संतापजनक भाऊबंदकी
गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले.