दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय
शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही.
कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्याची चटणी तरी हवीच.
पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा.