यतिरीक्त पुढील मुद्दा जरा अडगळीपेक्षा समृद्ध वाटला: ते पातंजली आणि एकाग्रतेबद्दल बोलतात, त्यातून ते दिवसाकाठी एकदातरी समाधीत जाणे महत्वाचे आहे. त्याचे महत्व सांगताना ते त्याला खास हिंदू शोध म्हणतात. आणि मग (साधारण २८ व्या मिनिटाला) हिंदू म्हणजे काय म्हणताना हिमालयाच्या पुढे अगदी अटकेपार गांधारापर्यंत पसरलेला सांस्कृतिक समाज म्हणजे हिंदू असे म्हणतात. अर्थात त्यांच्या दृष्टीने तरी देखील हिंदूत्व हे ते म्हणत असलेल्या हिंदू पेक्षा वेगळे आहे .. असो.

In reply to by विकास

अर्धवटराव 16/03/2013 - 01:26
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

दादा कोंडके 16/03/2013 - 01:44
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन.
पाण्याची बाटली उपडी धरताना थरथरणारा हात बघून उगीच वाईट वाटलं. गरज असलेली लोकं इतक्या लवकर म्हातारी होउ नयेत असं वाटलं. :(

In reply to by दादा कोंडके

अर्धवटराव 16/03/2013 - 02:30
म्हातारी व्हावीत (खास करुन त्या झोकदार पांढर्‍या मिशा... त्यामुळे खराखुरा आजोबा फील येतो ) पण तब्बेतीने कमजोर होऊ नये :) अर्धवटराव

विद्रोही साहित्य संमेलने एकाचवेळी एकच नव्हे तर एकाच वेळी दहा जरी झाली तरी एक साहित्याचा वाचक म्हणून त्यात काही 'आचरटपणा' आहे, असे व्यक्तिगत मला वाटत नाही. परिवर्तनाशी बांधिलकी माननारा विचार विद्रोही साहित्याने दिला. साहित्यातील एक संकुचितपणा तोडून सामान्य माणसाशी नाते जोडणारे साहित्य दिले.मराठी भाषेला समृद्धी दिली. मराठी शब्द-कोशात नसलेले असंख्य शब्द,शब्दप्रयोग, साहित्यकृतीतून आले. समग्र जीवनाचे भान देण्याचे काम विद्रोही साहित्याने दिले. देव्,ऋषि,पुराण-पुरुष, यांच्यापेक्षाही माणसाच्या सुख दु:खाचा विचार मांडायचे भान विद्रोही साहित्याने दिले माणूस साहित्याचा केंद्रबिंदु मानला. विषमता,अन्याय,माणसाचे शोषण याविरुद्धचा विचार विद्रोही साहित्यात दिसून येतो. एक विचार अनेक विचारपीठावरुन येत असेल तर त्यात काही वावगे नाही. बाकी, भालचंद्र नेमाडे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. रामाने सितेला छळलं म्हणून स्त्रियांनी राममंदिराला विरोध केला पाहिजे. साहित्य संमेलनातून साहित्यिकांना येऊ देऊ नये, हिंदु संस्कृतीतीतील अनिष्ठ रुढींविरुद्ध बंड केले तरच हिंदु संस्कृती टीकेल. देशीवाद, मौखिक साहित्यातील देशीवाद अशा कितीतरी त्यांच्या बोलण्यातल्या आवडीच्या गोष्टी आहेत, तेव्हा त्यांना त्यांच्या जागेवरुन विचार मांडतांना रसिक म्हणून काही वेगळे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

चौकटराजा 10/03/2013 - 18:56
कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो व संघटित नसतो. या तिन्ही दुर्गुणांचे प्रॉडक्ट जेवढे त्याच्या बाबतीत तेवढा तो अधिक शोषित राहतो. निरबुद्धाला उपद्रव मुल्य नसते. आळशालाही उपद्रव मुल्य नसते ( कारण उपदद्रव मुल्य हे उपयुक्ततेतून येते )व असंघटिताला तर नसतेच नसते. "शिका ,संघर्ष करा, संघटित व्हा " याचा अर्थ हा असा आहे.

In reply to by चौकटराजा

>>> कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो... छ्या...! -दिलीप बिरुटे

पैसा 10/03/2013 - 22:20
राम मंदिर वगैरे नंतर बघू. विद्रोही साहित्य म्हणजे काय? चालत आलेल्या व्यवस्थेपेक्षा वेगळा काही विचार करणारं ते विद्रोही साहित्य म्हणायला हरकत नाही. फक्त साहित्यातून सामाजिक परिवर्तन वगैरे होतं का? वादाचा मुद्दा आहे. पाहू गेल्यास वेदांचा आणि भगवद्गीतेचा अर्थ प्राकृत मर्‍हाटीत सांगणारे तुकोबा आणि ज्ञानश्वर हे पहिले विद्रोही म्हटले पाहिजेत. त्यांच्या साहित्यातून आणि वागण्यामुळे काही प्रमाणात तरी समाज परिवर्तन व्हायला मदत झाली. नंतरच्या काळात केशवसुत हे पण विद्रोही म्हटले पाहिजेत. अलिकडच्या काळात विद्रोही साहित्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. त्यातही मराठी लोकांच्या खास स्वभावाप्रमाणे गट पडणे वगैरे प्रकार झाले. चालायचंच. फक्त हे विद्रोही साहित्य एका साच्यात अडकत आहे का? तसे झाल्यास तोही प्रस्थापित साहित्याचा प्रकार होणार नाही का? त्याला 'विद्रोही' हे लेबल आणखी किती दिवस लावता येईल?

आजानुकर्ण 11/03/2013 - 23:44
नेमाड्यांचे भाषण अत्यंत झकास. शिवाजीसंदर्भातील टिप्पणी विशेष आवडली. मदारी मेहतर, काझी हैदर, नूरखान बेग, इब्राहिमखान गारदी वगैरे शिवाजीच्या अत्यंत विश्वासातील आणि महत्त्वाच्या पदांवरील, स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुसलमानांची प्रेरणा घेऊन सध्याच्या मुसलमानांनी शिवाजीची आयडेंटिटी क्लेम करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे शिवाजीनेच बांधलेल्या अफजलखानाच्या कबरीचे वादही मिटवता येतील. रामाबाबतचे 'कृष्ण हा एक मामुली डायवर होता वगैरे' पठडीतील वक्तव्य हे खास नेमाडे स्टाईल. भाषणाचा दुवा दिल्याबद्दल सोत्रि यांचे खास आभार.

विकास 16/03/2013 - 01:12
नेमाड्यांच्या भाषणाचा दुवा आवडला. त्यात वादग्रस्त असे काही वाटले नाही. बोलण्याची पद्धत देखील आवडली. पंचविशीला सिटीझनशिपचे शिक्षण मिळायला लागते मग वंदेमातरम वगैरे म्हणायला लागायला लागते, हे वाक्य जरा बुचकळ्यात टाकणारे आहे. त्याव्यतिरीक्त पुढील मुद्दा जरा अडगळीपेक्षा समृद्ध वाटला: ते पातंजली आणि एकाग्रतेबद्दल बोलतात, त्यातून ते दिवसाकाठी एकदातरी समाधीत जाणे महत्वाचे आहे. त्याचे महत्व सांगताना ते त्याला खास हिंदू शोध म्हणतात. आणि मग (साधारण २८ व्या मिनिटाला) हिंदू म्हणजे काय म्हणताना हिमालयाच्या पुढे अगदी अटकेपार गांधारापर्यंत पसरलेला सांस्कृतिक समाज म्हणजे हिंदू असे म्हणतात. अर्थात त्यांच्या दृष्टीने तरी देखील हिंदूत्व हे ते म्हणत असलेल्या हिंदू पेक्षा वेगळे आहे .. असो.

In reply to by विकास

अर्धवटराव 16/03/2013 - 01:26
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

दादा कोंडके 16/03/2013 - 01:44
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन.
पाण्याची बाटली उपडी धरताना थरथरणारा हात बघून उगीच वाईट वाटलं. गरज असलेली लोकं इतक्या लवकर म्हातारी होउ नयेत असं वाटलं. :(

In reply to by दादा कोंडके

अर्धवटराव 16/03/2013 - 02:30
म्हातारी व्हावीत (खास करुन त्या झोकदार पांढर्‍या मिशा... त्यामुळे खराखुरा आजोबा फील येतो ) पण तब्बेतीने कमजोर होऊ नये :) अर्धवटराव
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

प्रास ·

गवि 19/02/2013 - 12:09
त्या काथ्याकुटाच्या निमित्ताने प्रास पुन्हा लिहीता झाला याबद्दल त्या काथ्याकूटकर्त्याचे अनेक आभार. संपूर्ण लेखमाला वाचून मग मत देण्यात येईल. ओघवत्या लिखाणाबद्दल प्रासभाऊचे धन्यवाद...

ही संपूर्ण लेखमाला मिपावर एक माईलस्टोन होईल यात शंका नाही प्रासभो धन्यवाद आणी पैसातै अनेक आभार. पुलेशु.

पैसा 19/02/2013 - 12:35
मस्त समजावून देतो आहेस! ही मालिका पुरी होईल तशी मिपाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार यात काही शंका नाही! सध्या हा अतिशय लेख आवडला आहे आणि मालिका येणार आहे असे समजते. असंख्य वेळा धन्यवाद!

बॅटमॅन 19/02/2013 - 18:23
पुभाप्र. आयुर्वेद फॉर डमीज ची फार दिवसांपासून वाट पहात होतो. निस्ते संस्कृत शब्दांचा मारा करणारे लोक यापलीकडे आयुर्वेदवाल्यांबद्दल चांगलेवाईट कसलेही मत नव्हते आधी आणि आत्ताही नाही. त्यामुळे ही लेखमाला चांगली उपयुक्त ठरेल यात संशय नाही.

बाबा पाटील 19/02/2013 - 23:57
धन्यवाद प्रास ,तुम्ही लिहिते झालात नाहीतर काही लोकांचे आयुर्वेद विषयी अफाट विचार एकुन मी झीट येउन पडायचा बाकी होतो......

संपुर्ण लेखमाला अशीच झळकत राहो व विशेष्तः गैरसमजांचा निचरा व्हावा हीच इछ्चा. जाताजाता- उपयोग किती या बरोबरच, आयुर्वेद ही आज एक अतिशय खर्चीक उपचार पध्दती झाली आहे अशीही टिका असते, मला स्वतःला अल्प अनुभवानुसार त्यात तथ्यही वाटते. यावर काहि उपाय आहे काय ज्यामुळे या शास्त्राचा जनाधार किमान भारतासारख्या विकसनशील देशात वाढेल ?

स्मिता. 22/02/2013 - 17:30
दिवाळी अंकातला लेखही आवडला होता. आता एक छान लेखमाला येवू द्यात. पुभाप्र.

राघव 22/02/2013 - 18:33
वाचतोय. खूप महत्त्वाचं लेखन होईल हे शक्य तेवढे खोलात जाऊन लिहावे ही विनंती. :) राघव

विलासराव 22/02/2013 - 22:02
पण सामान्यजनांना या आयुर्वेदातल्या परिभाषांची योग्य ती शास्त्रीय माहिती असतेच असं नाही. सवयीने या शब्दांचा वापर होताना दिसतो आणि हा वापर माझ्यासारख्या या विषयातल्या विद्यार्थ्याला व्यथित करतो. आयुर्वेदाच्या परिभाषांची नावं माहित असणं म्हणजे आयुर्वेदाच्या सर्व सिद्धांतांचं ज्ञान असणं नव्हे. किंबहुना कोणतंही ज्ञान नसताना केवळ काही परिभाषांची, संकल्पनांची नावं माहित असल्याने व्यक्ती अधिकारवाणीने या विषयी बोलतात, या प्रवृत्तीबद्दल अपार खेद होतो. खूपदा असंही होताना दिसतं की परिभाषांचा, संकल्पनांचा शब्दार्थ समजतोय म्हणून आपल्याला वाटतोय तोच अर्थ खरा समजून शास्त्रावर प्रहार करण्याचा मोहही भल्याभल्यांना सोडवत नाही. हेच आपण जेंव्हा चर्चा करतो तेव्हा होते माझ्या विषयावर. भेटु तेव्हा पुन्हा चर्चा करुच. पण मला हे तुम्हाला या शब्दात सांगता आले नसते. असो. लेख आवडला.

गवि 19/02/2013 - 12:09
त्या काथ्याकुटाच्या निमित्ताने प्रास पुन्हा लिहीता झाला याबद्दल त्या काथ्याकूटकर्त्याचे अनेक आभार. संपूर्ण लेखमाला वाचून मग मत देण्यात येईल. ओघवत्या लिखाणाबद्दल प्रासभाऊचे धन्यवाद...

ही संपूर्ण लेखमाला मिपावर एक माईलस्टोन होईल यात शंका नाही प्रासभो धन्यवाद आणी पैसातै अनेक आभार. पुलेशु.

पैसा 19/02/2013 - 12:35
मस्त समजावून देतो आहेस! ही मालिका पुरी होईल तशी मिपाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार यात काही शंका नाही! सध्या हा अतिशय लेख आवडला आहे आणि मालिका येणार आहे असे समजते. असंख्य वेळा धन्यवाद!

बॅटमॅन 19/02/2013 - 18:23
पुभाप्र. आयुर्वेद फॉर डमीज ची फार दिवसांपासून वाट पहात होतो. निस्ते संस्कृत शब्दांचा मारा करणारे लोक यापलीकडे आयुर्वेदवाल्यांबद्दल चांगलेवाईट कसलेही मत नव्हते आधी आणि आत्ताही नाही. त्यामुळे ही लेखमाला चांगली उपयुक्त ठरेल यात संशय नाही.

बाबा पाटील 19/02/2013 - 23:57
धन्यवाद प्रास ,तुम्ही लिहिते झालात नाहीतर काही लोकांचे आयुर्वेद विषयी अफाट विचार एकुन मी झीट येउन पडायचा बाकी होतो......

संपुर्ण लेखमाला अशीच झळकत राहो व विशेष्तः गैरसमजांचा निचरा व्हावा हीच इछ्चा. जाताजाता- उपयोग किती या बरोबरच, आयुर्वेद ही आज एक अतिशय खर्चीक उपचार पध्दती झाली आहे अशीही टिका असते, मला स्वतःला अल्प अनुभवानुसार त्यात तथ्यही वाटते. यावर काहि उपाय आहे काय ज्यामुळे या शास्त्राचा जनाधार किमान भारतासारख्या विकसनशील देशात वाढेल ?

स्मिता. 22/02/2013 - 17:30
दिवाळी अंकातला लेखही आवडला होता. आता एक छान लेखमाला येवू द्यात. पुभाप्र.

राघव 22/02/2013 - 18:33
वाचतोय. खूप महत्त्वाचं लेखन होईल हे शक्य तेवढे खोलात जाऊन लिहावे ही विनंती. :) राघव

विलासराव 22/02/2013 - 22:02
पण सामान्यजनांना या आयुर्वेदातल्या परिभाषांची योग्य ती शास्त्रीय माहिती असतेच असं नाही. सवयीने या शब्दांचा वापर होताना दिसतो आणि हा वापर माझ्यासारख्या या विषयातल्या विद्यार्थ्याला व्यथित करतो. आयुर्वेदाच्या परिभाषांची नावं माहित असणं म्हणजे आयुर्वेदाच्या सर्व सिद्धांतांचं ज्ञान असणं नव्हे. किंबहुना कोणतंही ज्ञान नसताना केवळ काही परिभाषांची, संकल्पनांची नावं माहित असल्याने व्यक्ती अधिकारवाणीने या विषयी बोलतात, या प्रवृत्तीबद्दल अपार खेद होतो. खूपदा असंही होताना दिसतं की परिभाषांचा, संकल्पनांचा शब्दार्थ समजतोय म्हणून आपल्याला वाटतोय तोच अर्थ खरा समजून शास्त्रावर प्रहार करण्याचा मोहही भल्याभल्यांना सोडवत नाही. हेच आपण जेंव्हा चर्चा करतो तेव्हा होते माझ्या विषयावर. भेटु तेव्हा पुन्हा चर्चा करुच. पण मला हे तुम्हाला या शब्दात सांगता आले नसते. असो. लेख आवडला.
पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो.

स्वप्नातल्या देशा

मृत्युन्जय ·

चित्रगुप्त 01/01/2013 - 14:47
एकदम फर्मास, झकास लेखन. सलाम. कधीकधी वास्तवापेक्षा स्वप्नात असणेच जास्त बरे वाटते आणि कधीकधी वास्तवाचे भानच उरत नाही हेच खरे.... .... हा शेवट अंतर्मुख करून गेला...

In reply to by प्रमोद्_पुणे

सस्नेह 02/01/2013 - 12:08
पहिला मूड अन दुसरा एकदम Contrast वाटले. लिखाण छान.

चित्रगुप्त 01/01/2013 - 14:47
एकदम फर्मास, झकास लेखन. सलाम. कधीकधी वास्तवापेक्षा स्वप्नात असणेच जास्त बरे वाटते आणि कधीकधी वास्तवाचे भानच उरत नाही हेच खरे.... .... हा शेवट अंतर्मुख करून गेला...

In reply to by प्रमोद्_पुणे

सस्नेह 02/01/2013 - 12:08
पहिला मूड अन दुसरा एकदम Contrast वाटले. लिखाण छान.
"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक. नाही म्हणले तरी मला ठसका लागला.

माझी चार अंग वस्रे

ज्ञानोबाचे पैजार ·

तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे (मुर्खाशी का जवळीक साधावी) तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही (ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार) तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका (मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार) तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे (नाटक की रियालीटी) पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
ती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
अशी जगात कुणी असणं शक्य नाही.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
जिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
ती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा! किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.

स्पंदना 21/11/2012 - 16:39
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार? अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?

In reply to by स्पंदना

तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-) बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे. (निर्वस्त्र) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 21/11/2012 - 16:52
काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ?? (आंजावरील सनातनी) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)

In reply to by बॅटमॅन

वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत. अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 22/11/2012 - 12:41
:) काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना || (वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अस्वस्थामा 22/11/2012 - 15:55
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.
विमेंचा ठ्ठो बार..!! gunner

In reply to by स्पंदना

आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे, काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत, पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.

अस्वस्थामा 21/11/2012 - 17:24
अगागागागा... बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !! चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ... (गडबडा लोळणारा स्माईली )

तिमा 21/11/2012 - 18:36
कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!

पैसा 21/11/2012 - 19:12
नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?

तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे (मुर्खाशी का जवळीक साधावी) तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही (ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार) तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका (मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार) तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे (नाटक की रियालीटी) पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
ती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
अशी जगात कुणी असणं शक्य नाही.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे
जिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.
जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे
ती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा! किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.

स्पंदना 21/11/2012 - 16:39
ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार? अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?

In reply to by स्पंदना

तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-) बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे. (निर्वस्त्र) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 21/11/2012 - 16:52
काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ?? (आंजावरील सनातनी) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)

In reply to by बॅटमॅन

वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत. अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 22/11/2012 - 12:41
:) काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना || (वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अस्वस्थामा 22/11/2012 - 15:55
अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.
विमेंचा ठ्ठो बार..!! gunner

In reply to by स्पंदना

आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे, काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत, पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.

अस्वस्थामा 21/11/2012 - 17:24
अगागागागा... बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !! चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ... (गडबडा लोळणारा स्माईली )

तिमा 21/11/2012 - 18:36
कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!

पैसा 21/11/2012 - 19:12
नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

तुम्ही किती व्यवस्थित आहात?

फारएन्ड ·

बहुगुणी 10/11/2012 - 01:43
Thankfully, माझी बहुतेक (*) उत्तरं 'ब' वर्गात मोडतात, त्यामुळे ४००० च मार्क्स :-) (वाचलो!) (*) ब्लूटूथ हैच नही अपने पास! त्यामुळे त्या प्रश्नाला उत्तर नाही. बाकी लेखनाची खुसखुषीत भाषा आवडलीच!

रामपुरी 10/11/2012 - 02:59
९ गुण मिळवून भरून पावलो. फक्त पहिल्या प्रश्नात मुळात इस्त्रीच करत नसल्याने फक्त वरची एकच गुंडी (जी आधीच्या वेळॅस सदरा हँगरवर बसावा म्हणून लावलेली असते) शोधून काढावी लागते.

काही टीप्स उपयोगाच्या आहेत. :) बाकी, तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता? अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो. खपल्या गेलो आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि 10/11/2012 - 15:36
हे अशक्य आहे अगदी, साफ खपल्या गेले आहे :) - (हसून हसून खपल्या गेलेला) सोकाजी

इरसाल 10/11/2012 - 12:09
अतिशय सुव्यवस्थित ह्या प्रकारात मोडतो. द्वैत स्थितीत गुणमापन करावयास गेलो तर ९००० हजार ही गुण्संख्या पुरेशी नाही हे नमुद करु इच्छितो. ५ एस चा परिणाम म्हणावा लागेल रिट्रीव्हल वेळ १० सेकंदापेक्षा कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इरसाल 10/11/2012 - 12:29
५ एस हे http://en.wikipedia.org/wiki/5S_%28methodology%29 आणी मिपावर काही मंडळी स्वतःला देवादिकांच्या पलिकडले(अद्वैत) समजतात म्हणुन मी द्वैतात आहे असे नमुद केलेय.

In reply to by इरसाल

मी एकच एस वापरतो : सिंप्लिसिटी! आणि जगणं तर सगळं द्वैतातच आहे. अद्वैताबद्दल म्हणाल तर तिथे मेथडॉलिजी नाही, कारण ती स्थिती आहे.

sagarpdy 10/11/2012 - 12:33
५०० ते १०००
४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता? अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
या प्रकारचे लोकं कान कधी धुतात हो ?

सस्नेह 10/11/2012 - 14:40
हा हा हा ! निव्वळ खुसखुशीत ! मार्क मोजायच्या भानगडीत न पडलेलं बरं (!), अशी कंडिशन आहे...

पैसा 10/11/2012 - 15:03
मला एकदा ९ तर एकदा ९००० मिळू शकतात. कारण घरातल्या गोष्टी जागच्या जागी [दोन्ही प्रकारात] ठेवण्यात घरातल्या सगळ्यांचाच हातभार असतो. त्यामुळे मै कहां हूं?

१२०६
फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.
हे छान कारण आहे, असे बर्याच वेळेला घडलय,नुसतच1 करीत र्‍हायच.

चिगो 11/11/2012 - 13:29
बहूतेक प्रश्नांत १च मार्क.. ७व्यात शंकेस जागा आहे. (पर्याय ब) बाकी अव्यवस्थित जगण्यात आपलं व्यवस्थित चाललं आहे.. ;-)

राघव 05/09/2017 - 11:41
अरेच्चा ! हा लेख कसा काय सुटला.. ;-) मस्त प्रश्नावली! बायकोनं सांगीतलं की याचं प्रिंट काढून डेस्कटॉप वर लावून ठेव व दर तासाला वाचत जा!! :D

बहुगुणी 10/11/2012 - 01:43
Thankfully, माझी बहुतेक (*) उत्तरं 'ब' वर्गात मोडतात, त्यामुळे ४००० च मार्क्स :-) (वाचलो!) (*) ब्लूटूथ हैच नही अपने पास! त्यामुळे त्या प्रश्नाला उत्तर नाही. बाकी लेखनाची खुसखुषीत भाषा आवडलीच!

रामपुरी 10/11/2012 - 02:59
९ गुण मिळवून भरून पावलो. फक्त पहिल्या प्रश्नात मुळात इस्त्रीच करत नसल्याने फक्त वरची एकच गुंडी (जी आधीच्या वेळॅस सदरा हँगरवर बसावा म्हणून लावलेली असते) शोधून काढावी लागते.

काही टीप्स उपयोगाच्या आहेत. :) बाकी, तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता? अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो. खपल्या गेलो आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि 10/11/2012 - 15:36
हे अशक्य आहे अगदी, साफ खपल्या गेले आहे :) - (हसून हसून खपल्या गेलेला) सोकाजी

इरसाल 10/11/2012 - 12:09
अतिशय सुव्यवस्थित ह्या प्रकारात मोडतो. द्वैत स्थितीत गुणमापन करावयास गेलो तर ९००० हजार ही गुण्संख्या पुरेशी नाही हे नमुद करु इच्छितो. ५ एस चा परिणाम म्हणावा लागेल रिट्रीव्हल वेळ १० सेकंदापेक्षा कमी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इरसाल 10/11/2012 - 12:29
५ एस हे http://en.wikipedia.org/wiki/5S_%28methodology%29 आणी मिपावर काही मंडळी स्वतःला देवादिकांच्या पलिकडले(अद्वैत) समजतात म्हणुन मी द्वैतात आहे असे नमुद केलेय.

In reply to by इरसाल

मी एकच एस वापरतो : सिंप्लिसिटी! आणि जगणं तर सगळं द्वैतातच आहे. अद्वैताबद्दल म्हणाल तर तिथे मेथडॉलिजी नाही, कारण ती स्थिती आहे.

sagarpdy 10/11/2012 - 12:33
५०० ते १०००
४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता? अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
या प्रकारचे लोकं कान कधी धुतात हो ?

सस्नेह 10/11/2012 - 14:40
हा हा हा ! निव्वळ खुसखुशीत ! मार्क मोजायच्या भानगडीत न पडलेलं बरं (!), अशी कंडिशन आहे...

पैसा 10/11/2012 - 15:03
मला एकदा ९ तर एकदा ९००० मिळू शकतात. कारण घरातल्या गोष्टी जागच्या जागी [दोन्ही प्रकारात] ठेवण्यात घरातल्या सगळ्यांचाच हातभार असतो. त्यामुळे मै कहां हूं?

१२०६
फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.
हे छान कारण आहे, असे बर्याच वेळेला घडलय,नुसतच1 करीत र्‍हायच.

चिगो 11/11/2012 - 13:29
बहूतेक प्रश्नांत १च मार्क.. ७व्यात शंकेस जागा आहे. (पर्याय ब) बाकी अव्यवस्थित जगण्यात आपलं व्यवस्थित चाललं आहे.. ;-)

राघव 05/09/2017 - 11:41
अरेच्चा ! हा लेख कसा काय सुटला.. ;-) मस्त प्रश्नावली! बायकोनं सांगीतलं की याचं प्रिंट काढून डेस्कटॉप वर लावून ठेव व दर तासाला वाचत जा!! :D
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा. प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.

चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा

आळश्यांचा राजा ·

बहुगुणी 31/10/2012 - 22:22
प्रकाश झांविषयी चार चांगले शब्द ऐकून होतो. त्या पार्श्वभूमीवर एका जाणकाराकडून इतकं निगेटिव्ह विश्लेषण वाचल्यानंतर हा चित्रपट शोधून काढून पाहीन असं अजिबात वाटत नाही. पण एक नक्की वाटलं की 'आळश्यांच्या राजे'साहेबांसारख्या या प्रश्नावर नेहेमीच लक्षणीय आणि चांगलं लिखाण करणार्‍यांनी स्वतःच एक चित्रपटकथा लिहून नक्षलवादाचं वास्तव नेमकं काय आहे ते सामान्यांपुढे आणायला हवं.

चिगो 31/10/2012 - 23:09
खरेतर ह्याचित्रपटावर आणि एकंदरीतच ह्या विषयावर तुमच्यापेक्षा जास्त अधिकाराने दुसरा कोणी लिहू शकणार नाही,मिपावर तरी.. आणि म्हणूनच तुमच्या परीक्षणाची वाट बघत होतो. मलाही चित्रपट बघतांना बर्‍याच गोष्टी खटकल्या. नक्षलवाद्यांचे "ग्लोरीफिकेशन" आणि प्रशासन / पोलिसयंत्रणा किती असंवेदनशील आहे, हे दाखवण्याचा अवास्तव खटाटोप आहे हा चित्रपट म्हणजे..
स्थानिक राजकारणी म्हणजे निव्वळ गुंड. बुल्डोझर घेऊन गावे जमीनदोस्त करणारे. आणि विशेष म्हणजे हे करत असताना त्यांना नक्षलांचे मुळीच भय नसते. एरवी मात्र नक्षलांची प्रचंड दहशत वगैरे असते. आणि स्थानिक राजकारण्यांच्या या असल्या गुंडागर्दीला "सलवा जुडूम" असे म्हणतात म्हणे.
जिल्हा प्रशासनाचा पत्ताच नाही. जिल्हा इथे एस्पीच जणू सांभाळत असतो. तोच गावांमध्ये जातो, लोकांच्या जखमांना मलम लावतो, त्यांना विकासाचा शब्द देतो. आश्चर्य म्हणजे लँड अ‍ॅक्विझिशनही इथे एस्पीच करत असतो. आणि त्यावर थेट राज्याचे गृहमंत्री देखरेख करत असतात. डीजीपी त्यांचे भालदार चोपदार असल्यासारखे सतत त्यांच्यामागे उभे असतात आणि फोनवरून एस्पीला सबूरीचा सल्ला देत असतात.
हे आणि तुमचे बाकी मुद्दे लाजवाब.. इतउप्पर, नक्षलवादी म्हणजे न्यायाची प्रचंड चाड असलेले लोक जणू. त्यांच्याद्वारे आदिवाश्यांवर होणार्‍या अन्याय / अत्याचाराचा शष्प उल्लेख नाही. चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या नक्षल-चळवळीची निष्फळता, त्यांच्यामुळे आदिवास्यांची होणारी ससेहोलपट, प्रशासनाद्वारे आदिवास्यांच्या विकासासाठी करण्यात येणारे प्रयत्न ह्यावर कुठेही भाष्य नाही. आणि बरेच काही.. शेवटी, पुर्वी दिलेल्या चित्रपटांवरुन पुढच्या चित्रपटांबद्दल अपेक्षा बाळगून अर्थ नाही, हेच झांनी दाखवून दिलंय..

चौकटराजा 01/11/2012 - 08:50
आता हे " शिनेप्रिक्षान" वाचल्यावर थेटरला पिच्चर बघायचा ब्येत क्यानसल ! प्रकाश झा साठी टीव्ही वर आल्यावर नजर टाकेन म्हन्तो ! धनेवाद आरा साहेब !

छोटा डॉन 01/11/2012 - 11:06
नेहमीप्रमाणे मुद्देसुद आणि वस्तुनिष्ठ परिक्षण, लेख कम चित्रपटाची ओळख आवडली आहे. सिनेमाचे ट्रेलर्स पाहुनच पिक्चर गंडला आहे ह्याची शंका आली होती. अ‍ॅक्च्युअली 'नक्षलवाद, अंडरवर्ल्ड, कॉर्पोरेट वर्ल्ड' वगैरे बाबी खुणावणार्‍या असल्या तरी त्यातली गुंतागुंत आणि जे आहे ते आहे तसे मांडता येण्याचे आव्हान प्रत्यक्षात चित्रपट बनवताना पेलता येईलच ह्याची खात्री नाही. प्रकाश झा अर्थातच चांगले दिग्दर्शक आहेत पण हा चित्रपट गंडला असेल असे वाटलेच होते. कास्टिंगही फारशी आवडली नव्हतीच ... धन्यवाद आरा. आता चित्रपट थेट्रात बघण्याचा विचार सोडुन दिला आहे, मात्र घरी चित्रपट नक्की बघेन असे वाटते. - छोटा डॉन

प्रकाश झा हे हल्ली गल्यावर लक्ष ठेवून शिनेमे काढतात आणि त्यांना म्हणे गल्ला पेटी व कलेचे नाते जोडणारा शिनेमा काढायचा असतो. आरक्षण , राजनीती व आता चक्रव्यूह हे सिनेमे पाहतांना हा प्रत्यय येतो. मूळ मुद्याला बगल देऊन त्याचा मुलामा देत फिल्मी कथा सादर करत कलेच्या नावावर धंदा करणाऱ्या पेक्षा निव्वळ मनोरंजन ह्या मुद्याभोवती फिरणारे सल्लूचे शिनेमे निदान त्यांच्या प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करत नाहीत. सादर सिनेमा अर्धवट पहिला. आणि ही समीक्षा वाचून त्याबद्दल खेद वाटेनासा झाला आहे.

प्रदीप 01/11/2012 - 18:33
आवडले. वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे, ह्या विषयावर तुमच्या इतके माहितीपूर्ण फारच थोड्या व्यक्ति लिहू शकतील.चित्रपट पाहिला नाही, पण तुमच्या जज्मेंटवर विश्वास आहे, तेव्हा आता तो पाहीन असे वाटत नाही. तरीही ह्या चित्रपटाचे आंतररराष्ट्रीय फिल्म- फेस्टिव्हल्स सर्किटवर प्रचंड स्वागत होईल, झा (बहुधा दाढी वाढवून, व झोळी लटकवून) जिथेतिथे जातील, भाषणे ठोकतील, हारतुरे स्वीकारतील, असा अंदाज आहे. विकसनशील देशांच्या असल्या स्टोरीज ह्या सर्किट्सवर चांगल्या खपाव्यात.

In reply to by अन्या दातार

अमोल खरे 03/11/2012 - 20:07
"रावण" पिक्चर पण असाच होता. नक्षलवादी ग्रेट आणि पोलिस म्हणजे अत्याचारी अशी सरळसोप्पी व्याख्या त्यात होती. हाईट म्हणजे अनेक लोकांना आजही नक्षलवाद्यांबद्दल सहानुभुती असते. व्यक्तिशः मलातरी नक्षलवादी आणि दहशतवादी ह्यांत काहीच फरक वाटत नाही.

In reply to by अमोल खरे

नक्षलांविषयी सहानुभूती वाटणे काही लोकांसाठी सहजपणे येते. भ्रष्टाचाराने मातलेल्या आणि न्याय न देणार्‍या व्यवस्थेचे उद्वेगजनक अनुभव आलेल्यांना नक्षलांविषयी सहानुभूती वाटू शकते. दहशतवादी या शब्दाचा प्रचलित अर्थ पाहिला तर साधारणपणे पाकिस्तान भारताविरुद्ध करत असलेले प्रॉक्सी वॉर मनात येते. त्या अर्थाने दहशतवादी हा शब्द घेतला तर नक्षलवादी आणि दहशतवादी यांच्यात बराच फरक आहे. नक्षलवादी हे राजकीय लढाई करत असले तरी त्यांचा (सध्या तरी) रोख हा सामाजिक मुद्द्यांवरच आहे; दहशतवादी हे स्थूल राजकीय - आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दंगा करताना दिसतात.

In reply to by आळश्यांचा राजा

अमोल खरे 04/11/2012 - 21:21
तुमच्या इतका स्टडी माझा नाही, पण जो भारताविरुद्ध उभा राहतो, जो भारताच्या पोलिसांवर, लष्करावर हल्ला करतो तो दहशतवादी अशी माझी सरळसोप्पी व्याख्या आहे. त्या लोकांवर अन्याय झालाही असेल पण म्हणुन त्यांनी पोलिसांना गोळ्या घालायच्या ? आता मुंबईत लोकल्स वाढवत नाहीत, रिक्षावाले, बेस्ट बस वाले कधीही संपावर जातात, भाववाढ होते हा पण अन्यायच आहे, पण म्हणुन मुंबईत पण लोकांनी बंदुका हाती घ्यायच्या का ? जो कोणी देशाविरुद्ध उठेल त्याला ठार करायलाच हवा. मग तो दहशतवादी असो कि नक्षलवादी. साधा सरळ हिशोब आहे. आणि नक्षलवादी आत्ता ईंटर्नल प्रश्नावर बोलतात. उद्या पाकिस्तान बरोबर युद्ध झालं तर हे तेवढ्या काळापुरत्या आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीज थांबवणार आहेत का ? नक्कीच नाही. त्यामुळे सहानुभुती न दाखवता जो कोणी भारताच्या विरुद्ध आहे त्याला संपवायलाच हवं. आत्ता इग्नोर केलं तर अजुन काही वर्षांनी हीच लोकं मोठ्या शहरांमध्ये हल्ले करतील आणि तेव्हा त्यांना आवरणे खुप कठीण होईल.

सहज 02/11/2012 - 06:53
आरा तुमच्या भावना पोहोचल्य पण जाउ द्या. सिनेमा हा धंदा आहे, कलेची सेवा बिवा काही खास नाही काहीतरी मनोरंजनात्मक काढून पैसे कमावणे मुख्य ध्येय. सिनेमा खरे किती, खोटे किती मग तिला माहीतीपट का म्हणु नये वगैरे वगैरे आहेच [जितका बंडल सिनेमा तितकी फारएन्ड यांची एक से एक अफलातून परीक्षण वाचायला मिळतात हा फायदा आहेच.] पण याहून महत्वाची गोष्ट मेडीया, वृत्तपत्र माध्यम हाच किती मोठा धंदा झाला आहे, सोयीच्या बातम्या, सोयीचे राजकारण, खरे व खोटे याची प्रचंड सरमिसळ, त्याकडे बघून जनतेला हसू, कीव, चीड यायला हवी व ती येतही असेल पण बदलाचे काय? अभी देश उबल रहा है म्हणायचे व आपल्याने जितके जमेल तितके करत रहायचे. बाकी काय? झा बिचारा पोटापाण्यासाठी करतो असले काहीबाही जाउ द्या... बाकी ज्याची त्याची समज ज्याची त्याची जाण...

आपण चित्रपटाबद्दल लिहिलंय आपल्याकडुनच अशा चित्रपटांबद्दल समजुन घेतले पाहिजे. चित्रपटाबद्दल लिहिल्याबद्दल आभार. चित्रपटाकडुन फार अपेक्षा दिसत नाही, शेवटी तो चित्रपट आहे असे समजून सोडावे लागेल. चित्रपट पाहिलेला नसल्यामुळे अधिक उणे आपल्याकडुनच कळते. झा आता बॉक्स ऑफिसवर लक्ष ठेवून असतात, प्रतिसादात वर काही चित्रपटांचे उल्लेख आलेच आहेत. चित्रपटाचे कथानक नंदीग्रामवर आधारित आहे. चित्रपटात ते नंदीघाट म्हणुन आले आहे. जमीन अधिग्रहणाचा विषय सविस्तर माहिती नसल्यामुळे हा चित्रपट रसिकांना कुठे घेऊन जातो माहिती नाही. आपण उणिवा असलेल्या गोष्टींबद्दल उल्लेख केलाच आहे. नक्षलवाद्यांच्या बाजुने विचार करणारे, सरकारच्या बाजुने विचार करणारे, पोलिसांच्या बाजुने विचार करणारे, आदिवासींच्या बाजुने विचार करणार्‍या अशा सर्वच चक्रव्यूहात अडकलेल्यांना चित्रपट कुठे घेऊन जातो आपण लिहिलेच आहे, चित्रपट नक्कीच पाहीन. -दिलीप बिरुटे

In reply to by सुहास..

होय. शबाना - अनंत नाग यांचा पहिला सिनेमा. अंकुर आणि निशांत हे दोन्ही सिनेमे साधारणपणे एकाच कथेचा भाग असावेत इतक्या समांतर पार्श्वभूमीवर बेतलेले आहेत. तेलंगणाचा जमीनदारांच्या प्रभुत्वाखाली असलेला भाग. नक्षलवादाचा जन्म बंगालात झालेला असला तरी मुख्य करुन तो फोफावला या भागात. आजही नक्षलांचे मुख्य नेतृत्व हे तेलुगूच आहे. अंकुर आणि निशांतमध्ये या सामाजिक बंडाची पार्श्वभूमी बेनेगलांनी मांडलेली आहे. दाबून ठेवलेले सामाजिक घटक काहीच वाट मिळत नसेल तर अचानक बंड करुन उठतात आणि हिंसक बनतात. निशांतमध्ये हिंसा व्यक्त झालेली दिसते. अंकुरमध्ये हिंसेचा/ बंडाचा "अंकुर" दिसतो. एरवी असहायपणे जमीनदाराच्या लहरी लीला पाहणारे लोक त्याला तोंडावर उलट बोलतात; लहान मुलगा दगड फेकून जमीनदाराच्या घराची काच फोडतो - हा तो अंकुर.

सुहास.. 04/11/2012 - 00:18
आरा , म्हणजे मी शेवट नीट नाही पाहिला बहुधा ...डुकरांच्या सवे नाला क्रॉस करून शबाना मुलाला ( त्यांच्याच सोबत ) जन्म देते तोच ना भाऊ ...मग अंकुर हा काहीसा प्रेमपट होता की मी च्यामायला लहान होतो नक्षलवाद समजायला :(

In reply to by सुहास..

डुकरे वगैरे काही नाहीत हो शेवटात. आणि तो शबानाच्या पोटातला अंकुरही बाहेर नाही आलेला. एक पोरगं दगड मारुन काच फोडतं आणि पळत सुटतं. एवढंच आहे. त्यानंतर पडदा लाल होतो आणि सिनेमा संपतो. आता बेनेगलांनी तो पडदा शेवटी लाल का केलाय ते त्यांना ठाऊक. नक्षलवाद दाखवण्यासाठी की लाल रंग आपला बाय डिफॉल्ट एडिटरनं टाकला हे तेच जाणोत.

In reply to by आळश्यांचा राजा

सुहास.. 04/11/2012 - 00:29
आरा , माझ्या कडे जी कॉपी आहे अंकुर ची ती पाठवितो मित्रा ! ( याच मिपावर कोणीतरी लिहीले देखील आहे अंकुर विषयी, तेव्हा लोड केली होती, दुर्दैवाने तो लॅपी चार्ज होत नसल्याने बंद आहे !! लिंक सुध्दा !! :( )

In reply to by सुहास..

इंटरेस्टिंग! असू शकेल. पण मी हे लिहिताना पुन्हा शेवट माझ्याकडच्या कॉपीत पाहून घेतला. डुकरं शंभर टक्के नाहीत! असो. ते महत्वाचं नाहीये. डुकरं दाखवली असतील तर उलट परिणाम अधिकच साधेल. http://www.youtube.com/watch?v=on-0oCBerOk इथे शेवट कन्फर्म करुन घेता येईल.

बहुगुणी 31/10/2012 - 22:22
प्रकाश झांविषयी चार चांगले शब्द ऐकून होतो. त्या पार्श्वभूमीवर एका जाणकाराकडून इतकं निगेटिव्ह विश्लेषण वाचल्यानंतर हा चित्रपट शोधून काढून पाहीन असं अजिबात वाटत नाही. पण एक नक्की वाटलं की 'आळश्यांच्या राजे'साहेबांसारख्या या प्रश्नावर नेहेमीच लक्षणीय आणि चांगलं लिखाण करणार्‍यांनी स्वतःच एक चित्रपटकथा लिहून नक्षलवादाचं वास्तव नेमकं काय आहे ते सामान्यांपुढे आणायला हवं.

चिगो 31/10/2012 - 23:09
खरेतर ह्याचित्रपटावर आणि एकंदरीतच ह्या विषयावर तुमच्यापेक्षा जास्त अधिकाराने दुसरा कोणी लिहू शकणार नाही,मिपावर तरी.. आणि म्हणूनच तुमच्या परीक्षणाची वाट बघत होतो. मलाही चित्रपट बघतांना बर्‍याच गोष्टी खटकल्या. नक्षलवाद्यांचे "ग्लोरीफिकेशन" आणि प्रशासन / पोलिसयंत्रणा किती असंवेदनशील आहे, हे दाखवण्याचा अवास्तव खटाटोप आहे हा चित्रपट म्हणजे..
स्थानिक राजकारणी म्हणजे निव्वळ गुंड. बुल्डोझर घेऊन गावे जमीनदोस्त करणारे. आणि विशेष म्हणजे हे करत असताना त्यांना नक्षलांचे मुळीच भय नसते. एरवी मात्र नक्षलांची प्रचंड दहशत वगैरे असते. आणि स्थानिक राजकारण्यांच्या या असल्या गुंडागर्दीला "सलवा जुडूम" असे म्हणतात म्हणे.
जिल्हा प्रशासनाचा पत्ताच नाही. जिल्हा इथे एस्पीच जणू सांभाळत असतो. तोच गावांमध्ये जातो, लोकांच्या जखमांना मलम लावतो, त्यांना विकासाचा शब्द देतो. आश्चर्य म्हणजे लँड अ‍ॅक्विझिशनही इथे एस्पीच करत असतो. आणि त्यावर थेट राज्याचे गृहमंत्री देखरेख करत असतात. डीजीपी त्यांचे भालदार चोपदार असल्यासारखे सतत त्यांच्यामागे उभे असतात आणि फोनवरून एस्पीला सबूरीचा सल्ला देत असतात.
हे आणि तुमचे बाकी मुद्दे लाजवाब.. इतउप्पर, नक्षलवादी म्हणजे न्यायाची प्रचंड चाड असलेले लोक जणू. त्यांच्याद्वारे आदिवाश्यांवर होणार्‍या अन्याय / अत्याचाराचा शष्प उल्लेख नाही. चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या नक्षल-चळवळीची निष्फळता, त्यांच्यामुळे आदिवास्यांची होणारी ससेहोलपट, प्रशासनाद्वारे आदिवास्यांच्या विकासासाठी करण्यात येणारे प्रयत्न ह्यावर कुठेही भाष्य नाही. आणि बरेच काही.. शेवटी, पुर्वी दिलेल्या चित्रपटांवरुन पुढच्या चित्रपटांबद्दल अपेक्षा बाळगून अर्थ नाही, हेच झांनी दाखवून दिलंय..

चौकटराजा 01/11/2012 - 08:50
आता हे " शिनेप्रिक्षान" वाचल्यावर थेटरला पिच्चर बघायचा ब्येत क्यानसल ! प्रकाश झा साठी टीव्ही वर आल्यावर नजर टाकेन म्हन्तो ! धनेवाद आरा साहेब !

छोटा डॉन 01/11/2012 - 11:06
नेहमीप्रमाणे मुद्देसुद आणि वस्तुनिष्ठ परिक्षण, लेख कम चित्रपटाची ओळख आवडली आहे. सिनेमाचे ट्रेलर्स पाहुनच पिक्चर गंडला आहे ह्याची शंका आली होती. अ‍ॅक्च्युअली 'नक्षलवाद, अंडरवर्ल्ड, कॉर्पोरेट वर्ल्ड' वगैरे बाबी खुणावणार्‍या असल्या तरी त्यातली गुंतागुंत आणि जे आहे ते आहे तसे मांडता येण्याचे आव्हान प्रत्यक्षात चित्रपट बनवताना पेलता येईलच ह्याची खात्री नाही. प्रकाश झा अर्थातच चांगले दिग्दर्शक आहेत पण हा चित्रपट गंडला असेल असे वाटलेच होते. कास्टिंगही फारशी आवडली नव्हतीच ... धन्यवाद आरा. आता चित्रपट थेट्रात बघण्याचा विचार सोडुन दिला आहे, मात्र घरी चित्रपट नक्की बघेन असे वाटते. - छोटा डॉन

प्रकाश झा हे हल्ली गल्यावर लक्ष ठेवून शिनेमे काढतात आणि त्यांना म्हणे गल्ला पेटी व कलेचे नाते जोडणारा शिनेमा काढायचा असतो. आरक्षण , राजनीती व आता चक्रव्यूह हे सिनेमे पाहतांना हा प्रत्यय येतो. मूळ मुद्याला बगल देऊन त्याचा मुलामा देत फिल्मी कथा सादर करत कलेच्या नावावर धंदा करणाऱ्या पेक्षा निव्वळ मनोरंजन ह्या मुद्याभोवती फिरणारे सल्लूचे शिनेमे निदान त्यांच्या प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करत नाहीत. सादर सिनेमा अर्धवट पहिला. आणि ही समीक्षा वाचून त्याबद्दल खेद वाटेनासा झाला आहे.

प्रदीप 01/11/2012 - 18:33
आवडले. वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे, ह्या विषयावर तुमच्या इतके माहितीपूर्ण फारच थोड्या व्यक्ति लिहू शकतील.चित्रपट पाहिला नाही, पण तुमच्या जज्मेंटवर विश्वास आहे, तेव्हा आता तो पाहीन असे वाटत नाही. तरीही ह्या चित्रपटाचे आंतररराष्ट्रीय फिल्म- फेस्टिव्हल्स सर्किटवर प्रचंड स्वागत होईल, झा (बहुधा दाढी वाढवून, व झोळी लटकवून) जिथेतिथे जातील, भाषणे ठोकतील, हारतुरे स्वीकारतील, असा अंदाज आहे. विकसनशील देशांच्या असल्या स्टोरीज ह्या सर्किट्सवर चांगल्या खपाव्यात.

In reply to by अन्या दातार

अमोल खरे 03/11/2012 - 20:07
"रावण" पिक्चर पण असाच होता. नक्षलवादी ग्रेट आणि पोलिस म्हणजे अत्याचारी अशी सरळसोप्पी व्याख्या त्यात होती. हाईट म्हणजे अनेक लोकांना आजही नक्षलवाद्यांबद्दल सहानुभुती असते. व्यक्तिशः मलातरी नक्षलवादी आणि दहशतवादी ह्यांत काहीच फरक वाटत नाही.

In reply to by अमोल खरे

नक्षलांविषयी सहानुभूती वाटणे काही लोकांसाठी सहजपणे येते. भ्रष्टाचाराने मातलेल्या आणि न्याय न देणार्‍या व्यवस्थेचे उद्वेगजनक अनुभव आलेल्यांना नक्षलांविषयी सहानुभूती वाटू शकते. दहशतवादी या शब्दाचा प्रचलित अर्थ पाहिला तर साधारणपणे पाकिस्तान भारताविरुद्ध करत असलेले प्रॉक्सी वॉर मनात येते. त्या अर्थाने दहशतवादी हा शब्द घेतला तर नक्षलवादी आणि दहशतवादी यांच्यात बराच फरक आहे. नक्षलवादी हे राजकीय लढाई करत असले तरी त्यांचा (सध्या तरी) रोख हा सामाजिक मुद्द्यांवरच आहे; दहशतवादी हे स्थूल राजकीय - आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दंगा करताना दिसतात.

In reply to by आळश्यांचा राजा

अमोल खरे 04/11/2012 - 21:21
तुमच्या इतका स्टडी माझा नाही, पण जो भारताविरुद्ध उभा राहतो, जो भारताच्या पोलिसांवर, लष्करावर हल्ला करतो तो दहशतवादी अशी माझी सरळसोप्पी व्याख्या आहे. त्या लोकांवर अन्याय झालाही असेल पण म्हणुन त्यांनी पोलिसांना गोळ्या घालायच्या ? आता मुंबईत लोकल्स वाढवत नाहीत, रिक्षावाले, बेस्ट बस वाले कधीही संपावर जातात, भाववाढ होते हा पण अन्यायच आहे, पण म्हणुन मुंबईत पण लोकांनी बंदुका हाती घ्यायच्या का ? जो कोणी देशाविरुद्ध उठेल त्याला ठार करायलाच हवा. मग तो दहशतवादी असो कि नक्षलवादी. साधा सरळ हिशोब आहे. आणि नक्षलवादी आत्ता ईंटर्नल प्रश्नावर बोलतात. उद्या पाकिस्तान बरोबर युद्ध झालं तर हे तेवढ्या काळापुरत्या आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीज थांबवणार आहेत का ? नक्कीच नाही. त्यामुळे सहानुभुती न दाखवता जो कोणी भारताच्या विरुद्ध आहे त्याला संपवायलाच हवं. आत्ता इग्नोर केलं तर अजुन काही वर्षांनी हीच लोकं मोठ्या शहरांमध्ये हल्ले करतील आणि तेव्हा त्यांना आवरणे खुप कठीण होईल.

सहज 02/11/2012 - 06:53
आरा तुमच्या भावना पोहोचल्य पण जाउ द्या. सिनेमा हा धंदा आहे, कलेची सेवा बिवा काही खास नाही काहीतरी मनोरंजनात्मक काढून पैसे कमावणे मुख्य ध्येय. सिनेमा खरे किती, खोटे किती मग तिला माहीतीपट का म्हणु नये वगैरे वगैरे आहेच [जितका बंडल सिनेमा तितकी फारएन्ड यांची एक से एक अफलातून परीक्षण वाचायला मिळतात हा फायदा आहेच.] पण याहून महत्वाची गोष्ट मेडीया, वृत्तपत्र माध्यम हाच किती मोठा धंदा झाला आहे, सोयीच्या बातम्या, सोयीचे राजकारण, खरे व खोटे याची प्रचंड सरमिसळ, त्याकडे बघून जनतेला हसू, कीव, चीड यायला हवी व ती येतही असेल पण बदलाचे काय? अभी देश उबल रहा है म्हणायचे व आपल्याने जितके जमेल तितके करत रहायचे. बाकी काय? झा बिचारा पोटापाण्यासाठी करतो असले काहीबाही जाउ द्या... बाकी ज्याची त्याची समज ज्याची त्याची जाण...

आपण चित्रपटाबद्दल लिहिलंय आपल्याकडुनच अशा चित्रपटांबद्दल समजुन घेतले पाहिजे. चित्रपटाबद्दल लिहिल्याबद्दल आभार. चित्रपटाकडुन फार अपेक्षा दिसत नाही, शेवटी तो चित्रपट आहे असे समजून सोडावे लागेल. चित्रपट पाहिलेला नसल्यामुळे अधिक उणे आपल्याकडुनच कळते. झा आता बॉक्स ऑफिसवर लक्ष ठेवून असतात, प्रतिसादात वर काही चित्रपटांचे उल्लेख आलेच आहेत. चित्रपटाचे कथानक नंदीग्रामवर आधारित आहे. चित्रपटात ते नंदीघाट म्हणुन आले आहे. जमीन अधिग्रहणाचा विषय सविस्तर माहिती नसल्यामुळे हा चित्रपट रसिकांना कुठे घेऊन जातो माहिती नाही. आपण उणिवा असलेल्या गोष्टींबद्दल उल्लेख केलाच आहे. नक्षलवाद्यांच्या बाजुने विचार करणारे, सरकारच्या बाजुने विचार करणारे, पोलिसांच्या बाजुने विचार करणारे, आदिवासींच्या बाजुने विचार करणार्‍या अशा सर्वच चक्रव्यूहात अडकलेल्यांना चित्रपट कुठे घेऊन जातो आपण लिहिलेच आहे, चित्रपट नक्कीच पाहीन. -दिलीप बिरुटे

In reply to by सुहास..

होय. शबाना - अनंत नाग यांचा पहिला सिनेमा. अंकुर आणि निशांत हे दोन्ही सिनेमे साधारणपणे एकाच कथेचा भाग असावेत इतक्या समांतर पार्श्वभूमीवर बेतलेले आहेत. तेलंगणाचा जमीनदारांच्या प्रभुत्वाखाली असलेला भाग. नक्षलवादाचा जन्म बंगालात झालेला असला तरी मुख्य करुन तो फोफावला या भागात. आजही नक्षलांचे मुख्य नेतृत्व हे तेलुगूच आहे. अंकुर आणि निशांतमध्ये या सामाजिक बंडाची पार्श्वभूमी बेनेगलांनी मांडलेली आहे. दाबून ठेवलेले सामाजिक घटक काहीच वाट मिळत नसेल तर अचानक बंड करुन उठतात आणि हिंसक बनतात. निशांतमध्ये हिंसा व्यक्त झालेली दिसते. अंकुरमध्ये हिंसेचा/ बंडाचा "अंकुर" दिसतो. एरवी असहायपणे जमीनदाराच्या लहरी लीला पाहणारे लोक त्याला तोंडावर उलट बोलतात; लहान मुलगा दगड फेकून जमीनदाराच्या घराची काच फोडतो - हा तो अंकुर.

सुहास.. 04/11/2012 - 00:18
आरा , म्हणजे मी शेवट नीट नाही पाहिला बहुधा ...डुकरांच्या सवे नाला क्रॉस करून शबाना मुलाला ( त्यांच्याच सोबत ) जन्म देते तोच ना भाऊ ...मग अंकुर हा काहीसा प्रेमपट होता की मी च्यामायला लहान होतो नक्षलवाद समजायला :(

In reply to by सुहास..

डुकरे वगैरे काही नाहीत हो शेवटात. आणि तो शबानाच्या पोटातला अंकुरही बाहेर नाही आलेला. एक पोरगं दगड मारुन काच फोडतं आणि पळत सुटतं. एवढंच आहे. त्यानंतर पडदा लाल होतो आणि सिनेमा संपतो. आता बेनेगलांनी तो पडदा शेवटी लाल का केलाय ते त्यांना ठाऊक. नक्षलवाद दाखवण्यासाठी की लाल रंग आपला बाय डिफॉल्ट एडिटरनं टाकला हे तेच जाणोत.

In reply to by आळश्यांचा राजा

सुहास.. 04/11/2012 - 00:29
आरा , माझ्या कडे जी कॉपी आहे अंकुर ची ती पाठवितो मित्रा ! ( याच मिपावर कोणीतरी लिहीले देखील आहे अंकुर विषयी, तेव्हा लोड केली होती, दुर्दैवाने तो लॅपी चार्ज होत नसल्याने बंद आहे !! लिंक सुध्दा !! :( )

In reply to by सुहास..

इंटरेस्टिंग! असू शकेल. पण मी हे लिहिताना पुन्हा शेवट माझ्याकडच्या कॉपीत पाहून घेतला. डुकरं शंभर टक्के नाहीत! असो. ते महत्वाचं नाहीये. डुकरं दाखवली असतील तर उलट परिणाम अधिकच साधेल. http://www.youtube.com/watch?v=on-0oCBerOk इथे शेवट कन्फर्म करुन घेता येईल.
लेखनप्रकार
मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी. प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्‍यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्‍यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्‍या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्‍यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्‍या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला.

एकापेक्षा एक.

मृत्युन्जय ·

गणपा 09/10/2012 - 18:59
किस्से धमाल आहेत, पण...(तोच सागेगम फेम देवकी पंडितवाला)
केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर इतका अपमान सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो.
ह्याची काय गरज होती? ट्यार्पी खेचायला ? ;) मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.

In reply to by गणपा

५० फक्त 10/10/2012 - 05:49
तुम्ही जर मालवणातल्या गणेश देवळामागच्या खाणावळीबद्दल बोलत असाल तर,जे झालं त्यात अपमान असण्यासारखं काही नाही, त्या खानावळीच्या जेवणाला आणि ते बनवणा-याला लाख लाख सलाम, उकडीचे मोदक, कढी, लिंबाचं लोणचं(लोकल)आणि भात असं लिमिटेड जेवण जेवलोय तिथं, एवढ्या साध्या पदार्थात जो जीव ओतला होता त्यांचं नाव ते... लईच्च बेकार.

In reply to by गणपा

मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.
सहमत. "केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर गिऱ्हाइकाविषयी इतकी बेपर्वाई सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो." हे वाक्य जास्त योग्य ठरलं असतं.

यशोधरा 10/10/2012 - 08:37
काजूची उसळ खरेच प्रत्येक सीझनमध्ये मिळू शकत नाही आणि उकडीचे मोदक बनवायला खरोखरच वेळ लागतो. कोकणात तयार सुवासिक पिठीपासून बनवत नैत मोदक. :P त्या हाटेलवाल्या काकांच काही चुकलं नै. तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची! :P आणि शेवटी अतिसौजन्यसप्ताहवाल्याच्या हाटेलाचाच पंचनामा झाला म्हणायचा. तात्पर्यः बिजिनेस करताना फक्त गोड बोलून काम साधत नाही, तेथे पाहिजे कामसूपणाचे, येरा आळशाचे काम नाही!

In reply to by यशोधरा

मृत्युन्जय 10/10/2012 - 10:21
शमत आहे. पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. बर्‍याच वेळा बर्‍याच ठिकाणी तसे ते तयारच असतात. कोकणात गेल्यावर उद्या कोणी मासे आहेत का असे विचारल्यावर " मासे काय असे लगेच मिळतात का हो? आधी जाळे टाकावे लागते, मासे पकडावे लागतात, चांगले मासे निवडुन सोलावे लागतात, मसाला तयार करुन मासे त्याच्यात घोळवावे लागतात. बरीच मोठी प्रक्रिया आहे ती." असे जर कोणी सांगितले तर मी तरी त्या इसमापुढे हात टेकीन.
तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची!
याच्याशीही शमत आहे. पण मग पुणेरी टाचणी लागल्यावर लोकांची एवढी मळमळ का होते तेच समजत नाही (हे तुझ्यासाठी नाही. नाहितर मारशील मला)

In reply to by मृत्युन्जय

५० फक्त 10/10/2012 - 10:47
पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. - याच्याशी सहमत. ब-याच ठिकाणी दिवे आगार / दापोली - बापट दोन्हीकडे ,मालवणला मयेकर / वर उल्लेख केलेली गणेश मंदिरामागची खानावळ, इथं तर संध्याकाळी जेवणात किती मोदक हवेत याची ऑर्डर दुपारी द्यावी लागते, तरच संध्याकाळी तेवढेच मोजुन तेवढेच मोदक मिळतात.

In reply to by मृत्युन्जय

यशोधरा 10/10/2012 - 12:51
आमच्यासमोर कोकण आणि पुण्यास नावे ठेवू नये. कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे :) मोदक असतात रे तयार, पण ते नेहमीचा तसा व्यवसाय असला तरच असतील असे वाटते मला. नाहीतर कोकणात ते सगळे बनवायचेही फार कष्ट असतात. म्हणजे पहा, नारळ पाडायचा, मग सोलायचा, मग खोबरे खवायचे, त्याच्या पाण्याने ती उकड मळायची.... बरेच निगुतीने बनतात ह्या रेश्प्या. त्यामुळे ते करुन ठेवणे सगळ्यांनाच परवडेल असे नै.

In reply to by यशोधरा

गवि 10/10/2012 - 13:16
अत्यंत सहमत. आधीच तयार केलेले थंडगार मोदक स्टॉलवर /जाळीच्या झाकणाखाली बटाटेवड्यांसारखे मांडून ठेवणारा हाटेलवाला किंवा दुकानदार हा कोंकणातला नसून बाहेरुन आलेला धंदेवाईक आहे किंवा उत्तम जुन्या कोंकणी व्यावसायिकाची पुढची पिढी आहे हे ओळखून असावे. किमान दोन तासांच्या ऑर्डरीने मोदक बनवून देणार्‍या अनेक माऊल्या आहेत गणपतीपुळ्याला. पण ऐनवेळी हवे म्हणाल तर नाहीच शक्य. इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे.. बाकी पुण्यांत लोक कोंकणातूनच आलें आहेत असें आमचें म्हणणें आहें.

In reply to by गवि

मेघवेडा 12/10/2012 - 13:49
इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे..
मला वाटते ते वझ्यांनी 'काय कटकटै.. एकदा सांगून कळत नाही का' असं वाटून वैतागून दिलेले उत्तर असावे. ही जय गणेश खानावळ नक्की नाही. पोष्टाफिसाजवळची वझेंची खानावळ ही. तेच ते! :) बाकी यशोमतीमैय्याच्या वाक्यावाक्याशी शमत.

In reply to by यशोधरा

रेवती 12/10/2012 - 21:04
कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे हे आधी नाही सांगायचेस? मला वाटायचे माझेच आहे म्हणून. बरं झालं योग्य माहिती मिळाली. ;)

पाषाणभेद 10/10/2012 - 09:49
+१००-१ किस्से एकदम झकास. लेखकाने लेखात लग्नाळू असल्याचे जाणवून दिले आहे.

In reply to by पाषाणभेद

मृत्युन्जय 10/10/2012 - 10:15
दया करा देवा. एका लग्नात वाट लागली आहे. पुनःश्च लग्नाळू कशापायी करताय? सगळे किस्से अंमळ काही काळापुर्वीचे असल्याने काही संदर्भ तसे आले असावेत कदाचित (उदा. मी तरूण असण्याचे. पण तसा मी अजुनही तरुणच आहे ;) )

समीरसूर 10/10/2012 - 15:29
आवडले किस्से. :-) एका फुले विकणार्‍या दुकानात मध्ये गेलो होतो. तिथे एक बाई हार तयार करत बसली होती. वय साधारण ५०-५५ च्या आसपास असावे. "मावशी, फुले द्या थोडी बांधून" "......." माझ्याकडे त्या बाईने ढुंकूनही पाहिले नाही. मी तिच्या प्रतिसादाची वाट बघत थांबलो. मला वाटलं हातातले फूल ओवल्यानंतर तरी ती माझ्याकडे बघेल पण कसले काय. कॉलेजात सुंदर मुलीने आपल्याकडे बघावे यासाठी मी जितका आसुसलेलो नव्हतो तितका त्यावेळी त्या बाईने माझ्याकडे बघावे म्हणून अधीर झालो होतो. मला घाई होती. बाबा पूजा करण्यासाठी बसले होते आणि फुलेच नाहीत असे लक्षात आल्यावर ते खट्टू झाले. मी त्यांना म्हटले तुम्ही पूजा सुरु करा मी पटकन घेऊन येतो. फुलांशिवाय पूजा म्हणजे सोड्याशिवाय व्हिस्की! किंवा चिकनशिवाय पार्टी! "मावशी, फुलं द्या ना लवकर" मी पुन्हा म्हटले. मावशी तरीही हलल्या नाहीत. "मावशी, फुलं देताय ना?" मी पुन्हा म्हटले. तरीही (आई शप्पथ सांगतो, खोटं असल्यास पुढच्या जन्मी मी आफ्ताब शिवदासानी व्हायला तयार आहे) मावशी ढिम्म! थोड्या वेळाने डास जास्त गुणगुण करायला लागल्यावर आपण ज्या त्रासिक मुद्रेने पाहतो तसं तिने माझ्याकडे पाहिलं. नुसतंच कपाळ उडवून तिने काय पाहिजे (काय ताप आहे डोक्याला असंच म्हणायचं होतं बहुतेक तिला) असं विचारलं. "फुलं" तिने बांधून दिले. "किती झाले?" "....." "किती द्यायचे?" "...." मावशी पुन्हा मनमोहन सिंग झाल्या. मी भीतभीतच दहाची नोट पुढे केली. अशी माणसे खवळली तर भरतीच्या समुद्रापेक्षा बुडाऊ असतात असे ऐकले आहे. "किती?" मी नोट पुढे करत असतांना पुन्हा क्षीणपणे विचारले. "दह्ह्हा" तिने तिच्या सुमधुर आवाजात सांगीतले. मी पुडी उचलली आणि तिथून अदृष्य झालो. :-)

पैसा 12/10/2012 - 21:23
लय भारी किस्से! पुणे आणि पुणेकरांना काही पण म्हणा, कोकण्यांना नावं ठेवायचं काम नाय! :D

सोत्रि 12/10/2012 - 22:28
तुमची साइझ काय आहे ते नाही सांगितलेत असला हलकट प्रश्न विचारणार्‍यांचा अपमान केला जाइल हे लक्षात घ्यावे
ज्यांना तुमचे प्रत्त्यक्ष दर्शन झाले आहे त्यांना हा प्रश्न पडणार नाही :P - ('त' वरून ताकभात ओळखणारा हलकट) सोकाजी

In reply to by सोत्रि

मृत्युन्जय 13/10/2012 - 10:17
च्यामारी प्रत्यक्ष ओळखणार्‍यांना माझा साइझ कसा कळणार म्हणे. स्पष्ट लिही रे सोक्या नाय तर लोकांचा गैरसमज व्हायचा माझ्याबद्दल ;) बादवे मला तुझ्या प्रतिसादावरुन एकदम वन टु थ्री मधला परेश रावल आठवला. त्याच्या अंडरगार्मेंट्स चा व्यवसाय असतो आणि तोही असाच माणूस बघुन कच्छे बनियान चा साइझ सांगत असतो :P

मृत्युन्जय 13/10/2012 - 10:22
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. धागा वाचुन प्रचंड जळजळ होउनही प्रतिसाद न दिलेल्यांचे डब्बल धन्यवाद. त्यामुळे धागा ट्रॅकवर राहिला ;) असो. कोकणावर कुठलीही टीका न करताही कोकणाच्या अस्मितेला धक्का पोचल्याबद्दल इतकी नाराजी व्यक्त होउ शकते तर उठसुट पुण्यावर टीका करुनही थोडी जरी नाराजी व्यक्त केली तर त्याला खाजुन अवधान आणणे असे का म्हटले जाते ते कळत नाही. ;) चला पुरेसे तेल ओतुन झाले आहे. अजुन १० प्रतिक्रिया देउन धाग्याची हाफ सेंचुरी पुर्ण व्हायला किमान हरकत नाही आता. मग मी टेचात सांगु शकेन की आजकाल माझे धागे किमान हाफ सेंच्युरी तरी मारतातच ब्वॉ. :D :P

गणपा 09/10/2012 - 18:59
किस्से धमाल आहेत, पण...(तोच सागेगम फेम देवकी पंडितवाला)
केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर इतका अपमान सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो.
ह्याची काय गरज होती? ट्यार्पी खेचायला ? ;) मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.

In reply to by गणपा

५० फक्त 10/10/2012 - 05:49
तुम्ही जर मालवणातल्या गणेश देवळामागच्या खाणावळीबद्दल बोलत असाल तर,जे झालं त्यात अपमान असण्यासारखं काही नाही, त्या खानावळीच्या जेवणाला आणि ते बनवणा-याला लाख लाख सलाम, उकडीचे मोदक, कढी, लिंबाचं लोणचं(लोकल)आणि भात असं लिमिटेड जेवण जेवलोय तिथं, एवढ्या साध्या पदार्थात जो जीव ओतला होता त्यांचं नाव ते... लईच्च बेकार.

In reply to by गणपा

मुळात सदर प्रसंगात खाणावळ चालकाने कुठलाही अपमान केल्याचे दिसत नाही.
सहमत. "केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर गिऱ्हाइकाविषयी इतकी बेपर्वाई सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो." हे वाक्य जास्त योग्य ठरलं असतं.

यशोधरा 10/10/2012 - 08:37
काजूची उसळ खरेच प्रत्येक सीझनमध्ये मिळू शकत नाही आणि उकडीचे मोदक बनवायला खरोखरच वेळ लागतो. कोकणात तयार सुवासिक पिठीपासून बनवत नैत मोदक. :P त्या हाटेलवाल्या काकांच काही चुकलं नै. तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची! :P आणि शेवटी अतिसौजन्यसप्ताहवाल्याच्या हाटेलाचाच पंचनामा झाला म्हणायचा. तात्पर्यः बिजिनेस करताना फक्त गोड बोलून काम साधत नाही, तेथे पाहिजे कामसूपणाचे, येरा आळशाचे काम नाही!

In reply to by यशोधरा

मृत्युन्जय 10/10/2012 - 10:21
शमत आहे. पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. बर्‍याच वेळा बर्‍याच ठिकाणी तसे ते तयारच असतात. कोकणात गेल्यावर उद्या कोणी मासे आहेत का असे विचारल्यावर " मासे काय असे लगेच मिळतात का हो? आधी जाळे टाकावे लागते, मासे पकडावे लागतात, चांगले मासे निवडुन सोलावे लागतात, मसाला तयार करुन मासे त्याच्यात घोळवावे लागतात. बरीच मोठी प्रक्रिया आहे ती." असे जर कोणी सांगितले तर मी तरी त्या इसमापुढे हात टेकीन.
तुम्ही शहरी टॅचात गेला असाल बोलायला, त्यांनी कोअक्णी टाचणी लावून हवा काढली असेल तुमची!
याच्याशीही शमत आहे. पण मग पुणेरी टाचणी लागल्यावर लोकांची एवढी मळमळ का होते तेच समजत नाही (हे तुझ्यासाठी नाही. नाहितर मारशील मला)

In reply to by मृत्युन्जय

५० फक्त 10/10/2012 - 10:47
पण कोकणात शेकडो वेळा जाउन आल्यावर उकडीचे मोदक सकाळी सांगुन दुपारी मिळतात. - याच्याशी सहमत. ब-याच ठिकाणी दिवे आगार / दापोली - बापट दोन्हीकडे ,मालवणला मयेकर / वर उल्लेख केलेली गणेश मंदिरामागची खानावळ, इथं तर संध्याकाळी जेवणात किती मोदक हवेत याची ऑर्डर दुपारी द्यावी लागते, तरच संध्याकाळी तेवढेच मोजुन तेवढेच मोदक मिळतात.

In reply to by मृत्युन्जय

यशोधरा 10/10/2012 - 12:51
आमच्यासमोर कोकण आणि पुण्यास नावे ठेवू नये. कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे :) मोदक असतात रे तयार, पण ते नेहमीचा तसा व्यवसाय असला तरच असतील असे वाटते मला. नाहीतर कोकणात ते सगळे बनवायचेही फार कष्ट असतात. म्हणजे पहा, नारळ पाडायचा, मग सोलायचा, मग खोबरे खवायचे, त्याच्या पाण्याने ती उकड मळायची.... बरेच निगुतीने बनतात ह्या रेश्प्या. त्यामुळे ते करुन ठेवणे सगळ्यांनाच परवडेल असे नै.

In reply to by यशोधरा

गवि 10/10/2012 - 13:16
अत्यंत सहमत. आधीच तयार केलेले थंडगार मोदक स्टॉलवर /जाळीच्या झाकणाखाली बटाटेवड्यांसारखे मांडून ठेवणारा हाटेलवाला किंवा दुकानदार हा कोंकणातला नसून बाहेरुन आलेला धंदेवाईक आहे किंवा उत्तम जुन्या कोंकणी व्यावसायिकाची पुढची पिढी आहे हे ओळखून असावे. किमान दोन तासांच्या ऑर्डरीने मोदक बनवून देणार्‍या अनेक माऊल्या आहेत गणपतीपुळ्याला. पण ऐनवेळी हवे म्हणाल तर नाहीच शक्य. इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे.. बाकी पुण्यांत लोक कोंकणातूनच आलें आहेत असें आमचें म्हणणें आहें.

In reply to by गवि

मेघवेडा 12/10/2012 - 13:49
इथे वर्णन केलेली दोन दिवसांची आगाऊ मागणीची अपेक्षा मात्र नक्कीच "अत्ति" आहे..
मला वाटते ते वझ्यांनी 'काय कटकटै.. एकदा सांगून कळत नाही का' असं वाटून वैतागून दिलेले उत्तर असावे. ही जय गणेश खानावळ नक्की नाही. पोष्टाफिसाजवळची वझेंची खानावळ ही. तेच ते! :) बाकी यशोमतीमैय्याच्या वाक्यावाक्याशी शमत.

In reply to by यशोधरा

रेवती 12/10/2012 - 21:04
कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे हे आधी नाही सांगायचेस? मला वाटायचे माझेच आहे म्हणून. बरं झालं योग्य माहिती मिळाली. ;)

पाषाणभेद 10/10/2012 - 09:49
+१००-१ किस्से एकदम झकास. लेखकाने लेखात लग्नाळू असल्याचे जाणवून दिले आहे.

In reply to by पाषाणभेद

मृत्युन्जय 10/10/2012 - 10:15
दया करा देवा. एका लग्नात वाट लागली आहे. पुनःश्च लग्नाळू कशापायी करताय? सगळे किस्से अंमळ काही काळापुर्वीचे असल्याने काही संदर्भ तसे आले असावेत कदाचित (उदा. मी तरूण असण्याचे. पण तसा मी अजुनही तरुणच आहे ;) )

समीरसूर 10/10/2012 - 15:29
आवडले किस्से. :-) एका फुले विकणार्‍या दुकानात मध्ये गेलो होतो. तिथे एक बाई हार तयार करत बसली होती. वय साधारण ५०-५५ च्या आसपास असावे. "मावशी, फुले द्या थोडी बांधून" "......." माझ्याकडे त्या बाईने ढुंकूनही पाहिले नाही. मी तिच्या प्रतिसादाची वाट बघत थांबलो. मला वाटलं हातातले फूल ओवल्यानंतर तरी ती माझ्याकडे बघेल पण कसले काय. कॉलेजात सुंदर मुलीने आपल्याकडे बघावे यासाठी मी जितका आसुसलेलो नव्हतो तितका त्यावेळी त्या बाईने माझ्याकडे बघावे म्हणून अधीर झालो होतो. मला घाई होती. बाबा पूजा करण्यासाठी बसले होते आणि फुलेच नाहीत असे लक्षात आल्यावर ते खट्टू झाले. मी त्यांना म्हटले तुम्ही पूजा सुरु करा मी पटकन घेऊन येतो. फुलांशिवाय पूजा म्हणजे सोड्याशिवाय व्हिस्की! किंवा चिकनशिवाय पार्टी! "मावशी, फुलं द्या ना लवकर" मी पुन्हा म्हटले. मावशी तरीही हलल्या नाहीत. "मावशी, फुलं देताय ना?" मी पुन्हा म्हटले. तरीही (आई शप्पथ सांगतो, खोटं असल्यास पुढच्या जन्मी मी आफ्ताब शिवदासानी व्हायला तयार आहे) मावशी ढिम्म! थोड्या वेळाने डास जास्त गुणगुण करायला लागल्यावर आपण ज्या त्रासिक मुद्रेने पाहतो तसं तिने माझ्याकडे पाहिलं. नुसतंच कपाळ उडवून तिने काय पाहिजे (काय ताप आहे डोक्याला असंच म्हणायचं होतं बहुतेक तिला) असं विचारलं. "फुलं" तिने बांधून दिले. "किती झाले?" "....." "किती द्यायचे?" "...." मावशी पुन्हा मनमोहन सिंग झाल्या. मी भीतभीतच दहाची नोट पुढे केली. अशी माणसे खवळली तर भरतीच्या समुद्रापेक्षा बुडाऊ असतात असे ऐकले आहे. "किती?" मी नोट पुढे करत असतांना पुन्हा क्षीणपणे विचारले. "दह्ह्हा" तिने तिच्या सुमधुर आवाजात सांगीतले. मी पुडी उचलली आणि तिथून अदृष्य झालो. :-)

पैसा 12/10/2012 - 21:23
लय भारी किस्से! पुणे आणि पुणेकरांना काही पण म्हणा, कोकण्यांना नावं ठेवायचं काम नाय! :D

सोत्रि 12/10/2012 - 22:28
तुमची साइझ काय आहे ते नाही सांगितलेत असला हलकट प्रश्न विचारणार्‍यांचा अपमान केला जाइल हे लक्षात घ्यावे
ज्यांना तुमचे प्रत्त्यक्ष दर्शन झाले आहे त्यांना हा प्रश्न पडणार नाही :P - ('त' वरून ताकभात ओळखणारा हलकट) सोकाजी

In reply to by सोत्रि

मृत्युन्जय 13/10/2012 - 10:17
च्यामारी प्रत्यक्ष ओळखणार्‍यांना माझा साइझ कसा कळणार म्हणे. स्पष्ट लिही रे सोक्या नाय तर लोकांचा गैरसमज व्हायचा माझ्याबद्दल ;) बादवे मला तुझ्या प्रतिसादावरुन एकदम वन टु थ्री मधला परेश रावल आठवला. त्याच्या अंडरगार्मेंट्स चा व्यवसाय असतो आणि तोही असाच माणूस बघुन कच्छे बनियान चा साइझ सांगत असतो :P

मृत्युन्जय 13/10/2012 - 10:22
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. धागा वाचुन प्रचंड जळजळ होउनही प्रतिसाद न दिलेल्यांचे डब्बल धन्यवाद. त्यामुळे धागा ट्रॅकवर राहिला ;) असो. कोकणावर कुठलीही टीका न करताही कोकणाच्या अस्मितेला धक्का पोचल्याबद्दल इतकी नाराजी व्यक्त होउ शकते तर उठसुट पुण्यावर टीका करुनही थोडी जरी नाराजी व्यक्त केली तर त्याला खाजुन अवधान आणणे असे का म्हटले जाते ते कळत नाही. ;) चला पुरेसे तेल ओतुन झाले आहे. अजुन १० प्रतिक्रिया देउन धाग्याची हाफ सेंचुरी पुर्ण व्हायला किमान हरकत नाही आता. मग मी टेचात सांगु शकेन की आजकाल माझे धागे किमान हाफ सेंच्युरी तरी मारतातच ब्वॉ. :D :P
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

क क कपलचा - भाग ०९

५० फक्त ·

बॅटमॅन 26/09/2012 - 11:24
>>आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it' हे सर्वांत जबरा!!!!!!

प्रचेतस 26/09/2012 - 13:25
मस्त चाललीय कथा. फ्लॅशबॅकचा वापर अगदी सुरेख केलाय. कथानकात फारसे काही घडत नसूनही प्रत्येक भागात नवा ट्विस्ट निर्माण होतोय आणि पुढच्या भागाची उत्सुकता वाढतीय.

साती 27/09/2012 - 11:46
एकदम वेगळा विषय अतिशय संयतपणे मांडताय याबद्दल कौतुक!

रेवती 28/09/2012 - 06:50
कथा संपली का? मला तरी संपल्यासारखी वाटत आहे. हे असं वाचताना कसंसच होतं एवढं खरं.

बॅटमॅन 26/09/2012 - 11:24
>>आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it' हे सर्वांत जबरा!!!!!!

प्रचेतस 26/09/2012 - 13:25
मस्त चाललीय कथा. फ्लॅशबॅकचा वापर अगदी सुरेख केलाय. कथानकात फारसे काही घडत नसूनही प्रत्येक भागात नवा ट्विस्ट निर्माण होतोय आणि पुढच्या भागाची उत्सुकता वाढतीय.

साती 27/09/2012 - 11:46
एकदम वेगळा विषय अतिशय संयतपणे मांडताय याबद्दल कौतुक!

रेवती 28/09/2012 - 06:50
कथा संपली का? मला तरी संपल्यासारखी वाटत आहे. हे असं वाचताना कसंसच होतं एवढं खरं.
3