मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धिस इज द सिस्टीम !

सस्नेह ·

आयुर्हित 26/01/2014 - 00:27
धन्य आहात आपण ! कोणत्या मातीचे असतात आपल्यासारखे अधिकारी? कमाल आहे आपल्या सहनशक्तीची. कोटी कोटी प्रणाम!!!!

सरकारी काम आणि सहा महिने थांब. सरकारी खाती, महानगरपालिका वगैरे कचेर्‍यांमध्ये प्रामाणिक अधिकार्‍यांचीही कशी गळचेपी होते ह्याचे ज्वलंत उदाहरण.

राही 26/01/2014 - 10:54
टेबलाअलीकडची बाजू. म्हणूनच सरकारी यंत्रणेला सरसकट धारेवर धरायला लेखणी धजत नाही.

विजुभाऊ 26/01/2014 - 12:03
सरकारी यंत्रणेबद्दल आदर आहे. बरेचदा कर्मचारी खरेच खूप सहनशील असतात. वरील कथेत ग्राहक म्हणून चांडकांचे काही चूक आहे असे वाटत नाही त्यांचे युनीट जर फ्यूज अभावी बंद रहात असेल तर त्यानी तरी काय करायचे.

In reply to by विजुभाऊ

सस्नेह 26/01/2014 - 18:07
ते लिहिले नाही मी. त्यांचे युनिट बंद पडले नव्हते. फक्त बॉक्स गरम होत होती. बंद असते तर वेगळी अ‍ॅक्शन घ्यावी लागली असती.

In reply to by सस्नेह

उपाशी बोका 30/01/2014 - 11:49
>> फक्त बॉक्स गरम होत होती. म्हणजे हा प्रकार युनिट बंद पडण्याइतका गंभीर न्हवता, असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

In reply to by उपाशी बोका

सस्नेह 30/01/2014 - 22:19
हा बॉक्स येणार्‍या जाणार्‍यांच्या पोहोचेपासून दूर असतो. अन खोडसाळपणा न केल्यास त्यापासून प्राणांतिक धोका होऊ शकत नाही.

प्यारे१ 26/01/2014 - 12:32
कटकट आहे राव! ह्यांचं चुकलं म्हणावं तर त्यांची बाजू दिसते, त्यांचं चुकलं म्हणावं तर ह्यांची बाजू दिसते, दोन्ही चुकलं म्हणावं तर काम अडतं.... मॅडम, बघा की जरा लौकर. मिसेस नं हळदीकुंकू ठेवलंय. या की घरी, साहेबांना घेऊन!

बाबा पाटील 27/01/2014 - 13:04
जरा पोलिस आणी महसुल खात्याचे अनुभव कुनी तरी टाका रे, एक से बढकर एक नमुने बरले गेले आहे तिथे. सहा महिने चकरा मारल्या की अनुभव विश्व एकदम समृद्ध होते.

सुहास.. 27/01/2014 - 15:37
छान !! आमच्या संगतीत आहेस याचा अभिमान ही वाटला ( उगा खोटे कशाला बोलु ) अवांतर : एक राजकारणी म्हणुन सरकारी अधिकार्‍यांशी आलेले अनुभव लवकरच मिपावर )

सरकारी अधिकारीही माणुसच असतात हे मान्य असले तरी, वैयक्तीक स्वार्थ मधे न आणता नेमून दिलेले काम प्रामाणिक पणे करणारे सरकारी अधिकारी दुर्मिळातले दुर्मिळ असतात आणि त्यावरही त्या कळपात राहुन संवेदनाक्षमता जपणे म्हणजे किती अवघड काम. असे अधिकारी भेटले की बरं वाटत. विक्रीकर विभागातही मला असेच एक संवेदनाशील अधिकारी भेटले होते. अजुनही तिकडे गेलो की त्यांना न चुकता भेटुन येतो.

arunjoshi123 28/01/2014 - 13:28
छान लेख. सरकारी व्यवस्था अपूर्णपणे आखलेली असते आणि जास्तीत जास्त लोक कामातले नाविन्य हाताळायला अक्षम असतात.

सस्नेह 29/01/2014 - 22:31
सर्व प्रतिसादकांचे आभार ! इथे मला अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकता तत्परता इ. पेक्षा यंत्रणा सुधारण्याची गरज अधोरेखित करायची होती. सरकारी यंत्रणेत गेल्या साठ-सत्तर वर्षात ब्रिटीश काळापेक्षा फार सुधारणा झाल्या आहेत असे वाटत नाही. सत्तेचे केंद्र, धोरणात्मक निर्णय जिथे होतात, त्यापेक्षा फार वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या परिस्थितीत अंमलात आणले जातात. क्षेत्रिय गरजा, व्यवहार्यता, समस्या सत्ताकेंद्रातल्यांना कधीच समजून घ्यावाश्या का वाटत नाहीत ? साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते. खाजगीकारण हा याला खरंच योग्य पर्याय आहे का ? सरकारी सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय का विचारात घेतला जात नाही ? य अन अशा अनेक शंका मनात येतात म्हणून हे यानिमित्ताने लिहिले. सरसकट अशीच परिस्थिती सर्व सरकारी खात्यात असेल असेही नाही. पुन्हा एकदा आभार.

In reply to by सस्नेह

आदूबाळ 29/01/2014 - 22:53
साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते.
हा अनुभव खाजगी क्षेत्रात पण येतो.

साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते. खाजगीकारण हा याला खरंच योग्य पर्याय आहे का ? सरकारी सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय का विचारात घेतला जात नाही ? सरकारी असो अथवा खाजगी, ज्या संस्थाचे लक्ष्य फलनिष्पत्ती असते (आउटकम-ओरिएंटेड ऑर्गॅनायझेशन्स) तेथे असा केंद्र आणि फिल्डचा संघर्ष आपोआप कमी होतो. सरकारी संस्थांत बहुतेक वेळेस वरच्या पदावर बसलेल्यांना हवी असलेली फलनिष्पत्ती (आउटकम) आणि प्रत्यक्ष काम करणार्‍यांना योग्य वाटत असलेल्या फलनिष्पत्तीत असलेल्या फरकाने हा संघर्ष (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) होतो. कारण वरिष्ठाना हवी असलेली फलनिष्पत्ती प्रत्यक्ष काम करणार्‍यांना स्पष्ट सांगितली जात नाही अथवा ती स्पष्ट सांगणे सोईचे नसते. लेखातल्या उदाहरणात साहेबांनी लेखिकेला अगोदर दाखवलेले "खायचे दात" आणि नंतर गिर्‍हाईकासमोर दाखवलेले "दाखवायचे दात", हे याचे उत्तम उदाहरण आहे. खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे प्रमाण कमी असते कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते. अर्थात बारकाव्यात गेल्यास यालाही (स्वार्थ, कंपूबाजी, वगैरेमुळे) अपवाद असू शकतात... पण सरकारी संस्थांपेक्षा खूप कमी प्रमाणात आणि कमी तीव्रतेचे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आदूबाळ 30/01/2014 - 00:41
खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे प्रमाण कमी असते कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते.
पण हे अर्धसत्य आहे. बोनस आणि प्रगती बर्‍याचदा इतर फॅक्टर्सवर अवलंबून असते. तुम्ही जर कंपनीचे अन्नदाते (प्रॉफिट सेंटर) असाल तर तुमचं काम आणि बोनस/प्रगतीमध्ये थेट संबंध असू शकतो. (कंपूबाजी, राजकारण वगैरे अलाहिदा). मात्र तुम्ही जर कंपनीचे अन्नखाते (कॉस्ट सेंटर) असाल तर कंपनीचं ध्येय तुमच्यावर होणारा खर्च कमी कमी करत जाणे (कामावर परिणाम होऊ न देता, अर्थात) असं आहे. मग बोनस/प्रगतीला एक मर्यादा पडते. लोकांचं ध्येय बदलतं. उदा. माझ्या पहाण्यातले खाजगी क्षेत्रातलेही बरेच लोक "काहीही झालं तरी सहाला हपीसातून निघायचं म्हणजे निघायचंच" हा निश्चय करतात आणि पाळूनसुद्धा दाखवतात!

In reply to by आदूबाळ

मात्र तुम्ही जर कंपनीचे अन्नखाते (कॉस्ट सेंटर) असाल तर कंपनीचं ध्येय तुमच्यावर होणारा खर्च कमी कमी करत जाणे (कामावर परिणाम होऊ न देता, अर्थात) असं आहे. मग बोनस/प्रगतीला एक मर्यादा पडते. याचे उत्तर माझ्या वरच्या प्रतिसादाच्या खालील वाक्यात आहे. कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते. आउटकम ओरिएंटेड संस्थांत ज्या विभागांचा / कर्मचार्‍यांचा प्रभाव आऊटकमवर (संस्थेचा म्हणजेच पर्यायाने भागधारकांचा फायदा) जास्त त्यांच्याकडे आपोआप जास्त लक्ष आणि जास्त फायदा (बेनेफिट्स) जातात. अर्थात प्रॉफिट सेंटर्सकडे जास्त लक्ष आणि केवळ कॉस्ट सेंटर्स असलेल्या सपोर्ट विभागांकडे (उदा अन्नखाते, इ) कमी लक्ष हे सहाजिकपणे होते. येथे ते "बरोबर आहे की चूक" हा मुद्दा नसुन "अशी वस्तुस्थिती का निर्माण होते त्याचे विश्लेशण आहे". अवांतरः आपले कामाचे क्षेत्र निवडताना वरची वस्तूस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय करणे फायद्याचे ठरते. अन्नखाते हे मुख्य व्यवसाय (कोअर आक्टिविटी) असलेल्या कंपनीत, उदा. आतिथ्य व्यवसायातल्या संस्थात (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, इ) प्रॉफिट सेंटर असते तर इतर बहुतेक व्यवसायातल्या संस्थात (आयटी, मेकॅनिकल इंजिनियरिंग, सेवा पुरवणारी ऑफिसेस, इ) कॉस्ट सेंटर असते. ज्याला अन्नक्षेत्रात प्रगती करायची असेल त्याने प्रॉफिट सेंटरमध्येच शिरकाव केला तर निराशेने ध्येय बदलण्याची पाळी येण्याची शक्यता बरीच कमी होईल.

अभ्या.. 30/01/2014 - 14:53
मस्त लिखाण स्नेहातै. एकूणच असे जाणवतेय की नोकरीच्या नव्या ठिकाणी रुळलीयस चांगलीच. :) नावे अन ठिकाण तर एकदम परिचयाचे. ;) बाकी काम करणारे माणूस बरोबर हेरणारा बार्शीचा गुण कळला दिसतोय. ;)

निशदे 31/01/2014 - 05:20
शक्यतो टेबलाच्या 'इकडच्या' बाजूला असल्यामुळे टेबलाच्या 'तिकडे' असणार्‍यांबद्दल सहानुभूती वाटत नाही. तुमच्या लेखाने ती जाणीव करून दिली. तुमची खुसखुशीत लेखनशैली बोनस...... :)

सुबोध खरे 31/01/2014 - 11:36
सरकारी खात्यात विशेषतः जिथे जनतेशी संपर्क असतो तेथे आपल्या कामाला पोचपावती मिळणे अशक्य असते.(आपण कधी रेल्वेच्या आरक्षण खिडकीवरील माणसावर खूश झाल्याचे आठवते काय? पण त्याला आपल्यापैकी १००टक्के लोकानी कधी ना कधी शिव्या घातल्या असतीलच). पण आपले वरिष्ठ हुशार असल्याने श्रेय उपटतात आणि तक्रारी आपल्या माथ्यावर फोडतात हे फार वेळा अनुभवायला मिळते. यावर उपाय एकाच आपले कागदी घोडे उत्तम नाचवायचे आणि अशा व्ही आय पी समोर नांगी न टाकता सत्य सरळ पुढे ठेवायचे यात वरिष्ठ आपल्यावर नाराज होतातच परंतु पुढस्यावेळी आपल्याला तोफेच्या तोंडी देताना तीन वेळा विचार करतात. हे धोरण मी अठरा वर्षे राबविले त्यामुळे सहसा मला लोकांसमोर आपली नाचक्की करून घ्यावी लागली नाही.वरिष्ठ उगाच ओरडत असेल तर मी सरळ व्ही आय पी समोर त्यांचे पितळ उघडे करीत असे. शिवाय हा माणूस कोणापुढे काहीही बोलतो अशी "ख्याति" असल्यामुळे आपले नजीकचे वरिष्ठ स्वतः ची चामडी वाचवण्यासाठी उगाच उच्च पदस्थानसमोर माझे उणे दुणे काढण्या पुर्वी तीनदा विचार करीत असत.सरकारी नोकरी असल्यामुळे माझी बढती किंवा नोकरी याला वरिष्ठ हात लावू शकत नव्हते.शिवाय मला सरकारी नियम आणि कायदे वरिष्ठाणपेक्षा नक्कीच जास्त माहित होते.थोडक्यात धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी सोय आपण करून ठेवायची.म्हणजे सरकारी नोकरी सुखात करता येते. विस्तार भयापायी उदाहरणे देत नाही

In reply to by सुबोध खरे

उपाशी बोका 05/02/2014 - 09:30
सरकारी नोकरी असल्यामुळे माझी बढती किंवा नोकरी याला वरिष्ठ हात लावू शकत नव्हते.
हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे होते काय की बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये कामचुकारपणा करण्याची प्रवृत्ती दिसून येते.

In reply to by उपाशी बोका

सुबोध खरे 05/02/2014 - 09:49
अगदी शंभर टक्के.सरकारी नोकरी मध्ये असलेले अमर्याद संरक्षण हे कामचुकार पणा आणि माज याला कारणीभुत आहे असे मेज़ स्पश मत आहे.खाजगी संस्था मध्ये आपली नोकरी जाउ शकते या भितीने लोक काम करतात नियमात राहतात वेळेत येतात आणि जातात. सरकारी नोकरीत केंव्हाही या किंवा जा काम करा अथवा करू नका. युनियन चे संरक्षण असतेच. सरकारी नोकराला तुम्ही काढून टाकू शकत नाही त्याची बढती फारतर एखादे वर्ष थांबवू शकता ते सुद्धा त्याला किचकट अशी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया केल्यावर. त्यामुळे आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असा माज असतो. मी स्वतः सरकारी नोकरीत १८+ वर्षे राहून हे तुम्हाला सांगू शकतो. मुम्बईच्या आयुक्ताच्या पातळीचा अधिकारी असलेला माझा कमांडींग ओफिसर त्याला मी तोंडावर सांगितले की तुम्ही दिलेला बेकायदेशीर आदेश मी मानत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. त्याला काहीही करता येत नव्हते.(अर्थात त्याचा आदेश मुळात बेकायदेशीर असल्याने काही करावे अशी त्याची हिम्मत नव्हती हा भाग अलाहिदा)

तिमा 02/02/2014 - 14:46
तारापूर औद्योगिक वसाहतीत आमचा(म्हणजे आमच्या मालकांचा)कारखाना होता. काहीही इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला की 'पटवलेला' मराविम चा कर्मचारी एका तासाच्या आंत फौज घेऊन येई आणि दुरुस्त करी. अट एवढीच की जो पार्ट गेला असेल त्याचे आम्ही बाजारभावाने पैसे द्यायचे, त्याने मात्र तो पार्ट मराविम च्या स्टोअर मधून इश्यू केलेलाच असे. आमच्या दृष्टीने, नियमानुसार गेल्यास जो वेळ लागायचा, ते उत्पादनाचे तास वाया घालवणे आम्हाला परवडत नसे. बहुतेक सगळ्या कंपन्या हेच करायच्या.

In reply to by तिमा

अर्धवटराव 05/02/2014 - 10:19
एखादा नियम, क्लॉज आज जे पांढरं आहे त्या उद्या काळं करतो आणि उलट देखील. त्याबरह्कुम एखाद्याची खादी आज स्वच्छ तर उद्या मळकी होते किंवा अचानक धुतल्या जाते. मला मुळातच खरेदी-विक्री प्रकारात भ्रष्टाचार का शोधला जातो हे कळत नाहि.

मारकुटे 05/02/2014 - 10:04
समजा.. समजा हं... त्याने तुम्हाला पैसे दिले असते किंवा तुमच्या हाताखालच्या किंवा वरच्याला दिले असते तर त्याचे काम पटकन झाले असते ना?

In reply to by मारकुटे

सस्नेह 05/02/2014 - 11:45
हे म्हणजे, तुम्ही दारू पिणे कधी सोडलेत ? अशापैकी झाले. वेल, या प्रश्नाचे सरसकटीकरण होऊ शकत नाही. सरकारी नोकरीत खाजगीप्रमाणेच काळे-गोरे आलेच. पण काम करणारे लोक कसेही काम करतातच अन न करणारे (पैसे घेऊनही) करत नाहीत असा अनुभव आहे. नुळात आपण पैसे देऊ करणे हाच अपराध आहे. योग्य मार्गाने गेले अन सिस्टिमचे कायदेकानून समजून घेतले तर विलंबाने का होईना, काम होतेच. कोणतेही काम 'पटकन' होण्यासाठी शॉर्टकट शोधणारे लोक पैशाचा वापर करतात अन नवी 'सिस्टीम' बनवतात. अशा सिस्टीमचा प्रामाणिक अधिकारी अन ग्राहक यांना त्रास होतो.

In reply to by सस्नेह

मारकुटे 06/02/2014 - 13:46
>>> योग्य मार्गाने गेले अन सिस्टिमचे कायदेकानून समजून घेतले तर विलंबाने का होईना, काम होतेच. विलंब होण्याचे कधीही कारण नसते, ते शोधले जाते नियमांचा आधार घेत

बाबा पाटील 08/02/2014 - 12:56
एका कायदेशिर कामाकरिता स्थानिक पोलिस अधिकार्‍याचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते.संबधित अधिकार्‍याला काय प्रॉब्लेम होता माहित नाही,सुरुवातीला प्रथम त्यांना भेटल्यावर तुम्ही नामांकित डॉक्टर आहात्,तुम्हाला अडवण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले व दोन दिवसांनी येउन सह्या करा फाइल डी.वाय.एस.पी.कडे पाठवतो म्हणुन सांगितले,दोन दिवसांनी गेल्यावर कळले साहेब १० दिवसांच्या सुट्टीवर गेलेत.ते आल्याशिवाय काम होणार नाही.परत १० दिवासांनी गेलो तर साहेबांचे काय डोके फिरले माहित नाही जो हवलदार कागदपत्रांचची पुर्तता करुन सही करिता त्यांच्या समोर गेला त्याला माझ्यासमोरच आई माई वरुन शिव्या घातल्या व अश्या सह्या मी करत नाही.असे मला सांगितले,याच्या आयला भोसडीच्याला काय काळे कुत्रे चावले मलाही कळले नाही.मग जवळच्या एका तहसिलदार मित्राला सांगितले त्यांनी फोन केल्यावर म्हटले की त्यांच्या फाइल मध्ये काहीच अडचन नाही फाइल पाठवतो.झाल यात पुर्ण दोन महिने गेले.शेवटी फाइल जागच्या जागीच नंतर त्यांच्याच हवलदाराने सांगितले कुनीतरी वरिष्ठ अधिकारी अथवा राजकारणी व्यक्तीला सांगा साहेब काम करतील. काम पुर्णतः कायदेशिर मग अडचण काय विचारल्यावर जे उत्तर मिळाले ते एकदम भारी होते."साहेब एडा आहे"इती हवलदार. आयच्या गावात आता अश्या अधिकार्‍याचे काय करायचे.शेवटी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे विषय मांडला,तत्काळ कारवाईचे आदेश निघाले,तरी एका सहायक पोलिस निरीक्षकाने त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या,मंत्र्यांच्या ओ.एस.डी.ला चक्क दिशाभुल करणारी खोटी उत्तरे दिली गेली.शेवटी साहेबाची दुरच्या जिल्ह्यात बदली झाली. त्यानंतर काम झाले पण या साहेबाने का ? कश्यासाठी ? कोठले हितसंबध साहेबाला जपायचे होते ? हे आजपर्यंत तरी मला कळले नाही. शेवटी काम झाले, पण ज्या कामाच्या पुर्ण प्रोसेस साठी फक्त दोनच महिने लागत होते ते काम एकाच अधिकार्‍याच्या टेबलावर एक वर्ष रखडले.

पैसा 10/02/2014 - 14:08
सरकारी मध्यम दर्जाचे अधिकारी ना घरका ना घाटका. अशा हापिसातले शिपाई हे सर्वात सुखी असतात बहुतेक. मात्र अशा ग्राहक आणि वरिष्ठांना चांगुलपणा दाखवायची अजिबात गरज नाही. तोंडाळ म्हणून प्रसिद्धी असलेली उपयोगी पडते हे निश्चित. बरं, प्रत्यक्षात काम करा नायतर करू नका कागदोपत्री आपण काहीतरी करतोय याचे पुरावे असणे महत्त्वाचे.

समीरसूर 10/02/2014 - 22:31
मजा आली वाचून. तुमच्या लिखाणाची शैली ओघवती आणि उत्कंठा वाढवणारी आहे. लेखात संदर्भ असणारे कार्यालय महावितरणचे आहे का? बाकी खरं सांगायचं म्हणजे शासकीय कार्यालयात काही काम निघाले तर मला तर धडकीच भरते. अक्षरशः आधीचे दोन-तीन दिवस शासकीय कार्यालयात जायचे आहे म्हणून आणि नंतरचे दोन-तीन दिवस काम लगेच आणि मनाप्रमाणे झालं नाही (पहिल्या झटक्यात काम झालं तर मी नायगारावरून खाली उडी मारायला तयार आहे) म्हणून मन अस्वस्थ राहते. माझा एक डॉक्टर मित्र सध्या अमेरिकेत राहतो. तो काल मला सांगत होता की पुण्यात प्रवास करण्यासाठी म्हणून बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर तिकिट दिल्यानंतर सुटे पैसे परत देईल की नाही, देतांना काय बोलेल, विशेष हक्क असल्यासारखा गप्पकन पाणउतारा करेल का, त्यापेक्षा सुटे पैसे न मागणंच बरं का...असले प्रश्न मनात घेऊन तो बसमध्ये बसायचा. त्याकाळी मित्राची पैशांची चणचण असल्याने सुटे पैसे पण खूप महत्वाचे असायचे. अगदी मोजून १०-२० रुपयात दिवस भागवायचा अशी त्याची परिस्थिती होती. आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला फक्त एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर द्यायचा ही पद्धतच नाहीये. त्याचं पद, पैसा, प्रतिष्ठा, राजकीय किंवा गुंडीय लागेबांधे, दरारा केवळ अशा गुंणांवरच समोरच्या व्यक्तीला आदर द्यायचा ही एक सर्वसाधारण पद्धत आहे आपल्याकडे. त्यामुळे सामान्य लोकं दबलेले, आत्मविश्वास गमावलेले, घाबरून राहणारे होतात. साहजिकच सेल्फ-रिस्पेक्ट, आत्मविश्वास कमी होतात. एकदा पाकीट आणि मोबाईल फोन घरातून चोरीला गेल्याची तक्रार करायला पोलिस स्टेशनला गेलो असता तिथल्या फौजदाराने मलाच झापले होते. नीट काळजी नाही घेता येत का, इथे काय रामराज्य आहे का, आमचा त्रास वाढवता वगैरे आशय होता पण स्वर कसा असेल अंदाज बांधू शकता. असो. ही भारतीय पद्धत आणि मनोवृत्ती बदलायला कमीत कमी १००-१५० वर्षे तरी लागतील. किंवा कदाचित बदलणारच नाही.

समीरसूर 10/02/2014 - 22:39
स्नेहांकिता, आपल्या विद्युत अभियांत्रिकीच्या ज्ञानापुढे आपण नतमस्तक! मी शिक्षणाने विद्युत अभियंताच आहे पण माझं त्या क्षेत्रातलं ज्ञान लाज वाटण्याइतपत तोकडं आणि जुजबी आहे. अक्षरशः ढ आहे मी त्या विषयात! आणि याचा मला कधी कधी जबर खेद वाटतो. :-( एक चांगलं शास्त्र नीट समजून घेण्याची संधी मी दवडली. मिळवली ती फक्त पदवीच्या कागदाची पुंगळी! :-( आपल्या पुढील मार्गक्रमणास अनेकोत्तम शुभेच्छा! :-)

काळा पहाड 11/02/2014 - 00:49
सरकारी अधिकार्‍यांकडून काम करून घेण्याचे उपाय कोणते असावेत? माझ्या मते सगळी खाती प्रायव्हेट करणे. १/ प्रायव्हेट मध्ये, जे काम करत नाहीत, त्यांच्या एका विशिष्ट अवयवावर लाथा घालून काम करून घेतले जाते. २/ प्रायव्हेट मध्ये पगार यांच्या लायकीच्या प्रमाणातच दिला जातो. सातवा वेतन आयोग वगैरे या हरामखोरांचे जे लाड चालले आहेत त्या ऐवजी सध्याच्या एक दशांश पगार देवून १२-१४ तास काम करून घेतले जाईल. बर फक्त फायली इकडून तिकडे सरकवून तंबाखूच्या पिंक मारणे हेच स्किल असल्यामुळे काम केलं नाही तर बाहेर पण कोणी नोकरी देणार नाही. त्यामुळे झक मारून काम करावेच लागेल. ३/ बाबा पाटीलांनी सांगितलेल्या उदाहरणा प्रमाणे "एडे" लोक प्रायव्हेट मध्ये चालत नाहीत. त्या सायबाला "घरी जा" असं सांगितलं जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पोलीसांचं सुद्धा प्रायव्हेटायझेशन होण्ं गरजेचं आहे. ४/ जनते कडून दर महिन्याला फिडबॅक घेवून पगार ठरवला जावा. महिन्याला ५ पेक्षा जास्त कंप्लेंट आल्या तर त्या महिन्याचा पगार कट! इथे असणार्‍या सरकारी अधिकार्‍यांनी स्वत्:ला या टीकेतून वगळायला हरकत नाही.

In reply to by काळा पहाड

अर्धवटराव 11/02/2014 - 01:29
त्यातुन प्रावव्हेट वाल्यांची लॉबी तयार होणार नाहि व ते सुद्धा "सरकारी" बनणार नाहि याची गॅरण्टी काय? जिथे सेवाभाव आणि कर्तव्यबुद्धी अपेक्षीत आहे त्या ठिकाणि पर्फोर्मन्स वरुन कार्यसिद्धीची गॅरण्टी काय? देशी आणि विदेशी खासगी उद्योग समुहांत काम करणारे पाट्या टाकत नाहि हा निश्कर्ष कसा काढलात? प्रॉडक्शन असो वा आर अ‍ॅण्ड डी, सर्वीस असो वा कॉल सेण्टर, त्यांची एकुण कार्यपद्धत आणि एफीशियन्सी बघता पोलीस खाते त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा आहे काय? मग कोण पोलीस कमांडो कसाबचा पाठलाग करेल?

स्पंदना 11/02/2014 - 07:41
कसा जाळ निघत असेल मनात ते चांगलच जाणवतय. फार छान अनुभव मांडला आहेस. मला तरी आजवर सरकारी सिस्टीमचा (जास्त करुन पोलीस) चांगला अनुभव आहे. कधीच नाव ठेवावी अस वा पैसे मागितले नाही आहेत. हां पण एल आय सी, म्हाडा, पासपोर्ट येथे मात्र जाम हातघाई करावी लागली आहे. तरीही वर म्हंटल्याप्रमाणे टेबलच्या अल्याडच माहीत होतं, आता पल्याडच उलगडलं.

साठ्यात फ्यूज का नव्हता? मिनिमम लेव्हल का राखली नव्हती हा प्रश्न आपण उभा करू शकला असतात. फक्त भरपूर शत्रू निर्माण झाले असते. फ्यूज फक्त गरम होतो हे स्पष्टीकरण पटणारे नाही. हे आपण फार सैलपणे घेऊ नका. वीजवापर अति वाढल्यास आग लागू शकते. याबद्दल अनुमान करणे धोक्याचे आहे. (अग्निशमन अधिकार्‍याशी हवे तर चर्चा करा.) शक्यतेची टक्केवारी कमी असली तरी दुर्लक्ष करण्याजोगी खासच नाही. आणि आकस्मिक खर्च म्हणून फ्यूज बाजारातून विकत आणू शकला असतात. अशा वेळी ग्राहक खर्च उचलायला तयार असतो. चांडक या गोष्टीला तयार आहेत की नाही याही चाचपणी आपण केल्याचे लेखात नमूद केलेले नाही. यात शत्रू देखील निर्माण होत नाहीत. या कामात माझ्या मते आपला जास्त सकारात्मक पुढाकार आवश्यक होता. वीज मंडळाचा जागेवरचा ताफा (फील्ड स्टाफ) कार्यक्षमच असतो. कार्यालयीन लोकच सामान्यतः अकार्यक्षम, अनभिज्ञ आणि मुख्य म्हणजे सामान्य ग्राहकांबद्दल संवेदनाहीन असतात असा माझा अनुभव आहे. माझे दोन परस्परविरोधी अनुभव नोकरशाही इथे आणि असाही एक अनुभव इथे वाचायला मिळतील

In reply to by सुधीर कांदळकर

सस्नेह 11/02/2014 - 12:20
हो. फ्यूज शिलकीत असतात. पण उच्च रेटींगच्या फ्यूजची मागणी कमी असल्याने ते सहसा साठ्यात नसतात. तशीच इमर्जन्सी असेल तर ते विकत घेऊन घालतात. या केसमध्ये आणखी विलंब झाला असता तर बाजारातून आणून फ्यूज घातले गेले असते. फील्डवर असेच केले जाते. खर्च ग्राहकाने केला तर त्याला परतावा दिला जातो. फ्यूजमध्ये गळती असेल तर तो तापू शकतो. पण त्याचे मूळ्कार्य, जे करंट वाढला तर खंडीत होणे, ते यामुळे बाधित होत नाही. तांत्रिक बारकावे विचारात घेतल्याबद्दल कौतुक आहे.a

आयुर्हित 26/01/2014 - 00:27
धन्य आहात आपण ! कोणत्या मातीचे असतात आपल्यासारखे अधिकारी? कमाल आहे आपल्या सहनशक्तीची. कोटी कोटी प्रणाम!!!!

सरकारी काम आणि सहा महिने थांब. सरकारी खाती, महानगरपालिका वगैरे कचेर्‍यांमध्ये प्रामाणिक अधिकार्‍यांचीही कशी गळचेपी होते ह्याचे ज्वलंत उदाहरण.

राही 26/01/2014 - 10:54
टेबलाअलीकडची बाजू. म्हणूनच सरकारी यंत्रणेला सरसकट धारेवर धरायला लेखणी धजत नाही.

विजुभाऊ 26/01/2014 - 12:03
सरकारी यंत्रणेबद्दल आदर आहे. बरेचदा कर्मचारी खरेच खूप सहनशील असतात. वरील कथेत ग्राहक म्हणून चांडकांचे काही चूक आहे असे वाटत नाही त्यांचे युनीट जर फ्यूज अभावी बंद रहात असेल तर त्यानी तरी काय करायचे.

In reply to by विजुभाऊ

सस्नेह 26/01/2014 - 18:07
ते लिहिले नाही मी. त्यांचे युनिट बंद पडले नव्हते. फक्त बॉक्स गरम होत होती. बंद असते तर वेगळी अ‍ॅक्शन घ्यावी लागली असती.

In reply to by सस्नेह

उपाशी बोका 30/01/2014 - 11:49
>> फक्त बॉक्स गरम होत होती. म्हणजे हा प्रकार युनिट बंद पडण्याइतका गंभीर न्हवता, असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

In reply to by उपाशी बोका

सस्नेह 30/01/2014 - 22:19
हा बॉक्स येणार्‍या जाणार्‍यांच्या पोहोचेपासून दूर असतो. अन खोडसाळपणा न केल्यास त्यापासून प्राणांतिक धोका होऊ शकत नाही.

प्यारे१ 26/01/2014 - 12:32
कटकट आहे राव! ह्यांचं चुकलं म्हणावं तर त्यांची बाजू दिसते, त्यांचं चुकलं म्हणावं तर ह्यांची बाजू दिसते, दोन्ही चुकलं म्हणावं तर काम अडतं.... मॅडम, बघा की जरा लौकर. मिसेस नं हळदीकुंकू ठेवलंय. या की घरी, साहेबांना घेऊन!

बाबा पाटील 27/01/2014 - 13:04
जरा पोलिस आणी महसुल खात्याचे अनुभव कुनी तरी टाका रे, एक से बढकर एक नमुने बरले गेले आहे तिथे. सहा महिने चकरा मारल्या की अनुभव विश्व एकदम समृद्ध होते.

सुहास.. 27/01/2014 - 15:37
छान !! आमच्या संगतीत आहेस याचा अभिमान ही वाटला ( उगा खोटे कशाला बोलु ) अवांतर : एक राजकारणी म्हणुन सरकारी अधिकार्‍यांशी आलेले अनुभव लवकरच मिपावर )

सरकारी अधिकारीही माणुसच असतात हे मान्य असले तरी, वैयक्तीक स्वार्थ मधे न आणता नेमून दिलेले काम प्रामाणिक पणे करणारे सरकारी अधिकारी दुर्मिळातले दुर्मिळ असतात आणि त्यावरही त्या कळपात राहुन संवेदनाक्षमता जपणे म्हणजे किती अवघड काम. असे अधिकारी भेटले की बरं वाटत. विक्रीकर विभागातही मला असेच एक संवेदनाशील अधिकारी भेटले होते. अजुनही तिकडे गेलो की त्यांना न चुकता भेटुन येतो.

arunjoshi123 28/01/2014 - 13:28
छान लेख. सरकारी व्यवस्था अपूर्णपणे आखलेली असते आणि जास्तीत जास्त लोक कामातले नाविन्य हाताळायला अक्षम असतात.

सस्नेह 29/01/2014 - 22:31
सर्व प्रतिसादकांचे आभार ! इथे मला अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकता तत्परता इ. पेक्षा यंत्रणा सुधारण्याची गरज अधोरेखित करायची होती. सरकारी यंत्रणेत गेल्या साठ-सत्तर वर्षात ब्रिटीश काळापेक्षा फार सुधारणा झाल्या आहेत असे वाटत नाही. सत्तेचे केंद्र, धोरणात्मक निर्णय जिथे होतात, त्यापेक्षा फार वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या परिस्थितीत अंमलात आणले जातात. क्षेत्रिय गरजा, व्यवहार्यता, समस्या सत्ताकेंद्रातल्यांना कधीच समजून घ्यावाश्या का वाटत नाहीत ? साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते. खाजगीकारण हा याला खरंच योग्य पर्याय आहे का ? सरकारी सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय का विचारात घेतला जात नाही ? य अन अशा अनेक शंका मनात येतात म्हणून हे यानिमित्ताने लिहिले. सरसकट अशीच परिस्थिती सर्व सरकारी खात्यात असेल असेही नाही. पुन्हा एकदा आभार.

In reply to by सस्नेह

आदूबाळ 29/01/2014 - 22:53
साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते.
हा अनुभव खाजगी क्षेत्रात पण येतो.

साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते. खाजगीकारण हा याला खरंच योग्य पर्याय आहे का ? सरकारी सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय का विचारात घेतला जात नाही ? सरकारी असो अथवा खाजगी, ज्या संस्थाचे लक्ष्य फलनिष्पत्ती असते (आउटकम-ओरिएंटेड ऑर्गॅनायझेशन्स) तेथे असा केंद्र आणि फिल्डचा संघर्ष आपोआप कमी होतो. सरकारी संस्थांत बहुतेक वेळेस वरच्या पदावर बसलेल्यांना हवी असलेली फलनिष्पत्ती (आउटकम) आणि प्रत्यक्ष काम करणार्‍यांना योग्य वाटत असलेल्या फलनिष्पत्तीत असलेल्या फरकाने हा संघर्ष (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) होतो. कारण वरिष्ठाना हवी असलेली फलनिष्पत्ती प्रत्यक्ष काम करणार्‍यांना स्पष्ट सांगितली जात नाही अथवा ती स्पष्ट सांगणे सोईचे नसते. लेखातल्या उदाहरणात साहेबांनी लेखिकेला अगोदर दाखवलेले "खायचे दात" आणि नंतर गिर्‍हाईकासमोर दाखवलेले "दाखवायचे दात", हे याचे उत्तम उदाहरण आहे. खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे प्रमाण कमी असते कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते. अर्थात बारकाव्यात गेल्यास यालाही (स्वार्थ, कंपूबाजी, वगैरेमुळे) अपवाद असू शकतात... पण सरकारी संस्थांपेक्षा खूप कमी प्रमाणात आणि कमी तीव्रतेचे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आदूबाळ 30/01/2014 - 00:41
खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे प्रमाण कमी असते कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते.
पण हे अर्धसत्य आहे. बोनस आणि प्रगती बर्‍याचदा इतर फॅक्टर्सवर अवलंबून असते. तुम्ही जर कंपनीचे अन्नदाते (प्रॉफिट सेंटर) असाल तर तुमचं काम आणि बोनस/प्रगतीमध्ये थेट संबंध असू शकतो. (कंपूबाजी, राजकारण वगैरे अलाहिदा). मात्र तुम्ही जर कंपनीचे अन्नखाते (कॉस्ट सेंटर) असाल तर कंपनीचं ध्येय तुमच्यावर होणारा खर्च कमी कमी करत जाणे (कामावर परिणाम होऊ न देता, अर्थात) असं आहे. मग बोनस/प्रगतीला एक मर्यादा पडते. लोकांचं ध्येय बदलतं. उदा. माझ्या पहाण्यातले खाजगी क्षेत्रातलेही बरेच लोक "काहीही झालं तरी सहाला हपीसातून निघायचं म्हणजे निघायचंच" हा निश्चय करतात आणि पाळूनसुद्धा दाखवतात!

In reply to by आदूबाळ

मात्र तुम्ही जर कंपनीचे अन्नखाते (कॉस्ट सेंटर) असाल तर कंपनीचं ध्येय तुमच्यावर होणारा खर्च कमी कमी करत जाणे (कामावर परिणाम होऊ न देता, अर्थात) असं आहे. मग बोनस/प्रगतीला एक मर्यादा पडते. याचे उत्तर माझ्या वरच्या प्रतिसादाच्या खालील वाक्यात आहे. कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते. आउटकम ओरिएंटेड संस्थांत ज्या विभागांचा / कर्मचार्‍यांचा प्रभाव आऊटकमवर (संस्थेचा म्हणजेच पर्यायाने भागधारकांचा फायदा) जास्त त्यांच्याकडे आपोआप जास्त लक्ष आणि जास्त फायदा (बेनेफिट्स) जातात. अर्थात प्रॉफिट सेंटर्सकडे जास्त लक्ष आणि केवळ कॉस्ट सेंटर्स असलेल्या सपोर्ट विभागांकडे (उदा अन्नखाते, इ) कमी लक्ष हे सहाजिकपणे होते. येथे ते "बरोबर आहे की चूक" हा मुद्दा नसुन "अशी वस्तुस्थिती का निर्माण होते त्याचे विश्लेशण आहे". अवांतरः आपले कामाचे क्षेत्र निवडताना वरची वस्तूस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय करणे फायद्याचे ठरते. अन्नखाते हे मुख्य व्यवसाय (कोअर आक्टिविटी) असलेल्या कंपनीत, उदा. आतिथ्य व्यवसायातल्या संस्थात (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, इ) प्रॉफिट सेंटर असते तर इतर बहुतेक व्यवसायातल्या संस्थात (आयटी, मेकॅनिकल इंजिनियरिंग, सेवा पुरवणारी ऑफिसेस, इ) कॉस्ट सेंटर असते. ज्याला अन्नक्षेत्रात प्रगती करायची असेल त्याने प्रॉफिट सेंटरमध्येच शिरकाव केला तर निराशेने ध्येय बदलण्याची पाळी येण्याची शक्यता बरीच कमी होईल.

अभ्या.. 30/01/2014 - 14:53
मस्त लिखाण स्नेहातै. एकूणच असे जाणवतेय की नोकरीच्या नव्या ठिकाणी रुळलीयस चांगलीच. :) नावे अन ठिकाण तर एकदम परिचयाचे. ;) बाकी काम करणारे माणूस बरोबर हेरणारा बार्शीचा गुण कळला दिसतोय. ;)

निशदे 31/01/2014 - 05:20
शक्यतो टेबलाच्या 'इकडच्या' बाजूला असल्यामुळे टेबलाच्या 'तिकडे' असणार्‍यांबद्दल सहानुभूती वाटत नाही. तुमच्या लेखाने ती जाणीव करून दिली. तुमची खुसखुशीत लेखनशैली बोनस...... :)

सुबोध खरे 31/01/2014 - 11:36
सरकारी खात्यात विशेषतः जिथे जनतेशी संपर्क असतो तेथे आपल्या कामाला पोचपावती मिळणे अशक्य असते.(आपण कधी रेल्वेच्या आरक्षण खिडकीवरील माणसावर खूश झाल्याचे आठवते काय? पण त्याला आपल्यापैकी १००टक्के लोकानी कधी ना कधी शिव्या घातल्या असतीलच). पण आपले वरिष्ठ हुशार असल्याने श्रेय उपटतात आणि तक्रारी आपल्या माथ्यावर फोडतात हे फार वेळा अनुभवायला मिळते. यावर उपाय एकाच आपले कागदी घोडे उत्तम नाचवायचे आणि अशा व्ही आय पी समोर नांगी न टाकता सत्य सरळ पुढे ठेवायचे यात वरिष्ठ आपल्यावर नाराज होतातच परंतु पुढस्यावेळी आपल्याला तोफेच्या तोंडी देताना तीन वेळा विचार करतात. हे धोरण मी अठरा वर्षे राबविले त्यामुळे सहसा मला लोकांसमोर आपली नाचक्की करून घ्यावी लागली नाही.वरिष्ठ उगाच ओरडत असेल तर मी सरळ व्ही आय पी समोर त्यांचे पितळ उघडे करीत असे. शिवाय हा माणूस कोणापुढे काहीही बोलतो अशी "ख्याति" असल्यामुळे आपले नजीकचे वरिष्ठ स्वतः ची चामडी वाचवण्यासाठी उगाच उच्च पदस्थानसमोर माझे उणे दुणे काढण्या पुर्वी तीनदा विचार करीत असत.सरकारी नोकरी असल्यामुळे माझी बढती किंवा नोकरी याला वरिष्ठ हात लावू शकत नव्हते.शिवाय मला सरकारी नियम आणि कायदे वरिष्ठाणपेक्षा नक्कीच जास्त माहित होते.थोडक्यात धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी सोय आपण करून ठेवायची.म्हणजे सरकारी नोकरी सुखात करता येते. विस्तार भयापायी उदाहरणे देत नाही

In reply to by सुबोध खरे

उपाशी बोका 05/02/2014 - 09:30
सरकारी नोकरी असल्यामुळे माझी बढती किंवा नोकरी याला वरिष्ठ हात लावू शकत नव्हते.
हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे होते काय की बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये कामचुकारपणा करण्याची प्रवृत्ती दिसून येते.

In reply to by उपाशी बोका

सुबोध खरे 05/02/2014 - 09:49
अगदी शंभर टक्के.सरकारी नोकरी मध्ये असलेले अमर्याद संरक्षण हे कामचुकार पणा आणि माज याला कारणीभुत आहे असे मेज़ स्पश मत आहे.खाजगी संस्था मध्ये आपली नोकरी जाउ शकते या भितीने लोक काम करतात नियमात राहतात वेळेत येतात आणि जातात. सरकारी नोकरीत केंव्हाही या किंवा जा काम करा अथवा करू नका. युनियन चे संरक्षण असतेच. सरकारी नोकराला तुम्ही काढून टाकू शकत नाही त्याची बढती फारतर एखादे वर्ष थांबवू शकता ते सुद्धा त्याला किचकट अशी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया केल्यावर. त्यामुळे आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही असा माज असतो. मी स्वतः सरकारी नोकरीत १८+ वर्षे राहून हे तुम्हाला सांगू शकतो. मुम्बईच्या आयुक्ताच्या पातळीचा अधिकारी असलेला माझा कमांडींग ओफिसर त्याला मी तोंडावर सांगितले की तुम्ही दिलेला बेकायदेशीर आदेश मी मानत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. त्याला काहीही करता येत नव्हते.(अर्थात त्याचा आदेश मुळात बेकायदेशीर असल्याने काही करावे अशी त्याची हिम्मत नव्हती हा भाग अलाहिदा)

तिमा 02/02/2014 - 14:46
तारापूर औद्योगिक वसाहतीत आमचा(म्हणजे आमच्या मालकांचा)कारखाना होता. काहीही इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला की 'पटवलेला' मराविम चा कर्मचारी एका तासाच्या आंत फौज घेऊन येई आणि दुरुस्त करी. अट एवढीच की जो पार्ट गेला असेल त्याचे आम्ही बाजारभावाने पैसे द्यायचे, त्याने मात्र तो पार्ट मराविम च्या स्टोअर मधून इश्यू केलेलाच असे. आमच्या दृष्टीने, नियमानुसार गेल्यास जो वेळ लागायचा, ते उत्पादनाचे तास वाया घालवणे आम्हाला परवडत नसे. बहुतेक सगळ्या कंपन्या हेच करायच्या.

In reply to by तिमा

अर्धवटराव 05/02/2014 - 10:19
एखादा नियम, क्लॉज आज जे पांढरं आहे त्या उद्या काळं करतो आणि उलट देखील. त्याबरह्कुम एखाद्याची खादी आज स्वच्छ तर उद्या मळकी होते किंवा अचानक धुतल्या जाते. मला मुळातच खरेदी-विक्री प्रकारात भ्रष्टाचार का शोधला जातो हे कळत नाहि.

मारकुटे 05/02/2014 - 10:04
समजा.. समजा हं... त्याने तुम्हाला पैसे दिले असते किंवा तुमच्या हाताखालच्या किंवा वरच्याला दिले असते तर त्याचे काम पटकन झाले असते ना?

In reply to by मारकुटे

सस्नेह 05/02/2014 - 11:45
हे म्हणजे, तुम्ही दारू पिणे कधी सोडलेत ? अशापैकी झाले. वेल, या प्रश्नाचे सरसकटीकरण होऊ शकत नाही. सरकारी नोकरीत खाजगीप्रमाणेच काळे-गोरे आलेच. पण काम करणारे लोक कसेही काम करतातच अन न करणारे (पैसे घेऊनही) करत नाहीत असा अनुभव आहे. नुळात आपण पैसे देऊ करणे हाच अपराध आहे. योग्य मार्गाने गेले अन सिस्टिमचे कायदेकानून समजून घेतले तर विलंबाने का होईना, काम होतेच. कोणतेही काम 'पटकन' होण्यासाठी शॉर्टकट शोधणारे लोक पैशाचा वापर करतात अन नवी 'सिस्टीम' बनवतात. अशा सिस्टीमचा प्रामाणिक अधिकारी अन ग्राहक यांना त्रास होतो.

In reply to by सस्नेह

मारकुटे 06/02/2014 - 13:46
>>> योग्य मार्गाने गेले अन सिस्टिमचे कायदेकानून समजून घेतले तर विलंबाने का होईना, काम होतेच. विलंब होण्याचे कधीही कारण नसते, ते शोधले जाते नियमांचा आधार घेत

बाबा पाटील 08/02/2014 - 12:56
एका कायदेशिर कामाकरिता स्थानिक पोलिस अधिकार्‍याचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते.संबधित अधिकार्‍याला काय प्रॉब्लेम होता माहित नाही,सुरुवातीला प्रथम त्यांना भेटल्यावर तुम्ही नामांकित डॉक्टर आहात्,तुम्हाला अडवण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले व दोन दिवसांनी येउन सह्या करा फाइल डी.वाय.एस.पी.कडे पाठवतो म्हणुन सांगितले,दोन दिवसांनी गेल्यावर कळले साहेब १० दिवसांच्या सुट्टीवर गेलेत.ते आल्याशिवाय काम होणार नाही.परत १० दिवासांनी गेलो तर साहेबांचे काय डोके फिरले माहित नाही जो हवलदार कागदपत्रांचची पुर्तता करुन सही करिता त्यांच्या समोर गेला त्याला माझ्यासमोरच आई माई वरुन शिव्या घातल्या व अश्या सह्या मी करत नाही.असे मला सांगितले,याच्या आयला भोसडीच्याला काय काळे कुत्रे चावले मलाही कळले नाही.मग जवळच्या एका तहसिलदार मित्राला सांगितले त्यांनी फोन केल्यावर म्हटले की त्यांच्या फाइल मध्ये काहीच अडचन नाही फाइल पाठवतो.झाल यात पुर्ण दोन महिने गेले.शेवटी फाइल जागच्या जागीच नंतर त्यांच्याच हवलदाराने सांगितले कुनीतरी वरिष्ठ अधिकारी अथवा राजकारणी व्यक्तीला सांगा साहेब काम करतील. काम पुर्णतः कायदेशिर मग अडचण काय विचारल्यावर जे उत्तर मिळाले ते एकदम भारी होते."साहेब एडा आहे"इती हवलदार. आयच्या गावात आता अश्या अधिकार्‍याचे काय करायचे.शेवटी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे विषय मांडला,तत्काळ कारवाईचे आदेश निघाले,तरी एका सहायक पोलिस निरीक्षकाने त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या,मंत्र्यांच्या ओ.एस.डी.ला चक्क दिशाभुल करणारी खोटी उत्तरे दिली गेली.शेवटी साहेबाची दुरच्या जिल्ह्यात बदली झाली. त्यानंतर काम झाले पण या साहेबाने का ? कश्यासाठी ? कोठले हितसंबध साहेबाला जपायचे होते ? हे आजपर्यंत तरी मला कळले नाही. शेवटी काम झाले, पण ज्या कामाच्या पुर्ण प्रोसेस साठी फक्त दोनच महिने लागत होते ते काम एकाच अधिकार्‍याच्या टेबलावर एक वर्ष रखडले.

पैसा 10/02/2014 - 14:08
सरकारी मध्यम दर्जाचे अधिकारी ना घरका ना घाटका. अशा हापिसातले शिपाई हे सर्वात सुखी असतात बहुतेक. मात्र अशा ग्राहक आणि वरिष्ठांना चांगुलपणा दाखवायची अजिबात गरज नाही. तोंडाळ म्हणून प्रसिद्धी असलेली उपयोगी पडते हे निश्चित. बरं, प्रत्यक्षात काम करा नायतर करू नका कागदोपत्री आपण काहीतरी करतोय याचे पुरावे असणे महत्त्वाचे.

समीरसूर 10/02/2014 - 22:31
मजा आली वाचून. तुमच्या लिखाणाची शैली ओघवती आणि उत्कंठा वाढवणारी आहे. लेखात संदर्भ असणारे कार्यालय महावितरणचे आहे का? बाकी खरं सांगायचं म्हणजे शासकीय कार्यालयात काही काम निघाले तर मला तर धडकीच भरते. अक्षरशः आधीचे दोन-तीन दिवस शासकीय कार्यालयात जायचे आहे म्हणून आणि नंतरचे दोन-तीन दिवस काम लगेच आणि मनाप्रमाणे झालं नाही (पहिल्या झटक्यात काम झालं तर मी नायगारावरून खाली उडी मारायला तयार आहे) म्हणून मन अस्वस्थ राहते. माझा एक डॉक्टर मित्र सध्या अमेरिकेत राहतो. तो काल मला सांगत होता की पुण्यात प्रवास करण्यासाठी म्हणून बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर तिकिट दिल्यानंतर सुटे पैसे परत देईल की नाही, देतांना काय बोलेल, विशेष हक्क असल्यासारखा गप्पकन पाणउतारा करेल का, त्यापेक्षा सुटे पैसे न मागणंच बरं का...असले प्रश्न मनात घेऊन तो बसमध्ये बसायचा. त्याकाळी मित्राची पैशांची चणचण असल्याने सुटे पैसे पण खूप महत्वाचे असायचे. अगदी मोजून १०-२० रुपयात दिवस भागवायचा अशी त्याची परिस्थिती होती. आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला फक्त एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर द्यायचा ही पद्धतच नाहीये. त्याचं पद, पैसा, प्रतिष्ठा, राजकीय किंवा गुंडीय लागेबांधे, दरारा केवळ अशा गुंणांवरच समोरच्या व्यक्तीला आदर द्यायचा ही एक सर्वसाधारण पद्धत आहे आपल्याकडे. त्यामुळे सामान्य लोकं दबलेले, आत्मविश्वास गमावलेले, घाबरून राहणारे होतात. साहजिकच सेल्फ-रिस्पेक्ट, आत्मविश्वास कमी होतात. एकदा पाकीट आणि मोबाईल फोन घरातून चोरीला गेल्याची तक्रार करायला पोलिस स्टेशनला गेलो असता तिथल्या फौजदाराने मलाच झापले होते. नीट काळजी नाही घेता येत का, इथे काय रामराज्य आहे का, आमचा त्रास वाढवता वगैरे आशय होता पण स्वर कसा असेल अंदाज बांधू शकता. असो. ही भारतीय पद्धत आणि मनोवृत्ती बदलायला कमीत कमी १००-१५० वर्षे तरी लागतील. किंवा कदाचित बदलणारच नाही.

समीरसूर 10/02/2014 - 22:39
स्नेहांकिता, आपल्या विद्युत अभियांत्रिकीच्या ज्ञानापुढे आपण नतमस्तक! मी शिक्षणाने विद्युत अभियंताच आहे पण माझं त्या क्षेत्रातलं ज्ञान लाज वाटण्याइतपत तोकडं आणि जुजबी आहे. अक्षरशः ढ आहे मी त्या विषयात! आणि याचा मला कधी कधी जबर खेद वाटतो. :-( एक चांगलं शास्त्र नीट समजून घेण्याची संधी मी दवडली. मिळवली ती फक्त पदवीच्या कागदाची पुंगळी! :-( आपल्या पुढील मार्गक्रमणास अनेकोत्तम शुभेच्छा! :-)

काळा पहाड 11/02/2014 - 00:49
सरकारी अधिकार्‍यांकडून काम करून घेण्याचे उपाय कोणते असावेत? माझ्या मते सगळी खाती प्रायव्हेट करणे. १/ प्रायव्हेट मध्ये, जे काम करत नाहीत, त्यांच्या एका विशिष्ट अवयवावर लाथा घालून काम करून घेतले जाते. २/ प्रायव्हेट मध्ये पगार यांच्या लायकीच्या प्रमाणातच दिला जातो. सातवा वेतन आयोग वगैरे या हरामखोरांचे जे लाड चालले आहेत त्या ऐवजी सध्याच्या एक दशांश पगार देवून १२-१४ तास काम करून घेतले जाईल. बर फक्त फायली इकडून तिकडे सरकवून तंबाखूच्या पिंक मारणे हेच स्किल असल्यामुळे काम केलं नाही तर बाहेर पण कोणी नोकरी देणार नाही. त्यामुळे झक मारून काम करावेच लागेल. ३/ बाबा पाटीलांनी सांगितलेल्या उदाहरणा प्रमाणे "एडे" लोक प्रायव्हेट मध्ये चालत नाहीत. त्या सायबाला "घरी जा" असं सांगितलं जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पोलीसांचं सुद्धा प्रायव्हेटायझेशन होण्ं गरजेचं आहे. ४/ जनते कडून दर महिन्याला फिडबॅक घेवून पगार ठरवला जावा. महिन्याला ५ पेक्षा जास्त कंप्लेंट आल्या तर त्या महिन्याचा पगार कट! इथे असणार्‍या सरकारी अधिकार्‍यांनी स्वत्:ला या टीकेतून वगळायला हरकत नाही.

In reply to by काळा पहाड

अर्धवटराव 11/02/2014 - 01:29
त्यातुन प्रावव्हेट वाल्यांची लॉबी तयार होणार नाहि व ते सुद्धा "सरकारी" बनणार नाहि याची गॅरण्टी काय? जिथे सेवाभाव आणि कर्तव्यबुद्धी अपेक्षीत आहे त्या ठिकाणि पर्फोर्मन्स वरुन कार्यसिद्धीची गॅरण्टी काय? देशी आणि विदेशी खासगी उद्योग समुहांत काम करणारे पाट्या टाकत नाहि हा निश्कर्ष कसा काढलात? प्रॉडक्शन असो वा आर अ‍ॅण्ड डी, सर्वीस असो वा कॉल सेण्टर, त्यांची एकुण कार्यपद्धत आणि एफीशियन्सी बघता पोलीस खाते त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा आहे काय? मग कोण पोलीस कमांडो कसाबचा पाठलाग करेल?

स्पंदना 11/02/2014 - 07:41
कसा जाळ निघत असेल मनात ते चांगलच जाणवतय. फार छान अनुभव मांडला आहेस. मला तरी आजवर सरकारी सिस्टीमचा (जास्त करुन पोलीस) चांगला अनुभव आहे. कधीच नाव ठेवावी अस वा पैसे मागितले नाही आहेत. हां पण एल आय सी, म्हाडा, पासपोर्ट येथे मात्र जाम हातघाई करावी लागली आहे. तरीही वर म्हंटल्याप्रमाणे टेबलच्या अल्याडच माहीत होतं, आता पल्याडच उलगडलं.

साठ्यात फ्यूज का नव्हता? मिनिमम लेव्हल का राखली नव्हती हा प्रश्न आपण उभा करू शकला असतात. फक्त भरपूर शत्रू निर्माण झाले असते. फ्यूज फक्त गरम होतो हे स्पष्टीकरण पटणारे नाही. हे आपण फार सैलपणे घेऊ नका. वीजवापर अति वाढल्यास आग लागू शकते. याबद्दल अनुमान करणे धोक्याचे आहे. (अग्निशमन अधिकार्‍याशी हवे तर चर्चा करा.) शक्यतेची टक्केवारी कमी असली तरी दुर्लक्ष करण्याजोगी खासच नाही. आणि आकस्मिक खर्च म्हणून फ्यूज बाजारातून विकत आणू शकला असतात. अशा वेळी ग्राहक खर्च उचलायला तयार असतो. चांडक या गोष्टीला तयार आहेत की नाही याही चाचपणी आपण केल्याचे लेखात नमूद केलेले नाही. यात शत्रू देखील निर्माण होत नाहीत. या कामात माझ्या मते आपला जास्त सकारात्मक पुढाकार आवश्यक होता. वीज मंडळाचा जागेवरचा ताफा (फील्ड स्टाफ) कार्यक्षमच असतो. कार्यालयीन लोकच सामान्यतः अकार्यक्षम, अनभिज्ञ आणि मुख्य म्हणजे सामान्य ग्राहकांबद्दल संवेदनाहीन असतात असा माझा अनुभव आहे. माझे दोन परस्परविरोधी अनुभव नोकरशाही इथे आणि असाही एक अनुभव इथे वाचायला मिळतील

In reply to by सुधीर कांदळकर

सस्नेह 11/02/2014 - 12:20
हो. फ्यूज शिलकीत असतात. पण उच्च रेटींगच्या फ्यूजची मागणी कमी असल्याने ते सहसा साठ्यात नसतात. तशीच इमर्जन्सी असेल तर ते विकत घेऊन घालतात. या केसमध्ये आणखी विलंब झाला असता तर बाजारातून आणून फ्यूज घातले गेले असते. फील्डवर असेच केले जाते. खर्च ग्राहकाने केला तर त्याला परतावा दिला जातो. फ्यूजमध्ये गळती असेल तर तो तापू शकतो. पण त्याचे मूळ्कार्य, जे करंट वाढला तर खंडीत होणे, ते यामुळे बाधित होत नाही. तांत्रिक बारकावे विचारात घेतल्याबद्दल कौतुक आहे.a
लेखनप्रकार
'विथ रेफरन्स टु धिस ऑफिस लेटर डेटेड सिक्स्थ डिसेंबर, वी आर टु इनफॉर्म यू दॅट ...' 'बीप बिपीप ...बीप बिपीप..' लँडलाइनच्या आवाजाने मी सेक्रेटरीला देत असलेले डिक्टेशन मधेच खंडित झाले. सकाळपासून मी ते महत्वाचे पत्र कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करीत होते. पण भेटायला येणाऱ्या लोकांच्या एकसारख्या फ्लोमुळे ते काही बेटे मूर्त स्वरूपात येईना. अखेर सेक्रेटरीला बोलावून मी ते पूर्ण करण्याचा निकराचा प्रयत्न चालवला असताना पुन्हा या लँडलाइनने घात केला. 'ओह शिट...हॅलो ?' पहिले दोन शब्द अर्थातच मी रिसिव्हर उचलण्यापूर्वी म्हटले होते.

नाईट-ओव्हर!!!

वडापाव ·

प्यारे१ 11/01/2014 - 02:33
लिखाण आवडलं. जास्त 'सोललं' आहे असं वाटतंय. बाकी डिस्क्लेमर वगैरे काही नाही. योगायोग समजावा वगैरे काही नाही. चलो अच्छा ही होगा! अवांतर : मधे मधे आमच्या अभिषेकची आठवण आली मला.

In reply to by प्यारे१

अभ्या.. 15/01/2014 - 15:54
प्यार्या च्यामारी कस्काय शेम टू शेम आठवण आली रे. . . . धान्य बदलले की चक्किवाला बी सेटिंग बदलतो. ते बी नाय :-D

बाबा पाटील 11/01/2014 - 14:21
पण भिकारचोट धंदे कधी केले नाही आणी कुनाला करुन पण दिले नाही.पोरग जास्त उतमात करायला लागल तर तिथल्या तिथे कानफाटात ठिवुन द्यायचो.त्यामुळे बरोबरीच्या कन्या जरा जास्तच वचकुन असायच्या. बाकी कॉलेज संपल्यावर बायकोकडुन कळल आमच्या सन्मानिय मैत्रिणींनी आमच नामकरण औरंगजेब केल होत.

पैसा 15/01/2014 - 11:44
आजकालची कॉलेजची पोट्टी फक्त हेच करतात की कालिजात जाऊन काही अभ्यास गिब्यास पण करतात?

गवि 15/01/2014 - 12:45
प्रत्येकाचा आपापला माईन्डसेट आणि त्याची स्पष्टीकरणं... मुळात आपण अमुक असे असतो.. आणि असतो म्हणून त्याचं स्पष्टीकरण देतो. कोणाला दारु पिऊनच्या कैफाचं कौतुक तर कुणाला दारु न पिताच्या कैफाचं.. कोणाला व्हर्जिन असल्याचं कौतुक तर कोणाला व्हर्जिन असल्याचा कॉम्प्लेक्स.. माणसाची घडण आणि घट्ट धारणा खूप इंटरेस्टिंग असतात.. :) लेख नेहमीप्रमाणेच रंजक..

In reply to by गवि

सोत्रि 15/01/2014 - 13:00
चामरी गवि, सेंट परसेंट अशी प्रतिक्रिया (पोलिटिकली करेक्ट) कशी लिहावी ह्याचा विचार करत करत खाली आलो ते तुझ्याच प्रतिसादाच्या शोधात आणि भरून पावलो! :) - (गविबरोबर एक नाइट-आउट करायची इच्छा असलेला*) सोकाजी *: कसलाही पांचट विनोद केल्यास अपमान केला जाईल

ती द्वैत संपवून टाकते विविध वय जात लिंग कर्तुत्व अधिकार वगैरे भ्रम माया वगैरे तात्पुरते बाजुला पडून नशापान करणारे फ़क्त एका सामान भावावर स्थिर होतात तो म्हणजे आपण फक्त एक एंटिटी आहोत अगदी एकसमान, म्हणुनच मैत्री घट्ट करणारी विण म्हणजे नशा होय. पोरीने एका घोटात पेग घेतला म्हणजे नक्किच नवखि आसणार, अट्टल असती तर सावकाश मारत रेङ्गाळ्त बसली असती. असो सेक्स ला महत्व कितपत द्यायचे ज्याचे त्याने ठरवावे परंतु फ़क्त यूरोपियन लोकांसोबत पार्ट्या केलेल्या असल्यानी त्यातिल मुली भारतीय व्याक्तिसोबत मेकाउट टाळायचे प्रमुख कारण हे सांगतात की तुम्ही लगेच सिरिअस होता अन नंतर पिछ्चा सोडता सोडत नाही... रात गयी बात गयी हे तुम्हाला कळतच नाही

In reply to by बर्फाळलांडगा

मारकुटे 15/01/2014 - 12:51
सहमत आहे. युरोपीयन देशात उतरल्याबरोबर भारतिय लोकांचे ट्रेनिंग घेऊन त्यांना समजाऊन सांगितले पाहिजे.

In reply to by मारकुटे

म्हणुन अगदी यूरोप मधील विद्यार्थी सुधा इन्टर्न म्हणुन भारतीय (पुणे)कंपन्यात यायचे. अर्थातच प्लेसमेंट एजंसी थ्रू. मग शनिवार रविवार विविध कंपनीत कामे करणारी पण समान एजन्सी तर्फे पुण्यात आलेल्या मुलांचा आपोआप ग्रुप बनायाचा व पार्टी ऑल नाईट असायची. आता त्यांची पार्टी म्हणजे फक्त ओली... मद्य अन इतर पेय जलाचा महापुर. जेवण स्वत: आधीच थोडसे करून मगच हजर व्हायचे. तिथे तुम्ही कंपनीत मित्र वगैरे किती बनवले वर्तनुक कशी होती हे बघितले जायचे त्यामुळे हे युरोपिअन्स कामाच्या ठिकाणच्या तथा कथित इन्टुक सोबत मैत्री करायचे व अर्थातच पार्टी ऑल नाईट ची संधि मिळायचि. आरोग्या बाबत जागृत असल्याने संपूर्ण लैंगिक संबंध सोडले तर तिथे काय होते हे मी सांगायला नकोच्. त्यावेळी मला तिथल्या मुलीने सांगितले की तुम्ही लोक फारच गळ्यात पड़ता इट वाज जस्ट अ फन डेट नॉट अ रिलेशन शीप हे तुम्ही पटवून घेत नाही मग कितीही इन्टुक का असेनात . थोडक्यात हा किस्सा कोरेगाव पार्क पुणे भारत इथे अनुभवलेला आहे हे नमूद करतो.

In reply to by बर्फाळलांडगा

मारकुटे 15/01/2014 - 13:22
तेच तर. मग शाळेपासूनच सुरवात करावी भारतीयांना फन शिकवण्याची. रोलेशन्शिप फाट्यावर मारा आन केवळ एंजोय करा असा पाचवीपासून शिकवले पाहिजे साला त्याशिवाय ह्या गोर्‍यांप्रमाणे प्रगत होता येणार नाही.

In reply to by मारकुटे

रिलेशनशिप अन एंजॉय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत... infact पुरेसा एंजॉय जाहला असेल तर रिलेशन शिप फ़ाट्यावर मारायची वेळ येतच नाही. पण केवळ रिलेशनशीप सारखे दाट नात्याचे ओझे नाही म्हणून एंजॉय करू नये हां अटटहास दुराग्रही आहे. जसे जीवनसाथी हुड्काय्च्या नादात मैत्री विसरणे योग्य... तसेच

In reply to by मारकुटे

तुम्ही खरोखर मिपाचे संपादक असायला हवे होते अशी माझी मनोमन खात्री पटली.

In reply to by मारकुटे

कुत्री म्हणा कुत्री...! अन नंतर लिहा मला कुत्रा न्हवे गाढव अभिप्रेत होत . केज्रिवालां इतके आम बनून कसं चालेल ?

In reply to by बर्फाळलांडगा

सोत्रि 15/01/2014 - 13:03
ती द्वैत संपवून टाकते विविध वय जात लिंग कर्तुत्व अधिकार वगैरे भ्रम माया वगैरे तात्पुरते बाजुला पडून नशापान करणारे फ़क्त एका सामान भावावर स्थिर होतात तो म्हणजे आपण फक्त एक एंटिटी आहोत अगदी एकसमान, म्हणुनच मैत्री घट्ट करणारी विण म्हणजे नशा होय.
रात गयी बात गयी हे तुम्हाला कळतच नाही
दोन्हीसाठी +१ आणि टाळ्या! - (बर्फाळ पेये आवडणारा) सोकाजी

In reply to by वासु

बॅटमॅन 15/01/2014 - 16:14
अशी मुक्ताफळे उधळणार्‍या दुढ्ढाचार्यांनी आयुष्यात काय दिवे लावले तेवढे सांगावे, मग पुढचे बोलता येईल.

In reply to by बॅटमॅन

@अशी मुक्ताफळे उधळणार्‍या दुढ्ढाचार्यांनी आयुष्यात काय दिवे लावले तेवढे सांगावे, >>>. : D नाव पहा कि हो त्यां.....चं! =)) काय हे!? =))

जबरदस्त!!!! भांगेत तुळस तसं "हँबर्गरांत" "वडापाव" आम्ही बी गावाकडं असलं करायचो (वजा पोरी)अन विषय पण अमक्याने तमक्या पक्षाच्या तालुका अध्यक्षाचीच मेव्हणी कशी पटवली अन तालुक्याल्लाच तिला कसा "बँड बाजा बारात" दाखवला असलाच असायचा (फोटो प्रुफ नेसेसरी होते), पर ह्येलाच नाईट ओव्हर म्हणतेत हे नोते मालुम मले बा!!!. पुण्यात अभ्यासाला आलो तेव्हा एक अश्याच "नाईट ओव्हर " ला गेल्तो, पोरी ढोसताना पाहुन गपगार झाल्तो, इतला की पुरा रम चा हाफ कोरा मारुन बी मले चढेच नाही!!!, वापस नाही कई चान्स आला!!! बादवे, खरेच गावाकडल्या मंड़ळींनी ह्यात कायतर वंगाळ असल्याचा आव आणु नये!!!, उसाच्या फडाला, तुरीचा पाठी, वढ्यात, अन आमराईत काय होतं ? दारु नसली तरी ह्या पोरी पोरं दारु पिऊन करतात तेच दारु न पिता होतं!!! अजुन काय!!!, आपण तर वस्तीला पैदा होऊन राजधानीस्तोवर पोचलोय!, पळसाला पाने तिनच!!! असो!!!, लिवलंय ब्येस!!! तेवढं प्रोफाईल्ल अपडेट चं बघा :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाबा पाटील 15/01/2014 - 20:31
कुठ कुठ घुसताय बाप्पु,फकिस्त कोयनाळात घुसताना जरा जपुन बर तर, नाय तर नकु तिथ काटा घुसायचा अन सगळाच बल्ल्या व्हायचा....

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्यारे१ 16/01/2014 - 13:09
कोयनाळ म्हणजे नक्की काय? (करवंदीची जाळी माहिती आहे, तसं काही असतं का? बेशरमची झाडं पण माहिती आहेत) - इमानदारीत प्रश्नकर्ता

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 16/01/2014 - 13:14
कोयनेलची झाडं असतात त्यांचं जंजाळ काय? बहुता वर्षांपूर्वी आमच्या घराला लाकूड + कोयनेलची झाडे असे कुंपण होते.

In reply to by प्यारे१

बाबा पाटील 16/01/2014 - 19:06
कुबाभळीची रान किंवा येडी बाभळ, ,नेहमीच्या बाभळीपेक्षा मोठा काटा असतो.एकदा पायात घुसला की पाय टम्म फुगतो,बराचदा चप्पल मधुन पण भोक पाडुन टोचतो. भिमा नदीच्या काठाने या वनस्पतीची प्रचंड अनियंत्रीत वाढ झाली आहे गावात ओढा,पाणवठा,पांद,मसनवाटा याच्या आजुबाजुस बर्‍यापैकी आढळतो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन 16/01/2014 - 13:06
बादवे, खरेच गावाकडल्या मंड़ळींनी ह्यात कायतर वंगाळ असल्याचा आव आणु नये!!!, उसाच्या फडाला, तुरीचा पाठी, वढ्यात, अन आमराईत काय होतं ? दारु नसली तरी ह्या पोरी पोरं दारु पिऊन करतात तेच दारु न पिता होतं!!! अजुन काय!!!, आपण तर वस्तीला पैदा होऊन राजधानीस्तोवर पोचलोय!, पळसाला पाने तिनच!!!
जबरदस्त!!!!!!

In reply to by बॅटमॅन

सालं सेक्स टॅबु असणा-या ह्या देशात १२२ कोटी लोक पैदा झालेत!!!! फिश!!!! माझ्या मते इस्ट्रोजेन ,टेस्टेस्टेरोन प्रभुती मंडळींस "संस्क्रूती, भद्र, अभद्र, नैतिक" वैगैरे झोल झपाटे झेपतच नसतात!!! सबब त्याचे सिक्रिशन कोणातच थांबत नसते!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन 17/01/2014 - 14:58
पूर्ण सहमत. फक्त एक लहानशी दुरुस्ती म्हणजे व्हिक्टोरियन काळ येईपर्यंत सेक्स टॅबू मानत नसत. तो वायझेडपणा त्यानंतर सुरू झाला. हार्मोन्स उसळी मारण्याच्या वयात लग्ने होऊन शरीर संबंध येऊन पोरे होत असत, सबब फ्रस्ट्रेशन तितके असेल असे वाटत नाही. बाकी साडेतीन टक्क्यांची तथाकथित मोरॅलिटी देशाला चिकटवणे अलीकडे लैच सुरू आहे. मजा म्हणजे हे साडेतीन टक्केवालेही मस्त मजा मारत असत. जुन्या काळी बाकी काही असले तरी असला दिखाऊपणा नव्हता. अलीकडे हे ढोंग फार वाढलेय. (साडेतीन टक्केवाले म्हणजे सर्वच हुच्चभ्रू आले. त्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या जातीला उद्देशून हे वाक्य नाही याची नोंद घेणे.)

In reply to by बॅटमॅन

कपिलमुनी 17/01/2014 - 15:07
साडेतीन टक्केवाले म्हणजे सर्वच हुच्चभ्रू
आम्ही ब्राह्मण्यावर टीका करतो .. ब्राह्मणांवर नाही .. असे पूर्वी चालायचे त्याचीच आठवण झाली ..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 17/01/2014 - 15:15
ते उदाहरण एकदम क्लिशे झालंय- चैनीची परमावधी म्हणून ;) पण दॅट अपार्ट, लग्नाबाहेर मजा मारणे हे कै जातींवर अवलंबून नव्हते अन याची बरीच प्रमाणे जुन्या आत्मचरित्रांमधून मिळतात.

In reply to by पैसा

बॅटमॅन 17/01/2014 - 15:53
आणि तरी लोक आपल्या संस्कृतीचे नाही तिथे गोडवे गातात!!! आपले पूर्वज आपल्यापेक्षा बरेच 'कूल' होते. आपण मात्र नुस्ते वांझपणे चुकीच्या गोष्टींचे गोडवे गात बसतो. अन सगळ्यांत मोठा विरोधाभास हा आहे की व्हिक्टोरियन काळातले रोपण सार्वकालिक आहे अशी आपली समजूत असते =)) या विरोधाभासात इतका केविलवाणेपणा आहे की बोलायची सोय नाही.

प्यारे१ 11/01/2014 - 02:33
लिखाण आवडलं. जास्त 'सोललं' आहे असं वाटतंय. बाकी डिस्क्लेमर वगैरे काही नाही. योगायोग समजावा वगैरे काही नाही. चलो अच्छा ही होगा! अवांतर : मधे मधे आमच्या अभिषेकची आठवण आली मला.

In reply to by प्यारे१

अभ्या.. 15/01/2014 - 15:54
प्यार्या च्यामारी कस्काय शेम टू शेम आठवण आली रे. . . . धान्य बदलले की चक्किवाला बी सेटिंग बदलतो. ते बी नाय :-D

बाबा पाटील 11/01/2014 - 14:21
पण भिकारचोट धंदे कधी केले नाही आणी कुनाला करुन पण दिले नाही.पोरग जास्त उतमात करायला लागल तर तिथल्या तिथे कानफाटात ठिवुन द्यायचो.त्यामुळे बरोबरीच्या कन्या जरा जास्तच वचकुन असायच्या. बाकी कॉलेज संपल्यावर बायकोकडुन कळल आमच्या सन्मानिय मैत्रिणींनी आमच नामकरण औरंगजेब केल होत.

पैसा 15/01/2014 - 11:44
आजकालची कॉलेजची पोट्टी फक्त हेच करतात की कालिजात जाऊन काही अभ्यास गिब्यास पण करतात?

गवि 15/01/2014 - 12:45
प्रत्येकाचा आपापला माईन्डसेट आणि त्याची स्पष्टीकरणं... मुळात आपण अमुक असे असतो.. आणि असतो म्हणून त्याचं स्पष्टीकरण देतो. कोणाला दारु पिऊनच्या कैफाचं कौतुक तर कुणाला दारु न पिताच्या कैफाचं.. कोणाला व्हर्जिन असल्याचं कौतुक तर कोणाला व्हर्जिन असल्याचा कॉम्प्लेक्स.. माणसाची घडण आणि घट्ट धारणा खूप इंटरेस्टिंग असतात.. :) लेख नेहमीप्रमाणेच रंजक..

In reply to by गवि

सोत्रि 15/01/2014 - 13:00
चामरी गवि, सेंट परसेंट अशी प्रतिक्रिया (पोलिटिकली करेक्ट) कशी लिहावी ह्याचा विचार करत करत खाली आलो ते तुझ्याच प्रतिसादाच्या शोधात आणि भरून पावलो! :) - (गविबरोबर एक नाइट-आउट करायची इच्छा असलेला*) सोकाजी *: कसलाही पांचट विनोद केल्यास अपमान केला जाईल

ती द्वैत संपवून टाकते विविध वय जात लिंग कर्तुत्व अधिकार वगैरे भ्रम माया वगैरे तात्पुरते बाजुला पडून नशापान करणारे फ़क्त एका सामान भावावर स्थिर होतात तो म्हणजे आपण फक्त एक एंटिटी आहोत अगदी एकसमान, म्हणुनच मैत्री घट्ट करणारी विण म्हणजे नशा होय. पोरीने एका घोटात पेग घेतला म्हणजे नक्किच नवखि आसणार, अट्टल असती तर सावकाश मारत रेङ्गाळ्त बसली असती. असो सेक्स ला महत्व कितपत द्यायचे ज्याचे त्याने ठरवावे परंतु फ़क्त यूरोपियन लोकांसोबत पार्ट्या केलेल्या असल्यानी त्यातिल मुली भारतीय व्याक्तिसोबत मेकाउट टाळायचे प्रमुख कारण हे सांगतात की तुम्ही लगेच सिरिअस होता अन नंतर पिछ्चा सोडता सोडत नाही... रात गयी बात गयी हे तुम्हाला कळतच नाही

In reply to by बर्फाळलांडगा

मारकुटे 15/01/2014 - 12:51
सहमत आहे. युरोपीयन देशात उतरल्याबरोबर भारतिय लोकांचे ट्रेनिंग घेऊन त्यांना समजाऊन सांगितले पाहिजे.

In reply to by मारकुटे

म्हणुन अगदी यूरोप मधील विद्यार्थी सुधा इन्टर्न म्हणुन भारतीय (पुणे)कंपन्यात यायचे. अर्थातच प्लेसमेंट एजंसी थ्रू. मग शनिवार रविवार विविध कंपनीत कामे करणारी पण समान एजन्सी तर्फे पुण्यात आलेल्या मुलांचा आपोआप ग्रुप बनायाचा व पार्टी ऑल नाईट असायची. आता त्यांची पार्टी म्हणजे फक्त ओली... मद्य अन इतर पेय जलाचा महापुर. जेवण स्वत: आधीच थोडसे करून मगच हजर व्हायचे. तिथे तुम्ही कंपनीत मित्र वगैरे किती बनवले वर्तनुक कशी होती हे बघितले जायचे त्यामुळे हे युरोपिअन्स कामाच्या ठिकाणच्या तथा कथित इन्टुक सोबत मैत्री करायचे व अर्थातच पार्टी ऑल नाईट ची संधि मिळायचि. आरोग्या बाबत जागृत असल्याने संपूर्ण लैंगिक संबंध सोडले तर तिथे काय होते हे मी सांगायला नकोच्. त्यावेळी मला तिथल्या मुलीने सांगितले की तुम्ही लोक फारच गळ्यात पड़ता इट वाज जस्ट अ फन डेट नॉट अ रिलेशन शीप हे तुम्ही पटवून घेत नाही मग कितीही इन्टुक का असेनात . थोडक्यात हा किस्सा कोरेगाव पार्क पुणे भारत इथे अनुभवलेला आहे हे नमूद करतो.

In reply to by बर्फाळलांडगा

मारकुटे 15/01/2014 - 13:22
तेच तर. मग शाळेपासूनच सुरवात करावी भारतीयांना फन शिकवण्याची. रोलेशन्शिप फाट्यावर मारा आन केवळ एंजोय करा असा पाचवीपासून शिकवले पाहिजे साला त्याशिवाय ह्या गोर्‍यांप्रमाणे प्रगत होता येणार नाही.

In reply to by मारकुटे

रिलेशनशिप अन एंजॉय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत... infact पुरेसा एंजॉय जाहला असेल तर रिलेशन शिप फ़ाट्यावर मारायची वेळ येतच नाही. पण केवळ रिलेशनशीप सारखे दाट नात्याचे ओझे नाही म्हणून एंजॉय करू नये हां अटटहास दुराग्रही आहे. जसे जीवनसाथी हुड्काय्च्या नादात मैत्री विसरणे योग्य... तसेच

In reply to by मारकुटे

तुम्ही खरोखर मिपाचे संपादक असायला हवे होते अशी माझी मनोमन खात्री पटली.

In reply to by मारकुटे

कुत्री म्हणा कुत्री...! अन नंतर लिहा मला कुत्रा न्हवे गाढव अभिप्रेत होत . केज्रिवालां इतके आम बनून कसं चालेल ?

In reply to by बर्फाळलांडगा

सोत्रि 15/01/2014 - 13:03
ती द्वैत संपवून टाकते विविध वय जात लिंग कर्तुत्व अधिकार वगैरे भ्रम माया वगैरे तात्पुरते बाजुला पडून नशापान करणारे फ़क्त एका सामान भावावर स्थिर होतात तो म्हणजे आपण फक्त एक एंटिटी आहोत अगदी एकसमान, म्हणुनच मैत्री घट्ट करणारी विण म्हणजे नशा होय.
रात गयी बात गयी हे तुम्हाला कळतच नाही
दोन्हीसाठी +१ आणि टाळ्या! - (बर्फाळ पेये आवडणारा) सोकाजी

In reply to by वासु

बॅटमॅन 15/01/2014 - 16:14
अशी मुक्ताफळे उधळणार्‍या दुढ्ढाचार्यांनी आयुष्यात काय दिवे लावले तेवढे सांगावे, मग पुढचे बोलता येईल.

In reply to by बॅटमॅन

@अशी मुक्ताफळे उधळणार्‍या दुढ्ढाचार्यांनी आयुष्यात काय दिवे लावले तेवढे सांगावे, >>>. : D नाव पहा कि हो त्यां.....चं! =)) काय हे!? =))

जबरदस्त!!!! भांगेत तुळस तसं "हँबर्गरांत" "वडापाव" आम्ही बी गावाकडं असलं करायचो (वजा पोरी)अन विषय पण अमक्याने तमक्या पक्षाच्या तालुका अध्यक्षाचीच मेव्हणी कशी पटवली अन तालुक्याल्लाच तिला कसा "बँड बाजा बारात" दाखवला असलाच असायचा (फोटो प्रुफ नेसेसरी होते), पर ह्येलाच नाईट ओव्हर म्हणतेत हे नोते मालुम मले बा!!!. पुण्यात अभ्यासाला आलो तेव्हा एक अश्याच "नाईट ओव्हर " ला गेल्तो, पोरी ढोसताना पाहुन गपगार झाल्तो, इतला की पुरा रम चा हाफ कोरा मारुन बी मले चढेच नाही!!!, वापस नाही कई चान्स आला!!! बादवे, खरेच गावाकडल्या मंड़ळींनी ह्यात कायतर वंगाळ असल्याचा आव आणु नये!!!, उसाच्या फडाला, तुरीचा पाठी, वढ्यात, अन आमराईत काय होतं ? दारु नसली तरी ह्या पोरी पोरं दारु पिऊन करतात तेच दारु न पिता होतं!!! अजुन काय!!!, आपण तर वस्तीला पैदा होऊन राजधानीस्तोवर पोचलोय!, पळसाला पाने तिनच!!! असो!!!, लिवलंय ब्येस!!! तेवढं प्रोफाईल्ल अपडेट चं बघा :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाबा पाटील 15/01/2014 - 20:31
कुठ कुठ घुसताय बाप्पु,फकिस्त कोयनाळात घुसताना जरा जपुन बर तर, नाय तर नकु तिथ काटा घुसायचा अन सगळाच बल्ल्या व्हायचा....

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्यारे१ 16/01/2014 - 13:09
कोयनाळ म्हणजे नक्की काय? (करवंदीची जाळी माहिती आहे, तसं काही असतं का? बेशरमची झाडं पण माहिती आहेत) - इमानदारीत प्रश्नकर्ता

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 16/01/2014 - 13:14
कोयनेलची झाडं असतात त्यांचं जंजाळ काय? बहुता वर्षांपूर्वी आमच्या घराला लाकूड + कोयनेलची झाडे असे कुंपण होते.

In reply to by प्यारे१

बाबा पाटील 16/01/2014 - 19:06
कुबाभळीची रान किंवा येडी बाभळ, ,नेहमीच्या बाभळीपेक्षा मोठा काटा असतो.एकदा पायात घुसला की पाय टम्म फुगतो,बराचदा चप्पल मधुन पण भोक पाडुन टोचतो. भिमा नदीच्या काठाने या वनस्पतीची प्रचंड अनियंत्रीत वाढ झाली आहे गावात ओढा,पाणवठा,पांद,मसनवाटा याच्या आजुबाजुस बर्‍यापैकी आढळतो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन 16/01/2014 - 13:06
बादवे, खरेच गावाकडल्या मंड़ळींनी ह्यात कायतर वंगाळ असल्याचा आव आणु नये!!!, उसाच्या फडाला, तुरीचा पाठी, वढ्यात, अन आमराईत काय होतं ? दारु नसली तरी ह्या पोरी पोरं दारु पिऊन करतात तेच दारु न पिता होतं!!! अजुन काय!!!, आपण तर वस्तीला पैदा होऊन राजधानीस्तोवर पोचलोय!, पळसाला पाने तिनच!!!
जबरदस्त!!!!!!

In reply to by बॅटमॅन

सालं सेक्स टॅबु असणा-या ह्या देशात १२२ कोटी लोक पैदा झालेत!!!! फिश!!!! माझ्या मते इस्ट्रोजेन ,टेस्टेस्टेरोन प्रभुती मंडळींस "संस्क्रूती, भद्र, अभद्र, नैतिक" वैगैरे झोल झपाटे झेपतच नसतात!!! सबब त्याचे सिक्रिशन कोणातच थांबत नसते!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन 17/01/2014 - 14:58
पूर्ण सहमत. फक्त एक लहानशी दुरुस्ती म्हणजे व्हिक्टोरियन काळ येईपर्यंत सेक्स टॅबू मानत नसत. तो वायझेडपणा त्यानंतर सुरू झाला. हार्मोन्स उसळी मारण्याच्या वयात लग्ने होऊन शरीर संबंध येऊन पोरे होत असत, सबब फ्रस्ट्रेशन तितके असेल असे वाटत नाही. बाकी साडेतीन टक्क्यांची तथाकथित मोरॅलिटी देशाला चिकटवणे अलीकडे लैच सुरू आहे. मजा म्हणजे हे साडेतीन टक्केवालेही मस्त मजा मारत असत. जुन्या काळी बाकी काही असले तरी असला दिखाऊपणा नव्हता. अलीकडे हे ढोंग फार वाढलेय. (साडेतीन टक्केवाले म्हणजे सर्वच हुच्चभ्रू आले. त्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या जातीला उद्देशून हे वाक्य नाही याची नोंद घेणे.)

In reply to by बॅटमॅन

कपिलमुनी 17/01/2014 - 15:07
साडेतीन टक्केवाले म्हणजे सर्वच हुच्चभ्रू
आम्ही ब्राह्मण्यावर टीका करतो .. ब्राह्मणांवर नाही .. असे पूर्वी चालायचे त्याचीच आठवण झाली ..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 17/01/2014 - 15:15
ते उदाहरण एकदम क्लिशे झालंय- चैनीची परमावधी म्हणून ;) पण दॅट अपार्ट, लग्नाबाहेर मजा मारणे हे कै जातींवर अवलंबून नव्हते अन याची बरीच प्रमाणे जुन्या आत्मचरित्रांमधून मिळतात.

In reply to by पैसा

बॅटमॅन 17/01/2014 - 15:53
आणि तरी लोक आपल्या संस्कृतीचे नाही तिथे गोडवे गातात!!! आपले पूर्वज आपल्यापेक्षा बरेच 'कूल' होते. आपण मात्र नुस्ते वांझपणे चुकीच्या गोष्टींचे गोडवे गात बसतो. अन सगळ्यांत मोठा विरोधाभास हा आहे की व्हिक्टोरियन काळातले रोपण सार्वकालिक आहे अशी आपली समजूत असते =)) या विरोधाभासात इतका केविलवाणेपणा आहे की बोलायची सोय नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो.

चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

सोत्रि ·

प्यारे१ 10/12/2013 - 15:24
उच्च! बाकी ते एके ठिकाणी 'बारमातीकर' चपखल बसलंय बरं. ;) - चावडी गँगचा चाहता

चौकटराजा 10/12/2013 - 15:34
पवार यानी या शेती मंत्री पदाचा चार्ज घेतल्याचे दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच शेतमालाचे भाव आता वाढणार हे भाकित " जाणता राजा" या पदावरून केले होते. भाववाढ इतर अनेक गोष्टीमुळे झाली आहे हे खरेच आहे. ( मनमोहन सिंग यांच्या मते तेलाच्या भावात वाढ व शेतमालाचा किमान भावात वाढ ही दोन त्यातीलच ) .भाववाढ नमो व केजरीवाल कुणालाही थांबवता येणार नाही. पण इतर अनेक कारणामुळे कोंग्रेस तरत्या मतदारांमधे अप्रिय ठरली आहे. बाकी केजरीवालाप्रमाणे राज ठाकरे यानीही पूर्वी काहीसा धक्का दिल्याचे लोकाना स्मरत असेल.

चिरोटा 10/12/2013 - 15:41
मस्तच.'आप्'च्या यशाने हुरळून जाण्याचे कारण नसले तरी अनेक राज्यांतले/पक्षातले 'जाणते राजे',सम्राट थोडेसे 'जळता' आहेत्.

लाटा येतात आणि जातात... आणीबाणीच्या वेळी पण जयप्रकाश यांची लाट आलीच होती. लाटेवर स्वार होतात की लाटेत डुंबतात की विरघळून जातात, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. ब्रिटिशांच्या काळात पण काँग्रेसची लाट होतीच की.(वादळच होते ते) (१९५०च्या दशकांत खासदार पण महिना अखेरीस १०रु. मागत असत, असा किस्सा फिरिझ रानडे यांनी लिहीला आहे.) जनतेला नेहमीच स्वच्छ सरकार हवे असते, इतका बोध सगळ्याच पक्षांनी घेतला तरी बराच फरक पडू शकतो.

आता दिल्लीत सत्ता चालवणे कोणालाही कठीणच होणार आहे. त्यामुळे अगोदर सत्ता मिळवण्यासाठी चाललेली स्पर्धा विरोधकांमध्ये बसण्यासाठी चालू आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

मिपा वर रोज यायला आणि लेख-प्रतिसादांचा पावूस पाडायला सगळेच तयार पण संपादक मंडळात सामील व्हायला कुणीच तयार नाही. (वरील वाक्य हे १००% विनोदी असल्याने गांभीर्याने घेवू नये.)

प्यारे१ 10/12/2013 - 15:24
उच्च! बाकी ते एके ठिकाणी 'बारमातीकर' चपखल बसलंय बरं. ;) - चावडी गँगचा चाहता

चौकटराजा 10/12/2013 - 15:34
पवार यानी या शेती मंत्री पदाचा चार्ज घेतल्याचे दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच शेतमालाचे भाव आता वाढणार हे भाकित " जाणता राजा" या पदावरून केले होते. भाववाढ इतर अनेक गोष्टीमुळे झाली आहे हे खरेच आहे. ( मनमोहन सिंग यांच्या मते तेलाच्या भावात वाढ व शेतमालाचा किमान भावात वाढ ही दोन त्यातीलच ) .भाववाढ नमो व केजरीवाल कुणालाही थांबवता येणार नाही. पण इतर अनेक कारणामुळे कोंग्रेस तरत्या मतदारांमधे अप्रिय ठरली आहे. बाकी केजरीवालाप्रमाणे राज ठाकरे यानीही पूर्वी काहीसा धक्का दिल्याचे लोकाना स्मरत असेल.

चिरोटा 10/12/2013 - 15:41
मस्तच.'आप्'च्या यशाने हुरळून जाण्याचे कारण नसले तरी अनेक राज्यांतले/पक्षातले 'जाणते राजे',सम्राट थोडेसे 'जळता' आहेत्.

लाटा येतात आणि जातात... आणीबाणीच्या वेळी पण जयप्रकाश यांची लाट आलीच होती. लाटेवर स्वार होतात की लाटेत डुंबतात की विरघळून जातात, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. ब्रिटिशांच्या काळात पण काँग्रेसची लाट होतीच की.(वादळच होते ते) (१९५०च्या दशकांत खासदार पण महिना अखेरीस १०रु. मागत असत, असा किस्सा फिरिझ रानडे यांनी लिहीला आहे.) जनतेला नेहमीच स्वच्छ सरकार हवे असते, इतका बोध सगळ्याच पक्षांनी घेतला तरी बराच फरक पडू शकतो.

आता दिल्लीत सत्ता चालवणे कोणालाही कठीणच होणार आहे. त्यामुळे अगोदर सत्ता मिळवण्यासाठी चाललेली स्पर्धा विरोधकांमध्ये बसण्यासाठी चालू आहे.

In reply to by अविनाश पांढरकर

मिपा वर रोज यायला आणि लेख-प्रतिसादांचा पावूस पाडायला सगळेच तयार पण संपादक मंडळात सामील व्हायला कुणीच तयार नाही. (वरील वाक्य हे १००% विनोदी असल्याने गांभीर्याने घेवू नये.)
लेखनविषय:
chawadee “पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत. “वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी!

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

खटासि खट ·

In reply to by कवितानागेश

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

In reply to by कवितानागेश

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कवितानागेश 06/12/2013 - 12:42
अहो, जगात फक्त भारत आणि अमेरिका इतकी २च स्थळं आहेत का? आणि कमिट्मेंटचे म्हणाल तर ती प्रत्येकालाच समोरच्याकडून हवी असते! अगदी आईवडलांनासुद्धा अपत्यांकडून म्हातारपणी सांभाळ करण्याची हमी हवीच असते. ... मी फक्त निरिक्षण नोंदवत होते. :)

In reply to by सांजसंध्या

लिव इन स्त्रियांना वरदान वाटू शकतं
लेखात लिहीलेल्या सवलती सोडल्या तर इतर काही अँगल आहे का तुमच्या या म्हणण्याला? (कारण ते स्वातंत्र्य तर दोघांनाही आहे, त्यात विषेश काही नाही)

In reply to by संजय क्षीरसागर

काय भारी अँगल मारलाय राव. मला तर आनंदाने ओरडावसंच वॉटतया! हॉ कू SSS हॉ कू SSS हॉ कू SSS... .

स्पंदना 04/12/2013 - 03:10
विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! मला एक प्रश्न पडतो या लिव इन वाल्यांबद्दल. लग्न करायच नाही, बंधन नको आहे, कुणाची जोर जबरदस्तीसुद्धा नको आहे अन जबाबदारीही नको आहे. मग राहता राहिली भूक! मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात? उगा लिव इन मध्ये चुकुन एखादा पार्टनर गुंतला भावनिकरित्या तर लोचा होतो तो तरी नाही व्हायचा!

In reply to by स्पंदना

भूकेसंबद्धीची सुरक्षा मिळविण्यासाठी मानव हंटर-गॅदरर जीवनपद्धती सोडून शेतकरी झाला. :)

In reply to by स्पंदना

चित्रगुप्त 09/12/2013 - 18:09
मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात?
आमचे वाघिणीचे दूध अंम्मळ कच्चे असल्याने याचा अर्थ नीट उमजला नाही. 'वन नाईट स्टँड' म्हणजे एक रात्रभर उभे रहाणे, खडा पहारा देणे, असा आहे का? मग त्याचा लिविन वगैरेशी काय संबंध? की 'वन नाईट स्लीप' असे म्हणायचे आहे?

In reply to by चित्रगुप्त

चिगो 13/12/2013 - 11:41
Sleep की Slip? Sleep असल्यास चुकलं की राव.. ते काय झोपायला एकत्र येतात की काय? ;-) ह्यावरुन आठवलेला एक विनोद : मुलगा, पाद्र्यास : Father, is it wrong to sleep with a girl before marriage? पाद्री: No, son.. But the problem is you don't sleep... ;-) :-D

आशु जोग 04/12/2013 - 04:02
मूळ धाग्यापेक्षा विडंबनच सरस ठरले आहे खटासि खट मझा आणलात तुम्ही

Dhananjay Borgaonkar 04/12/2013 - 13:55
माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन लिवइन मधे नाहीये पण मला प्रश्ण असा पडतो की खरच लिविनची का गरज पडते यांना? बर लिविन आहत तर मग लग्नाला काय प्रॉब्लेम आहे? यातुन मुल झालच तर त्याच संगोपन कोणी करायचं? आणि संस्कार काय आणि कोण करणार? कदाचित काही लोकांना हे खुप बुरसटलेले विचार वाटु शकतात.

In reply to by Dhananjay Borgaonkar

साती 05/12/2013 - 20:28
कमाल आहे! माझ्या पाहण्यात तर मीच होते. लिव इन मध्ये राहणारे लोक मुलं होऊ न देण्याइतके हुशार असतात. लग्न न करण्याची हजार कारणे असु शकतात.

वासु 05/12/2013 - 13:55
मीही अजुन कोणाला पाहिलेले नाहिये लिवइन मध्ये राहिलेल... पण मला हे पट्तच नाही. असे राहुन काय साध्य करायाचे आहे? जो आदर आपल्याला लग्न झाल्यावर मिळतो तो लिवइन मध्ये राहिल्यावर नाही मिळू शकत. उलट लोक म्हण्तात "हेच संस्कार केले का तुमच्या आई-वडील यांनी?" ह्या मध्ये फक्त आई-वडीलच बद्नाम होतात.

स्पंदना 06/12/2013 - 03:24
आता विषय चाललाच आहे तर बेसिक माहीती काही मिळेल का? कसा सुरु झाला हा लिव्ह इन चा ट्रेंड? त्याचे फायदे काय अन तोटे किती? माझ निरिक्षण. आज ऑस्ट्रेलियात मुले १५-१६ची झाली की मातापित्यांना त्यांनी त्यांच्या घरात राहुन त्यांची कमाई खावी हे पटत नाही. त्यातच १६ वर्षापासून सरकार या मुलांना स्वतःचा भत्ता द्यायला सुरवात करते. तरुणवयातला उथळपणा, हातातले स्वतःच्या नावावर येणारे पैसे या मुळे ही तरुणाई पालकांनाही डोइजड होते. मग हे असे तरुण रक्त घराबाहेर पडुन चाचपडत जगायला सुरवात करते. त्यातुनही काहीजण काम करत शिक्षण चालु ठेवतात यशस्वी होतात. पण त्यांची पालक त्यांच्या कोणत्याही निर्णयात सहभागी नसल्याने स्वतःचा स्वतः जोडीदार शोधुन तसेच राहीले जाते. त्यातही भांडणे, हेवेदावे असतातच. पण अश्यावेळी लग्न करुन सेटल होण्याचा जो एक महत्वाचा टप्पा असतो त्याचा निर्णय घेण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. तरीहे येथे लग्ने होतात. इकडे पालक हळुहळु वृद्ध होत जातात. शरीर साथ द्यायच बंद करत. लग्न झाल असेल ठिक नाहीतर मग एकट रहाव लागत. प्रॉपर्टी असेल तर ती विकुन वृद्धाश्रमात १००,००० पासून ३००,००० पर्यंत पैसे भरले जातात. मुलांना फक्त माहीत असत आई या ओल्डएज होम मध्ये आहे. मी भेट दिली आहे अश्या होम्सना. परत जायची इच्छा नाही. मदत करायलाही नाही, अन ते विदिर्ण करणार आयुष्य पहायलाही नाही. काही दिवसांनी मग मुलांना कळवले जाते आई-बाप जो कोणी असेल तो सिरिअस. जमल तर मुल जातात नाहे तर "आज माझ्या आईच फ्युनरल आहे तिकडे लांब पण मी कामामुळे जाउ नाही शकत अस सहज बोलुन जातात". उसासा वगैरे टाकुन,"धिस इज लाईफ" वगैरे बोलल जात. आई बापान असेल ती प्रॉपर्टी विकुन कधीच बंध तोडलेले असतात, त्यामुळे यांच्याकडुन अपेक्षेलाही तोंड नसत. इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते. बोला रहायच आहे लिव इन मध्ये?

In reply to by स्पंदना

@इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते. बोला रहायच आहे लिव इन मध्ये? >>> बाप रे!!!!!!!!!!!!!!!

In reply to by स्पंदना

ज्यांची जन्मापासून अशी मनोधारणा तयार झाली असेल त्यांना कदाचित ह्यात कांही वावगं वाटतही नसेल. परंतु नात्यांची घट्ट वीण असणार्‍या आपल्या समाजात ही परिस्थिती फारच धक्कादायक म्हणावी अशी आहे. नात्यातील अत्युच्चतम ओलावा मुलं आणि आई-वडिलांमध्ये आणि त्यानंतर इतर रक्ताच्या नात्यात दिसून येतो. (अपवाद असतीलही पण फक्त नियम सिद्ध करण्यापुरते). तिथेच एवढी शुष्कता असेल तर आयुष्यातील इतर नातेसंबंधांची काय अवस्था असेल? माणुस हा पहिल्या पासून कळपात राहणारा प्राणी आहे. नातेसंबंध हा अशा कळपाला एकत्र धरून ठेवणारा समान धागा म्हणावा लागेल. त्याचीच वानवा असेल तर असा समाज ऐहिकतेपलीकडे कसा विचार करत असेल ह्याची कल्पना करता येत नाही.

जर का आप्ल्याला कोणतीच जबाब्दारी नको आणी स्वतन्त्र जगायच असेल तर, एकट किन्वा मित्र-मैत्रिनीन सोबत राह्ता येत. लीव-इन चि गरज काय? आणी जर फक्त वासना शमविण्याचा प्रश्न असेल (शब्द जरा वाईटच आहे पण...तेच खर पण आहे. ) तर मग वन-नाईट-स्टयाण्ड आहेतच...त्यात तर काहिच रेस्पोन्सीबिलिटी नसते. एका जागी राहायचि पण नाहि...

खटासि खट 06/12/2013 - 12:59
लग्न ही संस्था पुरुषसत्ताक आहे असं ऐकून आहे. मुलीनेच सासरी का जायचं ? तिनेच घरकाम का करायचं ? अपत्याच्या जबाबदा-या तिच्यावरच का ? सासू सास-यांच्या जबाबदा-या तिने घ्यायच्या पण तिच्या आईवडिलांबद्दल काय ? खूप कमी जोडप्यात वरील प्रश्नांचं सोल्युशन काढलेलं असतं. नाहीतर आनंदीआनंदच असतो सगळा. लिव इन म्हणजे स्वैराचार हे टोकाचं मत आहे. काही आयटी शहरात जागा शेअर करण्यातून झालेल्या लिव इन मधून झालेलं हे मत असणार. लिव -इन - रिलेशन म्हणजे विचारांती घेतलेल्या निर्णयाचाच आपण विचार करू. लग्नसंस्थेला पर्याय असला तर बिघडलं कुठं ? शेवटी लग्नसंस्था म्हणजे तरी काय आहे ? दुर्बल पुरुषाला त्याची बायको त्याच्यासोबत नांदण्याची समाजाने दिलेली ग्वाही अशीही व्याख्या करता येईल . पूर्वी एखाद्या बाहुबलीला कुणाची सुंदर स्त्री आवडली तर उचलून नेली जात होती. त्याच्याविरुद्ध अपील कुठं होतं ? आणि लग्नाचा नवरा काय करत होता ? अशा रक्षण करू न शकणा-या पुरुषाबरोबर राहण्याची ग्वाही कायद्याच्या राज्यात पुरुषाला मिळते. विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.

In reply to by खटासि खट

ही आंतरजालाची इच्छुकांस मिळालेली देणगी होय
लै भारी! बाय द वे, आता तुम्हीच लिव-इनवर चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद देतो.
विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.
हे एकांगी विधान आहे. मानवी जीवनाचा (स्त्री असो की पुरुष) समग्रतेनं (जन्म ते मृत्यू) विचार करुन विवाह ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मानवी मुलाला स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वात प्रदीर्घ कालावधी लागतो (साधारण तेवीस ते पंचवीस वर्ष). या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.

In reply to by निराकार गाढव

खटासि खट 08/12/2013 - 12:16
ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय गाढवाचा(च) आठवतो आठवणीनं. त्यातून निराकार असल्यानं वंदन करतो. - सावळा खट

In reply to by संजय क्षीरसागर

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.
माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी एकत्र काही अपरिहार्य, काही जमतय का बघु असे म्हणुन, काही दोघांनाही कोणि इतर मिळाले नाहित म्हणुन, काही दोघांचीही गरज म्हणुन असे (लीव्ह-इन)राहात आहेत. काहि आनंदाने तर काही ना आनंद ना दुःख अश्या विचारात.

खटासि खट 06/12/2013 - 15:01
या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.
लिव इन मधे राहून हे सर्व करता येणार नाही हे कशाच्या आधारावर ठरवलंय ? (त्यासाठी विवाहाची गरज काय ?)

In reply to by खटासि खट

एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो. त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

खटासि खट 06/12/2013 - 15:14
त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >> याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?

In reply to by खटासि खट

खटासि खट 06/12/2013 - 15:16
एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो.
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?

In reply to by खटासि खट

म्हणजे चर्चेला दिशा राहील. वेगवेगवेगळे मुद्दे किंवा मुद्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
मूल हवं असेल तर रितसर लग्नाचा समाजमान्य पर्याय आहे. मग लिव-इन कशाला?
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?
तुम्ही असफल विवाह आणि लिव-इन यांची सरमिसळ करतायं. असफल विवाहाची वेगळी कारणमिमांसा आहे. तुम्ही फक्त लिव-इन वर्सेस (सफल किंवा वेल अ‍ॅक्सेप्टेड) विवाह अश्या दृष्टीकोनातून तुमचे विचार लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

खटासि खट 06/12/2013 - 17:45
तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे ते लिहा ना, ते बरं पडेल. चर्चेसाठी तुम्हीच उत्सुक होता म्हणजे माहीतगार तुम्हीच. आम्ही मौजमजा, टाईमपास या कॅटेगरीत मोडणारे..

In reply to by खटासि खट

खटासि खट 06/12/2013 - 17:48
आदर्शची काही गरज नाही. तुम्ही स्वतः केलेले स्टेटमेण्टस का केले हा सोपा प्रश्न आहे उत्तरासाठी. तेव्हढी उत्तरं द्या. आग्रह नाही.

खटासि खट 06/12/2013 - 15:08
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही. >> हे पण काय झेपलं नाय बाबा. लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?

In reply to by खटासि खट

मग तुमच्या दृष्टीनं लिव-इनचं वय काय? टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?
असफल विवाह हा वेगळा मुद्दा आहे. विवाहाला लिव-इन हा पर्याय आहे का असा विषय आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

साती 06/12/2013 - 18:27
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? त्यांचे वय किती होते? त्या मरेपर्यंत लिवईनमध्ये होत्या. आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते. काकूचे वय ४८-५० असेल. काकांचे वय ५०-५५. काकांना स्वतःची मुले आहेत काकूंना मुलबाळ नाही. दोघंही अगदी प्रतिष्ठितपणे आपापल्या समाजात वावरतात (दोघे वेगवेगळ्या जातींचे आहेत) तोंडावर तरी त्यांना नाव ठेवायची कुणाची हिंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

खटासि खट 06/12/2013 - 18:32
तुम्हाला मुद्दे समजत नाहीत असं दिसतंय. तुम्ही एका ठिकाणी लिव इन २५ ते ४० वर्षे एकत्र राहणे असं म्हणता. सर्वात पहिल्यांदा हे स्टेटमेण्ट कसं काय केलं हे जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. दुसरं म्हणजे विवाह बंधनात स्त्री पुरूष "समाधानी" असते तर वर सांगितलेलं झालं असतं का ? विवाह झाला म्हणजे स्त्री-पुरूष समाधानी होतात, सुखी होतात, त्यांची टक्केवारी किती याबद्दल तुमच्याकडे काही विदा आहे काय ?

In reply to by संजय क्षीरसागर

पिशी अबोली 06/12/2013 - 18:58
टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का? केवळ लग्न या संस्थेने त्यांना बांधून ठेवलंय म्हणून ते स्वतःशी आणि बायकोशी प्रतारणा करत जगतात का? मग लिव इन मधला प्रामाणिकपणा काय वाईट? केवळ भावनिक गुंतवणूक नाकारणे या कारणासाठी लिव इन वर टीका करत असाल, तर भावनिक नातं अजिबात नसूनही आयुष्यभर केवळ 'लग्न झालंय' म्हणून एकत्र राहणार्‍यांच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे?

In reply to by पिशी अबोली

खटासि खट 06/12/2013 - 19:03
एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही माहीती नसताना स्टेटमेण्ट्स करणं, चर्चा करणं, लोकांना चर्चेला भाग पाडणं याला काय म्हणावं ? किमान आपण जे स्टेटमेण्ट्स करतो त्याबद्दल सफाई पेश करता येत नसेल तर तसं कबूल करण्याचा प्रांजळपणा तरी दिसावा. उगाचच चर्चेला तोंड फोडून पांडीत्य सांडत सुटायचं आणि अंगाशी आलं कि तुम्हीच सांगा अशी १८० अंशातून उसळी घ्यायची असल्या चर्चेला आपला तर रामराम. आमचं येड्याचं ध्यान कितीतरी बरं, काय म्हणता मंडळी ?

खटासि खट 06/12/2013 - 18:36
स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील? ?>>> तारुण्य ओसरल्यावर लिव इन रिलेशन संपतं असा तुमचा मुद्दा असेल तर गूगलदेवाला शरण जावे. तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही. तुमच्या मते विवाहात अडकून बायकोचं तारुण्य ओसरलं म्हणून बाहेर लफडी करणं हे समर्थनीय आहे का ? कि विवाह करणारे असं काही करत नाहीत असं म्हणायचंय ?

In reply to by खटासि खट

कवितानागेश 06/12/2013 - 18:45
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही.>> असं कसं? विवाहसंस्था 'जुलुमाचा रामराम' करायला लावते की. :)

पहिली गोष्ट, लिव-इनमधे राहाणार की विवाह करणार हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो सध्याच्या अविवाहितांच्या दृष्टीनं विचाराधिन आहे. त्यांना या चर्चेचा काही उपयोग होईल अशी आशा आहे. विवाहितांच्या लिव-इनच्या कल्पना आणि इतरांचे दाखले निरुपयोगी आहेत. तस्मात :
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? आणि आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.
याला अर्थ नाही. विषयाला धरुन फक्त तुमचे मुद्दे मांडा.
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का?
विचार करणं आणि कृत्य यात कमालीची तफावत आहे. शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही
हा विचार लिव-इन संदर्भात आहे. त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा की नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल. थोडक्यात जे विवाहाच्या बाजूनं आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि जे लिव-इनमधे राहू इच्छितात किंवा आहेत त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले तर चर्चा विधायक होईल.

In reply to by दिनेश सायगल

लिव-इनवर चर्चा करण्यासाठी एकतर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध हवा किंवा तुम्ही तो निवडलेला हवा आणि लिव-इनच्या विरुद्ध मत मांडायच असेल तर तुम्हाला विवाहाचा अनुभव हवा अन्यथा चर्चेला अर्थ नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 07/12/2013 - 00:12
म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की =)) कॉमन सेन्स इतका अनकॉमन असेलसं वाटलं नव्हतं.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 09/12/2013 - 19:15
म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की
:)) ए ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव् :))

In reply to by संजय क्षीरसागर

साती 07/12/2013 - 13:54
लिव ईनचा तीन वर्षे आणि लग्नाचा साडेआठ वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे मी चर्चा करण्यास पात्रं आहे. ;) दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.

In reply to by साती

काय बोललात! आणि खुद्द तुमचा अनुभव तेच तर सांगतो :
तीन वर्षे लिव ईन + साडेआठ वर्ष लग्न आणि प्रेझंट स्टेटस : मॅरीड!
वॉट एल्स कॅन बी द प्रूफ!

In reply to by संजय क्षीरसागर

पियू परी 09/12/2013 - 19:30
शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
हे कश्याच्या आधारावर लिहिताय? ज्यांची भावनिक गुंतवणुक असुन लीवीन मध्ये राहात आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल? लग्नात आकर्षण नसते हे कश्यावरून? कांदेपोह्याच्या कार्यक्रमात अर्धा तास वै. बोलायला एकटे सोडतात. त्या अर्ध्या तासात ते दोघे कश्यावरून एकमेकांच्या कमिटमेंटच्या कल्पनांविषयी बोलतात? माझ्या माहितीत बरेच जण "आधी अफेअर होते का?" अश्या टाईपचे प्रश्न विचारतात. (स्वानुभव नाही).
नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल.
"लिवीन चा पाया फक्त शारीरीक आकर्षण आहे" अशी तुमची काहीतरी गैरसमजुत झालेली दिसते. तसंच पुन्हा लिवीन म्हणजे एकाच वेळी अनेकांशी संबंध हा अजुन एक गैरसमज. ता.क. मी लिव्ह-इनचे अजिबात समर्थन करत नाही. पण म्हणुन सरसकटीकरण (जनरलाईझेशन) करणार नाही.

कुनाचा कुनाला पायपोस नाय, कोन कुनाला काय बोल्तय ते कळंना... जे ह्या बाजूचे हैत, त्यांनी ह्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..) जे त्या बाजूचे हैत, त्यांनी त्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..) जे तटस्थ हैत, त्यांनी शंका इचारा...

In reply to by तुषार काळभोर

सांजसंध्या 07/12/2013 - 14:01
असं व्हय. बरं. -------------------------------------------------------------- कल लुंगी पेहनकु आया, आज पँट पेहनकु.. फटे पुराने जुते भी बदलकू आते तो हम नही पैचानते

खटासि खट 07/12/2013 - 16:35
@ साती, अँजेलिना जोलीची लिंक इथं देता आली असती. नंतर कधीतरी अनेक वर्षे लिव इन मधे राहीलेले आणि शेवटी शेवटी लग्न केलेले, न केलेले असे काही सेलेब्रिटीज यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सेलेब्रिटीजच का इतरांमधेही आहे कि हा ट्रेण्ड. भारतातही आहे. मध्यंतरी संध्या गोखले या बाईचं लिव इन बद्दलचं एक आर्टिकल वाचनात आलेलं. http://wonderwoman.intoday.in/story1/do-they-need-to-say-i-do/1/86035.html संदर्भ म्हणून फक्त. ;)

In reply to by कवितानागेश

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

In reply to by कवितानागेश

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

कवितानागेश 06/12/2013 - 12:42
अहो, जगात फक्त भारत आणि अमेरिका इतकी २च स्थळं आहेत का? आणि कमिट्मेंटचे म्हणाल तर ती प्रत्येकालाच समोरच्याकडून हवी असते! अगदी आईवडलांनासुद्धा अपत्यांकडून म्हातारपणी सांभाळ करण्याची हमी हवीच असते. ... मी फक्त निरिक्षण नोंदवत होते. :)

In reply to by सांजसंध्या

लिव इन स्त्रियांना वरदान वाटू शकतं
लेखात लिहीलेल्या सवलती सोडल्या तर इतर काही अँगल आहे का तुमच्या या म्हणण्याला? (कारण ते स्वातंत्र्य तर दोघांनाही आहे, त्यात विषेश काही नाही)

In reply to by संजय क्षीरसागर

काय भारी अँगल मारलाय राव. मला तर आनंदाने ओरडावसंच वॉटतया! हॉ कू SSS हॉ कू SSS हॉ कू SSS... .

स्पंदना 04/12/2013 - 03:10
विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! मला एक प्रश्न पडतो या लिव इन वाल्यांबद्दल. लग्न करायच नाही, बंधन नको आहे, कुणाची जोर जबरदस्तीसुद्धा नको आहे अन जबाबदारीही नको आहे. मग राहता राहिली भूक! मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात? उगा लिव इन मध्ये चुकुन एखादा पार्टनर गुंतला भावनिकरित्या तर लोचा होतो तो तरी नाही व्हायचा!

In reply to by स्पंदना

भूकेसंबद्धीची सुरक्षा मिळविण्यासाठी मानव हंटर-गॅदरर जीवनपद्धती सोडून शेतकरी झाला. :)

In reply to by स्पंदना

चित्रगुप्त 09/12/2013 - 18:09
मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात?
आमचे वाघिणीचे दूध अंम्मळ कच्चे असल्याने याचा अर्थ नीट उमजला नाही. 'वन नाईट स्टँड' म्हणजे एक रात्रभर उभे रहाणे, खडा पहारा देणे, असा आहे का? मग त्याचा लिविन वगैरेशी काय संबंध? की 'वन नाईट स्लीप' असे म्हणायचे आहे?

In reply to by चित्रगुप्त

चिगो 13/12/2013 - 11:41
Sleep की Slip? Sleep असल्यास चुकलं की राव.. ते काय झोपायला एकत्र येतात की काय? ;-) ह्यावरुन आठवलेला एक विनोद : मुलगा, पाद्र्यास : Father, is it wrong to sleep with a girl before marriage? पाद्री: No, son.. But the problem is you don't sleep... ;-) :-D

आशु जोग 04/12/2013 - 04:02
मूळ धाग्यापेक्षा विडंबनच सरस ठरले आहे खटासि खट मझा आणलात तुम्ही

Dhananjay Borgaonkar 04/12/2013 - 13:55
माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन लिवइन मधे नाहीये पण मला प्रश्ण असा पडतो की खरच लिविनची का गरज पडते यांना? बर लिविन आहत तर मग लग्नाला काय प्रॉब्लेम आहे? यातुन मुल झालच तर त्याच संगोपन कोणी करायचं? आणि संस्कार काय आणि कोण करणार? कदाचित काही लोकांना हे खुप बुरसटलेले विचार वाटु शकतात.

In reply to by Dhananjay Borgaonkar

साती 05/12/2013 - 20:28
कमाल आहे! माझ्या पाहण्यात तर मीच होते. लिव इन मध्ये राहणारे लोक मुलं होऊ न देण्याइतके हुशार असतात. लग्न न करण्याची हजार कारणे असु शकतात.

वासु 05/12/2013 - 13:55
मीही अजुन कोणाला पाहिलेले नाहिये लिवइन मध्ये राहिलेल... पण मला हे पट्तच नाही. असे राहुन काय साध्य करायाचे आहे? जो आदर आपल्याला लग्न झाल्यावर मिळतो तो लिवइन मध्ये राहिल्यावर नाही मिळू शकत. उलट लोक म्हण्तात "हेच संस्कार केले का तुमच्या आई-वडील यांनी?" ह्या मध्ये फक्त आई-वडीलच बद्नाम होतात.

स्पंदना 06/12/2013 - 03:24
आता विषय चाललाच आहे तर बेसिक माहीती काही मिळेल का? कसा सुरु झाला हा लिव्ह इन चा ट्रेंड? त्याचे फायदे काय अन तोटे किती? माझ निरिक्षण. आज ऑस्ट्रेलियात मुले १५-१६ची झाली की मातापित्यांना त्यांनी त्यांच्या घरात राहुन त्यांची कमाई खावी हे पटत नाही. त्यातच १६ वर्षापासून सरकार या मुलांना स्वतःचा भत्ता द्यायला सुरवात करते. तरुणवयातला उथळपणा, हातातले स्वतःच्या नावावर येणारे पैसे या मुळे ही तरुणाई पालकांनाही डोइजड होते. मग हे असे तरुण रक्त घराबाहेर पडुन चाचपडत जगायला सुरवात करते. त्यातुनही काहीजण काम करत शिक्षण चालु ठेवतात यशस्वी होतात. पण त्यांची पालक त्यांच्या कोणत्याही निर्णयात सहभागी नसल्याने स्वतःचा स्वतः जोडीदार शोधुन तसेच राहीले जाते. त्यातही भांडणे, हेवेदावे असतातच. पण अश्यावेळी लग्न करुन सेटल होण्याचा जो एक महत्वाचा टप्पा असतो त्याचा निर्णय घेण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. तरीहे येथे लग्ने होतात. इकडे पालक हळुहळु वृद्ध होत जातात. शरीर साथ द्यायच बंद करत. लग्न झाल असेल ठिक नाहीतर मग एकट रहाव लागत. प्रॉपर्टी असेल तर ती विकुन वृद्धाश्रमात १००,००० पासून ३००,००० पर्यंत पैसे भरले जातात. मुलांना फक्त माहीत असत आई या ओल्डएज होम मध्ये आहे. मी भेट दिली आहे अश्या होम्सना. परत जायची इच्छा नाही. मदत करायलाही नाही, अन ते विदिर्ण करणार आयुष्य पहायलाही नाही. काही दिवसांनी मग मुलांना कळवले जाते आई-बाप जो कोणी असेल तो सिरिअस. जमल तर मुल जातात नाहे तर "आज माझ्या आईच फ्युनरल आहे तिकडे लांब पण मी कामामुळे जाउ नाही शकत अस सहज बोलुन जातात". उसासा वगैरे टाकुन,"धिस इज लाईफ" वगैरे बोलल जात. आई बापान असेल ती प्रॉपर्टी विकुन कधीच बंध तोडलेले असतात, त्यामुळे यांच्याकडुन अपेक्षेलाही तोंड नसत. इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते. बोला रहायच आहे लिव इन मध्ये?

In reply to by स्पंदना

@इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते. बोला रहायच आहे लिव इन मध्ये? >>> बाप रे!!!!!!!!!!!!!!!

In reply to by स्पंदना

ज्यांची जन्मापासून अशी मनोधारणा तयार झाली असेल त्यांना कदाचित ह्यात कांही वावगं वाटतही नसेल. परंतु नात्यांची घट्ट वीण असणार्‍या आपल्या समाजात ही परिस्थिती फारच धक्कादायक म्हणावी अशी आहे. नात्यातील अत्युच्चतम ओलावा मुलं आणि आई-वडिलांमध्ये आणि त्यानंतर इतर रक्ताच्या नात्यात दिसून येतो. (अपवाद असतीलही पण फक्त नियम सिद्ध करण्यापुरते). तिथेच एवढी शुष्कता असेल तर आयुष्यातील इतर नातेसंबंधांची काय अवस्था असेल? माणुस हा पहिल्या पासून कळपात राहणारा प्राणी आहे. नातेसंबंध हा अशा कळपाला एकत्र धरून ठेवणारा समान धागा म्हणावा लागेल. त्याचीच वानवा असेल तर असा समाज ऐहिकतेपलीकडे कसा विचार करत असेल ह्याची कल्पना करता येत नाही.

जर का आप्ल्याला कोणतीच जबाब्दारी नको आणी स्वतन्त्र जगायच असेल तर, एकट किन्वा मित्र-मैत्रिनीन सोबत राह्ता येत. लीव-इन चि गरज काय? आणी जर फक्त वासना शमविण्याचा प्रश्न असेल (शब्द जरा वाईटच आहे पण...तेच खर पण आहे. ) तर मग वन-नाईट-स्टयाण्ड आहेतच...त्यात तर काहिच रेस्पोन्सीबिलिटी नसते. एका जागी राहायचि पण नाहि...

खटासि खट 06/12/2013 - 12:59
लग्न ही संस्था पुरुषसत्ताक आहे असं ऐकून आहे. मुलीनेच सासरी का जायचं ? तिनेच घरकाम का करायचं ? अपत्याच्या जबाबदा-या तिच्यावरच का ? सासू सास-यांच्या जबाबदा-या तिने घ्यायच्या पण तिच्या आईवडिलांबद्दल काय ? खूप कमी जोडप्यात वरील प्रश्नांचं सोल्युशन काढलेलं असतं. नाहीतर आनंदीआनंदच असतो सगळा. लिव इन म्हणजे स्वैराचार हे टोकाचं मत आहे. काही आयटी शहरात जागा शेअर करण्यातून झालेल्या लिव इन मधून झालेलं हे मत असणार. लिव -इन - रिलेशन म्हणजे विचारांती घेतलेल्या निर्णयाचाच आपण विचार करू. लग्नसंस्थेला पर्याय असला तर बिघडलं कुठं ? शेवटी लग्नसंस्था म्हणजे तरी काय आहे ? दुर्बल पुरुषाला त्याची बायको त्याच्यासोबत नांदण्याची समाजाने दिलेली ग्वाही अशीही व्याख्या करता येईल . पूर्वी एखाद्या बाहुबलीला कुणाची सुंदर स्त्री आवडली तर उचलून नेली जात होती. त्याच्याविरुद्ध अपील कुठं होतं ? आणि लग्नाचा नवरा काय करत होता ? अशा रक्षण करू न शकणा-या पुरुषाबरोबर राहण्याची ग्वाही कायद्याच्या राज्यात पुरुषाला मिळते. विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.

In reply to by खटासि खट

ही आंतरजालाची इच्छुकांस मिळालेली देणगी होय
लै भारी! बाय द वे, आता तुम्हीच लिव-इनवर चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद देतो.
विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.
हे एकांगी विधान आहे. मानवी जीवनाचा (स्त्री असो की पुरुष) समग्रतेनं (जन्म ते मृत्यू) विचार करुन विवाह ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मानवी मुलाला स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वात प्रदीर्घ कालावधी लागतो (साधारण तेवीस ते पंचवीस वर्ष). या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.

In reply to by निराकार गाढव

खटासि खट 08/12/2013 - 12:16
ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय गाढवाचा(च) आठवतो आठवणीनं. त्यातून निराकार असल्यानं वंदन करतो. - सावळा खट

In reply to by संजय क्षीरसागर

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.
माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी एकत्र काही अपरिहार्य, काही जमतय का बघु असे म्हणुन, काही दोघांनाही कोणि इतर मिळाले नाहित म्हणुन, काही दोघांचीही गरज म्हणुन असे (लीव्ह-इन)राहात आहेत. काहि आनंदाने तर काही ना आनंद ना दुःख अश्या विचारात.

खटासि खट 06/12/2013 - 15:01
या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.
लिव इन मधे राहून हे सर्व करता येणार नाही हे कशाच्या आधारावर ठरवलंय ? (त्यासाठी विवाहाची गरज काय ?)

In reply to by खटासि खट

एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो. त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

खटासि खट 06/12/2013 - 15:14
त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >> याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?

In reply to by खटासि खट

खटासि खट 06/12/2013 - 15:16
एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो.
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?

In reply to by खटासि खट

म्हणजे चर्चेला दिशा राहील. वेगवेगवेगळे मुद्दे किंवा मुद्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
मूल हवं असेल तर रितसर लग्नाचा समाजमान्य पर्याय आहे. मग लिव-इन कशाला?
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?
तुम्ही असफल विवाह आणि लिव-इन यांची सरमिसळ करतायं. असफल विवाहाची वेगळी कारणमिमांसा आहे. तुम्ही फक्त लिव-इन वर्सेस (सफल किंवा वेल अ‍ॅक्सेप्टेड) विवाह अश्या दृष्टीकोनातून तुमचे विचार लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

खटासि खट 06/12/2013 - 17:45
तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे ते लिहा ना, ते बरं पडेल. चर्चेसाठी तुम्हीच उत्सुक होता म्हणजे माहीतगार तुम्हीच. आम्ही मौजमजा, टाईमपास या कॅटेगरीत मोडणारे..

In reply to by खटासि खट

खटासि खट 06/12/2013 - 17:48
आदर्शची काही गरज नाही. तुम्ही स्वतः केलेले स्टेटमेण्टस का केले हा सोपा प्रश्न आहे उत्तरासाठी. तेव्हढी उत्तरं द्या. आग्रह नाही.

खटासि खट 06/12/2013 - 15:08
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही. >> हे पण काय झेपलं नाय बाबा. लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?

In reply to by खटासि खट

मग तुमच्या दृष्टीनं लिव-इनचं वय काय? टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?
असफल विवाह हा वेगळा मुद्दा आहे. विवाहाला लिव-इन हा पर्याय आहे का असा विषय आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

साती 06/12/2013 - 18:27
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? त्यांचे वय किती होते? त्या मरेपर्यंत लिवईनमध्ये होत्या. आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते. काकूचे वय ४८-५० असेल. काकांचे वय ५०-५५. काकांना स्वतःची मुले आहेत काकूंना मुलबाळ नाही. दोघंही अगदी प्रतिष्ठितपणे आपापल्या समाजात वावरतात (दोघे वेगवेगळ्या जातींचे आहेत) तोंडावर तरी त्यांना नाव ठेवायची कुणाची हिंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

खटासि खट 06/12/2013 - 18:32
तुम्हाला मुद्दे समजत नाहीत असं दिसतंय. तुम्ही एका ठिकाणी लिव इन २५ ते ४० वर्षे एकत्र राहणे असं म्हणता. सर्वात पहिल्यांदा हे स्टेटमेण्ट कसं काय केलं हे जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. दुसरं म्हणजे विवाह बंधनात स्त्री पुरूष "समाधानी" असते तर वर सांगितलेलं झालं असतं का ? विवाह झाला म्हणजे स्त्री-पुरूष समाधानी होतात, सुखी होतात, त्यांची टक्केवारी किती याबद्दल तुमच्याकडे काही विदा आहे काय ?

In reply to by संजय क्षीरसागर

पिशी अबोली 06/12/2013 - 18:58
टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का? केवळ लग्न या संस्थेने त्यांना बांधून ठेवलंय म्हणून ते स्वतःशी आणि बायकोशी प्रतारणा करत जगतात का? मग लिव इन मधला प्रामाणिकपणा काय वाईट? केवळ भावनिक गुंतवणूक नाकारणे या कारणासाठी लिव इन वर टीका करत असाल, तर भावनिक नातं अजिबात नसूनही आयुष्यभर केवळ 'लग्न झालंय' म्हणून एकत्र राहणार्‍यांच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे?

In reply to by पिशी अबोली

खटासि खट 06/12/2013 - 19:03
एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही माहीती नसताना स्टेटमेण्ट्स करणं, चर्चा करणं, लोकांना चर्चेला भाग पाडणं याला काय म्हणावं ? किमान आपण जे स्टेटमेण्ट्स करतो त्याबद्दल सफाई पेश करता येत नसेल तर तसं कबूल करण्याचा प्रांजळपणा तरी दिसावा. उगाचच चर्चेला तोंड फोडून पांडीत्य सांडत सुटायचं आणि अंगाशी आलं कि तुम्हीच सांगा अशी १८० अंशातून उसळी घ्यायची असल्या चर्चेला आपला तर रामराम. आमचं येड्याचं ध्यान कितीतरी बरं, काय म्हणता मंडळी ?

खटासि खट 06/12/2013 - 18:36
स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील? ?>>> तारुण्य ओसरल्यावर लिव इन रिलेशन संपतं असा तुमचा मुद्दा असेल तर गूगलदेवाला शरण जावे. तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही. तुमच्या मते विवाहात अडकून बायकोचं तारुण्य ओसरलं म्हणून बाहेर लफडी करणं हे समर्थनीय आहे का ? कि विवाह करणारे असं काही करत नाहीत असं म्हणायचंय ?

In reply to by खटासि खट

कवितानागेश 06/12/2013 - 18:45
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही.>> असं कसं? विवाहसंस्था 'जुलुमाचा रामराम' करायला लावते की. :)

पहिली गोष्ट, लिव-इनमधे राहाणार की विवाह करणार हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो सध्याच्या अविवाहितांच्या दृष्टीनं विचाराधिन आहे. त्यांना या चर्चेचा काही उपयोग होईल अशी आशा आहे. विवाहितांच्या लिव-इनच्या कल्पना आणि इतरांचे दाखले निरुपयोगी आहेत. तस्मात :
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? आणि आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.
याला अर्थ नाही. विषयाला धरुन फक्त तुमचे मुद्दे मांडा.
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का?
विचार करणं आणि कृत्य यात कमालीची तफावत आहे. शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही
हा विचार लिव-इन संदर्भात आहे. त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा की नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल. थोडक्यात जे विवाहाच्या बाजूनं आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि जे लिव-इनमधे राहू इच्छितात किंवा आहेत त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले तर चर्चा विधायक होईल.

In reply to by दिनेश सायगल

लिव-इनवर चर्चा करण्यासाठी एकतर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध हवा किंवा तुम्ही तो निवडलेला हवा आणि लिव-इनच्या विरुद्ध मत मांडायच असेल तर तुम्हाला विवाहाचा अनुभव हवा अन्यथा चर्चेला अर्थ नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन 07/12/2013 - 00:12
म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की =)) कॉमन सेन्स इतका अनकॉमन असेलसं वाटलं नव्हतं.

In reply to by बॅटमॅन

यसवायजी 09/12/2013 - 19:15
म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की
:)) ए ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव् :))

In reply to by संजय क्षीरसागर

साती 07/12/2013 - 13:54
लिव ईनचा तीन वर्षे आणि लग्नाचा साडेआठ वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे मी चर्चा करण्यास पात्रं आहे. ;) दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.

In reply to by साती

काय बोललात! आणि खुद्द तुमचा अनुभव तेच तर सांगतो :
तीन वर्षे लिव ईन + साडेआठ वर्ष लग्न आणि प्रेझंट स्टेटस : मॅरीड!
वॉट एल्स कॅन बी द प्रूफ!

In reply to by संजय क्षीरसागर

पियू परी 09/12/2013 - 19:30
शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
हे कश्याच्या आधारावर लिहिताय? ज्यांची भावनिक गुंतवणुक असुन लीवीन मध्ये राहात आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल? लग्नात आकर्षण नसते हे कश्यावरून? कांदेपोह्याच्या कार्यक्रमात अर्धा तास वै. बोलायला एकटे सोडतात. त्या अर्ध्या तासात ते दोघे कश्यावरून एकमेकांच्या कमिटमेंटच्या कल्पनांविषयी बोलतात? माझ्या माहितीत बरेच जण "आधी अफेअर होते का?" अश्या टाईपचे प्रश्न विचारतात. (स्वानुभव नाही).
नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल.
"लिवीन चा पाया फक्त शारीरीक आकर्षण आहे" अशी तुमची काहीतरी गैरसमजुत झालेली दिसते. तसंच पुन्हा लिवीन म्हणजे एकाच वेळी अनेकांशी संबंध हा अजुन एक गैरसमज. ता.क. मी लिव्ह-इनचे अजिबात समर्थन करत नाही. पण म्हणुन सरसकटीकरण (जनरलाईझेशन) करणार नाही.

कुनाचा कुनाला पायपोस नाय, कोन कुनाला काय बोल्तय ते कळंना... जे ह्या बाजूचे हैत, त्यांनी ह्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..) जे त्या बाजूचे हैत, त्यांनी त्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..) जे तटस्थ हैत, त्यांनी शंका इचारा...

In reply to by तुषार काळभोर

सांजसंध्या 07/12/2013 - 14:01
असं व्हय. बरं. -------------------------------------------------------------- कल लुंगी पेहनकु आया, आज पँट पेहनकु.. फटे पुराने जुते भी बदलकू आते तो हम नही पैचानते

खटासि खट 07/12/2013 - 16:35
@ साती, अँजेलिना जोलीची लिंक इथं देता आली असती. नंतर कधीतरी अनेक वर्षे लिव इन मधे राहीलेले आणि शेवटी शेवटी लग्न केलेले, न केलेले असे काही सेलेब्रिटीज यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सेलेब्रिटीजच का इतरांमधेही आहे कि हा ट्रेण्ड. भारतातही आहे. मध्यंतरी संध्या गोखले या बाईचं लिव इन बद्दलचं एक आर्टिकल वाचनात आलेलं. http://wonderwoman.intoday.in/story1/do-they-need-to-say-i-do/1/86035.html संदर्भ म्हणून फक्त. ;)
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो.

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

मृत्युन्जय ·

आदूबाळ 18/11/2013 - 00:21
ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात!

In reply to by अग्निकोल्हा

प्यारे१ 18/11/2013 - 01:03
द्यायचा होता 'सुज्ञ' ला प्रतिसाद, झाला लेख! होतंय असं. :) लेख आवडला रे! -पुण्याच्या लांबच्या परिघातला प्यारे. :)

In reply to by प्यारे१

समजुन घेणार की लेखकाला फाट्यावर मारून हिडिसतेचा नंगानाच दाखवणार याचे कुतुहल आहे.

In reply to by पक पक पक

पण जे चांगले नाही त्याला सुध्दा छान म्हणतात. म्हनुनच लेखकावर अनावश्यक पुण्याचा उल्लेख करायची नामुष्की आली व् अमुक तमुक हिकड़े नाय आवडलं तर तिकड जाऊंन खा म्हणावे लागले. इतर शहरात असे ऑप्शन देणारे नसतात तिथे अमुक ठिकाणी छान असते असे सांगतात तेव्हां ते छानच निघते उगाच त्याच पदार्थासाठी दुसर होटेल ट्राय मारावे लागत नाही

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय 22/11/2013 - 16:22
पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही नामुष्कीने करणार नाही. अभिमानानेच करेल. मी रुढार्थाने पुणेकर नाही ते वेगळे. अनेक पर्याय देण्यामागचे कारण असे की वेगवेगळ्या चवींचे अनेक पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीप्रमाणे निवडावे. उदाहरणच द्यायचे झाले तर मी नगरातल्या लस्सीचे दिले. मला अजिबात नाही आवडली. कोल्हापुरची फडतरे मिसळ अशीच माझ्यासाठी हुकलेली होती. त्याप्रमाणे एखाद्याला बेडेकर नाही आवडणार तर अजुन अनेक पर्याय आहेत. शक्यता आहे की एखाद्याला काहिच नाही आवडणार. पण असा एखादाच असेल.

In reply to by रेवती

प्यारे१ 18/11/2013 - 02:01
मला असा वाद ऐकला वाचला की राहून राहून मुंबई पुणे मुंबई हा सिनुमामा आठवतो. सारसबागेतली भेळ खाताना (पुणेकर असून देखील) स्वप्निल जोशी म्हणतो : भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! फॉर दॅट मॅटर सगळ्याच गोष्टी तशा अस्मितांचा टॅग न लावता एन्जॉय करा की! आणखी मजा येईल. आनि लई बारीक बगायचंच म्हनलं तर बाईला बी मिशा दिसत्यातच की! तेला काय शीमा हाय व्हय मग?

In reply to by प्यारे१

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:42
भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! आयला प्यारे हेच लिहायचे होते रे. त्यासाठी एक लेख खर्ची पाडायला लागला. छ्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 18/11/2013 - 17:27
हा हा हा, नेमके!!!! उचकणारे असले की उचकवणारे भेटतातच! बरं मजा अशी की दुर्लक्षिलेलेही चालत नाही =)) धरलं तर चावतंय आणि सोडलं तरी परत जवळ येतंय =))

स्पंदना 18/11/2013 - 03:12
हाण्ण तेच्या! शंभर घाव एक तुकडा अर्धा पांगळा अर्धा वाकडा!! (गैरसमज नको, मला सौ बात की एक बात म्हणायच आहे. जरा पद्यात म्हंटल)

नगरीनिरंजन 18/11/2013 - 04:18
बालिशपणा! नगरच्या लस्सीवाल्याच्या लस्सीला नावं ठेवली म्हणून आम्हाला राग येत नाही; पण हा असला बालिशपणा पाहून करमणूक मात्र होते. :-)

In reply to by मीता

पक्या 19/11/2013 - 04:18
हे हे हे, आम्ही दिल्लीची लस्सी उत्कृष्ट मानतो नगरची काहीच नाही त्यापुढे. अजुन पंजाबला जायचा योग आला नाही पण तिकडची अजुन बेस्ट असेल असे वाटते.

In reply to by पक्या

यसवायजी 19/11/2013 - 18:07
लुधियाणात ४-५ दिवस होतो तेंव्हा रोज लस्सी प्यायचो. आपल्याकडे मिळणारी आणी तिकडची लस्सी यात फरक आहे. इथे लस्सी खुप दाट असते. तिकडे तितकी दाट नव्हती. तिथल्या स्विट अन साल्टी दोन्ही मस्त वाटल्या. खाण्याच्या -(पिण्याच्या सुद्धा ;) ) बाबतीत चंगळ होती. पण एके दिवशी कांदे-पोह्यात पनीर पाहीले अन एकदाच ठरवलं की, व्हेन यु आर इन पंजाब, पंजाबीच खा. (हे इतरत्रही लागु पडावे असे वाटते) उगाच आमच्या महारष्ट्रात असले पोहे मिळतात असे सांगण्यात काही अर्थ नाही ना. ;)

रमेश आठवले 18/11/2013 - 08:14
पुण्याबाहेर रहणार्या मझ्या सारख्याच्या माहितीसाठी मस्तानी हा कोणता खाद्य पदार्थ आहे ते सांगाल का ?

In reply to by रमेश आठवले

शैलेन्द्र 18/11/2013 - 11:34
मस्तानी हा खाद्य्/पिद्य पदार्थ आहे, घट्टश्या दुधात, कस्टर्ड, फ्लेवर, आइस्क्रीम व चवीपुरते जिन्नस टाकुन स्टृऑ/ चमच्याने खातात.. पोटभर पिण्यासाठी मात्र तुम्ही बाजीरावच हवे..

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 21/11/2013 - 13:06
थोडे पाणचट चवीचे फ्रूट सॅलड ग्लासात भरून, त्यावर आंबट अननसाची चकती खोचून, व वर थोडी टूटीफ्रूटी उर्फ रंगीत साखरेच्यापाकातल्या भोपळ्याच्या बारीक फोडी टाकल्या, त्याला अव्वाच्या सव्वा किम्मत लावून ओव्हरहाईप केले, की जे बनते, त्याला पुण्यात मस्तानी म्हणतात.

In reply to by आनंदी गोपाळ

रेवती 21/11/2013 - 18:21
गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत नाही पण तुम्ही म्हणताय तितकी वाईट्ट नक्कीच बनवलेली नसते. उगीच नावं ठेवताना कै च्या कै नको.

मैत्र 18/11/2013 - 10:39
पुण्यापासून शेकडो मैल लांब असल्याने सर्व वर्णने वाचून थोडा त्रास झाला पण जी खास पुणेरी तळमळ दिसली - की जे जे उत्तम उदात्त उन्नत च्या चालीवर
जे जे चविष्ट खमंग रूचकर ते ते मनापासून खा ना लेको!!
ती विलक्षण आवडली. पण तरीही नगरची लस्सी चांगलीच आहे. जरा कालमानाप्रमाणे थोडी दर्जात घसरली आहे. तरी एका विधानाचा सूड घेण्यासाठी दुसर्‍या पदार्थात पार बेगॉन (बॅगोन नव्हे) घालण्यापर्यंत जाणं हे शेवटच्या परिच्छेदाशी जुळलं नाही.. बाकी आनंदच वाटला जरा अस्सल आपल्या खाद्यकुळीतला पाहून :)

सुहास.. 18/11/2013 - 10:44
पुणेकरांना घुसडल्याबद्दल निषेध, पण आय डी नेमका आपलाच असल्याने ;) ....लेख अतिशय समतोल आणी प्रामाणीक . माझे ही होते असे , चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई ;) , वडाई ;) , दोसाई ;) आणि उथ्थप्पम खाल्ले की दुसरी कडे (अगदी जगात ) खायला जरा त्रास च होतो ....आमच्या पुनमला मिळणारी दाल -खिचडी मी बाहेर कुठे ही खावु शकय नाही .......तसेच नोएडा/दिल्ली ला गेलो की लस्सी , कुलचे , तंदुरी याची चव तोंडार रेंगाळत असते ...

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:46
चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई Wink , वडाई Wink , दोसाई Wink आणि उथ्थप्पम खाल्ले मुरुगन रे मित्रा मुरुगनची आठवण झाली. कासावीस झाला रे जीव. मला ते सर्वणा भवन एवढे आठवत नाही पण मुरुगन म्हटल्यावर जीव जातो.

अनुप ढेरे 18/11/2013 - 11:12
आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत.
एकदम चपखल !! हेच वाटतं बेडेकर मिसळ खाल्लीकी... लेख फक्कड !!

In reply to by अनुप ढेरे

विटेकर 18/11/2013 - 11:31
खरयं , म्हणोन आमची चक्कर दर शनिवारी सकाळी बेडेकरांकडे ! अगदी गेल्यी जन्मीचे देणे असल्यासारखे. मधे त्यांनी कमिन्स कॉलेजच्या गलीत ब्राण्च काढली होती पण तिथे ती " अस्मिता " की कायशी नव्ह्ती ( त्यांना तुसडेपणा म्हणायचा असावा !) त्यामुळे पुन्हा गावातल्या चकरा सुरु झाल्या ! हल्ली फार महाग झालीय पण बेडेकर मिसळ ! चाळीस रुपये घेतात आणि पुन्हा स्वंय्-सेवा( शेल्फ सर्विस) पण मजा येते हां ! लेख छानच ! बा़की अस्मिता वगैरे ठीक आहे , पण बा़कीच्या गावांत चांगले पदार्थ मिळ्तात. मागे एकदा धाराशिव ( उस्मानाबाद ) ला एका मुस्लिम होटेल मधून आणलेले गुलाब जामून खाल्ले होते ! अप्रतिम ! एवढ्या दुष्काळी गावात ( तेव्हा महिन्यातून दोनदा पाअणी येते होते शहरात ) असला जबराट मेवा मिळाला ! फार प्रसिद्ध आहेत म्हणे हे गुलाब जामून.

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे 18/11/2013 - 17:57
पण सुरुवातीला जेवढा देतात तो रग्गड असतो मिसळीला. काही लोक यक्ष्ट्रा स्लाइस घेउन फुकटच्या तर्रिबरोबर हादडायचे. त्यांचा वांदा.

In reply to by विटेकर

गणामास्तर 18/11/2013 - 22:50
विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव आहे त्या हॉटेल (त्याला हॉटेल म्हणणे म्हणजे मांजरीला वाघ म्हणण्यासारखे आहे)चे. बाकी तिथे बसून गरमागरम, भल्या मोठ्या आकाराचे गुलाब्जाम (तिथे असाचं उच्चार होतो) खाण्याची मजा निराळीचं.तिथे पुरी भाजी सुद्धा अप्रतिम मिळते..पुरी सोबत येणारी तिखट जाळ बटाट्याची भाजी खाल्ल्यावर रामनाथ आणि चिंचवडातला नेवाळे मिसळवाला सुद्धा लाजेल..

In reply to by गणामास्तर

बॅटमॅन 19/11/2013 - 00:05
बाकी रामनाथ बद्दल आपले मत कै खास नै आज्याबात. पाटी जितकी बुंगाट आहे तितके खाणे बुंगाट असते तर अजून बरे झाले असते.

In reply to by गणामास्तर

विटेकर 20/11/2013 - 11:46
धन्यवाद गणामास्तर ! आमच्या बहिणाबाईनी तृप्त केले होते ते गुलाबजामुन खायला घालून ! पुरी -भाजी खाण्याची वेळ आली नाही पण रस्सा हादडयचा म्हणजे पाण्याची सोय मस्ट आहे हो !

In reply to by सुहास..

बॅटमॅन 18/11/2013 - 17:29
हा मुरुगन काय प्रकार आहे? चेन्नैतच आहे की पुण्यात पण आहे??? (पुण्यात राहूनही रोज एकवेळ आंध्रा मेसमध्ये जेवून तृप्त होणारा) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 19/11/2013 - 14:25
मुरुगन चेन्नैतले एक उच्च शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे केळीच्या पानावर पदार्थ वाढतात, सांबारासकट सग्ळे. सांबार चटणीसाठी वेगळ्या वाट्या नसतात. तर मिनिटाला येउन पानात वाढुन जातात. मद्रासी स्टाइलने ओरपायचे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी निव्व़ळ सुख

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 11:51
मुरगन इडली म्हणजे स्वर्गारोहण ! आण्खी एक वैशिष्ट्य . सांबार वाटी असते पण चमाचा दिला नव्हता. ओरपा हाताने . म्हणजे बघा, ईडली घ्यायची आणि त्या केळीच्या पानावरच सांबार / चट्णी ओतायची ! आणि मग ..... आ क्र म ण ! त्या मानाने सर्वनन( उच्चार सार्व्ण) भुवन चे नाव जास्त झाले आहे. ते ही ठीकच आहे पण हल्ली त्याचे मद्रासी स्वरुप जाऊन अधुनिक झाले आहे.

In reply to by विटेकर

विटेकर 20/11/2013 - 11:59
बंगळूरातील .. एम टी आर .. हौस फिटते सौदिन्डियन खाण्याची ! मलबारी, तामिळ , तेलगु , कानडी अशा विविध छटा असल्या तरी मराठी माणसाला फार विशेष वाट्त नाही. कानडी स्व्यंपाक सर्व सौदिन्डियन मधे उजवा अशी माझी आवड आहे ! बाकी बंगलोरात चालुक्य चा दोसा खाणे यासाठी बरेच पुण्य गाठीशी हवे ! अस्ला मसाला दोसा जगात कुठेही मिळत नाही. दुधाची ताकावर साठी - विद्यार्थी ( गांधीबाजार ) , गणेश ( उच्चार गनेश - जयनगर ), बल्लाळ रेसिदेन्सी (रेसीदेन्सी रोड) , अडिगा ( जय नगर ) कामत आणि शांतिसागर यांचे दोसे ही चालतील.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 12:11
धण्यवाद सरजी. चार महिने बंगळुरात राहण्याचा योग आला होता दोनेक वर्षांमागे पण केंगेरीजवळ आणि दोघा बंगाल्यांसोबत राहिल्याने ही ठिकाणे काही कव्हर करता आली नाहीत. बंगाली तेच्यायला नुस्ते नॉनव्हेज नॉनव्हेज करत मरत असायचे त्यामुळे जरा मागेच पडलं हे ऑथेंटिक खाणं. आता मात्र जाईन तेव्हा अवश्य खाईन तिथे!

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 12:22
खर आहे.. एकदा भुवनेश्वर मध्ये बंगाल्याबरोबर आठवडाभर होतो. मी शुद्ध शाकाहारी आणि हा साला माश्याशिवाय नाव काढेना ! शेवटी एका स्थानिक रिक्षावाला पकडला आणि त्याने ज्या ठिकाणी नेले... शुद्ध शाकाहारी खाणावळ होती ! तृप्ती म्हणजे काय याचा अखंड अनुभव ! आणि इअतके विविध प्रकार .. फक्त मिठाया नव्हेत तर भाज्या आणि स्टफड मटेरियल ! अप्रतिम ! त्यानंतर दोन वर्षांनी पुरीला आई- वडिलांसोबत गेलो होतो . ती खाणावळ शोधून काढली अणि चेपून आलो! भारतातील सर्व प्रांतात उत्तम शाकाहारी पदार्थ मिळतात आणि त्या त्या भागात तेच खावे.. शक्य तर नोन होटेल्स टाळून गल्लिबोळ धुंडाळावेत, उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. थोडी रिस्क घेण्याची तयारी हवी . पाटण्यच्या गांधी मैदानाच्या बाजूला बेलफळाचे सरबत विकतात. २ रुपये ग्लास . .. हायला शप्पथ सांगतो , हलाहलाचा दाह शांत होईल .पण धाडस हवे.बाटलीतील पाणी पिनार्याला ती मजा नाही.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 13:05
ओरिसामध्ये कधी गेलो नाही. बंगालमध्ये २ वर्षे राहिलो-कलकत्त्यात. नॉनव्हेज खात नसतो तर कसा जगलो असतो देव जाणे तिथे. बंगाली व्हेज हा अंमळ टर्न ऑफच प्रकार आहे माझ्यासाठी.

In reply to by सुहास..

बॅटमॅन 20/11/2013 - 20:21
आता कबूल करायला हरकत नाही. कोलकात्यात मासे कमीच खाल्ले :( माशाचा वास कैक दिवस सहन होत नसे. पुढेपुढे खाऊ लागलो अन मग मात्र प्रेमात पडलो. पाबदा, हिलसा ऊर्फ इलिश, रोहू अन सरताज म्हणजे भेटकी हे माझे खाल्ले. त्यापुढे जास्त नै. प्रॉन ऊर्फ चिंगडी तेही खाल्ले. माछेर झोल चांगली असते पण आपल्या गोवन/मालवणी फिश करीसारखी खंग्री नसते. चिंगडी माछेर मलाई करी हाही एक वेगळा पदार्थ खाल्ला-नारळाच्या दुधासोबतची प्रॉन करी. बाकी सर्वांत आवडलेला पदार्थ म्हणजे भेटकी. आखूडशिंगी बहुदुधीसारखे बहुमांसी स्वल्पकाटी म्हणता येईल त्या माशाला. त्याची ती डिश भेटकी पातुडी म्हणजे पानांत भेटकी माशाचे तुकडे करून वाफवले जातात. त्याची चव निव्वळ अप्रतिम लागते. जण्रल करी ऊर्फ झोलसुद्धा मस्त उत्तम लागतो. पण ज्याचा इतका उदोउदो केला जातो त्या हिलशात मात्र कै दम वाटला नै. दोनतीनदा खाऊनही कैच वाटलं नै. एक तर ढीगभर काटे त्यात परत टेस्टपण लै खास नै. असो, (अंमळ) जुन्या आठवणी जाग्या झाल्या या निमित्ताने.

In reply to by विटेकर

रेवती 20/11/2013 - 18:48
हा प्रतिसाद वाचल्यावर मनुष्याने लगेच उठून त्या त्या ठिकाणी जावे. असो. भारतवारीत (म्हन्जे पुढील दोन तीन वर्षात) येईन तेंव्हा जाण्यासाठी हा धागा वाचनखूण म्हणून साठवावा म्हणते.

In reply to by विटेकर

मैत्र 20/11/2013 - 22:14
बहुधा माझे पुण्य पुरेसे नसावे गेल्या तीन वर्षात या चालुक्य बद्दल कधी ऐकले नाही त्यामुळे योग आला नाही. गुगलून पाहिले तर एक हॉटेल चालुक्य - म्हणजे राहण्याचे हॉटेल - रेस्टॉरंट नव्हे, दिसते आहे बसवेश्वर नगर मध्ये. तेच का अजून दुसरे कुठे आहे.. बाकि आडिगा उत्तम. बंगलोरात आवडलेले म्हणजे अडयार आनंद भवन आणि अर्थात एम टी आर. - बिशि बेळे भात, खारा भात (म्हणजे उपीठ) (सगळीकडे स्पेलिंग bath), एका प्लेटला एकच मिळणारा अप्रतिम वडा. आणि हो अनलिमिटेड थाळी.. फारच तयारीने जावे लागते. पण त्यातले सांबार / रसम माझ्या तेलूगू चवीला सरावलेल्या जिभेला थोडे गोड आणि कमी चवीचे वाटते. बाकी झकास.. सगळ्यात एक नंबर इडली आणि वडा मिळतो ब्राम्हिन्स कॉफी बार नामक एका अतिशय लहान जागेत .. ही आप्पासारखीच आणि त्याहून जुनी एक इन्स्टिट्युशन आहे. याहून भारी इडली, वडा आणि फिल्टर कॉफी कोणी बनवूच शकणार नाही. (अजून मुरुगनची चव नाही पाहिलेली त्यामुळे त्याशिवाय इतर)

In reply to by मैत्र

विटेकर 21/11/2013 - 11:40
चालुक्य - रेसकोर्स रोडला .. विधानभवानाच्या मागे .. बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच्या बरोबर समोर. होय तिथे राहण्याची सोय आहे पण तेच बसवेशवर नगर का हे माहीत नाही. दहा वर्शे उलटून गेली त्यामुळे आता को ओर्डिनेट्स स्मृतीतून पुसट होऊ लागले आहेत. ब्राह्मिन्स कॉफिबार - शंकर पुरम चा ना ? क्लासच आहे. पण त्याची मुरुगन बरोबर तुलना नको , दोन्ही इडल्या आपआपल्या जागी महान आहेत. एक कानडी तर एक मद्रासी , दोन्हीची घराणी वेगळी. आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे - ती एक संस्कृतीच आहे. तो भाग ही जुन्या कन्नडिगांचा आहे. विद्वत्प्रचुर चेहर्याचे अनेक कानडी आप्पा तिथे गहन चर्चा करताना दिसतील. तिथून केशव- कृपा अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे अनेक वेळा जाणे व्हायचे ! तिथली चट्णी.. वॉव .. तोंडाला पाणी सुटले.

In reply to by विटेकर

विटेकर 21/11/2013 - 11:50
Hotel Chalukya 44, Race Course Road, Basaveshwara Circle, High Grounds, Bangalore, Karnataka 560001 ‎ 080 2226 6866 याच हॉतेल्मध्ये रेस्त्रो आहे.आणि दारात कार लावून कारमध्ये बसून खायची पद्धत आहे. "कामत" आणि "पै" ची कर्नाटकी पातळ भाकरी ( जोल्डा रोटी - आपला जोंधळा) खाल्ली की नाही ? कधीतरी जायला हरकत नाही, पण वांग्याच्या भाजीचा चिखल करतात, आप्लं तेल वांगे दहावेळा तोंडात मारेल त्याच्या.

In reply to by विटेकर

आदूबाळ 22/11/2013 - 12:43
हे बेंगळुरूच्या खाद्यसंस्कृती बद्दलचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवा. परत बेंगळुरूला गेलो की या ठिकाणी जायचा बेत आहे - तेव्हा वाचनखूण सापडली पाहिजे :) का वेगळा लेखच लिहिताय बेंगळुरू बर?

In reply to by आदूबाळ

मैत्र 22/11/2013 - 15:59
प्रतिसाद आवडल्या गेला आहे बंगलोरचे प्रतिसाद इथे नकोत हे इतक्या सभ्यपणे लिहिल्याबद्दल --/\-- नोंद घेण्यात आली आहे. यापुढचे प्रतिसाद पुणे खाद्यसंस्कृतीवरच दिले जातील. (बंगळूरच्या तीन आधी पुण्यातच तीस वर्षे मनसोक्त खादाडी केली आहे..)

सूड 18/11/2013 - 11:44
>>पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते. सहमत. मस्त लिहीलंय. काल एफ.सी रोडवर (याला काही लोक एफ.सी. कॉलेज रोड असेही म्हणतात)यानामध्ये सिझलर्स खाल्ल्यानंतर कॅफे चॉकोलेडमध्ये एक लार्ज वॉलनट कॅड बी खाताना काहीसं असंच डिस्कशन चाललं होतं. पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही यावर एक छोटासा परिसंवादही (हो, परिसंवादच !! ;) ) घडला.

In reply to by सूड

सुनील 18/11/2013 - 12:01
पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही
आता शिक्रणालादेखिल चंगळीच्या यादीत टाकले तर, यादीतील आयट्म्सची संख्या वाढणारच ! ;)

In reply to by गणामास्तर

मैत्र 18/11/2013 - 23:51
आप्पा गेले असं ऐकलं आहे. :( मटार उसळ घेतल्यावर अतिशय मऊ आवाजात - "शेव देऊ का? ताजी आहे." असं विचारलं होतं एक दोन वेळा. दस्तुरखुद्द प्रेमाने विचारतायत म्हटल्यावर काय बिशाद. मग एका बिस्किटाच्या (पारलेचा मोठा पत्र्याचा डबा) डब्यातून वर्तमानपत्रात ठेवलेली खरोखर ताजी आणि केवळ अप्रतिम शेव आप्पा बशीमध्ये द्यायचे. आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by मैत्र

शेखर 19/11/2013 - 03:35
अप्पा जाऊन २ वर्षे झाली असावीत. अजुन म्हणजे, अप्पाकडची खिचडी काकडी केवळ अप्रतिम.. खरच तुम्ही म्हणता तसे आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by आदूबाळ

सुहास.. 19/11/2013 - 11:04
कित्येकदा !! कँम्पवरून आठवले , काय खावे तिथे ? मार्जोरिन ला आईसक्रीम बर्गर किंग ला किंगसाईज बर्गर नायाब , रेडिओ ला खिमा गार्डनपासला वडापाव फुटबॉल, बियरचा प्युयर ड्राफ्ट आणि बिलीयर्डचा मुड असेल तर टुन्स ला बसाव

सुज्ञ 18/11/2013 - 11:55
शोभलात हो ! आला का अभिमान वर. म्हनलेत स्वतास शहाने.. केलीत जहिरात... शोभलात हो पुनेकर !

झालय असं की ह्या लेखाचं ब्याकग्राउंड मला माहितीच नाहीये.. म्हणुन मला लेखाचा "निर्भेळ आनंद" घेता आला..!!! (पण काय हाणलाय च्यामारी.. वगैरे मजा नाही घेता आली!!) लेख उत्तम जमुन आलाय..!!! अगदी फक्कड..!!

यांचे जरा सविस्तर पत्ते मिळतील का? मनिषात पाणीपुरी - गणेशची लस्सी आणि ....सुजाताची मस्तानी खाउ शकतो... कधी मथुराची मस्तानी (जे एम रोड) ट्राय कर. आणि सिझलर्सचा विषय निघालाच आहे तर दोन ठिकाणं : शांग्रीला (कर्वे रोड) आणि रविराज (भांडारकर रोड).

In reply to by संजय क्षीरसागर

मृत्युन्जय 18/11/2013 - 13:17
मनिषा - कर्वेनगर मध्ये. कर्वे नगर मध्ये ३ गणेश भेळ आहेत. एक जोशी स्वीट्स समोर, एक चितळे (देवेश बंधु) शेजारी आणि एक त्यापासुन थोडेसे पुढे जाउन मयुर हॉटेलच्या अलीकडच्या गल्लीत. हे जे तिसरे गणेश भेळ आहे त्यासमोर मनिषाची पाणीपुरी आहे. त्यांची मसाला पुरी देखील मस्तच. गणेश लस्सी मोदी गणपतीजवळ आहे. स्टेशनवरचे कैलास देखील चांगले आहे. मथुरा, शांग्रीला आणि रविराज ट्राय किया जायेगा. धन्यवाद.

In reply to by संजय क्षीरसागर

लॉ कॉलेज रोड चे योको सिझलर्स बेस्ट्.आणि नंतर सिझलिंग ब्राउनी खायला विसरु नका तेच ते...केकवर आइस्क्रीम आणि वर गरम चॉकलेट ओतुन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मी-सौरभ 19/11/2013 - 19:36
मला कल्याणि नगर मधलं बाऊंटी सिझलर खुप आवडलयं. ईतर कुणी ट्राय केलयं का? तसचं ईस्ट स्ट्रीट वरचं चायनीज रुम आणि जहांगीर बाहेरचा वहुमन कॅफे या पण लई भारी जागा आहेत :)

In reply to by कपिलमुनी

मी-सौरभ 20/11/2013 - 10:27
सॉमट्न, भोलेनाथ किंवा पालथा पण चालेल मुनीवर्यः एका सेकंड ह्यांड गाडीची पार्टी मागण्यापेक्षा तुमच्या नव्या जॉब ची पार्टी द्या. (नवा पगार आल्यावर पण चालेल)

नितीन पाठक 18/11/2013 - 14:03
लेख एकदम छान जमला आहे. माझ्या मते फक्त नगर येथे लस्सी मध्ये आइसक्रीम टाकून मिळते. (चूक भूल द्यावी / घ्यावी). नगरची दूर्गासिगची अंजीर लस्सीची चव छानच आहे. आपण नगरच्या लस्सीवरून पुणेकरांच्या खाद्यसंस्कृती वर कसे काय वळाला ? तसेच पुण्याचे लोक लग्नाचा बस्ता बा^धण्यासाठी नगरमध्ये येतात आणि संपूर्ण लग्नाचे व-हाड नगरची लस्सी पिल्याशिवाय परत जात नाही.

आदूबाळ 18/11/2013 - 00:21
ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात!

In reply to by अग्निकोल्हा

प्यारे१ 18/11/2013 - 01:03
द्यायचा होता 'सुज्ञ' ला प्रतिसाद, झाला लेख! होतंय असं. :) लेख आवडला रे! -पुण्याच्या लांबच्या परिघातला प्यारे. :)

In reply to by प्यारे१

समजुन घेणार की लेखकाला फाट्यावर मारून हिडिसतेचा नंगानाच दाखवणार याचे कुतुहल आहे.

In reply to by पक पक पक

पण जे चांगले नाही त्याला सुध्दा छान म्हणतात. म्हनुनच लेखकावर अनावश्यक पुण्याचा उल्लेख करायची नामुष्की आली व् अमुक तमुक हिकड़े नाय आवडलं तर तिकड जाऊंन खा म्हणावे लागले. इतर शहरात असे ऑप्शन देणारे नसतात तिथे अमुक ठिकाणी छान असते असे सांगतात तेव्हां ते छानच निघते उगाच त्याच पदार्थासाठी दुसर होटेल ट्राय मारावे लागत नाही

In reply to by अग्निकोल्हा

मृत्युन्जय 22/11/2013 - 16:22
पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही नामुष्कीने करणार नाही. अभिमानानेच करेल. मी रुढार्थाने पुणेकर नाही ते वेगळे. अनेक पर्याय देण्यामागचे कारण असे की वेगवेगळ्या चवींचे अनेक पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीप्रमाणे निवडावे. उदाहरणच द्यायचे झाले तर मी नगरातल्या लस्सीचे दिले. मला अजिबात नाही आवडली. कोल्हापुरची फडतरे मिसळ अशीच माझ्यासाठी हुकलेली होती. त्याप्रमाणे एखाद्याला बेडेकर नाही आवडणार तर अजुन अनेक पर्याय आहेत. शक्यता आहे की एखाद्याला काहिच नाही आवडणार. पण असा एखादाच असेल.

In reply to by रेवती

प्यारे१ 18/11/2013 - 02:01
मला असा वाद ऐकला वाचला की राहून राहून मुंबई पुणे मुंबई हा सिनुमामा आठवतो. सारसबागेतली भेळ खाताना (पुणेकर असून देखील) स्वप्निल जोशी म्हणतो : भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! फॉर दॅट मॅटर सगळ्याच गोष्टी तशा अस्मितांचा टॅग न लावता एन्जॉय करा की! आणखी मजा येईल. आनि लई बारीक बगायचंच म्हनलं तर बाईला बी मिशा दिसत्यातच की! तेला काय शीमा हाय व्हय मग?

In reply to by प्यारे१

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:42
भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! आयला प्यारे हेच लिहायचे होते रे. त्यासाठी एक लेख खर्ची पाडायला लागला. छ्या.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बॅटमॅन 18/11/2013 - 17:27
हा हा हा, नेमके!!!! उचकणारे असले की उचकवणारे भेटतातच! बरं मजा अशी की दुर्लक्षिलेलेही चालत नाही =)) धरलं तर चावतंय आणि सोडलं तरी परत जवळ येतंय =))

स्पंदना 18/11/2013 - 03:12
हाण्ण तेच्या! शंभर घाव एक तुकडा अर्धा पांगळा अर्धा वाकडा!! (गैरसमज नको, मला सौ बात की एक बात म्हणायच आहे. जरा पद्यात म्हंटल)

नगरीनिरंजन 18/11/2013 - 04:18
बालिशपणा! नगरच्या लस्सीवाल्याच्या लस्सीला नावं ठेवली म्हणून आम्हाला राग येत नाही; पण हा असला बालिशपणा पाहून करमणूक मात्र होते. :-)

In reply to by मीता

पक्या 19/11/2013 - 04:18
हे हे हे, आम्ही दिल्लीची लस्सी उत्कृष्ट मानतो नगरची काहीच नाही त्यापुढे. अजुन पंजाबला जायचा योग आला नाही पण तिकडची अजुन बेस्ट असेल असे वाटते.

In reply to by पक्या

यसवायजी 19/11/2013 - 18:07
लुधियाणात ४-५ दिवस होतो तेंव्हा रोज लस्सी प्यायचो. आपल्याकडे मिळणारी आणी तिकडची लस्सी यात फरक आहे. इथे लस्सी खुप दाट असते. तिकडे तितकी दाट नव्हती. तिथल्या स्विट अन साल्टी दोन्ही मस्त वाटल्या. खाण्याच्या -(पिण्याच्या सुद्धा ;) ) बाबतीत चंगळ होती. पण एके दिवशी कांदे-पोह्यात पनीर पाहीले अन एकदाच ठरवलं की, व्हेन यु आर इन पंजाब, पंजाबीच खा. (हे इतरत्रही लागु पडावे असे वाटते) उगाच आमच्या महारष्ट्रात असले पोहे मिळतात असे सांगण्यात काही अर्थ नाही ना. ;)

रमेश आठवले 18/11/2013 - 08:14
पुण्याबाहेर रहणार्या मझ्या सारख्याच्या माहितीसाठी मस्तानी हा कोणता खाद्य पदार्थ आहे ते सांगाल का ?

In reply to by रमेश आठवले

शैलेन्द्र 18/11/2013 - 11:34
मस्तानी हा खाद्य्/पिद्य पदार्थ आहे, घट्टश्या दुधात, कस्टर्ड, फ्लेवर, आइस्क्रीम व चवीपुरते जिन्नस टाकुन स्टृऑ/ चमच्याने खातात.. पोटभर पिण्यासाठी मात्र तुम्ही बाजीरावच हवे..

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 21/11/2013 - 13:06
थोडे पाणचट चवीचे फ्रूट सॅलड ग्लासात भरून, त्यावर आंबट अननसाची चकती खोचून, व वर थोडी टूटीफ्रूटी उर्फ रंगीत साखरेच्यापाकातल्या भोपळ्याच्या बारीक फोडी टाकल्या, त्याला अव्वाच्या सव्वा किम्मत लावून ओव्हरहाईप केले, की जे बनते, त्याला पुण्यात मस्तानी म्हणतात.

In reply to by आनंदी गोपाळ

रेवती 21/11/2013 - 18:21
गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत नाही पण तुम्ही म्हणताय तितकी वाईट्ट नक्कीच बनवलेली नसते. उगीच नावं ठेवताना कै च्या कै नको.

मैत्र 18/11/2013 - 10:39
पुण्यापासून शेकडो मैल लांब असल्याने सर्व वर्णने वाचून थोडा त्रास झाला पण जी खास पुणेरी तळमळ दिसली - की जे जे उत्तम उदात्त उन्नत च्या चालीवर
जे जे चविष्ट खमंग रूचकर ते ते मनापासून खा ना लेको!!
ती विलक्षण आवडली. पण तरीही नगरची लस्सी चांगलीच आहे. जरा कालमानाप्रमाणे थोडी दर्जात घसरली आहे. तरी एका विधानाचा सूड घेण्यासाठी दुसर्‍या पदार्थात पार बेगॉन (बॅगोन नव्हे) घालण्यापर्यंत जाणं हे शेवटच्या परिच्छेदाशी जुळलं नाही.. बाकी आनंदच वाटला जरा अस्सल आपल्या खाद्यकुळीतला पाहून :)

सुहास.. 18/11/2013 - 10:44
पुणेकरांना घुसडल्याबद्दल निषेध, पण आय डी नेमका आपलाच असल्याने ;) ....लेख अतिशय समतोल आणी प्रामाणीक . माझे ही होते असे , चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई ;) , वडाई ;) , दोसाई ;) आणि उथ्थप्पम खाल्ले की दुसरी कडे (अगदी जगात ) खायला जरा त्रास च होतो ....आमच्या पुनमला मिळणारी दाल -खिचडी मी बाहेर कुठे ही खावु शकय नाही .......तसेच नोएडा/दिल्ली ला गेलो की लस्सी , कुलचे , तंदुरी याची चव तोंडार रेंगाळत असते ...

In reply to by सुहास..

मृत्युन्जय 18/11/2013 - 10:46
चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई Wink , वडाई Wink , दोसाई Wink आणि उथ्थप्पम खाल्ले मुरुगन रे मित्रा मुरुगनची आठवण झाली. कासावीस झाला रे जीव. मला ते सर्वणा भवन एवढे आठवत नाही पण मुरुगन म्हटल्यावर जीव जातो.

अनुप ढेरे 18/11/2013 - 11:12
आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत.
एकदम चपखल !! हेच वाटतं बेडेकर मिसळ खाल्लीकी... लेख फक्कड !!

In reply to by अनुप ढेरे

विटेकर 18/11/2013 - 11:31
खरयं , म्हणोन आमची चक्कर दर शनिवारी सकाळी बेडेकरांकडे ! अगदी गेल्यी जन्मीचे देणे असल्यासारखे. मधे त्यांनी कमिन्स कॉलेजच्या गलीत ब्राण्च काढली होती पण तिथे ती " अस्मिता " की कायशी नव्ह्ती ( त्यांना तुसडेपणा म्हणायचा असावा !) त्यामुळे पुन्हा गावातल्या चकरा सुरु झाल्या ! हल्ली फार महाग झालीय पण बेडेकर मिसळ ! चाळीस रुपये घेतात आणि पुन्हा स्वंय्-सेवा( शेल्फ सर्विस) पण मजा येते हां ! लेख छानच ! बा़की अस्मिता वगैरे ठीक आहे , पण बा़कीच्या गावांत चांगले पदार्थ मिळ्तात. मागे एकदा धाराशिव ( उस्मानाबाद ) ला एका मुस्लिम होटेल मधून आणलेले गुलाब जामून खाल्ले होते ! अप्रतिम ! एवढ्या दुष्काळी गावात ( तेव्हा महिन्यातून दोनदा पाअणी येते होते शहरात ) असला जबराट मेवा मिळाला ! फार प्रसिद्ध आहेत म्हणे हे गुलाब जामून.

In reply to by मृत्युन्जय

अनुप ढेरे 18/11/2013 - 17:57
पण सुरुवातीला जेवढा देतात तो रग्गड असतो मिसळीला. काही लोक यक्ष्ट्रा स्लाइस घेउन फुकटच्या तर्रिबरोबर हादडायचे. त्यांचा वांदा.

In reply to by विटेकर

गणामास्तर 18/11/2013 - 22:50
विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव आहे त्या हॉटेल (त्याला हॉटेल म्हणणे म्हणजे मांजरीला वाघ म्हणण्यासारखे आहे)चे. बाकी तिथे बसून गरमागरम, भल्या मोठ्या आकाराचे गुलाब्जाम (तिथे असाचं उच्चार होतो) खाण्याची मजा निराळीचं.तिथे पुरी भाजी सुद्धा अप्रतिम मिळते..पुरी सोबत येणारी तिखट जाळ बटाट्याची भाजी खाल्ल्यावर रामनाथ आणि चिंचवडातला नेवाळे मिसळवाला सुद्धा लाजेल..

In reply to by गणामास्तर

बॅटमॅन 19/11/2013 - 00:05
बाकी रामनाथ बद्दल आपले मत कै खास नै आज्याबात. पाटी जितकी बुंगाट आहे तितके खाणे बुंगाट असते तर अजून बरे झाले असते.

In reply to by गणामास्तर

विटेकर 20/11/2013 - 11:46
धन्यवाद गणामास्तर ! आमच्या बहिणाबाईनी तृप्त केले होते ते गुलाबजामुन खायला घालून ! पुरी -भाजी खाण्याची वेळ आली नाही पण रस्सा हादडयचा म्हणजे पाण्याची सोय मस्ट आहे हो !

In reply to by सुहास..

बॅटमॅन 18/11/2013 - 17:29
हा मुरुगन काय प्रकार आहे? चेन्नैतच आहे की पुण्यात पण आहे??? (पुण्यात राहूनही रोज एकवेळ आंध्रा मेसमध्ये जेवून तृप्त होणारा) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय 19/11/2013 - 14:25
मुरुगन चेन्नैतले एक उच्च शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे केळीच्या पानावर पदार्थ वाढतात, सांबारासकट सग्ळे. सांबार चटणीसाठी वेगळ्या वाट्या नसतात. तर मिनिटाला येउन पानात वाढुन जातात. मद्रासी स्टाइलने ओरपायचे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी निव्व़ळ सुख

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 11:51
मुरगन इडली म्हणजे स्वर्गारोहण ! आण्खी एक वैशिष्ट्य . सांबार वाटी असते पण चमाचा दिला नव्हता. ओरपा हाताने . म्हणजे बघा, ईडली घ्यायची आणि त्या केळीच्या पानावरच सांबार / चट्णी ओतायची ! आणि मग ..... आ क्र म ण ! त्या मानाने सर्वनन( उच्चार सार्व्ण) भुवन चे नाव जास्त झाले आहे. ते ही ठीकच आहे पण हल्ली त्याचे मद्रासी स्वरुप जाऊन अधुनिक झाले आहे.

In reply to by विटेकर

विटेकर 20/11/2013 - 11:59
बंगळूरातील .. एम टी आर .. हौस फिटते सौदिन्डियन खाण्याची ! मलबारी, तामिळ , तेलगु , कानडी अशा विविध छटा असल्या तरी मराठी माणसाला फार विशेष वाट्त नाही. कानडी स्व्यंपाक सर्व सौदिन्डियन मधे उजवा अशी माझी आवड आहे ! बाकी बंगलोरात चालुक्य चा दोसा खाणे यासाठी बरेच पुण्य गाठीशी हवे ! अस्ला मसाला दोसा जगात कुठेही मिळत नाही. दुधाची ताकावर साठी - विद्यार्थी ( गांधीबाजार ) , गणेश ( उच्चार गनेश - जयनगर ), बल्लाळ रेसिदेन्सी (रेसीदेन्सी रोड) , अडिगा ( जय नगर ) कामत आणि शांतिसागर यांचे दोसे ही चालतील.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 12:11
धण्यवाद सरजी. चार महिने बंगळुरात राहण्याचा योग आला होता दोनेक वर्षांमागे पण केंगेरीजवळ आणि दोघा बंगाल्यांसोबत राहिल्याने ही ठिकाणे काही कव्हर करता आली नाहीत. बंगाली तेच्यायला नुस्ते नॉनव्हेज नॉनव्हेज करत मरत असायचे त्यामुळे जरा मागेच पडलं हे ऑथेंटिक खाणं. आता मात्र जाईन तेव्हा अवश्य खाईन तिथे!

In reply to by बॅटमॅन

विटेकर 20/11/2013 - 12:22
खर आहे.. एकदा भुवनेश्वर मध्ये बंगाल्याबरोबर आठवडाभर होतो. मी शुद्ध शाकाहारी आणि हा साला माश्याशिवाय नाव काढेना ! शेवटी एका स्थानिक रिक्षावाला पकडला आणि त्याने ज्या ठिकाणी नेले... शुद्ध शाकाहारी खाणावळ होती ! तृप्ती म्हणजे काय याचा अखंड अनुभव ! आणि इअतके विविध प्रकार .. फक्त मिठाया नव्हेत तर भाज्या आणि स्टफड मटेरियल ! अप्रतिम ! त्यानंतर दोन वर्षांनी पुरीला आई- वडिलांसोबत गेलो होतो . ती खाणावळ शोधून काढली अणि चेपून आलो! भारतातील सर्व प्रांतात उत्तम शाकाहारी पदार्थ मिळतात आणि त्या त्या भागात तेच खावे.. शक्य तर नोन होटेल्स टाळून गल्लिबोळ धुंडाळावेत, उत्तमोत्तम पदार्थ मिळतात. थोडी रिस्क घेण्याची तयारी हवी . पाटण्यच्या गांधी मैदानाच्या बाजूला बेलफळाचे सरबत विकतात. २ रुपये ग्लास . .. हायला शप्पथ सांगतो , हलाहलाचा दाह शांत होईल .पण धाडस हवे.बाटलीतील पाणी पिनार्याला ती मजा नाही.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 20/11/2013 - 13:05
ओरिसामध्ये कधी गेलो नाही. बंगालमध्ये २ वर्षे राहिलो-कलकत्त्यात. नॉनव्हेज खात नसतो तर कसा जगलो असतो देव जाणे तिथे. बंगाली व्हेज हा अंमळ टर्न ऑफच प्रकार आहे माझ्यासाठी.

In reply to by सुहास..

बॅटमॅन 20/11/2013 - 20:21
आता कबूल करायला हरकत नाही. कोलकात्यात मासे कमीच खाल्ले :( माशाचा वास कैक दिवस सहन होत नसे. पुढेपुढे खाऊ लागलो अन मग मात्र प्रेमात पडलो. पाबदा, हिलसा ऊर्फ इलिश, रोहू अन सरताज म्हणजे भेटकी हे माझे खाल्ले. त्यापुढे जास्त नै. प्रॉन ऊर्फ चिंगडी तेही खाल्ले. माछेर झोल चांगली असते पण आपल्या गोवन/मालवणी फिश करीसारखी खंग्री नसते. चिंगडी माछेर मलाई करी हाही एक वेगळा पदार्थ खाल्ला-नारळाच्या दुधासोबतची प्रॉन करी. बाकी सर्वांत आवडलेला पदार्थ म्हणजे भेटकी. आखूडशिंगी बहुदुधीसारखे बहुमांसी स्वल्पकाटी म्हणता येईल त्या माशाला. त्याची ती डिश भेटकी पातुडी म्हणजे पानांत भेटकी माशाचे तुकडे करून वाफवले जातात. त्याची चव निव्वळ अप्रतिम लागते. जण्रल करी ऊर्फ झोलसुद्धा मस्त उत्तम लागतो. पण ज्याचा इतका उदोउदो केला जातो त्या हिलशात मात्र कै दम वाटला नै. दोनतीनदा खाऊनही कैच वाटलं नै. एक तर ढीगभर काटे त्यात परत टेस्टपण लै खास नै. असो, (अंमळ) जुन्या आठवणी जाग्या झाल्या या निमित्ताने.

In reply to by विटेकर

रेवती 20/11/2013 - 18:48
हा प्रतिसाद वाचल्यावर मनुष्याने लगेच उठून त्या त्या ठिकाणी जावे. असो. भारतवारीत (म्हन्जे पुढील दोन तीन वर्षात) येईन तेंव्हा जाण्यासाठी हा धागा वाचनखूण म्हणून साठवावा म्हणते.

In reply to by विटेकर

मैत्र 20/11/2013 - 22:14
बहुधा माझे पुण्य पुरेसे नसावे गेल्या तीन वर्षात या चालुक्य बद्दल कधी ऐकले नाही त्यामुळे योग आला नाही. गुगलून पाहिले तर एक हॉटेल चालुक्य - म्हणजे राहण्याचे हॉटेल - रेस्टॉरंट नव्हे, दिसते आहे बसवेश्वर नगर मध्ये. तेच का अजून दुसरे कुठे आहे.. बाकि आडिगा उत्तम. बंगलोरात आवडलेले म्हणजे अडयार आनंद भवन आणि अर्थात एम टी आर. - बिशि बेळे भात, खारा भात (म्हणजे उपीठ) (सगळीकडे स्पेलिंग bath), एका प्लेटला एकच मिळणारा अप्रतिम वडा. आणि हो अनलिमिटेड थाळी.. फारच तयारीने जावे लागते. पण त्यातले सांबार / रसम माझ्या तेलूगू चवीला सरावलेल्या जिभेला थोडे गोड आणि कमी चवीचे वाटते. बाकी झकास.. सगळ्यात एक नंबर इडली आणि वडा मिळतो ब्राम्हिन्स कॉफी बार नामक एका अतिशय लहान जागेत .. ही आप्पासारखीच आणि त्याहून जुनी एक इन्स्टिट्युशन आहे. याहून भारी इडली, वडा आणि फिल्टर कॉफी कोणी बनवूच शकणार नाही. (अजून मुरुगनची चव नाही पाहिलेली त्यामुळे त्याशिवाय इतर)

In reply to by मैत्र

विटेकर 21/11/2013 - 11:40
चालुक्य - रेसकोर्स रोडला .. विधानभवानाच्या मागे .. बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच्या बरोबर समोर. होय तिथे राहण्याची सोय आहे पण तेच बसवेशवर नगर का हे माहीत नाही. दहा वर्शे उलटून गेली त्यामुळे आता को ओर्डिनेट्स स्मृतीतून पुसट होऊ लागले आहेत. ब्राह्मिन्स कॉफिबार - शंकर पुरम चा ना ? क्लासच आहे. पण त्याची मुरुगन बरोबर तुलना नको , दोन्ही इडल्या आपआपल्या जागी महान आहेत. एक कानडी तर एक मद्रासी , दोन्हीची घराणी वेगळी. आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे - ती एक संस्कृतीच आहे. तो भाग ही जुन्या कन्नडिगांचा आहे. विद्वत्प्रचुर चेहर्याचे अनेक कानडी आप्पा तिथे गहन चर्चा करताना दिसतील. तिथून केशव- कृपा अगदी हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे अनेक वेळा जाणे व्हायचे ! तिथली चट्णी.. वॉव .. तोंडाला पाणी सुटले.

In reply to by विटेकर

विटेकर 21/11/2013 - 11:50
Hotel Chalukya 44, Race Course Road, Basaveshwara Circle, High Grounds, Bangalore, Karnataka 560001 ‎ 080 2226 6866 याच हॉतेल्मध्ये रेस्त्रो आहे.आणि दारात कार लावून कारमध्ये बसून खायची पद्धत आहे. "कामत" आणि "पै" ची कर्नाटकी पातळ भाकरी ( जोल्डा रोटी - आपला जोंधळा) खाल्ली की नाही ? कधीतरी जायला हरकत नाही, पण वांग्याच्या भाजीचा चिखल करतात, आप्लं तेल वांगे दहावेळा तोंडात मारेल त्याच्या.

In reply to by विटेकर

आदूबाळ 22/11/2013 - 12:43
हे बेंगळुरूच्या खाद्यसंस्कृती बद्दलचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवा. परत बेंगळुरूला गेलो की या ठिकाणी जायचा बेत आहे - तेव्हा वाचनखूण सापडली पाहिजे :) का वेगळा लेखच लिहिताय बेंगळुरू बर?

In reply to by आदूबाळ

मैत्र 22/11/2013 - 15:59
प्रतिसाद आवडल्या गेला आहे बंगलोरचे प्रतिसाद इथे नकोत हे इतक्या सभ्यपणे लिहिल्याबद्दल --/\-- नोंद घेण्यात आली आहे. यापुढचे प्रतिसाद पुणे खाद्यसंस्कृतीवरच दिले जातील. (बंगळूरच्या तीन आधी पुण्यातच तीस वर्षे मनसोक्त खादाडी केली आहे..)

सूड 18/11/2013 - 11:44
>>पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते. सहमत. मस्त लिहीलंय. काल एफ.सी रोडवर (याला काही लोक एफ.सी. कॉलेज रोड असेही म्हणतात)यानामध्ये सिझलर्स खाल्ल्यानंतर कॅफे चॉकोलेडमध्ये एक लार्ज वॉलनट कॅड बी खाताना काहीसं असंच डिस्कशन चाललं होतं. पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही यावर एक छोटासा परिसंवादही (हो, परिसंवादच !! ;) ) घडला.

In reply to by सूड

सुनील 18/11/2013 - 12:01
पुण्यात जितकी खाण्याची चंगळ आहे तितकी मुंबईत नाही
आता शिक्रणालादेखिल चंगळीच्या यादीत टाकले तर, यादीतील आयट्म्सची संख्या वाढणारच ! ;)

In reply to by गणामास्तर

मैत्र 18/11/2013 - 23:51
आप्पा गेले असं ऐकलं आहे. :( मटार उसळ घेतल्यावर अतिशय मऊ आवाजात - "शेव देऊ का? ताजी आहे." असं विचारलं होतं एक दोन वेळा. दस्तुरखुद्द प्रेमाने विचारतायत म्हटल्यावर काय बिशाद. मग एका बिस्किटाच्या (पारलेचा मोठा पत्र्याचा डबा) डब्यातून वर्तमानपत्रात ठेवलेली खरोखर ताजी आणि केवळ अप्रतिम शेव आप्पा बशीमध्ये द्यायचे. आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by मैत्र

शेखर 19/11/2013 - 03:35
अप्पा जाऊन २ वर्षे झाली असावीत. अजुन म्हणजे, अप्पाकडची खिचडी काकडी केवळ अप्रतिम.. खरच तुम्ही म्हणता तसे आप्पा हे एक इंस्टीट्युशन होतं खाद्य संस्कृतीचं.

In reply to by आदूबाळ

सुहास.. 19/11/2013 - 11:04
कित्येकदा !! कँम्पवरून आठवले , काय खावे तिथे ? मार्जोरिन ला आईसक्रीम बर्गर किंग ला किंगसाईज बर्गर नायाब , रेडिओ ला खिमा गार्डनपासला वडापाव फुटबॉल, बियरचा प्युयर ड्राफ्ट आणि बिलीयर्डचा मुड असेल तर टुन्स ला बसाव

सुज्ञ 18/11/2013 - 11:55
शोभलात हो ! आला का अभिमान वर. म्हनलेत स्वतास शहाने.. केलीत जहिरात... शोभलात हो पुनेकर !

झालय असं की ह्या लेखाचं ब्याकग्राउंड मला माहितीच नाहीये.. म्हणुन मला लेखाचा "निर्भेळ आनंद" घेता आला..!!! (पण काय हाणलाय च्यामारी.. वगैरे मजा नाही घेता आली!!) लेख उत्तम जमुन आलाय..!!! अगदी फक्कड..!!

यांचे जरा सविस्तर पत्ते मिळतील का? मनिषात पाणीपुरी - गणेशची लस्सी आणि ....सुजाताची मस्तानी खाउ शकतो... कधी मथुराची मस्तानी (जे एम रोड) ट्राय कर. आणि सिझलर्सचा विषय निघालाच आहे तर दोन ठिकाणं : शांग्रीला (कर्वे रोड) आणि रविराज (भांडारकर रोड).

In reply to by संजय क्षीरसागर

मृत्युन्जय 18/11/2013 - 13:17
मनिषा - कर्वेनगर मध्ये. कर्वे नगर मध्ये ३ गणेश भेळ आहेत. एक जोशी स्वीट्स समोर, एक चितळे (देवेश बंधु) शेजारी आणि एक त्यापासुन थोडेसे पुढे जाउन मयुर हॉटेलच्या अलीकडच्या गल्लीत. हे जे तिसरे गणेश भेळ आहे त्यासमोर मनिषाची पाणीपुरी आहे. त्यांची मसाला पुरी देखील मस्तच. गणेश लस्सी मोदी गणपतीजवळ आहे. स्टेशनवरचे कैलास देखील चांगले आहे. मथुरा, शांग्रीला आणि रविराज ट्राय किया जायेगा. धन्यवाद.

In reply to by संजय क्षीरसागर

लॉ कॉलेज रोड चे योको सिझलर्स बेस्ट्.आणि नंतर सिझलिंग ब्राउनी खायला विसरु नका तेच ते...केकवर आइस्क्रीम आणि वर गरम चॉकलेट ओतुन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मी-सौरभ 19/11/2013 - 19:36
मला कल्याणि नगर मधलं बाऊंटी सिझलर खुप आवडलयं. ईतर कुणी ट्राय केलयं का? तसचं ईस्ट स्ट्रीट वरचं चायनीज रुम आणि जहांगीर बाहेरचा वहुमन कॅफे या पण लई भारी जागा आहेत :)

In reply to by कपिलमुनी

मी-सौरभ 20/11/2013 - 10:27
सॉमट्न, भोलेनाथ किंवा पालथा पण चालेल मुनीवर्यः एका सेकंड ह्यांड गाडीची पार्टी मागण्यापेक्षा तुमच्या नव्या जॉब ची पार्टी द्या. (नवा पगार आल्यावर पण चालेल)

नितीन पाठक 18/11/2013 - 14:03
लेख एकदम छान जमला आहे. माझ्या मते फक्त नगर येथे लस्सी मध्ये आइसक्रीम टाकून मिळते. (चूक भूल द्यावी / घ्यावी). नगरची दूर्गासिगची अंजीर लस्सीची चव छानच आहे. आपण नगरच्या लस्सीवरून पुणेकरांच्या खाद्यसंस्कृती वर कसे काय वळाला ? तसेच पुण्याचे लोक लग्नाचा बस्ता बा^धण्यासाठी नगरमध्ये येतात आणि संपूर्ण लग्नाचे व-हाड नगरची लस्सी पिल्याशिवाय परत जात नाही.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

राजघराणं ·

आशु जोग 14/10/2013 - 01:21
एवढं सगळं आम्हाला वाचून समजणे अवघड आहे. त्यापेक्षा भाषण का देत नाही या विषयावर आम्ही ऐकू ...

अर्धवटराव 14/10/2013 - 04:47
पण तत्कालीन आणि सद्यःकाकीन समाज परिस्थिती राजकारणाला कसं वळण देते याचा उहापोह करत राहणं आवश्यक आहे. या पठडीतले तुमचे लेख म्हणुनच वाचनीय, मननीय असतात. हिंदु धर्माच्या दुरावस्थेला सवर्ण समाज जबाबदार आहे हे सत्य आहेच. अखील मानवीय कल्याणाची क्षमता असलेला हा धर्म वर्ण दुराभिनाच्या जोखडातुन मुक्त होईल तो सुदीन... आणि तो दिन लवकर येवो... पुढील आव्हाने फार बिकट आणि भयावह आहेत.

छान लेख. हिंदू महासभा सावरकरादी फॅसिस्ट लोक भारतात पुन्हा चार्तुवर्ण आणू पाहत होते... याविरोधात बाबासाहेब, गांधिजीनी प्रबोधनाच्या माध्यमांतून चांगले काम करत या धर्मांध लोकांना अलगद बाजूला काढले. गांधी आणि आंबेडकर दोघेही आधुनिक बुद्धच होते, ज्यांनी मानवतेला मोठे करण्याचे काम केले.

In reply to by ग्रेटथिन्कर

अर्धवटराव 14/10/2013 - 08:16
पण जेंव्हा एखादी चांगली चर्चा सुरु असेल आणि आपल्याला त्यात मुल्यवर्धन करता येत नसेल तर किमान तिथे हागुन तरी ठेऊ नये.

In reply to by ग्रेटथिन्कर

धन्या 14/10/2013 - 15:50
हिंदू महासभा सावरकरादी फॅसिस्ट लोक भारतात पुन्हा चार्तुवर्ण आणू पाहत होते...
यासाठी संदर्भ देऊ शकाल का? सावरकरांसारख्या विज्ञानवादी आणि सुधारणावादी व्यक्तीला "पुन्हा चातुर्वर्ण आणू पाहणारा फॅसिस्ट" म्हणणं जरा अती वाटतंय.

In reply to by अर्धवटराव

आबा 15/10/2013 - 22:25
या निमित्ताने, बाकी सर्व महापुरुषांच्या मागे उभी असते तशी एक ब्रिगेड गांधीजींच्याही मागे उभी राहिली हे ही नसे थोडके. आता हे विधान आशिष नंदी छाप वाटू शकेल, पण त्याला उपाय नाही (अरूण जोशी, ऐकताय ना? :) )

In reply to by आबा

arunjoshi123 16/10/2013 - 14:13
आपले नाव ऐकले नाही, पण वेगळ्या स्थानी, वेगळ्या काळी नंदींनी केलेल्या ध्वनींचे पडसाद कोठवर पडताहेत ते पाहून चाट पडलो आहे. आता आपली प्रतिभा वापरून नंदीच्याबद्दलच एक नंदीवाक्य करून टाका.

In reply to by बॅटमॅन

रत्नांग्रिच्या पतितपावन मंदीरप्रवेशाचा प्रश्न तूमाला माहीत नाही काय.... दलितांनी तिथे प्रवेश मागितला तेव्हा हेच स्वातंत्रवीर दलितांना म्हणाले' आम्ही तूम्हाला वेगळे मंदिर बांधुन देतो, मुळ मंदीरात मात्र तूमी येऊ नका' हा काय प्रकार आहे ???अश्या वागण्याने चार्तुवर्णाला खतपाणी मिळेल कि तो नष्ट होईल?

In reply to by ग्रेटथिन्कर

अनिरुद्ध प 14/10/2013 - 14:51
हा काय प्रकार आहे? कारण प्रत्यक्षात आम्हाला ज्ञात अस्लेल्या माहितीच्या बरोबर विरुद्ध आपण सान्गत आहत.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन 14/10/2013 - 15:03
आणि त्यांनी त्याच रत्नांग्रीत सहभोजने आयोजित केली होती ती वर्णव्यवस्था टिकविण्यासाठीच, नैका? सिलेक्टिव्ह रीडिंग केले की असेच होते.

In reply to by बॅटमॅन

दलितांबरोबर सहभोजन केले, विहीरीतील पाणी दिले की लगेच जातियवाद संपतो हे अजब तर्कट आपण कुठे शिकलात ?हिंदूमध्ये आंतरजातीय विवाह ,रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी एकदाही प्रयत्न करु नयेत यातून काय सुचीत होते? सहा की सात सोनेरी पाने यात पुष्यमित्र शुंगाची स्तुती करणे, की ज्याने मनुस्मृती लिहीली व धर्माची वाट लावली त्याला अख्खे पान वाहणार्या माणसाने जातिअंतासाठी प्रयत्न केले असे सांगायचे म्हणजे त्यासाठी गोबेल्सचेच जीगर पाहीजे :-P

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन 14/10/2013 - 15:41
पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली असे धडधडीत खोटारडे वाक्य खरे म्हणून खपवायला ग्रेटथिंकरचे काळीज पाहिजे =))

In reply to by मुक्त विहारि

विटेकर 14/10/2013 - 15:51
मुवि , ब्याट्मन साहेब . जाने देव .. पीयेला आदमी हय.

In reply to by विटेकर

पण मी तर काहीच म्हणालो नाही आहे, मी आज फक्त गाणीच लिहीली आहेत... कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोडो बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना... (स्मॉल पेगर)

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन 14/10/2013 - 16:00
नुसत्या गफ्फांना इतिहास म्हणून शिकवणार्‍या शाळेत तुम्ही शिकला असाल, आम्ही नाही. पुष्यमित्र शुंगानेच ती कमिशन केली होती असे म्हणण्याला काय आधार आहे तेही सांगा. सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट हे आमच्या भारतात आधीपासूनच होते, तुमच्या युरोपात अलीकडे झाल्यामुळे तुम्हाला असेल बॉ त्याचे कौतुक. तुमच्या वागण्यावरून डाव्यांचे लाल रंगाबरोबर इतके गहिरे नाते का आहे ते समजले बाकी. शाब्दिक रक्तपात करायचा तो करायचाच, शिवाय आपलीच लाल करायची. माईका लाल हा शब्दप्रयोगही तुमच्यामुळेच रूढ झालाय असेच वाट्टे =))

In reply to by बॅटमॅन

क्लिंटन 14/10/2013 - 19:58
मानले रे बाबा तुला बॅटमॅना.एका मागोमाग एक बेजबाबदार विधाने करून स्वतःला मोठा थिंकर म्हणणवणार्‍या मनुष्याच्या तोंडी लागणे म्हणजे भयंकर संयमाचेच काम आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

दलितांबरोबर सहभोजन केले, विहीरीतील पाणी दिले की लगेच जातियवाद संपतो हे अजब तर्कट आपण कुठे शिकलात ?
जातियवाद संपवायसाठीचं एक पाऊल म्हणु शकतो आपण त्याला.
आंतरजातीय विवाह ,रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा.
जर सहभोजनानी जातियवाद संपत नसेल तर वरच्या उपायांनी संपेल? आजपर्यंतचा इतिहास पाहीला तर आंतरजातीय रोटी-बेटी चा अवलंब करणार्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि लागतोय ते पाहा आसपास. त्यासाठी कठोर कायद्याचं संरक्षणचं पाहीजे.

In reply to by ग्रेटथिन्कर

चिगो 24/10/2013 - 12:30
दलितांबरोबर सहभोजन केले, विहीरीतील पाणी दिले
रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा. आपल्या ह्या दोन वाक्यांमधला विरोधाभास आपल्याला कळतोय का? वेगळ्या जाती-वर्णाच्या व्यक्तीच्या हातून शिजवलेले किंवा वाढलेले खाणे, ह्यालाच "रोटी" व्यवहार म्हणतात. ह्याला विरोध करण्यापासूनच जातीव्यवस्था विरोधाची सुरुवात झाली होती..

In reply to by चिगो

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांची चूलत बहीण होळकर या धनगर राजघराण्यात दिली होती... तुमच्या तात्यारावांनी कुणा ब्राह्मणेत्तराची मुलगी घरात सून म्हणून आणली का ????वा त्यांची मुलगी कुणा ब्राह्मणेत्तराच्या घरात दिली का? त्यांच्या कुणा कार्यकर्त्याने आंतरजातिय विवाह केल्याचे उदाहरण दाखवा आणि हजार रुपये बक्षिस मिळवा.वरवरचा कोडगा रोटीव्यवहार करणारे जातिअंतासाठी काम करत होते म्हणे..कैच्याकै

In reply to by ग्रेटथिन्कर

ग्रेटथिंकर, नावा प्रमाणे वागण्यास तयार असाल तर ,खालिल पुस्तक(मुद्दाम विकत घेउन) वाचा. आणि त्याचा सप्रमाण प्रतिवादही करुन दाखवा! :) http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/144beb1457d04afe9d7cc62955a44770.jpg

In reply to by ग्रेटथिन्कर

त्यांच्या कुणा कार्यकर्त्याने आंतरजातिय विवाह केल्याचे उदाहरण दाखवा आणि हजार रुपये बक्षिस मिळवा.वरवरचा कोडगा रोटीव्यवहार करणारे जातिअंतासाठी काम करत होते म्हणे
ह्या न्यायाने "पेटा" (P. E. T. A. )च्या प्रत्येक सदस्याने कुत्रा, मांजर,गाढव अश्या प्राण्याशी लग्न करणे आवश्यक असेल नै ?

In reply to by विद्युत् बालक

अरे अकलेच्या कांद्या, पेटाचे म्हणणे इतकेच आहे की प्राण्यांना एथिकल ट्रीटमेंट द्यावी...तशी पेटासदस्य देतात. हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी धेडगुजरी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी काय केलं ते सांग..

In reply to by ग्रेटथिन्कर

हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी धेडगुजरी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी काय केलं ते सांग..
धर्मनिरपेक्ष म्हणजे राष्ट्रियत्व कसं काय होतं हो? गोळिची वेळ चुकली वाटतं.

In reply to by ग्रेटथिन्कर

फार लागले नाहे ना तुला? बाळ किती वेळा तू असे तोंडघशी पडणार? जा बरे तुझी पथ्याची आणि औषध घ्यायची वेळ झाली आहे.. आणि हो ते पथ्याचे विसरू नको बरे.... आणि हो जातांना जरा मुद्दामच सांगतो, ती आंबट चिंच पण जास्त खावू नकोस.

In reply to by ग्रेटथिन्कर

मृत्युन्जय 25/10/2013 - 10:51
कोल्हापूरच्या शाहू महराजांनी अजुन बरेच काही केले आहे म्हणतात. बादवे त्यांनी एखाद्या ब्राह्मण मुलीशी लग्न केले होते का?

In reply to by मृत्युन्जय

उद्दाम 26/10/2013 - 09:25
कोल्हापूरच्या शाहू म्हाराजांनी बरेच काही केले आहे. राधानगरीचे धरण त्या काळात त्यानीच बांधले. इंग्रजी काळातील संस्थानिकाने बांधलेले त्या काळातील ते सर्वात मोठे धरण होते. त्या धरणाच्या उजेडात आजही महाराष्ट्र नांदतो. तुमच्या मेंदूत प्रकाश त्याचा पडला का ते पहा आणि त्या प्रकाशात म्हाराजांनी केलेली इतर कामे दिसतात का ते पहा.

In reply to by उद्दाम

जाऊद्या हो उद्दामाण्णा,पेशवाईतल्या सुग्रास भोजनाच्या पंगतीवर चर्चा करणारे हे लोक, यांच्या मेंदूच्या गोट्या झाल्या आहेत .यांना समाजाभिमूख, विधायक गोष्टी दिसणार नाहीत. *सावरकरांनी पण इंग्लंडात आणि रत्नांग्रित बरेच काही केल्याचे म्हण्टले जाते,मी तर त्यांना हे समजत होतो, आपलं काय म्हणतात ते क्रांतिकारक.. क्रांतिकारक..*

In reply to by ग्रेटथिन्कर

मृत्युन्जय 26/10/2013 - 10:55
जाऊद्या हो उद्दामाण्णा,पेशवाईतल्या सुग्रास भोजनाच्या पंगतीवर चर्चा करणारे हे लोक, यांच्या मेंदूच्या गोट्या झाल्या आहेत . अँ? पेशवाईतल्या सुग्रास जेवणांबद्दल नाके मोरडुन त्यांच्यावर चर्चा करणारे वेगळेच लोक असतात. आम्ही त्यातले नव्हे. बाकी तुमच्या गोट्यांचाच मेंदु झाला असल्याने तुम्हाला कळायचेही नाही म्हणा. त्यामुळे जाउ द्यात यांना समाजाभिमूख, विधायक गोष्टी दिसणार नाहीत. आम्हाला खुप समाजाभिमुख, productive गोष्टींबद्दल माहिती आहे म्हणुनच तर वरील वक्तव्य केले. महाराज महान पुरुष होते तर मी तसे वक्तव्य का बरे करु नये म्हणे? त्यांच्याबद्दल माहिती नसलेल्या एका गोष्टीबद्दल मी केवळ पृच्छा केली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी तर तुमच्यासारखे समाजकंटक धाउन आले. जौद्यात. काय बोलणार. *सावरकरांनी पण इंग्लंडात आणि रत्नांग्रित बरेच काही केल्याचे म्हण्टले जाते,मी तर त्यांना हे समजत होतो, आपलं काय म्हणतात ते क्रांतिकारक.. क्रांतिकारक..* तर हो. क्रांतिकारक तर ते होतेच. नव्हते का? आणि त्यांनी देशकल्याणकारक बरीच कामे इंग्लंडात आणि संपुर्ण भारतात केली (केवळा रत्नाग्रित नाही काही)

In reply to by उद्दाम

मृत्युन्जय 26/10/2013 - 10:49
मला तर त्यांनी अजुन बरीच समाजसुधारणेची कामे केल्याची आठवतात. तुम्ही हे एकच का सांगितले? आणि या एका गोष्टीने मेंदुत काय प्रकाश पडायचा? तुमच्या मेंदुत काहीच नसल्यासारखी वक्त्यव्ये काय करता आहात? तुम्हाला महाराजांनी केलेली इतकी महान कामे दिसत नसतील तर मी काय करणार म्हणा?

In reply to by ग्रेटथिन्कर

पैसा 14/10/2013 - 18:52
रत्नांग्रिच्या पतितपावन मंदीरप्रवेशाचा प्रश्न तूमाला माहीत नाही काय....
आधी रत्नागिरीला जाऊन तिथे पतितपावनाच्या मंदिरासमोर भागोजीशेट कीरांचा पुतळा बघा, तिथे काय काय लिहिले आहे ते वाचून या आणि मग वाटेल ते बोला.

In reply to by ग्रेटथिन्कर

पिशी अबोली 20/10/2013 - 22:18
ग्रेटथिंकर काका किती हसवता हो तुम्ही...जाम आवडतं तुमचं लिखाण...लगे रहो...कुणी प्रतिसाद देवो न देवो, तुम्ही लिहीत रहा... इतकं हल्कफुल्कं असंबद्ध लिहिणं नाहीतर कुणाला जमायचं?

विटेकर 14/10/2013 - 14:59
लेख आवडला ! सगळीच मते पट्ली नसली तरिही ! अवांतर : जातियता संपूर्ण नष्ट झाली असती ( सतीच्या प्रथेमाणे ) असा माझा दावा आहे पण राजकारण्यांनी ( विशेषतः कॉग्रेस ने ) ते घोंगडे भिजतच ठेवले केवळ राजकीय स्वार्थापोटी ! अस्पृश्यता नष्ट झालीच की !काही चीड आणणारे अपवाद सोडले तर अस्पृश्यता निवारणाला आता मर्यादित यश आले आहेच ! कालानुरुप नवे बदल स्वीकारण्याइतका हिंदूधर्म नक्किच लवचिक आहे. यज्ञांसारख्या गैर लागू गोष्टी सुद्धा बाहेर काढून टाकल्या जातातच. असेच जातियता नष्ट होइइल असा मला विश्वास आहे. सोशल ईम्जिनिअरिंगच्या नावाने केवळ मतांचे राजकारण सुरु आहे.ते जेव्हा थांबेल तेव्हाच खरा विकास होऊ शकेल. कॉग्रेस्ने सुरु केलेले हे राजकारण अन्य पक्षांनी साळ्सूद पणे सुरु ठेवले ही खरी शोकांतिका आहे. बाकीचे सारे पक्ष कानामागून येऊन तिखट झाले आणि आता राजकारण म्हण्जे समाजकारणाचा बळी देऊनच करायचे असते असा समज दृढ झाला आहे. आजच्या काळात मूल्यमापन करायचे झाल्यास डो. आंबेड्करांचे हिंदूच्यावरिल सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. अन्यथा काय परिस्थिती झाली असती याचे कल्पना ही करवत नाही !

In reply to by विटेकर

धन्या 14/10/2013 - 15:57
डो. आंबेड्करांचे हिंदूच्यावरिल सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही.
असे वाचले आहे की धर्मांतरापूर्वी बाबासाहेब गाडगेबाबांना भेटायला गेले होते. गाडगेबाबा म्हणाले "तुम्ही शिकले सवरलेले. मला अडाण्याला काय कळतं त्यातलं. जो काही निर्णय घ्याल तो विचारपुर्वक घ्या".

विटेकर 14/10/2013 - 16:07
नाझ्या स्मरणाप्रमाणे हे बरोबर आहे. पण त्याच बरोबर अनेक मौलवि आणि पाद्री देखील त्याना सल्ला देतच होते. पू.बाबासाहेबांनी ढेबूजींचा सल्ला मानला. नाठाळ कार्ट्याला आईने एक ठेऊन द्यावी,त्याप्रमाणे बाबांसाहेबांनी हिंदू धर्माला चपराक दिली आणि हे योग्यच केले. त्यांना पक्की जाणीव होती की अन्य धर्मात प्रवेश म्हणजे भारतीयत्वाचा लोप !

मदनबाण 14/10/2013 - 16:12
छान माहिती... गांधीजींनी अस्पृश्य लोकांसाठी हरिजन हा शब्द प्रयोग वापरण्यास सुरु केला होता. बाकी लेखात बर्‍याच ठिकाणी गांधीजींचा एकेरी उल्लेख वाचला आणि तो योग्य वाटला नाही.

In reply to by मदनबाण

लगता अगर तीर हमारे शरीर पर तो अच्छा होता शायद हमारी जान अगर जाती तो भी अच्छा था. घाव देखके हकीम भी कछ कर सकता था. लेकीन ये जालीम दोस्त तुमने तीर तो ऐसी जगह मारा है की घाव तो दिखता ही नहीं और दर्द तो ऐसे होते है की जनमभर सहने ही पडेंगे...

आशु जोग 14/10/2013 - 17:00
अस्पृश्यता निर्मूलन झाले असेल तर आंबेडकर जयंतीला लोक्सचे उलट्सुलट प्रतिसाद का येतात मिसळीवर...

पैसा 14/10/2013 - 18:53
अतिशय अभ्यासपूर्ण लेख. सगळीच मते पटतील असे नाही. पण तुमचा त्यामागे केवढा अभ्यास आहे हे जाणवतं आहे.

अवतार 14/10/2013 - 19:45
काही अतिरिक्त मुद्दे गांधी आणि आंबेडकर हा संघर्ष केवळ दोन नेत्यांचा नसून दोन विचारधारांचा संघर्ष होता. समता प्रस्थापित करणे हे अंतिम ध्येय असले तरी त्यासाठी मार्ग कोणता निवडावा हा मतभेदाचा मुद्दा होता. शिवाय गांधीजींना ज्याप्रमाणे काँग्रेससारखी समाजातील विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना सांभाळायची होती तसे काही दडपण आंबेडकर यांच्यावर नव्हते. त्यामुळेच गांधीजींची भाषा ही काहीशी संदिग्ध आणि आडवळणाची तर आंबेडकर यांची भाषा ही थेट आणि रोखठोक असल्याचे दिसते. ज्या वेळी दुसऱ्या गोलमेज परिषदेत आंबेडकर दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ मागत होते तेव्हा गांधीजींनी मुस्लिम प्रतिनिधींची स्वतंत्र भेट घेऊन आंबेडकरांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी मुस्लिमांच्या मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली होती. "मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना विभक्त मतदार संघ दिले तर ठीक पण दलितांना मात्र देऊ नयेत", ही गांधीजींची भूमिका होती. तसेच या परिषदेत गांधीजी हे कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर भारताचे प्रतिनिधी या नात्याने उपस्थित राहिल्याचा दावा करत होते. सुरुवातीला आंबेडकर स्वत:ला प्रोटेस्टंट हिंदू म्हणवून घेत होते. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा १९३५ मध्ये केली. त्यानंतर तब्बल २१ वर्षे ते वाट पाहत होते. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अंतिम निर्णय घेतला. सद्य परिस्थितीत होणाऱ्या धर्मांतरांकडे पाहतांना हा मुद्दा उपयुक्त ठरावा.

In reply to by अवतार

धन्या 14/10/2013 - 19:49
"मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना विभक्त मतदार संघ दिले तर ठीक पण दलितांना मात्र देऊ नयेत", ही गांधीजींची भूमिका होती.
खुप काही बोलून जातं हे वाक्य.

प्यारे१ 15/10/2013 - 00:19
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का? त्यांना संत बनायचं होतं पण राजकारणी झाले किंवा राजकारणात राहून संत व्हायचं होतं का आणखी काही ह्याचा खरंच प्रश्न पडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्यांना नि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आलेल्या अनुभवांना अनुसरुनच असावी. दुर्दैवानं समाजाला एकूणच समाजाला त्यांचीही भूमिका झेपलेली दिसत नाही. एक रेषा लहान करुन दुसरी रेषा मोठी होत नाही. दुसरीनं पहिल्या रेघेपेक्षा मोठं व्हावं. असो.

In reply to by प्यारे१

विटेकर 15/10/2013 - 11:47
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का? बहुधा हो , राजकारण ही त्यांची प्रकृतीच नव्हती त्याच नेहरू आदीनी मस्त गैरफायदा घेतला.एखाद्या प्राचीन ऋषीमुनींसारखे त्यांचे व्यक्तिमत्व होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी राजकारण करण्याचा क्षीण प्रयत्न केला.त्यांचे सारे जीवन हिंदू मान्यतेप्रमाणे होते आणि म्हणूनच त्यांना भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली. साधु-संतांच्या मागे जाणे हीच आमची परंपरा होती. धर्म सत्तेने राजसत्तेवर अंकुश ठेवायचा हाच इथला परिपाठ होता. पण म्हणून वसिष्ठांनी शस्त्र हातात घेतले नाही , तसेच विद्यारण्य स्वामीनी अथवा समर्थांनीही ! आपली पोलिसी मेकेर ची भूमीका सोडून गांधीजी ओपेरेशन मधे उतरले आनि घोळ झाला त्यांच्या आदर्शवादी विचारसरणीचा व्यवहारात शून्य उपयोग होता ! आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही ! इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले! मुस्लिमांचा अनुनय हा तर शूद्ध भाबडेपणा होता. आणि त्यांच्या चुकलेल्या राजनीतीने जेव्हा रौद्ररुप धारण केले तेव्हा ते हताश आणि असहाय झाले ! त्यांनी गेल्या चारशे वर्षांच्या इतिहासाचा नीट अभ्यास केला असता तर मुस्लिमांच्यावर विश्वास टाकण्याची चूक त्यांनी केली नसती ! अस्तु, या जर-तर च्या गोष्टी आहेत, तरिही गांधीजी महानच होते, ज्या विशुढ्ध जीवन शैलीचा त्यांनी अंगिकार केला होता ती हिंदू संन्याश्याची जीवनशैली होती.निश्चित आदरणीय होती ! वाईट याचे वाटते की स्वार्थी काँग्रेसी राजकारण्यांनी गांधीच्या नावाने आपली पोळी भाजून घेतली आणि खराखुरा गांधीजींचा ( त्यांच्या तत्वज्ञानाचा) खून केला. अजूनही करताहेत !

In reply to by ग्रेटथिन्कर

एक साधा सोपा प्रश्र्न विचार करून लिहावे की विचार न करता लिहावे? "ह्याचे उत्तर आपणच द्यायचे आहे" हे सांगणे न लगे.... माझ्या वरील प्रश्र्नाचे उत्तर विचार पुर्वक दिलेत की मग मी तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर नक्की देईन. त्याचे काय आहे, तुमचे प्रश्र्न कधीच संपत नाहीत आणि इत्रांच्या शंकांचे समाधान तुमच्याकडून होत पण नाही. बरे खरडवही तर आपण बघत पण नाही. कळावे, आपला "स्मॉल पेगर"

In reply to by मुक्त विहारि

ग्रेट थिंकर साहेबांना "मिपावरील डिग्गीराजा" * ही पदवी कशीकाय वाटते?... त्यांची असंबद्ध आणि बेजबाबदार विधाने करून विनोदी कोलांट्याउड्या मारण्याची शक्ती त्या महामानवाइतकीच प्वॉवरफूल्ल हाय असं आमाला वाटू लागलयं. मुख्य मुद्दा सोडून भलतीकडे भरकटण्याची अचाट शक्ती हेही त्यांचं एक खास वैशिष्ट्य सांगता येईल. याशिवाय, मिपावर स्वतःचं हसं करून घेऊन इतरांची इतकी निखळ करमणूक करण्याची कामगिरी इतर कोणी गेलाबाजार दोन आठवडे तरी केली नाही असा आमचा दावा हाय. क म्हंताव?

In reply to by विटेकर

त्यातही खालील २ वाक्ये तर जबराच... "आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही!" आणि "इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!"

In reply to by मुक्त विहारि

"इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!" मला वाटतं हे तत्व या धाग्यावरच्या काही चर्चेतही सिद्ध होत आहे म्हणा !

In reply to by विटेकर

उद्दाम 16/10/2013 - 11:47
गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला वगैरे रडगाणे गाइल्याशिवाय काही लोकान्ना अन्न गोड लागत नाही. १. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. मुस्लिम लीगही १९०६ साली स्थापन झाली, तेंव्हा गांधीजी राजकारणातही नव्हते. मधल्या काळात त्यांची संख्याही ४० % झालेली होती. ४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. २. गांधीजीदेखील स्वतःच्या विचारसरणीने मोठे झाले. गंमत म्हणजे एकाच वेळी हे दोघेही स्वतंत्रपणे मोठे झाले आणि इथल्या तथाकथित 'सनातन धार्मिक' गटांना ते मोठे झाले हे पचवणं आजही जमलेलं नाही. मग ते जिथे तिथे अमूक धर्माचे लोक विश्वासघातकी असतात म्हणे आणि गांधीजींनी त्यान्ना मोठं केलं की त्यान्नी यान्ना मोठं केलं याच्या रडकहाण्या ऐकवत फिरत असतात.

In reply to by उद्दाम

अर्धवटराव 16/10/2013 - 20:33
>>मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. -- अ‍ॅब्सोल्युटली. भारतात मुस्लीम राज्यकर्ते त्यांच्या मनगटातले बळ आणि आणि निष्णात राजकारणात यांच्या भरोशावर स्थिरावले. >>४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. -- १००% सहमत.

In reply to by अर्धवटराव

उद्दाम 17/10/2013 - 13:29
१. गांधीजी ग्रेट थिंकर होते. २. मुघल उद्दाम होते. म्हणूनच दोघेही महान ठरले.

In reply to by उद्दाम

अर्धवटराव 18/10/2013 - 10:06
कुर्‍हाडीच्या दांड्यांनी गोतास काळ आणला व कावळा मशिदीच्या मिनारावर बसुन मौलवी बनला.

In reply to by अर्धवटराव

उद्दाम 18/10/2013 - 10:41
मंडनमिश्रा बौध्ह धर्म सोडून तुमच्याकडे आला तर एका रात्रीत शंकराचार्य झाला. कावळा मौलवी बनला तर तुमच्या पोटात कावळे का ओरडताहेत?

In reply to by उद्दाम

अर्धवटराव 18/10/2013 - 18:52
मण्डनमिश्राने आपला अधिकार सिद्ध करुन आचार्य पदाला शोभा आणली तर कावळ्याने फक्त कावकाव करत मौलवीपद खुजे केले.

In reply to by उद्दाम

बॅटमॅन 18/10/2013 - 18:59
हरे राम...आपलं ते हे हेर मार्क्स!!!! मण्डनमिश्राने बौद्ध धर्म कधीच स्वीकारला नव्हता. मतपिंका टाकायलासुद्धा एक शिस्त लागते हे विसरलात बहुतेक.

In reply to by उद्दाम

चौकटराजा 20/10/2013 - 18:50
१. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. उद्दाम साहेब हे तुम्ही मुद्दाम लिहिलय का ? आताशी २१ वे शतक चालू झाले आहे.

In reply to by विनायक प्रभू

आधी विचार चांगले विचाराने वर्तन चांगले वर्तनाने व्यक्तिमत्व ते भले असे व्यक्तिमत्व जगी गाजले (मुवि)

चिगो 15/10/2013 - 12:52
"जर.. तर.."च्या जाळ्यात न अडकता केलेले, इतिहासाचे समर्पक विश्लेषण.. लेख आवडला..

मृत्युन्जय 15/10/2013 - 14:19
१. सावरकर फॅसिस्ट होते, २. पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली, ३. गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे. ही ३ वक्तव्ये ऐकली. आता : १. शिवाजी महाराज कर्मट मुसलमान होते, २. राजकारणात येण्यासाठी आंबेडकर नावाच्या ब्राह्मणाने अस्पृश्यता निवारन चळवळीचा वसा स्वीकारल्याचे ढोंग स्वीकारले आणी ३. सावरकरांना पोहता येत नव्हते ही ३ वक्तव्य वाचली की मी डोळे मिटायला मोकळा. बाकी चालु देत.

In reply to by मृत्युन्जय

अनिरुद्ध प 15/10/2013 - 14:39
असत एखाद्याचे 'ग्रेट थिंकींग' त्याला आपण काय करायचे? तर वरती विटेकर काकांनी सान्गीतल्या प्रमाणे 'पीयेला हय' असे म्हणुन सोडुन द्यावे कसे?

आशु जोग 14/10/2013 - 01:21
एवढं सगळं आम्हाला वाचून समजणे अवघड आहे. त्यापेक्षा भाषण का देत नाही या विषयावर आम्ही ऐकू ...

अर्धवटराव 14/10/2013 - 04:47
पण तत्कालीन आणि सद्यःकाकीन समाज परिस्थिती राजकारणाला कसं वळण देते याचा उहापोह करत राहणं आवश्यक आहे. या पठडीतले तुमचे लेख म्हणुनच वाचनीय, मननीय असतात. हिंदु धर्माच्या दुरावस्थेला सवर्ण समाज जबाबदार आहे हे सत्य आहेच. अखील मानवीय कल्याणाची क्षमता असलेला हा धर्म वर्ण दुराभिनाच्या जोखडातुन मुक्त होईल तो सुदीन... आणि तो दिन लवकर येवो... पुढील आव्हाने फार बिकट आणि भयावह आहेत.

छान लेख. हिंदू महासभा सावरकरादी फॅसिस्ट लोक भारतात पुन्हा चार्तुवर्ण आणू पाहत होते... याविरोधात बाबासाहेब, गांधिजीनी प्रबोधनाच्या माध्यमांतून चांगले काम करत या धर्मांध लोकांना अलगद बाजूला काढले. गांधी आणि आंबेडकर दोघेही आधुनिक बुद्धच होते, ज्यांनी मानवतेला मोठे करण्याचे काम केले.

In reply to by ग्रेटथिन्कर

अर्धवटराव 14/10/2013 - 08:16
पण जेंव्हा एखादी चांगली चर्चा सुरु असेल आणि आपल्याला त्यात मुल्यवर्धन करता येत नसेल तर किमान तिथे हागुन तरी ठेऊ नये.

In reply to by ग्रेटथिन्कर

धन्या 14/10/2013 - 15:50
हिंदू महासभा सावरकरादी फॅसिस्ट लोक भारतात पुन्हा चार्तुवर्ण आणू पाहत होते...
यासाठी संदर्भ देऊ शकाल का? सावरकरांसारख्या विज्ञानवादी आणि सुधारणावादी व्यक्तीला "पुन्हा चातुर्वर्ण आणू पाहणारा फॅसिस्ट" म्हणणं जरा अती वाटतंय.

In reply to by अर्धवटराव

आबा 15/10/2013 - 22:25
या निमित्ताने, बाकी सर्व महापुरुषांच्या मागे उभी असते तशी एक ब्रिगेड गांधीजींच्याही मागे उभी राहिली हे ही नसे थोडके. आता हे विधान आशिष नंदी छाप वाटू शकेल, पण त्याला उपाय नाही (अरूण जोशी, ऐकताय ना? :) )

In reply to by आबा

arunjoshi123 16/10/2013 - 14:13
आपले नाव ऐकले नाही, पण वेगळ्या स्थानी, वेगळ्या काळी नंदींनी केलेल्या ध्वनींचे पडसाद कोठवर पडताहेत ते पाहून चाट पडलो आहे. आता आपली प्रतिभा वापरून नंदीच्याबद्दलच एक नंदीवाक्य करून टाका.

In reply to by बॅटमॅन

रत्नांग्रिच्या पतितपावन मंदीरप्रवेशाचा प्रश्न तूमाला माहीत नाही काय.... दलितांनी तिथे प्रवेश मागितला तेव्हा हेच स्वातंत्रवीर दलितांना म्हणाले' आम्ही तूम्हाला वेगळे मंदिर बांधुन देतो, मुळ मंदीरात मात्र तूमी येऊ नका' हा काय प्रकार आहे ???अश्या वागण्याने चार्तुवर्णाला खतपाणी मिळेल कि तो नष्ट होईल?

In reply to by ग्रेटथिन्कर

अनिरुद्ध प 14/10/2013 - 14:51
हा काय प्रकार आहे? कारण प्रत्यक्षात आम्हाला ज्ञात अस्लेल्या माहितीच्या बरोबर विरुद्ध आपण सान्गत आहत.

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन 14/10/2013 - 15:03
आणि त्यांनी त्याच रत्नांग्रीत सहभोजने आयोजित केली होती ती वर्णव्यवस्था टिकविण्यासाठीच, नैका? सिलेक्टिव्ह रीडिंग केले की असेच होते.

In reply to by बॅटमॅन

दलितांबरोबर सहभोजन केले, विहीरीतील पाणी दिले की लगेच जातियवाद संपतो हे अजब तर्कट आपण कुठे शिकलात ?हिंदूमध्ये आंतरजातीय विवाह ,रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी एकदाही प्रयत्न करु नयेत यातून काय सुचीत होते? सहा की सात सोनेरी पाने यात पुष्यमित्र शुंगाची स्तुती करणे, की ज्याने मनुस्मृती लिहीली व धर्माची वाट लावली त्याला अख्खे पान वाहणार्या माणसाने जातिअंतासाठी प्रयत्न केले असे सांगायचे म्हणजे त्यासाठी गोबेल्सचेच जीगर पाहीजे :-P

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन 14/10/2013 - 15:41
पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली असे धडधडीत खोटारडे वाक्य खरे म्हणून खपवायला ग्रेटथिंकरचे काळीज पाहिजे =))

In reply to by मुक्त विहारि

विटेकर 14/10/2013 - 15:51
मुवि , ब्याट्मन साहेब . जाने देव .. पीयेला आदमी हय.

In reply to by विटेकर

पण मी तर काहीच म्हणालो नाही आहे, मी आज फक्त गाणीच लिहीली आहेत... कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोडो बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना... (स्मॉल पेगर)

In reply to by ग्रेटथिन्कर

बॅटमॅन 14/10/2013 - 16:00
नुसत्या गफ्फांना इतिहास म्हणून शिकवणार्‍या शाळेत तुम्ही शिकला असाल, आम्ही नाही. पुष्यमित्र शुंगानेच ती कमिशन केली होती असे म्हणण्याला काय आधार आहे तेही सांगा. सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट हे आमच्या भारतात आधीपासूनच होते, तुमच्या युरोपात अलीकडे झाल्यामुळे तुम्हाला असेल बॉ त्याचे कौतुक. तुमच्या वागण्यावरून डाव्यांचे लाल रंगाबरोबर इतके गहिरे नाते का आहे ते समजले बाकी. शाब्दिक रक्तपात करायचा तो करायचाच, शिवाय आपलीच लाल करायची. माईका लाल हा शब्दप्रयोगही तुमच्यामुळेच रूढ झालाय असेच वाट्टे =))

In reply to by बॅटमॅन

क्लिंटन 14/10/2013 - 19:58
मानले रे बाबा तुला बॅटमॅना.एका मागोमाग एक बेजबाबदार विधाने करून स्वतःला मोठा थिंकर म्हणणवणार्‍या मनुष्याच्या तोंडी लागणे म्हणजे भयंकर संयमाचेच काम आहे.

In reply to by ग्रेटथिन्कर

दलितांबरोबर सहभोजन केले, विहीरीतील पाणी दिले की लगेच जातियवाद संपतो हे अजब तर्कट आपण कुठे शिकलात ?
जातियवाद संपवायसाठीचं एक पाऊल म्हणु शकतो आपण त्याला.
आंतरजातीय विवाह ,रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा.
जर सहभोजनानी जातियवाद संपत नसेल तर वरच्या उपायांनी संपेल? आजपर्यंतचा इतिहास पाहीला तर आंतरजातीय रोटी-बेटी चा अवलंब करणार्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि लागतोय ते पाहा आसपास. त्यासाठी कठोर कायद्याचं संरक्षणचं पाहीजे.

In reply to by ग्रेटथिन्कर

चिगो 24/10/2013 - 12:30
दलितांबरोबर सहभोजन केले, विहीरीतील पाणी दिले
रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा. आपल्या ह्या दोन वाक्यांमधला विरोधाभास आपल्याला कळतोय का? वेगळ्या जाती-वर्णाच्या व्यक्तीच्या हातून शिजवलेले किंवा वाढलेले खाणे, ह्यालाच "रोटी" व्यवहार म्हणतात. ह्याला विरोध करण्यापासूनच जातीव्यवस्था विरोधाची सुरुवात झाली होती..

In reply to by चिगो

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांची चूलत बहीण होळकर या धनगर राजघराण्यात दिली होती... तुमच्या तात्यारावांनी कुणा ब्राह्मणेत्तराची मुलगी घरात सून म्हणून आणली का ????वा त्यांची मुलगी कुणा ब्राह्मणेत्तराच्या घरात दिली का? त्यांच्या कुणा कार्यकर्त्याने आंतरजातिय विवाह केल्याचे उदाहरण दाखवा आणि हजार रुपये बक्षिस मिळवा.वरवरचा कोडगा रोटीव्यवहार करणारे जातिअंतासाठी काम करत होते म्हणे..कैच्याकै

In reply to by ग्रेटथिन्कर

ग्रेटथिंकर, नावा प्रमाणे वागण्यास तयार असाल तर ,खालिल पुस्तक(मुद्दाम विकत घेउन) वाचा. आणि त्याचा सप्रमाण प्रतिवादही करुन दाखवा! :) http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/144beb1457d04afe9d7cc62955a44770.jpg

In reply to by ग्रेटथिन्कर

त्यांच्या कुणा कार्यकर्त्याने आंतरजातिय विवाह केल्याचे उदाहरण दाखवा आणि हजार रुपये बक्षिस मिळवा.वरवरचा कोडगा रोटीव्यवहार करणारे जातिअंतासाठी काम करत होते म्हणे
ह्या न्यायाने "पेटा" (P. E. T. A. )च्या प्रत्येक सदस्याने कुत्रा, मांजर,गाढव अश्या प्राण्याशी लग्न करणे आवश्यक असेल नै ?

In reply to by विद्युत् बालक

अरे अकलेच्या कांद्या, पेटाचे म्हणणे इतकेच आहे की प्राण्यांना एथिकल ट्रीटमेंट द्यावी...तशी पेटासदस्य देतात. हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी धेडगुजरी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी काय केलं ते सांग..

In reply to by ग्रेटथिन्कर

हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी धेडगुजरी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी काय केलं ते सांग..
धर्मनिरपेक्ष म्हणजे राष्ट्रियत्व कसं काय होतं हो? गोळिची वेळ चुकली वाटतं.

In reply to by ग्रेटथिन्कर

फार लागले नाहे ना तुला? बाळ किती वेळा तू असे तोंडघशी पडणार? जा बरे तुझी पथ्याची आणि औषध घ्यायची वेळ झाली आहे.. आणि हो ते पथ्याचे विसरू नको बरे.... आणि हो जातांना जरा मुद्दामच सांगतो, ती आंबट चिंच पण जास्त खावू नकोस.

In reply to by ग्रेटथिन्कर

मृत्युन्जय 25/10/2013 - 10:51
कोल्हापूरच्या शाहू महराजांनी अजुन बरेच काही केले आहे म्हणतात. बादवे त्यांनी एखाद्या ब्राह्मण मुलीशी लग्न केले होते का?

In reply to by मृत्युन्जय

उद्दाम 26/10/2013 - 09:25
कोल्हापूरच्या शाहू म्हाराजांनी बरेच काही केले आहे. राधानगरीचे धरण त्या काळात त्यानीच बांधले. इंग्रजी काळातील संस्थानिकाने बांधलेले त्या काळातील ते सर्वात मोठे धरण होते. त्या धरणाच्या उजेडात आजही महाराष्ट्र नांदतो. तुमच्या मेंदूत प्रकाश त्याचा पडला का ते पहा आणि त्या प्रकाशात म्हाराजांनी केलेली इतर कामे दिसतात का ते पहा.

In reply to by उद्दाम

जाऊद्या हो उद्दामाण्णा,पेशवाईतल्या सुग्रास भोजनाच्या पंगतीवर चर्चा करणारे हे लोक, यांच्या मेंदूच्या गोट्या झाल्या आहेत .यांना समाजाभिमूख, विधायक गोष्टी दिसणार नाहीत. *सावरकरांनी पण इंग्लंडात आणि रत्नांग्रित बरेच काही केल्याचे म्हण्टले जाते,मी तर त्यांना हे समजत होतो, आपलं काय म्हणतात ते क्रांतिकारक.. क्रांतिकारक..*

In reply to by ग्रेटथिन्कर

मृत्युन्जय 26/10/2013 - 10:55
जाऊद्या हो उद्दामाण्णा,पेशवाईतल्या सुग्रास भोजनाच्या पंगतीवर चर्चा करणारे हे लोक, यांच्या मेंदूच्या गोट्या झाल्या आहेत . अँ? पेशवाईतल्या सुग्रास जेवणांबद्दल नाके मोरडुन त्यांच्यावर चर्चा करणारे वेगळेच लोक असतात. आम्ही त्यातले नव्हे. बाकी तुमच्या गोट्यांचाच मेंदु झाला असल्याने तुम्हाला कळायचेही नाही म्हणा. त्यामुळे जाउ द्यात यांना समाजाभिमूख, विधायक गोष्टी दिसणार नाहीत. आम्हाला खुप समाजाभिमुख, productive गोष्टींबद्दल माहिती आहे म्हणुनच तर वरील वक्तव्य केले. महाराज महान पुरुष होते तर मी तसे वक्तव्य का बरे करु नये म्हणे? त्यांच्याबद्दल माहिती नसलेल्या एका गोष्टीबद्दल मी केवळ पृच्छा केली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी तर तुमच्यासारखे समाजकंटक धाउन आले. जौद्यात. काय बोलणार. *सावरकरांनी पण इंग्लंडात आणि रत्नांग्रित बरेच काही केल्याचे म्हण्टले जाते,मी तर त्यांना हे समजत होतो, आपलं काय म्हणतात ते क्रांतिकारक.. क्रांतिकारक..* तर हो. क्रांतिकारक तर ते होतेच. नव्हते का? आणि त्यांनी देशकल्याणकारक बरीच कामे इंग्लंडात आणि संपुर्ण भारतात केली (केवळा रत्नाग्रित नाही काही)

In reply to by उद्दाम

मृत्युन्जय 26/10/2013 - 10:49
मला तर त्यांनी अजुन बरीच समाजसुधारणेची कामे केल्याची आठवतात. तुम्ही हे एकच का सांगितले? आणि या एका गोष्टीने मेंदुत काय प्रकाश पडायचा? तुमच्या मेंदुत काहीच नसल्यासारखी वक्त्यव्ये काय करता आहात? तुम्हाला महाराजांनी केलेली इतकी महान कामे दिसत नसतील तर मी काय करणार म्हणा?

In reply to by ग्रेटथिन्कर

पैसा 14/10/2013 - 18:52
रत्नांग्रिच्या पतितपावन मंदीरप्रवेशाचा प्रश्न तूमाला माहीत नाही काय....
आधी रत्नागिरीला जाऊन तिथे पतितपावनाच्या मंदिरासमोर भागोजीशेट कीरांचा पुतळा बघा, तिथे काय काय लिहिले आहे ते वाचून या आणि मग वाटेल ते बोला.

In reply to by ग्रेटथिन्कर

पिशी अबोली 20/10/2013 - 22:18
ग्रेटथिंकर काका किती हसवता हो तुम्ही...जाम आवडतं तुमचं लिखाण...लगे रहो...कुणी प्रतिसाद देवो न देवो, तुम्ही लिहीत रहा... इतकं हल्कफुल्कं असंबद्ध लिहिणं नाहीतर कुणाला जमायचं?

विटेकर 14/10/2013 - 14:59
लेख आवडला ! सगळीच मते पट्ली नसली तरिही ! अवांतर : जातियता संपूर्ण नष्ट झाली असती ( सतीच्या प्रथेमाणे ) असा माझा दावा आहे पण राजकारण्यांनी ( विशेषतः कॉग्रेस ने ) ते घोंगडे भिजतच ठेवले केवळ राजकीय स्वार्थापोटी ! अस्पृश्यता नष्ट झालीच की !काही चीड आणणारे अपवाद सोडले तर अस्पृश्यता निवारणाला आता मर्यादित यश आले आहेच ! कालानुरुप नवे बदल स्वीकारण्याइतका हिंदूधर्म नक्किच लवचिक आहे. यज्ञांसारख्या गैर लागू गोष्टी सुद्धा बाहेर काढून टाकल्या जातातच. असेच जातियता नष्ट होइइल असा मला विश्वास आहे. सोशल ईम्जिनिअरिंगच्या नावाने केवळ मतांचे राजकारण सुरु आहे.ते जेव्हा थांबेल तेव्हाच खरा विकास होऊ शकेल. कॉग्रेस्ने सुरु केलेले हे राजकारण अन्य पक्षांनी साळ्सूद पणे सुरु ठेवले ही खरी शोकांतिका आहे. बाकीचे सारे पक्ष कानामागून येऊन तिखट झाले आणि आता राजकारण म्हण्जे समाजकारणाचा बळी देऊनच करायचे असते असा समज दृढ झाला आहे. आजच्या काळात मूल्यमापन करायचे झाल्यास डो. आंबेड्करांचे हिंदूच्यावरिल सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. अन्यथा काय परिस्थिती झाली असती याचे कल्पना ही करवत नाही !

In reply to by विटेकर

धन्या 14/10/2013 - 15:57
डो. आंबेड्करांचे हिंदूच्यावरिल सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही.
असे वाचले आहे की धर्मांतरापूर्वी बाबासाहेब गाडगेबाबांना भेटायला गेले होते. गाडगेबाबा म्हणाले "तुम्ही शिकले सवरलेले. मला अडाण्याला काय कळतं त्यातलं. जो काही निर्णय घ्याल तो विचारपुर्वक घ्या".

विटेकर 14/10/2013 - 16:07
नाझ्या स्मरणाप्रमाणे हे बरोबर आहे. पण त्याच बरोबर अनेक मौलवि आणि पाद्री देखील त्याना सल्ला देतच होते. पू.बाबासाहेबांनी ढेबूजींचा सल्ला मानला. नाठाळ कार्ट्याला आईने एक ठेऊन द्यावी,त्याप्रमाणे बाबांसाहेबांनी हिंदू धर्माला चपराक दिली आणि हे योग्यच केले. त्यांना पक्की जाणीव होती की अन्य धर्मात प्रवेश म्हणजे भारतीयत्वाचा लोप !

मदनबाण 14/10/2013 - 16:12
छान माहिती... गांधीजींनी अस्पृश्य लोकांसाठी हरिजन हा शब्द प्रयोग वापरण्यास सुरु केला होता. बाकी लेखात बर्‍याच ठिकाणी गांधीजींचा एकेरी उल्लेख वाचला आणि तो योग्य वाटला नाही.

In reply to by मदनबाण

लगता अगर तीर हमारे शरीर पर तो अच्छा होता शायद हमारी जान अगर जाती तो भी अच्छा था. घाव देखके हकीम भी कछ कर सकता था. लेकीन ये जालीम दोस्त तुमने तीर तो ऐसी जगह मारा है की घाव तो दिखता ही नहीं और दर्द तो ऐसे होते है की जनमभर सहने ही पडेंगे...

आशु जोग 14/10/2013 - 17:00
अस्पृश्यता निर्मूलन झाले असेल तर आंबेडकर जयंतीला लोक्सचे उलट्सुलट प्रतिसाद का येतात मिसळीवर...

पैसा 14/10/2013 - 18:53
अतिशय अभ्यासपूर्ण लेख. सगळीच मते पटतील असे नाही. पण तुमचा त्यामागे केवढा अभ्यास आहे हे जाणवतं आहे.

अवतार 14/10/2013 - 19:45
काही अतिरिक्त मुद्दे गांधी आणि आंबेडकर हा संघर्ष केवळ दोन नेत्यांचा नसून दोन विचारधारांचा संघर्ष होता. समता प्रस्थापित करणे हे अंतिम ध्येय असले तरी त्यासाठी मार्ग कोणता निवडावा हा मतभेदाचा मुद्दा होता. शिवाय गांधीजींना ज्याप्रमाणे काँग्रेससारखी समाजातील विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना सांभाळायची होती तसे काही दडपण आंबेडकर यांच्यावर नव्हते. त्यामुळेच गांधीजींची भाषा ही काहीशी संदिग्ध आणि आडवळणाची तर आंबेडकर यांची भाषा ही थेट आणि रोखठोक असल्याचे दिसते. ज्या वेळी दुसऱ्या गोलमेज परिषदेत आंबेडकर दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ मागत होते तेव्हा गांधीजींनी मुस्लिम प्रतिनिधींची स्वतंत्र भेट घेऊन आंबेडकरांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी मुस्लिमांच्या मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली होती. "मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना विभक्त मतदार संघ दिले तर ठीक पण दलितांना मात्र देऊ नयेत", ही गांधीजींची भूमिका होती. तसेच या परिषदेत गांधीजी हे कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर भारताचे प्रतिनिधी या नात्याने उपस्थित राहिल्याचा दावा करत होते. सुरुवातीला आंबेडकर स्वत:ला प्रोटेस्टंट हिंदू म्हणवून घेत होते. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा १९३५ मध्ये केली. त्यानंतर तब्बल २१ वर्षे ते वाट पाहत होते. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अंतिम निर्णय घेतला. सद्य परिस्थितीत होणाऱ्या धर्मांतरांकडे पाहतांना हा मुद्दा उपयुक्त ठरावा.

In reply to by अवतार

धन्या 14/10/2013 - 19:49
"मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना विभक्त मतदार संघ दिले तर ठीक पण दलितांना मात्र देऊ नयेत", ही गांधीजींची भूमिका होती.
खुप काही बोलून जातं हे वाक्य.

प्यारे१ 15/10/2013 - 00:19
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का? त्यांना संत बनायचं होतं पण राजकारणी झाले किंवा राजकारणात राहून संत व्हायचं होतं का आणखी काही ह्याचा खरंच प्रश्न पडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्यांना नि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आलेल्या अनुभवांना अनुसरुनच असावी. दुर्दैवानं समाजाला एकूणच समाजाला त्यांचीही भूमिका झेपलेली दिसत नाही. एक रेषा लहान करुन दुसरी रेषा मोठी होत नाही. दुसरीनं पहिल्या रेघेपेक्षा मोठं व्हावं. असो.

In reply to by प्यारे१

विटेकर 15/10/2013 - 11:47
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का? बहुधा हो , राजकारण ही त्यांची प्रकृतीच नव्हती त्याच नेहरू आदीनी मस्त गैरफायदा घेतला.एखाद्या प्राचीन ऋषीमुनींसारखे त्यांचे व्यक्तिमत्व होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी राजकारण करण्याचा क्षीण प्रयत्न केला.त्यांचे सारे जीवन हिंदू मान्यतेप्रमाणे होते आणि म्हणूनच त्यांना भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली. साधु-संतांच्या मागे जाणे हीच आमची परंपरा होती. धर्म सत्तेने राजसत्तेवर अंकुश ठेवायचा हाच इथला परिपाठ होता. पण म्हणून वसिष्ठांनी शस्त्र हातात घेतले नाही , तसेच विद्यारण्य स्वामीनी अथवा समर्थांनीही ! आपली पोलिसी मेकेर ची भूमीका सोडून गांधीजी ओपेरेशन मधे उतरले आनि घोळ झाला त्यांच्या आदर्शवादी विचारसरणीचा व्यवहारात शून्य उपयोग होता ! आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही ! इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले! मुस्लिमांचा अनुनय हा तर शूद्ध भाबडेपणा होता. आणि त्यांच्या चुकलेल्या राजनीतीने जेव्हा रौद्ररुप धारण केले तेव्हा ते हताश आणि असहाय झाले ! त्यांनी गेल्या चारशे वर्षांच्या इतिहासाचा नीट अभ्यास केला असता तर मुस्लिमांच्यावर विश्वास टाकण्याची चूक त्यांनी केली नसती ! अस्तु, या जर-तर च्या गोष्टी आहेत, तरिही गांधीजी महानच होते, ज्या विशुढ्ध जीवन शैलीचा त्यांनी अंगिकार केला होता ती हिंदू संन्याश्याची जीवनशैली होती.निश्चित आदरणीय होती ! वाईट याचे वाटते की स्वार्थी काँग्रेसी राजकारण्यांनी गांधीच्या नावाने आपली पोळी भाजून घेतली आणि खराखुरा गांधीजींचा ( त्यांच्या तत्वज्ञानाचा) खून केला. अजूनही करताहेत !

In reply to by ग्रेटथिन्कर

एक साधा सोपा प्रश्र्न विचार करून लिहावे की विचार न करता लिहावे? "ह्याचे उत्तर आपणच द्यायचे आहे" हे सांगणे न लगे.... माझ्या वरील प्रश्र्नाचे उत्तर विचार पुर्वक दिलेत की मग मी तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर नक्की देईन. त्याचे काय आहे, तुमचे प्रश्र्न कधीच संपत नाहीत आणि इत्रांच्या शंकांचे समाधान तुमच्याकडून होत पण नाही. बरे खरडवही तर आपण बघत पण नाही. कळावे, आपला "स्मॉल पेगर"

In reply to by मुक्त विहारि

ग्रेट थिंकर साहेबांना "मिपावरील डिग्गीराजा" * ही पदवी कशीकाय वाटते?... त्यांची असंबद्ध आणि बेजबाबदार विधाने करून विनोदी कोलांट्याउड्या मारण्याची शक्ती त्या महामानवाइतकीच प्वॉवरफूल्ल हाय असं आमाला वाटू लागलयं. मुख्य मुद्दा सोडून भलतीकडे भरकटण्याची अचाट शक्ती हेही त्यांचं एक खास वैशिष्ट्य सांगता येईल. याशिवाय, मिपावर स्वतःचं हसं करून घेऊन इतरांची इतकी निखळ करमणूक करण्याची कामगिरी इतर कोणी गेलाबाजार दोन आठवडे तरी केली नाही असा आमचा दावा हाय. क म्हंताव?

In reply to by विटेकर

त्यातही खालील २ वाक्ये तर जबराच... "आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही!" आणि "इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!"

In reply to by मुक्त विहारि

"इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!" मला वाटतं हे तत्व या धाग्यावरच्या काही चर्चेतही सिद्ध होत आहे म्हणा !

In reply to by विटेकर

उद्दाम 16/10/2013 - 11:47
गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला वगैरे रडगाणे गाइल्याशिवाय काही लोकान्ना अन्न गोड लागत नाही. १. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. मुस्लिम लीगही १९०६ साली स्थापन झाली, तेंव्हा गांधीजी राजकारणातही नव्हते. मधल्या काळात त्यांची संख्याही ४० % झालेली होती. ४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. २. गांधीजीदेखील स्वतःच्या विचारसरणीने मोठे झाले. गंमत म्हणजे एकाच वेळी हे दोघेही स्वतंत्रपणे मोठे झाले आणि इथल्या तथाकथित 'सनातन धार्मिक' गटांना ते मोठे झाले हे पचवणं आजही जमलेलं नाही. मग ते जिथे तिथे अमूक धर्माचे लोक विश्वासघातकी असतात म्हणे आणि गांधीजींनी त्यान्ना मोठं केलं की त्यान्नी यान्ना मोठं केलं याच्या रडकहाण्या ऐकवत फिरत असतात.

In reply to by उद्दाम

अर्धवटराव 16/10/2013 - 20:33
>>मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. -- अ‍ॅब्सोल्युटली. भारतात मुस्लीम राज्यकर्ते त्यांच्या मनगटातले बळ आणि आणि निष्णात राजकारणात यांच्या भरोशावर स्थिरावले. >>४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. -- १००% सहमत.

In reply to by अर्धवटराव

उद्दाम 17/10/2013 - 13:29
१. गांधीजी ग्रेट थिंकर होते. २. मुघल उद्दाम होते. म्हणूनच दोघेही महान ठरले.

In reply to by उद्दाम

अर्धवटराव 18/10/2013 - 10:06
कुर्‍हाडीच्या दांड्यांनी गोतास काळ आणला व कावळा मशिदीच्या मिनारावर बसुन मौलवी बनला.

In reply to by अर्धवटराव

उद्दाम 18/10/2013 - 10:41
मंडनमिश्रा बौध्ह धर्म सोडून तुमच्याकडे आला तर एका रात्रीत शंकराचार्य झाला. कावळा मौलवी बनला तर तुमच्या पोटात कावळे का ओरडताहेत?

In reply to by उद्दाम

अर्धवटराव 18/10/2013 - 18:52
मण्डनमिश्राने आपला अधिकार सिद्ध करुन आचार्य पदाला शोभा आणली तर कावळ्याने फक्त कावकाव करत मौलवीपद खुजे केले.

In reply to by उद्दाम

बॅटमॅन 18/10/2013 - 18:59
हरे राम...आपलं ते हे हेर मार्क्स!!!! मण्डनमिश्राने बौद्ध धर्म कधीच स्वीकारला नव्हता. मतपिंका टाकायलासुद्धा एक शिस्त लागते हे विसरलात बहुतेक.

In reply to by उद्दाम

चौकटराजा 20/10/2013 - 18:50
१. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. उद्दाम साहेब हे तुम्ही मुद्दाम लिहिलय का ? आताशी २१ वे शतक चालू झाले आहे.

In reply to by विनायक प्रभू

आधी विचार चांगले विचाराने वर्तन चांगले वर्तनाने व्यक्तिमत्व ते भले असे व्यक्तिमत्व जगी गाजले (मुवि)

चिगो 15/10/2013 - 12:52
"जर.. तर.."च्या जाळ्यात न अडकता केलेले, इतिहासाचे समर्पक विश्लेषण.. लेख आवडला..

मृत्युन्जय 15/10/2013 - 14:19
१. सावरकर फॅसिस्ट होते, २. पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली, ३. गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे. ही ३ वक्तव्ये ऐकली. आता : १. शिवाजी महाराज कर्मट मुसलमान होते, २. राजकारणात येण्यासाठी आंबेडकर नावाच्या ब्राह्मणाने अस्पृश्यता निवारन चळवळीचा वसा स्वीकारल्याचे ढोंग स्वीकारले आणी ३. सावरकरांना पोहता येत नव्हते ही ३ वक्तव्य वाचली की मी डोळे मिटायला मोकळा. बाकी चालु देत.

In reply to by मृत्युन्जय

अनिरुद्ध प 15/10/2013 - 14:39
असत एखाद्याचे 'ग्रेट थिंकींग' त्याला आपण काय करायचे? तर वरती विटेकर काकांनी सान्गीतल्या प्रमाणे 'पीयेला हय' असे म्हणुन सोडुन द्यावे कसे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? (मला समजलेले गांधीजी भाग २ )

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? ********************************************************************************* संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे.

'लोकायत' विचारचर्चा

प्रास ·

आतिवास 19/09/2013 - 09:36
स्तुत्य प्रयत्न. अधिक वाचण्यास उत्सुक आहे. अवांतरः तेवढं ते 'पुरुष १' बदलून त्या बुवांना एखादे नाव दिलेत तर संवाद शैलीशी ते सुसंगत ठरेल.

In reply to by आतिवास

प्रास 19/09/2013 - 23:11
माधवासमोरच्या व्यक्तीला नाव देण्याचा विचार केला होता पण दिलं नाही कारण पुढे पुढे एक जाऊन दुसरी व्यक्ती येते आणि आपापल्या मान्यतेच्या दर्शनाच्या मण्डनाचे विचार मांडते. तेव्हा नावापेक्षा क्रमांक उपयुक्त ठरतील असं वाटलं.

उद्दाम 19/09/2013 - 09:38
आण्णा, लिवलंत छान . पण काही उपेग नाही. चार्वाक ते दाभोळकर , काळ बदलला. लोक तेच आहेत.

चौकटराजा 19/09/2013 - 09:57
धर्म, देव , संस्कृति, परंपरा, रुढी, योगविज्ञान ई ची सरमिसळ करणारी एक भयानक संस्कृति तयार होत चालली आहे. एका बाजूला उच्चशिक्षित 'निसर्ग नावाची एक व्यवस्था आहे. उत्पती स्थिति व लय या बेसवर ती चालते. ' या निष्कर्षाप्रत आले आहेत . तर तितकेच उच्च शिक्षित देवाने, धर्मानेच, रूढींनीच, हे जग नीट चालविले आहे व हेतूपूर्वक चालविले आहे .बुद्धीवाद्याना काही अक्क्क्ल नाही असे ठामपणे म्हणणारे आहेत. जास्तीत जास्त मनांमधे वेगळा विचार करण्याचा आळस असतो. सबब बरेच लोक स्थितिवादी असतात फिलॉसिफिकली .

अर्धवटराव 19/09/2013 - 23:31
लईच भारी :) अवांतरः लोकायत फिलॉसॉफीचा बेस इतका कच्चा असेल असं वाटलं नव्हतं. असो... वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या तौलनीक अभ्यासाचे सार एकच... कि माणासाने दिवेआगारचा समुद्रकिनारा, पर्वती टेकडी, किंवा माऊंट एव्हरेस्ट, कुठुनही उडी मारली तरी त्याचे हात चंद्राला टेकणार नाहित. उड्या मारण्याची मजा मात्र नक्की अनुभवावी :)

एस 20/09/2013 - 00:02
अतिशय थोडक्यात चार्वाक किंवा लोकायतमताची व त्यातील काही मूलभूत सिद्धांतांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' हे प्रा. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक सुंदर व वाचनीय आहे. त्यात त्यांनी चार्वाकांना आस्तिक का म्हटले पाहिजे याची छान मीमांसा केली आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय. मिपावरीलच शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेखही सुंदर आहे

चार्वाकाचे विचार लय भारी आहेत . (अवांतर : कॉलेजात असताना विविध गृप डिस्कशन मधे पोरींना ते विचार पटवुन द्यायचा लाख प्रयत्न केला ...पण हाय रे देवा :( असो. म्हणुन मग सध्या आम्ही ओशो कडे वळालो आहोत ;) )

@वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)>>>>>> पसंत आहेच. अता त्या क्रमा'ला लवकर शह द्या! :)

धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो झिंगतो. अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल. द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो... जसे की चैतन्य अन देह संयोगे मानव... नाहि का ?
बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा, असा घ्यायचा का?
देह्धारण केला आहे म्हणून आत्म्याचे (अत्रुप्त न्हवे) अस्तित्व सदा जाणवत असते हाच मुळात गैरसमज आहे.. उदा. झोपेत हे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे देह नश्ट झालेला असतो नाहि उलट यावरुन असे म्हणता येइल कि देहामधे आत्म्याचि विस्मृति निर्माण करायची क्षमता नक्किच आहे. थोडक्यात देहाचे अस्तित्व आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण ठरु शकत नाही. उरलेल्या गोश्टिवर विचार ३१ सप्टेंबरचि कामे संपल्याव्र करुया.

In reply to by अग्निकोल्हा

एस 21/09/2013 - 00:40
एखाद्याला एकतर उथळ किंवा आपलाच ठरवून येनकेनप्रकारेण संपवायचा हे इहवाद्यांचे जुनेच धोरण आहे.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
पुरुषार्थ या शब्दामधील पुरुष म्हणजे मनुष्यप्रजातीतील नर हा एवढाच संकुचित अर्थ लावून वरील वाक्याला छेद देण्याचा प्रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे. आधुनिक काळाच्या संदर्भाने यातील पुरुष म्हणजे मानव. त्याअर्थाने पुरुषार्थाला अधिक सुसंगत असा मानवार्थ हा शब्दप्रयोग इथे करता येईल.
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो
येथे आपणच आपले मत खोडून काढले आहे. जोपर्यंत वारुणी आणि माणूस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत तेथे मद उत्पन्न होत नाही. वारुणी जेव्हा मनुष्याच्या शरीरात जाते तेव्हा त्यांच्या संयोगे मद तयार होतो. वारूणीला मद चढत नाही तसेच माणसालाही मद चढत नाही. मद ही वारूणीमय देहाची एक अवस्था आहे. थोडक्यात मदाचे वारूणी व मनुष्य यांच्याबाहेर अस्तित्व नाही. मदावस्था माणसाच्या देहातील वारुणीच्या प्रमाणावर टिकते. म्हणजेच जडाची एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट प्रमाणातील स्थिती हे त्या जडसंयोगाला चैतन्य प्रदान करते. चैतन्य हे जडाचे फल (Function) आहे. जड चैतन्याचे फल नव्हे. किंबहुना जडाबाहेर चैतन्याला अस्तित्त्व असू शकत नाही असे चार्वाकमत सांगते. कृपया हा फरक लक्षात घ्या. 'चैतन्य अन देह संयोगे मानव' असू शकत नाही. देहाची विशिष्ट अवस्था म्हणजे जिवंत देह. चार्वाकांनी पृथ्वी-आप-तेज-वायू हीच महाभूते मानली व केवळ त्यांच्या विशिष्ट संयोगे चैतन्यावस्थेतील जड निर्माण होऊ शकते असे म्हटले. आजचे विज्ञान चार्वाकमताचे आधुनिक स्वरूप आहे असे म्हणावे लागेल. अणुरेणूंची योग्य प्रमाणात व योग्य स्थितीत सांगड घातली असता चैतन्य असलेला जीव निर्माण करता येऊ शकेल. अर्थात ती एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की प्रायोगिक विज्ञान तेथपर्यंत अजून पोहोचू शकलेले नाही. परंतु शुद्धसैद्धान्तिकरित्या हे शक्य आहे.
चैतन्ययुक्त देह हाच आत्मा
आत्म्याचे अस्तित्त्व सिद्ध करायची किंवा आत्मा कुठल्याही स्वरूपात मानायची गरजच संपते.
चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका. असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल. बाकी चार्वाकबौद्धादी मतांचे खंडन करण्यासाठी तर्काचा आधार घेणारे आदिशंकराचार्य वेदांची मीमांसा मात्र तर्काने करायची नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हे काही कळत नाही. शेवटी उद्वेगाने म्हणावेसे वाटते... त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: ! जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य. (शरद यांच्या लेखाच्या सौजन्याने साभार)

In reply to by एस

अर्धवटराव 21/09/2013 - 01:36
या सगळ्या चर्चेचा परिपाक असा, कि जीवन/चेतना हि देहाची एक अवस्था आहे. इन अदर वर्ड्स, चैतन्य हि व्हर्च्युअल टर्म आहे. नेमकं हेच आहे का चार्वाक/लोकायत मत?

In reply to by एस

रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे...
विनोद हा विनोदच असतो हे आपणास कळाले यातच त्या वाक्याचे सार्थक झाले .
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
अरे हो चमचा तोंडात द्यायला विसरलो कि.
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका.
सॉरी तुम्हाला प्रेतांबद्दल इतका आदर आहे हे माहित न्हवते म्हणून भावना दुखावली गेल्यास क्षमस्व. आणि हो मी नेहमी नेहमी प्रेतांवर टिका करत नाही बरक टिका मुर्दाडपणावर असते.
असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले? तरीही शब्दात तुमची भावना समजुन घ्यायची म्हटले तर आपल्याला असं म्हणायच आहे काय की यु वॉंट टु रिप्लेस अ कॉम्प्लिटली डेड ऑर्गन (ऑर कंप्लिट डेड स्टेट ऑफ ऑर्गन)ओफ अब्सोलुटली डेड हुमन बॉडी विद अ लाइव वन सो दॅट ह्युमन बॉडी कॅन फंक्शन बॅक अगेन ??? गुड लक!

In reply to by अग्निकोल्हा

एस 23/09/2013 - 00:54
आपल्या आणि अर्धवटरावांच्या प्रतिसादातील दोन मुद्दे इथे स्पष्ट करण्यासारखे आहेत म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. आणि चैतन्य ही जडाच्याच अवस्थेचे फल असल्याने अशा कुठल्याही बाह्यशक्तीचे अस्तित्व नाकारणे हा चार्वाकमताचा मुख्य मुद्दा. हाच दोन्हींमधला फरक आहे. देह आणि आत्मा हेही ह्याच आधारे स्पष्ट करता येईल. आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे. थोडक्यात देहातील (जडावस्थेतील) वार्धक्यामुळे होणारे बदल थोपवणे आणि जमल्यास ते विरूद्ध फिरवून चैतन्य किंवा जीवन पुन्हा बहाल करणे वा चिरतारुण्य मिळवणे हे आजच्या आधुनिक जैवविज्ञानाचे धेय्य व त्याचे मूळ हे चार्वाकमताच्या जड विरुद्ध चैतन्य ह्या वादावरील सिद्धांतात सापडते. जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. बाकी चालू द्या.

In reply to by एस

अर्धवटराव 23/09/2013 - 08:52
चार्वाक मताचा तुमचा आणखी अभ्यास असल्यास काही मुद्द्यांवर प्रकाश पाडा प्लीज. >>चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. -- हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि. >>जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. -- माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

In reply to by अर्धवटराव

एस 23/09/2013 - 15:28
छान प्रश्न विचारले आहेत आपण मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. परंतु जेवढी मला माहिती आहे त्यावरून तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा अल्प प्रयत्न करतो.
हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि
या प्रश्नात दोन उपप्रश्न सामावले आहेत. एक म्हणजे चार्वाकयुगाचा काळ कोणता. व दुसरा म्हणजे चार्वाकविरोधक ही संज्ञा नेमकी कोणाला वापरावी. चार्वाकमताचा काळ किंवा त्याचा उद्भव ठामपणे सांगता येणे कठीण आहे कारण चार्वाकांचे साहित्य अतिशय तुटपुंज्या स्वरूपात शिल्लक राहिले आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' ह्या ग्रंथात लोकायतसाहित्याच्या र्‍हासाची काही कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. http://www.misalpav.com/node/15418#new येथे उद्दाम यांनी 'भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली' असे मत मांडले आहे. ते तितकेसे बरोबर नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा विरोधी मतांचे खंडण करणे केवळ यापुरतेच तेव्हाचे वादविवाद किंवा संघर्ष मर्यादित नसून त्यासाठी विरोधकांना संपवण्याचे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचेही तंत्र यशस्वीपणे अवलंबले गेले. महाभारतातील युद्धानंतर चार्वाक नावाच्या असुराने युधिष्ठिराला आपल्याच रक्ताच्या नात्यांच्या माणसांना मारल्याबद्दल भरसभेत दोष दिला तेव्हा तिथे उपस्थित ऋषीगणांनी क्रोधाने त्याला जाळून टाकले असा उल्लेख आहे. या उदाहरणावरून विरोधकांबद्दल इतकी टोकाची असहिष्णुता तेव्हाही तितकीच प्रचलित होती हे समजण्यासारखे आहे. कौटिल्याने आन्विक्षिकी या लोकायतमताचा समावेश असलेल्या विद्येचा गौरवाने उल्लेख केला यामुळेही कदाचित त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ गेल्या शतकात म्हैसूरला सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता ही बाब इथे उल्लेखनीय आहे. चार्वाकमताचा उदय हा सर्व षड्दर्शनांपैकी सर्वात प्राचीन असावा असे मानण्यास वाव आहे. कारण मनुष्याने उत्क्रांतीच्या ओघात नैसर्गिक शक्तींची उपासना करण्यास सुरुवात करून आजचे सोफिस्टिकेटेड देव-अध्यात्मरूपी कल्पनांचे युग आणले हा प्रवास जेवढा जुना तेवढेच चार्वाकांचा भौतिकवादही प्राचीन असण्याची शक्यता मला सर्वात नैसर्गिक वाटते. ऋग्वेदातील उषा, वरूण, इत्यादी देवता मागे पडून आज विष्णू व अनार्यांच्या रुद्राचे आर्यकरण म्हणजे शंकर इ. देवता लोकप्रिय झालेल्या दिसतात ही देव किंवा अभौतिक संकल्पनांची उत्क्रांती म्हणता येईल. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक या मतांनी नंतर उत्तरमीमांसकांशी काहीसे जुळवून घेतल्याने त्यांचे खंडन करण्याची तीव्रता कमी ओघाने कमी होत गेली. बौद्ध व जैन तत्वज्ञानांनीही चार्वाकांइतका ठाम नास्तिकपणा जपला नाही. एकटे चार्वाक आपल्या मूळ भौतिकवादाशी प्रामाणिक राहिले व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. याबाबत माझी मते चुकीची किंवा अल्प माहितीवर आधारित असल्याची शक्यता आहे, तरी आपणाला अजून माहिती किंवा संदर्भ हवे असल्यास मिपावरील जाणकारांना विचारता येईल.
माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?
या प्रश्नाचा रोख मला समजला नाही. तरी शब्दशः अर्थ घेतला तर होय. थोडी भर - चार्वाकांना निव्वळ भोगवादी ठरवून मोकळे होण्याची किंवा त्यांना नीतिमत्ताशून्य ठरवण्याची चार्वाकविरोधकांची घाई होते असा अनुभव आहे. चार्वाकमत, जे समाजातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आचरीत असतो, ते असे नैतिकमूल्यांचे विरोधक नसून एका अर्थाने नैतिकतेचे सर्वात मोठे पाईक आहेत. नैतिकता व धार्मिकता यांचा आपापसात कसलाही संबंध नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो.

In reply to by एस

अर्धवटराव 30/09/2013 - 23:17
माझी प्रश्न मांडण्यात चुक झाली. चार्वाकयुग म्हणजे चार्वाक नामक तत्ववेत्त्याचा काळ असं मला विचारायचं नव्हतं. थोडं इलॅबोरेट करतो. सत्याची आस अणि सुखाची कामना या स्वयंभू प्रेरणा मानवी मनात नांदतात. या प्रेरणा कधी म्युचुअली एक्स्क्लुझीव्ह, कधी समांतर, तर कधी अगदी परस्पर विरोधी देखील असु शकतात. या दोन्ही प्रेरणांची एकसंगत लावण्याचे कार्य प्रत्येक दार्शनीक करतो. कुठलं दर्शन किती प्रभाव पाडतं हे तत्कालीन समाज परिस्थीती ठरवते. चार्वाकाचा मूळ सिद्धांत काय, तर यावत् जीवेत सुखं जीवेत. त्याचं कारण तो देतो कि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः . चैतन्य हे जडापासुन तयार होत नाहि असं मानणारं तत्वज्ञान तसंही भस्मीभूत देहाचं पुनरागमन होतं असं म्हणत नाहि, किंबहुना जुनं वस्त्र टाकुनच नवीन वस्त्र परिधान करावं लागतं असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ते चार्वाकाला विरोधी ठरत नाहिच, तर चार्वाक संपतो तिथुन ते सुरु होतं. हे तत्वज्ञान एस्टॅब्लीश झालं, सशक्त झालं, आणि इतकं उग्र झालं कि त्याने चार्वाकाला फाईट दिली असं होणं अशक्य आहे. या सर्व घाडामोडी होण्याचा काळ एखाद्या तत्ववेत्याच्या आयुष्यापेक्षा खुपच जास्त मोठा असणार. चार्वाक विचारधारेशी, चार्वाक पंथाशी संघर्ष झाला असेल, पण तसं अजुन तरी वाचनात आले नाहि. थोडक्यात काय, तर सत्याप्रती मानवी मनाची भूक चार्वाक तत्वज्ञान भागवु शकलं नाहि, आणि सुखप्राप्तीची साधनं गोळा करण्यास मानवाला कुठल्या दार्शनीकाची आवश्यकता तशिही राहात नाहि, म्हणुन चार्वाक संपला. यज्ञसंस्कृतीने सुरुवातीला मानवी सुखाची भरपूर सोय करुन ठेवली. पण पुढे त्यातलं कर्मकांड मानवी सुखाच्या आड येत गेलं, म्हणुन चार्वाक तत्वज्ञान उदयास आलं, अशी एक उपपत्ती लावता येते. पण ज्याप्रमाणे फक्त कम्युनीझम सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्यानंतर लोकशाहीचा प्रोग्राम देखील द्यावा लागतो, त्याचप्रमाणे सुखप्राप्तीकरता कर्मकांड सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्याला रिप्लेसमेण्ट म्हणुन इतर संस्था-यंत्रणा उभ्या कराव्या लागतात जे चार्वाकाला जमलं नाहि म्हणुन तो मागे पडला. आजच्या युगात चार्वाक तत्वज्ञान पुन्हा उसळी मारणं सहाजीक आहे, कारण सुखोपभोगाचे स्वातंत्र कधि नव्हे तेव्हढं माणासाला आज उपलब्ध आहे, व सत्य शोधनाची इन्स्टीक्ट शमवण्यासाठी विज्ञानाचे राजमार्ग उपलब्ध आहेत. पण हि परिमाणं काहि शतके आगोदरच्या समाज परिस्थितीला लावता येत नाहित. असो. माझं वाचन याबाबतीत फार म्हणजे फारच तुटपुंजं आहे. म्हणुन एकुणच चार्वाकीझम बद्दल शक्य असेल तिथे प्रश्न विचारतो. त्याचकारणाने तुम्हाला तसदी दिली. मिपावर आणि इतरत्र जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा शक्य होईल तेंव्हा अभ्यास करेनच... बघु. अवांतरः युधीष्ठीराच्या सभेची कथा विरोधी विचारांप्रती असहिष्णुतेचे उदाहरण म्हणुन अजीबात पटलं नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

एस 01/10/2013 - 01:11
एकूणच चार्वाकमत काय किंवा इतर दर्शने काय, समाजातील त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवरील स्वीकृती ही नेहमीच बदलती आणि जाणीव-नेणिवेच्या धूसरतेआड जात राहिली आहे. तसे का याचे विवेचन आपण केलेच आहे. व्यावहार्यिकतेच्या पातळीवर आणि मानसिक स्थिरतेच्या कसोटीवर लोकायत संपूर्णपणे आणि कठोरपणे स्वीकारणे तितके सोपे नाही. सामान्यांना तर मुळीच नाही. प्रत्येक दर्शनाची किंवा शास्त्राचीही सुरुवात ही सत्याचा नव्याने प्रसंगी नवा किंवा जुना असा शोध घेण्यातून झाली. पण इतर दर्शनांमध्ये मूळ तत्त्वज्ञानाच्या विपरित कित्येक बाबींची कालांतराने सरमिसळ झाल्याचे दिसून येते. उदा. सुरुवातीला केवळ प्रकृतीप्रधान असणारा सांख्यवाद नंतर पुरुष आणि हळूहळू परमपुरुष आणि त्याच्या मुक्तीभोवती गुरफटला गेला. हे केवळ उदाहरण झाले. अशाच पद्धतीने दर्शनांतून उपदर्शने, पंथ आणि वाद उदयास येत गेले - येत आहेत. आणि या सगळ्यांची एक विलक्षण गुंफण आपल्या भारतीय समाजमनात झालेले दिसून येते. हा गुंता सोडवायला म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर सोपाही आहे. असो. चार्वाकांचे मला सर्वात जास्त आवडणारे गुण म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मान्यता आणि त्याआधारे सिद्ध होणार्‍या गोष्टी स्वीकारायचा उदारपणा. हा उदारपणा इतर दर्शनांच्या कर्मठ ताठरतेपेक्षा उठून दिसतो. आज लोकायत विज्ञानाच्या परिभाषेत मांडणे त्यामुळेच शक्य आहे आणि आवश्यकही. एवढे सांगून या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.

In reply to by एस

आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही
आत्मा.... जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व ? माझ्या माहिती (व काही अनुभवानुसार) आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.
आता आत्मस्वरुपाची कल्पना येत असली तरी देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे. थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते. अवकाशतत्वाची अजुन एक गंमत अशी आहे कि यामधे चैतन्य दिसत नाही पण ते आहे गृहित धरले तर आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत कमालिचा योग्य ठरु लागतो. ( टाइम-स्पेस बेंडीग बद्दल लिहणे मोठि अन रोचक कल्पना आहे परंतु त्याचे विस्तारभय प्रचंड असल्याने गुगल हाच एकमेव पर्याय आहे याबद्दल अधिक माहिती घ्यायला)

In reply to by अग्निकोल्हा

एस 24/09/2013 - 08:46
आपल्या प्रतिसादातील तर्काशी असहमत.
आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही. त्यातही पंचमहाभूतांची आपण वरप्रमाणे घातलेली सांगडही मला अतर्क्य वाटते.
देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.
सांख्यिकी किंवा विज्ञानाच्या कुठलाही सिद्धांत स्वीकारण्याच्या काही कसोट्या असतात. त्यात एखाद्या सिद्धांताची सिद्धी किंवा प्रूफ ही नकारात्मकतेकडून म्हणजेच तो सिद्धांत फेटाळून सुरू केली जाते. उदा. एखादे नवीन औषध हे त्या आजारावर उपयोगी आहे असे जर प्रतिपादन करायचे असेल तर विविध चाचण्यांमधून त्या औषधाच्या सकारात्मक परिणामकारतेच्या पुराव्यांपेक्षा जास्त काटेकोरपणे त्याचे नकारात्मक किंवा न्यूट्रल इफेक्ट - उदासीन परिणाम तपासले जातात. असे का, तर एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आहे हे मानून चालले आणि ती गोष्ट नसली तर होणारे नुकसान हे एखादी गोष्ट नाही असे मानून चालले आणि ती गोष्ट खरोखर असली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा कितीतरी पटींने हानिकारक आणि इर्रिवर्सिबल - अपरिवर्तनीय असते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन हा नेहमी नवीन वा जुने सिद्धांत त्यांच्या वैश्विकतेला सतत आव्हान देऊन त्यांची वैधता तपासण्याला महत्त्व देतो. वरील बाब लक्षात घेता अशा संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले नसताना त्या आहेत हे मानणे हे त्या असल्याच तर न मानण्यामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जोपर्यंत अशा संकल्पनांचे अस्तित्त्व वर उल्लेखलेल्या आणि इतरही शास्त्रीय कसोट्यांवर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्य न करणे हेच शहाणपणाचे ठरेल हे इथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल इतक्या कठोरपणे तपासूनच मगच अशा सिद्धांतांचे अस्तित्त्व मानावे हे चार्वाकांनी सांगितले.
थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.
इतर दर्शनांनी पाच महाभूतांचे अस्तित्त्व मान्य केले असताना चार्वाकांनी मात्र अवकाश सोडून फक्त इतर चार महाभूते मानली याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत. जसे अंधार म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव, पण अंधार निर्माण करायला केवळ प्रकाशाचा स्रोत अडवणे हाच एक मार्ग असल्याने अंधाराचे अस्तित्त्व हे प्रकाशाशी पूर्णपणे निगडित आहे, प्रकाश हा अंधारावर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे अवकाश आपले अस्तित्त्व इतर महाभूतांच्या मदतीनेच दाखवून देऊ शकते. समजा केवळ उदाहरणासाठी सैद्धांतिकरित्या असे समजू की जडाची निर्मिती करण्यासाठी तुम्हांला काही भांड्यांत पृथ्वी-आप-तेज-वायू ही महाभूते दिली आहेत. केवळ या चार महाभूतांच्या मदतीने आपण जडाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी पाचव्या भांड्यातून थोडे अवकाश घेऊन त्यात मिसळण्याची गरज नसते. या कारणांनी चार्वाकांनी अवकाशाला पाचवे महाभूत म्हणून स्थान दिले नाही.
आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत
टाइम-स्पेस बेंडिंग हे गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येते. त्यासाठी तितक्या प्रचंड वस्तुमानाची खगोलीय वस्तू हवी असते. गुरुत्वाकर्षणाचा इतर मूलभूत बलांशी (विद्युतचुंबकीय बल, रेण्वीय बल आणि केंद्रकीय बल) संबंध सिद्ध करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना उल्लेखनीय यश आलेले नसले तरी गुरुत्वाकर्षण हे चैतन्य वगैरे मुळीच नव्हे. तसेच निव्वळ अवकाशात स्थळकाळाला वळवण्याची वा नियंत्रित करण्याची क्षमता नसते. ती केवळ त्या अवकाशात असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या घटकांमुळेच होऊ शकते.

In reply to by एस

हु नेवर नो व्हेर दि हेल इस तमिलनाड ? हेन्स दे डाँट क्नो इंडिया डज एगझिस्ट नॉर दि तमिलनाड इन सेम वर्ल्ड दे आर लिवींग. ऑर पिपल लाइक यु एंड मी हु थिक्स आनेवाडी इज एम्याजिनरी विलेज. आय्नीवेय... स्पेस बेंडिंग हे फक्त आणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येत नाहि हो :) म्हणूनच स्पेस बेंडिग समजुन घ्या हा रेफरन्स दिला.
याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत.
स्पेस बेंडिग समजुन घ्या. मगच ह्या विषयावर चिंतन करा, गुगल केल्यावर उघडणारी पहिलीच लिंक चाळून स्पेसवर मत प्रदर्षित करण्याइतका छोटा आवाका या विषयाचा खरोखर नाहिये.
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही.
अनेको आयुर्वेदिक औषधे विज्ञानाच्या कसोटीवर विषारीच असतात पण आयुर्वेद मात्र शरिराच्या वात कफ पित्त लक्षणाने उपचार करतेच. सो चर्वाक शुड हॅव क्नो की विज्ञान शुडंट बी टोटल बेस टु उण्डरस्टँड आल एंटिटीज. तसही विज्ञान पंचमहाभुते न्हवे तर सॉलिड लिक्विड अन गॅस अशा पदार्थाच्या मात्र तिनच अवस्था असतात इतकच मानते. पण अध्यात्म यामधे अवस्थां/तत्वां सोबत अग्नि आणि पोकळी तत्वांचाही अतंर्भाव करते. खर तर विज्ञानाच्या कसोटिवर चर्वाक घासले तरी उताणे पडतिल असे असताना इतर गोश्टी सध्या घासणे अप्रस्तुत आहे.

In reply to by एस

अनिरुद्ध प 24/09/2013 - 13:35
म्हणजे मानवी शरीरात आकाश /अवकाश हे तत्व नसून फक्त चार तत्वांनी हे शरीर बनले आहे असे आपले मत आहे असे दिसून येते हे जरा स्पष्ट कराल का ? तेव्हडीच आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे वाटते.

In reply to by उद्दाम

एस 23/09/2013 - 00:35
शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेख वाचावा अशी विनंती करत आहे. जेणेकरून हा सुंदर लेख आपल्या व इतरांच्या वाचनात येईल.

In reply to by अग्निकोल्हा

उद्दाम 24/09/2013 - 14:19
There are many differences between a living body and a dead body.

आशु जोग 21/09/2013 - 15:00
लेख समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही जमले. मग प्रतिक्रिया वाचल्या. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. या जगात दोन जाती आहे एक चार्वाकाला नावे ठेवणार्‍यांची दुसरी त्याचे समर्थन करणारी. इथे जात आय मीन कॅटेगरी हे लक्षात ठेवावे.

पैसा 22/09/2013 - 18:19
संवादरूपात चार्वाक मताची ओळख करून देणारा प्रयोग आवडला. चर्चा वाचत आहे. आणि पुढील क्रमश: भाग कधी येतोय याची प्रतीक्षा करत आहे.

आतिवास 19/09/2013 - 09:36
स्तुत्य प्रयत्न. अधिक वाचण्यास उत्सुक आहे. अवांतरः तेवढं ते 'पुरुष १' बदलून त्या बुवांना एखादे नाव दिलेत तर संवाद शैलीशी ते सुसंगत ठरेल.

In reply to by आतिवास

प्रास 19/09/2013 - 23:11
माधवासमोरच्या व्यक्तीला नाव देण्याचा विचार केला होता पण दिलं नाही कारण पुढे पुढे एक जाऊन दुसरी व्यक्ती येते आणि आपापल्या मान्यतेच्या दर्शनाच्या मण्डनाचे विचार मांडते. तेव्हा नावापेक्षा क्रमांक उपयुक्त ठरतील असं वाटलं.

उद्दाम 19/09/2013 - 09:38
आण्णा, लिवलंत छान . पण काही उपेग नाही. चार्वाक ते दाभोळकर , काळ बदलला. लोक तेच आहेत.

चौकटराजा 19/09/2013 - 09:57
धर्म, देव , संस्कृति, परंपरा, रुढी, योगविज्ञान ई ची सरमिसळ करणारी एक भयानक संस्कृति तयार होत चालली आहे. एका बाजूला उच्चशिक्षित 'निसर्ग नावाची एक व्यवस्था आहे. उत्पती स्थिति व लय या बेसवर ती चालते. ' या निष्कर्षाप्रत आले आहेत . तर तितकेच उच्च शिक्षित देवाने, धर्मानेच, रूढींनीच, हे जग नीट चालविले आहे व हेतूपूर्वक चालविले आहे .बुद्धीवाद्याना काही अक्क्क्ल नाही असे ठामपणे म्हणणारे आहेत. जास्तीत जास्त मनांमधे वेगळा विचार करण्याचा आळस असतो. सबब बरेच लोक स्थितिवादी असतात फिलॉसिफिकली .

अर्धवटराव 19/09/2013 - 23:31
लईच भारी :) अवांतरः लोकायत फिलॉसॉफीचा बेस इतका कच्चा असेल असं वाटलं नव्हतं. असो... वेगवेगळ्या तत्वज्ञानांच्या तौलनीक अभ्यासाचे सार एकच... कि माणासाने दिवेआगारचा समुद्रकिनारा, पर्वती टेकडी, किंवा माऊंट एव्हरेस्ट, कुठुनही उडी मारली तरी त्याचे हात चंद्राला टेकणार नाहित. उड्या मारण्याची मजा मात्र नक्की अनुभवावी :)

एस 20/09/2013 - 00:02
अतिशय थोडक्यात चार्वाक किंवा लोकायतमताची व त्यातील काही मूलभूत सिद्धांतांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. यासंदर्भात 'आस्तिकशिरोमणी चार्वाक' हे प्रा. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक सुंदर व वाचनीय आहे. त्यात त्यांनी चार्वाकांना आस्तिक का म्हटले पाहिजे याची छान मीमांसा केली आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' हे या विषयावर मी वाचलेलं सर्वात उत्तम पुस्तक होय. मिपावरीलच शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेखही सुंदर आहे

चार्वाकाचे विचार लय भारी आहेत . (अवांतर : कॉलेजात असताना विविध गृप डिस्कशन मधे पोरींना ते विचार पटवुन द्यायचा लाख प्रयत्न केला ...पण हाय रे देवा :( असो. म्हणुन मग सध्या आम्ही ओशो कडे वळालो आहोत ;) )

@वाचकांना पसंतीस पडल्यास पुढील चर्चा अशाच स्वरूपात सादर करण्याचा विचार आहे हीच 'क्रमशः' मागची भूमिका.)>>>>>> पसंत आहेच. अता त्या क्रमा'ला लवकर शह द्या! :)

धर्माचा काय संबंध? जगामध्ये अर्थ आणि काम हे दोनच पुरूषार्थ आहेत. आमचाच काय पण लोकांचाही हाच अनुभव आहे आणि म्हणूनच चार्वाकाच्या मताला लोकायत असंही म्हणतात.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
जोवर जीव आहे, तोवर सुखाने राहावे, मरण कुणाचं टळलंय? एकदा का शरीरीचं चितेवर भस्म बनलं तर या जगात पुन्हा कुठे येणं होणार आहे?
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
या द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो. तो झिंगतो. अगदी तसंच आहे बघा आपलं! पृथ्वी, जल, तेज आणि वायु या चार महाभूत तत्त्वांच्या संयोगातून देह निर्माण होताना त्यात चैतन्याचा आविष्कार होतो.
नशा शराबमे होता तो नाचती बोतल. द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो... जसे की चैतन्य अन देह संयोगे मानव... नाहि का ?
बुवाजी, याचा अर्थ, देहाशिवाय आत्म्याच्या अस्तित्वाला काहीच प्रमाण नाही तर चैतन्ययुक्त देह हाच आत्मा, असा घ्यायचा का?
देह्धारण केला आहे म्हणून आत्म्याचे (अत्रुप्त न्हवे) अस्तित्व सदा जाणवत असते हाच मुळात गैरसमज आहे.. उदा. झोपेत हे अस्तित्व जाणवत नाही म्हणजे देह नश्ट झालेला असतो नाहि उलट यावरुन असे म्हणता येइल कि देहामधे आत्म्याचि विस्मृति निर्माण करायची क्षमता नक्किच आहे. थोडक्यात देहाचे अस्तित्व आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण ठरु शकत नाही. उरलेल्या गोश्टिवर विचार ३१ सप्टेंबरचि कामे संपल्याव्र करुया.

In reply to by अग्निकोल्हा

एस 21/09/2013 - 00:40
एखाद्याला एकतर उथळ किंवा आपलाच ठरवून येनकेनप्रकारेण संपवायचा हे इहवाद्यांचे जुनेच धोरण आहे.
पुरुषार्थ कळाले पण स्त्रियार्थाबाबत काहि विवेचन आहे काय ? का एखादा विषिश्ट परिघ निर्माण करुन केवळ त्यात नांदायच म्हणजे स्त्रियार्थ असतो.... वगैरे वगैरे वगैरे ?
पुरुषार्थ या शब्दामधील पुरुष म्हणजे मनुष्यप्रजातीतील नर हा एवढाच संकुचित अर्थ लावून वरील वाक्याला छेद देण्याचा प्रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे. आधुनिक काळाच्या संदर्भाने यातील पुरुष म्हणजे मानव. त्याअर्थाने पुरुषार्थाला अधिक सुसंगत असा मानवार्थ हा शब्दप्रयोग इथे करता येईल.
आधुनिक काळातिल मानवी मेंदु व मनासंबधि काहि प्रयोग ह्या मताला दुजोरा देत नाहित.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
द्रव्यांच्या मिश्रणातूनच तयार होणार्‍या वारूणीच्या सेवनाने माणसाला मद चढतो, त्या वारुणिला नाही म्हणजेच माणुस अन वारुणी या दोन वेगवेगळ्या गोश्टी आहेत ज्या संयोगे मद तयार होतो
येथे आपणच आपले मत खोडून काढले आहे. जोपर्यंत वारुणी आणि माणूस ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत तेथे मद उत्पन्न होत नाही. वारुणी जेव्हा मनुष्याच्या शरीरात जाते तेव्हा त्यांच्या संयोगे मद तयार होतो. वारूणीला मद चढत नाही तसेच माणसालाही मद चढत नाही. मद ही वारूणीमय देहाची एक अवस्था आहे. थोडक्यात मदाचे वारूणी व मनुष्य यांच्याबाहेर अस्तित्व नाही. मदावस्था माणसाच्या देहातील वारुणीच्या प्रमाणावर टिकते. म्हणजेच जडाची एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट प्रमाणातील स्थिती हे त्या जडसंयोगाला चैतन्य प्रदान करते. चैतन्य हे जडाचे फल (Function) आहे. जड चैतन्याचे फल नव्हे. किंबहुना जडाबाहेर चैतन्याला अस्तित्त्व असू शकत नाही असे चार्वाकमत सांगते. कृपया हा फरक लक्षात घ्या. 'चैतन्य अन देह संयोगे मानव' असू शकत नाही. देहाची विशिष्ट अवस्था म्हणजे जिवंत देह. चार्वाकांनी पृथ्वी-आप-तेज-वायू हीच महाभूते मानली व केवळ त्यांच्या विशिष्ट संयोगे चैतन्यावस्थेतील जड निर्माण होऊ शकते असे म्हटले. आजचे विज्ञान चार्वाकमताचे आधुनिक स्वरूप आहे असे म्हणावे लागेल. अणुरेणूंची योग्य प्रमाणात व योग्य स्थितीत सांगड घातली असता चैतन्य असलेला जीव निर्माण करता येऊ शकेल. अर्थात ती एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की प्रायोगिक विज्ञान तेथपर्यंत अजून पोहोचू शकलेले नाही. परंतु शुद्धसैद्धान्तिकरित्या हे शक्य आहे.
चैतन्ययुक्त देह हाच आत्मा
आत्म्याचे अस्तित्त्व सिद्ध करायची किंवा आत्मा कुठल्याही स्वरूपात मानायची गरजच संपते.
चर्वाक खरच मुद्देसुद असते तर...प्रेताने मुलं जन्माला घातली असती
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका. असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल. बाकी चार्वाकबौद्धादी मतांचे खंडन करण्यासाठी तर्काचा आधार घेणारे आदिशंकराचार्य वेदांची मीमांसा मात्र तर्काने करायची नाही अशी दुटप्पी भूमिका का घेतात हे काही कळत नाही. शेवटी उद्वेगाने म्हणावेसे वाटते... त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचरा: ! जर्फरी तुर्फरीत्यादी पंडितानां वच: स्मृतम !! माधवाचार्य. (शरद यांच्या लेखाच्या सौजन्याने साभार)

In reply to by एस

अर्धवटराव 21/09/2013 - 01:36
या सगळ्या चर्चेचा परिपाक असा, कि जीवन/चेतना हि देहाची एक अवस्था आहे. इन अदर वर्ड्स, चैतन्य हि व्हर्च्युअल टर्म आहे. नेमकं हेच आहे का चार्वाक/लोकायत मत?

In reply to by एस

रयत्न चांगलाय पण हास्यास्पद आहे...
विनोद हा विनोदच असतो हे आपणास कळाले यातच त्या वाक्याचे सार्थक झाले .
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले?
अरे हो चमचा तोंडात द्यायला विसरलो कि.
नेहमीप्रमाणेच पातळी सोडून टीकेखातर टीका.
सॉरी तुम्हाला प्रेतांबद्दल इतका आदर आहे हे माहित न्हवते म्हणून भावना दुखावली गेल्यास क्षमस्व. आणि हो मी नेहमी नेहमी प्रेतांवर टिका करत नाही बरक टिका मुर्दाडपणावर असते.
असोत. जर प्रेत ह्या देहाच्या स्थितीतून देहाला पुन्हा जिवंतावस्थेत नेता येण्यासारखे बदल देहाच्या भौतिक संरचनेत करता आले तर असा जिवंत झालेला देह नक्कीच जिवंतपणाची सर्व कार्ये त्याच्या कुवतीनुसार करू शकेल.
शास्त्रीय पुरावे/संदर्भ वगैरे?? की उगाचच मतांची पिंक टाकली की झाले? तरीही शब्दात तुमची भावना समजुन घ्यायची म्हटले तर आपल्याला असं म्हणायच आहे काय की यु वॉंट टु रिप्लेस अ कॉम्प्लिटली डेड ऑर्गन (ऑर कंप्लिट डेड स्टेट ऑफ ऑर्गन)ओफ अब्सोलुटली डेड हुमन बॉडी विद अ लाइव वन सो दॅट ह्युमन बॉडी कॅन फंक्शन बॅक अगेन ??? गुड लक!

In reply to by अग्निकोल्हा

एस 23/09/2013 - 00:54
आपल्या आणि अर्धवटरावांच्या प्रतिसादातील दोन मुद्दे इथे स्पष्ट करण्यासारखे आहेत म्हणून हा संयुक्त प्रतिसाद. चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. आणि चैतन्य ही जडाच्याच अवस्थेचे फल असल्याने अशा कुठल्याही बाह्यशक्तीचे अस्तित्व नाकारणे हा चार्वाकमताचा मुख्य मुद्दा. हाच दोन्हींमधला फरक आहे. देह आणि आत्मा हेही ह्याच आधारे स्पष्ट करता येईल. आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे. थोडक्यात देहातील (जडावस्थेतील) वार्धक्यामुळे होणारे बदल थोपवणे आणि जमल्यास ते विरूद्ध फिरवून चैतन्य किंवा जीवन पुन्हा बहाल करणे वा चिरतारुण्य मिळवणे हे आजच्या आधुनिक जैवविज्ञानाचे धेय्य व त्याचे मूळ हे चार्वाकमताच्या जड विरुद्ध चैतन्य ह्या वादावरील सिद्धांतात सापडते. जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. बाकी चालू द्या.

In reply to by एस

अर्धवटराव 23/09/2013 - 08:52
चार्वाक मताचा तुमचा आणखी अभ्यास असल्यास काही मुद्द्यांवर प्रकाश पाडा प्लीज. >>चैतन्य हे जडापेक्षा वेगळे असते आणि ते बाहेरून जडात घालता येते किंवा जडातून काढता येते. असे करण्याची क्षमता कुठल्यातरी विशेष शक्तीत आहे व अशा शक्तीचे अस्तित्त्व आहे किंवा त्याला देव वगैरे म्हणले जावे हे चार्वाकविरोधकांचे मुख्य मत आहे. -- हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि. >>जीवनपूर्व आणि जीवनप्रश्चात कालाचे अस्तित्त्व नाकारून माणसांना त्यांचे असलेले आयुष्य सुंदर रितीने योग्य प्रकारे उपभोग घेत व्यतित करायला लावणे हे चार्वाकांचे सर्वात मोठे उद्दिष्ट होय. -- माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?

In reply to by अर्धवटराव

एस 23/09/2013 - 15:28
छान प्रश्न विचारले आहेत आपण मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. परंतु जेवढी मला माहिती आहे त्यावरून तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा अल्प प्रयत्न करतो.
हे मत चार्वाक युगानंतरचे कि त्या पूर्वीचे? म्हणजे हे मत चार्वाकाला प्रतिवाद करायला म्हंणुन जन्माला आले काय? नसल्यास ते "चार्वाकविरोधकांचे" नाहि
या प्रश्नात दोन उपप्रश्न सामावले आहेत. एक म्हणजे चार्वाकयुगाचा काळ कोणता. व दुसरा म्हणजे चार्वाकविरोधक ही संज्ञा नेमकी कोणाला वापरावी. चार्वाकमताचा काळ किंवा त्याचा उद्भव ठामपणे सांगता येणे कठीण आहे कारण चार्वाकांचे साहित्य अतिशय तुटपुंज्या स्वरूपात शिल्लक राहिले आहे. 'चार्वाक: ऐतिहासिक आणि तात्त्विक मीमांसा: डी. वाय. हाडेकर' ह्या ग्रंथात लोकायतसाहित्याच्या र्‍हासाची काही कारणे त्यांनी स्पष्ट केली आहेत. http://www.misalpav.com/node/15418#new येथे उद्दाम यांनी 'भारतात त्या वेळी विरोधी पंथांचे ग्रंथ जाळण्याची पद्धत नव्हती. ती मुसलमान आक्रमकांनी आणली' असे मत मांडले आहे. ते तितकेसे बरोबर नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या किंवा विरोधी मतांचे खंडण करणे केवळ यापुरतेच तेव्हाचे वादविवाद किंवा संघर्ष मर्यादित नसून त्यासाठी विरोधकांना संपवण्याचे किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचेही तंत्र यशस्वीपणे अवलंबले गेले. महाभारतातील युद्धानंतर चार्वाक नावाच्या असुराने युधिष्ठिराला आपल्याच रक्ताच्या नात्यांच्या माणसांना मारल्याबद्दल भरसभेत दोष दिला तेव्हा तिथे उपस्थित ऋषीगणांनी क्रोधाने त्याला जाळून टाकले असा उल्लेख आहे. या उदाहरणावरून विरोधकांबद्दल इतकी टोकाची असहिष्णुता तेव्हाही तितकीच प्रचलित होती हे समजण्यासारखे आहे. कौटिल्याने आन्विक्षिकी या लोकायतमताचा समावेश असलेल्या विद्येचा गौरवाने उल्लेख केला यामुळेही कदाचित त्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ गेल्या शतकात म्हैसूरला सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता ही बाब इथे उल्लेखनीय आहे. चार्वाकमताचा उदय हा सर्व षड्दर्शनांपैकी सर्वात प्राचीन असावा असे मानण्यास वाव आहे. कारण मनुष्याने उत्क्रांतीच्या ओघात नैसर्गिक शक्तींची उपासना करण्यास सुरुवात करून आजचे सोफिस्टिकेटेड देव-अध्यात्मरूपी कल्पनांचे युग आणले हा प्रवास जेवढा जुना तेवढेच चार्वाकांचा भौतिकवादही प्राचीन असण्याची शक्यता मला सर्वात नैसर्गिक वाटते. ऋग्वेदातील उषा, वरूण, इत्यादी देवता मागे पडून आज विष्णू व अनार्यांच्या रुद्राचे आर्यकरण म्हणजे शंकर इ. देवता लोकप्रिय झालेल्या दिसतात ही देव किंवा अभौतिक संकल्पनांची उत्क्रांती म्हणता येईल. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक या मतांनी नंतर उत्तरमीमांसकांशी काहीसे जुळवून घेतल्याने त्यांचे खंडन करण्याची तीव्रता कमी ओघाने कमी होत गेली. बौद्ध व जैन तत्वज्ञानांनीही चार्वाकांइतका ठाम नास्तिकपणा जपला नाही. एकटे चार्वाक आपल्या मूळ भौतिकवादाशी प्रामाणिक राहिले व त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली. याबाबत माझी मते चुकीची किंवा अल्प माहितीवर आधारित असल्याची शक्यता आहे, तरी आपणाला अजून माहिती किंवा संदर्भ हवे असल्यास मिपावरील जाणकारांना विचारता येईल.
माणसाचे आयुष्य सुंदर बनवायला हे असे काळाचे अस्तित्व नाकारणे चार्वाकाने अनिवार्य मानले आहे काय?
या प्रश्नाचा रोख मला समजला नाही. तरी शब्दशः अर्थ घेतला तर होय. थोडी भर - चार्वाकांना निव्वळ भोगवादी ठरवून मोकळे होण्याची किंवा त्यांना नीतिमत्ताशून्य ठरवण्याची चार्वाकविरोधकांची घाई होते असा अनुभव आहे. चार्वाकमत, जे समाजातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आचरीत असतो, ते असे नैतिकमूल्यांचे विरोधक नसून एका अर्थाने नैतिकतेचे सर्वात मोठे पाईक आहेत. नैतिकता व धार्मिकता यांचा आपापसात कसलाही संबंध नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो.

In reply to by एस

अर्धवटराव 30/09/2013 - 23:17
माझी प्रश्न मांडण्यात चुक झाली. चार्वाकयुग म्हणजे चार्वाक नामक तत्ववेत्त्याचा काळ असं मला विचारायचं नव्हतं. थोडं इलॅबोरेट करतो. सत्याची आस अणि सुखाची कामना या स्वयंभू प्रेरणा मानवी मनात नांदतात. या प्रेरणा कधी म्युचुअली एक्स्क्लुझीव्ह, कधी समांतर, तर कधी अगदी परस्पर विरोधी देखील असु शकतात. या दोन्ही प्रेरणांची एकसंगत लावण्याचे कार्य प्रत्येक दार्शनीक करतो. कुठलं दर्शन किती प्रभाव पाडतं हे तत्कालीन समाज परिस्थीती ठरवते. चार्वाकाचा मूळ सिद्धांत काय, तर यावत् जीवेत सुखं जीवेत. त्याचं कारण तो देतो कि भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः . चैतन्य हे जडापासुन तयार होत नाहि असं मानणारं तत्वज्ञान तसंही भस्मीभूत देहाचं पुनरागमन होतं असं म्हणत नाहि, किंबहुना जुनं वस्त्र टाकुनच नवीन वस्त्र परिधान करावं लागतं असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे ते चार्वाकाला विरोधी ठरत नाहिच, तर चार्वाक संपतो तिथुन ते सुरु होतं. हे तत्वज्ञान एस्टॅब्लीश झालं, सशक्त झालं, आणि इतकं उग्र झालं कि त्याने चार्वाकाला फाईट दिली असं होणं अशक्य आहे. या सर्व घाडामोडी होण्याचा काळ एखाद्या तत्ववेत्याच्या आयुष्यापेक्षा खुपच जास्त मोठा असणार. चार्वाक विचारधारेशी, चार्वाक पंथाशी संघर्ष झाला असेल, पण तसं अजुन तरी वाचनात आले नाहि. थोडक्यात काय, तर सत्याप्रती मानवी मनाची भूक चार्वाक तत्वज्ञान भागवु शकलं नाहि, आणि सुखप्राप्तीची साधनं गोळा करण्यास मानवाला कुठल्या दार्शनीकाची आवश्यकता तशिही राहात नाहि, म्हणुन चार्वाक संपला. यज्ञसंस्कृतीने सुरुवातीला मानवी सुखाची भरपूर सोय करुन ठेवली. पण पुढे त्यातलं कर्मकांड मानवी सुखाच्या आड येत गेलं, म्हणुन चार्वाक तत्वज्ञान उदयास आलं, अशी एक उपपत्ती लावता येते. पण ज्याप्रमाणे फक्त कम्युनीझम सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्यानंतर लोकशाहीचा प्रोग्राम देखील द्यावा लागतो, त्याचप्रमाणे सुखप्राप्तीकरता कर्मकांड सोडा म्हणुन सांगुन भागत नाहि तर त्याला रिप्लेसमेण्ट म्हणुन इतर संस्था-यंत्रणा उभ्या कराव्या लागतात जे चार्वाकाला जमलं नाहि म्हणुन तो मागे पडला. आजच्या युगात चार्वाक तत्वज्ञान पुन्हा उसळी मारणं सहाजीक आहे, कारण सुखोपभोगाचे स्वातंत्र कधि नव्हे तेव्हढं माणासाला आज उपलब्ध आहे, व सत्य शोधनाची इन्स्टीक्ट शमवण्यासाठी विज्ञानाचे राजमार्ग उपलब्ध आहेत. पण हि परिमाणं काहि शतके आगोदरच्या समाज परिस्थितीला लावता येत नाहित. असो. माझं वाचन याबाबतीत फार म्हणजे फारच तुटपुंजं आहे. म्हणुन एकुणच चार्वाकीझम बद्दल शक्य असेल तिथे प्रश्न विचारतो. त्याचकारणाने तुम्हाला तसदी दिली. मिपावर आणि इतरत्र जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा शक्य होईल तेंव्हा अभ्यास करेनच... बघु. अवांतरः युधीष्ठीराच्या सभेची कथा विरोधी विचारांप्रती असहिष्णुतेचे उदाहरण म्हणुन अजीबात पटलं नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

एस 01/10/2013 - 01:11
एकूणच चार्वाकमत काय किंवा इतर दर्शने काय, समाजातील त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवरील स्वीकृती ही नेहमीच बदलती आणि जाणीव-नेणिवेच्या धूसरतेआड जात राहिली आहे. तसे का याचे विवेचन आपण केलेच आहे. व्यावहार्यिकतेच्या पातळीवर आणि मानसिक स्थिरतेच्या कसोटीवर लोकायत संपूर्णपणे आणि कठोरपणे स्वीकारणे तितके सोपे नाही. सामान्यांना तर मुळीच नाही. प्रत्येक दर्शनाची किंवा शास्त्राचीही सुरुवात ही सत्याचा नव्याने प्रसंगी नवा किंवा जुना असा शोध घेण्यातून झाली. पण इतर दर्शनांमध्ये मूळ तत्त्वज्ञानाच्या विपरित कित्येक बाबींची कालांतराने सरमिसळ झाल्याचे दिसून येते. उदा. सुरुवातीला केवळ प्रकृतीप्रधान असणारा सांख्यवाद नंतर पुरुष आणि हळूहळू परमपुरुष आणि त्याच्या मुक्तीभोवती गुरफटला गेला. हे केवळ उदाहरण झाले. अशाच पद्धतीने दर्शनांतून उपदर्शने, पंथ आणि वाद उदयास येत गेले - येत आहेत. आणि या सगळ्यांची एक विलक्षण गुंफण आपल्या भारतीय समाजमनात झालेले दिसून येते. हा गुंता सोडवायला म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर सोपाही आहे. असो. चार्वाकांचे मला सर्वात जास्त आवडणारे गुण म्हणजे केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मान्यता आणि त्याआधारे सिद्ध होणार्‍या गोष्टी स्वीकारायचा उदारपणा. हा उदारपणा इतर दर्शनांच्या कर्मठ ताठरतेपेक्षा उठून दिसतो. आज लोकायत विज्ञानाच्या परिभाषेत मांडणे त्यामुळेच शक्य आहे आणि आवश्यकही. एवढे सांगून या धाग्यावरून आपला निरोप घेतो. धन्यवाद.

In reply to by एस

आत्मा हे चैतन्याचे जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व असे मान्य करून त्याला दिलेले रूप आहे. जर चार्वाकांच्या मते असे वेगळे अस्तित्त्वच नाही
आत्मा.... जडापेक्षा वेगळे अस्तित्त्व ? माझ्या माहिती (व काही अनुभवानुसार) आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
त्यामुळे आत्मा, देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे कारणच संपते हे चार्वाकमत आहे.
आता आत्मस्वरुपाची कल्पना येत असली तरी देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे. थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते. अवकाशतत्वाची अजुन एक गंमत अशी आहे कि यामधे चैतन्य दिसत नाही पण ते आहे गृहित धरले तर आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत कमालिचा योग्य ठरु लागतो. ( टाइम-स्पेस बेंडीग बद्दल लिहणे मोठि अन रोचक कल्पना आहे परंतु त्याचे विस्तारभय प्रचंड असल्याने गुगल हाच एकमेव पर्याय आहे याबद्दल अधिक माहिती घ्यायला)

In reply to by अग्निकोल्हा

एस 24/09/2013 - 08:46
आपल्या प्रतिसादातील तर्काशी असहमत.
आत्मस्वरुप यापध्दतिने जडापासुन सुक्ष्माकडे अधोरेखित होत जाते. प्रुथ्वि->>जल->>अग्नि->>वायु->>आकाश->> आणि आत्मतत्व/ स्वरुप (आत्मा).
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही. त्यातही पंचमहाभूतांची आपण वरप्रमाणे घातलेली सांगडही मला अतर्क्य वाटते.
देव, मुक्ती, स्वर्ग-नरकादि संकल्पना ह्या गोष्टी मानण्याचे/असण्याचे वा नसण्याचे कारण काय आहे हे अजुनही मी अस्तित्वात का आहे (कसा आहे न्हवे तर का आहे) या प्रश्ना इतकेच अनुत्तरित वाटते. असे माझे मत आहे.
सांख्यिकी किंवा विज्ञानाच्या कुठलाही सिद्धांत स्वीकारण्याच्या काही कसोट्या असतात. त्यात एखाद्या सिद्धांताची सिद्धी किंवा प्रूफ ही नकारात्मकतेकडून म्हणजेच तो सिद्धांत फेटाळून सुरू केली जाते. उदा. एखादे नवीन औषध हे त्या आजारावर उपयोगी आहे असे जर प्रतिपादन करायचे असेल तर विविध चाचण्यांमधून त्या औषधाच्या सकारात्मक परिणामकारतेच्या पुराव्यांपेक्षा जास्त काटेकोरपणे त्याचे नकारात्मक किंवा न्यूट्रल इफेक्ट - उदासीन परिणाम तपासले जातात. असे का, तर एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आहे हे मानून चालले आणि ती गोष्ट नसली तर होणारे नुकसान हे एखादी गोष्ट नाही असे मानून चालले आणि ती गोष्ट खरोखर असली तर होणार्‍या नुकसानीपेक्षा कितीतरी पटींने हानिकारक आणि इर्रिवर्सिबल - अपरिवर्तनीय असते. त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन हा नेहमी नवीन वा जुने सिद्धांत त्यांच्या वैश्विकतेला सतत आव्हान देऊन त्यांची वैधता तपासण्याला महत्त्व देतो. वरील बाब लक्षात घेता अशा संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले नसताना त्या आहेत हे मानणे हे त्या असल्याच तर न मानण्यामुळे होणार्‍या नुकसानीपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकेल. त्यामुळे जोपर्यंत अशा संकल्पनांचे अस्तित्त्व वर उल्लेखलेल्या आणि इतरही शास्त्रीय कसोट्यांवर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्य न करणे हेच शहाणपणाचे ठरेल हे इथे महत्त्वाचे आहे. थोडक्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल इतक्या कठोरपणे तपासूनच मगच अशा सिद्धांतांचे अस्तित्त्व मानावे हे चार्वाकांनी सांगितले.
थोडक्यात केवळ जडता नाही म्हणून आत्मा नाकारणे हे जडता नाही म्हणून अवकाश (स्पेस) तत्वही नाकारण्या इतक सकृतदर्शनी अनावश्यक वाटते.
इतर दर्शनांनी पाच महाभूतांचे अस्तित्त्व मान्य केले असताना चार्वाकांनी मात्र अवकाश सोडून फक्त इतर चार महाभूते मानली याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत. जसे अंधार म्हणजे प्रकाशाचा पूर्ण अभाव, पण अंधार निर्माण करायला केवळ प्रकाशाचा स्रोत अडवणे हाच एक मार्ग असल्याने अंधाराचे अस्तित्त्व हे प्रकाशाशी पूर्णपणे निगडित आहे, प्रकाश हा अंधारावर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे अवकाश आपले अस्तित्त्व इतर महाभूतांच्या मदतीनेच दाखवून देऊ शकते. समजा केवळ उदाहरणासाठी सैद्धांतिकरित्या असे समजू की जडाची निर्मिती करण्यासाठी तुम्हांला काही भांड्यांत पृथ्वी-आप-तेज-वायू ही महाभूते दिली आहेत. केवळ या चार महाभूतांच्या मदतीने आपण जडाची निर्मिती करू शकतो. त्यासाठी पाचव्या भांड्यातून थोडे अवकाश घेऊन त्यात मिसळण्याची गरज नसते. या कारणांनी चार्वाकांनी अवकाशाला पाचवे महाभूत म्हणून स्थान दिले नाही.
आइन्स्टाइनचा टाइम-स्पेस बेंडीगचा सिध्दांत
टाइम-स्पेस बेंडिंग हे गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येते. त्यासाठी तितक्या प्रचंड वस्तुमानाची खगोलीय वस्तू हवी असते. गुरुत्वाकर्षणाचा इतर मूलभूत बलांशी (विद्युतचुंबकीय बल, रेण्वीय बल आणि केंद्रकीय बल) संबंध सिद्ध करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना उल्लेखनीय यश आलेले नसले तरी गुरुत्वाकर्षण हे चैतन्य वगैरे मुळीच नव्हे. तसेच निव्वळ अवकाशात स्थळकाळाला वळवण्याची वा नियंत्रित करण्याची क्षमता नसते. ती केवळ त्या अवकाशात असलेल्या वेगवेगळ्या वस्तुमानाच्या घटकांमुळेच होऊ शकते.

In reply to by एस

हु नेवर नो व्हेर दि हेल इस तमिलनाड ? हेन्स दे डाँट क्नो इंडिया डज एगझिस्ट नॉर दि तमिलनाड इन सेम वर्ल्ड दे आर लिवींग. ऑर पिपल लाइक यु एंड मी हु थिक्स आनेवाडी इज एम्याजिनरी विलेज. आय्नीवेय... स्पेस बेंडिंग हे फक्त आणी फक्त गुरुत्वाकर्षणाच्या अतिप्रचंड बलामुळे घडून येत नाहि हो :) म्हणूनच स्पेस बेंडिग समजुन घ्या हा रेफरन्स दिला.
याचे कारण अवकाश मुळातच इतर महाभूतांच्या अस्तित्त्वाचा अभाव किंवा त्यांच्यामधील पोकळी होय. त्याला स्वतःचे गुणधर्म नाहीत.
स्पेस बेंडिग समजुन घ्या. मगच ह्या विषयावर चिंतन करा, गुगल केल्यावर उघडणारी पहिलीच लिंक चाळून स्पेसवर मत प्रदर्षित करण्याइतका छोटा आवाका या विषयाचा खरोखर नाहिये.
यामागील तर्क मला विज्ञानाच्या कुठल्याच कसोटीवर खरा उतरताना दिसत नाही.
अनेको आयुर्वेदिक औषधे विज्ञानाच्या कसोटीवर विषारीच असतात पण आयुर्वेद मात्र शरिराच्या वात कफ पित्त लक्षणाने उपचार करतेच. सो चर्वाक शुड हॅव क्नो की विज्ञान शुडंट बी टोटल बेस टु उण्डरस्टँड आल एंटिटीज. तसही विज्ञान पंचमहाभुते न्हवे तर सॉलिड लिक्विड अन गॅस अशा पदार्थाच्या मात्र तिनच अवस्था असतात इतकच मानते. पण अध्यात्म यामधे अवस्थां/तत्वां सोबत अग्नि आणि पोकळी तत्वांचाही अतंर्भाव करते. खर तर विज्ञानाच्या कसोटिवर चर्वाक घासले तरी उताणे पडतिल असे असताना इतर गोश्टी सध्या घासणे अप्रस्तुत आहे.

In reply to by एस

अनिरुद्ध प 24/09/2013 - 13:35
म्हणजे मानवी शरीरात आकाश /अवकाश हे तत्व नसून फक्त चार तत्वांनी हे शरीर बनले आहे असे आपले मत आहे असे दिसून येते हे जरा स्पष्ट कराल का ? तेव्हडीच आमचे अज्ञान दूर होण्यास मदत होईल असे वाटते.

In reply to by उद्दाम

एस 23/09/2013 - 00:35
शरद यांचा दर्शने ५ चार्वाक ऊर्फ लोकायत दर्शन हा लेख वाचावा अशी विनंती करत आहे. जेणेकरून हा सुंदर लेख आपल्या व इतरांच्या वाचनात येईल.

In reply to by अग्निकोल्हा

उद्दाम 24/09/2013 - 14:19
There are many differences between a living body and a dead body.

आशु जोग 21/09/2013 - 15:00
लेख समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नाही जमले. मग प्रतिक्रिया वाचल्या. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. या जगात दोन जाती आहे एक चार्वाकाला नावे ठेवणार्‍यांची दुसरी त्याचे समर्थन करणारी. इथे जात आय मीन कॅटेगरी हे लक्षात ठेवावे.

पैसा 22/09/2013 - 18:19
संवादरूपात चार्वाक मताची ओळख करून देणारा प्रयोग आवडला. चर्चा वाचत आहे. आणि पुढील क्रमश: भाग कधी येतोय याची प्रतीक्षा करत आहे.
लेखनप्रकार
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

लादेन ध्यानप्रकार

राजेश घासकडवी ·

आशु जोग 11/08/2013 - 22:25
नावात काय नाही ! अशी एक म्हण आहे मराठीत.

पैसा 11/08/2013 - 22:27
ठार! क्रमशः राहिलंय काय? असो, तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल?? =))

In reply to by पैसा

तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल??
असं लिहून तूच इथे लेखकांना निरुत्साही करण्याचा प्रयत्न करते आहेस. माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. मात्र संपादकांनीच असा तेजोभंग आरंभण्याला काय म्हणावं? इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. सूज्ञ व्यक्तीकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. ती 'पुढचे लेख लिहू नका' असं कसं म्हणू शकते?

In reply to by राजेश घासकडवी

पैसा 11/08/2013 - 22:47
माफ करा पण इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे किंवा इतर लोक किती वैचारिक उंची गाठू शकतात यावर लेखात भाष्य करून कितपत मूल्यवर्धन होते? तुमच्या लेखातील कन्टेन्टपेक्षा इतर गोष्टींवर चर्चा का होते? याचे कारण (माझ्या मते) इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार आणि असे वारंवार झाले तर ते कोणाला आवडेल? आणि बाय द वे, मी या संकेतस्थळावर एका निकनेमने लिहिते आणि कोणी कोणत्या नावाने लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. तुम्हाला माझे नाव माहित आहे पण ते नाव मी इथे वापरत नसताना तुम्ही परस्पर ते इथे कसे वापरू शकता? आँ. आणि संपादक झाले म्हणून काय झाले, आम्हाला काय आवडीनिवडी, भावना असू नयेत काय! -हिलरी क्लिंटन

In reply to by पैसा

तुझं खरं नाव काय आहे मला माहित नाही. किंबहुना तूही खरी आहेस की नाही हे मला माहीत नाही. हे मी स्वीकारू शकतो. कारण माझं मन मला काय सांगतं याकडे मी लक्ष देत नाही. पण सहीमध्येच तू ज्योति कामत असं लिहिलेलं आहेस. कदाचित ते तुझं नाव नसेलही. कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल. या सगळ्या गोष्टी मी सूज्ञ असल्याने मला समजतात. तुला समजत नाहीत म्हणून अनुकंपा वाटते. पण सर्वांनीच सतत माझी वैयक्तिक पातळीवर उतरून चेष्टा करावी हे बरोबर नाही. हे स्पष्ट सांगणं याला जर तुझ्या बुद्धीची कुवत काढणं असं वाटत असेल तर समज बापडी. त्यावरून तुझ्या मानसिकतेची समज येते.

In reply to by राजेश घासकडवी

पैसा 11/08/2013 - 23:00
माझी मानसिकता काढल्याने तुमचा प्वॉइंटाचा मुद्दा कसा काय सिद्ध होतो ब्वॉ? सगळी माया आहे हे समजायला सूक्ष्मात जायची गरज नाही. असं तुम्हाला कधीपासून होतंय हो?

In reply to by पैसा

तुमची मानसिकता काढल्याने प्वॉइंटाचा मुद्दा सिद्ध बिलकुल होत नाही. मला या साधनेचे मिळणारे प्वॉइंट्स वाढतात. हे लेखात इतक्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे. लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढावा ही विनंती. माया या शब्दाच्या अर्थाच्या पातळ्याही तुमच्या लक्षात आलेल्या नाहीत. माया म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेली - तो फारच ढोबळ अर्थ आहे. माया म्हणजे प्रेमसुद्धा. माया म्हणजे जाडी वाढल्यावरही कपडा मोठा करता यावा यासाठी ठेवलेली जागासुद्धा. आणि माया म्हणजे गोळा करण्याची मायाही. मी इथे प्रतिसादांची माया गोळा करतो आहे हेही तुमच्या लक्षात आलेलं नाही. एकंदरीत तुमचं नाव काहीही असलं तरी 'सूज्ञा' निश्चित नसावं असं वाटत रहातं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पैसा 11/08/2013 - 23:18
तुमचंच बरोबर! लेख शांतपणेच काय प्रिंट औट काढून वाचेन आणि अर्थ कळलाच तर परत येईन. आता माझी सूक्ष्मात जायची वेळ झाली. तुमचं चालू द्या!

In reply to by पैसा

अशा तिरक्या प्रतिसादांत जेव्हा समोरची व्यक्ती दगडावर डोकं आपटत बसल्याचं फीलिंग घेऊन शेवटी कंटाळून, वैतागून निघून जाते तेव्हा मला बोनस पॉइंट्स मिळतात...

In reply to by मोदक

बोनस पॉइंट्स हे निराकारच असतात. तुमच्याकडे काही क्रेडिट कार्ड वगैरे नाही का? त्या कंपन्या ज्या बोनस पॉइंट्स वगैरे देतात त्यांविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही? आपलं इतकं अज्ञान इतक्या प्रच्छन्नपणे उघड करण्याची लोकांना हौस असावी. स्ट्रीकिंग करणं वगैरेची काही लोकांना विकृत हौस असते त्यातलाच हा प्रकार असावा. असो. तुमच्या अज्ञानावर पांघरूण घालून लज्जारक्षण करण्याचाच माझा प्रयत्न आहे. तर या निराकार बोनस पॉइंट्सचा वापर मला पुढच्या सिद्धी मिळवण्यासाठी करता येतो. जसे की इथल्या सर्व सदस्यांची व्यक्तिगत माहिती उघड करण्याची शक्ती. ती थोड्या प्रमाणात मिळालेली आहेच, पण पुरेसे पॉइंट्स झाले की ही शक्ती अजूनही वाढेल. मग मला सगळ्यांचे क्रेडिट कार्ड नंबर्स, बॅंक अकाउंट नंबर्स, पासवर्ड्स, व्यक्तिगत पत्रं सगळं काही दिसेल. अमेरिकन सिक्युरिटीवाल्या लोकांना या सिद्धीमुळेच तर हे सगळं करता येतं.

In reply to by राजेश घासकडवी

मोदक 12/08/2013 - 00:31
अर्रे..??? साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!! नेहेमीप्रमाणे अंमळ गल्लत होते आहे की तुमच्या कंपूत (त्या मैदानावर पळणार्‍यांच्या) ओढण्याचा प्रयत्न..? असो.. सिद्धी प्राप्त झाली की कळवा. त्यावेळचे त्यावेळी पाहू ;-)

In reply to by मोदक

साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!!
लादेन ध्यानपद्धती अशीच असते मोदका, लादेन ध्यानपद्धती अशीच असते. (श्रेयअव्हेर वि.वा.शिरवाडकर)

In reply to by मोदक

शेवटचा प्रतिसाद आपलाच ठेवण्याची धडपड आवडली. पण मी ती चालू देणार नाही. कारण शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात.

In reply to by प्रास

रविवार दुपार फुकट घालवण्याची गरज नाही. मी कधीतरी साताठ दिवसांनी येईन आणि हळूच इथे शेवटचा प्रतिसाद देऊन जाईन.

In reply to by राजेश घासकडवी

अनिरुद्ध प 12/08/2013 - 13:59
हे बघ्ण्याची सिद्धी एका सोफ्ट्वेर (Software),मध्ये आधीच आहे,आपण सिद्धी प्राप्त करे पर्यन्त त्यानी सुद्धा पुढील पातळी गाठ्ली असेल्,असो सिद्धी प्राप्त कर्ण्यासाठी शुभेच्छा.

In reply to by अनिरुद्ध प

हेच काम बीपीओ कंपन्यातल्या कर्मचार्‍यांना व्हितॅमीन एम् चा प्रसाद चढवून काही साधकांनी अगोदरच केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 12/08/2013 - 17:13
फ्रंट व्ह्यू आहे हो तो, डोक्याने सगळे झाकून टाकलेय. त्यामुळे ऑर्थोग्राफिक नियमाप्रमाणे डोस्कंच तेवढं दिष्णार.

In reply to by बॅटमॅन

नानबा 19/08/2013 - 12:15
फ्रंट व्ह्यू मध्ये दात डाव्या बाजूला कसे दिसतील ओ?? ही घ्या हो एक स्माईली. यात पोट धरून हसत नाहीये पण तुमचं काम होऊन जाईल याने. :) as

In reply to by राजेश घासकडवी

"शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात." असं तुम्हीच ना म्हणाला होतात. विजुभाऊ मिसळपाववरचे सन्माननीय आणि अनुभवी सदस्य आहेत. अशा (लवेचेप्रच्या) युक्त्या तुमच्या आधीपासून त्यांना माहित आहेत.

अरे अरे घासू, मी कित्ती कित्ती हसू..! ? हसून हसून हुभा र्‍हाऊ,की मांडी घालुन बसू..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/belly-laugh.gif =================================== @मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे.>>> =)) @लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो.>>> =)) प्रत्येक वाक्या वाक्यावर हसतो आहे..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही. सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल. निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.

In reply to by राजेश घासकडवी

मैत्र 11/08/2013 - 23:24
"निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते. " याचा व्यत्यास असा होईल काय ? "उच्च स्तरावर काम करतो असे वाटणार्‍या बुद्धीला कमालीचा अहंगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक खोली गाठता येत नाही. मग गंभीरपणाचा आव आणून ती स्वतःचा समर्थन करू पाहते."

In reply to by राजेश घासकडवी

मैत्र 12/08/2013 - 00:54
पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.
प्रतिसाद आवडल्या गेला आहे.. हाण्ण.आत्मविश्वास असावा तर असा.

In reply to by राजेश घासकडवी

अनिरुद्ध प 12/08/2013 - 17:01
कुठेतरी वाचले आहे कि 'अहन्कार जळोनी जावा' पण ईथे 'मी' पणा काही सुटत नाही,असो या आमच्या प्रतिसादाने आपले बोनस (बोगस) गुण वाढोत.

In reply to by राजेश घासकडवी

@मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif @निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो>>> =)) हे राम... http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/setting-himself-on-fire.gif आत्मा दहन..आपलं ते हे..आत्मदहन करीत आहे मी या वाक्यावर! =)) @कारण तिला कुठलीही वैचारिक उंची http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.>>> http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अनिरुद्ध प 13/08/2013 - 18:49
हे कस काय बुवा,कारण आम्ही गीतेतील 'नैनन छिन्दन्ति' असे काहिसे ऐकले आहे.तेव्हा या अज्ञानाचे निराकरण करावे.

In reply to by राजेश घासकडवी

चौकटराजा 12/08/2013 - 16:46
हे पहा राजेश की काय कोण असाल ते...., तुम्ही हा धागा लिहिताना तुमचा फार नि पार गोंधळ उडलाय याला आमच्या आमच्या अध्यात्माच्या भाषेत ( तुम्हाला ती भाषा कळणे नाही ) संभ्रमावस्था म्हणतात. अर्थात ज्याला बुद्धी त्यालाच संभ्रम पडणार हेही आम्ही जाणतो.आता तुमच्यावरआम्ही ही सरळ सरळ का टीका करतो आहोत हे सांगतो. धाग्यात तुम्ही म्हणताय शिक्षण मौजमजा . ओके? मग मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे हे वाक्य कशासाठी ? ऑं ? तुम्ही एकतर मौज ठेवा किंवा गंभीरपणा.. एक पे रहना .. ग्वोडा चतुर ग्वोडा चतुर ये कया लगाया हे या ग्वोडा बोलो या चतुर...... अरे बापरे पण मी इथे मौज मजा करायला आलो होतो मलाही संभ्रमाची बाधा झाली की काय ?? ..

In reply to by प्रसाद गोडबोले

उत्खनक 17/06/2020 - 21:40
सध्याचा मिपावर चाललेला तथाकथित अध्यात्मिक गोंधळ पाहता आणि मार्कस भौंनी केलेल्या खास सुडंबनानं, घासुगुर्जींनी केलेल्या ह्या स्वतंत्र वृत्तीच्या डुंबनाची प्रकर्षानं आठवण जाहली. सात वर्षांपुर्वीची परिस्थिती अजूनही जवळ-जवळ तशीच कायम आहे हे पाहून खरंच विस्मय जाहला..! धमाल आहे अगदी!! हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ म्हणतात त्याचा पुनःप्रत्यय आला!! म्हटले, हा आनंद आपण एकट्यानंच घेण्याचे पातक का करावे?? म्हणून हा खननोद्योग! =))

In reply to by प्रसाद गोडबोले

तब्बल १० वर्षांनी ह्या लेखनाची आठवण आली . जुन्या आठवणी जाग्या झ्याल्या अन हसु आले =)))) परिस्थीतीत आजही जैसे थे च आहे ! =)))) जय गुर्देव __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

हॅज कन्सिस्टन्सी ! परफेक्शन को इम्प्रुव करना मुश्कील होता है - दिल चाहता है ! आजही मीपा संक्षीना मिस करते आहे म्हणजे बघा !

नंदन 12/08/2013 - 04:28
त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय? :) बाकी लेख फक्कडच. स्पांडोबांच्या, आपलं प्रसन्नच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ;) (प्रास प्रास!)

In reply to by नंदन

कवितानागेश 12/08/2013 - 07:27
व्हेअर इज द स्पा ऑफ द अस? :( टीम लीडर बेपत्ता असल्यानी कुठला स्टँड घ्यायचा ते कळत नाहीये. त्यामुळे कालपासून फक्त हसत लोळतेय.. ;)

In reply to by नंदन

चिगो 16/08/2013 - 17:53
कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
हे म्हणजे धोनीष्टाईल झालं.. लास्ट बॉलवर सिक्स आणि वर्ल्ड्कप खिशात.. ;-)
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?
=)) =))

चित्रगुप्त 12/08/2013 - 08:48
अभिनंदन ध्यानाचे एकशे आठ प्रकार आजवर ठाऊक होते, त्या सर्वांहून वरचढ ही लादेन ध्यानपद्धती निर्माण करून आपण एक अद्वितीय आणि अभिनंदनीय कृत्य केलेले आहे, आणि समस्त मानवजातीवर अगणित उपकार करून ठेवलेले आहेत. कृपया "साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील" हे कसे घडते, या ध्यान पद्धतीतून साधकाची एकंदरित वाटचाल 'समाधीतून संभोगाकडे' अशी होते का, 'स्ट्रीकिंग करणे' या ध्यान-प्रकाराशी याचा काही संबंध आहे का, वगैरे खुलासा करावा. याशिवाय 'बेशर्त स्वीकृती' असल्याशिवाय सुद्धा हे ध्यान करता येते का, हेही लिहावे. अभ्यास वाढवावा, म्हणून हे प्रश्न विचारले आहेत, वाचकांनी सुद्धा नीट वाचून समजवून घ्यावे, म्हणजे जीवन आनंदमय होईल.

स्पा 12/08/2013 - 10:18
"पूजा" कार घासू गुर्जींकडून इतक्या उथळ आणि हलक्या लेखाची अपेक्षा नव्हती असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?

In reply to by स्पा

असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?
मी अंधश्रद्धेच्या दरीत लोटतोय? अहो मी माझे आणि इतर साधकांचे अनुभव सांगितले. ते सत्यच आहेत. या साधनेने मोक्षाच्या वाटेवर अनेक सिद्धी मिळतात. मला सांगा, तुमची त्वचा आहे का बावीस सेंटीमीटर जाड? नाही ना? मग ही पद्धती वापरून बघायला काय हरकत आहे?

In reply to by राजेश घासकडवी

राघव 15/08/2013 - 00:39
लोकांच्या अध्यात्माबद्दल काय काय कल्पना असतात! राजेश, तुम्ही स्वतःच अतिशय संभ्रमित आहात. त्यात अजून इतरांना काय सांगताय?
कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो
जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे
वरील दोन वाक्यांतच तुमचा संभ्रम उघड झालेला आहे.
सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली.
हे म्हणजे तर संभ्रमित अवस्थेची पुढची पायरी दाखवण्याचा प्रकार आहे. लेखाचा आणि या वाक्याचा काहिएक संबंध नाहीये.
मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे
मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो
हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे.
कधी तंत्र, कधी पद्धती, कधी प्रकार.. इतके संभ्रमित मन असतांना तुमच्या ज्ञानाची काय पातळी आहे ते समजलेच आहे.
अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन.
इथे तर स्वतःच मान्य केलेलं आहे की तुम्हाला काहीही समजलेलं नाही. विषय संपला! केवळ काहीतरी असंबद्ध खरडायचे आणि आपल्या तोकड्या ज्ञानाचे जगजाहीर प्रदर्शन करायचे याशिवाय या लेखाचे काहीही प्रयोजन नाही असे मी म्हणेन. असा प्रतिसाद देण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. --- केवळ मीच सत्य लिहितो.

In reply to by राघव

आनंदी गोपाळ 18/08/2013 - 09:42
पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.
म्हंजे तुम्ही लिवलंय त्या विषयात तुमाला बी काय कळत नाय असं म्हंताय का?

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ, या लेखावर माझ्या बाजूने प्रतिसाद देणारे तुम्ही पहिलेच! यावरून एकट्या तुम्हालाच प्रगल्भता नाही तरी किमान अक्कल आहे हे दिसून येतं. मला एक समजत नाही. मी या लेखात केवळ एक तंत्र सांगितलेलं आहे. असं असूनही माझ्यावर सगळ्यांनी असे हल्ले करण्याचं कारण काय? या लेखात काही भडकाऊ नाही, कुणाविरुद्ध बदनामीकारक शब्द नाही. मिसळपावच्या आधिकारिक धोरणात तर बसतोच आहे, नाहीतर संपादकांनी उडवला असता. मग सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं? म्हणजे सगळेच सदस्य अज्ञानी तर आहेतच, पण त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?

In reply to by राजेश घासकडवी

सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं?...... .....त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?
अरेरे! थोडक्यात लेखाच्या मुळ स्वभावाला सोडून दूर गेलात. प्रश्न नाही. विधानं करा. 'सर्व सदस्य विनाकारण माझ्यावर तुटून पडत आहेत.' आणि 'त्याच्यापाशी किमान सुसंस्कृतपणाही नाही.' मी तुमच्या प्रतिसादावर लिहीलं आहे. हा तुमच्यावर वैयक्तिक हल्ला वगैरे नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

आनंदी गोपाळ 18/08/2013 - 23:32
हे एक. त्यावर तशाच मनोवृत्तीत जाऊन प्रतिसाद देणे हे म्हणजे खालील बिरबलाच्या गोष्टिसारखे आहे. तुमचे अभिनंदन! * एकदा एक बहुरूपी बादशहासमोर म्हणे बैलाचे सोंग करीत असतो. बघ्यांत उभा असलेला एक लहान मुलगा त्या बैलाला खडा मारतो. अन मग नंतर खुश होऊन स्वतःची मळलेली टोपी बैलाला उर्फ बहुरूप्याला बक्षीस देतो. हे पहाणारा बादशाह त्या मुलाला बोलावून घेतो अन विचारतो, की हे नक्की काय केलेस? मुलगा सांगतो, खाविंद, जनावराला खडा मारला, तर ते तिथली चामडि हलविते. ते या बहुरूप्याने केले. त्याचे सोंग वठले, म्हणून मी टोपी बक्षीस दिली! तर 'म्हणे', तो बादशहा होता अकबर, व हा मुलगा बिरबल. घासकडवींनी नुसता खडूस लेख लिहिलेला नाही, तर त्यावर त्यांच्या प्रकृतीच्या विसंगत असे भांडकुदळ व आक्रस्ताळे प्रतिसाद देखिल देत आहेत. हे मला एकट्याला नव्हे, अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना जाणवले आहेच. मी मारलेल्या खड्याला योग्य प्रतिसाद आला, याचाच अर्थ, बहुरूप्याचे सोंग चांगले वठते आहे.. * गुर्जी, जौ द्या ना. की फर्क पैन्दा?

राही 12/08/2013 - 13:21
छे बुवा. सगळीकडे या भुंग्यांच्या रुणझुणाटाने उच्छाद मांडलाय नुसता.

निम 12/08/2013 - 18:32
लेख वाचला , प्रतिसादही वाचले…. हा लेख उद्देशात्मक आहे कि उपहासात्मक आहे हे काही कळले नाही बा !! पण फार करमणूक झाली … अगदी ROFL !

नानबा 12/08/2013 - 22:03
पुढला भाग आला की कळेलसं वाटतंय. आत्ता तरी लेख कर्टली अँब्रोजचा उसळलेला चेंडू सचिन न वाकतासुद्धा त्याच्या डोक्यावरून जावा तितका बाऊन्सर गेलेला आहे.

हा मी तुमच्यावर "लादेन" तोच सर्वोत्तम ध्यानप्रकार, जरादेखील शंका घेतलीत तर.... याप्रकारचा वाटतो, म्हणून त्याचे नाव "लादेन ध्यानप्रकार" असे पडले असावे.

आशु जोग 11/08/2013 - 22:25
नावात काय नाही ! अशी एक म्हण आहे मराठीत.

पैसा 11/08/2013 - 22:27
ठार! क्रमशः राहिलंय काय? असो, तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल?? =))

In reply to by पैसा

तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल??
असं लिहून तूच इथे लेखकांना निरुत्साही करण्याचा प्रयत्न करते आहेस. माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. मात्र संपादकांनीच असा तेजोभंग आरंभण्याला काय म्हणावं? इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. सूज्ञ व्यक्तीकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. ती 'पुढचे लेख लिहू नका' असं कसं म्हणू शकते?

In reply to by राजेश घासकडवी

पैसा 11/08/2013 - 22:47
माफ करा पण इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे किंवा इतर लोक किती वैचारिक उंची गाठू शकतात यावर लेखात भाष्य करून कितपत मूल्यवर्धन होते? तुमच्या लेखातील कन्टेन्टपेक्षा इतर गोष्टींवर चर्चा का होते? याचे कारण (माझ्या मते) इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार आणि असे वारंवार झाले तर ते कोणाला आवडेल? आणि बाय द वे, मी या संकेतस्थळावर एका निकनेमने लिहिते आणि कोणी कोणत्या नावाने लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. तुम्हाला माझे नाव माहित आहे पण ते नाव मी इथे वापरत नसताना तुम्ही परस्पर ते इथे कसे वापरू शकता? आँ. आणि संपादक झाले म्हणून काय झाले, आम्हाला काय आवडीनिवडी, भावना असू नयेत काय! -हिलरी क्लिंटन

In reply to by पैसा

तुझं खरं नाव काय आहे मला माहित नाही. किंबहुना तूही खरी आहेस की नाही हे मला माहीत नाही. हे मी स्वीकारू शकतो. कारण माझं मन मला काय सांगतं याकडे मी लक्ष देत नाही. पण सहीमध्येच तू ज्योति कामत असं लिहिलेलं आहेस. कदाचित ते तुझं नाव नसेलही. कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल. या सगळ्या गोष्टी मी सूज्ञ असल्याने मला समजतात. तुला समजत नाहीत म्हणून अनुकंपा वाटते. पण सर्वांनीच सतत माझी वैयक्तिक पातळीवर उतरून चेष्टा करावी हे बरोबर नाही. हे स्पष्ट सांगणं याला जर तुझ्या बुद्धीची कुवत काढणं असं वाटत असेल तर समज बापडी. त्यावरून तुझ्या मानसिकतेची समज येते.

In reply to by राजेश घासकडवी

पैसा 11/08/2013 - 23:00
माझी मानसिकता काढल्याने तुमचा प्वॉइंटाचा मुद्दा कसा काय सिद्ध होतो ब्वॉ? सगळी माया आहे हे समजायला सूक्ष्मात जायची गरज नाही. असं तुम्हाला कधीपासून होतंय हो?

In reply to by पैसा

तुमची मानसिकता काढल्याने प्वॉइंटाचा मुद्दा सिद्ध बिलकुल होत नाही. मला या साधनेचे मिळणारे प्वॉइंट्स वाढतात. हे लेखात इतक्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे. लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढावा ही विनंती. माया या शब्दाच्या अर्थाच्या पातळ्याही तुमच्या लक्षात आलेल्या नाहीत. माया म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेली - तो फारच ढोबळ अर्थ आहे. माया म्हणजे प्रेमसुद्धा. माया म्हणजे जाडी वाढल्यावरही कपडा मोठा करता यावा यासाठी ठेवलेली जागासुद्धा. आणि माया म्हणजे गोळा करण्याची मायाही. मी इथे प्रतिसादांची माया गोळा करतो आहे हेही तुमच्या लक्षात आलेलं नाही. एकंदरीत तुमचं नाव काहीही असलं तरी 'सूज्ञा' निश्चित नसावं असं वाटत रहातं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पैसा 11/08/2013 - 23:18
तुमचंच बरोबर! लेख शांतपणेच काय प्रिंट औट काढून वाचेन आणि अर्थ कळलाच तर परत येईन. आता माझी सूक्ष्मात जायची वेळ झाली. तुमचं चालू द्या!

In reply to by पैसा

अशा तिरक्या प्रतिसादांत जेव्हा समोरची व्यक्ती दगडावर डोकं आपटत बसल्याचं फीलिंग घेऊन शेवटी कंटाळून, वैतागून निघून जाते तेव्हा मला बोनस पॉइंट्स मिळतात...

In reply to by मोदक

बोनस पॉइंट्स हे निराकारच असतात. तुमच्याकडे काही क्रेडिट कार्ड वगैरे नाही का? त्या कंपन्या ज्या बोनस पॉइंट्स वगैरे देतात त्यांविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही? आपलं इतकं अज्ञान इतक्या प्रच्छन्नपणे उघड करण्याची लोकांना हौस असावी. स्ट्रीकिंग करणं वगैरेची काही लोकांना विकृत हौस असते त्यातलाच हा प्रकार असावा. असो. तुमच्या अज्ञानावर पांघरूण घालून लज्जारक्षण करण्याचाच माझा प्रयत्न आहे. तर या निराकार बोनस पॉइंट्सचा वापर मला पुढच्या सिद्धी मिळवण्यासाठी करता येतो. जसे की इथल्या सर्व सदस्यांची व्यक्तिगत माहिती उघड करण्याची शक्ती. ती थोड्या प्रमाणात मिळालेली आहेच, पण पुरेसे पॉइंट्स झाले की ही शक्ती अजूनही वाढेल. मग मला सगळ्यांचे क्रेडिट कार्ड नंबर्स, बॅंक अकाउंट नंबर्स, पासवर्ड्स, व्यक्तिगत पत्रं सगळं काही दिसेल. अमेरिकन सिक्युरिटीवाल्या लोकांना या सिद्धीमुळेच तर हे सगळं करता येतं.

In reply to by राजेश घासकडवी

मोदक 12/08/2013 - 00:31
अर्रे..??? साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!! नेहेमीप्रमाणे अंमळ गल्लत होते आहे की तुमच्या कंपूत (त्या मैदानावर पळणार्‍यांच्या) ओढण्याचा प्रयत्न..? असो.. सिद्धी प्राप्त झाली की कळवा. त्यावेळचे त्यावेळी पाहू ;-)

In reply to by मोदक

साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!!
लादेन ध्यानपद्धती अशीच असते मोदका, लादेन ध्यानपद्धती अशीच असते. (श्रेयअव्हेर वि.वा.शिरवाडकर)

In reply to by मोदक

शेवटचा प्रतिसाद आपलाच ठेवण्याची धडपड आवडली. पण मी ती चालू देणार नाही. कारण शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात.

In reply to by प्रास

रविवार दुपार फुकट घालवण्याची गरज नाही. मी कधीतरी साताठ दिवसांनी येईन आणि हळूच इथे शेवटचा प्रतिसाद देऊन जाईन.

In reply to by राजेश घासकडवी

अनिरुद्ध प 12/08/2013 - 13:59
हे बघ्ण्याची सिद्धी एका सोफ्ट्वेर (Software),मध्ये आधीच आहे,आपण सिद्धी प्राप्त करे पर्यन्त त्यानी सुद्धा पुढील पातळी गाठ्ली असेल्,असो सिद्धी प्राप्त कर्ण्यासाठी शुभेच्छा.

In reply to by अनिरुद्ध प

हेच काम बीपीओ कंपन्यातल्या कर्मचार्‍यांना व्हितॅमीन एम् चा प्रसाद चढवून काही साधकांनी अगोदरच केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 12/08/2013 - 17:13
फ्रंट व्ह्यू आहे हो तो, डोक्याने सगळे झाकून टाकलेय. त्यामुळे ऑर्थोग्राफिक नियमाप्रमाणे डोस्कंच तेवढं दिष्णार.

In reply to by बॅटमॅन

नानबा 19/08/2013 - 12:15
फ्रंट व्ह्यू मध्ये दात डाव्या बाजूला कसे दिसतील ओ?? ही घ्या हो एक स्माईली. यात पोट धरून हसत नाहीये पण तुमचं काम होऊन जाईल याने. :) as

In reply to by राजेश घासकडवी

"शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात." असं तुम्हीच ना म्हणाला होतात. विजुभाऊ मिसळपाववरचे सन्माननीय आणि अनुभवी सदस्य आहेत. अशा (लवेचेप्रच्या) युक्त्या तुमच्या आधीपासून त्यांना माहित आहेत.

अरे अरे घासू, मी कित्ती कित्ती हसू..! ? हसून हसून हुभा र्‍हाऊ,की मांडी घालुन बसू..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/belly-laugh.gif =================================== @मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे.>>> =)) @लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो.>>> =)) प्रत्येक वाक्या वाक्यावर हसतो आहे..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही. सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल. निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.

In reply to by राजेश घासकडवी

मैत्र 11/08/2013 - 23:24
"निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते. " याचा व्यत्यास असा होईल काय ? "उच्च स्तरावर काम करतो असे वाटणार्‍या बुद्धीला कमालीचा अहंगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक खोली गाठता येत नाही. मग गंभीरपणाचा आव आणून ती स्वतःचा समर्थन करू पाहते."

In reply to by राजेश घासकडवी

मैत्र 12/08/2013 - 00:54
पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.
प्रतिसाद आवडल्या गेला आहे.. हाण्ण.आत्मविश्वास असावा तर असा.

In reply to by राजेश घासकडवी

अनिरुद्ध प 12/08/2013 - 17:01
कुठेतरी वाचले आहे कि 'अहन्कार जळोनी जावा' पण ईथे 'मी' पणा काही सुटत नाही,असो या आमच्या प्रतिसादाने आपले बोनस (बोगस) गुण वाढोत.

In reply to by राजेश घासकडवी

@मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif @निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो>>> =)) हे राम... http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/setting-himself-on-fire.gif आत्मा दहन..आपलं ते हे..आत्मदहन करीत आहे मी या वाक्यावर! =)) @कारण तिला कुठलीही वैचारिक उंची http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.>>> http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अनिरुद्ध प 13/08/2013 - 18:49
हे कस काय बुवा,कारण आम्ही गीतेतील 'नैनन छिन्दन्ति' असे काहिसे ऐकले आहे.तेव्हा या अज्ञानाचे निराकरण करावे.

In reply to by राजेश घासकडवी

चौकटराजा 12/08/2013 - 16:46
हे पहा राजेश की काय कोण असाल ते...., तुम्ही हा धागा लिहिताना तुमचा फार नि पार गोंधळ उडलाय याला आमच्या आमच्या अध्यात्माच्या भाषेत ( तुम्हाला ती भाषा कळणे नाही ) संभ्रमावस्था म्हणतात. अर्थात ज्याला बुद्धी त्यालाच संभ्रम पडणार हेही आम्ही जाणतो.आता तुमच्यावरआम्ही ही सरळ सरळ का टीका करतो आहोत हे सांगतो. धाग्यात तुम्ही म्हणताय शिक्षण मौजमजा . ओके? मग मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे हे वाक्य कशासाठी ? ऑं ? तुम्ही एकतर मौज ठेवा किंवा गंभीरपणा.. एक पे रहना .. ग्वोडा चतुर ग्वोडा चतुर ये कया लगाया हे या ग्वोडा बोलो या चतुर...... अरे बापरे पण मी इथे मौज मजा करायला आलो होतो मलाही संभ्रमाची बाधा झाली की काय ?? ..

In reply to by प्रसाद गोडबोले

उत्खनक 17/06/2020 - 21:40
सध्याचा मिपावर चाललेला तथाकथित अध्यात्मिक गोंधळ पाहता आणि मार्कस भौंनी केलेल्या खास सुडंबनानं, घासुगुर्जींनी केलेल्या ह्या स्वतंत्र वृत्तीच्या डुंबनाची प्रकर्षानं आठवण जाहली. सात वर्षांपुर्वीची परिस्थिती अजूनही जवळ-जवळ तशीच कायम आहे हे पाहून खरंच विस्मय जाहला..! धमाल आहे अगदी!! हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ म्हणतात त्याचा पुनःप्रत्यय आला!! म्हटले, हा आनंद आपण एकट्यानंच घेण्याचे पातक का करावे?? म्हणून हा खननोद्योग! =))

In reply to by प्रसाद गोडबोले

तब्बल १० वर्षांनी ह्या लेखनाची आठवण आली . जुन्या आठवणी जाग्या झ्याल्या अन हसु आले =)))) परिस्थीतीत आजही जैसे थे च आहे ! =)))) जय गुर्देव __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

हॅज कन्सिस्टन्सी ! परफेक्शन को इम्प्रुव करना मुश्कील होता है - दिल चाहता है ! आजही मीपा संक्षीना मिस करते आहे म्हणजे बघा !

नंदन 12/08/2013 - 04:28
त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय? :) बाकी लेख फक्कडच. स्पांडोबांच्या, आपलं प्रसन्नच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ;) (प्रास प्रास!)

In reply to by नंदन

कवितानागेश 12/08/2013 - 07:27
व्हेअर इज द स्पा ऑफ द अस? :( टीम लीडर बेपत्ता असल्यानी कुठला स्टँड घ्यायचा ते कळत नाहीये. त्यामुळे कालपासून फक्त हसत लोळतेय.. ;)

In reply to by नंदन

चिगो 16/08/2013 - 17:53
कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
हे म्हणजे धोनीष्टाईल झालं.. लास्ट बॉलवर सिक्स आणि वर्ल्ड्कप खिशात.. ;-)
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?
=)) =))

चित्रगुप्त 12/08/2013 - 08:48
अभिनंदन ध्यानाचे एकशे आठ प्रकार आजवर ठाऊक होते, त्या सर्वांहून वरचढ ही लादेन ध्यानपद्धती निर्माण करून आपण एक अद्वितीय आणि अभिनंदनीय कृत्य केलेले आहे, आणि समस्त मानवजातीवर अगणित उपकार करून ठेवलेले आहेत. कृपया "साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील" हे कसे घडते, या ध्यान पद्धतीतून साधकाची एकंदरित वाटचाल 'समाधीतून संभोगाकडे' अशी होते का, 'स्ट्रीकिंग करणे' या ध्यान-प्रकाराशी याचा काही संबंध आहे का, वगैरे खुलासा करावा. याशिवाय 'बेशर्त स्वीकृती' असल्याशिवाय सुद्धा हे ध्यान करता येते का, हेही लिहावे. अभ्यास वाढवावा, म्हणून हे प्रश्न विचारले आहेत, वाचकांनी सुद्धा नीट वाचून समजवून घ्यावे, म्हणजे जीवन आनंदमय होईल.

स्पा 12/08/2013 - 10:18
"पूजा" कार घासू गुर्जींकडून इतक्या उथळ आणि हलक्या लेखाची अपेक्षा नव्हती असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?

In reply to by स्पा

असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?
मी अंधश्रद्धेच्या दरीत लोटतोय? अहो मी माझे आणि इतर साधकांचे अनुभव सांगितले. ते सत्यच आहेत. या साधनेने मोक्षाच्या वाटेवर अनेक सिद्धी मिळतात. मला सांगा, तुमची त्वचा आहे का बावीस सेंटीमीटर जाड? नाही ना? मग ही पद्धती वापरून बघायला काय हरकत आहे?

In reply to by राजेश घासकडवी

राघव 15/08/2013 - 00:39
लोकांच्या अध्यात्माबद्दल काय काय कल्पना असतात! राजेश, तुम्ही स्वतःच अतिशय संभ्रमित आहात. त्यात अजून इतरांना काय सांगताय?
कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो
जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे
वरील दोन वाक्यांतच तुमचा संभ्रम उघड झालेला आहे.
सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली.
हे म्हणजे तर संभ्रमित अवस्थेची पुढची पायरी दाखवण्याचा प्रकार आहे. लेखाचा आणि या वाक्याचा काहिएक संबंध नाहीये.
मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे
मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो
हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे.
कधी तंत्र, कधी पद्धती, कधी प्रकार.. इतके संभ्रमित मन असतांना तुमच्या ज्ञानाची काय पातळी आहे ते समजलेच आहे.
अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन.
इथे तर स्वतःच मान्य केलेलं आहे की तुम्हाला काहीही समजलेलं नाही. विषय संपला! केवळ काहीतरी असंबद्ध खरडायचे आणि आपल्या तोकड्या ज्ञानाचे जगजाहीर प्रदर्शन करायचे याशिवाय या लेखाचे काहीही प्रयोजन नाही असे मी म्हणेन. असा प्रतिसाद देण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. --- केवळ मीच सत्य लिहितो.

In reply to by राघव

आनंदी गोपाळ 18/08/2013 - 09:42
पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.
म्हंजे तुम्ही लिवलंय त्या विषयात तुमाला बी काय कळत नाय असं म्हंताय का?

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ, या लेखावर माझ्या बाजूने प्रतिसाद देणारे तुम्ही पहिलेच! यावरून एकट्या तुम्हालाच प्रगल्भता नाही तरी किमान अक्कल आहे हे दिसून येतं. मला एक समजत नाही. मी या लेखात केवळ एक तंत्र सांगितलेलं आहे. असं असूनही माझ्यावर सगळ्यांनी असे हल्ले करण्याचं कारण काय? या लेखात काही भडकाऊ नाही, कुणाविरुद्ध बदनामीकारक शब्द नाही. मिसळपावच्या आधिकारिक धोरणात तर बसतोच आहे, नाहीतर संपादकांनी उडवला असता. मग सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं? म्हणजे सगळेच सदस्य अज्ञानी तर आहेतच, पण त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?

In reply to by राजेश घासकडवी

सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं?...... .....त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?
अरेरे! थोडक्यात लेखाच्या मुळ स्वभावाला सोडून दूर गेलात. प्रश्न नाही. विधानं करा. 'सर्व सदस्य विनाकारण माझ्यावर तुटून पडत आहेत.' आणि 'त्याच्यापाशी किमान सुसंस्कृतपणाही नाही.' मी तुमच्या प्रतिसादावर लिहीलं आहे. हा तुमच्यावर वैयक्तिक हल्ला वगैरे नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

आनंदी गोपाळ 18/08/2013 - 23:32
हे एक. त्यावर तशाच मनोवृत्तीत जाऊन प्रतिसाद देणे हे म्हणजे खालील बिरबलाच्या गोष्टिसारखे आहे. तुमचे अभिनंदन! * एकदा एक बहुरूपी बादशहासमोर म्हणे बैलाचे सोंग करीत असतो. बघ्यांत उभा असलेला एक लहान मुलगा त्या बैलाला खडा मारतो. अन मग नंतर खुश होऊन स्वतःची मळलेली टोपी बैलाला उर्फ बहुरूप्याला बक्षीस देतो. हे पहाणारा बादशाह त्या मुलाला बोलावून घेतो अन विचारतो, की हे नक्की काय केलेस? मुलगा सांगतो, खाविंद, जनावराला खडा मारला, तर ते तिथली चामडि हलविते. ते या बहुरूप्याने केले. त्याचे सोंग वठले, म्हणून मी टोपी बक्षीस दिली! तर 'म्हणे', तो बादशहा होता अकबर, व हा मुलगा बिरबल. घासकडवींनी नुसता खडूस लेख लिहिलेला नाही, तर त्यावर त्यांच्या प्रकृतीच्या विसंगत असे भांडकुदळ व आक्रस्ताळे प्रतिसाद देखिल देत आहेत. हे मला एकट्याला नव्हे, अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना जाणवले आहेच. मी मारलेल्या खड्याला योग्य प्रतिसाद आला, याचाच अर्थ, बहुरूप्याचे सोंग चांगले वठते आहे.. * गुर्जी, जौ द्या ना. की फर्क पैन्दा?

राही 12/08/2013 - 13:21
छे बुवा. सगळीकडे या भुंग्यांच्या रुणझुणाटाने उच्छाद मांडलाय नुसता.

निम 12/08/2013 - 18:32
लेख वाचला , प्रतिसादही वाचले…. हा लेख उद्देशात्मक आहे कि उपहासात्मक आहे हे काही कळले नाही बा !! पण फार करमणूक झाली … अगदी ROFL !

नानबा 12/08/2013 - 22:03
पुढला भाग आला की कळेलसं वाटतंय. आत्ता तरी लेख कर्टली अँब्रोजचा उसळलेला चेंडू सचिन न वाकतासुद्धा त्याच्या डोक्यावरून जावा तितका बाऊन्सर गेलेला आहे.

हा मी तुमच्यावर "लादेन" तोच सर्वोत्तम ध्यानप्रकार, जरादेखील शंका घेतलीत तर.... याप्रकारचा वाटतो, म्हणून त्याचे नाव "लादेन ध्यानप्रकार" असे पडले असावे.
लेखनविषय:
अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार ·

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.

पैसा 14/07/2013 - 19:27
पैजारबुवा, समजून घेण्यासाठी प्रिंट औट काढत आहे!

जेपी 14/07/2013 - 21:59
उपदेश कळाला ..... बाकी डोक्यावरुन गेल.. अजुनहि एकटा

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सुबोध खरे 15/07/2013 - 09:29
नवर्याला बैल का म्हणतात ? कारण सर्व बायका स्वतःला गरीब गाय समजत असतात असे ऐकले आहे

In reply to by संजय क्षीरसागर

लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील. ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल. जे वंचीत आहेत ते: या लेखनातल्या तृटी शोधत बसतील किंवा असहमत होतील अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही पण मजा अशीये, लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे. _____________ जे खातो तेच ...... (संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.) (कच्च्या मडक्या सारखा)

स्पंदना 15/07/2013 - 09:14
सांगतो पैजार। होउनी बेजार। आता तरी बये दया दाखवावी! कशास सोफा। विचार तो कोता। गटारच बरी समजावी। हलके घ्या हो बुवा. लेखन आवडले हे वे. सां. न लगे

सस्नेह 15/07/2013 - 10:40
जगात 'गरीब गायी' नसत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? पैजारबुवांनी आश्रम कधी स्थापन केला म्हणायचा ?

In reply to by सस्नेह

स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ? आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

कार्यकर्ते येती घरा...

राजेश घासकडवी ·

अर्धवट 09/05/2013 - 09:21
थोर आहात, साक्षात संतांचे पाय लागले आपल्या घरी, पुढेमागे लोकं बिकांवर डॉक्यूमेंटरी बनवायला घेतील तेव्हा संदर्भासाठी तुमचा पत्ता देउन ठेवा. ;)

रितुश्री 09/05/2013 - 09:22
धाग्याचे नाव वाचुनचं धागा आवडला. :) फोटो पाहिले फक्त (शेवटचा फोटो दिसत नाही :().. छान आहेत. लेख सवडीने वाचेन.

कार्यकर्ते परदेशात, अब नही लग रहा है दिल उनका अम्रिका मे, ने मजशी परत....., अशा बातम्या जालावर येत होत्या तेव्हा आम्हाला कळलं की कोणी मिपाकर अमेरिकेत कामानिमित्त गेले आहेत. मात्र पाहुनचाराच्या बातम्या कै अपडेट होत नव्हत्या. वृत्तांत कळला तो असा, धन्स. >>> मालक, संपादक, आणि सल्लागार यांच्यातील सत्तावाटपबद्दलही काही प्रश्न उपस्थित झाले. पण त्यांना ज्या शिताफीने बगल मिळाली त्यावरून बिका हे थोर महात्मा गांधींप्रमाणे एक बॅरिस्टर महात्मा (श्रेयअव्हेर नरहर कुरुंदकर) आहेत याची प्रचिती आली. लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला.
आता त्यांनी जर सगळं खर्रखुर्रं सांगून टाकलं असेल, तरी मी थोडीच ते कबूल करणार आहे? मी असंच लिहिणार की. ;)

सहज 09/05/2013 - 09:40
साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा!!! स्ट्रॉबेरी डायक्वेरी घेउनही महानुभावांचा चेहरा ग्लासभर टोमॅटो सॉस संपवावा लागतोय असा का ते कळायला प्रवचन ऐकावे लागेल. बहुदा वेध लागले/ चित्त पलीकडे लागले असावे.

कुंदन 09/05/2013 - 09:45
एकदा ते पेशल टॅक्सी करुन शारजाहुन आमच्या घरी आले होते , त्याची आठवण झाली.

ऋषिकेश 09/05/2013 - 10:26
:) छान. त्या तीर्थाचं काय करणार आहात? सीलबंद वगैरे? ;)

बिपिन कार्यकर्त्यांसमवेत कांही घटका घालविल्या आहेत. मजा आली होती. मुलाला खेळवताना कार्यकर्ते साहेबांनी जे त्याला वर उचलले आहे तसे मी करायला गेलो तर माझा शर्टही वर होऊन माझेही पोट दिसेल अशा विचारांनी असला अघोरी खेळ आपण खेळायचा नाही असा पक्का निश्चय केला. मुलाच्या चेहर्‍यावर, 'पाय आभाळाला टेकल्याचे', समाधान ओसंडून वाहते आहे.

सन्जोप राव 09/05/2013 - 11:12
कार्यकर्त्यांच्या भेटीचा वृत्तांत आवडला. आपल्याला हवी ती माणसे अमेरिकेत यायच्या सुमारास आपले बस्तान इष्ट कोष्टासारख्या वसंताल्हादी ठिकाणी ठेवायचे आणि आपल्याला नको ती माणसे (खरे तर त्यांची लायकी नसताना चुकुनमाकून) अमेरिकेत आली की दूर दुर्गम ठिकाणी पसार व्हायचे हे होष्टांचे कसबही स्पृहणीय आहे. असो. आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे. बाकी कार्यकर्यांच्या भेटीने तुम्हाला घरी एखादा सत्यनारायण किंवा लघुरुद्र केल्यासारखे वाटले असणार याबाबत शंका नाही. हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो. त्याचा शिंपी तरी असल्या अवघड मट्रेलचे कपडे कसे शिवतो कोण जाणे! पण रावसाहेबांप्रमाणे -म्हणजे कृष्णराव हरीहर- आम्ही नव्हे!- यांचाही हस्तस्पर्शच असा की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. मग स्ट्रॉबेरी डायक्वेरी तर साक्षात अमृताहुनी गोड वाटली असणार यात नवल ते काय? बाकी 'भाकरी-मिसळ' हा मेनू आवडला. हा मेनू आणि या संकेतस्थळावर टाकलेला हा लेख यात काही बेरजेचे राजकारण नाही ना अशी शंका काही लोकांना येईल, पण त्याकडे दुर्लक्ष करावे. कार्यकर्त्यांना तुमच्याकडचे माफक का होईना पण अपेयपान चालते आणि मिसळीतली मिरचीही चालते आणि आमच्या मेल्या इंडियातल्या मैफिलीत बाकी ते लिंबूपाणी आणि बिनमसाल्याची डाळखिचडी यापुढे जात नाहीत हे आम्ही विसरणार नाही हा आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवावा.

In reply to by सन्जोप राव

आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे.
अहो, आम्हा इष्ट कोष्टियांना वादळांची सवय असते. त्यामुळे हरिकेन कट्रिनासारखंच हरिकेन सन्जोप आलं तर स्वागत करायला आमची फीमा तयार आहे.
हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो.
हो, त्यांचे कपडे दिसायला साधे असले तरी एखाद्या स्थितप्रज्ञ योगी-महंताप्रमाणे त्यांच्या आंतरिक तेजापासून जनसामान्यांचं रक्षण करण्याची क्षमता बाळगून असतात. तळपत्या सूर्याकडे पहायचं तर लोकांना दर वेळी डोळ्यावर गॉगल चढवून का ठेवावा लागावा, या परोपकारी वृत्तीतून ते शरीरावर संरक्षक कवच घालून हिंडतात.

छोटा डॉन 09/05/2013 - 11:14
जोरदार वृत्तांत गुरुजी. बाकी इतर बरेच डिटेल्स मिसिंग वाटत आहेत ;) बादवे, एवढ्या लांब असुन कार्यकर्ते तुम्हाला भेटले ह्याचा हेवा वाटला, इथे आम्ही पुण्यात राहुन आम्हाला भेटायचे नाव नाही. ;) - छोटा डॉन

अभ्या.. 09/05/2013 - 14:28
श्री. कार्यकर्ते साह्यबांचा चेहरा कुठेतरी सारखा पाह्यल्यासारखा वाटतोय. ;) अगदी लैच ओळखीचा वाटतोय.

श्रावण मोडक 09/05/2013 - 17:06
शीर्षक आणि लेखकाचे नाव पाहिल्यानंतर हे लेखन 'साधू-संत येती घरा' टाईपचे असणार नाही, तर 'दारे खिडक्या बंद करा' असे धमाल असेल, असे वाटले होते. निराशा झाली. पारच सात्वीक... फटू पाहून मात्र एक लक्षात आलं की एखाद्याला उचलून उलटं करायचं आणि त्याचे पाय छताला लावायचे ही खोड सार्वत्रिक दिसतीये. फक्त जालापुरती नाही.

धमाल मुलगा 09/05/2013 - 17:49
अगदी येण्याच्या ऐनवक्ताला थोर बालिश्टर महात्मा बिनिपचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांनी फोन करुन 'आम्ही राजनैतिक घडामोडी आणि निर्णयप्रक्रियेवर चर्चा करणार आहोत, तू येण्याची आवश्यकता नाही' असं सांगून माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला. (त्यामुळं घासुगुर्जींनी दिलेला एयरहोष्टेसला डोळा घालण्याचा चानस हुकला! :( ) >>तर शेजारूनच काहीतरी 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती....' असा कर्कश प्रश्न विचारणारा रिंगटोन वाजला. आयला! एव्हढ्यातच रिंगटोन बदलेलं दिसतंय. आत्ताआत्तापर्यंत 'गोविंदा गोविंदा गोविंदा...गोऽविंऽदा' अशी होती ना? बाकी, कट्टा जोरदार झाला असणार ह्यात काही शंका नाहीच. पण....इतकं अष्टसात्विक भावानं लिहिलंय, तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...नवेकोरे कपडे, डोक्याला करकरीत भट्टीची पांढरीफेक गांधीटोपी, खांद्यावर उपरणं अन जिलेबीवर पाक थबथबलेला असतो तसे चेहर्‍यावर थबथबलेला भक्तीभाव! :D अवांतर - ह्या बिपिनदाला पोरं छताला टेकवायची काय हौस असते काय कळत नाय बॉ! :)

In reply to by धमाल मुलगा

माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला.
मग एक मुक्तीसेना वगैरे स्थापन करा. साठेक वर्षांनी तुमच्यावर 'आमी धॉमॉल मुलगा बोलेछी' नावाचा सिनेमा निघेल!
तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...
लक्ष्मणाला जसे फक्त सीतेचे पाय दिसायचे तसे माझ्या कॅमेराला केवळ बिपिनदा दिसले. माझ्याकडे बघण्याची त्याची इच्छाच झाली नाही. अर्थात एखाददोन एकत्र फोटो काढलेले आहेत, पुढेमागे पोलिटिकल कॅपिटल म्हणून वापरायला.

ढब्बू पैसा 09/05/2013 - 17:49
थोडा कंटाळवाणा वाटला. धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय. बाकी बाळसं उतरणे आणि भाकरीविषयी सहमती ;) (स्वगतः ढब्बे, हा लेख पल्याडला का नसावा बरे ?)

In reply to by ढब्बू पैसा

धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय.
धन्यवाद. बिकांच्या भेटीच्या आठवणी ताज्या असताना काल रात्री भराभर लिहून काढला म्हणून काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. नमनालाच घडाभर तेल टाकलं, त्यामुळे कमी भजी तळली गेली असावीच. आठवतील तसे नवीन घाणे काढतो. असे लेख फार उशीरा आले तर 'बैल गेला अन् झोपा केला' सारखे होतात. (बिका गेले अन्... असं लिहायचा मोह आवरला)

In reply to by राजेश घासकडवी

इरसाल 11/05/2013 - 09:49
असे लेख फार उशीरा आले तर 'बैल गेला अन् झोपा केला' सारखे होतात. (बिका गेले अन्... असं लिहायचा मोह आवरला)
म्हणजे तंबुही गेला, उंटही गेला आणी शेखही गेला..

>>निघायच्या वेळी 'आपण बिपिनकाकाला ठेवून घेऊया' असा हट्टही केला. बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब हा मोठा माणूस खरा! आई-वडलांना नावाने हाक मारणारा पोरगा ज्यांना काका म्हणतो तो म्हणजे कोणी महान विभूतीच असला पाहिजे. पण अगदी साधा माणूस हो; 'तत्त्वतः सारखेच' असं साधं लोकशाही तत्त्व खरडीतूनही शिकवतो. गुर्जींच्या घरी एवढं बिझी शेड्यूल असतानाही 'सही बदल' असा सोपा सल्ला सुचवून माझी अडचण दूर केली. (पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू या प्रशंसेचा.)

नंदन 09/05/2013 - 22:19
अमेरिकेत इष्ट कोष्ट आणि वेश्ट कोष्ट यांच्यात सतत चालू असणार्‍या चढाओढीत बिकांच्या दौर्‍यामुळे पारडे इष्ट ठिकाणी झुकले आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 10/05/2013 - 05:36
लवकरच घ्यायला हवी. आपल्या किनार्‍यावर कार्यकर्त्यांनी पायधूळ आतापर्यंत झाडली नसली, तरी एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी :) *'षोक अनावर झाला' ही प्रसिद्ध उ. सं. डु. आठवली ;)

In reply to by नंदन

एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी.
जरूर! रंगीत तालीम तो करेंगेही. लेकिन उनको आने तो दो. षोकसभा तो क्या मोरक्कन हॉस्पिटॅलिटी भी मौजूद करेंगे!!! ;) बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते! असतं एकेकाचं नशीब!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते! असतं एकेकाचं नशीब!!!!
बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.
दोन थोर्थोर लोक एकदम होलसेलमधे 'उदारमतवादी' बनलेले पाहून फार्फार आनंद झाला.

In reply to by राजेश घासकडवी

बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.
होय का? अख्खा आफ्रिका का? हे माहिती नव्हतं!!! मानलं बुवा!!!! बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!! :) कुणीतरी म्हंटलंच आहे, "व्हेन यू हॅव फ्रेंन्डस लाईक दीज.....!!!!" बिका, वरील ओळ पूर्ण कर पाहू!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

होय का? अख्खा आफ्रिका का?
अहो त्यांनी सांगितलं तेच मी रीपीट करतोय. गाडीत बसल्याबसल्या बिकांनी पहिली गोष्ट काय सांगितली असेल तर त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागल्या त्या. जी काय कागदपत्रं गोळा करावी लागली ती सगळी असली तरी नक्की तिथे जाऊन काय करायचं आहे याची उत्तरं ते आदल्या रात्रभर घोकत होते. पण मुख्य पंचाइत आली ती म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत मिपावर मिरवलेल्या 'शेखी'मुळे. ते काय ते खोबार, अरबस्तान, नायजेरिया, घाना, वगैरे वगैरे ठिकाणी जाऊन राहून आलेले आहेत. मिपावर टाकलेले अनुभव काय अमेरिकन सीआयएने वाचले नसतील असं वाटतं का तुम्हाला? इतक्या टेररिस्ट देशांमध्ये जाऊन आले आहेत त्यामुळे ते नुसते साधेसुधे टेररिस्ट नाहीत, तर अनेक देशांमधल्या टेररिस्ट सेल्स कोऑर्डिनेट करणारे कोणीतरी हाय लेव्हलचे आहेत असं वाटलं. त्यात त्यांचाही काही दोष नाही, त्यांच्याकडे पाहिलं कीच हा माणूस कोणीतरी वरच्या लेव्हलचा, सरकारं चालवणारा/पाडणारा, आणि अध्यात-मध्यात नाही असं लोकांना सहज पटवून देणारा असणार असा संशय येतोच. मग आयताच हा माणूस अमेरिकन कॉन्सुलेटच्या भूमीवर म्हणजे साक्षात अमेरिकेत आला आहे हे पाहून त्यांना तिथेच ठेवून घेऊन डिप्लोमॅटिक डफल बॅगमधून अमेरिकेत आणि तिथून नंतर ग्वाटानामो बे ला पाठवण्याचा प्लॅन होता, पण कसेबसे सुटले. (त्यांना सांगितलं नाही, पण मीच आमच्या मध्यरात्री डिपार्टमेंट ऑफ स्टेट आणि होमलॅंड सिक्युरिटीमधली माझी कनेक्शनं वापरून त्यांना सोडायला लावलं होतं... बिकांसाठी काय वाटेल ते. पण म्हटलं त्यांना सांगून ओशाळं का करा?)
बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!!
घ्या, म्हणजे मित्रासाठी एवढं काहीतरी करायचं आणि इतरांकडून अशी दळभद्री बोलणी ऐकून घ्यायची! याचसाठी का माझा जन्म झाला? धरतीमाते, मला पोटात का घेतलं नाहीस गं, बिका यायच्या आधीच...

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 14/05/2013 - 10:39
धरतीमाते, मला पोटात का घेतलं नाहीस गं, >> अजीर्ण होईल अशी खात्रीयुक्त भीती वाटली असेल तिला!

jaypal 09/05/2013 - 22:25
सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते गरजु व्यक्तींच्या मदती साठी तुमच्या घरी आले आणि मग तुम्ही त्यांची कशी काशी केली...... असो व्रुतांत आणि पिलुचा फोटो आवडला.

In reply to by प्यारे१

पैसा 10/05/2013 - 00:25
स्वत:च स्वत:ला तार्किक, डोळस, लढाऊ आणि हुच्च समजणारे लोक वाद अंगाशी आला की फेसबुकीय लढाईतून पळ काढतात शिवाय समोरच्याला ब्लॉक करतात, हे पाहून विस्मयचकित झालो आहे.
काय रे ही सही! तू म्हणजे सह्याजीराव आहेस अगदी! त्या प्रसंगाला मी मूक साक्षीदार होते बरं! =))

In reply to by पैसा

प्यारे१ 10/05/2013 - 00:37
जाऊ दे हो. चालायचं. मातीच्या ** गळून पडतात शेवटी. आम्ही मूर्ख आहोत (हे त्यांचंच मत) पण ज्यांच्याकडं आशेनं पहावं असे लोक देखील असं करु लागले म्हणून विस्मयचकित झालो. खरंच.

वाचक 10/05/2013 - 09:04
नव्या जर्सी पर्यंत येउनही बिका शेठनी त्यांची कृपा(काक)दृष्टी बॉस्ट्न कडे न वळवल्याबद्दल जाहिर निषेध. तो धम्या रडतोच आहे 'बस ने कसा येउ' वगैरे करत, आता कार्यकर्तेच अस करायला लागल्यावर आम्ही भक्तांनी कुणाच्या तोंडाकडे पहायच ऑं ? (अवांतरः पल्याडच्या गुर्जींना बिकाच्या आगमनाचा पत्ता आणि अल्याडच्या 'जुने अणे जाणिते' लोकांना का नसावा बुवा? ) :)

कालच संध्याकाळी कार्यकर्तेंनी मला फोन केला तरी लै आनंद झाला. तुमच्या तर ते चक्क घरी आले की भौ :) रच्याकने -- घासकडवी गुर्जी न्यू जर्सीत मूव्हलात का? तसे असेल तर नक्की कधी सांगणार होता? :)

In reply to by संदीप चित्रे

रच्याकने -- घासकडवी गुर्जी न्यू जर्सीत मूव्हलात का?
नाही हो, म्हणून तर त्यांना वाट वाकडी करावी लागली.

In reply to by संदीप चित्रे

नंदन 11/05/2013 - 03:00
एम्पायर स्टेटच्या ८६व्या मजल्यावरून
'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील ;)

In reply to by नंदन

'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील
हा हा हा... नुसतं तेवढंच नाही, 'क्लाउड नाइन' मधून फोन आला की जमिनीवरचा माणूसदेखील 'क्लाउड नाइन' मध्ये जातो.

अर्धवट 09/05/2013 - 09:21
थोर आहात, साक्षात संतांचे पाय लागले आपल्या घरी, पुढेमागे लोकं बिकांवर डॉक्यूमेंटरी बनवायला घेतील तेव्हा संदर्भासाठी तुमचा पत्ता देउन ठेवा. ;)

रितुश्री 09/05/2013 - 09:22
धाग्याचे नाव वाचुनचं धागा आवडला. :) फोटो पाहिले फक्त (शेवटचा फोटो दिसत नाही :().. छान आहेत. लेख सवडीने वाचेन.

कार्यकर्ते परदेशात, अब नही लग रहा है दिल उनका अम्रिका मे, ने मजशी परत....., अशा बातम्या जालावर येत होत्या तेव्हा आम्हाला कळलं की कोणी मिपाकर अमेरिकेत कामानिमित्त गेले आहेत. मात्र पाहुनचाराच्या बातम्या कै अपडेट होत नव्हत्या. वृत्तांत कळला तो असा, धन्स. >>> मालक, संपादक, आणि सल्लागार यांच्यातील सत्तावाटपबद्दलही काही प्रश्न उपस्थित झाले. पण त्यांना ज्या शिताफीने बगल मिळाली त्यावरून बिका हे थोर महात्मा गांधींप्रमाणे एक बॅरिस्टर महात्मा (श्रेयअव्हेर नरहर कुरुंदकर) आहेत याची प्रचिती आली. लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला.
आता त्यांनी जर सगळं खर्रखुर्रं सांगून टाकलं असेल, तरी मी थोडीच ते कबूल करणार आहे? मी असंच लिहिणार की. ;)

सहज 09/05/2013 - 09:40
साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा!!! स्ट्रॉबेरी डायक्वेरी घेउनही महानुभावांचा चेहरा ग्लासभर टोमॅटो सॉस संपवावा लागतोय असा का ते कळायला प्रवचन ऐकावे लागेल. बहुदा वेध लागले/ चित्त पलीकडे लागले असावे.

कुंदन 09/05/2013 - 09:45
एकदा ते पेशल टॅक्सी करुन शारजाहुन आमच्या घरी आले होते , त्याची आठवण झाली.

ऋषिकेश 09/05/2013 - 10:26
:) छान. त्या तीर्थाचं काय करणार आहात? सीलबंद वगैरे? ;)

बिपिन कार्यकर्त्यांसमवेत कांही घटका घालविल्या आहेत. मजा आली होती. मुलाला खेळवताना कार्यकर्ते साहेबांनी जे त्याला वर उचलले आहे तसे मी करायला गेलो तर माझा शर्टही वर होऊन माझेही पोट दिसेल अशा विचारांनी असला अघोरी खेळ आपण खेळायचा नाही असा पक्का निश्चय केला. मुलाच्या चेहर्‍यावर, 'पाय आभाळाला टेकल्याचे', समाधान ओसंडून वाहते आहे.

सन्जोप राव 09/05/2013 - 11:12
कार्यकर्त्यांच्या भेटीचा वृत्तांत आवडला. आपल्याला हवी ती माणसे अमेरिकेत यायच्या सुमारास आपले बस्तान इष्ट कोष्टासारख्या वसंताल्हादी ठिकाणी ठेवायचे आणि आपल्याला नको ती माणसे (खरे तर त्यांची लायकी नसताना चुकुनमाकून) अमेरिकेत आली की दूर दुर्गम ठिकाणी पसार व्हायचे हे होष्टांचे कसबही स्पृहणीय आहे. असो. आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे. बाकी कार्यकर्यांच्या भेटीने तुम्हाला घरी एखादा सत्यनारायण किंवा लघुरुद्र केल्यासारखे वाटले असणार याबाबत शंका नाही. हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो. त्याचा शिंपी तरी असल्या अवघड मट्रेलचे कपडे कसे शिवतो कोण जाणे! पण रावसाहेबांप्रमाणे -म्हणजे कृष्णराव हरीहर- आम्ही नव्हे!- यांचाही हस्तस्पर्शच असा की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. मग स्ट्रॉबेरी डायक्वेरी तर साक्षात अमृताहुनी गोड वाटली असणार यात नवल ते काय? बाकी 'भाकरी-मिसळ' हा मेनू आवडला. हा मेनू आणि या संकेतस्थळावर टाकलेला हा लेख यात काही बेरजेचे राजकारण नाही ना अशी शंका काही लोकांना येईल, पण त्याकडे दुर्लक्ष करावे. कार्यकर्त्यांना तुमच्याकडचे माफक का होईना पण अपेयपान चालते आणि मिसळीतली मिरचीही चालते आणि आमच्या मेल्या इंडियातल्या मैफिलीत बाकी ते लिंबूपाणी आणि बिनमसाल्याची डाळखिचडी यापुढे जात नाहीत हे आम्ही विसरणार नाही हा आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवावा.

In reply to by सन्जोप राव

आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे.
अहो, आम्हा इष्ट कोष्टियांना वादळांची सवय असते. त्यामुळे हरिकेन कट्रिनासारखंच हरिकेन सन्जोप आलं तर स्वागत करायला आमची फीमा तयार आहे.
हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो.
हो, त्यांचे कपडे दिसायला साधे असले तरी एखाद्या स्थितप्रज्ञ योगी-महंताप्रमाणे त्यांच्या आंतरिक तेजापासून जनसामान्यांचं रक्षण करण्याची क्षमता बाळगून असतात. तळपत्या सूर्याकडे पहायचं तर लोकांना दर वेळी डोळ्यावर गॉगल चढवून का ठेवावा लागावा, या परोपकारी वृत्तीतून ते शरीरावर संरक्षक कवच घालून हिंडतात.

छोटा डॉन 09/05/2013 - 11:14
जोरदार वृत्तांत गुरुजी. बाकी इतर बरेच डिटेल्स मिसिंग वाटत आहेत ;) बादवे, एवढ्या लांब असुन कार्यकर्ते तुम्हाला भेटले ह्याचा हेवा वाटला, इथे आम्ही पुण्यात राहुन आम्हाला भेटायचे नाव नाही. ;) - छोटा डॉन

अभ्या.. 09/05/2013 - 14:28
श्री. कार्यकर्ते साह्यबांचा चेहरा कुठेतरी सारखा पाह्यल्यासारखा वाटतोय. ;) अगदी लैच ओळखीचा वाटतोय.

श्रावण मोडक 09/05/2013 - 17:06
शीर्षक आणि लेखकाचे नाव पाहिल्यानंतर हे लेखन 'साधू-संत येती घरा' टाईपचे असणार नाही, तर 'दारे खिडक्या बंद करा' असे धमाल असेल, असे वाटले होते. निराशा झाली. पारच सात्वीक... फटू पाहून मात्र एक लक्षात आलं की एखाद्याला उचलून उलटं करायचं आणि त्याचे पाय छताला लावायचे ही खोड सार्वत्रिक दिसतीये. फक्त जालापुरती नाही.

धमाल मुलगा 09/05/2013 - 17:49
अगदी येण्याच्या ऐनवक्ताला थोर बालिश्टर महात्मा बिनिपचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांनी फोन करुन 'आम्ही राजनैतिक घडामोडी आणि निर्णयप्रक्रियेवर चर्चा करणार आहोत, तू येण्याची आवश्यकता नाही' असं सांगून माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला. (त्यामुळं घासुगुर्जींनी दिलेला एयरहोष्टेसला डोळा घालण्याचा चानस हुकला! :( ) >>तर शेजारूनच काहीतरी 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती....' असा कर्कश प्रश्न विचारणारा रिंगटोन वाजला. आयला! एव्हढ्यातच रिंगटोन बदलेलं दिसतंय. आत्ताआत्तापर्यंत 'गोविंदा गोविंदा गोविंदा...गोऽविंऽदा' अशी होती ना? बाकी, कट्टा जोरदार झाला असणार ह्यात काही शंका नाहीच. पण....इतकं अष्टसात्विक भावानं लिहिलंय, तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...नवेकोरे कपडे, डोक्याला करकरीत भट्टीची पांढरीफेक गांधीटोपी, खांद्यावर उपरणं अन जिलेबीवर पाक थबथबलेला असतो तसे चेहर्‍यावर थबथबलेला भक्तीभाव! :D अवांतर - ह्या बिपिनदाला पोरं छताला टेकवायची काय हौस असते काय कळत नाय बॉ! :)

In reply to by धमाल मुलगा

माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला.
मग एक मुक्तीसेना वगैरे स्थापन करा. साठेक वर्षांनी तुमच्यावर 'आमी धॉमॉल मुलगा बोलेछी' नावाचा सिनेमा निघेल!
तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...
लक्ष्मणाला जसे फक्त सीतेचे पाय दिसायचे तसे माझ्या कॅमेराला केवळ बिपिनदा दिसले. माझ्याकडे बघण्याची त्याची इच्छाच झाली नाही. अर्थात एखाददोन एकत्र फोटो काढलेले आहेत, पुढेमागे पोलिटिकल कॅपिटल म्हणून वापरायला.

ढब्बू पैसा 09/05/2013 - 17:49
थोडा कंटाळवाणा वाटला. धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय. बाकी बाळसं उतरणे आणि भाकरीविषयी सहमती ;) (स्वगतः ढब्बे, हा लेख पल्याडला का नसावा बरे ?)

In reply to by ढब्बू पैसा

धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय.
धन्यवाद. बिकांच्या भेटीच्या आठवणी ताज्या असताना काल रात्री भराभर लिहून काढला म्हणून काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. नमनालाच घडाभर तेल टाकलं, त्यामुळे कमी भजी तळली गेली असावीच. आठवतील तसे नवीन घाणे काढतो. असे लेख फार उशीरा आले तर 'बैल गेला अन् झोपा केला' सारखे होतात. (बिका गेले अन्... असं लिहायचा मोह आवरला)

In reply to by राजेश घासकडवी

इरसाल 11/05/2013 - 09:49
असे लेख फार उशीरा आले तर 'बैल गेला अन् झोपा केला' सारखे होतात. (बिका गेले अन्... असं लिहायचा मोह आवरला)
म्हणजे तंबुही गेला, उंटही गेला आणी शेखही गेला..

>>निघायच्या वेळी 'आपण बिपिनकाकाला ठेवून घेऊया' असा हट्टही केला. बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब हा मोठा माणूस खरा! आई-वडलांना नावाने हाक मारणारा पोरगा ज्यांना काका म्हणतो तो म्हणजे कोणी महान विभूतीच असला पाहिजे. पण अगदी साधा माणूस हो; 'तत्त्वतः सारखेच' असं साधं लोकशाही तत्त्व खरडीतूनही शिकवतो. गुर्जींच्या घरी एवढं बिझी शेड्यूल असतानाही 'सही बदल' असा सोपा सल्ला सुचवून माझी अडचण दूर केली. (पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू या प्रशंसेचा.)

नंदन 09/05/2013 - 22:19
अमेरिकेत इष्ट कोष्ट आणि वेश्ट कोष्ट यांच्यात सतत चालू असणार्‍या चढाओढीत बिकांच्या दौर्‍यामुळे पारडे इष्ट ठिकाणी झुकले आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले :)

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 10/05/2013 - 05:36
लवकरच घ्यायला हवी. आपल्या किनार्‍यावर कार्यकर्त्यांनी पायधूळ आतापर्यंत झाडली नसली, तरी एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी :) *'षोक अनावर झाला' ही प्रसिद्ध उ. सं. डु. आठवली ;)

In reply to by नंदन

एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी.
जरूर! रंगीत तालीम तो करेंगेही. लेकिन उनको आने तो दो. षोकसभा तो क्या मोरक्कन हॉस्पिटॅलिटी भी मौजूद करेंगे!!! ;) बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते! असतं एकेकाचं नशीब!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते! असतं एकेकाचं नशीब!!!!
बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.
दोन थोर्थोर लोक एकदम होलसेलमधे 'उदारमतवादी' बनलेले पाहून फार्फार आनंद झाला.

In reply to by राजेश घासकडवी

बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.
होय का? अख्खा आफ्रिका का? हे माहिती नव्हतं!!! मानलं बुवा!!!! बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!! :) कुणीतरी म्हंटलंच आहे, "व्हेन यू हॅव फ्रेंन्डस लाईक दीज.....!!!!" बिका, वरील ओळ पूर्ण कर पाहू!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

होय का? अख्खा आफ्रिका का?
अहो त्यांनी सांगितलं तेच मी रीपीट करतोय. गाडीत बसल्याबसल्या बिकांनी पहिली गोष्ट काय सांगितली असेल तर त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागल्या त्या. जी काय कागदपत्रं गोळा करावी लागली ती सगळी असली तरी नक्की तिथे जाऊन काय करायचं आहे याची उत्तरं ते आदल्या रात्रभर घोकत होते. पण मुख्य पंचाइत आली ती म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत मिपावर मिरवलेल्या 'शेखी'मुळे. ते काय ते खोबार, अरबस्तान, नायजेरिया, घाना, वगैरे वगैरे ठिकाणी जाऊन राहून आलेले आहेत. मिपावर टाकलेले अनुभव काय अमेरिकन सीआयएने वाचले नसतील असं वाटतं का तुम्हाला? इतक्या टेररिस्ट देशांमध्ये जाऊन आले आहेत त्यामुळे ते नुसते साधेसुधे टेररिस्ट नाहीत, तर अनेक देशांमधल्या टेररिस्ट सेल्स कोऑर्डिनेट करणारे कोणीतरी हाय लेव्हलचे आहेत असं वाटलं. त्यात त्यांचाही काही दोष नाही, त्यांच्याकडे पाहिलं कीच हा माणूस कोणीतरी वरच्या लेव्हलचा, सरकारं चालवणारा/पाडणारा, आणि अध्यात-मध्यात नाही असं लोकांना सहज पटवून देणारा असणार असा संशय येतोच. मग आयताच हा माणूस अमेरिकन कॉन्सुलेटच्या भूमीवर म्हणजे साक्षात अमेरिकेत आला आहे हे पाहून त्यांना तिथेच ठेवून घेऊन डिप्लोमॅटिक डफल बॅगमधून अमेरिकेत आणि तिथून नंतर ग्वाटानामो बे ला पाठवण्याचा प्लॅन होता, पण कसेबसे सुटले. (त्यांना सांगितलं नाही, पण मीच आमच्या मध्यरात्री डिपार्टमेंट ऑफ स्टेट आणि होमलॅंड सिक्युरिटीमधली माझी कनेक्शनं वापरून त्यांना सोडायला लावलं होतं... बिकांसाठी काय वाटेल ते. पण म्हटलं त्यांना सांगून ओशाळं का करा?)
बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!!
घ्या, म्हणजे मित्रासाठी एवढं काहीतरी करायचं आणि इतरांकडून अशी दळभद्री बोलणी ऐकून घ्यायची! याचसाठी का माझा जन्म झाला? धरतीमाते, मला पोटात का घेतलं नाहीस गं, बिका यायच्या आधीच...

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 14/05/2013 - 10:39
धरतीमाते, मला पोटात का घेतलं नाहीस गं, >> अजीर्ण होईल अशी खात्रीयुक्त भीती वाटली असेल तिला!

jaypal 09/05/2013 - 22:25
सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते गरजु व्यक्तींच्या मदती साठी तुमच्या घरी आले आणि मग तुम्ही त्यांची कशी काशी केली...... असो व्रुतांत आणि पिलुचा फोटो आवडला.

In reply to by प्यारे१

पैसा 10/05/2013 - 00:25
स्वत:च स्वत:ला तार्किक, डोळस, लढाऊ आणि हुच्च समजणारे लोक वाद अंगाशी आला की फेसबुकीय लढाईतून पळ काढतात शिवाय समोरच्याला ब्लॉक करतात, हे पाहून विस्मयचकित झालो आहे.
काय रे ही सही! तू म्हणजे सह्याजीराव आहेस अगदी! त्या प्रसंगाला मी मूक साक्षीदार होते बरं! =))

In reply to by पैसा

प्यारे१ 10/05/2013 - 00:37
जाऊ दे हो. चालायचं. मातीच्या ** गळून पडतात शेवटी. आम्ही मूर्ख आहोत (हे त्यांचंच मत) पण ज्यांच्याकडं आशेनं पहावं असे लोक देखील असं करु लागले म्हणून विस्मयचकित झालो. खरंच.

वाचक 10/05/2013 - 09:04
नव्या जर्सी पर्यंत येउनही बिका शेठनी त्यांची कृपा(काक)दृष्टी बॉस्ट्न कडे न वळवल्याबद्दल जाहिर निषेध. तो धम्या रडतोच आहे 'बस ने कसा येउ' वगैरे करत, आता कार्यकर्तेच अस करायला लागल्यावर आम्ही भक्तांनी कुणाच्या तोंडाकडे पहायच ऑं ? (अवांतरः पल्याडच्या गुर्जींना बिकाच्या आगमनाचा पत्ता आणि अल्याडच्या 'जुने अणे जाणिते' लोकांना का नसावा बुवा? ) :)

कालच संध्याकाळी कार्यकर्तेंनी मला फोन केला तरी लै आनंद झाला. तुमच्या तर ते चक्क घरी आले की भौ :) रच्याकने -- घासकडवी गुर्जी न्यू जर्सीत मूव्हलात का? तसे असेल तर नक्की कधी सांगणार होता? :)

In reply to by संदीप चित्रे

रच्याकने -- घासकडवी गुर्जी न्यू जर्सीत मूव्हलात का?
नाही हो, म्हणून तर त्यांना वाट वाकडी करावी लागली.

In reply to by संदीप चित्रे

नंदन 11/05/2013 - 03:00
एम्पायर स्टेटच्या ८६व्या मजल्यावरून
'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील ;)

In reply to by नंदन

'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील
हा हा हा... नुसतं तेवढंच नाही, 'क्लाउड नाइन' मधून फोन आला की जमिनीवरचा माणूसदेखील 'क्लाउड नाइन' मध्ये जातो.
लेखनप्रकार
लेखाला शीर्षक काय द्यावं हा प्रश्न अनेकदा आ वासून उभा रहातो. हा लेख लिहिताना देखील त्याने तेच केलं. मग त्याने उघडलेल्या मोठ्ठ्या तोंडात 'माझ्या तोंडात कचरा टाका' असं म्हणत चोच वासून बागांमध्ये उभे राहिलेल्या पेंग्विनांच्या पुतळारूपी कचरापेटीच्या आजूबाजूला जितक्या सहजतेने आपण कचरा टाकतो तशी काही नावं भिरकावून बघितली. 'बिपिन कार्यकर्तेंनी अमेरिका प्रवास केला हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न', 'आंगतुक पाव्हण्याचं मोठ्या मनाने आदरातिथ्य करून अमेरिकेत जपलेली भारतीय संस्कृती', 'कार्यकर्तेंचं राजपण, आजपण, उद्यापण' वगैरे अनेक नावं लिहिली.