मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार ·

तिता 08/07/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार 08/07/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/07/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 09/07/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?

तिता 08/07/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार 08/07/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/07/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 09/07/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?
लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

कॉर्बेटचं मृगजळ

आकाश खोत ·

मारवा 28/06/2025 - 05:18
वाघाच्या नादात खरोखर आपण बाकी इतर इतक्या सुंदर जंगलावर त्यातील इतर प्राण्यांवर फोकस करून आनंद घेऊ शकत नाही.असे होते खरे. फोटो फार सुंदर आलेले आहेत. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्याचा आनंद मोठा. पण पर्यटक कधी कधी अतिरेक करतात माणूस हा in general सर्वात नालायक प्राणी आहे. Simulated Safari प्रकार भन्नाट आहे माहिती नव्हता जमल्यास याची अजून माहिती द्यावी

सुबोध खरे 28/06/2025 - 20:34
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो हि एक अंधश्रद्धा आहे. माझ्या माहितीतील एकालाही वाघ दिसलेला नाही. तेथे जवळच राहणारा माझा वर्गमित्र ( लष्करातून निवृत्त झालेला) स्वच्छपणे म्हणाला कॉर्बेट पार्क च्या मध्य भागात( कोअर झोन) वाघ असतात आणि तुम्हाला सफारी मध्ये तेथे मध्य भागात( कोअर झोन) घेऊनच जात नाहीत. तुमची वनखात्यात ओळख असेल तर त्या कोअर झोन मध्ये जात येते आणि एवढं करूनही वाघ दिसेल असे नाही. त्या मानाने पेंच, ताडोबा किंवा कान्हा किसली मध्ये वाघ दिसण्याची शक्यता किती तरी पट जास्त आहे

In reply to by सुबोध खरे

आकाश खोत 29/06/2025 - 19:17
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ येत असतात. पण तुम्ही म्हणता तसे फार आतले असतील. मी म्हटलो तो ढिकाला हा झोन, जिथे आत जाऊन मुक्काम करावा लागतो, तिकडेसुद्धा शक्यता जास्त आहे म्हणतात. बघू पुढे भविष्यात तुम्ही म्हणताय तिथे बघण्याचा योग आला तर चांगलंच आहे.

गोरगावलेकर 01/07/2025 - 13:11
उत्तराखंडची सहल केली मात्र कार्बेट अभयारण्य सुटले आहे . बघू कधी जमतंय . कान्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये तीन सफरी करूनही वाघाने दर्शन दिले नव्हते.

विवेकपटाईत 02/07/2025 - 07:49
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो पण वाघाचे दर्शन झाले नाही. नर्मदा पुरम इथले सतपुडा अभयारण्य जास्त सुंदर आणि भरपूर प्राणी आणि पक्षी तिथे दिसतात. वाघ दिसण्याची शक्यता 90 टक्के आहे. आम्हाला दीड दिवसांत तीन वेळा वाघाचे दर्शन झाले. मधई गेट जवळ एमपी टुरिजमचे हॉटेल देनुआ नदी काठी आहे. नदी तवा बांधला मिळते. त्यामुळे पात्र मोठे आहे. वाटर सफारी ही वेगळी आहे. मगर आणि अनेक पक्षी ही नदीकाठी दिसतात. दुसर्‍या तीरावर अभयारण्याचे कोर झोन आहे. सफारी तिथून सुरू होते. वाघ गौर सांभार हरिण अस्वल काळे आणि लाल माकडे आणि अनेक पक्षी इत्यादि. निवांत वेळ घालविण्यासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. एमपी टुरिजमची व्यवस्था ही उत्तम आहे.

मारवा 28/06/2025 - 05:18
वाघाच्या नादात खरोखर आपण बाकी इतर इतक्या सुंदर जंगलावर त्यातील इतर प्राण्यांवर फोकस करून आनंद घेऊ शकत नाही.असे होते खरे. फोटो फार सुंदर आलेले आहेत. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्याचा आनंद मोठा. पण पर्यटक कधी कधी अतिरेक करतात माणूस हा in general सर्वात नालायक प्राणी आहे. Simulated Safari प्रकार भन्नाट आहे माहिती नव्हता जमल्यास याची अजून माहिती द्यावी

सुबोध खरे 28/06/2025 - 20:34
कॉर्बेट अभयारण्यात वाघ दिसतो हि एक अंधश्रद्धा आहे. माझ्या माहितीतील एकालाही वाघ दिसलेला नाही. तेथे जवळच राहणारा माझा वर्गमित्र ( लष्करातून निवृत्त झालेला) स्वच्छपणे म्हणाला कॉर्बेट पार्क च्या मध्य भागात( कोअर झोन) वाघ असतात आणि तुम्हाला सफारी मध्ये तेथे मध्य भागात( कोअर झोन) घेऊनच जात नाहीत. तुमची वनखात्यात ओळख असेल तर त्या कोअर झोन मध्ये जात येते आणि एवढं करूनही वाघ दिसेल असे नाही. त्या मानाने पेंच, ताडोबा किंवा कान्हा किसली मध्ये वाघ दिसण्याची शक्यता किती तरी पट जास्त आहे

In reply to by सुबोध खरे

आकाश खोत 29/06/2025 - 19:17
कॉर्बेट मधले सुद्धा व्हिडीओ येत असतात. पण तुम्ही म्हणता तसे फार आतले असतील. मी म्हटलो तो ढिकाला हा झोन, जिथे आत जाऊन मुक्काम करावा लागतो, तिकडेसुद्धा शक्यता जास्त आहे म्हणतात. बघू पुढे भविष्यात तुम्ही म्हणताय तिथे बघण्याचा योग आला तर चांगलंच आहे.

गोरगावलेकर 01/07/2025 - 13:11
उत्तराखंडची सहल केली मात्र कार्बेट अभयारण्य सुटले आहे . बघू कधी जमतंय . कान्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये तीन सफरी करूनही वाघाने दर्शन दिले नव्हते.

विवेकपटाईत 02/07/2025 - 07:49
कार्बेट मध्ये दोन वेळा गेलो पण वाघाचे दर्शन झाले नाही. नर्मदा पुरम इथले सतपुडा अभयारण्य जास्त सुंदर आणि भरपूर प्राणी आणि पक्षी तिथे दिसतात. वाघ दिसण्याची शक्यता 90 टक्के आहे. आम्हाला दीड दिवसांत तीन वेळा वाघाचे दर्शन झाले. मधई गेट जवळ एमपी टुरिजमचे हॉटेल देनुआ नदी काठी आहे. नदी तवा बांधला मिळते. त्यामुळे पात्र मोठे आहे. वाटर सफारी ही वेगळी आहे. मगर आणि अनेक पक्षी ही नदीकाठी दिसतात. दुसर्‍या तीरावर अभयारण्याचे कोर झोन आहे. सफारी तिथून सुरू होते. वाघ गौर सांभार हरिण अस्वल काळे आणि लाल माकडे आणि अनेक पक्षी इत्यादि. निवांत वेळ घालविण्यासाठी ही हे उत्तम ठिकाण आहे. एमपी टुरिजमची व्यवस्था ही उत्तम आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता. पूर्वतयारी जिम कॉर्बेटची सफारी त्यांच्या वेबसाईट वर आधीच बुक करावी लागते. शेकडो एकर परिसर असल्यामुळे तिथे वेगवेगळे झोन आहेत. बिजरानी, झिरना, ढिकाला, ढेला अशी त्या झोन्सची नावे आहेत. अजूनही आहेत. तिथे जाण्यासाठी विमानमार्गे पंतनगर / हल्द्वानी हे विमानतळ आहे. रामनगर हे रेल्वे स्टेशन आहे. ह्याच गावाजवळ बरेच झोन आहेत त्यामुळे इथे बरीच वर्दळ असते. बहुतांश लोक याच गावात मुक्कामाला राहून कॉर्बेटला जाऊन येतात.

जागतिक योग दिवशी ऋषभ पंतचं प्रात्यक्षिक!

मार्गी ·

क्रिकेटमधे अशा प्रकारचं सिलेब्रेशन जरा नवंच वाटलं. सर्कशीतल्या त्या सुंदर युवती आपल्या शरिराच्या अशा विविध लवचिक हालचाली करतांना पाहिलंय पण क्रिकेटमधे पंत ज्या पद्धतीने लिलया उडी मारतो ते लैच भारी. 'पत्त्यामधले राजे आम्ही, मी असा कसा, असा कसा वेगळा वेगळा' बावळा. म्हणा नंदुशेठ. सॉरी पंतशेठ.
मागच्या चेंडूवर काहीही होवो, पुढचा चेंडू- पुढचा क्षण नवीन आहे. मागच्या क्षणाचं "बॅगेज" मी नेणार नाही आणि तो चेंडू जसा वाटेल, तसा खेळेन हे पंतचं ब्रीद!
सहमत. माझं तर लै डोकं खराब होतं त्याची बॅटींग पाहतांना. पुढच्या बॉलला हा भावड्या झोपून शॉट मारेल, बसून शॉट मारेल, पळत मारेल याचा काहीच भरवसा नाही. याचं क्रिकेटच वेगळं आहे. पंत नीट खेळ रे भावड्या असे सारखे तोंडून शब्द येत असतात. -दिलीप बिरुटे

क्रिकेटमधे अशा प्रकारचं सिलेब्रेशन जरा नवंच वाटलं. सर्कशीतल्या त्या सुंदर युवती आपल्या शरिराच्या अशा विविध लवचिक हालचाली करतांना पाहिलंय पण क्रिकेटमधे पंत ज्या पद्धतीने लिलया उडी मारतो ते लैच भारी. 'पत्त्यामधले राजे आम्ही, मी असा कसा, असा कसा वेगळा वेगळा' बावळा. म्हणा नंदुशेठ. सॉरी पंतशेठ.
मागच्या चेंडूवर काहीही होवो, पुढचा चेंडू- पुढचा क्षण नवीन आहे. मागच्या क्षणाचं "बॅगेज" मी नेणार नाही आणि तो चेंडू जसा वाटेल, तसा खेळेन हे पंतचं ब्रीद!
सहमत. माझं तर लै डोकं खराब होतं त्याची बॅटींग पाहतांना. पुढच्या बॉलला हा भावड्या झोपून शॉट मारेल, बसून शॉट मारेल, पळत मारेल याचा काहीच भरवसा नाही. याचं क्रिकेटच वेगळं आहे. पंत नीट खेळ रे भावड्या असे सारखे तोंडून शब्द येत असतात. -दिलीप बिरुटे
लेखनप्रकार
✪ ऋषभ पंतची कोलांट उडी (कार्टव्हील) ✪ आधीच्या बॉलला काहीही होवो, पुढचा बॉल नवा ✪ Uncluttered mind, हसरा चेहरा आणि जिद्द ✪ प्रत्येक क्षणी वर्तमानात असणं "ध्यानाचं" प्रात्यक्षिक ✪ शेकडो वेळेस उड्या मारण्याची क्षमता ✪ संयम, सातत्य, संकल्प शिकवणारा खेळ ✪ रंग हो अकेले तो इन्द्रधनुष बनता ही नही! ✪ ठरवलेल्या प्रकारे तासन् तास खेळण्याचं कौशल्य ✪ मैदानावरचं मैदानावर सोडून देण्याची कला! नुकताच झालेला भारत- इंग्लंड कसोटी सामना! शेवटच्या तासापर्यंत रंगत कायम असलेला व अटी- तटीचा झालेला हा सामना!

आकाशात तार्‍याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा

मार्गी ·

वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल. बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी 24/06/2025 - 17:55
@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

In reply to by कंजूस

मार्गी 28/06/2025 - 18:57
पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून. जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.

वा! असामान्य घटना. जवळजवळ ९७१ वर्षांनंतर अशा घटनेची नोंद होते आहे. हा तारकासमूह सुमारे ४६०प्रकाशवर्षें दूर आहे हे ध्यानात घेतले तर सुमारे १५६५ साली घडलेले आतां दिसते आहे असे म्हणता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता नवनवीन माहिती उजेडात येईल. उदा. लोह या धातूपेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये कां व कशी तयार होतात हे कळले तर जाणून घ्यायला मजा येईल. ध्यानीमनी नसलेली आणखी काही माहितीही उजेडात येईल. बहुमोल माहितीबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

मार्गी 24/06/2025 - 17:55
@ सुधीर कांदळकर सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण पंधराव्या शतकातही शर्मिष्ठा तारकासमूहात ठळक सुपरनोव्हा बघितला गेला होता. आणि नंतरही छोटे- मोठे दिसतातच. आणि तारकासमूहाचं अंतर जरी ४६० प्रकाशवर्षं असलं तरी "त्या तार्‍याचं" अंतर तेच असेल असंही नाही. संशोधनाच्या संदर्भात असं म्हणतात की, जे जड मूलद्रव्य आहेत, ते तारकास्फोटातून बाहेर येतात.

In reply to by कंजूस

मार्गी 28/06/2025 - 18:57
पुण्यातून आणि कधी कधी बाहेरच्या प्रकाश प्रदूषण नसलेल्या लांबच्या गावांमधून. जिथे निरभ्र आकाश असेल तिथे बायनॅक्युलरने हा सुपरनोव्हा दिसू शकेल. आणि खूपच जास्त अंधारं आकाश असेल, तिथे अगदी रेअर स्थितीमध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्‍याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्‍यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्‍यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्‍याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं.

सृष्टीआड दृष्टी

कुमार जावडेकर ·
एक मुलाखत: “नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं या शिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली. “पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले. “हा आपला विनय आहे.

बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा ====================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले युयुत्सुनेटचे भाकीत बरोबर ठरले आहे. पण मी लावलेला अर्थ चुकला. त्यामुळे या खेपेस मी माझं डोकं चालवायचं नाही असं ठरवलं आहे.

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

मार्गी ·

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.

विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.

विवेकपटाईत 16/06/2025 - 17:01
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.

विजुभाऊ 17/06/2025 - 10:00
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते

कपिलमुनी 18/06/2025 - 16:10
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.

विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.

विवेकपटाईत 16/06/2025 - 17:01
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.

विजुभाऊ 17/06/2025 - 10:00
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते

कपिलमुनी 18/06/2025 - 16:10
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort ✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक ✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का? ✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू? ✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर? ✪ आपत्ती येणारच आहेत ✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो? डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो.

Ee Sala Cup Namde अखेर सत्यात उतरले..

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले. १८ वर्षे, तब्बल १८ वर्षे आरसीबी एका आयपीएल ट्रॉफी साठी झगडत होती, चाहते तळमळत होते. यादरम्यान २- ४ वेळेस आरसीबी जेतेपदाच्या अगदी जवळ सुद्धा गेली पण कधी नशीब तर कधी समोरील संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ट्रॉफीने हुलकावणी दिली.

सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट

नपा ·

चौथा कोनाडा 11/06/2025 - 12:41
अ ति श य सुंदर चित्रपट ओळख ... बघणयादीत लिहुन ठेवला आहे. नक्की बघणार ! असाच एक वैद्यकिय पार्श्वभुमीवरचा चित्रपट "स्काय इज पिंक" हा सत्यकथे वर आधारित सुनेमा पहिला होता ... आवडला होता !

चौथा कोनाडा 11/06/2025 - 12:41
अ ति श य सुंदर चित्रपट ओळख ... बघणयादीत लिहुन ठेवला आहे. नक्की बघणार ! असाच एक वैद्यकिय पार्श्वभुमीवरचा चित्रपट "स्काय इज पिंक" हा सत्यकथे वर आधारित सुनेमा पहिला होता ... आवडला होता !
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.

युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष

माहितगार ·

चित्रगुप्त 08/07/2025 - 05:06
चाट जीपीटी चे यावर काय म्हणणे आहे, ते जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे संवाद साधला गेला: मी: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप : युरो-अमेरिका (युरोप आणि अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी घटनांपुरता मर्यादित नाही, तर तो खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांवर आधारित आहे का ? असल्यास यावर एक व्यापक लेख लिहून सर्वांगीण माहिती द्या चाट जीपीटी : होय, युरो-अमेरिका (युरोप व अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी संघर्ष नसून, तो अनेक दशकांपासून चालत आलेला एक दीर्घकालीन, बहुआयामी हितसंघर्ष आहे. या संघर्षाचे स्वरूप ऐतिहासिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय अशा अनेक स्तरांवर पसरलेले आहे. खाली यावर एक सर्वांगीण, सुसंगत लेख दिला आहे: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप १. ऐतिहासिक पार्श्वभूमी: युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांचा उगम १९व्या शतकातच झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर (१९४५) जग दोन गटांमध्ये विभागले गेले — एकीकडे अमेरिका आणि तिचे युरोपीय सहयोगी (नाटो), आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया (USSR). यामुळे शीतयुद्ध (Cold War) सुरू झाले, ज्यामध्ये थेट युद्ध टाळले गेले, पण प्रॉक्सी वॉर, हेरगिरी, शस्त्रस्पर्धा, तांत्रिक व आर्थिक वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. शीतयुद्ध संपल्यानंतर USSR चे विघटन झाले (१९९१), पण रशियाची जागतिक सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याची आकांक्षा कायम राहिली. याउलट, युरो-अमेरिकन शक्तींनी त्यांच्या प्रभावक्षेत्राचा विस्तार सुरूच ठेवला — यामध्ये नाटोचा विस्तार, युरोपीय संघाचे प्रसार, आणि पूर्व युरोपमध्ये उदारमतवादी लोकशाहींचा प्रसार यांचा समावेश आहे. २. आर्थिक हितसंबंध आणि संसाधनांचे राजकारण: रशिया हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेले राष्ट्र आहे — विशेषतः नैसर्गिक वायू, तेल, कोळसा. युरोप या स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. रशिया ही गोष्ट एक प्रकारचे "ऊर्जास्त्र" म्हणून वापरत आले आहे. दुसरीकडे, अमेरिका व युरोप रशियावर अवलंबन कमी करण्यासाठी नव्या ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत व इतर देशांशी व्यवहार वाढवत आहेत. याशिवाय, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठेवण्यासाठी पश्चिमेकडून आर्थिक निर्बंध लादले जातात, विशेषतः युक्रेन युद्धानंतर. त्यामुळे रशिया आणि युरो-अमेरिका यांच्यातील आर्थिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ३. भौगोलिक आणि सामरिक संघर्ष: रशिया आपल्या सीमांच्या सुरक्षेला प्रचंड महत्त्व देते. नाटोचा पूर्वेकडे विस्तार — म्हणजेच पूर्व युरोपातील देशांना नाटोमध्ये सामील करणे — रशियाला थेट धोका वाटतो. युक्रेन व जॉर्जिया यांना नाटोमध्ये सामावून घेण्याच्या योजना रशियासाठी "रेड लाईन" होत्या. युक्रेनमधील २०१४ मधील राजकीय उलथापालथ, आणि त्यानंतर रशियाने क्रिमिया ताब्यात घेणे, हे या संघर्षाचे ठळक उदाहरण आहे. यानंतरचा २०२२ मधील पूर्णपणे युद्धात परिवर्तित झालेला संघर्ष म्हणजेच युरो-अमेरिका आणि रशियामधील हितसंघर्षाची पराकाष्ठा आहे. ४. मानसिकता व सांस्कृतिक ध्रुवीकरण: रशियन नेतृत्व – विशेषतः व्लादिमीर पुतीन – हे रशियाच्या ऐतिहासिक साम्राज्यवादी गौरवाची पुनर्स्थापना करण्याच्या विचाराने प्रेरित आहे. त्यांच्यामते, पश्चिमी लोकशाही मॉडेल हे रशियाच्या पारंपरिक मूल्यांशी विसंगत आहे. त्यामुळे रशिया एक वेगळ्या ‘सभ्यतासंस्था’ (civilizational model) म्हणून स्वतःला मांडते. अमेरिका आणि युरोप हे उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, आणि खुले बाजार यांच्या मूल्यांवर आधारित आहेत. रशिया हे या मूल्यांनाही खुले आव्हान देतो. यामुळे या संघर्षाला वैचारिक आणि मानसशास्त्रीय स्वरूपही प्राप्त झाले आहे. ५. माहिती युद्ध आणि सायबर संघर्ष: २१व्या शतकात संघर्ष फक्त रणांगणावर होत नाही, तर तो माहितीच्या पातळीवर, इंटरनेटवर, माध्यमांमध्ये आणि सायबर स्पेसमध्येही होतो. रशियावर अनेकदा आरोप झाले आहेत की त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याउलट, युरोप व अमेरिका देखील रशियात लोकशाहीसाठी चळवळी प्रोत्साहित करतात, आणि अनेक वेळा त्या देशातील सत्ताधाऱ्यांविरोधातील प्रचार करतात. हे एक "मुल्ययुद्ध" (values war) बनले आहे. निष्कर्ष: युरो-अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्ष हा केवळ लष्करी नव्हे, तर तो एक भूराजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक संघर्ष आहे. तो शतकानुशतकेच्या इतिहासात रुजलेला असून, आजही वेगवेगळ्या स्वरूपात पुढे जात आहे. युद्ध, निर्बंध, शस्त्रस्पर्धा, सायबर युद्ध, माहिती नियंत्रण, ऊर्जा राजकारण – हे सर्व त्या संघर्षाचे विविध पडसाद आहेत. आणि म्हणूनच हा संघर्ष तात्कालिक नसून दीर्घकालीन आहे – ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर उमटतात. तुम्हाला या विषयावर विशिष्ट पैलूंवर अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास जरूर सांगा. मी: पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया हा केवळ एक देश नसून एक वेगळी 'सभ्यता' (civilization) आहे आणि तिला पाश्चिमात्य उदारमतवादापासून वाचवले पाहिजे, असा विचार रशियन राष्ट्रवादात प्रभावी आहे..... या विषयावर लिहा. चाट जीपीटी: १. सभ्यतात्मक राष्ट्र म्हणून रशियाची कल्पना: रशियन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि धोरणकर्ते (जसे की अलेक्झांडर दुगिन) रशियाला केवळ एका राजकीय राष्ट्राच्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांच्या मते, रशिया ही एक युरेशियन सभ्यता आहे — जी युरोप आणि आशिया यांच्या सीमेवर उभी राहून स्वतंत्र मूल्य, धर्म, परंपरा आणि सामाजिक रचना जोपासते. पुतिन यांनीही वेळोवेळी हाच विचार प्रतिपादित केला आहे — की रशिया ही एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे, जी पाश्चिमात्यांच्या सार्वत्रिक मूल्यसंकल्पनांपासून भिन्न आहे आणि त्या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे रशियाच्या आत्म्याचा नाश होणे होय. २. पाश्चिमात्य उदारमतवादावर टीका: रशियन राष्ट्रवादी विचारसरणीत पाश्चिमात्य उदारमतवाद म्हणजे: व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरेकी रूप पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे विघटन धर्माचे स्थान कमी करणे राष्ट्रवादावर आधारित ऐक्याचा अभाव पुतिन यांनी अनेक वेळा समलैंगिक विवाह, लैंगिक ओळख, बहुसंस्कृतीवाद, आणि उदारवादी लोकशाहीच्या नावाखाली होणाऱ्या अस्थैर्यांवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, या गोष्टी समाजाला कमकुवत करतात, आणि रशिया त्याच्या ऐतिहासिक मूल्यांवर आधारित "मजबूत राष्ट्र" उभारू इच्छितो. ३. रूढीवादी मूल्यांचा आग्रह: पुतिन यांचे शासन रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी घनिष्ठ संबंध ठेवते. धर्म, परंपरा, सैन्यशक्ती, आणि "वास्तविक पुरुषार्थ" या मूल्यांचा प्रचार करून एक मजबूत राष्ट्रीय ओळख तयार केली जाते. उदा. रशियन शाळांमध्ये देशभक्तीपर शिक्षणावर भर, इतिहासाचे पुनर्लेखन, किंवा LGBTQ हक्कांवरील बंदी ही सर्व उदाहरणे रशियाच्या रूढीवादी विचारसरणीची आहेत. ४. उदारमतवादाविरोधातील संघर्षाचा भू-राजकीय आयाम: पुतिन यांच्या मते, पश्चिमेकडून उदारमतवाद फक्त सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय अस्त्र म्हणून वापरले जाते — जे इतर देशांमध्ये "लोकशाहीच्या नावाखाली" हस्तक्षेप करते, सरकारे उलथवते (उदा. युक्रेनमधील 'मैदान क्रांती'), आणि रशियासारख्या देशांवर दबाव आणते. या पार्श्वभूमीवर, रशिया स्वतःला एक "संस्कृतीचा संरक्षक" (Defender of Civilization) म्हणून पाहतो — जिथे पाश्चिमात्य हस्तक्षेपाविरुद्ध आणि त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांविरुद्ध रक्षण केले जाते. ५. या विचारसरणीचे परिणाम: आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडणे: पश्चिमी देशांकडून रशियावर निर्बंध, टीका, आणि अलिप्तता वाढलेली आहे. घरेलू राजकारणात एकाधिकारशाहीचा उदय: राष्ट्रवादाच्या नावाखाली विरोधकांचे दमन, माध्यमांचे नियंत्रण, आणि लोकशाही संस्थांचे क्षीणकरण. विकल्पात्मक जागतिक व्यवस्था: रशिया चीन, इराण, भारतासारख्या देशांशी विविध प्रकारचे सहयोग वाढवून एक बहुपक्षीय जागतिक शक्तिसंतुलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्ष: पुतिन यांच्या नेतृत्वातील रशिया "एक देश" म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र सभ्यता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ही सभ्यता पाश्चिमात्य उदारमतवादास नकार देऊन, पारंपरिक मूल्यांवर आधारित असलेली, सशक्त, राष्ट्रीय अस्मिता जोपासणारी आहे. या विचारसरणीचा प्रभाव केवळ रशियन अंतर्गत राजकारणावरच नाही, तर संपूर्ण जागतिक भूराजकारणावर पडत आहे. हे मूल्यसंघर्षाचे (values conflict) एक स्पष्ट उदाहरण आहे — जिथे एक बाजू सार्वत्रिक उदारमतवादी मूल्यांची घोषणा करते, तर दुसरी बाजू स्थानिक, पारंपरिक मूल्यांच्या आधारे स्वतंत्र सभ्यतेची पुनर्रचना करते. तुम्हाला हाच विषय अधिक सखोल सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून हवा असल्यास जरूर सांगा. ------ हे सगळे एकातून दुसरी, दुसर्यातून तिसरी.... अशी गोष्टींची मालिका बनवण्यासारखी उठाठेव आहे, तस्मात इथेच थांबतो. 'ए.आय.चा मिपावर परिणाम' असा लेख कुणीतरी पाडावा आता.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 08/07/2025 - 08:57
@चित्रगुप्त एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का? तुमची अडचण अधिक व्यवस्थीत समजल्यास सुधारणेस सोपे जाईल. केवळ हातात एआय आत्ता आलेले आहे म्हणून लेख पाडून मोकळा झालो असे नक्कीच नाही. अदमासे ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची माझी रुची सर्वसामान्यपेक्षा अधिक सखोल राहीलेली आहे. ज्ञानकोशीय लेखनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माझा वेगळा दृष्टीकोण मी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुष्टीसाठी मी पुर्वी स्वतः संदर्भ चाळत होतो. संदर्भ उपलब्ध करण्यास वेळ देता आला नाही तर लेखनाचा योग बर्‍याचदा टळत असे. ते काम आता एआय मुळे हलके झाले एवढेच. एआय जे लिहुन देते ते संबंधीत विषयाच्या संदर्भात तथ्यात्मकदृष्ट्या पुरेसे योग्य झाले आहे का हे पडताळण्याची क्षमता माझ्यात आहे. एआयच्या लेखन शैली व शब्द योजनेत अद्याप कृत्रिमता जाणवते हे खरे आहे. मी माझे स्वतःचे लेखन आणि एआयचे स्वतंत्र दाखवून देतो.

चित्रगुप्त 08/07/2025 - 22:34
एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का?
नाही. मी ए.आय. संबंधित विविध प्रयोग करून बघतो आहे. अर्थात माझे प्रयोग प्रतिमा निर्मितीविषयी आहेत आणि त्यासाठी चाट जीपीटी पैसे भरून वापरतो आहे. त्यात काही प्रयोग मराठी लिखाणाबद्दल -- किंबहुना इंग्रजी पेक्षा मला मराठी वाचणे सोपे पडते म्हणून - देखील करतो, त्यापैकी हा एक होता. म्हणजे एकादा विषय किती खेचला जाऊ शकतो, ते मला बघायचे होते. या प्रकारचे प्रयोग खरेतर मला माझ्या आवडीच्या विषयांसंबंधी केले पाहिजेत, म्हणजे निदान कळेल तरी काय चालले आहे ते. आता पर्यंतच्या प्रयत्नातून अजून तरी मला अगदी हव्या तशा प्रतिमा - बराच खटाटोप करून देखील - बनवता येत नाहीयेत.

विवेकपटाईत 09/07/2025 - 19:15
माझ्या पासून प्रेरणा घेऊन लेख लिहला यासाठी धन्यवाद. आज पर्यन्त जगात झालेल्या अधिकान्श युद्धांचे कारण आर्थिक असतात. ( फक्त जेहादी युद्ध काफिरांना मारून त्यांची संपत्ति आणि स्त्रिया आणि मुलांना गुलाम करण्यासाठी होतात). अमेरिकन अर्थव्यवस्था आणि डॉलरचे साम्राज्य टिकविण्यासाठी जगात अस्थिरता राहिली पाहिजे ही नीती अमेरिकेने द्वितीय युद्धांनंतर लगेच सुरू केली. आज युरोप मध्ये अस्थिरता त्यामुळे युरोवर जगाचा विश्वास नाही. पेट्रोल वर आधारित अर्थव्यवस्था जिथे आहे त्या मध्य आशियात सतत अस्थिरता ठेवली जाणे आपण पाहतच आहो. जगाला डॉलर शिवाय पर्याय नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी trillions डॉलरचे बॉन्ड विका. पुन्हा बॉन्ड विकून व्याज चुकवा. जगाला डॉलर वर आश्रित ठेवा आणि चैन करा. हे अमेरिकेचे ध्येय आहे. अमेरिका यात यशस्वी झाला नसता तर आज अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडून पडली असती. उदा: "The U.S. government will spend a record $1.2 trillion on interest payments in 2024, the highest amount ever recorded" अमेरिका अस्त्र शस्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि विक्री ही करतो. जगात युद्ध सुरू राहील तर शस्त्र विक्री वाढत राहणार. भारताने ओपेरेशन सिंदूर दोन दिवसात पूर्ण करून युद्धविराम केला त्याचे सर्वात जास्त दु:ख अमेरिकेला झाले असेल. या शिवाय आता जगात भारतीय शस्त्रांची विक्री ही वाढणार. त्याचे नुकसान ही अमेरिकेलाच. भविष्यात अमेरिका भारताविरुद्ध काही ना काही कुरघोडी करणार. माझ्या मते विभिन्न विचारसरणीचा युक्रेन रशिया युद्धाशी काहीही संबंध नाही. बाकी इराण आणि इझराईल युद्धात मात्र जेहादी विचारसरणी ही येते. ती नसती तर इराण ने शांत राहून चर्चा करत परमाणु अस्त्र बनवून टाकले असते. हिजिबुल्लाला मदत करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.

चित्रगुप्त 08/07/2025 - 05:06
चाट जीपीटी चे यावर काय म्हणणे आहे, ते जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे संवाद साधला गेला: मी: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप : युरो-अमेरिका (युरोप आणि अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी घटनांपुरता मर्यादित नाही, तर तो खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांवर आधारित आहे का ? असल्यास यावर एक व्यापक लेख लिहून सर्वांगीण माहिती द्या चाट जीपीटी : होय, युरो-अमेरिका (युरोप व अमेरिका) आणि रशिया यांच्यातील संघर्ष केवळ तात्कालिक राजकीय किंवा लष्करी संघर्ष नसून, तो अनेक दशकांपासून चालत आलेला एक दीर्घकालीन, बहुआयामी हितसंघर्ष आहे. या संघर्षाचे स्वरूप ऐतिहासिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय अशा अनेक स्तरांवर पसरलेले आहे. खाली यावर एक सर्वांगीण, सुसंगत लेख दिला आहे: युरो-अमेरिका आणि रशिया: प्रदीर्घ हितसंघर्षाचे स्वरूप १. ऐतिहासिक पार्श्वभूमी: युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंधांचा उगम १९व्या शतकातच झाला. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर (१९४५) जग दोन गटांमध्ये विभागले गेले — एकीकडे अमेरिका आणि तिचे युरोपीय सहयोगी (नाटो), आणि दुसरीकडे सोव्हिएत रशिया (USSR). यामुळे शीतयुद्ध (Cold War) सुरू झाले, ज्यामध्ये थेट युद्ध टाळले गेले, पण प्रॉक्सी वॉर, हेरगिरी, शस्त्रस्पर्धा, तांत्रिक व आर्थिक वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू झाली. शीतयुद्ध संपल्यानंतर USSR चे विघटन झाले (१९९१), पण रशियाची जागतिक सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याची आकांक्षा कायम राहिली. याउलट, युरो-अमेरिकन शक्तींनी त्यांच्या प्रभावक्षेत्राचा विस्तार सुरूच ठेवला — यामध्ये नाटोचा विस्तार, युरोपीय संघाचे प्रसार, आणि पूर्व युरोपमध्ये उदारमतवादी लोकशाहींचा प्रसार यांचा समावेश आहे. २. आर्थिक हितसंबंध आणि संसाधनांचे राजकारण: रशिया हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेले राष्ट्र आहे — विशेषतः नैसर्गिक वायू, तेल, कोळसा. युरोप या स्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. रशिया ही गोष्ट एक प्रकारचे "ऊर्जास्त्र" म्हणून वापरत आले आहे. दुसरीकडे, अमेरिका व युरोप रशियावर अवलंबन कमी करण्यासाठी नव्या ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत व इतर देशांशी व्यवहार वाढवत आहेत. याशिवाय, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठेवण्यासाठी पश्चिमेकडून आर्थिक निर्बंध लादले जातात, विशेषतः युक्रेन युद्धानंतर. त्यामुळे रशिया आणि युरो-अमेरिका यांच्यातील आर्थिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ३. भौगोलिक आणि सामरिक संघर्ष: रशिया आपल्या सीमांच्या सुरक्षेला प्रचंड महत्त्व देते. नाटोचा पूर्वेकडे विस्तार — म्हणजेच पूर्व युरोपातील देशांना नाटोमध्ये सामील करणे — रशियाला थेट धोका वाटतो. युक्रेन व जॉर्जिया यांना नाटोमध्ये सामावून घेण्याच्या योजना रशियासाठी "रेड लाईन" होत्या. युक्रेनमधील २०१४ मधील राजकीय उलथापालथ, आणि त्यानंतर रशियाने क्रिमिया ताब्यात घेणे, हे या संघर्षाचे ठळक उदाहरण आहे. यानंतरचा २०२२ मधील पूर्णपणे युद्धात परिवर्तित झालेला संघर्ष म्हणजेच युरो-अमेरिका आणि रशियामधील हितसंघर्षाची पराकाष्ठा आहे. ४. मानसिकता व सांस्कृतिक ध्रुवीकरण: रशियन नेतृत्व – विशेषतः व्लादिमीर पुतीन – हे रशियाच्या ऐतिहासिक साम्राज्यवादी गौरवाची पुनर्स्थापना करण्याच्या विचाराने प्रेरित आहे. त्यांच्यामते, पश्चिमी लोकशाही मॉडेल हे रशियाच्या पारंपरिक मूल्यांशी विसंगत आहे. त्यामुळे रशिया एक वेगळ्या ‘सभ्यतासंस्था’ (civilizational model) म्हणून स्वतःला मांडते. अमेरिका आणि युरोप हे उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, आणि खुले बाजार यांच्या मूल्यांवर आधारित आहेत. रशिया हे या मूल्यांनाही खुले आव्हान देतो. यामुळे या संघर्षाला वैचारिक आणि मानसशास्त्रीय स्वरूपही प्राप्त झाले आहे. ५. माहिती युद्ध आणि सायबर संघर्ष: २१व्या शतकात संघर्ष फक्त रणांगणावर होत नाही, तर तो माहितीच्या पातळीवर, इंटरनेटवर, माध्यमांमध्ये आणि सायबर स्पेसमध्येही होतो. रशियावर अनेकदा आरोप झाले आहेत की त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याउलट, युरोप व अमेरिका देखील रशियात लोकशाहीसाठी चळवळी प्रोत्साहित करतात, आणि अनेक वेळा त्या देशातील सत्ताधाऱ्यांविरोधातील प्रचार करतात. हे एक "मुल्ययुद्ध" (values war) बनले आहे. निष्कर्ष: युरो-अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्ष हा केवळ लष्करी नव्हे, तर तो एक भूराजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक संघर्ष आहे. तो शतकानुशतकेच्या इतिहासात रुजलेला असून, आजही वेगवेगळ्या स्वरूपात पुढे जात आहे. युद्ध, निर्बंध, शस्त्रस्पर्धा, सायबर युद्ध, माहिती नियंत्रण, ऊर्जा राजकारण – हे सर्व त्या संघर्षाचे विविध पडसाद आहेत. आणि म्हणूनच हा संघर्ष तात्कालिक नसून दीर्घकालीन आहे – ज्याचे परिणाम संपूर्ण जगावर उमटतात. तुम्हाला या विषयावर विशिष्ट पैलूंवर अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास जरूर सांगा. मी: पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया हा केवळ एक देश नसून एक वेगळी 'सभ्यता' (civilization) आहे आणि तिला पाश्चिमात्य उदारमतवादापासून वाचवले पाहिजे, असा विचार रशियन राष्ट्रवादात प्रभावी आहे..... या विषयावर लिहा. चाट जीपीटी: १. सभ्यतात्मक राष्ट्र म्हणून रशियाची कल्पना: रशियन विचारवंत, तत्त्वज्ञ आणि धोरणकर्ते (जसे की अलेक्झांडर दुगिन) रशियाला केवळ एका राजकीय राष्ट्राच्या चौकटीत पाहत नाहीत. त्यांच्या मते, रशिया ही एक युरेशियन सभ्यता आहे — जी युरोप आणि आशिया यांच्या सीमेवर उभी राहून स्वतंत्र मूल्य, धर्म, परंपरा आणि सामाजिक रचना जोपासते. पुतिन यांनीही वेळोवेळी हाच विचार प्रतिपादित केला आहे — की रशिया ही एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे, जी पाश्चिमात्यांच्या सार्वत्रिक मूल्यसंकल्पनांपासून भिन्न आहे आणि त्या मूल्यांचा स्वीकार करणे म्हणजे रशियाच्या आत्म्याचा नाश होणे होय. २. पाश्चिमात्य उदारमतवादावर टीका: रशियन राष्ट्रवादी विचारसरणीत पाश्चिमात्य उदारमतवाद म्हणजे: व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरेकी रूप पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे विघटन धर्माचे स्थान कमी करणे राष्ट्रवादावर आधारित ऐक्याचा अभाव पुतिन यांनी अनेक वेळा समलैंगिक विवाह, लैंगिक ओळख, बहुसंस्कृतीवाद, आणि उदारवादी लोकशाहीच्या नावाखाली होणाऱ्या अस्थैर्यांवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, या गोष्टी समाजाला कमकुवत करतात, आणि रशिया त्याच्या ऐतिहासिक मूल्यांवर आधारित "मजबूत राष्ट्र" उभारू इच्छितो. ३. रूढीवादी मूल्यांचा आग्रह: पुतिन यांचे शासन रशियन ऑर्थोडॉक्स चर्चशी घनिष्ठ संबंध ठेवते. धर्म, परंपरा, सैन्यशक्ती, आणि "वास्तविक पुरुषार्थ" या मूल्यांचा प्रचार करून एक मजबूत राष्ट्रीय ओळख तयार केली जाते. उदा. रशियन शाळांमध्ये देशभक्तीपर शिक्षणावर भर, इतिहासाचे पुनर्लेखन, किंवा LGBTQ हक्कांवरील बंदी ही सर्व उदाहरणे रशियाच्या रूढीवादी विचारसरणीची आहेत. ४. उदारमतवादाविरोधातील संघर्षाचा भू-राजकीय आयाम: पुतिन यांच्या मते, पश्चिमेकडून उदारमतवाद फक्त सांस्कृतिक नव्हे, तर राजकीय अस्त्र म्हणून वापरले जाते — जे इतर देशांमध्ये "लोकशाहीच्या नावाखाली" हस्तक्षेप करते, सरकारे उलथवते (उदा. युक्रेनमधील 'मैदान क्रांती'), आणि रशियासारख्या देशांवर दबाव आणते. या पार्श्वभूमीवर, रशिया स्वतःला एक "संस्कृतीचा संरक्षक" (Defender of Civilization) म्हणून पाहतो — जिथे पाश्चिमात्य हस्तक्षेपाविरुद्ध आणि त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांविरुद्ध रक्षण केले जाते. ५. या विचारसरणीचे परिणाम: आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडणे: पश्चिमी देशांकडून रशियावर निर्बंध, टीका, आणि अलिप्तता वाढलेली आहे. घरेलू राजकारणात एकाधिकारशाहीचा उदय: राष्ट्रवादाच्या नावाखाली विरोधकांचे दमन, माध्यमांचे नियंत्रण, आणि लोकशाही संस्थांचे क्षीणकरण. विकल्पात्मक जागतिक व्यवस्था: रशिया चीन, इराण, भारतासारख्या देशांशी विविध प्रकारचे सहयोग वाढवून एक बहुपक्षीय जागतिक शक्तिसंतुलन उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. निष्कर्ष: पुतिन यांच्या नेतृत्वातील रशिया "एक देश" म्हणून नव्हे, तर एक स्वतंत्र सभ्यता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ही सभ्यता पाश्चिमात्य उदारमतवादास नकार देऊन, पारंपरिक मूल्यांवर आधारित असलेली, सशक्त, राष्ट्रीय अस्मिता जोपासणारी आहे. या विचारसरणीचा प्रभाव केवळ रशियन अंतर्गत राजकारणावरच नाही, तर संपूर्ण जागतिक भूराजकारणावर पडत आहे. हे मूल्यसंघर्षाचे (values conflict) एक स्पष्ट उदाहरण आहे — जिथे एक बाजू सार्वत्रिक उदारमतवादी मूल्यांची घोषणा करते, तर दुसरी बाजू स्थानिक, पारंपरिक मूल्यांच्या आधारे स्वतंत्र सभ्यतेची पुनर्रचना करते. तुम्हाला हाच विषय अधिक सखोल सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून हवा असल्यास जरूर सांगा. ------ हे सगळे एकातून दुसरी, दुसर्यातून तिसरी.... अशी गोष्टींची मालिका बनवण्यासारखी उठाठेव आहे, तस्मात इथेच थांबतो. 'ए.आय.चा मिपावर परिणाम' असा लेख कुणीतरी पाडावा आता.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 08/07/2025 - 08:57
@चित्रगुप्त एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का? तुमची अडचण अधिक व्यवस्थीत समजल्यास सुधारणेस सोपे जाईल. केवळ हातात एआय आत्ता आलेले आहे म्हणून लेख पाडून मोकळा झालो असे नक्कीच नाही. अदमासे ४० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची माझी रुची सर्वसामान्यपेक्षा अधिक सखोल राहीलेली आहे. ज्ञानकोशीय लेखनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माझा वेगळा दृष्टीकोण मी लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुष्टीसाठी मी पुर्वी स्वतः संदर्भ चाळत होतो. संदर्भ उपलब्ध करण्यास वेळ देता आला नाही तर लेखनाचा योग बर्‍याचदा टळत असे. ते काम आता एआय मुळे हलके झाले एवढेच. एआय जे लिहुन देते ते संबंधीत विषयाच्या संदर्भात तथ्यात्मकदृष्ट्या पुरेसे योग्य झाले आहे का हे पडताळण्याची क्षमता माझ्यात आहे. एआयच्या लेखन शैली व शब्द योजनेत अद्याप कृत्रिमता जाणवते हे खरे आहे. मी माझे स्वतःचे लेखन आणि एआयचे स्वतंत्र दाखवून देतो.

चित्रगुप्त 08/07/2025 - 22:34
एआयाच्या साहाय्याने लेख पाडायचा म्हणून पाडला अशी काही तुमची समजूत होते आहे का?
नाही. मी ए.आय. संबंधित विविध प्रयोग करून बघतो आहे. अर्थात माझे प्रयोग प्रतिमा निर्मितीविषयी आहेत आणि त्यासाठी चाट जीपीटी पैसे भरून वापरतो आहे. त्यात काही प्रयोग मराठी लिखाणाबद्दल -- किंबहुना इंग्रजी पेक्षा मला मराठी वाचणे सोपे पडते म्हणून - देखील करतो, त्यापैकी हा एक होता. म्हणजे एकादा विषय किती खेचला जाऊ शकतो, ते मला बघायचे होते. या प्रकारचे प्रयोग खरेतर मला माझ्या आवडीच्या विषयांसंबंधी केले पाहिजेत, म्हणजे निदान कळेल तरी काय चालले आहे ते. आता पर्यंतच्या प्रयत्नातून अजून तरी मला अगदी हव्या तशा प्रतिमा - बराच खटाटोप करून देखील - बनवता येत नाहीयेत.

विवेकपटाईत 09/07/2025 - 19:15
माझ्या पासून प्रेरणा घेऊन लेख लिहला यासाठी धन्यवाद. आज पर्यन्त जगात झालेल्या अधिकान्श युद्धांचे कारण आर्थिक असतात. ( फक्त जेहादी युद्ध काफिरांना मारून त्यांची संपत्ति आणि स्त्रिया आणि मुलांना गुलाम करण्यासाठी होतात). अमेरिकन अर्थव्यवस्था आणि डॉलरचे साम्राज्य टिकविण्यासाठी जगात अस्थिरता राहिली पाहिजे ही नीती अमेरिकेने द्वितीय युद्धांनंतर लगेच सुरू केली. आज युरोप मध्ये अस्थिरता त्यामुळे युरोवर जगाचा विश्वास नाही. पेट्रोल वर आधारित अर्थव्यवस्था जिथे आहे त्या मध्य आशियात सतत अस्थिरता ठेवली जाणे आपण पाहतच आहो. जगाला डॉलर शिवाय पर्याय नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी trillions डॉलरचे बॉन्ड विका. पुन्हा बॉन्ड विकून व्याज चुकवा. जगाला डॉलर वर आश्रित ठेवा आणि चैन करा. हे अमेरिकेचे ध्येय आहे. अमेरिका यात यशस्वी झाला नसता तर आज अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडून पडली असती. उदा: "The U.S. government will spend a record $1.2 trillion on interest payments in 2024, the highest amount ever recorded" अमेरिका अस्त्र शस्त्रांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि विक्री ही करतो. जगात युद्ध सुरू राहील तर शस्त्र विक्री वाढत राहणार. भारताने ओपेरेशन सिंदूर दोन दिवसात पूर्ण करून युद्धविराम केला त्याचे सर्वात जास्त दु:ख अमेरिकेला झाले असेल. या शिवाय आता जगात भारतीय शस्त्रांची विक्री ही वाढणार. त्याचे नुकसान ही अमेरिकेलाच. भविष्यात अमेरिका भारताविरुद्ध काही ना काही कुरघोडी करणार. माझ्या मते विभिन्न विचारसरणीचा युक्रेन रशिया युद्धाशी काहीही संबंध नाही. बाकी इराण आणि इझराईल युद्धात मात्र जेहादी विचारसरणी ही येते. ती नसती तर इराण ने शांत राहून चर्चा करत परमाणु अस्त्र बनवून टाकले असते. हिजिबुल्लाला मदत करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
धागा लेख प्रेर्ना आपले पटाईत सर हे खरं आहे की युरो-अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर आपले आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध साध्य करण्यासाठी नव-आर्थिक वसाहतवादाचे प्रारूप राबवले. आपले हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी असंख्य देशांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचंड हस्तक्षेप केला आहे आणि तो आजही चालू आहे.