मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीस रुपयाची छॉटीसी गोष्ट

शब्दानुज ·

पगला गजोधर 16/07/2015 - 14:09
देवी हसत म्हणत असेल कदाचित, जे काम/बिझिनेस/शिक्षण/कर्तव्य करत असशील, ते करतानाच फक्त मानःतून माझं एक क्षण नामस्मरण केलं असतेस तरी चालले असते एवढ्या लांब प्रवास करून व पैसे खर्चून बाहेरच्या फोटोला नमस्कार करण्यापेक्षा. देवाचं / देवीचं त्याच्या लोकप्रसिद्ध मंदिरात जावून, पेड रांगेतून प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घायलाच पाहिजे असं काही देवाचं कम्पल्शन नसतं, जरी भेट दिलीच, तर खर्चिक पूजेचं ताट / अभिषेक / दक्षिणा / शाल / निज्पाद दर्शन / पेड दर्शन, वैगरे वर खर्च केलाच पाहिजे असेही देव म्हणत नाही.

पगला गजोधर 16/07/2015 - 14:09
देवी हसत म्हणत असेल कदाचित, जे काम/बिझिनेस/शिक्षण/कर्तव्य करत असशील, ते करतानाच फक्त मानःतून माझं एक क्षण नामस्मरण केलं असतेस तरी चालले असते एवढ्या लांब प्रवास करून व पैसे खर्चून बाहेरच्या फोटोला नमस्कार करण्यापेक्षा. देवाचं / देवीचं त्याच्या लोकप्रसिद्ध मंदिरात जावून, पेड रांगेतून प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घायलाच पाहिजे असं काही देवाचं कम्पल्शन नसतं, जरी भेट दिलीच, तर खर्चिक पूजेचं ताट / अभिषेक / दक्षिणा / शाल / निज्पाद दर्शन / पेड दर्शन, वैगरे वर खर्च केलाच पाहिजे असेही देव म्हणत नाही.
कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले. ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो. सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो. यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो. तिथे अर्थातच गर्दी पसरली होती.

२. भानावर येण्यापूर्वी

निरन्जनदास ·

पैसा 29/06/2015 - 19:29
लक्षात येतंय.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.

In reply to by पैसा

निरन्जनदास 29/06/2015 - 21:54
खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "

In reply to by निरन्जनदास

पैसा 29/06/2015 - 22:10
काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्‍याला काही वेगळंच दिसतं. The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts. रसेल आठवला. दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.

सुधीर 29/06/2015 - 21:27
'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'. हे शेवटचे दोन पॅरा आवडले.

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम! वाचनखूण साठवलि गेली आहे. :)

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 30/06/2015 - 10:11
सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) हेच म्हणतो. मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात) आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार? त्यामुळे सध्या पास.

In reply to by पैसा

सुबोध खरे 30/06/2015 - 10:41
पैसा ताई हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे. आपला शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)

In reply to by सुबोध खरे

पैसा 30/06/2015 - 10:48
:) तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच. पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?

तुडतुडी 30/06/2015 - 12:38
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>> मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं . त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .

निरन्जनदास 01/07/2015 - 18:03
सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी, तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान. हे पाहा, आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू. प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू. हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह! पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर" आता हे चमत्कारिक आहे. "तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली. पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो! वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल. आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की. सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.

In reply to by निरन्जनदास

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:46
अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )

In reply to by अस्वस्थामा

निरन्जनदास 02/07/2015 - 17:54
"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. सरांना भेटायला मी उत्सुक आहे.

अर्धवटराव 01/07/2015 - 21:19
असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला? तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 02/07/2015 - 18:09
बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे. बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत. निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! " करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते ! करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:49
अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे. तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्‍या भागासाठी. ) (सा.सं. बघा जरा. :) )

मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्‍या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मराठी_माणूस 06/07/2015 - 12:27
माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा. कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही. हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.

In reply to by मराठी_माणूस

निरन्जनदास 07/07/2015 - 14:38
हं, हे ही फार चूक नाही. प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते. म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे. समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे. अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ? माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे ! प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!! पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो. अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही. पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान. मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 07/07/2015 - 11:29
पैजारबुवा, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला. आणि आता, अनुक्रमे जाऊ. हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो. अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास

In reply to by निरन्जनदास

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद, उत्तरावर विचार करतो आहे. ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन, पैजारबुवा,

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 19:20
नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 07/07/2015 - 21:31
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता, आणि असा
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 22:48
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्‍या (किंवा जाणवणार्‍या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 08/07/2015 - 09:33
फारच छान ! आवडलं. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू. १.
माणूस निसर्गाची निर्मिती आहे
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 08/07/2015 - 16:42
१)
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 09/07/2015 - 16:25
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 09/07/2015 - 18:05
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.

In reply to by निरन्जनदास

राही 07/07/2015 - 23:29
इतके सुंदर विवेचन! " निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी. आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे. उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.

निरन्जनदास 08/07/2015 - 16:15
हं, आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं ! मजा करताय राव तुम्ही!!

मदनबाण 08/07/2015 - 16:27
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

निरन्जनदास 08/07/2015 - 16:56
नाही, देहभान नाही. आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.

In reply to by निरन्जनदास

मदनबाण 09/07/2015 - 13:58
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...

In reply to by मदनबाण

निरन्जनदास 09/07/2015 - 16:29
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे. पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

निरन्जनदास 09/07/2015 - 16:33
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही ! आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.

In reply to by निरन्जनदास

बॅटमॅन 09/07/2015 - 16:43
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 09/07/2015 - 17:06
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 09/07/2015 - 16:43
सहमत. फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..." आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?

गामा पैलवान 09/07/2015 - 20:09
निरन्जनदास, आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो. १. >> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त >> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही. २. >> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, >> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची >> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता >> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे. भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे. ३. >> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का? पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का? या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 11/07/2015 - 18:16
निरन्जनदास, >> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही. तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील. आ.न., -गा.पै.

निरन्जनदास 13/07/2015 - 16:24
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो, तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे. प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे. तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे. तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही. अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या . मग आपण बोलू.

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 13/07/2015 - 16:52
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्‍यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्‍या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्‍या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे. प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते. विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात. अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

संदीप डांगे 13/07/2015 - 17:25
धन्यवाद पैजारबुवा, मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्‍या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.

मराठी_माणूस 13/07/2015 - 17:11
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे

निरन्जनदास 13/07/2015 - 20:55
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे. प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही. माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली. साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत. 'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर. आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !! दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ? ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे. हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य. आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ; तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. 'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो? शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार? विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो. प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात. आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती. आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.

पैसा 29/06/2015 - 19:29
लक्षात येतंय.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.

In reply to by पैसा

निरन्जनदास 29/06/2015 - 21:54
खरे आहे तुमचे म्हणणे. निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजायला हरकत नसावी. बहुतेकजण 'बेभान' असतात. गोची अशी आहे की "आपण बेभान आहोत'' याची जाणीव त्यांना असू शकते, पण ते ''भानावर येण्यास'' तयार नसतात. पण तसा भास देण्यात ते यशस्वी होतात, इथे त्यांची आणि आपली, म्हणजे प्रेक्षकांची गफलत होऊ शकते. म्हणून ''साव ऽ ऽऽ धान ! "

In reply to by निरन्जनदास

पैसा 29/06/2015 - 22:10
काही जणांना आपण भानावर आहोत असा आत्मविश्वास असतो, पण दुरून पाहणार्‍याला काही वेगळंच दिसतं. The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wise people so full of doubts. रसेल आठवला. दु:खनिरोधः याबद्दल वाचायला आवडेल.

सुधीर 29/06/2015 - 21:27
'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' आणि 'हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे'. हे शेवटचे दोन पॅरा आवडले.

@ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. >> अप्रतिम! वाचनखूण साठवलि गेली आहे. :)

सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) पुढे कधी तरी निवांत वेळ मिळाला, तर परत एकदा व्यवस्थित, तन-मन एकत्र करून आणि मनन-चिंतनासाठी वेळ मिळाला तर, वाचायचा विचार आहे.

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 30/06/2015 - 10:11
सध्या तरी बर्‍याच गोष्टी किचकट आणि समजण्याच्या पलीकडे आहेत. (दोष तुमचा नाही, आमच्या स्वल्प मतीचा आहे.) हेच म्हणतो. मुळात माझे मन तत्वज्ञान सारख्या गंभीर विषयात रमत नाही. वाचले पण फारसे समजले नाही. (स्वगत-- बाप रे लोक इतका गूढ आणि खोल विचार करतात) आमची पट्टी काळी दोन. पांढरी पाच कशी झेपणार? त्यामुळे सध्या पास.

In reply to by पैसा

सुबोध खरे 30/06/2015 - 10:41
पैसा ताई हे असेच काहीतरी मोठ्या प्रमाणात मनोविकार शास्त्रात होतं. म्हणून आमचे ब्रिगेडियर पेठे सर(मनोविकारशास्त्राचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली मी काही महिने काम केले) मला म्हणाले तू मनोविकार शास्त्रापेक्षा( PSYCHIATRY) क्षकिरण शास्त्र( RADIOLOGY) हा विषय घे ( SUBJECTIVE पेक्षा OBJECTIVE) घे. ते तुला जास्त चांगले जमेल. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला तत्त्वज्ञानाबद्दल आदर आहे पण ते मला झेपत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील "डिके" सारखी माझी गत आहे. आपला शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस)

In reply to by सुबोध खरे

पैसा 30/06/2015 - 10:48
:) तुम्हाला आणि निरन्जनदासांनाही एक शंका विचारते. मी साधे म्हणून वाचले आणि मला या लेखातले बरेच भाग कळले. जे कळले नाहीत त्यासाठी मी निरन्जनदासांना हळूहळू विचारीनच. पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?

तुडतुडी 30/06/2015 - 12:38
पण माझ्या माहितीत एकाने अगदी लहान कॉलेज आणि नोकरीच्या वयात तत्त्वज्ञानाचे खूप ग्रंथ वाचले, अगदी विवेकानंद सुद्धा. आणि मग तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला. सायकिअ‍ॅट्रिस्टकडे गेला तेव्हा त्यानी त्याला हे सगळे वाचन आधी बंद कर म्हणून सांगितले. तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?>>> मुळात आत्मभान येणे , 'स्व' ची जाणीव होणे हे भयानक काहीतरी आहे असंच ९०% लोकांचं मत असतं . ज्याला त्याची आवड असते त्यांना इतर लौकिक गोष्टींमध्ये रस वाटत नाही . कारण त्यातला फोलपणा त्यांना समजलेला असतो . परंतु इतरांना मात्र हे डिप्रेशन किंवा औदासिन्य वाटतं . त्यांनी स्वतः विवेकानंद किवा तत्सम वाचल्याशिवाय त्याचं महत्व समजणार नसतं .

निरन्जनदास 01/07/2015 - 18:03
सुहृद मित्र सुबोध, पैसा आणि तुडतुडी, तुम्ही चर्चेचा श्रीगणेशा केला हे अतिशय छान. हे पाहा, आता एक समस्या समजावून घेत येते का ते पाहू. प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. तत्त्वज्ञान आणि तत्त्वभान यात मी व्यावसायिक तत्त्ववेत्ता (Professional Philosopher म्हणजे तत्त्वज्ञानाचा शिक्षक ) म्हणून ढोबळमानाने कसा फरक करतो आहे, तर तत्त्वज्ञान ही शिकण्याची तांत्रिक गोष्ट आहे तर तत्त्वभान महणजे ही तांत्रिक गोष्ट कशी शिकायची हे शिकायचे आहे. हा काही अंशी प्रशिक्षणाचा खेळ आहे. या खेळाचा मी एक प्रशिक्षक आहे, असे समजू. हा खेळ, त्याचे नियम समजावून घेऊन आपण खेळलो तर फार मजा येईल. हा नियम अर्थात प्रत्येक खेळाला लागू आहे. अगदी प्रेमाच्या खेळासह! पण नियम समजावून न घेता खेळायला जो जाईल त्याचा गोंधळ होणारच. तेच पैसा जे उदाहरण देतात त्यातील माणसाबाबत घडले असावे. शिवाय त्या म्हणतात "तो अन्य काही कारणाने माईल्ड डिप्रेशनमधे गेला." आणि सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणतो, " हे सगळे - म्हणजे तत्त्वज्ञानाचे वाचन आधी बंद कर" आता हे चमत्कारिक आहे. "तत्त्वज्ञान वाचून एखाद्याचे डिप्रेशन वाढेल असे होऊ शकते का?" याचे स्वतंत्र उत्तर "आहे/नाही" असे दोन्ही देता येईल. तुम्ही कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान वाचता, निर्माण करता यावर तुमची मानसिकता अवलंबून राहील. काफ्का, कामु वाचाल तर निराशा वाटू शकते. मी नववीत म्हणजे १४ व्या वर्षी जी ए वाचायला सुरुवात केली. रमलखुणा वाचून नियतीवाद घुमू लागला. समजत नव्हतं. पण का समजत नाही, म्हणून पिच्छा पुरवला आणि तत्त्वज्ञानाचा खजिना गवसला. निराशा टाळली. पण म्हणून खूप आनंद झाला असे नाही. अजूनही जी ए वाचतो, आत कुठेतरी नवीन डोळा उघडतो! वि आ बुवा, ठणठणपाळ, पु. ल. वाचाल तर सगळा ताण जाईल. आपण सारेजण तत्त्वज्ञान समजावून घेऊ. मलाही तुमच्यामुळे नव्या गोष्टी कळतील की. सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.

In reply to by निरन्जनदास

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:46
अभिनिवेशरहित लेखन आणि हा प्रतिसाद देखील खूप आवडला..
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.
आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.
हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )

In reply to by अस्वस्थामा

निरन्जनदास 02/07/2015 - 17:54
"सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता." या विधानात आणखी थोडी दुरुस्ती करतो. ती अशी : सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, मगच प्रत्यक्ष सायकल दुरुस्ती करता येईल. ती दुरुस्त झाली की आहेच ती दामटायला तयार ! ; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञान जाणून घ्यावयाचे तर तत्त्वज्ञानाची साधने, उपकरणे हाताशी घ्यावी लागतील, ही साधने कोणती याचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग कोणतेही तत्त्वज्ञान अवघड राहणार नाही, होता होईल, तितके ते आकलनशक्तीच्या कह्यात येईल. तत्त्वज्ञानाच्या स्वरूपानुसार संथ गतीने आकलनशक्तीही विकसित होत राहील..... मग, तुमच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक विचारविश्वातून तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. सरांना भेटायला मी उत्सुक आहे.

अर्धवटराव 01/07/2015 - 21:19
असं काहिसं म्हणायचं आहे का आपल्याला? तसं असल्यास विश्लेषणाची प्रेरणा हिच मनुष्य शरीराला इतर प्राण्यांपासुन वेगळं करते ??

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 02/07/2015 - 18:09
बरोबर ! विश्लेषण ही बौद्धिक कृती निखळ मानवी घटना आहे. बुद्धि (Reason), आत्मभान (Self awarness) आणि करुणा (Compassion) ही तीन वैशिष्ट्ये माणसाची लक्षणे आहेत. निव्वळ बुद्धिमान माणूस कितीही अधम पातळीवर जाऊ शकतो, याची उदाहरणे देण्याची गरज नाही. ज्याला आपण काय करीत आहोत, याची जाणीव असते तोच करुणाभाव विकसित करतो. येशूचं स्मरण केलं तर काय मिळतं, " हे ईश्वरा, त्यांना माफ कर ते काय करीत आहेत, हे त्यांना कळत नाही !! " करुणाहीन बुद्धि हिंसेशी मैत्री करते ! करुणा असेल तर आणि तरच मानवतेचा उदय शक्य होतो.

अस्वस्थामा 02/07/2015 - 16:49
अजून एक, तुमच्या लेखांमध्ये पुढच्या मागच्या लेखनाचा दुवा टाकता आला तर पहावे. तसेच धागा जर दखल पात्र झाला तर नवीन लेख आलेले लक्षात येईल इतरांच्यापण. (आम्हाला खोदकाम करावे लागले दुसर्‍या भागासाठी. ) (सा.सं. बघा जरा. :) )

मी पहिल्यांदा हे कबुल करु इच्छितो की या विषयावर बोलण्याचा मला काही एक अधिकार नाही. कारण या विषयाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास मी केलेला नाही. मी खाली जी काही विधाने करणार आहे ती केवळ माझ्या शंका निरसन करण्यासाठीच केली आहेत. ती विधाने सत्य आहेत, किंवा मी म्हणतो ते बरोबरच आहे असा कोणताही दावा मी करत नाही.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे
जर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्‍या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.
मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मराठी_माणूस 06/07/2015 - 12:27
माझ्याही मनात असे विचार आले होते . तुम्ही ते व्यवस्थित शब्दात मांडले आहेत. विशेष करुन प्राण्यांचा आत्मभानाचा मुद्दा. कदाचीत , प्राण्यांना देखील आपल्या पेक्षा वेगळ्या प्रकारचे भान असेल जे आपल्या समजण्या पलीकडे असेल . जसे की , आपण एकमेकांशी भाषेच्या माध्यमातुन संवाद साधतो , प्राणी सुध्दा एकमेकांशी संवाद साधतात जो आपण समजु शकत नाही. हेमाडे सरांच्या उत्तराची प्रतिक्षा आणि उत्सुकता.

In reply to by मराठी_माणूस

निरन्जनदास 07/07/2015 - 14:38
हं, हे ही फार चूक नाही. प्राण्यांना भान नसते, असे नाही. पण ते 'आत्मभान' नसते. म्हणजे मानवी आत्मभान ज्या स्वरूपाचे असते, त्या स्वरूपाचे नसते. समाज, भाषा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान इत्यादी मानवी आविष्कार केवळ मानवी आत्मभानच निर्माण करू शकते, प्राणिज भान नव्हे. समाज आणि समूह, टोळी, थवा, कळप यात आपण फरक का करतो ? कारण यातील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या जीवांना लागू आहे. अगदी फार काय पण खुद्द ही प्रस्तुत चर्चा फक्त मानव आणि केवळ मानवामध्येच चालू आहे, यापेक्षा वेगळा पुरावा कशाला ? माणसाला भाषा असेल काय ? त्याचे संवादाचे माध्यम कोणते ? अशी चर्चा कोणत्याही प्राण्यात चालू नाही, माणसात चालू आहे ! प्राण्यांचा अभ्यास माणूस करतो, प्राणी माणसाचा करीत नाहीत. त्यांना परंपरा नसते, कारण स्मृती नसते. परिणामी ते केवळ जनन करण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. माणसाची स्मृती इतकी ताणली गेली की त्याला गतजन्मीचे आठवते !!! पुढे, अबब !!!! म्हणावे असे अनेक जन्माचे आठवते. श्रीकृष्ण तोच दावा करतो. अहो, जन्म, पुनर्जन्म, त्याचे चक्र, त्यातून मोक्ष हे आम्ही निर्माण केलेले महाजाल आहे ! प्राण्यांनी नाही. पण छान, चांगली भरीव चर्चा या निमित्ताने होते, याचे समाधान. मराठी माणसाला विचार केलाच पाहिजे बरं .

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास 07/07/2015 - 11:29
पैजारबुवा, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो.. तुम्हाला प्रतिसाद देण्यास उशीर झाला. आणि आता, अनुक्रमे जाऊ. हे पाहा, मी पहिल्या लेखातच असे म्हंटले आहे की तत्त्वज्ञानावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याचे कारण प्रत्येक 'जन' काहीतरी दृष्टीकोन बाळगत असतो. त्यामुळे तुम्ही अगदी बोलू शकताच. आणि मुळात हा विषयच असा आहे की प्रत्येक वेळी जगण्याचा नवा पैलू समोर आणि सामोरा येतो. त्यामुळे कितीही "परिपूर्ण' दृष्टीकोन मांडला तरी काहीतरी उरलेले असतेच. खरे तर त्यातूनच 'ईश्वर' जन्माला येतो. अधेमध्ये ईश्वर येत राहील.पण ते असो,
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?
यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.
हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास

In reply to by निरन्जनदास

सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद, उत्तरावर विचार करतो आहे. ज्या शंकांची उत्तरे मिळाली नाहीत ती मिळवण्यासाठी मालिका वाचत राहीन, पैजारबुवा,

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 19:20
नैसर्गीक घटनांचा अन्वयार्थ लावणं, त्याला निर्मीती वा विनाशाची लेबलं लावणं हा जर आत्मभानाचा अविश्कार असेल तर तो माणसात निसर्गाकडुनच आलाय. मानवाला 'निर्मीती' ठाऊक आहे पण निसर्गाला नाहि असं होणार नाहि. जे घडतय ते केवळ ट्रान्फोर्मेशन असेल (आणि ते तसं आहेच) तर मानवी भानाला जाणवणारी निर्मीती/विनाश वगैरे देखील केवळ क्रिया आहेत. आणि जर मानवी भान सत्य असेल तर ते निसर्गात देखील ओतप्रेत भरलं आहे. निसर्गातल्या क्रिया विनाउद्देश असु शकतात पण भानरहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 07/07/2015 - 21:31
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता, आणि असा
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 07/07/2015 - 22:48
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,
असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !
धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्‍या (किंवा जाणवणार्‍या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 08/07/2015 - 09:33
फारच छान ! आवडलं. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी अतिशय आभारी आहे. तुम्ही चालना देणारे म्हणणे मांडले आहे. आता, आपण तुमच्या मांडणीनुसार अनुक्रमे जावू. १.
माणूस निसर्गाची निर्मिती आहे
, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे
, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित
म्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 08/07/2015 - 16:42
१)
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?
ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.

In reply to by अर्धवटराव

निरन्जनदास 09/07/2015 - 16:25
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे :
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.

In reply to by निरन्जनदास

अर्धवटराव 09/07/2015 - 18:05
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहे
अशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.
तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.

In reply to by निरन्जनदास

राही 07/07/2015 - 23:29
इतके सुंदर विवेचन! " निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. निसर्गाला हेतू नाही, त्याला आत्मभान नाही... नेमकी वाक्ये. फक्त एक शंका आहे, ती पुन्हा कधीतरी. आत्मभान हा माझा आवडता विषय आणि परवलीचा शब्द आहे. उत्सुकतेने वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद घेत आहे.

निरन्जनदास 08/07/2015 - 16:15
हं, आपण नावच मितभाषी घ्यायचं आणि लोकांना "और आन्दो" म्हणायचं ! मजा करताय राव तुम्ही!!

मदनबाण 08/07/2015 - 16:27
रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. हे देहभान असे हवे ? "आत्मभान" हे आत्म्याशी आणि त्या अनुशंगाने परमेश्वराशी असते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M

निरन्जनदास 08/07/2015 - 16:56
नाही, देहभान नाही. आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. परमेश्वराशी तर नाहीच नाही. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? कृपया वाचा.

In reply to by निरन्जनदास

मदनबाण 09/07/2015 - 13:58
आत्म याचा अर्थ 'असण्याची जाणीव. याचा आत्म्याशी संबंध नाही. असण्याची जाणीव हे चेतना (consciousness) असल्यामुळे संभव होते ना ? आत्म्या शरीरात असल्यानेच चेतनेचे अस्तिव असते आणि म्हणुनच मनुष्या देहातुन प्राण निघुन गेल्यावरच शरीर संपूर्णपणे अचेतन होते. त्यामुळे असण्याची जाणीव होण्याचा आणि आत्म्याचा संबंध आहे. तुम्ही आधीचे लेख वाचले आहेत काय ? हो... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Kisi Disco Mein Jayen...

In reply to by मदनबाण

निरन्जनदास 09/07/2015 - 16:29
तुम्ही आत्मा आहेच, असे गृहीत धरत आहात. ते गृहीत न धरता चेतनेचे स्पष्टीकरण देता येते का ? हा प्रश्न आहे. पुढील काही लेखात तुमच्या शंकाची उत्तरे मिळू शकतील. थोडी वाट पहावी, ही विनंती.

In reply to by बॅटमॅन

निरन्जनदास 09/07/2015 - 16:33
यातला साधा प्रश्न असा आहे की मानवेतरांना आत्मभान आहे की नाही, हे तुम्ही मानव बोलत आहात, मानवेतर नाही. तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही ! आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव हे विसरलो की गडबड होते.

In reply to by निरन्जनदास

बॅटमॅन 09/07/2015 - 16:43
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !
हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 09/07/2015 - 17:06
आत्मभान = ज्ञानात्मक जाणीव मानवेतर प्राण्यांना एखाद्या कृतीत धोका आहे हे कळलं तर ते परत तीच चूक करतांना दिसत नाहीत. ही ज्ञानात्मक जाणीव नाही का? मानव अशा चुका वारंवार करतांना दिसतो.

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 09/07/2015 - 16:43
सहमत. फक्त मनुष्याला आत्मभान आहे याच्या पुष्ट्यर्थ लेखकांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे नाही. कदाचित मनुष्य ज्या उलाढाली आज करतोय ते पाहून इतर प्राणी मनातल्या मनात हसतही असतील आणि म्हणत असतील की "बाबारे, हे सगळे उद्योग करून झालेत आमचे. शेवटी चार मूळ भावनांपलिकडे काहीच नाही हे आम्हाला कळलंय. म्हणून शांतपणे जगत असतो. सगळे निसर्गनियम व्यवस्थित पाळून. तूच अशांत आहेस कारण तू जस्ट अभीच आया है ज्युनिअर..." आता म्हणा ह्याला काही पुरावा आहे काय? तर असं नाहीये ह्यालाही काही पुरावा नाहीये. मानव स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत आलाय ते मला कायमच डोक्यात गेलेलं आहे. अरे चार मूळ भावना नियंत्रित करू शकत नाही तो कसा काय सर्वश्रेष्ठ?

गामा पैलवान 09/07/2015 - 20:09
निरन्जनदास, आपला लेख व संदेश वाचले. काही विधानांवर चर्चा करेन म्हणतो. १. >> पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त >> समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! पटलं नाही. हा दावा खरा असेल तर भक्तीमार्गी संत सगळ्या सर्वदेशी, सर्वकाळी, सर्वलिंगी, सर्वजात, सर्ववयीन कसे आढळून येतात? ते एका मूठभरांच्या गटात दाखल व्हायला हवेत ना? भक्तिमार्ग वेदविरोधी नाही. २. >> लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, >> व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची >> संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता >> येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. असहमत. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांना मार्गदर्शन करणारे काहीही नाही. अपवाद करायचाच झाला तर फक्त ५१ व्या कलमाचा किंचित प्रमाणावर करता येईल. त्यात नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांकडे ढोबळमानाने निर्देश आहे. भारतीय जनमानसास अधिकारांपेक्षा कर्तव्यपूर्ती अधिक महत्वाची वाटते. त्यामुळे उपरोक्त विधान भारताच्या संदर्भात निरर्थक आहे. ३. >> निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. हे फार धाडसी विधान आहे. सूर्य पृथ्वीपासून १०८ सौरव्यास दूर आहे, तर चंद्र पृथ्वीपासून १०८ चांद्रव्यास दूर आहे. त्यामुळे खग्रास सूर्य्ग्रहानाच्या वेळेस चंद्रबिंब सूर्यबिंबास अचूकपणे झाकतं. आता हे इतकं प्रमाण आपोआप उत्पन्न झालं का? पृथ्वीवरील वातावरणात प्राणवायूचं प्रमाण २०% आहे. ते जरासं वाढून २२% झालं तर वनस्पती उत्स्फूर्तपणे पेट घेतील. हे प्रमाण निसर्गत: आढळून येतं. हेही आपोआप झालं का? या घटनांचा अर्थ काय लावायचा? निसर्ग रचना करतो आहे की नाहीये? ईश्वराने सृष्टी (=निसर्ग) उत्पन्न केली असा लावावा का? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 11/07/2015 - 18:16
निरन्जनदास, >> त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. एक शंका आहे. मी जे खातो तो आहार माझं शरीर माझी परवानगी न घेता पचवून टाकतं. अन्नपचन ही एक नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ती जिथे होत असते त्या शरीर नामे पिशवीला त्या क्रियेचं भान नाहीये. म्हणजेच मला आत्मभान असलं तरी माझ्या शरीराला मात्र आत्मभान नाही. तर मग मी माझ्या शरीराहून वेगळा मानावा का? तुमची मते ऐकायला आवडतील. आ.न., -गा.पै.

निरन्जनदास 13/07/2015 - 16:24
बॅटमॅन आणि संदीप मित्रहो, तुमच्या चर्चेतून सिद्ध होणारी एकच गोष्ट आहे की तुम्ही भूतदयावादी आहात ? तुम्हाला प्राण्यांची काळजी आहे. प्राण्यांच्या वतीने तुम्ही बुद्धिमान मनुष्यप्राणी बोलत आहात. तुमचे दावे 'बोलाची कधी बोलाचाच भात' असे होत आहे. तुमच्याशी स्वतःच्या भावना बोलणारा प्राणी भेटला तर मी त्यास भेटण्यास उत्सुक आहे. तथाकथित, अकथित, कथित, थकीत इत्यादी बुद्धिवाद्याचे सारे प्रकार केवळ माणसाचेच असतात, प्राण्यांचे नाही. अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. आता, प्राण्यांनाच थेट माझ्याशी बोलू द्या . मग आपण बोलू.

In reply to by निरन्जनदास

संदीप डांगे 13/07/2015 - 16:52
अन्न, पाणी आणि लिंगभाव या खेरीज प्राण्यांना जास्त काही नसते. मानवाप्राण्याचा सर्वात मोठा भ्रम तो हाच. आहारनिद्राभयमैथूनच्या पलिकडेही अनेक प्राणी अनेक भावना दाखवतात. माणसांपेक्षा प्राण्यांचे भवतालच्या निसर्गाबद्दलचे ज्ञान कैक पटीने जास्त असते. (भूकंप व सुनामी यापुर्वीचे प्राण्यांचे व्यवहार, योग्य मार्ग शोधत आपल्या मूळ ठिकाणी परतणे, इत्यादी.) प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून त्यांना कसलेच ज्ञान नाही असे म्हणणे ही आत्मप्रौढी झाली. एखादा आदीवासी भले आपल्यासारखी चार बुकं शिकला नसेल पण त्याच्याकडे आपल्यापेक्षा वेगळे ज्ञान खचितच असेल आणि ते आपल्या चार बुकांपेक्षा जास्त मौल्यवान असेल. आपण ज्याप्रकारे व्यवहार करतो तसे व्यवहार न करणार्‍यांना गावंढळ व आडाणी समजणे हे स्वतःला आधुनिक समजणार्‍या माणसाच्या अहंकाराचे प्रथम लक्षण आहे. ज्या पद्धतीने पाश्चात्त्य देशातील पांढर्‍या लोकांना आफ्रीकी वंशाचे लोक हे आपल्याच मनुष्यवंशाचे वाटतच नव्हते, त्याप्रमाणेच इतर श्वापद ही चार भावनांपलिकडे काहीच राखत नाहीत असे मानणे आहे. प्राण्यांनी तुमच्याशी बोलले तरच तुम्हाला त्यांचे काय ज्ञान आहे/नाही हे समजेल असं तुमचं म्हणणं विचित्र आहे असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संदीप डांगे

डांगे सरांचे म्हणणे बरोबर वाटते. विशेषत: प्राणी ज्या शांतपणे मृत्यू ला सामोरे जातात ती शक्ती मिळवण्या साठी मनुष्याला अपार कष्ट करावे लागतात. अजूनहि बरीच उदाहरणे देता येतील मनुष्य हा प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा दावा मान्य करता येणार नाही. पैजाराबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

संदीप डांगे 13/07/2015 - 17:25
धन्यवाद पैजारबुवा, मनुष्याने स्वतःच स्वतःला श्रेष्ठ ठरवून, निसर्गापासून वेगळा ठरवून निसर्गातून आपसूक मिळणार्‍या मौल्यवान ज्ञानाला दरवाजे बंद केलेत असं कधी कधी वाटतं. माणसाने आजवर जी काही प्रगती, विकास केलाय तो निसर्गाचेच निरिक्षण करून/त्याची कॉपी मारून केलाय. इतर प्राण्यांना तसे करण्याची काही आवश्यकता वाटली नसावी कारण उपजतच त्यांना मनुष्यापेक्षा जास्त क्षमता निसर्गाने बहाल केल्या आहेत. त्यांचे जगणे मनुष्यप्राण्यापेक्षा नक्कीच मजेदार आहे असे वाटते.

मराठी_माणूस 13/07/2015 - 17:11
खालिल वाक्ये आजच्या लोकसत्ता मधील ह्या लेखातील आहेत http://www.loksatta.com/sampadkiya-news/humans-forefathers-1122407/.
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे

निरन्जनदास 13/07/2015 - 20:55
माफ करा, पुन्हा तीच चूक घडते आहे. प्राण्यांना भावना आहेत आणि त्यांना भाषा आहे, म्हणून त्यांना संस्कृती निर्माण करता येते, असे नाही. माणसाने संस्कृती निर्माण केली, धर्म, तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि कितीएक विज्ञाने निर्माण केली. साधी गोष्ट सौंदर्यशास्त्र हा भावनांचा आविष्कार आहे आणि भाषाशास्त्र, अर्थनिर्धारणशास्त्र इत्यादी भाषेचे. प्राणी हे करू शकत नाहीत. 'प्रत्येक पक्षी-प्राण्याची स्वत:ची एक भाषा असते' हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या अवैध आहे. तुम्ही 'प्राण्यांना संवादाची एक त्यांच्यापुरती पद्धती असते' असे म्हणू शकता फार तर. आता, तुम्ही जर असे म्हणाल की त्यांच्यातही ते असतेच, तर बोलणेच खुंटले !! दुसरे, तुम्ही आदिवासी मध्येच कुठून आणले ? ती माणसे आहेत, त्यांच्यात बुद्धिमत्ता आहे. ते विविध प्रकारे व्यक्त करतात, त्यांना कमी लेखणे चूकच आहे. हे, पहा, आपण काय पाहत आहोत; तर एकूण प्राणी जगतात माणूस हा प्राणी वेगळा कसा, का आहे ते ! (त्यात जगातले सगळे आदिवासी येतात ) माणसचे वैशिष्ट्य : बुद्धी, आत्मभान आणि करुणा. हे प्राण्यात नसते, हे कृपया लक्षात घ्या. ते अविकसित आहेत. आजचा सर्वात प्रगत प्राणी केवळ मनुष्य. आता, मराठी माणसाने काय लक्षात घ्यावे ; तर ते हे की पशु-पक्ष्यांना माणसापेक्षा जास्त तीव्र इंद्रिय असेलही. पण माणूस इंद्रियांच्या दृष्टीने पाहता अतिशय मर्यादित आहे. म्हणूनच त्याने इंद्रियांचा विस्तार केला. जसे कि हातोडा हा हाताचा विस्तार आहे, दुर्बीण हा डोळ्याचा , फोन-मोबाईल हा कानाचा इत्यादी. असा विस्तार प्राणी करू शकले का ? विज्ञान-तंत्रज्ञान (इंटरनेट मानवी आहे. प्राणिज नाही. ) हा मानवी ज्ञानाचा, त्याच्या अनंत मर्यादांचा विस्तार आहे. माणूस आपल्या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न करतो. 'मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते' पण कामापुराताच, माणूस बिनकामाचे किती फालतू संवाद करतो ! किती रद्दी निर्माण करतो? शेवटचा मुद्दा प्राणी माझ्याशी बोलले तर त्यांना माझ्या भाषेतच बोलावे लागेल. मी त्यांच्या भाषेत कसा बोलणार? विनोद म्हणून ची ची चू चू ठीक आहे. अर्थात तो विनोदही आपणच करतो. प्राण्याची भाषा ही म्हणजे प्राण्यांची संवादाची रीत त्यांची त्यांच्यापुरती खासगी असते. आणि भाषा खासगी नसते. कोणतीही भाषा जर ती भाषा असेल तर ती सार्वजनिकच असते. म्हणूनच कोणत्याही माणसाला - मराठी माणूस - धरून कोणतीही भाषा शिकता येते. एकजण दुसऱ्याची भाषा शिकू शकतो. प्राणी माणसाची भाषा शिकत नाहीत. ते ध्वनी ओळखतात. आता, कृपया तिन्ही लेख आपण प्रत्येकांनी एकामागे एक असे वाचावेत, सुटे वाचू नयेत. शक्य तो प्रिंट काढून समोर ठेऊन वाचावेत. ही विंनती. आता, आपण पुढील लेखाकडे जाऊ.
लेखनविषय:

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल....

मुक्त विहारि ·

एस 20/06/2015 - 21:28
भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे. पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांनी किंवा त्या विश्वस्तांनी दाद न दिल्यास सरळ न्यायालयाकडून मनाई आदेश आणू शकता.

प्यारे१ 20/06/2015 - 21:34
कायद्यानं जाण्या ऐवजी सामोपचारा चा वापर करावा असं वाटतं. कायद्यानं विरोध केल्यास तुम्हाला मूळ मुद्दा बाजूस पडून अकारण शिव्यांचं धनी व्हावं लागेलच त्याबरोबर धर्मबुडवे वगैरे विशेषणं लागून त्रास होण्याची शक्यता आहे. त्याची सर्वार्थानं तयारी असल्यास पुढचा मार्ग अवलंबणे.

In reply to by उगा काहितरीच

कंजूस 21/06/2015 - 06:12
मागे एका एसी लावण्याच्या धाग्यावर त्याची इकॅानमी दिलेली आहेच.पहिला एसी मठ अशी प्रसिद्धी झाली की इतर मठ आणि नावाजलेली देवळेही एसी होण्याचा धुमधडाका शुरू होईल. खालील पाट्या दिसतील- "एसी साठी देणगीदार- १) २) ३) वगैरे. नंतर "या महिन्याचे एसी बिल श्रीरामभक्त अमुक अमुक यांचेकडून" वगैरे.

रेवती 20/06/2015 - 23:42
हा धागा वाचत राहीन. माझ्या माहेरच्या सोसायटीत तरी यावर काही उपाय काढता आलेला नाही. कारण सोसायटीच्या अगदी बाहेरच असलेले (विनापरवाना) देऊळ माजी नगरसेवकाचे आहे. म्हणजे तिथे आधी देऊळ नव्हतेच. गणेशोत्सव झाल्यानंतर उत्सवमूर्ती ठेवण्यासाठी एक बंद खोली केली होती. त्याचे दरवाजे बांधून होईपर्यंत जाळी लावली होती. बघता बघता येणारा जाणारा पैसे टाकू लागला, नारळ फोडू लागला. मग कश्याला हा बुवा बंद दरवाजे करतोय! त्याने नक्षीदार खांब रोवले आणि काचेचे दरवाजे, दानपेटी वगैरे. पब्लिक इतके वेडे असते की आता ते देऊळ म्हणून वापरले जाते. मग आता जे आहे ते नीट वापरावे ना! तर ते नाही! देवळाच्या मागे आडोसा करून वर्तमानपत्रवाला मनुष्य, सकाळी तात्पुरता दूध स्टॉल, संध्याकाळी वडापाव अशा गाड्या लागतात. त्या लोकांनी सांगितले की (२ वर्षांपूर्वी हां) ११०० रुपये प्रतिमहिना देतोय नगरशेवकान्ला आनि मग धंदा करतोय. आमाला कोनी हटवू शकत नाही. आता होते काय की सोसायटीत येणार्‍या जाणार्‍या तरण्या मुलींच्या आईवडीलांच्या जिवाला घोर लागलाय. नेहमी मूर्ख पब्लिकचा राबता सोसा. च्या गेटपाशी असतो व यथेच्छ टवाळी चालू असते. अनेक तक्रारी करूनही उपयोग नाही. वॉचमनने सोसायटीत वॉच ठेवण्याऐवजी त्यालाच वॉच करण्याची गरज पडतिये. एकतर काही वयस्क रहिवासी नियमबाह्य कामे त्याला करायला सांगतात, उदा. दूध आणणे, दळणाचे डबे आणणे, उपहारगृहातून पार्सले आणणे वगैरे. तोच गेटवर मूर्ख लोकांशी गप्पा मारत बसतो.

सर्वसाक्षी 20/06/2015 - 23:58
सर्व त्रस्त नागरिकांनी आसपास सर्वत्र फलक लावुन येणार्‍या भक्तांना संदेश द्या की १) इश्वर बहीरा नाही, त्याला भक्तांचे बोलणे ऐकु येते. २) लाउड स्पिकर कितीही मोठा लावलात तरी त्याचा आवाज स्व्रर्गापर्यंत पोचू शकत नाहीच, मात्र आवाजाने तुम्ही पृथ्वीवर नर्क निर्माण करीत आहात. ३) लाउड स्पिकर लावुन आपण स्वतःला व देवाला ढणाणा लाउड स्पिकर लावणार्‍या झोपड्वासियाच्या पातळीवर नेउन ठेवत आहात ४) तरीही लाऊड्स्पिकर लावायचा अट्टाहास असेल तर मिळमिळीत भजने न लावता ढिंच्याक गाणी लावा, त्यामुळे भक्तगण झपाट्याने वाढतील.

In reply to by सर्वसाक्षी

+++१११ यात अजुन एक भर! गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातून "आपल्या भक्ति श्रद्धेपोटि दुसय्रांचा छळ करणे,हे महाराज देखिल कसे चुकीचे मानत असत!" याचे दाखले काढा. त्याच्या प्रिंट़ाऊट्स काढुन तिकडे आजुबाजुला आणि विशेषता: त्यांच्या तिथे येणाय्रा भक्तांना दिसतील असे लावा.. फुल्ल टू मुन्नाभाई श्टाइलनी गांधीगिरी करा!

जवळपास प्रत्येक सोसायटीत/कॉलनीत/गल्लीत/वस्तीत/गावात हेच असते. आमच्या घरापासून २०० मी अंतरावर एक विठ्ठलमंदीर आहे. तेथे दर हिवाळ्यात काकडआरती असते. रोज पहाटे त्याचा मंद स्वर ऐकू येतो, साधारण ७-७.३० पर्यंत. एकदा त्यावेळेदरम्यान मंदीराजवळून चाललो असताना कळले की कर्णा लावलाय अन् तो कर्णकर्कश्श आवाजात किंचाळतोय. दया आली जवळ राहणार्‍या लोकांची. असाच आवाज १-४ तास चालणार्‍या लग्नाच्या वराती, गणपती-देवी(तोरण)-शिवजयंती-आंबेडकर जयंती च्या मिरवणुकीतही असतो. (मागच्या आठवड्यात तर जिजामाता/अहिल्याबाई होळकर यांपैकी कुणाची तरी मिरवणूक होती! गढूळाचं पाणी कुनी ढवळीलं...........!!!!! ) स्थानिक 'नेतृत्व/आधारस्तंभ्/इत्यादी'च्या वाढदिवसाला हेच असते. ईद/मोहरमला हेच असते. १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला हेच असते. पुण्यात पालखी आल्यावर दोन दिवस हेच असते. कितीवेळा कोणत्या गोष्टींसाठी त्रास करून घेणार? (डायनोसॉरच्या वेळी झाला होता तशा महाविनाशाशिवाय या भारतदेशाला कोणीही वाचवू शकणार नाही, यावर ठाम विश्वास असणारा) पैलवान

टवाळ कार्टा 21/06/2015 - 11:34
कानात कापसाचे बोळे घालून बसा ...भारतात आंधळ्या बहिर्या भक्तांची कमी नाहीये...सोसायटीला काहितरी चिरिमीरी मिळत असेल तर कमीटी कधीही मठाच्या विरुध्ध बोलणार नाही

सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे
असे असेल तर तुम्ही पण तुमच्या सोसायटी मधे रोज एखादा कार्यक्रम आयोजित करा. साउंड सिस्टीम भाड्याने आणून त्यांच्या भजनाची / किर्तनाची वेळ पाहुन त्याच वेळी कर्कष्य आवाजात सिनेमाची किंवा इतर जास्तीजास्त भंकस गाणी मोठमोठ्यांदी लाउन ठेवायची. "कर्ण्यांची तोंडे अर्थात मठा कडे". जर चारपाच सोसायट्यांची एकत्र तक्रार असेल तर रोज एका सोसायटीने हा कार्यक्रम करायचा. त्या आधि त्यांच्या भजन किर्तनाच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग करायला विसरु नका. समजा ते तुमच्या विरुध्द पोलिसात वगेरे गेले तर उपयोगी येईल. तुमच्या नशिबाने सध्या रमझान सुरु आहे. तेव्हा लाउडस्पीकरवर रमझानची सुरेल गाणी वाजवायची आणि दिवसातून पाच वेळा नमाजाची बांग असेलच. यासाठी सोसायटी मधे कोणी मुसलमान कुटुंब रहात असले पाहीजे असे काही नाही. पण रहात असेल तर त्यांनाही तुमच्यात सामिल करुन घेता आले तर उत्तमच. (फक्त रमझान सेलिब्रेशन परमनंट होणार नाही असे बघावे नाहितर "भिक नको पण कुत्रा आवर" आशी तुमची आवस्था होईल) दोनतीन दिवसात तुम्हाला शरण आलेच पहिजेत. एकदा का शरण आले की मग मात्र कोणतीही दयामाया दाखवू नका. पैजारबुवा,

टवाळ कार्टा 21/06/2015 - 13:42
काल शाळेतल्या कायप्पा ग्रुपवर एकाने व्हिडिओ फॉरवर्ड केलेला कोणत्यातरी धरणाचे पाणी सोडण्याच्या ठिकाणी ४ जण नेमके पाणी सोडण्याच्या वेळेसच ती जागा धावत पार करायला जातात पण पाणी झपकन वाढल्याने मध्येच अडकून पडतात आणि पाण्याचा जोर वाढल्याने अगदी २-३ मिनीटांतच पुढे पाण्याबरोबर दरीत कोसळतात.... त्याआधी त्याच व्यक्तीने असाच एक व्हिडिओ फॉरवर्ड केलेला... एका मॉलमध्ये लहान मुलगा एस्कलेटरची फिरती पट्टी (जी कठड्याला चिटकून फिरत असते) धरून ठेवतो आणि पट्टीबरोबर ओढला जाउन पहिल्या मजल्यावरुन खाली पडतो वायझेड लोक साले...लोकांचे अपघाती मरणेसुध्धा एखाद्या इव्हेंटची क्लिप असल्यासारखी फॉरवर्ड करतात... ज्याने फॉरवर्ड केला तो शाळेत एक शांत, अभ्यासू टैपचा मुलगा होता (आताचे म्हैत नै) पण अगदी चारचौघांसारखा नाकासमोर चालणारा...घरच्यांचे ऐकून आज्ञाधारकपणे ठरवून लग्न करून २ वर्षांत मुल झालेला...अगदी देव-देव नै पण आस्तीक टैपचा...व्यसनांपासून दूर असणारा...अगदी मनःशांतीसाठी सद्गुरु बैठकीला जाणारा वगैरे टैपचा मुलगा आहे... तो व्हिडिओ बघताच माझी पहिली प्रतिक्रिया "भें**...why the f*ck people forward such videos"...असा व्हिडिओ कोणी फॉरवर्ड केलाच तर आपणसुध्धा मेंढरांसारखे तोच व्हिडिओ दुसर्याला पाठवायचा??? पाठवण्याआधी जरा एकदा विचार करून पहा "जर त्या व्हिडिओत आपण स्वतः असतो अथवा आपल्या जवळच्यांपैकी असते आणि दुसरा कोणी आपला व्हिडिओ असा शेअर करत असेल तर आपण काय करू". सगळ्यात वाईट्ट म्हणजे तो व्हिडिओ पाठवून १२ तास उलटून गेले...अज्जून दुसर्या कोणानेही त्या व्यक्तीला विरोध केलेला नै...स्वतःकडे वाईटपणा येउ नये यासाठी??? डोक्यातला वैताग इथे बाहेर काढत आहे...

सगळ्याच सभासदांचा मंदिरामुळे होणार्‍या द्वनी प्रदूषणाला विरोध असल्याने, सोसायटी तशी तक्रार मंदिराच्या पदाधिकार्‍यांना करणार आहे. बघू आता पुढे काय होत आहे ते.... अपसेट्स देत राहीनच. कदाचित, इतर कुणाला पण हा असा त्रास होत असेल किंवा पुढे-मागे झालाच तर त्या मिपाकराला नक्कीच फायदा होईल. (एकनिष्ठ मिपाकर) मुवि

मदनबाण 28/06/2015 - 09:23
हे भक्ती साँग नियमत ऐकत जा... चित्तातली चलबिचल कमी होउन मनःशांती लाभेल ! ;) जाता जाता :- आपल्या आस्थेचा दुसर्‍यांना त्रास का ? मी गोंदवल्याला जाउन आलो आहे अतिशय सुंदर अनुभव आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar

खटपट्या 28/06/2015 - 11:34
पोलिसात जाउनही काही झाले नाही किंवा अत्रुप्त यांनी सुचवलेले गांधीगीरीचाही काही फायदा झाला नाही तर. तुमच्या सोसायटीत अखंड हरीनाम सप्ताह वगैरे चालू करा. मोठ्या मोठ्याने भजने लावा. भोंगे मठाकडे वळवा. जसास तसे उत्तर द्या..

भाते 28/06/2015 - 14:08
दोन महिन्यांपुर्वीचा प्रसंग. दहावी बारावीच्या परिक्षा चालू होत्या. बाजूच्या इमारतीत लग्न/संगीत कार्यक्रमासाठी मंडप घातला होता. शनिवारी दुपारी खुर्च्या आणि लाऊड स्पिकर्स यांची जुळवाजुळव चालू झाली. सातच्या सुमारास तिकडे लोक यायला लागले. साडेसात वाजता कर्कश्य आवाजात गाणी लाऊन त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. त्या आवाजाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाज्यांना हादरे बसत होते. सगळ्या इमारतीमधले लोक खाली उतरून आपसात चर्चा करू लागले. दहा वाजता लाऊड स्पिकर्सची वेळ संपल्यावर आजूबाजूच्या इमारतीमधले सगळे जण (सुमारे शंभर) एकत्र येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आणि त्यांना दहा वाजल्यानंतर लाऊड स्पिकर्स बंद करायला सांगितले. संगीत कार्यक्रमात धुंद असलेल्या त्यांनी (सुमारे पन्नास) त्याला विरोध केला. इतरांकडून अचानक विरोध झाल्याने बिथरलेल्या लोकांनी अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. मग पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांच्या गाडीतुन दोन पोलिस आल्यावर त्यांनी यात हस्तक्षेप केला आणि लाऊड स्पिकर्स बंद करून कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. अर्थात, मी वर दिलेला अनुभव 'लाऊड स्पिकर्सची दहाची डेडलाईन' संबंधी असल्याने पोलिसांनी कारवाई केली होती. या गोष्टी तपासुन पहा. गोंदवलेकर महाराजांचा मठ ज्या इमारतीत आहे ती जागा कोणातरी एका इसमाच्या नावावर असेल. त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? वरती सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचा आजूबाजूच्या सोसायट्यांना याचा त्रास होतो आहे. मग प्रत्येक सोसायटीने आपल्या सर्व-साधारण सभेत याची चर्चा करून पोलिसांकडे तक्रार करायचा ठराव मंजुर करून घ्या आणि सर्वांनी एकत्रितपणे पोलिसांकडे याची तक्रार करा. पोलिस यावर नक्की कारवाई करतील. हा त्रास कायमचा थांबवण्यासाठी, नाईलाजाने मठाविरुध्द कोर्टात जायचा शेवटचा पर्याय तुमच्याकडे आहेच! जाताजाता, तुमचा हा त्रागा तुम्ही सोशल मिडियावर मांडला आहे याची त्यांना जाणिव करून द्या.

In reply to by भाते

त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? नाही... इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? नाही.... मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? माहीत नाही. पण सोसायटीच्या परवानगीशिवाय पोलीस कसे काय परवानगी देवू शकतात?

In reply to by मुक्त विहारि

भाते 28/06/2015 - 20:44
म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!) जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे. मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे. मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे. जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे. विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?

In reply to by भाते

"म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!") "जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे." आर्थिक लाभ नाही.तर फसवणूक.सुरुवातीला एकादशीच्या नावाने परवानगी घेतली.पण पुढे प्रस्थ वाढत गेले. "मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे. मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे." सध्या तरी प्रश्र्न कागदोपत्री सोडवायचे ठरले आहे.सुदैवाने सोसायटीतली सगळीच माणसे मठामुळे होणार्‍या ध्वनी-प्रदूषणाने त्रस्त आहेत, त्यामुळे दुहीचा प्रश्र्न येत नाही. "जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे." समोरच हॉस्पीटल आहे आणि ते पण लेखी तक्रार सोसायटीकडे करणार आहेत. "विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?" बहूदा असावी.नक्की माहीत नाही.

माहितगार 24/07/2018 - 14:39
या दुव्यावर अजून दोन दुव्यांची माहिती आहे. ज्यात आपल्या जागेतून दुसर्‍यांचे ध्वनी प्रदुषणकरणारे स्पिकर हॅक करुन विराम देता येऊ शकतो अशी काही माहिती असावी असे दिसते आहे. याचे तथ्य चेक करुन कुणि मिपाकर अथवा कुणि इलेक्ट्रीकल/ इलेक्टॉनीक किंवा ध्वनी अभियंते मार्गदर्शन करु शकल्यास पहावे.

In reply to by मुक्त विहारि

रामचंद्र 23/04/2024 - 20:03
आपण पोलिसांत तक्रार केली आहे म्हणता. पोलीस आयुक्तांना ईमेल करून पाहता का? थोडी सावकाश पण नक्की दखल घेतली जाते असा माझा अनुभव आहे.

येडझवे लोक आहेत. माझ्या फ्लॅट पासून १००मिटरवर पांडुरंग रुखमाई चे देऊळ आहे. जमिनी विकून बक्कळ पैसा, बिना सायलेन्सर च्या फटफट्या,डिजे डाॅल्बी ,नुसता उत आलाय. लग्आनसराई, अगदी बैलपोळा,चतुर्थी, शिवजयंती, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कुठेतरी पळून जावेसे वाटते. पोलीसांना तक्रार केली तरी काही उपयोग नाही. समुपदेशन,स्थानिक पुढारी सर्व काही फेल. आता सुद्धा हरीनाम सप्ताह निमीत्त गाव गदर्भ गळा काढून रेकता आहेत. नवरा बायको केव्हांच पळून गेलेत.(कोण ते अंदाज लावा). अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज उठावे आणी सरावा प्रवास सारा -आरती प्रभू आशी इच्छा असताना नशिबी मात्र.... अखेरच्या वळणावर आला कर्णकर्कश डाॅल्बीवाला किटले कान उडाली झोप झडकरी यावा आता निरोप -त्रासलेला कसरत पराधीन आहे जगती ..... सहन करणे एवढेच हातात आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 24/04/2024 - 11:04
सहन करणे एवढेच हातात आहे. घराच्या बेडरुमला साउंड प्रूफिंग करून घ्या. खर्च ३ लाखापर्यंत येईल असाही किंवा फेनेस्ट या आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या कंपन्या आहेत. परंतु खोलीला आणि मनाला नक्की शांतता लाभेल. घरच बदलण्यापेक्षा कितीतरी स्वस्त आणि खात्रीचा उपाय आहे.

माझ्या लहानपणी आजुबाजूला बरेच लोक मंगळवार चे मौनव्रत पाळायचे, असा प्रयोग करुन पाहायला हवा. त्यामुळे कदाचित ध्वनीप्रदुषण कमी होईल. माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार महिने बंद झालाय. तो दुरुस्त करुन घेतला नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदुषण कमी व्हायला मदत होतेय. आजूबाजूच्या गाड्या बिनाकामाच्या हॉर्न वाजवतच असतात त्यामुळे मला हॉर्नची गरज पडत नाही. शिवाय तो बंद आहे त्यामुळे गाडी जपून चालवावी लागते हा अजून एक फायदा. घरातील टिव्ही सात-आठ वर्षापुर्वी बंद पडला तो परत घेतला नाही त्यामुळे अजून प्रदुषण कमी झाले. मी पहिल्यापासून माणूसघाणा असल्यामुळे कुणाशी जास्त बोलत चालत नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदूषण टाळण्यास मदत झाली आहे. माझ्या इतक्या वाईट सवयींमुळे ध्वनीप्रदुषण कमी होण्यास हातभार लागतोय हे पाहून मनी आनंद जाहला.

सुबोध खरे 24/04/2024 - 11:00
माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार महिने बंद झालाय. तो दुरुस्त करुन घेतला नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदुषण कमी व्हायला मदत होतेय. हॉर्न न आवाजवल्याने एखादा माणूस मध्ये आला तर ब्रेक मारावा लागतो आणि त्या नंतर परत गाडीला वेग देताना जळणाऱ्या पेट्रोलचे प्रदूषण याचा परिणाम ध्वनी प्रदूषणापेक्षा कितीतरी जास्त आहे. हॉर्न कमी आणि आवश्यक असेल तरच वाजवावा हे सत्य. परंतु हॉर्न दुरुस्तच न करणे हे पटत नाही

एस 20/06/2015 - 21:28
भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे. पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांनी किंवा त्या विश्वस्तांनी दाद न दिल्यास सरळ न्यायालयाकडून मनाई आदेश आणू शकता.

प्यारे१ 20/06/2015 - 21:34
कायद्यानं जाण्या ऐवजी सामोपचारा चा वापर करावा असं वाटतं. कायद्यानं विरोध केल्यास तुम्हाला मूळ मुद्दा बाजूस पडून अकारण शिव्यांचं धनी व्हावं लागेलच त्याबरोबर धर्मबुडवे वगैरे विशेषणं लागून त्रास होण्याची शक्यता आहे. त्याची सर्वार्थानं तयारी असल्यास पुढचा मार्ग अवलंबणे.

In reply to by उगा काहितरीच

कंजूस 21/06/2015 - 06:12
मागे एका एसी लावण्याच्या धाग्यावर त्याची इकॅानमी दिलेली आहेच.पहिला एसी मठ अशी प्रसिद्धी झाली की इतर मठ आणि नावाजलेली देवळेही एसी होण्याचा धुमधडाका शुरू होईल. खालील पाट्या दिसतील- "एसी साठी देणगीदार- १) २) ३) वगैरे. नंतर "या महिन्याचे एसी बिल श्रीरामभक्त अमुक अमुक यांचेकडून" वगैरे.

रेवती 20/06/2015 - 23:42
हा धागा वाचत राहीन. माझ्या माहेरच्या सोसायटीत तरी यावर काही उपाय काढता आलेला नाही. कारण सोसायटीच्या अगदी बाहेरच असलेले (विनापरवाना) देऊळ माजी नगरसेवकाचे आहे. म्हणजे तिथे आधी देऊळ नव्हतेच. गणेशोत्सव झाल्यानंतर उत्सवमूर्ती ठेवण्यासाठी एक बंद खोली केली होती. त्याचे दरवाजे बांधून होईपर्यंत जाळी लावली होती. बघता बघता येणारा जाणारा पैसे टाकू लागला, नारळ फोडू लागला. मग कश्याला हा बुवा बंद दरवाजे करतोय! त्याने नक्षीदार खांब रोवले आणि काचेचे दरवाजे, दानपेटी वगैरे. पब्लिक इतके वेडे असते की आता ते देऊळ म्हणून वापरले जाते. मग आता जे आहे ते नीट वापरावे ना! तर ते नाही! देवळाच्या मागे आडोसा करून वर्तमानपत्रवाला मनुष्य, सकाळी तात्पुरता दूध स्टॉल, संध्याकाळी वडापाव अशा गाड्या लागतात. त्या लोकांनी सांगितले की (२ वर्षांपूर्वी हां) ११०० रुपये प्रतिमहिना देतोय नगरशेवकान्ला आनि मग धंदा करतोय. आमाला कोनी हटवू शकत नाही. आता होते काय की सोसायटीत येणार्‍या जाणार्‍या तरण्या मुलींच्या आईवडीलांच्या जिवाला घोर लागलाय. नेहमी मूर्ख पब्लिकचा राबता सोसा. च्या गेटपाशी असतो व यथेच्छ टवाळी चालू असते. अनेक तक्रारी करूनही उपयोग नाही. वॉचमनने सोसायटीत वॉच ठेवण्याऐवजी त्यालाच वॉच करण्याची गरज पडतिये. एकतर काही वयस्क रहिवासी नियमबाह्य कामे त्याला करायला सांगतात, उदा. दूध आणणे, दळणाचे डबे आणणे, उपहारगृहातून पार्सले आणणे वगैरे. तोच गेटवर मूर्ख लोकांशी गप्पा मारत बसतो.

सर्वसाक्षी 20/06/2015 - 23:58
सर्व त्रस्त नागरिकांनी आसपास सर्वत्र फलक लावुन येणार्‍या भक्तांना संदेश द्या की १) इश्वर बहीरा नाही, त्याला भक्तांचे बोलणे ऐकु येते. २) लाउड स्पिकर कितीही मोठा लावलात तरी त्याचा आवाज स्व्रर्गापर्यंत पोचू शकत नाहीच, मात्र आवाजाने तुम्ही पृथ्वीवर नर्क निर्माण करीत आहात. ३) लाउड स्पिकर लावुन आपण स्वतःला व देवाला ढणाणा लाउड स्पिकर लावणार्‍या झोपड्वासियाच्या पातळीवर नेउन ठेवत आहात ४) तरीही लाऊड्स्पिकर लावायचा अट्टाहास असेल तर मिळमिळीत भजने न लावता ढिंच्याक गाणी लावा, त्यामुळे भक्तगण झपाट्याने वाढतील.

In reply to by सर्वसाक्षी

+++१११ यात अजुन एक भर! गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातून "आपल्या भक्ति श्रद्धेपोटि दुसय्रांचा छळ करणे,हे महाराज देखिल कसे चुकीचे मानत असत!" याचे दाखले काढा. त्याच्या प्रिंट़ाऊट्स काढुन तिकडे आजुबाजुला आणि विशेषता: त्यांच्या तिथे येणाय्रा भक्तांना दिसतील असे लावा.. फुल्ल टू मुन्नाभाई श्टाइलनी गांधीगिरी करा!

जवळपास प्रत्येक सोसायटीत/कॉलनीत/गल्लीत/वस्तीत/गावात हेच असते. आमच्या घरापासून २०० मी अंतरावर एक विठ्ठलमंदीर आहे. तेथे दर हिवाळ्यात काकडआरती असते. रोज पहाटे त्याचा मंद स्वर ऐकू येतो, साधारण ७-७.३० पर्यंत. एकदा त्यावेळेदरम्यान मंदीराजवळून चाललो असताना कळले की कर्णा लावलाय अन् तो कर्णकर्कश्श आवाजात किंचाळतोय. दया आली जवळ राहणार्‍या लोकांची. असाच आवाज १-४ तास चालणार्‍या लग्नाच्या वराती, गणपती-देवी(तोरण)-शिवजयंती-आंबेडकर जयंती च्या मिरवणुकीतही असतो. (मागच्या आठवड्यात तर जिजामाता/अहिल्याबाई होळकर यांपैकी कुणाची तरी मिरवणूक होती! गढूळाचं पाणी कुनी ढवळीलं...........!!!!! ) स्थानिक 'नेतृत्व/आधारस्तंभ्/इत्यादी'च्या वाढदिवसाला हेच असते. ईद/मोहरमला हेच असते. १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला हेच असते. पुण्यात पालखी आल्यावर दोन दिवस हेच असते. कितीवेळा कोणत्या गोष्टींसाठी त्रास करून घेणार? (डायनोसॉरच्या वेळी झाला होता तशा महाविनाशाशिवाय या भारतदेशाला कोणीही वाचवू शकणार नाही, यावर ठाम विश्वास असणारा) पैलवान

टवाळ कार्टा 21/06/2015 - 11:34
कानात कापसाचे बोळे घालून बसा ...भारतात आंधळ्या बहिर्या भक्तांची कमी नाहीये...सोसायटीला काहितरी चिरिमीरी मिळत असेल तर कमीटी कधीही मठाच्या विरुध्ध बोलणार नाही

सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे
असे असेल तर तुम्ही पण तुमच्या सोसायटी मधे रोज एखादा कार्यक्रम आयोजित करा. साउंड सिस्टीम भाड्याने आणून त्यांच्या भजनाची / किर्तनाची वेळ पाहुन त्याच वेळी कर्कष्य आवाजात सिनेमाची किंवा इतर जास्तीजास्त भंकस गाणी मोठमोठ्यांदी लाउन ठेवायची. "कर्ण्यांची तोंडे अर्थात मठा कडे". जर चारपाच सोसायट्यांची एकत्र तक्रार असेल तर रोज एका सोसायटीने हा कार्यक्रम करायचा. त्या आधि त्यांच्या भजन किर्तनाच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग करायला विसरु नका. समजा ते तुमच्या विरुध्द पोलिसात वगेरे गेले तर उपयोगी येईल. तुमच्या नशिबाने सध्या रमझान सुरु आहे. तेव्हा लाउडस्पीकरवर रमझानची सुरेल गाणी वाजवायची आणि दिवसातून पाच वेळा नमाजाची बांग असेलच. यासाठी सोसायटी मधे कोणी मुसलमान कुटुंब रहात असले पाहीजे असे काही नाही. पण रहात असेल तर त्यांनाही तुमच्यात सामिल करुन घेता आले तर उत्तमच. (फक्त रमझान सेलिब्रेशन परमनंट होणार नाही असे बघावे नाहितर "भिक नको पण कुत्रा आवर" आशी तुमची आवस्था होईल) दोनतीन दिवसात तुम्हाला शरण आलेच पहिजेत. एकदा का शरण आले की मग मात्र कोणतीही दयामाया दाखवू नका. पैजारबुवा,

टवाळ कार्टा 21/06/2015 - 13:42
काल शाळेतल्या कायप्पा ग्रुपवर एकाने व्हिडिओ फॉरवर्ड केलेला कोणत्यातरी धरणाचे पाणी सोडण्याच्या ठिकाणी ४ जण नेमके पाणी सोडण्याच्या वेळेसच ती जागा धावत पार करायला जातात पण पाणी झपकन वाढल्याने मध्येच अडकून पडतात आणि पाण्याचा जोर वाढल्याने अगदी २-३ मिनीटांतच पुढे पाण्याबरोबर दरीत कोसळतात.... त्याआधी त्याच व्यक्तीने असाच एक व्हिडिओ फॉरवर्ड केलेला... एका मॉलमध्ये लहान मुलगा एस्कलेटरची फिरती पट्टी (जी कठड्याला चिटकून फिरत असते) धरून ठेवतो आणि पट्टीबरोबर ओढला जाउन पहिल्या मजल्यावरुन खाली पडतो वायझेड लोक साले...लोकांचे अपघाती मरणेसुध्धा एखाद्या इव्हेंटची क्लिप असल्यासारखी फॉरवर्ड करतात... ज्याने फॉरवर्ड केला तो शाळेत एक शांत, अभ्यासू टैपचा मुलगा होता (आताचे म्हैत नै) पण अगदी चारचौघांसारखा नाकासमोर चालणारा...घरच्यांचे ऐकून आज्ञाधारकपणे ठरवून लग्न करून २ वर्षांत मुल झालेला...अगदी देव-देव नै पण आस्तीक टैपचा...व्यसनांपासून दूर असणारा...अगदी मनःशांतीसाठी सद्गुरु बैठकीला जाणारा वगैरे टैपचा मुलगा आहे... तो व्हिडिओ बघताच माझी पहिली प्रतिक्रिया "भें**...why the f*ck people forward such videos"...असा व्हिडिओ कोणी फॉरवर्ड केलाच तर आपणसुध्धा मेंढरांसारखे तोच व्हिडिओ दुसर्याला पाठवायचा??? पाठवण्याआधी जरा एकदा विचार करून पहा "जर त्या व्हिडिओत आपण स्वतः असतो अथवा आपल्या जवळच्यांपैकी असते आणि दुसरा कोणी आपला व्हिडिओ असा शेअर करत असेल तर आपण काय करू". सगळ्यात वाईट्ट म्हणजे तो व्हिडिओ पाठवून १२ तास उलटून गेले...अज्जून दुसर्या कोणानेही त्या व्यक्तीला विरोध केलेला नै...स्वतःकडे वाईटपणा येउ नये यासाठी??? डोक्यातला वैताग इथे बाहेर काढत आहे...

सगळ्याच सभासदांचा मंदिरामुळे होणार्‍या द्वनी प्रदूषणाला विरोध असल्याने, सोसायटी तशी तक्रार मंदिराच्या पदाधिकार्‍यांना करणार आहे. बघू आता पुढे काय होत आहे ते.... अपसेट्स देत राहीनच. कदाचित, इतर कुणाला पण हा असा त्रास होत असेल किंवा पुढे-मागे झालाच तर त्या मिपाकराला नक्कीच फायदा होईल. (एकनिष्ठ मिपाकर) मुवि

मदनबाण 28/06/2015 - 09:23
हे भक्ती साँग नियमत ऐकत जा... चित्तातली चलबिचल कमी होउन मनःशांती लाभेल ! ;) जाता जाता :- आपल्या आस्थेचा दुसर्‍यांना त्रास का ? मी गोंदवल्याला जाउन आलो आहे अतिशय सुंदर अनुभव आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar

खटपट्या 28/06/2015 - 11:34
पोलिसात जाउनही काही झाले नाही किंवा अत्रुप्त यांनी सुचवलेले गांधीगीरीचाही काही फायदा झाला नाही तर. तुमच्या सोसायटीत अखंड हरीनाम सप्ताह वगैरे चालू करा. मोठ्या मोठ्याने भजने लावा. भोंगे मठाकडे वळवा. जसास तसे उत्तर द्या..

भाते 28/06/2015 - 14:08
दोन महिन्यांपुर्वीचा प्रसंग. दहावी बारावीच्या परिक्षा चालू होत्या. बाजूच्या इमारतीत लग्न/संगीत कार्यक्रमासाठी मंडप घातला होता. शनिवारी दुपारी खुर्च्या आणि लाऊड स्पिकर्स यांची जुळवाजुळव चालू झाली. सातच्या सुमारास तिकडे लोक यायला लागले. साडेसात वाजता कर्कश्य आवाजात गाणी लाऊन त्यांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. त्या आवाजाने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाज्यांना हादरे बसत होते. सगळ्या इमारतीमधले लोक खाली उतरून आपसात चर्चा करू लागले. दहा वाजता लाऊड स्पिकर्सची वेळ संपल्यावर आजूबाजूच्या इमारतीमधले सगळे जण (सुमारे शंभर) एकत्र येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आणि त्यांना दहा वाजल्यानंतर लाऊड स्पिकर्स बंद करायला सांगितले. संगीत कार्यक्रमात धुंद असलेल्या त्यांनी (सुमारे पन्नास) त्याला विरोध केला. इतरांकडून अचानक विरोध झाल्याने बिथरलेल्या लोकांनी अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला सुरुवात केली. मग पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांच्या गाडीतुन दोन पोलिस आल्यावर त्यांनी यात हस्तक्षेप केला आणि लाऊड स्पिकर्स बंद करून कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. अर्थात, मी वर दिलेला अनुभव 'लाऊड स्पिकर्सची दहाची डेडलाईन' संबंधी असल्याने पोलिसांनी कारवाई केली होती. या गोष्टी तपासुन पहा. गोंदवलेकर महाराजांचा मठ ज्या इमारतीत आहे ती जागा कोणातरी एका इसमाच्या नावावर असेल. त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? वरती सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाचा आजूबाजूच्या सोसायट्यांना याचा त्रास होतो आहे. मग प्रत्येक सोसायटीने आपल्या सर्व-साधारण सभेत याची चर्चा करून पोलिसांकडे तक्रार करायचा ठराव मंजुर करून घ्या आणि सर्वांनी एकत्रितपणे पोलिसांकडे याची तक्रार करा. पोलिस यावर नक्की कारवाई करतील. हा त्रास कायमचा थांबवण्यासाठी, नाईलाजाने मठाविरुध्द कोर्टात जायचा शेवटचा पर्याय तुमच्याकडे आहेच! जाताजाता, तुमचा हा त्रागा तुम्ही सोशल मिडियावर मांडला आहे याची त्यांना जाणिव करून द्या.

In reply to by भाते

त्याने इमारतीकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? नाही... इमारतीने त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? नाही.... मठाने पोलिसांकडे संपुर्ण माहितीसह या कार्यक्रमासाठी लेखी अर्ज केला आहे का? पोलिसांनी त्या अर्जाला लेखी स्वरूपात परवानगी दिली आहे का? माहीत नाही. पण सोसायटीच्या परवानगीशिवाय पोलीस कसे काय परवानगी देवू शकतात?

In reply to by मुक्त विहारि

भाते 28/06/2015 - 20:44
म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!) जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे. मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे. मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे. जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे. विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?

In reply to by भाते

"म्हणजे ती जागा ज्याच्या नावावर आहे त्याने (इथे मठ) या कार्यक्रमासाठी लेखी त्या इमारतीकडे अर्ज केलेला नाही. मग त्या इमारतीमधल्या लोकांनी (सर्व-साधारण सभेत ठराव मंजुर करून) यापध्दल पोलिसांकडे तक्रार का केली नाही? म्हणजे, सदर इमारतीमधल्या सगळ्या सदस्यांची संमती आहे असे गृहित धरून, हा मुद्दा पोलिसांकडे तक्रार करताना, हि बाब दाखवुन देणे गरजेचे आहे. इमारतीमधले सगळे सदस्य हा त्रास कायम कसे काय आणि का सहन करतात? (कदाचित आर्थिक लाभ!") "जर मठाकडुन काही या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देणारा अर्ज आला नसेल तर इमारतीकडुन त्याला लेखी स्वरूपात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. इथे सदर इमारतीची या प्रकाराला मुक मान्यता आहे किंवा ते याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत आहेत. (पुन्हा एकदा, आर्थिक लाभ!) पोलिसांकडे तक्रार करताना हा मुद्दा महत्वाचा आहे." आर्थिक लाभ नाही.तर फसवणूक.सुरुवातीला एकादशीच्या नावाने परवानगी घेतली.पण पुढे प्रस्थ वाढत गेले. "मठाने सदर इमारतीला या कार्यक्रमाची कल्पना दिलेली नाही आहे. सदर इमारतीची या कार्यक्रमाला संमती नाही / आहे. (महत्वाचे) मठाने किंवा सदर इमारतीने पोलिसांकडे या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी मागितली नाही आहे. मग कराचं सगळ्यांनी मिळुन तक्रार पोलिसांकडे." सध्या तरी प्रश्र्न कागदोपत्री सोडवायचे ठरले आहे.सुदैवाने सोसायटीतली सगळीच माणसे मठामुळे होणार्‍या ध्वनी-प्रदूषणाने त्रस्त आहेत, त्यामुळे दुहीचा प्रश्र्न येत नाही. "जवळपास, (१०० मीटर परिसरात) एखादी शाळा किंवा हॉस्पिटल आहे का? या वास्तु सायलेंट झोनमध्ये येत असल्याने हा मुद्दादेखिल, पोलिसांकडे तक्रार करताना, महत्वाचा आहे." समोरच हॉस्पीटल आहे आणि ते पण लेखी तक्रार सोसायटीकडे करणार आहेत. "विरोध करायला, कोणी राजकीय व्यक्ति या मठाशी संबंधित आहे का?" बहूदा असावी.नक्की माहीत नाही.

माहितगार 24/07/2018 - 14:39
या दुव्यावर अजून दोन दुव्यांची माहिती आहे. ज्यात आपल्या जागेतून दुसर्‍यांचे ध्वनी प्रदुषणकरणारे स्पिकर हॅक करुन विराम देता येऊ शकतो अशी काही माहिती असावी असे दिसते आहे. याचे तथ्य चेक करुन कुणि मिपाकर अथवा कुणि इलेक्ट्रीकल/ इलेक्टॉनीक किंवा ध्वनी अभियंते मार्गदर्शन करु शकल्यास पहावे.

In reply to by मुक्त विहारि

रामचंद्र 23/04/2024 - 20:03
आपण पोलिसांत तक्रार केली आहे म्हणता. पोलीस आयुक्तांना ईमेल करून पाहता का? थोडी सावकाश पण नक्की दखल घेतली जाते असा माझा अनुभव आहे.

येडझवे लोक आहेत. माझ्या फ्लॅट पासून १००मिटरवर पांडुरंग रुखमाई चे देऊळ आहे. जमिनी विकून बक्कळ पैसा, बिना सायलेन्सर च्या फटफट्या,डिजे डाॅल्बी ,नुसता उत आलाय. लग्आनसराई, अगदी बैलपोळा,चतुर्थी, शिवजयंती, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कुठेतरी पळून जावेसे वाटते. पोलीसांना तक्रार केली तरी काही उपयोग नाही. समुपदेशन,स्थानिक पुढारी सर्व काही फेल. आता सुद्धा हरीनाम सप्ताह निमीत्त गाव गदर्भ गळा काढून रेकता आहेत. नवरा बायको केव्हांच पळून गेलेत.(कोण ते अंदाज लावा). अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज उठावे आणी सरावा प्रवास सारा -आरती प्रभू आशी इच्छा असताना नशिबी मात्र.... अखेरच्या वळणावर आला कर्णकर्कश डाॅल्बीवाला किटले कान उडाली झोप झडकरी यावा आता निरोप -त्रासलेला कसरत पराधीन आहे जगती ..... सहन करणे एवढेच हातात आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 24/04/2024 - 11:04
सहन करणे एवढेच हातात आहे. घराच्या बेडरुमला साउंड प्रूफिंग करून घ्या. खर्च ३ लाखापर्यंत येईल असाही किंवा फेनेस्ट या आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या कंपन्या आहेत. परंतु खोलीला आणि मनाला नक्की शांतता लाभेल. घरच बदलण्यापेक्षा कितीतरी स्वस्त आणि खात्रीचा उपाय आहे.

माझ्या लहानपणी आजुबाजूला बरेच लोक मंगळवार चे मौनव्रत पाळायचे, असा प्रयोग करुन पाहायला हवा. त्यामुळे कदाचित ध्वनीप्रदुषण कमी होईल. माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार महिने बंद झालाय. तो दुरुस्त करुन घेतला नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदुषण कमी व्हायला मदत होतेय. आजूबाजूच्या गाड्या बिनाकामाच्या हॉर्न वाजवतच असतात त्यामुळे मला हॉर्नची गरज पडत नाही. शिवाय तो बंद आहे त्यामुळे गाडी जपून चालवावी लागते हा अजून एक फायदा. घरातील टिव्ही सात-आठ वर्षापुर्वी बंद पडला तो परत घेतला नाही त्यामुळे अजून प्रदुषण कमी झाले. मी पहिल्यापासून माणूसघाणा असल्यामुळे कुणाशी जास्त बोलत चालत नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदूषण टाळण्यास मदत झाली आहे. माझ्या इतक्या वाईट सवयींमुळे ध्वनीप्रदुषण कमी होण्यास हातभार लागतोय हे पाहून मनी आनंद जाहला.

सुबोध खरे 24/04/2024 - 11:00
माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार महिने बंद झालाय. तो दुरुस्त करुन घेतला नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदुषण कमी व्हायला मदत होतेय. हॉर्न न आवाजवल्याने एखादा माणूस मध्ये आला तर ब्रेक मारावा लागतो आणि त्या नंतर परत गाडीला वेग देताना जळणाऱ्या पेट्रोलचे प्रदूषण याचा परिणाम ध्वनी प्रदूषणापेक्षा कितीतरी जास्त आहे. हॉर्न कमी आणि आवश्यक असेल तरच वाजवावा हे सत्य. परंतु हॉर्न दुरुस्तच न करणे हे पटत नाही
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या मी जिथे राहतो, त्याच इमारतीत, तळ-मजल्यावर, गोंदवलेकर महाराजांचे देऊळ आहे. रोज संध्याकाळी आणि दुपारी तिथे भजन-किर्तनाचे कार्यक्रम होत असतात. आधीच्या पदाधिकार्‍यांनी देवूळासाठी आणि भजन किर्तनासाठी परवानगी दिली होती. सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने तर ह्या देवळाच्या विश्र्वस्तांना तर ऊतच आला आहे. तर आता हा त्रास कमी कसा करता येईल? सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे. आजु-बाजुच्या सोसायटीतल्या माझ्या मित्रांची पण ह्या आवाजाबाबत तक्रार आहे. येत्या गुरुवारी सोसायटीच्या सर्व-साधारण सभेत मी हा मुद्दा चर्चे साठी मांडणार आहेच. तरी पण त्यांनी जुमानले नाही तर.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

शब्द झाले मोती...

गणेशा ·

गणेशा 29/05/2015 - 14:32
आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस मात्र शनिवार - रविवार असले तरी मनाचा सुट्टीचा दिवस शुक्रवार ... शुक्रवारी मन खुप मुक्त पणे भरकटते... कधी ते असेच सरळ त्या काळसर डोंगरावर चढुन जाते... कड्या-कपारीतुन फिरुन येते... उन्हातान्हातुन .. सावलीतुन हळुच गिरकी घेवुन येते कधी झाडांच्या फांदीवरुन.. पानांवरुन हलकेच परत येते... कधी मिट्ट काळोख्या रात्रीतील त्या अमुर्त स्वप्नाला अलगद मिठी मारुन येते... कधी हलकेच घराच्या खिडकीतुन पहात राहते... खिडकी.. खिडकी ही मनाची अशी जागा.. की त्यातुन दिसणार्‍या इवल्याशा आभाळावर ही मन आपले राज्य प्रस्तापित करु पाहते... तासन तास त्या आभाळाच्या तुकड्यावर प्रेम करत, ताटकळत उभे असते... आपले अस्तित्व त्या आभाळाकडे जणु ते सुपुर्त करुन देते... मनाचे अस्तित्व कोणी मान्य करो वा न करो .. त्या आभाळाने कदाचीत ते मान्य केले असेल . ------- २९/५/२०१५, १४:३२

In reply to by गणेशा

प्रचेतस 29/05/2015 - 14:47
आज आभाळ भरुन आलंय. मला भरलेलं आभाळ फार आवडतं कारण त्यातूनच बर्‍याच वेळा पाऊस येतो. मागच्या पावसाळ्यात कुठे बाहेर भटकणं झालंच नाही फारसं. याखेपी मात्र भरपूर फिरायचा विचार आहे. मी विचार फारसा करत नाही असे लोक म्हणतात. काही लोक तर तुम्ही निरथक अत्मरंजन करताय असंही म्हणत असतात. निरर्थक अत्मरंजनातूनच माणूस भ्रमवादाचा बळी ठरतो. हल्ली तर आत्मकुंथित भ्रमवादाची मोठी फ्याशन आहे....

In reply to by गणेशा

आम्ही कामगार वर्गात मोडत असल्यामुळे शुक्रवार हा आमच्या साठी आठवड्याचा पहिला दिवस. कालच्या दिवसभरात बायकोनी हातात टेकवलेल्या यादीमधली कोणकोणती कामे राहीली आणि ती आता कशी करायची, पुढच्या गुरुवारवर काय ढकलायचे, त्याचे हिशेब मांडत, आणि आज दिवसभरात ऑफिसमधे काय करायच ते ठरवत पोचले की समोर दुसरेच काहीतरी (साहेबांच्या मते) अतिमहत्वाचे वाढुन ठेवलेले असते. त्यातच वाया जाणारा शुक्रवार दिसत असतो. आपण आपल्यावरच (आणि साहेबावर) चडफडत काम सुरु करावे तर गणेशा सारख्या कोणत्या तरी मित्राचा फोन येतो "शनिवार रविवारचा काय प्लॅन आहे? येतोस का राजगडावर?" मग आम्ही ओशाळावाणे हसत त्याला सांगतो आम्ही दत्तभक्त आहोत म्हणून. "अरे हो.. तू सांगीतले होतेस मागच्या वेळी. सॉरी विसरलोच. पण च्यायला बर आहे रे तुझे, गुरुवारी सुट्टी असल्या मुळे बाहेरची कामे तरी होतात. आम्हाला बाहेरची कामे कराची तर एक हाफ डे तरी वाया घालवायलाच लागतो." अशी मुक्ताफळे उधळत मित्र फोन ठेवतो. आणि आम्ही परत कामाचा ढिगारा उपसायला लागतो. पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 14:40
अरे बाबा अस्तित्व कोठे कोणास असते .. त्या सुगंधाला ही माहीत नाही .. त्याचे अस्तित्व काय आहे ? .. त्या वार्‍याला ही माहित नाही त्याचे अस्तित्व कोठे आहे .. पण मग हे आकाश काय आहे.. त्याच्या अस्तित्वाची पुसटशी रेघ म्हणुन का क्षितिजापाशी ते खाली वाकलेले आहे... का निसर्ग त्याचे अस्तित्व दाखवत आहे.... अश्या नेक प्रश्नांची शृंखला मनात घर करुन आहे... कधी वाटते.. मनाप्रमाणे वागावे.. वाट्टेलसे.. पण कधी वाटते.. आपण उलट निट वागत आहोत.. समाजातील ह्या चालीरीती.. नियम आपण पाळत आहोत.. मन उगाच भरकटलेले आहे.. कधीही कुठेही कसे ही गेले तर चालेले का ? प्रत्येक प्रश्न .. त्याचे अस्तित्व यांना उत्तर खरेच द्यावे का ? मनाचे अस्तित्व मान्य केले तरी मनाप्रमाणे वागले तर कदाचीत येथे आपण वेडे ही ठरु शकु .. आपण नकी काय विचार करत आहे हेच आता कळत नाही.. मनापासुन आपण आचरणाचे नियम पाळत आहोत .. की आचरण करताना मनापासुनच आपण थोडे लांब चालत आहोत .... --- २९/५/२०१५, १४:४०

गणेशा 29/05/2015 - 14:54
प्रश्नांच्या या पानगळीत... उत्तरे दवबिंदुंसम ओली.. हलकाच स्पर्श ओळखीचा... मग उरतात फक्त रिक्त जागा... उडुन गेली अशीच उत्तरे.. त्या प्रकाश किरणांसंगे.. जो दाखवे वाट जगाला.. त्यातच उत्तरे विलीन जाहली.. मग प्रश्न का उरले येथे.. का अस्तित्व ना मिटले काही.. का ओळखीच्या खाणाखुणा शोधतो जणु मी त्यावरी असेच सरली वर्षे .. असेच संपले सारे.. आयुष्याच्या शेवटाला तरी प्रश्न का उरतोच आहे ? ----- २९/५/२०१५, १४:५४

गणेशा 29/05/2015 - 14:59
आभाळ भरुन आलं की.. मला गच्च हुंदक्यांची आठवण येते.. का कोणास ठावुन .. तन भिजवणारा पाऊस माझं मन कदाचीत भ्हिजवत नाही.. कोरड्याच मनाने मी पाहतो मग .. भरुन आलेल ते आभाळ.. ते गच्च आभाळ.. कधीतरी मनाची कोरडीच वीज चमकते .. आणि उठतो आगडोंब मनात... हे मानाचे काहुर ... कसे थांबवावे .. काहीच कळत नाही... हलकेच नंतर पाहताना .. आभाळ निवाळलेलं असत मनात मात्र तेच आभाळ पुन्हा पुन्हा भरुन येत राहते .. बस्स असेच पुन्हा पुन्हा भरुन येते...

गणेशा 29/05/2015 - 15:08
शनिवारी ..रविवारी सगळी मित्र मंडळी.. अशीच फिरायला जातात... आमच्या गुरुवारच्या सुत्टीमध्ये कामे होतात म्हणुन म्हणे त्यांना कौतुकेच जास्त असतात.. डोंगरावरच्या मैनीची ओढ बाकीच्यांना असते.. काटेरी झुडपात तीची अवस्था मात्र आपल्यासारखीच असेल असे सहज वाटुन गेले... आज मी असाच काम करत होतो ... ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? " मी : का गं ? ती : अरे त्याच्याबरोबर ट्रेकिंगला चालले आहे शनिवार- रविवारी, तुला सुट्टी असते गुरुवारी मला खुप कामे आहेत नेमकी ऑफिसला .. तु करशील का ? मी.. हो .. मी (मनात) : दत्त गुरु हे बरे नव्हे .. हलकेच फुलपाखरु जवळ यावे.. आणि ते पुन्हा दूसर्याच्या कळपात शिरावे... हे फक्त तुमच्या ह्या वारामुळे .... तुम्ही तरी हे मनाचे दु:ख समजुन घेताल का ? --- २९/५/२०१५, १५:०८

In reply to by गणेशा

ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
च्या ऐवजी
ती : " दादा... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
असे हवे होते का? पैजारबुवा,

प्रश्र्णांची भिजकी पाने पाठीवर माझ्या पडता उरफोडून धावत सुटतो फिरुनी क्षणही न बघता गलितगात्र मग एक पळी मी कोसळता धरणी वरती देवाचा धावा करतो मी मज तारुन नेण्यासाठी, देवावर ठेवून भिस्त मी दबकत दबकत वळतो पाचोळा पाहून मागे मी क्षणभर मलाच हसतो, पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 15:46
@ पाचोळ्या: पाचोळ्या, मी पाहिलं तुला, डोंगरकडेवरुन तु स्वताला झोकुन देत होतास ... पण का ? कश्यासाठी ? मी असाच फिरत होतो ... तुला मी मुक्त वाटतो .. पण मी स्वैर भतकत असतो.. मलाही नाही कुठलीच दिशा... असेच अस्तित्व वेदणेचे मी पंखांवर घेवुन फिरतो डोंगरदरयामध्ये.. झाडातुन.. पानांतुन.. अनी मित्रा तुझ्या सोनेरी पाउलवाटेवरुन ही.. रोज सकाळी तुला वाटते.. कोण बरे ही असंख्य दवरुपी आसवे तुझ्या अंगावर ठेवुन जातो ... तो मीच आहे.. माझ्याच अस्तित्वाच्या त्या विखुरलेल्या खुणा आहेत.. तर हा , तुला पाहिले मी त्या दोंगरमाध्यावरती.. मी अलगद आलो .. तुला झेलण्यासाठी.. तु हळुच वार्‍यासंगे डुलत खाली चालला होता... मी आलो तुझ्यापाशी .. तर तु पुन्हा चिंब ओला झाला होता.... मग हातात हात घेवुनी आपण तेथेच विसावलो त्या तिथल्या झाडाखाली... असंख्य तुझ्या प्रश्नांना मी प्रश्नांचीच उत्तरे देत होतो .. आठवते ना तुला ? -------- २९/५/२०१५, १५:४५

साले आभाळही आता पहिल्या सारखे आपले राहिलेले नाही त्याच्या कडे बघताना आता मन पहिल्या सारखे प्रसन्न होत नाही उलट तिच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा मात्र ओल्या होतात आणि मग ढगाच्या एखाद्या तुकड्या मधे तिचा चेहरा शोधू लागतात तेवढ्यात सूर्यावर एखादा काळा कुळकुळीत ढग येतो तिच्या सोबतीने भिजलेल्या पहिल्या पावसाची आठवण करुन देतो त्या नंतर जोरदार वार्‍याची आणि कडाडणार्‍या विजेची पाळी असते क्षणभर चमकणार्‍या त्या उजेडामधे मला घट्ट बिलगलेली ती मला दिसते .... क्षणभरच....मग... अंगावरची शाल आणि कानटोपी आणखीनच घट्ट लपेटत मी उठतो आणि दारे खिडक्या बंद करुन डोक्यावरुन पांघरुण ओढून झोपतो नातवंडे म्हणतात म्हातारपण फार वाईट, अजोबांना आजकाल काहीच सहन होत नाही मी मनातच म्हणतो, खरच वाईट कारणजे सहन होत नाही ते कोणाला सांगताही येत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गणेशा 29/05/2015 - 16:11
असा शिल्लक रिप्लाय देणार नव्हतो .. पण ही कविता आता पर्यंतच्या सर्व रिप्लायमधील एक हिरा आहे, अत्यंत उत्कट .. निस्सिम ... याला उत्तर लिहिणे अवघड आहे.. सहज आठवले आधीचे सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी

In reply to by प्रसाद गोडबोले

त्या दुरच्या डोंगरातून, शांतता पसरत खाली येते आणि मी माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे, वेध घेत कशाचा ? त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे माझे विचार भविष्यात ( ?) तर परावर्तित होत नसतील ना ?

गणेशा 29/05/2015 - 16:08
तुझ आभाळ मला दे .. माझ आभाळ तुला .. झाकोळल ज्या हाताने सूर्याला तो जख्मी झालेला सुर्य ही मावळताना मला सोनेरी किनार परिधान करतो.. असंख्य तांबडे पिवळे रंग माझ्यावरती टाकतो ... बघ तु जेंव्हा माझ्याकडे पाहतो , तेंव्हा मी तुला अशीच दिसते का रे ... तांबडे कुकू कपाळावर ल्यालेली .. सोनेरी किनारेची साडी नेसलेली .. सांग ना .. अगद्दी तसीच का रे आहे मी अजुन तुझ्या डोळ्यात .. अन मग बरसतो पाऊस तुझ्या माझ्या डोळ्यात ... अंधुक होतात काळाचे पडते ... अन .. ते काळे क्षणही... फक्त क्षणभर ... मग ... तू पुन्हा सकाळी उठलेला असतो .. सूर्याच्या जखमा कधी कोणास दिसल्यात का ? बस्स .. माझे रुप पाहण्यासाठी तो मात्र त्याचे रक्त त्या जखमांमधुन संध्याकाळी असेच सांडवत असेल ... तुझ्यासारखेच ------ तुझी ती २९/५/२०१५, १६:०७

निखारा नेहमी दुसर्‍याच्या तळहातावरच तेजस्वी भासतो मग आपण अशा पुरुषाची देव म्हणुन भक्ती करु लागतो खरेतर नियती प्रत्येकालाच समान संधी देत असते पण त्यावेळी बहुतेकांना वाळूत तोंड खुपसायला आवडते पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 17:01
धन्यवाद... आता निघतो आहे, सोमवार-मंगळवारी पण सुट्टी टाकली आहे, तरी नेट गावाला चालल्यास येतो अधुन मधुन ... उद्या असेल शक्यतो थोडावेळ... पुन्हा लिहितो आल्यावर.. तो पर्यंत आनखिन रिप्लाय येवुद्या ... छान आहे सर्व .. पैजारबुवा खुप आभारी आहे तुमच्याशिवाय ही शृंखला जमलीच नसती असे वाटते.. तुमच्या आभाळ हे मनातील उत्कट भावनांचे चित्रण हे आजचे फलित ... सर्वांचे आभार ... आनखिन रिप्लाय येवोत ही इच्छा !

हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ...मन रमत नाही यात...त्या खळाळणार्या रेवेत दिसणारं ओथंबलेलं आभाळ परत कधी दिसणार म्हणुन वाहणारे डोळे नक्की कशाची चाहुल देत होते...तुझ्या गमनाची वार्ता होती त्या आकाशाला....म्हणुनच नुसते भरुन आले होते ते....पुर्ण प्रवासात नर्मदेपेक्षा रेवाच जवळची वाटली रे....तीचेच प्रतीरूप.तरीही वेगळे अस्तीत्व दाखवणारे...आपलेही असेच नाही का?तुला माझ्यातुन वगळले तर बाकी काय उरेल...पण उरलेय अजून..तुझ्याशिवायचे सगळे ऋतु अनुभवत...फक्त आता तीचा राैरव नाही..अन् तुझी गाजही..पण आभाळ गाभूळतंच रे त्याच्या काळात...फक्त अनुभवायला तु नसतोस सोबत....असतो एक तुकडा आभाळाचा...मी आपला समज करुन घेते की बघतोयस तु..त्या आभाळाच्या झरोक्यातून..

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

नर्मदा किंवा रेवा सतत प्रवाही असतात, कुणासाठी थांबत नाहीत कारण माहित आहे?.... वहात रहाणे महत्वाचे हे त्यांना माहीत आहे... सतत वहात रहाणे... जगात केवळ एकच गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे बदल...... काही कोटी वर्षांपूर्वी जेव्हा हा सूर्यही अस्तित्वात नव्हता तेव्हाही मी होतोच.... आजूबाजुला कितीही काहिही बदलले तरी..... कालही मी होतोच आजही मी आजही आहे आणि उद्याही असणारच आहे....निरंतर रहाणार आहे.... नर्मदाही मी आणि रेवाही मी, आभाळही मी आणि चारही़ ऋतू म्हणजेही मी, सूर्यही मी आणि काळही मीच. मी केवळ स्वतः कडे निरनिराळ्या कोनांमधून पहात राहिलो आणि हा खेळ बघता बघता वाढतच गेला..... कधी कधी मीच माझ्या या खेळात गुरफटून जातो...... आणि स्वतःच स्वतःला शोधत रहातो.... फार मजा येते असा स्वतःचा शोध घेताना..... पैजारबुवा,

मस्त रे गणेशा! या प्रकारच्या लेखनाचा हा विचारच भारी आहे. उस्फुर्त म्हणजे एकदम उस्फ़ुर्तच ! त्यासाराखे दुसरे भारी काहीही नाही. कारण त्याला कसलेही बंधन नाही. ना विषयाचे, ना वेळेचे, ना कोणाला आवडेल/नावडेल का? असल्या विचारांचे! मनात आले ते उतरवून गेलो. पुसले जाइल की राहील याची तमा न बाळगता! कोणाला आवडो नावडो ,स्वच्छंदि लिहिन मी कुणी जवळ थांबतय की नाही याची अर्थातच..तमा न बाळगता! एक ओळ होवो,वा एक पान भरो वाचलं गेलं तरी लिहिन , न गेलं तरीही!.. अगदी कुणी उघडून पाहिलं की नाही? याचीही तमा न बाळगता मग उस्फ़ूर्ततेचे उद्यान होइल, स्वच्छंदि बागडणाय्रा फ़ुलपाखरांसाठीचे! तिथे फ़ुलं असतील? ,नुसतीच पानं? ,की काटेहि??? .. निश्चितच! याचीही तमा न बाळगता!

गणेशा 31/05/2015 - 00:29
@ पैजार बुवा...@ भाग्यश्री प्रवाह .... आहे ना ... गती आहेच.. पण हे वर्तुळ ...त्याचा परिघ... मला ओलांडताच येत नाहिये.. त्या गाभुळलेल्या आठवणी अजुनही पिंगा घालतात सभोवताली... त्या प्रत्येक क्षणांचे ओरखडे .. हो ओरखडेच आणि ते अजुनही काळाच्या पडद्याआड लपुन हळुच माझ्याकडे पाहुन खुदकन हसतात ... माझ्या मनाच्या झरोक्यातुन पुन्हा ते काळाला छेदुन जुन्या दिवसात जातात.. आणि माझे मन असे असंख्य ओरखडे घेवुन पुन्हा खालमानेने गपचुप निघुन येते... परिघ ओलांडण्याची किंमत माझ्या मनाला माहितेय... मी मात्र अजुनही त्या परिघावरील एक बिंदु बनुन राहिले आहे.. जगासाठी मी त्याच वर्तुळावर रोजचेच प्रवाही आयुष्य जगते आहे... आणि तुझ्यासाठी... हा तुझ्यासाठी मी अजुनही तेथेच आहे... त्या जागीच... त्या परिघावरच तुझी अजुनही वाट पहाते आहे...

गणेशा 31/05/2015 - 00:57
काल रात्री पुन्हा पाऊस आला होता.. मी गच्चीत झोपलो होतो... त्याच्या त्या येण्याने झोप मोडली ... पण मग असे वाटले बरेच झाले... भरलेल्या आभाळाची ती मजा रात्रीत तरी मला निटशी घेता आली नसली तरी भटकण्याची एक चाहुल तेथे ही होती.. आजकाल असच होते... मनाच्या कप्प्यात असंख्य वादळे दाटलेली असतात.. आणि मग त्या करुन कहाण्यात आपण कधी ओढलो जातो ते कळतच नाही... पण त्या कप्प्यांमध्ये आत्ताचा स्पर्ष ही न झालेले कोवळे आभाळ ही बसु शकेल ना..? हा एक नविन कप्पा मला आता केलाच पाहिजे.. अगदी मनसोक्त भटकायच.. पाउस असाच झेलत पुढे चालत रहायचे.. निसर्ग..त्याचे विहंगम चित्रे पुन्हा पुन्हा या नव्या कप्प्यात साठवायचे... काय माहीत पुन्हा केंव्हा तरी हा कप्पा हळुच उघडला की एक निसर्गाचा देखावा कायम पहाता येइल .. पण या कप्प्यात फक्त मी आणि निसर्ग नकोय ... तु पण असशील का ग सोबत... मी.. तू आणि निसर्ग ....

गणेशा 01/06/2015 - 00:29
आज १ जुन, वडिलांचा वाढदिवस .... बारामतीला आलोय ... पाउस पडलाय आज... वातावरण शांत ... बर्याच गोष्टी आठवुन जातात... वाढदिवस तसा आम्ही कोणाचाच साजरा करत नसु.. पण घरात गोड - धोड केले जाई.. आज ही असाच बेत आहे... प्रत्येक वाढदिवशीच सारे काही आधीचे आठवते असे काही नाही...पण या दिवशी त्या आठवणींना थोडा भावनेचा स्पर्श जास्त असतो .. संस्काराची शिदोरी अशीच .. त्या पिढीकडुन आपल्याकडे आली... प्रामाणिक पणा, चिकाटी... सतत कार्यरत राहणे या गोष्टी त्यांच्याकडे पाहुनच आपण शिकत आलो... नाही असे नाही.. बर्याच गोष्टीत वेगळे विचार-- हेतु आहेच .. पण सारासार विचार करता ते जास्त बरोबर ... सुख हे पैश्याच्या श्रीमंतीवर नाही.. तर मनाच्या समाधानावर अवलंबुन असते... समाधान आणि सुख ह्या खरे तर वेगळ्या गोष्टी... आपल्या कडे जास्त चैनीच्या गोष्टी म्हणुन आपण सुखी.. पण त्यांच्याकडे आत्मिक समाधान जास्त ... दूसर्‍यांप्रति असणारा आदरयुक्त भाव... स्वता हालाअपेष्टा सोसुन घरातील प्रत्येकाला स्व-कर्तुत्ववान बनवण्याची धडफड .. निरपेक्ष प्रेम... स्वता पेक्षा इतरांच्या सुखा साठी आयुष्यामधील अनेक क्षण वेचले असल्याने ते जास्त समाधानी... बर्याच दा मनात येते .. माणसाने समाधानी असावे... सुख त्या समाधानाकडे आपोआप खेचले जातेच ... आपण उलटे करतो .. समाधाना पेक्षा सुखाकडे आपला कल जास्त असतो.. त्यामुळे कधीच आपले समाधान होत नाही.. आणि सुखाची एक एक पायरी आपण वाढवत जात राहतो ... नक्की आपण कुठल्या पायर्‍या चढतो आहे हे जेंव्हा जाणवते .. तेंव्हा समाधानाच्या सिमेरेषेपासुन आपण बरेच पुढे आलेलो असतो ... मग आपल्याला कळते आपला रस्ता चुकीचा आहे.. हे कळणे ही कदाचीत महत्वाचे..

In reply to by गणेशा

पळत्याच्या पाठी | लागू नये कधी| हाती लागे अंती| काही नाही|| शेजार्‍याच्या चार | अलिशान कार| आपली स्कूटर | खरी असे || शेजार्‍याची भार्या| दिसते ऐश्र्वर्या| तुझे रुप आर्या|अभिषेक नाही|| सुख समाधान |असती समान जेव्हा तुझे मन| स्थिर असे|| अंतरीचे ध्यान | पहावे करुन खरे समाधान| चित्ती वसे|| बुवा म्हणे राम| नामाचे भजन दुर करी भ्रम| अंतरीचा||

गणेशा 02/06/2015 - 00:04
पाऊस मला वाटते नेहमी तरुणच असावा... त्याला पाहिले की त्या सर्व मोहक आठवणी जाग्या होतात... त्या आठवणींप्रमाणे पावसालाही चिरतारुण्याचे वरदान मिळालेले असेल असेच वाटते.... वर्षातला पहिला पाउस मला पहिल्या प्रेमाप्रमाणेच भासतो...उत्कट ..निर्मळ..अतिव...हवाहवासा... त्या चिरतरुण आठवणींचे मेघ हा असाच दरवर्षी माझ्यावर बरसवत असतो... मग मला जयश्री आठवते... माझं पहिले प्रेम... निर्मळ ...निरागस... तासनतास मारलेल्या गप्पा....ती स्वप्ने ... त्या अनाभाका.... कॉलेजला एकत्र केलेला अभ्यास... तो हवाहवासा स्पर्श ... ते हळुच लाजणे... हवाहवासा वाटणारा हा चिरतरुण आठवणींचा काळ आणि पहिला पाऊस यांचे नातेच एकदम घट्ट... पहिल्या पावसानंतर पावसाच्या आणि आठवणींच्या अनेक सरी बरसतच असतात ... बेलगाम... स्वैर.. मुक्त... बेभान... या तारुण्याच्या कित्येक छटा या पावसात मला आठवतात.. तारुण्याच्या या स्वैर..मुक्त..बेभान आठवणी समोरुन झरकण पुढे सरकतात.. गच्च हिरव्या रानातुन जसे पाण्याचे असंख्य झरे वाहत असतात.. तसेच मनाच्या कड्यांवरुन अनेक विचार... अनेक गोष्टी अश्याच उड्या टाकत होत्या हे आठवते ... असंख्य झरे.. असंख्य ओल्या वाटा... गर्द धुक्यात फक्त आपण ..मुक्त.. स्वच्छ... शेवटी वळवाचा पाऊस येतो...अफाट...अचाट...असह्य..अचानक आलेला... तारुण्यातील या गर्द धुक्यातुन .. असंख्य वाटातुन आपला रस्ता आपल्याला त्यात शोधावाच लागतो ... नाहीतर एकदा हरवलो की आपलाच थांग लागणे कठीण... वळवाच्या पावसाचे ही असेच ... अचानक..अफाट... वळवाचा पाऊस असाच जीवनाचा हमरस्ता शोधुन देण्याचे काम करतो... गच्च हिरव्या रानातील असंख्य आपल्याशा वाटणार्या वाटा असह्य पणे आपल्याला सोडुन द्याव्या लागतात.. कधी कधी अचानक समोर काहीच दिसत नाही... तरीही घट्टपणे मनाशी आपली वाट पक्की करुन आपण चालत रहायचे बस्स...

रातराणी 02/06/2015 - 04:15
आज पाउस यावा असं वाटतंय! मरगळलेल्या मनाला त्यानं स्वच्छ धुऊन जावं, मुळूमुळू रडत येण्यापेक्षा आज गर्जना करीत यावं, सभ्यपणाची शाल आज त्यान घरीच ठेवून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! मळभाची काळी चादर आज त्यान फाडून यावं, प्रेमाची भीक देण्यापेक्षा, मुक्त हस्ताने उधळीत यावं, माझ्या उधारीचा हिशोब आज तरी विसरून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! तहानलेल्या सृष्टीला आज त्यान मिठीत घ्यावं, चिंब चिंब भिजवून तिला तृप्त तृप्त करावं, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आज त्यानच मिटवीत जावं!

भीमराव 02/06/2015 - 13:26
वारामागुन वार येतो अन तसाच निघुन जातो. हल्ली कशाचं काहीच वाटत नाही जे सोमवारचं ते च रवीवारचं. पाऊस येतो पडुन जातो, फुले फुलतात सायंकाळी कधीतरी मग नंतर माना मुरगाळुन तशीच पडुन राहतात. मी मात्र तसाच बसुन असतो. धुंदीत जगत असल्या सारखा. टेकडी वरून दीसनारा सुर्यास्त पाहुन किती दिवस झाले हे तर आठवत सुद्धा नाही. कधीतरी लहर येते पावसात भिजायची, मोठ्याने आरोळी ठोकायची. वाटतं वेडं वाकडं धावावं, पाण्यामधे डुंबावं. पन ही इच्छा सुद्धा मनात कुठेतरी जिरून जाते. कुठेतरी विटी दांडु अन लगोरी- गोट्या असले काहीतरी चालुच असते, मी मात्र मान ताठ करून निघुन येतो. पडनारा पाऊस तुषार, वर्षाव, शिडकावा,श्रावण धारा असलं काही का असेना मी त्याला चिकचीकच म्हणतो. खिडकीवर आलेलं पाखरू सुद्धा आताशा किलबील करने सोडुन कलकलाट करू लागलय तरी बरं मला अजुन माझाच त्रास होत नाही.

In reply to by भीमराव

विहिरीच्या काठावर उभा राहून आजकाल मी विहिरीत नूसते डोकावून बघतो पाण्यात पाय घालायला सुध्दा नको वाटते, काही वर्षांपूर्वी मी सहज विहीरीच्या तळाशी टाकलेले नाणे घेउन येत असे, माझा मुलगा मात्र बिनधास्त उडी मारुन विहिरीतून नाणे काढून आणतो, तो वर येई पर्यंत मी विहिरीचा काठ घट्ट धरुन, पाणी कधी हलतय त्याची वाट बघत पाण्याकडे एकटक पहात उभा असतो, अगदी माझे बाबा उभे असायचे तसाच, मी त्या वेळी बाबांना हसत असे, आणि आज माझा मुलगा आणि माझे बाबा दोघे मला हसतात, आजकाल माझे हे असे का होते? काही वर्षांपूर्वी अमर्यादीत थाळी देणार्‍या हॉटेल मधेच आवर्जून जाणारा मी, आजकाल अर्धा वडापाव टाकून देतो, जात नाही म्हणून, "टाकु नका मी खातो" असे म्हणताना माझा मुलगा दात दाखवत मला हसत असतो, आणि माझे बाबा कवळी सांभळत त्याला साथ देत असतात, आजकाल माझे हे असे का होते? रात्री उशीरा पर्यंत झोप येत नाही, डोक्यात सतत काहीतरी विचार येत असतात, त्या वेळी माझा मुलगा एकाग्रपणे अभ्यास करत बसलेला असतो, आणि बाबा मनलावून कोणता तरी जाडजुड ग्रंथ वाचत असतात, मी मात्र तळमळत इकडून तिकडे फेर्‍या मारत असतो, ते दोघे डोळे मिचकावून एकमेकांकडे बघत, मला हसत असतात, आजकाल माझे हे असे का होते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आजकाल माझे हे असे का होते? मनाच्या गाभार्‍यातुन उमटणारे गुढ प्रश्न आत आत दाबून टाकावेत मनमुक्त होऊन उधळून झुगारावेत असचं वाटत असतांना पायात एक अनामिक बेडी जाणवत राहते असं कां? --- साधी कागदी होडी बादलीतल्या पाण्यावर तरंगतांना बघून लेकीच्या डोळ्यात आलेली लकाकी बघून मन हरखुन जाते पुढच्या क्षणी तिच्या स्वप्नांची होडी तिराला लागेल की नाही या विचाराने जीव कासाविस होतो.. असं कां? ----- अल्याड मी असतो पल्याड स्वप्न असतात मध्ये भला मोठ्ठा जलाशय कधी मन उचल खातं म्हणतं चल मार उडी.. परत तेच मन हात धरुन मागे ओढत राहतं असं कां? -------------------------------------------- काय लिहीलय मी माहीत नाही.. सहज सुचल. बाकी धाग्यावर नजर ठेवून आहेचं. येईन परत.

रोजचा आला दिवस सरताना मागे काही ठसा ठेऊन जातो.कधी ठळक कधी पुसट..काही बोचलेले शब्द काही रेंगाळणारी गुपिते.तर कुठे मनाच्या कोपर्यात जपलेला हिरवा गारवा.काहीही मागे ठेवायचे नाही म्हणताना लेकीची गळामिठी प्रेमाचा ठसा ठेऊन जाते.आणि मी मात्र लांब दिसणारं धुसर चित्र जणू हातात आल्यासारखी नादावते...परत उगवणारा उद्या पायातल्या मणामणाच्या बेड्या संभाळत कोलु पिसु लागतो.अखंड चालणारा हा अविरत घाणा.सुखाचे वंगण अन दुःखाची धार लावुन पळत राहतो.दिसामाजी कापलेले अंतर बघु गेलो तर मागे उरतो माझ्याच पायानी बनलेल्या वतृळाचा ठसा....

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

पैसा 10/06/2015 - 21:44
प्रवास सुरू झाला तेव्हा कुठे जायचंय हे माहीत नव्हतं, किती वेळ लागेल हेही माहीत नव्हतं. अर्धा रस्ता संपला तरी अजून कुठे जायचं हे माहीत नाही अन किती चालायचं हेही माहीत नाही. पावलं तीच, मीही तीच, रस्ताही तोच. सुरुवात झाली तेव्हा लहानशी पायवाट होती. बाजूंनी फुलं होती सगळी. आणि डोक्यावर गर्द सावली. हळूहळू झाडी विरळ झाली. फुलं सुकली आणि डोक्यावर ऊन भाजू लागलं. तरी वाट सरता सरेना. कधीतरी वार्‍याची झुळूक ह़ळूच येऊन गालावर रेंगाळून जाते. माथ्यावर ढग दुरून जराशी सावली देतो अन कधीतरी एखादी पावसाची सरही. आताशा सावलीही पायातळी आली आहे. सुरुवात कशी होती तेही आज धूसर चित्रासारखं आठवतं आहे. शेवट कसा असेल माहीत नाही. आज, आता इथे आहे एवढंच खरं. पण एकच माहीत आहे की मला चालायचं आहे. बाकी सगळे निघून गेले तिथे जाण्यासाठी. पाय साथ देतील तोपर्यंत.

In reply to by पैसा

गणेशा 11/06/2015 - 12:25
ती ज्वारीची शेते .... पाणांवर दवबिंदू ल्यालेली शहारलेली कोवळी पाने... गावाचा तो शेतावरला बांध... काळीकुट्ट जमीन.. आणि त्या काळ्याश्या ठिसुळ ढेकळाला हळुवार पणे भिजवत पुढे चाललेले पाणी.... ती दगडी भिंतीची ओबढ शाळा.... सुंदर झाडलेले आणि सभोवताली अशोकाची उंचच उंच झाडे असलेले पटांगण ... ती पळसाकडील विहीर... तासनतास मारलेल्या गप्पा.. एकत्र केलेला अभ्यास.... ती अनामिक हुरहुर .... सुगंधाचे क्षण.. फुलांचे सांजेला मोहक लाजणे... तो चंद्र .... तो अनामिक दूरावा... ते सैल झालेले मायेचे पाश... त्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा.... ते ओठांआड थांबलेले शब्द .. ते हिरव्या बांगड्यांचे लेणे घेतलेले पण त्या क्षणी अतिव ओढीने थरथरणारे हात.... तो अंगणातील पारिजात... रात्री पडलेला फुलांचा सुगंधीत सडा... ती पहिल्यांदाच न उजाडू वाटणारी सुरेख ..गुलाबी सकाळ... ते इवलेसे टोपडे... इवलेसे स्वेटर... मऊ मनाला आनंदित करणारा स्पर्श... जीवनाचा सर्वोच्च आनंदी क्षण.... ती सकाळची गडबड ... ते कुतुहल.. दप्तराच्या ओझ्यांची चिंता... बंद केलेला टीव्ही ... ती काळजीळतली परिक्षा... हे अर्धे आयुष्य सरले आहे आता.. आयुष्याच्या ह्या एक एका फ्रेम ने मन अगदी काठोकाठ भरुन गेले आहे... पुढच्या प्रवासाची एक अनाम ओढ ... इवल्याशा काळजाच्या तुकड्यात गुंतलेला श्वास... आणि श्वासागणिक वाहिलेले वाहिलेले हे आयुष्य ..पुन्हा तो अंगणातला पारिजात...........

गणेशा 03/06/2015 - 12:55
@मिका.. कागदी होडी वरुन आठवले... गावाकडे अंगणात... पावसात.. पाणीच पाणी साठायचे... अश्या वेळेस क्रिकेट खेळता येत नव्हते म्हणुन मन नाराज होत असे... आणि मग आम्ही मोर्चा वळवत असु कागदी होड्या बनवण्याकडे... आम्ही म्हणजे मी आणि तायडी(ताई) ... तायडी या एकाच शब्दात कीती माया साठवलेली असते ना... या शब्दाच्या उच्चाराने पण मन प्रसन्न झाले... हा..तर या होड्या बनवायचो मी.. तीला पण मीच बनवुन द्यायचो .. तीला बनवायला येत नसत.. मग तासन तास त्या पाण्यात आम्ही खेळत असु..कोणाची होडी लांब जाते त्यावर पैजा लावत असु.. कसलीच चिंता नसायची तेंव्हा... कपडे खराब होण्याची.. अभ्यासाची... भविष्याची.. कसलीच नाही.. कीती मस्त दिवस होते ते.... आणि आता त्या पावसाची आपण वाट पाहत आहे.. पण त्या कागदी होड्यांप्रमाणे त्या बालपणीच्या आठवणींचे आपण काहीच करणार नाही का ? मला वाटते.. लेकीच्या रुपाने ते दिवस पुन्हा आपल्याकडे येवु पाहत आहेत.. तर मग तीच्या सोबत पुन्हा तेच दिवस जगायला आपण सुरुवात केली पाहिजे असे वाटते... कसलीच चिंता न करता.. म्हणुन मी पण आता पावसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहे... सहज मला आवडणारे गाणे आठवले यावरुन... एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी

नाखु 03/06/2015 - 14:15
खरच लहानाबरोबर लहान होणं सोपं असतं का? नसतंच कारण ज्या क्षणी तुम्ही विचार करता की मी लहान होतो आहे तेव्हांच तुमचं बाल्य हरवलेलं असतं. बाल्य कसे पाहिजे मित्रांअम्ध्ये दिलखुलास शेर्‍याला, हजरजबाबीपणाला आपोआप टाळी देणारा-घेणारा हात जसा उस्फुर्त आतून असतो अगदी तसाच. एकदा का तुम्ही बाल्यपणात आपोआप घुसलात की त्या नजरेने जग सुंदर दिसतं अगदी पुस्तकातल्या चित्रा सारखं स्वच्छ, निर्मळ. थोडी कट्टी थोडी बट्टी ,खोटा खोटा स्वयंपाक भातुअकलीच्या भांडयातून दिलेले बेदाणे-शेंगदाणे आपण फार मोठा चविष्ट पदार्थ खातोय असा भाव केल्याबरोबर डोळ्यांत ओसंडणारा आनंद, मध्ये लुड्बुड केली तर लटका राग हे खाली बसून बरोबरीने अनुभवायची गंमत आहे. कपड्यांची धुळीअगोदर, मोठेपणाची वस्त्रे झटकली तरच मस्ट. मी एका वर्षी दिवाळी किल्ल्यासाठी लेकीला आणि लेकाला माती-चिखलात हात घालून किल्ल्यासाठी मदत घेतली तेव्हा किल्ला कसा झालाय त्याहीपेक्षा ही नदी/हा डोंगर मी केलाय याचेच त्या दोघांना खूप अप्रूप होते.(अजून ही चित्रे माळावर आहेत) ह्या दिवाळीत काढावीच बाहेर, आपण का अड्वायच आपल्यातल्या !!!! ताईदादाचा बापूस नाखु

गणेशा 03/06/2015 - 15:49
आपल्या मनातील आपले विचार.. सहजपणे जेंव्हा असे बाहेर येवु लागतील.. आपल्याच लिखानातुन एक एक रुप घेवु लागतील, तेंव्हा त्यांना आपल्याला तठस्थपणे पाहता येवु शकेल... मग कुठल्या विचारांचे रुप आपल्याला बदलायचे.. कुठले चित्र कसे निट करायचे.. हे आपल्यालाच समजेल... आपणच आपल्या विचारांचे चित्रकार.. मुर्तीकार... कुठला टाका कुठे टाकायचा हे ठरवणारे ही आपण .. आणि कुठला रंग कुठे भरला की उठुन दिसेल हे ठरवणारे ही आपण.. निसर्ग ही असाच असेल नाही ?. प्रत्येक वेळेस एक वेगळीच निर्मिती साकारण्याचे सामर्थ्य ही त्याच्यात असेच आले असेल... स्वताच्याच निर्मितीस तठस्थपणे पाहणे ही पण एक कलाच...

हे सुरांनो चंद्र व्हा! काय रचना आहे... विरहणी म्हणजे काय ते हे गाणं ऐकून कळते. परीपूर्ण रचना.. अप्रतिम संगीत आणि अभिषेकीवुबा तर बिनतोड... एकाकी दुर माळरानावर ती उभी आहे. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आहे, आणि तिच्या मनातून उमटलेल्या वेदनेतून या रचनेने जन्म घेतलाय. पण वेदना कशी पोहचवणार? तर ती सुरांनाच सांगते, तुम्हीच चंद्र व्हा आणि चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा. काय कल्पना आहे ना? जीवघेणा प्रकार आहे. तसाच काहीतरी विचार डोक्यात ठेवून हे लिखाणः ---------------------- दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- वाट भरकटून अंधारात चाचपडत चाचपडत त्याच्याकडे पोहचण्याचा निष्फळ प्रयत्न माझा फसलाच परत एकदा --- वेदनेला शब्द सापडतात कधी कधी नि:शब्द तडफड एका क्षणात आकाश व्हावे सगळी वेदना कृष्ण मेघात भरावी आणि बरसावे... रिक्त होईस्तोवर --- आज परत एकदा पौर्णिमा आली आता अधीरता अगतिकता झाली बेचैनी रिक्ततेकडे झुकली अन् वेदना जिवावरचे दुखणे झाले तरीही दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा....

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम. अभिशेकीबुवांच्या गाण्याचा प्रश्र्णच नाही, त्याला काही तोडच नाही, पण हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली ती मुग्धा वैशंपायन https://www.youtube.com/watch?v=1qFJtCMqcK0 पैजारबुवा,

मिका, या झाल्या एका विरहिणीच्या व्यथा पण पुरुषांचे त्यांची प्रेयसी, पत्नी कुठे गावाला गेल्यावर काय कमी हाल होतात का ? हे बघा काय म्हणतो पास्तरनाक..... दरवाजातून आत बघितले माझेच घर मला ओळखू येईना अचानक तिच्या जाण्याने घराचा आणि मनाचा कसा गोंधळ उडाला आहे भयानक. ठणकणार्‍या वेदना आणि डोळ्यांतील अश्रू समजून नाही देत या अवस्था झालेल्या जखमा कशा मोजता येतील आणि कशाने ? मनात एक तीव्र कळ ऊठली. मी जागा होतो का स्वप्नात ? का माझ्या डोळ्यातील पाण्याने माझ्या बुद्धीवर मात केली आहे ? धुरकटलेल्या काचांमुळे का डोळ्यांतील पाण्याने हे जग मला पार तुटलेले वाटते आहे. मनोवेदनेत माझ्या का दिसत आहेत मला राक्षसी लाटा आणि तुटलेली घरे ? ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........

In reply to by जयंत कुलकर्णी

त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले
व्वाह...

In reply to by जयंत कुलकर्णी

ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. सुरेख. -दिलीप बिरुटे

प्यारे१ 03/06/2015 - 18:14
शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे अनिमिष नेत्रांनी बघत फ़क्त आस्वाद घेत राहावं.... शांतपणं मनाच्या खोल तलाशयात या रत्नाना साठवत राहावं... सरस्वतीच्या या पुत्रांना नतमस्तक होत निव्वळ न्याहाळत राहावं... एकेका मुक्तकासाठी/ कवितेसाठी तुम्हाला एक एक पार्टी लागू! मिपा वरचा अप्रतिमोत्तम वरचा क्रमांक असलेला एक धागा

गणेशा 03/06/2015 - 18:55
@ मिका आणि जयंत जी. एकोळी रिप्लाय ह्या धाग्यावर खरे तर द्यायचे नाही ठरवलेले आहे, पण तुम्हा दोघांच्या या अतिउच्च विचार/लिखाना ला सलाम तर करावा लागतोच .... तरीही जाता सुचेल ते लिहितोच. इतरांना मात्र एक विनंती एकोळी रिप्लाय शक्यतो नको.. वा.. छान ही नको.. त्या उलट शब्दांच्या थव्याने तुम्ही येथे या.. मनसोक्त जे वाट्टेल ते लिहा.. त्याची खरी गरज आणि एकदम धागा वाचताना ही मग मध्येच थांबल्या सारखे होणार नाही.. फक्त रिप्लाय किती पेक्षा किती मुक्तके/कविता/चित्रे ते महत्वाचे.. उत्तर लिहितो असेच...

गणेशा 03/06/2015 - 19:48
@ मिका @ जयंत जी... तिचे नसणे माझ्या मनाला मान्यच नसते कधी... ती गेली त्या दिवशी तिने आनंदाने अंगणात रांगोळी काढली होती...ठिपक्या ठिपक्यांचे कासव तीला यायचे.. तेव्हडेच यायचे... ती गेली आणि त्या रांगोळीचे ठिपके धुसर झाले... आज पर्यंत पुन्हा अंगणाला रांगोळीचा स्पर्श झाला नाही.. तिचे मंगल पावित्र्य अंगणाला पुन्हा कधी मिळाले नाही.. ही गत फक्त अंगणाची.. माझ्या आयुष्याचे वेगळे असे काय झाले ? अंधुक भग्न घराच्या कडेकपारीतुन अजुनही तो ओळखीचा सूर ऐकु येतो..... ओठांच्या घाटावर.. त्या शब्दसावल्या अजुनही विखुरलेल्या आहेत .. तश्याच ... आवाज न करता... मळकट पायवाटेवर... ते ओळखीच वारुळ अजुन तसेच आहे... दु:ख पारावर अजुनही तसेच घट्ट बसुन आहे... शेताच्या बांधावर भासांची टोळी अशीच अचानक येते अन मग फाटक्या माझ्या झोळीतुनही त्या टपोर्‍या दाण्यांना अलगद वेचुन न्हेते.. आजकाल हे असेच होते.. पाटाचे पाणी पण हबकुन वाहते... काल वटपोर्णिमा होती.. ते वडाचे झाड मात्र वाळलेले होते.. नाही.. दोरा होता गुंडाळलेला.. करकच्च... पण त्याच्या पारंब्याला माझी स्वप्न लगडलेली होती.. आणि निजले होते माझे विचारगाव त्या तिथेच झाडाखाली...

रातराणी 04/06/2015 - 01:30
कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि वार्याबरोबर उडून गेलेला तिचा सुगंध, आता पुन्हा ती बहरेल का? मोडून पडलेला विश्वास आणि बाहेरून आत शिरू पाहणाऱ्या वादळांची धिटाई, आता पुन्हा ती जळेल का? रुतलेली अदृश्य जखम आणि श्वासांचही ओझ झाल्यासारखा तुझा अनोळखी अबोला, आता पुन्हा ती हसेल का? तू गाशील विरहाचे गाणे आणि ती सोडवत बसेल आठवणींचा गुंता, खर सांगा, आता पुन्हा ती जगेल का? ( हे अगदीच काहीतरी आहे पण आमच्या हाताला खाज फार!)

भीमराव 04/06/2015 - 11:17
कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या भावना यावर सहजतेन हळुवार फुंकर घालनारी तु पहील्याच भेटीमधे मनाला अलगद स्पर्ष करून गेली नसतीस तर मला साहजिकच नवल वाटलं असतं. दररोज तुझ्या मनाचे ऊलगडनारे नवे नवे पदर मला कळत नकळत तुझ्या जवळ खेचत होते. तुझा अल्लडपना तर खुप गोड वाटायचा.मी इतका गुंतत चाललो होतो की तुझा थोडासा विरह देखिल मला खुप अस्वस्थ करून जायचा. तु हाती न लागनारे मृगजळ कधीच न्हवती, मात्र तरीही सहज साद्ध्य ही न्हवती. आयुष्याचं प्रतयेक वळन आजही तुझी साथ मागतं. निवांत अशा एकांतामधे तर मनाला खोल खोल जखमा होऊन जातात. कधी कधी तर तुझ्या आठवणीने इतका वेडा होऊन जातो, माझं मलाच भान रात नाही. वाटलेलं तुझी आठवण मनाला मोरपीसासारखी सुखावत राहील, मऊ पीसाला इतकी धार येईल हे मात्र स्वप्नातही वाटलं न्हवतं

नाखु 04/06/2015 - 12:57
तुमच्या या कवीतेने जखम ओली झाली
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........
जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी.. तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको. आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो. आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला. अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात. एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही. शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे. काकाश्रींचा पंखा नाखुस

गणेशा 04/06/2015 - 15:27
@ बाबुदादा... हळव्या या वातावरणाला थोडेशे चेंज करावे म्हणतो .... ---------------- तु आयुष्यात आली.. अन आनंदाचे उधान आयुष्यात आले... लवासाला पहिल्यांदा भेटलो आपण..लग्ना अगोदर .. साखरपुड्यानंतर .. जाताना मुठा नदी किती सुंदर दिसत होतीना तिकडे... तिथेच विसावलो त्या छोट्ट्याशा ब्रिजवर आपण ... पहिल्यांदाच लाजत झालेला तो स्पर्श .. अह्हा हा किती सुंदर.. मोरपिस अंगावरुन फिरुन जावे तसाच... मग आपण पुढे फिरत गेलो.. निसर्ग आपल्या दोघांना आवडतो.. त्या निसर्गात मनमुराद फिरणे पण .... पण माझा एक रुसवा अजुनही आहे, साखरपुडा आणि लग्नात इतके ४-५ महिन्यांचे अंतर असताना ही आपण फक्त एकदाच भेटु शकलो ... तु आता म्हणत असते आपण पुन्हा लवासा ला जावू .. गेल्यावर्षी खुप हट्ट केला.. पण मी न्हेले नव्हते.. या वर्षी पावसात..आपण जाउया नक्की... खरे सांगु मला तुझ्याशिवाय असे फिरायला जायला आवडत नाही शक्यतो ... १० जून माझा वाढदिवस असतो .. दरवर्षी याच्या आसपासच्या सुट्टीमध्ये आपण फिरायला जातो.. या वर्षी पण त्याच्या आसपास आपण जावु फिरायला... काळ किती फास्ट पळतोय ना.. अस वाटत आहे.. हा काळ असाच थांबावा या क्षणांमध्येच... तु मला शर्ट घेतला या वर्षी पण .. तु नेहमीच वाढदिवसा साठी मला शर्ट घेते.. मला आवडते ते खुप.. यावेळेस चा व्हाईट शर्ट .. तो ही कॅज्युअल pepe jeamo चा.. मस्त आहे एकदम... मला खरेच छान वाटले.. पण तुला असे वाटते.. तु काहीच जास्त घेतले नाही.. कारण तुझ्या वाढदिवसाला तुला २ ड्रेस हवे असताना मी तुला ४ गिफ्ट दिले होते... घरी सांगताना पण आपण १च घेतला असे सांगितले होते... किती दिवस झाले ना आपण पिक्चर ला एकत्र गेलो नाही... आता पर्यंत पिक्चर ला जाताना आपले मात्र लक खुप खराब आहे... आपण लग्ना नंतर पाहिलेला पिक्चर होता डर्टी पिक्चर .. काय करणाअर दोनच ऑप्शन होते... एक डर्टी आणि दुसरा विकी डोनर ... मग डर्टी निवडला.. लग्नाच्या गडबडीत नक्की तो कशावर आहे ते ही माहिती नव्हते... नंतर मात्र धमाल आली मराठी किती सुरेख चित्रपट पाहिले आपण ना.. त्यातल्या त्यात शाळा आणि दुनियादारी मस्तच होते... ती पुस्तके मी तुला वाचायला दिली होती.. तुला वाचनाची जास्त आवड नाही.. पण ही आणि या बरोबर अनेक पुस्तके तु, मी म्हणालो म्हणुन वाचली... आता लवकरच आपण नाटकाला ही जात जावु .. मला नाटके आवडतात.. तु अजुन तशी नाटके पाहिली नाहीसच .. तुला बाहेरचे खायला आवडते.. पाणीपुरी वडापाव भेळ आणि मासे... मला तर खायला आवडतेच त्यामुळे फिरणे आण खाणे होत रहातेच.. पण तु मागच्या काही महिन्यांअगोदर ठरवले आहे, बाहेरचा खर्च कमी.. त्यामुळे आता बरीच मुरड बसली आहे या गोष्टींना.. तसे बरे आहे.. पण तुझी पाणीपुरी मात्र मध्ये मध्ये डोके वर काढतेच आहे...

गणेशा 04/06/2015 - 16:20
मागिल काही दिवसांअगोदर, जवळच झाडावर चूऊताईचे घेरटे पाहिले.... चिऊ आपल्या इवल्याश्या पिल्लांना खाऊ देत होती.... त्या पिल्लांची तिला पाहण्याची ओढच लागली असेल त्याच्या अगोदर.. बिच्चारी चिऊ ताई पण.. कधी एकदा खाऊ घरात बाळांसाठी न्हेते असे वाटुन पटकन माघारी फिरली असेल.. मागच्या आठवड्यात ती पिल्ले हळुच आपल्या आईकडे बघुन घरट्यातुन टुनकन बाहेर आली होती.. जास्त लांब नाही गेली पण थोडे पंखांना बळ देत असल्यासारखे पाहिले त्यांनी .. मग चिऊताईने पुन्हा त्यांना घरट्यात जाण्यास सांगितले नव्हे घरट्यात लोटलेच जणु ... असेच त्यांची शाळाच जणु अजुन चालली होती.. फांदिच्या टोकावर बसुन ती पिल्ले धडपडत का होईना .. हळु हळु पंखात बळ साठवत होती.. चिऊताई आता मास्तरीन म्हणुन पण एकदम छान दिसत होती.. आज ती पिल्ले थोडे दूर उडुन गेली ... पंखात आकाश सामावण्याचा त्यांच्या इरादा होता हे नक्की... बालगीत झाडावरती घरटे चिऊताईचे ... पानांआड दडलेले.. .... घास भरवती पिल्लांना आपल्याच इवल्या चोचीने पंखाना बळ देती ती छडी हातात घेवुनी ... आकाशा ला मिठीत घेवू ही प्रार्थना तिच्या शाळेची... एक दिवस आला असा .. परिक्षा संपली पटकन चिऊताईची शाळा संपली पिल्ले उडाली भुर्रकन

मनीषा 04/06/2015 - 18:08
उपक्रम चांगला आहे. असं लिहून ठेवलेलं चांगलंअसतं. ते परत वाचताना काहीवेळा नवल वाटतं. कधीतरी असही काही आपल्या मनात आलं होतं म्हणून .

In reply to by मनीषा

मनीषा 04/06/2015 - 20:59
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु? ........आणि काय सांगु? नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच आणि आतल्या प्रकाशावर पडू दिली नाही अंधाराची छाया कधी म्हणूनच तर आहेत त्या माझ्या जीवाच्या जीवलग निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात जगाच्या सा-या तापांपासून दूर कधीतरी वाटतं मलाही पहावं .... काय चाललं आहे बाहेर? मग उघडते मी एक छोटासा झरोका बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता त्यातुनच येतात मग जुन्या नव्या आठवणी काही सुखावणा-या .... तर .. काही रडवणा-या त्यांच्याशी बोलत राहते मी कधी ---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही बाहेरचा कोलाहल मला अगदी ----- नवा नवा वाटतो त्यात एखादा ओळखीचा सूरही असतोच त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात ------ मग सगळे चेहरे एकमेकात मिसळतात अन त्यांचा बनतो एकच चेहरा त-हेत-हेच्या भाव-भावनांचे आविष्कार दाखवणारा त्यातून मग अनेक रंग विखूरतात त्यातले काही मला भावतात देखील ... मग मी त्या रंगांना निरखून पाहते त्यांना एक आगळा वेगळा गंध असतो .... तो गंध माझ्या कणाकणात भिनतो मनावर एक अनोखी धुंदी चढते ---- त्या गंधांची ........ त्या रंगांची मग त्या चार भिंतीतलं माझं एकटेपण जणू नाहीसं होतं अनेक भावनांचे रंग... त्यातून तयार होते एक अद्भूत नक्षी कशी माहित नाही ... पण मला ती आवडते त्या नक्षीच्या बिलोरी काचा सा-या घरभर पसरतात त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात माझं मन मोहून जातं त्या कवडशांना हातात घ्यावं त्यांना जवळून पहावं ... असं वाटतं ...... पण त्यांना हातात घ्यायला मी जाते .... तशी ते माझ्यापासून लांब जातात असा खेळ ---------- कितीतरी वेळ चालतो शेवटी मी थकून जाते एका जागी बसून त्या कवडशांकडे पहात राहते हळूहळू उन, आपली पावलं मागे घ्यायला लागतं तसे सारे कवडसे सुद्धा त्याच्या मागे धावतात मग तिथे काहीच रहात नाही दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो शांत ..... सुस्थीर .... अश्वासक....... मनाला दिलासा देणारा काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा माझं मन शांत होतं पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र हरवूनच जातात माझ्या मनात राहतात मग फक्त त्यांच्या आठवणी त्या आठवणी मी माझ्या मनात जपून ठेवते आता त्या आठवणींना माझ्याकडे यण्यासाठी झरोक्याची आवश्यकता नसते त्या चार भिंतींच्या अवकाशात त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या सोबती असतात ..

गणेशा 05/06/2015 - 00:47
आठवणींचा बिलोरी आरसा आपल्याकडे असला की कधी पण आपण त्या आरश्यातुन काळाच्या पडद्याला छेद देत त्यावेळेसचे क्षण पुन्हा अनुभवत असतो ... मन आपल्याच भिंतींना झुगारुन कधी मुक्त होऊन जाते ते ही कळत नाही ... आठवणी त्या सुखाच्या बालपणीच्या ... भातुकलीच्या ... बाहुलीच्या केसांसारख्या.. मखमली सोनेरी रंगांच्या... नववारीतील आज्जीच्या गोष्टीतल्या परीसारख्या... अंगणातल्या अबोलीच्या. आठवणी त्या सुखाच्या ... पहिल्या रिकाम्या दप्तराच्या... पाटीवरील पहिल्या अक्षराच्या... आठवणी त्या सुखाच्या.... बालसंवगड्यांशी खेळण्याचा... माळलेल्या गजर्‍याच्या आठवणी त्या सुखाच्या... पाहिलेल्या नजरेच्या... मुक्या स्पर्श भावनांच्या... आठवणी त्या सप्तपदीच्या प्रितीतल्या गोडव्याच्या तुझ्या माझ्या गोड क्षणांच्या आठवणी त्या सुखाच्या ... अवांतर.. ५ मिनिटात काय लिहिले हे पुन्हा न वाचताच देत आहे... लिहायला गेलो गद्य आणि झाले असेच काहितरी पद्य..

गणेशा 05/06/2015 - 12:29
उद्या... शिवराज्यभिषेक दिन... सगळे मित्र रायगडाची वाटा चालत आहेत.. मी मात्र आज येथेच ऑफिसात .. आज चतुर्थी पण आहे.. सकाळी पाऊस पडला .. वातावारण खुप मस्त आहे... पण पावसामुळे बाळाला घेवुन या चतुर्थीला मोरया गोसावी मंदिरात सकाळी सकाळी जाता आले नाही... संध्याकाळी जाईन पण .. बाळाला बप्पा खुप आवडतो .... मंदिरात गेल्याने छान वाटतेच.. पण महिन्यातुन एकदा सकाळी एकत्र बाहेर पडायला मिळते ते पण खुप छान ... आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्वांसाठी टाईम काढलाच पाहिजे असे वाटते.. मग ते मित्र असुद्या.. फॅमिली असुद्या नाहीतर पर्सनल गोष्ट असुद्या .... मुलांना तर टाईम दिलाच पाहिजे.. प्रत्येक पालकाने हे केलेच पाहिजे.. बाळ मोठे झाल्यावर तर आठवड्यातला एक दिवस मी बाळासाठी रीझर्व ठेवणार आहे.. मग तो शनिवार असेल किंवा रविवार.. पण फक्त बाळाबरोबर.. वाटल्यास बाळाला माझ्यासोबत फिरण्याच्या सवयी लावेल ... बाप झाल्यावर किती गोष्टी बदलतात ना... पहिल्यांदा दुकानात गेलो की मी माझ्या वस्तुंबद्दल विचार करायचो.. मस्त आवडेल ते घ्यायचो .. आजकाल असे होत नाही.. पैसे आले की बाळाला काय घ्यावे असे वाटते.. तीला एखादी फ्रॉक लहान पडत असली की दूसरी आपण बघुन ठेवलेली आता घेवुया असे वाटते... खेळणी.. गाडी..इतकेच काय सायकल ची पण तयारी आताच झाली आहे... खरेच बाप हा मुलगी झाल्यावर पुर्ण बदलतो .. बदलतात त्याचे विचार.. आचार... हे मला आता कळते आहे... जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा माझे वडील तायडी ला बिंधास्त ट्रीप ला जावुन द्यायचे.. तिचे खुप लाड करायचे.. माझ्या पेक्षा.. तेंव्हा मी आईला बोलायचो ते.. आई माझी होती ना.. तायडीचे पप्पा.. पण आज कळते आहे.. हा नैसर्गिक बंध आहे... कदाचीत बाप झाल्यावर आपल्या बापाच्या भावना आपल्याला जास्त कळत असतील .. असेच असेल...

मोहनराव 05/06/2015 - 15:37
बरोबर आहे तुमचे. आजकाल ऑफिसमधुन घरी जाण्याची एक अनामिक ओढ असते. ते इवलेइवले हात हातात घेऊन एक गालाचा मुका घेतला व बाळाचे आपल्याला बघुन खुश होणे पाहिलं की दिवसभराचा थकवा कुठे निघुन जातो कळतच नाही. जगातल्या कसल्याही दुखा:चा लवलेश नाही.. चिंता नाही. असे आयुष्य परत जगता आले तर किती मजा येईल असे वाटते. ये दौलतभी लेलो ये शोहरतभी लेलो... गझल आपसुकच गुणगुणायला लागतो. मध्ये ही बाळाला घेऊन गावी गेलेली महिनाभर, तर मन कशातही रमायचे नाही. चातकासारखी बाळाची वाट पाहिली. परत आली तेव्हा स्वारी ओळखायला तयार नाही :( पण लगेच एक दिवसात परत माझ्याकडे छकुली येऊ लागली. मी विचार केला, आत्ताच आपले हे हाल.. अजुन काही वर्षांनी मुलगी मोठी होऊन सासरी जाऊ लागली तर आपले काय होणार. तेव्हा एका मुलीच्या बापाचे दु:ख काय असते याची कल्पना येऊ लागली.

साधुची झोळी का पडली? नदि काठच्या एका गर्द झाडी मधे बसून, तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करत होता, तिकडुन तो कोणाला सहज दिसत नव्हता, पण तो मात्र बरेच काही पाहू शकत होता, नुकताच वयाच्या सोळाव्या वर्षी विरक्त होउन, त्याने संन्यास घेतला होता, आणि भगवंताचा शोध घेत, दिवसरात्र तो रानोमाळ भटकत होता, अचानक कसल्यातरी आवाजाने, त्याची समाधी भंग पावली, एक लावण्यवती, रमत गमत पाण्याला जाताना, त्याला दिसली, हरणाची चपळाई आणि मोराचा डौल होता, तिच्या पावलो पावली जणु केतकीच्या बना मधून, एखादी नागीण सळाळत निघाली, त्या वेळी त्या दोघांशीवाय, तिथे तिसरे कोणीच नव्हते, तो आपल्याला बघतो आहे, याचे तिला जरा देखील भान नव्हते, तिच्या हातात एक आणि एक कमरेवर एक असे दोन घडे होते, आणि मोकळे लांबसडक केस तिच्या कमरेवरती रुळत होते, इकडे साधूबुवांच्या हृदयाची धडधड मात्र, जोरदार वाढली होती, आता त्या जागेवरुन उठायची सुध्दा, त्यांच्या मधे हिम्मत नव्हती डोळ्यांची पापणी मिटावी, असे ठरवून देखील, ती बंद होत नव्हती दूसरीकडे आपल्या चंचल, कमकुवत मनाची, त्यांना लाज वाटत होती इकडे तिकडे सावध नजर टाकत, क्षणार्धात ती निर्वस्त्र झाली, मासोळी सारखी सुळकन, नदिच्या पाण्यात तिने उडी मारली, मनसोक्त डुंबुन झाल्यावर, ती तशीच ओलेती बाहेर निघाली, अनिमिष नेत्रांनी हे बघणार्‍या साधुच्या, जीवाची मात्र काहीली झाली, हे सगळे कमी होते म्हणुन की काय?, ती इकडेच यायला निघाली, साधुबुवांच्याच समोरच्या झुडपा मागे उभी राहून, अंग कोरडे करु लागली, तिची सूर्यासारखी तेजस्वी नितळ काया, साधुबुवांना अगदी जवळून दिसली, आणि तिच्या अंगप्रत्यांगाच्या गोलाई मधे, बुवांची नजर अडकून बसली, स्वतःच्याच धुंदीत असलेल्या तिला मात्र, कशाचेही भान नव्हते, तिचे ओलसर मोकळे केस, सुर्यकिरण पडून चमचम चमकत होते, तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवातुन, यौवन ओसांडून वहात होते, ते पहाताना साधुमहाराज मात्र, हाताच्या मुठी घट्ट आवळत होते, बर्‍याच वेळा नंतर अखेर, त्यांना मोकळा श्र्वास घेता आला, कारण त्यांच्या समोरचा मोहमायेचा खेळ, होता आता संपला, घागरींमधे पाणी भरुन घेउन, तिने आपल्या गावाचा रस्ता धरला, बुवांनी इतकावेळ नकळत घट्ट आवळलेल्या मांड्या, थोड्या मोकळ्या केल्या, साधुबुवांना आपल्या या निर्लज्ज कृतीची फारच शरम वाटली, तो एक अपघात होता, असे म्हणुन, त्यांनी स्वतःची समजुत घातली, चित्त थार्‍यावर यावे म्हणुन, झोळी मधली पोथी त्यांनी काढली, परमेश्र्वराच्या शोधा कडे, त्यांनी पावले पुन्हा एकदा वळवली, पोटात कावळे कोकलायला लागले, म्हणुन ते गावा कडे गेले, "ओम भवती भिक्षांदेही", असे एका घरा समोर जाउन म्हणाले, याचकाची नजर नेहमी जमिनी कडे हवी, हा नियम ते विसरले, आणि भिक्षा घेउन येणारी स्त्री पाहुन, त्यांचे देहभान हरपले, ती तिच होती, जिला त्यांनी नुकतेच नदिवर पाहिले होते, आता तिने कपाळावर कुंकु गळ्यात मंगळसुत्र घातले होते, सुरेखसा गजरा माळत, केसही तिने निटनेटके बांधले होते, जणू बुवांच्या समोर साक्षात सरस्वतीचेच प्रतिरुप उभे होते, "महाराज भिक्षा घ्यावी", नमस्कार करत ती म्हणाली, बुवांच्या छाती मधली धडधड, पुन्हा एकदा वाढली, पायातली शक्ती गेली, हातातली झोळी खाली पडली, तिच्याकडे न पहाता, बुवांनी तिकडून जोरात धुम ठोकली, एका खोल कड्याच्या टोकावर, स्तब्ध पणे साधुबुवा बसले होते, हे असे का झाले?, याचा विचार करताना, स्वतःलाच हसत होते, कारण विचार करता करता, त्यांच्या हेच लक्षात आले होते, "देव आहे चराचरी" हे तत्व, त्यांना नीटसे समजलेलेच नव्हते, "पुनश्र्च हरी ओम" असे म्हणत, त्यांनी ध्यानासाठी डोळे मिटले, त्यांच्या डोळ्यासमोर, पुन्हा एकदा तेच नदिवरचे दृष्य उभे ठाकले, पण यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित, जराही नाही ढळले, एका तटस्थवृत्तीने, ते आपल्या मनाच्या या खेळाकडे पाहु लागले. पैजारबुवा,

गणेशा 08/06/2015 - 12:12
@ पैजारबुवा ... समरसता ही मनाची एक कला आहे.. या कलेचा आनंद जोपर्यंत माणसाला घेता येत नाही.. तो पर्यंत त्याला जीवन जगणे म्हणजे काय हे कळालेच नाही असे वाटते...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जडभरत 23/07/2015 - 20:58
वाः बुवा वाः लिहिणारे समर्थ तर ग्रेटच पण हा इतका दुर्मिळ आणि अर्थपूर्ण श्लोक लक्षात ठेवणारे तुम्ही पण ग्रेट!!! हा श्लोक पाठ करत आहे.

गणेशा 08/06/2015 - 13:51
देवावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा ... हा मुद्दा वेगळा.. पण माणसांच्यात..मुलांच्यात ..कामात.. मित्रांच्यात सदभावनेने जो वेळ घालवाला जाईल तोच देवपुजेचा अर्थ असावा असे माझे मत आहे.. देवपुजेच महत्व त्यामुळे नक्कीच कमी होत नाही.. स्वता लहानमुलासारखे जगणे थोडे मुस्किलच आहे, या जीवनात फक्त साथ देवुन नाही तर त्याबरोबर योग्य गरज निभावने पण तितकेच मोलाचे ....आणि गरजेला पैश्याची निकड लागतेच.. मग व्यवहारी जगणे आले.. आणि मग पुन्हा कायम, आपल्या मुलांच्यात ही लहान होउन जगता न आल्याचे शल्य पण .. त्यामुळे मुलांशी मैत्रीपुर्ण वागताना लहान व्हायचे.. आनंद साजरा करायचा अगदी त्यांच्याच पद्धतीने.. पण नंतर पुन्हा व्यवहारी बनायचे.. बहुतेक हे असेच करावे लागत असेल जगताना... कदाचीत त्यामुळे निदान अपेक्षांचे शल्य तरी नाही बोचणार .... अपेक्षांचे ओझे आपणच आपल्यावर टाकत जातो .. बहुतेक आपण विचार जास्त करतो .. त्याचेच हे ओझे.. मग आपण जर विचार जास्त करतो तर आपण लहान कसे होऊ .. मग विचार करने सोडुन ही देता येत नाही... हे असेच असते.. अनेक प्रश्नांचे उत्तर आपण एकच करुन ठेवलेले असु शकते.. त्यामुळे उत्तरे बदलायला .. निटसे पुन्हा उत्तरे सुधारायला लागलेच पाहिजे ....

गणेशा 09/06/2015 - 12:57
आत्ताच.. पाउस, ती आणि मी चा भाग १ वाचला आणि थोडे मनाशीच बोलावेसे वाटले.... च्यायला, या असल्या कथा वाचल्या की आमचे काय होते काय माहित .. सगळ्या कॉलेज च्या आठवणी सरसर डोळ्यापुढे येतात. तिच्या डायरीतल्या शेवटच्या पानावरील या ओळी मात्र लगेच आठवतात "तू अशीच हसत रहा... सर्वांचे मन मोहत रहा... माझी नसताना पुन्हा... माझीच होत रहा... " तिने मला डेडिकेट केलेले हे गाणे मात्र माझे ही आवडते गाणे झाले आनि कायम ऐकतो ... " --- --- आते जाते.. ह्सते गाते..सोचा था मैने मन मे कई बार.. ओठो की कली, कुछ और खिली...ये दिल पे हुआ है किसका इफ्तियार तुम कोन हो.. बतलातो दो.. क्यो करने लगी मै तुमपे एतबार खामोश रहु .. या मै कह दू .. या कर लु मै चुपकेसे ये स्विकार यही सच है शायद मैने प्यार किया हा हा तुमसे मैने प्यार किया ... " आठवणी या अश्याच असतात.. प्रेम प्रत्येक वेळेस सफल होईल असे नाही.. पण माणसाने आपल्या नजरेत कधी पडु नये असे मला वाटते.. कोण कधी कोठे असेल .. आणि आयुष्यात फिरुन कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही .. माणसाने माणुसकीने जगले पाहिजे.. भले एकत्र असु नाही तर नसु.. स्वाभिमान मात्र माणसाने कधीच गहान टाकु नये.. आजकालच्या प्रेमात पडलेल्या पोरांकडे बघुन एक खिन्न भाव समोर येतो .. काय ते लागट ..लाचार.. मागे मागे फिरणे.. प्रेम हे असे नसते.. तुम्ही कसे ही असा.. मनातुन कसा आहे हे महत्वाचे..... स्वाभिमानाने प्रेमात जगलेले दिवस आठवले की अजुनही छान वाटते..... त्यानंतर सर्वांचे ब्रदर टाईप मटेरीअल असा आलेला उल्लेख ही आवडला.. कारण नंतर मी कधी मुलींवर प्रेम केलेच नव्हते.. आमची ही आयुष्यात येई पर्यंत.... आणि अचानक ब्रदर टाईप मटेरीअल चे .. हीच्या साठी हजबंड टाईप मटेरीअल मध्ये रुपांतर झाले हे कळलेच नाही...

गणेशा 29/05/2015 - 14:32
आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस मात्र शनिवार - रविवार असले तरी मनाचा सुट्टीचा दिवस शुक्रवार ... शुक्रवारी मन खुप मुक्त पणे भरकटते... कधी ते असेच सरळ त्या काळसर डोंगरावर चढुन जाते... कड्या-कपारीतुन फिरुन येते... उन्हातान्हातुन .. सावलीतुन हळुच गिरकी घेवुन येते कधी झाडांच्या फांदीवरुन.. पानांवरुन हलकेच परत येते... कधी मिट्ट काळोख्या रात्रीतील त्या अमुर्त स्वप्नाला अलगद मिठी मारुन येते... कधी हलकेच घराच्या खिडकीतुन पहात राहते... खिडकी.. खिडकी ही मनाची अशी जागा.. की त्यातुन दिसणार्‍या इवल्याशा आभाळावर ही मन आपले राज्य प्रस्तापित करु पाहते... तासन तास त्या आभाळाच्या तुकड्यावर प्रेम करत, ताटकळत उभे असते... आपले अस्तित्व त्या आभाळाकडे जणु ते सुपुर्त करुन देते... मनाचे अस्तित्व कोणी मान्य करो वा न करो .. त्या आभाळाने कदाचीत ते मान्य केले असेल . ------- २९/५/२०१५, १४:३२

In reply to by गणेशा

प्रचेतस 29/05/2015 - 14:47
आज आभाळ भरुन आलंय. मला भरलेलं आभाळ फार आवडतं कारण त्यातूनच बर्‍याच वेळा पाऊस येतो. मागच्या पावसाळ्यात कुठे बाहेर भटकणं झालंच नाही फारसं. याखेपी मात्र भरपूर फिरायचा विचार आहे. मी विचार फारसा करत नाही असे लोक म्हणतात. काही लोक तर तुम्ही निरथक अत्मरंजन करताय असंही म्हणत असतात. निरर्थक अत्मरंजनातूनच माणूस भ्रमवादाचा बळी ठरतो. हल्ली तर आत्मकुंथित भ्रमवादाची मोठी फ्याशन आहे....

In reply to by गणेशा

आम्ही कामगार वर्गात मोडत असल्यामुळे शुक्रवार हा आमच्या साठी आठवड्याचा पहिला दिवस. कालच्या दिवसभरात बायकोनी हातात टेकवलेल्या यादीमधली कोणकोणती कामे राहीली आणि ती आता कशी करायची, पुढच्या गुरुवारवर काय ढकलायचे, त्याचे हिशेब मांडत, आणि आज दिवसभरात ऑफिसमधे काय करायच ते ठरवत पोचले की समोर दुसरेच काहीतरी (साहेबांच्या मते) अतिमहत्वाचे वाढुन ठेवलेले असते. त्यातच वाया जाणारा शुक्रवार दिसत असतो. आपण आपल्यावरच (आणि साहेबावर) चडफडत काम सुरु करावे तर गणेशा सारख्या कोणत्या तरी मित्राचा फोन येतो "शनिवार रविवारचा काय प्लॅन आहे? येतोस का राजगडावर?" मग आम्ही ओशाळावाणे हसत त्याला सांगतो आम्ही दत्तभक्त आहोत म्हणून. "अरे हो.. तू सांगीतले होतेस मागच्या वेळी. सॉरी विसरलोच. पण च्यायला बर आहे रे तुझे, गुरुवारी सुट्टी असल्या मुळे बाहेरची कामे तरी होतात. आम्हाला बाहेरची कामे कराची तर एक हाफ डे तरी वाया घालवायलाच लागतो." अशी मुक्ताफळे उधळत मित्र फोन ठेवतो. आणि आम्ही परत कामाचा ढिगारा उपसायला लागतो. पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 14:40
अरे बाबा अस्तित्व कोठे कोणास असते .. त्या सुगंधाला ही माहीत नाही .. त्याचे अस्तित्व काय आहे ? .. त्या वार्‍याला ही माहित नाही त्याचे अस्तित्व कोठे आहे .. पण मग हे आकाश काय आहे.. त्याच्या अस्तित्वाची पुसटशी रेघ म्हणुन का क्षितिजापाशी ते खाली वाकलेले आहे... का निसर्ग त्याचे अस्तित्व दाखवत आहे.... अश्या नेक प्रश्नांची शृंखला मनात घर करुन आहे... कधी वाटते.. मनाप्रमाणे वागावे.. वाट्टेलसे.. पण कधी वाटते.. आपण उलट निट वागत आहोत.. समाजातील ह्या चालीरीती.. नियम आपण पाळत आहोत.. मन उगाच भरकटलेले आहे.. कधीही कुठेही कसे ही गेले तर चालेले का ? प्रत्येक प्रश्न .. त्याचे अस्तित्व यांना उत्तर खरेच द्यावे का ? मनाचे अस्तित्व मान्य केले तरी मनाप्रमाणे वागले तर कदाचीत येथे आपण वेडे ही ठरु शकु .. आपण नकी काय विचार करत आहे हेच आता कळत नाही.. मनापासुन आपण आचरणाचे नियम पाळत आहोत .. की आचरण करताना मनापासुनच आपण थोडे लांब चालत आहोत .... --- २९/५/२०१५, १४:४०

गणेशा 29/05/2015 - 14:54
प्रश्नांच्या या पानगळीत... उत्तरे दवबिंदुंसम ओली.. हलकाच स्पर्श ओळखीचा... मग उरतात फक्त रिक्त जागा... उडुन गेली अशीच उत्तरे.. त्या प्रकाश किरणांसंगे.. जो दाखवे वाट जगाला.. त्यातच उत्तरे विलीन जाहली.. मग प्रश्न का उरले येथे.. का अस्तित्व ना मिटले काही.. का ओळखीच्या खाणाखुणा शोधतो जणु मी त्यावरी असेच सरली वर्षे .. असेच संपले सारे.. आयुष्याच्या शेवटाला तरी प्रश्न का उरतोच आहे ? ----- २९/५/२०१५, १४:५४

गणेशा 29/05/2015 - 14:59
आभाळ भरुन आलं की.. मला गच्च हुंदक्यांची आठवण येते.. का कोणास ठावुन .. तन भिजवणारा पाऊस माझं मन कदाचीत भ्हिजवत नाही.. कोरड्याच मनाने मी पाहतो मग .. भरुन आलेल ते आभाळ.. ते गच्च आभाळ.. कधीतरी मनाची कोरडीच वीज चमकते .. आणि उठतो आगडोंब मनात... हे मानाचे काहुर ... कसे थांबवावे .. काहीच कळत नाही... हलकेच नंतर पाहताना .. आभाळ निवाळलेलं असत मनात मात्र तेच आभाळ पुन्हा पुन्हा भरुन येत राहते .. बस्स असेच पुन्हा पुन्हा भरुन येते...

गणेशा 29/05/2015 - 15:08
शनिवारी ..रविवारी सगळी मित्र मंडळी.. अशीच फिरायला जातात... आमच्या गुरुवारच्या सुत्टीमध्ये कामे होतात म्हणुन म्हणे त्यांना कौतुकेच जास्त असतात.. डोंगरावरच्या मैनीची ओढ बाकीच्यांना असते.. काटेरी झुडपात तीची अवस्था मात्र आपल्यासारखीच असेल असे सहज वाटुन गेले... आज मी असाच काम करत होतो ... ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? " मी : का गं ? ती : अरे त्याच्याबरोबर ट्रेकिंगला चालले आहे शनिवार- रविवारी, तुला सुट्टी असते गुरुवारी मला खुप कामे आहेत नेमकी ऑफिसला .. तु करशील का ? मी.. हो .. मी (मनात) : दत्त गुरु हे बरे नव्हे .. हलकेच फुलपाखरु जवळ यावे.. आणि ते पुन्हा दूसर्याच्या कळपात शिरावे... हे फक्त तुमच्या ह्या वारामुळे .... तुम्ही तरी हे मनाचे दु:ख समजुन घेताल का ? --- २९/५/२०१५, १५:०८

In reply to by गणेशा

ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
च्या ऐवजी
ती : " दादा... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
असे हवे होते का? पैजारबुवा,

प्रश्र्णांची भिजकी पाने पाठीवर माझ्या पडता उरफोडून धावत सुटतो फिरुनी क्षणही न बघता गलितगात्र मग एक पळी मी कोसळता धरणी वरती देवाचा धावा करतो मी मज तारुन नेण्यासाठी, देवावर ठेवून भिस्त मी दबकत दबकत वळतो पाचोळा पाहून मागे मी क्षणभर मलाच हसतो, पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 15:46
@ पाचोळ्या: पाचोळ्या, मी पाहिलं तुला, डोंगरकडेवरुन तु स्वताला झोकुन देत होतास ... पण का ? कश्यासाठी ? मी असाच फिरत होतो ... तुला मी मुक्त वाटतो .. पण मी स्वैर भतकत असतो.. मलाही नाही कुठलीच दिशा... असेच अस्तित्व वेदणेचे मी पंखांवर घेवुन फिरतो डोंगरदरयामध्ये.. झाडातुन.. पानांतुन.. अनी मित्रा तुझ्या सोनेरी पाउलवाटेवरुन ही.. रोज सकाळी तुला वाटते.. कोण बरे ही असंख्य दवरुपी आसवे तुझ्या अंगावर ठेवुन जातो ... तो मीच आहे.. माझ्याच अस्तित्वाच्या त्या विखुरलेल्या खुणा आहेत.. तर हा , तुला पाहिले मी त्या दोंगरमाध्यावरती.. मी अलगद आलो .. तुला झेलण्यासाठी.. तु हळुच वार्‍यासंगे डुलत खाली चालला होता... मी आलो तुझ्यापाशी .. तर तु पुन्हा चिंब ओला झाला होता.... मग हातात हात घेवुनी आपण तेथेच विसावलो त्या तिथल्या झाडाखाली... असंख्य तुझ्या प्रश्नांना मी प्रश्नांचीच उत्तरे देत होतो .. आठवते ना तुला ? -------- २९/५/२०१५, १५:४५

साले आभाळही आता पहिल्या सारखे आपले राहिलेले नाही त्याच्या कडे बघताना आता मन पहिल्या सारखे प्रसन्न होत नाही उलट तिच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा मात्र ओल्या होतात आणि मग ढगाच्या एखाद्या तुकड्या मधे तिचा चेहरा शोधू लागतात तेवढ्यात सूर्यावर एखादा काळा कुळकुळीत ढग येतो तिच्या सोबतीने भिजलेल्या पहिल्या पावसाची आठवण करुन देतो त्या नंतर जोरदार वार्‍याची आणि कडाडणार्‍या विजेची पाळी असते क्षणभर चमकणार्‍या त्या उजेडामधे मला घट्ट बिलगलेली ती मला दिसते .... क्षणभरच....मग... अंगावरची शाल आणि कानटोपी आणखीनच घट्ट लपेटत मी उठतो आणि दारे खिडक्या बंद करुन डोक्यावरुन पांघरुण ओढून झोपतो नातवंडे म्हणतात म्हातारपण फार वाईट, अजोबांना आजकाल काहीच सहन होत नाही मी मनातच म्हणतो, खरच वाईट कारणजे सहन होत नाही ते कोणाला सांगताही येत नाही. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गणेशा 29/05/2015 - 16:11
असा शिल्लक रिप्लाय देणार नव्हतो .. पण ही कविता आता पर्यंतच्या सर्व रिप्लायमधील एक हिरा आहे, अत्यंत उत्कट .. निस्सिम ... याला उत्तर लिहिणे अवघड आहे.. सहज आठवले आधीचे सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी

In reply to by प्रसाद गोडबोले

त्या दुरच्या डोंगरातून, शांतता पसरत खाली येते आणि मी माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे, वेध घेत कशाचा ? त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे माझे विचार भविष्यात ( ?) तर परावर्तित होत नसतील ना ?

गणेशा 29/05/2015 - 16:08
तुझ आभाळ मला दे .. माझ आभाळ तुला .. झाकोळल ज्या हाताने सूर्याला तो जख्मी झालेला सुर्य ही मावळताना मला सोनेरी किनार परिधान करतो.. असंख्य तांबडे पिवळे रंग माझ्यावरती टाकतो ... बघ तु जेंव्हा माझ्याकडे पाहतो , तेंव्हा मी तुला अशीच दिसते का रे ... तांबडे कुकू कपाळावर ल्यालेली .. सोनेरी किनारेची साडी नेसलेली .. सांग ना .. अगद्दी तसीच का रे आहे मी अजुन तुझ्या डोळ्यात .. अन मग बरसतो पाऊस तुझ्या माझ्या डोळ्यात ... अंधुक होतात काळाचे पडते ... अन .. ते काळे क्षणही... फक्त क्षणभर ... मग ... तू पुन्हा सकाळी उठलेला असतो .. सूर्याच्या जखमा कधी कोणास दिसल्यात का ? बस्स .. माझे रुप पाहण्यासाठी तो मात्र त्याचे रक्त त्या जखमांमधुन संध्याकाळी असेच सांडवत असेल ... तुझ्यासारखेच ------ तुझी ती २९/५/२०१५, १६:०७

निखारा नेहमी दुसर्‍याच्या तळहातावरच तेजस्वी भासतो मग आपण अशा पुरुषाची देव म्हणुन भक्ती करु लागतो खरेतर नियती प्रत्येकालाच समान संधी देत असते पण त्यावेळी बहुतेकांना वाळूत तोंड खुपसायला आवडते पैजारबुवा,

गणेशा 29/05/2015 - 17:01
धन्यवाद... आता निघतो आहे, सोमवार-मंगळवारी पण सुट्टी टाकली आहे, तरी नेट गावाला चालल्यास येतो अधुन मधुन ... उद्या असेल शक्यतो थोडावेळ... पुन्हा लिहितो आल्यावर.. तो पर्यंत आनखिन रिप्लाय येवुद्या ... छान आहे सर्व .. पैजारबुवा खुप आभारी आहे तुमच्याशिवाय ही शृंखला जमलीच नसती असे वाटते.. तुमच्या आभाळ हे मनातील उत्कट भावनांचे चित्रण हे आजचे फलित ... सर्वांचे आभार ... आनखिन रिप्लाय येवोत ही इच्छा !

हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ...मन रमत नाही यात...त्या खळाळणार्या रेवेत दिसणारं ओथंबलेलं आभाळ परत कधी दिसणार म्हणुन वाहणारे डोळे नक्की कशाची चाहुल देत होते...तुझ्या गमनाची वार्ता होती त्या आकाशाला....म्हणुनच नुसते भरुन आले होते ते....पुर्ण प्रवासात नर्मदेपेक्षा रेवाच जवळची वाटली रे....तीचेच प्रतीरूप.तरीही वेगळे अस्तीत्व दाखवणारे...आपलेही असेच नाही का?तुला माझ्यातुन वगळले तर बाकी काय उरेल...पण उरलेय अजून..तुझ्याशिवायचे सगळे ऋतु अनुभवत...फक्त आता तीचा राैरव नाही..अन् तुझी गाजही..पण आभाळ गाभूळतंच रे त्याच्या काळात...फक्त अनुभवायला तु नसतोस सोबत....असतो एक तुकडा आभाळाचा...मी आपला समज करुन घेते की बघतोयस तु..त्या आभाळाच्या झरोक्यातून..

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

नर्मदा किंवा रेवा सतत प्रवाही असतात, कुणासाठी थांबत नाहीत कारण माहित आहे?.... वहात रहाणे महत्वाचे हे त्यांना माहीत आहे... सतत वहात रहाणे... जगात केवळ एकच गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे बदल...... काही कोटी वर्षांपूर्वी जेव्हा हा सूर्यही अस्तित्वात नव्हता तेव्हाही मी होतोच.... आजूबाजुला कितीही काहिही बदलले तरी..... कालही मी होतोच आजही मी आजही आहे आणि उद्याही असणारच आहे....निरंतर रहाणार आहे.... नर्मदाही मी आणि रेवाही मी, आभाळही मी आणि चारही़ ऋतू म्हणजेही मी, सूर्यही मी आणि काळही मीच. मी केवळ स्वतः कडे निरनिराळ्या कोनांमधून पहात राहिलो आणि हा खेळ बघता बघता वाढतच गेला..... कधी कधी मीच माझ्या या खेळात गुरफटून जातो...... आणि स्वतःच स्वतःला शोधत रहातो.... फार मजा येते असा स्वतःचा शोध घेताना..... पैजारबुवा,

मस्त रे गणेशा! या प्रकारच्या लेखनाचा हा विचारच भारी आहे. उस्फुर्त म्हणजे एकदम उस्फ़ुर्तच ! त्यासाराखे दुसरे भारी काहीही नाही. कारण त्याला कसलेही बंधन नाही. ना विषयाचे, ना वेळेचे, ना कोणाला आवडेल/नावडेल का? असल्या विचारांचे! मनात आले ते उतरवून गेलो. पुसले जाइल की राहील याची तमा न बाळगता! कोणाला आवडो नावडो ,स्वच्छंदि लिहिन मी कुणी जवळ थांबतय की नाही याची अर्थातच..तमा न बाळगता! एक ओळ होवो,वा एक पान भरो वाचलं गेलं तरी लिहिन , न गेलं तरीही!.. अगदी कुणी उघडून पाहिलं की नाही? याचीही तमा न बाळगता मग उस्फ़ूर्ततेचे उद्यान होइल, स्वच्छंदि बागडणाय्रा फ़ुलपाखरांसाठीचे! तिथे फ़ुलं असतील? ,नुसतीच पानं? ,की काटेहि??? .. निश्चितच! याचीही तमा न बाळगता!

गणेशा 31/05/2015 - 00:29
@ पैजार बुवा...@ भाग्यश्री प्रवाह .... आहे ना ... गती आहेच.. पण हे वर्तुळ ...त्याचा परिघ... मला ओलांडताच येत नाहिये.. त्या गाभुळलेल्या आठवणी अजुनही पिंगा घालतात सभोवताली... त्या प्रत्येक क्षणांचे ओरखडे .. हो ओरखडेच आणि ते अजुनही काळाच्या पडद्याआड लपुन हळुच माझ्याकडे पाहुन खुदकन हसतात ... माझ्या मनाच्या झरोक्यातुन पुन्हा ते काळाला छेदुन जुन्या दिवसात जातात.. आणि माझे मन असे असंख्य ओरखडे घेवुन पुन्हा खालमानेने गपचुप निघुन येते... परिघ ओलांडण्याची किंमत माझ्या मनाला माहितेय... मी मात्र अजुनही त्या परिघावरील एक बिंदु बनुन राहिले आहे.. जगासाठी मी त्याच वर्तुळावर रोजचेच प्रवाही आयुष्य जगते आहे... आणि तुझ्यासाठी... हा तुझ्यासाठी मी अजुनही तेथेच आहे... त्या जागीच... त्या परिघावरच तुझी अजुनही वाट पहाते आहे...

गणेशा 31/05/2015 - 00:57
काल रात्री पुन्हा पाऊस आला होता.. मी गच्चीत झोपलो होतो... त्याच्या त्या येण्याने झोप मोडली ... पण मग असे वाटले बरेच झाले... भरलेल्या आभाळाची ती मजा रात्रीत तरी मला निटशी घेता आली नसली तरी भटकण्याची एक चाहुल तेथे ही होती.. आजकाल असच होते... मनाच्या कप्प्यात असंख्य वादळे दाटलेली असतात.. आणि मग त्या करुन कहाण्यात आपण कधी ओढलो जातो ते कळतच नाही... पण त्या कप्प्यांमध्ये आत्ताचा स्पर्ष ही न झालेले कोवळे आभाळ ही बसु शकेल ना..? हा एक नविन कप्पा मला आता केलाच पाहिजे.. अगदी मनसोक्त भटकायच.. पाउस असाच झेलत पुढे चालत रहायचे.. निसर्ग..त्याचे विहंगम चित्रे पुन्हा पुन्हा या नव्या कप्प्यात साठवायचे... काय माहीत पुन्हा केंव्हा तरी हा कप्पा हळुच उघडला की एक निसर्गाचा देखावा कायम पहाता येइल .. पण या कप्प्यात फक्त मी आणि निसर्ग नकोय ... तु पण असशील का ग सोबत... मी.. तू आणि निसर्ग ....

गणेशा 01/06/2015 - 00:29
आज १ जुन, वडिलांचा वाढदिवस .... बारामतीला आलोय ... पाउस पडलाय आज... वातावरण शांत ... बर्याच गोष्टी आठवुन जातात... वाढदिवस तसा आम्ही कोणाचाच साजरा करत नसु.. पण घरात गोड - धोड केले जाई.. आज ही असाच बेत आहे... प्रत्येक वाढदिवशीच सारे काही आधीचे आठवते असे काही नाही...पण या दिवशी त्या आठवणींना थोडा भावनेचा स्पर्श जास्त असतो .. संस्काराची शिदोरी अशीच .. त्या पिढीकडुन आपल्याकडे आली... प्रामाणिक पणा, चिकाटी... सतत कार्यरत राहणे या गोष्टी त्यांच्याकडे पाहुनच आपण शिकत आलो... नाही असे नाही.. बर्याच गोष्टीत वेगळे विचार-- हेतु आहेच .. पण सारासार विचार करता ते जास्त बरोबर ... सुख हे पैश्याच्या श्रीमंतीवर नाही.. तर मनाच्या समाधानावर अवलंबुन असते... समाधान आणि सुख ह्या खरे तर वेगळ्या गोष्टी... आपल्या कडे जास्त चैनीच्या गोष्टी म्हणुन आपण सुखी.. पण त्यांच्याकडे आत्मिक समाधान जास्त ... दूसर्‍यांप्रति असणारा आदरयुक्त भाव... स्वता हालाअपेष्टा सोसुन घरातील प्रत्येकाला स्व-कर्तुत्ववान बनवण्याची धडफड .. निरपेक्ष प्रेम... स्वता पेक्षा इतरांच्या सुखा साठी आयुष्यामधील अनेक क्षण वेचले असल्याने ते जास्त समाधानी... बर्याच दा मनात येते .. माणसाने समाधानी असावे... सुख त्या समाधानाकडे आपोआप खेचले जातेच ... आपण उलटे करतो .. समाधाना पेक्षा सुखाकडे आपला कल जास्त असतो.. त्यामुळे कधीच आपले समाधान होत नाही.. आणि सुखाची एक एक पायरी आपण वाढवत जात राहतो ... नक्की आपण कुठल्या पायर्‍या चढतो आहे हे जेंव्हा जाणवते .. तेंव्हा समाधानाच्या सिमेरेषेपासुन आपण बरेच पुढे आलेलो असतो ... मग आपल्याला कळते आपला रस्ता चुकीचा आहे.. हे कळणे ही कदाचीत महत्वाचे..

In reply to by गणेशा

पळत्याच्या पाठी | लागू नये कधी| हाती लागे अंती| काही नाही|| शेजार्‍याच्या चार | अलिशान कार| आपली स्कूटर | खरी असे || शेजार्‍याची भार्या| दिसते ऐश्र्वर्या| तुझे रुप आर्या|अभिषेक नाही|| सुख समाधान |असती समान जेव्हा तुझे मन| स्थिर असे|| अंतरीचे ध्यान | पहावे करुन खरे समाधान| चित्ती वसे|| बुवा म्हणे राम| नामाचे भजन दुर करी भ्रम| अंतरीचा||

गणेशा 02/06/2015 - 00:04
पाऊस मला वाटते नेहमी तरुणच असावा... त्याला पाहिले की त्या सर्व मोहक आठवणी जाग्या होतात... त्या आठवणींप्रमाणे पावसालाही चिरतारुण्याचे वरदान मिळालेले असेल असेच वाटते.... वर्षातला पहिला पाउस मला पहिल्या प्रेमाप्रमाणेच भासतो...उत्कट ..निर्मळ..अतिव...हवाहवासा... त्या चिरतरुण आठवणींचे मेघ हा असाच दरवर्षी माझ्यावर बरसवत असतो... मग मला जयश्री आठवते... माझं पहिले प्रेम... निर्मळ ...निरागस... तासनतास मारलेल्या गप्पा....ती स्वप्ने ... त्या अनाभाका.... कॉलेजला एकत्र केलेला अभ्यास... तो हवाहवासा स्पर्श ... ते हळुच लाजणे... हवाहवासा वाटणारा हा चिरतरुण आठवणींचा काळ आणि पहिला पाऊस यांचे नातेच एकदम घट्ट... पहिल्या पावसानंतर पावसाच्या आणि आठवणींच्या अनेक सरी बरसतच असतात ... बेलगाम... स्वैर.. मुक्त... बेभान... या तारुण्याच्या कित्येक छटा या पावसात मला आठवतात.. तारुण्याच्या या स्वैर..मुक्त..बेभान आठवणी समोरुन झरकण पुढे सरकतात.. गच्च हिरव्या रानातुन जसे पाण्याचे असंख्य झरे वाहत असतात.. तसेच मनाच्या कड्यांवरुन अनेक विचार... अनेक गोष्टी अश्याच उड्या टाकत होत्या हे आठवते ... असंख्य झरे.. असंख्य ओल्या वाटा... गर्द धुक्यात फक्त आपण ..मुक्त.. स्वच्छ... शेवटी वळवाचा पाऊस येतो...अफाट...अचाट...असह्य..अचानक आलेला... तारुण्यातील या गर्द धुक्यातुन .. असंख्य वाटातुन आपला रस्ता आपल्याला त्यात शोधावाच लागतो ... नाहीतर एकदा हरवलो की आपलाच थांग लागणे कठीण... वळवाच्या पावसाचे ही असेच ... अचानक..अफाट... वळवाचा पाऊस असाच जीवनाचा हमरस्ता शोधुन देण्याचे काम करतो... गच्च हिरव्या रानातील असंख्य आपल्याशा वाटणार्या वाटा असह्य पणे आपल्याला सोडुन द्याव्या लागतात.. कधी कधी अचानक समोर काहीच दिसत नाही... तरीही घट्टपणे मनाशी आपली वाट पक्की करुन आपण चालत रहायचे बस्स...

रातराणी 02/06/2015 - 04:15
आज पाउस यावा असं वाटतंय! मरगळलेल्या मनाला त्यानं स्वच्छ धुऊन जावं, मुळूमुळू रडत येण्यापेक्षा आज गर्जना करीत यावं, सभ्यपणाची शाल आज त्यान घरीच ठेवून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! मळभाची काळी चादर आज त्यान फाडून यावं, प्रेमाची भीक देण्यापेक्षा, मुक्त हस्ताने उधळीत यावं, माझ्या उधारीचा हिशोब आज तरी विसरून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! तहानलेल्या सृष्टीला आज त्यान मिठीत घ्यावं, चिंब चिंब भिजवून तिला तृप्त तृप्त करावं, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आज त्यानच मिटवीत जावं!

भीमराव 02/06/2015 - 13:26
वारामागुन वार येतो अन तसाच निघुन जातो. हल्ली कशाचं काहीच वाटत नाही जे सोमवारचं ते च रवीवारचं. पाऊस येतो पडुन जातो, फुले फुलतात सायंकाळी कधीतरी मग नंतर माना मुरगाळुन तशीच पडुन राहतात. मी मात्र तसाच बसुन असतो. धुंदीत जगत असल्या सारखा. टेकडी वरून दीसनारा सुर्यास्त पाहुन किती दिवस झाले हे तर आठवत सुद्धा नाही. कधीतरी लहर येते पावसात भिजायची, मोठ्याने आरोळी ठोकायची. वाटतं वेडं वाकडं धावावं, पाण्यामधे डुंबावं. पन ही इच्छा सुद्धा मनात कुठेतरी जिरून जाते. कुठेतरी विटी दांडु अन लगोरी- गोट्या असले काहीतरी चालुच असते, मी मात्र मान ताठ करून निघुन येतो. पडनारा पाऊस तुषार, वर्षाव, शिडकावा,श्रावण धारा असलं काही का असेना मी त्याला चिकचीकच म्हणतो. खिडकीवर आलेलं पाखरू सुद्धा आताशा किलबील करने सोडुन कलकलाट करू लागलय तरी बरं मला अजुन माझाच त्रास होत नाही.

In reply to by भीमराव

विहिरीच्या काठावर उभा राहून आजकाल मी विहिरीत नूसते डोकावून बघतो पाण्यात पाय घालायला सुध्दा नको वाटते, काही वर्षांपूर्वी मी सहज विहीरीच्या तळाशी टाकलेले नाणे घेउन येत असे, माझा मुलगा मात्र बिनधास्त उडी मारुन विहिरीतून नाणे काढून आणतो, तो वर येई पर्यंत मी विहिरीचा काठ घट्ट धरुन, पाणी कधी हलतय त्याची वाट बघत पाण्याकडे एकटक पहात उभा असतो, अगदी माझे बाबा उभे असायचे तसाच, मी त्या वेळी बाबांना हसत असे, आणि आज माझा मुलगा आणि माझे बाबा दोघे मला हसतात, आजकाल माझे हे असे का होते? काही वर्षांपूर्वी अमर्यादीत थाळी देणार्‍या हॉटेल मधेच आवर्जून जाणारा मी, आजकाल अर्धा वडापाव टाकून देतो, जात नाही म्हणून, "टाकु नका मी खातो" असे म्हणताना माझा मुलगा दात दाखवत मला हसत असतो, आणि माझे बाबा कवळी सांभळत त्याला साथ देत असतात, आजकाल माझे हे असे का होते? रात्री उशीरा पर्यंत झोप येत नाही, डोक्यात सतत काहीतरी विचार येत असतात, त्या वेळी माझा मुलगा एकाग्रपणे अभ्यास करत बसलेला असतो, आणि बाबा मनलावून कोणता तरी जाडजुड ग्रंथ वाचत असतात, मी मात्र तळमळत इकडून तिकडे फेर्‍या मारत असतो, ते दोघे डोळे मिचकावून एकमेकांकडे बघत, मला हसत असतात, आजकाल माझे हे असे का होते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आजकाल माझे हे असे का होते? मनाच्या गाभार्‍यातुन उमटणारे गुढ प्रश्न आत आत दाबून टाकावेत मनमुक्त होऊन उधळून झुगारावेत असचं वाटत असतांना पायात एक अनामिक बेडी जाणवत राहते असं कां? --- साधी कागदी होडी बादलीतल्या पाण्यावर तरंगतांना बघून लेकीच्या डोळ्यात आलेली लकाकी बघून मन हरखुन जाते पुढच्या क्षणी तिच्या स्वप्नांची होडी तिराला लागेल की नाही या विचाराने जीव कासाविस होतो.. असं कां? ----- अल्याड मी असतो पल्याड स्वप्न असतात मध्ये भला मोठ्ठा जलाशय कधी मन उचल खातं म्हणतं चल मार उडी.. परत तेच मन हात धरुन मागे ओढत राहतं असं कां? -------------------------------------------- काय लिहीलय मी माहीत नाही.. सहज सुचल. बाकी धाग्यावर नजर ठेवून आहेचं. येईन परत.

रोजचा आला दिवस सरताना मागे काही ठसा ठेऊन जातो.कधी ठळक कधी पुसट..काही बोचलेले शब्द काही रेंगाळणारी गुपिते.तर कुठे मनाच्या कोपर्यात जपलेला हिरवा गारवा.काहीही मागे ठेवायचे नाही म्हणताना लेकीची गळामिठी प्रेमाचा ठसा ठेऊन जाते.आणि मी मात्र लांब दिसणारं धुसर चित्र जणू हातात आल्यासारखी नादावते...परत उगवणारा उद्या पायातल्या मणामणाच्या बेड्या संभाळत कोलु पिसु लागतो.अखंड चालणारा हा अविरत घाणा.सुखाचे वंगण अन दुःखाची धार लावुन पळत राहतो.दिसामाजी कापलेले अंतर बघु गेलो तर मागे उरतो माझ्याच पायानी बनलेल्या वतृळाचा ठसा....

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

पैसा 10/06/2015 - 21:44
प्रवास सुरू झाला तेव्हा कुठे जायचंय हे माहीत नव्हतं, किती वेळ लागेल हेही माहीत नव्हतं. अर्धा रस्ता संपला तरी अजून कुठे जायचं हे माहीत नाही अन किती चालायचं हेही माहीत नाही. पावलं तीच, मीही तीच, रस्ताही तोच. सुरुवात झाली तेव्हा लहानशी पायवाट होती. बाजूंनी फुलं होती सगळी. आणि डोक्यावर गर्द सावली. हळूहळू झाडी विरळ झाली. फुलं सुकली आणि डोक्यावर ऊन भाजू लागलं. तरी वाट सरता सरेना. कधीतरी वार्‍याची झुळूक ह़ळूच येऊन गालावर रेंगाळून जाते. माथ्यावर ढग दुरून जराशी सावली देतो अन कधीतरी एखादी पावसाची सरही. आताशा सावलीही पायातळी आली आहे. सुरुवात कशी होती तेही आज धूसर चित्रासारखं आठवतं आहे. शेवट कसा असेल माहीत नाही. आज, आता इथे आहे एवढंच खरं. पण एकच माहीत आहे की मला चालायचं आहे. बाकी सगळे निघून गेले तिथे जाण्यासाठी. पाय साथ देतील तोपर्यंत.

In reply to by पैसा

गणेशा 11/06/2015 - 12:25
ती ज्वारीची शेते .... पाणांवर दवबिंदू ल्यालेली शहारलेली कोवळी पाने... गावाचा तो शेतावरला बांध... काळीकुट्ट जमीन.. आणि त्या काळ्याश्या ठिसुळ ढेकळाला हळुवार पणे भिजवत पुढे चाललेले पाणी.... ती दगडी भिंतीची ओबढ शाळा.... सुंदर झाडलेले आणि सभोवताली अशोकाची उंचच उंच झाडे असलेले पटांगण ... ती पळसाकडील विहीर... तासनतास मारलेल्या गप्पा.. एकत्र केलेला अभ्यास.... ती अनामिक हुरहुर .... सुगंधाचे क्षण.. फुलांचे सांजेला मोहक लाजणे... तो चंद्र .... तो अनामिक दूरावा... ते सैल झालेले मायेचे पाश... त्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा.... ते ओठांआड थांबलेले शब्द .. ते हिरव्या बांगड्यांचे लेणे घेतलेले पण त्या क्षणी अतिव ओढीने थरथरणारे हात.... तो अंगणातील पारिजात... रात्री पडलेला फुलांचा सुगंधीत सडा... ती पहिल्यांदाच न उजाडू वाटणारी सुरेख ..गुलाबी सकाळ... ते इवलेसे टोपडे... इवलेसे स्वेटर... मऊ मनाला आनंदित करणारा स्पर्श... जीवनाचा सर्वोच्च आनंदी क्षण.... ती सकाळची गडबड ... ते कुतुहल.. दप्तराच्या ओझ्यांची चिंता... बंद केलेला टीव्ही ... ती काळजीळतली परिक्षा... हे अर्धे आयुष्य सरले आहे आता.. आयुष्याच्या ह्या एक एका फ्रेम ने मन अगदी काठोकाठ भरुन गेले आहे... पुढच्या प्रवासाची एक अनाम ओढ ... इवल्याशा काळजाच्या तुकड्यात गुंतलेला श्वास... आणि श्वासागणिक वाहिलेले वाहिलेले हे आयुष्य ..पुन्हा तो अंगणातला पारिजात...........

गणेशा 03/06/2015 - 12:55
@मिका.. कागदी होडी वरुन आठवले... गावाकडे अंगणात... पावसात.. पाणीच पाणी साठायचे... अश्या वेळेस क्रिकेट खेळता येत नव्हते म्हणुन मन नाराज होत असे... आणि मग आम्ही मोर्चा वळवत असु कागदी होड्या बनवण्याकडे... आम्ही म्हणजे मी आणि तायडी(ताई) ... तायडी या एकाच शब्दात कीती माया साठवलेली असते ना... या शब्दाच्या उच्चाराने पण मन प्रसन्न झाले... हा..तर या होड्या बनवायचो मी.. तीला पण मीच बनवुन द्यायचो .. तीला बनवायला येत नसत.. मग तासन तास त्या पाण्यात आम्ही खेळत असु..कोणाची होडी लांब जाते त्यावर पैजा लावत असु.. कसलीच चिंता नसायची तेंव्हा... कपडे खराब होण्याची.. अभ्यासाची... भविष्याची.. कसलीच नाही.. कीती मस्त दिवस होते ते.... आणि आता त्या पावसाची आपण वाट पाहत आहे.. पण त्या कागदी होड्यांप्रमाणे त्या बालपणीच्या आठवणींचे आपण काहीच करणार नाही का ? मला वाटते.. लेकीच्या रुपाने ते दिवस पुन्हा आपल्याकडे येवु पाहत आहेत.. तर मग तीच्या सोबत पुन्हा तेच दिवस जगायला आपण सुरुवात केली पाहिजे असे वाटते... कसलीच चिंता न करता.. म्हणुन मी पण आता पावसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहे... सहज मला आवडणारे गाणे आठवले यावरुन... एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी

नाखु 03/06/2015 - 14:15
खरच लहानाबरोबर लहान होणं सोपं असतं का? नसतंच कारण ज्या क्षणी तुम्ही विचार करता की मी लहान होतो आहे तेव्हांच तुमचं बाल्य हरवलेलं असतं. बाल्य कसे पाहिजे मित्रांअम्ध्ये दिलखुलास शेर्‍याला, हजरजबाबीपणाला आपोआप टाळी देणारा-घेणारा हात जसा उस्फुर्त आतून असतो अगदी तसाच. एकदा का तुम्ही बाल्यपणात आपोआप घुसलात की त्या नजरेने जग सुंदर दिसतं अगदी पुस्तकातल्या चित्रा सारखं स्वच्छ, निर्मळ. थोडी कट्टी थोडी बट्टी ,खोटा खोटा स्वयंपाक भातुअकलीच्या भांडयातून दिलेले बेदाणे-शेंगदाणे आपण फार मोठा चविष्ट पदार्थ खातोय असा भाव केल्याबरोबर डोळ्यांत ओसंडणारा आनंद, मध्ये लुड्बुड केली तर लटका राग हे खाली बसून बरोबरीने अनुभवायची गंमत आहे. कपड्यांची धुळीअगोदर, मोठेपणाची वस्त्रे झटकली तरच मस्ट. मी एका वर्षी दिवाळी किल्ल्यासाठी लेकीला आणि लेकाला माती-चिखलात हात घालून किल्ल्यासाठी मदत घेतली तेव्हा किल्ला कसा झालाय त्याहीपेक्षा ही नदी/हा डोंगर मी केलाय याचेच त्या दोघांना खूप अप्रूप होते.(अजून ही चित्रे माळावर आहेत) ह्या दिवाळीत काढावीच बाहेर, आपण का अड्वायच आपल्यातल्या !!!! ताईदादाचा बापूस नाखु

गणेशा 03/06/2015 - 15:49
आपल्या मनातील आपले विचार.. सहजपणे जेंव्हा असे बाहेर येवु लागतील.. आपल्याच लिखानातुन एक एक रुप घेवु लागतील, तेंव्हा त्यांना आपल्याला तठस्थपणे पाहता येवु शकेल... मग कुठल्या विचारांचे रुप आपल्याला बदलायचे.. कुठले चित्र कसे निट करायचे.. हे आपल्यालाच समजेल... आपणच आपल्या विचारांचे चित्रकार.. मुर्तीकार... कुठला टाका कुठे टाकायचा हे ठरवणारे ही आपण .. आणि कुठला रंग कुठे भरला की उठुन दिसेल हे ठरवणारे ही आपण.. निसर्ग ही असाच असेल नाही ?. प्रत्येक वेळेस एक वेगळीच निर्मिती साकारण्याचे सामर्थ्य ही त्याच्यात असेच आले असेल... स्वताच्याच निर्मितीस तठस्थपणे पाहणे ही पण एक कलाच...

हे सुरांनो चंद्र व्हा! काय रचना आहे... विरहणी म्हणजे काय ते हे गाणं ऐकून कळते. परीपूर्ण रचना.. अप्रतिम संगीत आणि अभिषेकीवुबा तर बिनतोड... एकाकी दुर माळरानावर ती उभी आहे. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आहे, आणि तिच्या मनातून उमटलेल्या वेदनेतून या रचनेने जन्म घेतलाय. पण वेदना कशी पोहचवणार? तर ती सुरांनाच सांगते, तुम्हीच चंद्र व्हा आणि चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा. काय कल्पना आहे ना? जीवघेणा प्रकार आहे. तसाच काहीतरी विचार डोक्यात ठेवून हे लिखाणः ---------------------- दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- वाट भरकटून अंधारात चाचपडत चाचपडत त्याच्याकडे पोहचण्याचा निष्फळ प्रयत्न माझा फसलाच परत एकदा --- वेदनेला शब्द सापडतात कधी कधी नि:शब्द तडफड एका क्षणात आकाश व्हावे सगळी वेदना कृष्ण मेघात भरावी आणि बरसावे... रिक्त होईस्तोवर --- आज परत एकदा पौर्णिमा आली आता अधीरता अगतिकता झाली बेचैनी रिक्ततेकडे झुकली अन् वेदना जिवावरचे दुखणे झाले तरीही दूर तिथे त्या माळरानापलिकडे माझा जिवलग एकाकी... मी इथे एकाकी --- हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहचवा....

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

कुसुमाग्रज, अभिशेकीबुवा आणि मिका तिघांना सलाम. अभिशेकीबुवांच्या गाण्याचा प्रश्र्णच नाही, त्याला काही तोडच नाही, पण हे वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली ती मुग्धा वैशंपायन https://www.youtube.com/watch?v=1qFJtCMqcK0 पैजारबुवा,

मिका, या झाल्या एका विरहिणीच्या व्यथा पण पुरुषांचे त्यांची प्रेयसी, पत्नी कुठे गावाला गेल्यावर काय कमी हाल होतात का ? हे बघा काय म्हणतो पास्तरनाक..... दरवाजातून आत बघितले माझेच घर मला ओळखू येईना अचानक तिच्या जाण्याने घराचा आणि मनाचा कसा गोंधळ उडाला आहे भयानक. ठणकणार्‍या वेदना आणि डोळ्यांतील अश्रू समजून नाही देत या अवस्था झालेल्या जखमा कशा मोजता येतील आणि कशाने ? मनात एक तीव्र कळ ऊठली. मी जागा होतो का स्वप्नात ? का माझ्या डोळ्यातील पाण्याने माझ्या बुद्धीवर मात केली आहे ? धुरकटलेल्या काचांमुळे का डोळ्यांतील पाण्याने हे जग मला पार तुटलेले वाटते आहे. मनोवेदनेत माझ्या का दिसत आहेत मला राक्षसी लाटा आणि तुटलेली घरे ? ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........

In reply to by जयंत कुलकर्णी

त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले
व्वाह...

In reply to by जयंत कुलकर्णी

ती जशी होती तशीच मला प्रिय होती, लोभस होती. जसा समुद्राला किनारा प्रिय आणि बोटीला किनाऱ्याचे आकर्षण. समुद्राच्या तळाशी जसा एखादा मोती, तसेच तिचे रुप आणि सुंदर शरीर माझ्या आत्म्यामधे कुठेतरी खोलवर जपून ठेवले आहे मी. सुरेख. -दिलीप बिरुटे

प्यारे१ 03/06/2015 - 18:14
शब्दसूरांच्या या आतिशबाजीकडे अनिमिष नेत्रांनी बघत फ़क्त आस्वाद घेत राहावं.... शांतपणं मनाच्या खोल तलाशयात या रत्नाना साठवत राहावं... सरस्वतीच्या या पुत्रांना नतमस्तक होत निव्वळ न्याहाळत राहावं... एकेका मुक्तकासाठी/ कवितेसाठी तुम्हाला एक एक पार्टी लागू! मिपा वरचा अप्रतिमोत्तम वरचा क्रमांक असलेला एक धागा

गणेशा 03/06/2015 - 18:55
@ मिका आणि जयंत जी. एकोळी रिप्लाय ह्या धाग्यावर खरे तर द्यायचे नाही ठरवलेले आहे, पण तुम्हा दोघांच्या या अतिउच्च विचार/लिखाना ला सलाम तर करावा लागतोच .... तरीही जाता सुचेल ते लिहितोच. इतरांना मात्र एक विनंती एकोळी रिप्लाय शक्यतो नको.. वा.. छान ही नको.. त्या उलट शब्दांच्या थव्याने तुम्ही येथे या.. मनसोक्त जे वाट्टेल ते लिहा.. त्याची खरी गरज आणि एकदम धागा वाचताना ही मग मध्येच थांबल्या सारखे होणार नाही.. फक्त रिप्लाय किती पेक्षा किती मुक्तके/कविता/चित्रे ते महत्वाचे.. उत्तर लिहितो असेच...

गणेशा 03/06/2015 - 19:48
@ मिका @ जयंत जी... तिचे नसणे माझ्या मनाला मान्यच नसते कधी... ती गेली त्या दिवशी तिने आनंदाने अंगणात रांगोळी काढली होती...ठिपक्या ठिपक्यांचे कासव तीला यायचे.. तेव्हडेच यायचे... ती गेली आणि त्या रांगोळीचे ठिपके धुसर झाले... आज पर्यंत पुन्हा अंगणाला रांगोळीचा स्पर्श झाला नाही.. तिचे मंगल पावित्र्य अंगणाला पुन्हा कधी मिळाले नाही.. ही गत फक्त अंगणाची.. माझ्या आयुष्याचे वेगळे असे काय झाले ? अंधुक भग्न घराच्या कडेकपारीतुन अजुनही तो ओळखीचा सूर ऐकु येतो..... ओठांच्या घाटावर.. त्या शब्दसावल्या अजुनही विखुरलेल्या आहेत .. तश्याच ... आवाज न करता... मळकट पायवाटेवर... ते ओळखीच वारुळ अजुन तसेच आहे... दु:ख पारावर अजुनही तसेच घट्ट बसुन आहे... शेताच्या बांधावर भासांची टोळी अशीच अचानक येते अन मग फाटक्या माझ्या झोळीतुनही त्या टपोर्‍या दाण्यांना अलगद वेचुन न्हेते.. आजकाल हे असेच होते.. पाटाचे पाणी पण हबकुन वाहते... काल वटपोर्णिमा होती.. ते वडाचे झाड मात्र वाळलेले होते.. नाही.. दोरा होता गुंडाळलेला.. करकच्च... पण त्याच्या पारंब्याला माझी स्वप्न लगडलेली होती.. आणि निजले होते माझे विचारगाव त्या तिथेच झाडाखाली...

रातराणी 04/06/2015 - 01:30
कोमेजून गेलेलं अस्तित्व आणि वार्याबरोबर उडून गेलेला तिचा सुगंध, आता पुन्हा ती बहरेल का? मोडून पडलेला विश्वास आणि बाहेरून आत शिरू पाहणाऱ्या वादळांची धिटाई, आता पुन्हा ती जळेल का? रुतलेली अदृश्य जखम आणि श्वासांचही ओझ झाल्यासारखा तुझा अनोळखी अबोला, आता पुन्हा ती हसेल का? तू गाशील विरहाचे गाणे आणि ती सोडवत बसेल आठवणींचा गुंता, खर सांगा, आता पुन्हा ती जगेल का? ( हे अगदीच काहीतरी आहे पण आमच्या हाताला खाज फार!)

भीमराव 04/06/2015 - 11:17
कोमेजलं मन अन सुरकुतलेल्या भावना यावर सहजतेन हळुवार फुंकर घालनारी तु पहील्याच भेटीमधे मनाला अलगद स्पर्ष करून गेली नसतीस तर मला साहजिकच नवल वाटलं असतं. दररोज तुझ्या मनाचे ऊलगडनारे नवे नवे पदर मला कळत नकळत तुझ्या जवळ खेचत होते. तुझा अल्लडपना तर खुप गोड वाटायचा.मी इतका गुंतत चाललो होतो की तुझा थोडासा विरह देखिल मला खुप अस्वस्थ करून जायचा. तु हाती न लागनारे मृगजळ कधीच न्हवती, मात्र तरीही सहज साद्ध्य ही न्हवती. आयुष्याचं प्रतयेक वळन आजही तुझी साथ मागतं. निवांत अशा एकांतामधे तर मनाला खोल खोल जखमा होऊन जातात. कधी कधी तर तुझ्या आठवणीने इतका वेडा होऊन जातो, माझं मलाच भान रात नाही. वाटलेलं तुझी आठवण मनाला मोरपीसासारखी सुखावत राहील, मऊ पीसाला इतकी धार येईल हे मात्र स्वप्नातही वाटलं न्हवतं

नाखु 04/06/2015 - 12:57
तुमच्या या कवीतेने जखम ओली झाली
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........
जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी.. तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको. आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो. आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला. अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात. एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही. शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे. काकाश्रींचा पंखा नाखुस

गणेशा 04/06/2015 - 15:27
@ बाबुदादा... हळव्या या वातावरणाला थोडेशे चेंज करावे म्हणतो .... ---------------- तु आयुष्यात आली.. अन आनंदाचे उधान आयुष्यात आले... लवासाला पहिल्यांदा भेटलो आपण..लग्ना अगोदर .. साखरपुड्यानंतर .. जाताना मुठा नदी किती सुंदर दिसत होतीना तिकडे... तिथेच विसावलो त्या छोट्ट्याशा ब्रिजवर आपण ... पहिल्यांदाच लाजत झालेला तो स्पर्श .. अह्हा हा किती सुंदर.. मोरपिस अंगावरुन फिरुन जावे तसाच... मग आपण पुढे फिरत गेलो.. निसर्ग आपल्या दोघांना आवडतो.. त्या निसर्गात मनमुराद फिरणे पण .... पण माझा एक रुसवा अजुनही आहे, साखरपुडा आणि लग्नात इतके ४-५ महिन्यांचे अंतर असताना ही आपण फक्त एकदाच भेटु शकलो ... तु आता म्हणत असते आपण पुन्हा लवासा ला जावू .. गेल्यावर्षी खुप हट्ट केला.. पण मी न्हेले नव्हते.. या वर्षी पावसात..आपण जाउया नक्की... खरे सांगु मला तुझ्याशिवाय असे फिरायला जायला आवडत नाही शक्यतो ... १० जून माझा वाढदिवस असतो .. दरवर्षी याच्या आसपासच्या सुट्टीमध्ये आपण फिरायला जातो.. या वर्षी पण त्याच्या आसपास आपण जावु फिरायला... काळ किती फास्ट पळतोय ना.. अस वाटत आहे.. हा काळ असाच थांबावा या क्षणांमध्येच... तु मला शर्ट घेतला या वर्षी पण .. तु नेहमीच वाढदिवसा साठी मला शर्ट घेते.. मला आवडते ते खुप.. यावेळेस चा व्हाईट शर्ट .. तो ही कॅज्युअल pepe jeamo चा.. मस्त आहे एकदम... मला खरेच छान वाटले.. पण तुला असे वाटते.. तु काहीच जास्त घेतले नाही.. कारण तुझ्या वाढदिवसाला तुला २ ड्रेस हवे असताना मी तुला ४ गिफ्ट दिले होते... घरी सांगताना पण आपण १च घेतला असे सांगितले होते... किती दिवस झाले ना आपण पिक्चर ला एकत्र गेलो नाही... आता पर्यंत पिक्चर ला जाताना आपले मात्र लक खुप खराब आहे... आपण लग्ना नंतर पाहिलेला पिक्चर होता डर्टी पिक्चर .. काय करणाअर दोनच ऑप्शन होते... एक डर्टी आणि दुसरा विकी डोनर ... मग डर्टी निवडला.. लग्नाच्या गडबडीत नक्की तो कशावर आहे ते ही माहिती नव्हते... नंतर मात्र धमाल आली मराठी किती सुरेख चित्रपट पाहिले आपण ना.. त्यातल्या त्यात शाळा आणि दुनियादारी मस्तच होते... ती पुस्तके मी तुला वाचायला दिली होती.. तुला वाचनाची जास्त आवड नाही.. पण ही आणि या बरोबर अनेक पुस्तके तु, मी म्हणालो म्हणुन वाचली... आता लवकरच आपण नाटकाला ही जात जावु .. मला नाटके आवडतात.. तु अजुन तशी नाटके पाहिली नाहीसच .. तुला बाहेरचे खायला आवडते.. पाणीपुरी वडापाव भेळ आणि मासे... मला तर खायला आवडतेच त्यामुळे फिरणे आण खाणे होत रहातेच.. पण तु मागच्या काही महिन्यांअगोदर ठरवले आहे, बाहेरचा खर्च कमी.. त्यामुळे आता बरीच मुरड बसली आहे या गोष्टींना.. तसे बरे आहे.. पण तुझी पाणीपुरी मात्र मध्ये मध्ये डोके वर काढतेच आहे...

गणेशा 04/06/2015 - 16:20
मागिल काही दिवसांअगोदर, जवळच झाडावर चूऊताईचे घेरटे पाहिले.... चिऊ आपल्या इवल्याश्या पिल्लांना खाऊ देत होती.... त्या पिल्लांची तिला पाहण्याची ओढच लागली असेल त्याच्या अगोदर.. बिच्चारी चिऊ ताई पण.. कधी एकदा खाऊ घरात बाळांसाठी न्हेते असे वाटुन पटकन माघारी फिरली असेल.. मागच्या आठवड्यात ती पिल्ले हळुच आपल्या आईकडे बघुन घरट्यातुन टुनकन बाहेर आली होती.. जास्त लांब नाही गेली पण थोडे पंखांना बळ देत असल्यासारखे पाहिले त्यांनी .. मग चिऊताईने पुन्हा त्यांना घरट्यात जाण्यास सांगितले नव्हे घरट्यात लोटलेच जणु ... असेच त्यांची शाळाच जणु अजुन चालली होती.. फांदिच्या टोकावर बसुन ती पिल्ले धडपडत का होईना .. हळु हळु पंखात बळ साठवत होती.. चिऊताई आता मास्तरीन म्हणुन पण एकदम छान दिसत होती.. आज ती पिल्ले थोडे दूर उडुन गेली ... पंखात आकाश सामावण्याचा त्यांच्या इरादा होता हे नक्की... बालगीत झाडावरती घरटे चिऊताईचे ... पानांआड दडलेले.. .... घास भरवती पिल्लांना आपल्याच इवल्या चोचीने पंखाना बळ देती ती छडी हातात घेवुनी ... आकाशा ला मिठीत घेवू ही प्रार्थना तिच्या शाळेची... एक दिवस आला असा .. परिक्षा संपली पटकन चिऊताईची शाळा संपली पिल्ले उडाली भुर्रकन

मनीषा 04/06/2015 - 18:08
उपक्रम चांगला आहे. असं लिहून ठेवलेलं चांगलंअसतं. ते परत वाचताना काहीवेळा नवल वाटतं. कधीतरी असही काही आपल्या मनात आलं होतं म्हणून .

In reply to by मनीषा

मनीषा 04/06/2015 - 20:59
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु? ........आणि काय सांगु? नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच आणि आतल्या प्रकाशावर पडू दिली नाही अंधाराची छाया कधी म्हणूनच तर आहेत त्या माझ्या जीवाच्या जीवलग निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात जगाच्या सा-या तापांपासून दूर कधीतरी वाटतं मलाही पहावं .... काय चाललं आहे बाहेर? मग उघडते मी एक छोटासा झरोका बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता त्यातुनच येतात मग जुन्या नव्या आठवणी काही सुखावणा-या .... तर .. काही रडवणा-या त्यांच्याशी बोलत राहते मी कधी ---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही बाहेरचा कोलाहल मला अगदी ----- नवा नवा वाटतो त्यात एखादा ओळखीचा सूरही असतोच त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात ------ मग सगळे चेहरे एकमेकात मिसळतात अन त्यांचा बनतो एकच चेहरा त-हेत-हेच्या भाव-भावनांचे आविष्कार दाखवणारा त्यातून मग अनेक रंग विखूरतात त्यातले काही मला भावतात देखील ... मग मी त्या रंगांना निरखून पाहते त्यांना एक आगळा वेगळा गंध असतो .... तो गंध माझ्या कणाकणात भिनतो मनावर एक अनोखी धुंदी चढते ---- त्या गंधांची ........ त्या रंगांची मग त्या चार भिंतीतलं माझं एकटेपण जणू नाहीसं होतं अनेक भावनांचे रंग... त्यातून तयार होते एक अद्भूत नक्षी कशी माहित नाही ... पण मला ती आवडते त्या नक्षीच्या बिलोरी काचा सा-या घरभर पसरतात त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात माझं मन मोहून जातं त्या कवडशांना हातात घ्यावं त्यांना जवळून पहावं ... असं वाटतं ...... पण त्यांना हातात घ्यायला मी जाते .... तशी ते माझ्यापासून लांब जातात असा खेळ ---------- कितीतरी वेळ चालतो शेवटी मी थकून जाते एका जागी बसून त्या कवडशांकडे पहात राहते हळूहळू उन, आपली पावलं मागे घ्यायला लागतं तसे सारे कवडसे सुद्धा त्याच्या मागे धावतात मग तिथे काहीच रहात नाही दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो शांत ..... सुस्थीर .... अश्वासक....... मनाला दिलासा देणारा काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा माझं मन शांत होतं पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र हरवूनच जातात माझ्या मनात राहतात मग फक्त त्यांच्या आठवणी त्या आठवणी मी माझ्या मनात जपून ठेवते आता त्या आठवणींना माझ्याकडे यण्यासाठी झरोक्याची आवश्यकता नसते त्या चार भिंतींच्या अवकाशात त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या सोबती असतात ..

गणेशा 05/06/2015 - 00:47
आठवणींचा बिलोरी आरसा आपल्याकडे असला की कधी पण आपण त्या आरश्यातुन काळाच्या पडद्याला छेद देत त्यावेळेसचे क्षण पुन्हा अनुभवत असतो ... मन आपल्याच भिंतींना झुगारुन कधी मुक्त होऊन जाते ते ही कळत नाही ... आठवणी त्या सुखाच्या बालपणीच्या ... भातुकलीच्या ... बाहुलीच्या केसांसारख्या.. मखमली सोनेरी रंगांच्या... नववारीतील आज्जीच्या गोष्टीतल्या परीसारख्या... अंगणातल्या अबोलीच्या. आठवणी त्या सुखाच्या ... पहिल्या रिकाम्या दप्तराच्या... पाटीवरील पहिल्या अक्षराच्या... आठवणी त्या सुखाच्या.... बालसंवगड्यांशी खेळण्याचा... माळलेल्या गजर्‍याच्या आठवणी त्या सुखाच्या... पाहिलेल्या नजरेच्या... मुक्या स्पर्श भावनांच्या... आठवणी त्या सप्तपदीच्या प्रितीतल्या गोडव्याच्या तुझ्या माझ्या गोड क्षणांच्या आठवणी त्या सुखाच्या ... अवांतर.. ५ मिनिटात काय लिहिले हे पुन्हा न वाचताच देत आहे... लिहायला गेलो गद्य आणि झाले असेच काहितरी पद्य..

गणेशा 05/06/2015 - 12:29
उद्या... शिवराज्यभिषेक दिन... सगळे मित्र रायगडाची वाटा चालत आहेत.. मी मात्र आज येथेच ऑफिसात .. आज चतुर्थी पण आहे.. सकाळी पाऊस पडला .. वातावारण खुप मस्त आहे... पण पावसामुळे बाळाला घेवुन या चतुर्थीला मोरया गोसावी मंदिरात सकाळी सकाळी जाता आले नाही... संध्याकाळी जाईन पण .. बाळाला बप्पा खुप आवडतो .... मंदिरात गेल्याने छान वाटतेच.. पण महिन्यातुन एकदा सकाळी एकत्र बाहेर पडायला मिळते ते पण खुप छान ... आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्वांसाठी टाईम काढलाच पाहिजे असे वाटते.. मग ते मित्र असुद्या.. फॅमिली असुद्या नाहीतर पर्सनल गोष्ट असुद्या .... मुलांना तर टाईम दिलाच पाहिजे.. प्रत्येक पालकाने हे केलेच पाहिजे.. बाळ मोठे झाल्यावर तर आठवड्यातला एक दिवस मी बाळासाठी रीझर्व ठेवणार आहे.. मग तो शनिवार असेल किंवा रविवार.. पण फक्त बाळाबरोबर.. वाटल्यास बाळाला माझ्यासोबत फिरण्याच्या सवयी लावेल ... बाप झाल्यावर किती गोष्टी बदलतात ना... पहिल्यांदा दुकानात गेलो की मी माझ्या वस्तुंबद्दल विचार करायचो.. मस्त आवडेल ते घ्यायचो .. आजकाल असे होत नाही.. पैसे आले की बाळाला काय घ्यावे असे वाटते.. तीला एखादी फ्रॉक लहान पडत असली की दूसरी आपण बघुन ठेवलेली आता घेवुया असे वाटते... खेळणी.. गाडी..इतकेच काय सायकल ची पण तयारी आताच झाली आहे... खरेच बाप हा मुलगी झाल्यावर पुर्ण बदलतो .. बदलतात त्याचे विचार.. आचार... हे मला आता कळते आहे... जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा माझे वडील तायडी ला बिंधास्त ट्रीप ला जावुन द्यायचे.. तिचे खुप लाड करायचे.. माझ्या पेक्षा.. तेंव्हा मी आईला बोलायचो ते.. आई माझी होती ना.. तायडीचे पप्पा.. पण आज कळते आहे.. हा नैसर्गिक बंध आहे... कदाचीत बाप झाल्यावर आपल्या बापाच्या भावना आपल्याला जास्त कळत असतील .. असेच असेल...

मोहनराव 05/06/2015 - 15:37
बरोबर आहे तुमचे. आजकाल ऑफिसमधुन घरी जाण्याची एक अनामिक ओढ असते. ते इवलेइवले हात हातात घेऊन एक गालाचा मुका घेतला व बाळाचे आपल्याला बघुन खुश होणे पाहिलं की दिवसभराचा थकवा कुठे निघुन जातो कळतच नाही. जगातल्या कसल्याही दुखा:चा लवलेश नाही.. चिंता नाही. असे आयुष्य परत जगता आले तर किती मजा येईल असे वाटते. ये दौलतभी लेलो ये शोहरतभी लेलो... गझल आपसुकच गुणगुणायला लागतो. मध्ये ही बाळाला घेऊन गावी गेलेली महिनाभर, तर मन कशातही रमायचे नाही. चातकासारखी बाळाची वाट पाहिली. परत आली तेव्हा स्वारी ओळखायला तयार नाही :( पण लगेच एक दिवसात परत माझ्याकडे छकुली येऊ लागली. मी विचार केला, आत्ताच आपले हे हाल.. अजुन काही वर्षांनी मुलगी मोठी होऊन सासरी जाऊ लागली तर आपले काय होणार. तेव्हा एका मुलीच्या बापाचे दु:ख काय असते याची कल्पना येऊ लागली.

साधुची झोळी का पडली? नदि काठच्या एका गर्द झाडी मधे बसून, तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करत होता, तिकडुन तो कोणाला सहज दिसत नव्हता, पण तो मात्र बरेच काही पाहू शकत होता, नुकताच वयाच्या सोळाव्या वर्षी विरक्त होउन, त्याने संन्यास घेतला होता, आणि भगवंताचा शोध घेत, दिवसरात्र तो रानोमाळ भटकत होता, अचानक कसल्यातरी आवाजाने, त्याची समाधी भंग पावली, एक लावण्यवती, रमत गमत पाण्याला जाताना, त्याला दिसली, हरणाची चपळाई आणि मोराचा डौल होता, तिच्या पावलो पावली जणु केतकीच्या बना मधून, एखादी नागीण सळाळत निघाली, त्या वेळी त्या दोघांशीवाय, तिथे तिसरे कोणीच नव्हते, तो आपल्याला बघतो आहे, याचे तिला जरा देखील भान नव्हते, तिच्या हातात एक आणि एक कमरेवर एक असे दोन घडे होते, आणि मोकळे लांबसडक केस तिच्या कमरेवरती रुळत होते, इकडे साधूबुवांच्या हृदयाची धडधड मात्र, जोरदार वाढली होती, आता त्या जागेवरुन उठायची सुध्दा, त्यांच्या मधे हिम्मत नव्हती डोळ्यांची पापणी मिटावी, असे ठरवून देखील, ती बंद होत नव्हती दूसरीकडे आपल्या चंचल, कमकुवत मनाची, त्यांना लाज वाटत होती इकडे तिकडे सावध नजर टाकत, क्षणार्धात ती निर्वस्त्र झाली, मासोळी सारखी सुळकन, नदिच्या पाण्यात तिने उडी मारली, मनसोक्त डुंबुन झाल्यावर, ती तशीच ओलेती बाहेर निघाली, अनिमिष नेत्रांनी हे बघणार्‍या साधुच्या, जीवाची मात्र काहीली झाली, हे सगळे कमी होते म्हणुन की काय?, ती इकडेच यायला निघाली, साधुबुवांच्याच समोरच्या झुडपा मागे उभी राहून, अंग कोरडे करु लागली, तिची सूर्यासारखी तेजस्वी नितळ काया, साधुबुवांना अगदी जवळून दिसली, आणि तिच्या अंगप्रत्यांगाच्या गोलाई मधे, बुवांची नजर अडकून बसली, स्वतःच्याच धुंदीत असलेल्या तिला मात्र, कशाचेही भान नव्हते, तिचे ओलसर मोकळे केस, सुर्यकिरण पडून चमचम चमकत होते, तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवातुन, यौवन ओसांडून वहात होते, ते पहाताना साधुमहाराज मात्र, हाताच्या मुठी घट्ट आवळत होते, बर्‍याच वेळा नंतर अखेर, त्यांना मोकळा श्र्वास घेता आला, कारण त्यांच्या समोरचा मोहमायेचा खेळ, होता आता संपला, घागरींमधे पाणी भरुन घेउन, तिने आपल्या गावाचा रस्ता धरला, बुवांनी इतकावेळ नकळत घट्ट आवळलेल्या मांड्या, थोड्या मोकळ्या केल्या, साधुबुवांना आपल्या या निर्लज्ज कृतीची फारच शरम वाटली, तो एक अपघात होता, असे म्हणुन, त्यांनी स्वतःची समजुत घातली, चित्त थार्‍यावर यावे म्हणुन, झोळी मधली पोथी त्यांनी काढली, परमेश्र्वराच्या शोधा कडे, त्यांनी पावले पुन्हा एकदा वळवली, पोटात कावळे कोकलायला लागले, म्हणुन ते गावा कडे गेले, "ओम भवती भिक्षांदेही", असे एका घरा समोर जाउन म्हणाले, याचकाची नजर नेहमी जमिनी कडे हवी, हा नियम ते विसरले, आणि भिक्षा घेउन येणारी स्त्री पाहुन, त्यांचे देहभान हरपले, ती तिच होती, जिला त्यांनी नुकतेच नदिवर पाहिले होते, आता तिने कपाळावर कुंकु गळ्यात मंगळसुत्र घातले होते, सुरेखसा गजरा माळत, केसही तिने निटनेटके बांधले होते, जणू बुवांच्या समोर साक्षात सरस्वतीचेच प्रतिरुप उभे होते, "महाराज भिक्षा घ्यावी", नमस्कार करत ती म्हणाली, बुवांच्या छाती मधली धडधड, पुन्हा एकदा वाढली, पायातली शक्ती गेली, हातातली झोळी खाली पडली, तिच्याकडे न पहाता, बुवांनी तिकडून जोरात धुम ठोकली, एका खोल कड्याच्या टोकावर, स्तब्ध पणे साधुबुवा बसले होते, हे असे का झाले?, याचा विचार करताना, स्वतःलाच हसत होते, कारण विचार करता करता, त्यांच्या हेच लक्षात आले होते, "देव आहे चराचरी" हे तत्व, त्यांना नीटसे समजलेलेच नव्हते, "पुनश्र्च हरी ओम" असे म्हणत, त्यांनी ध्यानासाठी डोळे मिटले, त्यांच्या डोळ्यासमोर, पुन्हा एकदा तेच नदिवरचे दृष्य उभे ठाकले, पण यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित, जराही नाही ढळले, एका तटस्थवृत्तीने, ते आपल्या मनाच्या या खेळाकडे पाहु लागले. पैजारबुवा,

गणेशा 08/06/2015 - 12:12
@ पैजारबुवा ... समरसता ही मनाची एक कला आहे.. या कलेचा आनंद जोपर्यंत माणसाला घेता येत नाही.. तो पर्यंत त्याला जीवन जगणे म्हणजे काय हे कळालेच नाही असे वाटते...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जडभरत 23/07/2015 - 20:58
वाः बुवा वाः लिहिणारे समर्थ तर ग्रेटच पण हा इतका दुर्मिळ आणि अर्थपूर्ण श्लोक लक्षात ठेवणारे तुम्ही पण ग्रेट!!! हा श्लोक पाठ करत आहे.

गणेशा 08/06/2015 - 13:51
देवावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा ... हा मुद्दा वेगळा.. पण माणसांच्यात..मुलांच्यात ..कामात.. मित्रांच्यात सदभावनेने जो वेळ घालवाला जाईल तोच देवपुजेचा अर्थ असावा असे माझे मत आहे.. देवपुजेच महत्व त्यामुळे नक्कीच कमी होत नाही.. स्वता लहानमुलासारखे जगणे थोडे मुस्किलच आहे, या जीवनात फक्त साथ देवुन नाही तर त्याबरोबर योग्य गरज निभावने पण तितकेच मोलाचे ....आणि गरजेला पैश्याची निकड लागतेच.. मग व्यवहारी जगणे आले.. आणि मग पुन्हा कायम, आपल्या मुलांच्यात ही लहान होउन जगता न आल्याचे शल्य पण .. त्यामुळे मुलांशी मैत्रीपुर्ण वागताना लहान व्हायचे.. आनंद साजरा करायचा अगदी त्यांच्याच पद्धतीने.. पण नंतर पुन्हा व्यवहारी बनायचे.. बहुतेक हे असेच करावे लागत असेल जगताना... कदाचीत त्यामुळे निदान अपेक्षांचे शल्य तरी नाही बोचणार .... अपेक्षांचे ओझे आपणच आपल्यावर टाकत जातो .. बहुतेक आपण विचार जास्त करतो .. त्याचेच हे ओझे.. मग आपण जर विचार जास्त करतो तर आपण लहान कसे होऊ .. मग विचार करने सोडुन ही देता येत नाही... हे असेच असते.. अनेक प्रश्नांचे उत्तर आपण एकच करुन ठेवलेले असु शकते.. त्यामुळे उत्तरे बदलायला .. निटसे पुन्हा उत्तरे सुधारायला लागलेच पाहिजे ....

गणेशा 09/06/2015 - 12:57
आत्ताच.. पाउस, ती आणि मी चा भाग १ वाचला आणि थोडे मनाशीच बोलावेसे वाटले.... च्यायला, या असल्या कथा वाचल्या की आमचे काय होते काय माहित .. सगळ्या कॉलेज च्या आठवणी सरसर डोळ्यापुढे येतात. तिच्या डायरीतल्या शेवटच्या पानावरील या ओळी मात्र लगेच आठवतात "तू अशीच हसत रहा... सर्वांचे मन मोहत रहा... माझी नसताना पुन्हा... माझीच होत रहा... " तिने मला डेडिकेट केलेले हे गाणे मात्र माझे ही आवडते गाणे झाले आनि कायम ऐकतो ... " --- --- आते जाते.. ह्सते गाते..सोचा था मैने मन मे कई बार.. ओठो की कली, कुछ और खिली...ये दिल पे हुआ है किसका इफ्तियार तुम कोन हो.. बतलातो दो.. क्यो करने लगी मै तुमपे एतबार खामोश रहु .. या मै कह दू .. या कर लु मै चुपकेसे ये स्विकार यही सच है शायद मैने प्यार किया हा हा तुमसे मैने प्यार किया ... " आठवणी या अश्याच असतात.. प्रेम प्रत्येक वेळेस सफल होईल असे नाही.. पण माणसाने आपल्या नजरेत कधी पडु नये असे मला वाटते.. कोण कधी कोठे असेल .. आणि आयुष्यात फिरुन कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही .. माणसाने माणुसकीने जगले पाहिजे.. भले एकत्र असु नाही तर नसु.. स्वाभिमान मात्र माणसाने कधीच गहान टाकु नये.. आजकालच्या प्रेमात पडलेल्या पोरांकडे बघुन एक खिन्न भाव समोर येतो .. काय ते लागट ..लाचार.. मागे मागे फिरणे.. प्रेम हे असे नसते.. तुम्ही कसे ही असा.. मनातुन कसा आहे हे महत्वाचे..... स्वाभिमानाने प्रेमात जगलेले दिवस आठवले की अजुनही छान वाटते..... त्यानंतर सर्वांचे ब्रदर टाईप मटेरीअल असा आलेला उल्लेख ही आवडला.. कारण नंतर मी कधी मुलींवर प्रेम केलेच नव्हते.. आमची ही आयुष्यात येई पर्यंत.... आणि अचानक ब्रदर टाईप मटेरीअल चे .. हीच्या साठी हजबंड टाईप मटेरीअल मध्ये रुपांतर झाले हे कळलेच नाही...
लेखनविषय:
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे..

खड्डा आणि मी

शब्दानुज ·

In reply to by नगरीनिरंजन

अगदी अगदी. फायदा तेथे समानता. नुकसान, त्रास अश्या गोष्टी दिसल्या की मला बै नै जमायचं हे. तेवढं करशील का माझ्यासाठी प्लीssSSSssज असं. (सगळ्याचं असं नाही वागतं पण मेजॉरिटी अशीच आहे.) (पॉपकॉर्न)

In reply to by नगरीनिरंजन

अगदी अगदी. फायदा तेथे समानता. नुकसान, त्रास अश्या गोष्टी दिसल्या की मला बै नै जमायचं हे. तेवढं करशील का माझ्यासाठी प्लीssSSSssज असं. (सगळ्याचं असं नाही वागतं पण मेजॉरिटी अशीच आहे.) (पॉपकॉर्न)
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे त्या दिवशी मी महत्वाच्या कामानिमित्त [कोणते ? राष्ट्रउभारणीचे अत्यंत गुपित कार्य होते ते] त्या रस्यावरुन निघालो होतो.एक ब्रह्नानंदी टाळी लावलेला टॅम्पो रस्त्यात हळुवारपणे चालला होता.इतर कोणत्याही सांसारिक गोष्टिप्रमाणे त्याला मागच्या कोणत्याही ओरडणारया वाहनाची तमा नव्हती.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

पुराणासाठी वांगी

संदीप डांगे ·

निर्वाण पावलो आहे. __/\__ __/\__ __/\__ वंदन. इचिभैन या जोशी सायेबांच्या तर वांग्यात बियाच पडो हजारो...

In reply to by अत्रुप्त आत्मा

विवेकपटाईत 20/04/2015 - 20:06
या फोटोतले वांगे पाहून दोन बाबी लक्ष्यात आल्या. वान्ग्यांवर पाण्याचे थेंब स्थिर स्वरूपात आहे, अर्थात आधी वांगी तेल मिश्रित पाण्यातून काढलेली आहे. बहुधा वान्ग्यांवर चकाकी दिसावी म्हणून. दुसरा निष्कर्ष- वांगे दुकानात येऊन २४ तासांच्या वर होऊन गेले आहे, म्हणून आज सकाळी दुकानदाराने, पाण्यात तेल टाकून वांगे बुडवून काढली आहे.

नाखु 20/04/2015 - 10:23
वांगे वांगे पे लिख्खा है डांगे डांगे का नाम ! हे भरीत जबराट आहे.

In reply to by कहर

माझ्या मते सदर लेखन कुठल्या एका धाग्यावर नसून पुराणातल्या वांग्यांना आजही भाजत बसण्याच्या प्रवृत्तीवर केलेलें भाष्य आहे. मिपावर शोधावे, अनेक धागे मिळतील.

होबासराव 07/07/2015 - 21:17
अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 13/07/2015 - 14:45
कुंभपर्वावर मालिका लिहितोय... आपले बरेच गैरसमज दूर होतिल... (प्रस्तुत लेखाकडे विनोदबुद्धीने पहा असे सांगण्याची गरज पडते यात लेखकाचे अपयश आहे)

तुडतुडी 15/07/2015 - 12:57
कुंभपर्वावर मालिका लिहितोय.आपले बरेच गैरसमज दूर होतिल.>>> कसले गैरसमज ? माझा कुंभ मेळ्याला पाठींबा आहे असा तर तुमचा गैरसमज झाला नाही ना ?जे बरोबर आहे ते बरोबरच आहे . जे चूक आहे ते चूक आहे . लाखातला एखादाच अध्यात्मिक उंची गाठणारा . बाकी सगळे भोंदू गांजेकस. आयुष्यात दुसरं काही जमत नाही , कोणी कुत्र विचारात नाही म्हणून साधूचा वेष घेवून फिरणारे . आणि मग गोदावरीत स्नान करून पापाचं परिमार्जन करणारे . अरे त्या गोदावरीच पावित्र्य ठेवलाय का लोकांनी ? गटार करून टाकलय नुस्त

In reply to by संजय पाटिल

प्यारे१ 15/07/2015 - 17:08
हो. चला धरा. सतरंजीला बरोबर मध्ये धरा. मधोमध उचला. आता हळूच झटका दया. पडली ना खाली घाण सगळी? आता आणखी एक उभी घड़ी एक डावीकडून एक उजवीकडून. आता पुढुन निम्म्यात्. बास! आता उचला आणि कार्यालयाच्या हॉपिस् मधे नेऊन ठेवा.

निर्वाण पावलो आहे. __/\__ __/\__ __/\__ वंदन. इचिभैन या जोशी सायेबांच्या तर वांग्यात बियाच पडो हजारो...

In reply to by अत्रुप्त आत्मा

विवेकपटाईत 20/04/2015 - 20:06
या फोटोतले वांगे पाहून दोन बाबी लक्ष्यात आल्या. वान्ग्यांवर पाण्याचे थेंब स्थिर स्वरूपात आहे, अर्थात आधी वांगी तेल मिश्रित पाण्यातून काढलेली आहे. बहुधा वान्ग्यांवर चकाकी दिसावी म्हणून. दुसरा निष्कर्ष- वांगे दुकानात येऊन २४ तासांच्या वर होऊन गेले आहे, म्हणून आज सकाळी दुकानदाराने, पाण्यात तेल टाकून वांगे बुडवून काढली आहे.

नाखु 20/04/2015 - 10:23
वांगे वांगे पे लिख्खा है डांगे डांगे का नाम ! हे भरीत जबराट आहे.

In reply to by कहर

माझ्या मते सदर लेखन कुठल्या एका धाग्यावर नसून पुराणातल्या वांग्यांना आजही भाजत बसण्याच्या प्रवृत्तीवर केलेलें भाष्य आहे. मिपावर शोधावे, अनेक धागे मिळतील.

होबासराव 07/07/2015 - 21:17
अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 13/07/2015 - 14:45
कुंभपर्वावर मालिका लिहितोय... आपले बरेच गैरसमज दूर होतिल... (प्रस्तुत लेखाकडे विनोदबुद्धीने पहा असे सांगण्याची गरज पडते यात लेखकाचे अपयश आहे)

तुडतुडी 15/07/2015 - 12:57
कुंभपर्वावर मालिका लिहितोय.आपले बरेच गैरसमज दूर होतिल.>>> कसले गैरसमज ? माझा कुंभ मेळ्याला पाठींबा आहे असा तर तुमचा गैरसमज झाला नाही ना ?जे बरोबर आहे ते बरोबरच आहे . जे चूक आहे ते चूक आहे . लाखातला एखादाच अध्यात्मिक उंची गाठणारा . बाकी सगळे भोंदू गांजेकस. आयुष्यात दुसरं काही जमत नाही , कोणी कुत्र विचारात नाही म्हणून साधूचा वेष घेवून फिरणारे . आणि मग गोदावरीत स्नान करून पापाचं परिमार्जन करणारे . अरे त्या गोदावरीच पावित्र्य ठेवलाय का लोकांनी ? गटार करून टाकलय नुस्त

In reply to by संजय पाटिल

प्यारे१ 15/07/2015 - 17:08
हो. चला धरा. सतरंजीला बरोबर मध्ये धरा. मधोमध उचला. आता हळूच झटका दया. पडली ना खाली घाण सगळी? आता आणखी एक उभी घड़ी एक डावीकडून एक उजवीकडून. आता पुढुन निम्म्यात्. बास! आता उचला आणि कार्यालयाच्या हॉपिस् मधे नेऊन ठेवा.
लेखनविषय:
जोशी सायेबांनी 'भरीता'ची आठवण करून दिली म्हणुन थोडे वांगे आणून देतो. करा काय करायचं ते, चीमायभईन... १. आपली चिंचोके, कवळ्या, काचेचे तुकडे, क्रिकेटरचे फटूवाले कूपन ठेवायची जागा अपोजिट पार्टीला सांगतो म्हणून रावणाने बिबिषणाला ल्हानपणीच पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी आई आल्याने तो वाचला आणि पुढे हा मेला. कुंबकरनाने लय बोर्नव्हीटा एकदम पेली. तर तो एकदम म्होटा झाला. एकदम लय भूक लागली, एकदम जेवला, एकदम लय झोप आली. येकदम झोपला का उटाचं नाव नाय म्हाराज्या. डायरेक दुपारच्या टायमाले भाऊ हिडो गेम खेलते बगून उटून बसला. अन मी बी खेल्तो म्हनून मांगं लागला.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

किरण८८७७ ·

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .