मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

राजेश घासकडवी ·

पैसा 16/11/2011 - 10:41
ही फक्त पोच. समजून घ्यायचा प्रयत्न करतेय.

यकु 16/11/2011 - 11:51
नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'शब्द' अभिव्यक्तीचा समानार्थी होऊ शकत नाही. *In the beginning there was 'word' असं एक वाक्य बायबलमध्ये आहे, त्यावरुन 'वर्ड' चा काय तो अर्थ घ्या. नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'केवळ तुमच्या डोळ्यांना ते तसं दिसतंय, खरं ते तसं नाहीच' असं सांगण्यासाठी इथे वापरला आहे, तो वापर फसला आहे कारण 'शब्द' अभिव्यक्तीत 'नेत्रपटलांवरील चित्र' हा शब्दच काय, मर्त्य मानव** करु शकणारे समस्त शब्द येतात. (*म्हणजे सृष्टीनिर्मितीपूर्वी शब्द होता. अर्थात खरीच सृष्टीनिर्मिती कुणी केलीय, कुणी केलीयच का वगैरे प्रश्नांचे अंतिम उत्तर बायबलमध्ये आहे असं म्हणायचं नाही.) ** (राजेश घासवकड्वी हे मानव आहेत, त्या अर्थी ते मर्त्य आहेत ;-) )

In reply to by यकु

In the beginning there was 'word' असं एक वाक्य बायबलमध्ये आहे, त्यावरुन 'वर्ड' चा काय तो अर्थ घ्या.
बायबलमधला वर्ड हा खूपच व्यापक (आणि धूसर) अर्थाने आहे. The word for “word” here is “logos”, the Greek word for the indwelling logic, or rational order of things. But it also refers to and translated the figure of “Wisdom” from the Hebrew scriptures. ...And the Word was made flesh, and dwelt among us, (and we beheld his glory, the glory as of the only begotten of the Father,) full of grace and truth. तुमच्या मूळ लेखात तुम्ही 'शब्द' हा शब्द सर्वसाधारण अर्थानेच वापरलेला दिसतो.
नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'शब्द' अभिव्यक्तीचा समानार्थी होऊ शकत नाही.
असहमत. - नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत. - खऱ्या जगाचं ती शब्दांप्रमाणेच अपूर्ण प्रातिनिधित्व करतात. (आपल्याला एकाच कोनातून दिसतं, रंग सगळे दिसत नाहीत इत्यादी) - शब्दांना जशा मर्यादा असतात तशाच नेत्रपटलावरील चित्रांना मर्यादा असतात. म्हणून तर दृष्टीभ्रम होऊ शकतात. - ती चित्रं 'वापरून' आपण अंतर्पटलावर प्रतिमा निर्माण करतो. डोळे बंद केले म्हणून या प्रतिमा येणं थांबत नाही. - ती चित्रं ही चिह्नं असतात. सर्वसाधारणपणे सर्वच लोक त्या चिह्नांचा अर्थ पुरेसा सारखा लावतात.
नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'केवळ तुमच्या डोळ्यांना ते तसं दिसतंय, खरं ते तसं नाहीच' असं सांगण्यासाठी इथे वापरला आहे, तो वापर फसला आहे कारण 'शब्द' अभिव्यक्तीत 'नेत्रपटलांवरील चित्र' हा शब्दच काय, मर्त्य मानव** करु शकणारे समस्त शब्द येतात.
- हा केवळ 'शब्द' या शब्दाच्या जागी ठेवलेला कुठचातरी वाटेल तो शब्द नाही. यातून डोळ्यांना दिसतंय ते खरं नाही, असंही सांगण्याचा प्रयत्न नाही. वर लिहिल्याप्रमाणे ती चित्रं आणि शब्द हे एकच भूमिका बजावतात. काहीसं नौदळ आणि हवाई दळासारखं. माध्यम वेगळं पण ध्येय एकच. या लेखात मी धनंजयने म्हटल्याप्रमाणे कांद्याची आणखीन एक साल सोललेली आहे. शब्दही नको, चित्रही नको, स्पर्शही नको... इत्यादी. हे सगळं जाऊनही कुठेतरी आपण त्यापलिकडे वेगळे शिल्लक राहू असा तुमचा विश्वास असेल तर तुमची याला हरकत नसावी. प्रश्न असा आहे की तुमची किती सालं सोलायची तयारी आहे?

In reply to by राजेश घासकडवी

नगरीनिरंजन 16/11/2011 - 20:14
>>नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत. या वाक्याशी असहमत. मी मराठीतून बघतो, इतर कोणी इंग्रजीतून बघतो असा प्रकार नसतो. शब्द आणि पर्यायाने भाषा मनुष्यनिर्मित आहेत म्हणून अनेक आहेत. नेत्रपटलावर चित्र उमटण्याची क्रिया नैसर्गिक आहे, मनुष्यनिर्मित नाही. त्या प्रतिमेला नाव द्यायची प्रक्रिया मात्र मनुष्यनिर्मित आहे. (एकदा उमटलेली चित्रं साठवून पुन्हा आठवणे म्हणजे निर्मिती नव्हे.) बाकी आपल्या डोळ्यांनी संपूर्ण सत्यच दिसत नाही याच्याशी सहमत आहे आणि नेत्रपटलावर चित्र उमटले तरी त्या चित्रासाठीचा शब्द किंवा विचार मनात न उमटणे हे ध्येय असू शकते. शब्द,दृष्य, गंध, स्पर्श नको असे म्हणणे म्हणजे वेगवेगळ्या साली काढणे नसून मनात त्यांची प्रतिक्रिया म्हणून विचार न उमटणे आणि तरीही उरणारे आपले अस्तित्व अनुभवणे अशी एकच साल काढली जातेय असं मला वाटतंय. या सगळ्या संवेदना नको म्हणून ज्ञानेंद्रियं बंद केली पण विचार चालूच ठेवले तर आठवणीतल्या संवेदना उरतातच.

यकु 16/11/2011 - 20:18
तुमच्या मूळ लेखात तुम्ही 'शब्द' हा शब्द सर्वसाधारण अर्थानेच वापरलेला दिसतो
सर्वसाधारण आणि व्यापक कसेही म्हटले तरी शब्दाचा संबंध सगळीकडे तितक्याच परिणामकारकपणे येतो.
नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत. - खऱ्या जगाचं ती शब्दांप्रमाणेच अपूर्ण प्रातिनिधित्व करतात. (आपल्याला एकाच कोनातून दिसतं, रंग सगळे दिसत नाहीत इत्यादी) - शब्दांना जशा मर्यादा असतात तशाच नेत्रपटलावरील चित्रांना मर्यादा असतात. म्हणून तर दृष्टीभ्रम होऊ शकतात. - ती चित्रं 'वापरून' आपण अंतर्पटलावर प्रतिमा निर्माण करतो. डोळे बंद केले म्हणून या प्रतिमा येणं थांबत नाही. - ती चित्रं ही चिह्नं असतात. सर्वसाधारणपणे सर्वच लोक त्या चिह्नांचा अर्थ पुरेसा सारखा लावतात
असहमतीची ही कारणं पटली. पण ही कारणं वाचल्यानंतर तुम्ही केलेल्या शब्दबदलाचे काही प्रयोजन रहात नाही.
हे सगळं जाऊनही कुठेतरी आपण त्यापलिकडे वेगळे शिल्लक राहू असा तुमचा विश्वास असेल तर तुमची याला हरकत नसावी.
आपण शब्दावेगळे शिल्लक रहात नाही असं ऐकून आहे. शिल्लक रहात नाही याचा अर्थ आता ज्या मर्यादांसह आहोत तसे रहात नाही.
प्रश्न असा आहे की तुमची किती सालं सोलायची तयारी आहे?
माझी सालं सोलायची भरपूर तयारी आहे, पण ती मी माझ्या पुरती सोलतो म्हणे.

पैसा 16/11/2011 - 10:41
ही फक्त पोच. समजून घ्यायचा प्रयत्न करतेय.

यकु 16/11/2011 - 11:51
नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'शब्द' अभिव्यक्तीचा समानार्थी होऊ शकत नाही. *In the beginning there was 'word' असं एक वाक्य बायबलमध्ये आहे, त्यावरुन 'वर्ड' चा काय तो अर्थ घ्या. नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'केवळ तुमच्या डोळ्यांना ते तसं दिसतंय, खरं ते तसं नाहीच' असं सांगण्यासाठी इथे वापरला आहे, तो वापर फसला आहे कारण 'शब्द' अभिव्यक्तीत 'नेत्रपटलांवरील चित्र' हा शब्दच काय, मर्त्य मानव** करु शकणारे समस्त शब्द येतात. (*म्हणजे सृष्टीनिर्मितीपूर्वी शब्द होता. अर्थात खरीच सृष्टीनिर्मिती कुणी केलीय, कुणी केलीयच का वगैरे प्रश्नांचे अंतिम उत्तर बायबलमध्ये आहे असं म्हणायचं नाही.) ** (राजेश घासवकड्वी हे मानव आहेत, त्या अर्थी ते मर्त्य आहेत ;-) )

In reply to by यकु

In the beginning there was 'word' असं एक वाक्य बायबलमध्ये आहे, त्यावरुन 'वर्ड' चा काय तो अर्थ घ्या.
बायबलमधला वर्ड हा खूपच व्यापक (आणि धूसर) अर्थाने आहे. The word for “word” here is “logos”, the Greek word for the indwelling logic, or rational order of things. But it also refers to and translated the figure of “Wisdom” from the Hebrew scriptures. ...And the Word was made flesh, and dwelt among us, (and we beheld his glory, the glory as of the only begotten of the Father,) full of grace and truth. तुमच्या मूळ लेखात तुम्ही 'शब्द' हा शब्द सर्वसाधारण अर्थानेच वापरलेला दिसतो.
नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'शब्द' अभिव्यक्तीचा समानार्थी होऊ शकत नाही.
असहमत. - नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत. - खऱ्या जगाचं ती शब्दांप्रमाणेच अपूर्ण प्रातिनिधित्व करतात. (आपल्याला एकाच कोनातून दिसतं, रंग सगळे दिसत नाहीत इत्यादी) - शब्दांना जशा मर्यादा असतात तशाच नेत्रपटलावरील चित्रांना मर्यादा असतात. म्हणून तर दृष्टीभ्रम होऊ शकतात. - ती चित्रं 'वापरून' आपण अंतर्पटलावर प्रतिमा निर्माण करतो. डोळे बंद केले म्हणून या प्रतिमा येणं थांबत नाही. - ती चित्रं ही चिह्नं असतात. सर्वसाधारणपणे सर्वच लोक त्या चिह्नांचा अर्थ पुरेसा सारखा लावतात.
नेत्रपटलांवरील चित्र हा शब्द 'केवळ तुमच्या डोळ्यांना ते तसं दिसतंय, खरं ते तसं नाहीच' असं सांगण्यासाठी इथे वापरला आहे, तो वापर फसला आहे कारण 'शब्द' अभिव्यक्तीत 'नेत्रपटलांवरील चित्र' हा शब्दच काय, मर्त्य मानव** करु शकणारे समस्त शब्द येतात.
- हा केवळ 'शब्द' या शब्दाच्या जागी ठेवलेला कुठचातरी वाटेल तो शब्द नाही. यातून डोळ्यांना दिसतंय ते खरं नाही, असंही सांगण्याचा प्रयत्न नाही. वर लिहिल्याप्रमाणे ती चित्रं आणि शब्द हे एकच भूमिका बजावतात. काहीसं नौदळ आणि हवाई दळासारखं. माध्यम वेगळं पण ध्येय एकच. या लेखात मी धनंजयने म्हटल्याप्रमाणे कांद्याची आणखीन एक साल सोललेली आहे. शब्दही नको, चित्रही नको, स्पर्शही नको... इत्यादी. हे सगळं जाऊनही कुठेतरी आपण त्यापलिकडे वेगळे शिल्लक राहू असा तुमचा विश्वास असेल तर तुमची याला हरकत नसावी. प्रश्न असा आहे की तुमची किती सालं सोलायची तयारी आहे?

In reply to by राजेश घासकडवी

नगरीनिरंजन 16/11/2011 - 20:14
>>नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत. या वाक्याशी असहमत. मी मराठीतून बघतो, इतर कोणी इंग्रजीतून बघतो असा प्रकार नसतो. शब्द आणि पर्यायाने भाषा मनुष्यनिर्मित आहेत म्हणून अनेक आहेत. नेत्रपटलावर चित्र उमटण्याची क्रिया नैसर्गिक आहे, मनुष्यनिर्मित नाही. त्या प्रतिमेला नाव द्यायची प्रक्रिया मात्र मनुष्यनिर्मित आहे. (एकदा उमटलेली चित्रं साठवून पुन्हा आठवणे म्हणजे निर्मिती नव्हे.) बाकी आपल्या डोळ्यांनी संपूर्ण सत्यच दिसत नाही याच्याशी सहमत आहे आणि नेत्रपटलावर चित्र उमटले तरी त्या चित्रासाठीचा शब्द किंवा विचार मनात न उमटणे हे ध्येय असू शकते. शब्द,दृष्य, गंध, स्पर्श नको असे म्हणणे म्हणजे वेगवेगळ्या साली काढणे नसून मनात त्यांची प्रतिक्रिया म्हणून विचार न उमटणे आणि तरीही उरणारे आपले अस्तित्व अनुभवणे अशी एकच साल काढली जातेय असं मला वाटतंय. या सगळ्या संवेदना नको म्हणून ज्ञानेंद्रियं बंद केली पण विचार चालूच ठेवले तर आठवणीतल्या संवेदना उरतातच.

यकु 16/11/2011 - 20:18
तुमच्या मूळ लेखात तुम्ही 'शब्द' हा शब्द सर्वसाधारण अर्थानेच वापरलेला दिसतो
सर्वसाधारण आणि व्यापक कसेही म्हटले तरी शब्दाचा संबंध सगळीकडे तितक्याच परिणामकारकपणे येतो.
नेत्रपटलांवरील चित्रं शब्दांप्रमाणेच मनुष्यनिर्मित आहेत. - खऱ्या जगाचं ती शब्दांप्रमाणेच अपूर्ण प्रातिनिधित्व करतात. (आपल्याला एकाच कोनातून दिसतं, रंग सगळे दिसत नाहीत इत्यादी) - शब्दांना जशा मर्यादा असतात तशाच नेत्रपटलावरील चित्रांना मर्यादा असतात. म्हणून तर दृष्टीभ्रम होऊ शकतात. - ती चित्रं 'वापरून' आपण अंतर्पटलावर प्रतिमा निर्माण करतो. डोळे बंद केले म्हणून या प्रतिमा येणं थांबत नाही. - ती चित्रं ही चिह्नं असतात. सर्वसाधारणपणे सर्वच लोक त्या चिह्नांचा अर्थ पुरेसा सारखा लावतात
असहमतीची ही कारणं पटली. पण ही कारणं वाचल्यानंतर तुम्ही केलेल्या शब्दबदलाचे काही प्रयोजन रहात नाही.
हे सगळं जाऊनही कुठेतरी आपण त्यापलिकडे वेगळे शिल्लक राहू असा तुमचा विश्वास असेल तर तुमची याला हरकत नसावी.
आपण शब्दावेगळे शिल्लक रहात नाही असं ऐकून आहे. शिल्लक रहात नाही याचा अर्थ आता ज्या मर्यादांसह आहोत तसे रहात नाही.
प्रश्न असा आहे की तुमची किती सालं सोलायची तयारी आहे?
माझी सालं सोलायची भरपूर तयारी आहे, पण ती मी माझ्या पुरती सोलतो म्हणे.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

प्रास ·

पुष्करिणी 16/11/2011 - 01:54
आभ्यासपूर्ण लेख आवडला. तुमच्या सविस्तर लेखामुळं मला यकुंचा लेख थोडाफार कळला असं वाटतय. आधी माझा समज होता की युजी शब्दांच्या बाबतीत 'मॅप इज नॉट अ टेरिटरी' असं काहीसं बोलत आहेत. पण आता टेरिटरीच नसल्यानं मॅप कसला आणि बॉर्डर कसली.

यकु 16/11/2011 - 02:08
जेव्हा या चिह्नांनी दर्शवलेल्या प्रतिमांच्या जंजाळातून सुटू म्हणजे भाषा --> शब्द --> चिह्न --> प्रतिमा --> असत्य ही साखळी तोडू तेव्हा आपल्याला सत्याचं म्हणजेच युंजींच्या मताने आपल्या आजुबाजुच्या जगताचं दर्शन होईल.
युजींचा असा कुठलाही विचार नाही हे स्‍पष्‍ट करु इच्‍छितो. मी लिहीलेल्या कालच्या चार-दोन परिच्छेदांसांठी फक्त बीज म्हणून त्यांच्या अंतर्पटलावर शब्द कसलीही ''प्रतिमा'' निर्माण करु शकत नाहीत हा विचार वापरला होता.
वकिलातीने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी खर्च करण्याचं नाकारलं.
'प्रत्यार्पण' हा शब्द गुन्हेगारांना एका देशाकडून दुसर्‍या देशाकडे हस्तांतरीत करण्‍यासाठी वापरला जात असल्याचं पाहिलं आहे. इथे हा शब्द चपखल नाही.
तेव्हा भारतीय वकिलातीमधल्या व्हॅलेंटिना नावाच्या साठीच्या महिलेने त्यांना आसरा दिला
अचूकतेसाठी, त्या बाईंचं नाव 'व्हॅलेन्‍टाइन डी कार्व्हान'
त्यांचं सदर तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या काही व्यक्तींना ते ज्ञानी वाटत तर काहींना पाखंडी पण लवकरच त्यांच्या या 'अगम्य' तत्त्वज्ञानाबद्दल पुस्तकं लिहिली गेली, त्यांची विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली आणि ते एकूणच प्रसिद्धीस पावले.
इथे स्‍पष्‍ट करु इच्‍छितो की युजींनी कधीही 'हे घ्‍या माझं तत्वज्ञान' अशी भूमिका घेतलेली नाही. टेल देम दॅट देअर इज नथींग टु अंडरस्‍टँड हे तुम्ही वर लिहीलंच आहेत. त्यांची पुस्तकं जरुर आहेत, पण ती युजींनी अजेंडा म्हणून लिहवून घेतलेली नाहीत. ज्यांना युजीचे विचार मोलाचे वाटले त्यांनी त्यांना ग्रंथरुप देण्‍याचा उद्योग केला. दुसरी गोष्‍ट अशी की युजी कृष्‍णमूर्ती पूर्वायुष्‍यात जरी जगप्रसिद्ध वक्ते असले तरी, रुपांतरणोत्तर मात्र ते भाषण देऊ शकत नसत. हां, ते तुकड्‍या तुकड्यातील संवाद जरुर साधत. हा संवादच पुस्तकांत ग्रथीत करण्‍यात आला आहे. त्यामुळं 'विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली' म्हणणं निखालस चुकीचं आहे. मुलाखती जरुर घेतल्या गेल्या. रुपांतरणांनंतर त्यांचं एकच व्याख्‍यान झालं, जे ऐकलं तर कळु शकेल ती युजींना सलग बोलणे, सलग एक विचारधारा पकडून बोलत रहाणे अशक्य बनले होते.
योग आणि ध्यान करणार्‍यांच्या साधनेमध्ये त्रुटी किंवा चूक घडल्यास त्याचे परिणाम त्यांच्या मनाला भोगावे लागतात असं योगशास्त्रात सांगितलं जातं. हे परिणाम क्लेश स्वरूपात त्यांचे मन त्रिगुणांपैकी (सत्त्व-रज-तम) ज्या गुणाच्या अधिपत्याखाली असेल त्यानुसार घडून येतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश होत. पातंजल योगसूत्रांमध्येही या क्लेशांना अविद्याजन्य मानलेलं आहे. हे इथे सांगण्याचं कारण इतकंच की असाच काहीसा प्रकार युजींच्या बाबतीत घडला असावा आणि त्यालाच त्यांनी त्यांना स्वतःला अनुभवाला आलेलं 'रुपांतरण' असं मानलं असावं.
पातंजल योगसूत्रातील माहीतीसाठी धन्यवादच, ही माहिती माझ्‍यासाठी नवीन आहे. पण युजींचं रुपांतरण फक्त मानसिक नसून ते पूर्णत: शारीरिक आहे हे लक्षात घ्‍या. त्यांच्या प्रत्येक संवादात 'शरीर' हा मुख्य घटक आहे आणि ते मनोव्यापार, मन सरळसोटपणे उडवून लावतात. मनाचं अस्तित्व युजी जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हाही त्यांना जाणवलं नाही. मन नसतं हा त्यांचा जुनाच स्‍वानुभव होता. इथे युजी आणि इतर दा‍र्शनिकांमधला रुपांतरणोत्तर फरक ठळक करु इच्छितो की, युजी वगळता जवळपास सर्वांचं (अगदी गौतम बुद्ध, महावीर ते अलीकडचे जे. कृष्‍णमूर्ती, रजनीश, एकहार्ट टुली, मुजी, पुंजाजी आणि असेच जेवढे असतील तेवढे ) मानसिक रुपांतरण घडल्याचे दाखले आहेत, युजीच्या रुपांतरणाचा आधार पूर्णत: शारीरिक आहे. युजीबद्दल मी इथे लिहिलेली लेखमाला वाचली तर जाणवेल की त्यांनी रुपांतरण 'मानलं' असे मानणे निखालस गैरसमजाचे होईल. जे बदल शरीरात/वर दृश्य रुपात स्पष्‍टपणे दिसले आहेत, ते कुणी मानण्‍या न मानण्‍याची काय पत्रास?
यासाठी किती काळ लागतो वगैरे सूत्रांमध्ये दिलेलं नाही पण युजींची ही अवस्था आठ दिवस होती असं त्यांच्या शब्दांतूनच कळतं. युजींच्या भ्रमित अवस्थेला सुरूवात झाली ती इथेच असं मला वाटतं.
शरीरात बदल घडून ते स्पष्‍ट दिसायला सुरुवात झालेली असताना ती भ्रम सुरु होण्‍याची अवस्‍था होती असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे आपल्यासारख्‍या आयुर्वेदाचार्याला मी सांगू काय?
युजी म्हणतात - भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो. संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही. व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.
हे युजींचे विचार नाहीत. त्यांच्या मनात शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही हा बीजरुप विचार घेऊन मी पुढे मांडलेली भुमिका म्हणा हवं तर. मी मांडलेली ही भूमिका चुकीची आहे असं म्हटलंत तर चालेल, पण हे युजींचे विचार आहेत असं म्हणू नका, ते चूक असोत, बरोबर असोत पण ते त्यांचे विचार नाहीत.
त्याचप्रमाणे ते जेव्हा भाषेला जगाची प्रतिमा मानतात (मुळात हा विचारच किती निरर्थक आहे? तुम्ही जगालाच नाकारता मग त्याची ही प्रतिमा कुठून पैदाकरता?)
प्रतिमा युजी पैदा करीत नाहीत, तुमच्या-आमच्या मनात जी प्रतिमा आहे त्याबद्दल ते बोलतात. देअर इज ओन्ली धीस रिअॅली‍टी, देअर इज नथींग मोर फॉर मी दॅन धीस (हे धीस म्हणजे जग जसं आहे तसं).
"जगात काहीही जाणण्यासारखं नाही, जे काही आहे ते केवळ काही असंबद्ध वाक्यं आहेत, ज्यांची संगती तुम्ही लावण्याचा प्रयत्न करता," अशा वाक्यांमधून (सं - विकी) युजींची वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते असं मला वाटतं''
'युजींची वैचारिक दिवाळखोरी' हा फार चांगला शब्दप्रयोग केला आहे. ज्यावेळी ते रुपांतरणातून बाहेर पडले तेव्हाच ते विचारमुक्त झाले होते. ते विचाराच्या बाबतीत खरोखर दिवाळखोरीत जगले, पण वेगळ्या अर्थानं. मग ते जे बोललेत ते काय आहे? असं विचाराल तर त्यांना जेव्हा प्रश्न विचारले जात त्यावर ते बोलत आणि हे बोलणे म्हणजे 'समोरच्याच्या मनात जे आहे ते जसंच्या 'इथं' (युजी नावाचे जे काही पटल असेल त्यावर) तसं विचारां/शब्दांद्वारे किंवा शिवाय प्रतिबिंबीत झालेलं आहे.' इथं एक किस्सा सांगण्‍याचा मोह होतो. युजी समोरचा माणूस काहीही बोलला नाही तरी त्याच्या मनातले विचार ओळखू शकत याचं चित्रिकरण हे एका चित्रीकरणात आलेलं आहे. युजींसोबतच्या बैठकीत बसलेल्या महिलांतील एक सुंदर महिलेला पाहून तिच्याशी संग करता आला तर किती बरं असा विचार त्या बैठकीत बसलेल्या महेश भट यांच्या मनात आला. युजींनी तिथल्या तिथे महेश भट यांना त्यांच्या ब्रॅण्‍डेड शैलीत झोडपून काढून 'तिला मिठीत घ्‍यावं वाटतंय तर घेत का नाहीस (ती तुझ्‍या थोबाडीत मारील हा भाग वेगळा!) , पण तिथं तुझ्यात भरलेली नैतिकता, समाजाचे नियाम आडवे येतात... यामुळंच तुमच्याकडून कधीच जशी घडायला हवा ती कृती घडत नाही' हे सुनावलं होतं. महेश भट यांनी त्यांच्या मनात असे विचार आल्याचे नाकारलेले नाहीच, स्‍वीकारलेलं मात्र आहे. तुम्ही स्वत:च पहा:

This Is a Dog Barking

ऐकणार्‍याला हातात काहीच मिळत नाही.
हे मान्य करतो. काही मिळण्‍यासाठी जे युजी वाचतील त्यांच्या हातात काहीही पडत नाही. उलट जे काही जमवलं असेल त्यावरुन हात धुवून बसावे लागते. हा माझा स्वानुभव आहे. मी माझ्‍यालेखी शब्दांचे महत्व गमावून बसत आहे हा स्वानुभव आहे.
मात्र असं असूनही युजी अंगाला काहीच लाऊन घेत नाहीत. त्यांनी ज्ञानालाच नाकारलेलं असल्याने ते कोणतं तरी ज्ञान देत आहेत असं ते स्वतःच मानत नाहीत पण त्याचवेळेला ऐकणार्‍याला त्यांच्या विधानांची संगती लावण्याच्या दृष्टीने त्यांच्या मते मृत भाषेतील शब्दांचे बुडबुडे ते सोडतच असतात मात्र हे बुडबुडे त्यांची मानसिक अवस्था समजावी म्हणूनच असतात, हे एक गौडबंगालच आहे.
युजींना स्वत:साठी त्यांचे स्वत:चेही शरीर जाणवत नव्हते... मग अंगाला कसे काय लाऊन घेतील ;-) विनोद सोडा. माझी मानसिक अवस्‍था समजून घ्‍याच, असा त्यांचा आग्रह कधीच नव्हता. त्यांच्या अवस्‍थेत आणि आपल्या अवस्‍थेत मूलभूत फरक आहे आणि तो काय आहे हे ज्यांना समजून घ्‍यावं वाटलं त्यांच्यासाठी युजींना शब्दांचे बुडबुडे सोडावे लागले. यात गौडबंगाल काहीही नाही.
करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे.
युजींच्या बोलण्‍यातून कसलाही तात्त्विक किंवा अध्‍यात्मिक अर्थ मी काढत नाही. काही असेलच, तर ते प्रॅक्‍टीकली मला कसं लागू होतं हे अनुभवण्‍याचा प्रयत्न मी जरुर करतो. भजनी लागणे वगैरे प्रकार युजींच्या बाबत संभवत नाहीत, हे आपल्याला माहित नसण्‍याचे कारण म्हणजे आपली युजींशी पुरती ओळख झालेली नाहीय. त्यांना वाचायला गेलं तर प्रत्येक क्षणी, मनात आलेला प्रत्येक विचार छाटून काढतात, अगदी 'वैचारिक दिवाळखोरीत' ढकलतात. ही विशिष्‍ट वैचारिक दिवाळखोरीच (विचारांपासून मुक्त होणे) मला वाटतं सत्य जाणू इच्छिणार्‍यांना अपेक्षित असते. त्यामुळे भजनी लागणार्‍यांची शोकांतिका आहे वगैरे म्हणणे हे या विषयात नेहमीच केल्या जाणार्‍या विधानांप्रमाणे एक 'स्वीपिंग स्‍टेटमेंट' आहे.
युजी स्वतः सांगतात की मी सगळं नाकारतोय पण लोकंच त्यांच्या त्यांच्या डोक्याने त्यांच्या (युजींच्या) असंगत वाक्यांतून अर्थ काढत बसतात आणि अखेर काहीच हातात न मिळाल्याने निराश होतात. युजींच्या वक्तव्यांचा विचार करता ते त्यांना प्रश्न विचारणार्‍याचा प्रत्येक मुद्दा नाकारतात. प्रश्नकर्ता कोणत्यातरी अडचणी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याच्या अडचणी व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या शब्दांनाच नाकारतात. नंतर त्याच्या अडचणींनाच नाकारतात. पुढे त्या व्यक्तीच्या जाणीवांनाच नाकारतात आणि अशा प्रकारे आपल्या अडचणींचा सामना करताना मेटाकुटीला आलेला जिज्ञासू अधिकच संभ्रमात पडतो आणि त्यांच्या नकारात गूढ अर्थ शोधू लागतो. यातच पुढे अधिकाधिक गुरफटत जातो. अशा प्रकारचा विचार काहीही निष्पन्न करत नाही आणि असे असंबद्ध नि 'गूढ' विचार व्यक्त करण्यासाठी युजींसारखं रुपांतरणही आवश्यक नसतं. आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात. भांग खाऊन व्यक्त केलेले नसले तरी युजींचे विचार तसाच एक कल्पनाविलास वाटतो. खरं तर युजींच्या या तथाकथित तत्त्वज्ञानाचं (पुन्हा वदतोव्यघात) वेगवेगळ्या प्रकारे खंडन करता येणं शक्य आहे. अनेक संदर्भ आणि शास्त्रवचनं यासाठी देता येतील पण ज्यांनी स्वतः तत्त्वज्ञानाचा पाया असलेलं शाश्वत सत्य नाकारलं, त्या सत्याचं ज्ञान नाकारलं, त्या सत्याच्या ज्ञानाचं साधन नाकारलं आणि जग तथा जीवनासंदर्भात कुठल्याही तर्‍हेची साध्यं नाकारली अशा व्यक्तीला फक्त 'नाकारून'च त्याच्या मतांचं खंडण करणं मला अधिक योग्य वाटतं.
तुमच्यात माझ्‍याही चिंध्‍या करण्‍याचं धैर्य जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही सत्य जाणलेलं असेल अशा अर्थाचं युजींचं एक विधान आहे. पण त्यांना नाकारणं हे युजींचं पूर्णपणे परिशिलन करुन या विषयात आलेल्या स्वानुभवातून घडत असेल तर आनंदच आहे. पण पुरेसं समजून न घेताच घाईत निष्‍कर्ष काढला जात असेल तर मला आपल्याला थांबवायला आवडेल. ही वाक्ये तशीच वाटतात, म्हणून त्यावर सखोल लिहीत नाही.

In reply to by यकु

चित्रा 16/11/2011 - 03:08
वरील चित्रफितीत महेश भटांना दिलेला सल्ला हे ते शेवटी क्रूड एक्झांपल आहे हे म्हणतात ते बरे झाले. कोणी हा सल्ला पाळला नाही म्हणजे मिळवले! मी माझ्‍यालेखी शब्दांचे महत्व गमावून बसत आहे हा स्वानुभव आहे. म्हणजे काय? कसलेही वर्णन करण्यास प्रतिमा पुरेशी असते?

In reply to by चित्रा

यकु 16/11/2011 - 03:19
म्हणजे काय? कसलेही वर्णन करण्यास प्रतिमा पुरेशी असते?
हे मी माझ्याबद्दल लिहिलं आहे. म्हणजे माझ्यालेखी माझ्यासमोर येणार्‍या शब्दांना फारसं महत्व नाही. त्या शब्दांतून जी प्रतिमा उभी होत असते ती फारतर लक्ष देण्यासारखी असेल.

In reply to by यकु

रामपुरी 16/11/2011 - 03:28
चित्रफीतीबद्दल धन्यवाद. सगळं संभाषण नीट ऐकल्यावर पूर्वीचा निष्कर्ष पक्का झाला. "आणखी एक तद्दन भंपक बाबा" बाकी विचार ओळखण्याबद्दल म्हणाल तर असले "चमत्कार" कुणीही थोडीफार निरिक्षणशक्ती असलेला आंडूपांडू करू शकतो.

In reply to by रामपुरी

यकु 16/11/2011 - 03:48
चित्रफीतीबद्दल धन्यवाद. सगळं संभाषण नीट ऐकल्यावर पूर्वीचा निष्कर्ष पक्का झाला. "आणखी एक तद्दन भंपक बाबा"
आपण जर युजींबद्दल माझ्या लेखमाला वाचून त्यांच्याबद्दलचं हे मत बनवलं असेल तर तो दोष माझ्या तोकड्या लिखाणाकडं आणि मांडणीकडे जातो. मी आपल्याला याबद्दल पुन्हा एकदा स्वतःच्या कोर्‍या पाटीनं प्रयत्न करुन पहावा, आणि तरीही असाच निष्कर्ष निघाला तर योग्य ते मानावं असा सल्ला देईन.
बाकी विचार ओळखण्याबद्दल म्हणाल तर असले "चमत्कार" कुणीही थोडीफार निरिक्षणशक्ती असलेला आंडूपांडू करू शकतो.
हा चमत्कार आहे म्हणून व्हिडिओ इथे टाकलेला नाहीय. शब्दांच्या विना देखील कुणाचेही मंतव्य कुणालाही स्पष्ट दिसू शकते हे याचं दृश्य उदाहरण आहे म्हणून तो टाकला आहे. चमत्कार हा विशिष्ट पठडीतून विचार करणार्‍यांनी तयार केलेला शब्द आहे. आणि थोडेफार चमत्कार कुणीही करु शकतो, जसा हा प्रतिसाद देऊन आपण केलात !

In reply to by यकु

पहिल्यांदा एवढ्या चांगल्या चर्चेबद्दल दोघांचेही अभिनंदन करतो व धन्यवादही वर दिलेलेच आहेत. चर्चा अत्यंत योग्य अशा वातावरणात चालली असून ती अशीच याच वातावरणात चालू राहूदेत ही सर्वांना विनंती. शेवटी मतांना विरोध करतानासुद्धा आपण त्यातूनही काहीतरी ग्रहण करत असतोच. काही प्रश्न पडले आहेत ते काही काळाने विचारतोच.

In reply to by जयंत कुलकर्णी

Nile 17/11/2011 - 08:17
शेवटी मतांना विरोध करतानासुद्धा आपण त्यातूनही काहीतरी ग्रहण करत असतोच.
असं काय नसतंय हो जयंतराव. हे वाक्य त्या व्हिडिओतल्या निरर्थक संवादासारखंच आहे.

In reply to by यकु

प्रास 16/11/2011 - 13:17
धन्यवाद यशवंतराव! आमच्या अल्पस्वल्प मतिनुसार लिहिलेल्या लेखावर अपेक्षेप्रमाणे तुम्ही अगदी विस्तृत प्रतिसाद दिलेला आहे. आधी एक गोष्ट पुन्हा एकदा ध्यानात घ्या की तुमच्या सारखा मी काही युजींच्या मताचा अभ्यासक नाही. किंबहुना तुमच्या त्या संबंधीच्या लेखांनीच माझं युजींकडे लक्ष गेलं आणि त्यासंदर्भात काही वाचन झालं. तुम्ही शब्दासंबंधी लिहिलेल्या लेखाने आणि त्यावरील मतप्रदर्शनाने वरचं लिखाण झालं. मला व्यक्तिशः कोणत्याही तत्त्वज्ञ आणि ज्ञानी माणसाकडून काही लोकोपयोगी कार्याची अपेक्षा असते. आपल्याकडील ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग लोकांच्या वैचारिक अडचणींवर उतारा म्हणून व्हावा असं काहीसं मला अपेक्षित असतं अन्यथा त्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा उपयोग तो काय? अर्थात माझं असं म्हणणं नाही की हे मत सर्वमान्यच व्हावं पण त्याला सर्वसामान्य म्हणायला काय हरकत असावी? ज्या वेळी एखादी व्यक्ती ज्ञानी म्हणून समोर येते, त्यांना आलेल्या असामान्य अनुभवाबद्दल सांगते, त्या अनुभवांमुळे त्यांच्यात झालेल्या व्यक्तिगत बदलांचं वर्णन करते आणि एका अर्थात लोकांना त्याद्वारे स्तिमित करते, त्या व्यक्तीकडून आपोआपच समाज काही अपेक्षा करतो. समाज हा जनसामान्यांनीच बनलेला असतो. तेव्हा जनसामान्यांची अपेक्षा त्यांना पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची प्रामुख्याने असते. त्यांना त्यांच्या अडचणीतून एक 'वे आऊट' हवा असतो. शक्य झाल्यास काही उपायांची अपेक्षा असते. युजी लोकांना त्यांच्या अनुभववर्णनाने स्तिमित करतात पण त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नसतात. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना युजी त्यांच्या 'तथाकथित' रुपांतरीत अवस्थानुरूप उत्तरं देतात पण प्रश्नकर्ती मंडळी त्यांच्याप्रमाणे रुपांतरणाचा अनुभव नसलेली आहेत ना, त्यांना युजींचं म्हणणं कसं कळावं? यशवंतराव, तुम्ही म्हणता
शरीरात बदल घडून ते स्पष्‍ट दिसायला सुरुवात झालेली असताना ती भ्रम सुरु होण्‍याची अवस्‍था होती असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे आपल्यासारख्‍या आयुर्वेदाचार्याला मी सांगू काय?
खरं तर मला ते कसं चुकीचं आहे ते समजून घ्यायला आवडेल. कारण युजींचं तथाकथित रुपांतरण फक्त शारीर होतं हेच मला समजण्यासाठी कठीण आहे. केवळ ते स्वतः आणि त्यांचे मित्र तसं म्हणतात नि मानतात म्हणून मी ही तसंच मानावं असं तुमचं म्हणणं असेल तर किमान मला तरी ते अशक्य आहे. तुम्ही तुमच्या लेखांमध्ये या शारीर बदलांचं वर्णन केलेलं आहे. त्यातल्या बर्‍याचशा गोष्टी युजींचे स्वतःचे अनुभव आहेत. त्वचा, पापण्या वगैरे सोडा पण मेंदूची स्थिती कशी झालीय ते वाटणं, कानाचं जवळचा आवाज दूरून वगैरे विविध प्रकारे ऐकू येणं, डोळ्याने भिंगांसारखं दिसणं इ. इ. वर्णनं युजींचे स्वतःचे अनुभव असल्याने ते सर्वमान्य व्हावेत असा आग्रह मान्य करता येत नाही. त्यातही पुन्हा
मनाचं अस्तित्व युजी जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हाही त्यांना जाणवलं नाही. मन नसतं हा त्यांचा जुनाच स्‍वानुभव होता.
हे असलं आम्ही का मान्य करावं? आता तुम्ही भ्रम सुरू होण्याच्या अवस्थेबद्दल विचारलंच आहेत तर त्यावर काही सांगू इच्छितो. युजींनी वर्णन केलेली रुपांतरणाच्या वेळची लक्षणं वात दोषाच्या विकृतीची दिसतात. वात विकृतीमधून अशा अवस्थेत भ्रम हे व्याधीलक्षण होऊ शकते. भ्रमात असलेल्या व्यक्तीला जाणवलेल्या गोष्टी तो वर्णन करू शकतो पण ती त्याची शारीरिक स्थिती असेलच असं नसतं. युजी मनाला मानत नाहीत म्हणून त्यांच्या शरीरातलं मनाचं अस्तित्व मी देखिल मानू नये असं तुमचं सांगणं आहे का? तर तसं मला करता येणार नाही. त्यांच्या तथाकथित मृत्यु विषयीसुद्धा मला भ्रमाचीच शक्यता वाटते. शेवटी त्या अवस्थेनंतर ते जीवित राहिले होते तर किमान आयुर्वेदातल्या जीविताच्या व्याख्येनुसार "शरिरेन्द्रिय सत्त्वात्मसंयोगो धारि जीवितम्।" (चरक संहिता) त्यावेळी त्यांच्या ठायी शरीर, इन्द्रिय, मन आणि आत्मा यांचा संयोग नक्कीच होता. तिथे मन होतं, युजींनी ते मानलं काय न मानलं काय, त्याने काहीच फरक पडत नाही. मन त्यांना आवश्यक असेल तेव्हा तेवढ्यापुरतं उभं राहतं आणि गरज नसताना पूर्ववत पडून राहतं म्हणून ते नसतंच हे असलं आयुर्वेदाला तरी मान्य नाही हे नमूद करू इच्छितो. असो. कुणी युजींना मानावं, त्यांच्या मतांच्या संग्रहांचा, संवादांच्या संग्रहांचा अभ्यास करावा, त्याने स्वतःची मत बनवावी हे व्यक्तिशः मी त्यांच्या त्यांच्यावरच सोडेन. वैयक्तिकरीत्या किमान माझ्यापुरते मी ते नाकारलेलेच आहेत. हीच माझ्याकडून लेखन सीमा होय.

In reply to by यकु

प्रास 16/11/2011 - 20:00
काय आहे, या अशा विषयांवर होऊ शकणार्‍या प्रतिसादांच्या प्रतिसादांची सीमा गाठणे कठीण आहे. कुठेतरी ठरवून सीमा आखावीच लागते. शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाची मतं आहेत आणि ती तो नेहमी ठामपणे मांडत राहणारच आहे. आपली मतं एकमेकांना पटली नाहीत तरीही आपण एकमेकांच्या मतांचा आदर निश्चितच करू शकतो, असंच मी मानतो.

In reply to by प्रास

यकु 16/11/2011 - 21:09
अगदी.. अगदी सुरुवातीला कित्येक वेळा युजी हे ठार बुद्धीभ्रष्ट आहेत असं मलाही कित्येकदा वाटलं होतं. म्हणून कुणी युजींच्या नावाने काहीही म्हटले तरी त्यात आश्चर्य वाटत नाही. ठाम विचार मांडण्यामागे फक्त तोंडओळखीवरुन काही महत्वाचं सुटू नये एवढाच विचार होता.

यकु 16/11/2011 - 02:59
करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे
आणखी सुसंगत उत्तर सुचले म्हणून हा पुन्हा एक प्रतिसाद. 'करुन सवरुन'बद्दल सांगतो - युजींच्या जीवनकालात त्यांच्या अवतीभवती कुठलीही संस्था त्यांनी उभी राहू दिली नाही. विकण्यासारखं कोणतंही प्रॉडक्ट आपल्याकडे नाही, कसल्याही आध्यात्मिक प्रश्नावर आपल्याकडे उत्तर नाही हे युजी सांगत असत. उत्तरे मिळवण्यासाठी जे आध्यात्मिक गुरु बाजारात बसले आहेत त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला युजी देत. निषेध करायचा असेल तर त्या तथाकथित आध्यात्मिक गुरुंचा करा जे केवळ शब्दच्छल करुन, येनकेन प्रकारेण लोकांना गंडवण्याच्या युक्त्या वापरुन स्वतःचे साम्राज्य उभे करतात. १. रूपांतरणोत्तर आयुष्यात युजी कधीही डॉक्टरांकडे गेले नाहीत. शरीर हे स्वतः ला बरं करुन घेण्यात स्वतःच समर्थ असतं असे ते मानायचे. याचा अर्थ कुणीही डॉक्टरांकडे जाऊ नये असे त्यांचे म्हणणे नव्हते. वेदना होत असतील तर जरुर डॉक्टरांचे उपचार करायला हवेत असे ते सांगायचे. पण 'शुट ऑल डॉक्टर्स ऑन साईट अ‍ॅण्ड अ‍ॅट साईट... वी डू नॉट नीड ऑल दोज स्क्रौंड्रल्स' असेही त्यांचे एक विधान आहे. २. रुपांतरणोत्तर आयुष्यात युजींनी कधीही 'हेल्थ फूड' किंवा कसलेही आहाराचे चोचले केले नाहीत. केवळ सॉलिड क्रिम आणि चीज हा त्यांचा मरेपर्यंत ६०-७० वर्षे आहार राहिला. तुम्ही अन्न खात नाही, संकल्पना खाता असं त्यांचं म्हणणं असे. लोक अवतीभवती जमा होतात म्हणू युजी दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त एका ठिकाणी रहात नसत. युजी हे एखाद्या गावी जाण्यासाठी विमानाचं बुकींग करतात, ते लगेच दुसर्‍या गावी जाण्यासाठी असे त्यांचा ट्रॅव्हल एजंट म्हणत असे. यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - कुठेही कुठली संस्था न उभारता, 'टिचींग' चा कसलाच अजेंडा नसताना! मी मेल्यानंतर बागेतलं गांडूळ जसं सडून जातं तसाच सडेन हे त्यांचं म्हणणं होतं. ते इटालीतील व्हॅलेक्रोशिया येथे अगदी एकांतात, त्यांना ऐकाणार्‍या, शेवटचं पहाण्यासाठी जमलेल्या लोकांच्या कसल्याही सेलिब्रेशन शिवाय त्यांचा मृत्यू झाला, आणि तो तसाच व्हायला हवा हे त्यांनी सांगून ठेवलं होतं.

In reply to by रामपुरी

आत्मशून्य 16/11/2011 - 03:51
जन्माचं सेलीब्रेशन होतं. जन्म दीवसाचही होतं मग जर आर्थीक तरतूद असेल तर सामोर्‍या गेलेल्या मृत्यूच सेलीब्रेशन का नसावं ? इतकी का ती अनैसर्गीक घटना आहे ?

In reply to by आत्मशून्य

यकु 16/11/2011 - 03:54
युजी हे त्यांना ऐकायला येणार्‍या लोकांमध्ये कितीही नाही म्हटलं तरी 'एक पोचलेली विभूती' मानले जात होते. अशा व्यक्तीची गेल्यानंतर समाधी बांधणे, त्याच्या मृत्यूसमयी/नंतर काही विशेष गोष्टी करणे वगैरे केले जाते, ते केले नव्हते या अर्थाने 'सेलिब्रेशन.'

In reply to by यकु

मराठी_माणूस 16/11/2011 - 08:54
काही शंका यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - ह्याचा सर्व खर्च कोणी केला. जे.कृष्णमुर्ति आणि युजींच्या तत्वज्ञानात काय फरक आहे ?

In reply to by मराठी_माणूस

यकु 16/11/2011 - 23:34
यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - ह्याचा सर्व खर्च कोणी केला.
व्हॅलेंटाईन डी कार्व्हान या बाईंनी युजींच्या प्रवासासाठी स्वखर्चाने एक फंड उभारला होता, त्यातून तो खर्च होत असे. व्हॅलेंटाईनने कधीही युजींबद्दल कसलेही मतप्रदर्शन केलेले नाहीय. त्या शेवटी बंगलोर मध्ये, युजींच्या मित्रांकडे रहात असत. तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या डायरीत युजीबद्दल 'व्हेअर एल्स इन दि वर्ल्ड आय कुड हॅव फाऊंड सच ए मॅन लाईक युजी' असं एकच विधान आहे. यावर आता शेवटी व्हॅलेंटाईनला का होईना लुटलेच ना ? असे म्हणायचे असेल तर मी अगोदरच असं म्हणून ठेऊ इच्छितो की माणसांदरम्यान ऋणानुबंध निर्माण होऊच शकत नाहीत असे ज्याला वाटत असेल त्याने असा जरुर विचार करावा.
जे.कृष्णमुर्ति आणि युजींच्या तत्वज्ञानात काय फरक आहे ?
मलाही माहित नाही. तो समजून घ्यावा लागेल.

धनंजय 16/11/2011 - 05:28
दिलेले संदर्भ वाचले. येथे शून्यवादाचे तत्त्वज्ञानही आहे, आणि यूजी हे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात त्या तत्त्वाला जमेल तितके प्रामाणिकही होते. त्यांच्या अनुयायांबाबत आपली "जो जे वांछील" अशी भूमिका हवी. (इतपत लेखकाशी असहमती सांगतो आहे.) महेश भट यांच्यासह संवादाची चित्रफीत बघितली. जर अनुयायांना यूजी यांची तत्त्व-प्रामाणिक स्थिती हवी असून मिळवता येत नसेल, तर तत्त्वज्ञान शिकवण्याच्या पद्धतीचा तरी विरोध करण्यालायक आहे. (इतपत सहमती सांगतो आहे.) मला पूर्ण शून्यवादाचे तत्त्वज्ञान पुरते पटत नाही. त्यातील (म्हणजे नेमके युजी नव्हे, तर शून्यवादातील) कुठला भाग पटतो, आणि कुठला भाग पटत नाही, ते वेगळ्या लेखात लिहिलेले आहे.

ऋषिकेश 16/11/2011 - 09:28
आतापर्यंत मी जितके युजींचे जे लिखाण वाचले आहे ते वाचुन मला अजिबात पटलेले नाहि.. उगाच आपलं कै च्या कै लिहायचा हा माणूस (असं मला वाटलं.) युजींचं वाचलं की पुलं च्या "आमच्या गुरुदेवांकडे चला.. मग तुम्हाला ब्लड म्हणून नाहि प्रेशर म्हणून नाही... काहि राहणार नाही" हे वाक्य आठवतं! ;)

गवि 16/11/2011 - 09:35
युजींचं तत्वज्ञान (!! हा शब्द तरी कसा वापरावा??!) किंवा त्यांची विचारस्थिती (हे जास्त बरोबर होईल मला वाटतं) हे नक्कीच १. एकदम फारच टाकाऊ वाटेल किंवा २. एकदम फारच आकर्षून घेणारं वाटेल या दोन एक्स्ट्रीम्सचंच आहे. त्यांचं रिअलायझेशन (पुन्हा त्यांचे विचार किंवा त्यांची मतं हा शब्द टाळतोय..) निव्वळ थिऑरिटिकली योग्य्/बरोबर्/सत्य/ परम सत्य असं काहीही असू शकेल. तशा अनेक कन्सेप्टस प्युअर थिअरीमधे मान्य करण्यासारख्या असतात (मल्टिव्हर्स/ पॅरेलल युनिव्हर्स/ एन्-डायमेन्शनल जॉमेट्री / वक्राकार स्पेसटाईम.) पण ... आपण शेवटी प्रत्येक विचाराचा (भले मिथ्या आयुष्य का असेना पण) आपल्या आयुष्यातला रिलेव्हन्स बघतोच.. आणि या युजींच्या विचारांचा "उपयोग" किंवा त्याने काही "फरक पडत असल्याचं" युजींनीही अमान्यच केलं असेल.. शिवाय युजी काही सिद्धही करु शकत नाहीत / इच्छित नाहीत.. "समजून घेण्यासारखं काही नाही" हा एक विचार आहे. पण तो अर्थहीन आहे. (थ्री डायमेन्शनल स्पेसमधे (०,०,०) असाही एक पॉईंट असतो.. पण त्यामधे एक्स वाय आणि झेड मधल्या परस्पर ओरिएंटेशनची स्पेसिफिसिटी नष्ट झालेली असते.. त्यामुळे या बिंदूचे ज्ञान होऊन किंवा न होऊन खास काही फरक पडतो असे नव्हे..) ऑल सेड अँड डन: युजींच्या "विचारां"ची थिअरी मांडणं म्हणजे "मी याक्षणी गाढ झोपेत आहे" असं मोठ्याने ओरडून सांगण्यासारखं पॅरेडॉक्सिकल आहे..

In reply to by गवि

गवि 16/11/2011 - 10:00
पुलंचं एक वाक्य आठवलं ते देण्याचा मोह अनावर होतोय.. >>>>>>>>>> "तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल !"

In reply to by गवि

आत्मशून्य 16/11/2011 - 17:32
तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? फारच सूंदर वाक्य. निराश मनाला तर एकदम उल्हासीत करणारं, हवहवस वाटणारं. भौतीक सूखं राखण्याच्या नादात दमलेल्या प्रत्येकाला क्षणापूरतं आपलसं वाटणारं. पण काळ्या दगडावरची रेघ असतं तर ज्यांनी दारासमोर फुलबाग केली आहे! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागतो हे संपूर्ण अनूभवलेलं आहे ते शून्याला भागायच्या फंदात कधीच पडले नसते.

मन१ 16/11/2011 - 11:59
"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " असे प्रत्यक्सहत कधीच हातात तल्वार न घेणारे, "मौ मेणाहूनी" असलेले आमचे तुकोबा का म्हणत असतील, कुनाशी युद्ध करत असतील ह्याची पुसटशी कल्पना येते आहे (की कल्पना आल्याचा भास होतोय?) बाकी, यकुच्या जोशात(मराठी गंडलं) लिहिल्यासारख्या वाटणार्‍या भाषेतही आध्यात्मिक गुरु बाजारात बसले आहेत किंवा अ ब्युटिफुल व्हायोलन्स अशी अनेक वाक्ये गंमतीशीर वाटतात. बाकी युजींचा इतका अभ्यास केलात हे उत्तमच. पण तरीही आम्ही तरी वरती गविंच्या प्रतिसादातल्या पुलंशी ११०% सहमत. भरपूर खा, व्यायाम करा. एखादा छंद जोपासा. कुणाच्या चेहर्‍यावर हसू आणता आलं तर ते करा. तत्वज्ञान वाचत बसण्याइतकं मानवी आयुष्य पुरेसं नाही. थोडक्यात, "तुझे आहे तुजपाशी" च्या एका प्रयोगाला मी माझ्या मित्रांना स्पॉन्सर करण्यास तयार आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

यकु 16/11/2011 - 19:34
मी रजनीशांचं बरच वाचलेलं आहे. अंतर्जालावर उपलब्ध असलेल्या युजींबद्दलच्या रजनीशांच्या मतांमध्ये आपण जे म्हणालात ते कुठेही उपलब्ध नाही. हे कुठे लिहीलेले असेल, आणि ते आपल्याकडे उपलब्ध असेल ते इथे टाकू शकता का? हा खोडसाळपणा मनात धरुन दिलेला प्रतिसाद असेल तर आपण इथे सांगितलेल्या ओशोचे तथाकथित मत सिद्ध करण्यासाठी आपण काहीही पुरावा देऊ शकणार नाही, आणि तशी अपेक्षाही नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

चित्रा 16/11/2011 - 20:16
का समलिंगी संभोगी आहे. य विषमलिंगी संभोगी आहे. फ पुरुष आहे. र स्त्री आहे. क काळा आहे. प गोरी आहे. ड नकटी आहे. तो ब्रह्मचारी आहे. कोणाही माणसाने काय सांगितलेले आहे ते तत्व आपल्याला पटते का? एवढाच प्रश्न आहे. अर्थात अविनाशकुलकर्णींकडून याचे उत्तर मला अपेक्षित नाही. (त्यांचे म्हणणे अधिक जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटली नाही हे माझ्यापुरते उत्तर).

सदर मत मेी एका पुस्तकात वाचले होत पण संधर्भ लागत नाहि..देवु शकत नाहि ..पुस्त्क खुप जुने आहे.. त्या मुळे विधान मागे घेत आहे.. यशवंत रावाना मानसीक यातना झाल्या त्या बद्दल दिलगीर आहोत...

In reply to by अविनाशकुलकर्णी

यकु 17/11/2011 - 01:15
सदर मत मेी एका पुस्तकात वाचले होत पण संधर्भ लागत नाहि..देवु शकत नाहि ..पुस्त्क खुप जुने आहे.. त्या मुळे विधान मागे घेत आहे.. यशवंत रावाना मानसीक यातना झाल्या त्या बद्दल दिलगीर आहोत...
स्वतःचा काहीही अनुभव नसताना आणि फक्त रजनीशांच्या एका 'जुन्या पुस्तकात' वाचल्याबद्दल आणि ते इथे सादर न करु शकल्याबद्दल दिलगीर झालात ते योग्यच. पण रजनीशांचं असं मत असलेलं कोणतंही पुस्तक असू शकत नाही कारण रजनीशांची सगळी मते (सन ६०-६२ पासुनची नंतरची ) जे. कृष्णमूर्तींबद्दल आहेत, युजी कृष्णमूर्तींबद्दल नव्हे! मला कसल्याही मानसिक यातना झाल्या नाहीत.

In reply to by प्यारे१

यकु 17/11/2011 - 23:00
आपल्याला नक्की काय म्हणायचे होते
तेच हो!
यकु साहेब? Wink
मायला लोक आम्हाला पूर्णपणे सटकलेली केस समजायला लागले राव! ;-) जाऊ द्या.. कि फरक पैंदा ;-)

आनंदी गोपाळ 21/11/2011 - 20:01
आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात.
२ पैशात भांग आजकाल कुठे मिळते? शिक्षकांना भांगे(च्या तत्वज्ञाना)बद्दल कुठे माहिती मिळाली?

In reply to by आनंदी गोपाळ

प्रास 21/11/2011 - 20:15
२ पैशात भांग आजकाल कुठे मिळते?
२ पैशात भांग मिळणारे दिवस गेले आणि तेवढ्याला भांग आणणारे शिक्षकही गेले.....
शिक्षकांना भांगे(च्या तत्वज्ञाना)बद्दल कुठे माहिती मिळाली?
त्या वेळचे शिक्षक अगदी स्वानुभवसंपन्न होते असं म्हणायला हरकत नाही.... :-)

पुष्करिणी 16/11/2011 - 01:54
आभ्यासपूर्ण लेख आवडला. तुमच्या सविस्तर लेखामुळं मला यकुंचा लेख थोडाफार कळला असं वाटतय. आधी माझा समज होता की युजी शब्दांच्या बाबतीत 'मॅप इज नॉट अ टेरिटरी' असं काहीसं बोलत आहेत. पण आता टेरिटरीच नसल्यानं मॅप कसला आणि बॉर्डर कसली.

यकु 16/11/2011 - 02:08
जेव्हा या चिह्नांनी दर्शवलेल्या प्रतिमांच्या जंजाळातून सुटू म्हणजे भाषा --> शब्द --> चिह्न --> प्रतिमा --> असत्य ही साखळी तोडू तेव्हा आपल्याला सत्याचं म्हणजेच युंजींच्या मताने आपल्या आजुबाजुच्या जगताचं दर्शन होईल.
युजींचा असा कुठलाही विचार नाही हे स्‍पष्‍ट करु इच्‍छितो. मी लिहीलेल्या कालच्या चार-दोन परिच्छेदांसांठी फक्त बीज म्हणून त्यांच्या अंतर्पटलावर शब्द कसलीही ''प्रतिमा'' निर्माण करु शकत नाहीत हा विचार वापरला होता.
वकिलातीने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी खर्च करण्याचं नाकारलं.
'प्रत्यार्पण' हा शब्द गुन्हेगारांना एका देशाकडून दुसर्‍या देशाकडे हस्तांतरीत करण्‍यासाठी वापरला जात असल्याचं पाहिलं आहे. इथे हा शब्द चपखल नाही.
तेव्हा भारतीय वकिलातीमधल्या व्हॅलेंटिना नावाच्या साठीच्या महिलेने त्यांना आसरा दिला
अचूकतेसाठी, त्या बाईंचं नाव 'व्हॅलेन्‍टाइन डी कार्व्हान'
त्यांचं सदर तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या काही व्यक्तींना ते ज्ञानी वाटत तर काहींना पाखंडी पण लवकरच त्यांच्या या 'अगम्य' तत्त्वज्ञानाबद्दल पुस्तकं लिहिली गेली, त्यांची विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली आणि ते एकूणच प्रसिद्धीस पावले.
इथे स्‍पष्‍ट करु इच्‍छितो की युजींनी कधीही 'हे घ्‍या माझं तत्वज्ञान' अशी भूमिका घेतलेली नाही. टेल देम दॅट देअर इज नथींग टु अंडरस्‍टँड हे तुम्ही वर लिहीलंच आहेत. त्यांची पुस्तकं जरुर आहेत, पण ती युजींनी अजेंडा म्हणून लिहवून घेतलेली नाहीत. ज्यांना युजीचे विचार मोलाचे वाटले त्यांनी त्यांना ग्रंथरुप देण्‍याचा उद्योग केला. दुसरी गोष्‍ट अशी की युजी कृष्‍णमूर्ती पूर्वायुष्‍यात जरी जगप्रसिद्ध वक्ते असले तरी, रुपांतरणोत्तर मात्र ते भाषण देऊ शकत नसत. हां, ते तुकड्‍या तुकड्यातील संवाद जरुर साधत. हा संवादच पुस्तकांत ग्रथीत करण्‍यात आला आहे. त्यामुळं 'विविध ठीकाणी भाषणं आयोजीत केली गेली' म्हणणं निखालस चुकीचं आहे. मुलाखती जरुर घेतल्या गेल्या. रुपांतरणांनंतर त्यांचं एकच व्याख्‍यान झालं, जे ऐकलं तर कळु शकेल ती युजींना सलग बोलणे, सलग एक विचारधारा पकडून बोलत रहाणे अशक्य बनले होते.
योग आणि ध्यान करणार्‍यांच्या साधनेमध्ये त्रुटी किंवा चूक घडल्यास त्याचे परिणाम त्यांच्या मनाला भोगावे लागतात असं योगशास्त्रात सांगितलं जातं. हे परिणाम क्लेश स्वरूपात त्यांचे मन त्रिगुणांपैकी (सत्त्व-रज-तम) ज्या गुणाच्या अधिपत्याखाली असेल त्यानुसार घडून येतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश होत. पातंजल योगसूत्रांमध्येही या क्लेशांना अविद्याजन्य मानलेलं आहे. हे इथे सांगण्याचं कारण इतकंच की असाच काहीसा प्रकार युजींच्या बाबतीत घडला असावा आणि त्यालाच त्यांनी त्यांना स्वतःला अनुभवाला आलेलं 'रुपांतरण' असं मानलं असावं.
पातंजल योगसूत्रातील माहीतीसाठी धन्यवादच, ही माहिती माझ्‍यासाठी नवीन आहे. पण युजींचं रुपांतरण फक्त मानसिक नसून ते पूर्णत: शारीरिक आहे हे लक्षात घ्‍या. त्यांच्या प्रत्येक संवादात 'शरीर' हा मुख्य घटक आहे आणि ते मनोव्यापार, मन सरळसोटपणे उडवून लावतात. मनाचं अस्तित्व युजी जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हाही त्यांना जाणवलं नाही. मन नसतं हा त्यांचा जुनाच स्‍वानुभव होता. इथे युजी आणि इतर दा‍र्शनिकांमधला रुपांतरणोत्तर फरक ठळक करु इच्छितो की, युजी वगळता जवळपास सर्वांचं (अगदी गौतम बुद्ध, महावीर ते अलीकडचे जे. कृष्‍णमूर्ती, रजनीश, एकहार्ट टुली, मुजी, पुंजाजी आणि असेच जेवढे असतील तेवढे ) मानसिक रुपांतरण घडल्याचे दाखले आहेत, युजीच्या रुपांतरणाचा आधार पूर्णत: शारीरिक आहे. युजीबद्दल मी इथे लिहिलेली लेखमाला वाचली तर जाणवेल की त्यांनी रुपांतरण 'मानलं' असे मानणे निखालस गैरसमजाचे होईल. जे बदल शरीरात/वर दृश्य रुपात स्पष्‍टपणे दिसले आहेत, ते कुणी मानण्‍या न मानण्‍याची काय पत्रास?
यासाठी किती काळ लागतो वगैरे सूत्रांमध्ये दिलेलं नाही पण युजींची ही अवस्था आठ दिवस होती असं त्यांच्या शब्दांतूनच कळतं. युजींच्या भ्रमित अवस्थेला सुरूवात झाली ती इथेच असं मला वाटतं.
शरीरात बदल घडून ते स्पष्‍ट दिसायला सुरुवात झालेली असताना ती भ्रम सुरु होण्‍याची अवस्‍था होती असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे आपल्यासारख्‍या आयुर्वेदाचार्याला मी सांगू काय?
युजी म्हणतात - भाषा व भाषेतील शब्द हा अफाट पसरलेल्या या जगाचा प्रतिमारूप जीवनतत्त्वविरहित चिह्नांचा समुदाय आहे आणि मानव त्यांचा ठिगळरूपाने स्वतःच्या संकुचित विचारांना व्यक्त करण्यासाठी वापर करतो. संपूर्ण जगाला व्यक्त करण्याचं सामर्थ्य असूनही संकुचित वापरामुळे शब्द तुकड्यातुकड्यांच्या स्वरूपातंच अभिव्यक्त होतात आणि एखाद्या जिग्सॉ पझलप्रमाणे हे तुकडे एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या तशा स्थितीतील वापरामुळे त्यांच्या योजनेतून कोणतंही योग्य चित्र उमटू शकत नाही. व्यक्ती जेव्हा अशा चिह्नांचा संवादासाठी वापर करते तेव्हा त्या चिह्नांवर त्या व्यक्तीच्या अभिनिवेशांचं आरोपण होऊन त्या चिह्नांमध्ये जीव येतो.
हे युजींचे विचार नाहीत. त्यांच्या मनात शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही हा बीजरुप विचार घेऊन मी पुढे मांडलेली भुमिका म्हणा हवं तर. मी मांडलेली ही भूमिका चुकीची आहे असं म्हटलंत तर चालेल, पण हे युजींचे विचार आहेत असं म्हणू नका, ते चूक असोत, बरोबर असोत पण ते त्यांचे विचार नाहीत.
त्याचप्रमाणे ते जेव्हा भाषेला जगाची प्रतिमा मानतात (मुळात हा विचारच किती निरर्थक आहे? तुम्ही जगालाच नाकारता मग त्याची ही प्रतिमा कुठून पैदाकरता?)
प्रतिमा युजी पैदा करीत नाहीत, तुमच्या-आमच्या मनात जी प्रतिमा आहे त्याबद्दल ते बोलतात. देअर इज ओन्ली धीस रिअॅली‍टी, देअर इज नथींग मोर फॉर मी दॅन धीस (हे धीस म्हणजे जग जसं आहे तसं).
"जगात काहीही जाणण्यासारखं नाही, जे काही आहे ते केवळ काही असंबद्ध वाक्यं आहेत, ज्यांची संगती तुम्ही लावण्याचा प्रयत्न करता," अशा वाक्यांमधून (सं - विकी) युजींची वैचारिक दिवाळखोरीच दिसून येते असं मला वाटतं''
'युजींची वैचारिक दिवाळखोरी' हा फार चांगला शब्दप्रयोग केला आहे. ज्यावेळी ते रुपांतरणातून बाहेर पडले तेव्हाच ते विचारमुक्त झाले होते. ते विचाराच्या बाबतीत खरोखर दिवाळखोरीत जगले, पण वेगळ्या अर्थानं. मग ते जे बोललेत ते काय आहे? असं विचाराल तर त्यांना जेव्हा प्रश्न विचारले जात त्यावर ते बोलत आणि हे बोलणे म्हणजे 'समोरच्याच्या मनात जे आहे ते जसंच्या 'इथं' (युजी नावाचे जे काही पटल असेल त्यावर) तसं विचारां/शब्दांद्वारे किंवा शिवाय प्रतिबिंबीत झालेलं आहे.' इथं एक किस्सा सांगण्‍याचा मोह होतो. युजी समोरचा माणूस काहीही बोलला नाही तरी त्याच्या मनातले विचार ओळखू शकत याचं चित्रिकरण हे एका चित्रीकरणात आलेलं आहे. युजींसोबतच्या बैठकीत बसलेल्या महिलांतील एक सुंदर महिलेला पाहून तिच्याशी संग करता आला तर किती बरं असा विचार त्या बैठकीत बसलेल्या महेश भट यांच्या मनात आला. युजींनी तिथल्या तिथे महेश भट यांना त्यांच्या ब्रॅण्‍डेड शैलीत झोडपून काढून 'तिला मिठीत घ्‍यावं वाटतंय तर घेत का नाहीस (ती तुझ्‍या थोबाडीत मारील हा भाग वेगळा!) , पण तिथं तुझ्यात भरलेली नैतिकता, समाजाचे नियाम आडवे येतात... यामुळंच तुमच्याकडून कधीच जशी घडायला हवा ती कृती घडत नाही' हे सुनावलं होतं. महेश भट यांनी त्यांच्या मनात असे विचार आल्याचे नाकारलेले नाहीच, स्‍वीकारलेलं मात्र आहे. तुम्ही स्वत:च पहा:

This Is a Dog Barking

ऐकणार्‍याला हातात काहीच मिळत नाही.
हे मान्य करतो. काही मिळण्‍यासाठी जे युजी वाचतील त्यांच्या हातात काहीही पडत नाही. उलट जे काही जमवलं असेल त्यावरुन हात धुवून बसावे लागते. हा माझा स्वानुभव आहे. मी माझ्‍यालेखी शब्दांचे महत्व गमावून बसत आहे हा स्वानुभव आहे.
मात्र असं असूनही युजी अंगाला काहीच लाऊन घेत नाहीत. त्यांनी ज्ञानालाच नाकारलेलं असल्याने ते कोणतं तरी ज्ञान देत आहेत असं ते स्वतःच मानत नाहीत पण त्याचवेळेला ऐकणार्‍याला त्यांच्या विधानांची संगती लावण्याच्या दृष्टीने त्यांच्या मते मृत भाषेतील शब्दांचे बुडबुडे ते सोडतच असतात मात्र हे बुडबुडे त्यांची मानसिक अवस्था समजावी म्हणूनच असतात, हे एक गौडबंगालच आहे.
युजींना स्वत:साठी त्यांचे स्वत:चेही शरीर जाणवत नव्हते... मग अंगाला कसे काय लाऊन घेतील ;-) विनोद सोडा. माझी मानसिक अवस्‍था समजून घ्‍याच, असा त्यांचा आग्रह कधीच नव्हता. त्यांच्या अवस्‍थेत आणि आपल्या अवस्‍थेत मूलभूत फरक आहे आणि तो काय आहे हे ज्यांना समजून घ्‍यावं वाटलं त्यांच्यासाठी युजींना शब्दांचे बुडबुडे सोडावे लागले. यात गौडबंगाल काहीही नाही.
करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे.
युजींच्या बोलण्‍यातून कसलाही तात्त्विक किंवा अध्‍यात्मिक अर्थ मी काढत नाही. काही असेलच, तर ते प्रॅक्‍टीकली मला कसं लागू होतं हे अनुभवण्‍याचा प्रयत्न मी जरुर करतो. भजनी लागणे वगैरे प्रकार युजींच्या बाबत संभवत नाहीत, हे आपल्याला माहित नसण्‍याचे कारण म्हणजे आपली युजींशी पुरती ओळख झालेली नाहीय. त्यांना वाचायला गेलं तर प्रत्येक क्षणी, मनात आलेला प्रत्येक विचार छाटून काढतात, अगदी 'वैचारिक दिवाळखोरीत' ढकलतात. ही विशिष्‍ट वैचारिक दिवाळखोरीच (विचारांपासून मुक्त होणे) मला वाटतं सत्य जाणू इच्छिणार्‍यांना अपेक्षित असते. त्यामुळे भजनी लागणार्‍यांची शोकांतिका आहे वगैरे म्हणणे हे या विषयात नेहमीच केल्या जाणार्‍या विधानांप्रमाणे एक 'स्वीपिंग स्‍टेटमेंट' आहे.
युजी स्वतः सांगतात की मी सगळं नाकारतोय पण लोकंच त्यांच्या त्यांच्या डोक्याने त्यांच्या (युजींच्या) असंगत वाक्यांतून अर्थ काढत बसतात आणि अखेर काहीच हातात न मिळाल्याने निराश होतात. युजींच्या वक्तव्यांचा विचार करता ते त्यांना प्रश्न विचारणार्‍याचा प्रत्येक मुद्दा नाकारतात. प्रश्नकर्ता कोणत्यातरी अडचणी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याच्या अडचणी व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या शब्दांनाच नाकारतात. नंतर त्याच्या अडचणींनाच नाकारतात. पुढे त्या व्यक्तीच्या जाणीवांनाच नाकारतात आणि अशा प्रकारे आपल्या अडचणींचा सामना करताना मेटाकुटीला आलेला जिज्ञासू अधिकच संभ्रमात पडतो आणि त्यांच्या नकारात गूढ अर्थ शोधू लागतो. यातच पुढे अधिकाधिक गुरफटत जातो. अशा प्रकारचा विचार काहीही निष्पन्न करत नाही आणि असे असंबद्ध नि 'गूढ' विचार व्यक्त करण्यासाठी युजींसारखं रुपांतरणही आवश्यक नसतं. आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात. भांग खाऊन व्यक्त केलेले नसले तरी युजींचे विचार तसाच एक कल्पनाविलास वाटतो. खरं तर युजींच्या या तथाकथित तत्त्वज्ञानाचं (पुन्हा वदतोव्यघात) वेगवेगळ्या प्रकारे खंडन करता येणं शक्य आहे. अनेक संदर्भ आणि शास्त्रवचनं यासाठी देता येतील पण ज्यांनी स्वतः तत्त्वज्ञानाचा पाया असलेलं शाश्वत सत्य नाकारलं, त्या सत्याचं ज्ञान नाकारलं, त्या सत्याच्या ज्ञानाचं साधन नाकारलं आणि जग तथा जीवनासंदर्भात कुठल्याही तर्‍हेची साध्यं नाकारली अशा व्यक्तीला फक्त 'नाकारून'च त्याच्या मतांचं खंडण करणं मला अधिक योग्य वाटतं.
तुमच्यात माझ्‍याही चिंध्‍या करण्‍याचं धैर्य जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही सत्य जाणलेलं असेल अशा अर्थाचं युजींचं एक विधान आहे. पण त्यांना नाकारणं हे युजींचं पूर्णपणे परिशिलन करुन या विषयात आलेल्या स्वानुभवातून घडत असेल तर आनंदच आहे. पण पुरेसं समजून न घेताच घाईत निष्‍कर्ष काढला जात असेल तर मला आपल्याला थांबवायला आवडेल. ही वाक्ये तशीच वाटतात, म्हणून त्यावर सखोल लिहीत नाही.

In reply to by यकु

चित्रा 16/11/2011 - 03:08
वरील चित्रफितीत महेश भटांना दिलेला सल्ला हे ते शेवटी क्रूड एक्झांपल आहे हे म्हणतात ते बरे झाले. कोणी हा सल्ला पाळला नाही म्हणजे मिळवले! मी माझ्‍यालेखी शब्दांचे महत्व गमावून बसत आहे हा स्वानुभव आहे. म्हणजे काय? कसलेही वर्णन करण्यास प्रतिमा पुरेशी असते?

In reply to by चित्रा

यकु 16/11/2011 - 03:19
म्हणजे काय? कसलेही वर्णन करण्यास प्रतिमा पुरेशी असते?
हे मी माझ्याबद्दल लिहिलं आहे. म्हणजे माझ्यालेखी माझ्यासमोर येणार्‍या शब्दांना फारसं महत्व नाही. त्या शब्दांतून जी प्रतिमा उभी होत असते ती फारतर लक्ष देण्यासारखी असेल.

In reply to by यकु

रामपुरी 16/11/2011 - 03:28
चित्रफीतीबद्दल धन्यवाद. सगळं संभाषण नीट ऐकल्यावर पूर्वीचा निष्कर्ष पक्का झाला. "आणखी एक तद्दन भंपक बाबा" बाकी विचार ओळखण्याबद्दल म्हणाल तर असले "चमत्कार" कुणीही थोडीफार निरिक्षणशक्ती असलेला आंडूपांडू करू शकतो.

In reply to by रामपुरी

यकु 16/11/2011 - 03:48
चित्रफीतीबद्दल धन्यवाद. सगळं संभाषण नीट ऐकल्यावर पूर्वीचा निष्कर्ष पक्का झाला. "आणखी एक तद्दन भंपक बाबा"
आपण जर युजींबद्दल माझ्या लेखमाला वाचून त्यांच्याबद्दलचं हे मत बनवलं असेल तर तो दोष माझ्या तोकड्या लिखाणाकडं आणि मांडणीकडे जातो. मी आपल्याला याबद्दल पुन्हा एकदा स्वतःच्या कोर्‍या पाटीनं प्रयत्न करुन पहावा, आणि तरीही असाच निष्कर्ष निघाला तर योग्य ते मानावं असा सल्ला देईन.
बाकी विचार ओळखण्याबद्दल म्हणाल तर असले "चमत्कार" कुणीही थोडीफार निरिक्षणशक्ती असलेला आंडूपांडू करू शकतो.
हा चमत्कार आहे म्हणून व्हिडिओ इथे टाकलेला नाहीय. शब्दांच्या विना देखील कुणाचेही मंतव्य कुणालाही स्पष्ट दिसू शकते हे याचं दृश्य उदाहरण आहे म्हणून तो टाकला आहे. चमत्कार हा विशिष्ट पठडीतून विचार करणार्‍यांनी तयार केलेला शब्द आहे. आणि थोडेफार चमत्कार कुणीही करु शकतो, जसा हा प्रतिसाद देऊन आपण केलात !

In reply to by यकु

पहिल्यांदा एवढ्या चांगल्या चर्चेबद्दल दोघांचेही अभिनंदन करतो व धन्यवादही वर दिलेलेच आहेत. चर्चा अत्यंत योग्य अशा वातावरणात चालली असून ती अशीच याच वातावरणात चालू राहूदेत ही सर्वांना विनंती. शेवटी मतांना विरोध करतानासुद्धा आपण त्यातूनही काहीतरी ग्रहण करत असतोच. काही प्रश्न पडले आहेत ते काही काळाने विचारतोच.

In reply to by जयंत कुलकर्णी

Nile 17/11/2011 - 08:17
शेवटी मतांना विरोध करतानासुद्धा आपण त्यातूनही काहीतरी ग्रहण करत असतोच.
असं काय नसतंय हो जयंतराव. हे वाक्य त्या व्हिडिओतल्या निरर्थक संवादासारखंच आहे.

In reply to by यकु

प्रास 16/11/2011 - 13:17
धन्यवाद यशवंतराव! आमच्या अल्पस्वल्प मतिनुसार लिहिलेल्या लेखावर अपेक्षेप्रमाणे तुम्ही अगदी विस्तृत प्रतिसाद दिलेला आहे. आधी एक गोष्ट पुन्हा एकदा ध्यानात घ्या की तुमच्या सारखा मी काही युजींच्या मताचा अभ्यासक नाही. किंबहुना तुमच्या त्या संबंधीच्या लेखांनीच माझं युजींकडे लक्ष गेलं आणि त्यासंदर्भात काही वाचन झालं. तुम्ही शब्दासंबंधी लिहिलेल्या लेखाने आणि त्यावरील मतप्रदर्शनाने वरचं लिखाण झालं. मला व्यक्तिशः कोणत्याही तत्त्वज्ञ आणि ज्ञानी माणसाकडून काही लोकोपयोगी कार्याची अपेक्षा असते. आपल्याकडील ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग लोकांच्या वैचारिक अडचणींवर उतारा म्हणून व्हावा असं काहीसं मला अपेक्षित असतं अन्यथा त्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा उपयोग तो काय? अर्थात माझं असं म्हणणं नाही की हे मत सर्वमान्यच व्हावं पण त्याला सर्वसामान्य म्हणायला काय हरकत असावी? ज्या वेळी एखादी व्यक्ती ज्ञानी म्हणून समोर येते, त्यांना आलेल्या असामान्य अनुभवाबद्दल सांगते, त्या अनुभवांमुळे त्यांच्यात झालेल्या व्यक्तिगत बदलांचं वर्णन करते आणि एका अर्थात लोकांना त्याद्वारे स्तिमित करते, त्या व्यक्तीकडून आपोआपच समाज काही अपेक्षा करतो. समाज हा जनसामान्यांनीच बनलेला असतो. तेव्हा जनसामान्यांची अपेक्षा त्यांना पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची प्रामुख्याने असते. त्यांना त्यांच्या अडचणीतून एक 'वे आऊट' हवा असतो. शक्य झाल्यास काही उपायांची अपेक्षा असते. युजी लोकांना त्यांच्या अनुभववर्णनाने स्तिमित करतात पण त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नसतात. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना युजी त्यांच्या 'तथाकथित' रुपांतरीत अवस्थानुरूप उत्तरं देतात पण प्रश्नकर्ती मंडळी त्यांच्याप्रमाणे रुपांतरणाचा अनुभव नसलेली आहेत ना, त्यांना युजींचं म्हणणं कसं कळावं? यशवंतराव, तुम्ही म्हणता
शरीरात बदल घडून ते स्पष्‍ट दिसायला सुरुवात झालेली असताना ती भ्रम सुरु होण्‍याची अवस्‍था होती असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे आपल्यासारख्‍या आयुर्वेदाचार्याला मी सांगू काय?
खरं तर मला ते कसं चुकीचं आहे ते समजून घ्यायला आवडेल. कारण युजींचं तथाकथित रुपांतरण फक्त शारीर होतं हेच मला समजण्यासाठी कठीण आहे. केवळ ते स्वतः आणि त्यांचे मित्र तसं म्हणतात नि मानतात म्हणून मी ही तसंच मानावं असं तुमचं म्हणणं असेल तर किमान मला तरी ते अशक्य आहे. तुम्ही तुमच्या लेखांमध्ये या शारीर बदलांचं वर्णन केलेलं आहे. त्यातल्या बर्‍याचशा गोष्टी युजींचे स्वतःचे अनुभव आहेत. त्वचा, पापण्या वगैरे सोडा पण मेंदूची स्थिती कशी झालीय ते वाटणं, कानाचं जवळचा आवाज दूरून वगैरे विविध प्रकारे ऐकू येणं, डोळ्याने भिंगांसारखं दिसणं इ. इ. वर्णनं युजींचे स्वतःचे अनुभव असल्याने ते सर्वमान्य व्हावेत असा आग्रह मान्य करता येत नाही. त्यातही पुन्हा
मनाचं अस्तित्व युजी जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हाही त्यांना जाणवलं नाही. मन नसतं हा त्यांचा जुनाच स्‍वानुभव होता.
हे असलं आम्ही का मान्य करावं? आता तुम्ही भ्रम सुरू होण्याच्या अवस्थेबद्दल विचारलंच आहेत तर त्यावर काही सांगू इच्छितो. युजींनी वर्णन केलेली रुपांतरणाच्या वेळची लक्षणं वात दोषाच्या विकृतीची दिसतात. वात विकृतीमधून अशा अवस्थेत भ्रम हे व्याधीलक्षण होऊ शकते. भ्रमात असलेल्या व्यक्तीला जाणवलेल्या गोष्टी तो वर्णन करू शकतो पण ती त्याची शारीरिक स्थिती असेलच असं नसतं. युजी मनाला मानत नाहीत म्हणून त्यांच्या शरीरातलं मनाचं अस्तित्व मी देखिल मानू नये असं तुमचं सांगणं आहे का? तर तसं मला करता येणार नाही. त्यांच्या तथाकथित मृत्यु विषयीसुद्धा मला भ्रमाचीच शक्यता वाटते. शेवटी त्या अवस्थेनंतर ते जीवित राहिले होते तर किमान आयुर्वेदातल्या जीविताच्या व्याख्येनुसार "शरिरेन्द्रिय सत्त्वात्मसंयोगो धारि जीवितम्।" (चरक संहिता) त्यावेळी त्यांच्या ठायी शरीर, इन्द्रिय, मन आणि आत्मा यांचा संयोग नक्कीच होता. तिथे मन होतं, युजींनी ते मानलं काय न मानलं काय, त्याने काहीच फरक पडत नाही. मन त्यांना आवश्यक असेल तेव्हा तेवढ्यापुरतं उभं राहतं आणि गरज नसताना पूर्ववत पडून राहतं म्हणून ते नसतंच हे असलं आयुर्वेदाला तरी मान्य नाही हे नमूद करू इच्छितो. असो. कुणी युजींना मानावं, त्यांच्या मतांच्या संग्रहांचा, संवादांच्या संग्रहांचा अभ्यास करावा, त्याने स्वतःची मत बनवावी हे व्यक्तिशः मी त्यांच्या त्यांच्यावरच सोडेन. वैयक्तिकरीत्या किमान माझ्यापुरते मी ते नाकारलेलेच आहेत. हीच माझ्याकडून लेखन सीमा होय.

In reply to by यकु

प्रास 16/11/2011 - 20:00
काय आहे, या अशा विषयांवर होऊ शकणार्‍या प्रतिसादांच्या प्रतिसादांची सीमा गाठणे कठीण आहे. कुठेतरी ठरवून सीमा आखावीच लागते. शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाची मतं आहेत आणि ती तो नेहमी ठामपणे मांडत राहणारच आहे. आपली मतं एकमेकांना पटली नाहीत तरीही आपण एकमेकांच्या मतांचा आदर निश्चितच करू शकतो, असंच मी मानतो.

In reply to by प्रास

यकु 16/11/2011 - 21:09
अगदी.. अगदी सुरुवातीला कित्येक वेळा युजी हे ठार बुद्धीभ्रष्ट आहेत असं मलाही कित्येकदा वाटलं होतं. म्हणून कुणी युजींच्या नावाने काहीही म्हटले तरी त्यात आश्चर्य वाटत नाही. ठाम विचार मांडण्यामागे फक्त तोंडओळखीवरुन काही महत्वाचं सुटू नये एवढाच विचार होता.

यकु 16/11/2011 - 02:59
करून सवरून नामानिराळं राहण्याच्या युजींच्या या कृतीचा निषेध करावा तितका थोडा आहे. पण दोष त्यांना तरी का द्या? त्यांच्या असंगत आणि भ्रमिष्टावस्थेतील बोलण्यात काही तरी तात्त्विक आणि अध्यात्मिक अर्थ सामावला आहे अशी कल्पना करून त्यांच्या भजनी लागणार्‍या लोकांचीच ही खरी शोकांतिका आहे
आणखी सुसंगत उत्तर सुचले म्हणून हा पुन्हा एक प्रतिसाद. 'करुन सवरुन'बद्दल सांगतो - युजींच्या जीवनकालात त्यांच्या अवतीभवती कुठलीही संस्था त्यांनी उभी राहू दिली नाही. विकण्यासारखं कोणतंही प्रॉडक्ट आपल्याकडे नाही, कसल्याही आध्यात्मिक प्रश्नावर आपल्याकडे उत्तर नाही हे युजी सांगत असत. उत्तरे मिळवण्यासाठी जे आध्यात्मिक गुरु बाजारात बसले आहेत त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला युजी देत. निषेध करायचा असेल तर त्या तथाकथित आध्यात्मिक गुरुंचा करा जे केवळ शब्दच्छल करुन, येनकेन प्रकारेण लोकांना गंडवण्याच्या युक्त्या वापरुन स्वतःचे साम्राज्य उभे करतात. १. रूपांतरणोत्तर आयुष्यात युजी कधीही डॉक्टरांकडे गेले नाहीत. शरीर हे स्वतः ला बरं करुन घेण्यात स्वतःच समर्थ असतं असे ते मानायचे. याचा अर्थ कुणीही डॉक्टरांकडे जाऊ नये असे त्यांचे म्हणणे नव्हते. वेदना होत असतील तर जरुर डॉक्टरांचे उपचार करायला हवेत असे ते सांगायचे. पण 'शुट ऑल डॉक्टर्स ऑन साईट अ‍ॅण्ड अ‍ॅट साईट... वी डू नॉट नीड ऑल दोज स्क्रौंड्रल्स' असेही त्यांचे एक विधान आहे. २. रुपांतरणोत्तर आयुष्यात युजींनी कधीही 'हेल्थ फूड' किंवा कसलेही आहाराचे चोचले केले नाहीत. केवळ सॉलिड क्रिम आणि चीज हा त्यांचा मरेपर्यंत ६०-७० वर्षे आहार राहिला. तुम्ही अन्न खात नाही, संकल्पना खाता असं त्यांचं म्हणणं असे. लोक अवतीभवती जमा होतात म्हणू युजी दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त एका ठिकाणी रहात नसत. युजी हे एखाद्या गावी जाण्यासाठी विमानाचं बुकींग करतात, ते लगेच दुसर्‍या गावी जाण्यासाठी असे त्यांचा ट्रॅव्हल एजंट म्हणत असे. यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - कुठेही कुठली संस्था न उभारता, 'टिचींग' चा कसलाच अजेंडा नसताना! मी मेल्यानंतर बागेतलं गांडूळ जसं सडून जातं तसाच सडेन हे त्यांचं म्हणणं होतं. ते इटालीतील व्हॅलेक्रोशिया येथे अगदी एकांतात, त्यांना ऐकाणार्‍या, शेवटचं पहाण्यासाठी जमलेल्या लोकांच्या कसल्याही सेलिब्रेशन शिवाय त्यांचा मृत्यू झाला, आणि तो तसाच व्हायला हवा हे त्यांनी सांगून ठेवलं होतं.

In reply to by रामपुरी

आत्मशून्य 16/11/2011 - 03:51
जन्माचं सेलीब्रेशन होतं. जन्म दीवसाचही होतं मग जर आर्थीक तरतूद असेल तर सामोर्‍या गेलेल्या मृत्यूच सेलीब्रेशन का नसावं ? इतकी का ती अनैसर्गीक घटना आहे ?

In reply to by आत्मशून्य

यकु 16/11/2011 - 03:54
युजी हे त्यांना ऐकायला येणार्‍या लोकांमध्ये कितीही नाही म्हटलं तरी 'एक पोचलेली विभूती' मानले जात होते. अशा व्यक्तीची गेल्यानंतर समाधी बांधणे, त्याच्या मृत्यूसमयी/नंतर काही विशेष गोष्टी करणे वगैरे केले जाते, ते केले नव्हते या अर्थाने 'सेलिब्रेशन.'

In reply to by यकु

मराठी_माणूस 16/11/2011 - 08:54
काही शंका यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - ह्याचा सर्व खर्च कोणी केला. जे.कृष्णमुर्ति आणि युजींच्या तत्वज्ञानात काय फरक आहे ?

In reply to by मराठी_माणूस

यकु 16/11/2011 - 23:34
यातून त्यांनी आफ्रिकेतील काही देश सोडले तर जगभरातील देशांत प्रवास केला - ह्याचा सर्व खर्च कोणी केला.
व्हॅलेंटाईन डी कार्व्हान या बाईंनी युजींच्या प्रवासासाठी स्वखर्चाने एक फंड उभारला होता, त्यातून तो खर्च होत असे. व्हॅलेंटाईनने कधीही युजींबद्दल कसलेही मतप्रदर्शन केलेले नाहीय. त्या शेवटी बंगलोर मध्ये, युजींच्या मित्रांकडे रहात असत. तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या डायरीत युजीबद्दल 'व्हेअर एल्स इन दि वर्ल्ड आय कुड हॅव फाऊंड सच ए मॅन लाईक युजी' असं एकच विधान आहे. यावर आता शेवटी व्हॅलेंटाईनला का होईना लुटलेच ना ? असे म्हणायचे असेल तर मी अगोदरच असं म्हणून ठेऊ इच्छितो की माणसांदरम्यान ऋणानुबंध निर्माण होऊच शकत नाहीत असे ज्याला वाटत असेल त्याने असा जरुर विचार करावा.
जे.कृष्णमुर्ति आणि युजींच्या तत्वज्ञानात काय फरक आहे ?
मलाही माहित नाही. तो समजून घ्यावा लागेल.

धनंजय 16/11/2011 - 05:28
दिलेले संदर्भ वाचले. येथे शून्यवादाचे तत्त्वज्ञानही आहे, आणि यूजी हे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात त्या तत्त्वाला जमेल तितके प्रामाणिकही होते. त्यांच्या अनुयायांबाबत आपली "जो जे वांछील" अशी भूमिका हवी. (इतपत लेखकाशी असहमती सांगतो आहे.) महेश भट यांच्यासह संवादाची चित्रफीत बघितली. जर अनुयायांना यूजी यांची तत्त्व-प्रामाणिक स्थिती हवी असून मिळवता येत नसेल, तर तत्त्वज्ञान शिकवण्याच्या पद्धतीचा तरी विरोध करण्यालायक आहे. (इतपत सहमती सांगतो आहे.) मला पूर्ण शून्यवादाचे तत्त्वज्ञान पुरते पटत नाही. त्यातील (म्हणजे नेमके युजी नव्हे, तर शून्यवादातील) कुठला भाग पटतो, आणि कुठला भाग पटत नाही, ते वेगळ्या लेखात लिहिलेले आहे.

ऋषिकेश 16/11/2011 - 09:28
आतापर्यंत मी जितके युजींचे जे लिखाण वाचले आहे ते वाचुन मला अजिबात पटलेले नाहि.. उगाच आपलं कै च्या कै लिहायचा हा माणूस (असं मला वाटलं.) युजींचं वाचलं की पुलं च्या "आमच्या गुरुदेवांकडे चला.. मग तुम्हाला ब्लड म्हणून नाहि प्रेशर म्हणून नाही... काहि राहणार नाही" हे वाक्य आठवतं! ;)

गवि 16/11/2011 - 09:35
युजींचं तत्वज्ञान (!! हा शब्द तरी कसा वापरावा??!) किंवा त्यांची विचारस्थिती (हे जास्त बरोबर होईल मला वाटतं) हे नक्कीच १. एकदम फारच टाकाऊ वाटेल किंवा २. एकदम फारच आकर्षून घेणारं वाटेल या दोन एक्स्ट्रीम्सचंच आहे. त्यांचं रिअलायझेशन (पुन्हा त्यांचे विचार किंवा त्यांची मतं हा शब्द टाळतोय..) निव्वळ थिऑरिटिकली योग्य्/बरोबर्/सत्य/ परम सत्य असं काहीही असू शकेल. तशा अनेक कन्सेप्टस प्युअर थिअरीमधे मान्य करण्यासारख्या असतात (मल्टिव्हर्स/ पॅरेलल युनिव्हर्स/ एन्-डायमेन्शनल जॉमेट्री / वक्राकार स्पेसटाईम.) पण ... आपण शेवटी प्रत्येक विचाराचा (भले मिथ्या आयुष्य का असेना पण) आपल्या आयुष्यातला रिलेव्हन्स बघतोच.. आणि या युजींच्या विचारांचा "उपयोग" किंवा त्याने काही "फरक पडत असल्याचं" युजींनीही अमान्यच केलं असेल.. शिवाय युजी काही सिद्धही करु शकत नाहीत / इच्छित नाहीत.. "समजून घेण्यासारखं काही नाही" हा एक विचार आहे. पण तो अर्थहीन आहे. (थ्री डायमेन्शनल स्पेसमधे (०,०,०) असाही एक पॉईंट असतो.. पण त्यामधे एक्स वाय आणि झेड मधल्या परस्पर ओरिएंटेशनची स्पेसिफिसिटी नष्ट झालेली असते.. त्यामुळे या बिंदूचे ज्ञान होऊन किंवा न होऊन खास काही फरक पडतो असे नव्हे..) ऑल सेड अँड डन: युजींच्या "विचारां"ची थिअरी मांडणं म्हणजे "मी याक्षणी गाढ झोपेत आहे" असं मोठ्याने ओरडून सांगण्यासारखं पॅरेडॉक्सिकल आहे..

In reply to by गवि

गवि 16/11/2011 - 10:00
पुलंचं एक वाक्य आठवलं ते देण्याचा मोह अनावर होतोय.. >>>>>>>>>> "तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापेक्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल !"

In reply to by गवि

आत्मशून्य 16/11/2011 - 17:32
तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? फारच सूंदर वाक्य. निराश मनाला तर एकदम उल्हासीत करणारं, हवहवस वाटणारं. भौतीक सूखं राखण्याच्या नादात दमलेल्या प्रत्येकाला क्षणापूरतं आपलसं वाटणारं. पण काळ्या दगडावरची रेघ असतं तर ज्यांनी दारासमोर फुलबाग केली आहे! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागतो हे संपूर्ण अनूभवलेलं आहे ते शून्याला भागायच्या फंदात कधीच पडले नसते.

मन१ 16/11/2011 - 11:59
"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " असे प्रत्यक्सहत कधीच हातात तल्वार न घेणारे, "मौ मेणाहूनी" असलेले आमचे तुकोबा का म्हणत असतील, कुनाशी युद्ध करत असतील ह्याची पुसटशी कल्पना येते आहे (की कल्पना आल्याचा भास होतोय?) बाकी, यकुच्या जोशात(मराठी गंडलं) लिहिल्यासारख्या वाटणार्‍या भाषेतही आध्यात्मिक गुरु बाजारात बसले आहेत किंवा अ ब्युटिफुल व्हायोलन्स अशी अनेक वाक्ये गंमतीशीर वाटतात. बाकी युजींचा इतका अभ्यास केलात हे उत्तमच. पण तरीही आम्ही तरी वरती गविंच्या प्रतिसादातल्या पुलंशी ११०% सहमत. भरपूर खा, व्यायाम करा. एखादा छंद जोपासा. कुणाच्या चेहर्‍यावर हसू आणता आलं तर ते करा. तत्वज्ञान वाचत बसण्याइतकं मानवी आयुष्य पुरेसं नाही. थोडक्यात, "तुझे आहे तुजपाशी" च्या एका प्रयोगाला मी माझ्या मित्रांना स्पॉन्सर करण्यास तयार आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

यकु 16/11/2011 - 19:34
मी रजनीशांचं बरच वाचलेलं आहे. अंतर्जालावर उपलब्ध असलेल्या युजींबद्दलच्या रजनीशांच्या मतांमध्ये आपण जे म्हणालात ते कुठेही उपलब्ध नाही. हे कुठे लिहीलेले असेल, आणि ते आपल्याकडे उपलब्ध असेल ते इथे टाकू शकता का? हा खोडसाळपणा मनात धरुन दिलेला प्रतिसाद असेल तर आपण इथे सांगितलेल्या ओशोचे तथाकथित मत सिद्ध करण्यासाठी आपण काहीही पुरावा देऊ शकणार नाही, आणि तशी अपेक्षाही नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

चित्रा 16/11/2011 - 20:16
का समलिंगी संभोगी आहे. य विषमलिंगी संभोगी आहे. फ पुरुष आहे. र स्त्री आहे. क काळा आहे. प गोरी आहे. ड नकटी आहे. तो ब्रह्मचारी आहे. कोणाही माणसाने काय सांगितलेले आहे ते तत्व आपल्याला पटते का? एवढाच प्रश्न आहे. अर्थात अविनाशकुलकर्णींकडून याचे उत्तर मला अपेक्षित नाही. (त्यांचे म्हणणे अधिक जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटली नाही हे माझ्यापुरते उत्तर).

सदर मत मेी एका पुस्तकात वाचले होत पण संधर्भ लागत नाहि..देवु शकत नाहि ..पुस्त्क खुप जुने आहे.. त्या मुळे विधान मागे घेत आहे.. यशवंत रावाना मानसीक यातना झाल्या त्या बद्दल दिलगीर आहोत...

In reply to by अविनाशकुलकर्णी

यकु 17/11/2011 - 01:15
सदर मत मेी एका पुस्तकात वाचले होत पण संधर्भ लागत नाहि..देवु शकत नाहि ..पुस्त्क खुप जुने आहे.. त्या मुळे विधान मागे घेत आहे.. यशवंत रावाना मानसीक यातना झाल्या त्या बद्दल दिलगीर आहोत...
स्वतःचा काहीही अनुभव नसताना आणि फक्त रजनीशांच्या एका 'जुन्या पुस्तकात' वाचल्याबद्दल आणि ते इथे सादर न करु शकल्याबद्दल दिलगीर झालात ते योग्यच. पण रजनीशांचं असं मत असलेलं कोणतंही पुस्तक असू शकत नाही कारण रजनीशांची सगळी मते (सन ६०-६२ पासुनची नंतरची ) जे. कृष्णमूर्तींबद्दल आहेत, युजी कृष्णमूर्तींबद्दल नव्हे! मला कसल्याही मानसिक यातना झाल्या नाहीत.

In reply to by प्यारे१

यकु 17/11/2011 - 23:00
आपल्याला नक्की काय म्हणायचे होते
तेच हो!
यकु साहेब? Wink
मायला लोक आम्हाला पूर्णपणे सटकलेली केस समजायला लागले राव! ;-) जाऊ द्या.. कि फरक पैंदा ;-)

आनंदी गोपाळ 21/11/2011 - 20:01
आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे की बाजारातून दोन पैशाची भांग आणून खाल्ली की तत्त्वज्ञानातल्या शेकडो नवनव्या कल्पना सुचू शकतात.
२ पैशात भांग आजकाल कुठे मिळते? शिक्षकांना भांगे(च्या तत्वज्ञाना)बद्दल कुठे माहिती मिळाली?

In reply to by आनंदी गोपाळ

प्रास 21/11/2011 - 20:15
२ पैशात भांग आजकाल कुठे मिळते?
२ पैशात भांग मिळणारे दिवस गेले आणि तेवढ्याला भांग आणणारे शिक्षकही गेले.....
शिक्षकांना भांगे(च्या तत्वज्ञाना)बद्दल कुठे माहिती मिळाली?
त्या वेळचे शिक्षक अगदी स्वानुभवसंपन्न होते असं म्हणायला हरकत नाही.... :-)
लेखनविषय:
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

दुखरी बाजू का खुपते?

आशु जोग ·

आशु जोग 13/11/2011 - 21:12
अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू असताना अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनाची सर्वागीण चिकित्सा करणारा विस्तृत लेख ‘लोकसत्ता’च्या ११ सप्टेंबर २०११च्या अंकात लिहिला होता. त्या लेखामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. अतुल कुलकर्णी यांच्या लेखातील महत्वाच्या मुद्यांचा प्रतिवाद करणारा हा लेख.. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आंदोलनाचा तितकाच जोरदार प्रतिवाद होणार, हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अपेक्षितच होते. अण्णा रूढार्थाने विचारवंत नाहीत. एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या प्रसिद्ध स्तंभलेखिकेने तर ‘लष्करी सेवेतून निवृत्त झालेला अर्धशिक्षित ट्रक ड्रायव्हर’ असाही त्यांचा उपहासात्मक उल्लेख केला आहे. ते पदवीधर नसले तरी ‘सु’शिक्षित आहेत, हे आमच्या अशिक्षित पदवीधरांच्या लक्षात आलेले नाही, एवढाच त्याचा अर्थ. आपली संस्कृती सांगते, ‘य: क्रियावान् स: पंडित:’ जो कृतिशील आहे तो पंडित. आणि या व्याख्येप्रमाणे अण्णा पंडित आहेत. पण रूढार्थाने पंडित नसल्याने अण्णांच्या बोलण्यात शहरी सफाई नाही आणि प्रामाणिक असल्याने त्यांच्यात खेडवळ बेरकीपणाही नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दांचा, जाणीवपूर्वक वा अजाणता, विपर्यास करणे विद्वानांना सहज शक्य होते. अण्णांच्या या उणिवेमुळे काही सरळ मनाच्या लोकांचाही त्यांच्या भूमिकेसंबंधी गैरसमज होणे शक्य आहे. अतुल कुलकर्णीचे काहीसे तसेच झाले असावे, असे त्यांच्या ११ सप्टेंबरच्या ‘लोकसत्ता’तील लेखावरून वाटते. त्यांच्या वैचारिक प्रामाणिकपणाबाबत आम्हाला संशय नसल्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा हा प्रपंच. गोरे ब्रिटिश आणि काळे ब्रिटिश अण्णांनी आपल्या राज्यकर्त्यांना काळे ब्रिटिश (खरे म्हणजे काळे इंग्रज) म्हणणे कुलकर्णीना धोकादायक वाटते. अण्णांना नेमके काय म्हणायचे आहे हे अगोदर समजून घेऊ. आमच्या राज्यकर्त्यांना काळे इंग्रज म्हणणारे अण्णा काही पहिले नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. सुरुवातीपासूनच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक धोरणाबाबत महात्मा गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद होते. एकदा ‘या मतभेदाचे नेमके स्वरूप काय आहे?’ असा प्रश्न एका वार्ताहराने गांधीजींना केला असता आपल्या नेहमीच्या शैलीत ते म्हणाले होते, ‘‘अगदी थोडक्यात फरक सांगतो. माझे स्वप्न आहे की येथून इंग्रजांची नीती हटली पाहिजे, भले येथे इंग्रजी राहिले तरी चालतील. या उलट जवाहरची भूमिका आहे. त्याला वाटते, इंग्रज येथून हटले पाहिजेत. भले इंग्रजांची व्यवस्था येथे चालू राहो.’’ स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधीजी आपल्यात फार दिवस राहिले नाहीत, पण इंग्रजांची नीती चालूच राहिली. अण्णांना नेमके हेच म्हणायचे आहे- नेते काळे, पण नीती इंग्रजांची. इंग्रजांची नीती होती रयतेने राजनिष्ठ राहून इंग्रज बादशहाची वा महाराणीची इमाने-इतबारे सेवा करावी; इंग्रजांची नीती होती, रयतेने संघटित होऊन विरोध करू नये यासाठी समाजात धर्मा-धर्मात, जाती-जातीत सतत दुफळी माजली पाहिजे; इंग्रजांची नीती होती, इंग्लंडच्या खजिन्यात भर पडली पाहिजे, हिंदुस्थानची प्रजा भुकेकंगाल झाली तरी विचार करण्याचे कारण नाही. बंगालच्या दुष्काळात दहा लाख लोक भुकेने मेले. सरकार त्यांना धान्य देऊ शकले असते, पण गुलामांचे जीव वाचविण्याची बादशहाला काहीच निकड नव्हती. जालियनवाला बाग एक बंदिस्त जागा होती. जमलेले लोक नि:शस्त्र होते. जमावात स्त्रिया आणि मुले होती. तरीही त्यांच्यावर निर्दयपणे गोळ्या झाडण्यात आल्या. ठार मारण्याच्या उद्देशानेच मारण्यात आल्या! कारण? प्रजेला राज्यकत्यांची दहशत वाटली पाहिजे. इंग्रजी राज्यव्यवस्था इंग्रज बादशहाचे वा महाराणीचे राज्य यावच्चंद्रदिवाकरौ निष्कंटक राहावे यासाठी निर्माण केली होती. रयतेच्या भल्यासाठी नाही. त्यांच्या शासनप्रणालीची पोलादी चौकट, त्यांची पोलीस दले, त्यांच्या सैन्यदलाची संरचना, त्यांची न्यायव्यवस्था, त्यांचे शैक्षणिक धोरण, त्यांचे याचे कायदेकानू, त्यांची दीर्घकालीन व अल्पकालीन धोरणे सर्व काही साम्राज्याच्या संवर्धनासाठी आणि राज्यकर्त्यांच्या भल्यासाठी निर्माण झाली होती. आज शासनव्यवस्थेत बदल झाला नाही असे नाही, पण तो बराचसा परिमाणात्मक आहे, गुणात्मक नाही. आजही जो शासनव्यवस्थेत असतो तो इंग्रजाप्रमाणे वागतो आणि शासनव्यवस्थेच्या बाहेर असतो तो मानसिक दृष्टीने स्वत:ला रयतच मानतो. आमचे आंग्रविद्याविद्याविभूषित प्रजाजनही गव्हर्नर आणि प्रेसिडेन्ट यांना ‘हिज एक्सलन्सी’ आणि ‘हर एक्सलन्सी’ असे संबोधण्यात धन्य मानतात. श्री. राज्यपाल आणि श्रीमती राष्ट्राध्यक्षा असे म्हणायचे धाडस करीत नाहीत. लोकप्रतिनिधींची किरकोळ टीकेनेही मानहानी होते. अगदी जनहिताच्या प्रामाणिक हेतूने धोरणात बदल करतानासुद्धा जनतेला विश्वासात घेणे आपले कर्तव्य आहे, असे आपल्या थोर राष्ट्रीय नेत्यांनाही जेथे वाटत नाही तेथे राज्य आणि गावपातळीवरील नेत्यांची आणि पोटार्थी सरकारी नोकरांची काय कथा! १९५४ साली आलेला तथाकथित समाजवादही वरून लादलेला होता आणि १९९१ नंतर आलेले अबाऊट टर्न उदारीकरणही. लोकांची मागणी किंवा त्यासाठीची चळवळ कुठेच नव्हती. अण्णांचे आंदोलन पगारवाढीसाठी नाही, महागाई कमी करा म्हणून नाही, सबसिडी मागण्यासाठीही नाही. आम्हाला अमूक प्रकारचा कायदा हवा म्हणून लोकांनी आंदोलन करणे हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाच्या मार्गातील एक मोठे पाऊल आहे. अण्णांचे आंदोलन ही राज्यकर्त्यांची साम्राज्यशाही वृत्ती घालविण्याचे आंदोलन आहे. आपले आजचे राज्यकर्ते काळे इंग्रज आहेत, हे आणखीही एका अर्थाने खरे आहे. आमचे राज्यकर्ते जनतेच्या मतांवर निवडून येतात, पण ते जनतेचेच प्रतिनिधित्व करतात, असे बऱ्याचदा घडताना दिसत नाही. कित्येकवेळा त्यांना काही उद्योगपतींचे हितसंबंध अधिक महत्त्वाचे वाटतात, तर बऱ्याचदा ते पक्षाध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे वागतात. म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने पूर्वीचे राज्यकर्ते परके आणि आताचेही! स्वातंत्र्याची दुसरी लढाई ‘स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ हे शब्दही कुलकर्णीना पसंत नाहीत. हे शब्द वापरणारेसुद्धा अण्णा पहिलेच नव्हेत. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत लोकसभेच्या सभापतींनीच हे शब्द वापरले होते आणि ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ असे सांगणारे सुरेश भट वेगळे काही म्हणत नाहीत. कुलकर्णीनी यासंदर्भात बरेच प्रश्न विचारले आहेत. १) स्वातंत्र्य कुणापासून? २) आपल्या उदासीनतेमुळेच ‘असे लोक’ राज्यकर्ते होत नाहीत काय? ३) हे राज्यकर्ते हटवले तर त्यांची जागा कोण घेणार? ४) गुलामगिरी मनात असते. राज्यकर्त्यांना टार्गेट करून काय होणार? ५) कोणताही ठोस पर्याय न देता राजकारण आणि राजकारणी यांच्यासंबंधी तुच्छता निर्माण करणे धोकादायक नाही काय? सर्व प्रश्न एकमेकांत गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांचा एकत्रतच विचार करावा लागेल. पहिल्या प्रश्नाचे उत्तर वस्तुत: इतके अवघड नाही. आम्हाला जे स्वातंत्र्य हवे आहे राज्यकर्त्यांच्या इंग्रजी मनोवृत्तीपासून, राज्यकारभाराच्या इंग्रजी ढाच्यापासून. ढाचा जो आम्हाला सरकारी कचेरीत दिसतो, पोलीस स्टेशनवर दिसतो, शैक्षणिक धोरणात दिसतो, भाषाविषयक धोरणात दिसतो, न्यायालयात दिसतो, सैन्यदलात दिसतो. हा ढाचा इंग्रजांनी भारतीयाां लुटण्यासाठी तयार केला होता. इंग्रज भारतात येण्यापूर्वीही इथले राज्यकर्ते जनतेला लुटतच होते, पण इंग्रजांनी (कदाचित प्रथमच) या देशात कायद्याचे राज्य आणले. म्हणजे इंग्रजांनी पद्धतशीरपणे, कायदेशीरपणे (?) लुटायला सुरुवात केली. गोरे इंग्रज त्यांच्या देशासाठी भारताला लुटत होते. आताचे राज्यकर्ते व्यक्तिगत फायद्यासाठी लुटतात. इंग्रज भारतीयांना उत्तर द्यायला बांधलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या धोरणात पारदर्शकता नव्हती. याच पारदर्शकतेच्या अभावाचा स्वदेशी राज्यकर्त्यांनी गैरफायदा घेतला आणि तिला स्वदेशी भ्रष्टाचाराची जोड दिली. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध तीन आघाडय़ांवर लढा द्यावा लागेल. एक) इंग्रज नीती बदलण्यासाठी, दोन) इंग्रजी मानसिकता बदलण्यासाठी आणि तीन) स्वदेशी राज्यकर्त्यांचे मूळचे दोष घालविण्यासाठी. कुलकर्णी एक विसरतात. अण्णा कार्यक्रम देतात. तत्त्वचर्चा करीत नाहीत. गांधीजीसुद्धा तात्त्विक चर्चेपेक्षा आतल्या आवाजाला महत्त्व देत. अण्णांच्या जागी महात्माजी असते तर म्हणाले असते, मी अंधारात टॉर्च घेऊन उभा आहे. मला फार पुढचे दिसत नाही, फक्त पुढचे पाऊल कुठे टाकायचे ते सांगतो. माहिती अधिकार हे एक पाऊल, जनलोकपाल हे आणखी एक. निवडणूक प्रक्रिया, न्यायप्रणाली ही पुढची पावले. या सर्व सुधारणा अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हाती घ्यायच्या आहेत. आज देश एका खासगी कंपनीप्रमाणे चालवला जात आहे. पंतप्रधान चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचे काम करीत आहेत. ते फक्त पार्टी-बॉसला उत्तरदायी आहेत. स्वातंत्र्य या प्रवृत्तीपासून मिळवायचे आहे. जनतेच्या प्रतिनिधींनी राज्यकारभार जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सहमतीने चालवायचा आहे. तो पक्षाच्या हितासाठी, बॉसच्या मनाप्रमाणे, चालवायचा नाही. काम याच लोकांनी करायचे आहे. पण जनतेसाठी. विरोध आजच्या राज्यकर्त्यांना नाही. त्यांच्या इंग्रजी नीतीला आहे. अर्थात काळे इंग्रज तर इंग्रजीपणा सोडत नसतील तर त्यांना टार्गेट करावेच लागेल. गुलामगिरी मनात असते हे खरेच आहे. म्हणून तर वरचेवर अण्णा लोकप्रतिनिधींना जाणीव करून देतात की ते सेवक आहेत आणि जनता मालक आहे. अण्णांची चळवळ हा शिक्षणाचाच भाग आहे. लोकांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्याही. अण्णांची चळवळ राजकारणासंबंधी, संसदेसंबंधी किंबहुना एकूण लोकशाही प्रक्रियेसंबंधीच तुच्छता दाखवते, ही राजकारणी लोकांनी करून दिलेली आणि करून घेतलेली एक सोयिस्कर गैरसमजूत आहे. जनलोकपाल बिल संसदेला सादर करा. भलेही ते फेटाळले जाऊ दे, अशीच अण्णांची मूळ मागणी होती. बिल संसदेला सादर झाले असते तर पुढचे रामायण टळले असते. शेवटी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, जेव्हा कायद्याचे राज्य नष्ट होते तेव्हाच लोक कायदा हातात घेतात. लोकांनी कायदा हातात घेतल्याने कायद्याचे राज्य नष्ट होत नाही. ते अगोदरच नष्ट झालेले असते. आणखी एक गोष्ट. चांगल्या लोकांनी निवडणुकांवर बहिष्कार घातलेला नाही. निवडणुकांनी चांगल्या लोकांवर बहिष्कार घातला आहे. यासाठी निवडणूक पद्धतीच बदलली पाहिजे. पण तो स्वतंत्र विषय आहे. भ्रष्टाचाराची व्याख्या काय? कुलकर्णीचा हा प्रश्न चुकीचा नाही. फक्त त्याची जागा अप्रस्तुत आहे. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकच त्यांना अतिव्याप्ती आणि व्याप्तीसारख्या दोषापासून मुक्त व्याख्या देऊ शकतील, अण्णा नाही. आणि ती व्याख्या ठरेपर्यंत अण्णांनी आपली भ्रष्टाचारनिर्मूलनाची चळवळ तहकूब ठेवावे, असे कुलकर्णीचेही मत नसावे. भ्रष्टाचार कशाला म्हणायचे हे माहीत नसल्याने राज्यकर्ते लोक आज भ्रष्टाचार करीत आहेत, असे नाही. धर्माने वागूनही अर्थ आणि काम मिळविता येतात, हे व्यासांच्या काळापासून सर्व समाजहितैषींनी दोन्ही हात वर करून ओरडून सांगितले आहे. पण तरीही लोकांना ‘शॉर्टकट’चा मोह पडतो. हा शॉर्टकट धोकादायक करणे हाही भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे, हे कुलकर्णीना मान्य व्हावे. राहिला प्रश्न संकल्पनांच्या सुलभीकरणाचा. लोकांना कार्यक्रम देताना नेहमीच संकल्पनांचे सुलभीकरण होते. नाही तर ैफ४१ं’ी’ीू३१्रऋ्रूं३्रल्ल ्र२ २्रूं’्र२े'. असे लेनिन म्हणता ना, टकळीवर सूत काढल्याबरोबर लगेच इंग्रज पळून जाणार नाहीत, हे गांधींनाही माहीत होते. कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे, चारित्र्यसंपन्न नागरिक निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहेच, पण राजकारणही स्वच्छ करण्याचीही जरुरी आहे. दोन्ही कामे एकाचवेळी होऊ शकतात, नव्हे एकाच वेळी झाली पाहिजेत. आजचा भ्रष्टाचार हा सर्वसामान्य जनतेची नीतिमत्ता घसरल्याचा परिणाम नाही. सामान्य जनतेला भ्रष्टाचार नको आहे म्हणून तर ती गांधीजी आणि अण्णांच्या मागे गेली. आजचा भ्रष्टाचार हा आमच्या राजकीय नेत्यांची नीतिमत्ता घसरल्याचा परिणाम आहे. तो वरून खाली झिरपला आहे. त्यामुळे शुद्धिकरणही वरून सुरू व्हायला हवे. हे शुद्धिकरण राज्यकर्त्यांच्या केवळ सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून होणार नाही. त्यांना शिक्षेचा धाकही हवाच. जो सध्या नाही. प्रत्यक्ष कार्यक्रम अण्णांनी आपला कार्यक्रम आधीच जाहीर केला आहे. त्याची चर्चाही या लेखात पूर्वी केली आहे. हे आंदोलन गांधींची कॉपी होऊ शकत नाही. गोरे इंग्रज काळ्यांपेक्षा खूपच सुसंस्कृत होते. गोऱ्यांचे नियम जुलनी असतील, पण नियम होते. ते अगोदर सांगितले जात होते आणि पाळलेही जात होते. आजचे राज्यकर्ते नियम मोडण्यात मोठेपणा समजतात. शिवाय आमचेच असल्याने ते बुद्धिभेद सुलभतेने करू शकतात. अंमलबजावणी जनलोकपालच्या हातात पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांचे अधिकार एकत्र आले आहेत, हा एक सार्वत्रिक गैरसमज का पसरला आहे हे समजत नाही. किरकोळ दंड करण्याचे अधिकार सोडता न्याय वा शिक्षा देण्याचे कोणतेही अधिकार लोकपालला नाहीत. लोकपाल केवळ तक्रारी स्वीकारतो, त्यांची चौकशी करतो आणि ज्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते त्यांच्या न्यायालयीन चौकशीला परवानगी देतो. न्यायालय आपले काम स्वतंत्रपणे करणारच आहे. सुलभीकरणाचा दोष पत्करून असे म्हणता येईल की, जनलोकपाल म्हणजे सीबीआय आणि सीव्हीसी यांना एकत्र करून त्यांना राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवणे आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या त्रुटी आढळतील त्या दूर केल्या जातीलच. नेहमी असेच होते. उद्याच्या भारतीय मनावर परिणाम अण्णांचे आंदोलन अयशस्वी झाले तर जनतेत नैराश्य येईल, हे भीती कुलकर्णीना वाटते. लोकपालची संस्थाच भ्रष्ट झाली तर जनतेचा स्वप्नभंग होईल आणि तो एक दीर्घ परिणामी ‘सेट बॅक’ असेल, असे त्यांना वाटते. कोणत्याही आंदोलनात असा धोका नेहमीच असतो. भारतीय लोक स्वातंत्र्याला लायक नाहीत, असे म्हणणारे सारेच काही साम्राज्यवादी नव्हते. शेवटी स्वातंत्र्याचा परिणाम लक्षावधी लोक मरण्यात आणि कोटय़वधी निर्वासित होण्यात झालाच, पण म्हणून आम्हाला पारतंत्र्य हवे असे आपण म्हणत नाही. आपली लोकशाही काही फार आदर्श पद्धतीने चालली आहे असे नाही, पण म्हणून काही आपण हुकूमशाहीची भलावण करीत नाही. राजकारण-समाजकारणातलेच नव्हे तर आपण घेतलेले सर्वच निर्णय त्यांचे अमूक परिणाम होतील, अशा अपेक्षेने घेतलेले असतात. तसे झाले नाही तर परिस्थितीप्रमाणे आणि आलेल्या अनुभवानुसार त्यात आपण आवश्यक त्या सुधारणा करीत जतो. वस्तुत: जनलोकपाल बिलात ‘चेक्स अ‍ॅण्ड बॅलेन्सेस’ आहेत. संसदेत बिल आल्यावर आणखी सविस्तर चर्चा होईलच आणि त्यानुसार दुरुस्त्यापण होतील. अपघात होतात म्हणून कोणी प्रवास टाळू शकत नाही आणि आमच्या लोकांच्या नालायकीबाबत एवढा विश्वास बरा नाही. अनेक प्रसंगी आम्ही आमची योग्यता चांगल्या अर्थानेही सिद्ध केली आहे. मुख्य गरज राजकीय पर्यायाची? कुलकर्णीच्या मते अण्णांचे आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्यांनी नवा राजकीय पक्ष काढावा. दिग्विजयसिंगांपासून मायावतींपर्यंत अनेकांनी अण्णांना तशी सूचना केली आहे. प्रत्येकाच्या अंतरीचा हेतू अर्थातच वेगळा असू शकतो. कुलकर्णी राजकीय नेते नाहीत, त्यामुळे ते जे सांगत आहेत तेच त्यांना म्हणायचे असावे. यासाठी त्यांच्या मनातील गोंधळ दूर करणे आवश्यक ठरते. आपल्या देशात राजकीय पक्षांची कमतरता नाही. देशात प्रामाणिक लोकांचीही उणीव नाही. पण परिस्थितीच अशी आहे की, प्रामाणिक राजकीय व्यक्ती निष्प्रभ ठरते. आज गुन्हेगारांना भीती वाटत नाही. (अण्णांनाही गुंडाळण्याचा प्रयत्न झाला आणि अजून चालूच आहे.) किंबहुना सर्व राजकीय प्रक्रियेचेच झपाटय़ाने गुन्हेगारीकरण होत आहे. अण्णांनी आणखी एक पक्ष काढल्याने त्यात काही फरक पडणार नाही. त्यामुळे अण्णांचा प्रयत्न परिस्थिती बदलण्याचा आहे. त्या दिशेने त्यांनी फक्त पहिले पाऊल टाकले आहे. अजून खूप वाटचाल करायची आहे. परिस्थिती बदलण्यासाठी विचारमंथन सुरू आहे आणि त्यात कुलकर्णीसारख्यांच्या सहभागाचे स्वागतच आहे. डॉ. हरिहर कुंभोजकर एम.ए.पीएच.डी. (आयआयटी, कानपूर) hvk_maths@yahoo.co.in डॉ. सुभाष आठले एम.एस. (जन. सर्जरी) subhashathale@gmail.com

दादा कोंडके 13/11/2011 - 23:56
काय लिहिलय! एक एक शब्द खणखणीत नाण्यासारखा! रामदेव बाबांच्या आंदोलनाच्या वेळी हिडन अजेंडा, त्यांना राजकारणात उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म वगैरे म्हणून टिका करण्यात आली आणि आता ७४ वर्षाचा म्हातारा माणूस कोणतीही राजकिय महत्वाकांक्षा नसताना लढतोय तेंव्हा मात्र त्यांना निवडणुक लढवुन दाखवा, लोकशाहीमध्ये सिस्टीममध्ये येउन बदला, संसद सर्वोच्य वगैरे म्हणून टिका होतेय. अण्णाटिम मधले सगळेच धुतल्या तांदळासारखे नसतीलही, अगदी तळागाळापर्यंत भ्रष्टाचार पसरलेला असेल आणि आहेच, पण वर्षानुवर्षे मुर्दाड पडलेल्या लोकांमध्ये काहितरी हलचाल होती आहे. क्रिकेट आणि सिनेमासाठी गर्दीकरणारी तरुणाई कशासाठी तरी स्वयंस्फुर्तीने एकत्र येती आहे, सुरवात तर होती आहे.

आशु जोग 13/11/2011 - 21:12
अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू असताना अतुल कुलकर्णी यांनी या आंदोलनाची सर्वागीण चिकित्सा करणारा विस्तृत लेख ‘लोकसत्ता’च्या ११ सप्टेंबर २०११च्या अंकात लिहिला होता. त्या लेखामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. अतुल कुलकर्णी यांच्या लेखातील महत्वाच्या मुद्यांचा प्रतिवाद करणारा हा लेख.. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आंदोलनाचा तितकाच जोरदार प्रतिवाद होणार, हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे अपेक्षितच होते. अण्णा रूढार्थाने विचारवंत नाहीत. एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या प्रसिद्ध स्तंभलेखिकेने तर ‘लष्करी सेवेतून निवृत्त झालेला अर्धशिक्षित ट्रक ड्रायव्हर’ असाही त्यांचा उपहासात्मक उल्लेख केला आहे. ते पदवीधर नसले तरी ‘सु’शिक्षित आहेत, हे आमच्या अशिक्षित पदवीधरांच्या लक्षात आलेले नाही, एवढाच त्याचा अर्थ. आपली संस्कृती सांगते, ‘य: क्रियावान् स: पंडित:’ जो कृतिशील आहे तो पंडित. आणि या व्याख्येप्रमाणे अण्णा पंडित आहेत. पण रूढार्थाने पंडित नसल्याने अण्णांच्या बोलण्यात शहरी सफाई नाही आणि प्रामाणिक असल्याने त्यांच्यात खेडवळ बेरकीपणाही नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दांचा, जाणीवपूर्वक वा अजाणता, विपर्यास करणे विद्वानांना सहज शक्य होते. अण्णांच्या या उणिवेमुळे काही सरळ मनाच्या लोकांचाही त्यांच्या भूमिकेसंबंधी गैरसमज होणे शक्य आहे. अतुल कुलकर्णीचे काहीसे तसेच झाले असावे, असे त्यांच्या ११ सप्टेंबरच्या ‘लोकसत्ता’तील लेखावरून वाटते. त्यांच्या वैचारिक प्रामाणिकपणाबाबत आम्हाला संशय नसल्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा हा प्रपंच. गोरे ब्रिटिश आणि काळे ब्रिटिश अण्णांनी आपल्या राज्यकर्त्यांना काळे ब्रिटिश (खरे म्हणजे काळे इंग्रज) म्हणणे कुलकर्णीना धोकादायक वाटते. अण्णांना नेमके काय म्हणायचे आहे हे अगोदर समजून घेऊ. आमच्या राज्यकर्त्यांना काळे इंग्रज म्हणणारे अण्णा काही पहिले नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. सुरुवातीपासूनच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक धोरणाबाबत महात्मा गांधी आणि नेहरू यांच्यात मतभेद होते. एकदा ‘या मतभेदाचे नेमके स्वरूप काय आहे?’ असा प्रश्न एका वार्ताहराने गांधीजींना केला असता आपल्या नेहमीच्या शैलीत ते म्हणाले होते, ‘‘अगदी थोडक्यात फरक सांगतो. माझे स्वप्न आहे की येथून इंग्रजांची नीती हटली पाहिजे, भले येथे इंग्रजी राहिले तरी चालतील. या उलट जवाहरची भूमिका आहे. त्याला वाटते, इंग्रज येथून हटले पाहिजेत. भले इंग्रजांची व्यवस्था येथे चालू राहो.’’ स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधीजी आपल्यात फार दिवस राहिले नाहीत, पण इंग्रजांची नीती चालूच राहिली. अण्णांना नेमके हेच म्हणायचे आहे- नेते काळे, पण नीती इंग्रजांची. इंग्रजांची नीती होती रयतेने राजनिष्ठ राहून इंग्रज बादशहाची वा महाराणीची इमाने-इतबारे सेवा करावी; इंग्रजांची नीती होती, रयतेने संघटित होऊन विरोध करू नये यासाठी समाजात धर्मा-धर्मात, जाती-जातीत सतत दुफळी माजली पाहिजे; इंग्रजांची नीती होती, इंग्लंडच्या खजिन्यात भर पडली पाहिजे, हिंदुस्थानची प्रजा भुकेकंगाल झाली तरी विचार करण्याचे कारण नाही. बंगालच्या दुष्काळात दहा लाख लोक भुकेने मेले. सरकार त्यांना धान्य देऊ शकले असते, पण गुलामांचे जीव वाचविण्याची बादशहाला काहीच निकड नव्हती. जालियनवाला बाग एक बंदिस्त जागा होती. जमलेले लोक नि:शस्त्र होते. जमावात स्त्रिया आणि मुले होती. तरीही त्यांच्यावर निर्दयपणे गोळ्या झाडण्यात आल्या. ठार मारण्याच्या उद्देशानेच मारण्यात आल्या! कारण? प्रजेला राज्यकत्यांची दहशत वाटली पाहिजे. इंग्रजी राज्यव्यवस्था इंग्रज बादशहाचे वा महाराणीचे राज्य यावच्चंद्रदिवाकरौ निष्कंटक राहावे यासाठी निर्माण केली होती. रयतेच्या भल्यासाठी नाही. त्यांच्या शासनप्रणालीची पोलादी चौकट, त्यांची पोलीस दले, त्यांच्या सैन्यदलाची संरचना, त्यांची न्यायव्यवस्था, त्यांचे शैक्षणिक धोरण, त्यांचे याचे कायदेकानू, त्यांची दीर्घकालीन व अल्पकालीन धोरणे सर्व काही साम्राज्याच्या संवर्धनासाठी आणि राज्यकर्त्यांच्या भल्यासाठी निर्माण झाली होती. आज शासनव्यवस्थेत बदल झाला नाही असे नाही, पण तो बराचसा परिमाणात्मक आहे, गुणात्मक नाही. आजही जो शासनव्यवस्थेत असतो तो इंग्रजाप्रमाणे वागतो आणि शासनव्यवस्थेच्या बाहेर असतो तो मानसिक दृष्टीने स्वत:ला रयतच मानतो. आमचे आंग्रविद्याविद्याविभूषित प्रजाजनही गव्हर्नर आणि प्रेसिडेन्ट यांना ‘हिज एक्सलन्सी’ आणि ‘हर एक्सलन्सी’ असे संबोधण्यात धन्य मानतात. श्री. राज्यपाल आणि श्रीमती राष्ट्राध्यक्षा असे म्हणायचे धाडस करीत नाहीत. लोकप्रतिनिधींची किरकोळ टीकेनेही मानहानी होते. अगदी जनहिताच्या प्रामाणिक हेतूने धोरणात बदल करतानासुद्धा जनतेला विश्वासात घेणे आपले कर्तव्य आहे, असे आपल्या थोर राष्ट्रीय नेत्यांनाही जेथे वाटत नाही तेथे राज्य आणि गावपातळीवरील नेत्यांची आणि पोटार्थी सरकारी नोकरांची काय कथा! १९५४ साली आलेला तथाकथित समाजवादही वरून लादलेला होता आणि १९९१ नंतर आलेले अबाऊट टर्न उदारीकरणही. लोकांची मागणी किंवा त्यासाठीची चळवळ कुठेच नव्हती. अण्णांचे आंदोलन पगारवाढीसाठी नाही, महागाई कमी करा म्हणून नाही, सबसिडी मागण्यासाठीही नाही. आम्हाला अमूक प्रकारचा कायदा हवा म्हणून लोकांनी आंदोलन करणे हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाच्या मार्गातील एक मोठे पाऊल आहे. अण्णांचे आंदोलन ही राज्यकर्त्यांची साम्राज्यशाही वृत्ती घालविण्याचे आंदोलन आहे. आपले आजचे राज्यकर्ते काळे इंग्रज आहेत, हे आणखीही एका अर्थाने खरे आहे. आमचे राज्यकर्ते जनतेच्या मतांवर निवडून येतात, पण ते जनतेचेच प्रतिनिधित्व करतात, असे बऱ्याचदा घडताना दिसत नाही. कित्येकवेळा त्यांना काही उद्योगपतींचे हितसंबंध अधिक महत्त्वाचे वाटतात, तर बऱ्याचदा ते पक्षाध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे वागतात. म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने पूर्वीचे राज्यकर्ते परके आणि आताचेही! स्वातंत्र्याची दुसरी लढाई ‘स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ हे शब्दही कुलकर्णीना पसंत नाहीत. हे शब्द वापरणारेसुद्धा अण्णा पहिलेच नव्हेत. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत लोकसभेच्या सभापतींनीच हे शब्द वापरले होते आणि ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ असे सांगणारे सुरेश भट वेगळे काही म्हणत नाहीत. कुलकर्णीनी यासंदर्भात बरेच प्रश्न विचारले आहेत. १) स्वातंत्र्य कुणापासून? २) आपल्या उदासीनतेमुळेच ‘असे लोक’ राज्यकर्ते होत नाहीत काय? ३) हे राज्यकर्ते हटवले तर त्यांची जागा कोण घेणार? ४) गुलामगिरी मनात असते. राज्यकर्त्यांना टार्गेट करून काय होणार? ५) कोणताही ठोस पर्याय न देता राजकारण आणि राजकारणी यांच्यासंबंधी तुच्छता निर्माण करणे धोकादायक नाही काय? सर्व प्रश्न एकमेकांत गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांचा एकत्रतच विचार करावा लागेल. पहिल्या प्रश्नाचे उत्तर वस्तुत: इतके अवघड नाही. आम्हाला जे स्वातंत्र्य हवे आहे राज्यकर्त्यांच्या इंग्रजी मनोवृत्तीपासून, राज्यकारभाराच्या इंग्रजी ढाच्यापासून. ढाचा जो आम्हाला सरकारी कचेरीत दिसतो, पोलीस स्टेशनवर दिसतो, शैक्षणिक धोरणात दिसतो, भाषाविषयक धोरणात दिसतो, न्यायालयात दिसतो, सैन्यदलात दिसतो. हा ढाचा इंग्रजांनी भारतीयाां लुटण्यासाठी तयार केला होता. इंग्रज भारतात येण्यापूर्वीही इथले राज्यकर्ते जनतेला लुटतच होते, पण इंग्रजांनी (कदाचित प्रथमच) या देशात कायद्याचे राज्य आणले. म्हणजे इंग्रजांनी पद्धतशीरपणे, कायदेशीरपणे (?) लुटायला सुरुवात केली. गोरे इंग्रज त्यांच्या देशासाठी भारताला लुटत होते. आताचे राज्यकर्ते व्यक्तिगत फायद्यासाठी लुटतात. इंग्रज भारतीयांना उत्तर द्यायला बांधलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या धोरणात पारदर्शकता नव्हती. याच पारदर्शकतेच्या अभावाचा स्वदेशी राज्यकर्त्यांनी गैरफायदा घेतला आणि तिला स्वदेशी भ्रष्टाचाराची जोड दिली. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध तीन आघाडय़ांवर लढा द्यावा लागेल. एक) इंग्रज नीती बदलण्यासाठी, दोन) इंग्रजी मानसिकता बदलण्यासाठी आणि तीन) स्वदेशी राज्यकर्त्यांचे मूळचे दोष घालविण्यासाठी. कुलकर्णी एक विसरतात. अण्णा कार्यक्रम देतात. तत्त्वचर्चा करीत नाहीत. गांधीजीसुद्धा तात्त्विक चर्चेपेक्षा आतल्या आवाजाला महत्त्व देत. अण्णांच्या जागी महात्माजी असते तर म्हणाले असते, मी अंधारात टॉर्च घेऊन उभा आहे. मला फार पुढचे दिसत नाही, फक्त पुढचे पाऊल कुठे टाकायचे ते सांगतो. माहिती अधिकार हे एक पाऊल, जनलोकपाल हे आणखी एक. निवडणूक प्रक्रिया, न्यायप्रणाली ही पुढची पावले. या सर्व सुधारणा अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हाती घ्यायच्या आहेत. आज देश एका खासगी कंपनीप्रमाणे चालवला जात आहे. पंतप्रधान चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचे काम करीत आहेत. ते फक्त पार्टी-बॉसला उत्तरदायी आहेत. स्वातंत्र्य या प्रवृत्तीपासून मिळवायचे आहे. जनतेच्या प्रतिनिधींनी राज्यकारभार जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सहमतीने चालवायचा आहे. तो पक्षाच्या हितासाठी, बॉसच्या मनाप्रमाणे, चालवायचा नाही. काम याच लोकांनी करायचे आहे. पण जनतेसाठी. विरोध आजच्या राज्यकर्त्यांना नाही. त्यांच्या इंग्रजी नीतीला आहे. अर्थात काळे इंग्रज तर इंग्रजीपणा सोडत नसतील तर त्यांना टार्गेट करावेच लागेल. गुलामगिरी मनात असते हे खरेच आहे. म्हणून तर वरचेवर अण्णा लोकप्रतिनिधींना जाणीव करून देतात की ते सेवक आहेत आणि जनता मालक आहे. अण्णांची चळवळ हा शिक्षणाचाच भाग आहे. लोकांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्याही. अण्णांची चळवळ राजकारणासंबंधी, संसदेसंबंधी किंबहुना एकूण लोकशाही प्रक्रियेसंबंधीच तुच्छता दाखवते, ही राजकारणी लोकांनी करून दिलेली आणि करून घेतलेली एक सोयिस्कर गैरसमजूत आहे. जनलोकपाल बिल संसदेला सादर करा. भलेही ते फेटाळले जाऊ दे, अशीच अण्णांची मूळ मागणी होती. बिल संसदेला सादर झाले असते तर पुढचे रामायण टळले असते. शेवटी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, जेव्हा कायद्याचे राज्य नष्ट होते तेव्हाच लोक कायदा हातात घेतात. लोकांनी कायदा हातात घेतल्याने कायद्याचे राज्य नष्ट होत नाही. ते अगोदरच नष्ट झालेले असते. आणखी एक गोष्ट. चांगल्या लोकांनी निवडणुकांवर बहिष्कार घातलेला नाही. निवडणुकांनी चांगल्या लोकांवर बहिष्कार घातला आहे. यासाठी निवडणूक पद्धतीच बदलली पाहिजे. पण तो स्वतंत्र विषय आहे. भ्रष्टाचाराची व्याख्या काय? कुलकर्णीचा हा प्रश्न चुकीचा नाही. फक्त त्याची जागा अप्रस्तुत आहे. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकच त्यांना अतिव्याप्ती आणि व्याप्तीसारख्या दोषापासून मुक्त व्याख्या देऊ शकतील, अण्णा नाही. आणि ती व्याख्या ठरेपर्यंत अण्णांनी आपली भ्रष्टाचारनिर्मूलनाची चळवळ तहकूब ठेवावे, असे कुलकर्णीचेही मत नसावे. भ्रष्टाचार कशाला म्हणायचे हे माहीत नसल्याने राज्यकर्ते लोक आज भ्रष्टाचार करीत आहेत, असे नाही. धर्माने वागूनही अर्थ आणि काम मिळविता येतात, हे व्यासांच्या काळापासून सर्व समाजहितैषींनी दोन्ही हात वर करून ओरडून सांगितले आहे. पण तरीही लोकांना ‘शॉर्टकट’चा मोह पडतो. हा शॉर्टकट धोकादायक करणे हाही भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे, हे कुलकर्णीना मान्य व्हावे. राहिला प्रश्न संकल्पनांच्या सुलभीकरणाचा. लोकांना कार्यक्रम देताना नेहमीच संकल्पनांचे सुलभीकरण होते. नाही तर ैफ४१ं’ी’ीू३१्रऋ्रूं३्रल्ल ्र२ २्रूं’्र२े'. असे लेनिन म्हणता ना, टकळीवर सूत काढल्याबरोबर लगेच इंग्रज पळून जाणार नाहीत, हे गांधींनाही माहीत होते. कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे, चारित्र्यसंपन्न नागरिक निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहेच, पण राजकारणही स्वच्छ करण्याचीही जरुरी आहे. दोन्ही कामे एकाचवेळी होऊ शकतात, नव्हे एकाच वेळी झाली पाहिजेत. आजचा भ्रष्टाचार हा सर्वसामान्य जनतेची नीतिमत्ता घसरल्याचा परिणाम नाही. सामान्य जनतेला भ्रष्टाचार नको आहे म्हणून तर ती गांधीजी आणि अण्णांच्या मागे गेली. आजचा भ्रष्टाचार हा आमच्या राजकीय नेत्यांची नीतिमत्ता घसरल्याचा परिणाम आहे. तो वरून खाली झिरपला आहे. त्यामुळे शुद्धिकरणही वरून सुरू व्हायला हवे. हे शुद्धिकरण राज्यकर्त्यांच्या केवळ सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून होणार नाही. त्यांना शिक्षेचा धाकही हवाच. जो सध्या नाही. प्रत्यक्ष कार्यक्रम अण्णांनी आपला कार्यक्रम आधीच जाहीर केला आहे. त्याची चर्चाही या लेखात पूर्वी केली आहे. हे आंदोलन गांधींची कॉपी होऊ शकत नाही. गोरे इंग्रज काळ्यांपेक्षा खूपच सुसंस्कृत होते. गोऱ्यांचे नियम जुलनी असतील, पण नियम होते. ते अगोदर सांगितले जात होते आणि पाळलेही जात होते. आजचे राज्यकर्ते नियम मोडण्यात मोठेपणा समजतात. शिवाय आमचेच असल्याने ते बुद्धिभेद सुलभतेने करू शकतात. अंमलबजावणी जनलोकपालच्या हातात पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांचे अधिकार एकत्र आले आहेत, हा एक सार्वत्रिक गैरसमज का पसरला आहे हे समजत नाही. किरकोळ दंड करण्याचे अधिकार सोडता न्याय वा शिक्षा देण्याचे कोणतेही अधिकार लोकपालला नाहीत. लोकपाल केवळ तक्रारी स्वीकारतो, त्यांची चौकशी करतो आणि ज्या तक्रारीत तथ्य आहे असे वाटते त्यांच्या न्यायालयीन चौकशीला परवानगी देतो. न्यायालय आपले काम स्वतंत्रपणे करणारच आहे. सुलभीकरणाचा दोष पत्करून असे म्हणता येईल की, जनलोकपाल म्हणजे सीबीआय आणि सीव्हीसी यांना एकत्र करून त्यांना राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवणे आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या त्रुटी आढळतील त्या दूर केल्या जातीलच. नेहमी असेच होते. उद्याच्या भारतीय मनावर परिणाम अण्णांचे आंदोलन अयशस्वी झाले तर जनतेत नैराश्य येईल, हे भीती कुलकर्णीना वाटते. लोकपालची संस्थाच भ्रष्ट झाली तर जनतेचा स्वप्नभंग होईल आणि तो एक दीर्घ परिणामी ‘सेट बॅक’ असेल, असे त्यांना वाटते. कोणत्याही आंदोलनात असा धोका नेहमीच असतो. भारतीय लोक स्वातंत्र्याला लायक नाहीत, असे म्हणणारे सारेच काही साम्राज्यवादी नव्हते. शेवटी स्वातंत्र्याचा परिणाम लक्षावधी लोक मरण्यात आणि कोटय़वधी निर्वासित होण्यात झालाच, पण म्हणून आम्हाला पारतंत्र्य हवे असे आपण म्हणत नाही. आपली लोकशाही काही फार आदर्श पद्धतीने चालली आहे असे नाही, पण म्हणून काही आपण हुकूमशाहीची भलावण करीत नाही. राजकारण-समाजकारणातलेच नव्हे तर आपण घेतलेले सर्वच निर्णय त्यांचे अमूक परिणाम होतील, अशा अपेक्षेने घेतलेले असतात. तसे झाले नाही तर परिस्थितीप्रमाणे आणि आलेल्या अनुभवानुसार त्यात आपण आवश्यक त्या सुधारणा करीत जतो. वस्तुत: जनलोकपाल बिलात ‘चेक्स अ‍ॅण्ड बॅलेन्सेस’ आहेत. संसदेत बिल आल्यावर आणखी सविस्तर चर्चा होईलच आणि त्यानुसार दुरुस्त्यापण होतील. अपघात होतात म्हणून कोणी प्रवास टाळू शकत नाही आणि आमच्या लोकांच्या नालायकीबाबत एवढा विश्वास बरा नाही. अनेक प्रसंगी आम्ही आमची योग्यता चांगल्या अर्थानेही सिद्ध केली आहे. मुख्य गरज राजकीय पर्यायाची? कुलकर्णीच्या मते अण्णांचे आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्यांनी नवा राजकीय पक्ष काढावा. दिग्विजयसिंगांपासून मायावतींपर्यंत अनेकांनी अण्णांना तशी सूचना केली आहे. प्रत्येकाच्या अंतरीचा हेतू अर्थातच वेगळा असू शकतो. कुलकर्णी राजकीय नेते नाहीत, त्यामुळे ते जे सांगत आहेत तेच त्यांना म्हणायचे असावे. यासाठी त्यांच्या मनातील गोंधळ दूर करणे आवश्यक ठरते. आपल्या देशात राजकीय पक्षांची कमतरता नाही. देशात प्रामाणिक लोकांचीही उणीव नाही. पण परिस्थितीच अशी आहे की, प्रामाणिक राजकीय व्यक्ती निष्प्रभ ठरते. आज गुन्हेगारांना भीती वाटत नाही. (अण्णांनाही गुंडाळण्याचा प्रयत्न झाला आणि अजून चालूच आहे.) किंबहुना सर्व राजकीय प्रक्रियेचेच झपाटय़ाने गुन्हेगारीकरण होत आहे. अण्णांनी आणखी एक पक्ष काढल्याने त्यात काही फरक पडणार नाही. त्यामुळे अण्णांचा प्रयत्न परिस्थिती बदलण्याचा आहे. त्या दिशेने त्यांनी फक्त पहिले पाऊल टाकले आहे. अजून खूप वाटचाल करायची आहे. परिस्थिती बदलण्यासाठी विचारमंथन सुरू आहे आणि त्यात कुलकर्णीसारख्यांच्या सहभागाचे स्वागतच आहे. डॉ. हरिहर कुंभोजकर एम.ए.पीएच.डी. (आयआयटी, कानपूर) hvk_maths@yahoo.co.in डॉ. सुभाष आठले एम.एस. (जन. सर्जरी) subhashathale@gmail.com

दादा कोंडके 13/11/2011 - 23:56
काय लिहिलय! एक एक शब्द खणखणीत नाण्यासारखा! रामदेव बाबांच्या आंदोलनाच्या वेळी हिडन अजेंडा, त्यांना राजकारणात उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म वगैरे म्हणून टिका करण्यात आली आणि आता ७४ वर्षाचा म्हातारा माणूस कोणतीही राजकिय महत्वाकांक्षा नसताना लढतोय तेंव्हा मात्र त्यांना निवडणुक लढवुन दाखवा, लोकशाहीमध्ये सिस्टीममध्ये येउन बदला, संसद सर्वोच्य वगैरे म्हणून टिका होतेय. अण्णाटिम मधले सगळेच धुतल्या तांदळासारखे नसतीलही, अगदी तळागाळापर्यंत भ्रष्टाचार पसरलेला असेल आणि आहेच, पण वर्षानुवर्षे मुर्दाड पडलेल्या लोकांमध्ये काहितरी हलचाल होती आहे. क्रिकेट आणि सिनेमासाठी गर्दीकरणारी तरुणाई कशासाठी तरी स्वयंस्फुर्तीने एकत्र येती आहे, सुरवात तर होती आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा लेख जरूर वाचावा http://tinyurl.com/lokanna लोकसत्तेने उगाचच नि:पक्षपणाचा आव आणून अण्णांच्या आंदोलनावर टीका सुरु केली होती जणू ए राजा, कनिमोळी, कलमाडी आणि टीम मनिमोहनचे सदस्य धुतल्या तांदळासारखे आहेत.

वेळ आहे कुणाला?

डॉ.श्रीराम दिवटे ·

डॉक्टर साहेब, व्यवस्थेतेतील खेदजनक गोष्टींबद्दल काय आणि किती बोलायचं. सालं आपण काहीही विचार करा. आपलं त्या मेंढराप्रमाणे चाललेलं असतं. एखादी मेंढी कळप सोडून नव्या मार्गाने निघाली की ती भांबावल्यासारखी होते आणि पुन्हा कळपात आले की तिला कोण आनंद होतो नाय का ? तसं आपलंही झालंय. अपवाद असलेली माणसंच मग मोठी होतात. असो, बाकी, डॉक्टर साहेब, लोकमतमधील लेखनाबद्दलही अभिनंदन. लिहित राहा..! -दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब, व्यवस्थेतेतील खेदजनक गोष्टींबद्दल काय आणि किती बोलायचं. सालं आपण काहीही विचार करा. आपलं त्या मेंढराप्रमाणे चाललेलं असतं. एखादी मेंढी कळप सोडून नव्या मार्गाने निघाली की ती भांबावल्यासारखी होते आणि पुन्हा कळपात आले की तिला कोण आनंद होतो नाय का ? तसं आपलंही झालंय. अपवाद असलेली माणसंच मग मोठी होतात. असो, बाकी, डॉक्टर साहेब, लोकमतमधील लेखनाबद्दलही अभिनंदन. लिहित राहा..! -दिलीप बिरुटे
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

पराभवाचे श्राद्ध !

जयंत कुलकर्णी ·

In reply to by नगरीनिरंजन

sagarparadkar 07/10/2011 - 00:05
जनरल थोरात ह्यांचं आत्मचरित्रदेखील वाचावं अशी विनंति सर्वांनाच करतोय. मी त्यातील काही भाग बहुतेक 'लोकसत्ता'मधे वाचला होता, जेव्हा ते आत्मचरित्र प्रसिद्ध झालं .... अर्थातच तेव्हा श्री. माधव गडकरी हे लोकसत्ताचे संपादक असावेत नाहीतर बहुतेक ते लेख लोकसत्तामधे आलेच नसते अशी माझी खात्री आहे .... त्या 'कौल्'चे होस्पिटलमधून जनरल थिमय्यांना आदेश देणे वगैरे चीड आणणारा भाग होता .... (इथे नावांमधे काही चूक झाली असल्यास क्षमस्व)

समीरसूर 06/10/2011 - 13:39
छान लेख! पं. नेहरू हा एक भंपक माणूस होता यात काहीच शंका नाही. पं. नेहरूंना भारताने अकारण डोक्यावर चढवलेले आहे. लेडी माऊंटबॅटनच्या आगे-मागे घुटमळण्याखेरीज आणि स्वत:च्या पत्नीला सतत हीन आणि अपमानास्पद वागणूक देण्याखेरीज या भ्रमराने काहीच केले नाही. आताही जर चीनने हल्ला केला तर फार काही वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही. चीन अतिमहाकाय आणि अतिताकदवान असा देश आहे. आपला फार काळ टिकाव लागेल असे वाटत नाही. अजूनही त्यांची सीमेलगतची जमवाजमव, नेपाळ, पाकिस्तानमधले सीमेलगतचे रस्ताउभारणीचे काम, शेजारच्या देशांना आपल्या बाजूला करून घेण्याचे उपद्व्याप, अरुणाचल प्रदेशावर अधून-मधून हक्क सांगणे, व्हीसाचे सुटे कागद देणे...या गोष्टी वाटतात तितक्या सरळ वाटत नाहीत. आपण बसलोय कॉमनवेल्थ गेम्ससारखे आणि आयपीएलसारखे निरर्थक आणि बिनबूडाचे तमाशे भरवत!!! भारतीय लोकं दूरदृष्टीच्या बाबतीत खूपच कच्चे आहेत. 'चलता हैं' नावाचा व्हायरस जेव्हा आपल्या लोकांना सोडेल तेव्हाच काहीतरी चांगले घडेल... --समीर

In reply to by समीरसूर

पं. नेहरू हा एक भंपक माणूस होता यात काहीच शंका नाही. पं. नेहरूंना भारताने अकारण डोक्यावर चढवलेले आहे. हे अत्यंत उथळ विधान आहे. हा माणूस थोर लेखक तर होताच याशिवाय अत्यंत बिलंदर राजकारणी होता. सरदार पटेलांसारख्या माणसाला गवत चारुन जो माणूस पंतप्रधान झाला तो माणूस बिलंदरच असणार. चीनने शांततेचे आश्वासन दिले आणि त्यावर पंडितजींनी विश्वास ठेवला इतके साधे हे गणित नसावे. भारत हे एक समॄद्ध आणि बलिष्ठ राष्ट्र व्हावे हे स्वप्न त्यांनी पाहिले. पहिली पंचवार्षिक योजना शेती आणि दुसरी अवजड उद्योग-धंद्यांना वाहिलेली आहे. कदाचित तिसर्‍या किंवा चौथ्या योजनेमध्ये संरक्षण व्यवस्था बलिष्ठ करण्याचा त्यांचा विचार असेल सुद्धा. भुकेकंगाल माणूस आधी जेवण मिळवण्याचा विचार करेल आणि मग सुरक्षिततेचा. अन्यथा त्या माणसाचे किंवा देशाचे पाकिस्तान होणार नाही का ? लेडी माऊंटबॅटनच्या आगे-मागे घुटमळण्याखेरीज आणि स्वत:च्या पत्नीला सतत हीन आणि अपमानास्पद वागणूक देण्याखेरीज या भ्रमराने काहीच केले नाही. या तपशीलांविषयी फारशी माहिती नाही. तरीदेखील या खाजगी गोष्टींशी आपल्याला काय करायचे आहे ? शिवाय असे आरोप करणार्‍यांकडे तसे काही पुरावे आहेत काय ?

In reply to by अप्पा जोगळेकर

रामपुरी 06/10/2011 - 21:51
" अत्यंत बिलंदर राजकारणी" वगैरे ठिक आहे पण "थोर लेखक" नक्कीच म्हणू शकत नाही. "भुकेकंगाल माणूस आधी जेवण मिळवण्याचा विचार करेल आणि मग सुरक्षिततेचा." जवळ विषारी साप बसलेला असताना कितीही भुकेकंगाल माणूस जेवण करू शकेल असे वाटत नाही. तो प्रथम आपल्या सुरक्षिततेचाच विचार करेल असे नाही वाटत??? आता तो माणूस मूर्ख असेल किंवा अतिशय भोळा असेल किंवा तो साप आहे यावर त्याला (काही कारणाने) विश्वासच ठेवायचा नसेल तर गोष्ट वेगळी.... तसे काही पुरावे आहेत काय ? पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? :) :)

In reply to by रामपुरी

" अत्यंत बिलंदर राजकारणी" वगैरे ठिक आहे पण "थोर लेखक" नक्कीच म्हणू शकत नाही. डिस्कव्हरी ऑफ ईंडिया किंवा ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी वाचले आहे काय ? ही पुस्तके आपणास सुमार दर्जाची वाटतात काय ? पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? हो. असेच म्हणायचे आहे. तो प्रथम आपल्या सुरक्षिततेचाच विचार करेल असे नाही वाटत??? असेच वाटते. शांततेचा लांबरुंद मंडप पसरुन तयारी करण्यासाठी, मजबूत बनण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर बरे असा विचार पंडितजींनी केला असावा. अर्थात ते असाच विचार करत असतील याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. पण समजा त्यांचा तसा इरादा नसेल तरीसुद्धा भंपक माणूस इतक्या शेलक्या विशेषणांनी त्यांचा पाणउतारा करणे हा भंपकपणा वाटतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

>>पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? >>हो. असेच म्हणायचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे, हि एक उघड गोष्ट होती. खुद्द लेडी माउंटबॅटनने या विषयी लिहिले आहे असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

माझ्या माहितीप्रमाणे, हि एक उघड गोष्ट होती. खुद्द लेडी माउंटबॅटनने या विषयी लिहिले आहे असे वाचल्याचे स्मरते. ठीक आहे. मग तर प्रश्नच मिटला. या उघड गोष्टीच्या आधारे त्या माणसाचे मूल्यमापन असे आपणांस वाटते काय ?

In reply to by अप्पा जोगळेकर

संबंध नसताना मधे बोलतो. डिस्कव्हरी ऑफ ईंडिया किंवा ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी वाचले आहे काय ? ही पुस्तके आपणास सुमार दर्जाची वाटतात काय ? हो विषेशतः डीस्कवरी ऑफ इंडिया मधली मते. असेच वाटते. शांततेचा लांबरुंद मंडप पसरुन तयारी करण्यासाठी, मजबूत बनण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर बरे असा विचार पंडितजींनी केला असावा. अर्थात ते असाच विचार करत असतील याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. तसा शांततेचा विचार कोणी करत असेल तर काही चूक नाही. परंतु एकूण जगाच्या इतिहासाचा विचार करता कमरेला तलवार बांधूनच राम राम करत मनुष्य शांतपणे बसू शकतो. त्यामुळे पंडीतजींना तसे वाटले असेल तर ते बालिश वाटले इतकेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हो विषेशतः डिस्कवरी ऑफ इंडिया मधली मते. हे पुस्तक म्हणजे माहिती, अ‍ॅनालिसिस, मते आणि कन्क्ल्युजन्स यांचा महासागर आहे. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक वाचकाचा अनेक ठिकाणी लेखकाशी मतभेद होणार हे उघड आहे. या मतभेदांमुळे त्या पुस्तकाला सुमार म्हणण्याचा अधिकार वाचकाला आहे असे वाटत नाही. हां. आता लिहिलेले वाक्य न वाक्य चुकीचे, भंपक वगैरे वाटत असेल तर माझे काहीच म्हणणे नाही. या पुस्तकात शिवाजी राजांवर काहीच्या बाही टीका केली गेली आहे असे मी ऐकले होते. पण जेंव्हा प्रत विकत घेउन वाचली त्यामधे असे काही मला तरी सापडले नाही. 'राईज ऑफ हिंदू नॅशनॅलिझम ' असा उल्लेख करुन शिवाजीचा गौरव केला आहे हेच मला आढळले. 'कदाचित काँग्रेसच्या नेहमीच्या धोरणानुसार तो भाग नंतर एडिट केला गेला असेल' हे शक्य आहे. पण, झापडे लावून 'सहा सोनेरी पाने' वाचावे आणि जागतिक दर्जाचे पुस्तक म्हणून त्याचा गौरव करावा. तशीच झापडे लावून 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' वाचावे आणि त्याच्यावर'सुमार' पुस्तक म्हणून टीका करावी ही मला स्वतःशीच केलेली प्रतारणा वाटते. तुम्ही तसे आहात असे माझे म्हणणे नाही पण अशी काही मंडळी भेटलेली आहेत इतकेच सांगू इच्छितो. त्यामुळे पंडीतजींना तसे वाटले असेल तर ते बालिश वाटले इतकेच. याबद्दल अधि़आराने काहीच बोलू शकत नाही. भाग-२ वर चालू असलेली यासंदर्भातली चर्चा वाचून मी तरी गोंधळून गेलो आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

समीरसूर 10/10/2011 - 10:34
कालच्या, म्हणजे ०९-ऑक्टोबर-२०११ (रविवार) च्या दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीच्या सप्तरंग पुरवणीमध्ये १९६२ च्या भारत-चीन युद्धावर काही जाणकारांचे आणि प्रत्यक्ष त्या युद्धात भाग घेतलेल्या योद्ध्यांचे लेख आलेले आहेत. पहिला लेख या युद्धात कैदी झालेल्या लेफ्टनंट कर्नल श्रीकांत हसबनीस यांचा आहे. चीनच्या आक्रमणाला भारताचे प्रत्युत्तर किती भिकार होते याचे त्यांनी वर्णन केले आहे. निव्वळ थंड केबिन्समध्ये आरामात बसून आपल्या राज्यकर्त्यांनी नकाशावर बोट ठेवून इथे पोस्ट उभारा, तिथे पोस्ट उभारा असे सांगीतले होते असे हसबनिस सांगतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवरची परिस्थिती किती अवघड होती आणि भारताची तयारी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे किती तोकडी होती याचे यथार्थ आणि वैषम्यपूर्ण वर्णन हसबनिस या लेखात करतात. याच सुराचे लेख कॅप्टन भूषण गोखले आणि अनंत बागाईतकर यांचे आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर १५ वर्षे उलटून गेल्यावरही भारतावर राज्य करणारे पं. नेहरूंसारखे भंपक नेते किती स्वप्नाळू, भित्रे, पुचाट आणि निर्बुद्ध होते हे या लेखांमधून स्पष्टपणे समोर येते. हे लेख प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्या किंवा त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या आणि तज्ञ मंडळींनी लिहिले असल्याने त्या लेखांच्या सत्यतेविषयी शंका घेण्याचा प्रश्नच उरत नाही. शांततेचा पुरस्कर्ता असणं म्हणजे निर्बुद्धसारखं युद्धाची तयारी न ठेवणं नव्हे! पाकिस्तानसारखा विषारी आणि कृतघ्न साप शेजारी असतांना आणि त्याच्या विषाचा प्रत्यय आलेला असतांना आपण शांत राहण्याच्या नादात सुसज्ज संरक्षणव्यवस्था न ठेवणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे. पं. नेहरूंनी चीनची लाचारी पत्करून आपल्या भित्र्या आणि कमअसल मनोवृत्तीचे दर्शन घडवले. शांतता, सलोखा, भाईचारा, अहिंसा, शेजार्‍यांशी सौहार्दाचे संबंध इत्यादी गुण तुम्ही तेव्हाच सर्व ताकदीनिशी दाखवू शकता जेव्हा तुमची संरक्षणव्यवस्था अत्यंत मजबूत आणि कुठल्याही आगळीकीला सडेतोड उत्तर देण्याच्या क्षमतेची असते; अन्यथा त्या निव्वळ वल्गना ठरतात. इतकी सोपी गोष्ट पं. नेहरूंसारख्या तथाकथित महान नेत्याला कळली नाही यातच त्यांचे बुळेपण दिसून येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५ वर्षे आपली संरक्षणव्यवस्था इतकी ढिसाळ होती की त्याकाळी भारतात पं. नेहरूंसारखा तथाकथित दूरदृष्टी असलेला, कणखर, प्रखर देशप्रेमी वगैरे वगैरे नेता आपला पंतप्रधान होता हे खरेच वाटत नाही. तिथे पाहिजे होते सरदार वल्लभभाई पटेल! पं. नेहरूंचे नशीब जोरदार म्हणून त्यांना पंतप्रधानपद मिळाले. जसे आज कुठल्याही कर्तुत्वाविना प्रतिभा पाटलांना राष्ट्रपतिपद मिळते, आवाज नसणार्‍या मनमोहन सिंगांना चक्क दोन-दोन टर्म्स पंतप्रधानपद मिळते, देवेगौडासारख्या झोपाळू माणसाला पंतप्रधानपद मिळते, अगदी तसेच पं. नेहरूंना पंतप्रधानपद मिळाले. भारतातले हे घाणेरडे आणि स्वार्थी राजकारण पं. नेहरूंच्या काळापासून सुरु आहे. त्याच बळावर नेहरूंनी पंतप्रधानपद आपल्या पदरात पाडून घेतले; बाकी त्यांना भारताने (मुख्यत्वेकरून काँग्रेसच्या ब्रँड बनवण्याच्या राजकारणाने) अकारण डोक्यावर चढवले आहे (होते) हे नक्की. असाच सूर (त्यांचे नाव न घेता) सप्तरंगच्या लेखांमधून व्यक्त होतो.

In reply to by समीरसूर

हा प्रतिसाद इथे चुकुन पडला आहे का ? तो माझ्या इथल्या प्रतिसादाच्या संदर्भात असंबद्ध वाटला आणि तो भाग २ मधे देखील वाचला. याकरता विचारत आहे.

In reply to by बद्दु

यकु 06/10/2011 - 14:41
ते ४००० सैनिक पाकव्याप्त काश्मिरमध्ये पर्यटनासाठी नक्कीच आले नसतील. आणि लष्करप्रमुख एखाद्या वार्ताहरासारखी नुसतीच बातमी देत आहेत. बाकी जयंतरावांचा लेख नेहमीप्रमाणेच औचित्यपूर्ण.

प्रास 06/10/2011 - 14:57
आमच्या जन्माच्याही आधीची आणि फुटकळ उल्लेखच होऊ शकलेली अशी ही हकिगत असल्यामुळे या विषयी फार माहिती नव्हती आणि नाही हे सांगायला खूपच वाईट वाटतेय. तुमच्यासारखेच कधी या आणि अशा विषयांवरती प्रश्न विचारण्याचा प्रसंग आला असताना लहान, अननुभवी आणि विषय आमच्या (त्यावेळच्या बुद्धीच्या) आवाक्याबाहेरचा, अशा कारणांनी आम्हालाही चूप बसवण्यात आले होते आणि त्याच वेळी भारत-चीन युद्ध या विषयालाच अनुल्लेखाने मारण्याचा सातत्याने प्रयत्न होत राहिला होता हे आठवते. हे (काहीशा) खेदाने नमूद करून सांगावे लागतेय की आमच्या घरातील वडीलधारे आणि शाळेतील वडीलधारे (शिक्षक) तेव्हाही नेहरुबाबांच्या विरोधी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायच्या मनोभूमिकेमध्येच नव्हते. "नेहरु कधीच चुकणार नाहीत" अशी पालुपदं तेव्हाही खूपदा ऐकलेली आहेत. त्यातही "पाठीत खंजिर खुपसला" वगैरे होतेच. आज बर्‍याच वर्षांनी या विषयाबद्दल तुमच्याद्वारे काही योग्य माहिती मिळण्याची शक्यता आलेली आहे तेव्हा तिचा योग्य तो फायदा करून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा, जयंतराव, या युद्धानंतर पंधरा वर्षांनी जन्माला आलेल्या आमच्यासारख्या जनांना ही माहिती योग्य प्रकारे मिळतेय हेच काहीसं भाग्य म्हणावं लागेल. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. तुमचा फ्याण :-)

पैसा 06/10/2011 - 14:58
वाचावंच लागेल. "आम्ही निष्काळजी राहिलो" अशी कबुली सर्वोच्च स्थानावरच्या व्यक्ति देत होत्या ही एका राष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. अर्थात पंतप्रधान, राष्ट्रपती अशी कबुली देत होते हीच मोठी गोष्ट म्हटली पाहिजे. आताच्या काळातल्या एकाही राजकारण्याने अशी कबुली दिली नसती.

कारगिल मध्येही ह्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे वाचले होते. ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून झोपायचे, ज्यांच्या आठवणींनी आदर वाटून मान ताठ होते त्या आपल्या सैन्याचा हा गाफिलपणा म्हणायचा की राजकारण्यांचा मुर्खपणा? हे सर्व वाचून मेंदू बधिर होतो आहे. पण तुम्ही लिहीत राहा. आपले राजकारणी स्वार्थ आणि मुर्खपणाच्या आधीन होऊन नैतिकतेच्या किती निम्न पातळीवर आहेत हे सर्वांना समजलेच पाहिजे. नेहरू-गांधींवर काही न बोललेलेच बरे. लगेच वादाला तोंड फुटते आणि मूळ विषय बाजूलाच राहतो.

गणपा 06/10/2011 - 15:06
चांगल्या विषयाला हात घातलाय. अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. :)

In reply to by गणपा

मृत्युन्जय 06/10/2011 - 22:29
अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. आत्ता प्रत्येक शब्दाला नविन अर्थ प्राप्त झाल्यासारखे वाटते आहे ;)

शाहिर 06/10/2011 - 15:11
पुढील भाग वाचण्यास अतिशय उत्सुक ! लहान पणी फास्टर फेणे च्या पुस्ताका मधे नेफा आघाडी ची वाताहत वाचली होती ( अर्थात कथा रूपाने) आता तिचे स्वरूप समोर येइल .. जयंत सर , तुमचे मनपूर्वक आभार !!

खूपच चांगला संकल्प सोडलात जयवंत राव तुम्ही....पुढचा भाग लवकर येऊदे... (समुद्री) चाचा नेहरू बद्दल काय बोलणार...आधीच मर्कट त्यात आयत्या सत्तेचे मद्य प्याला...

उपास 06/10/2011 - 15:34
बेजबाबदार राजकारणी ही कायमस्वरुपी गोष्ट आहे आपल्याकडे.. अगदी अशाच प्रकारचा गाफीलपणा आपण २६ नोव्हेंबरच्या मुंबईचरच्या हल्ल्यांवेळी अनुभवलाच..

तिमा 06/10/2011 - 17:18
जयंतराव, तुमच्या स्पष्टवक्त्या लेखाचे स्वागत. ह्या प्रकरणी तेंव्हाचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन हे व्हीलन ठरले होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता हे आठवते. त्यानंतर यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून बोलावल्यावर 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री' असली आचरट शीर्षके वाचल्याचेही आठवतंय. ' यशस्वी माघार' हा शब्दप्रयोग तेंव्हाच जन्माला घातला, आपल्या या पुळचट नेत्यांनी !

In reply to by तिमा

>>' यशस्वी माघार' हा शब्दप्रयोग तेंव्हाच जन्माला घातला नक्की का? मी दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात ऐकला आहे हा शब्द. आठवा, डंकर्कची यशस्वी माघार. तो युद्धशास्त्रातील सर्वमान्य प्रकार असावा.

मदनबाण 06/10/2011 - 21:38
जयंत कका, तुम्ही केलेले स्वैर भाषांतर आवडले. :) पुढील भागाची वाट पाहतो आहे. सध्याची परिस्थीती देखील काही चांगली दिसत नाहीये. :( सध्या पाक व्याप्त काश्मिर मधे नक्की किती चीनी सैन्य तैनात आहे या बद्धल काही समजेनासे झाले आहे मला ! कोणत्या बातमीत ते ४ हजार म्हंटले आहे, तर कुठे हीच संख्या १२ ते १५ हजार इतकी सांगितली जात आहे. चीन ने पाकिस्तानात एक मजबुत सैन्यतळ बनवण्याची तयारी चालवलेली दिसते ! ग्वादार बंदर ते शिनजँग व्ह्याया गिलगिट-बल्टिस्तान (पाक व्याप्त काश्मिरचा भाग) असा मार्ग चीन ने निवडलेला दिसतोय ! त्यामुळे रेड आर्मी चे पाकव्याप्त काश्मिर मधले अस्तित्व हे सामरिक दॄष्ट्या हिंदुस्थानला घातक आहे असे मला वाटते. उद्या समजा ग्वादार बंदरात चीन ने त्यांचे युद्ध पोत आणुन ठेवले तर देशाची आर्थीक राजधानी मुंबईला टारगेट करणे कठीण जाणार नाही.(इथे मोठ्या बोटी बिनदिक्कत किनार्‍या लागतात तिथे मुंबईच्या सुरक्षा किती पोकळ होती ते दिसलेच म्हणा) शिवाय पाकव्याप्त काश्मिर + तिबेटच्या बाजुने + अरुणाचल /आसामच्या बाजुने चीन आक्रमण करेल काय ? असा एक विचार मनात तरळतो आहे. ता.क :--- काही दुवे http://www.youtube.com/watch?v=89HbQwWolyg http://www.youtube.com/watch?v=kCtgvj2qh7g http://www.youtube.com/watch?v=mVOmsLWI1EA&feature=related

मराठे 06/10/2011 - 19:03
श्रीलंकेतही प्रथम आर्थिक आणी नंतर नागरी मदत देण्याच्या नावाखाली चीनने हातपाय पसरायला सुरुवात केलीच आहे. त्यामुळे भारताला चहूबाजूंनी घेरण्याचा आणि आशियामधे दबदबा निर्माण करण्याचा चीनचा हेतु सरळ आहे.

"चीनने पाठीत खंजिर खुपसला" शाळेत असेच शीकवीत असत! नंतर एकेक कथा कळाल्या ... असो! आज मात्र परीस्थीती फारच बदललीय असे वाटतेय. जागतीक राजकारणाचा प्रभाव तसेच भारताची वाढ्लेली ताकद (जरि पुरेशी नसली तरी) ह्यास कारणीभुत असावी असे वाटतेय. चीनने दिलेल्या शांततेच्या आश्वासनावर पंडितजींनी विश्वास ठेवला असेलही (वा नसेलही). आम्ही एव्हढाच बोध घ्यावयास हवा "विश्वास जरुर ठेवावा, पण सजगता हरवुन नव्हे". बा़की जयंतरावांचे आभार ...

बहुगुणी 06/10/2011 - 22:46
जयंतरावः लिहा आणखी विस्ताराने, आपल्या राजकीय तसंच लष्करी नेतृत्वाची लक्तरं काढणारा हा कालखंड तरूणांना कळायलाच हवा म्हणजे भाविष्यात पुन्हा असं होऊ नये याची काळजी घेण्याचा रेटा ते आताच्या नेतृत्वावर आणू शकतील (अशी भाबडी आशा तरी व्यक्त करतो!) मला वाटतं 'हकीकत' हा चित्रपट याच युद्धावर आधारित होता. 'हकीकत' हा सर्वोत्तम भारतीय युद्ध-चित्रपट होता असा त्याचा उल्लेख झालेला आढळतो, तरीही माझ्या आठवणीप्रमाणे ही प्रामुख्याने एक प्रेमकथा होती आणि त्यात दिल्लीच्या राजकारणाचा फारसा उल्लेख नव्हता, असं आठवतं. (पुन्हा पाहून खात्री करायला हवी. पण तसा तो नसण्याची शक्यता आहेच, कारण या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्याला भारतीय सैन्यदलाने आर्थिक सहाय्य केल्याचा उल्लेख मला पाहिल्याचं आठवतं.) त्यातली लता, रफी आणि सहकार्‍यांची गाणी अजूनही अंगावर काटा आणतात. 'कर चले हम फिदा जानो तन साथियों' हे रफी ने जीव तोडून गायलेलं गाणं याच चित्रपटातलं.

अर्धवटराव 07/10/2011 - 00:00
भारताचा दारुण पराभव झाला... मान्य. त्याचं खापर अर्थात राजकीय-लश्करी नेतृत्वावर फुटायचं.. हे ही मान्य. पण नेहरुंना शिव्या घलण्यात काहि पोईंट नाहि. नुकताच स्वतंत्र झालेल्या, गरीब-मागासलेल्या-सरंजामशाहीची सवय असलेल्या राष्ट्राला सर्वांग-शक्तीशाली बनवायला ५० वर्षाचा काळ देखील अपुरा आहे. नेहरुंनी नुकतीच कुठे जमिनीची मशागत केली होती आणि बियाणे पेरले होते. त्याचं फळ यायला वेळ लागणारच होता. काहि ठोकताळे-अंदाज बांधुन, काहि रिस्क घेउन त्यातल्यात्यात चांगलं काय करता येईल ते नेहरुंनी करायचा प्रयत्न केला. काहि अंदाज चुकले... पण म्हणुन त्यांना केवळ स्वप्नाळू वगैरे म्हणता येणार नाहि. सरदार पटेल, सुभाषबाबु वगैरे प्रभृती देशाची कमान हाती घेते तर चित्रं फार चांगलं असतं असं म्हणायला जागा आहे (मलाही असं वाटतं) पण हा अंदाज आहे, निष्कर्श नाहि. नेहरुं नेंतर काँग्रेसने जी देशाची वाट लावली ति मात्र अक्षम्य आहे. खास करुन सद्ध्या तर लाजीरवाणेपणाचा कळस केलाय त्या पार्टीने. बाकी भविष्याचं प्लॅनींग करायला इतीहासाचा रेफरन्स घ्यावाच लागतो, तेंव्हा अशे लेख निश्चितच स्वागतार्ह आहेत. येउ देत. अर्धवटराव

शिल्पा ब 07/10/2011 - 00:24
विश्वास ठेवावा पण आधी खात्री करुनच!! या गोष्टी न विसरता त्यांच्यापासुन धडा घ्यायला हवा. चीन सगळ्याच बाबतीत भारताच्या पुढे आहे. अमेरीका , नाटो चिटो कोणालाही दाद न देण्याची त्यांची प्रवृत्ती सगळ्यांना माहीतीच आहे आणि त्यांच्या बाजारपेठेमुळे आणि स्वस्त लेबरमुळे कोणी फारसा विरोध करणारही नाही. देशाचा एक भाग त्यांनी गिळला अजुन अरुणाचल प्रदेश वगैरेवर हक्क सांगतच आहेत. अजुनही भारत सरकार उत्तर पुर्व भागातल्या राज्यांकडे हवे तेवढे लक्ष पुरवत नाही. त्यांना जाणीव व्हायला हवी की ते भारतीय आहेत. लोकसत्ता वगैरेत खुपदा लेख वाचलेत की त्यांना भारत हा त्यांचा देश वाटतच नाही म्हणुन. :( दुर्दैव!! इतके पोटेंशियल असलेल्या देशाची नासाडी चालु आहे दुसरे काही नाही. लोकं सुद्धा सत्ताधार्‍यांना काही धडा (निवडणुका) शिकवु इच्छित नाहीत. :(

+१ वाचावेच लागेल. भारत-चीन युद्ध नेहमीच उपेक्षित विषय वाटत आलेला आहे. खुप खुलेपणानी त्यावरच्या चर्चा वाचल्याचे आठवत नाही. पानिपताच्या पराभवाच्या कटु आठ्वणींसारखेच मनाच्या कोपर्यात दडवुन ठेवलेला विषयावर अधिक वाचायला आवडेल. --मयुरा.

sagarparadkar 07/10/2011 - 00:52
नेमके अशावेळीच कुठे दडी मरून बसतात कोण जाणे .... बाकी नेहरूंना या प्रकरणी लोक शिव्या का घालतात ते वर म्हटल्याप्रमाणे जनरल थोरात ह्यांचं आत्मचरित्र वाचल्यावरच कळेल. कृष्ण मेनन ह्यांच्याबद्दल ते जितके आग्रही का होते तितकेच सैनिकांच्या जीवाबद्दल ते बेफिकीर वाटले, निदान मला तरी. मला नेहेमी आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की विज्ञान्-तंत्रज्ञान ह्या गोष्टींबद्दल जिव्हाळा असलेले नेहरू, व्यावहारीक बाबतींत एवढे गाफील कसे राहिले असतील?

In reply to by sagarparadkar

नितिन थत्ते 07/10/2011 - 16:06
कहॉ गये वो चाचा? Submitted by sagarparadkar on Fri, 07/10/2011 - 00:52. नेमके अशावेळीच कुठे दडी मरून बसतात कोण जाणे ....
हा व्यक्तिगत शेरा आहे असे वाटते. भारताच्या सैन्याची तयारी नव्हती + इक्विपमेंट नव्हती हे मान्य परंतु नेहरू चीनकडून असलेल्या धोक्याबाबत (चीनने हल्ला करेपर्यंत) गाफील होते हे मान्य नाही. नुकत्याच मिपावरील मनोबांच्या धाग्यात या बाबतची वस्तुस्थिती मांडली होती. वर अप्पा जोगळेकर यांनी कुरुंदकारांच्या 'जागर' मधील उल्लेख दिले आहेत. चीनशी केव्हा ना केव्हा संघर्ष होणार हे नेहरूंना नक्कीच ज्ञात होते. तयारीला उसंत म्हणून शांततेचा आणि मैत्रीचा मंडप उभारून शक्य तितका वेळ मिळवणे हेच त्या हिंदी-चीनी भाई भाई धोरणाचे सार होते. हा दुवा अभ्यासावा.

In reply to by नितिन थत्ते

मैत्र 13/10/2011 - 11:13
चीनशी केव्हा ना केव्हा संघर्ष होणार हे नेहरूंना नक्कीच ज्ञात होते. तयारीला उसंत म्हणून शांततेचा आणि मैत्रीचा मंडप उभारून शक्य तितका वेळ मिळवणे हेच त्या हिंदी-चीनी भाई भाई धोरणाचे सार होते. हा दुवा अभ्यासावा. दुव्यावरचं एक महत्त्वाचं वाक्य -- So, the only conclusion one can come to is that all the signals from New Delhi were interpreted in Beijing as a determined preparation for war against China. Once that conclusion was reached, the Chinese decided to take pre-emptive action. And when one dose of such action in October 1962 did not produce results, they administered a second one in November. मिपावरच पूर्वी एकदा झालेल्या तपशीलवार चर्चेत असा साधारण संदर्भ / निष्कर्ष निघाला होता की "फॉरवर्ड पॉलिसी" मुळे भारताचे पुढे सरकणे आणि सीमेवरच्या (मॅकमोहन) सैनिकरहीत जागा आणि चौक्या ताब्यात घेणे हे चीनने हल्ला किंवा आगळीक / provocation असे धरले. जेव्हा ते त्यांच्या कल्पनेच्या / संयमाच्या पलिकडे गेले तेव्हा चीनने सर्व शक्तीनिशी जोरदार हल्ला करुन उलट नेफा प्रांतातला बराचसा भाग काबीज केला. हिंदी चीनी भाई भाई म्हणून गाफील राहिले यापेक्षा स्वतः पुढे सरकून आंतरराष्ट्रीय धोरणात घोडचुक ठरेल अशी गोष्ट वारंवार करुन चीन फक्त आपल्या संबंधांवर विश्वास ठेवून हल्ला करणार नाही किंवा सीमा ओलांडून आपला भूप्रदेश ताब्यात घेणार नाही असं शेवटपर्यंत विचार करणं हे दिवास्वप्नच म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट गाफील राहण्याची -- जर फॉरवर्ड पॉलिसी होती तर सैन्याची त्या वातावरणात आणि उंचीवर लढण्याची तयारी हवी होती. ज्या तुकड्या - रेजिमेंट्स किंवा बटालियन्स हलवल्या गेल्या त्यात याचा बराच घोळ घातला गेला. श्री. हसबनीस यांनी सकाळच्या लेखात सांगितलं आहे की त्यांना आधी थोडे दिवस लेह मध्ये नेऊन प्रशिक्षण / वातावरणाची आणि चढाईची तयारी केली गेली.. ही चांगलीच गोष्ट होती. पण लगेचच उलट पवित्रा घेऊन वेगळ्या रेजिमेंट्स तिथे पाठवल्या गेल्या. या चूका खूप मोठ्या प्रमाणात भोवल्या. एक अतिशय नवीन तरूण राष्ट्र केवळ १५ वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेलं... या सर्व भवति न भवति मध्ये जरा तरी मागे गेलं. नेहरुंना स्वतःलाही धक्का बसला असावा. नव्या देशाच्या सैन्याचा मनोबलावर किती परिणाम झाला असेल हे तेव्हा लढलेले लोकच सांगू शकतील...

मराठी_माणूस 07/10/2011 - 10:50
ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय....... मग नैतीक जबाबदारी स्विकारुन राजीनामा का नाही दिला? स्वतः तर खुर्चीला चीकटुन राहीलेच , मुलीलाही आणले . आजता गायत ती लीगसि चालु आहे.

इरसाल 07/10/2011 - 12:18
बरीचशी माहिती नवीन.लेख नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक आणि माहितीपूर्ण. अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. अवांतर : गणपाच्या या वाक्यावरून तो संपादकपणाच्या भूमिकेत शिरला देखील.

मनीषा 07/10/2011 - 15:21
माहितीपूर्ण लेख ... उच्चपद्स्थ व्यक्तीच्या स्वप्नरंजनाची खूप मोठी किंमत संपूर्ण देशाने चुकविली आहे ... आणि अजून देणे फिटलेले नाही . तरीही मला वाटते,व्यक्तीगत आयुष्यात जे चांगले गुण ठरले असते ते राजकीय जीवनात मात्र घातक ठरले . उदा. दुसर्‍याच्या चांगुलपणावर असलेला विश्वास .

सुनील 07/10/2011 - 15:04
वाचतोय. मॅक मोहन रेषा आणि भारताची फॉरवर्ड पॉलिसी याबद्दल विस्ताराने लिहावे.

मन१ 08/10/2011 - 17:37
मी सुरु केलेल्या १९६५ च्या संदर्भातल्या धाग्यात भारत्-चीन सीमप्रश्नाबद्दलही बरीच माहिती प्रतिसादातून समजली होती. त्याचीही माहिती कामाची ठरावी.

सध्या अनेक वृत्त पत्रात १९६२ च्या सैन्यामधील अधिकाऱ्यांचे लेख येत आहेत .त्यांनी सर्वांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे . नेहरूंचे सो कोल्ड परराष्ट्र धोरण आपल्या देशाला अपरिमित हानीकारक ठरले . १९६२ चा मानहानीकारक पराभव हा त्याचा परिपाक आहे . मुळात नेहरू ह्यांचे प्रसिद्धीचा ( आंतराष्ट्रीय राजकारणात ) हव्यास. चमकोगिरी करण्याची प्रवृत्ती मुळे त्यांनी शीत युद्धात नुसते तटस्थ न राहता एक तिसरी आघाडी उघडून दोन महासत्ता व त्यांच्या कंपूला बोधांमृत पाजायला सुरवात केली . हे म्हणजे गल्लीतील दोन दादा ( भाई ) भांडत असतांना नुकत्याच हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलेल्या मुलाने त्यांना भानू नका असा उपदेश करणे होय . अश्यावेळी ते दोघेही भाई आपली भांडणे एक मिनिट बाजूला ठेवून त्या मुलाला म्हणतील ;; तुझे वय काय ,तू बोलतो काय ? १९६२ च्या वेळी बध्याची भूमिका घेऊन ह्या महासत्तांनी जणू नेहरू ह्यांना हेच दाखवून दिले .( जमले तर आमरण उपोषण करा नाही तर सत्याग्रह. ) नी सोडवा हा पेचप्रसंग .तिसर्या आघाडीचे पुढे पानिपत झाले . अर्थात चीन व भारताच्या ह्याच्यात सीमा तंट्याची सुरवात झाली ती स्वातंत्र्यपूर्वी . ब्रिटीश साम्राज्याने भारत गिळकृत केला तेव्हा चीन च्या लगत असलेला आपल्या प्रदेशात स्वतःच्या मर्जीने सीमा आखून घेतली .( त्यांच्या विरुद्ध काय चीन बोलणार ?) मात्र भारत स्वतंत्र झाला .व त्याने त्याच सीमेला आधार मानले . खुद्द ब्रिटन आता स्वतःच्या पुनर्वसनात मग्न होता .अश्यावेळी चीनी महत्वाकांक्षेला पंख फुटले . स्वातंत्र्य नंतर आपल्या सैन्याचे आधुनुकीकरण झाले नाही .सगळ्यात कहर म्हणजे पाकिस्ताने जेव्हा काश्मीर वरून राडा घातला. तेव्हा त्यांनी १९४८ साली आय एस आय ची स्थापना केली जिचे त्यावेळचे लक्ष्य भारत होते .( ह्या आधी ब्रिटीश काळातील आयबी ही देशांतर्गत हेर संघटना ही भारत पाक मध्ये विभागल्या गेली होती .) मात्र आय एस आय ही परकीय भूमीवर कारवाया करण्यासाठी सी आय ए च्या धर्तीवर निर्माण केल्या गेली .आमचे शांततेची पुंगी वाजणाऱ्या ह्या नेत्याने भारतात अश्या बाबतील काहीच केले नाही .( इंदिराजी ह्यांनी १९६८ साली रॉ ची निर्मिती केली .व १९७१ ला रॉ ने आपले पहिले मिशन पूर्ण केले .) शत्रू हा अकस्मात हल्ला करतो .आमची सरकारी यंत्रणा गाफील होती ,स्वतःच्या स्वप्न रंजनात मश्गुल होती पण चीनशी संबंध चांगले ठेवताना काही चुका माझ्या मते नेहरू ह्यांनी केल्या .१) दलाई लामा ह्यांना संरक्षण देणे आपल्या दृष्टीने लामा कितीही थोर असले तरी चीनची त्यांचा संघर्ष होता अश्यावेळी चीनला राग येणे स्वाभाविक आहे .( एक उदाहरण देतो ही तुलना नाही आहे . दाउद आज पाकिस्तान मध्ये आहे तो आय एस आय व अलकायदा ह्यांना निधी पुरवतो म्हणून त्यांचे तेथे कौतुक होते .) मात्र आपल्या दृष्टीने हे पाकचे महा पातक आहे . २) नेहरू एकीकडे जागतिक शांततेसाठी आघाडी करून बसले होते .पण खुद भारतात हैद्राबाद व गोवा प्रसंगी भूभाग कब्जात घेण्यासाठी सफल सैन्य कारवाई केली .( ह्यावेळी काश्मीर सारखा हा प्रश्न युएन मध्ये नेला नाही ) अर्थात पोलादी पुरुषाच्या मुळे हे शक्य झाले व आपल्या दृष्टीने योग्य झाले .. पण हा विरोधाभास चीन ला खटकला . तेव्हा त्यांनी आपल्या कुमकुवत सैन्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन नियोजन पद्धतीने आपल्यावर हल्ला चढवला . ह्या प्रसंगी आपली भूमिका ज्यात , लष्कराचा वापर योग्य व आवश्यक होता चीनला व जगाला पटवून देणे .गरजेचे होते .( जे आपण केले नाही .कदाचीत पटेल, नेहरू ह्यांच्यातील सुप्त संघर्ष ह्याला कारणीभूत असेल ) अजून महत्वाची घोड चूक म्हणजे अमेरीकेला चीन अणुचाचणी करणार ही कुणकुण लागली होती ( चीन ने १९६४ साली ती केली ) नेहरुकडे अमेरिकेने चीन वर हेरगिरी करण्यासाठी मदत मागितली .मात्र पु ल म्हणतात तसे ''आपले पराराष्ट्र धोरण ह्या संबंधी कधी हो ,कधी नाही असे होते .( खरे तर अण्वस्त्र सज्ज चीन आपल्यासाठी त्रासदायक होता ) ह्या युध्धा नंतर मेनन ह्यांना संरक्षण मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले . धर्मावर आधारीत राष्ट्रे मान्य नाही म्हणून ज्यू राष्ट्राला मान्यता न देणे हा गांधीजींचा विचार आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग झाला ( ह्या राष्ट्राची स्थापना वेस्ट च्या बड्या राष्ट्रांनी केली होती .त्यांना विरोधात जाऊन स्वताचा अकलेचे तारे तोडणे म्हणजे ....) नरसिंह राव ह्यांनी ही चूक सुधारली लुक वेस्ट हा नारा दीला . व ज्यू राष्ट्राशी अधिकृत रीत्या संबंध जोडले ज्यावर वाजपेयी सरकार व नुकतेच गडकरी ह्यांनी कळस चढवला . १९६४ साली चीन अण्वस्त्र सज्ज होणे ही आपल्या दृष्टीने गंभीर बाब होती .किंबहुना त्यांच्या अण्वस्त्र सज्ज होण्याच्या प्रक्रियेत वेस्टन देश अडथळे आणत होते .भारतातवर कारवाई करून चीन ने जगाला अप्रत्यक्ष संदेश दिला '' नाद करायचा नाही '' अर्थात आपले राजकर्ते युद्ध करण्याच्या मनस्थितीत नाही ह्यांची त्यांना पुरेपूर कल्पना होती . दसर्याला शस्त्र पूजा करणाऱ्या भारतीय जनतेच्या हातात बळजबरीने चरखा देऊ पाहणाऱ्या ह्या राज्यकर्त्याने भारतीय इतिहासाची चांगलीच डिस्कवरी केली होती ,व तो समजून घेतला होता .

In reply to by नगरीनिरंजन

sagarparadkar 07/10/2011 - 00:05
जनरल थोरात ह्यांचं आत्मचरित्रदेखील वाचावं अशी विनंति सर्वांनाच करतोय. मी त्यातील काही भाग बहुतेक 'लोकसत्ता'मधे वाचला होता, जेव्हा ते आत्मचरित्र प्रसिद्ध झालं .... अर्थातच तेव्हा श्री. माधव गडकरी हे लोकसत्ताचे संपादक असावेत नाहीतर बहुतेक ते लेख लोकसत्तामधे आलेच नसते अशी माझी खात्री आहे .... त्या 'कौल्'चे होस्पिटलमधून जनरल थिमय्यांना आदेश देणे वगैरे चीड आणणारा भाग होता .... (इथे नावांमधे काही चूक झाली असल्यास क्षमस्व)

समीरसूर 06/10/2011 - 13:39
छान लेख! पं. नेहरू हा एक भंपक माणूस होता यात काहीच शंका नाही. पं. नेहरूंना भारताने अकारण डोक्यावर चढवलेले आहे. लेडी माऊंटबॅटनच्या आगे-मागे घुटमळण्याखेरीज आणि स्वत:च्या पत्नीला सतत हीन आणि अपमानास्पद वागणूक देण्याखेरीज या भ्रमराने काहीच केले नाही. आताही जर चीनने हल्ला केला तर फार काही वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही. चीन अतिमहाकाय आणि अतिताकदवान असा देश आहे. आपला फार काळ टिकाव लागेल असे वाटत नाही. अजूनही त्यांची सीमेलगतची जमवाजमव, नेपाळ, पाकिस्तानमधले सीमेलगतचे रस्ताउभारणीचे काम, शेजारच्या देशांना आपल्या बाजूला करून घेण्याचे उपद्व्याप, अरुणाचल प्रदेशावर अधून-मधून हक्क सांगणे, व्हीसाचे सुटे कागद देणे...या गोष्टी वाटतात तितक्या सरळ वाटत नाहीत. आपण बसलोय कॉमनवेल्थ गेम्ससारखे आणि आयपीएलसारखे निरर्थक आणि बिनबूडाचे तमाशे भरवत!!! भारतीय लोकं दूरदृष्टीच्या बाबतीत खूपच कच्चे आहेत. 'चलता हैं' नावाचा व्हायरस जेव्हा आपल्या लोकांना सोडेल तेव्हाच काहीतरी चांगले घडेल... --समीर

In reply to by समीरसूर

पं. नेहरू हा एक भंपक माणूस होता यात काहीच शंका नाही. पं. नेहरूंना भारताने अकारण डोक्यावर चढवलेले आहे. हे अत्यंत उथळ विधान आहे. हा माणूस थोर लेखक तर होताच याशिवाय अत्यंत बिलंदर राजकारणी होता. सरदार पटेलांसारख्या माणसाला गवत चारुन जो माणूस पंतप्रधान झाला तो माणूस बिलंदरच असणार. चीनने शांततेचे आश्वासन दिले आणि त्यावर पंडितजींनी विश्वास ठेवला इतके साधे हे गणित नसावे. भारत हे एक समॄद्ध आणि बलिष्ठ राष्ट्र व्हावे हे स्वप्न त्यांनी पाहिले. पहिली पंचवार्षिक योजना शेती आणि दुसरी अवजड उद्योग-धंद्यांना वाहिलेली आहे. कदाचित तिसर्‍या किंवा चौथ्या योजनेमध्ये संरक्षण व्यवस्था बलिष्ठ करण्याचा त्यांचा विचार असेल सुद्धा. भुकेकंगाल माणूस आधी जेवण मिळवण्याचा विचार करेल आणि मग सुरक्षिततेचा. अन्यथा त्या माणसाचे किंवा देशाचे पाकिस्तान होणार नाही का ? लेडी माऊंटबॅटनच्या आगे-मागे घुटमळण्याखेरीज आणि स्वत:च्या पत्नीला सतत हीन आणि अपमानास्पद वागणूक देण्याखेरीज या भ्रमराने काहीच केले नाही. या तपशीलांविषयी फारशी माहिती नाही. तरीदेखील या खाजगी गोष्टींशी आपल्याला काय करायचे आहे ? शिवाय असे आरोप करणार्‍यांकडे तसे काही पुरावे आहेत काय ?

In reply to by अप्पा जोगळेकर

रामपुरी 06/10/2011 - 21:51
" अत्यंत बिलंदर राजकारणी" वगैरे ठिक आहे पण "थोर लेखक" नक्कीच म्हणू शकत नाही. "भुकेकंगाल माणूस आधी जेवण मिळवण्याचा विचार करेल आणि मग सुरक्षिततेचा." जवळ विषारी साप बसलेला असताना कितीही भुकेकंगाल माणूस जेवण करू शकेल असे वाटत नाही. तो प्रथम आपल्या सुरक्षिततेचाच विचार करेल असे नाही वाटत??? आता तो माणूस मूर्ख असेल किंवा अतिशय भोळा असेल किंवा तो साप आहे यावर त्याला (काही कारणाने) विश्वासच ठेवायचा नसेल तर गोष्ट वेगळी.... तसे काही पुरावे आहेत काय ? पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? :) :)

In reply to by रामपुरी

" अत्यंत बिलंदर राजकारणी" वगैरे ठिक आहे पण "थोर लेखक" नक्कीच म्हणू शकत नाही. डिस्कव्हरी ऑफ ईंडिया किंवा ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी वाचले आहे काय ? ही पुस्तके आपणास सुमार दर्जाची वाटतात काय ? पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? हो. असेच म्हणायचे आहे. तो प्रथम आपल्या सुरक्षिततेचाच विचार करेल असे नाही वाटत??? असेच वाटते. शांततेचा लांबरुंद मंडप पसरुन तयारी करण्यासाठी, मजबूत बनण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर बरे असा विचार पंडितजींनी केला असावा. अर्थात ते असाच विचार करत असतील याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. पण समजा त्यांचा तसा इरादा नसेल तरीसुद्धा भंपक माणूस इतक्या शेलक्या विशेषणांनी त्यांचा पाणउतारा करणे हा भंपकपणा वाटतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

>>पुरावे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? त्यांची प्रेमपत्रे/ पेज ३ फोटो वगैरे म्हणायचे आहे काय? >>हो. असेच म्हणायचे आहे. माझ्या माहितीप्रमाणे, हि एक उघड गोष्ट होती. खुद्द लेडी माउंटबॅटनने या विषयी लिहिले आहे असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

माझ्या माहितीप्रमाणे, हि एक उघड गोष्ट होती. खुद्द लेडी माउंटबॅटनने या विषयी लिहिले आहे असे वाचल्याचे स्मरते. ठीक आहे. मग तर प्रश्नच मिटला. या उघड गोष्टीच्या आधारे त्या माणसाचे मूल्यमापन असे आपणांस वाटते काय ?

In reply to by अप्पा जोगळेकर

संबंध नसताना मधे बोलतो. डिस्कव्हरी ऑफ ईंडिया किंवा ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी वाचले आहे काय ? ही पुस्तके आपणास सुमार दर्जाची वाटतात काय ? हो विषेशतः डीस्कवरी ऑफ इंडिया मधली मते. असेच वाटते. शांततेचा लांबरुंद मंडप पसरुन तयारी करण्यासाठी, मजबूत बनण्यासाठी थोडा वेळ मिळाला तर बरे असा विचार पंडितजींनी केला असावा. अर्थात ते असाच विचार करत असतील याचा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. तसा शांततेचा विचार कोणी करत असेल तर काही चूक नाही. परंतु एकूण जगाच्या इतिहासाचा विचार करता कमरेला तलवार बांधूनच राम राम करत मनुष्य शांतपणे बसू शकतो. त्यामुळे पंडीतजींना तसे वाटले असेल तर ते बालिश वाटले इतकेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हो विषेशतः डिस्कवरी ऑफ इंडिया मधली मते. हे पुस्तक म्हणजे माहिती, अ‍ॅनालिसिस, मते आणि कन्क्ल्युजन्स यांचा महासागर आहे. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक वाचकाचा अनेक ठिकाणी लेखकाशी मतभेद होणार हे उघड आहे. या मतभेदांमुळे त्या पुस्तकाला सुमार म्हणण्याचा अधिकार वाचकाला आहे असे वाटत नाही. हां. आता लिहिलेले वाक्य न वाक्य चुकीचे, भंपक वगैरे वाटत असेल तर माझे काहीच म्हणणे नाही. या पुस्तकात शिवाजी राजांवर काहीच्या बाही टीका केली गेली आहे असे मी ऐकले होते. पण जेंव्हा प्रत विकत घेउन वाचली त्यामधे असे काही मला तरी सापडले नाही. 'राईज ऑफ हिंदू नॅशनॅलिझम ' असा उल्लेख करुन शिवाजीचा गौरव केला आहे हेच मला आढळले. 'कदाचित काँग्रेसच्या नेहमीच्या धोरणानुसार तो भाग नंतर एडिट केला गेला असेल' हे शक्य आहे. पण, झापडे लावून 'सहा सोनेरी पाने' वाचावे आणि जागतिक दर्जाचे पुस्तक म्हणून त्याचा गौरव करावा. तशीच झापडे लावून 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' वाचावे आणि त्याच्यावर'सुमार' पुस्तक म्हणून टीका करावी ही मला स्वतःशीच केलेली प्रतारणा वाटते. तुम्ही तसे आहात असे माझे म्हणणे नाही पण अशी काही मंडळी भेटलेली आहेत इतकेच सांगू इच्छितो. त्यामुळे पंडीतजींना तसे वाटले असेल तर ते बालिश वाटले इतकेच. याबद्दल अधि़आराने काहीच बोलू शकत नाही. भाग-२ वर चालू असलेली यासंदर्भातली चर्चा वाचून मी तरी गोंधळून गेलो आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

समीरसूर 10/10/2011 - 10:34
कालच्या, म्हणजे ०९-ऑक्टोबर-२०११ (रविवार) च्या दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीच्या सप्तरंग पुरवणीमध्ये १९६२ च्या भारत-चीन युद्धावर काही जाणकारांचे आणि प्रत्यक्ष त्या युद्धात भाग घेतलेल्या योद्ध्यांचे लेख आलेले आहेत. पहिला लेख या युद्धात कैदी झालेल्या लेफ्टनंट कर्नल श्रीकांत हसबनीस यांचा आहे. चीनच्या आक्रमणाला भारताचे प्रत्युत्तर किती भिकार होते याचे त्यांनी वर्णन केले आहे. निव्वळ थंड केबिन्समध्ये आरामात बसून आपल्या राज्यकर्त्यांनी नकाशावर बोट ठेवून इथे पोस्ट उभारा, तिथे पोस्ट उभारा असे सांगीतले होते असे हसबनिस सांगतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवरची परिस्थिती किती अवघड होती आणि भारताची तयारी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे किती तोकडी होती याचे यथार्थ आणि वैषम्यपूर्ण वर्णन हसबनिस या लेखात करतात. याच सुराचे लेख कॅप्टन भूषण गोखले आणि अनंत बागाईतकर यांचे आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर १५ वर्षे उलटून गेल्यावरही भारतावर राज्य करणारे पं. नेहरूंसारखे भंपक नेते किती स्वप्नाळू, भित्रे, पुचाट आणि निर्बुद्ध होते हे या लेखांमधून स्पष्टपणे समोर येते. हे लेख प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्या किंवा त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या आणि तज्ञ मंडळींनी लिहिले असल्याने त्या लेखांच्या सत्यतेविषयी शंका घेण्याचा प्रश्नच उरत नाही. शांततेचा पुरस्कर्ता असणं म्हणजे निर्बुद्धसारखं युद्धाची तयारी न ठेवणं नव्हे! पाकिस्तानसारखा विषारी आणि कृतघ्न साप शेजारी असतांना आणि त्याच्या विषाचा प्रत्यय आलेला असतांना आपण शांत राहण्याच्या नादात सुसज्ज संरक्षणव्यवस्था न ठेवणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे. पं. नेहरूंनी चीनची लाचारी पत्करून आपल्या भित्र्या आणि कमअसल मनोवृत्तीचे दर्शन घडवले. शांतता, सलोखा, भाईचारा, अहिंसा, शेजार्‍यांशी सौहार्दाचे संबंध इत्यादी गुण तुम्ही तेव्हाच सर्व ताकदीनिशी दाखवू शकता जेव्हा तुमची संरक्षणव्यवस्था अत्यंत मजबूत आणि कुठल्याही आगळीकीला सडेतोड उत्तर देण्याच्या क्षमतेची असते; अन्यथा त्या निव्वळ वल्गना ठरतात. इतकी सोपी गोष्ट पं. नेहरूंसारख्या तथाकथित महान नेत्याला कळली नाही यातच त्यांचे बुळेपण दिसून येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५ वर्षे आपली संरक्षणव्यवस्था इतकी ढिसाळ होती की त्याकाळी भारतात पं. नेहरूंसारखा तथाकथित दूरदृष्टी असलेला, कणखर, प्रखर देशप्रेमी वगैरे वगैरे नेता आपला पंतप्रधान होता हे खरेच वाटत नाही. तिथे पाहिजे होते सरदार वल्लभभाई पटेल! पं. नेहरूंचे नशीब जोरदार म्हणून त्यांना पंतप्रधानपद मिळाले. जसे आज कुठल्याही कर्तुत्वाविना प्रतिभा पाटलांना राष्ट्रपतिपद मिळते, आवाज नसणार्‍या मनमोहन सिंगांना चक्क दोन-दोन टर्म्स पंतप्रधानपद मिळते, देवेगौडासारख्या झोपाळू माणसाला पंतप्रधानपद मिळते, अगदी तसेच पं. नेहरूंना पंतप्रधानपद मिळाले. भारतातले हे घाणेरडे आणि स्वार्थी राजकारण पं. नेहरूंच्या काळापासून सुरु आहे. त्याच बळावर नेहरूंनी पंतप्रधानपद आपल्या पदरात पाडून घेतले; बाकी त्यांना भारताने (मुख्यत्वेकरून काँग्रेसच्या ब्रँड बनवण्याच्या राजकारणाने) अकारण डोक्यावर चढवले आहे (होते) हे नक्की. असाच सूर (त्यांचे नाव न घेता) सप्तरंगच्या लेखांमधून व्यक्त होतो.

In reply to by समीरसूर

हा प्रतिसाद इथे चुकुन पडला आहे का ? तो माझ्या इथल्या प्रतिसादाच्या संदर्भात असंबद्ध वाटला आणि तो भाग २ मधे देखील वाचला. याकरता विचारत आहे.

In reply to by बद्दु

यकु 06/10/2011 - 14:41
ते ४००० सैनिक पाकव्याप्त काश्मिरमध्ये पर्यटनासाठी नक्कीच आले नसतील. आणि लष्करप्रमुख एखाद्या वार्ताहरासारखी नुसतीच बातमी देत आहेत. बाकी जयंतरावांचा लेख नेहमीप्रमाणेच औचित्यपूर्ण.

प्रास 06/10/2011 - 14:57
आमच्या जन्माच्याही आधीची आणि फुटकळ उल्लेखच होऊ शकलेली अशी ही हकिगत असल्यामुळे या विषयी फार माहिती नव्हती आणि नाही हे सांगायला खूपच वाईट वाटतेय. तुमच्यासारखेच कधी या आणि अशा विषयांवरती प्रश्न विचारण्याचा प्रसंग आला असताना लहान, अननुभवी आणि विषय आमच्या (त्यावेळच्या बुद्धीच्या) आवाक्याबाहेरचा, अशा कारणांनी आम्हालाही चूप बसवण्यात आले होते आणि त्याच वेळी भारत-चीन युद्ध या विषयालाच अनुल्लेखाने मारण्याचा सातत्याने प्रयत्न होत राहिला होता हे आठवते. हे (काहीशा) खेदाने नमूद करून सांगावे लागतेय की आमच्या घरातील वडीलधारे आणि शाळेतील वडीलधारे (शिक्षक) तेव्हाही नेहरुबाबांच्या विरोधी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायच्या मनोभूमिकेमध्येच नव्हते. "नेहरु कधीच चुकणार नाहीत" अशी पालुपदं तेव्हाही खूपदा ऐकलेली आहेत. त्यातही "पाठीत खंजिर खुपसला" वगैरे होतेच. आज बर्‍याच वर्षांनी या विषयाबद्दल तुमच्याद्वारे काही योग्य माहिती मिळण्याची शक्यता आलेली आहे तेव्हा तिचा योग्य तो फायदा करून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा, जयंतराव, या युद्धानंतर पंधरा वर्षांनी जन्माला आलेल्या आमच्यासारख्या जनांना ही माहिती योग्य प्रकारे मिळतेय हेच काहीसं भाग्य म्हणावं लागेल. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. तुमचा फ्याण :-)

पैसा 06/10/2011 - 14:58
वाचावंच लागेल. "आम्ही निष्काळजी राहिलो" अशी कबुली सर्वोच्च स्थानावरच्या व्यक्ति देत होत्या ही एका राष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. अर्थात पंतप्रधान, राष्ट्रपती अशी कबुली देत होते हीच मोठी गोष्ट म्हटली पाहिजे. आताच्या काळातल्या एकाही राजकारण्याने अशी कबुली दिली नसती.

कारगिल मध्येही ह्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे वाचले होते. ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवून झोपायचे, ज्यांच्या आठवणींनी आदर वाटून मान ताठ होते त्या आपल्या सैन्याचा हा गाफिलपणा म्हणायचा की राजकारण्यांचा मुर्खपणा? हे सर्व वाचून मेंदू बधिर होतो आहे. पण तुम्ही लिहीत राहा. आपले राजकारणी स्वार्थ आणि मुर्खपणाच्या आधीन होऊन नैतिकतेच्या किती निम्न पातळीवर आहेत हे सर्वांना समजलेच पाहिजे. नेहरू-गांधींवर काही न बोललेलेच बरे. लगेच वादाला तोंड फुटते आणि मूळ विषय बाजूलाच राहतो.

गणपा 06/10/2011 - 15:06
चांगल्या विषयाला हात घातलाय. अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. :)

In reply to by गणपा

मृत्युन्जय 06/10/2011 - 22:29
अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. आत्ता प्रत्येक शब्दाला नविन अर्थ प्राप्त झाल्यासारखे वाटते आहे ;)

शाहिर 06/10/2011 - 15:11
पुढील भाग वाचण्यास अतिशय उत्सुक ! लहान पणी फास्टर फेणे च्या पुस्ताका मधे नेफा आघाडी ची वाताहत वाचली होती ( अर्थात कथा रूपाने) आता तिचे स्वरूप समोर येइल .. जयंत सर , तुमचे मनपूर्वक आभार !!

खूपच चांगला संकल्प सोडलात जयवंत राव तुम्ही....पुढचा भाग लवकर येऊदे... (समुद्री) चाचा नेहरू बद्दल काय बोलणार...आधीच मर्कट त्यात आयत्या सत्तेचे मद्य प्याला...

उपास 06/10/2011 - 15:34
बेजबाबदार राजकारणी ही कायमस्वरुपी गोष्ट आहे आपल्याकडे.. अगदी अशाच प्रकारचा गाफीलपणा आपण २६ नोव्हेंबरच्या मुंबईचरच्या हल्ल्यांवेळी अनुभवलाच..

तिमा 06/10/2011 - 17:18
जयंतराव, तुमच्या स्पष्टवक्त्या लेखाचे स्वागत. ह्या प्रकरणी तेंव्हाचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन हे व्हीलन ठरले होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता हे आठवते. त्यानंतर यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून बोलावल्यावर 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री' असली आचरट शीर्षके वाचल्याचेही आठवतंय. ' यशस्वी माघार' हा शब्दप्रयोग तेंव्हाच जन्माला घातला, आपल्या या पुळचट नेत्यांनी !

In reply to by तिमा

>>' यशस्वी माघार' हा शब्दप्रयोग तेंव्हाच जन्माला घातला नक्की का? मी दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात ऐकला आहे हा शब्द. आठवा, डंकर्कची यशस्वी माघार. तो युद्धशास्त्रातील सर्वमान्य प्रकार असावा.

मदनबाण 06/10/2011 - 21:38
जयंत कका, तुम्ही केलेले स्वैर भाषांतर आवडले. :) पुढील भागाची वाट पाहतो आहे. सध्याची परिस्थीती देखील काही चांगली दिसत नाहीये. :( सध्या पाक व्याप्त काश्मिर मधे नक्की किती चीनी सैन्य तैनात आहे या बद्धल काही समजेनासे झाले आहे मला ! कोणत्या बातमीत ते ४ हजार म्हंटले आहे, तर कुठे हीच संख्या १२ ते १५ हजार इतकी सांगितली जात आहे. चीन ने पाकिस्तानात एक मजबुत सैन्यतळ बनवण्याची तयारी चालवलेली दिसते ! ग्वादार बंदर ते शिनजँग व्ह्याया गिलगिट-बल्टिस्तान (पाक व्याप्त काश्मिरचा भाग) असा मार्ग चीन ने निवडलेला दिसतोय ! त्यामुळे रेड आर्मी चे पाकव्याप्त काश्मिर मधले अस्तित्व हे सामरिक दॄष्ट्या हिंदुस्थानला घातक आहे असे मला वाटते. उद्या समजा ग्वादार बंदरात चीन ने त्यांचे युद्ध पोत आणुन ठेवले तर देशाची आर्थीक राजधानी मुंबईला टारगेट करणे कठीण जाणार नाही.(इथे मोठ्या बोटी बिनदिक्कत किनार्‍या लागतात तिथे मुंबईच्या सुरक्षा किती पोकळ होती ते दिसलेच म्हणा) शिवाय पाकव्याप्त काश्मिर + तिबेटच्या बाजुने + अरुणाचल /आसामच्या बाजुने चीन आक्रमण करेल काय ? असा एक विचार मनात तरळतो आहे. ता.क :--- काही दुवे http://www.youtube.com/watch?v=89HbQwWolyg http://www.youtube.com/watch?v=kCtgvj2qh7g http://www.youtube.com/watch?v=mVOmsLWI1EA&feature=related

मराठे 06/10/2011 - 19:03
श्रीलंकेतही प्रथम आर्थिक आणी नंतर नागरी मदत देण्याच्या नावाखाली चीनने हातपाय पसरायला सुरुवात केलीच आहे. त्यामुळे भारताला चहूबाजूंनी घेरण्याचा आणि आशियामधे दबदबा निर्माण करण्याचा चीनचा हेतु सरळ आहे.

"चीनने पाठीत खंजिर खुपसला" शाळेत असेच शीकवीत असत! नंतर एकेक कथा कळाल्या ... असो! आज मात्र परीस्थीती फारच बदललीय असे वाटतेय. जागतीक राजकारणाचा प्रभाव तसेच भारताची वाढ्लेली ताकद (जरि पुरेशी नसली तरी) ह्यास कारणीभुत असावी असे वाटतेय. चीनने दिलेल्या शांततेच्या आश्वासनावर पंडितजींनी विश्वास ठेवला असेलही (वा नसेलही). आम्ही एव्हढाच बोध घ्यावयास हवा "विश्वास जरुर ठेवावा, पण सजगता हरवुन नव्हे". बा़की जयंतरावांचे आभार ...

बहुगुणी 06/10/2011 - 22:46
जयंतरावः लिहा आणखी विस्ताराने, आपल्या राजकीय तसंच लष्करी नेतृत्वाची लक्तरं काढणारा हा कालखंड तरूणांना कळायलाच हवा म्हणजे भाविष्यात पुन्हा असं होऊ नये याची काळजी घेण्याचा रेटा ते आताच्या नेतृत्वावर आणू शकतील (अशी भाबडी आशा तरी व्यक्त करतो!) मला वाटतं 'हकीकत' हा चित्रपट याच युद्धावर आधारित होता. 'हकीकत' हा सर्वोत्तम भारतीय युद्ध-चित्रपट होता असा त्याचा उल्लेख झालेला आढळतो, तरीही माझ्या आठवणीप्रमाणे ही प्रामुख्याने एक प्रेमकथा होती आणि त्यात दिल्लीच्या राजकारणाचा फारसा उल्लेख नव्हता, असं आठवतं. (पुन्हा पाहून खात्री करायला हवी. पण तसा तो नसण्याची शक्यता आहेच, कारण या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्याला भारतीय सैन्यदलाने आर्थिक सहाय्य केल्याचा उल्लेख मला पाहिल्याचं आठवतं.) त्यातली लता, रफी आणि सहकार्‍यांची गाणी अजूनही अंगावर काटा आणतात. 'कर चले हम फिदा जानो तन साथियों' हे रफी ने जीव तोडून गायलेलं गाणं याच चित्रपटातलं.

अर्धवटराव 07/10/2011 - 00:00
भारताचा दारुण पराभव झाला... मान्य. त्याचं खापर अर्थात राजकीय-लश्करी नेतृत्वावर फुटायचं.. हे ही मान्य. पण नेहरुंना शिव्या घलण्यात काहि पोईंट नाहि. नुकताच स्वतंत्र झालेल्या, गरीब-मागासलेल्या-सरंजामशाहीची सवय असलेल्या राष्ट्राला सर्वांग-शक्तीशाली बनवायला ५० वर्षाचा काळ देखील अपुरा आहे. नेहरुंनी नुकतीच कुठे जमिनीची मशागत केली होती आणि बियाणे पेरले होते. त्याचं फळ यायला वेळ लागणारच होता. काहि ठोकताळे-अंदाज बांधुन, काहि रिस्क घेउन त्यातल्यात्यात चांगलं काय करता येईल ते नेहरुंनी करायचा प्रयत्न केला. काहि अंदाज चुकले... पण म्हणुन त्यांना केवळ स्वप्नाळू वगैरे म्हणता येणार नाहि. सरदार पटेल, सुभाषबाबु वगैरे प्रभृती देशाची कमान हाती घेते तर चित्रं फार चांगलं असतं असं म्हणायला जागा आहे (मलाही असं वाटतं) पण हा अंदाज आहे, निष्कर्श नाहि. नेहरुं नेंतर काँग्रेसने जी देशाची वाट लावली ति मात्र अक्षम्य आहे. खास करुन सद्ध्या तर लाजीरवाणेपणाचा कळस केलाय त्या पार्टीने. बाकी भविष्याचं प्लॅनींग करायला इतीहासाचा रेफरन्स घ्यावाच लागतो, तेंव्हा अशे लेख निश्चितच स्वागतार्ह आहेत. येउ देत. अर्धवटराव

शिल्पा ब 07/10/2011 - 00:24
विश्वास ठेवावा पण आधी खात्री करुनच!! या गोष्टी न विसरता त्यांच्यापासुन धडा घ्यायला हवा. चीन सगळ्याच बाबतीत भारताच्या पुढे आहे. अमेरीका , नाटो चिटो कोणालाही दाद न देण्याची त्यांची प्रवृत्ती सगळ्यांना माहीतीच आहे आणि त्यांच्या बाजारपेठेमुळे आणि स्वस्त लेबरमुळे कोणी फारसा विरोध करणारही नाही. देशाचा एक भाग त्यांनी गिळला अजुन अरुणाचल प्रदेश वगैरेवर हक्क सांगतच आहेत. अजुनही भारत सरकार उत्तर पुर्व भागातल्या राज्यांकडे हवे तेवढे लक्ष पुरवत नाही. त्यांना जाणीव व्हायला हवी की ते भारतीय आहेत. लोकसत्ता वगैरेत खुपदा लेख वाचलेत की त्यांना भारत हा त्यांचा देश वाटतच नाही म्हणुन. :( दुर्दैव!! इतके पोटेंशियल असलेल्या देशाची नासाडी चालु आहे दुसरे काही नाही. लोकं सुद्धा सत्ताधार्‍यांना काही धडा (निवडणुका) शिकवु इच्छित नाहीत. :(

+१ वाचावेच लागेल. भारत-चीन युद्ध नेहमीच उपेक्षित विषय वाटत आलेला आहे. खुप खुलेपणानी त्यावरच्या चर्चा वाचल्याचे आठवत नाही. पानिपताच्या पराभवाच्या कटु आठ्वणींसारखेच मनाच्या कोपर्यात दडवुन ठेवलेला विषयावर अधिक वाचायला आवडेल. --मयुरा.

sagarparadkar 07/10/2011 - 00:52
नेमके अशावेळीच कुठे दडी मरून बसतात कोण जाणे .... बाकी नेहरूंना या प्रकरणी लोक शिव्या का घालतात ते वर म्हटल्याप्रमाणे जनरल थोरात ह्यांचं आत्मचरित्र वाचल्यावरच कळेल. कृष्ण मेनन ह्यांच्याबद्दल ते जितके आग्रही का होते तितकेच सैनिकांच्या जीवाबद्दल ते बेफिकीर वाटले, निदान मला तरी. मला नेहेमी आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की विज्ञान्-तंत्रज्ञान ह्या गोष्टींबद्दल जिव्हाळा असलेले नेहरू, व्यावहारीक बाबतींत एवढे गाफील कसे राहिले असतील?

In reply to by sagarparadkar

नितिन थत्ते 07/10/2011 - 16:06
कहॉ गये वो चाचा? Submitted by sagarparadkar on Fri, 07/10/2011 - 00:52. नेमके अशावेळीच कुठे दडी मरून बसतात कोण जाणे ....
हा व्यक्तिगत शेरा आहे असे वाटते. भारताच्या सैन्याची तयारी नव्हती + इक्विपमेंट नव्हती हे मान्य परंतु नेहरू चीनकडून असलेल्या धोक्याबाबत (चीनने हल्ला करेपर्यंत) गाफील होते हे मान्य नाही. नुकत्याच मिपावरील मनोबांच्या धाग्यात या बाबतची वस्तुस्थिती मांडली होती. वर अप्पा जोगळेकर यांनी कुरुंदकारांच्या 'जागर' मधील उल्लेख दिले आहेत. चीनशी केव्हा ना केव्हा संघर्ष होणार हे नेहरूंना नक्कीच ज्ञात होते. तयारीला उसंत म्हणून शांततेचा आणि मैत्रीचा मंडप उभारून शक्य तितका वेळ मिळवणे हेच त्या हिंदी-चीनी भाई भाई धोरणाचे सार होते. हा दुवा अभ्यासावा.

In reply to by नितिन थत्ते

मैत्र 13/10/2011 - 11:13
चीनशी केव्हा ना केव्हा संघर्ष होणार हे नेहरूंना नक्कीच ज्ञात होते. तयारीला उसंत म्हणून शांततेचा आणि मैत्रीचा मंडप उभारून शक्य तितका वेळ मिळवणे हेच त्या हिंदी-चीनी भाई भाई धोरणाचे सार होते. हा दुवा अभ्यासावा. दुव्यावरचं एक महत्त्वाचं वाक्य -- So, the only conclusion one can come to is that all the signals from New Delhi were interpreted in Beijing as a determined preparation for war against China. Once that conclusion was reached, the Chinese decided to take pre-emptive action. And when one dose of such action in October 1962 did not produce results, they administered a second one in November. मिपावरच पूर्वी एकदा झालेल्या तपशीलवार चर्चेत असा साधारण संदर्भ / निष्कर्ष निघाला होता की "फॉरवर्ड पॉलिसी" मुळे भारताचे पुढे सरकणे आणि सीमेवरच्या (मॅकमोहन) सैनिकरहीत जागा आणि चौक्या ताब्यात घेणे हे चीनने हल्ला किंवा आगळीक / provocation असे धरले. जेव्हा ते त्यांच्या कल्पनेच्या / संयमाच्या पलिकडे गेले तेव्हा चीनने सर्व शक्तीनिशी जोरदार हल्ला करुन उलट नेफा प्रांतातला बराचसा भाग काबीज केला. हिंदी चीनी भाई भाई म्हणून गाफील राहिले यापेक्षा स्वतः पुढे सरकून आंतरराष्ट्रीय धोरणात घोडचुक ठरेल अशी गोष्ट वारंवार करुन चीन फक्त आपल्या संबंधांवर विश्वास ठेवून हल्ला करणार नाही किंवा सीमा ओलांडून आपला भूप्रदेश ताब्यात घेणार नाही असं शेवटपर्यंत विचार करणं हे दिवास्वप्नच म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट गाफील राहण्याची -- जर फॉरवर्ड पॉलिसी होती तर सैन्याची त्या वातावरणात आणि उंचीवर लढण्याची तयारी हवी होती. ज्या तुकड्या - रेजिमेंट्स किंवा बटालियन्स हलवल्या गेल्या त्यात याचा बराच घोळ घातला गेला. श्री. हसबनीस यांनी सकाळच्या लेखात सांगितलं आहे की त्यांना आधी थोडे दिवस लेह मध्ये नेऊन प्रशिक्षण / वातावरणाची आणि चढाईची तयारी केली गेली.. ही चांगलीच गोष्ट होती. पण लगेचच उलट पवित्रा घेऊन वेगळ्या रेजिमेंट्स तिथे पाठवल्या गेल्या. या चूका खूप मोठ्या प्रमाणात भोवल्या. एक अतिशय नवीन तरूण राष्ट्र केवळ १५ वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेलं... या सर्व भवति न भवति मध्ये जरा तरी मागे गेलं. नेहरुंना स्वतःलाही धक्का बसला असावा. नव्या देशाच्या सैन्याचा मनोबलावर किती परिणाम झाला असेल हे तेव्हा लढलेले लोकच सांगू शकतील...

मराठी_माणूस 07/10/2011 - 10:50
ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय....... मग नैतीक जबाबदारी स्विकारुन राजीनामा का नाही दिला? स्वतः तर खुर्चीला चीकटुन राहीलेच , मुलीलाही आणले . आजता गायत ती लीगसि चालु आहे.

इरसाल 07/10/2011 - 12:18
बरीचशी माहिती नवीन.लेख नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक आणि माहितीपूर्ण. अन्य प्रतिसादातुनही चांगली माहिती मिळेल अश्या आशेन धाग्यावर लक्ष ठेवुन आहे. अवांतर : गणपाच्या या वाक्यावरून तो संपादकपणाच्या भूमिकेत शिरला देखील.

मनीषा 07/10/2011 - 15:21
माहितीपूर्ण लेख ... उच्चपद्स्थ व्यक्तीच्या स्वप्नरंजनाची खूप मोठी किंमत संपूर्ण देशाने चुकविली आहे ... आणि अजून देणे फिटलेले नाही . तरीही मला वाटते,व्यक्तीगत आयुष्यात जे चांगले गुण ठरले असते ते राजकीय जीवनात मात्र घातक ठरले . उदा. दुसर्‍याच्या चांगुलपणावर असलेला विश्वास .

सुनील 07/10/2011 - 15:04
वाचतोय. मॅक मोहन रेषा आणि भारताची फॉरवर्ड पॉलिसी याबद्दल विस्ताराने लिहावे.

मन१ 08/10/2011 - 17:37
मी सुरु केलेल्या १९६५ च्या संदर्भातल्या धाग्यात भारत्-चीन सीमप्रश्नाबद्दलही बरीच माहिती प्रतिसादातून समजली होती. त्याचीही माहिती कामाची ठरावी.

सध्या अनेक वृत्त पत्रात १९६२ च्या सैन्यामधील अधिकाऱ्यांचे लेख येत आहेत .त्यांनी सर्वांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे . नेहरूंचे सो कोल्ड परराष्ट्र धोरण आपल्या देशाला अपरिमित हानीकारक ठरले . १९६२ चा मानहानीकारक पराभव हा त्याचा परिपाक आहे . मुळात नेहरू ह्यांचे प्रसिद्धीचा ( आंतराष्ट्रीय राजकारणात ) हव्यास. चमकोगिरी करण्याची प्रवृत्ती मुळे त्यांनी शीत युद्धात नुसते तटस्थ न राहता एक तिसरी आघाडी उघडून दोन महासत्ता व त्यांच्या कंपूला बोधांमृत पाजायला सुरवात केली . हे म्हणजे गल्लीतील दोन दादा ( भाई ) भांडत असतांना नुकत्याच हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलेल्या मुलाने त्यांना भानू नका असा उपदेश करणे होय . अश्यावेळी ते दोघेही भाई आपली भांडणे एक मिनिट बाजूला ठेवून त्या मुलाला म्हणतील ;; तुझे वय काय ,तू बोलतो काय ? १९६२ च्या वेळी बध्याची भूमिका घेऊन ह्या महासत्तांनी जणू नेहरू ह्यांना हेच दाखवून दिले .( जमले तर आमरण उपोषण करा नाही तर सत्याग्रह. ) नी सोडवा हा पेचप्रसंग .तिसर्या आघाडीचे पुढे पानिपत झाले . अर्थात चीन व भारताच्या ह्याच्यात सीमा तंट्याची सुरवात झाली ती स्वातंत्र्यपूर्वी . ब्रिटीश साम्राज्याने भारत गिळकृत केला तेव्हा चीन च्या लगत असलेला आपल्या प्रदेशात स्वतःच्या मर्जीने सीमा आखून घेतली .( त्यांच्या विरुद्ध काय चीन बोलणार ?) मात्र भारत स्वतंत्र झाला .व त्याने त्याच सीमेला आधार मानले . खुद्द ब्रिटन आता स्वतःच्या पुनर्वसनात मग्न होता .अश्यावेळी चीनी महत्वाकांक्षेला पंख फुटले . स्वातंत्र्य नंतर आपल्या सैन्याचे आधुनुकीकरण झाले नाही .सगळ्यात कहर म्हणजे पाकिस्ताने जेव्हा काश्मीर वरून राडा घातला. तेव्हा त्यांनी १९४८ साली आय एस आय ची स्थापना केली जिचे त्यावेळचे लक्ष्य भारत होते .( ह्या आधी ब्रिटीश काळातील आयबी ही देशांतर्गत हेर संघटना ही भारत पाक मध्ये विभागल्या गेली होती .) मात्र आय एस आय ही परकीय भूमीवर कारवाया करण्यासाठी सी आय ए च्या धर्तीवर निर्माण केल्या गेली .आमचे शांततेची पुंगी वाजणाऱ्या ह्या नेत्याने भारतात अश्या बाबतील काहीच केले नाही .( इंदिराजी ह्यांनी १९६८ साली रॉ ची निर्मिती केली .व १९७१ ला रॉ ने आपले पहिले मिशन पूर्ण केले .) शत्रू हा अकस्मात हल्ला करतो .आमची सरकारी यंत्रणा गाफील होती ,स्वतःच्या स्वप्न रंजनात मश्गुल होती पण चीनशी संबंध चांगले ठेवताना काही चुका माझ्या मते नेहरू ह्यांनी केल्या .१) दलाई लामा ह्यांना संरक्षण देणे आपल्या दृष्टीने लामा कितीही थोर असले तरी चीनची त्यांचा संघर्ष होता अश्यावेळी चीनला राग येणे स्वाभाविक आहे .( एक उदाहरण देतो ही तुलना नाही आहे . दाउद आज पाकिस्तान मध्ये आहे तो आय एस आय व अलकायदा ह्यांना निधी पुरवतो म्हणून त्यांचे तेथे कौतुक होते .) मात्र आपल्या दृष्टीने हे पाकचे महा पातक आहे . २) नेहरू एकीकडे जागतिक शांततेसाठी आघाडी करून बसले होते .पण खुद भारतात हैद्राबाद व गोवा प्रसंगी भूभाग कब्जात घेण्यासाठी सफल सैन्य कारवाई केली .( ह्यावेळी काश्मीर सारखा हा प्रश्न युएन मध्ये नेला नाही ) अर्थात पोलादी पुरुषाच्या मुळे हे शक्य झाले व आपल्या दृष्टीने योग्य झाले .. पण हा विरोधाभास चीन ला खटकला . तेव्हा त्यांनी आपल्या कुमकुवत सैन्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन नियोजन पद्धतीने आपल्यावर हल्ला चढवला . ह्या प्रसंगी आपली भूमिका ज्यात , लष्कराचा वापर योग्य व आवश्यक होता चीनला व जगाला पटवून देणे .गरजेचे होते .( जे आपण केले नाही .कदाचीत पटेल, नेहरू ह्यांच्यातील सुप्त संघर्ष ह्याला कारणीभूत असेल ) अजून महत्वाची घोड चूक म्हणजे अमेरीकेला चीन अणुचाचणी करणार ही कुणकुण लागली होती ( चीन ने १९६४ साली ती केली ) नेहरुकडे अमेरिकेने चीन वर हेरगिरी करण्यासाठी मदत मागितली .मात्र पु ल म्हणतात तसे ''आपले पराराष्ट्र धोरण ह्या संबंधी कधी हो ,कधी नाही असे होते .( खरे तर अण्वस्त्र सज्ज चीन आपल्यासाठी त्रासदायक होता ) ह्या युध्धा नंतर मेनन ह्यांना संरक्षण मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले . धर्मावर आधारीत राष्ट्रे मान्य नाही म्हणून ज्यू राष्ट्राला मान्यता न देणे हा गांधीजींचा विचार आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग झाला ( ह्या राष्ट्राची स्थापना वेस्ट च्या बड्या राष्ट्रांनी केली होती .त्यांना विरोधात जाऊन स्वताचा अकलेचे तारे तोडणे म्हणजे ....) नरसिंह राव ह्यांनी ही चूक सुधारली लुक वेस्ट हा नारा दीला . व ज्यू राष्ट्राशी अधिकृत रीत्या संबंध जोडले ज्यावर वाजपेयी सरकार व नुकतेच गडकरी ह्यांनी कळस चढवला . १९६४ साली चीन अण्वस्त्र सज्ज होणे ही आपल्या दृष्टीने गंभीर बाब होती .किंबहुना त्यांच्या अण्वस्त्र सज्ज होण्याच्या प्रक्रियेत वेस्टन देश अडथळे आणत होते .भारतातवर कारवाई करून चीन ने जगाला अप्रत्यक्ष संदेश दिला '' नाद करायचा नाही '' अर्थात आपले राजकर्ते युद्ध करण्याच्या मनस्थितीत नाही ह्यांची त्यांना पुरेपूर कल्पना होती . दसर्याला शस्त्र पूजा करणाऱ्या भारतीय जनतेच्या हातात बळजबरीने चरखा देऊ पाहणाऱ्या ह्या राज्यकर्त्याने भारतीय इतिहासाची चांगलीच डिस्कवरी केली होती ,व तो समजून घेतला होता .
लेखनविषय:
3

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

VINODBANKHELE ·

VINODBANKHELE 23/09/2011 - 14:22
नाहि हो शिंदे सरकार, बुडति हे जन देखवेना डोळा, आपल्या सायबर क्याफे मधे असे खुप जन येतात, त्यांचि परिस्थिती नसते तरि कर्ज वगैरे काढुन उद्योग करतात. सगळे त्यांचेच अनुभव आहेत. कालच एक जन आला होता मोबाईल टा॓वर साठी ७००० रु भरले होते.महानुभाव पन्थिय साधु होता. खुप दिवसां पासुन पहातोय आज अगदिच राहवले नाहि म्हनुन हा पत्र प्रपंच.

विनीत संखे 23/09/2011 - 14:49
धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा एसेमेस कांड आजच्या जगात होतात ते होत राहतात कारण कुणीनाकुणीतरी बकरा त्यांना बळी पडत राहतोच. आमच्या कॉलनीत एका बँकेत काम करणारी एक काकू ह्या प्रलोभनाला बळी पडली. तिला युरोप टूर फ्री च एसेमेस आला होता. त्यासाठी तिनं विझा बनवण्यासाठी त्या निनावी एजण्टला दहा हजार रूपये भरले. कमालीची गोष्ट म्हणजे त्या एजण्टने कुठलीही कागदपत्र ... अगदी पासपोर्ट सुद्धा तिच्याकडून मागितला नाही. आता इतकी सुशिक्षित माणसं बावळटपणा करू शकतात तर अशिक्षित बावळटांची काय कहाणी कथन करावी?

In reply to by विनीत संखे

VINODBANKHELE 24/09/2011 - 13:13
हि जमात पण भारी अक्कलवान असते, माझ्या कडे आलेल्या अनेक अश्या बकर्यां पैकी जवळपास प्रत्येक जण बँकेत काम करणार्या कुनाला तरी भेटुन त्यांचा सल्ला घेउन मग पैसे भरुन पावती ईमेल करायला येतात. एका महाभागाला मी फोन केला तर ते बेणं मला म्हनालं ते पॅन कार्ड पण मागतात म्हणजे खरोखर देतिल पैसे. आता काय म्हणणार या युक्तिवादा वर?

प्रचेतस 23/09/2011 - 14:56
मस्त लिहिलयं विनोदराव. अवांतरः लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत टाका की राव एकदा. यावेळी ते मंदिर बघायचं राहूनच गेलं.

In reply to by प्रचेतस

VINODBANKHELE 24/09/2011 - 10:12
लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत ........... वल्ली भाई , आपन मिपाकर जाउयात एकदा पाताळेश्वर ला ........ आणि दिवाळी नंतर कधितरी हरिश्चन्द्रगडा वर दोन तिन दिवस मुक्कामी.

दीप्स 23/09/2011 - 16:10
विनोद्जी छान लिहिले आहे तुम्ही आणि खरेही आहे ते. अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते. कॉलेजेचे विद्यार्थी पण काही कमी नाही माझे आजोबा खूप आजारी होते त्यांना भेटायला मी गावी गेले आणि आक्षार्षां दिवसभर त्या मुलांनी फोन करून हैराण केले. दर १५ - २० मिनिटाने वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून राकेश आहे का ?असे विचारायचे आणि मी रोंग नंबर सांगायचे (इथे मला नाव आठवत नाही म्हणून मी राकेश नाव वापरले आहे). असे करत करत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मात्र हद्द झली असे म्हणून मी त्या आलेल्या फोनवर भडकले यावेळी एक मुलगी होती तिने मला सोरी म्हणायला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले कि आम्ही रोज काही नंबर जमाकारतो आणि त्यातून लकी नंबर काढतो व दिवसभर त्या व्यक्तीला फोन करून टाईम पास करतो. हे ऐकल्यावर तर माझे चांगलेच सटकले ती तिला चांगलेच झापले आणि समजून सांगितले कि आज मी दवाखान्यात होते माझ्यावरचा प्रसंग काय होता याची कल्पना आहे का तुला? आणि तुम्ही तिकडे मजा करत होते. (मांजराच खेळ होतो उंदराचा मात्र जीव जातो अशी गम्मत ) मग बरेच बोलणे झाल्यावर तिने मला प्रोमिस केले आता पुन्हा ते असे नाही करणार... तसे बघायला गेलेतर जाश्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली बाजू कुठली ते आपण बघायचे असते. असेच या फोनचे पण आहे याच चांगल्यात चांगला उपयोग किवा सदुपयोग असा करायचं हे आपल्यावर असेते .

५० फक्त 23/09/2011 - 19:17
जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी एकदा एका अशा लफड्यात पडलो होतो आणि जवळपास रु.१४०० घालवुन बसलो आहे. आणि त्यानंतर ते सागाचे झाडे लावणॅ, पण ह्या सगळ्या फसवणूकी लग्नापुर्वीच्या आहेत, त्यानंतर जी काय अक्कल आली की ज्याचं नाव ते, आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

In reply to by ५० फक्त

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो.. त्यापेक्षा असं सांगा की "आता माला वाईच टेबलं पुसायची हायती. तुमी जरा आमच्या मॅडमसायबांशी बोला!". असं म्हणुन बायकोकडे फोन द्या.... बायको फोनशी तर डील करेलच पण मॅडमसायेब म्हटल्याबद्दल नंतर तुम्हाला काहीतरी गोड-गुलाबी मिळण्याची शक्यता वाढेल!!!! :) आपला अनुभवी, नाना फडणवीस ;)

In reply to by पिवळा डांबिस

५० फक्त 24/09/2011 - 07:06
असं काय काका,किमान एखाद्या अनोळखी पोरीसमोर तरी आपल्याला आपल्या घरात बायकोपेक्षा मोठं स्थान आहे हे सांगण्याची मजा का हिरावुन घेताय ओ, तेवढंच आत्मिक समाधान. असं खरंखुरं वास्तव जगासमोर विस्कटुन मांडुन कसं चालेल सांगा बरं? उगा ' कशी नशिबानं थट्टा आज मांड्ली ; म्हणण्यापेक्षा ' नको न्याह्याळु नितळ काया'; म्हणलं की कसं बरं वाटतं. ना ?

मदनबाण 23/09/2011 - 20:37
असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली जवळपास रोज येतात. ! डिलीट करुन करुन वैताग आला आहे. :( फालतु फोन देखील येतात.एकदम वैतागवाडी आहे हा सर्व प्रकार. डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवुन देखील परिस्थीतीत काही फरक पडलेला नाय.समस बद्धल आधी तक्रार करायचो...मग समस कोणत्या नंबर वरुन आलाय,समस मधे काय लिवलय इं चौकश्या झाल्या की तक्रार नोंदवुन घेतली जाते,पण समस येणे काही बंद झाले नाहीये. :( कारण दर वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन समस पाठवले जातात. सध्या तरी समस डिलीटवण्या पलिकडे काहीच पर्याय नाही. :(

असले एसेमेस खूप येतात..आपण तर बुवा तात्काळ उडवतो..पण फोनही येतात, मी एकाला---तूला माझा 'फायदा' करून द्यायचाय ना?...मग हे पहिले पैसे पण तूच मला आणून दे..मग मी ते तूला पाहिजे तिथे भरतो...असा उलट बाण मारला होता... त्या कोल्ह्यानी तात्काळ फोन कट केला.... वस्तुतः आंम्ही तुमचं 'कल्याण' करायला आलोय...(आणी नंतर तुमची डोंबीवली करणार आहोत...)...अशी वाक्य कुणीही उच्चारली तरी समजावं ''धोका'' आहे...कारण एम.एल.एम... हे ही असलच आधुनिक बुवाबाजीचं जाळं आहे,,,इथलीही भाषा,साधनं,शैली..हे सर्व काही फसव,मधुर,शीघ्र परिणाम कारक स्वरुपाचं असतं... त्यांनाही हेच उत्तर द्याव--माझे पहिले सगळे पैसे तुंम्ही गुंतवा... लगेच ती गिधाड पुढच्या फांदीवर नव भक्ष शोधायला जातात... अवांतर- एम.एल.एम.ची आंतरीक उद-घोषणा ---आमचे येथे स्वतःच स्वतःला फुकटात फसवुन मिळेल..... ;-)

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र 24/09/2011 - 00:03
त्यांच मत ते मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत देतीलच.. आणी त्यावर शासनाचा जी आर पण निघेल.. थोडा दम काढा.

In reply to by शैलेन्द्र

असे (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQMTY4NTRiMjEtODk4OC00ZmMxLTg5NTMtZWY1NTU0NzhiNDk2&hl=en_US) जर एखादे गंभीर प्रकरण असते तर त्यांच्या कडे तक्रार केलीही असती, आणि त्यांनी नक्कीच दखल घेतली असती, पण ज्या समस्या आपल्या पातळीवर सोडविता येण्याजोग्या असतात त्याकरिता त्यांना त्रास कशाला द्यावा? (अवांतर: उद्या कोणी म्हणेल मिसळपाव वर नको ते प्रतिसाद देऊन जेरीस आणणार्‍या सदस्यांचा बंदोबस्त करण्याकरिताही मुख्यमंत्र्यांकडे बैठक भरवा. अशा किरकोळ बाबींकरता त्यांची मदत मागायची तर मग सरकार कोणी चालवायचे?)

In reply to by नगरीनिरंजन

तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब लिस्ट मध्ये नोंद केलेला असतानाही नको असलेले कॉल वा संदेश येत असतील तर ट्राय कडे तक्रार नोंदवा. दोषींना अडीच लाख रूपये दंड होईल. अर्थात याकरिता आपला वेळ खर्चावा लागतो व पाठपुरावा करावा लागतो. मी एक सोपा उपाय केला. स्नॅपडील वाले मला रोज संदेश पाठवित. एकदा तर त्यांनी मला रात्री अडीच वाजता संदेश पाठविला. मग मी सरळ त्यांच्या संकेतस्थळावरून एक Cash On Delivery पद्धतीने order नोंदविली. प्रत्यक्षात वस्तु माझ्यापर्यंत पोचल्यावर ती घेण्याचे नाकारले. त्यानंतर कंपनीतून फोन आला, "तुम्ही वस्तु मागविली आणि नंतर पैसे भरून ती स्वीकारण्यास नकार का दिलात?" मग उत्तरादाखल मी त्यांना सांगितले की माझा फोन डू नॉट डिस्टर्ब मध्ये नोंद असूनही तुमचे संदेश येत असतात. मला मनस्ताप होतो, म्हणून तुम्हालाही दिला (मी कुणाचंच काही फुकट घेत नाही, अगदी मनस्ताप देखील). बाई काय समजायचं ते समजल्या. माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. आता त्यांच्याकडून संदेश यायचं बंद झालंय. मला नको असणारे संदेश पाठविणार्‍या बहुतेक सर्व कंपन्यांना मी असा दणका देतच असतो. त्यामुळे आंतरजालावर अनेक ठिकाणी अगदी उघडपणे माझा मोबाईल क्रमांक प्रकाशित असला तरी सहसा त्यावर आता मनस्ताप देण्याची आगळीक कुठली कंपनी करीत नाही.

शिल्पा ब 24/09/2011 - 07:00
कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा...बाकी अनोळखी समस वर विश्वास अज्जिबात ठेउ नये...कंपनी मुलाखतीसाठी समस पाठवते का, पैसे मागते का? लोकं पण कशावरही विश्वास ठेवतात.

In reply to by शिल्पा ब

कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा... >> पूर्णत: सहमत. ज्यांना कमी कष्टात जास्त मिळवायची हाव असते तेच असला जुगार खेळायची जोखीम पत्करतात आणि सर्वस्व गमावून बसतात. मेहनत करून त्याचा योग्य मोबदला मिळण्याची आशा ठेवलीत तर माणूस सहसा फसत नाही.

VINODBANKHELE 23/09/2011 - 14:22
नाहि हो शिंदे सरकार, बुडति हे जन देखवेना डोळा, आपल्या सायबर क्याफे मधे असे खुप जन येतात, त्यांचि परिस्थिती नसते तरि कर्ज वगैरे काढुन उद्योग करतात. सगळे त्यांचेच अनुभव आहेत. कालच एक जन आला होता मोबाईल टा॓वर साठी ७००० रु भरले होते.महानुभाव पन्थिय साधु होता. खुप दिवसां पासुन पहातोय आज अगदिच राहवले नाहि म्हनुन हा पत्र प्रपंच.

विनीत संखे 23/09/2011 - 14:49
धनबक्षिसाचे जे ईमेल किंवा एसेमेस कांड आजच्या जगात होतात ते होत राहतात कारण कुणीनाकुणीतरी बकरा त्यांना बळी पडत राहतोच. आमच्या कॉलनीत एका बँकेत काम करणारी एक काकू ह्या प्रलोभनाला बळी पडली. तिला युरोप टूर फ्री च एसेमेस आला होता. त्यासाठी तिनं विझा बनवण्यासाठी त्या निनावी एजण्टला दहा हजार रूपये भरले. कमालीची गोष्ट म्हणजे त्या एजण्टने कुठलीही कागदपत्र ... अगदी पासपोर्ट सुद्धा तिच्याकडून मागितला नाही. आता इतकी सुशिक्षित माणसं बावळटपणा करू शकतात तर अशिक्षित बावळटांची काय कहाणी कथन करावी?

In reply to by विनीत संखे

VINODBANKHELE 24/09/2011 - 13:13
हि जमात पण भारी अक्कलवान असते, माझ्या कडे आलेल्या अनेक अश्या बकर्यां पैकी जवळपास प्रत्येक जण बँकेत काम करणार्या कुनाला तरी भेटुन त्यांचा सल्ला घेउन मग पैसे भरुन पावती ईमेल करायला येतात. एका महाभागाला मी फोन केला तर ते बेणं मला म्हनालं ते पॅन कार्ड पण मागतात म्हणजे खरोखर देतिल पैसे. आता काय म्हणणार या युक्तिवादा वर?

प्रचेतस 23/09/2011 - 14:56
मस्त लिहिलयं विनोदराव. अवांतरः लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत टाका की राव एकदा. यावेळी ते मंदिर बघायचं राहूनच गेलं.

In reply to by प्रचेतस

VINODBANKHELE 24/09/2011 - 10:12
लेण्याद्रीजवळील पाताळेश्वराचा सचित्र वृत्तांत ........... वल्ली भाई , आपन मिपाकर जाउयात एकदा पाताळेश्वर ला ........ आणि दिवाळी नंतर कधितरी हरिश्चन्द्रगडा वर दोन तिन दिवस मुक्कामी.

दीप्स 23/09/2011 - 16:10
विनोद्जी छान लिहिले आहे तुम्ही आणि खरेही आहे ते. अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते. कॉलेजेचे विद्यार्थी पण काही कमी नाही माझे आजोबा खूप आजारी होते त्यांना भेटायला मी गावी गेले आणि आक्षार्षां दिवसभर त्या मुलांनी फोन करून हैराण केले. दर १५ - २० मिनिटाने वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून राकेश आहे का ?असे विचारायचे आणि मी रोंग नंबर सांगायचे (इथे मला नाव आठवत नाही म्हणून मी राकेश नाव वापरले आहे). असे करत करत संध्याकाळचे सहा वाजले आणि आता मात्र हद्द झली असे म्हणून मी त्या आलेल्या फोनवर भडकले यावेळी एक मुलगी होती तिने मला सोरी म्हणायला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितले कि आम्ही रोज काही नंबर जमाकारतो आणि त्यातून लकी नंबर काढतो व दिवसभर त्या व्यक्तीला फोन करून टाईम पास करतो. हे ऐकल्यावर तर माझे चांगलेच सटकले ती तिला चांगलेच झापले आणि समजून सांगितले कि आज मी दवाखान्यात होते माझ्यावरचा प्रसंग काय होता याची कल्पना आहे का तुला? आणि तुम्ही तिकडे मजा करत होते. (मांजराच खेळ होतो उंदराचा मात्र जीव जातो अशी गम्मत ) मग बरेच बोलणे झाल्यावर तिने मला प्रोमिस केले आता पुन्हा ते असे नाही करणार... तसे बघायला गेलेतर जाश्या नाण्याला दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चांगली बाजू कुठली ते आपण बघायचे असते. असेच या फोनचे पण आहे याच चांगल्यात चांगला उपयोग किवा सदुपयोग असा करायचं हे आपल्यावर असेते .

५० फक्त 23/09/2011 - 19:17
जाम भारी वाटलं वाचुन, पुर्वी एकदा एका अशा लफड्यात पडलो होतो आणि जवळपास रु.१४०० घालवुन बसलो आहे. आणि त्यानंतर ते सागाचे झाडे लावणॅ, पण ह्या सगळ्या फसवणूकी लग्नापुर्वीच्या आहेत, त्यानंतर जी काय अक्कल आली की ज्याचं नाव ते, आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो..

In reply to by ५० फक्त

आता असे फोन आले की मी सऱळ सांगतो, ' मला जरा मोठ्या चेकवर सह्या करायच्या आहेत माझ्या सेक्रेटरीशी बोला' अन फोन बायकोला देतो.. त्यापेक्षा असं सांगा की "आता माला वाईच टेबलं पुसायची हायती. तुमी जरा आमच्या मॅडमसायबांशी बोला!". असं म्हणुन बायकोकडे फोन द्या.... बायको फोनशी तर डील करेलच पण मॅडमसायेब म्हटल्याबद्दल नंतर तुम्हाला काहीतरी गोड-गुलाबी मिळण्याची शक्यता वाढेल!!!! :) आपला अनुभवी, नाना फडणवीस ;)

In reply to by पिवळा डांबिस

५० फक्त 24/09/2011 - 07:06
असं काय काका,किमान एखाद्या अनोळखी पोरीसमोर तरी आपल्याला आपल्या घरात बायकोपेक्षा मोठं स्थान आहे हे सांगण्याची मजा का हिरावुन घेताय ओ, तेवढंच आत्मिक समाधान. असं खरंखुरं वास्तव जगासमोर विस्कटुन मांडुन कसं चालेल सांगा बरं? उगा ' कशी नशिबानं थट्टा आज मांड्ली ; म्हणण्यापेक्षा ' नको न्याह्याळु नितळ काया'; म्हणलं की कसं बरं वाटतं. ना ?

मदनबाण 23/09/2011 - 20:37
असे बरेच लॉटरीवाले समस हल्ली जवळपास रोज येतात. ! डिलीट करुन करुन वैताग आला आहे. :( फालतु फोन देखील येतात.एकदम वैतागवाडी आहे हा सर्व प्रकार. डु नॉट डिस्टर्बच्या यादीत नाव नोंदवुन देखील परिस्थीतीत काही फरक पडलेला नाय.समस बद्धल आधी तक्रार करायचो...मग समस कोणत्या नंबर वरुन आलाय,समस मधे काय लिवलय इं चौकश्या झाल्या की तक्रार नोंदवुन घेतली जाते,पण समस येणे काही बंद झाले नाहीये. :( कारण दर वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन समस पाठवले जातात. सध्या तरी समस डिलीटवण्या पलिकडे काहीच पर्याय नाही. :(

असले एसेमेस खूप येतात..आपण तर बुवा तात्काळ उडवतो..पण फोनही येतात, मी एकाला---तूला माझा 'फायदा' करून द्यायचाय ना?...मग हे पहिले पैसे पण तूच मला आणून दे..मग मी ते तूला पाहिजे तिथे भरतो...असा उलट बाण मारला होता... त्या कोल्ह्यानी तात्काळ फोन कट केला.... वस्तुतः आंम्ही तुमचं 'कल्याण' करायला आलोय...(आणी नंतर तुमची डोंबीवली करणार आहोत...)...अशी वाक्य कुणीही उच्चारली तरी समजावं ''धोका'' आहे...कारण एम.एल.एम... हे ही असलच आधुनिक बुवाबाजीचं जाळं आहे,,,इथलीही भाषा,साधनं,शैली..हे सर्व काही फसव,मधुर,शीघ्र परिणाम कारक स्वरुपाचं असतं... त्यांनाही हेच उत्तर द्याव--माझे पहिले सगळे पैसे तुंम्ही गुंतवा... लगेच ती गिधाड पुढच्या फांदीवर नव भक्ष शोधायला जातात... अवांतर- एम.एल.एम.ची आंतरीक उद-घोषणा ---आमचे येथे स्वतःच स्वतःला फुकटात फसवुन मिळेल..... ;-)

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र 24/09/2011 - 00:03
त्यांच मत ते मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत देतीलच.. आणी त्यावर शासनाचा जी आर पण निघेल.. थोडा दम काढा.

In reply to by शैलेन्द्र

असे (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQMTY4NTRiMjEtODk4OC00ZmMxLTg5NTMtZWY1NTU0NzhiNDk2&hl=en_US) जर एखादे गंभीर प्रकरण असते तर त्यांच्या कडे तक्रार केलीही असती, आणि त्यांनी नक्कीच दखल घेतली असती, पण ज्या समस्या आपल्या पातळीवर सोडविता येण्याजोग्या असतात त्याकरिता त्यांना त्रास कशाला द्यावा? (अवांतर: उद्या कोणी म्हणेल मिसळपाव वर नको ते प्रतिसाद देऊन जेरीस आणणार्‍या सदस्यांचा बंदोबस्त करण्याकरिताही मुख्यमंत्र्यांकडे बैठक भरवा. अशा किरकोळ बाबींकरता त्यांची मदत मागायची तर मग सरकार कोणी चालवायचे?)

In reply to by नगरीनिरंजन

तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब लिस्ट मध्ये नोंद केलेला असतानाही नको असलेले कॉल वा संदेश येत असतील तर ट्राय कडे तक्रार नोंदवा. दोषींना अडीच लाख रूपये दंड होईल. अर्थात याकरिता आपला वेळ खर्चावा लागतो व पाठपुरावा करावा लागतो. मी एक सोपा उपाय केला. स्नॅपडील वाले मला रोज संदेश पाठवित. एकदा तर त्यांनी मला रात्री अडीच वाजता संदेश पाठविला. मग मी सरळ त्यांच्या संकेतस्थळावरून एक Cash On Delivery पद्धतीने order नोंदविली. प्रत्यक्षात वस्तु माझ्यापर्यंत पोचल्यावर ती घेण्याचे नाकारले. त्यानंतर कंपनीतून फोन आला, "तुम्ही वस्तु मागविली आणि नंतर पैसे भरून ती स्वीकारण्यास नकार का दिलात?" मग उत्तरादाखल मी त्यांना सांगितले की माझा फोन डू नॉट डिस्टर्ब मध्ये नोंद असूनही तुमचे संदेश येत असतात. मला मनस्ताप होतो, म्हणून तुम्हालाही दिला (मी कुणाचंच काही फुकट घेत नाही, अगदी मनस्ताप देखील). बाई काय समजायचं ते समजल्या. माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. आता त्यांच्याकडून संदेश यायचं बंद झालंय. मला नको असणारे संदेश पाठविणार्‍या बहुतेक सर्व कंपन्यांना मी असा दणका देतच असतो. त्यामुळे आंतरजालावर अनेक ठिकाणी अगदी उघडपणे माझा मोबाईल क्रमांक प्रकाशित असला तरी सहसा त्यावर आता मनस्ताप देण्याची आगळीक कुठली कंपनी करीत नाही.

शिल्पा ब 24/09/2011 - 07:00
कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा...बाकी अनोळखी समस वर विश्वास अज्जिबात ठेउ नये...कंपनी मुलाखतीसाठी समस पाठवते का, पैसे मागते का? लोकं पण कशावरही विश्वास ठेवतात.

In reply to by शिल्पा ब

कोणी कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट का देतयं? पैसे कधी कोणी फुकट देतं का? जरा विचार करावा... >> पूर्णत: सहमत. ज्यांना कमी कष्टात जास्त मिळवायची हाव असते तेच असला जुगार खेळायची जोखीम पत्करतात आणि सर्वस्व गमावून बसतात. मेहनत करून त्याचा योग्य मोबदला मिळण्याची आशा ठेवलीत तर माणूस सहसा फसत नाही.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

निस्तीच पोकापोकी!

डॉ.श्रीराम दिवटे ·

धन्या 16/09/2011 - 20:33
अहो सोशल नेटवर्किंग साईटा हे व्हर्च्युअल जग आहे. त्यामुळे तेथे फक्त पोकापोकीच शक्य आहे. तुम्हाला जर ठोकाठोकी करायची असेल तर त्यासाठी ज्या व्यक्तीला ठोकून काढायचे आहे तिला प्रत्यक्षात भेटावे लागेल.

आत्मशून्य 16/09/2011 - 20:43
Facebook and orkut is best way to keep in touch with whom we don't want to keep in touch.... ;) असो, थोडी काळजी घेतली तर फार त्रास होत नाही, तसचं भारतातले सायबर लॉ सूध्दा अत्यंत कडक आहेत. पण ही दूधारी तलवार आहे हे मात्र मान्य.

डॉ. दिवटे.. लेख मनापासुन आवड्ला. आजवर फेसबुक्/ऑर्कुट इ. सोशल नेटवर्किंग साईट्स वर या पेक्षा उत्तम भाष्य करणारे लेखन वाचनात आले नव्हते. - http://www.facebook.com/rishikesh.chindarkar

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 16/09/2011 - 22:05
अज्ञान असलं तरी त्याचं प्रदर्शन कमी कर. आपण प्रदर्शीत करत आहोत ते अज्ञान आहे हे समजण्याच्या बाबतीतच अज्ञान असेल तर? ;) बाकी सोशलनेटवर्कींगवरून मला ellen degeneres या अवखळ उभ्या उभ्या विनोदाचे कार्यक्रम करणार्‍या अभिनेत्रीचे एक म्हणणे आवडते. I don't like FB as I have enough friends. But I like Twitter as I get followers. :-)

In reply to by विकास

मला तर बुवा फेसबुक आवडतं, तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते. ;-) माणसाला प्रत्यक्ष न भेटताही त्याचे विचार काय आहे हे समजतं. आपले स्वतःचे मित्रमैत्रीणीतर असतातच पण त्यांच्या मित्रमैत्रीणींमधे कोणी रोचक व्यक्ती असतील तर त्यांचं लिखाणही वाचता येतं. समोर बसणारी व्यक्ती तुफान बोरिंग नाहीतर अज्ञान काय हे न समजण्याएवढी अज्ञ असेल तरीही आपण तिच्याशीच बोलावं अशी सक्ती फेसबुकावर होत नाही. ज्या लोकांना काहीही म्हणायचं नसतं किंवा ज्यांनी काही म्हटलेलं मला महत्वाचं वाटत नाही किंवा ज्यांना उगाच मित्रसंख्या वाढवायची आहे अशा लोकांना मी सरळच टाळू शकते. विकास, तुमची मागे एक सही होती ती पण मला आवडायची: मेरे पास फेसबुक है, ट्विटर है, ऑर्कुट है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास नौकरीधंदा है।

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ 16/09/2011 - 22:55
सहमत. अवांतरः- हे फेसबुकचं महत्व मसं वर येउन सांगण्याइतकं मसं महत्वाचं शेवटी वाटतच ना. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 16/09/2011 - 22:58
तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते
ह्या बाबतीत खरंच सहमत आहे, अगदी ऑर्कूटवरही जरा भडक लीहलं की मूक्तपीठ कम्यूनीटीमधून बॅन लागायचं.. एकूणच मराठी माणसांची मानसीकता तीतकी ओपन माइंडेड असलेली अंतरजालावरही फारशी दीसून येत नाही... तिथही संकूचीतपणा सूटायचा नाही असंच अनूभवाला येतं. आणी अर्थातच who you are is less important than who you know मूळे एकंदर तीथही फार सूखानं नादतात असेही नाही.

In reply to by आत्मशून्य

पाषाणभेद 16/09/2011 - 23:54
असाच विचार माझाही पक्का व्हायला लागलाय हल्ली हल्ली. म्हणजे अगदीच योग्य वेळेत सांगायच झालं तर कालपासून.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाळकराम 17/09/2011 - 18:11
फेबु वा तत्सम सोशल नेटवर्किंग साईट्स बद्दलआणि आम्हा सर्वांचं अज्ञान दूर करा! गरीबावर एवढी कृपा कराच बुवा!

मुक्तसुनीत 16/09/2011 - 22:28
सोशल नेटवर्किंग साईट चा उपयोग लोक चुकीचा करतात का ? होय. मग त्यामुळे सोशल नेटवर्किंग ही संकल्पनाच चुकीची आहे का ? नाही. सोशल नेटवर्किंग साईट्स च्या आधीच्या इमेल आदि माध्यमांचाही दुरुपयोग होण्याचे प्रकार पाहण्यात आलेले आहेत का ? होय. मग सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये दोष आहे की त्यांचा योग्य तो वापर न करणार्‍या आणि प्रसंगी वाईट वापर करणार्‍या लोकांमधे दोष आहे ? दोष अशा लोकांमधे आहे. अर्थात फेसबुकसारख्या बाबतीत , साईटस च्या चुकीच्या धोरणामुळे प्रायव्हसीचा भंग होण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत. या न्यायाने फेसबुक सदोष आहे हे मान्यच. मात्र "नुसतीच पोकापोकी" हा तो दोष नव्हे. असो.

मराठे 16/09/2011 - 22:44
उगाच एक आठवलं... "काय , आजकाल भेटत नाही अजिबात.. काही खुशाली कळली नाही तुझी" या प्रश्नाची बदलत्या काळाप्रमाणे बदलणारी उत्तरं: १९९० च्या आसपासः "अरे यार तू आधी मोबाईल घे.. म्हणजे तुला एसेमेस पाठवता येतिल.. मोबाईल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल." २००० च्या आसपासः "माझ्या सगळ्या मित्रांशी मी इमेल मधून टच मधे असतो.. तु इमेल अकाउंट ओपन कर.. इमेल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल" २०१० च्या आसपासः "तुझ्या फेसबूक मधे अ‍ॅडव ना मला... काय फेसबूक वापरत नाही? "फेसबूक" नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल!"

In reply to by मराठे

आत्मशून्य 16/09/2011 - 22:53
हेच एकमेव कारण आहे टेलिफोन... टीव्ही... पेजर...मोबाइल.. एस.एम.एस...... एमेल....ओर्कूट... फेस्बूक---- ट्व्वीटर... आणी मिसळपाव..... यांचा शोध लागण्याचं आणी ते यशस्वी होण्याचं... भवीष्यातही जेव्हां जेव्हां या संदर्भात इनोवेशंन होतील यशस्वीच ठरतील :)

छान प्रतिसाद दिलेत सर्वांनी. आभार. मनाला वाटेल ते वॉलवर लिहिता येऊ शकते. म्हणजे काहीही लिहायचे का? काहीही डकवायचे का? आपल्याच मित्र मैत्रिणींना वेगळ्या नावाचे आयडी वापरून सतावायचे का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यासाठी हा लेख लिहिला आहे. या मुद्द्यावर मंथन व्हावे ही अपेक्षा.

In reply to by शिल्पा ब

बाळकराम 18/09/2011 - 19:31
बाकी, तुम्ही कुणाचे ड्यु आय डी आहात ते आम्हाला कळलं बरं का! ;) ( पण अशा साध्या बाबतीत चेगुसुंनाच प्रकाश पाडावा लागतो, हे बघून मौज वाटली! बाकी चालू द्या!)

In reply to by शिल्पा ब

धन्या 19/09/2011 - 20:27
अहो अशा गोष्टी चार चौघात बोंबलायच्या नसतात हो शिल्पातै. बाळकराम बोंबलले का? आणि त्यांच्या फक्त दोन ओळ वाचून तुम्ही हा निष्कर्ष काढलात खुपच तल्लख बुद्धी आहे बुवा तुमची. अमेरिकेत असता काय?

In reply to by धन्या

बाळकराम 20/09/2011 - 01:21
अमेरिकेत असता काय?>> हे काय इचारनं झालं का राव! आपुन काय न बोलता बी समदं कळतंय त्येन्ला! उगाच अमेरिकेत गेल्याती का त्या? काय म्हंता, काडा चंची आन तंबाकू!

रेवती 18/09/2011 - 21:04
दिवटे साहेब, चक्क लेखन आवडले. १००% पटले असे म्हणता येणार नाही. बर्याच चांगल्या गोष्टी असतात हो, त्याचा वापर वाईट रितीने करणारेही असतातच. आता वाईटाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असेल तर काय करणार? अश्लील गोष्टींसाठी वापर केला जात असेल तर ते मला वाईट आहे असे वाटते पण तसे ते वापरणार्‍याला वाटत नसेल तर काय करणार? "थोडक्यात गोडी आणि जास्तीत लबाडी" ;)

स्वस्त असल्याने नेट व मोबाईल चा वापर व दुर उपयोग वाढला आहे.. उपाय........ मोबाईल...इन कमींग व ऑट गोईंग १० रु /मिनिट रेट करावा,.. नेट ..मिनिमम चार्ज रु.५००० ठेवावा... त्या मुळे ज्यांना गरज आहेत असेच लोक नेट वापरतिल... ल्याड लाईन रेट कमी करुन होणारी गैर सोय टाळता येईल... व आज मोबाईल वापर जो बोकाळला आहे तो थांबु शकेल....... मोबाईल व नेट चा व्यवसाया व्यतिरिक्त वापर म्हणजे चंगळ वाद आहे.... लोकांनी ल्यांड लाईन वापरणे जवळ जवळ बंद केल्या गत आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

स्मिता. 19/09/2011 - 16:27
मोबाईल किंवा आंतरजालाचा भरपूर वापर हा त्या सोयींचा दुरुपयोग कसा म्हणता येईल? किंवा मोबाईचा/नेटचा वापर 'बोकाळल्याने' तुम्हाला-आम्हाला काय त्रास होतो? जोवर तंत्रज्ञानाचा गैरवापर होत नाही तोवर त्याचा वापर कितीही असला तरी हरकत नसावी. खरं तर त्यांच्या सहाय्याने किती तरी लोकांची कामे सुकर होतात.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मृत्युन्जय 19/09/2011 - 16:47
बरोबर आहे. मी तर म्हणतो की सरसकट दूरध्वनीवरच (स्थिर काय किंवा भ्रमण काय) बंदी घालावी. दूरध्वनी मुळे लोकांनी पोस्टकार्ड वापरणे बंद केले आहे हो. पत्र लिहिण्याची कलाच नाहिशी होउ लागली आहे. किंबहुना मी तर म्हणतो की पोस्टखातेच बंद करावे. बिचार्‍या पोस्टमनला किती पळवतात हे लोक. त्यापेक्षा पुर्वीची कबूतर मेसेजिंग सर्व्हिस सुरु केली तर कित्ती बरे होइल. आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती) त्यांचा काही उपयोगही करुन घेता येइल. एका कबूतर मेसेजचे ५००० रुपये. दाणापाण्याचा खर्च वेगळा अ‍ॅट अ‍ॅक्चुयल.

In reply to by मृत्युन्जय

आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती)
अगदी योग्य अर्थाने घेतला गेल्या आहे. पुढच्या कट्ट्यास आम्ही तुम्हाला न्यायला व सोडायला येऊ ब्रिजेशच्या गाडीतून.

In reply to by जाई.

आमच्या सोसायटीतही या कबूतरांनी वैताग आणलाय
'या' म्हणजे नक्की कोणत्या ? १) एकट्याने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? का २) जोडीने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? पारवा परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 19/09/2011 - 18:20
बाब्बौ, अग्गा गा गा !!!
एका सोसायटीत किती कबुतरे असतात? किंवा तुमच्या सोसायटीत किती कबुतरे आहेत ? कबुतर घ्या घ्या घ्या, कबुतर घ्या घ्या घ्या, घ्या $$$ घ्या $$$

अनिकेतपन्त 28/09/2011 - 17:36
दिवटे डाक्टर्...तुमच्या लेखाबद्द्ल काय म्हणायच नाही राव आम्हाला...पण 'क्रीडा' म्हणुन बूकमार्क कशाला केलय? आमच्यासारख्या रोजचा पेपर शेवटच्या पानपासुन वाचणार्या लोकांचा पोपट होतो हो बाकी काय नाही.

In reply to by अनिकेतपन्त

मेघवेडा 28/09/2011 - 17:51
अनिकेतपन्त, द वणवणे> डागदरसायबांच्या मनरूपी खेळाडूने विचारांच्या मैदानात कोट्याऽनुप्रासादिरूपी सवंगड्यांसोबत केलेली नैबंधिक क्रीडा आहे ही! /द वणवणे>

धन्या 16/09/2011 - 20:33
अहो सोशल नेटवर्किंग साईटा हे व्हर्च्युअल जग आहे. त्यामुळे तेथे फक्त पोकापोकीच शक्य आहे. तुम्हाला जर ठोकाठोकी करायची असेल तर त्यासाठी ज्या व्यक्तीला ठोकून काढायचे आहे तिला प्रत्यक्षात भेटावे लागेल.

आत्मशून्य 16/09/2011 - 20:43
Facebook and orkut is best way to keep in touch with whom we don't want to keep in touch.... ;) असो, थोडी काळजी घेतली तर फार त्रास होत नाही, तसचं भारतातले सायबर लॉ सूध्दा अत्यंत कडक आहेत. पण ही दूधारी तलवार आहे हे मात्र मान्य.

डॉ. दिवटे.. लेख मनापासुन आवड्ला. आजवर फेसबुक्/ऑर्कुट इ. सोशल नेटवर्किंग साईट्स वर या पेक्षा उत्तम भाष्य करणारे लेखन वाचनात आले नव्हते. - http://www.facebook.com/rishikesh.chindarkar

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास 16/09/2011 - 22:05
अज्ञान असलं तरी त्याचं प्रदर्शन कमी कर. आपण प्रदर्शीत करत आहोत ते अज्ञान आहे हे समजण्याच्या बाबतीतच अज्ञान असेल तर? ;) बाकी सोशलनेटवर्कींगवरून मला ellen degeneres या अवखळ उभ्या उभ्या विनोदाचे कार्यक्रम करणार्‍या अभिनेत्रीचे एक म्हणणे आवडते. I don't like FB as I have enough friends. But I like Twitter as I get followers. :-)

In reply to by विकास

मला तर बुवा फेसबुक आवडतं, तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते. ;-) माणसाला प्रत्यक्ष न भेटताही त्याचे विचार काय आहे हे समजतं. आपले स्वतःचे मित्रमैत्रीणीतर असतातच पण त्यांच्या मित्रमैत्रीणींमधे कोणी रोचक व्यक्ती असतील तर त्यांचं लिखाणही वाचता येतं. समोर बसणारी व्यक्ती तुफान बोरिंग नाहीतर अज्ञान काय हे न समजण्याएवढी अज्ञ असेल तरीही आपण तिच्याशीच बोलावं अशी सक्ती फेसबुकावर होत नाही. ज्या लोकांना काहीही म्हणायचं नसतं किंवा ज्यांनी काही म्हटलेलं मला महत्वाचं वाटत नाही किंवा ज्यांना उगाच मित्रसंख्या वाढवायची आहे अशा लोकांना मी सरळच टाळू शकते. विकास, तुमची मागे एक सही होती ती पण मला आवडायची: मेरे पास फेसबुक है, ट्विटर है, ऑर्कुट है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास नौकरीधंदा है।

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ 16/09/2011 - 22:55
सहमत. अवांतरः- हे फेसबुकचं महत्व मसं वर येउन सांगण्याइतकं मसं महत्वाचं शेवटी वाटतच ना. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 16/09/2011 - 22:58
तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसते. थोडक्यात लोकशाही असते
ह्या बाबतीत खरंच सहमत आहे, अगदी ऑर्कूटवरही जरा भडक लीहलं की मूक्तपीठ कम्यूनीटीमधून बॅन लागायचं.. एकूणच मराठी माणसांची मानसीकता तीतकी ओपन माइंडेड असलेली अंतरजालावरही फारशी दीसून येत नाही... तिथही संकूचीतपणा सूटायचा नाही असंच अनूभवाला येतं. आणी अर्थातच who you are is less important than who you know मूळे एकंदर तीथही फार सूखानं नादतात असेही नाही.

In reply to by आत्मशून्य

पाषाणभेद 16/09/2011 - 23:54
असाच विचार माझाही पक्का व्हायला लागलाय हल्ली हल्ली. म्हणजे अगदीच योग्य वेळेत सांगायच झालं तर कालपासून.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाळकराम 17/09/2011 - 18:11
फेबु वा तत्सम सोशल नेटवर्किंग साईट्स बद्दलआणि आम्हा सर्वांचं अज्ञान दूर करा! गरीबावर एवढी कृपा कराच बुवा!

मुक्तसुनीत 16/09/2011 - 22:28
सोशल नेटवर्किंग साईट चा उपयोग लोक चुकीचा करतात का ? होय. मग त्यामुळे सोशल नेटवर्किंग ही संकल्पनाच चुकीची आहे का ? नाही. सोशल नेटवर्किंग साईट्स च्या आधीच्या इमेल आदि माध्यमांचाही दुरुपयोग होण्याचे प्रकार पाहण्यात आलेले आहेत का ? होय. मग सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये दोष आहे की त्यांचा योग्य तो वापर न करणार्‍या आणि प्रसंगी वाईट वापर करणार्‍या लोकांमधे दोष आहे ? दोष अशा लोकांमधे आहे. अर्थात फेसबुकसारख्या बाबतीत , साईटस च्या चुकीच्या धोरणामुळे प्रायव्हसीचा भंग होण्यासारख्या घटना घडलेल्या आहेत. या न्यायाने फेसबुक सदोष आहे हे मान्यच. मात्र "नुसतीच पोकापोकी" हा तो दोष नव्हे. असो.

मराठे 16/09/2011 - 22:44
उगाच एक आठवलं... "काय , आजकाल भेटत नाही अजिबात.. काही खुशाली कळली नाही तुझी" या प्रश्नाची बदलत्या काळाप्रमाणे बदलणारी उत्तरं: १९९० च्या आसपासः "अरे यार तू आधी मोबाईल घे.. म्हणजे तुला एसेमेस पाठवता येतिल.. मोबाईल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल." २००० च्या आसपासः "माझ्या सगळ्या मित्रांशी मी इमेल मधून टच मधे असतो.. तु इमेल अकाउंट ओपन कर.. इमेल नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल" २०१० च्या आसपासः "तुझ्या फेसबूक मधे अ‍ॅडव ना मला... काय फेसबूक वापरत नाही? "फेसबूक" नसेल तर टच मधे राहणं अवघड झालंय आजकाल!"

In reply to by मराठे

आत्मशून्य 16/09/2011 - 22:53
हेच एकमेव कारण आहे टेलिफोन... टीव्ही... पेजर...मोबाइल.. एस.एम.एस...... एमेल....ओर्कूट... फेस्बूक---- ट्व्वीटर... आणी मिसळपाव..... यांचा शोध लागण्याचं आणी ते यशस्वी होण्याचं... भवीष्यातही जेव्हां जेव्हां या संदर्भात इनोवेशंन होतील यशस्वीच ठरतील :)

छान प्रतिसाद दिलेत सर्वांनी. आभार. मनाला वाटेल ते वॉलवर लिहिता येऊ शकते. म्हणजे काहीही लिहायचे का? काहीही डकवायचे का? आपल्याच मित्र मैत्रिणींना वेगळ्या नावाचे आयडी वापरून सतावायचे का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यासाठी हा लेख लिहिला आहे. या मुद्द्यावर मंथन व्हावे ही अपेक्षा.

In reply to by शिल्पा ब

बाळकराम 18/09/2011 - 19:31
बाकी, तुम्ही कुणाचे ड्यु आय डी आहात ते आम्हाला कळलं बरं का! ;) ( पण अशा साध्या बाबतीत चेगुसुंनाच प्रकाश पाडावा लागतो, हे बघून मौज वाटली! बाकी चालू द्या!)

In reply to by शिल्पा ब

धन्या 19/09/2011 - 20:27
अहो अशा गोष्टी चार चौघात बोंबलायच्या नसतात हो शिल्पातै. बाळकराम बोंबलले का? आणि त्यांच्या फक्त दोन ओळ वाचून तुम्ही हा निष्कर्ष काढलात खुपच तल्लख बुद्धी आहे बुवा तुमची. अमेरिकेत असता काय?

In reply to by धन्या

बाळकराम 20/09/2011 - 01:21
अमेरिकेत असता काय?>> हे काय इचारनं झालं का राव! आपुन काय न बोलता बी समदं कळतंय त्येन्ला! उगाच अमेरिकेत गेल्याती का त्या? काय म्हंता, काडा चंची आन तंबाकू!

रेवती 18/09/2011 - 21:04
दिवटे साहेब, चक्क लेखन आवडले. १००% पटले असे म्हणता येणार नाही. बर्याच चांगल्या गोष्टी असतात हो, त्याचा वापर वाईट रितीने करणारेही असतातच. आता वाईटाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असेल तर काय करणार? अश्लील गोष्टींसाठी वापर केला जात असेल तर ते मला वाईट आहे असे वाटते पण तसे ते वापरणार्‍याला वाटत नसेल तर काय करणार? "थोडक्यात गोडी आणि जास्तीत लबाडी" ;)

स्वस्त असल्याने नेट व मोबाईल चा वापर व दुर उपयोग वाढला आहे.. उपाय........ मोबाईल...इन कमींग व ऑट गोईंग १० रु /मिनिट रेट करावा,.. नेट ..मिनिमम चार्ज रु.५००० ठेवावा... त्या मुळे ज्यांना गरज आहेत असेच लोक नेट वापरतिल... ल्याड लाईन रेट कमी करुन होणारी गैर सोय टाळता येईल... व आज मोबाईल वापर जो बोकाळला आहे तो थांबु शकेल....... मोबाईल व नेट चा व्यवसाया व्यतिरिक्त वापर म्हणजे चंगळ वाद आहे.... लोकांनी ल्यांड लाईन वापरणे जवळ जवळ बंद केल्या गत आहे..

In reply to by अविनाशकुलकर्णी

स्मिता. 19/09/2011 - 16:27
मोबाईल किंवा आंतरजालाचा भरपूर वापर हा त्या सोयींचा दुरुपयोग कसा म्हणता येईल? किंवा मोबाईचा/नेटचा वापर 'बोकाळल्याने' तुम्हाला-आम्हाला काय त्रास होतो? जोवर तंत्रज्ञानाचा गैरवापर होत नाही तोवर त्याचा वापर कितीही असला तरी हरकत नसावी. खरं तर त्यांच्या सहाय्याने किती तरी लोकांची कामे सुकर होतात.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मृत्युन्जय 19/09/2011 - 16:47
बरोबर आहे. मी तर म्हणतो की सरसकट दूरध्वनीवरच (स्थिर काय किंवा भ्रमण काय) बंदी घालावी. दूरध्वनी मुळे लोकांनी पोस्टकार्ड वापरणे बंद केले आहे हो. पत्र लिहिण्याची कलाच नाहिशी होउ लागली आहे. किंबहुना मी तर म्हणतो की पोस्टखातेच बंद करावे. बिचार्‍या पोस्टमनला किती पळवतात हे लोक. त्यापेक्षा पुर्वीची कबूतर मेसेजिंग सर्व्हिस सुरु केली तर कित्ती बरे होइल. आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती) त्यांचा काही उपयोगही करुन घेता येइल. एका कबूतर मेसेजचे ५००० रुपये. दाणापाण्याचा खर्च वेगळा अ‍ॅट अ‍ॅक्चुयल.

In reply to by मृत्युन्जय

आमच्या सोसायटीत सध्या खुप कबूतरे आहेत ( हा शब्द योग्य अर्थाने घ्यावा ही नम्र विनंती)
अगदी योग्य अर्थाने घेतला गेल्या आहे. पुढच्या कट्ट्यास आम्ही तुम्हाला न्यायला व सोडायला येऊ ब्रिजेशच्या गाडीतून.

In reply to by जाई.

आमच्या सोसायटीतही या कबूतरांनी वैताग आणलाय
'या' म्हणजे नक्की कोणत्या ? १) एकट्याने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? का २) जोडीने त्रास देणार्‍या कबूतरांनी ? पारवा परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

वपाडाव 19/09/2011 - 18:20
बाब्बौ, अग्गा गा गा !!!
एका सोसायटीत किती कबुतरे असतात? किंवा तुमच्या सोसायटीत किती कबुतरे आहेत ? कबुतर घ्या घ्या घ्या, कबुतर घ्या घ्या घ्या, घ्या $$$ घ्या $$$

अनिकेतपन्त 28/09/2011 - 17:36
दिवटे डाक्टर्...तुमच्या लेखाबद्द्ल काय म्हणायच नाही राव आम्हाला...पण 'क्रीडा' म्हणुन बूकमार्क कशाला केलय? आमच्यासारख्या रोजचा पेपर शेवटच्या पानपासुन वाचणार्या लोकांचा पोपट होतो हो बाकी काय नाही.

In reply to by अनिकेतपन्त

मेघवेडा 28/09/2011 - 17:51
अनिकेतपन्त, द वणवणे> डागदरसायबांच्या मनरूपी खेळाडूने विचारांच्या मैदानात कोट्याऽनुप्रासादिरूपी सवंगड्यांसोबत केलेली नैबंधिक क्रीडा आहे ही! /द वणवणे>
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो. सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच.

पेट्रोल ची पुन्हा दरवाढ.

चन्द्रशेखर सातव ·

In reply to by मी-सौरभ

रेवती 15/09/2011 - 20:32
हा हा हा. सायकल चालविणे, चालणे हे आरोग्यासाठी हितकर असते. सरकारला काळजी आहेच की जनसामान्यांच्या आरोग्याची! कालच वीज दरवाढीची बातमीही वाचली. आता कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागणार काय?

In reply to by आशु जोग

रेवती 16/09/2011 - 02:03
सायकल चालवताय तर पेट्रोलची चिंता का करताय माझ्या प्रतिसादात कुठेही चिंता व्यक्त केलेली नाही अथवा तो शब्द वापरलेला नाही. काळजी असली तर ती सरकारला.......मला नाही. स्पष्ट लिहिलय.

मीनवीनसायकलघेणारआहेनेहमठेरवायचो की आता आतानक्कीठरकेलेणतानक्कीठरलेसर्कारचेडोकेठिकाणावराअहीकायसूदेनायतरनसिऊदेपणातामीनक्कीसायकलघेणारे

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नितिन थत्ते 16/09/2011 - 15:18
पंगा मोड ऑन> >>सोनियांच्या शस्त्रक्रियेचा खर्च भरून काढण्याकरिता ही दरवाढ झालीये. या विधानांवरून काही चमत्कारिक निष्कर्ष निघतात. सदर व्यक्ती शस्त्रक्रिया होऊन विश्रांती घेऊन परत आपल्या घरी परतल्यानंतर भारत सरकारने त्या खर्चाची जमवाजमव सुरू केली आहे त्याअर्थी... १. ज्या देशात शस्त्रक्रिया झाली त्या देशातील रुग्णालयात व्यक्तीला आडमिट करायच्या आधीच पैसे भरायला सांगण्याची पद्धत नसावी. इतकेच काय तर पैसे न देताच रुग्णास घरीदेखील जाऊ देण्याची पद्धत त्या देशात दिसते. ती रक्कम कुणीतरी (त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबाने किंवा पक्षाने किंवा सरकारने) आधीच भरली असल्यास त्या खर्चासाठी दरवाढ झाली हे विधान वायफळ ठरते. २. या कारणासाठी दरवाढ झाली असल्यास शस्त्रक्रियेस लागणारी रक्कम जमा होताच (म्हणजे १-२ दिवसातच) सदर दरवाढ रद्द करण्यात येईल असा आशादायक निष्कर्ष काढण्यास प्रत्यवाय नसावा. ;) ३. शस्त्रक्रियेस लागणारे पैसे लोकवर्गणीतून जमा करावे लागले त्या अर्थी सदर व्यक्तीच्या (भारतातील किंवा भारताबाहेरील-विशेषतः बर्‍याच लोकांना उघडपणे माहिती असलेल्या स्विट्झर्लंडमधील गुप्त) बँकखात्यांत पुरेशी रक्कम नव्हती. तसेच सदर व्यक्तीला राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा म्हणून शस्त्रक्रियेचा खर्च मिळण्याची तरतूद नव्हती. ४. सरकारने किंवा त्यांनी स्वतः वैद्यकीय खर्चाचा विमा उतरवलेला नव्हता. अथवा तो उतरवला असल्यास विमा कंपनीने त्यांचा क्लेम नामंजूर केला असावा. जी व्यक्ती एका विमा कंपनीला वाकवू शकली नाही तिच्यासाठी सरकार पैसे जमा करेल अशी शक्यता सध्याच्या बाजाराभिमुख भांडवलवादी व्यवस्थेत विचित्र वाटते. पंगा मोड ऑफ> नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 20/09/2011 - 07:45
पंगेसे पंगा> १. ज्या देशात शस्त्रक्रिया झाली त्या देशातील रुग्णालयात व्यक्तीला आडमिट करायच्या आधीच पैसे भरायला सांगण्याची पद्धत नसावी. इतकेच काय तर पैसे न देताच रुग्णास घरीदेखील जाऊ देण्याची पद्धत त्या देशात दिसते. ती रक्कम कुणीतरी (त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबाने किंवा पक्षाने किंवा सरकारने) आधीच भरली असल्यास त्या खर्चासाठी दरवाढ झाली हे विधान वायफळ ठरते. खिशात आणि ब्यांकेतही भरपूर पैसे होते आणि आहेतच पण ते इतक्या मोठ्या प्रमाणात, अनपेक्षितरित्या, गुपचुप द्यावे लागले ह्याचा राग कुणावर तरी काढायचा होता. आणि शिवाय अपनी गली मे कुत्ती भी शेरनी बनती है ( हे केवळ वाक्प्रचार म्हणून आलंकारिक अर्थाने बरं का!) आणि हो, ही सगळी दुखणी कशामुळे बरे? राणी "चिंता करिते देशाची" म्हणूनच. तेव्हा त्याचा भारतीयांना थोओओओडासा त्रास झाला तर काय हरकत आहे? >> २. या कारणासाठी दरवाढ झाली असल्यास शस्त्रक्रियेस लागणारी रक्कम जमा होताच (म्हणजे १-२ दिवसातच) सदर दरवाढ रद्द करण्यात येईल असा आशादायक निष्कर्ष काढण्यास प्रत्यवाय नसावा किती रकमेची वसूली झाल्यावर थोरल्या आऊसाहेब शांत होतील ते सांगणे कठीण आहे. त्यामुळे १-२ दिवसाचे लॉजिक बिनबुडाचे आहे. >> ३. शस्त्रक्रियेस लागणारे पैसे लोकवर्गणीतून जमा करावे लागले त्या अर्थी सदर व्यक्तीच्या (भारतातील किंवा भारताबाहेरील-विशेषतः बर्‍याच लोकांना उघडपणे माहिती असलेल्या स्विट्झर्लंडमधील गुप्त) बँकखात्यांत पुरेशी रक्कम नव्हती. तसेच सदर व्यक्तीला राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा म्हणून शस्त्रक्रियेचा खर्च मिळण्याची तरतूद नव्हती. मुद्दा १ चे उत्तर बघावे. >> ४. सरकारने किंवा त्यांनी स्वतः वैद्यकीय खर्चाचा विमा उतरवलेला नव्हता. अथवा तो उतरवला असल्यास विमा कंपनीने त्यांचा क्लेम नामंजूर केला असावा. जी व्यक्ती एका विमा कंपनीला वाकवू शकली नाही तिच्यासाठी सरकार पैसे जमा करेल अशी शक्यता सध्याच्या बाजाराभिमुख भांडवलवादी व्यवस्थेत विचित्र वाटते. मुद्दा १ चे उत्तर बघावे. पंगेसे पंगा ऑफ>

५० फक्त 16/09/2011 - 06:48
एक वस्तुस्थिती लक्षात घ्या, पेट्रोलची दरवाढ जो तोटा भरुन काढण्यासाठी होते आहे तो काही फक्त पेट्रोलमुळे होणारा तोटा नाही, त्याचा एक भाग डिझेल. एल्पिजी आणि केरोसिन च्या सबसिडितुन येतो. पेट्रोल आपण वापरतो फक्त रोजच्या ये जा करण्यासाठि जे गरजेचे आहे @ ६०% आणि चैनीसाठी @४०% (यावर एक धागा येतोच आहे, वाट बघा), पण हा विचार करा की जर डिझेलची सबसिडि कमी केलि किंवा डिझेलचे भाग नियंत्रणमुक्त केले जसे सध्या पेट्रोलचे आहेत तर डिझेलच्या भावात होणा-या फरकांमु़ळे बाकिच्या सगळ्याच गोष्टींचे भाव वाढु शकतात आणि पेट्रोल ३ ने वाढले तर पडणारा फरक आपल्याला कळतो आणि आपण त्यासाठि तयार राहतो, पण डिझेल ३ ने वाढले तर वाहतुकदार , रेल्वे यांच्या वाहतुकीच्या भावात जी वाढ होईल ती आपल्या डोक्यावर काय रेटने बडवली जाईल त्याचि कल्पनाच केलेली बरी. दगडापेक्षा वीट मउ या न्यायाने डिझेलचे भाव वाढण्यापेक्षा पेट्रोलचे वाढलेले बरे.

In reply to by ५० फक्त

सोत्रि 16/09/2011 - 11:09
दगडापेक्षा वीट मउ या न्यायाने डिझेलचे भाव वाढण्यापेक्षा पेट्रोलचे वाढलेले बरे.
तुमच्या तोंडात साखर पडो. नविन डिझेलची गाडी घ्यायचा विचार करतो आहे. वाढुदे वाढुदे पेट्रोल वाढुदे...(म्हणजे पेट्रोलचे भाव नाहीतर आदिमाया आहेच विक्षिप्तपणॆ wink > करायला) ..... ;) - (हलकट) सोकाजी

In reply to by सोत्रि

५० फक्त 16/09/2011 - 12:57
डिझेलचे पण भाव वाढणारच आहेत, त्यात वर्गवारी करायचा विचार आहे, ट्रकला वेगळा, पब्लिक ट्रान्स. ला वेगळा, पॅसेंजर कारला वेगळा, एस्युव्हिला वेगळा, त्यामुळं तर बरेच अ‍ॅटोवाले थांबले आहेत नविन गाड्या काढायचं, नॅनो डिझेल, नविन सफारी, झायलो मिनी, नविन विस्टा, नविन रिट्झ, बरेच जण वाट पाहात आहेत. सगळ्यात मोठा फटका एलपिजीची सबसिडी काढल्यावर बसणार आहे. डायरेक्ट ७५०-८०० सिलिंडर. आणि खाली थत्तेजी म्हणत आहेत ते बरोबर आहे, एक थेअरी अशी आहे की रिलायन्स व एस्सार ही मंडळी डिझेल नियंत्रण मुक्त होण्याची वाट पहात आहेत, कारण चांगल्या व्यवस्थापनाच्या व नविन तांत्रिकतेच्या जोरावर ही लोकं डिझेल १-२ रु, स्वस्त विकु शकतात, पेट्रोलचं मार्केट डिझेलपेक्षा फार कमी आहे, किमान हायवेला तरी, आणि प्रायव्हेट लोकं सिटित पंप काढणार नाहीत. सध्या क्वालिटि अन क्वांटीटी चा विचार केला तर पुण्यात शेल सगळ्यात मस्त, आधीपासुन्च ७१ आहे पण क्वालिटि अन क्वांटीटीचा काही इश्यु नाही, तुम्ही अगदी ५ लिटर पेट्रोल घेतलं आणि १ लिटर पेट्रोल मोजुन दाखवण्यची मागणी केली तरी ती पुर्ण केली जाते , अर्थात खुप गर्दी नसेल तर.

कुंदन 16/09/2011 - 10:57
बरेच झाले की , गरजेपेक्षा जास्त गाड्या झाल्या आहेत आपल्या कडे. सायकल रिक्षा सुरु कराव्यात आता ,ऑटो रिक्षा वगैरे मोड्कळीत काढुन.

नितिन थत्ते 16/09/2011 - 11:00
>>किमती ८५ डॉलर्स प्रती पिंप पर्यंत खाली उतरल्या होत्या तेव्हा किमती कमी करण्याचा विचार केला नाही.आता मात्र रुपयाचे मूल्य डॉलर च्या तुलनेने कमी झाल्यावर लगेच दरवाढ का केली जात आहे ? मला वाटते ज्या अर्थी इतर उत्पादक सरकारी दरापेक्षा कमी दराने पेट्रोल विक्री करीत नाहीयेत त्या अर्थी पेट्रोलची "वाजवी किंमत" ही आत्ताच्या पातळीपेक्षा बरीच वर असावी. अन्यथा खाजगी उत्पादकांनी (रिलायन्स*, एस्सार, एजिस वगैरे) सरकारपेक्षा १-२ रुपयांनी दर कमी ठेवून धंदा स्वतःकडे खेचला असता. जाणकारांनी प्रकाश टाकावा. २००३ च्या सुमारास रिलायन्स अशी कमी दराने विक्री करत असे हे स्मरते. नितिन थत्ते

काल "स्टार माझा" वरील लेख वाचनात आला: http://starmajha.newsbullet.in/india/34-more/8975-2011-09-15-15-06-44 दिलेली आकडेवारी बरोबर आहे काय? जाणकारांनि (प्लिज) मार्गदर्शन करावे.

In reply to by वसईचे किल्लेदार

नितिन थत्ते 16/09/2011 - 14:32
लेख वाचला. सदरहु लेखकाचा १५८.७६ लि कच्च्या तेलातून १५८.७६ लि पेट्रोल निघते असा समज असावा असे वाटते. पेट्रोल डीझेल, आणि इतर उत्पादने ही को प्रॉडक्टस असल्याने त्यांच्या सापेक्ष किंमती ठरवणे (खर्च कोणत्या उत्पादनावर किती चार्ज धरावा) हा "बिझिनेस डिसिजन" असतो. तसेच त्याने वहातुक खर्च आणि डीलर कमिशन हे "कर" म्हणून धरले आहेत. क्रूड ऑईलवरील कस्टम ड्यूटी आणि पेट्रोलवरील कस्टम ड्यूटी असे दोनदा मोजले आहे. क्रूड ऑईल आयात केले असेल तर क्रूडची कस्टम ड्यूटी लागेल पण पेट्रोलची कस्टम ड्यूटी लागणार नाही. पेट्रोल आयात केले असेल तर क्रूडची कस्टम ड्यूटी लागणार नाही. करांमुळे किंमत जास्त आहे* असे बिंबवण्यासाठी "बनवलेली" आकडेवारी वाटते. *येथे काही काळापूर्वी विमान कंपन्या अशीच चलाखी करत असल्याचे आठवते. विमानाच्या तिकिटावर खालीलप्रमाणे ब्रेक अप असे. फेअर = ५०० रु टॅक्सेस & फ्युएल सरचार्ज = १८०० रु एकूण = २३०० रु यामध्ये टॅक्सेस & फ्युएल सरचार्ज च्या १८०० रु मध्ये फक्त २२० रु कर असायचा. उरलेले १५८० रु विमान कंपनीच घेत असे. परंतु ते एकत्र दाखवल्यामुळे प्रवाशांचा असा समज होई की ५०० रु भाड्यावर १८०० रु कर लावला जातो.

In reply to by नितिन थत्ते

सदरहु लेखकाचा १५८.७६ लि कच्च्या तेलातून १५८.७६ लि पेट्रोल निघते असा समज असावा असे वाटते.
ही तर घोडचूकच आहे. शिवाय त्यात टायपो आहे ती अशी: शिक्षण कर – ४३ रु. तो शिक्षण कर ४३ पैसे असा असला पाहिजे. डायरेक्ट असे आकडे देण्यापेक्षा कोणता कर किती टक्के लागतो हे दिलं असतं तर आणखी जास्त विश्वासार्ह वाटलं असतं. सध्या भारतीय रूपयाचं डॉलरच्या संदर्भात होणारं अवमूल्यन पहाता थोडे जास्त पैसे तेल कंपन्यांनी मागणे अवास्तव वाटत नाही. डॉलरचा गेल्या ३० दिवसांतला भारतीय रूपयांमधला दर. डॉलरची आत्ता किंमत साधारणतः ४७.२५ रूपये एवढी आहे, महिन्याभरापूर्वी ४४.९ अशी होती. ५० फक्त यांच्या मुद्याशीही सहमती. तुलनेकरता, अमेरिकेत साधारणतः ४० ते ५० रूपये प्रति लिटर अशी किंमत द्यावी लागते. अमेरिकेत भारतापेक्षा कर कमी आहेत आणि शिवाय त्यांना चलन बदलायला लागत नाही याचा फायदा होतो.

In reply to by विनायक प्रभू

नितिन थत्ते 16/09/2011 - 14:08
विक्षिप्त बै याला जवाबदार असणार. परकीय हात म्हणतात तो हाच. ;) अवांतर : या न्यायाने पुढची वाढ "५०फक्त" होणार बहुधा. :(

In reply to by विनायक प्रभू

तिमा 16/09/2011 - 20:44
ही वाढ रुपये 'पाय' ने व्हावी ह्या मागचे रहस्य काय रहस्य हेच असावे की पाय ची डेसिमलनंतरची नेमकी किंमत काढता येत नाही तशीच पेट्रोलचीही नक्की किंमत कोणाला काढता येऊ नये. मानवी शरीरापासून इंधन करता येते का यावर शोध लागावा. आपल्या देशात 'कच्चा माल' भरपूर उपलब्ध आहे.

In reply to by तिमा

वपाडाव 20/09/2011 - 10:45
आपल्या देशात 'कच्चा माल' भरपूर उपलब्ध आहे.
अधोरेखित शब्दाला 'कच्ची कली' या अर्थी घ्यावे का असा विचार मनात डोकावुन गेला... याच निमित्ताने ह्युमन ट्रॅफिकिंग या विषयावर एखादा लेख (जिलबी) पाडावी की काय, असेही वाटुन गेले आहे....

५० फक्त 16/09/2011 - 14:58
थत्ते काका, डिझेलचा भावी भाव सांगताय का ? त्या सोकाजीला काही काळ तरी चालवु द्या की फायद्यातली गाडी. बादवे - सोकाजी कोणती गाडी घेताय? स्कॉर्पिओ का?

अनामिका 16/09/2011 - 16:28
काँग्रेसच्या सर्वेसर्वा त्यागमुर्ती .सोनियादेवी नुकत्याच गंभिर आजारावर भारतात निष्णात शल्यविशारदांची व वैद्यकशास्त्रातील जाणकारांची वानवा असल्याकारणाने अमेरिकेतून शस्त्रक्रिया करवून हिंदुस्थानात अवतरल्या आहेत्..त्यांच्या आगमनादिवशीच दिल्लीत दिग्विजय सिंग यांच्या परमप्रिय इस्लामी अतिरेक्यांनी बाँबस्फोट घडवून सामान्य माणसाच्या रक्तामासाचा सडा घालत व १४ सामान्य नागरिकांचे बळी देत दिव्य सोनियामातेचे हार्दिक व भव्य स्वागत केलेच आहे....आणि आता आम आदमी के साथ असणार्‍या आदरणीय त्यागमुर्तीच्या उपचारार्थ झालेल्या खर्चाची रक्कम आम आदमीनेच भाववाढ ,व्याजदरवाढ ,इंधन दरवाढ या मार्गाने अदा केलीच पाहिजे....कायम हात दाखवून अवलक्षण करणार्‍या काँग्रेसच्या नतद्रष्ट हाताच्या निशाणीवर शिक्कामारून पवित्र घराण्याला राजरोस लुटमारीचा परवाना देणार्‍या आम आदमीने सगळ्या प्रकारची दरवाढ मिटल्या तोंडी सहन करुन आपले नैतिक व राष्ट्रिय कर्तव्य पार पाडायलाच हवे..

मदनबाण 20/09/2011 - 17:35
बांग्लादेश आणि पाकड्यांकडे सद्या पेट्रोलचा भाव ४४ /४१ (रु) असा आहे, तसेच अमेरिकेत ४२.८२ (रु. प्रमाणे ) मग आपल्याच देशात पेट्रोल इतके महाग कसे ? ऑइल कंपन्या म्हणतात की त्यांना सबसिडीमुळे तोटा होत आहे, पण मग इतके वर्ष तोटा होवुन ते त्यांच्या कर्मच्यार्‍यांचा पगार कसे देउ शकतात ? आत्ताच खालील धागा वाचल्याने मला वरील प्रश्न पडले आहेत... http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/energy/oil-gas/Petrol-price-State-oil-companies-raise-petrol-prices-by-Rs-314/litre-ATF-price-hiked-by-25/articleshow/9999346.cms

पेट्रोल डिझेल घ्या भरुन. रुपये-दोन रुपये वाचल्याचे समाधान मिळेल. मध्यरात्रीपासून पुन्हा दणका द्यायचा पेट्रोल कंपन्यांचा विचार दिसतोय. आज पेंट्रोल कंपन्या नेहमीप्रमाणे वाढत्या दरांबाबत आणि इतर गोष्टींची 'समीक्षा' करायला बसणार आहेत. रुपया घसरणे, डॉलर सावरणे, कच्चे तेल महागणे ही कारणं पेट्रोल-डिझेलच्या लिटरमागे तीन-चार रुपये वाढवायला पुरेशी आहेत. -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 20/06/2013 - 20:44
यापुढील निवडणुक थेट डिसेंबर २०१३ मध्ये असल्याने (राजस्थान, म.प्र., छत्तीसगड, दिल्ली इ. राज्यांच्या विधानसभा निवडणुका व कदाचित झारखंडची विधानसभा निवडणुक देखील होईल), साधारणपणे ऑक्टोबर २०१३ पर्यंत पेट्रोल/डिझेलचे भाव वाढत राहतील व नंतर निवडणुक होईपर्यंत ते भाव १०-१२ रूपयांनी कमी होतील.

श्रीगुरुजी 15/07/2013 - 14:33
पेट्रोलने पुन्हा एकदा रू. ७८ प्रति लिटरची पातळी पार केली आहे. मार्च २०१३ अखेरीस हीच भावपातळी होती. पण मे २०१३ मधील कर्नाटकातील निवडणुकीवर डोळा ठेवून पेट्रोलचे भाव रू ६९ पर्यंत खाली आणण्यात आले. त्याचवेळी मी एका धाग्यावर लिहिले होते की निवडणुक संपल्यावर काही काळातच भाव पुन्हा ७८ पर्यंत जातील. आता ऑक्टोबर २०१३ पर्यंत भाव वाढून रू. ८५-९० पर्यंत जातील. नंतर डिसेंबर २०१३ मध्ये ५ राज्यांच्या निवडणुका असल्याने भाव परत ७०-७५ पर्यंत खाली आणले जातील व लोकसभेची निवडणुक होईपर्यंत (म्हणजे मे २०१४ पर्यंत भाव वाढणार नाहीत). एकंदरीत पेट्रोल भाववाढीचा डॉलरच्या किंमतीशी कमी संबंध असून निवडणुकांच्या तारखांशी जास्त संबंध आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 01/11/2013 - 20:32
माझा अंदाज बराचसा खरा ठरला. वर लिहिल्याप्रमाणे ऑक्टोबर २०१३ मध्ये पेट्रोल रू. ८४.०९ प्रति लिटर झाले होते. आता नोव्हेंबर २०१३ मध्ये ते परत रू. ७८.५० पर्यंत खाली आले आहे. नोव्हेंबर अखेरीस भाव अजून ४-५ रूपयांनी उतरतील व नंतर ३१ डिसेंबरपूर्वी भाव परत ८० च्या पुढे जाईल. नंतर फेब्रुवारी मध्ये २-३ टप्प्यात भाव रू. ७० पर्यंत खाली आणले जातील.

In reply to by मी-सौरभ

रेवती 15/09/2011 - 20:32
हा हा हा. सायकल चालविणे, चालणे हे आरोग्यासाठी हितकर असते. सरकारला काळजी आहेच की जनसामान्यांच्या आरोग्याची! कालच वीज दरवाढीची बातमीही वाचली. आता कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागणार काय?

In reply to by आशु जोग

रेवती 16/09/2011 - 02:03
सायकल चालवताय तर पेट्रोलची चिंता का करताय माझ्या प्रतिसादात कुठेही चिंता व्यक्त केलेली नाही अथवा तो शब्द वापरलेला नाही. काळजी असली तर ती सरकारला.......मला नाही. स्पष्ट लिहिलय.

मीनवीनसायकलघेणारआहेनेहमठेरवायचो की आता आतानक्कीठरकेलेणतानक्कीठरलेसर्कारचेडोकेठिकाणावराअहीकायसूदेनायतरनसिऊदेपणातामीनक्कीसायकलघेणारे

In reply to by चेतन सुभाष गुगळे

नितिन थत्ते 16/09/2011 - 15:18
पंगा मोड ऑन> >>सोनियांच्या शस्त्रक्रियेचा खर्च भरून काढण्याकरिता ही दरवाढ झालीये. या विधानांवरून काही चमत्कारिक निष्कर्ष निघतात. सदर व्यक्ती शस्त्रक्रिया होऊन विश्रांती घेऊन परत आपल्या घरी परतल्यानंतर भारत सरकारने त्या खर्चाची जमवाजमव सुरू केली आहे त्याअर्थी... १. ज्या देशात शस्त्रक्रिया झाली त्या देशातील रुग्णालयात व्यक्तीला आडमिट करायच्या आधीच पैसे भरायला सांगण्याची पद्धत नसावी. इतकेच काय तर पैसे न देताच रुग्णास घरीदेखील जाऊ देण्याची पद्धत त्या देशात दिसते. ती रक्कम कुणीतरी (त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबाने किंवा पक्षाने किंवा सरकारने) आधीच भरली असल्यास त्या खर्चासाठी दरवाढ झाली हे विधान वायफळ ठरते. २. या कारणासाठी दरवाढ झाली असल्यास शस्त्रक्रियेस लागणारी रक्कम जमा होताच (म्हणजे १-२ दिवसातच) सदर दरवाढ रद्द करण्यात येईल असा आशादायक निष्कर्ष काढण्यास प्रत्यवाय नसावा. ;) ३. शस्त्रक्रियेस लागणारे पैसे लोकवर्गणीतून जमा करावे लागले त्या अर्थी सदर व्यक्तीच्या (भारतातील किंवा भारताबाहेरील-विशेषतः बर्‍याच लोकांना उघडपणे माहिती असलेल्या स्विट्झर्लंडमधील गुप्त) बँकखात्यांत पुरेशी रक्कम नव्हती. तसेच सदर व्यक्तीला राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा म्हणून शस्त्रक्रियेचा खर्च मिळण्याची तरतूद नव्हती. ४. सरकारने किंवा त्यांनी स्वतः वैद्यकीय खर्चाचा विमा उतरवलेला नव्हता. अथवा तो उतरवला असल्यास विमा कंपनीने त्यांचा क्लेम नामंजूर केला असावा. जी व्यक्ती एका विमा कंपनीला वाकवू शकली नाही तिच्यासाठी सरकार पैसे जमा करेल अशी शक्यता सध्याच्या बाजाराभिमुख भांडवलवादी व्यवस्थेत विचित्र वाटते. पंगा मोड ऑफ> नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

हुप्प्या 20/09/2011 - 07:45
पंगेसे पंगा> १. ज्या देशात शस्त्रक्रिया झाली त्या देशातील रुग्णालयात व्यक्तीला आडमिट करायच्या आधीच पैसे भरायला सांगण्याची पद्धत नसावी. इतकेच काय तर पैसे न देताच रुग्णास घरीदेखील जाऊ देण्याची पद्धत त्या देशात दिसते. ती रक्कम कुणीतरी (त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबाने किंवा पक्षाने किंवा सरकारने) आधीच भरली असल्यास त्या खर्चासाठी दरवाढ झाली हे विधान वायफळ ठरते. खिशात आणि ब्यांकेतही भरपूर पैसे होते आणि आहेतच पण ते इतक्या मोठ्या प्रमाणात, अनपेक्षितरित्या, गुपचुप द्यावे लागले ह्याचा राग कुणावर तरी काढायचा होता. आणि शिवाय अपनी गली मे कुत्ती भी शेरनी बनती है ( हे केवळ वाक्प्रचार म्हणून आलंकारिक अर्थाने बरं का!) आणि हो, ही सगळी दुखणी कशामुळे बरे? राणी "चिंता करिते देशाची" म्हणूनच. तेव्हा त्याचा भारतीयांना थोओओओडासा त्रास झाला तर काय हरकत आहे? >> २. या कारणासाठी दरवाढ झाली असल्यास शस्त्रक्रियेस लागणारी रक्कम जमा होताच (म्हणजे १-२ दिवसातच) सदर दरवाढ रद्द करण्यात येईल असा आशादायक निष्कर्ष काढण्यास प्रत्यवाय नसावा किती रकमेची वसूली झाल्यावर थोरल्या आऊसाहेब शांत होतील ते सांगणे कठीण आहे. त्यामुळे १-२ दिवसाचे लॉजिक बिनबुडाचे आहे. >> ३. शस्त्रक्रियेस लागणारे पैसे लोकवर्गणीतून जमा करावे लागले त्या अर्थी सदर व्यक्तीच्या (भारतातील किंवा भारताबाहेरील-विशेषतः बर्‍याच लोकांना उघडपणे माहिती असलेल्या स्विट्झर्लंडमधील गुप्त) बँकखात्यांत पुरेशी रक्कम नव्हती. तसेच सदर व्यक्तीला राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा म्हणून शस्त्रक्रियेचा खर्च मिळण्याची तरतूद नव्हती. मुद्दा १ चे उत्तर बघावे. >> ४. सरकारने किंवा त्यांनी स्वतः वैद्यकीय खर्चाचा विमा उतरवलेला नव्हता. अथवा तो उतरवला असल्यास विमा कंपनीने त्यांचा क्लेम नामंजूर केला असावा. जी व्यक्ती एका विमा कंपनीला वाकवू शकली नाही तिच्यासाठी सरकार पैसे जमा करेल अशी शक्यता सध्याच्या बाजाराभिमुख भांडवलवादी व्यवस्थेत विचित्र वाटते. मुद्दा १ चे उत्तर बघावे. पंगेसे पंगा ऑफ>

५० फक्त 16/09/2011 - 06:48
एक वस्तुस्थिती लक्षात घ्या, पेट्रोलची दरवाढ जो तोटा भरुन काढण्यासाठी होते आहे तो काही फक्त पेट्रोलमुळे होणारा तोटा नाही, त्याचा एक भाग डिझेल. एल्पिजी आणि केरोसिन च्या सबसिडितुन येतो. पेट्रोल आपण वापरतो फक्त रोजच्या ये जा करण्यासाठि जे गरजेचे आहे @ ६०% आणि चैनीसाठी @४०% (यावर एक धागा येतोच आहे, वाट बघा), पण हा विचार करा की जर डिझेलची सबसिडि कमी केलि किंवा डिझेलचे भाग नियंत्रणमुक्त केले जसे सध्या पेट्रोलचे आहेत तर डिझेलच्या भावात होणा-या फरकांमु़ळे बाकिच्या सगळ्याच गोष्टींचे भाव वाढु शकतात आणि पेट्रोल ३ ने वाढले तर पडणारा फरक आपल्याला कळतो आणि आपण त्यासाठि तयार राहतो, पण डिझेल ३ ने वाढले तर वाहतुकदार , रेल्वे यांच्या वाहतुकीच्या भावात जी वाढ होईल ती आपल्या डोक्यावर काय रेटने बडवली जाईल त्याचि कल्पनाच केलेली बरी. दगडापेक्षा वीट मउ या न्यायाने डिझेलचे भाव वाढण्यापेक्षा पेट्रोलचे वाढलेले बरे.

In reply to by ५० फक्त

सोत्रि 16/09/2011 - 11:09
दगडापेक्षा वीट मउ या न्यायाने डिझेलचे भाव वाढण्यापेक्षा पेट्रोलचे वाढलेले बरे.
तुमच्या तोंडात साखर पडो. नविन डिझेलची गाडी घ्यायचा विचार करतो आहे. वाढुदे वाढुदे पेट्रोल वाढुदे...(म्हणजे पेट्रोलचे भाव नाहीतर आदिमाया आहेच विक्षिप्तपणॆ wink > करायला) ..... ;) - (हलकट) सोकाजी

In reply to by सोत्रि

५० फक्त 16/09/2011 - 12:57
डिझेलचे पण भाव वाढणारच आहेत, त्यात वर्गवारी करायचा विचार आहे, ट्रकला वेगळा, पब्लिक ट्रान्स. ला वेगळा, पॅसेंजर कारला वेगळा, एस्युव्हिला वेगळा, त्यामुळं तर बरेच अ‍ॅटोवाले थांबले आहेत नविन गाड्या काढायचं, नॅनो डिझेल, नविन सफारी, झायलो मिनी, नविन विस्टा, नविन रिट्झ, बरेच जण वाट पाहात आहेत. सगळ्यात मोठा फटका एलपिजीची सबसिडी काढल्यावर बसणार आहे. डायरेक्ट ७५०-८०० सिलिंडर. आणि खाली थत्तेजी म्हणत आहेत ते बरोबर आहे, एक थेअरी अशी आहे की रिलायन्स व एस्सार ही मंडळी डिझेल नियंत्रण मुक्त होण्याची वाट पहात आहेत, कारण चांगल्या व्यवस्थापनाच्या व नविन तांत्रिकतेच्या जोरावर ही लोकं डिझेल १-२ रु, स्वस्त विकु शकतात, पेट्रोलचं मार्केट डिझेलपेक्षा फार कमी आहे, किमान हायवेला तरी, आणि प्रायव्हेट लोकं सिटित पंप काढणार नाहीत. सध्या क्वालिटि अन क्वांटीटी चा विचार केला तर पुण्यात शेल सगळ्यात मस्त, आधीपासुन्च ७१ आहे पण क्वालिटि अन क्वांटीटीचा काही इश्यु नाही, तुम्ही अगदी ५ लिटर पेट्रोल घेतलं आणि १ लिटर पेट्रोल मोजुन दाखवण्यची मागणी केली तरी ती पुर्ण केली जाते , अर्थात खुप गर्दी नसेल तर.

कुंदन 16/09/2011 - 10:57
बरेच झाले की , गरजेपेक्षा जास्त गाड्या झाल्या आहेत आपल्या कडे. सायकल रिक्षा सुरु कराव्यात आता ,ऑटो रिक्षा वगैरे मोड्कळीत काढुन.

नितिन थत्ते 16/09/2011 - 11:00
>>किमती ८५ डॉलर्स प्रती पिंप पर्यंत खाली उतरल्या होत्या तेव्हा किमती कमी करण्याचा विचार केला नाही.आता मात्र रुपयाचे मूल्य डॉलर च्या तुलनेने कमी झाल्यावर लगेच दरवाढ का केली जात आहे ? मला वाटते ज्या अर्थी इतर उत्पादक सरकारी दरापेक्षा कमी दराने पेट्रोल विक्री करीत नाहीयेत त्या अर्थी पेट्रोलची "वाजवी किंमत" ही आत्ताच्या पातळीपेक्षा बरीच वर असावी. अन्यथा खाजगी उत्पादकांनी (रिलायन्स*, एस्सार, एजिस वगैरे) सरकारपेक्षा १-२ रुपयांनी दर कमी ठेवून धंदा स्वतःकडे खेचला असता. जाणकारांनी प्रकाश टाकावा. २००३ च्या सुमारास रिलायन्स अशी कमी दराने विक्री करत असे हे स्मरते. नितिन थत्ते

काल "स्टार माझा" वरील लेख वाचनात आला: http://starmajha.newsbullet.in/india/34-more/8975-2011-09-15-15-06-44 दिलेली आकडेवारी बरोबर आहे काय? जाणकारांनि (प्लिज) मार्गदर्शन करावे.

In reply to by वसईचे किल्लेदार

नितिन थत्ते 16/09/2011 - 14:32
लेख वाचला. सदरहु लेखकाचा १५८.७६ लि कच्च्या तेलातून १५८.७६ लि पेट्रोल निघते असा समज असावा असे वाटते. पेट्रोल डीझेल, आणि इतर उत्पादने ही को प्रॉडक्टस असल्याने त्यांच्या सापेक्ष किंमती ठरवणे (खर्च कोणत्या उत्पादनावर किती चार्ज धरावा) हा "बिझिनेस डिसिजन" असतो. तसेच त्याने वहातुक खर्च आणि डीलर कमिशन हे "कर" म्हणून धरले आहेत. क्रूड ऑईलवरील कस्टम ड्यूटी आणि पेट्रोलवरील कस्टम ड्यूटी असे दोनदा मोजले आहे. क्रूड ऑईल आयात केले असेल तर क्रूडची कस्टम ड्यूटी लागेल पण पेट्रोलची कस्टम ड्यूटी लागणार नाही. पेट्रोल आयात केले असेल तर क्रूडची कस्टम ड्यूटी लागणार नाही. करांमुळे किंमत जास्त आहे* असे बिंबवण्यासाठी "बनवलेली" आकडेवारी वाटते. *येथे काही काळापूर्वी विमान कंपन्या अशीच चलाखी करत असल्याचे आठवते. विमानाच्या तिकिटावर खालीलप्रमाणे ब्रेक अप असे. फेअर = ५०० रु टॅक्सेस & फ्युएल सरचार्ज = १८०० रु एकूण = २३०० रु यामध्ये टॅक्सेस & फ्युएल सरचार्ज च्या १८०० रु मध्ये फक्त २२० रु कर असायचा. उरलेले १५८० रु विमान कंपनीच घेत असे. परंतु ते एकत्र दाखवल्यामुळे प्रवाशांचा असा समज होई की ५०० रु भाड्यावर १८०० रु कर लावला जातो.

In reply to by नितिन थत्ते

सदरहु लेखकाचा १५८.७६ लि कच्च्या तेलातून १५८.७६ लि पेट्रोल निघते असा समज असावा असे वाटते.
ही तर घोडचूकच आहे. शिवाय त्यात टायपो आहे ती अशी: शिक्षण कर – ४३ रु. तो शिक्षण कर ४३ पैसे असा असला पाहिजे. डायरेक्ट असे आकडे देण्यापेक्षा कोणता कर किती टक्के लागतो हे दिलं असतं तर आणखी जास्त विश्वासार्ह वाटलं असतं. सध्या भारतीय रूपयाचं डॉलरच्या संदर्भात होणारं अवमूल्यन पहाता थोडे जास्त पैसे तेल कंपन्यांनी मागणे अवास्तव वाटत नाही. डॉलरचा गेल्या ३० दिवसांतला भारतीय रूपयांमधला दर. डॉलरची आत्ता किंमत साधारणतः ४७.२५ रूपये एवढी आहे, महिन्याभरापूर्वी ४४.९ अशी होती. ५० फक्त यांच्या मुद्याशीही सहमती. तुलनेकरता, अमेरिकेत साधारणतः ४० ते ५० रूपये प्रति लिटर अशी किंमत द्यावी लागते. अमेरिकेत भारतापेक्षा कर कमी आहेत आणि शिवाय त्यांना चलन बदलायला लागत नाही याचा फायदा होतो.

In reply to by विनायक प्रभू

नितिन थत्ते 16/09/2011 - 14:08
विक्षिप्त बै याला जवाबदार असणार. परकीय हात म्हणतात तो हाच. ;) अवांतर : या न्यायाने पुढची वाढ "५०फक्त" होणार बहुधा. :(

In reply to by विनायक प्रभू

तिमा 16/09/2011 - 20:44
ही वाढ रुपये 'पाय' ने व्हावी ह्या मागचे रहस्य काय रहस्य हेच असावे की पाय ची डेसिमलनंतरची नेमकी किंमत काढता येत नाही तशीच पेट्रोलचीही नक्की किंमत कोणाला काढता येऊ नये. मानवी शरीरापासून इंधन करता येते का यावर शोध लागावा. आपल्या देशात 'कच्चा माल' भरपूर उपलब्ध आहे.

In reply to by तिमा

वपाडाव 20/09/2011 - 10:45
आपल्या देशात 'कच्चा माल' भरपूर उपलब्ध आहे.
अधोरेखित शब्दाला 'कच्ची कली' या अर्थी घ्यावे का असा विचार मनात डोकावुन गेला... याच निमित्ताने ह्युमन ट्रॅफिकिंग या विषयावर एखादा लेख (जिलबी) पाडावी की काय, असेही वाटुन गेले आहे....

५० फक्त 16/09/2011 - 14:58
थत्ते काका, डिझेलचा भावी भाव सांगताय का ? त्या सोकाजीला काही काळ तरी चालवु द्या की फायद्यातली गाडी. बादवे - सोकाजी कोणती गाडी घेताय? स्कॉर्पिओ का?

अनामिका 16/09/2011 - 16:28
काँग्रेसच्या सर्वेसर्वा त्यागमुर्ती .सोनियादेवी नुकत्याच गंभिर आजारावर भारतात निष्णात शल्यविशारदांची व वैद्यकशास्त्रातील जाणकारांची वानवा असल्याकारणाने अमेरिकेतून शस्त्रक्रिया करवून हिंदुस्थानात अवतरल्या आहेत्..त्यांच्या आगमनादिवशीच दिल्लीत दिग्विजय सिंग यांच्या परमप्रिय इस्लामी अतिरेक्यांनी बाँबस्फोट घडवून सामान्य माणसाच्या रक्तामासाचा सडा घालत व १४ सामान्य नागरिकांचे बळी देत दिव्य सोनियामातेचे हार्दिक व भव्य स्वागत केलेच आहे....आणि आता आम आदमी के साथ असणार्‍या आदरणीय त्यागमुर्तीच्या उपचारार्थ झालेल्या खर्चाची रक्कम आम आदमीनेच भाववाढ ,व्याजदरवाढ ,इंधन दरवाढ या मार्गाने अदा केलीच पाहिजे....कायम हात दाखवून अवलक्षण करणार्‍या काँग्रेसच्या नतद्रष्ट हाताच्या निशाणीवर शिक्कामारून पवित्र घराण्याला राजरोस लुटमारीचा परवाना देणार्‍या आम आदमीने सगळ्या प्रकारची दरवाढ मिटल्या तोंडी सहन करुन आपले नैतिक व राष्ट्रिय कर्तव्य पार पाडायलाच हवे..

मदनबाण 20/09/2011 - 17:35
बांग्लादेश आणि पाकड्यांकडे सद्या पेट्रोलचा भाव ४४ /४१ (रु) असा आहे, तसेच अमेरिकेत ४२.८२ (रु. प्रमाणे ) मग आपल्याच देशात पेट्रोल इतके महाग कसे ? ऑइल कंपन्या म्हणतात की त्यांना सबसिडीमुळे तोटा होत आहे, पण मग इतके वर्ष तोटा होवुन ते त्यांच्या कर्मच्यार्‍यांचा पगार कसे देउ शकतात ? आत्ताच खालील धागा वाचल्याने मला वरील प्रश्न पडले आहेत... http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/energy/oil-gas/Petrol-price-State-oil-companies-raise-petrol-prices-by-Rs-314/litre-ATF-price-hiked-by-25/articleshow/9999346.cms

पेट्रोल डिझेल घ्या भरुन. रुपये-दोन रुपये वाचल्याचे समाधान मिळेल. मध्यरात्रीपासून पुन्हा दणका द्यायचा पेट्रोल कंपन्यांचा विचार दिसतोय. आज पेंट्रोल कंपन्या नेहमीप्रमाणे वाढत्या दरांबाबत आणि इतर गोष्टींची 'समीक्षा' करायला बसणार आहेत. रुपया घसरणे, डॉलर सावरणे, कच्चे तेल महागणे ही कारणं पेट्रोल-डिझेलच्या लिटरमागे तीन-चार रुपये वाढवायला पुरेशी आहेत. -दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 20/06/2013 - 20:44
यापुढील निवडणुक थेट डिसेंबर २०१३ मध्ये असल्याने (राजस्थान, म.प्र., छत्तीसगड, दिल्ली इ. राज्यांच्या विधानसभा निवडणुका व कदाचित झारखंडची विधानसभा निवडणुक देखील होईल), साधारणपणे ऑक्टोबर २०१३ पर्यंत पेट्रोल/डिझेलचे भाव वाढत राहतील व नंतर निवडणुक होईपर्यंत ते भाव १०-१२ रूपयांनी कमी होतील.

श्रीगुरुजी 15/07/2013 - 14:33
पेट्रोलने पुन्हा एकदा रू. ७८ प्रति लिटरची पातळी पार केली आहे. मार्च २०१३ अखेरीस हीच भावपातळी होती. पण मे २०१३ मधील कर्नाटकातील निवडणुकीवर डोळा ठेवून पेट्रोलचे भाव रू ६९ पर्यंत खाली आणण्यात आले. त्याचवेळी मी एका धाग्यावर लिहिले होते की निवडणुक संपल्यावर काही काळातच भाव पुन्हा ७८ पर्यंत जातील. आता ऑक्टोबर २०१३ पर्यंत भाव वाढून रू. ८५-९० पर्यंत जातील. नंतर डिसेंबर २०१३ मध्ये ५ राज्यांच्या निवडणुका असल्याने भाव परत ७०-७५ पर्यंत खाली आणले जातील व लोकसभेची निवडणुक होईपर्यंत (म्हणजे मे २०१४ पर्यंत भाव वाढणार नाहीत). एकंदरीत पेट्रोल भाववाढीचा डॉलरच्या किंमतीशी कमी संबंध असून निवडणुकांच्या तारखांशी जास्त संबंध आहे.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 01/11/2013 - 20:32
माझा अंदाज बराचसा खरा ठरला. वर लिहिल्याप्रमाणे ऑक्टोबर २०१३ मध्ये पेट्रोल रू. ८४.०९ प्रति लिटर झाले होते. आता नोव्हेंबर २०१३ मध्ये ते परत रू. ७८.५० पर्यंत खाली आले आहे. नोव्हेंबर अखेरीस भाव अजून ४-५ रूपयांनी उतरतील व नंतर ३१ डिसेंबरपूर्वी भाव परत ८० च्या पुढे जाईल. नंतर फेब्रुवारी मध्ये २-३ टप्प्यात भाव रू. ७० पर्यंत खाली आणले जातील.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पेट्रोल ची पुन्हा सुमारे ३ रुपयांनी दरवाढ झाली आहे. ७१ रुपये प्रती लिटर आता पेट्रोल ची किमत असणार आहे,काही महिन्या पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर्स प्रती पिंप होती तेव्हा सरकार ने दरवाढ केली होती,परंतु सुमारे दोन महिन्या पूर्वी एशियन बाजात तेलाच्या किमती ८५ डॉलर्स प्रती पिंप पर्यंत खाली उतरल्या होत्या तेव्हा किमती कमी करण्याचा विचार केला नाही.आता मात्र रुपयाचे मूल्य डॉलर च्या तुलनेने कमी झाल्यावर लगेच दरवाढ का केली जात आहे ? चारही सरकारी तेल कंपन्या प्रचंड फायद्यात आहेत,मग कंपन्यांचे होणारे नुकसान त्या नफ्यातून का भरून काढले जात नाही ?

मिपावर उठवळ मोर्चा (स्लटवॉक)

राजेश घासकडवी ·

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

स्पा 26/08/2011 - 10:47
ओये मिका , माझी सीट ठेव रे बाबा पॉपकॉर्न घिऊन येतो घासू गुर्जी, उठवळ मोर्चाच नेतृत्व करताना कशे दिसतील याच चित्र डोळ्या समोर अल.. आणि अमळ सद्गदित झाहलो -- माचो स्पा

चिरोटा 26/08/2011 - 10:51
मस्तच रे राजेश. साधक बाधक चर्चा होईल ही अपेक्षा. मोर्चा काढण्यापेक्षा २/३ कि.मी. लांब मानवी शृंखला केली तर?

तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... >> तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का? >> पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो. >> काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?>> असा अनुभव आलाय पण तरीही उठवळ मोर्चा काढायची इच्छा नाहीय. आम्ही अगदी टोकाचे देव आनंद भक्त, म्हणजे आम्हाला सबकुछ देवआनंद (लेखक/निर्माता/दिग्दर्शक/अभिनेता सारं काही देवआनंदच असलेले) चित्रपटच जास्त आवडतात. अशा चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ प्रेमपुजारी, हरे राम हरे कृष्ण, मिस्टर प्राईम मिनिस्टर, सेन्सॉर, लुटमार, हे व असे अनेक) अनेक पात्र देव आनंद ला छळ छळ छळतात तरी तो अगदीच गरज पडल्याशिवाय फारसा कुणाचा प्रतिवाद करीत नाही (सेन्सॉर मध्ये तर ममता कुलकर्णी देव आनंद चा एकेरी उल्लेख करून बराच उपमर्द करते तरी तो स्थितप्रज्ञच. शेवटी जेव्हा तो शांतपणे आपली लढाई लढून जिंकतो तेव्हा तीदेखील आनंद व्यक्त करतेच. कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो. तो मिळत नाही म्हणून एक सॅडिस्ट जळजळ ती व्यक्त करीत असते इतकेच.). तो छळ तो एन्जॉय करतो. आम्हीही मिपावर होणारा आमचा छळ एन्जॉय करतो. त्यांना कळत नाहीय ते काय करतात असाच काहीसा छळ करणार्‍यांविषयीचा आमचा दृष्टीकोन असतो. एका महिलेला स्लट वॉक विषयी मुलाखतकर्त्याने तिचे मत विचारले (काही दिवसांपूर्वीच्या मटात आले होते). ती म्हणाली, "मला याचा उद्देशच पटत नाही. 'हे पाहा, माझ्याकडे तुम्ही पाहू नका' असा काही तरी विसंगत संदेश हा मोर्चा देतो असे मला वाटते." स्लटवॉक / उठवळ मोर्चा विषयीच्या त्या महिलेच्या विधानाशी मी देखील सहमत आहे. हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार >> या विधानाबद्दल विशेष कौतूक.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शाहिर 26/08/2011 - 14:11
कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो ऑ !!

विनीत संखे 26/08/2011 - 10:57
Love is cliche and cliches doent make you extraordinary but only human. सामान्य असणं हा मानव असल्याचा मुख्य पुरावा आहे असे मार्टीन ल्युथर किंग यानी म्हटलंय. आपण असामान्य आहोत हे इतरांना किंवा किंबहुना स्वतःला पटवून देण्याची उठाठेप करावीच का माणसानं? सो कॉल्ड विचारवंत किंवा विचारजंत माझ्या सामान्यत्वाविषयी आपले असामान्य किंवा अतिसामान्य विचार मांडोत अथवा नाही, त्यामुळे माझ्या बायकोचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. आणि मिपापिडित असणं हा प्रकार काय बुवा हे मला कळलेलेले नाही... इंटरनेट वर भांडणे हे सामान्य नेटकराचे उदाहरण झाले. म्हणून कुणी अमका तमका तुमच्याशी मिपावर भांडला आणि तुम्हाला त्याने टिकेचं धनी केलं तर काय बिघडलं? इथंच बघा... बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना? पुरेसं आहे. उठवळ मोर्चा काढायचा का त्यासाठी?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गवि 26/08/2011 - 11:10
चेतन आणि विनीत, हा लेख हे एक विनोदी आणि उपरोधात्मक / विरंगुळात्मक वगैरे लिखाण आहे अशी माझी समजूत आहे. तुम्ही गंभीर स्पष्टीकरण दिले आहेत म्हणून आता मात्र लेखाविषयी पुनर्विचार करुन पाहतो.

In reply to by विनीत संखे

उठवळ मोर्चाचा उद्देश तुम्ही सामान्य असा वा असामान्य तुमच्यावर तुमच्या अभिव्यक्तीबद्दल हल्ला होऊ नये यासाठीच आहे. जगा आणि जगू द्या.
बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना?
जर तुम्हाला मिपावरच्या प्रतिसादांपेक्षा खऱ्या माणसांच्या प्रेमाचीच पडलेली असेल तर तुमच्या प्रायॉरिटीज थोड्या और आहेत असंच म्हणावं लागेल. टू इच इट्स ओन. 'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे) कार्टून लय भारी. (प्रतिसादात पुरेसे क्लिशे झाले का?)

In reply to by शुचि

'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे)>> वपुंचं ते पुस्तक तर बरंच जुनं आहे. मिपा हे संकेतस्थळ तेव्हाही अस्तित्वात होतं. कमाल आहे, मला ठाऊक च नव्हतं.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शुचि 26/08/2011 - 11:48
नवर्‍याच्या पिवळ्या बनियनची पर्वा न करता ... त्याच्या कुशीत शिरणारी ,,,,,,,,, का काहीतरी वाक्य आहे

In reply to by शुचि

पिवळे बनियन घालणार्‍या माणसाला नवरा म्हणून निवडणे हाच मुळात उठवळपणा आहे. :D अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. इतरांच्या मताचा आदर, अभिव्यक्तिस्वातंत्र, ई. ई.

In reply to by स्पा

आनंदी गोपाळ 11/11/2011 - 01:42
बायकोने नीट धुतल्यानंतर नीळ लावली तर पिवळा पडत नाही असा अनुभव आहे. इथे नीळ लावायचा कंटाळा दिसतोय. मग पिवळ्याकडे दुर्लक्ष करणे तिला भाग आहे

In reply to by शुचि

अर्धवट 26/08/2011 - 16:13
शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य कॅलेंडर ह्या कथेतील नसून, "वहिदा रेहमान" ह्या कथेतील आहे बाकी चालूद्या, ;)

In reply to by राजेश घासकडवी

विनीत संखे 26/08/2011 - 12:24
मिपा सोडाच पण संपूर्ण मास मिडिया हे अभिव्यक्तीवरील टिकेहल्ल्यांनी कोळलेलं आहे. वृत्तपत्रांनी कसाबवर तेवढी टिका केलेली नाही जेवढी अण्णांवर केलीय. म्हणून काय अण्णा मिडियाविरुद्ध आंदोलन करत नाहीत. अण्णांचं सोडा (अगदीच क्लिशे झालाय तो विषय आजकल) पण खुद्द पुलंना रात्री नाट्यसमीक्षक डास होऊन चावतायत असं स्वप्न पडलं होतं म्हणून काही त्यांनी समीक्षकांच्या तोंडांची तुंबलेली गटारं साफ करण्यात आपलं आयुष्य नाही घालवलं. तुमचं साहित्य हे केर असेल तर आपसूकच कालौघात त्याचं विघटन होतं आणि जर ते कालातीत असेल तर त्याला 'कल्ट' चा दर्जा मिळतोच. मिपाही त्याला अपवाद नाही.

धन्य जाहलो. महान घासु गुर्जी कडुन महान लेखात फक्त माझाच नामोल्लेख. @चे.सु.गु. तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय हो?

In reply to by विनायक प्रभू

@ वि. प्र. तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच अस्थानी प्रतिक्रिया देता काय? माझा काही प्रॉब्लेम आहे असं मत मी कुठेच मांडलेलं नाहीय. धागाकर्त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहे असा माझा अनुभव मांडलाय फक्त त्याबाबत त्यांनी सूचविलेला उपाय मला अवलंबायचा नाहीय एवढंच माझं मत मी मांडलंय. हा काही माझा प्रॉब्लेम नाहीय. उलट असले अनुभव मी एन्जॉय करतोय असं म्हंटलंय. एन्जॉय करणं प्रॉब्लेम असू शकतं का? अर्थात मी एन्जॉय करतो हा तुमचा प्रॉब्लेम असल्यास त्याविषयी एक्झॅक्टली तुम्हाला च जास्त ठाऊक असणार.

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) मला वाटला. नाही पटत द्या सोडुन. एन्जॉय करता आहात तर काहीच प्रॉब्लेम नाही. एन्जॉय करण्याकरता धरलेला रस्ता तुम्हाला योग्य वाटत असेल तर... लगे रहो.

In reply to by विनायक प्रभू

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) >> तुम्हाला या संकेतस्थळावरील वाटचाली विषयी म्हणायचं आहे का? की माझ्या एकंदर आयुष्याबद्दल बोलताय? जरा अजून खुलासा करावा. तुमचा या संकेतस्थळावरचा प्रॉब्लेम तर तुम्ही न सांगताही माझ्या लक्षात आला. तुम्हाला प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रतिक्रिया देताच येत नाही. तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती त्यामुळे धाग्यावरचा नवा प्रतिसाद ठरतो. हे कसे करायचे ते कुणाकडून तरी नीट समजून घ्या. अर्थात हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नसेल तर सोडून द्या.

Nile 26/08/2011 - 11:50
आता उरल्यासुरल्या आयुष्यात* अजून काय काय पहावं लागणार आहे कोणास ठावूक! ;-) *अधिक माहीती करता.. अभ्यास वाढवा म्हणजे आपोआप कळेल.

शुचि 26/08/2011 - 12:00
>> मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. >> :( सुंदर विश्लेषण!!!

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे मोर्चातल्या अनेक व्यक्ती एकमेकाविरुद्ध मोर्चात आलेल्या असण्याची शक्यता आहे.
त्याला काहीच हरकत नाही. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज मोर्चाफेलोज असं कायसं कोणीतरी म्हटलेलं आहेच. किंबहुना एकमेकांचा उद्धार करणारे खांद्याला खांदा लावून मोर्चात उभे राहिले तर सगळेच समदुःखी आहेत ही जाणीव होईलच ना. तेच महत्त्वाचं.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ढब्बू पैसा 26/08/2011 - 20:58
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा! (संतप्त मोर्चेकरी) ढब्बू

In reply to by ढब्बू पैसा

या लाह्या खाणर्‍यांमुळे काही वैचारिक प्रगती होत नाही, मी त्यांचा निषेध करते.
तुमची झाली आहे तेवढी प्रगती पुरी आहे की देशासाठी ;)
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा!
म्हणजे नक्की काय करा ? परदेशात बसून देशात उगा राळ उडवणार्‍या अदिती व ढब्बीचा तिव्र निषेध !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, अदिती, व ढब्बू पैसा यांना: लोकहो, निव्वळ निषेध हा नकारात्मक आहे. त्याला सकारात्मक डूब हवी. म्हणजे उदाहरणार्थ 'मी हिरवा माजवाली/ला आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करते/तो' किंवा 'मी सौंदर्यफुफाटा निरखून पहाणारा/री आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करतो/ते' उठवळ मोर्चा हा एकमेकांचा निषेध करण्यासाठी नाही. मिळून मिसळून आपल्या समान शत्रूला विरोध करण्यासाठी आहे.

चिरोटा 26/08/2011 - 13:56
भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो. चिरोटा मोर्चाअडवी

In reply to by चिरोटा

भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो.
अगदी अगदी. परदेशात बसून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुंची तुलना फक्त दाऊद बरोबरच होउ शकते. आम्हाला सत्ता दिल्यास त्यांना मुसक्या बांधून इकडे आणतो का नाही बघाच. परानाथ मुंढे

प्रियाली 26/08/2011 - 14:17
यात भाग घ्यायचा झाला तर मला माझ्या दोन ड्युप्लिकेट आयडी ३_१४ विक्षिप्त अदिती आणि राजेश घासकडवी सोडून मिपावरल्या प्रत्येक आयडीविरुद्ध मोर्चा काढावा लागेल. ;) पहिला मोर्चा मिपावरील वयस्क कार्यकर्त्यांविरुद्ध काढावा असे म्हणते. ;)

वय हे मिपावरले का खरे खुरे. बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे. आणि एन्जॉय पण करत आहे.

In reply to by विनायक प्रभू

प्रियाली 26/08/2011 - 14:24
बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे.
ती फडफड आणि गळकं नाक, रडके डोळे तुम्ही एन्जॉय करताय मास्तर! आदर वाढला. ;)
वय हे मिपावरले का खरे खुरे.
अहो मी वयस्क कार्यकर्ते यांच्याविषयी बोलत होते.

ऋषिकेश 26/08/2011 - 14:28
तुम्ही केवळ जुने आहात, तुमचा कंपू आहे म्हणून नवी मंडळी तुमचा छळ मांडतात का? तुम्ही दारू पित नाही म्हणून दारू पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का? तुम्ही मांसाहारी आहात म्हणून शाकाहारी तुम्हाला हिणवतात? तुम्ही अश्रद्ध आहात म्हणून ईश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात? तुम्ही सदस्य आहात म्हणून काही संपादक तुमच्याविरोधात प्रतिसाद उडवणे, समजुतीआडच्या धमकीचे खरडी/व्यनी टाकणे वगैरे हत्यार उपसतात का? तुम्ही अनिवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे? तुम्ही निवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला कोणत्याही घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक नाही आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही पुरुष-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात तरीहि काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देत नाहित का? व्यनीमनीच्या गोष्टी करून कवी तुमच्या मागे आमच्याही कवितांचं विडंबन करा असे मागे लागतात का? तुम्ही लोकप्रिय नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?

खरे म्हटले तर वाईट वाट्ते अशी फड्फड बघुन. पण काय करणार? असतात एकेकाचे प्रॉब्लेम. आता आणखी एक अनावृत्त पत्र लिहीण्याची काही एक इच्छा नाही. एन्जॉय हा शब्द नो जॉय अर्थाने. @ आदरः काय सांगताय?

मुक्तसुनीत 26/08/2011 - 15:16
उठवळ मोर्च्याची कल्पना आवडली. त्यातल्या "स्वतःच्या मनातले विचार बोलून दाखवावेत" या संदर्भापुरता प्रतिसाद देतो. आयडी गुम जायेगा साईट भी ब्लॉक् हो जाएगा मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है ... गर याद रहे. हेच खरं. नाही का ? करंदीकर म्हणाले होते "तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको; मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको." . तद्वत् , कुणी विचारजंत म्हणो, नाहीतर पाणीपुरीवाला म्हणो , किंवा वैयक्तिक हल्ले चढवो , हीन अभिरुचीच्या कमेंट्स करो. जे योग्य वाटेल ते - व्यासपीठावरील सुसंस्कृतपणाच्या नीतीला धरून - बोलत रहावे. मोर्चात सामील व्हायला मिळालं तरी हरकत नाही. न मिळालं तरी तक्रार नाही.

In reply to by मुक्तसुनीत

मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है
अगदी खरं. दुसऱ्या एका कवीने म्हटलेलंच आहे इक दिन बिक जायेगा माती के मोल जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल असे बोल बोलत असताना, इतर कोणी बोलबच्चन अकारण बोल लावतं. आपलं गाणं आपण गात असताना आरडाओरडा करून रंग मे भंग करून टाकतं. आपलं गाणं बंद करण्याऐवजी, असं करणाऱ्या सर्वांविरुद्ध आवाज उठवा असं या मोर्चाचं आवाहन आहे.

साती 26/08/2011 - 15:17
लेख आवडला. मोर्च्याच्या प्रतिक्षेत. घासु गुर्जींना बाहेरून पाठिंबा देण्यासाठी आम्ही शांत आयडी मेणबत्ती मोर्चा काढतो. ९१४२०४२०४२० नंबरवर एक मिस कॉल दुया आणि घासुंना पाठिंबा द्या. isupportghasu@slut.mipa.com वर लॉग इन व्हा आणि घासुसप्तकाला (प्रियालीच्या लिष्टीतलं आयड्यांचं सप्तक) पाठिंबा द्या.

In reply to by साती

प्रियाली 26/08/2011 - 15:20
साते साते लिहायला लाग परत पहिल्यासारखी मग प्रियालीला आपलं अष्टप्रधान मंडळच बनवून टाकू. ;) किंवा नायल्याला धरून मिपादरबारातील नवरत्ने करून टाकू.

In reply to by प्रियाली

मी_ओंकार 26/08/2011 - 15:55
हेच म्हणतो. सातीचे तात्याबांची आरती हेच शेवटचे लिखाण आठवतयं. - ओंकार.

श्रावण मोडक 26/08/2011 - 15:39
कमाल आहे, मला ठाऊकच नव्हतं. ;) म्हणून मी इथं जास्त फडफड केली नाही. माहिती नसताना मी उगाच कुठंही फडफड करत नसतोच. तर ते असो, हा प्रकार मला कसा माहिती नव्हता? ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रियाली 26/08/2011 - 15:42
तुम्ही प्रियाली हा आयडी वापरता का? मिपावरचा दहातोंडी रावणच बनवा आता प्रियालीला. (सध्या प्रियाली) राजेश.

आत्मशून्य 26/08/2011 - 16:16
हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार
:) असो, बाकी लेख मनापासून आवडला. मस्त पिसं काढलीत स्लट्वॉक संकल्पनेची.

धागा...धागा...अखंड विणू या मिसळपाव मिसळपाव मुखे म्हणू या... ;-) ''मिसळ पाव विणकर महा मंडळ'' संस्थापक- अध्यक्ष- सचिव- इ.इ. पदे 'भरायची' आहेत इच्छुकांनी लाइन मारावी....सॉरी सॉरी... आपलं ते,हे--लावावी....अर्ज रात्री ११ ते १ या वेळेत स्वीकारण्यात येतील... :-)

विजुभाऊ 26/08/2011 - 16:40
वायफळाचा मळा कसा फुलवायचा हे घासु गुर्जींकडून शिकून घ्यावे. ( विंदांच्या "घेता" कवितेत दोन ओळी अ‍ॅड करा. हिरव्या पिवळ्या घासू कडून हिरवा पिवळा धागा घ्यावा ३.१४आदिती कडून विक्षीतपणाचा सहकार घ्यावा घेता घेता एक दिवस मिपावर हाहाकार करावा अवांतर : निळे या सदस्याने या धाग्यावर एकही प्रतिसाद लिहीलेला नसताना त्यांचे कुठेही नाव नसताना नवरत्न मंडळात त्यांचे नॉमिनेशन यावे यात कार्टेलिंग दिसून येत आहे.

जर तुम्ही तुमचं खरं नाव आणि आडनाव युजर आयडी म्हणून वापरत असाल तर तुमच्या आडनावाच्या शब्दांचे अपभ्रंश / विडंबन केले जाते. हा अनुभव मला आलाय. मला वाटते हा अनुभव तुम्हाला देखील आलाय. काही सदस्यांकडून तुमचा घासू गुरूजी असा उल्लेख केला गेलाय. अर्थात तरीही स्लट वॉक हा उपाय योग्य वाटत नाही. त्यापेक्षा थोडा वेगळा उपाय सुचवितो. देव आनंदचा एक जुना चित्रपट आहे काला बाजार (यात देव आनंद चे दिग्दर्शन नाही, पण देव आनंदला आपल्या पुढील चित्रपटांत दिग्दर्शन करण्याची प्रेरणा बहुधा यातून च मिळाली असणार). यात क्लायमॅक्सला देव आनंद आणि मदन पुरीचा वाद दाखविलाय. देव आनंद त्याला म्हणतो, "मैने पहिले तुमसे लडकर तुम्हे हराया है, आज मै तुमसे कोई लडाई नही लडना चाहत।" तरीही चेकाळून मदन पुरी त्याच्यावर हल्ला करतोच. देव आनंद काहीच प्रतिकार करीत नाही. तो इतकेच म्हणतो, "मेरे यह दो हाथ नही उठेंगे, तू जीतना चाहे मारले। मै देखना चाहता हूं की वह बाकी सौ हाथ इनकी मदद के लिए आज उठेंगे या नही?" त्यानंतर देव आनंद ची चूक नाहीय हे ज्या समुदायाला पटत असतं, त्यातले एकूण एक लोक मदन पुरीवर हल्ला करून त्याला निष्प्रभ करून टाकतात. असं घडू शकतं. नव्हे या संकेतस्थळावरच माझ्या एका धाग्यावर आज घडलंय.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 26/08/2011 - 18:13
बाकी आजच या धाग्यावर तूम्ही मिपा-कम्यूनीस्टांना त्यांच्या खर्‍या प्रवृत्तींचे जे उघड दर्शन द्यायला भाग पाडलतं ते बघता तूमच्या सामर्थ्याची कल्पना मिपा-कम्यूनीस्टांना याआधी आलीच नाही असे म्हणावे लागेल. आता वाटत नाही यापूढे कोणताही मिपा-कम्यूनीस्ट तूमच्यावर उघड हल्ला करायला धजावेल. गेल्या दोन दीवसात आपण दोन मोठे कम्यूनीस्ट हीरे टीपले आहेत असं आवर्जून नमूद करतो. मज्या आली.... क्या सॉलीड मारा........ फक्त यापूढील वाटचाल थोडी सावध ठेवा, गाठ मिपा-कम्यूनीस्टांशी आहे हे विसरू नका.

In reply to by आत्मशून्य

पाठिंबा आणि कौतुकाबद्दल धन्यवाद. मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्‍या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्‍यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आत्मशून्य 26/08/2011 - 22:49
तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते
विश्वनाथ, अहो ज्याच्या मिपा प्रोफाइलवर सदस्यंता कालावधी 2 वर्षे 49 आठवडे असं दिसत आहे अशा जून्या जाणत्या व जेष्ठ मिपाकरावर असा आरोप जरा अनावश्यकच वाटतो.

In reply to by आत्मशून्य

मी नक्की कुठला आरोप केला असे तुम्हाला वाटते ते एकदा स्पष्ट केलेत तर बरे होईल. त्यांचा बिल्ला नंबर जुना आहे हे मला माहित आहे. पण निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले :-) सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. बघू पुढे काय होते ते. :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते >> चला तुम्हाला तयारी दिसते आहे, तेव्हा त्याविषयी काहीच मत व्यक्त करीत नाही. राहिता राहिला प्रश्न सावधगिरीचा तर तुम्ही मला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलात त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. १. तुम्ही माझे हितचिंतक आहात कारण शत्रू कधीच असा सल्ला देणार नाहीत उलट ते बेसावध ठेवण्याचाच प्रयत्न करतील. २. कोणी संकटात दिसला तर त्याचे हितचिंतक पुढे येतात. या निमित्ताने तसे ते पुढे आलेत. सबब, प्रत्यक्षात पूर्णत: सावध असतानाही मी तुम्हाला बेसावध वाटलो, तुम्हाला तसे वाटणे आणि तुम्ही चिंता व्यक्त करणारे मत मांडणे, त्यामुळे मला जाणवणार्‍या या जालावरील माझ्या हिंतचिंतकांमध्ये अजून एकाची भर पडणे - हा सगळा माझ्या सावधगिरीचाच भाग होता. निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. >> हे घडणे ही स्वाभाविकच आहे. शिवाजी महाराजांच्या मुठभर सैन्याला प्रचंड मुघल सैन्यापुढे लढण्याची पाळी येई तेव्हा एकेका मावळ्याला दहा - वीस जणांना सामोरे जावे लागतच असे. तुमच्या सारख्या एका हिंतचिंतकाच्या एका प्रोत्साहनपर प्रतिसादामुळे देखील हुरूप वाढून अजून दहापट आघाड्यांवर लढण्याची ऊर्जा मिळते. धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य जी त्यांच्या सल्ल्यावरून तुमच्याप्रमाणेच तेही हिंतचिंतक असल्याचे मला जाणवत आहे. त्यांनी कुठलाही आरोप केला नसून काळजीपोटी सल्ला दिला आहे असेच मला वाटते. तरी त्यांची काळजी दूर करणारा प्रतिसाद त्यांना दिला आहेच. तुम्ही माझ्या बाजूने सक्रियपणे खिंड लवढत असल्याबद्दल तुमचे देखील आभार.

चित्रा 26/08/2011 - 18:49
>>आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. हे वाक्य वाचून हसू आवरेना. सॉरी. स्लटवॉक वगैरेची गरज नाही. आमचे खरे व्यक्तिमत्व पहायचे असले तर हे पहा. (चित्र विकीपिडियावरून साभार).

आम्हाला उठवळ मोर्चा हे भाषांतर अश्लील वाटते. तरी बर आम्ही आता नीतीमत्तेच्या गोष्टी करत नाही. व्यनीमनीच्या गोष्टी देखील करीत नाही. असो सद्या आम्हाला लोकांचे सदिच्छातरंग हवे आहेत.

In reply to by धनंजय

हा धागा सीरियसली घेऊन प्रत्यक्ष मोर्चात सामील होणारे तुम्ही पहिले म्हणून तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला जर तमुकतमुक मनोवृत्तीचे लोक त्रास देत असतील तर त्यांचा निषेधही जाहीर करावा ही विनंती.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

स्पा 26/08/2011 - 10:47
ओये मिका , माझी सीट ठेव रे बाबा पॉपकॉर्न घिऊन येतो घासू गुर्जी, उठवळ मोर्चाच नेतृत्व करताना कशे दिसतील याच चित्र डोळ्या समोर अल.. आणि अमळ सद्गदित झाहलो -- माचो स्पा

चिरोटा 26/08/2011 - 10:51
मस्तच रे राजेश. साधक बाधक चर्चा होईल ही अपेक्षा. मोर्चा काढण्यापेक्षा २/३ कि.मी. लांब मानवी शृंखला केली तर?

तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... >> तुमचा कंपू नाही किंवा जुन्या कंपूएवढा मोठा नाही म्हणून जुनेजाणते तुमचा छळ मांडतात का? >> पुलंनी म्हटलेलंच आहे की उंट तिरका म्हणजे तिरकाच चालणार, हत्ती सरळ म्हणजे सरळच चालणार. पण समाज हा काही बाबतीत क्रूर असतो. पुलंच्या वाक्यांना टाळ्या देतो, पण प्रत्यक्षात सर्वमान्य चालीपेक्षा तुम्ही वेगळे चाललात तर तो तुम्हाला फटकारतो, सुनावतो. >> काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का?>> असा अनुभव आलाय पण तरीही उठवळ मोर्चा काढायची इच्छा नाहीय. आम्ही अगदी टोकाचे देव आनंद भक्त, म्हणजे आम्हाला सबकुछ देवआनंद (लेखक/निर्माता/दिग्दर्शक/अभिनेता सारं काही देवआनंदच असलेले) चित्रपटच जास्त आवडतात. अशा चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ प्रेमपुजारी, हरे राम हरे कृष्ण, मिस्टर प्राईम मिनिस्टर, सेन्सॉर, लुटमार, हे व असे अनेक) अनेक पात्र देव आनंद ला छळ छळ छळतात तरी तो अगदीच गरज पडल्याशिवाय फारसा कुणाचा प्रतिवाद करीत नाही (सेन्सॉर मध्ये तर ममता कुलकर्णी देव आनंद चा एकेरी उल्लेख करून बराच उपमर्द करते तरी तो स्थितप्रज्ञच. शेवटी जेव्हा तो शांतपणे आपली लढाई लढून जिंकतो तेव्हा तीदेखील आनंद व्यक्त करतेच. कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो. तो मिळत नाही म्हणून एक सॅडिस्ट जळजळ ती व्यक्त करीत असते इतकेच.). तो छळ तो एन्जॉय करतो. आम्हीही मिपावर होणारा आमचा छळ एन्जॉय करतो. त्यांना कळत नाहीय ते काय करतात असाच काहीसा छळ करणार्‍यांविषयीचा आमचा दृष्टीकोन असतो. एका महिलेला स्लट वॉक विषयी मुलाखतकर्त्याने तिचे मत विचारले (काही दिवसांपूर्वीच्या मटात आले होते). ती म्हणाली, "मला याचा उद्देशच पटत नाही. 'हे पाहा, माझ्याकडे तुम्ही पाहू नका' असा काही तरी विसंगत संदेश हा मोर्चा देतो असे मला वाटते." स्लटवॉक / उठवळ मोर्चा विषयीच्या त्या महिलेच्या विधानाशी मी देखील सहमत आहे. हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार >> या विधानाबद्दल विशेष कौतूक.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शाहिर 26/08/2011 - 14:11
कारण उघड ती त्याचा कितीही उपमर्द करत असली तरी मनातून तिला तो फार फार आवडत असतो ऑ !!

विनीत संखे 26/08/2011 - 10:57
Love is cliche and cliches doent make you extraordinary but only human. सामान्य असणं हा मानव असल्याचा मुख्य पुरावा आहे असे मार्टीन ल्युथर किंग यानी म्हटलंय. आपण असामान्य आहोत हे इतरांना किंवा किंबहुना स्वतःला पटवून देण्याची उठाठेप करावीच का माणसानं? सो कॉल्ड विचारवंत किंवा विचारजंत माझ्या सामान्यत्वाविषयी आपले असामान्य किंवा अतिसामान्य विचार मांडोत अथवा नाही, त्यामुळे माझ्या बायकोचं माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. आणि मिपापिडित असणं हा प्रकार काय बुवा हे मला कळलेलेले नाही... इंटरनेट वर भांडणे हे सामान्य नेटकराचे उदाहरण झाले. म्हणून कुणी अमका तमका तुमच्याशी मिपावर भांडला आणि तुम्हाला त्याने टिकेचं धनी केलं तर काय बिघडलं? इथंच बघा... बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना? पुरेसं आहे. उठवळ मोर्चा काढायचा का त्यासाठी?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गवि 26/08/2011 - 11:10
चेतन आणि विनीत, हा लेख हे एक विनोदी आणि उपरोधात्मक / विरंगुळात्मक वगैरे लिखाण आहे अशी माझी समजूत आहे. तुम्ही गंभीर स्पष्टीकरण दिले आहेत म्हणून आता मात्र लेखाविषयी पुनर्विचार करुन पाहतो.

In reply to by विनीत संखे

उठवळ मोर्चाचा उद्देश तुम्ही सामान्य असा वा असामान्य तुमच्यावर तुमच्या अभिव्यक्तीबद्दल हल्ला होऊ नये यासाठीच आहे. जगा आणि जगू द्या.
बायको, आई किंवा मित्र प्रेम करतातच ना?
जर तुम्हाला मिपावरच्या प्रतिसादांपेक्षा खऱ्या माणसांच्या प्रेमाचीच पडलेली असेल तर तुमच्या प्रायॉरिटीज थोड्या और आहेत असंच म्हणावं लागेल. टू इच इट्स ओन. 'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे) कार्टून लय भारी. (प्रतिसादात पुरेसे क्लिशे झाले का?)

In reply to by शुचि

'नवऱ्याला मिपावर मिळालेल्या अपमानास्पद प्रतिसादांकडे दुर्लक्ष करूनही जी त्याच्या कुशीत शिरते, तीच खरी त्याची वहिदा.' (वाहिदा या आयडीशी संबंध नाही... हे वपुंचं एक अजरामर वाक्य आहे)>> वपुंचं ते पुस्तक तर बरंच जुनं आहे. मिपा हे संकेतस्थळ तेव्हाही अस्तित्वात होतं. कमाल आहे, मला ठाऊक च नव्हतं.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

शुचि 26/08/2011 - 11:48
नवर्‍याच्या पिवळ्या बनियनची पर्वा न करता ... त्याच्या कुशीत शिरणारी ,,,,,,,,, का काहीतरी वाक्य आहे

In reply to by शुचि

पिवळे बनियन घालणार्‍या माणसाला नवरा म्हणून निवडणे हाच मुळात उठवळपणा आहे. :D अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. इतरांच्या मताचा आदर, अभिव्यक्तिस्वातंत्र, ई. ई.

In reply to by स्पा

आनंदी गोपाळ 11/11/2011 - 01:42
बायकोने नीट धुतल्यानंतर नीळ लावली तर पिवळा पडत नाही असा अनुभव आहे. इथे नीळ लावायचा कंटाळा दिसतोय. मग पिवळ्याकडे दुर्लक्ष करणे तिला भाग आहे

In reply to by शुचि

अर्धवट 26/08/2011 - 16:13
शुचितै.. एक सुधारणा, हे वाक्य कॅलेंडर ह्या कथेतील नसून, "वहिदा रेहमान" ह्या कथेतील आहे बाकी चालूद्या, ;)

In reply to by राजेश घासकडवी

विनीत संखे 26/08/2011 - 12:24
मिपा सोडाच पण संपूर्ण मास मिडिया हे अभिव्यक्तीवरील टिकेहल्ल्यांनी कोळलेलं आहे. वृत्तपत्रांनी कसाबवर तेवढी टिका केलेली नाही जेवढी अण्णांवर केलीय. म्हणून काय अण्णा मिडियाविरुद्ध आंदोलन करत नाहीत. अण्णांचं सोडा (अगदीच क्लिशे झालाय तो विषय आजकल) पण खुद्द पुलंना रात्री नाट्यसमीक्षक डास होऊन चावतायत असं स्वप्न पडलं होतं म्हणून काही त्यांनी समीक्षकांच्या तोंडांची तुंबलेली गटारं साफ करण्यात आपलं आयुष्य नाही घालवलं. तुमचं साहित्य हे केर असेल तर आपसूकच कालौघात त्याचं विघटन होतं आणि जर ते कालातीत असेल तर त्याला 'कल्ट' चा दर्जा मिळतोच. मिपाही त्याला अपवाद नाही.

धन्य जाहलो. महान घासु गुर्जी कडुन महान लेखात फक्त माझाच नामोल्लेख. @चे.सु.गु. तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय हो?

In reply to by विनायक प्रभू

@ वि. प्र. तुम्ही प्रतिसाद नीट न वाचताच अस्थानी प्रतिक्रिया देता काय? माझा काही प्रॉब्लेम आहे असं मत मी कुठेच मांडलेलं नाहीय. धागाकर्त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहे असा माझा अनुभव मांडलाय फक्त त्याबाबत त्यांनी सूचविलेला उपाय मला अवलंबायचा नाहीय एवढंच माझं मत मी मांडलंय. हा काही माझा प्रॉब्लेम नाहीय. उलट असले अनुभव मी एन्जॉय करतोय असं म्हंटलंय. एन्जॉय करणं प्रॉब्लेम असू शकतं का? अर्थात मी एन्जॉय करतो हा तुमचा प्रॉब्लेम असल्यास त्याविषयी एक्झॅक्टली तुम्हाला च जास्त ठाऊक असणार.

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) मला वाटला. नाही पटत द्या सोडुन. एन्जॉय करता आहात तर काहीच प्रॉब्लेम नाही. एन्जॉय करण्याकरता धरलेला रस्ता तुम्हाला योग्य वाटत असेल तर... लगे रहो.

In reply to by विनायक प्रभू

एक खुलासा: प्रॉब्लेम ही प्रतिक्रिया ही आपल्या आतापर्यंतच्या प्रवासावर आहे.(सर्वसमावेशक) >> तुम्हाला या संकेतस्थळावरील वाटचाली विषयी म्हणायचं आहे का? की माझ्या एकंदर आयुष्याबद्दल बोलताय? जरा अजून खुलासा करावा. तुमचा या संकेतस्थळावरचा प्रॉब्लेम तर तुम्ही न सांगताही माझ्या लक्षात आला. तुम्हाला प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रतिक्रिया देताच येत नाही. तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती त्यामुळे धाग्यावरचा नवा प्रतिसाद ठरतो. हे कसे करायचे ते कुणाकडून तरी नीट समजून घ्या. अर्थात हा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत नसेल तर सोडून द्या.

Nile 26/08/2011 - 11:50
आता उरल्यासुरल्या आयुष्यात* अजून काय काय पहावं लागणार आहे कोणास ठावूक! ;-) *अधिक माहीती करता.. अभ्यास वाढवा म्हणजे आपोआप कळेल.

शुचि 26/08/2011 - 12:00
>> मिपावरती वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्यांचंदेखील हेच होतं. आपलं स्वत्व, आपली आयडेंटिंटी आपल्या शब्दांतून उघडी केल्यावर तोकड्या कपड्यांतून दिसणाऱ्या अंगाकडे जशा आंबटशौकीन, वाईट नजरा वळतात तशाच इथेही वळतात. मग वैचारिक बलात्कार होतात. >> :( सुंदर विश्लेषण!!!

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे मोर्चातल्या अनेक व्यक्ती एकमेकाविरुद्ध मोर्चात आलेल्या असण्याची शक्यता आहे.
त्याला काहीच हरकत नाही. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज मोर्चाफेलोज असं कायसं कोणीतरी म्हटलेलं आहेच. किंबहुना एकमेकांचा उद्धार करणारे खांद्याला खांदा लावून मोर्चात उभे राहिले तर सगळेच समदुःखी आहेत ही जाणीव होईलच ना. तेच महत्त्वाचं.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ढब्बू पैसा 26/08/2011 - 20:58
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा! (संतप्त मोर्चेकरी) ढब्बू

In reply to by ढब्बू पैसा

या लाह्या खाणर्‍यांमुळे काही वैचारिक प्रगती होत नाही, मी त्यांचा निषेध करते.
तुमची झाली आहे तेवढी प्रगती पुरी आहे की देशासाठी ;)
काहीही भरीव न लिहिता, नुसता सौंदर्यफुफाटा न्याहळत लाह्या खाणार्‍या पर्‍याचा जळळीत निषेध! जागे व्हा! सक्रीय व्हा!
म्हणजे नक्की काय करा ? परदेशात बसून देशात उगा राळ उडवणार्‍या अदिती व ढब्बीचा तिव्र निषेध !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, अदिती, व ढब्बू पैसा यांना: लोकहो, निव्वळ निषेध हा नकारात्मक आहे. त्याला सकारात्मक डूब हवी. म्हणजे उदाहरणार्थ 'मी हिरवा माजवाली/ला आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करते/तो' किंवा 'मी सौंदर्यफुफाटा निरखून पहाणारा/री आहे. तसं असणं हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्याबद्दल टीका करणं म्हणजे माझ्या अस्मितेचीच गळचेपी करणं आहे. त्याचा मी निषेध करतो/ते' उठवळ मोर्चा हा एकमेकांचा निषेध करण्यासाठी नाही. मिळून मिसळून आपल्या समान शत्रूला विरोध करण्यासाठी आहे.

चिरोटा 26/08/2011 - 13:56
भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो. चिरोटा मोर्चाअडवी

In reply to by चिरोटा

भडकाउ लिखाण करुन शांत, सोज्वळ मिपाकरांना चेतवू पाहणार्‍या राजेश ह्यांना संपादक मंड्ळाने अटक करावी अशी विनंती करतो.
अगदी अगदी. परदेशात बसून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुंची तुलना फक्त दाऊद बरोबरच होउ शकते. आम्हाला सत्ता दिल्यास त्यांना मुसक्या बांधून इकडे आणतो का नाही बघाच. परानाथ मुंढे

प्रियाली 26/08/2011 - 14:17
यात भाग घ्यायचा झाला तर मला माझ्या दोन ड्युप्लिकेट आयडी ३_१४ विक्षिप्त अदिती आणि राजेश घासकडवी सोडून मिपावरल्या प्रत्येक आयडीविरुद्ध मोर्चा काढावा लागेल. ;) पहिला मोर्चा मिपावरील वयस्क कार्यकर्त्यांविरुद्ध काढावा असे म्हणते. ;)

वय हे मिपावरले का खरे खुरे. बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे. आणि एन्जॉय पण करत आहे.

In reply to by विनायक प्रभू

प्रियाली 26/08/2011 - 14:24
बाकी तुम्ही मोर्चा॑ काढल्यावर कशी फड्फड होते ते बघत आहे.
ती फडफड आणि गळकं नाक, रडके डोळे तुम्ही एन्जॉय करताय मास्तर! आदर वाढला. ;)
वय हे मिपावरले का खरे खुरे.
अहो मी वयस्क कार्यकर्ते यांच्याविषयी बोलत होते.

ऋषिकेश 26/08/2011 - 14:28
तुम्ही केवळ जुने आहात, तुमचा कंपू आहे म्हणून नवी मंडळी तुमचा छळ मांडतात का? तुम्ही दारू पित नाही म्हणून दारू पिणारे तुम्हाला तुच्छ लेखतात का? तुम्ही मांसाहारी आहात म्हणून शाकाहारी तुम्हाला हिणवतात? तुम्ही अश्रद्ध आहात म्हणून ईश्वरवादी तुमच्या विरोधात धागे काढतात? तुम्ही सदस्य आहात म्हणून काही संपादक तुमच्याविरोधात प्रतिसाद उडवणे, समजुतीआडच्या धमकीचे खरडी/व्यनी टाकणे वगैरे हत्यार उपसतात का? तुम्ही अनिवासी भारतीय आहात म्हणून तुम्हाला भारतात घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल दोष दिला जातो आहे? तुम्ही निवासी भारतीय आहात तेव्हा तुम्हाला कोणत्याही घटनांवर बोलण्याचाच अधिकार नाही असं म्हटलं जातं का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक नाही आहात केवळ म्हणून काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात केवळ म्हणून काही पुरुष-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देतात का? तुम्ही भारतीय संस्कृतीचे पाईक आहात तरीहि काही स्त्री-नामधारक-आयडी तुम्हाला "मोठे व्हा", "इनो घ्या" असले अवमानकारक सल्ले देत नाहित का? व्यनीमनीच्या गोष्टी करून कवी तुमच्या मागे आमच्याही कवितांचं विडंबन करा असे मागे लागतात का? तुम्ही लोकप्रिय नाही म्हणून निव्वळ तुमच्या प्रतिसादांचं विडंबन होतं का?

खरे म्हटले तर वाईट वाट्ते अशी फड्फड बघुन. पण काय करणार? असतात एकेकाचे प्रॉब्लेम. आता आणखी एक अनावृत्त पत्र लिहीण्याची काही एक इच्छा नाही. एन्जॉय हा शब्द नो जॉय अर्थाने. @ आदरः काय सांगताय?

मुक्तसुनीत 26/08/2011 - 15:16
उठवळ मोर्च्याची कल्पना आवडली. त्यातल्या "स्वतःच्या मनातले विचार बोलून दाखवावेत" या संदर्भापुरता प्रतिसाद देतो. आयडी गुम जायेगा साईट भी ब्लॉक् हो जाएगा मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है ... गर याद रहे. हेच खरं. नाही का ? करंदीकर म्हणाले होते "तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको; मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको." . तद्वत् , कुणी विचारजंत म्हणो, नाहीतर पाणीपुरीवाला म्हणो , किंवा वैयक्तिक हल्ले चढवो , हीन अभिरुचीच्या कमेंट्स करो. जे योग्य वाटेल ते - व्यासपीठावरील सुसंस्कृतपणाच्या नीतीला धरून - बोलत रहावे. मोर्चात सामील व्हायला मिळालं तरी हरकत नाही. न मिळालं तरी तक्रार नाही.

In reply to by मुक्तसुनीत

मेरी पोस्टींग्ज़ही पहचान है
अगदी खरं. दुसऱ्या एका कवीने म्हटलेलंच आहे इक दिन बिक जायेगा माती के मोल जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल असे बोल बोलत असताना, इतर कोणी बोलबच्चन अकारण बोल लावतं. आपलं गाणं आपण गात असताना आरडाओरडा करून रंग मे भंग करून टाकतं. आपलं गाणं बंद करण्याऐवजी, असं करणाऱ्या सर्वांविरुद्ध आवाज उठवा असं या मोर्चाचं आवाहन आहे.

साती 26/08/2011 - 15:17
लेख आवडला. मोर्च्याच्या प्रतिक्षेत. घासु गुर्जींना बाहेरून पाठिंबा देण्यासाठी आम्ही शांत आयडी मेणबत्ती मोर्चा काढतो. ९१४२०४२०४२० नंबरवर एक मिस कॉल दुया आणि घासुंना पाठिंबा द्या. isupportghasu@slut.mipa.com वर लॉग इन व्हा आणि घासुसप्तकाला (प्रियालीच्या लिष्टीतलं आयड्यांचं सप्तक) पाठिंबा द्या.

In reply to by साती

प्रियाली 26/08/2011 - 15:20
साते साते लिहायला लाग परत पहिल्यासारखी मग प्रियालीला आपलं अष्टप्रधान मंडळच बनवून टाकू. ;) किंवा नायल्याला धरून मिपादरबारातील नवरत्ने करून टाकू.

In reply to by प्रियाली

मी_ओंकार 26/08/2011 - 15:55
हेच म्हणतो. सातीचे तात्याबांची आरती हेच शेवटचे लिखाण आठवतयं. - ओंकार.

श्रावण मोडक 26/08/2011 - 15:39
कमाल आहे, मला ठाऊकच नव्हतं. ;) म्हणून मी इथं जास्त फडफड केली नाही. माहिती नसताना मी उगाच कुठंही फडफड करत नसतोच. तर ते असो, हा प्रकार मला कसा माहिती नव्हता? ;)

In reply to by श्रावण मोडक

प्रियाली 26/08/2011 - 15:42
तुम्ही प्रियाली हा आयडी वापरता का? मिपावरचा दहातोंडी रावणच बनवा आता प्रियालीला. (सध्या प्रियाली) राजेश.

आत्मशून्य 26/08/2011 - 16:16
हा लेख लिहिताना ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीचं प्रचंड योगदान मिळालं. त्याबद्दल त्या आयडीचे टॉपपासून बॉटमपर्यंत आभार
:) असो, बाकी लेख मनापासून आवडला. मस्त पिसं काढलीत स्लट्वॉक संकल्पनेची.

धागा...धागा...अखंड विणू या मिसळपाव मिसळपाव मुखे म्हणू या... ;-) ''मिसळ पाव विणकर महा मंडळ'' संस्थापक- अध्यक्ष- सचिव- इ.इ. पदे 'भरायची' आहेत इच्छुकांनी लाइन मारावी....सॉरी सॉरी... आपलं ते,हे--लावावी....अर्ज रात्री ११ ते १ या वेळेत स्वीकारण्यात येतील... :-)

विजुभाऊ 26/08/2011 - 16:40
वायफळाचा मळा कसा फुलवायचा हे घासु गुर्जींकडून शिकून घ्यावे. ( विंदांच्या "घेता" कवितेत दोन ओळी अ‍ॅड करा. हिरव्या पिवळ्या घासू कडून हिरवा पिवळा धागा घ्यावा ३.१४आदिती कडून विक्षीतपणाचा सहकार घ्यावा घेता घेता एक दिवस मिपावर हाहाकार करावा अवांतर : निळे या सदस्याने या धाग्यावर एकही प्रतिसाद लिहीलेला नसताना त्यांचे कुठेही नाव नसताना नवरत्न मंडळात त्यांचे नॉमिनेशन यावे यात कार्टेलिंग दिसून येत आहे.

जर तुम्ही तुमचं खरं नाव आणि आडनाव युजर आयडी म्हणून वापरत असाल तर तुमच्या आडनावाच्या शब्दांचे अपभ्रंश / विडंबन केले जाते. हा अनुभव मला आलाय. मला वाटते हा अनुभव तुम्हाला देखील आलाय. काही सदस्यांकडून तुमचा घासू गुरूजी असा उल्लेख केला गेलाय. अर्थात तरीही स्लट वॉक हा उपाय योग्य वाटत नाही. त्यापेक्षा थोडा वेगळा उपाय सुचवितो. देव आनंदचा एक जुना चित्रपट आहे काला बाजार (यात देव आनंद चे दिग्दर्शन नाही, पण देव आनंदला आपल्या पुढील चित्रपटांत दिग्दर्शन करण्याची प्रेरणा बहुधा यातून च मिळाली असणार). यात क्लायमॅक्सला देव आनंद आणि मदन पुरीचा वाद दाखविलाय. देव आनंद त्याला म्हणतो, "मैने पहिले तुमसे लडकर तुम्हे हराया है, आज मै तुमसे कोई लडाई नही लडना चाहत।" तरीही चेकाळून मदन पुरी त्याच्यावर हल्ला करतोच. देव आनंद काहीच प्रतिकार करीत नाही. तो इतकेच म्हणतो, "मेरे यह दो हाथ नही उठेंगे, तू जीतना चाहे मारले। मै देखना चाहता हूं की वह बाकी सौ हाथ इनकी मदद के लिए आज उठेंगे या नही?" त्यानंतर देव आनंद ची चूक नाहीय हे ज्या समुदायाला पटत असतं, त्यातले एकूण एक लोक मदन पुरीवर हल्ला करून त्याला निष्प्रभ करून टाकतात. असं घडू शकतं. नव्हे या संकेतस्थळावरच माझ्या एका धाग्यावर आज घडलंय.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आत्मशून्य 26/08/2011 - 18:13
बाकी आजच या धाग्यावर तूम्ही मिपा-कम्यूनीस्टांना त्यांच्या खर्‍या प्रवृत्तींचे जे उघड दर्शन द्यायला भाग पाडलतं ते बघता तूमच्या सामर्थ्याची कल्पना मिपा-कम्यूनीस्टांना याआधी आलीच नाही असे म्हणावे लागेल. आता वाटत नाही यापूढे कोणताही मिपा-कम्यूनीस्ट तूमच्यावर उघड हल्ला करायला धजावेल. गेल्या दोन दीवसात आपण दोन मोठे कम्यूनीस्ट हीरे टीपले आहेत असं आवर्जून नमूद करतो. मज्या आली.... क्या सॉलीड मारा........ फक्त यापूढील वाटचाल थोडी सावध ठेवा, गाठ मिपा-कम्यूनीस्टांशी आहे हे विसरू नका.

In reply to by आत्मशून्य

पाठिंबा आणि कौतुकाबद्दल धन्यवाद. मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्‍या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्‍यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

>>यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे. तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आत्मशून्य 26/08/2011 - 22:49
तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते
विश्वनाथ, अहो ज्याच्या मिपा प्रोफाइलवर सदस्यंता कालावधी 2 वर्षे 49 आठवडे असं दिसत आहे अशा जून्या जाणत्या व जेष्ठ मिपाकरावर असा आरोप जरा अनावश्यकच वाटतो.

In reply to by आत्मशून्य

मी नक्की कुठला आरोप केला असे तुम्हाला वाटते ते एकदा स्पष्ट केलेत तर बरे होईल. त्यांचा बिल्ला नंबर जुना आहे हे मला माहित आहे. पण निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले :-) सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. बघू पुढे काय होते ते. :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तयारी दिसते आहे पण सावधगिरी अजून थोडी बाळगली असती तर बरे झाले असते >> चला तुम्हाला तयारी दिसते आहे, तेव्हा त्याविषयी काहीच मत व्यक्त करीत नाही. राहिता राहिला प्रश्न सावधगिरीचा तर तुम्ही मला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलात त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. १. तुम्ही माझे हितचिंतक आहात कारण शत्रू कधीच असा सल्ला देणार नाहीत उलट ते बेसावध ठेवण्याचाच प्रयत्न करतील. २. कोणी संकटात दिसला तर त्याचे हितचिंतक पुढे येतात. या निमित्ताने तसे ते पुढे आलेत. सबब, प्रत्यक्षात पूर्णत: सावध असतानाही मी तुम्हाला बेसावध वाटलो, तुम्हाला तसे वाटणे आणि तुम्ही चिंता व्यक्त करणारे मत मांडणे, त्यामुळे मला जाणवणार्‍या या जालावरील माझ्या हिंतचिंतकांमध्ये अजून एकाची भर पडणे - हा सगळा माझ्या सावधगिरीचाच भाग होता. निष्णात सेनानी एकाच वेळी एकापेक्षा जास्त आघाड्या उघडताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी मला दिसली नाही असे म्हटले सध्यातरी बऱ्याच आघाड्या त्यांनी सांभाळल्या आहेत. >> हे घडणे ही स्वाभाविकच आहे. शिवाजी महाराजांच्या मुठभर सैन्याला प्रचंड मुघल सैन्यापुढे लढण्याची पाळी येई तेव्हा एकेका मावळ्याला दहा - वीस जणांना सामोरे जावे लागतच असे. तुमच्या सारख्या एका हिंतचिंतकाच्या एका प्रोत्साहनपर प्रतिसादामुळे देखील हुरूप वाढून अजून दहापट आघाड्यांवर लढण्याची ऊर्जा मिळते. धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य जी त्यांच्या सल्ल्यावरून तुमच्याप्रमाणेच तेही हिंतचिंतक असल्याचे मला जाणवत आहे. त्यांनी कुठलाही आरोप केला नसून काळजीपोटी सल्ला दिला आहे असेच मला वाटते. तरी त्यांची काळजी दूर करणारा प्रतिसाद त्यांना दिला आहेच. तुम्ही माझ्या बाजूने सक्रियपणे खिंड लवढत असल्याबद्दल तुमचे देखील आभार.

चित्रा 26/08/2011 - 18:49
>>आपल्या अभिव्यक्तीचे हवे तितके हवे तसे कपडे करून आपलं खरं व्यक्तिमत्व उघडं करा. हे वाक्य वाचून हसू आवरेना. सॉरी. स्लटवॉक वगैरेची गरज नाही. आमचे खरे व्यक्तिमत्व पहायचे असले तर हे पहा. (चित्र विकीपिडियावरून साभार).

आम्हाला उठवळ मोर्चा हे भाषांतर अश्लील वाटते. तरी बर आम्ही आता नीतीमत्तेच्या गोष्टी करत नाही. व्यनीमनीच्या गोष्टी देखील करीत नाही. असो सद्या आम्हाला लोकांचे सदिच्छातरंग हवे आहेत.

In reply to by धनंजय

हा धागा सीरियसली घेऊन प्रत्यक्ष मोर्चात सामील होणारे तुम्ही पहिले म्हणून तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला जर तमुकतमुक मनोवृत्तीचे लोक त्रास देत असतील तर त्यांचा निषेधही जाहीर करावा ही विनंती.
तुम्हाला मिपावर कधी कोणी टोमणा मारला आहे का? कधी तुमच्यावर शाब्दिक किंवा वैयक्तिक हल्ला झालाय का? आणि तो होऊन वर त्याबद्दल तुम्हालाच दोषी धरलं गेलंय का? तसं असेल तर चला, आपण सगळे मिळून मिपावर उठवळ मोर्चा काढू... आता तुम्ही मला विचाराल, की उठवळ मोर्चा म्हणजे नक्की काय? तर उठवळ मोर्चा हे स्लटवॉकचं मराठी भाषांतर आहे. कॅनडा का कुठल्याशा देशात एका पोलिस अधिकाऱ्यांने बायकांना सांगितलं की 'तुम्हाला जर बलात्कार करून घ्यायचा नसेल तर हे असले उठवळ बायकांसारखे उत्तान कपडे घालणं थांबवा'. त्यावरून बायका खवळल्या. एक तर पुरुष प्रधान संस्कृतीत पददलित म्हणून रहायचं. वर वेळोवेळी पुरुष बलात्कार करतात.

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ५: फासे पडले नि फासही

रमताराम ·

गणेशा 20/08/2011 - 20:32
मधले काही भाग वाचायचे राहिले, नुकतेच याबद्दल्च अआठवले होते .. आणि हा भाग आला छान वाटले.. निवांत पुन्हा सगळॅ आधीचे भाग वाचुन रिप्लाय देतो

गणेशा 20/08/2011 - 20:32
मधले काही भाग वाचायचे राहिले, नुकतेच याबद्दल्च अआठवले होते .. आणि हा भाग आला छान वाटले.. निवांत पुन्हा सगळॅ आधीचे भाग वाचुन रिप्लाय देतो
3